ज्योतिष
नाडी ग्रंथांवरील प्रथम आंतरराष्टीय अधिवेशनाचे वार्तांकन - दिवस पहिला
दि ५ जून २०१०
प्रागला नाडी ग्रंथाच्या पहिल्या आंतरराष्ट्रीय अधिवेशनाचा मान मिळाला. भारतात याच्या आधी दोन ठिकाणी नाडी ग्रंथांवर अधिवेशन भरवले गेले होते. २००७ साली पुण्यात व नंतर २००९ साली बडोद्यात. त्यावेळी काही कल्पनाही नव्हती की त्यानंतरचे अधिवेशन असे भारताबाहेर घडेल म्हणून.
दि. ५जून २०१०, शनिवारी सकाळी दहा वाजता जुन्या टाऊन हॉलच्या एका मोठ्या हॉलमधे अधिवेशनाची सुरवात झाली. त्याआधी नऊ वाजल्यापासून बाहेर ज्यांनी आपली नावे नोंदवली होती त्याचे व नविन लोकांचे नावनोंदणीचे काम करायला गर्दी जमा झाली होती. पण कुठेच धक्काबुक्की नव्हती. शांतपणे लोक क्यूला उभे होते. असो.

जोसेफ श्रोटर यांनी अधिवेशनाची सुरवात झाल्याचे जाहीर केले. मात्र स्टेजवर नेहमी प्रमाणे टेबलखुर्च्यांची मांडामांड नव्हती की समईच्या दीपप्रज्वलनाची सोय. मात्र मी आणलेल्या अगस्त्य व भृगु महर्षींचे फोटो आवर्जून ठेवले गेले होते.
पॉवेलने अगोदर सांगून ठेवले होते. त्याच्या भाषेत, "आय दोंत लाईक आरेंजमेत ऑफ स्तुपीद कम्युनिस्ट. नोथिंग ऑन स्टेज." त्याप्रमाणे स्टेजवर मांडामांड होणार नाही. साधेपणाने प्रत्येकाने उभे राहून बोलायचे आहे. माईक हातात घरून.
आम्हाला पुढील रांगेत बसायची सोय होती. चीफ नाडी ग्रंथ वाचक शिवषणमुगम, दुसरे नाडी वाचक पलनी त्यानंतर भाषांतरकार रवी, स्वतः पॉवेल, नाडी ग्रंथ प्रेमी मेरीया, तिची वृद्ध आई धेनका व अन्य काही पहिल्या रांगेत होते. स्टेजच्या एका बाजूला माईक व व्हीडिओ शूटिंगच्या टीममधे काम करणारे जॉन, मीशा, येरी तत्परतेने उभे होते. आम्हा भारतातून आलेल्या निमंत्रितांचा सत्कार रुबाबदार पुष्पगुछ्यांनी झाला.
जोसेफ श्रोटर प्रागमधील एक मान्यवर सायकिक अनॅलेलिस करणारे एक्सपर्ट म्हणून गणले जातात. त्यांनी प्रथम सत्रात सिक्स्थ सेंन्स व नाडी ग्रंथ यावर आपले भाषण केले. त्यांच्या भाषणाचा गोषवारा त्यांचा मुलगा रोडिक मला दबक्या आवाजात सांगत होता. त्यांचे संपुर्ण (पॉवर पॉईटवरून केलेले) भाषण वेगळे येथे वाचायला मिळेल. त्यांच्या भाषणाला टाळ्याचा कडकडाट होऊन उत्साहाचा प्रतिसाद मिळाला. नंतर माझी वेळ आली. मी आधीच्या श्रोटरांच्या भाषणातील धागा पकडून नाडी ग्रंथांतील कथन हे मानवी बुद्धीच्या पलिकडील वैश्विक ज्ञानाच्या साठ्यातून मिळवलेले असल्याचे प्रतिपादन केले. त्यासाठी महर्षींचीच कथने त्याला पुरक आहेत असा खुलासा केला. त्याआधी मी थोडक्यात या अधिवेशनाचा माझ्या दृष्टीने उद्देश व महत्व कथन करणारे निवेदन व स्वागत भाषण केले. माझ्या भाषणाचा अनुवाद रोडिक तत्परतेने करत होता. वेळोवेळी ऐकू येणाऱ्या टाळ्यांमुळे माझे म्हणणे श्रोत्यांपर्यंत पोचत असल्याचे जाणवत होते.
