टंकलेखन साहाय्य
सामर्थ्यदाता : गमभन !
इतिहास
रत्नपारखी शिवराय : भाग एक - बाजी पासलकर.....एक झलक.....
प्रेषक उदय सप्रे ( शुक्र, ०६/२७/२००८ - १५:३७) .बाजी लढताना एक घाव त्यांच्या पाठून त्यांच्या फिरंग समशेरधारी उजव्या हातावर झाला.वेदनेने कळवळलेले बाजी त्या भ्याडाचा प्रतिकार करण्यासाठी त्याही परिश्तितीत वळले आणि तोच क्षण साधत गनिमाची तलवार त्यांच्या छातीवर उतरली.पासष्ठ वर्षांचा तरणाबांड योध्दा-बाजी पडले !
आपल्या मागे वळण्याची इतिकर्तव्यता झाली हे लक्षात येताच फत्तेखान आपल्या सैन्यासह परत वळून पळून गेला.कावजी मल्हारला हे समजताच तो तीरासारखा सासवडला धावला.आपल्या धन्याचं जखमी शरीर पाठीवर लादून वाहून नेणारी बाजींची यशवंती घोडी आणि कावजी मल्हार यांच्या दु:खाची जात एकच होती ! पुरंदर येईतो बाजींनी शरीरातली धुगधुगी फक्त आपल्या विजयी राजाला - शिवरायांना पहाण्यासाठी व दोन अखेरचे शब्द बोलण्यासाठी शिल्लक ठेवली होती.गडाच्या पायथ्यापासून बाजींची पालखी वर आली आणि वाट चुकलेलं कोकरू आपल्या आईला-गोमातेला बघताच धावत सुटतं तसे राजे पालखीकडे धावले ! पालखी उतरून त्यांनी बाजींचं जखमांनी छिन्नविच्छिन्न झालेलं शरीर तोललं आणि त्यांची मान आपल्या मांडीवर घेत टाहो फोडला,"बाजी,आम्हाला असं पोरकं करुन कुठे चाललात?"
राजांचे अश्रू बाजींच्या जखमांवर पडले.खारट पाण्याने जखमा चुरचुरल्या पण आपलं बलिदान जणू राजाने अभिषेकाने पावन केलं या जाणिवेनं मरणाच्या दारात असलेल्या बाजींच्या गलमिश्या थरथरल्या! क्षीण पण करारी आवाजात ते बोलले,"आरं मांज्या राजा,तुला भेटलो,औक्षाचं सोनं जालं रं मांज्या ल्येकरा ! मला ल्योक न्हाई पर मरताना तुंजी मांडी गावली.त्या फत्याचं मुंडकं आननार व्हतो रं , पर डांव चुकला आन् त्यो पळाला.थोरल्या रांजास्नी पकडून नेणार्या त्या नामर्द बाजी घोरपड्याला नागवनार व्हतो पर त्ये बी र्हाईलं ! पर तू नगं चिंता करू!, ह्यो मांजा नातू सर्जेराव बाजी जेधे आन् त्येचा बा कान्होजी जेधे हाईती तुंज्या सांगाती.येक डाव माफी कर राजा, म्होरला जलम घिऊन यी न पुन्यांदा सवराज्यासाटी लडाया!तुज्यासाटी द्याया येकलाच जीव गावला ह्ये वंगाळ बंग ! म्या चाललू रांजा, आपलं सवताचं सवराज्य व्हनार, जय काळकाई !....."
राजांच्या मांडीवर प्राण सोडलेल्या बाजींचे डोळे उघडेच होते, ते शिवबांनी मिटले आणि दाबून ठेवलेल्या हुंदक्यांना वाट करून दिली.....
---------------------------------------------------------------------------------
उदय गंगाधर सप्रे लिखित "रत्नपारखी शिवराय : भाग एक - बाजी पासलकर" या आगामी पुस्तकातून सप्रेम
थोरांची टोपण नावे.
प्रेषक मी ( गुरू, ०६/२६/२००८ - १२:२१) .सखाराम_गटणेंच्या लेखावरून मला ही चर्चा सुचली. बर्याच थोरामोठ्यांना लोक टोपण नावाने ओळखतात. पण एकच टोपण नाव अनेकांना मिळाल्याचे दिसते. म्हणजे बघा
तात्या
तात्याराव सावरकर
तात्या टोपे
सेनापती बापट
नाना
क्रांतीसींह नाना पाटील.
नाना फडणवीस
नानासाहेब पेशवे.
बाबा
बाबा आमटे
बाबाराव सावरकर
भालजी पेंढारकर
तुम्हीही यात थोडी भर घाला.
की घेतले व्रत न हे अम्हि अंधतेने.....
प्रेषक मदनबाण ( गुरू, ०६/२६/२००८ - ११:३९) .रत्नागिरीस आलो असताना पतित पावन मंदिर व स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकास भेट दिली व काही अमुल्य क्षण टिपले.....
माझी सर्व मिपा करांस नम्र विनंती आहे,,जर कधी रत्नागिरीस येण्याचा योग झाला तर या ठिकाणी जरुर भेट ध्या.
(विशेष आभार :-- सौ.गीता कृ पालवणकर यांच्या कडुन त्यांच्या अंदमान भेटीतील काही फोटो इथे दिलेले आहेत.)






(सप्टेंबर १९२९ मधे आपल्या अमोघ वत्कृत्वाने सभा जिंकुन पूर्वास्पृश्याना रत्नागिरी येथील मंदिरात प्रवेश मिळवून देताना तात्याराव सावरकर )

(भारतात सर्वात प्रथम विदेशी कपड्यांची होळी पुण्यातील लकडी पुलाजवळ करताना लोकमान्य टिळकांसमवेत युवा सावरकर:--७ ऑक्टोबर १९०६ विजयादशमी)

(चाफेकर बंधुंच्या फाशीमुळे उद्विग्न होऊन भगुर येथील आपले घरातील अष्टभुजा देवीसमोर भारत मातेच्या स्वातंत्र्यासाठी मारिता मारिता मरेतो झुंजेन अशी शपथ घेताना बाल विनायक :--१८ एप्रिल १८९८ )

(अंदमानात 'कोलू' नावाच्या तेलाच्या घाण्याला जुंपून घेऊन प्रखर देशभक्तीच्या गुन्ह्यासाठी दोन जन्मठेपांचा सश्रम कारावास भोगताना स्वातंत्र्यवीर सावरकर )




(स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी ज्या 'मोरिया' जलयानातुन उडी मारुन मार्सेलिस,फ्रान्सचा किनारा गाठला त्याची प्रतिकृती)
अंदमान :--





(येथेच स्वातंत्र्यवीर सावरकर यांना ठेवण्यात आले होते.)
(स्वातंत्र्यवीर सावरकर भक्त )
मदनबाण.....
२५ जुन- १९८३
प्रेषक अमोल केळकर ( बुध, ०६/२५/२००८ - ११:४८) .२५ जुन १९८३ भारतीय क्रिकेट इतिहासातील सोनेरी दिवस .या दिवशी भारताने कपिल देवच्या नेतॄत्वाखाली विश्वचषक जिंकला होता. आज या गोष्टीला २५ वर्ष पुर्ण झाली. सांघिक कामगिरी, अष्टपैलू -मेहनती खेळाडू यांच्या जोरावर भारतीय संघाने दैदिप्यमान यश संपादन केले.
नुकताच त्यावेळच्या भारतीय संघातील खेळाडुंना २५ लाख रु. देऊन दिल्ली येथे सत्कार करण्यात आला. (ज्यावेळी संघ भारतात कप जिंकुन आला त्यावेळी बोर्डाकडे खेळाडुंना द्यायला पैसे नव्हते. लता मंगेशकरांचा एक कार्यक्रम ठेवुन बोर्डाने कसेबसे १ लाख रु. सर्वांना दिले.)
आजच्या व्यावसायिक खेळाडुंना मिळणार्या रकमेपेक्षा २५ लाख ही रक्क्म फार मोठी नाही. परंतु सर्वांच्या चेहेर्यावरचे समाधान आणी आपण देशासाठी काही तरी करु शकलो ही भावना या पैशापेक्षा खुप मोठी होती.
कुणा मिपाकरांना त्यावेळच्या काही आठवणी सांगता येतील का?

छत्रपती शिवरायांची माणसे - यावरील पहिल्या पुस्तकाचे प्रकाशन आणि वितरण
प्रेषक उदय सप्रे ( मंगळ, ०६/२४/२००८ - १०:०२) .मिपा चे समस्त सुजाण वाचक,
सप्रेम नमस्कार.
