संदर्भ
युलीप बाबत काय करावे?
प्रेषक सदानंद ठाकूर ( मंगळ, 03/16/2010 - 21:17) .युलीप बाबत काय करावे?
वय वर्षे ३५ पर्यंतचे व्यक्तीने शक्यतो टर्म इंशुरन्स माध्यमातून जिवन विमा घ्यावा व गुंतवणूक म्युच्युअल फंड किंवा अन्य गुंतवणूक पर्यायांमध्ये करावी. ज्यावेळी आपल्या गुंतवणूकीचे मुल्य अपेक्षीत रकमे एवढे होईल, म्हणजेच आपल्या पश्चात वारसाचे सर्व प्रकारच्या आर्थीक गरजा भागण्याएवढे होईल तेव्हा टर्म इंशुरन्सचा हप्ता भरणे बंद करुन सर्व रक्कम गुंतवणूक पर्यायात करावी. (नियमीत दर महा अथवा वार्षीक स्वरुपात करणे चालू ठेवावे).
युलीपचे फायदे:
* मर्यादीत ५ वर्षे हप्ते भरुन नंतर हप्ते न भरताही वयाची ७५ वर्षे पुर्ण होईपर्यंत विमा संरक्षण चालू ठेवण्याची सुविधा.
* आयकर कलम ८०-सी नुसार कर बचत.
युलीपचे तोटे:
* पहिल्या वर्षी अँलोकेशन चार्जेस बरेच असतात त्यामुळे संपुर्ण रक्कम गुंतवणूकीला जात नाही.
* २ –या व ३ –या वर्षी सुध्दा व काही योजनेत नंतरही चार्जेस कापले जातात.
* सर्व प्रकारचे विमा संरक्षणापोटी कापले जाणारे मॉर्ट्यालीटी चार्जेस, फंड मँनेजमेंट चार्जेस, अँडमिनीस्ट्रेशन चार्जेस हे दर महिना आपली त्याप्रमाणात युनीटस् कापून आकारले जातात, ज्यामुळे भविष्यात युनीटची एनएव्ही वाढली तरी त्याचा पुर्ण लाभ विमा धारकाला मिळत नाही.
* मार्केट वरती जात असताना एनएव्ही मधील बदल म्युच्युअल फंडाचे तुलनेत लक्षणीय नसतो. मात्र मार्केट कोसळत असताना एनएव्ही जास्त प्रमाणात कोसळते.
युलीपचे तुलनेत गुंतवणूक म्हणून म्युच्युअल फंड योजनाच का स्विकारावी?
* संपुर्ण रक्कम गुतवली जाते.
* कोणतेही चार्जेस युनीटस कमी करुन आकरले जात नाहीत तर ते चार्जेस वजा केल्यानंतरच एनएव्ही जाहीर केली जाते.
* मार्केट नुसार एनएव्ही मधील बदल लक्षणीय असतो.
* म्युच्युअल फंडाचे इएलएसएस योजनेत केलेल्या गुंतवणूकीवरही आयकर कलम ८०-सी नुसार कर सवलत मिळते.
* पैसे भरणे व काढणे आपल्या सोइनुसार ठरवता येते.
* म्युच्युअल फंड व युलीप दोन्हीकडे बाजाराचे चढ उताराची जोखिम असते अशावेळी म्युच्युअल फंडातील परतावा हा युलीप पेक्षा नेहमीच अधीक असतो.
परंतु जर वय ३५ पेक्षा जास्त असेल व जिवन विमा घेणे गरजेचे असेल तर एखाचे चांगले युलीप योजनेद्वारे विमा उतरावा, मात्र तो उतरवताना उदिष्ट हे प्रथम विमा व नंतर परतावा असेच असावे.
त्यासाठी खालीलप्रमाणे धोरण अवलंबल्यास फायदेशीर होते:
* युलीप योजना स्विकारताना बाजारात उपलब्ध असणा-या सर्व योजनांचा तौलनीकदृष्ट्या अभ्यास करुन ज्या योजनेत कमीत कमी अँलोकेशन चार्जेस असती व ज्या योजनेत आपले स्वत:चे वय ७५ वर्षे पुर्ण होईपर्यत विमासंरक्षण मिळू शकत असेल तसेच ज्या योजनेत अपघाती मृत्यु, कायमस्वरुपी अपंगत्व, मेडिकल संरक्षण इ. मिळत असेल अशी सर्वसमावेशक योजना निवडावी. एक लक्षात ठेवा बहुतांशी एजंट सर्वसाधारणपणे तुमचा विचार न करता त्याचे कमिशनचाच जास्त विचार करत असतो.
* आपले जिवन संरक्षण वय वर्षे ७५ पर्यंतची घ्यावे.
* विमा संरक्षण योजनेतून जितके जास्तीत जास्त मिळेल तेवढे घ्यावी.
* सर्वसाधारणपणे युलीपमध्ये विमा हि वार्षीक हप्ता गुणीले मुदत भागीले दोन द्यावेच लागते, परंतु जर सदर योजनेतून जादा जिवन संरक्षण मिळत असेल तर ते संपूर्ण घ्यावे.
