वाङ्मय
घनदाट, घनगर्भ अंधार दाटून येतो
कधीतरी मनात आतून अंधार दाटून येतो
तो इतका दाट असतो की डोळ्यात बोट घातले तरी काही म्हणता काहीच दिसत नाही
मग आस लागते त्या किरणांची जी या घनगर्भ अंधाराला दूर सारून शांत, शीतल असा प्रकाश शिंपडून जातील.
पण हे क्षणा क्षणाच वाट पाहणं असह्य होत जात, अस वाटत की त्या अमरत्वाचा शाप मिळालेल्या अश्वत्थाम्या प्रमाणे आपल्याला पण हा युगानु युगे वाट पाहण्याचा शाप मिळालेला आहे का ?
एक एक क्षण एकेका युगाप्रमाणे भासतो आहे.
या अंधाराचे छातीवर असह्य दडपण आलं आहे ज्यामुळे श्वास घेणं देखील दुर्धर झालंय.
गीतारहस्य चिंतन-प्रकरण ७ कपिलसंख्याशास्त्र किंवा क्षराक्षरविचार
गीतारहस्य-७
कपिलसंख्याशास्त्र किंवा क्षराक्षरविचार
वेदांतींनी कणाद यांच्या परमाणु' सिद्धांताऐवजी कपिलाचार्यांचा सांख्य सिद्धांताला अद्वैत सिद्धांत न सोडिता बऱ्याच अंशी ग्राह्य धरले आहे.
सांख्य शब्दाचा अर्थ-
१.सांख्य हा शब्द सं-ख्या धातूपासून निघाला असल्यामुळे त्याचा पहिला अर्थ मोजणारा असा होतो. कपिलशास्त्रांतील मूलतत्वे 'पंचवीस' असल्यामुळे त्यांस 'मोजणारे' या अर्थी सांख्य विशिष्ट नाव मिळाले.
२.नंतर सांख्य म्हणजे सामान्यतः तत्त्वज्ञान (सर्व प्रकारचे)
असा व्यापक अर्थ बनला.
सृष्टीआड दृष्टी
एक मुलाखत:
“नमस्कार जयंतराव. सुरुवातीलाच मला सांगावंसं वाटतं की आपण फार मोठे खगोलशास्त्रज्ञ आहात! ... आणि अकलेचे तारे तोडणं या शिवाय माझा आकाशाशी संबंध आलेला नाहीये. तसं पाहता, शाळा सोडल्यापासून, विज्ञान या विषयाचा मला राग येत नाही. विज्ञान-वादी असणं म्हणजे काय ते बहुधा कळतं; पण मी विज्ञान-संवादी नाही. त्यामुळे ही मुलाखत घेणं मला जरा अवघडच वाटतं आहे.” पु. लं. नी सुरुवात केली.
“पु. ल., तुम्ही विनोदी लेखक आहात. मी विज्ञान अभ्यासक आहे. पण मला वाटतं आपल्या विचारांचा ‘वि’ हा या दोन्हींतला समान घटक आहे.” जयंत नारळीकर म्हणाले.
गर्जा महाराष्ट्र (ऐसी अक्षरे -२६)
#गर्जामहाराष्ट्र
लेखक-सदानंद मोरे
इतिहासाची मांडणी हितसंबंधांच्या दृष्टीने करीत राहिल्याने अनेक दोष त्यात येतात, ती अपूर्ण राहते.
पुस्तक परिचय : लढा आळशीपणाशी
पुस्तक परिचय
पुस्तक : लढा आळशीपणाशी
लेखक: चकोर शाह
प्रकाशकः हेडविग मिडीया हाऊस.
परिचय कर्ता : चकोर शाह.
रात्रीर्गमिश्यति भविष्यति सुप्रभात
भास्वानुदेष्यति हसिष्यसी पंकजश्री:
इथ्थं विचिन्तयति कोषगते द्विरेफे
हा हन्त हन्त नलिनिं गज उच्चहरः
गीतारहस्यचिंतन ४ -आधिभौतिकसुखवाद
#गीतारहस्य४
#आधिभौतिकसुखवाद
दुःखादुद्विजते सर्वः सर्वस्य सुखमीप्सितम् । मभा. शां. १३९.६१
दुःखाचा सर्वांसच कंटाळा असतो आणि सुख सर्वांसच हवे असते.
दोसतार चे निमित्त
काल अचानक एका जुन्या मित्राचा फोन आला.
तो कुठल्याशा गावात एका अभिवाचन स्पर्धेचा परिक्षक म्हणून तिथे गेला होता.
तेथे एका मुलाने (वय वर्षे १४) माझ्या दोसतार कादम्बरीतील एक उतारा अभिवाचनासाठी निवडला होता.
मित्राला सध्या सम्पर्कात नसल्याने दोसतार बद्दल काहीच माहिती नव्हती.
पण पुस्तकातील उतारा धमाल वाटल्याने त्याने त्या मुलाच्या पालकांकडे चौकशी केली.
त्याच्या पालकानी पुस्तक दाखवल्यावर त्याने थेट मला फोन लावला.त्या मुलाच्या पालकाना माझ्याशी बोलायचे होते.
गीतारहस्य चिंतन -३
#गीतारहस्य
प्रकरण तिसरे -कर्मयोगशास्त्र
"तस्मादयोगाय युज्यस्व योगः कर्मसु कौशलम्"(गीता २.५०)
"म्हणून तू योगाचा आश्रय कर, कर्म करण्याची जी शैली, चातुर्य किंवा कुशलता त्यास योग म्हणतात."
योग शब्दाची व्याख्या लक्षण आहे.
कर्माकर्माच्या विवंचनेत अनेक अडचणी उद्भवतात, तेव्हा ते काम सोडून कर्माचा लोप न करता', योग' म्हणजे युक्ती शहाण्या पुरुषाने स्वीकारली पाहिजे, तुहि स्वीकार.
' तस्मादद्योगाय युज्यस्व' हे श्रीकृष्णाचे अर्जुनास प्रथम सांगणे आहे, आणि हा योग म्हणजे कर्मयोगशास्त्र होय.