मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

जॉन अब्राहम (भाग ३)

श्रीगुरुजी ·

अ‍ॅब्रॅहॅम लिंकन रिपब्लिकन पक्षाचे अगदी सुरवातीचे सदस्य होते. हा पक्ष गुलामगिरीविरोधात होता. तर डेमॉक्रॅटिक पक्ष १८२९ ते १८३७ या काळातील वर्णद्वेषी अध्यक्ष अ‍ॅन्ड्र्यू जॅक्सन यांच्या धोरणांमुळे प्रभावित झालेल्यांनी स्थापन केला होता. आता मात्र परिस्थिती अगदी उलट दिसते. वर्णवर्चस्ववादी गोरे जास्त करून रिपब्लिकन पक्षात दिसतात तर त्याविरोधी भूमिका असलेले डेमॉक्रॅटिक पक्षात. १८६० मध्ये अध्यक्षीय निवडणुक झाली होती त्यात लिंकन रिपब्लिकन पक्षाकडून होते. ते उघडपणे गुलामगिरी विरोधात होते. तर त्यावेळेस डेमॉक्रॅटिक पक्षात फूट पडली होती. त्याचे कारण दक्षिणेकडील राज्यांमधील डेमॉक्रॅटिक नेते गुलामगिरीचे समर्थन करत होते पण उत्तरेकडील नेते उघड समर्थन करू नव्हते पण गुलामगिरी काढावी असे त्यांचे म्हणणे नव्हते. त्यामुळे अधिक कट्टर सदर्न डेमॉक्रॅट्स आणि त्यामानाने सौम्य नॉर्दन डेमॉक्रॅट्स अशी फूट पडली त्यामुळे लिंकनना ती निवडणुक बरीच सोपी गेली. आधीच्या भागातील प्रतिसादात उल्लेख केलेले स्टिफन डग्लस नॉर्दन डेमॉक्रॅटिक पक्षाकडून उमेदवार होते. लिंकननी १८६४ ची निवडणुक परत लढवली. त्यावेळेस त्यांच्याविरोधात डेमॉक्रॅटिक पक्षाचे उमेदवार होते जॉर्ज मॅकलेलान. हे गृहस्थ यादवी युध्दात उत्तरेकडील सैन्याचे (म्हणजे लिंकनच्या बाजूचे) सेनापती होते. त्यांचा स्वतःचा गुलामगिरीला विरोध होता मात्र गुलामगिरीला विरोध करायच्या नादात देशाचे तुकडे व्हावेत असे त्यांना वाटत नव्हते. त्यामुळे लिंकननी आदेश दिले तरी कोंडीत पकडल्या गेलेल्या दक्षिणेकडील सैन्याचा निर्णायक पराभव करायला हल्ला करायचा सोडून ते थंड बसून राहिले. १८६४ मध्ये या जॉर्ज मॅकलेलान यांनी पाहिजे असेल तर दक्षिणेच्या राज्यांना गुलामगिरी चालू ठेऊ देऊ पण यादवी युध्द थांबवू या अजेंड्यावर लिंकनविरोधात निवडणुक लढवली होती. त्या निवडणुकीच्या प्रचारात जॉर्ज मॅकलेलान यांनी लिंकनविरोधात विखारी शब्द वापरले होते. लिंकन अध्यक्ष असले तरी त्यांना रणांगणातील डावपेच कळत नव्हते. त्यामुळे ते प्रचारात लिंकनचा उल्लेख 'बफून' म्हणून पण करत होते.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

सुरवातीला लिंकनचा रिपब्लिकन पक्ष गुलामगिरीच्या विरोधात होता. त्या कार्यासाठी स्वतः लिंकननी आपल्या प्राणाचे बलिदान केले. तर डेमॉक्रॅटिक पक्ष मात्र वेगळा होता. सगळे डेमॉक्रॅटिक पक्षाचे नेते गुलामगिरीच्या बाजूने होते असे नाही पण गुलामगिरी काढावी असे फार डेमॉक्रॅटिक नेत्यांना तितक्या तीव्रतेने वाटत होते असे वाटत नाही. यादवी युद्ध चालू असताना सुरवातीला दक्षिणेकडील लोकही गुलामगिरीच्या बाजूने होते असे म्हणायला हरकत नसावी. मात्र लिंकनची हत्या झाल्यानंतर ते चित्र बदलले. दक्षिणेतल्या लोकांनाही लिंकनच्या बलिदानानंतर गुलामगिरी वाईट होती हे समजले असे म्हणायला हवे. लिंकनची हत्या केल्यानंतर दक्षिणेतून आपल्याला मोठे समर्थन मिळेल आणि आपण तिथे जाऊन लपू शकू असे लिंकनच्या मारेकर्‍याला वाटत होते पण तसे झाले नाही. या बदललेल्या वातावरणाचा परिणाम म्हणजे यादवी युध्द झाल्यानंतर जवळपास ६७ वर्षात व्हाईट हाऊसमध्ये बराचसा काळ रिपब्लिकन अध्यक्ष राहिला आणि डेमॉक्रॅटिक पक्षाचा अध्यक्ष त्या मानाने कमी काळ राहिला. १८६४ मध्ये लिंकन जिंकले होते. त्यानंतर १८६८ आणि १८७२ मध्ये यादवी युध्द काळात शेवटी उत्तरेचे सेनापती असलेले युलिसिस ग्रँट, १८७६ मध्ये रूदरफोर्ड हेस, १८८० मध्ये जेम्स गारफिल्ड आणि त्यांची हत्या झाल्यानंतर चेस्टर आर्थर हे रिपब्लिकन अध्यक्ष झाले. १८८४ आणि १८९२ मध्ये ग्रोव्हर क्लिव्हलँड हे डेमॉक्रॅटिक अध्यक्ष झाले. पण १८८८ मध्ये बेंजामिन हॅरीसन, १८९६ आणि १९०० मध्ये विलिअम मॅकिन्ली, १९०१ मध्ये त्यांची हत्या झाल्यानंतर थिओडोर रूझवेल्ट, १९०४ मध्ये थिओडोर रूझवेल्ट आणि १९०८ मध्ये विलिअम हॉवर्ड टाफ्ट हे रिपब्लिकन अध्यक्ष झाले. १९१२ मध्ये माजी अध्यक्ष थिओडोर रूझवेल्ट आणि अध्यक्ष विलिअम हॉवर्ड टाफ्ट यांच्यातील मतभेदांमुळे थिओडोर रूझवेल्ट यांनी तिसर्‍या टर्मसाठी आणखी एक निवडणुक लढवली. त्यात रूझवेल्ट आणि टाफ्ट या दोघांचाही मतविभागणीमुळे मोठा पराभव झाला आणि डेमॉक्रॅटिक वुड्रो विल्सन १९१२ मध्ये आणि नंतर १९१६ मध्ये अध्यक्षपदावर निवडून गेले. परत १९२० मध्ये वॉरन हार्डिंग,१९२४ मध्ये केल्विन कूलिज आणि १९२८ मध्ये हर्बर्ट हूवर हे रिपब्लिकन अध्यक्ष निवडून आले. १९२९ ची महामंदी आली नसती तर कदाचित आणखी काही काळ रिपब्लिकनांचे व्हाईट हाऊसवर वर्चस्व राहिले असते. पण त्या महामंदीमुळे १९३२ मध्ये डेमॉक्रॅटिक फ्रँकलीन रूझवेल्ट निवडून आले आणि मग खर्‍या अर्थाने डेमॉक्रॅटिक पक्ष व्हाईट हाऊससाठी शर्यतीत खर्‍या अर्थाने आला. १९३२ च्या सुमारास यादवी युध्द संपून ६७ वर्षे झाली होती. यादवी युध्दाच्या वेळेस गुलामगिरीचे उघड/छुपे समर्थन करणारे डेमॉक्रॅटिक नेतृत्व मागे पडून पूर्ण नवे नेतृत्व पुढे आले होते. त्यामुळे यादवीच्या वेळेस डेमॉक्रॅटिक नेत्यांची भूमिका हा विषय मागे पडला आणि डेमॉक्रॅटिक पक्ष खर्‍या अर्थाने व्हाईट हाऊसच्या शर्यतीत आला.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

श्रीगुरुजी 18/01/2025 - 13:24
थिओडोर रूझवेल्ट यांनी तिसर्‍या टर्मसाठी आणखी एक निवडणुक लढवली. अमेरिकेत अध्यक्ष जास्तीत जास्त दोन वेळाच अध्यक्ष होऊ शकतो हा कायदा अमेरिकेत का, कोणी व केव्हा आणला? जर एखाद्या वर्तमान अध्यक्षाच्या अकाली निधनामुळे किंवा वर्तमान अध्यक्षाने काही कारणाने राजीनामा दिल्याने उपाध्यक्ष अध्यक्ष झाल्यास त्याची अपूर्ण मुदत हा अध्यक्षपदाचा पूर्ण काळ समजला जातो का? म्हणजे उपाध्यक्ष जेमतेम एक महिनाच अध्यक्षपदावर असला तर त्याला भविष्यात जास्तीत जास्त एकदाच अध्यक्ष होता येते का?

In reply to by श्रीगुरुजी

अमेरिकेचे अध्यक्ष हा लेख मी २० जानेवारी रोजी लिहिणार आहे. अमेरिकेच्या अध्यक्षांविषयी मला जे काही माहित आहे ते त्या लेखात लिहिणार आहे. तो लेख विनाकारण लांबलचक व्हायला नको म्हणून मूळ लेखात काही मुद्दे आणि नंतर हळूहळू प्रतिसादांमधून उरलेले मुद्दे लिहिणार आहे. त्यात २० जानेवारीलाच याविषयी लिहिणार आहे.

यापुढील कोणत्या तरी भागात या दोघांच्या हत्येविषयीच्या कॉन्स्पिरसी थिअरींचा उल्लेख करणार ना? करणार असल्यास त्यावर मी लिहित नाही. दोघांच्या, विशेषतः केनेडींच्या हत्येविषयी मसालेदार कॉन्स्पिरसी थिअरी आहे.

सौंदाळा 17/01/2025 - 10:28
लिंकन आणि केनडी दोघांची हत्या आणि दक्षिणेतील राज्यांच्या गुलामगिरीच्या प्रथेबद्दल वरवरची माहिती होती. पण या लेखमालेतून विस्तृतपणे कळत आहे. हा भाग पण आवडला.

अ‍ॅब्रॅहॅम लिंकन रिपब्लिकन पक्षाचे अगदी सुरवातीचे सदस्य होते. हा पक्ष गुलामगिरीविरोधात होता. तर डेमॉक्रॅटिक पक्ष १८२९ ते १८३७ या काळातील वर्णद्वेषी अध्यक्ष अ‍ॅन्ड्र्यू जॅक्सन यांच्या धोरणांमुळे प्रभावित झालेल्यांनी स्थापन केला होता. आता मात्र परिस्थिती अगदी उलट दिसते. वर्णवर्चस्ववादी गोरे जास्त करून रिपब्लिकन पक्षात दिसतात तर त्याविरोधी भूमिका असलेले डेमॉक्रॅटिक पक्षात. १८६० मध्ये अध्यक्षीय निवडणुक झाली होती त्यात लिंकन रिपब्लिकन पक्षाकडून होते. ते उघडपणे गुलामगिरी विरोधात होते. तर त्यावेळेस डेमॉक्रॅटिक पक्षात फूट पडली होती. त्याचे कारण दक्षिणेकडील राज्यांमधील डेमॉक्रॅटिक नेते गुलामगिरीचे समर्थन करत होते पण उत्तरेकडील नेते उघड समर्थन करू नव्हते पण गुलामगिरी काढावी असे त्यांचे म्हणणे नव्हते. त्यामुळे अधिक कट्टर सदर्न डेमॉक्रॅट्स आणि त्यामानाने सौम्य नॉर्दन डेमॉक्रॅट्स अशी फूट पडली त्यामुळे लिंकनना ती निवडणुक बरीच सोपी गेली. आधीच्या भागातील प्रतिसादात उल्लेख केलेले स्टिफन डग्लस नॉर्दन डेमॉक्रॅटिक पक्षाकडून उमेदवार होते. लिंकननी १८६४ ची निवडणुक परत लढवली. त्यावेळेस त्यांच्याविरोधात डेमॉक्रॅटिक पक्षाचे उमेदवार होते जॉर्ज मॅकलेलान. हे गृहस्थ यादवी युध्दात उत्तरेकडील सैन्याचे (म्हणजे लिंकनच्या बाजूचे) सेनापती होते. त्यांचा स्वतःचा गुलामगिरीला विरोध होता मात्र गुलामगिरीला विरोध करायच्या नादात देशाचे तुकडे व्हावेत असे त्यांना वाटत नव्हते. त्यामुळे लिंकननी आदेश दिले तरी कोंडीत पकडल्या गेलेल्या दक्षिणेकडील सैन्याचा निर्णायक पराभव करायला हल्ला करायचा सोडून ते थंड बसून राहिले. १८६४ मध्ये या जॉर्ज मॅकलेलान यांनी पाहिजे असेल तर दक्षिणेच्या राज्यांना गुलामगिरी चालू ठेऊ देऊ पण यादवी युध्द थांबवू या अजेंड्यावर लिंकनविरोधात निवडणुक लढवली होती. त्या निवडणुकीच्या प्रचारात जॉर्ज मॅकलेलान यांनी लिंकनविरोधात विखारी शब्द वापरले होते. लिंकन अध्यक्ष असले तरी त्यांना रणांगणातील डावपेच कळत नव्हते. त्यामुळे ते प्रचारात लिंकनचा उल्लेख 'बफून' म्हणून पण करत होते.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

सुरवातीला लिंकनचा रिपब्लिकन पक्ष गुलामगिरीच्या विरोधात होता. त्या कार्यासाठी स्वतः लिंकननी आपल्या प्राणाचे बलिदान केले. तर डेमॉक्रॅटिक पक्ष मात्र वेगळा होता. सगळे डेमॉक्रॅटिक पक्षाचे नेते गुलामगिरीच्या बाजूने होते असे नाही पण गुलामगिरी काढावी असे फार डेमॉक्रॅटिक नेत्यांना तितक्या तीव्रतेने वाटत होते असे वाटत नाही. यादवी युद्ध चालू असताना सुरवातीला दक्षिणेकडील लोकही गुलामगिरीच्या बाजूने होते असे म्हणायला हरकत नसावी. मात्र लिंकनची हत्या झाल्यानंतर ते चित्र बदलले. दक्षिणेतल्या लोकांनाही लिंकनच्या बलिदानानंतर गुलामगिरी वाईट होती हे समजले असे म्हणायला हवे. लिंकनची हत्या केल्यानंतर दक्षिणेतून आपल्याला मोठे समर्थन मिळेल आणि आपण तिथे जाऊन लपू शकू असे लिंकनच्या मारेकर्‍याला वाटत होते पण तसे झाले नाही. या बदललेल्या वातावरणाचा परिणाम म्हणजे यादवी युध्द झाल्यानंतर जवळपास ६७ वर्षात व्हाईट हाऊसमध्ये बराचसा काळ रिपब्लिकन अध्यक्ष राहिला आणि डेमॉक्रॅटिक पक्षाचा अध्यक्ष त्या मानाने कमी काळ राहिला. १८६४ मध्ये लिंकन जिंकले होते. त्यानंतर १८६८ आणि १८७२ मध्ये यादवी युध्द काळात शेवटी उत्तरेचे सेनापती असलेले युलिसिस ग्रँट, १८७६ मध्ये रूदरफोर्ड हेस, १८८० मध्ये जेम्स गारफिल्ड आणि त्यांची हत्या झाल्यानंतर चेस्टर आर्थर हे रिपब्लिकन अध्यक्ष झाले. १८८४ आणि १८९२ मध्ये ग्रोव्हर क्लिव्हलँड हे डेमॉक्रॅटिक अध्यक्ष झाले. पण १८८८ मध्ये बेंजामिन हॅरीसन, १८९६ आणि १९०० मध्ये विलिअम मॅकिन्ली, १९०१ मध्ये त्यांची हत्या झाल्यानंतर थिओडोर रूझवेल्ट, १९०४ मध्ये थिओडोर रूझवेल्ट आणि १९०८ मध्ये विलिअम हॉवर्ड टाफ्ट हे रिपब्लिकन अध्यक्ष झाले. १९१२ मध्ये माजी अध्यक्ष थिओडोर रूझवेल्ट आणि अध्यक्ष विलिअम हॉवर्ड टाफ्ट यांच्यातील मतभेदांमुळे थिओडोर रूझवेल्ट यांनी तिसर्‍या टर्मसाठी आणखी एक निवडणुक लढवली. त्यात रूझवेल्ट आणि टाफ्ट या दोघांचाही मतविभागणीमुळे मोठा पराभव झाला आणि डेमॉक्रॅटिक वुड्रो विल्सन १९१२ मध्ये आणि नंतर १९१६ मध्ये अध्यक्षपदावर निवडून गेले. परत १९२० मध्ये वॉरन हार्डिंग,१९२४ मध्ये केल्विन कूलिज आणि १९२८ मध्ये हर्बर्ट हूवर हे रिपब्लिकन अध्यक्ष निवडून आले. १९२९ ची महामंदी आली नसती तर कदाचित आणखी काही काळ रिपब्लिकनांचे व्हाईट हाऊसवर वर्चस्व राहिले असते. पण त्या महामंदीमुळे १९३२ मध्ये डेमॉक्रॅटिक फ्रँकलीन रूझवेल्ट निवडून आले आणि मग खर्‍या अर्थाने डेमॉक्रॅटिक पक्ष व्हाईट हाऊससाठी शर्यतीत खर्‍या अर्थाने आला. १९३२ च्या सुमारास यादवी युध्द संपून ६७ वर्षे झाली होती. यादवी युध्दाच्या वेळेस गुलामगिरीचे उघड/छुपे समर्थन करणारे डेमॉक्रॅटिक नेतृत्व मागे पडून पूर्ण नवे नेतृत्व पुढे आले होते. त्यामुळे यादवीच्या वेळेस डेमॉक्रॅटिक नेत्यांची भूमिका हा विषय मागे पडला आणि डेमॉक्रॅटिक पक्ष खर्‍या अर्थाने व्हाईट हाऊसच्या शर्यतीत आला.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

श्रीगुरुजी 18/01/2025 - 13:24
थिओडोर रूझवेल्ट यांनी तिसर्‍या टर्मसाठी आणखी एक निवडणुक लढवली. अमेरिकेत अध्यक्ष जास्तीत जास्त दोन वेळाच अध्यक्ष होऊ शकतो हा कायदा अमेरिकेत का, कोणी व केव्हा आणला? जर एखाद्या वर्तमान अध्यक्षाच्या अकाली निधनामुळे किंवा वर्तमान अध्यक्षाने काही कारणाने राजीनामा दिल्याने उपाध्यक्ष अध्यक्ष झाल्यास त्याची अपूर्ण मुदत हा अध्यक्षपदाचा पूर्ण काळ समजला जातो का? म्हणजे उपाध्यक्ष जेमतेम एक महिनाच अध्यक्षपदावर असला तर त्याला भविष्यात जास्तीत जास्त एकदाच अध्यक्ष होता येते का?

In reply to by श्रीगुरुजी

अमेरिकेचे अध्यक्ष हा लेख मी २० जानेवारी रोजी लिहिणार आहे. अमेरिकेच्या अध्यक्षांविषयी मला जे काही माहित आहे ते त्या लेखात लिहिणार आहे. तो लेख विनाकारण लांबलचक व्हायला नको म्हणून मूळ लेखात काही मुद्दे आणि नंतर हळूहळू प्रतिसादांमधून उरलेले मुद्दे लिहिणार आहे. त्यात २० जानेवारीलाच याविषयी लिहिणार आहे.

यापुढील कोणत्या तरी भागात या दोघांच्या हत्येविषयीच्या कॉन्स्पिरसी थिअरींचा उल्लेख करणार ना? करणार असल्यास त्यावर मी लिहित नाही. दोघांच्या, विशेषतः केनेडींच्या हत्येविषयी मसालेदार कॉन्स्पिरसी थिअरी आहे.

सौंदाळा 17/01/2025 - 10:28
लिंकन आणि केनडी दोघांची हत्या आणि दक्षिणेतील राज्यांच्या गुलामगिरीच्या प्रथेबद्दल वरवरची माहिती होती. पण या लेखमालेतून विस्तृतपणे कळत आहे. हा भाग पण आवडला.
लेखनविषय:
जॉन अब्राहम १ ==> जॉन अब्राहम २ शेवटी दुसर्‍या दिवशी १५ एप्रिलला सकाळी ७:२२ वाजता लिंकन यांचा मृत्यू झाल्याचे जाहीर करण्यात आले . . . अब्राहम लिंकन अब्राहम लिंकन अब्राहम लिंकनचा जन्म फेब्रुवारी १२, इ.स.

जॉन अब्राहम (भाग २)

श्रीगुरुजी ·

लिंकन आणि केनेडींची हत्या हा माझ्या खूप आवडीचा भाग आहे. याविषयी अजून लिहिता येईल पण त्यातून कदाचित पुढील भागात येणारी माहिती आधीच फोडली जाईल म्हणून आता जास्त लिहित नाही. तरीही काही गोष्टी लिहितो- १. १९५० च्या दशकात अमेरिकेत टिव्हीवर I've Got A Secret म्हणून एक कार्यक्रम लागायचा. अर्थातच या कार्यक्रमाविषयी मला आंतरजालावरूनच समजले. त्या कार्यक्रमात ८ फेब्रुवारी १९५६ रोजी मेरिलँडमधील सॅम्युएल जे. सीमोर म्हणून ९६ वर्षाचे गृहस्थ आले होते. ते लिंकनची हत्या झाली तेव्हा फोर्ड थिएटरमध्ये होते- तेव्हा वय वर्ष ५. तेव्हा अध्यक्षांना गोळी मारली गेली आहे हे त्या बालसुलभ वयात त्यांना कळणे शक्य नव्हते. लिंकनच्या मारेकर्‍याने (त्याचे नाव अजून लेखात आलेले नाही म्हणून लिहित नाही) व्यासपीठावर उडी मारली तेव्हा उंचावरून उडी मारलेला तो मनुष्य सुरक्षित असेल ना हा प्रश्न त्यांना तेव्हा पडला होता. १९५६ मध्ये हा कार्यक्रम झाला तेव्हा अ‍ॅब्रॅहॅम लिंकनच्या हत्येची प्रत्यक्ष साक्षीदार असलेले ते शेवटची हयात व्यक्ती होते. सॅम्युएल जे. सीमोरचे त्यानंतर काही आठवड्यांनी निधन झाले. हा कार्यक्रम युट्यूबवर https://www.youtube.com/watch?v=1RPoymt3Jx4&t वर बघता येईल. २. अ‍ॅब्रॅहॅम लिंकनचे उपाध्यक्ष अ‍ॅंड्र्यू जॉन्सन म्हणजे एखाद्या उत्युंग राज्यकर्त्यानंतर पुढचा राज्यकर्ता अगदी खुजा निघावा त्याचे उत्तम उदाहरण होते. लिंकनना गोळी लागली आणि त्यांना पीटरसन हाऊसमध्ये नेले गेले आहे हे समजताच उपाध्यक्ष आणि मंत्रीमंडळातील मंत्री तिथे पोचले. लिंकनची हत्या करायच्या कटात सहभागी असलेल्या लोकांनी लिंकनबरोबरच सेक्रेटरी ऑफ स्टेट विलिअम सिवार्ड आणि हे उपाध्यक्ष अँड्र्यू जॉन्सनच्या हत्येचाही कट रचला होता. मुख्य हल्ला लिंकनवर फोर्ड थिएटरमध्ये झाला आणि इतर दोघांवर त्यांच्या घरी हल्ला करायचा असे ठरले होते. आयत्या वेळेस उपाध्यक्षांवर हल्ला करायचे धैर्य त्या व्यक्तीला झाले नाही म्हणून उपाध्यक्ष पीटरसन हाऊसमध्ये जाऊ शकले. सेक्रेटरी ऑफ स्टेट विलिअम सिवार्ड मात्र जखमी झाले होते. हे उपाध्यक्ष अँड्र्यू जॉन्सन कसे नादान होते याविषयी वेगवेगळ्या ठिकाणी वाचले/बघितले आहे. लगेच संदर्भ देता येणार नाही पण हे मी वाचले/बघितले आहे हे नक्की. अ‍ॅब्रॅहॅम लिंकनची पत्नी मेरी लिंकनना हे उपाध्यक्ष अँड्र्यू जॉन्सन बहुतेक आवडायचे नाहीत त्यामुळे त्यांनी त्यांना पीटरसन हाऊसमधून जायला सांगितले. या हल्ल्यातून अध्यक्ष वाचायची शक्यता फार थोडी आणि कदाचित ते काही तासांचेच सोबती आहेत याची कल्पना तिथे असलेल्या सगळ्यांनाच आली होती. अशावेळी कदाचित आपल्याला अध्यक्षपदाची सुत्रे हाती घ्यावी लागतील ही कल्पना अँड्र्यू जॉन्सनना आली नसेल का? अशावेळी त्यांचे वर्तन कसे होते? परिस्थितीचे गांभीर्य, ती जाण त्यांच्याकडे अजिबात नव्हती. ते घरी जाऊन दारू ढोसून झोपून राहिले. दुसर्‍या दिवशी सकाळी ७.२२ वाजता लिंकन यांचे निधन झाले याचा त्यांना पत्ताही नव्हता. अँड्र्यू जॉन्सन यांचा अध्यक्ष म्हणून सकाळी ९ वाजता छोटेखानी शपथग्रहण समारंभ ठेवला होता आणि लिंकन गेले असून आपणच अध्यक्ष होणार आहोत याचा त्या महाशयांना पत्ताही नव्हता. त्यांच्या घरी त्यांना बोलावून आणायला माणसे पाठवावी लागली आणि त्यांनी त्यांच्या अंगावर पाणी मारून त्यांना उठवले. अँड्र्यू जॉन्सन थोडेसे उशीराच शपथ घ्यायला तिथे पोचले. त्यांच्यावर पुढे अमेरिकन संसदेत महाभियोग आणला गेला होता. त्यातून ते थोडक्यात बचावले. ३. अ‍ॅब्रॅहॅम लिंकनची पत्नी मेरी लिंकन (मूळची मेरी टॉड) एका श्रीमंत आणि वजनदार घराण्यातील होती. तशाच श्रीमंत आणि वजनदार घराण्यातील होते इलिनॉयचे सीनेटर स्टिफन डग्लस. तर अ‍ॅब्रॅहॅम लिंकन एकदम साध्या कुटुंबातील होते. गंमत म्हणजे स्टिफन डग्लस यांनी पण मेरी टॉडला 'प्रपोज' केले होते. पण मेरीने अ‍ॅब्रॅहॅम लिंकन या त्यामानाने खूपच साध्या माणसाशी लग्न केले. त्याचे कारण म्हणजे feminine intuition होते- स्टिफन डग्लस नाही तर कधीतरी लिंकन अध्यक्ष बनतील असे मेरीला वाटले असे अविनाश धर्माधिकारींच्या एका भाषणात ऐकले आहे. व्यक्तिशः मला ते खरे वाटत नाही. कारण १८३९ मध्ये मेरी अ‍ॅब्रॅहॅम लिंकनना भेटली तेव्हा लिंकन कधीकाळी अध्यक्ष बनू शकतील असे काही वाटण्यासारखे त्यांच्यात काही होते असे वाटत नाही. त्याउलट स्टिफन डग्लस मात्र खूपच वजनदार होते. असो. तर १८५८ मध्ये याच स्टिफन डग्लसनी अ‍ॅब्रॅहॅम लिंकनचा इलिनॉयच्या सीनेटरच्या निवडणुकीत पराभव केला आणि १८६० मध्ये अ‍ॅब्रॅहॅम लिंकननी अध्यक्षपदाच्या निवडणुकीत स्टिफन डग्लसचा. ४. अ‍ॅब्रॅहॅम लिंकन म्हणजे एकदम सत्यवादी वगैरे आपल्याला वाटते. पण प्रत्यक्षात ते १००% सत्य नक्कीच नव्हते. २०२० च्या अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकांपूर्वी नेटफ्लिक्सवर 'Race for the White House' नावाची जबराट सिरीज बघितली नाही. दुर्दैवाने ती आता नेटफ्लिक्स किंवा इतर कुठेच उपलब्ध नाही. त्या सिरीजमध्ये एक गोष्ट दाखवली होती ते बघून धक्का बसला. रिपब्लिकन पक्षाचे १८६० च्या निवडणुकीसाठी अध्यक्षपदाचा उमेदवार निवडायला अधिवेशन भरले होते शिकागोमध्ये. त्यावेळेस पक्षांतर्गत स्पर्धक अधिवेशनाला जायचे नाहीत. आघाडीवर नाव होते न्यू यॉर्कचे सीनेटर विलिअम एच. सिवार्ड यांचे (वर उल्लेख केलेले तेच). तेव्हा लिंकनच्या कॅम्पेन मॅनेजरने चापलुसी करून शिकागोमध्ये (म्हणजे आपल्या राज्यात) अधिवेशन होते याचा फायदा उठवत आपले लोक तिथे भरले. त्या सिरीजमध्ये दाखविले होते की त्या मॅनेजरने चक्क खोटी तिकिटे छापून आपल्या लोकांना अधिवेशन सुरू व्हायच्या आधी तिथे भरले आणि सिवार्डचे समर्थक तिथे जाऊ शकले नाहीत. अशा आपल्या लोकांकरवी भरपूर घोषणाबाजी आणि आवाज करून कुंपणावरच्या डेलिगेट्सपुढे लिंकन प्रचंड लोकप्रिय आहेत असे चित्र उभे केले आणि त्यातून सिवार्डना अधिक पाठिंबा आहे असे चित्र असले तरी उमेदवार झाले लिंकन. एका अर्थी लिंकननी पक्षाची उमेदवारी 'ढापली' होती. तीच गोष्ट केनेडींची. १९६० मध्ये जॉन केनेडींनी रिचर्ड निक्सनना थोडक्यात हरविले. केनेडींच्या या विजयात टेक्सस (२४ इलेक्टोरल कॉलेज डेलिगेट्स) आणि इलिनॉय (२७ इलेक्टोरल कॉलेज डेलिगेट्स) या दोन राज्यांचा वाटा मोठा होता. दोन उमेदवारांना मिळालेल्या मतांमध्ये फरक थोडा होता पण इलेक्टोरल कॉलेजमध्ये केनेडींना ३०३ तर निक्सनना २१९ मते होती. टेक्सस आणि इलिनॉय ही दोन राज्ये निक्सननी जिंकली असती तर निक्सनना २७० मते मिळून ते अध्यक्ष झाले असते. केनेडींचे उपाध्यक्षपदाचे उमेदवार होते लिंडन जॉन्सन. हे महाशय गुंड प्रवृत्तीचे होते. केनेडींची हत्या झाल्यावर ते अध्यक्ष झाले तेव्हा आपल्याला पाहिजे त्याप्रमाणे व्याजाचे दर कमी करत नाही म्हणून लिंडन जॉन्सननी फेडचे चेअरमन (रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरला समकक्ष) बिल मार्टीन यांना धक्काबुक्की (की मारहाणही?) केली होती. https://mises.org/mises-wire/when-lbj-assaulted-fed-chairman .आपल्याकडे समजा पंतप्रधानांनी रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरना मारहाण केली तर? पण ते अमेरिकेत करून दाखविले लिंडन जॉन्सननी. तर हे लिंडन जॉन्सन असे होते. त्याप्रमाणे १९६० च्या निवडणुकांमध्ये केनेडींचे खंदे समर्थक होते शिकागोचे महापौर रिचर्ड डॅली. ते पण काहीसे लिंडन जॉन्सनसारखेच. १९६० च्या निवडणुकांमध्ये केनेडींनी टेक्सस जिंकले ४६ हजार मतांनी तर इलिनॉय जिंकले ९ हजार मतांनी. या दोन राज्यात बर्‍याच काऊंटींमध्ये (आपल्याकडील जिल्ह्याला समकक्ष) तिकडच्या लोकसंख्येपेक्षा जास्त मतदान झाले आणि विशेषत: इलिनॉयमध्ये तर अगदी प्रॉपर फ्रॉड झाला होता. इलिनॉयच्या इतर सगळ्या काऊंटींमध्ये निक्सनना आघाडी होती पण शिकागो शहरात मात्र केनेडींना भरघोस मते पडली होती. वर म्हटल्याप्रमाणे अनेक ठिकाणी तिकडच्या लोकसंख्येपेक्षा जास्त मते मतपेटीत गेली होती. या फ्रॉडबद्दल काहींना १९६२ मध्ये न्यायालयाने शिक्षाही केली. निक्सन समर्थकांनी त्यांच्याकडे या निकालाला न्यायालयात आव्हान द्या असा आग्रह धरला. पण स्वतः निक्सन आपण 'क्राय बेबी' दिसायला नको म्हणून तसे आव्हान दिले नाही. मात्र निक्सन समर्थकांनी ठिकठिकाणी निकालांना न्यायालयात आव्हान दिले. हवाईमध्येही असा प्रकार झाला होता. निवडणुक संपल्यावर केनेडी अध्यक्ष झाल्यावर न्यायालयाने हवाईतून केनेडी नाही तर निक्सन जिंकले होते असा निकाल दिला आणि तिकडची इलेक्टोरल कॉलेजमधील तीन मते पूर्वलक्षी प्रभावाने केनेडींकडून काढून निक्सनना दिली. इलिनॉय आणि टेक्ससमध्ये मात्र न्यायलयाचे निकाल लागलेच नाहीत आणि मला वाटते केनेडींची हत्या झाल्यावर ते खटले बंद करण्यात आले. हा भाग तपासून बघायला हवा. अर्थात आजही केनेडी समर्थक असे काही झाले होते हे नाकारतात. म्हणजेच काय अ‍ॅब्रॅहॅम आणि जॉन दोघांनीही एका अर्थी निवडणुक 'ढापली' होती असे म्हणता येईल. जॉन केनेडींना निवडणुक ढापली असेल तर आपल्यासाठी ते चांगलेच झाले. निक्सन पक्के भारतद्वेष्टे होते तर केनेडी आपल्यासाठी बरेच चांगले होते. शीतयुध्द काळात भारत-अमेरिका संबंध सगळ्यात चांगले होते केनेडींच्या काळात. १९६२ च्या चीन युध्दात केनेडींनी भारताला मदत केली होती. तसेच निक्सन अध्यक्ष झाले असते तर डिसेंबर १९६१ मध्ये नेहरूंनी गोव्यात कारवाई करून गोवा आपल्या नियंत्रणात आणले ते कदाचित केले नसते असेही म्हणायला जागा आहे असे वाचले आहे. कारण गोवा पोर्तुगाल या नाटो देशाच्या नियंत्रणात होता त्यामुळे गोव्यावर हल्ला म्हणजे नाटो मित्रदेशावर हल्ला असा त्याचा अर्थ लाऊन अमेरिका आपल्याविरोधात उठली असती तर आपल्याला काहीही करता आले नसते. निक्सन अध्यक्ष असते तर त्यांनी तसे केले असते ही शक्यता बरीच जास्त पण केनेडींनी तसे केले नाही. ५. १८६० मध्ये लिंकन जिंकल्यावर त्यांच्या नव्याने जिंकलेल्या प्रदेशांमध्ये गुलामगिरी पसरू द्यायची नाही या भूमिकेमुळे त्यांच्या जीवाला धोका होता. त्यामुळे त्यांनी इलिनॉयची राजधानी स्प्रिंगफिल्ड ते वॉशिंग्टन हा प्रवास बराच लांबच्या मार्गाने रेल्वेने केला होता. शेवटी लिंकनचा मृतदेह त्याच मार्गाने वॉशिंग्टन ते स्प्रिंगफिल्ड असा नेण्यात आला आणि त्यांच्यावर अंत्यसंस्कार स्प्रिंगफिल्डमध्ये झाले. लिंकनचा मृत्यू आणि त्यांच्यावर अंत्यसंस्कार यात जवळपास एक महिन्याहून जास्त कालावधी होता. त्या काळात त्यांचा मृतदेह सडू नये म्हणून त्यावर रसायनांचा लेप लावण्यात आला होता. ठिकठिकाणी त्यांच्या मृतदेहाचे अंत्यदर्शन घेण्यासाठी ती शवपेटी वेगवेगळ्या शहरांमध्ये ठेवली जात होती. आपल्या शहरात तशाप्रकारे शवपेटी ठेवण्यात येणार आहे याची पूर्वसूचना द्यायला लिंकनची शवपेटी नेणार्‍या ट्रेनपुढे दुसरी एक ट्रेन सोडली गेली होती. ती ट्रेन पुढे जाऊन पूर्वसूचना देऊन लोकांना सूचित करत असे. वॉशिंग्टनवरून बाल्टिमोर, न्यू यॉर्क, बफेलो, क्लिव्हलंड, इंडियानापोलिस, शिकागे अशा अनेक शहरांमध्ये असे लोकांनी अंत्यदर्शन घेतले होते. कित्येक लोक रेल्वेमार्गाच्या बाजूला उभे राहून अभिवादन करत होते. असे म्हणतात की त्यावेळी अमेरिकेची लोकसंख्या होती त्याच्या जवळपास अर्ध्या लोकांनी अशाप्रकारे एकतर रेल्वेमार्गाच्या बाजूला उभे राहून अभिवादन केले किंवा शवपेटीचे अंत्यदर्शन घेतले. त्यानंतर अनेक वर्षे स्प्रिंगफिल्डमधील लिंकनच्या कबरीतून त्यांचा मृतदेह नाहिसा झाला अशा वावड्या उठत होत्या. शेवटी त्याला पूर्णविराम द्यायला १९०१ मध्ये ती कबर उघडून तसे काही झालेले नाही याची खात्री करण्यात आली.

