प्रकटन
महामानवास अभिवादन!
प्रेषक, बिपिन कार्यकर्ते, Mon, 06/12/2010 - 12:25डोंबिवली कट्टा...भाग २....
प्रेषक, मुक्त विहारि, Mon, 20/05/2013 - 13:04मित्रांनो आणि मैत्रिणींनो,
बरीच चर्चा आणि व्य.नी.तून असे समजले की, डोंबिवली कट्टा करायला काहीच हरकत नाही.ठरल्याप्रमाणे आपला डोंबिवली कट्टा होणारच.
वेळ : संध्याकाळी ७:३०
स्थळ : नंदी पॅलेस
कसे यायचे : डोंबिवली स्टेशन वरून रिक्षा मिळतात.साधारण ४०रु. होतात.रात्री १२ वाजेपर्यंत नंदी पॅलेस ते डोंबिवली स्टेशन पर्यंत रिक्षा सुरु असतात.
खर्चाचा अंदाज : साधारण, दर माणशी ५००ते ६०० रु. येईल.
प्रतिसाद देतांना क्रुपया खालील माहिती नक्की द्या..
'छूकर मेरे मन को'
प्रेषक, हर्षद खुस्पे, Sat, 18/05/2013 - 13:55परवा मला 'छूकर मेरे मन को' या गाण्याबद्द्ल ऐकले की हे गाणे (कविता) रविंन्द्रनाथ टागोर यांनी लिहिले आहे या गाण्याची गोष्ट मोठी रंजक आहे.
रविंन्द्रनाथ टागोर दररोज सकाळी फ़िरायला जात असत तेव्हा एक वेडसर दिसणारा माणुस येउन त्यांच्या छातीला हात लावुन म्हणत असे " काही तरी आहे इथे" आणि निघुन जात असे। असा क्रम बरेच दिवस चाले. पुढे रविंन्द्रनाथ टागोर यांना नोबेल पुर्स्कार जाहिर झाला ...त्यादिवशी सकाळी पुन्हा तो वेडसर दिसणारा माणुस येउन त्यांच्या छातीला हात लावुन म्हणाला..."आज काहीतरी मिळाले".....
बालक पालक आणि मी
प्रेषक, तुमचा अभिषेक, Fri, 17/05/2013 - 11:32बाप हे दोन प्रकारचे असतात...!!
एक बाप तो असतो जो घरी यायची वेळ होताच मुले त्याच्या धाकाने खेळमस्ती दंगागाणी बंद करून अभ्यासाचे पुस्तक उघडून बसतात.
तर एक बाप तो असतो जो घरात शिरताक्षणीच त्याची मुले आनंदाने नाचत बागडत येऊन त्याला बिलगतात.
शेवटी आपले स्वत:लाच ठरवायचे असते की आपल्याला यातला कोणता बाप बनायचे आहे....!!
एका गारुड्याची गोष्ट १ : पुण्याचे पत्ते - माझा छंद !
प्रेषक, जॅक डनियल्स, Fri, 17/05/2013 - 03:54(मी पुण्यात असताना, सर्पोद्यानचे सहा वर्ष काम केले, तेंव्हाचे अनुभव संघटीत करून लिहित आहे. हा लेख पूर्वी (दोन वर्ष) माझ्याच कट्ट्यावर (ब्लॉग) प्रकाशित झाला होता, त्यानेच मी या अनुभवांची सुरुवात करत आहे.)
आत्ता अमेरिकेमध्ये मला कोणी नवीन पुण्याचे भेटले की माझा त्यांना ठरलेला प्रश्न असतो "तुम्ही पुण्यात कुठे राहतात?" तुम्हाला वाटेल काय साधा प्रश्न आहे . पण तसं नाही. ते जेंव्हा उत्तर देतात तेंव्हा मी त्यांच्या शब्दांबरोबर पुण्याच्या रस्यावर फिरत असतो. ती पान टपरी,कोपऱ्यावरचे अमृततुल्य, आतला छोटा बोळ असे सगळे माझ्या डोळ्यासमोर दिसत असते."पुण्यातले पत्ते शोधणे " हा माझा छंद होता .
कसं सुचतं हे सगळं ? अहो, ब्रह्ममुहूर्तावर जाग येण्यातून.
