टंकलेखन साहाय्य
सामर्थ्यदाता : गमभन !
राहणी
पानी तेरा रंग कैसा?
प्रेषक श्रीकृष्ण सामंत ( गुरू, ०७/०३/२००८ - ०७:२०) ."ज्ञान निर्मितीच्या क्रियेमधे जसं तू पहाशिल तसं तुला दिसत जातं.शास्त्रिय जगात एका पद्धतीत विचार करून मुलभूत शोध लागून ते शोध जवळ जवळ स्थापित झालेच आहेत असं समजून जाता जाता परत तेच शोध दुसऱ्या पद्धतीने विचार करून तेव्हड्याच हिरिरीने स्थापित करून दाखवले गेले आहेत.
देवाचं अस्थित्व आहे आणि देवाचं अस्थित्व नाही हा
पण त्यातलाच प्रकार असावा."
मी आणि प्रो.देसाई तळ्यावर गप्पा मारत बसलो होतो.समोरून दोन उमदे तरूण येताना पाहिले.त्यात प्रो.देसायांचा नातू होता हे नक्की समजलं.पण दुसरी व्यक्ति कोण हे ते दोघे जवळ यई पर्यंत कळलं नाही.नंतर समजलं तो त्याचा मित्र होता.
ह्या पुर्वी भाऊसाहेबांच्या नातवाने देवाचं अस्तित्व तो कसा मानतो,त्यावर एकदा तळ्यावर ह्याच जागी सुंदर लेक्चर दिलं होत.हा त्याचा मित्र मात्र अगदी विरोधी मताचा आहे तो देवाचं अस्थित्व मानत नाही आणि त्याचे त्याबद्दल काय मुद्दे आहेत ते समजावून सांगण्यासाठी त्याला आमच्याकडे घेवून आला होता.
प्रो.देसाई मला म्हणाले,
"माणसाच्या डोक्यात विचार येतात ती एक ईश्वराची- किंवा वाटलं तर निसर्गाची म्हणा- निर्मिती आहे.ह्या तरूण मुलात अनेक प्रकारची निर्मिती करण्याची क्षमता जास्त असते.कुठलेही मुलभूत शोध अशाच वयावर लागले आहेत.ही एक प्रकारची देणगी आहे.
बघुयातर खरं काय ह्याचे मुद्दे आहेत ते"
मी म्हणालो,
" आपण अवश्य ऐकू या"
"देवाचं अस्थित्वच नाही असं मला वाटतं.मी नास्तिकाच्या पुढे गेलो आहे.देवावर ज्याचा विश्वास नाही त्याला नास्तिक म्हणतात.देवावर विश्वास न ठेवणं हे सोपं आहे.जे नसतंच ते आहे म्हणून कसं शाबित करावं. म्हणजे निगेटिव्ह कसं पृव्ह करायचं?माझ्या खोलीत हत्ती नाही हे आपण कसं शाबित करणार?
हत्ती हे एक उदाहरण म्हणून मी घेतलं. हत्ती ऐवजी चमत्कार हे उदाहरण घ्या,किंवा वरून आलेला आवाज हे एक हवं तर उदाहरण घ्या,त्याचं अस्थित्व कसं सिद्ध करायचं.?
ह्याचा अर्थ असा की ज्याला सत्यावर प्रेम आहे,त्याला प्रथम देवच नाही अशी समजूत करून घेवून मगच देव आहे का ह्या साठी शोधण्याचा त्याने प्रयत्न केला पाहिजे.त्या अगाध शक्तिचा साक्षातकार होण्यासाठी प्रयत्न केला गेला पाहिजे.
त्यामुळे देवाचं अस्थित्वच नाही असं समजणं फार सोप्यातली सोपी गोष्ट आहे.
"माझा देवावर विश्वास आहे" असं एखाद्याचं म्हणणं असल्यावर त्याच्या ह्या वयक्तिक विचारसरणीचा उहापोह जास्त केला जाण्याची अपेक्षा असते.त्याच्या श्रद्धेची झेप पाहून त्याच्या आयुष्याचं चित्र जास्त स्पष्ट करून घेण्याची अपेक्षा असते.कारण ही श्रद्धा त्याच्या जीवनाला मार्ग दाखवत असते.
म्हणून मी म्हणतो की "मला वाटतं देव नाही" अशा विचाराचं पाऊल घेतल्यानंतर माझ्या आयुष्यात मला क्षणो क्षणी स्मरण करून दिलं जातं की मी आप्प्लपोटा नाही,माझं मन प्रेमाने भरलेलं आहे,मी संतुष्ट आहे.जीवनात माझ्या उपलब्धेतही मी संतुष्ट आहे.जे अदृष्य आहे त्याची हाव असणं बरोबर नाही. केवळ प्रेमापोटी मला माझ्या कुटुंबाने वर काढलं आणि तशाच प्रेमापोटी मी जे कुटुंब वर काढतोय ह्यात मी तृप्त आहे.मला त्यासाठी स्वर्गाच्या उपलब्धीची जरूरी भासत नाही. आहे त्यातच मी पुर्ण सुखी आहे.
देवाचं अस्थित्व नाकारल्याने मी थोडासा लोकांच्या मनातून खपा होईन.कदाचीत मला त्यांच्याकडून दयेची प्राप्ती होईल.तर मग हे चांगलंच होईल.इतरांच्या विचारसरणी बद्दल मी जागृत राहिन.जणू पहिल्यांदाच भेटत आहे अशा अविर्भावात इतरांशी संबध ठेवीन.
देवाच्या अस्थित्वार विश्वास न ठवल्याने माझंच फक्त एकट्याचं अस्थित्व जगात असावं असा विचार करण्यापासून मी परावृत्त होईन.निरनीराळ्या लोकांकडून निरनीराळ्या संस्कृतीबद्दल मला नव्याने शिकता येईल.
देवाशिवाय,विचारकरून समोर दिसणाऱ्या सत्य परिस्थिती बद्दल एकमत होईल.आणि माझं कुठं चुकतं ह्याचं मला परिक्षण करता येईल.एकमेकाला समजावून घेण्य़ाच्या वृत्तीने एकमेकाशी संवाद ठेवता येईल.
"माझी श्रद्धा आहे,आणि मी ती माझ्या अंतरात ठेवली आहे,आणि कुणी काही सांगितलं किंवा कुणी काही केलं तरी माझा ह्या श्रद्धेवरचा विश्वास हलणार नाही."
असं म्हणणं म्हणजे थोडक्यात माझ्या सारख्याला, "गप्प बस मला तुझं काहीही ऐकायचं नाही."
असंच सांगितल्या सारखं आहे. पण असं म्हणणाऱ्याच्या भोवऱ्यात मी सापडणार नाही.हे असलं बोलणं हे वळणं वळणं घेवून धार्मिक संस्कारातून बोलल्या सारखं होतं.
देवाचं अस्थित्व नाकारण्याने मला माझा विचार जर चुकिचा आहे हे सिद्ध करून दाखवायचं झाल्यास त्या माझ्या प्रयत्नात मी बरंच काही शिकून जाण्यात आनंद मानतो.
कुटुंबात निर्माण होणारी अगणित दुःख,नव्हे तर जगातच होणारी ही दुःख ही त्या अंतरज्ञानी,सर्वव्यापी, सर्वशक्तिमान शक्तिमुळे होत आहेत आणि अशी ती शक्ति आम्हा पामराना मदत करण्याचा साधा विचार करण्याचं सोडून उलट ही शक्ति आपली परिक्षाच घेत आहे अशी समजूत करून घेवून जगत राहिल्यास कदाचीत एकमेकाला मदतीची जरूरी असली तरी ती करण्या पासून एकमेक वंचित होतो.
अशा ह्या देवाच्या अस्थित्वाचा विचार आणून जास्त दुःखी होण्या ऐवजी त्याचं अस्थित्व न मानण्याने जास्त त्रास करून घेण्यापासून सुटकाच होते असं मानावं लागतं.
