वाद
(तेंडुलकर आणि गांगुली फालतु क्रिकेटर -मायकेल कॅस्प्रोविचचे मत)
प्रेषक चेतन ( सोम, 03/08/2010 - 11:27) .रावसाहेबांचा हा लेख वाचला आणि बाष्कळ चर्चा करणार्या फोर्थ अंपायरची आठवण झाली. (रण ही पाहिला होताच म्हणा)
असो...
इंडिया २४/७ वर राजपाल यादवांनी घेतलेल्या मुलाखतीत मायकेल कॅस्प्रोविचचे सचिन तेंडुलकर आणि सौरव गांगुली या भारतातील दोन बुजुर्ग क्रिकेटरांविषयीचे सडेतोड विचार ऍकले/पाहिले त्यांच्या मते:
१. सचिन तेंडुलकरने गेली २० वर्षे फक्त रेकॉर्ड बनवण्यापलीकडे काहीही केले नाही. भारतीय खेळाडुला पाश्चात्य देशातिल अंपायर मुद्दामुन दंड करतात / आउट देतात असे ब्रेनवॉशिंग बीसीसीआयने केले, पण प्रत्यक्षात भारतीय खेळाडुंना पुढे आणण्यासाठी ठोस असे काहीही बीसीसीआयने, आणि विशेषतः सचिन तेंडुलकरनी केले नाही. ज्या आयपीएल मध्ये बीसीसीआयने भारतीय खेळाडूंना उचलून धरल्याचा दावा केला, त्या स्पर्धेत अभारतीय खेळाडूंची आजची संख्या दोन वर्षांपूर्वीच्या संख्येपेक्षा अधिक आहे.
२. गेल्या वीस वर्षात भारतातील खेळांच्या र्हासाचे प्रमुख कारण म्हणजे बीसीसीआय. बीसीसीआयने अर्वाच्च, गलिच्छ आणि शिवराळ स्लेजींगचे उदात्तीकरण केले. कायदा धाब्यावर बसवण्याचा राजरोसपणा बीसीसीआयने भारताच्या क्रिकेट्मध्ये आणला. 'आयपीएल' मधील कित्येक चीअर गर्ल्सवर कायदेशीर कारवाई होऊ शकते, पण सचिन तेंडुलकरला बाहेर करणारा माईका लाल अजून जन्माला यायचा आहे, ही मस्तवाल भाषा आणि गुर्मी बीसीसीआयने भारतात प्रथम सुरु केली.
३. बीसीसीआयचे भारतीय कैवाराचे धोरण स्वतःला सोयीस्कर आणि धरसोडीचे आहे. भारतात भारतीय माध्यमातून सुरु झालेल्या काही क्रिकेट स्पर्धांना (आयसीएल) पहिला विरोध बीसीसीआयचा होता.
४. सौरव गांगुली बीसीसीआयची ताकद ओळखण्यात अपयशी ठरला. बीसीसीआयला ताब्यात ठेवणे त्यांला शक्य असूनही त्यानी (कदाचित काही वेगळी राजकीय समीकरणे डोक्यात असल्याने) ते केले नाही. त्याच्या जेंव्हा ते ध्यानात आले, तेंव्हा फार उशीर झाला होता.
५. 'एक लढाउ संघनायक' ही सौरव गांगुलीची ओळख फारशी खरी नाही. इतर क्रिकेट संघनायकांच्या मानाने त्यातल्या त्यात आक्रमक भाषा व काही स्पर्धांमध्ये उठबस एवढा फरक सोडला तर सौरव गांगुली आणि इतर क्रिकेट खेळाडु यांच्यात काही फरक नाही. 'अजित वाडेकर नंतरचा भारताचा उत्तम कर्णधार' हे सौरव गांगुलीचे वर्णन निरर्थक आहे.
६. धोनीला मिळणारा प्रतिसाद ही वीस वर्षे क्रिकेट पाहून भ्रमनिरास झालेल्यांची प्रतिक्रिया आहे. धोनी देखील सचिन तेंडुलकरप्रमाणेच उथळ आणि सवंग खेळ या एकाच अस्त्रावर लोकप्रिय होताहेत. फरक इतकाच वाटतो, की त्यांच्या मागे जाणारे आता वीस वर्षे थांबणारा नाहीत. ते लवकर हिशेब मागतील.