मी नजरेने केलेल्या मोजणी प्रमाणे सर्व खुर्च्या भरलेल्या दिसत होत्या. त्यानुसार सुरवातीला १२० श्रोते होते नंतर वाढून १४० जमले असावेत. माझ्या नंतर मेरीयाने तिचा नाडी ग्रंथांचा भारतातील अनुभव थोडक्यात कथन केला. मग जेवायला सर्व पांगले. भोजन आपापले सोईने करायचे होते. त्यामुळे भारतात हटकून दिसणारी भोजन भाऊंची लगबग इथे नव्हती.
आम्हाला जवळच्या एका रेस्तोरॉंमधे नेले गेले. नेहमी प्रमाणे बीरची ऑर्डर झाली. “पटा पटा आटपा” असा खाक्या नव्हता. तरीही आम्ही तासाभरात हॉलवर वेळेवर परतून पुढील कार्यक्रमात सामील झालो. नंबर माझ्याच होता. यावेळी मला आलेल्या विविध अनुभवांचे कथन करायला सांगण्यात आले होते. योगी रामसुरत कुमारांचा व पॉन्डेचरीतील अरविंदाश्रमाचा भाग सांगताना वेळ संपली. कारण मला रोडिकच्या झेकमधील रुपांतरासाठी वेळ द्यायला लागत होता. असो.
त्या नंतर शिवषण्मुगना पाचारण करण्यात आले. त्यांनी आपल्या खड्या आवाजात तमिळ गायनाने अनेक महर्षींची आळवणी करणारे गायन केले. त्यावर श्रोत्यांच्या आनंदाच्या टाळ्या आल्या. त्यांनी व पलनीने शिवस्तुतीही म्हटली. पुन्हा मला बोलायला आमंत्रित केले गेले. यावेळी मी नाडी ग्रंथांतील विविध कांडांची रचना व त्यातील मजेशीर माहिती दिली.
त्यानंतरच्या सत्रात मानवीशरीरातील सात आंतरअंगांची कल्पना मी सांगितली व चौथ्याशरीरातील विविध शक्ती प्राप्त महर्षींनी संपुर्ण मानवाला देश, धर्म, जाती वा भाषा आदिंची बंधने झुगारून केलेली ही अनन्य साधारण मानवतेची सेवा आहे असे ठासून सांगितले. असा अधिवेशनाचा पहिला दिवस संपन्न झाला.
अधिवेशनाला जमलेल्यात समाजात ९५ टक्के स्त्रियांचा भरणा होता! काही विविध तंग पोषाखातील तरुणी, काही उच्च विचारांच्या गर्भश्रीमंत वाटल्या, तर काही पन्नाशी नंतरच्या! काहींशी बोलताना भारताबद्दल खुप माहिती असलेल्या तर काहींना योगा, प्राणायाम, मंत्र, आस्त्रालोगी(जी), एनर्गी(र्जी) लेवल वर अभ्यास केल्याची जाण असलेल्या विदुशी होत्या. उरलेले पुरुष मारुन मुटकून आल्यासारखे चेहरे करून बसलेले वाटत होते. काही पुरुषांनी मात्र खुप प्रश्न विचारून आपली जागरूकता दर्शवली.
दुसऱ्या दिवसाचे कथन आणि प्राग कॉलिंग लेखमालिका क्रमशः
२६ जून चे चंद्र्ग्रहण - भाग २ (बाधित जन्मतारखा)
कोणत्याही वर्षी खालिल जन्मतारखाना जन्मलेल्या व्यक्तीना त्यांच्या पत्रिकेतील रवि २६ जूनच्या बृहच्चौकोनात सापडतो
१७ मार्च - २५ मार्च
१८ जून ते २५ जून
१९ सप्टे ते २६ सप्टे
१८ डिसे ते २६ डिसे
वरील जन्मतारखाना कार्यनाश, आरोग्याच्या तक्रारी, मानसिक त्रास, निकटच्या लोकांशी मतभेद, आक्रस्ताळीपणा इत्यादि गोष्टी अनुभवास येण्याची शक्यता जास्त आहे
खालिल जन्मतारखाना जन्मलेल्या व्यक्तीना त्यांच्या पत्रिकेतील मंगळ २६ जूनच्या बृहच्चौकोनात सापडतो.
या तारखाना जन्मलेल्या व्यक्तीनी वाहन, धोकादायक यंत्रे चालवणे, कोणतीही नवीन जोखीम स्वीकारणे, भावनिक उद्रेक या पासून काळजी घ्यावी.
