शिफारस

झोप (Need, Deprivation and Abstinence thereof)

नमस्कार,

माझे वय आजमितीला सुमरे २१ वर्ष आणि ४.५ महिने आहे. मला सुमारे ५ वर्षांपासून रात्री काम करणे आणि दिवसा झोपणे, अशा (सामान्यतः अनारोग्यकारक समजल्या जाणार्या दिनक्रमाची ) सवय लागली आहे. तर रात्रीची झोप येण्यासाठी काय करावे? अशा प्रकारचे अनैसर्गिक वेळापत्रक असल्यामुळे शरीरावर होणारे दूरगामी परिणाम यांची कृपया माहिती द्यावी.

--
आपला नम्र,
इंटरनेटप्रेमी, मुंबई, महाराष्ट्र राज्य.

मुंबई - तिरुपती - चेन्नई - मुंबई

या (2010) वर्षीच्या मे महिन्याच्या उत्तरार्धात ४-6 दिवसांचा मुंबई - तिरुपती - चेन्नई - मुंबई असा धार्मिक प्रवास योजिला आहे.
रेल्वेचे confirm आरक्षण झालेले आहे, मात्र अजून राहण्याच्या व फिरण्याच्या ठिकाणांबद्दल काही संशोधन केलेले नाही. सन्माननीय मिपाकरांना माझी नम्र विनंती आहे की त्यांनी, तिरुपती, चेन्नई येथे प्रवास करत असतानाच्या घ्यावयाच्या काळजी बद्दल माहिती दयावी.
अजून एक गोष्ट अशी की, जातानाचा प्रवास जरी ६ जणांना जरी समूहाने करायचा असला तरी वैयक्तिक कारणांमुळे माझा येतानाचा प्रवास एकट्यानेच आहे. त्यामुळे Two Tier AC ने एकट्याने रात्री २.०० ते दुसर्या दिवशी सकाळी ६.०० पर्यंत असा [रेनीगुंटा (तिरुपतीचे सर्वात नजीकचे रेल्वे स्थानक) - दादर] प्रवास करताना सुरक्षेची कोणती खबरदारी घ्यावी याचीही माहिती द्यावी.

'law and order' या विषयवरील आपले आवडते चित्रपट...

नमस्कार,

नुकतेच Law Abiding Citizen (2009 ) आणि Presumed Innocent (1990) हे दोन चित्रपट पाहण्यात आले, दोन्ही चित्रपट सर्वच बाबतीत उत्तम आहेत. नकीच पाहावेत असे आहेत. अशा प्रकारच्या अजून काही चित्रपटांची नावे माहीत असल्यास ती येथे माहीत करून द्यावीत, अशी सर्व माननीय मिपाकरांना नम्र विनंती. त्याच बरोबर सदर चित्रपट कृष्णधवल आहे की रंगीत याचीही माहिती दयावी.

--
आपला नम्र,
इंटनेटप्रेमी.

शब्दबंध २०१०

२००८ व २००९ या दोन्ही वर्षी 'शब्दबंध' या आंतरजालीय जालनिशीकारांच्या उपक्रमात सहभागी झालो होतो. आता या वर्षीच्या 'शब्दबंध'चे वारे वाहू लागले आहेत. त्या संबंधीची 'शब्दबंध'च्या अधिकृत जालनिशीवरील उद्घोषणा इच्छुकांच्या अधिक माहितीसाठी येथे डकवत आहे.
===========================================================================

२००८ मधे १० लोकांनी साकारलेल्या शब्दबंधने मागच्या वर्षी २९ लोकाना सामावून घेतलं! मराठी ब्लॉगर्सच्या या जागतीक ई-सभेचे आयोजन आपण याही वर्षी दिमाखात करणार आहोत. मित्रहो तारखांची नोंद करा - ५ आणि ६ जुन २०१०!
परत एकदा आपण सर्वजण या सभेत भेटायचंय. काही नवे तर काही जुने शब्दबंधी घेऊन यायचंय. जिथे आहात तिथून, थेट सर्वांच्या हृदयापर्यंत पोहोचायचंय. परत एकदा सर्व हौशी मराठी ब्लॉगर्सना त्यांचं लिखाण त्यांच्या थाटात व्यक्त करण्यासाठी हे खास व्यासपीठ सजवायचंय.

