इती लेखनसीमा
इती लेखनसीमा
इती लेखनसीमा
जर्द पिवळी विजार, तीतून
द्वार ठोठावत आलेले
आतड्यांतुनी साठलेले
पोटी आवळून धरलेले
संधी मिळाली नाही तेंव्हा
आडोशाला बसण्याची
जे त्याज्य ते त्याग करूनी
मोकलाया दाही दिश्यांची
आधी असं झालं नाही
कधी पिवळं झालं नाही
त्या कातर वेळी मात्र
रोखून धरणं झालं नाही
मग जनाची ना मनाची
कसली लाज कुणाची
निसर्ग-हाकेला ओ देऊन
क्लांत शांत होण्याची
- (साधी सुती विजार घालणारा) द्येस्मुक् राव्
नक्कीच, दिलेल्या तीन लिंकमधील माहितीच्या आधारे एक कविता तयार करण्याचा प्रयत्न मी करत आहे.
**कविता:**
**शीर्षक: 'मिसळपाव' चा गदारोळ**
चार भिडू डावे, उजवेही चार,
कुंपणाच्या वर, दोन भिडू फार.
भिडू भिडतात, त्वेषे परस्परा,
मौज ही इतरा, फुकटची जरा.
राजकारणाच्या व्यतिरिक्त काही,
घडतची नाही, देशात ह्याही.
ऐसा आविर्भाव, भिडू बाळगती,
आता झाले अती, हौस फिटे किती.
अवांछित मजकूर, डोळे फिरवतो,
दुर्लक्ष करणे, उपाय ठरतो.
मिसळपाव चा रस्ता, वळणावळणाचा,
वाद-विवाद, विषय नानाच.
साधारण पस्तीस वर्षे झाली असतील या गोष्टीला
विजा लग्न ठरल्याची बातमी घेऊन आला. आमच्या मित्रपरिवारामध्ये सर्वात लहान. गेल्या पाचेक वर्षात एकेक करून जवळपास सगळ्यांची लग्न होऊन गेली होती. नेहमी प्रमाणे सर्वांनी मुलगी कोण कुठली काय करते अशी सरबत्ती केली. वर पार्टीची मागणी होतीच.
सहज सुचलं म्हणून
( राजकारणसोडून छोट्या चर्चांसाठी)
इतिहास, पुस्तकं, पाककला आणि इतर विषयांची चर्चा खरडफळ्यावर होते आणि मोठमोठे माहितीपर प्रतिसाद खरडफळा साफ झाल्यावर गायब होतात. तर तसे होऊ नये म्हणून हा धागा सुरू करत आहे.
पात्रे:
1. धाग्याबाबा - राजकीय लेख लिहिणारा, वाद निर्माण करण्यात पटाईत
2. प्रथम प्रतिसादक - लेखावर जोरदार समर्थन करणारा
3. द्वितीय प्रतिसादक - लेखावर चिरफाड करणारा
4. वाचक - वादाच्या गोंधळात सापडलेला साधा नागरिक
---
(पडदा उघडतो. एका कॅफेच्या कोपऱ्यात धाग्याबाबा लॅपटॉपवर टाइप करत बसलेला आहे. प्रथम आणि द्वितीय प्रतिसादक फोनवर चर्चा करतायत. वाचक एका टेबलवर शांत बसून वर्तमानपत्र वाचतो.)
---
इस रंग बदलती दुनिया मे ...
मराठवाड्यातील एक लग्न आणि इतर निरीक्षणे
परभणी जिल्ह्यातल्या एका लहानशा गावी, माझ्या आजोळच्या एका लग्नाला यायचं होतं. काल रात्री सिकंदराबादहून १७६६३ या रेल्वेने बसलो. आज सकाळी परभणीला आलो. तिथून आधी १७६६८ या गाडीने, नंतर एका जीपने लग्नाच्या गावी आलो.
फ्रेश होऊन नाश्ता झाल्यानंतर दाढी ट्रिम् करायला बाहेर पडलो. या गावात दोन सलुन आहेत. आधी एका ठिकाणी गेलो तर तिथे दोनजण आधीच बसून होते. दुसरा दुकानात तीनजण बसून होते. परत पहिल्या दुकानात आलो. वाट पाहण्याशिवाय गत्यंतर नव्हते.
मन कशात लागत नाही,
अदमास कशाचा घ्यावा ।
अज्ञात झऱ्यावर रात्री,
मज ऐकू येतो पावा ॥
-ग्रेस
मित्रहो अशाच मनस्थितीत गेले काही दिवस चालले होते,चिडचिड होत होती.गदिमांच्या गीतरामायणा मधील प्रभू श्रीरामाच्या तोंडून वदवलेल्या प्रसिद्ध ओळी सांत्वन करण्यास कमी पडत होत्या.
"खेळ चाललासे माझ्या पूर्वसंचिताचा
पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा".
सकाळी नऊ वाजता उठलो चित्रगुप्त काकांनी सांगितल्याप्रमाणे पंधरा मिनिट चालत गेलो, मला T3 ट्रॅम पकडायची होती. तिथून तिकीट काढून ट्रॅम धरली आणि शेवटच्या स्टेशनला पोहोचलो तिथून दुसरी पकडायची होती. एक कृष्णवर्णीय फ्रेंच कर्मचार्याला मला या स्टेशनला जायचंय असा एका इंग्लिश येणाऱ्या मुलीच्या मदतीने सांगितलं. त्याने मला यापुढे ट्रॅम जाणार नाही कारण काम चालूय, त्यासाठी ट्रॅम ने वेगळी बस सुविधा दिलीय ती सुविधा वापर आणि त्या समोरच्या स्टेशनला जाऊन उभा रहा. तिथून ट्रॅम ची बस पकड. मी स्थानकावर जाऊन उभा राहिलो बराच वेळ गेला तरी ट्रॅमची कुठलीही बस आली नाही.