काळजी घ्या मुवि. हाडाचे दुखणे म्हणजे वेळखाऊ दुखणे असते. काहीही झाले तरी मुळातले दुखणे आणि मग फिजिओथेरपी वगैरे प्रकार मिळून अडीच-तीन महिने जातातच. मी पण तो अनुभव घेतला आहे. पण त्या काळात मिपावर पूर्णवेळ पडीक राहून वेळेचा सदुपयोग केला होता :)
पुणे बुक फेस्टिवल २०२४
१४ डिसेंबरपासून सुरू झालेल्या पुणे बुक फेस्टिवलचा आज २२ डिसेंबर शेवटचा दिवस होता.कामाचं आठवडा नियोजन पूर्ण फुल्ल असल्याने आजचाच दिवस या फेस्टिव्हलमध्ये येण्यासाठी मिळाला.खरोखर पुस्तक प्रेमींसाठी ही एक अनोखी पंढरी फर्ग्युसन महाविद्यालयात अवतरली होती.जवळपास २५० पेक्षा अधिक प्रकाशकांचे बुक स्टॉल येथे उपलब्ध होते.फर्ग्युसन महाविद्यालयात प्रवेश करताच पुस्तक वाचण्यात मग्न अनेक भव्य प्रतिकृती ठराविक अंतरावर होत्या.पुस्तकांच्या आकाराच्या प्रतिकृतींची सजावट मार्गावर होती.अंम्पी थिअटरात अनेक कार्यक्रमांचीही रेलचेल होती.पुढे सर्वप्रथम भारतीय संविधानाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त पुस्तकरूपी "संविधान प्रतिकृती ९.९४ मीटर जिचा गिनीज बुक मध्ये समावेश करण्यात आला आहे, ती पाहिली.मग त्या भव्य प्रांगणात आलो जिथे फेस्टिव्हल भरले होते.इथे पंतप्रधान मोदी, मुख्यमंत्री फडणवीस यांचे आउटलेट छायाचित्रं काढण्यासाठी होते.
आत गेल्यावर अनेक प्रसिद्ध प्रकाशनाची पुस्तके पाहून खूप आनंद झाला.इतकी पुस्तक पाहून कोणती घेऊ कोणती नको असं झालं.
पहिल्याच पुस्तकाच्या स्टॉलवर पुस्तक पाहत चाळत होते.दुसऱ्या ठिकाणी हेच ,वेळेचे बंधन नसल्याने माझा नवरा आणि मुलगी मला टाटा करून पुढे निघून गेले.अनेक पुस्तकं जी नगरात पाहायलाही मिळत नाही ती जवळपास सर्वच पाहिली.इंग्रजी पुस्तकेही बरीच होती,तिथे गर्दीही भरपूर होती.मी प्रामुख्याने गीतारहस्य(लोकमान्य टिळक) पुस्त,पैशाचे मानसशास्त्र(मराठी , इंग्रजी दोन्ही भाषेत घेतले),हस्ताचा पाऊस(माडगूळकर),ज्ञानदेवा तिथे समाधी(राहूल देशपांडे), संस्कृती (इरावती कर्वे) , बिझिनेस महाराजा इत्यादी पुस्तके घेतली.थोड्या वेळाने लेकीची परत भेट झाली .तीला देखील पुस्तकांची गोडी निर्माण व्हावी म्हणून मुद्दामाहून आणले होते.ते सफलही झाले कारण घरी असलेली अनेक पुस्तके तिने ओळखून "आई हे आपल्या घरी हे पुस्तक आहे" असं सांगितलं :).रा.चि.ढेरे, कुरुंदकर ,इरावती कर्वे अशा अनेक आवडत्या लेखकांची सर्व अज्ञात पुस्तकेही पाहायला मिळाली.इथे सातवाहन गाथा सप्तशती पाहायला मिळाले.पण आता खुप उशीर झाला होता १२-४ असा वेळ इथे होते.एक तरी लेखक भेटतील अशी आशा होती पण ते घडलं नाही. फर्ग्युसन महाविद्यालय पाहत फिरत बाहेर आले.बाप लेकीने आधीच पोटोबा फुल्ल केला होता.जवळच वैशाली,वाडेश्वर आहे हे माहिती होतं.पण खूप दमलो होतो समोर ' रौनक' पावभाजी होती तिथेच गेलो.मस्त झाडांच्या सावलीत टेबल होते.पुण्यातलं पहिले १९६७ साली पावभाजीचे हे रेस्तराँ आहे असं तिथे लिहिले होते.पुण्याची पावभाजी तिखट नसणार म्हणून त्यांना तिखट द्या असं मुद्दामहूनच सांगितले.खुपच सुंदर सजवलेली (प्रेझेंटेशन)पावभाजी आणि बरोबर तिखट लसूण आलं सरबरीत चटणी,तिखटातला चिरलेला कांदा बरोबर आला.इतकी छान सर्व्हिस पाहून छान वाटलं.पुण्यात गोष्टींची 'गुणवत्ता' हाच महत्त्वाचा निकष परत दिसला.एफसी रोडवर जरा फेर फाटका मारून परत घरी निघालो.
वाचन ही शांत वातावरणात चालणारी प्रक्रिया आहे याचे थोडेसुद्धा भान आयोजकांना नसावे याचे वाईट वाटले. संध्याकाळच्या वेळेस तिथं जावं तर तिथंच चाललेल्या संगीताच्या कार्यक्रमामुळं कानठळ्या बसत होत्या. अर्थात एकंदरीतच आयोजनाच्या बाबतीत उत्सवी वातावरणात वाचनसंस्कृतीचे भान ठेवून शांत वातावरण, डोळ्याला त्रासदायक होणारा प्रखर प्रकाश टाळणे अशा गोष्टींची अपेक्षा करणं जरा जास्तच होतं याची पुरेशी जाणीव झाली आहे.
बाकी हिंदी पुस्तकांच्या तसेच मराठवाड्यातल्या, तितकेसे प्रसिद्ध नसलेल्या स्टॉलवरही वेगळी, वाचनीय पुस्तकं पहायला मिळाली याचा आनंद आहे.
वाचाल तर आनंदी होणार
सकाळ पुस्तक महोत्सव २०२५, अहिल्यानगर.
पुणे बुक फेस्टिवलच्या धर्तीवर अगदी भव्य नाही पण बरेचसे मोठे , चांगली पुस्तके असणारे पुस्तक महोत्सव नगरमध्ये २१-२४ मार्च दरम्यान भरले आहे.पुढचे काही दिवस व्यस्त असल्यामुळे आजच फेरफटका मारला.
नेहमीप्रमाणे पुस्तकाच्या दुकानात,प्रदर्शनात मला वेळेचे भान उरत नाही.तेव्हा तू एकटीच जा असं घरून सांगण्यात आले,फक्त मोबाईलची बॅटरी संपायच्या आधी घरी ये असंही सुनावण्यात आले.
लोकप्रिय साहित्यिकांची पुस्तके ऑनलाईन सहज मिळतातं पण अशा प्रदर्शनात नवे पुस्तक समजतात.पुस्तकांना हातात घेऊन,पाने चाळत, अनुक्रमणिका पाहत ते पुस्तक घेणं निराळं सुखच असते.
कादंबरी मी वाचनालयातून मिळालेल्या पुस्तकांतून वाचते.
तेव्हा संस्कृती, अध्यात्मिक, वैज्ञानिक, समाजजीवन, निसर्ग,इतिहास,भटकंती विषयांची पुस्तके घेण्याकडे कल असतो.
तरीही आनंद नाडकर्णी, ग्रेस, अच्युत गोडबोले,जयवंत दळवी,नरहर कुरुंदकर,नरेंद्र दाभोळकर यांची काही पुस्तके हेरुन ठेवली आहेत,लवकरच घेईन.
मी घेतलेली अनवट पुस्तके-
१.येई परतुनी ज्ञानेश्वरा'
आज मला नवीन लेखक समजले डॉ.रा.श्री.मोरवंचीकर
डॉ. रा. श्री. मोरवंचीकर आजही ज्ञानदानाच्या पवित्र कार्यात अखंड नंदादीपासम तेवत आहेत. त्यांनी 'येई परतुनी ज्ञानेश्वरा' हा मराठी लोकमानसाच्या जिव्हाळ्याचा ग्रंथ अध्यायनिहाय अनेक अंगांनी उलगडला आहे. त्यातील सचित्र ओव्यांचे मार्मिकपणे केलेले निरूपण पाहून त्यांच्या ज्ञानेश्वरांप्रती असलेल्या उत्कट प्रेमाचा अनुभव दिसतो.
२.निसर्गायण
दुसरे नव्याने समजलेले लेखक निसर्ग आणि विकास अभ्यासक दिलीप कुलकर्णी .
पर्यावरणाची समस्या ही अशा प्रकारे बाह्य निसर्गातील असली, तरी तिचं मूळ आहे आपल्या मनोवृत्तीत -आपल्या विचारांत. आपली भोगवादी वृत्ती, हाव, आक्रमकता ही या समस्येला कारणीभूत आहे आणि केवळ ही एकच नव्हे, तर शस्त्रस्पर्धा, दुर्बलांवरचे अत्याचार, गुन्हेगारी, व्यसनाधीनता, मानसिक तणाव, स्वैराचार अशा अनेक समस्या त्याच मनोवृत्तीमुळे आपल्यासमोर उभ्या ठाकल्या आहेत.आधुनिक पाश्चात्त्य विज्ञान आणि प्राचीन पौर्वात्य तत्त्वज्ञान यांच्या आधारे या बदलाची दिशा शोधणारं हे पुस्तक.
३. थर्ड ॲंगल हे छोटेखानी पुस्तक हटके विषयावर म्हणजे ' थिअरॉटिकल मित्राने प्रॅक्टिकल क्लबमध्ये केलेली भाषणे एक वैचारिक अनोखा अनुभव आहे.
मनाची नित्य नाव
पुस्तकाच्या पानांनी
वल्हवली जातात
मग आयुष्याचा भवसिंधु
सहज तरुन जातो
ज्ञान सागराची ओढ
अजुनच सहज पूर्ण होते...
-भक्ती
अरे वा! पुस्तक प्रदर्शन गाजलं. आता दरवर्षी होईल. तुमच्या मुलीसाठी पर्वणीच. ( आउटलेट छायाचित्रं काढण्यासाठी होते.= कटाउटस)
फार पूर्वी मुंबईत (आझाद मैदान) आणि दिल्लीत ( प्रगती मैदान) येथे मोठे पुस्तक प्रदर्शन आलटून पालटून एक वर्षाआड होत असे. नंतर मुंबईतील बंदच झाले. मग छत्रपती टर्मिनस जवळचा खाजगी बुक स्टॉल आशिष दरवर्षी प्रदर्शन भरवून लागला सुंदराबाई हॉलमध्ये. पण मराठी पुस्तके नसत ( ती साहित्य संमेलनांत अधिक). अक्षर वाङमय यांनी काही वर्षे प्रदर्शने भरवली. माझ्या दृष्टीने पुस्तकं चाळायला मिळणे महत्त्वाचे कारण विकत घेत नाही. विकत आणून नंतर करायचे काय हा प्रश्न असतो. तरी भाषा शिकण्यासाठीची पुस्तके घेतो ती संग्रही आणि संदर्भासाठी कायम लागतात.
स्थानिक नगरवाचनालयात काही वाचायला मिळतात. पण मोठी बाडं कधीच येत नाहीत.
स्थानिक प्रकाशकांनी एक होऊन एक कायमची तारीख किंवा आठवडा प्रदर्शन भरवण्यासाठी निश्चित केला तर वाचकांच्या कायम लक्षात राहील. उदाहरणार्थ डिसेंबरचा दुसरा आठवडा.
माझ्या दृष्टीने पुस्तकं चाळायला मिळणे महत्त्वाचे कारण विकत घेत नाही. विकत आणून नंतर करायचे काय हा प्रश्न असतो. तरी भाषा शिकण्यासाठीची पुस्तके घेतो ती संग्रही आणि संदर्भासाठी कायम लागतात.
खरं आहे,अशा मोठ्या प्रदर्शनात खुप पुस्तकं पाहायला ,चाळायला मिळतात हे महत्त्वाचे.माझा पुस्तक घेण्यासाठी हव्यास होता त्यामुळे बजेट संपल्यावर पुस्तक फक्त पाहण्याचं ऑड वाटू लागले.पुढच्यावेळी जरा याबाबत सतर्क राहीन ;)
होय लेकीसाठी हळूहळू एम एच १२ केंद्रबिंदू (पर्वणी) तयार करणार आहे!
होळी, वजा तीस तापमान.
शेवटचा प्याला मार्च १९९९,प्रसंग मारूती आठशे पहिली चार चाकी घेतली.
व्यसनाधीन झालो का ?नाही, प्रत्येकाच्या इच्छाशक्ती वर आवलंबून.
दारू पिली पाहीजे असे काही नाही. पण अती परिचयात अवाज्ञा तद्वत दारूला डोक्यावर चढवून नये.
अर्थात माझे मत.
बरोबर.
रोज थोडी थोडी घरीच घ्यावी म्हणजे त्यातली गंमत सामान्य होते. आणि कधी प्रसंगाप्रमाणे जे पितात भरपूर तसं होत नाही. कितीही कोणतेही दारूचे ब्रांड आले तरी बेसिकली अल्कोहोल अमुक टक्के यापलिकडे काही नाही. तांदुळाचेही तसेच आहे पंधरा रुपये ते सातशे पन्नास रुपये किलोचा असो त्यांचे पोषणमूल्य समानच असते. सगळे पॉलिश केलेलेच असतात. हातसडीचे कुठे मिळतात?
ये इंतजार गलत है के शाम हो जाये
जो हो सके तो अभी दौर-ए-जाम हो जाये
मुझ जैसे रिंद को भी तूने हश्र मे या रब
बुला लीया है तो, कुछ इंतजाम हो जाये
हुई महँगी बहत ही शराब, के थोड़ी-थोड़ी पिया करो
पियो लेकिन रखो हिसाब, के थोड़ी-थोड़ी पिया करो
कौन कहता, अंगुर की बेटी गलत है
अंगुरके दामाद को बस इसकी लत है
इसके साथ कुछ गम गलत करता है
तो बेरहम जमाने क्या जाता है,अगर...
वो उसके साथ कुछ पल बिताता है
आशिष बुक स्टॉल
छत्रपती टर्मिनस जवळचा खाजगी बुक स्टॉल आशिष दरवर्षी प्रदर्शन भरवू लागला सुंदराबाई हॉलमध्ये.
यांच्या पुस्तक प्रदर्शनात भेटी दिल्यावर एक लक्षात आलं की यामध्ये पुस्तके कोण घेतो. इंटिरिअर डेकोरेशनचा व्यवसाय करणारे मुंबईत बरेच आहेत. ते इकडे फिरतात. भरपूर रंगीत चित्र असलेली जाडजूड पुस्तके तिथे निम्म्या किंमतीत असतात. ती त्यांना हवी असतात नवनवीन फर्निचरच्या डिझाइनसाठी. शिवाय गार्डनिंग लेआउटचीही असतात. आर्किटेक्ट नाही पुस्तके लागतात. मोठ्या बास्केट घेऊन फिरतात आणि भराभर पुस्तके उचलतात.
तरुण मुलं मुली इंग्रजी कादंबऱ्या विकत घेतात. काही महिला कुकींगची पुस्तके बघतात.
आपण जी मराठी साहित्यातील कवितासंग्रह, कादंबऱ्या विकत घेतो त्याचा आनंद आठ दिवसांत संपतो. इतिहास,भाषा यांचे अभ्यासक पुस्तके घेतात ती त्यांच्या कामाची असतात. पण मग असा विचार येईल की वाचकांनी पुस्तके विकत घ्यावीत का? वाचनालयांनी घ्यावीत. म्हणजे महिन्याच्या फीमध्ये साहित्य वाचता येईल.
विना अनुदानित, वाचनालये आता ओस पडत चालली आहेत.
डोंबिवली येथे एक फ्रेंड्स लायब्ररी सोडली तर बरीचशी वाचनालये बंद पडली आहेत.
मानपाडा रोड वरील ३ वाचनालये, डोंबिवली पश्चिम येथील एक वाचनालय, midc मधील एक वाचनालय, ही काही ठळक उदाहरणे. रामनगर मधील एक वाचनालय आणि P ,& T मधील एक वाचनालय, फ्रेंड्स लायब्ररीच्या सहयोगाने चालतात.
त्यापेक्षा पण भयावह स्थिती, अभ्यासक्रमा व्यतिरिक्त , पुस्तक विक्रेत्यांची आहे....
कालाय तस्मै नमः....
गोवा पर्यटन/ कोकण/समुद्री पर्यटन
गोरगावलेकर यांनी केलेल्या गोवा पर्यटनाचे धागे येत आहेत. त्यांचे अनुभव लिहित आहेत. तिसऱ्या भागात हिवाळी सहल, दक्षिण गोवा :भाग 3 : बटरफ्लाय बीच आणि लोलये-पैंगिण चे वेताळ गोवा आणि कोकण यांच्या पर्यटनाची तुलना फायदे तोटे यांची प्रतिसादांतून चर्चा फारच वाढली. ती इकडे करता येईल.
धाग्यातली चर्चा इथे कॉपी पेस्ट करताही येईल पण तो त्या प्रतिसादकर्त्या लेखकांचा अधिकार आहे.
मीही पूर्वी गोव्यावर एक धागा काढला होता ते आठवले. माझा समुद्र पर्यटन, खाणे पिणे वगैरेंचा आनंद फारच संकुचित आहे. तरी एकदा गोवा काय आहे म्हणून पाहण्यासाठी गेलो होतो. परतताना कुडाळहून( कोकण) आलो. एसटीचाच प्रवास त्यामुळे जमेल तेवढे पाहिले.
गोव्याच्या पर्यटनाबद्दल ऐकले वाचलेले भारतातले आणि परदेशी पर्यटक इथे येतात. आनंद घेतात आणि पुन्हापुन्हा येतात. गर्दी वाढली की ट्रेनची तिकिटे मिळत नाहीत. विमान आणि हॉटेल्सचे भाडी दर वाढतात. परवडण्याच्या पलिकडे जातात. तरीही पसंती असते.
कोकण ( महाराष्ट्रातला) याबद्दल श्री.ना. पेंडसे किंवा जयवंत दळवी किंवा इतर लेखकांच्या कथा कादंबऱ्यांतून मराठी वाचकांना माहीत झालेला असतो. तो खरंच कसा आहे हे पहाण्यासाठी ठाणे,रायगड, सिंधुदुर्ग जिल्हेसोडून उर्वरित महाराष्ट्रातील दूरच्या ठिकाणांहून पर्यटक येतात. त्यात किहीम, अलिबाग, श्रीवर्धन,हर्णे मुरुड, रत्नागिरी परिसर, देवगड, मालवण, देवबाग ही ठिकाणे येतात.
कोकण आणि गोव्याप्रमाणेच कर्नाटकातील २६० किमी किनारपट्टीवरही कारवार,गोकर्ण, मुर्डेश्वर, उडुपी, मंगळुरू ही ठिकाणं आहेत. तीही पाहिली. हॉटेल्स(राहाणे आणि खाणे शाकाहारी तसेच मासाहारी), बसप्रवास यादृष्टीने फारच चांगल्या सोयी आहेत. शिवाय किनारपट्टीसोडून वरती घाट चढून गेल्यावरही अनेक सुंदर ठिकाणी जाता येतं. मार्चपर्यंत वाहणारे धबधबे आहेत. इथल्या लोकांना पर्यटक येण्याची सवय आहे. त्यांचा त्रास वाटत नाही . तुसडेपणा नाही. मला कर्नाटक पर्यटन फार आवडले आणि पुन्हा जावेसे वाटते. किनारे स्वच्छ चांगले आहेतच शिवाय नद्याही बारमाही पाणी वाहणाऱ्या आणि अतिशय स्वच्छ पाण्याच्या आहेत. नदीकिनारी जी धार्मिक स्थळे आहेत ती निसर्गसौंदर्याने अधिकच चांगली वाटतात. सह्याद्रीचा सुंदर निसर्ग पाहावा तर इथेच. उडुपी आणि मंगळुरू येथे समुद्र पर्यटन आणि मत्स्याहारही खूप प्रचलित आहे.
https://www.youtube.com/embed/Jhsq0fdiEq0
गोवा पर्यटन मंत्री यांची मुलाखत. ही सोशल मीडियावर सर्वत्र सुरू झालेली चर्चा हा चुकीच्या (चायनीज) आकडेवारीवर आधारित एक प्रोपागांडा आहे असे त्यांचे म्हणणे त्यांनी इथे मांडले आहे.
गोरगावलेकर यांनी केलेल्या गोवा पर्यटनाचे धागे येत आहेत. त्यांचे अनुभव लिहित आहेत.
