समाज

माहिती हवी आहे - महिला रोजगार

आपल्याकडे कला पदवीधरांचे पीक बेसुमार आहे. हा एक असा मोठा गट आहे जो सध्याच्या प्रगतीच्या वार्‍यापासून कोसो दूर रहिला आहे. शेती परवडत नाही, व्यवसायासाठी भांडवल/मार्गदर्शन नाही, इंग्रजी येत नसल्याने कॉल सेंटर सारख्या नोकर्‍या मिळत नाहीत, कॉमर्स शिकल्याले नसल्याने बँकांच्या/वित्तीय संस्थांच्या नोकर्‍या मिळत नाहीत, विज्ञान/तंत्रशिक्षण झालेले नसल्याने कारखान्यांमध्ये नोकर्‍या मिळत नाहीत... अशी या पदवीधरांची शोकांतिका आहे. हा तरुण वर्ग मग कारखाण्यांमध्ये कामगार बनतो वा कारकून/चपराशी/हवालदार अशा नोकर्‍या मिळवण्यासाठी लाखोंची गर्दी करतो (उदा. या आठवड्यातली पोलीस भरती).

रोजगार मिळवण्यात सर्वांत जास्त हाल होतात ते कला विषयातल्या महिला पदवीधारकांना. कारण वरील सर्व सामाजिक समस्यांबरोबरच त्यांना घरातल्या समस्यांना/जबाबदार्‍यांना तोंड द्यावे लागते. लग्न, नवरा, मुलेबाळे, घरकाम या सगळ्या कसरती करत त्या बिचार्‍यांनी रोजगाराच्या नव्या संधींचा शोध कसा घ्यावा?

पुण्यात माझ्या परिचयातल्या बर्‍याच कुटुंबात हा प्रश्न आहे. तरुण महिलांना स्वतः काहीतरी करायचे आहे पण काय करता येऊ शकेल याची कल्पना नाही. अशा महिलांना मार्गदर्शन करण्यासाठी काही संस्था आहेत का? अथवा तुम्हाला कोणाला या महिलांना रोजगार उपलब्ध करुन देण्यासाठी मार्गदर्शन करता येईल का?

आपल्या प्रतिसादांच्या प्रतिक्षेत....

खंडांळ्याची पार्टी - एका बातमीच्या निमित्ताने

गेले एक-दोन कस्टममधील २२ अधिकार्‍यांना खंडाळ्याला पार्टीला गेलेले असताना पकडल्याची बातमी (म.टा. मधील मूळ बातमी) येत आहे. त्यातील प्रमुख भाग खाली चिकटवत आहे:

विदेशी मद्य... ब्ल्यू फिल्म... लॅपटॉप... कोऱ्या करकरीत नोटा, अशी सारी तजवीज करून मुंबईतील बारबालांसोबत थंड हवेच्या खंडाळ्यातील खासगी बंगल्यात रंग उधळणाऱ्या कस्टम विभागातील बड्या अधिकाऱ्यांना ११ बारबालांसह मंगळवारी रात्री अटक करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. हे सारे अधिकारी सहार आंतरराष्ट्रीय विमानतळावरील असून त्यात १२ कस्टम सुप्रिंटेंडंट व १० इन्स्पेक्टरांचा समावेश असून सर्वांना जामिनावर सोडण्यात आले....कस्टम अधिकाऱ्यांच्या या 'पराक्रमा'ची माहिती पुणे ग्रामीण पोलिसांना मिळाली. सुप्रिंटेंडंट रवींद कदम यांनी दिलेल्या सूचनेनुसार लोणावळा शहर पोलिस ठाण्याचे इन्स्पेक्टर सुदार दरेकर, सहायक इन्स्पेक्टर ए. डी. फडतरे यांच्या नेतृत्वाखाली सुमारे २५ पोलिसांचे पथक मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास 'ताज कॉटेज' वर धडकले तेव्हा बेधुंद होऊन, अर्धनग्न अवस्थेत नाचणारे अधिकारी त्यांना पाहायला मिळाले. त्यातील एका कस्टम अधिकाऱ्याकडे ५५ हजार रुपये, तर दुसऱ्या अधिकाऱ्याकडे २५ हजाराची रोकड होती. त्यापैकी ५२ हजार रुपयांची रोकड त्यांनी बारबालांवर उधळल्याचे फडतरे यांनी सांगितले....

आता ही बातमी पाहीली तर ठिक वाटेल... पण त्या पुढे जाऊन यातील सर्व अधिकार्‍यांची नावे नंतरच्या बातमीत जाहीर केली आहेत. त्यामुळे विशेष करून प्रश्न पडले:

  1. सर्व प्रथम वर वर्णन केलेली पार्टी आणि त्यातील अधिकार्‍यांचे वर्तन हे नैतिकतेच्या दृष्टीने कदाचीत चुकीचे असेल. त्यांनी नक्की काय केले हे अजून सिद्ध न झाल्याने "कदाचीत" म्हणत आहे. पण म्हणून पोलीसांना तसे अटक करण्याचा हक्क आहे का?
  2. हे कस्टम अधिकारी इतर सर्व सरकारी अधिकार्‍यांप्रमाणे स्वतःच्या "पॉवरच्या" रेशो मध्ये भ्रष्ट असतीलही... पण हे वरील वर्तनातून सिद्ध होते का?
  3. इतर अशा किती ठिकाणी धाडी घातल्या जातात?
  4. त्याहूनही महत्वाचे जो पर्यंत असले आरोप हे "कथीत" असतात, तो पर्यंत त्यांचे नाव, गाव, वय आणि काही बाबतीत रहातात ती सोसायटी जाहीर करणे योग्य आणि त्याहूनही महत्वाचे कायदेशीर आहे का?
  5. अशी नावे सिंहगडला पकडलेल्या मुलांची तरी जाहीर केली गेली होती का?

एक स्पष्टीकरणः माझा यातील अथवा कुठल्याच कस्टम अधिकार्‍याशी संबंध नाही. भ्रष्टाचार नक्की होत असेल जरी मी कधी अनुभवला नसला तरी. पण हा मुद्दा मी वेगळ्या कारणाने करत आहे - केवळ असे काही तरी सनसनाटी पद्धतीने नको तेथे पकडणे (त्यांना लाच घेताना वगैरे पकडलेले नाही), त्याच्या बातम्या करणे आणि नंतर नावे छापणे हे कायद्याने अथवा कुठल्याही कारणाने योग्य वाटते का?

