टंकलेखन साहाय्य
सामर्थ्यदाता : गमभन !
धोरण
अरे काय हे!
प्रेषक पिवळा डांबिस ( रवी, ०५/१८/२००८ - ०१:०१) .अरे काय, हे काय मांडलयंत काय तुम्ही लोकांनी?
आम्ही हल्ली मिपावर हजर असतो तेंव्हा काहीतरी बेसुर्या चर्चा, प्रेमभंगाच्या कविता, निर्बोध रेसेपी (आम्हाला निर्बोध, कारण कुकिंगमधलं आम्हाला काही कळत नसल्यामुळे हो!) वगैरे टाकता आणि आम्ही जरा दोन-तीन दिवस दूर गेलो की अशी छान-छान चित्रं लोड करतां!!
अरे ओंकार, चतुरंग, भाग्यश्री, सतलज! अरे काय सुरेख चित्रं काढली आहेत रे तुम्ही लोकांनी! कायहो केशवसुमार? देवाने इतकी चांगली कला तुमच्या बोटांत ठेवली आहे आणि विडंबनं कसली करता?
आणि कुठे गेलं ते आमचं ईनोबा? अरे इतकी छान चित्रं काढता येतात तुला आणि टवाळ्या कसल्या करत फिरतोस रे मिपावर?
मंडळी तुम्ही म्हणाल, आम्ही काय करायचं हा आमचा प्रश्न आहे, हा पिवळा डांबिस कोण सांगणार आम्हाला? खरं आहे!! पण एका म्हातार्याच्या कळकळीने सांगतो, देवाने तुम्हाला अशी कला दिली आहे तर शक्य असतील तितकी चित्रं काढा. त्यावर फोकस करा...
अरे हे ईश्वराचं देणं किती महान आहे याची तुम्हाला कल्पना नसेल पण आमच्यासारख्यांना, ज्यांच्याकडे ते नाही त्यांना पुरेपूर कल्पना आहे रे!!!
अरे आम्हाला अशी चित्रं काढता येत असती तर आम्ही कशाला केवळ शब्दपुजारी बनलो असतो?
असो. कुणीतरी एक झकास आयडिया काढली होती की अश्या चित्रांचा वेगळा विभाग का बनवू नये? मस्त कल्पना!! जर "जे देखे न रवी" असू शकतं तर चित्रांचा स्वत:चा विभाग का नसावा? तेंव्हा ही आयडिया फुकट जाऊ नये म्हणुन (आणि संपादकमंडळावर लोकमताचा प्रभाव आणण्यासाठी!
आम्ही नवीन पोल सुरू करतो आहोत. अर्थात आमचे कंप्युटरविषयीचे ज्ञान आमच्या विषयापुरतेच मर्यादित असल्याने तो पोल इथेच न देता स्वतंत्रपणे नव्या धाग्यात द्यावा लागत आहे. (नीलकांताने जर मनावर घेतलं तर तो हे दोन धागे एकत्र करू शकेलही, करणार काय रे बाबा नीलकांता?)
पण आपले मत न चुकता कळवा...
- प्रतिक्रिया प्रकाशित करण्यासाठी येण्याची नोंद करा अथवा सदस्य व्हा.
औट घटकेचा पाहुणा...
प्रेषक प्राजु ( मंगळ, ०५/१३/२००८ - २०:३७) .मंडळी,
परवाच्या शुक्रवारी आमच्याकडे एक भन्नाट घटना घडली... सांगू?? सांगतेच.
तर झालं असं....
आमच्या कडे सकाळी सकाळी ७.०० वाजता पाणी येतं कार्पोरेशनचं. ते आलेलं होतं आणि आई अंगणात पाणी मारत होती. ते झाल्यावर तिने काही झाडांनाही पाणी घातलं. हे सगळं काम आई अंगणात आमच्या २ कुत्र्यांना सोबत घेऊन करते. म्हणजे ती कुत्री सकाळी अंगणात तिच्यासोबत हिंडत असतात. तर त्यादिवशी पाणी मारत असताना एकदम धप्प असा आवाज आला. आईने जाऊन पाहिले तर एक पिलू असलेला पोपट अंगणातल्या फरशीवर पडला होता. तो पडला, तसाच उठला आणि उडायचे सोडून चालू लागला. आमची कुत्री ताबडतोब शिकार मिळाल्याच्या आनंदात त्या पोपटावर धावून गेली. त्यात भर म्हणून की काय, सुगावा लागल्याप्रमाणे आमचं मांजरही तिथे दैत्य म्हणून हजर. झालं.... ! आईची तारांबळ उडाली. त्या पोपटाला वाचवायचं कसं? आईने मला जोरदार हाक मारली. साखर झोपेतून जागी होत मी अंगणात पळाले. झालेला प्रकार आईने गडबडीने कुत्र्यांवर ओरडत, मांजराला हुस्कावत मला सांगितला... मला पु.लं.च्या चितळे मास्तरांची आठवण झाली.
