कला

छायाचित्र परिक्षण - २

मँगलोरहुन उडुपीला जाताना सुरतकल येथे एन.आय.टी.के नावाचे कॉलेज आहे. कॉलेज कॅम्पसचा भाग म्हणुन एक बीच आहे. (इथे शिकलो असतो तर किती बरे झाले असते Wink ). उडुपीहुन परत मॅगलोरला येताना संध्याकाळ्च्या सुमारास इथे थांबुन सुर्यास्त बघण्याचा योग आला. कॅमेराचा उपयोग करण्याची संधी मी सोडली नाही. त्यापैकीच एक चित्र इथे ड्कवीत आहे. जरुर परिक्षण करा.

हिरवी जिद्द

.

सिमेंटच्या शेवाळल्या थरात....
मातीचा बोटभर तुकडा शोधून,
उंच उंच जाणार्‍या इमारती मधल्या
फुटभराच्या रोपट्या....
किती रे सुंदर दिसतोस!

तुझ्या एका हिरव्या जिद्दीनं
''जीव शिंपडलाय या देखाव्यात''
जमिनीला घट्ट धरून ठेवणारी तुझी मुळं...
आणि काळपट-करड्या पार्श्वभूमीवरच..
ते टोकाचं हसरं पिवळं फुल,
म्हणजे सौंर्दयाचा कळस!

आहा... !
डोळे अगदी तृप्त झाले तुला पाहून.

बर आहे..., तू चित्रात आहेस!,
असाच रहशिल कायम...
असच राहील तुझ चैतन्यमयी हास्य,
तुझ कोवळे पण..
तुझी हिरवी जिद्द!
न जराठता , कोमेजता!

=====================
स्वाती फडणीस ............ ०८-०५-२००८

गायक-संगीतकार विठ्ठल शिंदे ह्यांना भावपूर्ण आदरांजली!

मित्रहो,माझे बालपण समृद्ध करणार्‍या अनेक कलाकारांपैकी एक म्हणजे विठ्ठल शिंदे. भाळी अर्धचंद्र,माथी शुभ्र गंगा,लिंपिले सर्वांगा चिता-भस्म हे त्यांचे मी ऐकलेले पहिले गाणे. काहीसा चोरटा तरीही गोड आणि तितकाच आर्त आवाज असणार्‍या विठ्ठलरावांनी त्या गाण्याने अवघ्या महाराष्ट्राला वेडं केलं होतं. भल्या पहाटे आकाशवाणीवरून प्रसारित होणार्‍या मंगलप्रभात ह्या कार्यक्रमात दर सोमवारी हे गीत हमखास लागायचे. तसेच त्यांनी गायलेली अजून काही भक्तिगीतेही खूपच लोकप्रिय होती. १)देवा हो सख्या पांडुरंगा,दर्शन द्या मजला श्रीरंगा २) विठ्ठला, देवा आलासी माझ्या दारी,पण थांब जरासा विटेवरी ३)नित्य वाचे तुझे नाम गाऊ,पांडुरंगी सदा लीन राहू ही देखिल माझ्या आवडीची आहेत आणि आजही अधून मधून ती आकाशवाणीवरून लागत असतात.
इथेच आणि ह्या बांधावर अशीच शामल वेळ,सख्या रे किती रंगला खेळ हे माणिक वर्मांनी गायलेले सुमधुर गीत आणि मज भेटून जा हो दत्त सख्या अवधूता हे आर.एन.पराडकरांनी गायलेले दत्तगीत ; ह्या दोन्ही गाजलेल्या गीतांचे संगीत दिग्दर्शन विठ्ठलरावांचे आहे.

विठ्ठलरावांचे नाव त्रिखंडात गाजवले ते मात्र एका लावणीने. प्रतिलता रोशन सातारकरांनी गायलेली लावणी म्हणजे नेहमीच राया तुमची घाई,नका लावू गठूडं बांधायला,येऊ कशी मी नांदायला हो,येऊ कशी तशी मी नांदायला ही होय. ह्या लावणीचे संगीत आहे विठ्ठरावांचे .
विठ्ठलरावांचे संगीत आणि गायिका रोशन सातारकर ह्या जोडगोळीची ही अजून काही गाजलेली लोकगीतं!
१)माझ्या नवर्‍याने सोडलीया दारु

२)मला म्हन्त्यात पुन्याची मैना
३)डार्लिंग डार्लिंग काय म्हन्तोस
४)उद्या जाईन मी माझ्या गावा,माझ्या अंगाला हळद लावा
५)पैठणचा शालू आज मला आणा गडे पतिराज .
ही गाणी ऐकलेली नाहीत असा क्वचितच कुणी मराठी माणूस भेटेल.