अध्यक्ष अ‍ॅब्रॅहॅम लिंकन यांच्या जीवाला पहिल्यापासूनच धोका होता. वरील प्रतिसादात म्हटल्याप्रमाणे १८६० ची निवडणुक जिंकल्यावर ते स्प्रिंगफिल्डहून वॉशिंग्टनला काही दिवसांचा ट्रेनचा प्रवास करून आले होते. त्यांच्या प्रवासाविषयी आणि ते नक्की कुठे आहेत याविषयी कमालीची गुप्तता तेव्हा राखली गेली होती. इतके असूनही त्यांच्या संरक्षणाचा विचार सरकारी यंत्रणांनी सोडाच स्वतः लिंकननीही केलेला दिसत नाही. १८६४ ची निवडणुक जिंकून ४ मार्च १८६५ रोजी लिंकन यांनी अध्यक्षपदाची दुसर्‍यांदा शपथ घेतली. त्यावेळी अध्यक्ष निवडणुकीचा निकाल लागल्यावर पुढील वर्षाच्या ४ मार्चला शपथ घेत असत. १९३३ मध्ये फ्रँकलीन रूझवेल्ट यांच्यापासून ती तारीख ४ मार्चवरून बदलून २० जानेवारी करण्यात आली. शपथ घेतल्यानंतर वॉशिंग्टनमधील कॅपिटॉलमधून अध्यक्ष राष्ट्राला उद्देशून भाषण करतात तसे लिंकननी पण केले. त्या भाषणाला लिंकनची महिन्याभरानंतर ज्याने हत्या केली तो मारेकरी हजर होता आणि नुसता हजरच होता असे नाही तर त्याने ठरविले असते तर लिंकनवर तिथूनच गोळ्या झाडू शकला असत्या अशा ठिकाणी तो होता. याविषयीचे पुढील छायाचित्र प्रसिध्द आहे- Lincoln अध्यक्षांच्या बाजूला सिनेटर वगैरे लोक असतील तर समजू शकतो. पण सामान्य लोकांना अध्यक्ष जिथून भाषण करणार होते त्या ठिकाणच्या वरील गॅलरीत प्रवेश देणे अनाकलनीय वाटते. कदाचित त्यावेळी असा विचार केला गेला नसेल. १८६५ मध्ये लिंकनची हत्या झाल्यावर १८८१ मध्ये जेम्स गारफिल्ड आणि १९०१ मध्ये विलिअम मॅकिनली या अध्यक्षांची हत्या झाली होती. त्यानंतर हळूहळू अध्यक्षांच्या सुरक्षेसाठी सिक्रेट सर्व्हिस वगैरे वापरणे सुरू झाले असे दिसते. लिंकनची हत्या होण्याच्या काही दिवस आधी त्याच मारेकर्‍याने त्यांची हत्या करायचा प्रयत्न केला होता. लिंकन अध्यक्ष असल्याने व्हाईट हाऊसमध्ये राहायचे. पण त्यांचे वॉशिंग्टनमध्ये स्वतःचे दुसरे एक घरही होते. ते व्हाईट हाऊसमधून आपल्या दुसर्‍या घरी एकटेच घोड्यावरून जात. यादवी युध्द सुरू असतानाही आणि त्यांच्या जीवावर इतके लोक टपून बसलेले असताना लिंकन घोड्यावरून एकटेच जायचे हे अनाकलनीय वाटते. असे एकदा ते घोड्यावरून जात असताना त्या मारेकर्‍याने त्यांच्यावर गोळी झाडली होती. पण तो नेम थोडक्यात चुकला. लिंकन मुळात उंच होते आणि त्याकाळच्या पध्दतीनुसार ते बर्‍यापैकी उंच हॅटही घालायचे. ती गोळी लागून त्यांची हॅट खाली पडली पण त्यावेळेस ते सुरक्षित राहिले होते. निदान या अनुभवावरून तरी त्यांच्या सुरक्षेसाठी अधिक खबरदारी घेतली जाणे अपेक्षित होते. पण तसे झालेले दिसत नाही. लिंकनना आपल्या मृत्यूची जाणीव झाली होती असे म्हणतात. त्यांची हत्या होण्यापूर्वी चार-पाच दिवस ते व्हाईट हाऊसमध्ये रात्री झोपले होते तेव्हा त्यांना स्वप्न पडले. व्हाईट हाऊसमध्ये एक शवपेटी ठेवली होती आणि त्यावर अमेरिकेचा झेंडा लावला होता. स्वप्नात त्यांनी पहारेकर्‍याला विचारले- काय झाले? कोणाचा मृत्यू झाला आहे? तेव्हा तो पहारेकरी म्हणाला- तुम्हाला कळले नाही का? अध्यक्षांचा मृत्यू झाला आहे. त्यानंतर ते झोपेतून जागे झाले आणि त्या स्वप्नाविषयी त्यांनी त्यांच्या अंगरक्षकाला आणि त्यांचे चरीत्र लिहिणार्‍याला सांगितले होते.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

सुधारणा- लिंकन घोड्यावरून जात असताना त्यांच्यावर गोळी कोणी झाडली हे नक्की कळलेले नाही. मला वाटत होते की ती गोळी नंतर त्यांची हत्या करणार्‍या मारेकर्‍यानेच मारली होती पण ती गोळी नक्की कोणी मारली हे इतिहासाला माहित नाही. ही घटना ऑगस्ट १८६४ मध्ये झाली होती. https://www.americancivilwarstory.com/attempted-assassination-of-abraham-lincoln.html

श्रीगुरूजींचा लेख नी चान्सुकू ह्यांचा प्रतिसाद दोन्हीही जबरजस्त! अमेरिका अध्यक्ष म्हटले की चान्सुकू ह्यांची लेखणी सरसर चालू लागते. :) मस्तच!

लिंकन आणि केनेडींची हत्या हा माझ्या खूप आवडीचा भाग आहे. याविषयी अजून लिहिता येईल पण त्यातून कदाचित पुढील भागात येणारी माहिती आधीच फोडली जाईल म्हणून आता जास्त लिहित नाही. तरीही काही गोष्टी लिहितो- १. १९५० च्या दशकात अमेरिकेत टिव्हीवर I've Got A Secret म्हणून एक कार्यक्रम लागायचा. अर्थातच या कार्यक्रमाविषयी मला आंतरजालावरूनच समजले. त्या कार्यक्रमात ८ फेब्रुवारी १९५६ रोजी मेरिलँडमधील सॅम्युएल जे. सीमोर म्हणून ९६ वर्षाचे गृहस्थ आले होते. ते लिंकनची हत्या झाली तेव्हा फोर्ड थिएटरमध्ये होते- तेव्हा वय वर्ष ५. तेव्हा अध्यक्षांना गोळी मारली गेली आहे हे त्या बालसुलभ वयात त्यांना कळणे शक्य नव्हते. लिंकनच्या मारेकर्‍याने (त्याचे नाव अजून लेखात आलेले नाही म्हणून लिहित नाही) व्यासपीठावर उडी मारली तेव्हा उंचावरून उडी मारलेला तो मनुष्य सुरक्षित असेल ना हा प्रश्न त्यांना तेव्हा पडला होता. १९५६ मध्ये हा कार्यक्रम झाला तेव्हा अ‍ॅब्रॅहॅम लिंकनच्या हत्येची प्रत्यक्ष साक्षीदार असलेले ते शेवटची हयात व्यक्ती होते. सॅम्युएल जे. सीमोरचे त्यानंतर काही आठवड्यांनी निधन झाले. हा कार्यक्रम युट्यूबवर https://www.youtube.com/watch?v=1RPoymt3Jx4&t वर बघता येईल. २. अ‍ॅब्रॅहॅम लिंकनचे उपाध्यक्ष अ‍ॅंड्र्यू जॉन्सन म्हणजे एखाद्या उत्युंग राज्यकर्त्यानंतर पुढचा राज्यकर्ता अगदी खुजा निघावा त्याचे उत्तम उदाहरण होते. लिंकनना गोळी लागली आणि त्यांना पीटरसन हाऊसमध्ये नेले गेले आहे हे समजताच उपाध्यक्ष आणि मंत्रीमंडळातील मंत्री तिथे पोचले. लिंकनची हत्या करायच्या कटात सहभागी असलेल्या लोकांनी लिंकनबरोबरच सेक्रेटरी ऑफ स्टेट विलिअम सिवार्ड आणि हे उपाध्यक्ष अँड्र्यू जॉन्सनच्या हत्येचाही कट रचला होता. मुख्य हल्ला लिंकनवर फोर्ड थिएटरमध्ये झाला आणि इतर दोघांवर त्यांच्या घरी हल्ला करायचा असे ठरले होते. आयत्या वेळेस उपाध्यक्षांवर हल्ला करायचे धैर्य त्या व्यक्तीला झाले नाही म्हणून उपाध्यक्ष पीटरसन हाऊसमध्ये जाऊ शकले. सेक्रेटरी ऑफ स्टेट विलिअम सिवार्ड मात्र जखमी झाले होते. हे उपाध्यक्ष अँड्र्यू जॉन्सन कसे नादान होते याविषयी वेगवेगळ्या ठिकाणी वाचले/बघितले आहे. लगेच संदर्भ देता येणार नाही पण हे मी वाचले/बघितले आहे हे नक्की. अ‍ॅब्रॅहॅम लिंकनची पत्नी मेरी लिंकनना हे उपाध्यक्ष अँड्र्यू जॉन्सन बहुतेक आवडायचे नाहीत त्यामुळे त्यांनी त्यांना पीटरसन हाऊसमधून जायला सांगितले. या हल्ल्यातून अध्यक्ष वाचायची शक्यता फार थोडी आणि कदाचित ते काही तासांचेच सोबती आहेत याची कल्पना तिथे असलेल्या सगळ्यांनाच आली होती. अशावेळी कदाचित आपल्याला अध्यक्षपदाची सुत्रे हाती घ्यावी लागतील ही कल्पना अँड्र्यू जॉन्सनना आली नसेल का? अशावेळी त्यांचे वर्तन कसे होते? परिस्थितीचे गांभीर्य, ती जाण त्यांच्याकडे अजिबात नव्हती. ते घरी जाऊन दारू ढोसून झोपून राहिले. दुसर्‍या दिवशी सकाळी ७.२२ वाजता लिंकन यांचे निधन झाले याचा त्यांना पत्ताही नव्हता. अँड्र्यू जॉन्सन यांचा अध्यक्ष म्हणून सकाळी ९ वाजता छोटेखानी शपथग्रहण समारंभ ठेवला होता आणि लिंकन गेले असून आपणच अध्यक्ष होणार आहोत याचा त्या महाशयांना पत्ताही नव्हता. त्यांच्या घरी त्यांना बोलावून आणायला माणसे पाठवावी लागली आणि त्यांनी त्यांच्या अंगावर पाणी मारून त्यांना उठवले. अँड्र्यू जॉन्सन थोडेसे उशीराच शपथ घ्यायला तिथे पोचले. त्यांच्यावर पुढे अमेरिकन संसदेत महाभियोग आणला गेला होता. त्यातून ते थोडक्यात बचावले. ३. अ‍ॅब्रॅहॅम लिंकनची पत्नी मेरी लिंकन (मूळची मेरी टॉड) एका श्रीमंत आणि वजनदार घराण्यातील होती. तशाच श्रीमंत आणि वजनदार घराण्यातील होते इलिनॉयचे सीनेटर स्टिफन डग्लस. तर अ‍ॅब्रॅहॅम लिंकन एकदम साध्या कुटुंबातील होते. गंमत म्हणजे स्टिफन डग्लस यांनी पण मेरी टॉडला 'प्रपोज' केले होते. पण मेरीने अ‍ॅब्रॅहॅम लिंकन या त्यामानाने खूपच साध्या माणसाशी लग्न केले. त्याचे कारण म्हणजे feminine intuition होते- स्टिफन डग्लस नाही तर कधीतरी लिंकन अध्यक्ष बनतील असे मेरीला वाटले असे अविनाश धर्माधिकारींच्या एका भाषणात ऐकले आहे. व्यक्तिशः मला ते खरे वाटत नाही. कारण १८३९ मध्ये मेरी अ‍ॅब्रॅहॅम लिंकनना भेटली तेव्हा लिंकन कधीकाळी अध्यक्ष बनू शकतील असे काही वाटण्यासारखे त्यांच्यात काही होते असे वाटत नाही. त्याउलट स्टिफन डग्लस मात्र खूपच वजनदार होते. असो. तर १८५८ मध्ये याच स्टिफन डग्लसनी अ‍ॅब्रॅहॅम लिंकनचा इलिनॉयच्या सीनेटरच्या निवडणुकीत पराभव केला आणि १८६० मध्ये अ‍ॅब्रॅहॅम लिंकननी अध्यक्षपदाच्या निवडणुकीत स्टिफन डग्लसचा. ४. अ‍ॅब्रॅहॅम लिंकन म्हणजे एकदम सत्यवादी वगैरे आपल्याला वाटते. पण प्रत्यक्षात ते १००% सत्य नक्कीच नव्हते. २०२० च्या अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकांपूर्वी नेटफ्लिक्सवर 'Race for the White House' नावाची जबराट सिरीज बघितली नाही. दुर्दैवाने ती आता नेटफ्लिक्स किंवा इतर कुठेच उपलब्ध नाही. त्या सिरीजमध्ये एक गोष्ट दाखवली होती ते बघून धक्का बसला. रिपब्लिकन पक्षाचे १८६० च्या निवडणुकीसाठी अध्यक्षपदाचा उमेदवार निवडायला अधिवेशन भरले होते शिकागोमध्ये. त्यावेळेस पक्षांतर्गत स्पर्धक अधिवेशनाला जायचे नाहीत. आघाडीवर नाव होते न्यू यॉर्कचे सीनेटर विलिअम एच. सिवार्ड यांचे (वर उल्लेख केलेले तेच). तेव्हा लिंकनच्या कॅम्पेन मॅनेजरने चापलुसी करून शिकागोमध्ये (म्हणजे आपल्या राज्यात) अधिवेशन होते याचा फायदा उठवत आपले लोक तिथे भरले. त्या सिरीजमध्ये दाखविले होते की त्या मॅनेजरने चक्क खोटी तिकिटे छापून आपल्या लोकांना अधिवेशन सुरू व्हायच्या आधी तिथे भरले आणि सिवार्डचे समर्थक तिथे जाऊ शकले नाहीत. अशा आपल्या लोकांकरवी भरपूर घोषणाबाजी आणि आवाज करून कुंपणावरच्या डेलिगेट्सपुढे लिंकन प्रचंड लोकप्रिय आहेत असे चित्र उभे केले आणि त्यातून सिवार्डना अधिक पाठिंबा आहे असे चित्र असले तरी उमेदवार झाले लिंकन. एका अर्थी लिंकननी पक्षाची उमेदवारी 'ढापली' होती. तीच गोष्ट केनेडींची. १९६० मध्ये जॉन केनेडींनी रिचर्ड निक्सनना थोडक्यात हरविले. केनेडींच्या या विजयात टेक्सस (२४ इलेक्टोरल कॉलेज डेलिगेट्स) आणि इलिनॉय (२७ इलेक्टोरल कॉलेज डेलिगेट्स) या दोन राज्यांचा वाटा मोठा होता. दोन उमेदवारांना मिळालेल्या मतांमध्ये फरक थोडा होता पण इलेक्टोरल कॉलेजमध्ये केनेडींना ३०३ तर निक्सनना २१९ मते होती. टेक्सस आणि इलिनॉय ही दोन राज्ये निक्सननी जिंकली असती तर निक्सनना २७० मते मिळून ते अध्यक्ष झाले असते. केनेडींचे उपाध्यक्षपदाचे उमेदवार होते लिंडन जॉन्सन. हे महाशय गुंड प्रवृत्तीचे होते. केनेडींची हत्या झाल्यावर ते अध्यक्ष झाले तेव्हा आपल्याला पाहिजे त्याप्रमाणे व्याजाचे दर कमी करत नाही म्हणून लिंडन जॉन्सननी फेडचे चेअरमन (रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरला समकक्ष) बिल मार्टीन यांना धक्काबुक्की (की मारहाणही?) केली होती. https://mises.org/mises-wire/when-lbj-assaulted-fed-chairman .आपल्याकडे समजा पंतप्रधानांनी रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरना मारहाण केली तर? पण ते अमेरिकेत करून दाखविले लिंडन जॉन्सननी. तर हे लिंडन जॉन्सन असे होते. त्याप्रमाणे १९६० च्या निवडणुकांमध्ये केनेडींचे खंदे समर्थक होते शिकागोचे महापौर रिचर्ड डॅली. ते पण काहीसे लिंडन जॉन्सनसारखेच. १९६० च्या निवडणुकांमध्ये केनेडींनी टेक्सस जिंकले ४६ हजार मतांनी तर इलिनॉय जिंकले ९ हजार मतांनी. या दोन राज्यात बर्‍याच काऊंटींमध्ये (आपल्याकडील जिल्ह्याला समकक्ष) तिकडच्या लोकसंख्येपेक्षा जास्त मतदान झाले आणि विशेषत: इलिनॉयमध्ये तर अगदी प्रॉपर फ्रॉड झाला होता. इलिनॉयच्या इतर सगळ्या काऊंटींमध्ये निक्सनना आघाडी होती पण शिकागो शहरात मात्र केनेडींना भरघोस मते पडली होती. वर म्हटल्याप्रमाणे अनेक ठिकाणी तिकडच्या लोकसंख्येपेक्षा जास्त मते मतपेटीत गेली होती. या फ्रॉडबद्दल काहींना १९६२ मध्ये न्यायालयाने शिक्षाही केली. निक्सन समर्थकांनी त्यांच्याकडे या निकालाला न्यायालयात आव्हान द्या असा आग्रह धरला. पण स्वतः निक्सन आपण 'क्राय बेबी' दिसायला नको म्हणून तसे आव्हान दिले नाही. मात्र निक्सन समर्थकांनी ठिकठिकाणी निकालांना न्यायालयात आव्हान दिले. हवाईमध्येही असा प्रकार झाला होता. निवडणुक संपल्यावर केनेडी अध्यक्ष झाल्यावर न्यायालयाने हवाईतून केनेडी नाही तर निक्सन जिंकले होते असा निकाल दिला आणि तिकडची इलेक्टोरल कॉलेजमधील तीन मते पूर्वलक्षी प्रभावाने केनेडींकडून काढून निक्सनना दिली. इलिनॉय आणि टेक्ससमध्ये मात्र न्यायलयाचे निकाल लागलेच नाहीत आणि मला वाटते केनेडींची हत्या झाल्यावर ते खटले बंद करण्यात आले. हा भाग तपासून बघायला हवा. अर्थात आजही केनेडी समर्थक असे काही झाले होते हे नाकारतात. म्हणजेच काय अ‍ॅब्रॅहॅम आणि जॉन दोघांनीही एका अर्थी निवडणुक 'ढापली' होती असे म्हणता येईल. जॉन केनेडींना निवडणुक ढापली असेल तर आपल्यासाठी ते चांगलेच झाले. निक्सन पक्के भारतद्वेष्टे होते तर केनेडी आपल्यासाठी बरेच चांगले होते. शीतयुध्द काळात भारत-अमेरिका संबंध सगळ्यात चांगले होते केनेडींच्या काळात. १९६२ च्या चीन युध्दात केनेडींनी भारताला मदत केली होती. तसेच निक्सन अध्यक्ष झाले असते तर डिसेंबर १९६१ मध्ये नेहरूंनी गोव्यात कारवाई करून गोवा आपल्या नियंत्रणात आणले ते कदाचित केले नसते असेही म्हणायला जागा आहे असे वाचले आहे. कारण गोवा पोर्तुगाल या नाटो देशाच्या नियंत्रणात होता त्यामुळे गोव्यावर हल्ला म्हणजे नाटो मित्रदेशावर हल्ला असा त्याचा अर्थ लाऊन अमेरिका आपल्याविरोधात उठली असती तर आपल्याला काहीही करता आले नसते. निक्सन अध्यक्ष असते तर त्यांनी तसे केले असते ही शक्यता बरीच जास्त पण केनेडींनी तसे केले नाही. ५. १८६० मध्ये लिंकन जिंकल्यावर त्यांच्या नव्याने जिंकलेल्या प्रदेशांमध्ये गुलामगिरी पसरू द्यायची नाही या भूमिकेमुळे त्यांच्या जीवाला धोका होता. त्यामुळे त्यांनी इलिनॉयची राजधानी स्प्रिंगफिल्ड ते वॉशिंग्टन हा प्रवास बराच लांबच्या मार्गाने रेल्वेने केला होता. शेवटी लिंकनचा मृतदेह त्याच मार्गाने वॉशिंग्टन ते स्प्रिंगफिल्ड असा नेण्यात आला आणि त्यांच्यावर अंत्यसंस्कार स्प्रिंगफिल्डमध्ये झाले. लिंकनचा मृत्यू आणि त्यांच्यावर अंत्यसंस्कार यात जवळपास एक महिन्याहून जास्त कालावधी होता. त्या काळात त्यांचा मृतदेह सडू नये म्हणून त्यावर रसायनांचा लेप लावण्यात आला होता. ठिकठिकाणी त्यांच्या मृतदेहाचे अंत्यदर्शन घेण्यासाठी ती शवपेटी वेगवेगळ्या शहरांमध्ये ठेवली जात होती. आपल्या शहरात तशाप्रकारे शवपेटी ठेवण्यात येणार आहे याची पूर्वसूचना द्यायला लिंकनची शवपेटी नेणार्‍या ट्रेनपुढे दुसरी एक ट्रेन सोडली गेली होती. ती ट्रेन पुढे जाऊन पूर्वसूचना देऊन लोकांना सूचित करत असे. वॉशिंग्टनवरून बाल्टिमोर, न्यू यॉर्क, बफेलो, क्लिव्हलंड, इंडियानापोलिस, शिकागे अशा अनेक शहरांमध्ये असे लोकांनी अंत्यदर्शन घेतले होते. कित्येक लोक रेल्वेमार्गाच्या बाजूला उभे राहून अभिवादन करत होते. असे म्हणतात की त्यावेळी अमेरिकेची लोकसंख्या होती त्याच्या जवळपास अर्ध्या लोकांनी अशाप्रकारे एकतर रेल्वेमार्गाच्या बाजूला उभे राहून अभिवादन केले किंवा शवपेटीचे अंत्यदर्शन घेतले. त्यानंतर अनेक वर्षे स्प्रिंगफिल्डमधील लिंकनच्या कबरीतून त्यांचा मृतदेह नाहिसा झाला अशा वावड्या उठत होत्या. शेवटी त्याला पूर्णविराम द्यायला १९०१ मध्ये ती कबर उघडून तसे काही झालेले नाही याची खात्री करण्यात आली.

अध्यक्ष अ‍ॅब्रॅहॅम लिंकन यांच्या जीवाला पहिल्यापासूनच धोका होता. वरील प्रतिसादात म्हटल्याप्रमाणे १८६० ची निवडणुक जिंकल्यावर ते स्प्रिंगफिल्डहून वॉशिंग्टनला काही दिवसांचा ट्रेनचा प्रवास करून आले होते. त्यांच्या प्रवासाविषयी आणि ते नक्की कुठे आहेत याविषयी कमालीची गुप्तता तेव्हा राखली गेली होती. इतके असूनही त्यांच्या संरक्षणाचा विचार सरकारी यंत्रणांनी सोडाच स्वतः लिंकननीही केलेला दिसत नाही. १८६४ ची निवडणुक जिंकून ४ मार्च १८६५ रोजी लिंकन यांनी अध्यक्षपदाची दुसर्‍यांदा शपथ घेतली. त्यावेळी अध्यक्ष निवडणुकीचा निकाल लागल्यावर पुढील वर्षाच्या ४ मार्चला शपथ घेत असत. १९३३ मध्ये फ्रँकलीन रूझवेल्ट यांच्यापासून ती तारीख ४ मार्चवरून बदलून २० जानेवारी करण्यात आली. शपथ घेतल्यानंतर वॉशिंग्टनमधील कॅपिटॉलमधून अध्यक्ष राष्ट्राला उद्देशून भाषण करतात तसे लिंकननी पण केले. त्या भाषणाला लिंकनची महिन्याभरानंतर ज्याने हत्या केली तो मारेकरी हजर होता आणि नुसता हजरच होता असे नाही तर त्याने ठरविले असते तर लिंकनवर तिथूनच गोळ्या झाडू शकला असत्या अशा ठिकाणी तो होता. याविषयीचे पुढील छायाचित्र प्रसिध्द आहे- Lincoln अध्यक्षांच्या बाजूला सिनेटर वगैरे लोक असतील तर समजू शकतो. पण सामान्य लोकांना अध्यक्ष जिथून भाषण करणार होते त्या ठिकाणच्या वरील गॅलरीत प्रवेश देणे अनाकलनीय वाटते. कदाचित त्यावेळी असा विचार केला गेला नसेल. १८६५ मध्ये लिंकनची हत्या झाल्यावर १८८१ मध्ये जेम्स गारफिल्ड आणि १९०१ मध्ये विलिअम मॅकिनली या अध्यक्षांची हत्या झाली होती. त्यानंतर हळूहळू अध्यक्षांच्या सुरक्षेसाठी सिक्रेट सर्व्हिस वगैरे वापरणे सुरू झाले असे दिसते. लिंकनची हत्या होण्याच्या काही दिवस आधी त्याच मारेकर्‍याने त्यांची हत्या करायचा प्रयत्न केला होता. लिंकन अध्यक्ष असल्याने व्हाईट हाऊसमध्ये राहायचे. पण त्यांचे वॉशिंग्टनमध्ये स्वतःचे दुसरे एक घरही होते. ते व्हाईट हाऊसमधून आपल्या दुसर्‍या घरी एकटेच घोड्यावरून जात. यादवी युध्द सुरू असतानाही आणि त्यांच्या जीवावर इतके लोक टपून बसलेले असताना लिंकन घोड्यावरून एकटेच जायचे हे अनाकलनीय वाटते. असे एकदा ते घोड्यावरून जात असताना त्या मारेकर्‍याने त्यांच्यावर गोळी झाडली होती. पण तो नेम थोडक्यात चुकला. लिंकन मुळात उंच होते आणि त्याकाळच्या पध्दतीनुसार ते बर्‍यापैकी उंच हॅटही घालायचे. ती गोळी लागून त्यांची हॅट खाली पडली पण त्यावेळेस ते सुरक्षित राहिले होते. निदान या अनुभवावरून तरी त्यांच्या सुरक्षेसाठी अधिक खबरदारी घेतली जाणे अपेक्षित होते. पण तसे झालेले दिसत नाही. लिंकनना आपल्या मृत्यूची जाणीव झाली होती असे म्हणतात. त्यांची हत्या होण्यापूर्वी चार-पाच दिवस ते व्हाईट हाऊसमध्ये रात्री झोपले होते तेव्हा त्यांना स्वप्न पडले. व्हाईट हाऊसमध्ये एक शवपेटी ठेवली होती आणि त्यावर अमेरिकेचा झेंडा लावला होता. स्वप्नात त्यांनी पहारेकर्‍याला विचारले- काय झाले? कोणाचा मृत्यू झाला आहे? तेव्हा तो पहारेकरी म्हणाला- तुम्हाला कळले नाही का? अध्यक्षांचा मृत्यू झाला आहे. त्यानंतर ते झोपेतून जागे झाले आणि त्या स्वप्नाविषयी त्यांनी त्यांच्या अंगरक्षकाला आणि त्यांचे चरीत्र लिहिणार्‍याला सांगितले होते.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

सुधारणा- लिंकन घोड्यावरून जात असताना त्यांच्यावर गोळी कोणी झाडली हे नक्की कळलेले नाही. मला वाटत होते की ती गोळी नंतर त्यांची हत्या करणार्‍या मारेकर्‍यानेच मारली होती पण ती गोळी नक्की कोणी मारली हे इतिहासाला माहित नाही. ही घटना ऑगस्ट १८६४ मध्ये झाली होती. https://www.americancivilwarstory.com/attempted-assassination-of-abraham-lincoln.html

श्रीगुरूजींचा लेख नी चान्सुकू ह्यांचा प्रतिसाद दोन्हीही जबरजस्त! अमेरिका अध्यक्ष म्हटले की चान्सुकू ह्यांची लेखणी सरसर चालू लागते. :) मस्तच!
लेखनविषय:
जॉन अब्राहम (भाग १) (त्याने अचानक ०.४४ कॅलिबर डेरिंजर पिस्तुलाने लिंकन यांच्या कानामागून डोक्यात गोळी झाडली. ती लिंकन यांची कवटी फोडून मेंदूत घुसली. लिंकन तत्काळ कोमात गेले . . . ) . . . _______________________________________________________________________________________________

१४ एप्रिल १८६५, वेळ सायंकाळी अंदाजे १०:२० वाजता

प्रेक्षकातील काही डॉक्टरांनी लिंकनवर प्राथमिक उपचार करण्याचा तात्काळ प्रयत्न केला.

