टंकलेखन साहाय्य
सामर्थ्यदाता : गमभन !
प्रवास
ले गई दिल 'दुनिया' जापानकी.. ११
प्रेषक स्वाती दिनेश ( रवी, ०६/२२/२००८ - २०:०३) .याआधी: ले गई दिल 'दुनिया' जापानकी.. १०
आम्ही मैतरणी जवळ जवळ रोजच सकाळी १० ते १०.३० च्या दरम्यानं बाहेर पडत असू.दोन तीन तास आसपासच्या रस्त्यांवरून भटकंती करत तिथल्या रस्त्यांची,दुकानांची आणि माणसांचीही ओळख करून घेत येताना भाजी,दूध ,अंडी इ. गोष्टी आणत असू.इथल्या टीव्ही वरती फक्त जपानी चॅनेले दिसायची.(आता इथेही तेच! फकस्त जर्मन चॅनेले! दुसर्या महायुध्दातल्या पराभूत देशात असा रुल आहे की काय?
)तर इथे फक्त जपानी कार्यक्रम दिसत. घरी इंटरनेट नव्हते. बाहेर नेट कॅफे असत पण सगळे जपानीतून ! इंग्रजी व्हर्जन ज्या नेट कॅफेमध्ये होते तो आमच्या घरापासून २ किमी लांब! सॉलिटेअर तरी किती खेळणार?आम्ही ३ कुटुंबे एकत्र राहत होतो. स्वतंत्र बेडरुम आणि बाथरुम असल्या तरी आमचे स्वयंपाक घर आणि हॉल एकत्र होते. आमच्या मालकीण बाई श्रीमती लीला रेड्डी आम्हाला वेगवेगळ्या हिंदी सिनेमांच्या कॅसेटा देत असत.(हो, तेव्हा सीडी,डीव्हीडी इतक्या सहज मिळत नसत.)कधीतरी दुपारी आम्ही तिघीजणी एकत्र सिनेमा पहायचो पण जपानमधला वेळ हिंदी सिनेमात वाया घालवायला मला आणि सुप्रियाला जास्त आवडायचं नाही.लेखाला मात्र शिनूमात रस असायचा.मग आम्ही दोघी भटक्या परत बाहेर पडत असू आणि मोतोमाचीच्या शॉपिंग लेनमध्ये नाहीतर शिन कोबेच्या रस्त्यावर,बागांमध्ये भटकत असू.

आमच्या घराच्या कोपर्यावरच एक "को ऑप" नावाचं सहकारी भांडार होतं. तेथेही आम्ही जात असू.कोऑपच्या समोरच सुंदर कट्टा बांधलेला होता आणि काही बाकडीही टाकलेली होती.तिथे बसलं की वार्याच्या हलक्या झुळूका येत असत आणि समोरचे कोऑप आणि संपूर्ण रस्त्यावरच्या हालचाली दिसायच्या. पहारे करायला बसल्यासारख्या आम्ही दोघी तिथे बसत असू. आजूबाजूच्या बाकड्यांवरही कोणकोण बसलेले असायचे.ओळख देख नसताना सहज "कोन्निचिव्हा" (हॅलो,नमस्कार..)व्हायचे.आमची बिनाअस्तराची जपानी आणि त्यांची तितकीच बिनाअस्तराची इंग्रजी; दोन्हीची मोडतोड करत संवाद सुरू व्हायचा.आमचा वेळ मजेत जायचा. दुपारी साधारण प्रौढ आणि वृध्द स्रियांचाच वावर तिथे जास्त असायचा.त्या काय खरेदी करतात? त्यावरून त्यांच्या राहण्या खाण्याच्या सवयींचा अंदाज बांधायचा जणू छंदच आम्हा दोघींना लागला होता.

बर्याच जणी आपापले कुत्रे घेऊन खरेदीला येत. त्यांना बांधायला दुकानाच्या दाराशी स्वतंत्र स्टँड होता.तिथे बांधतानाही त्यांच्याशी लाडेलाडे बोलत.(बहुतेक ,"शहाणा मुग्गा ना तू? शांत बसायचं हं,मी लग्गेच येतेच.तुला चॉक्केट आणते हं. आणि काय हवं बाळाला?" असला काही संवाद जपानीतून होत असावा असा मला दाट संशय आहे.)त्यांचे लहान मुलांच्या वरताण लाड!त्यांच्या केसांना रिबिनी काय बांधतील,केस रंगवतीलच काय?त्यांना झबलेवजा फ्रॉक काय घालतील. पाऊस असला तर रेनकोट! आणि हद्द म्हणजे त्यांच्या पायात बूट!
