शुभेच्छा
एक दिवस मैत्रीचा..
ऑगस्टचा पहिला रविवार असो किंवा कॉलेजचा पहिला दिवस, पावसाळ्यात नव्या मैत्रीचे नवे दिवस सुरु होतात. कारण ते दिवस नवे असतात, ते वर्ष नवे असते अन् तो अभ्यासक्रमही नवाच असतो. कॉलेज कँपस नवनव्या मैतरांनी फुलून येते. तिथूनच मग मैत्रीचे नवे जग सुरू होते. नव्याने मनांची चाचपणी केली जाते. काही लगेचच जुळतात, काही वेळ घेतात तर काही मने नुसतीच छळतात, प्रसंगी जळतातसुद्धा!
एकंदर आठवणीत राहते ती कॉलेजचीच मैत्री. त्या वयात जाण आलेली असते. भल्याबुऱ्यांची समज कळत जाते. अपने-पराये देखील ओळखता येत असतात. हीच मैत्री जीवनभर सोबतीला येते. या आठवणी आयुष्यभर पुरतात, वेळी अवेळी स्मरतात अन् कधी कधी त्या मैत्रीसाठी छानशा ओळीही स्फुरतात. तर अशी ही मैत्री अवीट गोडीची, अजोड जोडीची अन् अनिवार ओढीची..
या मैत्रीने आम्हांस काय दिलं? मित्रत्वाचं मोठ्ठं सर्कल दिलं, मित्रप्रेम चिरकाल दिलं अन् शाश्वताचं भान हरकाल दिलं. मित्रांनी जशा चांगल्या गोष्टी दिल्या तशा वाईट वाटाही दाखवल्या. काही मित्र सोवळे होते तर काही फार निराळे होते. काही 'असे' होते, काही 'तसे'. 'अशां'च्या जवळ जातांना बिकट वहिवाट दिसायची तर 'तशां'च्या सान्निध्यात धोपट मार्गाने जाऊन चुकणं व्हायचं, तरीही पुन्हा धडपडत वाटेवर यायचं, यात कमालीचा रोमांच होता. जीवनपथाचा प्रत्येक मैल असल्या अविस्मरणीय दगडांनी पूर्ण झालाय...
मैत्रिणीही होत्या! खळाळून हसणाऱ्या, मुळुमुळू रडणाऱ्या, कोणाच्यातरी आठवणींत कुढणाऱ्या. त्यातील काही अकालीच विखुरल्या, काही अज्ञातवासात शिरल्या तर काही आजपर्यँत पुरून उरल्या! त्या आजही फोन करतात, आयुष्याची उजळणी मांडतात, 'ते दिवस मजेचे होते' असेही अश्रू त्या कधीकधी सांडतात. त्यांना धीर देणं हे एकच काम आता उरतं. हे आयुष्य असंच बेफिकीरपणे पुढे संपत जातं याची जाणीव करून द्यावी लागते. परंतु तरीही त्या सर्वांची उणीव प्रकर्षाने जाणवत रहाते. वाटतं, ही मैत्रीही खूपच परिक्षा पाहते...
आणि त्या सर्व परिक्षार्थींना मैत्रदिनाच्या अनेक हार्दिक शुभेच्छा द्याव्याशा वाटतात! देऊ यात...
प्राजक्ता पटवर्धन यांचे अभिनंदन!
मध असला की मधमाध्या गुणगुणतात, सुवास आला की भुंगे घोंघावतात आणि गुण दिसले की गुणग्राहक जमतात! या उक्तीचा प्रत्यय नुकताच पुण्यात आला, ख्यातनाम कवियत्री आणि मिसळपाव, मी मराठी आदि संस्थळांच्या सदस्या प्राजक्ता पटवर्धन यांच्या अल्बमच्या प्रकाशनाच्या निमित्ताने.
मुळातच प्राजक्ता पटवर्धन या प्रतिभावंत कवियित्री. मिसळपाव, मी मराठी आदि संस्थळावरच्या रसिक वाचकांची त्यांच्या कवितांना आधीच भरभरुन दाद मिळालेली आहे. विविध संस्थळांचे मालक, संपादक आणि समस्त जालकरी मंडळींचा समर्थ पाठिंबा देखील त्यांना सतत मिळत असतोच. नुकताच त्यांचा फुलांची आर्जवे हा कवितासंग्रह प्रकाशीत झाला आणि आता त्यांच्या कविताचा अल्बमदेखील बाजारात आला आहे. या अल्बमच्या प्रकाशन सोहळ्याचा इत्यंभुत, सविस्तर आणि सचित्र वृत्तांत मिसळपावचे संपादक बिपिन कार्यकर्ते यांनी त्यांच्या खास शैलीत सोहळ्यानंतर लगेचच दिला होताच.
आंतरजालावर रमणार्या प्राजक्ता पटवर्धन यांचे समस्त जालकर्यांनी जे कौतुक केले ते तसे अपेक्षितच होते. परंतु या सोहळ्यानंतर प्राजक्ता पटवर्धन यांचे जे कौतुक विविध भाषिक वृत्तपत्रांमधे छापुन आले ते पाहुन कुण्याही जालकर्याची छाती अभिमानाने फुलेल यात अजिबात शंका नाही.
आज प्राजक्ता पटवर्धन या अक्षरशः पेज थ्री सेलिब्रिटी झालेल्या आहेत. मराठी वृत्तपत्रांनी त्यांच्याबाबत लिहिले आहेच पण अगदी भाषेची दरी लीलया ओलांडुन त्यांच्या कवितांनी एरव्ही एतद्देशीय भाषिक साहित्याकडे उपमर्दानेच पाहणार्या इंग्रजी वृत्तपत्रांवर देखील गारुड घातलेले आहे. विविध वृत्तपत्रांनी याविषयाची दखल अशी घेतलेली दिसते:
१. सकाळ ( २० जुलै २०१० )

