मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

एका चर्चेच्या निमित्ताने माझे २ पैसे

युयुत्सु ·

आग्या१९९० गुरुवार, 08/21/2025 - 11:50
स्वतःचा बंगला असल्याने मलाही काही अडचणी जाणवतात. घर बंद करून बाहेरगावी गेल्यास घराचे cctv कॅमेरे सतत आजुबाजूच्या हालचालींचे मेसेज पाठवत असल्याने प्रत्येकवेळी घर सुरक्षित आहे ना ह्याची खात्री करत असतो. मागे घर काही दिवस बंद होते तेव्हा कोणीतरी meter box मधून मेन स्विच बंद केल्याने इन्व्हर्टरचा बॅक अप बंद झाल्याने cctv बंद झाले. शंका आली म्हणून मित्राला फोन केला. तेथील वीजपुरवठा खंडित झालेला नव्हता. त्याला बंगल्यावर चक्कर मारायला सांगितले , कुलूप जागेवर होते, मेन switch बंद होते ,ते त्याने चालू केले, थोड्याच वेळात cctv कॅमेरे चालू झाल्याचे दिसले. घरी आल्यावर बघितले तर फ्रिज मधील सगळ्या वस्तू खराब झाल्या होत्या. सोसायटीतील स्वतःचे घर आणि स्वतंत्र घर ह्यात जबादाऱ्यामध्ये बराच फरक आहे.

कंजूस गुरुवार, 08/21/2025 - 12:05
बरोबर आहे. पण जिथे बंगला प्रॉपर्टी टिकवून ठेवण्याची समाजात आवड आणि प्रवृत्ती आहे तिथे काही त्रास होत नसतो. उदाहरणार्थ वसई विरार भाग. आजुबाजूच्या बंगल्यांतून वावर असतो. एकमेकाला धरून असतात रहिवासी. त्या रस्त्याने जाणारा नवखा माणूस लक्षात येतो. बंगला बंद असेल तर खिडक्यांच्या काचा फोडल्या जात नाहीत.

राजेंद्र मेहेंदळे गुरुवार, 08/21/2025 - 12:37
ही फक्त भारतातीलच नाही, तर परदेशातीलही परीस्थिती आहे. १. बंगला म्हटले की त्याचा सगळा मेंटेनन्स (स्वच्छता, लाईट, पाणी, सुरक्षा,रंगकाम) स्वतःला करावी लागते. फ्लॅटमध्ये हे खर्च विभागले जातात. २. तरुणपणी पैसा नसतो पण बंगला हवा असतो, म्हातारपणी पैसा असतो पण बळ नसते. म्हणुन फ्लॅट बरा वाटतो. ३. त्यातल्या त्यात भारतात पैसे टाकुन स्विगी,झोमॅटो,ओला,उबर्,सिक्युरिटी, कामाला माणासे वगैरे मिळतात म्हणुन आणि थोडेफार शेजार पाजारच्या चांगुलपणावर चालुन जाते. परदेशात तेही नाही किवा खुपच महाग. ४. तरुणपणी कुठेही लांबवर स्वस्तात मोठी घरे मिळाली म्हणुन घेणारे वय झाले की गुमान शहराच्या मध्यावर भाड्याने फ्लॅटमध्ये रहायला येतात. ५. एकट्या दुकट्या वयस्कर लोकांच्या बंगल्याभोवती एजंट लोक कायमच घिरट्या घालत असतात. त्यात नवल काही नाही. तस्मात "हाती नाही बळ, दारी नाही आड, त्याने फुलझाड लावु नये"

अमरेंद्र बाहुबली गुरुवार, 08/21/2025 - 13:23
धुळ्यातील एक किस्सा, एका बंगल्यात एक म्हातारी राहत होती, तिची दोन्ही मुले अमेरिकेत होती, घर विक म्हणून शहरातले गुंड तिच्यामागे लागले, ती अडून बसली, अमेरिकेतील मुलानी काही केले नाही की काय माहीत नाही, पण म्हातारीचा बंगला खरे/ खोटे कागदपत्र दमदाटी करून सह्या वगैरेंनी कसे माहीत नाही पण लाटला, इथपर्यंत झाले पण नंतर त्या बंगल्यावरून त्या गुंडात आपसात वाद झाले, त्या वादातून एकाचा खून झाला, तो खून सीसीटीव्हीत रेकॉर्ड झाला, इतका भयंकर खून होता की सारे शहर हादरले, त्या खुनाचा व्हिडिओ तुफान पसरला, युट्युबलही आहे. तलवारीने तुकडे तुकडे केले. बाकी तुम्ही म्हणता ते खरे आहे, प्रॉपर्टी हडपण्यासाठी प्रचंड त्रास दिला जाती एकट्या दुकट्या माणसाला!

विवेकपटाईत गुरुवार, 08/21/2025 - 19:50
जे लोक व्यवसायिक आहे आणि त्या शहरात राहणार.उदा.किराणा स्टोअर हलवाई इत्यादी. त्यांनी अवश्य बंगला किंवा घर बांधले पाहिजे. बाकी ज्यांना नोकरीच करायची आहे आणि एकच अपत्य आहे. त्यांनी फ्लॅटमध्ये राहणे उत्तम. कारण नोकरीच्या निमित्ताने कुठेहाकुठे भटकावे लागेल कुणालाच माहीत नाही. बाकी सामान्यत: कोणीही २०- ५० वर्षांपेक्षा जास्त एका जागी राहात नाही. ३५ वर्ष स्वतः च्या घरात राहून मीही फ्लॅट मध्ये आलो. कारण मुलाची नोकरी.

सुबोध खरे गुरुवार, 08/21/2025 - 20:00
आमच्या सासऱ्यांच्या पनवेलला बंगला होता. ते काश्मीरला गेले असताना तेथे चोरी झाली पहिल्या दिवशी फारसं काही गेलं नाही सासऱ्यां च्या मित्राने तेथे फोन केला तेंव्हा सासर्यांनी त्यांना गोद्रेजच्या कपाटातील चांदीची भांडी काढून घ्यायला सांगितली. दोन दिवसांनी परत त्यांच्या बंगल्यात चोरी झाली. यावेळेस सासूबाईंच्या महागाच्या साड्या सोडून काहीच मिळाले नाही. त्यांनी जाताना सगळे पितळेचे नळ काढून नेले. त्यामुळे तळमजल्यावर पाणी भरले. शेजारी तुम्हाला काही २४ तास मदत करू शकत नाहीत. बंगला असल्याचा हा मोठा तोटा असतो. सासूबाई गेल्यावर आम्ही सासर्यांना बंगला विकून टाकायला लावला आणि आता ते मुलाच्या फ्लॅट मध्ये पुण्याला राहतात

आग्या१९९० गुरुवार, 08/21/2025 - 11:50
स्वतःचा बंगला असल्याने मलाही काही अडचणी जाणवतात. घर बंद करून बाहेरगावी गेल्यास घराचे cctv कॅमेरे सतत आजुबाजूच्या हालचालींचे मेसेज पाठवत असल्याने प्रत्येकवेळी घर सुरक्षित आहे ना ह्याची खात्री करत असतो. मागे घर काही दिवस बंद होते तेव्हा कोणीतरी meter box मधून मेन स्विच बंद केल्याने इन्व्हर्टरचा बॅक अप बंद झाल्याने cctv बंद झाले. शंका आली म्हणून मित्राला फोन केला. तेथील वीजपुरवठा खंडित झालेला नव्हता. त्याला बंगल्यावर चक्कर मारायला सांगितले , कुलूप जागेवर होते, मेन switch बंद होते ,ते त्याने चालू केले, थोड्याच वेळात cctv कॅमेरे चालू झाल्याचे दिसले. घरी आल्यावर बघितले तर फ्रिज मधील सगळ्या वस्तू खराब झाल्या होत्या. सोसायटीतील स्वतःचे घर आणि स्वतंत्र घर ह्यात जबादाऱ्यामध्ये बराच फरक आहे.

कंजूस गुरुवार, 08/21/2025 - 12:05
बरोबर आहे. पण जिथे बंगला प्रॉपर्टी टिकवून ठेवण्याची समाजात आवड आणि प्रवृत्ती आहे तिथे काही त्रास होत नसतो. उदाहरणार्थ वसई विरार भाग. आजुबाजूच्या बंगल्यांतून वावर असतो. एकमेकाला धरून असतात रहिवासी. त्या रस्त्याने जाणारा नवखा माणूस लक्षात येतो. बंगला बंद असेल तर खिडक्यांच्या काचा फोडल्या जात नाहीत.

राजेंद्र मेहेंदळे गुरुवार, 08/21/2025 - 12:37
ही फक्त भारतातीलच नाही, तर परदेशातीलही परीस्थिती आहे. १. बंगला म्हटले की त्याचा सगळा मेंटेनन्स (स्वच्छता, लाईट, पाणी, सुरक्षा,रंगकाम) स्वतःला करावी लागते. फ्लॅटमध्ये हे खर्च विभागले जातात. २. तरुणपणी पैसा नसतो पण बंगला हवा असतो, म्हातारपणी पैसा असतो पण बळ नसते. म्हणुन फ्लॅट बरा वाटतो. ३. त्यातल्या त्यात भारतात पैसे टाकुन स्विगी,झोमॅटो,ओला,उबर्,सिक्युरिटी, कामाला माणासे वगैरे मिळतात म्हणुन आणि थोडेफार शेजार पाजारच्या चांगुलपणावर चालुन जाते. परदेशात तेही नाही किवा खुपच महाग. ४. तरुणपणी कुठेही लांबवर स्वस्तात मोठी घरे मिळाली म्हणुन घेणारे वय झाले की गुमान शहराच्या मध्यावर भाड्याने फ्लॅटमध्ये रहायला येतात. ५. एकट्या दुकट्या वयस्कर लोकांच्या बंगल्याभोवती एजंट लोक कायमच घिरट्या घालत असतात. त्यात नवल काही नाही. तस्मात "हाती नाही बळ, दारी नाही आड, त्याने फुलझाड लावु नये"

अमरेंद्र बाहुबली गुरुवार, 08/21/2025 - 13:23
धुळ्यातील एक किस्सा, एका बंगल्यात एक म्हातारी राहत होती, तिची दोन्ही मुले अमेरिकेत होती, घर विक म्हणून शहरातले गुंड तिच्यामागे लागले, ती अडून बसली, अमेरिकेतील मुलानी काही केले नाही की काय माहीत नाही, पण म्हातारीचा बंगला खरे/ खोटे कागदपत्र दमदाटी करून सह्या वगैरेंनी कसे माहीत नाही पण लाटला, इथपर्यंत झाले पण नंतर त्या बंगल्यावरून त्या गुंडात आपसात वाद झाले, त्या वादातून एकाचा खून झाला, तो खून सीसीटीव्हीत रेकॉर्ड झाला, इतका भयंकर खून होता की सारे शहर हादरले, त्या खुनाचा व्हिडिओ तुफान पसरला, युट्युबलही आहे. तलवारीने तुकडे तुकडे केले. बाकी तुम्ही म्हणता ते खरे आहे, प्रॉपर्टी हडपण्यासाठी प्रचंड त्रास दिला जाती एकट्या दुकट्या माणसाला!

विवेकपटाईत गुरुवार, 08/21/2025 - 19:50
जे लोक व्यवसायिक आहे आणि त्या शहरात राहणार.उदा.किराणा स्टोअर हलवाई इत्यादी. त्यांनी अवश्य बंगला किंवा घर बांधले पाहिजे. बाकी ज्यांना नोकरीच करायची आहे आणि एकच अपत्य आहे. त्यांनी फ्लॅटमध्ये राहणे उत्तम. कारण नोकरीच्या निमित्ताने कुठेहाकुठे भटकावे लागेल कुणालाच माहीत नाही. बाकी सामान्यत: कोणीही २०- ५० वर्षांपेक्षा जास्त एका जागी राहात नाही. ३५ वर्ष स्वतः च्या घरात राहून मीही फ्लॅट मध्ये आलो. कारण मुलाची नोकरी.

सुबोध खरे गुरुवार, 08/21/2025 - 20:00
आमच्या सासऱ्यांच्या पनवेलला बंगला होता. ते काश्मीरला गेले असताना तेथे चोरी झाली पहिल्या दिवशी फारसं काही गेलं नाही सासऱ्यां च्या मित्राने तेथे फोन केला तेंव्हा सासर्यांनी त्यांना गोद्रेजच्या कपाटातील चांदीची भांडी काढून घ्यायला सांगितली. दोन दिवसांनी परत त्यांच्या बंगल्यात चोरी झाली. यावेळेस सासूबाईंच्या महागाच्या साड्या सोडून काहीच मिळाले नाही. त्यांनी जाताना सगळे पितळेचे नळ काढून नेले. त्यामुळे तळमजल्यावर पाणी भरले. शेजारी तुम्हाला काही २४ तास मदत करू शकत नाहीत. बंगला असल्याचा हा मोठा तोटा असतो. सासूबाई गेल्यावर आम्ही सासर्यांना बंगला विकून टाकायला लावला आणि आता ते मुलाच्या फ्लॅट मध्ये पुण्याला राहतात
लेखनविषय:
लेखनप्रकार
एका चर्चेच्या निमित्ताने माझे २ पैसे =================== -राजीव उपाध्ये (निमित्त - अमरेंन्द्र बाहुबली यांचा धागा.) घर भाड्याचे की स्वत:च्या मालकीचे याची अलिकडे वारंवार चर्चा होत असते. योग्य नियोजन केल्यास भाड्याचे घर हा आर्थिकदृष्टय़ा फायदेशीर पर्याय असला तरी मानसिक स्वास्थ्य हा निकष असेल तर मात्र स्वत:चे घर केव्हाही योग्य... गेले ~५० वर्षे मी स्वत:च्या मालकीच्या घरात (टु बी प्रिसाईज "बंगल्यात") राहात आहे. हा अनेकांच्या वैषम्याचा विषय आहे. पण स्वत:ची जमीन आणि स्वत:चे आकाश या सुखाबरोबरच काही प्रश्न बरेच गंभीर आहेत.

कंट्या - मराठी कादंबरी अभिप्राय

राघवेंद्र ·

धर्मराजमुटके Mon, 06/30/2025 - 22:16
कंट्या ? मी बाबा भांड यांची "तंट्या" कादंबरी वाचलेली आहे. कंट्या पहिल्यांदाच ऐकतो आहे. अर्थात माझे मर्यादित वाचन हे देखील एक कारण असू शकेल. कोण जाणो उद्या मंट्या, फंट्या, झांट्या नावाच्या पण कादंबर्‍या यायच्या. असो. ओळख आवडली. (झांटे आडनाव बहुधा गोवा/ कोकणात ऐकले आहे.)

धर्मराजमुटके Mon, 06/30/2025 - 22:16
कंट्या ? मी बाबा भांड यांची "तंट्या" कादंबरी वाचलेली आहे. कंट्या पहिल्यांदाच ऐकतो आहे. अर्थात माझे मर्यादित वाचन हे देखील एक कारण असू शकेल. कोण जाणो उद्या मंट्या, फंट्या, झांट्या नावाच्या पण कादंबर्‍या यायच्या. असो. ओळख आवडली. (झांटे आडनाव बहुधा गोवा/ कोकणात ऐकले आहे.)
लेखनविषय:
लेखनप्रकार
नेहमीप्रमाणे ग्रंथालयात फिरत होतो आणि सहज पुस्तकं चाळत होतो. दरवेळी २-४ मराठी पुस्तकं घरी येतात, पण पूर्ण फार कमी वेळा होतं. यावेळी एक वेगळंच पुस्तक नजरेस पडलं – ‘कंट्या’ लेखक गणेश बर्गे. कथाही तितकीच साधी, पण हृदयाला भिडणारी – एका गावात आजी-आजोबांसोबत राहणारा एक मुलगा, ज्याने कधीच आपल्या आईला पाहिलेला नाही आणि वडिलांनी कधीच सांभाळलेलं नाही. सुरुवात होते आनंदी स्वभावाच्या ‘कंट्या’पासून.

निवडणूक: एका मतदान केंद्र व्यवस्थापनाचा पक्षांचा खर्च किती येतो

विवेकपटाईत ·

मुक्त विहारि Wed, 01/15/2025 - 20:11
"किमान लोकसभा आणि विधानसभा निवडणूक एकाच वेळी झाली तर कितीतरी अब्जावधीचा खर्च पक्षांचा वाचेल." सहमत आहे.

माईसाहेब कुरसूंदीकर गुरुवार, 01/16/2025 - 09:36
उद्देश चांगला आहे पण एखाद्या राज्यात आघाडीचे सरकार आले, आणी एखाद्या घटक पक्षाने २ वर्षानी पाठिंबा काढुन घेतला तर काय करायचे? ३वर्षे वाट पहायची? राजकीय पक्षांचे पुढारी सत्तेसाठी किती उतावळे असतात ते आपण पाहतच असतो. त्यांना खर्च वाचवायचा असेल तर भावनिक आवाहने बण्द करा आणि पाच वर्षे गुमान काम करा.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

विवेकपटाईत Tue, 01/21/2025 - 13:14
पाठिंबा काढल्यावर दुसरी सरकार बनते. जसे महाराष्ट्रात झाले. आजच्या घटकेला कोणत्याही पक्षाचे विधायक पाच वर्षाच्या आधी निवडणूक घेण्याचे समर्थन करणार नाही. पुन्हा निवडणूक जिंकणे आता तितके सौपे नाही. (पूर्वी कोंग्रेस पक्षाचे विधायक दहा बारा वेळा सतत निवडणूक जिंकू शकत होते, तो काळ केंव्हाच गेला).

मुक्त विहारि Wed, 01/15/2025 - 20:11
"किमान लोकसभा आणि विधानसभा निवडणूक एकाच वेळी झाली तर कितीतरी अब्जावधीचा खर्च पक्षांचा वाचेल." सहमत आहे.

माईसाहेब कुरसूंदीकर गुरुवार, 01/16/2025 - 09:36
उद्देश चांगला आहे पण एखाद्या राज्यात आघाडीचे सरकार आले, आणी एखाद्या घटक पक्षाने २ वर्षानी पाठिंबा काढुन घेतला तर काय करायचे? ३वर्षे वाट पहायची? राजकीय पक्षांचे पुढारी सत्तेसाठी किती उतावळे असतात ते आपण पाहतच असतो. त्यांना खर्च वाचवायचा असेल तर भावनिक आवाहने बण्द करा आणि पाच वर्षे गुमान काम करा.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

विवेकपटाईत Tue, 01/21/2025 - 13:14
पाठिंबा काढल्यावर दुसरी सरकार बनते. जसे महाराष्ट्रात झाले. आजच्या घटकेला कोणत्याही पक्षाचे विधायक पाच वर्षाच्या आधी निवडणूक घेण्याचे समर्थन करणार नाही. पुन्हा निवडणूक जिंकणे आता तितके सौपे नाही. (पूर्वी कोंग्रेस पक्षाचे विधायक दहा बारा वेळा सतत निवडणूक जिंकू शकत होते, तो काळ केंव्हाच गेला).
लेखनविषय:
लेखनप्रकार
निवडणूकीच्या दिवशी मतदाता मत देण्यासाठी मतदान केंद्रावर जातो. मतदात्याने मतदान केन्द्रावर जाऊन आपल्या पक्षासाठी मतदान केले पाहिजे यासाठी प्रत्येक राजनीतिक पक्षाला यंत्रणा राबवावी लागते आणि त्यासाठी मनुष्यबळ ही लागतो आणि त्यासाठी पैसा ही खर्च करावा लागतो. लोकसभा निवडणूकीच्या वेळी दोन्ही पक्षांचे बूथ प्रमुख माझ्या समोरच लहानचे मोठे झाले होते. त्यांच्या कडून मिळालेल्या माहिती आधारावर हा लेख. लेखात बूथ व्यवस्थापकाचे नाव मी सचिन ठेवले आहे. सचिनच्या शब्दांत: सचिन मला म्हणाला, विवेकजी, निवडणूक आयोगाने निवडणूक घोषित केली.

पुष्पा २: द रूल् - संक्षिप्त ओळख वगैरे

वामन देशमुख ·

कंजूस Fri, 12/20/2024 - 17:59
एकच फार्मुला असतो कारण तोच पाहायला प्रेक्षक येतात. या मसाल्यातले बरेच चित्रपट निघत असावेत. तसे दोन आम्ही मागच्या वर्षी तमिळनाडू सहलीत बसमध्येच पाहिले होते. प्रवासात पाहण्यासाठी आणि भाषा न कळली तरी चालतात असे. हिंदीचे चित्रपट पाहायचे म्हटले तर फक्त हेराफेरी. कुठूनही केव्हाही केव्हाही भाग प्रवासात पाहिला तरी मजा.

In reply to by कंजूस

टर्मीनेटर Fri, 12/20/2024 - 18:48
हिंदीचे चित्रपट पाहायचे म्हटले तर फक्त हेराफेरी. कुठूनही केव्हाही केव्हाही भाग प्रवासात पाहिला तरी मजा.
कंकाका हिंदीत हेराफेरी१,२, 'अंदाज अपना अपना', धमाल, मुन्नाभाई १,२ आणि जुन्यात 'जाने भी दो यांरो' हे चित्रपट कधीही आणि कुठूनही बघितले तरी कंटाळा येत नाही 😀 बाकी द्येशमुखरावांनी 'संक्षिप्त' नावाखाली एका भव्यदिव्य चित्रपटाचा जो अत्यंत त्रोटक परिचय करून दिला आहे त्यासाठी त्यांचा त्रिवारच नाही तर पंच-षष्ठ वार निषेध... पुढल्या प्रतिसादांतून आम्हा 'पुष्पा' प्रेमिंची बाजू मांडतो!

चित्रगुप्त Fri, 12/20/2024 - 18:44
कालच दोन्ही मुलगे, सुना, अर्धांगिनी वगैरे मशारनिल्हे चित्रपट बघून आले. मी गेलो नव्हतो. आल्यावर मुलगा म्हणाला की तुम्ही आला असता तर पहिल्या पंधरा मिनिटातच उठून घरी आला असता. .

In reply to by चित्रगुप्त

टर्मीनेटर Fri, 12/20/2024 - 18:59
अक्षरशः खरे आहे... पहिली जवळपास १३-१३.५ मिनिटे हा चित्रपट पाहताना आपण चुकून क्रिश ४, ५, ६ वगैरे किंवा मार्वल वाल्यांचा कुठला सिनेमा बघायला तर आलो नाही ना हा प्रश्न पडतो! पण ते सगळं स्वप्नात घडल्याचे बघितल्यावर पुढचा चित्रपट पाहण्यासाठी ऊर्जा मिळते आणि ती शेवटपर्यंत कायम राहते... अर्थात सुरुवातीचा तो विलक्षण सीन आणि सगळीच गाणी वगळली असती तर चित्रपटाची लांबी आणि बजेट बऱ्यापैकी कमी झाले असते असे माझे मत! बाकी चित्रपट मजेदार आहे... आपल्याला बुद्धी आहे की नाही हे तपासण्यासाठी जे लोकं चित्रपट पहायला जात असतील त्यांनी मात्र ह्या चित्रपटापासून दूर राहावे!

चौथा कोनाडा Fri, 12/20/2024 - 19:04
श्रीवल्ली (रश्मिका मादन्ना),
रश्मिका मादक अण्णा म्हणायचे आहे का ? हा .... हा .... हा .... :) रश्मिका मंदाण्णा असं नाव आहे तिचं ... अशी अण्णा वाली बरीच नावं असतात तिकडं ! सिनेमाचे तिकिटदर कमी झाले की पुष्पा-२ पाहण्यात येईल असा घरचा आदेश आहे.

In reply to by चौथा कोनाडा

टर्मीनेटर Fri, 12/20/2024 - 19:10
सिनेमाचे तिकिटदर कमी झाले की पुष्पा-२ पाहण्यात येईल असा घरचा आदेश आहे.
हरकत नाही... पण चित्रपट शौकीन असाल तर हा Wild fire चित्रपट मोठ्या पडद्यावरच बघा अशी विनंती!

In reply to by टर्मीनेटर

वामन देशमुख Fri, 12/20/2024 - 20:37
सिनेमाचे तिकिटदर कमी झाले की पुष्पा-२ पाहण्यात येईल असा घरचा आदेश आहे.
आम्हीही पहिल्या दिवशी तिकिटे जास्त होती म्हणून पाहीला नाही. खरंतर त्या शोला अपघातानेच गेलो. आमच्या अहोंना आणि त्यांच्या मैत्रिणींना मिळून हा सिनेमा तेलुगुत १३ डिसेम्बर ला पाहायचा होता. त्यांच्यासाठी तिकीट मी बुक केले ते चुकून हिंदीचे. ते लोक घरून निघायच्या वेळी ते लक्षात आले. मग त्यांनी बेत रद्द करून, आम्ही म्हणजे मी, अहो, अपत्ये आणि आई असे पाच जण गेलो. तिसऱ्या दिवशी १५ डिसेम्बर रोजी मी आणि माझे मित्र असे संध्याकाळी मस्त टुल्ल होऊन रात्रीच्या शोला गेलो. परत येताना पुन्हा टुल्ल होऊन, जेवण करून घरी दोन वाजता परतलो. घरी आल्यावर झोप येत नव्हती म्हणून पुन्हा पुष्पा १ ओटीटीवर पाहीला. पहाटे साडेपाचला झोपी गेलो.
... हा Wild fire चित्रपट मोठ्या पडद्यावरच बघा अशी विनंती!
अगदी अगदी! "पुष्पा अंटे फायर कादू, पुष्पा अंटे वाइल्ड फायर !" आणि मग दाढीवर दोन्ही उलटे हात फिरवणे हे पाहण्याची मजा मोठ्या पडद्यावरच आहे.

वामन देशमुख Fri, 12/20/2024 - 20:58
विशेषतः सणवार, उत्सव वगैरे बाबतीत आंध्र-तेलंगणा संस्कृती खूपच वैविध्यपूर्ण आहे. वीसपंचवीस तोळे सोन्याचे दागिने सहजच घालणाऱ्या स्त्रियांचा रुबाब, मोगरा-अबोली-गजरे माळलेल्या तरुणींची लगबग, हाफ साडी नेसलेल्या मुलींची धावपळ, रामराजचे पांढरेशुभ्र शर्ट-पंचा नेसलेल्या पुरुषांचा दरारा, नाना वेष धारण केलेल्या कलाकारांची विविध पारंपारीक रुपे, सात्विक तेजस्वी पंडित लोकांचे शास्त्रशुद्ध मंत्रोच्चार... आंब्याची तोरणे, नारळे, हळद, कुंकू, अक्षता, फळे, फुले यांची रेलचेल... पुष्पा २ (आणि इतरही अनेक सिनेमांतून) हे सर्व आणि अजूनही बरेच काही सविस्तर पाहायला मिळते. --- अवांतर: हे आवडणाऱ्या लोकांनी विशेषतः नवरात्रात तेलंगणात आणि संक्रांतीला आंध्रात पर्यटन करायला हवे. कधी योग आला तर एखाद्या देवळाच्या ध्वजस्तंभ पायाभरणी कार्यक्रमाला हजेरी लावायला हवी.

सौन्दर्य Sat, 12/21/2024 - 04:18
कालच ओटीपीवर हा सिनेमा पाहिला, मुद्दाम हाच पाहायचा अस काही नव्हतं, समोर आला आणि पहिला इतकंच . पूर्वीच्या सिनेमात हिरो सुरवातीला कितीही वाईट असला तरी शेवटी तो सुधरतो असे दाखवले जायचे जे प्रेक्षकांना भावायचं, आता गुन्हेगारीचे उदात्तीकरण लोकांना आवडतं हे बघून आपण म्हातारे होत चाललो आहोत हे जाणवले. चालायचंच , कालाय तस्मे नमः

Madhugandha Wed, 12/25/2024 - 08:25
चित्रपट म्हणजे समाजाचा आरसा . आता खलनायक नायक म्हणून समोर येत आहे आणि पोलीस खलनायक दाखवला गेला आहे. अॅनिमल चित्रपट आठवतो आहे का? म्हणजेच समाजात खलनायक प्रवृत्ती वाढत आहे, आणि वाढतच जाणार

टर्मीनेटर Wed, 12/25/2024 - 15:53
१ - 'पुष्पा: द राईज' - जगभरातील एकूण ढोबळ कमाई = ३९३.५० कोटी रुपये! "पुष्पा नाम सुनकर फ्लॉवर समझे क्या? फ्लॉवर नहीं... फायर हैं" 🙂 २ - 'पुष्पा: द रुल' - ५ डिसेंबरला प्रदर्शित झाल्यापासून काल (२४ डिसेंबर) पर्यंतची २० दिवसांतली चित्रपटाची भारतातील ढोबळ कमाई = १०८९.८५ कोटी रुपये! "पुष्पा फ्लॉवर नहीं... वाइल्ड फायर हैं" 😘 आणि, जगभरातील एकूण ढोबळ कमाई = १६२५.३१ कोटी रुपये! "पुष्पा को नॅशनल खिलाडी समझे क्या?... इंटरनॅशनल हैं" 😍 ३ - 'पुष्पा: द रॅम्पेज' - हा (आगामी) तिसरा भाग पहिल्या दोन भागांप्रमाणे व्यावसायिकदृष्ट्या यशस्वी होईल कि नाही हे पुढे कळेलच, पण तो बघायची प्रचंड उत्सुकता मात्र लागून राहिली आहे! दुसऱ्या भागासाठी तब्बल तीन वर्षे वाट पाहावी लागली... तिसऱ्या भागासाठी तरी फार प्रतीक्षा करावी लागू नये ही अपेक्षा 😎 अवांतर: रविवारी 'मुफासा: द लायन किंग' पाहिला, खूप आवडला... करमणूकीच्या दृष्टीने वर्षाखेर * चांगली झाली 👌 २० डिसेंबरला प्रदर्शित झालेल्या ह्या सुंदर अ‍ॅनिमेटेड चित्रपटाला भरघोस प्रतिसाद देत त्याच दिवशी प्रदर्शित झालेल्या 'वनवास' हा उत्कर्ष शर्मा आणि नाना पाटेकर ह्यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या भावनाप्रधान चित्रपटाकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवल्याचे पाहिल्यावर 'चित्रपट माध्यम' आणि त्यातल्या 'मनोरंजन मुल्या' कडे पाहण्याचा भारतीय प्रेक्षकांचा दृष्टिकोन सकारात्मकरित्या बदलत असल्याची सुखद जाणीव झाली 👍 २०२४ च्या नोव्हेंबर आणि डिसेंबर ह्या शेवटच्या दोन महिन्यात 'सिंघम अगेन' आणि 'भूल भुलैया ३' ह्या दोन ट्रिक्वेल चित्रपटांनी अनुक्रमे साफ निराशा आणि थोडेफार मनोरंजन केले, तर 'ग्लॅडिएटर २', 'मोआना २', 'पुष्पा: द रुल' आणि 'मुफासा: द लायन किंग' अशा अनुक्रमे तीन सिक्वेल आणि एका प्रिक्वेलने झकास करमणूक केली! २०२५ ह्या येत्या वर्षात अनेक चांगले करमणूकप्रधान चित्रपट रसिकांना पहायला मिळोत अशी मनोरंजनाच्या देवाकडे प्रार्थना 🙏 (*आज प्रदर्शित झालेला 'बेबी जॉन' हा हिंदी चित्रपट २०१६ च्या 'थेरी' ह्या तामिळ चित्रपटाचा रिमेक असुन तो पुर्वीच पाहुन झाला आहे हे एक कारण आणि वरुण धवन आणि किर्ती सुरेश हे दोन्ही कलवंत आवडत नाहीत हे दुसरे कारण असल्याने बेबी जॉन बघण्यात रस नाही त्यामुळे नविन चित्रपट बघण्याच्या दृष्टीने माझ्यासाठी हे वर्ष संपले आहे.)

वामन देशमुख Wed, 02/05/2025 - 09:15
जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात, अधिकची दृश्ये वाढवून पुष्पा २: द रूल् (रिलौडेड् वर्जन्) पुन्हा प्रदर्शित झाला. सिनेमा आता पाउणेतीन तासांचा झालाय. नवीन वर्जन् सगळ्याच मोठ्या शहरांतील थेटरात अजूनही सुरुच आहे असे दिसते. मागच्या आठवड्यात तो नेटफ्लिक्सवरही प्रदर्शित झालाय.

कंजूस Fri, 12/20/2024 - 17:59
एकच फार्मुला असतो कारण तोच पाहायला प्रेक्षक येतात. या मसाल्यातले बरेच चित्रपट निघत असावेत. तसे दोन आम्ही मागच्या वर्षी तमिळनाडू सहलीत बसमध्येच पाहिले होते. प्रवासात पाहण्यासाठी आणि भाषा न कळली तरी चालतात असे. हिंदीचे चित्रपट पाहायचे म्हटले तर फक्त हेराफेरी. कुठूनही केव्हाही केव्हाही भाग प्रवासात पाहिला तरी मजा.

In reply to by कंजूस

टर्मीनेटर Fri, 12/20/2024 - 18:48
हिंदीचे चित्रपट पाहायचे म्हटले तर फक्त हेराफेरी. कुठूनही केव्हाही केव्हाही भाग प्रवासात पाहिला तरी मजा.
कंकाका हिंदीत हेराफेरी१,२, 'अंदाज अपना अपना', धमाल, मुन्नाभाई १,२ आणि जुन्यात 'जाने भी दो यांरो' हे चित्रपट कधीही आणि कुठूनही बघितले तरी कंटाळा येत नाही 😀 बाकी द्येशमुखरावांनी 'संक्षिप्त' नावाखाली एका भव्यदिव्य चित्रपटाचा जो अत्यंत त्रोटक परिचय करून दिला आहे त्यासाठी त्यांचा त्रिवारच नाही तर पंच-षष्ठ वार निषेध... पुढल्या प्रतिसादांतून आम्हा 'पुष्पा' प्रेमिंची बाजू मांडतो!

चित्रगुप्त Fri, 12/20/2024 - 18:44
कालच दोन्ही मुलगे, सुना, अर्धांगिनी वगैरे मशारनिल्हे चित्रपट बघून आले. मी गेलो नव्हतो. आल्यावर मुलगा म्हणाला की तुम्ही आला असता तर पहिल्या पंधरा मिनिटातच उठून घरी आला असता. .

