विज्ञान

झोप (Need, Deprivation and Abstinence thereof)

नमस्कार,

माझे वय आजमितीला सुमरे २१ वर्ष आणि ४.५ महिने आहे. मला सुमारे ५ वर्षांपासून रात्री काम करणे आणि दिवसा झोपणे, अशा (सामान्यतः अनारोग्यकारक समजल्या जाणार्या दिनक्रमाची ) सवय लागली आहे. तर रात्रीची झोप येण्यासाठी काय करावे? अशा प्रकारचे अनैसर्गिक वेळापत्रक असल्यामुळे शरीरावर होणारे दूरगामी परिणाम यांची कृपया माहिती द्यावी.

--
आपला नम्र,
इंटरनेटप्रेमी, मुंबई, महाराष्ट्र राज्य.

नोकिया E63 आणि वायफाय राउटर

नोकीया E63 वायफाय राउटरशी कसा कॉनफिगर करायचा हे कुणाला ठाउक आहे का? माझ्याकडे नेटगिअरचा राउटर आहे.

विंडोज व्हिस्टा मध्ये काही गेम्स चालत नाहीत त्यासाठी काय करावे? व्हिस्टा सोबत आणखी एक ओ. एस. कशी टाकावी?

काही गेम्स मी जेव्हा "विंडोज व्हिस्टा" मध्ये इंन्स्टॉल करायला जातो, तेव्हा एक मॅसेज येतो की, धीस इज नॉट अ वॅलीड वीन ३२ ऍप्लिकेशन. त्यासाठी मी एक "डॉस बॉक्स" हा फ्री प्रोग्रॅम टाकून पाहिला, तरीही ते गेम रन करता येत नाही. पण, व्हिस्टा मध्ये "डॉस बॉक्स" च्या आधारे "डॉस गेम्स" चालतात (उद- डेव्ह, बायो-मेनॅस, लायन कींग वगैरे).

पण, विंडोज व्हिस्टा" मध्ये नीड फॉर स्पीड, तसेच व्ही कॉप वगैरे हे गेम्स चालत नाहीत. त्यासाठी काय करावे लागेल?

किंवा, मग व्हिस्टा असतांना आणखी एक जुने विंडोज चे व्हर्जन (एक्स पी किंवा ९८) वेगळया ड्राईव्ह वर मी ट्राय केले पण ते होत नाही.

मग जुने गेम्स टाकण्यासाठी काय करावे?

दोन्ही ओ. एस. (ऑपरेटींग सिस्टीम) हव्या असतील तर काय करावे?

होमींग पिजन - कुशल वाटाड्या कबुतर

कबुतराच्या अचूकतेने घरी परतण्याच्या कुशलतेची माहिती मानवाला खूप आधी पासुन होती असे दिसते. ह्या कुशलतेचा वापर मानवाने लगेचच केला. ज्यांना हे कळाले की, कबुतरांमधेच असे काहीतरी विषेश आहे त्यांची स्तुती केलीच पाहिजे. इजिप्त्शियन संस्कृतीत कबुतरांचा वापर झाल्याचे दाखले आहेत. भारतीय पुराणात काही दाखले आहेत की नाही माहीत नाही.

दुसऱ्या विश्वव्यापक युद्धात जर्मनीने कबुतरांचा वापर निरोप्या म्हणून तर केलाच पण त्यांच्या मानेखाली बटू-क्यामेरे लावून चित्रफित मिळवली व युद्धात ह्या माहितीचा वापर केला. भारतात ओरीसातील पोलिस खाते कबुतरांचा वापर दुर्गम भागातील ख्याली-खुशाली कळवण्यासाठी अगदी अलिकडे पर्यंत करत होते पण आंतर्जालाच्या माध्यमाने ती गरज आता उरली नाही.