गणपती साठी ?

कालचाच अनुभव. शेजारच्या किराणा दुकानात काही वस्तु आणायला गेलो होतो.
...तेवढ्यात तेथे एका गणेश मंडळाचे कार्यकर्ते आले. दुकानदाराला काही न विचारता त्यानीं रु.१००१/- ची पावती तयार केली आणि त्याच्या हातात ठेवली. दुकानदाराने त्याची कैफीयत मांडली की, येथे चार गणेश मंडळाना पैसे द्यावे लागतात एवढे कसे काय देणार ? तेव्हां गणेश मंडळाचे कार्यकर्त्यानी दुकानदाराला दमदाटी केली आणि एवढेही सुनावले कि, जर गल्ल्यात हात घातला तर नक्कीच यापेक्षा जास्त घेऊ....बिचारा दुकानदार.
गणेश मंडळाचे कार्यकर्ते गेल्यानंतर दुकानदाराने सांगितले की, "येथे जवळपास चार गणेश मंडळाकडुन अशीच वर्गणी घेतली जाते. गणपती गेल्यानंतर ही मंडळे त्याच मांडवात देवीची प्रतिष्ठापणा करतात आणि वर्गणीचे चक्र असेच चालु राहते. "

मिपाकरनो,...... आज कुत्र्याच्या छ्त्र्याप्रमाणे ही मंडळे उगवलेली दिसतात. खरच यापैकी किती गणेश मंड्ळे विधायक कामासाठी हा पैसा वापरत असतील ? यामधे गणेश भक्ति किती? की या मंडळाना हा पैसे गोळा करण्याचा हक्कचा सिझन वाटतो?
मिपाकरनो, मला यातुन कोणत्याही धर्मावर टीका करायची नाही. पण गणेशाच्या नावाखाली दमदाटी करुन पैसे गोळा करणारी मंडळे योग्य निश्चितच नाहीत. मी हे सगळ्या मंडळाबद्द्ल बोलत नाही.
आपल्याला काय वाटत?

ओरिसा - पोप महाशयांचे दु:ख

सध्या ओरीसात जे काही चालले आहे त्याने प्रत्येक भारतीयाला दु:खच होत आहे. तसेच आज पोप महाशयांनी सुद्धा या विषयाबद्दल त्यांची चिंता व्यक्त केली. मला बुवा त्यांची कमाल वाटते.

काही आठवड्यांपूर्वी याच पोप महाशयांनी ऑस्ट्रेलियात जाऊन तेथील मूळ वंशजांची माफी मागितली होती. त्यात त्यांनी "मूळ वंशजांची संस्कृती, धर्म व भाषा यांचा ख्रिश्चनांनी नाश केला" याबद्दल दिलगिरी व्यक्त केली होती. या अगोदर पोप महाशयांनी अशा प्रकारच्या माफी अमेरिकेत व इतरत्र सुद्धा मागितल्या आहेत. सर्वसामान्य माणसाला याबद्दल त्यांचा आदरच वाटणार. जर शांतीदूत म्हणजे जर कोणी असेल तर केवळ हेच अशी अनेकांची यामुळे समजूत होणे शक्य आहे!

पण जरा खोलात जाऊन बघितल्यास आपल्या लक्षात येईल की त्यांनी ज्यांची माफी मागितली ते आता ख्रिश्चन धर्मात जवळपास संपूर्णपणे मिसळून गेलेले आहेत. त्यांना त्यांचे धर्म, संस्कृती वा भाषांचे पुनरुज्जीवन करणे केवळ आशक्य आहे. जर पोप यांना खरेच पश्चताप होत असेल तर त्यांनी येथून पुढे असे होऊ नये याची काळजी घेतल्यास जगातले बरेच प्रश्न कमी होतील.

भारतापुरते बोलायचे झाल्यास पोप महाशयांनी खालील गोष्टी कराव्यात जेणे करून त्यांना आजच्या सारखा शोकसंदेश पुन्हा द्यायची वेळ येणार नाही.

१. भारतात मिशनर्‍यांनी धर्मांतरे पूर्ण बंद करावीत जेणेकरून स्थानिक लोकांची त्यांच्या धर्म/संस्कृती पासून नाळ तुटणार नाही.
२. मिशनरी शाळांतून सक्ती असणारे हे नियम पुर्णतः रद्द करावेत जेणेकरुन मुलांची त्यांच्या संस्कृतीशी नाळ ढिली होणार नाही...
मुलींनी टिकली न लावणे, सणावारंना सुटी न घेणे, सक्तीने ख्रिस्मस साजरा करायला लावने, बळजवरीने बायबलवरील "प्रोजेक्ट" करुन घेणे (न केल्यास खूप कमी मार्क देणे वा नापास करणे), डब्यात भारतीय जेवन आणन्यास मज्जाव करणे, वगैरे.
३. सेवाभावी मिशनरी दवाखाण्यातून कसल्याही धार्मिक शपथा वगैरे न घ्यायला लावता रुग्णांची सेवा करणे. (येशु महाराजांची आरती न म्हणनार्‍यास इलाज लागू होत नाही अशा तद्दन फोटारड्या गोष्टी सांगून आदिवासींना न फसवने).
४. भुकंप/पूर वगैरे नैसर्गिक आपत्तींच्या वेळी कोणाच्याही नावात बदल न करता मदत करने.
(सर्वांत महत्वाचे) - ५. आतापर्यंत धर्मांतरीत झालेल्या भारतीयांना त्यांच्या मूळ संस्कृती/धर्मा नुसार पुन्हा जगणे शक्य आहे. त्यांची माफी मागून त्यांना परत आपल्या मूळ धर्मात जायला सांगावे.

