अभिनंदन
तात्यांचे आणि मिसळपावचे अभिनंदन ( लोकसत्ता ०७/०३/२०१०)
प्रेषक JAGOMOHANPYARE ( रवी, 03/07/2010 - 13:56) .आजच्या लोकसत्तामध्ये मिसळपाव आणि तात्या यांची एक बातमी आहे. अभिनंदन.
http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=529...
व्वा २००!!!
प्रेषक कोदरकर ( बुध, 02/24/2010 - 18:42) .सचिन तेंडुलकर च्या २०० धावांबद्दल हार्दिक अभिनंदन!!!
सईद चा विक्रम तोड्ल्या बद्द्ल अत्यंत आभार.......
प्रत्येकानी वाचावेच असे.....
प्रेषक विजुभाऊ ( सोम, 02/08/2010 - 10:38) .नुसार संपूर्ण लेख इथे कोपी पेष्ट करून इथे टाकावा असे वाटते पण मिपाच्या पॉलीसीनुसारते शक्य नाही म्हणून हा दुवा इथे देत आहे.
आवर्जून वाचावे असे काही
http://72.78.249.125/esakal/20100208/5087969775112240764.htm
या लोकांची इच्छाशक्तीला लाख सलाम ........ हॅट्स ऑफ
रंगकर्मी - पुन्हा एकदा
प्रेषक रंगकर्मी ( गुरू, 01/28/2010 - 20:34) .नमस्कार,
सर्वांना कळवण्यास अत्यंत आनंद होतो की आजपासुन मराठीतले नाटकावरचे पहिले संस्थळ रंगकर्मी .कॉम पुन्हा सुरु झाले आहे. जवळ जवळ ४ महिन्यापुर्वी गिरिष ओकांच्या हस्ते उद्घाटन होऊन हे संस्थळ सुरु झाले होते,मात्र मध्यंतरी काही तांत्रिक अडचणींमुळे हे स्थळ बंद पडले होते. मात्र आता अथक प्रयत्नानंतर हे संस्थळ पुन्हा सुरु झाले असुन वाचकानी मागितलेल्या सर्व सोयी देण्यात आलेल्या आहेत.
आजपासुन http://www.rangakarmi.com या पत्त्यावर तुम्ही हे स्थळ पाहु शकता. येत्या २४ तासात http://www.rangkarmi.com या जुन्या पत्त्यावर ही साईट दिसु लागेल ,मात्र पहिला पत्ता हाच कायम राहिल
या संस्थळाचे काम दिपक ( ब्लॉगर -भुंगा ) यांनी केले आहे ,त्यांनी गेले काही दिवस आम्हास जे सहकार्य दाखवले ,विशेषत: व्यवस्थापकांची अनुपलबध्ता असतानाही त्यांनी हे काम करुन दिले आहे, त्याबद्दल त्यांचे जाहीर आभार मानणेच उचित ठरेल.
आज या निमित्ताने रंगकर्मी व्यवस्थापन आपले मनोगत मांडत असुन नवीन बदलासंबंधी माहितीही देत आहे.
१. या पुर्वी संस्थळावर लिखाण करण्यासाठी व्यवस्थापनाशी संपर्क साधावा लागत असे , मात्र असा होणार नाही, आता आपला संवाद दुमार्गी झालेला आहे
२. संस्थळावर लेख आपण थेट लिहु शकता ,यासाठी आपणाला सदस्य व्हावे लागेल ,त्यानंतर तुम्हाला लेख लिहिता येइल .यासाठी फोनेटिक मराठी टायपिंग ची सोयही देण्यात आलेली आहे. उजव्या कोपर्यात आपणाला ती दिसु शकेल . दिसत नसेल तर तिथे असणार्या छोटाश्या बाणावर टिचकी मारल्यास ते दिसु लागेल .यामुळे सर्व रंगकर्मीना लिखाण करणे सोपे जाईल
३. काही जणाना फक्त अभिप्राय द्यायचा असतो ,त्यासाठी सदस्यत्व घेणे त्या सदस्याना आणि व्यवस्थापनाला ही परवडणारे नसते ,यासाठी संस्थळावर अभिप्राय कोणालाही देता येतील ( सदस्य न होता) मात्र लिखाण करण्यासाठी मात्र सदस्य व्हावे लागेल
४. यातुनही आपणास लेख टाईप करणे न जमल्यास तुम्ही तो आम्हाला पाठवु शकता ,आम्ही तो प्रकाशित करु
५. याशिवाय रंगकर्मी व्यवस्थापनही काही लेख प्रकाशित करेल ते तुम्हाला रंगकर्मी विशेष या भागात वाचता येतील.