१ नोव्हे - ७ नोव्हे १९३५,
२६ फेब्रु - २ मार्च १९३६, ३० जून -६ जूलै १९३६, १९ नोव्हे - २६ नोव्हे १९३६
४ ऑक्टो - १० ऑक्टो १९३७
३ फेब्रु - ८ फेब्रु १९३८, ११ जून - १७ जून १९३८, २९ ऑक्टो - ५ नोव्हे १९३८
२६ मार्च - २ एप्रिल १९३९,
८ जाने - १४ जाने १९४०, २२ मे - २८ मे १९४०, १० ऑक्टो - १६ ऑक्टो १९४०
२२ फेब्रु १९४१ - २७ फेब्रु १९४१, ७ जुलै - १४ जुलै १९४१,
१मे - ७मे १९४२, २१सप्टे - २८ सप्टे १९४२,
३० जाने - ५ फेब्रु १९४३, ३१ मे - ५ जून १९४३
३ एप्रिल - १० एप्रिल १९४४, २ सप्टें १९४४ - ८ सप्टें १९४४
९ जाने - १५ जाने १९४५, १२ सप्टे - १९ सप्टे १९४५
१४ ऑगस्ट - २० ऑगस्ट १९४६, २१ डिसेम्बर - २६ डिसेम्बर १९४६
१५ एप्रिल - २० एप्रिल १९४७, १८ ऑगस्ट -२४ ऑगस्ट १९४७
२२ जुलै - २८ जुलै १९४८, ३० नोव्हे - ६ डिसे १९४८
२५ मार्च - ३० मार्च १९४९, २७ जुलै - २ऑगस्ट १९४९
२ जाने ५० ते १५ जाने १९५०, १० मार्च ते २१ मार्च १९५०
, १९ जून - २८ जून १९५० , १० नोव्हे - १५ नोव्हे १९५०
५ मार्च - १० मार्च १९५१, ८ जुलै - १४ जुलै १९५१, २९ नोव्हे - ६ डिसे १९५१,
१६ ऑक्टो - २१ ऑक्टो १९५२,
११ फेब्रु - १७ फेब्रु १९५३, ६ नोव्हे - १२ नोव्हे १९५३
२० एप्रिल - ६मे १९५४, ९ जून -२४ जून १९५४, १ सप्टे - १० सप्टे १९५४
१९ जाने - २४ जाने १९५५, ३० मे - ५ जून १९५५, १८ ऑक्टो -२४ ऑक्टो १९५५,
४ मार्च - १० मार्च १९५६, १२ डिसे - १९ डिसे १९५६,
९ मे - १५ मे १९५७, २८ सप्टे - ४ ऑक्टो १९५७
७ फेब्र - १३ फेब्रु १९५८, ११ जून - १७ जून १९५८,
१५ एप्रिल - २२ एप्रिल १९५९, १० सप्टे -१६ सप्टे १९५९,
१८ जाने - २३ जाने १९६०, १५ मे -२०मे १९६०, २६ सप्टे - ५ ऑक्टो १९६०
४ जाने -१६ जाने १९६१, २८ फेब्रु - १४ मार्च १९६१, २१ ऑगस्ट - २७ ऑगस्ट १९६१, २८ डिसे १९६१ - २ जाने १९६२
२३ एप्रिल -२८ एप्रिल १९६२, २७ ऑगस्ट - २ सप्टे १९६२,
३१ जुलै - ७ ऑगस्ट १९६३, ९ डिसे -१४ डिसे १९६३
२ एप्रिल - ७ एप्रिल १९६४, ४ ऑगस्ट - १० ऑगस्ट १९६४, ४ जुलै - १२ जुलै १९६५
१८ नोव्हे - २३ नोव्हे १९६५,
१३ मार्च - १८ मार्च १९६६, १५ जुलै ते २१ जुलै १९६६, ९ डिसे - १७ डिसे १९६६
२७ ऑक्टोबर - १ नोव्हे १९६७,
२० फेब्रु - २६ फेब्रु १९६८, २५ जून - १ जुलै १९६८, १४ नोव्हे - २० नोव्हे १९६८
२५ सप्टे - २ ऑक्टो १९६९, २८ जाने - ३ फेब्रु १९७०, ६ जून- १२ जून १९७०, २५ ऑक्टो - ३१ ऑक्टो १९७०
१७ मार्च - २३ मार्च १९७१,
३१ डिसे १९७१ - ६ जाने १९७२,
१७ मे - २३ मे १९७२, ५ ऑक्टो - ११ ऑक्टो १९७२,
१६ फेब्रु - २३ फेब्रु १९७३, २५ जून - १ जूलै १९७३
२५ एप्रिल - १ मे १९७४, १७ सप्टे - २३ सप्टे १९७४
