मांडणी

ह्या गांधींचं करायचं काय ???

ग़ेले दोन दिवस झाले मी ह्या घटनेचा विचार करत आहे.
पहिल्यांदा मी नेहमीचच आहे म्हणून दुर्लक्ष करून विसरण्याचा प्रयत्न केला पण काल रात्री "बघूया काय चाललय देशात" म्हणून "टी व्ही" लावला तर तेच नाटक चालू. अशी सणक आली ना मस्तकात कि विचारू नका, म्हणूनच हा लेख लिहण्याचा खटाटोप ....
आत ह्यात गांधींचा काय संमंध ? पण मी ज्या लोकांबद्दल बोलतोय ते महात्मा गांधी नसून आजचे ढोंगी गांधी म्हणजे अनुक्रमे "सोनिया ग़ांधी, राहुल गांधी व प्रियंका वढेरा [ सोईसाठी ग़ांधी , कारण त्याशिवाय व्ही आय पी ट्रीटमेंट मिळत नाही ]."

एकूण दोन घटना आहेत .....

१. पहिली म्हणजे गांधी-नेहरू घराण्याचे वफादार व आजच्या राजकारणातील एक अडगळ असे "अर्जूनसिंगांनी" भारताच्या पंतप्रधानपदासाठी सर्वश्री "राहूल गांधींचे " नाव पुढे करणे, अपेक्षेप्रमाने त्यावर राहूलने कोणतीही प्रतिक्रीया न देणे, त्यावर कॉग्रेस पक्षातर्फे "सध्या पंतप्रधानपदाची खूर्ची रिकामी नाही आणि सोनिया गांधींना चापलूसकी [ कॉग्रेसच्या राजकारण्यांसाठी कसा फिट्ट शब्द आहे बघा ] आवडत नाही" असा खूलासा करणे व शेवटी सोनिया व अर्जूनसिंगाची गुप्त बैठक [ ह्यात म्हणे त्यांना ठोकले , मी तर म्हणतो पाठ थोपटली असेल].
ह्यावरून एकंदरीत मला ह्या लोकांना म्हणायचे आहे तरी काय हे समजेना. अरे काही तरी किंमत ठेवा त्या "पंतप्रधान " पदाची. पुर्वीच्या शास्त्री, इंदीरा गांधी, राजीव गांधी, वाजपीई सारख्या माणसांनी हे पद भूषवून त्याची मानमर्यादा अतिशय उच्च करून ठेवली होती व आज त्याचे हाल कुत्रे पण खात नाही. ख़ुद्द मनमोहन सिंग कबूल करतात "मी हतबल आहे", बाकीचे काय पाहिजे अजून ? असो.
तर तो आपल्या चर्चेचा विषय नाही, तो आहे राहूलची योग्यता [ थोडक्यात लायकी ]. फ़क्त गांधी कुटुंबात जन्माला महान ,चांगले विदेशात शिक्षण घेतले, थोडा दिसायला चांगला आहे, झालच तर भाषने आईसारखी वाचून दाखवत नाही, व्यवस्थीत हिंदी बोलतो, झालच तर ४ दिवस गरिब आणि स्पेशली दलित जनतेत हिंडतो हे सर्व गूण भारताचा पंतप्रधान होण्यासाठी चिक्कार झाले का ? बाकी त्याची एकंदरीत देशाच्या परिस्थीतीबद्दल असलेली जाण, समज, थोडा अनुभव, ह्या लेवलला येण्यासाथी करावे लागणारे [ व लोकांनी केलेले ] कष्ट, करावा लागणारा त्याग ह्यांची काहिच किंमत नाही का ? का हा देश गांधी-नेहरू घराण्याला आंदण दिलाय ?
तसे असेल तर बंद करा ही लोकशाहीची नाटकं आणि जाहीर करा " यापुढे फक्त गांधी परिवारातील व्यक्तीलाच हे पद मिळेल, बकी कुणी ह्याला विरोध केला तर तो देशद्रोह समजला जाईल" म्हणजे विषयच संपला. आता तर ह्यांचे "चरणभाट " असा दाखला देतात की "राहूलने मनाचा मोठेपणा दाखवून मंत्रीपदाचा त्याग केला" . खरं की काय ? आम्हाला वाटलं सगळी नाटकंच चालू आहेत. छे छे किते मुर्ख ना मी ? मला एवढेच म्हणाय्चे आहे की सध्यातरी राहूलची या पदाचे स्वप्न सुध्धा बघायची लायकी नसताना त्याला मारून मुटकून फौजदार बनवायचा हा प्रयत्न कशासाठी? त्याला प्रोजेक्ट करण्यासाठी एवढी नाटके कशासाठी ? बाकीच्या कॉग्रेसमधल्या चरणभाटांना, चापलूसकरांना, चमच्यांना त्यांचा मतदारसंघात तोंड दाखवायला जागा नसल्यामुळे हा सर्व सावळागोंधळ का ?
अशाने देशाचे किते नुकसान होत आहे, आपली इमेज कशी खराब होत आहे याची काळजी कुणालाच नाही का ?