मी गेले बरेच दिवस "छत्रपती शिवरायांची माणसे" यावर क्रमशः लिहितोय्.यापैकी प्रथम भाग : बाजी पासलकर लिहून तयार आहे.या संबंधात मी अनेक प्रकाशकांशी बोललो आणि काल या सगळ्याचा गोषवारा काढला तो पुढीलप्रमाणे :
१. हे ३२ पानी पुस्तक आहे ज्याची किंमत ३५/- रुपये आहे.
२. १००० प्रती खपवायच्या झाल्यास किमान ३ वितरक नेमावे लागतील , आणि वितरकांची अपेक्षा विक्रीच्या किंमतीच्या किमान ४० % एव्हढी आहे.यासाठी इतर लोक / प्रकाशक करतात (असे मला एका प्रकाशकानेच सांगितले आहे) तसे मूळ पुस्तकाचे किंमत अव्वा च्या सव्वा मला करायची नाहिये (आणि तसे केल्यास ते विकलेही जाणार नाही !) कारण माझा मूळ उद्देश पैसे कमावणे हा नसून लोकांच्या-सुजाण वाचकांच्या मनात घर करण्यासाठी त्यांच्या घरात प्रवेश मिळविणे (पुस्तकाच्या रूपाने) असा आहे.आणि त्यांना ४० % दिले तर माझा छपाईखर्चच निघून येणार नाही.जरी पैसा कमावणे हा उद्देश नसला तरी पुढील पुस्तकाचा पाया तरी उभा रहायला हवा ना? पुढील पुस्तक : कान्होजी जेधे - ९०-९५ % लिहून झाले आहे.
३. दुसर्या एका प्रकाशकाची पध्दत अशी : प्रत्येक पानाला ते २५/- रुपये देतात मानधन म्हणून म्हणजे मला ८००/- देणार आणि आयुष्यभर माझ्या पुस्तकाच्या हव्या तेव्हढ्या प्रती काढून विकणार्.पण ते पुस्तक मात्र छान काढतात आणि म्हणून मी तयार होतो यासाठी पण ते काल म्हणाले की त्यांच्याकडे सध्ध्या एव्हढे लिखाण पडून आहे की मला अजून २-३ वर्षे थांबावे लागेल !
म्हणून माझी मिपा च्या तमाम वाचकांना अशी विनंती आहे की समजा मीच जर का १००० प्रती काढून खपवायच्या म्हटल्या (नुस्ती संख्या नव्हे - मिपा सारख्या वाचकांना विकल्या म्हणजे- ते पुस्तक वाचले जाईल याची खात्री राहील !) तर मिपा मला याबाबत किती सहकार्य करू शकेल? - म्हणजे मिपा चे वरिष्ठ लोक याबाबत काय सहकार्य करू शकतील?(प्रत्येकाने काही प्रती वितरीत केल्या तरी ही खूप मोठ्ठी मदत होईल मला.मागे मी याबाबत मिपा वर विचारले असता बर्याच लोकांनी प्रायोजक म्हणून पैसे देण्याची पण तयारी दाखवली होती !)
आपण मला माझ्या ई-मेल वर पण लिहून तसे कळवू शकता : sudayan2003@yahoo.com
कळावे , आपल्या प्रतिक्रियांची आतुरतेने वाट पहात आहे.
उदय सप्रेम
भ्रमण ध्वनी : ९९६७५ ४२७०३
बावीस जून!
प्रेषक डॉ.प्रसाद दाढे ( रवी, ०६/२२/२००८ - १९:३२) .आज बावीस जून! काही महत्वाच्या ऐतिहासिक घटना ह्या दिवशी घडल्या आहेत, त्या॑चा हा धा॑डोळा..
१) २२ जून १८९७ ह्या दिवशी रात्री पुण्यात गणेशखि॑डीजवळ चाफेकर ब॑धूनी जुलमी 'रॅ॑ड' साहेबावर भर रस्त्यात गोळ्या झाडून त्याला ठार केला. सार्वभौम ब्रिटीश सत्तेवर प्रहार झाला. भारतीय स्वात॑त्र्यलढ्यातील एक महत्वाचे पान उलगडले गेले..
२) २२ जून १९४० रोजी फ्रान्सने (दुसर्या महायुद्धात) हिटलरपुढे गुढगे टेकले, बिनशर्त शरणागती पत्करली. हिटलरने पहिल्या महायुद्धातल्या पराजयाचा सूड उगवला.
३) २२ जून १९४१ रोजी हिटलरने रशियावर स्वारी केली (ऑपरेशन बार्बारोसा). ही त्याची लष्करी घोडचूक ठरली. न॑तर जगाच्या नकाशावर याचा मोठाच परिणाम झाला
रात्री सवास - थायलंड सफर (अंतिम)
प्रेषक ॐकार ( शनी, ०६/२१/२००८ - १५:१४) .सायं सवास पासून पुढे...
थायलंडमध्ये खाओ याई नॅशनल पार्कला गेलो होतो. पावसाळ्यात खरं तर इथे भेट द्यायला हवी पण इतर वेळेसही भेट द्यायला हरकत नाही. इथे रहायचीही व्यवस्था आहे. तंबूंपासून अगदी हवेशीर बंगल्यांची सोय आहे, पण महिन-दोन महिने आधीच नोंदणी करावी लागते. बुकींग फुल्ल असल्याने माझा कार्यक्रम एका दिवसात आटोपता घ्यायला लागला. त्यामुळे नाईट सफारीचा आनंद घेता आला नाही. धबधबे, जंगलवाटा, अगदी रस्त्यांवर फिरणारी हरणंही हमखास भेटतात इथे.
काही चित्रे:
या राष्ट्रीय उद्यानानजीकच जमिनीखाली तयार झालेले एक निसर्गनिर्मित बुद्धाचे देऊळ आहे. चुनखडकावर काही प्रक्रिया होऊन निसर्गतःच तयार झालेली अमूर्त शिल्पकृती इथे पहायला मिळतात-
काहीठिकाणी तर ह्या भिंती अर्धपारदर्शी आहेतः
याचसोबत खरेदीसाठी जतुजा ( थाई उच्चार : जाः तुक् जा:) मार्केटला चक्कर टाकावी. बँकॉकमधला जणू आठवडाबाजार! तब्बल २० हजारच्या आसपास दुकाने असणार्या या बाजारात बर्याच गोष्टी मिळतात. भाव करायला तुम्हाला थाई अंक, संख्या यांची थोडीफार ओळख असायला हवी. किंवा मग एखादा थाई मित्र अथवा मैत्रिण सोबत असेल तर चांगले.
समिंदरावर जायचे असेल तर चा-आम, फुकेत ला जावे. सोबत नाईट लाईफ अनुभवायची असल्यास पट्टाया! पर्यटकांच्या रेट्यामुळे हल्ली पट्टाया गजबजलेले असते तरी त्याचे आकर्षण परदेशातील लोकांनाच, थाई लोक मात्र त्यापेक्षा निवांत आणि चांगल्या समुद्रकिनारी जाणं पसंत करतात.
थायलंडमधील आणखी काही प्रकाशचित्रे त्यात सहभागी असणार्या थाई व्यक्तींची अनुमती नसल्याने देऊ शकलो नसलो तरी या सुस्वभावी लोकांनी केलेलं आदरातिथ्य मात्र कायम लक्षात राहील. भारताबाहेर आपली जमीन, आपलं आकाश आणि आपली माणसं वाटावीत अस थायलंडचं आश्वासक चित्र मनात आहे. जमल्यास थायलंडची सफर नक्की करून या.
या लेखांचा शेवट काही चित्रफितींनी करतो.
रटरटते चिकनः
लोटी तयार करणार्या थाई महिलेची हातोटी:
फ्लोटिंग मार्केटमध्ये मिळणारा गोड पदार्थ नावेत बसून बनवताना:
बँकॉकच्या रस्त्यावर नाचणारी पोरं टोरं:
निद्रिस्थ बुद्धराजः
रात्री सवास !(good night!)
शिवराज्याभिषेक-३३४ वा वर्धापन दिन !
प्रेषक उदय सप्रे ( सोम, ०६/१६/२००८ - ००:१८) ."आज सकाळपासूनच आपला "बा" लंय जोमांत हाय !" असं मनांत येताच बजाबा आपल्या बापाला म्हणजे श्रीपतीला म्हणाला,"आंज लगीन घाई लागलिया जनू बा तुंज्या मांगं?काई इशेस?"
श्रीपती आपल्या कल्ल्यापर्यंत पोचलेल्या आकडेबाज मिशीवर पालथा हात फिरवंत म्हणाला,"आरं , काल बाजारला ग्येलो व्हतो तवाधरंनंच मांजा जीव आबाळायेवढा जांलाय बग !आरं , आपला धनी 'शिवाजी राजा आता दोन रोजांतच आबिषेक करुन घ्येत परत्यक्षात राजा हुनार हाय' अशी खबंर दिली बग सवता हंबीरमामा मोहित्यानं मला ! आन् त्ये आईकल्यापासनं मांजं काळीज सुपायेवढं जांलया बग ! त्याच नांदात लय झ्वोकात चालंत आलू रं मर्दा म्यां बाजारातून घरापत्तूर !"
