मांडणी
भयकथा
मला भयकथा वाचायला खूप आवडतात...
मिसळ पाव वर यापूर्वी हे लिखाण झाले असल्यास..
लिंक द्यावी ......
हि विनंती .......
इतिहासाचे पुनर्लेखन
आमचे तुल्यबळ शत्रु श्री. पुण्याचे पेशवे ह्यांच्या 'इतिहासाचे पुनर्लेखन कराच' ह्या आव्हानाला सामोरे जाण्याचे आम्ही ठरवले आहे. तसे त्यांना कळवल्याबरोब्बर त्यांनी आपल्या वाड्यातील एक ओसरी आम्हास नेमस्त करुन दिली आहेच.
असो..
तर नुसत्या बहुजनांच्या इतिहासाचेच नाहीतर राम-लक्ष्मणापासुनच्या संपुर्ण इतिहासाचे पुनर्लेखन करण्याचे आम्ही ठरवलेले आहे. त्यासाठी मिपावरील मान्यवर अभ्यासु सदस्यांची मदत मिळाल्यास आमचे कार्य अधिक सुखकर होईल.
आमचे चालु इतिहासा विषयीचे काही आक्षेप :-
१) सर्व देवांना (पुरुष) मग ते अगदी ब्रम्हा-विष्णु-महेशा पासून ते किन्नर गंधर्वांपर्यंत कायम जान्हवे घालुन का दाखवले जाते ? सर्व देव हे ब्राम्हण असल्याचे जनमानसावर ठसवण्याचे हे प्रयत्न का खपवुन घेतले जात आहेत ? ह्याउलट राक्षस व देव विरोधी लोकांना मात्र ब्राम्हणेतर दाखवले जाते. रावण, बिभिषण वगैरे सोडल्यास कुठल्याच राक्षस वा असुराच्या अंगात कधी जान्हवे बघितले आहे का? काही काही हलकट लोकांनी तर शिवाजीराजांना देखील काही चित्रपटात जान्हवे घालुन समोर आणले आहे. हा खोटेपणा कशासाठी ?
ब्रम्हा-विष्णु- महेश ह्या देवतांनी घेतलेले बहुदा सर्व अवतार देखील ब्राम्हण कुळातच घेतल्याचे सतत का लिहिले गेले ? हा खोटा इतिहास का लादला गेला ?
२) राम-लक्ष्मण (हे देखील कायम जान्हवी घातलेलेच) हे १४ वर्षे खरच वनवासात राहिले होते काय ? वालीचा पराभव झाल्यानंतर हे दोघेही सुग्रीवाच्या आश्रयास असल्याचा स्पष्ट उल्लेख आढळतो. ह्याचाच अर्थ ते देखील सुग्रीवासह राजमहालातच निवास करत होते असा होत नाही का ? हे सत्य दडवण्यामागे काय कारण असावे ?
३) द्रौपदीला नावे ठेवणारे कुंतीला आणि माद्रीला का माफ करतात ? कुंतीला आणि माद्रीला पुत्रप्राप्ती कशी झाली हे लोक का विसरतात ?
४) एकलव्य आणि कर्ण हि बहुजनांवर / ब्राम्हणेतरांवर एका विशीष्ठ जातीकडून पुर्वांपार चालु असलेल्या अन्यायाची उदाहरणे नाहीत काय ? त्याविषयावर कोणीच काही का बोलत नाही ? एकलव्याचे तर पुढे काय झाले हे देखील स्पष्ट करताना भले भले दमलेले दिसतात. त्याचा उल्लेख देखील सहसा कुठे पुढच्या भागात आढळत नाही.
५) दादोजी आणि समर्थांचे उदोउदो करणारे आणि इतरांना खरा इतिहास शोधा म्हणुन अक्कल शिकवणारे ज्ञानेश्वरांच्या समाधिची तपासणी करायची मागणी होताच सापासारखे फुत्कार का सोडायला लागतात ? शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचे पुरावे मागणारे ज्ञानेश्वरांनीच ज्ञानेश्वरी लिहिली ह्याचे पुरावे देतील काय ?
गहनीनाथ हे निवृतीनाथांचे गुरु, त्यांच्याच आज्ञेवरुन निवृत्तीनाथांनी गीतेवर प्रवचने दिली तीच पुढे ज्ञानेश्वरी ठरली हे खोटे आहे का ? ज्ञानेश्वरी मध्ये निवृत्तीनाथांसदर्भाचा खालील श्लोक काय दर्शवतो ?
