चित्रपट

एका गोष्टीची गोष्ट...( नाट्यलेखनतंत्राबद्दल थोडंसं) भाग तिसरा : संघर्ष

एका गोष्टीची गोष्ट...( नाट्यलेखनतंत्राबद्दल थोडंसं) ... भाग पहिला. प्रिमाईस
एका गोष्टीची गोष्ट...( नाट्यलेखनतंत्राबद्दल थोडंसं) ... भाग दुसरा : प्रमुख व्यक्तिरेखा
एका गोष्टीची गोष्ट...( नाट्यलेखनतंत्राबद्दल थोडंसं) भाग तिसरा : संघर्ष

आता एक गोष्ट बघू...
एक मुलगा सकाळी उठून शाळेत जातो , त्याचा रिझल्ट कळतो, त्याला शाळेत पहिला आल्याबद्दल बक्षीस मिळतं आणि तो आनंदानं घरी येतो.

ओके..गोष्ट बरी आहे, पण मला त्यातून का मजा येत नाही?
त्यात अजिबात संघर्ष नाही...
शाळेत पहिला आला नाही तर काय होईल ते कळत नाही...
व्हॉट इज ऍट स्टेक? काय पणाला लागलंय?

एका दुसर्‍या मुलाने खूप स्पर्धा निर्माण केली आहे आणि पहिला नंबर येणार्‍या मुलाला दिल्लीला विज्ञान प्रदर्शनात थेट जायला मिळणार आहे...
किंवा त्याला वडिलांनी कबूल केलं आहे की पहिला आलास तर या वर्षी सगळे सिंगापूरला जाऊ.
किंवा तो नेहमी पहिला येतो पण या परीक्षेच्या वेळी त्याचे वडील खूप आजारी होते आणि त्याने पहिलं यावं अशी त्यांची शेवटची इच्छा होती...ते त्याला पूर्ण करायलाच हवी..
ही झाली प्रेरणा...ध्येय म्हणजे नातेसंबंध टिकवणे,स्वाभिमान जपणे ...अडचणी म्हणजे तीव्र स्पर्धा, वडील आजारी, पेपर अवघड निघणे वगैरे...पहिला नंबर आणणे ही झाली कृती...
______________________

कोणत्याही गोष्टीसाठी सर्वात महत्त्वाचा भाग... संघर्ष नसला तर कोणतीही गोष्ट रटाळ, कंटाळवाणी होणार..
उदा.
i] एखादं पात्र गरज नसताना, कोणीही विचारलं नसताना त्याच्या आयुष्याबद्दल माहिती देत राहतं..
ii]स्थलकाल, इतिहास, निसर्ग याबद्दल अति माहिती देणं.. लेखकाचं जास्त संशोधन झालं असलं की त्याला ते सारं गोष्टीत आणावंसं वाटतं.
iii]गरज नसताना नवनवीन पात्रं फ़क्त विनोदनिर्मितीसाठी आणली जातात, अशाचा जाम कंटाळा येतो.

या चुका कशा सुधाराव्यात?
i]पात्रांची माहितीसुद्धा संघर्षातूनच मिळावी. ( उदा.एखादं पात्र आरोप करतंय, प्रश्न विचारतंय आणि दुसरं पात्र काहीतरी लपवालपवी करतंय, त्यातून होणार्या संघर्षातून पात्रांची माहिती मिळावी)..
ii]वाचकाला किंवा प्रेक्षकाला समोर घडणार्या घटनांसंदर्भातच रिलेव्हंट माहिती अपेक्षित असते, उगाच ऐतिहासिक , नसर्गिक गोष्टींच्या खोलात शिरण्याची गरज नाही.
iii]पात्रांची संख्या मर्यादित असूद्या., एखाद्या प्रसंगामुळे / दृश्यामुळे / व्यक्तिरेखांमुळे मुख्य पात्रांच्या नातेसंबंधांमध्ये काहीही बदल होत नसेल, तर मुख्य थीमशी संबंधित नसलेले अनावश्यक प्रसंग सरळ निर्दयपणे कापून टाकलेले उत्तम.

संघर्षाचे काही प्रकार

आंतरिक संघर्ष : इच्छा, हक्क आणि कर्तव्य यासंदर्भात
मनातलाच बर्यावाईटाचा संघर्ष
बर्याचदा हा संस्कारासंदर्भात असतो.
बाह्य संघर्ष : व्यक्ती आणि नातेसंबंधातला संघर्ष
पठडीतला हीरो आणि व्हिलन यांच्यातला संघर्ष

समाजामधले इतर संघर्ष : व्यावसायिक / राजकीय / जातीय / धार्मिक
___________________________________________________
आणखी एक वेगळ्या प्रकारचे वर्गीकरण मी ऐकले ..त्यावरून माझ्या आवडत्या सिनेमामधली थेट उदाहरणेच देतो..

१. शक्ती... ..दिलिपकुमार आणि अमिताभ यांच्यात आंतरिक संघर्ष ...वडील आणि मुलगा दोघे प्रोटॆगनिस्टच पण त्यांच्यातला संघर्ष अधिक गडद. आणि बाह्य संघर्ष तो (अमिताभ + दिलिपकुमार) आणि अमरीश पुरी यांच्यात. इथे अमरीश ऎंटागनिस्ट...साधारणपणे ऎंटागनिस्ट बाह्य संघर्षाचे कारण असतो..आणि अमिताभच्या मनातले द्वंद्व म्हणजे अंतर्गत आंतरिक संघर्ष...!!?

. सरफ़रोश : पोलीस ऒफ़िसर आणि आतिरेकी यांच्यातला बाह्य संघर्ष पण अजय राठोड आणि सलीम यांच्यातला आंतरिक संघर्ष
...आणि या आतिरेकी कटाचा सूत्रधार अजय राठोडच्या ओळखीचा पाकिस्तानी गायक असणं, ही वाढती गुंतागुंत आणि शेवटी याला मारू की नको असा अजय राठोडचा अंतर्गत आंतरिक संघर्ष !!!?

३. मला अजिबात न आवडलेला सिनेमा ... मैं प्रेम की दीवानी हूं... ( हाहाहाहाहा) .....
राजश्री फ़िल्म्स च्या साधारणपणे सगळ्याच फ़िल्म्समध्ये संघर्षच आधी खूप कमी... सगळं गोग्गोड... बरं असलाच तर कोणीतरी आजारी पडतं, अपघात होतो,पत्र उशीरा मिळतं आणि गैरसमज होतो असला नियतीवर आधारलेला योगायोगी बाह्य संघर्ष... त्यात अगदीच दम नसतो असं माझं वैयक्तिक मत.

४. काही आंतरधर्मीय विवाहाचे सिनेमे... यात पोरांचे आई-बाप अगदी ऎंटागनिस्ट दाखवले जातात बर्‍याचदा... मग त्यामुळे तेच बाह्य संघर्ष आहेत असे वाटायला लागते, मग शेवटी ते यांना माफ़ वगैरे करतात हे पचनी पडत नाही... त्यासाठी आधीच आईबापांचा विरोध हा आंतरिक संघर्ष मानला पाहिजे , आणि सामाजिक परिस्थितीचा त्यांच्यावरचा दबाव हा बाह्य संघर्ष..

संघर्ष कसा वाढवावा?

नुसतंच टोमणे मारणं, किरकिर करत भांडणं म्हणजे संघर्ष नव्हे..त्यातून काहीही बदल घडत नाही. प्रोटॆगोनिस्टच्या अडचणी व संकटं वाढवत नेणारा, त्याला अधिकाधिक संकटात पाडणारा संघर्ष हवा.त्यासाठी व्यक्तिरेखांवर दबाव वाढत जायला हवा..

काय पणाला लागलंय? ध्येय गाठलं नाही तर काय संकट येणार आहे हे ठरणं महत्त्वाचं..

आयुष्य, प्रेम, संपत्ती, आरोग्य, स्वाभिमान जेव्हा यावरच संकट कोसळतं तेव्हा मग मुख्य पात्र निकराने झगडतं... आपलं ( प्रेमाईसनं ठरवलेलं ) ध्येय गाठण्यासाठी अविश्रांत मेहनत करतं...
आणि या संघर्षातूनच त्याच्यात मोठा बदल घडतो आणि त्यातूनच ते पात्र धडा शिकतं... ( हेच ते तात्पर्य / कथाबीज)

हीरोला अधिकाधिक अडचणीत आणण्यासाठी मुख्य गोष्टीमध्ये काही उपकथानकं ( सबप्लॊट्स) तयार करता येतात.
परंतु ही उपकथानकं मुख्य गोष्टीला विरोध करणारी किंवा पाठिंबा देणारी किंवा त्यासाठी वाचकाला तयार करणारी म्हणजेच संबंधित हवीत.. उदा. खूनी शोधायच्या कथेत डिटेक्टिव्ह हीरो खुनी स्त्रीच्या प्रेमात पडला की गुंतागुंत झालीच.

संघर्ष वाढवण्यासाठी आवश्यक असलेले प्लॊट मोटिव्हेटर्स.
सूड, संकट,पाठलाग, द्वेष,प्रेम,दु:ख, वियोग, बंडखोरी, फ़सवणूक,स्वार्थत्याग, छळ, स्पर्धा, संशोधन,महत्त्वाकांक्षा, सर्व्हायव्हल.

प्रेरणा ध्येय अडचणी कृती

संघर्ष गडद करण्यासाठी प्रेरणा ध्येय अडचणी कृती या गोष्टी सतत चढत्या भाजणीने घडाव्या लागतात.