२. दुसरी घटना तर पहिल्यापेक्षा भयानक व निंदनीय. क़ाय तर म्हणे, प्रियंका गांधींनी म्हणे तिच्या पित्याचे मारेकरी नलिनी ची भेट घेतली, का तर की तिला ह्यामागचा हेतू जाणून घ्यायचा होता [ आत्तापर्यंत तपास करत असलेली पोलीस, गुप्तचर संघटना काय माश्या मारत होती का ?] , झालचं तर आपल्या पित्याला मारून किते मोठी चूक तिने केली आहे हे सुनवायचे होते [ तर तर , ती नलिनी पण संतच ना, मला तर वाटते आज पुन्हा एकदा वाल्याचा वाल्मीकी झाला असावा] व शेवटी येताना
"आपल्या मनात कोणतेही शतॄत्व नाही " हे सुनवून आपण किते महान हे जनतेला सांगायचे होते.
माझं तर डोकं सुन्न झालं. ह्यांनी आता बापाच्या मरण्याचे पण भांडवल करायला सुरवात केली तर. बर आत्ताच कसा निवडणूकीच्या तोंडावर हा महान विचार मनात आला ? जर ही गोष्ट पर्सनल असेल तर बरोबर आपल्या लाचार मिडियाची फौज कशाला बरोबर न्हेली आणि अख्ख्या देशाला हा नजारा कशासाठी दाखवला कारण तुमच्या मते ही गोष्ट अतिशय पर्सनल होती ? नेहमीप्रमाणे ह्या घटनेचे पण भाटांनी व मिडियाने उदे उदे केलेच, दुसरी अपेक्षा तरी काय ठेवणार हो ?

आता प्रश्न असा आहे की ह्या घटना ज्या रितेने घडल्या व त्या प्रोजेक्ट केल्या गेल्या ती पद्धत बरोबर आहे का ? का पब्लिकला चुत्यात काढायचे धंदे आहेत हे ? आपल्या देशात ह्या गांधींपेक्षा दुसरे कोणी लीडर बलायला नालायक आहे का ? मिडियापण ह्या लोकांच्या दावणीला बांधल्यासारखा का वागतो कारण तो तर लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे ? बाबासाहेबांना अपेक्षीत असलेली लोकशाही हिच का ? हे असे लोकच भविष्यात आपले नेतत्व करणार आहेत का ?

तसे असेल तर माझ्यासारख्या सुशिक्षीत, पांढरपेश्या माणसाला तो फक्त स्वताचे बघतो, त्यांचे देशाशी काही देणेघेणे नाही अशा शिव्या देण्यात काय अर्थ आहे जर हे लोक असेच वागणार असतील. ह्या गोष्टींवर आपल्याकडे काहीच उपाय नाही का ? हे सर्व असेच चालू राहणार आहे का ? तसे असल्यास ह्याला कंटाळून राजकारणाकडे ढ़ूंकून न बघणाऱ्या व कदाचेत देश सोडून जाणाऱ्या माणसाला दोष देण्यात काय अर्थ आहे ? आपले मिशन "२०-२०" असेच लोक पूर्ण करणार आहेत का ? होय असेल तर त्यानंतर देशाची परिस्थीती काय असेल ? ह्या अश्या भाटगिरी करणाऱ्या न्युज चॅनेल्स वर बंदी आणावी का ?

