काथ्याकूट
सर्वम - भारतीय ए०आय०
सर्वम् या भारतीय ए०आय० कडे लोकांनी पाठ फिरवल्याचे वृत्त वाचले. म्हणून उत्सूकता निर्माण झाली. मला त्यांच्या वेबसाईटवर संवादक (चॅटबॉट) सापडला नाही. मग लोक वापरून बघणार कसे?
हा ए० आय० डावी कडे की उजवीकडे झुकला आहे, याची उत्सूकता होती.
कलिवर्ज्य- भाग-२
History of Dharmastra या विख्यात ग्रंथाच्या तिसर्या भागात कलिवर्ज्य नावाचे एक प्रकरण विस्तारपुर्वक मांडुन झाल्यावर कलिवर्ज्यावरमहामहोपाध्याय भारतरत्न पांडुरंग वामन काणे खालील त्यांचे मत किंवा भुमिका नोंदवतात ती त्यांच्याच शब्दात खालीलप्रमाणे ( जाड ठसा मुळचा नाही माझा आहे )
रिसेल घर घेताना ....
हल्ली नवीन फ्लॅट घेणे परवडत नाही, आणि परवडणारी घरे आवडत नाहीत. तेव्हा रिसेल फ्लॅट घेणे हा एक पर्याय असतो. रिसेल फ्लॅट घेताना काय काळजी घ्यावी याबाबत माझे काही परिमाणे मी ठरवली आहेत ती खाली देत आहे. ही यादी सर्वंकष नाही. पण किमान या गोष्टी तरी ड्यू डेलिगेन्स करून घ्याव्या असे माझे मत.
भारत पाक संधी,ओपरेशन सिन्दूर थांबले?
भारताने पाक हवाई तळांवर केलेल्या शेवटच्या हल्ल्यानंतर युद्धबंदी स्वीकारली.
• पाक डीजीएमओने दुपारी ३:३० वाजता युद्धबंदीची विनंती केली, पुढील हल्ले न करण्याचे आश्वासन दिले
• अमेरिकेने आयएमएफच्या १ अब्ज डॉलर्सच्या निधीचा तात्काळ युद्धबंदीशी संबंध जोडून पाकिस्तानवर दबाव आणला.
• सिंधू पाणी कराराची माहिती सामायिकरण स्थगित आहे; भारत उत्तर नदी प्रकल्पांसह पुढे जाईल.
मराठी भाषेतील सर्वात भंगार ( सुविचार) वाक्य कोणते?
मराठी भाषेत अनेक चांगली वचने आहेत.
त्या पैकी काही आपल्याला प्रगती करायला प्रोत्साहन देतात तर काही मात्र सुविचार असूनही आपल्याला संकुचित करून ठेवतात.
उदा :
१) ठेवीले अनंते तैसेची रहावे , चित्ती असू द्यावे समाधान
सरकारी कार्यालयातील वातानुकूलन यंत्रणा
काल एका समाजसेवकाचे एक रिल फेसबुकवर बघितले. त्या रिलमध्ये सदर गृहस्थ एका सरकारी अधिकार्यास समजवजा निवेदन देत असल्याचे दिसले. विशिष्ट सरकारी नोकरांना आपल्या कार्यालयात वातानुकूलन यंत्रणा बसविण्यास सरकारची परवानगी आहे. त्यासाठी जो निकष आहे तो पगाराचा आहे (असे त्या रिलमुळे समजले).
माझे म्हणणे असे की -
ऑपरेशन सिंदूर - युद्ध की मर्यादित कारवाई?
आज पहाटे भारतीय विमानांनी पाकव्याप्त काश्मीर व पाकिस्तान भूमीवर ९ ठिकाणी क्षेपणास्त्र हल्ला केला. त्याच्या काही चित्रफिती पाहिल्या. काही इमारती उद्ध्वस्त झालेल्या दिसल्या त्यात एक मशीद आहे. आपण भारताची ५ लढाऊ विमाने (त्यात एक राफेल) व एक ड्रोन पाडले असा पाकिस्तानने दावा केलाय. सीमेवर दोन्ही बाजूने तोफांचा भडीमार झालाय.
