मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

नाशिक जिल्ह्यातील प्राचीन मंदिरे

vcdatrange ·

चौथा कोनाडा 20/03/2025 - 22:01
सुंदर संकलन ... धन्यवाद ! रोजगार निर्मितीसाठी या जागांचे संवर्धन करुन पर्यटनाधारीत उद्योग-नोकर्‍या सुरु केल्यास खुप छान होईल ... गल्लोगल्ली पायलीला पन्नास इंजोनियर्स हवेत कशाला ... ?

कॉलिंग प्रचेतस दातरंगे साहेब- नर्मदा ते तुंगभद्रा हा फार मोठा पल्ला आहे, त्यामुळॅ खच्चुन माहीती जमा होणार हे नक्की. अभ्यासकांना चांगलीच उपयोगी पडेल. पुढे याचे काही पुस्तक वगैरे काढणार आहात का?

प्रचेतस 24/03/2025 - 12:17
चांगले संकलन. यातली बरीचशी मंदिरे पाहिली आहेत, काहींवर लेखही लिहिले आहेत. गोंदेश्वराच्या शिवपंचायतनात आयेश्वराच्या अंगणी अंजनेरीची भग्न मंदिरे दिंडोरीच्या शिवमंदिरात समुद्रमंथनाचा देखणा पट आहे.

चौथा कोनाडा 20/03/2025 - 22:01
सुंदर संकलन ... धन्यवाद ! रोजगार निर्मितीसाठी या जागांचे संवर्धन करुन पर्यटनाधारीत उद्योग-नोकर्‍या सुरु केल्यास खुप छान होईल ... गल्लोगल्ली पायलीला पन्नास इंजोनियर्स हवेत कशाला ... ?

कॉलिंग प्रचेतस दातरंगे साहेब- नर्मदा ते तुंगभद्रा हा फार मोठा पल्ला आहे, त्यामुळॅ खच्चुन माहीती जमा होणार हे नक्की. अभ्यासकांना चांगलीच उपयोगी पडेल. पुढे याचे काही पुस्तक वगैरे काढणार आहात का?

प्रचेतस 24/03/2025 - 12:17
चांगले संकलन. यातली बरीचशी मंदिरे पाहिली आहेत, काहींवर लेखही लिहिले आहेत. गोंदेश्वराच्या शिवपंचायतनात आयेश्वराच्या अंगणी अंजनेरीची भग्न मंदिरे दिंडोरीच्या शिवमंदिरात समुद्रमंथनाचा देखणा पट आहे.
लेखनविषय:
नर्मदा ते तुंगभद्राच्या जलरेघेतील महाराष्ट्रच्या ऐतिहासिक वारसास्थळांच्या अभ्यासास एकत्रित करण्यासाठी 'मध्ययुगीन मंदिरे' या संदर्भाने स्थळांची यादी करावयास घेतली आहे. याची सुरुवात राहत्या नाशिक जिल्ह्यापासुन करत आहे. या सर्व स्थळांना येत्या पाच वर्षात प्रत्यक्ष भेट देण्याचे व्यक्तिगत उद्दिष्ट ठेवले आहे. यातील वास्तुंचा विचार करताना मुख्यत्वेकरुन मराठापुर्व कालीन धार्मिक वास्तुंचाच विचार केला आहे. आंतरजालावरील उपलब्ध माहिती, गुगल लोकेशन व मॅपिंग करुन राज्यभरातील सर्व ठिकांणाचा एकत्रित नकाशा तयार होईल जो अभ्यासु व पर्यटकांसाठी उपयुक्त राहील.

प्रतिपश्चंद्र

विअर्ड विक्स ·

किसन शिंदे 19/03/2025 - 15:22
पुस्तकाच्या तुलनेत मालिका व्यवस्थित जमून आलेली नाही हे माझे वैयक्तिक मत आहे. कथेमध्ये खुप जास्त पोंटेशियल असूनही पटकथा व्यवस्थित न लिहिल्याने मालिका गंडलीय. अभिनयाच्या बाबतीत फक्त राजीव खंडेलवाल तेवढा एकटाच पुस्तकातल्या रवि या व्यतिरेखेशी साम्य दाखवणार वाटला. आणि न्यायाधिश दिक्षित एक.

In reply to by किसन शिंदे

प्रतिसादाबद्दल आभार . पुस्तक वाचलेलं नाही . पण एखाद्या पुस्तकावरून आधारित चित्रपट व मालिका पहाताना एक दोष जाणवतो तो म्हणजे कथासार अगोदरच माहित असते आणि संदर्भ माहित असल्यामुळे रंजकता नाहीशी होते . या लेखात मी दोन घटना संदर्भ दिले आहेत. कथा त्यावरून सुचली का काही सत्यता दडलेली आहे ह्याचा पुस्तकात उल्लेख केला असल्यास कळवावे.

सस्नेह 20/03/2025 - 21:48
मालिकेचे माहिती नाही. पुस्तक वाचले. मध्ये मध्ये जरा पाल्हाळिक वर्णन आहे तेवढे सोडले तर कथानक लक्षणीयरीत्या उत्कंठावर्धक आणि वेधक आहे. कादंबरी आवडली. मालिका बघेन जमल्यास.

In reply to by सस्नेह

प्रतिसादाबद्दल आभार . जरूर पहा . या लेखाचा उद्देशच हा आहे कि का आदित्य सरपोतदार सारख्या मराठी माणसास हि मालिका हिंदीत बनवावी लागली हे आपण जाणणे फार गरजेचे आहे. मराठी चित्रपट कोणी पाहत नाही आणि OTT वर कोणी विचारत नाही. मराठी भाषा अभिजात म्हणून घोषित केले तरी आजकालच्या जगात पुस्तकांपेक्षा द्रुकश्राव्य हे भाषा प्रसाराचे प्रभावी माध्यम ठरू शकते आणि इथेच आपण मागे पडतोय असे माझे प्रांजळ मत आहे.

In reply to by सस्नेह

बऱ्याच दिवसानी तुमचा प्रतिसाद पाहून आनंद वाटला! कश्या आहात ह्या मालिकेबद्दल ऐकून आहे. पाहीन लवकरच!

खरेतर दा विन्ची कोड नंतर अश्या साच्यावर बर्याच जणांनी कादंबर्या/मालिका/चित्रपट बनवुन हात धुवुन घेतले. एखादा पुरातन खजिना/रहस्य आणि त्याचा सांभाळ करणारे अथवा रहस्यातला एखादा भाग माहीती असणारे सध्याचे जमान्यातले वंशज वगैरे.बरेच क्रिप्टीक संदेश/श्लोक वगैरे आणि त्याची उकल करताना करावा लागणारा संघर्ष,त्यातले थ्रिल वगैरे वगैरे. ही मालिकाही त्याच पठडीतली आहे पण खजिना एकदम मिळतो ते थोडे अतर्क्य वाटले. तशी बरी आहे मालिका. वन टाईम वॉच.

In reply to by कानडाऊ योगेशु

प्रतिसादाबद्दल आभार . या लेखात मी दोन घटना संदर्भ दिले आहेत. आपले त्याविषयी काय मत आहे ? कारण त्या घटना संदर्भ कुठेतरी गुप्ततेस वाव देतात. १. इतके वर्षात का कोणी राज्यपाल इतिहास संशोधकाप्रमाणे आपल्याच घरात भुयार शोधू शकला नाही ? २. उत्तराखंड ची एक व्यक्ती का कोणताही विशेष दिवस नसताना शिवनेरी दर्शनास वयाच्या ७५ नंतर स्वतः चढत गेले ?

किसन शिंदे 19/03/2025 - 15:22
पुस्तकाच्या तुलनेत मालिका व्यवस्थित जमून आलेली नाही हे माझे वैयक्तिक मत आहे. कथेमध्ये खुप जास्त पोंटेशियल असूनही पटकथा व्यवस्थित न लिहिल्याने मालिका गंडलीय. अभिनयाच्या बाबतीत फक्त राजीव खंडेलवाल तेवढा एकटाच पुस्तकातल्या रवि या व्यतिरेखेशी साम्य दाखवणार वाटला. आणि न्यायाधिश दिक्षित एक.

In reply to by किसन शिंदे

प्रतिसादाबद्दल आभार . पुस्तक वाचलेलं नाही . पण एखाद्या पुस्तकावरून आधारित चित्रपट व मालिका पहाताना एक दोष जाणवतो तो म्हणजे कथासार अगोदरच माहित असते आणि संदर्भ माहित असल्यामुळे रंजकता नाहीशी होते . या लेखात मी दोन घटना संदर्भ दिले आहेत. कथा त्यावरून सुचली का काही सत्यता दडलेली आहे ह्याचा पुस्तकात उल्लेख केला असल्यास कळवावे.

सस्नेह 20/03/2025 - 21:48
मालिकेचे माहिती नाही. पुस्तक वाचले. मध्ये मध्ये जरा पाल्हाळिक वर्णन आहे तेवढे सोडले तर कथानक लक्षणीयरीत्या उत्कंठावर्धक आणि वेधक आहे. कादंबरी आवडली. मालिका बघेन जमल्यास.

In reply to by सस्नेह

प्रतिसादाबद्दल आभार . जरूर पहा . या लेखाचा उद्देशच हा आहे कि का आदित्य सरपोतदार सारख्या मराठी माणसास हि मालिका हिंदीत बनवावी लागली हे आपण जाणणे फार गरजेचे आहे. मराठी चित्रपट कोणी पाहत नाही आणि OTT वर कोणी विचारत नाही. मराठी भाषा अभिजात म्हणून घोषित केले तरी आजकालच्या जगात पुस्तकांपेक्षा द्रुकश्राव्य हे भाषा प्रसाराचे प्रभावी माध्यम ठरू शकते आणि इथेच आपण मागे पडतोय असे माझे प्रांजळ मत आहे.

In reply to by सस्नेह

बऱ्याच दिवसानी तुमचा प्रतिसाद पाहून आनंद वाटला! कश्या आहात ह्या मालिकेबद्दल ऐकून आहे. पाहीन लवकरच!

खरेतर दा विन्ची कोड नंतर अश्या साच्यावर बर्याच जणांनी कादंबर्या/मालिका/चित्रपट बनवुन हात धुवुन घेतले. एखादा पुरातन खजिना/रहस्य आणि त्याचा सांभाळ करणारे अथवा रहस्यातला एखादा भाग माहीती असणारे सध्याचे जमान्यातले वंशज वगैरे.बरेच क्रिप्टीक संदेश/श्लोक वगैरे आणि त्याची उकल करताना करावा लागणारा संघर्ष,त्यातले थ्रिल वगैरे वगैरे. ही मालिकाही त्याच पठडीतली आहे पण खजिना एकदम मिळतो ते थोडे अतर्क्य वाटले. तशी बरी आहे मालिका. वन टाईम वॉच.

In reply to by कानडाऊ योगेशु

प्रतिसादाबद्दल आभार . या लेखात मी दोन घटना संदर्भ दिले आहेत. आपले त्याविषयी काय मत आहे ? कारण त्या घटना संदर्भ कुठेतरी गुप्ततेस वाव देतात. १. इतके वर्षात का कोणी राज्यपाल इतिहास संशोधकाप्रमाणे आपल्याच घरात भुयार शोधू शकला नाही ? २. उत्तराखंड ची एक व्यक्ती का कोणताही विशेष दिवस नसताना शिवनेरी दर्शनास वयाच्या ७५ नंतर स्वतः चढत गेले ?
लेखनविषय:
लेखनप्रकार
नमस्कार मंडळी ! ऐतिहासिक मराठी पार्श्वभूमीवर हिंदी जाल दुनियेतील मालिका बघण्याचा मनसुबा असेल तर पुढील लेख वाचून आपणास एक पर्याय मिळू शकतो. " प्रतिपश्चंद्र " हि डॉ प्रकाश कोयंडे लिखित एक ऐतिहासिक रहस्य कादंबरी आहे. या कादंबरीवर आधारित " द सिक्रेट्स ऑफ शिलेदार " हि मालिका तप्ततारा जालदुनियेवर उपलब्ध आहे. "NATIONAL TREASURE MOVIE " पठडीतील हि मालिका आहे. हि मालिका आदित्य सरपोतदार यांनी दिग्दर्शित केली आहे. मध्यवर्ती भूमिकेत राजीव खंडेलवाल आणि सई ताम्हणकर आहेत. जोडीला दिलीप प्रभावळकर ,आशिष विद्यार्थी आणि कानन अरुणाचलम आहेत. रहस्य कथा असल्यामुळे कथाविस्तार टाळतो.

राजकुमार, बुटका आणि राक्षस: नवी कहाणी

विवेकपटाईत ·

चित्रगुप्त 05/03/2025 - 13:33
रशियाचे तुकडे झाले तेंव्हा
-- म्हणजे सोव्हिएत युनियनचे ना ? गेल्या ३- ४ शतकांतला युक्रेन/रशियाचा इतिहास काय आहे तेही या निमित्ताने धागाकर्त्याने अभ्यास करून लिहावे, ही विनंती.

युक्रेन युरोप-अमेरिकेला प्रसन्न करण्यासाठी रशिया विरोधी भूमिका घेत राहिला
युक्रेनच्या दृष्टीने विचार केला तर त्यांनी रशियाविरोधी भूमिका घेणे पूर्णपणे समजता येते. गेल्या काही शतकांच्या इतिहासात युक्रेन फारच कमी काळ स्वतंत्र राहिला होता. कधी रशियन, कधी पोलिश, कधी लिथुएनियन साम्राज्याचा भाग तो राहिला. युक्रेन इतरांना लाख हवा असेल पण युक्रेनच्या लोकांना स्वतंत्र राहायचे असेल तर काय? मग संघर्ष अटळ आहेच. २० व्या शतकात १९२२ मध्ये युक्रेन सोव्हिएट युनियनचा भाग झाल्यानंतर १९३० च्या दशकात स्टालिनने केलेल्या सामुहिक शेतीच्या तुघलकी शेख महंमदी प्रयोगामुळे युक्रेनमध्ये मानवनिर्मित दुष्काळ आला आणि लाखो लोक मारले गेले. स्टालिनच्या अत्याचारांचा वरवंटा युक्रेनमध्ये जोरदार चालला. खरं तर हिटलरने सोव्हिएट युनियनवर हल्ला केला तेव्हा सुरवातीला बर्‍याच ठिकाणी नाझी सैन्याचे मुक्तीदाते म्हणून स्थानिक लोकांनी स्वागत केले होते इतके अत्याचार स्टालिनने केले होते. दुसरे महायुध्द संपल्यावरही सोव्हिएट वरवंटा युक्रेनमध्ये चालू होताच. दुसर्‍या महायुध्दात युक्रेनमध्ये प्रचंड हानी झाली होती. त्यामुळे तिथे पुनर्निमाणासाठी मदत म्हणून रशियन लोक युक्रेनच्या पूर्व भागात वसविले गेले. डॉनबास भागात रशियन लोकांची बहुसंख्या दिसते त्याचे कारण ते आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर युक्रेनमध्ये रशियाविरोधी वातावरण असेल तर त्यात धक्कादायक असे काहीच नाही. मुळात सोव्हिएट युनियन मध्ये जे १५ प्रदेश होते त्यातील एक बेलारूस वगळता बर्‍याचशा इतर प्रदेशांचे रशियाशी काहीही घेणेदेणे नव्हते. लेनिन आणि त्यापेक्षा मोठ्या स्टालिन या दोन बोक्यांनी ते प्रदेश आपल्या टाचेखाली आणले होते. इस्टोनिया, लाटव्हिया आणि लिथुएनिया या बाल्टिक देशांना आणि मोल्दोवाला स्टालिनने दुसरे महायुध्द संपताना आपल्याकडे ओढून घेतले होते. अशा देशांमध्ये रशियाविरोधी वातावरण असले तर त्यात नवल काय? तेव्हा युक्रेन रशियाविरोधी भूमिका घेत होता हे म्हणणे ठीक आहे पण तशी भूमिका तो का घेत होता हे पण बघायला हवे.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

युक्रेन इतरांना लाख हवा असेल पण युक्रेनच्या लोकांना स्वतंत्र राहायचे असेल तर काय?
बरोब्बर. आताही हाच मुद्दा आहे. पुतिन आणी कंपनीचा ईतिहास सर्वाना माहित आहे. फक्त बलाढ्य आहे म्हणुन युक्रेनने शरण जावे असे वाटणे वेडेपणाचे आहे. युक्रेनमधील सरकार अस्थिर करणे, नेत्यांना/सरकारी अधिकार्याना पैसे चारुन व्यवस्था खिळखिळी करणे हे उद्योग पुतिन ह्यांनी अनेक वर्षे आरंभले आहेत. सध्याचे व्हिडियो/अहवाल पाहिलेत तर दिसते की युक्रेनमधील नागरिक मरायलाही तयार आहेत. 'मेलो तेरी बेहत्तर पण रशियाला शरण जायचे नाही' ही तेथील लोकभावना आहे.लोकांना भुकेले ठेउन मारणे, विष घालुन मारणे.. हे प्रकार रशियन सत्ताधार्यांनी अनेक्वेळा केले आहेत व पुतिन ते अनेकवेळा करतात. तेव्हा रशियाला शरण गेलो तर आपली पुढची पिढी पुतिन बरबाद करतील ही भीती नागरिकांना आहे.

