मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

शुभेच्छा

निकाल : महाराष्ट्र दिन २०१७ - चारोळी स्पर्धा

साहित्य संपादक ·

आणि विजेत्यांचे विशेष कौतुक!!! इतक्या अल्पकालीन सुचनेवर भरभरून उत्स्फूर्त चारोळ्या आल्या. मिपाकरांच्या उत्साहाला, कल्पनाशक्तीला, परीक्षकांच्या आयोजनाला, परीक्षकांच्या निवडीला सलाम!!!!

कृपया चारोळ्या कुठल्या निकषांवर निवडल्या हे सांगाल तर बरे होईल. महाराष्ट्राची महती गायची होती ना मिपाकरांनी? विषय "महाराष्ट्र" आणि उच्च दर्जाची मराठी भाषा, चारोळीचे व्याकरण, महाराष्ट्राच्या गुणवैशिष्ट्यांचे वर्णन वगैरे पाहिले तर निवडलेल्या चारोळ्या का निवडल्या गेल्या हे अजिबात कळाले नाही....

In reply to by शार्दुल_हातोळकर

नमस्कार. स्पर्धेतल्या चारोळ्यांचं गुणांकन खालील निकषांवर केलं गेलं: १. विषय २. शब्दसंख्या ३. प्रमाणलेखन ('शुद्ध'लेखन नव्हे) ४. गेयता ५. अर्थ परीक्षण शक्य तितकं वस्तुनिष्ठ असावं असा प्रयत्न होता. पण अर्थात सगळ्याच निकषांत वस्तुनिष्ठता आणता येत नाही. वैयक्तिक 'बायस' येऊ नये म्हणून तीन साहित्य संपादकांनी केलेल्या गुणांकनाची सरासरी काढण्यात आली. विजेत्या तिन्ही चारोळ्यांना तिन्ही परीक्षकांनी दिलेल्या गुणांत विशेष फरक नव्हता.

In reply to by साहित्य संपादक

महाराष्ट्राची महती गायची असा विषय होता, कशाने काय व्हावे आणि पडघम वाजावा हे अपेक्षित होते काय? एकुणच परिक्षणाच्या दर्जाबद्दलच प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. मग अशा सुमार दर्जाचे परिक्षण होणार असेल तर इथुन पुढे लोकांनी साहित्य संपादकांच्या विनंतीला मान देऊन सहभाग कसा घ्यायचा? केवळ मी स्वतः सहभाग घेतला होता आणि मला कसा नंबर दिला नाही म्हणुन वादविवाद करतो असे अजिबात समजु नका, पण एक साहित्यप्रेमी आणि महाराष्ट्रभक्त म्हणुन मी माझे म्हणने मांडतो आहे. आता वाचकांनाच ठरवु द्या की वरील तीन निवडलेल्या चारोळ्यांच्या तुलनेत खालील चारोळी कशी वाटते ती (केवळ उदाहरणादाखल). काही अलंकारीक भाषा, महाराष्ट्राचा गुणगौरव, खोल अर्थ वगैरे असते की नाही? बहुविध राज्ये आसेतुहिमाचल जरी नांदती या राष्ट्रामधे नसे तोड शौर्या कलासंस्कृतीला सुखे नांदे जी महाराष्ट्रामधे खरी ज्ञानभक्ती धर्मक्षात्रतेजा मनी जागविते ही पुण्यभूमी चला वंदुया मराठी देवलोका मोहिनी जयाची जगा नेहमी - शार्दुल हातोळकर (लेखन - २८ एप्रिल २०१७)

In reply to by शार्दुल_हातोळकर

आपण दिलेल्या विषयावर सुंदर चारोळी लिहीलेली आहे ! आपल्या 'महाराष्ट्रावर' त्याच्या गुणवैशिष्ट्यांवर लिहीताना आपली मायमराठी अलंकार लेवून सजली - नटली तर ते सुरेख दिसते ! " जय महाराष्ट्र " !!

In reply to by शार्दुल_हातोळकर

देशप्रेमी 02/05/2017 - 13:41
तुमची चारोळी खुप आवडली ! अत्यंत उत्कृष्ट आणि अलंकारिक भाषेत स्पर्धेसाठी दिलेल्या विषयास अनुसरुन महाराष्ट्राचे यथार्थ वर्णन....

राघव 02/05/2017 - 09:43
सर्व मिपाकरांना मनःपूर्वक धन्यवाद! उल्कातै आणि माम्लेदारचा पन्खा दोघांचेही अभिनंदन. बॅनरला अगदी शोभेशा ओळी आहेत!! :-)

वरुण मोहिते 02/05/2017 - 14:17
सगळ्यांचे. ज्यांनी ज्यांनी सहभाग घेतला त्यांचे . विजेत्यांचे तर खास अभिनंदन . अतिशय कमी काळात मिपाकरांनी चारोळ्या लिहिल्या . मजा आली वाचून .

सपे-पुणे-३० 02/05/2017 - 14:54
चारोळी स्पर्धेत विजेत्या आणि सहभागी सदस्यांचे अभिनंदन! सर्व चारोळ्या 'एक से बढकर एक' होत्या. महाराष्ट्र दिनानिमित्त 'महाराष्ट्र' ह्या विषयावर चारोळी स्पर्धा घेण्याचा उपक्रम अतिशय आवडला. मिपाचा बॅनरही एक नंबर झालाय.

माहितगार 02/05/2017 - 15:03
महाराष्ट्र आणि मराठीवरील 'अतुट विश्वास' या निकष जोडून मी सासं ने निवडलेल्या चारोळ्या पुन्हा वाचल्या तर दोन क्रमांकावर आलेली राघव यांची चारोळी कर्मभूमी अन् ज्ञानभूमी ही अजोड इथली नाती! फुलवायाला माती इथली अगणित तुटली पाती.. "महा"न इतिहासाने नटते "राष्ट्र"भिमानी छाती!! समृद्धतेच्या आकांक्षांच्या लक्ष उजळती वाती!! अधिक उजवी वाटली. पहिल्या आलेल्या चारोळीचे स्वरुप महाराष्ट्राचा परिचय संस्कृतीने घडतो मराठीचा पडघम कर्तृत्वाने वाजतो असे असते तर कदाचीत अधिक भावले असते का असे वाटून गेले.

In reply to by माहितगार

माहितगार 02/05/2017 - 15:15
महाराष्ट्राचा परिचय संस्कृतीने घडावा मराठीचा पडघम कर्तृत्वाने वाजावा या स्वरूपात कविला सांस्कृतिक narrative विशीष्ट पद्धतीचा असावा अशी इच्छा आहे. सद्य स्थिती हि सुद्धा एक narrative असते सद्य स्थिती च्या narrative बद्दल प्रश्न विचारणारे आणि मार्गदर्शन करणार्‍या काव्यांचाही सांस्कृतीक narrative वर लाँग टर्म मध्ये प्रभाव पडत असू शकतो पण साशंकता शिल्लक ठेऊन पेक्षा तसा विश्वास असल्याचे सांस्कृतीक narrative तसे वागण्यास आणि संस्कृती तशी घदवण्यास अधिक प्रवृत्त करू शकतात असे माझे व्यक्तिगत मत.

सही रे सई 02/05/2017 - 19:45
मिपा बॅनर नेहमीप्रमाणेच उत्तम जमला आहे. विजेत्यांचे अभिनंदन. सगळ्याच चारोळ्या एकसे बढकर एक होत्या. शार्दुल हातोळकर यांची चारोळीही छानच होती. कदचित शब्द संख्येमुळे तिचा विचार झाला नसावा असे वाटते. तांत्रिकरित्या पहिलं तर उल्का यांची चारोळी २ च ओळींची (वाक्य या स्वरुपात पाहिले तर) आहे असे दिसते. त्या २ ओळी ४ ओळींमधे लिहिल्या मुळे तिला चारोळी म्हणावी का असा प्रश्न पडला आहे. अर्थात परिक्षकांचे मत अंतिमच आहे. आणि ते मान्यच आहे.

In reply to by सही रे सई

स्पर्धेच्या नियमानुसार जास्तीत जास्त चार ओळी आणि प्रत्येक ओळीत जास्तीत जास्त आठ शब्द असायला हवे होते. माझ्या चारोळीमधे वर लिहीलेल्या स्पर्धेच्या त्या नियमांचे कुठेही उल्लंघन झालेले नाही. शिवाय चारोळी महाराष्ट्राची महती सांगणारी, गेय आणि विषयानुसारच होती. माझी चारोळी आवडल्याचे नमुद करणाऱ्या सर्व रसिक वाचकांचे मनापासुन धन्यवाद. __/\__

In reply to by शार्दुल_हातोळकर

दशानन 02/05/2017 - 22:35
मित्रा एवढे मनाला लावून घेऊ नकोस, निवड करणारे देखील शेवटी हाड मास असलेली व्यक्ती आहेत, तुझी रचना छान आहे पण जेव्हा स्पर्धा असते तेव्हा आलेला निकाल खुल्या मनाने मान्य करणे व परत नव्या स्पर्धेची तयारी करणे हेच योग्य आहे, कधी कधी आपल्याला निर्णय मान्य होत नाही, म्हणून काही सगळे विरुद्ध मताचे आहेत असे होत नाही ना? अनेकांना तुझी रचना आवडली व मला देखील, पण पंच निर्णय हा निर्णय आहे, त्यांना आवडल्या पटल्या त्यांना त्यांनी क्रमांक दिला पण तू तुझ्या लेखनाची मोजमाप त्यावर का करतोय आहेस?

In reply to by शार्दुल_हातोळकर

यशोधरा 03/05/2017 - 07:45
मला वाटते, तुमच्या चारोळीमध्ये अजून ओळी वाढवल्यात तर कविता म्हणून ती खरोखरच सुरेख वाटेल. चारोळी हा प्रकार सहसा सुटसुटीत असावा. क्लिष्ट आणि लांबलचक शब्द योजना नसावी. तुम्ही रॉय किणीकर ह्यांचं अतिशय उच्च असं उत्तर रात्र - ह्या अथवा , गेला बाजार चंगोंच्या चारोळ्या वाचल्या असतील. त्या काव्यामध्ये जसा सहजपणा आणि सुटसुटीतपणा आहे, तसा तुमच्या चारोळीत जाणवला नाही. कला संस्कृती हा एक शब्दही होऊ शकत नाही :) - ही तीट समजा. अवांतरः मी परीक्षक नाही पण मिपाकरांचे मत तुम्हांला हवे होते म्हणून लिहिले.

In reply to by यशोधरा

देशप्रेमी 03/05/2017 - 14:15
सर्वप्रथम हे स्पष्ट करतो की तुमचे वैयक्तिक मत आम्हाला मान्य आहे, पण..... साध्या चारोळ्या आणि महाराष्ट्रासाठीच्या अर्थगर्भ चार ओळी यांची तुलना कशी काय होऊ शकेल? महाराष्ट्राच्या चार ओळी या ऐकताच रक्त सळसळेल अशाच पाहिजेत. शिवाय हातोळकरांनी सुरुवातीलाच स्पष्ट केलेले दिसते आहे कि त्यांचा आक्षेप हा त्यांचा नंबर आला नाही म्हणुन नाहीये. आणि कलासंस्कृती हा एक शब्द कसा काय असु शकत नाही? प्रत्येक गोष्टीला संस्कृती(culture) असते. मराठीत वाचनसंस्कृती, क्रिडासंस्कृती असे इतरही शब्द आहेत. मग इथे कवीला कलासंस्कृती म्हणजे कलेची संस्कृती असे कदाचित अभिप्रेत असावे. राघव यांची चारोळी वगळता इतर दोन रचना या काही महाराष्ट्राचे फार काही वर्णन करत नाहीत.

In reply to by देशप्रेमी

शार्दुलजी पुर्ण कविता लिहा. चारोळीपेक्षा उत्तम जमेल.

चौथा कोनाडा 05/05/2017 - 22:26
हार्दिक अभिनंदन, विजेत्यांचे ! क्रियाशिल मिपाकरांचा प्रशंसनिय उपक्रम ! मजा आली चारोळ्या वाचायला ! नंबरात न आलेलया, पण उल्लेखनियअसलेल्या चारोळ्यांना मिपाच्या बॅनरवर योग्य त्या निमित्ताने ( दसरा, दिवाळी, साहित्यिकांचे वाढदिवस इ. निमिताने) स्थान देण्यात यावे ही संमंला आग्रहाची विनंती !

पाषाणभेद 06/05/2017 - 00:56
सर्व विजेत्यांचे हार्दीक अभिनंदन!! लावणी अन अभंग सुखे नांदती तसेच तलवार अन बोरूही महाराष्ट्र माझा सदैव पुढेच राहील उज्वल भवितव्याची ग्वाही ही

आणि विजेत्यांचे विशेष कौतुक!!! इतक्या अल्पकालीन सुचनेवर भरभरून उत्स्फूर्त चारोळ्या आल्या. मिपाकरांच्या उत्साहाला, कल्पनाशक्तीला, परीक्षकांच्या आयोजनाला, परीक्षकांच्या निवडीला सलाम!!!!

कृपया चारोळ्या कुठल्या निकषांवर निवडल्या हे सांगाल तर बरे होईल. महाराष्ट्राची महती गायची होती ना मिपाकरांनी? विषय "महाराष्ट्र" आणि उच्च दर्जाची मराठी भाषा, चारोळीचे व्याकरण, महाराष्ट्राच्या गुणवैशिष्ट्यांचे वर्णन वगैरे पाहिले तर निवडलेल्या चारोळ्या का निवडल्या गेल्या हे अजिबात कळाले नाही....

In reply to by शार्दुल_हातोळकर

नमस्कार. स्पर्धेतल्या चारोळ्यांचं गुणांकन खालील निकषांवर केलं गेलं: १. विषय २. शब्दसंख्या ३. प्रमाणलेखन ('शुद्ध'लेखन नव्हे) ४. गेयता ५. अर्थ परीक्षण शक्य तितकं वस्तुनिष्ठ असावं असा प्रयत्न होता. पण अर्थात सगळ्याच निकषांत वस्तुनिष्ठता आणता येत नाही. वैयक्तिक 'बायस' येऊ नये म्हणून तीन साहित्य संपादकांनी केलेल्या गुणांकनाची सरासरी काढण्यात आली. विजेत्या तिन्ही चारोळ्यांना तिन्ही परीक्षकांनी दिलेल्या गुणांत विशेष फरक नव्हता.

In reply to by साहित्य संपादक

महाराष्ट्राची महती गायची असा विषय होता, कशाने काय व्हावे आणि पडघम वाजावा हे अपेक्षित होते काय? एकुणच परिक्षणाच्या दर्जाबद्दलच प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. मग अशा सुमार दर्जाचे परिक्षण होणार असेल तर इथुन पुढे लोकांनी साहित्य संपादकांच्या विनंतीला मान देऊन सहभाग कसा घ्यायचा? केवळ मी स्वतः सहभाग घेतला होता आणि मला कसा नंबर दिला नाही म्हणुन वादविवाद करतो असे अजिबात समजु नका, पण एक साहित्यप्रेमी आणि महाराष्ट्रभक्त म्हणुन मी माझे म्हणने मांडतो आहे. आता वाचकांनाच ठरवु द्या की वरील तीन निवडलेल्या चारोळ्यांच्या तुलनेत खालील चारोळी कशी वाटते ती (केवळ उदाहरणादाखल). काही अलंकारीक भाषा, महाराष्ट्राचा गुणगौरव, खोल अर्थ वगैरे असते की नाही? बहुविध राज्ये आसेतुहिमाचल जरी नांदती या राष्ट्रामधे नसे तोड शौर्या कलासंस्कृतीला सुखे नांदे जी महाराष्ट्रामधे खरी ज्ञानभक्ती धर्मक्षात्रतेजा मनी जागविते ही पुण्यभूमी चला वंदुया मराठी देवलोका मोहिनी जयाची जगा नेहमी - शार्दुल हातोळकर (लेखन - २८ एप्रिल २०१७)

In reply to by शार्दुल_हातोळकर

आपण दिलेल्या विषयावर सुंदर चारोळी लिहीलेली आहे ! आपल्या 'महाराष्ट्रावर' त्याच्या गुणवैशिष्ट्यांवर लिहीताना आपली मायमराठी अलंकार लेवून सजली - नटली तर ते सुरेख दिसते ! " जय महाराष्ट्र " !!

In reply to by शार्दुल_हातोळकर

देशप्रेमी 02/05/2017 - 13:41
तुमची चारोळी खुप आवडली ! अत्यंत उत्कृष्ट आणि अलंकारिक भाषेत स्पर्धेसाठी दिलेल्या विषयास अनुसरुन महाराष्ट्राचे यथार्थ वर्णन....

राघव 02/05/2017 - 09:43
सर्व मिपाकरांना मनःपूर्वक धन्यवाद! उल्कातै आणि माम्लेदारचा पन्खा दोघांचेही अभिनंदन. बॅनरला अगदी शोभेशा ओळी आहेत!! :-)

वरुण मोहिते 02/05/2017 - 14:17
सगळ्यांचे. ज्यांनी ज्यांनी सहभाग घेतला त्यांचे . विजेत्यांचे तर खास अभिनंदन . अतिशय कमी काळात मिपाकरांनी चारोळ्या लिहिल्या . मजा आली वाचून .

सपे-पुणे-३० 02/05/2017 - 14:54
चारोळी स्पर्धेत विजेत्या आणि सहभागी सदस्यांचे अभिनंदन! सर्व चारोळ्या 'एक से बढकर एक' होत्या. महाराष्ट्र दिनानिमित्त 'महाराष्ट्र' ह्या विषयावर चारोळी स्पर्धा घेण्याचा उपक्रम अतिशय आवडला. मिपाचा बॅनरही एक नंबर झालाय.

माहितगार 02/05/2017 - 15:03
महाराष्ट्र आणि मराठीवरील 'अतुट विश्वास' या निकष जोडून मी सासं ने निवडलेल्या चारोळ्या पुन्हा वाचल्या तर दोन क्रमांकावर आलेली राघव यांची चारोळी कर्मभूमी अन् ज्ञानभूमी ही अजोड इथली नाती! फुलवायाला माती इथली अगणित तुटली पाती.. "महा"न इतिहासाने नटते "राष्ट्र"भिमानी छाती!! समृद्धतेच्या आकांक्षांच्या लक्ष उजळती वाती!! अधिक उजवी वाटली. पहिल्या आलेल्या चारोळीचे स्वरुप महाराष्ट्राचा परिचय संस्कृतीने घडतो मराठीचा पडघम कर्तृत्वाने वाजतो असे असते तर कदाचीत अधिक भावले असते का असे वाटून गेले.

In reply to by माहितगार

माहितगार 02/05/2017 - 15:15
महाराष्ट्राचा परिचय संस्कृतीने घडावा मराठीचा पडघम कर्तृत्वाने वाजावा या स्वरूपात कविला सांस्कृतिक narrative विशीष्ट पद्धतीचा असावा अशी इच्छा आहे. सद्य स्थिती हि सुद्धा एक narrative असते सद्य स्थिती च्या narrative बद्दल प्रश्न विचारणारे आणि मार्गदर्शन करणार्‍या काव्यांचाही सांस्कृतीक narrative वर लाँग टर्म मध्ये प्रभाव पडत असू शकतो पण साशंकता शिल्लक ठेऊन पेक्षा तसा विश्वास असल्याचे सांस्कृतीक narrative तसे वागण्यास आणि संस्कृती तशी घदवण्यास अधिक प्रवृत्त करू शकतात असे माझे व्यक्तिगत मत.

सही रे सई 02/05/2017 - 19:45
मिपा बॅनर नेहमीप्रमाणेच उत्तम जमला आहे. विजेत्यांचे अभिनंदन. सगळ्याच चारोळ्या एकसे बढकर एक होत्या. शार्दुल हातोळकर यांची चारोळीही छानच होती. कदचित शब्द संख्येमुळे तिचा विचार झाला नसावा असे वाटते. तांत्रिकरित्या पहिलं तर उल्का यांची चारोळी २ च ओळींची (वाक्य या स्वरुपात पाहिले तर) आहे असे दिसते. त्या २ ओळी ४ ओळींमधे लिहिल्या मुळे तिला चारोळी म्हणावी का असा प्रश्न पडला आहे. अर्थात परिक्षकांचे मत अंतिमच आहे. आणि ते मान्यच आहे.

In reply to by सही रे सई

स्पर्धेच्या नियमानुसार जास्तीत जास्त चार ओळी आणि प्रत्येक ओळीत जास्तीत जास्त आठ शब्द असायला हवे होते. माझ्या चारोळीमधे वर लिहीलेल्या स्पर्धेच्या त्या नियमांचे कुठेही उल्लंघन झालेले नाही. शिवाय चारोळी महाराष्ट्राची महती सांगणारी, गेय आणि विषयानुसारच होती. माझी चारोळी आवडल्याचे नमुद करणाऱ्या सर्व रसिक वाचकांचे मनापासुन धन्यवाद. __/\__

In reply to by शार्दुल_हातोळकर

दशानन 02/05/2017 - 22:35
मित्रा एवढे मनाला लावून घेऊ नकोस, निवड करणारे देखील शेवटी हाड मास असलेली व्यक्ती आहेत, तुझी रचना छान आहे पण जेव्हा स्पर्धा असते तेव्हा आलेला निकाल खुल्या मनाने मान्य करणे व परत नव्या स्पर्धेची तयारी करणे हेच योग्य आहे, कधी कधी आपल्याला निर्णय मान्य होत नाही, म्हणून काही सगळे विरुद्ध मताचे आहेत असे होत नाही ना? अनेकांना तुझी रचना आवडली व मला देखील, पण पंच निर्णय हा निर्णय आहे, त्यांना आवडल्या पटल्या त्यांना त्यांनी क्रमांक दिला पण तू तुझ्या लेखनाची मोजमाप त्यावर का करतोय आहेस?

In reply to by शार्दुल_हातोळकर

यशोधरा 03/05/2017 - 07:45
मला वाटते, तुमच्या चारोळीमध्ये अजून ओळी वाढवल्यात तर कविता म्हणून ती खरोखरच सुरेख वाटेल. चारोळी हा प्रकार सहसा सुटसुटीत असावा. क्लिष्ट आणि लांबलचक शब्द योजना नसावी. तुम्ही रॉय किणीकर ह्यांचं अतिशय उच्च असं उत्तर रात्र - ह्या अथवा , गेला बाजार चंगोंच्या चारोळ्या वाचल्या असतील. त्या काव्यामध्ये जसा सहजपणा आणि सुटसुटीतपणा आहे, तसा तुमच्या चारोळीत जाणवला नाही. कला संस्कृती हा एक शब्दही होऊ शकत नाही :) - ही तीट समजा. अवांतरः मी परीक्षक नाही पण मिपाकरांचे मत तुम्हांला हवे होते म्हणून लिहिले.

In reply to by यशोधरा

देशप्रेमी 03/05/2017 - 14:15
सर्वप्रथम हे स्पष्ट करतो की तुमचे वैयक्तिक मत आम्हाला मान्य आहे, पण..... साध्या चारोळ्या आणि महाराष्ट्रासाठीच्या अर्थगर्भ चार ओळी यांची तुलना कशी काय होऊ शकेल? महाराष्ट्राच्या चार ओळी या ऐकताच रक्त सळसळेल अशाच पाहिजेत. शिवाय हातोळकरांनी सुरुवातीलाच स्पष्ट केलेले दिसते आहे कि त्यांचा आक्षेप हा त्यांचा नंबर आला नाही म्हणुन नाहीये. आणि कलासंस्कृती हा एक शब्द कसा काय असु शकत नाही? प्रत्येक गोष्टीला संस्कृती(culture) असते. मराठीत वाचनसंस्कृती, क्रिडासंस्कृती असे इतरही शब्द आहेत. मग इथे कवीला कलासंस्कृती म्हणजे कलेची संस्कृती असे कदाचित अभिप्रेत असावे. राघव यांची चारोळी वगळता इतर दोन रचना या काही महाराष्ट्राचे फार काही वर्णन करत नाहीत.

In reply to by देशप्रेमी

शार्दुलजी पुर्ण कविता लिहा. चारोळीपेक्षा उत्तम जमेल.

चौथा कोनाडा 05/05/2017 - 22:26
हार्दिक अभिनंदन, विजेत्यांचे ! क्रियाशिल मिपाकरांचा प्रशंसनिय उपक्रम ! मजा आली चारोळ्या वाचायला ! नंबरात न आलेलया, पण उल्लेखनियअसलेल्या चारोळ्यांना मिपाच्या बॅनरवर योग्य त्या निमित्ताने ( दसरा, दिवाळी, साहित्यिकांचे वाढदिवस इ. निमिताने) स्थान देण्यात यावे ही संमंला आग्रहाची विनंती !

पाषाणभेद 06/05/2017 - 00:56
सर्व विजेत्यांचे हार्दीक अभिनंदन!! लावणी अन अभंग सुखे नांदती तसेच तलवार अन बोरूही महाराष्ट्र माझा सदैव पुढेच राहील उज्वल भवितव्याची ग्वाही ही
नमस्कार मंडळी, महाराष्ट दिनाच्या आपणा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. या खास दिवसाच्या निमित्ताने घेतलेल्या चारोळी स्पर्धेचा निकाल आज जाहीर करीत आहोत. इतक्या कमी मुदतीत सुद्धा आवाहनाला भरभरून प्रतिसाद दिल्याबद्दल आणि उत्तमोत्तम रचना पाठवल्याबद्दल सगळ्या स्पर्धकांचे मन:पूर्वक आभार. सर्वच प्रवेशिका खरोखर सुरेख होत्या.

पुस्तकं

मितान ·

नंदन 23/04/2017 - 11:17
पुस्तकांच्या वाटांवरून नवी नवी पुस्तके हातात हात घालून एकमुखाने पुस्तकांच्या पर्वतावर शांती आहे असे ठामपणे सांगत आहेत.
आमेन!

पद्मावति 24/04/2017 - 15:01
पुस्तकांच्या वाटांवरून नवी नवी पुस्तके हातात हात घालून एकमुखाने पुस्तकांच्या पर्वतावर शांती आहे असे ठामपणे सांगत आहेत. आहा...क्लास्स!!

नंदन 23/04/2017 - 11:17
पुस्तकांच्या वाटांवरून नवी नवी पुस्तके हातात हात घालून एकमुखाने पुस्तकांच्या पर्वतावर शांती आहे असे ठामपणे सांगत आहेत.
आमेन!

पद्मावति 24/04/2017 - 15:01
पुस्तकांच्या वाटांवरून नवी नवी पुस्तके हातात हात घालून एकमुखाने पुस्तकांच्या पर्वतावर शांती आहे असे ठामपणे सांगत आहेत. आहा...क्लास्स!!
पुस्तकं जिवंत असतात. जन्माला यायच्या आधीच लेखकाच्या हृदयात ती धडधडत असतात. एखादं नवजात पुस्तक हळुवार जवळ घेतलंत तर जावळांचा वासही येतो. अनोळखी हातात ती आधी फडफडतात पण एकदा त्या हातानी आपलं म्हणलं की त्याच्या नजरेखाली शांत निवांत होतात. काही पुस्तकं वाढतात,विकसित होतात, थोर होतात आभाळएवढी; काही खुरटी च राहतात. अधलीमधली सामान्य माणसासारखी आयुष्यभर अजून एक पायरी वर चढायची धडपड करत राहतात.

खरा भक्त आणि भोंदूबाबा

परशु सोंडगे ·
कथा आणि व्यथा *************** भक्ती त्या दिवशी मी निवांत चहाच्या टपरीवर बसलो होतो. कामचं नव्हतं काही. टाईम पास चाल्ला होता. टाईम पास करणं ही वाटतं तेवढी सोपी गोष्ट नाही.काय करावं हेचं कळतं नाही मुळी .डोकचं बंद पडतं. तेवढयात माने गुरूजी आला.माने म्हणजे सज्जन माणूस...खोट बोलायचं ते ठरवून ही तो बोलू शकत नाही. का तर ? त्याला पाप लागेल. देवाधर्माचा लयं नाद. नाद म्हणजे निव्वळ याडचं त्याला. सकाळ संध्याकाळ पूजा करायची. नुसता देवदेव करायचं याड. पूजा अर्चा करणं .वा-या करणं. फक्त दिंडीत जाण्यासाठी त्यांनी अख्या अर्जीत रजा खर्च करणारे ते सर. महान आहेतं. कसा वेळ घालवायचा हा सुध्दा मोठा प्रश्न असतो?

शतशब्दकथा स्पर्धा २०१७: स्पर्धकांची ओळख

साहित्य संपादक ·

चौथा कोनाडा 29/03/2017 - 12:56
सर्व विजेत्यांचे मनापासून अभिनंदन ! अच्छा, ही ती मंडळी आहेत का त्यांच्या लेखन-कौशल्याने आम्हाला भुरळ घालणारी ! बर्‍याचश्या शशक आवडल्या. भन्नाट उपक्रम ! उलगडायची पद्धत पण झक्कासच ! आय लव्ह मिपा !

