मत

माझी कविता

प्रयत्नही करुनही जमत नाही कविता
तेव्हा होणारा वैचारिक मनस्ताप
माझ्या अहंकाराला डिवचतो.
ही अस्वस्थता कोसळत जाते,
तिन्ही सांजेला.

धुक्यात लपेटलेल्या रस्त्यावरुन
कवितेला बिलगुन चालतांना
कोणताच विचार मला सुचत नाही.
ऐनिलिसिस करता येत नाही
गुदमरलेल्या श्वासांचा.

आभाळ भरुन आल्यावर
मी डोकावून पाहतो,
निर्वासित वेदनांच्या गोंगाटात
दारावरुन परत फिरलेल्या शब्दांसहीत,
माझी कविता एकाकी असते.

पहिल्या पाहुण्या संपादकाचे स्वागत...!

राम राम मंडळी,

आम्हाला सांगायला अतिशय आनंद होतो की आमच्या या आवाहनाला साद देऊन आपल्या मिपा परिवाराचे एक सन्माननीय सभासद मुक्तसुनीत यांनी मिपाचा सर्वप्रथम पाहुणा सांपादक होण्याचे मान्य केले आहे. सोमवार दि ७ जुलै रोजी मिपाचा पहिलावहिला संपादकीय अग्रलेख तुम्हाआम्हा सर्व मिपाकरांना वाचायला मिळणार आहे.

आम्हाला खात्री आहे की मिपाकरांना निश्चितच काही चांगले विचार वाचावयास मिळतील.

अग्रलेख हा लेखनप्रकार निश्चितच एका आव्हानात्मक व अतिशय जबाबदारी असलेला प्रकार आहे अशी आमची धारणा आहे. तो केवळ नुसता एक लेख नव्हे! अग्रलेख लिहिणार्‍या लेखकाची दृष्टी अतिशय व्यापक असली पाहिजे व एखाद्या प्रकरणाचा सर्वतोपरी व सांगोपांग विचार करण्याची व ते विचार मांडण्याची हातोटी त्याच्याकडे असली पाहिजे.

लोकमान्यांच्या,

"सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय?"

या अवघ्या एका अग्रलेखाने अक्षरश: खळबळ माजवली होती ही अग्रलेखाची ताकद आहे!

असो...

मुक्तसुनीत यांनी सुरवात केलीच आहे परंतु त्यानंतरही स्वत:हून काही मंडळी पुढे येतील व मिपाच्या संपादकीय अग्रलेखाची ही कल्पना अशीच चांगल्या प्रकारे राबवली जाईल असा विश्वास आम्ही बाळगतो. या निमित्ताने मिपाने एक पाऊल पुढे टाकण्याचा प्रयत्न केला आहे ते आपल्यासारख्या मायबाप मिपाप्रेमींच्या पाठबळ आणि भरवश्यावरच!

आम्ही समस्त मिपाकरांतर्फे मुक्तसुनीत यांचे आभार मानतो व त्यांना मनापासून शुभेच्छा देतो....

शुभं भवतु!

आपला नम्र,
तात्या अभ्यंकर.

आता जाता जाता थोडं ह घ्या - Smile

मुक्तसुनीत यांना एकच जाहीर परंतु नम्र विनंती -

त्यांच्या पहिल्याच अग्रलेखाचे शीर्षक,

"तात्याचे डोके ठिकाणावर आहे काय?"

असे असू नये असे मनपासून वाटते! Smile

आपला,
(टिळकभक्त!) तात्या.

संकेतस्थळांचे उपयोग - मिपा सदस्यांना विनंती

नमस्कार मंडळी,

सर्वप्रथमः "मिपाचे मालक/विश्वस्त तात्या यांच्याशी चर्चा करूनच मी हा प्रस्ताव मांडत आहे व सदर चर्चाप्रस्तावास मिसळपाव डॉट कॉम या संस्थळाचा पूर्ण पाठिंबा आहे. सबब, सदर प्रस्ताव ही मिपाचीच अधिकृत घोषणा आहे असे समजावे!"