वरील मुद्दे २,३,४ सारख्या अनेक बाबी आहेत ज्या स्थानिक हिंदूंना ख्रिश्चनांच्या विरुद्ध भडकवतात. त्यांनी या टाळल्या तरच या दोन धर्मांमध्ये सलोखा निर्माण होण्याची शक्यता आहे. परंतू मिशनर्‍यांचे डाव वेगळे आहेत. पुर्वांचलात ख्रिस्ती धर्म मोठा करुन आल्पसंख्यांक हिंदूंना आपल्या इशार्‍यावर नाचवायला सुरु केल्यावर त्यांच्या अपेक्षा वाढलेल्या आहेत. त्यामुळे त्यांनी अदिवासी/वनवासी भागातील भारतीयांना आपले "टार्गेट" बनवून धर्मांतरांचा सपाटा चालवला आहे व या मार्गात कोणी स्वामी लक्ष्मानंद सरस्वतीसारखा आलाच तर त्यांचा काटा काढून बाकीच्यांना दहशत बसवून आपले काम फत्ते करण्याचा त्यांचा मानस दिसतो आहे.

आपल्याला पोप यांच्या भुमिकेबद्द्ल काय वाटते?

राष्ट्राय स्वाहा: इदं न मम!!!!

भारतात अनेक अश्या व्यक्ती झाल्या कि ज्यांचे कर्तृत्व असामान्य आहे. त्या ज्या क्षेत्रात काम केले ते मैलाचा दगड ठरले. आजही त्या हजारो व्यक्तींना १०० करोड व्यक्ती आदर्श मानत आहेत आणि राहतील. थोडक्यात भारतभूचे सुपूत्र या सदरात ते येतात. मात्र भारतभूचे सुपूत्र होणे इतके सोपे आहे का? प्रचंड उलथापालथी नंतर भारताच्या सुपूत्रांपैकी ४ जण माझ्या डोळ्यांसमोर रात्रं-दिवस येत आहेत. आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांच्या आधी आणि त्यांच्या नंतर भारतात किंवा भारता बाहेर हजारो आदरणीय व्यक्ती झाल्या वा होतील पण या चौघांचे स्थान एकमेवाद्वितीय आहे.

या चौघांचाहि कालखंड भिन्न आहे. हे चौघही उत्तर-दक्षीण-पूर्व-पश्चीम अश्या भारताच्या ४ टोकांतुन जन्मले मात्र त्यांचा प्रभाव संपूर्ण भारतभर पसरला आहे. या पैकी एकाने तर भारताच्या सीमाहि ओलांडल्या आहेत. भारताचा इतिहास या चार व्यक्तींशिवाय कदापि पूर्ण होणार नाहि इतके अलौकीक-प्रचंड आणि विस्मयकारक काम त्यांनी करुन ठेवलय.

ही चौघाच डोळ्यासमोर का आली?? तर याचं पहिलं उत्तर "माहित नाहि!" असंच आहे. मात्र विचारांती थोडस तुटक आणि अंधुक उत्तर मिळत - "हे चौघही उत्तम विध्यार्थी होते, हे चौघही उत्तम गुरु होते, हे चौघही द्रष्टे होते आणि महत्वाचं म्हणजे ह्या चौघांकडे "चारीत्र्य" होते, शुचिता होती." या चार गुणांमुळेच आपले सुस्पष्ट ध्येय आणि अढळ निष्ठा त्या चौघांकडे होती. त्यांचा जन्म ही त्या काळची गरजच होती. आणि काळाची गरज म्हणण्यापेक्षाही जणु काळाने/नियतीने यांचा जन्म होणारच अशी मांडणी केली होती. एखाद्या महानाट्यात एका पात्राने रंगमंचावर प्रवेश करावा आणि बघता बघाता त्या संपूर्ण रंगमंचाचा ताबा घेउन लोकांना स्तिमीत कराव, तसे ते चौघे आले - त्यांनी पाहिलं - त्यांनी जिंकल. विष्णुच्या अवतार संकल्पनेवर कोणाचा विश्वास बसला नाहि तरी हे चार अवतारच असावेत असे यंच्या ’इतिहासाकडे’ बघुन पटत.

वर म्हंटल्याप्रमाणे हे चौघ उत्तम विद्यर्थी होते, आणि ते ज्या गुरुकुलाचे अथवा गुरुचे शिष्य होते मुळात त्याच व्यक्ती असामान्य होत्या. आणि उलट त्या गुरुकुलाचे अथवा गुरुचे शिष्य बनण्यासाठी त्या ’शिष्यांची’ पात्रता असणं जास्त महत्वाचं होतं. या चार जणांच्या गुरुकुलाच्या अथवा गुरुच्या प्रभावाखाली-छत्राखाली कदाचित इतरही हजारो जण शिकले असतीलही, पण मग हेच चौघ का? हा प्रश्न जास्त महत्वाचा आहे. याचेच उत्तर म्हणजे सर्वोत्तम विद्यार्थी असणे हा गुण उपजतच त्यांच्यात होता. ते जे शिकले ते त्यांनी आचरणात आणलं त्याने इतरांचं भलं कसं होईल याचा विचार केला. त्यानी आपल्या गुरुंचे पांग फेडले.

पुढे ते स्वत: गुरु झाले आणि आपलं कार्य चालवणारी अनेक माणसे त्यांनी घडवली. या पैकी दोघांनी राजकारणात येणार्‍या पिढ्यांना पाठ घालुन दिले तर इतर दोघांनी समाजकारणात. आणि त्यांचा कालखंडही आलटुन पालटुन आहे. म्हणजे सर्वप्रथम राजकारण मग समाजकारण मग परत राजकारण आणि सरते शेवटी समाजकारण अशी कालानुरुप मार्गदर्शक तत्वे आणि क्रिया त्यांनी त्यांच्या क्षेत्रात घडवल्या. यापैकी पहिल्या दोघांचा कालखंड हा हजार वर्षांच्या अंतराने आलाय मग परत हजार वर्षे गेली आहेत आणि शेवतच्या दोघांत फक्त काहि शे वर्षांचे अंतर आहे. सगळं कसं अगदी ठरल्या सारखं घडत गेलय. इथे मी समाजकारण आणि धर्म हे एकमेकांत गुंतले असल्यानं संपुर्ण प्रक्रीयेलाच समाजकारण म्हंटलं आहे. त्यात "लोकांनी धारण केलेला आहे तो अथवा जो लोकांना धारण करतो तो ’धर्म’" या व्याख्येचा वापर अपेक्षीत आहे. म्हणुन त्यातील दोघंजण हे धर्माचे पालन अथवा समाजकारणच करत होते असं म्हणता येईल. उरलेल्या दोघांनीही देव-देश-धर्म यांना दैनंदिन जीवनात अनन्यसाधारण महत्व दिल्याचं दिसतं.