* जेवढे रायडर उपलब्ध असतील तेवढे घ्यावेत.
* पॉलिसी सुरु झाल्यापासून पुढे ५ वर्षे नियमीत विमा हप्ता भरावा.
* ५ वर्षानंतर विमा संरक्षण वय वर्षे ७५ पर्यंत चालू ठेवण्याचा पर्यायाचा अर्ज द्यावा.
* ५ वर्षानंतर विमा हप्ते भरणे बंद करावे पण पैसे काढू नयेत.
* ५ वर्षानंतर जेवढा विमा हप्ता आपण दर वर्षी भरत होतो पैकी त्यावेळी असणारे आयकर कायद्याप्रामाणे जेवढी सुट कलम ८०-सी प्रमाणे मिळत असेल तेवढी रक्कम म्युच्युअल फंडाच्या टँक्स प्लँन मध्ये गुतवावी व उर्वरीत रक्कम इक्वीटी अथवा डेट म्युच्युअल फंड योजनेत आपल्या जोखिम स्विकाणेच्या तयारीनुसार गुंतवावी.
* आपल्या गुंतवणूक मुल्यातूनच विमा आकार कापला जाऊन विमा संरक्षण मुदतपुर्तीपर्यंत चालू राहील.
* मुदतपुर्ती पुर्वी मृत्यु आल्यास विमा संरक्षणा इतकी रक्कम वारसाला प्राप्त होईल.
* मुदतपुर्तीचे वेळी आपण हयात असल्यास जे काय गुंतवणूक मुल्य असेल ते आपणास परत मिळेल.
* युलीपद्वारे जिवन विमा संरक्षण घेताना गुंतवणूक म्हणून नव्हे तर सोईचा विमा पर्याय म्हणूनच पहावे.
* युलीप हा खरे पहाता गुंतवणूक पर्याय म्हणून पहावयाचाच नसल्यामुळे उगाच गुंतवणूक मुल्य वगैरे पहाण्याच्या फंदातही पडू नये.
* शेअस बाजाराचे मँजीकल परतव्यामुळे आपले विमा संरक्षणाचे चार्जेस ५ वर्षे नियमीत हप्ते भरले असता चालू रहाण्याची सर्वाधीक शक्यता असते.
ह्याप्रमाणे युलीपद्वारे जिवन विमा संरक्षण घेणे कोणत्याही वयाचे व्यक्तीला फायदेशीर होते कारण फक्त ५ वर्षे इतक्या मर्यादित काळासाठी हप्ते भरुन नंतर वर वर्षे ७५ पर्यंत विमा संरक्षण चालू रहाण्याची सुविधा मिळते व ७५ वर्षानंतर शिल्क मुल्यही परत मिळते. आपल्याला जेवढे विमा संरक्षण हवे आहे त्याच प्रमाणात युलीपचा हप्ता ठरवावा व उर्वरीत रक्कम शक्यतो सिस्टीमँटीक इन्व्हेस्टमेंट योजनेचे माध्यमातून एखादे चांगले म्युच्युअल फंड योजनेत गुंतवावेत.
अशा प्रकारे युलीप बाबत निर्णय घेतल्यास पस्तावण्याची वेळ येत नाही.
आपली एकूण बचत हि आपल्या निव्वळ (सर्व कर्जाचे हप्ते वगैरे वजा जाता) उत्पन्नाचे ३५% एवढी असावी, जेणे करुन भविष्याची चांगली तरतुद होऊ शकेल. आपली गुंतवणूक हि निरनिराळ्या गुंतवणूक माध्यमात, उदा. बँक, पोस्ट, पी.पी.एफ., इक्वीटी म्युच्युअल फंड, डेट फंड, बँलन्स फंड व शेअर्स मध्ये करावी जेणे करुन जोखिमीचे संतुलन होईल.
युलीप किंवा म्युच्युअल फंडात गुंतवणूक करताना जवळचे एजंट मार्फत गुंतवणूक करण्याऐवजी तज्ञ गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला (त्याची फि देऊनही) घेऊन मगच निर्णय घेणे गुंतवणूकदाराचे हिताचे असते.
- प्रतिक्रिया प्रकाशित करण्यासाठी येण्याची नोंद करा अथवा सदस्य व्हा.
विंदांकडून काय घ्यावे?
प्रेषक चिंतातुरजंतू ( सोम, 03/15/2010 - 13:54) .वक्रतुंड महाकाय गणपतीच्या
सोंडेकडे पाहून (अश्लील वाङ्मय
चोरून वाचणार्या) एका प्रमदेला
कामेच्छा झाली
तिचे दोन्ही मोदक स्तन
चट्टदिशी घट्ट धरून
वक्रतुंड महाकाय गणपतीने
तिला एकवीस वेळा आकाशात गरगर
फिरवली
आणि जेहेत्तेकालाचेठायी
श्लील नामक घोर नरकामध्ये
फेकून दिली.