ह्या कबुतरांबद्दल माझे कुतूहल परवा चाळवले गेले ते गुगलच्या सर्च इंजिनबद्दल आमची चर्चा सुरु होती तेव्हा. एकाने माहिती पुरवली की, गुगलच्या ऑफिसमधे काही कबुतरे मुद्दाम "पाळली" आहेत व त्यांच्या ह्या घर शोधण्याच्या कुशलतेने प्रोत्साहन मिळावे अशी त्यांची धारणा आहे. मला कौतुक तर वाटलेच, पण ते कबुतर पाळण्याचे आणि त्यामागची भूमिका ऐकून नव्हे तर, कबुतरांची घाण कोण साफ करत असेल आणि एअर कुलिंग सिस्टीममधून त्याचा वास सर्वत्र पसरु नये म्हणून घेतलेली असावी त्या काळजीचे.

कबुतरं अर्थातच आपल्याला हव्या त्या व त्यांच्या दृष्टीने नव्या ठिकाणी जाऊ शकत नाहीत- त्यांना घरी परतायची कला येते. काही ठिकाणी कबुतरांच्या शर्यतीही लावल्या जातात व १८०० किमी पेक्षा जास्त अंतर त्यांना पार करुन अचूकतेने व वेगाने परतायचे असते. मालकाला भरगोस बक्षीस मिळते. अर्थातच हे खूपच अचंबित करणारे आहे कारण, त्यांची जी काही विदा साठवण्याची पद्धत आहे त्याच्या वापराने ते १८०० किमी पर्यंतचा विदा ते लक्षात ठेवू शकतात व विदा परत मिळवून त्याचा वापर करु शकतात.

मानवाला त्यांच्या ह्या कुशलतेचे नेहमीच कुतूहल वाटत आले आहे व अनेकांनी त्यांच्या ह्या वाटाडेगिरीचा छडा लावण्यासाठी अनेक प्रयोग केले आहेत. काही प्रयोगांमधे त्यांना भूलीचे औषध देऊन, तर काही वेळा दोन्ही- भूल व झाकून नेऊन त्यांच्या घरापासून लांब नेले तरी ते अचूकतेने घरी परतले. असा एक समज आहे की ते त्यांच्या घराचे ठिकाण कोऑर्डीनेट (अक्षांश-रेखांक्ष) लक्षात ठेवतात व त्यासाठी ते सूर्याच्या फिरण्याच्या कक्षाच्या/ स्थितीचा अथवा त्याबरोबरच पृथ्वीच्या चूंबकीय शक्तीचा वापर करतात.

प्रवास करतांना ते खूपसे सरळ रेषेत ऊडतात, जणू काही त्यांना त्यांच्या घराच्या ठिकाणाबद्दल आत्मविश्वास असतो. त्यांचा मागोवा विमानाने केला गेला आहे व त्यातून असे निश्कर्ष काढले गेले आहेत. घरी परततांना ते दिवसाच उडण्याचे पसंत करतात (शिकवले तर रात्रीही ऊडतात), जोराचा पाऊस असेल तर विश्रांती घेतात व वाऱ्याची दिशा कशीही असली तरी ते उडू शकतात असे दिसून आले आहे.

एकावेळेस एकापेक्षा जास्त कबुतरे त्यांच्या घरापासून दूर नेऊन जर एकाच वेळेस सोडली तर सगळी कबुतरे घरी परततात पण थोड्या विखूर्लेल्या वेगळ्या वाटा प्रत्येक कबुतर निवडते. (ते रांगेने एकामागोमाग ऊडत नाहीत).

अनेकांचा कबुतरांच्या ह्या शक्तीचा शोध घेण्याचा प्रयत्न आजही चालू आहे पण अजुन खात्रीने कोणीच काही सांगू शकलेले नाही. मला वाटते की, कबुतराला बोलता आले तरच त्या रहस्याचा उलगडा होईल.

सुर्यग्रहण पाहण्याचा सोपा व धोकादायक नसणारा मार्ग कोणता?

सुर्यग्रहण पाहण्याचा सोपा व धोकादायक नसणारा मार्ग कोणता?

