मुक्तक

अनुदिनी अनुतापे...

माय मराठीच्या जगभर उमटलेल्या पाऊलखुणा संगणकाच्या पडद्यावर पाहाताना येणाया आनंदाच्या भरात मीही एकदा मराठीच्या जागतिकीकरणात आपलाही हातभार लावावा, म्हणून `अनुदिनी' सुरु केली. आनंदाचं ते भरतं ओसरायच्या आत दोनचार लेखही पाडून अनुदिनीवर डकवले. तेव्हापासून रोज त्यावरच्या हिट्स मोजल्याशिवाय मला झोप येईनाशी झाली. दिवसातून दहापंधरा वेळा तरी आपली अनुदिनी उघडावी, आणि जगभरातल्या किती मराठीप्रेमींनी आपल्या `वैश्विक साहित्या'चा आस्वाद घेतला, ते पाहात आनंदून जावे, हा छंद मला जडला. प्रत्येक वेळी उघडलेल्या अनुदिनीच्या `हिट काऊंटर'वर एकएका आकड्याची भर पडताना पाहून माझ्या आनंदाला अक्षरश: उधाण यायचे, आणि साहित्यनिर्मितीच्या उर्मी उरात उचंबळायला लागायच्या. रात्ररात्र जागून मग मी साहित्याच्या लगडी उलगडून अनुदिनीवर पसरायचो,आणि लगेचच, हिट्स मोजायाची सुरुवात व्हायची...
... दिवसामागून दिवस जात राहिले. माझ्या अनुदिनीवरल्या हिट्स कितीने वाढल्या, ते मी न चुकता, दिवसातून जमेल तितक्यांदा पाहात होतो. प्रत्येक वेळी वाढणारा आकडा पाहून येणार्या त्या आनंदाच्या उधाणात डुंबत असताना, कॉमेंटसच्या रिकाम्या रकान्याकडे माझं लक्षच जात नव्हतं.
... आणि एका दिवशी, माझ्या मित्राला अनुदिनी उघडून दाखवली. संगणकाच्या पडद्यावरल्या माझ्या अक्षर साहित्याचे शब्द ताठ मानेनं जग पाहातायत, या जाणीवेनं मी मोहरून गेलो, आणि अनुदिनी बंद केली. पण त्यानं मला ती पुन्हा उघडायला लावली, आणि मी हिटस काऊंटरकडे पाहिलं... एका क्षणात तिथला आकडा एकाने पुढे सरकला होता... आपल्या साहित्यावर जग फिदा झालंय अशी माझी खात्रीच झाली. आता एखाद्या ऑनलाईन अंकाचं संपादक वगैरे होण्यासाठी चाचपणी वगैरे करायला काहीच हरकत नाही, असा एक विचारही मनात विजेसारखा चमकून गेला, आणि क्षणाचाही विलंब न लावता तो तोंडातून बाहेरही पडला... शून्यात पाहाताना, जगाच्या कुठल्यातरी कोपर्यातला, मायभूमीच्या ओढीने अस्वस्थ झालेला आणि मराठीला मुकलेला, मराठीसाठी भुकेला मराठी बांधव आपल्या अनुदिनीचा आस्वाद घेत आपली भूक भागवतोय, असं चित्र माझ्या डोळ्यांसमोर तरळत होतं. माझा तो मित्र, अनुदिनीची उघडझाप करत होता, आणि ...हिटस वाढतच होत्या... आणि माझ्या डोक्यात लक्कन वीज चमकली. हिट्सचा आकडा आपल्या क्लिकबरोबरच वाढत नसेल ना, या शंकेनं मी कावराबावरा झालो, आणि पुन्हा ती शंका तोंडातून बाहेर पडली. वास्तवाला सामोरं जायचा क्षण जवळ आला होता, हे मी ओळखलं, आणि ओशाळून अनुदिनी बंद केली...
... आता कधीमधी मी ती उघडतो, तेव्हा हिट्स काऊंटर एका आकड्याची भर घालून शून्याएवढे डोळे वटारून माझ्याकडे पहात हसताहसता जिवंतपणाची साक्ष देत असतो... प्रतिक्रीयांचा रकाना मात्र एकलकोंड्यासारखा शून्यात बघत, तळाशी कुठेतरी लपलेला असतो...

कशी शांतता शून्य शब्दांत येते....

तो किंवा ती आपल्याला मनापासून आवडते. आपल्या काळजातच घुसते. कुठल्याही अपेक्षेनं नव्हे, पण निव्वळ त्याच्या व्यक्तिमत्त्वाच्या आपण प्रेमात पडतो. त्यानं/तिनं आपल्याशी मैत्री करावी, असं वाटतं. पण ती एका मर्यादेपलीकडं आपल्याला फार भीक घालत नाही. आपण अनेक प्रयत्न करतो...त्यासाठी प्रसंगी, वेगळ्या वाटेनं जातो. पण व्यर्थ!
ती (व्यक्ती) कुठलीही असू शकते. कुठल्याही पार्श्‍वभूमीची, कुठल्याही प्रवृत्तीची. आपल्याला आवडते, ती तिची प्रवृत्ती. जगण्याची कला. धडाडी, कर्तबगारी, शैली, बोलण्या-वागण्याची पद्धत, एखाद्या विषयातला अभ्यास, विचार, मतं मांडण्याची पद्धत, यांपैकी काहीही. आपल्याकडे तो गुण नसतो कदाचित, म्हणून आपण तिचा आदर करायला लागतो. तिच्याकडून आणखी काही शिकता यावं, असं वाटतं. त्यासाठी तिच्याशी मैत्री करायला हवी असते. तिनं आपल्यासाठी खास काही करावं, काही द्यावं, अशी अपेक्षा नसते. पण थोडा वेळ तिच्या सहवासात राहता यावं, असं वाटत असतं. तिच्या सोबत राहून जेवढं टिपता येईल, तेवढं आपल्याला टिपायचं असतं. तिच्या खासगी गोष्टी तिनं सांगाव्यात, अशी अपेक्षा नसते, पण आपल्या खासगी गोष्टींत तिचा सल्ला मिळेल, निदान तिच्या सहवासाचा काही प्रभाव पडेल, असं वाटत असतं.
ती कुणी "ग्रेट' असतेच, असं नाही. पण सर्वसामान्यांपेक्षा कुठल्या तरी बाबतीत वेगळी असते. काही एक वेगळा गुण असतो, ज्याचं आपल्याला आकर्षण वाटत असतं आणि आपल्यात तो नसल्याबद्दल रुखरुखही. पण तिला आपल्याबद्दल फारसं वाटत नसतं. औपचारिक ओळख ठेवण्यापलीकडे मैत्री सरकत नाही. मैत्रीच्या तारा काही छेडल्या जात नाहीत. आपण प्रामाणिक प्रयत्न करतो, पण तिला त्याची फारशी कदर नसते. निदान आपल्या मैत्रीच्या प्रयत्नांचा आदर राखण्याएवढंही सौजन्यही कधी कधी वाट्याला येत नाही. हा तिचा दोष असतो, की आपल्याच अवाजवी अपेक्षांमधला फोलपणा?
तुम्हाला हा अनुभव आलाय कधी? मला हज्जारदा आलाय! अनेकदा तोंडघशी पडलोय, अनेकदा त्रास करून घेतलाय. अगदी मनापासूनचा म्हणवणारा मित्र काही कारण नसताना दुरावल्याचा. माझ्या व्यक्तिमत्त्वाच्या प्रेमात पडल्याची साक्ष देणाऱ्याकडून नंतर काहीच संपर्क न साधला गेल्याचा. कॉलेज संपल्यावर नातंही संपल्याचा. आणि आपण कितीही ओढीनं आपली सुख-दुःखं सांगितल्यानंतरही, त्यांची परतफेड न झाल्याचा. आपण अतिशय प्रामाणिक राहिल्यानंतरही, त्याच्या आयुष्यातला अगदी महत्त्वाचा टप्पाही दुसऱ्याच्या तोंडून कळण्याचा.
आपल्या चांगल्या/वेगळ्या कामगिरीकडे, कलेकडे नियमितपणे लक्ष ठेवून त्यात सूचना करणारा, कान धरणारा, सल्ले देणारा कुणीच मित्र असत नाही? गरज असल्याशिवाय, आपल्या आयुष्यात काय चाललंय, याची चौकशी करावीशीही त्याला वाटत नाही?
खरंच खरी मैत्री एवढी दुरापास्त आहे? व्यावहारिकतेच्या, धावपळीच्या आयुष्याच्या, अर्थाजनाच्या बंधनांनी तिला जखडून, संपवून टाकलंय? कधीतरी हॉटेलात जाणं, फोनवर बोलणं, एसएमएस करणं, यापलीकडे मैत्री जाऊ शकत नाही? नोकरी, जबाबदाऱ्या यांची बंधनं मैत्रीच्या नात्यापेक्षाही तीव्र असतात?
चांगल्या मैत्रीची गरज काय फक्त एकटेपणीच असते? अगदी जगण्याचं रहाटगाडगं व्यवस्थित चालू असतानाही मित्रांशी उत्तम नातं नाही राखता येत?
-------------