दचकलात? संपादित करायला हात शिवशिवू लागले? दुखावण्यास भावना सरसावल्या? थोडे थांबा. ज्यांना श्रध्दांजली वाहायला गेल्या चोवीस तासांत शेकडो धावले असे गूगल सांगते, त्या विंदांच्या लेखणीतून ही विरुपिका उतरली आहे. विरुपाचे रूप दाखवणार्या या विरुपिकेस १९७३ साली प्रसिध्दी मिळाली आणि त्याविषयी वादही झाले. तेव्हा खुद्द विंदांनी त्याविषयी जे निरुपण केले, ते असे (अधोरेखिते आमची):
‘सत्यकथे’च्या ऑगस्ट १९७३च्या अंकात माझ्या पंधरा कविता प्रसिद्ध झाल्या. त्यातल्या काही ‘विरूपिका’ होत्या. त्यातील ‘वक्रतुंड महाकाय’ या शब्दांनी सुरू होणार्या विरूपिकेसंबंधी आपल्या समाजातील काही लोकांनी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या स्वरूपांत तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केलेल्या आढळल्या. प्रथम पुण्याच्या वर्तमानपत्रांत तिच्याविरुद्ध पत्रे व लेख येऊ लागले. नंतर काही जिल्हापत्रांनी तिच्याविरुद्ध अग्रलेख लिहिले. पाठोपाठ सांगली व बार्शीसारख्या शहरांतून कवीचा व संपादकांचा निषेध करणार्या सभा व मोर्चे झाले. एका नगरपालिकेने व काही महिला मंडळांनी निर्भर्त्सना करणारे ठराव पाठवले. भावे-माडगूळकरांनी अध्यक्षस्थानावरून प्रतिकूल प्रतिक्रिया व्यक्त केल्या. वैयक्तिक धमकावण्या आल्या.
माझ्या पुस्तकांची होळी करण्यात आली. हे सर्व इतके जलद व पद्धतशीरपणे होत गेले की, त्या माझ्या दहा ओळींच्या कवितेतील विशिष्ट मजकुरामुळेच हे घडत आहे, यावर विश्वास ठेवणे कठीण वाटावे. या सर्व प्रकारांत प्रतिगामी राजकीय पक्षांनी पुढाकार घेतलेला आढळला. या संधीचा फायदा उठवून जनतेपासून अलग पडलेल्या प्रतिगाम्यांचा भक्तिभावनेच्या आधाराने पुन्हा एकदा जनतेशी जवळीक साधण्याचा हा एक प्रयत्न तर नव्हे?
काही असले तरी त्या कवितेच्या रूपाविषयी, तिच्यातील आशयाविषयी व तिच्या लेखामागील माझ्या हेतूविषयी काही लोकांच्या मनात गैरसमज निर्माण झाला आहे किंवा तो करून दिला जात आहे, ही वस्तुस्थिती आहे. त्या कवितेसंबंधी माझी भूमिका संबंधित लोकांनी शांतपणे समजून घेतली तर हा सर्व विरोध अनाठायी आहे, ही गोष्ट त्यांच्या लक्षात येईल.
पहिली गोष्ट म्हणजे ‘वक्रतुंड महाकाय’ ही विरूपिका आहे; रूढ चाकोरीतील कविता नव्हे. अभिव्यक्तीचा एक नवा प्रकार शोधण्याचा हा प्रयत्न आहे. अर्वाचीन चित्रकलेत प्ररूपीकरण (अॅब्स्ट्रॅक्शन), प्रवाहीकरण (सर्रिअॅलिझम) व प्रकल्प (फँटसी) या प्रक्रिया वेगवेगळय़ा पद्धतीने प्रकट होताना आढळतात. तशाच स्वरूपाच्या बंदिश शब्दांच्या साहाय्याने निर्माण करता आली तर पाहावी, ही त्या अंगातील अनेक विरूपिका लिहिण्यामागील माझी प्रमुख प्रेरणा होती. प्रस्तुत विरूपिका ही अल्प प्रमाणात प्ररूपीकरणावर व मुख्यत: प्रकल्पावर आधारलेली आहे. वास्तवाच्या अंगाने- म्हणजे गणपती प्रत्यक्षात जसा दिसतो तशा अंगाने- तिच्याकडे पाहणे चुकीचे आहे. माझा हेतू गणपती किंवा प्रमदा यांचे यथातथ्य चित्रण करणे हा नसून, विशिष्ट प्रकारच्या प्रकल्पनातून एका व्यापक आशयाला भिडण्याचा, निदान त्या व्यापक आशयाकडे झेपावण्याचा आहे.
