मौजमजा

कोण कोण येणार धम्याचा लग्नाला ?

धमाल्या ८ जुलैला विवाहाच्या पवित्र बंधनात पुणे येथे अडकत आहे.
(सस्नेह निमंत्रण.)
त्याला प्रोत्साहन व धीर देण्यासाठी कोण कोण हजर राहणार आहे?

गेल्या वेळीच्या दंगलीला मी अनुपस्थित राहील्याने आंद्या ने नको त्या भागावर लाथा मारल्या. त्याच्या अजुन वेदना होतायत.
म्हणुन ते पापमार्जन करण्यासाठी, मी खास त्या दिवशी सुट्टी घेउन धमाल्याच्या लग्नात जाणार आहे.

अजुन तरी धम्याला भेटवस्तु द्यायचा निर्णय झाला नाही. त्यामुळे मी त्याला आहेर करायच्या विचारात आहे.

पण मला ऐकादी गणपतीची मुर्ती वैगेरे द्यावशी वाटते आहे. अजुन ऐकादा चांगली भेट वस्तु आहे का?
जर अजुन कोणाला भेट द्यायची असेल तर ऐकत्र मिळुन भेट देउ शकतो.

त्याला प्रोत्साहन व धीर देण्यासाठी कोण कोण हजर राहणार आहे?
कोणी भेटवस्तु देणार आहे का?

लहान मुलांचे उपद्व्याप

लहान मुले करमणूक तर करतातच, पण कधीकधी भयंकर उपद्व्याप करून सळो की पळो करून सोडतात.

माझा भाचा आहे. तो घरात कोणी नसताना ब्लेडने बाहुलीचं नाक कापत होता. नाकावरून ब्लेड सटकून त्याच्या तळहाताला कापलं आणि रक्त यायला लागलं. मग त्याची आई रागवेल म्हणून त्यानी जखमेत फेविकॉल भरला. मग दुसर्‍या दिवशी पस होउन ठणकायला लागल्यावर बोंबलला आणि त्याच्या आईला सगळा प्रकार कळला! आता बोला!

तुम्हीपण तुमच्या घरातील / ओळखीतील पाहिलेले / ऐकलेले / अनुभवलेले लहान मुलांचे उपद्व्याप इथे सांगा!

एक चित्र..मायक्रोसॉफ्ट पेंट मध्ये..

चित्रे काढण्याची खुप हौस..पण आळशी आणि वेळ..एकदा सहजच मायक्रोसॉफ्ट पेंट वर खालील चित्र काढले..
कागदावर काढायचे म्हणजे बराच वेळ पाहीजे..नेहमी डोळ्यांसमोर संगणक..त्यामुळे हा रीकामा उद्योग.. Smile

सांगा कसे आले ते??

स्वप्निल..

"इलो रे,इलो! कोकणातला पाऊस.

"शीरा मारां!ही काय पडण्याची रीत झाली?"
कोकणातला पाऊस अनुभवल्या शिवाय कसा असतो तो कळणं कठीण.
"नेमिची येई मग पावसाळा"
हे कुणीतरी कोकणातल्या पावसालाच उद्देशून म्हटलं असणार.

मृग नक्षत्र ७ जूनला लागत.शेतकऱ्या पासून लहान मुला पर्यंत एप्रिल,मेचा उन्हाळा सहन करून झाल्यावर केव्हा एकदा पाऊस येईल असं होतं.मला आठवतं त्यानुसार, मृग नक्षत्र आलं की अगदी नियमीत त्या दिवसात पाऊस यायचाच.
"घडाम,घुडूम आकाशात व्हायचं.कडाड,कुडुम" होवून लाखो दिवे पेटवावेत तसं आकाशात क्षणभर सगळं उजाळून जायचं.
"इलो रे! इलो"
हे दोन शब्द ज्याच्या त्याच्या तोंडातून बोलले जायचे.ऐकून बरं वाटायचं.
कुणीतरी एखाद्दया व्यक्तिला संभोधून बोलावं तसं पावसाला बोलायचे.त्याच्या विषयी अनुद्नार काढण्यापासून ते त्याचं स्वागताचं संभाषण करण्यापर्यंत सर्वांची मजल जायची.तो पाऊस बिचारा सर्व ऐकून घ्यायचा.मालवणीत एक म्हण आहे,
"पावसान झोडल्यान आणि नवऱ्यान मारल्यान तर कोणाकडे जावून सांगतलय?"
आणि तसंच पावसाच्या बाबतीत व्हायचं.तो त्याला हवं तेच करायचा.
कोकणातले लाल मातीचे रस्ते,एप्रिल,मे मधे वाऱ्याच्या वावटळी येवून जी काय रस्त्यावरून धूळ उडून जायची ती जायची.पण उरलेली धूळ काय कमी असायची. एकदा का पावसाच्या सरी वर सरी यायला लागल्या की पावसाने लाल रस्ते धुवून निघायचे आणि रस्त्याच्या बाजूच्या गटारातून लाल पाणी धो,धो वहात कुठे जायचं कुणास ठावूक.पण मुंबईतल्या इराण्याने "पाणीकम चहाचे" भरून भरून लाखो कप जणू गटारात ओतून टाकल्या सारखं वाटायचं.
आम्ही लहान असताना त्यावेळी आमच्या घराच्या पडवीत बसून रस्त्यावरून जाणायेणाऱ्या लोकांचे स्वगत किंवा बरोबरच्याशी होणारे संवाद ऐकण्यात मजा लूटायचो.
"इलो रे,इलो!
हो आता पिच्छो पाडल्या शिवाय रव्हचो नाय!
आता धुम्शाण खूप झालां बाबा!
वषाड पडो! नुकसान केल्या शिवाय हो आता सोडूचो नाय!
केंव्हा एकदा त्वांड घेवोन जाय्त असां झालां!
असोच मधून मधून उघाडी ठेवून रव्ह.ह्या वेळेक तरी आमच्यावर उपकार कर!
शीरा मारां!ही काय पडण्याची रीत झाली?
गेले आठ दिवस जांवचां, नांव म्हणून काढणां नांय!
गेले आठ दिवस नुसतां झोडपून काढल्यान!
येतानां गर्जून येतां,आणि जातानां पण गर्जून जातां!"