प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असते(३)

मागील दुवे : प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असते(१) http://misalpav.com/node/2158
: प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असते(२) http://misalpav.com/node/2266

काल मी असाच गावात फ़िरत होतो. एकटाच.या दूर देशात मला माझं असं कोण भेटणार आहे.
ऊन रणरणत होते....रस्त्यावर काही बघणं ही नको वाटत होतं.डोक्यावरचा सूर्य कोणावरतरी रागावुन आल्यासारखा आग ओकत होता.माणसे नाईलाजाने रस्त्यावरुन जात होती.
शर्टच्या बाही नंतरच्या उघड्या अंगाला जळत असावे तसे उन्हाचे चटके बसत होते. रणरणत्या ऊन्हात मी का भटकत होतो ते मलाच कळत नव्हते.आपण या गावात का आलो .मी असा एकटा निरुद्देश का फ़िरतो ते शोधत होतो.आपले ध्येय काय......ते साधुन काय मिळणार आहे हे प्रश्न सतावत होते. काम असले की बरे असते. हे असले प्रश्न डोके सुद्धा वर काढत नाहीत.
तेव्हढ्यात मला तो दिसला...एकटाच थांबलेला सिगरीट ओढत स्वत:च्याच विचारात मग्न....जगाची फ़िकिर नसलेला...जणु माझे विचारांचे प्रतिरूप बनुन या जगात आलेला....

सडक के किनारे ; चिलचीलाती धूप मे
मै जलती सिगरेट लिये खडा था
पैरो के जूते इस कदर घिस गये थे
के एडीयां और सडक एक से लगते थे
कपडे मैले और फ़टे
हम अपनी ही हालात पे हस रहे थे
हर समय मुझे अतीत ही लग रही थी
जलती सिगरेटसा मै भी जल रहा था
छोडे कश के धुवें मे
खुद को ही पाता
और बिखरता देख रहा था.

त्याचाच विचार करत थोडा वेळ तसाच चालत राहिलो.....रणरणतं ऊन....... आसपासच्या झाडांच्या केरसुण्या झाल्या होत्या....उन्हाने जळुन कोळसा होत नाही म्हणून त्याला झाड म्हणायचे.इतकेच.....एखादे दुसरे पान नावाला सुद्धा शिल्लक नव्हते......कन्दील जळावा तशी दुपार ढाण ढाण जळत होती........रस्त्यावर चिटपाखरु नव्हते.......मग हा का इथे ? काय करतो आहे?
मग मी तरी काय करतो आहे इथे?
स्वत:ला प्रश्न विचारण्याव्यतिरिक्त आपल्याला काहीच करता येण्यासारखे नाही हे लक्षात येताच मी विचार करणं बंद केले....नुसताच चालत राहीलो....दूर एका निष्पर्ण झाडाखाली त्याच्या वठलेल्या सावलीत कोणी दुष्काळी कामावरचा मजूर झोपला होता. शेजारीच एक छोटे मूल तिथेच निवान्त बिनघोर खेळत होते.त्याला मी पहातच राहिलो. गारुड केल्यासारखा डोळे विस्फ़ारुन......

चिलचिलाती धूप..; रूखे सूखे पेड
पत्ते भी जल गये थे
बस; सर कटी लाशों की तरह
सूखे दरख्त खडे थे.
ऐसेही एक दरख्त की सूखी छांव मे
तुम थकान के नशे मे सोये थे
पासही में कुछ औजार भी सो रहे थे
शायद पत्थर फ़ोड फ़ोडकर वे भी थक गये थे.........
तुम्हारे चेहरे पर मुस्कान थी
शायद भूक की दूनिया से तुम आज़ाद हो गये थे
पास खेलता हुवा तुम्हारा बच्चा
वो हसी देखकर खिलखिलाया
उसे क्या मालुम....
के ख्वाबों मे देखे
वो चावल के दाने
असल की भूख नही मिटाते.............

काल पाऊस आला होता........हो काल पाऊस आला होता...या दूर देशात कोणीतरी आपलं भेटायला आलं असावं असं वाटलं.आपल्या इथे येतो तसा जोराचा शिडकावा नव्हता थोडावेळ आला मग ये जा करत राहीला.....कसाही असला तरी पाउस आपला वाटतो...पाऊस येताना नेहमी मला "रिमझीम के तराने लेके आयी बरसात..याद आयी वो पहली मुलाकात " हेच गाणे आठवते...का कोण जाणे....अगदी लहानपणापासुन....आपली पहिली भेट कुठे झाली होती आठवते तुला.....आपण असेच कॊलेजमधुन घरी निघालो होतो. बसची वाट पहात स्टॊप वर उभे होतो. मी चिक्क भिजलो होतो आणि तू माझ्याकडे पाहिलेस आणि मोठ्याने हसायला लागलीस.....तू का हसते आहेस ते मला कळेना....रागारागानेच मी तुझ्याकडे पाहिले...तू आणखीनच जोराने हसायला लागलीस.....तुझे हे नेहमीचेच...हसायला लागलीस की थांबतच नाहीस....एक हात पोटावर आणि दुसरा तॊंडावर......तु हसत राहिलीस...मी तस्सा बसची वाटसुद्धा न पहाता भिजत निघुन गेलो.......दूर जाउन प्यान्टवर कुठे कुठे चिखलाचे डाग लागले ते पहात बसलो......मला कळालच नाही तू का हासली होतीस ते....मी नन्तर कितिदातरी विचारले तुला त्याबद्दल.....पाऊस आला की तुला काय उत्साह यायचा........चेहेरा वर करुन मिटल्या डोळ्यांवर पावसाचे थेम्ब झेलणे तुला खूप आवडायचे...अगदी लहान मूल व्हायचीस तू त्यावेळी....
पाऊस आला की मला हे नेहमीच आठवते.....अर्थात ते आठवण्यासाठी पाऊसच यायला हवा असे नाही...........उघड्या खिडकीतुन त्या दूरच्या टेकडीकडे पहाताना देखिल मला पाऊस आठवतो....आणि त्या मागोमाग ते क्षण धावत येतात............