मला माहित आहे की असे लिहून काही उपयोग नाही, कारण "हम नही बदलेंगे" असे त्यांनी ठरवले आहे. आपण जर हे वाचून काही करण्याचा प्रयत्न करणार असाल तर मी त्यात माझे थोडेसे समाधान मानतो व पुढे आपण अगदीच परिस्थीती हाताबाहेर जाउ देणार नाही अशी आशा बाळगतो.

बेंगलोर मिपा ओसरी ...

काल दि. १२ एप्रिल २००८ रोजी संध्याकाळी ६ ते रात्री १० वाजेपर्यंत "बेंगलोर मिपा ओसरी [ हा कट्टा नाही, ओसरीच ... कारण ओसरीवर कसेही निवांत आदवेतिडवे पसरता येते, लोळता येते.] संपन्न झाला.
आधी प्रोग्रॅमचा जास्त गाजावाजा न करता तो घेण्याचे ठरवून काल तो यशस्वी झाला.

कार्यक्रमास सर्वश्री " अबब, स्वयंभू , छोटा डॉन तसेच काळोख [ आगामी आकर्षण] " उपस्थीत होते.
या कार्यक्रमामध्ये वहिवाटीच्या इतर कार्यक्रमासहित इतर काही गोष्टी डिस्कस करण्यात आल्या...

यामध्ये आपल्या बाकीच्या दोस्तांबरोबर संपर्क करून "मिपाचे दक्षिण भारतातील कुटुंब अधिक मजबूत " करण्याबद्दलही चर्चा करण्यात आली. सध्या काही फोटो वगैरे काढले नाहीत पण पुन्हा जेव्हा आम्ही भेटू तेव्हाचे फोटॉ नक्की चढवू ...

अनोखे वंशवृक्ष

कर्नाटकातल्या हुलिकल गावातील एक दलित जोडपं, तिमक्का आणि तिचा नवरा बिक्कालु चिकैय्या. लग्नाला बरीच वर्ष झाली तरी त्यांना मूल होईना. एव्हाना शेजारी पाजारी आणि सग्यासोयर्‍यांनी तिमक्काला 'वांझ' म्हणून दूषणं द्यायला सुरुवात केली होती. एकाकीपणाची भावना घेरू लागलेल्या या जोडप्याने मग अखेर निर्णय घेतला मूल दत्तक घ्यायचा.

मूल दत्तक घेण्यात काय एव्हढं विशेष. विशेष होते कारण तिमक्काने पालनपोषण करून मोठ्ठं करण्यासाठी निवडली ३०० वडाची रोपटी. १९५० च्या आसपास ह्या जोडप्याने लावलेल्या त्या रोपट्यांनी आता चांगलाच आकार घेतला आहे. कर्णाटकातील राष्ट्रीय महामार्ग क्र. ४८ च्या दोन्ही बाजूला काट्याकुट्या रोवून तिमक्काने जीवापाड जपलेल्या रोपट्यांचे आता डेरेदार वटवृक्ष झाले आहेत. बाजारात सुमारे ८५ कोटी रुपये इतकी किंमत असलेले हे वृक्ष वनविभागाने नुकतेच आपल्या ताब्यात घेतले. त्या बाजारभावाचा विचार कधी न तिमक्काच्या मनाला शिवला, न आज हयात नसलेल्या बिक्कालुच्या.

तिमक्काला नुकताच पंतप्रधानांच्या हस्ते सामाजिक वनीकरणासाठीचा राष्ट्रीय नागरिक पुरस्कार देण्यात आला. कुणाही कृतार्थ आईने म्हणावं तशी तिमक्का त्यावेळी म्हणाली, "त्यांना मोठ्ठं होताना पाहणं ह्यातच माझे सुख आहे".

- मटा १९९५

लेखन मालिका

खालील मत हे मिसळपाववर प्रस्तुत होणार्‍या लेखन मालिकांच्या प्रेमापोटी आणि पुढील भागांच्या प्रतिक्षेपोटी आणि उत्सुकतेपोटी... (गैरसमज नसावा.)