In reply to by चित्रगुप्त

टर्मीनेटर Fri, 12/20/2024 - 18:59
अक्षरशः खरे आहे... पहिली जवळपास १३-१३.५ मिनिटे हा चित्रपट पाहताना आपण चुकून क्रिश ४, ५, ६ वगैरे किंवा मार्वल वाल्यांचा कुठला सिनेमा बघायला तर आलो नाही ना हा प्रश्न पडतो! पण ते सगळं स्वप्नात घडल्याचे बघितल्यावर पुढचा चित्रपट पाहण्यासाठी ऊर्जा मिळते आणि ती शेवटपर्यंत कायम राहते... अर्थात सुरुवातीचा तो विलक्षण सीन आणि सगळीच गाणी वगळली असती तर चित्रपटाची लांबी आणि बजेट बऱ्यापैकी कमी झाले असते असे माझे मत! बाकी चित्रपट मजेदार आहे... आपल्याला बुद्धी आहे की नाही हे तपासण्यासाठी जे लोकं चित्रपट पहायला जात असतील त्यांनी मात्र ह्या चित्रपटापासून दूर राहावे!

चौथा कोनाडा Fri, 12/20/2024 - 19:04
श्रीवल्ली (रश्मिका मादन्ना),
रश्मिका मादक अण्णा म्हणायचे आहे का ? हा .... हा .... हा .... :) रश्मिका मंदाण्णा असं नाव आहे तिचं ... अशी अण्णा वाली बरीच नावं असतात तिकडं ! सिनेमाचे तिकिटदर कमी झाले की पुष्पा-२ पाहण्यात येईल असा घरचा आदेश आहे.

In reply to by चौथा कोनाडा

टर्मीनेटर Fri, 12/20/2024 - 19:10
सिनेमाचे तिकिटदर कमी झाले की पुष्पा-२ पाहण्यात येईल असा घरचा आदेश आहे.
हरकत नाही... पण चित्रपट शौकीन असाल तर हा Wild fire चित्रपट मोठ्या पडद्यावरच बघा अशी विनंती!

In reply to by टर्मीनेटर

वामन देशमुख Fri, 12/20/2024 - 20:37
सिनेमाचे तिकिटदर कमी झाले की पुष्पा-२ पाहण्यात येईल असा घरचा आदेश आहे.
आम्हीही पहिल्या दिवशी तिकिटे जास्त होती म्हणून पाहीला नाही. खरंतर त्या शोला अपघातानेच गेलो. आमच्या अहोंना आणि त्यांच्या मैत्रिणींना मिळून हा सिनेमा तेलुगुत १३ डिसेम्बर ला पाहायचा होता. त्यांच्यासाठी तिकीट मी बुक केले ते चुकून हिंदीचे. ते लोक घरून निघायच्या वेळी ते लक्षात आले. मग त्यांनी बेत रद्द करून, आम्ही म्हणजे मी, अहो, अपत्ये आणि आई असे पाच जण गेलो. तिसऱ्या दिवशी १५ डिसेम्बर रोजी मी आणि माझे मित्र असे संध्याकाळी मस्त टुल्ल होऊन रात्रीच्या शोला गेलो. परत येताना पुन्हा टुल्ल होऊन, जेवण करून घरी दोन वाजता परतलो. घरी आल्यावर झोप येत नव्हती म्हणून पुन्हा पुष्पा १ ओटीटीवर पाहीला. पहाटे साडेपाचला झोपी गेलो.
... हा Wild fire चित्रपट मोठ्या पडद्यावरच बघा अशी विनंती!
अगदी अगदी! "पुष्पा अंटे फायर कादू, पुष्पा अंटे वाइल्ड फायर !" आणि मग दाढीवर दोन्ही उलटे हात फिरवणे हे पाहण्याची मजा मोठ्या पडद्यावरच आहे.

वामन देशमुख Fri, 12/20/2024 - 20:58
विशेषतः सणवार, उत्सव वगैरे बाबतीत आंध्र-तेलंगणा संस्कृती खूपच वैविध्यपूर्ण आहे. वीसपंचवीस तोळे सोन्याचे दागिने सहजच घालणाऱ्या स्त्रियांचा रुबाब, मोगरा-अबोली-गजरे माळलेल्या तरुणींची लगबग, हाफ साडी नेसलेल्या मुलींची धावपळ, रामराजचे पांढरेशुभ्र शर्ट-पंचा नेसलेल्या पुरुषांचा दरारा, नाना वेष धारण केलेल्या कलाकारांची विविध पारंपारीक रुपे, सात्विक तेजस्वी पंडित लोकांचे शास्त्रशुद्ध मंत्रोच्चार... आंब्याची तोरणे, नारळे, हळद, कुंकू, अक्षता, फळे, फुले यांची रेलचेल... पुष्पा २ (आणि इतरही अनेक सिनेमांतून) हे सर्व आणि अजूनही बरेच काही सविस्तर पाहायला मिळते. --- अवांतर: हे आवडणाऱ्या लोकांनी विशेषतः नवरात्रात तेलंगणात आणि संक्रांतीला आंध्रात पर्यटन करायला हवे. कधी योग आला तर एखाद्या देवळाच्या ध्वजस्तंभ पायाभरणी कार्यक्रमाला हजेरी लावायला हवी.

सौन्दर्य Sat, 12/21/2024 - 04:18
कालच ओटीपीवर हा सिनेमा पाहिला, मुद्दाम हाच पाहायचा अस काही नव्हतं, समोर आला आणि पहिला इतकंच . पूर्वीच्या सिनेमात हिरो सुरवातीला कितीही वाईट असला तरी शेवटी तो सुधरतो असे दाखवले जायचे जे प्रेक्षकांना भावायचं, आता गुन्हेगारीचे उदात्तीकरण लोकांना आवडतं हे बघून आपण म्हातारे होत चाललो आहोत हे जाणवले. चालायचंच , कालाय तस्मे नमः

Madhugandha Wed, 12/25/2024 - 08:25
चित्रपट म्हणजे समाजाचा आरसा . आता खलनायक नायक म्हणून समोर येत आहे आणि पोलीस खलनायक दाखवला गेला आहे. अॅनिमल चित्रपट आठवतो आहे का? म्हणजेच समाजात खलनायक प्रवृत्ती वाढत आहे, आणि वाढतच जाणार

टर्मीनेटर Wed, 12/25/2024 - 15:53
१ - 'पुष्पा: द राईज' - जगभरातील एकूण ढोबळ कमाई = ३९३.५० कोटी रुपये! "पुष्पा नाम सुनकर फ्लॉवर समझे क्या? फ्लॉवर नहीं... फायर हैं" 🙂 २ - 'पुष्पा: द रुल' - ५ डिसेंबरला प्रदर्शित झाल्यापासून काल (२४ डिसेंबर) पर्यंतची २० दिवसांतली चित्रपटाची भारतातील ढोबळ कमाई = १०८९.८५ कोटी रुपये! "पुष्पा फ्लॉवर नहीं... वाइल्ड फायर हैं" 😘 आणि, जगभरातील एकूण ढोबळ कमाई = १६२५.३१ कोटी रुपये! "पुष्पा को नॅशनल खिलाडी समझे क्या?... इंटरनॅशनल हैं" 😍 ३ - 'पुष्पा: द रॅम्पेज' - हा (आगामी) तिसरा भाग पहिल्या दोन भागांप्रमाणे व्यावसायिकदृष्ट्या यशस्वी होईल कि नाही हे पुढे कळेलच, पण तो बघायची प्रचंड उत्सुकता मात्र लागून राहिली आहे! दुसऱ्या भागासाठी तब्बल तीन वर्षे वाट पाहावी लागली... तिसऱ्या भागासाठी तरी फार प्रतीक्षा करावी लागू नये ही अपेक्षा 😎 अवांतर: रविवारी 'मुफासा: द लायन किंग' पाहिला, खूप आवडला... करमणूकीच्या दृष्टीने वर्षाखेर * चांगली झाली 👌 २० डिसेंबरला प्रदर्शित झालेल्या ह्या सुंदर अ‍ॅनिमेटेड चित्रपटाला भरघोस प्रतिसाद देत त्याच दिवशी प्रदर्शित झालेल्या 'वनवास' हा उत्कर्ष शर्मा आणि नाना पाटेकर ह्यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या भावनाप्रधान चित्रपटाकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवल्याचे पाहिल्यावर 'चित्रपट माध्यम' आणि त्यातल्या 'मनोरंजन मुल्या' कडे पाहण्याचा भारतीय प्रेक्षकांचा दृष्टिकोन सकारात्मकरित्या बदलत असल्याची सुखद जाणीव झाली 👍 २०२४ च्या नोव्हेंबर आणि डिसेंबर ह्या शेवटच्या दोन महिन्यात 'सिंघम अगेन' आणि 'भूल भुलैया ३' ह्या दोन ट्रिक्वेल चित्रपटांनी अनुक्रमे साफ निराशा आणि थोडेफार मनोरंजन केले, तर 'ग्लॅडिएटर २', 'मोआना २', 'पुष्पा: द रुल' आणि 'मुफासा: द लायन किंग' अशा अनुक्रमे तीन सिक्वेल आणि एका प्रिक्वेलने झकास करमणूक केली! २०२५ ह्या येत्या वर्षात अनेक चांगले करमणूकप्रधान चित्रपट रसिकांना पहायला मिळोत अशी मनोरंजनाच्या देवाकडे प्रार्थना 🙏 (*आज प्रदर्शित झालेला 'बेबी जॉन' हा हिंदी चित्रपट २०१६ च्या 'थेरी' ह्या तामिळ चित्रपटाचा रिमेक असुन तो पुर्वीच पाहुन झाला आहे हे एक कारण आणि वरुण धवन आणि किर्ती सुरेश हे दोन्ही कलवंत आवडत नाहीत हे दुसरे कारण असल्याने बेबी जॉन बघण्यात रस नाही त्यामुळे नविन चित्रपट बघण्याच्या दृष्टीने माझ्यासाठी हे वर्ष संपले आहे.)

वामन देशमुख Wed, 02/05/2025 - 09:15
जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात, अधिकची दृश्ये वाढवून पुष्पा २: द रूल् (रिलौडेड् वर्जन्) पुन्हा प्रदर्शित झाला. सिनेमा आता पाउणेतीन तासांचा झालाय. नवीन वर्जन् सगळ्याच मोठ्या शहरांतील थेटरात अजूनही सुरुच आहे असे दिसते. मागच्या आठवड्यात तो नेटफ्लिक्सवरही प्रदर्शित झालाय.
एकाच आठवड्यात हा सिनेमा मी दोनदा पाहीला. पहिल्यांदा कुटुंबीयांसमवेत हिंदीत एका थेटरात; चार दिवसांनी मित्रांसमवेत तेलुगूत दुसऱ्या एका थेटरात. पुष्पा १: द राइज् आवडलेला होताच. पुष्पा २: द रूल् अधिकच आवडला. इतर कोणत्याही लोकप्रिय तेलुगु सिनेमातल्यासारखाच या सिनेमातही प्रचंड मसाला आहे.

सहज सुचलं म्हणून

कंजूस ·

चित्रगुप्त Sun, 12/22/2024 - 05:35
येत्या फेब्रुवारी ११-२० मी पुण्यात मुक्कामास असेन, त्या दरम्यान कट्टा करुया का ? (फक्त १६ तारीख सोडून. त्या दिवशी एका लग्नात उपस्थिती लावयची आहे)

In reply to by चित्रगुप्त

मुक्त विहारि Sun, 12/22/2024 - 10:42
सध्या आमचे भ्रमण फक्त ६ फूट बाय ३ फूट इतपतच मर्यादित असल्याने, माझ्या घरीच कट्टा करू शकतो.

In reply to by मुक्त विहारि

काळजी घ्या मुवि. हाडाचे दुखणे म्हणजे वेळखाऊ दुखणे असते. काहीही झाले तरी मुळातले दुखणे आणि मग फिजिओथेरपी वगैरे प्रकार मिळून अडीच-तीन महिने जातातच. मी पण तो अनुभव घेतला आहे. पण त्या काळात मिपावर पूर्णवेळ पडीक राहून वेळेचा सदुपयोग केला होता :)

Bhakti Sun, 12/22/2024 - 21:15
पुणे बुक फेस्टिवल २०२४ अ आ १४ डिसेंबरपासून सुरू झालेल्या पुणे बुक फेस्टिवलचा आज २२ डिसेंबर शेवटचा दिवस होता.कामाचं आठवडा नियोजन पूर्ण फुल्ल असल्याने आजचाच दिवस या फेस्टिव्हलमध्ये येण्यासाठी मिळाला.खरोखर पुस्तक प्रेमींसाठी ही एक अनोखी पंढरी फर्ग्युसन महाविद्यालयात अवतरली होती.जवळपास २५० पेक्षा अधिक प्रकाशकांचे बुक स्टॉल येथे उपलब्ध होते.फर्ग्युसन महाविद्यालयात प्रवेश करताच पुस्तक वाचण्यात मग्न अनेक भव्य प्रतिकृती ठराविक अंतरावर होत्या.पुस्तकांच्या आकाराच्या प्रतिकृतींची सजावट मार्गावर होती.अंम्पी थिअटरात अनेक कार्यक्रमांचीही रेलचेल होती.पुढे सर्वप्रथम भारतीय संविधानाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त पुस्तकरूपी "संविधान प्रतिकृती ९.९४ मीटर जिचा गिनीज बुक मध्ये समावेश करण्यात आला आहे, ती पाहिली.मग त्या भव्य प्रांगणात आलो जिथे फेस्टिव्हल भरले होते.इथे पंतप्रधान मोदी, मुख्यमंत्री फडणवीस यांचे आउटलेट छायाचित्रं काढण्यासाठी होते. आत गेल्यावर अनेक प्रसिद्ध प्रकाशनाची पुस्तके पाहून खूप आनंद झाला.इतकी पुस्तक पाहून कोणती घेऊ कोणती नको असं झालं. पहिल्याच पुस्तकाच्या स्टॉलवर पुस्तक पाहत चाळत होते.दुसऱ्या ठिकाणी हेच ,वेळेचे बंधन नसल्याने माझा नवरा आणि मुलगी मला टाटा करून पुढे निघून गेले.अनेक पुस्तकं जी नगरात पाहायलाही मिळत नाही ती जवळपास सर्वच पाहिली.इंग्रजी पुस्तकेही बरीच होती,तिथे गर्दीही भरपूर होती.मी प्रामुख्याने गीतारहस्य(लोकमान्य टिळक) पुस्त,पैशाचे मानसशास्त्र(मराठी , इंग्रजी दोन्ही भाषेत घेतले),हस्ताचा पाऊस(माडगूळकर),ज्ञानदेवा तिथे समाधी(राहूल देशपांडे), संस्कृती (इरावती कर्वे) , बिझिनेस महाराजा इत्यादी पुस्तके घेतली.थोड्या वेळाने लेकीची परत भेट झाली .तीला देखील पुस्तकांची गोडी निर्माण व्हावी म्हणून मुद्दामाहून आणले होते.ते सफलही झाले कारण घरी असलेली अनेक पुस्तके तिने ओळखून "आई हे आपल्या घरी हे पुस्तक आहे" असं सांगितलं :).रा.चि.ढेरे, कुरुंदकर ,इरावती कर्वे अशा अनेक आवडत्या लेखकांची सर्व अज्ञात पुस्तकेही पाहायला मिळाली.इथे सातवाहन गाथा सप्तशती पाहायला मिळाले.पण आता खुप उशीर झाला होता १२-४ असा वेळ इथे होते.एक तरी लेखक भेटतील अशी आशा होती पण ते घडलं नाही. फर्ग्युसन महाविद्यालय पाहत फिरत बाहेर आले.बाप लेकीने आधीच पोटोबा फुल्ल केला होता.जवळच वैशाली,वाडेश्वर आहे हे माहिती होतं.पण खूप दमलो होतो समोर ' रौनक' पावभाजी होती तिथेच गेलो.मस्त झाडांच्या सावलीत टेबल होते.पुण्यातलं पहिले १९६७ साली पावभाजीचे हे रेस्तराँ आहे असं तिथे लिहिले होते.पुण्याची पावभाजी तिखट नसणार म्हणून त्यांना तिखट द्या असं मुद्दामहूनच सांगितले.खुपच सुंदर सजवलेली (प्रेझेंटेशन)पावभाजी आणि बरोबर तिखट लसूण आलं सरबरीत चटणी,तिखटातला चिरलेला कांदा बरोबर आला.इतकी छान सर्व्हिस पाहून छान वाटलं.पुण्यात गोष्टींची 'गुणवत्ता' हाच महत्त्वाचा निकष परत दिसला.एफसी रोडवर जरा फेर फाटका मारून परत घरी निघालो. ई उ क च थ

In reply to by Bhakti

रामचंद्र Mon, 12/23/2024 - 22:05
वाचन ही शांत वातावरणात चालणारी प्रक्रिया आहे याचे थोडेसुद्धा भान आयोजकांना नसावे याचे वाईट वाटले. संध्याकाळच्या वेळेस तिथं जावं तर तिथंच चाललेल्या संगीताच्या कार्यक्रमामुळं कानठळ्या बसत होत्या. अर्थात एकंदरीतच आयोजनाच्या बाबतीत उत्सवी वातावरणात वाचनसंस्कृतीचे भान ठेवून शांत वातावरण, डोळ्याला त्रासदायक होणारा प्रखर प्रकाश टाळणे अशा गोष्टींची अपेक्षा करणं जरा जास्तच होतं याची पुरेशी जाणीव झाली आहे. बाकी हिंदी पुस्तकांच्या तसेच मराठवाड्यातल्या, तितकेसे प्रसिद्ध नसलेल्या स्टॉलवरही वेगळी, वाचनीय पुस्तकं पहायला मिळाली याचा आनंद आहे.

In reply to by Bhakti

Bhakti Fri, 03/21/2025 - 22:45
वाचाल तर आनंदी होणार अ सकाळ पुस्तक महोत्सव २०२५, अहिल्यानगर. पुणे बुक फेस्टिवलच्या धर्तीवर अगदी भव्य नाही पण बरेचसे मोठे , चांगली पुस्तके असणारे पुस्तक महोत्सव नगरमध्ये २१-२४ मार्च दरम्यान भरले आहे.पुढचे काही दिवस व्यस्त असल्यामुळे आजच फेरफटका मारला. नेहमीप्रमाणे पुस्तकाच्या दुकानात,प्रदर्शनात मला वेळेचे भान उरत नाही.तेव्हा तू एकटीच जा असं घरून सांगण्यात आले,फक्त मोबाईलची बॅटरी संपायच्या आधी घरी ये असंही सुनावण्यात आले. लोकप्रिय साहित्यिकांची पुस्तके ऑनलाईन सहज मिळतातं पण अशा प्रदर्शनात नवे पुस्तक समजतात.पुस्तकांना हातात घेऊन,पाने चाळत, अनुक्रमणिका पाहत ते पुस्तक घेणं निराळं सुखच असते. कादंबरी मी वाचनालयातून मिळालेल्या पुस्तकांतून वाचते. तेव्हा संस्कृती, अध्यात्मिक, वैज्ञानिक, समाजजीवन, निसर्ग,इतिहास,भटकंती विषयांची पुस्तके घेण्याकडे कल असतो. तरीही आनंद नाडकर्णी, ग्रेस, अच्युत गोडबोले,जयवंत दळवी,नरहर कुरुंदकर,नरेंद्र दाभोळकर यांची काही पुस्तके हेरुन ठेवली आहेत,लवकरच घेईन. मी घेतलेली अनवट पुस्तके- १.येई परतुनी ज्ञानेश्वरा' आज मला नवीन लेखक समजले डॉ.रा.श्री.मोरवंचीकर डॉ. रा. श्री. मोरवंचीकर आजही ज्ञानदानाच्या पवित्र कार्यात अखंड नंदादीपासम तेवत आहेत. त्यांनी 'येई परतुनी ज्ञानेश्वरा' हा मराठी लोकमानसाच्या जिव्हाळ्याचा ग्रंथ अध्यायनिहाय अनेक अंगांनी उलगडला आहे. त्यातील सचित्र ओव्यांचे मार्मिकपणे केलेले निरूपण पाहून त्यांच्या ज्ञानेश्वरांप्रती असलेल्या उत्कट प्रेमाचा अनुभव दिसतो. २.निसर्गायण दुसरे नव्याने समजलेले लेखक निसर्ग आणि विकास अभ्यासक दिलीप कुलकर्णी . पर्यावरणाची समस्या ही अशा प्रकारे बाह्य निसर्गातील असली, तरी तिचं मूळ आहे आपल्या मनोवृत्तीत -आपल्या विचारांत. आपली भोगवादी वृत्ती, हाव, आक्रमकता ही या समस्येला कारणीभूत आहे आणि केवळ ही एकच नव्हे, तर शस्त्रस्पर्धा, दुर्बलांवरचे अत्याचार, गुन्हेगारी, व्यसनाधीनता, मानसिक तणाव, स्वैराचार अशा अनेक समस्या त्याच मनोवृत्तीमुळे आपल्यासमोर उभ्या ठाकल्या आहेत.आधुनिक पाश्चात्त्य विज्ञान आणि प्राचीन पौर्वात्य तत्त्वज्ञान यांच्या आधारे या बदलाची दिशा शोधणारं हे पुस्तक. ३. थर्ड ॲंगल हे छोटेखानी पुस्तक हटके विषयावर म्हणजे ' थिअरॉटिकल मित्राने प्रॅक्टिकल क्लबमध्ये केलेली भाषणे एक वैचारिक अनोखा अनुभव आहे. मनाची नित्य नाव पुस्तकाच्या पानांनी वल्हवली जातात मग आयुष्याचा भवसिंधु सहज तरुन जातो ज्ञान सागराची ओढ अजुनच सहज पूर्ण होते... -भक्ती

कंजूस Mon, 12/23/2024 - 06:56
अरे वा! पुस्तक प्रदर्शन गाजलं. आता दरवर्षी होईल. तुमच्या मुलीसाठी पर्वणीच. ( आउटलेट छायाचित्रं काढण्यासाठी होते.= कटाउटस) फार पूर्वी मुंबईत (आझाद मैदान) आणि दिल्लीत ( प्रगती मैदान) येथे मोठे पुस्तक प्रदर्शन आलटून पालटून एक वर्षाआड होत असे. नंतर मुंबईतील बंदच झाले. मग छत्रपती टर्मिनस जवळचा खाजगी बुक स्टॉल आशिष दरवर्षी प्रदर्शन भरवून लागला सुंदराबाई हॉलमध्ये. पण मराठी पुस्तके नसत ( ती साहित्य संमेलनांत अधिक). अक्षर वाङमय यांनी काही वर्षे प्रदर्शने भरवली. माझ्या दृष्टीने पुस्तकं चाळायला मिळणे महत्त्वाचे कारण विकत घेत नाही. विकत आणून नंतर करायचे काय हा प्रश्न असतो. तरी भाषा शिकण्यासाठीची पुस्तके घेतो ती संग्रही आणि संदर्भासाठी कायम लागतात. स्थानिक नगरवाचनालयात काही वाचायला मिळतात. पण मोठी बाडं कधीच येत नाहीत. स्थानिक प्रकाशकांनी एक होऊन एक कायमची तारीख किंवा आठवडा प्रदर्शन भरवण्यासाठी निश्चित केला तर वाचकांच्या कायम लक्षात राहील. उदाहरणार्थ डिसेंबरचा दुसरा आठवडा.

In reply to by कंजूस

Bhakti Mon, 12/23/2024 - 08:15
सॉरी,माझी भयानक डिक्शनरी ;) =)(कटआऊट)
माझ्या दृष्टीने पुस्तकं चाळायला मिळणे महत्त्वाचे कारण विकत घेत नाही. विकत आणून नंतर करायचे काय हा प्रश्न असतो. तरी भाषा शिकण्यासाठीची पुस्तके घेतो ती संग्रही आणि संदर्भासाठी कायम लागतात.
खरं आहे,अशा मोठ्या प्रदर्शनात खुप पुस्तकं पाहायला ,चाळायला मिळतात हे महत्त्वाचे.माझा पुस्तक घेण्यासाठी हव्यास होता त्यामुळे बजेट संपल्यावर पुस्तक फक्त पाहण्याचं ऑड वाटू लागले.पुढच्यावेळी जरा याबाबत सतर्क राहीन ;) होय लेकीसाठी हळूहळू एम एच १२ केंद्रबिंदू (पर्वणी) तयार करणार आहे!

In reply to by Bhakti

मुक्त विहारि Mon, 12/23/2024 - 08:20
हे पुस्तकं खरेदी करण्यासाठी उत्तम ठिकाण आहे. आणि डोंबिवली हे केंद्रस्थानी असल्याने, डोंबिवली येथे उत्तम पुस्तके मिळतात.

In reply to by मुक्त विहारि

कर्नलतपस्वी Mon, 12/23/2024 - 09:41
बुकगंगा,अक्षरधारा,ॲमेझोन सारख्या संस्थळावर पुस्तके स्वस्त आणी घरपोच येतात. मागील वर्षापेक्षा या वर्षी अधिक चांगले प्रदर्शन होते.

श्रीरंग_जोशी Mon, 12/23/2024 - 10:18

In reply to by श्रीरंग_जोशी

अरेरे. उशीर झाला. पहिला प्याला बर्‍याच वर्षांपूर्वी पिऊन झाला आहे :(

In reply to by श्रीरंग_जोशी

कर्नलतपस्वी Mon, 12/23/2024 - 11:47
होळी, वजा तीस तापमान. शेवटचा प्याला मार्च १९९९,प्रसंग मारूती आठशे पहिली चार चाकी घेतली. व्यसनाधीन झालो का ?नाही, प्रत्येकाच्या इच्छाशक्ती वर आवलंबून. दारू पिली पाहीजे असे काही नाही. पण अती परिचयात अवाज्ञा तद्वत दारूला डोक्यावर चढवून नये. अर्थात माझे मत.

In reply to by कर्नलतपस्वी

कंजूस Mon, 12/23/2024 - 12:21
बरोबर. रोज थोडी थोडी घरीच घ्यावी म्हणजे त्यातली गंमत सामान्य होते. आणि कधी प्रसंगाप्रमाणे जे पितात भरपूर तसं होत नाही. कितीही कोणतेही दारूचे ब्रांड आले तरी बेसिकली अल्कोहोल अमुक टक्के यापलिकडे काही नाही. तांदुळाचेही तसेच आहे पंधरा रुपये ते सातशे पन्नास रुपये किलोचा असो त्यांचे पोषणमूल्य समानच असते. सगळे पॉलिश केलेलेच असतात. हातसडीचे कुठे मिळतात?

In reply to by कंजूस

कर्नलतपस्वी Mon, 12/23/2024 - 17:26
ये इंतजार गलत है के शाम हो जाये जो हो सके तो अभी दौर-ए-जाम हो जाये मुझ जैसे रिंद को भी तूने हश्र मे या रब बुला लीया है तो, कुछ इंतजाम हो जाये हुई महँगी बहत ही शराब, के थोड़ी-थोड़ी पिया करो पियो लेकिन रखो हिसाब, के थोड़ी-थोड़ी पिया करो

In reply to by कर्नलतपस्वी

कर्नलतपस्वी Mon, 12/23/2024 - 17:45
कौन कहता, अंगुर की बेटी गलत है अंगुरके दामाद को बस इसकी लत है इसके साथ कुछ गम गलत करता है तो बेरहम जमाने क्या जाता है,अगर... वो उसके साथ कुछ पल बिताता है

In reply to by श्रीरंग_जोशी

कंजूस Mon, 12/23/2024 - 12:23
सर्व विषे कमी प्रमाणात औषधेच असतात. अगदी तंबाखू, चहा, अफू,अर्सेनिक सुद्धा.

कंजूस Mon, 12/23/2024 - 12:39
आशिष बुक स्टॉल छत्रपती टर्मिनस जवळचा खाजगी बुक स्टॉल आशिष दरवर्षी प्रदर्शन भरवू लागला सुंदराबाई हॉलमध्ये. यांच्या पुस्तक प्रदर्शनात भेटी दिल्यावर एक लक्षात आलं की यामध्ये पुस्तके कोण घेतो. इंटिरिअर डेकोरेशनचा व्यवसाय करणारे मुंबईत बरेच आहेत. ते इकडे फिरतात. भरपूर रंगीत चित्र असलेली जाडजूड पुस्तके तिथे निम्म्या किंमतीत असतात. ती त्यांना हवी असतात नवनवीन फर्निचरच्या डिझाइनसाठी. शिवाय गार्डनिंग लेआउटचीही असतात. आर्किटेक्ट नाही पुस्तके लागतात. मोठ्या बास्केट घेऊन फिरतात आणि भराभर पुस्तके उचलतात. तरुण मुलं मुली इंग्रजी कादंबऱ्या विकत घेतात. काही महिला कुकींगची पुस्तके बघतात. आपण जी मराठी साहित्यातील कवितासंग्रह, कादंबऱ्या विकत घेतो त्याचा आनंद आठ दिवसांत संपतो. इतिहास,भाषा यांचे अभ्यासक पुस्तके घेतात ती त्यांच्या कामाची असतात. पण मग असा विचार येईल की वाचकांनी पुस्तके विकत घ्यावीत का? वाचनालयांनी घ्यावीत. म्हणजे महिन्याच्या फीमध्ये साहित्य वाचता येईल.

In reply to by कंजूस

मुक्त विहारि Mon, 12/23/2024 - 18:30
विना अनुदानित, वाचनालये आता ओस पडत चालली आहेत. डोंबिवली येथे एक फ्रेंड्स लायब्ररी सोडली तर बरीचशी वाचनालये बंद पडली आहेत. मानपाडा रोड वरील ३ वाचनालये, डोंबिवली पश्चिम येथील एक वाचनालय, midc मधील एक वाचनालय, ही काही ठळक उदाहरणे. रामनगर मधील एक वाचनालय आणि P ,& T मधील एक वाचनालय, फ्रेंड्स लायब्ररीच्या सहयोगाने चालतात. त्यापेक्षा पण भयावह स्थिती, अभ्यासक्रमा व्यतिरिक्त , पुस्तक विक्रेत्यांची आहे.... कालाय तस्मै नमः....

कंजूस Fri, 12/27/2024 - 06:03
गोवा पर्यटन/ कोकण/समुद्री पर्यटन गोरगावलेकर यांनी केलेल्या गोवा पर्यटनाचे धागे येत आहेत. त्यांचे अनुभव लिहित आहेत. तिसऱ्या भागात हिवाळी सहल, दक्षिण गोवा :भाग 3 : बटरफ्लाय बीच आणि लोलये-पैंगिण चे वेताळ गोवा आणि कोकण यांच्या पर्यटनाची तुलना फायदे तोटे यांची प्रतिसादांतून चर्चा फारच वाढली. ती इकडे करता येईल. धाग्यातली चर्चा इथे कॉपी पेस्ट करताही येईल पण तो त्या प्रतिसादकर्त्या लेखकांचा अधिकार आहे. मीही पूर्वी गोव्यावर एक धागा काढला होता ते आठवले. माझा समुद्र पर्यटन, खाणे पिणे वगैरेंचा आनंद फारच संकुचित आहे. तरी एकदा गोवा काय आहे म्हणून पाहण्यासाठी गेलो होतो. परतताना कुडाळहून( कोकण) आलो. एसटीचाच प्रवास त्यामुळे जमेल तेवढे पाहिले. गोव्याच्या पर्यटनाबद्दल ऐकले वाचलेले भारतातले आणि परदेशी पर्यटक इथे येतात. आनंद घेतात आणि पुन्हापुन्हा येतात. गर्दी वाढली की ट्रेनची तिकिटे मिळत नाहीत. विमान आणि हॉटेल्सचे भाडी दर वाढतात. परवडण्याच्या पलिकडे जातात. तरीही पसंती असते. कोकण ( महाराष्ट्रातला) याबद्दल श्री.ना. पेंडसे किंवा जयवंत दळवी किंवा इतर लेखकांच्या कथा कादंबऱ्यांतून मराठी वाचकांना माहीत झालेला असतो. तो खरंच कसा आहे हे पहाण्यासाठी ठाणे,रायगड, सिंधुदुर्ग जिल्हेसोडून उर्वरित महाराष्ट्रातील दूरच्या ठिकाणांहून पर्यटक येतात. त्यात किहीम, अलिबाग, श्रीवर्धन,हर्णे मुरुड, रत्नागिरी परिसर, देवगड, मालवण, देवबाग ही ठिकाणे येतात. कोकण आणि गोव्याप्रमाणेच कर्नाटकातील २६० किमी किनारपट्टीवरही कारवार,गोकर्ण, मुर्डेश्वर, उडुपी, मंगळुरू ही ठिकाणं आहेत. तीही पाहिली. हॉटेल्स(राहाणे आणि खाणे शाकाहारी तसेच मासाहारी), बसप्रवास यादृष्टीने फारच चांगल्या सोयी आहेत. शिवाय किनारपट्टीसोडून वरती घाट चढून गेल्यावरही अनेक सुंदर ठिकाणी जाता येतं. मार्चपर्यंत वाहणारे धबधबे आहेत. इथल्या लोकांना पर्यटक येण्याची सवय आहे. त्यांचा त्रास वाटत नाही . तुसडेपणा नाही. मला कर्नाटक पर्यटन फार आवडले आणि पुन्हा जावेसे वाटते. किनारे स्वच्छ चांगले आहेतच शिवाय नद्याही बारमाही पाणी वाहणाऱ्या आणि अतिशय स्वच्छ पाण्याच्या आहेत. नदीकिनारी जी धार्मिक स्थळे आहेत ती निसर्गसौंदर्याने अधिकच चांगली वाटतात. सह्याद्रीचा सुंदर निसर्ग पाहावा तर इथेच. उडुपी आणि मंगळुरू येथे समुद्र पर्यटन आणि मत्स्याहारही खूप प्रचलित आहे.

In reply to by कंजूस

गवि Fri, 12/27/2024 - 08:33
https://www.youtube.com/embed/Jhsq0fdiEq0 गोवा पर्यटन मंत्री यांची मुलाखत. ही सोशल मीडियावर सर्वत्र सुरू झालेली चर्चा हा चुकीच्या (चायनीज) आकडेवारीवर आधारित एक प्रोपागांडा आहे असे त्यांचे म्हणणे त्यांनी इथे मांडले आहे.