मै युंही जब
कभी वक्त गुजारता हुं..
बादल अचानक कहीसे दौडे आते हैं
अन्धेरासा छा जाता है....
बारीश की फ़ुहार होती हैं
फ़िज़ा मे कुछ नमी कुछ तवानाई....
गुजरा वक्त तरो ताज़ा होकर
युं सामने आ बैठ जाता है..
बारीश की हर बूंद
एक एक पल ले आती हैं
कुछ बुंदे मैं हाथों मे समेटना चाहता हुं
वो चन्द हसींन पल; तुम्हारी खिलखिलाती हसी....
वो सलोनी रुसवाई
सब कुछ हातों मे रोकना चाहता हुं
मै खुद भीग जाता हुं
आखों मे नमी लिये
बरसते बादल ताकता हुं......

तुला आठवतं? तू एकदा अशीच घरी आली होतीस...कोणतेतरी गाणे गुणगुणत स्वत:शीच हसत होतीस....आपल्याच नादात होतीस....गाणे गुणगुणताना तू सगळ्या खिडक्या उघडल्यास.........जोराचा वारा आला....टेबलावरचे सगळे कागद उडत विखुरले गेले...एकदोन कागद तर खिडकी बाहेर गेले.........मला तर कागद शोधु की खिडकी बंद करु या गोंधळात बावचळायला झालं...माझी ती अवस्था पाहुन तू आणखीनच जोरात हसायला लागलीस.........तुला हसायला निमित्य लागायचे नाहीच........कधीही तयार.....ए... पण एक सांगु...तुझे हसणे एकदम खळखळत्या पाण्याच्या झ-या सारखे वाटायचे.....वातावरणात एक उत्साह पसरवायचे.....तू येउन गेलीस की आख्खे घर जणु उत्साहात न्हालेले असायचे. तुझ्या आवडी निवडी घरातल्या लोकानाच काय पण घरातल्या फ़र्निचर ला सुद्धा पाठ असतील.....बेडशीट ला एकही सुरकुती पडलेली तुला खपायचे नाही....सोफ़्यावरचे कव्हर प्रत्येकवेळा तू नीट करायचीस.....अन मी तर असा.......पसारा असल्याशिवाय काम राहुदे; मला काही बोलणही सुचायचे नाही..... अन तू पसारा आवरायचे जणू व्रत घेतलेली......माझे टेबल आवरुन ठेवलेस की मला कोणतीही वस्तु सापडायची नाही........माझ्या या चरफ़डीला तू हसायचीस.प्रत्येकवेळा वस्तु शोधायला मला तुला फ़ोन करावा लागायचा.........
पण तू माझे टेबल आवरुन ठेवलेस की त्याला एक वेगळाच रुबाब प्राप्त व्हायचा........ते काही वेगळेच दिसायचे. खोलीचे रूपरंगच पालटुन जायचे.
शहर से कुछ दूर
और थोडा करीब भी
एक आशियां है मेरा
हर शामचमकते जुगनू
और सुबह तितलीयों के साथ गुजारता...
पास के पेडो मे चहकती चिडीयां
और महकते फ़ूलों की बाते सुनता
एक आशियां है मेरा......
टूटी फ़ूटी खपच्चड दीवाले
और सादासा फ़र्निचर लिये
वक्त गुजारता....
एक आशियां है मेरा
एक पुरानी अलमारी
साथ मे दीवाल से सटा टेबल
और कुछ ताजा तरीन यादें लिये
एक आशियां है मेरा....
तुम कभी यहां आती थी
दो प्याली चाय के साथ खिलखिलाती थी
तुम्हारी आवाज़ ; तुम्हारे हौसलें
और वो सादे से सपने
सब कुछ अपने मे समेटायें
एक आशियां है मेरा.....
वैसे तो हर वक्त तुम याद आती हो
जब भी याद आती हो
दीवाले , अलमारी , कुर्सी
सब तरो ताज़ा हो जाते हैं
वही खुश मिज़ाज़ी त्योहार मनाता
एक आशियां है मेरा........
(क्रमश:)

प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असते(२)

मागील दुवा http://misalpav.com/node/2158

तू अशी नेहमी माझ्या पासुन दूर कधी नसतेसच...माझा प्रत्येक क्षण तुझी काही ना काही आठवण करुन देतोच...माझ्या टेबलावरचे हे घड्याळ....तुला यायला ऊशीर झाला की तू काटे फ़िरवुन ते थोडेसे मागे करायचीस..आणि म्हणायचीस बघ आले की नाही मी बरोब्बर वेळेवर......हम....वेडी..... काटे मागे फ़िरवुन का कधी भूतकाळात रमता येते. मीही आता तो विचार करतोय...घड्याळच नव्हे तर आख्खं कॆलेंडर मागे न्यायचं आहे मला...तुझ्या समवेत जगलेला प्रत्येक क्षण पुन्हा तितक्याच उत्कटतेने जगायचाय मला....खरच ते क्षण ....आठवतात तुला?

तुम्हारे साथ जीना
कुछ अलग ही बात है.
जैसे एक ही पल में
दिन और रात है
खिलखिलाते हसते हुवे भी
आंखों मे नमी का साथ है
सिसकियां लेते हुवे भी
होठों पर मुस्कान की राहत है.
तुम्हारा गुस्सा भी प्यारा लगता है
इन्ताजार मे बिताया छोटासा पल भी
पुरे दिन जितना लंबा लगता है
और साथ बीताया दिन भी
चन्द लम्हो में समेट जाता है.
तुम्हारा कहा एकाध छोटा लब्ज़ भी
बहुत कुछ कह जाता है.
और वो घन्टो की बातचित भी
कुछ मायने नही रखती.
कभी लगता है
की तुम एक वो पुलिन्दा हो
अतीत और वर्तमान
जिसमे एक साथ समेटा हो
तुम्हारी उन्ही नम आंखोंमे
ज़ज़्बातों का बारूद भी है
मै इसे करिश्मा कहु या फ़िर क्या कहु
ये तय नही कर पाता हु
बस तुम्हारी तरह ही.....
बहुत कुछ चाहते हुवे भी....
बोल नही पाता हुं..

