संस्कृती
वार्तालाप : जीभ आणि सर्वनाश
जीभ आपल्या शरीराचा महत्वपूर्ण अवयव आहे. जीभ नसेल तर जेवणाचा स्वाद घेता येणार नाही. जीभ नसेल तर आपण बोलू ही शकत नाही. पण काय बोलावे आणि कसे बोलावे हेच जर आपल्याला कळत नसेल तर मौन राहणे उत्तम. कधी-कधी जीभेतून सुटलेले कटुवचन सर्वनाशाला ही कारणीभूत ठरतात. श्री सार्थ दासबोधात समर्थ अश्याच लोकांसाठी म्हणतात:
जनासीं मीत्री करीना।
कठिण शब्द बोले नाना।
मूर्खपणें आवरेना।
कोणीयेकासी॥ 1९/३/१३॥
आम्ही जातो आमुच्या गावा (भाग १- व्याप आवरते घेणे)
मित्रहो, आयुष्याची सांजवेळ सामोरी आलेली आहे. दूरदेशीच्या ‘आपुल्या गावा’ कायमचे जाण्यासाठी वळकटी बांधून आता तयार राहिले पाहिजे आणि तिकडे नेणारा दूत आला की हसतमुखाने त्याला सामोरे गेले पाहिजे.
समवयस्क मित्र एकेक करून आपापल्या दूताबरोबर रवाना होत आहेत आणि त्यांच्या तशा जाण्यातून आपलीही वेळ आता फारशी दूर नाही, ही जाणीव प्रबळ होत चालली आहे.
तर आपले एकंदरीत व्याप वगैरे आता तरी आवरते घेतलेच पाहिजेत … आता व्याप म्हटले तर ते कोणकोणते ?
— सध्याचे आपले राहते घर आणि त्याबद्दलची आसक्ती, मोह, सवय (तसेच ते सोडण्यातून कदाचित होणारा पश्चात्ताप, असुरक्षिततेची भावना वगैरे)
अशीच एक धुंद, गुलाबी सकाळ
"ए, परीक्षेनंतर आपण लग्न करूयात ? "
"काय म्हणतेस सुले ?"
"होय रे माझ्या राजा "
-- असं म्हणत ती आवेगाने धावत येऊन त्याला बिलगते.
-- मंचावरचे लाईट फेड होऊन पडदा पडतो.
टाळ्यांचा कडकडाट विरतो न विरतो तेवढ्यात -
'आटो-प्ले' मोडमुळे पुढला व्हिडियो सुरु होतो....
कुठलेतरी कविराज कवत असतात --
"अशाच एका धुंद सकाळी -
मनात माझ्या स्फुरती ओळी -
जरतारी तो शालू आणिक -
धुंद मखमली नाजुक चोळी "
परदेशस्थ भारतीय
चोरी
छोटा कृष्णा मित्रांसोबत वाड्याच्या अंगणात खेळण्यात गुंग होता. "कृष्णा गौरव्वा आहे का रे घरात ?" ह्या प्रश्नाने त्याचे मन खेळातून बाहेर आले, त्याची मान आवाजाच्या दिशेने वळली - सत्तरी ओलांडून गेलेल्या आज्जी काठी जमिनीला टेकवून उभ्या होत्या. त्याने होकारार्थी मान हलवली . पळत आत जाऊन वर्दी दिली - "आई स्वामी आज्जी आल्या आहेत. " गौरव्वा हातातलं काम टाकून डोक्यावरचा पदर सावरत स्वयंपाक घरातुन बाहेर आली. तोपर्यंत स्वामीनबाई सोप्यातल्या आरामखुर्चीत येऊन विसावल्या होत्या. गौरव्वानं त्यांच्या पायावर डोकं टेकवलं.
समर्थ रामदास: श्रोता अवलक्षण समासाचे निरूपण
जय जय रघुवीर समर्थ
(श्री समर्थ सेवा मंडळाद्वारा संचालित श्री सार्थ दासबोधाचे निरूपण कार्यक्रमात, देशभरात श्री दासबोधाचे निरुपणाचे कार्यक्र्म सुरू आहे. जानेवारी 2023 महिन्यात दिल्ली केंद्राला पाच रविवारी हा कार्यक्र्म सादर कारण्याचा मान मिळाला. पहिल्या रविवारी मला श्रोता अवलक्षण समासाचे निरूपण करण्याचे दायित्व मिळाले. दिल्ली केंद्राचे दायित्व निर्वाह करणार्या डॉक्टर मंगला कवठेकर यांच्या मार्गदर्शनाची मोलाची मदत झाली. हा कार्यक्र्म 1 जानेवारी 2023 ला संध्याकाळी 4 ते 5 ऑन लाइन झाला. पुढील कार्यक्रम ही रविवारी याच वेळी होतील).
पंचगंगातिरीचा दिपोत्सव
Silver Trumpet and Trumpet Banner
रंगभूमीवरची पहाट
पुष्पांमाजी मोगरी आणि परिमळांमांजी कस्तुरी असलेल्या माझ्या माय मराठीचं एक वैशिष्ट्य म्हणजे लवचिकता. लाकूड तेच - पण जात्यात घातलं की खुंटा होतो, गोठ्यात रोवलं की खुंट होतो आणि भिंतीत ठोकलं की खुंटी होते.