In reply to by कंजूस

गोरगावलेकर Fri, 12/27/2024 - 12:16
गोरगावलेकर यांनी केलेल्या गोवा पर्यटनाचे धागे येत आहेत. त्यांचे अनुभव लिहित आहेत. धाग्याच्या पहिल्या भागात आम्ही मडगाव स्टेशन ते कोलवा बीच पर्यंत प्रवास केला होता . स्टेशनच्या बाहेरच प्रीपेड टॅक्सी मिळाली . टॅक्सिवाल्यांचा कथित मुजोरपणा दिसला नाही . दुसऱ्या भागात कोलवा ते पाळोळे पर्यंत प्रवास केला . पर्यटन स्थळे बघत जात आम्ही जवळपास पूर्ण दिवस घेतला व त्यात पाच - पंचवीस किमी अंतर जास्त झाले त्याचे वाढीव पैसेही दिले . किती खर्च येतो हे कळावे इतकाच लिहिण्यामागचा उद्देश . आज कुठल्या शहरात स्विफ्ट डिझायरचे संपूर्ण दिवसासाठी ३ १ ० ० /- रुपये भाडे असेल ? ड्रायव्हरचा पगार , गाडीची देखभाल दुरुस्ती, इंधन खर्च जाऊन मालकाच्या हातात कितीसे पैसे जातील ? कोला बीचला जातांना अगदी ओबड धोबड रस्त्यावरून गाडी गेली . स्वत : ची गाडी नेतांनाही विचार करावा लागेल असा रस्ता . कुठलीही कुरकुर न करता शक्य होतील ती ठिकाणे दाखवली . येथेही गाडीवाल्यांचा कथित मुजोरपणा दिसला नाही .

In reply to by गोरगावलेकर

गवि Fri, 12/27/2024 - 13:15
मुजोर म्हणजे बोलण्यात अशा अर्थाने नसावं. पण अतिरिक्त मनाला येईल तितके पैसे मागणे हे अनेकदा घडते. पूर्ण दिवसाचे ३१०० इतकेच घेतले असतील तर तुम्हाला नशिबाने चांगले डील आणि व्यक्ती लाभली. एरवी कोपऱ्यावर सोडून यायचे सहाशे (हे उदाहरण मे २०२४ मधलं, ऑफ सिझन काळ. अंतर दोन ते तीन किमी. पार्किंग नसल्याने टॅक्सी मागवावी लागली होती.). नुसती चौकशी केली होती तेव्हा, दाभोळी एअरपोर्ट ते अगोंद वन वे नुसते ड्रॉप करण्याचे ऑफ सिझन २००० आणि सिझन मध्ये ३५०० ते ४०००. तुलनेसाठी असे पाहा की मुंबईहून गोव्याचे विमान तिकीट देखील कधी कधी याहून कमी असते. वार्का ते काबो द राम किल्ला आणि परत इतक्या अंतराचे हॉटेलशी संलग्न टॅक्सीवाल्यांनी सुमारे आठ वर्षांपूर्वी तीन हजार घेतले आणि वरून टिप मागितली. वाटेत कुठे थांबायला देखील तयार नव्हता. नव्वद टक्के वेळा मुंबईपासून स्वत:ची कारच घेऊन जाणे किंवा एअरपोर्टवर उतरताच पूर्ण मुक्कामाइतकी सेल्फ ड्राईव्ह कार घेणे हे दोन उपाय करून ही समस्या आता सोडवली आहे. बाय द वे, गोव्यातील स्थानिक लोक कोंकणी भाषेच्या सवयीनुसार एकेरीत अरेतुरे करत बोलतात आणि त्या स्टाईल मुळे काही वेळा बाहेरील लोकांना ते अशिष्ट उद्धट उगीचच वाटू शकतात.

In reply to by गवि

कंजूस Fri, 12/27/2024 - 14:58
सहमत. खाजगी वाहनाशिवाय तसेच भाड्याच्या वाहनाशिवाय जमेल तेवढे फिरणे आणि आनंद मानणे हेच आमचे ध्येय असते. त्यामुळे काही त्रास /संताप होत नाही. शेअरिंग साठी कुणाला तयार करणेही नाही. म्हणजे अगदीच घरी कॉटवर पाय हलवत गप्पा मारण्यापेक्षा चार ठिकाणं पाहाणे बरे या रुळावर आमची गाडी सुसाट धावते. शिवाय खरेदी करायची नाही हे ठरवूनच टाकले आहे. आमचा गाईड लोनली प्लानेट पुस्तक " India travel survival kit " - Tony Wheeler and others.

In reply to by गवि

टर्मीनेटर Sun, 12/29/2024 - 13:08
"पूर्ण दिवसाचे ३१०० इतकेच घेतले असतील तर तुम्हाला नशिबाने चांगले डील आणि व्यक्ती लाभली."
काशिनाथ नाडकर्णी : "तो कोकणांतला असला पाहिजे अंऽऽऽ..." कोचरेकर मास्तर : "पाहिलंत? पाहिलंत... माणुसकी नाही.. नाही म्हणतात ना?... ही घ्या माणुसकी! प्रवासात काय अनुभव येतील सांगता येत नाही. वास्तविक असल्या ह्या लोकांचे जाहीर सत्कारच करायला पाहिजेत. त्याचे नाव, नंबर वगैरे आपण टिपून घ्यायला पाहिजे होता नाही का..."
"एरवी कोपऱ्यावर सोडून यायचे सहाशे (हे उदाहरण मे २०२४ मधलं, ऑफ सिझन काळ. अंतर दोन ते तीन किमी. पार्किंग नसल्याने टॅक्सी मागवावी लागली होती.). नुसती चौकशी केली होती तेव्हा, दाभोळी एअरपोर्ट ते अगोंद वन वे नुसते ड्रॉप करण्याचे ऑफ सिझन २००० आणि सिझन मध्ये ३५०० ते ४०००."
सोकाजीनाना त्रिलोकेकर : "ए नाडकर्णी, बघ... बघ! बघ लेका तुझा कोकणातला व्हिक्टोरिया (टॅक्सी) वाला... " काशिनाथ नाडकर्णी : "तो कोकणांतला असणंच शक्य नांयऽऽऽ... अहो तो कोकणात व्हिक्टोरिया (टॅक्सी) चालवायला शिकणार कुठून मला सांगा बघू आंऽऽऽ... कायत्तरी काय? आमच्या कोकणातले म्हणजे सगळे बैल..." 😀 भ्रमण मंडळ - बटाट्याची चाळ गोव्याला असंख्य वेळा जाउनही तिथल्या सार्वजनीक वाहतुक व्यवस्थेचा आणि टॅक्सीवाल्यांचा मला फारसा अनुभव नाही. ह्या वर्षीच्या जानेवारी महिन्यात दोना पावला येथील मुक्काम असलेल्या 'इंटरनॅशनल सेंटर गोवा (ICG)' येथुन त्यांच्याचतर्फे संध्याकाळी तिथुन सुमारे सात किमी अंतरावर असलेल्या कॅसिनो पर्यंत जाउन मध्यरात्री तिथुन परतण्यासाठी घेतलेल्या टॅक्सी सेवेसाठी त्या टॅक्सीवाल्याने (आधीच बोलणी केल्याप्रमाणे) संध्याकाळी जाताना ड्रॉप साठी ३०० रुपये आणि मध्यरात्री तिथुन निघताना फोन करुन बोलवल्यावर पिक-अपसाठीचे ५०० रुपये असे जाउन-येउन एकुण ८०० रुपये घेतले होते. मध्य्ररात्री १:३० च्या नंतर फोन करुनही तो सांगीतल्याप्रमाणे परत न्यायला आला होता हे विषेश! असो, मिपाकरांना त्याठिकाणी आलेले टॅक्सीवाल्यांचे वेगवेगळे, बरे-वाईट अनुभव वाचुन माहितीत भर पडत आहे 👍

In reply to by गोरगावलेकर

विमानतळावरून आपल्या हॉटेलवर किंवा आपल्या हॉटेलवरून विमानतळावर जायचे असेल तर टॅक्सीवाल्यांचे अवाच्या सवा दर आहेत याचा मला तरी अनुभव आला नव्हता. आम्ही गोवा विमानतळापासून सगळ्यात लांब राहिलो होतो अगोंद आणि पाटणेला. दोन्ही ठिकाणी जायला विमानतळाहून १८०० रूपयात प्रीपेड टॅक्सी मिळाली होती. अर्थात ही अनुक्रमे २०१७ आणि २०१८ ची गोष्ट. सध्याचे दर किती हे माहित नाही. मात्र दोन्ही ठिकाणे दाबोळी विमानतळाहून साधारण ६०-६५ किलोमीटर अंतरावर आहेत. अंतर ध्यानात घेता तो दर अवाजवी जास्त आहे असे वाटले नव्हते. विमानतळावर समजा प्रीपेड टॅक्सी असते आणि त्यांना ठरवून दिलेले दर आहेत तितकेच घ्यावे लागतात. पण परतीच्या प्रवासात हॉटेलवरून विमानतळावर जातानाही टॅक्सीवाल्याने तेवढेच पैसे घेतले होते. अगोंदहून परत येताना आमचे विमान रात्रीचे होते त्यामुळे दाबोळी विमानतळावर रात्री साडेनऊच्या सुमारास पोचलो होतो. त्या वेळेस विमानतळावरून भाडी मिळत असतील की नाही शंकाच आहे कारण त्यावेळेनंतर फार विमाने येत नाहीत. तरीही त्याने जास्त पैसे घेतले नव्हते. टॅक्सीवाले अवाच्या सवा दर लावतात ते हॉटेलबाहेर साईटसिईंगला जाणार्‍यांकडून. वारकामध्ये आम्ही उतरलो होतो वारकाला आमच्या हॉटेलच्या बाहेर पर्यटकांसाठी म्हणून एक टॅक्सी स्टॅन्ड होता. तिथून मडगाव फार तर १०-१२ किलोमीटरवर होते. काजू आणि बेबिंका अशा गोष्टी घ्यायला मडगावला जायचे होते तेव्हा हॉटेलबाहेरील टॅक्सीवाल्यांनी जाऊन येऊन २७०० रूपये सांगितले होते. आणि ही गोष्ट २०१२ ची होती म्हणजे आणखी जुनी. ही अक्षरशः लूट होती. मला वाटते तिथे जास्त गोरे पर्यटक येतात आणि परदेशी पर्यटकांना अवाच्या सवा दर लाऊन लुटणे हा प्रकार नाही म्हटले तरी सगळीकडे होतोच. जर ते गोरे पर्यटक असे वाढीव दर द्यायला तयार होत असतील तर टॅक्सीवाल्यांना बहुदा आम्हा भारतीय पर्यटकांची गरज नसावी. त्यामुळे यायचे असेल तर या दरात या नाहीतर येऊ नका असा त्यांचा दृष्टीकोन होता.

श्रीरंग_जोशी Sun, 12/29/2024 - 01:44
गेल्या काही महिन्यांपासून माझी पत्नी सौरभ बोथरा यांच्या ऑनलाइन योगासन वर्गांना उपस्थिती लावत आहे. मी देखील महिन्याभरापासून सुरुवात केली आहे. शीर्षकात जरी केवळ योग असले तरी, योगासनांखेरीज, इतर कार्डिओ व श्वसनाचे व्यायाम, प्राणायम व थोडेफार ध्यान यांचाही या वर्गांत अंतर्भाव असतो. रोज युट्युब लाइव्ह द्वारे भाप्रवे नुसार सकाळ व संध्याकाळी हे वर्ग चालतात. सूचना सहजपणे समजतील अशा असतात व स्क्रीनवर पाहून आपण ते व्यायामप्रकार करू शकतो. ६ जानेवारीपासून तीन आठवडे या वर्गांचा नि:शुल्क लाभ घेता येईल - त्यासाठीचा दुवा. या वर्गांना काही दिवस उपस्थिती लावल्यावर, असे वर्ग आपल्याला काही वर्षे अगोदर का नाही मिळाले अशी भावना आमच्यासह बहुतेकांच्या मनात निर्माण झाली आहे / होत असते.

In reply to by श्रीरंग_जोशी

कंजूस Sun, 12/29/2024 - 04:00
ती साईट पाहिली. नोंदणी केली नाही. उपक्रम आणि ओनलाइन आहे हे बरे. काही शाळांत योगासने शिकवतात बहुतेक. आमच्या शाळेत शिकवली होती. पाचवी पासूनच . लहानपणी केली नाही तरी चालतात. कारण तेव्हा वाढते तरुण वय असते. पण नंतर कधी करायची झाल्यास छोट्या पुस्तिका विकत मिळतात त्या पाहिल्या की काही सोपी रोज करण्याची आसने दहा बारा आहेत ती करता येतात. चीनमध्ये तिथल्या बागांत ( parks) ६०+, ८५+ वयोगटातील नागरिकांसाठी काही त्यांच्या पद्धतींचे व्यायाम प्रकार करणारे करवून घेणारे गट असतात. त्यांचे काही विडिओ मी मागे पाहिले होते ( dwtv channel documentaries बहुतेक.) त्यांचे व्यायाम प्रकारही खूप चांगले वाटले. विशेषतः शरीराची रोजची हालचाल करण्यासाठीचे ते सराव आहेत. वरील दोन वयोगटांच्या वयाप्रमाणे हालचालींचा वेग वेगळा दिसला. इकडच्या काही बाबा लोकांचे योग प्रकार मला काही आवडले नाहीत. अतिरंजीत वाटले. ....... वजन कमी करणे/ हालचालींसाठी सराव/ रोग नियंत्रण/ मानसिक समाधान शांती यांपैकी एक किंवा सर्व असा काही झोल योगासनांमध्ये घालण्याचा खटाटोप दिसतो हे माझे मत.

Bhakti Sun, 12/29/2024 - 14:44
हरारीची मुलाखत रणवीरने घेतली.हरारी माझा आवडता विचारवंत आहे.तो भारतात नेक्सास' पुस्तक प्रकाशित करण्यासाठी आला होता.तेव्हा अनेकांना त्याच्याबरोबर मुलाखती घेतल्या. १. https://youtu.be/eNVtYPgJ6b0?si=3VfqDjCcx6_lYjk2 २. https://youtu.be/6x4UgHI7qbk?si=_Iz_eP9HF7SYH-ZM दुसरी मुलाखत अजून ऐकायची आहे. पहिली मुलाखत रणवीरने घेतली आहे.AI हा हरारीचा १० वर्षांपूर्वी पासूनचा विषय आहे.जो AI वर वरचढ होईल तोच पुढच्या काळात जगावर राज्य करणारे.इथे रशिया,ट्रम्प यांचा वर्चस्ववादी भूमिकेचा त्याने चांगला समाचार घेतला आहे.अमेरिकासारख्या बलाढ्य देशाने,लीडरने जगाच्या शांततेचा विचार आधी केला पाहिजे तरच माणूसकी टिकेल असं त्यांचं म्हणणं आहे.रणवीरचा शो म्हटला की तो स्पिरिच्युलिटीवर समोरच्याला बोलायला लावणारच हे ठरलेलं आहे 😀 त्यात हरारी विपश्यनेचा साधक आहे. पण हरारी म्हणतो कोणीही कोणाला दोन ,तीन तास ध्यानाला बसा हे म्हणणं सोपं आहे.पण पंधरा मिनिटे तरी केवळ स्वतःच्या आता बाहेर जाण्याऱ्या श्वासावर लक्ष केंद्रित करा.इतर कोणताच विचार डोक्यात आणायचा नाही,हे सांगितले तर कोणालाच हे फारसं जमणार नाही.यासाठी खुप तयारीच हवी.मेडिटेशन कसं करायचं, कोणतं करायचं हे ज्याचं त्यालाच ठरवू द्या.उगाच मेंढ्याचा कळप करण्यात अर्थ नाही. युद्ध करावं की नाही याबाबत त्याचं मत मला गोलगोल वाटलं,आधी तो म्हणाला मिलिटरी वर ५०% हून अधिक खर्च चिंताजनक आहे नंतर म्हणाला इस्राएल आणि भारताने ज्या चुका रोमन व मुस्लिम+ब्रिटिश आक्रमणाच्या काळात सैन्य ताकद वाढवण्यावर भर देतात केली ती त्यांना आता करणे अजिबात परवडणारं नाही👏

In reply to by Bhakti

कंजूस Sun, 12/29/2024 - 15:53
मराठी किंवा कुणीही. आंतरराष्ट्रीय मते राजकीय/ सामाजिक / धार्मिक ही नेहमी ती व्यक्ती कोणत्या डोक्यातली आहे त्याप्रमाणे एकांगीच असतात. विरुद्ध गटाचा साधा उल्लेखही नसतो. तर काहींची प्रसिद्ध केलेली व्यक्तव्ये त्यांच्या देशाच्या राजकीय दडपणाखालीही असतात.

कंजूस Tue, 12/31/2024 - 20:43
पहिला काचेचा पूल काल कन्याकुमारी, तमिळनाडू इथे असलेल्या विवेकानंद स्मारक आणि तिरुवल्लूवर पुतळा या दोन ठिकाणांमध्ये काचेचा पूल उभारला त्याचे उद्घाटन झाले. hindustan times बातमी

कंजूस Fri, 01/03/2025 - 11:27
खरडफळ्यावर विषय निघाला म्हणून......... गुजरातचे सुंदर समुद्र किनारे आणि पर्यटन. फार प्रचलित नाही तरीही थोडक्यात... गुजरातध्ये {सूरतजवळच्या} हजिरा येथे आणि जामनगर येथे दोन मोठे रासायनिक प्रकल्प ( भारतीय कंपन्या, रिलायन्स) अगोदरच आहेत. सूरतजवळच्या दहेज बंदरातून - घोघा पलिकडे जाऊन भावनगरला काही जण जातात. धार्मिक पर्यटन. दीवचा किनारा पर्यटनासाठी आहे. तिथून वेरावळ - सोमनाथ आहे. पण धार्मिक महत्त्व आणि मासेमारी. दमणचा किनारा काळा आहे. मासेमारी बोटींच्या डिझेलमुळे. जवळचा परिसर दारूबार आणि इतर इलेक्ट्रॉनिक्स मार्केटसाठी पूर्वी प्रसिद्ध होता. आता त्याचे महत्त्व उरले नाही. तरीही दमण- वापी- दादरा नगरहवेली- खानवेल ( गार्डन्स) अशी सहल होऊ शकते. द्वारका पोरबंदर समुद्र -धार्मिक पर्यटन अंकलेश्वर/अंकलेसर भरूच हे नर्मदा पर्यटनामुळे चर्चेत असते. गुजरात - महाराष्ट्र सीमेजवळचे डहाणू आणि बोर्डी येथे हॉटेल्स खूप आहेत. डहाणू-जव्हार- त्र्यंबकेश्वर -नाशिक - सापूतारा असाही सहल प्लान होऊ शकतो. गुजरात समुद्र किनारे थंडीतच ठीक. गरमा फार असतो. काही ठिकाणी रात्री चमकणाऱ्या लाटा दिसतात. मुंबई पुणे पर्यटकांसाठी कोकण, गोवा, कर्नाटक समुद्रच बरा.

In reply to by कंजूस

गवि Fri, 01/03/2025 - 14:19
दमण- वापी- दादरा नगरहवेली- खानवेल ( गार्डन्स) अशी सहल होऊ शकते.
दमण किनारे घाणेरडे. केमिकल आणि वास. अस्वच्छ. हल्ली काही भाग बांधून चौपाटी केली आहे असे ऐकले पण एकूण समुद्र घाण. खूप इंडस्ट्रीज. सिल्वासा कंटाळवाणे. सर्वसाधारण लहान शहर. उन्हाळ्यात तर अगदी नदी देखील कोरडी. तिथली वाटेतली लायन सफारी केविलवाणी. सापुतारा वगैरे हिल स्टेशन हा अधिक चांगला ऑप्शन आहे त्यापेक्षा.

In reply to by प्रचेतस

गवि Fri, 01/03/2025 - 15:50
आधी मद्य पिऊन मग कोणत्याही मार्केटमध्ये फिरायला मजाच येते. किंबहुना काळ्या समुद्रावर फिरायला देखील मजाच येते. :))

In reply to by प्रचेतस

गवि Fri, 01/03/2025 - 16:00
तुमच्या इतका जोरकस, प्रगाढ, वादळी, पावसाळी, ओलाकंच, इंटेंस अनुभव नसला तरी प्रवासाचा अंमळ थोडासा अनुभव आहे इतकंच..

In reply to by प्रचेतस

गवि Fri, 01/03/2025 - 16:09
सळसळत्या वाऱ्याने एखादा प्राजक्त थरथरावा आणि खालून जाणाऱ्या आपल्या तापल्या अंगावर गार दवबिंदूंचा पडलेला पाऊस हृदयाचे मधलेच चार ठोके चोरून जावा तशी अवस्था झालेली दिसते त्या आठवणींनी.

In reply to by गवि

प्रचेतस Fri, 01/03/2025 - 17:24
हो ना. अगदीच मोरपिशी अवस्था. बाकी तुमचे अनुभवही ह्याबाबतीत दांडगेच असणार म्हणा हे तुमच्या तरल शब्दांनी सहजच स्पष्ट होते.

In reply to by गवि

टर्मीनेटर Fri, 01/03/2025 - 16:55
वरच्या वाक्यात
"आधी मद्य पिऊन मग कोणत्याही मार्केटमध्ये फिरायला मजाच येते."
असे 'कोणत्याही मार्केटमध्ये' हे दोन शब्द ठळक करायचे राहुन गेले काय 😀 नीळा, हिरवा, पिवळा, तांबडाच काय पण 'मृत' समुद्रही जर कौतुकास पात्र ठरत असतील तर बिचाऱ्या 'काळ्या' समुद्राने असे काय कोणाचे घोडे मारले आहे? ('काळ्याशार' गोष्टीही आकर्षक असु शकतात 😉) तेव्हा घ्यावी की त्याच्यावरही फिरायची मजा 😂 बाकी 'काळ्या' वरुन सहज सुचलं म्हणून... काला रे सइयां काला रे तन काला रे मन काला रे काली जबान की काली गारी काले दिन की काली शामें सइयां करते जी कोल् बाज़ारी काला रे सइयां काला रे तन् काला रे मन काला रे काली जबान की काली गारी काले दिन की काली शामें सइयां करते जी कोल् बाज़ारी बैरी कोल् कोल् कोल् छीने तोल तोल तोल बैरी कोल् कोल् छीने तोल तोल तोल छत आँगन चार दिवारी सइयां करते जी सइयां करते जी सइयां करते जी सइयां करते जी सइयां करते जी कोल् बाज़ारी सइयां करते जी कोल् बाज़ारी काली मिटटी कुत्ता काला काला बिलकुल सुर्मे वाला काला कौवा हौवा काला काली मिटटी कुत्ता काला काला बिलकुल सुर्मे वाला काला कौवा हौवा काला काला बादल गिरने वाला काला मोती गिरने वाला काला झंडा डण्डा कला काला बटवा पैसा काला काली आँखों जैसा काला काली अग्नि काली गर्मी सूरज काला काला बीघा और गज काला काली हाथी हाथी काला काला बैरी कोल् कोल् कोल् छीने तोल तोल तोल बैरी कोल् कोल् छीने होल से टोल रंग पानी और पिचकारी सइयां करते जी पिया करते जी सइयां करते पिया करते जी काला रे सइयां काला रे तन काला रे मन्न काला रे काली जबान की काली गारी काले दिन की काली शामें सइयां करते जी कोल् बाज़ारी काला रे सइयां काला रे तन काला रे मन्न काला रे काली जबान की काली गारी काले दिन की काली शामें सइयां करते जी कोल् बाज़ारी. स्नेहा खानवलकर ह्या गुणी संगीत दिग्दर्शिकेने संगीतबद्ध केलेल्या 'गँग्स ऑफ वासेपूर २' मधल्या काला रे ह्या गाण्यात गीतकार वरुण ग्रोवर ह्यांनी इतक्या काळ्या गोष्टींचा उल्लेख केलाय, पण बिचारा 'काळा समुद्र' मात्र त्यात घ्यायचा राहून गेला बघा... 😎

In reply to by गवि

कंजूस Fri, 01/03/2025 - 14:46
खरंतर गुजरातला समुद्र पर्यटनाला जाऊच नये. औद्योगिकरणावर गुजरातने खूप भर दिला. नवसारीपासून पुढे वरती. मुंबई बाजारपेठ जवळ पडते. सापुतारा जरी महाराष्ट्रातील पर्यटकांना आवडत असले ( नाशिक जवळ) तरी गुजरातींना आवडत नाही. त्यांचे आवडते माथेरान महाबळेश्वर पाचगणी. मुंबई पुण्याला जवळची ठिकाणं पाहून झाल्यावर जरा बदल म्हणून दुसरीकडे काही आहे का याची चाचपणी करतात. पालघरच्य पश्चिमेला दहा किमीवर केळवे माहिम किनारा आहे. पालघर -मनोर - विक्रमगड- जव्हार- त्र्यंबकेश्वर - नाशिक या वाटेवर हल्ली 'गोवर्धन इको विलेज' मिनी वृंदावन ( इस्कॉनवाल्यांचं) हल्ली लोकप्रिय होत आहे. या मार्गावर बरीच रिसॉर्ट झाली आहेत. जव्हार मोखाडा भागातील वारली चित्रकला कमी होत आहे किंवा बाजारू होत आहे असं ऐकून आहे. सहलीच्या आराखड्यात/ मार्गावर चार पाच ठिकाणे असणे फायद्याचं ठरतं . एखादं नाही आवडलं कुणाला तर दुसरं सहल यशस्वी करतं.

In reply to by कंजूस

गवि Fri, 01/03/2025 - 15:54
केळवे किनारा तर लोकांनी घाणीने कचऱ्याने भरून टाकलेला दिसला. अगदी गेल्या वर्षात काही बदल झाला असेल तर माहीत नाही. लोक तिथे पिकनिक सारखा कार्यक्रम करून, बसून खाऊन प्लास्टिक प्लेट्स, खरकटे, उर्वरित अन्न असे सर्व जागीच टाकून उठत होते. किनाऱ्यावर हागणदारी होती. पार्किंग शुल्क किंवा तत्सम शुल्क वगैरे वसुली अवश्य होत होती पण स्वच्छतेच्या दृष्टीने काही दिसले नाही. पेड टॉयलेट होते. तेही अस्वच्छ. आपले सामान्य नागरिक देखील एकूण स्वच्छतेचा सेन्स कमी असलेले आहेत असेच वाटते सगळीकडे.

In reply to by गवि

कंजूस Fri, 01/03/2025 - 16:24
हं. नवीन अपडेट्स लक्षात ठेवायला हवेत. बाकी प्रचेतसकुमार चांगल्या जागा शोधतात. पण काहीच उघड करतात. BNHS वालेही चांगल्या जागा सांगत सुटत नाहीत. फेसबुकाच्या भिंती भरल्या की लोंढे तिकडेच जातात. राजमाची, कास पठार, सांधण, हरिहर.

टर्मीनेटर Fri, 01/03/2025 - 17:47
आपल्या सर्वांच्या माहितीतले मिपाकर लेखक 'कुमार१' हे काही कामानिमित्त मुंबईला येणार आहेत. त्या निमित्ताने सोमवार दिनांक ६ जानेवारी २०२५ रोजी संध्याकाळी ६ नंतर भायखळा येथे एक मिपा कट्टा करण्याचे ठरत आहे. सोमवारचा, म्हणजे कामकाजाचा दिवस असल्याने फार लांबुन कोणी येऊ शकणार नाहीत ह्याची कल्पना असल्यामुळे 'कट्ट्यासाठी' वेगळा धागा वगैरे काढलेला नाही, परंतु भायखळा परिसरात किंवा मुंबई उपनगरांत रहाणारे कोणी मिपाकर येऊ शकत असतील तर त्यांचे सहर्ष स्वागत आहे. (केवळ एकमेकांची सदिच्छा भेट आणि गप्पा-टप्पांचा कार्यक्रम एवढाच ह्या कट्ट्याचा मुळ उद्देश आहे 😀)

In reply to by टर्मीनेटर

कंजूस Fri, 01/03/2025 - 18:16
मुंबईत मिपाकर मोजून तीन चारच असतील. आणि त्यातून राणीबाग फुले प्रदर्शनाचे निमित्त साधले तर उत्तम.

In reply to by कंजूस

विजुभाऊ Sun, 01/05/2025 - 15:09
मुंबईत ( ठाणे डोंबिवली धरुन) किमान तीस एक मिपाकर सहज असतील. रामदास , शँपेन , क्लिंटन, प्रभू मास्तर , साक्षी , ज्योति अळवणी , मदनबाण असे बरेच आहेत.

In reply to by टर्मीनेटर

Bhakti Sat, 01/04/2025 - 11:34
कुमार १ आता मिपावर का लिहित नाही.त्यांना नक्की सांगा की तुमचे अभ्यासपूर्ण लेख मिपावर देत जा.

In reply to by टर्मीनेटर

Nitin Palkar Mon, 01/06/2025 - 08:18
या कट्ट्याला येतो असे कुमार१ यांना बोललो होतो. अचानक महत्वाचे काम निघाल्यामुळे येऊ शकत नाही. लवकरच पुन्हा असा योग येवो.

Bhakti Sat, 01/04/2025 - 11:43
आणि आजोबा परत जिवंत झाले! ;) लाखातून एखादा व्यक्ती इतका नशीबवान असू शकतो.हार्ट ॲटॅकमुळे मृत घोषित केलेल्या आजोबांचे शव रूग्णवाहिकेतून घरी नेताना रस्त्यावरील खड्ड्यांच्या धक्क्यामुळे आजोबांचे ह्रदय पुन्हा चालू झाले असावे.कारण नातवाला नंतर त्यांच्या हाताच्या बोटांची हालचाल दिसली.मग पुढील उपचाराला परत दुसऱ्या दवाखान्यात नेले.तर आजोबांच्या ह्रदयाचे ठोके दिसले. देव तारी त्याला कोण मारी... https://youtu.be/Y5Ap-dknaww?si=Ezn1IIWLjspCJ5Sl

In reply to by Bhakti

चौथा कोनाडा Sun, 01/05/2025 - 20:10
या घटनेची नोंद घेत महाराष्ट्राच्या आरोग्य खात्याने सदर खड्ड्याचे मोजमाप करून तशाच प्रकारचे खड्डे विविध रस्त्यांवर पाडण्याचे नियोजन केलेले आहे. या खड्डा इफेक्टमुळे सीपीआर ची प्रोसिजर कालबाह्य होऊ शकते असे माझी आरोग्य सचिव माननीय डॉक्टर चंगावडकर श्रीपाद यांनी प्रतिपादित केले ! या नियोजित खड्ड्यांच्या कंत्राटांवरून आत्ताच वाद सुरू झालाय ! राजकीय नेते श्री अमुक प्रमुख यांनी या कंत्राटात बावीस कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला. आणि या प्रकरणाची चौकशी करावी अशी मागणी माननीय मुख्यमंत्री यांच्याकडे केली.

कंजूस Sun, 01/05/2025 - 10:24
माथेरानमध्ये पर्यटक घोड्यावर बसून जात आहेत, काही जण मिनी ट्रेन पाहात आहेत, माकडे पर्यटकांच्या खाऊच्या पिशव्या हिसकावून घेत आहेत अशा माहितीवर Chatgpt ने काढलेलं चित्र.image थोड्या चुका आहेत, अर्धवट कापली गेली आहेत दृष्य. तरी ठीकच.

कंजूस Mon, 02/24/2025 - 00:28
उन्हाळी भटकंती. काल एक भटकंती केली. खंडाळा घाटासाठी रेल्वे जिथून पळसधरी स्टेशनानंतर वर चढते त्या पहिल्या डोंगरात आहे सोनगिरी. ( मुंबईतील तरुण नवख्या ट्रेकरांचा पावसाळ्यातला आवडता ट्रेक. आणखी एक सोंडाई डोंगर माथेरानच्या चौक पाॅइंटच्या खाली आहे.) उन्हाळा सुरू झाला आहे, रान वाळले आहे तरी दुपारी बारा ते पाच तळापासून माथ्यापर्यंत (५०० मिटर्स) अतोनात डास होते. शांतपणे बसून डबासुद्धा खाता आला नाही. या उलट मागचाच डोंगर राजमाचीचा. तिथे कधीच कुठेही डास नसतात. हे असं का?

कंजूस Wed, 03/12/2025 - 10:38
वेरूळ दहाव्या लेण्यात किरणोत्सव..... लोकसत्ता बातमी. https://youtu.be/2xX1I0EUcNk?si=Q7AHHpInuRYAN6Zc असा दिसत असला तरी त्यासाठी लेण्या तशा बांधलेल्या नसाव्यात. वेरूळ लेण्या बहुशा पश्चिमाभिमुख आहेत त्यामुळे दुपारी वर्षातून दोनवेळा किरण आतापर्यंत येत असणारच. आपली देवळं मुद्दामहून पूर्वाभिमुख बांधतात. काही पश्चिम दिशेला तोंड करून. तसं लेण्यांचं नाही. बौद्ध भिक्कुंना पावसाळ्यात विश्रांतीसाठी विहार आणि लेणी आणि चैत्य बांधण्यात ( खोदण्यात) आले होते. मूळ उद्देश हा होता.

कंजूस Wed, 03/12/2025 - 10:56
विमान परत फिरवणे.... मागच्या आठवड्यात एक शिकागो ते दिल्ली विमान टॉयलेट्स तुंबल्याने परत शिकागोला नेले. https://youtu.be/ZQemz_Enpxc?si=w1SuHw86alXZ6IiW उड्डाणाचे फक्त चार तास उरले होते. मग वाटेत कुठे emergency landing या कामासाठी मिळत नसावेत का? किंवा ते देश अशि सर्विस देत नसतील?

कंजूस Wed, 03/19/2025 - 18:32
माथेरान कालपासून बंद. टॅक्सी, इ रिक्षा आणि घोडे वाले संपावर. कारण काय तर म्हणे पर्यटकांची फसवणूक करणारे विडिओ यूट्यूबवर आले. खरं कारण ... खाजगी वाहनाने येणारे पर्यटक वाढले आणि ते दस्तुरी नाक्यावरून शटल टॉय ट्रेन किंवा इ रिक्षांनी माथेरानच्या बाजार पर्यंत जातात. ते आठवड्यात कोणत्याही दिवशी येऊन जातात. हमाल, हॉटेल्स आणि घोडेवाल्यांचा धंधा जोरात चालतो. इ रिक्षा दहा आहेत. फक्त सुट्ट्या लागल्यावर येणारे पर्यटकच टॅक्सी घेतात. एकूण काय तर २७० टॅक्सी वाल्यांना धंधा मिळत नाही पण पर्यटक खूप येतात. नेरळ ते दस्तुरी नाका जाणारी एसटी मिनीबस ( पंचवीस रुपयांत) हीसुद्धा पोटदुखी आहे. फसवणूक टॅक्सीवालेच करतात. खाजगी कार्यालयांना " आमच्या टॅक्सी नेच जा असा हेका धरतात किंवा पाचशे रुपये द्या असा दम भरतात. काही शहाणे टॅक्सी वाल्यांनी मात्र पन्नास रु सीटने धंधा सुरू ठेवला आहे. ( अधिकृत भाडे शंभर रु प्रती प्रवासी असे चारांचे चारशे रुपये घेतात. किंवा पूर्ण टॅक्सी खिडकीवर जाऊन बुक केल्यास ३६० रुपये लागतात. आता प्रश्न असा आहे की टॅक्सीवाले आठवड्याच्या इतर दिवशी ओला/ उबेर/ वगैरेंनी संबंध का ठेवत नाहीत. कारण या साईट्स " मारुती इको" वाहन नको सांगतात. सर्व माथेरान टॅक्स्या याच प्रकारच्या आहेत.

