संदर्भ
माझे लेखन
सध्या बरेच जण 'माझे लेखन'ची लिंक नसल्याचे लिहीत आहेत, खालील लिंक त्यांसाठीच.
माझे लेखन (http://www.misalpav.com/mytrack) ही लिंक तुमच्या बूकमार्क्स मधे साठवून ठेवा. ह्या लिंकवर तुमचे स्वतःचे सगळे लेखन मिळेल. :)
-प्रभो
नातीगोती व वंशावळी जपण्याचा नवा ई-मार्ग....

आजकालच्या धकाधकीच्या व अंतरजालाच्या जीवन पद्धती मध्ये नातीगोती जपणे खरोखरच अवघड झाले आहे, म्हणूनच कि काय आता हे जपण्यासाठी अंतरजालामध्येच हि सुविधा उपलब्ध झालि आहे.
www.geni.com हे संकेतस्थळ कसे काम करते??
Geni हे संकेतस्थळ आपण आपली वंशावळी बनवण्यासाठी वापरता येईल,आपल्या नातेवाइकांमधे नवीन कार्यक्रम किंवा छायाचित्रे प्रकाशित करता येतील, ह्या संकेतस्थळाचा उपयोग
आपल्या नातेवाईकांसोबत आपल्या वंशाच्या नवीन किंवा असलेल्या शाखांचा आराखडा बनवता येतो.
ह्या संकेतस्थलावरील सहज आणि सोप्या अंतरफलका (Simple Interface) चा वापर करुन तुम्ही स्वतःचे खाते बनवून स्वतःच्या परिवारपासुन सुरुवात करु शकतात. हे संकेतस्थळ
पुर्णपणे मोफत आहे व ते आपल्या नातेवाईकांना आपल्या वंशाचे सदस्य होण्यासाठी अत्यंत त्वरीत सम्पर्क साधुन नम्र विनंती / अर्ज देते. ह्या सोप्या कार्यप्रणाली मुळे तुम्हाला तुमची वंशावळी
फारच त्वरीत बनवुन त्याचा आढावा घेता येतो.
जसे जसे आपण आपली व माहिती असलेल्या नातेवाईकांची माहीती टाकाल, Geni स्वयंचलीत पध्दतीने तुमच्या परिवाराच्या ईतर परीवाराशी संभाव्य संबध असल्याची सुचना तुम्हाला
ई-पत्रा द्वारे कळवेल, जेणेकरुन तुमच्या वंशावळिचा / परिवाराचा विस्तार अधिक गतिने होतो. किन्बहुना आपली वंशावळी ही संपूर्ण जगतातील वंशावळीचा एक भाग पण बनु शकेल.
सध्याच्या वर्तमान परीस्थिती नुसार Geni वर संपुर्ण जगत वंशावळी मध्ये ४० लाखांवर खाते आहेत.
वंशावळीतील/ परीवारातील प्रत्येक सदस्याला एक वैयक्तीक खाते असते व ह्या खात्यावरुन त्याच वंशावळीतील ईतर सदस्याला त्याच्य बद्दल माहीतीची देवाण घेवाण करता येते, उदा.
छायाचित्र,नात्यांमधे होणारे लग्न,मुंजी,बारसे ईत्यादी. ह्याचा सर्वोत्तम फायदा म्हणजे आपले नातेवाईक व नात्यातील घडामोडींशी संपर्कात राहता येते.तसेच एक किंवा अधिक परीवार
मिळुन आपल्या पूर्वजांची वंशावळी अत्यंत सहज बनवता येईल.
Geni हे एक निजी संकेतस्थळ आहे. फक्त तुमच्या वंशावळीतील/ परीवारातील सदस्यच तुमचे खाते बघु शकतात. Geni तुमचा जालातील निरोप पत्ता ह ईतरत्र कुठेही प्रकशित करणार
नाही, त्यामुळे तुम्हाला spam ची चिंता नाही होणार. तुम्ही किंवा वंशावळीतील/ परीवारातील कर्त्या (Administrator) ने केलेले सर्व बदल सर्वांना एका दैनिक पारीवारिक वृत्तपत्राद्वारे कळवले जाते.
आधिक माहीती साठी कृपया येथे पहा....
मि.पा वर पहीले लेखन करीत आहे. चू.भू.मा. अ.
स्वछंदी पाखरु.....
आज का डोळ्यात माझ्या, पाणी पुन्हा दाटले होते...
कासाविस या व्याकुळ आत्म्यात, आभाळ भरून साठले होते...

पण... पंख पिंजर्यातच अडकलेले होते..........
विदेशी दिनदर्शिकेसंबंधीत माहिती
आय टी उद्योगच नव्हे तर आजकाल सगळ्याच उद्योगांत काम करतांना बर्याचदा पाश्चात्य देशांशी संबंध येत असतो. त्या कारणाने तेथील वेळा, सण वार, सुट्या, राष्ट्रिय सण, समारंभ, स्थानिक सुट्या आदी असल्या तर त्या भारतात राहून समजत नाही. येथे अनेक सदस्य आयटी/ अन्य कारणाने भारताबाहेर वास्तव्यास आहेत. माझी एक विनंती आहे की त्यांनी त्या त्या देशातल्या वर उल्लेखिलेल्या सुट्यांचे वेळापत्रक सरकारतर्फे जाहिर झालेले वेळापत्रक म्हणा किंवा त्याशी संबंधीत संस्थळ किंवा दिनदर्शिका असेल तर ते येथे द्यावे जेणे करून येथील अनेक सदस्यांना त्याचा उपयोग होवू शकेल.
एक नेहमीचा उपयोग म्हणजे एखाद्या सदस्याला जर अमेरीकेचे संयुक्त संस्थानाशी कारभार करायचा असेल अन त्याला समजा त्या देशाचा राष्ट्रिय सण समजा परवा असेल तर तो येथे भारतात जोडून सुट्टी घेवू शकतो. त्याने त्याचे त्या दिवसाचे न केलेले कामाचा दिवस त्याच्या कार्यालयात सत्कारणी लागून कार्यालयाचे व त्याचेही वरखर्च वाचू शकतो.
परमेश्वराचे उगमस्थान तुमचा मेंदू ................?भाग - १० या इथे ही लेखमाला संपवत आहे.
Reprinted with permission from EnlightenNext magazine,
© 2005 EnlightenNext, Inc. All rights reserved. www.enlightennext.org
परमेश्वराचे उगमस्थान तुमचा मेंदू ..........भाग - १
परमेश्वराचे उगमस्थान तुमचा मेंदू ..........भाग - २
परमेश्वराचे उगमस्थान तुमचा मेंदू ..........भाग - ३
परमेश्वराचे उगमस्थान तुमचा मेंदू ..........भाग - ४
परमेश्वराचे उगमस्थान तुमचा मेंदू ..........भाग - ५
परमेश्वराचे उगमस्थान तुमचा मेंदू ..........भाग - ६
परमेश्वराचे उगमस्थान तुमचा मेंदू ..........भाग - ७
परमेश्वराचे उगमस्थान तुमचा मेंदू ..........भाग - ८
परमेश्वराचे उगमस्थान तुमचा मेंदू ..........भाग - ९
उपसंहार
हे लेखन आपण सर्वांनी वाचल्याबद्दल मी आपला आभारी आहे. हे वाचल्यामुळे हा विषय किती महत्वाचा व रंगतदार आहे हेही आपल्या लक्षात आले असेल.