आधीच तो तव कृपाळू । वरी गुरू आज्ञेचा बोलू । जाला जैसा वरिषा काळू । खवळणे मेघा ।।
आर्ताचेनि वोरसे । गीतार्थ ग्रंथनमिसे । वरिखला शांतरसे । तो हा ग्रंथू ।।
तेथ पुढा मी बापिया । माडिला आर्ती आपुलेया । की ययासाठी येवडेया । आणिलो यशा ।।
५) संभाजीराजांवर बदफैलीपणाचा आरोप करणारे बाजीराव-मस्तानीच्या प्रेमाचे मात्र 'अद्वितीय' , 'दैवी' अशी विशेषणे लावुन गोडवे का गातात ? हा दुटप्पीपणा न्हवे काय ?
ह्या आणि अशा अनेक खोट्या संदर्भांचे वस्त्रहरण करणे हाच आमचा ह्या लेखनामागील उद्देश आहे. येथील जाणकार अजुन मुद्दे उपस्थीत करुन इथल्या दांभिक लोकांना घाम फोडतीलच. तुम्हा सर्व जाणकारा अभ्यासुंच्या मदतीने लवकरच नव्या इतिहास सुर्याची पहाट उगवणार आहे हे निश्चीत.
आणखी एक राहूल
आणखी एक राहूल!
बातमी पहा.
एक दुर्दैवी गोष्ट !
भारतीय जनता पक्षाच्या आतील गोटातील काही पॉवर ब्रोकर पैश्यांसाठी त्यांना प्रवेश देण्यासाठी प्रयत्न करून यशस्वी पण होतील. ज्यांनी आयुष्यभर पक्ष्याचा प्रचार केला त्यांच्यावर खुप वाईट दिवस येतील.
१. हे गुणी बाळ प्रवेश केल्यावर वडिलाच्या पुण्याईवर सर्व धुरिणांना " मार्गदर्शन " करतील.
२.यांनी लावलेले दिवे इतके प्रकाशमान आहेत की कार्यकर्ते भांबाउन जातील. विरोधक अधिक आक्रमक होतील.
३.निखिल वागळेना दोन विषय मिळतील. एक- प्रवेश द्यावा का? दोन प्रवेश दिल्यावर ( किंवा न दिल्यावर) तोयोग्य आहे का? त्यांचा टिआरपी वाढेलच पण सामान्य कार्यकर्त्याना काय?
अवांतर :::: हे कसले संघाचे संस्कार ?
हा राजकारणातील प्रवेश हाणून पाडला पाहीजे.
बन्धन भावनेचं!!
(मागच्या वेळी केलेल नमन आता या वेळी सुद्धा आहे, पण गणपा भाउ, जागुताई अन केशवजीं बरोबर फोटो अन व्हिडिओ साठी आदरणीय बहुगुणी अन आपले सर्वांचे लाडके धमाल मुलगा यांचे जाहिर रित्या आभार!!
तुम्ही मदत केली नसती तर, कुठली अपर्णा, अन, कुठला हा लेख!!)
अरे हो राहिल प्रिय डॉन रावांनी मला अक्षर रंग अन इतर सुविधा देण्याच आश्वासन दिल्या मुळे इथुन पुढे मीही थाटात रंग बदल बदल के लिहिणार आहे!! ठ्यांक्यु ह डॉन साहेब!!
आला क्षण , गेला क्षण.
कसे जगायचे ठरवा आपण !!!
गेले दोन दिवस राखी बांधायच्या कल्पनेन कळवळलेले, काय ओवाळणी घालावी या विचारानं तळमळलेले, अन राखी बांधून घेण्या आधी जिम जॉईन कराव आणि बहिणीच रक्षण करण्यास समर्थ व्हाव असे सगळे मुद्दे मि.पा वरील बंधूंनी चर्चिले.
माझ्या नजरेन पाहाल तर सण आहे साजरा करा! ज्या भावनेन त्याचा उपज झाला त्या भावनेचा आदर करा अन आला क्षण साजरा करा!