अहो वाट वाट म्हणजे बघायची तरी किती!!
आज येईल पुढचा भाग... नाही उद्या नक्की येईल... नाही परवा येईल बहुतेक... या आठवड्यात तरी यायला हवा... ह्या महिन्यात येईल असं वाटतंय... पण छ्या...
तात्यांचे रौशनी, सालस, धोंडोपंतांचे अच्युत गणपुले... एक ना अनेक! आम्ही मात्र ते वाचण्यासाठी इथे तिष्ठत असतो.

मान्य आहे कामाच्या रगाड्यात नाही जमत एखाद्याला किंवा नाही बैठक जमत तशी जी त्या दुनियेत पुन्हा घेउन जाईल आणि शब्द न शब्द आपोआपच स्फुरेल... ह्रदयातून... अगदी बेमालूमपणे...
अहो, पण ह्या व्यक्ती, त्यांचे पैलू तर आम्हांला नकळतपणे जगायला शिकवतात, आमच्या कामाच्या रगाड्यात आम्हांला इंद्रधनु दाखवितात, घटकाभर स्वतःचे दु:ख विसरुन हसवतात, स्वत:चा प्रवास थोडावेळ बाजूला ठेवून कोणी एक किती खडतर भुमिकेतून जाउ शकतो याचे शाश्वत दाखवतात!

काय मिसळपावकरी तुमचे काय मत आहे... तुम्ही बघताय की नाही वाट रौशनी, सालस, अच्युत गणपुले आणि अजून कितीतरी.. ज्यांची गाडी मिसळपाववर येता येता कुठेतरी अडून बसलिये...

एक शिफारस : सर्व भाग लिहून अद्ययावत पूर्ण झाले की मग ठराविक अंतराने एक एक करून मिसळपाववर चढवावेत.

नशीब एकेकाच

तिने कपाटाचे दार उघडले आणि आत न बघताच हातातले खोके आत भिरकावून दिले. अगदी त्यात काचेची वस्तू आहे अथवा नाही याची एवढीही फिकीर न करता.

आत पडताक्षणी मी बघितले तर माझ्यासारखेच काही खोके तिथे होते. काही आपल्या शोभिवंत कागदातून बाहेर आले होते तर काही माझ्याच सारखे रंगीबेरंगी कागदात बंदिस्त.

"ए ,ओळखलेस का? "
एकदम आलेल्या प्रश्नाने मी जरा बावचळून गेलो खरा.
पण लगेचच आठवले की काही महिन्यांपूर्वी त्या खोक्याला मी भेटलो होतो. आमचा अगदी सार्वजनिक पंचनामा झाला होता. वेष्टनातून काढून अगदी आतून बाहेरून लोकांनी आम्हाला बघितले होते. काय तो रंग, अगदीच जुनाट डिझाइन इत्यादी अलंकारांनी नटवून मग आमची रवानगी झाली होती अंधाऱ्या कपाटात अशीच...

"काय म्हणतोस दोस्ता? भेटून आनंद झाला." सराईतासारखे मी सांगितले. मग आम्ही कोणाकडे आणि कोठे भेटलो याच्या गप्पा मारायला सुरुवात केली.

लग्न, मुंज, बारस , नवे घर यापैकी काही निमित्त्य मिळाल तर आमची सुटका अंधारकोठडीतून व्हायची. नशीब बर असल तर देखण्या कपाटात जागा नाही तर प्लॅस्टिमध्ये, पोत्यात कोंबून आम्हाला माळ्यावर सुद्धा फेकलेले आठवतय मला. थोडक्यात काय तर असच वेष्टनासकट अंधारकोठडीतून जागा बदलत एकमेकांना खो देत राहण आमच्या नशीबात लिहिलेले.

"कशाला देतात ही माणस भेटवस्तू?. नको तर द्या ना टाकून ... पण नाही ..मी तर अगदी कंटाळले आहे अशा अंधार कोठडीतल्या प्रवासाला " एका गुलाबी चपट्यापेटीतून एक हळवा आवाज कानावर आला.

"मी तर एकदम खूष आहे. विश्वास बसणार नाही तुमचा पण तब्बल पाच वर्षांनी इथेच परत आलो आहे मी. हे घर, ही माणस , हे कपाट सगळ आठवतय मला. दुकानातून थेट वास्तूशांतीच्याच तर दिवशी या कपाटात आलो होतो मी पहिल्यांदा. ..."