तुमचे लाडके ट्रम्प तात्या, बघा काय बोलत आहेत, भारताबद्दल ... Donald Trump ने अमेरिकी कांग्रेस को संबोधित करते हुए India, Pakistan पर क्या कहा? (BBC Hindi) #https://www.youtube.com/watch?v=YvHaYiWyCeI

In reply to by आंद्रे वडापाव

'ट्रम्प आमचे ,बायडेन तुमचे' करणार्या काही भारतियांसाठी हा धडा आहे. उद्या एखाद्याची एच.वन.बी व्हिसाची मुदत संपली तर त्याचे हात-पाय नेट्वर्क केबलने बांधुन, गळ्यात लॅपटॉप अडकवुन भारतात पाठवायला ट्रम्प कमी करणार नाही.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

वामन देशमुख 05/03/2025 - 18:34
'ट्रम्प आमचे ,बायडेन तुमचे' करणार्या काही भारतियांसाठी हा धडा आहे.
"बायडेन आमचे, ट्रम्प तुमचे" करणाऱ्या काही भारतीयांसाठी काय धडा आहे?

In reply to by वामन देशमुख

सध्या तरी बायडेन सरकार परवडले असेच सगळे जग म्हणतय ना?. २०१६-२०२० ह्या कालवधीत जेवढा घातला होता त्याहुन अधिक धिंगाणा ट्रम्प घालेल असे दिसतय. अध्य़क्ष झाल्यापासुन त्यानी डझनावारी खोटी विधाने केली आहेत(बर्नी सँडर्स ह्यांचे भाषण ऐका). 'बिनधास्त फेकायचे कारण झेलायला अनेकजण आहेत.' भविष्यात कळेलच.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

उद्या एखाद्याची एच.वन.बी व्हिसाची मुदत संपली तर त्याचे हात-पाय नेट्वर्क केबलने बांधुन, गळ्यात लॅपटॉप अडकवुन भारतात पाठवायला ट्रम्प कमी करणार नाही.
बरं मग?समजा एच-१ ची मुदत संपली, रिन्युअल होत नसेल आणि तरीही संबंधित मनुष्य अमेरिकेतच राहात असेल तर अशा व्यक्तीविषयी अमेरिका सरकारने काय करावे असे वाटते? एच-१ व्हिसा हा मर्यादित कालावधीसाठी कायदेशीर स्टेटसवर काम करण्यासाठी परदेशी नागरीकांना दिलेला व्हिसा असतो ना? तसा व्हिसा मिळणे हा काय भारतीयांचा जन्मसिध्द अधिकार आहे का? व्हिसाची मुदत संपत असेल तर अशा परदेशी नागरीकांनी आपण होऊन निघून जावे अशी अपेक्षा अमेरिका सरकारची असेल तर त्यात काय चूक आहे? व्हिसाची मुदत संपल्यावरही परदेश सोडून न जाणे हा गुन्हा आहे. अशा गुन्हेगारांना अमेरिका सरकारने का म्हणून सहानुभूती दाखवायची? जाता जाता- मी अमेरिकेत विद्यार्थी म्हणून राहिलो आहे. आणि तिथे भारतीय विद्यार्थी नोकर्‍या मिळवायला कसले एकेक जुगाड करतात हे अगदी जवळून बघितले आहे. आमच्या विद्यापीठातील अनेक विद्यार्थ्यांनी, अगदी माझ्या मित्रांनीही ते जुगाड केले आहेत. असले जुगाड करून देणारे कन्सलटन्ट्स असतात. ते त्या विद्यार्थ्यांना त्यांचा सीव्ही बनवून देतात. त्या विद्यार्थ्यांना आपलाच सीव्ही बघितला तर त्यातील नाव वगळता काहीही परिचयाचे दिसायचे नाही कारण सीव्ही बनविताना ते खोटा अनुभव दाखवतात, एखाद्या क्षेत्रात (समजा जावा) काम करायचा अनुभव शून्य असेल तरी चार वर्षे त्यात काम केले आहे असे सीव्हीवर दाखवतात. असा खोटा अनुभव दाखविताना ज्या ठिकाणी संबंधित विद्यार्थी चांगला आहे असा रेफरन्स देणारे कन्सल्टन्टचे लोक पेरलेले असतात त्याच कंपनीचा अनुभव दाखविला जातो. ते विद्यार्थी ओपीटीवर असताना कन्सलटन्ट त्या विद्यार्थ्यांना त्यांच्याच जाळ्यातून पूर्वी गेलेल्यांकडून ट्रेनिंग देतात आणि इंटरव्ह्यू पार पाडता येईल इतके बाळकडू देतात. तो विद्यार्थी कागदावर त्या कन्सलटन्टकडे नोकरीला असतो आणि तो कन्सलटन्ट त्यांना क्लाएंट साईटवर कुठेतरी पाठवतो. क्लाएंटला जितके बिलिंग करतात त्याच्या ५०-६०% रक्कम विद्यार्थ्याला दिली जाते आणि उरलेली तो कन्सलटन्ट स्वतः ठेवतो. त्यावर जॉब सपोर्ट म्हणून आणखी एक प्रकार असतो. एखाद्याने चार वर्षाचा खोटा अनुभव दाखवला तर त्याच्याकडून ज्या पातळीचे काम केले जाईल ही अपेक्षा असेल ती कशी पूर्ण होणार? मग एखादा कठीण प्रश्न आला की फक्त I will get back to you on this tomorrow असे म्हणायचे आणि कन्सलटन्टच्या जॉब सपोर्टवाल्यांना फोन करून त्या प्रश्नाचे उत्तर मिळवायचे आणि दुसर्‍या दिवशी ते द्यायचे. असला सगळा जुगाडू प्रकार चालू असतो. अशातून तरून गेलेले लोक ओपीटीवरून एच-१ वर गेले आहेत. हा सगळा गोलमाल करणार्‍यांचे समर्थन का करायचे? ते भारतीय आहेत म्हणून? आता ट्रम्पतात्यांचे सरकार असले प्रकार करणार्‍या कन्सलटन्ट लोकांवर उठले आहे असे दिसते. https://timesofindia.indiatimes.com/world/us/us-and-world/international-students-who-were-victims-of-opt-fraud-have-more-to-worry-about-must-take-legal-recourse-to-clear-their-name/articleshow/118730845.cms त्यात तात्यांचे काहीही चुकले असे वाटत नाही. असला खोटारडेपणा करून अमेरिकेत राहणारे परदेशी लोक त्यांना नको असतील तर अमेरिकेचे अध्यक्ष या नात्याने त्यांचे नक्की काय चुकले? वरील बातमीत आणखी एक गोष्ट दिली आहे. असले प्रकार करून ओपीटीवरून एच-१ वर पूर्वी गेलेल्या काहींना भारत भेटीनंतर अमेरिकेला परत जाताना विमानतळावरच प्रवेश नाकारला गेला. त्यात तात्यांच्या सरकारचे नक्की काय चुकले? शेवटी चोरी ती चोरीच ना? अशी चोरी पकडली जाईल तेव्हा शिक्षा दिली तर काय चुकले? इतकी वर्षे आम्हाला शिक्षा दिली नाही आणि आता कशी देता असा बचाव चोर करू शकतो? एकूणच तात्या भरपूर रॅश आहेत, आक्रस्ताळे आहेत, मनाला येईल ते वाटेल ते बोलतात वगैरे सगळ्या गोष्टी मान्य. पण ते करत आहेत त्यातील अनेक गोष्टी अमेरिकेच्या (आणि जगाच्याही) हिताच्या आहेत असे दिसते. युएस एडच्या नावाने घाना की बुर्किना फासो मध्ये ट्रान्सजेंडर लोकांच्या ऑपरेशनसाठी पैसे अमेरिकेच्या करदात्यांनी का भरायचे? कोणत्या कोणत्या देशात रेजिम चेंजसाठी, मतदान प्रभावित करायला पैसे अमेरिकेच्या करदात्यांनी का भरायचे?भारतातही एकेकाळी शेतकरी आंदोलनाच्या वेळेस त्या रिकामटेकड्यांना पिझ्झा काय आणि मसाज काय आणि इतर ऐशोरामांची व्यवस्था केली गेली होती. आता अगदी भगवंत माननेही तथाकथित शेतकरी आंदोलकांवर बडगा उगारलेला दिसत आहे. तिकडून येणारा पैसा आटला म्हणून ते होत आहे की नाही मला माहित नाही. बायडन आजोबा अध्यक्ष असताना एखादा माणूस एल.जी.बी.टी. क्यू + आणि आणखी काय काय नसेल तर त्याच्यात काहीतरी खोट आहे असे वाटावे असे वातावरण निर्माण होत आहे की काय असे एखाद्याला वाटावे. असला प्रकार तात्यांच्या काळात बंद केला जात आहे. दुसर्‍या महायुध्दापासून अमेरिकेच्या प्रत्येक अध्यक्षाने इतर अनेक देशात जाऊन काड्या घातल्या आहेत. अगदी गोग्गोड बोलून मोठ्या मोठ्या गप्पा मारणार्‍या ओबामानेही सिरीया आणि लिबियात काड्याच घातल्या होत्या. बायडनने बांगलादेशात काड्या घातल्या होत्या. महंमद युनूसला प्रेसिडेंशिअल मेडल ऑफ फ्रिडम ओबामानेच दिले होते. बहुदा त्याच्या काळापासूनच बांगलादेशात काड्या घालायचा प्रयत्न चालू झाला असावा. जगात जिथेतिथे नाक खुपसायची अमेरिकेची घाणेरडी सवय कमी करून आमचे आम्ही बघतो असे कोणी अध्यक्ष करत असेल तर त्याचे स्वागत करायचे की त्यालाच विरोध करायचा? टॅरीफ वगैरे प्रकरणात तात्या आपल्याला पाहिजे तशी भूमिका घेत नसतीलही. पण कोणीही अमेरिकन अध्यक्ष १००% आपल्याला अनुकूल करेल अशी अपेक्षा कशी करता येईल? बेकायदेशीरपणे घुसलेल्यांना किंवा व्हिसा संपल्यावरही तिथे राहणार्‍यांना ट्रम्पतात्या हाकलत असतील तर त्यात त्यांचे काही चुकले असे मला तरी अजिबात वाटत नाही. बाकी कोणी काहीही म्हणो. मी तर ट्रम्पतात्यांचा या घडीला तरी मोठ्ठा फॅन आहे. त्यातून भविष्यात तात्या दुसरे निक्सन किंवा रेगन झाले तर त्यांना पण विरोधच करू. तशी अमेरिकेच्या अध्यक्षांना विरोध करायची एक भारतीय म्हणून आपल्याला सवयच आहे. ट्रम्पतात्या तसेच वागायला लागले तर त्यांनाही विरोध करू. हाकानाका. तसाही आपण विरोध करून किंवा आपण त्यांचे फॅन असून कोणाला घंटा फरक पडतो? व्हाईट हाऊसच्या प्रांगणातील झाडाचे एक पानही त्यामुळे पडायचे नाही. ट्रम्पतात्या या घडीला माझ्यासारखे तुमच्या बरोबरच.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

"अमेरिका सरकारने काय करावे असे वाटते?" ट्रम्पोजीच्या आक्रस्ताळी स्वभावाबद्दल म्हणत आहे. अमेरिकेने व्हीसा मुदत संपलेल्या लोकांवर उपकार करावेत असे कोणीच म्हणत नाही. असो. कॅनडाच्या जस्टिन ट्रुडोनी अमेरिकेला ऐकवलेच.(https://www.youtube.com/watch?v=wz_42pckM7w&t=159s ) चीनने ही प्रत्युत्तर दिले (https://www.youtube.com/watch?v=RyHbpiOotB8 ) भारतात अजूनही शांतताच पसरली आहे.(कूटनीती इन प्रोग्रेस ?)

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

ट्रम्पतात्या या घडीला माझ्यासारखे तुमच्या बरोबरच. अहो मी तर तात्यांचा २०१६ पासून फॅन आहे. तात्या म्हणजे काळीज! मला तात्याभक्त म्हटले तरीही चालेल!

In reply to by अमरेंद्र बाहुबली

डोनाल्ड ट्रम्पास तात्या म्हंटले की गुजरातमधील जवाहिर्यांच्या/कारगिरांच्या आत्महत्या कमी होणार आहेत का? २ एप्रिलपासुन ट्रम्पाने आयात शुल्क २०% वर नेले की मग आतमह्त्या वाढण्याची शक्यता आहे. https://www.youtube.com/watch?v=KkttlEK_wg8

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

अहो माई, तात्यांनी समजा तसे काही केले आणि समजा त्यामुळे गुजरात किंवा इतर ठिकाणच्या ५०-१०० कारागिरांनी आत्महत्या केल्या तर वाईटच. त्याविषयी काहीच दुसरे मत असू शकणार नाही. पण दुसरी बाजू पण लक्षात घे की. अमेरिकेच्या आधीच्या अध्यक्षांनी जगात विविध ठिकाणी किती लाख लोकांना मारले होते? जर तात्या इतर देशांमधील अमेरिकेची नाक खुपसायची घाणेरडी सवय कमी करत असतील तर ते चांगले नाही का?५०-१००-५००-१००० कारागिर मारले जाणे वाईटच पण लाखो लोक मारले जाण्यापेक्षा त्या मानाने कमी वाईट नाही का?

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

माई आपल्या देशात झालेल्या आत्महत्यांना दुसऱ्या देशाचा राष्ट्राध्यक्ष कसा जबाबदार असेल? आपल्या पंतप्रधान जबाबदार असेल ना? आपण कुणाशी संबंध चांगले ठेवले आहेत?

In reply to by अमरेंद्र बाहुबली

"डोनाल्ड ट्रम्प माझे मित्र आहेत" असे पंतप्रधानच म्हणत होते ना? भारतावर आयात शुल्क आधीसारखेच असेल असे ह्यांनाही वाटले होते. ट्रम्प ह्यांची निवड झाल्या झाल्या जयशंकर ताबडतोब अमेरिकेला रवाना झाले होते.ट्रम्प भारत्,चीन्,कॅनडा ह्यांना एकाच तराजुत तोलत असतील तर मग ईतके दिवस गप्प राहण्याचा आणी तिकडे जाउन 'चर्चा' करण्याचा फायदा काय झाला?

रशियाचे तुकडे झाले तेंव्हा युक्रेनच्या पूर्व आणि दक्षिण भागात रशियन बोलणारे जास्त होते. त्या वेळी रशियन बोलणारा भाग रशियात विलीन झाला असता तर आज ही समस्या उत्पन्न झाली नसती.
याच न्यायाने भारतातील पंजाब पाकीस्तानात आणि भारतातील बंगाल बांग्लादेशात जायला हवे काय ?