धाग्याच्या पहिल्या भागात आम्ही मडगाव स्टेशन ते कोलवा बीच पर्यंत प्रवास केला होता . स्टेशनच्या बाहेरच प्रीपेड टॅक्सी मिळाली . टॅक्सिवाल्यांचा कथित मुजोरपणा दिसला नाही .
दुसऱ्या भागात कोलवा ते पाळोळे पर्यंत प्रवास केला . पर्यटन स्थळे बघत जात आम्ही जवळपास पूर्ण दिवस घेतला व त्यात पाच - पंचवीस किमी अंतर जास्त झाले त्याचे वाढीव पैसेही दिले . किती खर्च येतो हे कळावे इतकाच लिहिण्यामागचा उद्देश . आज कुठल्या शहरात स्विफ्ट डिझायरचे संपूर्ण दिवसासाठी ३ १ ० ० /- रुपये भाडे असेल ? ड्रायव्हरचा पगार , गाडीची देखभाल दुरुस्ती, इंधन खर्च जाऊन मालकाच्या हातात कितीसे पैसे जातील ? कोला बीचला जातांना अगदी ओबड धोबड रस्त्यावरून गाडी गेली . स्वत : ची गाडी नेतांनाही विचार करावा लागेल असा रस्ता . कुठलीही कुरकुर न करता शक्य होतील ती ठिकाणे दाखवली . येथेही गाडीवाल्यांचा कथित मुजोरपणा दिसला नाही .
मुजोर म्हणजे बोलण्यात अशा अर्थाने नसावं. पण अतिरिक्त मनाला येईल तितके पैसे मागणे हे अनेकदा घडते. पूर्ण दिवसाचे ३१०० इतकेच घेतले असतील तर तुम्हाला नशिबाने चांगले डील आणि व्यक्ती लाभली. एरवी कोपऱ्यावर सोडून यायचे सहाशे (हे उदाहरण मे २०२४ मधलं, ऑफ सिझन काळ. अंतर दोन ते तीन किमी. पार्किंग नसल्याने टॅक्सी मागवावी लागली होती.). नुसती चौकशी केली होती तेव्हा, दाभोळी एअरपोर्ट ते अगोंद वन वे नुसते ड्रॉप करण्याचे ऑफ सिझन २००० आणि सिझन मध्ये ३५०० ते ४०००. तुलनेसाठी असे पाहा की मुंबईहून गोव्याचे विमान तिकीट देखील कधी कधी याहून कमी असते.
वार्का ते काबो द राम किल्ला आणि परत इतक्या अंतराचे हॉटेलशी संलग्न टॅक्सीवाल्यांनी सुमारे आठ वर्षांपूर्वी तीन हजार घेतले आणि वरून टिप मागितली. वाटेत कुठे थांबायला देखील तयार नव्हता.
नव्वद टक्के वेळा मुंबईपासून स्वत:ची कारच घेऊन जाणे किंवा एअरपोर्टवर उतरताच पूर्ण मुक्कामाइतकी सेल्फ ड्राईव्ह कार घेणे हे दोन उपाय करून ही समस्या आता सोडवली आहे.
बाय द वे, गोव्यातील स्थानिक लोक कोंकणी भाषेच्या सवयीनुसार एकेरीत अरेतुरे करत बोलतात आणि त्या स्टाईल मुळे काही वेळा बाहेरील लोकांना ते अशिष्ट उद्धट उगीचच वाटू शकतात.
सहमत.
खाजगी वाहनाशिवाय तसेच भाड्याच्या वाहनाशिवाय जमेल तेवढे फिरणे आणि आनंद मानणे हेच आमचे ध्येय असते. त्यामुळे काही त्रास /संताप होत नाही. शेअरिंग साठी कुणाला तयार करणेही नाही. म्हणजे अगदीच घरी कॉटवर पाय हलवत गप्पा मारण्यापेक्षा चार ठिकाणं पाहाणे बरे या रुळावर आमची गाडी सुसाट धावते. शिवाय खरेदी करायची नाही हे ठरवूनच टाकले आहे. आमचा गाईड लोनली प्लानेट पुस्तक " India travel survival kit " - Tony Wheeler and others.
"पूर्ण दिवसाचे ३१०० इतकेच घेतले असतील तर तुम्हाला नशिबाने चांगले डील आणि व्यक्ती लाभली."
काशिनाथ नाडकर्णी : "तो कोकणांतला असला पाहिजे अंऽऽऽ..."
कोचरेकर मास्तर : "पाहिलंत? पाहिलंत... माणुसकी नाही.. नाही म्हणतात ना?... ही घ्या माणुसकी! प्रवासात काय अनुभव येतील सांगता येत नाही. वास्तविक असल्या ह्या लोकांचे जाहीर सत्कारच करायला पाहिजेत. त्याचे नाव, नंबर वगैरे आपण टिपून घ्यायला पाहिजे होता नाही का..."
"एरवी कोपऱ्यावर सोडून यायचे सहाशे (हे उदाहरण मे २०२४ मधलं, ऑफ सिझन काळ. अंतर दोन ते तीन किमी. पार्किंग नसल्याने टॅक्सी मागवावी लागली होती.). नुसती चौकशी केली होती तेव्हा, दाभोळी एअरपोर्ट ते अगोंद वन वे नुसते ड्रॉप करण्याचे ऑफ सिझन २००० आणि सिझन मध्ये ३५०० ते ४०००."
सोकाजीनाना त्रिलोकेकर : "ए नाडकर्णी, बघ... बघ! बघ लेका तुझा कोकणातला व्हिक्टोरिया (टॅक्सी) वाला... "
काशिनाथ नाडकर्णी : "तो कोकणांतला असणंच शक्य नांयऽऽऽ... अहो तो कोकणात व्हिक्टोरिया (टॅक्सी) चालवायला शिकणार कुठून मला सांगा बघू आंऽऽऽ... कायत्तरी काय? आमच्या कोकणातले म्हणजे सगळे बैल..."
😀 भ्रमण मंडळ - बटाट्याची चाळ
गोव्याला असंख्य वेळा जाउनही तिथल्या सार्वजनीक वाहतुक व्यवस्थेचा आणि टॅक्सीवाल्यांचा मला फारसा अनुभव नाही. ह्या वर्षीच्या जानेवारी महिन्यात दोना पावला येथील मुक्काम असलेल्या 'इंटरनॅशनल सेंटर गोवा (ICG)' येथुन त्यांच्याचतर्फे संध्याकाळी तिथुन सुमारे सात किमी अंतरावर असलेल्या कॅसिनो पर्यंत जाउन मध्यरात्री तिथुन परतण्यासाठी घेतलेल्या टॅक्सी सेवेसाठी त्या टॅक्सीवाल्याने (आधीच बोलणी केल्याप्रमाणे) संध्याकाळी जाताना ड्रॉप साठी ३०० रुपये आणि मध्यरात्री तिथुन निघताना फोन करुन बोलवल्यावर पिक-अपसाठीचे ५०० रुपये असे जाउन-येउन एकुण ८०० रुपये घेतले होते. मध्य्ररात्री १:३० च्या नंतर फोन करुनही तो सांगीतल्याप्रमाणे परत न्यायला आला होता हे विषेश!
असो, मिपाकरांना त्याठिकाणी आलेले टॅक्सीवाल्यांचे वेगवेगळे, बरे-वाईट अनुभव वाचुन माहितीत भर पडत आहे 👍
विमानतळावरून आपल्या हॉटेलवर किंवा आपल्या हॉटेलवरून विमानतळावर जायचे असेल तर टॅक्सीवाल्यांचे अवाच्या सवा दर आहेत याचा मला तरी अनुभव आला नव्हता. आम्ही गोवा विमानतळापासून सगळ्यात लांब राहिलो होतो अगोंद आणि पाटणेला. दोन्ही ठिकाणी जायला विमानतळाहून १८०० रूपयात प्रीपेड टॅक्सी मिळाली होती. अर्थात ही अनुक्रमे २०१७ आणि २०१८ ची गोष्ट. सध्याचे दर किती हे माहित नाही. मात्र दोन्ही ठिकाणे दाबोळी विमानतळाहून साधारण ६०-६५ किलोमीटर अंतरावर आहेत. अंतर ध्यानात घेता तो दर अवाजवी जास्त आहे असे वाटले नव्हते. विमानतळावर समजा प्रीपेड टॅक्सी असते आणि त्यांना ठरवून दिलेले दर आहेत तितकेच घ्यावे लागतात. पण परतीच्या प्रवासात हॉटेलवरून विमानतळावर जातानाही टॅक्सीवाल्याने तेवढेच पैसे घेतले होते. अगोंदहून परत येताना आमचे विमान रात्रीचे होते त्यामुळे दाबोळी विमानतळावर रात्री साडेनऊच्या सुमारास पोचलो होतो. त्या वेळेस विमानतळावरून भाडी मिळत असतील की नाही शंकाच आहे कारण त्यावेळेनंतर फार विमाने येत नाहीत. तरीही त्याने जास्त पैसे घेतले नव्हते.
टॅक्सीवाले अवाच्या सवा दर लावतात ते हॉटेलबाहेर साईटसिईंगला जाणार्यांकडून. वारकामध्ये आम्ही उतरलो होतो वारकाला आमच्या हॉटेलच्या बाहेर पर्यटकांसाठी म्हणून एक टॅक्सी स्टॅन्ड होता. तिथून मडगाव फार तर १०-१२ किलोमीटरवर होते. काजू आणि बेबिंका अशा गोष्टी घ्यायला मडगावला जायचे होते तेव्हा हॉटेलबाहेरील टॅक्सीवाल्यांनी जाऊन येऊन २७०० रूपये सांगितले होते. आणि ही गोष्ट २०१२ ची होती म्हणजे आणखी जुनी. ही अक्षरशः लूट होती. मला वाटते तिथे जास्त गोरे पर्यटक येतात आणि परदेशी पर्यटकांना अवाच्या सवा दर लाऊन लुटणे हा प्रकार नाही म्हटले तरी सगळीकडे होतोच. जर ते गोरे पर्यटक असे वाढीव दर द्यायला तयार होत असतील तर टॅक्सीवाल्यांना बहुदा आम्हा भारतीय पर्यटकांची गरज नसावी. त्यामुळे यायचे असेल तर या दरात या नाहीतर येऊ नका असा त्यांचा दृष्टीकोन होता.
गेल्या काही महिन्यांपासून माझी पत्नी सौरभ बोथरा यांच्या ऑनलाइन योगासन वर्गांना उपस्थिती लावत आहे. मी देखील महिन्याभरापासून सुरुवात केली आहे.
शीर्षकात जरी केवळ योग असले तरी, योगासनांखेरीज, इतर कार्डिओ व श्वसनाचे व्यायाम, प्राणायम व थोडेफार ध्यान यांचाही या वर्गांत अंतर्भाव असतो. रोज युट्युब लाइव्ह द्वारे भाप्रवे नुसार सकाळ व संध्याकाळी हे वर्ग चालतात. सूचना सहजपणे समजतील अशा असतात व स्क्रीनवर पाहून आपण ते व्यायामप्रकार करू शकतो.
६ जानेवारीपासून तीन आठवडे या वर्गांचा नि:शुल्क लाभ घेता येईल - त्यासाठीचा दुवा.
या वर्गांना काही दिवस उपस्थिती लावल्यावर, असे वर्ग आपल्याला काही वर्षे अगोदर का नाही मिळाले अशी भावना आमच्यासह बहुतेकांच्या मनात निर्माण झाली आहे / होत असते.
ती साईट पाहिली. नोंदणी केली नाही.
उपक्रम आणि ओनलाइन आहे हे बरे.
काही शाळांत योगासने शिकवतात बहुतेक. आमच्या शाळेत शिकवली होती. पाचवी पासूनच . लहानपणी केली नाही तरी चालतात. कारण तेव्हा वाढते तरुण वय असते. पण नंतर कधी करायची झाल्यास छोट्या पुस्तिका विकत मिळतात त्या पाहिल्या की काही सोपी रोज करण्याची आसने दहा बारा आहेत ती करता येतात.
चीनमध्ये तिथल्या बागांत ( parks) ६०+, ८५+ वयोगटातील नागरिकांसाठी काही त्यांच्या पद्धतींचे व्यायाम प्रकार करणारे करवून घेणारे गट असतात. त्यांचे काही विडिओ मी मागे पाहिले होते ( dwtv channel documentaries बहुतेक.) त्यांचे व्यायाम प्रकारही खूप चांगले वाटले. विशेषतः शरीराची रोजची हालचाल करण्यासाठीचे ते सराव आहेत. वरील दोन वयोगटांच्या वयाप्रमाणे हालचालींचा वेग वेगळा दिसला.
इकडच्या काही बाबा लोकांचे योग प्रकार मला काही आवडले नाहीत. अतिरंजीत वाटले.
.......
वजन कमी करणे/ हालचालींसाठी सराव/ रोग नियंत्रण/ मानसिक समाधान शांती यांपैकी एक किंवा सर्व असा काही झोल योगासनांमध्ये घालण्याचा खटाटोप दिसतो हे माझे मत.
हरारीची मुलाखत रणवीरने घेतली.हरारी माझा आवडता विचारवंत आहे.तो भारतात नेक्सास' पुस्तक प्रकाशित करण्यासाठी आला होता.तेव्हा अनेकांना त्याच्याबरोबर मुलाखती घेतल्या.
१.
https://youtu.be/eNVtYPgJ6b0?si=3VfqDjCcx6_lYjk2
२.
https://youtu.be/6x4UgHI7qbk?si=_Iz_eP9HF7SYH-ZM
दुसरी मुलाखत अजून ऐकायची आहे.
पहिली मुलाखत रणवीरने घेतली आहे.AI हा हरारीचा १० वर्षांपूर्वी पासूनचा विषय आहे.जो AI वर वरचढ होईल तोच पुढच्या काळात जगावर राज्य करणारे.इथे रशिया,ट्रम्प यांचा वर्चस्ववादी भूमिकेचा त्याने चांगला समाचार घेतला आहे.अमेरिकासारख्या बलाढ्य देशाने,लीडरने जगाच्या शांततेचा विचार आधी केला पाहिजे तरच माणूसकी टिकेल असं त्यांचं म्हणणं आहे.रणवीरचा शो म्हटला की तो स्पिरिच्युलिटीवर समोरच्याला बोलायला लावणारच हे ठरलेलं आहे 😀 त्यात हरारी विपश्यनेचा साधक आहे. पण
हरारी म्हणतो कोणीही कोणाला दोन ,तीन तास ध्यानाला बसा हे म्हणणं सोपं आहे.पण पंधरा मिनिटे तरी केवळ स्वतःच्या आता बाहेर जाण्याऱ्या श्वासावर लक्ष केंद्रित करा.इतर कोणताच विचार डोक्यात आणायचा नाही,हे सांगितले तर कोणालाच हे फारसं जमणार नाही.यासाठी खुप तयारीच हवी.मेडिटेशन कसं करायचं, कोणतं करायचं हे ज्याचं त्यालाच ठरवू द्या.उगाच मेंढ्याचा कळप करण्यात अर्थ नाही.
युद्ध करावं की नाही याबाबत त्याचं मत मला गोलगोल वाटलं,आधी तो म्हणाला मिलिटरी वर ५०% हून अधिक खर्च चिंताजनक आहे नंतर म्हणाला इस्राएल आणि भारताने ज्या चुका रोमन व मुस्लिम+ब्रिटिश आक्रमणाच्या काळात सैन्य ताकद वाढवण्यावर भर देतात केली ती त्यांना आता करणे अजिबात परवडणारं नाही👏
मराठी किंवा कुणीही.
आंतरराष्ट्रीय मते राजकीय/ सामाजिक / धार्मिक ही नेहमी ती व्यक्ती कोणत्या डोक्यातली आहे त्याप्रमाणे एकांगीच असतात. विरुद्ध गटाचा साधा उल्लेखही नसतो. तर काहींची प्रसिद्ध केलेली व्यक्तव्ये त्यांच्या देशाच्या राजकीय दडपणाखालीही असतात.
पहिला काचेचा पूल
काल कन्याकुमारी, तमिळनाडू इथे असलेल्या विवेकानंद स्मारक आणि तिरुवल्लूवर पुतळा या दोन ठिकाणांमध्ये काचेचा पूल उभारला त्याचे उद्घाटन झाले.
hindustan times बातमी
खरडफळ्यावर विषय निघाला म्हणून.........
गुजरातचे सुंदर समुद्र किनारे आणि पर्यटन.
फार प्रचलित नाही तरीही थोडक्यात...
गुजरातध्ये {सूरतजवळच्या} हजिरा येथे आणि जामनगर येथे दोन मोठे रासायनिक प्रकल्प ( भारतीय कंपन्या, रिलायन्स) अगोदरच आहेत.
सूरतजवळच्या दहेज बंदरातून - घोघा पलिकडे जाऊन भावनगरला काही जण जातात. धार्मिक पर्यटन.
दीवचा किनारा पर्यटनासाठी आहे. तिथून वेरावळ - सोमनाथ आहे. पण धार्मिक महत्त्व आणि मासेमारी.
दमणचा किनारा काळा आहे. मासेमारी बोटींच्या डिझेलमुळे. जवळचा परिसर दारूबार आणि इतर इलेक्ट्रॉनिक्स मार्केटसाठी पूर्वी प्रसिद्ध होता. आता त्याचे महत्त्व उरले नाही. तरीही दमण- वापी- दादरा नगरहवेली- खानवेल ( गार्डन्स) अशी सहल होऊ शकते.
द्वारका पोरबंदर समुद्र -धार्मिक पर्यटन
अंकलेश्वर/अंकलेसर भरूच हे नर्मदा पर्यटनामुळे चर्चेत असते.
गुजरात - महाराष्ट्र सीमेजवळचे डहाणू आणि बोर्डी येथे हॉटेल्स खूप आहेत. डहाणू-जव्हार- त्र्यंबकेश्वर -नाशिक - सापूतारा असाही सहल प्लान होऊ शकतो.
गुजरात समुद्र किनारे थंडीतच ठीक. गरमा फार असतो. काही ठिकाणी रात्री चमकणाऱ्या लाटा दिसतात.
मुंबई पुणे पर्यटकांसाठी कोकण, गोवा, कर्नाटक समुद्रच बरा.
दमण- वापी- दादरा नगरहवेली- खानवेल ( गार्डन्स) अशी सहल होऊ शकते.
दमण किनारे घाणेरडे. केमिकल आणि वास. अस्वच्छ. हल्ली काही भाग बांधून चौपाटी केली आहे असे ऐकले पण एकूण समुद्र घाण. खूप इंडस्ट्रीज.
सिल्वासा कंटाळवाणे. सर्वसाधारण लहान शहर. उन्हाळ्यात तर अगदी नदी देखील कोरडी.
तिथली वाटेतली लायन सफारी केविलवाणी.
सापुतारा वगैरे हिल स्टेशन हा अधिक चांगला ऑप्शन आहे त्यापेक्षा.
सळसळत्या वाऱ्याने एखादा प्राजक्त थरथरावा आणि खालून जाणाऱ्या आपल्या तापल्या अंगावर गार दवबिंदूंचा पडलेला पाऊस हृदयाचे मधलेच चार ठोके चोरून जावा तशी अवस्था झालेली दिसते त्या आठवणींनी.
"आधी मद्य पिऊन मग कोणत्याही मार्केटमध्ये फिरायला मजाच येते."
असे 'कोणत्याही मार्केटमध्ये' हे दोन शब्द ठळक करायचे राहुन गेले काय 😀
नीळा, हिरवा, पिवळा, तांबडाच काय पण 'मृत' समुद्रही जर कौतुकास पात्र ठरत असतील तर बिचाऱ्या 'काळ्या' समुद्राने असे काय कोणाचे घोडे मारले आहे? ('काळ्याशार' गोष्टीही आकर्षक असु शकतात 😉) तेव्हा घ्यावी की त्याच्यावरही फिरायची मजा 😂
बाकी 'काळ्या' वरुन सहज सुचलं म्हणून...
काला रे सइयां काला रे
तन काला रे मन काला रे
काली जबान की काली गारी
काले दिन की काली शामें
सइयां करते जी कोल् बाज़ारी
काला रे सइयां काला रे
तन् काला रे मन काला रे
काली जबान की काली गारी
काले दिन की काली शामें
सइयां करते जी कोल् बाज़ारी
बैरी कोल् कोल् कोल्
छीने तोल तोल तोल
बैरी कोल् कोल्
छीने तोल तोल तोल
छत आँगन चार दिवारी
सइयां करते जी सइयां करते जी
सइयां करते जी सइयां करते जी
सइयां करते जी कोल् बाज़ारी
सइयां करते जी कोल् बाज़ारी
काली मिटटी कुत्ता काला
काला बिलकुल सुर्मे वाला
काला कौवा हौवा काला
काली मिटटी कुत्ता काला
काला बिलकुल सुर्मे वाला
काला कौवा हौवा काला
काला बादल गिरने वाला
काला मोती गिरने वाला
काला झंडा डण्डा कला
काला बटवा पैसा काला
काली आँखों जैसा काला
काली अग्नि
काली गर्मी सूरज काला
काला बीघा और गज काला
काली हाथी हाथी काला काला
बैरी कोल् कोल् कोल्
छीने तोल तोल तोल
बैरी कोल् कोल्
छीने होल से टोल
रंग पानी और पिचकारी
सइयां करते जी पिया करते जी
सइयां करते पिया करते जी
काला रे सइयां काला रे
तन काला रे मन्न काला रे
काली जबान की काली गारी
काले दिन की काली शामें
सइयां करते जी कोल् बाज़ारी
काला रे सइयां काला रे
तन काला रे मन्न काला रे
काली जबान की काली गारी
काले दिन की काली शामें
सइयां करते जी कोल् बाज़ारी.
