शहरी माणूस.
सुरुवातीला गांगरलो, भोवळलो, घुसमटलो
पण...
आता रुळू लागलोय या वस्तीत.
किती दिवसात नाही पाहिलं चांदणं
काजव्यांच लुकलुकणं
चंद्राच्या अस्तित्वाचीच आता
येऊ लागलेय शंका
सूर्याचं उगवणं, मावळणं देखील
किती दिवसात अनुभवलेलं नाही.
इथे व्यवहार चालतो घड्याळाच्या काट्यावर
त्याच्या काट्यानुसार आमचं आयुष्य
सरकत असतं पुढं पुढं
माणसांच्या गर्दीत राहून सुद्धा असतो एकटा एकटा
आसपासच्या माणसाचं अस्तित्वसुद्धा
कळत नाही आतासं.
किंवा...
तशी गरजच भासत नाही कुणाला.