In reply to by धर्मराजमुटके

सुबोध खरे 06/03/2025 - 09:45
मी उलट म्हणतो, पाकिस्तानी पंजाब आणि बांगला देश भारतात यायला हवा. कारण हे भाग मूळ भारताचे होते. परंतु भारतात फाळणी हि भाषेवरआधारित झालेली नसून धर्मावर आधारित झालेली आहे त्यामुळे हे उदाहरण तसे गैरलागू आहे

विवेकपटाईत 07/03/2025 - 13:06
अमेरिकेची शत्रुता महागात पडते पण मैत्री विनाशाला कारणीभूत ठरते. अमेरिकेने सुरवातीला शस्त्र मदत दिली नसती तर किमान युक्रेन ने शांततेसाठी रशियाची वाटाघाटी केली असती. https://www.facebook.com/share/v/17TtUzNXxN/

In reply to by विवेकपटाईत

व्वा काका , एक तर फेसबुक च्या लिंक देताय ... तुम्हाला एक सुचवणी करू का ? तुम्ही थोडा इतिहास वाचा किंवा जाणून घ्या , या भागाचा ... मग तुम्ही मत व्यक्त कराल का ? तुम्हाला माहिती आहे का अमेरिकेच्याच सांगण्यावरून युक्रेनला आण्विक शस्त्र सोडून द्यावी लागली कारण त्याबदल्यात अमेरिका सुरक्षा छत्र देणार होता ..

In reply to by आंद्रे वडापाव

Ukraine once had the world’s 3rd largest nuclear arsenal; but gave up its weapons for this reason Read more at: https://economictimes.indiatimes.com/news/international/us/ukraine-once-had-the-worlds-3rd-largest-nuclear-arsenal-but-gave-up-its-weapons-for-this-reason/articleshow/118765127.cms?utm_source=contentofinterest&utm_medium=text&utm_campaign=cppst Ukraine made a significant move in 1994 when it signed the Budapest Memorandum. The United States, the United Kingdom, and Russia were also signatories. Ukraine agreed to remove all its nuclear weapons in return for a guarantee of sovereignty and territorial integrity of the country. The memorandum also provided that these three nations would not attack Ukraine militarily and would request the UN to intervene in case of any threat to the sovereignty of the country. #https://economictimes.indiatimes.com/news/international/us/ukraine-once-had-the-worlds-3rd-largest-nuclear-arsenal-but-gave-up-its-weapons-for-this-reason/articleshow/118765127.cms?from=mdr

In reply to by आंद्रे वडापाव

सुबोध खरे 13/03/2025 - 20:08
@आंद्रे वडापाव There were several important reasons that led Ukraine towards nuclear disarmament. First of all, although it had the weapons at its disposal, it was unable to launch them on its own. The launch keys and other controls were left with Moscow, making the weapon system ineffective as a deterrent. आपण दिलेला दुवा आपणच वाचलेला दिसत नाही. युक्रेन कझाखस्तान सारख्या सोव्हिएत युनियनच्या देशांनी आपली अण्वस्त्रे परत केली ते काही सभ्य आणि सुसंस्कृत आहेत म्हणून नव्हे तर त्याचा वापर त्यांना करणे अशक्य होते म्हणून आणि ठेवल्या जागी गंज लागला तर त्यातून होणार किरणोत्सार भीषण असतो. यामुळेच अण्वस्त्रे म्हणजे काही सोने नव्हे कि काही ना करता तिजोरीत ठेवले तर तसेच राहते. त्यांची वेळोवेळी देखभाल करावीच लागते. हे सर्व सव्यापसव्य करणं युक्रेनला अशक्य होतं. बाकी झेलेन्स्की आम्ही शांततेचे दूत असून शांततेसाठी अण्वस्त्रे परत केली असे कधी म्हणाल्याचे आठवत नाही. अण्वस्त्रधारी देशांचे पंतप्रधान किंवा अध्यक्ष आपल्याबरोबर काही हौसेनं ब्रिफ केस घेऊन फिरत नाहीत. त्यात या अण्वस्त्रांची आणि ती धारण केलेल्या क्षेपणास्त्रांची कोड त्यांच्या कडे सुरक्षित असतात. एखादा माथेफिरू लष्करी अधिकारी सहज दुसऱ्या देशावर अण्वस्त्रे डागेल अशी शक्यता शून्य असते. बाकी तुमचं चालू द्या

In reply to by सुबोध खरे

कदाचित आपल्याला कल्पना नसेल, अण्वस्त्रां तुलनेत, क्षेपणास्त्र आणि विमान (डिलिव्हरी सिस्टिम) तंत्रज्ञान तुलनेत जास्त सोपे असते. अण्वस्त्रां आणि त्याचे तंत्रज्ञान अवाच्या सव्वा किमतीला हसत हसत खरेदी इच्छुक इराण आणि इराक सारखे जगात खूप आहेत/होते. असो लेख मी पूर्ण वाचूनच प्रतिक्रिया देतो... पण आपणास लेखाचा मुद्दा समजला नाहीये बहुदा.. बाकी चालू द्यात...

In reply to by आंद्रे वडापाव

सुबोध खरे 19/03/2025 - 20:14
The launch keys and other controls were left with Moscow, making the weapon system ineffective as a deterrent. हे आपणच दिलेल्या दुव्यात आहे. माझे ज्ञान नाही. अण्वस्त्रे नेणारी क्षेपणास्त्रे तयार करणे आणि ती उत्तम स्थितीत ठेवणे हि आपण म्हणता तशी भाजी आणण्यासारखी बाजारात पैसे टाकून आणण्याची वस्तू नाही. तसे असते तर इराण ने आतापर्यंत इस्रायल वर अणुहल्ला करून त्याचा विध्वंस केला असता. किंवा इंग्लंड सारखा एकेकाळी बलाढ्य असणाऱ्या आणि जगावर राज्य करणाऱ्या देशाने अमेरिकेचे ट्रायडेंट हे क्षेपणास्त्र आपल्या अणुपाणबुड्यांवर ठेवले नसते. ""अण्वस्त्रां तुलनेत, क्षेपणास्त्र आणि विमान (डिलिव्हरी सिस्टिम) तंत्रज्ञान तुलनेत जास्त सोपे असते."" नक्की का? मग भारताचे राजकारणी आणि शास्त्रज्ञ मूर्ख असावेत. कारण भारताने १९७४ मध्ये पहिला अणुस्फोट केला. पृथ्वी हे आपले पहिले क्षेपणास्त्र याचा प्रकल्प १९८३ मध्ये चालू झाला आणि पहिले सफल परीक्षण १९८८ साली झाले. तेजस अणुबॉम्ब नेऊ शकेल का याबद्दल मला माहिती नाही. परंतु अणुबॉम्ब नेण्यासाठी भारत मिराज २०००, जग्वार सुखोई ३० आणि आता राफेल या परदेशी विमानांवर अवलंबून आहे बाकी आपण सर्वज्ञ आहात तेंव्हा यावर मी अधिक बोलू इच्छित नाही

In reply to by आंद्रे वडापाव

विवेकपटाईत 10/03/2025 - 11:38
मला इतिहास ही माहीत आहे आणि सीआयए कशी काम करते इथल्या सर्वांपेक्षा उत्तम माहीत आहे. कारण मी प्रत्यक्ष काम केलेले आहे. बाकी अमेरिकेने बुटक्याला शस्त्र दिले आणि त्याला राक्षसा विरुद्ध सोडले. हे सर्वांनी प्रत्यक्ष बघितले आहे. अफगाणिस्तान असो वा विएतनाम अमेरिका तेथे अमेरिकेच्या तालावर नाचणार्‍या सत्ताधार्‍यांना वार्‍यावर सोडून अमेरिकेने माघार घेतली होती. हा इतिहास बहुतेक तुम्ही वाचला नसावा. युक्रेनच्या जनतेने अमेरिका आणि युरोप प्रायोजित झेलेंस्कीला निवडले त्याचे परिणाम युक्रेनची जनता भोगणार.

In reply to by विवेकपटाईत

सीआयए कशी काम करते इथल्या सर्वांपेक्षा उत्तम माहीत आहे.
अहो काका त्याच्याच मुळे आधी लिहिलय ... भारतामध्ये "जे एन दीक्षित" नंतर... पटाईत काकाच एकमेव फक्त ... जयशंकर तर पटाइटांच्या पासंगालाही पुरणार नाही ... कारण जी काय अक्कल आहे ती आपल्यालाच आहे , असा गंड मला तरी नाही ...

In reply to by आंद्रे वडापाव

विवेकपटाईत 16/03/2025 - 19:37
मला कसलाही अहंगंड आणि घेऊन न्यूनगंड नाही. फक्त तुमच्या प्रतिक्रियेचे उत्तर दिले. बाकी फक्त एक अजेंडा मनात ठेवून परिस्थितीचे विश्लेषण करणे बंद करा डोळे उघडून सत्य पाहायला शिका.

In reply to by विवेकपटाईत

बाकी फक्त एक अजेंडा मनात ठेवून परिस्थितीचे विश्लेषण करणे बंद करा डोळे उघडून सत्य पाहायला शिका.
हेच मी तुम्हाला सान्गत होतो वरती .. पण फक्त अप्रत्यक्श्पणे

यूक्रेनपुढे दोनच पर्याय आहेत! रशियाच्या संगतीने गरीब राहणे किंवा अमेरिका/युरोपच्या नादी लागून रशियाविरोधात जाऊन मरणे! माझ्यामते गरीब राहणे मारण्यापेक्षा चांगले आहे.

तुम्हाला इंटरनॅशनल-डंकापती चा -भक्त व्हायचं का? जरूर व्हा. आमचे काही म्हणणे नाही.... पहिली गोष्ट म्हणजे- कसलाही न्यूनगंड बाळगू नका. आणि प्रत्येक बाबतीमध्ये डंकापती सारखे मत व्यक्त करायला शिका. म्हणजे आपण कोण आहोत, आपला शैक्षणिक दर्जा काय, एकूण कर्तृत्त्व काय, याचा अजिबात विचार न करता मत ठोकून द्यायचं. विषय कुठलाही असो. म्हणजे आता "युक्रेनची भु राजकीय सामरिक घडी नीट बसवण्याचा खरा मार्ग कोणता?" या विषयावरती, आपण स्वतः शासनात भलेही, उंदीर मारायच्या विभागात नोकरीला होतो, हे विसरून मत ठणकावता आले पाहिजे. युक्रेनची भु राजकीय सामरिक स्थिती - ठोका...

निनाद 23/03/2025 - 13:31
रशिया-युक्रेन युद्धाच्या पैलूंचे चांगले विश्लेषण. या युद्धामध्ये माहिती युद्धाचे महत्त्व दुर्लक्षित केले जाऊ शकत नाही. दोन्ही बाजूंकडून प्रसार माध्यमांचा वापर करून जनतेची मते प्रभावित करण्याचा प्रयत्न केला गेला आहे आणि आपण सर्व त्याचे बळी आहोत. विचारप्रवर्तक लेखन आहे. ऐतिहासिक संदर्भ, आंतरराष्ट्रीय राजकारण आणि आर्थिक परिणाम यांसारख्या विषयांवर प्रकाश टाकल्याबद्दल लेखकाचे अभिनंदन.

चित्रगुप्त 05/03/2025 - 13:33
रशियाचे तुकडे झाले तेंव्हा
-- म्हणजे सोव्हिएत युनियनचे ना ? गेल्या ३- ४ शतकांतला युक्रेन/रशियाचा इतिहास काय आहे तेही या निमित्ताने धागाकर्त्याने अभ्यास करून लिहावे, ही विनंती.

युक्रेन युरोप-अमेरिकेला प्रसन्न करण्यासाठी रशिया विरोधी भूमिका घेत राहिला
युक्रेनच्या दृष्टीने विचार केला तर त्यांनी रशियाविरोधी भूमिका घेणे पूर्णपणे समजता येते. गेल्या काही शतकांच्या इतिहासात युक्रेन फारच कमी काळ स्वतंत्र राहिला होता. कधी रशियन, कधी पोलिश, कधी लिथुएनियन साम्राज्याचा भाग तो राहिला. युक्रेन इतरांना लाख हवा असेल पण युक्रेनच्या लोकांना स्वतंत्र राहायचे असेल तर काय? मग संघर्ष अटळ आहेच. २० व्या शतकात १९२२ मध्ये युक्रेन सोव्हिएट युनियनचा भाग झाल्यानंतर १९३० च्या दशकात स्टालिनने केलेल्या सामुहिक शेतीच्या तुघलकी शेख महंमदी प्रयोगामुळे युक्रेनमध्ये मानवनिर्मित दुष्काळ आला आणि लाखो लोक मारले गेले. स्टालिनच्या अत्याचारांचा वरवंटा युक्रेनमध्ये जोरदार चालला. खरं तर हिटलरने सोव्हिएट युनियनवर हल्ला केला तेव्हा सुरवातीला बर्‍याच ठिकाणी नाझी सैन्याचे मुक्तीदाते म्हणून स्थानिक लोकांनी स्वागत केले होते इतके अत्याचार स्टालिनने केले होते. दुसरे महायुध्द संपल्यावरही सोव्हिएट वरवंटा युक्रेनमध्ये चालू होताच. दुसर्‍या महायुध्दात युक्रेनमध्ये प्रचंड हानी झाली होती. त्यामुळे तिथे पुनर्निमाणासाठी मदत म्हणून रशियन लोक युक्रेनच्या पूर्व भागात वसविले गेले. डॉनबास भागात रशियन लोकांची बहुसंख्या दिसते त्याचे कारण ते आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर युक्रेनमध्ये रशियाविरोधी वातावरण असेल तर त्यात धक्कादायक असे काहीच नाही. मुळात सोव्हिएट युनियन मध्ये जे १५ प्रदेश होते त्यातील एक बेलारूस वगळता बर्‍याचशा इतर प्रदेशांचे रशियाशी काहीही घेणेदेणे नव्हते. लेनिन आणि त्यापेक्षा मोठ्या स्टालिन या दोन बोक्यांनी ते प्रदेश आपल्या टाचेखाली आणले होते. इस्टोनिया, लाटव्हिया आणि लिथुएनिया या बाल्टिक देशांना आणि मोल्दोवाला स्टालिनने दुसरे महायुध्द संपताना आपल्याकडे ओढून घेतले होते. अशा देशांमध्ये रशियाविरोधी वातावरण असले तर त्यात नवल काय? तेव्हा युक्रेन रशियाविरोधी भूमिका घेत होता हे म्हणणे ठीक आहे पण तशी भूमिका तो का घेत होता हे पण बघायला हवे.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

युक्रेन इतरांना लाख हवा असेल पण युक्रेनच्या लोकांना स्वतंत्र राहायचे असेल तर काय?
बरोब्बर. आताही हाच मुद्दा आहे. पुतिन आणी कंपनीचा ईतिहास सर्वाना माहित आहे. फक्त बलाढ्य आहे म्हणुन युक्रेनने शरण जावे असे वाटणे वेडेपणाचे आहे. युक्रेनमधील सरकार अस्थिर करणे, नेत्यांना/सरकारी अधिकार्याना पैसे चारुन व्यवस्था खिळखिळी करणे हे उद्योग पुतिन ह्यांनी अनेक वर्षे आरंभले आहेत. सध्याचे व्हिडियो/अहवाल पाहिलेत तर दिसते की युक्रेनमधील नागरिक मरायलाही तयार आहेत. 'मेलो तेरी बेहत्तर पण रशियाला शरण जायचे नाही' ही तेथील लोकभावना आहे.लोकांना भुकेले ठेउन मारणे, विष घालुन मारणे.. हे प्रकार रशियन सत्ताधार्यांनी अनेक्वेळा केले आहेत व पुतिन ते अनेकवेळा करतात. तेव्हा रशियाला शरण गेलो तर आपली पुढची पिढी पुतिन बरबाद करतील ही भीती नागरिकांना आहे.

