प्रकटन
माझी दिवाळी
नमस्कार मिपाकरहो,
दिपावली अभिष्टचिंतन!
दिवाळी अंक २०१३
नमस्कार मिपाकर हो,
महामानवास अभिवादन!
3
अहमदाबाद क्रॅश - बोईंग ७८७ ड्रीमलायनर - भंगलेलं स्वप्न.
२४२ लोकांना घेऊन उड्डाण करणारे एअर इंडियाचे अहमदाबाद ते गॅटविक (लंडन) मार्गावर निघालेले बोईंग ७८७ ड्रीमलायनर विमान टेक ऑफ नंतर लगेचच शहरी वस्तीत कोसळले आहे. कोणतीही कारणमीमांसा होऊ शकायला थोडा वेळ लागेल. दुपारी एक वाजून अडतीस मिनिटांनी हे उड्डाण झालं होतं.
इथे अपडेट करत राहता यावे म्हणून धागा.
कॅप्टन सुमित सब्रवाल कमांडर होते तर कॅप्टन क्लाइव्ह कुंदर हे को पायलट होते.
रस्त्यावरील अपघात --चूक कोणाची?
नमस्कार मंडळी सध्या बरेच दिवस पुण्यातील (किंवा इतरत्रही) रस्त्यावरील अपघातांचा विषय चर्चेत आहे. एकुणातच अपघातांचे प्रमाण आणि चालकांची मग्रुरी किंवा बेपर्वाई वाढली आहे असा एक सार्वत्रिक निष्कर्ष त्यातून काढला जातो. बहुतेक वेळा अपघात झाला की चूक चालकाचीच असे समजून त्याला चोप दिला जातो. पोलीस केस होते वगैरे वगैरे. पण याची दुसरी बाजू कोणी बघतो का?
मी चालकांच्या बाजूने मुळीच बोलत नाहीये, अपराध्याला शासन हे झालेच पाहिजे पण नेहमी चूक फक्त चालकाचीच असते का? मला खटकणारे काही मुद्दे इथे मांडतो आहे
वायुसेनेतील आठवणी – भाग ४ "शब्दांपलीकडली शपथ – कॉपल पांडे"
वायुसेनेतील आठवणी – भाग ४
"शब्दांपलीकडली शपथ – कॉपल पांडे"
"सर, आर यू द नेफ्यू ऑफ कॅप्टन पी.एन. ओक? हू वॉज इन आझाद हिंद फौज विथ नेताजी सुभाषचंद्र बोस?"
(“सर, तुम्ही कॅप्टन ओक यांचे पुतणे आहात का? जे नेताजींसोबत आझाद हिंद फौजेत होते?”)
"यू नेव्हर मेंशनड टू मी व्हाईल इन पुणे! इट्स डन डील… आय विल गो टू कॅप्टन ओक सर टू सॅल्युट हिम!"
(“तुम्ही हे पुण्यात असताना कधी सांगितलंच नाही! आता ठरलं – मी त्यांना भेटायला, त्यांना सॅल्युट करायला नक्की जाणार!”)
समाधी....
..
सन 1982.महाराष्ट्र आणि गोवा सीमेवरचा तिल्लारी गाव. तिलारी गावांमध्ये धरणाचे काम जोरात सुरू होते. कर्नाटक आंध्र प्रदेश आणि इतर राज्यातूनही त्या ठिकाणी कामगार आले होते.त्यामध्येच मल्लाप्पा नावाचे कामगार होता. मल्लाप्पा आणि त्याच्याबरोबरचे सहकारी एका दिवशी जमीन खणत होते आणि अचानक एक मोठा काळा पत्थर लागला. महत्प्रयासाने त्यांनी तो काळा पत्थर बाजूला केला आणि खाली पाहतात तर एक जिवंत मनुष्य त्या पत्थरखाली बसलेला होता.
वारी !!!
में महीना पूर्ण भरात आहे. तळपत्या सूर्याखाली सगळंकाही भाजून निघतंय. हिमालयाच्या अगदी कुशीतलं उखीमठसुद्धा उन्हाच्या तडाख्यातून सुटलेलं नाही. चराचरांचा विधाता, देवांचा देव महादेवही कदाचित एवढ्या काहीलीनं त्रस्त झालांय. त्यामुळं दरवर्षीप्रमाणं भोलेनाथ आपल्या “समर हॉलिडे होमकडे” निघायची तयारी करू लागतात. भल्या पहाटे सगळं उरकून, वारी उखीमठातल्या ओंकारेश्वरामधनं मध्यमहेश्वर मंदिराकडे निघते. सगळ्यात पुढे मुख्य पुजारी घोड्यावर स्वार होऊन आणि त्यापाठोपाठ “डोलीचे” भोई भोलेनाथांना खांद्यावर घेऊन घाटातून झपझप चालू लागतात.
पुस्तकं..
आपण सगळेच पुस्तकाला पवित्र मानतो. समग्र जगाचं ज्ञान देणारी खिडकी मानतो. "न हि ज्ञानेनसदृशं पवित्रं इह विद्यते", म्हणजे ज्ञानाइतकं पवित्र या जगात दुसरं काही नाही. असं वचन आहे. हे ज्ञान आपल्याला पुस्तकं देतात.
जेव्हा माणसाला छपाईचं तंत्र अवगत नव्हतं तेव्हा मौखिक परंपरेने ज्ञान मिळवले जात होते. आपले ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद, उपनिषदे,ही मौखिक परंपरेने चालत आलेली आहेत. नंतर त्यांची पुस्तकं प्रकाशित झाली. या ग्रंथांचे लेखक अज्ञात आहेत, म्हणून त्यांना अपौरुषेय असं म्हटलं जातं. आज ऋग्वेदाला सर्वांत प्राचीन ग्रंथ म्हणून मान्यता मिळाली आहे.