धोरण

रेवती संपादकपदी विराजमान..

राम राम मिपाकरहो,

कळवण्यास आनंद वाटतो की आपल्याच एक मिपाकर सभासद आणि हितचिंतक सौ रेवती यांना मिपाचे संपादक बहाल करण्याचे आम्ही ठरवले आहे व तसे ते केले आहे..

मिपावरील इतर संपादकांप्रमाणेच रेवती यादेखील आपली संपादकीय जिम्मेदारी व्यवस्थित सांभाळतील असा आम्हाला विश्वास आहे.

अर्थात, आमच्या एखाद्-दोन देवगडी शेलक्या शिव्याकडे त्यांनी इतर संपादकांप्रमाणेच दुर्लक्ष करावे, इतकीच लिबर्टी आम्हाला मिपाचे मालक म्हणून हवी आहे. ती त्यांनी द्यावी अशी नम्र विनंती..Smile

बाकी संपादकीय कामात आमची ढवळाढवळ नाही व नसेल..

त्याचप्रमाणे मिपाच्या संपादक मंडळात अन्यही काही कमीअधिक फेरफार करण्याचे आम्ही ठरवले आहे व ते लौकरच करू आणि संपादकांची अद्ययावत यादी मिपाकरांकरता येथे सादर करू..

असो,

रेवती यांना मिपाचे संपादकपद पूर्ण जबाबदारीने सांभाळण्याकरता अनेकानेक शुभेच्छा..

तात्या.

महदाश्चर्यम्!

महदाश्चर्यम्!

मी या व इतर फोरम्सवर नेहमीच लिहीत आलोय् कीं लोकशाहीमध्ये आपण श्रेष्ठींना त्यांच्या धोरणांबद्दल व निर्णयांबद्दल आपला संतोष, राग-संताप त्यांच्यापर्यंत पोचवला पाहिजे व मी हे काम करत असतो, अगदी मनमोहन सिंग-जी, प्रतिभाताई, बराकसाहेब यांच्यापर्यंत! (मी मनमोहन सिंग-जीं व प्रतिभाताईंना 'अरुणाचल'बद्दल लिहिलेले निरोप मी श्री विकास यांच्या "अरुणाचल" या धाग्याखाली लिहिले होते.) हा निरोप लिहिताना त्यांच्या वेबवर असलेल्या ५०० 'characters'च्या मर्यादेमुळे अडचण आली म्हणून मी काल PM साहेबांच्या ऑफीसला (PMO) लिहिले होते कीं "५०० 'characters' च्या मर्यादेमुळे कांहींच meaningful लिहिता येत नाहीं, तरी ही मर्यादा वाढवून ५०० शब्द करावी!"

महदाश्चर्यम्! मला PMO कडून कांहीं तासांतच खालील उत्तर आले.....

From:
"Web PMO"

To:
kbkale@yahoo.com

Dear Mr. Kale,
The mail ID is
pmosb@pmo.nic.in
regards
Communications Incharge

म्हणजे आपली पत्रे (कधी-कधी तरी) वाचली जातात असे म्हणायला हरकत नाही! एका क्षणात माझा आपल्या लोकशाहीबद्दलचा आदर द्विगुणित झाला!
आपणा सर्वांना ही विनंती कीं आपली लोकशाही गुंडांच्या हातून सुशिक्षितांच्या हातात जावी असे ज्यांना-ज्यांना वाटत असेल तर अशा सर्वांनी आपापले मतप्रदर्शन करण्यात आढेवेढे घेऊ नयेत व 'बिनधास' लिहीत जावे!
(मूळ 'अरुणाचल'वरील मतप्रदर्शनाला अद्याप उत्तर आलेले नाहीं!)
सुधीर काळे

शब्दबंध २०१०

२००८ व २००९ या दोन्ही वर्षी 'शब्दबंध' या आंतरजालीय जालनिशीकारांच्या उपक्रमात सहभागी झालो होतो. आता या वर्षीच्या 'शब्दबंध'चे वारे वाहू लागले आहेत. त्या संबंधीची 'शब्दबंध'च्या अधिकृत जालनिशीवरील उद्घोषणा इच्छुकांच्या अधिक माहितीसाठी येथे डकवत आहे.
===========================================================================