आता "द्रष्टा" म्हणाजे काय ते या चारही जणांकडे बघुन समजतं. क्षणभंगुर सुखाच्या मागे धावणारा सामान्य माणुस हा शक्यतो मी-माझा या पलिकडे विचार करत नाहि. काळाची पाऊले त्याला ओळखता येत नाहित. उलट ती ओळखता येत नाहित म्हणुनच तो सामान्य ठरतो. मेंढरासारखे एकाच्या मागे दुसरा त्यामागे तिसरा असे करत आयुष्य घालवतो. मात्र समाजाच्या आखुन दिलेल्या चौकटितुन काहि माणसे बाहेर पडतात, त्यांना काळाची पाऊले ओळखता देखिल येतात. तशी ते आपली कृती ठरवतात ज्याने संपूर्ण राष्ट्राचे भवितव्य उज्वल होते, त्यांनाच "द्रष्टा" म्हणता येईल. नुसता ’नेता’ होणेच कर्मकठीण आहे "द्रष्टा" होणे तर दुरच राहो. मात्र ही चार व्यक्तीमत्वे उपजतच द्रष्टेपण घेउन आली होती असे म्हंटल्यास वावगे ठरु नये.

आणि त्यांच्याकडे द्रष्टेपण होतं म्हणुनच ते समर्थ नेतृत्व करु शकले. शेकडो वर्षांनंतरचा विचार करुन त्यांनी आपली धोरणे आखली ती राबवली, कदाचित म्हणुनच तत्कालीन समाज अथवा त्या नंतरच्या पिढ्या तग धरुन राहु शकल्या. अन्यथा र्‍हास पावलेल्या बाबिलोनियन, माया, पारसिक, रोमन, ग्रीक, इजिप्शीयन अश्या प्रचंड मोठ्या संस्कृतींच्या वा साम्राज्यांच्या यादित भारत किंवा हिंदु संस्कृतीचे नाव आले असते. या चौघांपैकी दक्षीणेतील द्रष्ट्याने तर उभ्या हिंदु धर्मावर हिमालया इतके कधीहि न फिटणारे उपकार करुन ठेवले आहेत. तर पश्चीमेकडील द्रष्टा तर ’हिंद्दुहृदयसम्राट’ बनला असे कार्य करुन गेलाय.

"चारीत्र्य" हे तर यांच महत्वाचं बलस्थान. माया-मदिरा-स्त्री यांच्या आहारी ते कधीच गेले नाहित. या चार जणांतील तिघे तर आजन्म ब्रह्मचारी राहिले तर चौथा संसारी असला तरी आपल्या संसाराला आपल्या आयुष्यात गरजेपेक्षा जास्त स्थान त्याने कधीच दिले नाहि. आणि अगदी शत्रुनेही "स्त्री-दाक्षीण्य" या गुणाबाबत त्यावरुन आपले सर्वस्व ओवाळुन टाकावे इतकी शुचिता त्याच्याकडे होती.

वरील पूर्ण लेखामधुन "ते" चौघे कोण हे सुज्ञांच्या लक्षात आलेही असेल. मात्र त्यांच्या कालखंडानुसार मी त्यांची नावे प्रकट करतो - "आर्य चाणक्य, आदि शंकराचार्य, छत्रपति शिवाजी महाराज आणि स्वामी विवेकानंद" वरील प्रत्येक गोष्ट त्यांच्या बाबत चपखल बसते.

तक्षशीला गुरुकुल असो, जिजाऊसाहेब असोत अथवा रामकृष्ण परमहंस असोत यांचे शिष्यत्व पत्करणं म्हणजे शिवधनुष्य पेलण्यासारखं आहे. आणि नुसतं पेलुन फायदा नाहिये तर त्यावर आपल्या कार्याची प्रत्युंचा देखिल चढवता आली पाहिजे.

मुळात भारतभू हि पुण्यभूमी असल्याने असे सुपुत्र तिच्या पोटि जन्माला आले. आणि ते केवळ भारतभुमीचे सदभाग्य नसुन या चौघांचेही सुदैव आहे असेच म्हणावे लागेल कारण राष्ट्रापेक्षा कोणीचि मोठा नसतो हीच त्यांची शिकवण आहे. तरीही त्यांचे स्थान ध्रुवाप्रमाणे अढळ आहे. ज्याला ’भारत’ समजुन घ्ययचा असेल त्याने या चौघांचे चरीत्र समजुन घेण्याचा प्रयत्न करावा. कारण ह्या चौघांच्या चरीत्राचा एल लक्षांश अर्थ जरी समजला आणि त्या समजलेल्या चरीत्राच्या शतांशा इतकाहि त्यांचा किमान एक गुण आपण आपल्यात उतरवु शकलो तरी ’भारत’ समजला असे म्हणायला हरकत नाहि. नुसते ’मेरा भारत महान!’ असे वर्षातुन दोनदा म्हणायच आणि मग आपल्या कृतीने आपल्या देशाला कमीपणा येईल असे वागायचे याला भारत समजला असे नाहि म्हणता येत.

चाणक्याचं द्रष्टेपण, शंकराचार्यांचे ज्ञान, शिवरायांची शुचिता आणि विवेकानंदांची निष्ठाच भारताला महासता बनवु शकते. यातले दोन जण "योद्धा संन्यासी" होते, एक "महागुरु" होता आणि एक जण "श्रीमंत योगी" होता. ’राजयोग आणि कर्मयोग’ यांच अजब मिश्रण त्यांच्या व्यक्तीमत्वात होतं. यांनी ठरवलं असतं तर जगातली सर्व सुखं त्यांच्या पायाशी सहज आली असती. मात्र यांनी ’सोन्याचे पलंग’ वापरल्याचं कोणी ऐकले नाहिये. त्यांनी कधी कोणाचे वाईट केले नाहि. मात्र आपल्या मातृभूमीवर होणारे अत्याचार थांबवुन तिला संपन्न करण्यासाठी शक्य ते उपाय योजल्यांच दिसतं थोडक्यात या चौघांना "आचरल्यास" भारत महासत्ता होणार हि काळ्या दगडावरची रेघ आहे.एक दिवस भारताच्या महसत्तेचा तारा क्षीतीजावर पुन: उगवल्याशिवाय नाहि राहणार.