चौथा कोनाडा 29/03/2017 - 12:56
सर्व विजेत्यांचे मनापासून अभिनंदन ! अच्छा, ही ती मंडळी आहेत का त्यांच्या लेखन-कौशल्याने आम्हाला भुरळ घालणारी ! बर्‍याचश्या शशक आवडल्या. भन्नाट उपक्रम ! उलगडायची पद्धत पण झक्कासच ! आय लव्ह मिपा !
नमस्कार मिपाकरहो, स्पर्धेत भाग घेतलेल्या सर्व लेखकांची ओळख या धाग्यात जाहीर करत आहोत. अनुक्रमणिका 01. वर्तुळाचा एक कोन = मृत्युन्जय 02. नवी सुरुवात = आंबट गोड 03. ती आणि द्वारकाधीश = ज्योति अलवनि 04. ईश्वराचा शोधं = भृशुंडी 05. पाउलखुणा = श्वेता व्यास 06.

दांडी मारणे - एक विलक्षण कला

किसन शिंदे ·

In reply to by किसन शिंदे

मी काय म्हणतो की एवीतेवी अभ्या जेवायला घालत आहेच तर ऑफीसला दांडी मारुन सोलापुरला एक चक्कर टाकुन येवुयात काय ? ;)

In reply to by अभ्या..

किसन शिंदे 30/03/2017 - 16:50
असं कसं x २ जिलब्या बंद झाल्या म्हणजे जेवण द्यायलाच लागेल आता. तिथे सोलापूरात नाही दिलेस तरी इकडे पुण्यात येऊन दे. ;)

In reply to by किसन शिंदे

अभ्या.. 30/03/2017 - 16:55
अबे काय लाड करुन घ्यायलास बे? अडलंय का नडलंय. जावाई का तू माझा? पुण्यात येऊन घाल म्हणे जेवण. . किसन्या अजून किती प्रतिसाद हवेत सांग ना गडे एकदाच. चाळीस झाले की बास म्हणायचं हं. ;)

मोदक 24/03/2017 - 19:20
बाकी काहीही असो.. असे आजारपणाचे / दुखापतीचे किंवा मयताच्या घरचे फोटो पुरावा म्हणून मागणे चुकीचे आहे. हुच्चभ्रु भाषेत - असंवेदनशील वगैरे. ..आणि हे वैयक्तीक घेऊ नकोस. कंपनीची तशी रीत असली तरी त्याचे अनुकरण करणे / न करणे आपल्या हातात असते.

In reply to by मोदक

किसन शिंदे 24/03/2017 - 19:26
तसं ते असंवेदनशील असलं तरी प्रत्येकाच्या बाबतीत होतेच असे नाही. ज्यांचा रेकाॅर्ड्सचा याबाबतीत नेहमी ट्रॅक ठेवला जातो, त्यांच्याकडूनच असे पुरावे मागितले जातात. नाक दाबल्याशिवाय तोंड उघडत नाही तसाच काहीसा प्रकार.

पैसा 24/03/2017 - 20:16
एकदा मारलेल्या नातेवाईकाला पुन्हा मारलं नाही की झालं!

शेवटचा डाव 25/03/2017 - 01:43
काही लोकांकडे करीश्मा असतो माझ्या रिलीव्हर ने एकही नाईट पुर्ण आठवडा केल्याच आठवत नाही.कस काय पटवतो बाँसल काय माहाती दिवाळीत ईंटरचेँज झाल म्हणुन वाचलो .,,,,,,पर्सनली माझ्या थापा 1गाडी पंचर झाली आहे माझी ,,,,,,मग काय पर्याय नसतो अन व्हाटसाप फोटो हि नाही 2[लग्नाआधी] सर घरी पोरी कडील बघायला येणार आहे 3एकदातर प्यायला बसलो होतो .कळून चुकल आता नाईट ला जाण शक्य नाही लावला बाँसला फोन "सर दोस्तो ने जबरजस्ती दारु पिलादी हे "बाँस "मतलब आज नाईट मे नही आरहे" असो "रात्री हा नव्हता आला काय झाल त्याला" लगेच दुसरा "कशाच काय काल गेला असल त्या भवानीला भेटायला तीकडच भिडेल असल भिडु" तिसरा"साहेबाला बराबर बाटलीत टाखल साल्यान" अशा कमेँट कँन्टीन मध्ये चालतात खडुस बाँसच्या काळात 50च्या वर लिव्ह बँलंस असायच्या पोरांचा पण आमच्या चार पाच जणांचा 15च्या वर गेल्याच नाही पण नविन बाँस आला पटापट सगळेच 20 च्या आत आले त्याला कुठलेच नियोजन करावे लागत नाही फक्त फोन करायचा सर सुट्टी घेतोय तो लगेच म्हनणार ठिक आहे रिलीव्हरला सांग

आनंदयात्री 25/03/2017 - 02:10
>>अजूनही बरंच काही सांगायचंय पण...आलोच, पोटात मुरडा उठल्यामुळे कामाला येत नसल्याचा बॉसला मॅसेज टाकून.. हा हा हा. आता बॉसला फोटो मागायचीही सोय नाही. या हातच्या काकणाने नोकरदारांच्या आयुष्यात चांगलाच हलकल्लोळ उडवलाय की! कोणे एके काळी वर्क फ्रॉम होम करताना, दुपारी जरा डोळा लागेल तेव्हा लिंक/कम्युनिकेटरवरचा दिवा हिरवाच राहावा म्हणून केलेले स्क्रिप्टिंग आठवले.

जगप्रवासी 25/03/2017 - 12:01
मंथ एन्डला पगार करताना जेव्हा लिव्ह रिपोर्ट काढतो तेव्हा एक एक भन्नाट कारणे वाचायला भेटतात. एकाने सुट्टी टाकली होती की अपघात झालाय, दोन दिवस यायला जमणार नाही. त्याच्या बॉसने रजा अप्रूव्ह केली आणि त्याच पट्ठ्याने अलिबाग बीचवरचा फोटो एफबीवर लोकेशन टॅग करून टाकला, काय तर म्हणे फिलिंग रिलॅक्स अट नागाव. नशीब त्याचा बॉस एफबी वर नाहीये. अजून एक मुलगी फायनान्स मध्ये आहे जी मंथ एंडला येणाऱ्या शनिवारी हमखास दांडी मारायची, फायनान्स मॅनेजरला विचारला तर तव बोलला अरे तिचा नवरा किंवा सासू नेहमी मंथ एंडला आजारी पडतात. एका मुलाने त्याच्या बहिणीला बघायला येणार आहेत म्हणून सुट्टी घेतली होती, मी मनातच म्हटलं लेका तू तिथे राहून काय करणार होतास. इव्हन माझ्या बॉसला माहिती आहे जेव्हा मी मोठ्या ट्रेकला जातो तेव्हा सोमवारी मी काही येणार नाही. नेहमीप्रमाणे मेसेज टाकतो ट्रॅफिक मुळे सकाळी ११ला घरी पोचलो, आज यायला जमणार नाही. बॉस देखील माहित असल्याप्रमाणे ओके बोलतो. अजून खूप मजेशीर कारण आहेत, सवड भेटली की टंकेन

विशुमित 25/03/2017 - 14:59
ज्या खऱ्या कारणासाठी दांडी मारलेली असते, त्या कारणाचा उपयोग ह्या दांडी साठी न करता पुढील दांडी साठी वापरण्याचा माझा फंडा होता. आताच्या कंपनी मध्ये गेले ३ वर्ष झाले मी उद्या/आज येणार नाही एवढे सांगितले तरी मला सुट्टी मिळाली आहे, कोणते ही कारण न सांगता. नशीबवान आहे मी.

एमी 30/03/2017 - 07:45
माफ कर किसन्या, दोस्तीत जेवाया घालतो पण असल्या जिल्ब्या नकोत राव. >> =)) त्याला कुठलेच नियोजन करावे लागत नाही फक्त फोन करायचा सर सुट्टी घेतोय तो लगेच म्हनणार ठिक आहे रिलीव्हरला सांग. >> Like!

आमचे सध्याचे साहेब फार कमी रजा मंजूर करतात, मंजूर करतानाही चेहरा खूप वेडावाकडा करतात, पेक्षा सुटी नको असा फील असतो. सुटी दिली तरी फोन करतात का, ही धास्ती. मला सुट्टीसाठी 'लूज मोशन' हे कारण लागू पडले आहे. एकदा ताप आला आहे, असे सांगितले तेव्हा तुम्ही तब्येतीची डेली रिपोर्टींग केलं नाही म्हणून मला खुलासाही द्यावा लागला आहे. पण धागा मस्तय रे...! -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

किसन शिंदे 30/03/2017 - 17:30
एकदा ताप आला आहे, असे सांगितले तेव्हा तुम्ही तब्येतीची डेली रिपोर्टींग केलं नाही म्हणून मला खुलासाही द्यावा लागला आहे.
बहुदा त्यांना तुमच्या तब्येतीची खूप काळजी असावी. #प्राचार्य रॉक्स_प्रॉ डॉ शॉक्स ;)

मी-सौरभ 30/03/2017 - 17:52
लोकं भारी भारी कारणं टाकतात. माझ्या ओळखिच्या एका काकांनी दोन दा अ‍ॅपेंडिक्क्स च्या शस्त्रक्रियेसाठी सुट्टी घेतलेली (२ वेगवेगळ्या साहेबांकडून) आणि शस्त्रक्रिया एकदा पण नाहि झालि.

In reply to by किसन शिंदे

मी काय म्हणतो की एवीतेवी अभ्या जेवायला घालत आहेच तर ऑफीसला दांडी मारुन सोलापुरला एक चक्कर टाकुन येवुयात काय ? ;)

In reply to by अभ्या..

किसन शिंदे 30/03/2017 - 16:50
असं कसं x २ जिलब्या बंद झाल्या म्हणजे जेवण द्यायलाच लागेल आता. तिथे सोलापूरात नाही दिलेस तरी इकडे पुण्यात येऊन दे. ;)

In reply to by किसन शिंदे

अभ्या.. 30/03/2017 - 16:55
अबे काय लाड करुन घ्यायलास बे? अडलंय का नडलंय. जावाई का तू माझा? पुण्यात येऊन घाल म्हणे जेवण. . किसन्या अजून किती प्रतिसाद हवेत सांग ना गडे एकदाच. चाळीस झाले की बास म्हणायचं हं. ;)

मोदक 24/03/2017 - 19:20
बाकी काहीही असो.. असे आजारपणाचे / दुखापतीचे किंवा मयताच्या घरचे फोटो पुरावा म्हणून मागणे चुकीचे आहे. हुच्चभ्रु भाषेत - असंवेदनशील वगैरे. ..आणि हे वैयक्तीक घेऊ नकोस. कंपनीची तशी रीत असली तरी त्याचे अनुकरण करणे / न करणे आपल्या हातात असते.

In reply to by मोदक

किसन शिंदे 24/03/2017 - 19:26
तसं ते असंवेदनशील असलं तरी प्रत्येकाच्या बाबतीत होतेच असे नाही. ज्यांचा रेकाॅर्ड्सचा याबाबतीत नेहमी ट्रॅक ठेवला जातो, त्यांच्याकडूनच असे पुरावे मागितले जातात. नाक दाबल्याशिवाय तोंड उघडत नाही तसाच काहीसा प्रकार.

पैसा 24/03/2017 - 20:16
एकदा मारलेल्या नातेवाईकाला पुन्हा मारलं नाही की झालं!

शेवटचा डाव 25/03/2017 - 01:43
काही लोकांकडे करीश्मा असतो माझ्या रिलीव्हर ने एकही नाईट पुर्ण आठवडा केल्याच आठवत नाही.कस काय पटवतो बाँसल काय माहाती दिवाळीत ईंटरचेँज झाल म्हणुन वाचलो .,,,,,,पर्सनली माझ्या थापा 1गाडी पंचर झाली आहे माझी ,,,,,,मग काय पर्याय नसतो अन व्हाटसाप फोटो हि नाही 2[लग्नाआधी] सर घरी पोरी कडील बघायला येणार आहे 3एकदातर प्यायला बसलो होतो .कळून चुकल आता नाईट ला जाण शक्य नाही लावला बाँसला फोन "सर दोस्तो ने जबरजस्ती दारु पिलादी हे "बाँस "मतलब आज नाईट मे नही आरहे" असो "रात्री हा नव्हता आला काय झाल त्याला" लगेच दुसरा "कशाच काय काल गेला असल त्या भवानीला भेटायला तीकडच भिडेल असल भिडु" तिसरा"साहेबाला बराबर बाटलीत टाखल साल्यान" अशा कमेँट कँन्टीन मध्ये चालतात खडुस बाँसच्या काळात 50च्या वर लिव्ह बँलंस असायच्या पोरांचा पण आमच्या चार पाच जणांचा 15च्या वर गेल्याच नाही पण नविन बाँस आला पटापट सगळेच 20 च्या आत आले त्याला कुठलेच नियोजन करावे लागत नाही फक्त फोन करायचा सर सुट्टी घेतोय तो लगेच म्हनणार ठिक आहे रिलीव्हरला सांग

आनंदयात्री 25/03/2017 - 02:10
>>अजूनही बरंच काही सांगायचंय पण...आलोच, पोटात मुरडा उठल्यामुळे कामाला येत नसल्याचा बॉसला मॅसेज टाकून.. हा हा हा. आता बॉसला फोटो मागायचीही सोय नाही. या हातच्या काकणाने नोकरदारांच्या आयुष्यात चांगलाच हलकल्लोळ उडवलाय की! कोणे एके काळी वर्क फ्रॉम होम करताना, दुपारी जरा डोळा लागेल तेव्हा लिंक/कम्युनिकेटरवरचा दिवा हिरवाच राहावा म्हणून केलेले स्क्रिप्टिंग आठवले.

जगप्रवासी 25/03/2017 - 12:01
मंथ एन्डला पगार करताना जेव्हा लिव्ह रिपोर्ट काढतो तेव्हा एक एक भन्नाट कारणे वाचायला भेटतात. एकाने सुट्टी टाकली होती की अपघात झालाय, दोन दिवस यायला जमणार नाही. त्याच्या बॉसने रजा अप्रूव्ह केली आणि त्याच पट्ठ्याने अलिबाग बीचवरचा फोटो एफबीवर लोकेशन टॅग करून टाकला, काय तर म्हणे फिलिंग रिलॅक्स अट नागाव. नशीब त्याचा बॉस एफबी वर नाहीये. अजून एक मुलगी फायनान्स मध्ये आहे जी मंथ एंडला येणाऱ्या शनिवारी हमखास दांडी मारायची, फायनान्स मॅनेजरला विचारला तर तव बोलला अरे तिचा नवरा किंवा सासू नेहमी मंथ एंडला आजारी पडतात. एका मुलाने त्याच्या बहिणीला बघायला येणार आहेत म्हणून सुट्टी घेतली होती, मी मनातच म्हटलं लेका तू तिथे राहून काय करणार होतास. इव्हन माझ्या बॉसला माहिती आहे जेव्हा मी मोठ्या ट्रेकला जातो तेव्हा सोमवारी मी काही येणार नाही. नेहमीप्रमाणे मेसेज टाकतो ट्रॅफिक मुळे सकाळी ११ला घरी पोचलो, आज यायला जमणार नाही. बॉस देखील माहित असल्याप्रमाणे ओके बोलतो. अजून खूप मजेशीर कारण आहेत, सवड भेटली की टंकेन

विशुमित 25/03/2017 - 14:59
ज्या खऱ्या कारणासाठी दांडी मारलेली असते, त्या कारणाचा उपयोग ह्या दांडी साठी न करता पुढील दांडी साठी वापरण्याचा माझा फंडा होता. आताच्या कंपनी मध्ये गेले ३ वर्ष झाले मी उद्या/आज येणार नाही एवढे सांगितले तरी मला सुट्टी मिळाली आहे, कोणते ही कारण न सांगता. नशीबवान आहे मी.

एमी 30/03/2017 - 07:45
माफ कर किसन्या, दोस्तीत जेवाया घालतो पण असल्या जिल्ब्या नकोत राव. >> =)) त्याला कुठलेच नियोजन करावे लागत नाही फक्त फोन करायचा सर सुट्टी घेतोय तो लगेच म्हनणार ठिक आहे रिलीव्हरला सांग. >> Like!

आमचे सध्याचे साहेब फार कमी रजा मंजूर करतात, मंजूर करतानाही चेहरा खूप वेडावाकडा करतात, पेक्षा सुटी नको असा फील असतो. सुटी दिली तरी फोन करतात का, ही धास्ती. मला सुट्टीसाठी 'लूज मोशन' हे कारण लागू पडले आहे. एकदा ताप आला आहे, असे सांगितले तेव्हा तुम्ही तब्येतीची डेली रिपोर्टींग केलं नाही म्हणून मला खुलासाही द्यावा लागला आहे. पण धागा मस्तय रे...! -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

किसन शिंदे 30/03/2017 - 17:30
एकदा ताप आला आहे, असे सांगितले तेव्हा तुम्ही तब्येतीची डेली रिपोर्टींग केलं नाही म्हणून मला खुलासाही द्यावा लागला आहे.
बहुदा त्यांना तुमच्या तब्येतीची खूप काळजी असावी. #प्राचार्य रॉक्स_प्रॉ डॉ शॉक्स ;)

मी-सौरभ 30/03/2017 - 17:52
लोकं भारी भारी कारणं टाकतात. माझ्या ओळखिच्या एका काकांनी दोन दा अ‍ॅपेंडिक्क्स च्या शस्त्रक्रियेसाठी सुट्टी घेतलेली (२ वेगवेगळ्या साहेबांकडून) आणि शस्त्रक्रिया एकदा पण नाहि झालि.
खासगी किंवा सरकारी कार्यालयात काम करताना इतर चांगल्या-वाईट अनुभवांसोबत एका वेगळ्या गोष्टीचा अनुभव सगळ्यांनाच असतो, तो म्हणजे दांडी मारण्याचा आणि त्यासाठी अफलातून अशी कारणे देण्याचा वा शोधण्याचा. दोन्ही ठिकाणी वरिष्ठ पदावर काम करत असलेल्या व्यक्तीला त्याच्या हाताखाली असलेल्या कर्मचार्‍याकडून अचानकपणे दांडी मारण्याची अनेक कारणे दिली जातात. काही वेळेला ती खरी असतातही, तर काही वेळेला ती निव्वळ खोटी आणि मजेशीरही असतात.

पुस्तकांविषयी सर्वकाही...

मोदक ·

मोदक 27/02/2017 - 13:42
मी सुरूवात करतो. आज एकच दिवस मेहता प्रकाशनमध्ये मराठी भाषा दिनानिमीत्त सर्व पुस्तकांवर ४०% सूट आहे. किमान ३४००/- रूपयांची खरेदी आवश्यक, म्हणजे एकूण डिस्काऊंट मिळून बिल २०००/- दरम्यान होते.

सागर 27/02/2017 - 15:14
मोदका छान धागा सुरु केलास सध्या मी भा. रा. भागवतांनी अनुवाद केलेले "शाब्बास शेरलॉक होम्स" ही ५ छोट्या पुस्तकांची मालिका वाचतो आहे. डायमंड प्रकाशनाने गजानन मेहेंदळे यांचे "श्री. राजा शिवछत्रपति" या दोन खंडांची पुनर्र्छ्पाई केली आहे. इतिहासाची आवड असणार्‍यांनी अवश्य संग्रही ठेवावा असा हा ग्रंध आहे. असो मला जुनी काही पुस्तके हवी आहेत. कोणी मदत करु शकले तर खूप आनंद होईल. - वारसा नॉस्ट्राडेमसचा - मूळ लेखक : रेमंड लिओनार्ड - मराठी अनुवाद : अनिल काळे - द हॉट झोन - रिचर्ड प्रेस्टन - अनुवाद : प्रमोद जोगळेकर - शकुंतला - आनंद साधले (याची झेरॉक्स प्रत देखील चालेल )

In reply to by सागर

सागर 27/02/2017 - 15:19
गजानन मेहेंदळे यांचे "श्री. राजा शिवछत्रपति" २ खंड ऑनलाईन ऑर्डर करता येतील. मी घेतले आहेत. २०% सवलतीने खरेदी करण्यासाठीचा दुवा : http://www.diamondbookspune.com/viewdetails.php?bid=118&disc=20

वरुण मोहिते 27/02/2017 - 15:38
मला एक पुस्तक हवंय..डार्क गॉड्स नावाचं .टेड क्लेन म्हणून लेखक आहेत अमेझॉन वरून मागवलं तर २० दिवसांनी त्यांचा परत मेल आला कि उपलब्ध नाही म्हणून. असं म्हणतात हे पुस्तक नारायण धारपांचं इन्स्पिरेशन आहे.ते गेल्यावर त्यांच्या घरातली पुस्तक जेव्हा विकली तेव्हा रद्दीत हे पुस्तक हृषीकेश जोशी सध्या भयकथा वैग्रे लिहितात त्यांना मिळालं . अशी कथा ऐकल्यावर उगाच उत्सुकता लागलीये ते पुस्तक वाचायची .

In reply to by वरुण मोहिते

सागर 27/02/2017 - 16:33
वरुण हे पुस्तक अमेझॉन वर उपलब्ध आहे पण खुप महाग आहे. अ‍ॅमेझॉन च्या साईट वर सर्च मधे नाहि सापडले. पण गूगल सर्च मधून सापडले. लिन्कः http://www.amazon.in/gp/offer-listing/0330297147/ref=dp_olp_used_mbc?ie=UTF8&condition=used बहुदा वापरलेले (सेकंड सेल आहे) पुस्तकाच्या रेटिंग वरुन बरेच प्रसिद्ध पुस्तक आहे असे दिसते.

वरुण मोहिते 27/02/2017 - 17:30
सातवाहन कालीन महाराष्ट्र आणि मराठ्यांचा इतिहास ..महाराष्ट्र विद्यापीठ ग्रंथ मंडळासाठी विजयानगर पुणे ३०... अशी बऱ्यापैकी रेअर असलेली यादी पण आहे . रोज इकडे एखाद पुस्तक शेयर करावं का??

In reply to by वरुण मोहिते

मोदक 27/02/2017 - 17:46
रोज इकडे एखाद पुस्तक शेयर करावं का?? हो करा की. तसेच पुस्तकाची ओळख आणि तुम्हाला त्यात काय आवडले हे ही जरूर लिहा.

दीपक११७७ 27/02/2017 - 18:19
मला 'विषातील विज्ञान' हे पुस्तक हवं आहे मला या पुस्तकाचं फक्त नावच पुसटस आठवत, हे पुस्तक अनुवदित आहे, जर कुणाला याबद्दल काही माहीत असल्यास क्रुपया सांगावे. छान धागा मोदक मित्रा!

Nitin Palkar 27/02/2017 - 18:49
१९९० ते २०११ या काळातील Readers Digest चे सुमारे शंभर मासिक अंक (संमिश्र, सलग नव्हेत) माझ्याकडे आहेत. हौशी संग्रहाकास नाममात्र किमतीस विकणे आहेत. संपर्क: ७०४५६ ३६३४६

आदूबाळ 27/02/2017 - 18:51
महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ - ऑनलाईन ईबुक्स https://msblc.maharashtra.gov.in/pdf/ (यापद्धतीने लिंक द्यायचं कारण म्हणजे 'छुपी' पुस्तकंही दिसतात.)

केडी 27/02/2017 - 19:40
हल्ली वाचनाला वेळ मिळत नाही म्हणून मग audible (ऍमेझॉन) वर पुस्तक श्रवण करतो, ऑफिस ला गाडीतून जाता येता. आधी थोडं वेगळं वाटत, पण सवय होते, आणि नंतर मज्जा येते. ह्यावर आवर्जून ऐकावे/वाचावे असे पुस्तक म्हणजे Man versus Wild च्या Bear Grylls चे पुस्तक Mud, Sweat and Tears. हे माझ्या १२ वर्षाच्या मुलाला देखील ऐकवले आणि त्याने मन लावून ऐकले। विलक्षण अनुभव आहेत ह्या माणसाचे. नक्की वाचून बघा।

गॅरी ट्रुमन 27/02/2017 - 21:41
India Since Independence: Making Sense of Indian Politics हे जनेयुमधील प्राध्यापक व्ही.कृष्ण अनंत यांचे पुस्तक माझ्या अगदी 'ऑल टाईम फेव्हरेट' मध्ये आहे. हे पुस्तक भारतीय राजकारणात स्वातंत्र्यापासून जवळपास १९९० पर्यंतच्या घटनांचा आढावा घेते. तसेच या पुस्तकामध्ये घटना जशा घडल्या तशा दिल्या आहेत त्यामुळे या पुस्तकाचे लेखक जनेयुमधील प्राध्यापक असले तरी जनेयु स्टाईलमध्ये हलकटपणा करायला स्कोप नाही. मिपावर राजकारणावरील चर्चांमध्ये माझ्या अनेक प्रतिसादांना या पुस्तकाचा आधार असतो. या पुस्तकात नेहरूंचा काळ, इंदिरा गांधींचा काळ, आणीबाणी, जनता पक्ष, राजीव गांधींचा कालावधी इत्यादी काळात झालेले राजकीय चढउतार भरपूर सविस्तरपणे दिले आहेत. माझ्यासारख्या राजकारणात अतोनात रस असलेल्याला हे पुस्तक म्हणजे अगदी पर्वणीच आहे. कितीही वेळा वाचले तरी मधूनमधून ते पुस्तक मी परत वाचत असतो. हे पुस्तक उत्तम आहेच फक्त पुस्तकात अनेकवेळा तारखांचा घोळ झाला आहे (म्हणजे फार घोळ नाही--२-४ दिवस इकडेतिकडे) ते टाळता आले असते तर बरे झाले असते असे वाटते.

In reply to by गॅरी ट्रुमन

पुंबा 01/03/2017 - 17:19
रोचक वाटत आहे. बिपन चम्द्रा आणि रामचंद्र गुहा या दोघांची स्वातंत्र्योत्तर भारतावरची पुस्तके संग्रही आहेत. आता हेदेखील वाचायला हवे.

सध्या आतिवास सविता ह्यांचे अफगाणिस्तानमधील अनुभवावर आधारित 'भय इथले' हे पुस्तक वाचत आहे. त्यानंतर जयंत नारळीकर ह्यांचे 'चार नगरातील माझे विश्व' वाचणार आहे.

प्रचेतस 28/02/2017 - 10:09
सध्या गजानन मेहेंदळे ह्यांनी लिहिलेले 'श्री राजा शिवछत्रपती' हे पुस्तक वाचत आहे. प्रचंड माहितीच्या ओघाने निव्वळ थक्क व्ह्यायला होतंय.

वरुण मोहिते 28/02/2017 - 10:27
वसंत वसंत लिमये यांचं . रहस्य कथा कथा वर्तमान काळाशी सुसंगत ह्या धर्तीवर . आधीचं लॉक ग्रिफिन पण तसेच होते. 'शोध 'पण असेच होते मुरलीधर खैरनार यांचे . अंग्रेजी मध्ये सध्या 'द ग्रेट इंडियन नॉवेल ' वाचतोय शशी थरूर यांचे .

पुंबा 28/02/2017 - 10:28
नुकतेच 'पाडस', 'चीपर बाय द डझन' आणि 'सारे प्रवासी घडीचे' ही तीन पुस्तके वाचून संपवली. अत्यंत सुंदर पुस्तके आहेत तीनही. सध्या कथासंग्रह वाचायचा मूड आहे, दि बा मोकाशींचा 'दिवेलागण' आणि श्री दा पानवलकरांचा 'सूर्य' असे दोन कथासंग्रह वाचत आहे. मिपावर बॅटमॅन यांनी अफाट स्तुती केल्याने मराठी 'वांग्मयाचा गाळीव इतिहास' हे देखील आणले आहे, दुकानात चाळत असताना पहिली एक दोन पाने वाचूनच जो वेड्यासारखा हसत होतो. नॉन फिक्शनमध्ये मायकेल सँडेल यांचे 'जस्टिस: व्हॉट्स द राईट थिंग टू डू' आणि 'गावगाडा' ही दोन चालू आहेत पण तितका सलग वेळ देता येत नसल्याने एखादे प्रकरण वाचून थंड पडत आहेत. न सांगण्याजोगी गोष्ट आणले आहे, पण सुरू करण्यासाठीच मूड येत नाहीये. मुख्य ओढा कथासंग्रहांकडे असल्याने, मिपाकर, कृपया चांगले कथासंग्रह सुचवा. तसेच, 'जप्ती' ही कथा मी सातवीत असताना वाचली होती, ती खूप आवडली होती, दुर्दैवाने लेखिकेचे आणि कथासंग्रहाचे नाव लक्षात येत नाही. बहुदा, वसुंधरा पटवर्धन किंवा असेच काही तरी त्यांचे नाव होते. कुणाला ही कथा ठाऊक असल्यास अधिक माहिती द्यावी.