आता हे एक वाक्य बघू... (सुनील शेट्टी / सनी देओल यांच्या सिनेमात नेहमी असणारी परिस्थिती)
आपल्या वडिलांवरील चोरीचा आळ घालवण्यासाठी अर्जुनला एका साक्षीदाराला घेऊन न्यायालयात वेळेवर पोचणं आवश्यक आहे, हे माहित असल्याने राणाठाकूर आपल्या गुंडांना अर्जुनला अडवायला पाठवतो, अर्जुनला हे आधीच कळल्याने तो त्यातल्या काहींना गुंगारा देतो आणि न्यायालयाबाहेर उरलेल्यांशी तुफ़ान हाणामारी करून साक्षीदाराला न्यायालयात वेळेत पोचवतो आणि वडिलांना वाचवतो... .

आता या वाक्याचे तुकडे पाडू...

प्रेरणा : वडिलांवरील चोरीचा आळ घालवण्यासाठी
ध्येय : साक्षीदाराला घेऊन न्यायालयात वेळेवर पोचणं आवश्यक
अडचणी : गुंडांना अर्जुनला अडवायला पाठवतो
कृती : गुंगारा आणि हाणामारी

motivation goal obstacles action या गोष्टी योग्य क्रमाने घडत राहिल्या की व्यक्तिरेखासुद्धा फ़ुलतात, संघर्ष उत्कर्षबिंदूला पोचतो...

वळु

वळु

बर्‍याच दिवसांनी मराठी चित्रपट बघण्याचा योग आला. खरे तर मराठी चित्रपट बघायला मला आवडते. मध्यंतरीच्या काळात सचिन व महेश कोठारे चे चित्रपट छान असायचे. परंतु त्यानंतर मराठी चित्रपट एकाच साच्यात अडकला तेंव्हापासुन तो नकोसा व्हायला लागला होता. श्वास पासुन ही परिस्थीती बदलायला लागली आहे.

तर बरेच दिवसांनी चित्रपट बघितला, वळु. कथानक सर्वांना माहीत झालेच असेल. एका गावात वळुने उच्छाद मांडलेला असतो त्यामुळे फॉरेस्ट ऑफीसरला बोलावणे पाठवले जाते. त्याबरोबर त्याचा भाऊ डॉक्युमेंटरी करण्यासाठी येतो. गावकर्यांना एकत्र जमवुन डॉक्युमेंटरी करताना कथानक उलगडत जाते. त्यात संगीची प्रेमकथा असे उपकथानक सुद्धा आहे. डॉक्यमेंटरी करुन संपते आणि त्यानंतरच्या एक-दोन प्रयत्नांमधे वळु पकडला जातो, व चित्रपट संपतो.

मला चित्रपट आवडला नाही. कथानकात तस काही दम नाही. अगदीच साधे आहे. म्हणुन मग त्यात गावातल्या तरुण नेत्याची कुरघोडी करण्याची धडपड. भटजीबुवांचे (दिलीप प्रभावळकर) विनोद आणि संगीचे (अमृता सुभाष) प्रेमप्रकरण त्यात आले आहे. वळु बघितल्यानंतर त्याला पकडण्यासाठी फॉरेस्ट ऑफीसरची नेमणुक विचीत्र वाटते. वळु बिचारा एकदमच शांत आहे. चित्रपटात तो नुसताच इकडुन तिकडे जातो. तर त्याला लोक एवढे घाबरतात का हे काही समजत नाही. वळुचे पुर्ण दर्शन अगदी शेवटी घडते. तोपर्यंत त्याचा त्याला अर्धवट दाखवुन बॅकग्राउंडला त्याचा जोरात उच्छवास ऐकवण्यात आला आहे. त्यावरुन तो हिंसक झाला आहे असे आपण समजायचे. वळु पकडण्यासाठी गेलेला फॉरेस्ट ऑफीसर डॉक्युमेंटरी बनवण्यात मध्यांतरापर्यंत वेळ घालवतो. त्यानंतर त्याने केलेले प्रयत्न एका अननुभवी माणसाने केलेले प्रयत्न वाटत रहातात. शेवटी वळु पकडला जातो परंतु त्या प्रसंगात काही थ्रिल नाही.

अतुल कुलकर्णी हा एक चांगला अभिनेता आहे हे हा चित्रपट बघुन कोणीही म्हणणार नाही.काही मनाविरुद्ध घडले तर 'शिट शिट शिट' आणि मनासारखे घडले तर 'येस येस येस' असे संवाद त्याच्या तोंडी आहेत. वळु पकडण्यासाठी फॉरेस्ट ऑफिसरला आवश्यक असलेली लीडरशीप कुठेही जाणवत नाही. त्याच्यासारख्या अभिनेत्याला वाया घालवलेले आहे एवढेच म्हणता येइल.

दिलीप प्रभावळकरांनी ही भुमिका का स्वीकारली असावी असा प्रश्न पडतो. दिवस/रात्री कोणत्याही वेळेस परसाकडला जाणे य पलिकडे या भुमिकेत काहीच नाही. विनोद निर्मीती साठी हे पात्र असावे असे म्हटले तर सारखे 'लागली आहे' असा अभिनय करत इकडुन तिकडे जाणार्‍्या पात्रात कसली आली आहे विनोदनिर्मीती. त्यात सरकार राज मधली दिलीप प्रभावळकरांची भुमिका बघितल्यानंतर त्यांना या भुमिकेत बघायचे म्हणजे एक शिक्षा आहे.

चित्रपटात काही प्रसंग उगाच घुसडल्यासारखे वाटतात. आता छोट्या मुलाला त्याची आई देवळाबाहेरच शु करायला लावते. यात दिग्दर्शकाला काय म्हणायचे आहे? विनोदनिर्मीतीसाठी असेल तर यात विनोद काय आहे. त्यात बाकी चित्रपट विनोदी अंगाने जात नाही. मला तर एकाही ठिकाणी खळखळुन हसु आले नाही.

चित्रपटात सगळेच काही निगेटिव्ह नाही. गावाची वातावरण निर्मिती उत्तम झाली आहे. जीवन्याची भुमिका करणार्या नटाने (गिरिश कुलकर्णी) उत्तम अभिनय केला आहे. फॉरेस्ट ऑफीसरला सगळी मदत केल्यानंतर ऑफीसर निघुन जाताना एकदम हळुवार होणे हे त्याने मस्त दाखवले आहे. चित्रपट तांत्रिक दृष्ट्या चांगला वाटतो.

हे चित्रपट परिक्षण नाही, तर नुसतेच माझे मत आहे. या वरुन चित्रपट पहायचे की नाही हे ठरवु नका. पण मराठी चित्रपटात सुधारणा व्हावी. किंबहुना मराठीत आंतरराष्टीय दर्जाचे चित्रपट निघावेत असे वाटते. त्यामुळे 'वळु' खरोखरच चांगला असता तर किती छान झाले असते असे चित्रपट बघितल्यानंतर वाटत राहीले म्हणुन चार ओळी खरडल्या एवढेच.

- - राजस

आम्‍ही आणि आम्‍ही लावलेले दिवे

संकलनः विकास शिरपूरकर

फिल्मोग्राफी

1.
आमिर खान

बॉलीवूड मध्ये ‘मि. परफेक्शनिस्ट’ म्हणून ओळखला जाणारा आमीर खान चित्रपटांमध्ये चॉकलेटी हिरोच्या रूपात स्थिरावला. प्रत्येक चित्रपट करताना त्याबद़दल प्रचंड 'चुझी' असलेल्या आमीरने आपल्या अनेक वर्षांच्या कारकीर्दीत खूप कमी चित्रपट केले. एरवी कोणत्याही पुरस्कार व प्रसिद्धीपासून दूर राहणारा आमीर सध्या आपला ब्लॉग लिहायला लागल्यापासून बराच चर्चेत आला आहे.

त्याचे आजवरचे चित्रपट असे ः

तारे जमीं पर (2007)
फना (2006)
रंग दे बसंती (2006)
मंगल पांडे - दि राइजिंग (2005)
दिल चाहता है (2001)
लगान (2001)
मेला (2000)
1947 :अर्थ (1999)
मन (1999)
सरफरोश (1999)
गुलाम (1998)
इष्क (1997)
राजा हिंदुस्तानी (1996)
अकेले हम अकेले तुम (1995)
रंगीला (1995)
आतंक ही आतंक (1995)
बाजी (1995)
अंदाज अपना अपना (1994)
हम हैं राही प्यार के (1993)
परंपरा (1993)
दामिनी (1993) - पाहुणा कलाकार
पहला नशा (1993) - पाहुणा कलाकार
जो जीता वही सिकंदर (1992)
दौलत की जंग (1992)
इसी का नाम जिंदगी (1992)
दिल है की मानता नहीं (1991)
अफसाना प्यार का (1991)
जवानी जिंदाबाद (1990)
दीवाना मुझ-सा नहीं (1990)
दिल (1990)
तुम मेरे हो (1990)
अव्वल नंबर (1990)
लव लव लव (1989)
राख (1989)
कयामत से कयामत तक (1988)
होली (1984)

----------------------------------------

2.
माधुरी दीक्षित

सडपातळ शरीरयष्टीच्या माधुरी दीक्षितने जेव्हा 'अबोध' चित्रपटाच्या माध्यमातून जेव्हा चित्रपटसृष्टीत प्रवेश केला. त्यावेळी ही मुलगी एक दिवस करोडो लोकांच्या हृदयाचा ठोका चुकविणारी 'धक... धक गर्ल' ठरेल असा विचारही कुणी केला नव्हता. सुरुवातीची काही वर्ष संघर्ष कराव्या लागलेल्या माधुरीला 1988 मध्ये अनिल कपूर सोबत केलेल्या 'तेजाब'ने एक... दो... तीन गात-गात यशस्वीतेच्या शिखरावर नेऊन पोचविले.

