संदर्भ

आमार बांगला सोनार बांगला

मराठी अस्मितेबद्दल सध्या बरेच काही ऐकू येत आहे. राज ठाकरे यांनी तर तो आपला राजकीय अजेंडा ठरवला आहे. बाकीचे पक्षही यात (आपल्या परीने) उतरले आहेत. मराठी मन मात्र या विषयावर विभागले गेल्यासारखे दिसते. वर्तमानपत्रातील प्रतिक्रिया, ब्लॉग्ज यावरून ते दिसतेय. पण बंगाली लोकांचा भाषाभिमान याविषयी एक चांगला लेख येथे वाचला. मला तो आवडला आणि पटलाही.
http://marathi.webdunia.com/miscellaneous/special08/mumbai/0805/10/10805...

बासूदांचे 'अनुभव'

बासू भट्टाचार्य एक बिनधास्त व्यक्तिमत्व होऊन गेलं. मानवी नातेसंबंध विशेषतः स्त्री-पुरूष संबंध हा त्यांचा अतिशय जिव्हाळ्याचा विषय. त्यावरच अनुभव, अविष्कार आणि गृहप्रवेश ही चित्रत्रयी त्यांनी दिली. काही वर्षांपूर्वी आलेला आस्था हा चित्रपटही त्याच साखळीतला होता, असे म्हणायला हरकत नाही. नुकतंच बासूदांचं 'अनुभव' हे आत्मकथनपर पुस्तक वाचलं. 'सकाळ'मध्ये काही वर्षांपूर्वी हे आत्मकथन सदरातून प्रसिद्ध होत होतं. पण एकत्रितरित्या पुस्तकातून वाचताना त्याचा आनंद काही औरच.

फिल्मी मंडळींच्या आत्मचरित्रातून अनेक गोष्टी समजतात. याच वर्तुळात रहाणारी मंडळी कशी कचकड्याची असतात, हेही त्यातून दिसून येत असते. बासूदांच्या या पुस्तकातूनही काही लोकांविषयीची अशी माहिती मिळते, पण हे पुस्तक मुख्यतः बासुदांचे स्वतःकडे बघणे आहे. स्वतःविषयी सांगण्याच्या ओघात इतरांविषयी सांगून जाते. पण उगाचच एखाद्याविषयी आपल्याला असलेली खाजगी माहिती फोडावी अशा पद्धतीने ते सांगत नाहीत. पण त्यांनी यात सांगितलेले अनेक किस्से मस्त आहेत.

पश्चिम बंगालमधून मुंबईत चित्रपट हे करीयर करण्यसाठी आलेल्या बासूदांना मुंबईत सहाजिकच संघर्ष करावा लागला. या काळात मुंबईतल्या बंगाली मंडळींनी त्यांना चांगलाच हात दिला. त्यातला एक किस्सा फार मस्त आहे. बासूदा मुळात बिनधास्त माणूस. कधी काय करतीय काही नेम नाही. सलील चौधरींच्या संगीत दिग्दर्शनाखाली लताबाईंनी एक बंगाली गाणं गायलं. सगळ्यांचं म्हणणं गाणं छान झालं असं होतं. पण बासूदांनी स्पष्टपणे सांगितलं, बाईंनी बंगाली गाणं जे गायलंय त्यातून हिंदी उच्चार दिसून येतात. त्यामुळे ते खटकतं. झालं. बासूदांच्या अशा आगाऊपणाने सगळेच गोरेमोरे झाले. मग लताबाई पुढे आल्या आणि कोणते उच्चार खटकले असे विचारून त्या त्या ठिकाणी सुधारणा केली. या घटनेनंतर लताबाईंनी बासूदांना विचारलं की मला बंगाली शिकवशील का? बासूदांनी हो म्हणून सांगितलं आणि घसघशीत रकमेची मागणी केली. लताबाईंनी त्याहीपेक्षा जास्त रक्कम देऊ केली. पण त्यानंतर बासूदांनी आणखी एक अट घातली.''मला घ्यायला तुमची गाडी येईल.'' बाईंनी तीही अट मान्य केली. हे महाशय भाड्याच्या खोलीत रहात होते. तिथून गाडीने लताबाईंना बंगाली शिकवायला जायचे.