चपाती आंदोलनाचे गूढ

चामुंडराय ·

रोचक प्रकार. हो अशा पोळ्या गावोगावी पाठवून त्यातून क्रांतीचा संदेश पसरवला गेला असे वाचले आहे. पण नुसत्या पोळ्या पाठविल्या जात नसाव्यात. त्याबरोबर आणखी कसलातरी (निदान तोंडी) संदेश तरी पाठविला जात असावा असे वाटते. नाहीतर नुसत्या पोळ्या दुसर्‍या गावातून आपल्या गावात आल्या तर त्यामुळे ब्रिटीशांविरोधात उठाव करावा असे इतक्या (म्हणजे अनेक लाख- कदाचित कोटीही) लोकांना वाटणे याची तर्कसंगती लावता येत नाही. लेखाबद्दल धन्यवाद

In reply to by चंद्रसूर्यकुमार

टर्मीनेटर 02/01/2025 - 12:31
पण नुसत्या पोळ्या पाठविल्या जात नसाव्यात. त्याबरोबर आणखी कसलातरी (निदान तोंडी) संदेश तरी पाठविला जात असावा असे वाटते.
हो, लेखात म्हंटल्याप्रमाणे लाल कमळ आणि बकऱ्याच्या मांसाचे लहान तुकडेही सहसा त्या पोळ्यांबरोबर असत, आणि "सब लाल हो गया हैं" असा एक गुढ तोंडी संदेशही त्या वस्तु एका ठिकाणाहुन दुसऱ्या ठिकाणी पोचवणारे धावपटु देत असत म्हणे. त्या चपात्या, कमळाचे फुल, बकऱ्याचे मांस आणि ह्या संदेशाचा नक्की काय परस्पर संबंध होता राम जाने!

रामचंद्र 01/01/2025 - 21:08
हा पोळी/रोटी गूढ प्रवास इतकं अंतर झटपट होऊ शकला असेल तर तीही इंग्रजी/कंपनी सरकारचीच कृपा म्हटली पाहिजे. अन्यथा इतक्या झपाट्याने अशी हालचाल इंग्रजपूर्व (उत्तर) भारतात अशक्यच ठरली असती.

टर्मीनेटर 02/01/2025 - 12:19
एकंदरीत हा प्रकार रहस्यमय आहे खरा! आणि इतक्या वर्षांनंतरही त्या मागचे गूढ उकलले नाही ह्याचे आश्चर्य वाटते!
त्यांनी त्यांच्या मेन्यू मध्ये चिकन टिक्का मसाला बरोबरीने "चपाती-ब्रेड" चा स्वीकार केला आहे परंतु हि द्विरुक्ती आहे ("चाय-टी" - अजून एक उदाहरण) हे कोणीतरी त्यांना सांगायला हवे आहे.
"चपाती-ब्रेड" हि द्विरुक्ती आहे पण 'चाय-टी' म्हणजे दुधाचा चहा आणि नुसता 'टी' म्हणजे कोरा चहा/ब्लॅक टी असे अर्थ त्यातुन अभिप्रेत असतात.

रामचंद्र 02/01/2025 - 13:35
या निमित्ताने घडीच्या पोळ्या या आपल्या दैनंदिन आहारात कधी समाविष्ट झाल्या असाव्यात कोणी सांगू शकेल का? कारण सुमारे शंभरेक वर्षांपूर्वी पुण्यासारख्या शहरातही ब्राह्मणवर्गातही घरोघरी पोळ्यांपेक्षा भाकरीच केल्या जात असं ऐकून आहे. रोजच्या आहारात त्या तितक्याशा प्रचलित नव्हत्या.

In reply to by रामचंद्र

चौथा कोनाडा 02/01/2025 - 21:37
आंजावर शोधल्यावर हे सापडलं :
हजारो वर्षांपासून गहू पिकवला जात असल्याने रोटी बनवण्याची पाककला विकसित होत गेलेली दिसते. सोमेश्वराच्या ‘अभिलषितार्थ चिंतामणी’मध्ये तर याचे साद्यंत वर्णन येते. गव्हाचे पीठ केल्यावर त्यात थोडे तूप व मीठ घालून दूध व पाणी या दोन्हींच्या साहाय्याने कणीक भिजवावी, असे सोमेश्वर म्हणतो. याच कणकेत सारण भरून बनवलेल्या मांडय़ांना सोमेश्वराने पहलिका किंवा पोलिका म्हटले आहे. हीच आपली पोळी असावी. चपाती हा शब्द सगळ्या प्रांतात आढळतो. चपटना, चपटून, लाटून केलेला पदार्थ म्हणजे चपाती असा या शब्दाचा उगम असावा. पोळी हा शब्द मात्र सर्व प्रांतांमध्ये नाही. तो महाराष्ट्रात विशेषत्वाने आढळतो. सोमेश्वराच्या याच ग्रंथात कणकेचे गोळे हातावर पसरून विस्तवावर टाकून तांबूस होईपर्यंत भाजून ‘अंगारपोलिका’ करण्याची कृती सांगितली आहे. ही अंगारपोलिका म्हणजे आपला आजचा फुलका असावा. १६ व्या शतकातील ‘भावप्रकाश’नामक ग्रंथात रोटीका असा संस्कृत उल्लेख आहे. ती आजची रोटी. याच दरम्यानच्या ऐन-ए-अकबरीमध्ये चपातीचा उल्लेखही आढळतो.
पण घडीची पोळी याबद्दल काही सापडलं नाही ! माझ्यामते पोळीचा शोध लागतानाच घडीची पोळी करण्याची कृती सापडली असावी.. व्याख्या साधी सोपी : जी मऊ आहे आणि घडी घालता येते अन प्रवासात न्यायला सुटसुटीत अन टिकाऊ !

In reply to by चौथा कोनाडा

रामचंद्र 02/01/2025 - 22:07
घडीची पोळी म्हणजेच आपण रोज खातो ती पोळी. शंका एवढीच आहे, की हा प्रकार महाराष्ट्रात किमान काही शतके नक्कीच माहीत असावा पण रोजच्या आहारात त्याचा समावेश या शतकभरातलाच असावा. यावर कोणी जाणकार प्रकाश टाकू शकतील काय?

In reply to by गवि

Bhakti 04/01/2025 - 15:04
एवढस काय? . . वांग. त्याला काय? देठ. तुमची आमची कायमची भेट. https://youtu.be/gNmbChjJ3HQ?si=c2S5dskupoXkmI1b नुसतं नॉस्टॅल्जिया..ते रविवारचे सिनेमे...ती निखळ धमाल..ओह मिसिंग. हो कोणता डबा कोणासाठी हे सांगत जा, चिठ्ठी काय पाठवता...आठवतेय ;)

चामुंडराय 12/01/2025 - 08:23
चित्रगुप्त, मुक्त विहारि, वामन देशमुख - तुमच्या प्रतिक्रियेबद्दल आभार चंद्रसूर्यकुमार - खरे आहे, तर्काच्या कसोटीवर असे नुसत्या चपात्या वितरित करण्याने क्रांती होईल हे पटत नाही टर्मीनेटर - 'सब लाल हो गया हैं' म्हणजे काय किंवा कमळ, बकऱ्याचे मांस ह्याचा काय संबंध असावा हे कळत नाही. रामचंद्र - आजकाल वाहतुकीची सर्व साधने उपलब्ध असल्याने ३०० किमी चा प्रवास एका रात्रीत शक्य आहे परंतु तो तेव्हा कसा जमत असेल? चौथा कोनाडा - हो, हे रोचक प्रकरण आहे खरे. ह्याला क्रमशः नाही. टर्मीनेटर - हो खरंच गूढ आणि रहस्यमय आहे हे आंदोलन रामचंद्र - माझ्यामते पूर्वी महाराष्ट्रात मुख्यत्वे ज्वारी, बाजरी नाचणी इत्यादींच्या भाकरीच खात असत. पुराणपोळी सणासुदीला करत असावेत. तेव्हा खपली गहू असे, असे ऐकले आहे यश राज - प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद कानडाऊ योगेशु - इंग्रजांनी नक्कीच ह्या पोळ्या उघडून बघितल्या असतील परंतु त्यांना काहीही सापडले नाही. Bhakti - चिनी मंडळींच्या फॉर्च्युन कूकीज मध्ये संदेश लिहिलेला कागद असतो तशी तुमची फॉर्च्युन चपाती/पोळी होईल. गवि - त्या 'वाजवा रे वाजवा' चित्रपटात चपातीसंदर्भात काही होते का?

चामुंडराय 12/01/2025 - 08:26
उगीच गंमत म्हणून गप्पीष्ट-गणपतीला (Chat-GPT) चपाती आंदोलनावर कविता कर अशी आज्ञा केली तर त्याने लगेच एक कविता प्रसवली. थोड्या व्याकरणाच्या चुका सुधारून - चपाती आंदोलनाचे गूढ चपाती फिरत होती गावोगावी, गूढ तिचं होतं, कथा अनोखी दावी। कधी कुणी नेली, कधी कुणी दिली, शब्दांशिवाय संदेशाची तीच शैली। साध्या कणकेच्या त्या गरम पोळ्या, झाल्या उठावाचे मूक शस्त्र ज्या। नाही राजा, नाही सेनापती, जनतेच्या मनात पेटल्या ज्योती नव्या। घरोघरी फिरली ती अद्भुत कहाणी, ओळख पटेना, का चालली ही चालेवाणी। द्रोणासारखी पसरली ती जाळं, ब्रिटिशांचे मन हरवले, झाले बेजार। कधी ती असहकार, कधी ती बंड, चपातीचं गूढ राहिलं अनंत। भारतीयांची एकता, एक लढाईची आस, त्या चपातीने बांधली साऱ्यांना एकत्र खास। आजही विचारतो इतिहास, कोण होतं ते सूत्रधार खास? चपाती आंदोलनाचं गूढ अजूनही उलगडलं नाही, पण स्वातंत्र्याच्या लढ्यात त्याचं स्थान कमी नाही। धन्य ती पोळी, धन्य ती भावना, जनतेच्या मनात उठली जळून जाणारी ज्वाला। चपाती आंदोलनाचा हा इतिहास, राहील सदा प्रेरणादायी, भारतीय श्वास।

विजुभाऊ 12/01/2025 - 09:01
हा Chat-GPT चा दुरूपयोगआहे. Chat-GPT वापरून कविता लिहीणे म्हणजे फॉर्म्युला वन घेऊन कोपर्‍यावरच्या टपरीवर चहा प्यायला गेल्यासारखे आहे

चित्रगुप्त 19/01/2025 - 04:56
माझ्या वाचनात असे आले आहे की सर्वप्रथम ज्याने TEA हा शब्द इंग्रजीत आणला, त्याने चाय - चा- च्या अश्या कानावर पडलेल्या ध्वनीचे स्पेलिंग TEA असे केले. -- जसे NATURE, CAPTURE, ARCHITECTURE या शब्दांमधे 'T' चा उच्चार 'च' होतो, तसे.

चामुंडराय 24/03/2025 - 21:25
पलकी शर्मा उपाध्याय ची "शोध पत्रकारिता" चांगली असते, नवनवीन विषयांची माहिती मिळते. जेव्हा कुंभमेळा चालू होता तेव्हा कायप्पा वर एक व्हीडिओ आला होता. Lifebuoy ने एक शिक्का बनवून घेतला आणि कुंभमेळ्यातील स्वयंपाक घरात तयार होणाऱ्या प्रत्येक चपाती वर मारला. "तुम्ही जेवायच्या आधी लाईफबॉय ने हात धुतले आहेत का?" अशा आशयाचा तो शिक्का होता. म्हणजे एक क्लुप्ती लढवून, कमी खर्चात प्रचंड मोठ्या प्रमाणात त्यांनी मार्केटिंग केले. तो व्हीडिओ इथे कसा अपलोड करायचा माहीत नाही.

रोचक प्रकार. हो अशा पोळ्या गावोगावी पाठवून त्यातून क्रांतीचा संदेश पसरवला गेला असे वाचले आहे. पण नुसत्या पोळ्या पाठविल्या जात नसाव्यात. त्याबरोबर आणखी कसलातरी (निदान तोंडी) संदेश तरी पाठविला जात असावा असे वाटते. नाहीतर नुसत्या पोळ्या दुसर्‍या गावातून आपल्या गावात आल्या तर त्यामुळे ब्रिटीशांविरोधात उठाव करावा असे इतक्या (म्हणजे अनेक लाख- कदाचित कोटीही) लोकांना वाटणे याची तर्कसंगती लावता येत नाही. लेखाबद्दल धन्यवाद

In reply to by चंद्रसूर्यकुमार

टर्मीनेटर 02/01/2025 - 12:31
पण नुसत्या पोळ्या पाठविल्या जात नसाव्यात. त्याबरोबर आणखी कसलातरी (निदान तोंडी) संदेश तरी पाठविला जात असावा असे वाटते.
हो, लेखात म्हंटल्याप्रमाणे लाल कमळ आणि बकऱ्याच्या मांसाचे लहान तुकडेही सहसा त्या पोळ्यांबरोबर असत, आणि "सब लाल हो गया हैं" असा एक गुढ तोंडी संदेशही त्या वस्तु एका ठिकाणाहुन दुसऱ्या ठिकाणी पोचवणारे धावपटु देत असत म्हणे. त्या चपात्या, कमळाचे फुल, बकऱ्याचे मांस आणि ह्या संदेशाचा नक्की काय परस्पर संबंध होता राम जाने!

रामचंद्र 01/01/2025 - 21:08
हा पोळी/रोटी गूढ प्रवास इतकं अंतर झटपट होऊ शकला असेल तर तीही इंग्रजी/कंपनी सरकारचीच कृपा म्हटली पाहिजे. अन्यथा इतक्या झपाट्याने अशी हालचाल इंग्रजपूर्व (उत्तर) भारतात अशक्यच ठरली असती.

टर्मीनेटर 02/01/2025 - 12:19
एकंदरीत हा प्रकार रहस्यमय आहे खरा! आणि इतक्या वर्षांनंतरही त्या मागचे गूढ उकलले नाही ह्याचे आश्चर्य वाटते!
त्यांनी त्यांच्या मेन्यू मध्ये चिकन टिक्का मसाला बरोबरीने "चपाती-ब्रेड" चा स्वीकार केला आहे परंतु हि द्विरुक्ती आहे ("चाय-टी" - अजून एक उदाहरण) हे कोणीतरी त्यांना सांगायला हवे आहे.
"चपाती-ब्रेड" हि द्विरुक्ती आहे पण 'चाय-टी' म्हणजे दुधाचा चहा आणि नुसता 'टी' म्हणजे कोरा चहा/ब्लॅक टी असे अर्थ त्यातुन अभिप्रेत असतात.

रामचंद्र 02/01/2025 - 13:35
या निमित्ताने घडीच्या पोळ्या या आपल्या दैनंदिन आहारात कधी समाविष्ट झाल्या असाव्यात कोणी सांगू शकेल का? कारण सुमारे शंभरेक वर्षांपूर्वी पुण्यासारख्या शहरातही ब्राह्मणवर्गातही घरोघरी पोळ्यांपेक्षा भाकरीच केल्या जात असं ऐकून आहे. रोजच्या आहारात त्या तितक्याशा प्रचलित नव्हत्या.

In reply to by रामचंद्र

चौथा कोनाडा 02/01/2025 - 21:37
आंजावर शोधल्यावर हे सापडलं :
हजारो वर्षांपासून गहू पिकवला जात असल्याने रोटी बनवण्याची पाककला विकसित होत गेलेली दिसते. सोमेश्वराच्या ‘अभिलषितार्थ चिंतामणी’मध्ये तर याचे साद्यंत वर्णन येते. गव्हाचे पीठ केल्यावर त्यात थोडे तूप व मीठ घालून दूध व पाणी या दोन्हींच्या साहाय्याने कणीक भिजवावी, असे सोमेश्वर म्हणतो. याच कणकेत सारण भरून बनवलेल्या मांडय़ांना सोमेश्वराने पहलिका किंवा पोलिका म्हटले आहे. हीच आपली पोळी असावी. चपाती हा शब्द सगळ्या प्रांतात आढळतो. चपटना, चपटून, लाटून केलेला पदार्थ म्हणजे चपाती असा या शब्दाचा उगम असावा. पोळी हा शब्द मात्र सर्व प्रांतांमध्ये नाही. तो महाराष्ट्रात विशेषत्वाने आढळतो. सोमेश्वराच्या याच ग्रंथात कणकेचे गोळे हातावर पसरून विस्तवावर टाकून तांबूस होईपर्यंत भाजून ‘अंगारपोलिका’ करण्याची कृती सांगितली आहे. ही अंगारपोलिका म्हणजे आपला आजचा फुलका असावा. १६ व्या शतकातील ‘भावप्रकाश’नामक ग्रंथात रोटीका असा संस्कृत उल्लेख आहे. ती आजची रोटी. याच दरम्यानच्या ऐन-ए-अकबरीमध्ये चपातीचा उल्लेखही आढळतो.
पण घडीची पोळी याबद्दल काही सापडलं नाही ! माझ्यामते पोळीचा शोध लागतानाच घडीची पोळी करण्याची कृती सापडली असावी.. व्याख्या साधी सोपी : जी मऊ आहे आणि घडी घालता येते अन प्रवासात न्यायला सुटसुटीत अन टिकाऊ !

In reply to by चौथा कोनाडा

रामचंद्र 02/01/2025 - 22:07
घडीची पोळी म्हणजेच आपण रोज खातो ती पोळी. शंका एवढीच आहे, की हा प्रकार महाराष्ट्रात किमान काही शतके नक्कीच माहीत असावा पण रोजच्या आहारात त्याचा समावेश या शतकभरातलाच असावा. यावर कोणी जाणकार प्रकाश टाकू शकतील काय?

In reply to by गवि

Bhakti 04/01/2025 - 15:04
एवढस काय? . . वांग. त्याला काय? देठ. तुमची आमची कायमची भेट. https://youtu.be/gNmbChjJ3HQ?si=c2S5dskupoXkmI1b नुसतं नॉस्टॅल्जिया..ते रविवारचे सिनेमे...ती निखळ धमाल..ओह मिसिंग. हो कोणता डबा कोणासाठी हे सांगत जा, चिठ्ठी काय पाठवता...आठवतेय ;)

चामुंडराय 12/01/2025 - 08:23
चित्रगुप्त, मुक्त विहारि, वामन देशमुख - तुमच्या प्रतिक्रियेबद्दल आभार चंद्रसूर्यकुमार - खरे आहे, तर्काच्या कसोटीवर असे नुसत्या चपात्या वितरित करण्याने क्रांती होईल हे पटत नाही टर्मीनेटर - 'सब लाल हो गया हैं' म्हणजे काय किंवा कमळ, बकऱ्याचे मांस ह्याचा काय संबंध असावा हे कळत नाही. रामचंद्र - आजकाल वाहतुकीची सर्व साधने उपलब्ध असल्याने ३०० किमी चा प्रवास एका रात्रीत शक्य आहे परंतु तो तेव्हा कसा जमत असेल? चौथा कोनाडा - हो, हे रोचक प्रकरण आहे खरे. ह्याला क्रमशः नाही. टर्मीनेटर - हो खरंच गूढ आणि रहस्यमय आहे हे आंदोलन रामचंद्र - माझ्यामते पूर्वी महाराष्ट्रात मुख्यत्वे ज्वारी, बाजरी नाचणी इत्यादींच्या भाकरीच खात असत. पुराणपोळी सणासुदीला करत असावेत. तेव्हा खपली गहू असे, असे ऐकले आहे यश राज - प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद कानडाऊ योगेशु - इंग्रजांनी नक्कीच ह्या पोळ्या उघडून बघितल्या असतील परंतु त्यांना काहीही सापडले नाही. Bhakti - चिनी मंडळींच्या फॉर्च्युन कूकीज मध्ये संदेश लिहिलेला कागद असतो तशी तुमची फॉर्च्युन चपाती/पोळी होईल. गवि - त्या 'वाजवा रे वाजवा' चित्रपटात चपातीसंदर्भात काही होते का?

चामुंडराय 12/01/2025 - 08:26
उगीच गंमत म्हणून गप्पीष्ट-गणपतीला (Chat-GPT) चपाती आंदोलनावर कविता कर अशी आज्ञा केली तर त्याने लगेच एक कविता प्रसवली. थोड्या व्याकरणाच्या चुका सुधारून - चपाती आंदोलनाचे गूढ चपाती फिरत होती गावोगावी, गूढ तिचं होतं, कथा अनोखी दावी। कधी कुणी नेली, कधी कुणी दिली, शब्दांशिवाय संदेशाची तीच शैली। साध्या कणकेच्या त्या गरम पोळ्या, झाल्या उठावाचे मूक शस्त्र ज्या। नाही राजा, नाही सेनापती, जनतेच्या मनात पेटल्या ज्योती नव्या। घरोघरी फिरली ती अद्भुत कहाणी, ओळख पटेना, का चालली ही चालेवाणी। द्रोणासारखी पसरली ती जाळं, ब्रिटिशांचे मन हरवले, झाले बेजार। कधी ती असहकार, कधी ती बंड, चपातीचं गूढ राहिलं अनंत। भारतीयांची एकता, एक लढाईची आस, त्या चपातीने बांधली साऱ्यांना एकत्र खास। आजही विचारतो इतिहास, कोण होतं ते सूत्रधार खास? चपाती आंदोलनाचं गूढ अजूनही उलगडलं नाही, पण स्वातंत्र्याच्या लढ्यात त्याचं स्थान कमी नाही। धन्य ती पोळी, धन्य ती भावना, जनतेच्या मनात उठली जळून जाणारी ज्वाला। चपाती आंदोलनाचा हा इतिहास, राहील सदा प्रेरणादायी, भारतीय श्वास।

विजुभाऊ 12/01/2025 - 09:01
हा Chat-GPT चा दुरूपयोगआहे. Chat-GPT वापरून कविता लिहीणे म्हणजे फॉर्म्युला वन घेऊन कोपर्‍यावरच्या टपरीवर चहा प्यायला गेल्यासारखे आहे

चित्रगुप्त 19/01/2025 - 04:56
माझ्या वाचनात असे आले आहे की सर्वप्रथम ज्याने TEA हा शब्द इंग्रजीत आणला, त्याने चाय - चा- च्या अश्या कानावर पडलेल्या ध्वनीचे स्पेलिंग TEA असे केले. -- जसे NATURE, CAPTURE, ARCHITECTURE या शब्दांमधे 'T' चा उच्चार 'च' होतो, तसे.

चामुंडराय 24/03/2025 - 21:25
पलकी शर्मा उपाध्याय ची "शोध पत्रकारिता" चांगली असते, नवनवीन विषयांची माहिती मिळते. जेव्हा कुंभमेळा चालू होता तेव्हा कायप्पा वर एक व्हीडिओ आला होता. Lifebuoy ने एक शिक्का बनवून घेतला आणि कुंभमेळ्यातील स्वयंपाक घरात तयार होणाऱ्या प्रत्येक चपाती वर मारला. "तुम्ही जेवायच्या आधी लाईफबॉय ने हात धुतले आहेत का?" अशा आशयाचा तो शिक्का होता. म्हणजे एक क्लुप्ती लढवून, कमी खर्चात प्रचंड मोठ्या प्रमाणात त्यांनी मार्केटिंग केले. तो व्हीडिओ इथे कसा अपलोड करायचा माहीत नाही.
लेखनविषय:
लेखनप्रकार
chapati आपल्या दररोजच्या जेवणात असलेली "चपाती / पोळी / रोटी" चा भारतीय स्वातंत्र्य लढ्यात सहभाग होता का? "चपाती आंदोलन" म्हणून ओळखली गेलेली हि चळवळ खरंच स्वातंत्र्य लढ्याचा भाग होती का? १८५७ च्या स्वातंत्र्य लढ्याची प्रेरणा चपाती आंदोलन होती का? आणि जर असेल तर हे आंदोलन एव्हढे दुर्लक्षित का राहिले? चपाती आंदोलनाशी संबंधित अनेक प्रश्नांची उत्तरे आज आपल्याल

एका तेलियाने(ऐसी अक्षरे-२२)

Bhakti ·

तूम्ही, पुस्तक परीक्षण अतिशय उत्तम रित्या केले आहे. मी फक्त पुस्तके किंवा सिनेमे सुचवू शकतो. परीक्षण हा माझा प्रांत नाही... बाय द वे, ह्या पुस्तका आधी, " हा तेल नावाचा इतिहास आहे," हे गिरीश कुबेर, यांचे पुस्तक वाचा. आखाती देशांत काम करत असताना, ह्या दोन्ही पुस्तकांच्या माहितीचा चांगला उपयोग झाला. सौदी अरेबिया मध्ये काम करण्या आधी किंवा काम करत असाल तर, खालील पुस्तक जरुर वाचा.. "सोन्याच्या धुराचे ठसके." (https://www.bookganga.com/ebooks/Books/details/5285083743043205896?BookName=Sonyachya%20Dhurache%20Thaske) सौदीत काम करत असताना, लेखिकेला प्रत्यक्ष भेटता आले आणि सौदी अरेबियात काय काळजी घ्यावी, हे पण सांगीतले...

In reply to by मुक्त विहारि

Bhakti 27/12/2024 - 22:03
नक्कीच आगामी काळात ही पुस्तके वाचेन.पण या पुस्तकात राजकारण सहज सोपे समजेल असे सांगितले आहे त्यामुळे गिरीश कुबेर यांचे 'हा तेल नावाचा इतिहास ' वाचायची उत्सुकता आहे.

In reply to by Bhakti

संपादक म्हणून, एककल्ली लेखन करतात. पण, एखादा विषय घेऊन, त्याच्यावर चतुरस्त्र लेखन करतात... अधर्म युध्द आणि युद्ध जीवांचे, ही दोन्ही पुस्तके ही त्यांच्या चतुरस्त्र लेखनाची अजून दोन ठळक उदाहरणे.. टाटायन , हे पुस्तक पण ठीक आहे. बाय द वे, तेलाच्या बाबतीत अजून काही जाणून घ्यायचे असेल तर, "तेल नावाचे वर्तमान." हे पण पुस्तक वाचावे लागेल, असे वाटते. हे पुस्तक माझ्या संग्रही नाही.

आजच हे पुस्तक वाचून संपवले! अतिशय सुंदर पुस्तक आहे! मला जुनी आवृत्ती मिळाली असावी कारण शेवटचे एबिसचं रक्तरंजित प्रकरण ह्यात नाही. बाकी अमेरिकेसारख्या बलाढ्य देशाला, कंपन्यांना, नी ओपेकला सांभाळून आणी त्याहीपेक्षा सौदीच्या काही राजाना सांभाळून यामानी ह्यांनी जगाची तेलाबद्दलची जी काही घडी बसवली ती वखाणण्याजोगी आहे. पुस्तकही छान लिहिलय! काही प्रकरणे वाचून पोट धरून हसत होतो, जसे सौदीच्या राजाच्या मूळव्याधीच्या ऑपरेशन वेळचे किस्से, राजाने असे विदेशी लोकासमोर उघडे जाऊ नये म्हणून नकारार्थी हललेल्या डाढ्या, त्यानंतर राजाचे पाहून अनेकांनी मुळव्याधीच्या ऑपरेशसाठी केलेली गर्दी, रेडिओ देशात आला तर सैतान रेडियोत घुसेल अशी मुल्लामौलवींची भीती, अमेरिकेतील राष्ट्राध्यक्ष तेलाची काटकसर सांगतो तरीही अमेरिकन पेट्रोल पंपाच्या रांगांमध्येही गाड्या चालू ठेवून पेट्रोल जाळतच राहतात, अमेरिकेने हल्ला केला तर पेट्रोल विहिरी बॉम्बने उडवून द्यायची यामानी ह्यांची योजना, खोमेनी ह्यांचे एका झटक्यात देशातल्या सगळ्या तेलविहिरी बंद करणे, त्यावर “कुराणात तेल कसे काढायचे हे सांगितलेले नाही,नि जे कुराणात सांगितलेले नाही ते समजून घेण्याच्या लायकीचेच नाही” अशी लेखकाने केलेली टिप्पणी, यामानी ह्यांची किडनॅपिंग, गद्दाफींचा अडेलतट्टूपना हे सगळे वाचताना हसून हसून पोट दुखत होते! पुस्तक मस्त मस्त नि मस्तच!

तूम्ही, पुस्तक परीक्षण अतिशय उत्तम रित्या केले आहे. मी फक्त पुस्तके किंवा सिनेमे सुचवू शकतो. परीक्षण हा माझा प्रांत नाही... बाय द वे, ह्या पुस्तका आधी, " हा तेल नावाचा इतिहास आहे," हे गिरीश कुबेर, यांचे पुस्तक वाचा. आखाती देशांत काम करत असताना, ह्या दोन्ही पुस्तकांच्या माहितीचा चांगला उपयोग झाला. सौदी अरेबिया मध्ये काम करण्या आधी किंवा काम करत असाल तर, खालील पुस्तक जरुर वाचा.. "सोन्याच्या धुराचे ठसके." (https://www.bookganga.com/ebooks/Books/details/5285083743043205896?BookName=Sonyachya%20Dhurache%20Thaske) सौदीत काम करत असताना, लेखिकेला प्रत्यक्ष भेटता आले आणि सौदी अरेबियात काय काळजी घ्यावी, हे पण सांगीतले...

