संस्कृती

ऊन

शिव कन्या's picture
शिव कन्या in जे न देखे रवी...
1 Jun 2017 - 9:52 pm

दिवसाचा ताप संपला
कि ऊन उदास होऊन
कोपऱ्यात एकटे बसते.

आपण कुणासाठी सावली
झालो नाही म्हणून
हुरहुरते, हळहळते.

अंधारात गडप होऊन
पाण्यापलीकडचे मृगजळ
शोधू लागते.

-शिवकन्या

कविता माझीवावरसंस्कृतीवाङ्मयकविताजीवनमान

आगमन, निर्गमन आणि पुनरागमन (भाग ७)

Anand More's picture
Anand More in जनातलं, मनातलं
31 May 2017 - 1:05 pm

आगमन संकल्पना समजायला थोडी गुंतागुंतीची आणि कठीण आहे . कारण आगमनात येणारा विचार एक असतो तर त्याला आपापल्या मगदुराप्रमाणे आणि स्वार्थबुद्धीने प्रतिसाद देणारे प्रस्थापित विचार अनेक असतात. त्यामुळे समाजातील वेगवेगळ्या घटकांकडून एकाच वेळी आगमनाचे स्वागत आणि विरोध चालू असतो. आणि हे सर्व प्रकारचे प्रतिसाद, त्यांच्यामागील कार्यकारणभाव समजून घेणे एका व्यक्तीच्या प्रज्ञेला सहजशक्य नसते.

संस्कृतीआस्वाद

माहेरचं 'माणूस'

भारी समर्थ's picture
भारी समर्थ in जनातलं, मनातलं
28 May 2017 - 7:17 pm

"आगं आक्का, खूप कामं आहेत गं ऑफिसात. दोघंजण सुट्टीवर आहेत." जनक काकुळतीला येऊन आक्काची मनधरणी करत होता.
"जनु, कुणी नको सोबत. पण तेवढं सुरमंडीच्या गाडीत बसवून दे बाबा."
"तिकडं तुझं कोण करणारे का काही? तो शशी स्वतःच्या संसारात नरडीपर्यंत बुडालाय. कधी साधा फोन नाय का हालहवाल विचारायची सवड नाय."
"हं"
"काल त्याचा फोन काय आला अन् लगीच तुला घाई झाली त्याला भेटायची. मला तर कधी तोंडदेखलंबी बोलत नाय की गावाकडं ये म्हणून."

संस्कृतीकथालेख

पैलवान-१

चांदणे संदीप's picture
चांदणे संदीप in जनातलं, मनातलं
26 May 2017 - 11:54 am

"मोप.... मोप... मोप पटांगण व्हतं राव!" शंकऱ्या, विनोद आणि रामाचे ग्लास धरलेले हात तोंडाशी जाईना, पुढचं ऐकण्यासाठी चकणा चावायचा पण थांबवला त्या तिघांनी.

संस्कृतीकलावाङ्मयकथासमाजजीवनमानमौजमजाविरंगुळा

फॉर्मॅलीटी

समो's picture
समो in जनातलं, मनातलं
24 May 2017 - 7:49 pm

बरेच दिवस झाले हा लेख लिहायचा असे चाललेलं आज योग आला. त्याला कारण ही तसेच आहे, गेल्या महिन्यात एका पाहुण्यांच्या घरी कामा निमित्त जाण्याचा योग आला, मी आपला साधारण संध्याकाळच्या वेळी गेलो, जसे सर्वांचे असते तसेच आमच्याही गप्पा टप्पा झाल्या त्याच बरोबर गॉसिपिंग मधून इतर पाहुण्यांचे क्षेम कुशल कळाले.

संस्कृतीविचार

नाणी ते नोटा छपाई : नाशिक उद्योग ०७

सुधीर मुतालीक's picture
सुधीर मुतालीक in जनातलं, मनातलं
19 May 2017 - 2:26 pm

पैसे छापणे हा नाशिकचा खुप जुना व्यवसाय आहे. आजही नाशकात भद्रकाली परिसरात एक टांकसाळ गल्ली आहे. इथल्या टांकसाळे वाड्यात मुठ्ठल नामक परिवार राहायचा. त्यांना पेशव्यांनी टांकसाळे हे आडनांव दिले होते. बडोद्याचे गायकवाड नाशकातल्या टांकसाळीतून १७६९ ते सुमारे १७७२ या कालावधीत आपली नाणी पाडत असत. पेशवाईत नाणी पडण्याच्या भानगडीत सरकार पडत नसे. नाणी पाडणे हा खाजगी धंदा असायचा. हा व्यवसाय सुरु करायला सरकारची परवानगी मात्र घ्यावी लागे. अर्थात सरकार नाणी पडण्याचा मोबदला मात्र घेत असे. १७५०च्या सुमारास दोन कासारांना नाणी पाडण्याची परवानगी मिळाली होती.

