समाज

मिपा रांगोळी स्पर्धा २०१३

संपादक मंडळ's picture
संपादक मंडळ in जनातलं, मनातलं
2 Nov 2013 - 5:16 am

मंडळी,

दिवाळी आणि रांगोळीचं अगदी जीवाभावाचं नातं आहे. लहानपणी रांगोळ्या काढण्यापासूनच सार्वजनिक चित्रकलेला सुरुवात होते. रोजच्या रोज तुळशीपाशी एखादं स्वस्तिक, दाराच्या उंबरठ्यावर गोपद्म, लक्ष्मीची पाऊले असे आईने काढताना आपण बघत आलोय तरी खरी गंमत दिवाळीला असते. त्यावेळी आपल्या चित्रकारीत खरेखुरे रंग भरता येतात. लहानपणी पोपट, मांजर, फुले काढण्यापासून सुरुवात होते. मोठे झाल्यावर ठिपक्यांची रांगोळी जमवण्यासाठी धडपड असते. समांतर ठिपके कोणत्याही फूटपट्टीशिवाय काढण्याचं कसब अंगी हवं, नाहीतर ठिपक्यांचे कागद ती सोय करतात. मग रांगोळीची रेघ नाजूक हवी, रंगसंगती उठावदार हवी असे सल्ले मिळतात.

हे ठिकाणसमाजजीवनमानराहणीमौजमजाछायाचित्रणरेखाटनस्थिरचित्रसद्भावनाशुभेच्छाअभिनंदनआस्वादप्रतिभाविरंगुळा

माझी दिवाळी

संपादक मंडळ's picture
संपादक मंडळ in जनातलं, मनातलं
1 Nov 2013 - 7:21 pm

नमस्कार मिपाकरहो,

दिपावली अभिष्टचिंतन!

हे ठिकाणसंस्कृतीकलापाकक्रियासमाजजीवनमानराहणीमौजमजाछायाचित्रणप्रकटनविचारप्रतिसादसद्भावनाशुभेच्छाअभिनंदनप्रतिक्रियाआस्वादअनुभवप्रतिभाविरंगुळा

पुस्तकं..

आजी's picture
आजी in जनातलं, मनातलं
26 May 2025 - 11:16 am

आपण सगळेच पुस्तकाला पवित्र मानतो. समग्र जगाचं ज्ञान देणारी खिडकी मानतो. "न हि ज्ञानेनसदृशं पवित्रं इह विद्यते", म्हणजे ज्ञानाइतकं पवित्र या जगात दुसरं काही नाही. असं वचन आहे. हे ज्ञान आपल्याला पुस्तकं देतात.

जेव्हा माणसाला छपाईचं तंत्र अवगत नव्हतं तेव्हा मौखिक परंपरेने ज्ञान मिळवले जात होते. आपले ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद, उपनिषदे,ही मौखिक परंपरेने चालत आलेली आहेत. नंतर त्यांची पुस्तकं प्रकाशित झाली. या ग्रंथांचे लेखक अज्ञात आहेत, म्हणून त्यांना अपौरुषेय असं म्हटलं जातं. आज ऋग्वेदाला सर्वांत प्राचीन ग्रंथ म्हणून मान्यता मिळाली आहे.

साहित्यिकसमाजजीवनमानप्रकटनविचारप्रतिसाद

प्रा. जयंत नारळीकर यांना श्रद्धांजली

कपिलमुनी's picture
कपिलमुनी in जनातलं, मनातलं
20 May 2025 - 1:52 pm

भारतीय खगोलशास्त्र आणि सैद्धांतिक भौतिकशास्त्र यांचे दिग्गज प्रा. जयंत नारळीकर यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या जाण्याने केवळ भारतीय विज्ञानच नाही तर जागतिक विज्ञानसमाजानेही एक महान विचारवंत, संशोधक आणि समाजसुधारक गमावला. त्यांनी विज्ञानाच्या प्रत्येक अंगाने भारतीय तरुण पिढीसाठी मार्गदर्शन केले, वैज्ञानिक विचारांना जनसामान्यांपर्यंत पोहोचवले आणि विज्ञानप्रेमी बालकांच्या मनात विज्ञानाविषयी उत्सुकता निर्माण केली.