हे पावसाळ्याच्या दिवसात निरनिराळ्या दिवशी आणि दिवसाच्या निरनिराळ्या वेळचे उद्गार ऐकायला यायचे. डोक्यावर ताज्या भाजीचं ओझं किंवा विकून झाल्यावर रिकाम्या झालेल्या टोपल्या घेवून परत जाताना विक्रेकर बायका आणि पुरूष त्यांच्या मनात आलेला सर्व शीण त्या बिचाऱ्या पावसावर असले शेरे देवून कमी करून घ्यायचे.
कुणी तरी म्हटलंय ना,
"माळावर बोंब मारायला पाटलाची परमीशन कशाला?"
तसंच,
"पावसावर टीका करायला कोणाची कोण परवानगी घेत नसतो.?
पाऊस येण्यापुर्वी एक दोन महिने अगोदर,लोकं आपआपली घरं शाखारून घ्यायची.मंगळौरी घरांची कौलं असलेले घरमालक कामगाराना घरावर चढवून कचरा साफ करून घ्यायचे. पावसाचं कौलावरून येणारं पाणी पन्हळातून खाली जमिनीवर आणल्या जाणाऱ्या ह्या पन्हळांना पण साफ करून घ्यावं लागायचं. पण दुसऱ्या प्रकारच्या कौलाना मात्र संपुर्ण काढून साफ करून मग नीट ओळीत लावावं लागायचं.त्याला घर शाखारून घेणं म्हणायचे.
त्याशिवाय झोपडी वजा घरं असायची त्यांच्या वर माडाच्या झाडांच्या पानाच्या-झावळ्यांच्या-विणून केलेल्या झापांना शाखारून घ्यावं लागायचं.ह्या दिवसात हे काम करणाऱ्या कामगाराना पोटा पुरता मोबद्ला मिळून पोट भरायाचा मार्ग मोकळा व्हायचा.तो कामगार पावसाचे अन्य तर्हेने आभार मानायचा.

कोकणात पावसाच्या दिवसात सर्व आसमंत गार गार होवून जायचं.कावळे,चिमण्या,कबूतरं वगैरे पक्षी बिचारे झाडांच्या फांद्दयांचा आडोसा घेवून निमुट दिवस काढायचे.जरा उघाडी मिळाली की कावळे कुणी उष्ट्या हाताने काही अन्न बाहेर फेकलं असल्यास तेव्हडंच गीळून दिवस काढायचे.कावळ्या कडून एक शिकण्या सारखं आहे की उष्टं अन्न खाताना आपल्या भाईबंधाना कांव कांव करून बोलावून घेवून ते अन्न सर्व मिळून खायचे.हे माणसाने आप्पलपोटेपणा कसा नसावा हे शिकण्यासारखं आहे.
कोकणातल्या शहरातून जरा खेड्यांत गेल्यास पावसाळ्यात येणाऱ्या मजेची नुसती आठवण मन बेचैन करून टाकतं.शेतकरी भर पावसात डोक्यावर इरली घेवून शेतात काम करायचे.ही इरली पण बांबुच्या पट्ट्याची बनवतात. मुस्लीम बायका चेहरा उघडा ठेवून बुरखा कसा घेतात तसाच बांबुच्या पट्ट्यांचा बनवलेला हा बुरखा पुढून उघडा असतो आणि डोक्यावरून ते पाठीवर खालपर्यंत जाईल असा अर्थात हा बुरख्या पेक्षा जाड असूनही पावसात काम करताना भिजून न जाण्यासाठी अंगावर घेवून शेतकरी शेतात काम करीत असतात.
ह्या इरल्यामुळे दोन हात मोकळे राहिल्याने वाकून जमिनीवर काम करतां येतं.भात लावणीच्या दिवसात प्रत्येक कुणग्यात-चौकोनी आकाराच्या पट्ट्यात- एका टोका पासून दुसऱ्या टोकापर्यंत एका ओळीत बसून, रोपं पेरत-trans plant- करत,कामाचा शीण कमी होण्यासाठी मिळून गाणं गात, इंच इंच पुढे सरकतानाचं दृष्य पाहून शेतकरी घेत असलेली मेहनत पाहून ह्यावेळी असं मनात यतं ते गाणं,
"आम्ही दैवाचे दैवाचे शेतकरी रे
करू काम स्मरू नाम
मुखी राम हरी रे"
मुंबईहून कॉलेजच्या सुट्टीत कोकणात घरी आल्यावर मावशीच्या खेड्यात जावून तिच्या झोपडीवजा घराच्या वरच्या माडीवर जावून अशा पावसाच्या
दिवसात खिडकीत बसून बाहेर दिसणारी हिरवी गार शेतं बघून मन प्रसन्न व्हायचं.
अशावेळी न सांगता मावशी भरपूर साखर घातलेला कप भरून चहा आणि थाळी भरून खमंग कांद्दयाची भजी घेवून यायची.अशा पावसातच हे कॉम्बीनेशन एनजॉय करता यायचं. एकदा असाच सुट्टीत आलो असताना मला आठवतं मी बसलो होतो. पुढल्या खिडकीत बसून श्रीहरी असंच बाहेरचं पावसाळी वातारण पाहून मुरलीवर, मंगेश पाडगांवकरांचं,