आपण फ़िरायचो तो चतु:श्रुंगीचा रस्ता आठवतो तुला....काहीही न बोलता चालत असायचो.....कशी कोण जाणे आसपास एकदम शांतता असायची....खरे तर आसपास कितीही वर्दळ असली तरी आपण आपल्याच नादात असायचो....आपले लक्षच नसायचे...
रस्ता काही फ़क्त आपल्यासाठीच केला असावा असे आपण चालायचो..... हात हातात घेतला की ते तुला आवडायचे नाही..तू म्हणायचीस की प्रेमात मालकीहक्क कशाला.....पण मग थोड्यावेळाने तूच माझा हात हातात घ्यायचीस.....मग मी सहजच गालात हसायचो..तु रागवायचीस..थोडावेळ आपण पुन्हा अबोल व्हायचो.....
एकटा असताना डोळे मिटुन घेतले की ते सगळे पुन्हा आठवते
जब भी कभी आंखे मूंद लेता हुं
कुछ दूसरीही दुनियामे चला जाता हुं
वहां तुम होती हो और साथ कुछ खामोशी
कुछ कदम चलकर तुम मेरे पास आती हो
एक हवा का झौका आता है.
तुम्हारे पास होने का एहसास दिलाता है
आंख खुल जाती है........
सामने कुछ खामोशी पाता हुं
शायद तुम उसे यहां छोडकर
मेरी दुनिया मे आ बसी हो.....
एकदा तू विचारले होतेस की "काय पाहिलेस माझ्यात " मला उत्तर सुचले नव्हते....खरे तर मीही कधी स्वत:ला हा प्रश्न विचारला नव्हता
या असल्या प्रश्नांचे उत्तरे नसतात....आणि जी मिळतात ती तेव्हढी सद्धर नसतात. तू तरी सांग काय पहिले होतेस माझ्यात तू? देशील उत्तर कधी याचे? मी तुला जेंव्हा हे विचारले तेंव्हा तू हसली होतीस....त्या हसण्यात मी विरघळुन गेलो आणि आपण काही प्रश्न विचारला आहे हेच विसरुन गेलो.
तुझ्या हसण्यात काय जादु होती हे कधी उमगलेच नाही....खूपदा विचार केला...आरशात पाहुन तुझ्यासारखे डोळे मिचकावुन हसता येते का तसा प्रयत्न केला......पण ते जमणार आहे थोडेच.
तुला सुद्धा माझ्या थोडे पॊज घेउन बोलण्याची मजा वाटायची..तु म्हणायचीस सुद्धा की मी थोडा अजून मोठा पॊज घेतला तर कर्मा चित्रपटातल्या दिलीपकुमारलाही मागे टाकेन म्हणुन.....
मी तुझ्या बोलण्यातले "अय्या हो" मोजायचो आणि तू माझ्या "शॊटच की " या ऊद्गारांचा स्कोर मोजायचीस.....काहीही कारण नसताना उगाचच मधेच कधितरी ३५ / ३७ / ५७ / ६३ असा काही आकडा तुझ्या तोंडुन आला की समजायचे की आज मी जरा जास्तच "शॊटच की " बोलतोय. तीन मिनिटात दोन वेळा चालेल ही आपण घालुन घेतलेली लिमिट.....
वेडेच होतो आपण दोघेही...छोट्या छोट्या गोष्टींवरुन भांडायचो....भांडलो की अबोला धरायचो.आणि अगोदर आपल्या दोघातलं कोण बोलतय याची वाट बघत बसायचो......
ते अबोल्याचे क्षण त्यावेळी किती छान वाटायचे ना..........
मला तर तू कधी कधी अगदी लहान दुसरी तिसरीतली मुलगी वाटायचीस.....निरागस....हसरी.......रुसकी... तांबडी रेबीन आणि चप्पट केस असते तर मी कदाचित शाळेत नेउन सोडलं असतं......पण खरे सांगु............तुझ्यातले ते निरागसपणच मला भावलं होतं....
"काय पाहिलेस माझ्यात " याप्रश्नाला मी हे उत्तर दिले असते तर तू काय प्रतिक्रिया दिली असतीस कोण जाणे पण त्यावर मी मात्र म्हणालो असतो.
एक सादासा फ़ूल
और उसकी सादिसी पंखुडिया
कुछ जादूसा कर देते हैं
किसी राह पडे पत्थर को.....
................. भगवान बना देते है.......
...............................ही प्रचिती मी घेतली आहे.............
तुझे हे साधेपण तुला कधीच जाणवायचं नाही. हे साधेपण तुझ्या वागण्या बोलण्यातही असे. बाहेरच्या देखाव्याला भुलुन न जाता दबुन न जाता समोरच्याशी सहज बोलण्याची अवघड कला तु कुठुन अवगत केली होतीस कोण जाणे.....तुझ्या या असल्या सहज बोलण्यामुळे उलट समोरचाच दबुन जायचा.
तुझ्या सोबत असताना मला एखाद्या पारिजातकच्या फ़ुला सोबत असल्यासारखे वाटायचे. पारिजातकाच्या नाजुकपण बरोबर ती केशरी पांढरी रंगसंगती त्याला वेगळाच सात्वीकपणा देउन जाते. तसेच काहीसे........मी एकदा हे तुला सांगितले होते..........त्यावर तू मान तिरकी करुन छानसे स्मित केले होतेस.....अगदी पारिजातकाच्या नाजूक फ़ुलासारखे.

मी कधी कधी एकटा असताना या खिडकीतुन बाहेर बघत असतो........मल कळत नसते मी काय पहात असतो ते......नजरेला दिसत नसणारे काहितरी दिसत असते.....

खिडकी से बाहर झांकना
अब ये आदतसी हो गयी हैं
उस मोड से तुम्हे आते निहारना
ये भी आदतसी हो गयी हैं
नजरे मिलतेही मुस्कुराना
ये आदतसी हो गयी है
उसी से बस दिन अच्छा गुजरेगा कहना
ये आदतसी हो गयी है
कभी ना दिखायी दिये तो
दिन काट लेते है
तुम्हारी रुखत के बहाने
इंतजार में खिडकी से झांकना
ये आदतसी हो गयी है
तुम नही आओगी...ये तो पता है
बाहर झांकना फ़िज़ुल है....
ये दिल को समझाने की भी
अब आदतसी हो गयी है.

(क्रमश:)

कार्लिनबुवा आणि कर्वेबाई

जून २२, २००८ रोजी जॉर्ज कार्लिन हे अमेरिकेतील ज्येष्ठ विनोदी कलाकार वारले. ते जिवंत असताना त्यांच्याविषयी मला काही माहीत नव्हते. पण त्यांच्या मृत्यूच्या संदर्भाने अनेक वर्तमानपत्रांत स्मरणलेख आलेत, त्यावरून एका काळच्या त्यांच्या लोकप्रियतेची कल्पना आली. त्यांचा एका विशिष्ट विनोदी भाषणाचा उल्लेख बर्‍याच ठिकाणी आला "Seven Words You Can Never Say on Television" (दूरदर्शनवर कधीही न म्हणता येणारे सात शब्द). त्याची थोडक्यात यूट्यूबवर झलक -


अर्थात हे सातही शब्द संभोग किंवा मलमूत्रविसर्जनासंबंधी आहेत. हे भाषण कार्लिन यांनी १९७२ मध्ये दिले. प्रथम त्यांना मिलवॉकी येथील एका कोर्टात खेचले गेले पण त्या कोर्टाने त्यांना सोडून दिले. पण पुढे ते भाषण दूरदर्शनवर दिल्यामुळे त्यांना पुन्हा कोर्टापुढे जावे लागले, तो खटला थेट अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेला. सर्वोच्च न्यायालयाने "हे शब्द दूरदर्शनवर बोलू नयेत" या बाजूने निर्णय दिला (१९७८).

मला हा कुठला इतिहास माहिती नव्हता. शिवाय हे सात शब्द मी कॉलेजमधील दोस्तमंडळींमध्ये सोडले तर जवळजवळ कधीच वापरत नाही. पण योगायोग असा, की गेल्याच आठवड्यात मी इरावती कर्वेबाईंचा ललितलेखसंच "गंगाजल" वाचत होतो. पैकी एक लेख रँग्लर परांजपे (अप्पा) यांच्याविषयी आहे. त्यातील एक घटना माझ्या लक्षात राहिली.