बीसीसीआयने ज्यांची ज्यांची कल्हई केली त्यांना सोन्याचे दिवस आले, असे इतिहास सांगतो. जडेजा, अझरुद्दीनपासुन स्टीव बकनरपर्यंतची उदाहरणे आहेत. मायकेल कॅस्प्रोविच हा तर फार पूर्वीपासून बीसीसीआयच्या हिटलिस्टवर असणार्या. त्यांला सचिन तेंडुलकरनी ज्याला 'खास स्ट्रेट ड्राईव्ह' असे कौतुकाने म्हटले जाते त्या भाषेत 'झोडपुन' घेतले आहे. मायकेल कॅस्प्रोविचच्या या मुलाखतीत सचिन तेंडुलकरचा राग (मला तरी) दिसला नाही. दिसली ती फक्त दया. मरणासन्न अवस्थेतल्या, दात आणि नखे झडून गेलेल्या आणि तरीही सोन्याचा पिंजरा सोडू न शकणार्या वाघाकडे बघताना वाटावी अशी दया.
डिस्क्लेमिअरः हे लिखाण काल्पनिक आहे. (पण फोर्थ अंपायर आणि निखील बगळे बघुन डोक फिरतं हे नक्की)
महिलादिन?: स्त्रीच आहे शत्रू स्त्रीची!! पुरुष नाही.
प्रेषक क्षणाचा सोबती ( सोम, 03/08/2010 - 09:53) .८ मार्च हा जागतिक महिला दिन म्हणून जगभरात साजरा केला जातोय.
विविध कायद्यांच्या चर्चा होताहेत. पुरुषांविरूद्ध जास्तीत जास्त बोलले म्हणजे महिला दिन खऱ्या साजरा झाला असे समजले जात आहे. पण, पुरुष हे महिलांचे कधीच शत्रू नव्हते, नाहीत आणि यापुढेही नसणार आहेत.
महिलेची खरी शत्रू महिलाच असते.
स्त्रीयांचे एकमेकांतील नातेसंबंध बघितल्यास असे दिसून येते की, सासू-सून, नणंद-भावजय, जावा-जावा... याप्रकारची नाती सगळ्यात बदनाम नाती आहेत. टोकाच्या शत्रूत्त्वाची नाती आहेत.
नोकरी करून घरकाम सांभाळणाऱ्या सूनेला "समजून न घेणारी" ही सासूच असते. नवरा किंवा सासरा नाही.
हा जर जुन्या-नव्या पिढीचा वाद मानला, तर मग नणंद-भावजयीचे ही एकमेकांशी का पटत नाही? त्या तर एकाच काळातल्या असतात.
तसेच पुरुष हा स्त्री कडे उपभोग्य वस्तू म्हणून बघतो अशी ओरड केली जाते. ते खरे नाही. स्त्रीच बऱ्याच अंशी याला जबाबदार आहे. कोर्पोरेट क्षेत्रात काम करतांना सौंदर्याच्या आधारे स्त्री आपली कामे करवून घेते, प्रमोशन पदरी पाडून घेते. फॅशन शो मधल्या महिला सुद्धा लाजतील असे कपडे घालून महिला आजकाल ऑफिसला जातात, मुली कॉलेजला जातात.
महिलाच स्वत:ला अशा पद्धतीने पेश करत आहेत की पुरुषांचा दृष्टीकोन हा उपभोगाचाच राहील!!
पैसे मिळतात म्हणून महिलाच अश्लील चित्रपटात काम करतात, अश्लील जाहिराती करतात. त्यांना नको असेल तर त्या अशा जाहिराती नाकारू शकतात. अशा जाहिराती थांबवायच्या असतील तर कोणत्याच स्त्रीने अशा जाहिराती/चित्रपट नाकारल्या पाहिजेत. नाहितर याला दुटप्पीपणा किंवा दांभिकपणा म्हणावे लागेल. कारण आपल्याला वाटेल तसे स्वैर वागायचे आणि काही झाले की पुरुष आणि पुरुषप्रधान संस्कृतीला दोष देवून मोकळे..
आणि प्रत्येक क्षेत्रात पुरुषांच्या बरोबरीने समानता पाहिजे आणि आरक्षण पाहिजे. समानता पाहिजे असेल तर मग सवलत कशाला हवी? कारण कायद्यांबाबतही असमानता आहे. सगळे कायदे स्त्रीच्याच बाजूने आहेत.
आरक्षणामुळे आजकाल असे झाले आहे की, एखादा कुटूंबात पती-पत्नी दोन्ही कमावणारे, तर एखाद्या कुटुंबातल्या एकाही तरूणाला नोकरी नाही. नोकरी देतांना कंपन्यांनी हा विचार जरूर करावा.