कुणास ठाऊक उद्या सण असेल पण साजरा करायला सोबत नसेल? उगाच डोक आहे म्हणून सारख चालवलच पाहिजे का? कधीतरी रूढी म्हणून; परंपरा म्हणून; अश्या चांगल्या पद्धतिं समोर मान तुकवावी, म्हणजे मनाला रुख रुख नाही रहात!! काय ? खर ना?
तर चला आज काय करायचं माहिती आहे? हो राखी बांधायची! पण मग स्वयंपाक काय?
आज असतो साखरभात ! नारळी पौर्णिमा साजरी करण्या साठी अगदी स्पेश्शल!. हो हो नारळी भात पण म्हणतात पण माझ्या सासूबाई साखर भात करतात आज.
तर घ्या साहित्य:
१ वाटी बासमती तांदूळ.
३/४ वाटी साखर.
२ टेबल स्पून साजूक तूप. ( नुसत तूप म्हंटल तर काय वेगळ असत?)
३ लवंगा.
२ दालचिनीचे तुकडे.
४-५ वेलदोडे.
जायफळ .
केशर
थोडस मीठ
झाल!
अरे हो मेन इंग्रेडियअंट राहिला ना? लिंबू ! चांगले दोन!!.
आत्ता कृती :-
तांदूळ धुवून निथळत ठेवा. केशर दुधात भिजत घाला. भांड्यात तूप गरम करायला ठेवा. दुसरया एका भांड्यात भाता साठी पाणी गरम करायला ठेवा.
तूप तापल की लवंग दालचिन वेलदोडे तडकावून घ्या.
अन तांदूळ छान वास सुटे पर्यंत भाजून घ्या. थोड मीठ घालून वरून गरम पाणी घाला अन भात अगदी चांगला सुटसुटीत असा तयार होऊ द्या .
हा भात तयार होई पर्यंत ३/४ वाटी साखरेत तेव्हढंच पाणी घालून चांगल खळ खळ उकळवून घ्या. जवळ जवळ एक तारी पाक तयार होतो याचा!. आता तयार होत आलेल्या भातावर थोड जायफळ किसून घाला अन वरून हा तयार झालेला पाक ओता.
अगदी हलक्या हातां फक्त बाजूने हा पाक खाली पर्यंत पोहोचतो आहे ना याची खात्री करण्या करता भात हळुवार उचलून परत सेट होऊ द्या. परत एकदा भात मुरत आला अगदी सगळा पाक कोरडा होत आला, की केशर खलुन ते दुध घेवून एक अधिक चिन्ह काढा. म्हणजे भाताला केशराचा वास तर येईल पण थोडा केशरी अन थोडा पांढरा असा सुरेख भात तयार होईल. तुम्हाला नारळी भातच हवा असेल तर आत्त्ता त्यावर खोवलेला नारळ पसरवुन परत एकदा हलक्या हाताने मिसळा.
सगळा भात तयार झाला की मग शेवटी जवळ जवळ १ टेबल स्पून एव्हढा लिंबाचा रस या भातावर पिळा, अन आच बंद करा.
हा घ्या भात.
आता एव्हढी तयारी झाल्यावर राखी पण बांधलीच पाहिजे ना? बस एव्हढा एक दिवस निरागस व्हा अन सण साजरा करा.
कसा? अस्स्स्सा !!!!
पल पल दिल के पास...
हे लेखन माझा मित्र चंद्रशेखर महामुनीचे आहे. आधी इ-सकाळवर प्रकाशित झालंय पण त्याच्या परवानगीने इकडे प्रकाशित कर्तेय...
पल पल दिल के पास...
हर शाम आँखोपर तेरा आँचल लहेराये,
हर रात यादों की बारात ले आये
मै सॉंस लेता हूँ, तेरी खुशबू आती है
इक महका महका सा, पैगाम लाती है
मेरे दिलकी धडकन भी, तेरे गीत है
पल पल दिल के पास, तुम रहती हो
जीवन मिठी प्यास, ये कहती हो...
प्रियतमेच्या आठवणींचं, जळी, स्थळी, काष्ठी, पाषाणी सर्वत्र भासणाऱ्या तिच्या हव्याहव्याशा अस्तित्वाचं इतकं अप्रतिम वर्णन खूप कमी ठिकाणी वाचायला मिळतं. "मणिकांचन योग', "समसमा संयोग', "दुग्धशर्करा योग', असे जे काही शब्द आपण अशा वेळी वापरतो ते सारे शब्द, साऱ्या उपमा "ब्लॅकमेल' मधल्या या अनुपम गाण्यासाठी अगदी यथार्थ आहेत.
