मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

इराण : डोंगरी भिवरलीचं अधर्मयुद्ध

गामा पैलवान ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
लोकहो, म्हंटलं इराणवर एक लेख व्हायला हवा. सध्या त्याच्या विरोधात अमेरिका व इस्रायल यांचं युद्ध चालू आहे. तर इराणचा इतिहासाचा व आजच्या परिस्थितीचा धावता आढावा घ्यावा असा बेत आहे. तर सुरुवात कुठनं करायची? म्हंटलं नुकताच अली खामेनेई मेलाय तर त्याच्यापासनं लेख सुरू करूया. हा इसम शियांचा प्रमुख होता असा दावा आहे. क्याथलिकांचा पोप असतो तसा. मग हा पॅट्रिस लुमुंबा नामे नास्तिक कम्युनिस्ट विद्यापीठात काय झक मारायला गेला होता का? नाही. मुळीच नाही. तो तिथे कम्युनिस्ट क्रांती भक्कम करणं शिकायला गेला होता. होय, इ.स. १९७९ ची खोमेनीची इराणातली धार्मिक क्रांती कम्युनिस्ट ढाच्यावर आधारित आहे.

‘नेक्सस’ युवाल नोव्हा हरारी(ऐसी अक्ष्ररे-४०)

Bhakti ·
लेखनविषय:
‘नेक्सस’ युवाल नोव्हा हरारी 1 युवाल नोव्हा हरारी हा असा इतिहासकार आहे की, जो केवळ इतिहासात रमायला शिकवत नाही, तर इतिहासाने माणसाचे जीवन कसे बदलत गेले हे पाहायला शिकवतो.

धूम्राक्ष, मानवीय इच्छा पूर्ण करणारा दैत्य

विवेकपटाईत ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
मानव ऋषीने दगड घासून अग्नी प्रज्वलित केला. अग्नीला प्रसन्न करण्यासाठी प्रार्थना केली “हे अग्नी, सुख-समृद्धी दे, शत्रूंवर विजय मिळवून दे.” त्याने उच्चारले: “अग्नये स्वाहा. इदं अग्नये इदं न मम.” तेवढ्यात हवनकुंडातून एक धुरकट अशरीरी आकृती प्रकट झाली. हात जोडून उभी. ती म्हणाली, “मी धूम्राक्ष, अग्निपुत्र. धूर हेच माझं भोजन. मानवाच्या इच्छा पूर्ण करणं, हाच माझा धर्म.” ऋषीने मधमाश्यांच्या पोळ्याचं मध मागितलं. धूम्राक्षने धूर निर्माण केला, मधमाश्या निघून गेल्या. ऋषीला खोकला आला, पण मधुर मध चाखायला मिळाला.

"बौद्ध मूर्तीशास्त्र"

Bhakti ·
लेखनविषय:
सर्वांना वाटेल की मी अतीच सिनेमे पाहते काय(कोणाला आपल्याबद्दल काही वाटलं तरी आपण बदलू नाही ,हा बेसिक नियम मान्यच असेल ..:)) तर मी माझ्या क्षेत्राशिवाय अजूनही काही विशेष पाहत असते.मुळात अज्ञानी राहायला आवडत नाही.३ इडियट मधल्या रांचोचा एक डायलॉग मला फार रिलेट होतो,कायमच...

कुंपण

रांचो ·
लेखनप्रकार
खडकवाडीची वस्ती गावाच्या बाहेर नव्हती. ती गावातच होती—पण जिथे रस्ता अचानक अरुंद होतो, तिथे, एका अदृश्य रेषेच्या पलीकडे. इथे सकाळ कोंबड्याच्या आरवण्याने सुरू न होता रिकाम्या हंड्यांच्या आवाजाने होत असे. भांडी एकमेकांवर आपटल्यासारखा आवाज हा पाणी भरण्याचा नव्हे, तर दिवस सुरू झाल्याची खूण देणारा होता. वस्तीकरता एक हौद आणि गावासाठी एक विहीर—अशी पिढ्यान्‌पिढ्यांची रचना होती. ती आता इतकी सवयीची झाली होती की कुणालाच ती प्रश्न वाटत नव्हती. लक्ष्मी रोज पहाटे चारला उठायची. घरात पाणी उरलं नसेल, तर तिला राग येत नसे. राग करण्याची सवयच नव्हती. हंडे आतून धुऊन ठेवायचे.