२५ जाने - ३१ जाने १९७५, २६ मे - ३० मे १९७५
२४ मार्च - २ एप्रिल १९७६, २८ ऑगस्ट - ४ सप्टे १९७६
४ जाने - १० जाने १९७७, १ मे - ६ मे १९७७, ५ सप्टे - १२ सप्टे १९७७,
९ ऑगस्ट - १५ ऑगस्ट १९७८, १६ डिसे - २१ डिसे १९७८
१० एप्रिल - १६ एप्रिल १९७९, १२ ऑगस्ट - १९ ऑगस्ट १९७९
१५ जुलै - २२ जुलै १९८०, २५ नोव्हे १ डिसे १९८०,
२० मार्च - २६ मार्च १९८१, २२ जुलै - २८ जुलै १९८१, २२ डिसे - ३१ डिसे १९८१
१० एप्रिल - २२ एप्रिल १९८२, १ जून १९८२ - १५ जून १९८२, ४ नोव्हे - १० नोव्हे १९८२
२८ फेब्रु - ६ मार्च १९८३, ३ जुलै - ९ जुलै १९८३, २३ नोव्हे - ३० नोव्हे १९८३
९ ऑक्टो - १५ ऑक्टो १९८४,
६ फेब्रु - ११ फेब्रु १९८५
२६ जून चे चंद्र्ग्रहण - भाग 1
दोन ग्रह एकमेकांशी निरीक्षकसापेक्ष नव्वद अंशाचा कोन जर करत असतील तर त्या रचनेला ज्योतिषात केन्द्रयोग अशी संज्ञा आहे. केंद्रयोग हे सहसा त्रासदायक असतात कारण त्यात ग्रहांची तत्त्वे नकारात्मक किंवा एकमेकांना विरुद्ध होइल असे काम करताना दिसतात.
दोनाच्या जागी जर चार ग्रह एकत्र येऊन जर एकमेकांशी केंद्र योग करत असतील तर नकारात्मक आविष्कार अधिकच वाढतो. यामुळे ज्या रचना आकाशात तयार होतात. त्यापैकी एक म्हणजे ग्रॅण्ड स्क्वेअर किंवा मराठीत बृहच्चौकोन. जन्मपत्रिकेत बृहच्चौकोन ही रचना असेल तर कमालीच्या जीवनसंघर्षला अशा व्यक्तीनी तोंड दिलेले असते. याच्या उलट बृहत्त्रिकोण ही रचना असते. ज्यांच्या पत्रिकेत बृहत्त्रिकोण असतो त्यांचा आयुष्यक्रम हेवा वाटेल इतका सहज असतो. आयुष्यातले प्रश्न सीमित असतात किंवा वेळच्या वेळी सुटत जातात. संघर्ष हा शब्द त्यांच्या शब्द्कोषात नसतो. अशा व्यक्तीना जगातली गुंतागुंत, इतरांचे कष्ट यांच्या विषयी संवेदना पण कमी असते. जन्मपत्रिकेतील रवि,चंद्र, लग्न आणि ख-मध्य हे जर बृहत्त्रिकोण किंवा बृहच्चौकोन तयार करत असतील तर मात्र वर सांगितलेले आविष्कार हमखास बघायला मिळतात.
हे सर्व सांगायचा उद्देश एवढाच की २६ जून रोजी होणारे ग्रहण बृहच्चौकोन ही रचना निर्माण करणार आहे (प्रभावकाल +/- ५ दिवस). सुदैवाने हा बृहच्चौकोन काही मिनीटेच म्हणजे चंद्र रविच्या प्रतियुतीमध्ये असे पर्यंतच टिकेल. पण तरीही याचा परीणाम मोठा आणि दूरगामी असू शकतो.
ग्रहणाची पत्रिका

अमुक अमुक ग्रहयोगांमुळे जागतिक पातळीवर काय घडामोडी होतील याचा विचार मेदिनीय ज्योतिषात करतात. मेदिनीय ज्योतिष ही ज्योतिषाची शाखा खूप बाल्यावस्थेत आहे. तरी पण बृहच्चौकोना सारख्या रचनांचा मेदिनीय ज्योतिषाच्या अंगाने विचार त्यात असलेल्या रवी-शनी-हर्षल-प्लुटो यासारख्या ग्रहांमुळे करणे इष्ट ठरते.