आपण सर्वचजणं मिपावर येण्याचा आणि गप्पाटप्पा मारण्याचा आनंद मनापासून घेत आहोत. प्रत्येकाचे प्रत्येकाशी पटत नसेल, वादविवाद घडत असले अगदी तात्यांच्या हाताच्या टपल्यापण खाल्या तरी बहुतांशी सर्वजण पुन्हपुन्हा येत राहतात. मिपाचे हे यश वृद्धींगत होवोत ही मनःपूर्वक शुभेच्छा!

तर अशाच एका चर्चेत (छोटा डॉनने चालू केलेल्या चर्चेत) मी काही मुद्दे मांडले. विषय होता भारताबाबत आणि आपण एकत्र राहू का नाही, समाजाची अवस्था वगैरे आणि मूळ लेखाचा मथळा होता: इंडीया-दी वन नेशन आणि धार्मीक, जातीय व प्रादेशिक अस्मिता त्यावर मुक्तसुनीत यांनी मला काही खरडले... त्यांचा मूळ मुद्दा होता मिपासारखी संकेतस्थळे या संदर्भात काय करू शकतात? याला उत्तर देणे प्रतिसादा इतके सोपे नव्हते म्हणलं विचार करतो... तर नंतर परत गेल्या एका वादामधील माझ्या प्रतिसादावर त्यांनी मला आठवण करून दिली. मग काही गोष्टी खरडल्या, तात्यांना व्य.नि.ने विचारल्या आणि मुक्तसुनीत यांच्यापण त्यासंबंधात सुचना घेतल्या.

हे सर्व सांगायचे (नमनाला घडाभर तेलाचे) कारण काय? - तर संकेतस्थळातील देवाणघेवाणितून विरंगुळा जसा होवू शकतो तसाच काही भरीव गोष्टी करण्यासाठीपण एकमेकांना न बघता देखील उपयोग होऊ शकतो हे यातून दिसून येते. तर आता जे आमची निरोपानिरोपी झाली ती खाली मी देतो. मूळ कल्पना मुक्तसुनीत यांची, संकेतस्थळ तात्यांचे, मी फक्त निमित्त...

मिपाला गणेश चतुर्थीला वर्ष पूर्ण होईल. इथे इतकी माणसे येत असतात ते वास्तवात भेटून कट्टे करत असतात या कट्ट्यांचाच उपयोग त्या त्या कट्ट्यातील मेंबरांनी काहीतरी स्थानिक गरज असलेल्या गोष्टींना मदत करण्यासाठी केला तर एक चांगला पायंडा पडेल. याचा अर्थ त्यांनी टिपी करू नये असा अजिबात नाही. पण त्याचबरोबर काहीतरी सामाजीक जाण ठेवली गेली त्यातून काही उपक्रम (संकेतस्थळ नाही बरं का!) तयार झाला राबवला गेला तर बरेच काही साध्य होईल. कुणाचे काहीतरी चांगभले होईल तर कुणाला तसे करण्याची नकळत सवय लागेल. यात कोणी काय करावे, कुणाबरोबर करावे हा ज्याचा/जीचा/त्याचा/तिचा प्रश्न असेल आणि स्वभावाप्रमाणे त्यांनी काहीतरी करावे. कुठल्याही चांगल्या/प्रामाणिक संस्थेबरोबर काम करावे - पैसे देऊन अथवा बौद्धीक दान देऊन किंवा अजून कशातरी पद्धतीने. त्यात राजकारण नसावे -कुठल्याही विचारांच्या संस्थांना एखाद्या विशिष्ठ प्रोजेक्टसाठी मदत करता येईल, कधी कधी शाळांना अथवा गरजू विद्यार्थ्यांना पुस्तकांची अथवा अजून कसली मदत करता येईल. कुठल्या संस्थेकडून होते ह्याने काही फरक पडत नाही - सर्व लोकगंगेला मिळाल्याशी कारण... संस्था प्रामाणिक आणि ट्रॅकरेकॉर्ड असलेली असावी, त्यातून कुठलाही भेदभाव तयार होऊ नये इतकीच काय ती प्रामाणिक इच्छा/अट असावी...
किंवा
अजून एक शक्यता : ज्याला काही एक विशिष्ट सामाजिक कार्य/प्रोजेक्ट करायचा आहे त्याने/तिने मिपावर एक पोस्ट टाकावे. आपल्या प्रोजेक्टची माहिती सविस्तर कळवावी. शेवटी आपल्या कॉन्टॅक्ट पर्सनचे नाव-पत्ता-फोनसकट डीटेल्स कळवावेत. ज्या ज्या मिसळपावकराला काही मदत करायची असेल त्याने त्याने एका विशिष्ट मुदतीमधे ती करावी. योग्य तसा निधी जमा झाल्यावर त्या संस्थेला जाऊन ती मदत सुपूर्त करण्यात यावी. या सगळ्याचा छायाचित्रांसकट वृत्तांत त्या त्या माणसाने मिपावर छापावा....