२००८ मधे १० लोकांनी साकारलेल्या शब्दबंधने मागच्या वर्षी २९ लोकाना सामावून घेतलं! मराठी ब्लॉगर्सच्या या जागतीक ई-सभेचे आयोजन आपण याही वर्षी दिमाखात करणार आहोत. मित्रहो तारखांची नोंद करा - ५ आणि ६ जुन २०१०!
परत एकदा आपण सर्वजण या सभेत भेटायचंय. काही नवे तर काही जुने शब्दबंधी घेऊन यायचंय. जिथे आहात तिथून, थेट सर्वांच्या हृदयापर्यंत पोहोचायचंय. परत एकदा सर्व हौशी मराठी ब्लॉगर्सना त्यांचं लिखाण त्यांच्या थाटात व्यक्त करण्यासाठी हे खास व्यासपीठ सजवायचंय.

मागील वेळेसारखेच, मराठीमध्ये १०० % स्वतःचं लेखन असलेला किमान एक ब्लॉग असलेल्या कुठल्याही ब्लॉगकाराला यात सहभागी होता येईल. या सभेची व्याप्ती अधिकाधिक वाढवणे आणि अधिकाधिक मराठी ब्लॉगर्सना त्यांनी लिहिलेल्या, त्याना आवडणाऱ्या, आणि त्यांच्या लिखाणाचं वाचन करण्यासाठी ई-व्यासपीठ ऊपलब्ध करून देणे हा यावेळीही हेतू आहे. मराठीमधलं लिखाण हा एकच समान दुवा पकडून आपण सर्वजण एकत्र येणार आहोत. प्रवास वर्णनं, अनुभव, कथा, कविता, व्यक्तीचित्रं, लघुनिबंध, तंत्रज्ञान आणि अशाच कित्येक छटांनी सजलेल्या मराठी ब्लॉगविश्वाची छोटीशी झलक आपल्याला या सभेमधे साकार करायचीये. तेही अनौपचारीक पद्धतीने.
सर्वसाधारणतः या सभेचं स्वरूप असं असेल. स्काईप, किंवा तत्सम साधन वापरून, आपण वेगवेगळी सत्रं आयोजीत करू. सहभागी होणाऱ्या सर्व हौशी ब्लॉगर्सना या तंत्राची माहिती सभेच्या आधी करून देण्यात येईल. जपान-ऑस्ट्रेलियापासून ही सभा सुरू होईल. सत्रांची सूत्रं क्रमाक्रमाने पश्चिमेकडे हस्तांतरीत होऊन भारत-आफ़्रिका-युरोप-अमेरिका या क्रमाने अभिवाचनाचं सत्र सुरू राहील.

शब्दबंध-२०१० मधे सहभागी होणं सोपं आहे. सहभाग घेण्यासाठी किंवा केवळ आयोजनामधे मदत करण्यासाठीही, कृपया या फॉर्मवर नोंद करावी -https://spreadsheets.google.com/viewform?formkey=dHhIT3dWN21tYWpDVHo4UG9yMlZycWc6MA. तुमच्याबद्दलची माहिती आणि तुमच्या सहभागाचं स्वरूप आम्हाला या फॉर्मवरून कळेल. सर्व जुन्या आणि नव्या शब्दबंधीनी या फॉर्मवरून नोंद करावी ही विनंती. ईथे नाव नोंदवणाऱ्या सर्वाना आपोआप shabdabandha@googlegroups.com मधे प्रवेश दिला जाईल आणि तिथेच पुढच्या सर्व चर्चा होतील. (तुम्ही आधीपासून जरी shabdabandha@googlegroups.com चे सभासद असाल, तरीसुद्धा शब्दबंध-२०१० मध्ये सहभागासाठी, कृपया फॉर्ममधे नोंद करावी. तसदीबद्दल क्षमस्व.)