मेदिनीय ज्योतिषात एक मूलभूत तत्त्व असे आहे की आकाशात ग्रहांची विशिष्ट रचना जेव्हा तयार होते तेव्हा त्या रचनेतील ग्रह ज्या भूभागात आकाशात बरोबर डोक्यावर येतात त्या ठिकाणी (किंवा सभोवतालच्या भागात) ग्रहांच्या तत्त्वांशी संबंधित घटना घडायची शक्यता असते.

२६ जूनच्या बृहच्चौकोनाचा विचार केला तर रवी फ्रान्स जर्मनी आणि आफ्रिकेचा काही भाग येथे ख-मध्यावर येतो. शनी चीन, बांगलादेश, रशियाचा काही भाग येथे ख-मध्यावर येतो. चंद्र-प्लुटॊ रशियाचा अतिपूर्वेकडील काही भाग येथे ख-मध्यावर येतात (नकाशा बघावा). सहसा ज्याबाबतीत हा भूभाग संवेदनशील असतो त्या बाबतीत घटना घडताना दिसते, म्हणजे राजकीय अस्थैर्य असेल तर घातपात, भौगोलिक (नैसर्गिक) अस्थैर्य असेल तर वादळ/भूंकपाची शक्यता इत्यादि...
माझ्या अंदाजानुसार २६ जूनचे चंद्रग्रहण हे चिनी अर्थव्यवस्थेची घोडदौड थांबवणार्या घटनांची नांदी ठरावे. असो.
लेखाच्या पुढच्या भागात २६ जूनचे ग्रहण वैयक्तिक आयुष्यात कोणत्या जन्मतारखाना महत्त्वाचे आहे याचा विचार करु.
फसवणुक - कायदेशीर मदत हवी आहे.
५ हजार वर्षापूर्वी वेगवेगळ्या ऋषी-मुनींनी माझे भविष्य आणि मला मार्गदर्शक गोष्टी एका नाडीपट्टी वर माझ्यासाठी लिहून ठेवलेल्या होत्या. त्या फक्त माझ्यासाठी आणि माझ्यासाठीच लिहिलेल्या आहेत. त्यावर माझे नावही कोरलेले आहे. शिवाय त्या पट्टीचा या जगातील दुसर्या कुणालाही उपयोग नाही.
असे असुनही नाडीकेंद्रातल्या लोकानी महर्षींनी फक्त माझ्या साठी लिहिलेली ही पट्टी लपवून ठेवलेली आहे. मला ते देत नाहीतच शिवाय ती वाचायचे पैसे मागत आहेत.
महर्षींनी माझ्यासाठी लिहिलेली पट्टी हे केंद्रवाले कोणत्या बळावर दाबून ठेवू शकतात?
या मुजोर केंद्रचालकांवर कोणत्या कायद्यान्वये मला कारवाई करता येईल?
माझ्या एकट्याचीच नव्हे तर मला माझ्या पुढच्या पिढीतल्या सगळ्या पट्ट्या ताब्यात हव्या आहेत.
ह्या पट्टीच्या अभावी माझे भविष्य अंधकारमय झाले आहे.
तरी सर्वांनि योग्य ते मार्गदर्शन करावे.
वृषभ राशीच्या व्यक्तींची वैशिष्ट्ये...
सूचना:
ज्योतिषशास्त्र, राशी आणि स्वभाव वैशिष्ट्ये हे सर्व मानणार्या मिसळपावच्या वाचकांसाठी हा चर्चेचा प्रस्ताव....
रास ओळखण्याचा नियम-
जन्मकुंडलीत ज्या राशीत चंद्र असतो ती आपली रास असते.
मिसळपाव चे जे वाचक वॄषभ राशीचे आहेत त्यांनी आणि ज्या वाचकांचे मित्र/नातेवाईक/ ओळखीचे/ संपर्कातले व्यक्ती वृषभ राशीचे आहेत त्यांनी वॄषभ व्यक्तींचा स्वभाव येथे मांडावा.
हेतू हा की ज्योतिष शास्त्रात जी वॄषभ राशीची वैशिष्ट्ये सांगितली आहेत ती पडताळून पाहाणे....
अजून एक :
कुंडलीत प्रथम स्थानी २ हा आकडा असेल (वृषभ) आणि प्रथम स्थानी शुक्र ग्रह असला ...
तरीपण त्या व्यक्तीचा स्वभाव वृषभ राशीसारखा असू शकतो,
मूळ रास वेगळी असली तरी... (म्हणजे चंद्र हा २ हा आकडा असलेल्या स्थानात नसला तरीही..)
तीळ व त्यांचे अर्थ...