६. जगातील सर्व मराठी रंगकर्मी एकत्र यावेत ,हा एक महत्त्वाचा उद्देश या प्रकल्पामागे होता म्हणुनच या साईटवर चर्चा या विशेष विभागात फोरमची सोय देण्यात आलेली आहे
७. एखाद्याला आपला प्रयोग कोठे आहे ,कधी आहे ते इतराना कळवायचे असते ,त्यासाठी आजपर्यंत लोक फेसबुक वगैरेंचा वापर करायचे , मात्र आता हा फोरमही तुम्ही वापरु शकता.
८. रंगकर्मी वरचे महत्त्वाचे लेख लेखकाच्या परवानगीने काही प्रसिद्ध मराठी संस्थळावर प्रकाशित करायची इच्छा आहे.
याशिवाय होणारे बदल आपणाला कळवले जातील .
मित्रानो ,शेवटी इतकेच म्हणायचे आहे, की नाटक हा मराठी माणसाची आवड आणि संस्कृती आहे. ती जोपासण्यासाठी आपण सारे मिळुन प्रयत्न करु . त्यासाठी या नव्या माध्यमात आम्हाला जरुर साथ द्या. लेख आणि अभिप्राय हे त्यासाठी माध्यम असेल. आपण सारे मिळून आपली नाट्य संस्कृती वाढवु आणि टिकवु...
आपल्या सहकार्याच्या प्रतीक्षेत.
धन्यावाद,
आपले ,
रंगकर्मी व्यवस्थापन
वि .सु.-
साईटवर काही छोटे मोठे बदल राहिले आहेत, ते लवकरच केले जातील
आपण सध्यस्थीतीत आमच्याशी admin@rangakarmi.com वर संपर्क साधु शकता.
आणि जर हा उपक्रम आपणाला आवडला तर त्याबदल इतराना सांगायला विसरु नका.
धन्यवाद
मिसळपाव सदस्यांकडुन या उपक्रमाला भरघोस प्रतिसाद मिळावा ही इच्छा.
- प्रतिक्रिया प्रकाशित करण्यासाठी येण्याची नोंद करा अथवा सदस्य व्हा.
थांबा आणि पहा-’नटरंग’ ने केलेली क्रांति!
प्रेषक अमृतांजन ( मंगळ, 12/08/2009 - 01:46) .सोनाली कुलकर्णीचे हे नृत्य एका महिन्यापुर्वीच झीच्याच एका कार्यक्रमात सादर झाले होते व भान हरपून ते पाहिले. नंतर युट्युबवर पुन्हा-पुन्हा आणि पुन्हा-पुन्हापाहिले- समाधान होतच नाही.
अजय-अतुलचे संगीत- आम्ही पामरं काय बोलणार- संगीताचे शिक्षणही न घेता त्यांच्या कलाविष्कार इतका अद्भूत होऊ शकतो हे पाहिल्यानंतर त्यांच्या बद्दल आदराची भावना निर्माण होते व ते मराठी संगीतकार आहेत ह्याचा अभिमान वाटतो. त्यांनी झी ला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी म्हणाल्याप्रमाणे, त्यांची पाटी कोरी असल्यामुळे त्यांना त्यावर स्वतःला जे हवे ते लिहिता येते. हेच त्यांच्या सध्याच्या वर्चस्वाचे यश आहे. (मागेच एक-दोन आठवड्यापुर्वी मराठी चित्रपट सृष्टीतील महत्वाच्या संगीतकाराच्या यादीत अजय-अतुलचे नाव त्या लेखकाने त्या संकुचित लेखात टाकले नव्हते).
नटरंग- एक उत्तुंग कामगिरी! धन्य!