लवकरच भेटू. आपली वाट बघतोय.

- शब्दबंध स्वागतक आणि कार्यकारी मंडळ

संकेतस्थळे आणि खाजगी मालकी - एक मुक्तविचार

सध्या दुसर्‍या एका धाग्याच्या निमित्ताने (पुन्हा) हा प्रश्न ऐरणीवर आला आहे त्यासंदर्भाने बर्‍याच दिवसांपासून मनात आलेले विचार शब्दबद्ध करतोय, सगळ्यांचा वैचरिक सहभाग अपेक्षित आहे, कृपया वैयक्तिक टीकेऐवजी मुद्द्यांना प्राधान्य देणे.

माणूस संकेतस्थळ का काढतो ? ह्या प्रश्नाचे उत्तर मला आधी वाटलं - माणसाची आदिम प्रेरणा "मला काही सांगायचय" ही असावी. पण नंतर थोडा विचार केला असता असे लक्षात आले की 'मला जे सांगायचय' त्यासाठी इतर 'फुकट' अनेक पर्याय उपलब्ध आहेत जसे की ब्लॉग, दुसरी संकेतस्थळे. मग स्वतःचे संकेतस्थळ असावे ही प्रेरणा नेमकी कशामुळे ?
आत्तापर्यंतचा इतिहास बघितला तर संकेतस्थळांची 'वृत्तपत्रांशी' तुलना करता येइल.
१) 'स्वतःच्या विचारांचा (अनिर्बंध वा मुक्त) प्रसार' किंवा
२) 'दुसर्‍यांच्या विचारांचा विरोध' ह्यासाठी स्वतःचे वृत्तपत्र असावे ह्याच विचारांनी अनेकांनी वृत्तपत्रे चालू केली किंवा विकत घेतली. पुढे त्यात जाहिराती हा मुद्दाही समाविष्ट झाला पण तसे बघितले तर तोसुद्धा मुद्दा क्र. १) मधे बसू शकेल. हाच नियम संकेतस्थळांनाही लागू पडतो.

हा विचार कॄतीत आणण्यामागच्या प्रेरणाही वेगवेगळ्या असू शकतात. इतर संकेतस्थळांच्या धोरणांविषयी, तिथल्या सदस्यांविषयी, सुविधांविषयी, विषयांबद्दल - नापसंती ही एक प्रमुख प्रेरणा. त्याचबरोबर 'ही गोष्ट तुम्ही करता त्यापेक्षा (वेगळी, चांगली) करता येउ शकेल हे दाखवून देण्याची जिद्द किंवा नुसतीच 'स्वयं शिक्षणाची आच' (अर्थात ही फार दुर्मिळ). पण कारण कुठलेही असूदे, संकेतस्थळ उभारण्या / चालवण्या साठी पदरमोड करण्याची तयारी, (तांत्रिक किंवा समविचारी) सहकार्‍यांची जमवाजमव, सुरुवातीला तरी एक निश्चित धोरण वा उद्दिष्ट अशा अनेक गोष्टींची गरज असते.

आता संकेतस्थळ चालू केले आहेच तर मुख्यत्वे 'वाचकवर्ग' आणि नंतर सहभागी 'लेखक वर्ग' हवाच. मग ह्या दोन्ही वर्गांना त्यांचे संकेतस्थळावरचे वावरणे सोपे व्हावे म्हणून अधिकाधिक सुविधा पुरविणे - प्रसंगी (पैशाची, वेळाची, ज्ञानाची) पदरमोड करुन. ह्यातून वाचक / लेखक वाढीस लागले की संकेतस्थळाची 'क्षमता' गरजेप्रमाणे वाढवणे त्यासाठी परत पदरमोड. असे करुन संकेतस्थळ भरभराटीस येते.