महिलादिनानिमित्त स्त्रीयांनी पुरुषांचा विचार करावा आणि पुरुषांवरचा अन्याय दूर करावा.
बीटी पोर!
प्रेषक अरुंधती ( रवी, 03/07/2010 - 13:23) .आमच्याकडे सध्या नवा वाद रंगलाय.
आमच्या ओळखीचे एक शेतकरी दादा परवा तावातावाने घरात शिरले.
त्यांच्या व माझ्या भावामधला हा संवाद!
"तुम्ही ते बीटी वांग्याचं, बीटी भाज्यांचं आमच्या बायकूकडं येवढं कवतिक का हो करून राहिला भाऊ? "
"का? काय झालं? मी तर वर्तमानपत्रातल्या बातम्या मोठ्यानं वाचत होतो!"
"अहो, तुमचं वाचन आमच्या बायकूनं आयकलं आन आमच्या 'हिच्या' डोक्यात तवापास्नं किडा वळवळाया लागलाय बघा... म्हनत्ये की भाजीत जर त्या ब्यॅक्टेरियाचा जीन टाकता येतो तर मग मानसात का नाही?"
"म्हणजे? मी नाही समजलो... "
"अहो, आता बघा, त्यो जीन घालून पिकवल्येलं वांगं म्हने कीड, रोगाला जवळ फटकू द्येत न्हाय... त्येला दवा-औषध काय लागत न्हाय असं आमचे दादा म्हनून राह्यले...म्हंजे त्ये आसं त्यांच्या भाषनात म्हनाले आसं तुमीच सांगितलं! "
"बरं... मग? "
"तर आता आमची 'ही' म्हनतिया की फुडचं प्वार बीटी प्वारच पायजेल! "
"आँ? "
"आरं भाऊ, तिचं म्हननं जर बीटी वांग्याला कीड, रोग लागत नसंल, दवापानी कराया लागत नसंल तर तसंच मानसाच्या पोराला का नको? मानसात पन घालायचा असलाच कंचा तरी जीन आन मग होऊन जाऊ द्ये पटापटा हवी त्येवढी पोरं! "
"अरे बाबा, पण त्याला कायद्यानं मान्यता हवी ना! आणि तेवढं तंत्रज्ञानही विकसित व्हायला हवं! "
" पर कायदा का म्हनून नाकारेल अशी बात? जर त्यानं समद्यांचा फायदा होत आसंल, भलं होत आसंल तर मग कायदा त्या बाजूनंच हवा की हो राव! आन तुमी ते तंत्रज्ञानाचं काय पन सांगू नकासा! फारीनला ते गोरे लोक जर डुप्लिक्येट मानूस बनवून राह्यले तर ह्ये तर येकदम सोप्पं काम हाय! मस्त चार-पाच पोरं झाली की कारभारनी माझं टकुरं खानं बंद करंल!"
"अरे, पण एवढ्या पोरांना तू खायला काय घालणार? त्यांचा कसा सांभाळ करणार? "
"आवं आसं काय बोल्तासा, हायेत की मंग आपली बीटी वांगी, बीटी धान्य आमच्या बीटी पोरास्नी पोसाया....जास्त पोरं म्हंजे शेतात कामास्नी येत्याल, आन आजारी पन पडणार न्हाय.... "
आता आमच्या ह्या शेतकरी भाऊना काय बरे उत्तर द्यावे?
त्यांना आता बीटी पोर हवे आहे. भारत सरकार त्यांना मदत करेल काय?
अरुंधती
Sing, Dance, Meditate, Celebrate!
http://iravatik.blogspot.com/
श्वानत्रस्त विरुद्ध श्वानप्रेमी!!!
प्रेषक क्षणाचा सोबती ( रवी, 03/07/2010 - 10:18) .भटक्या कुत्र्यांचा प्रश्न दिवसेंदिवस पुणे, मुंबईत गंभीर होत चालला आहे. अर्थातच इतर शहरात सुद्धा असेलच. दिवसा सुद्धा आणि विशेषकरून रात्री अंधार पडल्यावर या भटक्या कुत्र्यांचे साम्राज्य सुरू होते. त्यांच्या रात्री च्या मोठमोठ्याने ओरडण्याने झोपमोड सुद्धा होते.