आणि हो असा एखादा प्रकल्प केलाच तर तो होण्यासाठी मिपा हे संकेतस्थळ कारणीभूत ठरले (कारण येथे भेटलेल्या सदस्यांच्या कट्ट्यातून होत असल्याने) असे जाहीरपणे म्हणायला/सांगायला विसरू नये अशी प्रेमळ अट.

म्हणले तर यात तसे कमी लॉजिस्टीक्स असेल. कोणी येथे येऊन गैरफायदा घेणार नाही ना अशी काळजी वाटू शकेल आणि त्यात काही चूक नाही. म्हणून च ट्रॅक रेकॉर्ड असलेल्या सेवाभावी संस्था आणि फोकस्ड प्रॉजेक्ट्सचा विचार व्हावा. नुसत्या हृदयाने नाही तर डोक्याने विचार करूनच ज्याला/जीला जो प्रकल्प आवडेल/मानवेल त्याला/तिने स्वेच्छेने मदत करावी. ती मदत काही ठिकाणि पैशाने असेल पण काही ठिकाणि व्हॉलेंटिअरींग/सेवा पद्धतीची पण असू शकते.

यात अमुकने केले म्हणजे मला पण तितकेच केले पाहीजे असे प्रेशर आणायचे नाही आणि घेयचे नाही. पण हा प्रकल्प संसर्गजन्य होण्यासाठी (म्हणजे एकमेकांकडून प्रेरणा घेऊन) ज्याने असे काही केले ते येथे जाहीरपणे सांगावे. यात पब्लिसिटी आहे, एका हाताने केलेले दान इतर हातांना कळून त्यांना पण तसे करावेसे वाटायला लावणे हा उद्देश राहूदेत...

११५ वर्षांपूर्वी लोकमान्यांनी त्याकाळाला साजेसा आणि गरजेप्रमाणे राजकीय कारणांसाठी सार्वजनीक गणेशोत्सवाचा प्रारंभ आणि उपयोग केला. आता राजकारण नाही पण समाजकारणासाठी करता आला, जिथे असेल तिथे, यथाशक्ती तर काही तरी चांगला पायंडा पडेल असे वाटते.

आपले विचार समजून घेयला आवडतील.

मिपा संपादकीय...! जाहीर आवाहन..

सर्व मायबाप मिपाकरांना माझा दंडवत...!

राम राम मंडळी,

मिपा हे एक साप्तहिक आहे किंवा पाक्षिक आहे असे मानून 'मिपा संपादकीय...' हे एक सदर दर आठवड्याला किंवा पंधरवड्याला सुरू करावे असे मनात आहे. आपल्याकडे सामाजिक, राजकीय भान असणारे, वाचन असणारे, उत्तम विचार असणारे बरेच जण आहेत. या मंडळींचे वृतपत्रीय/आंतरजालीय वाचनही चौरस असते असे माझ्या निदर्शनास आले आहे. या मंडळींनी 'मिपा संपादकीय' या सदरात दर सप्ताहात/पाक्षिकात एक अग्रलेख लिहावा असे वाटते. हा अग्रलेख बहुतकरून भारतातील किंवा भारताबहेरील राजकीय, सामाजिक विषयांवर, ताज्या घडामोडींवरच असेल. त्यातली मते अर्थातच संपूर्णपणे त्या संपादकाचीच असतील. वर म्हटल्याप्रमाणे हा अग्रलेख भारतातील अथवा भारताबाहेरील सामजिक अथव राजकीय विषयावर, ताज्या घडामोडींवर भाष्य करणारा असेल. प्रसंगानुरूप किंवा क्वचित प्रसंगी अर्थ, क्रीडा किंवा अन्य एखाद्या विशेष गाजत असलेल्या विषयावरही असेल.