तुमचे लाडके ट्रम्प तात्या, बघा काय बोलत आहेत, भारताबद्दल ... Donald Trump ने अमेरिकी कांग्रेस को संबोधित करते हुए India, Pakistan पर क्या कहा? (BBC Hindi) #https://www.youtube.com/watch?v=YvHaYiWyCeI

In reply to by आंद्रे वडापाव

'ट्रम्प आमचे ,बायडेन तुमचे' करणार्या काही भारतियांसाठी हा धडा आहे. उद्या एखाद्याची एच.वन.बी व्हिसाची मुदत संपली तर त्याचे हात-पाय नेट्वर्क केबलने बांधुन, गळ्यात लॅपटॉप अडकवुन भारतात पाठवायला ट्रम्प कमी करणार नाही.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

वामन देशमुख 05/03/2025 - 18:34
'ट्रम्प आमचे ,बायडेन तुमचे' करणार्या काही भारतियांसाठी हा धडा आहे.
"बायडेन आमचे, ट्रम्प तुमचे" करणाऱ्या काही भारतीयांसाठी काय धडा आहे?

In reply to by वामन देशमुख

सध्या तरी बायडेन सरकार परवडले असेच सगळे जग म्हणतय ना?. २०१६-२०२० ह्या कालवधीत जेवढा घातला होता त्याहुन अधिक धिंगाणा ट्रम्प घालेल असे दिसतय. अध्य़क्ष झाल्यापासुन त्यानी डझनावारी खोटी विधाने केली आहेत(बर्नी सँडर्स ह्यांचे भाषण ऐका). 'बिनधास्त फेकायचे कारण झेलायला अनेकजण आहेत.' भविष्यात कळेलच.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

उद्या एखाद्याची एच.वन.बी व्हिसाची मुदत संपली तर त्याचे हात-पाय नेट्वर्क केबलने बांधुन, गळ्यात लॅपटॉप अडकवुन भारतात पाठवायला ट्रम्प कमी करणार नाही.
बरं मग?समजा एच-१ ची मुदत संपली, रिन्युअल होत नसेल आणि तरीही संबंधित मनुष्य अमेरिकेतच राहात असेल तर अशा व्यक्तीविषयी अमेरिका सरकारने काय करावे असे वाटते? एच-१ व्हिसा हा मर्यादित कालावधीसाठी कायदेशीर स्टेटसवर काम करण्यासाठी परदेशी नागरीकांना दिलेला व्हिसा असतो ना? तसा व्हिसा मिळणे हा काय भारतीयांचा जन्मसिध्द अधिकार आहे का? व्हिसाची मुदत संपत असेल तर अशा परदेशी नागरीकांनी आपण होऊन निघून जावे अशी अपेक्षा अमेरिका सरकारची असेल तर त्यात काय चूक आहे? व्हिसाची मुदत संपल्यावरही परदेश सोडून न जाणे हा गुन्हा आहे. अशा गुन्हेगारांना अमेरिका सरकारने का म्हणून सहानुभूती दाखवायची? जाता जाता- मी अमेरिकेत विद्यार्थी म्हणून राहिलो आहे. आणि तिथे भारतीय विद्यार्थी नोकर्‍या मिळवायला कसले एकेक जुगाड करतात हे अगदी जवळून बघितले आहे. आमच्या विद्यापीठातील अनेक विद्यार्थ्यांनी, अगदी माझ्या मित्रांनीही ते जुगाड केले आहेत. असले जुगाड करून देणारे कन्सलटन्ट्स असतात. ते त्या विद्यार्थ्यांना त्यांचा सीव्ही बनवून देतात. त्या विद्यार्थ्यांना आपलाच सीव्ही बघितला तर त्यातील नाव वगळता काहीही परिचयाचे दिसायचे नाही कारण सीव्ही बनविताना ते खोटा अनुभव दाखवतात, एखाद्या क्षेत्रात (समजा जावा) काम करायचा अनुभव शून्य असेल तरी चार वर्षे त्यात काम केले आहे असे सीव्हीवर दाखवतात. असा खोटा अनुभव दाखविताना ज्या ठिकाणी संबंधित विद्यार्थी चांगला आहे असा रेफरन्स देणारे कन्सल्टन्टचे लोक पेरलेले असतात त्याच कंपनीचा अनुभव दाखविला जातो. ते विद्यार्थी ओपीटीवर असताना कन्सलटन्ट त्या विद्यार्थ्यांना त्यांच्याच जाळ्यातून पूर्वी गेलेल्यांकडून ट्रेनिंग देतात आणि इंटरव्ह्यू पार पाडता येईल इतके बाळकडू देतात. तो विद्यार्थी कागदावर त्या कन्सलटन्टकडे नोकरीला असतो आणि तो कन्सलटन्ट त्यांना क्लाएंट साईटवर कुठेतरी पाठवतो. क्लाएंटला जितके बिलिंग करतात त्याच्या ५०-६०% रक्कम विद्यार्थ्याला दिली जाते आणि उरलेली तो कन्सलटन्ट स्वतः ठेवतो. त्यावर जॉब सपोर्ट म्हणून आणखी एक प्रकार असतो. एखाद्याने चार वर्षाचा खोटा अनुभव दाखवला तर त्याच्याकडून ज्या पातळीचे काम केले जाईल ही अपेक्षा असेल ती कशी पूर्ण होणार? मग एखादा कठीण प्रश्न आला की फक्त I will get back to you on this tomorrow असे म्हणायचे आणि कन्सलटन्टच्या जॉब सपोर्टवाल्यांना फोन करून त्या प्रश्नाचे उत्तर मिळवायचे आणि दुसर्‍या दिवशी ते द्यायचे. असला सगळा जुगाडू प्रकार चालू असतो. अशातून तरून गेलेले लोक ओपीटीवरून एच-१ वर गेले आहेत. हा सगळा गोलमाल करणार्‍यांचे समर्थन का करायचे? ते भारतीय आहेत म्हणून? आता ट्रम्पतात्यांचे सरकार असले प्रकार करणार्‍या कन्सलटन्ट लोकांवर उठले आहे असे दिसते. https://timesofindia.indiatimes.com/world/us/us-and-world/international-students-who-were-victims-of-opt-fraud-have-more-to-worry-about-must-take-legal-recourse-to-clear-their-name/articleshow/118730845.cms त्यात तात्यांचे काहीही चुकले असे वाटत नाही. असला खोटारडेपणा करून अमेरिकेत राहणारे परदेशी लोक त्यांना नको असतील तर अमेरिकेचे अध्यक्ष या नात्याने त्यांचे नक्की काय चुकले? वरील बातमीत आणखी एक गोष्ट दिली आहे. असले प्रकार करून ओपीटीवरून एच-१ वर पूर्वी गेलेल्या काहींना भारत भेटीनंतर अमेरिकेला परत जाताना विमानतळावरच प्रवेश नाकारला गेला. त्यात तात्यांच्या सरकारचे नक्की काय चुकले? शेवटी चोरी ती चोरीच ना? अशी चोरी पकडली जाईल तेव्हा शिक्षा दिली तर काय चुकले? इतकी वर्षे आम्हाला शिक्षा दिली नाही आणि आता कशी देता असा बचाव चोर करू शकतो? एकूणच तात्या भरपूर रॅश आहेत, आक्रस्ताळे आहेत, मनाला येईल ते वाटेल ते बोलतात वगैरे सगळ्या गोष्टी मान्य. पण ते करत आहेत त्यातील अनेक गोष्टी अमेरिकेच्या (आणि जगाच्याही) हिताच्या आहेत असे दिसते. युएस एडच्या नावाने घाना की बुर्किना फासो मध्ये ट्रान्सजेंडर लोकांच्या ऑपरेशनसाठी पैसे अमेरिकेच्या करदात्यांनी का भरायचे? कोणत्या कोणत्या देशात रेजिम चेंजसाठी, मतदान प्रभावित करायला पैसे अमेरिकेच्या करदात्यांनी का भरायचे?भारतातही एकेकाळी शेतकरी आंदोलनाच्या वेळेस त्या रिकामटेकड्यांना पिझ्झा काय आणि मसाज काय आणि इतर ऐशोरामांची व्यवस्था केली गेली होती. आता अगदी भगवंत माननेही तथाकथित शेतकरी आंदोलकांवर बडगा उगारलेला दिसत आहे. तिकडून येणारा पैसा आटला म्हणून ते होत आहे की नाही मला माहित नाही. बायडन आजोबा अध्यक्ष असताना एखादा माणूस एल.जी.बी.टी. क्यू + आणि आणखी काय काय नसेल तर त्याच्यात काहीतरी खोट आहे असे वाटावे असे वातावरण निर्माण होत आहे की काय असे एखाद्याला वाटावे. असला प्रकार तात्यांच्या काळात बंद केला जात आहे. दुसर्‍या महायुध्दापासून अमेरिकेच्या प्रत्येक अध्यक्षाने इतर अनेक देशात जाऊन काड्या घातल्या आहेत. अगदी गोग्गोड बोलून मोठ्या मोठ्या गप्पा मारणार्‍या ओबामानेही सिरीया आणि लिबियात काड्याच घातल्या होत्या. बायडनने बांगलादेशात काड्या घातल्या होत्या. महंमद युनूसला प्रेसिडेंशिअल मेडल ऑफ फ्रिडम ओबामानेच दिले होते. बहुदा त्याच्या काळापासूनच बांगलादेशात काड्या घालायचा प्रयत्न चालू झाला असावा. जगात जिथेतिथे नाक खुपसायची अमेरिकेची घाणेरडी सवय कमी करून आमचे आम्ही बघतो असे कोणी अध्यक्ष करत असेल तर त्याचे स्वागत करायचे की त्यालाच विरोध करायचा? टॅरीफ वगैरे प्रकरणात तात्या आपल्याला पाहिजे तशी भूमिका घेत नसतीलही. पण कोणीही अमेरिकन अध्यक्ष १००% आपल्याला अनुकूल करेल अशी अपेक्षा कशी करता येईल? बेकायदेशीरपणे घुसलेल्यांना किंवा व्हिसा संपल्यावरही तिथे राहणार्‍यांना ट्रम्पतात्या हाकलत असतील तर त्यात त्यांचे काही चुकले असे मला तरी अजिबात वाटत नाही. बाकी कोणी काहीही म्हणो. मी तर ट्रम्पतात्यांचा या घडीला तरी मोठ्ठा फॅन आहे. त्यातून भविष्यात तात्या दुसरे निक्सन किंवा रेगन झाले तर त्यांना पण विरोधच करू. तशी अमेरिकेच्या अध्यक्षांना विरोध करायची एक भारतीय म्हणून आपल्याला सवयच आहे. ट्रम्पतात्या तसेच वागायला लागले तर त्यांनाही विरोध करू. हाकानाका. तसाही आपण विरोध करून किंवा आपण त्यांचे फॅन असून कोणाला घंटा फरक पडतो? व्हाईट हाऊसच्या प्रांगणातील झाडाचे एक पानही त्यामुळे पडायचे नाही. ट्रम्पतात्या या घडीला माझ्यासारखे तुमच्या बरोबरच.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

"अमेरिका सरकारने काय करावे असे वाटते?" ट्रम्पोजीच्या आक्रस्ताळी स्वभावाबद्दल म्हणत आहे. अमेरिकेने व्हीसा मुदत संपलेल्या लोकांवर उपकार करावेत असे कोणीच म्हणत नाही. असो. कॅनडाच्या जस्टिन ट्रुडोनी अमेरिकेला ऐकवलेच.(https://www.youtube.com/watch?v=wz_42pckM7w&t=159s ) चीनने ही प्रत्युत्तर दिले (https://www.youtube.com/watch?v=RyHbpiOotB8 ) भारतात अजूनही शांतताच पसरली आहे.(कूटनीती इन प्रोग्रेस ?)

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

ट्रम्पतात्या या घडीला माझ्यासारखे तुमच्या बरोबरच. अहो मी तर तात्यांचा २०१६ पासून फॅन आहे. तात्या म्हणजे काळीज! मला तात्याभक्त म्हटले तरीही चालेल!

In reply to by अमरेंद्र बाहुबली

डोनाल्ड ट्रम्पास तात्या म्हंटले की गुजरातमधील जवाहिर्यांच्या/कारगिरांच्या आत्महत्या कमी होणार आहेत का? २ एप्रिलपासुन ट्रम्पाने आयात शुल्क २०% वर नेले की मग आतमह्त्या वाढण्याची शक्यता आहे. https://www.youtube.com/watch?v=KkttlEK_wg8

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

अहो माई, तात्यांनी समजा तसे काही केले आणि समजा त्यामुळे गुजरात किंवा इतर ठिकाणच्या ५०-१०० कारागिरांनी आत्महत्या केल्या तर वाईटच. त्याविषयी काहीच दुसरे मत असू शकणार नाही. पण दुसरी बाजू पण लक्षात घे की. अमेरिकेच्या आधीच्या अध्यक्षांनी जगात विविध ठिकाणी किती लाख लोकांना मारले होते? जर तात्या इतर देशांमधील अमेरिकेची नाक खुपसायची घाणेरडी सवय कमी करत असतील तर ते चांगले नाही का?५०-१००-५००-१००० कारागिर मारले जाणे वाईटच पण लाखो लोक मारले जाण्यापेक्षा त्या मानाने कमी वाईट नाही का?

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

माई आपल्या देशात झालेल्या आत्महत्यांना दुसऱ्या देशाचा राष्ट्राध्यक्ष कसा जबाबदार असेल? आपल्या पंतप्रधान जबाबदार असेल ना? आपण कुणाशी संबंध चांगले ठेवले आहेत?

In reply to by अमरेंद्र बाहुबली

"डोनाल्ड ट्रम्प माझे मित्र आहेत" असे पंतप्रधानच म्हणत होते ना? भारतावर आयात शुल्क आधीसारखेच असेल असे ह्यांनाही वाटले होते. ट्रम्प ह्यांची निवड झाल्या झाल्या जयशंकर ताबडतोब अमेरिकेला रवाना झाले होते.ट्रम्प भारत्,चीन्,कॅनडा ह्यांना एकाच तराजुत तोलत असतील तर मग ईतके दिवस गप्प राहण्याचा आणी तिकडे जाउन 'चर्चा' करण्याचा फायदा काय झाला?

रशियाचे तुकडे झाले तेंव्हा युक्रेनच्या पूर्व आणि दक्षिण भागात रशियन बोलणारे जास्त होते. त्या वेळी रशियन बोलणारा भाग रशियात विलीन झाला असता तर आज ही समस्या उत्पन्न झाली नसती.
याच न्यायाने भारतातील पंजाब पाकीस्तानात आणि भारतातील बंगाल बांग्लादेशात जायला हवे काय ?

In reply to by धर्मराजमुटके

सुबोध खरे 06/03/2025 - 09:45
मी उलट म्हणतो, पाकिस्तानी पंजाब आणि बांगला देश भारतात यायला हवा. कारण हे भाग मूळ भारताचे होते. परंतु भारतात फाळणी हि भाषेवरआधारित झालेली नसून धर्मावर आधारित झालेली आहे त्यामुळे हे उदाहरण तसे गैरलागू आहे

विवेकपटाईत 07/03/2025 - 13:06
अमेरिकेची शत्रुता महागात पडते पण मैत्री विनाशाला कारणीभूत ठरते. अमेरिकेने सुरवातीला शस्त्र मदत दिली नसती तर किमान युक्रेन ने शांततेसाठी रशियाची वाटाघाटी केली असती. https://www.facebook.com/share/v/17TtUzNXxN/

In reply to by विवेकपटाईत

व्वा काका , एक तर फेसबुक च्या लिंक देताय ... तुम्हाला एक सुचवणी करू का ? तुम्ही थोडा इतिहास वाचा किंवा जाणून घ्या , या भागाचा ... मग तुम्ही मत व्यक्त कराल का ? तुम्हाला माहिती आहे का अमेरिकेच्याच सांगण्यावरून युक्रेनला आण्विक शस्त्र सोडून द्यावी लागली कारण त्याबदल्यात अमेरिका सुरक्षा छत्र देणार होता ..