देवाचं अप्रत्यक्ष अस्थित्व न मानल्याने माझं कुटुंब,माझे इतार सहप्रवासी,प्रेम,सत्य,सुंदरता आणि अशा अनेक सभोवताली असलेल्या गोष्टीचं प्रत्यक्ष अस्थित्व-रियालिटी- असल्याचं पाहून हेच जीवन जास्त सुखकर आहे असं वाटून माझ्या मनाला बरं वाटतं."
हे सर्व ऐकून झाल्यावर माझ्या मनात विचार आला,
" हे काय तो म्हणतो त्याला पण काही तरी अर्थ आहे.इट हॅझ सम सेन्स."
मी त्याला म्हणालो,
"ज्ञान निर्मितीच्या क्रियेमधे जसं तू पहाशिल तसं तुला दिसत जातं.शास्त्रिय जगात एका पद्धतीत विचार करून मुलभूत शोध लागून ते शोध जवळ जवळ स्थापित झालेच आहेत असं समजून जाता जाता परत तेच शोध दुसऱ्या पद्धतीने विचार करून तेव्हड्याच हिरिरीने स्थापित करून दाखवले गेले आहेत.निसर्गाकडे ज्या दृष्टीने तू पाहशिल तसाच तो तुला दिसत राहतो.हिच तर त्याची खूबी आहे.
देवाचं अस्थित्व आहे आणि देवाचं अस्थित्व नाही हा
पण त्यातलाच प्रकार असावा."
एव्हडं बोलून झाल्यावर आम्ही सर्व घरी जायला निघालो.
श्रीकृष्ण सामंत
- प्रतिक्रिया प्रकाशित करण्यासाठी येण्याची नोंद करा अथवा सदस्य व्हा.
औद्योगीक इसापनीती भाग चार (शेवटचा) - गाढव, रानडुक्कर, घुबड, कोल्हा आणि सिंह
प्रेषक अरुण मनोहर ( गुरू, ०७/०३/२००८ - ०४:४८) .भाग एक- http://www.misalpav.com/node/2330
भाग दोन- http://www.misalpav.com/node/2345
भाग तीन- http://www.misalpav.com/node/2363
औद्योगीक इसापनीती भाग तीन - गाढव, रानडुक्कर, घुबड, कोल्हा आणि सिंह
एका जंगलात एक सिंह आपल्या कळपाबरोबर रहात होता. कळपातील सिंहीणी रोज त्याच्यासाठी शिकार करून आणत. एक दिवस दुसर्या एका सिंहाने त्याला कळपातून हुसकावून लावले. तेव्हा तो सिंह रानामधे एकटाच राहू लागला. शिकार आणण्यासाठी त्याने एक गाढव, एक रानडूक्कर, एक घुबड आणि एक कोल्हा असे चार मदतनीस कामास लावले. तेही राजाकडे काम मिळते आहे म्हणून तयार झाले. सिंहाला वाटले की या प्रत्येकाची वैशिष्टे एकत्र येवून भरपूर शिकार मिळेल.
गढव दिवसभर रानात चरत फिरायचे. चरायचा कंटाळा आला की लोळत पडायचे. खुशीत आले की दोनचार तानाबिना मारून सर्वांची करमणूक करायचे. सिंह त्याच्याकडे एक आळशी पण गमतीदार प्राणी म्हणून बघायचा. चमूला मनोरंजन येवढाच त्याचा उपयोग होता.
रानडुक्कर शिकार दिसली रे दिसली की तिच्यामागे सुसाट धावत सुटे. त्याला फक्त सरळ रेषेत धावणे जमायचे. गरज पडलीच तर अचानक पावित्रा बदलून शिकार पकडण्याची कला त्याला माहीत नव्हती. जर शिकार यदाकदाचित तावडीत आलीच, तर धडाधड धडका देउन तिला पाडणे येवधेच त्याला माहीत होते. ह्या धकाधकीत रनडुक्कर खूप काम करून थकून जायचे. हा मूर्ख प्राणी सतत कही उपयोगी, काही निरूपयोगी उद्योगात असतो येवढीच माफक माहिती सिंहाला त्याच्याविषयी होती.
घुबड आपले सतत चिंतामग्न बसून असायचे. त्याला उडतांना किंवा काम करतांना कोणीच पाहिले नसावे. चुपचाप एका जागी बसून, डोळे शुन्यात लावून विचार करीत असायचे. कामाच्या चिंतेने रात्रभर झोपायचे नाही. सिंहाला त्याचा एकूण आभास एखाद्या अभ्यासू विचारवंताचा वाटायचा.
सिंहाचा सर्वात विश्वासू मात्र कोल्हाच होता. त्याच्या समयोचित सल्ल्यावर सिंह अवलंबून रहायचा. कोल्हा नेहमीच सिंहाच्या कानाशी लागलेला असायचा. आपल्याला सिंहाची कसी काळजी वाटते, त्याचा पुर्वीचा कळप परत कसा मिळवता येईल वगैरे गुजगोष्टी सिंहाशी बोलत रहायचा. हा काय सारखी कानाफुसी करत असतो हे कोणालाच कळायचे नाही. पण सिंहाचा विश्वासू म्हणून दबदबा असल्याने बाकी चमू त्याला घाबरून होती.
एकदा जंगलामधे वणवा पेटला. जंगल सोडून जायची वेळ आली. त्यावेळी आळशी गाढव व मूर्ख रानडूक्कराला पेटलेल्या जंगलात सोडून, विचारी घुबड आणि विश्वासू कोल्हा या दोघांना घेऊन सिंह दुसर्या जंगलात निघून गेला.
आराम नव्हे, काम कर.
काम नव्हे, कामाची फिक्र कर.
फिक्र देखील नव्हे, फिक्रची जिक्र कर.
१) आपापल्या जंगलातील गाढव, रानडुक्कर, घुबड, कोल्हा आणि सिंह ओळखा, आणि तेच का निवडले ह्याची कारणे द्या.
२) औद्योगीक इसापनीती साठी पुढचे भाग लिहा
बालपणीचा काळ सुखाचा! १३ बायमावशी!
प्रेषक प्रमोद देव ( शनी, ०६/२८/२००८ - २१:४३) .आमच्या घरात तसे फारसे धार्मिक वातावरण नव्हते. थोडीफार पूजा-अर्चा रोज नित्यनेमाने चालत असे.पण सोवळे-ओवळे,अभिषेक किंवा जप-जाप्य असली कर्मकांडे नव्हती. एक छोटीशी फळी ठोकलेली भिंतीत(हाच देव्हारा),त्याच फळीवर एखादी तसबीर आणि समोर छोट्य़ा ताम्हणात तीन चार पितळी मूर्ती असत.त्यातील एक शंकर,दुसरा गणपती,एक कोणती तरी देवी(लक्ष्मी की पार्वती? आठवत नाही) आणि लंगडा बाळकृष्ण.पूजा आईच करायची पण कधी अडचण असली तर मग आम्हा मुलांपैकी कुणी तरी करत असू.अर्थात पूजा म्हणजे स्वच्छ फडक्याने तसबीर साफ करायची,सगळे पितळी देव पुसायचे(आठवड्या्तून एकदा त्यांना आंघोळही घातली जायची), हळद-कुंकू वाहायचे,थोडी फुले वाहायची... की झाली पूजा. हाय काय नी नाय काय.
शाळेत गीतापठण,श्लोकपठण वगैरे असल्यामुळे ते सगळे पाठ होते. संध्याकाळी इतर उजळणी बरोबर त्याचीही उजळणी व्हायची. आता माझाच विश्वास बसत नाहीये,तर तुमचा काय बसणार म्हणा,पण त्या काळात मला रामरक्षा,अथर्वशीर्ष,मनाचे श्लोक, गीतेतले २,१२ आणि १५ असे अध्याय,झालेच तर संस्कृत सुभाषिते,मोरोपंतांच्या आर्या आणि असेच काही मिळून कितीतरी गोष्टी पाठ होत्या. अगदी मधनंच कुठूनही सुरु करायला सांगितले तरी न अडता,अस्खलितपणे घडाघडा म्हणून दाखवू शकत असे, असा मी घनपाठी होतो. असो. गेले ते दिवस! आता थोड्या वेळापूर्वी काय केले हेही आठवत नाहीये. 