आता 'असतिल शिते तेथे जमतिल भुते' - किंवा 'कट्ट्यावर जमणारे कट्टेकरी' किंवा 'विचारांची देवाण घेवाण करु इच्छिणारी मंडळी' - कुठल्याही कारणाने का असेना मंडळी जमणारच - आणि ती जमावितच असाच चालकांचा उद्देश तेव्हा हे योग्यच. पण जसजशी लोकं वाढायला लागतात तेव्हाच 'दुसर्‍या' विचारांची लोक, मत्सरग्रस्त, निव्वळ मजा बघणारे, बाजूने भांडणारे, भांडण लावणारे असे अनेक लोक गोळा होतात. हेही साहजिकच.

आणि तेव्हाच खरी कसोटी लागते चालकांची. ही खाजगी मालमत्ता खरीच, त्याबाबत दुमत होण्याचे कोणाचे काहीच कारण नाही. आणि खाजगी पणाबरोबरच तो खाजगीपणा जपण्याचे काही नियमही. नियम पाळण्याची जबाबदारी सदस्यांची, ते नियम बनवून, उपलब्ध करुन देण्याची जबाबदारी चालकांची आणि नियमांचे पालन करवून घेण्याची जबाबदारी प्रशासकांची/संपादकांची. आता ह्यात पारदर्शकता नसली, समन्वयाचा अभाव असला किंवा एकाला एक न्याय आणि दुसर्‍याला दुसराच असे प्रकार असले की गडबड होणारच.

मालकी खाजगी - त्यामुळे नियम ठरविण्याचे स्वातंत्र्यही आणि ते बदलण्याचेही. त्याचमुळे "चपला", "आहे हे असे आहे" असे प्रतिसाद येणे अगदी साहजिकच. तसच वेळोवेळी स्पष्ट केल्याप्रमाणे 'चालेल तेवढे दिवस चालेल नाहीतर बंद करुन टाकीन तिच्यामायला" हेही परिचयाचे. पण ह्याच वेळी "मिपाकरांमुळेच मिपा आहे..सर्व मिपाकरांचे मनापासून आभार.." अशा प्रतिसादांमुळे गोंधळ उडतो.

इथले मालक पूर्वीपासून दुसर्‍या एका संकेतस्थळाचे नियमित, चांगले लिखाणकर्ते सदस्य, स्वत्: संगीततज्ज्ञ म्हणता येईल इथपर्यंत शास्त्रीय संगितात गती असलेले, बर्‍याच वेळेला दिसलेली उत्तम विनोद बुद्धी शिवाय व्यक्तिचित्रातून दिसणारी निरिक्षणशक्ती आणि वेगवेगळ्या कट्ट्यांतून कानावर पडल्याप्रमाणे माणस जोडण्याची क्षमताही.
पूर्वोक्त संकेतस्थळांचे जाचक नियम न पटल्यामुळे बाहेर पडून जिद्दिने, पदरमोड करुन नविन संकेतस्थळाची उभारणी आणि ते नावारुपाला आणून दाखविण्याची कला, क्षमता अंगी.
अशा सर्व पार्श्वभूमीवर 'अशी परिस्थिती का यावी' हे माझ्या आकलनाबाहेरचे.
मालकांनी नुकतेच एका जाहिर कार्यक्रमात 'मिपाचे' प्रतिनिधित्त्व केले, माझ्या अल्प माहिती नुसार ते ह्या संकेतस्थळाचे प्रवर्तक आहेत म्हणूनच त्यांना सहभागी व्हायची संधी मिळाली (नुसते ब्लॉगलेखक म्हणून नव्हे) आणि त्याच बरोबर त्यांनी सदस्यांचे जाहिर आभारही मानले आहेत.

असे असताना, (हे) संकेतस्थळ काढण्यामागची पूर्वीची उद्दिष्ट्ये काय होती, त्यांच्यात काही बदल झाला आहे का? निर्माण केलेले संकेतस्थळ त्या उद्दिष्ट्यपूर्तीच्या मार्गावर आहे का? नसेल तर कसे आणता येईल, प्रशासानात पारदर्शकतपाकशी आणता / वाढविता येईल, वगैरे वगैरे बाबींचा उहापोह करण्यासाठी हा लेख प्रपंच.