बजाबाला आपल्या म्हातार्या बापाचं हसू आलं.जिवा-शिवा या खिल्लारी बैलाची जोडी असलेली बैलगाडी घेऊन बाजाराला गेलेला आपला 'बा' "चालत आलू रं!" म्हणतोय म्हणजे हसायचं नाहीतर काय?
बजाबाला आपल्या बापाची थट्टा करायची लहर आली.तो म्हणाला,"बा, पाय लय दुखलं आस्त्याल न्हाई बैलगाडीतल्या गाडीत चालून्?"आणि आपल्याच या कोटीवर तो गडगडाट करत हसू लागला.त्याचं ते हसणं ऐकून त्याची बायको जनी आणि लेक रखमा परसातून धावत माजघरात आली.त्या दोघींकडे बजाबाचं लक्ष जाईपर्यंत जनी श्रीपतीजवळ वाकली होती आणि गुढग्यात डोकं खुपसून हमसून हमसून रडणार्या आपल्या सासर्याला म्हणाली,"मामंजी, पर म्यां म्हनीते, आंदी आपली प्वारं जिवा-शिवा इकलासा आन् आता टिपं गाळतासा ! ह्ये समदं कशापायी वं?"
बजाबाचं हसणं गपकन थांबलं.जनीचं बोलणं-बापाचं तोंड खुपसून हमसून रडणं याचा अर्थ त्याच्या रांगड्या टक्कुर्यात शिरेपर्यंत काळच जणू थांबला होता. पण जिवा-शिवा या बैलजोडीला विकलं हे विदारक सत्य समजताच बजाबा चवताळ्ला आणि गुरकावत बापाला म्हणाला,"आरं मांज्या द्येवा,ही काय अवदसां आटिवली म्हनायची रं बा तुला? तुला काय कमी पडलं रं म्हून तू ....." आणि मग बजाबानं जीभ चावली.त्याच्या लक्षात आलं की आपली आई त्या आदिलशहाच्या कुण्या एका सरदारानं उचलून नेली, नासवली आणि त्या दु:खाने तिने जीव दिला. नंतर आपल्या याच बापानं रात्रंदिवस मेहेनत करून्,शेती करून आपल्याला वाढवले.जातीचा रामोशी असला तरी श्रीपती शेतकरी होता.त्यामुळे तसंच काहिसं कारण असल्याशिवाय आपला बा असं काही करणार नाही अशी कुठेतरी जाणीव त्याच्या मनाला झाली.कानकोंडं होत तो बापाकडे पाहू लागला.
आपल्या पैरणीच्या बाहीला डोळे पुसून घशातला कढ आवरत श्रीपती म्हणाला,"प्वारांनू,आरं म्यां बी शेतकरीच हाय् न्हवं? शेतकर्याला बैल म्हंजी ल्येकरापरीस पिरतीचं ह्ये काय म्यां सांगाया हुवं व्हंय रं तुमास्नी?आरं पर म्यां जिवा-शिवा इकले त्ये मांज्या सुकासाटी न्हाय रं मांज्या ल्येकरांनू! परत्यक्ष आपला धनी -शिवाजी म्हाराज -आता दोन रोजांनी तख्तावर बसनार -त्येला समदी बामनं पुंजापाट करनार - आबिष्येक करनार. म्हंजी ह्ये अक्षी घरचंच कार्य व्हनार म्हना की ! तर् त्यापाई गावच्या पाटलानं गावगन्ना-सिंहासनपट्टी गोळा केलिया.दो मासां आंदी गावच्या त्या म्हादेवाच्या मंदिरात राजाचं पत्तुर आल्येलं पुजार्या जोश्यानं वाचून दावलं हुतं.आता तुमी तिंगंबी कालच सूनबाईच्या घरनं तिच्या भावाचं लगीन आटपून आलासा,तवा म्या म्हातार्याच्या काय बी टक्कुर्यात र्हायनां ह्ये बोलायाचं.बरं त्ये आसू जाऊ-म्या ग्येलं दो मास पैका साटवन्याची लई कोशिस क्येली रं पर जमनां ! मंग विलाजच हरला रं सोन्यांनू मांजा आन् काळजाचं त्ये द्वान तुकडं काल बाजरला इकून आलू जालं!"
आपल्या बापाचं हे बोलणं ऐकलं मात्र , आणि बजाबाच्या तळपायाची आग मस्तकाला गेली.तो एकदम चवताळून जात ओरडला,"म्हंजी कालचा पातशहा हुता त्येच्यापरीस ह्यो रांजा जुलमाचा जाला की रं बा! पर म्या म्हनतो, ह्ये आपल्या परजेला आसं नागवं करून तख्तावर कशापाई बसनार हाय रं ह्यो?ह्येच्यापरीस त्यो आदिलशहा पातशहा बरा रं - तख्ती बसनार म्हून वसुली तर करत न्हाई ! आन् ,.." याहीपुढे बोलण्यासाठी तोंडपट्टा चालू असलेल्या बजाबाच्या डोळ्यांपुढे एकदम काजवे चमकले.साठीच्या पुढचा श्रीपती - आपला बा बसल्या जागेवरून उठून आपल्या पुढ्यात आला कधी आणि त्याने आपल्या म्हातार्या पण कमावलेल्या शरीराच्या हातांनी फाडकन आपल्या कानाखाली आवाज काढला कधी हे समजेपर्यंत श्रीपतीची आणखीन एक चपराक त्याच्या दुसर्या कानाखाली बसली आणि तरणाबांड बजाबा खाली कोलमडला.चार वर्षांची चिमुरडी रखमा भोकाड पसरून रडू लागली.बायको जनी बजाबाला सावरायला पुढे झाली व करवादंत म्हणाली,"अवं बाबा , पर म्या म्हनीते काय चुकलं वं ह्येंचंबी?रीन काडून सन करनारा असा राजा हुवाच कुनाला?" आणि तिनं बजाबाला बसतं केलं.
आता मात्र श्रीपतीला रहावलं नाही.आपल्या दोन हातांनी आपले कान झाकत तो जमिनीवर फतकल मारून बसला आणि म्हणाला,"ह्ये आसलं वंगाळ मांज्या द्येवाबदल - राजाबद्दल आईकन्यापरीस मांजं डोळं का मिटलं न्हाईस रं द्येवा?आरं प्वारा-- सून बाई , या या बजाबाची माय - तिनं जीव दिला तवाधरनं म्या याला माय आन् बाप व्हंत सांबाळला,कंदी नक बी न्हाय लावलं त्येला , त्ये हात आंज उटलं मांजं ! का?म्हाईत हाये?न्हाई ना?मंग आईका तर-, ये रकमे ये, मांजी शानी बाय ती!" असं म्हणंत श्रीपतीने रखमेला जवळ घेतले , तिच डोळे पुसले आणि तिच्या पाठीवरून हात फिरवत तो बोलू लागला,"या चिमन्येयेवडाच व्हता गं तुजा ह्यो धगड्.त्येची माय जीव दिऊन सुटली आन् म्यां अडाकलो.आता काय करावं हा सवाल टक्कुरं फिरवंत व्हता.त्या लांड्या सरदारास्नी इरोद क्येला म्हून रांडंच्यांनी घरदार जाळलं.माज्या शिरपा बैल आन् यशवंती गाईला गोठ्यात जाळलं.घरादाराचा इस्कोट क्येला.म्या तवा पार इसकटलो व्हतो आन् श्येजारच्या आबा द्येशमुकानं सांगितल्यापर्मानं पुनवडीला त्या माऊलीकडं ग्येलो व्हतो.तवा म्या काय बी सांगायच्या आंदीच येका तरन्याबांड प्वारानं-या या बजाबाच्या आताच्या उमरीचाच आसंल बंग त्यो-शिवाजी राजा-त्येनं मांज्या हातात मला आन् ह्येला आशी कापडं दिल्ली आन् सवताच्या श्येजारी बसवून ठिवत मला चटनी भाकार भरवली रं प्वारांनू ! नरड्यांतून घास जाईना रं मांज्या त्यांचं त्ये पिरेम बंगून्.जीव पार घुसमाटला.म्या त्येच्या पायावर घालून घ्याया ग्येलो तं त्येनंच मांजं पाय धरलं रं प्वारांनू आन् म्हनला,"बाबा, आमच्या आया-बहिणींची अब्रू रक्षण करण्याचं व्रत आम्ही घेतलंय.पण अजून म्हणावं तेव्हढं धन्,शस्त्र काहीच आमच्याकडे नाही.त्यामुळे तुमच्या बजाबाच्या आईला आम्ही वाचवू शकलो नाही, म्हणून आम्हीच तुमची माफी मागतो.पण आई भवानीची आम्हांस आण असे बाबा, पुन्हा कुअट्।अल्या बजाबाला पोरकं होऊन द्यायची वेळ येऊन देऊ नयी म्हणून आमचं व्रत आचरण्याचं बळ आम्हांस येण्याचा आशिर्वाद आम्हांस द्या !"
