टंकलेखन साहाय्य
सामर्थ्यदाता : गमभन !
प्रकटन
संभाषणातील आनंद
प्रेषक धोंडोपंत ( शनी, ०५/१७/२००८ - ०७:३८) .काही वेळा कुणीतरी आपल्याशी फार रंगात येऊन बोलत असतं. अशा वेळेस त्या व्यक्तिकडून काही चुकीचे संदर्भ दिले जातात. त्यावर तुमची प्रतिक्रिया काय असते? तुम्ही लगेच त्याला त्याची चूक दाखवता वा त्याच्या चुका न दाखवता, त्याच्या रंगाचा बेरंग न करीत संभाषण चालू ठेवता?
उदाहरणार्थ,
गेल्या वर्षी पावसाळ्यातली घटना. आमच्या स्नेह्यांच्या मोबाईलवर आम्ही फोन केला. ते मुंबईत असतील ही आमची समजूत. पण ते तेव्हा कोकणात होते. त्यांनी फोन घेताच ते उत्साहाने बोलायला लागले.
"नमस्कार पंत... आत्ता गुहागरला आहे.....समुद्रकिनार्यावर भटकतोय. काय मौसम आहे हो! वा वा. हलकासा पाऊस पडतोय.... आभाळ मेघाच्छादित आहे. सर्वत्र हिरवेगार डोंगर...
पाडगावकरांनी काय सुंदर लिहिलाय हो
"श्रावणमासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहिकडे....क्षणात येते सरसर शिरवे, क्षणात फिरुनी उन पडे".
या पाडगावकरांच्या ओळी गुणगुणत मी समुद्रकिनार्यावर भटकतोय......................"
आम्ही बालकवींची मनातल्या मनात क्षमा मागितली. व त्यांना म्हटले
"हो ना, पाडगावकर म्हणजे काय? विचारूच नका".
आपल्या आयुष्यात असे प्रसंग घडले असतील तर सांगावे.
धोंडोपंत
ट्रकवाले - २
प्रेषक स्वयंभू ( शुक्र, ०५/१६/२००८ - १८:५५) .आत जाऊन सिट वर बसलो आणि हा ट्रक कुणाचा असा विचार करत असतानाच मागच्या बाका वरून आवाज आला 'मै अर्जून'. ट्रकचा मालक आरामात मागच्या अरूंद बाकावर बसरला होता. 'मै जोशी' 'ऐसी बारीश बरसोंके बाद लगी है, रात भर चलेगी शायद' असं म्हणून त्याने खिडकीतून आकाशाकडे पाहीलं.'
मी मनात म्हटलं असं नको म्हणू मेल्या, तू इथेच आडवा पडून रहशील. मला ३५-४० किलोमीटर बाईक हाकत जायचंय घरी.
क्या करते हो आप.
मला त्याला ऍड एजन्सी मध्ये कॉपीरायटर म्हणजे काय हे कसं समजवावं हे न सुचल्याने मी म्हणालो 'प्रायवेट कंपनी में हूं'
हं...
हं...
ये ट्रक आपका है?
ह्या वर तो हाहाहा करून हसला.
अगर मेरा ट्रक होता तो और क्या चाहिये था...
बहुसंख्य ट्रक वाल्यांप्रमाणे हा सुद्धा दुसऱ्या कुणाचा ट्रक चलवत होता. आणि बहुसंख्य ट्रक वाल्यांप्रमाणेच आपल्याही मालकीचा एखादा ट्रक असावा हे त्याचं स्वप्न होतं.
कबसे चला रहे हो ट्रक?
कुछ ६-८ साल हो गये. छोटा था तब पिताजी के साथ घुमता था. वो भी ट्रक चलाते था. बडा होने पर उन्होने अपने मालीक की ट्रांसपोर्ट कंपनी मे लगा लिया. और तबसे घर छूट गया.
आता हा पुढे ट्रक ऍक्सीडंट मध्ये वडील गेले असं सांगतो की काय असं वाटलं. पण सुदैवाने ते जिवंत होते. पण आता वयामुळे असं ट्रक चलवणं जमत नव्हतं. म्हणून त्याच्या वडिलांनी गावातून जाणाऱ्या हायवे वर ट्रकचं गॅरेज काढलं होतं. घरी आई, वडील, बायको आणि एक ३ वर्षाचा मुलगा होता. इतर ट्रक चालवणाऱ्या लोकांप्रमाणे हा सुद्धा आयुष्यावर नि गरीबीवर वैतगलेला असेल असं मला वाटलं. पण हा तर एकदम जॉली माणूस निघाला. त्याने आता रस्ता म्हणजेच आपलं घर हे सत्य स्विकारलं होतं.
