जे न देखे रवी...
चक्र
कवीने वाचावे
वाचले साचावे
वाचले, साचले
साचले, सुचले
आतल्या आचेच्या
प्रखर धगीत
प्रज्ञेच्या मुशीत
शब्दांच्या साच्यात
अल्लाद ओतून
पाचही प्राणांची
पाखर घालून
उत्फुल्ल, उत्कट
प्रतिभा शिंपून
वाटून टाकावे
पुन्हा एकदा
कागद कोरा ~
सृजन चक्राचा
नवीन फेरा
इंद्रायणीकाठी
इंद्रायणी काठी
सुंदर कुंडमळा
वैष्णवांचा मेळा
दाटतो इथे....
पावसाची झडी
इंद्रायणी दुथडी
वैष्णवांची दाटी
इंद्रायणीकाठी......
एकच तो सांधा
वैष्णवांचा वांधा
आड्याल पड्याल
कसे जावे....
विकांती आकांत
एक्याजागी दाटला
सहावेना भार
वैष्णवांचा....
जरासे दोन घोट घेऊन लिहावे .. ..
जरासे ............ दोन घोट घेऊन लिहावे
मिसळपावच्या तर्रीचे गुणगान करावे.
जरासे ............ दोन घोट घेऊन लिहावे
पादावे पण मिसळपाव खाऊन नांदावे
जरासे, दोन घोट घेऊन हवे ते लिहावे
कवितांची प्रेर्ना नमुद करणे कविला
अवघडावे असे लिहावे
मिसळपावच्या तर्रीचे गुणगान करत लिहावे
जरासे ............ दोन घोट घेऊन लिहावे.
चा-वट पॉर्निमा!
तिचे बोलणे खरे करते
ती असे नखरे करते
पिझ्झा बर्गर नेहेमीचे पण
जेवण सुद्धा बरे करते
राग नक्की झूठ असावा
प्रेम बहुदा खरे करते
मिठी मध्ये घेते आणिक
हट्ट सारे पुरे करते
शाळेचा पहिला दिवस...
उन्हाळ्याची सुट्टी संपली. शाळा सुरू झाल्या. वसंत ऋतूत जशी पालवी फुटते ,आनंदाचे वातावरण निर्माण होते तसाच उत्साह, उर्जा शाळेतल्या मुला मुलीं मधे असतो. आई बापाची लगबग,तगमग, व मुलांचा उत्साह बघताना काही पंक्ती सुचल्या.मोठी मुले आपापल्या मित्रांबरोबर पुनर्भेटीचा आनंद घेत होते तर पहिल्यांदाच जाणारी,छोटी आई बापाला बिलगुन होती.
न्यायाधीश 'कॅश'वंत वर्मा...
घ्या कविता...
'कॅश'वंत वर्मा,
भोग आता कर्मा,
महाभियोगधर्मा
सामोरी जा ||
जर दिला राजीनामा,
तर नाही काजीनामा,
सांग तुझा कारनामा,
निवृत्ती जा ||
न्यायाधीशाच्या घरी रोकड,
आता तो शोधतो बोकड,
जो घेईल खांद्यावर जोखड,
वाचवण्या ||
संसदेत घेराव,
मांडला ठराव,
तरी हे राव,
ढिम्म नाही ||
त्रिमितीच्या तुरुंगात
त्रिमितीच्या तुरुंगात
घुसमटे जीव ज्यांचा
उघडीन त्यांच्यासाठी
मार्ग चवथ्या मितीचा
कळसा नंतर पाया
तिथे नियम असतो
कार्यकारण भावाचा
जाच जराही नसतो
स्थळ-काळात तिथल्या
पेव खाच खळग्यांचे
उतरवी वर्तमान
भूत वेडे भविष्याचे
दोर परतीचे मात्र
नाही कापणार नक्की
आपापल्या कोठडीची
खूण ध्यानी ठेवा पक्की :)
ओलसर क्षण...
पावसाची सुरुवात
नेहमीच अनाहूत असते —
नवे नभ, जुना ओळखीचा ओलसर वास घेऊन येणारा वारा,
अन् अवचित उगम पावलेली नवीन आठवण,
जशी एखादी शब्दावाचून उमजलेली कविता,
जी वाचली नाही,
पण आत कुठेतरी कायमची ठसलेली आहे.
गवळण
शिणवतो मजला छंद मनाचा
काही सुचेना काम रे,
हरि वाजवी वाजवी ....
वेणू वाजवी वाजवी..
मन रिझवी रिझवी ..
माझे रे....॥
कशी सोडवू जीवास माझ्या
झाली मजला बाधा,
कधी रुक्मिणी कधी भामिनी
मध्यरात्री मी राधा
हरवून गेले मीच मला मी
दे आता आधार रे ॥
हरि वाजवी वाजवी ....।ध्रु।
धडधड होते उरात माझ्या
अंगी भासे कणकण
सुट्टी
सुट्टी
चालत्या घड्ञाळासारखी असावी
बाकीच्या जगाला चालू दिसताना
आत ते नियमीत निवांत
अनवाईण्ड होत असते.
ते इतरांच्या वेळेवर नाही
पळत, इतरांना
स्वतःच्या वेळेवर पळवते.