तिने आजवर केलेले चित्रपट

अबोध (1984)
आवारा बाप (1985)
स्वाती (1986)
मानव हत्या (1986)
हिफाजत (1987)
उत्तर दक्षिण (1987)
मोहरे (1988)
खतरों के खिलाडी (1988)
दयावान (1988)
तेजाब (1988)
वर्दी (1989)
राम लखन (1989)
प्रेम प्रतिज्ञा (1989)
इलाका (1989)
मुजरिम (1989)
त्रिदेव (1989)
कानून अपना अपना (1989)
परिंदा (1989)
पाप का अंत (1989)
प्यार का देवता (1990)
महासंग्राम (1990)
किशन कन्हैय्या (1990)
इज्जतदार (1990)
दिल (1990)
दीवाना मुझसा नहीं (1990)
जीवन एक संघर्ष (1990)
सैलाब (1990)
जमाई राजा (1990)
थानेदार (1990)
प्रहार (1991)
खिलाफ (1991)
प्यार का देवता (1991)
हंड्रेड डेज (1991)
प्रतिकार (1991)
साजन (1991)
संगीत (1992)
बेटा (1992)
जिंदगी एक जंग (1992)
प्रेम दीवाने (1992)
खेल (1992)
धारावी (1993)
फूल (1993)
आँसू बने अंगारे (1993)
साहिबां (1993)
खलनायक (1993)
दिल तेरा आशिक (1993)
अंजाम (1994)
हम आपके हैं कौन! (1994)
पापी देवता (1995)
राजा (1995)
याराना (1995)
राजकुमार (1996)
प्रेम ग्रंथ (1996)
कोयला (1997)
महानता (1997)
मृत्युदंड (1997)
मोहब्बत (1997)
दिल तो पागल है (1997)
घर वाली बाहर वाली (1998) - पाहुणी कलाकार
बड़े मियाँ छोटे मियाँ (1998)- पाहुणी कलाकार
वजूद (1998)
आरजू (1999)
पुकार (2000)
गजगामिनी (2000)
यह रास्ते हैं प्यार के (2001)
लज्जा (2001)
हम तुम्हारे हैं सनम (2002)
देवदास (2002)
आजा नच ले (2007)

-----------------------------------

3.
काजोल

सही वेळ साधून बॉलीवूडमध्ये आलेली काजोल सही वेळेलाच टॉपवर पोचली आणि सहीवेळेलाच लग्न करून बॉलीवूडला निरोप दिला. तिची लग्नानंतरची एंट्रीही झक्कास झाली आता काजोलने निर्णय घेतला आहे, की आता केवळ निवडक चित्रपट करायचे.
आतापर्यंत 30 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केलेल्या काजोलने तीन चित्रपटांमध्ये विशेष भूमिका केली आहे. तीनही खान (शाहरुख-सलमान-आमीर. यांच्यासोबत तिची जोडी हीट ठरली. मात्र ज्या-ज्या कलावंताने काजोलसह चित्रपट करिअर सुरू केले त्यांच्यासाठी ती अनलकी ठरली. कमल सदाना, विकास भल्ला आणि रोहित भाटिया याचे उदाहरण आहेत. पती अजय देवगण सोबत तिने सर्वाधिक 6 चित्रपट केले.

बेखुदी (31 जुलै 1992) - कमल सदाना
बाजीगर (12 नोव्हेंबर 1993) - शाहरुख खान
उधार की जिंदगी (1994) - रोहित भाटिया
ये दिल्लगी (1994) - अक्षय कुमार/ सैफ सली खान
करण अर्जुन (13 जानेवारी 1995) - शाहरुख खान
ताकत (23 जून 1995) - विकास भल्ला
हलचल (4 ऑगस्ट 1995) - अजय देवगण
गुण्डाराज (8 सप्टेंबर 1995) - अजय देवगण
दिलवाले दुल्हनियाँ ले जाएँगे (20 ऑक्टोबर 1995) - शाहरुख खान
बंबई का बाबू (22 मार्च 1996) - सैफ अली खान
गुप्त (4 जुलै 1996) - बॉबी देओल
हमेशा (12 सप्टेंबर 1997) - सैफ अली खान
इष्क (28 नोव्हेंबर 1997) - अजय देवगण
प्यार किया तो डरना क्या (27 मार्च 1998) - सलमान खान
डुप्लिकेट (7 मे 1998) - पाहुणी कलावंत
दुश्मन (29 मे 1998) - जस अरोरा / संजय दत्त
प्यार तो होना ही था (27 मार्च 1998) - अजय देवगण
कुछ कुछ होता है (16 ऑक्टोबर 1998) - शाहरुख खान
दिल क्या करें (1999) - अजय देवगण
हम आपके दिल में रहते हैं (22 जानेवारी 1999) - अनिल कपूर
होते-होते प्यार हो गया (2 जुलै 1999) - जैकी श्रॉफ / अतुल अग्निहोत्री
राजू चाचा (डिसेंबर 2000) - अजय देवगण
कुछ खट्टी कुछ मिठी (जानेवारी 2001) - सुनील शेट्टी
कभी खुशी कभी गम (14 डिसेंबर 2001) - शाहरुख खान
कल हो ना हो (28 ऑक्टोबर 2003) - पाहुणी कलावंत
फना (26 मे 2006) - आमिर खान
कभी अलविदा ना कहना (11 ऑगस्ट 2006) - पाहुणी कलावंत
यु मी और हम (डिसेंबर 2007)
- अजय देवगण

हाल-ए-दिल (20 जून 2008) पाहुणी कलावंत

---------------------------------

4.

ऐश्वर्या राय

विश्व सुंदरीचा किताब मिळालेली सौंदर्यवती अभिनेत्री ऐश्वर्याकडे रूपाचेही तितकेच मोठे ऐश्वर्य आहे. सलमान, विवेक ओबेरॉय यांना झुलवीत ठेवणारी ऐश्वर्या शेवटी बच्चन कुटुंबीयांची सून झाली. चित्रपटसृष्टीत ऐश्वर्याच्या विवाहाला मिळालेल्या प्रसिद्धी इतकी कुणालाही हाईप मिळाली नाही. आपल्या रूपाचे व अभिनयाच्या बळावर बॉलीवूडच नव्हे हॉलिवूडलाही तिने भुरळ घातली असून अभिषेक बच्चनची बायको म्हणूनही ती तितकीच सुंदर दिसते.

तिचे आजवरचे चित्रपट

जोधा अकबर (2008)
सरकार राज (2008)
प्रोवोक्ड (2007)
गुरू (2007)
धूम-2 (2006)
उमराव जान (2006)
द मिस्ट्रेस ऑफ स्पाइसेस (2006)
बंटी और बबली (2005) - पाहुणी कलावंत
शब्द (2005)
रेनकोट (2004)
बल्ले बल्ले! फ्रॉम अमृतसर टू एल. ए. (2004)
क्यूँ! हो गया ना (2004)
खाकी (2004)
कुछ ना कहो (2003)
दिल का रिश्ता (2003)
चोखेर बाली (2003)
शक्ती - द पॉवर (2002) - पाहुणी कलावंत
देवदास (2002)
23 मार्च 1931 शहीद (2002) - पाहुणी कलावंत
हम किसी से कम नहीं (2002)
हम तुम्हारे हैं सनम (2002) - पाहुणी कलावंत
अलबेला (2001)
मोहब्बतें (2000)
ढाई अक्षर प्रेम के (2000)
हमारा दिल आपके पास है (2000)
जोश (2000)
मेला (2000) - पाहुणी कलावंत
ताल (1999)
हम दिल दे चुके सनम (1999)
आ अब लौट चलें (1999)
.. और प्यार हो गया (1997)
जीन्स (1996)
-----------------------------------

5.
शिल्पा शेट्टी

'बाजीगर' सारख्या चित्रपटातून शिल्पा शेट्टीने करिअरची सुरुवात केली. नंतर मात्र तिने अनेक चुकीच्या चित्रपटांची निवड केली. तशीही तिची इमेज केवळ 'ग्लॅमर डॉल' पुरतीच मर्यादित राहिली. अनेक बड्या नायकांसोबत तिने काम केले. मात्र दुदैवाने तिचा एकही चित्रपट हीट होऊ शकला नाही. तिचे करिअर संपल्यात जमा झाले असताना अचानक 'बिग ब्रदर' या रीअलीटी शोमध्ये ती विजेती ठरली त्याचा तिला प्रसिद्धीसाठी चांगलाच फायदा झाला. सध्या चित्रपटांपेक्षा इतर गोष्टींमुळेच शिल्पा प्रसिद्धी झोतात आहे.

तिचे आजवरचे चित्रपट

बाजीगर (1993)
आग (1994)
मैं खिलाडी तू अनाडी (1994)
आओ प्यार करें (1994)
हथकडी (1995)
गॅम्‍बलर (1995)
हिंमत (1996)
छोटे सरकार (1996)
औज़ार (1997)
ज़मीर (1997)
इंसाफ (1997)
पृथ्वी (1997)
आक्रोश (1998)
परदेसी बाबू (1998)
लाल बादशाह (1999)
शूल (1999)
जानवर (1999)
तरकीब (2000)
जंग (2000)
धडकन (2000)
इंडियन (2001)
बधाई हो बधाई (2002)
चोर मचाए शोर (2002)
हथियार (2002)
रिश्ते (2002)
कर्ज : द बर्डन ऑफ ट्रूथ (2002)
जुनून (2003)
डरना मना है (2003)
गर्व (2004)
फिर मिलेंगे (2004)
खामोश - खौफ की रात (2005)
फरेब (2005)
दस (2005)
शादी करके फँस गया यार (200607 )
लाइफ इन ए... मैट्रो (2007)
अपने (2007)

------------

6

सलमान खान :

सतत वादग्रस्त ठरलेला सलमान चित्रपटांच्या बाबतीत मात्र लकी ठरला. ऐश्वर्या रायसोबतचे प्रेम प्रकरण संपुष्टात आल्यानंतर तिला धमकावणे, तिचा तत्कालीन प्रियकर विवेक ओबेरॉयला बॉक्सिंगसाठी आव्हान देणे, राजस्थानातील काळविटाची शिकार केल्याने जयपूर न्यायालयाने दिलेली शिक्षा, मुंबईच्या फूटपाथवरील एकाला उडविल्यानंतर गाजलेले प्रकरण आदी अनेक घटनांमुळे सलमान नेहमीच चर्चेत राहिला. सलमानच्या गर्लफ्रेंडमुळेही त्याला बरीच प्रसिद्धी मिळाली. मात्र त्याच्यातील कलावंत नेहमीच जीवंत राहिला हे देखिल विशेष.
हॉलिवूडपटातही त्याने काम केले असून जगप्रसिद्ध मदान तुसॉंच्या संग्रहालयात त्याला मेणाचा पुतळा आहे. सध्या रियलीटी शोमधून तो आपले भाग्य अजमावून पाहत आहे.