In reply to by आंद्रे वडापाव

Ukraine once had the world’s 3rd largest nuclear arsenal; but gave up its weapons for this reason Read more at: https://economictimes.indiatimes.com/news/international/us/ukraine-once-had-the-worlds-3rd-largest-nuclear-arsenal-but-gave-up-its-weapons-for-this-reason/articleshow/118765127.cms?utm_source=contentofinterest&utm_medium=text&utm_campaign=cppst Ukraine made a significant move in 1994 when it signed the Budapest Memorandum. The United States, the United Kingdom, and Russia were also signatories. Ukraine agreed to remove all its nuclear weapons in return for a guarantee of sovereignty and territorial integrity of the country. The memorandum also provided that these three nations would not attack Ukraine militarily and would request the UN to intervene in case of any threat to the sovereignty of the country. #https://economictimes.indiatimes.com/news/international/us/ukraine-once-had-the-worlds-3rd-largest-nuclear-arsenal-but-gave-up-its-weapons-for-this-reason/articleshow/118765127.cms?from=mdr

In reply to by आंद्रे वडापाव

सुबोध खरे 13/03/2025 - 20:08
@आंद्रे वडापाव There were several important reasons that led Ukraine towards nuclear disarmament. First of all, although it had the weapons at its disposal, it was unable to launch them on its own. The launch keys and other controls were left with Moscow, making the weapon system ineffective as a deterrent. आपण दिलेला दुवा आपणच वाचलेला दिसत नाही. युक्रेन कझाखस्तान सारख्या सोव्हिएत युनियनच्या देशांनी आपली अण्वस्त्रे परत केली ते काही सभ्य आणि सुसंस्कृत आहेत म्हणून नव्हे तर त्याचा वापर त्यांना करणे अशक्य होते म्हणून आणि ठेवल्या जागी गंज लागला तर त्यातून होणार किरणोत्सार भीषण असतो. यामुळेच अण्वस्त्रे म्हणजे काही सोने नव्हे कि काही ना करता तिजोरीत ठेवले तर तसेच राहते. त्यांची वेळोवेळी देखभाल करावीच लागते. हे सर्व सव्यापसव्य करणं युक्रेनला अशक्य होतं. बाकी झेलेन्स्की आम्ही शांततेचे दूत असून शांततेसाठी अण्वस्त्रे परत केली असे कधी म्हणाल्याचे आठवत नाही. अण्वस्त्रधारी देशांचे पंतप्रधान किंवा अध्यक्ष आपल्याबरोबर काही हौसेनं ब्रिफ केस घेऊन फिरत नाहीत. त्यात या अण्वस्त्रांची आणि ती धारण केलेल्या क्षेपणास्त्रांची कोड त्यांच्या कडे सुरक्षित असतात. एखादा माथेफिरू लष्करी अधिकारी सहज दुसऱ्या देशावर अण्वस्त्रे डागेल अशी शक्यता शून्य असते. बाकी तुमचं चालू द्या

In reply to by सुबोध खरे

कदाचित आपल्याला कल्पना नसेल, अण्वस्त्रां तुलनेत, क्षेपणास्त्र आणि विमान (डिलिव्हरी सिस्टिम) तंत्रज्ञान तुलनेत जास्त सोपे असते. अण्वस्त्रां आणि त्याचे तंत्रज्ञान अवाच्या सव्वा किमतीला हसत हसत खरेदी इच्छुक इराण आणि इराक सारखे जगात खूप आहेत/होते. असो लेख मी पूर्ण वाचूनच प्रतिक्रिया देतो... पण आपणास लेखाचा मुद्दा समजला नाहीये बहुदा.. बाकी चालू द्यात...

In reply to by आंद्रे वडापाव

सुबोध खरे 19/03/2025 - 20:14
The launch keys and other controls were left with Moscow, making the weapon system ineffective as a deterrent. हे आपणच दिलेल्या दुव्यात आहे. माझे ज्ञान नाही. अण्वस्त्रे नेणारी क्षेपणास्त्रे तयार करणे आणि ती उत्तम स्थितीत ठेवणे हि आपण म्हणता तशी भाजी आणण्यासारखी बाजारात पैसे टाकून आणण्याची वस्तू नाही. तसे असते तर इराण ने आतापर्यंत इस्रायल वर अणुहल्ला करून त्याचा विध्वंस केला असता. किंवा इंग्लंड सारखा एकेकाळी बलाढ्य असणाऱ्या आणि जगावर राज्य करणाऱ्या देशाने अमेरिकेचे ट्रायडेंट हे क्षेपणास्त्र आपल्या अणुपाणबुड्यांवर ठेवले नसते. ""अण्वस्त्रां तुलनेत, क्षेपणास्त्र आणि विमान (डिलिव्हरी सिस्टिम) तंत्रज्ञान तुलनेत जास्त सोपे असते."" नक्की का? मग भारताचे राजकारणी आणि शास्त्रज्ञ मूर्ख असावेत. कारण भारताने १९७४ मध्ये पहिला अणुस्फोट केला. पृथ्वी हे आपले पहिले क्षेपणास्त्र याचा प्रकल्प १९८३ मध्ये चालू झाला आणि पहिले सफल परीक्षण १९८८ साली झाले. तेजस अणुबॉम्ब नेऊ शकेल का याबद्दल मला माहिती नाही. परंतु अणुबॉम्ब नेण्यासाठी भारत मिराज २०००, जग्वार सुखोई ३० आणि आता राफेल या परदेशी विमानांवर अवलंबून आहे बाकी आपण सर्वज्ञ आहात तेंव्हा यावर मी अधिक बोलू इच्छित नाही

In reply to by आंद्रे वडापाव

विवेकपटाईत 10/03/2025 - 11:38
मला इतिहास ही माहीत आहे आणि सीआयए कशी काम करते इथल्या सर्वांपेक्षा उत्तम माहीत आहे. कारण मी प्रत्यक्ष काम केलेले आहे. बाकी अमेरिकेने बुटक्याला शस्त्र दिले आणि त्याला राक्षसा विरुद्ध सोडले. हे सर्वांनी प्रत्यक्ष बघितले आहे. अफगाणिस्तान असो वा विएतनाम अमेरिका तेथे अमेरिकेच्या तालावर नाचणार्‍या सत्ताधार्‍यांना वार्‍यावर सोडून अमेरिकेने माघार घेतली होती. हा इतिहास बहुतेक तुम्ही वाचला नसावा. युक्रेनच्या जनतेने अमेरिका आणि युरोप प्रायोजित झेलेंस्कीला निवडले त्याचे परिणाम युक्रेनची जनता भोगणार.

In reply to by विवेकपटाईत

सीआयए कशी काम करते इथल्या सर्वांपेक्षा उत्तम माहीत आहे.
अहो काका त्याच्याच मुळे आधी लिहिलय ... भारतामध्ये "जे एन दीक्षित" नंतर... पटाईत काकाच एकमेव फक्त ... जयशंकर तर पटाइटांच्या पासंगालाही पुरणार नाही ... कारण जी काय अक्कल आहे ती आपल्यालाच आहे , असा गंड मला तरी नाही ...

In reply to by आंद्रे वडापाव

विवेकपटाईत 16/03/2025 - 19:37
मला कसलाही अहंगंड आणि घेऊन न्यूनगंड नाही. फक्त तुमच्या प्रतिक्रियेचे उत्तर दिले. बाकी फक्त एक अजेंडा मनात ठेवून परिस्थितीचे विश्लेषण करणे बंद करा डोळे उघडून सत्य पाहायला शिका.

In reply to by विवेकपटाईत

बाकी फक्त एक अजेंडा मनात ठेवून परिस्थितीचे विश्लेषण करणे बंद करा डोळे उघडून सत्य पाहायला शिका.
हेच मी तुम्हाला सान्गत होतो वरती .. पण फक्त अप्रत्यक्श्पणे

यूक्रेनपुढे दोनच पर्याय आहेत! रशियाच्या संगतीने गरीब राहणे किंवा अमेरिका/युरोपच्या नादी लागून रशियाविरोधात जाऊन मरणे! माझ्यामते गरीब राहणे मारण्यापेक्षा चांगले आहे.

तुम्हाला इंटरनॅशनल-डंकापती चा -भक्त व्हायचं का? जरूर व्हा. आमचे काही म्हणणे नाही.... पहिली गोष्ट म्हणजे- कसलाही न्यूनगंड बाळगू नका. आणि प्रत्येक बाबतीमध्ये डंकापती सारखे मत व्यक्त करायला शिका. म्हणजे आपण कोण आहोत, आपला शैक्षणिक दर्जा काय, एकूण कर्तृत्त्व काय, याचा अजिबात विचार न करता मत ठोकून द्यायचं. विषय कुठलाही असो. म्हणजे आता "युक्रेनची भु राजकीय सामरिक घडी नीट बसवण्याचा खरा मार्ग कोणता?" या विषयावरती, आपण स्वतः शासनात भलेही, उंदीर मारायच्या विभागात नोकरीला होतो, हे विसरून मत ठणकावता आले पाहिजे. युक्रेनची भु राजकीय सामरिक स्थिती - ठोका...

निनाद 23/03/2025 - 13:31
रशिया-युक्रेन युद्धाच्या पैलूंचे चांगले विश्लेषण. या युद्धामध्ये माहिती युद्धाचे महत्त्व दुर्लक्षित केले जाऊ शकत नाही. दोन्ही बाजूंकडून प्रसार माध्यमांचा वापर करून जनतेची मते प्रभावित करण्याचा प्रयत्न केला गेला आहे आणि आपण सर्व त्याचे बळी आहोत. विचारप्रवर्तक लेखन आहे. ऐतिहासिक संदर्भ, आंतरराष्ट्रीय राजकारण आणि आर्थिक परिणाम यांसारख्या विषयांवर प्रकाश टाकल्याबद्दल लेखकाचे अभिनंदन.
लेखनविषय:
लेखनप्रकार
एक जुनी भारतीय नीति कथा - राजकुमाराने बुटक्याच्या मदतीने राक्षसाला ठार मारले. राजकुमारला राजकुमारी मिळाली. युद्धात बुटक्याचे हात पाय तुटले. बुटक्याच्या नशीबी भीक मागण्याची पाळी आली. आजच्या कथेत फरक एवढाच राजकुमार स्वत: युद्धात उतरला नाही. त्याने बुटक्याला युद्धासाठी अस्त्र-शस्त्र दिले. राक्षस तर मेला नाही पण बुटका युद्धात जबर जखमी झाला. एवढेच नव्हे तर राक्षसाने बुटक्याचे अर्धे राज्य ही गिळंकृत केले. आता राजकुमाराला अस्त्र-शस्त्रांच्या मोबदल्यात बुटक्याचे उरलेले अर्धे राज्य पाहिजे.

नांदेड जिल्ह्यातील प्राचीन मंदिरे

vcdatrange ·

म्हणावे लागेल. आजपर्यंत नांदेड फक्त गुरुद्वारा म्हणून माहीत होते. खजुराहो येथील मंदिरे सुद्धा याच धाटणीची पण सॅण्डस्टोन मधे आहेत. लेखकांचे मनापासून आभार.

चौथा कोनाडा 01/03/2025 - 12:58
छान ओळख ! सुंदर मंदिरे आहेत ! गुनकाशास्थान दिल्याने तिथंच प्रचि सुद्धा पाहता आली ! धन्यवाद ! धन्यवाद !

म्हणावे लागेल. आजपर्यंत नांदेड फक्त गुरुद्वारा म्हणून माहीत होते. खजुराहो येथील मंदिरे सुद्धा याच धाटणीची पण सॅण्डस्टोन मधे आहेत. लेखकांचे मनापासून आभार.

चौथा कोनाडा 01/03/2025 - 12:58
छान ओळख ! सुंदर मंदिरे आहेत ! गुनकाशास्थान दिल्याने तिथंच प्रचि सुद्धा पाहता आली ! धन्यवाद ! धन्यवाद !
गेल्या आठवड्यात धावता नांदेड दौरा होता. अगदी थोडा वेळ काढूनही शहरा नजीकच्या प्राचीन मार्कंडेय शिव व ऋषी मंदिराला भेट दिली. मंदिरापर्यंत पोहोचण्याचा रस्त्याचे अर्धवट काम सुरू असल्याने प्रत्येक ठेचीला सोबतींच्या शिव्या खात गोदावरी किनारच्या या मंदिरात पोहोचलो. परिसर आणि बाह्य भागाचे सुशोभिकरण सुरू असल्याने प्रथमदर्शनी निराश होत मंदिरात प्रवेश केला. शिव मंदिराची संपूर्ण वास्तूचे दगड क्रमवार उतरवून ठेवले आहेत. होट्टल येथील सिद्धेश्वर मंदिर देखील अश्याच पद्धतीने पूर्णत नव्याने रचले आहे. सध्याच्या वास्तूत कोणतेही कलाकुसर नसलेला मुख्य मंडप व गर्भगृह अद्यापि शाबुत आहे.

शिवजयंती

अनुस्वार ·

Bhakti 19/02/2025 - 19:32
सुंदर!
शिवाजी म्हणजे तुम्ही, मी, आपण बस्स! कारण शिवाजी शब्दांत बांधता येत नाही, केवळ सिंहासनावर बसवता येत नाही, शिवाजी फक्त जिवंत राहतो. जिवंत माणसांत! जिवंत मनांत! जिवंत मातीत!

किसन शिंदे 20/02/2025 - 11:57
हे आवडलंय!
शिवाजी म्हणजे तुम्ही, मी, आपण बस्स! कारण शिवाजी शब्दांत बांधता येत नाही, केवळ सिंहासनावर बसवता येत नाही, शिवाजी फक्त जिवंत राहतो. जिवंत माणसांत! जिवंत मनांत! जिवंत मातीत! मनुष्य ज्या प्रेरणेने जगतो ती प्रेरणा म्हणजे शिवाजी. तीच स्वातंत्र्य प्रेरणा जी मनुष्यांना इतर प्राण्यांहून वेगळी ठरवते.

Bhakti 19/02/2025 - 19:32
सुंदर!
शिवाजी म्हणजे तुम्ही, मी, आपण बस्स! कारण शिवाजी शब्दांत बांधता येत नाही, केवळ सिंहासनावर बसवता येत नाही, शिवाजी फक्त जिवंत राहतो. जिवंत माणसांत! जिवंत मनांत! जिवंत मातीत!

किसन शिंदे 20/02/2025 - 11:57
हे आवडलंय!
शिवाजी म्हणजे तुम्ही, मी, आपण बस्स! कारण शिवाजी शब्दांत बांधता येत नाही, केवळ सिंहासनावर बसवता येत नाही, शिवाजी फक्त जिवंत राहतो. जिवंत माणसांत! जिवंत मनांत! जिवंत मातीत! मनुष्य ज्या प्रेरणेने जगतो ती प्रेरणा म्हणजे शिवाजी. तीच स्वातंत्र्य प्रेरणा जी मनुष्यांना इतर प्राण्यांहून वेगळी ठरवते.
लेखनविषय:
त्या पोराचे वडील तसे नामी सरदार होते बरं. आज आपण उपहासाने जो जहागीरदार शब्द वापरतो तसा त्या मुलाचा बाप खरंच खूप मोठा जहागीरदार होता. पैशापाण्याची, सेवेकऱ्यांची कमी नव्हती. त्या तरुणाने सगळी हयात मजा मारण्यात घालवली असती तरीसुद्धा तो काही चुकला असं कुणीही म्हणू शकलं नसतं. परंतु गर्व आजपर्यंत कुणाला चुकला? तुम्ही पुराणे उचकून पहा, परमेश्वरी अवतारांना सुद्धा गर्वाची बाधा झाल्याचे क्षण तुम्हाला सापडतील. असाच गर्व या विश्वाची निर्मिती करणाऱ्या आदियोगी-आदिशक्तीला झाला. आणि अनंत विश्वातल्या अनंत चुका अनंत चाचण्यांनी सुद्धा ज्याच्यात सापडणार नाहीत असा युगपुरुष निर्माण करण्याची नियतीला इच्छा झाली.

प्रभास पाटण अर्थात सोरटी सोमनाथ महत्व

kool.amol ·

चित्रगुप्त 10/02/2025 - 04:15
पुढील भाग लवकरच प्रसिद्ध करा आणि तुम्ही काढलेल्या फोटोंबरोबरच त्यात भरपूर जुनी चित्रे/फोटो येऊ द्यात. उदाहरणार्थ भारतीय लघुचित्र शैलीतली चित्रे, इंग्रज प्रवासी चित्रकारांनी रंगवलेली आणि इंग्लंडात प्रकाशित केलेली छापाचित्रे, पुरातत्व विभागाने केलेले संशोधन आणि नकाशे, तत्संबंधी पोस्टाची तिकीटे आणि अन्य प्रकारची चित्रे. . .