सैरभैर डायरी - २.३

कपिलमुनी ·
लेखनप्रकार
२.१ २.२ "मामू गाडी बाहेरवाली साईटला घे, देखते है ,क्या बताया भाईंने पोलिस को "उस्मानने थंड आवाजात सांगितले. २.३ उस्मान माझ्याकडे आणि मी त्याच्याकडे बघत अंदाज घेत होतो. पलीकडे डोकावून मामूला बोललो, "जातीवर आलास भाडखाऊ ! याला सोड तुलाच पहिला धरणार मी !" मामूला एकदम जिवाला लागले. "२ मिनिट बोलायचा भाउ , बाकी काही नाही, दीदीचा रीश्तेदार लागतो " पण मामूने गाडी साईटऐवजी कट्ट्याकडे घेतली.त्यालापण माहिती होते, कट्ट्यासोबत पंगा घेतला तर नंतर गावात पळवून मारतील..

इतिहासाची दुरुस्ती

युयुत्सु ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
 इतिहासाची दुरुस्ती ========== - राजीव उपाध्ये इतिहासाची दुरुस्ती करण्याचा सध्या एक मोठ्ठा खटाटोप चालला आहे. भारताचा सध्याचा आकार आणि भविष्यात निर्माण होणारे प्रश्न लक्षात घेतले तर या उद्योगाने काय साधलं जाईल असा प्रश्न पडतो. एका मित्राने पंतप्रधानांचे सल्लागार संजीव सन्याल यांची एक मुलाखत पाठवली https://youtu.be/u0TV6h2v2qE?si=CRL_8aLnKo01b5Oi). संजीव संन्याल रेशीमबागेतील विद्वानांपेक्षा बरेच सुसह्य आहेत. मुलाखातीचा बहुतेक भाग भारतीय इतिहासाच्या विकृतीकरणाबद्दल आहे. ही मुलाखत बघताना वरील प्रश्न पडला. एक उदा० देतो.

पर्व -भैरप्पा लिखित महाकादंबरी (ऐसी अक्षरे -३७)

Bhakti ·
लेखनविषय:
पर्व 1 मूळ कन्नडमध्ये १९७९ साली प्रकाशित झालेली दिग्गज लेखक डॉ. एस. एल. #भैरप्पा यांची महाकादंबरी 'पर्व' साहित्यातील एक मैलाचा दगड आहे.उमा कुलकर्णी यांनी ती मराठीत भाषांतरीत केली आहे.

दलितांना शिक्षणापासून कुणी वंचित ठेवले होते.

विवेकपटाईत ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
ब्रिटिश येण्यापूर्वी आपल्या देशात स्त्रियांना आणि शूद्रांना शिक्षणाचा अधिकार नव्हता असा प्रचार ब्रिटीशांनी आणि स्वतंत्रता प्राप्ती नंतर ब्रिटिश धार्जिणी सरकारी तंत्राने ही सतत केला. त्यामागे समाजाला विभाजित करून फूट डालो राज करो हा राजनीतिक उद्देश्य ही होता. पण सत्य कितीही लपविले तरी लपून राहत नाही. आज एआयच्या काळात जुने संदर्भ शोधता येतात आणि सत्य समोर आणता येते. त्याच्याच संदर्भ घेऊन हा लेख उकेरला आहे. सुरुवात वैदिक काळापासून करतो.

आदिमाया (ऐसी अक्षरे -३४)

Bhakti ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
पुस्तक -आदिमाया लेखक -अशोक_राणा विषय-मातृदेवता आजही जिथे स्त्रीयांववर अमानुषता करणारा समाज अस्तित्वात आहे.तो मातृसत्ताक संस्कृतीची मूळे पूर्ण विसरला आहे. तो समाज सिंधू संस्कृतीतील मातृदेवतांचे उगम वाचायला,जाणून घ्यायला उत्सुक कसा असणार? पण ही सरसकटीकरण करणारी वाक्यं न मानता ज्यांना संस्कृती, संस्कृतीची रूपांतरणे जाणून घ्यायची इच्छा आहे त्यांनी हे पुस्तक एकदा तरी नक्की वाचावे. पुस्तकात आर्येतर पूर्व काळातील मातृगणांची ओळख करून देली आहे.