---------------------------------------------------------------------------------------------------------------
२. पुढारी ( २० जुलै २०१० )

----------------------------------------------------------------------------------------------------------------
३. प्रभात ( १९ जुलै २०१० )

------------------------------------------------------------------------------------------------------------------
४. लोकसत्ता ( २१ जुलै २०१० )

-------------------------------------------------------------------------------------------------------------------
५. लोकमत ( १९ जुलै २०१० )

-------------------------------------------------------------------------------------------------------------------
६. केसरी ( २२ जुलै २०१० )

------------------------------------------------------------------------------------------------------------------
७. डी एन ए ( इंग्रजी वृत्तपत्र ) ( २२ जुलै २०१० )

आज गुरुपोर्णिमा....
गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु:
गुरुर्देवो महेश्वरा :
गुरु: साक्षात परब्रह्म
तस्मै श्रीगुरुवे नम: ॥

हे प्रार्थना गुरुदेव से यह स्वर्गसम संसार हो, अति उच्चतम जिवन बने, परमार्थमय व्यवहार हो, ना हम रहे, अपने लिये, हम को सभी से गर्ज है, गुरुदेव यह आशिष दे, जो सोचनेका फर्ज है ll हम हो पुजारी तत्व के,गुरुदेव के आदेशके सच प्रेम के नित नेम के , सद्धर्म के , सत्कर्म केहो चिढ झुठी शहकी, अन्यायकी अभिमानकी,सेवा कर्म को दासी की, परवाह नही हो जानकी ll छोटे न हो हम बुद्धी से , हे विश्वमय से ईशमय , हो राममय और कृष्णमय् , जगदेवमे जगदीशमे हर ईंद्रियोंपर ताप कर , हम वीर हो अतिधीर हो , उज्ज्वल रहे सरसे सदा , निजधर्मरत खंबीर हो ll अतिशुद्ध हो आचारसे , तन-मन हमारा सर्वदा ,अध्यात्म की शक्ती हमे , पलभी नही करदे जुदा , इस अमर आत्मा का हमे हर श्वास भरमे गम रहे , अगर मौत भी आ गई , सुख दु:ख हमसे सम रहे l हे गुरुदेव हम सबको सदबुद्धी दे l सत्कर्तव्य करने की प्रवृत्ती दे l सच बोलनेका अभ्यास दे l सत स्वरुप का ग्यान दे l
llशिष्यादिच्छत्पराजयम..ll
विवेकानंदांना घडवणारे...