In reply to by चित्रगुप्त

kool.amol 10/02/2025 - 08:45
हे आवडलं, छान कल्पना आहे! वरील फोटोसाठी धन्यवाद. मी नक्की टाकेन लेखामध्ये जे जे उपलब्ध होईल

In reply to by प्रचेतस

kool.amol 10/02/2025 - 08:47
धन्यवाद! आधी पौराणिक मग ऐतिहासिक ते सुद्धा क्रमवार आणि मग सध्या जे मंदिर आहे त्याची निर्मिती असा काहीसा क्रम डोक्यात आहे.

विजुभाऊ 11/02/2025 - 10:29
कंदहार, गझनी पासून थेट सोमनाथ पर्यंत आक्रमक आले. त्याना येताना आणि परत जातानाही मधे कोणीच कसा विरोध केला नाही याचे नवल वाटते? भारतीय समाज इतका कसा काय थिजलेला होता? पृथ्वीराज चौहानाने महंमद घोरीला सोडून दिल्यानंतरही तो इतक्या वेळेस परत आक्रमण करू शकला हे कसे शक्य आहे? तात्कालीन समाज आणि राज्ये अशी कशी होती की आक्रमकांना कुठेच रोखत नव्हती?

In reply to by विजुभाऊ

संभल , हे त्याचे उत्तम उदाहरण.... एका तीर्थस्थानचे , पाकधार्जिण्या स्थानात, कसे रुपांतर झाले, हा इतिहास नाकारता येत नाही. हिंदू कधीच एकत्र येत नाहीत.

In reply to by विजुभाऊ

kool.amol 11/02/2025 - 23:25
मुळात असं नाहीय, गजनीच्या हल्ल्यावेळी आणि नंतर काय झाले ह्यावर एक भाग लिहिणार आहे. वाचायच्या आधी मलाही असंच वाटायचं.

चित्रगुप्त 10/02/2025 - 04:15
पुढील भाग लवकरच प्रसिद्ध करा आणि तुम्ही काढलेल्या फोटोंबरोबरच त्यात भरपूर जुनी चित्रे/फोटो येऊ द्यात. उदाहरणार्थ भारतीय लघुचित्र शैलीतली चित्रे, इंग्रज प्रवासी चित्रकारांनी रंगवलेली आणि इंग्लंडात प्रकाशित केलेली छापाचित्रे, पुरातत्व विभागाने केलेले संशोधन आणि नकाशे, तत्संबंधी पोस्टाची तिकीटे आणि अन्य प्रकारची चित्रे. . .

In reply to by चित्रगुप्त

kool.amol 10/02/2025 - 08:45
हे आवडलं, छान कल्पना आहे! वरील फोटोसाठी धन्यवाद. मी नक्की टाकेन लेखामध्ये जे जे उपलब्ध होईल

In reply to by प्रचेतस

kool.amol 10/02/2025 - 08:47
धन्यवाद! आधी पौराणिक मग ऐतिहासिक ते सुद्धा क्रमवार आणि मग सध्या जे मंदिर आहे त्याची निर्मिती असा काहीसा क्रम डोक्यात आहे.

विजुभाऊ 11/02/2025 - 10:29
कंदहार, गझनी पासून थेट सोमनाथ पर्यंत आक्रमक आले. त्याना येताना आणि परत जातानाही मधे कोणीच कसा विरोध केला नाही याचे नवल वाटते? भारतीय समाज इतका कसा काय थिजलेला होता? पृथ्वीराज चौहानाने महंमद घोरीला सोडून दिल्यानंतरही तो इतक्या वेळेस परत आक्रमण करू शकला हे कसे शक्य आहे? तात्कालीन समाज आणि राज्ये अशी कशी होती की आक्रमकांना कुठेच रोखत नव्हती?

In reply to by विजुभाऊ

संभल , हे त्याचे उत्तम उदाहरण.... एका तीर्थस्थानचे , पाकधार्जिण्या स्थानात, कसे रुपांतर झाले, हा इतिहास नाकारता येत नाही. हिंदू कधीच एकत्र येत नाहीत.

In reply to by विजुभाऊ

kool.amol 11/02/2025 - 23:25
मुळात असं नाहीय, गजनीच्या हल्ल्यावेळी आणि नंतर काय झाले ह्यावर एक भाग लिहिणार आहे. वाचायच्या आधी मलाही असंच वाटायचं.
लेखनविषय:
आपल्याकडे 12 ज्योर्तीलिंगांचे महत्व आहे. आसेतूहिमाचल विस्तार असलेल्या ह्या प्रचंड देशात ही बाराही ज्योतिर्लिंगे विखूरलेली आहेत. काही पोचायला सोप्या अशा ठिकाणी, काही घोर जंगलात, केदारनाथ सारखे ठिकाण तर अत्यंत दुर्गम अशा हिमालयात तर सोमनाथ हे समुद्र किनारी! त्यापैकी सोरटी सोमनाथ म्हणून प्रसिद्ध असलेल्या ह्या मंदिरात जाण्याचा योग नुकताच आला. धार्मिक मान्यतेनुसार ह्या मंदिराचा क्रमांक पहिला येतो. बारा ज्योतिर्लिंगाची यात्रा इथून सुरु करण्याची पद्धत आहे. माझा असा काही मानस नव्हता. पण त्यानिमित्ताने ह्या मंदिराविषयी थोडं वाचन केलं आणि लक्षात आलं की ह्या मंदिराचा इतिहास अत्यंत रोमांचक आहे.

गीतारहस्य चिंतन-२

Bhakti ·

In reply to by प्रसाद गोडबोले

Bhakti 09/02/2025 - 20:54
प्रगोदादा,ठीक आहे.अजून सुटसुटीत मांडण्याचा प्रयत्न करीत राहते. हा भाग पहिल्या भागाचा कर्मजिज्ञासाचा दुसरा भाग आहे.सत्य, अहिंसा,अस्तेय या सारखी कर्म मनुष्य अनेकदा धर्म -अधर्म अशा द्वंद्वात टाकतात.तेव्हा याबाबत सूक्ष्म अभ्यास केला तर अनेकदा योग्य मार्ग जो इतरांचेही नुकसान करणार नाही आणि स्वतः चेही रक्षण करेल असा सापडतो.
या प्रकरणात टिळकांनी कर्म करतांना अनेक नीती शास्त्रानुसार कशा करायच्या,पाळायच्या यांचा संभ्रम पडत असतो‌ तेव्हा अपवाद कसा ओळखावा हे सांगितले आहे.तेव्हा काळानुसार धर्म बदलतो.नीतीस अनेक अपवाद असतात.अर्थात ते समजण्यासाठी सूक्ष्म अभ्यास असावा अथवा कृष्ण साथीला हवा.

चामुंडराय 09/02/2025 - 21:03
भक्ती ताई तुमची ही गीतारहस्य चिंतन लेखमाला वाचून घरी असलेला गीतारहस्य ग्रंथ वाचायला सुरुवात केली आहे परंतु शंभर वर्षांपेक्षा जुनी मराठी वाचायला क्लिष्ट वाटते आहे आणि वर त्यातील तत्वज्ञान समजून घेणे जिकरीचे वाटते आहे तरीही नेटाने प्रयत्न करतो आहे. ह्या ग्रंथावर एखादे सहज समजण्यासारखे भाष्य उपलब्ध आहे का?

In reply to by चामुंडराय

Bhakti 09/02/2025 - 21:10
परंतु शंभर वर्षांपेक्षा जुनी मराठी वाचायला क्लिष्ट वाटते आहे आणि वर त्यातील तत्वज्ञान समजून घेणे जिकरीचे वाटते आहे तरीही नेटाने प्रयत्न करतो आहे.
पण मला का इतकं सोप्पा वाटतोय बरे ;) अतिशयोक्ती नाही.पण मी जवळपास २०२० पासून वैदिक संस्कृती समजून घेण्याच्या मार्गावर आहे.त्यामुळे मी युट्यूबवर अगणित चित्रफिती पाहिल्या.एका विषयातून दुसरा, त्यातून तिसरा अशी ही मालिका सुरूच आहे.म्हणजे इतर कमी असं मी म्हणतं नाही.असं म्हणतात, ज्ञानाचा सगळ्यांत उपयोगी मार्ग पुस्तक आहे.मला तर खुप मज्जा येतेय ;) :)

स्वधर्म 10/02/2025 - 18:26
टिळकांना गीता आपल्या आयुष्यातील कोणते निर्णय घेताना कशी उपयोगी पडली, अशी काही उदाहरणे या ग्रंथात तुमच्या वाचनात आली, तर वाचायला आवडेल. ज्ञानाइतकेच आचरण महत्वाचे, म्हणून विचारत आहे.

In reply to by प्रसाद गोडबोले

Bhakti 09/02/2025 - 20:54
प्रगोदादा,ठीक आहे.अजून सुटसुटीत मांडण्याचा प्रयत्न करीत राहते. हा भाग पहिल्या भागाचा कर्मजिज्ञासाचा दुसरा भाग आहे.सत्य, अहिंसा,अस्तेय या सारखी कर्म मनुष्य अनेकदा धर्म -अधर्म अशा द्वंद्वात टाकतात.तेव्हा याबाबत सूक्ष्म अभ्यास केला तर अनेकदा योग्य मार्ग जो इतरांचेही नुकसान करणार नाही आणि स्वतः चेही रक्षण करेल असा सापडतो.
या प्रकरणात टिळकांनी कर्म करतांना अनेक नीती शास्त्रानुसार कशा करायच्या,पाळायच्या यांचा संभ्रम पडत असतो‌ तेव्हा अपवाद कसा ओळखावा हे सांगितले आहे.तेव्हा काळानुसार धर्म बदलतो.नीतीस अनेक अपवाद असतात.अर्थात ते समजण्यासाठी सूक्ष्म अभ्यास असावा अथवा कृष्ण साथीला हवा.

चामुंडराय 09/02/2025 - 21:03
भक्ती ताई तुमची ही गीतारहस्य चिंतन लेखमाला वाचून घरी असलेला गीतारहस्य ग्रंथ वाचायला सुरुवात केली आहे परंतु शंभर वर्षांपेक्षा जुनी मराठी वाचायला क्लिष्ट वाटते आहे आणि वर त्यातील तत्वज्ञान समजून घेणे जिकरीचे वाटते आहे तरीही नेटाने प्रयत्न करतो आहे. ह्या ग्रंथावर एखादे सहज समजण्यासारखे भाष्य उपलब्ध आहे का?

In reply to by चामुंडराय

Bhakti 09/02/2025 - 21:10
परंतु शंभर वर्षांपेक्षा जुनी मराठी वाचायला क्लिष्ट वाटते आहे आणि वर त्यातील तत्वज्ञान समजून घेणे जिकरीचे वाटते आहे तरीही नेटाने प्रयत्न करतो आहे.
पण मला का इतकं सोप्पा वाटतोय बरे ;) अतिशयोक्ती नाही.पण मी जवळपास २०२० पासून वैदिक संस्कृती समजून घेण्याच्या मार्गावर आहे.त्यामुळे मी युट्यूबवर अगणित चित्रफिती पाहिल्या.एका विषयातून दुसरा, त्यातून तिसरा अशी ही मालिका सुरूच आहे.म्हणजे इतर कमी असं मी म्हणतं नाही.असं म्हणतात, ज्ञानाचा सगळ्यांत उपयोगी मार्ग पुस्तक आहे.मला तर खुप मज्जा येतेय ;) :)

स्वधर्म 10/02/2025 - 18:26
टिळकांना गीता आपल्या आयुष्यातील कोणते निर्णय घेताना कशी उपयोगी पडली, अशी काही उदाहरणे या ग्रंथात तुमच्या वाचनात आली, तर वाचायला आवडेल. ज्ञानाइतकेच आचरण महत्वाचे, म्हणून विचारत आहे.
लेखनविषय:
गीतारहस्य चिंतन -१ #कर्मजिज्ञासा२ * अस्तेय (चोरी) एकाने यथान्याय मिळवलेली संपत्ती चोरून किंवा लुटून नेण्याची इतरांना मोकळीक मिळेल तर द्रव्यसंचय करण्याचे बंद पडून सर्वांचेच नुकसान होईल, समाजाची घडी विस्कळून सर्वत्र अनवस्था होईल हे निर्विवाद आहे.

बनेश्वर मंदिर (तळेगाव दाभाडे) भटकंती

चौथा कोनाडा ·

सहसा स्थानिक प्रेक्षणीय जागा बघितल्या जात नाहीत आणी बघितल्यावर कळते आपण काय मिस केले. नसरापुर माझे अजोड आहे त्यामुळेच तेथील बनेश्वर.मंदिराचा कोपरा कोपरा माहीत आहे. हे मंदिर सुद्धा तसेच वाटते. भटकंती आवडली.

In reply to by कर्नलतपस्वी

चौथा कोनाडा 31/01/2025 - 19:33
सहसा स्थानिक प्रेक्षणीय जागा बघितल्या जात नाहीत
अगदी खरंय .. काखेत कळसा अन गावाला वळसा अशी अवस्था असते. अ‍ॅण्ड येस .. आजोळ असल्यावर अजोड असणारच ! नसरापुर बनेश्वरचं बन अणि परिसर या बनेश्वर पेक्षा जास्त निसर्गरम्य आहे. धन्यवाद, कर्नलतपस्वी !

कपिलमुनी 30/01/2025 - 22:41
याच फेरीत गावातील प्रसिद्ध पाच पांडव मंदीर, ब्राह्मण डोह, केदारेश्वर मंदिर पाहता आले असते. या वास्तू पण प्राचीन आहेत. शिवाय नवीन बांधलेले पार्श्व प्रज्ञालग हे सुंदर शिल्पकला असलेले जैन मंदीर पाहता आले असते

In reply to by कपिलमुनी

चौथा कोनाडा 02/02/2025 - 20:35
पुढच्या वेळाच्या फेरीसाठी ही ठिकाणं हेरून ठेवलीत. नक्की पाहिन. या सुंदर सुचवणी साठी धन्यवाद कपिलमुनी. पार्श्व प्रज्ञालय आणि शंखेश्वर जैन मंदिर हे दोन्ही पाहिलंय ! या दोन्ही ठिकाणी वेळेत पोहोचले तर रास्त दरात भोजन आणि नाश्त्याची सोय होते. इथली स्वच्छता आणि पाळली जाणारी शिस्त वाखाणण्याजोगी असते. (अशीच सोय नारायणी मंदिर (हे बहुधा मारवाडी / माहेश्वरी लोकांचे आहे) लोणावळा इथे ही आहे, रहायची सोय देखील आहे) विथ फॅमिली भेट द्यायला उत्तम ठिकाण ! धन्यवाद !

प्रचेतस 31/01/2025 - 08:29
तुम्ही फार कमी लिहिता अशी आमची प्रेमळ तक्रार आहे. भटकंतीसारख्या वर्णनात्मक लेखालाही तुम्ही संवाद, छायाचित्रे, इतिहास इत्यादी विविध अंगांद्वारे सजीव करून सोडलं आहे.

In reply to by प्रचेतस

चौथा कोनाडा 04/02/2025 - 20:25
धन्यवाद, प्रचेतस, कर्नलतपस्वी आणि प्रा.डॉ.दिलीप बिरुटे. अनेक उचापती एकाच वेळी करत असल्यानं सगळंच थोडंथोडं आहे. जॅक ऑफ मेनी ट्रेड्स ... हा .... हा .... हा .... !

