त्यांनी हल्ला केला... आम्ही कडिनिंदा केली!
२००७ – त्यांनी समझौता एक्सप्रेसमध्ये बॉम्बस्फोट करून ६८ लोक मारले,
आम्ही कडिनिंदा केली आणि निर्बंध लादले!
२०११ – त्यांनी मुंबईत बॉम्बस्फोट करून २६ लोक मारले,
आम्ही कडिनिंदा केली आणि निर्बंध लादले!
२०१३ – त्यांनी हैदराबादमध्ये १८ जण उडवले,
आम्ही कडिनिंदा केली आणि निर्बंध लादले!
२०१४ – वाघा बॉर्डरवर ६० लोक घायाळ,
आम्ही पुन्हा तीच कडिनिंदा, तीच निर्बंधांची पीपानी वाजवली.
२०१५ – गुरदासपूर, ७ ठार,
पुन्हा 'खेद व्यक्त', आणि निर्बंधांची पीपानी !
२०१६ – पठाणकोटमध्ये ७ जवान गेले,
कडिनिंदा नी निर्बंध….