अप्पांचे शब्दज्ञान अचूक. शकू आणि मी शब्द आडला की...आदमासे ठोकून देत असू. ... कॉलेजमधले संस्कृत पुस्तक चालू असता शकू मला 'नितम्ब' शब्दाचा अर्थ विचारत होती. ... मी अगदी नि:शंकपणे सांगितले, "त्या शब्दाचा अर्थ गाल." अप्पा तेथेच होते. ते म्हणाले, "काहीतरी सांगू नकोस; त्या शब्दाचा अर्थ आहे ढुंगण अथवा कुल्ले." ... मी अगदी सोवळ्या घरात वाढले होते. जे वाङ्मय अप्पा वाचून घेत, तेही सोवळेच होते. प्रियेच्या नितंबांचा उल्लेख वाङ्मयात येईल, ही कल्पनाही मला नव्हती...

खरे म्हणावे, तर मलाही लहानपणी ही कल्पना नव्हती. पण का नसावी? शरिराचा हा भाग (-आता मीच ही विचित्र भीड सोडतो-) ढुंगण, त्याचा साधारण आकार बहुतेक कपड्यांतून स्पष्ट दिसतो. सभ्य स्त्री-पुरुष एकामेकांच्या साड्या-विजारींकडे बघताना डोळे फेरत नाही. आजही पूर्वीसारखेच मनातल्या शरीरसौष्ठवाच्या ('फिगर'च्या) कल्पनेत ढुंगणाचा आकार समाविष्ट असतो. ढुंगण म्हणजे लंगोटीने झाकलेल्या अवयवांसारखे गुप्त, सभ्य लोकांनी मुद्दाम लपवलेले नाही. ढुंगणाचा विचार म्हणजे प्रत्यक्ष संभोगाचा विचार नव्हे. मलमूत्रविसर्जनासारखा हा दुर्गंधीयुक्त प्रकार नाही - उलट सौंदर्याचा भाग आहे. मग हा शब्द सभ्य बोलण्या-लिहिण्यातून हद्दपार का असावा?

"ढ"काराने सुरू होणारे शब्द आपल्याला आवडत नाही, हे कारण असावे का? म्हणजे ढेकर, ढासळणे, ढेकूण, वगैरे... पण ढुंगण शब्दासारखाच "ढंग" शब्द सुंदर गोष्टींविषयी बोलताना आपण सहज वापरतो. म्हणजे शब्दाच्या ध्वनीचा दोष नाही. दोष कसला आहे, त्यावर इरावतीबाईंनी नेमके बोट ठेवले आहे - "सोवळेपणा". पण एका सुंदर अवयवासाठीच्या उपयोगी अर्थाच्या शब्दाला, या भंपक सोवळेपणामुळे आपल्याला मुकावे लागत आहे.

बहुधा कार्लिनबुवांचे सात शब्द मी रोजच्या वापरासाठी घेणार नाही. पण रँग्लर परांजपे यांनी बाईंना सभ्यपणे शिकवलेला "ढुंगण" शब्द मात्र योग्य अर्थपूर्ण संदर्भात, सभ्य बोलण्यालिहिण्यात मी वापरायला लागेन, असे वाटते.

अशा प्रकारच्या शब्दांबद्दल, सोवळेपणाबद्दल, तुमचे काय मत आहे?

प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असते

प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असते....तुमचे आणि आमचे अगदी सेम असते
हे जरी खरे असले...आपले ते अफ़ेयर आणि दुस-याची ती भानगड असे जरी म्हणत असलो तरी प्रेमात पडणे हे भाग्य सगळ्याना मिळतेच असे नाही.....न मिळणारी द्राक्षे आंबट मानुन काहीजण त्याची बोळवण करतात...
पण एक अनुभवलय तुम्ही....प्रेमात पडले की जग अगदी चांगले दिसायला लागते....सगळे लोक जणु आपल्याबद्दल बोलत आहेत असे वाटु लागते.ती विशेष व्यक्ती दिसली नाही की कसे तरी होते...आणि दिसली की इंग्रजीत बोलायचे तर "थाउजंड बटरफ़्लाईज फ़्लायिंग इन द स्टमक" असे काहीसे होते. एखादा खास क्षण संपुच नये असे वाटते. काळ थांबवणे आपल्या हातात असते तर घड्याळ तिथेच थांबवुन ठेवले असते.....
तुझ्या वाटेकडे डोळे लागले असतात. उगाचच फ़ोन व्हायब्रेट झाल्यासारखे वाटते.त्या वळणावरुन एखाद्या महाराणीसारखी चालत तू येशील.आणितुझे ते वेड लावणारे मिल्लीयन डॊलर स्माईल देशील......
तुझ्या त्या मुस्कुरहाटी च्या ओझरत्यासुद्धा दर्शनासाठी एका पायावर उभे राहुन तप:श्चर्या करावी लागली तरी चालेल असे आपण स्वत:शीच गुणगुणत असतो....मदनमोहनची गाणी पुन्हापुन्हा आठवत रहातात...प्रेम याबद्दल विचार करणंही खूप मस्त वाटु लागते..........आणि आपण चक्क कविता करु लागतो...

तुम दिखाई देती होती हो
तो युंही अच्छा लगता है
हर पेड और दरख्त; भी खुषमिज़ाज़ लगते है......
बस वही एक पल
हर चलता राहगीर
मासूम बच्चा लगता हैं.....
मै भी वही होता हुं
फ़िज़ा भी वही होती है
ये बदलाव कैसे होते है....
ये सोचना भी अच्छा लगता है
इस सोच मे हम कुछ उलझ जाते है....
और....तुम दिखाई देती हो......

कबीर म्हणतो "ढाई अक्षर प्रेमके" .खरंच काय जादू भरली असेल या अडीच अक्षरांत....
माझी तुझी कधीतरी भेट होईल... मनातली भावना तुला बोलुन दाखवु....मग तु ही माझ्यासारखीच मोहरुन येईशील......मनातल्या श्रावणसरींत चिंब भिजशील......खरंच होईल का असे....मला जे वाटते तेच तुलाही वाटत असेल? का मग हे आपल्या मनाचे सगळे खेळ....खरेच असेच असेल का....पण मग मी तुला आवडत नसेन तर? मी आवडत नसेन तरीही तु बोलशील माझ्याशी?
एक ना अनेक मन प्रश्नानी भरुन जाते.....उगाचच मुकेश ची गाणी आपलीशी होतात....
एखाद्या क्षणी तू दिसतेस ....मनात हिम्मत करुन आपण तुझ्या दिशेने पुढे होतो......मनातल्या मनात तुझ्याशी कसे बोलायचे याची हज्जारदा उजळणी होते...घसा उगाचच कोरडा होतो..छातीतली धकधक चौकातल्या सगळ्याना ऐकु येइल इतकी मोठ्याने होत असते. प्रेमात पडण्याच्या क्षणाची ती नांदी असते.पडदा वर जाणार असतो....आणि आपण सारे संवाद पुन्हा पुन्हा म्हणतो....या प्रवेशात प्रॊम्प्टर नसतो......असतो तो तुझ्या माझ्यातला एक अदृष्य अवकाश......तो कसा भरुन काढायचा हे कोणीच सांगितलेले नसते.....आपण पुन्हा प्रत्येक शक्यता पडताळुन पहात रहातो.... आलेला क्षण पकडणे हेच काय ते जमवायचे असते...