- सौरभ वैशंपायन(मुंबई).

श्रीगणेशउत्सवाबद्दल एक बाळबोध शंका

श्रीगणेशाची मिरवणुक ही विसर्जनाच्या दिवशी छान वाजत-गाजत होते. पण प्रतिष्ठापनेच्या दिवशी बर्‍याच मूर्ती केव्हा आणल्यात तेही समजत नाही. खरेतर हे उलट असायला हवे नाही? आनंदोत्सव हा श्रीगणेश येताना साजरा व्हायला हवा..अन् ते जातात तेव्हा आपण डोळ्यांत पाणी आणून त्यांना "..चैन पडेना आम्हाला" असे म्हणावयास हवे. काही समजत नाही. कुणी सांगू शकेल काय?

अवांतर:
हल्ली गणेशउत्सवात गणरायासमोर जे काही चालते ते बघता त्यांच्यासाठी तरी हा आनंदाचाच दिवस असायला हवा म्हणा!! Wink

बासरी

मिपा अभिरुची कट्ट्याला फोन केला असता विजुभाऊं च्या बासरीचे मधुर स्वर कानी पडले...आणि मला आठवला बासरीवाला,,, बासरीचा आवाज फारच मधुर असतो...
आमच्या कॉलनी मधे बर्‍याच वेळेला एखादा बासरीवाला बासरी विकण्यासाठी येतो..तो आला हे त्याच्या बासरीच्या आवाजावरुन लगेच कळते..
एशाच एका दिवशी मी एका बासरीवाल्याच्या बासरीतुन निघणारे मधुर स्वर ऐकले..घराच्या खिडकीतुन पाहिले असता एक लहान मुलगा अनेक बासर्‍या घेऊन चालला आहे व स्वतःएक बासरी वाजवत आहे असे मला दिसले..
मी विचार केला अशा किती बासर्‍या तो रोज विकत असेल्?बासरी ही काय रोज रोज विकत घ्यायची वस्तु नव्हे त्या मुळे त्याची रोजची कमाई किती असेल ? असा विचार माझ्या मनात आला..
मी त्या बासरीवाल्या मुलाशी बोलायचे ठरवले,,तो जिथे चालला होता तिथ मी त्याच्या मागो माग गेलो शेवठी एकदाचा गाठला त्याला,, मी त्या लहान मुलाला विचारले ये बासरी कितने का है? त्याने २०,२५,३० रु. वेगवेगळ्या बासर्‍या मला दाखवल्या,,माझ्या खिशात त्यावेळेला पैसे नव्हते मी त्याला म्हंटल आहेस तिथेच थांब कुठेही जाऊ नकोस मी पैसे घेऊन येतो,,,पैसे घेऊन मी परत आलो व त्याला २५रु.देऊन एक बासरी मागीतली,,तो स्वत :च सुमदर बासरी वाजवणारा असल्यामुळे मी त्याला म्हंटले तुच दोन तीन बासर्‍या वाजवुन बघ आणि ज्याचा सुर चांगला आहे ती बासरी मला दे..त्याने तसेच केले दोनचार वेगवेगळ्या बासर्‍या वाजवुन त्याने त्यातली एक बासरी मला दिली..मला स्वतःला बासरी अजिबात वाजवता येत नाही पण त्या मुलाल एक मदत म्हणुन मी ती बासरी विकत घेणार होतो..त्याला मी विचारले कुठुन आलास तो म्हणाला भिवंडी !!मला ते ऐकुन नवल वाटलं कारण भिवंडी ते ठाणे हे अंतर तो चालत चालत आला होता ,,कारण ज्याची दिवसाची कमाई ३० ते ४० रु. आहे ते सुध्दा कोणी बासरी विकत घेतली तर!! ज्याची दिवसाची कमाई एव्हढी कमी आहे त्याला बस मधुन येणे जाणे कसे परवडणार ??...
भिवंडी ते ठाणे हे अंतर तो लहान मुलगा चालत आला होता ज्या वयात इतर मुले स्वछंदपणे बागडतात त्या वयात तो मुलगा बासर्‍या विकत फिरतोय !!! त्यामुळे मला वाटले स्वातंत्र्य मिळुन इतकी वर्ष झाली पण लोकांची परिस्थीती मात्र खरचं बदललेली नाही !!
खरच मेरा भारत महान कधी होणार ???

(बासरीच्या सुरांचा प्रेमी)
मदनबाण.....

गणिताचे निम्नस्तरीय अध्यापन: विश्वशांती ढळण्याचे कारण

शीर्षकाबद्दल आधीच माफी मागतो. मला तशीही जरा प्रक्षोभक शीर्षके लिहिण्याची सवय आहे. आजवरच्या विश्वजालावरील वावरात मला तीन प्रकारचे लोक भेटले आहेत. एक गट, एकूण सदस्य संख्येच्या वीस टक्के, हा शीर्षक पाहून मगच लेखन वाचावे की नाही हे ठरवणारा. दुसरा गट, एकूणअंशी टक्क्यांचा, कुणी लिहिले हे पाहून मगच वाचणारा. तिसरा गट सध्या निवृत्त लोकांचा, त्यांना कुठलेही लेख वाचायला खूप वेळ असतो. दुसऱ्या गटाला स्वत:चे लेखन वाचायला लावणे, ही मोठ्या कष्टाची बाब आहे. त्यामुळे, मी पहिल्या वीस टक्क्यांवर लक्ष केंद्रित करतो. पण शीर्षक जरी नेहमीप्रमाणे अतिशयोक्तीकडे झुकणारे असले, तरी तुम्हाला हा लेख वाचायला त्याच शीर्षकाने उद्युक्त केले, हे नक्कीच. (तसे नसेल, तर तुम्ही अंशी टक्क्यात आहात, अभिनंदन!)