सुर्यग्रहण नुसत्या उघड्या डोळ्यांनी पाहू नये. (ग्रहण नसते तेव्हा व ग्रहणात असा काय बदल होतो जेणेकरून ग्रहणकाळातच सुर्याकडे उघड्या डोळ्यांनी बघू नये ते?) नासाच्या या साईटवर ते चांगले स्पष्ट केले आहे पण त्याचे मराठीकरण काय आहे?

आज होणारे सुर्यग्रहण पाहण्याचा सोपा व धोकादायक नसणारा मार्ग कोणता?
१) ग्रहणाचे चष्मे (ते बनावट कंपनीचेही किंवा चायनीज पण मिळू शकतात.)
२) पाण्यात / कागदावर ग्रहणाची प्रतिमा घेवून
३) पिनहोल कॅमेरा बनवून
४) डिजीटल कॅमेरॅच्या स्र्किन मध्ये
५) दुरदर्शनवर Smile

माझ्या मते सुर्यग्रहण हे डिजीटल कॅमेरॅच्या स्र्किन मध्ये बघितले असता डोळ्यांवर होणारा परिणाम हा सर्वात कमी असावा व त्यात ग्रहणही चांगले व रंगीत दिसेल.
आपले मत काय? आदीती बै काय म्हणतात.

कृपया अवांतर चर्चा न करता वेगवान, सुयोग्य, उद्बोधक उत्तर अपेक्षीत.

सिक्स सिग्मा

सिक्स सिग्मा म्हणजे काय?

http://en.wikipedia.org/wiki/Six_Sigma इथे थोडी माहिती आहे.

(डिजीटल किंवा साधी) फोटोग्राफी - एक कला की विज्ञान ?

(डिजीटल किंवा साधी) फोटोग्राफी - एक कला की विज्ञान ?

डिस्क्लेमर : या काथ्याकूटात मिपावर असणार्‍या फोटोग्राफरांना व कलादालनात फोटो टाकणार्‍यांना दुखावण्याचा अजिबात हेतू नाही. या बाबत मागेच मी एका धाग्यात या बद्दल चर्चा करण्याबाबत विचारले होते.

साधा फिल्मवरचा फोटो घ्या किंवा आताचे डिजीटल कॅमेरॅवरचे काढलेले फोटो घ्या, फायनल रिझल्ट (फोटो) तुमच्या हातात येईपर्यंत तुम्हाला कोणतेतरी तांत्रीक हत्यार वापरावी लागते किंवा त्या हत्यारांद्वारे केलेली क्रिया वापरावी लागते. यात ज्याचा फोटो काढायचा आहे तो ऑब्जे़क्ट, फोटोग्राफर, फोटो कॅमेरा, फोटो डेव्हलप करण्याची रसायने, त्यातील केमीकल क्रिया, प्रिंटींग आदी क्रिया येतात.

फोटोग्राफीच्या जन्मापासूनच फोटोग्राफी ही एक कला आहे की एक तांत्रीक क्रिया आहे या बद्दल वाद आहे. काही लोकांच्या मते कलाकारांचे (चित्रकार) पोट भरण्याचा मार्ग फोटोग्राफीमुळे खुंटला गेल्याने ते फोटोग्राफी ही कला नाही अशी तक्रार करतात असे म्हणणे आहे. इतिहास तपासला असता काही समूदायाने (चित्रकारांनी) या बाबत आपला आक्रोश देखील जाहिरपणे दाखवला होता.

आता असे समजा की तुम्हाला एक फुलपाखरू आवडले. त्याचे तुम्ही ५/६ (फिल्मअसलेल्या व डिजीटल कॅमेरॅने) फोटो काढले. त्यातला एक चांगला फोटो तुम्ही डेव्हलप केला व डिजीटल फोटो सॉफ्टवेअरने प्रक्रियेने उन्नत केला. त्याच फुलपाखराचे तुम्ही मेमरी ड्रॉइंग काढले. या दोन्ही किंवा तिनही क्रियेत कोणती क्रिया त्या माणसाची जास्तीत जास्त कलेकडची नजर दाखवते? प्रत्येक जण जसा विचार करेल त्या त्या प्रमाणे त्याचे उत्तर येईल. यात अनेक वादही होतील.