मुख्य दिवाळी संपली की देवदिवाळीच्या आधी येणारे तुळशीचे लग्न आमच्या वाडीत बर्याच जणांकडे साजरे व्हायचे. मात्र त्यात पहिला मान ह्या बायमावशींकडच्या तुळशीच्या लग्नाचा. वाडीतल्या जवळपास सगळ्या बायका अगदी नटून थटून त्यांच्या चिल्ल्यापिल्ल्यांसह येत असत. एरवी दिवसातनं एखादेवेळ पाणी घालण्या व्यतिरिक्त ज्या तुळशीकडे फारसे लक्ष नसायचे तिला आज भलतेच महत्व यायचे. ज्या डब्यात ती तुळस लावलेली असायची(बहुदा डालडाचा डबाच असायचा)त्या डब्याला बाहेरून गेरू फासला जायचा. मग त्यावर खडूने स्वस्तिक आणि कसली कसली नक्षी काढली जायची. तुळशीला जरीच्या हिरवाकंच खणाने गुंडाळले जायचे. समोर सुगंधी उदबत्ती,धूप लावला जायचा. तुळशीचा नवरा म्हणजे लंगडा बाळकृष्ण एका ताम्हणात घालून आणलेला असायचा. मग दोघांच्या मध्ये आंतरपाट म्हणून वापरायला नवा कोरा पंचा आणलेला असायचा.हळद कुंकु,ओटीचे सामान वगैरे सगळी जय्यत तयारी झाली की मग खास मला बोलावणे पाठवले जायचे. मी म्हणजे ते लग्न लावणारा पुरोहित असायचो.
अहो आता लग्नात भटजी काय म्हणतात कुणाला कळतंय? मलाही त्यातलं काही येत नव्हतंच. तसं मी बायमावशीना सांगितलं की त्या लगेच म्हणायच्या, "मी म्हणते, लग्नात ते मेले भटजी काय म्हणतात ते त्यांचं त्यांना तरी समजतंय काऽऽऽऽय?तुला जे काय श्लोक-बिक येतात नाऽऽऽऽ ते तू म्हण. आमच्या तुळशीबायला आणि बाळक्रिष्णाला चालेऽऽल बरं का! तू काऽऽऽऽऽऽही काळजी करू नकोस. मग मी हात जोडून संध्येला म्हणतात ते (माझी नुकतीच मुंज झालेली होती) "केशवायनम:,माधवाय नम:,गोविंदायनम: इतके म्हणून सुरु करायचो. माझे बघून बायमावशी सगळ्या पोरांना हात जोडायला लावत.
रामरक्षा,मनाचे श्लोक,गीतेचे तीन अध्याय,अथर्वशीर्ष आणि अजून जे जे काही म्हणून माझे पाठ होते ते सगळे म्हणायला मला किमान एक-दीड तास लागत असे. मी जे काही म्हणत असे त्याचा अर्थ माझ्यासकट कुणालाच समजत नसे . पण मोठ्या बायकांना माझे कोण कौतुक. पोरगं काय धडाधड संस्कृत बोलतंय.त्यावेळचे त्यांच्या चेहर्यावरचे ते कौतुकाने ओसंडून जाणारे भाव पाहिले की मलाही मी फार मोठा पंडित असल्यासारखा वाटायचो.निदान त्या क्षणी तरी मला हवेत तरंगल्यासारखे वाटायचे.
हे सगळं झालं की अक्षता वाटल्या जायच्या. मग तुळस आणि बाळक्रिष्णाच्या मध्ये आंतरपाट धरून कुणा हौशी बाईने रचलेली मंगलाष्टकं म्हटली जायची आणि शेवटी "शुभ लग्न सावधान" च्या गजरात अक्षता टाकून हे लग्न लागायचे की तिकडे मुलांनी लक्ष्मीबारचा धुमधडाका सुरु केलेला असायचा. त्यानंतर मग आम्हा चिल्लर पिल्लर लोकांना आवडणारा खाऊ मिळायचा तो म्हणजे उसाचे कर्वे,चिंचा,बोरं,बत्तासा आणि पुन्हा नव्याने बनवलेले ताजे दिवाळीचे पदार्थ. भटजींची दक्षिणा म्हणून मला सव्वा रुपया आणि एखादे शर्टाचे कापड मिळायचे. झालंच तर काही फळंही त्या बरोबरीने असायची. हे सगळे घेऊन ऐटीत मी घरी जात असे.काही म्हणा ते क्षण अक्षरश: मंतरललेले(मंत्र म्हणायचो म्हणून असेल!
)होते.
बायमावशींचं माझ्या बालपणातले स्थान हे माझ्या सख्ख्या मावशांपेक्षाही जास्त जवळचे होते. ११वीत जाईपर्यंत दरवर्षी मी ह्या नाटकात सक्रीय भाग घेत होतो. त्यानंतर शिंग फुटली म्हणा किंवा मनात संकोच निर्माण व्हायला लागला....कोणतेही कारण असो. मी ह्यातनं माझं अंग काढून घेतले.
(इथे बायमावशी पुराण संपले.)
एक खटकलेली बातमी ...
प्रेषक भडकमकर मास्तर ( गुरू, ०६/२६/२००८ - १५:२६) .गेल्याच महिन्यात वर्तमानपत्रात एक बातमी वाचली...
मथळा होता " लग्नाचे आमीष दाखवून बलात्कार" .........
असल्या बातम्या सतत वाचनात येतात... ही सुद्धा वाचली , त्यात नेहमीप्रमाणेच
..." एक गावाकडची मुलगी होती, कॉलेजात जाणारी , सज्ञान ..तिथे हा एक ओळखीचा मुलगा / बाप्या आला...तिला तो आवडला, प्रेम निर्माण झालं ... घरच्यांची परवानगी मिळणार नाही म्हणून मग त्याने तिला शहरात (पळवून !!! )आणलं... ते दोघे सहा महिने वेगवेगळ्या लॉजवर राहिले, वेगवेगळ्या शहरात राहिले, फिरले... मग नंतर त्याने तिच्याशी लग्न करण्यास नकार दिला.. मग ही पोलीसात गेली आणि त्याच्यावर बलात्काराचा आरोप करत फिर्याद दाखल केली..."....
थोड्याफार फरकाने या बातम्या अशाच असतात...
मला या प्रकारच्या बातम्यांमधली विसंगती नेहमी खटकते.... आमीष म्हणजे काय?
त्याने तिला फसवले ,हे मान्य पण म्हणून बलात्काराचा गुन्हा कसा काय ?? सहा महिने इतक्या लॉजमध्ये हिंडत हिंडत हा तिच्यावर बलात्कार करत होता काय ?? बलात्काराची व्याख्या काय?
...
इथे कोणी कायदा जाणत असेल तर कृपया स्पष्ट करावे... त्याने लग्नाला नकार दिला म्हणून ; सहा महिन्यांपासून घडत असलेल्या व तिच्या संमतीने होत असलेल्या रूटीन घटनेचे एकदम बलात्कारासारख्या गंभीर गुन्ह्यात रूपांतर झाले?
हे कसे काय बुवा ?किंवा त्याने तिच्याशी सहा महिन्यांनी लग्न केले असते तर मग पूर्वी घडलेल्या त्या सार्या घटना गुन्हा नव्हत्या???
एखाद्या गुन्ह्याची व्याख्या इतकी सापेक्ष कशी असू शकते ?? ( तीच घटना --- असे घडले तर गुन्हा आणि तसे घडले तर गुन्हा नाही..)
यात पुरुषाची चूक आहेच, पण बाई भासवते तितकी इनोसंट भोळी भाबडी कशी काय ? साध्या शब्दांत बोलायचे तर तिने सहा महिने काय त्या क्षणांचा आनंद लुटला नसेल ? म्हणजे आधी "जमानेसे क्या डरना " टाईप सिनेमा प्रमाणे क्रांती करायला पळून जायचे ,तो भौ पळाला की मग एकदम क्रांती वगैरे विसरून पोलीस केस करायची ?