मी हे सगळे लिहील्यावर माझ्या मनात विचार आला, कोण वाचणार आहे हे ? आणि जे वाचतील त्यांच्या मनात काय विचार येतील? त्यांना हे वाचल्यानंतर जे प्रश्न पडतील त्यांची उत्तरे मी देऊ शकेन का ? मी नाही देऊ शकलो, तर त्यांनी ती उत्तरे कुठून मिळवायची ?
मनाच्या खोलवर कप्यात मात्र मला असं वाटते आहे की युगानुयुगे जो चैतन्याचा शोध चाललेला आहे, त्याचा मी आणि तुम्ही एक छोटासा भाग आहे आणि हा शोध जोपर्यंत या विश्वात चैतन्य असलेल्या वस्तू असणार आहेत तो पर्यंत चालणार आहे, यात शंकाच नाही. माझ्या या प्रवासात जे अनुभव मला आले, त्या अनुभवांना सामोरे जाताना माझ्या मनात आणि मेंदूत बरीच उलथापालथ झाली. भौतिकवाद्यांबरोबर मी जास्त वेळ घालवला की मला त्यांचे म्हणणे पटू लागते आणि अध्यात्मावाद्यांबरोबर चर्चा केल्या तर मला त्यांचे म्हणणे पटू लागते. या सगळ्या वादांची आणि माझ्या जाणिवेची मोट बांधायची कशी हा माझ्या समोरचा अवघड प्रश्न आहे.
दोन्ही बाजूंची मते जरा बाजूला ठेवता येणे सहज शक्य आहे. भौतिकवाद्यांचे मत आहे की हे मन मेंदूचीच फलोत्पत्ती आहे. त्याच्या विरूध्द अध्यात्मवादी मनाला स्वर्गियत्व बहाल करून म्हणतात, मेंदूचा आणि मनाचा काही संबंध नाही. मला प्रामाणिकपणे वाटते की सत्य हे मधे कुठेतरी लपलेले आहे. पण कुठे आणि काय आहे ते ?
या शोधात माझे, तुमचे योगदान असायलाच पाहिजे.
सापडले तर मला खात्री आहे त्या उत्तराचा वापर करून अखिल मानवजातीला विनाशापासून निश्चितच वाचवता येईल.
मला खात्री आहे ! तुम्हाला ?.........
जयंत कुलकर्णी
भाग १० व लेखमाला संपन्न.
परमेश्वराचे उगमस्थान तुमचा मेंदू ................?भाग - ९
Reprinted with permission from EnlightenNext magazine,
© 2005 EnlightenNext, Inc. All rights reserved. www.enlightennext.org
परमेश्वराचे उगमस्थान तुमचा मेंदू ..........भाग - १
परमेश्वराचे उगमस्थान तुमचा मेंदू ..........भाग - २
परमेश्वराचे उगमस्थान तुमचा मेंदू ..........भाग - ३
परमेश्वराचे उगमस्थान तुमचा मेंदू ..........भाग - ४
परमेश्वराचे उगमस्थान तुमचा मेंदू ..........भाग - ५
परमेश्वराचे उगमस्थान तुमचा मेंदू ..........भाग - ६
परमेश्वराचे उगमस्थान तुमचा मेंदू ..........भाग - ७
परमेश्वराचे उगमस्थान तुमचा मेंदू ..........भाग - ८
“जर मेंदूला ज्ञान देणार्या ज्ञानेंद्रियांची संख्या कमी केली तर त्या माणसाची ग्रहणशक्ती निश्चितच वाढेल या समजुतीने १९७० साली संशोधकांनी एक छोटी आणि साधी पध्दत शोधून काढली. एक माणूस, ज्याला आपण “पाठवणारा” म्हणूया आणि ज्याला पाठवले आहे त्याला “स्विकारणारा” म्हणूया. पाठवणार्याला एक प्रतिमा काही वेळ दाखवून त्याला ती प्रतिमा स्विकारणार्याला पाठवायला सांगितल्या गेल्या. (टेलीपाथीने). जो स्विकारणारा होता त्याची अगोदरच तयारी करून घेण्यात आली होती. दहाएक मि. त्याला बाकिच्या ज्ञानेंद्रियांपासून वंचित करण्यात आले आणि त्याला चार वेगवेगळ्या प्रतिमा दाखवण्यात आल्या. त्यातच एक जी पाठवली जाणार होती ती पण अंतर्भूत होती. जर योगायोगानेच ही प्रतिमा ओळखली जाते असे गृहीत धरले तर २५ टक्केच यश मिळाले असते. पण गेल्या तीस वर्षात हा प्रयोग तिन हजार एकशे वेळा वेगवेगळ्या प्रयोगशाळांतून करण्यात आला आणि त्यात ३२ टक्के यश मिळालेले आहे. सांख्यशास्त्राप्रमाणे ही बाब उल्लेखनीय आहे. परंतू विज्ञानाप्रमाणे हा एक लाखातला एक योगायोग असेच समजले जाईल. पण हे अनुमान एस्पिरीन ह्रदयरोगावर एक चांगले औषध आहे हे ठरवण्यासाठी जे प्रयोग करण्यात आले त्यापेक्षा चांगले आहेत. हेही लक्षात घेतले पाहिजे की परचित्तज्ञान हा या शास्त्रातला फार छोटास भाग आहे. म्हणून नुसते पुरावे गोळा करुन चालणार नाही तर या विषयावर मुलभूत संशोधन विज्ञानानीच हाती घेतले पाहिजे.”
गेली तीस वर्षे रॅडीन सगळ्यांच्या प्रश्नांना उत्तरे देत असल्यामुळे त्याच्या कडे माहितीची (डाटा) आजिबात वानवा नाही. हे सगळे मुद्दे आता कालबाह्य झाले आहेत. हे सगळे पुरावे, ज्यांना, विज्ञानशास्त्राचे नियम लावले गेलेले आहेत, त्याने हे सिध्द झाले आहे की अतिंद्रीय शक्ती अस्तित्वात आहे. पण वैज्ञानिक जगत त्याला अजून मान्यता देत नाही कारण सैध्दांतिक विश्लेषणाचा अभाव. मान्यता नाही कारण त्याचे पटण्याजोगे स्पष्टिकरण देता येत नाही.