एका खोक्यातून आनंदाची ललकारी ऐकून सर्वांनी कुतुहलाने त्याकडे पाहिले.

"तुम्हाला म्हणून सांगतो अगदी काही म्हणून काही बदलल नाही..मला आणि त्यांना सुद्धा थोडी जुनाट कळा आली आहे एवढच. पण घरी परत आल्याचा आनंद काही विरळाच. आता हक्काच्या घरात आल्यासारख वाटतय. खूप झाली धावपळ."

"हक्काच घर कसल? कैदखाना म्हणा. ज्यांना हक्काचे म्हणता त्या माणसांना काही जाणीव आहे का?अरे , प्रसंग साजरा करायला त्यांना काही चालत! मी म्हणतो नाही जिव्हाळा तर जाऊ नका.., भेटू नका, उगीच भेटवस्तूचा देखावा कशाला?" तीच वस्तू कधी त्याच कागदात तर कधी प्लॅस्टिकमध्ये तर कधी दुसऱ्या वस्तूच्या वेगळ्या रंगीत कागदात!

वाक्यागणिक त्या खोक्याचा आवाज चढत होता. काही वेळाने खोक्याचे हृदयाचे ठोके भावनातिरेकाने जास्तच वाढले . त्याला शांत करायचा प्रयत्नात दोन खोकी एकमेकांवर आदळली..आई ग.̱
पण त्यांनी पाठीवर हात फिरवून थोडे विषयांतर करून त्या मोठ्या आणि जरा जीर्ण दिसणाऱ्या खोक्याला थोड्यावेळात कसेबसे शांत केले.

तर दुसरीकडे आनंदाने नाचणाऱ्या खोक्याला काय घडले त्याचे एवढेही सोयरसुतकच नव्हते. तो आपला आपलीच कहाणी सांगण्यात गुंग होता. एका घरातून दुसऱ्या घरात, कोणकोणत्या प्रसंगाने तो गेला. त्याला कसे कोणी उघडून पाहिले. कोणी स्वयंपाकघरात मोकळे ठेवले , एकदा वापरले आणि पुन्हा कागदात घातले, कुणाला भेट म्हणून दिले... ते सारे सारे दंग होऊन सांगत होता. आपण आपल्या घरी आलो या एका विचाराने सर्व मानापमानांचा त्याला विसर पडला होता. त्याचा ऊर भरून आला होता. (सावरकरांचा आत्माही लाजला असेल स्वर्गात या खोक्याचे घराचे प्रेम पाहून.)

तेवढ्यात एका कोपऱ्यात आतापर्यंत गप्प बसलेली एक कागदी पिशवी मोठ्याने हसायला लागली. त्या आवाजाकडे साहजिकच सर्वांचे लक्ष गेले.

"नवा कागद आणि नवे खोके म्हणता आहात ना. हे मला पहा. त्या बारक्या माणसाला जर ढगळ कपडा घालायला दिला तर घालेला का लेकाचा? त्यांना हवा अगदी मापाचा आणि नव्या फॅशनचा कपडा. माझ पहा. माझ्या आत एक मोठं खोक आहे. आणि त्या खोक्याला ढीगभर कागद. त्या खोक्यात काय आहे माहिती आहे? एक बारका गणपती! आणि त्याच्याभोवती भलमोठे थर्मोकोल बॉल्स.. कागदाच्या रिबिना.. बस्स. पण सोंग अस केलय की काय देणारा कर्णाचा अवतार वाटावा. "

ते ऐकल्यावर सगळेच हसायला लागले. आणि मग आपलही असेच कसे आणि केव्हा झालेच्या गोंगाटाने कपाटातला अंधार भरून गेला..

"मी म्हणतो, द्यायच ना जे द्यायच आहे ते खुलेपणे. दिखावा कशाला?"

"अमिताभकडे पण असेच होत असेल का रे? अभिषेकच्या लग्नात काय देखणी खोकी होती ती सगळी." एका खोक्याने स्व्प्नाळू आवाजात विचारले.

"काय माहिती मोठयांच्या सर्वच गोष्टी वेगळ्या.."