अगदी उलट विचार केला तर माझ्या पाहण्यात पुर्वीचे चित्रकार होते ते आता कॉम्पुटर वापरून आपली चित्रकारीतेचा व्यवसायात रूपांतर करणारे लोकही आहेत. त्यांच्या बाबतीत कला ही पैसे कमवण्याचे माध्यम झालेले आहे.

काही जणांचे असेही म्हणणे आहे की केवळ काढलेले फोटो जसेच्या तसे (प्रोसेस न करता, कोणताही लाईट, कॉस्चूम, सॉफ्टवेअर टचींग न करता ) बघीतले /वापरले तरच ती एक कला असे आहे.

माझ्या मते फोटोग्राफी एक आनंद देणारे, भूतकाळ सांभाळून ठेवणारे एक वैज्ञानीक माध्यम आहे तर चित्रकला हीच त्याची मुळ जननी आहे व ती कला आहे. फोटोग्राफी जोपर्यंत काही प्रोसेस न करता वापरात येते तोपर्यंत काही प्रमाणातच फोटो काढणार्‍याच्या अँगलने व तो फोटो कलेच्या अँगलने बघणार्‍याच्या अ‍ॅंगलने कला आहे. अन्यथा ती एक केवळ वैज्ञानीक प्रक्रिया आहे.

विज्ञान आणि चमत्कार या ग्रंथाच्या वाचकांना

शब्द गारवाच्या व मिपावाचकांना लेखक प्राचार्य अद्वयानंद गळतगे [1] आपल्या विज्ञान आणि चमत्कार या ग्रंथाच्या वाचकांना तो वाचनाच्या आधी महत्वाची सूचना देऊ इच्छितात.

कोणत्याही नैसर्गिक घटनांप्रकारांना(natural phenomena) – मग ते घटनाप्रकार कितीही अप्रिय असोत किंवा कितीही विलक्षण(बुद्धीली न पटणारे)असोत- विज्ञान निर्भयपणे सामोरे जाते व त्याविषयीचे सर्व पुरावे निःपक्षपातीपणाने तपासते, असे मानणाऱ्या शुद्ध विज्ञानवादी (विज्ञानावर शुद्ध प्रेम करणाऱ्या) लोकांसाठी हा ग्रंथ लिहिला आहे. त्यामुळे जो लोक स्वतःला विज्ञानवादी म्हणवून घेतात पण विज्ञानाला अशा (बुद्धीला न पटणाऱ्या) घटनांचा विचार करण्याची आवश्यकता नाही असे मानून त्या घटनांच्या खरेखोटेपणा विषयी पुराव्याची तपासणी करण्याकडे दुर्लक्ष (किंवा डोळेझाक) करतात ते लोक वैज्ञानिक दृष्ट्या आंधळे (scientifically blind) ठरतात; आणि जे लोक ही (पुरावे तपासण्याची) आवश्यकता उघडपणे मान्य करतात पण प्रत्यक्षात ती तपासणी न करताच ते घटनाप्रकार खोटे म्हणतात किंवा त्याविषयी संशयवादी भूमिका जाहीरपणे स्वीकारकतात, ते लोक वैज्ञानिकदृष्ट्या अप्रामाणिक (scientifically Dishonest) ठरतात; आणि जे लोक अशा प्रकारांच्या (खरेखोटेपणाविषयीच्या) पुराव्यांची तपासणी करतात, पण ती विज्ञानलाजेस्तव केवळ उपचार म्हणून वरकरणी असते व आतून ते घटनाप्रकार खोटे ठरवण्यासाठी त्यांच्या तपासणीत(त्या घटनांची खोटी उपपत्ती देऊन) लबाडी करतात (मग त्याची कारणे काहीही असोत) ते लोक वैज्ञानिकदृष्ट्या दुटप्पी (scientifically double-dealers) ठरतात. अशा या तीनही प्रकारच्या लोकांना – म्हणजे ‘वैज्ञानिक आंधळे’, ‘वैज्ञानिक अप्रामाणिक’ आणि ‘वैज्ञानिक दुटप्पी’ यांना-प्रस्तूत ग्रंथावर कोणत्याही प्रकारचा अभिप्राय जाहीरपणे व्यक्त करण्याचा शास्त्रीय अधिकार नाही याची वाचकांनी कृपया नोंद घ्यावी. जे लोक वरील तिन्ही प्रकारात बसत नाहीत त्यांनी संपूर्ण ग्रंथ वाचल्याशिवाय आपला अभिप्राय व्यक्त करू नये अशी विनंती आहे. [2]