In reply to by मुक्त विहारि

Bhakti 27/12/2024 - 22:03
नक्कीच आगामी काळात ही पुस्तके वाचेन.पण या पुस्तकात राजकारण सहज सोपे समजेल असे सांगितले आहे त्यामुळे गिरीश कुबेर यांचे 'हा तेल नावाचा इतिहास ' वाचायची उत्सुकता आहे.

In reply to by Bhakti

संपादक म्हणून, एककल्ली लेखन करतात. पण, एखादा विषय घेऊन, त्याच्यावर चतुरस्त्र लेखन करतात... अधर्म युध्द आणि युद्ध जीवांचे, ही दोन्ही पुस्तके ही त्यांच्या चतुरस्त्र लेखनाची अजून दोन ठळक उदाहरणे.. टाटायन , हे पुस्तक पण ठीक आहे. बाय द वे, तेलाच्या बाबतीत अजून काही जाणून घ्यायचे असेल तर, "तेल नावाचे वर्तमान." हे पण पुस्तक वाचावे लागेल, असे वाटते. हे पुस्तक माझ्या संग्रही नाही.

आजच हे पुस्तक वाचून संपवले! अतिशय सुंदर पुस्तक आहे! मला जुनी आवृत्ती मिळाली असावी कारण शेवटचे एबिसचं रक्तरंजित प्रकरण ह्यात नाही. बाकी अमेरिकेसारख्या बलाढ्य देशाला, कंपन्यांना, नी ओपेकला सांभाळून आणी त्याहीपेक्षा सौदीच्या काही राजाना सांभाळून यामानी ह्यांनी जगाची तेलाबद्दलची जी काही घडी बसवली ती वखाणण्याजोगी आहे. पुस्तकही छान लिहिलय! काही प्रकरणे वाचून पोट धरून हसत होतो, जसे सौदीच्या राजाच्या मूळव्याधीच्या ऑपरेशन वेळचे किस्से, राजाने असे विदेशी लोकासमोर उघडे जाऊ नये म्हणून नकारार्थी हललेल्या डाढ्या, त्यानंतर राजाचे पाहून अनेकांनी मुळव्याधीच्या ऑपरेशसाठी केलेली गर्दी, रेडिओ देशात आला तर सैतान रेडियोत घुसेल अशी मुल्लामौलवींची भीती, अमेरिकेतील राष्ट्राध्यक्ष तेलाची काटकसर सांगतो तरीही अमेरिकन पेट्रोल पंपाच्या रांगांमध्येही गाड्या चालू ठेवून पेट्रोल जाळतच राहतात, अमेरिकेने हल्ला केला तर पेट्रोल विहिरी बॉम्बने उडवून द्यायची यामानी ह्यांची योजना, खोमेनी ह्यांचे एका झटक्यात देशातल्या सगळ्या तेलविहिरी बंद करणे, त्यावर “कुराणात तेल कसे काढायचे हे सांगितलेले नाही,नि जे कुराणात सांगितलेले नाही ते समजून घेण्याच्या लायकीचेच नाही” अशी लेखकाने केलेली टिप्पणी, यामानी ह्यांची किडनॅपिंग, गद्दाफींचा अडेलतट्टूपना हे सगळे वाचताना हसून हसून पोट दुखत होते! पुस्तक मस्त मस्त नि मस्तच!
लेखनविषय:
लेखनप्रकार
पुस्तकाचे नाव -एका तेलियाने लेखक - गिरीश कुबेर अ शेख अहमद झाकी यामिनी या पुस्तकाच्या २००९ पासून २०२३ पर्यंत, सतरा आवृत्ती निघाल्या आहेत. गाथा इराणी' या पुस्तकानंतर आखाती देशांबद्‌दल एक कुतूहल निर्माण झालेच आहे.

सहज सुचलं म्हणून

कंजूस ·

चित्रगुप्त 22/12/2024 - 05:35
येत्या फेब्रुवारी ११-२० मी पुण्यात मुक्कामास असेन, त्या दरम्यान कट्टा करुया का ? (फक्त १६ तारीख सोडून. त्या दिवशी एका लग्नात उपस्थिती लावयची आहे)

In reply to by चित्रगुप्त

सध्या आमचे भ्रमण फक्त ६ फूट बाय ३ फूट इतपतच मर्यादित असल्याने, माझ्या घरीच कट्टा करू शकतो.

In reply to by मुक्त विहारि

काळजी घ्या मुवि. हाडाचे दुखणे म्हणजे वेळखाऊ दुखणे असते. काहीही झाले तरी मुळातले दुखणे आणि मग फिजिओथेरपी वगैरे प्रकार मिळून अडीच-तीन महिने जातातच. मी पण तो अनुभव घेतला आहे. पण त्या काळात मिपावर पूर्णवेळ पडीक राहून वेळेचा सदुपयोग केला होता :)

Bhakti 22/12/2024 - 21:15
पुणे बुक फेस्टिवल २०२४ अ आ १४ डिसेंबरपासून सुरू झालेल्या पुणे बुक फेस्टिवलचा आज २२ डिसेंबर शेवटचा दिवस होता.कामाचं आठवडा नियोजन पूर्ण फुल्ल असल्याने आजचाच दिवस या फेस्टिव्हलमध्ये येण्यासाठी मिळाला.खरोखर पुस्तक प्रेमींसाठी ही एक अनोखी पंढरी फर्ग्युसन महाविद्यालयात अवतरली होती.जवळपास २५० पेक्षा अधिक प्रकाशकांचे बुक स्टॉल येथे उपलब्ध होते.फर्ग्युसन महाविद्यालयात प्रवेश करताच पुस्तक वाचण्यात मग्न अनेक भव्य प्रतिकृती ठराविक अंतरावर होत्या.पुस्तकांच्या आकाराच्या प्रतिकृतींची सजावट मार्गावर होती.अंम्पी थिअटरात अनेक कार्यक्रमांचीही रेलचेल होती.पुढे सर्वप्रथम भारतीय संविधानाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त पुस्तकरूपी "संविधान प्रतिकृती ९.९४ मीटर जिचा गिनीज बुक मध्ये समावेश करण्यात आला आहे, ती पाहिली.मग त्या भव्य प्रांगणात आलो जिथे फेस्टिव्हल भरले होते.इथे पंतप्रधान मोदी, मुख्यमंत्री फडणवीस यांचे आउटलेट छायाचित्रं काढण्यासाठी होते. आत गेल्यावर अनेक प्रसिद्ध प्रकाशनाची पुस्तके पाहून खूप आनंद झाला.इतकी पुस्तक पाहून कोणती घेऊ कोणती नको असं झालं. पहिल्याच पुस्तकाच्या स्टॉलवर पुस्तक पाहत चाळत होते.दुसऱ्या ठिकाणी हेच ,वेळेचे बंधन नसल्याने माझा नवरा आणि मुलगी मला टाटा करून पुढे निघून गेले.अनेक पुस्तकं जी नगरात पाहायलाही मिळत नाही ती जवळपास सर्वच पाहिली.इंग्रजी पुस्तकेही बरीच होती,तिथे गर्दीही भरपूर होती.मी प्रामुख्याने गीतारहस्य(लोकमान्य टिळक) पुस्त,पैशाचे मानसशास्त्र(मराठी , इंग्रजी दोन्ही भाषेत घेतले),हस्ताचा पाऊस(माडगूळकर),ज्ञानदेवा तिथे समाधी(राहूल देशपांडे), संस्कृती (इरावती कर्वे) , बिझिनेस महाराजा इत्यादी पुस्तके घेतली.थोड्या वेळाने लेकीची परत भेट झाली .तीला देखील पुस्तकांची गोडी निर्माण व्हावी म्हणून मुद्दामाहून आणले होते.ते सफलही झाले कारण घरी असलेली अनेक पुस्तके तिने ओळखून "आई हे आपल्या घरी हे पुस्तक आहे" असं सांगितलं :).रा.चि.ढेरे, कुरुंदकर ,इरावती कर्वे अशा अनेक आवडत्या लेखकांची सर्व अज्ञात पुस्तकेही पाहायला मिळाली.इथे सातवाहन गाथा सप्तशती पाहायला मिळाले.पण आता खुप उशीर झाला होता १२-४ असा वेळ इथे होते.एक तरी लेखक भेटतील अशी आशा होती पण ते घडलं नाही. फर्ग्युसन महाविद्यालय पाहत फिरत बाहेर आले.बाप लेकीने आधीच पोटोबा फुल्ल केला होता.जवळच वैशाली,वाडेश्वर आहे हे माहिती होतं.पण खूप दमलो होतो समोर ' रौनक' पावभाजी होती तिथेच गेलो.मस्त झाडांच्या सावलीत टेबल होते.पुण्यातलं पहिले १९६७ साली पावभाजीचे हे रेस्तराँ आहे असं तिथे लिहिले होते.पुण्याची पावभाजी तिखट नसणार म्हणून त्यांना तिखट द्या असं मुद्दामहूनच सांगितले.खुपच सुंदर सजवलेली (प्रेझेंटेशन)पावभाजी आणि बरोबर तिखट लसूण आलं सरबरीत चटणी,तिखटातला चिरलेला कांदा बरोबर आला.इतकी छान सर्व्हिस पाहून छान वाटलं.पुण्यात गोष्टींची 'गुणवत्ता' हाच महत्त्वाचा निकष परत दिसला.एफसी रोडवर जरा फेर फाटका मारून परत घरी निघालो. ई उ क च थ

In reply to by Bhakti

रामचंद्र 23/12/2024 - 22:05
वाचन ही शांत वातावरणात चालणारी प्रक्रिया आहे याचे थोडेसुद्धा भान आयोजकांना नसावे याचे वाईट वाटले. संध्याकाळच्या वेळेस तिथं जावं तर तिथंच चाललेल्या संगीताच्या कार्यक्रमामुळं कानठळ्या बसत होत्या. अर्थात एकंदरीतच आयोजनाच्या बाबतीत उत्सवी वातावरणात वाचनसंस्कृतीचे भान ठेवून शांत वातावरण, डोळ्याला त्रासदायक होणारा प्रखर प्रकाश टाळणे अशा गोष्टींची अपेक्षा करणं जरा जास्तच होतं याची पुरेशी जाणीव झाली आहे. बाकी हिंदी पुस्तकांच्या तसेच मराठवाड्यातल्या, तितकेसे प्रसिद्ध नसलेल्या स्टॉलवरही वेगळी, वाचनीय पुस्तकं पहायला मिळाली याचा आनंद आहे.

In reply to by Bhakti

Bhakti 21/03/2025 - 22:45
वाचाल तर आनंदी होणार अ सकाळ पुस्तक महोत्सव २०२५, अहिल्यानगर. पुणे बुक फेस्टिवलच्या धर्तीवर अगदी भव्य नाही पण बरेचसे मोठे , चांगली पुस्तके असणारे पुस्तक महोत्सव नगरमध्ये २१-२४ मार्च दरम्यान भरले आहे.पुढचे काही दिवस व्यस्त असल्यामुळे आजच फेरफटका मारला. नेहमीप्रमाणे पुस्तकाच्या दुकानात,प्रदर्शनात मला वेळेचे भान उरत नाही.तेव्हा तू एकटीच जा असं घरून सांगण्यात आले,फक्त मोबाईलची बॅटरी संपायच्या आधी घरी ये असंही सुनावण्यात आले. लोकप्रिय साहित्यिकांची पुस्तके ऑनलाईन सहज मिळतातं पण अशा प्रदर्शनात नवे पुस्तक समजतात.पुस्तकांना हातात घेऊन,पाने चाळत, अनुक्रमणिका पाहत ते पुस्तक घेणं निराळं सुखच असते. कादंबरी मी वाचनालयातून मिळालेल्या पुस्तकांतून वाचते. तेव्हा संस्कृती, अध्यात्मिक, वैज्ञानिक, समाजजीवन, निसर्ग,इतिहास,भटकंती विषयांची पुस्तके घेण्याकडे कल असतो. तरीही आनंद नाडकर्णी, ग्रेस, अच्युत गोडबोले,जयवंत दळवी,नरहर कुरुंदकर,नरेंद्र दाभोळकर यांची काही पुस्तके हेरुन ठेवली आहेत,लवकरच घेईन. मी घेतलेली अनवट पुस्तके- १.येई परतुनी ज्ञानेश्वरा' आज मला नवीन लेखक समजले डॉ.रा.श्री.मोरवंचीकर डॉ. रा. श्री. मोरवंचीकर आजही ज्ञानदानाच्या पवित्र कार्यात अखंड नंदादीपासम तेवत आहेत. त्यांनी 'येई परतुनी ज्ञानेश्वरा' हा मराठी लोकमानसाच्या जिव्हाळ्याचा ग्रंथ अध्यायनिहाय अनेक अंगांनी उलगडला आहे. त्यातील सचित्र ओव्यांचे मार्मिकपणे केलेले निरूपण पाहून त्यांच्या ज्ञानेश्वरांप्रती असलेल्या उत्कट प्रेमाचा अनुभव दिसतो. २.निसर्गायण दुसरे नव्याने समजलेले लेखक निसर्ग आणि विकास अभ्यासक दिलीप कुलकर्णी . पर्यावरणाची समस्या ही अशा प्रकारे बाह्य निसर्गातील असली, तरी तिचं मूळ आहे आपल्या मनोवृत्तीत -आपल्या विचारांत. आपली भोगवादी वृत्ती, हाव, आक्रमकता ही या समस्येला कारणीभूत आहे आणि केवळ ही एकच नव्हे, तर शस्त्रस्पर्धा, दुर्बलांवरचे अत्याचार, गुन्हेगारी, व्यसनाधीनता, मानसिक तणाव, स्वैराचार अशा अनेक समस्या त्याच मनोवृत्तीमुळे आपल्यासमोर उभ्या ठाकल्या आहेत.आधुनिक पाश्चात्त्य विज्ञान आणि प्राचीन पौर्वात्य तत्त्वज्ञान यांच्या आधारे या बदलाची दिशा शोधणारं हे पुस्तक. ३. थर्ड ॲंगल हे छोटेखानी पुस्तक हटके विषयावर म्हणजे ' थिअरॉटिकल मित्राने प्रॅक्टिकल क्लबमध्ये केलेली भाषणे एक वैचारिक अनोखा अनुभव आहे. मनाची नित्य नाव पुस्तकाच्या पानांनी वल्हवली जातात मग आयुष्याचा भवसिंधु सहज तरुन जातो ज्ञान सागराची ओढ अजुनच सहज पूर्ण होते... -भक्ती

कंजूस 23/12/2024 - 06:56
अरे वा! पुस्तक प्रदर्शन गाजलं. आता दरवर्षी होईल. तुमच्या मुलीसाठी पर्वणीच. ( आउटलेट छायाचित्रं काढण्यासाठी होते.= कटाउटस) फार पूर्वी मुंबईत (आझाद मैदान) आणि दिल्लीत ( प्रगती मैदान) येथे मोठे पुस्तक प्रदर्शन आलटून पालटून एक वर्षाआड होत असे. नंतर मुंबईतील बंदच झाले. मग छत्रपती टर्मिनस जवळचा खाजगी बुक स्टॉल आशिष दरवर्षी प्रदर्शन भरवून लागला सुंदराबाई हॉलमध्ये. पण मराठी पुस्तके नसत ( ती साहित्य संमेलनांत अधिक). अक्षर वाङमय यांनी काही वर्षे प्रदर्शने भरवली. माझ्या दृष्टीने पुस्तकं चाळायला मिळणे महत्त्वाचे कारण विकत घेत नाही. विकत आणून नंतर करायचे काय हा प्रश्न असतो. तरी भाषा शिकण्यासाठीची पुस्तके घेतो ती संग्रही आणि संदर्भासाठी कायम लागतात. स्थानिक नगरवाचनालयात काही वाचायला मिळतात. पण मोठी बाडं कधीच येत नाहीत. स्थानिक प्रकाशकांनी एक होऊन एक कायमची तारीख किंवा आठवडा प्रदर्शन भरवण्यासाठी निश्चित केला तर वाचकांच्या कायम लक्षात राहील. उदाहरणार्थ डिसेंबरचा दुसरा आठवडा.

In reply to by कंजूस

Bhakti 23/12/2024 - 08:15
सॉरी,माझी भयानक डिक्शनरी ;) =)(कटआऊट)
माझ्या दृष्टीने पुस्तकं चाळायला मिळणे महत्त्वाचे कारण विकत घेत नाही. विकत आणून नंतर करायचे काय हा प्रश्न असतो. तरी भाषा शिकण्यासाठीची पुस्तके घेतो ती संग्रही आणि संदर्भासाठी कायम लागतात.
खरं आहे,अशा मोठ्या प्रदर्शनात खुप पुस्तकं पाहायला ,चाळायला मिळतात हे महत्त्वाचे.माझा पुस्तक घेण्यासाठी हव्यास होता त्यामुळे बजेट संपल्यावर पुस्तक फक्त पाहण्याचं ऑड वाटू लागले.पुढच्यावेळी जरा याबाबत सतर्क राहीन ;) होय लेकीसाठी हळूहळू एम एच १२ केंद्रबिंदू (पर्वणी) तयार करणार आहे!

In reply to by Bhakti

हे पुस्तकं खरेदी करण्यासाठी उत्तम ठिकाण आहे. आणि डोंबिवली हे केंद्रस्थानी असल्याने, डोंबिवली येथे उत्तम पुस्तके मिळतात.

In reply to by मुक्त विहारि

बुकगंगा,अक्षरधारा,ॲमेझोन सारख्या संस्थळावर पुस्तके स्वस्त आणी घरपोच येतात. मागील वर्षापेक्षा या वर्षी अधिक चांगले प्रदर्शन होते.

In reply to by श्रीरंग_जोशी

अरेरे. उशीर झाला. पहिला प्याला बर्‍याच वर्षांपूर्वी पिऊन झाला आहे :(

In reply to by श्रीरंग_जोशी

होळी, वजा तीस तापमान. शेवटचा प्याला मार्च १९९९,प्रसंग मारूती आठशे पहिली चार चाकी घेतली. व्यसनाधीन झालो का ?नाही, प्रत्येकाच्या इच्छाशक्ती वर आवलंबून. दारू पिली पाहीजे असे काही नाही. पण अती परिचयात अवाज्ञा तद्वत दारूला डोक्यावर चढवून नये. अर्थात माझे मत.

In reply to by कर्नलतपस्वी

कंजूस 23/12/2024 - 12:21
बरोबर. रोज थोडी थोडी घरीच घ्यावी म्हणजे त्यातली गंमत सामान्य होते. आणि कधी प्रसंगाप्रमाणे जे पितात भरपूर तसं होत नाही. कितीही कोणतेही दारूचे ब्रांड आले तरी बेसिकली अल्कोहोल अमुक टक्के यापलिकडे काही नाही. तांदुळाचेही तसेच आहे पंधरा रुपये ते सातशे पन्नास रुपये किलोचा असो त्यांचे पोषणमूल्य समानच असते. सगळे पॉलिश केलेलेच असतात. हातसडीचे कुठे मिळतात?

In reply to by कंजूस

ये इंतजार गलत है के शाम हो जाये जो हो सके तो अभी दौर-ए-जाम हो जाये मुझ जैसे रिंद को भी तूने हश्र मे या रब बुला लीया है तो, कुछ इंतजाम हो जाये हुई महँगी बहत ही शराब, के थोड़ी-थोड़ी पिया करो पियो लेकिन रखो हिसाब, के थोड़ी-थोड़ी पिया करो

In reply to by कर्नलतपस्वी

कौन कहता, अंगुर की बेटी गलत है अंगुरके दामाद को बस इसकी लत है इसके साथ कुछ गम गलत करता है तो बेरहम जमाने क्या जाता है,अगर... वो उसके साथ कुछ पल बिताता है

In reply to by श्रीरंग_जोशी

कंजूस 23/12/2024 - 12:23
सर्व विषे कमी प्रमाणात औषधेच असतात. अगदी तंबाखू, चहा, अफू,अर्सेनिक सुद्धा.

कंजूस 23/12/2024 - 12:39
आशिष बुक स्टॉल छत्रपती टर्मिनस जवळचा खाजगी बुक स्टॉल आशिष दरवर्षी प्रदर्शन भरवू लागला सुंदराबाई हॉलमध्ये. यांच्या पुस्तक प्रदर्शनात भेटी दिल्यावर एक लक्षात आलं की यामध्ये पुस्तके कोण घेतो. इंटिरिअर डेकोरेशनचा व्यवसाय करणारे मुंबईत बरेच आहेत. ते इकडे फिरतात. भरपूर रंगीत चित्र असलेली जाडजूड पुस्तके तिथे निम्म्या किंमतीत असतात. ती त्यांना हवी असतात नवनवीन फर्निचरच्या डिझाइनसाठी. शिवाय गार्डनिंग लेआउटचीही असतात. आर्किटेक्ट नाही पुस्तके लागतात. मोठ्या बास्केट घेऊन फिरतात आणि भराभर पुस्तके उचलतात. तरुण मुलं मुली इंग्रजी कादंबऱ्या विकत घेतात. काही महिला कुकींगची पुस्तके बघतात. आपण जी मराठी साहित्यातील कवितासंग्रह, कादंबऱ्या विकत घेतो त्याचा आनंद आठ दिवसांत संपतो. इतिहास,भाषा यांचे अभ्यासक पुस्तके घेतात ती त्यांच्या कामाची असतात. पण मग असा विचार येईल की वाचकांनी पुस्तके विकत घ्यावीत का? वाचनालयांनी घ्यावीत. म्हणजे महिन्याच्या फीमध्ये साहित्य वाचता येईल.

In reply to by कंजूस

विना अनुदानित, वाचनालये आता ओस पडत चालली आहेत. डोंबिवली येथे एक फ्रेंड्स लायब्ररी सोडली तर बरीचशी वाचनालये बंद पडली आहेत. मानपाडा रोड वरील ३ वाचनालये, डोंबिवली पश्चिम येथील एक वाचनालय, midc मधील एक वाचनालय, ही काही ठळक उदाहरणे. रामनगर मधील एक वाचनालय आणि P ,& T मधील एक वाचनालय, फ्रेंड्स लायब्ररीच्या सहयोगाने चालतात. त्यापेक्षा पण भयावह स्थिती, अभ्यासक्रमा व्यतिरिक्त , पुस्तक विक्रेत्यांची आहे.... कालाय तस्मै नमः....

कंजूस 27/12/2024 - 06:03
गोवा पर्यटन/ कोकण/समुद्री पर्यटन गोरगावलेकर यांनी केलेल्या गोवा पर्यटनाचे धागे येत आहेत. त्यांचे अनुभव लिहित आहेत. तिसऱ्या भागात हिवाळी सहल, दक्षिण गोवा :भाग 3 : बटरफ्लाय बीच आणि लोलये-पैंगिण चे वेताळ गोवा आणि कोकण यांच्या पर्यटनाची तुलना फायदे तोटे यांची प्रतिसादांतून चर्चा फारच वाढली. ती इकडे करता येईल. धाग्यातली चर्चा इथे कॉपी पेस्ट करताही येईल पण तो त्या प्रतिसादकर्त्या लेखकांचा अधिकार आहे. मीही पूर्वी गोव्यावर एक धागा काढला होता ते आठवले. माझा समुद्र पर्यटन, खाणे पिणे वगैरेंचा आनंद फारच संकुचित आहे. तरी एकदा गोवा काय आहे म्हणून पाहण्यासाठी गेलो होतो. परतताना कुडाळहून( कोकण) आलो. एसटीचाच प्रवास त्यामुळे जमेल तेवढे पाहिले. गोव्याच्या पर्यटनाबद्दल ऐकले वाचलेले भारतातले आणि परदेशी पर्यटक इथे येतात. आनंद घेतात आणि पुन्हापुन्हा येतात. गर्दी वाढली की ट्रेनची तिकिटे मिळत नाहीत. विमान आणि हॉटेल्सचे भाडी दर वाढतात. परवडण्याच्या पलिकडे जातात. तरीही पसंती असते. कोकण ( महाराष्ट्रातला) याबद्दल श्री.ना. पेंडसे किंवा जयवंत दळवी किंवा इतर लेखकांच्या कथा कादंबऱ्यांतून मराठी वाचकांना माहीत झालेला असतो. तो खरंच कसा आहे हे पहाण्यासाठी ठाणे,रायगड, सिंधुदुर्ग जिल्हेसोडून उर्वरित महाराष्ट्रातील दूरच्या ठिकाणांहून पर्यटक येतात. त्यात किहीम, अलिबाग, श्रीवर्धन,हर्णे मुरुड, रत्नागिरी परिसर, देवगड, मालवण, देवबाग ही ठिकाणे येतात. कोकण आणि गोव्याप्रमाणेच कर्नाटकातील २६० किमी किनारपट्टीवरही कारवार,गोकर्ण, मुर्डेश्वर, उडुपी, मंगळुरू ही ठिकाणं आहेत. तीही पाहिली. हॉटेल्स(राहाणे आणि खाणे शाकाहारी तसेच मासाहारी), बसप्रवास यादृष्टीने फारच चांगल्या सोयी आहेत. शिवाय किनारपट्टीसोडून वरती घाट चढून गेल्यावरही अनेक सुंदर ठिकाणी जाता येतं. मार्चपर्यंत वाहणारे धबधबे आहेत. इथल्या लोकांना पर्यटक येण्याची सवय आहे. त्यांचा त्रास वाटत नाही . तुसडेपणा नाही. मला कर्नाटक पर्यटन फार आवडले आणि पुन्हा जावेसे वाटते. किनारे स्वच्छ चांगले आहेतच शिवाय नद्याही बारमाही पाणी वाहणाऱ्या आणि अतिशय स्वच्छ पाण्याच्या आहेत. नदीकिनारी जी धार्मिक स्थळे आहेत ती निसर्गसौंदर्याने अधिकच चांगली वाटतात. सह्याद्रीचा सुंदर निसर्ग पाहावा तर इथेच. उडुपी आणि मंगळुरू येथे समुद्र पर्यटन आणि मत्स्याहारही खूप प्रचलित आहे.

In reply to by कंजूस

गवि 27/12/2024 - 08:33
https://www.youtube.com/embed/Jhsq0fdiEq0 गोवा पर्यटन मंत्री यांची मुलाखत. ही सोशल मीडियावर सर्वत्र सुरू झालेली चर्चा हा चुकीच्या (चायनीज) आकडेवारीवर आधारित एक प्रोपागांडा आहे असे त्यांचे म्हणणे त्यांनी इथे मांडले आहे.

In reply to by कंजूस

गोरगावलेकर 27/12/2024 - 12:16
गोरगावलेकर यांनी केलेल्या गोवा पर्यटनाचे धागे येत आहेत. त्यांचे अनुभव लिहित आहेत. धाग्याच्या पहिल्या भागात आम्ही मडगाव स्टेशन ते कोलवा बीच पर्यंत प्रवास केला होता . स्टेशनच्या बाहेरच प्रीपेड टॅक्सी मिळाली . टॅक्सिवाल्यांचा कथित मुजोरपणा दिसला नाही . दुसऱ्या भागात कोलवा ते पाळोळे पर्यंत प्रवास केला . पर्यटन स्थळे बघत जात आम्ही जवळपास पूर्ण दिवस घेतला व त्यात पाच - पंचवीस किमी अंतर जास्त झाले त्याचे वाढीव पैसेही दिले . किती खर्च येतो हे कळावे इतकाच लिहिण्यामागचा उद्देश . आज कुठल्या शहरात स्विफ्ट डिझायरचे संपूर्ण दिवसासाठी ३ १ ० ० /- रुपये भाडे असेल ? ड्रायव्हरचा पगार , गाडीची देखभाल दुरुस्ती, इंधन खर्च जाऊन मालकाच्या हातात कितीसे पैसे जातील ? कोला बीचला जातांना अगदी ओबड धोबड रस्त्यावरून गाडी गेली . स्वत : ची गाडी नेतांनाही विचार करावा लागेल असा रस्ता . कुठलीही कुरकुर न करता शक्य होतील ती ठिकाणे दाखवली . येथेही गाडीवाल्यांचा कथित मुजोरपणा दिसला नाही .

In reply to by गोरगावलेकर

गवि 27/12/2024 - 13:15
मुजोर म्हणजे बोलण्यात अशा अर्थाने नसावं. पण अतिरिक्त मनाला येईल तितके पैसे मागणे हे अनेकदा घडते. पूर्ण दिवसाचे ३१०० इतकेच घेतले असतील तर तुम्हाला नशिबाने चांगले डील आणि व्यक्ती लाभली. एरवी कोपऱ्यावर सोडून यायचे सहाशे (हे उदाहरण मे २०२४ मधलं, ऑफ सिझन काळ. अंतर दोन ते तीन किमी. पार्किंग नसल्याने टॅक्सी मागवावी लागली होती.). नुसती चौकशी केली होती तेव्हा, दाभोळी एअरपोर्ट ते अगोंद वन वे नुसते ड्रॉप करण्याचे ऑफ सिझन २००० आणि सिझन मध्ये ३५०० ते ४०००. तुलनेसाठी असे पाहा की मुंबईहून गोव्याचे विमान तिकीट देखील कधी कधी याहून कमी असते. वार्का ते काबो द राम किल्ला आणि परत इतक्या अंतराचे हॉटेलशी संलग्न टॅक्सीवाल्यांनी सुमारे आठ वर्षांपूर्वी तीन हजार घेतले आणि वरून टिप मागितली. वाटेत कुठे थांबायला देखील तयार नव्हता. नव्वद टक्के वेळा मुंबईपासून स्वत:ची कारच घेऊन जाणे किंवा एअरपोर्टवर उतरताच पूर्ण मुक्कामाइतकी सेल्फ ड्राईव्ह कार घेणे हे दोन उपाय करून ही समस्या आता सोडवली आहे. बाय द वे, गोव्यातील स्थानिक लोक कोंकणी भाषेच्या सवयीनुसार एकेरीत अरेतुरे करत बोलतात आणि त्या स्टाईल मुळे काही वेळा बाहेरील लोकांना ते अशिष्ट उद्धट उगीचच वाटू शकतात.

In reply to by गवि

कंजूस 27/12/2024 - 14:58
सहमत. खाजगी वाहनाशिवाय तसेच भाड्याच्या वाहनाशिवाय जमेल तेवढे फिरणे आणि आनंद मानणे हेच आमचे ध्येय असते. त्यामुळे काही त्रास /संताप होत नाही. शेअरिंग साठी कुणाला तयार करणेही नाही. म्हणजे अगदीच घरी कॉटवर पाय हलवत गप्पा मारण्यापेक्षा चार ठिकाणं पाहाणे बरे या रुळावर आमची गाडी सुसाट धावते. शिवाय खरेदी करायची नाही हे ठरवूनच टाकले आहे. आमचा गाईड लोनली प्लानेट पुस्तक " India travel survival kit " - Tony Wheeler and others.