"काही येत नाही तर कशाला मध्ये तोंड खुपसायच" दोन खोकी कुजबुजली.

"अहो, इज्जतीचा पंचनामा होईल याची भीती.. म्हणून हा दिखावा. पण काही म्हणा मी तर अशा मुद्दयावर आलो आहे की या लोकांपैकी काहींची गरीबी म्हणजे कमीपणा आणि श्रीमंताचा कद्रूपणा म्हणजे दागिना असा जमाना आहे. "

त्या पिशवीकडे पाहत एक खोका म्हणाला, " घरातल्या बायकाच याला जबाबदार. भेदभाव, जिव्हाळा, हा जवळचा तो दूरचा , हा माहेरचा , हा सासरचा ही त्यांचीच खुळ. ज्या गोष्टी त्या बायका वापरत नाही ते इतर घरात तरी कसे वापरतील? "

"ह्यांचे झाडणे म्हणजे आपला कचरा दुसऱ्याच्या अंगणात तसलाच प्रकार आहे हा" दुसऱ्याने वैतागून दुजोरा दिला.

" त्यांना सल्ले देणारे पुरूष जसे तुम्ही पाहिलेच नाही? हा मित्र, हा लंगोटीयार, हा साहेब विसरलास वाटत सर्व?" नाकाला मिरच्या झोंबाव्या अशा तिरमिरीने एका पिशवीने उत्तर दिले.

"लहान मुलांची खेळणी निदान ती निदान खोक्यातून काढतात, मुले खेळतात, मोडतात पण वापरतात. या मोठ्यांच्या आणि तशा दिखाव्याच्या वस्तूचे खोके होण्यासारखे दुःख नाही. "एकाने आपले मत मांडले.

गरजेच्या आणि ज्यांना खरच गरज आहे त्यांनाच भेटवस्तू कशा द्याव्या यावर बराच वेळ त्या खोक्यांनी चर्चा केली. निदान वस्तू आणि खोके दोघांचे भाग्य उजळेल असा आशेचा किरण त्यात त्यांना दिसत होता.

भेटवस्तू कशाच हवी मी म्हणतो.. एकाने मूलभूत विचार मांडला. कपाटात काही काळ शांततेचा गेला...

"परदेशात म्हणे वधूवर त्यांना काय हवे आहे याची एका दुकानात यादीच ठेवतात आणि त्यापैकीच काही तरी भेटवस्तू द्यावी लागते. आपल्याकडे सुद्धा असे केले तर कित्येक वस्तूंच्या आणि खोक्यांच्या नशीबातले दुःख टळेल. आपल्याकडे गिफ्ट कार्ड मिळतात ती सुद्धा चांगली नाही का? " एका खोक्याने सांगितले.

"हे इंपोर्टेड दिसतात. कन्सलटंटकडे वास्तव्य असेल बहुधा. खि खि खि..." दोन चार तरणी खोकी खिदळली.

"इकडे काय आणि तिकडे काय सगळीकडे माणसे सारखीच. फक्त तिकडच वाईटच सांगायच किंवा चांगलच सांगायच असे एकच धोरण काही स्वीकारतात. दुसऱ्या खोक्याने मान उडवत सांगितले. "

इकडचे तिकडचे असे शब्द ऐकल्यावर काही खोकी तेवढ्यात डोलर ते रू दराच्या तर काही परदेशवारीच्या स्वप्नात दंग झाली. जरा विषयांतर झाले होते एवढे नक्की!.

"तुमची दुःख शेवटी भरल्या पोटाची! आमच्याकडे बघा तेव्हा कळेल की तुम्हीच किती सुखी आहात ते!" रिकाम्या लिफाफ्यांच्या ढिगातून आवाज आला.

लोकांनी आपल्याच आनंदात किंवा दुःखात राहावे हे काहींना मंजूर नसते. फक्त माझ्याकडे लक्ष द्या एवढीच त्यांची भूमिका असते. बहुधा अशापैकी कोणी त्या ढिगात असावे.