[1] साधारण ७८ वर्षाचे श्री. अद्वयानंद गळतगे निवृत्त प्राचार्य असून कर्नाटकातील निपाणीपासून २५-३० किमी दूर भोज या खेड्यातील त्यांच्या मळ्यात वास्तव्य करतात. आज (दि ८ डिसेंबर २००९ रोजी) त्यांच्याशी प्रत्यक्ष बोलून (नवा फोन नंबर ०८३३८-२९३३९९) त्यांनी मला त्यांच्या या व अन्य ग्रंथातील उद्धृतांना यावेळी सढळपणे वापरण्याची परवानगी दिलेली आहे. त्यानुसार मी (शशिकांत ओक) त्यांच्या समारोपातील वरील उरलेले विष्लेषण टाईप करून येथे डकवत आहे. लेखक आडगावी असल्याने त्यांच्याशी ईमेलने संपर्क त्यांच्या निपाणीतील चिरंजीव प्रो. वेदान्त यांच्यातर्फे करावा लागतो. म्हणून त्यांचे प्रतिसाद मिळायला ८-१० दिवसांचा विलंब होण्याची शक्यता आहे. शिवाय त्यांना मराठीमधून ‘टाईपकरून उत्तरे पाठवायला शक्य होणार नाही म्हणून इंग्रजीतून उत्तरे पाठवू शकेन’ असे त्यांचे म्हणणे आहे. याची सर्वांनी नोंद घ्यावी.
[2] वरील तीनही प्रकारच्या लोकांची वर्तणूक विज्ञानविरोधी व म्हणून ते एक प्रकारचे ‘वैज्ञानिक पाप’ असले तरी पहिल्या दोन प्रकारचे ‘वैज्ञानिक पाप’ विज्ञानरुपी काशीत जाऊन (म्हणजे वैज्ञानिक पुरावे तपासून) धुतले जाऊ शकते. पण शेवटचे ‘वैज्ञानिक पाप’-म्हणजे ‘वैज्ञानिक दुटप्पीपणा’ – हे विज्ञान रुपी काशीत जाऊनच केलेले असल्यामुळे ते कशानेही धुतले जाऊ शकत नाही विज्ञान फसवणुकीवर कधीच चालू शकत नाही, हे त्याचे कारण आहे. वास्तविक ‘वैज्ञानिक दुटप्पीपणा’ हा शब्दप्रयोगच वदतोव्याघाती (self contradictory) आहे. कारण विज्ञान आणि फसवणूक या परस्पर विरोधी संकल्पना असून त्या एकत्र कधीच नांदू शकत नाहीत.

संपुर्ण ग्रंथ भाग १ पाने २२८ व भाग २ पाने ४६७ आपण येथे भाग १येथे भाग २ वाचावा
सादरीकरण शशिकांत

एअर ट्रॅफिक कंट्रोल

तीनेक वर्षांपुर्वी एअर ट्रॅफिक कंट्रोल ह्या सिस्टीमच्या एका छोट्या भागाचा अभ्यास करण्याचा योग आला होता. त्यावेळी जवळ-जवळ हजार पानांइतके स्पेक वाचायची, त्या गंजीतून सुई शोधून काढायची कामगिरी टाकण्यात आली होती.