तुम ऐसे हमेशा घर से बाहर रहेते हो, बिवी कुछ बोलती नहीं?
पेहले बोलती थी, मगर उसके पिताजी भी ट्रक चलाते थे. सो उसे आदत है. मुझे भी शुरुवात में बहुत याद आती थी घर की. पर अब एहसास भी कुछ धुंधलेसे हो गये है.
आप कहांसे हो?
कहांसे मतलब? यहीं से हुं. जनम बंबई मे ही हुवा है.
मुंबई
हां. अब मुंबई. मगर मेरा जनम हुवा तब वो बंबई ही थी. हा हा हा हा
मी पण हा हा हा हा
मनात विचार आला हा तर साला ओरिजीनल ट्रकवाला नाहीये. ट्रकवाला म्हटलं की उंचा पुरा मध्यमवयीन पंजाबी माणूस, छाती पर्यंत वाढलेली पिकलेली धाढी, डोक्यावर फेटा, असा अवतार डोळ्या समोर येतो.
तेवढ्यात हा बोलला 'वैसे गांव पंजाब में है. पिताजी और मां अब वहीं रेहते है.' मी जरा खुश झालो.
कभी जाते हो उनसे मिलने.
कभी कभी डिलीवरी के लिये गांवसे गुजरता हुं तब मिल लेता हुं.
अर्जुन अशिक्षीत असला तरी असंस्कृत नव्हता हे मला त्याच्याशी झालेल्या पुढल्या भेटींतून उलगडत गेलं. हॉर्न - ओके - प्लीज चा अर्थ त्यानीच मला समजावला. हॉर्न (उजवीकडे) - ओके (मध्यभागी) - प्लीज (डावीकडे) असं लिहिलेलं असतं. ह्याचा अर्थ म्हणजे उजव्या बाजुने ओवरटेक करायचा असेल तर हॉर्न वाजवा, मागे मागे यायचं असेल तर ठीक आहे, नि डव्या बाजूने जायचं असेल तर प्लिज जा. हॉर्न ची गरज नाही.
गपा मारता मारता त्यानी मला विचरलं लग्न झालंय का? मी नाही म्हणाल्यावर तो एकदम आश्चर्य चकीत झाला. त्याच्या लग्नाला ४ वर्ष झाली होती. नि मी त्याच्यापेक्षा मोठा असून अजून एकटाच होतो. नालायक परी ने ही त्याची बाजू घेतली. माझी सुटका करून घेण्यासाठी त्याच्या लग्नाचा विषय काढला.
त्याचा प्रेम विवाह होता. पण बायको मुसलमान होती. तिचे वडील सुद्धा ह्याच्याच ट्रांसपोर्ट कंपनीत ट्रक चालवायचे. त्यांच्या मोठ्या मुलाच्या लग्नात ह्याची तिच्याशी ओळख झाली. ह्याला ती बघता क्षणीच आवडली. हळू हळू भेटी गाठी वाढत गेल्या नि दोघे प्रेमात पडले. एकत्र जगण्या मरण्याच्या शपथा घेऊन झाल्या. एके दिवशी अर्जुन ने घाबरत घाबरत वडीलांसमोर विशय कढला. सांगीतलं मला शहीदा आवडते. शांतपणे विचार करून ते म्हणाले 'बेटा, तेरे खुशी में ही हमारी खुशी है. मगर मै रफीक को जानता हुं. वो कभी नही मानेगा.' ह्याने एकदा घरून परवानगी मिळाल्यावर तिला तिच्या वडीलांशी बोलायला सांगितलं. अपेक्षे प्रमाणेच ते भडकले. घरी येऊन हात पाय तोडायच्या धमक्या देऊन गेले.