बंगाली लोकांना स्वतःच्या साहित्याचा खूप अभिमान असतो. पण इतरांकडेही त्या दर्जाचे काही असते याची मात्र जाण नसते. बासूदाही सुरवातीला तसेच होते. पण नंतर त्यांच्या एका मित्राने हिंदीतल्या चांगल्या साहित्याची ओळख करून दिली. त्यानंतर मग त्यांनी भाषक साहित्य वाचायला सुरवात केली. बासुदा मराठी साहित्यही मराठीतूनच वाचत होते. मराठी त्यांना बोलता येत नसलं तरी अतिशय चांगलं कळत होतं.

बासूदांचा तीसरी कसम हा चित्रपट सुरवातीला पडला. पण त्याला राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर मात्र तो गाजला. पण त्याची हाय खाऊन त्याचा निर्माता व गीतकार शैलेंद्रने मात्र आधीच मरणाला कवटाळले. अतिशय रखडलेल्या या चित्रपटाच्या काळात राज कपूर यांनी सुरवातीला 'शोमनशिप' दाखवून अडवणूकही केली. पण रडत खडत पूर्ण होऊनही चित्रपट बरा चालला.

त्यांच्या दिग्दर्शनाची एक वेगळी पद्धत होती. ते कुणालाच पटकथा द्यायचे नाहीत. त्यांचे म्हणणे एकच होते. मी दिग्दर्शक आहे. पूर्ण चित्रपटाचा विचार मी केला आहे. मला पाहिजे, तसा चित्रपट व्हायला पाहिजे. त्यातील व्यक्तिरेखा कशा असतील काय असतील याचा पूर्ण विचार माझा आहे. तो तसाच पडद्यावर यायला पाहिजे. त्यामुळेच ते दिग्दर्शनात कुणाचीही लुडबूड सहन करत नसत. राज कपूरला तिसरी कसममध्ये घेतानाही त्यांनी याच अटीवर घेतले होते. त्यातही राज कपूरने अडवणूक केल्यानंतरही त्यांनी त्याला उमदा माणूस म्हटले आहे. बंगाली नट उत्तमकुमारनेही त्यांना खूप त्रास दिला.

एकदा एका चित्रपटासाठी रस्त्यावरून चालणार्‍या मुलीला त्यांनी चित्रपटात काम करशील काय म्हणून विचारले होते. तिने होकारही दिला. ही गोष्ट एका हॉटेलात बसून ते शम्मी कपूरला सांगता असताना त्याने त्या मुलीविषयी अतिशय अश्लील कॉमेंट केली आणि त्यांनी तिला त्या चित्रपटातूनच वगळले. ती मुलगी होती सिमी गरेवाल. चित्रपटातील कलावंत निवडीसाठी त्यांनी कुणाकुणाला विचारले नाही? तिसरी कसममधील नायिका नृत्यांगना होती, म्हणून बिहारमध्ये लोकेशन निवडीसाठी गेले असताना एका नाचणार्‍या बाईलाही त्यांनी हिरोईन होते का म्हणून विचारले होते आता बोला? पण वरकडी म्हणजे त्या बाईने एवढी मोठी संधी मिळत असतानाही त्यांना ठाम नकार दिला.

बासूदांचं लग्न हे एक प्रकरणच आहे. बिमल रॉय यांच्या कन्येसमेवत त्यांचे प्रेम जमले आणि रॉय कुटुंबियांच्या विरोधाला न जुमानता लग्न केले. हा पूर्ण किस्सा मुळातूनच वाचण्यासारखा आहे. वास्तविक बिमल रॉय हे बासूदांचे या क्षेत्रातील गुरू. त्यामुळे आपल्या मुलीने बासूशी प्रेम करावे हे त्यांना मान्य नव्हते. त्यात त्यांच्या पत्नीचाही बासूदांना तीव्र विरोध. त्यांनी मुलीला कोलकत्यात जवळपास बंदीवासातच नेऊन ठेवले. त्यात एक आवई उठवली. बासूदा व लता मंगेशकरांचे लफडे आहे, म्हणून. बासूदा कोलकत्याला गेल्यानंतर त्यांना हा प्रकार कळला. पुढे या दोघांनी मुंबईतूनच पळून जाऊन लग्न केले.