मी जेव्हा मागच्या थंडीत रॅडीनला भेटलो तेव्हा तो अजून एक पुस्तक लिहायच्या तयारीत होता. त्याचे नाव होते – एनटॅंगल्ड माईंड. या पुस्तकात त्याने काही सिध्दांत मांडायचा प्रयत्न केला आहे. त्याची अपेक्षा ही आहे की हे पुस्तक वाचल्यावर विज्ञानजगत अतिंद्रिय शक्ती तत्सम गोष्टींना शास्त्र म्हणून मान्यता देतील आणि या विषयाकडे जरा गंभीरपणे बघतील. ज्याप्रमाणे सरळ साध्या स्पष्टिकरणाचे स्त्रोत आटले की क्वांटम फिजीक्सचा आधार घेतला जातो त्या प्रमाणे रॅडीनसुध्दा त्याचा आधार घेऊ पहात आहे. तो म्हणतो “ अतिंद्रीय ज्ञानाचे गूढ हे पदार्थ्विज्ञानाचे गूढ आहे. प्रश्न फार सोपा आहे. तुमच्या मेंदूत काहितरी आहे जे तुमच्या नेहमीच्या ज्ञानेंद्रियातून गेलेले नाही. पण काळ आणि अवकाशाच्या सीमा त्याने गूढरित्या ओलांडलेल्या आहेत. हे जीवशास्त्र नाही, हे मानसशास्त्र नाही आणि चेताशास्त्रही नाही”
क्वांटम एनटॅंगलमेंट्च्या धर्तीवर त्याने “बायो एनटॅंगल्मेंट” असू शकेल का ? असा प्रश्न विचारला आहे. एनटॅंगलमेंट हा क्वांटम फिजीक्समधला एक अत्यंत विस्मयजनक सिध्दांत आहे. (या सिध्दांताप्रमाणे कुठलेही दोन क्वांटम कण, अणू असुदेत किंवा प्रकाशाचे रेणू असूदेत, एकामेकांना असे जोडता येतात, किंवा असे जोडलेले असतात की तुम्ही त्यांना कितीही अंतराने वेगळे केले तरीही एकात थोडा जरी बदल केला तरी दुसर्यात तो बदल ताबडतोब होतो. किती ताबडतोब ?तर प्रकाशाच्या वेगापेक्षाही अगोदर.) जगप्रसिध्द पदार्थवैज्ञानिक श्री. श्राडिंजर यांनी याविषयी आपले मत मांडले १९३७ साली. परंतू याचे अस्तित्व सिध्द व्हायला १९८० साल उजाडावे लागले. गंमत म्हणजे क्वांटम मेकॅनिक्सचे जनक श्री. आइनस्टाईन याच्या पूर्णपणे विरोधात होते. १९७२ सालात मानवाला याचा पहिला अनुभव आला आणि त्यानंतर रॅडीनच्या म्हणण्यानुसार “याची नवनवीन उदाहरणे आता सापडत आहेत. या सगळ्याचा आपण ज्या जगात आहोत ते समजून घेण्यावर काही परिणाम होईल का ? मला वाटते जर एनटॅंगल्ड होण्यासाठी दोन वस्तूमधे जर फक्त त्यांच्या इतिहासात कधीतरी संपर्क झाला असला पाहिजे हीच अट असेल तर सगळे विश्वच एनटॅंगल्ड आहे असे म्हणावे लागेल. कारण खगोलशास्त्रज्ञ आपल्याला नेहमीच सांगतात की या विश्वाचा उगम एकाच वेळी आणि एकाच स्फोटातून झाला आहे.” ( तसे जर असेल तर शनीची जागा बदलल्यावर आपल्यातील काही अणू जागा बदलत असतील का ? :-) ). सुक्ष्म जगातून बाहेर पडून नेहमीच्या जगात या सिध्दांताचा उपयोग अनेक गोष्टींचे स्पष्टिकरण देण्यासाठी करता येईल हे वैज्ञानिक अजूनही मानायला तयार नाहीत हे आपले दुर्दैव आहे.” पण रॅडीनच्या म्हणण्यानुसार बायोएन्टॅगलमेंट वर जर खरंच आभ्यास झाला तर अतिंद्रीय अनुभवांचे स्पष्टिकरण संशोधकांना निश्चितच देता येईल ( जे भौतिकशास्त्राने देता येत नाही).
जर मेंदू क्वांटम कणांप्रमाणे वागत असतील तर ते एनटॅंगल पण होऊ शकतात. “कशाशीही किंवा सगळ्याशी” हे जर आपण एकदा मान्य केले तर टोकाला जाऊन असेही म्हणता येईल की एक मेंदू दुसर्या मेंदूला माहिती पाठवतो असे म्हणण्याऐवजी आपण असे म्हणू शकतो की मेंदू आपले लक्ष स्वत:कडेच असलेल्या माहितीवर केंद्रित करतो. थोडक्यात थोडासा अतिशोयक्तीचा भाग सोडल्यास आपण असेही म्हणू शकतो की आपला मेंदू सगळ्याशी एकरूप आहे तर दुसर्याच्या मनात काय चाललेले आहे किंवा त्या पलिकडे काय चाललेले आहे याची माहिती आपल्या मेंदूत अगोदरच असणार. आपण फक्त आपल्या मेंदूला त्या माहितीकडे लक्ष द्यायला शिकवले पाहिजे.”
भौतिकवाद्यां विरूध्द या लढाईत रॅडीन आणि शेल्ड्रेक आता एकाकी नाहीत. गेल्या काही वर्षात तत्वज्ञानी, धर्मशास्त्र जाणणारे पंडीत, विश्वाचा अभ्यास करणारे आणि विज्ञानाच्या मुख्य प्रवाहात असणारे काही शास्त्रज्ञ यांचाही त्यांना पाठिंबा मिळतोय. याचा सगळ्यात मोठा फायदा असा झालाय की मेंदू आणि शरीर या संबंधी नवनवीन, वेगवेगळे सिध्दांत मांडले जाऊ लागलेत.
तत्वज्ञानाच्या दृष्टीकोनातून विचार केला तर भौतिकवाद आणि शरीर-मन संबंधाविषयी सध्या सगळ्यात आवडती कल्पना आहे “पॅनसायकीझम”ची. तशी ही जुनीच कल्पना आहे पण सध्या विचारल्या जाणार्या बर्याच प्रश्नांची उत्तरे यात मिळू शकतात म्हणून हा सिध्दांत लोकप्रिय झाला आहे. “पॅनसायकिझम” म्हणजे काय हे थोडक्यात सांगायचा प्रयत्न केल्याशिवाय पुढे जाता येणार नाही.
पॅनसायकिझम” मधे सांख्यवादाशिवाय दुसरे काही नाही. या सिध्दांतामधे असे मानण्यात येते की सर्व भौतिक वस्तू, हे जगसुध्दा, एक चैतन्य असलेला जीव आहे. त्याला वैश्विक बुध्दी, वैश्विक मन आहे तर त्याच्यात वैश्विक स्थूल तसेच सुक्ष्म भुते आहेत. सर्व वस्तू या जिवंत असतात, त्यांच्यात प्राण असतो. याचा अर्थ असा नाही की या तत्वानुसार सर्व जडद्रव्यात चैतन्य असते आणि त्यात प्राण असतो. त्यांना एवढेच म्हणायचे असते की जड द्रव्याचा काही भाग मात्र चैतन्ययुक्त असतो.