In reply to by गवि

टर्मीनेटर 29/12/2024 - 13:08
"पूर्ण दिवसाचे ३१०० इतकेच घेतले असतील तर तुम्हाला नशिबाने चांगले डील आणि व्यक्ती लाभली."
काशिनाथ नाडकर्णी : "तो कोकणांतला असला पाहिजे अंऽऽऽ..." कोचरेकर मास्तर : "पाहिलंत? पाहिलंत... माणुसकी नाही.. नाही म्हणतात ना?... ही घ्या माणुसकी! प्रवासात काय अनुभव येतील सांगता येत नाही. वास्तविक असल्या ह्या लोकांचे जाहीर सत्कारच करायला पाहिजेत. त्याचे नाव, नंबर वगैरे आपण टिपून घ्यायला पाहिजे होता नाही का..."
"एरवी कोपऱ्यावर सोडून यायचे सहाशे (हे उदाहरण मे २०२४ मधलं, ऑफ सिझन काळ. अंतर दोन ते तीन किमी. पार्किंग नसल्याने टॅक्सी मागवावी लागली होती.). नुसती चौकशी केली होती तेव्हा, दाभोळी एअरपोर्ट ते अगोंद वन वे नुसते ड्रॉप करण्याचे ऑफ सिझन २००० आणि सिझन मध्ये ३५०० ते ४०००."
सोकाजीनाना त्रिलोकेकर : "ए नाडकर्णी, बघ... बघ! बघ लेका तुझा कोकणातला व्हिक्टोरिया (टॅक्सी) वाला... " काशिनाथ नाडकर्णी : "तो कोकणांतला असणंच शक्य नांयऽऽऽ... अहो तो कोकणात व्हिक्टोरिया (टॅक्सी) चालवायला शिकणार कुठून मला सांगा बघू आंऽऽऽ... कायत्तरी काय? आमच्या कोकणातले म्हणजे सगळे बैल..." 😀 भ्रमण मंडळ - बटाट्याची चाळ गोव्याला असंख्य वेळा जाउनही तिथल्या सार्वजनीक वाहतुक व्यवस्थेचा आणि टॅक्सीवाल्यांचा मला फारसा अनुभव नाही. ह्या वर्षीच्या जानेवारी महिन्यात दोना पावला येथील मुक्काम असलेल्या 'इंटरनॅशनल सेंटर गोवा (ICG)' येथुन त्यांच्याचतर्फे संध्याकाळी तिथुन सुमारे सात किमी अंतरावर असलेल्या कॅसिनो पर्यंत जाउन मध्यरात्री तिथुन परतण्यासाठी घेतलेल्या टॅक्सी सेवेसाठी त्या टॅक्सीवाल्याने (आधीच बोलणी केल्याप्रमाणे) संध्याकाळी जाताना ड्रॉप साठी ३०० रुपये आणि मध्यरात्री तिथुन निघताना फोन करुन बोलवल्यावर पिक-अपसाठीचे ५०० रुपये असे जाउन-येउन एकुण ८०० रुपये घेतले होते. मध्य्ररात्री १:३० च्या नंतर फोन करुनही तो सांगीतल्याप्रमाणे परत न्यायला आला होता हे विषेश! असो, मिपाकरांना त्याठिकाणी आलेले टॅक्सीवाल्यांचे वेगवेगळे, बरे-वाईट अनुभव वाचुन माहितीत भर पडत आहे 👍

In reply to by गोरगावलेकर

विमानतळावरून आपल्या हॉटेलवर किंवा आपल्या हॉटेलवरून विमानतळावर जायचे असेल तर टॅक्सीवाल्यांचे अवाच्या सवा दर आहेत याचा मला तरी अनुभव आला नव्हता. आम्ही गोवा विमानतळापासून सगळ्यात लांब राहिलो होतो अगोंद आणि पाटणेला. दोन्ही ठिकाणी जायला विमानतळाहून १८०० रूपयात प्रीपेड टॅक्सी मिळाली होती. अर्थात ही अनुक्रमे २०१७ आणि २०१८ ची गोष्ट. सध्याचे दर किती हे माहित नाही. मात्र दोन्ही ठिकाणे दाबोळी विमानतळाहून साधारण ६०-६५ किलोमीटर अंतरावर आहेत. अंतर ध्यानात घेता तो दर अवाजवी जास्त आहे असे वाटले नव्हते. विमानतळावर समजा प्रीपेड टॅक्सी असते आणि त्यांना ठरवून दिलेले दर आहेत तितकेच घ्यावे लागतात. पण परतीच्या प्रवासात हॉटेलवरून विमानतळावर जातानाही टॅक्सीवाल्याने तेवढेच पैसे घेतले होते. अगोंदहून परत येताना आमचे विमान रात्रीचे होते त्यामुळे दाबोळी विमानतळावर रात्री साडेनऊच्या सुमारास पोचलो होतो. त्या वेळेस विमानतळावरून भाडी मिळत असतील की नाही शंकाच आहे कारण त्यावेळेनंतर फार विमाने येत नाहीत. तरीही त्याने जास्त पैसे घेतले नव्हते. टॅक्सीवाले अवाच्या सवा दर लावतात ते हॉटेलबाहेर साईटसिईंगला जाणार्‍यांकडून. वारकामध्ये आम्ही उतरलो होतो वारकाला आमच्या हॉटेलच्या बाहेर पर्यटकांसाठी म्हणून एक टॅक्सी स्टॅन्ड होता. तिथून मडगाव फार तर १०-१२ किलोमीटरवर होते. काजू आणि बेबिंका अशा गोष्टी घ्यायला मडगावला जायचे होते तेव्हा हॉटेलबाहेरील टॅक्सीवाल्यांनी जाऊन येऊन २७०० रूपये सांगितले होते. आणि ही गोष्ट २०१२ ची होती म्हणजे आणखी जुनी. ही अक्षरशः लूट होती. मला वाटते तिथे जास्त गोरे पर्यटक येतात आणि परदेशी पर्यटकांना अवाच्या सवा दर लाऊन लुटणे हा प्रकार नाही म्हटले तरी सगळीकडे होतोच. जर ते गोरे पर्यटक असे वाढीव दर द्यायला तयार होत असतील तर टॅक्सीवाल्यांना बहुदा आम्हा भारतीय पर्यटकांची गरज नसावी. त्यामुळे यायचे असेल तर या दरात या नाहीतर येऊ नका असा त्यांचा दृष्टीकोन होता.

गेल्या काही महिन्यांपासून माझी पत्नी सौरभ बोथरा यांच्या ऑनलाइन योगासन वर्गांना उपस्थिती लावत आहे. मी देखील महिन्याभरापासून सुरुवात केली आहे. शीर्षकात जरी केवळ योग असले तरी, योगासनांखेरीज, इतर कार्डिओ व श्वसनाचे व्यायाम, प्राणायम व थोडेफार ध्यान यांचाही या वर्गांत अंतर्भाव असतो. रोज युट्युब लाइव्ह द्वारे भाप्रवे नुसार सकाळ व संध्याकाळी हे वर्ग चालतात. सूचना सहजपणे समजतील अशा असतात व स्क्रीनवर पाहून आपण ते व्यायामप्रकार करू शकतो. ६ जानेवारीपासून तीन आठवडे या वर्गांचा नि:शुल्क लाभ घेता येईल - त्यासाठीचा दुवा. या वर्गांना काही दिवस उपस्थिती लावल्यावर, असे वर्ग आपल्याला काही वर्षे अगोदर का नाही मिळाले अशी भावना आमच्यासह बहुतेकांच्या मनात निर्माण झाली आहे / होत असते.

In reply to by श्रीरंग_जोशी

कंजूस 29/12/2024 - 04:00
ती साईट पाहिली. नोंदणी केली नाही. उपक्रम आणि ओनलाइन आहे हे बरे. काही शाळांत योगासने शिकवतात बहुतेक. आमच्या शाळेत शिकवली होती. पाचवी पासूनच . लहानपणी केली नाही तरी चालतात. कारण तेव्हा वाढते तरुण वय असते. पण नंतर कधी करायची झाल्यास छोट्या पुस्तिका विकत मिळतात त्या पाहिल्या की काही सोपी रोज करण्याची आसने दहा बारा आहेत ती करता येतात. चीनमध्ये तिथल्या बागांत ( parks) ६०+, ८५+ वयोगटातील नागरिकांसाठी काही त्यांच्या पद्धतींचे व्यायाम प्रकार करणारे करवून घेणारे गट असतात. त्यांचे काही विडिओ मी मागे पाहिले होते ( dwtv channel documentaries बहुतेक.) त्यांचे व्यायाम प्रकारही खूप चांगले वाटले. विशेषतः शरीराची रोजची हालचाल करण्यासाठीचे ते सराव आहेत. वरील दोन वयोगटांच्या वयाप्रमाणे हालचालींचा वेग वेगळा दिसला. इकडच्या काही बाबा लोकांचे योग प्रकार मला काही आवडले नाहीत. अतिरंजीत वाटले. ....... वजन कमी करणे/ हालचालींसाठी सराव/ रोग नियंत्रण/ मानसिक समाधान शांती यांपैकी एक किंवा सर्व असा काही झोल योगासनांमध्ये घालण्याचा खटाटोप दिसतो हे माझे मत.

Bhakti 29/12/2024 - 14:44
हरारीची मुलाखत रणवीरने घेतली.हरारी माझा आवडता विचारवंत आहे.तो भारतात नेक्सास' पुस्तक प्रकाशित करण्यासाठी आला होता.तेव्हा अनेकांना त्याच्याबरोबर मुलाखती घेतल्या. १. https://youtu.be/eNVtYPgJ6b0?si=3VfqDjCcx6_lYjk2 २. https://youtu.be/6x4UgHI7qbk?si=_Iz_eP9HF7SYH-ZM दुसरी मुलाखत अजून ऐकायची आहे. पहिली मुलाखत रणवीरने घेतली आहे.AI हा हरारीचा १० वर्षांपूर्वी पासूनचा विषय आहे.जो AI वर वरचढ होईल तोच पुढच्या काळात जगावर राज्य करणारे.इथे रशिया,ट्रम्प यांचा वर्चस्ववादी भूमिकेचा त्याने चांगला समाचार घेतला आहे.अमेरिकासारख्या बलाढ्य देशाने,लीडरने जगाच्या शांततेचा विचार आधी केला पाहिजे तरच माणूसकी टिकेल असं त्यांचं म्हणणं आहे.रणवीरचा शो म्हटला की तो स्पिरिच्युलिटीवर समोरच्याला बोलायला लावणारच हे ठरलेलं आहे 😀 त्यात हरारी विपश्यनेचा साधक आहे. पण हरारी म्हणतो कोणीही कोणाला दोन ,तीन तास ध्यानाला बसा हे म्हणणं सोपं आहे.पण पंधरा मिनिटे तरी केवळ स्वतःच्या आता बाहेर जाण्याऱ्या श्वासावर लक्ष केंद्रित करा.इतर कोणताच विचार डोक्यात आणायचा नाही,हे सांगितले तर कोणालाच हे फारसं जमणार नाही.यासाठी खुप तयारीच हवी.मेडिटेशन कसं करायचं, कोणतं करायचं हे ज्याचं त्यालाच ठरवू द्या.उगाच मेंढ्याचा कळप करण्यात अर्थ नाही. युद्ध करावं की नाही याबाबत त्याचं मत मला गोलगोल वाटलं,आधी तो म्हणाला मिलिटरी वर ५०% हून अधिक खर्च चिंताजनक आहे नंतर म्हणाला इस्राएल आणि भारताने ज्या चुका रोमन व मुस्लिम+ब्रिटिश आक्रमणाच्या काळात सैन्य ताकद वाढवण्यावर भर देतात केली ती त्यांना आता करणे अजिबात परवडणारं नाही👏

In reply to by Bhakti

कंजूस 29/12/2024 - 15:53
मराठी किंवा कुणीही. आंतरराष्ट्रीय मते राजकीय/ सामाजिक / धार्मिक ही नेहमी ती व्यक्ती कोणत्या डोक्यातली आहे त्याप्रमाणे एकांगीच असतात. विरुद्ध गटाचा साधा उल्लेखही नसतो. तर काहींची प्रसिद्ध केलेली व्यक्तव्ये त्यांच्या देशाच्या राजकीय दडपणाखालीही असतात.

कंजूस 31/12/2024 - 20:43
पहिला काचेचा पूल काल कन्याकुमारी, तमिळनाडू इथे असलेल्या विवेकानंद स्मारक आणि तिरुवल्लूवर पुतळा या दोन ठिकाणांमध्ये काचेचा पूल उभारला त्याचे उद्घाटन झाले. hindustan times बातमी

कंजूस 03/01/2025 - 11:27
खरडफळ्यावर विषय निघाला म्हणून......... गुजरातचे सुंदर समुद्र किनारे आणि पर्यटन. फार प्रचलित नाही तरीही थोडक्यात... गुजरातध्ये {सूरतजवळच्या} हजिरा येथे आणि जामनगर येथे दोन मोठे रासायनिक प्रकल्प ( भारतीय कंपन्या, रिलायन्स) अगोदरच आहेत. सूरतजवळच्या दहेज बंदरातून - घोघा पलिकडे जाऊन भावनगरला काही जण जातात. धार्मिक पर्यटन. दीवचा किनारा पर्यटनासाठी आहे. तिथून वेरावळ - सोमनाथ आहे. पण धार्मिक महत्त्व आणि मासेमारी. दमणचा किनारा काळा आहे. मासेमारी बोटींच्या डिझेलमुळे. जवळचा परिसर दारूबार आणि इतर इलेक्ट्रॉनिक्स मार्केटसाठी पूर्वी प्रसिद्ध होता. आता त्याचे महत्त्व उरले नाही. तरीही दमण- वापी- दादरा नगरहवेली- खानवेल ( गार्डन्स) अशी सहल होऊ शकते. द्वारका पोरबंदर समुद्र -धार्मिक पर्यटन अंकलेश्वर/अंकलेसर भरूच हे नर्मदा पर्यटनामुळे चर्चेत असते. गुजरात - महाराष्ट्र सीमेजवळचे डहाणू आणि बोर्डी येथे हॉटेल्स खूप आहेत. डहाणू-जव्हार- त्र्यंबकेश्वर -नाशिक - सापूतारा असाही सहल प्लान होऊ शकतो. गुजरात समुद्र किनारे थंडीतच ठीक. गरमा फार असतो. काही ठिकाणी रात्री चमकणाऱ्या लाटा दिसतात. मुंबई पुणे पर्यटकांसाठी कोकण, गोवा, कर्नाटक समुद्रच बरा.

In reply to by कंजूस

गवि 03/01/2025 - 14:19
दमण- वापी- दादरा नगरहवेली- खानवेल ( गार्डन्स) अशी सहल होऊ शकते.
दमण किनारे घाणेरडे. केमिकल आणि वास. अस्वच्छ. हल्ली काही भाग बांधून चौपाटी केली आहे असे ऐकले पण एकूण समुद्र घाण. खूप इंडस्ट्रीज. सिल्वासा कंटाळवाणे. सर्वसाधारण लहान शहर. उन्हाळ्यात तर अगदी नदी देखील कोरडी. तिथली वाटेतली लायन सफारी केविलवाणी. सापुतारा वगैरे हिल स्टेशन हा अधिक चांगला ऑप्शन आहे त्यापेक्षा.

In reply to by प्रचेतस

गवि 03/01/2025 - 15:50
आधी मद्य पिऊन मग कोणत्याही मार्केटमध्ये फिरायला मजाच येते. किंबहुना काळ्या समुद्रावर फिरायला देखील मजाच येते. :))

In reply to by प्रचेतस

गवि 03/01/2025 - 16:00
तुमच्या इतका जोरकस, प्रगाढ, वादळी, पावसाळी, ओलाकंच, इंटेंस अनुभव नसला तरी प्रवासाचा अंमळ थोडासा अनुभव आहे इतकंच..

In reply to by प्रचेतस

गवि 03/01/2025 - 16:09
सळसळत्या वाऱ्याने एखादा प्राजक्त थरथरावा आणि खालून जाणाऱ्या आपल्या तापल्या अंगावर गार दवबिंदूंचा पडलेला पाऊस हृदयाचे मधलेच चार ठोके चोरून जावा तशी अवस्था झालेली दिसते त्या आठवणींनी.

In reply to by गवि

प्रचेतस 03/01/2025 - 17:24
हो ना. अगदीच मोरपिशी अवस्था. बाकी तुमचे अनुभवही ह्याबाबतीत दांडगेच असणार म्हणा हे तुमच्या तरल शब्दांनी सहजच स्पष्ट होते.

In reply to by गवि

टर्मीनेटर 03/01/2025 - 16:55
वरच्या वाक्यात
"आधी मद्य पिऊन मग कोणत्याही मार्केटमध्ये फिरायला मजाच येते."
असे 'कोणत्याही मार्केटमध्ये' हे दोन शब्द ठळक करायचे राहुन गेले काय 😀 नीळा, हिरवा, पिवळा, तांबडाच काय पण 'मृत' समुद्रही जर कौतुकास पात्र ठरत असतील तर बिचाऱ्या 'काळ्या' समुद्राने असे काय कोणाचे घोडे मारले आहे? ('काळ्याशार' गोष्टीही आकर्षक असु शकतात 😉) तेव्हा घ्यावी की त्याच्यावरही फिरायची मजा 😂 बाकी 'काळ्या' वरुन सहज सुचलं म्हणून... काला रे सइयां काला रे तन काला रे मन काला रे काली जबान की काली गारी काले दिन की काली शामें सइयां करते जी कोल् बाज़ारी काला रे सइयां काला रे तन् काला रे मन काला रे काली जबान की काली गारी काले दिन की काली शामें सइयां करते जी कोल् बाज़ारी बैरी कोल् कोल् कोल् छीने तोल तोल तोल बैरी कोल् कोल् छीने तोल तोल तोल छत आँगन चार दिवारी सइयां करते जी सइयां करते जी सइयां करते जी सइयां करते जी सइयां करते जी कोल् बाज़ारी सइयां करते जी कोल् बाज़ारी काली मिटटी कुत्ता काला काला बिलकुल सुर्मे वाला काला कौवा हौवा काला काली मिटटी कुत्ता काला काला बिलकुल सुर्मे वाला काला कौवा हौवा काला काला बादल गिरने वाला काला मोती गिरने वाला काला झंडा डण्डा कला काला बटवा पैसा काला काली आँखों जैसा काला काली अग्नि काली गर्मी सूरज काला काला बीघा और गज काला काली हाथी हाथी काला काला बैरी कोल् कोल् कोल् छीने तोल तोल तोल बैरी कोल् कोल् छीने होल से टोल रंग पानी और पिचकारी सइयां करते जी पिया करते जी सइयां करते पिया करते जी काला रे सइयां काला रे तन काला रे मन्न काला रे काली जबान की काली गारी काले दिन की काली शामें सइयां करते जी कोल् बाज़ारी काला रे सइयां काला रे तन काला रे मन्न काला रे काली जबान की काली गारी काले दिन की काली शामें सइयां करते जी कोल् बाज़ारी. स्नेहा खानवलकर ह्या गुणी संगीत दिग्दर्शिकेने संगीतबद्ध केलेल्या 'गँग्स ऑफ वासेपूर २' मधल्या काला रे ह्या गाण्यात गीतकार वरुण ग्रोवर ह्यांनी इतक्या काळ्या गोष्टींचा उल्लेख केलाय, पण बिचारा 'काळा समुद्र' मात्र त्यात घ्यायचा राहून गेला बघा... 😎

In reply to by गवि

कंजूस 03/01/2025 - 14:46
खरंतर गुजरातला समुद्र पर्यटनाला जाऊच नये. औद्योगिकरणावर गुजरातने खूप भर दिला. नवसारीपासून पुढे वरती. मुंबई बाजारपेठ जवळ पडते. सापुतारा जरी महाराष्ट्रातील पर्यटकांना आवडत असले ( नाशिक जवळ) तरी गुजरातींना आवडत नाही. त्यांचे आवडते माथेरान महाबळेश्वर पाचगणी. मुंबई पुण्याला जवळची ठिकाणं पाहून झाल्यावर जरा बदल म्हणून दुसरीकडे काही आहे का याची चाचपणी करतात. पालघरच्य पश्चिमेला दहा किमीवर केळवे माहिम किनारा आहे. पालघर -मनोर - विक्रमगड- जव्हार- त्र्यंबकेश्वर - नाशिक या वाटेवर हल्ली 'गोवर्धन इको विलेज' मिनी वृंदावन ( इस्कॉनवाल्यांचं) हल्ली लोकप्रिय होत आहे. या मार्गावर बरीच रिसॉर्ट झाली आहेत. जव्हार मोखाडा भागातील वारली चित्रकला कमी होत आहे किंवा बाजारू होत आहे असं ऐकून आहे. सहलीच्या आराखड्यात/ मार्गावर चार पाच ठिकाणे असणे फायद्याचं ठरतं . एखादं नाही आवडलं कुणाला तर दुसरं सहल यशस्वी करतं.

In reply to by कंजूस

गवि 03/01/2025 - 15:54
केळवे किनारा तर लोकांनी घाणीने कचऱ्याने भरून टाकलेला दिसला. अगदी गेल्या वर्षात काही बदल झाला असेल तर माहीत नाही. लोक तिथे पिकनिक सारखा कार्यक्रम करून, बसून खाऊन प्लास्टिक प्लेट्स, खरकटे, उर्वरित अन्न असे सर्व जागीच टाकून उठत होते. किनाऱ्यावर हागणदारी होती. पार्किंग शुल्क किंवा तत्सम शुल्क वगैरे वसुली अवश्य होत होती पण स्वच्छतेच्या दृष्टीने काही दिसले नाही. पेड टॉयलेट होते. तेही अस्वच्छ. आपले सामान्य नागरिक देखील एकूण स्वच्छतेचा सेन्स कमी असलेले आहेत असेच वाटते सगळीकडे.

In reply to by गवि

कंजूस 03/01/2025 - 16:24
हं. नवीन अपडेट्स लक्षात ठेवायला हवेत. बाकी प्रचेतसकुमार चांगल्या जागा शोधतात. पण काहीच उघड करतात. BNHS वालेही चांगल्या जागा सांगत सुटत नाहीत. फेसबुकाच्या भिंती भरल्या की लोंढे तिकडेच जातात. राजमाची, कास पठार, सांधण, हरिहर.

टर्मीनेटर 03/01/2025 - 17:47
आपल्या सर्वांच्या माहितीतले मिपाकर लेखक 'कुमार१' हे काही कामानिमित्त मुंबईला येणार आहेत. त्या निमित्ताने सोमवार दिनांक ६ जानेवारी २०२५ रोजी संध्याकाळी ६ नंतर भायखळा येथे एक मिपा कट्टा करण्याचे ठरत आहे. सोमवारचा, म्हणजे कामकाजाचा दिवस असल्याने फार लांबुन कोणी येऊ शकणार नाहीत ह्याची कल्पना असल्यामुळे 'कट्ट्यासाठी' वेगळा धागा वगैरे काढलेला नाही, परंतु भायखळा परिसरात किंवा मुंबई उपनगरांत रहाणारे कोणी मिपाकर येऊ शकत असतील तर त्यांचे सहर्ष स्वागत आहे. (केवळ एकमेकांची सदिच्छा भेट आणि गप्पा-टप्पांचा कार्यक्रम एवढाच ह्या कट्ट्याचा मुळ उद्देश आहे 😀)

In reply to by टर्मीनेटर

कंजूस 03/01/2025 - 18:16
मुंबईत मिपाकर मोजून तीन चारच असतील. आणि त्यातून राणीबाग फुले प्रदर्शनाचे निमित्त साधले तर उत्तम.

In reply to by कंजूस

विजुभाऊ 05/01/2025 - 15:09
मुंबईत ( ठाणे डोंबिवली धरुन) किमान तीस एक मिपाकर सहज असतील. रामदास , शँपेन , क्लिंटन, प्रभू मास्तर , साक्षी , ज्योति अळवणी , मदनबाण असे बरेच आहेत.

In reply to by टर्मीनेटर

Bhakti 04/01/2025 - 11:34
कुमार १ आता मिपावर का लिहित नाही.त्यांना नक्की सांगा की तुमचे अभ्यासपूर्ण लेख मिपावर देत जा.

In reply to by टर्मीनेटर

Nitin Palkar 06/01/2025 - 08:18
या कट्ट्याला येतो असे कुमार१ यांना बोललो होतो. अचानक महत्वाचे काम निघाल्यामुळे येऊ शकत नाही. लवकरच पुन्हा असा योग येवो.

Bhakti 04/01/2025 - 11:43
आणि आजोबा परत जिवंत झाले! ;) लाखातून एखादा व्यक्ती इतका नशीबवान असू शकतो.हार्ट ॲटॅकमुळे मृत घोषित केलेल्या आजोबांचे शव रूग्णवाहिकेतून घरी नेताना रस्त्यावरील खड्ड्यांच्या धक्क्यामुळे आजोबांचे ह्रदय पुन्हा चालू झाले असावे.कारण नातवाला नंतर त्यांच्या हाताच्या बोटांची हालचाल दिसली.मग पुढील उपचाराला परत दुसऱ्या दवाखान्यात नेले.तर आजोबांच्या ह्रदयाचे ठोके दिसले. देव तारी त्याला कोण मारी... https://youtu.be/Y5Ap-dknaww?si=Ezn1IIWLjspCJ5Sl

In reply to by Bhakti

चौथा कोनाडा 05/01/2025 - 20:10
या घटनेची नोंद घेत महाराष्ट्राच्या आरोग्य खात्याने सदर खड्ड्याचे मोजमाप करून तशाच प्रकारचे खड्डे विविध रस्त्यांवर पाडण्याचे नियोजन केलेले आहे. या खड्डा इफेक्टमुळे सीपीआर ची प्रोसिजर कालबाह्य होऊ शकते असे माझी आरोग्य सचिव माननीय डॉक्टर चंगावडकर श्रीपाद यांनी प्रतिपादित केले ! या नियोजित खड्ड्यांच्या कंत्राटांवरून आत्ताच वाद सुरू झालाय ! राजकीय नेते श्री अमुक प्रमुख यांनी या कंत्राटात बावीस कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला. आणि या प्रकरणाची चौकशी करावी अशी मागणी माननीय मुख्यमंत्री यांच्याकडे केली.

कंजूस 05/01/2025 - 10:24
माथेरानमध्ये पर्यटक घोड्यावर बसून जात आहेत, काही जण मिनी ट्रेन पाहात आहेत, माकडे पर्यटकांच्या खाऊच्या पिशव्या हिसकावून घेत आहेत अशा माहितीवर Chatgpt ने काढलेलं चित्र.image थोड्या चुका आहेत, अर्धवट कापली गेली आहेत दृष्य. तरी ठीकच.

कंजूस 24/02/2025 - 00:28
उन्हाळी भटकंती. काल एक भटकंती केली. खंडाळा घाटासाठी रेल्वे जिथून पळसधरी स्टेशनानंतर वर चढते त्या पहिल्या डोंगरात आहे सोनगिरी. ( मुंबईतील तरुण नवख्या ट्रेकरांचा पावसाळ्यातला आवडता ट्रेक. आणखी एक सोंडाई डोंगर माथेरानच्या चौक पाॅइंटच्या खाली आहे.) उन्हाळा सुरू झाला आहे, रान वाळले आहे तरी दुपारी बारा ते पाच तळापासून माथ्यापर्यंत (५०० मिटर्स) अतोनात डास होते. शांतपणे बसून डबासुद्धा खाता आला नाही. या उलट मागचाच डोंगर राजमाचीचा. तिथे कधीच कुठेही डास नसतात. हे असं का?

कंजूस 12/03/2025 - 10:38
वेरूळ दहाव्या लेण्यात किरणोत्सव..... लोकसत्ता बातमी. https://youtu.be/2xX1I0EUcNk?si=Q7AHHpInuRYAN6Zc असा दिसत असला तरी त्यासाठी लेण्या तशा बांधलेल्या नसाव्यात. वेरूळ लेण्या बहुशा पश्चिमाभिमुख आहेत त्यामुळे दुपारी वर्षातून दोनवेळा किरण आतापर्यंत येत असणारच. आपली देवळं मुद्दामहून पूर्वाभिमुख बांधतात. काही पश्चिम दिशेला तोंड करून. तसं लेण्यांचं नाही. बौद्ध भिक्कुंना पावसाळ्यात विश्रांतीसाठी विहार आणि लेणी आणि चैत्य बांधण्यात ( खोदण्यात) आले होते. मूळ उद्देश हा होता.

कंजूस 12/03/2025 - 10:56
विमान परत फिरवणे.... मागच्या आठवड्यात एक शिकागो ते दिल्ली विमान टॉयलेट्स तुंबल्याने परत शिकागोला नेले. https://youtu.be/ZQemz_Enpxc?si=w1SuHw86alXZ6IiW उड्डाणाचे फक्त चार तास उरले होते. मग वाटेत कुठे emergency landing या कामासाठी मिळत नसावेत का? किंवा ते देश अशि सर्विस देत नसतील?

कंजूस 19/03/2025 - 18:32
माथेरान कालपासून बंद. टॅक्सी, इ रिक्षा आणि घोडे वाले संपावर. कारण काय तर म्हणे पर्यटकांची फसवणूक करणारे विडिओ यूट्यूबवर आले. खरं कारण ... खाजगी वाहनाने येणारे पर्यटक वाढले आणि ते दस्तुरी नाक्यावरून शटल टॉय ट्रेन किंवा इ रिक्षांनी माथेरानच्या बाजार पर्यंत जातात. ते आठवड्यात कोणत्याही दिवशी येऊन जातात. हमाल, हॉटेल्स आणि घोडेवाल्यांचा धंधा जोरात चालतो. इ रिक्षा दहा आहेत. फक्त सुट्ट्या लागल्यावर येणारे पर्यटकच टॅक्सी घेतात. एकूण काय तर २७० टॅक्सी वाल्यांना धंधा मिळत नाही पण पर्यटक खूप येतात. नेरळ ते दस्तुरी नाका जाणारी एसटी मिनीबस ( पंचवीस रुपयांत) हीसुद्धा पोटदुखी आहे. फसवणूक टॅक्सीवालेच करतात. खाजगी कार्यालयांना " आमच्या टॅक्सी नेच जा असा हेका धरतात किंवा पाचशे रुपये द्या असा दम भरतात. काही शहाणे टॅक्सी वाल्यांनी मात्र पन्नास रु सीटने धंधा सुरू ठेवला आहे. ( अधिकृत भाडे शंभर रु प्रती प्रवासी असे चारांचे चारशे रुपये घेतात. किंवा पूर्ण टॅक्सी खिडकीवर जाऊन बुक केल्यास ३६० रुपये लागतात. आता प्रश्न असा आहे की टॅक्सीवाले आठवड्याच्या इतर दिवशी ओला/ उबेर/ वगैरेंनी संबंध का ठेवत नाहीत. कारण या साईट्स " मारुती इको" वाहन नको सांगतात. सर्व माथेरान टॅक्स्या याच प्रकारच्या आहेत.

In reply to by कंजूस

चौथा कोनाडा 20/03/2025 - 20:29
खासगी करण : वरच्या पातळीवर अदानी- अंबानी खालच्या पातळी छोटेआका, बडेआका अणि अन असे कार्यकर्ते म्हणवणारे खंडणीकार्यकर्ते

वामन देशमुख 21/03/2025 - 13:10
माझा कालचा WhatsApp Status SohalLalTeaTime #LifeIsFunWithFriends&SohanlalTea ☕
एका जिवलगाचा प्रतिसाद -
चहा आणी आणी ते सुद्धा संध्याकाळी 7 नंतर! उन लागलं की काय वामन तुला ? काळजी घे बाबा.
माझे उत्तर - हमारे तेलंगाणा के लोओंका मालूम नै तुमारकू? सुब्बे उट्टे जब से रात को सोने तलक कब्बी बी चायाँ पीने कू रेडीच रैतें। कल क्या वा मालूम? हमारे संजय बावा होर उनके इनो आये थे हमारे इधर म्हाराष्ट्रा सें । फिर Abits कु जाने के प्लानाँ बनायें। तो मैं बोलूं, चलो बावा, कैसे बी उदर जारैं । तो व्हांपे सोहनलाल की चाय भोत सईं रैती, दूर दूर से लोआं आते पीनेकू। पीते, तुम्म? तो उनो बोले, तुम इत्ता बोलरे तो कैकु नै पीते वामन राव? फिर हम, हमारे इनो, बावा, बावा के इनो ऐसे चार जणां गए चायाँ पीनेकू। अब तुमारकू तो मालूमिच हैं, वो चायाँ वायाँ पीने के शौकां तो अपुन नै पालते। फिर वो तीन जणां चायाँ पिए। भोत अच्चे है चायाँ बोले। बोलके मई स्टेटसां लगायूँ।

वामन देशमुख 30/04/2025 - 10:55
अक्षय्य तृतीयेनिमित्त घराजवळच्या श्री वेंकटेश्वर स्वामी (बालाजी) मंदिरात सपत्नीक गेलो होतो. घरी आंब्याची पाने-झेंडूची फुले यांची तोरणे, देवांना ताजे हार,फुले, यथासांग पूजा, विशेष नैवेद्य हे झाले. गोडधोड जेवण आहे. श्री कृपेने प्रसन्न वाटते आहे. गोविंदा गोविंदा गोऽविंदा!