त्याच गल्लीच्या दुसर्या टोकाला "कुत्र्यांसाठी पेश्शल हाटेल" होते. ह्या सगळ्या श्वानमाता बहुतेक वेळा आपली खरेदी करून झाल्यावर किवा आधी त्या हाटेलात आपल्या "पपीला" नेऊन खायला प्यायला घालून लाड करताना दिसत. (त्या पेश्शल हाटेलाच्या बाहेर असलेल्या बाकड्यांवर बसून आमचे तेही निरिक्षण चाले.)पण एक मात्र होतं ,ह्यांच्या कुत्र्यांचा त्रास इतरांना होत नसे .प्रत्येक कुत्राधारिकेबरोबर एक पिशवी जरूर असायची.त्या पिशवीचं कोडं एक दिवस उलगडलं.एक श्वान माता आपल्या लेकराला बाहेर ठेवून खरेदीला गेली असता इकडे बाळाने कार्यक्रम करून ठेवला.ती ललना बाहेर आल्यावर ते दृश्य पाहून" अर्रे लबाडा,तरी सांगत होते जास्त खाऊ नकोस." असे भाव चेहर्यावर! पिशवीतून टिश्यु काढून तिने ती जागा आणि कुत्र्याचा पार्श्वभाग दोन्ही साफ केले.जवळच्या प्लास्टीक पिशवीत तो ऐवज परत ठेवला. समोरच मोठ्ठी कचराकुंडी असतानाही ती पिशवी घेऊन चालायला लागली.भोचकपणा करून आम्ही तिला (बिनाअस्तराच्या जपानीत)समोरच असलेली कचराकुंडी दाखवली.तिचं उत्तर मात्र बरच काही शिकवून गेलं." ही कुंडी कॅन्स आणि बाटल्यां,जुने कागद इ.साठी आहे.ते सारे रिसायकलिंगला जाते,त्यात ही घाण टाकून कसं चालेल?
त्या समोरच्या मोठ्या कचराकुंडी मध्ये कॅन्स,बाटल्या,ओला आणि सुका कचरा,कागद,दुधाचे खोके इ. साठी वेगवेगळे कंटेनर्स होते.(परदेशात बहुतेक सगळ्याच ठिकाणी असे असते हे तेव्हा माहित नव्हते.सगळ्याचीच नवलाई होती.)लोकं तिथे येऊन वर्गीकरण करून कचर्याची विल्हेवाट लावत असत. कोणीही एकदाही आपली कचर्याची पिशवी एकाच कंटेनरमध्ये टाकून गेलेले पाहिले नाही.दुधाचे खोके तर रिसायकलिंगला सोपे जावे म्हणून धुवून,चपटे करून,महिन्याभराचे साठवून त्यांचा गठ्ठा करून मगच टाकत. एकदा असेच तिथे कट्ट्यावर बसलो असताना एक स्त्री आणि तिची १०/१२ वर्षांची मुलगी कचरा टाकायला आल्या.बाई वेगवेगळ्या कुंड्यात वर्गवारी करत कचरा टाकत होत्या. मुलगी कंटाळली आणि तिने उरलेली पिशवी एकाच कुंडीत टाकली.बाईंनी पाहिलं आणि मुलीला ओरडा तर बसलाच पण बाईंनी ती पिशवी कुंडीतून उचलली आणि मुलीला वेगवेगळ्या कुंड्यात कचरा टाकायला लावला.
सार्वजनिक स्वच्छता आणि आरोग्य नुसते सप्ताह पाळून होत नाहीत तर या आणि अशाच गोष्टीतून ते राखलं जातं ह्याचा तो एक वस्तुपाठच होता.

रस्ते तर इतके स्वच्छ की चक्क पान घेऊन पंगत मांडावी!(पंगत मांडण्याइतके स्वच्छ रस्ते मला युरोपातही क्वचितच पहायला मिळाले. )रस्त्यांमधल्या डीव्हायडर वर अनंताची,गुलाबाची झाडं,बोगनवेली लावलेल्या असतात.छत्रीच्या वाकड्या मुठीने किवा काठीने कोणीही रामभाऊ देवपूजेसाठी ती काढताना किवा कोणी रमाकाकू,ठमाकाकू वेणीत माळण्यासाठी ती खुडताना दिसत नाहीत.एकदा सूटाबूटातले हपिसर लोकं हातात मोजे घालून,लांब चिमट्यांनी वाटेतला कचरा म्हणजे फुलांच्या पाकळ्या,वार्याने गळलेली पानं,चुकून कुठे असलंच तर सिगरेटच थोटुक गोळा करून जवळ असलेल्या एका कचर्याच्या कुंडीत टाकत होते.कपड्यांवरून ते काही सफाई कामगार तर वाटत नव्हतेच. आम्ही परत एकदा भोचकपणा करून ह्याबाबत त्यांना विचारलं .उत्तर मिळालं,"आम्ही इथल्या जवळपासच्या इमारतीत कामाला येतो तर इथला रस्ता स्वच्छ ठेवणं ही आमची जबाबदारी आहे."(काशीला गेलो असताना रस्त्यात घाण की घाणीत रस्ता आहे हे समजत नव्हते.तेव्हा विचारणा केली असता मिळालेले उत्तर होते."कितने लोग यहा रोजाना आते है। कॉर्पोरेशन के सफाई करनेवाले भी रोज कौनसी तो गली साफ करतेही नही है।")
राखेतून नंदनवन उभं केलेल्या ह्या देशाचं रहस्य तेथलेच सुजाण लोकं आपल्या कृतीतून सांगत होते.
रात्री सवास - थायलंड सफर (अंतिम)
प्रेषक ॐकार ( शनी, ०६/२१/२००८ - १५:१४) .सायं सवास पासून पुढे...