बासूदांच्या मित्रांपैकी एना व रूमा गांगुली यांच्याविषयीचे व्यक्तिगत किस्सेही यात येतात. यातील रूमा गांगुली म्हणजे किशोरकुमारची बायको. रूमा गांगुलीला बंगालीत एक स्वतंत्र स्थान आहे. ती एक कवीही होती. पण किशोरकुमारबरोबर तिचे खटके उडायचे. किशोर पैशांच्या मागे धावायचा असे तिचे म्हणणे. एकदा म्हणे किशोरला बरेच पैसे मिळाले. त्यावेळी रूमा घरात आल्यानंतर तिने पाहिले तर काय? किशोर घराच्या सर्व भिंतींना शंभराच्या नोटा चिकटवून त्याकडे पहात बसला होता. त्यातच किशोरचे मधुबालाशी जमल्याचे तिने प्रत्यक्ष पाहिल्यानंतर किशोरला सोडून ती कोलकत्याला गेली. विशेष म्हणजे तीही धुतल्या तांदळासारखी नव्हती. तिचेही एका बंगाली फोटोग्राफरशी लफडे होते. पण तिने त्याच्याशी लग्न केले नाही.

बासूदा स्त्री-पुरूष संबंधांवर भाष्य करताना फार छान लिहितात. रूमा गांगुली व एना दोघींचीही लफडी होती. पण त्यांनी मूळ पतीला सोडून दिल्यानंतर प्रियकराशी लग्न केले नाही. यामागे काहीही तार्किकता दिसत नाही. पतीविषयी त्यांचे मतभेद होते, हे खरे असले तरी त्यावर त्यांचे तितकेच प्रेमही होते. तरीही हे संबंध टिकू शकले नाहीत. त्यांनी दिलेल्या एनाचा किस्सा तर अस्वस्थ करणारा आहे. एनाने पतीला सोडून दुसर्‍याशी घरोबा केला तरी तिने त्याला कधीच सुख दिले नाही. शिवाय पहिल्या पतीपासून झालेली मुलेही वार्‍यावर सोडून दिली. त्या मुलांचे तर फारच वाईट हाल झाले.

सगळं सांगून झाल्यानंतर बासूदा स्वतःचा घटस्फोट झाल्याचेही सांगून टाकतात. पण लग्न टिकण्याची गरज असल्याचेही म्हणतात. कुटुंब असणे गरजेचे असे ते म्हणतात. त्याविषयी त्यांनी एक छान किस्सा सांगितलाय. कॅनडाला एकदा ते गेले असताना तिथे त्यांना एका मुलाने त्यांना प्रश्न विचारला. तुमच्या चित्रपटात पती-पत्नी भांड भांड भाडतात. पण शेवटी पुन्हा एकत्र येतात, हे कसे काय? त्यावर त्यांनी उत्तर दिले. तुझी संस्कृती वेगळी आहे, माझी वेगळी. तुमच्याकडे वस्तू गंजली की 'रिप्लेस' करतात आणि आमच्याकडे 'रिपेअर'. हाच फरक आहे.

आजकालचे मराठी चित्रपट

मित्रांनो आजकाल गाजलेल्या इंग्रजी चित्रपटांवर अधारीत (म्हणजेच कॉपी मारलेले) चित्रपट काढायची टूम हिंदीतून मराठीमध्ये पण आली आहे. व्हॉट विमेन वॉन्ट आणि माय कझिन विनी ह्या दोन इंग्रजी चित्रपटांवर आधारीत अग बाई अरेच्च्या आणि कायद्याच बोला हे दोन चित्रपट बरेच गाजले. ह्या नविन लाटेविषयी आपल्याला काय वाटते? मराठी शिणेमांचा दर्जा सुधारण्यासाठी हे गरजेचे आहे का?

-अघळ पघळ

नचिकेताचे उपाख्यान कोणी सांगेल का?

नचिकेताचे उपाख्यान कोणाला माहीत आहे काय?
असेल तर कृपया सांगावे ही विनंती.

एखादा यावर लेख कोणी लिहिला तर आनंदच वाटेल.

एकदा दान देताना नचिकेताच्या पित्याने नचिकेताला रागात सांगितले की मी तुला यमाला दान केले आहे.
त्यानंतर नचिकेत आणि यम यांचा संवाद ते नचिकेताचे उपाख्यान.
यात यमलोकाचे वर्णन नचिकेताने केलेले आहे.