मग महिना भर शहीदा घरात बंद होती. तिची आई मात्र नशिबाने त्यांच्या पाठीशी होती. तिला हाताशी घेऊन ह्यांनी एक प्लॅन बनवला. दोघांनी ह्याच्या गावाला पळून जाऊन लग्न करायचं. इथलं शांत होई पर्यंत त्याच्या भावाच्या घारी रहायचं. पोटा पाण्या साठी त्याच्या भावाने तिथल्या एका हॉटेल मध्ये ह्याच्या नोकरी विषयी बोलुनही ठेवले. ठरल्या प्रमाणे हे दोघे मध्य रत्री घरून निघाले. पण नशीब आडवं आलं. तिचे वडील त्या दिवशी ड्युटी संपवून लवकर घरी आले नि ह्यांना बघितलं. आरडा ओरडा करून मोहोल्ल्यामधली माणसं जमवली नि ह्याला बेदम मारलं.
पोटच्या पोराची ही अवस्था बघून ह्याचे वडीलांचं पंजाबी खून सळसळून उठलं. रफ़ीकच्या घरी जाऊन 'दिन दहाडे तेरी बेटी को तेरे आखोंके सामने ले जाउंगा, जो उखाडना है वो उखाडले' असं सांगून आले. नि अर्जुन बरा झाल्यावर खरंच एके दिवशी त्याच्या घरी ६ ट्रक भरून माणसं घेऊन गेले. निघण्यापुर्वी शहीदाला विचरलं 'बेटा, तुझे इस शादी से कोइ ऐतराज तो नहीं. ' ती नाही म्हणाल्यावर दोघांना घेऊन तडक रजिस्ट्रार ऑफीस गाठलं नि लग्न लाऊनच परत आणलं. माणसं जमवणं, पोलिसांना पुर्व सुचना देणं, रजिस्ट्रार ऑफीस मध्ये तारीख घेणं ह्या सगळ्या तयाऱ्या त्याच्या वडीलांनी आधीच केल्या होत्या. भारी माणूस.
त्या नंतर तिच्या वडीलांनी तिच्याशी बोलणंच टाकलं. आई मधून मधून दर्ग्यात भेटायची. वडीलही मुलीच्या भेटीसाठी मनतल्या मनात झुरत होते. तिला ह्या काफिरांच्या घरी त्रास होउ नये म्हणून अल्ला ला सकडं घालायचे. पण सरळ बोलायला इगो आड येत होता. तोही एके दिवशी गळून पडला. शहीदा ला ६ वा महीना चालू असतान ती एकदा दर्ग्यात गेली होती. बाहेर पडताना समोरून तिचे वडील आले. तिला तसं बघून ते क्षणभर थांबले नि मग तिला एकदम मिठी मारून मनाचा बांध फुटल्या सारखे रडायला लागले. अश्रुंसोबत मनतली जळमटंही वाहून गेली.
थोड्या वेळाने पाऊस थांबला आणि मी घरी जायला निघालो. तर हा म्हणाला 'अब इतनी रात गये कहां घर जा रहे हो? यहीं सो जाओ ट्रक में. पिछे कंबल डाल के देता हुं. चाहो तो यहां बाकडे पे सो जाओ' मी म्हटलं 'रात का डर नही भाई. रात अपनी सहेली है. फिर मिलेंगे.'
ट्रकवाले
प्रेषक स्वयंभू ( शुक्र, ०५/१६/२००८ - १६:२७) .ट्रकवाले हा तसा जगाने वाळीत टाकलेला विषय. पण का कोण जाणे मला दिवस दिवस रस्त्यावर प्रवास करणाऱ्या ह्या लोकांविषयी कुतुहल वाटत आलंय. सुदैवाने मला ह्यांचं आयुष्य जवळून बघायची संधी मिळाली. आणि ते अनुभव आता तुमच्या समोर मांडण्याचा विचार आहे. कसं वाटतंय हे नक्की सांगा. तुमच्या प्रतिक्रीया पाहून पुढला भाग लिहावा की नाही ही ठरवेन.
----------------------------------------------------------------------------------------------------
कधी काळी माझा आणि ह्यांचा संबध येईल आणि त्यांच्यावर मी चक्क एक लेख लिहीन असं मला स्वप्नातही वाटलं नव्हतं. पण संबंध आला आणि आता मी लेखही लिहितोय.
दारूडे, बेजबाबदार पणे सुसाट गाड्या हाकणारे, दिवसचे दिवस घरापासून दूर राहणारे, शरीराची गरज भगवण्या साठी वेश्यांकडे जाऊन पाठीशी रोग लाऊन घेणारे, अशिक्षीत, मॅनरलेस, गलिच्छ. अशी बरीच विशेषणं त्यांच्या फार जवळ न जाता जगानी त्यांना चिकटवली आहेत.