ज्योतिषशास्त्रात "पूर्ण शरिरावरील वेगवेगळ्या ठीकाणी असलेली तीळ आणि त्यांचे अर्थ "याबद्दल उल्लेख आढळतो.
ज्योतिष शास्त्र क्षेत्रातील जाणकार मंडळी या ठीकाणी याबद्दल अधिक माहिती सांगू शकतील काय?
या विषयाला वाहीलेले ऑनलाईन/ डाउनलोड करण्याजोगे / छापील पुस्तके / ब्लॉग्ज उपलब्ध आहेत का?
असल्यास माहिती द्यावी.
तसेच कुणी या विषयाचा अभ्यासक असेल त्याने येथे माहिती द्यावी.
कुणाला याबद्दल अनुभवसिद्ध माहिती असल्यास ती येथे शेअर करावी....
ही या चर्चेची अपेक्षा.
येथे तीळांबद्दल विज्ञानाच्या अनुषंगाने चर्चा मला अपेक्षीत नाही.
दिनांक २७ मे २०१० रोजी सायन धनु राशीत होणारी पौर्णिमा
आगामी काळात होणार्या काही खगोलशास्त्रीय घटना पुढील प्रमाणे असून त्यांचा फलज्योतिषाच्या अंगाने विचार भविष्यकाळात डोकावून पहाणार्यांसाठी केला आहे.
या घटना अशा -
- दिनांक २७ मे २०१० रोजी सायन धनु राशीत ६अंश३२मि. वर होणारी पौर्णिमा
- दिनांक ११ जुलै २०१० रोजी सायन कर्क राशीत १९ अंश २३ मि. वर होणारे सूर्यग्रहण
- दिनांक ३१ जुलै २०१० रोजी सायन तूळ राशीत ०अंश ४९ मि वर होणारी शनि-मंगळ युती
या प्रमुख खगोलशास्त्रीय घटनांचा आढावा आपण आता घेऊ...
वरील पौर्णिमा खाली दिलेल्या कालावधीमध्ये ज्यांचे जन्म असतील त्यांच्या जन्मपत्रिकेतील शनीस सक्रिय करते आणि त्यामुळे ते शनीने मूळ पत्रिकेत केलेल्या योगांनुसार त्रासदायक ठरायची शक्यता बरीच आहे.
१३ एप्रिल १९३५ ते ६ मे १९३५, ७ ऑगस्ट १९३५ ते ३ ऑक्टोबर १९३५
१२ डिसेंबर १९३५ ते २७ जानेवारी १९३६, २९ जून १९४२१७ जुलै १९४२
४ नोव्हेंबर १९४८ ते ३० जाने १९४९, २३ जुलै १९४९ ते २५ ऑगस्त १९४९
२१ नोव्हे १९५६ ते २५ डिसेंबर १९५६, ९ जुलै १९५७ ते १४ सप्टेंबर १९५७
२१ मे १९६४ ते १० जुलै १९६४, १ फेब्रु १९६५ ते ६ मार्च १९६५
२ ऑगस्ट १९७१ ते ७ नोव्हेंबर १९७१, १८ एप्रिल १९७२ ते २० मे १९७२
१ सप्टेम्बर १९७८ ते ४ ऑक्टोबर १९७८, २८ मार्च १९७९ ते २० जून १९७९
वरील पौर्णिमा खाली दिलेल्या कालावधीमध्ये ज्यांचे जन्म असतील त्यांच्या जन्मपत्रिकेतील हर्षल सक्रिय करते आणि त्यामुळे ते हर्षलने मूळ पत्रिकेत केलेल्या योगांनुसार त्रासदायक ठरायची शक्यता बरीच आहे.
३१ ऑगस्ट १९४२ ते २० सप्टेंबर १९४२, २५ मे १९४३ ते १९ ऑगस्ट १९४३
१२ ऑक्टोबर १९४३ ते २४ मे १९४४, ३१ ऑक्टोबर १९६२ ते ३१ जाने १९६३
११ ऑगस्ट १९६३ ते १८ ऑक्टोबर १९६३, १५ फेब्रु १९६४ ते ३ ऑगस्ट १९६४
वरील पौर्णिमा खाली दिलेल्या कालावधीमध्ये ज्यांचे जन्म असतील त्यांच्या जन्मपत्रिकेतील नेपच्यून सक्रिय करते आणि त्यामुळे ते नेपच्यूनने मूळ पत्रिकेत केलेल्या योगांनुसार त्रासदायक ठरायची शक्यता बरीच आहे.