लहान-थोर सगळ्यांनाच या भटक्या कुत्र्यांपासून त्रास होत असतो. रात्री दुचाकी वाहनांमागे पळत असल्याने वाहनांचे अपघात होऊन दुचाकीस्वाराचा मृत्यू होण्याचा संभव असतो. पायी चालणाऱ्या सर्वांनाच कुत्र्यांचा त्रास होतो. कुत्रा चावून लचका तोडून व्यक्तीला मरण ओढावू शकते. कुत्र्यांमुळे इकडे तिकडे घाणीचे साम्राज्य होते.
काही कथित प्राणीप्रेमी संघटना या कुत्रांवर काही बंदोबस्त करायला का नाही म्हणतात हे आकलनापलिकडचे आहे. त्यांना मारणे उचित नसेल तर प्राणीप्रेमी मंडळींनी सरकारी किंवा संघटनेच्या किंवा स्वत:च्या पैशातून त्या कुत्र्यांसाठी एक घर/संग्रहालय बनवून त्यात त्यांना पोसावे आणि २४ तास सोसावे. नसबंदी वगैरे करून त्यांची पैदास नियंत्रीत करण्याचे मागे कुठेतरी वाचले ते प्रत्यक्ष होते की नाही देव जाणे! प्राणीप्रेमी, श्वानप्रेमी मंडळींनी एकदा तरी रात्री गल्लीतून एकटे जावून दाखवावे. म्हणजे या गोष्टींची तीव्रता व त्रास त्यांना समजेल.एकदा तरी त्यांना(सुद्धा) एक तरी कुत्रा कडकडून चावावा, अशी माझासारख्या असंख्य श्वानत्रस्त व्यक्तींची मनापासून इच्छा आहे.
तसेच पाळीव कुत्र्यांना सकाळी फिरायला घेवून येणारी श्वानप्रेमी (कुत्राप्रेमी म्हणू नका बरं! ते चिडतील!) मंडळी रस्त्यावरच्या इतर जाणाऱ्या येणाऱ्या मंडळीचे बिनधास्त चालणे मुश्कील करून टाकतात. तसेच ही श्वानप्रेमी मंडळी इकडे तिकडे श्वान-विष्टा पसरवून निघून जातात. त्यांना प्रेम असेल कुत्र्यांबाबत, पण ते घरी राहूद्या! इतर सार्वजनीक ठिकाणी ते इतरांना दाखवण्याची आवश्यकता नाही. एवढे बरे की, काही ठीकाणी बागेत श्वान आणण्यास बंदी आहे. नाहीतर सकाळचा व्यायाम, जॉगींग सुद्धा भीत भीत करण्याची पाळी येईल.
याबाबत काय करता येईल?
पालीका/सरकार या प्राणीप्रेमी मंडळींच्या दबावाखाली एवढं का झुकतं?
ह्या श्वानप्रेमी/प्राणीप्रेमी संघटना या कुत्र्यांची जबाबदारी का घेत नाही?
याबाबत कुठे तक्रार करायची?
अनेकदा ओरड होउनही भटक्या कुत्र्यांसंदर्भात पालीका/सरकार ठोस पावले उचलून निर्णय का घेत नाही?
प्रशिक्षीत कुत्रे घराची राखण करतात, पोलीसांत त्याचा उपयोग होतो, ही एक वेगळी गोष्ट झाली, पण म्हणून त्यांना सामान्य माणसांना चावून मारून टाकण्याची परवानगी द्यावी, असे नाही.
मुलींचे स्कार्फ आणि विरोधाभास!!!
प्रेषक क्षणाचा सोबती ( गुरू, 02/18/2010 - 12:49) .नुकतेच वाचनात आले की महिलांचा वापर विघातक कारवायांसाठी होवू शकतो आणि त्या स्कार्फ बांधत असल्याने समस्या आणखी जटील होते, ओळख पटवणे कठीण होते. मागेही एकदा पुणे पोलिस आयुक्तांनी मुलीनी चेहेराभर स्कार्फ़ बांधण्यासाठी विरोध दर्शवला होता.