"लाजून हासणे अन हासून ते पहाणे
मी ओळखून आहे, सारे तुझे बहाणे"

हे गाणं सुंदर सुरात वाजवत होता.आणि खाली वाकून वाकून पहात होता.मी सहज वाकून खाली पाहिल्यावर साधना, एरव्ही मुंबईत कॉलेजात स्लीव्हलेस टॉप आणि खाली जीन अशा ड्रेस मधे वावरणारी,आज आजीचं नऊवारी पातळ आणि लांब बाह्यांचा ब्लाऊझ घालून हातात दोन घागरी घेवून विहीरीवर पाणी आणायला जात असलेली दिसली.साधना श्रीधरची शेजारीण.ती पण अशीच कॉलेजच्या सुट्टीत आजीकडे थोडे दिवस राहायला आली होती.तिला उद्देशूनच ते गाणं होतं हे समजायला मला वेळ लागला नाही.माझ्याकडे पाठकरून श्रीहरी बसल्याने त्याला मी पण खाली पहात होतो ते दिसत नव्हतं. विहीरीतून दोन घागरी पाणी भरून, डोक्यावर चूंबळ ठेवून त्यावर एक घागर, आणि दुसरी घागर कंबरेवर घेवून लचकत मुरडत येताना पाहून श्रीधरने आपलं गाणं बदलं होतं.

"पाण्या निघाली सुंदरी
मन ठेविले दो घागरी
चाले मोकळ्या पदरी
परी लक्ष तेथे "
ह्या गाण्याचे सूर आतां मुरलीवर वाजवायला लागला.
माझ्याच वयाचा माझा मावस भाऊ-श्रीहरी- तो पण कॉलेजच्या सुट्टीत आपल्या आईला भेटायला नेहमी सारखा आला होता.ह्या वेळी त्याची प्रेयसी-गर्ल फ्रेन्ड- साधना पण तिच्या आजीकडे सुट्टीत कोकणच्या पावसाची मजा एन्जॉय करायला आली होती.जुलै महिन्यात कोकणातल्या पावसाला कहर यायचा.वर्षातून बाकीचे दिवस कोरड्या रहाणाऱ्या नद्या ह्या दिवसात तुडूंब भरून वहायच्या.विहीरी पण एरव्ही पाणी अगदी तळाला गेलेल्या, जुलै महिन्यात काठोकाठ भरायच्या.
मी हा त्यांचा रोमान्स पाहून एन्जॉय करीत होतो.
का कुणास ठाऊक त्याचं माझ्याकडे लक्ष का गेलं ते.तो जरासा लाजला.ते पाहून मी पण एक जुनं गाणं आठवून गुणगुणलो

" नको वाजवूं श्रीहरी मुरली रे
तुझ्या मुरलीने भूक तहान हरली
नको वाजवूं, नको वाजवूं
श्रीहरी मुरली"
हे ऐकून,माझ्या जवळ येवून म्हणाला,
"वा! सर्व भजी आणि चहा फस्त केलास आणि
म्हणतोस भूक तहान हरली"
आणि नंतर आम्ही दोघे खूप जोरा जोरात हंसलो.
काही वर्षानी श्रीहरी आणि साधनाचं लग्नं पण झालं आणि आता त्याना शाळेत जाणारी दोन मुलं पण आहेत.
जुलैभर कहर करून झाल्यावर ऑगस्ट महिन्याच्या सुरवातीला हा पाऊस जरा उघडीप घेतो.कदाचीत ती निसर्गाचीच जरूरी असावी.भातशेती पण एव्हांतोपरी अंग धरते.आणि मधूनच उघडीप मिळून उन मिळाल्याने कोवळे दुधाळ भाताचे दाणे पोसले जातात.

भर पावसात मात्र सुकी मासळीच खावी लागते.सुकी कोलंबी-सुंगटं- सुके बांगडे पाऊस येण्यापुर्वी साठवण करून ठेवलेले असतात त्याचा वापर होतो.शिवाय भर उन्हात एप्रील मे मधे सांडगे,पापड,कुरडुया उन्हात वाळवून तयार केलेला साठा अशावेळी उपयोगी येतो.तसेच वाळवून ठेवलेल्या फणसपोळया आणि आंब्याची साठं उपयोगी पडतात.

नद्यांचे पूर जरा कमी झाल्याने जाळी टाकून मासे मिळण्याची वेळ येते.पावसात सुळे,गुंजूले.शेतकं,काळूंद्री नावाचे मध्यम आकाराचे मासे मुबलक मिळतात.मग घरोघरी सुळ्याची खोबऱ्याच्या रसातली आमटी,आणि गुंजुल्याचं जागच्याजागी-घट्ट-तिरफळं घालून केलेलं तिखलं,लालबुंद कोकमाचं सार-सोलकडी- आणि साप्पाटून भात मिळाल्यावर काय विचारतां?
कोकणातला पावसाळा ह्या सर्व कारणाने चांगलाच लक्षात राहतो.
" नेमिची येई मग पावसाळा"
हे कुणीतरी कोकणातल्या पावसालाच उद्देशून म्हटलं असणार.

श्रीकृष्ण सामंत

नविन वाहिनी.