विठ्ठलरावांनी बाबासाहेब आंबेडकरांवर गीत भीमायन हे महाकाव्य लिहिले आणि त्याचे हजारो कार्यक्रम त्यांनी अवघ्या महाराष्ट्रभर केलेत. अतिशय ऋजु वृत्तीच्या विठ्ठलरावांचे मराठी सुगम संगीत आणि लोकसंगीतातले कार्य अनमोल असेच आहे. महाराष्ट्रातल्या सर्व नामांकित गायक-गायिकांबरोबर काम करूनही हा लोकगायक शेवटपर्यंत तसा पडद्याआडच राहिला.

लोकगीतांमध्ये विठ्ठलरावांचे नाव धृवतार्‍याप्रमाणे अढळ आहे. काय विलक्षण योगायोग आहे पाहा. अशा ह्या लोकसंगीतातल्या महागुरुला काल दिनांक १८जुलै २००८ रोजी गुरुपौर्णिमेच्या दिवशीच देवाज्ञा झाली. मृत्युसमयी ते ७६ वर्षांचे होते. त्यांना माझी भावपूर्ण आदरांजली.

डॉ.काशिनाथ घाणेकर

ध्येय.....एक सदिच्छापत्र

जब जब तुम्हें भुलाया.....मदन मोहन.....

स्वर्गीय मदन मोहन यांना श्रध्दांजली !






मिसळ

ही मी पुणे नाशिक महामार्गावर मंचरजवळ कळंबगावी खाल्लेली मिसळ. चव अफाट होती.देव करो आणि मला परत लवकरात लवकर ही मिसळ खायला मिळो.
misal

फुलपाखरे छायाचित्रे

फुलपाखारांची चित्रे!

दोन्ही चित्रे कॅनन कॅमेरा
टॅमरॉन टेलेफोटो लेन्स.
ऍपर्चर ५.६
शटर : १/१२००

पौराणिक कथांवरील नवीन मालिकांविषयी थोडंसं...

सध्या वेगवेगळ्या वाहिन्यांची पौराणिक कथांवर मालिका दाखविण्याची स्पर्धा सुरू आहे असे दिसते. साईबाबा, वैष्णोदेवी, हनुमान, रामायण ह्या मालिका (आणि इतर भरपूर) सुरू आहेत. पुर्वी ह्या सर्व मालिकांची वेळ रविवार सकाळ असायची. त्याला पहिले कारण म्हणजे रविवारी सर्वांना सुट्टी असते आणि सकाळपासून लोक टीव्ही बघत असतात. तसेच दुसरे कारण म्हणजे आधी दाखविलेल्या रामायण, महाभारत, श्रीकृष्ण ह्या मालिकांचे यश असेल. असो, सध्या तरी त्या मालिका इतरवेळीही पुन्हा दाखविणे चालू होते.

मग एन डी टी व्ही इमॅजिन ने नवीन ’रामायण’ आणले. निर्माते जुन्या रामायणचेच. सागर आर्ट्स. त्यामुळे लोकांच्या थोडाफार अपेक्षा असतीलच. त्यात त्यांनी वेळ निवडली प्राईम टाईमची. नक्की माहित नाही पण एका ठिकाणी वाचल्याप्रमाणे, एनडीटीव्ही ला त्याचा फायदा झाला. (जरी लोक आय़ पी एलचे सामने जास्त बघत होते तरी त्यांना तेवढे नुकसान झाले नाही.)

