पाकिस्तानने भारतावर परमाणू अस्त्र वापरलं आणि भारताने आपलं—
मानवजात आणि भविष्यात होऊ घातलेली पृथ्वीची समस्या.
काल मी आणि प्रो. देसाई आम्ही दोघेच तळ्यावर भेटलो होतो.प्रो. पोंक्षे आणि श्री समर्थ दोघेही शहरात गेले होते.
अलीकडे जगात शेजारच्या शेजारच्या देशात छोट्या छोट्या युद्धाची धुम:चक्री चालू झाली आहे.दुसऱ्या दोन जवळच्या देशात बरेच दिवसांपासून युद्ध चालू आहे.
आमच्या कोकणात एक म्हण आहे.
“फौव नाय, कातळी नाय, खाऊक फक्त सूको काजर “
याचा अर्थ “सर्व प्रयास फुकट जाणं”.
युद्धाच्या संधर्भात म्हणायचं तर, युद्धात दोन्ही बाजुची लोकं मरतात, सामुग्रची हानी होते आणि शेवटी निष्पन्न काहीच नाही.असं काहीसं
म्हणता येईल.