मी मोठ्या कुत्र्याला घराच्या मागच्या अंगणात पिटाळलं, लहान आहे त्याला त्याच्या घरात बंद केलं आणि मांजराला घरात हाकललं. मी हे सर्व करे पर्यंत आई त्या पोपटाच्या मागे त्याला पकडायला चालत (पळत नव्हे) होती. पण चाल हळूहळू असली तरी आईला(कोंबडी मागे पळण्याची सवय नसल्याने) तो पोपट काही पकडता येईना. शेवटी मी पुढे सरसावले (है शाब्बास... झाशीची राणी!!). आणि (कोंबडीमागे पळण्याची नाही, तरी मुलामागे पळण्याची सवय असल्याने) अलगद तो पोपट हातात उचलून घेतला. हुश्श! मात्र..... त्या पोपटाने जमेल तसे वळून, वेडेवाकडे होत... माझ्या हाताला चावायला सुरूवात केली. (इश्य! माझा हात त्याला पेरूप्रमाणे गोड वाटला की काय??) डाव्या हातचे एक बोट, उजव्या हाताची २ बोटं अगदी अनेक वेळा चावून जखमी केली. तरीही मी त्याला खाली सोडत नाही म्हंटल्यावर त्याने माझ्या बोट चावून रक्तबंबाळ केलं. मग मात्र मी त्याला खाली सोडून दिला. इतक्यात मला आमचं मांजर खिडकीतून उडी टाकून खाली आलेलं दिसलं. झालं! हा पोपट आता बहुतेक या मांजराचे भक्ष्य होणार. आईने मला पटकन टॉवेल आणून दिला. तो टॉवेल त्या पोपटावर टाकून मी त्याला अलगद उचलला. आता मात्र त्याला माझा हात खाता म्हणजे चावता येईना. आईने कांदे-बटाटे ठेव्ण्याची जाळिची झाकण असलेली बास्केट रिकामी केली आणि मला आणून दिली. मी पोपट त्यात ठेवला. टॉवेल काढण्याआधी त्यात त्याला थोडा खाऊ ठेवला. आणि मग टॉवेल काढून, पटकन झाकण लावले. आणि त्यावर जाडजूड ऑक्सफर्डची डिक्शनरी ठेवली. शुकाचर्यांचा अभ्यास होईल आणि दुसरे महत्वाचे मांजराला बास्केट खाली ढकलून पाडता येणार नाही. पोपटाचे संरक्षण...! वाह वाह... हुश्शार!
सकाळची सगळी कामे उरकून मी भर दुपारी १२.०० वाजता, जराही उन वाया न घालवता, पोपटासाठी पिंजरा आणायला बाहेर पडले. पण पिंजरा मिळतो कुठे कोणाला माहिती?? गावभागांत चौकशी केल्यावर समजले की महानगरपालिकेपाशी मिळतो पिंजरा. तिथे गेले. त्या दुकानदाराशी हुज्जत घालून २३० रू.चा पिंजरा १७५ रू. ला घेतला. स्कूटरवरून सर्कस करत तो पिंजरा ट्रॅफिकमधून घरी घेऊन आले. त्यामध्ये असणार्या वाट्यांच्या जागी, घरातली कोणतीही वाटी बसेना. म्हणून मग, एका १२च्या सेट मधले २ कप त्यांचे कान अगदी नीट फोडून त्या पिंजर्यात ठेवले. एकात पाणी आणि एकात पोळीची तुकडे घातले. माळ्यावर चढून एक तार शोधून ती त्या पिंजर्याला बांधली. आणि मग शुकाचर्यांना अलगद त्या पिंजर्यात ठेवले (पुन्हा एकदा टॉवेल). आणि पिंजरा पोर्चमध्ये वरती खुंटीला टांगला. पोपटरावांनाची ते घर आवडलं असावं कारण "ट्रॅक ट्रॅक.. किर्रर्र्..."असा आवाज काढून त्यांनी तो आनंद साजरा केला.