खुश खबर! खुश खबर !! खुश खबर !!! आम्ही रावणसे बन्धु आपल्या मराठी दर्शकासाठी घेऊन येत आहोत, नविन वाहिनी नाव आहे.....अमावस्येची रात्र!.....
त्या साठी हवे आहेत नविन कलाकार.
आपण इच्छुक असल्यास लिहावे.

हमखास निवडी साठि. हडळीची ओळख, खविसाचे शीफारस पत्र,हिंदी सिनेमात बिल्ला नामक कलाकारा बरोबर काम केलेलीसी.डी.
पो.बॉं.नंबर १२
वेताळ गल्ली,मुंज्याच्या पिंपळा जवळ,
भुताची वाडी.

बालपणीचा काळ सुखाचा! १३ बायमावशी!

आमच्या घरात तसे फारसे धार्मिक वातावरण नव्हते. थोडीफार पूजा-अर्चा रोज नित्यनेमाने चालत असे.पण सोवळे-ओवळे,अभिषेक किंवा जप-जाप्य असली कर्मकांडे नव्हती. एक छोटीशी फळी ठोकलेली भिंतीत(हाच देव्हारा),त्याच फळीवर एखादी तसबीर आणि समोर छोट्य़ा ताम्हणात तीन चार पितळी मूर्ती असत.त्यातील एक शंकर,दुसरा गणपती,एक कोणती तरी देवी(लक्ष्मी की पार्वती? आठवत नाही) आणि लंगडा बाळकृष्ण.पूजा आईच करायची पण कधी अडचण असली तर मग आम्हा मुलांपैकी कुणी तरी करत असू.अर्थात पूजा म्हणजे स्वच्छ फडक्याने तसबीर साफ करायची,सगळे पितळी देव पुसायचे(आठवड्या्तून एकदा त्यांना आंघोळही घातली जायची), हळद-कुंकू वाहायचे,थोडी फुले वाहायची... की झाली पूजा. हाय काय नी नाय काय.

शाळेत गीतापठण,श्लोकपठण वगैरे असल्यामुळे ते सगळे पाठ होते. संध्याकाळी इतर उजळणी बरोबर त्याचीही उजळणी व्हायची. आता माझाच विश्वास बसत नाहीये,तर तुमचा काय बसणार म्हणा,पण त्या काळात मला रामरक्षा,अथर्वशीर्ष,मनाचे श्लोक, गीतेतले २,१२ आणि १५ असे अध्याय,झालेच तर संस्कृत सुभाषिते,मोरोपंतांच्या आर्या आणि असेच काही मिळून कितीतरी गोष्टी पाठ होत्या. अगदी मधनंच कुठूनही सुरु करायला सांगितले तरी न अडता,अस्खलितपणे घडाघडा म्हणून दाखवू शकत असे, असा मी घनपाठी होतो. असो. गेले ते दिवस! आता थोड्या वेळापूर्वी काय केले हेही आठवत नाहीये. Smile

मुख्य दिवाळी संपली की देवदिवाळीच्या आधी येणारे तुळशीचे लग्न आमच्या वाडीत बर्‍याच जणांकडे साजरे व्हायचे. मात्र त्यात पहिला मान ह्या बायमावशींकडच्या तुळशीच्या लग्नाचा. वाडीतल्या जवळपास सगळ्या बायका अगदी नटून थटून त्यांच्या चिल्ल्यापिल्ल्यांसह येत असत. एरवी दिवसातनं एखादेवेळ पाणी घालण्या व्यतिरिक्त ज्या तुळशीकडे फारसे लक्ष नसायचे तिला आज भलतेच महत्व यायचे. ज्या डब्यात ती तुळस लावलेली असायची(बहुदा डालडाचा डबाच असायचा)त्या डब्याला बाहेरून गेरू फासला जायचा. मग त्यावर खडूने स्वस्तिक आणि कसली कसली नक्षी काढली जायची. तुळशीला जरीच्या हिरवाकंच खणाने गुंडाळले जायचे. समोर सुगंधी उदबत्ती,धूप लावला जायचा. तुळशीचा नवरा म्हणजे लंगडा बाळकृष्ण एका ताम्हणात घालून आणलेला असायचा. मग दोघांच्या मध्ये आंतरपाट म्हणून वापरायला नवा कोरा पंचा आणलेला असायचा.हळद कुंकु,ओटीचे सामान वगैरे सगळी जय्यत तयारी झाली की मग खास मला बोलावणे पाठवले जायचे. मी म्हणजे ते लग्न लावणारा पुरोहित असायचो.

अहो आता लग्नात भटजी काय म्हणतात कुणाला कळतंय? मलाही त्यातलं काही येत नव्हतंच. तसं मी बायमावशीना सांगितलं की त्या लगेच म्हणायच्या, "मी म्हणते, लग्नात ते मेले भटजी काय म्हणतात ते त्यांचं त्यांना तरी समजतंय काऽऽऽऽय?तुला जे काय श्लोक-बिक येतात नाऽऽऽऽ ते तू म्हण. आमच्या तुळशीबायला आणि बाळक्रिष्णाला चालेऽऽल बरं का! तू काऽऽऽऽऽऽही काळजी करू नकोस. मग मी हात जोडून संध्येला म्हणतात ते (माझी नुकतीच मुंज झालेली होती) "केशवायनम:,माधवाय नम:,गोविंदायनम: इतके म्हणून सुरु करायचो. माझे बघून बायमावशी सगळ्या पोरांना हात जोडायला लावत.