येथे मी लिहिणार आहे ते त्यातील काही मनोरंजक गोष्टींबद्दल, ज्या आपल्या सर्व-सामान्यांच्या आयुष्यात अनेकदा कळत-नकळत प्रवेश करतात. किंबहूना मी असे म्हणेन की, ह्यांच्या शिवाय आपण विमानप्रवास सुखरुप करुच शकणार नाही व विमानप्रवास जरी केला नसेल तर आजपर्यंत आपल्या डोक्यावर भरकटून (सहजा-सहजी) एखादे विमान का आदळत नाही हे समजायला ही माहिती उपयोगी ठरावी. [ही संदेश प्रणालीचा संबंध सिक्रेट एन्क्रिप्टेड मेसेजशी अजिबात नाही]

एअर ट्रॅफिक कंट्रोल सिस्टीम एक काटेकोरपणे तयार केलेली संवादप्रणाली आहे. विमानं, हेलिकॉप्टरं, जहाजं ह्यांना एकमेकांशी तसेच नियंत्रण कक्षाशी सतत संपर्कात राहण्यात तसेच सुचनांची देवाण-घेवाण करण्यास उपयोगी पडेल अशी ही प्रणाली वर्षानुवर्षांच्या अनुभवातून (गंभीर चुकांमधून धडे व बोध घेतघेत) तयार झाली आहे.

ह्याचा एक भाग म्हणजे प्रत्येक विमानं, ई ना विशिष्ठ नावे देणे- ह्याची पद्धत प्रत्येक देशासाठी ठरवण्यात आली आहे.
दुसरा भाग एकमेकांशी संवाद साधतांना जी उपकरणं वापरतात त्यांच्या प्रमाणीकरणाबद्दल बोलतो- रडार, रेडिओ फ्रिक्वेन्सी, ई,

तिसरा भाग, संवाद काय साधायचा. हा सगळ्यात क्लिष्ट भाग आहे. त्यातील एक प्रकार आपल्या अगदी ओळखीचा आहे. जेव्हा दोन व्यक्तिंना (एक जण नियंत्रण कक्षातला व दुसरा विमानातला) एकमेकांशी प्रत्यक्ष बोलायची वेळ येते तेव्हा ते "आल्फा, बीटा.." असे संबोधन ए, बी,... साठी करतांना आपण ऐकले असेलच. जगभर हेच कॉलसाईन वापरले जातात. त्यांचं बोलण अत्यंत अचूक, खात्रीशीर व्हावे ही त्यातील कल्पना असते. व्यक्तिंना एकमेकांशी बोलण्याची वेळ शक्यतो टाळली जाते, हे सुरक्षेच्या दृष्टीने योग्य नसते कारण ऐकण्या-सांगण्यात होणारा फरक. त्यामुळे जास्तीत-जास्त मदार संगणकीय संवादावर असते. जेव्हा दोन संगणक एकमेकांशी बोलतात व ते त्यातील अर्थ काढून वैमानिकाला सांगतात [आणि त्या उलट], तेव्हा अचूक संवाद साधला जातो.

मिलिटरीसाठी प्रत्येक देश आपापली संदेश प्रणाली करु शकते किंवा ते शक्य नसल्यास नाटो सारख्या संस्थेचे सभासद्स्यत्व घेऊन त्यांची प्रणाली वापरु शकते. तसेच नौदल, वायुदल, भूदल ह्यांच्याशी समन्वय साधण्यासाठी तिघांचीही संदेश प्रणाली एकमेकांना पाठवलेले संदेश उलगडून दाखवण्यात वाकबगार असणे आवश्यक असते. (अमेरीका व्हियेतनामच्या युद्धात जे काही शिकली त्यात हे एक महत्वाचे शिक्षण होते).

पुढे, प्रत्येक विमान रडारच्या कक्षेत असेल तर व बाहेर असेल तर त्यातही कसे संदेश द्यायचे-घ्यायचे त्याचे प्रकार ठरलेले आहेत. एकदाका रडारच्या कक्षेत आले की, त्या विमानाला एक विशिष्ठ पध्दतीने ट्रॅक केले जाते- त्या विमानाचा त्यावेळी अवतीभवती असलेल्या इतर विमानांशी अपघात होऊ नये म्हणून त्यांच्या सतत संपर्क साधणे (संगणकाद्वारे), व वैमानिकाने तो संदेश ग्रहण केला ह्याची नोंद ठेवणे, त्याचे तंतोतंत पालन केले गेले की नाही ह्याची नोंद ठेवणे असे अनेक कामं संगणक बिनबोभट करत असतो.