स्नेहा खानवलकर ह्या गुणी संगीत दिग्दर्शिकेने संगीतबद्ध केलेल्या 'गँग्स ऑफ वासेपूर २' मधल्या काला रे ह्या गाण्यात गीतकार वरुण ग्रोवर ह्यांनी इतक्या काळ्या गोष्टींचा उल्लेख केलाय, पण बिचारा 'काळा समुद्र' मात्र त्यात घ्यायचा राहून गेला बघा... 😎
खरंतर गुजरातला समुद्र पर्यटनाला जाऊच नये. औद्योगिकरणावर गुजरातने खूप भर दिला. नवसारीपासून पुढे वरती. मुंबई बाजारपेठ जवळ पडते. सापुतारा जरी महाराष्ट्रातील पर्यटकांना आवडत असले ( नाशिक जवळ) तरी गुजरातींना आवडत नाही. त्यांचे आवडते माथेरान महाबळेश्वर पाचगणी.
मुंबई पुण्याला जवळची ठिकाणं पाहून झाल्यावर जरा बदल म्हणून दुसरीकडे काही आहे का याची चाचपणी करतात. पालघरच्य पश्चिमेला दहा किमीवर केळवे माहिम किनारा आहे. पालघर -मनोर - विक्रमगड- जव्हार- त्र्यंबकेश्वर - नाशिक या वाटेवर हल्ली 'गोवर्धन इको विलेज' मिनी वृंदावन ( इस्कॉनवाल्यांचं) हल्ली लोकप्रिय होत आहे. या मार्गावर बरीच रिसॉर्ट झाली आहेत. जव्हार मोखाडा भागातील वारली चित्रकला कमी होत आहे किंवा बाजारू होत आहे असं ऐकून आहे.
सहलीच्या आराखड्यात/ मार्गावर चार पाच ठिकाणे असणे फायद्याचं ठरतं . एखादं नाही आवडलं कुणाला तर दुसरं सहल यशस्वी करतं.
केळवे किनारा तर लोकांनी घाणीने कचऱ्याने भरून टाकलेला दिसला. अगदी गेल्या वर्षात काही बदल झाला असेल तर माहीत नाही. लोक तिथे पिकनिक सारखा कार्यक्रम करून, बसून खाऊन प्लास्टिक प्लेट्स, खरकटे, उर्वरित अन्न असे सर्व जागीच टाकून उठत होते. किनाऱ्यावर हागणदारी होती. पार्किंग शुल्क किंवा तत्सम शुल्क वगैरे वसुली अवश्य होत होती पण स्वच्छतेच्या दृष्टीने काही दिसले नाही. पेड टॉयलेट होते. तेही अस्वच्छ. आपले सामान्य नागरिक देखील एकूण स्वच्छतेचा सेन्स कमी असलेले आहेत असेच वाटते सगळीकडे.
हं.
नवीन अपडेट्स लक्षात ठेवायला हवेत.
बाकी प्रचेतसकुमार चांगल्या जागा शोधतात. पण काहीच उघड करतात. BNHS वालेही चांगल्या जागा सांगत सुटत नाहीत. फेसबुकाच्या भिंती भरल्या की लोंढे तिकडेच जातात. राजमाची, कास पठार, सांधण, हरिहर.
आपल्या सर्वांच्या माहितीतले मिपाकर लेखक 'कुमार१' हे काही कामानिमित्त मुंबईला येणार आहेत. त्या निमित्ताने सोमवार दिनांक ६ जानेवारी २०२५ रोजी संध्याकाळी ६ नंतर भायखळा येथे एक मिपा कट्टा करण्याचे ठरत आहे. सोमवारचा, म्हणजे कामकाजाचा दिवस असल्याने फार लांबुन कोणी येऊ शकणार नाहीत ह्याची कल्पना असल्यामुळे 'कट्ट्यासाठी' वेगळा धागा वगैरे काढलेला नाही, परंतु भायखळा परिसरात किंवा मुंबई उपनगरांत रहाणारे कोणी मिपाकर येऊ शकत असतील तर त्यांचे सहर्ष स्वागत आहे. (केवळ एकमेकांची सदिच्छा भेट आणि गप्पा-टप्पांचा कार्यक्रम एवढाच ह्या कट्ट्याचा मुळ उद्देश आहे 😀)
आणि आजोबा परत जिवंत झाले!
;)
लाखातून एखादा व्यक्ती इतका नशीबवान असू शकतो.हार्ट ॲटॅकमुळे मृत घोषित केलेल्या आजोबांचे शव रूग्णवाहिकेतून घरी नेताना रस्त्यावरील खड्ड्यांच्या धक्क्यामुळे आजोबांचे ह्रदय पुन्हा चालू झाले असावे.कारण नातवाला नंतर त्यांच्या हाताच्या बोटांची हालचाल दिसली.मग पुढील उपचाराला परत दुसऱ्या दवाखान्यात नेले.तर आजोबांच्या ह्रदयाचे ठोके दिसले.
देव तारी त्याला कोण मारी...
https://youtu.be/Y5Ap-dknaww?si=Ezn1IIWLjspCJ5Sl
या घटनेची नोंद घेत महाराष्ट्राच्या आरोग्य खात्याने सदर खड्ड्याचे मोजमाप करून तशाच प्रकारचे खड्डे विविध रस्त्यांवर पाडण्याचे नियोजन केलेले आहे. या खड्डा इफेक्टमुळे सीपीआर ची प्रोसिजर कालबाह्य होऊ शकते असे माझी आरोग्य सचिव माननीय डॉक्टर चंगावडकर श्रीपाद यांनी प्रतिपादित केले ! या नियोजित खड्ड्यांच्या कंत्राटांवरून आत्ताच वाद सुरू झालाय ! राजकीय नेते श्री अमुक प्रमुख यांनी या कंत्राटात बावीस कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला. आणि या प्रकरणाची चौकशी करावी अशी मागणी माननीय मुख्यमंत्री यांच्याकडे केली.
माथेरानमध्ये पर्यटक घोड्यावर बसून जात आहेत, काही जण मिनी ट्रेन पाहात आहेत, माकडे पर्यटकांच्या खाऊच्या पिशव्या हिसकावून घेत आहेत अशा माहितीवर Chatgpt ने काढलेलं चित्र.image
थोड्या चुका आहेत, अर्धवट कापली गेली आहेत दृष्य. तरी ठीकच.
उन्हाळी भटकंती.
काल एक भटकंती केली. खंडाळा घाटासाठी रेल्वे जिथून पळसधरी स्टेशनानंतर वर चढते त्या पहिल्या डोंगरात आहे सोनगिरी. ( मुंबईतील तरुण नवख्या ट्रेकरांचा पावसाळ्यातला आवडता ट्रेक. आणखी एक सोंडाई डोंगर माथेरानच्या चौक पाॅइंटच्या खाली आहे.) उन्हाळा सुरू झाला आहे, रान वाळले आहे तरी दुपारी बारा ते पाच तळापासून माथ्यापर्यंत (५०० मिटर्स) अतोनात डास होते. शांतपणे बसून डबासुद्धा खाता आला नाही.
या उलट मागचाच डोंगर राजमाचीचा. तिथे कधीच कुठेही डास नसतात. हे असं का?
वेरूळ दहाव्या लेण्यात किरणोत्सव..... लोकसत्ता बातमी.
https://youtu.be/2xX1I0EUcNk?si=Q7AHHpInuRYAN6Zc
असा दिसत असला तरी त्यासाठी लेण्या तशा बांधलेल्या नसाव्यात. वेरूळ लेण्या बहुशा पश्चिमाभिमुख आहेत त्यामुळे दुपारी वर्षातून दोनवेळा किरण आतापर्यंत येत असणारच.
आपली देवळं मुद्दामहून पूर्वाभिमुख बांधतात. काही पश्चिम दिशेला तोंड करून. तसं लेण्यांचं नाही. बौद्ध भिक्कुंना पावसाळ्यात विश्रांतीसाठी विहार आणि लेणी आणि चैत्य बांधण्यात ( खोदण्यात) आले होते. मूळ उद्देश हा होता.
विमान परत फिरवणे....
मागच्या आठवड्यात एक शिकागो ते दिल्ली विमान टॉयलेट्स तुंबल्याने परत शिकागोला नेले.
https://youtu.be/ZQemz_Enpxc?si=w1SuHw86alXZ6IiW
उड्डाणाचे फक्त चार तास उरले होते. मग वाटेत कुठे emergency landing या कामासाठी मिळत नसावेत का? किंवा ते देश अशि सर्विस देत नसतील?
माथेरान कालपासून बंद.
टॅक्सी, इ रिक्षा आणि घोडे वाले संपावर. कारण काय तर म्हणे पर्यटकांची फसवणूक करणारे विडिओ यूट्यूबवर आले. खरं कारण ... खाजगी वाहनाने येणारे पर्यटक वाढले आणि ते दस्तुरी नाक्यावरून शटल टॉय ट्रेन किंवा इ रिक्षांनी माथेरानच्या बाजार पर्यंत जातात. ते आठवड्यात कोणत्याही दिवशी येऊन जातात. हमाल, हॉटेल्स आणि घोडेवाल्यांचा धंधा जोरात चालतो. इ रिक्षा दहा आहेत. फक्त सुट्ट्या लागल्यावर येणारे पर्यटकच टॅक्सी घेतात. एकूण काय तर २७० टॅक्सी वाल्यांना धंधा मिळत नाही पण पर्यटक खूप येतात. नेरळ ते दस्तुरी नाका जाणारी एसटी मिनीबस ( पंचवीस रुपयांत) हीसुद्धा पोटदुखी आहे.
फसवणूक टॅक्सीवालेच करतात. खाजगी कार्यालयांना " आमच्या टॅक्सी नेच जा असा हेका धरतात किंवा पाचशे रुपये द्या असा दम भरतात. काही शहाणे टॅक्सी वाल्यांनी मात्र पन्नास रु सीटने धंधा सुरू ठेवला आहे. ( अधिकृत भाडे शंभर रु प्रती प्रवासी असे चारांचे चारशे रुपये घेतात. किंवा पूर्ण टॅक्सी खिडकीवर जाऊन बुक केल्यास ३६० रुपये लागतात.
आता प्रश्न असा आहे की टॅक्सीवाले आठवड्याच्या इतर दिवशी ओला/ उबेर/ वगैरेंनी संबंध का ठेवत नाहीत. कारण या साईट्स " मारुती इको" वाहन नको सांगतात. सर्व माथेरान टॅक्स्या याच प्रकारच्या आहेत.
माझा कालचा WhatsApp Status #LifeIsFunWithFriends&SohanlalTea ☕एका जिवलगाचा प्रतिसाद -
चहा आणी आणी ते सुद्धा संध्याकाळी 7 नंतर!
उन लागलं की काय वामन तुला ?
काळजी घे बाबा.
माझे उत्तर -
हमारे तेलंगाणा के लोओंका मालूम नै तुमारकू? सुब्बे उट्टे जब से रात को सोने तलक कब्बी बी चायाँ पीने कू रेडीच रैतें।
कल क्या वा मालूम? हमारे संजय बावा होर उनके इनो आये थे हमारे इधर म्हाराष्ट्रा सें ।
फिर Abits कु जाने के प्लानाँ बनायें।
तो मैं बोलूं, चलो बावा, कैसे बी उदर जारैं । तो व्हांपे सोहनलाल की चाय भोत सईं रैती, दूर दूर से लोआं आते पीनेकू। पीते, तुम्म?
तो उनो बोले, तुम इत्ता बोलरे तो कैकु नै पीते वामन राव?
फिर हम, हमारे इनो, बावा, बावा के इनो ऐसे चार जणां गए चायाँ पीनेकू।
अब तुमारकू तो मालूमिच हैं, वो चायाँ वायाँ पीने के शौकां तो अपुन नै पालते। फिर वो तीन जणां चायाँ पिए। भोत अच्चे है चायाँ बोले।
बोलके मई स्टेटसां लगायूँ।
अक्षय्य तृतीयेनिमित्त घराजवळच्या श्री वेंकटेश्वर स्वामी (बालाजी) मंदिरात सपत्नीक गेलो होतो. घरी आंब्याची पाने-झेंडूची फुले यांची तोरणे, देवांना ताजे हार,फुले, यथासांग पूजा, विशेष नैवेद्य हे झाले. गोडधोड जेवण आहे. श्री कृपेने प्रसन्न वाटते आहे.
गोविंदा गोविंदा गोऽविंदा!
मी हैदराबादला राहतो. घराजवळच्या (आम्ही लोकांनी बांधलेल्या) देवळात गेलो होतो.
यापूर्वी मेहकरच्या बालाजी मंदिरात गेलेलो आहे. तेथील बालाजीची मूर्ती खूप उंच आहे. बहुधा भारतभरातील सर्वात उंच मूर्ती असावी.
श्रीगुरुजी हा आइडी बॅन केल्याबद्दल मी तीव्र निषेध व्यक्त करतो. ज्या मोजक्या मिपाखरांमुळे मिसळपाववर वाचक येतात त्यांच्यापैकी एक हे श्रीगुरुजी होते.
हे लिहिण्याचा अधिकार मला आहे व हे लिहिल्यामुळे माझाच आइडी बॅन होणार नाही ही अपेक्षा.
जय हिंद.
---
हे मी खरडफळ्यावरही लिहिलं होतं; कायमची नोंद राहावी म्हणून इथे पुन्हा लिहीत आहे.
श्रीगुरुजी हे अनेकवेळा अभ्यासपूर्ण संदर्भासहित मांडणीणकरात होते हे खरे आहे.
काहीवेळा मतभेद असले तरी जेबकी स्वाभाविक आहे तरी त्यांची एकूण मांडणी व चर्चेला योगदान चांगलेच होते यात शंका नाही
अनेकदा माहीत नसलेले संदर्भ त्यांच्यामुळे माहिती होत होते.
मात्र वामनराव त्यांची भाषेची मर्यादा भंगलेली होती असेही दिसून येते.
त्यासाठी त्यांना समज देऊन संधी द्यायला हवी होती
असेच अमरेंद्र बाहुबली यांना देखील संधिं द्यायाला हवी होती.
असे उत्साहाने हिरीरीने चर्चा करणारे गेले तर त्याचे मला तरी नक्कीच वाईट वाटतें
काळजी घ्या मुवि. हाडाचे दुखणे म्हणजे वेळखाऊ दुखणे असते. काहीही झाले तरी मुळातले दुखणे आणि मग फिजिओथेरपी वगैरे प्रकार मिळून अडीच-तीन महिने जातातच. मी पण तो अनुभव घेतला आहे. पण त्या काळात मिपावर पूर्णवेळ पडीक राहून वेळेचा सदुपयोग केला होता :)
पुणे बुक फेस्टिवल २०२४
१४ डिसेंबरपासून सुरू झालेल्या पुणे बुक फेस्टिवलचा आज २२ डिसेंबर शेवटचा दिवस होता.कामाचं आठवडा नियोजन पूर्ण फुल्ल असल्याने आजचाच दिवस या फेस्टिव्हलमध्ये येण्यासाठी मिळाला.खरोखर पुस्तक प्रेमींसाठी ही एक अनोखी पंढरी फर्ग्युसन महाविद्यालयात अवतरली होती.जवळपास २५० पेक्षा अधिक प्रकाशकांचे बुक स्टॉल येथे उपलब्ध होते.फर्ग्युसन महाविद्यालयात प्रवेश करताच पुस्तक वाचण्यात मग्न अनेक भव्य प्रतिकृती ठराविक अंतरावर होत्या.पुस्तकांच्या आकाराच्या प्रतिकृतींची सजावट मार्गावर होती.अंम्पी थिअटरात अनेक कार्यक्रमांचीही रेलचेल होती.पुढे सर्वप्रथम भारतीय संविधानाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त पुस्तकरूपी "संविधान प्रतिकृती ९.९४ मीटर जिचा गिनीज बुक मध्ये समावेश करण्यात आला आहे, ती पाहिली.मग त्या भव्य प्रांगणात आलो जिथे फेस्टिव्हल भरले होते.इथे पंतप्रधान मोदी, मुख्यमंत्री फडणवीस यांचे आउटलेट छायाचित्रं काढण्यासाठी होते.
आत गेल्यावर अनेक प्रसिद्ध प्रकाशनाची पुस्तके पाहून खूप आनंद झाला.इतकी पुस्तक पाहून कोणती घेऊ कोणती नको असं झालं.
पहिल्याच पुस्तकाच्या स्टॉलवर पुस्तक पाहत चाळत होते.दुसऱ्या ठिकाणी हेच ,वेळेचे बंधन नसल्याने माझा नवरा आणि मुलगी मला टाटा करून पुढे निघून गेले.अनेक पुस्तकं जी नगरात पाहायलाही मिळत नाही ती जवळपास सर्वच पाहिली.इंग्रजी पुस्तकेही बरीच होती,तिथे गर्दीही भरपूर होती.मी प्रामुख्याने गीतारहस्य(लोकमान्य टिळक) पुस्त,पैशाचे मानसशास्त्र(मराठी , इंग्रजी दोन्ही भाषेत घेतले),हस्ताचा पाऊस(माडगूळकर),ज्ञानदेवा तिथे समाधी(राहूल देशपांडे), संस्कृती (इरावती कर्वे) , बिझिनेस महाराजा इत्यादी पुस्तके घेतली.थोड्या वेळाने लेकीची परत भेट झाली .तीला देखील पुस्तकांची गोडी निर्माण व्हावी म्हणून मुद्दामाहून आणले होते.ते सफलही झाले कारण घरी असलेली अनेक पुस्तके तिने ओळखून "आई हे आपल्या घरी हे पुस्तक आहे" असं सांगितलं :).रा.चि.ढेरे, कुरुंदकर ,इरावती कर्वे अशा अनेक आवडत्या लेखकांची सर्व अज्ञात पुस्तकेही पाहायला मिळाली.इथे सातवाहन गाथा सप्तशती पाहायला मिळाले.पण आता खुप उशीर झाला होता १२-४ असा वेळ इथे होते.एक तरी लेखक भेटतील अशी आशा होती पण ते घडलं नाही. फर्ग्युसन महाविद्यालय पाहत फिरत बाहेर आले.बाप लेकीने आधीच पोटोबा फुल्ल केला होता.जवळच वैशाली,वाडेश्वर आहे हे माहिती होतं.पण खूप दमलो होतो समोर ' रौनक' पावभाजी होती तिथेच गेलो.मस्त झाडांच्या सावलीत टेबल होते.पुण्यातलं पहिले १९६७ साली पावभाजीचे हे रेस्तराँ आहे असं तिथे लिहिले होते.पुण्याची पावभाजी तिखट नसणार म्हणून त्यांना तिखट द्या असं मुद्दामहूनच सांगितले.खुपच सुंदर सजवलेली (प्रेझेंटेशन)पावभाजी आणि बरोबर तिखट लसूण आलं सरबरीत चटणी,तिखटातला चिरलेला कांदा बरोबर आला.इतकी छान सर्व्हिस पाहून छान वाटलं.पुण्यात गोष्टींची 'गुणवत्ता' हाच महत्त्वाचा निकष परत दिसला.एफसी रोडवर जरा फेर फाटका मारून परत घरी निघालो.
वाचन ही शांत वातावरणात चालणारी प्रक्रिया आहे याचे थोडेसुद्धा भान आयोजकांना नसावे याचे वाईट वाटले. संध्याकाळच्या वेळेस तिथं जावं तर तिथंच चाललेल्या संगीताच्या कार्यक्रमामुळं कानठळ्या बसत होत्या. अर्थात एकंदरीतच आयोजनाच्या बाबतीत उत्सवी वातावरणात वाचनसंस्कृतीचे भान ठेवून शांत वातावरण, डोळ्याला त्रासदायक होणारा प्रखर प्रकाश टाळणे अशा गोष्टींची अपेक्षा करणं जरा जास्तच होतं याची पुरेशी जाणीव झाली आहे.