धोरणसंस्कृतीइतिहाससमाजजीवनमानतंत्रप्रकटनविचार

आगमन, निर्गमन आणि पुनरागमन (भाग ६)

Anand More's picture
Anand More in जनातलं, मनातलं
2 May 2017 - 7:32 pm

आगमन निर्गमन आणि पुनरागमन ह्या तीन संकल्पना आपण कुठल्याही समाजाला किंवा असामान्य आणि सामान्य व्यक्तींच्या आयुष्याला लावून पाहू शकतो. जेव्हा समाज किंवा व्यक्ती आगमन, निर्गमन किंवा पुनरागमानापैकी कुठल्याही एका वादळात सापडतात तेव्हा त्या वादळाला त्यांनी ज्या प्रकारे तोंड दिले त्यावरून त्यांचा भविष्यकाळ ठरतो.

संस्कृतीआस्वाद

होशंगाबादला काय काय बघावे? मिपाकर हैत का तिथे ?

चित्रगुप्त's picture
चित्रगुप्त in जनातलं, मनातलं
2 May 2017 - 3:06 pm

मित्रहो, उद्या संध्याकाळी मी होशंगाबादला पोहोचून ४ दिवस तिथे रहाणार आहे. बहुशः मोकळाच असेन. तरी तिकडे काय काय बघण्यासारखे आहे ? नर्मदेचे सौंदर्य बघायला सर्वोत्तम जागा/वेळ कोणती? काही प्राचीन अवशेष, किल्ला, जंगल वगैरे आहेत का ? शिवाय कोणी मिपाकर आहेत का ? कळवावे.
जायचे अचानक ठरल्याने आधी विचारणा करता आली नाही. कदाचित तिथे नेट नसेल, त्यामुळे तिथे मिपाकर कुणी असतील तर मला कृपया फोनने संपर्क करावा.
९९५३९०८२२१.

संस्कृतीप्रवासभूगोलप्रकटनअनुभवसल्लामाहितीचौकशीविरंगुळा

अक्षय्य तृतीया

सरनौबत's picture
सरनौबत in जनातलं, मनातलं
28 Apr 2017 - 6:28 pm

अक्षय्य तृतीया म्हणलं कि मुहूर्ताची सोनेखरेदी, आंब्याच्या सीझन मुळे दुपारच्या जेवणाला आमरस पुरी अश्या गोष्टी आठवतात. मला मात्र ह्या दिवशी कायम 'घोसाळ्याचा (घोसावळ्याचा) वेल आणि बालपणीचे दिवस' आठवतात.

संस्कृतीप्रकटनविचार

आगमन, निर्गमन आणि पुनरागमन (भाग ५)

Anand More's picture
Anand More in जनातलं, मनातलं
27 Apr 2017 - 7:36 pm

भारतात इंग्रजांचे, मिशनऱ्यांचे, वसाहतवादाचे, भांडवलवादाचे आणि आधुनिक विज्ञानाचे आगमन जवळपास एकाच वेळी झाले. त्यावेळी भारतीय समाज कसा होता?

परमार्थाच्या आवरणाखाली लपवलेला पण सदासर्वकाळ जागृत असलेला स्वार्थ; पुनर्जन्म संकल्पनेतुन स्वकेंद्री बनलेल्या व्यक्तींच्या छोट्या छोट्या वर्तुळांचा बनलेला समाज; जन्माधारीत जातीव्यवस्थेतून तयार झालेली शोषणमूलक समाजव्यवस्था; दैवतीकरण, बालविवाह, हुंडा व सतीप्रथा या सर्वांतून होणारे स्त्रीशोषण आणि कामसूत्राचा इतिहास असूनही लैंगिक संबंधांमध्ये असलेला चोरटेपणा; हे सर्व आपले पूर्वसंचित होते.

संस्कृतीआस्वाद