आणि त्या दिवशी रं ल्येकरांनू , रिता गेलेला म्यां रामोशी शेती - घर यापाई थैली अन् पांच सालाची शेतसारा माफी घिऊन भरल्या हातानं परतलू ! आन् त्यो राजा नी त्येची ती जिजाऊ माय कंदी आपलं बैल इकून पैकं मांगल आपल्याकडं आसं कसं रं वाटलं मुर्दाडा तुला?आरं आपल्या कातड्याचं पायतान क्येलं ना तरीबी ह्ये रीन न्हाई रं फिटनार त्येंचं ! त्या मांज्या राजा शिवाजीसाटी म्या बैल इकलं आन् ह्ये धन म्यां सवता द्येनार त्येला न्हिऊन त्या रायगडावं !"
आपल्या बापाचं हे बोलणं ऐकून बजाबा गहिवरला.पण तरी आपण आता शेती कशी करायची?ही शंकेची पाल त्याच्या मनात चुकचुकत होती.म्हणून भरल्या गळ्यानं तो म्हणाला,"बा, म्यां चुकलो रं ! तुंजं आबाळायेवढं काळीज वळीकलंच न्हांय रं म्यां ! पर बा, शेतकर्यानं बैल इकून शेती कशी रं करावी आन् मंग काय खावं रं प्वाटाला?"
आता श्रीपतीला जरा हुरूप आला व तो म्हणाला, "आरं मर्दा, ह्यो तुंज्या रुपानं वहागावानी मांजा ल्योक असल्यावर खायाची चिंता रं कुनाला? आरं त्या राजाचा शिपाय म्हून र्हा की तु तथंच रायगडावं त्येच्यापाशी ! आन् म्या बी बगंन काय वरकड काम न्हाय तं जनावरं राखन्याचं काय बाय काम. आरं राजाचं हात मजबूत व्हाया हौवेत रं मर्दा ! उंद्याच्याला रामपार्यात आपून समदी जावू रायगडावं आन् राजाला ह्ये आपलं धन द्येवू , त्या माय च्या पायावं सून बाय नी ह्या चिमन्या रकमेला घालून घ्येवू."
आपल्याला आपला राजा बघायला मिळणार म्हणून घटकेपुर्वी रडणारी रखमा आपल्या आजोबांच्या मांडीवर बसून खुदुखुदु हसू लागली आणि जनी पण हे बघून सुखावली.आपल्या राजासाठी सर्वस्व लुटून देवून समाधानाने हसणार्या त्या घरात तिन्ही सांजेला लक्ष्मी प्रसन्न होत प्रवेशत होती.
श्रीपती आणि बजाबा या सारख्या अनेक गरीब सामान्य बापलेकांना हा राजा आणि हे राज्य आपले आहे असेच वाटले आणि यातच आपल्या या राजाचं महत्व दिसून येते.
राज्याभिषेकाची आवश्यकता
लहानपणापासून शिवरायांनी सामान्य माणसांवरील अन्यायाच्या विरुध्द दंड थोपटले.१६४५ ते १६७४ या ३० वर्षांच्या काळात त्यांना अनेकदा असा अनुभव आला की लोक आपल्याला 'एक बंडखोर सरदार' किंवा 'पुंड-पाळेगार' समजतात.हा असा त्यांचा समज दृढ होण्याची अनेक कारणे होती .त्यातील काही ठळक कारणे व प्रसंग पुढीलप्रमाणे :
१. रांझ्याच्या पाटलाचा न्यायनिवाडा
सामान्य कुणब्याच्या पोरीवर रांझे गावच्या पाटलाने बलात्कार केला.नंतर जननिंदेस घाबरून त्या मुलीने आत्महत्या केली. ही गोष्ट समजताच पाटलाला हजर व्हायला शिवरायांनी आपल्या माणसांकरवी निरोप पाठवला.तेंव्हा तो म्हणाला, "तुमच्या त्या शिवाजीला जाऊन सांगा, तू नावाचा राजा आहेस्-तसा मी कुणी नावाचा पाटील नाही, या गावाचा अधिकारी पाटील आहे.मी या प्रजेला माझी बटीक समजतो." यानंतर त्याला मुसक्या बांधून शिवरायांसमोर हजर करण्यात आले व शिवरायांनी त्याचे हातपाय तोडण्याची शिक्षा फर्मावली.तेंव्हा पाटील तिथे हजर असलेल्या दादोजी कोंडदेवांना म्हणाला,"पंत, गोतमुखाने न्याय व्हावा!"
त्याच्या या म्हणण्याचा अर्थ शिवरायांच्या मनात घर करून राहिला की,' न्याय करण्याचा अधिकार राजाचा, वरीष्ष्ठ वर्णियांचा-ब्राह्मणांचा किंवा जात/गोत पंचायतीचा.शिवाजी राजा नाही,तो वरीष्ठ वर्णाचा नाही म्हणून त्याला न्याय्निवाडा करण्याचा अधिकार नाही.'
२. जावळीच्या चंद्रराव मोर्यांचा जबाब
जावळीच्या भौगोलीक महत्वामुळे चंद्रराव मोर्यांना आपण जावळीचे अभिषिक्त राजे व सम्राट असल्याचा दंभ निर्माण झाला.त्यावेळी शिवरायांनी त्यांना लिहिलेल्या पत्राला चंद्ररावाने दिलेला जबाब पण शिवरायांच्या मनात घर करून राहिला.चंद्ररावांनी लिहिले होते,
" चंद्रराव ही आमची खिताब ! आम्ही पिढीजात राजे ! तुम्ही काल राजे जाहाला.तुम्हासं राज्य कोणे दिधले? मुस्तफद राजा आपले घरी म्हंटलियावरी कोण मानितो? येता जावली - जाता गोवली.पुढे येक मनुष्य जिवंत जाणार नाही.तुम्हांमधे पुरुषार्थ असला तर उदईक येणार तर आजच यावे.आम्ही कोकणचे राजे असून आमचा राजा श्री महबळेश्वर ! त्याचे कृपेने राज्य करीतो.आम्हांस श्री चे कृपेने पातशहाने राजे खिताब मोरचेल सिंहासन मेहेरबान होऊन दिधले.आम्ही दाईमदारी दर पिढी राज्य जावळीचे करीतो.तुम्ही आम्हांसी खटपट कराल तर तो अपाय होईल.यश न येता अपयशास पात्र होऊन जाल !'
वास्तविक जावळी भागातील आदिलशहाचा सुभेदार दौलतराव - ज्याच्या घराण्याला "चंद्रराव" किताब होता-तो निपुत्रीक मरण पावल्यावर त्याची विधवा बायको आणि आई माणकाई ह्यांच्या सांगण्यावरून शिवरायांनीच शिवथरच्या यशवंतरावांना त्यांच्या कॄष्णाजी,बाजी या दोन मुलांसहीत व मोहना या मुलीसह दत्तक घेवून नवीन चंद्रराव गादीवर आणला होता हेतू हा की, जावळीसारखा दुर्गम भाग वेळप्रसंगी चंद्ररावासह स्वराज्याच्या पाठीशी राहील.पण प्रत्यक्ष आपणास "राजे"पद देणार्यास हे आपलेच लोक राजे मानत नाहित असा जीवघेणा कटू अनुभव शिवरायांना आला.