प्रेषक, चित्रगुप्त, Wed, 15/05/2013 - 13:45माझ्या ' मारा डंख मारा डंख मारा बिछुवा' या धाग्याच्या एका प्रतिसादात 'ढालगज भवानी' यांनी " कसं सुचतं हे सगळं ? असा प्रश्न केला होता, त्याचं उत्तर " अहो, ब्रह्म मुहूर्तावर जाग येण्यातून" असं आहे. कसं, ते सांगतो.
'ब्रम्ह मुहूर्त' ज्याला म्हणतात, त्याची नेमकी अशी काही वेळ (पंचांगातील सूर्योदयाच्या नियत वेळेसारखी) असेल, असे वाटत नाही (असल्यास सांगावे).
साधारणत: पहाटे तीनच्या सुमाराची वेळ म्हणजे 'ब्रम्ह मुहूर्त' असे म्हटले जाते. पण मुळात त्या वेळेला 'ब्रम्हमुहूर्त' असे का म्हणायचे ?
एक प्रेम दोन प्रेम तीन प्रेम चार!
प्रेषक, इनिगोय, Wed, 15/05/2013 - 01:31प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं
शिडीवर चढता चढता सापानं गिळायचा गेम असतं.
याच नावाने प्रदर्शित झालेला मृणाल कुलकर्णी यांनी दिग्दर्शित केलेला पहिला सिनेमा या विकांताला अखेर पाहिला. गेल्या काही काळात आलेला वैवाहिक नातेसंबंधावर उत्तम भाष्य करणारा हा दुसरा मराठी सिनेमा.

स्थानिक स्वराज्य संस्था कर ( एलबीटी )
प्रेषक, धर्मराजमुटके, Tue, 14/05/2013 - 15:29एखादा कर लागू होताना इतका धुरळा उडालेला मी तर कदाचित पाहिल्यांदाच पहात आहे. औरंगजेबाने जिझीया कर लावला तेव्हा कदाचित असे झाले असण्याची शक्यता आहे. (अर्थात दोघांची तुलना हा उद्देश येथे नाही).
स्थानिक स्वराज्य संस्था कर ( एलबीटी ) म्हणजे काय ?
पुर्वी कोणत्याही नगरपालिका / महानगरपालिका हद्दीत प्रवेश करतांना जकात भरावा लागत असे. उदाहरणार्थ मी एक संगणक विक्रेता आहे आणी मी जर रु. २५,०००० किमतीचा संगणक मुंबईत विकत घेतला व तो ठाण्यात नेला तर मला त्या किमतीवर ५ ट्क्के जकात द्यावी लागत असे. म्हणजे माझी खरेदी किंमत रु. २६,२५०.०० झाली.
आपला जल्मोजल्मी ऋणी आहे
प्रेषक, देशपाडॅ विनायक, Tue, 14/05/2013 - 09:50 मोठ्या ,प्रसिद्ध ,VIP अशा लोकांचा परिचय वाचताना ते लोक किती DOWN TO EARTH आहेत याचा उल्लेख येतोच . ही व्यक्ती विशेष नसून त्यांच्या गुणांनी नम्र आहे हे दाखविण्याचा तो एक जाणीवपूर्वक प्रयत्न असतो . मध्यम वर्गातील माणूस विशेष कोणीतरी बनण्याचे गुण अंगी असूनही आहे तसाच राहिलेला दिसतो .
मध्यम वर्गात जन्म घेतलेला ,मध्यम वर्गाचे संस्कार पाळणारा माणूस विशेष कसा बनणार ?तो तसाच राहणे हे खरे मध्यमवर्गीय संस्कार लक्षण . या वर्गाचे मान ,अपमान , सुख ,दुख यांचे जे मानदंड आहेत ,अशा कल्पना आचरण्यात यांना परम आनंद नव्हे तर जीवनाची पूर्तता वाटते , गीता आचरण्यात आणणे वाटते
मारा डंख मारा डंख मारा बिछुवा, मिपाप्रवेशाकांक्षिण्यांची गोची आणि आमची काशीयात्रा
प्रेषक, चित्रगुप्त, Mon, 13/05/2013 - 16:16"ओ मारा डंख मारा डंख मारा बिछुवा…
तोहरे प्यारके जहर चढे मितवा…"
'अपनीही मस्तीमे झूमते हुए' का काय म्हणतात तसा, आपल्याच धुंदीत, द्रुतगतीनं पायडिलं हाणत, गाणं म्हणत मी घराकडे सायकलत होतो.पोटात भूक खवळली होती आणि केंव्हा घरी पोचून वेगवेगळ्या मस्त रेसिप्या हाणतो, असं झालं होतं.