जुन्या मुंबई पुणे महामार्गा सारखाच मुंबई - अहमदाबाद हा सुद्धा माझा अतिशय आवडता रस्ता आहे. रात्री अपरत्री, धो-धो पावसात, टळटळीत दुपरी, अशा प्रत्येक वेळी मी इथे गेलोय. आणि दर वेळे वेगवेगळया लोकांना भेटलोय. असंच एकदा हौस म्हणून बाईक वरून मुंबई - अहमदाबाद महामार्गावर फिरता फिरता मला विरार च्या पुढे सधारण १०-१५ किलोमिटर वर एक ढाबा दिसला. आज काल कुत्राच्या छत्र्यांप्रमाणे महामार्गांवर असणाऱ्या ढाब्यांसारखा हा 5 Star AC ढाबा नव्हता. साध्या सरळ मध्यमवर्गीय माणसा प्रमाणे संस्कृतीशी इमान राखून असणारा ढाबा होता.
समोर गाड्या पार्क करायला मोकळी जागा आणि आत मध्ये साधारण २५-३० माणसं बसू शकतील इतका हॉल, त्या पलीकडे किचन असा आटोपशीर पसारा होता. पावसाळा सोडल्यास बाकीचे दिवस बाहेर खाटाही टाकलेल्या असत. तिथे अजुनही खऱ्या तंदूरी मध्ये जेवण बनवलं जातं. विजेवर चालणाऱ्या तंदूरीत नाही. त्यामुळे परठ्यांना शुद्ध तुपासोबातच कोळशाच्या रांगडा चवही येतो. लस्सी अजुनही हाताने घुसळूनच बनवली जाते. अगदी ऑथेंटीक ढाबा.
मला भेटलेला पहीला ट्रक वाला म्हणजे अर्जून. जुलै महिन्यात एके रात्री प्रचंड पाऊस पडत असताना मी साधारण २ च्या सुमारास ढाब्यावर पोचलो. ढाब्या समोरच्या मोकळया जागेत पावसामुळे लहानसं तळं तयार झालं होतं. मी नेहेमी प्रमाणे अगदी दरवाज्या पशी जाऊन बाईक पार्क केल. बाजूच्या रामचंदर पान वाल्याला हात दाखवला. हा पान वाला २४ तास सुरू असतो. सकळी भाऊ बसतो आणि रत्री हा. त्या दिवशी पाऊस जरा जास्तच जोरात पडत असल्याने ढाब्यावर बरीच गर्दी होती. आत शिरण्या इतकीहि जागा नव्हती. लोकं (ट्रक वाले) वाफाळता चहा पीत पीत पाउस कमी होण्याची वाट बघत होती. आता पर्यत बऱ्याच वेळा तिथे गेल्याने ढाब्याचा मॅनेजर 'परी' माझ्या चांगला ओळखीचा झाला होता.
आता काय करावं ह्या विचारात असतानाच परी एका हातात छत्री नि दुसऱ्या हातात चाहाचे तीन ग्लास घेऊन आला नि म्हणाला चल. कुठे, कशासाठी, वगैरे न विचारता त्याच्या मागून गेलो. तो एका ट्रक पाशी जाऊन थांबला. दार वाजवलं. दार आतून उघडल्या गेलं. ह्याने कप आत दिले, स्वतः चढला आणि मलाही आता यायची खुण केली. आत जाऊन सिट वर बसलो आणि हा ट्रक कुणाचा असा विचार करत असतानाच मागच्या बाका वरून आवाज आला 'मै अर्जून'. ट्रकचा मालक आरामात मागच्या अरूंद बाकावर बसरला होता. 'मै जोशी' 'ऐसी बारीश बरसोंके बाद लगी है, रात भर चलेगी शायद' असं म्हणून त्याने खिडकीतून आकाशाकडे पाहीलं.'
फक्त ती सुखात राहायला हवी...
प्रेषक पुन्हा सतिश गावडे ( शुक्र, ०५/१६/२००८ - ०९:३९) .त्याने मला विचारलं की
खरच आवडते ती तुला ?
जेव्हा तू एकटाच असतो
वेड लावते का जिवाला ?