आम्हीही निवांतपणे जेवलो आणि पोपट पाळण्याची स्वप्नं रंगवत, त्याला बोलायला कसं शिकवायचं... वगैरे विचार करत बसलो. अधून मधून पोपटराव आपला ठेवणीतला आवाज काढून ओरडत होतेच. आम्हालाही गम्मत वाटत होती. असेच ३-४ तास निघून गेले.
आणि संध्याकाळी ६ च्या दरम्यान फाटकाबाहेर दंगा ऐकू आला. बाहेर जाऊन पाहिले तर..आमच्या घरासमोर असणार्या कारवानांच्या वस्ती वरची माणसं होती ती. त्यांनी सांगितले की, तो पोपट त्यांचा होता. सकाळी निघून गेला होता. त्याचे पंख कापले होते म्हणून त्याला उडता येत नव्हते. (अच्छा!! आम्हाला वाटले की, ते पिलू आहे म्हणून त्याला उडता येत नाही.) आणि गेली ९ वर्षे तो त्यांच्याकडे आहे. सकाळपासून त्या मुलाच्या वडिलांनी पोपट हरवला म्हणून जेवणही नाही केले. आणि सकाळपासून ती लोकं त्या पोपटाला शोधत आहेत. आणि त्याचा आवज ऐकून माग काढत ते आमच्या घरी आले........................ अरे परमेश्वरा!!!
आता काय???? ह्या पोपटासाठी मी / आम्ही काय काय नाही केलं??? मी त्याला पकडण्यासाठी स्वतःची बोटं जखमी करून घेतली.... श्वान, मार्जार या सारख्या हिंस्त्र प्राण्यांपासून त्याचं रक्षण केलं.... त्याला ऑक्सफर्ड डिक्शनरी दिली वाचायला.... भर तळपत्या उन्हांत जाऊन त्याच्यासाठी ... त्या दुकानदारशी हुज्जत घालून स्कूटरवरून कसरत करत पिंजरा आणला... त्याला खायला घालण्यासाठी चांगल्या कपांचे कान फोडले.. मी आईच्या शिव्या खाल्ल्या.... आणि इतके करून... तो शुक्रवारी आलेला शुकाचार्य त्याचदिवशी निघून गेला. ...जाताना मात्र माझ्या मनाला उगाचच उदास करून गेला..
- प्राजु.
क्रमशः
प्रेषक नारदाचार्य ( सोम, ०५/१२/२००८ - १७:२०) .दीर्घ लेखन मालिकेच्या स्वरूपात टाकण्याची एक पद्धत रूढ होऊन गेली आहे. क्रमशः हा त्यासाठी अगदी सोप्पा मार्ग ठरतो की काय अशी भीती वाटावी अशी स्थिती आता निर्माण झाली आहे. काही मालिका उचितच असतात; पण प्रत्येक लेखन हे मालिकेच्या साच्यात बसते असे नाही. अशा वेळी तुकड्यांमध्ये मांडले जाणारे पण कालबद्धता नसणारे लेखन आस्वादाची गंमत घालवून टाकते. लेखनाच्या सोयीसाठी लेखनाचे तुकडे करणे उचितच आहे, पण त्यासाठी आस्वादाच्या बाबीचाही विचार होणे आवश्यक नाही का? लेखनाचा आस्वाददेखील तुकड्यांमधून अधिक चांगल्या पद्धतीने वाचकाला घेऊ द्यावा याची खूणगाठ लेखकानीही मनाशी बांधलेली असावीच. त्यासाठी लेखकांना एक सूचना करतो आहे
लेखन पूर्ण करावे आणि मग त्याचे सोयीनुसार तुकडे करून भागशः एकाचवेळी प्रसिद्ध करावे. लेखमाला असेल तर ही सूचना अर्थातच लागू होणार नाही. पण त्यातही काही कालबद्धतेचे बंधन स्वतःवर घालून घ्यावे.
एक वाचक म्हणून तुम्हाला काय वाटते?