In reply to by कंजूस

चौथा कोनाडा गुरुवार, 03/20/2025 - 20:29
खासगी करण : वरच्या पातळीवर अदानी- अंबानी खालच्या पातळी छोटेआका, बडेआका अणि अन असे कार्यकर्ते म्हणवणारे खंडणीकार्यकर्ते

वामन देशमुख Fri, 03/21/2025 - 13:10
माझा कालचा WhatsApp Status SohalLalTeaTime #LifeIsFunWithFriends&SohanlalTea ☕
एका जिवलगाचा प्रतिसाद -
चहा आणी आणी ते सुद्धा संध्याकाळी 7 नंतर! उन लागलं की काय वामन तुला ? काळजी घे बाबा.
माझे उत्तर - हमारे तेलंगाणा के लोओंका मालूम नै तुमारकू? सुब्बे उट्टे जब से रात को सोने तलक कब्बी बी चायाँ पीने कू रेडीच रैतें। कल क्या वा मालूम? हमारे संजय बावा होर उनके इनो आये थे हमारे इधर म्हाराष्ट्रा सें । फिर Abits कु जाने के प्लानाँ बनायें। तो मैं बोलूं, चलो बावा, कैसे बी उदर जारैं । तो व्हांपे सोहनलाल की चाय भोत सईं रैती, दूर दूर से लोआं आते पीनेकू। पीते, तुम्म? तो उनो बोले, तुम इत्ता बोलरे तो कैकु नै पीते वामन राव? फिर हम, हमारे इनो, बावा, बावा के इनो ऐसे चार जणां गए चायाँ पीनेकू। अब तुमारकू तो मालूमिच हैं, वो चायाँ वायाँ पीने के शौकां तो अपुन नै पालते। फिर वो तीन जणां चायाँ पिए। भोत अच्चे है चायाँ बोले। बोलके मई स्टेटसां लगायूँ।

वामन देशमुख Wed, 04/30/2025 - 10:55
अक्षय्य तृतीयेनिमित्त घराजवळच्या श्री वेंकटेश्वर स्वामी (बालाजी) मंदिरात सपत्नीक गेलो होतो. घरी आंब्याची पाने-झेंडूची फुले यांची तोरणे, देवांना ताजे हार,फुले, यथासांग पूजा, विशेष नैवेद्य हे झाले. गोडधोड जेवण आहे. श्री कृपेने प्रसन्न वाटते आहे. गोविंदा गोविंदा गोऽविंदा!

In reply to by कंजूस

वामन देशमुख Wed, 04/30/2025 - 15:56
मेहकरचा बालाजी?
मी हैदराबादला राहतो. घराजवळच्या (आम्ही लोकांनी बांधलेल्या) देवळात गेलो होतो.‌ यापूर्वी मेहकरच्या बालाजी मंदिरात गेलेलो आहे.‌ तेथील बालाजीची मूर्ती खूप उंच आहे. बहुधा भारतभरातील सर्वात उंच मूर्ती असावी.

वामन देशमुख Fri, 05/09/2025 - 13:44
श्रीगुरुजी हा आइडी बॅन केल्याबद्दल मी तीव्र निषेध व्यक्त करतो. ज्या मोजक्या मिपाखरांमुळे मिसळपाववर वाचक येतात त्यांच्यापैकी एक हे श्रीगुरुजी होते.‌ हे लिहिण्याचा अधिकार मला आहे व हे लिहिल्यामुळे माझाच आइडी बॅन होणार नाही ही अपेक्षा. जय हिंद. --- हे मी खरडफळ्यावरही लिहिलं होतं; कायमची नोंद राहावी म्हणून इथे पुन्हा लिहीत आहे.

In reply to by वामन देशमुख

मारवा Fri, 05/09/2025 - 13:54
श्रीगुरुजी हे अनेकवेळा अभ्यासपूर्ण संदर्भासहित मांडणीणकरात होते हे खरे आहे. काहीवेळा मतभेद असले तरी जेबकी स्वाभाविक आहे तरी त्यांची एकूण मांडणी व चर्चेला योगदान चांगलेच होते यात शंका नाही अनेकदा माहीत नसलेले संदर्भ त्यांच्यामुळे माहिती होत होते. मात्र वामनराव त्यांची भाषेची मर्यादा भंगलेली होती असेही दिसून येते. त्यासाठी त्यांना समज देऊन संधी द्यायला हवी होती असेच अमरेंद्र बाहुबली यांना देखील संधिं द्यायाला हवी होती. असे उत्साहाने हिरीरीने चर्चा करणारे गेले तर त्याचे मला तरी नक्कीच वाईट वाटतें

चित्रगुप्त Sun, 12/22/2024 - 05:35
येत्या फेब्रुवारी ११-२० मी पुण्यात मुक्कामास असेन, त्या दरम्यान कट्टा करुया का ? (फक्त १६ तारीख सोडून. त्या दिवशी एका लग्नात उपस्थिती लावयची आहे)

In reply to by चित्रगुप्त

मुक्त विहारि Sun, 12/22/2024 - 10:42
सध्या आमचे भ्रमण फक्त ६ फूट बाय ३ फूट इतपतच मर्यादित असल्याने, माझ्या घरीच कट्टा करू शकतो.

In reply to by मुक्त विहारि

काळजी घ्या मुवि. हाडाचे दुखणे म्हणजे वेळखाऊ दुखणे असते. काहीही झाले तरी मुळातले दुखणे आणि मग फिजिओथेरपी वगैरे प्रकार मिळून अडीच-तीन महिने जातातच. मी पण तो अनुभव घेतला आहे. पण त्या काळात मिपावर पूर्णवेळ पडीक राहून वेळेचा सदुपयोग केला होता :)

Bhakti Sun, 12/22/2024 - 21:15
पुणे बुक फेस्टिवल २०२४ अ आ १४ डिसेंबरपासून सुरू झालेल्या पुणे बुक फेस्टिवलचा आज २२ डिसेंबर शेवटचा दिवस होता.कामाचं आठवडा नियोजन पूर्ण फुल्ल असल्याने आजचाच दिवस या फेस्टिव्हलमध्ये येण्यासाठी मिळाला.खरोखर पुस्तक प्रेमींसाठी ही एक अनोखी पंढरी फर्ग्युसन महाविद्यालयात अवतरली होती.जवळपास २५० पेक्षा अधिक प्रकाशकांचे बुक स्टॉल येथे उपलब्ध होते.फर्ग्युसन महाविद्यालयात प्रवेश करताच पुस्तक वाचण्यात मग्न अनेक भव्य प्रतिकृती ठराविक अंतरावर होत्या.पुस्तकांच्या आकाराच्या प्रतिकृतींची सजावट मार्गावर होती.अंम्पी थिअटरात अनेक कार्यक्रमांचीही रेलचेल होती.पुढे सर्वप्रथम भारतीय संविधानाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त पुस्तकरूपी "संविधान प्रतिकृती ९.९४ मीटर जिचा गिनीज बुक मध्ये समावेश करण्यात आला आहे, ती पाहिली.मग त्या भव्य प्रांगणात आलो जिथे फेस्टिव्हल भरले होते.इथे पंतप्रधान मोदी, मुख्यमंत्री फडणवीस यांचे आउटलेट छायाचित्रं काढण्यासाठी होते. आत गेल्यावर अनेक प्रसिद्ध प्रकाशनाची पुस्तके पाहून खूप आनंद झाला.इतकी पुस्तक पाहून कोणती घेऊ कोणती नको असं झालं. पहिल्याच पुस्तकाच्या स्टॉलवर पुस्तक पाहत चाळत होते.दुसऱ्या ठिकाणी हेच ,वेळेचे बंधन नसल्याने माझा नवरा आणि मुलगी मला टाटा करून पुढे निघून गेले.अनेक पुस्तकं जी नगरात पाहायलाही मिळत नाही ती जवळपास सर्वच पाहिली.इंग्रजी पुस्तकेही बरीच होती,तिथे गर्दीही भरपूर होती.मी प्रामुख्याने गीतारहस्य(लोकमान्य टिळक) पुस्त,पैशाचे मानसशास्त्र(मराठी , इंग्रजी दोन्ही भाषेत घेतले),हस्ताचा पाऊस(माडगूळकर),ज्ञानदेवा तिथे समाधी(राहूल देशपांडे), संस्कृती (इरावती कर्वे) , बिझिनेस महाराजा इत्यादी पुस्तके घेतली.थोड्या वेळाने लेकीची परत भेट झाली .तीला देखील पुस्तकांची गोडी निर्माण व्हावी म्हणून मुद्दामाहून आणले होते.ते सफलही झाले कारण घरी असलेली अनेक पुस्तके तिने ओळखून "आई हे आपल्या घरी हे पुस्तक आहे" असं सांगितलं :).रा.चि.ढेरे, कुरुंदकर ,इरावती कर्वे अशा अनेक आवडत्या लेखकांची सर्व अज्ञात पुस्तकेही पाहायला मिळाली.इथे सातवाहन गाथा सप्तशती पाहायला मिळाले.पण आता खुप उशीर झाला होता १२-४ असा वेळ इथे होते.एक तरी लेखक भेटतील अशी आशा होती पण ते घडलं नाही. फर्ग्युसन महाविद्यालय पाहत फिरत बाहेर आले.बाप लेकीने आधीच पोटोबा फुल्ल केला होता.जवळच वैशाली,वाडेश्वर आहे हे माहिती होतं.पण खूप दमलो होतो समोर ' रौनक' पावभाजी होती तिथेच गेलो.मस्त झाडांच्या सावलीत टेबल होते.पुण्यातलं पहिले १९६७ साली पावभाजीचे हे रेस्तराँ आहे असं तिथे लिहिले होते.पुण्याची पावभाजी तिखट नसणार म्हणून त्यांना तिखट द्या असं मुद्दामहूनच सांगितले.खुपच सुंदर सजवलेली (प्रेझेंटेशन)पावभाजी आणि बरोबर तिखट लसूण आलं सरबरीत चटणी,तिखटातला चिरलेला कांदा बरोबर आला.इतकी छान सर्व्हिस पाहून छान वाटलं.पुण्यात गोष्टींची 'गुणवत्ता' हाच महत्त्वाचा निकष परत दिसला.एफसी रोडवर जरा फेर फाटका मारून परत घरी निघालो. ई उ क च थ

In reply to by Bhakti

रामचंद्र Mon, 12/23/2024 - 22:05
वाचन ही शांत वातावरणात चालणारी प्रक्रिया आहे याचे थोडेसुद्धा भान आयोजकांना नसावे याचे वाईट वाटले. संध्याकाळच्या वेळेस तिथं जावं तर तिथंच चाललेल्या संगीताच्या कार्यक्रमामुळं कानठळ्या बसत होत्या. अर्थात एकंदरीतच आयोजनाच्या बाबतीत उत्सवी वातावरणात वाचनसंस्कृतीचे भान ठेवून शांत वातावरण, डोळ्याला त्रासदायक होणारा प्रखर प्रकाश टाळणे अशा गोष्टींची अपेक्षा करणं जरा जास्तच होतं याची पुरेशी जाणीव झाली आहे. बाकी हिंदी पुस्तकांच्या तसेच मराठवाड्यातल्या, तितकेसे प्रसिद्ध नसलेल्या स्टॉलवरही वेगळी, वाचनीय पुस्तकं पहायला मिळाली याचा आनंद आहे.

In reply to by Bhakti

Bhakti Fri, 03/21/2025 - 22:45
वाचाल तर आनंदी होणार अ सकाळ पुस्तक महोत्सव २०२५, अहिल्यानगर. पुणे बुक फेस्टिवलच्या धर्तीवर अगदी भव्य नाही पण बरेचसे मोठे , चांगली पुस्तके असणारे पुस्तक महोत्सव नगरमध्ये २१-२४ मार्च दरम्यान भरले आहे.पुढचे काही दिवस व्यस्त असल्यामुळे आजच फेरफटका मारला. नेहमीप्रमाणे पुस्तकाच्या दुकानात,प्रदर्शनात मला वेळेचे भान उरत नाही.तेव्हा तू एकटीच जा असं घरून सांगण्यात आले,फक्त मोबाईलची बॅटरी संपायच्या आधी घरी ये असंही सुनावण्यात आले. लोकप्रिय साहित्यिकांची पुस्तके ऑनलाईन सहज मिळतातं पण अशा प्रदर्शनात नवे पुस्तक समजतात.पुस्तकांना हातात घेऊन,पाने चाळत, अनुक्रमणिका पाहत ते पुस्तक घेणं निराळं सुखच असते. कादंबरी मी वाचनालयातून मिळालेल्या पुस्तकांतून वाचते. तेव्हा संस्कृती, अध्यात्मिक, वैज्ञानिक, समाजजीवन, निसर्ग,इतिहास,भटकंती विषयांची पुस्तके घेण्याकडे कल असतो. तरीही आनंद नाडकर्णी, ग्रेस, अच्युत गोडबोले,जयवंत दळवी,नरहर कुरुंदकर,नरेंद्र दाभोळकर यांची काही पुस्तके हेरुन ठेवली आहेत,लवकरच घेईन. मी घेतलेली अनवट पुस्तके- १.येई परतुनी ज्ञानेश्वरा' आज मला नवीन लेखक समजले डॉ.रा.श्री.मोरवंचीकर डॉ. रा. श्री. मोरवंचीकर आजही ज्ञानदानाच्या पवित्र कार्यात अखंड नंदादीपासम तेवत आहेत. त्यांनी 'येई परतुनी ज्ञानेश्वरा' हा मराठी लोकमानसाच्या जिव्हाळ्याचा ग्रंथ अध्यायनिहाय अनेक अंगांनी उलगडला आहे. त्यातील सचित्र ओव्यांचे मार्मिकपणे केलेले निरूपण पाहून त्यांच्या ज्ञानेश्वरांप्रती असलेल्या उत्कट प्रेमाचा अनुभव दिसतो. २.निसर्गायण दुसरे नव्याने समजलेले लेखक निसर्ग आणि विकास अभ्यासक दिलीप कुलकर्णी . पर्यावरणाची समस्या ही अशा प्रकारे बाह्य निसर्गातील असली, तरी तिचं मूळ आहे आपल्या मनोवृत्तीत -आपल्या विचारांत. आपली भोगवादी वृत्ती, हाव, आक्रमकता ही या समस्येला कारणीभूत आहे आणि केवळ ही एकच नव्हे, तर शस्त्रस्पर्धा, दुर्बलांवरचे अत्याचार, गुन्हेगारी, व्यसनाधीनता, मानसिक तणाव, स्वैराचार अशा अनेक समस्या त्याच मनोवृत्तीमुळे आपल्यासमोर उभ्या ठाकल्या आहेत.आधुनिक पाश्चात्त्य विज्ञान आणि प्राचीन पौर्वात्य तत्त्वज्ञान यांच्या आधारे या बदलाची दिशा शोधणारं हे पुस्तक. ३. थर्ड ॲंगल हे छोटेखानी पुस्तक हटके विषयावर म्हणजे ' थिअरॉटिकल मित्राने प्रॅक्टिकल क्लबमध्ये केलेली भाषणे एक वैचारिक अनोखा अनुभव आहे. मनाची नित्य नाव पुस्तकाच्या पानांनी वल्हवली जातात मग आयुष्याचा भवसिंधु सहज तरुन जातो ज्ञान सागराची ओढ अजुनच सहज पूर्ण होते... -भक्ती

कंजूस Mon, 12/23/2024 - 06:56
अरे वा! पुस्तक प्रदर्शन गाजलं. आता दरवर्षी होईल. तुमच्या मुलीसाठी पर्वणीच. ( आउटलेट छायाचित्रं काढण्यासाठी होते.= कटाउटस) फार पूर्वी मुंबईत (आझाद मैदान) आणि दिल्लीत ( प्रगती मैदान) येथे मोठे पुस्तक प्रदर्शन आलटून पालटून एक वर्षाआड होत असे. नंतर मुंबईतील बंदच झाले. मग छत्रपती टर्मिनस जवळचा खाजगी बुक स्टॉल आशिष दरवर्षी प्रदर्शन भरवून लागला सुंदराबाई हॉलमध्ये. पण मराठी पुस्तके नसत ( ती साहित्य संमेलनांत अधिक). अक्षर वाङमय यांनी काही वर्षे प्रदर्शने भरवली. माझ्या दृष्टीने पुस्तकं चाळायला मिळणे महत्त्वाचे कारण विकत घेत नाही. विकत आणून नंतर करायचे काय हा प्रश्न असतो. तरी भाषा शिकण्यासाठीची पुस्तके घेतो ती संग्रही आणि संदर्भासाठी कायम लागतात. स्थानिक नगरवाचनालयात काही वाचायला मिळतात. पण मोठी बाडं कधीच येत नाहीत. स्थानिक प्रकाशकांनी एक होऊन एक कायमची तारीख किंवा आठवडा प्रदर्शन भरवण्यासाठी निश्चित केला तर वाचकांच्या कायम लक्षात राहील. उदाहरणार्थ डिसेंबरचा दुसरा आठवडा.

In reply to by कंजूस

Bhakti Mon, 12/23/2024 - 08:15
सॉरी,माझी भयानक डिक्शनरी ;) =)(कटआऊट)
माझ्या दृष्टीने पुस्तकं चाळायला मिळणे महत्त्वाचे कारण विकत घेत नाही. विकत आणून नंतर करायचे काय हा प्रश्न असतो. तरी भाषा शिकण्यासाठीची पुस्तके घेतो ती संग्रही आणि संदर्भासाठी कायम लागतात.
खरं आहे,अशा मोठ्या प्रदर्शनात खुप पुस्तकं पाहायला ,चाळायला मिळतात हे महत्त्वाचे.माझा पुस्तक घेण्यासाठी हव्यास होता त्यामुळे बजेट संपल्यावर पुस्तक फक्त पाहण्याचं ऑड वाटू लागले.पुढच्यावेळी जरा याबाबत सतर्क राहीन ;) होय लेकीसाठी हळूहळू एम एच १२ केंद्रबिंदू (पर्वणी) तयार करणार आहे!

In reply to by Bhakti

मुक्त विहारि Mon, 12/23/2024 - 08:20
हे पुस्तकं खरेदी करण्यासाठी उत्तम ठिकाण आहे. आणि डोंबिवली हे केंद्रस्थानी असल्याने, डोंबिवली येथे उत्तम पुस्तके मिळतात.

In reply to by मुक्त विहारि

कर्नलतपस्वी Mon, 12/23/2024 - 09:41
बुकगंगा,अक्षरधारा,ॲमेझोन सारख्या संस्थळावर पुस्तके स्वस्त आणी घरपोच येतात. मागील वर्षापेक्षा या वर्षी अधिक चांगले प्रदर्शन होते.

श्रीरंग_जोशी Mon, 12/23/2024 - 10:18

In reply to by श्रीरंग_जोशी

अरेरे. उशीर झाला. पहिला प्याला बर्‍याच वर्षांपूर्वी पिऊन झाला आहे :(

In reply to by श्रीरंग_जोशी

कर्नलतपस्वी Mon, 12/23/2024 - 11:47
होळी, वजा तीस तापमान. शेवटचा प्याला मार्च १९९९,प्रसंग मारूती आठशे पहिली चार चाकी घेतली. व्यसनाधीन झालो का ?नाही, प्रत्येकाच्या इच्छाशक्ती वर आवलंबून. दारू पिली पाहीजे असे काही नाही. पण अती परिचयात अवाज्ञा तद्वत दारूला डोक्यावर चढवून नये. अर्थात माझे मत.

In reply to by कर्नलतपस्वी

कंजूस Mon, 12/23/2024 - 12:21
बरोबर. रोज थोडी थोडी घरीच घ्यावी म्हणजे त्यातली गंमत सामान्य होते. आणि कधी प्रसंगाप्रमाणे जे पितात भरपूर तसं होत नाही. कितीही कोणतेही दारूचे ब्रांड आले तरी बेसिकली अल्कोहोल अमुक टक्के यापलिकडे काही नाही. तांदुळाचेही तसेच आहे पंधरा रुपये ते सातशे पन्नास रुपये किलोचा असो त्यांचे पोषणमूल्य समानच असते. सगळे पॉलिश केलेलेच असतात. हातसडीचे कुठे मिळतात?

In reply to by कंजूस

कर्नलतपस्वी Mon, 12/23/2024 - 17:26
ये इंतजार गलत है के शाम हो जाये जो हो सके तो अभी दौर-ए-जाम हो जाये मुझ जैसे रिंद को भी तूने हश्र मे या रब बुला लीया है तो, कुछ इंतजाम हो जाये हुई महँगी बहत ही शराब, के थोड़ी-थोड़ी पिया करो पियो लेकिन रखो हिसाब, के थोड़ी-थोड़ी पिया करो

In reply to by कर्नलतपस्वी

कर्नलतपस्वी Mon, 12/23/2024 - 17:45
कौन कहता, अंगुर की बेटी गलत है अंगुरके दामाद को बस इसकी लत है इसके साथ कुछ गम गलत करता है तो बेरहम जमाने क्या जाता है,अगर... वो उसके साथ कुछ पल बिताता है

In reply to by श्रीरंग_जोशी

कंजूस Mon, 12/23/2024 - 12:23
सर्व विषे कमी प्रमाणात औषधेच असतात. अगदी तंबाखू, चहा, अफू,अर्सेनिक सुद्धा.

कंजूस Mon, 12/23/2024 - 12:39
आशिष बुक स्टॉल छत्रपती टर्मिनस जवळचा खाजगी बुक स्टॉल आशिष दरवर्षी प्रदर्शन भरवू लागला सुंदराबाई हॉलमध्ये. यांच्या पुस्तक प्रदर्शनात भेटी दिल्यावर एक लक्षात आलं की यामध्ये पुस्तके कोण घेतो. इंटिरिअर डेकोरेशनचा व्यवसाय करणारे मुंबईत बरेच आहेत. ते इकडे फिरतात. भरपूर रंगीत चित्र असलेली जाडजूड पुस्तके तिथे निम्म्या किंमतीत असतात. ती त्यांना हवी असतात नवनवीन फर्निचरच्या डिझाइनसाठी. शिवाय गार्डनिंग लेआउटचीही असतात. आर्किटेक्ट नाही पुस्तके लागतात. मोठ्या बास्केट घेऊन फिरतात आणि भराभर पुस्तके उचलतात. तरुण मुलं मुली इंग्रजी कादंबऱ्या विकत घेतात. काही महिला कुकींगची पुस्तके बघतात. आपण जी मराठी साहित्यातील कवितासंग्रह, कादंबऱ्या विकत घेतो त्याचा आनंद आठ दिवसांत संपतो. इतिहास,भाषा यांचे अभ्यासक पुस्तके घेतात ती त्यांच्या कामाची असतात. पण मग असा विचार येईल की वाचकांनी पुस्तके विकत घ्यावीत का? वाचनालयांनी घ्यावीत. म्हणजे महिन्याच्या फीमध्ये साहित्य वाचता येईल.

In reply to by कंजूस

मुक्त विहारि Mon, 12/23/2024 - 18:30
विना अनुदानित, वाचनालये आता ओस पडत चालली आहेत. डोंबिवली येथे एक फ्रेंड्स लायब्ररी सोडली तर बरीचशी वाचनालये बंद पडली आहेत. मानपाडा रोड वरील ३ वाचनालये, डोंबिवली पश्चिम येथील एक वाचनालय, midc मधील एक वाचनालय, ही काही ठळक उदाहरणे. रामनगर मधील एक वाचनालय आणि P ,& T मधील एक वाचनालय, फ्रेंड्स लायब्ररीच्या सहयोगाने चालतात. त्यापेक्षा पण भयावह स्थिती, अभ्यासक्रमा व्यतिरिक्त , पुस्तक विक्रेत्यांची आहे.... कालाय तस्मै नमः....

कंजूस Fri, 12/27/2024 - 06:03
गोवा पर्यटन/ कोकण/समुद्री पर्यटन गोरगावलेकर यांनी केलेल्या गोवा पर्यटनाचे धागे येत आहेत. त्यांचे अनुभव लिहित आहेत. तिसऱ्या भागात हिवाळी सहल, दक्षिण गोवा :भाग 3 : बटरफ्लाय बीच आणि लोलये-पैंगिण चे वेताळ गोवा आणि कोकण यांच्या पर्यटनाची तुलना फायदे तोटे यांची प्रतिसादांतून चर्चा फारच वाढली. ती इकडे करता येईल. धाग्यातली चर्चा इथे कॉपी पेस्ट करताही येईल पण तो त्या प्रतिसादकर्त्या लेखकांचा अधिकार आहे. मीही पूर्वी गोव्यावर एक धागा काढला होता ते आठवले. माझा समुद्र पर्यटन, खाणे पिणे वगैरेंचा आनंद फारच संकुचित आहे. तरी एकदा गोवा काय आहे म्हणून पाहण्यासाठी गेलो होतो. परतताना कुडाळहून( कोकण) आलो. एसटीचाच प्रवास त्यामुळे जमेल तेवढे पाहिले. गोव्याच्या पर्यटनाबद्दल ऐकले वाचलेले भारतातले आणि परदेशी पर्यटक इथे येतात. आनंद घेतात आणि पुन्हापुन्हा येतात. गर्दी वाढली की ट्रेनची तिकिटे मिळत नाहीत. विमान आणि हॉटेल्सचे भाडी दर वाढतात. परवडण्याच्या पलिकडे जातात. तरीही पसंती असते. कोकण ( महाराष्ट्रातला) याबद्दल श्री.ना. पेंडसे किंवा जयवंत दळवी किंवा इतर लेखकांच्या कथा कादंबऱ्यांतून मराठी वाचकांना माहीत झालेला असतो. तो खरंच कसा आहे हे पहाण्यासाठी ठाणे,रायगड, सिंधुदुर्ग जिल्हेसोडून उर्वरित महाराष्ट्रातील दूरच्या ठिकाणांहून पर्यटक येतात. त्यात किहीम, अलिबाग, श्रीवर्धन,हर्णे मुरुड, रत्नागिरी परिसर, देवगड, मालवण, देवबाग ही ठिकाणे येतात. कोकण आणि गोव्याप्रमाणेच कर्नाटकातील २६० किमी किनारपट्टीवरही कारवार,गोकर्ण, मुर्डेश्वर, उडुपी, मंगळुरू ही ठिकाणं आहेत. तीही पाहिली. हॉटेल्स(राहाणे आणि खाणे शाकाहारी तसेच मासाहारी), बसप्रवास यादृष्टीने फारच चांगल्या सोयी आहेत. शिवाय किनारपट्टीसोडून वरती घाट चढून गेल्यावरही अनेक सुंदर ठिकाणी जाता येतं. मार्चपर्यंत वाहणारे धबधबे आहेत. इथल्या लोकांना पर्यटक येण्याची सवय आहे. त्यांचा त्रास वाटत नाही . तुसडेपणा नाही. मला कर्नाटक पर्यटन फार आवडले आणि पुन्हा जावेसे वाटते. किनारे स्वच्छ चांगले आहेतच शिवाय नद्याही बारमाही पाणी वाहणाऱ्या आणि अतिशय स्वच्छ पाण्याच्या आहेत. नदीकिनारी जी धार्मिक स्थळे आहेत ती निसर्गसौंदर्याने अधिकच चांगली वाटतात. सह्याद्रीचा सुंदर निसर्ग पाहावा तर इथेच. उडुपी आणि मंगळुरू येथे समुद्र पर्यटन आणि मत्स्याहारही खूप प्रचलित आहे.

In reply to by कंजूस

गवि Fri, 12/27/2024 - 08:33
https://www.youtube.com/embed/Jhsq0fdiEq0 गोवा पर्यटन मंत्री यांची मुलाखत. ही सोशल मीडियावर सर्वत्र सुरू झालेली चर्चा हा चुकीच्या (चायनीज) आकडेवारीवर आधारित एक प्रोपागांडा आहे असे त्यांचे म्हणणे त्यांनी इथे मांडले आहे.

In reply to by कंजूस

गोरगावलेकर Fri, 12/27/2024 - 12:16
गोरगावलेकर यांनी केलेल्या गोवा पर्यटनाचे धागे येत आहेत. त्यांचे अनुभव लिहित आहेत. धाग्याच्या पहिल्या भागात आम्ही मडगाव स्टेशन ते कोलवा बीच पर्यंत प्रवास केला होता . स्टेशनच्या बाहेरच प्रीपेड टॅक्सी मिळाली . टॅक्सिवाल्यांचा कथित मुजोरपणा दिसला नाही . दुसऱ्या भागात कोलवा ते पाळोळे पर्यंत प्रवास केला . पर्यटन स्थळे बघत जात आम्ही जवळपास पूर्ण दिवस घेतला व त्यात पाच - पंचवीस किमी अंतर जास्त झाले त्याचे वाढीव पैसेही दिले . किती खर्च येतो हे कळावे इतकाच लिहिण्यामागचा उद्देश . आज कुठल्या शहरात स्विफ्ट डिझायरचे संपूर्ण दिवसासाठी ३ १ ० ० /- रुपये भाडे असेल ? ड्रायव्हरचा पगार , गाडीची देखभाल दुरुस्ती, इंधन खर्च जाऊन मालकाच्या हातात कितीसे पैसे जातील ? कोला बीचला जातांना अगदी ओबड धोबड रस्त्यावरून गाडी गेली . स्वत : ची गाडी नेतांनाही विचार करावा लागेल असा रस्ता . कुठलीही कुरकुर न करता शक्य होतील ती ठिकाणे दाखवली . येथेही गाडीवाल्यांचा कथित मुजोरपणा दिसला नाही .

In reply to by गोरगावलेकर

गवि Fri, 12/27/2024 - 13:15
मुजोर म्हणजे बोलण्यात अशा अर्थाने नसावं. पण अतिरिक्त मनाला येईल तितके पैसे मागणे हे अनेकदा घडते. पूर्ण दिवसाचे ३१०० इतकेच घेतले असतील तर तुम्हाला नशिबाने चांगले डील आणि व्यक्ती लाभली. एरवी कोपऱ्यावर सोडून यायचे सहाशे (हे उदाहरण मे २०२४ मधलं, ऑफ सिझन काळ. अंतर दोन ते तीन किमी. पार्किंग नसल्याने टॅक्सी मागवावी लागली होती.). नुसती चौकशी केली होती तेव्हा, दाभोळी एअरपोर्ट ते अगोंद वन वे नुसते ड्रॉप करण्याचे ऑफ सिझन २००० आणि सिझन मध्ये ३५०० ते ४०००. तुलनेसाठी असे पाहा की मुंबईहून गोव्याचे विमान तिकीट देखील कधी कधी याहून कमी असते. वार्का ते काबो द राम किल्ला आणि परत इतक्या अंतराचे हॉटेलशी संलग्न टॅक्सीवाल्यांनी सुमारे आठ वर्षांपूर्वी तीन हजार घेतले आणि वरून टिप मागितली. वाटेत कुठे थांबायला देखील तयार नव्हता. नव्वद टक्के वेळा मुंबईपासून स्वत:ची कारच घेऊन जाणे किंवा एअरपोर्टवर उतरताच पूर्ण मुक्कामाइतकी सेल्फ ड्राईव्ह कार घेणे हे दोन उपाय करून ही समस्या आता सोडवली आहे. बाय द वे, गोव्यातील स्थानिक लोक कोंकणी भाषेच्या सवयीनुसार एकेरीत अरेतुरे करत बोलतात आणि त्या स्टाईल मुळे काही वेळा बाहेरील लोकांना ते अशिष्ट उद्धट उगीचच वाटू शकतात.

In reply to by गवि

कंजूस Fri, 12/27/2024 - 14:58
सहमत. खाजगी वाहनाशिवाय तसेच भाड्याच्या वाहनाशिवाय जमेल तेवढे फिरणे आणि आनंद मानणे हेच आमचे ध्येय असते. त्यामुळे काही त्रास /संताप होत नाही. शेअरिंग साठी कुणाला तयार करणेही नाही. म्हणजे अगदीच घरी कॉटवर पाय हलवत गप्पा मारण्यापेक्षा चार ठिकाणं पाहाणे बरे या रुळावर आमची गाडी सुसाट धावते. शिवाय खरेदी करायची नाही हे ठरवूनच टाकले आहे. आमचा गाईड लोनली प्लानेट पुस्तक " India travel survival kit " - Tony Wheeler and others.