३. एकदा वाड्यावर काही खास प्रसंगानिमित्त शिवरायांनी मानकरी व सरदार यांना आमंत्रणे दिली होती.भोजन समारंभाच्या वेळी शिवरायांसाठी मोठा चौरंग ठेवून त्यावर गादी घातली.दुतर्फा बाकिच्या मंडळींसाठी भोजनाची व्यवस्था केली गेली.त्या समारंभास आलेल्या मंडळींमधे मोहिते, महाडीक,शिर्के,निंबाळकर, घाडगे,जाधव आदी सरदार होते.महाराजांसाठी केले उच्चासन पाहून त्यांना विषाद वाटला व त्यापैकी काहीजण म्हणू लागले की,"शिवाजीमहाराजांकडी आता थोरपणा आला काय? आम्ही कदीम, तालेवार सरदार, आम्ही मोरचेलाचे अधिकारी्यांच्या वडिलांस हा अधिकार कधिही प्राप्त झाला नव्हता.असे असता आमची मानहानी करून हे उच्च स्थानी बसणार व आम्ही त्यांच्याजवळ खाली बसणार , हे आम्हांस कमीपणा आणणारे आहे.अशी अमर्यादा करून घेण्यापेक्षा ह्या सदरेस आम्ही बसूच नये हे उत्तम !" असे बोलून ते उठून चालू लागले.तेंव्हा कारभार्यांनी त्यांची समजूत घालून प्रत्यक्ष महाराजांशीच बोलण्याचा सल्ला दिला व महाराजांच्या पंगतीचा अवमान न करण्याची विनंती केली.महराजांच्या कानावर हा प्रकार जाताच महाराजांनी त्यातील बहुसंख्य मराठा सरदारांची "ना हरकत" मान्यता घेतलींअंतर घोरपडे, निंबाळकर यांसारख्या मानाच्या सरदारांना एकांती बोलावून त्यांची मर्जी विचारली.त्यावर त्या मानी सरदारांनी असा जबाब दिला की,"आम्ही यवन पादशहांचे पुरातन नोकर्.च्हारपाचशे वर्षांचे जुने सरदार.आम्हाला ही अमर्यादा सहन होणार नाही! तरी याचा विचार तुम्हीच करावा!"यावर महाराजांनी म्हटले,"ज्यांस आपल्या प्रतिष्ठितपणाचा येव्हढा अभिमान वाटत असेल, त्यांनी आमच्या सदरेस येवू नये.कारण पडेल त्यावेळी त्यांस बोलावून आणू.उगाच बखेडा माजविण्याचे कारण नाही.ज्यांस ही व्यवस्था रुचत नसेल त्यांस आम्ही निरोपाचे विडे देवू !" यानंतर ती सदर बरखास्त झाली.
ह्या प्रसंगावरून शिवरायांच्या लक्षात येऊन चुकले की आपल्या पदरच्या मराठे सरदारांना पण आपल्याविषयी विशेष मान्यताबुध्दी नाही.याचे कारण - जुलमी राजवट असली तरी यवन हे अभिस्।इक्त पातशहा आहेत आणि स्वराज्य स्थापन करूनही आपण अभिषिक्त राजे नाही !
४. 'आपल्या या काळात विदेशी यवनांनी आपला देश जुलूम जबरदस्तीने पादाक्रांत केला असून मोंगल , इराणी, तुराणी व पठाण स्वतःला वंशाने व धर्माने उच्च मानतात आणि आपल्या देशातील मुसलमानांनाच तुच्छ मानतात तिथे आपल्या हिंदूंची अवस्था विचारायलाच नको !' ही खंत विचार शिवारायांच्या मनांत वर्षानुवर्षे खदखदत होती!
या सगळ्यांत 'बळी तो कान पिळी' या न्यायाने राज्यकर्ता स्रेष्ठ होता ! त्याने सरंजामदार्-पाटील्-कुलकर्णी-वतनदार्-देशमुख्-जहागिरदार असे आपले हस्तक ठेवावेत - त्यांनी त्या त्या राजाच्या नावावर वसूली करावी , अवाच्या सवा कर वसूल करून वर प्रजेचा अमानुष छळ करावा व राजाला हिस्सा नेवून द्यावा.त्यामुळे सामान्य जनता गरीब माणूस भरडला जात असे.मग तो कोणत्या का धर्माचा वा जातीचा असेना ! "हे थांबवायचे असेल तर आधी ही पाटीलकी-वतनदारी ही मोडून काढतआपलं सामान्य माणसाला दिलासा देणारं सुराज्य-स्वराज्य निर्माण व्हायला हवं "हे शिवरायांनी आपलं ध्येय बनवलं !
मुसलमान राज्यांमधे धर्मसत्ता व राज्यसत्ता एकच आहे परंतू हिंदू राज्यात मात्र राजसत्तेला धर्मशास्त्राचा पाठिंबा मिळणे आवष्यक आहे याची जाणीव शिवरायांना झाली.
वरील कारणांमुळे तसेच "बहुसंख्य हिंदू असलेल्या या देशात गुप्त घराण्यानंतर हिंदू राजा - शासक मिळाला नव्हता.त्यामुळे हिंदू धर्म सर्रास लयास चालला आहे - तेंव्हा आता धर्मदंडास राजदंडाचं पाठबळ आणि धर्मदंडाच्या बैठकीवर राजदंड प्रस्थापित करणं आवश्यक असल्याचं " उत्तरेतील विश्वेश्वर भट्ट ऊर्फ गागाभट्ट या विद्वान ब्रह्माणाने प्रतिपादन केल्यामुळे , सामान्य जनतेलाही आपल्या या राज्यासाठी आपला राजा असावा अशी प्रबळ इच्छा झाली आणि आपल्या पश्चात् पण आपली रयत सुराज्यात नांदण्यासाठी शिवराय अभिषिक्त राजे झाले !
शिवराज्याभिषेकाचं महत्व व दुरोगामी परिणाम
१. मराठी सत्तेला अधिष्ठान प्राप्त झाले.सिंहासनाचे स्वातंत्र्य अबाधित राखण्याची प्रेरणा व चुरस समस्त मर्हाठी जनतेत निर्माण झाली !
२. आता केवळ शिवाजीच्या मृत्यूमुळे यवन सत्ताधीश यांच्या सत्तांपुढे निर्माण झालेले आव्हान विरून जाणे अशक्य झाले.त्यासाठी या सिंहासनावर अधिकार सांगणार्या हर एक वंशजाला समूळ नष्ट करणे वा शरण आणणे त्यांच्या दृष्टीने आवश्यक झाले.यामुळे सर्वात मोठा हादरा धर्मवेड्या औरंगझेबाला बसला - कारण त्याचे हिंदुस्थानचे इस्लामीकरण करण्याच्या महत्वाकांक्षेला अडसर निर्माण झाला.
३. करारनामे, करवसुली, कर लागू करणे , न्यायदान करणे, शिक्षा करणे , कुठल्याही जातीच्या माणसाला -विशेषतः त्यावेळी उच्च समजल्या जाणार्या ब्राह्मणांना शिक्षा वा दंड देणे या सार्यांना एक संवैधानिकता प्राप्त झाली.
४. प्रचलित भाषेमधे-प्राकृत मराठी भाषेमधे राज्यव्यवहार सुरू झाला.फारसी भाषा जी सर्वसामान्य माणसांना अवगत नसे ती जाऊन मराठीत व्यवहार सुरू झाला.
शालिवाहन राजाने आपल्या नावाने शक सुरू केला.पण या आमच्या राजाने स्वतःच्या नावाने शक चालू न करता "राज्याभिषेक शक" चालू करून जणू यवनांना व जुलमी माणसांना जी घटना कायम धसका देईल अशा ३०० वर्षांनंतर झालेल्या घटनेला स्वतःपेक्षा जास्त महत्व दिले.
५. राज्याभिषेकामुळे यवन राज्यकर्त्यांव्यतिरिक्त इतर प्रदेशी व्यापारी-डच्-फ्रेंच्-पोर्तुगीज्-इंग्रज- ज्यांनी व्यापाराचं निमित्त करून हिंदुस्थानात प्रवेश मिळवून हातपाय पसरण्याचे प्रयत्न सुरू केले होते त्या सर्वांवर एक वचक निर्माण झाला.
ज्या दिवशी शिवराय छत्रपती झाले तो दिवस म्हणजे ज्येष्ठ शुध्द त्रयोदशी ! महाराज बत्तीस मणाच्या अष्टकोनी सुवर्णसिंहासनास पाय न लावता त्यावर आरुढ झाले.महाराज छत्रपती झाले-राजे झाले.राजा म्हणजे नृपती-म्हणजे पृथ्वीचा पती, प्रजेचा पिता-सारी प्रजा त्याची लेकरें !
महाराज आपल्या अभिषिक्त राणी सोयराबाई व युवराज संभाजी यांच्यासह जिजाऊंना नमस्कार करण्यासाठी स्वर्गीय काशीबाई राणीसाहेबांच्या महाली आले.काशीबाईंचा स्वर्गवास झाल्यापासून जिजाऊ माँसाहेब त्यांच्याच महाली राहिल्या होत्या.
जिजाऊ माँसाहेब आता थकल्या होत्यां. नजर पण कमजोर झाली होती.तरी पण श्रवणेंद्रियांना यशवंत, कीर्तीवंत, छत्रपती राजाच्या दमदार पावलांची चाहूल लागलीच ! गुढग्यांना हातांचा आधार देत माँसाहेब उभ्या राहिल्या.मस्तकी सुवर्णाचा मुकुट धारण केलेले राजे जवळ येत चालले आणि पाऊणशे वर्षे वयोमान उलटून गेलेल्या डोळ्यांना धारा लागल्या.समोरचे दृष्य धूसर होत चालले.कानांना दमदार चाहूल लागताच ती माऊली कंबरेत वाकली.शिवरायांना मुजरा करत ती वात्सल्यमूर्ती म्हणाली,"छत्रपती शिवाजी महाराजांना मुजरा !"