वाचनाचा आस्वाद अधिक मधूर व्हावा हाच या चर्चाप्रस्तावाचा हेतू आहे.
मत
प्रेषक कालिन्दी ( बुध, ०५/०७/२००८ - ०१:१४) .नमस्कार मन्ड्ळी,
मी इथे नविन आहे. मराठीत लिहिण्याचा प्रयत्न करीत आहे.
मी या पूर्वीही मीपा वाचत होते. पण सद्स्य नव्हते.
मीपा छान आहे. त्यात वाद्च नाही. पण एक गोष्ट वाचताना लक्ष्क्षात आली कि इथे नवीन पेकी कोणी प्रतिक्रिया टाकली की जुने लोक ती सरळ उडवून लावतात किन्वा सरळ ignore करतात . आणी जुन्याना मात्र support kartat.
त्यामुळे इथे लिखाण करु नये अशी भिती वाटत रहाते.
(किंमत)
प्रेषक चेतन ( सोम, ०५/०५/२००८ - १४:०६) .कवी अनिरुद्ध अभ्यंकर यांची "किंमत" ही सुंदर गझल धरुन केलेली हि रचना (विडंबन म्हणा हव तरं)
कारणे होतीचं तशी लिहायला
प्रतिक्रीया होत्याच तशा न पटलेल्या
प्रश्न हा साधाच होता पण तरी
लागला तो काहीतरीच कारणे द्यायला
मी जरी आता सुखी दिसतो तुला
खूप किंमत लागली मोजायला (हे मात्रं खरे)
काळजी त्यांची नका करू एव्हढिही
की काळजी लागेल ही खटकायला
बंद कधीही नाही केले मी उमलायचे
आणि तो आला नेहमीप्रमाणे फुले तोडायला
कॉ. स्वतःला म्हटलेस तू पहिजे तसे
लागलास् तु वाट्टेल तसे लिहायला
भाव नाही तुला थोडासाही दिला
काजवे लागले दिवसाचं चमकायला
माणसे येतील नक्कीचं रस्त्यावरी
जेव्हा भूक ही लागेल बोलायला
महाराष्ट्रदिवसाच्या शुभेच्छा
प्रेषक चेतन ( गुरू, ०५/०१/२००८ - १०:१९) .सगळ्यांना महाराष्ट्र दिवसाच्या शुभेच्छा आणि हुतात्म्यांना आदरांजली
मला महीत असलेला हा महाराष्ट्र टाइम्स मधील एक लेखं (जुना आहे पणं मस्त)
सदर लेखन येथून काढून टाकले आहे. कृपया हे वाचावे...
-- जनरल डायर.
आपली बस
प्रेषक हेरंब ( रवी, ०४/२७/२००८ - १२:३९) .या संवादात बायकांवर टीका करण्याचा अजिबात हेतू नाही. एकूण सामाजिक व्यवस्थेवर मात्र आहे. गैरसमज नसावा.
सदू आणि दादू बसस्टॉपवर उभे असतात. एका जुन्या नाटकातले संवाद पुटपुटत असतात.
सदू : बस आली बस.
दादू : कुठाय बस, आपली नाही ती बस!
(तेवढ्यांत त्यांची बस येते. बसमधे चढल्यावर सदू डावीकडच्या पहिल्या सीटवर बसायला जातो.)
दादू : अरे, थांब थांब, ती सीट अपंगांसाठी आहे.
सदू : मग दुसर्या सीटवर बसु या का ?
दादू : नको रे, ती पण अपंगांसाठीच आहे.
सदू : अरेच्चा, एवढ्या सीट खाली असताना का नाही बसायचं ?
दादू : अरे लेका, हा आरक्षणाचा जमाना आहे. तिसरी सीट तान्ह्या बाळांना पाजणार्या आयांसाठी आहे. त्या मागची बाप्यांना पाजणार्या बायांसाठी!
सदू : त्वांड फोडू का ? काय बोलणं शोभतं का हे ?
दादू : उगाच चावट अर्थ काढू नकोस. बाप्यांना पाजणार्या म्हणजे बारबाला. एवढ्यानं संपतय का ? त्याच्या मागच्या सीट गरोदर स्त्रियांसाठी. त्यामागच्या तरुण स्त्रियांसाठी, मग आज्यांसाठी.