मागील वेळेसारखेच, मराठीमध्ये १०० % स्वतःचं लेखन असलेला किमान एक ब्लॉग असलेल्या कुठल्याही ब्लॉगकाराला यात सहभागी होता येईल. या सभेची व्याप्ती अधिकाधिक वाढवणे आणि अधिकाधिक मराठी ब्लॉगर्सना त्यांनी लिहिलेल्या, त्याना आवडणाऱ्या, आणि त्यांच्या लिखाणाचं वाचन करण्यासाठी ई-व्यासपीठ ऊपलब्ध करून देणे हा यावेळीही हेतू आहे. मराठीमधलं लिखाण हा एकच समान दुवा पकडून आपण सर्वजण एकत्र येणार आहोत. प्रवास वर्णनं, अनुभव, कथा, कविता, व्यक्तीचित्रं, लघुनिबंध, तंत्रज्ञान आणि अशाच कित्येक छटांनी सजलेल्या मराठी ब्लॉगविश्वाची छोटीशी झलक आपल्याला या सभेमधे साकार करायचीये. तेही अनौपचारीक पद्धतीने.
सर्वसाधारणतः या सभेचं स्वरूप असं असेल. स्काईप, किंवा तत्सम साधन वापरून, आपण वेगवेगळी सत्रं आयोजीत करू. सहभागी होणाऱ्या सर्व हौशी ब्लॉगर्सना या तंत्राची माहिती सभेच्या आधी करून देण्यात येईल. जपान-ऑस्ट्रेलियापासून ही सभा सुरू होईल. सत्रांची सूत्रं क्रमाक्रमाने पश्चिमेकडे हस्तांतरीत होऊन भारत-आफ़्रिका-युरोप-अमेरिका या क्रमाने अभिवाचनाचं सत्र सुरू राहील.

शब्दबंध-२०१० मधे सहभागी होणं सोपं आहे. सहभाग घेण्यासाठी किंवा केवळ आयोजनामधे मदत करण्यासाठीही, कृपया या फॉर्मवर नोंद करावी -https://spreadsheets.google.com/viewform?formkey=dHhIT3dWN21tYWpDVHo4UG9yMlZycWc6MA. तुमच्याबद्दलची माहिती आणि तुमच्या सहभागाचं स्वरूप आम्हाला या फॉर्मवरून कळेल. सर्व जुन्या आणि नव्या शब्दबंधीनी या फॉर्मवरून नोंद करावी ही विनंती. ईथे नाव नोंदवणाऱ्या सर्वाना आपोआप shabdabandha@googlegroups.com मधे प्रवेश दिला जाईल आणि तिथेच पुढच्या सर्व चर्चा होतील. (तुम्ही आधीपासून जरी shabdabandha@googlegroups.com चे सभासद असाल, तरीसुद्धा शब्दबंध-२०१० मध्ये सहभागासाठी, कृपया फॉर्ममधे नोंद करावी. तसदीबद्दल क्षमस्व.)

लवकरच भेटू. आपली वाट बघतोय.

- शब्दबंध स्वागतक आणि कार्यकारी मंडळ

जीवनाश्यक गोष्टी..

राम राम मंडळी,

येथे आपापल्या जीवनावश्यक गोष्टींची यादी प्रत्येकाने देणे अपेक्षित आहे..

माझ्यापासून सुरवात करतो. आपणही अवश्य सांगा -

मधुबाला, लता, किशोरदा, यमन, भीमण्णा, बाबूजी, पुलं, कुसुमाग्रज, सचिनदा, पंचमदा, शोले, हृषिदा, गुलजार, मदनमोहन, मिसळ, मासळीचं जेवण, श्रीखंड, पान-चुना-तंबाखू...