रामरक्षा,मनाचे श्लोक,गीतेचे तीन अध्याय,अथर्वशीर्ष आणि अजून जे जे काही म्हणून माझे पाठ होते ते सगळे म्हणायला मला किमान एक-दीड तास लागत असे. मी जे काही म्हणत असे त्याचा अर्थ माझ्यासकट कुणालाच समजत नसे . पण मोठ्या बायकांना माझे कोण कौतुक. पोरगं काय धडाधड संस्कृत बोलतंय.त्यावेळचे त्यांच्या चेहर्‍यावरचे ते कौतुकाने ओसंडून जाणारे भाव पाहिले की मलाही मी फार मोठा पंडित असल्यासारखा वाटायचो.निदान त्या क्षणी तरी मला हवेत तरंगल्यासारखे वाटायचे.
हे सगळं झालं की अक्षता वाटल्या जायच्या. मग तुळस आणि बाळक्रिष्णाच्या मध्ये आंतरपाट धरून कुणा हौशी बाईने रचलेली मंगलाष्टकं म्हटली जायची आणि शेवटी "शुभ लग्न सावधान" च्या गजरात अक्षता टाकून हे लग्न लागायचे की तिकडे मुलांनी लक्ष्मीबारचा धुमधडाका सुरु केलेला असायचा. त्यानंतर मग आम्हा चिल्लर पिल्लर लोकांना आवडणारा खाऊ मिळायचा तो म्हणजे उसाचे कर्वे,चिंचा,बोरं,बत्तासा आणि पुन्हा नव्याने बनवलेले ताजे दिवाळीचे पदार्थ. भटजींची दक्षिणा म्हणून मला सव्वा रुपया आणि एखादे शर्टाचे कापड मिळायचे. झालंच तर काही फळंही त्या बरोबरीने असायची. हे सगळे घेऊन ऐटीत मी घरी जात असे.काही म्हणा ते क्षण अक्षरश: मंतरललेले(मंत्र म्हणायचो म्हणून असेल! Wink )होते.
बायमावशींचं माझ्या बालपणातले स्थान हे माझ्या सख्ख्या मावशांपेक्षाही जास्त जवळचे होते. ११वीत जाईपर्यंत दरवर्षी मी ह्या नाटकात सक्रीय भाग घेत होतो. त्यानंतर शिंग फुटली म्हणा किंवा मनात संकोच निर्माण व्हायला लागला....कोणतेही कारण असो. मी ह्यातनं माझं अंग काढून घेतले.
(इथे बायमावशी पुराण संपले.)

मिपाकरांच्या आधुनिक म्हणी, सुवचने

आपण सगळे जण काही नवीन म्हणी तयार केलेल्या आहेत.
जसे इनोबांनी तयार केलीली चिकन रोटीची म्हण
मी काही दिवसापुर्वी केलीली म्हण
'प्रयत्ने कळफलक बडवता, शुद्ध मराठी गळे |

आणि आपण सही म्हणुन सुद्धा चागली वाक्ये लिहतो. मला विजुभाउ, चतुरंग यांची वाक्ये स्मरणात आहेत. ती वाक्ये काही संग्रही ठेवण्यालायक आहेत.

माझी काही आवडती वाक्ये
पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत - विजुभाउ

बुध्दीबळाच्या खेळात राजा किती ही मोठा असला तरी तो व प्यादा खेळानंतर एकाच बॉक्स मध्ये बंद होतात...! - राज जैन

बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है ..... - छोटा डॉन

इ इ.

तुमची अशी कोणती आवडती वाक्ये आहेत का?
जी आपण संग्रही ठेवण्यालायक ठेउ शकतो.