मला नचिकेताची अशी फक्त ढोबळ अशी गोष्ट माहित आहे. पण मला सविस्तर जाणून घ्यायचे आहे.
कोणी सांगेल का?

(वेदोपनिषदप्रेमी) सागर

शेअर बाजारात फेरफटका.

राम राम मंडळी,

नाना चेंगट, शरूबाबा यांच्याप्रमाणे आज जरा आम्हालाही शेअर बाजारात फेरफटका मारायचा मूड आला म्हणून हे चार शब्द!

तांत्रिक विश्लेषण -

कालचा बंद १५६००.

वरची पातळी साधारण १८२०० च्या आसपास आणि खाली साधारण पहिली पातळी १५३०० (कालच्या बंदच्या जवळ) व दुसरी १४७०० च्या आसपास निर्देशांक फिरतो आहे असे दिसते. ही रेंज गेल्या महिन्या सव्वा महिन्यांच्या कालावधीतील आहे. म्हणजे साधारण ३२०० ची उलथापालथ! बाजाराच्या दृष्टीने महिन्याभराच्या कालावधीत ३२०० अंकांची उलथापालथ ठीक नव्हे!

मंडळी, आजचा १५६०० निर्देशांक पाहता, इथून फक्त १८०० अंक दूर असलेली दिनांक १७ ऑगस्ट २००७ रोजीची १३७८० ही पातळी तांत्रिक विश्लेषणाच्या दृष्टीने मला महत्वाची वाटते. १३७८० या पातळीवरून बाजाराने खूप मोठी झेप घेतली आणि या दिवसापासून बाजाराने पुन्हा कधीही मागे वळून हा आकडा बघितला नाही आणि दिनांक १० जानेवारी २००८ रोजी थेट २१२०० ची पातळी गाठली! म्हणजे साधारणत: ५ महिन्यांच्या कालावधीत ७२०० अंकांची भयानक तेजी!

या कालावधीतील माझ्या सर्व प्रतिसादांत, 'हे जे काही चाललं आहे ते मला कळत नाही, मी बाजारापासून सध्या दूर कोपर्‍यात हातात पैशे घेऊन चुपचाप बसलो आहे' असंच म्हटलं आहे. तेव्हा अगदी मोजक्याच १० ते १२ कंपन्या माझ्या मते पैसे गुंतवण्यालायक होत्या. शेवटी व्हायचं तेच झालं आणि ५ महिन्यात ७२०० अंक चढलेला निर्देशांक पुढे अवघ्या सव्वा दोन महिन्यांत (१० जानेवारी ते १८ मार्च) २१२०० च्या उच्चांकावरून सणसणीत ६५०० अंकांनी आपटला व दिनांक १८ मार्च रोजी १४७०० ला बंद झाला! आणि आज तो १५६०० इतका आहे.

म्हणजे आता बघा हां मंडळी गंमत कशी आहे ती!

दिनांक - १७ ऑगस्ट २००७ - १३७८०.
दिनांक - ०१ एप्रिल २००८ १५६००.

म्हणजे वरील साडे सात महिन्यांच्या कालावधीतील खरी तेजी ही फक्त १५६०० वजा १३७८० = १८२० अंकांची आहे आणि ह्या तेजीला अधिक रिऍलिस्टिक म्हणता येईल! आणि म्हणूनच मी ५ महिन्यांतील ७२०० अंकांच्या तेजीला "भयानक तेजी" असे शब्द वापरले आहेत!

काय मंडळी, मी म्हणतोय ते पटतंय का? पटलं तर घ्या, नायतर द्या सोडून!

सांगायचा मुद्दा इतकाच की कंपन्यांची नेहमी फंडामेन्टल तब्येत तपासूनच पैसे गुंतवावेत. उदाहरणार्थ, प्रति समभाग उत्पन्न, किंमत/मिळकत गुणोत्तर, लाभांश, वार्षिक आणि तिमाही नफ्यांचे आकडे इत्यादी निकषात जर कंपनी बसत असेल तरच पैसे गुंतवावेत अन्यथा गुंतवू नयेत! माझ्या निरिक्षणानुसार २१२०० च्या पातळीवर बाजारातील जवळ जवळ ९० टक्के समभाग हे यापैकी 'किंमत/मिळकत गुणोत्तर' या निकषात बसत नव्हते आणि त्याच वेळेस नेमके सगळेजण आता बाजार २४००० जाणार, २५००० जाणार असे मांडे खात बाजारात पैसे गुंतवत होते. शेवटी व्हायचं तेच झालं!