त्याचे आजवरचे चित्रपट

ओम शांती ओम (2007) - पाहुणा कलावंत
साँवरिया (2007) - विशेष भूमिका
मैरी गोल्ड : एन एडवेंचर इन इंडिया (2007)
पार्टनर (2007)
सलाम-ए-इष्क (2007)
बाबुल (2006)
जानेमन (2006)
शादी करके फँस गया यार (2006)
सावन : द लव सीज़न (2006)
क्योंकी (2005)
नो एंट्री (2005)
मैंने प्यार क्यूं किया (2005)
लकी : नो टाइम फोर लव (2005)
दिल ने जिसे अपना कहा (2004)
फिर मिलेंगे (2004)
मुझसे शादी करोगी (2004)
गर्व (2004)
बागबान (2003)
तेरे नाम (2003)
स्टंपड (2003) - पाहुणा कलावंत
लव एट टाइम्स स्क्वेयर (2003) - पाहुणा कलावंत
ये है जलवा (2002)
हम तुम्हारे हैं सनम (2002)
तुमको ना भूल पाएँगे (2002)
चोरी चोरी चुपके चुपके (2001)
कहीं प्यार न हो जाए (2000)
ढाई अक्षर प्रेम के (2000) - पाहुणा कलावंत
हर दिल जो प्यार करेगा (2000)
चल मेरे भाई (2000)
दुल्हन हम ले जाएँगे (2000)
हम साथ साथ हैं (1999)
हॅलो ब्रदर (1999)
हम दिल दे चुके सनम (1999)
सिर्फ तुम (1999)
बीवी नं. 1 (1999)
जानम समझा करो (1999)
कुछ कुछ होता है (1999)
बंधन (1998)
सर उठा के जियो (1998) - पाहुणा कलावंत
जब प्यार किसी से होता है (1998)
प्यार किया तो डरना क्या (1998)
दीवाना मस्ताना (1997)
औजार (1997)
जुडवा (1997)
दुश्मन दुनिया का (1996) - पाहुणा कलावंत
जीत (1996)
खामोशी द म्यूजिकल (1996)
ये मंझधार (1996)
वीरगती (1995)
करण अर्जुन (1995)
संगदिल सनम (1994)
चाँद का टुकडा (1994)
हम आपके हैं कौन! (1994)
अंदाज अपना अपना (1994)
दिल तेरा आशिक (1993)
चंद्रमुखी (1993)
निश्चय (1992)
जागृती (1992)
एक लडका एक लडकी (1992)
सूर्यवंशी (1992)
साजन (1991)
लव (1991)
कुर्बान (1991)
पत्थर के फूल (1991)
सनम बेवफा (1991)
बागी (1990)
मैंने प्यार किया (1989)
बीवी हो तो ऐसी (1988)
-------------------------

7.

बिपाशा बसू

बॅंगॉली ब्लॅक ब्युटी बिपाशा चित्रपटात आली तीच हॉट गर्ल म्हणून. बॉलीवूडमध्ये बोल्डसीनचा ट्रेंड सेट करणारी अभिनेत्री म्हणून बिपाशा ओळखली जाते. भूमिकेतून तिने आजवर अभिनयाचे कोणतेही कसब दाखविले नसले तरीही सुरुवातीला डीनो मॉरीया आणि नंतर जॉन अब्राहम सोबतचे तिचे प्रेमसंबंध यामुळे ती बरीच चर्चेत आली.

तिचे आजवरचे चित्रपट

रेस (2008)
दन धनादन- गोल (2007)
नो स्मोकिंग (2007)
नहले पे दहला (2007)
धूम 2 (2006)
जाने होगा क्या (2006)
ओमकारा (2006)
कारपोरेट (2006)
फिर हेराफेरी (2006)
डरना जरूरी है (2006)
हम को दीवाना कर गई (2006)
शिखर (2005)
अपहरण (2005)
नो एंट्री (2005)
बरसात (2005)
विरुद्ध (2005)
चेहरा (2005)
मदहोशी (2004)
रक्त (2004)
रुद्राक्ष (2004)
एतबार (2004)
इष्क है तुमसे (2004)
जमीन (2003)
रूल्स : प्यार का सुपरहिट फार्मूला (2003)
फुटपाथ (2003)
जिस्म (2003)
गुनाह (2002)
चोर मचाए शोर (2002)
मेरे यार की शादी है (2002)
आँखें (2002)
राज (2002)
अजनबी (2001)

----------

8.
विवेक ओबेरॉय

कंपनीतील चंद्रुच्या भूमिकेमुळे सर्व परिचित झालेला विवेक ओबेरॉय नंतर मात्र विस्मरणात जातो की काय अशी स्थिती निर्माण झाली आहे. सुरेश ओबेरॉय यांचा मुलगा आणि ऐश्वर्याचा एक्स प्रियकर इतकीच त्याची ओळख. ऐश्वर्याने कलटी दिल्यानंतर जवळ-जवळ संपलेला विवेक आता कॉमेडी चित्रपटांकडे वळला असून हळूहळू जम बसविण्यात यशस्वी होईल अशी अपेक्षा आहे.

त्याचे सध्याचे चित्रपट

फूल एन फायनल (2007)
शूट आऊट एट लोखंडवाला (2007)
नक्शा (2006)
ओमकारा (2006)
प्यारे मोहन (2006)
होम डिलेवरी (2005)
दीवाने हुए पागल (2005)
काल (2005)
किसना (2005)
क्यूँ! हो गया ना (2004)
युवा (2004)
मस्ती (2004)
डरना मना है (2003)
दम (2003)
साथिया (2002)
रोड (2002)
कंपनी (2002)

-----------------------

9.

सुश्मिता सेन

पहिली जगतसुंदरी म्हणून सर्वांकडून गौरविलेली गेलेली सुश्मिता चित्रपटातील करिअरमध्ये
मात्र म्हणावी तितकी यशस्वी ठरली नाही.
तिच्या सामाजिक कार्याच्या जाणीवेने मात्र तिला समृद्ध ओळख मिळवून दिली आहे. इतर अभिनेत्रींप्रमाणे तिनेही हॉलिवूडमध्ये काम करण्याचा प्रयत्न केला आहे. कोणत्याही स्पर्धेपासून दूर असलेली कूल अभिनेत्री म्हणून तिची ओळख आहे.

तिचे आजवरचे चित्रपट

राम गोपाल वर्मा की आग (2007)
जिंदगी रॉक्स (2006)
चिंगारी (2006)
मैंने प्यार क्यूँ किया (2005)
मैं ऐसा ही हूँ (2005)
बेवफा (2005)
किस्ना (2005)
वास्तू शास्त्र (2004)
मैं हूँ ना (2004)
पैसा वसूल (2004)
समय - व्हेन टाइम स्ट्राइक्स (2003)
प्राण जाए पर शान न जाए (2003) - विशेष भूमिका
आँखें (2002)
तुमको ना भूल पाएँगे (2002)
फिलहाल (2002)
क्योंकी मैं झूठ नहीं बोलता (2001)
नायक (2001)
बस इतना सा ख्वाब है (2001)
आगाज़ (2000)
फिज़ा (2000) - विशेष भूमिका
हिंदुस्तान की कसम (1999)
सिर्फ तुम (1999)
बीवी नं. 1 (1999)
जोर (1998)
दस्तक (1996)
--- ------------------------

10.

रेखा

जेमिनी गणेशऩ या दक्षिणेतील आघाडीच्या नायकाची मुलगी म्हणून चित्रपटात आलेली रेखा वयाची साठी ओलांडल्यानंतर
आजही एव्हरग्रीन दिसते. अमिताभ सोबतचे तिचे प्रेमप्रकरण बरेच गाजले. मात्र चित्रपटांतूनही तिने आपल्या अभिनयाची चुणूक
दाखविली. सर्वाधिक चित्रपटांमध्ये भूमिका करणाऱया काही मोजक्या कलावंतांमध्ये तिची मोजदाद होते.

