प्रतिक्रिया
कर्नाटक विधानसभा निवडणुकांचे निकाल.
प्रेषक, मनोज श्रीनिवास जोशी, Wed, 08/05/2013 - 21:12कर्नाटक च्या जनतेने कोंग्रेस ला स्पष्ट बहुमत दिले आहे. सत्ताधारी भा.ज.प. आणि दोन प्रादेशिक पक्ष सत्ते पासून संपूर्ण बाजूला राहणार आहेत. भाजप चे दक्षिणायन रोखले गेले आहे की संपुष्टात आहे आहे ते पुढच्या ५ वर्षात स्पष्ट होईल. कुमारस्वामी हया अत्यंत संधीसाधू नेत्याला सत्ता स्थापनेमध्ये कोणतेही स्थान उरलेले नाही हे चांगले झाले. येडडीच्या गर्वाचे घर बेचिराख झाले आहे. निर्नायकी कॉंग्रेसचे विजयाबद्दल आणि येडडीचे भाजपा ला कर्नाटकात कमकुवत करण्याबद्दल अभिनंदन.
ही निवडणूक भ्रष्टाचाराच्या मुद्यावर लढवली गेली होती असे म्हणतात. तसे असते तर काँगेस चा विजय अशक्य होता.
दादी के हाथों को जलता देख...
प्रेषक, विसोबा खेचर, Mon, 06/05/2013 - 11:04प्राध्यापक अशोक चक्रधर.
हिंदीतले एक अत्यंत दिग्गज कवीवर. एक विलक्षण, बहुआयामी व्यक्तिमत्त्व..एक भाषाप्रभू, एक शब्दप्रभू..त्याचप्रमाणे एक अत्यंत मिश्किल, हसरं व्यक्तिमत्त्व. एखाद्या विनोदाला मनमुराद दाद देताना अगदी सोडावॉटरची बाटली फुटावी असं खळखळून, मनमोकळं हसणारं व्यक्तिमत्त्व..परंतु त्याचवेळी एक तेवढंच संवेदनशील व्यक्तित्व..जीवनाकडे, माणसांकडे, त्यांच्या प्रश्नांकडे तेवढ्याच संवेदनशीलतेने पाहणारं एक सहृदय व्यक्तिमत्त्व..
प्रिय नाना पाटेकर,
प्रेषक, विसोबा खेचर, Mon, 29/04/2013 - 14:30अलीकडेच बदलापूरच्या एका कार्यक्रमात नाना पाटेकर बोलत होता..
नाना म्हणतो की मुंबै माझी नाही...मुंबैत मुखवटे घातलेली माणसं वावरतात..ती म्हणे वाचता येत नाहीत म्हणून नाना म्हणतो की खेड्यात रहाणं त्याला आवडतं..
हा नान्यासुद्धा लेकाचा शेफारलाय अलीकडे.. लेका ज्या मुंबैनं, ज्या मुंबैच्या बॉलीवुडनं तुला मोठा केला.. आता चार दमड्या खिशात आल्यावर मुंबै माझी नाही म्हणतोस..? मुंबैतली माणसं वाचता येत नाही म्हणतोस..?
नान्या, खेड्यात कुठेसं फार्महाऊस बांधलंस..त्याकरता पैसा मुंबैतच कमावलास ना..????
स॑ण आणि संस्कृती.
प्रेषक, तुमचा अभिषेक, Thu, 25/04/2013 - 17:35काल रात्री ठिक बारा वाजता जेव्हा घड्याळाचे दोन काटे एकमेकाना भिडले अन तिसर्याने त्यांच्यापासून दूर पळायला सुरुवात केली तेव्हा अचानक मे भयानक कानठळ्या बसवणारे आवाज अंगाखांद्यावर कोसळू लागले अन मी पुरता बावचळून गेली की काय हे, मुंबई आयपीएल मध्ये एक मॅच काय जिंकली तर फटाक्यांच्या लडीच्या जागी कानफाडी करणारा कसला हा गोंधळ...
"दाखवणे" आणि फॉर्मल कपडे
प्रेषक, शिल्पा ब, Sat, 20/04/2013 - 09:39तारे तोडण्याची स्पर्धा
प्रेषक, गिरीजा, Tue, 09/04/2013 - 18:03नुकत्याच एका सत्तेतल्या प्रसिध्द नेत्याने दुष्काळाविषयी अश्लाघ्य विधाने करुन तारे तोडले नंतर लाईट जाण्याविषयीही तारे तोडले , मग त्याला उत्तर म्हणुन दुसर्या नेत्याने तारे तोडले .