In reply to by पुंबा

मोदक 28/02/2017 - 11:14
सारे प्रवासी घडीचे जबरदस्त पुस्तक आहे. =)) ********************** अवांतर - मी पूर्वी कधीतरी या पुस्तकाचे परिक्षण लिहिले होते. ********************** सारे प्रवासी घडीचे ही कथा आहे एका कोकणातल्या एका प्रतिष्ठीत घरातील जमीनदाराच्या मुलाची. "आपू" ची. शिक्षणानंतर शहरात गेलेला आपू गावामध्ये एक दोन दिवसांसाठी येतो, वाड्याचे बंद दारही पाहण्याची सवय नसणारा आपू त्याच वाड्याच्या रिकाम्या उदास भकास खोल्यातून जुन्या आठवणी शोधत फिरतो, वाळवी व कसर लागलेले देव पाहून खिन्न होतो, एखाद्या पाहुण्यासारखे पूजा करणार्‍या भटजींच्या डब्यातले अन्न खातो या व अशा उदास वातावरणात आपूची आत्म-कथा सुरू होते. आपूला एकेक गोष्टी आठवतात.. या पुस्तकातील सर्व घटना माणसांभोवती विणलेल्या आहेत. प्रत्येक घटनेला दळवींनी दिलेली विनोदाची झालर त्यांचे विनोदावरील प्रभुत्व दाखवून जाते.. निर्वीष, निर्वैयक्तीक आणि निव्वळ प्रसंग व संवादातून उभा केलेला विनोद!! आबा.. त्यांची ग्रामदैवत रवळनाथावरील निष्ठा. रवळनाथाचे त्यांना आलेले अनुभव. आबांचा कट्टर वैरी बाबुली. त्याच्याशी नेहमी सुरू असलेले कोर्टकचेरीतील दावे. आपूच्या शाळाप्रवेशाची नांदी. भविष्य पाहण्यासाठी आलेले भटजी व त्यांनी काढून दिलेला मुहूर्त. आपूचे व त्याच्या आजीचे विडी आणण्यावरून जमलेले द्वैत, आपू शाळेत गेला तर विड्यांचे काय ही आज्जीला लागलेली काळजी. शाळेत न जाण्याची आपूची तर त्याला शाळेत घालण्याची आबांची धडपड. "सरस्वती आयली तर लक्ष्मी जातली" हे आज्जीने सांगीतलेले तत्वज्ञान! आपूने शाळेतच बसावे - पळून जावू नये म्हणून केलेल्या दादुल्याची नेमणूक. शाळेतला "ढ" पण जिवलग मित्र नरू. "भो पंचम जॉर्ज"ची मनापासून प्रार्थना करणारे व शाळामास्तर हेच पोस्टमास्तर असलेले बागाईतकर मास्तर. "माका नाव W W कुळकर्णी असत" असे म्हणून V V कुळकर्णी नावाने आलेले पत्र नाकारणारे (पण कार्ड असेल तर वाचून परत देणारे) आपूचे शेजारी "वामन विष्णु कुळकर्णी" शाळेचे गॅदरींग, "घनतमी शुक्र राज्य करी" व "अहाहा चेंडू.." या गाण्यांच्या अयशस्वी प्रयोगानंतर सर्वानुमते ठरलेले "देवाजीने करूणा केली" हे गाणे. गॅदरींगमध्ये आपूच्या विळ्याने किरकोळ जखम झालेला परशा व त्यानंतर परशाचा विळा हातात घेवून बागाईतकरांचे धोतर (घामाने!) ओले होईपर्यंत भांडण केलेला परशाचा बा. बागाईतकरांच्या रिटायरमेंट नंतर शाळेत अवतरलेला पावटे मास्तर. हा मास्तर बाबुलीच्या गटातील असल्याने त्याने केलेले आपूचे हाल. पावटे मास्तरच्या हाताचा मार खाऊन खाऊन एक दिवस त्याच्या खुर्चीवर खाजकुयलीची कुसे टाकून व नंतर पावटे मास्तरच्या "दुर्गाबाय" नावाच्या एका विधवेशी असलेल्या प्रकरणावरून "दुर्गेदुर्गट भारी तुजविण संसारी.." हे आरती टाळ्या पिटून भर बाजारात पावटे मास्तरच्या मागी लागणारा नरू.. पावटे मास्तर जातपात पाळत असल्याने केशा चांभाराला शिक्षण कमीटीचा मेंबर म्हणून निवडून देणारे आबा व केशाने केलेले शाळेचे "इन्स्पेक्षन" एका चांभाराला निवडून देणारे गाव पुरोगामी असलेच पाहिजे म्हणून गावात अवतरलेले "खुळो डाक्टर" डॉ.रामदास. त्यांनी आयोजीत केलेले गावकर्‍यांनी सर्वभोजन. दारूचा गुत्ता चालवणारा पेस्तँव.. दारूडा बाबल्या मडवळ. पशू, पक्षी व वनस्पतींची जिवापाड काळजी घेणारा हाफमॅड तात्या. आपूला जेलमध्ये डांबले म्हणून गेम करून सस्पेंड केला गेलेला हवालदार मुंगी. दशावतारी जिवा, त्याने साकारलेला शंकासूर.. जिवाचा प्रतिस्पर्धी व रवळनाथाचा पुजारी बाबू गुरव. बाबूने केलेले एकमेव नाटक द्रौपदी वस्त्रहरण - ज्याचा शेवट "लंगोटीमध्ये उभी असलेली द्रौपदी विडी ओढणार्‍या भगवान कृष्णाच्या तोंडात भडकावते" असा होतो. गावातील रिकामटेकडे व सतत कोणाचीतरी माहिती काढत त्यावरून वेळ घालवणारे लोक.. त्यांनी वेगवेगळ्या सवईंवरून लोकांना बहाल केलेली झोंबणारी टोपणनावे.. नायनाय भाऊ, हाफमॅड तात्या, अमृतांजन प्रेमजी, दुलाजीचा मुलगा "यम" (रेड्यावर बसून शेतातून घरी येणारा म्हणून!) लंगडा तातू.. हे अगदी छोटेखानी पुस्तक हास्याचे कारंजे उडवते. या व अशा अनेक माणसांचे चित्रण इतके जिवंत झाले आहे की पुस्तकाच्या शेवटी "सर्व पात्रे व प्रसंग काल्पनीक" ही ओळ वाचून मला खूप वाईट वाटले होते!!

In reply to by मोदक

पुंबा 28/02/2017 - 13:47
मोदकभौ, फार भारी लिहिलेत आपण. सगळी उजळणी झाली मनातल्या मनात, परत हसतोय.
चित्रण इतके जिवंत झाले आहे की पुस्तकाच्या शेवटी "सर्व पात्रे व प्रसंग काल्पनीक" ही ओळ वाचून मला खूप वाईट वाटले होते!!
मी खरेच आहे असे मानतो.. :))

पुंबा 01/03/2017 - 17:17
मी ereader prestigio वापरतो. .mobi, तसेच epub दोन्हीही प्रकारची पुस्तके निश्चिंतपणे वाचता येतात. फाँट आणि मार्जिन कमी जास्त करता येते. google books व किंडल छानच आहेत पण मोबाईलमधील जास्त जागा खातात.

वरुण मोहिते 01/03/2017 - 18:03
मराठी _तुही यत्ता कंची?? तुही यत्ता लेखक -नामदेव ढसाळ अंग्रेजी -वॉट एव्हरी इंडियन शुड नो बिफोर इन्वेस्टींग लेखक _एम टी राजू

In reply to by अमर विश्वास

मोदक 01/03/2017 - 19:54
टाटायनमधली अजित केरकर आणि टाटा फायनान्स (पेंडसे ?) ही दोन प्रकरणे वाचून धक्का बसला होता. बाकी टाटांसंबंधी पुस्तके वाचायची असतील तर आर एम लाला यांच्या पुस्तकांना पर्याय नाही. (तसेच बिझनेस लिजंड आणि बिझनेस महाराजे मधली जेआरडी आणि रतन टाटांची व्यक्तीचित्रे.) __/\__

मारवा 01/03/2017 - 20:34
तुनळीवर एक झकास वल्ली आहे पुस्तकांवर जबरा बोलतो व सुचवतो. विशेषता आधुनिकोत्तर एकदा जरुर आजमवा त्याच्याच सुचवणीवरुन सध्याच वाचन सुरु आहे. युट्युबात. जावुन bookchemist टाइप करा व सर्च करा मजा आजायेगा गॅरंटी !

अमर विश्वास 01/03/2017 - 22:02
मोदकजी ... टाटांबद्दल जेव्हडे वाचु तेभाडे कमीच आहे गिरीश कुबेर यांचे यांचे सध्याचे (लोकसत्ता जॉईन केल्या नंतर) लिखाण वाचल्यानंतर त्यांचे पुस्तक वाचायला भीतीच वाटते .. पण टाटायन चांगले आहे. तुम्ही म्हणता त्याप्रमाणे अजित केरकर आणि टाटा फायनान्स ही दोन प्रकरणे खरच खळबळजनक आहेत. खुद्द पेंडसेंनी लिहिलेले जे आर डी - मी पाहिलेले हे पुस्तक ही वाचनीय आहे. त्याचप्रमाणे जे आर डी चे "key notes address " एकत्र पुस्तक रूपाने उपलब्ध आहे (मराठी भाषांतर) जरूर वाचा

In reply to by अमर विश्वास

मोदक 02/03/2017 - 17:00
कुबेरांबद्दल सहमत. ;) मी पाहिलेले जेआरडी लिहिणारे द. रा. पेंडसे - हे टाटा ग्रुप मध्ये वरिष्ठ अर्थतज्ञ होते. (टाटा फायनान्स वाले पेंडसे वेगळे.) तसेच टाटा याच विषयावर आर एम लाला यांचे "क्रिएशन ऑफ वेल्थ" नावाचे एक पुस्तक आहे. टाटांची सुरूवातीपासूनची कथा आणि मारिओ मिरांडा यांची विषयानुरूप बहारदार रेखाचित्रे असे जबरदस्त पुस्तक आहे. पुण्यात मंगळदास रोडवर "टाटा सेंट्रल अर्काईव्ह्ज" आहे. तेथे कधीतरी जरूर भेट द्या.

In reply to by मोदक

अमर विश्वास 02/03/2017 - 21:47
धन्यवाद मोदक ... खुप वर्षांपूर्वी मी पाहिलेले जेआरडी हे पुस्तक वाचले होते.. नावात घोळ झाला .... चुक सुधारल्याबद्दल धन्यवाद टाटा सेंट्रल अर्काईव्ह्ज ला भेट दिली आहे .. तसेच कामानिमित्त बॉम्बे हाऊस ला ही भेट देण्याची संधी सुद्धा मिळाली ... आत्तापर्यंत अनेक कॉर्पोरेट हाऊसेस ना भेट दिली .. पण बॉम्बे हाऊस चा अनुभव वेगळाच होता

गॅरी ट्रुमन 02/03/2017 - 11:02
माजी पंतप्रधान इंदरकुमार गुजराल यांचे आत्मचरित्र Matters of Discretion: An Autobiography मध्यंतरी वाचले होते. माझ्या मते हे एक चांगले पुस्तक आहे पण त्यातील काही गॅप मात्र जाणवण्यासारख्या आहेत. १. गुजराल यांनी मॉस्कोमधील भारतीय वकिल म्हणून १९७६ ते १९८० ही चार वर्षे काम पाहिले. आज इंदरकुमार गुजराल हे नाव ऐकले की आपण परराष्ट्रधोरणाबरोबर ते नाव ताबडतोब निगडीत करतो. मला वाटते की गुजराल यांचा परराष्ट्रधोरणातील एकूणच दृष्टीकोन या काळात जास्त बदलला. गुजराल यांना हा काळ त्यांच्या आयुष्यातील अत्यंत महत्वाचा काळ वाटत असणे स्वाभाविक आहे आणि त्यांनी पुस्तकातली अनेक प्रकरणे त्यावर दिली आहेत. पण अर्ध्याहून जास्त भारतीयांचा जन्म त्यांची मॉस्कोतील कारकिर्द संपल्यानंतर झालेला आहे. या वाचकवर्गाला त्यांचे मॉस्कोमधील अनुभव काहीसे कंटाळवाणे आणि फार रस वाटावे असे असतील असे वाटत नाही. त्यातील काही अनुभव तर खूपच विस्ताराने लिहिले आहेत असे मला वाटले. उदाहरणार्थ राष्ट्रपती नीलम संजीव रेड्डींच्या मॉस्को भेटीदरम्यान त्यांनी दिलेल्या मेजवानीच्या वेळी ब्रेझनेव्ह उपस्थित राहिले नाहीत हा रेड्डींना अपमान वाटला आणि त्यामुळे कूटनैतिक संकट उभे राहिले असते आणि ते कसे टळले यावर काही पाने खर्ची पाडली आहेत. हे अनुभव सामान्य भारतीय वाचकांना फार भावतील असे नाही. तसेच सोव्हिएट रशियाच्या इतिहासात रस असलेल्या वाचकालाही हे फार भावेल इतक्या विस्तारानेही या गोष्टी लिहिलेल्या नाहीत. म्हणजे हे काही अनुभव कोणत्याच वाचकाला भावतील असे वाटले नाहीत आणि ते नक्की कशाकरता पुस्तकात आहेत असेही वाटले. २. इंदिरा गांधींच्या मंत्रीमंडळात गुजराल माहिती आणि प्रसारणमंत्री होते. त्यावेळी आणीबाणीच्या काही दिवस आधी संजय गांधींनी त्यांच्यावर इंदिरा समर्थकांच्या सभांना रेडिओ-टिव्हीवर प्रसिध्दी द्या असा आदेश दिला होता आणि तो त्यांना मान्य नव्हता यावर त्यांनी लिहिले आहेच. पण आणीबाणी या स्वातंत्र्योत्तर भारतातील महत्वाच्या घटनेविषयी त्यांनी पुस्तकात फार लिहिलेले नाही हे पण जरा खटकलेच. ३. गुजराल सुरवातीपासून काँग्रेसशी संलग्न होते. पण एप्रिल १९८४ मध्ये त्यांनी काँग्रेसविरोधात विरोधी पक्षांची आघाडी उघडायचा प्रयत्न केला याविषयी त्यांनी लिहिले आहे. पण त्यांना काँग्रेस का सोडाविशी वाटली याविषयी गुजराल यांनी काहीच लिहिले नाही हे नक्कीच खटकले. मला स्वतःला १९८९ पूर्वीच्या घटना केवळ पुस्तके वाचून माहित आहेत त्यामुळे अशा महत्वाच्या घटनेविषयी काहीच न लिहिलेले मात्र खटकले. ४. गुजराल पंतप्रधान झाल्यावर त्यांनी उत्तर प्रदेश विधानसभेत कल्याणसिंग सरकारवरील विश्वासदर्शक ठरावावर झालेल्या हिंसाचारानंतर उत्तर प्रदेशात राष्ट्रपती राजवट लागू करायची शिफारस केली होती. ती राष्ट्रपती के.आर.नारायणन यांनी केंद्रीय मंत्रीमंडळाकडे परत पाठवली. गुजराल यांच्या पंतप्रधानपदाच्या कारकिर्दीवर हा नक्कीच डाग होता. याविषयी त्यांनी मायावतींनी कल्याणसिंग सरकारचा पाठिंबा काढून घेतल्यानंतर गुजराल यांचे राज्यपाल रोमेश भंडारी यांच्याशी काय बोलणे झाले एवढेच लिहिले आहे. आणि त्यानंतर "उत्तर प्रदेशातील पेचप्रसंग सुटल्यावरच मला व्यवस्थित झोप लागू शकली" असे लिहिले आहे. पण तो पेचप्रसंग नक्की कसा सुटला याचा उलगडा मात्र वाचकांना होत नाही. ५. पंतप्रधानपदावरून पायउतार झाल्यावरच्या त्यांच्या जीवनाविषयी फार त्यांनी लिहिलेले नाही. विशेषतः १९९८ च्या अणुचाचण्यांनंतर गुजराल यांनी लोकसभेत वाजपेयी सरकार नक्की कोणत्या चुका करत आहे यावर भाष्य केले होते. गुजराल यांची इंग्रजी भाषेवरील पकड आणि वक्तृत्व मला नेहमीच भावत असे. त्यांचे लोकसभेतील हे भाषण मी मुद्दामून बघितले होते. तसेच गुजराल पंतप्रधानपदावरून पायउतार झाल्यावर ही घटना दोन महिन्यातच झाली होती. तसेच भारताच्या परराष्ट्रधोरणाला नवे वळण लावणारी ही घटना होती. गुजराल यांचा परराष्ट्रधोरणातील रस लक्षात घेता या महत्वाच्या घटनेवर त्यांनी काहीतरी लिहायला हवे होते असे वाटून गेले. ६. जेव्हा एखादा नेता आत्मचरित्र लिहितो तेव्हा आपल्या जीवनात घडलेल्या घटना एकामागोमाग एक लिहिणे एवढाच त्याचा उद्देश नसावा असे वाटते. तर त्या नेत्याच्या विषयात पुढे काय घडामोडी होऊ शकतील याविषयीचे स्वतःचे मत असायला हवे असेही वाटते. विशेषतः गुजराल हे परराष्ट्रधोरणातील जाणकार असल्यामुळे यानंतरच्या काळात भारताला परराष्ट्रधोरणात नक्की कोणती आव्हाने उभी राहतील आणि ती पेलण्यासाठी काय करायला हवे याविषयी थोडे तरी भाष्य हवे होते असेही वाटले. एकूणच माझ्यासारख्या राजकारणात प्रचंड रस असलेल्या वाचकाला इंदरकुमार गुजराल यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याने लिहिलेल्या या पुस्तकाकडून ज्या अपेक्षा होत्या या मात्र पूर्ण झाल्या नाहीत. हे पुस्तक गुजराल यांनी वयाची नव्वदी ओलांडल्यानंतर प्रकाशित झाले होते. कदाचित त्यावेळी त्यांची प्रकृती त्यांना साथ देत नसावी. तसेच गुजराल यांचे निधन होण्यापूर्वी दोनेक वर्ष त्यांच्या पत्नीचेही निधन झाले होते. त्या वयात हा विरहाचा धक्का पचविणे तसे कठिणच असेल याची कल्पना करता येते. तसेच प्रकाशकांना आधीच कबूल केल्यामुळे प्रकृती साथ देत आहे तोपर्यंत पुस्तक पूर्ण करायचे हे पण दडपण असेल. या सगळ्या कारणांमुळे त्यांचे आत्मचरित्र हे एखाद्या अपूर्ण मूर्तीप्रमाणे वाटले. हे पुस्तक त्यांनी ८-१० वर्षे आधी लिहिले असते तर त्यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याकडून असलेल्या अपेक्षा पूर्ण करणारे झाले असते असेही वाटून गेले. अर्थातच हे पुस्तक वाईट आहे असे नक्कीच नाही. गुजराल, अडवाणी इत्यादी नेत्यांचे राजकीय जीवन म्हणजे स्वातंत्र्योत्तर भारताचा इतिहासच. या आत्मचरित्राच्या निमित्ताने स्वातंत्र्योत्तर भारताच्या इतिहासातील पहिल्या ५० वर्षांचा लेखाजोखा थोडा तरी नक्कीच समजतो. तसेच वि.प्र.सिंग यांच्या मंत्रीमंडळातील लाथाळ्या, १९९० चे इराक-कुवेत प्रकरण इत्यादींचा चांगलाच आढावा त्यांनी घेतला आहे. पण असाच आढावा इतर महत्वाच्या घटनांचाही घेतला गेला असता तर बरे झाले असते असे माझ्यासारख्या सामान्य नागरिकाला वाटून गेले.

दा विन्ची 02/03/2017 - 16:48
माझ्याकडे मोबाईल वर वाचण्यासाठी ३०-४० इंग्रजी पुस्तके उपलब्ध आहेत pdf फॉरमॅट मध्ये. साईझ साधारण १ ते २ Mb. सिडने शेल्डन, रॉबिन कुक, रॉबर्ट लुडलुम, मायकल क्रिश्टन, जॉन ग्रिशॅम आणि डॅन ब्राऊन ची. हवी असल्यास व्हाट्स अँप वर देऊ शकतो.

वरुण मोहिते 03/03/2017 - 14:12
मातोश्रीवर अर्धी रात्र लेखक -विजय तेंडुलकर ....काही अप्रकाशित कथा अंग्रेजी -गुड स्ट्रॅटेजी बॅड स्ट्रॅटेजी लेखक -रिचर्ड रुमेल्ट मॅनेजमेंट आवडणाऱ्या लोकांनी रुमेल्ट ह्यांचं पुस्तक वाचावं

हा एकच धागा असेल तर खरंच बरं होईल. मागे एकदा बोका भाऊंनी काही पुस्तकं मला एका धाग्यात सुचवली होती. तो धागा कोणता हेच मला आठवत नाही. कुणी कृपा करुन मिपावर आजवर पुस्तकांच्या याद्याविषयक आलेल्या धाग्यांच्या लिंक्स सुद्धा इथे देईल का? मी खुप दिवसात पुस्तकंच वाचलेले नाही. :( उद्याच लायब्ररीत जाईन. आणि इथे त्या पुस्तकाविषयी लिहेन. ह्या आधी वाचलेलं पुस्तक म्हणजे रिबेका. चांगलं आहे. शेवटाची ओढ लावतं पण शेवट नीटसा कळत नाही. भाषा मात्र अत्यंत प्रवाही आहे. कथा अप्रतिमपणे उभी केली आहे वाचकासमोर. गॉन विथ... वाचायला सुरूवात केली खरी. पण मला इतकी वर्णनं असलेली पुस्तकं वाचता येत नाहीत. त्यामुळे सोडुन दिलं.

In reply to by पिलीयन रायडर

पी. के. 04/03/2017 - 13:05
मिसळपाव वर असणारे पुस्तका विषयी हे काही जुने धागे वाचता वाचता वाढे..... मला आवडलेली पुस्तके: आत्मचरित्र/चरित्र पुस्तक खरेदी - मदत दहावी पास मुलांसाठी वाचनीय पुस्तके मला आवडलेले पुस्तक मला आवडलेले पुस्तक ( विस्तारीत) मला आवडलेली ५० पुस्तके ऑगस्ट महिन्यात "मला आवडलेली ५० पुस्तके" हा धागा वाचनात आला. प्रतिसाद वाचताना आपण पुस्तक वाचण्याच्या बाबतीत किती आळशी आहोत याची जाणीव झाली. वडिलांना आणी भावाला वाचनाची प्रचंड आवड त्यामुळे घरातील माळे, कपाटे, पलंगाचे कप्पे पुस्तकांनी तुडूंब भरलेले. मग काय झटकला आळस, काढली पुस्तकं कपाटातून बाहेर आणी केली सुरवात.. सद्य वि. ग. कानिटकरांचे विन्स्टन चर्चिल वाचतोय. मागच्या पाच महिन्यात वाचलेली पुस्तके. फकिरा:- अण्णाभाऊ साठे लोक माझे संगती:- शरद पवार राजा शिवछत्रपती :- बाबासाहेब पुरंदरे. डोंगरी ते दुबई हुसेन ज्वलज्वलनतेजास संभाजीराजे J R D मन मे है विश्वास राऊ स्वामी ययाती धागे अरब जगाचे पानिपत एक होता कार्व्हर अमृतवेल आजून ही खूप पुस्तकं आहेत घरात जी वाचायची बाकी आहेत. बघू कसं जमतंय ते शेवटी मिपाकरांचे आभार माझ्यात वाचायची आवड निर्माण केल्या बद्दल

In reply to by पिलीयन रायडर

एमी 22/03/2017 - 07:51
रिबेकाच्या शेवटमधे नक्की काय कळलं नाही? मी फार पुर्वी पुस्तक वाचलंय आणि चित्रपट पाहिलाय. जमल्यास शंका समाधान करायचा प्रयत्न करेन.

गॅरी ट्रुमन 06/03/2017 - 12:39
अर्थशास्त्रातील २००२ चे नोबेल पारितोषिक विजेते प्रिन्सटन विद्यापीठातील एमेरीटस प्राध्यापक डॅनिएल कॅनेमन यांचे Thinking, Fast and Slow हे नितांतसुंदर पुस्तक अलीकडेच वाचले. प्राध्यापक डॅनिएल कॅनेमन हे मुळातले अर्थशास्त्रज्ञ नाहीतच. ते आहेत मानसशास्त्रज्ञ. तरीही त्यांना अर्थशास्त्राचे नोबेल पारितोषिक मिळाले. त्याचे कारण सूक्ष्मअर्थशास्त्रातील ( मायक्रोइकॉनॉमिक्स) विविध मॉडेल ही माणसे 'रॅशनल' असतात या गृहितकावर आधारीत आहेत पण माणसे प्रत्यक्षात 'रॅशनल' नसतात हे प्राध्यापक डॅनिएल कॅनेमन आणि स्टॅनफर्ड विद्यापीठातील दुसरे मानसशास्त्रज्ञ कै. Amos Tversky यांनी १९७० च्या दशकात अनेक प्रयोग करून सिध्द केले. Thinking, Fast and Slow हे पुस्तक त्या दोघांनी (आणि इतरानी) केलेल्या विविध प्रयोगांवर आधारीत आहे. प्राध्यापक कॅनेमन यांच्या मते आपण विचार करतो तो विचार दोन पातळ्यांवर होतो-- सिस्टिम-१ आणि सिस्टिम-२. सिस्टिम-१ म्हणजे intuitive विचार करणारी व्यवस्था (फास्ट थिंकिंग) तर सिस्टिम-२ म्हणजे अधिक खोलात जाऊन अधिक वेळ घेऊन विचार करणारी व्यवस्था (स्लो थिंकिंग). प्राध्यापक कॅनेमन यांच्या मते सिस्टिम-२ ही 'आळशी' व्यवस्था असते. म्हणजे शक्यतो कार्यान्वित न होण्याकडे सिस्टिम-२ चा कल असतो. या दोन सिस्टिमचे कार्य कसे चालते आणि आपण नक्की कसा विचार करतो याविषयी पुस्तकात कित्येक उदाहरणे दिली आहेत. खरे तर या पुस्तकावरील प्रत्येक प्रकरणावर स्वतंत्र लेख होऊ शकेल. पण आतापुरते एक उदाहरण देतो: प्राध्यापक कॅनेमन यांनी एक 'लिंडा प्रॉब्लेम' म्हणून उदाहरण दिले आहे. त्यांनी लिंडा या एका काल्पनिक ३१ वर्षीय स्त्रीचे वर्णन दिले आहे. ती single, outspoken आणि तल्लख आहे. तसेच कोणत्याही प्रकारच्या भेदभावाविरूध्द आणि सामाजिक न्यायाच्या बाजूची तिची स्पष्ट भूमिका आहे आणि तिने अण्वस्त्रांच्या विरोधातील निदर्शनांमध्ये वेळोवेळी भाग घेतला आहे अशा स्वरूपाचे तिचे वर्णन आहे. हे वर्णन देऊन झाल्यानंतर प्राध्यापक कॅनेमन यांनी या प्रयोगातील लोकांना लिंडा नक्की कोणत्या पेशामध्ये असू शकेल याचे ८ पर्याय दिले. लोकांना ती ज्या पेशात असेल याची सर्वात जास्त शक्यता वाटेल त्या पेशाला क्रमांक १, त्यानंतर शक्यता असलेल्या पेशाला क्रमांक २ अशा पध्दतीने ८ पेशांची क्रमवारी लावणे अपेक्षित होते. त्या ८ पेशांच्या यादीत तिसरा पेशा होता-- "स्त्रीवादी चळवळीत आघाडीवर", सहावा पेशा होता "बँकेत टेलर" आणि आठवा पेशा होता "बँकेत टेलर आणि स्त्रीवादी चळवळीत आघाडीवर". त्या प्रयोगात भाग घेणार्‍यांपैकी बहुसंख्य लोकांनी लिंडा "बँकेत टेलर आणि स्त्रीवादी चळवळीत आघाडीवर" ला नुसत्या "बँकेत टेलर" पेक्षा वरचा क्रमांक दिला. वास्तविकपणे बँकेत टेलर असलेल्या समजा १०० स्त्रिया असतील तर स्त्रीवादी चळवळीत आघाडीवर असलेल्या बँकेतील टेलर नक्कीच १०० पेक्षा कमी असतील. म्हणजे 'रॅशनल' माणूस "बँकेत टेलर" या पेशाला "बँकेत टेलर आणि स्त्रीवादी चळवळीत आघाडीवर" पेक्षा वरचा क्रमांक देईल. पण तसे झाले नाही. आपण नक्की कसा विचार करतो याविषयी अशा कित्येक (किंबहुना काही शे) उदाहरणांचा खजिना आहे या पुस्तकात. या पुस्तकाने मला पूर्णपणे अंतर्बाह्य हलवून टाकले हे लिहिणे म्हणजे या पुस्तकाचा माझ्यावर जो परिणाम झाला आहे त्याचे अगदी मिळमिळीत वर्णन झाले. सूक्ष्मअर्थशास्त्रात मानसशास्त्राचाही अंतर्भाव असावा असे पूर्वीही अनेक रिसर्चर म्हणत असत.पण प्राध्यापक कॅनेमन आणि Amos Tversky यांच्या कामामुळे या प्रयत्नांना एक महत्वाची दिशा मिळाली. त्यातूनच 'बिहेव्हिअरल इकॉनॉमिक्स' हे सूक्ष्मअर्थशास्त्रातील एक महत्वाचे क्षेत्र विकसित झाले. याचा जाहिराती, सेल्स तसेच ह्युमन रिसोर्सेस इत्यादी अनेक मॅनेजमेन्टच्या क्षेत्रांवर अमूलाग्र परिणाम होऊ शकेल. प्राध्यापक डॅनिएल कॅनेमन यांना २००२ मध्ये नोबेल पारितोषिक मिळाले. त्याबद्दलचे सायटेशन होते: "for having integrated insights from psychological research into economic science, especially concerning human judgment and decision-making under uncertainty".प्राध्यापक Amos Tversky यांचे १९९६ मध्ये निधन झाले. अन्यथा त्यांनाही प्राध्यापक कॅनेमन यांच्या बरोबरच नोबेल पारितोषिक मिळाले असते. युट्यूबवर प्राध्यापक कॅनेमन यांचे अनेक व्हिडिओ उपलब्ध आहेत. त्यातील एक व्हिडिओ या पुस्तकाविषयी गुगल टॉक्समध्ये आहे. तो पुढीलप्रमाणे:
असले जबरदस्त काम करणारे लोक बघितले की खरोखरच भारावून जायला होते. जरी अर्थशास्त्रात फार इंटरेस्ट नसेल तरी हे पुस्तक जरूर वाचावे असे मी म्हणेन. आपण ज्या पध्दतीने विचार करतो त्यात कित्येक त्रुटी नकळतपणे कशा असू शकतात (ज्याविषयी आपल्याला काहीही माहित नसते) हे समजले की खरोखरच थक्क व्हायला होते. पुस्तकात Bayes' theorem , Binomial distribution याविषयीचे काही प्रोबॅबिलिटीतले उल्लेख आहेत. तो भाग माहित नसेल तर तेवढी २-३ प्रकरणे समजली नाहीत तरी इतर प्रकरणांमध्ये खरोखरच खजिना भरलेला आहे.