तिचे आजवरचे चित्रपट

ओम शांती ओम (2007) - पाहुणी कलावंत
यात्रा (2007)
कुड़ियों का है जमाना (2007)
क्रीश (2006)
बच के रहना रे बाबा (2005)
परिणीता (2005)
कोई मिल गया (2003)
भूत (2003)
दिल है तुम्हारा (2002)
लज्जा (2001)
मुझे मेरी बीवी से बचाओ (2001)
सेंसर (2001)
जुबैदा (2001)
बुलंदी (2001)
मदर 98 (1999)
किला (1998)
काम सूत्र (1998)
उडान (1997)
आस्था : इन द प्रिजन ऑफ स्प्रिंग (1997)
खिलाड़ियों का खिलाड़ी (1996)
औरत औरत औरत (1996)
अब इंसाफ होगा (1995)
निशाना (1995)
मैडम एक्स (1994)
गीतांजली (1993)
इंसाफ की देवी (1992)
वक्त का बादशाह (1992)
फूल बने अंगारे (1991)
यह आग कब बुझेगी (1991)
मेरा पती सिर्फ मेरा है (1990)
आजाद देश के गुलाम (1990)
अमीरी गरिबी (1990)
सौतन की बेटी (1990)
शेषनाग (1990)
बहू रानी (1990)
भ्रष्टाचार (1989)
लड़ाई (1989)
कसम सुहाग की (1989)
क्लर्क (1989)
बीवी हो तो ऐसी (1988)
खून भरी माँग (1988)
एक नया रिश्ता (1988)
इज्जत (1988)
सूरमा भोपाली (1988)
जान हथेली पे (1987)
संसार (1987)
खजाना (1987)
अपने अपने (1987)
प्यार की जीत (1987)
इंसाफ की आवाज (1986)
सदा सुहागन (1986)
जाँबाज (1986)
लॉकेट (1986)
जाल (1986)
झूठी (1986)
राम तेरे कितने नाम (1985)
फासले (1985)
उत्सव (1985)
झूठा सच (1984)
कामयाब (1984)
जमीन आसमान (1984)
बाजी (1984)
आशा ज्योती (1984)
माटी माँगे खून (1984)
बिंदिया चमकेगी (1984)
अगर तुम ना होते (1983)
मुझे इंसाफ चाहिए (1983)
प्रेम तपस्या (1983)
विजेता (1983)
फिल्म ही फिल्म (1983)
निशान (1983)
दीदार-ए-यार (1982)
मेहंदी रंग लाएगी (1982)
गजब (1982)
अपना बना लो (1982)
रास्ते प्यार के (1982)
जीवनधारा (1982)
सिस्टर (1982)
एक ही भूल (1981)
बसेरा (1981)
सिलसिला (1981)
खून और पानी (1981)
मंगलसूत्र (1981)
साजन की सहेली (1981)
कलयुग (1981)
उमराव जान (1981)
घुँघरू की आवाज (1981)
चश्मे बद्दूर (1981)
राम बलराम (1980)
माँग भरो सजना (1980)
जुदाई (1980)
आंचल (1980)
नीयत (1980)
एग्रीमेंट (1980)
जल महल (1980)
ज्योती बने ज्वाला (1980)
खूबसूरत (1980)
काली घटा (1980)
नया बकरा (1980)
चेहरे पे चेहरा (1980)
अहिंसा (1979)
दो शिकारी (1979)
सुहाग (1979)
मि. नटवरलाल (1979)
जानी दुश्मन (1979)
कर्तव्य (1979)
गोलमाल (1979)
मुकाबला (1979)
कर्म योगी (1978)
मुकद्दर का सिकंदर (1978)
राम कसम (1978)
दिल और दीवार (1978)
मुकद्दर (1978)
दो मुसाफिर (1978)
कसमे वादे (1978)
गंगा की सौगंध (1978)
राहू केतू (1978)
सावन के गीत (1978)
परमात्मा (1978)
प्रेम बंधन (1978)
ट्वेंटी सेवन डाउन (1978)
घर (1978)
भोला भाला (1978)
आखिरी डाकू (1978) ृ
पलकों की छाँव में (1977)
खून पसीना (1977)
ईमान धरम (1977)
आपकी खातिर (1977)
दिलदार (1977)
चक्कर पे चक्कर (1977)
कच्चा चोर (1977)
फरिश्ता या कातिल (1977)
राम भरोसे (1977)
एक ही रास्ता (1977)
आलाप (1977)
नागीन (1976)
दो अनजाने (1976)
संतान (1976)
आज का महात्मा (1976)
कबीला (1976)
खलीफा (1976)
धरम करम (1975)
धर्मात्मा (1975)
जोरो (1975)
दफा 302 (1975)
आक्रमण (1975)
कहते हैं मुझको राजा (1975)
हवस (1974)
दो आँखें (1974)
प्राण जाए पर वचन ना जाए (1974)
वो मैं नहीं (1974)
मेहमान (1974)
दुनिया का मेला (1974)
नमक हराम (1973)
खून खून (1973)
बरखा बहार (1973)
धर्मा (1973)
कीमत (1973)
अनोखी अदा (1973)
कहानी किस्मत की (1973)
कश्‍मकश (1973)
सजा (1972)
एक बेचारा (1972)
गाँव हमारा शहर तुम्हारा (1972)
जमीन आसमान (1972)
रामपूर का लक्ष्मण (1972)
डबल क्रॉस (1972)
हार जीत (1972)
दो यार (1972)
सजा और सनम (1972)
दोस्त और दुश्मन (1972)
गोरा और काला (1972)
हसीनों का देवता (1971)
ऐलान (1971)
सावन भादौ (1970)

----------------------------

1 1.

करिश्मा कपूर

कपूर खानदानची पहिली मुलगी म्हणून करिश्मा चित्रसृष्टीत आली. रणधीर कपूरचा घरातून विरोध असतानाही केवळ आई
बबिताच्या सपोर्टवर 'सरकायलो खटीया' करता-करता ती बॉलीवूडमध्ये चांगलीच स्थिरावली. सुरुवातीच्या काही चित्रपटांमधून ती
लेडी रणधीर कपूर म्हणून दुर्लक्षिली गेली असली तरीही तिने नंतर अभिनयाचीही चांगलीच चुणूक दाखविली. बच्चन घरची सून
होता-होता ती संजय कपूर या उद्योजकासोबत विवाहबद्ध झाली.

ओम शांती ओम (2007) : विशेष भूमिका
मेरे जीवन साथी (2006)
बाज (2003)
रिश्ते (2002)
शक्ती : द पॉवर (2002)
हाँ मैंने भी प्यार किया (2002)
दीवाना तेरे नाम का (2002)
एक रिश्ता : द बाँड ऑफ लव (2001)
आशिक (2001)
जुबैदा (2001)
शिकारी (2000)
फिजा (2000)
हम तो मोहब्बत करेगा (2000)
चल मेरे भाई (2000)
दुल्हन हम ले जाएँगे (2000)
जानवर (1999)
हम साथ साथ हैं (1999)
हसीना मान जाएगी (1999)
बीवी नंबर 1 (1999)
सिलसिला है प्यार का (1999)
दिल तो पागल है (1997)
मृत्युदाता (1997)
लहू के दो रंग (1997)
हीरो नं.1 (1997)
जुडवाँ (1997)
अजय (1996)
रक्षक (1996)
राजा हिंदुस्तानी (1996)
सपूत (1996)
बाल ब्रह्मचारी (1996)
जीत (1996)
कृष्णा (1996)
साजन चले ससुराल (1996)
मेघा (1996)
पापी गुड़िया (1996)
कुली नं. 1 (1995)
मैदान-ए-जंग (1995)
जवाब (1995)
गोपी किशन (1994)
सुहाग (1994)
आतिश (1994)
ये दिल्लगी (1994) : विशेष भूमिका
अंदाज अपना अपना (1994)
अंदाज (1994)
खुद्दार (1994)
दुलारा (1994)
राजा बाबू (1994)
प्रेम शक्ती (1994)
धनवान (1993)
शक्तिमान (1993)
संग्राम (1993)
मुकाबला (1993)
अनाड़ी (1993)
जिगर (1992)
दीदार (1992)
सपने साजन के (1992)
निश्चय (1992)
जागृती (1992)
पुलिस ऑफिसर (1992)
प्रेम कैदी (1991)

-----------------------------------------

12.

नीतू सिंह

कपूर खानदानकी बहू आणि ऋषी कपूरची बायको म्हणून ओळख मिळण्यापूर्वी नीतू सिंह एक चांगली अभिनेत्री म्हणून
चित्रसृष्टीत स्थिरावली होती. बालकलाकार म्हणूनही तिने अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. तिचे सर्वाधिक चित्रपट ऋषी कपूर
सोबतचेच आहेत. आताशा नीतू चित्रपटांत दिसेनाशी झाली असली तरीही रणबीर कपूर या उगवत्या ताऱयाची आई म्हणून ती
नव्या पिढीला ज्ञात आहे.

तिचे आजवरचे चित्रपट

राजमहल (1982)
तिसरी आँख (1982)
चोरनी (1982)
गंगा मेरी माँ (1982)
खून का रिश्ता (1981)
एक और एक ग्यारह (1981)
याराना (1981)
वक्त की दीवार (1981)
चोरों की बारात (1980)
द बर्निंग ट्रेन (1980)
चुनौती (1980)
धन दौलत (1980)
काला पानी (1980)
युवराज (1979)
काला पत्थर (1979)
दुनिया मेरी जेब में (1979)
चक्रव्यूह (1979)
जानी दुश्मन (1979)
द ग्रेट गॅम्‍बलर (1979)
झूठा कहीं का (1979)
आतिश (1979)
जहरीली (1979)
भला मानुस (1979)
कसमे वादे (1978)
हीरालाल पन्नालाल (1978)
अनजाने में (1978)
परवरिश (1977)
अदालत (1977)
दुसरा आदमी (1977)
अब क्या होगा (1977)
चोर सिपाही (1977)
अमर अकबर एंथोनी (1977)
ढोंगी (1977)
महा बदमाश (1977)
धरम वीर (1977)
प्रियतमा (1977)
जमानत (1977)
आंदोलन (1977)
कभी कभी (1976)
आशियाना (1976)
महाचोर (1976)
शराफत छोड़ दी मैंने (1976)
शंकर दादा (1976)
रफू चक्कर (1976)
दीवार (1975)
सेवक (1975)
जिंदा दिल (1975)
खेल खेल में (1975)
रानी और लाल परी (1975)
हवस (1974)
शतरंज के मोहरे (1974)
आईना (1974)
जहरीला इंसान (1974)
यादों की बारात (1973)
रिक्शावाला (1973)
पवित्र पापी (1970) - बाल कलाकार
वारिस (1969) - बाल कलाकार

------------------------

'सनई चौघडे '( चित्रपट ) एक फसलेला रिऍलीटी शो......