१ ऑक्टोबर १९३० ते १९ फेब्रु १९३१, ३ ऑगस्ट १९३१ ते २३ सप्टेंबर १९३२
९मार्च १९३३ ते २५ जुलै १९३३, १६ जाने १९७२ ते २९ एप्रिल १९७२
१५ नोव्हेंबर १९७२ ते ७ जाने १९७४
१९ मे १९७४ ते १० नोव्हेम्बर १९७४
वरील पौर्णिमा खाली दिलेल्या कालावधीमध्ये ज्यांचे जन्म असतील त्यांच्या जन्मपत्रिकेतील प्लुटो सक्रिय करते आणि त्यामुळे ते प्लुटोने मूळ पत्रिकेत केलेल्या योगांनुसार त्रासदायक ठरायची शक्यता बरीच आहे.
१५ सप्टे १९५९ ते ९ मार्च १९६०
१८ जुलै १९६० ते २१ सप्टे १९६१
११ मार्च १९६२ ते २४ जुलै १९६२
वरील कालावधीमध्ये जन्मलेल्या व्यक्तीनी ग्रहणाच्या पुढे व मागे १ आठवडा आपल्या सर्व व्यवहारात विशेष काळजी घ्यावी.
दिलगीरी
वर अनवधानाने २७मे रोजी चंद्र्ग्रहण असल्याचा उल्लेख अगोदर झाला होता. २७ मे रोजी फक्त पौर्णिमा असून ग्रहण २६ जुन २०१० रोजी आहे. येथे गणित करून काढलेल्या जन्मतारखा पौर्णिमेच्या प्रभावात येतात. यामुळे कुणाची दिशाभूल झाली असल्यास क्षमस्व...!
नाडी नाडी नाडी
आजकाल मिपावरती नाडी शब्द आला की नाडीवादी आणि नाडी-काफीर लगेच बाह्या सरसावून पुढे होतात...(बाकीचे पॉपकॉर्न घेउन जवळचे झाड पकडतात.)
परवाच कुठल्याश्या धाग्यावर जगातील सगळ्या लोकांच्या नाड्या केंद्रात उपलब्ध आहेत असे कुणीसे लिहिल्याचे वाचून डोक्याची चक्रे फिरायला लागली....
"याचा अर्थ अत्ता पर्यंत मेलेल्या लोकांच्या पण नाड्या असणार......."
आणि मग प्रश्नही निर्माण व्हायला लागले.....
जे लोक मरणपावलेत त्यांच्या नाड्यांचे हे नाडीकेंद्र वाले लोक काय करतात?
कारण एकदा माणूस मेला की त्याच्या नाडीचा काहीच उपयोग नाही. ती नाडी म्हणजे त्या केंद्राला एक प्रकारची अडगळच... मग अश्या निरुपयोगी नाड्यांचे हे लोक काय करतात? माणूस मेला की त्याच्या शरिराबरोबरच त्याच्या अंगठा ही नाहिसा होणार... मग त्याची नाडी शोधणार कशी? त्यामुळेच नाड्यांवर औषधांसारखी एक्स्पायरी डेट असते का? की "अमुक एक नाडीचा मनुष्य अमुक अमुक तारखेला मरणार/मेलेला आहे... त्या नंतर या नाडीचा उपयोग नाही."
मग अश्या नाड्या हे लोक नाडी-काफरांना अभ्यासासाठी का देत नाहीत? तसेही तो माणूस आता येऊ शकणार नाही.... म्हणजे त्या नाडीतून कमाई शुन्य... मग अभ्यासासाठी द्यायला काय हरकत आहे? एक तर नाडी-काफरांची तोंडे बंद होतील... शिवाय नाडीची जाहिरात होईल तो भाग वेगळाच... पण असे कुठलेही केंद्र करताना दिसत नाही...
काय अडचण असेल बर त्यांची?
ओपन माईंड ठेवायला कुणाचीच हरकत नसते पण
ओपन माईंड ठेवायला कुणाचीच हरकत नसते पण
थोडीशी समर्थनात्मक वाक्ये वाचून ओक यांचा मोठाच गोंधळ उडाला असण्याची शक्यता
राष्ट्रीय विज्ञान-तंत्रज्ञान दिनानिमित्त... वरुण यंत्र - यज्ञ तंत्राचा जाहीर निषेध
हा धागा टाकून मी वाट पहात होतो तेच नेमके झाले.
तेथे प्रतिसाद फार खाली गेले होते म्हणून नवा टाकत आहे.