मुलींचे प्रदुषणा पासून, उन्हापासून संरक्षण व्हावे आणि चेहेरा खराब होवू नये हा जरी उद्देश्य त्यामागचा असला तरी त्याचा वापर आपली ओळख लपवण्यासाठी, आपण कुणाबरोबर फिरतो आहे हे कुणालाही समजू नये अशा अयोग्य गोष्टींसाठीसुद्धा काही मुलींकडून केला जातो, हे सुद्धा तितकेच खरे आहे. सगळयात मोठा विरोधाभास आणि विनोद म्हणजे, स्कार्फने पूर्ण चेहेरा झाकणाऱ्या काही युवतींचे कपडे मात्र अंगप्रदर्शन जास्तीत जास्त कसे होईल असेच असतात. अगदी थंडीच्या दिवसातही रस्त्यावर स्कार्फने पूर्ण चेहेरा झाकणाऱ्या काही मुली आणि महिला पातळ, तंग, आखुड टी-शर्ट घालतात आणि पाय उघडे ठेवणारे स्कर्ट घालतात. त्यांना आता थंडीचा त्रास होत नसतो का? इतर शरीराला काय प्रदुषणाचा त्रास होत नाही. फक्त चेहेऱ्यालाच होतो? जरा विचार करा. आहे की नाही विरोधाभास. उद्देश्य एकच. आपली फिगर सतत प्रत्येकाला दिसणे हेच नोकरी, कॉलेज व इतर गोष्टींपेक्षा सर्वात जास्त महत्त्वाचे आहे, असे यांना वाटते!
आणि या उलट परिस्थिती पुरुषांबाबत. पुरुषांनी, मुलांनी स्कार्फ किंवा तत्सम कापड प्रदुषणा पासून, उन्हापासून संरक्षण व्हावे या हेतूने जरी घातले तरी त्याच्या कडे संशयाने बघितले जाते. पुरुषांना प्रदुषणाचा त्रास होत नाही की काय?
स्कार्फ नेमक्या कोणत्या कारणासाठी वापरला जातो? त्याऐवजी साधा मास्क का नाही वापरला जात? स्कार्फ चे वैद्यकियदृष्ट्या अनेक दुष्परिणामही आहेत.
पुणे शहरातील पीएमपी बसमध्ये डावीकडील स्त्रीयांची राखीव जागा आणि बिचारे पुरुष, मुलगे आणि वृद्ध
प्रेषक क्षणाचा सोबती ( बुध, 02/10/2010 - 14:28) .--पुण्याच्या पीएमपी बसेस मध्ये डावीकडची पूर्ण बाजू स्त्रियांसाठी रविवार वगळता आठवडाभर राखीव असते, असा "स्त्री-पुरुष" समानतेच्या काळातही कायदा आहे.
(स्त्री-पुरुष समानता पण हवी आहे, आणि प्रत्येक ठीकाणी आरक्षण सुद्धा)
पण याचा नेहेमी स्त्रीयांकडून गैरफायदा घेतला जातो तो असा-
(१) समजा डावीकडील सीट रिकामी आहे, आणि तरीही स्त्री उजवीकडच्या रिकाम्या सीटवर बसते, तर हा सुद्धा हा कायदा टोडण्याचाच प्रकार आहे. कारण, डावीकडची सीट रिकामी असल्यावर सुद्धा मुद्दाम मुली/स्त्रीया/आडदांड बाया, उजवीकडेच बसतात. थोडे काही म्हटले तर उगाच सगळ्या प्रवाशांचा रोष पत्करण्याची भीती. कारण बहुतेक कायदे पुन्हा स्त्रीकडून. म्हणजे पुरुषांची हकाची एक सीट जाते.
-- डावीकडील पूर्ण सीटस भरलेली असतील तरच उजवीकडे स्त्रीयांनी बसले पाहिजे.
(उजवीकडे बसू नका असे आम्ही म्हणू ही शकत नाही, कारण, त्यांचे उत्तर तयार असते- "उजवीकडे, पुरुषांसाठी राखीव असे थोडेच लिहिले आहे?")
(२) बसमध्ये पुरुष उभे असताना, पैसे खिशातून काढत असतांना वगैरे अगदी चुकून धक्का एखाद्या स्त्रीला लागला तरी त्या अशा काही नजरेने बघतात की बापरे. विशेष म्हणजे बसमधल्या प्रत्येक मुलीला/ स्त्रीला असे (गैरसमजापोटी) वाटत असते की तीच फक्त जगातील सर्वात सुंदर स्त्री आहे, आणि जणू काही बसमधले सगळे (सगळ्या वयाचे) पुरुष/ मुलगे फक्त तिलाच बघत आहेत.
-- बसमध्ये उभे असतांना कुणीही मुद्दाम धक्के देत नाही. बसमध्ये पुरुषांना हे टाळण्यासाठी अगदी चोरून उभे राहावे लागते.
(३) रविवारी कामाचा दिवस नसला तरी सुद्धा डावीकडच्या जागेसाठी स्त्रीया कंडक्टरकडे भांडत बसतात.