हिंदी चित्रपटातील काही गाणी अशी असतात, की एखादं गाणं आपण फक्त ऐकतो, तेव्हा त्याच्या चित्रीकरणाविषयी आपल्या मनामध्ये एक प्रतिमा तयार होते, पण जेव्हा ते गाणं आपण पडद्यावर पाहतो, तेव्हा मात्र भ्रमनिरास होतो. दिग्दर्शकानं आपल्या मनातल्या गाण्याची पार वाट लावलेली आपल्याला त्या वेळी दिसते. (रात का समॉं - लता - जिद्दी - या सुंदर गाण्याच्या बाबतीत मी स्वतः या अनुभवातून गेलोय.)
काही गाणी रुपेरी पडद्यावरच्या नितांत सुंदर चित्रीकरणामुळे मनात कायमची घर करून राहतात. (रमय्या वस्तावय्या - श्री 420, मेरे सपनों की रानी - आराधना) काही गाणी अशी असतात, त्यांची श्रवणीयता इतकी उच्च असते, की ती पडद्यावर न पाहताही आपल्या परिपूर्ण संगीताची अनुभूती देतात. "पल पल दिल के पास' मात्र या दोन्ही पातळ्यांवर आपल्याला आनंद देतं. तरल रोमॅंटिक गाण्यांमध्ये या गाण्याला खूप वरचं स्थान द्यावं लागेल; कारण ते "एव्हरग्रीन रोमॅंटिक' आहे.
सत्तरच्या दशकामध्ये इतिहास घडविलेल्या गुलशन रायच्या आणि देव-हेमामालिनीच्या "जॉनी मेरा नाम'च्या निमित्तानं गोल्डी (विजय आनंद) आणि संगीतकार कल्याणजी-आनंदजी यांची गाठ पडली. बॉक्स ऑफिसवर कोणती चाल हीट होईल, याचे अचूक अंदाज असणाऱ्या आणि सदासर्वदा गप्पांची मैफल जमविणाऱ्या बडबड्या कल्याणजींपेक्षा हळूवार, मितभाषी अशा धाकट्या आनंदजींबरोबर गोल्डींचे सांगीतिक सूर जास्त जुळले. त्यामुळे जॉनी मेरा नाम, ब्लॅकमेल, कोरा कागज या सगळ्या चित्रपटांमध्ये या दोघांनी एकत्र बसून जास्त काम केलं. "जॉनी'च्या बंपर यशानंतर राखी-धर्मेंद्रच्या "ब्लॅकमेल'साठी गाण्यांच्या सीटिंग्ज सुरू झाल्या.
राजेंद्रकृष्णसारखा पट्टीचा आणि अनुभवी लेखक-गीतकार या चित्रपटासाठी होता. गोल्डीला एक हळूवार प्रेमगीत हवं होतं. त्याचं शूटिंग कसं करायचं याचा विचार त्यानं आधीच पक्का केला होता.
त्यानं कल्याणजी-आनंदजींना गाण्याची सिच्युएशन सांगितली, "नायक एका मुलीवर प्रेम करतोय, पण ते तिला सांगायचं धाडस काही केल्या त्याच्यानं होत नाही एवढा तो लाजाळू आहे. आपल्या प्रेमभावना मग तो दररोज लिहायला सुरवात करतो, पण चिठ्ठी तिच्यापर्यंत पोचविण्याची हिंमत त्याच्यात नाही. अखेर एके दिवशी धाडस करून तो त्या सगळ्या चिठ्ठ्या, ती प्रेमपत्रं तिला देतो आणि नायिका वाचत असताना ती पत्रंच गायला लागतात. नायकाच्या भावना तिच्यापर्यंत पोचवितात.'