तो व्यापक आशय असा : जीवनाचे अंशदर्शन घेऊन त्यात रमणे हीच खरी विकृती आहे. अश्लील आणि श्लील असे द्वैत कल्पिणे म्हणजे जीवनाच्या व्यापक व एकात्म साक्षात्काराला पारखे होणे, शरीराचे अवयव सुटे-सुटे पाहिले की अभद्रता जाणवते, पण एकात्मतेने पाहिले की सौंदर्याचा प्रत्यय येतो; तसेच
जीवनाचे व कलेचेही आहे. जीवनाच्या एकात्म साक्षात्कारात अश्लील व श्लील या सुट्या कल्पनांचा कायाकल्प होतो. ही साकल्यवादी दृष्टी निकोप प्रकृतीच्या माणसामध्ये व पर्यायाने श्रेष्ठ कलाकृतीमध्ये
अभिप्रेत असते. या विरूपिकेतील ‘प्रमदा’ ही ‘अश्लील वाङ्मय चोरून वाचणारी’ आहे; त्यामुळे तिचे मन विकृत झाले आहे आणि तिचे मन विकृत आहे म्हणूनच मंगलाचे दर्शन घेत असताना ती अमंगल वासनेच्या आहारी जाते. अश्लील वाङ्मयाचा चोरटा आस्वाद घेणार्या सर्वच विकृत स्त्री-पुरुषांची ती
प्रतिनिधी आहे. अशा लोकांचे स्थित्यंतर झाले तरी अश्लीलाच्या नरकातून निघून श्लीलाच्या नरकात जाऊन
पोहोचतात : एका प्रकारच्या अंशदर्शनातून दुसर्या प्रकारच्या अंशदर्शनाकडे. फक्त निकोप वृत्तीची माणसेच
जीवनाचा व कलेचा साकल्याने व एकात्मवृत्तीने वेध घेऊ शकतात. मंगलाच्या दर्शनात अमंगल वासनेच्या आहारी जाणार्या त्या प्रमदेला गणपती शिक्षा करतो. तिला श्लीलाच्या नरकात फेकतो. ते करीत असताना त्याच्या मनात तिच्या स्तनांविषयी कोणतीही अमंगल भावना नसते. हे सूचित करण्यासाठीच ‘मोदक’ हा शब्द स्तनांच्या उल्लेखामागे आहे. या मोदकाशी संबंधित असलेली भावनेची छटा पावित्र्याची आहे, नैवेद्याची आहे. हे सूचित व्हावे, यासाठी पुढे वेगळ्या संबंधांत ‘एकवीस’ हा शब्द
मुद्दाम योजलेला आहे. कारण नैवेद्य एकवीस मोदकांचा असतो. ‘जेहेत्तेकालाचेठायी’ या शब्दांनी हे सर्व चित्रण प्रकल्पनाच्या पातळीवरचे आहे, वास्तवाच्या पातळीवरचे नाही, ही गोष्ट पुन्हा एकदा सूचित केली आहे. कारण हरदासी कथेमध्ये अशक्यप्राय घटनांना त्या शब्दांनी उठाव दिलेला असतो. सारांश, या विरूपिकेचा आशय विकृतीचे खंडन करणारा आहे; विकृतीचे मंडन करणारा नाही व तिच्या लेखनामागील हेतू कोणत्याही प्रकारे गणपतीची (अप्रतिष्ठा करणे नसून - आमचा अंदाज; मूळ शब्द उपलब्ध नाहीत) नेमका उलट आहे : गणपतीचे मंगल स्वरूप गृहीत धरल्यामुळे कवीने त्याला अमंगलाचा निखंदक म्हणून उभा केला आहे.
पण मी गणपतीच का निवडला? गणपतीची बीजकथा (मिथ) ही विरूपिकेतील आशयाच्या दृष्टीने अधिक अर्थपूर्ण वाटली म्हणून. या विशिष्ट काव्यप्रकाराला मी विरूपिका म्हणत होतो आणि गणपतीला आपल्या परंपरेत कुठे तरी ‘विरूपांचा विरूप’ म्हटले गेल्याचे स्मरत होते. शिवाय या लिखाणात अर्थाचे उलटसुलट पलटे होते; म्हणून परस्परविरुद्ध अर्थाच्या कक्षा सूचित करील अशी बीजकथा मला हवी होती. गणपतीची बीजकथा त्या अर्थाने संदर्भ-श्रीमंत होती. गणपती हा आर्यांचा होता, तसाच अनार्यांचा होता; वैदिकांचा होता, तसाच व्रात्यांचा होता. ऋग्वेदातील अभ्युदयेच्छू ऋषी त्याला ‘गणनांत्त्र गणपती’ व ‘कवि कवींनां’ म्हणत होते, तर यजुर्वेदातील गमेंच्छु स्त्रिया त्याला ‘आत्वं अजासि गर्भधं’ असे आवाहन करीत होत्या. एका बाजूने तो कुलप्रतिकाशी (टोटम) संबंधित, तर दुस-या बाजूने आदिम साम्यवादी गणराज्याशी, स्मृतिकारांचा गणपती बुद्धिहर्ता व विघ्नकर्ता तर पुराणांचा गणपती बुद्धिदाता व विघ्नहर्ता. तांत्रिकांचा वामाचारी, तर संतांचा मूर्तिमंत मांगल्य. पार्वतीने आपल्या अंगावरील मळातून या मंगलमूर्तीची निर्मिती केली. या एका आख्यायिकेतच जणू काय गणपतीच्या आयुष्यातील सर्व संक्रमणे सूचित होऊन जातात. शिवाय गणपतीची बीजकथा अजून पूर्णपणे गोठलेली नाही; सार्वजनिक गणपती अजूनही वाटल्यास गांधी टोपी घालू शकतो! म्हणूनच या गणपतीच्या आधारे काव्यात्म प्रकल्पनाचे आवश्यक ते स्वातंत्र्य व श्लील-अश्लीलाला छेद देणारे मांगल्याचे तत्त्वसूचन ही दोन्हीही मला साधता आली. शिवाय, अशी गोष्ट मी या कवितेत प्रथमच केली असेही नव्हे. विनोदी अंगाने माझ्या काही बालगीतांत व गंभीर अंगाने
‘हिमयोग’सारख्या माझ्या कवितेत हा गणपती पूर्वीही आलेला आहे. नवकाव्याला समृद्ध करणार्या अनेक मार्गांपैकी प्राचीन बीजकथांचा व प्रतीकांचा सृजनशील उपयोग हा एक प्रभावी मार्ग आहे, असे मी नेहमीच मानीत आलो आहे. या बीजकथांतील शब्दांचा वेध रूढ चाकोरीतून घेतल्यास ज्या गफलती होतात, त्याचेच हे प्रकरण म्हणजे एक उत्तम उदाहरण आहे.