In reply to by गवि

टर्मीनेटर Sun, 12/29/2024 - 13:08
"पूर्ण दिवसाचे ३१०० इतकेच घेतले असतील तर तुम्हाला नशिबाने चांगले डील आणि व्यक्ती लाभली."
काशिनाथ नाडकर्णी : "तो कोकणांतला असला पाहिजे अंऽऽऽ..." कोचरेकर मास्तर : "पाहिलंत? पाहिलंत... माणुसकी नाही.. नाही म्हणतात ना?... ही घ्या माणुसकी! प्रवासात काय अनुभव येतील सांगता येत नाही. वास्तविक असल्या ह्या लोकांचे जाहीर सत्कारच करायला पाहिजेत. त्याचे नाव, नंबर वगैरे आपण टिपून घ्यायला पाहिजे होता नाही का..."
"एरवी कोपऱ्यावर सोडून यायचे सहाशे (हे उदाहरण मे २०२४ मधलं, ऑफ सिझन काळ. अंतर दोन ते तीन किमी. पार्किंग नसल्याने टॅक्सी मागवावी लागली होती.). नुसती चौकशी केली होती तेव्हा, दाभोळी एअरपोर्ट ते अगोंद वन वे नुसते ड्रॉप करण्याचे ऑफ सिझन २००० आणि सिझन मध्ये ३५०० ते ४०००."
सोकाजीनाना त्रिलोकेकर : "ए नाडकर्णी, बघ... बघ! बघ लेका तुझा कोकणातला व्हिक्टोरिया (टॅक्सी) वाला... " काशिनाथ नाडकर्णी : "तो कोकणांतला असणंच शक्य नांयऽऽऽ... अहो तो कोकणात व्हिक्टोरिया (टॅक्सी) चालवायला शिकणार कुठून मला सांगा बघू आंऽऽऽ... कायत्तरी काय? आमच्या कोकणातले म्हणजे सगळे बैल..." 😀 भ्रमण मंडळ - बटाट्याची चाळ गोव्याला असंख्य वेळा जाउनही तिथल्या सार्वजनीक वाहतुक व्यवस्थेचा आणि टॅक्सीवाल्यांचा मला फारसा अनुभव नाही. ह्या वर्षीच्या जानेवारी महिन्यात दोना पावला येथील मुक्काम असलेल्या 'इंटरनॅशनल सेंटर गोवा (ICG)' येथुन त्यांच्याचतर्फे संध्याकाळी तिथुन सुमारे सात किमी अंतरावर असलेल्या कॅसिनो पर्यंत जाउन मध्यरात्री तिथुन परतण्यासाठी घेतलेल्या टॅक्सी सेवेसाठी त्या टॅक्सीवाल्याने (आधीच बोलणी केल्याप्रमाणे) संध्याकाळी जाताना ड्रॉप साठी ३०० रुपये आणि मध्यरात्री तिथुन निघताना फोन करुन बोलवल्यावर पिक-अपसाठीचे ५०० रुपये असे जाउन-येउन एकुण ८०० रुपये घेतले होते. मध्य्ररात्री १:३० च्या नंतर फोन करुनही तो सांगीतल्याप्रमाणे परत न्यायला आला होता हे विषेश! असो, मिपाकरांना त्याठिकाणी आलेले टॅक्सीवाल्यांचे वेगवेगळे, बरे-वाईट अनुभव वाचुन माहितीत भर पडत आहे 👍

In reply to by गोरगावलेकर

विमानतळावरून आपल्या हॉटेलवर किंवा आपल्या हॉटेलवरून विमानतळावर जायचे असेल तर टॅक्सीवाल्यांचे अवाच्या सवा दर आहेत याचा मला तरी अनुभव आला नव्हता. आम्ही गोवा विमानतळापासून सगळ्यात लांब राहिलो होतो अगोंद आणि पाटणेला. दोन्ही ठिकाणी जायला विमानतळाहून १८०० रूपयात प्रीपेड टॅक्सी मिळाली होती. अर्थात ही अनुक्रमे २०१७ आणि २०१८ ची गोष्ट. सध्याचे दर किती हे माहित नाही. मात्र दोन्ही ठिकाणे दाबोळी विमानतळाहून साधारण ६०-६५ किलोमीटर अंतरावर आहेत. अंतर ध्यानात घेता तो दर अवाजवी जास्त आहे असे वाटले नव्हते. विमानतळावर समजा प्रीपेड टॅक्सी असते आणि त्यांना ठरवून दिलेले दर आहेत तितकेच घ्यावे लागतात. पण परतीच्या प्रवासात हॉटेलवरून विमानतळावर जातानाही टॅक्सीवाल्याने तेवढेच पैसे घेतले होते. अगोंदहून परत येताना आमचे विमान रात्रीचे होते त्यामुळे दाबोळी विमानतळावर रात्री साडेनऊच्या सुमारास पोचलो होतो. त्या वेळेस विमानतळावरून भाडी मिळत असतील की नाही शंकाच आहे कारण त्यावेळेनंतर फार विमाने येत नाहीत. तरीही त्याने जास्त पैसे घेतले नव्हते. टॅक्सीवाले अवाच्या सवा दर लावतात ते हॉटेलबाहेर साईटसिईंगला जाणार्‍यांकडून. वारकामध्ये आम्ही उतरलो होतो वारकाला आमच्या हॉटेलच्या बाहेर पर्यटकांसाठी म्हणून एक टॅक्सी स्टॅन्ड होता. तिथून मडगाव फार तर १०-१२ किलोमीटरवर होते. काजू आणि बेबिंका अशा गोष्टी घ्यायला मडगावला जायचे होते तेव्हा हॉटेलबाहेरील टॅक्सीवाल्यांनी जाऊन येऊन २७०० रूपये सांगितले होते. आणि ही गोष्ट २०१२ ची होती म्हणजे आणखी जुनी. ही अक्षरशः लूट होती. मला वाटते तिथे जास्त गोरे पर्यटक येतात आणि परदेशी पर्यटकांना अवाच्या सवा दर लाऊन लुटणे हा प्रकार नाही म्हटले तरी सगळीकडे होतोच. जर ते गोरे पर्यटक असे वाढीव दर द्यायला तयार होत असतील तर टॅक्सीवाल्यांना बहुदा आम्हा भारतीय पर्यटकांची गरज नसावी. त्यामुळे यायचे असेल तर या दरात या नाहीतर येऊ नका असा त्यांचा दृष्टीकोन होता.

श्रीरंग_जोशी Sun, 12/29/2024 - 01:44
गेल्या काही महिन्यांपासून माझी पत्नी सौरभ बोथरा यांच्या ऑनलाइन योगासन वर्गांना उपस्थिती लावत आहे. मी देखील महिन्याभरापासून सुरुवात केली आहे. शीर्षकात जरी केवळ योग असले तरी, योगासनांखेरीज, इतर कार्डिओ व श्वसनाचे व्यायाम, प्राणायम व थोडेफार ध्यान यांचाही या वर्गांत अंतर्भाव असतो. रोज युट्युब लाइव्ह द्वारे भाप्रवे नुसार सकाळ व संध्याकाळी हे वर्ग चालतात. सूचना सहजपणे समजतील अशा असतात व स्क्रीनवर पाहून आपण ते व्यायामप्रकार करू शकतो. ६ जानेवारीपासून तीन आठवडे या वर्गांचा नि:शुल्क लाभ घेता येईल - त्यासाठीचा दुवा. या वर्गांना काही दिवस उपस्थिती लावल्यावर, असे वर्ग आपल्याला काही वर्षे अगोदर का नाही मिळाले अशी भावना आमच्यासह बहुतेकांच्या मनात निर्माण झाली आहे / होत असते.

In reply to by श्रीरंग_जोशी

कंजूस Sun, 12/29/2024 - 04:00
ती साईट पाहिली. नोंदणी केली नाही. उपक्रम आणि ओनलाइन आहे हे बरे. काही शाळांत योगासने शिकवतात बहुतेक. आमच्या शाळेत शिकवली होती. पाचवी पासूनच . लहानपणी केली नाही तरी चालतात. कारण तेव्हा वाढते तरुण वय असते. पण नंतर कधी करायची झाल्यास छोट्या पुस्तिका विकत मिळतात त्या पाहिल्या की काही सोपी रोज करण्याची आसने दहा बारा आहेत ती करता येतात. चीनमध्ये तिथल्या बागांत ( parks) ६०+, ८५+ वयोगटातील नागरिकांसाठी काही त्यांच्या पद्धतींचे व्यायाम प्रकार करणारे करवून घेणारे गट असतात. त्यांचे काही विडिओ मी मागे पाहिले होते ( dwtv channel documentaries बहुतेक.) त्यांचे व्यायाम प्रकारही खूप चांगले वाटले. विशेषतः शरीराची रोजची हालचाल करण्यासाठीचे ते सराव आहेत. वरील दोन वयोगटांच्या वयाप्रमाणे हालचालींचा वेग वेगळा दिसला. इकडच्या काही बाबा लोकांचे योग प्रकार मला काही आवडले नाहीत. अतिरंजीत वाटले. ....... वजन कमी करणे/ हालचालींसाठी सराव/ रोग नियंत्रण/ मानसिक समाधान शांती यांपैकी एक किंवा सर्व असा काही झोल योगासनांमध्ये घालण्याचा खटाटोप दिसतो हे माझे मत.

Bhakti Sun, 12/29/2024 - 14:44
हरारीची मुलाखत रणवीरने घेतली.हरारी माझा आवडता विचारवंत आहे.तो भारतात नेक्सास' पुस्तक प्रकाशित करण्यासाठी आला होता.तेव्हा अनेकांना त्याच्याबरोबर मुलाखती घेतल्या. १. https://youtu.be/eNVtYPgJ6b0?si=3VfqDjCcx6_lYjk2 २. https://youtu.be/6x4UgHI7qbk?si=_Iz_eP9HF7SYH-ZM दुसरी मुलाखत अजून ऐकायची आहे. पहिली मुलाखत रणवीरने घेतली आहे.AI हा हरारीचा १० वर्षांपूर्वी पासूनचा विषय आहे.जो AI वर वरचढ होईल तोच पुढच्या काळात जगावर राज्य करणारे.इथे रशिया,ट्रम्प यांचा वर्चस्ववादी भूमिकेचा त्याने चांगला समाचार घेतला आहे.अमेरिकासारख्या बलाढ्य देशाने,लीडरने जगाच्या शांततेचा विचार आधी केला पाहिजे तरच माणूसकी टिकेल असं त्यांचं म्हणणं आहे.रणवीरचा शो म्हटला की तो स्पिरिच्युलिटीवर समोरच्याला बोलायला लावणारच हे ठरलेलं आहे 😀 त्यात हरारी विपश्यनेचा साधक आहे. पण हरारी म्हणतो कोणीही कोणाला दोन ,तीन तास ध्यानाला बसा हे म्हणणं सोपं आहे.पण पंधरा मिनिटे तरी केवळ स्वतःच्या आता बाहेर जाण्याऱ्या श्वासावर लक्ष केंद्रित करा.इतर कोणताच विचार डोक्यात आणायचा नाही,हे सांगितले तर कोणालाच हे फारसं जमणार नाही.यासाठी खुप तयारीच हवी.मेडिटेशन कसं करायचं, कोणतं करायचं हे ज्याचं त्यालाच ठरवू द्या.उगाच मेंढ्याचा कळप करण्यात अर्थ नाही. युद्ध करावं की नाही याबाबत त्याचं मत मला गोलगोल वाटलं,आधी तो म्हणाला मिलिटरी वर ५०% हून अधिक खर्च चिंताजनक आहे नंतर म्हणाला इस्राएल आणि भारताने ज्या चुका रोमन व मुस्लिम+ब्रिटिश आक्रमणाच्या काळात सैन्य ताकद वाढवण्यावर भर देतात केली ती त्यांना आता करणे अजिबात परवडणारं नाही👏

In reply to by Bhakti

कंजूस Sun, 12/29/2024 - 15:53
मराठी किंवा कुणीही. आंतरराष्ट्रीय मते राजकीय/ सामाजिक / धार्मिक ही नेहमी ती व्यक्ती कोणत्या डोक्यातली आहे त्याप्रमाणे एकांगीच असतात. विरुद्ध गटाचा साधा उल्लेखही नसतो. तर काहींची प्रसिद्ध केलेली व्यक्तव्ये त्यांच्या देशाच्या राजकीय दडपणाखालीही असतात.

कंजूस Tue, 12/31/2024 - 20:43
पहिला काचेचा पूल काल कन्याकुमारी, तमिळनाडू इथे असलेल्या विवेकानंद स्मारक आणि तिरुवल्लूवर पुतळा या दोन ठिकाणांमध्ये काचेचा पूल उभारला त्याचे उद्घाटन झाले. hindustan times बातमी

कंजूस Fri, 01/03/2025 - 11:27
खरडफळ्यावर विषय निघाला म्हणून......... गुजरातचे सुंदर समुद्र किनारे आणि पर्यटन. फार प्रचलित नाही तरीही थोडक्यात... गुजरातध्ये {सूरतजवळच्या} हजिरा येथे आणि जामनगर येथे दोन मोठे रासायनिक प्रकल्प ( भारतीय कंपन्या, रिलायन्स) अगोदरच आहेत. सूरतजवळच्या दहेज बंदरातून - घोघा पलिकडे जाऊन भावनगरला काही जण जातात. धार्मिक पर्यटन. दीवचा किनारा पर्यटनासाठी आहे. तिथून वेरावळ - सोमनाथ आहे. पण धार्मिक महत्त्व आणि मासेमारी. दमणचा किनारा काळा आहे. मासेमारी बोटींच्या डिझेलमुळे. जवळचा परिसर दारूबार आणि इतर इलेक्ट्रॉनिक्स मार्केटसाठी पूर्वी प्रसिद्ध होता. आता त्याचे महत्त्व उरले नाही. तरीही दमण- वापी- दादरा नगरहवेली- खानवेल ( गार्डन्स) अशी सहल होऊ शकते. द्वारका पोरबंदर समुद्र -धार्मिक पर्यटन अंकलेश्वर/अंकलेसर भरूच हे नर्मदा पर्यटनामुळे चर्चेत असते. गुजरात - महाराष्ट्र सीमेजवळचे डहाणू आणि बोर्डी येथे हॉटेल्स खूप आहेत. डहाणू-जव्हार- त्र्यंबकेश्वर -नाशिक - सापूतारा असाही सहल प्लान होऊ शकतो. गुजरात समुद्र किनारे थंडीतच ठीक. गरमा फार असतो. काही ठिकाणी रात्री चमकणाऱ्या लाटा दिसतात. मुंबई पुणे पर्यटकांसाठी कोकण, गोवा, कर्नाटक समुद्रच बरा.

In reply to by कंजूस

गवि Fri, 01/03/2025 - 14:19
दमण- वापी- दादरा नगरहवेली- खानवेल ( गार्डन्स) अशी सहल होऊ शकते.
दमण किनारे घाणेरडे. केमिकल आणि वास. अस्वच्छ. हल्ली काही भाग बांधून चौपाटी केली आहे असे ऐकले पण एकूण समुद्र घाण. खूप इंडस्ट्रीज. सिल्वासा कंटाळवाणे. सर्वसाधारण लहान शहर. उन्हाळ्यात तर अगदी नदी देखील कोरडी. तिथली वाटेतली लायन सफारी केविलवाणी. सापुतारा वगैरे हिल स्टेशन हा अधिक चांगला ऑप्शन आहे त्यापेक्षा.

In reply to by प्रचेतस

गवि Fri, 01/03/2025 - 15:50
आधी मद्य पिऊन मग कोणत्याही मार्केटमध्ये फिरायला मजाच येते. किंबहुना काळ्या समुद्रावर फिरायला देखील मजाच येते. :))

In reply to by प्रचेतस

गवि Fri, 01/03/2025 - 16:00
तुमच्या इतका जोरकस, प्रगाढ, वादळी, पावसाळी, ओलाकंच, इंटेंस अनुभव नसला तरी प्रवासाचा अंमळ थोडासा अनुभव आहे इतकंच..

In reply to by प्रचेतस

गवि Fri, 01/03/2025 - 16:09
सळसळत्या वाऱ्याने एखादा प्राजक्त थरथरावा आणि खालून जाणाऱ्या आपल्या तापल्या अंगावर गार दवबिंदूंचा पडलेला पाऊस हृदयाचे मधलेच चार ठोके चोरून जावा तशी अवस्था झालेली दिसते त्या आठवणींनी.

In reply to by गवि

प्रचेतस Fri, 01/03/2025 - 17:24
हो ना. अगदीच मोरपिशी अवस्था. बाकी तुमचे अनुभवही ह्याबाबतीत दांडगेच असणार म्हणा हे तुमच्या तरल शब्दांनी सहजच स्पष्ट होते.

In reply to by गवि

टर्मीनेटर Fri, 01/03/2025 - 16:55
वरच्या वाक्यात
"आधी मद्य पिऊन मग कोणत्याही मार्केटमध्ये फिरायला मजाच येते."
असे 'कोणत्याही मार्केटमध्ये' हे दोन शब्द ठळक करायचे राहुन गेले काय 😀 नीळा, हिरवा, पिवळा, तांबडाच काय पण 'मृत' समुद्रही जर कौतुकास पात्र ठरत असतील तर बिचाऱ्या 'काळ्या' समुद्राने असे काय कोणाचे घोडे मारले आहे? ('काळ्याशार' गोष्टीही आकर्षक असु शकतात 😉) तेव्हा घ्यावी की त्याच्यावरही फिरायची मजा 😂 बाकी 'काळ्या' वरुन सहज सुचलं म्हणून... काला रे सइयां काला रे तन काला रे मन काला रे काली जबान की काली गारी काले दिन की काली शामें सइयां करते जी कोल् बाज़ारी काला रे सइयां काला रे तन् काला रे मन काला रे काली जबान की काली गारी काले दिन की काली शामें सइयां करते जी कोल् बाज़ारी बैरी कोल् कोल् कोल् छीने तोल तोल तोल बैरी कोल् कोल् छीने तोल तोल तोल छत आँगन चार दिवारी सइयां करते जी सइयां करते जी सइयां करते जी सइयां करते जी सइयां करते जी कोल् बाज़ारी सइयां करते जी कोल् बाज़ारी काली मिटटी कुत्ता काला काला बिलकुल सुर्मे वाला काला कौवा हौवा काला काली मिटटी कुत्ता काला काला बिलकुल सुर्मे वाला काला कौवा हौवा काला काला बादल गिरने वाला काला मोती गिरने वाला काला झंडा डण्डा कला काला बटवा पैसा काला काली आँखों जैसा काला काली अग्नि काली गर्मी सूरज काला काला बीघा और गज काला काली हाथी हाथी काला काला बैरी कोल् कोल् कोल् छीने तोल तोल तोल बैरी कोल् कोल् छीने होल से टोल रंग पानी और पिचकारी सइयां करते जी पिया करते जी सइयां करते पिया करते जी काला रे सइयां काला रे तन काला रे मन्न काला रे काली जबान की काली गारी काले दिन की काली शामें सइयां करते जी कोल् बाज़ारी काला रे सइयां काला रे तन काला रे मन्न काला रे काली जबान की काली गारी काले दिन की काली शामें सइयां करते जी कोल् बाज़ारी. स्नेहा खानवलकर ह्या गुणी संगीत दिग्दर्शिकेने संगीतबद्ध केलेल्या 'गँग्स ऑफ वासेपूर २' मधल्या काला रे ह्या गाण्यात गीतकार वरुण ग्रोवर ह्यांनी इतक्या काळ्या गोष्टींचा उल्लेख केलाय, पण बिचारा 'काळा समुद्र' मात्र त्यात घ्यायचा राहून गेला बघा... 😎

In reply to by गवि

कंजूस Fri, 01/03/2025 - 14:46
खरंतर गुजरातला समुद्र पर्यटनाला जाऊच नये. औद्योगिकरणावर गुजरातने खूप भर दिला. नवसारीपासून पुढे वरती. मुंबई बाजारपेठ जवळ पडते. सापुतारा जरी महाराष्ट्रातील पर्यटकांना आवडत असले ( नाशिक जवळ) तरी गुजरातींना आवडत नाही. त्यांचे आवडते माथेरान महाबळेश्वर पाचगणी. मुंबई पुण्याला जवळची ठिकाणं पाहून झाल्यावर जरा बदल म्हणून दुसरीकडे काही आहे का याची चाचपणी करतात. पालघरच्य पश्चिमेला दहा किमीवर केळवे माहिम किनारा आहे. पालघर -मनोर - विक्रमगड- जव्हार- त्र्यंबकेश्वर - नाशिक या वाटेवर हल्ली 'गोवर्धन इको विलेज' मिनी वृंदावन ( इस्कॉनवाल्यांचं) हल्ली लोकप्रिय होत आहे. या मार्गावर बरीच रिसॉर्ट झाली आहेत. जव्हार मोखाडा भागातील वारली चित्रकला कमी होत आहे किंवा बाजारू होत आहे असं ऐकून आहे. सहलीच्या आराखड्यात/ मार्गावर चार पाच ठिकाणे असणे फायद्याचं ठरतं . एखादं नाही आवडलं कुणाला तर दुसरं सहल यशस्वी करतं.

In reply to by कंजूस

गवि Fri, 01/03/2025 - 15:54
केळवे किनारा तर लोकांनी घाणीने कचऱ्याने भरून टाकलेला दिसला. अगदी गेल्या वर्षात काही बदल झाला असेल तर माहीत नाही. लोक तिथे पिकनिक सारखा कार्यक्रम करून, बसून खाऊन प्लास्टिक प्लेट्स, खरकटे, उर्वरित अन्न असे सर्व जागीच टाकून उठत होते. किनाऱ्यावर हागणदारी होती. पार्किंग शुल्क किंवा तत्सम शुल्क वगैरे वसुली अवश्य होत होती पण स्वच्छतेच्या दृष्टीने काही दिसले नाही. पेड टॉयलेट होते. तेही अस्वच्छ. आपले सामान्य नागरिक देखील एकूण स्वच्छतेचा सेन्स कमी असलेले आहेत असेच वाटते सगळीकडे.

In reply to by गवि

कंजूस Fri, 01/03/2025 - 16:24
हं. नवीन अपडेट्स लक्षात ठेवायला हवेत. बाकी प्रचेतसकुमार चांगल्या जागा शोधतात. पण काहीच उघड करतात. BNHS वालेही चांगल्या जागा सांगत सुटत नाहीत. फेसबुकाच्या भिंती भरल्या की लोंढे तिकडेच जातात. राजमाची, कास पठार, सांधण, हरिहर.

टर्मीनेटर Fri, 01/03/2025 - 17:47
आपल्या सर्वांच्या माहितीतले मिपाकर लेखक 'कुमार१' हे काही कामानिमित्त मुंबईला येणार आहेत. त्या निमित्ताने सोमवार दिनांक ६ जानेवारी २०२५ रोजी संध्याकाळी ६ नंतर भायखळा येथे एक मिपा कट्टा करण्याचे ठरत आहे. सोमवारचा, म्हणजे कामकाजाचा दिवस असल्याने फार लांबुन कोणी येऊ शकणार नाहीत ह्याची कल्पना असल्यामुळे 'कट्ट्यासाठी' वेगळा धागा वगैरे काढलेला नाही, परंतु भायखळा परिसरात किंवा मुंबई उपनगरांत रहाणारे कोणी मिपाकर येऊ शकत असतील तर त्यांचे सहर्ष स्वागत आहे. (केवळ एकमेकांची सदिच्छा भेट आणि गप्पा-टप्पांचा कार्यक्रम एवढाच ह्या कट्ट्याचा मुळ उद्देश आहे 😀)

In reply to by टर्मीनेटर

कंजूस Fri, 01/03/2025 - 18:16
मुंबईत मिपाकर मोजून तीन चारच असतील. आणि त्यातून राणीबाग फुले प्रदर्शनाचे निमित्त साधले तर उत्तम.

In reply to by कंजूस

विजुभाऊ Sun, 01/05/2025 - 15:09
मुंबईत ( ठाणे डोंबिवली धरुन) किमान तीस एक मिपाकर सहज असतील. रामदास , शँपेन , क्लिंटन, प्रभू मास्तर , साक्षी , ज्योति अळवणी , मदनबाण असे बरेच आहेत.

In reply to by टर्मीनेटर

Bhakti Sat, 01/04/2025 - 11:34
कुमार १ आता मिपावर का लिहित नाही.त्यांना नक्की सांगा की तुमचे अभ्यासपूर्ण लेख मिपावर देत जा.

In reply to by टर्मीनेटर

Nitin Palkar Mon, 01/06/2025 - 08:18
या कट्ट्याला येतो असे कुमार१ यांना बोललो होतो. अचानक महत्वाचे काम निघाल्यामुळे येऊ शकत नाही. लवकरच पुन्हा असा योग येवो.

Bhakti Sat, 01/04/2025 - 11:43
आणि आजोबा परत जिवंत झाले! ;) लाखातून एखादा व्यक्ती इतका नशीबवान असू शकतो.हार्ट ॲटॅकमुळे मृत घोषित केलेल्या आजोबांचे शव रूग्णवाहिकेतून घरी नेताना रस्त्यावरील खड्ड्यांच्या धक्क्यामुळे आजोबांचे ह्रदय पुन्हा चालू झाले असावे.कारण नातवाला नंतर त्यांच्या हाताच्या बोटांची हालचाल दिसली.मग पुढील उपचाराला परत दुसऱ्या दवाखान्यात नेले.तर आजोबांच्या ह्रदयाचे ठोके दिसले. देव तारी त्याला कोण मारी... https://youtu.be/Y5Ap-dknaww?si=Ezn1IIWLjspCJ5Sl

In reply to by Bhakti

चौथा कोनाडा Sun, 01/05/2025 - 20:10
या घटनेची नोंद घेत महाराष्ट्राच्या आरोग्य खात्याने सदर खड्ड्याचे मोजमाप करून तशाच प्रकारचे खड्डे विविध रस्त्यांवर पाडण्याचे नियोजन केलेले आहे. या खड्डा इफेक्टमुळे सीपीआर ची प्रोसिजर कालबाह्य होऊ शकते असे माझी आरोग्य सचिव माननीय डॉक्टर चंगावडकर श्रीपाद यांनी प्रतिपादित केले ! या नियोजित खड्ड्यांच्या कंत्राटांवरून आत्ताच वाद सुरू झालाय ! राजकीय नेते श्री अमुक प्रमुख यांनी या कंत्राटात बावीस कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला. आणि या प्रकरणाची चौकशी करावी अशी मागणी माननीय मुख्यमंत्री यांच्याकडे केली.

कंजूस Sun, 01/05/2025 - 10:24
माथेरानमध्ये पर्यटक घोड्यावर बसून जात आहेत, काही जण मिनी ट्रेन पाहात आहेत, माकडे पर्यटकांच्या खाऊच्या पिशव्या हिसकावून घेत आहेत अशा माहितीवर Chatgpt ने काढलेलं चित्र.image थोड्या चुका आहेत, अर्धवट कापली गेली आहेत दृष्य. तरी ठीकच.

कंजूस Mon, 02/24/2025 - 00:28
उन्हाळी भटकंती. काल एक भटकंती केली. खंडाळा घाटासाठी रेल्वे जिथून पळसधरी स्टेशनानंतर वर चढते त्या पहिल्या डोंगरात आहे सोनगिरी. ( मुंबईतील तरुण नवख्या ट्रेकरांचा पावसाळ्यातला आवडता ट्रेक. आणखी एक सोंडाई डोंगर माथेरानच्या चौक पाॅइंटच्या खाली आहे.) उन्हाळा सुरू झाला आहे, रान वाळले आहे तरी दुपारी बारा ते पाच तळापासून माथ्यापर्यंत (५०० मिटर्स) अतोनात डास होते. शांतपणे बसून डबासुद्धा खाता आला नाही. या उलट मागचाच डोंगर राजमाचीचा. तिथे कधीच कुठेही डास नसतात. हे असं का?

कंजूस Wed, 03/12/2025 - 10:38
वेरूळ दहाव्या लेण्यात किरणोत्सव..... लोकसत्ता बातमी. https://youtu.be/2xX1I0EUcNk?si=Q7AHHpInuRYAN6Zc असा दिसत असला तरी त्यासाठी लेण्या तशा बांधलेल्या नसाव्यात. वेरूळ लेण्या बहुशा पश्चिमाभिमुख आहेत त्यामुळे दुपारी वर्षातून दोनवेळा किरण आतापर्यंत येत असणारच. आपली देवळं मुद्दामहून पूर्वाभिमुख बांधतात. काही पश्चिम दिशेला तोंड करून. तसं लेण्यांचं नाही. बौद्ध भिक्कुंना पावसाळ्यात विश्रांतीसाठी विहार आणि लेणी आणि चैत्य बांधण्यात ( खोदण्यात) आले होते. मूळ उद्देश हा होता.

कंजूस Wed, 03/12/2025 - 10:56
विमान परत फिरवणे.... मागच्या आठवड्यात एक शिकागो ते दिल्ली विमान टॉयलेट्स तुंबल्याने परत शिकागोला नेले. https://youtu.be/ZQemz_Enpxc?si=w1SuHw86alXZ6IiW उड्डाणाचे फक्त चार तास उरले होते. मग वाटेत कुठे emergency landing या कामासाठी मिळत नसावेत का? किंवा ते देश अशि सर्विस देत नसतील?

कंजूस Wed, 03/19/2025 - 18:32
माथेरान कालपासून बंद. टॅक्सी, इ रिक्षा आणि घोडे वाले संपावर. कारण काय तर म्हणे पर्यटकांची फसवणूक करणारे विडिओ यूट्यूबवर आले. खरं कारण ... खाजगी वाहनाने येणारे पर्यटक वाढले आणि ते दस्तुरी नाक्यावरून शटल टॉय ट्रेन किंवा इ रिक्षांनी माथेरानच्या बाजार पर्यंत जातात. ते आठवड्यात कोणत्याही दिवशी येऊन जातात. हमाल, हॉटेल्स आणि घोडेवाल्यांचा धंधा जोरात चालतो. इ रिक्षा दहा आहेत. फक्त सुट्ट्या लागल्यावर येणारे पर्यटकच टॅक्सी घेतात. एकूण काय तर २७० टॅक्सी वाल्यांना धंधा मिळत नाही पण पर्यटक खूप येतात. नेरळ ते दस्तुरी नाका जाणारी एसटी मिनीबस ( पंचवीस रुपयांत) हीसुद्धा पोटदुखी आहे. फसवणूक टॅक्सीवालेच करतात. खाजगी कार्यालयांना " आमच्या टॅक्सी नेच जा असा हेका धरतात किंवा पाचशे रुपये द्या असा दम भरतात. काही शहाणे टॅक्सी वाल्यांनी मात्र पन्नास रु सीटने धंधा सुरू ठेवला आहे. ( अधिकृत भाडे शंभर रु प्रती प्रवासी असे चारांचे चारशे रुपये घेतात. किंवा पूर्ण टॅक्सी खिडकीवर जाऊन बुक केल्यास ३६० रुपये लागतात. आता प्रश्न असा आहे की टॅक्सीवाले आठवड्याच्या इतर दिवशी ओला/ उबेर/ वगैरेंनी संबंध का ठेवत नाहीत. कारण या साईट्स " मारुती इको" वाहन नको सांगतात. सर्व माथेरान टॅक्स्या याच प्रकारच्या आहेत.

In reply to by कंजूस

चौथा कोनाडा गुरुवार, 03/20/2025 - 20:29
खासगी करण : वरच्या पातळीवर अदानी- अंबानी खालच्या पातळी छोटेआका, बडेआका अणि अन असे कार्यकर्ते म्हणवणारे खंडणीकार्यकर्ते

वामन देशमुख Fri, 03/21/2025 - 13:10
माझा कालचा WhatsApp Status SohalLalTeaTime #LifeIsFunWithFriends&SohanlalTea ☕
एका जिवलगाचा प्रतिसाद -
चहा आणी आणी ते सुद्धा संध्याकाळी 7 नंतर! उन लागलं की काय वामन तुला ? काळजी घे बाबा.
माझे उत्तर - हमारे तेलंगाणा के लोओंका मालूम नै तुमारकू? सुब्बे उट्टे जब से रात को सोने तलक कब्बी बी चायाँ पीने कू रेडीच रैतें। कल क्या वा मालूम? हमारे संजय बावा होर उनके इनो आये थे हमारे इधर म्हाराष्ट्रा सें । फिर Abits कु जाने के प्लानाँ बनायें। तो मैं बोलूं, चलो बावा, कैसे बी उदर जारैं । तो व्हांपे सोहनलाल की चाय भोत सईं रैती, दूर दूर से लोआं आते पीनेकू। पीते, तुम्म? तो उनो बोले, तुम इत्ता बोलरे तो कैकु नै पीते वामन राव? फिर हम, हमारे इनो, बावा, बावा के इनो ऐसे चार जणां गए चायाँ पीनेकू। अब तुमारकू तो मालूमिच हैं, वो चायाँ वायाँ पीने के शौकां तो अपुन नै पालते। फिर वो तीन जणां चायाँ पिए। भोत अच्चे है चायाँ बोले। बोलके मई स्टेटसां लगायूँ।

वामन देशमुख Wed, 04/30/2025 - 10:55
अक्षय्य तृतीयेनिमित्त घराजवळच्या श्री वेंकटेश्वर स्वामी (बालाजी) मंदिरात सपत्नीक गेलो होतो. घरी आंब्याची पाने-झेंडूची फुले यांची तोरणे, देवांना ताजे हार,फुले, यथासांग पूजा, विशेष नैवेद्य हे झाले. गोडधोड जेवण आहे. श्री कृपेने प्रसन्न वाटते आहे. गोविंदा गोविंदा गोऽविंदा!

In reply to by कंजूस

वामन देशमुख Wed, 04/30/2025 - 15:56
मेहकरचा बालाजी?
मी हैदराबादला राहतो. घराजवळच्या (आम्ही लोकांनी बांधलेल्या) देवळात गेलो होतो.‌ यापूर्वी मेहकरच्या बालाजी मंदिरात गेलेलो आहे.‌ तेथील बालाजीची मूर्ती खूप उंच आहे. बहुधा भारतभरातील सर्वात उंच मूर्ती असावी.

वामन देशमुख Fri, 05/09/2025 - 13:44
श्रीगुरुजी हा आइडी बॅन केल्याबद्दल मी तीव्र निषेध व्यक्त करतो. ज्या मोजक्या मिपाखरांमुळे मिसळपाववर वाचक येतात त्यांच्यापैकी एक हे श्रीगुरुजी होते.‌ हे लिहिण्याचा अधिकार मला आहे व हे लिहिल्यामुळे माझाच आइडी बॅन होणार नाही ही अपेक्षा. जय हिंद. --- हे मी खरडफळ्यावरही लिहिलं होतं; कायमची नोंद राहावी म्हणून इथे पुन्हा लिहीत आहे.

In reply to by वामन देशमुख

मारवा Fri, 05/09/2025 - 13:54
श्रीगुरुजी हे अनेकवेळा अभ्यासपूर्ण संदर्भासहित मांडणीणकरात होते हे खरे आहे. काहीवेळा मतभेद असले तरी जेबकी स्वाभाविक आहे तरी त्यांची एकूण मांडणी व चर्चेला योगदान चांगलेच होते यात शंका नाही अनेकदा माहीत नसलेले संदर्भ त्यांच्यामुळे माहिती होत होते. मात्र वामनराव त्यांची भाषेची मर्यादा भंगलेली होती असेही दिसून येते. त्यासाठी त्यांना समज देऊन संधी द्यायला हवी होती असेच अमरेंद्र बाहुबली यांना देखील संधिं द्यायाला हवी होती. असे उत्साहाने हिरीरीने चर्चा करणारे गेले तर त्याचे मला तरी नक्कीच वाईट वाटतें
सहज सुचलं म्हणून ( राजकारणसोडून छोट्या चर्चांसाठी) इतिहास, पुस्तकं, पाककला आणि इतर विषयांची चर्चा खरडफळ्यावर होते आणि मोठमोठे माहितीपर प्रतिसाद खरडफळा साफ झाल्यावर गायब होतात. तर तसे होऊ नये म्हणून हा धागा सुरू करत आहे. * आमच्या इथे एक पेपर आणि मासिके वाचनाचा एक मिनी ज्येष्ठ नागरिक कट्टा ( म्हणजे दोन बाकडी , कडाप्पा फरशी टाकून) सुरू झाला होता. परवा तिकडे एक पाटी वाचली आणि पुण्यात असल्यासारखं वाटलं. 'ज्येष्ठ नागरिक कट्टा' पाटीखाली 'राजकारण चर्चेसाठी नाही' असं लिहिलं होतं. हसू आलं. तर हा आपला धागाही राजकारण चर्चेसाठी नकोच असं ठरवलं. बघू असा चालतो.