अब की बार आपसे मिलुंगा ....
कुछ सुनुंगा कुछ कहुंगा....
पता नही आप क्या कहोगी...
शायद यही सोचकर
हमने ये मुलाकात
खामोशी में गुज़ार दी है.........

स्वत:वर चरफ़डत मी तसाच घरी येतो...अंगातला टी शर्ट हवेत भिरकावत बेडवर पसरतो....झोपायचा प्रयत्न करतो...कितीतरी वेळ तुझाच विचार मनात असतो....
खरेच मी वेडा आहे...मी असा का वागतो.?.... मी खरेच तुला काय देउ शकतो? काय आहे असे माझ्याकडे ज्यावर तू भरोसा ठेउ शकशील ? माझे हे असे अधांतरी जगणे....ना अजुन नोकरीचा पत्ता ना कशाचा ? काय म्हणुन मी तुला काही बोलावे.....काय म्हणुन मी तुला स्वप्ने दाखवावीत........तू एक वेळ मला "आरशात तोंड पाहिले आहेस का माकडा"असे म्हणत झिडकारुन टाकलेस तरी चालेल...पण तू माझ्यावर विश्वास ठेवलास....माझी स्वप्ने स्वत:ची म्हणुन रंगवु पहिलीस तर...........उलट सुलट विचारानी मी कावराबावरा होतो....

हवा का झौका और...
सनसानाती तुम्हारी याद.....
मै कांप उठता हुं...
किसी बुढे बरगद सा.
अपनी ही जडोंको
और एक बार सहमाता हुं
किसी बुढे बरगद सा.....

सकाळी कधीतरी मला जाग येते....मी नक्की काय विचार करत होतो तीच आता संगती लागत नाही

या रब की सुनु या आपकी
ये सोचते हम जागते रहें
हर करवट की साथ नतीज़ा बदलता गया
सुबह होते होते....
क्या बताऊं अब...
क्या रब का क्या आपका
ये ही भूल गया
माझी नजर टेबलावर पडलेल्या माझ्या वही कडे जाते.....अस्ताव्यस्त पडलेल्या सामानाने टेबल भरलेले असते....त्या पसा-यातच जीवनाची शुश्क आकडेमोड लिहाणारे माझे पेन आणि क्यालक्युलेटर असतात......ते मला वास्तव जगात पुन्हापुन्हा खेचुन आणत असतात. केवळ भावनांवर अवलंबुन जगता येत नसतं....पैसा हेच सगळे काही असतं हा मोठा मंत्र ते सांगत असतात. पुन्हा पुन्हा डोक्यात तुझे विचार येत असतात.....पैसा हे कही जगण्याचे अन्तीम ध्येय नव्हे...मला एक घरटे उभे करायचे आहे......त्यात तुझ्या बरोबर छोटेसे का होईना माझे स्वत:चे विश्व असेल... ..... तुझे विचार मला बळ देतात...घराला भक्कम पाया असावा तसा माझ्या स्वप्नाना आधार देतात...
ये पेन और कैल्क्युलेटर
क्या बयां करेंगे मेरे ज़ज़्बात....
इस मंझील की हर बुनियाद;
इटोंकी जगह
तुम्हारी याद से रखी है..
कधीतरी एखाद्या कातर क्षणी तुझा हात माझ्या हातात असेल....न बोलताही आपण खूप काही बोलुन जाउ.....आपले भविष्य काय असेल....आपण काय करत असु.....याचाच विचार करत असु... मी तुझा मेहेंदी लावलेला हात हातात घेईन. त्यावरच्यी वेलबुट्टी निरखुन पाहीन.....भूतकाळ माहीत नाही पण आता आपला भविष्यकाळ मात्र एकत्र बांधला गेलाय एकमेकांसोबत..........पण ए...एक सांगशील?
आपके हाथ और ये मेहेंदी..
मै खो जाता हुं इन लकीरों मे...
भटक जाता हुं राह मे....खोजते हुवे....
बतादो इन मे से....
वो कौनसी....
..........मेरे तकदीर की लकीर हैं?
तू सोबत असलीस की सगळे कसे सोपे वाटते....मी कोठेही गेलो तरी तू सोबत असतेस.......माझ्या मनात का होईना तू माझ्याशी बोलत असतेस.....कुठेतरी मी घाम गाळत असतो....पिचल्या हाडानी रेटत कामाचा गाडा हाकत असतो..दूर परदेशात एकटाच जगत असतो.....तुझा एक कटाक्ष...एक स्मित मला पुन्हा उभारी देतं.....जगण्याची लढाई लढायचं बळ देतं
रस्त्यातले काटेकुटे तर जाणवतही नाहीत.
जब तुम साथ होती हो
हर राह युंही अच्छी होती है...
हर मोड मंज़ील लगता है..
पैरों मे काटोंका कोई
.......हिसाब नही लगता हैं...
मी इथे दूर देशात परदेशात अनोळखी मुलखात एकटाच आलोय. इथले सगळेच मला नवखे आहे.....काल इथे पाउस आला होता.....तुला भेटल्या सारखा तो मला भेटला...
कुछ अंधेरा कुछ रौशनी.....
बादलो की आडमे..
सूरज युं आधासा ढल गया था.
रेल की खीडकी से वो ओझल होता
तुम्हारा चेहरा याद आया
पलके भीगी; जमीन भीगी...
आज की बारीश मे..
कुछ मेरे आसूं भी शरीक थे
(क्रमश:)

अश्रु

मित्रांनो डोळ्यात पाणी येत असेल तर अडवू नका, अश्रु म्हंणजे भावनांचा अविष्कार
त्यांना जर उगीचच रोखल तर माणूस दगड होईल.

पुपुर्झा

कधीतरी कोणीतरी आपल्या मनात घर करत,कायमचा निवारा नसेलही तो,पण काही
काळ तरी आपल मन तिथ रमलेल असत, मनाला वेड लावणारे हे क्षण, रोजच्या धकाधकीच्या आयुष्यात असाही निवांतपणा हवाच ना

एक स्वप्न प्रवास (८)

या पूर्वीचा दुवा एक स्वप्न प्रवास (१) http://misalpav.com/node/1699
एक स्वप्न प्रवास (२) http://misalpav.com/node/1712
एक स्वप्न प्रवास.(३) http://misalpav.com/node/1785
एक स्वप्न प्रवास.(४) http://misalpav.com/node/1797
एक स्वप्न प्रवास.(५) http://misalpav.com/node/1859
एक स्वप्न प्रवास.(६) http://misalpav.com/node/1894
एक स्वप्न प्रवास.(७) http://misalpav.com/node/1966