ही कारवाई मर्यादित लाहू नये ही अपेक्षा आहे.
नोकरी नोकरी नोकरी ...
नोकरी नोकरी नोकरी ...
कौस्तुभ पोंक्षे
(८००७६०५०८२)
अनेक पोस्ट्स बघत असतो. त्यात मला इतक्या वर्षांचा अमुक नामांकित कंपनीतील अनुभव आहे, इतकं शिक्षण झालंय गेल्या अमुक वर्षांपासून जॉब चेंज साठी प्रयत्न करतोय पण जॉब मिळत नाही असे सर्व साधारण मुद्दे त्यात असतात.
नावात काय ठेवलय?
कोणताही विदा हातात आला की त्याच्याशी खेळत बसायची सवय आहे. नुकताच नंदुरबार जिल्ह्यातील दुर्गम आदिवासी गावातील हजारहून अधिक मुलांचे कुपोषण संदर्भात सर्वेक्षण केले. हजारभर मुलांचे दोन हजार पालक असा भला भक्कम विदा हाती आला. त्यातील अभ्यास संदर्भाने काढावयाची निष्कर्षे व्यतिरिक्त सहज म्हणून नावे बघत असताना काही बाबी जाणवल्या.
तुमच्या लेखी मराठी भाषेतील सर्वोत्कृष्ट वाक्य कोणते ?
काल मराठी राजभाषा दिन होता.
त्या निमित्ताने मनात एक मजेशीर आणि रोचक विचार आला .
" तुमच्या लेखी मराठी भाषेतील सर्वोत्कृष्ट वाक्य कोणते ?"
म्हणजे फक्त एकच वाक्य असे नाही, 2 3 वाक्ये असतील तरी चालेल, एखादी कविता किंवा त्या कवितेतील ओळही चालेल.
पण असं काहीतरी विशेष की जे ऐकून तुम्हाला वाटत " अहाहा काय लिहिलं आहे !!".
भोपाळ मधील सेक्स स्कँडल... "फरहान आणि त्याची टोळी..."
मागच्या महिन्यात, एक बातमी वाचण्यात आली,की भोपाळ मधील एका युवतीने, फरहान नावाच्या व्यक्ती विरोधात धर्मांतरण आणि जबरदस्तीने संबंध ठेवण्या बाबत तक्रार नोंदवली.....
मूळ बातमी. ...
पहलगाम अतिरेकी हल्ला ते जातिगत जनगणना - सरकारची संदिग्ध कोलांटीउडी
केंद्र सरकारचे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सरकार आता जातिगत जनगणना होणार असल्याची मोठी घोषणा केली आणि देशात एकच गदारोळ माजला आहे. सत्ताधारी पक्ष व त्यांची मातृसंस्था रा.स्व. संघ यांचे जातिगत जनगणनेला नेहमीच छुपा विरोध राहिलेला आहे. त्यामुळेच बटेंगे तो कटेंगे वगैरे घोषणा दिल्या होत्या. काँग्रेस गेल्या तीन वर्षांपासून जी मागणी करत होती ती केंद्र सरकारने अखेर तेच पाऊल उचलले आहे.
ताज्या घडामोडी- मे २०२५
आधीच्या भागात ४००+ प्रतिसाद झाले म्हणून आणि मे २०२५ चा महिना सुरू व्हायला आणखी साडेचार तासच (मोजून २७० मिनिटे) बाकी आहेत तेव्हा ताज्या घडामोडींचा नवा धागा सुरू करत आहे.
लोकप्रिय गायक अभिजीत सावंत २ मे रोजी 'जिची चाल तुरू तुरू' हे लोकप्रिय गाणे म्हटलेला अल्बम रिलीज करणार आहे. ते गाणे जुन्याच चालीत असेल की रिमिक्स असेल ही चर्चा अभिजीत सावंतच्या चाहत्यांमध्ये रंगली आहे.