गोल्डीच्या डोक्यातली ही भन्नाट कल्पना ऐकून दोघंही चक्रावून गेले. याच्यावर गाणं कसं बनवायचं, हा प्रश्न उभा राहिला; कारण चिठ्ठ्या गाणार होत्या! कल्पनांची देवाण-घेवाण सुरू झाली. दिवस लोटले. गाण्याच्या शूटिंगचा दिवस येऊन ठेपला, पण चाल काही तयार होईना. आदल्या दिवशीच्या रात्री पुन्हा बैठक जमली आणि सर्जनशील गोल्डीच्या मनात एक ओळ उमटली, "पल पल दिल के पास, तुम रहती हो...' त्यानं ही ओळ सांगताच आनंदजींना लगेच त्याची चाल सुचली. "जीवन मिठी प्यास ये कहती हो...' गोल्डीला लगेचच पुढचे शब्द सुचले. लगेच त्यालाही चाल लागली आणि पाहता पाहता गाण्याचा मुखडा तयार झाला.
दुसऱ्या दिवशी राजेंद्रकृष्ण आल्यानंतर गोल्डीने त्यांना सगळा किस्सा सांगितला आणि क्षमा मागून मुखडा समोर ठेवला. राजेंद्रकृष्ण यावर काही बोलले नाहीत. त्यांनी बराच वेळ विचार केला, पण कदाचित त्यांनाही या मुखड्याला पर्यायी शब्द सुचले नसावेत. त्यांनी तेच शब्द कायम ठेवून अत्यंत अप्रतिम असे एकाहून एक सरस तीन अंतरे लिहून दिले आणि एका अवीट गाण्याचा जन्म झाला!
पण मंडळी खरा क्लायमॅक्स अजून पुढेच आहे. गाणं तयार झालं खरं, पण शूटिंग आधीच ठरलेलं असल्यानं रेकॉर्डेड गाणं हातात नसताना, गोल्डीनं गाण्याचं "मीटर' डोक्यात ठेवून, त्यानुसार धर्मेंद्रला गाणं गुणगुणायला लावून आपल्या अद्भुत कल्पनाशक्तीनं गाणं शूट केलं. त्यानंतर आपल्या "गोल्डन' आवाजात किशोरनं ते रेकॉर्ड केलं. आज हेच गाणं पाहात किंवा ऐकत असताना आपल्याला या सगळ्या गोष्टींचा पत्ता तरी लागतो का?
- चंद्रशेखर महामुनी
nishad.pune@gmail.com
राजीव'जींना ६६व्या जयन्तीनिमित्त विनम्र अभिवादन! ..... WE STILL MISS YOU..~~ RAJEEV'JI! LOVE YOU!
~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~
आज २० ऑगस्ट, २०१०

राजीव'जी, तुमच्या ६६व्या जन्मदिनानिमित्त तुम्हाला विनम्र अभिवादन!
आज तुम्ही असता.... तर देशाचे चित्र कदाचित वेगळे असते! ......
WE MISS YOU!
साहित्य संमेलन अध्यक्ष आन वाद
साहित्य संमेलनाध्यक्षाच्या निवडणूका येऊन राह्यल्या. वाद-विवादाचा धुराळा उडाला लागलाय. साहित्यिक गिरिजा कीर आयबीएन लोकमतमधल्या एका चर्चेत म्हणल्या ''झोपडपट्टील लोकांकडे साहित्य प्रतिभा नसते'' आन काल स्टार माझाच्या चर्चेत त्या म्हणल्या ''माझ्या विधानाचा विपर्यास केला गेला''कोण चूक बोल्लं कोण बराबर बोल्लं ह्याच्यावर काथ्याकूट नाय कराचा मला. कोटीच्या घरात मराठी बोलणारी मंडली हाय आन साडेसातशे लोक जे साहित्य परिषदांचे निवडलेले मोजकेच सदस्य हायेत ते साहित्य मंडलाचे अध्यक्ष ठरतो ही गोठ काय बरी वाटत नाय. ज्यायला ज्यायला मराठी लेखन कराची, वाचाची हौस हाये अशा लोकायला मद्दान करुन दिले पाहिजेन. तुम्हाला काय वाट्टे ?
जालवाणी - अभिवाचनाचा अंक
काय म्हणता ?