सदू : म्हणजे ही "लेडीज स्पेशल" दिसतीये, चल लवकर उतरुया.
दादू : का ...ही उपयोग नाही. प्रत्येक बसमधे असंच असतंय बघ.
सदू : काही हरकत नाही. आपण उजवीकडे बसुया.
दादू : अहं, ते शक्य नाही.
सदू : का बरं ?
दादू : अरे, तिथे पण आरक्षणच!
सदू : आता ते कोणासाठी ?
दादू : पहिल्या चार सीट ज्येष्ठ नागरिकांसाठी. त्यामागल्या चार शाळेतल्या पोरांसाठी. त्या मागच्या ..........
सदू : पुरे, पुरे, आपल्यासाठी कुठल्या रहातात ते सांग बघू.
दादू : आहेत ना आहेत, त्या शेवटल्या पांच सीट पाहिल्यास का ? सर्वांच्या झाल्यावर आपल्यासाठी तेवढ्याच उरतात. आपल्यातला जो कोणी नशीबवान असेल तो स्पीडब्रेकरवर उडून कधीतरी अपंग होईलच ना, तेंव्हा त्याची बढती एकदम डावीकडल्या पहिल्या सीटवर!
सदू : आन तोपर्यंत ??
दादू : तोपर्यंत लोंबकळायचं आपण ! नाहीतरी सामान्यांच्या कपाळी याउपर लिहिलंय काय या देशांत ?
तुमचा पासवर्ड चेंज करा ....
प्रेषक छोटा डॉन ( गुरू, ०४/२४/२००८ - १६:५८) .सध्या "आय टी" इंडस्ट्री आणि आमच्यासारख्या बिगर "आय टी" पण पोट भरण्यासाठी कंपनीत कंप्युटरचा वापर करणार्या लोकांना भेडसवणारी एक समस्या म्हणजे दर एक महिन्यानी आपल्या स्क्रीन" वर येणारा "तुमचा लॉग्-ईन पासवर्ड आता गचकायची वेळ आली आहे, कॄपया तो बदला नाहि तर मातीत जावा " असा धमकीवजा संदेश ...
आपलं तर डोकंच काम करत नाही अशा वेळेस ...
किती वेळा बदलायचा, बर ठिक आहे बदलतो पण त्यासाठी तो असा नको तसा हवा अशा १०० अटी. शिवाय मागच्या १० वेळच्या पासवर्ड शी जुळल्यास पुन्हा बोंब ....
माझी तर आत्तापर्यंत माझ्य नाव, मित्रांची नावे, काही खास मैत्रीणींची नावे, जन्मतारखा, गाडीचे मॉडेल्स, आवडते खाद्य, खेळ नकोनकोते शब्द, आकडे सर्व वापरून झाले आहे, आता ह्यापुढे बुद्धी चालत नाही ....
बर एखादे खासगी "नाव" टाकावे म्हणले की लगेच दुसर्या दिवशी रात्री "कलीग" चा फोन " तेरा पासवर्ड बता, मुझे थोडा तेरे लॉग्-इन पे काम करना है ". आली का पंचाईत आता, पुढचा प्रश्न " कौन है वो ? साले हमसे छुपाता है ... *** **** ** "
आता तुम्हीच मला मदत करा, तुम्ही काय वापरता ते सांगा म्हणजे माझा मी योग्य तो लेसन घेईन ...
जास्त अवघड सांगू नका कारण मी अल्पमती आहे असे माझे सर म्हणायचे.[ त्यांचे नाव पण मी विसरलो आहे ...]
ह्या गांधींचं करायचं काय ???
प्रेषक छोटा डॉन ( गुरू, ०४/१७/२००८ - १७:२५) .ग़ेले दोन दिवस झाले मी ह्या घटनेचा विचार करत आहे.
पहिल्यांदा मी नेहमीचच आहे म्हणून दुर्लक्ष करून विसरण्याचा प्रयत्न केला पण काल रात्री "बघूया काय चाललय देशात" म्हणून "टी व्ही" लावला तर तेच नाटक चालू. अशी सणक आली ना मस्तकात कि विचारू नका, म्हणूनच हा लेख लिहण्याचा खटाटोप ....