ट-२० विश्वचषक अंतिम सामना

अज्ञात ·

अंतिम सामना भारतीय संघ जिंकणार इतक्या मजबूत स्थितीत भारतीय संघ आहे, कोहल्याचा बॅड प्याच सुरु आहे, कुठंही काहीही फटका खेळला तर, फोकलीचा तंबूत परतलेला असतो. रोहीत फार्मात आहे, आपण त्यांच्याकडून आज चांगल्या खेळीची अपेक्षा करू शकतो. समजा आज तो ढेपाळला तर, पंत, सूर्यकुमार, पांड्या, पंत, जड्डू सगळं देवभरोसे वाटतं. बूमबूम बुमराची गोलंदाजी चांगली व्हावी. अजुन काही खरडावे वाटले की धाग्यावर येईन, शनवारी फूल टाइम धाग्यावर पडिक राहु. -दिलीप बिरुटे

भागो Fri, 06/28/2024 - 14:20
भारतीय संघ जिंकणार ह्यात संशय नाही. तुलनात्मक विचार करायचा म्हटले तर (माझ्या मते) दक्षिण आफ्रिकेची गोलंदाजी जास्त सरस आहे तर त्याला उत्तर म्हणून भारतीय फलंदाजी. बघुया सामना कसा रंगतोय ते.

In reply to by भागो

आंद्रे वडापाव Sun, 06/30/2024 - 06:43
भारतीय संघाचे अभिनंदन. बरं झालं "पनौती" फायनल बघायला स्टेडियम मधे उपस्थित नव्हती... नाही तर वन डे वर्ल्ड कप फायनल सारखं .. झालं असतं.. मागच्या वेळे सारखं...

भागो Fri, 06/28/2024 - 15:37
सौंदाळा सर लेख समयोचित आहे पण, T-20 साठी ट-२० ? कुछ जम्या नही. कुणाच्या काही सूचना?

In reply to by भागो

सौंदाळा Fri, 06/28/2024 - 16:04
सर-बिर नको हो ट-२० हा मिपावर ज्यांनी क्रिकेटचे भरपूर लेख लिहिले आहेत त्या 'श्रीगुरुजी' या जुन्या मिपा सदस्याकडून उचलला आहे. बाकी अंतिम सामन्यासाठी भारतीय संघात काही बदल होतील का? मला तरी वाटत नाही. पण बरेच नेटकरी दुबेच्याऐवजी जयस्वालला घ्यावे आणि त्याला सलामीला पाठवून कोहलीला तीन नंबरवर पाठवावे असे म्हणत आहेत. काहीजण तर कोहली आणि दुबेला वगळून अनुक्रमे जयस्वाल आणि रिंकूला घ्यावे म्हणत आहेत.

In reply to by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)

भागो Fri, 06/28/2024 - 16:22
मला वाटत संघाच्या जडण घडणीत ऐन वेळी बदल करू नयेत. जयस्वाल आणि रिंकू ह्याना आधीच घ्यायला पाहिजे होते. आता नको. काय म्हणताय?

rahul ghate Sat, 06/29/2024 - 11:47
अंतिम सामन्या वर पावसाचे सावट असून सामन्याचा दिवस व राखीव दिवस असे २ हि दिवस ७०-८० टक्के पावसाची शक्यता आहे .

सौंदाळा Sat, 06/29/2024 - 20:46
१० षटक ७५/३ कोहली आणि अक्षरने डाव सावरला आहे. अक्षरने दोन षटकार सुध्दा मारले आहेत. त्याला काय सूचना दिल्या आहेत आता पुढील ५-६ षटके महत्त्वाची आहेत.

In reply to by प्रचेतस

सौंदाळा Sat, 06/29/2024 - 21:39
आज कोहली आणि दुबे चांगले खेळले. आतापर्यंतचा विश्वचषक अंतिम सामन्याचा सर्वात चांगला स्कोर. आफ्रिकेला जिंकण्यासाठी १७७ धावांचे आव्हान. भारत जिंकायला पाहिजे.

In reply to by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)

प्रचेतस Sat, 06/29/2024 - 22:03
बुमराने अप्रतिम चेंडू टाकला, आणि आता आर्षदीपने मार्करमला पण परतावले,

भारतीय संघ सुरुवातीच्या पडझडीनंतर सावरला १७७ चं आव्हान तसं चांगलं आहे, आफ़्रीकीची २ बाद १२ आणि तिसरं षटकं सुरु आहे, अजुन दोन विकेट्स पडल्या तर सामना आपल्या दृष्टीने आपण विजयाकडे जाऊ... -दिलीप बिरुटे

In reply to by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)

प्रचेतस Sat, 06/29/2024 - 23:22
गेलेली मॅच बुमरा आणि आर्शदिपच्या टिच्चून केलेल्या बॉलिंगमुळे एकदम रंगात आली.

In reply to by प्रचेतस

सौंदाळा Sat, 06/29/2024 - 23:34
जिंकली खूप हेलकावे खाल्ले पण जिंकली कोहली, दुबे, बुमरा, अर्शदीप, पंड्या आणि सूर्याचा भन्नाट कॅच अभिनंदन टीम इंडिया

In reply to by प्रचेतस

गवि Sun, 06/30/2024 - 00:00
भारताच्या विजयाच्या अद्भुत क्षणात सामील होण्यासाठी पूर्ण उत्साहाने आणि सकारात्मक मनाने आम्ही सामना अवलोकित केला. काही लोकांसारखे (सुमारे एक मिपासदस्य) यांच्यासारखे नकारात्मक कॉमेंट्स न टाकता. कारण आमचा टीम भारतवर गाढ विश्वास होता. तुम्ही जावा तिकडे पाकिस्तानात.

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आंद्रे वडापाव Sun, 06/30/2024 - 06:44
भारतीय संघाचे अभिनंदन. बरं झालं "पनौती" फायनल बघायला स्टेडियम मधे उपस्थित नव्हती... नाही तर वन डे वर्ल्ड कप फायनल सारखं .. झालं असतं.. मागच्या वेळे सारखं...

In reply to by रात्रीचे चांदणे

योगी९०० Mon, 07/01/2024 - 11:03
अख्खा देश भरताच्या विजयामुळे खुश आहे पण काहीना मात्र खाता पिता झोपता एकच चेहरा दिसतोय. बरोबर...त्याशिवाय अन्न पचत नाही व झोपही लागत नाही. जळी स्थळी केलेल्या निंदेने भाजपाच्या काही सिटा कमी झाल्या ह्याचेही त्यांना समाधान नाही. गंमत म्हणजे एरवी हिंदू धर्माच्या रूढी परंपरेला अंधश्रद्धा म्हणणारे हे लोकं, मोदींना पनवती म्हणतात. त्यावेळी हे म्हणताना त्यात त्यांना अंधश्रद्धा दिसत नाही.

पॅट्रीक जेड Sat, 07/06/2024 - 12:30
३० बॉल ३० रन करायचे होते आफ्रिकेला. भारतीय बॉलर काय लायकीचे आहेत हे आपल्या सगळ्यांनाच माहितीय. तरीही आफ्रिका मॅच हरतेय. मॅच फिक्स असल्याशिवाय हे शक्य नाही.

In reply to by मुक्त विहारि

चौकस२१२ Mon, 07/08/2024 - 06:11
मुक्त विहारि, अगदी अगदी आपले म्हणणे पटले , एक " अ . बा " म्हणून होते त्यांचे पण तसेच ... आणि एक विद्वानांना तर मुद्द्दा मिळाला नाही कि हगीनदारी काढायची किंवा "तुमच्या देशांत असेच असते का हो" वैगरे असले निरर्थक काहीतरी चिकटवत राहायचे

In reply to by चौकस२१२

भारत देशात टी ट्वेन्टीनंतर, मुंबैत रसिकांनी जे उत्स्फ़ुर्त स्वागत केलं त्याला तोड नाही. मजा आगया. क्रिकेट खेळ असा आहे की, त्यात रममाण झालो की त्या खेळाचा पूर्ण आनंद घेता येतो. क्रिकेटचं वेड आम्हाला लहानपणापासून. क्रिकेट खेळलो. पंचगिरी केली. वगैरे. क्रिकेट फिक्सींग, क्रिकेट हा देशाचा संघ नाही, वगैरे हे सगळे वाद असले तरी, क्रिकेटचा आनंद देहभान विसरुन घेता येतो. अन्य खेळाबाबतही थोड्या फार फरकाने आमचं असंच आहे. बाय द वे, आपल्या देशात कसा असतो क्रिकेटचा विजय साजरा करणे ? क्रिकेट सामने पाहणे ? आपल्या देशात एखाद्या खेळात विजय मिळाल्यानंतर देशाचे पंतप्रधान संघाच्या सर्व खेळाडुबरोबर गोल रिंगन करुन गप्पा-टप्पा करतात का ? हार्दीक पांड्याच्या पहिल्याच चेंडुवर कॅच पकडल्यावर 'त्याला तु काय म्हणालास ?' असे प्रश्न विचारुन आत्मीय संवाद करतात का ? आमच्याकडे अशा प्रश्न आणि आत्मीय संवादाने डोळ्यातून पाण्याचे ओघळ यायला लागतात. दोन-ह्जार तेवीसला विजयाची संधी गेली होती, तरी भारतीय संघांतील खेळाडुंचं जे सांत्वन मा. पंतप्रधान यांनी केलं होतं ते आठवलं की अजूनही गदगदून येतं. ''दाटून कंठ येतो, ओठात येई गाणे''.ती गळाभेट, हातात हात घेणे, खेळाडुंचे खिशातून हात काढून आपल्या हातात घेणे, हा जो आत्मीय स्पर्श असतो त्याने आपले रोम रोम फुलतात. डोळ्यातून पाण्याचे ओघळ वाहु लागतात. आपल्या देशात असे ओघळ येतात काय ? सॉरी असं खेळ प्रेम असतं का ? आमचे प्रश्न निरर्थक वाटल्यास दुर्लक्ष करा. उत्सुकता आहे. -दिलीप बिरुटे (क्रिकेटप्रेमी )

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

पॅट्रीक जेड Mon, 07/08/2024 - 10:11
हाहाहा. :) ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान असे महत्त्वाचे काम सोडून फालतू प्रशासकीय कामे करत असावेत बहुतेक. :)

अंतिम सामना भारतीय संघ जिंकणार इतक्या मजबूत स्थितीत भारतीय संघ आहे, कोहल्याचा बॅड प्याच सुरु आहे, कुठंही काहीही फटका खेळला तर, फोकलीचा तंबूत परतलेला असतो. रोहीत फार्मात आहे, आपण त्यांच्याकडून आज चांगल्या खेळीची अपेक्षा करू शकतो. समजा आज तो ढेपाळला तर, पंत, सूर्यकुमार, पांड्या, पंत, जड्डू सगळं देवभरोसे वाटतं. बूमबूम बुमराची गोलंदाजी चांगली व्हावी. अजुन काही खरडावे वाटले की धाग्यावर येईन, शनवारी फूल टाइम धाग्यावर पडिक राहु. -दिलीप बिरुटे

भागो Fri, 06/28/2024 - 14:20
भारतीय संघ जिंकणार ह्यात संशय नाही. तुलनात्मक विचार करायचा म्हटले तर (माझ्या मते) दक्षिण आफ्रिकेची गोलंदाजी जास्त सरस आहे तर त्याला उत्तर म्हणून भारतीय फलंदाजी. बघुया सामना कसा रंगतोय ते.

In reply to by भागो

आंद्रे वडापाव Sun, 06/30/2024 - 06:43
भारतीय संघाचे अभिनंदन. बरं झालं "पनौती" फायनल बघायला स्टेडियम मधे उपस्थित नव्हती... नाही तर वन डे वर्ल्ड कप फायनल सारखं .. झालं असतं.. मागच्या वेळे सारखं...

भागो Fri, 06/28/2024 - 15:37
सौंदाळा सर लेख समयोचित आहे पण, T-20 साठी ट-२० ? कुछ जम्या नही. कुणाच्या काही सूचना?

In reply to by भागो

सौंदाळा Fri, 06/28/2024 - 16:04
सर-बिर नको हो ट-२० हा मिपावर ज्यांनी क्रिकेटचे भरपूर लेख लिहिले आहेत त्या 'श्रीगुरुजी' या जुन्या मिपा सदस्याकडून उचलला आहे. बाकी अंतिम सामन्यासाठी भारतीय संघात काही बदल होतील का? मला तरी वाटत नाही. पण बरेच नेटकरी दुबेच्याऐवजी जयस्वालला घ्यावे आणि त्याला सलामीला पाठवून कोहलीला तीन नंबरवर पाठवावे असे म्हणत आहेत. काहीजण तर कोहली आणि दुबेला वगळून अनुक्रमे जयस्वाल आणि रिंकूला घ्यावे म्हणत आहेत.

In reply to by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)

भागो Fri, 06/28/2024 - 16:22
मला वाटत संघाच्या जडण घडणीत ऐन वेळी बदल करू नयेत. जयस्वाल आणि रिंकू ह्याना आधीच घ्यायला पाहिजे होते. आता नको. काय म्हणताय?

rahul ghate Sat, 06/29/2024 - 11:47
अंतिम सामन्या वर पावसाचे सावट असून सामन्याचा दिवस व राखीव दिवस असे २ हि दिवस ७०-८० टक्के पावसाची शक्यता आहे .

सौंदाळा Sat, 06/29/2024 - 20:46
१० षटक ७५/३ कोहली आणि अक्षरने डाव सावरला आहे. अक्षरने दोन षटकार सुध्दा मारले आहेत. त्याला काय सूचना दिल्या आहेत आता पुढील ५-६ षटके महत्त्वाची आहेत.

In reply to by प्रचेतस

सौंदाळा Sat, 06/29/2024 - 21:39
आज कोहली आणि दुबे चांगले खेळले. आतापर्यंतचा विश्वचषक अंतिम सामन्याचा सर्वात चांगला स्कोर. आफ्रिकेला जिंकण्यासाठी १७७ धावांचे आव्हान. भारत जिंकायला पाहिजे.

In reply to by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)

प्रचेतस Sat, 06/29/2024 - 22:03
बुमराने अप्रतिम चेंडू टाकला, आणि आता आर्षदीपने मार्करमला पण परतावले,

भारतीय संघ सुरुवातीच्या पडझडीनंतर सावरला १७७ चं आव्हान तसं चांगलं आहे, आफ़्रीकीची २ बाद १२ आणि तिसरं षटकं सुरु आहे, अजुन दोन विकेट्स पडल्या तर सामना आपल्या दृष्टीने आपण विजयाकडे जाऊ... -दिलीप बिरुटे

In reply to by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)

प्रचेतस Sat, 06/29/2024 - 23:22
गेलेली मॅच बुमरा आणि आर्शदिपच्या टिच्चून केलेल्या बॉलिंगमुळे एकदम रंगात आली.

In reply to by प्रचेतस

सौंदाळा Sat, 06/29/2024 - 23:34
जिंकली खूप हेलकावे खाल्ले पण जिंकली कोहली, दुबे, बुमरा, अर्शदीप, पंड्या आणि सूर्याचा भन्नाट कॅच अभिनंदन टीम इंडिया

In reply to by प्रचेतस

गवि Sun, 06/30/2024 - 00:00
भारताच्या विजयाच्या अद्भुत क्षणात सामील होण्यासाठी पूर्ण उत्साहाने आणि सकारात्मक मनाने आम्ही सामना अवलोकित केला. काही लोकांसारखे (सुमारे एक मिपासदस्य) यांच्यासारखे नकारात्मक कॉमेंट्स न टाकता. कारण आमचा टीम भारतवर गाढ विश्वास होता. तुम्ही जावा तिकडे पाकिस्तानात.

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आंद्रे वडापाव Sun, 06/30/2024 - 06:44
भारतीय संघाचे अभिनंदन. बरं झालं "पनौती" फायनल बघायला स्टेडियम मधे उपस्थित नव्हती... नाही तर वन डे वर्ल्ड कप फायनल सारखं .. झालं असतं.. मागच्या वेळे सारखं...

In reply to by रात्रीचे चांदणे

योगी९०० Mon, 07/01/2024 - 11:03
अख्खा देश भरताच्या विजयामुळे खुश आहे पण काहीना मात्र खाता पिता झोपता एकच चेहरा दिसतोय. बरोबर...त्याशिवाय अन्न पचत नाही व झोपही लागत नाही. जळी स्थळी केलेल्या निंदेने भाजपाच्या काही सिटा कमी झाल्या ह्याचेही त्यांना समाधान नाही. गंमत म्हणजे एरवी हिंदू धर्माच्या रूढी परंपरेला अंधश्रद्धा म्हणणारे हे लोकं, मोदींना पनवती म्हणतात. त्यावेळी हे म्हणताना त्यात त्यांना अंधश्रद्धा दिसत नाही.

पॅट्रीक जेड Sat, 07/06/2024 - 12:30
३० बॉल ३० रन करायचे होते आफ्रिकेला. भारतीय बॉलर काय लायकीचे आहेत हे आपल्या सगळ्यांनाच माहितीय. तरीही आफ्रिका मॅच हरतेय. मॅच फिक्स असल्याशिवाय हे शक्य नाही.

In reply to by मुक्त विहारि

चौकस२१२ Mon, 07/08/2024 - 06:11
मुक्त विहारि, अगदी अगदी आपले म्हणणे पटले , एक " अ . बा " म्हणून होते त्यांचे पण तसेच ... आणि एक विद्वानांना तर मुद्द्दा मिळाला नाही कि हगीनदारी काढायची किंवा "तुमच्या देशांत असेच असते का हो" वैगरे असले निरर्थक काहीतरी चिकटवत राहायचे

In reply to by चौकस२१२

भारत देशात टी ट्वेन्टीनंतर, मुंबैत रसिकांनी जे उत्स्फ़ुर्त स्वागत केलं त्याला तोड नाही. मजा आगया. क्रिकेट खेळ असा आहे की, त्यात रममाण झालो की त्या खेळाचा पूर्ण आनंद घेता येतो. क्रिकेटचं वेड आम्हाला लहानपणापासून. क्रिकेट खेळलो. पंचगिरी केली. वगैरे. क्रिकेट फिक्सींग, क्रिकेट हा देशाचा संघ नाही, वगैरे हे सगळे वाद असले तरी, क्रिकेटचा आनंद देहभान विसरुन घेता येतो. अन्य खेळाबाबतही थोड्या फार फरकाने आमचं असंच आहे. बाय द वे, आपल्या देशात कसा असतो क्रिकेटचा विजय साजरा करणे ? क्रिकेट सामने पाहणे ? आपल्या देशात एखाद्या खेळात विजय मिळाल्यानंतर देशाचे पंतप्रधान संघाच्या सर्व खेळाडुबरोबर गोल रिंगन करुन गप्पा-टप्पा करतात का ? हार्दीक पांड्याच्या पहिल्याच चेंडुवर कॅच पकडल्यावर 'त्याला तु काय म्हणालास ?' असे प्रश्न विचारुन आत्मीय संवाद करतात का ? आमच्याकडे अशा प्रश्न आणि आत्मीय संवादाने डोळ्यातून पाण्याचे ओघळ यायला लागतात. दोन-ह्जार तेवीसला विजयाची संधी गेली होती, तरी भारतीय संघांतील खेळाडुंचं जे सांत्वन मा. पंतप्रधान यांनी केलं होतं ते आठवलं की अजूनही गदगदून येतं. ''दाटून कंठ येतो, ओठात येई गाणे''.ती गळाभेट, हातात हात घेणे, खेळाडुंचे खिशातून हात काढून आपल्या हातात घेणे, हा जो आत्मीय स्पर्श असतो त्याने आपले रोम रोम फुलतात. डोळ्यातून पाण्याचे ओघळ वाहु लागतात. आपल्या देशात असे ओघळ येतात काय ? सॉरी असं खेळ प्रेम असतं का ? आमचे प्रश्न निरर्थक वाटल्यास दुर्लक्ष करा. उत्सुकता आहे. -दिलीप बिरुटे (क्रिकेटप्रेमी )

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

पॅट्रीक जेड Mon, 07/08/2024 - 10:11
हाहाहा. :) ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान असे महत्त्वाचे काम सोडून फालतू प्रशासकीय कामे करत असावेत बहुतेक. :)
लेखनविषय:
लेखनप्रकार
कालच इग्लंडविरुद्धचा उपांत्य सामना ६८ धावांनी जिंकून भा

वार्तालाप: अहल्या शिळा राघवे मुक्त केली

विवेकपटाईत ·

कॉमी Sun, 02/11/2024 - 10:57
मुनिवेषं सहस्राक्षं विज्ञाय रघुनन्दन।1.48.19 मतिं चकार दुर्मेधा देवराजकुतूहलात्।
अर्थ:
O Delight of the Raghus the evilintentioned Ahalya, inclined towards the king of the celestials and knowing him to be the thousandeyed Indra in the guise of the ascetic, consented for the union.
अर्थः हिन्दी (गीताप्रेस गोरखपुर)
हे रघुनंदन ! महर्षी गौतमका वेष धारण करके आये हुए इन्द्रको पहचानकर भी उस दुर्बुद्धी नारीने ‘अहो! देवराज इन्द्र मुझे चाहते है’ इस कौतूहलवश उनके साथ समागमका निश्चय करके वह प्रस्ताव स्वीकार कर लिया॥
नवर्‍यानेच शाप दिला असताना रोटी बेटी व्यवहाराचा, समाजाने वाळीत टाकायचा प्रश्नच येत नाही. शाप काय आहे ?
तथा शप्त्वा स वै शक्रमहल्यामपि शप्तवान्।।1.48.29।। इह वर्षसहस्राणि बहूनि त्वं निवत्स्यसि। वायुभक्षा निराहारा तप्यन्ती भस्मशायिनी।।1.48.30।। अदृश्या सर्वभूतानां आश्रमेऽस्मिन्निवत्स्यसि। यदा चैतद्वनं घोरं रामो दशरथात्मज:।।1.48.31।। आगमिष्यति दुर्धर्षस्तदा पूता भविष्यसि।
अर्थ-
Having thus cursed Indra, he also cursed Ahalya: 'You will be staying here for thousands of years without food and subsisting on air, lying down in ashes, doing penance, without being seen by any living beings in this ashrama' 'When the son of Dasaratha, the unassailable Rama enters this dreadful forest, you will be cleansed (of this sin)'. 'O Wickednatured one by offering hospitality to Rama, without covetousness and passion, you will happily live with me by regaining your present form'..
हिंदी-
इन्द्र को इस प्रकार शाप देकर गौतमने अपनी पत्नी को भी शाप दिया—‘दुराचारिणी! तू भी यहाँ कई हजार वर्षोतक केवल हवा पीकर या उपवास करके कष्ट उठाती हुई राखमे पड़ी रहेगी। समस्त प्राणियोंसे अदृश्य रहकर इस आश्रममे निवास करेगी। जब दुर्शर्ष दशरथ-कुमार राम इस घोर वनमें पदार्पण करेंगे, उस समय तू पवित्र होगी। उनका अतिथ्य-सत्कार करनेसे तेरे लोभ-मोह आदी दोष दूर हो जायँगे और तू प्रसन्नतापूर्वक मेरे पास पहूँचकर अपना पूर्व शरीर धारण कर लेगी’॥
(इंद्राचा शाप- त्याची वृषणं गळून पडली.) जमिनीवर फक्त हवा खात पडून राहणे, कुणाला नजरेत न येणे हे शिळेचे वर्णन वाटते. त्यानंतर "तु पुन्हा तुझ्या मूळ रुपात येशील" या उःशापावरुन अहील्येचे कशात तरी परिवर्तन झालेले हे समजते.

बलात्कार
ह्या शब्दाचा ठार निषेध करतो. वर कॉमी ह्यांनी मुळ श्लोक दिलेलाच आहे. अहिल्येला स्पष्ट ठाऊक होते की समोरचा व्यक्ती हा आपला पती नसुन देवराज इन्द्र आहे , आणि तरीही ती त्याच्याशी रत झाली , मग ह्याला बलात्कार कसे म्हणाता येईल? हे तर म्युचुअल कन्सेट ने झालेले अफेयर आहे !
अहल्या निर्दोष होती तरी समाजाने अहल्येलाच दोषी ठरवले
हे ठार चुकीचे अनुमान आहे, अहिल्या निर्दोष नव्हतीच . ब्रह्मचर्येऽपि वर्तन्त्याः साध्व्या ह्यपि च श्रूयते । हृद्यं हि पुरुषं दृष्ट्वा योनिः संक्लिद्यते स्त्रियाः । । २८ तुम्ही पुढचे दोन श्लोक वाचा म्हणजे तुम्हाला अहिल्येचा काय अ‍ॅटीट्युड होता तेही लक्षात येईल : अथाब्रवीत् सुरश्रेष्ठं कृतार्थेनान्तरात्मना । कृतार्थास्मि सुरश्रेष्ठ गच्छ शीघ्रमितः प्रभो ॥ २० ॥ आत्मानं मां च देवेश सर्वथा रक्ष गौतमात् । इन्द्रस्तु प्रहसन् वाक्यमहल्यामिदमब्रवीत् ॥ २१ ॥ सुश्रोणि परितुष्टोऽस्मि गमिष्यामि यथागतम् । रतिक्रिडेनंतर तिने देवराज इंद्रास संतुष्टचित्त होऊन म्हटले - "सुरश्रेष्ठ ! मी आपल्या समागमाने कृतार्थ झाले आहे. प्रभो ! आता आपण शीघ्र येथून निघून जावे. देवेश्वर ! महर्षि गौतमांच्या कोपापासून आपण आपले आणि माझे सर्व प्रकारे रक्षण करावे." ॥ २० ॥ तेव्हां इंद्राने हसत हसत अहल्येस म्हटले - "सुंदरी ! मीही संतुष्टचित्त झालो आहे. आता जसा आलो होतो तसाच परत निघून जाईन. ॥ २१ १/२ ॥ ह्यावरुन स्पष्ट दिसुन येते की झालेला प्रकार बलात्कार नव्हता , व्यवस्थित तेरीभी चुप मेरीभी चुप असे शिस्तीत केलेले डांगडिंग होते. त्यामुळे बलात्कार हा शब्द संपादित केला पाहिजे. ______________________________________________ बाकी लेखाविषयी काय बोलणार ? जाऊ द्या. धर्माची अशी ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्लूऊऊऊऊ बालीश संकल्पना असणार्‍या लोकांच्यामुळे खरे कडक सनातनी लोकं बदनाम होतात , हे पुनरेकवार नमुद करु इच्चितो. इत्यलम.

In reply to by प्रसाद गोडबोले

विवेकपटाईत Wed, 02/14/2024 - 10:56
अपराधी व्यक्तीला दिला जाणार दंड इंद्राला दिला. बलात्कार केला होता म्हणून. ज्या श्र्लोकांच्या आधारावर हा लेख आहे त्यात ती निर्दोष आहे आणि ऋषी गौतम तिच्या सोबत आश्रमात होते.त्यांनी श्राप दिला असता तर ते तिच्या सोबत आश्रमात नसते. यावरून दोन निष्कर्ष निघतात. १. अहल्या दोषी ठरविण्याचा भाग नंतर जोडला असेल. २. वाल्मिकी ने समाजात पसरलेल्या प्रवादाचे वर्णन केले असेल. मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम अपराधी स्त्रीच्या आश्रमात जाणे शक्य नाही. बाकी मी खरा सनातनी आहे.

विवेकपटाईत Sun, 02/11/2024 - 16:53
आपल्या सर्वच धर्मग्रंथात बदलता काळ आणि परिस्थिती अनुसार भेसळ झाली आहे. वाल्मिकी रामायणात अयोध्या कांड सर्ग ४८ आणि ४९ मध्ये विरोधाभास आहेत.याचा एकच अर्थ त्यात भेसळ झाली आहे. ४९ सर्गातील श्लोक १२ ते २२ जी कथा सांगतात त्या आधारावर वरील विवरण आहे. या कथेत गौतमाने अहल्येचा त्याग केला असा उल्लेख नाही. त्याच्या आश्रमाला लोकांनी वाळीत टाकले असाच एक अर्थ निघतो.

In reply to by विवेकपटाईत

कॉमी Sun, 02/11/2024 - 18:06
१. पहिली चूक, (अनावधानाने झाली असेल.) आपण आयोध्याकान्ड नाही तर बालकान्डाबद्दल बोलत आहोत. अहिल्येची गोष्ट बालकान्डात आहे. २. ४८व्या सर्गात अहिल्येला शाप कसा मिळाला ह्याची गोष्ट आहे. त्यात अजून राम-लक्ष्मण-विश्वामित्र त्रिकूटाने अजुन आश्रमात प्रवेश केला नाही. ४९व्या सर्गात इन्द्राला बोकडाचे वृषण कसे आले ह्याचे वर्णन आहे, त्यानन्तर त्रिकूट आश्रमात प्रवेश करते, आणि रामाकरवी अहिल्येचा उद्धार होतो. ह्या सर्गामध्ये पुन्हा शाप कसा मिळाला ही गोष्ट येत नाही. उ:शाप कसा असेल ह्यामध्येही ४८ आणि ४९व्या सर्गात कसलाही विरोधाभास नाही. त्यामुळे कोणताही विरोधाभास दिसला नाही. तुमच्या "वाळीत टाकले" थियरीला कसलाही आधार नाही. वर मार्कस ह्यांनी इन्द्रावर आरोप कसा चुकीचा आहे लिहिलेच आहे.

In reply to by प्रचेतस

अवांतर : पण वल्लीसर , हे असे लेख वाचुन आणि लोकांचे धर्माचे ज्ञान पाहुन माझ्या मनात कायम एक विचार येत असतो, जाणकार अभ्यासु लोकांनी धर्मध्वजा हातात घेतली नाही तर ती पटाईत काकांसारख्या भोळ्या भाबड्या भाविकांच्याच हातात जाणार अन शुध्द तर्कशास्त्र , अन लोकोत्तर अशा औपनिषदिक तत्वज्ञानावर आधारित अशा सनातन धर्माला ल्ल्ल्ल्ल्ल्लूऊऊऊऊ बाष्कळ अशी पुटं चढत जाणार ! ह्या सार्‍यात काही अंशी आपल्यासारख्या जाणुन कळुनही अलिप्त राहणार्‍या लोकांचा थोडा का होईना दोष आहे असे म्हणायला वाव आहे :( स्वामी विवेकानंद म्हणालेले - मला दुर्जनांच्या सक्रियतेची भीति नाही वाटत , मला सज्जन्नांच्या निष्क्रियतेची भीती वाटते. तसे काहीसे. आपण काही धर्माचे सखोल जाणकार नाही पण थोडेफार तरी अभ्यास केलेले , मुळ ग्रंथांच्या संहितांवर आपले आकलन तपासुन घेतलेले , सत्यासत्यता तावुन सुलाखुन पाहिलेले आहोत. आपण काहीतरी करायला हवे.

In reply to by प्रसाद गोडबोले

प्रचेतस Tue, 02/13/2024 - 08:59
तुका म्हणे उगी रहावे, जे जे होईल ते ते पहावे, चित्ती असू द्यावे समाधान ॥ आपला आपणच अभ्यास करावा आणि वेळोवेळी त्यासंबंधी लिहित जावे इतकेच करु शकतो.

In reply to by Bhakti

Trump Wed, 02/14/2024 - 13:41
प्रगो एक यूट्यूब चैनल बनवा बघा!
बनवतील असे वाटत नाही. त्यापेक्षा मिसळपाववर लिहा. अर्थातच ज्ञान वाटणार नाहीत, फक्त लिहतील त्यांच्यावर टिका करत राहणार.

In reply to by प्रचेतस

विवेकपटाईत Wed, 02/14/2024 - 11:24
ज्या इतिहासाचे वर्णन समर्थानी आणि वाल्मिकी ऋषींनी केले आहे तिचे लिहले आहे. अहल्या निर्दोष होती म्हणून तिला अपराध मुक्त केले. जरा थंड डोक्याने लेख वाचाल तर कळेल.

In reply to by विवेकपटाईत

आवरा .
अहल्या निर्दोष होती म्हणून तिला अपराध मुक्त केले
निर्दोष व्यक्तीला अपराध मुक्त कसं करतात ?=)))) ऐश आहे राव अहिल्येची. स्वेच्छेने मजा मारून सुध्धा ती निर्दोष. अन् बिचारा इंद्र, त्याला अहिल्येने फुल्ल सिग्नल दिला, पूर्ण कन्सेट दिला सेक्स करायला, तरी तो बलात्कारी . अगाध तर्क आहे हा . आता अहिल्या लगेच #metoo म्हणायला रिकामी. =)))) ही असली बाष्कळ विचारसरणी असणारे लोक समाजात आहेत हे मी माझ्या मित्रांना सांगितले तर त्यांचा जुन्या एक्स गर्लफ्रेंडस चां सोबतीतील "आठवणी" आठवून भीतीने थरकाप उडेल. अन् मग मटण च्यां दुकानात बोकडाचे वृषण शोधत फिरायची वेळ येईल =))))

कर्नलतपस्वी Mon, 02/12/2024 - 12:18
उठ सुट हिन्दू धर्मावरून शककुशंका काढून काही बाही लिहिण्याची फॅशन आणी पॅशन झाली आहे. इतर धर्मावरून काहीही बोलले तरी त्या धर्माचे लोक गंभीर दखल घेतात.