जेव्हा नवीन कळी उमलते तेंव्हा त्याचा आनंद कोणत्या शब्दांत वर्णावा ! तीच कळी अस्तित्वात येउन तिच फलांत रुपांतर करण्यासाठी त्याला लागणारं पोषक वातावरण उपलब्ध करण्यास सहाय्य ठरणारे गुरु.. जन्माला आल्यापासुन त्यावर संस्कार करण्याचे कार्य पार पाडत असलेले माता-पिता हे प्रथम गुरु..
शिक्षण हा कधीही न संपणारा शोधच असतो. विद्यार्थ्याची रुची- कल जाणुन त्याना योग्य मार्गदर्शन देणारा हाच गुरु..खरे तर अशीही म्हण प्रचलीत आहे की 'अनुभवासारखा श्रेष्ठ दुसरा गुरु नाही' ,'ग्रंथ हेच गुरु', पण सर्जनशीलता, स्वयंविचार,स्वयंअनुभव, निरिक्षणशक्तीचे एकत्रिकरण कर्ण्यास गरज भासते ती मानवी गुरुची...
आपल्याला असलेले अनुभव वाचायला उत्सुक....
आम्ही : एका स्वप्नपूर्तीचे साक्षीदार
मराठी जालावर आल्यापासून जे काही लोक ओळखीचे झाले आहेत, जीवाभावाचे मैतर झाले आहेत, त्यात प्राजुचं नाव अगदी आवर्जून घ्यावं असं. मराठी आंतरजालावर जे काही लोक अगदी सातत्याने आणि चांगलं लेखन करतात त्यातही तिचं नाव अगदी अग्रणी आहे. तिच्या सुंदर कविता / गझला मराठी संस्थळांवर नियमितपणे प्रसिद्ध होत असतात. तर अश्या या आमच्या मैत्रिणीच्या कवितांचा एक अल्बम येऊ घातलाय ही बातमी कुठून कुठून कानी येतच होती. आता प्राजुचा स्वभाव माहिती असल्यामुळे हा अल्बम एकदम नीटनेटका आणि झकास होणार हे नक्की असे वाटतच होते. साधारण दीड दोन महिन्यांपूर्वी प्राजुच्या 'फुलांची आर्जवे' या काव्यसंग्रहाच्या प्रकाशनाला हजर रहायचा योग आला होता. तेव्हाच या अल्बमचा प्रकाशन सोहळाही लवकरच होणार आहे असे कळले होते. तेव्हा पासून या कार्यक्रमाची वाट बघणे चालू होते.
मध्यंतरी, प्राजुने हा सोहळा १८ जुलैला पुण्यात होणार आहे असे कळवले आणि बर्याच लोकांकडून 'या समारंभाला हजर राहू' अशा अर्थाचे निरोप मिळाले. या निमित्ताने प्राजुला प्रत्यक्षात भेटायची संधी मिळणार होती आणि आपल्या मैत्रिणीचे कौतुक करायला जातीने हजर रहायचेच असे तेव्हाच ठरवले. निरोप आले, निरोप दिले गेले. प्ल्यानिंग झाले आणि आम्ही १८ जुलैला सकाळी पत्रकार भवन, पुणे इथे जमलो. मी, अदिती, परा, पेठकर काका, राजे, चंद्रशेखर महामुनी, सोनाली घाटपांडे, प्रकाश घाटपांडे, मनिष, पुण्याचे पेशवे, दत्ता काळे, लिखाळ, शाल्मली, टार्या, राजेश घासकडवी, धम्या, अविनाश कुलकर्णी, श्रावण मोडक, मराठमोळा अशी दणदणीत उपस्थिती होती. प्राजु जातीने स्वागत करून गेली.