चौको मस्त ! लेख , लेखन , फोटो सगळं आवडलं . आणि विशेष आभार जुन्या आठवणी जाग्या केल्या . या गावात मी लहान असताना वर्षभर राहिलो आहे . माझ्या त्या आठवणी - रंगीत चित्रं - या लेखात मांडल्या आहेत तेव्हा हे गाव लहान . हे मंदिर गावाबाहेर . गावाच्या टोकाला काका राहायचे . आम्ही लहान मुलं त्यांच्याकडे जायचो . त्यांचीही मुलं लहान . त्यांच्या घरापासून हे मंदिर चालत पाच मिनिंटावर . मग काय ? ते आमचं खेळण्याचं ठिकाण होतं नेहमीचं . आत निरव शांतता . एक माणूस नाहि . तेव्हा निवांत खेळायचो अन आकर्षण त्या पुष्करणीच खूप . खाली जायचं पाण्यात पाहायचं , भीती वाटायची . .. जर पाण्यात पडलो तर पोहता येत नाही आणि मदतीला एक माणूस नाही . एक गूढ आकर्षण ! ... फार छान वाटलं

In reply to by बिपीन सुरेश सांगळे

चौथा कोनाडा 04/02/2025 - 20:29
व्वा .. भारीच की ! सुंदर जुन्या आठवणी !
तेव्हा हे गाव लहान . हे मंदिर गावाबाहेर . गावाच्या टोकाला काका राहायचे . आम्ही लहान मुलं त्यांच्याकडे जायचो . त्यांचीही मुलं लहान . त्यांच्या घरापासून हे मंदिर चालत पाच मिनिंटावर . मग काय ? ते आमचं खेळण्याचं ठिकाण होतं नेहमीचं . आत निरव शांतता . एक माणूस नाहि . तेव्हा निवांत खेळायचो अन आकर्षण त्या पुष्करणीच खूप . खाली जायचं पाण्यात पाहायचं , भीती वाटायची . .. जर पाण्यात पडलो तर पोहता येत नाही आणि मदतीला एक माणूस नाही . एक गूढ आकर्षण ! ..
थरारक ! हे पुन्हा अनुभवायला मिळणार नाही ! आपण कशाकशाला पारखे होत आहोत हे आता जाणवतं. मनःपुर्वक धन्यवाद,बिपीन सुरेश सांगळे_/\_

चित्रगुप्त 01/02/2025 - 06:43
लवकरच मी पुण्यात येणार असल्याने हा लेख वाचून Baneshvar Temple, PUNE' असा गूगल मॅप वर शोध घेता किमान तीन तरी वेगवेगळी बनेश्वर - बाणेश्वर मादिरे दिसली. (तळीगव-दाभाडे, नसरापूर आणि बाणेर मधील) आणखीही आहेत बहुतेक. कृपया कोणीतरी यापैकी कोणकोणती आवर्जून बघण्यासारखी आहेत (माझी रुच 'धार्मिक' पेक्षा निसर्गरम्यत्व, वास्तुकला, मूर्तीकला यात आहे) हे सांगितले तर फार मदत होइल. धन्यवाद.

In reply to by चित्रगुप्त

प्रचेतस 01/02/2025 - 08:03
तिन्ही पाहिलेली आहेत, यापैकी बाणेरचे सर्वात प्राचीन, ती राष्ट्रकूटकालीन (पाताळेश्वरला समकालीन) खोदीव लेणी आहे (बहुधा नववे शतक). कातळ फोडून लेणीत जायचा मार्ग तयार केला आहे, आवारात वीरगळ आहेत आणि इतर कुठेही सहसा न दिसणारी बलीवेदीचा चौकोनी दगड आहे ज्याच्या चारी बाजुंना बकऱ्याची मस्तके कोरलेली आहेत.

In reply to by प्रचेतस

चित्रगुप्त 01/02/2025 - 08:30
मी बाणेरलाच मुक्काम करणार असल्याने तिथे जाईनच, शिवाय अन्य दोन्ही बघण्याचा प्रयत्न करेन.

यश राज 03/02/2025 - 13:24
सुन्दर लिहिलयं, यत्ता तिसरी का चौथीत असताना आमची शालेय सहल बनेश्वरला गेली होती.

जुइ 05/02/2025 - 04:16
सुंदर फोटो आणि माहिती. या बनेश्वर मंदिराबद्दल फारसे ऐकले नव्हते, या लेखामुळे ओळख झाली. धन्यवाद!

गोरगावलेकर 18/02/2025 - 11:52
पुण्याला जातांना तळेगांव टोलनाक्याच्या पुढे डावीकडे वळण घेत मंदिरास पोहोचलो. टोलनाक्यावर असलेल्या मार्गिकेतून आमची गाडी व्यवस्थित पुढे सरकत होती पण बाजूच्या मार्गिकेत बुथवर काही अडचण निर्माण झाल्याने मागील खूप गाड्या खोळंबल्या होत्या. काय अडचण आहे ते बघण्यासाठी उतरलेल्या एका प्रसिद्ध व्यक्तिमत्वाची टिपलेली ही एक झलक.  प्रतिसादांतून आलेल्या ठिकाणांपैकी पाच पांडव मंदीर, पूर्वीच पाहिलेले आहे .   केदारेश्वर मंदिर पहिले . खूप सुंदर आहे . येथील दगडी बांधकाम असेलेली आयताकृती विहीर खूपच आवडली

In reply to by गोरगावलेकर

चौथा कोनाडा 01/03/2025 - 19:55
छोटेखानी वृतांत आणि प्रचि खुपच सुंदर ! केदारेश्वर मंदिर, दगडी बांधकाम विहीर सुंदरच आहे ! पाच पांडव मंदीर साधंच पण विशेष दिसतंय ! आता या स्थळांना भेट देण्याचं आयोजन करावंच लागेल. धन्यवाद, गोरगावलेकर !

सहसा स्थानिक प्रेक्षणीय जागा बघितल्या जात नाहीत आणी बघितल्यावर कळते आपण काय मिस केले. नसरापुर माझे अजोड आहे त्यामुळेच तेथील बनेश्वर.मंदिराचा कोपरा कोपरा माहीत आहे. हे मंदिर सुद्धा तसेच वाटते. भटकंती आवडली.

In reply to by कर्नलतपस्वी

चौथा कोनाडा 31/01/2025 - 19:33
सहसा स्थानिक प्रेक्षणीय जागा बघितल्या जात नाहीत
अगदी खरंय .. काखेत कळसा अन गावाला वळसा अशी अवस्था असते. अ‍ॅण्ड येस .. आजोळ असल्यावर अजोड असणारच ! नसरापुर बनेश्वरचं बन अणि परिसर या बनेश्वर पेक्षा जास्त निसर्गरम्य आहे. धन्यवाद, कर्नलतपस्वी !

कपिलमुनी 30/01/2025 - 22:41
याच फेरीत गावातील प्रसिद्ध पाच पांडव मंदीर, ब्राह्मण डोह, केदारेश्वर मंदिर पाहता आले असते. या वास्तू पण प्राचीन आहेत. शिवाय नवीन बांधलेले पार्श्व प्रज्ञालग हे सुंदर शिल्पकला असलेले जैन मंदीर पाहता आले असते

In reply to by कपिलमुनी

चौथा कोनाडा 02/02/2025 - 20:35
पुढच्या वेळाच्या फेरीसाठी ही ठिकाणं हेरून ठेवलीत. नक्की पाहिन. या सुंदर सुचवणी साठी धन्यवाद कपिलमुनी. पार्श्व प्रज्ञालय आणि शंखेश्वर जैन मंदिर हे दोन्ही पाहिलंय ! या दोन्ही ठिकाणी वेळेत पोहोचले तर रास्त दरात भोजन आणि नाश्त्याची सोय होते. इथली स्वच्छता आणि पाळली जाणारी शिस्त वाखाणण्याजोगी असते. (अशीच सोय नारायणी मंदिर (हे बहुधा मारवाडी / माहेश्वरी लोकांचे आहे) लोणावळा इथे ही आहे, रहायची सोय देखील आहे) विथ फॅमिली भेट द्यायला उत्तम ठिकाण ! धन्यवाद !

प्रचेतस 31/01/2025 - 08:29
तुम्ही फार कमी लिहिता अशी आमची प्रेमळ तक्रार आहे. भटकंतीसारख्या वर्णनात्मक लेखालाही तुम्ही संवाद, छायाचित्रे, इतिहास इत्यादी विविध अंगांद्वारे सजीव करून सोडलं आहे.

In reply to by प्रचेतस

चौथा कोनाडा 04/02/2025 - 20:25
धन्यवाद, प्रचेतस, कर्नलतपस्वी आणि प्रा.डॉ.दिलीप बिरुटे. अनेक उचापती एकाच वेळी करत असल्यानं सगळंच थोडंथोडं आहे. जॅक ऑफ मेनी ट्रेड्स ... हा .... हा .... हा .... !

चौको मस्त ! लेख , लेखन , फोटो सगळं आवडलं . आणि विशेष आभार जुन्या आठवणी जाग्या केल्या . या गावात मी लहान असताना वर्षभर राहिलो आहे . माझ्या त्या आठवणी - रंगीत चित्रं - या लेखात मांडल्या आहेत तेव्हा हे गाव लहान . हे मंदिर गावाबाहेर . गावाच्या टोकाला काका राहायचे . आम्ही लहान मुलं त्यांच्याकडे जायचो . त्यांचीही मुलं लहान . त्यांच्या घरापासून हे मंदिर चालत पाच मिनिंटावर . मग काय ? ते आमचं खेळण्याचं ठिकाण होतं नेहमीचं . आत निरव शांतता . एक माणूस नाहि . तेव्हा निवांत खेळायचो अन आकर्षण त्या पुष्करणीच खूप . खाली जायचं पाण्यात पाहायचं , भीती वाटायची . .. जर पाण्यात पडलो तर पोहता येत नाही आणि मदतीला एक माणूस नाही . एक गूढ आकर्षण ! ... फार छान वाटलं

In reply to by बिपीन सुरेश सांगळे

चौथा कोनाडा 04/02/2025 - 20:29
व्वा .. भारीच की ! सुंदर जुन्या आठवणी !
तेव्हा हे गाव लहान . हे मंदिर गावाबाहेर . गावाच्या टोकाला काका राहायचे . आम्ही लहान मुलं त्यांच्याकडे जायचो . त्यांचीही मुलं लहान . त्यांच्या घरापासून हे मंदिर चालत पाच मिनिंटावर . मग काय ? ते आमचं खेळण्याचं ठिकाण होतं नेहमीचं . आत निरव शांतता . एक माणूस नाहि . तेव्हा निवांत खेळायचो अन आकर्षण त्या पुष्करणीच खूप . खाली जायचं पाण्यात पाहायचं , भीती वाटायची . .. जर पाण्यात पडलो तर पोहता येत नाही आणि मदतीला एक माणूस नाही . एक गूढ आकर्षण ! ..
थरारक ! हे पुन्हा अनुभवायला मिळणार नाही ! आपण कशाकशाला पारखे होत आहोत हे आता जाणवतं. मनःपुर्वक धन्यवाद,बिपीन सुरेश सांगळे_/\_

चित्रगुप्त 01/02/2025 - 06:43
लवकरच मी पुण्यात येणार असल्याने हा लेख वाचून Baneshvar Temple, PUNE' असा गूगल मॅप वर शोध घेता किमान तीन तरी वेगवेगळी बनेश्वर - बाणेश्वर मादिरे दिसली. (तळीगव-दाभाडे, नसरापूर आणि बाणेर मधील) आणखीही आहेत बहुतेक. कृपया कोणीतरी यापैकी कोणकोणती आवर्जून बघण्यासारखी आहेत (माझी रुच 'धार्मिक' पेक्षा निसर्गरम्यत्व, वास्तुकला, मूर्तीकला यात आहे) हे सांगितले तर फार मदत होइल. धन्यवाद.

In reply to by चित्रगुप्त

प्रचेतस 01/02/2025 - 08:03
तिन्ही पाहिलेली आहेत, यापैकी बाणेरचे सर्वात प्राचीन, ती राष्ट्रकूटकालीन (पाताळेश्वरला समकालीन) खोदीव लेणी आहे (बहुधा नववे शतक). कातळ फोडून लेणीत जायचा मार्ग तयार केला आहे, आवारात वीरगळ आहेत आणि इतर कुठेही सहसा न दिसणारी बलीवेदीचा चौकोनी दगड आहे ज्याच्या चारी बाजुंना बकऱ्याची मस्तके कोरलेली आहेत.

In reply to by प्रचेतस

चित्रगुप्त 01/02/2025 - 08:30
मी बाणेरलाच मुक्काम करणार असल्याने तिथे जाईनच, शिवाय अन्य दोन्ही बघण्याचा प्रयत्न करेन.

यश राज 03/02/2025 - 13:24
सुन्दर लिहिलयं, यत्ता तिसरी का चौथीत असताना आमची शालेय सहल बनेश्वरला गेली होती.

जुइ 05/02/2025 - 04:16
सुंदर फोटो आणि माहिती. या बनेश्वर मंदिराबद्दल फारसे ऐकले नव्हते, या लेखामुळे ओळख झाली. धन्यवाद!

गोरगावलेकर 18/02/2025 - 11:52
पुण्याला जातांना तळेगांव टोलनाक्याच्या पुढे डावीकडे वळण घेत मंदिरास पोहोचलो. टोलनाक्यावर असलेल्या मार्गिकेतून आमची गाडी व्यवस्थित पुढे सरकत होती पण बाजूच्या मार्गिकेत बुथवर काही अडचण निर्माण झाल्याने मागील खूप गाड्या खोळंबल्या होत्या. काय अडचण आहे ते बघण्यासाठी उतरलेल्या एका प्रसिद्ध व्यक्तिमत्वाची टिपलेली ही एक झलक.  प्रतिसादांतून आलेल्या ठिकाणांपैकी पाच पांडव मंदीर, पूर्वीच पाहिलेले आहे .   केदारेश्वर मंदिर पहिले . खूप सुंदर आहे . येथील दगडी बांधकाम असेलेली आयताकृती विहीर खूपच आवडली

In reply to by गोरगावलेकर

चौथा कोनाडा 01/03/2025 - 19:55
छोटेखानी वृतांत आणि प्रचि खुपच सुंदर ! केदारेश्वर मंदिर, दगडी बांधकाम विहीर सुंदरच आहे ! पाच पांडव मंदीर साधंच पण विशेष दिसतंय ! आता या स्थळांना भेट देण्याचं आयोजन करावंच लागेल. धन्यवाद, गोरगावलेकर !
लेखनविषय:
लेखनप्रकार
मॉल मधली थोडीफार खरेदी संपल्यानंतर बाहेर पडताना मोबाईल वाजला बघितला बघितला तर बबनचा फोन. घाईत होतो, त्यामुळे प्रश्न पडला फोन घ्यावा की नाही. पण मग घेतला फोन. उत्तरलो " मार्केट मध्ये शॉपिंगच्या गडबडीत आहे. घरी गेल्यावर फोन करतो " बबन म्हणजे माझा जुना दोस्त. गेल्या अनेक वर्षाचा सहवास. आमचं बोलणं सुरू झालं की खूप वेळ चालायचं.. म्हणजे एक तासाच्या वरच. वेगवेगळ्या विषयांवरच्या चर्चा रंगायच्या. शॉपिंग आटोपून घरी गेल्यावर त्याला फोन केला. बबन : अरे... काय, कुठे आहेस तू ? बबनचं असंच आहे.

जॉन अब्राहम (भाग ५)

श्रीगुरुजी ·

लिंकनच्या हत्येवर युट्यूबवर खूप काही आहे. तरीही मी बघितलेली एक डॉक्युमेन्टरी पुढे देत आहे-- The Last Night of Abraham Lincoln | Part 1: Assassination - https://www.youtube.com/watch?v=HEwy5k3nsT0 The Last Night of Abraham Lincoln | Part 2: Immortality- https://www.youtube.com/watch?v=GgATxed5C-4 केनेडींच्या हत्येवरही अशीच एक डॉ़क्युमेंटरी बघितली होती. ती मिळाल्यावर ती पण देतो.

सौंदाळा 23/01/2025 - 21:27
हा भाग पण आवडला पदावर असताना किती भारतीय पंतप्रधान, मुख्यमंत्री, राष्ट्रपती यांची हत्या झाली असा किडा या धाग्याच्या निमित्ताने डोक्यात आला. लाल बहादूर शास्त्री, इंदीरा गांधी, राजीव गांधी हे तर माहिती आहेत पण अजून कोण आहेत? वाय एस आर, माधवराव शिंदे यांचा अपघात झाला?