आत ह्यात गांधींचा काय संमंध ? पण मी ज्या लोकांबद्दल बोलतोय ते महात्मा गांधी नसून आजचे ढोंगी गांधी म्हणजे अनुक्रमे "सोनिया ग़ांधी, राहुल गांधी व प्रियंका वढेरा [ सोईसाठी ग़ांधी , कारण त्याशिवाय व्ही आय पी ट्रीटमेंट मिळत नाही ]."
एकूण दोन घटना आहेत .....
१. पहिली म्हणजे गांधी-नेहरू घराण्याचे वफादार व आजच्या राजकारणातील एक अडगळ असे "अर्जूनसिंगांनी" भारताच्या पंतप्रधानपदासाठी सर्वश्री "राहूल गांधींचे " नाव पुढे करणे, अपेक्षेप्रमाने त्यावर राहूलने कोणतीही प्रतिक्रीया न देणे, त्यावर कॉग्रेस पक्षातर्फे "सध्या पंतप्रधानपदाची खूर्ची रिकामी नाही आणि सोनिया गांधींना चापलूसकी [ कॉग्रेसच्या राजकारण्यांसाठी कसा फिट्ट शब्द आहे बघा ] आवडत नाही" असा खूलासा करणे व शेवटी सोनिया व अर्जूनसिंगाची गुप्त बैठक [ ह्यात म्हणे त्यांना ठोकले , मी तर म्हणतो पाठ थोपटली असेल].
ह्यावरून एकंदरीत मला ह्या लोकांना म्हणायचे आहे तरी काय हे समजेना. अरे काही तरी किंमत ठेवा त्या "पंतप्रधान " पदाची. पुर्वीच्या शास्त्री, इंदीरा गांधी, राजीव गांधी, वाजपीई सारख्या माणसांनी हे पद भूषवून त्याची मानमर्यादा अतिशय उच्च करून ठेवली होती व आज त्याचे हाल कुत्रे पण खात नाही. ख़ुद्द मनमोहन सिंग कबूल करतात "मी हतबल आहे", बाकीचे काय पाहिजे अजून ? असो.
तर तो आपल्या चर्चेचा विषय नाही, तो आहे राहूलची योग्यता [ थोडक्यात लायकी ]. फ़क्त गांधी कुटुंबात जन्माला महान ,चांगले विदेशात शिक्षण घेतले, थोडा दिसायला चांगला आहे, झालच तर भाषने आईसारखी वाचून दाखवत नाही, व्यवस्थीत हिंदी बोलतो, झालच तर ४ दिवस गरिब आणि स्पेशली दलित जनतेत हिंडतो हे सर्व गूण भारताचा पंतप्रधान होण्यासाठी चिक्कार झाले का ? बाकी त्याची एकंदरीत देशाच्या परिस्थीतीबद्दल असलेली जाण, समज, थोडा अनुभव, ह्या लेवलला येण्यासाथी करावे लागणारे [ व लोकांनी केलेले ] कष्ट, करावा लागणारा त्याग ह्यांची काहिच किंमत नाही का ? का हा देश गांधी-नेहरू घराण्याला आंदण दिलाय ?
तसे असेल तर बंद करा ही लोकशाहीची नाटकं आणि जाहीर करा " यापुढे फक्त गांधी परिवारातील व्यक्तीलाच हे पद मिळेल, बकी कुणी ह्याला विरोध केला तर तो देशद्रोह समजला जाईल" म्हणजे विषयच संपला. आता तर ह्यांचे "चरणभाट " असा दाखला देतात की "राहूलने मनाचा मोठेपणा दाखवून मंत्रीपदाचा त्याग केला" . खरं की काय ? आम्हाला वाटलं सगळी नाटकंच चालू आहेत. छे छे किते मुर्ख ना मी ? मला एवढेच म्हणाय्चे आहे की सध्यातरी राहूलची या पदाचे स्वप्न सुध्धा बघायची लायकी नसताना त्याला मारून मुटकून फौजदार बनवायचा हा प्रयत्न कशासाठी? त्याला प्रोजेक्ट करण्यासाठी एवढी नाटके कशासाठी ? बाकीच्या कॉग्रेसमधल्या चरणभाटांना, चापलूसकरांना, चमच्यांना त्यांचा मतदारसंघात तोंड दाखवायला जागा नसल्यामुळे हा सर्व सावळागोंधळ का ?