का कोणजाणे पण बाहेरचे वारे जरा कमी झाले होते. ढग आता हलत नव्हता.बाहेरची काही गम्मत कुठुन बघायला मिळते का हे मी पहात होतो.
तेवढ्यात ........
(क्रमश:)
एक अनाऊन्सन्समेंट झाली. यात्रेकरुनी कृपया आपल्या जागेवर बसुन घ्यावे. आपला ढग आता जगन्नाथ पूरीवरुन जात आहे. येथे उतरणारे एकहीजण नसणार नसल्याने ढगाने हा श्टॊप रद्द केला आहे. तरीपण केवळ यात्रेकरुंच्या सोईसाठी ढग काहीकाळ जगन्नाथ पूरीच्या ढग श्टेशनात केवळ दोन मिंटासाठी थांबेल.तरी कोणिही खाली उतरू नये.यात्रेकरुना जे हवे असेल ते सगळे ढगातच मिळेल.एक धक्का बसला आणि आमच्या ढगाचा हळु हळु वेग कमी होऊ लागला. काही वेळाने तो चक्क थांबला. ढग; पूरीच्या ढगश्टेशनात थांबला. तेथे बरेच ढग थांबले असावेत. मला ढग श्टेशन कसे असते ते बघायचे होते. पण खाली उतरलेले प्रवासी चुकुन दुस-या ढगात जातात त्यामुळे लोकाना खाली उतरायला प्रतिबंध होता.. ढगावर पाटी लावण्याची सध्या काहीच व्यवस्था नव्हती. लेझर किरणांचा वापर करुन ढगावर नावाची पाटी लावण्याचे प्रयोग चालु आहेत असे कळाले पण तोपर्यन्त ही गैरसोय होणार होती.
आसपास काही जण "ऐ मोनॅको, मोनॅको, पारले मोनॅको" असे ओरडत बिस्किटे विकत होते.
कसे कोण जाणे मोनॅको विकणारे सगळे हवेत तरंगत होते. अगदी आमच्या ढगात सुद्धा ते डायरेक्ट आले होते..
हवाई प्रवासाच्या नियमा नुसार ढगात ;हलकी असतात म्हणुन फ़क्त मोनॅको बिस्कीटे विकायला परवानगी होती.
थोड्या वेळाने टण टण टण टण टण टण टण टण टण असा आवाज झाला आणि एक अनाउन्समेंट झाली" कृपया आपल्या शेजारचा उतारु सीटवर बसला आहे याची खात्री करुन घ्या" मी शेजारी पाहिले . माझ्या शेजारचा पेस्तनकाका जागेवर नव्हता. त्याला मी बाहेर पडताना पाहिले नव्हते.पेस्तनकाका इकडे तिकदे असतील या अंदाजाने मी एक आवाज दिला...पेस्तनकाका..... पेस्तनकाका...दूरुन कुठुन तरी आवाज आला. "शू छे डिकरा" मी इकडे आजुबाजुला पाहिले कोणीच दिसत नव्हते. मी डोळ्यावरचा गॊगल काढुनही पाहिले..कोणीच दिसेना. मी पुन्हा एकदा आवाज दिला पेस्तनकाका..... पेस्तनकाका.तुम्ही कोठे आहात? " पेस्तनकाकांचा फ़क्त आवाजच येत होता "अरे मी इकडेच हाय".
"अरे पण इकडे म्हणजे कुठे" मी पुन्हा आवाज दिला.
"अरे जरा वरती बघ नी गर्दन उपर करुन". पेस्तनकाकांचा आवाज या वेळेस स्पष्ट आला. मी वर पाहिले.....पहातो तो काय. पेस्तनकाका हवेत तरंगत होते.त्यानी मोनॅको बिस्किटे जास्त प्रमाणात खाल्यामुळे ते फ़ारच हलके होऊन हवेत तरंगत होते.
ते तसेच हवेत बराच वेळ तरंगत राहिले. बहुधा त्यांचा बिस्किटांचा स्टॊक संपल्यामुळे की काय ते हळु हळु खाली आले.
ढग आता मेघालयावरुन जात असावा. खाली ढगाला आजुबाजुला खिडक्या असण्याऐवजी खाली जमिनीला खिडक्या होत्या.बाजुचे दिसणे शक्य नव्हते. पण काही काही ठिकाणी जमिनीला असलेल्या खिडक्यातुन खालची जमीन दिसत होती,तिष्ता नदीचे विशाल पात्र संध्याकाळच्या उन्हात चमकत होते. डोंगर, रस्ते, घरे , इमारती ,गाड्या सगळे कसे दिवाळीच्या किल्यावर ठेवल्यासारखे दिसत होते. फ़क्त शिवाजी महाराज, जंगलात गुहेत रहाणारा सिंह, पालथा झोपलेला सैनिक आणि सलाईनच्या बाटलीचे कारंजे असते तर फ़टाके न उडवतादेखील दिवाळी केल्यासारखे वाटले असते.शिलॊंग हे सगळ्या ढगांचे आजोळ म्हणुन तर त्याला मेघालायची राजधानी म्हणतात.येथे आम्ही पाणी उतरवणार होतो.अप्पर शिलोंग जवळ चेरापुंजी गाठायचे आणि पाउस पाडायचा ही पाणी उतरवण्याची पद्धत. चेरापुंजी आले. आता ढग पाउस कसा पाडणार ही मला उत्सुकता होती. आत्तापर्यंत पाउस पडताना पाहिला होता . पावसाचे पडणे हे पावसात भिजुन अनुभवले होते.पण स्वत: पाउस कधी पाडला नव्हता. मला पाउस कसा पाडतात हे पहायचे होते म्हणुन मी ढगाच्या डिस्पॆच विभागात गेलो. तेथे पाउस पाडण्याची पूर्वतयारी चालली होती. आकारमानाप्रमाणे आणि प्रदेशानुसार गारांचे वर्गिकरण करुन ठेवले होते.त्या एका चाळणीमधुन खाली टाकण्यात येणार होत्या. पाण्याने भरलेले छोटे ढगांचे तुकडे रचुन ठेवले होते.
पाउस पडण्यापूर्वी वातावरण निर्मिती व्हावी म्हणुन ढगातील स्पीकर चालु केले होते. त्यावर मेघ मल्हार रागातील विजांचा कडकडाट वाजत होता. विजांचा लखलखटाट व्हावा म्हणुन विद्युत भारीतदोन ढग कार्यरत होते. त्यानी एकमेकाना टाळी दिली आणि एकच लखलखाट झाला. पाउस पाडण्यापूर्वी हे असे लोकाना पावसाची वॊर्निंग देण्यासाठी करावेच लागते. अन्यथा तक्रार कक्षात तक्रारींचा खच पडतो. पाण्याचे ढग पिळणारे मशिन चालु झाले. आणि खालचे आसमंत एक वेगळ्याच सुगंधाने भरुन गेले.
हवा एकदम उत्साही वाटु लागली.खाली पाउस पडत होता. पाउस चालु असताना जवळ जवळ तासभर खाली काही दिसत नव्हते. पण पाउस संपल्यानन्तर सगळे कसे लख्ख दिसु लागले.
खाली तिष्ता नदी आता दुथडीभरुन वहात होती.झाडे कशी लहान मुलाला आईने आंघोळ घालावी तशी दिसत होती. जंगलातुन जाणा-या राष्ट्रीय महामार्गामुळे खाली दाट केसातुन भांग पाडावे तसे दिसत होते. दगडावरुन पडणारे नदीचे पाणी पाहुन मला कालिदासाने मेघदूतात वर्णन केलेल्या ओलेत्या ललनेच्या शुभ्र वस्त्राप्रमाणे दिसणारे नदीचे पाणी ही उपमा आठवली. खरेच कालिदासानेही असाच ढगातुन कधितरी प्रवास केला असावा त्याशिवाय त्याला ही उपमा सूचली नसती.