या सिध्दांतानुसार आपण शरीर/मन यांचे गूढ उकलण्यासाठी आपण हे मान्य करतो की हे विश्वाच्या अनेक गुणधर्मापैकी चैतन्य आणि अनुभव हे मुलभूत गुणधर्म आहेत आणि ते या विश्वात कोठेही कुठल्या ना कुठल्या स्वरूपात असतातच अगदी अणूरेणूमधेसुध्दा ! त्यांच्या मते हे चैतन्य मेंदूत कसे येते हे शोधून काढायची गरज नसते कारण ते सर्व विश्वात त्याच्या जन्मापासूनच असते. म्हणजे माळरानावरील दगडे आपापसात सुखदु:खाच्या गोष्टी का नाही करणार, असा प्रश्न तुम्ही विचारू शकाल, पण एक लक्षात घेतले पाहिजे की त्यांचे चैतन्य आणि आपले चैतन्य यामधे फरक आहे. अर्थात काही संशोधक याचा उपयोग करून भविष्यात चैतन्यमय यंत्रे असतील असा दावा करतात, त्या कडे आत्ताच एवढे गंभीरपणे बघायची आवश्यकता मला वाटत नाही. मला वाटते तसल्या यंत्रा अगोदर चैतन्य असलेला संगणक तयार होईल. असो.
“रिडक्शनीझम” (याचा अर्थ आपण मागे बघितलेला आहे) ला उत्तर म्हणून आधुनिक शास्त्र “इमर्जन्स” कडे बघत आहे. आता आपण याचा अर्थ थोडक्यात बघूया. एखादी वस्तू अनेक घटकांची बनलेली असते. या सर्व घटकांचे मूळ गुणधर्म असतात त्यापासूनच ही नवीन वस्तू बनलेली असते, पण त्या नवीन वस्तूमधे त्या घटकांच्या गुणधर्मापेक्षाही अधिक काहितरी असते. उदा. असे म्हटले जाते की चैतन्य हे मेंदूचा, त्यातून उदय झालेला गुणधर्म आहे. गुंतागुंतीच्या व्यवस्थेचे स्पष्टिकरण देताना “इमर्जन्स”चा वापर केला जातो आणि मेंदू ही एक अत्यंत गुंतागुंतीची व्यवस्था (system) आहे हे आपण जाणतोच. त्यामुळे या संकल्पनेचा वापर संशोधकानी केला नसेल तर नवलच. थोडक्यात सांगायचे म्हणजे खालच्या पातळीवरच्या घडामोडी वरच्या पातळीवरच्या अतर्क्य घडामोडींना उदय देतात आणि त्या घटनांचा उगम त्या खालच्या पातलीवरच्या घडामोडीत आहे असे आपण सिध्द करू शकत नाही. उदा. ऑक्सीजन ओला नसतो आणि हायड्रोजनही ओला नसतो पण त्यापासून तयार होणारा पदार्थ – पाणी मात्र ओले असते. त्याच प्रमाणे मनाचे जे गूणधर्म, उदा. विचार करणे, इच्छाशक्ती, निर्णयक्षमता, भावना इ. आपल्याला मज्जातंतूच्या गुणधर्मात सापडत नाहीत. या संकल्पनेचे विशेष असे आहे की ती मनाचे मूळ हे जीवशास्त्रीय आहे हे नाकारत नाही पण त्याच्याही पलिकडच्या काही अनुभवांचा ती पाठराखण करते.
माणसाच्या अतर्क्य अनुभवांना आता काही भौतिकशास्त्राच्या वैज्ञानिकांचाही पाठिंबा मिळत आहे. प्रसिध्द तत्वज्ञानी जॉन सर्ल म्हणतात ते फार महत्वाचे आहे. “चैतन्याच्या गुणधर्माची फोड आपण करू शकत नाही याचे कारण ते शब्दातीत किंवा गूढ आहे म्हनून नाही तर तो एक वैयक्तिक अनुभवच असू शकतो. विज्ञानाने आणि तत्वज्ञानाने एक फार मोठी चूक केली आहे ती म्हणजे ते म्हणतात, जर तुम्ही द्वैतवाद नाकारला तर तुम्हाला भौतिकवाद स्विकारावा लागेल किंवा भौतिकवाद नाकारला तर द्वैतवाद स्विकारावा लागेल. हे असेच असायचे सध्या काहिच कारण नाही. कारण या दोन्हीमधेच भरपूर गोंधळ आहे तो आधी निस्तरला पाहिजे.”
“इमर्जन्स आणि पॅनसायकीस्ट” वाल्यांचे असे म्हणणे आहे की जर भौतिकवाद्यांना माणसांच्या सगळ्या अनुभवांचे स्पष्टीकरण देता येत नसेल तर त्यांना या अभ्यासातून वगळले तरी चालेल. त्यांना अर्थात या अभ्यासाचा भाग म्हणून मान्यता मिळेल पण त्यांच्या ठराविक पठडीतील सिद्धांत आणि मते यांना आता कितपत मान्यता मिळेल याची शंकाच आहे. आता असा काहितरी सिध्दांत मांडायला पाहिजे की आंतरिक अनुभवाचे विश्व आणि भौतिक विश्व यांच्यातील अनुभवांची सत्यता दोन्ही विश्वात सिध्द करता येईल. अवघड आहे ते !
प्रसिध्द विश्वघटनाशास्त्रज्ञ श्री. जॉर्ज एलीस म्हणतात “सर्व शास्त्रातील मुलतत्ववादी एक मोठी चूक करतात ती म्हणजे एखद्या गोष्टीचा कार्यकारणभाव समजावून सांगताना ते एखाद्या छोट्या कारणाला त्या घटनेचे संपूर्ण कारण म्हणून पुढे करतात. तेथे न्युरॉन्स आहेत हे कोणीच नाकारत नाहीत. पण मेंदूच्या कार्याचे ते एक अत्यंत छोटे कारण आहे. या शास्त्रज्ञांना वरच्या पातळीवरून खाली बघण्याचा अनुभव नाही. खरंतर तेच जीवनाला खरा अर्थ प्राप्त करून देते. आता तुम्ही खालच्याच पातळीवरून वर काय चालले आहे हे जाणून घ्यायचा प्रयत्न केलात तर तो अर्थ तुम्हाला कधीच कळणार नाही. उदा. एखादे उडणारे विमान घ्या. खालून त्याच्याकडे बघताना, ते का उडते आहे या प्रश्नाचे उत्तर फार सोपे आहे. त्या विमानाच्या पंखावर हवेचे कण खालून आदळतात आणि त्याच्या वरती असणार्या हवेचा वेग हा त्याच्या वेगापेक्षा कमी असतो, म्हणून विमान उडते. विमानाच्या वरच्या पातळीवरून हाच प्रश्न विचारला तर त्याचे उत्तर येईल की कोणीतरी ते विमान उडण्यासाठी तयार केले आहे, त्यासाठी अनेक शास्त्रांच्या नियमांचा उपयोग करण्यात आलेला आहे, संगणकाचा वापर केलेला आहे. विमानाच्याच पातळीवरून ह प्रश्न विचारला तर उत्तर येईल की ते विमान उडते आहे याचे कारण एक वैमानिक ते उडवतोय. आता चेताशास्त्रज्ञ वरच्या पातळीवरचे आणि त्याच पातळीवरचे विचार करत नाहीत. (Level) ते म्हणतील त्या वैमानिकांच्या काही न्युरॉन्सच्या कार्यामुळे त्या विमानाला उडवता येत आहे. पण ते हे विसरतात की त्याने लहानपणीच वैमानिक व्हायचे ठरवले होते, त्यासाठी त्याने कष्ट काढलेले आहे.इ.इ.... एकाच पातळीवर लक्ष केंद्रित केल्यामुळे ते दुसर्या पातळीवर लक्ष देत नाहीत. या असल्या सिध्दांतांची आता मुळीच वानवा नाही पण पश्चिमेने भौतिकशास्त्राच्या बाजूने जो पक्षपातीपणा चालवला आहे त्यामुळे हे सिध्दांत मागे पडत आहेत. अमेरिकी तत्वज्ञानी थॉमस कून म्हणतो “ लवकरच आपल्याला या सगळ्याकडे बघण्याच्या दृष्टीकोनात मुलभूत फरक करावा लागेल हे स्पष्ट आहे.”