थायलंडमध्ये खाओ याई नॅशनल पार्कला गेलो होतो. पावसाळ्यात खरं तर इथे भेट द्यायला हवी पण इतर वेळेसही भेट द्यायला हरकत नाही. इथे रहायचीही व्यवस्था आहे. तंबूंपासून अगदी हवेशीर बंगल्यांची सोय आहे, पण महिन-दोन महिने आधीच नोंदणी करावी लागते. बुकींग फुल्ल असल्याने माझा कार्यक्रम एका दिवसात आटोपता घ्यायला लागला. त्यामुळे नाईट सफारीचा आनंद घेता आला नाही. धबधबे, जंगलवाटा, अगदी रस्त्यांवर फिरणारी हरणंही हमखास भेटतात इथे.
काही चित्रे:
या राष्ट्रीय उद्यानानजीकच जमिनीखाली तयार झालेले एक निसर्गनिर्मित बुद्धाचे देऊळ आहे. चुनखडकावर काही प्रक्रिया होऊन निसर्गतःच तयार झालेली अमूर्त शिल्पकृती इथे पहायला मिळतात-
काहीठिकाणी तर ह्या भिंती अर्धपारदर्शी आहेतः
याचसोबत खरेदीसाठी जतुजा ( थाई उच्चार : जाः तुक् जा:) मार्केटला चक्कर टाकावी. बँकॉकमधला जणू आठवडाबाजार! तब्बल २० हजारच्या आसपास दुकाने असणार्या या बाजारात बर्याच गोष्टी मिळतात. भाव करायला तुम्हाला थाई अंक, संख्या यांची थोडीफार ओळख असायला हवी. किंवा मग एखादा थाई मित्र अथवा मैत्रिण सोबत असेल तर चांगले.
समिंदरावर जायचे असेल तर चा-आम, फुकेत ला जावे. सोबत नाईट लाईफ अनुभवायची असल्यास पट्टाया! पर्यटकांच्या रेट्यामुळे हल्ली पट्टाया गजबजलेले असते तरी त्याचे आकर्षण परदेशातील लोकांनाच, थाई लोक मात्र त्यापेक्षा निवांत आणि चांगल्या समुद्रकिनारी जाणं पसंत करतात.
थायलंडमधील आणखी काही प्रकाशचित्रे त्यात सहभागी असणार्या थाई व्यक्तींची अनुमती नसल्याने देऊ शकलो नसलो तरी या सुस्वभावी लोकांनी केलेलं आदरातिथ्य मात्र कायम लक्षात राहील. भारताबाहेर आपली जमीन, आपलं आकाश आणि आपली माणसं वाटावीत अस थायलंडचं आश्वासक चित्र मनात आहे. जमल्यास थायलंडची सफर नक्की करून या.
या लेखांचा शेवट काही चित्रफितींनी करतो.
रटरटते चिकनः
लोटी तयार करणार्या थाई महिलेची हातोटी:
फ्लोटिंग मार्केटमध्ये मिळणारा गोड पदार्थ नावेत बसून बनवताना:
बँकॉकच्या रस्त्यावर नाचणारी पोरं टोरं:
निद्रिस्थ बुद्धराजः
रात्री सवास !(good night!)
राजमुंद्री --एक नयनरम्य ठिकाण
प्रेषक वैशाली हसमनीस ( शुक्र, ०६/२०/२००८ - १३:३१) . राजमुंद्री--एक नयनरम्य ठिकाण
आपल्या भारतात अनेक पाहण्यासारखी स्थळे आहेत.त्यातील हे एक आहे.आंध्र प्रदेशात एन्.एच.५ ह्या महामार्गापासून जवळच आहे.गोदावरी नदीच्या कांठावर वसलेले अत्यंत देखणे असे हे गाव.जिल्हा-पूर्व गो दावरीं. नाशिकपासून निघालेल्या गोदावरीचे पात्र येथे इतके भव्य होते की जणू समुद्रच! नजर जाईल तिथपर्यंत पाणीच पाणी.संपूर्ण प्रांत हिच्या पाण्याने सुजलाम सुफलाम झाला आहे.घाठावर अनेक सुंदर देवळे,एक पांडुरंगाचेही देउळ आहे.तिथेच कोटी शिवलिंगावर रोज संध्याकाळी कारंज्यातून अभिशेक केला जातो.ते द्रुश्य बघण्यासारखे असते.गोदावरीवर वरुन रोड व खालून रेल्वे पूल बांधला आहे. हा आशियातील दुसरा सर्वात लांबीचा पूल आहे्. हे गाव निसर्गाने देखणे केले आहे.जिकडे-तिकडे हिरवेगार! नारळाची झाडेच झाडे!सगळीकडे भाताची रोपे सळसळणारी.येथील केळीहि फारच रुचकर.गावातील रस्ते पक्क्या बांधणीचे.रस्त्यांची दुर्दशा नाही.गावात अनेक जागी देवळे.लोक देवभक्त व पापभीरू ,आतिथ्यशील. आनंद रिजन्सी आणि रिव्हर बे ही दोन होटेल्स पंचतारांकित.येथून नदीत सफर करता येते.सुती कापडाची मोठी बाजारपेठ .अनेक मारवाडींची वस्ती.थोडक्यात हे तेलगू कोंकण आहें. निसर्गाने ह्या गावावर आपला वरदहस्त ठेवला आहें .