नव्या वाटेवर मराठी सिनेमाला टाकणाऱ्या ह्या चित्रपटाला भव्य यश तर मिळणारच आहे पण त्याहून जास्त मोठे यश त्यांचे हे असेल की, अनेकांना ह्यातील कला एक मॉडेल म्हणून पहाता येईल.
[माझा आणि झी टॉकिजचा काहीच संबंध नाही. मी केलेली स्तुती पाहून उगाच गैरसमज नको- जे सत्य आहे ते मांडले- एका अचंबित झालेल्या कानसेनाच्या नात्याने, प्रेक्षकाच्या नात्याने, व मराठी असल्याच्या नात्याने]
स्टार माझा तर्फे आयोजित केलेल्या "ब्लॉग माझा" स्पर्धेत पारितोषिके मिळवणारे मिपाकर
प्रेषक अजय भागवत ( शुक्र, 11/20/2009 - 06:33) .स्टार माझा तर्फे आयोजित केलेल्या "ब्लॉग माझा" स्पर्धेत पारितोषिके मिळवणारे मिपाकरः
[सुरुवातीला मला फक्त डॉन बद्दल कळाले होते व त्याप्रमाणे मी येथे धागा दिला होता. म्हणून सुरुवातीचे काही प्रतिसाद डॉनचे अभिनंदन करतांना दिसत आहेत. नंतर देवकाकांनी कळवल्याप्रमाणे इतर्ही मिपाकरांना हे पारितोषिक मिळाल्याचे कळाले. त्यानुसार मी हा धागा संपादीत केला आहे]
नीरजा पटवर्धन(नीधप) ह्यांचा दुसरा क्रमांक आलाय.
छोटा डॉन, देवदत्त, राजे, आणि आनंदघन ह्यांना स्पर्धेत विषेश पारितोषिक मिळालंय.
ह्या सर्वांचे सहर्ष अभिनंदन!
शाब्बास मराठीच्या मुलांनो.
प्रेषक कलंत्री ( मंगळ, 11/10/2009 - 21:57) .मराठीद्वेष्ट्या अबुआझमीला सभागृहातच वाजवले हे वाचुन मला जितका आनंद झाला तो शब्दात व्यक्त करणे अवघड आहे.
आज अनेक मराठी वर्तमानपत्राचे अग्रलेख वाचले आणि मन निराश झाले.कोणतरी मराठीभाषेला आव्हान देतो, निरर्थक तर्क मांडतो आणि आपण उज्ज्वल परंपरा, सांसदिय लोकशाहीच्या नावावर गप्प बसावे इतका मूढपणा झाला नाही याचे निर्विवाद श्रेय मनसेच्या आमदारांना दिलेच पाहिजे.
जर मनसेच्या आमदारानी मौन पाळले असते, जानेदोना जानेदोना असे हताश उद्गार काढले असते इतिहासात मराठीच्या एका भेकड पिढीची नोंद झाली असती. सुदैवाने राजकारण असो अथवा त्यामागचा भावनिक आवेश असो, जे काही असेल ते असो, मनसेने लाक्षणिक का होईना, कानाखाली आवाज काढला हे बरेच झाले. शिवाजीचे वंशज म्हणून कोणाकडे तरी बोट दाखवता येईल असे सांगितले.
तुकाराम,नामदेव, एकनाथ, रामदास का मुर्ख होते म्हणून त्यांनी लोकभाषा म्हणून मराठीचा उपयोग केला? आचार्य अत्रे इत्यादींनी मराठीसाठी आपल्या आयुष्याचा त्याग केला, हु्तात्म्यांनी आपले प्राण दिले या सर्वांच्या परंपरेची कडी अथवा बुज मनसेने राखली हे मला नमूद करावेसे वाटते.
आज जर मराठीचे मुले आमदारकीच्या पत्रावळीसाठी गप्प बसले असते तर.... हा विचारही मला असह्य वाटतो.
आता आपल्यासर्वांचे एकच कर्तव्य आहे जेथे मारामारी याविरुद्ध विचार मांडला जाईल त्याला आपापल्या परीने मराठीहिताचाच विषय मांडणे. राजठाकरे यांचे समर्थन करणे हेच आपले कर्तव्य आहे.