विज्ञान जर मन/शरीर या जोडीचे गूढ उलगडू शकला नाही तर त्याची उपयुक्तता अंतिमत: संपेल का ? हाही एक महत्वाचा प्रश्न आहेच. का न्युरोसायन्स मेंदू/शरीर यांच्यातले गूढ उकलेल आणि ज्यावर हा समजुतींचा डोलारा उभा आहे तो धडाधडा कोसळेल ?
हा खरा अवघड प्रश्न आहे !
भाग ९ समाप्त.
जयंत कुलकर्णी.
भाग १० हा शेवटचा भाग असेल.
"उलटे समीकरण घातक!"
समाजाचे आणि सद्यस्थितीत घडलेल्या घटनांचे प्रतिबिंब सिनेमात, मालिकांमध्ये आणि बातम्यांमध्ये दिसते असे आपण म्हणतो. पण कधीकधी या उलटही घडू शकते, असे वाटण्यासारखी परिस्थिती आज निर्माण झाली आहे असे मला वाटते. त्यासाठी दोन उदाहरणे अत्यंत ताजी आहेत.
गेल्या वर्षाच्या शेवटच्या महिन्यात प्रदर्शित झालेला थ्री इडीयटस नंतर या वर्षीच्या जानेवारी महिन्या पासून शालेय आणि कोलेजच्या विद्यार्थ्यांमध्ये आत्महत्यांची लाट आली. ती अजूनही कायम आहे.
तसेच याच वर्षी प्रदर्शित झालेला हिंदी चित्रपट लव्ह, सेक्स और धोका यात ओनर किलिंग वर आधारित असलेल्या एका कथेचे अत्यंत वास्तव चित्रण मांडले होते आणि त्यानंतरच अचानक वर्तामानापत्रामध्ये, वृत्तवाहिन्या मध्ये समाजात घडत असलेल्या ओनर किलिंग संदर्भातील बातम्या दिसायला लागल्या. वाचकांनीही हे निरिक्षण केले असेलच. पूर्वीही आंतरजातीय विवाह वर चित्रपट आल्या वर जोडप्यांच्या आत्महत्यांची लाट आली असे ऐकिवात आहे.
आता प्रश्न असा पडतो की, आत्महत्या आणि ओनर किलिंग या दोन्ही गोष्टी वाईट असूनही चित्रपटात त्यांचे एका प्रकारे वास्तववादी चित्रीकरण केल्याने उदात्तीकरण झाल्यासारखे वाटते आणि त्यामुळे अशा घटना घडण्यापासून परावृत्त होण्याऐवजी तसे घडण्यास समाज आणखी प्रवृत्त होतो असे वाटते. कारण सतत त्याच त्याच गोष्टी बातम्या मधून, वृत्तवाहिन्या मधून समोर येत राहिली तर त्याचा नक्कीच परिणाम होतो. मग समीकरण उलटे होण्याचा संभव असतो. म्हणजे, समाजाचे प्रतिबिंब सिनेमात आणि बातम्यांमध्ये दिसण्या ऐवजी सिनेमा आणि बातम्या मुळे समाज बदलतो असे होते.
किंवा अशा घटना नेहेमी घडतच असाव्यात पण त्या वृत्तपत्रांमध्ये यायला सुरुवात तेव्हाच होत असेल जेव्हा अशा प्रकारे चित्रपटांतून त्याचे सर्वप्रथम चित्रीकरण होते किंवा त्या संदर्भात एखादी मोठी घटना घडते आणि त्या निमित्ताने मग सगळी पत्रकारिता त्या विषयाकडे कडे ओढली जाते.
कधीकधी हे समीकरण उलटीकडूनच सुरु होते. वृत्त वाहीन्या आणि काही वर्तमानपत्रे अगदी नेमाने, नेटाने स्त्री चे चित्रण (विशेषतः जाहिरातीमध्ये), पार्ट्यांचे, फॅशनेबल कपड्यांचे, पेज थ्री प्रकारचे चित्रण अशा काही पाश्चात्य पद्धतीने करतात की तसे आज समाजात सगळीकडे तसेच घडते आहे असे वाटावे. आजकाल पाहणी करुन विशिष्ट प्रकारचे अहवाल आणि निष्कर्ष टक्केवारीत प्रसिद्ध करण्याचे फॅड आले आहे. उदाहरणादाखल- इंडीया टूडे, आउटलूक वगैरे मासिकांमधून प्रसिद्ध होणारे सेक्स-सर्वे वगैरे. मग भलेही तशा घटना फक्त दहा टक्के अति श्रीमंत वर्गातच होत असतील.
काहीही असले तरी असे उलटे समीकरण मात्र घातकच आहे.
आपल्याला काय वाटते?
'रॉयटर'च्या श्री. अलिस्टर स्क्रटन (Alistair Scrutton) यांचा एक लेख
सुमारे महिन्यापूर्वी 'जकार्ता पोस्ट'मध्ये 'रॉयटर'च्या श्री. अलिस्टर स्क्रटन (Alistair Scrutton) यांचा एक लेख आला होता. शीर्षक होते, "As Pakistan stares at India, India eyes the world". हा लेख 'मिपा'कर http://www.reuters.com/article/idUSTRE6590YJ20100610 या दुव्यावर वाचू शकतील.
आपण भारतीय नागरिक परदेशी मीडियात भारताबद्दल साधारणपणे तुच्छतादर्शक मतप्रदर्शन वाचतो व रागावतो. पण या लेखातले भारताबद्दल उदार मतप्रदर्शन वाचून मला साश्चर्य आनंदाचा धक्काच बसला.
भारताने स्वातंत्र्यानंतरच्या साठाहून जास्त वर्षांत अस्सल लोकशाही, कधी-कधी अनागोंदीचीही म्हणता येईल, राबवीत जे कांहीं साध्य केले आहे त्याचा प्रत्येक भारतीय नागरिकाला अभिमान वाटतो. आपल्या देशाने कधीही कुणावरही आक्रमण केले नाहीं, अगदी बांगलादेश युद्धातही. कारण लवकरात लवकर भारताने तो नवनिर्मित देश शेख मुजीबुर रहमान यांच्या सरकारच्या हवाली करून आपली सेना परत बोलावली होती.
