चौकशी

आम्ही नसताना काय झाले ?

मंडळी,

येथील काही प्रतिसादांवरून (आणि भोचकपणे वाचलेल्या खरडवह्यांतून) आपल्याला जाणवलेच असेल, की मिसळपावाचे आम्ही २२ नंबराचे सदस्य असलो तरी कार्यबाहुल्यास्तव आम्हाला पूर्वीप्रमाणे येथे येणे जमत नव्हते. त्यामुळे गेले दोन महिने आम्ही मिसळपावच काय, तर आमची इतर टवाळक्यांची स्थाने देखील टाळत होतो.

गेल्या आठवड्यापासून जर फुर्सत मिळाली, आणि पुन्हा एकदा मिसळपावावर आमचा वावर सुरू झाला. त्यानिमित्ताने झंडू बामचा खपही वाढला असे काही सदस्य म्हणतात.

असो, पण मुळात, आम्ही नसताना येथे काय घडले, ह्याचा गोषवारा कुणीतरी द्यावा, अशी आमची विनंती आहे. नाहीतर उगाच गेल्या दोन महिन्यातले सगळे लिहिलेले वाचावे लागेल.

ते नकोच. उगाच कुणाच्या लहानपणी लहानभावाने व्रात्यपणा केला त्याचे वर्णन वगैरे थोर साहित्य वाचण्यात आमचा बहुमूल्य वेळ जाईल, माहितीच असलेल्या "थोर" संगीत कारांची चित्रे (महाजालावरून संकलीत केलेली) वगैरे उतरवून घेता घेताच आमचे अर्धे आयुष्य व्यतीत होईल, आणि मिसळपावाची आम्ही टवाळकी करण्यासाठी केलेली निवड व्यर्थ जाईल.

त्यापेक्षा कुणी जर संक्षिप्त रूपात येथे गेल्या २-४ महिन्यात काय घडले असे लिहिले, तर सोपे जाईल.

गेले दोन दिवस मी येथे भटकतोय, त्यातून मला कळलेल्या गोष्टी अशा:

१. संजोपराव आणि तात्यांचे चंची-सख्य आता मिटले, आणि चांगलेच वाजले आहे. ह्याला कारणीभूत संरा चे आसपास, सु आणि च वगैरे, असे कळते.
२. सुभाषिणीदेवी तात्याच्या आतल्या गोटात सामील झाल्या असून आता त्यांना सगळ्यांची इत्थंभूत माहिती आहे. (माझा आय पी ऍड्रेस कळवावा Wink
३. येथील नवीन सदस्यांची लग्ने झाली, कट्टे झालेत वगैरे सर्व सोशल ऍक्टिव्हिटीजला ऊत आलेला आहे, पण तात्या अजूनही त्या पिरंगुटच्या कट्ट्याची आठवण काढून हळहळतो आहे.
४. पोष्टमनची मनोगतावरून (पण) हकालपट्टी झाली, आणि तो आता न घरका न घाटका असा मुंजा म्हणून फिरतो आहे.
५. येथील एक जुना संपादक ही टल्ली होऊन सध्या "आबोदाना ढूंढता है" असे कळते.
६. कुणी पोलीस झालेत, कुणी इण्ड्या ला जाऊन आले, कुणी समर्थ भोजनालयात मासे हाणले.
७. कुणी संपादक झालेत, पाहुणे, आणि मिपा हा एक टवाळकीचा अड्डा नसून काहीतरी गंभीर प्रकरण आहे, हे उगाच लोकमनात ठसवू लागले.

या व्यतिरीक्त बर्‍याच घडामोडी असतील. प्रकट सांगता येत नसतील तर पोष्टकार्डाने कळवा.

- सर्किट

स्वप्नविश्वाचा विरह...

कधी सकाळचा गजर वाजून सांगतो की, "उठा, आवरा, ऑफीसला जा... " आणि आपले मात्र ढिम्म हलायचे मन नसते. इत्तके मस्त स्वप्न पडत असते की ते सोडून ऑफीसला जायचे म्हणजे कैच्याकैच असे वाटावे. ऑफिसमध्ये फोन करून सुट्टी घ्यावी आणि असेच अनादीअनंत काळासाठी आपण आपल्या स्वप्नात रममाण व्हावे अशी अनावर इच्छा होते. फोन करायलाही स्वप्नातून बाहेर पडवत नाही. स्वप्नात मन रमवावे वाटत असतानाही का कोण जाणे मनाचे अर्धेअधिक लक्ष मात्र त्या मेल्या पुढेपुढे सरकणाऱ्या काट्यासोबत टिकटिक करत फिरत राहते. जी दोलायमानता शेवटी असह्य होऊन तिरीमिरीत उठून आवरून ऑफिसला जावेच लागते. अख्खा दिवस मग काही मनाजोगते म्हणून घडत नाही किंवा घडले तरी त्यात मजा अशी वाटत नाही.. ते स्वप्न.. ते स्वप्न पूर्ण पहायला मिळाले असते तर मस्त झाले असते असे वाटत राहते पण ते नक्की काय होते ते मात्र आठवत नाही त्यामुळे एक वेगळीच विरहभावना मनात उभी रहाते.