In reply to by गॅरी ट्रुमन

गॅरी ट्रुमन 14/03/2017 - 11:07
प्राध्यापक डॅनिएल कॅनेमन यांनी म्हटल्याप्रमाणे विचार करायच्या सिस्टिम-१ आणि सिस्टिम-२ चे एक उदाहरण याच पुस्तकाच्या परिशिष्टामध्ये दिले आहे. या पुस्तकावर आणखी काही लिहून विनाकारण टी.आर.पी वाढवायचा नाही पण हा विषय मला प्रचंड आवडला आहे. तसेच यावर नवा लेख लिहावा इतपत मसालाही नाही. त्यामुळे इथेच घुसखोरी करत आहे. समजा एका शहरात दोन मॅटर्निटी होम्स आहेत. एकात दररोज सरासरी १५ बालकांचा जन्म होतो तर दुसर्‍यात दररोज सरासरी ४५ बालकांचा जन्म होतो. त्यापैकी कोणत्या मॅटर्निटी होममध्ये एखाद्या दिवशी जन्मलेल्या बालकांपैकी ६०% मुली असायची शक्यता जास्त आहे? या प्रश्नाचे मी 'सिस्टिम-१' चा वापर करून दोन्ही मॅटर्निटी होममध्ये ही शक्यता सारखीच आहे हे उत्तर दिले. प्रत्यक्षात ही शक्यता लहान मॅटर्निटी होममध्ये (दररोज १५ जन्म होणार्‍या) जास्त आहे. हा प्रश्न बायनॉमिअल डिस्ट्रीब्युशनचा वापर करून सोडवता येईल. हे उत्तर लहान मॅटर्निटी होमसाठी सुमारे १५.३% तर मोठ्या मॅटर्निटी होमसाठी सुमारे ४.९% इतके येते. मी स्वतः बायनॉमिअल डिस्ट्रीब्युशन विद्यार्थ्यांना गेली जवळपास ६ वर्षे शिकवत आलेलो आहे. हे उत्तर काढून ती शक्यता लहान मॅटर्निटी होमसाठी नक्कीच जास्त आहे हे मला समजले नसते असे नक्कीच नाही. पण अशा प्रकारची आकडेमोड करणे हे सिस्टिम-२ चे काम आहे. आणि वर म्हटल्याप्रमाणे सिस्टिम-२ आळशी असते. शक्यतो कार्यान्वित न होण्याकडे त्या सिस्टिमचा कल असतो.त्यामुळे आपली सिस्टिम-१ एकदम intuitive उत्तर असते ते देते. एकंदरीत लहान सॅम्पलमध्ये टोकाचे (एक्स्ट्रीम) रिडिंग यायची शक्यता वाढते. एक उदाहरण द्यायचे झाले तर समजा एक नाणे १० वेळा उडवले तर त्यात ६ छापे यायची (६०%) शक्यता बर्‍यापैकी असेल हे आपल्याला कळतेच. पण समजा तेच नाणे १ लाख वेळा उडवले तर त्यात ६० हजार छापे यायची (परत ६०%) शक्यता तितकी नसेल. कारण जसा सॅम्पल साईझ वाढतो त्याप्रमाणे 'अ‍ॅव्हरेज आऊट' होते आणि टोकाचे रिडिंग यायची शक्यता कमी होते. मी हा भाग स्वतः शिकवत असूनही आणि मी मुळातले पुस्तक वाचूनही (त्यात सॅम्पल साईझचा परिणाम काय होतो हे व्यवस्थित समजावून दिले आहे) माझ्या 'सिस्टिम-१' ने पटकन दोन्ही ठिकाणी ती शक्यता सारखीच असेल हे उत्तर दिले. सिस्टिम-१ आणि सिस्टिम-२ मध्ये हा फरक आहे. हे लक्षात येताच खरोखरच थक्क व्हायला झाले. हाच अनुभव मिपाकरांपर्यंत पोहोचवावा म्हणून इथेच घुसखोरी करत आहे. त्याबद्दल दिलगिरी. पण हे पुस्तक वाचलेत तर असे चकित व्हायचे अनुभव कित्येकवेळा येतील हे मात्र अगदी स्वानुभवावरून सांगतो.

In reply to by गॅरी ट्रुमन

एकंदरीत लहान सॅम्पलमध्ये टोकाचे (एक्स्ट्रीम) रिडिंग यायची शक्यता वाढते.... ...माझ्या 'सिस्टिम-१' ने पटकन दोन्ही ठिकाणी ती शक्यता सारखीच असेल हे उत्तर दिले. सिस्टिम-१ आणि सिस्टिम-२ मध्ये हा फरक आहे. हे लक्षात येताच खरोखरच थक्क व्हायला झाले.
माफ करा, जरा स्पष्टच विचारतो - ह्यात थक्क होण्यासारखे नक्की काय आहे? तुम्ही जरा विचार केला असतात, वेळ घेतला असतात आणि तुमच्याकडे असणाऱ्या सांख्यिकी ज्ञानाचा वापर केला असतात तर बरोबर उत्तर तुम्हाला सापडले असते. पण घाई केलीत आणि घोळ झाला. आता हे सांगायला मानस/अर्थशास्त्रज्ञ कशाला हवेत? बाकी तुमच्या शिफारशीवरून हे पुस्तक वाचण्याचा प्रयत्न करण्यात येईल. रच्याकने, सध्या 'बिहेव्हिअरल इकॉनॉमिक्स'ला आलेले 'अच्छे दिन' म्हणजे उत्क्रांतीवाद्यांनी डार्विनचे सिद्धांत चुकीचे आहेत हे मान्य करण्यासारखे आहे असे वाटते. सगळ्या अर्थशास्त्राचा डोलारा हा माणूस 'रॅशनल' (ह्याला मराठीत अचूक पर्यायी शब्द नाही) असण्यावर अवलंबून आहे. पण जवळपास सगळेच निर्णय घ्यायच्या वेळेस मनुष्य इररॅशनल वागतो हे अर्थशास्त्रद्यांना फार आधीच कळलेलं आहे. असो.

मोदक 14/03/2017 - 20:44
एका पुनर्जन्माची कथा हे पुस्तक वाचले.. Rheumatoid Arthritis नामक दुर्धर विकार झालेल्या मनोविकारतज्ञ डॉक्टरने, ओशो तत्त्वज्ञानाने या रोगाशी कसा सामना केला याचा विस्तृत अनुभव आहे.

In reply to by मोदक

पुंबा 15/03/2017 - 20:19
यांत्रिकाची यात्रा (लक्ष्मणराव किर्लोस्कर)
याबद्दल कुतुहल वाटते आहे. वाचून झाल्यावर सांगा कसे वाटते ते. मला किर्लोस्कर घराण्याबद्दल विलक्षण लोभ वाटतो. त्यामुळे हे पुस्तक नक्की वाचेन.

In reply to by पुंबा

मोदक 15/03/2017 - 21:41
मला किर्लोस्कर घराण्याबद्दल विलक्षण लोभ वाटतो - __/\__ किर्लोस्करांविषयी वाचायचे असेल तर पुढील पुस्तके जरूर वाचा. Cactus and Roses - शंतनुरावांचे आत्मचरित्र या पुस्तकाची शंतनुरावांच्या जन्मशताब्दीनिमीत्त निघालेली २००३ सालची प्रत सध्या उपलब्ध आहे किंवा येथे पीडीएफ डाऊनलोड करता येईल. कालापुढती चार पाऊले - सविता भावे (१९७९) यांत्रिकाची यात्रा (लक्ष्मणराव किर्लोस्कर) - शं वा किर्लोस्कर (१९८७ चे पुनर्मुद्रण) एका नांगराची कहाणी - डॉ. भा. र. साबडे (१९८९) शंतनुराव - डॉ. भा. र. साबडे वरील यादीतील "कालापुढती चार पाऊले" सध्या सहज मिळेल, अन्य कोणतीही पुस्तके मिळाली तर नक्की सांगा, तसेच या यादीपेक्षा अन्य कोणती पुस्तके माहिती असतील तर प्रतिसादात कळवा. शंतनुराव किंवा एकंदर किर्लोस्करांविषयी आणखी कांही वाचायचे असेल तर कल्याणी आणि ओगले ग्लास वर्क्स यांची पुस्तके वाचा, त्यांच्या सुरूवातीच्या काळात शंतनुरावांचे अनन्यसाधारण योगदान आहे.

In reply to by पुंबा

मोदक 16/03/2017 - 17:28
मी वरती नोंदवायचे विसरलो.. पण "यांत्रीकाची यात्रा" हे पुस्तक मला जुन्या पुस्तकाच्या दुकानात मिळाले. तुम्हाला नवीन पुस्तक मिळण्याची कितपत शक्यता आहे याची कल्पना नाही..

वरुण मोहिते 14/03/2017 - 20:56
दोन म्हातारे वं इतर कथा .अनुवाद -उमा कुलकर्णी इंग्लिश _ बऱ्यापैकी न आवडलेलं सियालकोट सागा _अश्विन संघी

पुंबा 15/03/2017 - 13:52
जी एंचं काजळमाया किंडलवर विकत घेतलं. त्यातली प्रदक्षिणा ही पहिली कथा कॉलेजला असताना वाचली होती. इतकं विकल होऊन जायला झालं होतं की सगळ्या कथा वाचवल्याच गेल्या नव्हत्या, सरळ पुस्तक ग्रंथालयात परत देऊन आलेलो. आता पुन्हा वाचायला सुरूवात केलीये. विकलता, एकटेपणा, जीवनाचं भयाण, क्रौर रूप, नियतीचा निर्दय सारीपाट, जगण्यातली विलक्षण गुंतागुंत मांडायला जी एंसारखा विलक्षण प्रतिभावंतच हवा.

In reply to by पुंबा

सानझरी 16/03/2017 - 17:40
जी एंचं कुठलंतरी पुस्तक वाचायला घेतलेलं. त्यातली रुपकं इतकी किळसवाणी वाटलेली कि पुढे वाचवलंच नाही. जी एंच्या २-३ कथा 'औदुंबर' पुस्तकात वाचल्यात तेवढ्याच.. बाकी जी एंच्या पत्रांची मी जबरदस्त फ्यॅन. (चारही खंड आणि जी एंची पत्रवेळा)

मदनबाण 18/03/2017 - 00:58
सध्या वेळ मिळेल तसे हे वाचतोय... P1 अतीशय सुंदर आणि समाधान देणारं !

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- उडी उडी जाये, उडी उडी जाये, दिल कि पतंग देखो उडी उडी जाये... ;):- Raees

गॅरी ट्रुमन 18/03/2017 - 10:13
मागे रघुराम राजन यांचे Fault Line: How Hidden Fractures Still Threaten the World Economy हे अप्रतिम पुस्तक वाचले होते. भूकंपशास्त्रात फॉल्टलाईन म्हणून एक संकल्पना आहे. जमिनीच्या खाली दोन भूगर्भाच्या प्लेट एकमेकांशेजारी असतात तिथे या फॉल्टलाईन्स असतात. या फॉल्टलाईन्सच्या ठिकाणी प्रचंड प्रमाणावर दबाव तयार होतो आणि तो दबाव प्रमाणाबाहेर वाढला की त्यातूनच पुढे भूकंप होतात. राजनसाहेबांनी जागतिक अर्थकारणात अशा कोणत्या 'फॉल्टलाईन्स' आहेत हे या पुस्तकात खूपच चांगल्या पध्दतीने समजावून सांगितले आहे. या पुस्तकात राजनसाहेबांनी २००७-०८ चे अमेरिकेतील आर्थिक संकट, १९९७ चे पूर्व आशियाई संकट इत्यादींचा व्यवस्थित उहापोह केला आहे. तसेच कोणत्याही जार्गनचा वापर न करता विषय अगदी साधीसाधी उदाहरणे वापरून समजावून दिला आहे. विशेषतः २००७-०८ च्या संकटाची मूळे बरीच मागे जातात आणि त्या संकटात सरकारनेही नकळतपणे कसा हातभार लावला होता हे त्यांनी समजावून सांगितले आहे. तसेच २००५ च्या जॅकसन होल कॉन्फरन्समध्ये इतर सगळे फेडचे चेअरमन अ‍ॅलन ग्रीनस्पॅन यांचे गोडवे गात असताना नेमक्या रघुराम राजन यांनी Has Financial Development Made the World Riskier? हा पेपर सादर करून एका अर्थी सगळ्यांचाच रसभंग केला हे पण त्यांनी लिहिले आहे. हा विषय इतक्या सोप्या शब्दात समजावून देणारे दुसरे पुस्तक वाचायला मिळणे कठिण आहे. Rajan

Ranapratap 18/03/2017 - 19:55
अच्युत गोडबोले यांचे बोर्डरूम व अर्थात वाचून झाले. इतर हि पुस्तके वाचनीय आहेत, जसे मुसाफिर भाग 1 व 2, गुलाम, मनात. सद्या नॉर्मन लेवीस यांचे word power made easy वाचतोय, अभ्यासतोय इंग्रजी सुधारण्यासाठी उत्तम पुस्तक.

In reply to by Ranapratap

गॅरी ट्रुमन 18/03/2017 - 20:20
सद्या नॉर्मन लेवीस यांचे word power made easy वाचतोय, अभ्यासतोय इंग्रजी सुधारण्यासाठी उत्तम पुस्तक.
हे पुस्तक चांगले आहे. विविध शब्द चांगल्या पध्दतीने समजावून सांगितले आहेत. पण हे पुस्तक खूपच प्राथमिक पातळीवरील आहे. इंग्रजी शब्दांसाठी आणखी दोन अक्षरशः खतरनाक पुस्तके सुचवतो. या पुस्तकात समानार्थी किंवा विरूध्दार्थी शब्द अशा स्वरूपाचे प्रश्न आहेत आणि प्रत्येक प्रश्नाला पर्याय आहेत. अनेक प्रश्नांमधील मुळातला शब्द आणि पर्यायात दिलेला एकही शब्द माहित नव्हता. मला भाषांमध्ये वगैरे फार गती नाही पण तरीही इंग्रजी शब्द करायला खूपच आवडते. नवे शब्द कळले की त्यातून वेगळा आनंदही मिळतो. त्यामुळे मला ही दोन पुस्तके प्रचंड म्हणजे प्रचंड आवडली. ही पुस्तके ६०-७० वर्षे जुनी असल्यामुळे प्रताधिकार वगैरे भानगडींमधून मुक्त झाली आहेत आणि खूप स्वस्तही आहेत (१०० रूपयाच्या आतबाहेर) १. All about words २. How to build a better vocabulary १ २

In reply to by पुंबा

गॅरी ट्रुमन 20/03/2017 - 11:01
या दोन पुस्तकांमधले शब्द करताना जाडीजुडी डिक्शनरी बरोबर घेऊन बसावे लागेल. पॉकेट डिक्शनरीचाही फार उपयोग होईल असे वाटत नाही :) हे शब्द केले की तेवढ्यापुरता आनंद मिळतोच. पण अर्थातच हे शब्द आपण दैनंदिन व्यवहारात वापरत नसल्यामुळे बर्‍याचशा शब्दांचा विसर पडतो. तरीही हे शब्द कुठेतरी बघितले/वाचले तर संदर्भातून त्याचा अर्थ समजतोही. पण तरीही स्वतःहून त्या शब्दांचा वापर तितक्या सफाईने करता आलेला नाही :(

सध्या तुनळीवर कधीपासुन वाचायच्या यादीत असणाऱ्या पुस्तकांची श्रवणरुपे (ऑडिओबुक्स) साडपली आहेत पण मूळ पुस्तक न वाचता सरळ 'ऐकण्याविषयी' मी साशंक आहे. एखादे आवर्जून वाचायचे पुस्तक तुम्ही सरळ 'ऐकले' आहे का? कसा होता तो अनुभव? विशेषतः ललित (फिक्शन. हाच पर्यायी शब्द आहे माहित नाही की नाही ते नक्की ठाऊक नाही)?

In reply to by मोदक

काफ्का (अजून कोण) - मेटामॉर्फोसिस
अतिशय गूढ वगैरे कथा असल्याने ऐकून कशी मजा येईल हे कळत नाहीये रच्याकने, मी आधी वाचून काढलेल्या कादंबऱ्यांची श्रवणपुस्तके ऐकण्यात पुनःप्रत्ययाचा आनंद नक्कीच मिळालेला आहे...

गणामास्तर 20/03/2017 - 10:19
शाळेत असताना मराठीला एक धडा होता. त्यात जहाजावर काम करणारा आणि लग्नाच्या सुट्टीसाठी घरी आलेला अबोल, थोडा तुसडा कथानायक होता. एका समारंभात लोक जमलेले असताना रेडिओवर एका बुडणाऱ्या जहाजावरून मोर्स कोडवरचे संदेश येऊ लागतात आणि तो ते समजावून देत असतो असे काही तरी कथानक होते. कुणाला आठवतंय का त्या कथा वा लेखकाचे नाव ?

In reply to by गणामास्तर

पुंबा 20/03/2017 - 10:51
रेडिओची गोष्टः दि बा मोकाशी लामणदिवा ह्या कथासंग्रहात ही कथा आहे. सध्या तोच कथासंग्रह वाचत आहे.

In reply to by पुंबा

पुंबा 20/03/2017 - 10:56
अवांतरः मोकाशींचा रेडिओदुरूस्तीचा व्यवसाय होता स्वतःचा. ह्या गोष्टीत रेडिओ हे महत्वाचे पात्र म्हणून येते.

गॅरी ट्रुमन 20/03/2017 - 10:49
या धाग्याच्या निमित्ताने कधीकाळी वाचलेली पुस्तके आठवायला लागली आहेत. युनिव्हर्सिटी ऑफ शिकॅगोमधील प्राध्यापक स्टीव्ह लेव्हिट यांचे Freakonomics: A Rogue Economist Explores the Hidden Side of Everything हे असेच एक पुस्तक. या पुस्तकात नुसत्या आकडेवारीचा अभ्यास करून अनेक गोष्टी कशा समजावून घेता येतात याविषयी लिहिले आहे. अनेकदा आपण असा विचारही केलेला नसतो. उदाहरणार्थ १९८० च्या दशकाच्या शेवटी आणि १९९० च्या दशकाच्या सुरवातीला अमेरिकेत 'टिनेज' गुन्हेगारांचे प्रमाण बरेच वाढले होते. त्यावेळी अजून १० वर्षात अमेरिकेतील कुठलेच शहर यापासून मुक्त नसेल आणि कधीही कुठेही अचानक १६-१८ वर्षाचा कोणी बंदूक दाखवून आपल्याला लुबाडेल अशा स्वरूपाचे चित्र सगळीकडे बघायला मिळेल वगैरे वगैरे बोलले जात होते. पण प्रत्यक्षात झाले उलटेच.१९९५ पासून हा गुन्हेगारीचा दर लक्षणीय प्रमाणात कमी झाला. २००० पर्यंत तर हा दर १० वर्षांपूर्वी होता त्यापेक्षा बराच कमी झाला होता. हे असे का झाले असावे? त्यासाठी १९९० च्या दशकात बिल क्लिंटनच्या काळात अर्थव्यवस्था सुधारली आणि नोकर्‍या अधिक प्रमाणावर उपलब्ध झाल्या म्हणून गुन्हेगारी कमी झाली वगैरे कारणे दिली गेली. पण ही कारणे ज्या प्रमाणात गुन्हेगारी कमी झाली त्याचा खुलासा करू शकत नाहीत हे पण प्रा.लेव्हिटने दाखवून दिले. मग असे काय झाले ज्यामुळे गुन्हेगारी अचानक कमी झाली? त्याचे कारण १९७३ मध्ये अमेरिकेत गर्भपाताला मान्यता मिळाली. एका कुणा स्त्रीची केस (नाव विसरलो) सुप्रीम कोर्टात गेली होती आणि त्यावेळी कोर्टाने गर्भपाताला मान्यता दिली. पूर्वी नको असलेली मुले जन्माला येत होती, परिणामी त्यांच्याकडे दुर्ल़क्ष होऊन मग तेच पुढे गुन्हेगार बनायचे प्रमाण जास्त होते. पण गर्भपाताला कायदेशीर मान्यता मिळाल्यावर नको असलेली मुले जन्माला यायचेच बंद झाले. अशा निर्णयांचे परिणाम लगेच दिसत नाहीत. त्यामुळे झाले असे की जे १९९० च्या दशकात बालगुन्हेगार व्हायची शक्यता सर्वात जास्त होती अशी मुले १९७० च्या दशकाच्या शेवटी आणि १९८० च्या दशकाच्या सुरवातीला जन्मालाच आली नाहीत. त्यातूनच हे गुन्हेगारीचे प्रमाण कमी झाले. काही वेळा अमेरिकेतील काही शाळाशिक्षक आपल्या शाळांमधील विद्यार्थ्यांची कामगिरी चांगली दिसावी (आणि त्याचे श्रेय आपल्याला मिळावे) म्हणून विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिकेत परीक्षा संपल्यावर ओ.एम.आर शीटमध्ये बरोबर उत्तरे स्वतः भरत असत. हे कसे पकडावे याविषयीही पुस्तकात काही लिहिले आहे हे वाचल्याचे आठवते. पुस्तकातील काही गोष्टी अमेरिकेतील परिस्थितीला अनुसरून आहेत. त्या वाचायला आपल्याला कंटाळवाणे होऊ शकते. उदाहरणार्थ ड्रग माफियांचे राज्य कसे चालते याविषयी सुधीर वेंकटेश म्हणून भारतीय वंशाच्या विद्यार्थ्याने तिथे जाऊन काढलेल्या माहितीवर अनेक पाने खर्ची घातली आहेत. मला तरी तो भाग वाचायला कंटाळवाणा झाला होता. तसेच गोर्‍या लोकांच्या केकेके संघटनेवरही काही लिहिले आहे. तो भागही तितका अपीलींग वाटला नाही. तरीही एकूण हे पुस्तक चांगलेच वाटले. या पुस्तकानंतर प्रा.स्टीव्ह लेव्हिट यांनी सुपर फ्रिकॉनॉमिक्स, थिंक लाईक अ फ्रिक अशी पुस्तकेही लिहिली आहेत. ती अजून वाचलेली नाहीत. तसेच त्यांचा हा ब्लॉगही इंटरेस्टींग आहे. अशा विषयांमध्ये रस असलेल्यांना प्रा.लेव्हिट यांचे हे पुस्तक वाचायला नक्कीच आवडेल. 1

अद्द्या 20/03/2017 - 11:48
मस्तच धागा , फक्त एक सूचना . लेखक , अनुवाद इत्यादी माहिती देताना .. जर आपल्याकडे पीडीएफ उपलब्ध असेल तर स्वतःचा मेल आयडी हि द्या. म्हणजे लोक त्यावर मेल करून पीडीएफ घेऊ शकतील .

मोदक 20/03/2017 - 21:57
पुस्तकांची यादी करणे सुरू आहे.. इथल्याच मित्रांनी सुचवल्याप्रमाणे पुस्तकाचा प्रकार - आत्मचरित्र / कादंबरी.. पुस्तकाचा प्रकार - वैद्यकीय / साहित्यीक... भाषा पुस्तकाचे नांव लेखकाचे नांव अशी यादी करतो आहे. आणखी काय ट्रॅक करावे..?

In reply to by मोदक

गॅरी ट्रुमन 21/03/2017 - 09:56
याची गुगल शीट बनवून सगळ्यांबरोबर शेअर करता आली तर चांगले होईल. बर्‍याचदा इतर मिपाकर वाचत असतील आणि आपण काहीही वाचत नसू तर त्यातून आपल्यालाही वाचायची प्रेरणा मिळते. व्यायामाविषयी हाच प्रकार अनुभवायला मिळत आहे. तसेच वाचनाविषयीही होईल.

In reply to by मोदक

इडली डोसा 21/03/2017 - 11:34
छापील प्रत उपलब्ध आहे / नाही , शिवाय किंडल आवृत्ती उपलब्ध आहे नाही हे पण लिहिता येईल का? गुगल शीट केल्यास मला सहभागी व्हायला आवडेल.

In reply to by मोदक

गॅरी ट्रुमन 21/03/2017 - 13:58
मला वाटते की या धाग्यावर किंवा गुडरीडावर किंवा अन्यत्र कुठे लिहिले असेल अशा पुस्तकांचा समावेश व्हावा आणि हळूहळू ती गुगल शीट (आणि हा धागा) अपडेट केला जावा. म्हणजे इतर मिपाकर नक्की काय वाचत आहेत हे समजून त्याविषयी आपल्याला वाचायला कल्पना मिळतील. अर्थातच हा एक आयत्या वेळी बनविलेला सल्ला झाला. अन्य कुठल्या पध्दतीने हे काम करता आले तर फारच चांगले. पण 'अरे मी इतरांच्या मानाने फार वाचत नाही' ही टोचणी लागणे आणि त्यातून जास्त वाचन होणे महत्वाचे. मग ती टोचणी कशीही लागो :)

In reply to by मोदक

गॅरी ट्रुमन 21/03/2017 - 16:30
धन्यवाद. त्या स्प्रेडशीटमध्ये प्रत्येक पुस्तकासाठी वेगळी वर्कशीट आहे. आतापर्यंतच या धाग्यावर १५-२० पुस्तकांविषयी चर्चा झालीच आहे. आणि मी अजून बरीच भर त्यात टाकणार आहे काळजी नसावी :) तेव्हा प्रत्येक पुस्तकासाठी वेगळी वर्कशीट असल्यास काही काळानंतर (म्हणजे त्या स्प्रेडशीटमध्ये ३०-४० पुस्तकांची नोंद झाल्यावर) ते अडचणीचे ठरू शकेल. मी फार टेक सॅव्ही नाही त्यामुळे मला यावर उपाय सुचवता येणार नाही. तसेच मी ती स्प्रेडशीट मेन्टेनही करत नसल्यामुळे नुसते सल्ले देणेही कितपत बरोबर आहे याची कल्पना नाही :)

गॅरी ट्रुमन 21/03/2017 - 10:03
अनेकदा आपल्याला पुस्तके कुठून मिळवावीत हा प्रश्न पडतोच. पुस्तके घरी घेऊन घरातील सामान वाढवावे असे अनेकांना वाटत नाही. मी पण त्यातलाच. अशावेळी किंडल उपयोगी ठरते. किंडलवर वाचताना डोळ्याला त्रासही होत नाही. बरीच पुस्तके छापील प्रतीपेक्षा स्वस्तात असतात आणि किंडलवर पुस्तक असले तर घरी किती पुस्तके साठवायची हा प्रश्नही येत नाही. तसेच किंडलवर 'अनलिमिटेड' म्हणून एक प्रकार असतो. त्यात किंडलवरची लायब्ररी असते. त्यात सगळी नाही तरी बरीच पुस्तके उपलब्ध असतात. तसेच घरपोच किंवा हापिसच्या डेस्कवर पुस्तके पोचती करणार्‍या लायब्ररी सेवाही उपलब्ध आहेतच. पूर्वी हापिसात क्वेंच कॉर्पोरेट लायब्ररीचा मी सदस्य होतो. नाममात्र फीमध्ये आपल्या डेस्कवर पुस्तके पोहोचती करायची/न्यायची सोय होती त्यात. त्याचबरोबर पै फ्रेंड्स लायब्ररी, लायब्ररीवाला.कॉम अशा काही सेवाही उपलब्ध आहेत.