मिपा दंगल भाम्बुर्डा(पुणे) वृत्तान्त

आमच्या वार्ताहाराकडुन
दिनांक २२ जुन
स्थळ : भांबुर्डा
२२जुन हा उभ्या महाराष्ट्राला एक अविस्मरणीय दिवस. बर्रोब्बर एकशे दहा वर्षापूर्वी याच भांबुर्ड्याच्या गणेश खिंडीत एक ऐतिहासीक प्रसंग घडला होता. या प्रसंगाची पुन्हा बरोबरी होणे नाही.
याच दिवसाचा पूर्व दिन भाम्बुर्डा दंगलीसाठी म्हणुन मुक्रर झाला करण्यात आला होता.दंगलीचा काळ ठरला होता पण स्थळ काही ठरत नव्हते.विजुभौ नी लैच टीमकी बडवली म्हणुन शांग्रीला अशा नेपाळी नावाच्या म-हाठी हाटीलात ( पहा एकविसाव्या शतकात देशांच्या सीमा कशा लहान होत चालल्यात ते)दंगल ठरवली. आखाड्यात दस्तुरखुद मोठे आनन्दयात्री आणि संत ईनोबा यानी पानी मारुन धुलीचा बंदोबस्त करुन ठेवला होता. बारीक लाल माती व्यस्थीत मळुन ठेवली होती आखाड्यात एकही खडा रहाणार नाही ( खडा म्हणजे बारका पत्थर....खडा रहाणार नाही म्हणजे उभा रहाणार नाही असा अर्थ घेउ नये)याची चोख खबरदारी घेतली होती. तालीम मास्तर संत ईनोबा असल्यावर कोणतीही कसूर रहाणार नाही हे नक्की होतेच. तरीही थोरले आनन्दयात्री यानी नेहमीच्या सवयीनुसार सर्व काही ठीक आहे याची जातीने पडताळणी केली.
दंगलीची वेळ संध्याकाळची होती. ही वेळ पैलवानाना सोयीची असते...पडझडले तर आराम फ़र्मावता येतो या हिशेबानेच अनुभावी इनोबानी सगळा बंदोबस्त ठेवला होता.
जंगी कुस्तीचा फ़ड आहे हे कळल्यामुळे जणु अवघ्या पुण्यनगरीने कुस्त्यांच्या दंगलीच्या ठिकाणास प्रथम पसंती दिली असावी इतकी तौबा गर्दी रस्त्यावर होती.
हळु हळु एकेक पैलवान येउ लागले. हिमालया येवढे उंच संत ईनोबा स्वातध्याक्ष होते. रुस्तुम ए चिंचवड शेखर , डोमकेसरी डोमकावाळे ,अती लाईट वेट कॆटेगरी पेहेलवान धमालखान ,रुस्तुम ए बिबवेवाडी आनन्दयात्री ,सगळे आले. विजुभाऊ नी धमाल बाळासोबत नन्तर उशीरा येउन अल्यागेल्याची विचारपुस केली. सर्वजण स्थानापन्न होतात्से झाले. दुसरे रुस्तुमे बिबवेवाडी मिपा केसरी पैलवान सखाराम जी याना गटणे त्यावेळी चहा पोह्याच्या लढाईस ऐन वेळी जावे लागले असल्याकारणे ते येतो म्हणुनही येऊ शकले नाहीत. कानोकानी चालत आलेल्या बातमीनुसार कोणी कोठे बोलावले तर आपल्या साहित्यासाधनेत व्यत्यय नको म्हणुन दुसरे रुस्तुमे बिबवेवाडी मिपा केसरी पैलवान सखाराम जी हे नेहमीच चहा पोह्याच्या लढाईस गेलो होतो असे सांगतात. अशी वदंता आहे. विषेश म्हणजे चहापोह्याच्या इतक्या लढाया लढुनही ;गनीमाने आतापावेतो त्याना अनेक वेळा खिंडीत गाठौनही; प्रत्येक वेळी अंगावर एकही जखम न घेता ते सुखरूप परत आलेले आहेत. त्यासाठी आता गनीमच मिपा महागुरु कैलीफ़ोर्नियापीठाधीश पिवळाडाम्बीस काकांच्या शिकवणी लावणार आहेत असे कळते.
सर्व लोक ज्यांची उत्कंठेने वाट पहात होते ते सर्वांचे आवडते सुपारी सम्राट दख्खन केसरी कैसर ई हिन्द महान छोटा डॊन यांचे आगमन झाले. त्याना पाहिल्याबरोबर प्रेक्षकातुन एकदम जी कडकडकड्कडकड टाळी पडली..........किर्र्र्र्र्र्र्किच्च ब्रेक दाबल्याचा...मोटारीवरमोटार आपटल्याचा किंवा एकसाथ एकाच वेळी सगळे फ़डताळ पालथे हौन भांडीकुंडी वाजावी तसा आवाज झाला. आमच्या वार्ताहराच्या मते हा आवाज प्रेक्षकानी वाजवलेल्या टाळ्यांचा होता. लोक तो आवाज कोणीतरी कोनावरतरी आदळल्याचा आवाज होता असे म्हणतात. सर्वांचे आणि वार्ताहाराचे लक्ष्य त्यावेळी सुपारी सम्राट दख्खन केसरी कैसर ई हिन्द महान छोटा डॊन यांचे कडे होते. लोक घाबरु नयेत म्हणुन सुपारी सम्राट दख्खन केसरी कैसर ई हिन्द महान छोटा डॊन यानी यावेळे त्यांचा अंगरक्षक कन्दील्फ़ेम आंबोळी याला सोबत आणले नव्हते. तर त्यांच्याच गेन्ग मधल्या एकाचे तरुणीप्रमाणे केशांतर करवुन लोकाना चकमा दिला होता
कुस्त्यांची दंगल सुरु झाली....एकेक पैलवान दुसयाचा जोर आजमावु लागला. धमाल आणि आनन्दयात्री अशी जोडी प्रथम आखाड्यात उतरली..आपल्याला हा भारी पैलवान जोड म्हणुन दिला म्हणुनअती लाईट वेट कॆटेगरी पेहेलवान धमाल खुश होता..आणि सोबत हा असला पैलवान दिला आता कुस्ती एकदम सोपी जाईल म्हणुन ,रुस्तुम ए बिबवेवाडी आनन्दयात्री खुश होते. त्यानी मोगॆम्बो खुष हुवा अशी आरोळी मारायचीच बाकी ठेवली होती.त्यांनी आर्य आणि पर्शियन परंपरेला साजेल अशा नूरा कुस्तीला प्रारंभ केला.मल्ल डोमकेसरी डोमकावाळे पंचगिरी करत होते. काही निर्णय चुकले तर त्यानाच पंचेस खावे लागत होते.
कट्टा सत्विक असावा अशी सुपारी सम्राट दख्खन केसरी कैसर ई हिन्द महान छोटा डॊन यांची ईच्छा होती. ते वेळोवेळी त्या वचनाला स्मरत होते. दुस-य़ाच क्षणी ते "हेच एक सत्य..बाकी जग मिथ्य " म्हणत मोहाला बळी पडत होते.
अचानक कट्ट्यावर धमाल बाळाने स्वत:ची ओळख करुन दिली. त्यावेळी धमाल मुलाने "धमाल" या नावाचे पेटंट आपल्याकडे असुन ते इतरानी वापरले तर आपल्याला रॊयल्टी म्हणुन केळवण द्यावे लागेल अशा अर्थाचा कायदेशीर कराराचा कागद दाखवला. धमाल बाळाने "बले झाले ले धमु काका; शकाली बशायला आनि पुशायला पन वापलता येईल" असे म्हणुन तो कराराचा कागद स्वत:कडे ठेउन घेतला.
निकाली कुस्ती ची परम्परा असलेल्या मैदानात नूरा कुस्ती हा प्रयोग जरा आगळाच होता. त्यामुळे थकलेले पैलवान एकमेकाना मूठी उलटी करुन "टैम प्लीज" म्हणु लागले. म्हणुन मिपागौरव पुरस्कार देण्यात येऊ लागले.