असे काही होते का तुम्हासोबतही? की मीच एकटी वेंधळी आहे असे चमत्कारीकसे काही आज अनुभवणारी? अशा परिस्थितीत नक्की काय केले तर ही विरहभावना टाळता येऊ शकते?

कोण कोण येणार धम्याचा लग्नाला ?

धमाल्या ८ जुलैला विवाहाच्या पवित्र बंधनात पुणे येथे अडकत आहे.
(सस्नेह निमंत्रण.)
त्याला प्रोत्साहन व धीर देण्यासाठी कोण कोण हजर राहणार आहे?

गेल्या वेळीच्या दंगलीला मी अनुपस्थित राहील्याने आंद्या ने नको त्या भागावर लाथा मारल्या. त्याच्या अजुन वेदना होतायत.
म्हणुन ते पापमार्जन करण्यासाठी, मी खास त्या दिवशी सुट्टी घेउन धमाल्याच्या लग्नात जाणार आहे.

अजुन तरी धम्याला भेटवस्तु द्यायचा निर्णय झाला नाही. त्यामुळे मी त्याला आहेर करायच्या विचारात आहे.

पण मला ऐकादी गणपतीची मुर्ती वैगेरे द्यावशी वाटते आहे. अजुन ऐकादा चांगली भेट वस्तु आहे का?
जर अजुन कोणाला भेट द्यायची असेल तर ऐकत्र मिळुन भेट देउ शकतो.

त्याला प्रोत्साहन व धीर देण्यासाठी कोण कोण हजर राहणार आहे?
कोणी भेटवस्तु देणार आहे का?

मिपाकरांच्या आधुनिक म्हणी, सुवचने

आपण सगळे जण काही नवीन म्हणी तयार केलेल्या आहेत.
जसे इनोबांनी तयार केलीली चिकन रोटीची म्हण
मी काही दिवसापुर्वी केलीली म्हण
'प्रयत्ने कळफलक बडवता, शुद्ध मराठी गळे |

आणि आपण सही म्हणुन सुद्धा चागली वाक्ये लिहतो. मला विजुभाउ, चतुरंग यांची वाक्ये स्मरणात आहेत. ती वाक्ये काही संग्रही ठेवण्यालायक आहेत.

माझी काही आवडती वाक्ये
पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत - विजुभाउ

बुध्दीबळाच्या खेळात राजा किती ही मोठा असला तरी तो व प्यादा खेळानंतर एकाच बॉक्स मध्ये बंद होतात...! - राज जैन

बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है ..... - छोटा डॉन

इ इ.

तुमची अशी कोणती आवडती वाक्ये आहेत का?
जी आपण संग्रही ठेवण्यालायक ठेउ शकतो.

माझ्या टोपण नावामागचे कारण

आपण येथे टोपण नावाने वावरतो. ते आपण स्व खुशीने घेतलेले आहे. ते नाव घेण्यापाठीमागे ऐक कारण आहे. ते कदाचीत ऐक प्रकारचे आकर्षण असु शकेल.

म्हणजे, मी लहान पणा पासुन जवळ पास पुस्तकी किडा. लहान पणी रॉबीन हुड, टारझन, अरेबियन नाईटस, रुस्तम आणि सोहराब (ह्या कथेचा शेवट वाचुन मी लहान असताना रड्लोय.), फास्टर फेणे, पुलं आणी खुप सारी पुस्तके वाचली.
रॉबीन हुड पुस्तकासाठी मित्राच्या घरी इतके हेलपाटे मारले की आजुबाजुचे लोक माझ्या हेलपाट्यामागे भलताच संशय घेउ लागले. महाविद्यालयात असताना सुदधा पुस्तकांची आवड कमी झाली नाही. शेवटी पैसे पुरत नाहीत म्हणुन रद्दीच्या दुकानातुन पुस्तके आणुन वाचली. ऐकुन काय तर मला पुस्तकांची भयंकर आवड.