"आईजवळून बाळ हिसकावून घ्यायच आणि तिला एकट सोडून द्यायच. काय वाटत असेल तिला? अगदी अशी गत आहे झाली आहे आमची. "
'सप्रेम भेट' एवढाच मजकूर असणारी, सहज उघडता येणारी काही पाकिटे एका कोपऱ्यात रचलेली होती. बघितली तर अगदी कोरी आहेत असे वाटणारी ती पाकिटे तक्रारीचे सूर काढत होती. त्यांच्या डोळ्यातून वाहणाऱ्या धारांनी कपाटातली इतर खोकी ओली होतील की काय अशी भीती वाटू लागली.

"भेट म्हणून दिलेली फुले आठवतात ना तुम्हाला.. त्यांच्यापेक्षा आपण बरे नाही का? ती कोमेजली की सरळ कचऱ्यात! आपल्याला निदान एक हक्काचे घर तर मिळते. " एका खोक्याने पोक्त आजीबाईच्या सुरात समजावले.

अमूक अमूक माणसापेक्षा आपले दुःख कसे जास्त.. तर कोठे दुसऱ्यापेक्षा आपण कसे सुखी अशा विविध विचारात ती खोकी बुडाली. शेवटी खोकीच ती.

एके दिवशी कपाटाचे दार पुन्हा करकरले... एक हात आत आला. दोन डोळे भिरभिर फिरले. दोन चार खोकी वर खाली करून त्या हाताने एक भलेमोठे पण हलके खोके उचलले. हाताबरोबर ते खोके कपाटातून नाहिसे झाले.

"अरे वा! तुम्ही आलात. किती छान वाटले म्हणून सांगू..अहो याची काय गरज होती, थॅक्स तरी पण... असे शब्द , (नेहमीचेच तस म्हटल तर )कानावर पडत असतांना एव्हाना सराईत झालेल्या खोक्याला हातबदल जाणवला होता.

पुन्हा कपाटाचे एक दार करकरले.. आत खोक्यांची रवानगी झाली.. थोडी कुरकूर, थोडे हसू, थोडे अश्रू आणि सामंजस्य बरोबर घेऊन खोकी पुन्हा नांदायला लागली.

ब्रेकिंग न्यूज

अजिबात वेळ घालवू नका. तडक टीव्ही लावा. राष्ट्रव्यापी समस्या.

तुम्ही ह्या बाबतीत काही करणार आहात की नाही?

break

सौजन्य = ई-ढकल.

भटकंती गाणी -२

मूळ धागा

जम्बो जेट जम्बो जेट झुऽऽऽऽऽऽऽऽऽऽई

(चाल - अशोक कुमारच्या 'रेलगाडी रेलगाडी' ची)

जम्बो जेट जम्बो जेट,
लंडन-मुंबई प्रवास थेट,
जगलो वाचलो पुन्हा भेट,
जम्बो जेट जम्बो जेट झुऽऽऽऽऽऽऽऽऽऽई

विमानात होता माथेफिरु,
त्याचा झाला भेजा सुरू,
तो म्हणाला पायलटला,
विमान वळव बैरुटला,
विमान उतरव त्या शेतात,
पिस्तुल आहे ह्या हातात,
जम्बो जेट जम्बो जेट झुऽऽऽऽऽऽऽऽऽऽई

ठेवीन प्रवासी तुमचे ओलीस,
मग काय करतील तुमचे पोलीस,
जम्बो जेट जम्बो जेट झुऽऽऽऽऽऽऽऽऽऽई
अरे जम्बो जेट जम्बो जेट झुऽऽऽऽऽऽऽऽऽऽई

मधल्या ओळी आठवत नाहीयेत, कोणाला आठवल्या तर जरूर लिहा आणि तुम्हाला जर अशी भटकंती गाणी येत असतील तर भटकंती - ३, ४ इ. भाग सुद्धा लिहिलेत तरी हरकत नाही.

संकेतस्थळ उघडण्यास अडचण ?

नमस्कार,

काही सदस्यांना संकेतस्थळ  उघड्यास अडचण येते आहे. ही अडचण नेमकीकाय आहे ते सांगता येईल का?
त्या सोबत तुमची OS  आणि ब्राऊजरची आवृत्ती सुध्दा  द्या.  काही संदेश येत असेलतर तोही द्या.
मोझीला फायरफॉक्स वर अशी काही अडचण आहे का ?