मी हलकेच हसलो तेव्हा
अन् उत्तर दिलं मी त्याला
अरे, माझा प्रत्येक श्वास
तिच्यासाठी आसुसलेला
अरे मग तू विचार ना तिला
त्याने अनाहूत सल्ला दीला
का वाट पाहतो रे तू संधीची
करुनच टाक एकदा फैसला
थोडासा हळवा झालो तेव्हा
आवाजही थोडा ओला झाला
म्हटलं, अस नसतं रे मित्रा
इथे जीव तिच्यात गुंतलेला
अगदी असंच काही नाही मित्रा
की ती माझी सखी व्हायला हवी
जगाच्या पाठीवर कुठेही राहो
फक्त ती सुखात राहायला हवी
(बर्याच दिवसानी मिसळपाव वर आलेला...)
सतीश गावडे
आम्ही इथेही उजेड पाडतो -> मी शोधतो किनारा...
मास्तरांची पेन्सिल स्केचेस
प्रेषक भडकमकर मास्तर ( शुक्र, ०५/१६/२००८ - ०९:३३) .इथे बरेच लोक स्केचेस टाकताना दिसले म्हटले आपणही आपली जुनी स्केचेस शोधून काढावीत आणि टाकावीत.
ते इनलाईन इमेजेस कसे टाकतात ते आधी आठवेना.. नंतर कळाले...
हे काका शाहिदचे बाबा आहेत... पंकजराव कपूर

आणि हे सुबोध भावे आणि डॉ.गिरिश ओक...
अवंतिका मालिकेच्या शूटिंगला जाताना म्हटले त्यांना दाखवावीत , आणि ( त्यांना त्यांच्यावर येणारा प्रसंग कळला की काय कोण जाणे)नेमके हे दोघे तिथे नव्हतेच...
( आम्ही अवंतिकेत दोन पाच ओळींचे फुटकळ काम केले हे अभिमानाने सांगायची गोष्ट नाही हे आम्ही जाणून आहोत, त्याबद्दल आमचे कान धरू नका आधीच सांगतोय...
शूटिंग च्या अनुभवाबद्दल पुन्हा कधीतरी लिहीन) )

क्रांती एका क्षणाची
प्रेषक देवदत्त ( बुध, ०५/१४/२००८ - १९:२१) .२००५ च्या दिवाळीच्या नंतरचे दिवस. दक्षिण रेल्वेचा एक डबा. आमच्या समोर दरवाज्यापासून तिसर्या कंपार्टमेंट मध्ये ते ४ मित्र पत्ते कुटत, गाणी गात प्रवासाची मजा घेत चालले होते. बदाम सात, रमी, झब्बू जे आठवतील ते पत्त्यांचे खेळ चालले होते. आजूबाजूचे ही ३/४ जण त्यांना सामिल झाले. मस्त गट बनला होता त्यांचा. कार्यालयातील गंमतीजमती, विनोद सांगण्यात जो तो वरचढ व्हायच्या प्रयत्नात. दिवाळीच्या सुट्ट्या संपल्यानंतर उद्या पुन्हा कामावर रूजू व्हायचे म्हणून थोडा कंटाळाही आलेला दिसत होता त्यांच्या बोलण्यात. तरी आता परतीच्या प्रवासात घरून आणलेल्या दिवाळीच्या फराळावर मध्ये मध्ये हात मारणे चालू होते. एकंदरीत तरूणाईची मजा चालली होती म्हणा ना.
अशा गंमतीत, थोड्याफार कंटाळ्यात संध्याकाळचे ७/७:३० वाजले असतील. आमच्या २र्या वर्गाच्या स्लीपर डब्यात गर्दी वाढत चाललेली. इकडून तिकडे फिरायला जागा नाही. डब्यात ह्या टोकापासून त्या टोकापर्यंत सगळीकडे लोक बसलेले. लोकांची कुजबुज वाढू लागली. "अरे, ही लोकं जनरल डब्यातील तिकिटे काढून ह्या डब्यात का आलीत?","कोणी काही बोलत का नाही?", "आपले सामान कसे सांभाळून ठेवणार आता." वगैरे वगैरे.
संध्याकाळचे खाणे खाऊन झाल्यावर ते सर्व मित्र गप्पा मारत बसले होते. पुन्हा लोकांची कुजबुज ऐकू आली. तेवढ्यात एक स्टेशन आले. आणखी लोक आत चढू लागले.