भारत जरी प्रगतीशील देश असला तरी गरीबच आहे. पण भारताने कधीही भीक मागितली नाहीं. कर्ज जरूर घेतले, पण व्याजासकट फेडले. एक गरीब देश म्हणून भारताने आपली सर्व शक्ती आणि संपत्ती जनतेच्या उद्धारासाठी, तिचे राहाणीमान सुधारण्यासाठी वापरली पाहिजे, तशीच पाकिस्ताननेही. पण कुठलाच देश आपले शेजारी निवडू शकत नाहीं आणि क्वचितच शेजारी राष्ट्रे गुण्यागोविंदाने रहातात, मग ती इंग्लंड-फ्रान्स-जर्मनी असोत किंवा भारत-पाकिस्तान असोत किंवा भारत-चीन असोत. (आणखीही अशी उदाहरणे असतील, पण मला आठवतो तो एकच अपवाद अमेरिका-कॅनडाचा!) त्यामुळे संरक्षणावर दोघांचा अवाच्या सवा खर्च होत आहे.
आज भारत अशा टप्प्यावर पोचला आहे कीं त्याला त्याची जोडी पाकिस्तानबरोबर लावल्यास मत्सर वाटत नाहीं, तो पाकिस्तानकडे एक ज्याच्याशी आपले पटत नाहीं, जो उधळ्या आहे पण कमवत नाही, जो कायम 'मदत' मागून जगतो असा एक शेजारी म्हणून बघतो. महागडी आणि धोकादायक 'खेळणी' जमा केलेला एक शेजारी! पण भारतीयांना त्याच्या सरकारचा जितका राग येतो तितकीच तिथल्या जनतेची कींव येते.
भारताची नजर सध्या खरोखरच खूप दूरवर जागतिक मंचावर लागली आहे.
ऑगस्ट २००९ मध्ये कुठल्या पाश्चात्य 'गोर्या' मीडियाने नव्हे तर अल जझीरा या दुबईस्थित अरबी दूरचित्रवाणीने "कुणापासून त्यांच्या राष्ट्राला सर्वात जास्त धोका संभवतो" या विषयावर पाकिस्तानी जनतेत एक सर्वेक्षण केले होते व त्यात पाकिस्तानी जनमताचा मागोवा घेतला होता. (पहा माझा लेख http://www.misalpav.com/node/8949 या दुव्यावर) सानंदाश्चर्याची गोष्ट अशी कीं फक्त १८ टक्के लोकांना भारतापासून धोका आहे असे वाटले तर ज्या देशाच्या पैशावर पाकिस्तानचा बराचसा खर्च चालतो त्या अमेरिकेपासून धोका आहे असे म्हणणारे ५९ टक्के निघाले. http://tinyurl.co/m65wbh आणि http://tinyurl.com/nwlv99 हे दुवे पहा. याचा अर्थ पाकिस्तानी जनता भारताला सर्वात मोठा धोका मानत नाहीं. भारतीय जनता ही घटना स्वागतार्ह मानत असली तरी पाकिस्तानी सरकारच्या पवित्र्यात जाणवण्याइतका बदल दिसत नाहीं.
पाकिस्तानात खर्या-खुर्या लोकशाहीने मूळच धरले नाहींय्. दोन लागोपाठच्या लष्करशाहीमधील एकादे स्वल्पविराम-पूर्णविरामासारखे चिन्ह एवढीच आतापर्यंत तिथल्या लोकशाहीच्या अस्तित्वाची जाणीव झालेली आहे. उद्या पाकिस्तानात लोकशाही जर रुजली तर परिस्थिती सुधारण्याची शक्यता वाटते कारण मग दोन्ही बाजूची सरकारे आपल्या देशांतर्गत समस्यांना पुढे करून आपापले अपयश लपवू शकणार नाहींत.
भारताने आपल्या परमाणू व प्रक्षेपणास्त्र या विभागातील अग्रणी शास्त्रज्ञाला 'भारतरत्न' देऊन तर गौरवलेच, पण नंतर त्याला राष्ट्रपतीभवनात पाठविले. या उलट दोन वेळा दोन वेगवेगंया राष्ट्राध्यक्षांकडून 'नीशाँ-इ-इम्तियाज़' हा सर्वोच्च मुलकी किताब मिळविलेल्या डॉ. अब्दुल कादीर खान यांच्या एकट्याच्या डोक्यावर अण्वस्त्रप्रसाराबद्दलचे संपूर्ण खापर फोडून त्यांना त्यांच्याच घरी कैदेत ठेवण्याचा कृतघ्नपणा पाकिस्तानी लष्करशहाने बिनदिक्कत केला व लोकांनी तो मु़काट्याने सहनही केला!
आज जगातील सर्वात जास्त अपयशी सरकारांची यादी "Foreign Policy" या नियतकालिकाने केली असून त्यात सोमालिया सर्वात जास्त अपयशी सरकार म्हणून पहिल्या क्रमांकावर आहे, अफगाणिस्तान, इराक ६व्या व सातव्या क्रमांकावर, पाकिस्तान दहाव्या क्रमांकावर, चीन ६२व्या क्रमांकावर, भारत ७९व्या क्रमांकावर तर नॉर्वे सर्वात यशस्वी राष्ट्र या नात्याने १७७व्या क्रमांकावर आहे. http://tinyurl.com/26lfpa5 या दुव्यावर तपशील वाचा.
पाकिस्तानने आपली परिस्थिती सुधारण्याचा प्रयत्न केला पाहिजे व त्यासाठी भारताबरोबरचे उभे वैर संपवून खर्याखुर्या मैत्रीचा हात पुढे केला पाहिजे. असे केल्यास भारत नक्कीच पाकिस्तानला मदत करायला तयार होईल असे मला वाटते.
बहुतेक सर्व भारतीय नागरिकांना पाकिस्तानी जनतेबद्दल वैरभावनेपेक्षा कींव जास्त आहे. त्यांचे इतके हाल होऊ नयेत असेही वाटते. मग वाटते कीं केंव्हां है वैर संपणार?
जितक्या आधी संपेल तितके बरे.
