जे न देखे रवी...
तुकाराम बीज सोहळा...
तुकाराम बीज सोहळा...
(375 वर्ष पूर्ण सोहळा )
तीर्थ देहू,
झाले सज्ज
बीज आज,
तुकाराम ।।
त्रिशतकोत्तर,
अमृतमहोत्सव,
हा सण उत्सव,
देहू क्षेत्री ।।
बीजसोहळा,
टाळ मृदंग,
भाविक दंग,
विठूनाम ।।
लाखो भाविक,
फुलांची सजावट,
दु:खाची वजावट,
नाचू रंगे ।।
अभ्यासोनी मग ...
"अभ्यासोनी मग | प्रकटावे" ऐसे
कुण्या रामदासे | सांगितले
"दिसामाजी काही | तरी ते लिहावे
प्रसंगी वाचावे | अखंडित"
असेही वदले | तेव्हा रामदास
मना उपदेश | करताना
आता मला सांगा | लिहिणे, वाचणे
अभ्यास करणे | कोणा झेपे?
अभ्यास कशाला | प्रकटण्या आधी?
इंटरनेट हाती | असताना !
नाराजीनामा
अखेर ते घडले
दागी मंत्री पडले ।।
मंत्रिपदाचे ते कवच,
भ्रष्टांना असते हवंच ।।
कवच असता
न्याय ओलीस,
कवच नसता
ओढतील पोलीस ।।
म्हणे फोटो पाहून
हेलावले,
राजीनाम्याला
पेन लावले ।।
पोलीस,राजकारणी,
मीडिया, डॉक्टर, न्याय,
सर्वांची आहे मिलीभगत,
वोटर जनता पाहतेय
भांबावल्यागत ।।
दिसे ची ना
प्रसंग बाका,
वाल्या च आका,
दिवसा डाका,
दिसेचीना।।
पवन चक्की,
जेल ची चक्की,
गोष्ट पक्की,
होईचिना।।
सरपंच,
रंगमंच,
भ्रष्ट संच,
न्याय चि ना ।।
दागी मंत्री,
गुन्हे जंत्री,
राजीनामा,
मागेचीना।।
पळालं आंधळं,
पोलीस पांगळं,
दिसतंय सगळं
सापडेचीना ।।
लाडकी झाली दोडकी...
लागली कडकी,
घटली लाडकी ।।
9 लाख अपात्री,
135 कोटी/महिना
खर्चाला कात्री ।।
लाडकी बहिणीमुळे जिंकले,
आता माशी शिंकली ।।
चारचाकी नाहीना,
कितीउत्पन्न महिना ?।
आला 'त्यांचा ' आदेश,
आता तपासा निकष ।।
गरजू बहिणी राहूद्या
अपात्र बहिणी जाऊद्या ।।
म्हणे वेळ कमी होता,
ना केलाआधार लिंक कोटा ।।
सतारीचे बोल
जरा सोडला लगाम ढिला,
अंग प्रत्यंगाने संकेत दिला.
हळूहळू कुरकूर करू लागलं.
गोबरे झाले गाल,टम्मं पोट फुगलं.
हात पायाच्या झाल्या काड्या,
कांट्यांनी चढल्या नव्वद माड्या.
कधी नव्हे तो पिंगळा साद देत होता.
दिवसा घोरासुर कुस्ती खेळत होता.
कधी माझ्या भोवती जग फिरले,
तर कधी डोळ्यासमोर तारे विरले.
परीक्षा...कुणाची ?
परीक्षा...कुणाची?
'सी ई ओ'समोर पडला
कॉप्यांचा पाऊस !
डोके गरगरले,संताप
आला भाऊस ।।
'विकास मीना'- करारी,
मारली धडक भरारी ।।
बारावी चा गणिताचा पेपर,
खोके भरून कॉप्या,गाईड,
पाहून आले फेफरं ।।
परीक्षाकेंद्रातून अनेकांनी
मारली धूम,
कॉपी फॅक्टरी हँडलूम ।।
शब्दांचा दंश जिव्हारी
शब्दांचा दंश जिव्हारी-
होता मी विमुक्त झालो
माथ्यावर सूर्य तरीही
काजव्यासवे झगमगलो
शब्दांची अविरत गाज
भवताल भारूनी उरली
नादावर अनुनादाची
हलकेच लहर शिरशिरली
शब्दांचा अबलख वारू
चौखूर उधळुनी गेला
अर्थाचा लगाम लहरी
हातून कधीचा सुटला
घरगुती हिंसा व पोटगी
https://marathi.freepressjournal.in/maharashtra/court-slaps-dhananjay-mu...
घ्या कविता
faster than instant coffee
कुणाची घ्यावी बाजू,
confuse झाला तराजू ।।
आयकर सुट
साबुदाण्याची खिचडी, त्यावर शेंगदाण्याचं कूट
निर्मला ताईंनी दिली, बारा लाखांपर्यंत आयकर सूट!