जगात गेली कित्येक वर्षे गणित हा विषय शिकवला जात आहे. अधिकाधिक ऋषींना भोवती बसून आहुती देण्यासाठी जागा वाढवता यावी, म्हणून यज्ञकुंडासाठी लागणाऱ्या जागेचा आकार कसा असावा, हा तत्कालीन पी एच डी चा विषय कुण्या शिष्याला कुण्या भारतीय ऋषीने जेव्हा दिला, तेव्हा गणिताला विद्या म्हणून स्थान मिळाले. पुढे अनेक राजे रजवाडे आपल्या राज्याच्या सीमांतर्गत क्षेत्र आपल्या अनेक राजपुत्रांमध्ये समसमान वाटून देण्यासाठी प्रधानजींना किंवा आपल्या कुलगुरूला संशोधन सहाय्य देऊ लागलेत, त्यामुळे भूमिती ह्या गणिताच्या शाखेचे महत्त्व वाढले. पण त्या आधीही, आकाशातले हे चमकणारे दिवे, आज रात्री एका ठिकाणी दिसतात, तर उद्या दुसऱ्या ठिकाणी, हे कसे काय बॉ ? हे शोधण्याच्या कामी अनेकांची नियुक्ती झाली. त्यांना जेव्हा ह्या दिव्यांच्या हालचालीत काही ठराविक परस्पर संबंध दिसलेत, तेव्हा त्यांनी ते संबंध समजवून घेण्याचा प्रयत्न तर केलाच, पण मग हे संबंध इतरांना समजवून सांगण्याचा प्रयत्न केला. त्यातून त्रिमीत भूमिती, बीजगणित ह्यांचाही शोध लागला. आणि हे ग्रहगोलांचे गणित सर्वसामान्य जनतेला शिकवण्यासाठी शैक्षणीय उपकरणे तयार झालीत, त्याचाच विपर्यास कुंडल्या आणि जन्मपत्रिकांत झाला.

चिन्हांच्या विशिष्ट मांडणीतून स्वत: आपल्या सभोवती दिसणाऱ्या सृष्टीबद्दल ताडलेले, स्वत:ला विज्ञानाबद्दल कळलेले, इतरांना सांगावे, ह्याचा इतिहास असा खूप जुना आहे. भाषा आणि लिपी ह्यांचा उगम आदिमानवाने स्वत:चे आत्मचरित्र गुहांमधल्या चित्रांतून केला. तीन-चार काड्यांसारखी माणसे एक मोठ्ठा हत्ती मारताहेत, अशी प्राचीन गुहांमधली चित्रे आपण बघितली आहेत. दरवेळी हे आदिमानव हत्तीच का मारायचे ? एकदातरी त्या तीन चार काड्यांमधून एखादी काडी त्या हत्तीच्या पायाखाली गेल्याचे पुरातन चित्र का दिसत नाही ? दरवेळी हे आदिमानव हत्तीचीच शिकार करत नसतील, कधी कधी एखादा गेंडा तरी दिसायला होता, ह्या चित्रांत! कदाचित सोंड असल्याने हत्तीचे चित्र कितीही घाणेरडा काढला तरी ओळखू येतो, म्हणून असेल. त्यामुळे ह्या चित्रे नसून चिन्हे आहेत, असे ठरवण्यास खूप वाव आहे. नव्हे, पुरातनकालातील चित्रलिपींतून ह्याचे अनेक पुरावे मिळतात. आपल्याला जे सांगायचे आहे, ते शब्दबंबाळ करण्यापेक्षा चिन्हांतून सांगणे सोपे, हे आपले संस्कार खूप जुने आहेत.

सांगायचे हेच, की चिन्हे, त्यांची विशिष्ट मांडणी, आणि त्यातून आपल्याला कळलेले ते इतरांना सांगणे, ही परंपरा खूप जुनी आहे. ह्या चिन्हांची ही भाषा, त्या चिन्हांच्या विशिष्ट मांडणीतून निर्माण होते, हे आपल्या पूर्वजांना कळले होते. भाषेची आणि लिपीची निर्मिती, आणि गणिताची निर्मिती ही ह्या चिन्हांपासून झाली आहे. माझ्या मते, कधीतरी ह्या चिन्हमांडणीकारांचे मतभेद झाले असावेत. "मी हत्तीची सोंड सरळ काढतो, तू कधी कधी ती वक्र काढतोस, म्हणून तुझे शुद्धलेखन चुकीचे आहे" म्हणून हत्तीला मारण्यासाठी बनवलेला दगडाचा भाला कुणा एका आदिमानवाने दुसऱ्या आदिमानवाच्या छातीत खुपसला नसेलच, असे सांगता येत नाही. पण कधीतरी ह्या चिन्हांना काहीतरी नियम असावेत, असे मानणाऱ्यांचा जय झाला (हत्तीची सोंड वक्र काढणारे आदिमानव, हे शुद्धलेखनवाल्या आदिमानवांनी संपवले.) आणि गणिताचा विजय झाला.

गणित ही विज्ञानाची भाषा झाली, ह्याचे कारण हे शुद्धलेखन. अचूक लिहिले नाही, तर अचूक समजून घेता येणार नाही, आणि अचूक समजून घेता आले नाही, तर स्वत:ला समजलेले ज्ञान इतरांपर्यंत नीट पसरवता येणार नाही, ही समजूत मानवाला कधी झाली, कुठून आली, ह्याविषयी अधिक संशोधन आवश्यक आहे. पण ही समजूत कधीतरी आली, हे नक्की.

स्वत:चे अनुभव इतरांना कळावे, म्हणून अधिकाधिक अचूक लिहिता यावे, ही मूळ भावना गणिताच्या इतिहासात नेहमीच दिसून आली आहे. म्हणून गणितींमध्ये ह्या शुद्धलेखनाविषयी जेवढे विवाद दिसून येतात, तेवढे भाषाशास्त्रज्ञांमध्ये पण दिसत नाहीत. आधुनिक युगामध्ये देखील गणितात आणि विज्ञानात हा "सिन्टॅक्स" खूप महत्वाचा मानतात. तर इतर "आर्ट्स" मध्ये सिंटॅक्स सोडून "सीमॅंटिक्स" किंवा "प्राग्मॅटिक्स" महत्त्वाचे मानतात.