परमेश्वराचे उगमस्थान तुमचा मेंदू ................?भाग - ८
Reprinted with permission from EnlightenNext magazine,
© 2005 EnlightenNext, Inc. All rights reserved. www.enlightennext.org
परमेश्वराचे उगमस्थान तुमचा मेंदू ..........भाग - १
परमेश्वराचे उगमस्थान तुमचा मेंदू ..........भाग - २
परमेश्वराचे उगमस्थान तुमचा मेंदू ..........भाग - ३
परमेश्वराचे उगमस्थान तुमचा मेंदू ..........भाग - ४
परमेश्वराचे उगमस्थान तुमचा मेंदू ..........भाग - ५
परमेश्वराचे उगमस्थान तुमचा मेंदू ..........भाग - ६
परमेश्वराचे उगमस्थान तुमचा मेंदू ..........भाग - ७
सुसानबाई काहीही म्हणत असल्यातरी हे ही खरे आहे की या अनुभवांवर वाचन केल्यावर हे जाणवत रहाते की भौतिक शास्त्रात या अनुभवांचे स्पष्टीकरण देण्यासाठी बरेच प्रयोग चाललेले आहेत. उदा. बर्याच डॉक्टरांनी आणि परिचारीकांनी नमूद केले आहे की बर्याच की कित्येक रूग्णांना ते बेशुध्दावस्थेत असताना, किंवा त्यांचा मेंदू मेंदू मृत्यू पावला असताना काही गोष्टी सांगता येत होत्या. उदा. एका रुग्णाने ज्या परिचारिकेने तो बेशूध्द असताना त्याची दाताची कवळी काढली होती तिला बरोबर ओळखले होते आणि ती तिने कुठे ठेवली होती हेही बरोबर सांगितले. एकीने तर म्हणे शरीराच्या बाहेर जाउन त्या रुग्णालयाच्या तिसर्या मजल्यावरच्या पायर्यांवर ठेवलेल्या टेनिसच्या बुटांचे बरोबर वर्णन केले. पण सगळ्यात नाट्यमय घटअना आहे ती म्हणजे एरिझोना प्रांतातल्या एका पाम रेनॉल्डस् नावाच्या स्त्रिची. तिला मृत्यूपासून वाचवण्यासाठी त्यांना तिच्या मेंदूला रक्तपुरवठा करणारी रक्तवाहिनी मेंदूला जिथे जोडली जाते तेथील एक गाठ काढायची होती. त्यासाठी त्यांनी तिच्या शरीराचे तापमान उणे साठ अंश फॅरनाईट पर्यंत खाली उतरवले. त्यामुळे तिचे ह्रदय गोठले आणि तिचा श्वासोश्वास थांबला. मग त्यांनी तिच्या शरीरातील आणि मेंदूतील (म्हणजे मेंदूच्या बाजूचे) सर्व रक्त काढून घेतले. तिचा EEG आता एक सरळ रेषा होती. तिचा मेंदू आता तिच्या कानात ठेवलेल्या आवाज करणार्या यंत्राला कुठलाही प्रतिसाद देत नव्हता. खरंतर ती आता मृतच होती. पण आश्चर्य म्हणजे या दुखण्यातून बरं झाल्यावर डॉक्टरांना असे आढळले की तिला NDE चा अनुभव आला होता आणि एवढेच नाही तर त्या शस्त्रक्रियेच्या वेळी कुठली उपकरणे वापरली ते शल्यविशारद काय चर्चा करत होते हे तिने अगदी सविस्तरपणे सांगितले होते.
NDE चे आत्तापर्यंतचे संशोधन हे तसे विशेष महत्वाचे मानले न गेल्यामुळे या सर्व गोष्टींना पुरावा म्हणून तिसर्याच व्यक्तिंची साक्ष काढण्यात आली नाही हे दुर्दैव. पण या अनुभवावरूनच वैज्ञानिक क्षेत्राला यावर संशोधन करण्याची प्रेरणा मिळाली हे निश्चित. या प्रकरणानंतर मात्र असल्या अनुभवांचा पूर्ण दस्त करण्यात येऊ लागला. विशेषत: ह्रदयरोगविभाग, जेथे बरेच मृत्यू होत असतात, ही त्यांची प्रयोगशाळा झाली. श्री. पीटर फेनविक म्हणतात “संशोधकांच्या दृष्टीने सगळ्यात महत्वाचा प्रश्न हा आहे की मृत्यूनंतरचे अनुभव का येतात.... आपण जर शास्त्रियदृष्ट्या हे सिध्द करू शकलो की मृत्यूनंतरचे हे अनुभव बेशुध्दावस्थेत, जेव्हा मेंदू काम करत नसतो, त्याचवेळेस येतात तर आपण असे म्हणू शकतो की चेतना ही मेंदूशिवाय वेगळी राहू शकते. ( या वाक्याचे महत्व लक्षात घ्या) आणि असे म्हणणे फार महत्वाचे आहे”. श्री. फेनविक आणि त्यांच्या सहाय्यकांचे जरी असे म्हणणे असले की याच्यावर अजून बर्याच संशोधनाची आवश्यकता आहे, तरी जी काही माहीती बर्याच इस्पितळातून जमा झाली आहे त्यावरून असे वाटते की मन हे निश्चितच अभौतिक आहे. या सगळ्या अभ्यासातून काही मुलभूत माहीती जमा झाली तर मात्र आत्मा/चित्त आणि मेंदू यांच्या संबंधाविषयी बरेच प्रश्न निर्माण होतील.
मग मन जर मेंदूत नसेल तर कुठे असेल ? पारंपारिक द्वैतवादी, म्हणजे देकार्तपासून त्यांचे म्हणणे आहे की मन म्हणजे एक अजडद्रव्य असून ते मेंदू आणि शरीराबरोबर कुठ्ल्यातरी गूढ तत्वाने बांधले गेले आहे. हे तत्व काय आहे यावरूनच मन-शरीर या संबंधी वाद चालू झाले आहेत. पण विज्ञानाने हे वाद आता फार तर्कशुध्द आणि समजण्याइतपत सोप्पे केले आहेत.
श्री. रुपर्ट शेलड्रेक यांनी या बाबतीत अजून एक वेगळेच मत मांडले आहे. ते म्हणतात मन आणि हे आयुष्य या संधर्भात अभ्यासासाठी “क्षेत्र” (field) ही संकल्पना फारच उपयोगी पडेल. ही संकल्पना आपल्याला चांगलीच माहीती आहे. ही मायकेल फॅरेडेने प्रथम विद्यूतचुंबकीय आणि गुरुत्वाकर्षणाच्या क्षेत्रासंधर्भात मांडली होती. या कल्पनेने बर्याच गोष्टींकडे याच दृष्टिकोनातून बघितले जाते. सर कार्ल पॉपर यांनी म्हटल्याप्रमाणे “मॉडर्न पदार्थविज्ञानामुळे आपल्या भौतिक ज्ञानामधे बरीच भर पडली असली तरी हेही समजले आहे की आता जडद्रव्य हा मुलभूत सिध्दांत रहिला नाही. पण क्षेत्र आणि शक्ती हे मात्र मुलभूत आहेत. हे जर खरं असेल तर मेंदूकडे या कल्पनेतून बघायला काय हरकत आहे ? म्हणजे बघा, जसे एखाद्या वस्तूभोवतालचे क्षेत्र हे त्या वस्तूमधे कोंडून रहात नाही, त्याप्रमाणे ज्या क्षेत्रावर मेंदूचे काम अवलंबून असते, ते त्या मेंदूत कोंडून रहात असेल असे कशावरून ?
हा सिध्दांत जर आपण खुल्यामनाने स्विकारला तर शेल्ड्रेकच्या मते आपण बर्याच प्रश्नांची समाधानकारक उत्तरे देऊ शकू. उदा. चित्ताचे मेंदूवरचे अवलंबित्व आणि त्याने स्वत: केलेल्या प्रयोगांची उत्तरे. त्याने परचित्तज्ञानावर बरेच प्रयोग केलेले आपणा सर्वांना माहिती असतीलच. या प्रयोगात त्याने आपले चित्त आपला मेंदू सोडू शकतो हे सिध्द करण्याचा बराच प्रयत्न केला आहे. ज्या प्रमाणे तुमच्या सेलफोनमधल्या वायरलेस सर्किटमधला एखादा भाग तुम्ही बदलला तर त्या सेलफोनच्या भोवतालचे क्षेत्र बदलेल का नाही ? तसेच मेंदूत काही उलथापालथ झाली तर त्या भोवतालचे क्षेत्र बदलेल का नाही? त्याच प्रमाणे काही बाह्य घडामोडींमुळेही हा बदल होणे शक्य आहे असे कोणी प्रतिपादन केले तर ?