मला खात्री आहे, दर सप्ताहाअंती किंवा पंधरवड्याअंती (जसे ठरेल तसे),

'या वेळी पाहुणा संपादक कोण आहे बरं? बघुया तरी त्याचा अग्रलेख वाचून!' अशी उत्सुकता तुम्हाआम्हा सर्व मिपाकरांना नक्कीच असेल अशी मला खात्री आहे. खूप मज येईल. काही चांगले वाचायला मिळेल! Smile

अर्थातच, दरवेळी संपादक बदलेल. म्हणजेच दरवेळी अग्रलेख लिहिणारी व्यक्ति ही त्या आठवड्यापुरती/पंधरवड्यापुरती मिपाची 'पाहुणा संपादक' असेल! Smile

अनवधानाने काही नांवे राहू शकतात परंतु,

चरुरंग, प्रियाली, चित्रा, मुक्तसुनीत, विकास, धनंजय, डॉ बिरुटे, देवकाका, विजूभाऊ, कोलबेर, नीलकांत, प्रकाश घाटपांडे, पिवळा डांबिस, इत्यादी...

या माझ्या मित्रमंडळींकडून मला खूप अपेक्षा आहेत. ताज्या सामाजिक व राजकीय विषयांवर याचं खूप चांगलं वाचन-चिंतन-मनन आहे असे माझे निरिक्षण आहे आणि म्हणूनच मी मुद्दामून या मंडळींची नांवे उद्घृत केली आहेत! यापैकी कुणालाही याबाबत व्यक्तिश: न लिहिता मी हा प्रस्ताव जाहीरपणे मांडत आहे. वरील नांवे आत्ता चटकन आठवली म्हणून मी लिहिली आहेत परंतु या मंडळींव्यतिरिक्तही जर कुणी एका सप्ताहाकरता अथवा पंधरवड्याकरता मिपाचा 'पाहुणा संपादक' होऊन छानसा अग्रलेख लिहायला तयार असेल तर त्याचेही स्वागतच आहे.

असो...

तर मंडळी, या प्रस्तावामागे मिपाकरता काहीतरी चांगलं करायचं मनात आहे, मिपा अधिकाधिक सर्वांगसुंदर बनवण्याचा विचार आहे. परंतु, हे काम अर्थातच माझ्या एकट्याचे नाही याची मला पूर्ण जाणीव आहे. मी व्यक्तिश: व्यक्तिचित्र, खादाडी, संगीत, टवाळक्या, माफक इष्कबाजी या विषयात रंगणारा मनुष्य आहे. माझ्या सामाजिक व राजकीय जाणिवा अग्रलेख लिहिण्याइतक्या समृद्ध नाहीत. तरीदेखील दर आठवड्याला किंवा पंधरवड्याला एखाद्या पाहुणा संपादकाने छानसा अग्रलेख लिहून मिपा या संकेतस्थळाचे सौंदर्य वाढवावे असे मनापासून वाटते म्हणूनच हा चर्चाप्रस्ताव!

बोला, करणार का मला या कामात मदत? स्वत:हून आळीपाळीने घेणार का अग्रलेख लिहिणार्‍या पाहुण्या संपादकाची जबाबदारी?

ज्या मंडळींची नांवे मी उद्घृत केली आहेत त्यांच्याकडून मला खूप अपेक्षा आहेत हे इथे खुल्या दिलाने नमूद करतो....

आपला,
(काही एक चांगलं काम करू पाहणारा) तात्या.

--
Not failure, but low aim is a crime..! Smile

एक खटकलेली बातमी ...