राजांच्या घशातून आवंढा आला.घोगर्या स्वरात ते म्हणाले,"माँसाहेब ! आमचा काय अपराध झाला म्हणून आपण आम्हांस असं....." त्यांच्यानं पुढे बोलवेना.ते मटकन खाली बसले.त्यांच्या पाझरणार्या डोळ्यांतील ऊष्ण अश्रूंनी जिजाऊंची पावले भिजली.त्यांनी भरल्या डोळ्यांनी धुरकट दिसणार्या राजांच्या खांद्यांना धरत त्यांना उठायची खूण केली.राजे उठता उठता त्या म्हणाल्या,"स्वराज्याच्या छत्रपतींना असं कमजोर होऊन कसं चालेल?राजे उठा, तुमची काहीही चूक झालेली नाही.उलट याचसाठी केला होता हा अट्टाहास ! स्वारी आम्हांस म्हणाली होती,"आम्ही कर्नाटकांत संभाजीस मोठ्ठा करू तुम्ही मर्हाट राज्यात शिऊबांना मोठ्ठे करा ! बघुया कोण जास्त कीर्तीवंत होतो - जो जास्त कीर्तीवंत होईल त्याचा पालन्कर्ता जिंकला असे समजू ! पण राणी सरकार, रणांगणातच नव्हे तर कधीही हार न आवडणार्या आम्हांस याबाबतीत मात्र आमची हारच होईल असे दिसते आहे आणि ही हार मात्र आम्हांस खचितच आवडेल !"
संभाजी कीर्तीवंत होत निघून गेला-स्वारी गेली- आम्ही या आमच्या बोडक्या कपाळानिशी तुमची मिठी सोडवली नाही म्हणून मागे राहिलो ते येकाच स्वप्नापायी ! आमच्या या मर्हाट राज्यात उघड्या नागड्या फिरणार्या कुठल्याही जातीचा धर्माचा माणूस अनाथ होऊ नये-त्याला हकाचा पिता-हकाचं छत्र-छत्रपती मिळावा-ते आम्ही पहावं-स्वारींचं अधुरं स्वप्नं आमच्या डोळ्यांनी पूर्ण होताना बघावं म्हणून ! लेकरा, या स्वराज्यासाठी तुझं पुत्रदान केलं आम्ही ! ते स्वप्न तू आज पुरं केलंस ! आम्ही आमच्या लेकींचा पती पृथ्वीच्या पोटात घातला - तेंव्हाच आमचा माँसाहेब हा अधिकार संपला.तुम्ही तर मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्रच ! तुम्ही कधीही उणं-दुणं वागला नाहीत.आमची रिती ओटी आज भरभरून वाहिली , आपल्या आई-बापाचं स्वप्नं तुम्ही आज पूर्ण केलंत! आज आमचा पुनर्जन्म झाला राजे ! आज तुम्ही प्रजेचे पिता झालात आणि आम्ही पण तुमचे प्रजारुपी लेकरू झालो आणि म्हणून या स्वराज्याची स्वप्नं बघणार्या या वेडीनं तो तुम्हांस मुजरा केला !
सारा देश यवनांनी पादाक्रांत केला असताना आपल्या सामान्य जनतेसाठी सामान्य जनतेचं राज्य - स्वराज्य यावं याची स्वप्नं बघत स्वारींनी केलेले इजा-बिजा-तिजा - तीन प्रयत्न फसले.पण तुम्ही ते स्वप्नं पूर्ण केलंत ! आज या त्रिभुवनांत आमच्याएव्हढं कुणी श्रीमंत नसेल राजे ! प्रत्येक कठीण प्रसंगी जीव मुठीत घेवून जिद्दीनं उभ्या राहिलो आम्ही, राजे केवळ या क्षणासाठी की तुम्हांस सांगावं 'स्त्री ही क्षणिक काळची पत्नी आणि काळची माता असते ह्याहीपेक्षा एक त्रिकालबाधित सत्य आहे आणि ते म्हणजे छत्रपती हा क्षणिक काळचा सुध्दा स्वतःचा रहात नाही ! तो फक्त प्रजेचा पिता असतो - अनादी अनंत काळापर्यंत !गागाभट्टांनी आमच्या येका गोमट्या मुलांस अभिषेक केला आणि अशा छत्रपतींनी आपल्या नि:स्पृह अश्रूंनी आमच्या चरणांस अभिषेक केला ! आम्ही धन्य झालो राजे, आज हे प्राण तुम्हावरून अखेरचे ओवाळून टाकत आहोत ! स्वतंत्र म्र्हाट राज्याच्या स्वराज्याच्या या छत्रपतींना आमचा मानाचा मुजरा !"
......आणि जिजाऊंनी आपले हे अखेरचे शब्दही खरे केले.राज्याभिषेकापासुन बरोब्बर १३ व्या दिवशी - १८ जून १६७४ रोजी चंदनाच्या खोडाप्रमाणे झिजत राहिलेल्या जिजाऊ माँसाहेब स्वर्गवासी झाल्या !
माँसाहेब, 'स्वराज्याचा छत्रपती घडवीन' या तुमच्या जिद्दीस एक मुजरा तर त्या स्वप्नपूर्तीनंतर इच्छामरणाने आम्हास सोडून जाण्याच्या तुमच्या अखेरच्या जिद्दीस आमचा त्रिवार मुजरा ! आणि 'याची देही याची डोळां' आपल्या मातेस कुबेराहूनही श्रीमंत करणार्या आमच्या छत्रपतींना आमचा आमरण मानाचा मुजरा !
जय भवानी ! जय भारत !
------------------------------------उदय गंगाधर सप्रे-ठाणे---------------------------------१६-जून्-२००८-वेळ ००.१६ वा.----------------------------------
आपण आम्हांस इथेही भेटू शकता :
कलास्वाद : http://uday-saprem.blogspot.com/
आणि
कवितांजली : http://uday-sapre.blogspot.com/
भोजशाळा ते भोजपूर - एक विषण्ण प्रवास
प्रेषक भोचक ( बुध, ०६/११/२००८ - १९:१६) .'कहॉं राज भोज और कहॉं गंगू तेली' या म्हणीतून राजा भोज भेटला होता. तसाच तो 'राजा भोजच्या गोष्टी'तूनही लहानपणीच भेटला होता. पण त्याचा महिमा पाहण्याची संधी मिळाली नव्हती. इंदूरला आल्याच्या निमित्ताने ती मिळाली. आमचे घरमालक ज्या क्षत्रिय समाजाचे आहेत. त्याच समाजाचा राजा भोज होता. त्यांच्याकडून एक पुस्तक मिळालं. त्यात त्याचा सगळा इतिहास दिला होता. दहाव्या शतकापर्यंत भोजाचे साम्राज्य मध्यभारतात पसरले होते. भोज नावाचे अनेक राजे होते. एका राजाचा तर लढाईत मृत्यू झाला होता. त्याच्याविषयीची अशी वेगवेगळी माहिती असली तरी राजा भोज म्हणून जो उल्लेखला जातो, तो कमालीचा कलासक्त होता. विविध विद्यात पारंगत होता. स्वतः लेखकही होता. त्याने अनेक पुस्तकेही लिहिली. या पुस्तकांचे विषयही अगदी शिल्पशास्त्रापासून ते साहित्यापर्यंत आहेत. भोजाविषयी उत्सुकता खूप दाटली होती. आणि एक दिवस अचानक धारला कूच केले.
धार हे पवारांचे संस्थान. पण ते अगदी अलीकडचे. त्याही आधी ते परमार वंशाच्या राजा भोजची राजधानी होते. या धार नगरीतच एकीकडे जसा दुसर्या बाजीरावाचा जन्म झालेला किल्ला भग्नावस्थेत इतिहासाचे ओझे खांद्यावर घेऊन उभा आहे. त्याचवेळी गावाच्या दुसर्या भागात हिंदू-मुसलमानांमधील रक्तरंजीत संघर्षाचे डाग घेऊन 'भोजशाळा' उभी आहे. भोजशाळा. दोन वर्षांपूर्वी या भोजशाळेवरून हिंदू- मुसलमानांमध्ये झालेला संघर्ष माहिती होताच. त्यामुळे धारमध्ये आल्यानंतर या शाळेला भेट देणे क्रमप्राप्तच होते. गावाच्या एका कडेला भाजीबाजाराच्या पाठिशी ही भोजशाळा आहे.
शाळेला लागूनच मशीद आहे. शिवाय कब्रस्तानही. शाळेच्या आवारात कुंपण घातले आहे. तिथे सुरक्षा व्यवस्था अगदी कडक. सगळी तपासणी करून आत सोडतात. आत गेल्यानंतर तर चक्रावलोच. मंदिराच्या भिंतीला अगदी खेटून मशीद. प्रत्यक्ष भोजशाळेत प्रवेश करतानाही कडक तपासणी झाली. आत गेलो. चार बाजूंनी मंडप असलेली मधले आवार मोकळे असलेली इमारत म्हणजे भोजशाळा. जवळपास हजारेक वर्ष जुनी. पुरातत्व खात्याने या शाळेतील खांब पूर्वीसारखे वाटतील असे उभे केलेले आहेत. भोजशाळा म्हणजे खरे तर सरस्वतीचे मंदिर. थोडक्यात त्याकाळचे विद्यापीठ. पण तिथे आता सरस्वतीचा साधा फोटोही नाही. उलट तिथल्या वास्तुशिल्पाला छेद देईल असे न शोभणार्या काळ्या संगमरवरी दगडात आयते मात्र कोरलेली आहेत.