पोळीत लपला आलूवडा, चहा कपभर खास
बजेटची चर्चा झाली, आता सगळं झालं बास
खिशात राहतं थोडं, केला सगळ्यांनी नवस
निर्मला ताईंनी बनवला सगळ्यांचा हसरा दिवस
साबुदाण्याची खिचडी, त्यावर शेंगदाण्याचं कूट
निर्मला ताईंनी दिली, बारा लाखांपर्यंत आयकर सूट!
मौनी कुंभ
मोक्षाची ती घाई,
संगम त्रिवेणी नेई,
मौनी डूबकी देही,
अमृतस्नान ।।
नेत्यांचे स्नान,
गर्दी ही बेभान,
गमावले प्राण,
निष्पाप तीस ।।
सर्वा तीच वेळ,
मग तोच खेळ,
कसा करील मेळ,
प्रशासन ।।
मौनी अमावस्या,
मोक्षाची समस्या,
कीव आली मत्स्या,
तैरतांना।।
खरा तरुण !
(सासवड - कस्तुरबा आश्रम येथील एका
सांस्कृतिक कार्यक्रम प्रसंगी , एका ८५ वर्षाच्या आजोबांनी खणखणीत आवाजामध्ये गीतरामायणातलं एक गाणं सादर केलं . त्यावेळी माझ्या मनात त्यांच्या माझ्यातल्या तुलनेबद्दल जी भावना झाली, ती मी या कवितेतून मांडलेली आहे . )
------------------------------
काठावर अज्ञाताच्या
जिज्ञासेच्या ज्योतीवर
फुंक अज्ञाताची येते
ज्ञेय-अज्ञेय द्वैताने
तर्कबुद्धी काजळते
कृष्ण ऊर्जा, कृष्ण द्रव्य,
संज्ञा पल्याड तर्काच्या
हुलकावण्या देतात
काठावर अज्ञाताच्या
किती कोडी अवघड
चराचरात दाटती
वाटे एक सुटले तो
नवी पुढ्यात ठाकती
बडिशोप
बडीशोप काही गोड नाही,
ती फार मोठी खोडंही नाही .
तंबाखू सारखी वाट लावणारी,
ती सर्वांगिण ओढंही नाही .
हातावर चोळावी लागत नाही. चुन्यासह पोळावी लागत नाही ! तोंडामध्ये कडेला ठेवून, तासंतास घोळावी लागत नाही !
तशी ही सोपी आहे
साध्या सहज स्वभावाची
कुणाशी मैत्री / वैर / ना प्रेम
जो हातावर घेइल , ती त्याची !
गाव सोडले होते
बिनधास्त उभा तो वाडा हळहळणारा
वर पिंपळ थकला तेथे सळसळणारा
ते जळमट काही प्रवेशद्वारापाशी
तृण उंच वाढले बिलगे तरु पर्णांशी
पोपडे जरासे भिंतीवरती ओले
अन धाप टाकुनी उदास खिडकी बोले
निखळले कसे हे अलगद वासे काही
ते वैभव सारे जिथे द्यायचे ग्वाही
शब्दांचा अचपळ पारा
कवितेच्या वाटेवरती
कधी झुलतो मोरपिसारा
मोहवितो पांथस्थांच्या
पाणवल्या, दिपल्या नजरा
कवितेच्या वाटेवरती
कधी विफल, विरागी राख
दडलेले त्यात कधीचे
धुमसते निखारे कैक
कवितेच्या वाटेवरती
अर्थाचा वर्ख निखळतो
शब्दांचा अचपळ पारा
वाटेवर विखरुनी जातो
गुरू आतला
नसे भोवती छत्रछाया वडील
गुरू आतला सावली ती वसे
नसे सोबती पितृमाया वडील
गुरू लाभला प्रेम पाठी तसे
उरी पोकळी पोरकी राहिलेली
भरूनी जिवाला मनी पाविले
नदी कोरडी आटली वाहिलेली
भिजूनी किनारा तृषा भागिले
वाहुनी तू रहावे
नसे सोय बोलून सत्यात काही
जगाला हवे ते असत्यात राही
उगा मौन राखून विश्वा पहावे
वहात्या जगा वाहुनी तू रहावे
घळे आसवांतून पाषाण लेणी
मुकी साचताना उरी दैव देणी
अबोलाच बोलून गाईल गाणी
स्थितप्रज्ञ राहूनही काळ वाणी
देणाऱ्याचे हात घ्यावे
लोकलच्या फूटबोर्डाच्या सांडव्यावरून
फलाटावर धो धो कोसळणाऱ्या
बेफाम गर्दीचा बेहाल
थेंब बनायची सवय करतानाच्या काळातली गोष्ट...
तो परत आला...
जातीयवादींचे प्राण झाले कासावीस,
परतून पुन्हा आलेच देवेंद्र फडणवीस !!
अपमानाचे पचवले हलाहल,
शांत राहिले, पाहून कोलाहल ।।
जातियवादींचा विषारी अपप्रचार,
देवेंद्र फक्त महाराष्ट्र विकासविचार ।।
अति केला द्वेष कारण ब्राम्हण,
आता तरी हा सक्षम आहे म्हण ।।
चीत केले देवाने देशद्रोही धार्जीणे,
लाजीरवाणी त्यांची हार व जीणे ।।
- 1 of 465
- next ›