या माझ्याकरता जीवनावश्यक गोष्टी आहेत..

आपल्याही अवश्य सांगा.. Smile

सर्वांना होलिकोत्सवाच्या शुभेच्छा!

तात्या.

कोकण सफारी

आम्ही ३ मित्र मिळून केलेली कोकण सफारी: माझा हा पहिलाच मिसळपाव वरील लेख आहे
त्यामुळे विस्त्रुत लिहिले नाही.
१)पहिल्या दिवशी रात्री हरिहरेश्वरला मुक्काम केला

From Harihareshwar-Ganapatipule Trip

२) सकाळी दर्शन घेउन वेश्वि खाडितुन पलिकडे पोचलो

From Harihareshwar-Ganapatipule Trip
From Harihareshwar-Ganapatipule Trip
From Harihareshwar-Ganapatipule Trip

३) आन्जर्ले येथिल गणपतिचे दर्शन घेतले

From Harihareshwar-Ganapatipule Trip
From Harihareshwar-Ganapatipule Trip
From Harihareshwar-Ganapatipule Trip
From Harihareshwar-Ganapatipule Trip
From Harihareshwar-Ganapatipule Trip

४) पुन्हा दाभोळ खाडि जेट्टितुन ओलान्डली

From Harihareshwar-Ganapatipule Trip

५)व्याडेश्वराचे दर्शन घेतले

From Harihareshwar-Ganapatipule Trip

६)वेळ्णेश्वराचे दर्शन घेतले

From Harihareshwar-Ganapatipule Trip

७) हेदवि पहिले

From Harihareshwar-Ganapatipule Trip

८)गणपतिपुळे पहिले

From Harihareshwar-Ganapatipule Trip
From Harihareshwar-Ganapatipule Trip
From Harihareshwar-Ganapatipule Trip

९) रत्नागिरि पहिले

From Harihareshwar-Ganapatipule Trip
From Harihareshwar-Ganapatipule Trip
From Harihareshwar-Ganapatipule Trip
From Harihareshwar-Ganapatipule Trip
From Harihareshwar-Ganapatipule Trip
From Harihareshwar-Ganapatipule Trip
From Harihareshwar-Ganapatipule Trip
From Harihareshwar-Ganapatipule Trip
From Harihareshwar-Ganapatipule Trip
From Harihareshwar-Ganapatipule Trip
From Harihareshwar-Ganapatipule Trip
From Harihareshwar-Ganapatipule Trip
From Harihareshwar-Ganapatipule Trip
From Harihareshwar-Ganapatipule Trip

महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक धोरण :: प्रतिक्रिया पाठवा :: (पण कोठे?)

महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक धोरण :: प्रतिक्रिया पाठवा :: (पण कोठे?)

http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=473...

http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=473...

(या असल्या धोरणाबाबतच्या बातम्या आम्हाला वर्तनामपत्रातूनच का वाचायला भेटतात? शासनाला सांस्कृतिक धोरण ठरविण्यासाठी सर्वसामान्य लोकांपर्यंत जाण्याची गरज वाटत नाही काय? असो.)

प्रा. आ. ह. साळुंखे यांच्या अध्यक्षतेखाली राज्याचे सांस्कृतिक धोरण ठरविण्यासाठी एक समिती विधानसभा निवडणुकांपूर्वी त्यावेळचे सांस्कृतिक मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या पुढाकाराने स्थापन करण्यात आली होती.

समितीच्या शिफारशींची सविस्तर माहिती www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर मिळू शकेल. प्रस्तुतचे लेख व प्रत्यक्ष शिफारशी वाचून वाचकांनी महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर येत्या २८ फेब्रुवारीपर्यंत प्रतिक्रिया नोंदवणे अपेक्षित आहे. त्यानंतरच या समितीच्या शिफारशींवर साधकबाधक चर्चा होऊन त्याचे प्रत्यक्ष धोरणात रूपांतर होण्याची प्रक्रिया सुरू होईल. महाराष्ट्र शासनाचा या प्रकारचा हा पहिलाच प्रयत्न असून तज्ज्ञांची मते आणि लोकांच्या सूचना यांतून समितीच्या शिफारशींची योग्यायोग्यता, आवश्यकता, उपयुक्तता पडताळून पाहिली जाणे गरजेचे आहे!