In reply to by कंजूस

वामन देशमुख 30/04/2025 - 15:56
मेहकरचा बालाजी?
मी हैदराबादला राहतो. घराजवळच्या (आम्ही लोकांनी बांधलेल्या) देवळात गेलो होतो.‌ यापूर्वी मेहकरच्या बालाजी मंदिरात गेलेलो आहे.‌ तेथील बालाजीची मूर्ती खूप उंच आहे. बहुधा भारतभरातील सर्वात उंच मूर्ती असावी.

वामन देशमुख 09/05/2025 - 13:44
श्रीगुरुजी हा आइडी बॅन केल्याबद्दल मी तीव्र निषेध व्यक्त करतो. ज्या मोजक्या मिपाखरांमुळे मिसळपाववर वाचक येतात त्यांच्यापैकी एक हे श्रीगुरुजी होते.‌ हे लिहिण्याचा अधिकार मला आहे व हे लिहिल्यामुळे माझाच आइडी बॅन होणार नाही ही अपेक्षा. जय हिंद. --- हे मी खरडफळ्यावरही लिहिलं होतं; कायमची नोंद राहावी म्हणून इथे पुन्हा लिहीत आहे.

In reply to by वामन देशमुख

मारवा 09/05/2025 - 13:54
श्रीगुरुजी हे अनेकवेळा अभ्यासपूर्ण संदर्भासहित मांडणीणकरात होते हे खरे आहे. काहीवेळा मतभेद असले तरी जेबकी स्वाभाविक आहे तरी त्यांची एकूण मांडणी व चर्चेला योगदान चांगलेच होते यात शंका नाही अनेकदा माहीत नसलेले संदर्भ त्यांच्यामुळे माहिती होत होते. मात्र वामनराव त्यांची भाषेची मर्यादा भंगलेली होती असेही दिसून येते. त्यासाठी त्यांना समज देऊन संधी द्यायला हवी होती असेच अमरेंद्र बाहुबली यांना देखील संधिं द्यायाला हवी होती. असे उत्साहाने हिरीरीने चर्चा करणारे गेले तर त्याचे मला तरी नक्कीच वाईट वाटतें

चित्रगुप्त 22/12/2024 - 05:35
येत्या फेब्रुवारी ११-२० मी पुण्यात मुक्कामास असेन, त्या दरम्यान कट्टा करुया का ? (फक्त १६ तारीख सोडून. त्या दिवशी एका लग्नात उपस्थिती लावयची आहे)

In reply to by चित्रगुप्त

सध्या आमचे भ्रमण फक्त ६ फूट बाय ३ फूट इतपतच मर्यादित असल्याने, माझ्या घरीच कट्टा करू शकतो.

In reply to by मुक्त विहारि

काळजी घ्या मुवि. हाडाचे दुखणे म्हणजे वेळखाऊ दुखणे असते. काहीही झाले तरी मुळातले दुखणे आणि मग फिजिओथेरपी वगैरे प्रकार मिळून अडीच-तीन महिने जातातच. मी पण तो अनुभव घेतला आहे. पण त्या काळात मिपावर पूर्णवेळ पडीक राहून वेळेचा सदुपयोग केला होता :)

Bhakti 22/12/2024 - 21:15
पुणे बुक फेस्टिवल २०२४ अ आ १४ डिसेंबरपासून सुरू झालेल्या पुणे बुक फेस्टिवलचा आज २२ डिसेंबर शेवटचा दिवस होता.कामाचं आठवडा नियोजन पूर्ण फुल्ल असल्याने आजचाच दिवस या फेस्टिव्हलमध्ये येण्यासाठी मिळाला.खरोखर पुस्तक प्रेमींसाठी ही एक अनोखी पंढरी फर्ग्युसन महाविद्यालयात अवतरली होती.जवळपास २५० पेक्षा अधिक प्रकाशकांचे बुक स्टॉल येथे उपलब्ध होते.फर्ग्युसन महाविद्यालयात प्रवेश करताच पुस्तक वाचण्यात मग्न अनेक भव्य प्रतिकृती ठराविक अंतरावर होत्या.पुस्तकांच्या आकाराच्या प्रतिकृतींची सजावट मार्गावर होती.अंम्पी थिअटरात अनेक कार्यक्रमांचीही रेलचेल होती.पुढे सर्वप्रथम भारतीय संविधानाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त पुस्तकरूपी "संविधान प्रतिकृती ९.९४ मीटर जिचा गिनीज बुक मध्ये समावेश करण्यात आला आहे, ती पाहिली.मग त्या भव्य प्रांगणात आलो जिथे फेस्टिव्हल भरले होते.इथे पंतप्रधान मोदी, मुख्यमंत्री फडणवीस यांचे आउटलेट छायाचित्रं काढण्यासाठी होते. आत गेल्यावर अनेक प्रसिद्ध प्रकाशनाची पुस्तके पाहून खूप आनंद झाला.इतकी पुस्तक पाहून कोणती घेऊ कोणती नको असं झालं. पहिल्याच पुस्तकाच्या स्टॉलवर पुस्तक पाहत चाळत होते.दुसऱ्या ठिकाणी हेच ,वेळेचे बंधन नसल्याने माझा नवरा आणि मुलगी मला टाटा करून पुढे निघून गेले.अनेक पुस्तकं जी नगरात पाहायलाही मिळत नाही ती जवळपास सर्वच पाहिली.इंग्रजी पुस्तकेही बरीच होती,तिथे गर्दीही भरपूर होती.मी प्रामुख्याने गीतारहस्य(लोकमान्य टिळक) पुस्त,पैशाचे मानसशास्त्र(मराठी , इंग्रजी दोन्ही भाषेत घेतले),हस्ताचा पाऊस(माडगूळकर),ज्ञानदेवा तिथे समाधी(राहूल देशपांडे), संस्कृती (इरावती कर्वे) , बिझिनेस महाराजा इत्यादी पुस्तके घेतली.थोड्या वेळाने लेकीची परत भेट झाली .तीला देखील पुस्तकांची गोडी निर्माण व्हावी म्हणून मुद्दामाहून आणले होते.ते सफलही झाले कारण घरी असलेली अनेक पुस्तके तिने ओळखून "आई हे आपल्या घरी हे पुस्तक आहे" असं सांगितलं :).रा.चि.ढेरे, कुरुंदकर ,इरावती कर्वे अशा अनेक आवडत्या लेखकांची सर्व अज्ञात पुस्तकेही पाहायला मिळाली.इथे सातवाहन गाथा सप्तशती पाहायला मिळाले.पण आता खुप उशीर झाला होता १२-४ असा वेळ इथे होते.एक तरी लेखक भेटतील अशी आशा होती पण ते घडलं नाही. फर्ग्युसन महाविद्यालय पाहत फिरत बाहेर आले.बाप लेकीने आधीच पोटोबा फुल्ल केला होता.जवळच वैशाली,वाडेश्वर आहे हे माहिती होतं.पण खूप दमलो होतो समोर ' रौनक' पावभाजी होती तिथेच गेलो.मस्त झाडांच्या सावलीत टेबल होते.पुण्यातलं पहिले १९६७ साली पावभाजीचे हे रेस्तराँ आहे असं तिथे लिहिले होते.पुण्याची पावभाजी तिखट नसणार म्हणून त्यांना तिखट द्या असं मुद्दामहूनच सांगितले.खुपच सुंदर सजवलेली (प्रेझेंटेशन)पावभाजी आणि बरोबर तिखट लसूण आलं सरबरीत चटणी,तिखटातला चिरलेला कांदा बरोबर आला.इतकी छान सर्व्हिस पाहून छान वाटलं.पुण्यात गोष्टींची 'गुणवत्ता' हाच महत्त्वाचा निकष परत दिसला.एफसी रोडवर जरा फेर फाटका मारून परत घरी निघालो. ई उ क च थ

In reply to by Bhakti

रामचंद्र 23/12/2024 - 22:05
वाचन ही शांत वातावरणात चालणारी प्रक्रिया आहे याचे थोडेसुद्धा भान आयोजकांना नसावे याचे वाईट वाटले. संध्याकाळच्या वेळेस तिथं जावं तर तिथंच चाललेल्या संगीताच्या कार्यक्रमामुळं कानठळ्या बसत होत्या. अर्थात एकंदरीतच आयोजनाच्या बाबतीत उत्सवी वातावरणात वाचनसंस्कृतीचे भान ठेवून शांत वातावरण, डोळ्याला त्रासदायक होणारा प्रखर प्रकाश टाळणे अशा गोष्टींची अपेक्षा करणं जरा जास्तच होतं याची पुरेशी जाणीव झाली आहे. बाकी हिंदी पुस्तकांच्या तसेच मराठवाड्यातल्या, तितकेसे प्रसिद्ध नसलेल्या स्टॉलवरही वेगळी, वाचनीय पुस्तकं पहायला मिळाली याचा आनंद आहे.

In reply to by Bhakti

Bhakti 21/03/2025 - 22:45
वाचाल तर आनंदी होणार अ सकाळ पुस्तक महोत्सव २०२५, अहिल्यानगर. पुणे बुक फेस्टिवलच्या धर्तीवर अगदी भव्य नाही पण बरेचसे मोठे , चांगली पुस्तके असणारे पुस्तक महोत्सव नगरमध्ये २१-२४ मार्च दरम्यान भरले आहे.पुढचे काही दिवस व्यस्त असल्यामुळे आजच फेरफटका मारला. नेहमीप्रमाणे पुस्तकाच्या दुकानात,प्रदर्शनात मला वेळेचे भान उरत नाही.तेव्हा तू एकटीच जा असं घरून सांगण्यात आले,फक्त मोबाईलची बॅटरी संपायच्या आधी घरी ये असंही सुनावण्यात आले. लोकप्रिय साहित्यिकांची पुस्तके ऑनलाईन सहज मिळतातं पण अशा प्रदर्शनात नवे पुस्तक समजतात.पुस्तकांना हातात घेऊन,पाने चाळत, अनुक्रमणिका पाहत ते पुस्तक घेणं निराळं सुखच असते. कादंबरी मी वाचनालयातून मिळालेल्या पुस्तकांतून वाचते. तेव्हा संस्कृती, अध्यात्मिक, वैज्ञानिक, समाजजीवन, निसर्ग,इतिहास,भटकंती विषयांची पुस्तके घेण्याकडे कल असतो. तरीही आनंद नाडकर्णी, ग्रेस, अच्युत गोडबोले,जयवंत दळवी,नरहर कुरुंदकर,नरेंद्र दाभोळकर यांची काही पुस्तके हेरुन ठेवली आहेत,लवकरच घेईन. मी घेतलेली अनवट पुस्तके- १.येई परतुनी ज्ञानेश्वरा' आज मला नवीन लेखक समजले डॉ.रा.श्री.मोरवंचीकर डॉ. रा. श्री. मोरवंचीकर आजही ज्ञानदानाच्या पवित्र कार्यात अखंड नंदादीपासम तेवत आहेत. त्यांनी 'येई परतुनी ज्ञानेश्वरा' हा मराठी लोकमानसाच्या जिव्हाळ्याचा ग्रंथ अध्यायनिहाय अनेक अंगांनी उलगडला आहे. त्यातील सचित्र ओव्यांचे मार्मिकपणे केलेले निरूपण पाहून त्यांच्या ज्ञानेश्वरांप्रती असलेल्या उत्कट प्रेमाचा अनुभव दिसतो. २.निसर्गायण दुसरे नव्याने समजलेले लेखक निसर्ग आणि विकास अभ्यासक दिलीप कुलकर्णी . पर्यावरणाची समस्या ही अशा प्रकारे बाह्य निसर्गातील असली, तरी तिचं मूळ आहे आपल्या मनोवृत्तीत -आपल्या विचारांत. आपली भोगवादी वृत्ती, हाव, आक्रमकता ही या समस्येला कारणीभूत आहे आणि केवळ ही एकच नव्हे, तर शस्त्रस्पर्धा, दुर्बलांवरचे अत्याचार, गुन्हेगारी, व्यसनाधीनता, मानसिक तणाव, स्वैराचार अशा अनेक समस्या त्याच मनोवृत्तीमुळे आपल्यासमोर उभ्या ठाकल्या आहेत.आधुनिक पाश्चात्त्य विज्ञान आणि प्राचीन पौर्वात्य तत्त्वज्ञान यांच्या आधारे या बदलाची दिशा शोधणारं हे पुस्तक. ३. थर्ड ॲंगल हे छोटेखानी पुस्तक हटके विषयावर म्हणजे ' थिअरॉटिकल मित्राने प्रॅक्टिकल क्लबमध्ये केलेली भाषणे एक वैचारिक अनोखा अनुभव आहे. मनाची नित्य नाव पुस्तकाच्या पानांनी वल्हवली जातात मग आयुष्याचा भवसिंधु सहज तरुन जातो ज्ञान सागराची ओढ अजुनच सहज पूर्ण होते... -भक्ती

कंजूस 23/12/2024 - 06:56
अरे वा! पुस्तक प्रदर्शन गाजलं. आता दरवर्षी होईल. तुमच्या मुलीसाठी पर्वणीच. ( आउटलेट छायाचित्रं काढण्यासाठी होते.= कटाउटस) फार पूर्वी मुंबईत (आझाद मैदान) आणि दिल्लीत ( प्रगती मैदान) येथे मोठे पुस्तक प्रदर्शन आलटून पालटून एक वर्षाआड होत असे. नंतर मुंबईतील बंदच झाले. मग छत्रपती टर्मिनस जवळचा खाजगी बुक स्टॉल आशिष दरवर्षी प्रदर्शन भरवून लागला सुंदराबाई हॉलमध्ये. पण मराठी पुस्तके नसत ( ती साहित्य संमेलनांत अधिक). अक्षर वाङमय यांनी काही वर्षे प्रदर्शने भरवली. माझ्या दृष्टीने पुस्तकं चाळायला मिळणे महत्त्वाचे कारण विकत घेत नाही. विकत आणून नंतर करायचे काय हा प्रश्न असतो. तरी भाषा शिकण्यासाठीची पुस्तके घेतो ती संग्रही आणि संदर्भासाठी कायम लागतात. स्थानिक नगरवाचनालयात काही वाचायला मिळतात. पण मोठी बाडं कधीच येत नाहीत. स्थानिक प्रकाशकांनी एक होऊन एक कायमची तारीख किंवा आठवडा प्रदर्शन भरवण्यासाठी निश्चित केला तर वाचकांच्या कायम लक्षात राहील. उदाहरणार्थ डिसेंबरचा दुसरा आठवडा.

In reply to by कंजूस

Bhakti 23/12/2024 - 08:15
सॉरी,माझी भयानक डिक्शनरी ;) =)(कटआऊट)
माझ्या दृष्टीने पुस्तकं चाळायला मिळणे महत्त्वाचे कारण विकत घेत नाही. विकत आणून नंतर करायचे काय हा प्रश्न असतो. तरी भाषा शिकण्यासाठीची पुस्तके घेतो ती संग्रही आणि संदर्भासाठी कायम लागतात.
खरं आहे,अशा मोठ्या प्रदर्शनात खुप पुस्तकं पाहायला ,चाळायला मिळतात हे महत्त्वाचे.माझा पुस्तक घेण्यासाठी हव्यास होता त्यामुळे बजेट संपल्यावर पुस्तक फक्त पाहण्याचं ऑड वाटू लागले.पुढच्यावेळी जरा याबाबत सतर्क राहीन ;) होय लेकीसाठी हळूहळू एम एच १२ केंद्रबिंदू (पर्वणी) तयार करणार आहे!

In reply to by Bhakti

हे पुस्तकं खरेदी करण्यासाठी उत्तम ठिकाण आहे. आणि डोंबिवली हे केंद्रस्थानी असल्याने, डोंबिवली येथे उत्तम पुस्तके मिळतात.

In reply to by मुक्त विहारि

बुकगंगा,अक्षरधारा,ॲमेझोन सारख्या संस्थळावर पुस्तके स्वस्त आणी घरपोच येतात. मागील वर्षापेक्षा या वर्षी अधिक चांगले प्रदर्शन होते.

In reply to by श्रीरंग_जोशी

अरेरे. उशीर झाला. पहिला प्याला बर्‍याच वर्षांपूर्वी पिऊन झाला आहे :(

In reply to by श्रीरंग_जोशी

होळी, वजा तीस तापमान. शेवटचा प्याला मार्च १९९९,प्रसंग मारूती आठशे पहिली चार चाकी घेतली. व्यसनाधीन झालो का ?नाही, प्रत्येकाच्या इच्छाशक्ती वर आवलंबून. दारू पिली पाहीजे असे काही नाही. पण अती परिचयात अवाज्ञा तद्वत दारूला डोक्यावर चढवून नये. अर्थात माझे मत.

In reply to by कर्नलतपस्वी

कंजूस 23/12/2024 - 12:21
बरोबर. रोज थोडी थोडी घरीच घ्यावी म्हणजे त्यातली गंमत सामान्य होते. आणि कधी प्रसंगाप्रमाणे जे पितात भरपूर तसं होत नाही. कितीही कोणतेही दारूचे ब्रांड आले तरी बेसिकली अल्कोहोल अमुक टक्के यापलिकडे काही नाही. तांदुळाचेही तसेच आहे पंधरा रुपये ते सातशे पन्नास रुपये किलोचा असो त्यांचे पोषणमूल्य समानच असते. सगळे पॉलिश केलेलेच असतात. हातसडीचे कुठे मिळतात?

In reply to by कंजूस

ये इंतजार गलत है के शाम हो जाये जो हो सके तो अभी दौर-ए-जाम हो जाये मुझ जैसे रिंद को भी तूने हश्र मे या रब बुला लीया है तो, कुछ इंतजाम हो जाये हुई महँगी बहत ही शराब, के थोड़ी-थोड़ी पिया करो पियो लेकिन रखो हिसाब, के थोड़ी-थोड़ी पिया करो

In reply to by कर्नलतपस्वी

कौन कहता, अंगुर की बेटी गलत है अंगुरके दामाद को बस इसकी लत है इसके साथ कुछ गम गलत करता है तो बेरहम जमाने क्या जाता है,अगर... वो उसके साथ कुछ पल बिताता है

In reply to by श्रीरंग_जोशी

कंजूस 23/12/2024 - 12:23
सर्व विषे कमी प्रमाणात औषधेच असतात. अगदी तंबाखू, चहा, अफू,अर्सेनिक सुद्धा.

कंजूस 23/12/2024 - 12:39
आशिष बुक स्टॉल छत्रपती टर्मिनस जवळचा खाजगी बुक स्टॉल आशिष दरवर्षी प्रदर्शन भरवू लागला सुंदराबाई हॉलमध्ये. यांच्या पुस्तक प्रदर्शनात भेटी दिल्यावर एक लक्षात आलं की यामध्ये पुस्तके कोण घेतो. इंटिरिअर डेकोरेशनचा व्यवसाय करणारे मुंबईत बरेच आहेत. ते इकडे फिरतात. भरपूर रंगीत चित्र असलेली जाडजूड पुस्तके तिथे निम्म्या किंमतीत असतात. ती त्यांना हवी असतात नवनवीन फर्निचरच्या डिझाइनसाठी. शिवाय गार्डनिंग लेआउटचीही असतात. आर्किटेक्ट नाही पुस्तके लागतात. मोठ्या बास्केट घेऊन फिरतात आणि भराभर पुस्तके उचलतात. तरुण मुलं मुली इंग्रजी कादंबऱ्या विकत घेतात. काही महिला कुकींगची पुस्तके बघतात. आपण जी मराठी साहित्यातील कवितासंग्रह, कादंबऱ्या विकत घेतो त्याचा आनंद आठ दिवसांत संपतो. इतिहास,भाषा यांचे अभ्यासक पुस्तके घेतात ती त्यांच्या कामाची असतात. पण मग असा विचार येईल की वाचकांनी पुस्तके विकत घ्यावीत का? वाचनालयांनी घ्यावीत. म्हणजे महिन्याच्या फीमध्ये साहित्य वाचता येईल.

In reply to by कंजूस

विना अनुदानित, वाचनालये आता ओस पडत चालली आहेत. डोंबिवली येथे एक फ्रेंड्स लायब्ररी सोडली तर बरीचशी वाचनालये बंद पडली आहेत. मानपाडा रोड वरील ३ वाचनालये, डोंबिवली पश्चिम येथील एक वाचनालय, midc मधील एक वाचनालय, ही काही ठळक उदाहरणे. रामनगर मधील एक वाचनालय आणि P ,& T मधील एक वाचनालय, फ्रेंड्स लायब्ररीच्या सहयोगाने चालतात. त्यापेक्षा पण भयावह स्थिती, अभ्यासक्रमा व्यतिरिक्त , पुस्तक विक्रेत्यांची आहे.... कालाय तस्मै नमः....

कंजूस 27/12/2024 - 06:03
गोवा पर्यटन/ कोकण/समुद्री पर्यटन गोरगावलेकर यांनी केलेल्या गोवा पर्यटनाचे धागे येत आहेत. त्यांचे अनुभव लिहित आहेत. तिसऱ्या भागात हिवाळी सहल, दक्षिण गोवा :भाग 3 : बटरफ्लाय बीच आणि लोलये-पैंगिण चे वेताळ गोवा आणि कोकण यांच्या पर्यटनाची तुलना फायदे तोटे यांची प्रतिसादांतून चर्चा फारच वाढली. ती इकडे करता येईल. धाग्यातली चर्चा इथे कॉपी पेस्ट करताही येईल पण तो त्या प्रतिसादकर्त्या लेखकांचा अधिकार आहे. मीही पूर्वी गोव्यावर एक धागा काढला होता ते आठवले. माझा समुद्र पर्यटन, खाणे पिणे वगैरेंचा आनंद फारच संकुचित आहे. तरी एकदा गोवा काय आहे म्हणून पाहण्यासाठी गेलो होतो. परतताना कुडाळहून( कोकण) आलो. एसटीचाच प्रवास त्यामुळे जमेल तेवढे पाहिले. गोव्याच्या पर्यटनाबद्दल ऐकले वाचलेले भारतातले आणि परदेशी पर्यटक इथे येतात. आनंद घेतात आणि पुन्हापुन्हा येतात. गर्दी वाढली की ट्रेनची तिकिटे मिळत नाहीत. विमान आणि हॉटेल्सचे भाडी दर वाढतात. परवडण्याच्या पलिकडे जातात. तरीही पसंती असते. कोकण ( महाराष्ट्रातला) याबद्दल श्री.ना. पेंडसे किंवा जयवंत दळवी किंवा इतर लेखकांच्या कथा कादंबऱ्यांतून मराठी वाचकांना माहीत झालेला असतो. तो खरंच कसा आहे हे पहाण्यासाठी ठाणे,रायगड, सिंधुदुर्ग जिल्हेसोडून उर्वरित महाराष्ट्रातील दूरच्या ठिकाणांहून पर्यटक येतात. त्यात किहीम, अलिबाग, श्रीवर्धन,हर्णे मुरुड, रत्नागिरी परिसर, देवगड, मालवण, देवबाग ही ठिकाणे येतात. कोकण आणि गोव्याप्रमाणेच कर्नाटकातील २६० किमी किनारपट्टीवरही कारवार,गोकर्ण, मुर्डेश्वर, उडुपी, मंगळुरू ही ठिकाणं आहेत. तीही पाहिली. हॉटेल्स(राहाणे आणि खाणे शाकाहारी तसेच मासाहारी), बसप्रवास यादृष्टीने फारच चांगल्या सोयी आहेत. शिवाय किनारपट्टीसोडून वरती घाट चढून गेल्यावरही अनेक सुंदर ठिकाणी जाता येतं. मार्चपर्यंत वाहणारे धबधबे आहेत. इथल्या लोकांना पर्यटक येण्याची सवय आहे. त्यांचा त्रास वाटत नाही . तुसडेपणा नाही. मला कर्नाटक पर्यटन फार आवडले आणि पुन्हा जावेसे वाटते. किनारे स्वच्छ चांगले आहेतच शिवाय नद्याही बारमाही पाणी वाहणाऱ्या आणि अतिशय स्वच्छ पाण्याच्या आहेत. नदीकिनारी जी धार्मिक स्थळे आहेत ती निसर्गसौंदर्याने अधिकच चांगली वाटतात. सह्याद्रीचा सुंदर निसर्ग पाहावा तर इथेच. उडुपी आणि मंगळुरू येथे समुद्र पर्यटन आणि मत्स्याहारही खूप प्रचलित आहे.

In reply to by कंजूस

गवि 27/12/2024 - 08:33
https://www.youtube.com/embed/Jhsq0fdiEq0 गोवा पर्यटन मंत्री यांची मुलाखत. ही सोशल मीडियावर सर्वत्र सुरू झालेली चर्चा हा चुकीच्या (चायनीज) आकडेवारीवर आधारित एक प्रोपागांडा आहे असे त्यांचे म्हणणे त्यांनी इथे मांडले आहे.

In reply to by कंजूस

गोरगावलेकर 27/12/2024 - 12:16
गोरगावलेकर यांनी केलेल्या गोवा पर्यटनाचे धागे येत आहेत. त्यांचे अनुभव लिहित आहेत. धाग्याच्या पहिल्या भागात आम्ही मडगाव स्टेशन ते कोलवा बीच पर्यंत प्रवास केला होता . स्टेशनच्या बाहेरच प्रीपेड टॅक्सी मिळाली . टॅक्सिवाल्यांचा कथित मुजोरपणा दिसला नाही . दुसऱ्या भागात कोलवा ते पाळोळे पर्यंत प्रवास केला . पर्यटन स्थळे बघत जात आम्ही जवळपास पूर्ण दिवस घेतला व त्यात पाच - पंचवीस किमी अंतर जास्त झाले त्याचे वाढीव पैसेही दिले . किती खर्च येतो हे कळावे इतकाच लिहिण्यामागचा उद्देश . आज कुठल्या शहरात स्विफ्ट डिझायरचे संपूर्ण दिवसासाठी ३ १ ० ० /- रुपये भाडे असेल ? ड्रायव्हरचा पगार , गाडीची देखभाल दुरुस्ती, इंधन खर्च जाऊन मालकाच्या हातात कितीसे पैसे जातील ? कोला बीचला जातांना अगदी ओबड धोबड रस्त्यावरून गाडी गेली . स्वत : ची गाडी नेतांनाही विचार करावा लागेल असा रस्ता . कुठलीही कुरकुर न करता शक्य होतील ती ठिकाणे दाखवली . येथेही गाडीवाल्यांचा कथित मुजोरपणा दिसला नाही .

In reply to by गोरगावलेकर

गवि 27/12/2024 - 13:15
मुजोर म्हणजे बोलण्यात अशा अर्थाने नसावं. पण अतिरिक्त मनाला येईल तितके पैसे मागणे हे अनेकदा घडते. पूर्ण दिवसाचे ३१०० इतकेच घेतले असतील तर तुम्हाला नशिबाने चांगले डील आणि व्यक्ती लाभली. एरवी कोपऱ्यावर सोडून यायचे सहाशे (हे उदाहरण मे २०२४ मधलं, ऑफ सिझन काळ. अंतर दोन ते तीन किमी. पार्किंग नसल्याने टॅक्सी मागवावी लागली होती.). नुसती चौकशी केली होती तेव्हा, दाभोळी एअरपोर्ट ते अगोंद वन वे नुसते ड्रॉप करण्याचे ऑफ सिझन २००० आणि सिझन मध्ये ३५०० ते ४०००. तुलनेसाठी असे पाहा की मुंबईहून गोव्याचे विमान तिकीट देखील कधी कधी याहून कमी असते. वार्का ते काबो द राम किल्ला आणि परत इतक्या अंतराचे हॉटेलशी संलग्न टॅक्सीवाल्यांनी सुमारे आठ वर्षांपूर्वी तीन हजार घेतले आणि वरून टिप मागितली. वाटेत कुठे थांबायला देखील तयार नव्हता. नव्वद टक्के वेळा मुंबईपासून स्वत:ची कारच घेऊन जाणे किंवा एअरपोर्टवर उतरताच पूर्ण मुक्कामाइतकी सेल्फ ड्राईव्ह कार घेणे हे दोन उपाय करून ही समस्या आता सोडवली आहे. बाय द वे, गोव्यातील स्थानिक लोक कोंकणी भाषेच्या सवयीनुसार एकेरीत अरेतुरे करत बोलतात आणि त्या स्टाईल मुळे काही वेळा बाहेरील लोकांना ते अशिष्ट उद्धट उगीचच वाटू शकतात.

In reply to by गवि

कंजूस 27/12/2024 - 14:58
सहमत. खाजगी वाहनाशिवाय तसेच भाड्याच्या वाहनाशिवाय जमेल तेवढे फिरणे आणि आनंद मानणे हेच आमचे ध्येय असते. त्यामुळे काही त्रास /संताप होत नाही. शेअरिंग साठी कुणाला तयार करणेही नाही. म्हणजे अगदीच घरी कॉटवर पाय हलवत गप्पा मारण्यापेक्षा चार ठिकाणं पाहाणे बरे या रुळावर आमची गाडी सुसाट धावते. शिवाय खरेदी करायची नाही हे ठरवूनच टाकले आहे. आमचा गाईड लोनली प्लानेट पुस्तक " India travel survival kit " - Tony Wheeler and others.