आमच्या घरी रामायण पाहणे सुरू असते. सुरूवातीला तसे बरे वाटले. अजूनही बरेच चांगले सूरू आहे. तरीही जुन्या रामायण मालिकेसोबत तुलना होणे स्वाभाविकच आहे. त्यात स्टार उत्सव वर ती जुनी मालिका दाखवित आहेत. मग तर काय संध्याकाळी जुने रामायण, रात्री नवीन रामायण. आता ह्यात जास्त तुलना होते ती कलाकारांच्या अभिनयाची, सादरीकरणाची. नवीन रामायणात मला सुरूवातीला तरी थोडा तजेलदारपणा वाटला. नवीन वाहिनी, नवीन कलाकार, नवीन तंत्रज्ञान. ह्याचा फरक तर दिसणारच. पण ह्यात राण्यांचा पेहराव, त्यांचे थोडेफार वागणे ह्यात सांस बहू मालिकांचा प्रभाव दिसत होता. मग पुढे दिसू लागला संगणकीय प्रभाव. हे मान्य आहे की ह्यात राक्षस, बाणांचा वर्षाव वगैरे आणि भरपूर गोष्टी प्रत्यक्षात दाखवू शकत नाही, तेव्हा त्यामागे स्पेशल इफ़ेक्ट्स वापरावे लागतात. पण इतर ठिकाणी तो जिवंतपणा वाटत नाही आहे. राजा दशरथाचा महाल बाहेरून दाखविण्यात संगणकाचा वापर जास्त केला असे दिसून येते. संध्याकाळचे राजमहालाचे दृष्य पाहताना त्याची जाणीव होते. इतरही वेळा वाटते की काहीतरी कृत्रिम दाखवण्यात येत आहे.

मग सुरू झाले 9x वाहिनीवर महाभारत सुरू होण्याचे वारे. गेले २ महिने रणभूमी, गदा, धनुष्य वगैरे दाखवून महाभारतातील एक एक गोष्टी समोर आणत त्याची जाहिरात दाखवत होते. त्या जाहिराती बघतानाही जाणवत होते की ह्यात थोडी अंधाराची छटा आहे. इथेही कृत्रिमतेचा भास होत होता. म्हटले पाहूया ह्यात काय आहे ते? काल परवा ह्याची नवीन जाहिरात पाहिली तेव्हा वाटले की हे पूर्ण फिल्मी प्रकारात चित्रीत केले आहे. आज कालचे नायक/खलनायक ज्याप्रमाणे दिसतात त्याप्रमाणे ती पात्रे दिसत होती.

मग आज रात्री ९ वाजता महाभारत दाखविणे सुरू झाले. सुरूवातीलाच धर्मराज खेळात हरलेला दाखविला. दुर्योधन सांगतो की द्रौपदीला घेउन ये. हे सर्व पाहत असताना मला वाटले की मी संगणकावर एखादा नवीन गेम बघत आहे. तेच स्पेशल इफेक्ट्स. ह्यात प्रजा दाखविली ती पूर्णत: संगणक निर्मित. मागील महालही तसाच वाटला. मग दुशासन द्रौपदीला आणायला जाताना दाखविला. पूर्णत: कृत्रिम माणूस. चेहयावरील भाव काहीच प्रभाव पाडत नाहीत. महालातील दासी तशाच. त्याआधी बाहेर युधिष्ठिर दाखवला होता. त्याला पाहताना मला राम गोपाल वर्माच्या ’कंपनी ’ मधील चंदू (विवेक ओबेराय)ची झलक दिसली. त्यात भर पाडली ती पार्श्वसंगीताने. ’सरकार’ मधील पार्श्वसंगीत जसे आहे तसेच. मला वाटले थोड्या वेळाने ’गोविंदा गोविंदा’ही सुरू होईल व द्रौपदीला वाचवायला कृष्ण आला आहे असे दाखवतील. पण आमच्या मातोश्रींना दुसरी मालिका पहायची होती म्हणून मग वाहिनी बदलण्यात आली.

तर हे सांगण्याचा उद्देश हाच की आता पौराणिक कथा पुन्हा तयार करून दाखवत आहेत हे कौतुकास्पद आहे. पण ते पाहताना आपण रामायण/महाभारत, राम/कृष्ण पाहत आहोत हे जाणविले पाहिजे. सध्या तरी रामायणामध्ये ते थोडेभार दिसते. पण नवीन महाभारताच्या पहिल्या दहा मिनिटांतच मला वाटले की ह्यात काहीतरी कमी आहे. कितपत चांगले वाटते ते बघू.

जमल्यास थोडी आणखी वाट पाहूया. २१ जुलै पासून नवीन वाहिनी ’कलर्स’ वर श्रीकृष्णावर (की बालकृष्णावर) मालिका येत आहे. ह्याच्या जाहिरातीही सुरू आहेत. त्यात तरी हा कृत्रिमपणा जाणवत नाही. खरं काय ते मालिका सुरू झाल्यावरच कळेल.