असे असल्यास, गणित आणि विज्ञान, हे समजायला सर्वात सोपे असायला पाहिजे. कारण, ह्या शाखेचे नियम अधिक अचूक आहेत. मुळात ह्या शाखांत "सीमॅंटिक्स" ला काहीही महत्त्व नाही. विज्ञान व्यक्त करण्याची भाषा, म्हणजे गणित. गुरू आणि शनीची युती पावसास घातदायक, असे सीमॅंटिक्सच्या दृष्टिकोणातून बरोबर असलेले विधान (कारण "घातदायक" ह्या शब्दाची अचूक व्याख्या नाही), गणिताच्या भाषेत कसे व्यक्त करता येईल ? (सर्व ग्रह हे बिंदू धरल्यास, त्रिमितीय भूमितीत गुरू ह्या एका बिंदूचा शनि ह्या दुसऱ्या बिंदूबरोबर पृथ्वीशी असणारा त्रिमिती कोन एक त्रिमितीय रॅडयन पेक्षा कमी असल्यास पृथ्वीच्या वातावरणातील पाणी पृथ्वीवर पडण्याचे प्रमाण एक टक्क्याने कमी होते, असे जरी सुडो-सायंटिफिक म्हटले, तरी ती गणिती भाषा होत नाही.)

धर्माचेही असेच. अनेक धर्मवेत्त्यांची वक्तव्ये (हिंदु धर्मवेत्त्यांत सध्या आसारामबापू, रामदेवबाबा वगैरे ह्यांची गणती होते, त्यामुळे) मी ऐकलेली आहेत. गणितातील भाषेचा उपयोग ते अधे मध्ये करीत असतात. विशेषत:, "क्ष हे विधान जर आपण खरे मानले, तर मग य हे विधान खरे होते" असे अनेकदा सांगतात. आणि मग हळूच, "य हे विधान खरे आहे, त्यामुळे क्ष हे विधान खरे असलेच पाहिजे", असे ठोकून देतात. इथे त्यांची गणिताशी फारकत होते. पण समोर माना डोलवणाऱ्या त्यांच्या शिष्यांना हे पटते असे त्या शिष्यांचे हावभाव आणि वाढणारी शिष्यसंख्या सांगत असते. ह्या शिष्यांत सगळेच काही अनपढ गवार नसतात, असा माझा अनुभव मला सांगतो. पण गणितातल्या, तर्कशास्त्रातल्या एका मूलभूत तत्वाची येथे अवहेलना होते आहे, हे त्यांच्या गावीही नसते.

गणिताचा विपर्यास (मुद्दाम?) करून घेणारा तिसरा वर्ग म्हणजे अर्थशास्त्रातील तज्ञ म्हणवून घेणारे समभाग विक्रेते आणि ग्राहक. स्वत:च्या विद्याशाखेला "शास्त्र" म्हणवून घेणारे अनेक गुणिजन आहेत. अभिजात संगीताला शास्त्रीय संगीत म्हणून हिंदुस्थानी गायकीच्या पाठीशी "शास्त्र" उभे आहे, अशी स्वत:ची समजूत करून घेणारे लोक, ज्योतिष शास्त्रज्ञ, आणि हे तिसरे म्हणजे स्टॉक ट्रेडर्स. "धीरुभाईने आज हरा कुर्ता पहना है", म्हणून आज रिलायन्स चा स्टॉक वरती जाणार, असा कयास लावून, आपल्या मध्यमवर्गीय ग्राहकांची कमाई रिलायन्स मध्ये उद्यापुरती टाकणारे लोक. हे फक्त भारतातच नाहीत. हे जगभरात सगळीकडे आहेत. ह्यांच्या अंधश्रद्धांविषयी फारसे लिहिले जात नाहीत, कारण "समभागांत गुंतवलेले पैसे, कमीजास्त होऊ शकतात, त्यामुळे सावधानी बाळगा", हे त्यांनी त्यांच्या ग्राहकांना आधीच बारीक अक्षरांत सांगितेलेले असते. पण मोठ्या अक्षरांत "गेल्या दहा वर्षांत आमच्या ग्राहकांचे पैसे दुप्पट झाले आहेत", असे देखील लिहिलेले असते. त्यामुळे, हे लोक गणितात बोलत नाहीत, त्यामुळे त्यांच्यावर विश्वास कसा ठेवायचा ? अशी एखाद्या विज्ञानाधीष्ठित गुंतवणुकदाराची निष्ठाही अर्थहीन असते. आर्ट्स वाल्या सर्वसामान्यांची तर गोष्टच निराळी. (ब्रोकरवर पूर्ण विश्वास ठेवणाऱ्यांतील आर्ट्स वाले किती, कॉमर्सवाले किती, आणि सायन्सवाले किती, हा एक संशोधनाचा विषय ठरावा. समाजशास्त्रातील एक-दोन पी एच डी नक्कीच होतील ह्या विषयावर.)

गणिताचा विपर्यास करणारे आणखी बरेच धंदेवाईक सापडतील. लॉटरी आणि सट्टेवाले. अनेक राजकारणी. अगदी डॉन लोक देखील आपल्या शार्पशूटर्स ला स्वत:शी एकनिष्ठ ठेवण्यासाठी गणिती शक्यतांचा प्रयोग करतात, हे सिद्ध झाले आहे. - दाऊदशी एकनिष्ठ असणारे किती छोटे मोठे ट्रिगरहॅपी डॉन दाऊदची जागा घेऊ शकतील ?)

जगात गणित समजणाऱ्यांची संख्या वाढली, तर गणिताला फाट्यावर मारणाऱ्या किंवा गणिताचा विपर्यास करणाऱ्या ह्या धंदेवाईकांचे प्रमाण कमी होईल. जगातील सुखी लोकांचे प्रमाण वाढेल आणि जग सुधारेल, असे समजण्यास खूपच वाव आहे. त्यामुळे मुलांना आणि मोठ्यांना गणित कसे शिकवावे, ह्याचा विचार होणे ही जग सुधारण्यासाठी सर्वात महत्त्वाची गरज आहे.