" डावीकडील पूर्ण सीटस भरलेली असतील तरच उजवीकडे रिकामी जागा असल्यास स्त्रीयांनी बसले पाहिजे."
अशी सूचना बसमध्ये लावली गेली पाहिजे.
नाहीतर, "उजवीकडील पूर्ण रांग पुरुषांसाठी राखीव करावा लागेल."
सर्व पुणेरी मंडळींना काय वाटते?
इतर शहरातील मंडळींनी सुद्धा मत व्यक्त करायला हरकत नाही.
मुलींना जसा आई-वडीलांच्या संपत्तीत "वाटा" हवा असतो तसाच त्यांच्या आजारपणाच्या खर्चाचा "वाटा" सुद्धा त्यांनी उचलावा!!!
प्रेषक क्षणाचा सोबती ( शनी, 01/23/2010 - 14:17) .आज स्त्री पुरुष समानतेचे जरा जास्तच स्तोम माजवले जात आहे. समानतेचा मूळ विधायक उद्देश मागे पडून फक्त पैसे आणि वाटणी (हक्क) मिळवण्यासाठीच त्याचा फक्त वापर केला जातो.
मुलगी मुलाच्या बरोबरीने वडीलांच्या संपत्तीत वाटा मागते -- हक्क!
पण आई-वडीलांची आजारपणं, त्यांना सांभाळणं, त्यावारचा खर्च हा सगळा "वाटा" फक्त मुलगाच उचलतो. --कर्तव्य !
तेव्हा कुठे जाते ही समानता?
मुलींना संपत्तीत वाटा असतो तसाच आई-वडीलांच्या आजारपणाचाही, त्याला लागणाऱ्या खर्चाचाही "वाटा" त्यांनी उचलावा, असा कायदा आहे का? नसल्यास तो करायला हवा.
मध्यंतरी एक कायदा आला की, आई-वडीलांना मुलांनी सांभाळले पाहिजे. बरोबरच आहे. पण त्यात बदल करून कायदा असा हवा-
"मुलाने आणि मुलीने सारख्याच प्रमाणात आई-वडीलांना सांभाळावे. नाहीतर कारवाई केली जाईल. दोघांवरही...."
कारण आई-वडील मुलाला जसे शिक्षण देतात, तसेच मुलीला ही देतात. त्यावारच ती नोकरीही करत असते. पुन्हा मुलीच्या लग्नाला भरमसाठ खर्च येतो तो वेगळा....तसेच, हुंडा किंवा इतर गोंडस नावाखाली लग्नानंतरही सतत येणाऱ्या मागण्या पूर्ण कराव्याच लागतात...
समानता ही हक्क आणि कर्तव्य या दोघांबाबत असायला हवी. नाही का?
आपल्याला काय वाटते?
"अशा" चित्रपटांची "ऐशी-तैशी"...
प्रेषक क्षणाचा सोबती ( रवी, 01/03/2010 - 19:56) ."सून-मुलगा अति नालायक-वाईट आणि आई-वडील-नणंद ही देवत्त्वापेक्षाही आदर्श माणसं" अशा धर्तीचे मराठी चित्रपट बंद होत आहेत, मराठी निर्माते-लेखक-दिग्दर्शक प्रगल्भ होत आहेत असे वाटायला लागले असतांनाच ....
"स्वातंत्र्याची ऐशी तैशी" हा चित्रपट आला. अन वाटलं... कुत्र्याचं शेपूट वाकडं ते वाकडंच राहाणार. नाण्याच्या एकाच बाजू साठी बनवले जाणारे चित्रपट असतात. नाण्याला दुसरी बाजू असते हेच मुळी त्यांना मान्य नसतं.
मराठी निर्माते-लेखक-दिग्दर्शक यांना पक्के माहिती आहे की, मराठी चित्रपट (बक्कळ पैसा मिळवून देणाऱ्या मल्टीप्लेक्स सह) चालण्याचे एकमेव हक्काचे ठीकाण- पुणे.
आणि पुणे येथे पेन्शनर वृद्ध वयस्कर मंडळी जास्त राहातात. मग त्यांच्या मनाला कॅश करुया. मग असे चित्रपट काढतात. पैसे कमावतात.
तरूण मंडळी इमाने इतबारे आपल्या आई वडीलांची सेवा करतात. यात वाद नाही. आदर्शपणाने नव्हे तर प्रॅक्टीकली!