कार्यक्रम बरोब्बर १० ला सुरू होणार असल्याने बरेच लोक १०.३० पर्यंत आले. त्यामुळे आमच्या सारख्या टैमवर आलेल्या लोकांना जिन्यात उभे राहून धिंगाणा करायला वाव मिळाला. आल्यागेल्या लोकांवर लक्ष ठेवत, आम्ही जिन्यात गर्दी करून उभे होतो. एक दोन पुणेरी आज्यांनी आमच्याकडे थोडा जळजळीत कटाक्ष टाकून आम्ही लोकांना अडचण करतो आहोत हे आमच्या मनावर बिंबवण्याचा प्रयत्न केला खरा. पण काही अस्सल पुणे-३० लोकही आमच्यातच असल्याने ते कटाक्ष रामानंद सागरच्या रामायणातल्या बाणांप्रमाणे मोडून पडले. शिवाय प्राजुच्या नात्यातले लोक सोडले तर एकगठ्ठा अशी आमचीच व्होटब्यांक असल्यामुळे प्राजु पण आमच्या दंग्याकडे कानाडोळा करून होती. ;)
कार्यक्रम १०.३० ला मात्र अगदी सुरूच झाला. कार्यक्रमाला बरेच ओळखीचे चेहरे दिसत होते. काही चेहरे टीव्ही आणि चित्रपटातून दिसणारे तर काही जालावर दिसणारे. बर्याच मराठी कार्यक्रमातून किंवा चित्रपटातून दिसणारे, प्रसिद्ध कलाकार श्रीरंग गोडबोले आणि नटरंग या चित्रपटाचे दिग्दर्शक रवि जाधव हे या कार्यक्रमाला अध्यक्ष आणि प्रमुख पाहुणे म्हणून लाभले होते. कार्यक्रमाची धुरा मंजुश्री गोखले यांनी सांभाळली. सुरूवातीला प्रास्ताविक, पाहुण्यांचे स्वागत आणि त्यांचे दोन शब्द वगैरे झाले आणि कार्यक्रमाला खर्या अर्थाने सुरूवात झाली ती अल्बम मधल्या गाण्यांच्या आणि त्या गाण्यांवर केलेल्या सुंदर नृत्यांच्या सादरीकरणाने. पौलमी पेठे, अमृता काळे, मधुरा दातार, संगिता चितळे इत्यादी कलाकारांनी अल्बम मधली गाणी पेश केली. प्राजुनेही तिचे मनोगत व्यक्त केले. तिच्या आयुष्यातला एक अतिशय आनंदाचा क्षण ती आमच्या सर्वांबरोबर वाटून घेत होती... अतिशय भावनाविवश झाली होती. काय बोलू आणि काय नको असे झाले होते तिला. सगळ्या आभारप्रदर्शानात तिने आपणा सगळ्या जालिय मित्रमंडळींचे खास आभार मानले. त्यावेळी झालेला टाळ्यांचा कडकडाट (आम्हीच केलेला) सगळ्यात जास्त होता. ;)