असो..

तांत्रिक दृष्ट्या बोलायचं झालं तर वर म्हटल्याप्रमाणे १७ ऑगस्ट २००७ ची १३७८० ही पातळी आणि अलिकडच्या काळातील २७ फेब्रुवारीची १८१०० ही पातळी, या दोन्ही पातळ्यांचं आता निरिक्षण करावं लागेल. त्यानंतर भले तेजी आली तरी १८१०० हा पहिला महत्वाचा टप्पा मानावा लागेल, त्यानंतर पूर्वीचा १० जानेवारीचा २१२०० चा दुसरा टप्पा,

आणि त्यानंतर मग काय बघायलाच नको, २५००० काय अन् ३०००० काय! मज्जाच मज्जा! :)**

माझ्यापुरतं बोलायचं झालं तर मी सध्या माझ्याकरता आणि माझ्या अशिलांकरता हळूहळू खरेदी करत आहे. कारण आत्ता नेमक्या बर्‍याचश्या कंपन्या वरील सर्व निकषांत बसत असून येत्या एक ते तीन वर्षांचा कालावधी गृहीत धरल्यास ह्या कंपन्या अतिशय चांगला परतावा देतील असं माझा अनुभव सांगतो..! आत्ता गाड्या रिकाम्या धावत आहेत, तेव्हा आत्ताच मस्तपैकी खिडकीची जागा पकडून बसून घ्या! पुढे मग २५००० ला किंवा ३०००० हजाराला गाडीत पुन्हा बरीच गर्दी होईल आणि मग दारात लोंबकाळत उभं रहावं लागेल! शिवाय डोकं बाहेर असल्यामुळे बाहेरच्या खांबाला डोकं आपटून धावत्या गाडीतून खाली पडण्याची भिती! Laughing

काय मंडळी, पटतंय का माझं म्हणणं?!

नजिकच्या काळातले काही मुद्दे -

१) आता येत्या महिन्याभरात सर्व कंपन्यांचे वार्षिक निकाल जाहीर होतील. ते आकडे काय आहेत, कसे आहेत ते पाहिले पाहिजे. कुठल्या कंपनीनी कशी प्रगती केली आहे हे पाहून मी खास मिपाच्या सदस्यांकरता खरेदीयोग्य कंपन्यांची काही नांवे सुचवीन. बाजाराच्या भाषेत सांगायचं तर "माल लेके बैठ जाओ!" Laughing

मला पोष्टकार्ड पाठवून, विचारणा करून माझी सशुल्क सेवा घ्यायलाही हरकत नाही. अहो एका मराठी माणसाला तरी चार पैशे मिळतील! Smile

२) मान्सून.

३) सरकार - बाजाराच्या दृष्टीने मनमोहन सिंग आणि चिदंबरम यांचा उपयोग आता संपलेला आहे. कारण त्यांच्या सरकारने शेवटचे पाचवे बजेट जाहीर केले आहे. तेव्हा आता येणारे सरकार कसे आहे, यावर पुढची लॉग टर्म तेजी बरीचशी अवलंबून आहे असं मला वाटतं! येणारं सरकार कसं आहे? स्पष्ट बहुमतातलं आहे की मिलिजुली सरकार आहे? की निवडणुकांचा निकाल त्रिशंकू लागतो, इत्यादी अनेक गोष्टींचा विचार बाजार करेल!

असो, मी काही कुणी ज्ञानी/तज्ञ नाही, तेव्हा आता निर्देशांक २४ हजार जाईल, २५ हजार जाईल असं अंतर्ज्ञानही मला नाही! अर्थात तो जाऊही शकतो आणि गेला तर माझ्याकरता आणि माझ्या अशिलांकरता ते चांगलंच आहे! कारण मी तरी येत्या ३ वर्षांचा कालावधी गृहीत धरून खरेदी सुरू केली आहे!

आपला,
(मुंबईतले बरेचसे बाजार हिंडून अखेर शेअर बाजारात स्थिरावलेला!)

-- तात्या अभ्यंकर.
दलाल स्ट्रीट, मुंबई - २३.