गेल्याच महिन्यात वर्तमानपत्रात एक बातमी वाचली...
मथळा होता " लग्नाचे आमीष दाखवून बलात्कार" .........
असल्या बातम्या सतत वाचनात येतात... ही सुद्धा वाचली , त्यात नेहमीप्रमाणेच

..." एक गावाकडची मुलगी होती, कॉलेजात जाणारी , सज्ञान ..तिथे हा एक ओळखीचा मुलगा / बाप्या आला...तिला तो आवडला, प्रेम निर्माण झालं ... घरच्यांची परवानगी मिळणार नाही म्हणून मग त्याने तिला शहरात (पळवून !!! )आणलं... ते दोघे सहा महिने वेगवेगळ्या लॉजवर राहिले, वेगवेगळ्या शहरात राहिले, फिरले... मग नंतर त्याने तिच्याशी लग्न करण्यास नकार दिला.. मग ही पोलीसात गेली आणि त्याच्यावर बलात्काराचा आरोप करत फिर्याद दाखल केली..."....

थोड्याफार फरकाने या बातम्या अशाच असतात...
मला या प्रकारच्या बातम्यांमधली विसंगती नेहमी खटकते.... आमीष म्हणजे काय?
त्याने तिला फसवले ,हे मान्य पण म्हणून बलात्काराचा गुन्हा कसा काय ?? सहा महिने इतक्या लॉजमध्ये हिंडत हिंडत हा तिच्यावर बलात्कार करत होता काय ?? बलात्काराची व्याख्या काय?
...
इथे कोणी कायदा जाणत असेल तर कृपया स्पष्ट करावे... त्याने लग्नाला नकार दिला म्हणून ; सहा महिन्यांपासून घडत असलेल्या व तिच्या संमतीने होत असलेल्या रूटीन घटनेचे एकदम बलात्कारासारख्या गंभीर गुन्ह्यात रूपांतर झाले?
हे कसे काय बुवा ?किंवा त्याने तिच्याशी सहा महिन्यांनी लग्न केले असते तर मग पूर्वी घडलेल्या त्या सार्‍या घटना गुन्हा नव्हत्या???
एखाद्या गुन्ह्याची व्याख्या इतकी सापेक्ष कशी असू शकते ?? ( तीच घटना --- असे घडले तर गुन्हा आणि तसे घडले तर गुन्हा नाही..)

यात पुरुषाची चूक आहेच, पण बाई भासवते तितकी इनोसंट भोळी भाबडी कशी काय ? साध्या शब्दांत बोलायचे तर तिने सहा महिने काय त्या क्षणांचा आनंद लुटला नसेल ? म्हणजे आधी "जमानेसे क्या डरना " टाईप सिनेमा प्रमाणे क्रांती करायला पळून जायचे ,तो भौ पळाला की मग एकदम क्रांती वगैरे विसरून पोलीस केस करायची ?

की आम्ही पूर्वीच्या एका धाग्यात लिहिल्याप्रमाणे ही स्त्री " प्रेमात पडल्यावर मला बाई जबरदस्तीच आवडते" अशा विचारांची असते?? आणि लग्न करायला नकार मिळाल्यावर तिला साक्षात्कार होतो की आपल्यावर बलात्कार झाला ???? ही तर जबाबदारी झटकणं झालं...
______________________________
लग्नापूर्वी शरीरसंबंध ठेवणे याबाबत ज्याचंत्याचं वैयक्तिक मत असलं तरी ते अत्यंत जबाबदारीचं काम आहे , असं आमचं वैयक्तिक मत आहे....
स्वतः केलेल्या कामाची जबाबदारी न घेता दुसर्‍यावर खापर फोडणं सर्वथा चूक...

आता कशाला उद्दयाची बात

आज कालचा उद्दया असतो
आणि
आज उद्दयाचा काल असतो
मग
उद्दया जेव्हा ’आज’ होईल
आणि
’आज’ त्याचा ’काल’ होईल
तेव्हा
त्या उद्दयाच्या उद्दयाला
’आजचा’ ’उद्दयाच’ म्हटलं जाईल
आता
आज जे होत राहिलंय
त्याचं
काल म्हणून होत जाणार
जे
उद्दया म्हणून होणार आहे
त्याला
आज म्हणून म्हटलं जाणार
म्हणून
“आता कशाला उद्दयाची बात
बघ उडुनी चालली रात
भर भरूनी पिऊ
रस रंग नऊ
चल
बुडुनी जाऊ रंगात”
हे माणूस सिनेमातलं गोड गाणं शांताबाई हुबळीकरांच्या तोंडून ऐकून मजा यायची.