श्रीगुरुजी 13/03/2025 - 15:27
धन्यवाद! २-३ दिवसात पुढील भाग लिहितो. सध्या खूप व्यग्र असल्याने लिहायला वेळ मिळत नाही.

लिंकनच्या हत्येवर युट्यूबवर खूप काही आहे. तरीही मी बघितलेली एक डॉक्युमेन्टरी पुढे देत आहे-- The Last Night of Abraham Lincoln | Part 1: Assassination - https://www.youtube.com/watch?v=HEwy5k3nsT0 The Last Night of Abraham Lincoln | Part 2: Immortality- https://www.youtube.com/watch?v=GgATxed5C-4 केनेडींच्या हत्येवरही अशीच एक डॉ़क्युमेंटरी बघितली होती. ती मिळाल्यावर ती पण देतो.

सौंदाळा 23/01/2025 - 21:27
हा भाग पण आवडला पदावर असताना किती भारतीय पंतप्रधान, मुख्यमंत्री, राष्ट्रपती यांची हत्या झाली असा किडा या धाग्याच्या निमित्ताने डोक्यात आला. लाल बहादूर शास्त्री, इंदीरा गांधी, राजीव गांधी हे तर माहिती आहेत पण अजून कोण आहेत? वाय एस आर, माधवराव शिंदे यांचा अपघात झाला?

श्रीगुरुजी 13/03/2025 - 15:27
धन्यवाद! २-३ दिवसात पुढील भाग लिहितो. सध्या खूप व्यग्र असल्याने लिहायला वेळ मिळत नाही.
लेखनविषय:
a ==> a ==> a ==> a त्यामुळं अब्राहम लिंकन यांनी गुलामगिरीला विरोध केला. अमेरिकेत त्यांनी कृष्णवर्णीयांच्या स्वातंत्र्यासाठी आवाज उठवाला.

जॉन अब्राहम (भाग ४)

श्रीगुरुजी ·

अ‍ॅब्रॅहॅम लिंकनचा मारेकरी जॉन विल्क्स बूथ अमेरिकन रंगभूमीवरील एक लोकप्रिय कलाकार होता. १४ एप्रिल १८६५ या दिवशी लिंकन फोर्ड थिएटरमध्ये 'माय अमेरिकन कझिन' हे विनोदी नाटक बघायला गेले होते. चार वर्षांच्या यादवी युद्धाचा ताण त्यांना अगदी असह्य झाला होता. चार दिवस आधीच युध्द संपल्याने त्यांच्या मनावरील मोठा ताण नाहीसा झाला होता. १४ एप्रिलला शुक्रवार होता. त्या दिवशी रात्री म्हणजे अमेरिकन परिभाषेत 'फ्रायडे नाईटला' ते दडपण नाहीसे झाल्याने काळजीमुक्त वातावरणात ते विनोदी नाटक बघायला गेले होते. त्याकाळी ब्रिटिश लोक स्वतःला अमेरिकन्सपेक्षा श्रेष्ठ समजायचे आणि ब्रिटनमध्ये ज्यांना काही करता येत नाही असे लोक अमेरिकेला जातात असे ब्रिटिश लोक अगदी पहिल्या महायुध्दापर्यंत समजत असत. असा एक असभ्य आणि असंस्कृत अमेरिकन आपल्या विस्तारीत कुटुंबातील इस्टेटीतील वाटा आपल्याला मिळणार हे कळल्यानंतर ब्रिटनला जातो. तिथे मग तो अमेरिकन आणि ब्रिटिश लोक यांच्यातील सांस्कृतिक खटके वगैरे त्या नाटकात दाखविले होते. त्या नाटकात एक विनोदी वाक्य कथानकात आल्यावर थिएटरमध्ये नेहमी हशा पिकायचा. जॉन विल्क्स बूथला हे माहित होते. तसेच फोर्ड थिएटरचा कोपरा आणि कोपरा त्याला माहित होता. त्या वाक्यावर हशा पिकेल बरोबर तेव्हा लिंकनना गोळी घालायची हे त्याने ठरविले होते. त्यावेळेस मेरी आणि अ‍ॅब्रॅहॅम लिंकन पहिल्या मजल्यावरील गॅलरीत त्यांच्यासाठीच्या विशेष कक्षात बसले होते.कक्षाचे दार बंद होते. पण दाराला जॉन विल्क्स बूथने त्या दिवशी सकाळीच एक छोटे भोक पाडून ठेवले होते. त्यामुळे तो कडी उघडून त्या कक्षात जाऊ शकणार होता. लिंकनचा अंगरक्षक एकच होता आणि तो त्या वेळेस त्या कक्षाच्या बाहेर असणे अपेक्षित होते पण तो तेव्हा जागेवर नव्हता. त्या कक्षाकडे जाणार्‍या जिन्याच्या समोर तळ मजल्याला फोर्ड थिएटरचे एक प्रवेशद्वार होते. तिथे थिएटरशी संबंधित एक माणूस होता. त्या प्रवेशद्वाराच्या बाहेर आपला घोडा लावून त्या घोड्याकडे थोडा वेळ लक्ष द्या मी आलोच असे म्हणत जॉन विल्क्स बूथने ते विनोदी वाक्य कथानकात यायच्या काही वेळ आधी तिथून फोर्ड थिएटरमध्ये प्रवेश केला. बूथ हा एक लोकप्रिय आणि नावाजलेला कलाकार असल्याने त्याने फोर्ड थिएटरमध्ये जाणे यात काही विशेष वाटले नसावे. मात्र अध्यक्ष बसले आहेत तिथल्याच बाजूने त्याला का जायचे आहे हा प्रश्न त्या माणसालाही पडला नाही. अध्यक्षांची सुरक्षाव्यवस्था इतकीच होती. बूथने कडी उघडून आत प्रवेश केला. तोपर्यंत तो मागे दबा धरून उभा होता. लिंकनना त्याची अजिबात कल्पना नव्हती. बरोबर ते विनोदी वाक्य आले आणि सभागृहात हशा पिकला आणि बरोबर त्याच वेळेस बूथने लिंकनना गोळी घातली. गोळीचा एकदम मोठा आवाज आणि धूर आल्याने सभागृहात गोंधळ उडाला. सभागृहातील लोकांना वरील गॅलरीत लिंकन आहेत आणि तिथून गोळीचा आवाज आला म्हणजे काय झाले असेल याची कल्पना आलीच असेल. तेवढ्यात बूथने त्या गॅलरीतून व्यासपीठावर उडी मारली. उंचावरून उडी मारल्याने त्याच्या पायाला दुखापत झाली- पायाचे हाड थोडेसे फ्रॅक्चरच झाले. व्यासपीठावर उडी मारल्यावर 'Sic semper tyrannis!' म्हणजे 'अत्याचार्‍यांबरोबर असेच व्हायला पाहिजे' या अर्थाचे लॅटिन वाक्य बोलला. बूथ हा ओळखीचा चेहरा असल्याने त्याला लोकांनी लगेच ओळखले. म्हणजे लिंकनना गोळी घालणारा जॉन विल्क्स बूथ हाच आहे हे लगेचच स्पष्ट झाले. सभागृहात उडालेल्या गोंधळाचा फायदा घेऊन तिथून बूथ निसटला आणि मागच्या बाजूला लावलेला घोडा त्याने ताब्यात घेतला आणि घोड्यावर बसून तो निघून गेला. तो पुढे कुठे गेला पुढील भागांमध्ये येईलच. त्यामुळे आता काही लिहित नाही.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

चार वर्षांच्या यादवी युद्धाचा ताण त्यांना अगदी असह्य झाला होता.
अमेरिकन यादवी युध्दात दोन्ही बाजूंकडून मारल्या गेलेल्यांची संख्या विविध अंदाजांप्रमाणे ७ ते १० लाख इतकी होती. १८६० मध्ये झालेल्या जनगणनेनुसार देशाची लोकसंख्या ३ कोटी १४ लाख होती. म्हणजे यादवी युध्दात कमितकमी २% पेक्षा जास्त लोक मारले गेले होते. त्यामुळे त्याचा अध्यक्षांवर तणाव आला असेल तर अजिबात नवल नाही. खालील फोटोमध्ये त्याची कल्पना येईल. डावीकडच्या फोटोत लिंकन १८६१ मध्ये अध्यक्षपदाची शपथ घेण्यापूर्वी कसे दिसायचे आणि उजवीकडच्या फोटोत त्यांची हत्या होण्यापूर्वी काही दिवस ते कसे दिसत होते हे दिसेल. अवघ्या चार वर्षात लिंकन किमान १५-२० वर्षाने अधिक म्हातारे दिसू लागले होते. Lincoln

अ‍ॅब्रॅहॅम लिंकनचा मारेकरी जॉन विल्क्स बूथ अमेरिकन रंगभूमीवरील एक लोकप्रिय कलाकार होता. १४ एप्रिल १८६५ या दिवशी लिंकन फोर्ड थिएटरमध्ये 'माय अमेरिकन कझिन' हे विनोदी नाटक बघायला गेले होते. चार वर्षांच्या यादवी युद्धाचा ताण त्यांना अगदी असह्य झाला होता. चार दिवस आधीच युध्द संपल्याने त्यांच्या मनावरील मोठा ताण नाहीसा झाला होता. १४ एप्रिलला शुक्रवार होता. त्या दिवशी रात्री म्हणजे अमेरिकन परिभाषेत 'फ्रायडे नाईटला' ते दडपण नाहीसे झाल्याने काळजीमुक्त वातावरणात ते विनोदी नाटक बघायला गेले होते. त्याकाळी ब्रिटिश लोक स्वतःला अमेरिकन्सपेक्षा श्रेष्ठ समजायचे आणि ब्रिटनमध्ये ज्यांना काही करता येत नाही असे लोक अमेरिकेला जातात असे ब्रिटिश लोक अगदी पहिल्या महायुध्दापर्यंत समजत असत. असा एक असभ्य आणि असंस्कृत अमेरिकन आपल्या विस्तारीत कुटुंबातील इस्टेटीतील वाटा आपल्याला मिळणार हे कळल्यानंतर ब्रिटनला जातो. तिथे मग तो अमेरिकन आणि ब्रिटिश लोक यांच्यातील सांस्कृतिक खटके वगैरे त्या नाटकात दाखविले होते. त्या नाटकात एक विनोदी वाक्य कथानकात आल्यावर थिएटरमध्ये नेहमी हशा पिकायचा. जॉन विल्क्स बूथला हे माहित होते. तसेच फोर्ड थिएटरचा कोपरा आणि कोपरा त्याला माहित होता. त्या वाक्यावर हशा पिकेल बरोबर तेव्हा लिंकनना गोळी घालायची हे त्याने ठरविले होते. त्यावेळेस मेरी आणि अ‍ॅब्रॅहॅम लिंकन पहिल्या मजल्यावरील गॅलरीत त्यांच्यासाठीच्या विशेष कक्षात बसले होते.कक्षाचे दार बंद होते. पण दाराला जॉन विल्क्स बूथने त्या दिवशी सकाळीच एक छोटे भोक पाडून ठेवले होते. त्यामुळे तो कडी उघडून त्या कक्षात जाऊ शकणार होता. लिंकनचा अंगरक्षक एकच होता आणि तो त्या वेळेस त्या कक्षाच्या बाहेर असणे अपेक्षित होते पण तो तेव्हा जागेवर नव्हता. त्या कक्षाकडे जाणार्‍या जिन्याच्या समोर तळ मजल्याला फोर्ड थिएटरचे एक प्रवेशद्वार होते. तिथे थिएटरशी संबंधित एक माणूस होता. त्या प्रवेशद्वाराच्या बाहेर आपला घोडा लावून त्या घोड्याकडे थोडा वेळ लक्ष द्या मी आलोच असे म्हणत जॉन विल्क्स बूथने ते विनोदी वाक्य कथानकात यायच्या काही वेळ आधी तिथून फोर्ड थिएटरमध्ये प्रवेश केला. बूथ हा एक लोकप्रिय आणि नावाजलेला कलाकार असल्याने त्याने फोर्ड थिएटरमध्ये जाणे यात काही विशेष वाटले नसावे. मात्र अध्यक्ष बसले आहेत तिथल्याच बाजूने त्याला का जायचे आहे हा प्रश्न त्या माणसालाही पडला नाही. अध्यक्षांची सुरक्षाव्यवस्था इतकीच होती. बूथने कडी उघडून आत प्रवेश केला. तोपर्यंत तो मागे दबा धरून उभा होता. लिंकनना त्याची अजिबात कल्पना नव्हती. बरोबर ते विनोदी वाक्य आले आणि सभागृहात हशा पिकला आणि बरोबर त्याच वेळेस बूथने लिंकनना गोळी घातली. गोळीचा एकदम मोठा आवाज आणि धूर आल्याने सभागृहात गोंधळ उडाला. सभागृहातील लोकांना वरील गॅलरीत लिंकन आहेत आणि तिथून गोळीचा आवाज आला म्हणजे काय झाले असेल याची कल्पना आलीच असेल. तेवढ्यात बूथने त्या गॅलरीतून व्यासपीठावर उडी मारली. उंचावरून उडी मारल्याने त्याच्या पायाला दुखापत झाली- पायाचे हाड थोडेसे फ्रॅक्चरच झाले. व्यासपीठावर उडी मारल्यावर 'Sic semper tyrannis!' म्हणजे 'अत्याचार्‍यांबरोबर असेच व्हायला पाहिजे' या अर्थाचे लॅटिन वाक्य बोलला. बूथ हा ओळखीचा चेहरा असल्याने त्याला लोकांनी लगेच ओळखले. म्हणजे लिंकनना गोळी घालणारा जॉन विल्क्स बूथ हाच आहे हे लगेचच स्पष्ट झाले. सभागृहात उडालेल्या गोंधळाचा फायदा घेऊन तिथून बूथ निसटला आणि मागच्या बाजूला लावलेला घोडा त्याने ताब्यात घेतला आणि घोड्यावर बसून तो निघून गेला. तो पुढे कुठे गेला पुढील भागांमध्ये येईलच. त्यामुळे आता काही लिहित नाही.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

चार वर्षांच्या यादवी युद्धाचा ताण त्यांना अगदी असह्य झाला होता.
अमेरिकन यादवी युध्दात दोन्ही बाजूंकडून मारल्या गेलेल्यांची संख्या विविध अंदाजांप्रमाणे ७ ते १० लाख इतकी होती. १८६० मध्ये झालेल्या जनगणनेनुसार देशाची लोकसंख्या ३ कोटी १४ लाख होती. म्हणजे यादवी युध्दात कमितकमी २% पेक्षा जास्त लोक मारले गेले होते. त्यामुळे त्याचा अध्यक्षांवर तणाव आला असेल तर अजिबात नवल नाही. खालील फोटोमध्ये त्याची कल्पना येईल. डावीकडच्या फोटोत लिंकन १८६१ मध्ये अध्यक्षपदाची शपथ घेण्यापूर्वी कसे दिसायचे आणि उजवीकडच्या फोटोत त्यांची हत्या होण्यापूर्वी काही दिवस ते कसे दिसत होते हे दिसेल. अवघ्या चार वर्षात लिंकन किमान १५-२० वर्षाने अधिक म्हातारे दिसू लागले होते. Lincoln
लेखनविषय:
जॉन अब्राहम (भाग १) ==> जॉन अब्राहम (भाग २) ==> जॉन अब्राहम (भाग ३) जेव्हा स्पष्टपणे गुलामगिरीविरोधी रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार अब्राहम लिंकन यांनी १८६० च्या अध्यक्षीय निवडणुकीत विजय मिळवला, तेव्हा सुरूवातीला सात दक्षिणी राज्ये (दक्षिण कॅरोलिना, मिसिसिपी, फ्लॉरिडा, अ‍ॅलाबामा, जॉर्जिया, लुझियाना आणि टेक्सस) यांनी धोका पत्करला आणि संघटित होऊन अमेरिकेतून वेगळे होऊन नवीन देश निर्माण करण्याचा निर्णय घेतला .