अचानक, त्याला काय वाटले कोणास ठाउक. तो तडक उठला. त्याच्या जवळ खाली बसलेल्या माणसांना म्हणाला,"तिकिट दाखवा". त्यांनी जनरल डब्याचे तिकिट दाखवल्यावर तो म्हणाला, "हा डबा रिजर्वेशन वाल्यांचा आहे. ज्यांचे कोणाचे रिजर्वेशन नाही त्यांनी इथून बाहेर जावे". कोणी काही प्रतिक्रिया दिली नाही. तेव्हा त्याने डब्याच्या दरवाज्याजवळ असणार्यांना बाहेर जाण्यास सांगितले. कोणी ऐकत नसल्याचे दिसल्यावर तो मित्रांना म्हणाला की "मी पोलिसांना बोलावत आहे." तिकडून तो उतरून बाहेर गेला. बहुधा रेल्वे पोलिसांना शोधायला. पण का कुणास ठाऊक परत आला. त्याने आपल्या मित्रांना सांगितले," ह्या लोकांना बाहेर जायला सांगा, मी आता खूप रागात आहे."
पुन्हा तो मागे गेला. त्याच्या बसण्याच्या जागेपासून दरवाज्यापर्यंत जेवढे साध्या तिकिटावरचे लोक खाली बसले होते, त्यांना एक एक करून बाहेर जाण्यास सांगू लागला. आम्ही बाकीचे लोक, त्याचे मित्र बघतच राहिले हा काय करत आहे म्हणून. आम्ही कोणी त्याला अडवायचा प्रयत्न केला नाही. पण त्याचे मित्र तयारीत होते की काही धांदल होऊ नये, पुढे त्यांनीही हातभार लावला. ते ही आरडाओरडा करत मग लोकांना बाहेर काढू लागले. एक माणूस म्हणाला, "अरे, राहू दे आम्हाला." पण तो कोणाचे ऐकत नव्हता. दरवाज्यापर्यंतची जागा हळू हळू रिकामी होऊ लागली. लोक उतरून दुसर्या डब्यात चढू लागले. तो संडासाच्या जवळ गेला. तिकडे दोन डब्यांना जोडण्याची जी जागा होती तिथल्या लोकांना म्हणाला, "एक तर दरवाज्याच्या ह्या बाजूला रहा किंवा त्या बाजूला." एक दोन जण ह्या डब्यात आले तर म्हणाला, "इथे यायचे तर खाली उतरावे लागेल." ते लोक लगेच डब्यांच्या जोडणीवरून दुसर्या डब्याकडे गेले. तिकडील सर्व जागा रिकामी झाल्यावर त्याने ते पत्र्याचे शटर खाली ओढून बंद केले. डब्याच्या त्या बाजूचे दोन्ही दरवाजे बंद केले. व डब्याच्या दुसर्या बाजूकडे जाऊ लागला. तिकडे आधीच सर्व रिकामे झाले होते. त्याने लोकांना विचारले, "तो दरवाजा बंद आहे का?" उत्तर मिळाले," हो, ते शटर ही बंद केले आहे."
मग डब्यातील इतर लोकांना तो म्हणाला," तुम्हाला त्या लोकांना बाहेर काढायला काय झाले होते." वास्तविक आमच्या त्या दुसर्या कंपार्टमेंट मध्येही लोक म्हणत होते की त्यांना रिजर्वेशनच्या डब्यात जागा नाही द्यायला पाहिजे. त्यांना बाहेर काढल्यावर सर्वांना थोडे बरे वाटले होते.
आम्हाला वाटले "चला, एक कार्यकर्ता मिळाला", आणि मग डबा शांत झाला.
पण नंतर वाटत होते, त्याने जे केले ते किती बरोबर होते?
नव्हती तेव्हा जागा म्हणून आलेत लोक रिजर्वेशनच्या डब्यात. गर्दीच्या दिवसांत करायचे सहन थोडे. आम्ही नव्हतो का सहन करत? त्याच्या सोबतीचे कोणी त्यांत असते तर त्याने हे केले असते का?
जर त्या लोकांनी मारामारी सुरू केली असती तर ? कारण आजकाल मारामारी व्हायला लहानशे कारणही पुरेशे असते.