बाकी हिंदी पुस्तकांच्या तसेच मराठवाड्यातल्या, तितकेसे प्रसिद्ध नसलेल्या स्टॉलवरही वेगळी, वाचनीय पुस्तकं पहायला मिळाली याचा आनंद आहे.
वाचाल तर आनंदी होणार
सकाळ पुस्तक महोत्सव २०२५, अहिल्यानगर.
पुणे बुक फेस्टिवलच्या धर्तीवर अगदी भव्य नाही पण बरेचसे मोठे , चांगली पुस्तके असणारे पुस्तक महोत्सव नगरमध्ये २१-२४ मार्च दरम्यान भरले आहे.पुढचे काही दिवस व्यस्त असल्यामुळे आजच फेरफटका मारला.
नेहमीप्रमाणे पुस्तकाच्या दुकानात,प्रदर्शनात मला वेळेचे भान उरत नाही.तेव्हा तू एकटीच जा असं घरून सांगण्यात आले,फक्त मोबाईलची बॅटरी संपायच्या आधी घरी ये असंही सुनावण्यात आले.
लोकप्रिय साहित्यिकांची पुस्तके ऑनलाईन सहज मिळतातं पण अशा प्रदर्शनात नवे पुस्तक समजतात.पुस्तकांना हातात घेऊन,पाने चाळत, अनुक्रमणिका पाहत ते पुस्तक घेणं निराळं सुखच असते.
कादंबरी मी वाचनालयातून मिळालेल्या पुस्तकांतून वाचते.
तेव्हा संस्कृती, अध्यात्मिक, वैज्ञानिक, समाजजीवन, निसर्ग,इतिहास,भटकंती विषयांची पुस्तके घेण्याकडे कल असतो.
तरीही आनंद नाडकर्णी, ग्रेस, अच्युत गोडबोले,जयवंत दळवी,नरहर कुरुंदकर,नरेंद्र दाभोळकर यांची काही पुस्तके हेरुन ठेवली आहेत,लवकरच घेईन.
मी घेतलेली अनवट पुस्तके-
१.येई परतुनी ज्ञानेश्वरा'
आज मला नवीन लेखक समजले डॉ.रा.श्री.मोरवंचीकर
डॉ. रा. श्री. मोरवंचीकर आजही ज्ञानदानाच्या पवित्र कार्यात अखंड नंदादीपासम तेवत आहेत. त्यांनी 'येई परतुनी ज्ञानेश्वरा' हा मराठी लोकमानसाच्या जिव्हाळ्याचा ग्रंथ अध्यायनिहाय अनेक अंगांनी उलगडला आहे. त्यातील सचित्र ओव्यांचे मार्मिकपणे केलेले निरूपण पाहून त्यांच्या ज्ञानेश्वरांप्रती असलेल्या उत्कट प्रेमाचा अनुभव दिसतो.
२.निसर्गायण
दुसरे नव्याने समजलेले लेखक निसर्ग आणि विकास अभ्यासक दिलीप कुलकर्णी .
पर्यावरणाची समस्या ही अशा प्रकारे बाह्य निसर्गातील असली, तरी तिचं मूळ आहे आपल्या मनोवृत्तीत -आपल्या विचारांत. आपली भोगवादी वृत्ती, हाव, आक्रमकता ही या समस्येला कारणीभूत आहे आणि केवळ ही एकच नव्हे, तर शस्त्रस्पर्धा, दुर्बलांवरचे अत्याचार, गुन्हेगारी, व्यसनाधीनता, मानसिक तणाव, स्वैराचार अशा अनेक समस्या त्याच मनोवृत्तीमुळे आपल्यासमोर उभ्या ठाकल्या आहेत.आधुनिक पाश्चात्त्य विज्ञान आणि प्राचीन पौर्वात्य तत्त्वज्ञान यांच्या आधारे या बदलाची दिशा शोधणारं हे पुस्तक.
३. थर्ड ॲंगल हे छोटेखानी पुस्तक हटके विषयावर म्हणजे ' थिअरॉटिकल मित्राने प्रॅक्टिकल क्लबमध्ये केलेली भाषणे एक वैचारिक अनोखा अनुभव आहे.
मनाची नित्य नाव
पुस्तकाच्या पानांनी
वल्हवली जातात
मग आयुष्याचा भवसिंधु
सहज तरुन जातो
ज्ञान सागराची ओढ
अजुनच सहज पूर्ण होते...
-भक्ती
अरे वा! पुस्तक प्रदर्शन गाजलं. आता दरवर्षी होईल. तुमच्या मुलीसाठी पर्वणीच. ( आउटलेट छायाचित्रं काढण्यासाठी होते.= कटाउटस)
फार पूर्वी मुंबईत (आझाद मैदान) आणि दिल्लीत ( प्रगती मैदान) येथे मोठे पुस्तक प्रदर्शन आलटून पालटून एक वर्षाआड होत असे. नंतर मुंबईतील बंदच झाले. मग छत्रपती टर्मिनस जवळचा खाजगी बुक स्टॉल आशिष दरवर्षी प्रदर्शन भरवून लागला सुंदराबाई हॉलमध्ये. पण मराठी पुस्तके नसत ( ती साहित्य संमेलनांत अधिक). अक्षर वाङमय यांनी काही वर्षे प्रदर्शने भरवली. माझ्या दृष्टीने पुस्तकं चाळायला मिळणे महत्त्वाचे कारण विकत घेत नाही. विकत आणून नंतर करायचे काय हा प्रश्न असतो. तरी भाषा शिकण्यासाठीची पुस्तके घेतो ती संग्रही आणि संदर्भासाठी कायम लागतात.
स्थानिक नगरवाचनालयात काही वाचायला मिळतात. पण मोठी बाडं कधीच येत नाहीत.
स्थानिक प्रकाशकांनी एक होऊन एक कायमची तारीख किंवा आठवडा प्रदर्शन भरवण्यासाठी निश्चित केला तर वाचकांच्या कायम लक्षात राहील. उदाहरणार्थ डिसेंबरचा दुसरा आठवडा.
माझ्या दृष्टीने पुस्तकं चाळायला मिळणे महत्त्वाचे कारण विकत घेत नाही. विकत आणून नंतर करायचे काय हा प्रश्न असतो. तरी भाषा शिकण्यासाठीची पुस्तके घेतो ती संग्रही आणि संदर्भासाठी कायम लागतात.
खरं आहे,अशा मोठ्या प्रदर्शनात खुप पुस्तकं पाहायला ,चाळायला मिळतात हे महत्त्वाचे.माझा पुस्तक घेण्यासाठी हव्यास होता त्यामुळे बजेट संपल्यावर पुस्तक फक्त पाहण्याचं ऑड वाटू लागले.पुढच्यावेळी जरा याबाबत सतर्क राहीन ;)
होय लेकीसाठी हळूहळू एम एच १२ केंद्रबिंदू (पर्वणी) तयार करणार आहे!
होळी, वजा तीस तापमान.
शेवटचा प्याला मार्च १९९९,प्रसंग मारूती आठशे पहिली चार चाकी घेतली.
व्यसनाधीन झालो का ?नाही, प्रत्येकाच्या इच्छाशक्ती वर आवलंबून.
दारू पिली पाहीजे असे काही नाही. पण अती परिचयात अवाज्ञा तद्वत दारूला डोक्यावर चढवून नये.
अर्थात माझे मत.
बरोबर.
रोज थोडी थोडी घरीच घ्यावी म्हणजे त्यातली गंमत सामान्य होते. आणि कधी प्रसंगाप्रमाणे जे पितात भरपूर तसं होत नाही. कितीही कोणतेही दारूचे ब्रांड आले तरी बेसिकली अल्कोहोल अमुक टक्के यापलिकडे काही नाही. तांदुळाचेही तसेच आहे पंधरा रुपये ते सातशे पन्नास रुपये किलोचा असो त्यांचे पोषणमूल्य समानच असते. सगळे पॉलिश केलेलेच असतात. हातसडीचे कुठे मिळतात?
ये इंतजार गलत है के शाम हो जाये
जो हो सके तो अभी दौर-ए-जाम हो जाये
मुझ जैसे रिंद को भी तूने हश्र मे या रब
बुला लीया है तो, कुछ इंतजाम हो जाये
हुई महँगी बहत ही शराब, के थोड़ी-थोड़ी पिया करो
पियो लेकिन रखो हिसाब, के थोड़ी-थोड़ी पिया करो
कौन कहता, अंगुर की बेटी गलत है
अंगुरके दामाद को बस इसकी लत है
इसके साथ कुछ गम गलत करता है
तो बेरहम जमाने क्या जाता है,अगर...
वो उसके साथ कुछ पल बिताता है
आशिष बुक स्टॉल
छत्रपती टर्मिनस जवळचा खाजगी बुक स्टॉल आशिष दरवर्षी प्रदर्शन भरवू लागला सुंदराबाई हॉलमध्ये.
यांच्या पुस्तक प्रदर्शनात भेटी दिल्यावर एक लक्षात आलं की यामध्ये पुस्तके कोण घेतो. इंटिरिअर डेकोरेशनचा व्यवसाय करणारे मुंबईत बरेच आहेत. ते इकडे फिरतात. भरपूर रंगीत चित्र असलेली जाडजूड पुस्तके तिथे निम्म्या किंमतीत असतात. ती त्यांना हवी असतात नवनवीन फर्निचरच्या डिझाइनसाठी. शिवाय गार्डनिंग लेआउटचीही असतात. आर्किटेक्ट नाही पुस्तके लागतात. मोठ्या बास्केट घेऊन फिरतात आणि भराभर पुस्तके उचलतात.
तरुण मुलं मुली इंग्रजी कादंबऱ्या विकत घेतात. काही महिला कुकींगची पुस्तके बघतात.
आपण जी मराठी साहित्यातील कवितासंग्रह, कादंबऱ्या विकत घेतो त्याचा आनंद आठ दिवसांत संपतो. इतिहास,भाषा यांचे अभ्यासक पुस्तके घेतात ती त्यांच्या कामाची असतात. पण मग असा विचार येईल की वाचकांनी पुस्तके विकत घ्यावीत का? वाचनालयांनी घ्यावीत. म्हणजे महिन्याच्या फीमध्ये साहित्य वाचता येईल.
विना अनुदानित, वाचनालये आता ओस पडत चालली आहेत.
डोंबिवली येथे एक फ्रेंड्स लायब्ररी सोडली तर बरीचशी वाचनालये बंद पडली आहेत.
मानपाडा रोड वरील ३ वाचनालये, डोंबिवली पश्चिम येथील एक वाचनालय, midc मधील एक वाचनालय, ही काही ठळक उदाहरणे. रामनगर मधील एक वाचनालय आणि P ,& T मधील एक वाचनालय, फ्रेंड्स लायब्ररीच्या सहयोगाने चालतात.
त्यापेक्षा पण भयावह स्थिती, अभ्यासक्रमा व्यतिरिक्त , पुस्तक विक्रेत्यांची आहे....
कालाय तस्मै नमः....
गोवा पर्यटन/ कोकण/समुद्री पर्यटन
गोरगावलेकर यांनी केलेल्या गोवा पर्यटनाचे धागे येत आहेत. त्यांचे अनुभव लिहित आहेत. तिसऱ्या भागात हिवाळी सहल, दक्षिण गोवा :भाग 3 : बटरफ्लाय बीच आणि लोलये-पैंगिण चे वेताळ गोवा आणि कोकण यांच्या पर्यटनाची तुलना फायदे तोटे यांची प्रतिसादांतून चर्चा फारच वाढली. ती इकडे करता येईल.
धाग्यातली चर्चा इथे कॉपी पेस्ट करताही येईल पण तो त्या प्रतिसादकर्त्या लेखकांचा अधिकार आहे.
मीही पूर्वी गोव्यावर एक धागा काढला होता ते आठवले. माझा समुद्र पर्यटन, खाणे पिणे वगैरेंचा आनंद फारच संकुचित आहे. तरी एकदा गोवा काय आहे म्हणून पाहण्यासाठी गेलो होतो. परतताना कुडाळहून( कोकण) आलो. एसटीचाच प्रवास त्यामुळे जमेल तेवढे पाहिले.
गोव्याच्या पर्यटनाबद्दल ऐकले वाचलेले भारतातले आणि परदेशी पर्यटक इथे येतात. आनंद घेतात आणि पुन्हापुन्हा येतात. गर्दी वाढली की ट्रेनची तिकिटे मिळत नाहीत. विमान आणि हॉटेल्सचे भाडी दर वाढतात. परवडण्याच्या पलिकडे जातात. तरीही पसंती असते.
कोकण ( महाराष्ट्रातला) याबद्दल श्री.ना. पेंडसे किंवा जयवंत दळवी किंवा इतर लेखकांच्या कथा कादंबऱ्यांतून मराठी वाचकांना माहीत झालेला असतो. तो खरंच कसा आहे हे पहाण्यासाठी ठाणे,रायगड, सिंधुदुर्ग जिल्हेसोडून उर्वरित महाराष्ट्रातील दूरच्या ठिकाणांहून पर्यटक येतात. त्यात किहीम, अलिबाग, श्रीवर्धन,हर्णे मुरुड, रत्नागिरी परिसर, देवगड, मालवण, देवबाग ही ठिकाणे येतात.
कोकण आणि गोव्याप्रमाणेच कर्नाटकातील २६० किमी किनारपट्टीवरही कारवार,गोकर्ण, मुर्डेश्वर, उडुपी, मंगळुरू ही ठिकाणं आहेत. तीही पाहिली. हॉटेल्स(राहाणे आणि खाणे शाकाहारी तसेच मासाहारी), बसप्रवास यादृष्टीने फारच चांगल्या सोयी आहेत. शिवाय किनारपट्टीसोडून वरती घाट चढून गेल्यावरही अनेक सुंदर ठिकाणी जाता येतं. मार्चपर्यंत वाहणारे धबधबे आहेत. इथल्या लोकांना पर्यटक येण्याची सवय आहे. त्यांचा त्रास वाटत नाही . तुसडेपणा नाही. मला कर्नाटक पर्यटन फार आवडले आणि पुन्हा जावेसे वाटते. किनारे स्वच्छ चांगले आहेतच शिवाय नद्याही बारमाही पाणी वाहणाऱ्या आणि अतिशय स्वच्छ पाण्याच्या आहेत. नदीकिनारी जी धार्मिक स्थळे आहेत ती निसर्गसौंदर्याने अधिकच चांगली वाटतात. सह्याद्रीचा सुंदर निसर्ग पाहावा तर इथेच. उडुपी आणि मंगळुरू येथे समुद्र पर्यटन आणि मत्स्याहारही खूप प्रचलित आहे.
https://www.youtube.com/embed/Jhsq0fdiEq0
गोवा पर्यटन मंत्री यांची मुलाखत. ही सोशल मीडियावर सर्वत्र सुरू झालेली चर्चा हा चुकीच्या (चायनीज) आकडेवारीवर आधारित एक प्रोपागांडा आहे असे त्यांचे म्हणणे त्यांनी इथे मांडले आहे.
गोरगावलेकर यांनी केलेल्या गोवा पर्यटनाचे धागे येत आहेत. त्यांचे अनुभव लिहित आहेत.
धाग्याच्या पहिल्या भागात आम्ही मडगाव स्टेशन ते कोलवा बीच पर्यंत प्रवास केला होता . स्टेशनच्या बाहेरच प्रीपेड टॅक्सी मिळाली . टॅक्सिवाल्यांचा कथित मुजोरपणा दिसला नाही .
दुसऱ्या भागात कोलवा ते पाळोळे पर्यंत प्रवास केला . पर्यटन स्थळे बघत जात आम्ही जवळपास पूर्ण दिवस घेतला व त्यात पाच - पंचवीस किमी अंतर जास्त झाले त्याचे वाढीव पैसेही दिले . किती खर्च येतो हे कळावे इतकाच लिहिण्यामागचा उद्देश . आज कुठल्या शहरात स्विफ्ट डिझायरचे संपूर्ण दिवसासाठी ३ १ ० ० /- रुपये भाडे असेल ? ड्रायव्हरचा पगार , गाडीची देखभाल दुरुस्ती, इंधन खर्च जाऊन मालकाच्या हातात कितीसे पैसे जातील ? कोला बीचला जातांना अगदी ओबड धोबड रस्त्यावरून गाडी गेली . स्वत : ची गाडी नेतांनाही विचार करावा लागेल असा रस्ता . कुठलीही कुरकुर न करता शक्य होतील ती ठिकाणे दाखवली . येथेही गाडीवाल्यांचा कथित मुजोरपणा दिसला नाही .
मुजोर म्हणजे बोलण्यात अशा अर्थाने नसावं. पण अतिरिक्त मनाला येईल तितके पैसे मागणे हे अनेकदा घडते. पूर्ण दिवसाचे ३१०० इतकेच घेतले असतील तर तुम्हाला नशिबाने चांगले डील आणि व्यक्ती लाभली. एरवी कोपऱ्यावर सोडून यायचे सहाशे (हे उदाहरण मे २०२४ मधलं, ऑफ सिझन काळ. अंतर दोन ते तीन किमी. पार्किंग नसल्याने टॅक्सी मागवावी लागली होती.). नुसती चौकशी केली होती तेव्हा, दाभोळी एअरपोर्ट ते अगोंद वन वे नुसते ड्रॉप करण्याचे ऑफ सिझन २००० आणि सिझन मध्ये ३५०० ते ४०००. तुलनेसाठी असे पाहा की मुंबईहून गोव्याचे विमान तिकीट देखील कधी कधी याहून कमी असते.
वार्का ते काबो द राम किल्ला आणि परत इतक्या अंतराचे हॉटेलशी संलग्न टॅक्सीवाल्यांनी सुमारे आठ वर्षांपूर्वी तीन हजार घेतले आणि वरून टिप मागितली. वाटेत कुठे थांबायला देखील तयार नव्हता.
नव्वद टक्के वेळा मुंबईपासून स्वत:ची कारच घेऊन जाणे किंवा एअरपोर्टवर उतरताच पूर्ण मुक्कामाइतकी सेल्फ ड्राईव्ह कार घेणे हे दोन उपाय करून ही समस्या आता सोडवली आहे.
बाय द वे, गोव्यातील स्थानिक लोक कोंकणी भाषेच्या सवयीनुसार एकेरीत अरेतुरे करत बोलतात आणि त्या स्टाईल मुळे काही वेळा बाहेरील लोकांना ते अशिष्ट उद्धट उगीचच वाटू शकतात.
सहमत.
खाजगी वाहनाशिवाय तसेच भाड्याच्या वाहनाशिवाय जमेल तेवढे फिरणे आणि आनंद मानणे हेच आमचे ध्येय असते. त्यामुळे काही त्रास /संताप होत नाही. शेअरिंग साठी कुणाला तयार करणेही नाही. म्हणजे अगदीच घरी कॉटवर पाय हलवत गप्पा मारण्यापेक्षा चार ठिकाणं पाहाणे बरे या रुळावर आमची गाडी सुसाट धावते. शिवाय खरेदी करायची नाही हे ठरवूनच टाकले आहे. आमचा गाईड लोनली प्लानेट पुस्तक " India travel survival kit " - Tony Wheeler and others.
"पूर्ण दिवसाचे ३१०० इतकेच घेतले असतील तर तुम्हाला नशिबाने चांगले डील आणि व्यक्ती लाभली."
काशिनाथ नाडकर्णी : "तो कोकणांतला असला पाहिजे अंऽऽऽ..."
कोचरेकर मास्तर : "पाहिलंत? पाहिलंत... माणुसकी नाही.. नाही म्हणतात ना?... ही घ्या माणुसकी! प्रवासात काय अनुभव येतील सांगता येत नाही. वास्तविक असल्या ह्या लोकांचे जाहीर सत्कारच करायला पाहिजेत. त्याचे नाव, नंबर वगैरे आपण टिपून घ्यायला पाहिजे होता नाही का..."
"एरवी कोपऱ्यावर सोडून यायचे सहाशे (हे उदाहरण मे २०२४ मधलं, ऑफ सिझन काळ. अंतर दोन ते तीन किमी. पार्किंग नसल्याने टॅक्सी मागवावी लागली होती.). नुसती चौकशी केली होती तेव्हा, दाभोळी एअरपोर्ट ते अगोंद वन वे नुसते ड्रॉप करण्याचे ऑफ सिझन २००० आणि सिझन मध्ये ३५०० ते ४०००."
सोकाजीनाना त्रिलोकेकर : "ए नाडकर्णी, बघ... बघ! बघ लेका तुझा कोकणातला व्हिक्टोरिया (टॅक्सी) वाला... "
काशिनाथ नाडकर्णी : "तो कोकणांतला असणंच शक्य नांयऽऽऽ... अहो तो कोकणात व्हिक्टोरिया (टॅक्सी) चालवायला शिकणार कुठून मला सांगा बघू आंऽऽऽ... कायत्तरी काय? आमच्या कोकणातले म्हणजे सगळे बैल..."