गॅरी ट्रुमन 21/03/2017 - 10:39
या धाग्याच्या निमित्ताने मागे वाचलेली अनेक पुस्तके आठवायला लागली आहेत. जशी आठवतील तशी आणि वेळ मिळेल त्याप्रमाणे त्यावर लिहिणारच आहे. अनुज धर यांचे India's biggest cover-up हे पुस्तक असेच मागे वाचले होते. नेताजी सुभाषचंद्र बोसांचे तैपईतल्या विमान अपघातात निधन झाले असे म्हटले जाते. पण त्याविषयी अनेक वादविवाद आहेत. हे पुस्तक त्याविषयीच आहे. सुभाषचंद्र बोसांचे नक्की काय झाले याविषयी १९५६ मध्ये आझाद हिंद सेनेचे शाहनवाझ खान यांच्या नेतृत्वाखाली तर १९७० मध्ये न्या.खोसला यांच्या नेतृत्वाखाली आयोग नेमण्यात आले होते. या दोन्ही आयोगांनी काम निष्पक्षपणे न करता सरकारला हवा होता तो अहवाल दिला असा अनुज धर यांचा दावा आहे. पुढे १९९९ मध्ये न्या.मुखर्जींच्या नेतृत्वाखाली तिसरा आयोग नेमण्यात आला. त्या आयोगाने बोसांचा त्या अपघातात मृत्यू झाला नाही असे म्हटले. अमुक एक साधू किंवा बाबा हेच नेताजी सुभाषचंद्र बोस असल्याच्या वावड्या अनेकदा उठल्या होत्या.त्यातल्या काही वावड्यांचाही या पुस्तकात उल्लेख आहे आणि संबंधित साधू हे सुभाषचंद्र बोस असू शकणार नाहीत हे अनुज धर यांनी म्हटले आहे. पण सुभाषचंद्र बोस यांचे नक्की काय झाले? त्यांचे त्या विमान अपघातात निधन झाले का? त्याविषयी लेखक अनुज धर यांनी काही परिस्थितीजन्य पुराव्यांच्या आधारावर एक स्पष्ट दावा केला आहे. तो दावा कोणता याविषयी इथे काहीही लिहित नाही (अन्यथा 'स्पॉईलर' होईल). एकूणच हे पुस्तक वाचताना 'सुभाषचंद्रांचे पुढे काय झाले' ही उत्कंठा वाचकाला शेवटपर्यंत खिळवून ठेवते. लेखकाने हे पुस्तक खूपच परिश्रमाने आणि खूप अभ्यास करून लिहिले आहे हे जाणवते. हे पुस्तकही नक्कीच वाचनीय आहे म्हणून रेकमेन्डेड :) Anuj Dhar

मोदक 27/02/2017 - 13:42
मी सुरूवात करतो. आज एकच दिवस मेहता प्रकाशनमध्ये मराठी भाषा दिनानिमीत्त सर्व पुस्तकांवर ४०% सूट आहे. किमान ३४००/- रूपयांची खरेदी आवश्यक, म्हणजे एकूण डिस्काऊंट मिळून बिल २०००/- दरम्यान होते.

सागर 27/02/2017 - 15:14
मोदका छान धागा सुरु केलास सध्या मी भा. रा. भागवतांनी अनुवाद केलेले "शाब्बास शेरलॉक होम्स" ही ५ छोट्या पुस्तकांची मालिका वाचतो आहे. डायमंड प्रकाशनाने गजानन मेहेंदळे यांचे "श्री. राजा शिवछत्रपति" या दोन खंडांची पुनर्र्छ्पाई केली आहे. इतिहासाची आवड असणार्‍यांनी अवश्य संग्रही ठेवावा असा हा ग्रंध आहे. असो मला जुनी काही पुस्तके हवी आहेत. कोणी मदत करु शकले तर खूप आनंद होईल. - वारसा नॉस्ट्राडेमसचा - मूळ लेखक : रेमंड लिओनार्ड - मराठी अनुवाद : अनिल काळे - द हॉट झोन - रिचर्ड प्रेस्टन - अनुवाद : प्रमोद जोगळेकर - शकुंतला - आनंद साधले (याची झेरॉक्स प्रत देखील चालेल )

In reply to by सागर

सागर 27/02/2017 - 15:19
गजानन मेहेंदळे यांचे "श्री. राजा शिवछत्रपति" २ खंड ऑनलाईन ऑर्डर करता येतील. मी घेतले आहेत. २०% सवलतीने खरेदी करण्यासाठीचा दुवा : http://www.diamondbookspune.com/viewdetails.php?bid=118&disc=20

वरुण मोहिते 27/02/2017 - 15:38
मला एक पुस्तक हवंय..डार्क गॉड्स नावाचं .टेड क्लेन म्हणून लेखक आहेत अमेझॉन वरून मागवलं तर २० दिवसांनी त्यांचा परत मेल आला कि उपलब्ध नाही म्हणून. असं म्हणतात हे पुस्तक नारायण धारपांचं इन्स्पिरेशन आहे.ते गेल्यावर त्यांच्या घरातली पुस्तक जेव्हा विकली तेव्हा रद्दीत हे पुस्तक हृषीकेश जोशी सध्या भयकथा वैग्रे लिहितात त्यांना मिळालं . अशी कथा ऐकल्यावर उगाच उत्सुकता लागलीये ते पुस्तक वाचायची .

In reply to by वरुण मोहिते

सागर 27/02/2017 - 16:33
वरुण हे पुस्तक अमेझॉन वर उपलब्ध आहे पण खुप महाग आहे. अ‍ॅमेझॉन च्या साईट वर सर्च मधे नाहि सापडले. पण गूगल सर्च मधून सापडले. लिन्कः http://www.amazon.in/gp/offer-listing/0330297147/ref=dp_olp_used_mbc?ie=UTF8&condition=used बहुदा वापरलेले (सेकंड सेल आहे) पुस्तकाच्या रेटिंग वरुन बरेच प्रसिद्ध पुस्तक आहे असे दिसते.

वरुण मोहिते 27/02/2017 - 17:30
सातवाहन कालीन महाराष्ट्र आणि मराठ्यांचा इतिहास ..महाराष्ट्र विद्यापीठ ग्रंथ मंडळासाठी विजयानगर पुणे ३०... अशी बऱ्यापैकी रेअर असलेली यादी पण आहे . रोज इकडे एखाद पुस्तक शेयर करावं का??

In reply to by वरुण मोहिते

मोदक 27/02/2017 - 17:46
रोज इकडे एखाद पुस्तक शेयर करावं का?? हो करा की. तसेच पुस्तकाची ओळख आणि तुम्हाला त्यात काय आवडले हे ही जरूर लिहा.

दीपक११७७ 27/02/2017 - 18:19
मला 'विषातील विज्ञान' हे पुस्तक हवं आहे मला या पुस्तकाचं फक्त नावच पुसटस आठवत, हे पुस्तक अनुवदित आहे, जर कुणाला याबद्दल काही माहीत असल्यास क्रुपया सांगावे. छान धागा मोदक मित्रा!

Nitin Palkar 27/02/2017 - 18:49
१९९० ते २०११ या काळातील Readers Digest चे सुमारे शंभर मासिक अंक (संमिश्र, सलग नव्हेत) माझ्याकडे आहेत. हौशी संग्रहाकास नाममात्र किमतीस विकणे आहेत. संपर्क: ७०४५६ ३६३४६

आदूबाळ 27/02/2017 - 18:51
महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ - ऑनलाईन ईबुक्स https://msblc.maharashtra.gov.in/pdf/ (यापद्धतीने लिंक द्यायचं कारण म्हणजे 'छुपी' पुस्तकंही दिसतात.)

केडी 27/02/2017 - 19:40
हल्ली वाचनाला वेळ मिळत नाही म्हणून मग audible (ऍमेझॉन) वर पुस्तक श्रवण करतो, ऑफिस ला गाडीतून जाता येता. आधी थोडं वेगळं वाटत, पण सवय होते, आणि नंतर मज्जा येते. ह्यावर आवर्जून ऐकावे/वाचावे असे पुस्तक म्हणजे Man versus Wild च्या Bear Grylls चे पुस्तक Mud, Sweat and Tears. हे माझ्या १२ वर्षाच्या मुलाला देखील ऐकवले आणि त्याने मन लावून ऐकले। विलक्षण अनुभव आहेत ह्या माणसाचे. नक्की वाचून बघा।

गॅरी ट्रुमन 27/02/2017 - 21:41
India Since Independence: Making Sense of Indian Politics हे जनेयुमधील प्राध्यापक व्ही.कृष्ण अनंत यांचे पुस्तक माझ्या अगदी 'ऑल टाईम फेव्हरेट' मध्ये आहे. हे पुस्तक भारतीय राजकारणात स्वातंत्र्यापासून जवळपास १९९० पर्यंतच्या घटनांचा आढावा घेते. तसेच या पुस्तकामध्ये घटना जशा घडल्या तशा दिल्या आहेत त्यामुळे या पुस्तकाचे लेखक जनेयुमधील प्राध्यापक असले तरी जनेयु स्टाईलमध्ये हलकटपणा करायला स्कोप नाही. मिपावर राजकारणावरील चर्चांमध्ये माझ्या अनेक प्रतिसादांना या पुस्तकाचा आधार असतो. या पुस्तकात नेहरूंचा काळ, इंदिरा गांधींचा काळ, आणीबाणी, जनता पक्ष, राजीव गांधींचा कालावधी इत्यादी काळात झालेले राजकीय चढउतार भरपूर सविस्तरपणे दिले आहेत. माझ्यासारख्या राजकारणात अतोनात रस असलेल्याला हे पुस्तक म्हणजे अगदी पर्वणीच आहे. कितीही वेळा वाचले तरी मधूनमधून ते पुस्तक मी परत वाचत असतो. हे पुस्तक उत्तम आहेच फक्त पुस्तकात अनेकवेळा तारखांचा घोळ झाला आहे (म्हणजे फार घोळ नाही--२-४ दिवस इकडेतिकडे) ते टाळता आले असते तर बरे झाले असते असे वाटते.

In reply to by गॅरी ट्रुमन

पुंबा 01/03/2017 - 17:19
रोचक वाटत आहे. बिपन चम्द्रा आणि रामचंद्र गुहा या दोघांची स्वातंत्र्योत्तर भारतावरची पुस्तके संग्रही आहेत. आता हेदेखील वाचायला हवे.

सध्या आतिवास सविता ह्यांचे अफगाणिस्तानमधील अनुभवावर आधारित 'भय इथले' हे पुस्तक वाचत आहे. त्यानंतर जयंत नारळीकर ह्यांचे 'चार नगरातील माझे विश्व' वाचणार आहे.

प्रचेतस 28/02/2017 - 10:09
सध्या गजानन मेहेंदळे ह्यांनी लिहिलेले 'श्री राजा शिवछत्रपती' हे पुस्तक वाचत आहे. प्रचंड माहितीच्या ओघाने निव्वळ थक्क व्ह्यायला होतंय.

वरुण मोहिते 28/02/2017 - 10:27
वसंत वसंत लिमये यांचं . रहस्य कथा कथा वर्तमान काळाशी सुसंगत ह्या धर्तीवर . आधीचं लॉक ग्रिफिन पण तसेच होते. 'शोध 'पण असेच होते मुरलीधर खैरनार यांचे . अंग्रेजी मध्ये सध्या 'द ग्रेट इंडियन नॉवेल ' वाचतोय शशी थरूर यांचे .

पुंबा 28/02/2017 - 10:28
नुकतेच 'पाडस', 'चीपर बाय द डझन' आणि 'सारे प्रवासी घडीचे' ही तीन पुस्तके वाचून संपवली. अत्यंत सुंदर पुस्तके आहेत तीनही. सध्या कथासंग्रह वाचायचा मूड आहे, दि बा मोकाशींचा 'दिवेलागण' आणि श्री दा पानवलकरांचा 'सूर्य' असे दोन कथासंग्रह वाचत आहे. मिपावर बॅटमॅन यांनी अफाट स्तुती केल्याने मराठी 'वांग्मयाचा गाळीव इतिहास' हे देखील आणले आहे, दुकानात चाळत असताना पहिली एक दोन पाने वाचूनच जो वेड्यासारखा हसत होतो. नॉन फिक्शनमध्ये मायकेल सँडेल यांचे 'जस्टिस: व्हॉट्स द राईट थिंग टू डू' आणि 'गावगाडा' ही दोन चालू आहेत पण तितका सलग वेळ देता येत नसल्याने एखादे प्रकरण वाचून थंड पडत आहेत. न सांगण्याजोगी गोष्ट आणले आहे, पण सुरू करण्यासाठीच मूड येत नाहीये. मुख्य ओढा कथासंग्रहांकडे असल्याने, मिपाकर, कृपया चांगले कथासंग्रह सुचवा. तसेच, 'जप्ती' ही कथा मी सातवीत असताना वाचली होती, ती खूप आवडली होती, दुर्दैवाने लेखिकेचे आणि कथासंग्रहाचे नाव लक्षात येत नाही. बहुदा, वसुंधरा पटवर्धन किंवा असेच काही तरी त्यांचे नाव होते. कुणाला ही कथा ठाऊक असल्यास अधिक माहिती द्यावी.

In reply to by पुंबा

मोदक 28/02/2017 - 11:14
सारे प्रवासी घडीचे जबरदस्त पुस्तक आहे. =)) ********************** अवांतर - मी पूर्वी कधीतरी या पुस्तकाचे परिक्षण लिहिले होते. ********************** सारे प्रवासी घडीचे ही कथा आहे एका कोकणातल्या एका प्रतिष्ठीत घरातील जमीनदाराच्या मुलाची. "आपू" ची. शिक्षणानंतर शहरात गेलेला आपू गावामध्ये एक दोन दिवसांसाठी येतो, वाड्याचे बंद दारही पाहण्याची सवय नसणारा आपू त्याच वाड्याच्या रिकाम्या उदास भकास खोल्यातून जुन्या आठवणी शोधत फिरतो, वाळवी व कसर लागलेले देव पाहून खिन्न होतो, एखाद्या पाहुण्यासारखे पूजा करणार्‍या भटजींच्या डब्यातले अन्न खातो या व अशा उदास वातावरणात आपूची आत्म-कथा सुरू होते. आपूला एकेक गोष्टी आठवतात.. या पुस्तकातील सर्व घटना माणसांभोवती विणलेल्या आहेत. प्रत्येक घटनेला दळवींनी दिलेली विनोदाची झालर त्यांचे विनोदावरील प्रभुत्व दाखवून जाते.. निर्वीष, निर्वैयक्तीक आणि निव्वळ प्रसंग व संवादातून उभा केलेला विनोद!! आबा.. त्यांची ग्रामदैवत रवळनाथावरील निष्ठा. रवळनाथाचे त्यांना आलेले अनुभव. आबांचा कट्टर वैरी बाबुली. त्याच्याशी नेहमी सुरू असलेले कोर्टकचेरीतील दावे. आपूच्या शाळाप्रवेशाची नांदी. भविष्य पाहण्यासाठी आलेले भटजी व त्यांनी काढून दिलेला मुहूर्त. आपूचे व त्याच्या आजीचे विडी आणण्यावरून जमलेले द्वैत, आपू शाळेत गेला तर विड्यांचे काय ही आज्जीला लागलेली काळजी. शाळेत न जाण्याची आपूची तर त्याला शाळेत घालण्याची आबांची धडपड. "सरस्वती आयली तर लक्ष्मी जातली" हे आज्जीने सांगीतलेले तत्वज्ञान! आपूने शाळेतच बसावे - पळून जावू नये म्हणून केलेल्या दादुल्याची नेमणूक. शाळेतला "ढ" पण जिवलग मित्र नरू. "भो पंचम जॉर्ज"ची मनापासून प्रार्थना करणारे व शाळामास्तर हेच पोस्टमास्तर असलेले बागाईतकर मास्तर. "माका नाव W W कुळकर्णी असत" असे म्हणून V V कुळकर्णी नावाने आलेले पत्र नाकारणारे (पण कार्ड असेल तर वाचून परत देणारे) आपूचे शेजारी "वामन विष्णु कुळकर्णी" शाळेचे गॅदरींग, "घनतमी शुक्र राज्य करी" व "अहाहा चेंडू.." या गाण्यांच्या अयशस्वी प्रयोगानंतर सर्वानुमते ठरलेले "देवाजीने करूणा केली" हे गाणे. गॅदरींगमध्ये आपूच्या विळ्याने किरकोळ जखम झालेला परशा व त्यानंतर परशाचा विळा हातात घेवून बागाईतकरांचे धोतर (घामाने!) ओले होईपर्यंत भांडण केलेला परशाचा बा. बागाईतकरांच्या रिटायरमेंट नंतर शाळेत अवतरलेला पावटे मास्तर. हा मास्तर बाबुलीच्या गटातील असल्याने त्याने केलेले आपूचे हाल. पावटे मास्तरच्या हाताचा मार खाऊन खाऊन एक दिवस त्याच्या खुर्चीवर खाजकुयलीची कुसे टाकून व नंतर पावटे मास्तरच्या "दुर्गाबाय" नावाच्या एका विधवेशी असलेल्या प्रकरणावरून "दुर्गेदुर्गट भारी तुजविण संसारी.." हे आरती टाळ्या पिटून भर बाजारात पावटे मास्तरच्या मागी लागणारा नरू.. पावटे मास्तर जातपात पाळत असल्याने केशा चांभाराला शिक्षण कमीटीचा मेंबर म्हणून निवडून देणारे आबा व केशाने केलेले शाळेचे "इन्स्पेक्षन" एका चांभाराला निवडून देणारे गाव पुरोगामी असलेच पाहिजे म्हणून गावात अवतरलेले "खुळो डाक्टर" डॉ.रामदास. त्यांनी आयोजीत केलेले गावकर्‍यांनी सर्वभोजन. दारूचा गुत्ता चालवणारा पेस्तँव.. दारूडा बाबल्या मडवळ. पशू, पक्षी व वनस्पतींची जिवापाड काळजी घेणारा हाफमॅड तात्या. आपूला जेलमध्ये डांबले म्हणून गेम करून सस्पेंड केला गेलेला हवालदार मुंगी. दशावतारी जिवा, त्याने साकारलेला शंकासूर.. जिवाचा प्रतिस्पर्धी व रवळनाथाचा पुजारी बाबू गुरव. बाबूने केलेले एकमेव नाटक द्रौपदी वस्त्रहरण - ज्याचा शेवट "लंगोटीमध्ये उभी असलेली द्रौपदी विडी ओढणार्‍या भगवान कृष्णाच्या तोंडात भडकावते" असा होतो. गावातील रिकामटेकडे व सतत कोणाचीतरी माहिती काढत त्यावरून वेळ घालवणारे लोक.. त्यांनी वेगवेगळ्या सवईंवरून लोकांना बहाल केलेली झोंबणारी टोपणनावे.. नायनाय भाऊ, हाफमॅड तात्या, अमृतांजन प्रेमजी, दुलाजीचा मुलगा "यम" (रेड्यावर बसून शेतातून घरी येणारा म्हणून!) लंगडा तातू.. हे अगदी छोटेखानी पुस्तक हास्याचे कारंजे उडवते. या व अशा अनेक माणसांचे चित्रण इतके जिवंत झाले आहे की पुस्तकाच्या शेवटी "सर्व पात्रे व प्रसंग काल्पनीक" ही ओळ वाचून मला खूप वाईट वाटले होते!!

In reply to by मोदक

पुंबा 28/02/2017 - 13:47
मोदकभौ, फार भारी लिहिलेत आपण. सगळी उजळणी झाली मनातल्या मनात, परत हसतोय.
चित्रण इतके जिवंत झाले आहे की पुस्तकाच्या शेवटी "सर्व पात्रे व प्रसंग काल्पनीक" ही ओळ वाचून मला खूप वाईट वाटले होते!!
मी खरेच आहे असे मानतो.. :))

पुंबा 01/03/2017 - 17:17
मी ereader prestigio वापरतो. .mobi, तसेच epub दोन्हीही प्रकारची पुस्तके निश्चिंतपणे वाचता येतात. फाँट आणि मार्जिन कमी जास्त करता येते. google books व किंडल छानच आहेत पण मोबाईलमधील जास्त जागा खातात.

वरुण मोहिते 01/03/2017 - 18:03
मराठी _तुही यत्ता कंची?? तुही यत्ता लेखक -नामदेव ढसाळ अंग्रेजी -वॉट एव्हरी इंडियन शुड नो बिफोर इन्वेस्टींग लेखक _एम टी राजू

In reply to by अमर विश्वास

मोदक 01/03/2017 - 19:54
टाटायनमधली अजित केरकर आणि टाटा फायनान्स (पेंडसे ?) ही दोन प्रकरणे वाचून धक्का बसला होता. बाकी टाटांसंबंधी पुस्तके वाचायची असतील तर आर एम लाला यांच्या पुस्तकांना पर्याय नाही. (तसेच बिझनेस लिजंड आणि बिझनेस महाराजे मधली जेआरडी आणि रतन टाटांची व्यक्तीचित्रे.) __/\__

मारवा 01/03/2017 - 20:34
तुनळीवर एक झकास वल्ली आहे पुस्तकांवर जबरा बोलतो व सुचवतो. विशेषता आधुनिकोत्तर एकदा जरुर आजमवा त्याच्याच सुचवणीवरुन सध्याच वाचन सुरु आहे. युट्युबात. जावुन bookchemist टाइप करा व सर्च करा मजा आजायेगा गॅरंटी !

अमर विश्वास 01/03/2017 - 22:02
मोदकजी ... टाटांबद्दल जेव्हडे वाचु तेभाडे कमीच आहे गिरीश कुबेर यांचे यांचे सध्याचे (लोकसत्ता जॉईन केल्या नंतर) लिखाण वाचल्यानंतर त्यांचे पुस्तक वाचायला भीतीच वाटते .. पण टाटायन चांगले आहे. तुम्ही म्हणता त्याप्रमाणे अजित केरकर आणि टाटा फायनान्स ही दोन प्रकरणे खरच खळबळजनक आहेत. खुद्द पेंडसेंनी लिहिलेले जे आर डी - मी पाहिलेले हे पुस्तक ही वाचनीय आहे. त्याचप्रमाणे जे आर डी चे "key notes address " एकत्र पुस्तक रूपाने उपलब्ध आहे (मराठी भाषांतर) जरूर वाचा

In reply to by अमर विश्वास

मोदक 02/03/2017 - 17:00
कुबेरांबद्दल सहमत. ;) मी पाहिलेले जेआरडी लिहिणारे द. रा. पेंडसे - हे टाटा ग्रुप मध्ये वरिष्ठ अर्थतज्ञ होते. (टाटा फायनान्स वाले पेंडसे वेगळे.) तसेच टाटा याच विषयावर आर एम लाला यांचे "क्रिएशन ऑफ वेल्थ" नावाचे एक पुस्तक आहे. टाटांची सुरूवातीपासूनची कथा आणि मारिओ मिरांडा यांची विषयानुरूप बहारदार रेखाचित्रे असे जबरदस्त पुस्तक आहे. पुण्यात मंगळदास रोडवर "टाटा सेंट्रल अर्काईव्ह्ज" आहे. तेथे कधीतरी जरूर भेट द्या.

In reply to by मोदक

अमर विश्वास 02/03/2017 - 21:47
धन्यवाद मोदक ... खुप वर्षांपूर्वी मी पाहिलेले जेआरडी हे पुस्तक वाचले होते.. नावात घोळ झाला .... चुक सुधारल्याबद्दल धन्यवाद टाटा सेंट्रल अर्काईव्ह्ज ला भेट दिली आहे .. तसेच कामानिमित्त बॉम्बे हाऊस ला ही भेट देण्याची संधी सुद्धा मिळाली ... आत्तापर्यंत अनेक कॉर्पोरेट हाऊसेस ना भेट दिली .. पण बॉम्बे हाऊस चा अनुभव वेगळाच होता

गॅरी ट्रुमन 02/03/2017 - 11:02
माजी पंतप्रधान इंदरकुमार गुजराल यांचे आत्मचरित्र Matters of Discretion: An Autobiography मध्यंतरी वाचले होते. माझ्या मते हे एक चांगले पुस्तक आहे पण त्यातील काही गॅप मात्र जाणवण्यासारख्या आहेत. १. गुजराल यांनी मॉस्कोमधील भारतीय वकिल म्हणून १९७६ ते १९८० ही चार वर्षे काम पाहिले. आज इंदरकुमार गुजराल हे नाव ऐकले की आपण परराष्ट्रधोरणाबरोबर ते नाव ताबडतोब निगडीत करतो. मला वाटते की गुजराल यांचा परराष्ट्रधोरणातील एकूणच दृष्टीकोन या काळात जास्त बदलला. गुजराल यांना हा काळ त्यांच्या आयुष्यातील अत्यंत महत्वाचा काळ वाटत असणे स्वाभाविक आहे आणि त्यांनी पुस्तकातली अनेक प्रकरणे त्यावर दिली आहेत. पण अर्ध्याहून जास्त भारतीयांचा जन्म त्यांची मॉस्कोतील कारकिर्द संपल्यानंतर झालेला आहे. या वाचकवर्गाला त्यांचे मॉस्कोमधील अनुभव काहीसे कंटाळवाणे आणि फार रस वाटावे असे असतील असे वाटत नाही. त्यातील काही अनुभव तर खूपच विस्ताराने लिहिले आहेत असे मला वाटले. उदाहरणार्थ राष्ट्रपती नीलम संजीव रेड्डींच्या मॉस्को भेटीदरम्यान त्यांनी दिलेल्या मेजवानीच्या वेळी ब्रेझनेव्ह उपस्थित राहिले नाहीत हा रेड्डींना अपमान वाटला आणि त्यामुळे कूटनैतिक संकट उभे राहिले असते आणि ते कसे टळले यावर काही पाने खर्ची पाडली आहेत. हे अनुभव सामान्य भारतीय वाचकांना फार भावतील असे नाही. तसेच सोव्हिएट रशियाच्या इतिहासात रस असलेल्या वाचकालाही हे फार भावेल इतक्या विस्तारानेही या गोष्टी लिहिलेल्या नाहीत. म्हणजे हे काही अनुभव कोणत्याच वाचकाला भावतील असे वाटले नाहीत आणि ते नक्की कशाकरता पुस्तकात आहेत असेही वाटले. २. इंदिरा गांधींच्या मंत्रीमंडळात गुजराल माहिती आणि प्रसारणमंत्री होते. त्यावेळी आणीबाणीच्या काही दिवस आधी संजय गांधींनी त्यांच्यावर इंदिरा समर्थकांच्या सभांना रेडिओ-टिव्हीवर प्रसिध्दी द्या असा आदेश दिला होता आणि तो त्यांना मान्य नव्हता यावर त्यांनी लिहिले आहेच. पण आणीबाणी या स्वातंत्र्योत्तर भारतातील महत्वाच्या घटनेविषयी त्यांनी पुस्तकात फार लिहिलेले नाही हे पण जरा खटकलेच. ३. गुजराल सुरवातीपासून काँग्रेसशी संलग्न होते. पण एप्रिल १९८४ मध्ये त्यांनी काँग्रेसविरोधात विरोधी पक्षांची आघाडी उघडायचा प्रयत्न केला याविषयी त्यांनी लिहिले आहे. पण त्यांना काँग्रेस का सोडाविशी वाटली याविषयी गुजराल यांनी काहीच लिहिले नाही हे नक्कीच खटकले. मला स्वतःला १९८९ पूर्वीच्या घटना केवळ पुस्तके वाचून माहित आहेत त्यामुळे अशा महत्वाच्या घटनेविषयी काहीच न लिहिलेले मात्र खटकले. ४. गुजराल पंतप्रधान झाल्यावर त्यांनी उत्तर प्रदेश विधानसभेत कल्याणसिंग सरकारवरील विश्वासदर्शक ठरावावर झालेल्या हिंसाचारानंतर उत्तर प्रदेशात राष्ट्रपती राजवट लागू करायची शिफारस केली होती. ती राष्ट्रपती के.आर.नारायणन यांनी केंद्रीय मंत्रीमंडळाकडे परत पाठवली. गुजराल यांच्या पंतप्रधानपदाच्या कारकिर्दीवर हा नक्कीच डाग होता. याविषयी त्यांनी मायावतींनी कल्याणसिंग सरकारचा पाठिंबा काढून घेतल्यानंतर गुजराल यांचे राज्यपाल रोमेश भंडारी यांच्याशी काय बोलणे झाले एवढेच लिहिले आहे. आणि त्यानंतर "उत्तर प्रदेशातील पेचप्रसंग सुटल्यावरच मला व्यवस्थित झोप लागू शकली" असे लिहिले आहे. पण तो पेचप्रसंग नक्की कसा सुटला याचा उलगडा मात्र वाचकांना होत नाही. ५. पंतप्रधानपदावरून पायउतार झाल्यावरच्या त्यांच्या जीवनाविषयी फार त्यांनी लिहिलेले नाही. विशेषतः १९९८ च्या अणुचाचण्यांनंतर गुजराल यांनी लोकसभेत वाजपेयी सरकार नक्की कोणत्या चुका करत आहे यावर भाष्य केले होते. गुजराल यांची इंग्रजी भाषेवरील पकड आणि वक्तृत्व मला नेहमीच भावत असे. त्यांचे लोकसभेतील हे भाषण मी मुद्दामून बघितले होते. तसेच गुजराल पंतप्रधानपदावरून पायउतार झाल्यावर ही घटना दोन महिन्यातच झाली होती. तसेच भारताच्या परराष्ट्रधोरणाला नवे वळण लावणारी ही घटना होती. गुजराल यांचा परराष्ट्रधोरणातील रस लक्षात घेता या महत्वाच्या घटनेवर त्यांनी काहीतरी लिहायला हवे होते असे वाटून गेले. ६. जेव्हा एखादा नेता आत्मचरित्र लिहितो तेव्हा आपल्या जीवनात घडलेल्या घटना एकामागोमाग एक लिहिणे एवढाच त्याचा उद्देश नसावा असे वाटते. तर त्या नेत्याच्या विषयात पुढे काय घडामोडी होऊ शकतील याविषयीचे स्वतःचे मत असायला हवे असेही वाटते. विशेषतः गुजराल हे परराष्ट्रधोरणातील जाणकार असल्यामुळे यानंतरच्या काळात भारताला परराष्ट्रधोरणात नक्की कोणती आव्हाने उभी राहतील आणि ती पेलण्यासाठी काय करायला हवे याविषयी थोडे तरी भाष्य हवे होते असेही वाटले. एकूणच माझ्यासारख्या राजकारणात प्रचंड रस असलेल्या वाचकाला इंदरकुमार गुजराल यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याने लिहिलेल्या या पुस्तकाकडून ज्या अपेक्षा होत्या या मात्र पूर्ण झाल्या नाहीत. हे पुस्तक गुजराल यांनी वयाची नव्वदी ओलांडल्यानंतर प्रकाशित झाले होते. कदाचित त्यावेळी त्यांची प्रकृती त्यांना साथ देत नसावी. तसेच गुजराल यांचे निधन होण्यापूर्वी दोनेक वर्ष त्यांच्या पत्नीचेही निधन झाले होते. त्या वयात हा विरहाचा धक्का पचविणे तसे कठिणच असेल याची कल्पना करता येते. तसेच प्रकाशकांना आधीच कबूल केल्यामुळे प्रकृती साथ देत आहे तोपर्यंत पुस्तक पूर्ण करायचे हे पण दडपण असेल. या सगळ्या कारणांमुळे त्यांचे आत्मचरित्र हे एखाद्या अपूर्ण मूर्तीप्रमाणे वाटले. हे पुस्तक त्यांनी ८-१० वर्षे आधी लिहिले असते तर त्यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याकडून असलेल्या अपेक्षा पूर्ण करणारे झाले असते असेही वाटून गेले. अर्थातच हे पुस्तक वाईट आहे असे नक्कीच नाही. गुजराल, अडवाणी इत्यादी नेत्यांचे राजकीय जीवन म्हणजे स्वातंत्र्योत्तर भारताचा इतिहासच. या आत्मचरित्राच्या निमित्ताने स्वातंत्र्योत्तर भारताच्या इतिहासातील पहिल्या ५० वर्षांचा लेखाजोखा थोडा तरी नक्कीच समजतो. तसेच वि.प्र.सिंग यांच्या मंत्रीमंडळातील लाथाळ्या, १९९० चे इराक-कुवेत प्रकरण इत्यादींचा चांगलाच आढावा त्यांनी घेतला आहे. पण असाच आढावा इतर महत्वाच्या घटनांचाही घेतला गेला असता तर बरे झाले असते असे माझ्यासारख्या सामान्य नागरिकाला वाटून गेले.