दुधसागर - धबधबा
प्रेषक अमोल केळकर ( मंगळ, ०६/१७/२००८ - १२:१८) .दुधसागर -
मडगाव पासुन २ तासाच्या अंतरावर मडगाव ( गोवा)- मिरज रेल्वे लाईन वर दुधसागर धबधबा आहे. काहीसा दुर्लक्षीत असा पण अतीशय प्रेक्षणीय धबधबा आहे. पाण्याच्या दुधासारख्या रंगामुळे कदाचीत त्याला हे नाव पडले असावे. सभोवती अतीशय घनदाट जंगल आहे. आपला जसा कर्जत- लोणावळा रेल्वे मार्ग आहे तसाच मडगाव - दुधसागर- लोंढा मार्ग घाटाचा आहे. अतिशय नयनरम्य प्रवास असे वर्णन करता येईल.
दुधसागरला रहायची फारशी चांगली व्यवस्था नाही. कर्नाटक सरकारच्या फॉरेस्ट डिपारमेंटचे गेस्ट हाऊस आहे. तेथील व्यवस्थेची फारशी माहिती नाही. मडगावहुन एकादिवसात जाऊन येणे बरे. मडगावहुन रेल्वे तसेच रस्ताने ही जाता येते.
गोव्यात गेल्यावर सागर किनारे, देवळे याचबरोबर वेळ असल्यास अवश्य भेट देण्यासारखे ठिकाण.
धबधब्याची काही चित्रे ( आंतरजालावरुन साभार)



मुली / स्रिया असण्याचे फायदे!
प्रेषक प्रगती ( गुरू, ०६/१२/२००८ - १६:२२) .काय ? विषय वाचून दचकलात का?
अहो ,दचकू नका मला माहीत आहे मुली / स्रिया असण्याचे जसे फायदे आहेत तसेच तोटे ही आहेत पण आज आपण फायदे बघुया.
प्रत्येकाला कधी ना कधी काही ना काही चांगले, वाईट अनुभव आले असतील तर चला करुया सुरुवात.
शनिवारची गोष्ट आहे, शनिवारी संध्या़काळी मी "सॅर्टरडे क्लब ठाणे" ( मराठी व्यावसायि़कांची सभा ) येथे माझ्या दुचाकीवरुन चालले
होते, डोक्यावर हेल्मेट नाही , तोंडावर अतिरेकी गुंडाळतात तसा स्कार्फ गुंडाळला होता, अंमळ उशीरच झाला होता म्हणून गाडी
वेगात चालली होती आणि अचानक लाल सिग्नल लागललेला माझ्या लक्षात आलं नाही आणि मी सिग्नल तोडला , मागून मला ट्रॅफिक
हवालदारच्या शिट्टीचा आवाज आला मी गाडी मागे वळवली (स्वगतः आलीया भोगासी असावे सादर) मनातल्या मनात म्हटलं आता
किती पैशाची काशी होणार कोणास ठाउक
कारण एकतर सिग्नल तोडला होता + हेल्मेट घातलं नव्हतं, मी गाडीवरुन खाली
उतरले साहेबांना एक छानसं स्माईल दिलं
, साहेबांनी सिग्नल तोडल्याचं कारण विचारलं मी त्यांना चूक झाली म्हणून सांगितलं
आजुबाजुचे बघे मनातल्या मनात म्हणत असतील चला साहेबांना एक बकरा सॉरी बकरी मिळाली
आणि अहो आश्चर्य साहेबांनी
मला काही दंड न करता जा म्हणून सांगितलं
राजवाड्यांचे शहर
प्रेषक आनंदघन ( रवी, ०६/०८/२००८ - १२:५३) .आमच्या जमखंडीसारखे पिटुकले संस्थान असो किंवा पांच खंडात पसरलेले ब्रिटीशांचे साम्राज्य असो, त्याच्या राजघराण्यातले लोक कुठे आणि कसे राहतात याबद्दल सामान्य प्रजाजनांत विलक्षण कुतूहल असे. त्या कुतूहलाची परिणती भयमिश्रित आदरात होऊन प्रजेने राजनिष्ठ बनावे यासाठी राजघराण्यातल्या व्यक्ती सामान्यांपेक्षा वेगळ्या आणि श्रेष्ठ असतात असे सतत लोकांच्या मनावर बिंबवले जात असे. राजे महाराजे म्हणजे दिसायला राजबिंडे, त्यांचे खाणेपिणे, कपडेलत्ते वगैरे सारे कांही राजेशाही थाटाचे आणि त्यांचा निवास भव्य राजवाड्यात असे. गांवातील कोठल्याही धनाढ्य माणसाचा वाडा, हवेली, कोठी वगैरेपेक्षा तिथला राजवाडा नेत्रदीपक आणि आलीशान असायलाच हवा. राजघराण्यातील व्यक्तींचे कडेकोट संरक्षण करण्यासाठी त्याचे बांधकाम चांगले भरभक्कम असे, त्याच्या सभोवती अभेद्य अशी तटबंदी, त्यावर तोफा ठेवण्यासाठी बुरुज, हत्तीला सुध्दा दाद देणार नाहीत असे मजबूत दरवाजे वगैरे सारा सरंजाम त्यात असे. पुरातन कालापासून असेच चालत आले आहे. इंग्रजी भाषेतल्या परीकथा, अरबी भाषेतील सुरस आणि चमत्कृतीपूर्ण किस्से, आपल्या पौराणिक कथा-कहाण्या या सगळ्यात पूर्वीच्या राजांच्या राजवाड्यांचे रसभरित वर्णन असतेच. त्यांच्या बांधकामामुळे हजारो मजूरांना रोजगार मिळतो, कुशल कारागीरांना आपले कौशल्य दाखण्याची संधी मिळते, त्यातून नवे कुशल कलाकार तयार होतात, प्रजेला सुंदर कलाकृती पहायला मिळतात, त्यामुळे तिची अभिरुची विकसित होते, वगैरे अनेक कारणांसाठी त्यावर होणा-या अमाप खर्चाचे समर्थन किंवा कौतुकच केले जात असे. राजेशाही संपून लोकशाही आल्यानंतर आताचे लोकप्रतिनिधी असलेले राज्यकर्ते देखील व्हाइट हाउस किंवा राष्ट्रपती भवन यासारख्या भव्य वास्तूमध्येच रहातात. ही परंपरा अशीच यापुढे राहणार असे दिसते.