😀 भ्रमण मंडळ - बटाट्याची चाळ
गोव्याला असंख्य वेळा जाउनही तिथल्या सार्वजनीक वाहतुक व्यवस्थेचा आणि टॅक्सीवाल्यांचा मला फारसा अनुभव नाही. ह्या वर्षीच्या जानेवारी महिन्यात दोना पावला येथील मुक्काम असलेल्या 'इंटरनॅशनल सेंटर गोवा (ICG)' येथुन त्यांच्याचतर्फे संध्याकाळी तिथुन सुमारे सात किमी अंतरावर असलेल्या कॅसिनो पर्यंत जाउन मध्यरात्री तिथुन परतण्यासाठी घेतलेल्या टॅक्सी सेवेसाठी त्या टॅक्सीवाल्याने (आधीच बोलणी केल्याप्रमाणे) संध्याकाळी जाताना ड्रॉप साठी ३०० रुपये आणि मध्यरात्री तिथुन निघताना फोन करुन बोलवल्यावर पिक-अपसाठीचे ५०० रुपये असे जाउन-येउन एकुण ८०० रुपये घेतले होते. मध्य्ररात्री १:३० च्या नंतर फोन करुनही तो सांगीतल्याप्रमाणे परत न्यायला आला होता हे विषेश!
असो, मिपाकरांना त्याठिकाणी आलेले टॅक्सीवाल्यांचे वेगवेगळे, बरे-वाईट अनुभव वाचुन माहितीत भर पडत आहे 👍
विमानतळावरून आपल्या हॉटेलवर किंवा आपल्या हॉटेलवरून विमानतळावर जायचे असेल तर टॅक्सीवाल्यांचे अवाच्या सवा दर आहेत याचा मला तरी अनुभव आला नव्हता. आम्ही गोवा विमानतळापासून सगळ्यात लांब राहिलो होतो अगोंद आणि पाटणेला. दोन्ही ठिकाणी जायला विमानतळाहून १८०० रूपयात प्रीपेड टॅक्सी मिळाली होती. अर्थात ही अनुक्रमे २०१७ आणि २०१८ ची गोष्ट. सध्याचे दर किती हे माहित नाही. मात्र दोन्ही ठिकाणे दाबोळी विमानतळाहून साधारण ६०-६५ किलोमीटर अंतरावर आहेत. अंतर ध्यानात घेता तो दर अवाजवी जास्त आहे असे वाटले नव्हते. विमानतळावर समजा प्रीपेड टॅक्सी असते आणि त्यांना ठरवून दिलेले दर आहेत तितकेच घ्यावे लागतात. पण परतीच्या प्रवासात हॉटेलवरून विमानतळावर जातानाही टॅक्सीवाल्याने तेवढेच पैसे घेतले होते. अगोंदहून परत येताना आमचे विमान रात्रीचे होते त्यामुळे दाबोळी विमानतळावर रात्री साडेनऊच्या सुमारास पोचलो होतो. त्या वेळेस विमानतळावरून भाडी मिळत असतील की नाही शंकाच आहे कारण त्यावेळेनंतर फार विमाने येत नाहीत. तरीही त्याने जास्त पैसे घेतले नव्हते.
टॅक्सीवाले अवाच्या सवा दर लावतात ते हॉटेलबाहेर साईटसिईंगला जाणार्यांकडून. वारकामध्ये आम्ही उतरलो होतो वारकाला आमच्या हॉटेलच्या बाहेर पर्यटकांसाठी म्हणून एक टॅक्सी स्टॅन्ड होता. तिथून मडगाव फार तर १०-१२ किलोमीटरवर होते. काजू आणि बेबिंका अशा गोष्टी घ्यायला मडगावला जायचे होते तेव्हा हॉटेलबाहेरील टॅक्सीवाल्यांनी जाऊन येऊन २७०० रूपये सांगितले होते. आणि ही गोष्ट २०१२ ची होती म्हणजे आणखी जुनी. ही अक्षरशः लूट होती. मला वाटते तिथे जास्त गोरे पर्यटक येतात आणि परदेशी पर्यटकांना अवाच्या सवा दर लाऊन लुटणे हा प्रकार नाही म्हटले तरी सगळीकडे होतोच. जर ते गोरे पर्यटक असे वाढीव दर द्यायला तयार होत असतील तर टॅक्सीवाल्यांना बहुदा आम्हा भारतीय पर्यटकांची गरज नसावी. त्यामुळे यायचे असेल तर या दरात या नाहीतर येऊ नका असा त्यांचा दृष्टीकोन होता.
गेल्या काही महिन्यांपासून माझी पत्नी सौरभ बोथरा यांच्या ऑनलाइन योगासन वर्गांना उपस्थिती लावत आहे. मी देखील महिन्याभरापासून सुरुवात केली आहे.
शीर्षकात जरी केवळ योग असले तरी, योगासनांखेरीज, इतर कार्डिओ व श्वसनाचे व्यायाम, प्राणायम व थोडेफार ध्यान यांचाही या वर्गांत अंतर्भाव असतो. रोज युट्युब लाइव्ह द्वारे भाप्रवे नुसार सकाळ व संध्याकाळी हे वर्ग चालतात. सूचना सहजपणे समजतील अशा असतात व स्क्रीनवर पाहून आपण ते व्यायामप्रकार करू शकतो.
६ जानेवारीपासून तीन आठवडे या वर्गांचा नि:शुल्क लाभ घेता येईल - त्यासाठीचा दुवा.
या वर्गांना काही दिवस उपस्थिती लावल्यावर, असे वर्ग आपल्याला काही वर्षे अगोदर का नाही मिळाले अशी भावना आमच्यासह बहुतेकांच्या मनात निर्माण झाली आहे / होत असते.
ती साईट पाहिली. नोंदणी केली नाही.
उपक्रम आणि ओनलाइन आहे हे बरे.
काही शाळांत योगासने शिकवतात बहुतेक. आमच्या शाळेत शिकवली होती. पाचवी पासूनच . लहानपणी केली नाही तरी चालतात. कारण तेव्हा वाढते तरुण वय असते. पण नंतर कधी करायची झाल्यास छोट्या पुस्तिका विकत मिळतात त्या पाहिल्या की काही सोपी रोज करण्याची आसने दहा बारा आहेत ती करता येतात.
चीनमध्ये तिथल्या बागांत ( parks) ६०+, ८५+ वयोगटातील नागरिकांसाठी काही त्यांच्या पद्धतींचे व्यायाम प्रकार करणारे करवून घेणारे गट असतात. त्यांचे काही विडिओ मी मागे पाहिले होते ( dwtv channel documentaries बहुतेक.) त्यांचे व्यायाम प्रकारही खूप चांगले वाटले. विशेषतः शरीराची रोजची हालचाल करण्यासाठीचे ते सराव आहेत. वरील दोन वयोगटांच्या वयाप्रमाणे हालचालींचा वेग वेगळा दिसला.
इकडच्या काही बाबा लोकांचे योग प्रकार मला काही आवडले नाहीत. अतिरंजीत वाटले.
.......
वजन कमी करणे/ हालचालींसाठी सराव/ रोग नियंत्रण/ मानसिक समाधान शांती यांपैकी एक किंवा सर्व असा काही झोल योगासनांमध्ये घालण्याचा खटाटोप दिसतो हे माझे मत.
हरारीची मुलाखत रणवीरने घेतली.हरारी माझा आवडता विचारवंत आहे.तो भारतात नेक्सास' पुस्तक प्रकाशित करण्यासाठी आला होता.तेव्हा अनेकांना त्याच्याबरोबर मुलाखती घेतल्या.
१.
https://youtu.be/eNVtYPgJ6b0?si=3VfqDjCcx6_lYjk2
२.
https://youtu.be/6x4UgHI7qbk?si=_Iz_eP9HF7SYH-ZM
दुसरी मुलाखत अजून ऐकायची आहे.
पहिली मुलाखत रणवीरने घेतली आहे.AI हा हरारीचा १० वर्षांपूर्वी पासूनचा विषय आहे.जो AI वर वरचढ होईल तोच पुढच्या काळात जगावर राज्य करणारे.इथे रशिया,ट्रम्प यांचा वर्चस्ववादी भूमिकेचा त्याने चांगला समाचार घेतला आहे.अमेरिकासारख्या बलाढ्य देशाने,लीडरने जगाच्या शांततेचा विचार आधी केला पाहिजे तरच माणूसकी टिकेल असं त्यांचं म्हणणं आहे.रणवीरचा शो म्हटला की तो स्पिरिच्युलिटीवर समोरच्याला बोलायला लावणारच हे ठरलेलं आहे 😀 त्यात हरारी विपश्यनेचा साधक आहे. पण
हरारी म्हणतो कोणीही कोणाला दोन ,तीन तास ध्यानाला बसा हे म्हणणं सोपं आहे.पण पंधरा मिनिटे तरी केवळ स्वतःच्या आता बाहेर जाण्याऱ्या श्वासावर लक्ष केंद्रित करा.इतर कोणताच विचार डोक्यात आणायचा नाही,हे सांगितले तर कोणालाच हे फारसं जमणार नाही.यासाठी खुप तयारीच हवी.मेडिटेशन कसं करायचं, कोणतं करायचं हे ज्याचं त्यालाच ठरवू द्या.उगाच मेंढ्याचा कळप करण्यात अर्थ नाही.
युद्ध करावं की नाही याबाबत त्याचं मत मला गोलगोल वाटलं,आधी तो म्हणाला मिलिटरी वर ५०% हून अधिक खर्च चिंताजनक आहे नंतर म्हणाला इस्राएल आणि भारताने ज्या चुका रोमन व मुस्लिम+ब्रिटिश आक्रमणाच्या काळात सैन्य ताकद वाढवण्यावर भर देतात केली ती त्यांना आता करणे अजिबात परवडणारं नाही👏
मराठी किंवा कुणीही.
आंतरराष्ट्रीय मते राजकीय/ सामाजिक / धार्मिक ही नेहमी ती व्यक्ती कोणत्या डोक्यातली आहे त्याप्रमाणे एकांगीच असतात. विरुद्ध गटाचा साधा उल्लेखही नसतो. तर काहींची प्रसिद्ध केलेली व्यक्तव्ये त्यांच्या देशाच्या राजकीय दडपणाखालीही असतात.
पहिला काचेचा पूल
काल कन्याकुमारी, तमिळनाडू इथे असलेल्या विवेकानंद स्मारक आणि तिरुवल्लूवर पुतळा या दोन ठिकाणांमध्ये काचेचा पूल उभारला त्याचे उद्घाटन झाले.
hindustan times बातमी
खरडफळ्यावर विषय निघाला म्हणून.........
गुजरातचे सुंदर समुद्र किनारे आणि पर्यटन.
फार प्रचलित नाही तरीही थोडक्यात...
गुजरातध्ये {सूरतजवळच्या} हजिरा येथे आणि जामनगर येथे दोन मोठे रासायनिक प्रकल्प ( भारतीय कंपन्या, रिलायन्स) अगोदरच आहेत.
सूरतजवळच्या दहेज बंदरातून - घोघा पलिकडे जाऊन भावनगरला काही जण जातात. धार्मिक पर्यटन.
दीवचा किनारा पर्यटनासाठी आहे. तिथून वेरावळ - सोमनाथ आहे. पण धार्मिक महत्त्व आणि मासेमारी.
दमणचा किनारा काळा आहे. मासेमारी बोटींच्या डिझेलमुळे. जवळचा परिसर दारूबार आणि इतर इलेक्ट्रॉनिक्स मार्केटसाठी पूर्वी प्रसिद्ध होता. आता त्याचे महत्त्व उरले नाही. तरीही दमण- वापी- दादरा नगरहवेली- खानवेल ( गार्डन्स) अशी सहल होऊ शकते.
द्वारका पोरबंदर समुद्र -धार्मिक पर्यटन
अंकलेश्वर/अंकलेसर भरूच हे नर्मदा पर्यटनामुळे चर्चेत असते.
गुजरात - महाराष्ट्र सीमेजवळचे डहाणू आणि बोर्डी येथे हॉटेल्स खूप आहेत. डहाणू-जव्हार- त्र्यंबकेश्वर -नाशिक - सापूतारा असाही सहल प्लान होऊ शकतो.
गुजरात समुद्र किनारे थंडीतच ठीक. गरमा फार असतो. काही ठिकाणी रात्री चमकणाऱ्या लाटा दिसतात.
मुंबई पुणे पर्यटकांसाठी कोकण, गोवा, कर्नाटक समुद्रच बरा.
दमण- वापी- दादरा नगरहवेली- खानवेल ( गार्डन्स) अशी सहल होऊ शकते.
दमण किनारे घाणेरडे. केमिकल आणि वास. अस्वच्छ. हल्ली काही भाग बांधून चौपाटी केली आहे असे ऐकले पण एकूण समुद्र घाण. खूप इंडस्ट्रीज.
सिल्वासा कंटाळवाणे. सर्वसाधारण लहान शहर. उन्हाळ्यात तर अगदी नदी देखील कोरडी.
तिथली वाटेतली लायन सफारी केविलवाणी.
सापुतारा वगैरे हिल स्टेशन हा अधिक चांगला ऑप्शन आहे त्यापेक्षा.
सळसळत्या वाऱ्याने एखादा प्राजक्त थरथरावा आणि खालून जाणाऱ्या आपल्या तापल्या अंगावर गार दवबिंदूंचा पडलेला पाऊस हृदयाचे मधलेच चार ठोके चोरून जावा तशी अवस्था झालेली दिसते त्या आठवणींनी.
"आधी मद्य पिऊन मग कोणत्याही मार्केटमध्ये फिरायला मजाच येते."
असे 'कोणत्याही मार्केटमध्ये' हे दोन शब्द ठळक करायचे राहुन गेले काय 😀
नीळा, हिरवा, पिवळा, तांबडाच काय पण 'मृत' समुद्रही जर कौतुकास पात्र ठरत असतील तर बिचाऱ्या 'काळ्या' समुद्राने असे काय कोणाचे घोडे मारले आहे? ('काळ्याशार' गोष्टीही आकर्षक असु शकतात 😉) तेव्हा घ्यावी की त्याच्यावरही फिरायची मजा 😂
बाकी 'काळ्या' वरुन सहज सुचलं म्हणून...
काला रे सइयां काला रे
तन काला रे मन काला रे
काली जबान की काली गारी
काले दिन की काली शामें
सइयां करते जी कोल् बाज़ारी
काला रे सइयां काला रे
तन् काला रे मन काला रे
काली जबान की काली गारी
काले दिन की काली शामें
सइयां करते जी कोल् बाज़ारी
बैरी कोल् कोल् कोल्
छीने तोल तोल तोल
बैरी कोल् कोल्
छीने तोल तोल तोल
छत आँगन चार दिवारी
सइयां करते जी सइयां करते जी
सइयां करते जी सइयां करते जी
सइयां करते जी कोल् बाज़ारी
सइयां करते जी कोल् बाज़ारी
काली मिटटी कुत्ता काला
काला बिलकुल सुर्मे वाला
काला कौवा हौवा काला
काली मिटटी कुत्ता काला
काला बिलकुल सुर्मे वाला
काला कौवा हौवा काला
काला बादल गिरने वाला
काला मोती गिरने वाला
काला झंडा डण्डा कला
काला बटवा पैसा काला
काली आँखों जैसा काला
काली अग्नि
काली गर्मी सूरज काला
काला बीघा और गज काला
काली हाथी हाथी काला काला
बैरी कोल् कोल् कोल्
छीने तोल तोल तोल
बैरी कोल् कोल्
छीने होल से टोल
रंग पानी और पिचकारी
सइयां करते जी पिया करते जी
सइयां करते पिया करते जी
काला रे सइयां काला रे
तन काला रे मन्न काला रे
काली जबान की काली गारी
काले दिन की काली शामें
सइयां करते जी कोल् बाज़ारी
काला रे सइयां काला रे
तन काला रे मन्न काला रे
काली जबान की काली गारी
काले दिन की काली शामें
सइयां करते जी कोल् बाज़ारी.
स्नेहा खानवलकर ह्या गुणी संगीत दिग्दर्शिकेने संगीतबद्ध केलेल्या 'गँग्स ऑफ वासेपूर २' मधल्या काला रे ह्या गाण्यात गीतकार वरुण ग्रोवर ह्यांनी इतक्या काळ्या गोष्टींचा उल्लेख केलाय, पण बिचारा 'काळा समुद्र' मात्र त्यात घ्यायचा राहून गेला बघा... 😎
खरंतर गुजरातला समुद्र पर्यटनाला जाऊच नये. औद्योगिकरणावर गुजरातने खूप भर दिला. नवसारीपासून पुढे वरती. मुंबई बाजारपेठ जवळ पडते. सापुतारा जरी महाराष्ट्रातील पर्यटकांना आवडत असले ( नाशिक जवळ) तरी गुजरातींना आवडत नाही. त्यांचे आवडते माथेरान महाबळेश्वर पाचगणी.
मुंबई पुण्याला जवळची ठिकाणं पाहून झाल्यावर जरा बदल म्हणून दुसरीकडे काही आहे का याची चाचपणी करतात. पालघरच्य पश्चिमेला दहा किमीवर केळवे माहिम किनारा आहे. पालघर -मनोर - विक्रमगड- जव्हार- त्र्यंबकेश्वर - नाशिक या वाटेवर हल्ली 'गोवर्धन इको विलेज' मिनी वृंदावन ( इस्कॉनवाल्यांचं) हल्ली लोकप्रिय होत आहे. या मार्गावर बरीच रिसॉर्ट झाली आहेत. जव्हार मोखाडा भागातील वारली चित्रकला कमी होत आहे किंवा बाजारू होत आहे असं ऐकून आहे.
सहलीच्या आराखड्यात/ मार्गावर चार पाच ठिकाणे असणे फायद्याचं ठरतं . एखादं नाही आवडलं कुणाला तर दुसरं सहल यशस्वी करतं.
केळवे किनारा तर लोकांनी घाणीने कचऱ्याने भरून टाकलेला दिसला. अगदी गेल्या वर्षात काही बदल झाला असेल तर माहीत नाही. लोक तिथे पिकनिक सारखा कार्यक्रम करून, बसून खाऊन प्लास्टिक प्लेट्स, खरकटे, उर्वरित अन्न असे सर्व जागीच टाकून उठत होते. किनाऱ्यावर हागणदारी होती. पार्किंग शुल्क किंवा तत्सम शुल्क वगैरे वसुली अवश्य होत होती पण स्वच्छतेच्या दृष्टीने काही दिसले नाही. पेड टॉयलेट होते. तेही अस्वच्छ. आपले सामान्य नागरिक देखील एकूण स्वच्छतेचा सेन्स कमी असलेले आहेत असेच वाटते सगळीकडे.
हं.
नवीन अपडेट्स लक्षात ठेवायला हवेत.
बाकी प्रचेतसकुमार चांगल्या जागा शोधतात. पण काहीच उघड करतात. BNHS वालेही चांगल्या जागा सांगत सुटत नाहीत. फेसबुकाच्या भिंती भरल्या की लोंढे तिकडेच जातात. राजमाची, कास पठार, सांधण, हरिहर.
आपल्या सर्वांच्या माहितीतले मिपाकर लेखक 'कुमार१' हे काही कामानिमित्त मुंबईला येणार आहेत. त्या निमित्ताने सोमवार दिनांक ६ जानेवारी २०२५ रोजी संध्याकाळी ६ नंतर भायखळा येथे एक मिपा कट्टा करण्याचे ठरत आहे. सोमवारचा, म्हणजे कामकाजाचा दिवस असल्याने फार लांबुन कोणी येऊ शकणार नाहीत ह्याची कल्पना असल्यामुळे 'कट्ट्यासाठी' वेगळा धागा वगैरे काढलेला नाही, परंतु भायखळा परिसरात किंवा मुंबई उपनगरांत रहाणारे कोणी मिपाकर येऊ शकत असतील तर त्यांचे सहर्ष स्वागत आहे. (केवळ एकमेकांची सदिच्छा भेट आणि गप्पा-टप्पांचा कार्यक्रम एवढाच ह्या कट्ट्याचा मुळ उद्देश आहे 😀)
आणि आजोबा परत जिवंत झाले!
;)
लाखातून एखादा व्यक्ती इतका नशीबवान असू शकतो.हार्ट ॲटॅकमुळे मृत घोषित केलेल्या आजोबांचे शव रूग्णवाहिकेतून घरी नेताना रस्त्यावरील खड्ड्यांच्या धक्क्यामुळे आजोबांचे ह्रदय पुन्हा चालू झाले असावे.कारण नातवाला नंतर त्यांच्या हाताच्या बोटांची हालचाल दिसली.मग पुढील उपचाराला परत दुसऱ्या दवाखान्यात नेले.तर आजोबांच्या ह्रदयाचे ठोके दिसले.