पुलं चे ज्या वेळी मी सखाराम गटणे वाचले त्या वेळी मला त्या व्यक्तीरेखे बद्द्ल ऐक जाणुन घ्यायची ईच्छ्या निर्माण झाली. ऐकदरच ते पुस्तकी बोलणे आणि शेवटचा विवाहाचा प्रसंग आम्ही हसुन हसुन घालवला. आपण ऐक प्रकारे त्याचे व्यक्तीमहत्व आपल्यात किंवा आपले त्याच्यात शोधण्याचा प्रयत्न करत असतो. म्हणजे, शिवाजी राजे सगळ्यांना (काही अपवाद सोडुन)आवडतात, पण सगळे शिवाजी राजे होत नाहीत. मग आपण आपल्या घरातल्या कोनाचे तरी नाव शिवाजी म्हणुन ठेवतो.

ह्यामुळे मी 'सखाराम गटण' हे नाव घेतले.

आपण आपले टोपण नाव का घेतले ?

II राजे II,
धमाल मुलगा,
आनंदयात्री,
पिवळा डांबिस,
विसोबा खेचर,
इनोबा म्हणे
इ.

बोला आता.
तुमचे व्यक्तीमहत्व कसे काय त्या टोपण नावाशी संबधित आहे?

ही विसंगती का?

आदाब!

ही वाक्ये पाहा -

"काय रे, घरी इतकी छान बायको असताना बाहेर शेण का खातोस?"

किंवा,

"इतका साधा, सज्जन आणि चांगला नवरा असून ती ऑफिसातल्या बॉसबरोबर शेण खाते!"

किंवा,

"असं करू नकोस, लोकं तोंडात शेण घालतील!"

अशी वाक्य आपण नेहमी ऐकतो. ह्या वाक्यांतून शेण हा काहितरी वाईट, निंदनीय प्रकार आहे असा अर्थ निघतो.

आता ही वाक्ये पाहा -

"शेणाने अगदी छान सारवलेलं घर!"

किंवा,

"शेणाने अगदी छान सारवलेल्या जमिनीचा एक हवाहवासा वाटणारा वास आणि जाणवणारा तो नैसर्गिक स्पर्श!"

इथे शेण म्हणजे काहितरी एक मंगलदायी, घराचे सौंदर्य वाढवणारा प्रकार आहे असा अर्थ निघतो.

वरील दोन्ही प्रकारच्या वाक्यात 'शेण' या पदार्थाच्या अर्थाबद्दल विसंगती दिसते. ही विसंगती का? कुणी सांगू शकेल काय?

शुक्रिया!

आपल्या सर्वांचाच,
शेणगोळा.

सर्वोत्तम पाच.

आदाब!

सर्व आदरणीय मिपा सभासदांकडून इथे लिहिल्या गेलेल्या साहित्याबद्दल निम्नलिखित माहिती मागवण्यात येत आहे. सहकार्याची अपेक्षा आहे.

साहित्य प्रकार - आपल्याला वाटणारे दहा सर्वोत्तम.
काव्य प्रकार - आपल्याला वाटणारे दहा सर्वोत्तम.
पाकप्रकार - आपल्याला वाटणारे दहा सर्वोत्तम.

माझे येथील बरेच वाचन बाकी आहे. वरील माहिती मिळाल्यास मला प्रथम हेच साहित्य वाचायला आवडेल.

मला मिपाच्या दिवाळी अंकात लिहायचे आहे. ते लेखन कुणाला पाठवायचे?

आदाब!

आपल्या सर्वांचाच,
शेणगोळा.

तो मी नव्हेच --- कीती समान नामधारी?

मिपाच्या प्रमोद देवांचे तो मी नव्हेच डिसक्लेमर वाचून हा चर्चेचा विषय सुचला. आपल्याच सारखे नाव असणारी आणखी इतर व्यक्तीमत्वे जगात असतात. (कधी कधी आपल्यासारखे तंतोतंत दिसणारेही असतात. ते जरा पचवायला कठीणच जाते.) मिपाकरांपैकी कोणाला आपापले समान नामधारी सापडले आहेत का?

मी माझ्यापासून सुरवात करतो.

मी अरुण मनोहर रहाणार सिंगापूर. ललीत साहित्य लिहीणे आणि वाचणे हा छंद.

