दत्तगुरूच्या चरणी लीन व्हावे
दत्तगुरूच्या चरणी लीन व्हावे ||१||
किती घ्यावे पुण्य जळूनी पाप जाय ||२||
कृपानिधींचा आशीर्वाद सदा असे डोई ||३||
त्रैमूर्ती सदोदीत डोळ्यासमोरी राही ||४||
दत्तगुरूच्या चरणी लीन व्हावे ||१||
किती घ्यावे पुण्य जळूनी पाप जाय ||२||
कृपानिधींचा आशीर्वाद सदा असे डोई ||३||
त्रैमूर्ती सदोदीत डोळ्यासमोरी राही ||४||
वयाचे एकविसावे वर्ष पूर्ण झालेलं होतं आणि नुकताच मतदानाचा अधिकार मिळाला होता (तेव्हा तो 21व्या वर्षी मिळायचा, 18व्या नव्हे). त्यामुळे झालो बाबा आपण एकदाचे प्रौढ, ही मनात सुखद भावना. पदवी शिक्षण शेवटच्या टप्प्यात आलेलं. त्याच दरम्यान लेखन उर्मी अगदी उफाळून आली. तशी ती त्यापूर्वीच्या काही वर्षांत मनात धुमसत होतीच परंतु लेखणीपर्यंत काही पोचत नव्हती. वसतिगृहाच्या एकंदरीत सामाजिक वातावरणातून लेखनाची ठिणगी पडायला चांगली मदत झाली. मग सुरुवातीस वहीतच काही खरडकामे झाली आणि त्यानंतर सार्वजनिक लेखनात पदार्पण केले ते वृत्तपत्रातील वाचकांच्या पत्रांमधून.
येरूडकर किंडल बुकमधल्या कथेच्या रूपाने सर्वांना भेटायला आला. पूर्वी मौज दिवाळी अंकात तो प्रकट झाला होता.
आता चेतना वैद्य या आवाजाच्या जादूगार असलेल्या व्हॉईस आर्टिस्ट आणि नाट्य दिग्दर्शिका यांच्या अफलातून आवाजात यूट्यूब वर ही गोष्ट ऐका.
आवडली तर मनापासून भरपूर प्रतिसाद द्या. शेअर लाईक आणि सबस्क्राईब करा. तिथे तुम्हाला भरपूर मराठी कथा कविता ऐकायला मिळतील.
थेट लिंक:
एम्बेडेड व्हिडिओ:
कोडी
===
-राजीव उपाध्ये १६. नोव्हें २०२५
तो सरळ
चालत होता...
चालता चालता
त्याला आयुष्याने
कोडी टाकायला
सुरुवात केली.
तो कोडी सोडविण्यात
मग्न असताना
त्याला कुणीतरी
धडक देऊन
पाडले.
तो पडला
जखम झाली
भळभळा वाहू
लागली.
मग आजुबाजुच्या
लोकांनी त्याला
आणखी दगड
मारायला सुरुवात
केली.
त्याला आणखी
जखमा झाल्या.
पण तरीही
त्याने सर्व ताकद
एकवटली.
नियतीचा धावा
केला.
‘प्रहरांच्या अक्षरनोंदी’ या आपल्या मिपाकर मी-दिपाली उर्फ दीपाली ठाकूर यांच्या पहिल्या-वहिल्या कवितासंग्रहाचं नुकतंच प्रकाशन झालं. दीपाली ठाकूर या विज्ञान शाखेच्या प्राध्यापिका आहेत. दीपाली ठाकूर या आंतरजालावर प्रसिद्ध आहेत आणि त्यांच्या नावाची चर्चा झाली ती त्यांच्या 'बहावा' या कवितेमुळे. फेसबुक, इन्स्टाग्राम, मराठी संकेतस्थळे, ब्लॉग यावर त्यांची ही कविता झळकली आणि त्यानंतर त्यांची ही कविता कोणीतरी कॉपीपेस्ट वाल्याने 'इंदिरा संत' यांच्या नावाने पुढे ढकलली.
इवले इवले डोळे, खूप खूप खेळले,
दमून झोपी कधी गेले, कळलं च नाई.
इवले इवले डोळे, खेळता खेळता रडले,
रडता रडता कधी हसले, कळलं च नाई.
इवले इवले डोळे, छोटे छोटे डोळे,
मोठे कधी झाले, कळलं च नाई.
इवले इवले डोळे, दूर निघून गेले,
कधी परत येतात, कळलं च नाई.
इवले इवले डोळे, परत फिरून आले,
नवीन इवले डोळे, सोबत कधी आले कळलं च नाई.
ही एक दीर्घ कविता आहे.
एका समुद्रात राहणाऱ्या निळ्या पोटाच्या काळ्या मासोळीची ही गोष्ट आहे. या मासोळीचे मनोविश्व मोठे विलक्षण आहे. वाचायला लागल्यावर एकसलग वाचत रमून जावे अशी ही गोष्ट.
या मासोळीला सारखे वाटत असते की ती इतरांपेक्षा वेगळी आहे. तिच्या मते प्रत्येकजण जरी आपापल्या जागी वेगळा असला तरी मी या सगळ्यापेक्षा वेगळी आहे. प्रत्येकाचे दिसणे वेगळे असते, चाकोरीतले जगणे वेगळे असते. या मासोळीचे मात्र आजूबाजूच्या विश्वात मन रमत नाही. तिला चाकोरी नकोशी झाली आहे. तिचे ठाम मत आहे की आपण चाकोरीत अडकून पडायलाच पुनः पुनः जन्म घेत असतो. तिला या सगळ्यातून बाहेर पडायचे आहे.
या वर्षी पावसाने कहर केलाय. एक शब्द चित्र......
नाही दिली उसंत
सावराया जिर्ण पाले
मुसळधार पावसाने
गर्विष्ठ ......
हवेल्यानां शांत केले
हिरव्या माळरानी
ना ही कळ्या उमलल्या
मुसळधार पावसात,
व्यथा.....
खडकात जिरून गेल्या
अंडी फुटून गेली
आळ्या मरून गेल्या
मुसळधार पावसाने
फुल.....
पाखरांचा काळ केला
कुंठल्या श्वान चाळा
विरह गीत गाती
मुसळधार पावसाने
Xxxx....
भादव्यात घात झाला
जागं मन हे, अर्धवट मिटल्या डोळ्यांत
देकार्तेच्या का शंकेचा पोकळ गोंधळ.
'मी विचार करतो, म्हणून मी आहे'?
पण हे विचार कुणाचे?
एका ॲपच्या नोटिफिकेशनचे?
अस्सल आरसा असूनही
पडझडलेल्या प्रतिमेचा भुगा
रात्री बेरात्री चिवडत बसणे
जसा नित्शेच्या 'माणसाच्या'
अशक्यप्राय स्वप्नाचा उपहास.
मोबाईलच्या काळोख्या स्क्रीनवर
मेलेली बोटं नाचतात,
एक अदृश्य तारांगण,
पण त्यात ना चंद्र, ना प्लॅटोच्या गुहेतून
बाहेर पडण्याचा मार्ग.
घरात पडला उंदीर मरूनी
थकलो सगळे शोध घेऊनी
चंद्रावर गेला मानव तरीही
उंदीर शोधण्या गॅजेटच नाही...