देव तारी त्याला कोण मारी...
https://youtu.be/Y5Ap-dknaww?si=Ezn1IIWLjspCJ5Sl
या घटनेची नोंद घेत महाराष्ट्राच्या आरोग्य खात्याने सदर खड्ड्याचे मोजमाप करून तशाच प्रकारचे खड्डे विविध रस्त्यांवर पाडण्याचे नियोजन केलेले आहे. या खड्डा इफेक्टमुळे सीपीआर ची प्रोसिजर कालबाह्य होऊ शकते असे माझी आरोग्य सचिव माननीय डॉक्टर चंगावडकर श्रीपाद यांनी प्रतिपादित केले ! या नियोजित खड्ड्यांच्या कंत्राटांवरून आत्ताच वाद सुरू झालाय ! राजकीय नेते श्री अमुक प्रमुख यांनी या कंत्राटात बावीस कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला. आणि या प्रकरणाची चौकशी करावी अशी मागणी माननीय मुख्यमंत्री यांच्याकडे केली.
माथेरानमध्ये पर्यटक घोड्यावर बसून जात आहेत, काही जण मिनी ट्रेन पाहात आहेत, माकडे पर्यटकांच्या खाऊच्या पिशव्या हिसकावून घेत आहेत अशा माहितीवर Chatgpt ने काढलेलं चित्र.image
थोड्या चुका आहेत, अर्धवट कापली गेली आहेत दृष्य. तरी ठीकच.
उन्हाळी भटकंती.
काल एक भटकंती केली. खंडाळा घाटासाठी रेल्वे जिथून पळसधरी स्टेशनानंतर वर चढते त्या पहिल्या डोंगरात आहे सोनगिरी. ( मुंबईतील तरुण नवख्या ट्रेकरांचा पावसाळ्यातला आवडता ट्रेक. आणखी एक सोंडाई डोंगर माथेरानच्या चौक पाॅइंटच्या खाली आहे.) उन्हाळा सुरू झाला आहे, रान वाळले आहे तरी दुपारी बारा ते पाच तळापासून माथ्यापर्यंत (५०० मिटर्स) अतोनात डास होते. शांतपणे बसून डबासुद्धा खाता आला नाही.
या उलट मागचाच डोंगर राजमाचीचा. तिथे कधीच कुठेही डास नसतात. हे असं का?
वेरूळ दहाव्या लेण्यात किरणोत्सव..... लोकसत्ता बातमी.
https://youtu.be/2xX1I0EUcNk?si=Q7AHHpInuRYAN6Zc
असा दिसत असला तरी त्यासाठी लेण्या तशा बांधलेल्या नसाव्यात. वेरूळ लेण्या बहुशा पश्चिमाभिमुख आहेत त्यामुळे दुपारी वर्षातून दोनवेळा किरण आतापर्यंत येत असणारच.
आपली देवळं मुद्दामहून पूर्वाभिमुख बांधतात. काही पश्चिम दिशेला तोंड करून. तसं लेण्यांचं नाही. बौद्ध भिक्कुंना पावसाळ्यात विश्रांतीसाठी विहार आणि लेणी आणि चैत्य बांधण्यात ( खोदण्यात) आले होते. मूळ उद्देश हा होता.
विमान परत फिरवणे....
मागच्या आठवड्यात एक शिकागो ते दिल्ली विमान टॉयलेट्स तुंबल्याने परत शिकागोला नेले.
https://youtu.be/ZQemz_Enpxc?si=w1SuHw86alXZ6IiW
उड्डाणाचे फक्त चार तास उरले होते. मग वाटेत कुठे emergency landing या कामासाठी मिळत नसावेत का? किंवा ते देश अशि सर्विस देत नसतील?
माथेरान कालपासून बंद.
टॅक्सी, इ रिक्षा आणि घोडे वाले संपावर. कारण काय तर म्हणे पर्यटकांची फसवणूक करणारे विडिओ यूट्यूबवर आले. खरं कारण ... खाजगी वाहनाने येणारे पर्यटक वाढले आणि ते दस्तुरी नाक्यावरून शटल टॉय ट्रेन किंवा इ रिक्षांनी माथेरानच्या बाजार पर्यंत जातात. ते आठवड्यात कोणत्याही दिवशी येऊन जातात. हमाल, हॉटेल्स आणि घोडेवाल्यांचा धंधा जोरात चालतो. इ रिक्षा दहा आहेत. फक्त सुट्ट्या लागल्यावर येणारे पर्यटकच टॅक्सी घेतात. एकूण काय तर २७० टॅक्सी वाल्यांना धंधा मिळत नाही पण पर्यटक खूप येतात. नेरळ ते दस्तुरी नाका जाणारी एसटी मिनीबस ( पंचवीस रुपयांत) हीसुद्धा पोटदुखी आहे.
फसवणूक टॅक्सीवालेच करतात. खाजगी कार्यालयांना " आमच्या टॅक्सी नेच जा असा हेका धरतात किंवा पाचशे रुपये द्या असा दम भरतात. काही शहाणे टॅक्सी वाल्यांनी मात्र पन्नास रु सीटने धंधा सुरू ठेवला आहे. ( अधिकृत भाडे शंभर रु प्रती प्रवासी असे चारांचे चारशे रुपये घेतात. किंवा पूर्ण टॅक्सी खिडकीवर जाऊन बुक केल्यास ३६० रुपये लागतात.
आता प्रश्न असा आहे की टॅक्सीवाले आठवड्याच्या इतर दिवशी ओला/ उबेर/ वगैरेंनी संबंध का ठेवत नाहीत. कारण या साईट्स " मारुती इको" वाहन नको सांगतात. सर्व माथेरान टॅक्स्या याच प्रकारच्या आहेत.
माझा कालचा WhatsApp Status #LifeIsFunWithFriends&SohanlalTea ☕एका जिवलगाचा प्रतिसाद -
चहा आणी आणी ते सुद्धा संध्याकाळी 7 नंतर!
उन लागलं की काय वामन तुला ?
काळजी घे बाबा.
माझे उत्तर -
हमारे तेलंगाणा के लोओंका मालूम नै तुमारकू? सुब्बे उट्टे जब से रात को सोने तलक कब्बी बी चायाँ पीने कू रेडीच रैतें।
कल क्या वा मालूम? हमारे संजय बावा होर उनके इनो आये थे हमारे इधर म्हाराष्ट्रा सें ।
फिर Abits कु जाने के प्लानाँ बनायें।
तो मैं बोलूं, चलो बावा, कैसे बी उदर जारैं । तो व्हांपे सोहनलाल की चाय भोत सईं रैती, दूर दूर से लोआं आते पीनेकू। पीते, तुम्म?
तो उनो बोले, तुम इत्ता बोलरे तो कैकु नै पीते वामन राव?
फिर हम, हमारे इनो, बावा, बावा के इनो ऐसे चार जणां गए चायाँ पीनेकू।
अब तुमारकू तो मालूमिच हैं, वो चायाँ वायाँ पीने के शौकां तो अपुन नै पालते। फिर वो तीन जणां चायाँ पिए। भोत अच्चे है चायाँ बोले।
बोलके मई स्टेटसां लगायूँ।
अक्षय्य तृतीयेनिमित्त घराजवळच्या श्री वेंकटेश्वर स्वामी (बालाजी) मंदिरात सपत्नीक गेलो होतो. घरी आंब्याची पाने-झेंडूची फुले यांची तोरणे, देवांना ताजे हार,फुले, यथासांग पूजा, विशेष नैवेद्य हे झाले. गोडधोड जेवण आहे. श्री कृपेने प्रसन्न वाटते आहे.
गोविंदा गोविंदा गोऽविंदा!
मी हैदराबादला राहतो. घराजवळच्या (आम्ही लोकांनी बांधलेल्या) देवळात गेलो होतो.
यापूर्वी मेहकरच्या बालाजी मंदिरात गेलेलो आहे. तेथील बालाजीची मूर्ती खूप उंच आहे. बहुधा भारतभरातील सर्वात उंच मूर्ती असावी.
श्रीगुरुजी हा आइडी बॅन केल्याबद्दल मी तीव्र निषेध व्यक्त करतो. ज्या मोजक्या मिपाखरांमुळे मिसळपाववर वाचक येतात त्यांच्यापैकी एक हे श्रीगुरुजी होते.
हे लिहिण्याचा अधिकार मला आहे व हे लिहिल्यामुळे माझाच आइडी बॅन होणार नाही ही अपेक्षा.
जय हिंद.
---
हे मी खरडफळ्यावरही लिहिलं होतं; कायमची नोंद राहावी म्हणून इथे पुन्हा लिहीत आहे.
श्रीगुरुजी हे अनेकवेळा अभ्यासपूर्ण संदर्भासहित मांडणीणकरात होते हे खरे आहे.
काहीवेळा मतभेद असले तरी जेबकी स्वाभाविक आहे तरी त्यांची एकूण मांडणी व चर्चेला योगदान चांगलेच होते यात शंका नाही
अनेकदा माहीत नसलेले संदर्भ त्यांच्यामुळे माहिती होत होते.
मात्र वामनराव त्यांची भाषेची मर्यादा भंगलेली होती असेही दिसून येते.
त्यासाठी त्यांना समज देऊन संधी द्यायला हवी होती
असेच अमरेंद्र बाहुबली यांना देखील संधिं द्यायाला हवी होती.
असे उत्साहाने हिरीरीने चर्चा करणारे गेले तर त्याचे मला तरी नक्कीच वाईट वाटतें
सहज सुचलं म्हणून
( राजकारणसोडून छोट्या चर्चांसाठी)
इतिहास, पुस्तकं, पाककला आणि इतर विषयांची चर्चा खरडफळ्यावर होते आणि मोठमोठे माहितीपर प्रतिसाद खरडफळा साफ झाल्यावर गायब होतात. तर तसे होऊ नये म्हणून हा धागा सुरू करत आहे.
* आमच्या इथे एक पेपर आणि मासिके वाचनाचा एक मिनी ज्येष्ठ नागरिक कट्टा ( म्हणजे दोन बाकडी , कडाप्पा फरशी टाकून) सुरू झाला होता. परवा तिकडे एक पाटी वाचली आणि पुण्यात असल्यासारखं वाटलं. 'ज्येष्ठ नागरिक कट्टा' पाटीखाली 'राजकारण चर्चेसाठी नाही' असं लिहिलं होतं. हसू आलं. तर हा आपला धागाही राजकारण चर्चेसाठी नकोच असं ठरवलं. बघू असा चालतो.
छान कविता.
बा द वे निर्महला सिथारामन यांना पाठवायला हवी ही कविता.
कारण त्यांच्या घरी त्या कांदा वापरत नाही, त्यामुळे त्या त्यांच्या डोक्यातील बटाटे काढून, त्याचा त्या घरी बराच उपयोग करू शकतील.
छान कविता.
बा द वे निर्महला सिथारामन यांना पाठवायला हवी ही कविता.
कारण त्यांच्या घरी त्या कांदा वापरत नाही, त्यामुळे त्या त्यांच्या डोक्यातील बटाटे काढून, त्याचा त्या घरी बराच उपयोग करू शकतील.
बाटाट्याचे उपयोग
स्वयंपाकघरात गाल फुगवून बसला होता बटाटा
अंगावरल्या डोळ्यांनी मला पाहत होता ||
माझ्याशी बोलायला लागला तो जेव्हा
खरे नाही वाटले मला तेव्हा
तुम्हालाही वाटेल मी सांगे हा प्रसंग खोटा ||
"
खाण्यामध्ये उपयोग माझे आहेत खूप मोठे
तरी तुम्ही का बोलतात डोक्यात आहे कांदे बटाटे
नाकाने सोलाल कांदे तर आहे तुमचाच
तोटा ||
कांद्याचे वाढले ना रे बाजारी भाव
चढ्या दराने गंजले सारे रंकराव
आता मला आला आहे मान मोठा ||
कधीही मी कामी येई जेव्हा नसे भाजी ताजी
कोणत्याही भाजीत मिसळून जाण्या मी राजी
बहुगुणी असा सगळ्या भाज्यांत शहाणा मोठा ||
माझी करा रस्सा भाजी सुकी भाजी मटार बटाटा भाजी
किंवा करा मिक्
डिस्क्लेमर : सध्या आम्हाला फावला वेळ भरपूर असल्याने आणि ...... आणि....... आणि......... आणि........हा लेख टाकला आहे.आमच्या लेखात कुठलेही वैचारिक धन नसल्याने, विचारवंतांनी ह्या धाग्याकडे दुर्लक्ष करावे, टवाळांनी, टवाळांसाठी काढलेला हा टवाळ धागा आहे.
स्वातीजी, उत्तम पाककृती!
मेथी मलई मटर हा माझा अत्यंत आवडता पदार्थ आहे. एकंदरीतच मेथीची भाजी, वांग्याची भाजी हे माझे अत्यंत लाडके खाद्यपदार्थ आहेत...
स्वातीजी, मिसळपाववर आपल्याकडून आणीही अश्याच उत्तमोत्तम पाककृतींची अपेक्षा आहे. आपल्या पाककृतींमुळे मिसळपाव उत्तरोत्तर अधिक चविष्ट बनत राहो हीच शुभकामना..!
आपला,
(खादाड) तात्या.
दर आठवड्याला एक पाककृती देण्याचा उपक्रम चांगला आहे. मेथी मलई मटर तर उत्तमच जमलयं!
मेथीचा रंग जर तसाच ठेवायचा असेल तर अजून एक प्रकार करून बघता येईल. मेथीची पाने उकळत्या पाण्यात १-२ मिनिटे ठेवून लगेचच थडगार पाण्यात टाकायची. या पद्धतीला ब्लान्च म्हणतात. हेच पालकाबाबतही करता येईल.
आवडत असेल तर पनीरचे तुकडे किंचित तळून या भाजीत टाकता येतील. किंवा अगदी लहान बटाटे आधी उकडून मग थोडे तळून, अख्खेच टाकता येतील.
(खवैय्या) सुनील
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
परवा गावी (इंदूरला) लग्न कार्यासाठि जाउन आलो.
लग्नात खास माळवी बेत होता, दाल बाफल्यांचा.
दाल बाटी आणि दाल बाफल्यांमध्ये, दाल ही सामायीक आहे.
ही दाल पातळ अथवा फार घट्ट नसते, ती मध्यम असते. दाल ही तुर अथवा चण्याची असते. दालच्या जागी रतलामी शेवेची कांदा -टोमॅटो घातलेलि भाजी सुध्धा अप्रतीम लागते.
बाटी आणि बाफल्यातला फरक पुढील प्रमाणे:
बाटी:
माळवी गव्हाचे (अथवा उच्च प्रतीच्या गव्हाचे) पीठ आणि त्यात थोडे मक्याचे पीठ मिसळून घट्ट कणिक मळावी. मळताना साजुक तुपाचे भरपूर मोहन घालावे. ह्या कणकेचे मुठी एवढे गोळे करुन, ते गोवर्यांवर मंद पणे भाजले की बाटी तयार होते.
ही बाटी डाळीत अथवा साजुक तुपात कुस्करुन खातात. साजुक तुपात कुस्करताना काही लोक डाळि ऐवजी पीठी साखर ही मिसळतात.
बाफले:
माळवी गव्हाचे पीठ आणि त्यात थोडे मक्याचे पीठ मिसळून घट्ट कणिक मळावी. मळताना साजुक तुपाचे भरपूर मोहन घालावे. ह्या कणकेचे मुठी एवढे गोळे करुन ते पाण्यात उकळावेत. भरपूर उकळल्यावर ते पाण्यावर तरंगू लागतात.
ते तरंगू लागले की ते काढुन कोरडे करावेत. कोरडे झाल्यावर गोवर्यांवर मंदपणे भाजावेत.
हे बाफले बाटी प्रमाणे डाळीत अथवा साजुक तुपात कुस्करुन खातात. वरिल प्रमाणे साजुक तुप आणि पीठी साखरेत कुस्करुन बाफले खाणारे ही आहेत.
टीपः शहरात गोवरर्यांची भट्टी शक्य नसल्यांमुळे, साध्या ओव्हनचा (माइक्रो वेव नव्हे) उपयोग भाजण्यासाठी केला जातो.
संजय अभ्यंकर
ये आपने अच्छा नहीं किया, दाल-बाटी की याद जो दिलायी! (ती सुध्दा माझं जेवण सुरु असताना!!)
माझं मूळ गाव अहमदनगर (अवांतर - एकही काना, मात्रा, वेलांटी नसलेलं!). आपल्याला ऐकून माहिती असलं तर इथे मारवाडी समाजाची भरपूर वस्ती.
माझेही खूपसे मित्र मारवाडी. त्यांच्यातल्या लग्नात मी आवर्जून दाल-बाटी, साजूक तूप व पिठीसाखर घातलेली चापायला जायचा!
(बाफले हा प्रकार मात्र पहिल्यांदाच ऐकतोय.)
बर्याच वर्षात तो योग नाही. इकडे अमेरिकेत तर काय विचारायची सोयच नाही.
असो, त्यानिमित्ताने आठवणी तरी जागल्या. धन्यवाद!
चतुरंग
दाल बाटी / बाफल्याची पाककृती दिलीत हे चांगलेच! परंतु ती मेथी मलई मटर मध्ये देण्याऐवजी स्वतंत्रपणे दिली असतीत तर उत्तम झाले असते.
बाकी, मीदेखील दाल्-बाटी हा प्रकार इंदूरात खाल्ला होता बर्याच वर्षांपूर्वी. त्याची छान आठवण अजूनही जिभेवर आहे!
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
चतुरंगजी, सुनीलजी,
प्रतिक्रियां बद्दल आभार.
दाल बाटी / बाफले हा प्रकार चतुरंगजीनी सांगितल्या प्रमाणे मारवाडी समाजातही लोकप्रिय आहे.
ह्या पाकक्रुती, पश्चिम म.प्र., पूर्व राजस्थान ह्या भागांत प्रचलित आहेत.
संजय अभ्यंकर
स्वातीजी, उत्तम पाककृती!
मेथी मलई मटर हा माझा अत्यंत आवडता पदार्थ आहे. एकंदरीतच मेथीची भाजी, वांग्याची भाजी हे माझे अत्यंत लाडके खाद्यपदार्थ आहेत...
स्वातीजी, मिसळपाववर आपल्याकडून आणीही अश्याच उत्तमोत्तम पाककृतींची अपेक्षा आहे. आपल्या पाककृतींमुळे मिसळपाव उत्तरोत्तर अधिक चविष्ट बनत राहो हीच शुभकामना..!
आपला,
(खादाड) तात्या.
दर आठवड्याला एक पाककृती देण्याचा उपक्रम चांगला आहे. मेथी मलई मटर तर उत्तमच जमलयं!
मेथीचा रंग जर तसाच ठेवायचा असेल तर अजून एक प्रकार करून बघता येईल. मेथीची पाने उकळत्या पाण्यात १-२ मिनिटे ठेवून लगेचच थडगार पाण्यात टाकायची. या पद्धतीला ब्लान्च म्हणतात. हेच पालकाबाबतही करता येईल.
आवडत असेल तर पनीरचे तुकडे किंचित तळून या भाजीत टाकता येतील. किंवा अगदी लहान बटाटे आधी उकडून मग थोडे तळून, अख्खेच टाकता येतील.
(खवैय्या) सुनील
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
परवा गावी (इंदूरला) लग्न कार्यासाठि जाउन आलो.
लग्नात खास माळवी बेत होता, दाल बाफल्यांचा.
दाल बाटी आणि दाल बाफल्यांमध्ये, दाल ही सामायीक आहे.
ही दाल पातळ अथवा फार घट्ट नसते, ती मध्यम असते. दाल ही तुर अथवा चण्याची असते. दालच्या जागी रतलामी शेवेची कांदा -टोमॅटो घातलेलि भाजी सुध्धा अप्रतीम लागते.
बाटी आणि बाफल्यातला फरक पुढील प्रमाणे:
बाटी:
माळवी गव्हाचे (अथवा उच्च प्रतीच्या गव्हाचे) पीठ आणि त्यात थोडे मक्याचे पीठ मिसळून घट्ट कणिक मळावी. मळताना साजुक तुपाचे भरपूर मोहन घालावे. ह्या कणकेचे मुठी एवढे गोळे करुन, ते गोवर्यांवर मंद पणे भाजले की बाटी तयार होते.
ही बाटी डाळीत अथवा साजुक तुपात कुस्करुन खातात. साजुक तुपात कुस्करताना काही लोक डाळि ऐवजी पीठी साखर ही मिसळतात.
बाफले:
माळवी गव्हाचे पीठ आणि त्यात थोडे मक्याचे पीठ मिसळून घट्ट कणिक मळावी. मळताना साजुक तुपाचे भरपूर मोहन घालावे. ह्या कणकेचे मुठी एवढे गोळे करुन ते पाण्यात उकळावेत. भरपूर उकळल्यावर ते पाण्यावर तरंगू लागतात.