प्राजुचे पती आणि अल्बमचे निर्माते जगदीश पाहुण्यांचे स्वागत करताना.


अमृता का़ळे

संगिता चितळे

पौलमी पेठे

प्राजु आणि जालिय मैत्रिण शाल्मली

नक्की किती मोठे व्हायचे त्याचे परिमाण सांगताना श्रावण मोडक आणि बाजूला आज्ञाधारक अभ्यासू लिखाळ भावोजी.

लिखाळ भावोजी की जान खतरे मे... द डेंजर बिहाइंड.

आधुनिक भरतभेट किंवा शिवाजी-अफझलखान भेट.

अवघडलेल्या अवस्थेतही जीवाच्या भितीमुळे बळंच कसं हसावं याचा वस्तुपाठ देताना परा

शूर आम्ही सरदार.... बाजीराव पेशवे (पहिले की दुसरे ते अजून नक्की कळले नाहीये. माणूस बेरकी आहे. कळू देत नाही.)

हात जायबंदी करून घेताना प्राजु...

पुणेरी इंगा बघितलेला राजेश घासकडवी पुणेरी इंगा दाखवणार्या परा बरोबर...

आम्हाला काय ब्वॉ कोणी नेलं नाही कधीच समर्थ भोजनालयात, म्हणून मग आम्हीच गेलो आणि फोटो काढून हौस भागवली. मागे आमचे आधारस्तंभ (पहिले का दुसरे) बाजीराव ऊर्फ पुण्याचे पेशवे. कोपर्यात अर्धा मराठमोळा आणि मागे (काकूंना घाबरून) तोंड लपवत पेठकर काका.


ऑटोग्राफ घ्यायच्या निमित्ताने पुढे पुढे करताना परा, मनिष, आदिती आणि आपल्याला हे असं का नाही सुचत या विचाराने व्यथित टार्या.
एकंदरीत कार्यक्रम सुरेखच झाला. या कार्यक्रमाच्या निमित्ताने आम्हाला सगळ्यांनाच भेटता आले बर्याच दिवसांनी. शिवाय या निमित्ताने काही जालिय भरतभेटी झाल्या, जुने मित्र परत भेटले. आपुलकीने चौकशी झाली, विचारपूस झाली. मजा आली. काही लोकांना जायची घाई असल्याने ते पळाले. आमच्या सारखे काही निरूद्योग लोक आता एकत्रच जेवू म्हणून एका हाटेलाकडे प्रयाण करते झाले. तिथेही दंगा झालाच भरपूर.

विचारविनिमय.

नंतर म्हणत होता टार्या की हेल्मेट सोडून देणार होता... एका फटक्यात काम तमाम.

टार्या त्याच्या खेळण्याबरोबर.

भाळी चंद्र असे धरिला... वडारवाडी तालुका कृषि उत्पन्न बाजार समितीचे धडाडीचे तरूण नेतृत्व धमालदादा बारामतीकर देशमुख

विद्वज्जनांना अन्नदान केल्याचे पुण्य मोजताना पेठकर काका.


