दिवाळी अंक २०१५: आवाहन
नमस्कार मिपाकर हो,
नमस्कार मिपाकर हो,
नमस्कार मिपाकरहो,
दिपावली अभिष्टचिंतन!
3
दिनांक १५ ऑगस्ट २०२२, सोमवार मिपाकट्टा - पावसाळी भेट मोहाडी, ता दिंडोरी, जिल्हा नाशिक येथे आयोजित केली आहे.
अष्टबाहू गोपाळकृष्ण मंदीर (लाकडी बांधकाम. रंगकाम एक नंबर)
गोसावी समाज साधू मंदीर
नवनाथ मंदीर
मोहाडेश्वर मंदीर
अहिल्यादेवी बारव
मोहाडमल्ल देवस्थान
सोमवंशी वाडा
ग्रामपंचायत कार्यालय
सह्याद्री फार्म कारखाना भेट व
तेथेच जेवण
(जेवणाचा हेडकाऊंट आधीच सांगावा लागेल)
परततांना नाशिक एअरपोर्ट पाहता येईल.
तरी ज्यांना शक्य आहे त्यांनी सकाळी १० वाजेपर्यंत मोहाडी येथे जमावे.
तुला काय ठाऊक सजणी
तुझ्यावर कोण कोण मरतंय
आख्खं गाव तुझ्यासाठी
रात्रंदिवस झुरतंय
माळावरचा दगडू पैलवान
भल्या-भल्यांना भरवतो हीव
तुझ्यासाठी त्याचा सजणी
टांगणीला गं लागलाय जीव
सुताराचा चकणा म्हादू
तुझ्यावर लईच मरतो
तुला बघत पटाशीचं काम
कानशीनं की करतो
डोईवर घेऊन शेण-बुट्टी
ठुमकत गं तू निघते
दीवाण्यांची टोळी तुझ्या
मागं मागं फिरते
प्रत्येकाला तुझाच राणी
गुलाम बनून रहायचंय
तुला मात्र माधुरी बनायला
म्हमईला जायचंय .
नर्मदा परिक्रमेचा आजचा अकरावा दिवस, चालून चालून पाय भेंडाळून गेलेत.. सुरुवातीला एकत्र असलेले आपापल्या सोयीनुसार , वेगानुसार पांगले आहेत.. दोन दिवस निबीड जंगलातला रस्ता आहे . अवचित एखादा वाटसरू दिसला की रस्ता चुकला नाही याचे समाधान मिळते...
संध्याकाळी दगडावर बसून नर्मदामैय्याचे विलोभनीय रूप बघत होतो तेव्हा डूबत्या सूर्यामागून एक उंच आकृती झपझप चालतं डोहाकडे आली ..धोतर , अंगरखा आणि डोईला मारवाड मुंडासे ! वाटसरू तहानलेला असावा.. येऊन गटागटा पाणी पिले , आमच्याकडे लक्ष नसावे बहुधा .. वाटसरू वस्त्रे काढून डोहात शिरला , मुंडासे काढले , केसांच्या दीर्घ जटा अस्ताव्यस्त पसरल्या..
काही दिवसांपूर्वी माझा एक मित्र मला म्हणाला, पटाईत, बर्याच महिन्यांपासून तू काही लिहले नाही. मी म्हणालो आजकाल मूड होत नाही. तो म्हणाला, अस कर, काहीतरी नवीन लिह. एखाद्या सिनेमाची समीक्षा तुझ्या शैलीत कर. मी त्याला म्हणालो, मी सिनेमे फारच कमी बघतो. उभ्या आयुष्यात थिएटरमध्ये जाऊन जास्तीसजास्त डझन भर बघितले असतील. तो म्हणाला, अरे सिनेमांची समीक्षा करायला, जास्त डोक्स लागत नाही. आपल्या सुपर डूपर मराठी सिनेमा सैराटची कर. आता मित्राचा आदेश टाळणे शक्य नव्हते.
(दर वर्षी आम्ही 2 लाखाहून जास्त माणसांचे बळी भारतात घेतो. )
शूर वीर डास आम्ही
बांधुनि कफन डोक्यावरी
तुटून पडतो शत्रुंवरती
त्यांचे रक्त पिऊनी
देतो विजयी आरोळी.
डेंगू मलेरियाच्या दिव्यास्त्रांनी
करतो हल्ला माणसांवरती
पाठवतो त्यांना यमसदनी.
घाबरून आमच्या फौजेला
मच्छरदानीत लपणार्या
भित्र्या भागुबाई माणसांशी
काहो करता तुलना आमुची.
भारत आधुनिक पोलोची जननी असला तरी हा क्रीडाप्रकार इथे फारसा लोकप्रियही झालेला नाही. हातात लांब स्टिक घेऊन घोड्यावर बसून खेळला जाणारा आणि हॉकीप्रमाणेच भासणारा हा क्रीडाप्रकार. हा खेळ अतिशय प्राचीन मानला जातो. या खेळाची सुरुवात नक्की कोठे झाली याबाबत स्पष्ट माहिती उपलब्ध नाही. तरीही या खेळाचे उगमस्थान भारतच असल्याचे संकेत देणारे काही पुरावे उपलब्ध आहेत. भारतात असलेल्या जगातील सर्वात जुन्या पोलो क्लबच्या स्थापनेला या वर्षी 160 वर्षे पूर्ण झाली आहेत.