त्यांची छोटीशी ओळख आणि श्रद्धांजली !

समाजबातमी

आव्वाज आव्वाज..

आजी's picture
आजी in जनातलं, मनातलं
13 May 2025 - 2:26 pm

आमच्या सोसायटीत सगळे बंगलेच आहेत. आपापली घरं फक्त कामवाल्यांसाठी उघडून आणि त्या कामं करून गेल्यावर ती पुन्हा बंद करून सगळ्या गृहिणी टीव्हीवर, आणि आताशा ओटीटीवर सिनेमे किंवा हिंदी भाषेतल्या कौटुंबिक मालिका बघत बसतात.

पण त्या अधुनमधून बंगल्याबाहेरही पडतात. भिशी,किटी पार्टी, हळदीकुंकू,बारशी, वाढदिवस,भजन, सत्यनारायणाची पूजा, इत्यादी त्या थाटामाटात आणि एकत्र येऊन साजरे करतात.

साहित्यिकसमाजजीवनमानप्रकटनविचारप्रतिसाद

मोदींचे भाषण आणि त्यावर घेतलेले बालीश आक्षेप

युयुत्सु's picture
युयुत्सु in जनातलं, मनातलं
13 May 2025 - 12:23 pm

मोदींचे भाषण आणि त्यावर घेतलेले बालीश आक्षेप

https://youtu.be/oq35bx7ktEM?si=SHdxD8Kmglr2iXD5

माझी उत्तरे

प्रश्न १ - समझौत्याची घोषणा भारत आणि पाक यांच्या ऐवजी त्रयस्थ पक्षाने करणे केव्हाही हितावह. जो पक्ष समझौत्याची भाषा करतो तो कमकुवत मानला जाऊ शकतो. भारताने अशी घोषणा केली असती तर पाकला आयते कोलीत मिळाले असते.

समाजविचार

समईतलं तेल संपूनही उरणारं तेज

मार्गी's picture
मार्गी in जनातलं, मनातलं
10 May 2025 - 3:10 pm

स्नेहप्रभा! प्रभा म्हणजे तेज. नुसतं तेज असेल तर त्या तेजोवलयाचा कधी कधी त्राससुद्धा होऊ शकतो. तेजामुळे दाहकता निर्माण होऊ शकते. पण तेजासोबत स्नेह असेल आणि ओलावा असेल तर ते तेज घातक ठरत नाही. स्नेह म्हणजेच तेल. जेव्हा तेजासोबत अशी आर्द्रता असेल तर ते तेज शीतल होतं. कदाचित तेजासोबत असलेल्या शीतलतेमुळे आयुष्यातल्या इतक्या दु:खाच्या आघातांनंतरही अशी व्यक्ती खंबीर राहू शकते आणि समईसारखी मंद तेवत राहू शकते!

समाजजीवनमानलेखअनुभव

माध्यमांची आरडाओरड

युयुत्सु's picture
युयुत्सु in जनातलं, मनातलं
9 May 2025 - 3:38 pm

नुकताच काही आठवड्यापूर्वीचा (पहलगाम घटनेच्या अगोदरचा) एक प्रसंग...

एका कंपनीत फायर ड्रील चालू होते. त्यात त्यांना आकस्मिक परिस्थितीमध्ये काय करायचे (उदा० हातातले काम टाकून संकटकालीन मार्गिकेकडे जाण्याच्या) याच्या सूचना दिल्या होत्या. नंतर काही दिवसांनी लोकांची तयारी बघण्यासाठी एक दिवस अचानक सायरन वाजवण्यात आला. त्यावर लोकांनी काय करावे?

त्यांनी प्रशासकीय अधिकार्‍यांना फोन करून "आता काय करायचे" असा प्रश्न विचारला, तेव्हा संबंधितानी कपाळाला हात मारला.

समाजविचार