पाकिस्तान आणि पाणी पुरवठ्या बद्दल माहीत मिळू शकेल ?
सगळ्यात मुख्य प्रश्न
१) कारगिल ,पुलवामा ते काल प्रत्यक वेळी पाकिस्तान चा पाणी पुरवठा बंद करतात ,मग ते पाणी परत चालू कोण करते ? तेव्हा मीडिया झोपलेला असतो का ?
२) पाकिस्तान ला पाणी पुरवठा काश्मीर मधून वाहणाऱ्या नद्या सोडून अजून तिथून होत नाही का ?
३) जर चीन ने त्यांच्या नंद्याचे पाणी भारताला बंद केले तर ? तसेच दोन्ही कडे जल फुगवटा निर्माण होण्याची शकयता ?
भारतातल्या पाकिस्तान प्रेमी लोकांचे काय करायचे ?
नोंद :- कृपया बाकी माहिती टाकू नये , त्यासाठी बाकी धागे आहेत
मुद्दा एवढाच कि. आत्ता दहशत वाद्यांनी हल्ला केला .ह्यात भारताने पाकिस्तन चे सर्व व्हिसा रद्द केले ,
ह्यात मेडिकल पेशंट पण आहेत
पण एक जण म्हणत होता त्यांची चूक काय ? ( माझ्याकडे व्हात्सअँप स्क्रीन शॉट आहेत )
पहलगामचा हल्ला आणि इस्लाम
नुकतेच काश्मीरमध्ये काही पर्यटक फिरायला गेले असता तिथे टी आर एफ या पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी संघटनेच्या अतिरेक्यांनी त्या पर्यटकांना त्यांचा धर्म विचारला. ते मुस्लिम सोडून अन्य धर्माचे लोक आहेत हे समजल्यानंतर अगदी जवळून बेछुट गोळीबार केला आणि त्यात २८ जण मृत पावले. त्या मृतात्म्यांना श्रद्धांजली. _/\_
सोने एक लाखावर...
काल २२ एप्रिल २०२५ रोजी सोन्याने एक लाख रुपयांचा टप्पा गाठला. जून २०२४ मध्ये सोने सत्तर हजार होते, तेंव्हा, वर्षभरात सोने एक लाखाचा टप्पा ओलांडेल असे अंदाज मी वर्तवला होता. सोने आता एक लाखावर गेले आहे. अर्थात आज ते थोडेसे उतरले आहे.
सोन्याच्या किमतींबाबतीतील काही वैयक्तिक, सार्वजनिक टप्पे सांगतो -
आपली मातृभाषा मराठी जिवंत राहण्यासाठी आपण काय काय करू शकतो?
२०२५-२६ या शैक्षणिक वर्षापासून महराष्ट्रात पहिलीपासून ३ भाषा सक्तीने अभ्यासक्रमात टाकलेल्या आहेत. दुर्दैवाने त्यात हिंदीचा पूर्णपणे अनावश्यक समावेश केला आहे.
मराठी भाषेला रोजगार उन्मुख करण्याची गरज.
जी भाषा रोजगार, धन दौलत आणि समाजिक प्रतिष्ठा मिळवून देते ती भाषा लोक शिकतात. जेंव्हा दिल्लीत 11वी बोर्ड होते. तेंव्हा 8वी बोर्डची परीक्षा दिल्या नंतर विज्ञान आणि वाणिज्य शाखेतील अधिकान्श विद्यार्थी हिन्दी विषय घ्यायचे नाही. विज्ञान घेणारे फक्त आंग्ल भाषा शिकायचे. वाणिज्य वाले अधिकान्श विद्यार्थी जास्त मार्क्स मिळतात म्हणून संस्कृत भाषा घायचे. उरलेले आमच्या सारखे हिन्दी हा विषय घ्यायचे.
- 1 of 370
- next ›