काव्याचा सूक्ष्म विचार करण्याची सवय व सवड नसलेल्या सामान्य नागरिकाला या वेगळ्या रीतीने शब्दवेध घेणे थोडेफार कठीण जात असेल, याची मला कल्पना आहे. त्यामुळेच प्रतिगाम्यांना माझ्याविषयी, संपादकांविषयी व त्या कवितेविषयी गैरसमज पसरविणे शक्य झाले असावे. ते गैरसमज दूर व्हावेत, या हेतूनेच हे सर्व लिहीत आहे. गणपती हा माझ्याही सांस्कृतिक वारशाचा एक अभिन्न भाग आहे; गणपतीच्या परंपराप्राप्त कथा, अष्टविनायकांच्या व इतर शिल्पांमधून त्याचा आढळणारा रूपविलास व त्याच्या वास्तव रूपाशी संबंध असलेली प्रतीकात्मकता, ही सर्व मलाही इतर भारतीयांइतकीच प्रिय आहेत. ‘वक्रतुंड महाकाय’ ही विरूपिका लिहिताना माझ्या मनात गणपतीची अप्रतिष्ठा करावी किंवा सश्रद्ध माणसांच्या भावना दुखवाव्या, असा पोरकट हेतू बिलकूल नव्हता; माझा हेतू, व्यापक व एकात्म अशा गंभीर जीवनदृष्टीकडे अंगुलिनिर्देश करणारा एक गमतीचा व वेगळा आकृतिबंध निर्माण करावा, एवढाच होता.
विरूपिकेची व्याख्या काय असे कुणी विचारले तर त्याचे उत्तर सध्या तरी माझ्याजवळ नाही. कोणताही नवा काव्यप्रकार आपली व्याख्या ठरवून जन्माला येत नाही; ते एक स्फुरण असते. विकसनाच्या व बहुरूपत्वाच्या अनेक शक्यता त्यात सामावलेल्या असतात. हळूहळू त्या प्रगट होत जातात आणि त्यानंतर समीक्षेच्या दृष्टीने सोयीची वाटणारी अशी त्याची व्याख्याही घडविली जाऊ लागते; पण ती व्याख्यासुद्धा कामचलावू, कार्यकारी व्याख्याच असते, हे विसरता कामा नये. ती अपरिवर्तनीय नसते. कोणत्याही काव्यप्रकाराची तर्कशुद्ध व्याख्या ही गोष्ट तर्कदृष्ट्याच असंभवनीय आहे. कारण स्वत:ची ओळख पटविण्याइतपत साकल्याधिष्ठित स्वत्व (आयडेंटिटी) त्याच्याजवळ कमी-जास्त प्रमाणात असले, तरी एखदा प्राणभूत गुणधर्म अथवा सत्त्व (इसेन्स) किंवा फक्त त्याचे असे व्यवच्छेदक लक्षण (डिफट्रिया) त्याच्याजवळ नसते.
(गो. वि. ऊर्फ विंदा करंदीकर यांच्या, ‘परंपरा आणि नवता’ या ग्रंथातून साभार)
आता वाचकांनी यातून काय बोध घ्यावा? अनेक शक्यता आहेत, जसे:
- थोडे आधी सांगायचे; यांनाही कतारला पाठवले असते.
- शेवटी यांचेही पाय (कोंकणांतल्या फोकलिच्यांनी कुले असे वाचावे) मातीचेच निघाले. (कडवे डावे) विचारवंत कडू ते कडूच, ज्ञानपीठात तळा किंवा लोकप्रियतेत घोळवा.
- ते हिंदू आहेत; त्यांना असे म्हणण्याचा हक्क आहे. (नास्तिक असले म्हणून काय झाले?)