ते तरंगू लागले की ते काढुन कोरडे करावेत. कोरडे झाल्यावर गोवर्यांवर मंदपणे भाजावेत.
हे बाफले बाटी प्रमाणे डाळीत अथवा साजुक तुपात कुस्करुन खातात. वरिल प्रमाणे साजुक तुप आणि पीठी साखरेत कुस्करुन बाफले खाणारे ही आहेत.
टीपः शहरात गोवरर्यांची भट्टी शक्य नसल्यांमुळे, साध्या ओव्हनचा (माइक्रो वेव नव्हे) उपयोग भाजण्यासाठी केला जातो.
संजय अभ्यंकर
ये आपने अच्छा नहीं किया, दाल-बाटी की याद जो दिलायी! (ती सुध्दा माझं जेवण सुरु असताना!!)
माझं मूळ गाव अहमदनगर (अवांतर - एकही काना, मात्रा, वेलांटी नसलेलं!). आपल्याला ऐकून माहिती असलं तर इथे मारवाडी समाजाची भरपूर वस्ती.
माझेही खूपसे मित्र मारवाडी. त्यांच्यातल्या लग्नात मी आवर्जून दाल-बाटी, साजूक तूप व पिठीसाखर घातलेली चापायला जायचा!
(बाफले हा प्रकार मात्र पहिल्यांदाच ऐकतोय.)
बर्याच वर्षात तो योग नाही. इकडे अमेरिकेत तर काय विचारायची सोयच नाही.
असो, त्यानिमित्ताने आठवणी तरी जागल्या. धन्यवाद!
चतुरंग
दाल बाटी / बाफल्याची पाककृती दिलीत हे चांगलेच! परंतु ती मेथी मलई मटर मध्ये देण्याऐवजी स्वतंत्रपणे दिली असतीत तर उत्तम झाले असते.
बाकी, मीदेखील दाल्-बाटी हा प्रकार इंदूरात खाल्ला होता बर्याच वर्षांपूर्वी. त्याची छान आठवण अजूनही जिभेवर आहे!
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
चतुरंगजी, सुनीलजी,
प्रतिक्रियां बद्दल आभार.
दाल बाटी / बाफले हा प्रकार चतुरंगजीनी सांगितल्या प्रमाणे मारवाडी समाजातही लोकप्रिय आहे.
ह्या पाकक्रुती, पश्चिम म.प्र., पूर्व राजस्थान ह्या भागांत प्रचलित आहेत.
संजय अभ्यंकर
सुन्दर...
थोड्या सुचना -
मीठाऐवजी शेतामध्ये "खारा दवणा" मिळतो, तो वापरून बघा... सुन्दर चव येते. आम्ही कधी मीठ नाही वापरले (मी अलिबाग - सासवने चा रहिवासी आहे)
कोम्बडी ची पण अशीच पोपटी बनते... सविस्तर लिहीन
प्रशान्त
कोम्बडी ची पण अशीच पोपटी बनते... सविस्तर लिहीन
लवकर द्या !
अलिबाग भागात पावसाळ्यात शेतात जिताडा नावाचा मासा मिळतो. कधी खाल्ला आहे का?
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
खुप वेळा खाल्ला आहे जीताडा..
हा मासा शेतात, तळ्यात आणि खाडीत मिळतो. शेतातला "दि बेस्ट" त्यानन्तर तळ्यातला, नन्तर खाडीतला.
कापणीच्या वेळेला शेतकरी शेतात फक्त भाकरी घेऊन जातात, आणि शेतातला जीताडा पकडून तिथेच शिजऊन खातात....
प्रशान्त.
अलिबागला जाताना पोयनाड या गावात रस्त्यालगत एक फलक आहे .... "येथे जिताड्याची पिलले मिळतील." (तेथे पिलले असेच लिहिले आहे). महिन्यातुन एकदा तरी नागांवला जातो आणि जाता येता नित्यनेमाने गाडी हळू करुन हा फलक वाचतो. पोयनाडचे अलिकडे, शहाबाज येथे देखिल जिताड्यची पिल्ले मिळतात. अगदी बारमही ....
आपला,
बहुरंगी मिसळे
प्रोपायटर धुमाळ नावाचे गृहस्थ आहेत...आणि 'पिलले' हे पांढर्या अक्षरात लाल पाटीवर लिहिलं आहे...अलिबागला जाताना उजवीकडे आहे ते... पण पेण कडे येतांना जी पाटी आहे त्यावर व्यवस्थित पिल्ले असं लिहिलं आहे... :)
अधिक टीपा:
मी आत्ता माझ्या गावला नागांव येथे गेलो होतो. माझे एक स्नेही श्री. केळकर (रा. चौल) यांच्याकडे गेलो असता पोपटी कशी करतात हे बघण्याचा व खाण्याचा योग आला. तेंव्हाच ठरवलं मनोगत वर ही आगळी वेगळी डिश द्यायची.
अहो बहुरंगीशेठ, हे मिसळपाव आहे..मिसळपाव..विसलात की काय? का कापी पेश्ट करताना घोळ झाला.. काळजी घ्या..ह.घ्या..
बाकी पाककृती उत्तम..
(दक्ष)केशवसुमार
अहो बहुरंगीशेठ, हे मिसळपाव आहे..मिसळपाव..विसलात की काय? का कापी पेश्ट करताना घोळ झाला.. काळजी घ्या..ह.घ्या..
अरे केशवा, चालायचंच! आपल्या मिपाला कापीपेस्टचं वावडं नाही! उद्या बहुरंगीदादांना मिपाबद्दल अधिक प्रेम उत्पन्न झाल्यास ते प्रथम मिपावरच लेखन करू लागतील! :)
बाकी, पोपटीची पाककृती खरंच आगळीवेगळी आणि उत्तम आहे हो! गेल्याच वर्षी पाली-सुधागड येथे शेतात पोपटी खाल्ली होती!
यावर्षी, अजून योग नाही...
तात्या.
अहो केशवसुमार शेठ,
आपलं म्हणणं मला अगदी पटलं. २ वर्षांपूर्वी हिच "पोपटी" मी मनोगतावर टाकली होती. कदाचित अजुनही तिथे तुम्हाला सापडेल. मनोगतावर मि फार काही लेखन केल नव्हतं. जे काही केलं होतं ते माझ्या संग्रही आहे. सध्या वालांचा सिझन आहे, त्यामुळे मिपावल्यांना लवकरात लवकर हि पाककृती वाचावयास मिळावी हा उद्देश. त्यात हा तुम्ही म्हणता तो "कापी पेश्ट" चा घोळ झाला खरे. घाई घाईने एकात दुसरं मिसळलं जायचच....
आणि अजुन एक .... शेठ असं काही म्हणू नका ...
अरे तात्या .... हि शेठ, साहेब, राव सगळी अडाण**** भानगड संपव रे एकदा ....
आपला,
बहुरंगी मिसळे
पोपटी हा खास जिव्हाळ्याचा पदार्थ! पोपटीशिवाय माझी एकही थंडी सरली नाही! :) (खरंतर भारतात असेपर्यंत नव्हती.. :( )
बहुरंगी, इथे हा पदार्थ दिल्याबद्दल अनेक आभार.
महत्वाची सुचना: :-) पोपटी हा केवळ खाद्यपदार्थ नसून तो कौटुंबिक सोहोळा आहे. तेव्हा घरी करण्याचा हा पदार्थ नसून हा कार्यक्रम किमान १० लोकांनी एकत्र येऊन मस्तपैकी अंगणात/परसात करावा. १-२बीएचके मधे होणारी हि साधीसुधी डिश नव्हे. याची ऐट आणि जिव्हाळा वेगळाच! जितकी मंडळी अधिक तितका हा पदार्थ रुचकर लागतो.
अजुन काहि:
१. भांबुर्डीचा पाला या काळात मुबलक असतो. कोणत्याहि मैदानात गेलात तर मिळेल. बाजारात जो विकायला येतो तो जून असतो.
२. बटाटे व कांदे जितके छोटे तितके रुचकर. पण बेबी पोटॅटोज आणि बेबी ओनियन्स नावाचे जे बेचव संकरीत खाद्य आलं आहे ते मात्र वापरू नका. एकवेळ मोठे बटाटे /कांदे चालतील पण हे बेबीवाले कृत्रिम नकोत
३. पोपटीमधले रताळे, अळूचे मुळ इं कंदही उत्तम लागतात
४. पोपटीच्या शेकोटीत नारळ टाकावा. छान खरपूस खोबरे कोणाला आवडत नाहि :)
५. कृपया शेकोटीसाठी रॉकेल वापरू नये. केवळ सुकापाला, गोवर्या, सुक्या झावळ्या वगैरे वापराव्या. वारा असेल तर फुंकणीने ज्वाळ तयार करावा. रॉकेलने पोपटीला एक वेगळा दर्प येतो.
(पोपटी आवडणारा) ऋषिकेश
पोपटी पाककृती पहिल्यांदाच वाचली. पाहणे तर दुर आणि खाणे तर कितीतरी मैलावर :(
पण, अनेकांनी एकत्र येऊन खाण्यासाठी इंजॉय करायचा पदार्थ इतकेच कळले. :)
आमच्या मराठवाड्यात याला दुसरे नाव तर नाही ना ?
पण, आपण म्हणता त्या प्रमाणे पोपटी वाचण्यात सुद्धा मजा वाटली !!!
हुरडा व पोपटी या खाद्यपदार्थांमध्ये जमीन आस्मानचा फरक आहे. हो मात्र, कौटुंबिक खाद्य सोहळा म्हणत असाल तर ऋणानुबंध आहेत असे मानायला हरकत नाहीत. जानेवारीचा महिना म्हणजे तर हुरड्याचा खास हंगाम... त्यातही कुचकुचीचा मऊ-मऊ अन रुचकर हुरडा आणि लसणातल्या खमंग चटण्या.... हातभर जीभ बाहेर आली आठवणीने. ;)
आपला,
(बीड जिल्ह्यातला खेडवळ) भास्कर
पोपटी शेतातच करावी. आमच्याकडे शेतात "खळ" करतात (शेणाने सारवून), त्यावरच पोपटी करायची. तिथे बसून पोपटी करण्यात आणि खाण्यात मजा काही औरच असते.
सोबत चोरलेली "नीरा" असेल तर मस्त!!. अलिबाग भागात जी नीरा मिळते ती शिन्दी पासून बनवतात. ती चोरण्याची पण एक कला आहे. सन्ध्याकाळी साधारण ७:३० - ८:०० ला त्या झाडान्जवळ जायचे, मडकी लटकवलेली असतात. ताडीवाले त्या मडक्यात आगोदरच पाणी भरून ठेवतात, ते ओतुन द्यायचे, नन्तर पोपटी लावून झाली कि परत त्या झाडान्जवळ जाउन ताडी घेउन यायचे. चान्गली वेळः १२:०० ते १२:३० रात्रो.. शुद्ध नीरा मिळते.
प्रशान्त
पोपटीच्या कथा कुटुंबात वाड-वडीलांकडून ऐकल्या होत्या पण प्रत्यक्ष खाण्याचा योग काही आला नाही. वर्णन वाचून आनंद झाला, तेवढेच समाधान !
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
बहुरंगी,
ही पाककृती मी प्रथमच वाचली. खरं सांगायच तर, मला माहीती ही नव्हतं की अशी काही पाककृती असते ते. कदाचित सारवलेल्या जमिनीशी फारच कमी संबंध आल्यामुळेही असेल. पण वाचून सुद्धा खूप मजा आली.
कधी गेले अलिबागला तर बघू. तसे अलिबागला कोणीही नाही माझे. आता मिपा करांपैकी कोणी असेल अलिबागचे, तर मला पोपटी खाण्यासाठी जरूर बोलवा...
- प्राजु.
बहुरंगी,
तुमची ही पाकक्रुती बहुरंगी आणि बहुढंगी आहे.
मस्त शेतात बसून खाण्यात काही ओरच मजा.
आम्ही आमच्या शेतात हुरडा (जोंधळ्याचा) खातो. पुढ्च्या वेळी पाहु जमते का अशी पाकक्रुती करायला.
मि.पा. वरील पोपटी चाहत्यास,
पोपटी हा एकत्र बसुन खाण्याचा आणि एंजॉय करण्याचा सोहळा आहे.
होळीच्या सुमारास एकदम मस्त सिझन. या वर्षी बेत करत असाल तर मी अलीबाग जवळ चोंढी येथे रहातो. एक रात्र बेत करा. साधी आणि कोंबडीची अशा दोन्ही पोपट्या अरेंज करूया.
माझा मोबाईल नं . : ९८२२२४८४७१
हे लई बेस बघा केशवराव.
हे तुम्ही समस्त मि.पा. वरील पोपटिच्या चाहत्यांना आमंत्रण दिलंत मन भरून आलं.
दिवास्वप्न दिसायला लगलीत, की मी शेतातल्या बांधावर बसून पोपटी लावते आहे, समोर भट्टी चालू आहे. स्वाती हुरडा बनवते आहे. तात्या, गात आहेत. वा वा वा..
- प्राजु
प्राजू,
माझंही दिवास्वप्न तुझ्याप्रमाणेच आहे परंतु त्यात,
की मी शेतातल्या बांधावर बसून पोपटी लावते आहे, समोर भट्टी चालू आहे. स्वाती हुरडा बनवते आहे. तात्या, गात आहेत. वा वा वा..
हे वाक्य,
की मी शेतातल्या बांधावर बसून पोपटी लावतो आहे, समोर भट्टी चालू आहे. स्वाती हुरडा बनवते आहे. प्राजू, गाते आहे. वा वा वा..
असे वाचावे...:)
आपला,
(न्हाणीघरातला गायक!) तात्या.
अवांतर - बाथरुम सिंगर या युजेबल मराठीचं 'न्हाणीघरातला गायक' हे शुद्ध मराठी आहे! :)
अहो, तात्या, ती पोपटीची पार्टी म्हणजे शेतातली मैफिल जमवायची आहे.. लोकांना पळवून नाही लावायचं.. त्यामुळे न्हाणीघरातले असले तरी गायन तुमचेच हवे. :)))
- प्राजु
माझ्या वसई मधल्या मित्राकढून आणखीन माहिती मिळाली ती खाली देत आहे
----------------------------------------------------------
वसई मध्ये ह्या पाककृतीला "उकड हंडी" म्हणतात.
ह्यात मडक्याला आतून केळीची पाने लावतात.
शेवग्याच्या शेंगांचे तुकडे, शहाळ्या मधली मलई पण टाकतात.
बर्यापैकी तेल पण ओततात.
अस॑ वाटतय आता जावे गावी आणि पोपटी खावी.
असाच आणखी एक पदार्थ म्हणजे 'ह॑डी खिचडी'.
मातीच्या ह॑ड्यात डाळ्,ता॑दूळ् ,पाणी व गा़जर्,वा॑गी,फरसबी,का॑दा,बटाटा,वाल चिरून घालावे.
वरून फोडणी द्यावी. हवा तस॑ तिखट ,काळा मसाला घालावा.
मडके चूलीवर थेवून कणिकेने त्याचे तोन्ड ब॑द करावे.
लो॑णच॑, भाकरी आणि वा॑ग्याच्या भाजीबरोबर खावे.
मातीच्या ह॑ड्यात डाळ्,ता॑दूळ् ,पाणी व गा़जर्,वा॑गी,फरसबी,का॑दा,बटाटा,वाल चिरून घालावे.
वरून फोडणी द्यावी. हवा तस॑ तिखट ,काळा मसाला घालावा.
मडके चूलीवर थेवून कणिकेने त्याचे तोन्ड ब॑द करावे.
लो॑णच॑, भाकरी आणि वा॑ग्याच्या भाजीबरोबर खावे.
अहो दीपांजलीताई, हे असे काहीतरी लिहून का उगाच अन्याय करता आहात आमच्यावर? अहो हे नुसते वाचणे देखील सहन होत नाही हो! :)
आपला,
(हावरट) तात्या.
पोपटी नावाचा कोकणात मी खाल्लेला पदार्थ याच जातकुळीचा होता. पण तेथे कांदे बटाटे कापून घेण्याची प्रथा नाही. तसेच पोपटी मधे घालावे. मडके मात्र तोंड पक्के बांधून उलटे ठेवण्याची प्रथा तिथे आहे. त्यामुळे अजून खरपूस पोपटी होते अशी समाजमान्यता आहे.
टीप: अशी ही पोपटी मी खारेपाटण ते कणकवली या पट्ट्यात खाल्ली आहे.
(सामाजिक पोपटि खाणारा)
-धन्या.
पुण्याचे पेशवे
सुन्दर...
थोड्या सुचना -
मीठाऐवजी शेतामध्ये "खारा दवणा" मिळतो, तो वापरून बघा... सुन्दर चव येते. आम्ही कधी मीठ नाही वापरले (मी अलिबाग - सासवने चा रहिवासी आहे)
कोम्बडी ची पण अशीच पोपटी बनते... सविस्तर लिहीन
प्रशान्त
कोम्बडी ची पण अशीच पोपटी बनते... सविस्तर लिहीन
लवकर द्या !
अलिबाग भागात पावसाळ्यात शेतात जिताडा नावाचा मासा मिळतो. कधी खाल्ला आहे का?
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
खुप वेळा खाल्ला आहे जीताडा..
हा मासा शेतात, तळ्यात आणि खाडीत मिळतो. शेतातला "दि बेस्ट" त्यानन्तर तळ्यातला, नन्तर खाडीतला.
कापणीच्या वेळेला शेतकरी शेतात फक्त भाकरी घेऊन जातात, आणि शेतातला जीताडा पकडून तिथेच शिजऊन खातात....
प्रशान्त.
अलिबागला जाताना पोयनाड या गावात रस्त्यालगत एक फलक आहे .... "येथे जिताड्याची पिलले मिळतील." (तेथे पिलले असेच लिहिले आहे). महिन्यातुन एकदा तरी नागांवला जातो आणि जाता येता नित्यनेमाने गाडी हळू करुन हा फलक वाचतो. पोयनाडचे अलिकडे, शहाबाज येथे देखिल जिताड्यची पिल्ले मिळतात. अगदी बारमही ....
आपला,
बहुरंगी मिसळे
प्रोपायटर धुमाळ नावाचे गृहस्थ आहेत...आणि 'पिलले' हे पांढर्या अक्षरात लाल पाटीवर लिहिलं आहे...अलिबागला जाताना उजवीकडे आहे ते... पण पेण कडे येतांना जी पाटी आहे त्यावर व्यवस्थित पिल्ले असं लिहिलं आहे... :)
अधिक टीपा:
मी आत्ता माझ्या गावला नागांव येथे गेलो होतो. माझे एक स्नेही श्री. केळकर (रा. चौल) यांच्याकडे गेलो असता पोपटी कशी करतात हे बघण्याचा व खाण्याचा योग आला. तेंव्हाच ठरवलं मनोगत वर ही आगळी वेगळी डिश द्यायची.
अहो बहुरंगीशेठ, हे मिसळपाव आहे..मिसळपाव..विसलात की काय? का कापी पेश्ट करताना घोळ झाला.. काळजी घ्या..ह.घ्या..
बाकी पाककृती उत्तम..
(दक्ष)केशवसुमार
अहो बहुरंगीशेठ, हे मिसळपाव आहे..मिसळपाव..विसलात की काय? का कापी पेश्ट करताना घोळ झाला.. काळजी घ्या..ह.घ्या..
अरे केशवा, चालायचंच! आपल्या मिपाला कापीपेस्टचं वावडं नाही! उद्या बहुरंगीदादांना मिपाबद्दल अधिक प्रेम उत्पन्न झाल्यास ते प्रथम मिपावरच लेखन करू लागतील! :)
बाकी, पोपटीची पाककृती खरंच आगळीवेगळी आणि उत्तम आहे हो! गेल्याच वर्षी पाली-सुधागड येथे शेतात पोपटी खाल्ली होती!
यावर्षी, अजून योग नाही...
तात्या.
अहो केशवसुमार शेठ,
आपलं म्हणणं मला अगदी पटलं. २ वर्षांपूर्वी हिच "पोपटी" मी मनोगतावर टाकली होती. कदाचित अजुनही तिथे तुम्हाला सापडेल. मनोगतावर मि फार काही लेखन केल नव्हतं. जे काही केलं होतं ते माझ्या संग्रही आहे. सध्या वालांचा सिझन आहे, त्यामुळे मिपावल्यांना लवकरात लवकर हि पाककृती वाचावयास मिळावी हा उद्देश. त्यात हा तुम्ही म्हणता तो "कापी पेश्ट" चा घोळ झाला खरे. घाई घाईने एकात दुसरं मिसळलं जायचच....
आणि अजुन एक .... शेठ असं काही म्हणू नका ...
अरे तात्या .... हि शेठ, साहेब, राव सगळी अडाण**** भानगड संपव रे एकदा ....