की आम्ही पूर्वीच्या एका धाग्यात लिहिल्याप्रमाणे ही स्त्री " प्रेमात पडल्यावर मला बाई जबरदस्तीच आवडते" अशा विचारांची असते?? आणि लग्न करायला नकार मिळाल्यावर तिला साक्षात्कार होतो की आपल्यावर बलात्कार झाला ???? ही तर जबाबदारी झटकणं झालं...
______________________________
लग्नापूर्वी शरीरसंबंध ठेवणे याबाबत ज्याचंत्याचं वैयक्तिक मत असलं तरी ते अत्यंत जबाबदारीचं काम आहे , असं आमचं वैयक्तिक मत आहे....
स्वतः केलेल्या कामाची जबाबदारी न घेता दुसर्यावर खापर फोडणं सर्वथा चूक...
पुस्तक-परिचयः सूर्य पेरणारा माणूस
प्रेषक नरेंद्र गोळे ( रवी, ०६/२२/२००८ - ०८:४५) .पुस्तक-परिचयः सूर्य पेरणारा माणूस
नुकतेच प्रा. प्रवीण दवणे यांचे "सूर्य पेरणारा माणूस" नावाचे पुस्तक वाचनात आले. प्रकाशक: साप्ताहिक विवेक (हिंदुस्थान प्रकाशनसंस्था), प्रथमावृत्तीः ८ मे २००८, मूल्यः रु. १००/- फक्त. विस्मयकारक नावाच्या, या पुस्तकात विस्मयचकित करणाऱ्या एका आयुष्याचा आलेख साकारला आहे. उण्यापुऱ्या एका दशकाच्या कालावधीत नव्या मुंबईतील प्रतिष्ठित बांधकाम व्यावसायिक म्हणून नावारूपास आलेल्या "हावरे बिल्डर्स" चे संस्थापक कै. सतीश काशिनाथ हावरे यांचे ते चरित्र आहे. आजमितीस 'हावरे बिल्डर्स' दररोज दहा-बारा घरे आणि दुकानांचा ताबा ग्राहकास सुपूर्त करत आहेत. नव्या मुंबईच्या क्षितिजरेषेवरच त्यांनी 'हावरे' नाव कोरले आहे. बांधकामक्षेत्रात सर्वात गतिमान आणि विश्वासार्ह व्यवसाय समर्थपणे प्रस्थापित करून ग्राहकांच्या पसंतीस पोहोचवणाऱ्या मराठी मातीतल्या उद्योजकाची ही यशोगाथा आहे. उद्योजकतेची आस मनात धरून समोर येणाऱ्या होतकरू मराठी तरुणांना, आयुष्य घडवावे कसे ह्याचा वस्तुपाठ म्हणून ते उपयोगी ठरू शकेल याचा विश्वास वाटतो.
दुवा क्र. १: हावरे डॉट कॉम या त्यांच्या संकेतस्थळावर आता या पुस्तकाचे 'वि-पुस्तक (e-book)' आविष्करण निःशुल्क उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. वाचकांनी ते अवश्य वाचावे आणि उद्योजकतेचा मार्ग गवसतो का ह्याची चाचपणी करावी. मार्ग नाही तरी दिशा अवश्य मिळू शकेल. किमान प्रेरणा तर खासच.
दुवा क्र. २: 'सूर्य पेरणारा माणूस' http://www.haware.com/Surya-Peranara-Manus-Pravin-Davane.pdf
दवणे म्हणतात, "जिद्दीच्या बिया घेऊन सतीश हावरे नावाचा 'सूर्य पेरणारा माणूस' आकाशावर आपली नाममुद्रा कोरून गेला. महाराष्ट्रातल्या प्रत्येक धडपडणाऱ्या युवकाला जिद्दीच्या बिया देण्याचे मोलाचे काम सतीश हावरे यांच्या आयुष्याने केलेले आहे. इमारती उभ्या करतांना, हजारो उपेक्षितांची, आयुष्ये उभी करणाऱ्या सतीश हावरे यांचे अजिंक्य जीवन नियतीलाही पुसता आले नाही. विदर्भातील पथ्रोट या छोट्या गावातून नव्या मुंबईतील 'हावरे बिल्डर्स'पर्यंतचा हा गगनचुंबी प्रवास. प्रत्येक पालकासाठी! प्रत्येक शिक्षकासाठी! जिंकू इच्छिणाऱ्या प्रत्येक कोवळ्या मनासाठी! "
रात्री सवास - थायलंड सफर (अंतिम)
प्रेषक ॐकार ( शनी, ०६/२१/२००८ - १५:१४) .सायं सवास पासून पुढे...
थायलंडमध्ये खाओ याई नॅशनल पार्कला गेलो होतो. पावसाळ्यात खरं तर इथे भेट द्यायला हवी पण इतर वेळेसही भेट द्यायला हरकत नाही. इथे रहायचीही व्यवस्था आहे. तंबूंपासून अगदी हवेशीर बंगल्यांची सोय आहे, पण महिन-दोन महिने आधीच नोंदणी करावी लागते. बुकींग फुल्ल असल्याने माझा कार्यक्रम एका दिवसात आटोपता घ्यायला लागला. त्यामुळे नाईट सफारीचा आनंद घेता आला नाही. धबधबे, जंगलवाटा, अगदी रस्त्यांवर फिरणारी हरणंही हमखास भेटतात इथे.
काही चित्रे:
या राष्ट्रीय उद्यानानजीकच जमिनीखाली तयार झालेले एक निसर्गनिर्मित बुद्धाचे देऊळ आहे. चुनखडकावर काही प्रक्रिया होऊन निसर्गतःच तयार झालेली अमूर्त शिल्पकृती इथे पहायला मिळतात-
काहीठिकाणी तर ह्या भिंती अर्धपारदर्शी आहेतः
याचसोबत खरेदीसाठी जतुजा ( थाई उच्चार : जाः तुक् जा:) मार्केटला चक्कर टाकावी. बँकॉकमधला जणू आठवडाबाजार! तब्बल २० हजारच्या आसपास दुकाने असणार्या या बाजारात बर्याच गोष्टी मिळतात. भाव करायला तुम्हाला थाई अंक, संख्या यांची थोडीफार ओळख असायला हवी. किंवा मग एखादा थाई मित्र अथवा मैत्रिण सोबत असेल तर चांगले.
समिंदरावर जायचे असेल तर चा-आम, फुकेत ला जावे. सोबत नाईट लाईफ अनुभवायची असल्यास पट्टाया! पर्यटकांच्या रेट्यामुळे हल्ली पट्टाया गजबजलेले असते तरी त्याचे आकर्षण परदेशातील लोकांनाच, थाई लोक मात्र त्यापेक्षा निवांत आणि चांगल्या समुद्रकिनारी जाणं पसंत करतात.
थायलंडमधील आणखी काही प्रकाशचित्रे त्यात सहभागी असणार्या थाई व्यक्तींची अनुमती नसल्याने देऊ शकलो नसलो तरी या सुस्वभावी लोकांनी केलेलं आदरातिथ्य मात्र कायम लक्षात राहील. भारताबाहेर आपली जमीन, आपलं आकाश आणि आपली माणसं वाटावीत अस थायलंडचं आश्वासक चित्र मनात आहे. जमल्यास थायलंडची सफर नक्की करून या.
या लेखांचा शेवट काही चित्रफितींनी करतो.
रटरटते चिकनः
लोटी तयार करणार्या थाई महिलेची हातोटी:
फ्लोटिंग मार्केटमध्ये मिळणारा गोड पदार्थ नावेत बसून बनवताना:
बँकॉकच्या रस्त्यावर नाचणारी पोरं टोरं:
निद्रिस्थ बुद्धराजः
रात्री सवास !(good night!)
कुत्रा आणि मी ... काही अनुभव...