संध्याकाळच्या बैठकीचे नियोजन करताना मंडळी. पेठकर काकांच्या आधाराने (कसाबसा) उभा असलेला राजे. ;)
***
प्राजुच्या निमित्ताने असेच अजून बरेच प्रसंग आम्हाला उपभोगायला मिळो हीच इच्छा. कीप इट अप, प्राजु. :)
डॉक्टर जगो..
डॉक्टरलोक पेशंटला नेहमीच कापतात, पैशांत मापतात किंवा टाळूवरचं लोणी चापतात... असे अनेक गैरसमज जनमाणसांत पसरलेले असतील. परंतु डॉक्टरांची कथा अन् व्यथा निराळीच आहे.
मूळात हा व्यवसाय/ पेशा रांत्रंदिन युद्धाचा प्रसंग असा असतो. डोळ्यात तेल घालून रुग्ण तपासणे, योग्य निदान करणे, उपचार पुरवणे हे काही सोपे काम नाहीये मित्रांनो.
पेशंटचा आजार वा पिडा कशी दूर करता येईल याच विचारांत डॉक्टर गढलेले असतात. रुग्ण बरा झाल्याशिवाय बिल घेतले जात नाही किंबहुना तसे उद्दिष्ट त्यांच्यापुढे मुळीच नसते.
समाजसेवा अन् सेवाभाव डॉक्टरकीत दडलेला असला तरी मेवा लाटणारे लुटारू डॉक्टरही आढळतात. वस्तुतः कुठलीही सेवा मेव्यासाठीच योजिली असल्याचा आभास लुटारूंच्या अंतरी वास करून असतो. म्हणूनच तिथे भ्रष्टाचाराशी सहवास सुरु होतो.
पूर्वीपेक्षा वैद्यकिय क्षेत्र फार प्रगत झालेय. नव नव्या संशोधनांनी परिपूर्ण होऊ लागलेय. नाविण्याची नवी चिकित्सा साधने उपलब्ध झाल्यामुळे आजाराच्या मूळापर्यँतचा प्रवास स्क्रिनवर सहजपणे पाहता येऊ लागलाय. अर्थात 'आमच्या अद्ययावत ज्ञानाचा उपयोग खर्चिक असल्याने तो तुम्ही पेलवलाच पाहिजे' अशी लालसा डॉक्टरीपेशात मूळ धरतांना आढळते.
कितीही किस काढला तरी मोरपिस हाती न लागता खराटाच अंगावरून फिरेल अशी परिस्थिती आहे. चांगल्या सेवाभावी व्रतस्थांना विसरायचं अन् वाईट वागणाऱ्यांची खुलेआम चर्चासत्रे भरवायची ही तर समाजाची वृत्ती.
चांगलं सोडून देऊन वाईटाला कुरवाळायचं अशी ही प्रवृत्ती. वृत्ती काय किंवा प्रवृत्ती काय एकदा का बोकाळली की चित्ती समाधान उरत नाही. म्हणूनच कोणत्याही पेशाकडे, व्यक्तिकडे आपण कोणत्या नजरेने पाहतो त्यावर सर्व काही अवलंबून आहे.
वैद्यकीय व्यवसाय अगोदर सेवेचं व्रत असतं मागाहून अर्थार्जनाचा पेशा ठरतो. हे लक्षात घेऊन अगणितांचे प्राण कंठाबाहेर पडू न देणाऱ्या डॉक्टरांना आदरार्थी शुभेच्छा द्यायलाच हव्यात. नाही का?
वटपोर्णिमेच्या शुभेच्छा

(चित्र जालावरुन साभार.)
वटपोर्णिमेच्या सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा.
मला अतिशय आवडणारा समयोचित श्लोक "सौन्दर्य लहरी" मधून -
विरिंचि: पंचत्वं व्रजति हरिरप्नोति विरतिं
विनाशं कीनाशो भजति धनदो याति निधनम|
वितन्द्री माहेन्द्रीविततिरपि अंमीलीत्-दृशा
महासंहारेSस्मिन विहरति सति त्वत्पति-रसौ||२६||
महा संहाराच्या समयी विरंची (ब्रम्हा) हा पंचतत्वामधे विलीन होतो. किनासा(यम, प्रत्यक्ष मृत्यूचा देव) मृत्यू पावतो.कुबेर, धनाच्या देवतेचा अंत होतो. इंद्र त्याच्या समस्त देवगणांसमवेत या संहार समयी डोळे मीटतो. परंतु हे सती अशा महासंहार काळी तुझा केवळ तुझा पती (सदाशिव) विहार करतो, क्रीडा करतो.
*कवीने पार्वतीच्या सौभाग्याची स्तुती वरील कडव्यात गायली आहे.
आनंदाची बातमी
अभिनंदण होSSSSSSSSSSSSSSSS
गोंद्या आला रे आला
गुड न्युज रे ..धमाल 'बाबा'??