अशाने देशाचे किते नुकसान होत आहे, आपली इमेज कशी खराब होत आहे याची काळजी कुणालाच नाही का ?
२. दुसरी घटना तर पहिल्यापेक्षा भयानक व निंदनीय. क़ाय तर म्हणे, प्रियंका गांधींनी म्हणे तिच्या पित्याचे मारेकरी नलिनी ची भेट घेतली, का तर की तिला ह्यामागचा हेतू जाणून घ्यायचा होता [ आत्तापर्यंत तपास करत असलेली पोलीस, गुप्तचर संघटना काय माश्या मारत होती का ?] , झालचं तर आपल्या पित्याला मारून किते मोठी चूक तिने केली आहे हे सुनवायचे होते [ तर तर , ती नलिनी पण संतच ना, मला तर वाटते आज पुन्हा एकदा वाल्याचा वाल्मीकी झाला असावा] व शेवटी येताना
"आपल्या मनात कोणतेही शतॄत्व नाही " हे सुनवून आपण किते महान हे जनतेला सांगायचे होते.
माझं तर डोकं सुन्न झालं. ह्यांनी आता बापाच्या मरण्याचे पण भांडवल करायला सुरवात केली तर. बर आत्ताच कसा निवडणूकीच्या तोंडावर हा महान विचार मनात आला ? जर ही गोष्ट पर्सनल असेल तर बरोबर आपल्या लाचार मिडियाची फौज कशाला बरोबर न्हेली आणि अख्ख्या देशाला हा नजारा कशासाठी दाखवला कारण तुमच्या मते ही गोष्ट अतिशय पर्सनल होती ? नेहमीप्रमाणे ह्या घटनेचे पण भाटांनी व मिडियाने उदे उदे केलेच, दुसरी अपेक्षा तरी काय ठेवणार हो ?
आता प्रश्न असा आहे की ह्या घटना ज्या रितेने घडल्या व त्या प्रोजेक्ट केल्या गेल्या ती पद्धत बरोबर आहे का ? का पब्लिकला चुत्यात काढायचे धंदे आहेत हे ? आपल्या देशात ह्या गांधींपेक्षा दुसरे कोणी लीडर बलायला नालायक आहे का ? मिडियापण ह्या लोकांच्या दावणीला बांधल्यासारखा का वागतो कारण तो तर लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे ? बाबासाहेबांना अपेक्षीत असलेली लोकशाही हिच का ? हे असे लोकच भविष्यात आपले नेतत्व करणार आहेत का ?
तसे असेल तर माझ्यासारख्या सुशिक्षीत, पांढरपेश्या माणसाला तो फक्त स्वताचे बघतो, त्यांचे देशाशी काही देणेघेणे नाही अशा शिव्या देण्यात काय अर्थ आहे जर हे लोक असेच वागणार असतील. ह्या गोष्टींवर आपल्याकडे काहीच उपाय नाही का ? हे सर्व असेच चालू राहणार आहे का ? तसे असल्यास ह्याला कंटाळून राजकारणाकडे ढ़ूंकून न बघणाऱ्या व कदाचेत देश सोडून जाणाऱ्या माणसाला दोष देण्यात काय अर्थ आहे ? आपले मिशन "२०-२०" असेच लोक पूर्ण करणार आहेत का ? होय असेल तर त्यानंतर देशाची परिस्थीती काय असेल ? ह्या अश्या भाटगिरी करणाऱ्या न्युज चॅनेल्स वर बंदी आणावी का ?
मला माहित आहे की असे लिहून काही उपयोग नाही, कारण "हम नही बदलेंगे" असे त्यांनी ठरवले आहे. आपण जर हे वाचून काही करण्याचा प्रयत्न करणार असाल तर मी त्यात माझे थोडेसे समाधान मानतो व पुढे आपण अगदीच परिस्थीती हाताबाहेर जाउ देणार नाही अशी आशा बाळगतो.
भारतरत्नाची जयंती
प्रेषक विकि ( सोम, ०४/१४/२००८ - १५:०४) .![]()
आज १४ एप्रिल भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती .त्या निमित्त त्यांना भावपुर्ण आदरांजली
जयंतीनिमित्त सर्वांना हार्दीक शुभेच्छा !
आपला
कॉ.विकि
अनावश्यक गोष्टी संपादित केलेल्या आहेत.
:संपादक