दा विन्ची 02/03/2017 - 16:48
माझ्याकडे मोबाईल वर वाचण्यासाठी ३०-४० इंग्रजी पुस्तके उपलब्ध आहेत pdf फॉरमॅट मध्ये. साईझ साधारण १ ते २ Mb. सिडने शेल्डन, रॉबिन कुक, रॉबर्ट लुडलुम, मायकल क्रिश्टन, जॉन ग्रिशॅम आणि डॅन ब्राऊन ची. हवी असल्यास व्हाट्स अँप वर देऊ शकतो.

वरुण मोहिते 03/03/2017 - 14:12
मातोश्रीवर अर्धी रात्र लेखक -विजय तेंडुलकर ....काही अप्रकाशित कथा अंग्रेजी -गुड स्ट्रॅटेजी बॅड स्ट्रॅटेजी लेखक -रिचर्ड रुमेल्ट मॅनेजमेंट आवडणाऱ्या लोकांनी रुमेल्ट ह्यांचं पुस्तक वाचावं

हा एकच धागा असेल तर खरंच बरं होईल. मागे एकदा बोका भाऊंनी काही पुस्तकं मला एका धाग्यात सुचवली होती. तो धागा कोणता हेच मला आठवत नाही. कुणी कृपा करुन मिपावर आजवर पुस्तकांच्या याद्याविषयक आलेल्या धाग्यांच्या लिंक्स सुद्धा इथे देईल का? मी खुप दिवसात पुस्तकंच वाचलेले नाही. :( उद्याच लायब्ररीत जाईन. आणि इथे त्या पुस्तकाविषयी लिहेन. ह्या आधी वाचलेलं पुस्तक म्हणजे रिबेका. चांगलं आहे. शेवटाची ओढ लावतं पण शेवट नीटसा कळत नाही. भाषा मात्र अत्यंत प्रवाही आहे. कथा अप्रतिमपणे उभी केली आहे वाचकासमोर. गॉन विथ... वाचायला सुरूवात केली खरी. पण मला इतकी वर्णनं असलेली पुस्तकं वाचता येत नाहीत. त्यामुळे सोडुन दिलं.

In reply to by पिलीयन रायडर

पी. के. 04/03/2017 - 13:05
मिसळपाव वर असणारे पुस्तका विषयी हे काही जुने धागे वाचता वाचता वाढे..... मला आवडलेली पुस्तके: आत्मचरित्र/चरित्र पुस्तक खरेदी - मदत दहावी पास मुलांसाठी वाचनीय पुस्तके मला आवडलेले पुस्तक मला आवडलेले पुस्तक ( विस्तारीत) मला आवडलेली ५० पुस्तके ऑगस्ट महिन्यात "मला आवडलेली ५० पुस्तके" हा धागा वाचनात आला. प्रतिसाद वाचताना आपण पुस्तक वाचण्याच्या बाबतीत किती आळशी आहोत याची जाणीव झाली. वडिलांना आणी भावाला वाचनाची प्रचंड आवड त्यामुळे घरातील माळे, कपाटे, पलंगाचे कप्पे पुस्तकांनी तुडूंब भरलेले. मग काय झटकला आळस, काढली पुस्तकं कपाटातून बाहेर आणी केली सुरवात.. सद्य वि. ग. कानिटकरांचे विन्स्टन चर्चिल वाचतोय. मागच्या पाच महिन्यात वाचलेली पुस्तके. फकिरा:- अण्णाभाऊ साठे लोक माझे संगती:- शरद पवार राजा शिवछत्रपती :- बाबासाहेब पुरंदरे. डोंगरी ते दुबई हुसेन ज्वलज्वलनतेजास संभाजीराजे J R D मन मे है विश्वास राऊ स्वामी ययाती धागे अरब जगाचे पानिपत एक होता कार्व्हर अमृतवेल आजून ही खूप पुस्तकं आहेत घरात जी वाचायची बाकी आहेत. बघू कसं जमतंय ते शेवटी मिपाकरांचे आभार माझ्यात वाचायची आवड निर्माण केल्या बद्दल

In reply to by पिलीयन रायडर

एमी 22/03/2017 - 07:51
रिबेकाच्या शेवटमधे नक्की काय कळलं नाही? मी फार पुर्वी पुस्तक वाचलंय आणि चित्रपट पाहिलाय. जमल्यास शंका समाधान करायचा प्रयत्न करेन.

गॅरी ट्रुमन 06/03/2017 - 12:39
अर्थशास्त्रातील २००२ चे नोबेल पारितोषिक विजेते प्रिन्सटन विद्यापीठातील एमेरीटस प्राध्यापक डॅनिएल कॅनेमन यांचे Thinking, Fast and Slow हे नितांतसुंदर पुस्तक अलीकडेच वाचले. प्राध्यापक डॅनिएल कॅनेमन हे मुळातले अर्थशास्त्रज्ञ नाहीतच. ते आहेत मानसशास्त्रज्ञ. तरीही त्यांना अर्थशास्त्राचे नोबेल पारितोषिक मिळाले. त्याचे कारण सूक्ष्मअर्थशास्त्रातील ( मायक्रोइकॉनॉमिक्स) विविध मॉडेल ही माणसे 'रॅशनल' असतात या गृहितकावर आधारीत आहेत पण माणसे प्रत्यक्षात 'रॅशनल' नसतात हे प्राध्यापक डॅनिएल कॅनेमन आणि स्टॅनफर्ड विद्यापीठातील दुसरे मानसशास्त्रज्ञ कै. Amos Tversky यांनी १९७० च्या दशकात अनेक प्रयोग करून सिध्द केले. Thinking, Fast and Slow हे पुस्तक त्या दोघांनी (आणि इतरानी) केलेल्या विविध प्रयोगांवर आधारीत आहे. प्राध्यापक कॅनेमन यांच्या मते आपण विचार करतो तो विचार दोन पातळ्यांवर होतो-- सिस्टिम-१ आणि सिस्टिम-२. सिस्टिम-१ म्हणजे intuitive विचार करणारी व्यवस्था (फास्ट थिंकिंग) तर सिस्टिम-२ म्हणजे अधिक खोलात जाऊन अधिक वेळ घेऊन विचार करणारी व्यवस्था (स्लो थिंकिंग). प्राध्यापक कॅनेमन यांच्या मते सिस्टिम-२ ही 'आळशी' व्यवस्था असते. म्हणजे शक्यतो कार्यान्वित न होण्याकडे सिस्टिम-२ चा कल असतो. या दोन सिस्टिमचे कार्य कसे चालते आणि आपण नक्की कसा विचार करतो याविषयी पुस्तकात कित्येक उदाहरणे दिली आहेत. खरे तर या पुस्तकावरील प्रत्येक प्रकरणावर स्वतंत्र लेख होऊ शकेल. पण आतापुरते एक उदाहरण देतो: प्राध्यापक कॅनेमन यांनी एक 'लिंडा प्रॉब्लेम' म्हणून उदाहरण दिले आहे. त्यांनी लिंडा या एका काल्पनिक ३१ वर्षीय स्त्रीचे वर्णन दिले आहे. ती single, outspoken आणि तल्लख आहे. तसेच कोणत्याही प्रकारच्या भेदभावाविरूध्द आणि सामाजिक न्यायाच्या बाजूची तिची स्पष्ट भूमिका आहे आणि तिने अण्वस्त्रांच्या विरोधातील निदर्शनांमध्ये वेळोवेळी भाग घेतला आहे अशा स्वरूपाचे तिचे वर्णन आहे. हे वर्णन देऊन झाल्यानंतर प्राध्यापक कॅनेमन यांनी या प्रयोगातील लोकांना लिंडा नक्की कोणत्या पेशामध्ये असू शकेल याचे ८ पर्याय दिले. लोकांना ती ज्या पेशात असेल याची सर्वात जास्त शक्यता वाटेल त्या पेशाला क्रमांक १, त्यानंतर शक्यता असलेल्या पेशाला क्रमांक २ अशा पध्दतीने ८ पेशांची क्रमवारी लावणे अपेक्षित होते. त्या ८ पेशांच्या यादीत तिसरा पेशा होता-- "स्त्रीवादी चळवळीत आघाडीवर", सहावा पेशा होता "बँकेत टेलर" आणि आठवा पेशा होता "बँकेत टेलर आणि स्त्रीवादी चळवळीत आघाडीवर". त्या प्रयोगात भाग घेणार्‍यांपैकी बहुसंख्य लोकांनी लिंडा "बँकेत टेलर आणि स्त्रीवादी चळवळीत आघाडीवर" ला नुसत्या "बँकेत टेलर" पेक्षा वरचा क्रमांक दिला. वास्तविकपणे बँकेत टेलर असलेल्या समजा १०० स्त्रिया असतील तर स्त्रीवादी चळवळीत आघाडीवर असलेल्या बँकेतील टेलर नक्कीच १०० पेक्षा कमी असतील. म्हणजे 'रॅशनल' माणूस "बँकेत टेलर" या पेशाला "बँकेत टेलर आणि स्त्रीवादी चळवळीत आघाडीवर" पेक्षा वरचा क्रमांक देईल. पण तसे झाले नाही. आपण नक्की कसा विचार करतो याविषयी अशा कित्येक (किंबहुना काही शे) उदाहरणांचा खजिना आहे या पुस्तकात. या पुस्तकाने मला पूर्णपणे अंतर्बाह्य हलवून टाकले हे लिहिणे म्हणजे या पुस्तकाचा माझ्यावर जो परिणाम झाला आहे त्याचे अगदी मिळमिळीत वर्णन झाले. सूक्ष्मअर्थशास्त्रात मानसशास्त्राचाही अंतर्भाव असावा असे पूर्वीही अनेक रिसर्चर म्हणत असत.पण प्राध्यापक कॅनेमन आणि Amos Tversky यांच्या कामामुळे या प्रयत्नांना एक महत्वाची दिशा मिळाली. त्यातूनच 'बिहेव्हिअरल इकॉनॉमिक्स' हे सूक्ष्मअर्थशास्त्रातील एक महत्वाचे क्षेत्र विकसित झाले. याचा जाहिराती, सेल्स तसेच ह्युमन रिसोर्सेस इत्यादी अनेक मॅनेजमेन्टच्या क्षेत्रांवर अमूलाग्र परिणाम होऊ शकेल. प्राध्यापक डॅनिएल कॅनेमन यांना २००२ मध्ये नोबेल पारितोषिक मिळाले. त्याबद्दलचे सायटेशन होते: "for having integrated insights from psychological research into economic science, especially concerning human judgment and decision-making under uncertainty".प्राध्यापक Amos Tversky यांचे १९९६ मध्ये निधन झाले. अन्यथा त्यांनाही प्राध्यापक कॅनेमन यांच्या बरोबरच नोबेल पारितोषिक मिळाले असते. युट्यूबवर प्राध्यापक कॅनेमन यांचे अनेक व्हिडिओ उपलब्ध आहेत. त्यातील एक व्हिडिओ या पुस्तकाविषयी गुगल टॉक्समध्ये आहे. तो पुढीलप्रमाणे:
असले जबरदस्त काम करणारे लोक बघितले की खरोखरच भारावून जायला होते. जरी अर्थशास्त्रात फार इंटरेस्ट नसेल तरी हे पुस्तक जरूर वाचावे असे मी म्हणेन. आपण ज्या पध्दतीने विचार करतो त्यात कित्येक त्रुटी नकळतपणे कशा असू शकतात (ज्याविषयी आपल्याला काहीही माहित नसते) हे समजले की खरोखरच थक्क व्हायला होते. पुस्तकात Bayes' theorem , Binomial distribution याविषयीचे काही प्रोबॅबिलिटीतले उल्लेख आहेत. तो भाग माहित नसेल तर तेवढी २-३ प्रकरणे समजली नाहीत तरी इतर प्रकरणांमध्ये खरोखरच खजिना भरलेला आहे.

In reply to by गॅरी ट्रुमन

गॅरी ट्रुमन 14/03/2017 - 11:07
प्राध्यापक डॅनिएल कॅनेमन यांनी म्हटल्याप्रमाणे विचार करायच्या सिस्टिम-१ आणि सिस्टिम-२ चे एक उदाहरण याच पुस्तकाच्या परिशिष्टामध्ये दिले आहे. या पुस्तकावर आणखी काही लिहून विनाकारण टी.आर.पी वाढवायचा नाही पण हा विषय मला प्रचंड आवडला आहे. तसेच यावर नवा लेख लिहावा इतपत मसालाही नाही. त्यामुळे इथेच घुसखोरी करत आहे. समजा एका शहरात दोन मॅटर्निटी होम्स आहेत. एकात दररोज सरासरी १५ बालकांचा जन्म होतो तर दुसर्‍यात दररोज सरासरी ४५ बालकांचा जन्म होतो. त्यापैकी कोणत्या मॅटर्निटी होममध्ये एखाद्या दिवशी जन्मलेल्या बालकांपैकी ६०% मुली असायची शक्यता जास्त आहे? या प्रश्नाचे मी 'सिस्टिम-१' चा वापर करून दोन्ही मॅटर्निटी होममध्ये ही शक्यता सारखीच आहे हे उत्तर दिले. प्रत्यक्षात ही शक्यता लहान मॅटर्निटी होममध्ये (दररोज १५ जन्म होणार्‍या) जास्त आहे. हा प्रश्न बायनॉमिअल डिस्ट्रीब्युशनचा वापर करून सोडवता येईल. हे उत्तर लहान मॅटर्निटी होमसाठी सुमारे १५.३% तर मोठ्या मॅटर्निटी होमसाठी सुमारे ४.९% इतके येते. मी स्वतः बायनॉमिअल डिस्ट्रीब्युशन विद्यार्थ्यांना गेली जवळपास ६ वर्षे शिकवत आलेलो आहे. हे उत्तर काढून ती शक्यता लहान मॅटर्निटी होमसाठी नक्कीच जास्त आहे हे मला समजले नसते असे नक्कीच नाही. पण अशा प्रकारची आकडेमोड करणे हे सिस्टिम-२ चे काम आहे. आणि वर म्हटल्याप्रमाणे सिस्टिम-२ आळशी असते. शक्यतो कार्यान्वित न होण्याकडे त्या सिस्टिमचा कल असतो.त्यामुळे आपली सिस्टिम-१ एकदम intuitive उत्तर असते ते देते. एकंदरीत लहान सॅम्पलमध्ये टोकाचे (एक्स्ट्रीम) रिडिंग यायची शक्यता वाढते. एक उदाहरण द्यायचे झाले तर समजा एक नाणे १० वेळा उडवले तर त्यात ६ छापे यायची (६०%) शक्यता बर्‍यापैकी असेल हे आपल्याला कळतेच. पण समजा तेच नाणे १ लाख वेळा उडवले तर त्यात ६० हजार छापे यायची (परत ६०%) शक्यता तितकी नसेल. कारण जसा सॅम्पल साईझ वाढतो त्याप्रमाणे 'अ‍ॅव्हरेज आऊट' होते आणि टोकाचे रिडिंग यायची शक्यता कमी होते. मी हा भाग स्वतः शिकवत असूनही आणि मी मुळातले पुस्तक वाचूनही (त्यात सॅम्पल साईझचा परिणाम काय होतो हे व्यवस्थित समजावून दिले आहे) माझ्या 'सिस्टिम-१' ने पटकन दोन्ही ठिकाणी ती शक्यता सारखीच असेल हे उत्तर दिले. सिस्टिम-१ आणि सिस्टिम-२ मध्ये हा फरक आहे. हे लक्षात येताच खरोखरच थक्क व्हायला झाले. हाच अनुभव मिपाकरांपर्यंत पोहोचवावा म्हणून इथेच घुसखोरी करत आहे. त्याबद्दल दिलगिरी. पण हे पुस्तक वाचलेत तर असे चकित व्हायचे अनुभव कित्येकवेळा येतील हे मात्र अगदी स्वानुभवावरून सांगतो.

In reply to by गॅरी ट्रुमन

एकंदरीत लहान सॅम्पलमध्ये टोकाचे (एक्स्ट्रीम) रिडिंग यायची शक्यता वाढते.... ...माझ्या 'सिस्टिम-१' ने पटकन दोन्ही ठिकाणी ती शक्यता सारखीच असेल हे उत्तर दिले. सिस्टिम-१ आणि सिस्टिम-२ मध्ये हा फरक आहे. हे लक्षात येताच खरोखरच थक्क व्हायला झाले.
माफ करा, जरा स्पष्टच विचारतो - ह्यात थक्क होण्यासारखे नक्की काय आहे? तुम्ही जरा विचार केला असतात, वेळ घेतला असतात आणि तुमच्याकडे असणाऱ्या सांख्यिकी ज्ञानाचा वापर केला असतात तर बरोबर उत्तर तुम्हाला सापडले असते. पण घाई केलीत आणि घोळ झाला. आता हे सांगायला मानस/अर्थशास्त्रज्ञ कशाला हवेत? बाकी तुमच्या शिफारशीवरून हे पुस्तक वाचण्याचा प्रयत्न करण्यात येईल. रच्याकने, सध्या 'बिहेव्हिअरल इकॉनॉमिक्स'ला आलेले 'अच्छे दिन' म्हणजे उत्क्रांतीवाद्यांनी डार्विनचे सिद्धांत चुकीचे आहेत हे मान्य करण्यासारखे आहे असे वाटते. सगळ्या अर्थशास्त्राचा डोलारा हा माणूस 'रॅशनल' (ह्याला मराठीत अचूक पर्यायी शब्द नाही) असण्यावर अवलंबून आहे. पण जवळपास सगळेच निर्णय घ्यायच्या वेळेस मनुष्य इररॅशनल वागतो हे अर्थशास्त्रद्यांना फार आधीच कळलेलं आहे. असो.

मोदक 14/03/2017 - 20:44
एका पुनर्जन्माची कथा हे पुस्तक वाचले.. Rheumatoid Arthritis नामक दुर्धर विकार झालेल्या मनोविकारतज्ञ डॉक्टरने, ओशो तत्त्वज्ञानाने या रोगाशी कसा सामना केला याचा विस्तृत अनुभव आहे.

In reply to by मोदक

पुंबा 15/03/2017 - 20:19
यांत्रिकाची यात्रा (लक्ष्मणराव किर्लोस्कर)
याबद्दल कुतुहल वाटते आहे. वाचून झाल्यावर सांगा कसे वाटते ते. मला किर्लोस्कर घराण्याबद्दल विलक्षण लोभ वाटतो. त्यामुळे हे पुस्तक नक्की वाचेन.

In reply to by पुंबा

मोदक 15/03/2017 - 21:41
मला किर्लोस्कर घराण्याबद्दल विलक्षण लोभ वाटतो - __/\__ किर्लोस्करांविषयी वाचायचे असेल तर पुढील पुस्तके जरूर वाचा. Cactus and Roses - शंतनुरावांचे आत्मचरित्र या पुस्तकाची शंतनुरावांच्या जन्मशताब्दीनिमीत्त निघालेली २००३ सालची प्रत सध्या उपलब्ध आहे किंवा येथे पीडीएफ डाऊनलोड करता येईल. कालापुढती चार पाऊले - सविता भावे (१९७९) यांत्रिकाची यात्रा (लक्ष्मणराव किर्लोस्कर) - शं वा किर्लोस्कर (१९८७ चे पुनर्मुद्रण) एका नांगराची कहाणी - डॉ. भा. र. साबडे (१९८९) शंतनुराव - डॉ. भा. र. साबडे वरील यादीतील "कालापुढती चार पाऊले" सध्या सहज मिळेल, अन्य कोणतीही पुस्तके मिळाली तर नक्की सांगा, तसेच या यादीपेक्षा अन्य कोणती पुस्तके माहिती असतील तर प्रतिसादात कळवा. शंतनुराव किंवा एकंदर किर्लोस्करांविषयी आणखी कांही वाचायचे असेल तर कल्याणी आणि ओगले ग्लास वर्क्स यांची पुस्तके वाचा, त्यांच्या सुरूवातीच्या काळात शंतनुरावांचे अनन्यसाधारण योगदान आहे.

In reply to by पुंबा

मोदक 16/03/2017 - 17:28
मी वरती नोंदवायचे विसरलो.. पण "यांत्रीकाची यात्रा" हे पुस्तक मला जुन्या पुस्तकाच्या दुकानात मिळाले. तुम्हाला नवीन पुस्तक मिळण्याची कितपत शक्यता आहे याची कल्पना नाही..

वरुण मोहिते 14/03/2017 - 20:56
दोन म्हातारे वं इतर कथा .अनुवाद -उमा कुलकर्णी इंग्लिश _ बऱ्यापैकी न आवडलेलं सियालकोट सागा _अश्विन संघी

पुंबा 15/03/2017 - 13:52
जी एंचं काजळमाया किंडलवर विकत घेतलं. त्यातली प्रदक्षिणा ही पहिली कथा कॉलेजला असताना वाचली होती. इतकं विकल होऊन जायला झालं होतं की सगळ्या कथा वाचवल्याच गेल्या नव्हत्या, सरळ पुस्तक ग्रंथालयात परत देऊन आलेलो. आता पुन्हा वाचायला सुरूवात केलीये. विकलता, एकटेपणा, जीवनाचं भयाण, क्रौर रूप, नियतीचा निर्दय सारीपाट, जगण्यातली विलक्षण गुंतागुंत मांडायला जी एंसारखा विलक्षण प्रतिभावंतच हवा.

In reply to by पुंबा

सानझरी 16/03/2017 - 17:40
जी एंचं कुठलंतरी पुस्तक वाचायला घेतलेलं. त्यातली रुपकं इतकी किळसवाणी वाटलेली कि पुढे वाचवलंच नाही. जी एंच्या २-३ कथा 'औदुंबर' पुस्तकात वाचल्यात तेवढ्याच.. बाकी जी एंच्या पत्रांची मी जबरदस्त फ्यॅन. (चारही खंड आणि जी एंची पत्रवेळा)

मदनबाण 18/03/2017 - 00:58
सध्या वेळ मिळेल तसे हे वाचतोय... P1 अतीशय सुंदर आणि समाधान देणारं !

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- उडी उडी जाये, उडी उडी जाये, दिल कि पतंग देखो उडी उडी जाये... ;):- Raees

गॅरी ट्रुमन 18/03/2017 - 10:13
मागे रघुराम राजन यांचे Fault Line: How Hidden Fractures Still Threaten the World Economy हे अप्रतिम पुस्तक वाचले होते. भूकंपशास्त्रात फॉल्टलाईन म्हणून एक संकल्पना आहे. जमिनीच्या खाली दोन भूगर्भाच्या प्लेट एकमेकांशेजारी असतात तिथे या फॉल्टलाईन्स असतात. या फॉल्टलाईन्सच्या ठिकाणी प्रचंड प्रमाणावर दबाव तयार होतो आणि तो दबाव प्रमाणाबाहेर वाढला की त्यातूनच पुढे भूकंप होतात. राजनसाहेबांनी जागतिक अर्थकारणात अशा कोणत्या 'फॉल्टलाईन्स' आहेत हे या पुस्तकात खूपच चांगल्या पध्दतीने समजावून सांगितले आहे. या पुस्तकात राजनसाहेबांनी २००७-०८ चे अमेरिकेतील आर्थिक संकट, १९९७ चे पूर्व आशियाई संकट इत्यादींचा व्यवस्थित उहापोह केला आहे. तसेच कोणत्याही जार्गनचा वापर न करता विषय अगदी साधीसाधी उदाहरणे वापरून समजावून दिला आहे. विशेषतः २००७-०८ च्या संकटाची मूळे बरीच मागे जातात आणि त्या संकटात सरकारनेही नकळतपणे कसा हातभार लावला होता हे त्यांनी समजावून सांगितले आहे. तसेच २००५ च्या जॅकसन होल कॉन्फरन्समध्ये इतर सगळे फेडचे चेअरमन अ‍ॅलन ग्रीनस्पॅन यांचे गोडवे गात असताना नेमक्या रघुराम राजन यांनी Has Financial Development Made the World Riskier? हा पेपर सादर करून एका अर्थी सगळ्यांचाच रसभंग केला हे पण त्यांनी लिहिले आहे. हा विषय इतक्या सोप्या शब्दात समजावून देणारे दुसरे पुस्तक वाचायला मिळणे कठिण आहे. Rajan

Ranapratap 18/03/2017 - 19:55
अच्युत गोडबोले यांचे बोर्डरूम व अर्थात वाचून झाले. इतर हि पुस्तके वाचनीय आहेत, जसे मुसाफिर भाग 1 व 2, गुलाम, मनात. सद्या नॉर्मन लेवीस यांचे word power made easy वाचतोय, अभ्यासतोय इंग्रजी सुधारण्यासाठी उत्तम पुस्तक.