माझ्या आजवरच्या वावरातून मराठी विश्वजालावर अनेक निवृत्त शिक्षिका / शिक्षक आहेत, असे कळले आहे. ह्या सर्वांनी गणित अध्यापनातील सुधारणांविषी विचार करायला हरकत नाही. आम्ही करतोच आहोत.

फाळणी

११ जुलै रोजी मुंबईत रेल्वेमध्ये जे स्फोट होऊन २०० पेक्षा जास्त माणसं मारली गेली होती त्या नंतर दोन दिवसांनी मला ही कविता सुचली आहे. शक्य तितकं वास्तव मांडण्याचा प्रयत्न केलाय. दुर्दैवाने गेल्या २०-२५ दिवसांत अश्या घटाना घडात आहेत कि सुभाषबाबुंचे ३रे कडवे आपण खरच खुप सिरीअसली घ्यायला हवे.
-----------------------------------------------

परवाच एका स्फोटात मेलो,
पहिल्याच झटक्यात स्वर्गात गेलो,
स्वर्गात जाण्याचा एकच कायदा होता,
सरळ जगण्याचा हाच एक फायदा होता. - १

स्वर्गात जाताच टिळक भेटले,
नमस्कार म्हणताच प्रसन्न हसले,
- टिळकांनी विचारले.......
काय रे, स्वातंत्र्या नंतर बदलय का काही?
म्हंटल, छे हो, सरकारच डोक ठिकाणावर नाही,
तिथुन लगबगीने सुभाषबाबु आले,
विचारु लागले खाली नेमके काय झाले? - २

मी म्हणालो,
नेताजी काय काय म्हणुन घड्तय हल्ली?
फक्त आमदारच म्हणतात चलो दिल्ली!
नेताजी! आजही स्वातंत्र्यासाठी आम्ही रक्तच देतो
फक्त 'खुन' आमच असतं आणि आझाद कश्मीर होतो! - ३

तितक्यात....
दुरवर सावरकर दिसले म्हणुन धावलो,
म्हंटल 'तात्या', उभ्या जन्माचं पुण्य पावलो,
म्हणाले, सध्या तरी सगळं कसा निवांत आहे,
इथे congressवाला नाही तर सगळं कस शांत आहे - ४

त्यांनाच विचारल....
तात्या, इथे सध्या शिवराय कुठे हो राहतात?
म्हणाले, ते पहा सौ्धातुन आपल्याकडेच पाहतात!
छत्रपतिंचा विजय असो, म्हणुन चटकन हात जोडले,
पण घडल भलतच, ते माझ्यावरच ओरडले,
- काय रे? कोण्या जेम्स लेनने म्हणे बत्तमिजी केली
तुमची अक्कल, तेंव्हा सांगा कोठे चरायला गेली? - ५

मान वर करायची माझी हिंमत होत नव्हती,
आणि महाराजांची नजर माझ्या वरुन ढळत नव्हती!
कबुल आहे महाराज, आम्हाला तुमची स्वप्न कळलीच नाही,
पैसा सोडुन आमची नजर, दुसरीकडे वळलीच नाही.
पण रक्षणकर्तेच लांडग्यांसारखे नेमके सावाज हेरतात,
आणि ब्र म्हणायचा अवकाश, गाढवाचे नांगर फिरतात. - ६

सगळे ऐकुन महाराजांच्या गालचे कल्ले थरारले,
आमचं केविलवाणं जगणं बघुन डोळ्यात पाणी तरारले,
क्षणभर राजेपण विसरुन ते दु:खावेगाने थरथरले,
आणि मग आमचं असं वागणं बघुन रागाने बिथरले - ७

पाय लटपटले....
वाटल आता, कंबख्ति भरलिच म्हणुन समज,
चुकिची शिक्षा, गर्दन मारलीच म्हणुन समज,
पण न्याय-कठोर असले तरि हृदय त्यांचे 'रीते' नव्हते,
अन मेलेल्यांनाच मारायला ते 'खुर्चीतले' नेते नव्हते. - ८

म्हणाले, फक्त नाव सांग, खाली जाउन समाचार घेतो,
म्हणालो राहुद्या 'लोकशाहीत' प्रत्येकाचा विचार होतो,
खाली आता न्याय बरेचदा विकत मिळतो,
आणि पैसेवाला दुसर्‍यांच्या जिवाशी खेळतो. - ९

फक्त एकच काळवीट मारले!म्हणत आपले माजोरडे नाक मुरडतो,
कोणीही आपल्या गाडीखाली गरिबांना चिरडतो
महाराजांनी मोठ्या मुश्किलीने, डोळ्यातलं पाणी अडवल,
कळलं मला हेच पातक आम्ही आयुष्यभर घडवल - १०

मान खाली घालुन तसाच पुढे गेलो............
अहो आश्चर्यम?? स्वर्गात मला औरंग्या भेटला
म्हणे काफरांना मारुन तर स्वर्ग गाठला

जिन्हा सुध्दा होता तिथेच,
म्हणाला, लवकरच आमची संख्या इथे लाखांवर जाईल
आणि मग स्वर्गाची सुद्धा फाळणी होईल - ११

- सौरभ वैशंपायन(मुंबई).

जय हो

लोकमान्य टिळकांनी प्रथम पुण्यात सार्वजनिक गणेशोत्सवास सुरुवात केली आणि बघता बघता सार्वजनिक गणेशोत्सव परदेशातही साजरा होऊ लागला.

यंदा प्रथमच हॉलंडच्या हेग शहरात गणेशोत्सव साजरा होणार असून, यासाठी सोमवारी पुण्यातून गणेशमूर्ती रवाना करण्यात येत आहेत.

मूर्तीबाबत देशमुख म्हणाले, "मूर्ती पूर्णपणे आंतरराष्ट्रीय नियमांचा विचार करून निर्माण केली आहे. मूर्तीसाठी नैसर्गिक रंगांचा वापर केला असून, ती पर्यावरणपूरक आहे.

हे नियम फक्त आंतरराष्ट्रीय मूर्तीला का?

भारतात पर्यावरणाला काही धोका नाही का?

अमेय