(टीपः मी नियमित लेखक नसलो तरी नियमित वाचक आहे आणि हा लेख संस्थळाचे बदलते स्वरुप जाणवले म्हणून लिहिला आहे, उडविला गेला, संपादित झाला तरी हरकत नाही, मला माझी जी मते आहेत ती व्यक्त कराविशी वाटली म्हणून केली एवढेच...)

रेज

दर आठवड्याला दोन दा तज्ञांकडुन तपासणी.
शाळेच्या जाहिरातीतील एक वाक्य.
कुतुहल वाढले.
बघुया काय प्रकार आहे ते.
फोन लावला.
समोर ज्या कुणी अधिकारी होत्या त्याना प्रश्न विचारला.
"कसली तपासणी हो? ती सुद्धा आठ्वड्यातुन दोन दा"
We talk to students to find out any presence of uncontrolled rage, dent in personality not noticed by parents.
कुठल्या यत्तेतील?
From first standard onwards, बाई म्हणाल्या.
कसले प्रश्न? उदाहरण म्हणुन एखादा सांगा.
Like Who is your favourite actor.?
एखाद्या मुलाने मोगँबो म्हटले तर?
We conclude that the child is having tilt towards violence.
कोण आहेत हो ट्रस्टीज. चरणामृत घेईन म्हणतो.
............................................................................................................................
"काय हो रेज म्हणजे काय"?
मनासारखे झाले नाही की होणार्‍या संतापाचा स्फोट. हा शब्द तुला का सुचला?
"अहो, ती सातव्या माळ्याची आली होती. तिच्या मुलाला काहीतरी रेज नावाचा मानसिक रोग आहे असे शाळेत सांगितलय."
हे निदान कशावरुन झाले.?
"अहो, तो आणलेली खेळणे दोन दिवसात मोडतो असे तीने शाळेतल्या पालक सभेत सांगितले. तेंव्हापासुन दर आठवड्यात त्या लहानग्या मुलाची दोन दा तपासणी होते. हे बरोबर आहे का"?
मला विचारु नकोस. नाहीतर मी वायोलंट होईन.