श्रीकृष्ण सामंत

म सा सं - पैशे कोण देणार??

अ भा म सा महामंडळ या विनोदी संस्थेच्या झालेल्या सभेत, येते मराठी साहित्य संमेलन हे अमेरीकेत घ्यायचे ठरवले आहे. अमेरीकेतही अनेक मराठी साहित्यप्रेमी राहतात त्यामुळे तेथील रसिकांनाही सहित्य संमेलनात सहभागी होण्याचा आनंद मिळावा ही गोष्ट समजू शकते.

पण महाराष्ट्र सरकार याकरता दरवर्षी जे लख्खो रुपायांचे अनुदान देते ते अनुदान मात्र या वर्षी राज्यसरकारने देऊ नये असे वाटते. महाराष्ट्रातील जनता तो पैसा कररुपाने आणि महसूलरुपाने सरकारी तिजोरीत जमा करत असते त्यामुळे त्या पैशांवर फक्त महाराष्ट्रीय (महाराष्ट्रात राहणार्‍या) जनतेचाच अधिकार आहे.

अमेरिकास्थित मराठी मंडळींनी त्यांच्या हौसेखातर संमेलने जरूर भरवावीत परंतु त्याची संपूर्ण आर्थिक जबाबदारीही त्यांनीच घ्यावी. महाराष्ट्रातल्या जनतेचा पैसा त्याकरता खर्च होऊ नये असे वाटते! अमेरिकास्थित मराठी माणसे खोर्‍याने पैसा कमावतात त्यामुळे साहित्य संमेलनाची हौस स्वत:च्या पैशांनी भागवणे त्यांना सहज शक्य आहे असे वाटते!

आपले मत काय?

आपला,
(सर्व कर भरणारा एक प्रामाणिक महाराष्ट्रीय नागरीक) तात्या.

सर्वोत्तम पाच.

आदाब!

सर्व आदरणीय मिपा सभासदांकडून इथे लिहिल्या गेलेल्या साहित्याबद्दल निम्नलिखित माहिती मागवण्यात येत आहे. सहकार्याची अपेक्षा आहे.

साहित्य प्रकार - आपल्याला वाटणारे दहा सर्वोत्तम.
काव्य प्रकार - आपल्याला वाटणारे दहा सर्वोत्तम.
पाकप्रकार - आपल्याला वाटणारे दहा सर्वोत्तम.

माझे येथील बरेच वाचन बाकी आहे. वरील माहिती मिळाल्यास मला प्रथम हेच साहित्य वाचायला आवडेल.

मला मिपाच्या दिवाळी अंकात लिहायचे आहे. ते लेखन कुणाला पाठवायचे?

आदाब!

आपल्या सर्वांचाच,
शेणगोळा.

संगीतकाराचा तुम्हाला आवडलेला चित्रपट !

नमस्कार मंडळी,

काथ्याकूट करण्यासाठी नवीन विषय हाजीर आहे.
कोणत्याही संगीतकाराचा तुम्हाला आवडलेला चित्रपट !
सुरवात नवीन संगीतकारांपासुन करुयात. नंतर ओघात जुने संगीतकाराही येतीलच.