www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर सदर माहिती जरी उपलब्ध असली तरी त्यावरील प्रतिक्रिया कोठे द्याव्यात यात कोठेही उल्लेख नाही. 'संपर्क करा' हा इमेल आयडी पण सापडत नाही. अशा वेळी कोणी या धोरणावर प्रतिक्रिया व्यक्त करण्यासाठी कोठे संपर्क कराव? नाही म्हणायला एक अर्ज आहे. पण तेथे कशा प्रकारे प्रतिक्रिया चढवावी अन त्याची पोचपावती मिळेल याची खात्री काय?

थोडक्यात शासकिय संकेतस्थळाने आपली दिवाळखोरी परत एकदा जाहिर केलेली आहे.

असो. तत्राप आपल्यामध्ये कोणास या प्रतिक्रिया देण्याच्या (पक्षी लश्कराच्या भाकर्‍या भाजणे हा शब्दप्रयोग योग्य होईल काय?) मोह झाल्यास आपण जरूर करावा अन राज्याचे सांस्कृतिक धोरण ठरविण्यासाठी सहभागी व्हावे.

PEGA म्हणजे काय?

नमस्कार मंडळी,
फार फार काळानंतर मिपावर यायला फुरसत झाली. हाटेलं जोरात चालु आहे हे दिसतच आहे.

आता थोड कामाच. मागच्या वर्षात मंदाबाईनी सगळ्यांनाच काहीना काही धडे दिले. त्यामुळे सध्या आम्ही नवी नोकरी शोधत आहोत.
तर आम्हाला पुण्यातल्या एका कंपनीने PEGA नावाच्या सिस्टीमवर काम करण्याची ऑफर दिली आहे. PEGA हे Business  Process Managementसाठीचे एक टूल आहे. नेटवरपण याची फारशी माहिती नाही. मला सापडलेले २ दुवे खाली दिले आहेत.

आपल्या मिपाकरांपैकी कोणी मला PEGA विषयी माहिती देउ शकतील काय? विशेषकरुन खालील २ प्रश्नांची उत्तरे मी शोधत आहे.
१. आजनंतर ४-५ वर्षांनी PEGA चे भविष्य काय?
२. PEGA ही C,C++,Java,。NET या पारंपारीक Languages पेक्षा कशा रोतीने वेगळी आहे.

धन्यवाद,
आपला गणा मास्तर,
(भोकरवाडी बुद्रुक)

माघ पोर्णिमा विशेषांक

येत्या ३० जानेवारीला 'माघ पोर्णिमा' आहे त्या निमित्ताने
मिसळपावचा "माघ पोर्णिमा विशेषांक " काढावा असे मी सगळ्यांना मंडळीना सुचवू इच्छितो.
ह्या अंकात फक्त चेष्टा,कुचेष्टा, टींगल, टवाळी अशा उत्साहवर्धक साहित्याचा समावेश असावा असे माझे वैयक्तिक मत आहे.
तेव्हा आपापली मतं मांडा पाहू.