आपला,
बहुरंगी मिसळे
पोपटी हा खास जिव्हाळ्याचा पदार्थ! पोपटीशिवाय माझी एकही थंडी सरली नाही! :) (खरंतर भारतात असेपर्यंत नव्हती.. :( )
बहुरंगी, इथे हा पदार्थ दिल्याबद्दल अनेक आभार.
महत्वाची सुचना: :-) पोपटी हा केवळ खाद्यपदार्थ नसून तो कौटुंबिक सोहोळा आहे. तेव्हा घरी करण्याचा हा पदार्थ नसून हा कार्यक्रम किमान १० लोकांनी एकत्र येऊन मस्तपैकी अंगणात/परसात करावा. १-२बीएचके मधे होणारी हि साधीसुधी डिश नव्हे. याची ऐट आणि जिव्हाळा वेगळाच! जितकी मंडळी अधिक तितका हा पदार्थ रुचकर लागतो.
अजुन काहि:
१. भांबुर्डीचा पाला या काळात मुबलक असतो. कोणत्याहि मैदानात गेलात तर मिळेल. बाजारात जो विकायला येतो तो जून असतो.
२. बटाटे व कांदे जितके छोटे तितके रुचकर. पण बेबी पोटॅटोज आणि बेबी ओनियन्स नावाचे जे बेचव संकरीत खाद्य आलं आहे ते मात्र वापरू नका. एकवेळ मोठे बटाटे /कांदे चालतील पण हे बेबीवाले कृत्रिम नकोत
३. पोपटीमधले रताळे, अळूचे मुळ इं कंदही उत्तम लागतात
४. पोपटीच्या शेकोटीत नारळ टाकावा. छान खरपूस खोबरे कोणाला आवडत नाहि :)
५. कृपया शेकोटीसाठी रॉकेल वापरू नये. केवळ सुकापाला, गोवर्या, सुक्या झावळ्या वगैरे वापराव्या. वारा असेल तर फुंकणीने ज्वाळ तयार करावा. रॉकेलने पोपटीला एक वेगळा दर्प येतो.
(पोपटी आवडणारा) ऋषिकेश
पोपटी पाककृती पहिल्यांदाच वाचली. पाहणे तर दुर आणि खाणे तर कितीतरी मैलावर :(
पण, अनेकांनी एकत्र येऊन खाण्यासाठी इंजॉय करायचा पदार्थ इतकेच कळले. :)
आमच्या मराठवाड्यात याला दुसरे नाव तर नाही ना ?
पण, आपण म्हणता त्या प्रमाणे पोपटी वाचण्यात सुद्धा मजा वाटली !!!
हुरडा व पोपटी या खाद्यपदार्थांमध्ये जमीन आस्मानचा फरक आहे. हो मात्र, कौटुंबिक खाद्य सोहळा म्हणत असाल तर ऋणानुबंध आहेत असे मानायला हरकत नाहीत. जानेवारीचा महिना म्हणजे तर हुरड्याचा खास हंगाम... त्यातही कुचकुचीचा मऊ-मऊ अन रुचकर हुरडा आणि लसणातल्या खमंग चटण्या.... हातभर जीभ बाहेर आली आठवणीने. ;)
आपला,
(बीड जिल्ह्यातला खेडवळ) भास्कर
पोपटी शेतातच करावी. आमच्याकडे शेतात "खळ" करतात (शेणाने सारवून), त्यावरच पोपटी करायची. तिथे बसून पोपटी करण्यात आणि खाण्यात मजा काही औरच असते.
सोबत चोरलेली "नीरा" असेल तर मस्त!!. अलिबाग भागात जी नीरा मिळते ती शिन्दी पासून बनवतात. ती चोरण्याची पण एक कला आहे. सन्ध्याकाळी साधारण ७:३० - ८:०० ला त्या झाडान्जवळ जायचे, मडकी लटकवलेली असतात. ताडीवाले त्या मडक्यात आगोदरच पाणी भरून ठेवतात, ते ओतुन द्यायचे, नन्तर पोपटी लावून झाली कि परत त्या झाडान्जवळ जाउन ताडी घेउन यायचे. चान्गली वेळः १२:०० ते १२:३० रात्रो.. शुद्ध नीरा मिळते.
प्रशान्त
पोपटीच्या कथा कुटुंबात वाड-वडीलांकडून ऐकल्या होत्या पण प्रत्यक्ष खाण्याचा योग काही आला नाही. वर्णन वाचून आनंद झाला, तेवढेच समाधान !
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
बहुरंगी,
ही पाककृती मी प्रथमच वाचली. खरं सांगायच तर, मला माहीती ही नव्हतं की अशी काही पाककृती असते ते. कदाचित सारवलेल्या जमिनीशी फारच कमी संबंध आल्यामुळेही असेल. पण वाचून सुद्धा खूप मजा आली.
कधी गेले अलिबागला तर बघू. तसे अलिबागला कोणीही नाही माझे. आता मिपा करांपैकी कोणी असेल अलिबागचे, तर मला पोपटी खाण्यासाठी जरूर बोलवा...
- प्राजु.
बहुरंगी,
तुमची ही पाकक्रुती बहुरंगी आणि बहुढंगी आहे.
मस्त शेतात बसून खाण्यात काही ओरच मजा.
आम्ही आमच्या शेतात हुरडा (जोंधळ्याचा) खातो. पुढ्च्या वेळी पाहु जमते का अशी पाकक्रुती करायला.
मि.पा. वरील पोपटी चाहत्यास,
पोपटी हा एकत्र बसुन खाण्याचा आणि एंजॉय करण्याचा सोहळा आहे.
होळीच्या सुमारास एकदम मस्त सिझन. या वर्षी बेत करत असाल तर मी अलीबाग जवळ चोंढी येथे रहातो. एक रात्र बेत करा. साधी आणि कोंबडीची अशा दोन्ही पोपट्या अरेंज करूया.
माझा मोबाईल नं . : ९८२२२४८४७१
हे लई बेस बघा केशवराव.
हे तुम्ही समस्त मि.पा. वरील पोपटिच्या चाहत्यांना आमंत्रण दिलंत मन भरून आलं.
दिवास्वप्न दिसायला लगलीत, की मी शेतातल्या बांधावर बसून पोपटी लावते आहे, समोर भट्टी चालू आहे. स्वाती हुरडा बनवते आहे. तात्या, गात आहेत. वा वा वा..
- प्राजु
प्राजू,
माझंही दिवास्वप्न तुझ्याप्रमाणेच आहे परंतु त्यात,
की मी शेतातल्या बांधावर बसून पोपटी लावते आहे, समोर भट्टी चालू आहे. स्वाती हुरडा बनवते आहे. तात्या, गात आहेत. वा वा वा..
हे वाक्य,
की मी शेतातल्या बांधावर बसून पोपटी लावतो आहे, समोर भट्टी चालू आहे. स्वाती हुरडा बनवते आहे. प्राजू, गाते आहे. वा वा वा..
असे वाचावे...:)
आपला,
(न्हाणीघरातला गायक!) तात्या.
अवांतर - बाथरुम सिंगर या युजेबल मराठीचं 'न्हाणीघरातला गायक' हे शुद्ध मराठी आहे! :)
अहो, तात्या, ती पोपटीची पार्टी म्हणजे शेतातली मैफिल जमवायची आहे.. लोकांना पळवून नाही लावायचं.. त्यामुळे न्हाणीघरातले असले तरी गायन तुमचेच हवे. :)))
- प्राजु
माझ्या वसई मधल्या मित्राकढून आणखीन माहिती मिळाली ती खाली देत आहे
----------------------------------------------------------
वसई मध्ये ह्या पाककृतीला "उकड हंडी" म्हणतात.
ह्यात मडक्याला आतून केळीची पाने लावतात.
शेवग्याच्या शेंगांचे तुकडे, शहाळ्या मधली मलई पण टाकतात.
बर्यापैकी तेल पण ओततात.
अस॑ वाटतय आता जावे गावी आणि पोपटी खावी.
असाच आणखी एक पदार्थ म्हणजे 'ह॑डी खिचडी'.
मातीच्या ह॑ड्यात डाळ्,ता॑दूळ् ,पाणी व गा़जर्,वा॑गी,फरसबी,का॑दा,बटाटा,वाल चिरून घालावे.
वरून फोडणी द्यावी. हवा तस॑ तिखट ,काळा मसाला घालावा.
मडके चूलीवर थेवून कणिकेने त्याचे तोन्ड ब॑द करावे.
लो॑णच॑, भाकरी आणि वा॑ग्याच्या भाजीबरोबर खावे.
मातीच्या ह॑ड्यात डाळ्,ता॑दूळ् ,पाणी व गा़जर्,वा॑गी,फरसबी,का॑दा,बटाटा,वाल चिरून घालावे.
वरून फोडणी द्यावी. हवा तस॑ तिखट ,काळा मसाला घालावा.
मडके चूलीवर थेवून कणिकेने त्याचे तोन्ड ब॑द करावे.
लो॑णच॑, भाकरी आणि वा॑ग्याच्या भाजीबरोबर खावे.
अहो दीपांजलीताई, हे असे काहीतरी लिहून का उगाच अन्याय करता आहात आमच्यावर? अहो हे नुसते वाचणे देखील सहन होत नाही हो! :)
आपला,
(हावरट) तात्या.
पोपटी नावाचा कोकणात मी खाल्लेला पदार्थ याच जातकुळीचा होता. पण तेथे कांदे बटाटे कापून घेण्याची प्रथा नाही. तसेच पोपटी मधे घालावे. मडके मात्र तोंड पक्के बांधून उलटे ठेवण्याची प्रथा तिथे आहे. त्यामुळे अजून खरपूस पोपटी होते अशी समाजमान्यता आहे.
टीप: अशी ही पोपटी मी खारेपाटण ते कणकवली या पट्ट्यात खाल्ली आहे.
(सामाजिक पोपटि खाणारा)
-धन्या.
पुण्याचे पेशवे
फेब्रुवारी ११-२० च्या दरम्यान पुण्यात कट्टा करुया का ?
In reply to फेब्रुवारी ११-२० च्या दरम्यान पुण्यात कट्टा करुया का ? by चित्रगुप्त
डोंबिवली येथे यायला जमेल का?
In reply to डोंबिवली येथे यायला जमेल का? by मुक्त विहारि
क्यूं
In reply to क्यूं by कंजूस
उजव्या मांडीचे हाड मोडले आहे.
In reply to उजव्या मांडीचे हाड मोडले आहे. by मुक्त विहारि
काळजी घ्या
पुणे बुक फेस्टिवल २०२४
In reply to पुणे बुक फेस्टिवल २०२४ by Bhakti
वाचन ही शांत वातावरणात
In reply to वाचन ही शांत वातावरणात by रामचंद्र
वाचन ही शांत वातावरणात चालणारी प्रक्रिया आहे
In reply to पुणे बुक फेस्टिवल २०२४ by Bhakti
झक्कास परवणी!
In reply to पुणे बुक फेस्टिवल २०२४ by Bhakti
#वाचालतरआनंदीहोणार
In reply to पुणे बुक फेस्टिवल २०२४ by Bhakti
वाचाल तर आनंदी होणार
In reply to पुणे बुक फेस्टिवल २०२४ by Bhakti
वाचाल तर आनंदी होणार
अरे वा! पुस्तक प्रदर्शन गाजलं
In reply to अरे वा! पुस्तक प्रदर्शन गाजलं by कंजूस
सॉरी,माझी भयानक डिक्शनरी ;) =
खरं आहे,अशा मोठ्या प्रदर्शनात खुप पुस्तकं पाहायला ,चाळायला मिळतात हे महत्त्वाचे.माझा पुस्तक घेण्यासाठी हव्यास होता त्यामुळे बजेट संपल्यावर पुस्तक फक्त पाहण्याचं ऑड वाटू लागले.पुढच्यावेळी जरा याबाबत सतर्क राहीन ;) होय लेकीसाठी हळूहळू एम एच १२ केंद्रबिंदू (पर्वणी) तयार करणार आहे!In reply to सॉरी,माझी भयानक डिक्शनरी ;) = by Bhakti
अप्पा बळवंत चौक... पुणे...
In reply to अप्पा बळवंत चौक... पुणे... by मुक्त विहारि
अंतरजालावरून सुद्धा घरपोच येतात.
महत्त्वपूर्ण लेखः दारूचा पहिला प्याला पिण्यापूर्वी हे वाचा
In reply to महत्त्वपूर्ण लेखः दारूचा पहिला प्याला पिण्यापूर्वी हे वाचा by श्रीरंग_जोशी
उपयोगी दुवा.
In reply to महत्त्वपूर्ण लेखः दारूचा पहिला प्याला पिण्यापूर्वी हे वाचा by श्रीरंग_जोशी
अरेरे. उशीर झाला.
In reply to महत्त्वपूर्ण लेखः दारूचा पहिला प्याला पिण्यापूर्वी हे वाचा by श्रीरंग_जोशी
पहिला प्याला १९८० मार्च...
In reply to पहिला प्याला १९८० मार्च... by कर्नलतपस्वी
बरोबर.
In reply to बरोबर. by कंजूस
पंकज उधास......
In reply to पंकज उधास...... by कर्नलतपस्वी
कौन कहता.....
In reply to बरोबर. by कंजूस
पोषणमूल्य समानच असते मग फरक काय असतो?
In reply to महत्त्वपूर्ण लेखः दारूचा पहिला प्याला पिण्यापूर्वी हे वाचा by श्रीरंग_जोशी
सर्व विषे कमी प्रमाणात औषधेच
आशिष बुक स्टॉल
In reply to आशिष बुक स्टॉल by कंजूस
वाचनालयांनी घ्यावीत.
गोवा पर्यटन/ कोकण/समुद्री
In reply to गोवा पर्यटन/ कोकण/समुद्री by कंजूस
गोवा पर्यटन मंत्री यांची
In reply to गोवा पर्यटन/ कोकण/समुद्री by कंजूस
कथित मुजोरपणा
In reply to कथित मुजोरपणा by गोरगावलेकर
मुजोर म्हणजे बोलण्यात अशा
In reply to मुजोर म्हणजे बोलण्यात अशा by गवि
सहमत.
In reply to मुजोर म्हणजे बोलण्यात अशा by गवि
"तो कोकणांतला असणंच शक्य नांयऽऽऽ...
In reply to कथित मुजोरपणा by गोरगावलेकर
मुजोरपणा
पुण्यातल्या पुस्तक महोत्सवात
३ आठवडे मोफत ऑनलाइन योगासन वर्ग
In reply to ३ आठवडे मोफत ऑनलाइन योगासन वर्ग by श्रीरंग_जोशी
ती साईट पाहिली. नोंदणी केली
हरारीची मुलाखत रणवीरने घेतली
In reply to हरारीची मुलाखत रणवीरने घेतली by Bhakti
मराठी किंवा कुणीही.
दुरुस्ती मराठीxxxx. हरारी
पहिला काचेचा पूल
खरडफळ्यावर विषय निघाला म्हणून
In reply to खरडफळ्यावर विषय निघाला म्हणून by कंजूस
दमण- वापी- दादरा नगरहवेली-
In reply to दमण- वापी- दादरा नगरहवेली- by गवि
पण दमणच्या मार्केटमध्ये
In reply to पण दमणच्या मार्केटमध्ये by प्रचेतस
आधी मद्य पिऊन मग कोणत्याही
In reply to आधी मद्य पिऊन मग कोणत्याही by गवि
एकूणात तुमचा अनुभव जोरदार
In reply to एकूणात तुमचा अनुभव जोरदार by प्रचेतस
तुमच्या इतका जोरकस, प्रगाढ,
In reply to तुमच्या इतका जोरकस, प्रगाढ, by गवि
नका हो त्या जीवघेण्या आठवणी :
In reply to नका हो त्या जीवघेण्या आठवणी : by प्रचेतस
सळसळत्या वाऱ्याने एखादा
In reply to सळसळत्या वाऱ्याने एखादा by गवि
हो ना.
In reply to आधी मद्य पिऊन मग कोणत्याही by गवि
काला रे सइयां काला रे...
In reply to काला रे सइयां काला रे... by टर्मीनेटर
चित्रकार मात्र शाम निळाच
In reply to दमण- वापी- दादरा नगरहवेली- by गवि
खरंतर गुजरातला समुद्र
In reply to खरंतर गुजरातला समुद्र by कंजूस
केळवे किनारा तर लोकांनी
In reply to केळवे किनारा तर लोकांनी by गवि
हं.
In reply to खरडफळ्यावर विषय निघाला म्हणून by कंजूस
या निमित्तने "मद्य पिऊन
घरी बसूनच काही प्राणी पक्षी
'मिपा कट्टा - भायखळा' (६ जानेवारी २०२५)
In reply to 'मिपा कट्टा - भायखळा' (६ जानेवारी २०२५) by टर्मीनेटर
मुंबईत मिपाकर मोजून तीन चारच
In reply to मुंबईत मिपाकर मोजून तीन चारच by कंजूस
मुंबईत ( ठाणे डोंबिवली धरुन)
In reply to 'मिपा कट्टा - भायखळा' (६ जानेवारी २०२५) by टर्मीनेटर
कुमार १ आता मिपावर का लिहित
In reply to 'मिपा कट्टा - भायखळा' (६ जानेवारी २०२५) by टर्मीनेटर
कट्टा मिस्ल्याची हुरहूर..
आणि आजोबा परत जिवंत झाले!
In reply to आणि आजोबा परत जिवंत झाले! by Bhakti
चालत घरी आले.
In reply to आणि आजोबा परत जिवंत झाले! by Bhakti
या घटनेची नोंद घेत
हंपीजवळच्या पुरातन दगडी
माथेरानमध्ये पर्यटक घोड्यावर
कट्टा मिस्ल्याची हुरहूर..
उन्हाळी भटकंती.
In reply to उन्हाळी भटकंती. by कंजूस
मागचाच डोंगर राजमाचीचा. तिथे कधीच कुठेही डास नसतात.
इन्स्टाग्रामवर अजिंठाचे काही
केरळमध्ये काय बघाल ....https:
वेरूळ दहाव्या लेण्यात
विमान परत फिरवणे....
माथेरान कालपासून बंद.
In reply to माथेरान कालपासून बंद. by कंजूस
# खाजगी कार्यालयांना xxxxx
In reply to माथेरान कालपासून बंद. by कंजूस
खासगी करण : वरच्या पातळीवर
स्टेटसां कैकु लगायूँ बोलेतो...
एका जिवलगाचा प्रतिसाद - माझे उत्तर - हमारे तेलंगाणा के लोओंका मालूम नै तुमारकू? सुब्बे उट्टे जब से रात को सोने तलक कब्बी बी चायाँ पीने कू रेडीच रैतें। कल क्या वा मालूम? हमारे संजय बावा होर उनके इनो आये थे हमारे इधर म्हाराष्ट्रा सें । फिर Abits कु जाने के प्लानाँ बनायें। तो मैं बोलूं, चलो बावा, कैसे बी उदर जारैं । तो व्हांपे सोहनलाल की चाय भोत सईं रैती, दूर दूर से लोआं आते पीनेकू। पीते, तुम्म? तो उनो बोले, तुम इत्ता बोलरे तो कैकु नै पीते वामन राव? फिर हम, हमारे इनो, बावा, बावा के इनो ऐसे चार जणां गए चायाँ पीनेकू। अब तुमारकू तो मालूमिच हैं, वो चायाँ वायाँ पीने के शौकां तो अपुन नै पालते। फिर वो तीन जणां चायाँ पिए। भोत अच्चे है चायाँ बोले। बोलके मई स्टेटसां लगायूँ।
In reply to स्टेटसां कैकु लगायूँ बोलेतो... by वामन देशमुख
हैदराबादी चाय रेसिपी त्यातील
In reply to स्टेटसां कैकु लगायूँ बोलेतो... by वामन देशमुख
वा, चित्र बघूनच तब्येत खूष!
हैदराबादी चाय रेसिपी त्यातील
In reply to हैदराबादी चाय रेसिपी त्यातील by कंजूस
फस्क्लास !
अक्षय्य तृतीयेनिमित्त
In reply to अक्षय्य तृतीयेनिमित्त by वामन देशमुख
मेहकरचा बालाजी?
In reply to मेहकरचा बालाजी? by कंजूस
मेहकरचा बालाजी?
कुप्रसिद्ध मिपाकर अमरेंद्र
In reply to कुप्रसिद्ध मिपाकर अमरेंद्र by अमरेंद्र बाहुबली
कुठेशी आहे ही घोडपाण्याची नाळ
In reply to कुठेशी आहे ही घोडपाण्याची नाळ by कंजूस
मुरबाड जवळ.
श्रीगुरुजी हा आइडी बॅन केल्याबद्दल मी तीव्र निषेध व्यक्त करतो.
In reply to श्रीगुरुजी हा आइडी बॅन केल्याबद्दल मी तीव्र निषेध व्यक्त करतो. by वामन देशमुख
श्री गुरुजी यांना संधी द्यायला हवी होती असे मी म्हणतो