यामागे राजकारण आहे की मिलिजुली आहे याचा विचार तरी करण्याचा मोह टाळणे.
आजदिवसभर माझ्या मनात एकच विचार येत होता की आचार्य अत्रे असते तर त्यांनी आपले मत कसे व्यक्त केले असते?
राज ठाकरे यांनी आता आपले स्वताचे एक वर्तमानपत्र निर्माण करावे असेही सुचवावेसे वाटते.
रमेशभाऊ यांचे अभिनंदन. ( अर्थातच ते आमच्या मतदारसंघाचे प्रतिनिधित्त्व करतात हा आमच्या भाग्याचा भाग आहे.).
शाब्बास मराठी मुलांनो, आम्हाला तुमचा अभिमान वाटतो. ज्या सभासदांना मराठीबद्दल प्रेम नाही त्यात तुम्हाला न बसवता नियतीने तुमचा सन्मानच केला आहे हे मला मनापासून वाटते.
जय महाराष्ट्र.
मलईदार खाती : यथामति उहापोह
प्रेषक भडकमकर मास्तर ( सोम, 11/09/2009 - 15:36) .
गेले चार सहा दिवस मलईदार खाती हा शब्द फार वाचनात आला.
कित्येक पत्रकारांनी न बनलेल्या सरकारवर आणि राजकारणावर तोंडसुख घेतले...
दिल्ली मुंबई वार्या करत करत चर्चेच्या फेर्यांवर फेर्या आटोपत मलईदार खात्यांसाठी कष्ट करणार्या आपल्या नेत्यांबद्दल मला पूर्ण आदर आहे.....
फक्त मलईदार खाती कोणती आणि मंत्र्यालाच मलई चाखायला का मिळते??काही विशिष्ट खात्याच्या मंत्र्यांनाच जास्त मलई चाखायला का मिळते?
आणि मलई नसलेली दुर्लक्षित खाती कोणती, याबद्दल मला जी उत्सुकता वाटते त्या उत्सुकतेचे शमन मिपावरील ज्ञानी माणसांनी चर्चा करून करावे , म्हणून हा धागा......
शिवाय काही ऑप्शनचे प्रश्नही विचारात घेता येतील.... नवीन आमदार जो यावेळी मंत्री व्हायला इच्छुक आहे, त्याचा पत्ता कट झाला आणि तो बिचारा केवळ आमदारच राहिला तर तो कुठे कुठे मलई शोधतो?
__________________________________
आता वरच्या प्रश्नावर लिहिलेली उत्तरे..
मलईदार खाती
अर्थ, गृह, महसूल , बांधकाम, पाटबंधारे
बिनामलईची खाती
समाजकल्याण, आरोग्य , कुटुंबकल्याण
( खरंतर बिनामलईची खाती सुचत नाहीत. ....सगळीकडे सोय असावीच / असायलाच पाहिजे असे वाटते.)
_______________________________________
हा चर्चाप्रस्ताव म्हणजे भ्रष्टाचाराचे उदात्तीकरण आणि लोकशाहीचे अवमूल्यन आहे असे कोणाला वाटल्यास तसेही लिहावे ....
किंवा काँग्रेसवाल्यांमुळे देशात भ्रष्टाचार बोकाळलाय / युतीने ९५ ते ९९ काय केलंय सार्यांना माहितीय , असे आरोप केल्याशिवाय मजा नाही...
चर्चा अर्थात राजकारणावर असल्याने प्रत्येकाने आपण स्वतः सर्वज्ञ आहोत असे मानूनच प्रतिसाद लिहावा अशी विनंती.....
१७०००
प्रेषक मदनबाण ( गुरू, 11/05/2009 - 19:18) .
(फोटो जालावरुन घेण्यात आला आहे.)
हिंदूस्थानचा महान क्रिकेट खेळाडु सचिन तेंडुलकर यांनी १७ हजार धावांचा टप्पा आज ओलांडला.
सचिन तुझे हार्दिक अभिनंदन !!! 
वैद्यकशास्त्रातील नोबेल पारितोषिक विजेते -२००९
प्रेषक जिवाणू ( बुध, 10/07/2009 - 13:52) .सजीवांची वाढ व विकास हे पेशिविभाजनाने होत असते. पेशींच्या वाढीची विशिष्ट सायकल असते ती चार भागात विभागलेली असते.