जेव्हा ते पुर्ण अनवाईण्ड होते
तेव्हा त्याचा आराम चालू होतो
पुन्हा कोणी रिवाईण्ड करे पर्यंत
मागवणे
ते मागत गेले
आम्ही देत गेलो,
ते हागत गेले
आम्ही होतो मेलो ||
लाखो रुपये हुंडा
'कस्पटा'समान दिले,
त्यांचे काम मा(ह )गवणे
आम्ही भरली बिले ||
आता वकील
करतील चारित्र्य हनन,
व्यर्थ ठिकाणी
हृदय गुंतले तन मन||
रात्रंदिन आम्हां ट्रॅफिकचा प्रसंग |
संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांची क्षमा मागून.
रात्रंदिन आम्हां ट्रॅफिकचा प्रसंग |
हॉर्नचे आवाज आणि धूर ||१||
"रोड रेज" चे जीवा होतसे आघात |
तरी दामटतो आपुले वाहन नित्य ||२||
मी म्हणे ह्या प्रदूषणाचिया बळे |
अवघ्यांचे काळें केले तोंड ||३||
चुकलो का मी?
दिवास्वप्न पाहत असताना
अधांतराची भक्कम भूमी
सोडुनी थोडा भटकत गेलो
चुकलो का मी?
वायफळाचा मळा उन्हाळी
मृगजळ शिंपून वाढविला मी
पीक पाखरे खाऊन गेली
चुकलो का मी?
वृत्त, छंद, गण बेड्या तोडून
भ्रमरासम स्वच्छंदपणे मी
फिरता, रेखीव वाट विसरलो
चुकलो का मी?
स्वर आले दुरूनी...विडंबन (सर आले दुरूनी)
विडंबन
सर आले दुरूनी
विझल्या सगळ्या त्या सिगरेटी
सर आले दुरूनी
विझल्या सगळ्या त्या सिगरेटी
सर आले दुरूनी
निघती ठसके जोराचे
तशात घाबरल्या पोरांचे
कुजबुजही थांबली पोरींची
पाचावर बसली सगळ्यांची
ऐशा रमलेल्या त्या स्थानी..
तीट
ओथंबल्या नभाखाली
भारलेली हवा
सोसाट्याच्या वाऱ्यामध्ये
सैरभैर थवा
गर्जणारा मेघ शिंपे
सृजनाचा ठेवा
वीज ओढी कड्यावर
ओरखडा नवा
काजव्यांच्या ठिणग्यांचा
पानोपानी दिवा.
आरस्पानी स्वप्नी सांगे
शकुनाचा रावा,
"दृष्टावल्या भवताला
काळी तीट लावा "
आजीच्या घरातली गंमत
एक चिमणी, दोन चिमणी,
तीन चिमण्या आल्या दारी,
पटापटा चोचीमध्ये,
धान्य घेऊन गेल्या घरी ।।
आजी म्हणाली चिमणी बाई,
आज का ग तुझी घाई ?,
चिमणी म्हणाली टाकून दाणा,
आज जायचयं एका लग्नाला ।।
घरी जाते, नाश्ता करते,
घालते पोरांना ही जेवायला,
पोरांची नाटकं रोज नवी,
कशी पुरवावी सांगा मजला? ।।
(ढू आय डी)
हे काव्य म्या अल्पमतीने केवळ मनोरंजन म्हणून खरडले आहे.. वेळोवेळी धारातिर्थी पडलेल्या आय डीं शीं याचा बादरायण संबध जोडू नये,जोडल्यास कवी जबाबदार नाही.
एक ढू आय डी द्या मज आणून
शिंपीन तो मी स्व प्रतिसादाने
खोडून काढीन सारी वचने
सार्या धाग्यांची वाट मी लावीन
कृष्णविवर
शतसूर्यांची जळती बिंबे
गिळुनी टाकण्या कृष्णविवर हे
स्थळकाळाची अदय शृंखला
तटतट तोडून हिंडत आहे
क्षुधा अपरिमित अंतर्यामी
धगधग पेटून उठली आहे
आदिम स्वाहाकार सूक्त का
पुनश्च अविरत गुंजत आहे?
विज्ञानाचे नियम तोकडे-
विपरित त्यांच्या घडते आहे
भवताला घोटात गिळुनिया
कृष्णविवर हे हिंडत आहे
राजा माझा
तोरणा, राजगड, रायगड, प्रतापगड
सहयाद्री असो वा सागरी
राज्य करतो, राजा माझा ||
शाहिस्ते खान, अफजल खान, मानसिंग, इंग्रज
देशी असो वा विदेशी
जिंकतो सगळ्यांना, राजा माझा ॥
दुर्जनांचा विनाशी, सज्जनांचा कैवारी
रयतेला न्याय देतो
सर्वांसाठी समान, राजा माझा ||
लैराईदेवी जत्रा चेंगराचेंगरी
हिंदुस्थानात सर्वात स्वस्त गोष्ट
माणसाचा जीव.
रोज मरताहेत अकाली
कशी करावी कीव?
गोवा,शिरगाव येथील लैराईदेवी जत्रा
जमले होते 40 हजार नऊ शे सतरा.
गेले होते आशीर्वाद घेण्या,
मिरवणुकीत सहभाग देण्या.
करण्या कुटुंबाची हौस
आणि मुलांची थोडी मौज.
मिरवणुकीदरम्यान,
एका ठिकाणी उतार,
लोकांना नाही कळले
ना रांग, नाही कतार
- 1 of 467
- next ›