दलपतसिंग येता गावा

२६ जानेवारी प्रजासत्त्ताक दिनी आम्ही एक राष्ट्रीय कर्तव्य केल ते म्हणजे दलपतसिंग येती गावा नावाचा शुभारंभाचा नाट्यप्रयोग भरत नाट्य मंदिरात पाहिला.पुण्यात लोकशाही उत्सव समिती च्या वतीने आयोजित केलेल्या कार्यक्र्मांतर्गत या शुभारंभाचा प्रयोग दणक्यात झाला. ५ जानेवारीला आपले मराठी ब्लॊगर मुक्त्त सुनीत पुण्यात होता. त्याच्या सोबत (खर म्हणजे त्याच्या ओळखीने ) मी, बिपीन कार्यकर्ते मंडळी अतुल पेठेंना भेटलो. तेव्हा गप्पांमधे त्यांच्याकडुन जांबसमर्थ नावाचे गाव प्रथमच ऐकले.
जालन्यापासून सुमारे १०० कि. मी. अंतरावर हे छोटे गाव आहे. तिथे लेखक राजकुमार तांगडे आणि दिग्दर्शक संभाजी तांगडे हे दोघे नाटकवेडे तरुण गेली काही र्वष अनेक अडीअडचणींशी सामना करत मोठय़ा निष्ठेने नाटकं करीत आहेत. त्यांची ग्रामीण भागातील वीजचोरीवरील 'आकडा' ही एकांकिका अतुल पेठेंनी पाहिली होती. या दोघांची कणकवलीला एन.एस.डी.च्या नाटय़प्रशिक्षण शिबिरात दिग्दर्शक अतुल पेठे यांच्याशी गाठ पडली होती. त्या गाठीभेटीतून दलपतसिंग येती गावा..’ या प्रयोगाचा जन्म झाली. मकरंद साठे या नाटककाराने यांनी विशेष अभ्यास करून लिहिलेल्या पटकथेचे हे नाटय़रूपांतर आहे. ते अतुल पेठे, मकरंद साठे आणि राजकुमार तांगडे यांनी केले आहे. संकल्पना व दिग्दर्शन अतुल पेठे यांचे आहे.पेठे यांनी जांबसमर्थ, लिंबी, पिंपळगाव, मूर्ती आणि जालना या गावांतील तरुणांना एकत्र करून जांबसमर्थ आणि जालना येथे एक कार्यशाळा घेतली. यांनी त्यात विविध विषयांवर चर्चा झाली. अभ्यासाचा एक भाग म्हणून प्रशिक्षणार्थी नर्मदा खोऱ्यात जाऊन आले. तिथे ते योगिनी खानोलकर या स्वयंसेवी कार्यकर्तीबरोबर हिंडले आणि रोजगार हमी योजनेबाबतची जनसुनवाई त्यांनी पाहिली. आर्थिक स्थिती नसूनही हे शेतकरी तरुण स्वखर्चाने फिरले. चार महिन्यांच्या या प्रशिक्षण शिबिरातून दलपतसिंग येती गावा..’ या नाटकाची निर्मिती झाली आहे. जगण्याचेच प्रश्न तीव्र असताना नाटकाद्वारे आपले आयुष्य मांडावे, असे या तरुणांना वाटते. दलपतसिंग येती गावा..’ हे नाटक त्यातलंच. हे नाटक अरुणा रॉय यांनी माहितीच्या अधिकारासाठी दिलेल्या लढय़ावर आधारीत आहे. आजचे गावपातळीवरील राजकीय व सामाजिक ताणतणाव त्यात पकडण्याचा प्रयत्न केला गेला आहे. साहाय्यक दिग्दर्शन संभाजी तांगडे यांनी केले असून, गाणी विनोद जैतमहाल आणि राजकुमार तांगडे यांनी लिहिली आहेत. यात राजकुमार तांगडे, संभाजी तांगडे, अशोक देवकर, विनोद जैतमहाल, अरुण घोडे, सचिन जैन, गजेंद्र तांगडे, सपना देशमुख, अश्विनी भालेकर आणि वीणा जामकर हे कलाकार आहेत.

नाटकाच्या सुरवातीला अतुल पेठे यांनी निर्मितीत सहाय्य केलेल्या अनेकांचे आभार मानले
नाटय़प्रशिक्षण व निर्मितीत इंद्रजित खांबे, राजेंद्र बापट, कणकवलीचे वसंतराव आचरेकर प्रतिष्ठान यांनी खर्चाचा काही भार उचलला आहे. अरुणा रॉय, नसिरुद्दीन शहा, डॉ. वाणी, मजदूर किसान शक्ती संघटन, स्क्विझोफ्रेनिया अवेअरनेस असोसिएशन, के. एस. वाणी मेमोरियल ट्रस्ट, जालना पत्रकार संघ आणि मॉटले ग्रुप, मुंबई यांनीही यास सहकार्य दिले आहे.