सुचना : गप्पाड्डा (आचार विचारांचे झटपट अदानप्रदान....)

राम राम मंडळी,

सतत काहीतरी नवीन देण्याच्या मिसळपावच्या उद्दीष्टाला धरुन आम्ही आपल्या लाडक्या संकेतस्थळावर "गप्पाड्डा" (गप्पांसाठी जागा/चॅट रुम) सुरु करायचे योजले आहे. अजून ही सोय पूर्णपणे कार्यांन्वित नसल्याने तुर्तास काही सद्स्यांना थोडी अडचण येण्याची शक्यता आहे.

तमाम मिसळपाव ग्रामस्थांनी त्याचा आनंद घ्यावा ही विनंती. काही अडचणी असल्यास त्या येथे मांडल्यास हरकत नाही.
वि.सु.येण्याची नोंद करणे आवश्यक आहे.

हिच सोय येथेही मिळेल

आपला नम्र,
सरपंच.

उत्तर शोधायचे आहे!

ओशो रजनिश यांच्या संत कबीरांवरील प्रवचनांचे भाषांतर वाचण्याचा योग आला. त्यात ओशोंनी पुढील दाखला दिला आहे -

एकदा चार बायका एक प्रसिद्ध सूफी संताकडे ज्ञानप्राप्तीकराता जातात आणि त्याने गुरू बनावे अशी विनवणी करतात. त्यांना त्याच्याकडून ज्ञान म्हणजे काय हे समजून घ्याअय्चे असते. परंतु सूफी संत मात्र तयार होत नाही. त्या बायका तश्याच दाराशी भुकेल्या तहानलेल्या बसून राहतात. अखेर त्याला त्यांची दया येते. तो त्यांची परीक्षा घेण्याचे ठरवतो. परीक्षेत उत्तीर्ण होणार्‍या स्त्रीला शिष्या करून घेण्यास तो तयार होतो. तो प्रत्येकीला एकेकटीला एक प्रश्न विचारतो - "समजा तू ) ती स्त्री) आणि ५० पुरुष एका जहाजावर आहात. ते जहाज वादळात फुटले आणि तुम्ही सगळे एका निर्जन बेटावर येऊन पोहोचलात. त्या ५० पुरुषांपासून तू स्वतःला वाचवायला काय उपाय करशील?"

पहिली स्त्री कुमारिका. तिला ह्या कल्पनेनेच भीती वाटते. ती म्हणते - मी पोहत पोहत खोल समुद्रात जाईन आणि अखेर मरेन. मेले तरी बेहेत्तर पण त्या पुरुषांसोबत राहणार नाही.
तो संत तिला परत पाठवून देतो.

दुसरी स्त्री विवाहित. ती विचार करते आणि म्हणते - मी त्यातल्या सर्वात बलवान पुरुषाशी लग्न करेन, म्हणजे बाकी पुरुषांपासून माझे तोच संरक्षण करेल.
तो संत तिलाही परत पाठवून देतो.

तिसरी असते वेश्या - ती म्हणते - ह्यात मूळात समस्या आहेच कुठे. बचावाचा प्रश्नच कुठे येतो?
तो संत तिलाही परत पाठवून देतो.

चौथी विचार करते. थोड्या वेळाने म्हणते - मला ठाऊक नाही. ह्याबबतीत मी अज्ञानी आहे.
तो संत तिला आपली शिष्या म्हणून पत्करतो.

---

पहिल्या स्त्रीने आत्महत्या हा मर्ग निवडला. आत्महत्या हा कोणत्याच समस्येवरचा तोडगा नाही. दुसर्‍या स्त्रीने तिच्या अनुभवातून सर्वात बलवान पुरुष निवडण्याचा मार्ग सांगितला. पण एकटा बलवान पुरुष बाकी ४९ पुरुष एकत्र आले तर त्यांच्याशी दोन हात करू शकणार नाही. तिसर्‍या स्त्रीला तर ही समस्याच वाटत नाही. जे काही चालले आहे ते आलबेल आहे असे तिला तिचे अनुभव पटवून देत होते. ह्या सर्वांनी आपपल्या कुवतीनुसार उत्तरे शोधली होती. त्यांच्यामते त्या ज्ञानी होत्या. चौथ्या स्त्रीला मात्र आपले अज्ञान उमगले. ज्याला आपले अज्ञान उमगते त्यालाच ज्ञानाचा मार्ग दाखवता येतो. ज्याला अखेर स्वतःचे ज्ञान होते त्याला स्वत्व विसरता येते. ह्याला अद्वैत म्हणा.