एकुणच राजकीय लोकांची ही तारे तोडण्याची स्पर्धा फार जुनी आहे असे नुकतेच एकाने कळवले ...." ब्रेड्बटर परवडत नाही तर केक खावा " असे कोणतरी फ्रान्सची राणी भुकेल्या गरीब जनतेला म्हणाली होती म्हणे .
असो तर तारे तोडण्याच्या स्पर्धेतील स्पर्धकांच्या वाक्यांचे हे कलेक्षन !
सहाशेपन्नास रुपये, पिडा - चोर अन शीलाकी बुद्धिमानी
प्रेषक, स्नेहांकिता, Fri, 29/03/2013 - 21:36आलेल्या नवीन वर्षापासून माझे ग्रह तरी १८० अंशात फिरले असावेत किंवा तारे तरी ! कारण भर दिवसा डोळ्यासमोर तारे चमकण्याचे प्रसंग नवीन वर्षात वरचेवर यायला लागलेत हो ! एक निस्तरते तोवर दुसरंच काही तरी समोर उभं ठाकलंय, असंच सारखं होऊ लागलंय. काय विचारू नका ससेहोलपट, …पायाखाली फटाक्यांची माळ लावावी तसं. अगदी खुळ्याची चावडी अन मीराबाईची मशीद अशी गत झालीये बघा !
आता तुम्ही म्हणाल असं काय बॉ आभाळ कोसळलंय तुमच्यावर ? अहो, आभाळ कोसळलं तर पाण्यात तरी उडी मारता येते. इथे आम्ही ना तळ्यात ना मळ्यात अशी बिकट अवस्था झालीय.
काठमांडू ते कंदाहार - Flight IC 814
प्रेषक, मोदक, Sun, 24/03/2013 - 23:121998 साली झालेल्या विमान अपहरणाबद्दल अनेक ठिकाणी अनेकवेळा सतत चर्चा होत असते.
श्री श्रीरंग जोशींनी या घटनेसंदर्भात विस्तृत लेखन दिवाळी अंकामधील काठमांडू ते कंदहार या लेखामध्ये केले आहेच.
अनेक ठिकाणी होणारे विषयांतर पाहता या विषयावर हा धागा काढत आहे. या धाग्यामध्ये आपण या अपहरणासंदर्भात चर्चा करूया.
संपादक मंडळास नम्र विनंती.
माहेरचा अव्हेर!
प्रेषक, आजानुकर्ण, Tue, 12/03/2013 - 20:26भारताच्या सर्वोच्चपदावर दीर्घकाळ विराजमान असणार्या महात्यागी, महाबुद्धीमान, महातेजस्वी राजमाता सोनियाजींचे माहेर इटलीचे हे आपल्याला आठवत असेलच.
काही दिवसांपूर्वी इटलीच्या दोन सैनिकांना निरपराध भारतीय कोळ्यांवर गोळीबार करुन त्यांची हत्या केल्याच्या संदर्भात अटक करण्यात आली होती. सर्वोच्च न्यायालयाच्या परवानगीनुसार या सैनिकांना चार आठवड्यांसाठी मायदेशात जाण्याची परवानगी देण्यात आली होती. ही सुटी संपल्यानंतर त्यांनी खटल्याचे कामकाज सुरु ठेवण्यासाठी परतणे अपेक्षित होते. मात्र आता इटालियन सरकारने हे सैनिक भारतात येणार नाहीत हे जाहीर केले आहे.
एकत्र कुटुंब ....जबाबदारी कोणाची?
प्रेषक, लिलि काळे, Sat, 09/03/2013 - 17:49आजकाल मुलांचा आपल्या पत्नीकडे बघण्याचा द्रुष्टिकोन खूपच चांगला झाला आहे. आणि बरेचसे तरुण आपल्या बायकोला समानतेने आणि सन्मानाने वागवताना दिसतात. पण सासरच्या बाकिच्या लोकांच्या वागण्यात एवढा फरक अजून पडलेला नाही दिसत. फक्त मुलाच्या घरच्यांनीच मुलाला वाढवताना कष्ट घेतले असतात का?
आजकाल खूप जणांची पसंती लग्न झाल्यावर स्वतंत्र राहण्यासाठी असते, पण ह्यासाठी फक्त मुलींनाच दोषी ठरवले जाते हे बघून खूप दुख होते.मुलींचा असा विचार होत असेल तर त्याला काय गोष्टी जबाबदार आहेत हे पण पाहिले पाहिजे.