In reply to by गवि

टर्मीनेटर 29/12/2024 - 13:08
"पूर्ण दिवसाचे ३१०० इतकेच घेतले असतील तर तुम्हाला नशिबाने चांगले डील आणि व्यक्ती लाभली."
काशिनाथ नाडकर्णी : "तो कोकणांतला असला पाहिजे अंऽऽऽ..." कोचरेकर मास्तर : "पाहिलंत? पाहिलंत... माणुसकी नाही.. नाही म्हणतात ना?... ही घ्या माणुसकी! प्रवासात काय अनुभव येतील सांगता येत नाही. वास्तविक असल्या ह्या लोकांचे जाहीर सत्कारच करायला पाहिजेत. त्याचे नाव, नंबर वगैरे आपण टिपून घ्यायला पाहिजे होता नाही का..."
"एरवी कोपऱ्यावर सोडून यायचे सहाशे (हे उदाहरण मे २०२४ मधलं, ऑफ सिझन काळ. अंतर दोन ते तीन किमी. पार्किंग नसल्याने टॅक्सी मागवावी लागली होती.). नुसती चौकशी केली होती तेव्हा, दाभोळी एअरपोर्ट ते अगोंद वन वे नुसते ड्रॉप करण्याचे ऑफ सिझन २००० आणि सिझन मध्ये ३५०० ते ४०००."
सोकाजीनाना त्रिलोकेकर : "ए नाडकर्णी, बघ... बघ! बघ लेका तुझा कोकणातला व्हिक्टोरिया (टॅक्सी) वाला... " काशिनाथ नाडकर्णी : "तो कोकणांतला असणंच शक्य नांयऽऽऽ... अहो तो कोकणात व्हिक्टोरिया (टॅक्सी) चालवायला शिकणार कुठून मला सांगा बघू आंऽऽऽ... कायत्तरी काय? आमच्या कोकणातले म्हणजे सगळे बैल..." 😀 भ्रमण मंडळ - बटाट्याची चाळ गोव्याला असंख्य वेळा जाउनही तिथल्या सार्वजनीक वाहतुक व्यवस्थेचा आणि टॅक्सीवाल्यांचा मला फारसा अनुभव नाही. ह्या वर्षीच्या जानेवारी महिन्यात दोना पावला येथील मुक्काम असलेल्या 'इंटरनॅशनल सेंटर गोवा (ICG)' येथुन त्यांच्याचतर्फे संध्याकाळी तिथुन सुमारे सात किमी अंतरावर असलेल्या कॅसिनो पर्यंत जाउन मध्यरात्री तिथुन परतण्यासाठी घेतलेल्या टॅक्सी सेवेसाठी त्या टॅक्सीवाल्याने (आधीच बोलणी केल्याप्रमाणे) संध्याकाळी जाताना ड्रॉप साठी ३०० रुपये आणि मध्यरात्री तिथुन निघताना फोन करुन बोलवल्यावर पिक-अपसाठीचे ५०० रुपये असे जाउन-येउन एकुण ८०० रुपये घेतले होते. मध्य्ररात्री १:३० च्या नंतर फोन करुनही तो सांगीतल्याप्रमाणे परत न्यायला आला होता हे विषेश! असो, मिपाकरांना त्याठिकाणी आलेले टॅक्सीवाल्यांचे वेगवेगळे, बरे-वाईट अनुभव वाचुन माहितीत भर पडत आहे 👍

In reply to by गोरगावलेकर

विमानतळावरून आपल्या हॉटेलवर किंवा आपल्या हॉटेलवरून विमानतळावर जायचे असेल तर टॅक्सीवाल्यांचे अवाच्या सवा दर आहेत याचा मला तरी अनुभव आला नव्हता. आम्ही गोवा विमानतळापासून सगळ्यात लांब राहिलो होतो अगोंद आणि पाटणेला. दोन्ही ठिकाणी जायला विमानतळाहून १८०० रूपयात प्रीपेड टॅक्सी मिळाली होती. अर्थात ही अनुक्रमे २०१७ आणि २०१८ ची गोष्ट. सध्याचे दर किती हे माहित नाही. मात्र दोन्ही ठिकाणे दाबोळी विमानतळाहून साधारण ६०-६५ किलोमीटर अंतरावर आहेत. अंतर ध्यानात घेता तो दर अवाजवी जास्त आहे असे वाटले नव्हते. विमानतळावर समजा प्रीपेड टॅक्सी असते आणि त्यांना ठरवून दिलेले दर आहेत तितकेच घ्यावे लागतात. पण परतीच्या प्रवासात हॉटेलवरून विमानतळावर जातानाही टॅक्सीवाल्याने तेवढेच पैसे घेतले होते. अगोंदहून परत येताना आमचे विमान रात्रीचे होते त्यामुळे दाबोळी विमानतळावर रात्री साडेनऊच्या सुमारास पोचलो होतो. त्या वेळेस विमानतळावरून भाडी मिळत असतील की नाही शंकाच आहे कारण त्यावेळेनंतर फार विमाने येत नाहीत. तरीही त्याने जास्त पैसे घेतले नव्हते. टॅक्सीवाले अवाच्या सवा दर लावतात ते हॉटेलबाहेर साईटसिईंगला जाणार्‍यांकडून. वारकामध्ये आम्ही उतरलो होतो वारकाला आमच्या हॉटेलच्या बाहेर पर्यटकांसाठी म्हणून एक टॅक्सी स्टॅन्ड होता. तिथून मडगाव फार तर १०-१२ किलोमीटरवर होते. काजू आणि बेबिंका अशा गोष्टी घ्यायला मडगावला जायचे होते तेव्हा हॉटेलबाहेरील टॅक्सीवाल्यांनी जाऊन येऊन २७०० रूपये सांगितले होते. आणि ही गोष्ट २०१२ ची होती म्हणजे आणखी जुनी. ही अक्षरशः लूट होती. मला वाटते तिथे जास्त गोरे पर्यटक येतात आणि परदेशी पर्यटकांना अवाच्या सवा दर लाऊन लुटणे हा प्रकार नाही म्हटले तरी सगळीकडे होतोच. जर ते गोरे पर्यटक असे वाढीव दर द्यायला तयार होत असतील तर टॅक्सीवाल्यांना बहुदा आम्हा भारतीय पर्यटकांची गरज नसावी. त्यामुळे यायचे असेल तर या दरात या नाहीतर येऊ नका असा त्यांचा दृष्टीकोन होता.

गेल्या काही महिन्यांपासून माझी पत्नी सौरभ बोथरा यांच्या ऑनलाइन योगासन वर्गांना उपस्थिती लावत आहे. मी देखील महिन्याभरापासून सुरुवात केली आहे. शीर्षकात जरी केवळ योग असले तरी, योगासनांखेरीज, इतर कार्डिओ व श्वसनाचे व्यायाम, प्राणायम व थोडेफार ध्यान यांचाही या वर्गांत अंतर्भाव असतो. रोज युट्युब लाइव्ह द्वारे भाप्रवे नुसार सकाळ व संध्याकाळी हे वर्ग चालतात. सूचना सहजपणे समजतील अशा असतात व स्क्रीनवर पाहून आपण ते व्यायामप्रकार करू शकतो. ६ जानेवारीपासून तीन आठवडे या वर्गांचा नि:शुल्क लाभ घेता येईल - त्यासाठीचा दुवा. या वर्गांना काही दिवस उपस्थिती लावल्यावर, असे वर्ग आपल्याला काही वर्षे अगोदर का नाही मिळाले अशी भावना आमच्यासह बहुतेकांच्या मनात निर्माण झाली आहे / होत असते.

In reply to by श्रीरंग_जोशी

कंजूस 29/12/2024 - 04:00
ती साईट पाहिली. नोंदणी केली नाही. उपक्रम आणि ओनलाइन आहे हे बरे. काही शाळांत योगासने शिकवतात बहुतेक. आमच्या शाळेत शिकवली होती. पाचवी पासूनच . लहानपणी केली नाही तरी चालतात. कारण तेव्हा वाढते तरुण वय असते. पण नंतर कधी करायची झाल्यास छोट्या पुस्तिका विकत मिळतात त्या पाहिल्या की काही सोपी रोज करण्याची आसने दहा बारा आहेत ती करता येतात. चीनमध्ये तिथल्या बागांत ( parks) ६०+, ८५+ वयोगटातील नागरिकांसाठी काही त्यांच्या पद्धतींचे व्यायाम प्रकार करणारे करवून घेणारे गट असतात. त्यांचे काही विडिओ मी मागे पाहिले होते ( dwtv channel documentaries बहुतेक.) त्यांचे व्यायाम प्रकारही खूप चांगले वाटले. विशेषतः शरीराची रोजची हालचाल करण्यासाठीचे ते सराव आहेत. वरील दोन वयोगटांच्या वयाप्रमाणे हालचालींचा वेग वेगळा दिसला. इकडच्या काही बाबा लोकांचे योग प्रकार मला काही आवडले नाहीत. अतिरंजीत वाटले. ....... वजन कमी करणे/ हालचालींसाठी सराव/ रोग नियंत्रण/ मानसिक समाधान शांती यांपैकी एक किंवा सर्व असा काही झोल योगासनांमध्ये घालण्याचा खटाटोप दिसतो हे माझे मत.

Bhakti 29/12/2024 - 14:44
हरारीची मुलाखत रणवीरने घेतली.हरारी माझा आवडता विचारवंत आहे.तो भारतात नेक्सास' पुस्तक प्रकाशित करण्यासाठी आला होता.तेव्हा अनेकांना त्याच्याबरोबर मुलाखती घेतल्या. १. https://youtu.be/eNVtYPgJ6b0?si=3VfqDjCcx6_lYjk2 २. https://youtu.be/6x4UgHI7qbk?si=_Iz_eP9HF7SYH-ZM दुसरी मुलाखत अजून ऐकायची आहे. पहिली मुलाखत रणवीरने घेतली आहे.AI हा हरारीचा १० वर्षांपूर्वी पासूनचा विषय आहे.जो AI वर वरचढ होईल तोच पुढच्या काळात जगावर राज्य करणारे.इथे रशिया,ट्रम्प यांचा वर्चस्ववादी भूमिकेचा त्याने चांगला समाचार घेतला आहे.अमेरिकासारख्या बलाढ्य देशाने,लीडरने जगाच्या शांततेचा विचार आधी केला पाहिजे तरच माणूसकी टिकेल असं त्यांचं म्हणणं आहे.रणवीरचा शो म्हटला की तो स्पिरिच्युलिटीवर समोरच्याला बोलायला लावणारच हे ठरलेलं आहे 😀 त्यात हरारी विपश्यनेचा साधक आहे. पण हरारी म्हणतो कोणीही कोणाला दोन ,तीन तास ध्यानाला बसा हे म्हणणं सोपं आहे.पण पंधरा मिनिटे तरी केवळ स्वतःच्या आता बाहेर जाण्याऱ्या श्वासावर लक्ष केंद्रित करा.इतर कोणताच विचार डोक्यात आणायचा नाही,हे सांगितले तर कोणालाच हे फारसं जमणार नाही.यासाठी खुप तयारीच हवी.मेडिटेशन कसं करायचं, कोणतं करायचं हे ज्याचं त्यालाच ठरवू द्या.उगाच मेंढ्याचा कळप करण्यात अर्थ नाही. युद्ध करावं की नाही याबाबत त्याचं मत मला गोलगोल वाटलं,आधी तो म्हणाला मिलिटरी वर ५०% हून अधिक खर्च चिंताजनक आहे नंतर म्हणाला इस्राएल आणि भारताने ज्या चुका रोमन व मुस्लिम+ब्रिटिश आक्रमणाच्या काळात सैन्य ताकद वाढवण्यावर भर देतात केली ती त्यांना आता करणे अजिबात परवडणारं नाही👏

In reply to by Bhakti

कंजूस 29/12/2024 - 15:53
मराठी किंवा कुणीही. आंतरराष्ट्रीय मते राजकीय/ सामाजिक / धार्मिक ही नेहमी ती व्यक्ती कोणत्या डोक्यातली आहे त्याप्रमाणे एकांगीच असतात. विरुद्ध गटाचा साधा उल्लेखही नसतो. तर काहींची प्रसिद्ध केलेली व्यक्तव्ये त्यांच्या देशाच्या राजकीय दडपणाखालीही असतात.

कंजूस 31/12/2024 - 20:43
पहिला काचेचा पूल काल कन्याकुमारी, तमिळनाडू इथे असलेल्या विवेकानंद स्मारक आणि तिरुवल्लूवर पुतळा या दोन ठिकाणांमध्ये काचेचा पूल उभारला त्याचे उद्घाटन झाले. hindustan times बातमी

कंजूस 03/01/2025 - 11:27
खरडफळ्यावर विषय निघाला म्हणून......... गुजरातचे सुंदर समुद्र किनारे आणि पर्यटन. फार प्रचलित नाही तरीही थोडक्यात... गुजरातध्ये {सूरतजवळच्या} हजिरा येथे आणि जामनगर येथे दोन मोठे रासायनिक प्रकल्प ( भारतीय कंपन्या, रिलायन्स) अगोदरच आहेत. सूरतजवळच्या दहेज बंदरातून - घोघा पलिकडे जाऊन भावनगरला काही जण जातात. धार्मिक पर्यटन. दीवचा किनारा पर्यटनासाठी आहे. तिथून वेरावळ - सोमनाथ आहे. पण धार्मिक महत्त्व आणि मासेमारी. दमणचा किनारा काळा आहे. मासेमारी बोटींच्या डिझेलमुळे. जवळचा परिसर दारूबार आणि इतर इलेक्ट्रॉनिक्स मार्केटसाठी पूर्वी प्रसिद्ध होता. आता त्याचे महत्त्व उरले नाही. तरीही दमण- वापी- दादरा नगरहवेली- खानवेल ( गार्डन्स) अशी सहल होऊ शकते. द्वारका पोरबंदर समुद्र -धार्मिक पर्यटन अंकलेश्वर/अंकलेसर भरूच हे नर्मदा पर्यटनामुळे चर्चेत असते. गुजरात - महाराष्ट्र सीमेजवळचे डहाणू आणि बोर्डी येथे हॉटेल्स खूप आहेत. डहाणू-जव्हार- त्र्यंबकेश्वर -नाशिक - सापूतारा असाही सहल प्लान होऊ शकतो. गुजरात समुद्र किनारे थंडीतच ठीक. गरमा फार असतो. काही ठिकाणी रात्री चमकणाऱ्या लाटा दिसतात. मुंबई पुणे पर्यटकांसाठी कोकण, गोवा, कर्नाटक समुद्रच बरा.

In reply to by कंजूस

गवि 03/01/2025 - 14:19
दमण- वापी- दादरा नगरहवेली- खानवेल ( गार्डन्स) अशी सहल होऊ शकते.
दमण किनारे घाणेरडे. केमिकल आणि वास. अस्वच्छ. हल्ली काही भाग बांधून चौपाटी केली आहे असे ऐकले पण एकूण समुद्र घाण. खूप इंडस्ट्रीज. सिल्वासा कंटाळवाणे. सर्वसाधारण लहान शहर. उन्हाळ्यात तर अगदी नदी देखील कोरडी. तिथली वाटेतली लायन सफारी केविलवाणी. सापुतारा वगैरे हिल स्टेशन हा अधिक चांगला ऑप्शन आहे त्यापेक्षा.

In reply to by प्रचेतस

गवि 03/01/2025 - 15:50
आधी मद्य पिऊन मग कोणत्याही मार्केटमध्ये फिरायला मजाच येते. किंबहुना काळ्या समुद्रावर फिरायला देखील मजाच येते. :))

In reply to by प्रचेतस

गवि 03/01/2025 - 16:00
तुमच्या इतका जोरकस, प्रगाढ, वादळी, पावसाळी, ओलाकंच, इंटेंस अनुभव नसला तरी प्रवासाचा अंमळ थोडासा अनुभव आहे इतकंच..

In reply to by प्रचेतस

गवि 03/01/2025 - 16:09
सळसळत्या वाऱ्याने एखादा प्राजक्त थरथरावा आणि खालून जाणाऱ्या आपल्या तापल्या अंगावर गार दवबिंदूंचा पडलेला पाऊस हृदयाचे मधलेच चार ठोके चोरून जावा तशी अवस्था झालेली दिसते त्या आठवणींनी.

In reply to by गवि

प्रचेतस 03/01/2025 - 17:24
हो ना. अगदीच मोरपिशी अवस्था. बाकी तुमचे अनुभवही ह्याबाबतीत दांडगेच असणार म्हणा हे तुमच्या तरल शब्दांनी सहजच स्पष्ट होते.

In reply to by गवि

टर्मीनेटर 03/01/2025 - 16:55
वरच्या वाक्यात
"आधी मद्य पिऊन मग कोणत्याही मार्केटमध्ये फिरायला मजाच येते."
असे 'कोणत्याही मार्केटमध्ये' हे दोन शब्द ठळक करायचे राहुन गेले काय 😀 नीळा, हिरवा, पिवळा, तांबडाच काय पण 'मृत' समुद्रही जर कौतुकास पात्र ठरत असतील तर बिचाऱ्या 'काळ्या' समुद्राने असे काय कोणाचे घोडे मारले आहे? ('काळ्याशार' गोष्टीही आकर्षक असु शकतात 😉) तेव्हा घ्यावी की त्याच्यावरही फिरायची मजा 😂 बाकी 'काळ्या' वरुन सहज सुचलं म्हणून... काला रे सइयां काला रे तन काला रे मन काला रे काली जबान की काली गारी काले दिन की काली शामें सइयां करते जी कोल् बाज़ारी काला रे सइयां काला रे तन् काला रे मन काला रे काली जबान की काली गारी काले दिन की काली शामें सइयां करते जी कोल् बाज़ारी बैरी कोल् कोल् कोल् छीने तोल तोल तोल बैरी कोल् कोल् छीने तोल तोल तोल छत आँगन चार दिवारी सइयां करते जी सइयां करते जी सइयां करते जी सइयां करते जी सइयां करते जी कोल् बाज़ारी सइयां करते जी कोल् बाज़ारी काली मिटटी कुत्ता काला काला बिलकुल सुर्मे वाला काला कौवा हौवा काला काली मिटटी कुत्ता काला काला बिलकुल सुर्मे वाला काला कौवा हौवा काला काला बादल गिरने वाला काला मोती गिरने वाला काला झंडा डण्डा कला काला बटवा पैसा काला काली आँखों जैसा काला काली अग्नि काली गर्मी सूरज काला काला बीघा और गज काला काली हाथी हाथी काला काला बैरी कोल् कोल् कोल् छीने तोल तोल तोल बैरी कोल् कोल् छीने होल से टोल रंग पानी और पिचकारी सइयां करते जी पिया करते जी सइयां करते पिया करते जी काला रे सइयां काला रे तन काला रे मन्न काला रे काली जबान की काली गारी काले दिन की काली शामें सइयां करते जी कोल् बाज़ारी काला रे सइयां काला रे तन काला रे मन्न काला रे काली जबान की काली गारी काले दिन की काली शामें सइयां करते जी कोल् बाज़ारी. स्नेहा खानवलकर ह्या गुणी संगीत दिग्दर्शिकेने संगीतबद्ध केलेल्या 'गँग्स ऑफ वासेपूर २' मधल्या काला रे ह्या गाण्यात गीतकार वरुण ग्रोवर ह्यांनी इतक्या काळ्या गोष्टींचा उल्लेख केलाय, पण बिचारा 'काळा समुद्र' मात्र त्यात घ्यायचा राहून गेला बघा... 😎

In reply to by गवि

कंजूस 03/01/2025 - 14:46
खरंतर गुजरातला समुद्र पर्यटनाला जाऊच नये. औद्योगिकरणावर गुजरातने खूप भर दिला. नवसारीपासून पुढे वरती. मुंबई बाजारपेठ जवळ पडते. सापुतारा जरी महाराष्ट्रातील पर्यटकांना आवडत असले ( नाशिक जवळ) तरी गुजरातींना आवडत नाही. त्यांचे आवडते माथेरान महाबळेश्वर पाचगणी. मुंबई पुण्याला जवळची ठिकाणं पाहून झाल्यावर जरा बदल म्हणून दुसरीकडे काही आहे का याची चाचपणी करतात. पालघरच्य पश्चिमेला दहा किमीवर केळवे माहिम किनारा आहे. पालघर -मनोर - विक्रमगड- जव्हार- त्र्यंबकेश्वर - नाशिक या वाटेवर हल्ली 'गोवर्धन इको विलेज' मिनी वृंदावन ( इस्कॉनवाल्यांचं) हल्ली लोकप्रिय होत आहे. या मार्गावर बरीच रिसॉर्ट झाली आहेत. जव्हार मोखाडा भागातील वारली चित्रकला कमी होत आहे किंवा बाजारू होत आहे असं ऐकून आहे. सहलीच्या आराखड्यात/ मार्गावर चार पाच ठिकाणे असणे फायद्याचं ठरतं . एखादं नाही आवडलं कुणाला तर दुसरं सहल यशस्वी करतं.

In reply to by कंजूस

गवि 03/01/2025 - 15:54
केळवे किनारा तर लोकांनी घाणीने कचऱ्याने भरून टाकलेला दिसला. अगदी गेल्या वर्षात काही बदल झाला असेल तर माहीत नाही. लोक तिथे पिकनिक सारखा कार्यक्रम करून, बसून खाऊन प्लास्टिक प्लेट्स, खरकटे, उर्वरित अन्न असे सर्व जागीच टाकून उठत होते. किनाऱ्यावर हागणदारी होती. पार्किंग शुल्क किंवा तत्सम शुल्क वगैरे वसुली अवश्य होत होती पण स्वच्छतेच्या दृष्टीने काही दिसले नाही. पेड टॉयलेट होते. तेही अस्वच्छ. आपले सामान्य नागरिक देखील एकूण स्वच्छतेचा सेन्स कमी असलेले आहेत असेच वाटते सगळीकडे.

In reply to by गवि

कंजूस 03/01/2025 - 16:24
हं. नवीन अपडेट्स लक्षात ठेवायला हवेत. बाकी प्रचेतसकुमार चांगल्या जागा शोधतात. पण काहीच उघड करतात. BNHS वालेही चांगल्या जागा सांगत सुटत नाहीत. फेसबुकाच्या भिंती भरल्या की लोंढे तिकडेच जातात. राजमाची, कास पठार, सांधण, हरिहर.

टर्मीनेटर 03/01/2025 - 17:47
आपल्या सर्वांच्या माहितीतले मिपाकर लेखक 'कुमार१' हे काही कामानिमित्त मुंबईला येणार आहेत. त्या निमित्ताने सोमवार दिनांक ६ जानेवारी २०२५ रोजी संध्याकाळी ६ नंतर भायखळा येथे एक मिपा कट्टा करण्याचे ठरत आहे. सोमवारचा, म्हणजे कामकाजाचा दिवस असल्याने फार लांबुन कोणी येऊ शकणार नाहीत ह्याची कल्पना असल्यामुळे 'कट्ट्यासाठी' वेगळा धागा वगैरे काढलेला नाही, परंतु भायखळा परिसरात किंवा मुंबई उपनगरांत रहाणारे कोणी मिपाकर येऊ शकत असतील तर त्यांचे सहर्ष स्वागत आहे. (केवळ एकमेकांची सदिच्छा भेट आणि गप्पा-टप्पांचा कार्यक्रम एवढाच ह्या कट्ट्याचा मुळ उद्देश आहे 😀)

In reply to by टर्मीनेटर

कंजूस 03/01/2025 - 18:16
मुंबईत मिपाकर मोजून तीन चारच असतील. आणि त्यातून राणीबाग फुले प्रदर्शनाचे निमित्त साधले तर उत्तम.

In reply to by कंजूस

विजुभाऊ 05/01/2025 - 15:09
मुंबईत ( ठाणे डोंबिवली धरुन) किमान तीस एक मिपाकर सहज असतील. रामदास , शँपेन , क्लिंटन, प्रभू मास्तर , साक्षी , ज्योति अळवणी , मदनबाण असे बरेच आहेत.

In reply to by टर्मीनेटर

Bhakti 04/01/2025 - 11:34
कुमार १ आता मिपावर का लिहित नाही.त्यांना नक्की सांगा की तुमचे अभ्यासपूर्ण लेख मिपावर देत जा.

In reply to by टर्मीनेटर

Nitin Palkar 06/01/2025 - 08:18
या कट्ट्याला येतो असे कुमार१ यांना बोललो होतो. अचानक महत्वाचे काम निघाल्यामुळे येऊ शकत नाही. लवकरच पुन्हा असा योग येवो.

Bhakti 04/01/2025 - 11:43
आणि आजोबा परत जिवंत झाले! ;) लाखातून एखादा व्यक्ती इतका नशीबवान असू शकतो.हार्ट ॲटॅकमुळे मृत घोषित केलेल्या आजोबांचे शव रूग्णवाहिकेतून घरी नेताना रस्त्यावरील खड्ड्यांच्या धक्क्यामुळे आजोबांचे ह्रदय पुन्हा चालू झाले असावे.कारण नातवाला नंतर त्यांच्या हाताच्या बोटांची हालचाल दिसली.मग पुढील उपचाराला परत दुसऱ्या दवाखान्यात नेले.तर आजोबांच्या ह्रदयाचे ठोके दिसले. देव तारी त्याला कोण मारी... https://youtu.be/Y5Ap-dknaww?si=Ezn1IIWLjspCJ5Sl

In reply to by Bhakti

चौथा कोनाडा 05/01/2025 - 20:10
या घटनेची नोंद घेत महाराष्ट्राच्या आरोग्य खात्याने सदर खड्ड्याचे मोजमाप करून तशाच प्रकारचे खड्डे विविध रस्त्यांवर पाडण्याचे नियोजन केलेले आहे. या खड्डा इफेक्टमुळे सीपीआर ची प्रोसिजर कालबाह्य होऊ शकते असे माझी आरोग्य सचिव माननीय डॉक्टर चंगावडकर श्रीपाद यांनी प्रतिपादित केले ! या नियोजित खड्ड्यांच्या कंत्राटांवरून आत्ताच वाद सुरू झालाय ! राजकीय नेते श्री अमुक प्रमुख यांनी या कंत्राटात बावीस कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला. आणि या प्रकरणाची चौकशी करावी अशी मागणी माननीय मुख्यमंत्री यांच्याकडे केली.

कंजूस 05/01/2025 - 10:24
माथेरानमध्ये पर्यटक घोड्यावर बसून जात आहेत, काही जण मिनी ट्रेन पाहात आहेत, माकडे पर्यटकांच्या खाऊच्या पिशव्या हिसकावून घेत आहेत अशा माहितीवर Chatgpt ने काढलेलं चित्र.image थोड्या चुका आहेत, अर्धवट कापली गेली आहेत दृष्य. तरी ठीकच.

कंजूस 24/02/2025 - 00:28
उन्हाळी भटकंती. काल एक भटकंती केली. खंडाळा घाटासाठी रेल्वे जिथून पळसधरी स्टेशनानंतर वर चढते त्या पहिल्या डोंगरात आहे सोनगिरी. ( मुंबईतील तरुण नवख्या ट्रेकरांचा पावसाळ्यातला आवडता ट्रेक. आणखी एक सोंडाई डोंगर माथेरानच्या चौक पाॅइंटच्या खाली आहे.) उन्हाळा सुरू झाला आहे, रान वाळले आहे तरी दुपारी बारा ते पाच तळापासून माथ्यापर्यंत (५०० मिटर्स) अतोनात डास होते. शांतपणे बसून डबासुद्धा खाता आला नाही. या उलट मागचाच डोंगर राजमाचीचा. तिथे कधीच कुठेही डास नसतात. हे असं का?

कंजूस 12/03/2025 - 10:38
वेरूळ दहाव्या लेण्यात किरणोत्सव..... लोकसत्ता बातमी. https://youtu.be/2xX1I0EUcNk?si=Q7AHHpInuRYAN6Zc असा दिसत असला तरी त्यासाठी लेण्या तशा बांधलेल्या नसाव्यात. वेरूळ लेण्या बहुशा पश्चिमाभिमुख आहेत त्यामुळे दुपारी वर्षातून दोनवेळा किरण आतापर्यंत येत असणारच. आपली देवळं मुद्दामहून पूर्वाभिमुख बांधतात. काही पश्चिम दिशेला तोंड करून. तसं लेण्यांचं नाही. बौद्ध भिक्कुंना पावसाळ्यात विश्रांतीसाठी विहार आणि लेणी आणि चैत्य बांधण्यात ( खोदण्यात) आले होते. मूळ उद्देश हा होता.

कंजूस 12/03/2025 - 10:56
विमान परत फिरवणे.... मागच्या आठवड्यात एक शिकागो ते दिल्ली विमान टॉयलेट्स तुंबल्याने परत शिकागोला नेले. https://youtu.be/ZQemz_Enpxc?si=w1SuHw86alXZ6IiW उड्डाणाचे फक्त चार तास उरले होते. मग वाटेत कुठे emergency landing या कामासाठी मिळत नसावेत का? किंवा ते देश अशि सर्विस देत नसतील?

कंजूस 19/03/2025 - 18:32
माथेरान कालपासून बंद. टॅक्सी, इ रिक्षा आणि घोडे वाले संपावर. कारण काय तर म्हणे पर्यटकांची फसवणूक करणारे विडिओ यूट्यूबवर आले. खरं कारण ... खाजगी वाहनाने येणारे पर्यटक वाढले आणि ते दस्तुरी नाक्यावरून शटल टॉय ट्रेन किंवा इ रिक्षांनी माथेरानच्या बाजार पर्यंत जातात. ते आठवड्यात कोणत्याही दिवशी येऊन जातात. हमाल, हॉटेल्स आणि घोडेवाल्यांचा धंधा जोरात चालतो. इ रिक्षा दहा आहेत. फक्त सुट्ट्या लागल्यावर येणारे पर्यटकच टॅक्सी घेतात. एकूण काय तर २७० टॅक्सी वाल्यांना धंधा मिळत नाही पण पर्यटक खूप येतात. नेरळ ते दस्तुरी नाका जाणारी एसटी मिनीबस ( पंचवीस रुपयांत) हीसुद्धा पोटदुखी आहे. फसवणूक टॅक्सीवालेच करतात. खाजगी कार्यालयांना " आमच्या टॅक्सी नेच जा असा हेका धरतात किंवा पाचशे रुपये द्या असा दम भरतात. काही शहाणे टॅक्सी वाल्यांनी मात्र पन्नास रु सीटने धंधा सुरू ठेवला आहे. ( अधिकृत भाडे शंभर रु प्रती प्रवासी असे चारांचे चारशे रुपये घेतात. किंवा पूर्ण टॅक्सी खिडकीवर जाऊन बुक केल्यास ३६० रुपये लागतात. आता प्रश्न असा आहे की टॅक्सीवाले आठवड्याच्या इतर दिवशी ओला/ उबेर/ वगैरेंनी संबंध का ठेवत नाहीत. कारण या साईट्स " मारुती इको" वाहन नको सांगतात. सर्व माथेरान टॅक्स्या याच प्रकारच्या आहेत.

In reply to by कंजूस

चौथा कोनाडा 20/03/2025 - 20:29
खासगी करण : वरच्या पातळीवर अदानी- अंबानी खालच्या पातळी छोटेआका, बडेआका अणि अन असे कार्यकर्ते म्हणवणारे खंडणीकार्यकर्ते

वामन देशमुख 21/03/2025 - 13:10
माझा कालचा WhatsApp Status SohalLalTeaTime #LifeIsFunWithFriends&SohanlalTea ☕
एका जिवलगाचा प्रतिसाद -
चहा आणी आणी ते सुद्धा संध्याकाळी 7 नंतर! उन लागलं की काय वामन तुला ? काळजी घे बाबा.
माझे उत्तर - हमारे तेलंगाणा के लोओंका मालूम नै तुमारकू? सुब्बे उट्टे जब से रात को सोने तलक कब्बी बी चायाँ पीने कू रेडीच रैतें। कल क्या वा मालूम? हमारे संजय बावा होर उनके इनो आये थे हमारे इधर म्हाराष्ट्रा सें । फिर Abits कु जाने के प्लानाँ बनायें। तो मैं बोलूं, चलो बावा, कैसे बी उदर जारैं । तो व्हांपे सोहनलाल की चाय भोत सईं रैती, दूर दूर से लोआं आते पीनेकू। पीते, तुम्म? तो उनो बोले, तुम इत्ता बोलरे तो कैकु नै पीते वामन राव? फिर हम, हमारे इनो, बावा, बावा के इनो ऐसे चार जणां गए चायाँ पीनेकू। अब तुमारकू तो मालूमिच हैं, वो चायाँ वायाँ पीने के शौकां तो अपुन नै पालते। फिर वो तीन जणां चायाँ पिए। भोत अच्चे है चायाँ बोले। बोलके मई स्टेटसां लगायूँ।

वामन देशमुख 30/04/2025 - 10:55
अक्षय्य तृतीयेनिमित्त घराजवळच्या श्री वेंकटेश्वर स्वामी (बालाजी) मंदिरात सपत्नीक गेलो होतो. घरी आंब्याची पाने-झेंडूची फुले यांची तोरणे, देवांना ताजे हार,फुले, यथासांग पूजा, विशेष नैवेद्य हे झाले. गोडधोड जेवण आहे. श्री कृपेने प्रसन्न वाटते आहे. गोविंदा गोविंदा गोऽविंदा!

In reply to by कंजूस

वामन देशमुख 30/04/2025 - 15:56
मेहकरचा बालाजी?
मी हैदराबादला राहतो. घराजवळच्या (आम्ही लोकांनी बांधलेल्या) देवळात गेलो होतो.‌ यापूर्वी मेहकरच्या बालाजी मंदिरात गेलेलो आहे.‌ तेथील बालाजीची मूर्ती खूप उंच आहे. बहुधा भारतभरातील सर्वात उंच मूर्ती असावी.

वामन देशमुख 09/05/2025 - 13:44
श्रीगुरुजी हा आइडी बॅन केल्याबद्दल मी तीव्र निषेध व्यक्त करतो. ज्या मोजक्या मिपाखरांमुळे मिसळपाववर वाचक येतात त्यांच्यापैकी एक हे श्रीगुरुजी होते.‌ हे लिहिण्याचा अधिकार मला आहे व हे लिहिल्यामुळे माझाच आइडी बॅन होणार नाही ही अपेक्षा. जय हिंद. --- हे मी खरडफळ्यावरही लिहिलं होतं; कायमची नोंद राहावी म्हणून इथे पुन्हा लिहीत आहे.