खिंड

"अय्या,सर तुम्ही. बर झाले तुम्ही भेटलात "
बॅकेत गर्दी होती. पैसे मिळायला कमीत कमी अर्धा तास लागणार होता. आता खिंड लढवणे भाग होते.
"पोरीने नशिब काढले हो"
लग्न ठरले का"?
"इश्श, काही तरीच काय. एवढ्यात कुठे लग्न"
ह्या मातेच्या मुलीला मी पंधरा दिवसापुर्वी एका गोरटेल्या मुलाबरोबर अपुर्ण स्काय वॉक वर 'टेकान घेवा' स्थितीत बघितलेले होते. त्यामुळे एक नैसर्गिक प्रश्न होता तो.
"माझ्या वेळी खुपच त्रास झाला होता हो. धड पंखे पण नव्हते"
आता हीच्या पहिल्या डीलिवरी ला मॅटरनिटी होम मधे लेबर रुममधे पंखा नसल्याने जे हाल झाले त्या बद्दल तर बोलत नसावी. पण हे माझ्या कडे का बरे बोलावे ? मी आपला हैराण. काहीतरी बोलुन तोंड घशी पडण्यापेक्षा मी आपला नेहेमीचा उपाय वापरला.
हम्म
"आताच सेंटर ला जाउन आले"
कसले सेंटर?
मला काहीच कळेना.
"अहो सर, असे काय करताय? उद्यापासुन बारावीची परिक्षा सुरु होतेय ना"?
हां हां. तुम्ही नशिबाबद्दल काही तरी म्हणत होतात त्या मुळे मी गोंधळलो.
"माझ्या वेळी तर बाक पण हलत होता. बाकात ढेकुण सुद्ध्हा होते. त्या मुळे माझी मेरीट गेली"
हम्म.
" सेंटर अगदी छान आहे. भरपुर वेंटीलेशन आहे. उजेड आहे. सहा सहा पंखे सुद्धा आहेत."
चालु आहेत ना?
" हो, हो. त्याची पण खात्री करुन घेतली"
खरेच नशिबवान हो तुमचे कन्या रत्न.
"आमच्या ह्यांनी गेले ३ आठवडे ऑफिस ला सुट्टी घेतली आहे."
वा वा वा.
" सांगायचे म्हटले तर ह्यांनी पण खुपच मेहेनत घेतली हो"
म्हणजे?
" ह्यांचे म्हटले तर एकदम 'सायंटीफीक काम' हो.
मी दचकलो. आजुबाजुला कुणी श्रवण कुमार नसल्याची खात्री करुन घेतली.
म्हणजे काय?
"आता तुम्हा डॉक्टर आणि समुपदेशक मंडळी ना आम्ही काय सांगणार"?
मी तुम्ही म्हणता तसा काहीही नाही हो. पण एक पालक म्हणून काय असेल तर सांगा तुमच्या ह्यांच्या सायंटीफिक कामाबद्दल.
"ही तुमची विनम्रता आहे. पण आता विचारताहात तर सांगते. ३ आठवड्या पुर्वी ह्यांनी गजबजलेल्या रस्त्यावरच्या ध्वनी प्रदुषणाचे रेकॉर्डींग केले.
इतर क्लासेस चे पेपर झेरॉक्स केले. एक हलणारा बाक आणला. हे सर्व पेपर त्यानी मुली कडुन बाकावर बसुन सोडवुन घेतले. पार्श्वभुमीवर टेप रेकॉर्ड लावला होता. ए पर्फेक्ट सिम्युलेशन एक्सरसाइज."
काय सांगताय? एकदम चंद्रावरची स्वारी इतकी तयारी म्हणा की.
" हो आपण सर्व प्रकारांना तयार असायला पाहीजे असे ह्यांचे म्हणणे"
हो का? बर बर. एकदा भेटायला पाहिजे बाबाना.(भेटल्यावर ह्याच्या भुमीवर लाथ घालायला मिळाली तर उत्तम)
" शेवटच्या दिवशी अभ्यासाची काही टीप द्या हो."
परिक्षेच्या आयचा घो म्हणत मुलीला शांत झोपु द्या.
इतक्यात टोकन ची बेल वाजली आणि माझी खिंडीतुन सुटका झाली.

कंपार्टमेंट

खरे तर 'अ' शी मैत्री व्हायचे काहीही कारण नव्हते.
एका अत्यंत जवळच्या मित्राने करुन दिली.
हळु हळु मैत्री वाढली.
एकत्र बसणे उठणे होउ लागले.
मैत्री घनिष्ठ झाली.
एकमेकांशी रोज बोलणे होउ लागले.
तसे 'अ' चे वर्तुळ फार मोठे.
त्या वर्तुळातले काही जण मित्र होउ लागले.
मैफिली जमु लागल्या.
अगदी वर्तुळातातले परदेशी असलेले सुद्धा भारत भेटीत न चुकता भेटु लागले.
एकंदरीत सगळे मजेत चालले होते.
काही कारणाने 'अ' चे वर्तुळातल्या 'ब' शी भांडण झाले.
सुरुवात अगदी छोटीशी झाली.
त्याचे वणव्यात रुपांतर झाले.
एकमेकांच्या पाठीवर थाप मारणारे पाठीवर वार करु लागले.
वर्तुळ गोंधळले.
काय करावे कळेना.
'अ' आणि 'ब' ची सार्वजनिक ठिकाणी एकमेकांची निर्भत्सना इतरांना त्रासदायक ठरु लागली.
मग त्यात दोन तट पडले.
कोण बरोबर कोण चुक ह्या बद्द्ल न्याय होउन हे तट वेगळे झाले.
पण काही जणाना हे मुळ स्वभावाने न्यायधिश होणे जमले नाही.
मग त्या सर्वांनी एकमेकांशी संपर्क साधुन एक निर्णय घेतला.
कोण चुक कोण बरोबर हा निर्णय आपण घ्यायचा नाही.
'अ' चे 'ब' शी शत्रुत्व हे वेगळे कंपार्ट्मेंट.
आपल्याला दोघेही सारखे.
इथे मैत्री करायला वेळ मिळत नाही.
दुष्मनीच्या पाट्या का उचलायच्या?
दोघांच्या बरोबर मैत्री तेवढीच निभवायची.
दोघांनाही एकच सांगायचे,
मी कुणाचीही बाजु घेणार नाही.
आपली मैत्री आणि तुम्हा दोघांची लढाई ही वेगवेगळी कंपार्ट्मेंट्स.
आणि ह्या मुद्द्यावर तुम्हा दोघांपैकी कुणाला आमची मैत्री सोडावीशी वाटली तर ती तुमची मर्जी.
काय म्हणता मंडळी तुम्हाला काय वाटते?

महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक धोरण :: प्रतिक्रिया पाठवा :: (पण कोठे?)

महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक धोरण :: प्रतिक्रिया पाठवा :: (पण कोठे?)

http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=473...

http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=473...

(या असल्या धोरणाबाबतच्या बातम्या आम्हाला वर्तनामपत्रातूनच का वाचायला भेटतात? शासनाला सांस्कृतिक धोरण ठरविण्यासाठी सर्वसामान्य लोकांपर्यंत जाण्याची गरज वाटत नाही काय? असो.)

प्रा. आ. ह. साळुंखे यांच्या अध्यक्षतेखाली राज्याचे सांस्कृतिक धोरण ठरविण्यासाठी एक समिती विधानसभा निवडणुकांपूर्वी त्यावेळचे सांस्कृतिक मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या पुढाकाराने स्थापन करण्यात आली होती.

समितीच्या शिफारशींची सविस्तर माहिती www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर मिळू शकेल. प्रस्तुतचे लेख व प्रत्यक्ष शिफारशी वाचून वाचकांनी महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर येत्या २८ फेब्रुवारीपर्यंत प्रतिक्रिया नोंदवणे अपेक्षित आहे. त्यानंतरच या समितीच्या शिफारशींवर साधकबाधक चर्चा होऊन त्याचे प्रत्यक्ष धोरणात रूपांतर होण्याची प्रक्रिया सुरू होईल. महाराष्ट्र शासनाचा या प्रकारचा हा पहिलाच प्रयत्न असून तज्ज्ञांची मते आणि लोकांच्या सूचना यांतून समितीच्या शिफारशींची योग्यायोग्यता, आवश्यकता, उपयुक्तता पडताळून पाहिली जाणे गरजेचे आहे!

www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर सदर माहिती जरी उपलब्ध असली तरी त्यावरील प्रतिक्रिया कोठे द्याव्यात यात कोठेही उल्लेख नाही. 'संपर्क करा' हा इमेल आयडी पण सापडत नाही. अशा वेळी कोणी या धोरणावर प्रतिक्रिया व्यक्त करण्यासाठी कोठे संपर्क कराव? नाही म्हणायला एक अर्ज आहे. पण तेथे कशा प्रकारे प्रतिक्रिया चढवावी अन त्याची पोचपावती मिळेल याची खात्री काय?

थोडक्यात शासकिय संकेतस्थळाने आपली दिवाळखोरी परत एकदा जाहिर केलेली आहे.

असो. तत्राप आपल्यामध्ये कोणास या प्रतिक्रिया देण्याच्या (पक्षी लश्कराच्या भाकर्‍या भाजणे हा शब्दप्रयोग योग्य होईल काय?) मोह झाल्यास आपण जरूर करावा अन राज्याचे सांस्कृतिक धोरण ठरविण्यासाठी सहभागी व्हावे.

सुधारीत आव्रुती - हा भलाईचा जमाना नक्किच नाही(जमाना हा शहाणपट्टीचा!)