In reply to by Ranapratap

गॅरी ट्रुमन 18/03/2017 - 20:20
सद्या नॉर्मन लेवीस यांचे word power made easy वाचतोय, अभ्यासतोय इंग्रजी सुधारण्यासाठी उत्तम पुस्तक.
हे पुस्तक चांगले आहे. विविध शब्द चांगल्या पध्दतीने समजावून सांगितले आहेत. पण हे पुस्तक खूपच प्राथमिक पातळीवरील आहे. इंग्रजी शब्दांसाठी आणखी दोन अक्षरशः खतरनाक पुस्तके सुचवतो. या पुस्तकात समानार्थी किंवा विरूध्दार्थी शब्द अशा स्वरूपाचे प्रश्न आहेत आणि प्रत्येक प्रश्नाला पर्याय आहेत. अनेक प्रश्नांमधील मुळातला शब्द आणि पर्यायात दिलेला एकही शब्द माहित नव्हता. मला भाषांमध्ये वगैरे फार गती नाही पण तरीही इंग्रजी शब्द करायला खूपच आवडते. नवे शब्द कळले की त्यातून वेगळा आनंदही मिळतो. त्यामुळे मला ही दोन पुस्तके प्रचंड म्हणजे प्रचंड आवडली. ही पुस्तके ६०-७० वर्षे जुनी असल्यामुळे प्रताधिकार वगैरे भानगडींमधून मुक्त झाली आहेत आणि खूप स्वस्तही आहेत (१०० रूपयाच्या आतबाहेर) १. All about words २. How to build a better vocabulary १ २

In reply to by पुंबा

गॅरी ट्रुमन 20/03/2017 - 11:01
या दोन पुस्तकांमधले शब्द करताना जाडीजुडी डिक्शनरी बरोबर घेऊन बसावे लागेल. पॉकेट डिक्शनरीचाही फार उपयोग होईल असे वाटत नाही :) हे शब्द केले की तेवढ्यापुरता आनंद मिळतोच. पण अर्थातच हे शब्द आपण दैनंदिन व्यवहारात वापरत नसल्यामुळे बर्‍याचशा शब्दांचा विसर पडतो. तरीही हे शब्द कुठेतरी बघितले/वाचले तर संदर्भातून त्याचा अर्थ समजतोही. पण तरीही स्वतःहून त्या शब्दांचा वापर तितक्या सफाईने करता आलेला नाही :(

सध्या तुनळीवर कधीपासुन वाचायच्या यादीत असणाऱ्या पुस्तकांची श्रवणरुपे (ऑडिओबुक्स) साडपली आहेत पण मूळ पुस्तक न वाचता सरळ 'ऐकण्याविषयी' मी साशंक आहे. एखादे आवर्जून वाचायचे पुस्तक तुम्ही सरळ 'ऐकले' आहे का? कसा होता तो अनुभव? विशेषतः ललित (फिक्शन. हाच पर्यायी शब्द आहे माहित नाही की नाही ते नक्की ठाऊक नाही)?

In reply to by मोदक

काफ्का (अजून कोण) - मेटामॉर्फोसिस
अतिशय गूढ वगैरे कथा असल्याने ऐकून कशी मजा येईल हे कळत नाहीये रच्याकने, मी आधी वाचून काढलेल्या कादंबऱ्यांची श्रवणपुस्तके ऐकण्यात पुनःप्रत्ययाचा आनंद नक्कीच मिळालेला आहे...

गणामास्तर 20/03/2017 - 10:19
शाळेत असताना मराठीला एक धडा होता. त्यात जहाजावर काम करणारा आणि लग्नाच्या सुट्टीसाठी घरी आलेला अबोल, थोडा तुसडा कथानायक होता. एका समारंभात लोक जमलेले असताना रेडिओवर एका बुडणाऱ्या जहाजावरून मोर्स कोडवरचे संदेश येऊ लागतात आणि तो ते समजावून देत असतो असे काही तरी कथानक होते. कुणाला आठवतंय का त्या कथा वा लेखकाचे नाव ?

In reply to by गणामास्तर

पुंबा 20/03/2017 - 10:51
रेडिओची गोष्टः दि बा मोकाशी लामणदिवा ह्या कथासंग्रहात ही कथा आहे. सध्या तोच कथासंग्रह वाचत आहे.

In reply to by पुंबा

पुंबा 20/03/2017 - 10:56
अवांतरः मोकाशींचा रेडिओदुरूस्तीचा व्यवसाय होता स्वतःचा. ह्या गोष्टीत रेडिओ हे महत्वाचे पात्र म्हणून येते.

गॅरी ट्रुमन 20/03/2017 - 10:49
या धाग्याच्या निमित्ताने कधीकाळी वाचलेली पुस्तके आठवायला लागली आहेत. युनिव्हर्सिटी ऑफ शिकॅगोमधील प्राध्यापक स्टीव्ह लेव्हिट यांचे Freakonomics: A Rogue Economist Explores the Hidden Side of Everything हे असेच एक पुस्तक. या पुस्तकात नुसत्या आकडेवारीचा अभ्यास करून अनेक गोष्टी कशा समजावून घेता येतात याविषयी लिहिले आहे. अनेकदा आपण असा विचारही केलेला नसतो. उदाहरणार्थ १९८० च्या दशकाच्या शेवटी आणि १९९० च्या दशकाच्या सुरवातीला अमेरिकेत 'टिनेज' गुन्हेगारांचे प्रमाण बरेच वाढले होते. त्यावेळी अजून १० वर्षात अमेरिकेतील कुठलेच शहर यापासून मुक्त नसेल आणि कधीही कुठेही अचानक १६-१८ वर्षाचा कोणी बंदूक दाखवून आपल्याला लुबाडेल अशा स्वरूपाचे चित्र सगळीकडे बघायला मिळेल वगैरे वगैरे बोलले जात होते. पण प्रत्यक्षात झाले उलटेच.१९९५ पासून हा गुन्हेगारीचा दर लक्षणीय प्रमाणात कमी झाला. २००० पर्यंत तर हा दर १० वर्षांपूर्वी होता त्यापेक्षा बराच कमी झाला होता. हे असे का झाले असावे? त्यासाठी १९९० च्या दशकात बिल क्लिंटनच्या काळात अर्थव्यवस्था सुधारली आणि नोकर्‍या अधिक प्रमाणावर उपलब्ध झाल्या म्हणून गुन्हेगारी कमी झाली वगैरे कारणे दिली गेली. पण ही कारणे ज्या प्रमाणात गुन्हेगारी कमी झाली त्याचा खुलासा करू शकत नाहीत हे पण प्रा.लेव्हिटने दाखवून दिले. मग असे काय झाले ज्यामुळे गुन्हेगारी अचानक कमी झाली? त्याचे कारण १९७३ मध्ये अमेरिकेत गर्भपाताला मान्यता मिळाली. एका कुणा स्त्रीची केस (नाव विसरलो) सुप्रीम कोर्टात गेली होती आणि त्यावेळी कोर्टाने गर्भपाताला मान्यता दिली. पूर्वी नको असलेली मुले जन्माला येत होती, परिणामी त्यांच्याकडे दुर्ल़क्ष होऊन मग तेच पुढे गुन्हेगार बनायचे प्रमाण जास्त होते. पण गर्भपाताला कायदेशीर मान्यता मिळाल्यावर नको असलेली मुले जन्माला यायचेच बंद झाले. अशा निर्णयांचे परिणाम लगेच दिसत नाहीत. त्यामुळे झाले असे की जे १९९० च्या दशकात बालगुन्हेगार व्हायची शक्यता सर्वात जास्त होती अशी मुले १९७० च्या दशकाच्या शेवटी आणि १९८० च्या दशकाच्या सुरवातीला जन्मालाच आली नाहीत. त्यातूनच हे गुन्हेगारीचे प्रमाण कमी झाले. काही वेळा अमेरिकेतील काही शाळाशिक्षक आपल्या शाळांमधील विद्यार्थ्यांची कामगिरी चांगली दिसावी (आणि त्याचे श्रेय आपल्याला मिळावे) म्हणून विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिकेत परीक्षा संपल्यावर ओ.एम.आर शीटमध्ये बरोबर उत्तरे स्वतः भरत असत. हे कसे पकडावे याविषयीही पुस्तकात काही लिहिले आहे हे वाचल्याचे आठवते. पुस्तकातील काही गोष्टी अमेरिकेतील परिस्थितीला अनुसरून आहेत. त्या वाचायला आपल्याला कंटाळवाणे होऊ शकते. उदाहरणार्थ ड्रग माफियांचे राज्य कसे चालते याविषयी सुधीर वेंकटेश म्हणून भारतीय वंशाच्या विद्यार्थ्याने तिथे जाऊन काढलेल्या माहितीवर अनेक पाने खर्ची घातली आहेत. मला तरी तो भाग वाचायला कंटाळवाणा झाला होता. तसेच गोर्‍या लोकांच्या केकेके संघटनेवरही काही लिहिले आहे. तो भागही तितका अपीलींग वाटला नाही. तरीही एकूण हे पुस्तक चांगलेच वाटले. या पुस्तकानंतर प्रा.स्टीव्ह लेव्हिट यांनी सुपर फ्रिकॉनॉमिक्स, थिंक लाईक अ फ्रिक अशी पुस्तकेही लिहिली आहेत. ती अजून वाचलेली नाहीत. तसेच त्यांचा हा ब्लॉगही इंटरेस्टींग आहे. अशा विषयांमध्ये रस असलेल्यांना प्रा.लेव्हिट यांचे हे पुस्तक वाचायला नक्कीच आवडेल. 1

अद्द्या 20/03/2017 - 11:48
मस्तच धागा , फक्त एक सूचना . लेखक , अनुवाद इत्यादी माहिती देताना .. जर आपल्याकडे पीडीएफ उपलब्ध असेल तर स्वतःचा मेल आयडी हि द्या. म्हणजे लोक त्यावर मेल करून पीडीएफ घेऊ शकतील .

मोदक 20/03/2017 - 21:57
पुस्तकांची यादी करणे सुरू आहे.. इथल्याच मित्रांनी सुचवल्याप्रमाणे पुस्तकाचा प्रकार - आत्मचरित्र / कादंबरी.. पुस्तकाचा प्रकार - वैद्यकीय / साहित्यीक... भाषा पुस्तकाचे नांव लेखकाचे नांव अशी यादी करतो आहे. आणखी काय ट्रॅक करावे..?

In reply to by मोदक

गॅरी ट्रुमन 21/03/2017 - 09:56
याची गुगल शीट बनवून सगळ्यांबरोबर शेअर करता आली तर चांगले होईल. बर्‍याचदा इतर मिपाकर वाचत असतील आणि आपण काहीही वाचत नसू तर त्यातून आपल्यालाही वाचायची प्रेरणा मिळते. व्यायामाविषयी हाच प्रकार अनुभवायला मिळत आहे. तसेच वाचनाविषयीही होईल.

In reply to by मोदक

इडली डोसा 21/03/2017 - 11:34
छापील प्रत उपलब्ध आहे / नाही , शिवाय किंडल आवृत्ती उपलब्ध आहे नाही हे पण लिहिता येईल का? गुगल शीट केल्यास मला सहभागी व्हायला आवडेल.

In reply to by मोदक

गॅरी ट्रुमन 21/03/2017 - 13:58
मला वाटते की या धाग्यावर किंवा गुडरीडावर किंवा अन्यत्र कुठे लिहिले असेल अशा पुस्तकांचा समावेश व्हावा आणि हळूहळू ती गुगल शीट (आणि हा धागा) अपडेट केला जावा. म्हणजे इतर मिपाकर नक्की काय वाचत आहेत हे समजून त्याविषयी आपल्याला वाचायला कल्पना मिळतील. अर्थातच हा एक आयत्या वेळी बनविलेला सल्ला झाला. अन्य कुठल्या पध्दतीने हे काम करता आले तर फारच चांगले. पण 'अरे मी इतरांच्या मानाने फार वाचत नाही' ही टोचणी लागणे आणि त्यातून जास्त वाचन होणे महत्वाचे. मग ती टोचणी कशीही लागो :)

In reply to by मोदक

गॅरी ट्रुमन 21/03/2017 - 16:30
धन्यवाद. त्या स्प्रेडशीटमध्ये प्रत्येक पुस्तकासाठी वेगळी वर्कशीट आहे. आतापर्यंतच या धाग्यावर १५-२० पुस्तकांविषयी चर्चा झालीच आहे. आणि मी अजून बरीच भर त्यात टाकणार आहे काळजी नसावी :) तेव्हा प्रत्येक पुस्तकासाठी वेगळी वर्कशीट असल्यास काही काळानंतर (म्हणजे त्या स्प्रेडशीटमध्ये ३०-४० पुस्तकांची नोंद झाल्यावर) ते अडचणीचे ठरू शकेल. मी फार टेक सॅव्ही नाही त्यामुळे मला यावर उपाय सुचवता येणार नाही. तसेच मी ती स्प्रेडशीट मेन्टेनही करत नसल्यामुळे नुसते सल्ले देणेही कितपत बरोबर आहे याची कल्पना नाही :)

गॅरी ट्रुमन 21/03/2017 - 10:03
अनेकदा आपल्याला पुस्तके कुठून मिळवावीत हा प्रश्न पडतोच. पुस्तके घरी घेऊन घरातील सामान वाढवावे असे अनेकांना वाटत नाही. मी पण त्यातलाच. अशावेळी किंडल उपयोगी ठरते. किंडलवर वाचताना डोळ्याला त्रासही होत नाही. बरीच पुस्तके छापील प्रतीपेक्षा स्वस्तात असतात आणि किंडलवर पुस्तक असले तर घरी किती पुस्तके साठवायची हा प्रश्नही येत नाही. तसेच किंडलवर 'अनलिमिटेड' म्हणून एक प्रकार असतो. त्यात किंडलवरची लायब्ररी असते. त्यात सगळी नाही तरी बरीच पुस्तके उपलब्ध असतात. तसेच घरपोच किंवा हापिसच्या डेस्कवर पुस्तके पोचती करणार्‍या लायब्ररी सेवाही उपलब्ध आहेतच. पूर्वी हापिसात क्वेंच कॉर्पोरेट लायब्ररीचा मी सदस्य होतो. नाममात्र फीमध्ये आपल्या डेस्कवर पुस्तके पोहोचती करायची/न्यायची सोय होती त्यात. त्याचबरोबर पै फ्रेंड्स लायब्ररी, लायब्ररीवाला.कॉम अशा काही सेवाही उपलब्ध आहेत.

गॅरी ट्रुमन 21/03/2017 - 10:39
या धाग्याच्या निमित्ताने मागे वाचलेली अनेक पुस्तके आठवायला लागली आहेत. जशी आठवतील तशी आणि वेळ मिळेल त्याप्रमाणे त्यावर लिहिणारच आहे. अनुज धर यांचे India's biggest cover-up हे पुस्तक असेच मागे वाचले होते. नेताजी सुभाषचंद्र बोसांचे तैपईतल्या विमान अपघातात निधन झाले असे म्हटले जाते. पण त्याविषयी अनेक वादविवाद आहेत. हे पुस्तक त्याविषयीच आहे. सुभाषचंद्र बोसांचे नक्की काय झाले याविषयी १९५६ मध्ये आझाद हिंद सेनेचे शाहनवाझ खान यांच्या नेतृत्वाखाली तर १९७० मध्ये न्या.खोसला यांच्या नेतृत्वाखाली आयोग नेमण्यात आले होते. या दोन्ही आयोगांनी काम निष्पक्षपणे न करता सरकारला हवा होता तो अहवाल दिला असा अनुज धर यांचा दावा आहे. पुढे १९९९ मध्ये न्या.मुखर्जींच्या नेतृत्वाखाली तिसरा आयोग नेमण्यात आला. त्या आयोगाने बोसांचा त्या अपघातात मृत्यू झाला नाही असे म्हटले. अमुक एक साधू किंवा बाबा हेच नेताजी सुभाषचंद्र बोस असल्याच्या वावड्या अनेकदा उठल्या होत्या.त्यातल्या काही वावड्यांचाही या पुस्तकात उल्लेख आहे आणि संबंधित साधू हे सुभाषचंद्र बोस असू शकणार नाहीत हे अनुज धर यांनी म्हटले आहे. पण सुभाषचंद्र बोस यांचे नक्की काय झाले? त्यांचे त्या विमान अपघातात निधन झाले का? त्याविषयी लेखक अनुज धर यांनी काही परिस्थितीजन्य पुराव्यांच्या आधारावर एक स्पष्ट दावा केला आहे. तो दावा कोणता याविषयी इथे काहीही लिहित नाही (अन्यथा 'स्पॉईलर' होईल). एकूणच हे पुस्तक वाचताना 'सुभाषचंद्रांचे पुढे काय झाले' ही उत्कंठा वाचकाला शेवटपर्यंत खिळवून ठेवते. लेखकाने हे पुस्तक खूपच परिश्रमाने आणि खूप अभ्यास करून लिहिले आहे हे जाणवते. हे पुस्तकही नक्कीच वाचनीय आहे म्हणून रेकमेन्डेड :) Anuj Dhar
नमस्कार मिपाकर्स.. सर्वप्रथम जागतीक मराठी दिनाच्या भरपूर शुभेच्छा..!! आपल्यापैकी बहुतांश लोक पुस्तकप्रेमी आहेत आणि सतत कांहीना कांही वाचत असतात. आपल्यापैकी अनेक दिग्गजांना पुस्तकांविषयी भरपूर गोष्टी माहिती असतात आणि अनेक वैविध्यपूर्ण माहिती / अनुभवही असतात.

सालगिराह मुबारक हो 'गुलाम अली साहब'.

महासंग्राम ·

सानझरी 05/12/2016 - 20:25
वाह!! झकास धागा.. आवारगी माझ्या आवडीच्या ग़झल पैकी एक.. अंदाज़ अपने देखते हैं आईने में वो और ये भी देखते हैं कि कोई देखता न हो। इक अजनबी झोंके ने जब पूछा, मेरे ग़म का सबब सहरा की भीगी रेत मैंने लिखा.. आवारगी..

वेल्लाभट 06/12/2016 - 12:30
ब्लॉग दुवा तुमच्या पोस्ट वरून प्रेरणा घेऊन मीही शुभेच्छा दिल्या. चुपके चुपके आमच्या आयुष्यात आलात मनात हंगामा करून आवारगी चं दान दिलंत भावनांची बिन बारिश बरसात केलीत आम्ही अपनी धुन में रहायला लागलो कुणी ए हुस्न-ए-बेपर्वाह शोधायला लागलो बेचैन बहुत फिरना, अपनी तस्वीर को देखना नेहमीचंच झालं मग, खुशबू जैसे लोग मिलना वो कभी मिल जाए तो म्हणत ये दिल, ये पागल दिल होणं इतनी मुद्दत बाद मिले तो हाल ऐसा नही के म्हणणं महफिल में बार बार, उनसे नैन मिला कर बघणं पत्ता पत्ता बूटा शोधत फासल्यांची बोच सलणं मनातलं मग न सांगता, तुमच्या त्या ग़ज़लेला कळणं आमचं सुदैव, तुम्हाला याची देही ऐकू शकलो शब्दसुरांचा अजोड मिलाफ प्रत्यक्षात जगू शकलो ग़ज़ल ऐकली ना, की दिल धडकने का सबब काय ते कळतं काढलंच कुणी वेड्यात, तर मेरे शौक़ दा नै इतबार तैनु ओठी येतं खुली जो आंख तो जाना, की गोष्टी बाकी राहिल्यात काही फिरून येतो पुन्हा हुरूप की, ये कहानी फिर सही माझ्यापुरतं सांगायचं तर ग़ज़ल = ग़ुलाम अली = दैवत. ये कहने के लिये भी हम बहोत छोटे है, पर सालगिरह मुबारक ग़ुलाम अली साहब! ५ डिसेंबर १९४०

सालगिराह मुबारक हो 'गुलाम अली साहब'. हमे तो ये सुनकर " दिलमें इक लहेरसी उठी है अभी, कोई ताजा हवा चली है अभी " ऐसा ही महसूस हुआ. फिर मनमें गीत आने लगा, " फिर तुम्हारी याद आयी ऐ सनम,ऐ सनम, हम ना भुलेंगे तुम्हें , अल्ला कसम ,"

गवि 07/12/2016 - 11:26
गुलाम अली साहेबांनी जे दिलंय ते वर्णनापलीकडलं आणि आभार मानण्यापलीकडलं आहे. जे ऐकत ऐकत मोठा झालो ते सर्व आता स्वतःच्या आठवणींचा अविभाज्य भाग बनलंय. ते आता आमच्यासोबतच जाणार. जियो साहब...

कपिलमुनी 07/12/2016 - 11:52
पाक कलाकारांवर घातलेली बंदी आठवली ! म्हणजे यांचा कलेचा आस्वाद तर हवा पण त्याचे पैसे त्यांना द्यायला नको !

In reply to by कपिलमुनी

वेल्लाभट 07/12/2016 - 12:11
ही खूप कठीण निवड आहे कपिलमुनी. कलाकाराबद्दलचं प्रेम, कलेबद्दलचं प्रेम तितकंच निर्मळ आहे जितका स्पष्ट राग त्या कलाकाराच्या देशाबद्दल आहे. आणि निर्णय राजकीय किंवा तात्विक असू शकतो, पण मनाला या दोनही गोष्टी कळत नाहीत. कसा मार्ग निघायचा? कठीणच.

In reply to by कपिलमुनी

तेजस आठवले 10/12/2016 - 20:43
असे नाही.कला, संगीत हे सगळ्याच्या पलीकडचे आहे, दैवी आहे असे म्हटले तरी चालेल. पाक कलाकार इकडे भारतात येऊन काही उपद्व्याप करू नयेत म्हणून बंदी घालणे योग्य ठरते. बाकी कोणी त्यांचे पैसे बुडवले आहेत का ?
म्हणजे यांचा कलेचा आस्वाद तर हवा पण त्याचे पैसे त्यांना द्यायला नको !
याच न्यायाने आपण पण असे म्हणू कि इकडे येऊन पैसे मिळवतात आणि त्याच पैशाने निरपराध लोक मारतात.

तेजस आठवले 10/12/2016 - 20:36
"का करू सजनी आये ना बालम" हे बडे गुलाम अली खान यांच्या आवाजात ऐकल्यानंतर परत दुसऱ्या कोणाच्या आवाजात ऐकायला जड जाते. येशुदास ने पण त्याचे एक व्हर्जन म्हटले आहे पण फारसे खास नाही.

सानझरी 05/12/2016 - 20:25
वाह!! झकास धागा.. आवारगी माझ्या आवडीच्या ग़झल पैकी एक.. अंदाज़ अपने देखते हैं आईने में वो और ये भी देखते हैं कि कोई देखता न हो। इक अजनबी झोंके ने जब पूछा, मेरे ग़म का सबब सहरा की भीगी रेत मैंने लिखा.. आवारगी..

वेल्लाभट 06/12/2016 - 12:30
ब्लॉग दुवा तुमच्या पोस्ट वरून प्रेरणा घेऊन मीही शुभेच्छा दिल्या. चुपके चुपके आमच्या आयुष्यात आलात मनात हंगामा करून आवारगी चं दान दिलंत भावनांची बिन बारिश बरसात केलीत आम्ही अपनी धुन में रहायला लागलो कुणी ए हुस्न-ए-बेपर्वाह शोधायला लागलो बेचैन बहुत फिरना, अपनी तस्वीर को देखना नेहमीचंच झालं मग, खुशबू जैसे लोग मिलना वो कभी मिल जाए तो म्हणत ये दिल, ये पागल दिल होणं इतनी मुद्दत बाद मिले तो हाल ऐसा नही के म्हणणं महफिल में बार बार, उनसे नैन मिला कर बघणं पत्ता पत्ता बूटा शोधत फासल्यांची बोच सलणं मनातलं मग न सांगता, तुमच्या त्या ग़ज़लेला कळणं आमचं सुदैव, तुम्हाला याची देही ऐकू शकलो शब्दसुरांचा अजोड मिलाफ प्रत्यक्षात जगू शकलो ग़ज़ल ऐकली ना, की दिल धडकने का सबब काय ते कळतं काढलंच कुणी वेड्यात, तर मेरे शौक़ दा नै इतबार तैनु ओठी येतं खुली जो आंख तो जाना, की गोष्टी बाकी राहिल्यात काही फिरून येतो पुन्हा हुरूप की, ये कहानी फिर सही माझ्यापुरतं सांगायचं तर ग़ज़ल = ग़ुलाम अली = दैवत. ये कहने के लिये भी हम बहोत छोटे है, पर सालगिरह मुबारक ग़ुलाम अली साहब! ५ डिसेंबर १९४०

सालगिराह मुबारक हो 'गुलाम अली साहब'. हमे तो ये सुनकर " दिलमें इक लहेरसी उठी है अभी, कोई ताजा हवा चली है अभी " ऐसा ही महसूस हुआ. फिर मनमें गीत आने लगा, " फिर तुम्हारी याद आयी ऐ सनम,ऐ सनम, हम ना भुलेंगे तुम्हें , अल्ला कसम ,"

गवि 07/12/2016 - 11:26
गुलाम अली साहेबांनी जे दिलंय ते वर्णनापलीकडलं आणि आभार मानण्यापलीकडलं आहे. जे ऐकत ऐकत मोठा झालो ते सर्व आता स्वतःच्या आठवणींचा अविभाज्य भाग बनलंय. ते आता आमच्यासोबतच जाणार. जियो साहब...

कपिलमुनी 07/12/2016 - 11:52
पाक कलाकारांवर घातलेली बंदी आठवली ! म्हणजे यांचा कलेचा आस्वाद तर हवा पण त्याचे पैसे त्यांना द्यायला नको !

In reply to by कपिलमुनी

वेल्लाभट 07/12/2016 - 12:11
ही खूप कठीण निवड आहे कपिलमुनी. कलाकाराबद्दलचं प्रेम, कलेबद्दलचं प्रेम तितकंच निर्मळ आहे जितका स्पष्ट राग त्या कलाकाराच्या देशाबद्दल आहे. आणि निर्णय राजकीय किंवा तात्विक असू शकतो, पण मनाला या दोनही गोष्टी कळत नाहीत. कसा मार्ग निघायचा? कठीणच.

In reply to by कपिलमुनी

तेजस आठवले 10/12/2016 - 20:43
असे नाही.कला, संगीत हे सगळ्याच्या पलीकडचे आहे, दैवी आहे असे म्हटले तरी चालेल. पाक कलाकार इकडे भारतात येऊन काही उपद्व्याप करू नयेत म्हणून बंदी घालणे योग्य ठरते. बाकी कोणी त्यांचे पैसे बुडवले आहेत का ?
म्हणजे यांचा कलेचा आस्वाद तर हवा पण त्याचे पैसे त्यांना द्यायला नको !
याच न्यायाने आपण पण असे म्हणू कि इकडे येऊन पैसे मिळवतात आणि त्याच पैशाने निरपराध लोक मारतात.

तेजस आठवले 10/12/2016 - 20:36
"का करू सजनी आये ना बालम" हे बडे गुलाम अली खान यांच्या आवाजात ऐकल्यानंतर परत दुसऱ्या कोणाच्या आवाजात ऐकायला जड जाते. येशुदास ने पण त्याचे एक व्हर्जन म्हटले आहे पण फारसे खास नाही.
 'चुपके चुपके रात दिन' आयुष्यात पहिल्यांदा ऐकलेली गझल, ती पण तुमच्या आवाजात आणि पाहता पाहता अशी रुतत गेली की बस्स्स.... आता तर ती जगण्याचा अविभाज्य घटक झालीय. हे सर्व झालं ते तुमच्या मुळे. जशी समज वाढायला लागली तसं तसं गुलाम अली काय चिज आहे हे एकेका गझले मधून उलगड़ायला लागलं. कोजागिरी च्या रात्री तिच्या सोबत ऐकलेल्या 'कल चौदहवी की रात थी' ने ती पुन्हा एकदा उलगडली.

(फक्त) ऑफिस ला पर्याय...

चांदणे संदीप ·

प्रचेतस 24/11/2016 - 23:19
दुसऱ्या ऑफिसातही काम होईल असे वाटत नाही, त्याच ऑफिसात अजून काही वेगळे लोकही काम करत असतील बघा. त्यांच्यावर लक्ष ठेवण्याचे काम द्या त्या बऱ्याच लोकांना. अर्धपोटी राहावं लागलं तरी उपाशी नक्कीच राहावं लागणार नाही.

वर्क फ्रॉम होम बघा ट्राय करुन. आमच्या ऑफीस चे काही लोक्स वर्क फ्रॉम होम कर्तात. आणी नेमके त्याच दिवशी त्यांन्च्या सासवा सुनांचा बड्डे वैगरे अस्तो. काय पण योगायोग ना.

मला वाटलं होतं माझ्या धाग्यासंदर्भात तुमच्याकडे अधिक माहिती असेल. असो, एखादा बिझनेस सुरु करावा म्हणतो मी...

In reply to by इरसाल कार्टं

धन्यवाद ह. घेतल्याबद्दल. तुमच्या धाग्यावर ऑलरेडी जाणकार मंडळींनी आपापल्या विजेऱ्या, मशाली वैग्रे पेटवून भरपूर उजेड पाडलेलाच आहे. म्या पामर माझी काजव्याएवढी चमचम घेऊन कुठे मध्ये मध्ये उडणार? असाच आपला विरंगुळा! :) Sandy

प्रचेतस 24/11/2016 - 23:19
दुसऱ्या ऑफिसातही काम होईल असे वाटत नाही, त्याच ऑफिसात अजून काही वेगळे लोकही काम करत असतील बघा. त्यांच्यावर लक्ष ठेवण्याचे काम द्या त्या बऱ्याच लोकांना. अर्धपोटी राहावं लागलं तरी उपाशी नक्कीच राहावं लागणार नाही.