In reply to by वामन देशमुख

मारवा 09/05/2025 - 13:54
श्रीगुरुजी हे अनेकवेळा अभ्यासपूर्ण संदर्भासहित मांडणीणकरात होते हे खरे आहे. काहीवेळा मतभेद असले तरी जेबकी स्वाभाविक आहे तरी त्यांची एकूण मांडणी व चर्चेला योगदान चांगलेच होते यात शंका नाही अनेकदा माहीत नसलेले संदर्भ त्यांच्यामुळे माहिती होत होते. मात्र वामनराव त्यांची भाषेची मर्यादा भंगलेली होती असेही दिसून येते. त्यासाठी त्यांना समज देऊन संधी द्यायला हवी होती असेच अमरेंद्र बाहुबली यांना देखील संधिं द्यायाला हवी होती. असे उत्साहाने हिरीरीने चर्चा करणारे गेले तर त्याचे मला तरी नक्कीच वाईट वाटतें
सहज सुचलं म्हणून ( राजकारणसोडून छोट्या चर्चांसाठी) इतिहास, पुस्तकं, पाककला आणि इतर विषयांची चर्चा खरडफळ्यावर होते आणि मोठमोठे माहितीपर प्रतिसाद खरडफळा साफ झाल्यावर गायब होतात. तर तसे होऊ नये म्हणून हा धागा सुरू करत आहे. * आमच्या इथे एक पेपर आणि मासिके वाचनाचा एक मिनी ज्येष्ठ नागरिक कट्टा ( म्हणजे दोन बाकडी , कडाप्पा फरशी टाकून) सुरू झाला होता. परवा तिकडे एक पाटी वाचली आणि पुण्यात असल्यासारखं वाटलं. 'ज्येष्ठ नागरिक कट्टा' पाटीखाली 'राजकारण चर्चेसाठी नाही' असं लिहिलं होतं. हसू आलं. तर हा आपला धागाही राजकारण चर्चेसाठी नकोच असं ठरवलं. बघू असा चालतो.

केशर : गाथा आणि दंतकथा - ४ (मोरोक्को)

टर्मीनेटर ·

कंजूस 11/11/2024 - 04:40
एकूण ही लेखमालिका चांगलीच झाली आहे. खाण्याच्या पदार्थाला रंग देणे याबरोबरच औषधी उपयोग या दोन कारणांमुळे केशर महत्त्वाचे झाले. काही विशेष हवामानाच्या देशांतच केशराचे झाड चांगले वाढते आणि ते देश फारच थोडे आहेत. महाग होण्याचं हे कारण. पुढील विषय - मोती.

नेहेमीप्रमाणेच छान माहिीपूर्ण लेखं... पुण्यात म्हणे एका तरुणाने ट्रक चा हवाबंद वातानुकूलित कंटेनर घेऊन त्यात केशराचे रोपटी तयार केलियेत... केशर लागवडीमध्ये हे रोपटे तयार करणे किचकट असते म्हणे, तुलनेने मग रोपट्यापासून पुढील शेती करणे कमी किचकट... आता ही छोटी रोपटी काश्मिरी शेतकरी त्याच्याकडून घेवून शेती करू शकतात.. खरे खोटे सोशल मीडिया जाणे...

In reply to by आंद्रे वडापाव

टर्मीनेटर 12/11/2024 - 15:12
कंकाका | आंद्रे वडापाव प्रतिसादासाठी आपले मनःपूर्वक आभार 🙏
आता ही छोटी रोपटी काश्मिरी शेतकरी त्याच्याकडून घेवून शेती करू शकतात..
व्यावहारीकदृष्ट्या ते शक्य नाही. काश्मिरमधले केशर उत्पादन सातत्याने घटत चालल्याने २०१०-२०११ मध्ये केंद्र सरकारने The National Saffron Mission (NSM) सुरु केले. त्या अंतर्गत तिथल्या केशराची लगवड करणाऱ्या शेतकऱ्यांना केशराचे कंद, लागवडीशी संबंधीत सोयी-सुविधा, सरकारी अनुदाने वगैरे मिळतात त्यामुळे त्यांना बाहेरुन अशी रोपे खरेदी करणे परवडणारे नाही, आणि अशा रोपांचे पुनर्रोपण यशस्वी होण्याची शक्यताही नाही. (भारताविषयीच्या भागात त्यबद्दलची माहिती येइलच...)
खरे खोटे सोशल मीडिया जाणे...
ते सोशल मीडिया वरचे महापंडीत परवडले एकवेळ, पण मुख्यप्रवाहातली माध्यमे म्हणवल्या जाणाऱ्यांनी 'Digital Content Creator' अशा हुद्द्याखाली जे महाभाग पोसायला घेतले आहेत ते जास्त वात आणतात 😀 ही मंडळी सोशल मीडियावरच्या पोस्ट्स, व्हिडिओज वाचुन/पाहुन त्या प्रयोगांची व्यावसायीक व्यवहार्यता वगैरे काहीही न तपासता बेधडकपणे "अमुक एक ठिकाणचा/ची तमुक एक तरुण/तरुणी ढमुक एक करुन महिन्याला कमावतेय इतके-तितके लाख रुपये" अशा मथळ्याखाली काय वाट्टेल त्या जिलब्या पाडत असतात.

वामन देशमुख 11/11/2024 - 09:28
टर्मी भौ, केशरी लेखमालेतील हे फूल देखील नेहमीप्रमाणेच छान फुललंय! --- मोत्यासाठी कंकाकांना अनुमोदन देतो. - केशरप्रेमी द्येस्मुकराव

Bhakti 12/11/2024 - 12:53
अगदी सुंदर, भौगोलिक जिज्ञासा पिकांच्या उत्पादन अभ्यासाने पूर्ण होते.इराण,ग्रीस इथे मुबलक मिळते त्यामुळे भरभरून जेवणात वापर होतो,तेवढंच काय ते केशरी सुख ;) पुढील पिकं पिस्ता,सर्व सुकामेवा पिकांवरही छान लेखमालिका होईल.काजू तर भारताचाच प्रसिद्ध सुकामेवा आहे.

In reply to by Bhakti

टर्मीनेटर 12/11/2024 - 15:26
केशरप्रेमी द्येस्मुकराव। श्वेता२४ । कर्नल साहेब । भक्ती प्रतिसादांसाठी आपले मनःपूर्वक आभार 🙏
काजू तर भारताचाच प्रसिद्ध सुकामेवा आहे.
काजू भारतातला प्रसिद्ध सुकामेवा असला तरी तो ही मुळचा 'भारतीय' नाही. काजुला ब्राझिलमधुन भारतात आणण्याचे श्रेयही पोर्तुगीजांना जाते... मोती आणि पिस्त्याची नोंद घेतली आहे, त्याला मुहुर्त कधी सापडतो ते बघावे लागेल 😀

वामन देशमुख 12/11/2024 - 23:33
कृबु चित्रे लेखाशी इतकी एकरुप झाली आहेत की ती काही विशिष्ट prompts देऊन कृबु वेगळी तयार करून घेतली आहेत असे वाटत नाहीच. झाडांवर फुलं दिसणं जसं स्वाभाविक वाटतं तशीच स्वाभावीक या लेखमालेतील चित्रे वाटतात. --- बाकी, केशर गाथा सुरु आहे पण "दाने दाने में केसर का दम" चा उल्लेख नाही ये बात कुछ हजम नहीं हुई! ;-) - (रजनीगंधा प्रेमी) द्येस्मुक राव --- साँस तेरी मदिर-मदिर जैसे रजनीगंधा प्यार तेरा मधुर-मधुर चाँदनी की गंगा

In reply to by वामन देशमुख

टर्मीनेटर 13/11/2024 - 11:51
बाकी, केशर गाथा सुरु आहे पण "दाने दाने में केसर का दम" चा उल्लेख नाही ये बात कुछ हजम नहीं हुई! ;-)
भारता विषयीच्या भागात 'भारतात होणारा केशराचा वैविध्यपूर्ण वापर' मध्ये त्याचा उल्लेख करतो 😀

In reply to by टर्मीनेटर

वामन देशमुख 01/05/2025 - 12:48
भारता विषयीच्या भागात 'भारतात होणारा केशराचा वैविध्यपूर्ण वापर' मध्ये त्याचा उल्लेख करतो 😀
पुढच्या भागाच्या प्रतीक्षेत... - (केशरप्रेमी) द्येस्मुक् राव्

टर्मीनेटर 13/11/2024 - 12:03
अथांग आकाश | प्रचेतस प्रतिसादांसाठी आपले मनःपूर्वक आभार 🙏 कृबु चित्रे बनवायला अजूनही शिकतोच आहे... परंतु लेखातल्या चित्रांची आपण दखल घेतलीत आणि ती आवडल्याचे कळवलेत त्यासाठी अथांग आकाश आणि (रजनीगंधा प्रेमी) द्येस्मुक राव आपले विशेष आभार!

सौंदाळा 13/11/2024 - 15:29
हा भागही छानच. नविन माहिती मिळत आहे. मध्य आशिया आणि दक्षिण अमेरीकेतून बरीच पिके, पदार्थ जगात पसरली हे ढोबळ मानाने बरोबर आहे का?

In reply to by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)

टर्मीनेटर 13/11/2024 - 16:18
मध्य आशिया आणि दक्षिण अमेरीकेतून बरीच पिके, पदार्थ जगात पसरली हे ढोबळ मानाने बरोबर आहे का?
हो! फक्त पिकेच नाहीत तर, गुरा-ढोरांची आणि अनेक आजारांचीचीही देवाणघेवाण त्या काळात जगभरात झाली.

मोरोक्कोमध्येही केशर होते हे माहीत नव्हते. एक गोष्ट कळत नाही. काश्मीरसारख्या थंड हवामान असलेल्या ठिकाणी केशर होते त्यावरून केशरासाठी थंड हवामान गरजेचे आहे असे वाटत होते. पण मोरोक्कोसारख्या वाळवंटी प्रदेशातही केशर होते? म्हणजे केशराला थंड हवामान असलेच पाहिजे असे नसते का?

In reply to by चंद्रसूर्यकुमार

टर्मीनेटर 13/11/2024 - 16:26
पण मोरोक्कोसारख्या वाळवंटी प्रदेशातही केशर होते? म्हणजे केशराला थंड हवामान असलेच पाहिजे असे नसते का?
मोरक्कोलाही भारतlप्रमाणेच सर्व प्रकारचे हवामान लाभले आहे. तिथे समुद्रही आहे, वाळवंटही आहे आणि हिमाच्छादित पर्वतशिखरेही आहेत!

कंजूस 11/11/2024 - 04:40
एकूण ही लेखमालिका चांगलीच झाली आहे. खाण्याच्या पदार्थाला रंग देणे याबरोबरच औषधी उपयोग या दोन कारणांमुळे केशर महत्त्वाचे झाले. काही विशेष हवामानाच्या देशांतच केशराचे झाड चांगले वाढते आणि ते देश फारच थोडे आहेत. महाग होण्याचं हे कारण. पुढील विषय - मोती.

नेहेमीप्रमाणेच छान माहिीपूर्ण लेखं... पुण्यात म्हणे एका तरुणाने ट्रक चा हवाबंद वातानुकूलित कंटेनर घेऊन त्यात केशराचे रोपटी तयार केलियेत... केशर लागवडीमध्ये हे रोपटे तयार करणे किचकट असते म्हणे, तुलनेने मग रोपट्यापासून पुढील शेती करणे कमी किचकट... आता ही छोटी रोपटी काश्मिरी शेतकरी त्याच्याकडून घेवून शेती करू शकतात.. खरे खोटे सोशल मीडिया जाणे...

In reply to by आंद्रे वडापाव

टर्मीनेटर 12/11/2024 - 15:12
कंकाका | आंद्रे वडापाव प्रतिसादासाठी आपले मनःपूर्वक आभार 🙏
आता ही छोटी रोपटी काश्मिरी शेतकरी त्याच्याकडून घेवून शेती करू शकतात..
व्यावहारीकदृष्ट्या ते शक्य नाही. काश्मिरमधले केशर उत्पादन सातत्याने घटत चालल्याने २०१०-२०११ मध्ये केंद्र सरकारने The National Saffron Mission (NSM) सुरु केले. त्या अंतर्गत तिथल्या केशराची लगवड करणाऱ्या शेतकऱ्यांना केशराचे कंद, लागवडीशी संबंधीत सोयी-सुविधा, सरकारी अनुदाने वगैरे मिळतात त्यामुळे त्यांना बाहेरुन अशी रोपे खरेदी करणे परवडणारे नाही, आणि अशा रोपांचे पुनर्रोपण यशस्वी होण्याची शक्यताही नाही. (भारताविषयीच्या भागात त्यबद्दलची माहिती येइलच...)
खरे खोटे सोशल मीडिया जाणे...
ते सोशल मीडिया वरचे महापंडीत परवडले एकवेळ, पण मुख्यप्रवाहातली माध्यमे म्हणवल्या जाणाऱ्यांनी 'Digital Content Creator' अशा हुद्द्याखाली जे महाभाग पोसायला घेतले आहेत ते जास्त वात आणतात 😀 ही मंडळी सोशल मीडियावरच्या पोस्ट्स, व्हिडिओज वाचुन/पाहुन त्या प्रयोगांची व्यावसायीक व्यवहार्यता वगैरे काहीही न तपासता बेधडकपणे "अमुक एक ठिकाणचा/ची तमुक एक तरुण/तरुणी ढमुक एक करुन महिन्याला कमावतेय इतके-तितके लाख रुपये" अशा मथळ्याखाली काय वाट्टेल त्या जिलब्या पाडत असतात.

वामन देशमुख 11/11/2024 - 09:28
टर्मी भौ, केशरी लेखमालेतील हे फूल देखील नेहमीप्रमाणेच छान फुललंय! --- मोत्यासाठी कंकाकांना अनुमोदन देतो. - केशरप्रेमी द्येस्मुकराव

Bhakti 12/11/2024 - 12:53
अगदी सुंदर, भौगोलिक जिज्ञासा पिकांच्या उत्पादन अभ्यासाने पूर्ण होते.इराण,ग्रीस इथे मुबलक मिळते त्यामुळे भरभरून जेवणात वापर होतो,तेवढंच काय ते केशरी सुख ;) पुढील पिकं पिस्ता,सर्व सुकामेवा पिकांवरही छान लेखमालिका होईल.काजू तर भारताचाच प्रसिद्ध सुकामेवा आहे.

In reply to by Bhakti

टर्मीनेटर 12/11/2024 - 15:26
केशरप्रेमी द्येस्मुकराव। श्वेता२४ । कर्नल साहेब । भक्ती प्रतिसादांसाठी आपले मनःपूर्वक आभार 🙏
काजू तर भारताचाच प्रसिद्ध सुकामेवा आहे.
काजू भारतातला प्रसिद्ध सुकामेवा असला तरी तो ही मुळचा 'भारतीय' नाही. काजुला ब्राझिलमधुन भारतात आणण्याचे श्रेयही पोर्तुगीजांना जाते... मोती आणि पिस्त्याची नोंद घेतली आहे, त्याला मुहुर्त कधी सापडतो ते बघावे लागेल 😀

वामन देशमुख 12/11/2024 - 23:33
कृबु चित्रे लेखाशी इतकी एकरुप झाली आहेत की ती काही विशिष्ट prompts देऊन कृबु वेगळी तयार करून घेतली आहेत असे वाटत नाहीच. झाडांवर फुलं दिसणं जसं स्वाभाविक वाटतं तशीच स्वाभावीक या लेखमालेतील चित्रे वाटतात. --- बाकी, केशर गाथा सुरु आहे पण "दाने दाने में केसर का दम" चा उल्लेख नाही ये बात कुछ हजम नहीं हुई! ;-) - (रजनीगंधा प्रेमी) द्येस्मुक राव --- साँस तेरी मदिर-मदिर जैसे रजनीगंधा प्यार तेरा मधुर-मधुर चाँदनी की गंगा

In reply to by वामन देशमुख

टर्मीनेटर 13/11/2024 - 11:51
बाकी, केशर गाथा सुरु आहे पण "दाने दाने में केसर का दम" चा उल्लेख नाही ये बात कुछ हजम नहीं हुई! ;-)
भारता विषयीच्या भागात 'भारतात होणारा केशराचा वैविध्यपूर्ण वापर' मध्ये त्याचा उल्लेख करतो 😀

In reply to by टर्मीनेटर

वामन देशमुख 01/05/2025 - 12:48
भारता विषयीच्या भागात 'भारतात होणारा केशराचा वैविध्यपूर्ण वापर' मध्ये त्याचा उल्लेख करतो 😀
पुढच्या भागाच्या प्रतीक्षेत... - (केशरप्रेमी) द्येस्मुक् राव्

टर्मीनेटर 13/11/2024 - 12:03
अथांग आकाश | प्रचेतस प्रतिसादांसाठी आपले मनःपूर्वक आभार 🙏 कृबु चित्रे बनवायला अजूनही शिकतोच आहे... परंतु लेखातल्या चित्रांची आपण दखल घेतलीत आणि ती आवडल्याचे कळवलेत त्यासाठी अथांग आकाश आणि (रजनीगंधा प्रेमी) द्येस्मुक राव आपले विशेष आभार!

सौंदाळा 13/11/2024 - 15:29
हा भागही छानच. नविन माहिती मिळत आहे. मध्य आशिया आणि दक्षिण अमेरीकेतून बरीच पिके, पदार्थ जगात पसरली हे ढोबळ मानाने बरोबर आहे का?

In reply to by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)

टर्मीनेटर 13/11/2024 - 16:18
मध्य आशिया आणि दक्षिण अमेरीकेतून बरीच पिके, पदार्थ जगात पसरली हे ढोबळ मानाने बरोबर आहे का?
हो! फक्त पिकेच नाहीत तर, गुरा-ढोरांची आणि अनेक आजारांचीचीही देवाणघेवाण त्या काळात जगभरात झाली.

मोरोक्कोमध्येही केशर होते हे माहीत नव्हते. एक गोष्ट कळत नाही. काश्मीरसारख्या थंड हवामान असलेल्या ठिकाणी केशर होते त्यावरून केशरासाठी थंड हवामान गरजेचे आहे असे वाटत होते. पण मोरोक्कोसारख्या वाळवंटी प्रदेशातही केशर होते? म्हणजे केशराला थंड हवामान असलेच पाहिजे असे नसते का?

In reply to by चंद्रसूर्यकुमार

टर्मीनेटर 13/11/2024 - 16:26
पण मोरोक्कोसारख्या वाळवंटी प्रदेशातही केशर होते? म्हणजे केशराला थंड हवामान असलेच पाहिजे असे नसते का?
मोरक्कोलाही भारतlप्रमाणेच सर्व प्रकारचे हवामान लाभले आहे. तिथे समुद्रही आहे, वाळवंटही आहे आणि हिमाच्छादित पर्वतशिखरेही आहेत!
लेखनविषय:
लेखनप्रकार

The Wise Woman of the Atlas ह्या मोरोक्कन दंतकथेचे मराठीत शब्दांकनः

पाकिस्तान- १४

अमरेंद्र बाहुबली ·

शशिकांत ओक 30/10/2024 - 01:03
प्रविण झा.
पुस्तक - दास्तान- ए- पाकिस्तान.
पुस्तकाचे सविस्तर रसग्रहण वाचनीय आहे. काही नवे लिहिले आहे का ते समजून घ्यायला आवडेल.

शशिकांत ओक 30/10/2024 - 01:03
प्रविण झा.
पुस्तक - दास्तान- ए- पाकिस्तान.
पुस्तकाचे सविस्तर रसग्रहण वाचनीय आहे. काही नवे लिहिले आहे का ते समजून घ्यायला आवडेल.
लेखनविषय:
. मुक्तिवाहिनीचा ध्वज युद्धामुळे जनतेला नुकसान झाले असले तरी, कुणीतरी फायद्यात होते. पाकिस्तानाच्या दृष्टिकोनातून पाहिले असता तीन गोष्टी घडल्या. पहिली म्हणजे, अयूब खानचे सैनिकी सरकार युद्धातील अपयशानंतर ढळले. याचा अर्थ होता, लोकशाहीचे पुनरुत्थान. दुसरी म्हणजे, पूर्वी पाकिस्तानने आपल्या वेगळ्या होण्याचा निश्चय केला. त्यांना वाटले की पश्चिमी पाकिस्तानमध्ये जास्त शक्ती नाही.

पाकिस्तान -१३

अमरेंद्र बाहुबली ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
इतिहासाच्या अभ्यासकांची किंवा विद्यार्थ्यांची भूमिका नेहमी खेळातल्या पंचाप्रमाणे असावी. जेव्हा पंच मैदानात असतात, तेव्हा आपल्या देशाच्या खेळाडूने षटकार मारला तरी ते आनंद व्यक्त करत नाहीत आणि आउट झाल्यावर दु:खही व्यक्त करत नाहीत. तरीही, जेव्हा सामना भारत-पाकिस्तान दरम्यान असतो, तेव्हा दोन्ही देशांचे पंचही तटस्थ राहू शकत नाहीत. बिशन सिंह बेदी आपल्या संघाला पाकिस्तानमधून परत घेऊन आले होते कारण पाकिस्तानी पंच अन्याय करत होते. तसेच, भारतीय पंच दारा धोतीवाला भारताच्या बाजूने कायम उभे दिसले. 1965 चे युद्ध तीन आठवड्यांपेक्षा थोडे अधिक काळ चालले. पण ते का झाले? कोणाला काय मिळाले? उद्दिष्ट काय होते?

शिवाजी महाराजांचे बसरबरचे पहिले नौकानयन - भाग १

शशिकांत ओक ·

शशिकांत ओक 29/10/2024 - 11:53
  • गोकर्ण बंदरातील शांत सागर आणि महाबळेश्वर मंदिरातील पवित्र वातावरणात आपल्या नौदलाच्या संकल्पना आकारू लागल्या.
  • पोर्तुगीज, डच, इंग्रज, अरब, सिद्दी, विजापुरकर यांच्या, वाहतूक बोटी,चाच्यापासून चोरट्यांचा सुळसुळाट, मासेमारी, मीठ बनवायचे व्यवसाय विना व्यत्यय चालू राहायला तटांची सुरक्षा वगैरे गरजा समजून आल्या.
  • जमिनीवरील राजकारणातून उसंत मिळाल्याने उत्तरेला भिवंडी-कल्याण, ते दक्षिणेत बसरूर, कारवार, गोमांतक किनारा हे आपल्या राज्याचे, सर्वात महत्वाचे क्षेत्र, म्हणून कोकणपट्टीच असू शकते. हे मनात ठसले.
  • भावी काळात घाटावरील किल्ले,जमिनीचा महसूल गमावला गेला तर सह्यपर्वताचे कडेकपारी, दाट जंगल आणि कोकण किनाऱ्यावरील मालवाहतूक, व्यापार आपल्याला वाचवू शकतात.
  • तटसुरक्षित करायला जलदुर्ग, सुसज्ज नाविक दल याशिवाय पर्याय नाही. भावी काळात याच भागात राजधानी बनली पाहिजे. असे मत प्रकर्षाने दृढ व्हायला लागले.
वरील विचारांवर वाचकांची प्रतिक्रिया अपेक्षित आहे...

शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील हि एकमेव सागरी मोहीम, कदाचित या मोहीमेत त्रास झाल्यामुळे शिवाजी महाराजांनी त्यानंनतर सागरी मोहीम केल्याचे आढळत नाही. या मोहीमेची योजना अतिशय बारकाईने केली असणार. एकतर महाराष्ट्र , कर्नाटकाच्या सागर किनारपट्टोवर इंग्रज, पोर्तुगीज, फ्रेंच ( मालवण येथे फ्रेंच वखार होती ) आणि वेंगुर्ल्याचे डच अशा चारही सागरी सत्ता आणि पर्यायने शत्रु होते, समुद्रावरुन प्रवास करताना त्यांना कार्ताझ द्यावा लागे. इथे त्यांनी शिवाजी महाराजांकडून कोणताही कार्ताज घेतलेला दिसत नाही. इथे शिवाजी महाराजांची या युरोपियान सत्तांनी घेतलेली दहशत लक्षात येते. मात्र या मोहीमेसाठी आवश्यक नियोजन खुप बारकाईने केलेले असणार. एकतर जेव्हा गुराबे रात्री किनार्यावर मुक्काम करतील तेव्हा कोठे मुक्काम करायचा तिथली सुरक्षा नेमकी कशी आखली असणार हे महत्वाचे आहे. तसेच जरी महाराजांचे सागरी दल समुद्रातून प्रवास करत असले तरी पायदळ आणि घोडदळ भुमार्गे महाराजांच्या नौदलाला समांतर जमीनमार्गे प्रवास करत असणार. त्यांचे एकमेकांशी सहसंपर्क कसा साधला असणार हे कुतुहल वाढवणारे आहे. कारण दोन्ही मार्गे प्रवास करताना वेगवेगळ्या अडचणींना तोंड द्यावे लागणार. तरीही दोन्ही दले एकाच वेळी मुक्कामाला पोहचणे गरजेचे आहे. यावर अधीक चर्चा झाली किंवा काही माहीती पुढे आली तर या मोहीमेवर अधीक प्रकाश पडेल.

विजुभाऊ 11/01/2025 - 10:04
महाराजांच्या कडे कोणकोणत्या प्रकारची गलबते होतीयाचे साद्यंत वर्णन ब मो पुरंदर्यानी केले आहे. तसेच ते कान्होजी आम्ग्रे या पुस्तकातदेखील आढळते. इतकी दूरदृष्टी असणारा राजा अजून काही वर्षे असायला हवा होता. संभाजी महाराज जर फंदफितुरीमुळे पकडले गेले नसते तर त्यानी औरंगजेबाला पुरते नेस्तनाबूत केले असते आणि हिरव्या विषवल्लीचा त्याच वेळेस नायनाट झाला असता.

In reply to by विजुभाऊ

शशिकांत ओक 12/01/2025 - 17:27
नमस्कार विजुभाऊ, आपण म्हणता ते बरोबर आहे. या नौकावहनाच्या वेळी महाराज कोणत्या प्रकारच्या गलबतातून प्रवास करत होते? किती जहाजे त्यांच्या बरोबर जात होती? त्यातून किती मावळे बरोबर असावेत? शिवाय काही घोडदळ जमिनीवरून आधीच कारवार, बसरूरला येऊन थांबले असावे? ही मोहीम नौदलाचे सामर्थ्य दाखवून बसरूर बाजार पेठेत डच, पोर्तुगीजांचा प्रभाव कमी करण्यासाठी प्रयत्न होता असे वाटते.

शशिकांत ओक 29/10/2024 - 11:53
  • गोकर्ण बंदरातील शांत सागर आणि महाबळेश्वर मंदिरातील पवित्र वातावरणात आपल्या नौदलाच्या संकल्पना आकारू लागल्या.
  • पोर्तुगीज, डच, इंग्रज, अरब, सिद्दी, विजापुरकर यांच्या, वाहतूक बोटी,चाच्यापासून चोरट्यांचा सुळसुळाट, मासेमारी, मीठ बनवायचे व्यवसाय विना व्यत्यय चालू राहायला तटांची सुरक्षा वगैरे गरजा समजून आल्या.
  • जमिनीवरील राजकारणातून उसंत मिळाल्याने उत्तरेला भिवंडी-कल्याण, ते दक्षिणेत बसरूर, कारवार, गोमांतक किनारा हे आपल्या राज्याचे, सर्वात महत्वाचे क्षेत्र, म्हणून कोकणपट्टीच असू शकते. हे मनात ठसले.
  • भावी काळात घाटावरील किल्ले,जमिनीचा महसूल गमावला गेला तर सह्यपर्वताचे कडेकपारी, दाट जंगल आणि कोकण किनाऱ्यावरील मालवाहतूक, व्यापार आपल्याला वाचवू शकतात.
  • तटसुरक्षित करायला जलदुर्ग, सुसज्ज नाविक दल याशिवाय पर्याय नाही. भावी काळात याच भागात राजधानी बनली पाहिजे. असे मत प्रकर्षाने दृढ व्हायला लागले.
वरील विचारांवर वाचकांची प्रतिक्रिया अपेक्षित आहे...

शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील हि एकमेव सागरी मोहीम, कदाचित या मोहीमेत त्रास झाल्यामुळे शिवाजी महाराजांनी त्यानंनतर सागरी मोहीम केल्याचे आढळत नाही. या मोहीमेची योजना अतिशय बारकाईने केली असणार. एकतर महाराष्ट्र , कर्नाटकाच्या सागर किनारपट्टोवर इंग्रज, पोर्तुगीज, फ्रेंच ( मालवण येथे फ्रेंच वखार होती ) आणि वेंगुर्ल्याचे डच अशा चारही सागरी सत्ता आणि पर्यायने शत्रु होते, समुद्रावरुन प्रवास करताना त्यांना कार्ताझ द्यावा लागे. इथे त्यांनी शिवाजी महाराजांकडून कोणताही कार्ताज घेतलेला दिसत नाही. इथे शिवाजी महाराजांची या युरोपियान सत्तांनी घेतलेली दहशत लक्षात येते. मात्र या मोहीमेसाठी आवश्यक नियोजन खुप बारकाईने केलेले असणार. एकतर जेव्हा गुराबे रात्री किनार्यावर मुक्काम करतील तेव्हा कोठे मुक्काम करायचा तिथली सुरक्षा नेमकी कशी आखली असणार हे महत्वाचे आहे. तसेच जरी महाराजांचे सागरी दल समुद्रातून प्रवास करत असले तरी पायदळ आणि घोडदळ भुमार्गे महाराजांच्या नौदलाला समांतर जमीनमार्गे प्रवास करत असणार. त्यांचे एकमेकांशी सहसंपर्क कसा साधला असणार हे कुतुहल वाढवणारे आहे. कारण दोन्ही मार्गे प्रवास करताना वेगवेगळ्या अडचणींना तोंड द्यावे लागणार. तरीही दोन्ही दले एकाच वेळी मुक्कामाला पोहचणे गरजेचे आहे. यावर अधीक चर्चा झाली किंवा काही माहीती पुढे आली तर या मोहीमेवर अधीक प्रकाश पडेल.

विजुभाऊ 11/01/2025 - 10:04
महाराजांच्या कडे कोणकोणत्या प्रकारची गलबते होतीयाचे साद्यंत वर्णन ब मो पुरंदर्यानी केले आहे. तसेच ते कान्होजी आम्ग्रे या पुस्तकातदेखील आढळते. इतकी दूरदृष्टी असणारा राजा अजून काही वर्षे असायला हवा होता. संभाजी महाराज जर फंदफितुरीमुळे पकडले गेले नसते तर त्यानी औरंगजेबाला पुरते नेस्तनाबूत केले असते आणि हिरव्या विषवल्लीचा त्याच वेळेस नायनाट झाला असता.

In reply to by विजुभाऊ

शशिकांत ओक 12/01/2025 - 17:27
नमस्कार विजुभाऊ, आपण म्हणता ते बरोबर आहे. या नौकावहनाच्या वेळी महाराज कोणत्या प्रकारच्या गलबतातून प्रवास करत होते? किती जहाजे त्यांच्या बरोबर जात होती? त्यातून किती मावळे बरोबर असावेत? शिवाय काही घोडदळ जमिनीवरून आधीच कारवार, बसरूरला येऊन थांबले असावे? ही मोहीम नौदलाचे सामर्थ्य दाखवून बसरूर बाजार पेठेत डच, पोर्तुगीजांचा प्रभाव कमी करण्यासाठी प्रयत्न होता असे वाटते.
लेखनविषय:
लेखनप्रकार

शिवाजी महाराजांचे बसरबरचे पहिले नौकानयन - भाग १

१अ नमस्कार मित्रांनो दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा, छत्रपती शिवाजी महाराजांच्या मोहिमांवर आधारित सादर केलेले लेखन मिपावरील वाचकांनी वाचले आहे. त्यावरील सूचना, मार्गदर्शनातून नंतरच्या काळात ईपुस्तके बनवायला प्रेरणा मिळाली. भारतीय नौसेनेचे स्वप्न दृष्टा म्हणून शिवाजी महाराजांचा गौरव होतो. आपण अनुभवातून अनेक गोष्टी शिकतो.

१५ ऑगस्ट विशेष : प्रशस्त, अतिभव्य, अप्रतिमही!

पराग१२२६३ ·
Howrah junction या 15 ऑगस्टला भारतीय स्वातंत्र्याची 77 वर्षं पूर्ण होत असतानाच आणखी एका ऐतिहासिक घटनेला 170 वर्षं पूर्ण होत आहेत. ती ऐतिहासिक घटना म्हणजे हावडा रेल्वे स्थानकाची 170 वर्षपूर्ती.