चित्रपट : " सनई चौघडे "( कांदे पोहे )
रविवार लोकसत्ता मधील चांगले परीक्षण ( कुणीही चुकवू नये असा चित्रपट ) वाचून चित्रपट बघायला गेले आणि पदरी घोर निराशा आली
या चित्रपटामध्ये कुठ्ल्या गोष्टीला मेळ्च बसत नाही अशा अतार्किक घटनांची संगती आहे.
या चित्रपटाद्वारे नक्की काय सांगायचं आहे त्यांनाच समजलं नाही त्यामुळे आपल्याला पण काहीच समजत नाही Sad
सनई चौघडे या नावामुळे आपल्याला वाटतं की लग्नामधील किंवा लग्नापुर्वी होणार्‍या गमती जमती यावर हा चित्रपट आहे, पण असं नसून
"कांदे पोहे" नावाचं एक वधु - वर सुचक केंद्र असतं आणि ते मुला मुलींच्या ह्जारो अर्जामधून एकमेकांना अनुरूप अशा पाच जोड्या निवडतात, आणि त्यांचा स्वभाव एकमेकांना कळावा म्हणून एका छानशा रिसॉर्ट मधे ठेवतात( त्यांच्या वर लक्ष ठेवायला आई - बाप पण
आहेत बरं का.) Nerd म्हणजे एकप्रकारे रिऍलीटी शो
मग त्यानंतर त्या पाच जोडयांचे एकमेकावरील आरोप प्रत्यारोप, एकमेकांचे विचार ,मधेच मुख्य हीरॉईन हीचं पूर्व प्रेम प्रकरण,
कुमारी-माता प्रकरण आणि या बाबतीत सगळ्यांचे तसेच त्यांच्या आई-बाबांचे थोर थोर विचार ऐकून आपल्या डोक्याचे उगाचच
कांदे-पोहे होतात At Wits End
त्यामुळे ह्या चित्रपटाबद्द्ल मी माझं मत सांगेन की आपापल्या जबाबदारीवर " सनई चौघडे " बघायला जा Wink Silly
चित्रपटभर सुनीधी चौहान यांचे कांदे SSS पोहे SSS हे र्शीषक गीत सारखं सारखं ऐकून आपल्या कानाचे पडदे शाबूत राहील्याबद्द्ल
देवाला धन्यवाद द्यायला विसरू नका. Smile

( वि. सु. आपली कोणाशी दुश्मनी असेल किंवा जुनी खुन्नस काढायची असेल तर त्यांना या चित्रपटाचे फुकट तिकीट द्या.) Rolling On The Floor

रेडिओ सिलोनच्या सुप्रसिद्ध निवेदिका पद्मिनी परेरा बेळगावात...

रेडिओ सिलोनच्या सुप्रसिद्ध निवेदिका पद्मिनी परेरा बेळगावात...
आजची संध्याकाळ बेळगावकरांच्या आयुष्यातील एक अनोखी, अविस्मरणीय संध्याकाळ ठरली आहे. रेडिओ सिलोनच्या सुप्रसिद्ध
निवेदिका पद्मिनी परेरा यांनी आज बेळगावमध्ये एक कार्यक्रम सादर केला. बेळगावात सध्या वास्तव्यास असलेले जुन्या चित्रपट
गीतांचे रसिक संग्राहक विजय नाफडे यांनी हा योग जुळवून आणला. त्यांनी निवडलेली तीस जुनी गाणी पद्मिनी परेरा यांच्या अप्रतिम
निवेदनासह रसिकांनी छोट्या पडद्यावर पाहिली. "ये श्रीलंका ब्रॉडकास्टिंग कार्पोरेशन का विदेश विभाग है..." हे वाक्य परेरांनी उच्चारले आणि रसिकांनी टाळ्यांचा कडकडाट केला. सगळ्यांच्या अंगावर रोमांच उभे राहिले. वर्षानुवर्षे जो आवाज रेडिओवरून ऐकला तो साक्षात आपल्यासमोर आहे याचा आनंद काही वेगळाच होता. नुकत्याच निवृत्त झालेल्या परेरा यांनी इतक्या लोकांसमोर निवेदन करण्याची किंवा बोलण्याची आपली पहिलीच वेळ आहे असे सांगत कार्यक्रम रंगवला. हा कार्यक्रम शहापूर बेळगावमधील सरस्वती वाचनालयाने आयोजित केला होता. अलीकडेच झालेल्या संशोधनानुसार संगीत शाकुंतल या नाटकाचा पहिला प्रयोग याच ठिकाणी झाला होता. (म्हणजे ही इमारत बांधण्यापूर्वीच्या मोकळ्या बखळीत.) एक विलक्षण अनुभव...

वहिंनीच्या बांगड्या - चित्रपट भाग - ४

वहिनींच्या बांगड्या - चित्रपट भाग - १
वहिनींच्या बांगड्या - चित्रपट भाग - २
वहिनींच्या बांगड्या - चित्रपट भाग - ३
'हो हो, आलोय मी' - मास्तरांनी पन्चायती समोरच तम्बाकुचा तोबरा टाकला.
'काल आमची म्हणजे मनोबा पाटिल, सरपंच इ. मान्यवर लोकांची बैठ्क झाली. त्यात खालील प्रमाणे ठरले आहे.' - मास्तर
---------------------------------------------------------
'आम्ही काल सगळे जण सरपंचाच्या वाड्यावर जमलो होतो. जेवण व नाचगाणॅ झाल्यावर आम्ही चित्रपटाविषयी बोललो. वेगवेगळ्या जबाबदार्या विषयी चर्चा झाली.' - भड्कमकर मास्तर. 'सरपंच, तो जरा कागद देता का?'
'हा, घ्या कागद' - सरपंचानी बंडीतुन कागद काडुन दिला.
'हे काय, सरपंच, बैंठकीचा कागद द्या. घायाळ बाईंचा फोटो आहे हा.' - मास्तर
'अहो, त्या फोटो च्या पाठिमागे बघा' - सरपंच. लोकांना आता अशा गोष्टींची सवय झाली होती. त्यामुळे कोणी विषय जास्त ताणला नाही.
तरीसुदधा मनोबा पाटिल म्हणालेच. ' सरपंच, कधी तरी अल्बम आम्हाला पण दाखवा' ख्याSS ख्या SS ख्या SS
सरपचांनी अनुभवाने आपण त्या गावचे नसल्यासारखा चेहरा केला आणी पाटिलांची गोची केली.
मास्तरांनी घसा खाकरुन पुन्हा सुरवात केली.
'कथा लेखन आणि दिग्ददर्शन याची जबाबदारी माझ्यावर सोपवण्यात आली आहे. मला विजुभाउ मद्त करतील'
'हा चित्रपटात गावातल्या भाई लोकांकडुन पैसे येणार आहेत. आणि तेच मार्केटींग पण करणार आहेत.' - मास्तरांना हे वाक्य बोलताना घाम आला होता. गावातल्या भाई लोकांची दह्शत आठवली.
'विजुभाउ, दाखवा ती ईस्टोरी' - पाटील.
'ही घ्या, मुख्य कथा लिहुन झाली आहे.' - विजुभाउंनी आपल्या बंडीच्या खिशातुन ऐक कागद काढला.
'कथा बरी आहे, हे घ्या सरपंच' - म्हणुन सरपंचांना कागद दिला.
'कथेचे ठिक आहे, आपल्याला आधी हिरो, हिरोइन ठरवली पाहीजे.' - सरपंचांनी मुख्य मुद्याला हात घातला.
'मी म्हणतोय, सरपंच तुम्हीच व्हा हिरो. तुम्हाला चांगले वेगवेगळे (!!) अनुभव आहेतच. आणि गावातील हिरो म्हणजे पैसाची ही बचत.' - पिवळा डांबिस. पिडा काकांनी आपली खजिनदाराची भुमिका पार पाडली.
'नाही, नाही, सरपचंच का? आम्हाला चानस नको का?' - आद्या, छोटा डॉन, धमु, विजुभाउ इ. ऐकसाथ ओरड्ले.
तिकडे अस्सल अमेरीकनाप्रमाणे पिडा काका दोन्ही कडे आग लावुन शांतपणे मजा घेत होते.
'हे बघा, तुम्ही म्हणतात ते बरोबर आहे. आपण याच्यावर दोन सद्स्यांची समिती नेमु आणि तीचा अहवाल आल्यावर पाहु.' - सरपंचांनी नवीन घोळघालु डाव टाकला.
'नको, नको, त्यापेक्क्षा आपण मतदान च घेउ' - आंद्या
'कशाला, मतदान आपण असे करु, आपण फैशन शो करु. आणी, जे पहीले पाच येतील त्यात मतदान घेउ.' - मास्तर. ही कल्पना सगळ्यांना पसंद पड्ली.
गावात मग फैशन शो झाला. त्यात पहीले पाच असे आले. (येथील क्रमांकांचा आणि गुणांचा काहीही सम्बध नाही.)
- प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
- थोरले आंनदराव पेशवे
- मदनबाण
- सरपंच
- मनोबा पाटिल

ह्या काही हेरोईन गावकर्यानी सुचवल्या आहेत.
१. जुही चावला.
२. माधुरी दिक्क्षित
३. रेखा
४. हेमा मालिनी.
५. अनुश्का

ह्या काही आइटेम साँगसाथी गावकर्यानी सुचवल्या आहेत.
१. ऐशवर्या राय
२. दिपिका पदुकोन
३. मल्लिका शेरावत
४. राखी सांवत
५. याना गुप्ता
झालेल्या बैठकीचा सारांश असा होता.