- आम्हांस ऋषितुल्य असलेल्या विंदांविषयी ते मेल्यावर असे वाईटसाईट पसरवणार्यासच चोपला पाहिजे. सूचना: आम्ही हे प्रहारमधून उचलले, त्यामुळे आधी नारायण राण्यांस चोपा. आम्हांस आनंदच होईल
- विंदा काय बोलले काही कळत नाही ब्वॉ. जाऊदेत आपण आपले मेलेल्यास नमस्कार करून मोकळे व्हावे, हे बरे.
झोप (Need, Deprivation and Abstinence thereof)
प्रेषक इंटरनेटप्रेमी ( शुक्र, 03/12/2010 - 02:30) .नमस्कार,
माझे वय आजमितीला सुमरे २१ वर्ष आणि ४.५ महिने आहे. मला सुमारे ५ वर्षांपासून रात्री काम करणे आणि दिवसा झोपणे, अशा (सामान्यतः अनारोग्यकारक समजल्या जाणार्या दिनक्रमाची ) सवय लागली आहे. तर रात्रीची झोप येण्यासाठी काय करावे? अशा प्रकारचे अनैसर्गिक वेळापत्रक असल्यामुळे शरीरावर होणारे दूरगामी परिणाम यांची कृपया माहिती द्यावी.
--
आपला नम्र,
इंटरनेटप्रेमी, मुंबई, महाराष्ट्र राज्य.
'law and order' या विषयवरील आपले आवडते चित्रपट...
प्रेषक इंटरनेटप्रेमी ( गुरू, 03/11/2010 - 19:29) .नमस्कार,
नुकतेच Law Abiding Citizen (2009 ) आणि Presumed Innocent (1990) हे दोन चित्रपट पाहण्यात आले, दोन्ही चित्रपट सर्वच बाबतीत उत्तम आहेत. नकीच पाहावेत असे आहेत. अशा प्रकारच्या अजून काही चित्रपटांची नावे माहीत असल्यास ती येथे माहीत करून द्यावीत, अशी सर्व माननीय मिपाकरांना नम्र विनंती. त्याच बरोबर सदर चित्रपट कृष्णधवल आहे की रंगीत याचीही माहिती दयावी.
--
आपला नम्र,
इंटनेटप्रेमी.
शब्दबंध २०१०
प्रेषक बेसनलाडू ( बुध, 03/10/2010 - 10:21) .२००८ व २००९ या दोन्ही वर्षी 'शब्दबंध' या आंतरजालीय जालनिशीकारांच्या उपक्रमात सहभागी झालो होतो. आता या वर्षीच्या 'शब्दबंध'चे वारे वाहू लागले आहेत. त्या संबंधीची 'शब्दबंध'च्या अधिकृत जालनिशीवरील उद्घोषणा इच्छुकांच्या अधिक माहितीसाठी येथे डकवत आहे.
===========================================================================
२००८ मधे १० लोकांनी साकारलेल्या शब्दबंधने मागच्या वर्षी २९ लोकाना सामावून घेतलं! मराठी ब्लॉगर्सच्या या जागतीक ई-सभेचे आयोजन आपण याही वर्षी दिमाखात करणार आहोत. मित्रहो तारखांची नोंद करा - ५ आणि ६ जुन २०१०!
परत एकदा आपण सर्वजण या सभेत भेटायचंय. काही नवे तर काही जुने शब्दबंधी घेऊन यायचंय. जिथे आहात तिथून, थेट सर्वांच्या हृदयापर्यंत पोहोचायचंय. परत एकदा सर्व हौशी मराठी ब्लॉगर्सना त्यांचं लिखाण त्यांच्या थाटात व्यक्त करण्यासाठी हे खास व्यासपीठ सजवायचंय.
मागील वेळेसारखेच, मराठीमध्ये १०० % स्वतःचं लेखन असलेला किमान एक ब्लॉग असलेल्या कुठल्याही ब्लॉगकाराला यात सहभागी होता येईल. या सभेची व्याप्ती अधिकाधिक वाढवणे आणि अधिकाधिक मराठी ब्लॉगर्सना त्यांनी लिहिलेल्या, त्याना आवडणाऱ्या, आणि त्यांच्या लिखाणाचं वाचन करण्यासाठी ई-व्यासपीठ ऊपलब्ध करून देणे हा यावेळीही हेतू आहे. मराठीमधलं लिखाण हा एकच समान दुवा पकडून आपण सर्वजण एकत्र येणार आहोत. प्रवास वर्णनं, अनुभव, कथा, कविता, व्यक्तीचित्रं, लघुनिबंध, तंत्रज्ञान आणि अशाच कित्येक छटांनी सजलेल्या मराठी ब्लॉगविश्वाची छोटीशी झलक आपल्याला या सभेमधे साकार करायचीये. तेही अनौपचारीक पद्धतीने.
सर्वसाधारणतः या सभेचं स्वरूप असं असेल. स्काईप, किंवा तत्सम साधन वापरून, आपण वेगवेगळी सत्रं आयोजीत करू. सहभागी होणाऱ्या सर्व हौशी ब्लॉगर्सना या तंत्राची माहिती सभेच्या आधी करून देण्यात येईल. जपान-ऑस्ट्रेलियापासून ही सभा सुरू होईल. सत्रांची सूत्रं क्रमाक्रमाने पश्चिमेकडे हस्तांतरीत होऊन भारत-आफ़्रिका-युरोप-अमेरिका या क्रमाने अभिवाचनाचं सत्र सुरू राहील.