हे नाटक मनोरंजन म्हणुन कोणी पहायला आला तर तो अस्वस्थ होउन बाहेर पडेल. नाट्याविष्कार हा लोकनाट्य कलेच्या माध्यामातुन आहे. हे प्रबोधननाटय आहे, इंग्रजांच्या काळात झाले असते तर अतुल पेठे व त्त्यांच्या या टोळीला देशद्रोहाच्या आरोपाखाली तुरुंगवास झाला असता. आजही तो विद्रोहच आहे. पण लोकशाहीचे संरक्षक कवच असल्याने व अजुन तरी राज्यघटना कागदावर का होईना अस्तित्वात असल्याने ते घडत नाही.
सुरवात महारष्ट्रातील हरिभाउ या स्थानिक राजकारण्याच्या उदोउदो लोकगीतातुन करुन कागदावरच संडास बांधणार्‍या ग्रामीण विकासातुन केली आहे. बतावणीतुन झालेली संवादफेक थेट घडलय बिघडलय ची आठवण करुन देते. फ्लॆशबॆकमधे भुरासिंग हा राजस्थानातील जमीनदाराने गावच्या गायरानाचा कब्जा घेउन गावकर्‍यांवर सत्ता गाजवण्यातुन झालेल्या संघर्षाची कहाणी घेतली आहे. पुर्वी पोलिसात ऒर्डर्ली म्हणुन काम करीत असलेला दलपतसिंग हा एसीपीच्या बायकोने सांगितलेली खाजगी कामे ऐकत नाही. फक्त प्रशिक्षणात अंतर्भुत असलेली कायदेशीर कामेच करीन असा पवित्रा घेतो. त्याविरोधी आंदोलन करतो. या 'विद्रोहा' साठी नोकरीतुन शिस्तभंग, बेकायदा आंदोलनाचा कायदेशीर बडगा दाखवुन त्याला नोकरीतुन काढुन टाकतात. तो परत गावी येतो. पारंपारिक सुतारीचे काम येणार्‍या दलपतला काम शोधताना एका जनआंदोलनाचे काम करणार्‍या एका एनजीओ ची ओळख होते. तिथे सहभाग घेउन तो काम करतो. रोजगारहमी योजनेत काम करणारे असंघटीत गावकरी मजुर असहाय्यपणे भ्रष्टाचार सहन करीत असतात. त्यांना संघटीत करुन तो भुराविरुद्ध संघर्ष करतो. गोपनीयतेचे कायदे संघर्षात आड येतात. तेव्हा माहिती अधिकार नसतो. माहिती अधिकाराच्या निर्मितीचा हा भाग त्यात घेतला आहे
सतीश शेट्टीच्या खुन प्रक्ररणाची दखल व आदरांजली ही संहितेतील केलेला सुनियोजित बदल हा लक्षवेधी आहे.कुठलेही प्रथितयश कलाकार न घेता केलेल्या या नाटकाला बोजड प्रबोधन नाट्य होउ न देण्यात अतुल पेठे यशस्वी झाले आहेत. नाटकाला अनेक कला नाट्य साहित्य क्षेत्रातील दिग्गज मंडळी आली होती. श्रीराम लागु पण होते बरं का! नाटकातील ओ का ठो न कळणार्‍या मला हे नाटक जाम आवडल व अस्वस्थ करुन गेल. नाटक संपल्यावर पुणेरी पद्धतीने चपळाईने आत जाउन अतुल पेठे व टीमचे अभिनंदन केल.

[ अतुल पेठे व मकरंद साठे कलाकार चमुसमवेत]

मुंबईत १ फेब्रुवारीला वाशीच्या विष्णुदास भावे नाटय़गृहात, तर २ फेब्रुवारीला दादरच्या शिवाजी मंदिरात याचे प्रयोग होणार आहेत. नाटकाचा कालावधी सलग पावणेदोन तास आहे.