या जागेत शुक्रवारी १ ते ३ या वेळेत हिंदूंना यायची बंदी असते. त्याचवेळी मंगळवारी दिवसभर मुसलमान येऊ शकत नाही. एरवी सगळ्यांना यायची मुभा आहे. हे व्हायचे कारणही उभय धर्मातला संघर्षच. एका शुक्रवारी वसंत पंचमी आली. हा या भागात फार मोठा सण आहे. त्या दिवशी उत्सव करण्यासाठी हिंदू उत्सुक होते. पण मुसलमानांचाही त्या दिवशी नमाज. दोघांत संघर्ष झडला आणि त्यातून रक्त सांडले. त्यातून ही व्यवस्था निर्माण करण्यात आली. तरीही अधुनमधून चकमकी झडतच असतात. इथे असलेले सुरक्षा रक्षकही स्थानिक नाहीत. ते कुणालाही फार वेळ थांबू देत नाहीत. विद्यादानासाठी राजा भोजने बांधलेली वास्तु आता धार्मिक वादात अडकली आहे. विद्येचा वारसा जपण्याऐवजी वाद रंगला आहे, याने मन व्यथित झाले.
------------------------
राजा भोजाविषयीच्या माहितीत भोजपूरचा उल्लेख आला होता. हे भोजपूर म्हणजे भोपाळपासून जवळपास १८ किलोमीटरवर आहे. इथे म्हणे त्याने मोठे शिवमंदिर उभारण्याचे काम हाती घेतले होते. शिवाय एक मोठा तलाव बांधायला घेतला होता. या तलावाची रचना अशी केली होती की नैसर्गिक पद्धतीने पाणी फिरून येईल. हे मंदिर बघण्याची आस होती. सांची पाहून आल्यानंतर भोपाळमध्ये मुक्काम केलाच होता. दुसर्या दिवशी भोजपूरला निघालो. 'मध्य प्रदेश सडक परिवहन निगम'च्या अनुबंधित ट्रेवल्स बसने प्रवास करण्याचे 'दिव्य' पार पाडत अखेर आम्ही भोजपूरला पोहोचलो. एका टेकडीवर हे मंदिर आहे. मूळ मंदिर तर पार पडून गेले आहे. पण पुरातत्व खात्याने मूळ वाटावे असे मंदिर उभे करण्याचा प्रयत्न केला आहे. 'भिंत खचली कलथून खांब गेला'चा अनुभव पहाताना आला. मंदिर पुष्कळच भव्य आहे. त्याचे तुकडे जोडून ते रचण्याचा प्रयत्नही दिसून येतो. वैशिष्ट्य म्हणजे भारतातील सर्वांत उंच शिवलिंग या मंदिरात आहे. हे शिवलिंगही तुटले होते. पुरातत्व खात्याने जोडून ते उभारले आहे. मंदिरासमोर छुटपूट मंदिरे आहेत. त्याचे मस्तपैकी व्यावसायिकरण झाले आहे. मुख्य मंदिरात मात्र पुरातत्व खात्याने कोणतीही पूजा करायला बंदी घातलीय ही समाधानाची बाब. आजूबाजूला छान हिरवळ आहे.
त्याकाळी राजा भोजने बांधलेल्या तलावाचा अंदाज येतो. राजा भोज आजारी असताना येथे आला होता. विशिष्ट प्रकारे पडणार्या पाण्याने अंघोळ करावी असा सल्ला त्याला वैद्याने दिला होता. म्हणूनच वैशिष्ट्यपूर्ण रचना असणारा तलाव बांधला गेला होता. या तलावाचे बांधीव काठ आजही दिसून येतात. भोजपूरला येण्याआधीच त्याच्या संरक्षक भिंती दिसतात. त्यावरून तो किती मोठा असावा याचा अंदाज येतो. पण आता तलाव म्हणून काहीही शिल्लक नाही. इथेही मुस्लिम आक्रमकांनी मोठी भूमिका बजावली. होशंगाबादने हा तलाव मध्ययुगात फोडून टाकला होता. त्यामुळे त्यात पाणी साठणे बंद झाले. आता तर भौगोलिकच बदल भरपूर घडले आहेत.
हा सगळा छिन्नविच्छिन्न इतिहास पाहून फार वाईट वाटलं. हजार वर्षांच्या वास्तुही आपल्याकडे धड राहू शकल्या नाहीत. मंदिरांचे पडलेले अवयव पाहून व्यथित व्हायला होतं. इंदूरचे संग्रहालय मध्यंतरी पहायला गेलो. त्यावेळी हजार, दोन हजार वर्षांपूर्वीच्या मूर्ती सरळ इमारतीच्या बाहेर ठेवलेल्या दिसल्या. पावसात त्या भिजत होत्या. तीच स्थिती धारच्या किल्ल्यातील किमती सामानाची आणि मांडूतल्या मौल्यवान शिल्पांची. लोकांची बेपवाई तर बोलायला नको. इंदूरमध्ये रहाणार्या अनेकांना भोजपूर माहित नाही. आम्ही भोजपूरला जातो, गेलो हे सांगितल्यानंतर समोरच्या व्यक्तिच्या चेहर्यावरचे प्रश्नचिन्हांसहित विविध भाव पाहूनही त्रास व्हायचा. आपल्या इतिहासाचीच जर आपल्याला माहित नसेल, तर वर्तमानात तरी आपण कसे जगतो असा प्रश्न पडतो. एकुणात काय हे सगळं पाहिल्यानंतर उगाचच उदास होऊन परतलो.
आर्यांचे मुळस्थान कोणते? : डॉ. आंबेडकर - ३
प्रेषक पंकज ( शनी, ०६/०७/२००८ - ११:४०) .आर्यांचे मुळस्थान कोणते? : डॉ. आंबेडकर
आर्यांचे मुळस्थान कोणते? : डॉ. आंबेडकर - २
आर्यांच्या मुळस्थानबद्दल डॉ. आंबेडकरांचा मुळ लेख हा बराच मोठा आहे, त्यात ऋग्वेदांतील तसेच इतर धर्मग्रंथातील संदर्भ दिलेले आहेत, जसे वर्ण या शब्दाचा उल्लेख इराणी वांङ्मयात येतो. "वर्ण" किंवा "वरेण" हा शब्द "झेंद अवेस्ता"(Zenda Avesta) मध्ये ६ वेळा वापरलेला आहे. "झेंद अवेस्ता" मधिल "वर्ण" किंवा "वरेण" च्या उल्लेखाबद्दल दिलेले स्पष्टिकरण जवळजवळ दोन ते तीन पानांचे आहे. त्यामुळे आंबेडकरांचा मुळ लेख इथे उतरवणे शक्य नव्हते, मला जो भाग महत्वाचा वाटला तो इथे उतरवला आहे. त्यामुळे कदाचीत हे लेख अपुर्ण वाटू शकतात.( तसे असल्यास त्यास मी जबाबदार ठरतो.)
आर्य वंशाचे दोन पंथ होते.
आर्यांनी भारतावर स्वारी केली व दास व दस्यू यांना जिंकले या सिध्दांताला जे लोक उचलून धरतात त्यांनी ऋग्वेदातील काहि ऋचांकडे कानाडोळा केलेला आहे. या ऋचा लक्षात न घेता त्या सिध्दांताची ज्यांनी उभारणी केली त्यांचा सारा खटाटोप व्यर्थ आहे, असे त्या ऋचा वाचल्यानंतर लक्षात येते. त्या ऋचा खाली देत आहे.
१. ऋग्वेद, ६-३३-३ - "हे इंद्रा! आमचे शत्रु दास व आर्य या दोघांनाही तू ठार केले आहेस."
२. ऋग्वेद, ६-६०-३ - " सन्मार्ग आणि सध्दर्म यांचे पालन करणार इंद्र व अग्नी यांनी आम्हाला घायाळ (दुखापत) करणारे दास व आर्य यांना नेस्तनाबूद केले."
३. ऋग्वेद, ७-८१-१ - "सुदामाचे शत्रु दास व आर्य यांना इंद्र व वरूण यांनी ठार मारले व त्यांनी दास व आर्य यांच्यापासून सुदामाचे रक्षण केले."