संदर्भ -
पुस्तक - आलं ज्ञानाचं तुफान ( भाषांतरित)
- कबीरांच्या वचनांवर प्रवचने
ओशो रजनीश

लेख अप्रकाशित, क्षमस्व!

स्वाती दिनेश यांचा 'ले गयी दिल दुनिया जपान की (भाग ८)' हा सुंदर लेख तूर्तास अप्रकाशित केला आहे. काही तांत्रिक अडचणींमुळे एक तर बर्‍याच जणांना हा लेख उघडताच आलेला नाही तसेच ज्यांना उघडता आला आहे त्यापैकी काहींना प्रतिसाद देता आलेला नाही/येत नाही.


मिसळपावच्या बदललेल्या स्वरुपानुसार/मुळे, ही काहीतरी तांत्रिक अडचण उद्भवली असावी/आहे. तरी तिचे पूर्ण निराकरण/निवारण झाल्यावरच हा लेख पुन:प्रकाशित करण्यात येईल म्हणजे वाचकांना तो वाचण्यास आणि त्याला प्रतिसाद देण्यास कुठलाही अडथळा येणार नाही.


तूर्तास, गैरसोयीबद्दल मिसळपाव स्वाती दिनेश तसेच सर्व मिपावासियांची दिलगीर आहे. कृपया सहकार्य करावे ही विनंती...


तात्या.