शक्य होईल तसे ते आई-वडीलांची हौस मौज करतच असतात, गरजा पुरवतच असतात. कारण कोणतेच आई वडील सुद्धा आपल्या मुलांना आदर्शपणे वाढवत नाहीत. तेही प्रॅक्टीकली विचार करूनच शक्य तेवढे शिक्षणच मुलांना देतात. स्वतःसाठी काही राखून. मग इच्छा मारून मुलेही न आवडणारे शिक्षण पूर्ण करतातच की. आई-वडीलांखातर अनेक स्वप्नांवर पाणी सोडतातच की.
मग अशा सिनेमांमुळे तरुणांची गळचेपी, मुस्कटदाबी होते. उगाच असे आदर्शवादी चित्रपट बघण्यासाठी "मुला-सूनेवर" दबाव टाकला जातो. हे सत्य आहे. सगळीकडेच नसेल पण हे ९० टक्के सत्य आहे.
नुकतंच, सुलोचना दिदी म्हणाल्या होत्या की, प्रेक्षकांनी जास्तीत जास्त मराठी चित्रपट पाहिले पाहिजेत. पण, निर्माते-लेखक-दिग्दर्शक यांचेकडे असल्या "आगलाव्या" चित्रपटांशिवाय दुसरे काही दाखवायला नसेल तर माझ्यासारखे असंख्य त्रस्त प्रेक्षक मराठी चित्रपटांकडे पाठ फिरवतीलच.
चित्रपटात दाखवतात त्याप्रमाणे कोणताच मुलगा-सून टोकाचे वाईट नसतातच. बहुतेक सासवा सुद्धा तश्या नसतात...
मात्र हुंड्यासाठी सुनेला जाळून मारणाऱ्या सासवा आजही आहेत. त्यांना कायदेशीर पणे अटकही होते असे दाखवणारे चित्रपट का बनवत नाहीत? अशा सासवा म्हणजे खुनीच की. पुरुष बिचारा एक खून केला की तुरुंगात खितपत पडतो. मात्र घराघरातींल अशा "दहशतवादी" बायकांचे काय करायचे?
सासू-सून वाद हे पिढीततले अंतर असल्याने आहे, हे समजू शकते, पण...
एकाच वयाचे, एकाच काळातले असूनही नणंद-भावजय एकमेकांना समजावून का घेऊ शकत नाही?
अशा दहशतवादाला खतपाणी घालणारे हे चित्रपट! बंद झाले पहीजेत असं मी म्हणत नाही, पण, कथा ही दोन्ही बाजू मांडणारी हवी.
महेश मांजरेकर नेहेमी हट के चित्रपट बनवतात. त्यांचे कडून एक तरी "मुलगा-सून" यांची बाजू मांडणारा चित्रपट पुढे येईल अशी अपेक्षा करायला हरकत नाही.
हिंदी चित्रपटही पूर्वी असे चित्रपट काढून वीट आणायचे (अवतार- राजेश खन्ना, आताशा अलेले उमीद, बाघबान)
काय वाटते आपल्याला? असले अतिशयोक्तीपूर्ण चित्रपटांची आवश्यकता आहे का?
विश्वातील पहिला सजीव कोण असावा आणि निर्जीव वस्तू कोणती असावी?
प्रेषक क्षणाचा सोबती ( गुरू, 12/31/2009 - 18:48) .विज्ञान म्हणतं त्याप्रमाणे सुर्याजवळून एक मोठा चुंबकीय शक्ती असलेला ग्रह (किंवा जे असेल ते) वेगाने गेल्यावर सुर्याचे तुकडे वगैरे होवून सगळे तुकडे सुर्याभोवती फिरायला लागलेत व पृथ्वी ही त्यापैकीच एक. हे सत्य मानले तर एक प्रश्न मनाला भेडसावतो की, मग त्या पृथ्वीवर सगळ्यात पहिला सजीव प्राणी कोण आला? कसा व कुठून आला असावा? तो जेथून आला ते तरी कोठून आले असावे? तो जर कोणीतरी निर्माण केला असे म्हणायचे असेल तर तो निर्माता कुठून आला? कृपया या चर्चेचा ओघ 'देव आहे किंवा नाही?' याकडे न वाहू देता मला या चर्चेत विविध वैज्ञानिक शक्यतांचा विचार करून बघायचा आहे. मुळात सुर्य कुठून आला असावा? विश्वात आधी काहीच नव्हते (फक्त पोकळी), त्यानंतर मग प्रथम काय आले असावे? व कोठून?