कुठलेही ऐतिहासिक गांव पाहतांना त्या जागी कधीकाळी बांधलेला राजवाडा हे पर्यटकांचे मुख्य आकर्षण असते. मध्ययुगात बांधलेल्या दणकट ऐतिहासिक वास्तू दिल्ली वा
आग्र्यासारख्या कांही थोड्या ठिकाणी अद्याप शाबूत राहिलेल्या दिसतात तर इतर अनेक ठिकाणी त्यांचे भग्न अवशेष पाहून इतिहास काळातील त्यांच्या गतवैभवाची कल्पना करावी
लागते. इतिहासाच्या आधुनिक कालखंडात म्हणजे ब्रिटीशांच्या राजवटीत तत्कालीन राजे, महाराजे, नवाब वगैरे लोकांनी आपापल्या राज्यात एकापेक्षा एक सुंदर राजवाड्यांचे बांधकाम
करवून घेतले. त्या बहुतेक इमारती आजही सुस्थितीत दिसतात आणि रोजच्या वापरात त्यांचा उपयोग होतांना दिसतो. बडोदा, ग्वाल्हेर, जयपूर आदि अनेक गांवांमध्ये हे दृष्य
आपल्याला दिसते. अशा सा-या शहरांत मैसूरचा क्रमांक सर्वात पहिला असावा असे वाटावे इतके भव्य आणि सुंदर राजवाडे या ठिकाणी बांधले गेले आहेत. मैसूरच्या प्रसिध्द मुख्य
राजवाड्याखेरीज जगन्मोहन पॅलेस, जयलक्ष्मीविलास पॅलेस, ललितामहाल, वसंतमहाल, कारंजीविलास, चेलुअंबा विलास, राजेंद्र विलास वगैरे महाल किंवा पॅलेस या शहराची
शोभा वाढवतात.
मैसूरच्या राजवाड्याला मोठा इतिहास आहे. चौदाव्या शतकाच्या अखेरीस वाडियार राजांनी मैसूरचे राज्य स्थापन केले तेंव्हापासून याच जागेवर त्यांचा निवास राहिला आहे. चौदाव्या
किंवा पंधराव्या शतकात बांधलेला पुरातन राजवाडा कधीतरी वीज कोसळून पडून गेल्यावर सतराव्या शतकात त्या जागी एका सुंदर राजवाड्याची उभारणी केली होती. तिचे वर्णन
असलेल्या साहित्यकृती व दस्तऐवज उपलब्ध आहेत. अठराव्या शतकाच्या अखेरीस तो जीर्ण झालेल्या अवस्थेत असतांना टिपू सुलतानाने तो पाडून टाकला. इंग्रजांनी टिपू सुलतानाला
मारून राज्याची सूत्रे पुन्हा वाडियार राजाकडे सोपवली. त्या राजाने त्याच जागी अल्पावधीत नवा राजवाडा बांधला. शंभर वर्षे टिकल्यानंतर एकोणीसाव्या शतकाच्या अखेरीस त्याचा
बराचसा भाग आगीत जळून खाक झाला. तत्कालीन राणीने त्याच जागी आणि सर्वसाधारणपणे जुन्या राजवाड्याच्याच धर्तीवर नवा आलीशान राजवाडा उभारायचे ठरवले. त्यासाठी
नेमलेल्या इंजिनियराने अनेक शहरांना भेटी देऊन तिथल्या उत्तमोत्तम इमारतींची पाहणी करून नव्या राजवाड्याच्या इमारतीचा आराखडा बनवला आणि एका भव्य वास्तूची निर्मिती केली. युरोपात विकसित झालेले त्या काळात प्रचलित असलेले स्थापत्यशास्त्र, वास्तुशिल्पकला आणि परंपरागत भारतीय शैलीच्या शिल्पकलेचा आविष्कार या सर्वांचा सुरेख संगम या
इमारतीच्या रचनेत झाला आहे. ती बांधण्यासाठी दूरदुरून खास संगमरवर आणि ग्रॅनाइटचे शिलाखंड आणून त्यावर कोरीव काम केले आहे. सुंदर भित्तीचित्रांनी त्याच्या भिंती सजवल्या
आहेत. तसेच खिडक्यांसाठी इंग्लंडमधून काचा मागवून त्यावर सुरेख चित्रे काढून घेतली आहेत. रोम येथील सेंट पीटर्स बॅसिलिकाची आठवण करून देणारी अनुपम चित्रे छतावर
रंगवली आहेत. तिथे बायबलमधील प्रसंग दाखवले आहेत तर मैसूरच्या राजवाड्यात दशावतार आणि तत्सम पौराणिक कथांचे दर्शन घडते. या इमारतीतले खांब, कमानी, सज्जे,
त्यावरील घुमट वगैरेंच्या आकारात पाश्चिमात्य, मुस्लिम आणि भारतीय अशा सर्व शैलींचा सुरेख संगम आढळतो. राजवाड्याच्या चारी बाजूंना भरपूर मोकळी जागा ठेवून त्याच्या
सभोवती तटबंदी आहे.