नठ्यारा Tue, 02/13/2024 - 02:30
प्रसाद गोडबोले,
धर्माची अशी ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्लूऊऊऊऊ बालीश संकल्पना असणार्‍या लोकांच्यामुळे खरे कडक सनातनी लोकं बदनाम होतात , हे पुनरेकवार नमुद करु इच्चितो.
प्रचंड सहमत. धर्माची माहिती अचूक असणे अभिप्रेत आहे. ती नसल्यास चिंतन करावे. पण मानवी प्रयत्नांची पराकाष्ठा केल्यानंतरच चिंतनाचा मार्ग अनुसरावा. अन्यथा चिंतन अर्धवट माहितीवर आधारित राहते. खरंतर नेमका असाच प्रकार विज्ञानाच्या बाबतीतही आढळून येतो. विज्ञानाची व वैज्ञानिक चिकित्सेची बालिश संकल्पना असणाऱ्या लोकांच्यामुळे खरे कडक विज्ञानवादी नाहक बदनाम होतात. धर्म आणि विज्ञान एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत ( किंवा असायला हव्यात ). -नाठाळ नठ्या

In reply to by अमरेंद्र बाहुबली

विवेकपटाईत Wed, 02/14/2024 - 11:45
धर्मग्रंथात भेसळ होते. आपले विचार ऋषि मुनींच्या नावाने धर्मग्रंथात खपविले जातात. धर्मग्रंथ नाहक बदनाम होतात. राजा भोजच्या काळात महाभारताचे श्लोक वीस पासून पंचवीस हजार पर्यंत पोहचले. त्यांनी यावर कडक नियम बनविले होते आणि दंड ही दिल्याचे उदाहरण आहेत. तरीही श्लोक वाढत राहिले हे वेगळे. त्यामुळे धर्मग्रंथ वाचताना भेसळ वेगळी करून त्यांचे अर्थ समजले पाहिजे. लेख लिहिताना वाल्मिकी रामायणाचे उदाहरण देताना फक्त अहल्येला निर्दोष ठरविणारे श्लोकांचे उदाहरण दिले.

In reply to by विवेकपटाईत

अहिरावण Wed, 02/14/2024 - 13:00
>>>>राजा भोजच्या काळात महाभारताचे श्लोक वीस पासून पंचवीस हजार पर्यंत पोहचले. त्यांनी यावर कडक नियम बनविले होते आणि दंड ही दिल्याचे उदाहरण आहेत राजा भोज हाच का? इ स ११ वे शतक इ स दुसरे शतकातच महाभारत लक्षश्लोकी झाले होते. मग वीस चे पंचवीस काय ? दंड काय? आले मनात दिले ठोकून हेच कारण सनातनी बदनाम होण्याचे. केवळ मी सनातनी आहे असे लिहून चालत नाही. वागावे लागते.

सुरिया Tue, 02/13/2024 - 16:08
घरच्या सीतेला चूक नसताना प्रजेच्या समधानासाठी अग्निपरिक्षा आणि पुन्हा वनवास. बाहेर करणार अहिल्येचा उध्दार आणि प्रजेला शिकवणार वाळीत टाकलेल्यांना कसे स्वीकारायचे ते. . वाह प्रभू अगाध तेरी लीला.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

शंबुक कसले शिक्षण घेत होता ? कुठे ऍडमिशन घेतलेले त्याने की ऍडमिशन न घेताच कॉलेजात घुसून बसलेला ? एलिजिबिलिटी एक्साम पास केली होती का त्याने ? शूद्रयोन्यां प्रजातोऽस्मि तप उग्रं समास्थितः । देवत्वं पार्थये राम सशरीरो महायशः ॥ २ ॥ न मिथ्याऽहं वदे राम देवलोकजिगीषया । शूद्रं मां विद्धि काकुत्स्थ शम्बूकं नाम नामतः ॥ ३ ॥ जो जो धर्माला विरुद्ध असे कृत्य करेल त्याचा त्याचा नाश रामारायानी केलेला आहे. मग त्यात शूद्र शंबुक आला, वानर वाली आला, स्त्री त्रातिका आली , अन् ब्राह्मण रावणही आला. श्रीरामाच्या चरित्रात कोठेही नाव ठेवायला जागा नाही. ते साक्षात धर्मस्वरुप आहेत. ( आणि त्यांनतर दुसरा म्हणजे युधिष्ठिर.) रामो विग्रहवान् धर्मः साधुः सत्यपराक्रमः । राजा सर्वस्य लोकस्य देवानाम् इव वासवः ॥ राम मूर्तिमंत सनातनधर्म आहे. हे वर्णन राक्षस मारीच ने केलेलं आहे, कोणी ब्राह्मण अथवा क्षात्रियाने नाही. पण कावीळ झालेल्यांना ते समजणार नाही. इत्यलम

In reply to by प्रसाद गोडबोले

कॉमी Tue, 02/13/2024 - 18:46
अनेक राक्षस इत्यादी तप करून वाट्टेल ते वर घेऊ शकतात. शुद्राने तप केले तर राजा येऊन मस्तक उडवून टाकतो आणि देव देवता फुलांचा वर्षाव करतात, आणि म्हणतात, ह्याला सदेह स्वर्गात जाऊ दिले नाही बरे केले.

हे असं होतं बघा. @विवेक पटाईत काका, हे पहा वराचे काही मोजके प्रतिसाद. तुमच्या अनाभ्यासातून म्हणा किंवा भोळ्या भाबड्या भक्तिभावतून आलेल्या बाळबोध लेखांमुळे लोकांचे कसे फावते ते. म्हातारी मेल्याचे दुःख नाही, पण काळ सोकावतो. ह्या म्हणीचे जिवंत उदाहरण इथे दिसून येत आहे. तुम्ही भक्तिभावाने काहीतरी बालिश लिहून जाता, त्याने सनातन धर्माला काही फरक पडत नाही पण लगेच धर्माची बदनामी करणाऱ्या अनभ्यासू लोकांना मोकळे रान मिळते, स्वतचा अजेंडा रेटायची संधी मिळते. हे जास्त गंभीर आहे. पुढे - आपण जास्त विचार अन् अभ्यास करून, मूळ संहिता पाहून, मगच लेख लिहावेत अशी सद्बुद्धी आपल्याला मिळो हीच प्रभू रामारायाच्या चरणी प्रार्थना.

In reply to by कॉमी

संपूर्ण वाल्मिकी रामायण ह्या इथे उपलब्ध आहे , तेही अत्यंत सुगम मराठी भाषांतर सह! https://satsangdhara.net/vara/prastavik.htm तुम्ही माझ्यावर विश्वास ठेऊ नका, मी ३.५% वाला आहे. तुम्ही मूळ संहिता वाचा, तुमचे तुम्हालाच कळेल की काय चूक आहे ते. अभ्यासोनी प्रकटावे। नाहीतर झाकोनी असावे। प्रकटोनी नासावे।हे बरे नव्हे।। - समर्थ रामदास स्वामी

In reply to by प्रसाद गोडबोले

कॉमी Tue, 02/13/2024 - 18:33
तुम्हीच तुमचा पाळला नाहीये. प्रगट झाला आणि आता म्हणता आहात तुमचे तुम्ही बघा. तुम्हाला तुमचे म्हणणे स्पष्ट करायचे नव्हते तर झाकोनी असावे, हे सार्थ झाले नसते का ? इंद्र कसा बलात्कारी नाही हे सांगायला कसा आलेला तसाच इथेही या, की वर सुरिया ह्यांनी काय चुकीचे लिहिले आहे सांगायला. बाकी कोण कुठल्या टक्क्यातले ह्याचे भारीच ऑब्सेशन दिसते तुम्हाला.

In reply to by कॉमी

कशाला वेळ वाया घालवायचा ? रामायण न वाचता रामावर टीका करणारे लोक बहुतांश वेळा ब्राह्मणद्वेष्टे आणि इन जनरल हिंदुद्वेषी असतात. मी कितीही श्लोक अन् संदर्भ दिले तरी त्याचा काहीही उपयोग नाही. मग कशाला वेळ वाया घालावा. बाकि विवेक पटाईत काका, हे धर्म द्वेष्टे नाही, उलट भोळे भाविक आहे, त्यांचे अहील्येविषयी, इंद्राविषयीचे चुकीचे आकलन हे अनाभ्यासतून आलेले आहे , द्वेषातून नाही , त्यांचा मूळ हेतू शुद्ध आहे म्हणून मी त्यांना प्रतिसाद दिलेला आहे. बाकि कोणाशी मला बोलायची इच्छा नाही.

In reply to by प्रसाद गोडबोले

Trump Tue, 02/13/2024 - 18:52
तुम्ही माझ्यावर विश्वास ठेऊ नका, मी ३.५% वाला आहे.
हे विधान तद्दन मुर्खपणाचे आहे. हिंदु समाजाच्या/धर्माच्या, भारताच्या अवनतीला जिथे-तिथे जन्माधारीत जात आणि वर्ण घुसवणारे लोक आहेत.

नठ्यारा Tue, 02/13/2024 - 18:47
लोकहो, पटाईतकाकांनी अस्सल स्रोत न वापरल्याने त्यांच्यावर टीका केली गेली. हे एका अर्थी उचित आहे. मात्र ती जरा जास्तंच तीव्र भाषेत केली गेली, असं माझं मत आहे. पटाईतकाका हिंदू धर्माच्या बाजूने लिहिणारे आहेत. ते दुखावले गेले नसतील अशी आशा आहे. प्रक्षेपांमुळे खरंच सनातन हिंदू लोकं बदनाम होतात का, असा प्रश्न आहे. हेच या संदेशामागील प्रयोजन आहे. एक उदाहरण देतो. राधा हे पात्र व्यासरचित महाभारतात नाही. तरीपण राधे-राधे संप्रदाय जोरात चालू आहे. त्यामुळे हिंदू धर्मास काही हानी पोचली आहे असं सकृतदर्शनी तरी दिसंत नाही. तेव्हा या विषयावर अधिक खोलात चर्चा करायला आवडेल. -नाठाळ नठ्या -नाठाळ नठ्या

In reply to by नठ्यारा

अहिरावण Tue, 02/13/2024 - 19:26
प्रक्षेपांमुळे हिंदू धर्माला काहीही हानी पोहोचत नाही. मात्र देशमुखरानडेसंप्रदायातील नवपुरोगामी भुक्कडांना गरळ ओकायची संधी मिळते, त्यांचे फावते.

In reply to by नठ्यारा

विवेकपटाईत Wed, 02/14/2024 - 11:57
प्रतिसाद आवडला. वाल्मिकी रामायणात जे आहे त्याचेच वर्णन आहे. अहल्या निर्दोष होती म्हणून श्रीरामाने तिचे आतिथ्य स्वीकार करून पुन्हा समाजात आणले. त्यामुळे तिला दोषी ठरविणारे श्लोक १०० टक्के भेसळ आहेत किंवा वाल्मिकीने त्यावेळी तिच्या बाबतीत समाजात पसरलेल्या प्रवादांचे वर्णन केले आहे.

Bhakti Wed, 02/14/2024 - 08:19
प्रगो बरोबर बोलतोय.कोमी यांनी 'संदर्भ' मांडलेत.हा तुमचा लेख मी एक वर्षांपूर्वी जरी वाचला असता तर भारावून गेले असते.पण गेल्या वर्षांपासून इतकं सनातन शोधून ऐकतेय,वाचतेय, समजून घेत आहे की बस!यू ट्यूब तर एका क्लिकवर आहे तेव्हा अमी गणात्रा(ex IIM) आणि विनित अग्रवाल(Dr.) जे आजच्या पिढीचे आहेत यांना महाभारत आणि रामायण यांच्या विषयी 'अचूक' बोलतांना नक्की ऐका. हे रामायण मधील राम ,सीता, हनुमान,अहिल्या,दशरथ इ.यांच्या कृतींची पडलेल्या प्रश्नांची हमखास उत्तरं देतो. "अहिल्या तपस्वी आहे रामा तिचे पाय धर,"असे विश्वामित्र म्हणतात.अहिल्येप्रमाणेच एकेकाळी विश्वामित्र लस्ट/मोह या इंद्रिय लोभाने भरकटले होते.तेव्हा तिची स्थिती विश्वामित्र यांना भलेभाती समजली होती.माणसाला दुसरी संधी नक्कीच द्यायला हवी. https://youtu.be/hppH--9iDxg?si=XgOl_bKgBV_ix5cE

कॉमी Sun, 02/11/2024 - 10:57
मुनिवेषं सहस्राक्षं विज्ञाय रघुनन्दन।1.48.19 मतिं चकार दुर्मेधा देवराजकुतूहलात्।
अर्थ:
O Delight of the Raghus the evilintentioned Ahalya, inclined towards the king of the celestials and knowing him to be the thousandeyed Indra in the guise of the ascetic, consented for the union.
अर्थः हिन्दी (गीताप्रेस गोरखपुर)
हे रघुनंदन ! महर्षी गौतमका वेष धारण करके आये हुए इन्द्रको पहचानकर भी उस दुर्बुद्धी नारीने ‘अहो! देवराज इन्द्र मुझे चाहते है’ इस कौतूहलवश उनके साथ समागमका निश्चय करके वह प्रस्ताव स्वीकार कर लिया॥
नवर्‍यानेच शाप दिला असताना रोटी बेटी व्यवहाराचा, समाजाने वाळीत टाकायचा प्रश्नच येत नाही. शाप काय आहे ?
तथा शप्त्वा स वै शक्रमहल्यामपि शप्तवान्।।1.48.29।। इह वर्षसहस्राणि बहूनि त्वं निवत्स्यसि। वायुभक्षा निराहारा तप्यन्ती भस्मशायिनी।।1.48.30।। अदृश्या सर्वभूतानां आश्रमेऽस्मिन्निवत्स्यसि। यदा चैतद्वनं घोरं रामो दशरथात्मज:।।1.48.31।। आगमिष्यति दुर्धर्षस्तदा पूता भविष्यसि।
अर्थ-
Having thus cursed Indra, he also cursed Ahalya: 'You will be staying here for thousands of years without food and subsisting on air, lying down in ashes, doing penance, without being seen by any living beings in this ashrama' 'When the son of Dasaratha, the unassailable Rama enters this dreadful forest, you will be cleansed (of this sin)'. 'O Wickednatured one by offering hospitality to Rama, without covetousness and passion, you will happily live with me by regaining your present form'..
हिंदी-
इन्द्र को इस प्रकार शाप देकर गौतमने अपनी पत्नी को भी शाप दिया—‘दुराचारिणी! तू भी यहाँ कई हजार वर्षोतक केवल हवा पीकर या उपवास करके कष्ट उठाती हुई राखमे पड़ी रहेगी। समस्त प्राणियोंसे अदृश्य रहकर इस आश्रममे निवास करेगी। जब दुर्शर्ष दशरथ-कुमार राम इस घोर वनमें पदार्पण करेंगे, उस समय तू पवित्र होगी। उनका अतिथ्य-सत्कार करनेसे तेरे लोभ-मोह आदी दोष दूर हो जायँगे और तू प्रसन्नतापूर्वक मेरे पास पहूँचकर अपना पूर्व शरीर धारण कर लेगी’॥
(इंद्राचा शाप- त्याची वृषणं गळून पडली.) जमिनीवर फक्त हवा खात पडून राहणे, कुणाला नजरेत न येणे हे शिळेचे वर्णन वाटते. त्यानंतर "तु पुन्हा तुझ्या मूळ रुपात येशील" या उःशापावरुन अहील्येचे कशात तरी परिवर्तन झालेले हे समजते.

बलात्कार
ह्या शब्दाचा ठार निषेध करतो. वर कॉमी ह्यांनी मुळ श्लोक दिलेलाच आहे. अहिल्येला स्पष्ट ठाऊक होते की समोरचा व्यक्ती हा आपला पती नसुन देवराज इन्द्र आहे , आणि तरीही ती त्याच्याशी रत झाली , मग ह्याला बलात्कार कसे म्हणाता येईल? हे तर म्युचुअल कन्सेट ने झालेले अफेयर आहे !
अहल्या निर्दोष होती तरी समाजाने अहल्येलाच दोषी ठरवले
हे ठार चुकीचे अनुमान आहे, अहिल्या निर्दोष नव्हतीच . ब्रह्मचर्येऽपि वर्तन्त्याः साध्व्या ह्यपि च श्रूयते । हृद्यं हि पुरुषं दृष्ट्वा योनिः संक्लिद्यते स्त्रियाः । । २८ तुम्ही पुढचे दोन श्लोक वाचा म्हणजे तुम्हाला अहिल्येचा काय अ‍ॅटीट्युड होता तेही लक्षात येईल : अथाब्रवीत् सुरश्रेष्ठं कृतार्थेनान्तरात्मना । कृतार्थास्मि सुरश्रेष्ठ गच्छ शीघ्रमितः प्रभो ॥ २० ॥ आत्मानं मां च देवेश सर्वथा रक्ष गौतमात् । इन्द्रस्तु प्रहसन् वाक्यमहल्यामिदमब्रवीत् ॥ २१ ॥ सुश्रोणि परितुष्टोऽस्मि गमिष्यामि यथागतम् । रतिक्रिडेनंतर तिने देवराज इंद्रास संतुष्टचित्त होऊन म्हटले - "सुरश्रेष्ठ ! मी आपल्या समागमाने कृतार्थ झाले आहे. प्रभो ! आता आपण शीघ्र येथून निघून जावे. देवेश्वर ! महर्षि गौतमांच्या कोपापासून आपण आपले आणि माझे सर्व प्रकारे रक्षण करावे." ॥ २० ॥ तेव्हां इंद्राने हसत हसत अहल्येस म्हटले - "सुंदरी ! मीही संतुष्टचित्त झालो आहे. आता जसा आलो होतो तसाच परत निघून जाईन. ॥ २१ १/२ ॥ ह्यावरुन स्पष्ट दिसुन येते की झालेला प्रकार बलात्कार नव्हता , व्यवस्थित तेरीभी चुप मेरीभी चुप असे शिस्तीत केलेले डांगडिंग होते. त्यामुळे बलात्कार हा शब्द संपादित केला पाहिजे. ______________________________________________ बाकी लेखाविषयी काय बोलणार ? जाऊ द्या. धर्माची अशी ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्लूऊऊऊऊ बालीश संकल्पना असणार्‍या लोकांच्यामुळे खरे कडक सनातनी लोकं बदनाम होतात , हे पुनरेकवार नमुद करु इच्चितो. इत्यलम.

In reply to by प्रसाद गोडबोले

विवेकपटाईत Wed, 02/14/2024 - 10:56
अपराधी व्यक्तीला दिला जाणार दंड इंद्राला दिला. बलात्कार केला होता म्हणून. ज्या श्र्लोकांच्या आधारावर हा लेख आहे त्यात ती निर्दोष आहे आणि ऋषी गौतम तिच्या सोबत आश्रमात होते.त्यांनी श्राप दिला असता तर ते तिच्या सोबत आश्रमात नसते. यावरून दोन निष्कर्ष निघतात. १. अहल्या दोषी ठरविण्याचा भाग नंतर जोडला असेल. २. वाल्मिकी ने समाजात पसरलेल्या प्रवादाचे वर्णन केले असेल. मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम अपराधी स्त्रीच्या आश्रमात जाणे शक्य नाही. बाकी मी खरा सनातनी आहे.

विवेकपटाईत Sun, 02/11/2024 - 16:53
आपल्या सर्वच धर्मग्रंथात बदलता काळ आणि परिस्थिती अनुसार भेसळ झाली आहे. वाल्मिकी रामायणात अयोध्या कांड सर्ग ४८ आणि ४९ मध्ये विरोधाभास आहेत.याचा एकच अर्थ त्यात भेसळ झाली आहे. ४९ सर्गातील श्लोक १२ ते २२ जी कथा सांगतात त्या आधारावर वरील विवरण आहे. या कथेत गौतमाने अहल्येचा त्याग केला असा उल्लेख नाही. त्याच्या आश्रमाला लोकांनी वाळीत टाकले असाच एक अर्थ निघतो.

In reply to by विवेकपटाईत

कॉमी Sun, 02/11/2024 - 18:06
१. पहिली चूक, (अनावधानाने झाली असेल.) आपण आयोध्याकान्ड नाही तर बालकान्डाबद्दल बोलत आहोत. अहिल्येची गोष्ट बालकान्डात आहे. २. ४८व्या सर्गात अहिल्येला शाप कसा मिळाला ह्याची गोष्ट आहे. त्यात अजून राम-लक्ष्मण-विश्वामित्र त्रिकूटाने अजुन आश्रमात प्रवेश केला नाही. ४९व्या सर्गात इन्द्राला बोकडाचे वृषण कसे आले ह्याचे वर्णन आहे, त्यानन्तर त्रिकूट आश्रमात प्रवेश करते, आणि रामाकरवी अहिल्येचा उद्धार होतो. ह्या सर्गामध्ये पुन्हा शाप कसा मिळाला ही गोष्ट येत नाही. उ:शाप कसा असेल ह्यामध्येही ४८ आणि ४९व्या सर्गात कसलाही विरोधाभास नाही. त्यामुळे कोणताही विरोधाभास दिसला नाही. तुमच्या "वाळीत टाकले" थियरीला कसलाही आधार नाही. वर मार्कस ह्यांनी इन्द्रावर आरोप कसा चुकीचा आहे लिहिलेच आहे.

In reply to by प्रचेतस

अवांतर : पण वल्लीसर , हे असे लेख वाचुन आणि लोकांचे धर्माचे ज्ञान पाहुन माझ्या मनात कायम एक विचार येत असतो, जाणकार अभ्यासु लोकांनी धर्मध्वजा हातात घेतली नाही तर ती पटाईत काकांसारख्या भोळ्या भाबड्या भाविकांच्याच हातात जाणार अन शुध्द तर्कशास्त्र , अन लोकोत्तर अशा औपनिषदिक तत्वज्ञानावर आधारित अशा सनातन धर्माला ल्ल्ल्ल्ल्ल्लूऊऊऊऊ बाष्कळ अशी पुटं चढत जाणार ! ह्या सार्‍यात काही अंशी आपल्यासारख्या जाणुन कळुनही अलिप्त राहणार्‍या लोकांचा थोडा का होईना दोष आहे असे म्हणायला वाव आहे :( स्वामी विवेकानंद म्हणालेले - मला दुर्जनांच्या सक्रियतेची भीति नाही वाटत , मला सज्जन्नांच्या निष्क्रियतेची भीती वाटते. तसे काहीसे. आपण काही धर्माचे सखोल जाणकार नाही पण थोडेफार तरी अभ्यास केलेले , मुळ ग्रंथांच्या संहितांवर आपले आकलन तपासुन घेतलेले , सत्यासत्यता तावुन सुलाखुन पाहिलेले आहोत. आपण काहीतरी करायला हवे.

In reply to by प्रसाद गोडबोले

प्रचेतस Tue, 02/13/2024 - 08:59
तुका म्हणे उगी रहावे, जे जे होईल ते ते पहावे, चित्ती असू द्यावे समाधान ॥ आपला आपणच अभ्यास करावा आणि वेळोवेळी त्यासंबंधी लिहित जावे इतकेच करु शकतो.

In reply to by Bhakti

Trump Wed, 02/14/2024 - 13:41
प्रगो एक यूट्यूब चैनल बनवा बघा!
बनवतील असे वाटत नाही. त्यापेक्षा मिसळपाववर लिहा. अर्थातच ज्ञान वाटणार नाहीत, फक्त लिहतील त्यांच्यावर टिका करत राहणार.

In reply to by प्रचेतस

विवेकपटाईत Wed, 02/14/2024 - 11:24
ज्या इतिहासाचे वर्णन समर्थानी आणि वाल्मिकी ऋषींनी केले आहे तिचे लिहले आहे. अहल्या निर्दोष होती म्हणून तिला अपराध मुक्त केले. जरा थंड डोक्याने लेख वाचाल तर कळेल.

In reply to by विवेकपटाईत

आवरा .
अहल्या निर्दोष होती म्हणून तिला अपराध मुक्त केले
निर्दोष व्यक्तीला अपराध मुक्त कसं करतात ?=)))) ऐश आहे राव अहिल्येची. स्वेच्छेने मजा मारून सुध्धा ती निर्दोष. अन् बिचारा इंद्र, त्याला अहिल्येने फुल्ल सिग्नल दिला, पूर्ण कन्सेट दिला सेक्स करायला, तरी तो बलात्कारी . अगाध तर्क आहे हा . आता अहिल्या लगेच #metoo म्हणायला रिकामी. =)))) ही असली बाष्कळ विचारसरणी असणारे लोक समाजात आहेत हे मी माझ्या मित्रांना सांगितले तर त्यांचा जुन्या एक्स गर्लफ्रेंडस चां सोबतीतील "आठवणी" आठवून भीतीने थरकाप उडेल. अन् मग मटण च्यां दुकानात बोकडाचे वृषण शोधत फिरायची वेळ येईल =))))

कर्नलतपस्वी Mon, 02/12/2024 - 12:18
उठ सुट हिन्दू धर्मावरून शककुशंका काढून काही बाही लिहिण्याची फॅशन आणी पॅशन झाली आहे. इतर धर्मावरून काहीही बोलले तरी त्या धर्माचे लोक गंभीर दखल घेतात.

नठ्यारा Tue, 02/13/2024 - 02:30
प्रसाद गोडबोले,
धर्माची अशी ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्लूऊऊऊऊ बालीश संकल्पना असणार्‍या लोकांच्यामुळे खरे कडक सनातनी लोकं बदनाम होतात , हे पुनरेकवार नमुद करु इच्चितो.
प्रचंड सहमत. धर्माची माहिती अचूक असणे अभिप्रेत आहे. ती नसल्यास चिंतन करावे. पण मानवी प्रयत्नांची पराकाष्ठा केल्यानंतरच चिंतनाचा मार्ग अनुसरावा. अन्यथा चिंतन अर्धवट माहितीवर आधारित राहते. खरंतर नेमका असाच प्रकार विज्ञानाच्या बाबतीतही आढळून येतो. विज्ञानाची व वैज्ञानिक चिकित्सेची बालिश संकल्पना असणाऱ्या लोकांच्यामुळे खरे कडक विज्ञानवादी नाहक बदनाम होतात. धर्म आणि विज्ञान एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत ( किंवा असायला हव्यात ). -नाठाळ नठ्या

In reply to by अमरेंद्र बाहुबली

विवेकपटाईत Wed, 02/14/2024 - 11:45
धर्मग्रंथात भेसळ होते. आपले विचार ऋषि मुनींच्या नावाने धर्मग्रंथात खपविले जातात. धर्मग्रंथ नाहक बदनाम होतात. राजा भोजच्या काळात महाभारताचे श्लोक वीस पासून पंचवीस हजार पर्यंत पोहचले. त्यांनी यावर कडक नियम बनविले होते आणि दंड ही दिल्याचे उदाहरण आहेत. तरीही श्लोक वाढत राहिले हे वेगळे. त्यामुळे धर्मग्रंथ वाचताना भेसळ वेगळी करून त्यांचे अर्थ समजले पाहिजे. लेख लिहिताना वाल्मिकी रामायणाचे उदाहरण देताना फक्त अहल्येला निर्दोष ठरविणारे श्लोकांचे उदाहरण दिले.

In reply to by विवेकपटाईत

अहिरावण Wed, 02/14/2024 - 13:00
>>>>राजा भोजच्या काळात महाभारताचे श्लोक वीस पासून पंचवीस हजार पर्यंत पोहचले. त्यांनी यावर कडक नियम बनविले होते आणि दंड ही दिल्याचे उदाहरण आहेत राजा भोज हाच का? इ स ११ वे शतक इ स दुसरे शतकातच महाभारत लक्षश्लोकी झाले होते. मग वीस चे पंचवीस काय ? दंड काय? आले मनात दिले ठोकून हेच कारण सनातनी बदनाम होण्याचे. केवळ मी सनातनी आहे असे लिहून चालत नाही. वागावे लागते.

सुरिया Tue, 02/13/2024 - 16:08
घरच्या सीतेला चूक नसताना प्रजेच्या समधानासाठी अग्निपरिक्षा आणि पुन्हा वनवास. बाहेर करणार अहिल्येचा उध्दार आणि प्रजेला शिकवणार वाळीत टाकलेल्यांना कसे स्वीकारायचे ते. . वाह प्रभू अगाध तेरी लीला.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

शंबुक कसले शिक्षण घेत होता ? कुठे ऍडमिशन घेतलेले त्याने की ऍडमिशन न घेताच कॉलेजात घुसून बसलेला ? एलिजिबिलिटी एक्साम पास केली होती का त्याने ? शूद्रयोन्यां प्रजातोऽस्मि तप उग्रं समास्थितः । देवत्वं पार्थये राम सशरीरो महायशः ॥ २ ॥ न मिथ्याऽहं वदे राम देवलोकजिगीषया । शूद्रं मां विद्धि काकुत्स्थ शम्बूकं नाम नामतः ॥ ३ ॥ जो जो धर्माला विरुद्ध असे कृत्य करेल त्याचा त्याचा नाश रामारायानी केलेला आहे. मग त्यात शूद्र शंबुक आला, वानर वाली आला, स्त्री त्रातिका आली , अन् ब्राह्मण रावणही आला. श्रीरामाच्या चरित्रात कोठेही नाव ठेवायला जागा नाही. ते साक्षात धर्मस्वरुप आहेत. ( आणि त्यांनतर दुसरा म्हणजे युधिष्ठिर.) रामो विग्रहवान् धर्मः साधुः सत्यपराक्रमः । राजा सर्वस्य लोकस्य देवानाम् इव वासवः ॥ राम मूर्तिमंत सनातनधर्म आहे. हे वर्णन राक्षस मारीच ने केलेलं आहे, कोणी ब्राह्मण अथवा क्षात्रियाने नाही. पण कावीळ झालेल्यांना ते समजणार नाही. इत्यलम

In reply to by प्रसाद गोडबोले

कॉमी Tue, 02/13/2024 - 18:46
अनेक राक्षस इत्यादी तप करून वाट्टेल ते वर घेऊ शकतात. शुद्राने तप केले तर राजा येऊन मस्तक उडवून टाकतो आणि देव देवता फुलांचा वर्षाव करतात, आणि म्हणतात, ह्याला सदेह स्वर्गात जाऊ दिले नाही बरे केले.

हे असं होतं बघा. @विवेक पटाईत काका, हे पहा वराचे काही मोजके प्रतिसाद. तुमच्या अनाभ्यासातून म्हणा किंवा भोळ्या भाबड्या भक्तिभावतून आलेल्या बाळबोध लेखांमुळे लोकांचे कसे फावते ते. म्हातारी मेल्याचे दुःख नाही, पण काळ सोकावतो. ह्या म्हणीचे जिवंत उदाहरण इथे दिसून येत आहे. तुम्ही भक्तिभावाने काहीतरी बालिश लिहून जाता, त्याने सनातन धर्माला काही फरक पडत नाही पण लगेच धर्माची बदनामी करणाऱ्या अनभ्यासू लोकांना मोकळे रान मिळते, स्वतचा अजेंडा रेटायची संधी मिळते. हे जास्त गंभीर आहे. पुढे - आपण जास्त विचार अन् अभ्यास करून, मूळ संहिता पाहून, मगच लेख लिहावेत अशी सद्बुद्धी आपल्याला मिळो हीच प्रभू रामारायाच्या चरणी प्रार्थना.

In reply to by कॉमी

संपूर्ण वाल्मिकी रामायण ह्या इथे उपलब्ध आहे , तेही अत्यंत सुगम मराठी भाषांतर सह! https://satsangdhara.net/vara/prastavik.htm तुम्ही माझ्यावर विश्वास ठेऊ नका, मी ३.५% वाला आहे. तुम्ही मूळ संहिता वाचा, तुमचे तुम्हालाच कळेल की काय चूक आहे ते. अभ्यासोनी प्रकटावे। नाहीतर झाकोनी असावे। प्रकटोनी नासावे।हे बरे नव्हे।। - समर्थ रामदास स्वामी

In reply to by प्रसाद गोडबोले

कॉमी Tue, 02/13/2024 - 18:33
तुम्हीच तुमचा पाळला नाहीये. प्रगट झाला आणि आता म्हणता आहात तुमचे तुम्ही बघा. तुम्हाला तुमचे म्हणणे स्पष्ट करायचे नव्हते तर झाकोनी असावे, हे सार्थ झाले नसते का ? इंद्र कसा बलात्कारी नाही हे सांगायला कसा आलेला तसाच इथेही या, की वर सुरिया ह्यांनी काय चुकीचे लिहिले आहे सांगायला. बाकी कोण कुठल्या टक्क्यातले ह्याचे भारीच ऑब्सेशन दिसते तुम्हाला.

In reply to by कॉमी

कशाला वेळ वाया घालवायचा ? रामायण न वाचता रामावर टीका करणारे लोक बहुतांश वेळा ब्राह्मणद्वेष्टे आणि इन जनरल हिंदुद्वेषी असतात. मी कितीही श्लोक अन् संदर्भ दिले तरी त्याचा काहीही उपयोग नाही. मग कशाला वेळ वाया घालावा. बाकि विवेक पटाईत काका, हे धर्म द्वेष्टे नाही, उलट भोळे भाविक आहे, त्यांचे अहील्येविषयी, इंद्राविषयीचे चुकीचे आकलन हे अनाभ्यासतून आलेले आहे , द्वेषातून नाही , त्यांचा मूळ हेतू शुद्ध आहे म्हणून मी त्यांना प्रतिसाद दिलेला आहे. बाकि कोणाशी मला बोलायची इच्छा नाही.

In reply to by प्रसाद गोडबोले

Trump Tue, 02/13/2024 - 18:52
तुम्ही माझ्यावर विश्वास ठेऊ नका, मी ३.५% वाला आहे.
हे विधान तद्दन मुर्खपणाचे आहे. हिंदु समाजाच्या/धर्माच्या, भारताच्या अवनतीला जिथे-तिथे जन्माधारीत जात आणि वर्ण घुसवणारे लोक आहेत.

नठ्यारा Tue, 02/13/2024 - 18:47
लोकहो, पटाईतकाकांनी अस्सल स्रोत न वापरल्याने त्यांच्यावर टीका केली गेली. हे एका अर्थी उचित आहे. मात्र ती जरा जास्तंच तीव्र भाषेत केली गेली, असं माझं मत आहे. पटाईतकाका हिंदू धर्माच्या बाजूने लिहिणारे आहेत. ते दुखावले गेले नसतील अशी आशा आहे. प्रक्षेपांमुळे खरंच सनातन हिंदू लोकं बदनाम होतात का, असा प्रश्न आहे. हेच या संदेशामागील प्रयोजन आहे. एक उदाहरण देतो. राधा हे पात्र व्यासरचित महाभारतात नाही. तरीपण राधे-राधे संप्रदाय जोरात चालू आहे. त्यामुळे हिंदू धर्मास काही हानी पोचली आहे असं सकृतदर्शनी तरी दिसंत नाही. तेव्हा या विषयावर अधिक खोलात चर्चा करायला आवडेल. -नाठाळ नठ्या -नाठाळ नठ्या

In reply to by नठ्यारा

अहिरावण Tue, 02/13/2024 - 19:26
प्रक्षेपांमुळे हिंदू धर्माला काहीही हानी पोहोचत नाही. मात्र देशमुखरानडेसंप्रदायातील नवपुरोगामी भुक्कडांना गरळ ओकायची संधी मिळते, त्यांचे फावते.