मिसळपाव व्यवस्थापन
नमस्कार,
मिसळपाववर नवीन काही सोय देताना किंवा काही बदल करतांना किंवा केल्या नंतर सर्व सदस्यांचे मत घेतले जाते. त्यावर एक धागा व्यवस्थापनाकडून काढला जातो त्यात्या विषयावर सदस्यांची जी मते आहेत ती मागवली जातात. सदस्यांनी आपले मत तेथे देणे अपेक्षीत असते. तसेच मिसळपाववर व्यवस्थापनाचा असा प्रयत्न आहे की ज्या सदस्यांना शक्य आहे त्यांना मिसळपावच्या कामात सहभागी करून घ्यावे. या सर्वांचा हेतू हाच की मिसळपाव हे प्रत्येकाला अधिकाधिक आपले वाटावे. आणि ते तसे आहे सुध्दा.
मात्र एवढ्यात असे लक्षात आले आहे की काही धागे आणि काही निवडक प्रतिसाद हे मिसळपाव कसे असावे आणि कसे नसावे आदींवर केंद्रित आहेत. या सर्व धाग्यांऐवजी ह्याच चर्चा त्यात्या आधिकारीक धाग्यांवर करता आल्या असत्या. असे असतांना अश्या व्यवस्थापकीय विषयावर चर्चा सुरू करणे योग्य नाही. यापुढे कृपया असे टाळावे.
मिसळपाववर काय असावे? काय नको? ते कसे चालावे? कसे दिसावे आदी कुठल्याही बाबतीत सदस्यांना आपले मत देण्याची मूभा आहे. नव्हे सदस्यांचा तो तसा अधीकार आहे. मात्र हा अधिकार जवाबदारीने वापरावा अशी रास्त अपेक्षा व्यवस्थापनाची आहे. मिसळपावच्या व्यवस्थापनाच्या बाबतीत कुठल्याही विषयावर यापुढे सरपंच या आयडीवर संपर्क करावा. तसेच मिसळपावचे विस्तृत संपादन मंडळ आहे. आणि त्यांची नावे जाहीर आहेत. तुम्हाला कुठल्याही अडचणीसाठी ते हजर आहेतच. मात्र अनेक सदस्यं आपल्या प्रतिक्रियांत आणि स्वाक्षर्यांत संपादकांबाबत टिप्पणी करीत असतात, ते त्यांनी टाळावं अशी अपेक्षा आहे. संपादक एकाच वेळी संपादक आणि सदस्यं या दोन्ही भूमिकेत असतात. तेव्हा त्यांच्याशी व्यक्तिगत पातळीवर चर्चा, मैत्री आणि चेष्टा समजू शकतो, मात्र एक संपादक म्हणून त्यांना काहीही बोलणं सदस्यांकडून अपेक्षीत नाही. एखाद्या विषयावर केवळ सरपंचांचेच मत अपेक्षीत असेल तर तसे लेखन जाहीर करण्याची मूळीच गरज नाही ते सरळ व्यक्तिगत निरोपाने पाठवावे. मात्र जाहीर लेखनावर केवळ सरपंचांनी मत द्यावे संपादकांनी नको असे लिहीने अजीबात खपवून घेतले जाणार नाही.
यापुढे कृपया असे प्रकार टाळावेत. मिसळपाववर अनेक जेष्ठ सदस्यांचा खूप मोठा अधिकार आहे. मात्र असे असतांना नवीन येणार्या सदस्यांना मिसळपाववर गैरसोईची वातवरण तयार होऊ नये याबाबत खबरदारी घेण्याची जबावदारी सर्व जेष्ठ सदस्यांची आहे. तरी यापुढे या सूचनांचे पालन सर्वांकडून होणे अपेक्षीत आहे.
मिसळपाववरील कसल्याही व्यवस्थापकीय अडचणीसाठी सरपंच आणि संपादक मंडळ हजर आहे. त्यांची मदत घ्यावी. जाहीर धागे काढू नये.
धन्यवाद,
- सरपंच
वाचनखुणा
आधी प्रत्येक लेखाला वाचनखुण साठवायची सोय होती ती आता नाही...त्यामुळे वेगवेगळे लेख आणि मुख्य म्हणजे पाकृ साठवायला जमत नाहीत...कृपया वाचनखुणा हि सोय परत उपलब्ध करून द्यावी.
आधीच्या एका धाग्यात बरेचदा विनंती करूनही सोय अजूनही उपलब्ध नसल्याने परत एकदा आठवण करून देण्यासाठी हा धागा काढला आहे.
काही technical कारण आहे का कि हि सोय उपलब्ध करून देता येत नाही?