शब्दबंध-२०१० मधे सहभागी होणं सोपं आहे. सहभाग घेण्यासाठी किंवा केवळ आयोजनामधे मदत करण्यासाठीही, कृपया या फॉर्मवर नोंद करावी -https://spreadsheets.google.com/viewform?formkey=dHhIT3dWN21tYWpDVHo4UG9yMlZycWc6MA. तुमच्याबद्दलची माहिती आणि तुमच्या सहभागाचं स्वरूप आम्हाला या फॉर्मवरून कळेल. सर्व जुन्या आणि नव्या शब्दबंधीनी या फॉर्मवरून नोंद करावी ही विनंती. ईथे नाव नोंदवणाऱ्या सर्वाना आपोआप shabdabandha@googlegroups.com मधे प्रवेश दिला जाईल आणि तिथेच पुढच्या सर्व चर्चा होतील. (तुम्ही आधीपासून जरी shabdabandha@googlegroups.com चे सभासद असाल, तरीसुद्धा शब्दबंध-२०१० मध्ये सहभागासाठी, कृपया फॉर्ममधे नोंद करावी. तसदीबद्दल क्षमस्व.)
लवकरच भेटू. आपली वाट बघतोय.
- शब्दबंध स्वागतक आणि कार्यकारी मंडळ
२ सेकन्दात स्वर्गानुभुति
प्रेषक तुका म्हणे ( सोम, 03/08/2010 - 18:31) .नमस्कार मंडळी,
पहिलेच लेखन.
जवळपास सहा महिन्यांपासून पाहुणा म्हणून हजेरी लावतोय. काय करणार तात्यांनी आज कृपा केली आणि खाते मान्य केले 
तरीही सहा महिने रेगुलर पाहुणा म्हणून येत असल्याने, जवळपास सगळ्या सदस्यांना बर्यापैकी ओळखतो (ओळखून आहे हे सुद्धा चाललं असत).
टंकवायला तसे काही विशेष नाही, पण नवे पणाची खाज जाणार कशी?
असो, सध्या हेडफोन मध्ये खालील गाणे चालले आहे.
या गाण्यातला फ़क़्त ०.०२ सेकंद ते ०.०४ सेकंद एवढाच भाग ऐका. बागेश्री मधली हि तान केवळ "दैवी" या एकाच विशेषणात बसणारी आहे. केवळ अशक्य!
मी बरेचदा हे अशा लोकांना ऐकवलं आहे, ज्यांना शास्त्रीय संगीतात फारसा (किंवा अजिबात) रस नाही. पण, त्यांची प्रतिक्रिया सुद्धा हिच होती.
माझ्या मते, किशोरी बाईनी या दोन सेकंदात केवळ आणि केवळ स्वर्ग उभा केला आहे. उर्वरित गाणे देखील अवश्य ऐका, पण या २ सेकंदात असणाऱ्या स्वर्गानुभूती ला मुकू नका.
आजतागायत, इतक्या कमी वेळात असा अनुभव देणारं मी या जगात काहीही ऐकलेलं नाही.
तुनळि वरिल धागा http://www.youtube.com/watch?v=_nm9TkY_H3k
धन्यवाद
भारतीय महिलांविषयीचे विनोद
प्रेषक चिंतातुरजंतू ( शनी, 03/06/2010 - 11:50) .आमच्या परिचयातील एक समाजशास्त्रज्ञ विदुषी भारतीय महिलांविषयीच्या विनोदांचे संकलन करीत आहेत. आपल्या ऐकिवात आलेल्या अथवा आपल्या प्रतिभेतून स्रवलेल्या अशा विनोदांस कॄपया या धाग्यावर प्रसिध्दी द्यावी. ते करताना खालील मुद्दे लक्षात घ्यावेत.
- आपल्या मते विनोद चांगला असावा.
- विनोदातील विनोदनिर्मितीचे मूळ भारतीय महिलांचे 'भारतीय' असणे आणि 'महिला' असणे याच्याशी संबंधित असावे.
- विशुध्द ज्ञानार्जनात श्लील/अश्लील असे काही नसते. त्यामुळे उपरोल्लेखित विदुषी स्वतः एक स्त्री असूनही त्यांना कोणत्याही प्रकारच्या विनोदाचे वावडे नाही. त्यातील काही या संस्थळाच्या धोरणात न बसणारे असू शकतील. आपला विनोद तसा असू शकेल, असे वाटल्यास तो या धाग्यावर न देता आम्हांस व्यक्तिगत निरोपाद्वारे पाठवावा, ही विनंती.
- विशुध्द ज्ञानार्जनात भावना भडकणे अभिप्रेत नसते. त्यामुळे उपरोल्लेखित विदुषी स्वतः एक संवेदनशील व सुजाण स्त्री असूनही त्यांना सर्व प्रकारच्या जातीय, प्रांतिक, लैंगिक, धार्मिक आणि इतरही अस्मितांचे दर्शन घडवणार्या विनोदांचेही वावडे नाही. त्यातील काही या संस्थळाच्या धोरणात न बसणारे असू शकतील. आपला विनोद तसा असू शकेल, असे वाटल्यास तो या धाग्यावर न देता आम्हांस व्यक्तिगत निरोपाद्वारे पाठवावा, ही विनंती.