कॉलेजमध्ये असतांना मी मैसूरचा राजवाडा दसरा महोत्सवासाठी शृंगारलेल्या स्थितीत पाहिला होता. माझ्या आयुष्यात पाहिलेली ही पहिलीच ितकी संदर इमारत असावी. कदाचित
त्यामुळे आजही मला ही वास्तू यासम ही वाटते. ताजमहालसारखे सुंदर महाल रिकामे रिकामे वाटतात आणि सिसिटीम चॅपेलसारख्या इमारतीत कलाकुसरीच्या वस्तू मुद्दाम मांडून
ठेवल्यासारख्या दिसतात. मैसूरच्या राजवाड्यात त्या नैसर्गिकरीत्या जागच्या जागी ठेवल्यासारके वाटते. तिथले एकंदर वातावरण चैतन्यमय आहे. दरबार हॉलमध्ये हिंडतांना
कोठल्याही क्षणी भालदार चोपदार महाराजाधिराजांच्या आगमनाची वर्दी देत येतील असा भास होतो.
जगन्मोहन पॅलेसमध्ये सुरेख आर्ट गॅलरी आहे. त्यात अनेक जुन्या चित्रकारांची तैलचित्रे तशीचइतर माध्यमातल्या कलाकृती आहेत. हळदणकर यांचे ग्लो ऑफ होप हे चित्र यातले
खास आकर्षण आहे. एक संपूर्ण दालन फक्त राजा रविवर्मा यांनी काढलेल्या भव्य चित्रांनी भरले आहे. ललितामहालमध्ये पंचतारांकित हॉटेल आहे. जयलक्ष्मीविलास पॅलेसमध्ये मैसूर
विद्यापीठाचे मुख्यकार्यालय आहे, तसेच त्याच्या कांही भागात लोककला आणि पुरातत्व या विषयांवरील पुराणवस्तुसंग्रहालय आहे. चलुअंबा पॅलेसमध्ये सेंट्रल फूड टेक्नॉलॉजिकेल
इन्स्टिट्यूट आहे. अशा प्रकारे इतर राजमहालांचा या ना त्या कारणासाठी उपयोग करण्यात येत आहे. मैसूरच्या रस्त्यांवरसुध्दा जागोजागी कमानी उभारलेल्या आहेत, तसेच
चौकौचौकात चबुतरे वगैरे बांधून त्यावर राजा महाराजांचे पुतळे उभे केले आहेत. शहरातून फेरफटका मारतांना ते राजवाड्यांचे शहर आहे याची जाणीव होत राहते.
अरून सवास, सायं सवास! भाग - २
प्रेषक ॐकार ( शनी, ०६/०७/२००८ - ००:१५) .अरून सवास वरून पुढे चालू...
सायं सवास - संध्याकाळचे अभिवादन करण्याची थायलंडमध्ये इतकीशी काही पद्धत नाही पण तुम्ही थायलंडमधले नसाल तर हे अभिवादन कानी पडतं. थायलंडमधलं विदेशी पर्यटकांचं प्रमुख आकर्षण म्हणजे 'फ्लोटिंग मार्केट'. नदीच्यालगत काढलेल्या कालव्यांतून इथे लहान मोठे बाजार भरतात. फळं, फुलं , भाज्या, कपडे, टोप्या, छत्र्या, थाई रेशीम, शोभेच्या वस्तू इतकंच काय अगदी नूडल्स पासून केळ्याचं साटंही इथे चाखता येतं! सफर कबाजाराची एक चक्कर मारायला नावेतून जायला माणशी १०० बाह्थ लागतात. (१ बाह्थ - थाई चलन = १.२५ रू).
काही प्रकाशचित्रे -
निघालो बाजारा...
भाऊगर्दी!
आधी पोटोबा
गाँन् - सिप् गाँन् (१० - १२) प्रकार!
खाऊन तर पहा!
जिस गली में तेरा घर ना हो बालमा, उस गली से हमको गुजरना नहीं!
मा फलेषु... ?
सावर रे- ऊंच झुला

कालव्याच्या काठावरच्या घरासमोरचे तुळशी वृंदावन.. आपले बुद्ध - वृंदावन.

नो ट्रॅफिक!

मला बघून विचार करत असावी - नुस्ता फोटूच काढणार की काही विकत पण घेणार

एक धागा सुखाचा ....


साखरेचे खाणार !
फ्लोटिंग मार्केट मधेच एका नावेत हा मस्त गोड पदार्थ विकत घेतला. तांदळाच्या डोश्यासारख्या छोट्या द्रोणांत पपईचा कीस, खवलेल्या नारळाची गोड पेस्ट आणि साखर. जीभेवर ठेवताच विरघळायला लागतो असा हा खाद्यप्रकार!