जर नियंत्रण कक्षाला वैमानिका सांगायचे असेल की, तू आता उतरायला सुरुवात कर, अमुकएक अल्टीट्युडला ऊड, तर ते अशाच "भाषेत" नियंत्रण कक्षाच्या संगणकातून विमानातील संगणकाला पाठवले जाते. तो संगणक त्याचे भाष्यांतर करुन वैमानिकाला कळेल अशा भाषेत त्याच्या पटलावर तो संदेश उमटवतो असे गृहीत धरु. [दोन ड्रायव्हर जसे रस्त्यात भेटले की, ट्र्क मधेच थांबवून खबरबात करतात तसा प्रकार येथे नसतो. नाहीतर, नियंत्रण कक्षातील नियंत्रक, "काय रे, पक्या कसा आहेस, आईने पाठवलेला गाजराचा हलवा मधेच संपवला तर नाही ना? (वाचक आपापले व्हरीएशन येथे टाकू शकतात)" अशा गप्पा मारत असतांना दुसरी दोन विमान एकमेकांना धडकली हे सुध्दा कळणार नाही]

[किंवा अचानक रडारवर नवे विमान दिसले तर, कंट्रोलर रेडिओ घेऊन, "कोण आहेस रे तू, काय काम काढलंस इकडे?" "अरे, मी तुझ्या पुण्याच्या मावशीचा विनय, आलो आज इकडे ड्युटीवर". "अरे, तू आहेस होय, मला वाटलं की कोण आलं". असे संभाषण न होता, विमानाच्या "आयडेंटीफाय", "फ्रेंड ऑर फो" अशा स्वरुपाच्या सुचना कशा पाठवायच्या ह्याचे एक स्पेक असते. तसेच विमान ह्या संदेशांना कशी उत्तरे देईल, म्हणजे ती इथल्या संगणकाला कळतील ह्या सगळ्या गोष्टी ठराविक पध्द्तीनेच पार पाडाव्या लागतात.]

तिसऱ्या भागाबद्दल बरेच बोललो आता रटाळ व्हायच्या आत थांबतो. पण हा विषय इतका मोठा आहे की, एकदा त्याबद्दल वाचायला घेतलं ह्या विषयातील खोलीबद्दल आश्चर्य वाटतं.

चौथा भाग आहे तो नियंत्रकांना प्रशिक्षण कसे द्यायचे, त्यांचे वय काय असले पाहिजे, निवृत्त केव्हा व्हायला पाहिजे अशा नियमांचा.

अशा सिस्टीम जर डेव्हलप (विकसित) केल्या तर त्या टेस्ट कशा करायच्या हा ही एक गुंतागुंतीचा विषय आहे. टेस्टींगच नव्हे तर सिस्टीमचा वापर करतांना छोटीशी चूकही झाली तरी भयंकर विध्वंस ठरलेलाच असतो त्यामुळे प्रत्येक संबंधीत व्यक्तिंवर प्रचंड दडपण असते.

एखाद्याला ह्यात करीयर करायचे असेल तर त्या-त्या पातळीचे प्रशिक्षण देणाऱ्या संस्था अमेरीकेत तसेच युरोपात आहेत. भारतात आहेत की नाही माहित नाही.

कोपनहेगन परिषद

पुढील आठवड्यात कोपनहेगनला भरत असलेल्या जागतिक हवामान बदल परिषदेविषयी माहिती हवी आहे. तसेच काल भारताने आपल्या कर्ब उत्सर्जनामधे २०२० पर्यन्त २०-२५ % कपात करण्याची घोषना केली आहे. त्याचे परिणम काय होतिल ?