प्रेषक भडकमकर मास्तर ( शनी, ०६/२१/२००८ - ०१:११) .".... कुत्रा घराची आणि शेताची राखण करतो.प्रसंगी स्वत:चा जीव धोक्यात घालून धन्याचे प्राण वाचवतो, असा हा इमानी प्राणी मला खूप आवडतो...." वगैरे वगैरे वगैरे.. हे असलं मी शाळेतल्या निबंधात अनेक वेळा लिहिलं आहे , यातला बराचसा भाग खरा असला तरी कुत्रा प्राण्याचं ते फ़ार एकांगी आणि फ़िल्मी वर्णन असतं... आता मी जे पुढं लिहिलंय त्या आहेत निबंधात न लिहिता येण्यासारख्या गोष्टी..
काही मंडळींना भटक्या कुत्र्यांबद्दल भन्नाट प्रेम असतं..पण त्यांना पहाटे सायकलवरून कामावर जायचं नसतं, किंवा रात्रपाळीवरून परत येताना मागे लागलेल्या कुत्र्यांमुळं खड्ड्यात पडावं लागलेलं नसतं..किंवा पोटावर इन्जेक्शनाची नक्शी काढून घ्यावी लागलेली नसते.... भटक्या कुत्र्यांचा त्रास शक्य ते उपाय वापरून बंद केला पाहिजे असं खुद्द अहिंसावादी गांधीजींनीही म्हटलं होतं म्हणे...हे तर भटक्या कुत्र्यांचं झालं ..पाळीव कुत्रे तरी काय सारे नियंत्रणात असतात काय??
हे सारं इथे आठवण्याचं कारण म्हणजे कालच मी एका ओळखीच्या गृहस्थांकडे गेलो असताना त्यांनी पाळलेल्या एका जर्मन शेफर्ड जातीच्या रॉकी नामक लाडक्या कुत्र्याने माझ्यावर हल्ला केला...हो, हो, मी हल्लाच म्हणणार.. कुत्रा पाळणार्यांनी म्हणावं की " रॉकी जरासा चिडला असेल इतकंच"... आता कोणी म्हणेल,", तुम्ही कशाला त्याची खोड काढायला गेलात? "... खरं सांगतो, " आपण काहीच केलं नाही..." आता त्या अक्षरश: वाघासारख्या प्राण्याची खोडी काढण्याइतके आम्ही निर्बुद्ध नाही हो.....

रॉकी अगदी अस्साच होता दिसायला...
त्या रॉकीला असा अंगणात मोकळा सोडलेला..घराला साडेपाच फ़ुटी उंच भिंत आणि लोखंडी गेट....मी गेटच्या बाहेरून बेल वाजवली आणि गेटपाशी उभा राहिलो, ते काही रॊकीला पसंत पडले नसावे... त्याने माझ्या दिशेने गुरकावून उडी मारायला सुरुवात केली, त्याचे पंजे चांगले माझ्या डोक्याच्याही वर जाणारे...त्याचा तो थयथयाट पाहूनही मी काही घाबरलो नाही, मध्ये भक्कम लोखंडी गेट होते ना...मी शांत उभा राहिलो...मग त्याने भुंकायला सुरुवत केली... मग घरातून काही लोक आले , त्याला घेऊन आत गेले, गेटच्या बाहेरूनच माझ्याशी बोलले ,
माझे काम झाले, मी जाणार तेवढ्यात घराच्या आतून सुसाट वेगाने रॊकी माझ्या दिशेने भुंकत आला, मी बाहेर जायला चालायला सुरुवात केली होती, पण त्याने भिंतीवर उडी मारली, आणि ज्या क्षणी माझ्या लक्षात आले की रॉकीच्या क्षमतेसाठी ही भिंत अपुरी आहे, आणि उडी मारून तो पलिकडे येणार, त्यावेळी मात्र माझे धाबे दणाणले, आसपास कोणी नाही... घरातल्यांच्या तोंडी सूचनेला रॊकी आवरत नाही हे दिसतच होते...रस्त्यातच हा रॊकी नावाचा वाघ आपल्याला फाडून खाणार असे मला दिसायला लागले..... पुढे काय झाले नीट आठवत नाही, मी भीतीने हंबरडा फोडला की तोंडातून आवाजच फ़ुटला नाही ते आठवतच नाही..धावण्याचा क्षीण प्रयत्न केला असावा,..कोणत्याही क्षणी आपल्या परमप्रिय शरीराचा लचका एक हिंस्त्र प्राणी तोडणार आहे, हे फीलिंग फार भयानक असतं खरं...मला शेजारच्या रो हाउसची भिंत वर चढून पार करावीशी वाटली... मी तिकडे धावून पलिकडे उडी मारली की काय केले आठवत नाही, आजूबाजूला आरडाओरडा झाला थोडासा..
रॉकीचे शेजारी त्यांच्या अंगणात खुर्ची घेऊन पेपर वाचत बसले होते , तेही ओरडू लागले...त्यांनी माझ्या दिशेने प्लास्टिकची खुर्ची फ़ेकली , आणि हातात धरून उभे रहा अशी सूचना केली...दोन चार सेकंदच गेली असतील मध्ये.. भानावर आलो तेव्हा मी दोन घरे पलिकडच्या भिंतीच्या आत खुर्ची धरून उभा होतो,.. तेव्हाही त्या खुर्चीचा फ़ार आधार वाटला हे खरं... तिथे कसा पोचलो ते काही आठवत नाही...( सिंहाच्या पिंजर्यात लाईट गेल्यानंतर दामू धोत्रे हे रिंगमास्टर असेच हातात स्टूल धरून उभे असतील या कल्पनेने मला आत्ता हसू येतेय.. आठवला तिसरीतला "प्रकाश प्रकाश " हा धडा")..मधल्या काळात रॉकीला आत नेले असावे मालकाने... चार क्षण दम खाल्ला, देवाचे आभार मानले... पायात जोरात कळ गेली...कुठेतरी उडी मारायच्या प्रयत्नात मी पडलो असणार , पायाला बरंच खरचटलं होतं, आणि मुका मार थोडासा...पाय ठणकत होता... हे अगदीच थोडक्यात भागलं.. पण भीतीनं मी थरथरत असणार.. .. माझी अवस्था पाहून शेजार्यांनी ग्लासभर पाणी आणून दिले, त्यांच्यासाठी हे प्रसंग नित्याचे असावेत...त्यांना माझी दया वगैरे आली असावी... मला बसा म्हणाले पाच मिनिटे... रॉकीच्या शेजारच्या घरात अजून थांबायची माझी इच्छा नव्हती, .. मी दुखर्या पायाने रॉकी मागे येत नाही ना हे पाहत पाहत , शक्य तितक्या वेगाने तिथून सटकलो... दुपारी रस्त्यावर गर्दी नव्हती, खरंतर कोणीच नव्हते...त्यामुळे आपल्या शेजारचा दातांचा डॉक्टर कुत्र्याला घाबरून खड्ड्यात पडला असा विनोदी प्रसंग लोकांनी मिस केला ...
या सार्यात रॉकीची चूक नाहीच पण त्याच्या मालकांची काही चूक आहे की नाही, असलीच तर किती ? हे ही मला माहित नाही...
लहानपणापासून माझं कुत्र्याशी फ़ार जमलं नाहीच... दुसरीत कोल्हापुरात एक पामेरियन कुत्रा चावला तेव्हा एक टिटॆनसच्या इन्जेक्शनावर भागलं... आठवीत पुन्हा पामेरियनच चावलं तेव्हा महापालिकेच्या दवाखान्यात जाऊन पोटावर रेबीजची तीन इन्जेक्शनं घेतली होती.. आणि काही कारण नसताना कालचा जर्मन शेफर्ड....माझं नशीब थोर की तो चावला नाही...त्यामुळं मला कुत्र्यांविषयी कधीच प्रेम वगैरे वाटलं नाही.. हा प्राणी आपल्याला चावू नये इतपत माफ़क अपेक्षा मी करत असे..
आमच्या घरी एक पाळलेली मांजरी होती...आईला फ़ार आवडत असे..पण ही मांजरी कोणत्याही उचकवण्याशिवाय मी अगदी पाठमोरा उभा असताना सुद्धा मला येऊन बोचकारत असे.
( मात्र त्याच मांजराच्या पिलांशी तासंतास खेळायला मात्र मजा येत असे)..