एखाद्या समाजात एखाद्या समाजघटकाविषयी उत्पन्न होणारे विनोद हा समाजशास्त्रीय संशोधनाचा एक भाग असतो, याविषयी काही शंका असल्यास विनोदांवरील हा निबंध वाचावा. त्याउप्पर काही शंका असल्यास त्या आम्हांस विचाराव्या.
धन्यवाद,
चिंतातुर जंतू
एम एफ हुसेनांचे कतार नागरिकत्व
प्रेषक भास्कर केन्डे ( शुक्र, 02/26/2010 - 02:34) .एम एफ हुसेन या चित्रकाराच्या जीवाला म्हणे भारतामध्ये प्रचंड धोका असल्याने हे महाशय भारताबाहेर आश्रयास आहेत. अशातच या वादग्रस्त हुसेनांना कतारने नागरिकत्व देऊ केल्याच्या बातम्या द हिंदू सह टाईम्स वगैरे वर्तमानपत्रात झळकत आहेत.
भारतीय नागरिकाने इतर देशांचे वा परदेशी लोकांनी भारताचे नागरिकत्व घेण्याच्या शेकडो घटना दररोज घडत असतात. मात्र एखाद्या इसमावर त्याच्या मायदेशात जर काही खटले चालू असतील तर त्या देशाचा आदर म्हणून इतर देश त्या इसमाला नागरिकत्व न देण्याचा आंतरराष्ट्रीय प्रोटोकॉल आहे. या प्रोटोकॉलचे उल्लंघन म्हणजे दुसर्या देशाला दिलेला एक संदेश समजला जातो.
अरबी देशांत भारतीयांना सहसा नागरिकत्व दिले जात नाही. या समजा बाहेर जाऊन व आंतरराष्ट्रीय प्रोटोकॉलला डावलून कतारने ज्या इसमावर समाजाचा अपमान करणे, दंगल भडकवण्यासदृश साहित्य (चित्रे) प्रसिद्ध करणे, धार्मिक तेढ वाढवणे, सामाजिक तणाव वाढवणे अशा गंभीर अरोपांखाली अनेक खटले सुरु आहेत अशा इसमाला नागरिकत्व का दिले असावे?...
१. भारताला आम्ही जुमानत नाही. तसेच आमच्या अरब लॉबी मुळे भारत आमचे काही वाकडे करु शकत नाही असा माज.
२. भारतीय राज्यकर्त्यांकडे कणा नाही याची पूर्ण जाणीव.
३. आम्ही "सर्वच" भारतीयांना कनिष्ठ मानतो. पण काफिरांचा सर्व पातळीवर आपमान करणार्या भारतीय मुसलमानांना अरब देश भारताच्या कायद्यापासून वाचवतील असा संदेश देण्यासाठी.
४. 'भारतात अल्पसंख्यांकांच्या जीवाला धोका आहे' या पाकिस्तानी तसेच तथाकथित मानवतावाद्यांच्या लॉबींगला आकड्यांची मदत करण्यासाठी.
द हिंदूचे संपादक राम यांनी या घटनेवर टिपण्णी करताना असे म्हटले आहे की या महान चित्रकाराला आयुष्याच्या अंतिम कालखंडात मरण्यासाठी सुद्धा भारतात यायला जमत नसल्याने त्यांनी भारताचे नागरिकत्व सोडून कतारचे नागरिकत्व घ्यावे. का?
१. संपादक महोदयांना आंतरराष्ट्रीय प्रोटोकॉलची वा त्यायोगे भारताच्या होणार्या नाचक्कीची माहिती नसावी.
२. संपादक महाशयांना भारताच्या इभ्रतीपेक्षा आपल्या स्नेह्यावरील खटल्यांची जास्त काळजी असावी.
वा आणखी काही?
अशा प्रकरणांत आपल्या देशाच्या विदेश मंत्रालयाकडून आपण काही अपेक्षा करु शकतो काय?
स्तोत्र
प्रेषक शुचि ( मंगळ, 02/09/2010 - 06:21) .आंतरजाला वर अनेक स्तोत्र अनेक ठीकाणी विखुरलेली आढळतात. त्यामुळे दर वेळेला सर्रास आढळणारं स्तोत्र काही कोणी मिपा वर टाकून उगीच भारूड-भरती करीत नाही. पण काल जालावर एक दुर्मीळ (मी तरी ना वाचलेल) आणि अतिशय सुंदर स्तोत्र सापडलं आणि मी याचीही खातरजमा करून घेतली की ते अन्यत्र बहुधा नसावं.
दुवा पुढे देत आहे. - http://3.bp.blogspot.com/_GaxZxdIo60Y/SlXiC-Q8c5I/AAAAAAAACLs/sxNkUws5RJ...