पुन्हा तो होता रेल्वेमध्ये, स्वत:च्या घरापासून/राहत्या जागेपासून दूर. का घ्यायची ही जोखीम?
असो, ही होती मी पाहिलेली एक क्रांती. एका क्षणात झालेली. एक क्षण चाललेली.
कवितेचा एक प्रयोग
प्रेषक रामदास ( बुध, ०५/१४/२००८ - १९:००) .सर्जनशीलता वाढावी म्हणून काही प्रयोग शिकण्यासाठी दोन दिवस गेलो होतो.
रँडम वर्ड- सहा शब्द -घेउन , त्यांचा ओळीच्या सुरुवातीस उपयोग करायचा आणि कविता लिहायची असा एक प्रयोग होता.
माझ्या वाट्याला आलेले शब्द असे होते.श्रावण,उन,रावण,वाळू,पापणी,चार,ज्यांचे.
तीन शब्द वापरून मी तीन ओळी लिहिल्या.
उरलेल्या शब्दांचा उपयोग राहून गेला.
कविंनो बघा काही जमतंय का.
श्रावण ,
सरण्यापूवी,
एकदा भिजून घेतो.
उन,
तापण्यापूर्वी,
मोगरा फुलून घेतो
पापण्या
झडण्यापूर्वी,
मनमुक्त रडून घेतो.
ही कविता पूर्ण न करता वेगळी लिहू शकाल का?
शनी मंगळ युती
प्रेषक धोंडोपंत ( सोम, ०५/१२/२००८ - १९:१६) .लोकहो,
ज्योतिष्यातील अत्यंत वाईट समजल्या गेलेल्या शनी मंगळ युतीवर आम्ही आज भाष्य करीत आहोत.
ही युती दिनांक २१ जून रोजी होणार आहे. युतीचे दिप्तांश १० अंश आहेत. म्हणजे मंगळ हा शनीजवळ १० अंश आल्यापासून ते शनीपासून १० अंश जाईपर्यंत या युतीचे परिणाम जाणवतील.
दिनांक २१ जून रोजी मंगळ कर्केत २९ अंश ४३ कलांवर असेल व त्या दिवशी शनी सिंहेत ०९ अंश ४२ कलांवर असेल. त्या दिवसापासून ही युती सुरु होईल. दिनांक १० जुलै रोजी ही युती एका अंशात म्हणजे अंशात्मक असेल. त्यानंतर मंगळ पुढे निघून जाईल व दिनांक ३१ जुलै रोजी ही युती पूर्णपणे तुटेल.
Mars- Saturn conjunction हा सर्व पद्धतीच्या ज्योतिर्विदांनी एक जबरदस्त कुयोग मानलेला आहे. अत्यंत वाईट फळे देणारी ही युती आहे. या फळात मोठे अपघात, ज्यात अनेक माणसे मृत्युमुखी पडतात अशी नैसर्गिक अरिष्टे, वादळे, घातपाती कारवाया, रक्तपात, दहशतवाद, इमारती कोसळणे, बॉम्बस्फोट, भूकंप, मोठमोठ्या आगी, रसायन आणि वायुगळती अशा प्रकारची फळे मिळतात.
तसेच व्यक्तिगत पातळीवर कुंडलीत ज्या स्थानात ही युती पडते, त्या स्थानाने दर्शविलेल्या बाबतीत एखादे जबरदस्त अशुभ फळ मिळते.
सध्या कर्क, सिंह आणि कन्या या राशी साडेसातीत आहेत. त्या राशीच्या लोकांनी फार सावध रहावे. खरे तर सर्वांनीच सतर्क रहावे.
मागील वेळी जेव्हा ही युती झाली होती तो दिवस अजूनही आम्ही विसरलेलो नाही. तेव्हा गुरूपौर्णिमेच्या दिवशी मुंबईमध्ये लोकल गाड्यात बॉम्बस्फोट झाले होते. १२ जुलै २००६.
त्या दिवशी गुरूपौर्णिमा होती. आम्ही गुहागरला होतो. दुपारी गुहागरहून गुरूपौर्णिमेनिमीत्त चिपळूणला आलो. आमच्या गुरूंच्या घरी दूरदर्शनच्या बातम्या लावल्या तेव्हा त्या भीषण बॉम्बस्फोटाची दृष्ये पाहून हबकलो.