४. ऋग्वेद, ७-२४-२७ - "हे इंद्रा! सिंधू नदिच्या तीरावर राहाणार्या क्रूर राक्षसांच्या आणि आर्यांच्या तावडीतून तू आम्हाला मुक्त केलेस. तू दासांच्या हातातून त्यांची शस्त्रे हिरावून घे."
५. ऋग्वेद, १०-३८-३ - "हे परमपूज्य इंद्रा! अधार्मिक दास व आर्य हे आमचे शत्रू आहेत. त्यांचा सहजपणे पाडाव करण्याचे सामर्थ आमच्यात येवो, तु आम्हाला आशीर्वाद दे. तुझ्या साहाय्याने आम्ही त्या शत्रूंना ठार करू"
६. ऋग्वेद, १०-८६-१९ - "हे ममेयूं! जो तूझी प्रार्थना करतो त्याला तू सर्वप्रकारचे सामर्थ देतोस. आपले शत्रू आर्य व दस्यू यांचा आम्ही तुझ्या मदतीने संहार करू."
वरील ऋचा आर्य ऋषींनी तयार केलेल्या असल्या पाहिजेत. त्या ऋचांतील अर्थ आर्य वंशाविरूध्द आहेत. या दोन गोष्टी लक्षात घेतल्या तर असे अनूमान काढता येते की आर्यांचे दोन वर्ग होते व ते परस्परांपासून सर्व दृष्टीने भिन्न होते व म्हणूनच ते वैरभावाने परस्परांशी वागत व झगडत होते. आर्यांचे दोन वेगवेगळे वर्ग अस्तित्वात होते हे सत्य होते व ते सत्य सिध्द करणारे अनेक पुरावे आहेत.
आर्यांचे दोन वेगवेगळे वर्ग अस्तित्वात होते. त्याचा एक पुराव असा की, निरनिराळ्या वेदांना पवित्र मानण्याबद्दल आर्यांत पुष्कळ दिवस वितंडवाद चालला होता. वेदांचा ज्यांनी कसून अभ्यास केलेला आहे त्यांची खात्री झालेली आहे की, खर पाहिले असता ऋग्वेद व अथर्ववेद हे दोन ग्रंथ वेद या पदवीला योग्य आहेत. सामवेद व यजुर्वेद हे ऋग्वेदाचे केवळ निरनिराळे भाग होत.
ऋग्वेदाला जितके पवित्र मानावे, तितकेच अथर्ववेदाला पवित्र मानावे, या गोष्टीला ब्राम्हण लोकांनी पुष्कळ वर्षे विरोध केलेला होता, ही गोष्ट वेदाभ्यासी पंडितांना माहित आहे.
ऋग्वेद व अथर्ववेदाला समसमान पवित्रपणा देण्यस ब्राम्हण का तयार नव्हते?
ऋग्वेदाला पवित्र तर अथर्ववेदाला अपवित्र मानण्याकडे ब्रांम्हणांची मनोवृत्ती का धावत होती?
माझ्या मते या प्रश्नांचे उत्तर असे आहे की. ऋग्वेद हा एका वर्गातील आर्यांनी रचला व अथर्ववेद हा दुसर्या वर्गातील आर्यांनी रचला, आणि हे दोन्ही वर्ग परस्परात मिसळून आर्यांचा एक वर्ग तयार झाला. तेंव्हा ऋगवेद व अथर्ववेद यांना समसमान पवित्रपणा देण्यात आला.
याशिवाय दुसरे पुरावे सर्व ब्राम्हणी वांङ्मयात इतस्ततः विखुरलेले आढळून येतात. हे पुरावे विशेषतः विश्वोत्पत्तीसंबंधी जे दोन सिध्दांत मांडण्यात आलेले आहेत त्यात दिसून येतात. या दोन सिध्दांतावरून असे सूचित होते की, ते आर्यांच्या दोन वर्गाने मांडलेले असावेत.
तैत्तिरीय संहिता, शतपथ ब्राम्हण, तैत्तिरीय आरण्यक, महाभारताचे वनपर्व, महाभारताचे आदिपर्व, रामायणातील दुसरे कांड, रामायणातील तिसरे कांड, तसेच पुराणातील काहि संदर्भ- जसे सूर्यवंशी लोकासंबंधी विष्णू पुराणातील गोष्ट, तशाच स्वरूपातील सोमवंशी लोकांसंबंधी गोष्ट...(मूळ लेखामधील सिध्दांताचे सविस्तर वर्णन मी इथे देत नाही , तर फक्त त्या ग्रंथांचा उल्लेख येथे करत आहे)
विश्वोत्पत्तीसंबंधीचे उपरिनिर्दिष्ट खुलासेवजा सिध्दांताची तुलना केली तर आपणाला काय दिसून येते? मला वाटते कि, या तुलनेतून पुढील मुद्दे उपस्थित होतातः-
१. विश्वोत्पत्तीसंबंधीचा एक सिध्दांत धार्मिक स्वरूपाचा आहे; तर दुसरा धर्मांतीत स्वरूपाचा आहे. (one is sacerdotal in colour and character, the other is secular()
२. मनू हा मानव असून तो सृष्टीचा कर्ता होय असे एक सिध्दांत मानतो; तर दुसरा सिध्दांत असे मानतो की, सृष्टीचा निर्माता ब्रम्हदेव किंवा प्रजापती आहे.
३. एक सिध्दांत ऐतिहासिक घटना सांगणारा आहे; तर दुसरा सिध्दांत अलौकिक घटनांची कथा सांगणारा आहे.
४. एक सिध्दांत जलप्रलयाची कथा सांगतो; तर दुसरा सिध्दांत त्याबद्दल ब्रसुध्दा काढीत नाही.
५. एक सिध्दांत चार वर्णांचे स्पष्टीकरण करण्याची मनीषा दाखवितो; तर दुसरा सिध्दांत समाजाची उत्पती कशी झाली, याचेच स्पष्टीकरण करण्याची मनीषा दाखवितो.
दोन प्रकारच्या सिध्दांतामध्ये असलेले उपरिनिर्दिष्ट फरक हे संख्येने बरेच व स्वरूपाने प्रमुख दर्जाचे आहेत हे स्पष्ट होते. चातुर्वर्ण्यासंबंधी जे निरनिराळे स्पष्टीकरण या दोन सिध्दांतांनी दिलेले आहे त्यातील फरक हा विशेषतः स्थूल मानाचा आहे. धार्मिक स्वरूपाचा जो सिध्दांत आहे त्यात चातुर्वर्ण्याला महत्व दिलेले आहे. धर्मविरहित स्वरूपाचा जो सिध्दांत आहे त्यात चारुर्वर्ण्याचे नावही नाही. मनूच्या संततीचे स्थित्यंतर चार वर्णात कसे झाले, हे दाखविण्याच्या हेतूने दोन्ही प्रकारच्या सिध्दांताची एकजूट करण्याचे प्रयत्न झाले, हे खरे आहे. ही गोष्ट रामायण व पुराणे यातील सिध्दांत लक्षात घेतले तर कळून येते. परंतू दोन्ही ध्येयवादी सिध्दांत एकत्र करण्याचा हा प्रयत्न होता हे स्पष्ट आहे. हा प्रयत्न जाणूनबुजून आणि पूर्वयोजनेनुसार झालेला आहे. परंतु या दोन्ही प्रकारच्या ध्येयवादी सिध्दांतात एवढा स्थूल मानाचा फरक आहे की, ते सिध्दांत एकत्र करण्याचा प्रयत्न झालेला असतानाही तो फरक स्पष्टपणे दृग्गोच्र होतो. या बाबतीत अशी गंमत झालेली आहे की, चातुर्वर्ण्याबद्दलचे एकच स्पष्टीकरण असण्याएवजी दोन स्पष्टीकरणे झालेली आहेत. एक पुरूषाने उत्पन्न केलेले चातुर्वर्ण्य व दुसरे मनूच्या पुत्रांनी पायरीपायरीने तयार केलेले चातुर्वर्ण्य. दोन्ही ध्येयवादी सिध्दांत एक करण्याचा प्रयत्न जो झाला त्याचा परिणाम अगदी ओंगळ स्वरूपाचा झाला. यावरून हेच सिध्द होते कि, ते सिध्दांत मूलतः वेगळ्या स्वरूपाचे आणि परस्परांशी न जुळणारे असे आहेत. हे भिन्न स्वरूपाचे दोन प्रकारचे सिध्दांत ब्राम्हणी वांङ्मयात असतानासुध्दा या विषयाचा ज्यांनी अभ्यास केलेला आहे, अशा पंडितांनी त्याची दखल घेतलेली नाही, ही एक शोचनीय गोष्ट आहे. परंतु ते सिध्दांत अस्तिवात आहेत व ते विशेष प्रकारचे आहेत हि बाब डोळ्याआड करता येणार नाही. या सिध्दांताच्या अस्तिवात्वाचे जे महत्व आहे ते कोणते? मला असे वा