(हाच लेख माझ्या अनुदिनीवरही वाचता येईल)

औद्योगीक इसापनीती भाग चार (शेवटचा) - गाढव, रानडुक्कर, घुबड, कोल्हा आणि सिंह

भाग एक- http://www.misalpav.com/node/2330
भाग दोन- http://www.misalpav.com/node/2345
भाग तीन- http://www.misalpav.com/node/2363

औद्योगीक इसापनीती भाग तीन - गाढव, रानडुक्कर, घुबड, कोल्हा आणि सिंह

एका जंगलात एक सिंह आपल्या कळपाबरोबर रहात होता. कळपातील सिंहीणी रोज त्याच्यासाठी शिकार करून आणत. एक दिवस दुसर्‍या एका सिंहाने त्याला कळपातून हुसकावून लावले. तेव्हा तो सिंह रानामधे एकटाच राहू लागला. शिकार आणण्यासाठी त्याने एक गाढव, एक रानडूक्कर, एक घुबड आणि एक कोल्हा असे चार मदतनीस कामास लावले. तेही राजाकडे काम मिळते आहे म्हणून तयार झाले. सिंहाला वाटले की या प्रत्येकाची वैशिष्टे एकत्र येवून भरपूर शिकार मिळेल.

गढव दिवसभर रानात चरत फिरायचे. चरायचा कंटाळा आला की लोळत पडायचे. खुशीत आले की दोनचार तानाबिना मारून सर्वांची करमणूक करायचे. सिंह त्याच्याकडे एक आळशी पण गमतीदार प्राणी म्हणून बघायचा. चमूला मनोरंजन येवढाच त्याचा उपयोग होता.

रानडुक्कर शिकार दिसली रे दिसली की तिच्यामागे सुसाट धावत सुटे. त्याला फक्त सरळ रेषेत धावणे जमायचे. गरज पडलीच तर अचानक पावित्रा बदलून शिकार पकडण्याची कला त्याला माहीत नव्हती. जर शिकार यदाकदाचित तावडीत आलीच, तर धडाधड धडका देउन तिला पाडणे येवधेच त्याला माहीत होते. ह्या धकाधकीत रनडुक्कर खूप काम करून थकून जायचे. हा मूर्ख प्राणी सतत कही उपयोगी, काही निरूपयोगी उद्योगात असतो येवढीच माफक माहिती सिंहाला त्याच्याविषयी होती.

घुबड आपले सतत चिंतामग्न बसून असायचे. त्याला उडतांना किंवा काम करतांना कोणीच पाहिले नसावे. चुपचाप एका जागी बसून, डोळे शुन्यात लावून विचार करीत असायचे. कामाच्या चिंतेने रात्रभर झोपायचे नाही. सिंहाला त्याचा एकूण आभास एखाद्या अभ्यासू विचारवंताचा वाटायचा.

सिंहाचा सर्वात विश्वासू मात्र कोल्हाच होता. त्याच्या समयोचित सल्ल्यावर सिंह अवलंबून रहायचा. कोल्हा नेहमीच सिंहाच्या कानाशी लागलेला असायचा. आपल्याला सिंहाची कसी काळजी वाटते, त्याचा पुर्वीचा कळप परत कसा मिळवता येईल वगैरे गुजगोष्टी सिंहाशी बोलत रहायचा. हा काय सारखी कानाफुसी करत असतो हे कोणालाच कळायचे नाही. पण सिंहाचा विश्वासू म्हणून दबदबा असल्याने बाकी चमू त्याला घाबरून होती.

एकदा जंगलामधे वणवा पेटला. जंगल सोडून जायची वेळ आली. त्यावेळी आळशी गाढव व मूर्ख रानडूक्कराला पेटलेल्या जंगलात सोडून, विचारी घुबड आणि विश्वासू कोल्हा या दोघांना घेऊन सिंह दुसर्‍या जंगलात निघून गेला.

बोध-
आराम नव्हे, काम कर.
काम नव्हे, कामाची फिक्र कर.
फिक्र देखील नव्हे, फिक्रची जिक्र कर.
गृहपाठ-
१) आपापल्या जंगलातील गाढव, रानडुक्कर, घुबड, कोल्हा आणि सिंह ओळखा, आणि तेच का निवडले ह्याची कारणे द्या.
२) औद्योगीक इसापनीती साठी पुढचे भाग लिहा