जसजसा मंगळ शनीच्या जवळ येतो तसतसा वातावरणात फरक पडतो. ब्रह्मदेशात येऊ घातलेले चक्रीवादळ याचीच सूचना देते आहे काय?
या दिवसांत सर्वांनी सतर्क आणि सावध रहावे. कोणताही अनुचित प्रकार दिसल्यास किंवा कोणी संशयास्पद रितीने वावरतांना दिसल्यास संबंधित शासकीय अधिकार्यांना त्याची त्वरीत सूचना द्यावी. अफवांवर विश्वास ठेऊ नये. रात्रीचे प्रवास शक्य असल्यास टाळावेत. रेल्वे स्थानके, बस स्थानके, सार्वजनिक ठिकाणे, उद्याने, बगीचे, चित्रपटगृहे येथे वावरतांना आजूबाजूस बारीक लक्ष ठेवावे व जबाबदार नागरिकाचे कर्तव्य पार पाडावे.
आपला,
(सावध) धोंडोपंत
क्रमशः
प्रेषक नारदाचार्य ( सोम, ०५/१२/२००८ - १७:२०) .दीर्घ लेखन मालिकेच्या स्वरूपात टाकण्याची एक पद्धत रूढ होऊन गेली आहे. क्रमशः हा त्यासाठी अगदी सोप्पा मार्ग ठरतो की काय अशी भीती वाटावी अशी स्थिती आता निर्माण झाली आहे. काही मालिका उचितच असतात; पण प्रत्येक लेखन हे मालिकेच्या साच्यात बसते असे नाही. अशा वेळी तुकड्यांमध्ये मांडले जाणारे पण कालबद्धता नसणारे लेखन आस्वादाची गंमत घालवून टाकते. लेखनाच्या सोयीसाठी लेखनाचे तुकडे करणे उचितच आहे, पण त्यासाठी आस्वादाच्या बाबीचाही विचार होणे आवश्यक नाही का? लेखनाचा आस्वाददेखील तुकड्यांमधून अधिक चांगल्या पद्धतीने वाचकाला घेऊ द्यावा याची खूणगाठ लेखकानीही मनाशी बांधलेली असावीच. त्यासाठी लेखकांना एक सूचना करतो आहे
लेखन पूर्ण करावे आणि मग त्याचे सोयीनुसार तुकडे करून भागशः एकाचवेळी प्रसिद्ध करावे. लेखमाला असेल तर ही सूचना अर्थातच लागू होणार नाही. पण त्यातही काही कालबद्धतेचे बंधन स्वतःवर घालून घ्यावे.
एक वाचक म्हणून तुम्हाला काय वाटते?
वाचनाचा आस्वाद अधिक मधूर व्हावा हाच या चर्चाप्रस्तावाचा हेतू आहे.
१० मे १८५७
प्रेषक राजे ( रवी, ०५/११/२००८ - २२:५९) .१० मे १८५७ !
काही महीन्यांच्या धावपळी नंतर तात्या टोपे व इतर क्रांतीका-यांनी ३० मे चा दिवस ठरवला होता बंडाचा ! विदेशी राज्यकर्ते खदेडून बाहेर काढण्यासाठी.
पण प्रचंड सामाजिक तनाव व मंगळ पांडे मुळे कानुपुर छावणीत झालेल्या उठावामुळे तात्यांना आंदोलन ठरलेल्या दिवसापेक्षा आधीच चालू करावे लागले.. व त्याची सुरवात कानपूर तथा सुरत छावणी पासूनच झाली सर्वांनी मिळूनबहाद्दुर शहा जफर ला बादशहा मानला व तात्या टोपे ह्यांच्या हाताखाली सर्व उत्तर भारत एक होऊन इंग्रजाच्या विरुध्द पहिले स्वातंत्र्य बिगूल फुकले...
ह्या दिवसाला व त्या क्रांती कार्याला गेल्या १० मे ला १५० वर्ष पुर्ण झाली !
सर्व क्रांतीका-यांना माझे नम्र अभिवादन !
जे माहीत आहेत त्यांना व जे माहीत नाही त्यांना लाख लाख नमन !
बहाद्दुर शहा जफर च्याच शायरीने यातना काय व कश्या होत्या ह्याचे उत्तर मिळते.
"ईतना बदनसीब है जफर.
दफन के लिए,
दो गज जमीं भी ना मिली,
कु-ए-यार में "