याचसोबत थायलंडमध्ये अगदी हमखास मिळणारा लोकप्रिय खाद्यपदार्थ चाखला - लोती (रोटी) . पण ह्याचा पोळी अथवा रोटीशी फारसा संबंध नाही. थोडक्यात सांगायचे झाल्यास साध्या डोश्यात "बुढ्ढीके बाल" भरा आणि त्याची गुंडाळी करून खा! खायला मजा येते.
मी हाय कोली
समुद्रमंथनातून काहीका निघालं असेल, मात्र ओहोटीच्यावेळी समुद्रकिनारी मिळणारे जीव आणि सी-वीडस् यांचा हा रूचकर पदार्थ मस्त होता.

आणि मासा! (ह्यापेक्षा त्याचं अधिक वर्नन करणं म्हणजे शब्द वाया घालवण्यासारखं आहे! )

अरेच्चा, आत्ता होता! गेला कुठे?
वरच्या फोटूंतील पदार्थ आणि नदीतला मोठा खेकडा असा बेत तीन माणसांत होता. सगळं फस्त! आणि मस्त!
जपानचे खानपान
थायलंडमध्ये जपानी खाण्यावर प्रेम करणारे बरेच खवय्ये आहेत. मला व्यक्तीशः जपानी खाणं खास वाटलं नाही. पण खाता न येण्याइतकं वाईट तर नक्कीच नाही. ह्या खाण्यातही एक थाटामाटाचा प्रकार आहे. ह्यात हिरव्या कच्च्या भाज्या, मांस, नूडल्स, चटणी , रॉ सी-फुड, तोफू यांची चळत आणून देतात.
टेबलाच्या मध्ये विजेवर चालणारी अगदी निटस हॉटप्लेट असते. यात पाणी गरम करून वरचे पदार्थ घालून खात रहायचे.
सोबत नूडल्स आणि सुशी.सोबत आम्ही खाल्ला तो खाना म्हणजे रोस्टेड डक! दील खुश हो जाता है!
१)
२)
३)
४)
५)
अप्रस्तुत तरी अपरिहार्य
मांसाहार खाणं म्हटलं आणि त्यात बीफ म्हणताच त्रागा करणारे लोक आहेत. त्यामुळे एखादवेळेस बीफ अप्रस्तुत वाटेल पण खाण्याचे लाड असल्याने त्याची आठवण अपरिहार्य आहे.
तसं म्हणावं तर हा प्रकार वातड. त्यातही टी-बोन, न्यूयॉर्क असे प्रकार आहेत. थायलंडमध्ये गाय आणि डुक्कर तेतक्याच चवीने खातात. त्यापेकी जे बीफ खाल्ले ते वर चित्रात आहे. पोर्क त्यामानने बरं लागतं.
अदरक मारके!
आल्याचा गरम तिखट रस त्यात लिंबू आणि साखर आणि त्यात अगदी मुलायम तोफू!

ह्याने घसा सुटला नाही तर नवल. अशी हुकमी खादाडी करायला तुम्हाला थाई मित्र-मैत्रिणींसोबतच फिरावं लागेल.
कावासान - बँकॉकमधली खाऊगल्ली
रस्त्यावरचं चमचमीत खायचं असेल तर कावासानला जावं.

नूडल्स, सूप, भात इथपासून चिकन, पोर्क, मासे ते अक्षरशः तळलेले, भाजलेले चतूर, बीटल्स, साप ह्यातलं काहीही खायला मिळेल इथे! ( हो हो खायला, तुम्ही बरोबर वाचत आहत
)
तरंगते रेस्तराँ
बँकॉक मधल्या नदीच्या काठांवर मोजकी तरंगती रेस्तराँ आहेत. लाकडी पायांवर बांधलेली ही रेस्तराँ नदीच्या पाण्यावर तरंगत असतात. त्यापैकी एकात मासे खायचा योग होता-

चित्रातल्या मध्यभागी चिकन रस्सा. तो सतत गरम रहावा म्हणून ज्योतीने गरम करायला खास पात्र! हा पदार्थ थायलंडमध्ये अगदी आवर्जून मागवतात. डावीकदच्या पुढच्या ताटलीत मासा. मागच्या ताटलीत अननस -भात - बिर्याणी. उजवीकडच्या ताटलीत नारळाच्या पानांमध्ये बांधून शिजवलेली कोलंबी.
थायलंडमध्ये स्टिक्स-कांड्या घेऊन खायला शिकायला मला ३-४ दिवस लागले. पण चमच्याने खाण्यापेक्षा याची सवय करणंच चांगलं. थायलंडपध्ये प्रत्येक ठिकाणी काटा चमचा मिळेलचं असं नाही. थायलंडमध्ये थाई थंड कॉफी प्यावी. मधुमेही व्यक्तींनी मात्र याच्या वाट्याल जाऊ नये. मातीच्या भांड्यात जर केली असेल तर चव न्यारीच. पण भरपूर गोड.
पुढच्या भागात खाओ हाई नॅशनल पार्क आणि काही इतर स्थळांबद्दल लिहीन...