कथा - पट्कथा - मास्तर आणी विजुभाउ.
गीते - शेक्सपियर, केशवसुमार, अरुण मनोहर
संगीत - मिपाचा ऑलराउडर धमाल मुलगा
हिरो - प्रा.डॉ.दिलीप बिरुटे, थोरले आंनदराव पेशवे , मदनबाण, सरपंच आणि मनोबा पाटिल याच्यांपैकी ऐक.
होरोईन - जुही चावला, माधुरी दिक्क्षित, रेखा, हेमा मालिनी आणि अनुश्का यांच्यापैकी ऐक.
आइटेम - ऐशवर्या राय, दिपिका पदुकोन, मल्लिका शेरावत, राखी सांवत आणि याना गुप्ता यांच्यापैकी ऐक.
निर्माता, मारकेटिंग - छोटा डॉन व त्याची गैंग
दिग्ददर्शन - मास्तर
इतर कामे - पाटील व सरपंच

तर गावकर्यानो मतदान करा,
हवे तर नवी होरोईन किंवा आइटेम गर्ल सुचवा.

हिरो - प्रा.डॉ.दिलीप बिरुटे, थोरले आंनदराव पेशवे , मदनबाण, सरपंच आणि मनोबा पाटिल याच्यांपैकी ऐक.
होरोईन - जुही चावला, माधुरी दिक्क्षित, रेखा, हेमा मालिनी आणि अनुश्का यांच्यापैकी ऐक.
आइटेम - ऐशवर्या राय, दिपिका पदुकोन, मल्लिका शेरावत, राखी सांवत आणि याना गुप्ता यांच्यापैकी ऐक.

'हाल ए दिल'ः हालच हाल

आपल्या चित्रसृष्टीवर नेहमीच असा आरोप केला जातो की आपले दिग्दर्शक हॉलिवूडपटांमधून उचलेगिरी करत असतात.

मात्र त्यांनी तो खोटा ठरविण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. आता हॉलिवूडपटांमधून नव्हे तर हिंदी चित्रपटांतूनच चोरी

केली जाऊ लागली आहे. या आठवड्यात प्रदर्शित झालेल्या 'हाल-ए-दिल'चे हाल यापेक्षा वेगळे नाहीतच. दिग्दर्शकाने

'जब वी मेट' या चित्रपटाची कथा अगदी सराईतपणे चोरली आहे.

शेखर सुमनाचा मुलगा अध्ययन सुमन या चित्रपटातून इंडस्ट्रीमध्ये करिअरची सुरुवात करीत आहे. या व्यतिरिक्त

चित्रपटात काहीही नवीन नाही. चित्रपटाची कथा आहे, संजनाची (अमिता पाठक) जी रोहितवर (अध्ययन सुमन) प्रचंड

प्रेम करते. आणि अचानक तिच्या आयुष्यात शेखर (नकुल मेहता) येतो. चित्रपटाची अर्धीअधिक कथा शेखर आणि

संजना यांच्या ट्रेनमधील प्रवासाभोवतीच फिरते. दोघांसोबतच प्रेक्षकांनाही तो असह़य होतो. कथेच काहीही नावीन्य

नाही. संगीत बरे आहे मात्र ढिसाळ कथेमुळे ते देखिल तग धरू शकणार नाही.

कुमार मंगत यांची निर्मिती असलेला हा चित्रपट बिग स्क्रीन बॅनर अंतर्गत बनला आहे. अजय देवगण आणि काजोल

चित्रपटात पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत काहीवेळ दिसतात. हाल मात्र कथेच्या पात्रांचे होण्यापेक्षा प्रेक्षकांचेच जास्त

होतात.

सिंहासन !

'सिंहासन' मी दहावीच्या बोर्डाची परीक्षा चालू असताना पहिल्यांदा पाहिलाय !

विजय तेंडुलकर गेले आणि 'सिंहासन' आठवला. “....तर नव्या मुख्यमंत्र्याला सचिवालयासमोर मी जोड्यानं मारीन !” हे म्हणणारा डिकास्टा आठवला !!

पाठोपाठ आठवायला लागले -- 'तें'च्या क्लासिक्समधले प्रसंग. सामना, सिंहासन, अर्धसत्यमधले प्रसंग !! घाशीराम कोतवालमधले प्रसंग !!!

खरंतर सामना,सिंहासन पहिल्यांदा झळकले तेव्हा मी खूप लहान होतो. 'घाशीराम...' पहिल्यांदा रंगमंचावर आले तेव्हा तर दोनेक वर्षांचाच होतो. आठवी-नववीत असताना ह्या कलाकृतींबद्दल इतकं ऐकलं होतं की कधी एकदा त्या पाहतो असं झालं होतं.

साधारण पंचाऐंशी / शहाऐंशीच्या सुमारास, शुक्रवारी रात्री उशीरा, दूरदर्शनवर अचानक 'सामना' बघायला मिळाला. त्या दिवसापासून “ह्या टोपीखाली दडलंय काय…” आणि "सख्या रे! घायाळ मी हरिणी" ही गाणी मनात जागा करून राहिलीयत. डॉ. श्रीराम लागू आणि निळू फुले ह्यांच्या जुगलबंदीबद्दल काय बोलायचं? आणि काय बोलायचं, “कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे…"बद्दल !!! भास्कर चंदावरकर म्हणजे अप्रतिम संगीत हे समीकरणही मनात तेव्हाच रजिस्टर झालं. (पुढे 'थोडासा रूमानी हो जाऍं' आणि 'घाशीराम कोतवाल' पाहिल्यानंतर ते समीकरण एकदम पक्कं झालं)

त्यामानाने 'घाशीराम कोतवाल' खूप उशीरा पहायला मिळालं. आत्ता चार-पाच वर्षांपूर्वी कधीतरी डीव्हीडी मिळाली. दीपा भारतात गेली होती त्यामुळे घरी एकटाच होतो. एका वीकांतला शांतपणे 'घाशीराम ...' पहायला बसलो. नाटक असं असतं? नाटक असंही असतं?? असू शकतं??? 'घाशीराम...' म्हणजे एक खर्‍या अर्थाने 'हटके' अनुभव होता. तरी आमची पिढी दुर्दैवी कारण आम्हाला डॉ. मोहन आगाशेंचा नाना फडणवीस बघता आला नाही.

मगाशी म्हणल्याप्रमाणे 'सिंहासन' दहावीची परीक्षा चालू असताना पाहिलाय. मोठा झाल्यावर सिंहासनची व्हिडीयो कॅसेट घेतली पण मी दहावीत असताना आजच्याइतक्या सर्रास डीव्हीडी किंवा व्हिडीयो कॅसेट मिळायच्या नाहीत. रविवारी दुपारी टीव्हीवर 'सिंहासन' होता. अनायसे सोमवारी रंगपंचमीमुळे पेपर नव्हता आणि मंगळवारी हिंदीचा(च) पेपर होता. त्यामुळे बिनधास्तपणे 'सिंहासन' पाहिला. (गणित किंवा जीव-भौतिक-रसायनपैकी एखादा त्रस्त समंध असता तर 'सिंहासन' डळमळलं असतं! तिथे तर हमखास 'ईशान अवस्थी' व्हायचा !! प्रश्न दिसायचे पण समजायचे नाहीत !!!)

'सिंहासन'चा विचार करताना आधी अरूण साधूंचा विचार करावाच लागतो. त्यांच्या 'मुंबई दिनांक' आणि 'सिंहासन' ह्या दोन कादंबऱ्यांततील निवडक प्रसंगांवर आधारित -- सिंहासन ! मराठी सिनेमांत मग 'वजीर', 'सरकारनामा' असे राजकीय पार्श्वभूमीचे चित्रपट आले पण 'सिंहासन'ची सर कुणालाच नव्हती. (जशी हिंदीत 'शोले'ची सर सुभाष घईंच्या 'कर्मा'ला नव्हती !)

सिंहासन, शोले आणि गॉडफादर ह्या सिनेमांत पुन्हा-पुन्हा बघण्यासारखं काय आहे ह्याचं उत्तर देता येत नाही. तुम्ही एकतर ह्या मूव्हीज परत-परत बघता किंवा तो प्रश्न विचारता. ज्या दिवशी तुमचं तुम्हाला सापडतं की परत परत बघण्यासारखं काय आहे, त्यादिवशी तुमचा प्रश्न बंद होतो.

एकतर सिंहासनमधे खूप पात्रं आहेत. त्यात सिनेमा इतका वेगवान आहे की पहिल्यांदा बघताना थोडा त्रयस्थपणे बघताच येत नाही. म्हणजे असं समजा की तुम्ही, एकामागोमाग एक चाली रचून चाललेला, बुद्धिबळाचा डाव बघताय. तुमच्याही नकळत तुम्ही त्यात ओढले जाता. त्रयस्थपणे चाली समजून घेऊन त्यांचं विश्लेषण करणं जमत नाही. सिंहासन बघताना एक्झॅक्टली असंच होतं. तुम्हाला काय वाटतं? …… द्या टाळी !

सिनेमात महत्वाची पात्रं चार – शिंदे, दाभाडे, डिकास्टा आणि दिगू टिपणीस. असं ऐकलं होतं की डिकास्टा हे कॅरॅक्टर त्याकाळचे 'संपसम्राट' जॉर्ज फर्नांडिस ह्यांच्यावर बेतलेलं होतं.