In reply to by नठ्यारा

विवेकपटाईत Wed, 02/14/2024 - 11:57
प्रतिसाद आवडला. वाल्मिकी रामायणात जे आहे त्याचेच वर्णन आहे. अहल्या निर्दोष होती म्हणून श्रीरामाने तिचे आतिथ्य स्वीकार करून पुन्हा समाजात आणले. त्यामुळे तिला दोषी ठरविणारे श्लोक १०० टक्के भेसळ आहेत किंवा वाल्मिकीने त्यावेळी तिच्या बाबतीत समाजात पसरलेल्या प्रवादांचे वर्णन केले आहे.

Bhakti Wed, 02/14/2024 - 08:19
प्रगो बरोबर बोलतोय.कोमी यांनी 'संदर्भ' मांडलेत.हा तुमचा लेख मी एक वर्षांपूर्वी जरी वाचला असता तर भारावून गेले असते.पण गेल्या वर्षांपासून इतकं सनातन शोधून ऐकतेय,वाचतेय, समजून घेत आहे की बस!यू ट्यूब तर एका क्लिकवर आहे तेव्हा अमी गणात्रा(ex IIM) आणि विनित अग्रवाल(Dr.) जे आजच्या पिढीचे आहेत यांना महाभारत आणि रामायण यांच्या विषयी 'अचूक' बोलतांना नक्की ऐका. हे रामायण मधील राम ,सीता, हनुमान,अहिल्या,दशरथ इ.यांच्या कृतींची पडलेल्या प्रश्नांची हमखास उत्तरं देतो. "अहिल्या तपस्वी आहे रामा तिचे पाय धर,"असे विश्वामित्र म्हणतात.अहिल्येप्रमाणेच एकेकाळी विश्वामित्र लस्ट/मोह या इंद्रिय लोभाने भरकटले होते.तेव्हा तिची स्थिती विश्वामित्र यांना भलेभाती समजली होती.माणसाला दुसरी संधी नक्कीच द्यायला हवी. https://youtu.be/hppH--9iDxg?si=XgOl_bKgBV_ix5cE
लेखनविषय:
लेखनप्रकार
अहल्या शिळा राघवे मुक्त केली पदी लागतां दिव्य होऊनी गेली. जया वर्णिता सिणली वेदवाणी नुपेक्षी कदा राम दासाभिमानी. समर्थ म्हणतात, श्रीरामांच्या चरणांचा स्पर्श होताच शिळा रुपी अहल्या मुक्त झाली. हा श्लोक वाचतना, अनेक प्रश्न मनात आले. अहल्या खरोखर शिळा झाली होती का? श्रीरामांच्या चरणाचा स्पर्श होतास ती पुन्हा मूळ स्वरूपात आली, हे कसे संभव आहे? समर्थांच्या या श्लोकाचा भावार्थ वाल्मिकी रामायणातील कथेत शोधण्याचा प्रयत्न मी आपल्या अल्प बुध्दीने केला आहे. महर्षि विश्वामित्र, राम, लक्ष्मण आणि अनेक ऋषी मुनीं सोवत मिथिलेत पोहोचले. श्रीरामांना तिथे एक ओसाड निर्जन आश्रम दिसले.

म्युच्युअल फंड गुंतवणूक: माझा अनुभव

ईंद्रधनु ·

विअर्ड विक्स Sat, 12/30/2023 - 10:02
तिन्ही फंड चांगले आहेत . निप्पोन स्मॉल कॅप मध्ये गुंतवले असते तर अजून अधिक परतावा मिळवला असता आजच्या घडीला . स्मॉल कॅप ने हौदोस घातला यावर्षी ;) sip करतांना पण स्मॉल कॅप चे थोडे एक्सपोजर ठेवा, वयागणिक प्रमाण कमी करणे .

सुबोध खरे Sat, 12/30/2023 - 11:05
वयागणिक प्रमाण कमी करणे . बहुसंख्य अर्थ सल्लागारांचा हाच झापडबंद सल्ला असतो. माझी समभागात गुंतवणूक ९९ .९% आहे आणि केवळ एक प्रयोग म्हणून मी दोन महिन्यांपूर्वी म्युच्युअल फंडात थोडेसे पैसे गुंतवले आहेत. माझे निवृत्त झालेले मित्र ज्यांना महिना लाखभर रुपये निवृत्तीवेतन आहे आणिआयुष्यभर वैद्यकीय सुविधा आहे त्यांना पण सर्व अर्थ सल्लागारांचा असाच सल्ला मिळताना पाहून आश्चर्य वाटते. ( त्यांचे पोट कसे चालेल याप्रमाणे बरेच अर्थ सल्लागार सल्ला देताना आढळतात) मला एक रुपया सुद्धा निवृत्तीवेतन नसताना मी ९९% गुंतवणूक समभागातच केलेली आहे. यासाठी धीर धरणे आवश्यक असते. मार्च २०२० मध्ये बाजार पडलेला असताना माझी गुंतवणूक मूळ मुदलाच्या ३० % वर आलेली होती. त्यावेळेस मी मोठ्या प्रमाणावर ब्लू चिप मध्ये गुंतवणूक केली. आज हीच गुंतवणूक तीन वर्षात चौपटीपेक्षा जास्त झालेली आहे. उदा. टी सी एस, एल अँड टी, स्टेट बँक ऑफ इंडिया सध्या बाजार फार उच्ची वर आहे त्यामुळे गेल्या तीन महिन्यात मी जवळजवळ ३० % गुंतवणूक काढून घेतली आहे आणि पुढच्या वर्षभरात (किंवा दोन वर्षात) जेंव्हा बाजार पडेल तेंव्हा हेच पैसे मी उत्तम समभागात गुंतवेन. बाजारात भय आणि लोभ या दोन गोष्टीमुळे गुंतवणूकदारांचे सर्वाधिक नुकसान होत असते. गेल्या १५ वर्षात मी बाजाराची तीन आवर्तने पाहिली आहेत यात मला सर्वात जास्त नफा २००८ च्या आणि २०२०च्या पडझडीत झालेला आहे. अशा वेळेस जेंव्हा बाजार खड्ड्यात असतो अशा वेळेस उत्तम समभागात केलेली गुंतवणूक हि सर्वात फायद्याची ठरते हा माझा अनेक वर्षांचा अनुभव आहे. सर्व अर्थ सल्लागार dont try to time the market हाच सल्ला देताना आढळतात. दुसर्यांनी दिलेल्या सल्ल्यामध्ये माझे सर्वात जास्त नुकसान झालेले आहे. यामुळे गेली ६-७ वर्षे मी कुणीही दिलेला कोणताही सल्ला लक्षात घेत नाही. बाजारात अनेक लोक स्वतःच्या फायद्यासाठी अशा अनेक कंड्या पिकवत असतात. उदा शेअर खान या सल्लागार कंपनीनें २०२१ मध्ये लॉरस लॅब मध्ये पैसे गुंतवा हा समभाग ८०० च्या वर जाईल असा सल्ला दिला आणि आपल्या ग्राहकांना ७०० च्या पातळीला समभाग विका असा सल्ला दिला होता. हा समभाग जास्तीत जास्त ७२३ पर्यंत जाऊन मग आपटला होता. यानंतर या कंपनीने ७०० ची पातळी आजतागायत गाठलेली नाही. एक तर स्वतः अभ्यास करा किंवा म्युच्युअल फंडात गुंतवणूक करा असेच माझे म्हणणे आहे. चार पैसे गाठीशी बांधून कोणतेही कष्ट न करता बक्कळ नफा मिळवावा याच हेतूने सर्व बाजारात आलेले असतात हि वस्तुस्थिती आहे. पण there is no free lunch. व्यवस्थित अभ्यास करा आणि विचार र्पूर्वक गुंतवणूक करा. जाता जाता नाक्यावर दिलेल्या सल्ल्यावर अवलंबून गुंतवणूक केल्यास नुकसान नक्की.

In reply to by सुबोध खरे

मनो Fri, 01/05/2024 - 03:23
> अशा वेळेस जेंव्हा बाजार खड्ड्यात असतो अशा वेळेस उत्तम समभागात केलेली गुंतवणूक हि सर्वात फायद्याची ठरते हा माझा अनेक वर्षांचा अनुभव आहे. १००% खरे आहे :-) नव्वदच्या दशकात वय १६ वर्षे असताना कागदी सर्टिफिकेट असणारे शेअर घेतले होते, त्यात रिलायन्स होता. त्यातले काही पैसे लागतील त्यावेळी विकले. उरलेल्याचा परतावा कित्येक पटीत आहे. २००२, २००८, २०२० साली घेतलेले शेअर अजूनही आहेत.

धर्मराजमुटके Sat, 12/30/2023 - 11:46
याबाबतीत माझा देखील अनुभव चांगला आहे. शेअर मार्केट मधून पैसा कमविण्यासाठी अभ्यास आणि पैसा दोहोंची आवश्यकता आहे. ज्यांच्याकडे जास्त अभ्यासासाठी वेळ नाही किंवा गती नाही त्यांच्यासाठी म्युच्युअल फंड गुंतवणूक उत्तम पर्याय आहे.

In reply to by सिरुसेरि

मनो Fri, 01/05/2024 - 03:28
कागदी परतावा आणि प्रत्यक्ष मिळालेला यात फार फरक असू शकतो, त्यामुळे सतत परतावा पहात राहू नये. त्याने उगाच anxiety शिवाय फार काही मिळत नाही. गरज असेल त्याच वेळी विक्रीच्या अगोदर काही दिवस जरूर पहावा.

राजेंद्र मेहेंदळे गुरुवार, 01/04/2024 - 19:52
म्युचुअल फंड मागच्या १-२ वर्षात स्मॉल कॅप आणि इन्फ्रा फंड्स दोन्ही कॅटेगरी जबरदस्त धावत आहेत. कोणतेही फंड घराणे पहा. खालील दुवा वापरुन आपण एकेक फंड घराणे सिलेक्ट करुन शेवटचा कॉलम सॉर्ट करुन प्रत्येक घराण्याचे टॉप फंड्स बघु शकता. होम अ‍ॅम्फि च्या वेबसाईटवर जाउन कुठल्याही फंडाची नेट अ‍ॅसेट व्हॅल्यु बघु शकता दुवा शेअर्स- खालील प्रत्येक क्षेत्रातील टॉपच्या ३-४ कंपन्या निवडुन त्यात पैसे गुंतवु शकता. आय टी बँक फार्मा एफ एम सी जी एनर्जी शेवटी काय? एफ डी पेक्षा आणि इन्फ्लेशन रेट पेक्षा जास्त परतावा मिळाल्याशी मतलब.(टॅक्स, ब्रोकरेज वगैरे वगळुन)

विअर्ड विक्स Sat, 12/30/2023 - 10:02
तिन्ही फंड चांगले आहेत . निप्पोन स्मॉल कॅप मध्ये गुंतवले असते तर अजून अधिक परतावा मिळवला असता आजच्या घडीला . स्मॉल कॅप ने हौदोस घातला यावर्षी ;) sip करतांना पण स्मॉल कॅप चे थोडे एक्सपोजर ठेवा, वयागणिक प्रमाण कमी करणे .

सुबोध खरे Sat, 12/30/2023 - 11:05
वयागणिक प्रमाण कमी करणे . बहुसंख्य अर्थ सल्लागारांचा हाच झापडबंद सल्ला असतो. माझी समभागात गुंतवणूक ९९ .९% आहे आणि केवळ एक प्रयोग म्हणून मी दोन महिन्यांपूर्वी म्युच्युअल फंडात थोडेसे पैसे गुंतवले आहेत. माझे निवृत्त झालेले मित्र ज्यांना महिना लाखभर रुपये निवृत्तीवेतन आहे आणिआयुष्यभर वैद्यकीय सुविधा आहे त्यांना पण सर्व अर्थ सल्लागारांचा असाच सल्ला मिळताना पाहून आश्चर्य वाटते. ( त्यांचे पोट कसे चालेल याप्रमाणे बरेच अर्थ सल्लागार सल्ला देताना आढळतात) मला एक रुपया सुद्धा निवृत्तीवेतन नसताना मी ९९% गुंतवणूक समभागातच केलेली आहे. यासाठी धीर धरणे आवश्यक असते. मार्च २०२० मध्ये बाजार पडलेला असताना माझी गुंतवणूक मूळ मुदलाच्या ३० % वर आलेली होती. त्यावेळेस मी मोठ्या प्रमाणावर ब्लू चिप मध्ये गुंतवणूक केली. आज हीच गुंतवणूक तीन वर्षात चौपटीपेक्षा जास्त झालेली आहे. उदा. टी सी एस, एल अँड टी, स्टेट बँक ऑफ इंडिया सध्या बाजार फार उच्ची वर आहे त्यामुळे गेल्या तीन महिन्यात मी जवळजवळ ३० % गुंतवणूक काढून घेतली आहे आणि पुढच्या वर्षभरात (किंवा दोन वर्षात) जेंव्हा बाजार पडेल तेंव्हा हेच पैसे मी उत्तम समभागात गुंतवेन. बाजारात भय आणि लोभ या दोन गोष्टीमुळे गुंतवणूकदारांचे सर्वाधिक नुकसान होत असते. गेल्या १५ वर्षात मी बाजाराची तीन आवर्तने पाहिली आहेत यात मला सर्वात जास्त नफा २००८ च्या आणि २०२०च्या पडझडीत झालेला आहे. अशा वेळेस जेंव्हा बाजार खड्ड्यात असतो अशा वेळेस उत्तम समभागात केलेली गुंतवणूक हि सर्वात फायद्याची ठरते हा माझा अनेक वर्षांचा अनुभव आहे. सर्व अर्थ सल्लागार dont try to time the market हाच सल्ला देताना आढळतात. दुसर्यांनी दिलेल्या सल्ल्यामध्ये माझे सर्वात जास्त नुकसान झालेले आहे. यामुळे गेली ६-७ वर्षे मी कुणीही दिलेला कोणताही सल्ला लक्षात घेत नाही. बाजारात अनेक लोक स्वतःच्या फायद्यासाठी अशा अनेक कंड्या पिकवत असतात. उदा शेअर खान या सल्लागार कंपनीनें २०२१ मध्ये लॉरस लॅब मध्ये पैसे गुंतवा हा समभाग ८०० च्या वर जाईल असा सल्ला दिला आणि आपल्या ग्राहकांना ७०० च्या पातळीला समभाग विका असा सल्ला दिला होता. हा समभाग जास्तीत जास्त ७२३ पर्यंत जाऊन मग आपटला होता. यानंतर या कंपनीने ७०० ची पातळी आजतागायत गाठलेली नाही. एक तर स्वतः अभ्यास करा किंवा म्युच्युअल फंडात गुंतवणूक करा असेच माझे म्हणणे आहे. चार पैसे गाठीशी बांधून कोणतेही कष्ट न करता बक्कळ नफा मिळवावा याच हेतूने सर्व बाजारात आलेले असतात हि वस्तुस्थिती आहे. पण there is no free lunch. व्यवस्थित अभ्यास करा आणि विचार र्पूर्वक गुंतवणूक करा. जाता जाता नाक्यावर दिलेल्या सल्ल्यावर अवलंबून गुंतवणूक केल्यास नुकसान नक्की.

In reply to by सुबोध खरे

मनो Fri, 01/05/2024 - 03:23
> अशा वेळेस जेंव्हा बाजार खड्ड्यात असतो अशा वेळेस उत्तम समभागात केलेली गुंतवणूक हि सर्वात फायद्याची ठरते हा माझा अनेक वर्षांचा अनुभव आहे. १००% खरे आहे :-) नव्वदच्या दशकात वय १६ वर्षे असताना कागदी सर्टिफिकेट असणारे शेअर घेतले होते, त्यात रिलायन्स होता. त्यातले काही पैसे लागतील त्यावेळी विकले. उरलेल्याचा परतावा कित्येक पटीत आहे. २००२, २००८, २०२० साली घेतलेले शेअर अजूनही आहेत.

धर्मराजमुटके Sat, 12/30/2023 - 11:46
याबाबतीत माझा देखील अनुभव चांगला आहे. शेअर मार्केट मधून पैसा कमविण्यासाठी अभ्यास आणि पैसा दोहोंची आवश्यकता आहे. ज्यांच्याकडे जास्त अभ्यासासाठी वेळ नाही किंवा गती नाही त्यांच्यासाठी म्युच्युअल फंड गुंतवणूक उत्तम पर्याय आहे.

In reply to by सिरुसेरि

मनो Fri, 01/05/2024 - 03:28
कागदी परतावा आणि प्रत्यक्ष मिळालेला यात फार फरक असू शकतो, त्यामुळे सतत परतावा पहात राहू नये. त्याने उगाच anxiety शिवाय फार काही मिळत नाही. गरज असेल त्याच वेळी विक्रीच्या अगोदर काही दिवस जरूर पहावा.

राजेंद्र मेहेंदळे गुरुवार, 01/04/2024 - 19:52
म्युचुअल फंड मागच्या १-२ वर्षात स्मॉल कॅप आणि इन्फ्रा फंड्स दोन्ही कॅटेगरी जबरदस्त धावत आहेत. कोणतेही फंड घराणे पहा. खालील दुवा वापरुन आपण एकेक फंड घराणे सिलेक्ट करुन शेवटचा कॉलम सॉर्ट करुन प्रत्येक घराण्याचे टॉप फंड्स बघु शकता. होम अ‍ॅम्फि च्या वेबसाईटवर जाउन कुठल्याही फंडाची नेट अ‍ॅसेट व्हॅल्यु बघु शकता दुवा शेअर्स- खालील प्रत्येक क्षेत्रातील टॉपच्या ३-४ कंपन्या निवडुन त्यात पैसे गुंतवु शकता. आय टी बँक फार्मा एफ एम सी जी एनर्जी शेवटी काय? एफ डी पेक्षा आणि इन्फ्लेशन रेट पेक्षा जास्त परतावा मिळाल्याशी मतलब.(टॅक्स, ब्रोकरेज वगैरे वगळुन)
लेखनप्रकार
म्युच्युअल फंड या विषयावर सोशल मिडिया आणि युट्युब यावर खूप माहिती मिळत असते. काहींच्या मते हा गुंतवणुकीसाठी सर्वोत्तम मार्ग आहे तर काही याला खूप नावं ठेवतात आणि स्वतः शेअर मार्केट मध्ये गुंतवुन त्यात जास्त फायदा कसा आहे ते सांगतात. या सर्व मत-मतान्तरात मी माझा अनुभव सांगतो. मी सुमारे ५ वर्षांपूर्वी म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणुकीला सुरुवात केली. अर्थात ५ वर्ष हा काही इक्विटी म्युच्युअल फंड मधील गुंतवणुकीच्या दृष्टीने फार मोठा कालावधी नाही.

‘शताब्दी’ची कॉपी, पण….

पराग१२२६३ ·

सर टोबी Sun, 12/17/2023 - 16:59
वंदे भारतमध्ये आसनांच्या रांगा एकाच दिशेने असण्याऐवजी निम्मी आसने गंतव्य स्थानाच्या दिशेने आणि निम्मी आसने विरुद्ध दिशेने असतात. हि आसने मधोमध जिथे समोरासमोर येतात तेथील प्रवाशांची कुचंबना विचारायला नको. काही स्वतःची म्हणून स्पेस नाही. त्यात लेकुरवाळे कुटुंब असले की संपलेच. पोरं इतकी असह्य किरकिर करतात की बस्स. पूर्वी चेअर कार ३ बाय २ अशा स्वरूपात असायच्या का? वंदे भारतमध्ये जो चेमटवून टाकणारा अनुभव येतो तसा कधी डेक्कन क्वीन मध्ये आल्याचं आठवत नाही.

In reply to by सर टोबी

पराग१२२६३ Sun, 12/17/2023 - 23:30
पूर्वी एसीप्रमाणेच काही काळ नॉन-एसी चेअर कारही ३×२ होत्या. पण एसी चेअर कार कायम ३×२ असते, गरीब रथची सोडून. सध्या दख्खनच्या राणीला चेअर कार शताब्दीप्रमाणेच आहेत.

मनो Sun, 12/17/2023 - 22:27
वंदे भारतचे तिकीट मला महाग वाटले. मुंबईला जायचे तर डेक्कन क्वीनच्या प्रवासाची तुलना इतर गाड्यांशी होऊ शकत नाही. वंदे भारत नवीन असताना छान दिसते, पण दोन-चार अपघात झाल्यानंतर तिचे पार्ट प्लास्टिक किंवा हलक्या पत्र्याचे असल्याने ती जागा वाईट दिसायला लागते - esp. समोरून. एकंदर प्रवासभाडे फार, गवगवा फार, परंतु रेल्वेच्या इतर कळकट-मळकट कामाला बळकट गाड्यांपेक्षा तुलनेने "हलकी" वाटते. भारतासारख्या price-conscious देशात तिकीट कमी केल्याशिवाय फार काळ चालणार नाही असे वाटते, पाहूया.

सौंदाळा Mon, 12/18/2023 - 10:26
माहितीपूर्ण लेख तिकिट जास्त असले तर माझ्या तरी खालील क्रमाने अपेक्षा असतीलः १. वेळेवर पोचणे (गाडीला प्राधान्य मिळावे) २. अंतर्गत स्वछता ३. आरामशीर आसनव्यवस्था ४. चांगली खान-पान सेवा लेख वाचून यातल्या १,३,४ अपेक्षा पूर्ण झाल्या नाहीत असे वाटले. नुसते युरोस्टार, आईस किंवा तत्सम गाड्यांसारखे दिसायला ऐटबाज इंजिन असून प्रवाशांना त्याचा फायदा नसेल तर अर्थ नाही. एकंदरीत अजून खूप सुधारणा होणे गरजेचे आहे असे वाटते.

विअर्ड विक्स Mon, 12/18/2023 - 17:49
दिवस चुकला ... वंदे भारत हि घाटवाळणाच्या व जिथे जलद मार्ग उपलब्ध नाही अशा ठिकाणी प्रवास करून तिची मजा येत नाही . दिल्ली - काशी असा रूट वर प्रवास करा तेव्हा स्पीडोमीटर पाहून मजा येते. नि खानपान म्हणाल तर त्या रूटला जलसा होता जेव्हा मी प्रवास केलेला !!! फ्रेंच croissant दिलेला साडीत साडी पाणेरीची त्याप्रमाणे गाडीत गाडी राजधानीची ! पण गुजर आंदोलनावेळी राजधानी ३-४ तास उशिरा धावे . त्यामुळे घाट रस्त्यात वंदे भारताची मझा नाही . त्यामुळे दिवस चुकला पण वंदे भारत गाडी मस्त आहे. सध्या भसाभसा उदघाटन करून सोड्तायेत . वेळ नि सुविधा यासाठी दाम मोजायची तयारी असणाऱ्यांसाठी ती गाडी आहे. माझ्यामते शताब्दी चे डबे एक्सप्रेसला देऊन वंदे भारत शताब्दी करायचा बेत दिसतोय. फुल्ल ट्रेन ac करायचे प्लॅन असेल तर शताब्दी व गरीब रथ चे डबे जनरल ला येणार थोड्या दिवसात ...

कंजूस Mon, 12/18/2023 - 20:16
साधी मुंबई लोकल ट्रेन एकदा गणपतीच्या उत्सवासाठी दादर ते चिपळूण पाठवली होती. त्यांचे विडिओ आहेत. तशीच मुंबई - पुणे - सोलापूर चालू करावी. वंदेला जाऊदे करतील प्रवासी.

सर टोबी Sun, 12/17/2023 - 16:59
वंदे भारतमध्ये आसनांच्या रांगा एकाच दिशेने असण्याऐवजी निम्मी आसने गंतव्य स्थानाच्या दिशेने आणि निम्मी आसने विरुद्ध दिशेने असतात. हि आसने मधोमध जिथे समोरासमोर येतात तेथील प्रवाशांची कुचंबना विचारायला नको. काही स्वतःची म्हणून स्पेस नाही. त्यात लेकुरवाळे कुटुंब असले की संपलेच. पोरं इतकी असह्य किरकिर करतात की बस्स. पूर्वी चेअर कार ३ बाय २ अशा स्वरूपात असायच्या का? वंदे भारतमध्ये जो चेमटवून टाकणारा अनुभव येतो तसा कधी डेक्कन क्वीन मध्ये आल्याचं आठवत नाही.

In reply to by सर टोबी

पराग१२२६३ Sun, 12/17/2023 - 23:30
पूर्वी एसीप्रमाणेच काही काळ नॉन-एसी चेअर कारही ३×२ होत्या. पण एसी चेअर कार कायम ३×२ असते, गरीब रथची सोडून. सध्या दख्खनच्या राणीला चेअर कार शताब्दीप्रमाणेच आहेत.

मनो Sun, 12/17/2023 - 22:27
वंदे भारतचे तिकीट मला महाग वाटले. मुंबईला जायचे तर डेक्कन क्वीनच्या प्रवासाची तुलना इतर गाड्यांशी होऊ शकत नाही. वंदे भारत नवीन असताना छान दिसते, पण दोन-चार अपघात झाल्यानंतर तिचे पार्ट प्लास्टिक किंवा हलक्या पत्र्याचे असल्याने ती जागा वाईट दिसायला लागते - esp. समोरून. एकंदर प्रवासभाडे फार, गवगवा फार, परंतु रेल्वेच्या इतर कळकट-मळकट कामाला बळकट गाड्यांपेक्षा तुलनेने "हलकी" वाटते. भारतासारख्या price-conscious देशात तिकीट कमी केल्याशिवाय फार काळ चालणार नाही असे वाटते, पाहूया.

सौंदाळा Mon, 12/18/2023 - 10:26
माहितीपूर्ण लेख तिकिट जास्त असले तर माझ्या तरी खालील क्रमाने अपेक्षा असतीलः १. वेळेवर पोचणे (गाडीला प्राधान्य मिळावे) २. अंतर्गत स्वछता ३. आरामशीर आसनव्यवस्था ४. चांगली खान-पान सेवा लेख वाचून यातल्या १,३,४ अपेक्षा पूर्ण झाल्या नाहीत असे वाटले. नुसते युरोस्टार, आईस किंवा तत्सम गाड्यांसारखे दिसायला ऐटबाज इंजिन असून प्रवाशांना त्याचा फायदा नसेल तर अर्थ नाही. एकंदरीत अजून खूप सुधारणा होणे गरजेचे आहे असे वाटते.

विअर्ड विक्स Mon, 12/18/2023 - 17:49
दिवस चुकला ... वंदे भारत हि घाटवाळणाच्या व जिथे जलद मार्ग उपलब्ध नाही अशा ठिकाणी प्रवास करून तिची मजा येत नाही . दिल्ली - काशी असा रूट वर प्रवास करा तेव्हा स्पीडोमीटर पाहून मजा येते. नि खानपान म्हणाल तर त्या रूटला जलसा होता जेव्हा मी प्रवास केलेला !!! फ्रेंच croissant दिलेला साडीत साडी पाणेरीची त्याप्रमाणे गाडीत गाडी राजधानीची ! पण गुजर आंदोलनावेळी राजधानी ३-४ तास उशिरा धावे . त्यामुळे घाट रस्त्यात वंदे भारताची मझा नाही . त्यामुळे दिवस चुकला पण वंदे भारत गाडी मस्त आहे. सध्या भसाभसा उदघाटन करून सोड्तायेत . वेळ नि सुविधा यासाठी दाम मोजायची तयारी असणाऱ्यांसाठी ती गाडी आहे. माझ्यामते शताब्दी चे डबे एक्सप्रेसला देऊन वंदे भारत शताब्दी करायचा बेत दिसतोय. फुल्ल ट्रेन ac करायचे प्लॅन असेल तर शताब्दी व गरीब रथ चे डबे जनरल ला येणार थोड्या दिवसात ...

कंजूस Mon, 12/18/2023 - 20:16
साधी मुंबई लोकल ट्रेन एकदा गणपतीच्या उत्सवासाठी दादर ते चिपळूण पाठवली होती. त्यांचे विडिओ आहेत. तशीच मुंबई - पुणे - सोलापूर चालू करावी. वंदेला जाऊदे करतील प्रवासी.
VB प्रवासाच्या दिवशी पुणे स्टेशनला निघण्यापूर्वी वंदे भारतची पुण्यात येण्याची स्थिती पाहिली होती, तेव्हा गाडी 15 मिनिटं लेट असल्याचं दाखवलं जात होतं. आमचा प्लॅन होता वंदे भारतनं मुंबईत पोहचल्यावर थोडं इकडं-तिकडं फिरून दुपारी 3-4 पर्यंत परतीची बस पकडायची. पण नंतर वंदे भारतनं तसं करणं अशक्य बनवलं होतं.

अ‍ॅनिमल...नी अंमळ मळ मळ

निओ ·

चौथा कोनाडा Sun, 12/10/2023 - 15:31
लै भारी निरिक्षण, परिक्षण, रसग्रहण ! PADHAHIWARI
तसंच आपले उपेंद्र भाऊ लिमये. tense वातावरणात भारी विनोद निर्मिती करून जातात. त्यांच्या तोंडून आयच्या गावात, चांगभलं व दोन चार मराठी शिव्या ऐकून या हैदराबादच्या थेटरात जय महाराष्ट्र जोरात ओरडावे वाटले. action ला background मधे 'डॉबीवाल्या बोलव माझ्या डीजे ला' मराठी गाणं ऐकायला मजा वाटली
याची लैच चर्चा सुरू आहे ! मराठी ऑडियन्स सुद्धा मिळावा म्हनून खटपट सुरु आहे की काय शंका येतेय ! अगदी योग्य शब्दात घेतली आहे !

In reply to by चौथा कोनाडा

शशिकांत ओक Sun, 12/24/2023 - 12:26
सीेेेेेेेेेेेेेेए करताना ती बाळगावी लागते याची आठवण झाली. वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन देमार मार धार करून आपले खिसे भरायला सोईचे होते.

विअर्ड विक्स Mon, 12/11/2023 - 09:36
परीक्षण आवडले असे सुपरस्टार बेस पिक्चर धो धो पैसे कमावतात .... कबीर सिंग , अर्जुन रेड्डी , KGF काय पठाण , जवान लिस्ट लंबी आहे ... सगळे one time watch पठडीतले ....

In reply to by विअर्ड विक्स

चौथा कोनाडा Mon, 12/11/2023 - 12:54
पण आपण जसजसे चोखंदळ आणि बहूश्रुत होत जातो तसे ही असले सिनेमे फोल वाटायला सुरुवात होते असे माझे निरिक्षण आहे

In reply to by चौथा कोनाडा

चौथा कोनाडा Mon, 12/11/2023 - 12:56
.. म्हणजे सगळे one time watch पठडीतले पण रहात नाहीत, असे मला म्हणायचे आहे. आधीच प्रचंड चर्चा झालेली असते, औत्सुक्य लोप पावते.

चौथा कोनाडा Sun, 12/10/2023 - 15:31
लै भारी निरिक्षण, परिक्षण, रसग्रहण ! PADHAHIWARI
तसंच आपले उपेंद्र भाऊ लिमये. tense वातावरणात भारी विनोद निर्मिती करून जातात. त्यांच्या तोंडून आयच्या गावात, चांगभलं व दोन चार मराठी शिव्या ऐकून या हैदराबादच्या थेटरात जय महाराष्ट्र जोरात ओरडावे वाटले. action ला background मधे 'डॉबीवाल्या बोलव माझ्या डीजे ला' मराठी गाणं ऐकायला मजा वाटली
याची लैच चर्चा सुरू आहे ! मराठी ऑडियन्स सुद्धा मिळावा म्हनून खटपट सुरु आहे की काय शंका येतेय ! अगदी योग्य शब्दात घेतली आहे !

In reply to by चौथा कोनाडा

शशिकांत ओक Sun, 12/24/2023 - 12:26
सीेेेेेेेेेेेेेेए करताना ती बाळगावी लागते याची आठवण झाली. वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन देमार मार धार करून आपले खिसे भरायला सोईचे होते.

विअर्ड विक्स Mon, 12/11/2023 - 09:36
परीक्षण आवडले असे सुपरस्टार बेस पिक्चर धो धो पैसे कमावतात .... कबीर सिंग , अर्जुन रेड्डी , KGF काय पठाण , जवान लिस्ट लंबी आहे ... सगळे one time watch पठडीतले ....

In reply to by विअर्ड विक्स

चौथा कोनाडा Mon, 12/11/2023 - 12:54
पण आपण जसजसे चोखंदळ आणि बहूश्रुत होत जातो तसे ही असले सिनेमे फोल वाटायला सुरुवात होते असे माझे निरिक्षण आहे

In reply to by चौथा कोनाडा

चौथा कोनाडा Mon, 12/11/2023 - 12:56
.. म्हणजे सगळे one time watch पठडीतले पण रहात नाहीत, असे मला म्हणायचे आहे. आधीच प्रचंड चर्चा झालेली असते, औत्सुक्य लोप पावते.
अ‍ॅनिमल पाहिला आणि लेखणी हाती घेतली. अ‍ॅनि मल की मळ, जे काही असेल ते आणि त्यामुळे झालेली मळमळ उलटी करून टाकावी म्हटले, म्हणजे मन शांत होईल म्हणून हा प्रपंच. सुरुवातीलाच वाईट जोक. कोणी आगाऊ म्हणेल कि मळ बाहेर काढायची दुसरी क्रिया पण असते ती इथे नाही केली याबद्दल धन्यवाद. असो कोटीचा मोह आवरला नाही. मूळ मुद्दा चित्रपटाबद्दल. Violence presented in entertaining way (काही दृश्य सोडली तर ) हे दिग्दर्शक व कलाकार या जोडीने दाखवून दिलं. आणि खरंच, चित्रपटात जेव्हा हाणामारी चालते तेव्हाच बरं वाटतं. फॅमिली ड्रामा येतो तेव्हा बोअरच होतं. तरीपण सध्याचा अति हिंसाचार नाही झेपत आपल्याला .