आमचे शेजारी गावठी कुत्रे पाळत असत.,.. त्यांच्या कुत्र्याशी मी फ़ार शत्रुत्त्व नाही किंवा फ़ार प्रेम नाही अशा पद्धतीने अंतर राखूनच वागत असे...पण तो कुत्रा रस्त्याने जाणार्या येणार्यांवर धावून जात असे,सायकलवाल्यांना घाबरवत असे, पाडत असे, त्यावेळी फ़िदी फ़िदी हसत गंमत पाहणार्या आपल्या मुलांना ते थाबवत तर नसतच पण कौतुकमिश्रीत उत्साहाने ," ...अग्गोबाई, आमच्या पिंटूने / मोत्याने / काळूने आस्सं केलं हो "..अशी चर्चा करत असत. मात्र कुत्र्यांना बांधणे त्यांना पसंत नसे.... अंगावर उड्या मारमारून भुंकणार्या कुत्र्याला पाहून कोणी येणारा सज्जन घाबरला तर म्हणत असत," काही करत नाही हो आमचा कुत्रा, उगीच घाबरू नका ".. मला हे फ़ार खटकत असे " काही करत नाही काय? चावणारच तो आता,म्हटल्यावर लोकांना भीती वाटणारच...उगीच कोण घाबरेल ?..." असं त्यांना सांगावंसं वाटत असे..पण मी फ़ार लहान असल्याने त्या वेळी काही बोलू शकत नव्हतो......
शाळेत असताना हक्क आणि कर्तव्ये नावाचा नागरिकशास्त्रात एक धडा होता...त्याला स्मरून सर्व प्राण्यांच्या मालकांना एक सांगावेसे वाटते,
कुत्रा (, माकड , वाघ, सिंह, हत्ती, कासव, ससा, जिराफ़ ,तरस, लांडगा, सुसर) काय वाट्टेल ते पाळा हो, पण आपले प्राणी बांधून ठेवा , नियंत्रणात ठेवा..
दुःख ही न थांबणारी क्रिया आहे.
प्रेषक श्रीकृष्ण सामंत ( गुरू, ०६/१९/२००८ - २२:३२) ."ते त्या आईचं मुल,एका खोल दरीत पडतं.ती आई त्या दरीच्या उंचवट्यावरून आपलेच कपडे फेकून देते.ते कपडे हवेत तरंगू देते.त्या कपड्यांची सुंदर फुलपाखरं होवून ती जणू भुर्कन उडून जातात"
आज प्रो.देसाई तिच्या भाचीला घेवून तळ्यावर आले होते.माझी ओळख करून देताना मला म्हणाले,
"ही वृंदा करंदीकर.ही कॉलेजात फिलॉसॉफीची प्राध्यापिका आहे."
तिचा विषय़ लक्षात घेवून मी तिला म्हणालो,
"वृंदा, मला एक तू सांग त्या दिवशी माझं आणि प्रो.देसायांच "दुःखात सुद्धा आनंदाची छटा असूं शकते" ह्या विषयावर चर्चा झाली होती.त्यावर प्रो.देसाई मला म्हणाले की,
" वृंदाने मला एक कल्पित गोष्ट उदाहरण म्हणून सांगितली होती.ती मला जशास तशी आता आठवत नाही.पण पुढल्या आठवड्यात ती आमच्या घरी येणार आहे तिलाच तुम्ही ह्या विषयावर बोलायला सांगा.ती तुम्हाला ती गोष्टही सांगिल आणि ह्या विषयावर आनंदाने आणि विस्ताराने बोलेल."
त्याचा संदर्भ देवून मी वृंदाला म्हणालो,
"तुम्ही दोघेही प्रोफेसर असल्याने तुमची विचार करण्याची पातळी थोडी वरची आहे तेव्हा मला जरा विस्तारानेच सांग"
हे ऐकून वृंदा म्हणाली,
"दुःखाला उंची माहित नसते ना खोली.ती एक प्रकारची अंतरातली योग्य भावना आहे.योग्य हा शब्द त्या शब्दाच्या अर्थाच्या अनुषंगाने घेतला गेला पाहिजे.
कदाचित कुणी म्हणेल की,
"दुःखाची भावना असणं योग्य आहे असं म्हणणं म्हणजे शुद्ध मानसिक हतबलता असावी."
पण ज्या काहीना दुःखाचा अनुभव आला आहे त्यानाच त्या भावनेच्या योग्य-अयोग्यतेचं महत्व समजणार. जवळचं माणूस गेल्याने नाजूक मनस्थिती असताना धक्का बसवू देणारं दुःख, हे योग्य दुःख आहे असं म्हटलं पाहिजे.
वृंदा पुढे म्हणते,
अलीकडेच एक विख्यात व्यक्ति जे म्हणाली ते ऐकल्यावर माझ्या म्हणण्याला थोडी पुष्टी येते.ते त्या व्यक्तिचं म्हणणं खोलवर जावून विचारात घ्यायला हवं.
ती व्यक्ती म्हणते,
" मी आता आपल्या मनाला कसं वाटून घ्यायचं ते शिकलो.जे काही वाटत असेल तसंच वाटून घ्यायचं. मग त्याच्या मागे कसल्याही भावना असल्यातरी. एव्हडंच की त्याला विरोध करायचा नाही. जे लोक सांगतात की ज्याना भावना वशच करीत नाही ते असं सांगून स्वतःशीच प्रामाणिक राहून बोलत नाहीत."
भावनेशी जागृत असणं,म्हणजेच त्या वेळी वाटणाऱ्या भावनेशी जीवंत असणं,आणि ती भावना समजावून घेणं. दुःख,मानसिक धक्का किंवा दुःखावेग हे पण भावनेचेच प्रकार आहेत. ते प्रकार मनात आहेत असा भास होत असतो,ते मनात राहतात आणि मनातून निघूनही जातात.
एका विशीष्ट प्रकारे मनाला लावून घेणं- केवळ तसं लावून घेणं हे इतराना बरं वाटावं म्हणून जर असेल- तर अशा प्रकारच्या वागण्याने माझ्या मनावर खूप मोठा पगडा येतो. म्हणून मला जसं वाटतं तसंच वाटून घेण्याचा माझा प्रयत्न असतो.त्यामुळे माझ्या आणि इतरांच्या विचार-स्वातंत्र्याचा परिणाम माणसाच्या भावनेविषयी विचार केल्यावर तो परिणाम कसा असू शकतो ह्याच नीट आकलन व्हायला मदत होते.
असं एकदा का असल्या पगड्या पासून निराळं राहण्याचं स्वातंत्र्य घेतलं की आपल्या मनाला एक प्रकारचा आनंद मिळतो, आणि दुःख होत असताना त्या दुःखाचीच ही दुसरी बाजू असावी असं वाटतं. हे गणीत असंच काहिसं जुळतं."
हे त्या व्यक्तिचं म्हणणं सांगून झाल्यावर वृंदा पुढे म्हणाली,
अशीच आणखीन एक दुसरी व्यक्ति, तिच्यावर आलेल्या प्रसंगाची चर्चा करीत असताना त्या प्रसंगामुळे झालेल्या दुःखावर पडदा टाकण्याचा सल्ला मिळाल्यावर म्हणते,
"दुःखावर पडदा टाकण्याचा सल्ला असुंच शकत नाही.कारण दुःख ही न थांबणारी क्रिया आहे. ज्या व्यक्तिवर आपण प्रेम करतो ती व्यक्ति निर्वतल्याने, झालेल्या दुःखाला खंड आणूच शकत नाही कारण त्या व्यक्तिवर आपण सतत प्रेम करीत असतो-त्या व्यक्तिवर प्रेम करण्याची आपली क्रिया-सतत चालूच असते."
हे सांगून झाल्यावर वृंदा म्हणते,
" ह्या ही व्यक्तीचं म्हणणं ऐकून माझ्याच म्हणण्याला परत दुजोरा मिळाल्या सारखं वाटतं.
आपल्या भावना सहन करताना त्या कितीही क्लेशदायी अथवा आनंददायी असल्या तरी त्या भावनां जागृत ठेवून आपल्यावर आणि इतरांवर विश्वास ठेवून राहण्याचं स्वातंत्र्य घेता आलं पाहिजे.