बुध-शुक्र युती दिनांक २६/०२/२००८

लोकहो ! दिनांक २६ फेब्रुवारी रोजी बुध आणि शुक्राची युती मकर राशीत होते आहे. दिनांक २६ फेब्रुवारी रोजी पहाटे साडेपाच वाजता बुध आणि शुक्र हे मकरेत १६ अंशांवर असतील. कोणत्याही दोन किंवा अधिक ग्रहांच्या युतियोगाला फलज्योतिषात फारच महत्व आहे. जेव्हा दोन ग्रह एकमेकांच्या युतीत असतात तेव्हा ते एकमेकांचे कारकत्व वाढवित असतात किंवा त्याचा नाश करतात. बुध शुक्र युतीबद्दल बोलायचे झाले तर हे दोन ग्रह "अंतर्वर्ती" ग्रह आहेत. म्हणजे सूर्य आणि पृथ्वी यांच्या मध्ये हे दोन ग्रह आहेत. त्यांच्या नंतर सूर्यमालेत पृथ्वी आहे आणि पृथ्वीच्या पुढे मंगळ गुरू शनी वगैरे ग्रह आहेत. "बहिर्वर्ती" हे दोन्ही ग्रह सूर्याला जवळ असल्याने यांच्या भ्रमणाची गती अधिक आहे. हे दोन ग्रह एकमेकांपासून फारफार तर ७६ अंश दूर जाऊ शकतात, त्याहून अधिक नाही. त्यामुळे या दोन ग्रहांमध्ये केवळ युतीयोग, द्विद्वार्दश योग, लाभयोग किंवा अर्धकेंद्रयोगच होऊ शकतो. या दोन ग्रहात षडाष्टक, प्रतियुती, नवपंचम हे योग कधीही होऊ शकत नाहीत. कारण हे तीनही योग ७६ अंशांहून अधिक अंतरावरच होतात. केंद्रयोग ९० अंश, नवपंचम योग १२० अंश, षडाष्टक योग १५० अंश, प्रतियुती १८० अंश. अंतर्ग्रहांच्या युतीसाठी ५ अंश दिप्तांश घ्यावे. बहिर्ग्रहांच्या युतियोगासाठि दिप्तांश ८ ते १० अंश असू शकतात. या दिप्तांशांच्या आत असलेली युति जोरदार फळे देते. शुक्र आणि गुरू हे शुभग्रह आहेत. बलवान चंद्रही शुभग्रह आहे. बुध हा शुभत्वाच्या बाबतीत "संगति संग दोषेण।" या स्वरूपाचा ग्रह आहे. बुध शुभ ग्रहाच्या युतीत असेल तर शुभ फले देतो आणि पापग्रहांच्या युतीत असता अशुभ फले देतो. शुक्राच्या युतीत असलेला बुध मात्र शुभ फलांचा वर्षाव करतो. शुक्र हा कलेचा आणि सौंदर्याचा कारक आहे. तो संपत्ती, समृद्धी आणि ऐहिक सुखाचाही कारक आहे. शुक्राबरोबर युतीत असलेला बुध, शुक्राचे कारकत्व अधिक उजळवतो. बुधाची बुद्धीमत्ता, वाक्पटुत्व, अवखळपणा शुक्राच्या कारकत्वाला उधाण आणतो. ज्यांच्या पत्रिकेत बुधशुक्र युती असते त्यांच्यात पुढील गोष्टी प्रकर्षाने दिसतात:- हे लोक फार मनमोकळे, बोलके आणि सतत आनंदी असतात. स्वभाव हलकाफुलका असतो. बोलण्यात वागण्यात एक प्रकारचा आकर्षकपणा असतो. या लोकांना माणसे जोडायला आवडतात. एकलकोंडे, माणूसघाणे नसतात. ही युती बौध्दिक राशीत असेल ( मिथुन, तुळ व कुंभ) तर यांची बुध्दिमत्ता वाखाणण्याजोगी असते. कोणताही विषय यांना चटकन समजतो. आणि समजलेला विषय हे लोक उत्तमपणे मांडू शकतात. presentation skills हा आजच्या युगातला फार मोठा गुण आहे. या गुण या लोकांकडे प्रचंड असतो. ही युती धनस्थानात बुधाच्या राशीत असेल ( वृषभ, सिंह लग्नाला) तर द्वितीयात बुध येतो. हे लोक फार बडबडे असतात. भेटल्यावर राजकारणापासून समाजकारणापर्यंत, अध्यात्मापासून अभ्यासापर्यंत, ज्ञानापासून विज्ञानापर्यंत, कलेपासून क्रीडेपर्यंत कोणत्याही विषयावर बोलतात. इतके की पुढे ऐकणारा कंटाळतो पण यांच्या तोंडचा पट्टा काही थांबत नाही. त्यांच्या बोलण्याला कोणताही विषय वर्ज्य नसतो. ही युती (धनस्थानातली) जर राहुने बिघडली असेल तर हे लोक थापाडे असतात. या लोकांना स्त्रियांचा सहवास जास्त आवडतो. सिनेमा, नाटक, गाणेबजावणे यांची आवड असते. स्त्रियांशी मैत्री पटकन होते. शुक्रावर मंगळाचे योग असतील तर हे लोक स्त्रियांशी मैत्री करण्यास आसुसलेले असतात. शुक्राची रसिकता, मंगळाचे धैर्य आणि बुधाचे संवादकौशल्य यांचा मिलाफ झाल्यावर काय सांगायचे? विषयसेवनासाठी लागणार्‍या सर्वच गोष्टी वश असता, अजून काय हवे? त्यात राहूची साथ लाभली तर या ग्रहयोगाच्या स्त्रीया परजातीतल्या परपुरुषाबरोबर स्वखुशीने बिघडतात. ही युती जर पंचमात झाली असेल किंवा लाभात झाली किंवा इतर घरात होऊन ती शनीच्या प्रतियोगात असेल तर या लोकांना मुली जास्त होतात. (कन्यासंतती) बुध, शुक्राच्या राशीतली युती साहित्य, वाग्ङ्मयाची आवड देते. तृतीयात किंवा भाग्यात ही युती असेल तर या लोकांच्या हातून अतिशय चांगले लेखन होते. तृतीयातील युतीवर नेपच्यूनचा शुभयोग असेल तर यांना एखादे वाद्य उत्तमरित्या वाजावता येत असते. हस्ताक्षर चांगले असते. एकूण जीवन आनंदी करणारी, जगण्याचे समाधान देणारी, बुद्धिदायक, ऐहिक सुखाची रेलचेल करणारी ही युती आहे. आपला, (सूक्ष्मदर्शी) धोंडोपंत

आजचा सुधारक कोंडीतून सुटका

या पुर्वी आजच्या सुधारकची कोंडी येथे वाचा. त्यावरील प्रतिक्रिया १ येथे वाचा. प्रतिक्रिया २ येथे वाचा. त्यावरील लेखकाचे प्रत्युत्तर येथे वाचा.

Picture 135