ज्योतिष किंवा भविष्य अशा शब्दांचा नुसता संदर्भ आला की ओपन माईंडवाल्यांना अनुभव घ्यायला का अवघड जावे हा त्यांनी विचार करण्यासारखा आहे.
चिकित्सा थिअरी मान्य करण्याचे निकष कसे ठरवावे वगैरे याचा विचार करावा लागतो.
नाडी ग्रंथांच्या बाबत निकष कसे ठरवावेत, काय असावेत याची चर्चा जरूर करावी पण आधी अनुभव तर घ्याल. त्यालाच जर कोणी नाकारत असेल तर मग निकष कसे ठरवणार, मिपावर काहींनी नाडीग्रंथांचा आस्वाद घ्यायचे ठरवले असल्याचे म्हटले गेले पण ते अपेक्षेप्रमाणे बोलघेवडे ठरले.
फतेहपुर सीक्री सहल धाग्याने मी ते हळूवारपणे दर्शवले होते.
नाडी ग्रंथाच्या चिकित्सेसाठी मिपावरील आपणासारख्या अनेकांनी विविध टिपण्यातून व माझ्या अन्य घाग्यातून "चिकित्सा थिअरी मान्य करण्याचे निकष " माहित असून त्याकडे जाणीवपुर्वक टाळले जाते हे लक्षात येते.
आपल्या सोईसाठी इथे मी आधी उल्लेख केलेला महत्वाचा निकष पुन्हा नमूद करतो - नाडीग्रंथांच्या ताडपट्टीत व्यक्तीचे नाव कोरुन येते का? येत असेल तर ते कसे? याचा शोध घेणे-
आता यात भविष्य वा ज्योतिष याचा संदर्भ आला कुठे? हा तर निखळ तमिळभाषेचा -लिपीचा शोध आहे.
मी माझ्याबाजूने केलेल्या अभ्यासाचा पुरावा सादर केला. तो मिपावरील काहींनी वाचून सत्य असल्याचा निर्वाळा दिल्याचे आपणास आठवत असेल.
त्याकडे दुर्लक्षकरून मिपाचे लोक आम्ही विचारतो त्या प्रश्नांची उत्तरे ओक देत नाहीत-टाळतात असा कांगावा करतात.
मी आत्ताच नमूद करतो की - जसा पुर्वी मला अंनिसवादी लोकांनी केलेल्या बहाण्याचा अनुभव आला त्याप्रमाणे - काही मिपाकर नाडीग्रंथांचा अनुभव मी म्हणतो म्हणून घेतीलही. पण ते अशासाठी की नंतर म्हणायला की ओकांचा आग्रह होता म्हणून त्यांच्या समाधानासाठी अनुभव घेतला. अन्यथा आम्हाला तो घ्यायची गरज नव्हती. आम्ही आधीच मानतो की नाडी-वाडी सर्व थोतांड आहे.
मात्र कोवूर,बी प्रेमानंद आदी दिग्गजांपासून ते मा श्री रिसबुड, प्रकाश घाटपांडे, दाभोळकर, शाम मानव आदी ज्या सर्वांनी छातीठोकून नाडीग्रंथांना थोतांड ठरवले त्यातल्या एकानेही नाडी पट्टीचा, त्यातील भाषेचा-लिपीचा, व्यक्तीच्या नावांचा पुरावा सादर करून काही म्हणणे मांडले असेल तर ते त्यांनी सादर करावेत. मी माझ्यापरीने ते पुरावे सादर केलेले आहेत. शिवाय त्यातच आपल्याकडून माहिती काढून तीच आपल्याला सांगितली जाते या आरोपाची शहानिशा आपोआप होते. बर त्यांनी नाही केले तर मिपाकरांनी करावेत.त्यांना तर कोणी आडवले नाही ना?
पृथ्वी फिरायची थांबली तर ...
समजा पृथ्वी फिरायची थांबली तर ...
समजा पृथ्वी ४ वाजता एकदमच थांबली ...तर तुमच्याइथे कायम ४ च वाजलेले असणार .
मग तुम्हाला अशी कोणती वेळ आवडेल - जी आयुष्यभर तुमची साथ करेल ? अन का ?
कोणाला पहाटेची वेळ आवडेल , कोणाला सूर्यास्त ...
तुमची आवड काय ?
बाकी पृथ्वी थांबल्यामुळे वातावरणावर होणारे परिणाम , त्याचा कुंडल्यावर होणारा परिणाम, नाड्यावर होणारा परिणाम
यासाठी आपण स्वतंत्र धागा काढू ...