तुम्हाला सांगितलं तर आश्चर्य वाटेल आणि वाईटही वाटेल की माझ्या मुलाच्या आकस्मिक निधनाने मी पुर्ण एकाकी पडले.मानसिक उपाय करणाऱ्याना मला
उपाय द्यायचे होते,आणि माझ्या मित्रमंडळीना मी ती घटना निमूट स्विकारून आगे बढो असा सल्ला द्यायचा होता.
माझ्या बॉसला तर मी रोजच्या कामाच्याच दृष्टीने दुषपरिणाम न होता काम करीत रहावं असं अपेक्षीत होतं.खरं तर मी पुर्ण वेडी झाली होते.मी मनाने पुर्ण खचली होते.
अशा परिस्थितीत माझ्या एका मैत्रिणीने मला एका मानसिक उपचार करणाऱ्या आश्रमात नेलं.खरं म्हणजे मला त्या मैत्रिणीने आमंत्रण दिलं नव्हतं.मीच तिची मदत मागितली होती.त्या आश्रमातल्या विद्वान व्यक्तिने
मला खूपच चांगला सल्ला दिला.
तो मला म्हणाला,
"ज्यांच्यावर तुम्ही प्रेम करता,त्यांचा सन्मान करणं जरूरीचं आहे.त्यांच स्मरण करणं जरूरीचं आहे.त्यांच्याशी संवादात राहणं जरूरी आहे.त्याने तुमच्याशी जवळीक करणं जरूरीचं आहे."
ह्या शब्दानी माझ्या उभ्या आयुष्याला कलाटणी मिळाली.माझं आयुष्य वाचवलं गेलं.मी पुढचा मार्ग काटू शकले.मी माझ्या मुलाला स्मरणात आणू शकले.त्या स्मरणाचा सन्मान करू शकले.
सखोल विचार करण्याचा,अर्थपुर्ण विचार करण्याचा,
भासवून घेण्याचा,मार्ग मला मिळाला.मी खूपच उपकृत झाले.
प्रेम आणि आनंदाबरोबर दुःख सुद्धा आपल्याला जवळ आणतं. न भिता, धरसोडपणा न करता, भावनेशी जागृत राहणं म्हणजेच आपलं आपण होणं.आपल्या अंगातून ह्या योग्य भावना वाहू देणं म्हणजेच ह्या क्षणाला आपण आपलं अस्थित्व जाणणं. ह्या अस्थित्वाच्या सत्याशी प्रातारणा न केल्याने माझी मी म्हणून जगू शकले.
माझ्या मनात विचार येवू लागला आहे की ह्या एकवीसाव्या शतकातलं दुःखाचं आणि अघटीत घटनेचं सांवट जे सर्वांवर आलं आहे ते एखाद्या बाटलीत लोकांच्या भावना जबरदस्तीने इतकी वर्ष दाबून कोंबून ठेवलेल्याचा परिणाम असावा.
मला एका प्रख्यात लेखकाच्या काल्पनीक गोष्टीची आठवण येते.
ते त्या आईचं मुल,एका खोल दरीत पडतं.ती आई त्या दरीच्या उंचवट्यावरून आपलेच कपडे फेकून देते.ते कपडे हवेत तरंगू देते.त्या कपड्यांची सुंदर फुलपाखरं होवून ती जणू भुर्कन उडून जातात.दुःखातही तिला आनंद मिळतो,असा ह्या गोष्टीतला आशय आहे.
समाधानाची गोष्ट अशी की जेव्हा आपण दुःखी मनस्थितीत असतो,त्यावेळी सुंदरता आणि आनंदही आपल्या बरोबर असतो तसंच दुःख आणि पिडा ह्यांचही अस्थित्व आपल्या बरोबर असतं. असं समजून राहिल्याने, अशा गोष्टी मनात जागृत ठेवल्यामुळे अंतिम शांतीकडे जावून पोहचण्याचं हे एक पाऊल होणार आहे असं वाटूं लागतं.
हा जागृतीचा मार्ग कधीच संपणारा नसतो.खरोखरीचं दुःख आणि पिडा होते त्याचं खरेपण प्रामाणिकपणे सांभाळून ठेवल्यास,त्या पासून मनाला झालेली जखम लवकर बरी व्ह्यायला पुर्णपणे मनाच्या स्वाधिन व्हायची जरूरी असते आणि तसं केल्याने खरा अर्थ समजण्यासाठी आपलं मन आपल्याला वरच्या पातळीवर आणून ठेवतं."
हे सर्व एकून मी वृंदाला म्हणालो,
"वृंदा खरंच तू ग्रेट आहेस.तुझं हे चिंतन ऐकून मला पण ह्या वयात काही तरी शिकल्या सारखं वाटलं. प्रो.देसाई ज्या अर्थी मला तुझा विचार ऐकायला शिफारस करतात त्याच वेळी मी समजून गेलो होतो,इथे काही तरी"ग्यानबाची मेख आहे"
"कसचं कसचं"
म्हणत वृंदा गालातल्या गालात हंसली,आणि आम्ही घरी जाययला निघालो.
श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com
- प्रतिक्रिया प्रकाशित करण्यासाठी येण्याची नोंद करा अथवा सदस्य व्हा.
मोबाईल
प्रेषक विकास ( मंगळ, ०६/१७/२००८ - १८:३३) .मोबाईल फोन्स वापरण्यात भारतात सर्वत्रच आणि विशेष करून शहरात, त्यातही तरूण वर्ग बराच पुढे आहे. वर्षानूवर्षे दूरध्वनी क्रमांक मिळण्यासाठी तिष्ठत राहावे लागलेल्या भारतात आता मोबाईल तरी लगेच मिळू शकतो आणि जगाबरोबर दुहेरी संवाद सहजसाध्य होतो.
अर्थात त्याच बरोबर शाळा-कॉलेजात मोबाईल्स आले त्याचे दुष्परीणाम, नंतर मोबाईल मधे असलेले कॅमेरा आणि व्हिडीओ कॅमेरा यांचे वाईट उपयोग आदी सुरू झाले. पण अशा गोष्टींना आळा घालणे शक्य असते.
आज मात्र म.टा. मधे खालील (सारांशाने दिलेली) बातमी वाचली. ज्यातील माहीती कायमच कुठेन कुठे तरी ऐकली आहे पण इतकी अधिकृत कशी आणि कोणी दिली असे वाटले:
मोबाइलचा वापर सर्वांनाच धोकादायक
16 Jun 2008, 1751 hrs ISTनवी दिल्ली ,
मटा ऑनलाइन वृत्तमोबाइल फोनमुळे होणा-या रेडिएशनचे शरिरावर अनेक वाईट परिणाम होतात. म्हणूनच लहान मुले आणि गर्भवती महिला मोबाइल फोनचा वापर करत असतानाच्या प्रचार मोबाइल फोनचे सर्विस प्रोवायडर आणि फोन निर्मात्यांनी टाळावा अशा सूचना सरकारने दिल्या आहेत.
मोबाइल फोनमधून निघणा-या इलेक्ट्रिक मॅग्नेटिक वेव्ज या मोबाइलचा वापर करणा-यांच्या डोक्यातील टिश्यूला नुकसान पोहोचवू शकत असल्याचे
दूरसंचार मंत्रालयाने अलिकडेच जाहीर केलेल्या मार्गदर्शनपर सूचनेत म्हटले आहे. तसेच लहान मुले , गर्भवती महिलला , हृदयविकाराचे रूग्ण यांनी मोबाइल फोनचा वापर कमी प्रमाणात करावा , असेही या सूचनांमध्ये नमूद करण्यात आले आहे. ....
वरील बातमी मुळे काही प्रश्न उद्भवतातः (हे विचारत असताना मोबाईलच्या दूष्परीणामांबद्दल मला शंका घेण्याचा उद्देश नाही. किंबहूना अशा सुचनेचे स्वागतच आहे)
- सामाजीक स्वास्थ्याच्या दृष्टीने इतकी महत्वाची बातमी असून देखील इतकी शांतपणे कशी दिली जात आहे?