जय श्री छ्त्रपति शिवाजी महराज
मला हे (खालील) म्हणायचे (म्हणने मांडुन आपले विचार जाणायचे होते/आहेत)
"मुद्देसुद बोलणे" पेक्षा "मुद्देसुद लिहणे" आवडते.

१.विनाकारण अरे येsssss करणारे,परीक्षणाने सांगतो,शटाकभर(ह्या शब्दाचा उगम नाशिक आहे का?) असतात.
त्यांना "काय रे!" नाहि केले तर "बाबु,अजुन घे" म्हणुन "देतात"

२.दुर्गुण बाजुला ठेवले तर महाराष्ट्र पोलिसांरखे दक्ष व कर्तबदार पोलिस देशात काय जगात नाहीत,आणि दुर्गुणासहित "एकापेक्षा एक" गेंडयाच्या कातडीचे,चरबी चढलेले,रेडयाचे आहेत.
ह्याला अपवाद असलेले वाघांपेक्षा वेगाने दिवसेंदिवस दुर्मिळ होत आहेत.

३. एखादा व्यक्ति "राजकीय" किंवा सबंधित आहे,म्हणुन त्याला भाव देणे,म्हणजे त्याला आपण त्यासमोर हतबल आहोत हे दाखवणे नाही का?
हे "राजकारण" नावाचं भुत,अशा "चु"मुळेच वाढलयं,म्हणुन माझे म्हणने मांडले.

हां तर,मला असा माझा राग लिहुन दाखवायचा होता व आपले म्हणने (हा न चुकिचा आहे ना? Waiting ) एकायचे आहे.

विषयालासोडुन,
मराठी ते मराठी सुन्दर्,अल्हाददायी व इंग्रजी ते इंग्रजी,हिंदी बोलण्या,लिहण्या,वाचण्यात मला काडीचा रस नाही.
कुणाला दुखवण्याचा माझा उद्देश नाही,तरीदेखिल कोणी दुखावले तर त्याने झेंडु बाम 'खाउन' पहावा(प्रयोगम्हणुन),कारण 'लावुण' तर काय फायदा होणार नाही हे नक्की.

विनोदी वाचायचंय?मग हे वाचु नका

कोणाचे बोलुन बोलुन कान चावणे व उगीचच गरज नसलेले लिहुन लेख वाढवणे यांत काही फरक नाही.म्हणुन माझे काही "विचार" (मला दुसरा शब्द सुचत नव्हता ) सरळ मुद्दांमधे मांडत आहे.

कोणत्याही दोन मुद्द्यांचा एकमेकांशी काही संबंध नाही,तसे योगायोगाने आढल्यास तो आपला मुर्खपणा समजावा.

१. E tv वरील COMEDY EXPRESS मधे शाब्दिक अश्लिलपणा(मानव शरीर संबधीत) रंगटायला त्या निर्माता व लेखकाला लाज नाही वाटत.
ते कोणि स्वत:हुन मुद्दाम हे करणारे आपल्या आईबाबांना सांगतिल का कि,"आता ज्यावर तुम्ही हसलात ना तो फाजिलपणा मी केला आहे!"

२.काल वाचले एका M.B.B.Sच्या विद्यार्थांने १ मार्कने नापास झाला म्हणुन आत्महत्या केली.ह्याला कारणिभुत सबंधीत आधिकारी व शिक्षणपद्धत जबाबदार नाही का?

३.आता राज्यसरकारच्या नावाने बोंबा मारणारे मतदानावेळी काय झक मारत होते,असे म्हणणारे स्वतः काय मारत होते?

४.राज ठाकरेंप्रमाणे भाषण करताना कोणामधे तशी मराठीसाठी तळमळ मलातर नाही दिसत.(माझा कोणत्याही राजकीय पक्षाशी कसलाही संबंध नाही).

५.बाह्यरुपाला एवढे महत्व प्राप्त करुनदेण्यात कोणास जवाबदार ठरवावे,आपणास हा विषय तितका गंभीर वाटत नसल्यास ह्यावर जास्त विचार करु नये.(माझ्यासाठी तो गंभीर आहे,असे समजु नये).