१) G - 1 : ह्या फेज़ मधे विविध विकर तयार होतात, जी DNA च्या Replication ( म्हणजे DNA ची जशी संरचना तसाच DNA तयार करणे.)
२) S : ह्या फेज मधे २ सारख्या गुणसूत्रांचे संच तयार होतात.
३) G - 2 : ह्या फेज़ मधे प्रथिने तयार केली जातात, जी माइक्रोट्युब्यूल्स च्या निर्मितीसाठी वापरली जातात. हि माइक्रोट्युब्यूल्स पेशींच्या विभाजनासाठी कार्य करतात. हि प्रकिर्या मिटोसिस (Mitosis) मधे होत असते.
४) M : M म्हणजे Mitosis ,ह्या फेज़ मधे सुरू होते. ह्यात केंद्रकाचे तसेच पेशींचे विभाजन होते. त्याला अनुक्रमे कर्यॉकिणेसिस ( Karyokinesis) व स्यटोकिनेसिस ( Cytokinesis) म्हणतात. त्यासोबतच नवीन पेशीचे आवरण देखील तयार होते. हि फेज़ पाच भागात विभागलेली असते.
अ. Prophase.
ब. Prometaphase.
क. Metaphase,
ड. Anaphase ,
ई. Telophase.
तर अशाप्रकारे १ पेशी सायकल (Cell Cycle) पूर्ण होते. सामान्य सजीवांच्या अर्भकात ह्या सायकलची पुनुरावृत्ती साधारणत: ४० ते ६० वेळा होते. ज्यावेळी पूर्ण गुणसूत्र तयार होते त्यावेळेला , गुणसूत्राच्या शेवटच्या टोकवरील काही DNA ची पुनुरावृत्ती होऊन ते टोपीसारखे घट्ट बसतात की जेणेकरून गुणसूत्रांची जी गुन्ढाळी असते ती सुटू नये व गुणसूत्रांतील DNA चे संरक्षण व्हावे. तर ह्या टोपीला Telomere अस म्हणतात. ज्यावेळेला पेशीवीभाजन आवश्यक असते, तेव्हा ही Telomere नष्ट होतात आणि पेशी विभाजन पूर्ण झाल्यावर पुन्हा टोपीसारखी गुणसूत्राच्या टोकावर स्थानापन्न होतात. ह्या त्यांच्या कार्यासाठी Telomerase reverse transcriptase ह्या विकराची मदत होते. तर ह्या सर्व लेखनाचा प्रपंच असा की एलिझाबेथ ब्लॅकबर्न, कॅरोल ग्राइडर आणि प्रा. जॅक त्झोस्ट्याक या शास्त्रज्ञांचा यंदाचे वैद्यकशास्त्रासाठीचे नोबेल पारितोषिक मिळाले आहे. त्यांचा मूळ संशोधनाचा विषय Telomere आणि त्याच्याशी संबंधित विकर हा आहे. ई- सकाळ मधे ह्यावर डॉ. अनिल लचके ह्यांचा सुंदर लेख आलेला आहे. त्यासाठी हा दुवा देत आहे.
http://beta.esakal.com/2009/10/06193124/editorial-hormone-research.html
तसेच हेहि वाचा.
http://timesofindia.indiatimes.com/news/world/us/3-Americans-share-2009-...
मानवी वैद्यकशास्त्राची ही प्रगती मैलाचा दगड ठरावी , कारण ह्या शोधामुळे कर्करोगाच्या अधिक खोलात शिरून त्यावर काही उपाययोजना करता येईल. तसेच जस वय वाढत जात ,तस Telomere ची लांबी कमी होत जाते. म्हणजे ह्यांचा अधिक अभ्यास करून जर Telomere ची लांबी कमी होण थांबविता किंवा लांबविता आल तर काही वर्ष का होईना ,पण आपण उशिराने म्हातारे होऊ अशी आशा करायला काय हरकत आहे.
ह्या नोबेल विजेत्यांचे अभिनंदन आणि त्यांच्या पुढील कार्यास शुभेच्छा.