याशिवाय मला दोन आणखी अरुण मनोहर माहित आहेत.
एक अरुण मनोहर हे नागपूरचे नावाजलेले सिनीयर लॉयर प्रसीद्धच आहेत.
दुसरे अरुण मनोहर graduate student working towards PhD at the Department of structural engineering, UCSD. हे फोटोग्राफीसाठी प्रसिद्ध आहेत. ह्या लीन्कवर त्यांची सुंदर प्रकाशचित्रे आहेत. http://www.flickr.com/photos/arunmanohar/
आणखी कोणी?
बघुया कदाचित इतर मिपाकरांकडून आणखी काही इन्टरेस्टींग माहिती मिळेल.

हा परिच्छेद कुठल्या पुस्तकातला आहे?

हा परिच्छेद कुठल्या पुस्तकातला आहे?

गुहेतून एक कुत्रा आला..मी त्याच्यासमोर माझे हाल टाकले..म्हणालो कुत्र्या माझे हाल खा.. कुत्र्याने ते खाल्ले नाही..याला म्हणतात्..कुत्र्यानेही हाल न खाणं!

बहुतेक जी. ए. किंवा नेमाडे - पण नक्की माहित नाही. कुणाला माहित आहे?

प्रत्यक्षातला कामाठीपुरा आणि बुधवार पेठ

"काठावरून निरखलेला कामाठीपुरा " वाचला. त्यापाठोपाठ त्या सीतामढीच्या हलकट गावकर्‍यांच्या
क्रुर वागणुकीची बातमीही वाचली.

पण काही प्रश्न पडलेतः-

"कामाठीपुरा किंवा बुधवार पेठ" इथं काय चालतं हे पोलिसांसकट सर्व यंत्रणेला ठाउक आहे ना?
मग वर्तमान पत्रात "पेठेतील अमुक ठिकाणी धाड आणी तमुक इतक्या व्यक्तिंची सुटका"
किंवा "भरशहरातील अमुक पार्लरच्या नावामागच्या कुंटणखान्यावर छापा."
अशा बातम्या दिसतात.
बरं ह्या बातम्या येउन गेल्यावरही (पोलिसांनी सगळ्यांना पकडुन नेल्यावरही)ह्या भागातील(पेठांमधील) "कार्यक्रम" चालुच.
ह्ये कसं काय होतय?
म्हणजे मुळात शरीर विक्रय हा भारतीय कायद्यानुसार अधिकृत/कायदेशीर आहे काय?
जर अधिकृत असेल तर पोलिस कुणालाही अटक कसे करु शकतात?
नसल्यास कोणत्या कलमाखाली तो दंडनीय गुन्हा आहे?
शरीर विक्रय करणारी व्यक्ती गुन्हेगार मानली जाते, की त्यासाठी दलाली (ह्याचा समानार्थी असभ्य शब्द टाळतोय.)
करणारी व्यक्ती गुन्हेगार असते?
ग्राहकाला नक्की काय शिक्षा मिळते?(किमान ते कमाल)
स्वतः प्रस्तुत लेखक टोकाच्या सुरक्षित(टिपिकल पांढरपेशा) आणि मध्यम वर्गीय घरातील असल्याने, ह्या
गोष्टींची माहिती केवळ पेपर मधुन होते, तेव्हढीच आहे.पण तीही संदिग्ध वाटते आहे.
कुणाला आणखी माहिती आहे का?
माझ्या माहिती प्रमाणे इथे युरोप मध्येही शरीर विक्रय चालतो.
(ह्याच्या अगदि जवळचा प्रकार"स्ट्रिप डान्सिंग" हा तर अगदिच सर्रास चालतो.)
पण इथे कुणाला जबरदस्तीनं,मारुन मुटकुन "धंद्याला" बसवलं जात नाही असं दिसतं.
म्हणजे, शरीर विक्रय करणार्‍या व्यक्तिच्याही ईच्छा-अनिच्छेला मान आहे.
शिवाय आपल्याकडे आहे, तितकी अवहेलना इथे नाहिये.
जर आपल्याला मानवाला १००% सुसंस्कृत करणं, आणि त्यायोगे हा व्यवसाय थांबवणं अशक्य असेल, तर निदान त्या व्यक्तिंना
इथल्या प्रमाणे सुसह्य आणि कमी अपमानास्पद जीवन देण भारतात करण्यासाठी किती काळ लागेल?
त्यासाठी कुणी आणि काय करायला हवं?
(आपण स्वतः अशा व्यवसायाचा ग्राहक न होणे, ही झाली एक वैयक्तिक पायरी . याशिवाय काय करता येइल? )