ऐ कोण आहे रे तिकड जा जा हत्ती वरुन साखर्या वाटा बारा- गुंजण मावळात , तळ कोकणात तोफांची सलामी द्या
धमाल रावांच युवराज आले म्हनाव कळु दे जरा लोकांना
आमचे स्नेही व मित्र श्री धमाल मुलगा ह्यांना मुलगा झाल्याची गोड बातमी कळाली !
धमाल मुलाचा धमाल बाबा झाला होSSSSSSSSSSSSSSSSSSSS
आजची स्त्री-२
ब्रम्हदेशात गेल्या दोन दशकांपासून अहिंसेच्या मार्गानं चालू असलेल्या स्वातंत्र्यलढ्याचा तेजस्वी चेहरा. गेल्या वीस वर्षातला अधिकांश काळ तुरूंगात / नजरकैदेत काढूनही जनतेच्या मनातल त्यांच अढ्ळ स्थान. त्या नजरेनं पाहिल तर कधीच पराभूत झालेल ब्रह्मदेशच हुकूमशाही सरकार.

दुसरं महायुद्ध संपायच्या पार्श्वभूमीवर झालेला जन्म. वडिल एक उच्च सेनाधिकारी; आई ब्रम्हदेशाच्या परराष्ट्र मंत्रालयात नोकरी. २ वर्षाची असतानाच वडिलांची झालेली हत्त्या. नंतर आईची नेमणूक भारतात ब्रह्मदेशाची राजदूत म्हणून झाली म्हणून दिल्लीतलं वास्त्व्य, इथेच गांधीच्या विचारांचा पडलेला प्रभाव. नंतर लंडन मध्ये उर्वरित शिक्षण त्यानंतर संयुक्त राष्ट्र्संघात नोकरी; नवर्याबरोबर भूतान, भारत, इंग्लंड मध्ये वास्तव्य आणि उच्च शिक्षण असा मुख्यत्वेकरून एक मुलगी-पत्नी-आई असा जीवनप्रवास ( स्वातंत्रलढ्यात सक्रीय कार्य नव्हतं तोपर्यंत ).

१९८८ मध्यी आईच्या आजारपणांत भेट द्यायला रंगूनला गेल्या असताना हुकुमशहा 'ने विन' च्या राजीनाम्यानंतर ( कार्यकाल ६२-८८ ) लोकशाहीच्या मागणीसाठी प्रचंड आंदोलनं झाली , झालेला हा उठाव सरकार कडून हिंसात्मकरित्या दडपला गेला आणि याचवेळी ओंग सान सू ची यांनी राजकारणात सक्रीय सहभाग जाहीर केला. सरकारनं जमावबंदीचा आदेश लागू केला असूनही लाखोंच्या जागृतीच काम केलं, या बंदीच्या दुसर्याच दिवशी नॅशनल डेमोक्रॅटिक लिग ची स्थापना केली आणि चळ्वळीच नेतृत्व त्यांच्याकडे आलं.

असहकार आणी अहिंसा ह्या तत्वावर हा लढा चालू आहे...या सगळ्या दरम्यान त्यांच्या आईचं निधन झाल आणि त्यावेळीच त्यांनी जाहीर केलं की त्यांच्या आईवडिलांनी देशासाठी जस आयुष्य वेचल तसंच त्याही; वेळ्प्रसंगी प्राण देउनही देशसेवा करतील. देशाच्या चारीदिशांना फ़िरून जनमत तयार केल. पण १९८९ मध्ये झालेल्या निवडणूकांत भाग घेण्यासाठी सरकारकडून बंदी घातली गेली; त्यांना अटक झाली. ह्या बंदीनंतरही त्यांचा पक्ष ८२% जागा जिंकला पण हुकूमशाही सरकारन ही निवडणूक रद्दबादल ठरवली.
१९९५ मध्ये तब्बल ६ वर्षांनी नजरकैदेतून सुटका झाली; सुटकेच्या पहिल्या काही महिन्यात त्यांनी घेतलेल्या सभांना लाखोंच्या गर्दीन पुन्हा आपल केलं आणि चिडून परत सभाबंदी जाहीर झाली. त्यांचे अनेक सहकारी मारले गेले कित्येक आजही तुरूंगात खितपत आहेत.
त्यांनी ब्रह्मदेशाला भेट देउ नका आणि कोण्तीही आर्थिक गुंतवणूक लोकशाहीची स्थापन झाल्याशिवाय करू नका अशी विनंती आंतरराष्ट्रीय समुदायाला केली आहे, अमेरिकेनं आर्थिक निर्बंध घातलेत पण आशियाई देश मात्र हा अंतर्गत मामला आहे म्हणून गप्प आहेत...सार्क परिषद्सुद्धा मूग गिळून आहे.
त्यांच्या पतीनं एकदाच शेवटच भेटू द्या म्हणून केलेली विनंतीही धुडकावून दिली गेली (त्यांच ९९ ला कॆन्सरन निधन झालय )हा सगळा व्यक्तिगत छळ, त्रास हा बर्माच्या स्वातंत्र्यप्राप्तीसाठी आवश्यक असा त्याग आहे अस त्या समजतात.
२००० साली परत अटक; २००२ ला सुटका; २००३ पासून परत नजर्कैदेत असं अट्क्-सुटका-परत अटक च्रक्र अव्याहत चालू आहे, लढा अजून सुरूच आहे.