खुप ईंटरेस्टींग विषय आहे हा!! (असे मला तरी वाटते)
भारत: का होतोय सगळ्यात जास्त खुन्यांचा/खुनांचा व अपघातांचा देश!?
प्रेषक क्षणाचा सोबती ( गुरू, 12/31/2009 - 18:46) .नुकतीच जवळपास सर्वच वर्तमानपत्रांमध्ये एका सर्वेक्षणासंदर्भात अशी बातमी होती की, भारत हा सर्वाधिक खून होणारा देश झाला आहे. यात आपण अमेरिकेलाही मागे टाकले आहे. तसेच अपघातांच्या बाबतीतही आपण पुढेच आहोत. अशी चुकीच्या क्षेत्रात (आणि दिशेने) होत चाललेली आपली प्रगती पाहून मन विषण्ण होते. ही वाढती गुन्हेगारी कशामुळे?
काही प्रातिनिधीक उदाहरणे :
•आरूषी हत्याकांड
•आजीने अश्लील विडियो पाहू दिला नाही म्हणून एका कुमारवरवयीन मुलाने आजीचा डोक्यात दगड घालून केलेला खून (आणि हो, हे भारतातच घडले आहे, तेही कोल्हापुरात)
•मरिया सुसाईराज संबंधीत खुन प्रकरण
•हुंडा दिला नाही म्हणून जाळले
•बलात्कार करून खुन
•नगरसेवकाचा पुर्व वैमनस्यातून खुन
मला अशा वाढत्या गुन्हेगारीमागे खालील ठळक कारणे दिसतात :
•लोकसंख्येची भरमसाठ वाढ आणि बेरोजगारी (हे सगळ्यात महत्त्वाचे कारण!)
•कधी नव्हे एवढे आज पैशाला आलेले अवाजवी महत्त्व (हेही तितकेच महत्त्वाचे!)
•भ्रष्ट राजकारणी व सगळीकडे पावलोपावली उघड उघड चालणारा भ्रष्टाचार व त्याला बळी पडणारा सामान्य माणूस
•अत्यंत जिवघेणी स्पर्धा, त्यात टिकण्याची धडपड, कामाचा ताण आणि वाढते अनैतीक संबंध
•(साधारण १९९२ सालानंतर) आकर्षक स्त्रीदेहांचा सतत चोवीस तास सगळ्या प्रकारच्या प्रसारमाध्यमांकडून होणारा हेतूपुर्वक मारा, त्यामुळे कुमारवयात स्त्रीदेहाविषयी चे मुळातच असलेल्या आकर्षणाला अजून मिळत असलेले खतपाणी व तो (स्त्री देह) कुठूनही, कसाही मिळवण्याची धडपड
•श्रीमंत गरिब यातील वाढती दरी (काही प्रगत देशांत ही दरी खुप कमी आहे)
•कष्ट न करता पैसा मिळावा असा वाढत चाललेला दृष्टीकोन
•स्पर्धेमुळे लहान मुलांवर पडणारा शिक्षणाचा अवाजवी ताण
•जगभराच्या बऱ्या- वाईट (बहुतेक वेळा फक्त वाईटच) बातम्या एका मिनिटांत सगळीकडे पसरतात. म्हणजेच माहितीचा मारा व अतिरेक. गुन्हेगारांना त्यातून मिळणारे आयते प्रशिक्षण...
•माणुसकीला व प्रामाणिकपणाला किंमत जवळपास शून्य, त्यामुळे प्रामाणिक माणसांची होणारी मुस्कटदाबी आणि बधीर झालेली माणुसकी.
•व्यक्तीवादाला व व्यक्तीपपूजेला आलेले महत्त्व
•प्रगतीच्या (चांगल्या अथवा वाईट?) मार्गाच्या आड कुणीही आले की त्याला सरळ सरळ संपवण्याचीच मानसिकता
•आपल्या मागण्या मान्य करण्यासाठी दगडफेक, जाळपोळ, तोडफोड हाच एकमेव उपाय उरला आहे असे वाटण्यासारखी परिस्थिती.
•हरवत चाललेली मन:शांती
हे सगळे बदलायला हवे अशी आशा करूया. महासत्ता वगैरे होण्याचे स्वप्न तर दूरच राहिले, आधी वरील पैकी एकतरी समस्या सुटली तरी खुप झाले. आपणांस काय वाटते.
आणखी कोणती कारणे असू शकतात यामागे?
कसे बदलता येईल हे सगळे? की बदलता येण्याच्या पलीकडे गेले आहे सगळे?