१. हिमेश - तेरे नाम - ( तुमसे मिलना, तेरे नाम, लगन लगी , ओ जाना ही गाणी श्रवणीय होती. आपण अभिनेता आणि गायक आहोत हा साक्षात्कार होण्याआधी हिमेश तसा बरा होता)
२. विशाल शेखर - मुसाफिर - (कोणि काही म्हणो, मुसाफिरची गाणी ट्रेंड सेटर होती. ईलेक्ट्रॉनिक संगित आणि क्लब मिक्स ताजे होते. एकाच गाण्याचे २ /३ वर्जन हा प्रकारही बराच चांगला वठला होता. सु सु सुनियो ऐकयला (आणि पहायलाही ) मस्त !
३. प्रितम - चॉकलेट - ( हल्का हल्कासे ये नशा, मम्मीसे ना कहना ठेका धरायला लावणारी. पण रॉक - खलीशसी है अप्रतिमच.
४. शंकर, एहसान, लॉय - दिल चाहता है
५. अनु मलिक - जानम - ( राहुल रॉय, महेश भट्टच्या या पडिक चित्रपटातली गाणी मात्र जमली होती. एकाच चित्रपटातली सगळी गाणी जमून येणं ही तशी दुर्मीळ गोष्ट. पण जानमच्या सगळ्या गाण्यावर एक अलग अशी छाप होती.)
६. जतीन ललित - खामोशि द म्युझिकल - ( संजय लीला भंसाली बिघडण्याच्या आधीचा, म्हणजेच त्याचा पहीला चित्रपट. ये दिल सुन रहा है सारखी अनेक श्रवणीय गाणी यात आहेत.
७. बप्पि लाहिरी - जिंदगी एक जुवा - ( प्रकाश मेहराचा महत्वकांक्षी पडेल सिनेमा. आशा़जींच्या मधाळ आवाजातले ये जिंदगी है एक जुवा आणि दिल तो दिल है एकदम क्लास.)

चला तर मग मंडळी, अजून बरीच नावं बाकी आहेत. पंचमदा, ए. आर. तुमच्या साठी सोडलेत.
प्रचंड मारामारी होणार आहे, हे मला माहीती आहे.

हिंदी चित्रपटांचा पंखा,
सचीन जी

काह्ही केल्या आवडतच नाही! :)

राम राम मंडळी,

नाट्य व चित्रपट कलावंतांसंदर्भात हा काथ्याकूट आहे हे सर्वप्रथम नमूद करतो आणि या काथ्याकुटाचा प्रवास याच मंडळींसंदर्भात चालावा अशी विनंतीवजा अपेक्षा करतो!

तर मंडळी, काही काही नाट्य व चित्र कलावंत हे त्यांच्या त्यांच्या जागी गुणीच असतात. त्यांनी आपलं काहीच बिघडवलेलं नसतं. एक कलाकार म्हणून आपल्याला त्यांच्याबद्दल उचित आदरही असतो.

पण...

यापैकी काही कलावंत हे आपल्याला काह्ही म्हणजे काह्ही केल्या आवडतच नाहीत/नसतात. काय असेल ते असो पण त्यांना पडद्यावर पाहिलं की अगदी नक्को वाटतं! Smile

हा कथ्याकूट हा याच मंडळींची नांवे लिहिण्याकरता मी सुरू करत आहे. आपण नेहमी आपल्या आवडीबद्दल/आवडणार्‍या कलावंतांबद्दल लिहीत असतो, या निमित्ताने एकदा आपल्या नावडीबद्दलही इथे लिहू या. बघुया तरी, कुणाला कोण आवडत नाही ते! Smile

चला, तर माझ्यापासूनच सुरवात करतो. तूर्तास जी नांवं चटकन आठवत आहेत ती इथे लिहीत आहे. आपणही भाग घेऊन आपापल्या नावडी कळवा! Smile

खालील मंडळी मला कधीच सहन होत नाहीत -

अनिलकपूरचे दोन्ही भाऊ,
संध्या,
प्रदिपकुमार,
आशिकीफेम राहूल रॉय,
जॉय मुखर्जी,
सचिन(अपवाद 'हा माझा मार्ग एकला, पण त्यानंतर कधीही आणि केव्व्हाच आवडला नाही!),
चित्रपटात काम करणारी शांतारामबापूंची अजून एक बायको (तिचं नाव आता आठवत नाही!),
इत्यादी इत्यादी इत्यादी...

बराय तर मंडळी, आता आपला निरोप घेतो. बरीचशी मंडळी मिपाचा दिवाळी अंक काढा म्हणून मागे लागली आहेत. त्या संदर्भात नीलकांत, डॉ बिरुटे, चतुरंग, मुक्तराव, प्रियाली, प्राजू, नीलकांत इत्यादी माझ्या काही मित्रमैत्रिणींशी विचारविनिमय करायचा आहे! Smile

"वीस रुपये रोजी, रोजी दोन टाईम चाय अन् रोजी एक शिग्रेट" या बोलीवर काही संपादक मिळतात का तेही पाहिलं पाहिजे! Smile

आपला,
(नावडता) तात्या.