वर्क फ्रॉम होम बघा ट्राय करुन. आमच्या ऑफीस चे काही लोक्स वर्क फ्रॉम होम कर्तात. आणी नेमके त्याच दिवशी त्यांन्च्या सासवा सुनांचा बड्डे वैगरे अस्तो. काय पण योगायोग ना.

मला वाटलं होतं माझ्या धाग्यासंदर्भात तुमच्याकडे अधिक माहिती असेल. असो, एखादा बिझनेस सुरु करावा म्हणतो मी...

In reply to by इरसाल कार्टं

धन्यवाद ह. घेतल्याबद्दल. तुमच्या धाग्यावर ऑलरेडी जाणकार मंडळींनी आपापल्या विजेऱ्या, मशाली वैग्रे पेटवून भरपूर उजेड पाडलेलाच आहे. म्या पामर माझी काजव्याएवढी चमचम घेऊन कुठे मध्ये मध्ये उडणार? असाच आपला विरंगुळा! :) Sandy
नमस्कार मिपाकरहो ! कृपया मला कुणी (फक्त) ऑफिसला साजेसा पर्याय सांगेल का? अवतीभवती अशी बरीचशी माणसे आहेत ज्यांना तिथे काम करणे आवडत नाही आणि उपाशी राहणेही योग्य वाटत नाही. अशांसाठी काही पर्याय माहित असल्यास सुचवावे. धन्यवाद.

रंगभूमी दिन

महासंग्राम ·

एस 05/11/2016 - 23:11
मानाचा मुजरा. पण मराठी रंगभूमीवर अजून बरेच काही लिहिता आले असते. अगदी सांगलीत मराठी नाटकाची नांदी कशी झाली ते आता हर्बेरियम सारख्या सुवर्णकाळ पुनरुज्जीवित करू पाहणाऱ्या प्रयोगांपर्यंत.

In reply to by एस

महासंग्राम 05/11/2016 - 23:18
खरंय तुमचं एस राव मराठी रंगभूमीवर बरंच काही लिहिता येईल, पण आता जे सुचलं ते लिहिलं. तुम्ही म्हणता तसं लिहायचा नक्की लिहायचा प्रयत्न करेन

>>>>>> आजच्या दिवशी रंगभूमीला आयुष्य वाहिलेल्या सगळ्या ज्ञात-अज्ञात रंगकर्मीना मानाचा मुजरा...! आमचाही सर्व रंगकर्मीना मानाचा मुजरा. -दिलीप बिरुटे

एस 05/11/2016 - 23:11
मानाचा मुजरा. पण मराठी रंगभूमीवर अजून बरेच काही लिहिता आले असते. अगदी सांगलीत मराठी नाटकाची नांदी कशी झाली ते आता हर्बेरियम सारख्या सुवर्णकाळ पुनरुज्जीवित करू पाहणाऱ्या प्रयोगांपर्यंत.

In reply to by एस

महासंग्राम 05/11/2016 - 23:18
खरंय तुमचं एस राव मराठी रंगभूमीवर बरंच काही लिहिता येईल, पण आता जे सुचलं ते लिहिलं. तुम्ही म्हणता तसं लिहायचा नक्की लिहायचा प्रयत्न करेन

>>>>>> आजच्या दिवशी रंगभूमीला आयुष्य वाहिलेल्या सगळ्या ज्ञात-अज्ञात रंगकर्मीना मानाचा मुजरा...! आमचाही सर्व रंगकर्मीना मानाचा मुजरा. -दिलीप बिरुटे
पंचतुंड नररुंडमालधर पार्वतीश आधीं नमितों । विघ्‍नवर्गनग भग्‍न कराया विघ्‍नेश्वर गणपति मग तो ॥ कालिदासकविराजरचित हें गानीं शाकुंतल रचितों । जाणुनियां अवसान नसोनि हें महत्कृत्यभर शिरीं घेतों ॥ ईशवराचा लेश मिळे तरि मूढयत्‍न शेवटिं जातो । या न्यायें बलवत्कवि निजवाक्पुष्पीं रसिकार्चन करितो ॥ या नांदी बरोबर तिसरी घंटा झाल्यावर रंगमंचावर नटाचा परकाया प्रवेश होतो. कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर, केशवराव भोसले, अण्णासाहेब किर्लोस्कर, बालगंधर्व, राम गणेश गडकरी यांसारख्या दिग्गजांनी रुजवलेलं हे रोपटं विजय तेंडुलकर, पु.ल. देशपांडे, सतीश आळेकर यांनी याला जोपासून त्याचं वटवृक्षात रूपांतर केलं.

डॉ.अक्षयकुमार काळे : एक ओळख. (अ.भा.मराठी साहित्य संमेलन उमेदवार)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे ·

एस 01/11/2016 - 22:43
संक्षिप्त परिचय आवडला. बहुसंख्य मराठी साहित्यिकांबद्दल मराठी विकिपीडियावर फारशी माहिती उपलब्ध नसते. त्यामुळे शक्य असल्यास या वर्षीच्या साहित्य संमेलनाच्या उमेदवारांवर विकीवर लेख यायला हवेत असे वाटते.

वटवट 02/11/2016 - 00:21
च्यायला आपलंच माहितीविश्व छोटंय बहुतेक.. ह्यांचं नाव ऐकलं नव्हतं... श्रीपाल सबनीस हे नाव पण त्यांच्या कॉंट्रोव्हर्सी मुळे कळालं होतं... या वर्षीच्या साहित्य संमेलनाच्या उमेदवारांवर विकीवर लेख यायला हवेत असे वाटते.>> सहमत... निदान सर्वांची एकत्रित अशी माहिती तरी मिळेल... शुभेच्छा...

श्रीगुरुजी 02/11/2016 - 14:52
गेल्या काही वर्षांपासून साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी उत्सुक असलेले जवळपास सर्वजण अनोळखी असतात. मागील वर्षी श्रीपाल सबनीस अध्यक्षपदासाठी निवडून आल्यावर कोण हे सबनीस असा प्रश्न पडला होता, कारण तोपर्यंत ते नावच कधी ऐकलेले नव्हते. अर्थात नंतर त्यांनी अत्यंत आचरटपणा करून पदाची शान घालविली हे नक्की. यावर्षी उत्सुक असणार्‍या चार जणांपैकी फक्त प्रवीण दवणे हे एकमेव लेखक माहिती आहेत. त्यांचे काही लेख, कथा वाचनात आलेल्या आहेत. इतरांबद्दल कणभरही माहिती नाही.

९० व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन अध्यक्ष पदाच्या उमेदवाराच्या ओळख धाग्याचं कौतुक केल्याबद्दल एस, प्रचेतस, वटवट, खेडूत, कवी संदीप, यशोधरा, धन्या आणि श्रीगुरूजी यांचे आणि मिपावाचकांचे मन:पूर्वक आभार. असाच लोभ असू द्या...!! खेडूत यांच्या कमेंट्सने गोड़ गुदगुल्या झाल्या तर धन्याने माझ्या विनयतेच्याबद्दल केलेल्या कमेंट्सने गदगदून आलं ! ;) -दिलीप बिरुटे

In reply to by चांदणे संदीप

धर्मराजमुटके अन् संदीपसेठ, धन्यवाद. काल डॉ.काळेंशी फोनवर बोलणं झालं खूश होते. बाकी, संदीपसेठ आता भेटूया डोंबिवलीला. ऐकतो तुमची कविता तिथे 'बसून'. कोण कोण भेटतंय डोंबिवलीत ? -दिलीप बिरुटे

In reply to by प्रचेतस

प्रचू सॉरी प्रचेतस. येणार का डोंबिवलीला ? मागच्या वेळी तुमच्या बरोबर पुण्यात साहित्य संमेलन एन्जॉय करता आलं आणि सोबत परिसर भटकंतीही सुरेख झाली. धन्याने पण मस्त वेळ दिला. आता धन्यासेठ कसले येतात. भोगा फळं :( -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

ए ए वाघमारे 14/12/2016 - 09:06
मी येणार आहे. भेटूयात जमलं तर! ते एक कट्टा की काय म्हणतात ते जमवा की! आम्ही इकडे सातासमुद्रापार विदर्भप्रांती वास्तव्यास असल्याने तुमचे ते कट्टेवृत्तांत नुसतेच वाचून आहोत. काय म्हणता?

समीक्षा ह्या एक अत्यंत खालच्या लेव्हलचा साहित्यप्रकार आहे , रादर समीक्षा हा साहित्यप्रकार नाहीच . ह्या डॉक्टरांचे कोणतेच लेखन वाचल्याचे आठवत नाही. त्यांचे अन्य काही लेखन प्रसिध्द असेल तर आधीच विनम्रपणे माफी मागतो पण समीक्षा हेच एकमेव त्यांचे योगदान असेल अ.भा.सा.म कडुन घोर निराशा झाली असे म्हणावे लागेल . हे म्हणजे हर्षा भोगलेला क्रिकेटर ऑफ द ईयर अ‍ॅवार्ड देण्यासारखे झाले किंव्वा त्या कपिल शर्माच्या शो मध्ये समोर बसुन हसणार्‍या सिध्दुला फिदीफिदी हसतो म्हणुन कॉमेडियन ऑफ द ईयर म्हणण्यासारखे झाले मुळातच समीक्षा ह्या प्रकाराची गरजच काय हेच लक्षात येत नाही . जे साहित्य मुळातच सुंदर आहे त्याला कोणी समीक्षा केली काय किंव्वा नाही केली काय , काहीही फरक पडत नाही . समीक्षा इज अ‍ॅबसोल्युटली रीडंडंट ! Anything in any way beautiful derives its beauty from itself and asks nothing beyond itself. Praise is no part of it, for nothing is made worse or better by praise. -Marcus Aurelius ह्या साहित्य समेंलनाच्या अध्क्षपदाच्या निवडणुक पध्दतीचा सर्वांनी पुनरेकवार विचार करायला हवा आणि दुसरे म्हणजे मराठी लोकांना जर समीक्षा हा अभिजात साहित्य प्रकार वाटत असेल तर दुर्दैवाने आमचीच गल्ली चुकली असे म्हणावे लागेल. महत्वाचे : डॉक्टरांचे काहीही वरिजिनल लेखन वाचनात आलेले नाही (दवणेंचे किमान वरीजिनल दवणीय लेखन तरी वाचलेले आहे लहानपणी.) डॉक्टरांचे काहीही अभिजात आणि स्वयंभु लेखन प्रसिध्द असेल तर आमच्या अडाणीपणाची लाज वाटुन घेवुन आणि बेशर्त माफी मागुन प्रतिसाद मागे घेत आहे. अतिमहत्वाचे : आजकाल महाराष्ट्रात प्रत्येक गोष्टीला जातीय रंग द्यायची फॅशन चालु आहे म्हणुन हा स्पेशल खुलासा की मला डॉ.काळेंची जात माहीत नाही , दवणेंची नाही आणि घुमटकरांचीही नाही. आणि हे कुळकर्णी जरी निव्वळ समीक्षा लिहुन अध्यक्ष झाले असते तरीही मी हाच प्रतिसाद दिला असता ! समीक्षा इज अ‍ॅबसोल्युटली रीडंडंट ! कृपया ह्या प्रतिसादाला कोणीही जातीय रंग देवु नये ही अतिनम्र विनंती !

In reply to by प्रसाद गोडबोले

आपला प्रतिसाद भाषेचा प्राध्यापक म्हणून मला कुठेच पटणारा नाही. सध्या व्यस्त आहे. जरा निवांत झालो की शांततेत प्रतिसाद लिहीन. समीक्षा साहित्याचा एक भाग आहे, समीक्षा हे शास्त्र आहे..... -दिलीप बिरुटे

पगला गजोधर 12/12/2016 - 21:13
मार्कस जी माझ्या अत्यल्प बुद्धी नुसार, ज्ञानदेवांनी गीतेवर केलेल्या, समीक्षेला, भावार्थ दीपिका म्हणतात न ? व टिळकांनी केलेल्या समीक्षेला गीतारहस्य म्हणतात ना ? तुमच्या मता प्रमाणे, मग ज्ञानदेव व सुहास शिरवळकर, यांच्यात, तुम्ही शिर्वालकारांना संमेलनाध्यक्ष कराल, कारण काय तर सुशी ची प्रकाशित पुस्तके जास्त माऊलींपेक्षा, माऊलीने तर समीक्षा लिहिलेली फक्त.

In reply to by पगला गजोधर

स्कोर सेटलींग अन्यत्र करूयात का ? ज्ञानदेव किंवा टिळक ह्यांचे विकी पेज पहा , त्यांनी समीक्षा सोडून लिहिलेल्या अन्य अभिजात साहित्याची यादी मिळेल . आणि हो , बहुतेक समीक्षा आणि टीका मध्ये काहीतरी फरक असतो बुवा .

In reply to by प्रसाद गोडबोले

पगला गजोधर 12/12/2016 - 22:45
स्कोर सेटलींग अन्यत्र करूयात का ?
कृपया आरोप करू नका, कसलं स्कोर सेटलींग,म्हणताय ?
समीक्षा आणि टीका मध्ये काहीतरी फरक असतो बुवा .
समजावून सांगा जरा प्लिज, ज्ञानदेव टीकाकार की समीक्षाकार ?

In reply to by पगला गजोधर

समीक्षा आणि टीका ह्या मधील सर्वात सोप्पा आणि अगदी सहज लक्षात येण्याजोगा फरक म्हणजे समीक्षा संपुर्णपणे मुळ कलाकृतीवर अवलंबुन असते जर मुळ साहित्य मुळ कलाकृती काढुन टाकली तर समीक्षा निव्वळ चोथा ठरते कारण समीक्षेत स्वतःचे असे समीक्षकाचे काहीच कलात्मक कर्तृत्व नसते साहित्यिक व्यॅल्यु अ‍ॅड नसते ! पण टीका तशी नसते . टीका ग्रंथातुन, लेखातुन , मुळ साहित्याचे , मुळ कलाकृतीचे सर्वच्या सर्व संदर्भ काढुन टाकले तरीही टीका एक स्वतंत्र पणे साहित्यकृती ठरते. तुम्ही मुळ ज्ञानेश्वरी मधील गीतेचे सर्वच्या सर्व श्लोक काढुन टाकलेत अन ज्ञानेश्वरी वाचलीत तरी ती एक अप्रतिम कलाकृती आहे हेच तुम्हाला जाणवेल. (मला तर ज्ञानेश्वरीतील काही श्लोक हे भगवंताला गीतेत , युध्दभुमीवर , अपेक्षित अर्थाचा अनर्थ करणारे वाटतात ) . गीतारहस्याची तर गोष्टच और आहे . गीतारहस्य वाचायला घेतल्यावर तर डोक्याला हातच लावला होता , आजवर कोणत्याही धार्मिक वातावरणात आपल्याला गीतेचा जो सारांश अर्थ सांगितला जातो त्याला लोकमान्यांनी अक्षरशः फाट्यावर मारले आहे असे वाटते . इथेही परत मुळ गीतेचा सर्वच्या सर्व संदर्भ काढुन टाकला तरीही एक तत्वज्ञानाचे पुस्तक म्हणुन गीतारहस्य स्वयंभुपणे , ठामपणे उभे रहाते . ( उपासनेचा दणकट पाया असल्याशिवाय साधकांनी गीतारहस्याला हात लावु नये , ज्ञानेश्वरीचाच आधार घ्यावा , असे माझे वैयक्तिक मत आहे ). सारांश इतकाच की टीका ही एक स्वयंपुर्ण कलाकृती असते , समीक्षा नसते.

विवेकपटाईत 13/12/2016 - 19:05
कुणीही अध्यक्ष झाले तरी काही फरक पडत नाही, पण एका वर्षाच्या कालावधीत मराठी साहित्यासाठी त्याने कार्य केले पाहिजे. मग तो साहित्यकार नसला तरी चालेल.

विकास 13/12/2016 - 21:41
थोडक्यात आणि चांगला परीचय. तुमचा पाठींबा असला तर आमचा देखील पाठींबा असेल! :) काळेसरांना आणि त्यांच्या समर्थकांना मनःपूर्वक शुभेच्छा!

खटपट्या 14/12/2016 - 04:25
डॉ. काळे यांचा परीचय आवडला. पण इच्छूकांच्या यादीत डॉ. जयप्रकाश घुमटकर हे नाव ऐकून आश्चर्याचा धक्का बसला. काही बूक कीपींगवरची पुस्तके सोडता यांनी काही लीहीले असेल असे वाटत नाही. तरी कोणाला यांच्या लेखन कारकीर्दीबद्दल माहीती असल्यास सांगावे.

एस 01/11/2016 - 22:43
संक्षिप्त परिचय आवडला. बहुसंख्य मराठी साहित्यिकांबद्दल मराठी विकिपीडियावर फारशी माहिती उपलब्ध नसते. त्यामुळे शक्य असल्यास या वर्षीच्या साहित्य संमेलनाच्या उमेदवारांवर विकीवर लेख यायला हवेत असे वाटते.

वटवट 02/11/2016 - 00:21
च्यायला आपलंच माहितीविश्व छोटंय बहुतेक.. ह्यांचं नाव ऐकलं नव्हतं... श्रीपाल सबनीस हे नाव पण त्यांच्या कॉंट्रोव्हर्सी मुळे कळालं होतं... या वर्षीच्या साहित्य संमेलनाच्या उमेदवारांवर विकीवर लेख यायला हवेत असे वाटते.>> सहमत... निदान सर्वांची एकत्रित अशी माहिती तरी मिळेल... शुभेच्छा...

श्रीगुरुजी 02/11/2016 - 14:52
गेल्या काही वर्षांपासून साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी उत्सुक असलेले जवळपास सर्वजण अनोळखी असतात. मागील वर्षी श्रीपाल सबनीस अध्यक्षपदासाठी निवडून आल्यावर कोण हे सबनीस असा प्रश्न पडला होता, कारण तोपर्यंत ते नावच कधी ऐकलेले नव्हते. अर्थात नंतर त्यांनी अत्यंत आचरटपणा करून पदाची शान घालविली हे नक्की. यावर्षी उत्सुक असणार्‍या चार जणांपैकी फक्त प्रवीण दवणे हे एकमेव लेखक माहिती आहेत. त्यांचे काही लेख, कथा वाचनात आलेल्या आहेत. इतरांबद्दल कणभरही माहिती नाही.

९० व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन अध्यक्ष पदाच्या उमेदवाराच्या ओळख धाग्याचं कौतुक केल्याबद्दल एस, प्रचेतस, वटवट, खेडूत, कवी संदीप, यशोधरा, धन्या आणि श्रीगुरूजी यांचे आणि मिपावाचकांचे मन:पूर्वक आभार. असाच लोभ असू द्या...!! खेडूत यांच्या कमेंट्सने गोड़ गुदगुल्या झाल्या तर धन्याने माझ्या विनयतेच्याबद्दल केलेल्या कमेंट्सने गदगदून आलं ! ;) -दिलीप बिरुटे

In reply to by चांदणे संदीप

धर्मराजमुटके अन् संदीपसेठ, धन्यवाद. काल डॉ.काळेंशी फोनवर बोलणं झालं खूश होते. बाकी, संदीपसेठ आता भेटूया डोंबिवलीला. ऐकतो तुमची कविता तिथे 'बसून'. कोण कोण भेटतंय डोंबिवलीत ? -दिलीप बिरुटे

In reply to by प्रचेतस

प्रचू सॉरी प्रचेतस. येणार का डोंबिवलीला ? मागच्या वेळी तुमच्या बरोबर पुण्यात साहित्य संमेलन एन्जॉय करता आलं आणि सोबत परिसर भटकंतीही सुरेख झाली. धन्याने पण मस्त वेळ दिला. आता धन्यासेठ कसले येतात. भोगा फळं :( -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

ए ए वाघमारे 14/12/2016 - 09:06
मी येणार आहे. भेटूयात जमलं तर! ते एक कट्टा की काय म्हणतात ते जमवा की! आम्ही इकडे सातासमुद्रापार विदर्भप्रांती वास्तव्यास असल्याने तुमचे ते कट्टेवृत्तांत नुसतेच वाचून आहोत. काय म्हणता?

समीक्षा ह्या एक अत्यंत खालच्या लेव्हलचा साहित्यप्रकार आहे , रादर समीक्षा हा साहित्यप्रकार नाहीच . ह्या डॉक्टरांचे कोणतेच लेखन वाचल्याचे आठवत नाही. त्यांचे अन्य काही लेखन प्रसिध्द असेल तर आधीच विनम्रपणे माफी मागतो पण समीक्षा हेच एकमेव त्यांचे योगदान असेल अ.भा.सा.म कडुन घोर निराशा झाली असे म्हणावे लागेल . हे म्हणजे हर्षा भोगलेला क्रिकेटर ऑफ द ईयर अ‍ॅवार्ड देण्यासारखे झाले किंव्वा त्या कपिल शर्माच्या शो मध्ये समोर बसुन हसणार्‍या सिध्दुला फिदीफिदी हसतो म्हणुन कॉमेडियन ऑफ द ईयर म्हणण्यासारखे झाले मुळातच समीक्षा ह्या प्रकाराची गरजच काय हेच लक्षात येत नाही . जे साहित्य मुळातच सुंदर आहे त्याला कोणी समीक्षा केली काय किंव्वा नाही केली काय , काहीही फरक पडत नाही . समीक्षा इज अ‍ॅबसोल्युटली रीडंडंट ! Anything in any way beautiful derives its beauty from itself and asks nothing beyond itself. Praise is no part of it, for nothing is made worse or better by praise. -Marcus Aurelius ह्या साहित्य समेंलनाच्या अध्क्षपदाच्या निवडणुक पध्दतीचा सर्वांनी पुनरेकवार विचार करायला हवा आणि दुसरे म्हणजे मराठी लोकांना जर समीक्षा हा अभिजात साहित्य प्रकार वाटत असेल तर दुर्दैवाने आमचीच गल्ली चुकली असे म्हणावे लागेल. महत्वाचे : डॉक्टरांचे काहीही वरिजिनल लेखन वाचनात आलेले नाही (दवणेंचे किमान वरीजिनल दवणीय लेखन तरी वाचलेले आहे लहानपणी.) डॉक्टरांचे काहीही अभिजात आणि स्वयंभु लेखन प्रसिध्द असेल तर आमच्या अडाणीपणाची लाज वाटुन घेवुन आणि बेशर्त माफी मागुन प्रतिसाद मागे घेत आहे. अतिमहत्वाचे : आजकाल महाराष्ट्रात प्रत्येक गोष्टीला जातीय रंग द्यायची फॅशन चालु आहे म्हणुन हा स्पेशल खुलासा की मला डॉ.काळेंची जात माहीत नाही , दवणेंची नाही आणि घुमटकरांचीही नाही. आणि हे कुळकर्णी जरी निव्वळ समीक्षा लिहुन अध्यक्ष झाले असते तरीही मी हाच प्रतिसाद दिला असता ! समीक्षा इज अ‍ॅबसोल्युटली रीडंडंट ! कृपया ह्या प्रतिसादाला कोणीही जातीय रंग देवु नये ही अतिनम्र विनंती !

In reply to by प्रसाद गोडबोले

आपला प्रतिसाद भाषेचा प्राध्यापक म्हणून मला कुठेच पटणारा नाही. सध्या व्यस्त आहे. जरा निवांत झालो की शांततेत प्रतिसाद लिहीन. समीक्षा साहित्याचा एक भाग आहे, समीक्षा हे शास्त्र आहे..... -दिलीप बिरुटे

पगला गजोधर 12/12/2016 - 21:13
मार्कस जी माझ्या अत्यल्प बुद्धी नुसार, ज्ञानदेवांनी गीतेवर केलेल्या, समीक्षेला, भावार्थ दीपिका म्हणतात न ? व टिळकांनी केलेल्या समीक्षेला गीतारहस्य म्हणतात ना ? तुमच्या मता प्रमाणे, मग ज्ञानदेव व सुहास शिरवळकर, यांच्यात, तुम्ही शिर्वालकारांना संमेलनाध्यक्ष कराल, कारण काय तर सुशी ची प्रकाशित पुस्तके जास्त माऊलींपेक्षा, माऊलीने तर समीक्षा लिहिलेली फक्त.

In reply to by पगला गजोधर

स्कोर सेटलींग अन्यत्र करूयात का ? ज्ञानदेव किंवा टिळक ह्यांचे विकी पेज पहा , त्यांनी समीक्षा सोडून लिहिलेल्या अन्य अभिजात साहित्याची यादी मिळेल . आणि हो , बहुतेक समीक्षा आणि टीका मध्ये काहीतरी फरक असतो बुवा .

In reply to by प्रसाद गोडबोले

पगला गजोधर 12/12/2016 - 22:45
स्कोर सेटलींग अन्यत्र करूयात का ?
कृपया आरोप करू नका, कसलं स्कोर सेटलींग,म्हणताय ?
समीक्षा आणि टीका मध्ये काहीतरी फरक असतो बुवा .
समजावून सांगा जरा प्लिज, ज्ञानदेव टीकाकार की समीक्षाकार ?

In reply to by पगला गजोधर

समीक्षा आणि टीका ह्या मधील सर्वात सोप्पा आणि अगदी सहज लक्षात येण्याजोगा फरक म्हणजे समीक्षा संपुर्णपणे मुळ कलाकृतीवर अवलंबुन असते जर मुळ साहित्य मुळ कलाकृती काढुन टाकली तर समीक्षा निव्वळ चोथा ठरते कारण समीक्षेत स्वतःचे असे समीक्षकाचे काहीच कलात्मक कर्तृत्व नसते साहित्यिक व्यॅल्यु अ‍ॅड नसते ! पण टीका तशी नसते . टीका ग्रंथातुन, लेखातुन , मुळ साहित्याचे , मुळ कलाकृतीचे सर्वच्या सर्व संदर्भ काढुन टाकले तरीही टीका एक स्वतंत्र पणे साहित्यकृती ठरते. तुम्ही मुळ ज्ञानेश्वरी मधील गीतेचे सर्वच्या सर्व श्लोक काढुन टाकलेत अन ज्ञानेश्वरी वाचलीत तरी ती एक अप्रतिम कलाकृती आहे हेच तुम्हाला जाणवेल. (मला तर ज्ञानेश्वरीतील काही श्लोक हे भगवंताला गीतेत , युध्दभुमीवर , अपेक्षित अर्थाचा अनर्थ करणारे वाटतात ) . गीतारहस्याची तर गोष्टच और आहे . गीतारहस्य वाचायला घेतल्यावर तर डोक्याला हातच लावला होता , आजवर कोणत्याही धार्मिक वातावरणात आपल्याला गीतेचा जो सारांश अर्थ सांगितला जातो त्याला लोकमान्यांनी अक्षरशः फाट्यावर मारले आहे असे वाटते . इथेही परत मुळ गीतेचा सर्वच्या सर्व संदर्भ काढुन टाकला तरीही एक तत्वज्ञानाचे पुस्तक म्हणुन गीतारहस्य स्वयंभुपणे , ठामपणे उभे रहाते . ( उपासनेचा दणकट पाया असल्याशिवाय साधकांनी गीतारहस्याला हात लावु नये , ज्ञानेश्वरीचाच आधार घ्यावा , असे माझे वैयक्तिक मत आहे ). सारांश इतकाच की टीका ही एक स्वयंपुर्ण कलाकृती असते , समीक्षा नसते.

विवेकपटाईत 13/12/2016 - 19:05
कुणीही अध्यक्ष झाले तरी काही फरक पडत नाही, पण एका वर्षाच्या कालावधीत मराठी साहित्यासाठी त्याने कार्य केले पाहिजे. मग तो साहित्यकार नसला तरी चालेल.

विकास 13/12/2016 - 21:41
थोडक्यात आणि चांगला परीचय. तुमचा पाठींबा असला तर आमचा देखील पाठींबा असेल! :) काळेसरांना आणि त्यांच्या समर्थकांना मनःपूर्वक शुभेच्छा!

खटपट्या 14/12/2016 - 04:25
डॉ. काळे यांचा परीचय आवडला. पण इच्छूकांच्या यादीत डॉ. जयप्रकाश घुमटकर हे नाव ऐकून आश्चर्याचा धक्का बसला. काही बूक कीपींगवरची पुस्तके सोडता यांनी काही लीहीले असेल असे वाटत नाही. तरी कोणाला यांच्या लेखन कारकीर्दीबद्दल माहीती असल्यास सांगावे.
राम राम मंडळी. डोंबिवली येथे नियोजित ९० व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाची रणधुमाळी सुरु झाली आहे. आमच्या मराठवाडा साहित्य परिषद शाखेत डॉ.अक्षयकुमार काळे यांनी नुकताच आपला अध्यक्षपदाचा अर्ज दाखल केला. आम्ही त्यांचे पाठीराखे, आणि मतदार असल्यामुळे आम्हीही त्यांच्या सोबत होतोच. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन साहित्य समाज आणि संस्कृतीच्या चिंतनाचं एक व्यासपीठ आहे, असे आम्ही समजतो. मराठी समाज, भाषा आणि संस्कृतीचा विचार त्या विचारपीठावरुन मांडल्या जातो हे अनेकांना माहिती आहेच.