सी वर्ल्ड, सॅन डिएगो सहल
प्रेषक बेसनलाडू ( शुक्र, ०६/०६/२००८ - २३:०२) .नुकतीच सॅन डिएगो या अमेरिकेच्या नैऋत्य टोकावरील सुंदर शहरास भेट दिली. तेथील समुद्रकिनारे फिरलो व सी वर्ल्ड ला भेट दिली. या सहलीतील काही चित्रे मिपाकर रसिकांसाठी देत आहे.
शामू - द किलर वेल
आणखी एकदा शामू
शामूचे कुटुंब
शामू हा किलर वेल (देवमासा) दिवसाला साधारण सरासरी १५० ते २५० पौंड अन्न (मासे) खातो
सी वर्ल्ड मध्ये दररोज त्याचे विविध खेळ बघायला मिळतात. शामू व त्याचे प्रशिक्षक यांच्यातल्या प्रेमाचे, त्याच्या प्रशिक्षणाचे नेहमीच कौतुकमिश्रित आश्चर्य, अप्रूप वाटत राहते.
सी लायन (समुद्रशार्दुल) आणि त्याचा एक मित्र 
सी लायन, ऑटर आणि वॉलरस यांच्यातला फरक मला बरेचदा चटकन कळत नाही. वॉलरसला हत्तीसारखे (हत्तीएवढे नाही) सुळे असतात, त्यामुळे तो जरा ओळखता तरी येतो. ऑटर हा तुलनेने सगळ्यात लहान असावा. खालच्या चित्रात (बहुदा) ऑटरच आहे 
हे आहेत फ्लेमिंगो (रोहित पक्षी?) कोलंब्या खाऊन खाऊन यांच्या रंग असा लालगुलाबी होतो म्हणे
मुंबईला शिवडीच्या खाडीवर हे पक्षी दिसतात व त्यांच्यासंबंधीच्या 'मोसमी' बातम्याही वर्तमानपत्रांमध्ये वाचावयास मिळतात.
बीबी का मकबरा
प्रेषक प्रा.डॉ.दिलीप बिरुटे ( शुक्र, ०६/०६/२००८ - १०:००) .नमस्कार, आम्हाला आमच्या ऐतिहासिक औरंगाबाद शहराचं फार कौतुक. प्रत्येकाला प्रत्येकाच्या शहरात अभिमान वाटावा अशा काही कलाकृती सतत आनंद देत असतात. ताजमहालाची प्रतिकृती असलेला बीबी का मकबरा त्या पैकी एक.
या महालात औरंगजेबाची पत्नी राबिया दुर्रानीची कबर आहे. ही कबर औरंगजेबाच्याच काळात बांधलेली आहे असे म्हणतात. परंतु ही प्रतिकृती मलिकाच्या मुलाने आजम शाहने १६७९ इ.स. मध्ये आपल्या आइच्या स्मरणार्थ बनविली आहे. आगर्याचा ताजमहाल संगमरवरी दगडाचा बनवलेला आहे तर ,मकबरा हा पांढर्या मातीपासुन बनविलेला आहे. एका भव्य दरवाजातून प्रवेश केल्यावर प्रवेशदारात मोठा पाण्याचा हौद आहे. त्यात डोलणारी कमळांची फुले लक्ष वेधुन घेतात. त्यानंतर पुढे कारंजे आणि दोन्ही बाजूने दगडी रस्ता आहे. दोन्ही बाजुने सरुची वृक्ष लावलेली आहेत. बीबीच्या मकबर्याची भव्यता आणि सौंदर्य डोळ्यात साठवण्याच मोह कोणासही व्हावा. मकबरा एक भव्य ओट्यावर बांधलेला आहे. मकबर्यात मधोमध बेगम राबियाची कबर आहे. पुर्वी थेट तिथे जाता येत होते आता तो भाग प्रवेशासाठी बंद केला आहे. कबरीच्या चारही बाजुने संगमरवरी जाळ्या बसवल्या आहेत. कबरीची रचना करतांना वरील छतांच्या खिडक्यांची अशी रचना केलेली आहे की त्या कबरीवर दिवसा सुर्याची किरणे आणि रात्री चंद्र प्रकाश त्या कबरीवर पडतो. मकबर्याचा घुमट संगमरवरी दगडाचा बनलेला आहे. भव्य ओट्यावर चारही बाजुने दोन ताळी मिनार बांधलेले आहेत. कधी काळी मिनारावर जाता येत होते. पण लोकांनी इहलोकाची यात्रा संपवण्यासाठी या जागेची निवड केल्यामुळे हा रस्ता कायमचा बंद करण्यात आलेला आहे. औरंगजेब व त्याची बेगम यांच्या वापरात येणार्या काही वस्तु भांडे, वस्त्र, लाकडी वस्तू या संग्रहात ठेवलेले आहे. पण हे संग्राहलय सुद्धा बंद करण्यात आलेले आहे. आजुबाजुच्या वीट भट्ट्यांमुळे संगमरवरी वास्तु काळी पडत आहे. त्याला रंगकाम देण्याचे काम सतत चालले असते. औरंगाबाद शहरात किमान बावन्न दरवाजे अजुनही येणार्या जाणार्याचे स्वागत करुन गतकाळाची आठवण देत असतात.
पुरातत्व खात्याने जर इमारतींची काळजी घेतली नाही तर आजुबाजुच्या वीटभट्ट्यामुळे ही सुंदर शिल्प काळाचे पडद्याआड जातील असे मात्र राहुन राहुन वाटते.