******मिपा जीवन गौरव नाट्यभैरव
नामंकने १) विजुभाऊ : :धमुचे लग्न
२) भडमकर मास्तर : करीयर गायडन्स क्लासेस
३)डॊ प्रसाद दाढे : मॆरेज सर्टीफ़िकेट रीन्युअल

यावर्षीचा मिपा जीवन गौरव नाट्यभैरव पुरस्कार हा एकमताने "भडकमकर मास्तर" याना देण्यात आला.

******मिपा जीवन गौरव मिपा वेताळ

नामंकने १)मदनबाण : अभ्यंकरांच्या चपला
२)आम्बोळी: कन्दील.
३) आम्बोळी : मी पाहिलेले मयत
हा यावर्षीचा मिपा जीवन गौरव सर्वानुमते देण्यात आला
आम्बोळी: कन्दील.

******मिपा जीवन गौरव मिपा देवर्षी
लोकाना मंत्रमुग्ध करुन त्याना चित्रबद्ध खिळवुन ठेवण्याबद्दल देण्यात येणारा पुरस्कारासाठी नामांकने होती
१) पिवळा डांबीस : गाबीत मास्तर
२) पिवळा डाम्बीस : अब्दुलखान
३)राजे :प्रवास
४)प्रमोद देव :माझे बालपण
हा यावर्षीचा मिपा जीवन गौरव सर्वानुमते देण्यात आला

पिवळा डांबीस : गाबीत मास्तर

******मिपा सर्वोत्क्रुष्ठ विडम्बन काव्य
विनोदी लिखाणा बद्दल देण्यात येणारा हा पुरस्कार याची नांमांकने
१) अवखळ मनाचा झारा
२)जाडी दहा मणांची
३)मदिरेच हाणितो पेले.
विनोदी लिखाणा बद्दल देण्यात येणारा हा पुरस्कार सर्वानुमते देण्यात आला
जाडी दहा मणांची....

मिपा पाकशास्त्री
सर्वोत्कृष्ठ पाककृती साठी नामांकने
१) पेठकर काका
२) स्वाती राजेश
३) स्वाती दिनेश

हा पुरस्कार या तिन्ही नामांकनात विभागुन देण्यात आला

मिपा वात्रटाचार्य चहाटळ झोटिंग
प्रतिसादात वात्रटपणा करण्यासाठी देण्यात येणारा पुरस्कार
या पुरस्कारासाठी सर्वात जास्त चढाओढ होती.
नामांकने
१) धमाल मुलगा :जहब-या आणि ठ्यॊ फ़ेम
२) आनन्दयात्री
३)विजुभाऊ
४) पुण्याचे पेशवे
५)पिवळा डाम्बीस
६)मनस्वी
७)ऋचा
८)पेठकरकाका :
९)छो.डॊन
१०) सखाराम गटणे.

खरड फ़ळ्यावर होणारी दंगले कोणत्या सदरात गृहीत धरायची असे विचारत या पुरस्कारावरुन सर्व पंच मंडळीत बराच वाद झाला. नूराकुस्तीला ख-या कुस्तीचे स्वरूप येईल की काय अशी दंगल ऊसळली.

प्रसंग ओळखुन धमाल बाळाने मध्यम मार्ग म्हणुन एक उपाय सुचवला.
हा पुरस्कार कोणाला द्यावा हा निर्णय सर्व मिपा सदस्यांवर सोपवण्यात आला असुन त्यावर एक स्वतंत्र धागा उघडुन त्यावर कौल घ्यावा.बिरुटे सर, रामदास,चतुरंग काका, छोटी टिंगी.अशा ज्येष्ठ सदस्यानी याचा निवाडा करावा.
सर्व उपस्थित सदस्यानी यास एकमुखाने अनुमोदन दिले.आणि घड्याळाने २२ जुन उजाडली असे जाहीर केल्याने; भांबुर्डा दंगल उरकली असे जाहीर करण्यात आले.
आमचा वार्ताहार कळवतो की पुरस्कार जाहीर झाल्यावर अशी दंगल पुन्हा एकदा घेणेत येईल.स्थळ काळ वेळ मागाहुन कळवनेत येईल.
आपला वाल्ताहल : धमाल बाळ

फुक्कटचे पाटील

रामराम मित्रांनो,
"पाटील" .... खेड्या-पाड्यातली एक मानापानाची पदवी. आपल्या महाराष्ट्रातील खेड्यांत 'पाटलां'ना फार आदराने
संबोधलं जातं. लग्न असो वा मयत, शालेय समारंभ किंवा गावची जत्रा..." पाटील" लोक नेहमी पूढाकार घेत अलेत आणि
जनताही हेच अपेक्षित करते. थोडक्यात काय तर "पाटलां"शिवाय पान हालत नाही.
पण हे झाले मानाचे 'पाटील' .....