सिनेमाच्या सुरूवातीला मुख्यमंत्री जिवाजीराव शिंदे ह्यांना एक निनावी फोन येतो … त्यांच्याविरूद्ध कट शिजतोय असं सांगणारा !! त्यानंतर डोक्यात ठोके पडल्यागत पार्श्वसंगीत सुरू होतं आणि मग सुरू होतं -- मुख्यमंत्री शिंदे, अर्थमंत्री विश्वासराव दाभाडे, कामगार लीडर डिकास्टा, स्मगलर्स आणि पर्यायाने इतर सगळ्यांचंच…एकमेकांवर कुरघोडी करू पाहणारं राजकारण -- सिंहासन! ह्या सगळ्याचा साक्षीदार म्हणजे पत्रकार दिगू टिपणीस ! जसजसा सिनेमा पुढे सरकतो तसतसे आपणही त्या दिगूसारखेच एका गर्तेत ओढले जातोय असं वाटतं !!

त्यात सुरेश भटांच्या हादरवणार्‍या ओळी

आम्ही चार किरणांचीही आस का धरावी?
जे कधीच नव्हते त्याची वाट का पहावी?
कसा सूर्य अंधाराच्या वाहतो पखाली !
अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली !!!

ब्लॅक एँड व्हाईट सिनेमाची एक वेगळीच जादू असते. जब्बार पटेलनं दिग्दर्शक म्हणून नुसती धमाल उडवून दिलीय ! त्यात अभिनयाच्या बाजूचे दिग्गज -- निळू फुले (दिगू टिपणीस), अरूण सरनाईक (मुख्यमंत्री जिवाजीराव शिंदे), डॉ. श्रीराम लागू (अर्थमंत्री अप्पासाहेब तथा विश्वासराव दाभाडे), दत्ता भट (शेतकीमंत्री माणिकराव पाटील), सतीष दुभाषी (कामगार पुढारी डिकास्टा), मधुकर तोरडमल (दत्ताजी), श्रीकांत मोघे (आनंदराव), माधव वाटवे (विधानसभेचे सभापती नाना गुप्ते), डॉ. मोहन आगाशे (बुधाजीराव), लालन सारंग (मिसेस. चंद्रापुरे) !!! जोडीला तेव्हाचे नवखे पण नंतरचे दिग्गज नाना पाटेकर (स्मगलर शेठचा हस्तक), रिमा लागू (अर्थमंत्र्यांची सून) !! अगदी न्हाव्याच्या छोट्या भूमिकेत राजा मयेकरांनीही बहार आणलीय !! सिंहासनमधे 'पानिटकर' साकारणार्‍या जयराम हर्डीकरचा अकाली मृत्यू झाला नसता तर ….!

खरंतर सिंहासन हा समान आवडीचे मित्र / मैत्रिणी जमवून एकत्र बघावा असा प्रकार आहे पण 'दुधाची तहान ताकावर...' म्हणून इथे काही निवडक संवाद दिल्याशिवाय राहवत नाहीये. तुम्हालाही जाणवेल की सत्तरचं दशक संपत असताना सिंहासन आला पण दुर्दैवाने सगळे डायलॉग्स जणू काही आजच्या परिस्थितीसाठी लिहिले आहेत !!!

-------------
रावसाहेब टोपले: (फोनवर बोलताना) शेतकऱ्याच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष होतंय …इंडस्ट्रीवल्यांना झुकतं माप मिळतंय…सेझचा प्रश्न आहे…आता काय पाईंट आहे? … स्थैर्य पायजे....
-------------
विश्वासराव दाभाडे: मुख्यमंत्र्यांच्याविषयी तुझं काय मत आहे?
डिकास्टा: डॅंबिस माणूस आहे ... पण माझं तुमच्याबद्दलही तेच मत आहे !
o डावं-उजवं करणं अवघड आहे …तुम्ही दोघंही सारखेच डॅंबिस आहात
o काही मागण्या कागदावर लिहिता येत नाहीत. पण म्हणून जर का त्या पूर्ण झाल्या नाहीत ....तर नव्या मुख्यमंत्र्याला सचिवालयासमोर मी जोड्यानं मारीन.
-------------
(उस्मानच्या घरी जेवताना पार्श्वसंगीतात गझल चालू आहे)
विश्वासराव दाभाडे: (टेपरेकॉर्डरकडे इशारा करून) हे मेहंदी हसन का?
उस्मान: नाही, गुलाम अली.
विश्वासराव दाभाडे: हां .. तेच ते (आवाज आणि नजरेत एक सहज बेफिकिरपणा)
-------------
मुख्यमंत्री जिवाजीराव शिंदे: कुठल्याही परिस्थितीत मला औद्योगिक बाजूला शांतता हवीय. नाईलाजाने मला तुला उचलावं लागेल.
डिकास्टा: आरोप कुठला ठेवणार?
मुख्यमंत्री जिवाजीराव शिंदे: तुझ्या सार्वजनिक जीवनात काहीही सापडेल. माणूस चोवीस तास डोळ्यात तेल घालून जगत नाही.
-------------
पक्षाध्यक्ष: च्यामायला ….. पक्षाध्यक्ष म्हणजे शेरडीच्या शेपटासारखं ! माश्या धड मारता येत नाहीत, अब्रू धड झाकता येत नाही !!
-------------
मुख्यमंत्री जिवाजीराव शिंदे: (कमालीच्या दांभिकपणे) राजकारण हे असं असणार माहिती असतं तर इथवर आलोच नसतो. देवाच्या आळंदीला निघालो आणि पोचलो चोराच्या आळंदीला !
-------------
शेवटी हा लेख पूर्ण करण्याआधी एकच संवाद जो एक चिरंतन सत्य सांगतो.
न्हावी: ह्या वेळी दाभाडे नक्की मुख्यमंत्री होणार.
दिगू टिपणीस: शिंदे आले काय आणि दाभाडे आले काय …तुमच्या आयुष्यात काय फरक पडतो?
------------------------------------
http://www.atakmatak.blogspot.com
------------------------------------

वहिंनीच्या बांगड्या - चित्रपट भाग - ३

वहिन्नीच्या बान्गड्या - चित्रपट भाग - १
वहिन्नीच्या बान्गड्या - चित्रपट भाग - २

गेल्या आठवड्यात दुसर्या गावातील लाकांनी येथे जरा मस्ती केली होती. त्याची मारामारी केल्या मुळे गावकरी दमले होते. वेगवेगळे महाराज येउन गेले, सर्वे झाले, त्यामुळे गावकरी जरा ह्या आठवड्यात सुस्तच होते.

आम्बोळी हा गावचा ऐकदम फेमस माणुस. गावात कोण ह्याचा नाद नाही करत. त्याला आजन्म मयताचे कन्त्राट मिळाले होते. कोणाची ही गेम करायची असेल तर ह्याला सांगायचे. सध्या छोटा डॉन च्या टोळीत शुटर चे काम करत आहे.
गावात आम्बोळी चे कन्दीलाचे दुकान होते. ह्यांन्च्या पुर्वजान्चा आणि शिवाजी राजांचा जवळचा संबंध. ह्यान्चे पुर्वज रांजांच्या चाकरीत होते. लढाइच्या कामात ऐकदम पुढे. दिसला यवन कि लाव कन्दील. म्हणुन तर मावळे जंगलातल्या लढाया जिन्कत. हा कन्दिल दिवसा उजेडी चालत नाही. पुढे हा कन्दील पेशव्याकडे पोचला. पण गडावरुन चढ्-उतारामुळे पुढे याचा परिनाम कमी झाला आणि मराठेशाही बुडाली. कोहिनुर हिर्याप्रमाणे हा परदेशी पोचला. आता तो अमेरिकन राष्ट्रपती याच्याकडे आहे. त्यांनी तो आता पेटवल्यामुळे तेलाच्या किमती वाढत आहेत आणि इराक, अफगाणिस्तान मध्ध्ये माणसे मरत आहेत. उगाच भारताचे नाव खराब. अशी ऐक कथा मिपा गावात प्रचलित आहे. अजुन ऐक कन्दील आम्बोळी कडे आहे. पण त्याचा उपयोग आता रात्रीचा मासे, खेकडे मारणे या साठी होतो.

तिकडे ह. भ. प. विजुभाउ 'अर्धविझल्या उदबत्त्या . रक्त गाभुळली वटवाघळे आणि उप्पीट' चे पारायण करुन उठले होते. हा मिपा धर्माचा धर्मग्रन्थ होता. त्यांनी पिडा काका कडुन आनलेली १०० मिली घेतली होती. बैटरी फुल चार्ज मध्ये होती. इतक्यात गावचा पोष्टमन पत्र घेउन आला. अत्तराच्या वासामुळे त्याने ते विजुभाउ चे पत्र धमुला दिले. पत्रावर ऐनी चा पत्ता बघताच धम्याने ते पत्र फोड्ले आनी वाचायला सुर्वात केले. कळवायला अतिशय वाईट वाटते आहे की आपण आमच्या घरी कान्दे पोहे खायला आलात; (आणि आमच्या घरचा फोवर पॉट फोडला, ह्या ओळी लिहुन नंतर खोड्ल्या होत्या.) आम्हला आनंद झाला, आपली आज्ञावली इशावाकु आहे. आणि माझी खिडकी आहे. ह्या वैर ग्रह असल्यामुळे पत्रिका जुळत नाही. तरी आपला मित्र लांब केस वाले आणि चश्मावाले छोडॉ यांची पत्रिका व फोटो पाठ्वुन द्यावेत. - आता लोभ नसावा ऐनी (सौ. चि. का. छोटी डॉनी व्ह्यायच्या प्रतिशेत).
इकडे छोडॉ च्या वाळवंटात बर्याच दिवसाने हिरवळ फुलली होती. छोडॉ ने आपल्या हातातल्या पिवळा डांबिस बा