नेल्सन मंडेलांनंतर 'स्वातंत्र्य लढा' या शब्दांना समानार्थी शब्द असं हे अद्वितीय व्यक्तिमत्व , आत्तापर्यंत नोबेलसहीत ६४ आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी त्या आलंकृत आहेत.अशा अत्यंत तेजस्वी, निडर ओंग सान सू ची यांचा आज ६५ वा वाढदिवस ( १९ जून ); त्यांना दीर्घायुष्य लाभो; आणि त्यांचे यापुढील वाढदिवस स्वतंत्र ब्रह्मदेशात साजरे करण्याच भाग्य त्यांना आणि आंम्हा सर्वांना लाभो हीच प्रार्थना!
* संदर्भ : पुस्तक 'फ्रिडम फ्रॉम फिअर' आणि आंतरजालावरून साभार
दहावीचा निकाल ऑनलाईन येथे पहा
उद्या दहावीचा निकाल आहे १७-जून-२०१०
खालील अधिकृत संकेतस्थळावर सकाळी ११ वाजल्यापासून निकाल उपलब्ध होतील
वरील अधिकृत संकेतस्थळाव्यतिरिक्त http://www.rediff.com/ या संस्थळावरही उपलब्ध होणार आहे अशी बातमी आहे. पण अधिकृत संकेतस्थळावर निकाल पाहिलेला उत्तम.
दहावीच्या सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा 
- सागर
धमालरावांना वाढदिवसाच्या शुभेच्छा ...
आज सकाळी उठलो आणि पहिल्याछुट आपण "पुण्यात" नसल्याचे लै दु:ख झाले.
मायला पुण्यात असतो तर काय दणका झाला असता की बोलायचे काम नाही.
काय ते भल्लेभल्ले होर्डिंग्स, पोश्टर्स, पेप्रात जैराती, केबल टीव्हीवर शुभेच्छांच्या क्लिपिंग्स वगैरे वगैरेचा दणका उडवला असता.
आज आमच्या मित्राचा वाढदिवस.
नव्हे नव्हे, आमच्या परममित्राचा आणि आंतरजालावरचे एक लोकप्रिय व्यक्तीमत्व व 'कट्टा स्पेशालिस्ट' श्री. श्री. श्री. धमालराव डोणजे पाटलांचा वाढदिवस.
त्यांना आमच्याकडुन वाढदिवसाच्या ह्या किंचित शुभेच्छा !!!

अवांतर :
ही केवळ पोच समजावी, बाकी सविस्तर लेख कम "धमालरावांचे व्यक्तिचित्र" लवकरच येत आहे ;)
आम्ही एकेकाळचे शिवसेनाप्रेमी असल्याने आजसुद्धा 'वाढदिवसाचा मुहुर्त' आम्ही शरसंधान करण्यासाठी वाया घालवत नाही :)