पाटलांची अजुन एक जमात आहे . हे आपल्या कर्माने 'पाटील' होतात. त्यासाठी , खालिल अटी लागु होतात,
थोड्याश्या स्तुतीने हूरळून जाऊन टग्या लोकांना चहा मिसळपाव खाऊ घालणे, "ढूंगणा"ला ठिगळ लागलेले
असले तरी निवडनूकीला ऊभे राहुन स्वता:चा आण्णू गोगोट्या करुन घेणे, जमिनी विकून स्कोर्पियो घेणे
(या पाटलांना "गुंठामंत्री" असे स्पेशल नाव आहे )
आता त्या स्कोर्पियोचा एवढा पानऊतारा झालायं यांच्या मुळे की , तुम्ही जर स्कोर्पियो घेतली तर लोक आधी विचार करतात
याने जमिन काढली वाट्ट. यांना 'अ' म्हणता 'ढ' लिहिता येत नाही ... पण खिश्याला पार्करचं पेन असतं.
हे 'पाटील' आपल्या आजूबाजूला सहज सापडतील...
मला एक असाच 'पाटील' आठवतो.

इंजिनियरींग ला कॉलेजात असताना, असाच एक पाटील होता ( योगायोगानं 'अडं'नावाने आणि कर्मानं)
राजू पाटील , मू.पो. जळगाव. यांच्या घरची परिस्थिती बेताचिच... वडिलांनी पोटात पोट काढून चिरंजीवांना इंजिनियरींगला
टाकलं. पहिल्यांदाच पूण्यात आलेले. ऊन्हाळ्यात घामाच्या धारा वाहील्या तरी 'गरमागरम' चहा ढोसू शकणारे महा'भाग'.
यांना पोरी पटवायचा नाद.मध्यम उंची, रंग अतिकाळा (यांच्या मता प्रमाणे पोरी काळ्यांवरंच फिदा होतात,
"उगाचं नाय आपण आपल्याला आसा ठीवला" असा अभिमानाने सांगणारा , तरीही फेअर & हँड्सम फासणारा)...
वजन; कपडे,पायतान आणि तेरेनाम स्टाईल केस धरुन ३७ किलो ३४७ ग्राम.
आख्ख्या होस्टेल वर "दानपेटी" म्हणून प्रचलित /प्रसिद्ध काय ते. कारणे सांगून, भावनाविवश करुन पैसे काढून घेण्यात निपूण,
आणि बाता आसल्या मोठ्या हाणाव्यात की आपल्याला एवढ्या महान व्यक्तीचा सहवास लागल्याचा अत्यानंद होऊन ह्रुदयविकार
व्हावा. यांनी आक्ख्या इंजिनियरींग मधे कधी चारचौघात खिशात हात घातल्याचे स्मरणात नाही.
झालं. कॉलेजच्या एका पोरीशी चुकून जवळीक झाली... पाटलांचा खिसापैसा त्यांनाच पूरत नव्हता.. त्यात हे हायफाय
पोरीला फिरवायचे स्टंट करु लागले. नेहमी हक्काने अस्मादिकांची यामाहा घेऊन जात (अति घनिष्ट मैत्रि असल्याने विचारने म्हणजे
तो दोस्तीचा अपमान होतो अशी पाटलांची समजूत ) आता यामाहाच ती.. तीची तहान मोठीच... यावर पण पाटील एक बकरा
शोधून तिची तहान भागवत. मग पोरीला स्वखर्चाने (?) सिनेमे दाखवणे, आता पोरगी ऊच्चअपेक्षा आणि यांचा स्वभावच मोठा
असल्या कारणाने अलका, मंगला, लक्ष्मीनारायण असल्या लो लेव्हल च्या सिनेगग्रुहात न जाता , ई-वर्ग(e-square),
शहर-अभिमान(city pride) किंवा आयनॉक्स थेटरात सूवर्णवर्गाचंच टिकीट काढलं जाई. जोश्यांकडे न जाता , चकाचक
काचांच्या मॅकडोनाल्ड काकांच्या जोरात्-अन्न ग्रुहात 'पाटील' मोठ्या थाटानं जात. आठ्वड्याला उसणं-पासणं करून का होईना
एक गिफ्ट घेतलं जाई. आणि पोरीने मलप्रुष्टावर लाथ हाणली की पाटील वरच्या आवाजात "आमू लै पूरी फिरवल्या भो " अशी
सिंहगर्जना करणारे आमचे पाटील ,,,, आयुष्यभर लक्षात रहातील.....

अशी पाटीलकी करणारी माणसं आपणं रोज आजुबाजुला बघतो...
"खिशात नाही आना.. अन बाजिराव म्हणा" काय असले पाटील आपल्या परीचयात आहेत ?
असल्यास लिहायला लाजू नका !!

आपला
कुबड्या पाटील

हास्यतुकडे-२

बोलणारा (उघड): साहेब आपल्या रेश्मा मॅडम आज येणार नाहीत असा त्यांचा फोन आला होता.

ऐकणारा (मनात): (कशी येणार? काल संध्याकळीच तर तिला जोश्याबरोबर बागेत रेडहॅंड पकडले होते.)

बोलणारा (उघड): साहेब त्या सुंदर बाई आपल्या ऑफिसमध्ये का आल्या होत्या?

ऐकणारा (मनात): (तुला कशाला पाहिजेत नसत्या चांभारचौकशा?)

बोलणारा (उघड): साहेब देवाच्या कृपेने एकदाचा माझा मुलगा पास झाला.

ऐकणारा (मनात): (मग काय गावभर पेढे वाटू?)

बोलणारा (उघड): साहेब आज मी नवीन मोटरसायकल विकत घेतली.

ऐकणारा (मनात): (बाकीचे काय फुकट घेतात की काय शिंच्या?)

बोलणारा (उघड): साहेब ५ वर्षे झाली. आता तरी माझे प्रमोशन करा की.

ऐकणारा (मनात): (लेका तुझं प्रमोशन म्हणजे माझी जागा आहे. ती तुला कशी देऊ?)