लेख अप्रकाशित, क्षमस्व!

स्वाती दिनेश यांचा 'ले गयी दिल दुनिया जपान की (भाग ८)' हा सुंदर लेख तूर्तास अप्रकाशित केला आहे. काही तांत्रिक अडचणींमुळे एक तर बर्‍याच जणांना हा लेख उघडताच आलेला नाही तसेच ज्यांना उघडता आला आहे त्यापैकी काहींना प्रतिसाद देता आलेला नाही/येत नाही.


मिसळपावच्या बदललेल्या स्वरुपानुसार/मुळे, ही काहीतरी तांत्रिक अडचण उद्भवली असावी/आहे. तरी तिचे पूर्ण निराकरण/निवारण झाल्यावरच हा लेख पुन:प्रकाशित करण्यात येईल म्हणजे वाचकांना तो वाचण्यास आणि त्याला प्रतिसाद देण्यास कुठलाही अडथळा येणार नाही.


तूर्तास, गैरसोयीबद्दल मिसळपाव स्वाती दिनेश तसेच सर्व मिपावासियांची दिलगीर आहे. कृपया सहकार्य करावे ही विनंती...


तात्या.

गमभन ०८.०२.२० आवृत्ती प्रकाशित..

राम राम मंडळी,


आपल्याला सर्वांना कळविण्यास अत्यंत आनंद होतो की मिसळपाव डॉट कॉमच्या अक्षर-सामर्थ्यदात्याने, म्हणजेच गमभन ने आता कात टाकली असून त्याची पुढील आवृत्ती 'गमभन ०८.०२.२०' ही आता प्रकाशित झाली आहे आणि मिसळपावला जोडली गेली आहे!


मंडळी, या सर्वाचे श्रेय आमचे मित्र व मिसळपावचे एक सभासद श्री ओंकार जोशी यांना जाते. त्यांच्या बुद्धीमत्तेला आणि अथक परिश्रमांना जेवढी दाद द्यावी तेवढी कमीच आहे! हे केवळ ओंकार हा आमचा मित्र आहे म्हणून आम्ही म्हणत नाही, तर खरोखरच तशी वस्तुस्थिती आहे!


आज आंतरजालावर ओंकार जोशी यांची गमभन ही मुक्त अक्षरदाताप्रणाली मिसळपावसारख्या मराठी संकेतस्थळांना अक्षरश: वरदायी ठरली आहे. अन्यथा, मिसळपाववर मराठी लेखन करणे शक्य झाले नसते!


पूर्वी एका ठराविक संकेतस्थळावरची ही मराठी लेखनाची एकाधिकारशाही ओंकार जोशींच्या कर्तृत्वामुळे आज निकालात निघाली आहे आणि म्हणूनच मिसळपावसारखी अनेक संकेतस्थळे केवळ कृतज्ञतेच्या भावनेतून,


"अक्षरदाता सुखीभव!"


असे म्हणतील!


ओंकारचे पुन्हा एकदा मनापासून कौतुक आणि त्याला शतश: धन्यवाद! त्याचे 'गमभन' हे उत्तरोत्तर अधिकाधिक यशस्वी होवो, हीच अगदी मनापासूनची प्रार्थना...


मिसळपाव डॉट कॉम तर्फे गमभन करता कृतज्ञतेची भावना व्यक्त करून हे दोन शब्द संपवतो...


-- तात्या अभ्यंकर.


ता क - मिसळपावच्या मुखपृष्ठाकरता आणि एकंदरीतच मिसळपावच्या तांत्रिक कामांकरताही ओंकार जोशी या पुढे विशेष लक्ष घालतील! आता साक्षात गमभनकारच जेथे मिसळपावच्या पाठीशी आहेत तेव्हा चिंता कशाची?! Smile


आणि नीलकांत?


नीलकांतरावांच्या मेहनतीला आणि मिसळपावकरता त्यांनी ज्या पोटतिडकीने काम केले आहे/करत आहेत त्याकरता तर मिसळपावकडे कुठलेही शब्दच नाहीत! आहे ती केवळ अन् केवळ कृतज्ञतेची भावना! मिसळपाव त्यांचंच आहे...!


-- तात्या अभ्यंकर.