खडकावरुन फ़ेसाळत खळाळणारा पाण्याचा शूभ्र प्रवाह...त्याभोवती गवताचे हिरवे गार मखमली पाचुचे मखर. मधेच दिसणारी लालसर काळी माती या सगळ्याला विसंगत छेद देणारा काळाशार डामरी राष्ट्रीय महामार्ग. अक्षरश: वेड लावणारे दृष्य होते ते. हिरव्या रंगाच्या अगणीत छटा कोणीतरी मनाला येईल तशा उधळल्या होत्या.एका रंगाच्या इतक्या छटा असतात हे प्रथमच पहात होतो.नुकत्याच फ़ुटु पहाणा-या कोवळ्या सोनेरी लालसर मखमली दुलई पासुन ते गाभुळल्या शेवाळी काळसर हिरव्यापर्यंत........दाट वाढलेल्या कुरणाच्या फ़िक्कट पोपटी छटेपासुन ते वा-यावर नाचत हिंदोळणा-या मोठ्या हत्ती गवताच्या पाचुच्या हिरव्या गालिच्या पर्यन्त हिरव्या रंगाच्या असतील नसतील तेव्हढया सगळ्या छटा उपस्थित होत्या.
पाउस झाल्यामुले माणसे खुशीत येत असतीलच पण ढगही खुशीत येतात. ते हलेके होतात. पुढील प्रवासासाठी हिरवे हिरवे गार गालिचे हरित तृणांच्या मखमालीचे म्हणत एकमेकांत मिसळतात.शाळा सुटल्यावर लहान मुलानी जल्लोश करत घरी जाण्यासाठी वर्गातुन मैदानात धाव घ्यावी. त्यांची एकच सरमिसळ व्हावी आणि त्या गर्दीला "उत्साह" एवढेच रूप मिळावे तसे काहिसे झाले.....आमच्या ढगात बरेचसे लहनमोठे ढ्ग मिसळले. आणि ढग वरवर जाउ लागला
आता बहुधा फ़ार संध्याकाळ झाली असावी.बाहेरे अंधारु लागले होते.हळु हळु ढगातही अंधारु लागले. खाली अंधार झाला होता. काहिच दिसेनासे झाले होते.
खाली दिसेनासे झाले म्हणुन की काय आकाशात एक चमत्कार होत होता. कोणितरी चिकटवावे तशा एकेक चांदण्या चमकु लागल्या. सप्तर्षी , व्याध , स्वाती , भूतप , कृत्तीका ,व्याध , रोहिणी , अश्लेशा, भरणी, ही सारी एकदम डोक्यावर चमकत होती. पूर्वेकडे वृस्चिकेत अनुराधा. ज्येष्ठा . मूळ नक्षत्रा सह दिमाखात उगवत होत्या. हे कमी होते म्हणुन की काय अगस्तीचा तारा दक्षीणेकडे लाल ,जांभळा रंग उधळत होता. मधुनच एखादा ईरिडियम उपग्रह चमकुन जात होता. मी ठरवुन टाकले पुढची कोजागिरी ढगातच साजरी करायची.
पौर्णीमेचा चंद्र दिसावा अशी मनोमन प्रार्थना करत होतो. पण नन्तर एकदम आठवले; प्रतिपदेला पौर्णीमेचा चन्द्र कसा दिसेल..
आता रात्र मध्यावर आली होती. सर्वत्र कसे शांत शांत होते . नाही म्हाणायला एखादा तारा तुटताना दिसत होता.माझ्या आजुबाजुचे सगळे गाढ झोपले होते. मध्यरात्र उलटुन रात्रीचा तिसराप्रहर सुरु होता.अधुन मधुन जाताना एखादा छोटा ढग फ़ारसा गाजावाजा न करता आम्हाला येउन मिळत होता. त्यानुसर आमचा ढग मोठामोठ होत होता. पूर्वेला शुक्र चमकयला लागला.त्य अंधारात शुक्र फ़ारच तेजाने तळपत होता. त्याचा प्रकाश इतका शीतल वाटत होता त्यामुळे सगळ्या ढगात नाईट लॆम्पमुळे यावा तसा एक निळसर प्रकाश सर्वत्र पसरला होता.
हळु हळु सगळे तारे अंधुक व्हायला लागले.पूर्वेला निळसर गुलाबी गुलालाची उधळण होऊ लागली.मी आत्तापर्यंत सूर्योदय फ़क्त डोंगराआडुनच होताना पाहिला होता.हा सूर्योदय अगदी क्षितीजावरुन होत होता.आकाश गुलाबी सोनेरी लालसर मोरपंखी अशा अनेक रंगानी भरुन गेले. आमचा ढग तर मिनिटामिनिटाला नवा रंग धारण करत होता.हळु हळु त्या प्रत्येक रंगात एक सोनेरी झाक डोकावु लागली. पूर्वेकडे साक्षात भगवान सहस्त्ररश्मी क्षितीजाआडुन डोकावु लागले.क्षितीजावरुन सूर्यास्त दिसतो जवळ जवळ तेवढाच सूर्योदय ही मनोहर दिसतो. किंबहुना त्यापेक्षा जास्तच. कोणाही मर्त्य मानावाला जमणार नाही अशी रंगांचे ही स्वर्गीय उधळण ढगात सुरु झाली होती. हळुहळु सगळ ढग लालसर सोनेरी प्रकाशाने न्हाउन निघाला. त्या प्रकाशात आम्ही सगळेच लालसर सोनेरी यक्ष दिसु लागलो. तेजपुंजाची झळाळी काय असते याचा आम्ही अनुभव घेत होतो.
मंत्रमुग्ध होणे म्हणजे काय ते अनुभवत होतो.आता सगळ ढग सोनेरी झाला. पिवळा चश्मा न लावातादेखील ढगातले सगळे दिसु लागले हळु हळु प्रकाश जास्त जास्त तीव्र होऊ लागला. आणि प्रखर झाला.पूर्वेला बघवत नव्हते इतका म्हणजे वेल्डिंग करताना असतो त्या पेक्षाही प्रखर उजेड दिसु लागला. डोळे दीपु लागले.सूर्याची किरणे आता थेट डोळ्यावर येऊ लागली.
.....................बेडरूमच्या खिडकीतून येणारी सूर्यकिरणे थेट डोळ्यावर येत होती. त्याने मला जाग आली. रेडीओ वर गाणे लागले होते " येरे घना येरे घना.... न्हाऊ घाल माझ्या मना....."
छे: आजही तसेच. ऎन; पुन्हा.एकदा मी स्वप्नात तुला न भेटताच परत आलो. ही अशी स्वप्नांची समाप्ती नको वाटते. पण ते आपल्य हातात थोडेच असते.
.तुझ्या स्वप्नात यायला आता सर्व काळजी घेउन काही तरी नवा मार्ग शोधायला हवा.....
बघु. हा तुझ्या स्वप्नात जाण्यासाठीचा प्रवास कसा पूर्ण करता येतोय ते.
तुझा मित्र विजुभाऊ व्हिक्टर...... ..........

मनोगत

Wink Angry
याहू ! याहू मिपावरचे माझे खाते पुन्हा उघडले. आनंद अत्यानंद आणि काय काय ते!!!!
मिपाचा विरह! संपुर्ण महिन्यासाठी !!!

जसा धरित्रीला वरूणराजाचा
अमावस्येला चांदण्यांना चंद्राचा
ग्रीष्मात वृक्षांना पानांचा
आणि नद्यांना पाण्याचा.

लिहायला मिळत नाही. लिहायचं मरू द्यात पण प्रतिक्रिया द्यायचही लायकी नाही. छ्या ह्या जगण्याला काय अर्थ ??????
फार सहन केले. आता पुन्हा नको ते दीनवाणेपण.

सर्वांना सहर्ष नमस्कार.