- त्यासाठी सरकारने नक्की कुठले वैज्ञानिक निरीक्षण संदर्भ म्हणून वापरले?
- इतरत्र (देशांमधे) इतके अधिकृतपणे (सरकारी) सांगितले गेले आहे का?
- वास्तवीक राजकारण्यांचा विचार करता मोबाईल कंपन्या त्यांना सहज खिशात घालून गप्प करू शकतील असे वाटते. तरी देखील असली सुचना जर दिली जात असेल तर याचा अर्थ सरकार कडे काही समाजस्वास्थ्यासंदर्भात अधिक माहीती उपलब्ध झाली आहे का? की ज्याबद्दल विशेष न बोलता फक्त अशी सुचना दिली जात आहे?
- आणि सर्वात महत्वाचे तुम्हाला या संदर्भात (मोबाईल वापर) काय वाटते?
अरून सवास, सायं सवास! भाग - २
प्रेषक ॐकार ( शनी, ०६/०७/२००८ - ००:१५) .अरून सवास वरून पुढे चालू...
सायं सवास - संध्याकाळचे अभिवादन करण्याची थायलंडमध्ये इतकीशी काही पद्धत नाही पण तुम्ही थायलंडमधले नसाल तर हे अभिवादन कानी पडतं. थायलंडमधलं विदेशी पर्यटकांचं प्रमुख आकर्षण म्हणजे 'फ्लोटिंग मार्केट'. नदीच्यालगत काढलेल्या कालव्यांतून इथे लहान मोठे बाजार भरतात. फळं, फुलं , भाज्या, कपडे, टोप्या, छत्र्या, थाई रेशीम, शोभेच्या वस्तू इतकंच काय अगदी नूडल्स पासून केळ्याचं साटंही इथे चाखता येतं! सफर कबाजाराची एक चक्कर मारायला नावेतून जायला माणशी १०० बाह्थ लागतात. (१ बाह्थ - थाई चलन = १.२५ रू).
काही प्रकाशचित्रे -
निघालो बाजारा...
भाऊगर्दी!
आधी पोटोबा
गाँन् - सिप् गाँन् (१० - १२) प्रकार!
खाऊन तर पहा!
जिस गली में तेरा घर ना हो बालमा, उस गली से हमको गुजरना नहीं!
मा फलेषु... ?
सावर रे- ऊंच झुला

कालव्याच्या काठावरच्या घरासमोरचे तुळशी वृंदावन.. आपले बुद्ध - वृंदावन.

नो ट्रॅफिक!

मला बघून विचार करत असावी - नुस्ता फोटूच काढणार की काही विकत पण घेणार

एक धागा सुखाचा ....


साखरेचे खाणार !
फ्लोटिंग मार्केट मधेच एका नावेत हा मस्त गोड पदार्थ विकत घेतला. तांदळाच्या डोश्यासारख्या छोट्या द्रोणांत पपईचा कीस, खवलेल्या नारळाची गोड पेस्ट आणि साखर. जीभेवर ठेवताच विरघळायला लागतो असा हा खाद्यप्रकार!
याचसोबत थायलंडमध्ये अगदी हमखास मिळणारा लोकप्रिय खाद्यपदार्थ चाखला - लोती (रोटी) . पण ह्याचा पोळी अथवा रोटीशी फारसा संबंध नाही. थोडक्यात सांगायचे झाल्यास साध्या डोश्यात "बुढ्ढीके बाल" भरा आणि त्याची गुंडाळी करून खा! खायला मजा येते.
मी हाय कोली
समुद्रमंथनातून काहीका निघालं असेल, मात्र ओहोटीच्यावेळी समुद्रकिनारी मिळणारे जीव आणि सी-वीडस् यांचा हा रूचकर पदार्थ मस्त होता.

आणि मासा! (ह्यापेक्षा त्याचं अधिक वर्नन करणं म्हणजे शब्द वाया घालवण्यासारखं आहे! )

अरेच्चा, आत्ता होता! गेला कुठे?
वरच्या फोटूंतील पदार्थ आणि नदीतला मोठा खेकडा असा बेत तीन माणसांत होता. सगळं फस्त! आणि मस्त!
जपानचे खानपान
थायलंडमध्ये जपानी खाण्यावर प्रेम करणारे बरेच खवय्ये आहेत. मला व्यक्तीशः जपानी खाणं खास वाटलं नाही. पण खाता न येण्याइतकं वाईट तर नक्कीच नाही. ह्या खाण्यातही एक थाटामाटाचा प्रकार आहे. ह्यात हिरव्या कच्च्या भाज्या, मांस, नूडल्स, चटणी , रॉ सी-फुड, तोफू यांची चळत आणून देतात.
टेबलाच्या मध्ये विजेवर चालणारी अगदी निटस हॉटप्लेट असते. यात पाणी गरम करून वरचे पदार्थ घालून खात रहायचे.
सोबत नूडल्स आणि सुशी.सोबत आम्ही खाल्ला तो खाना म्हणजे रोस्टेड डक! दील खुश हो जाता है!
१)
२)
३)
४)
५)
अप्रस्तुत तरी अपरिहार्य
मांसाहार खाणं म्हटलं आणि त्यात बीफ म्हणताच त्रागा करणारे लोक आहेत. त्यामुळे एखादवेळेस बीफ अप्रस्तुत वाटेल पण खाण्याचे लाड असल्याने त्याची आठवण अपरिहार्य आहे.
तसं म्हणावं तर हा प्रकार वातड. त्यातही टी-बोन, न्यूयॉर्क असे प्रकार आहेत. थायलंडमध्ये गाय आणि डुक्कर तेतक्याच चवीने खातात. त्यापेकी जे बीफ खाल्ले ते वर चित्रात आहे. पोर्क त्यामानने बरं लागतं.
अदरक मारके!
आल्याचा गरम तिखट रस त्यात लिंबू आणि साखर आणि त्यात अगदी मुलायम तोफू!

ह्याने घसा सुटला नाही तर नवल. अशी हुकमी खादाडी करायला तुम्हाला थाई मित्र-मैत्रिणींसोबतच फिरावं लागेल.
कावासान - बँकॉकमधली खाऊगल्ली
रस्त्यावरचं चमचमीत खायचं असेल तर कावासानला जावं.

नूडल्स, सूप, भात इथपासून चिकन, पोर्क, मासे ते अक्षरशः तळलेले, भाजलेले चतूर, बीटल्स, साप ह्यातलं काहीही खायला मिळेल इथे! ( हो हो खायला, तुम्ही बरोबर वाचत आहत
)
तरंगते रेस्तराँ
बँकॉक मधल्या नदीच्या काठांवर मोजकी तरंगती रेस्तराँ आहेत. लाकडी पायांवर बांधलेली ही रेस्तराँ नदीच्या पाण्यावर तरंगत असतात. त्यापैकी एकात मासे खायचा योग होता-

चित्रातल्या मध्यभागी चिकन रस्सा. तो सतत गरम रहावा म्हणून ज्योतीने गरम करायला खास पात्र! हा पदार्थ थायलंडमध्ये अगदी आवर्जून मागवतात. डावीकदच्या पुढच्या ताटलीत मासा. मागच्या ताटलीत अननस -भात - बिर्याणी. उजवीकडच्या ताटलीत नारळाच्या पानांमध्ये बांधून शिजवलेली कोलंबी.
थायलंडमध्ये स्टिक्स-कांड्या घेऊन खायला शिकायला मला ३-४ दिवस लागले. पण चमच्याने खाण्यापेक्षा याची सवय करणंच चांगलं. थायलंडपध्ये प्रत्येक ठिकाणी काटा चमचा मिळेलचं असं नाही. थायलंडमध्ये थाई थंड कॉफी प्यावी. मधुमेही व्यक्तींनी मात्र याच्या वाट्याल जाऊ नये. मातीच्या भांड्यात जर केली असेल तर चव न्यारीच. पण भरपूर गोड.
पुढच्या भागात खाओ हाई नॅशनल पार्क आणि काही इतर स्थळांबद्दल लिहीन...