विल्यम्स् जेम्स नावाच्या शास्त्रज्ञाने अजून एक सिध्दांत मांडला. तो म्हणाला की मेंदू हे एक प्रकारचे चित्ताचे आदान प्रदान करण्याचे यंत्र आहे. हे यंत्र ज्यांना मृत्यूनंतरचे अनुभव येतात त्यांच्या बाबतीत कशा प्रकाराने काम करते? कारण त्यावेळेस तर मेंदूचे काहिच कार्य चालु नसते. एक ह्रदयरोगतज्ञ आणि NDEचे संशोधक श्री. पीम व्हॅन लोमेल यांनी एक कल्पना मांडली आहे, ती विचार करण्यासरखी आहे. आपल्या चित्ताचे किंवा चैतन्याच्या माहितीचे आणि आठवणिंचे क्षेत्र आपल्या भोवती विद्यूत/चुंबकीय क्षेत्राप्रमाणे पसरलेले असते. मात्र हे क्षेत्र फक्त आपल्या जागत्या चैतन्याला, आपल्या मेंदूच्या आणि इतर पेशींमार्फत उपलब्ध होत असते. जेव्हा मेंदू मृतवत होतो तेव्हाही ही क्षेत्रे आपल्या भोवताली उपललब्ध असतात. त्यामुळे ज्यांचा मेंदू मृतवत होतो ते जेव्हा हळूहळू शुध्दिवर येऊ लागतात त्यावेळी हि क्षेत्रे त्यांना माहितीसाठी उपलब्ध होतात. त्यामुळे या लोकांना स्वत:ची ओळख, आजूबाजूची माहिती, लक्ष देणे, आणि भावना इ.ची माहिती होत असते. पण त्याची प्रत्यक्ष जाणीव ही मेंदू पूर्वस्थितीला आल्यानंतरच होते. म्हणून हे लोक शुध्दीत आल्यावर या सगळ्या आठवणी सांगतात.”
अर्थात या अशा कल्पनांना सध्याच्या वैज्ञानिक जगतात थारा मिळणे जरा कठीणच वाटते आहे. त्यामुळेच की काय शेल्ड्रेकसारख्या लोकांनी आता कर्मठ शास्त्रज्ञांना पटवायचा नाद सोडून जनसामान्यांना या विषयाचे (para psychology) शिक्षण द्यायला सुरवात केली आहे. त्यासाठी त्याने इंटरनेट आणि पुस्तकांचा वापर सुरू केला आहे आणि त्यांना खात्री आहे की एक दिवस जनसामान्यांना या विषयात रस निर्माण होईल आणि तेच शास्त्रज्ञांवर हा विषय गंभीरपणे घेण्यासाठी दबाव टाकतील.
Institute of Noetic Sciences चे प्रमूख श्री. रॅडीन म्हणतात “ पुराव्यांची आमच्याकडे कमी नाही. परंतू नुसत्या पुराव्याने काय होणार? आम्ही आता सैध्दांतिक मांडणी केली पाहिजे.” रॅडीन १९८० सालापासून या क्षेत्रात काम करत आहेत आणि त्यांनी त्यांच्या संशोधनावर आधारित एक पुस्तकपण लिहिले आहे. त्या पुस्तकाचे नाव आहे “The conscious Universe: The scientific Truth of Psychic Phenimena”. या पुस्तकात त्यांनी अभ्यासलेल्या सर्व अतिंद्रीय अनुभवांचे सविस्तर वर्णणे आणि विश्लेषणे आहेत. यात त्यांनी असे सिध्द करण्याचा प्रयत्न केला आहे की माणसाचे चैतन्य/चित्त/मन याची कार्यसीमा मेंदूच आहे असे मानायचे काही कारण नाही.
मन-जडद्रव्य यांच्यातील परस्पर संबंध किंवा अन्योन्यक्रियांच्या अभ्यासादरम्यान शस्त्रज्ञांना असे आढळून आले आहे की माणसे इलेक्ट्रॉनिक नंबर जनरेटर्सवर नुसत्या इच्छेने प्रभाव टाकू शकतात. ( भिमाने इच्छेने फासे बदलले हे खोटे मानायचे आता कारण नाही :-). दुरदृष्टी च्या संशोधनात, ज्याचा खर्च CIA ने उचलला होता/आहे, काही माणसांनी दुरवरच्या स्थानाचे वर्णन केले आहे. ( संजय उवाच ?) अर्थात याची संख्या लाखात एक अशी आहे हेही नमुद केले पाहिजे. सध्या वादग्रस्त ठरलेल्या दाव्याच्या – म्हणजे प्रार्थनेने दुरून एखाद्याला बरे करणे याच्या अभ्यासात असे आढळून आले आहे की त्याने सेकंडरी इन्फेक्शन कमी झालेले आहे तसेच नैसर्गिक प्रसूतीला मदतच होते. या संशोधनाला अमेरिकी सिनेटने ५० लाख डॉलार्सची मदत जाहीर केली होती हेही इथे नमूद केले पाहिजे. ( याचे कारण दुसरेच असण्याची शक्यता नाकारता येत नाही).
अतिंद्रीय शक्तिंच्या अभ्यासाला आणि तो करणार्यांना विज्ञानाकडून फार कठोर टीका सहन करायला लागली आहे. त्यांच्या संशोधन करायच्या पध्दतींवर, त्यांनी अभ्यास केलेल्या नमुन्यांची संख्या अत्यंत कमी असल्यामुळे तो अभ्यास विश्वसनीय नाही पासून तो नि:पक्षपाती नाही असे विविध आरोप त्यात करण्यात आलेले आहेत. म्हणून मी मुद्दामच रॅडीनला विचारले की त्याच्या संशोधनाचा असा कुठला भाग आहे ज्याने तो अतिंद्रीय शक्तींचे अस्तित्व आहे असे ठामपणे प्रतिपादन करू शकतो ? आणि टीकाकार त्याचे खंडन करू शकणार नाहीत ? त्यावर त्याचे उत्तर होते
“विज्ञानामधे असा एकही सिध्दांत नाही की त्याचे आपण खंडन केलेले नाही. टीका तर झालेलीच आहे”. असे म्हणत त्याने परचित्तज्ञानाबद्दल सांगितले. आपल्याला सर्वांना केव्हाना केव्हातरी लोकांच्या मनातले आपण ओळखले असे वाटतेच. फोन उचलायच्या अगोदर आपल्याला उगाचच असे वाटते की हा फोन अमुक अमुक व्यक्तिचाच असेल आणि तो त्याचाच असतो. आपण एखाद्याला इ-मेलने एखादा प्रश्न विचारावा म्हणून आपला लॅपटॉप उघडावा तर त्याच्या कडून त्याच विषयावर इ-मेल आलेला असतो. यावर टीकाकारांचे ठराविक उत्तर असते “ तो निव्वळ एक योगायोग आहे” पण या वरचे संशोधन आता असे सांगू पहाते आहे की योगायोगाच्या पलिकडे यात काहितरी दडलेले आहे.
रॅडीनच्या म्हणण्यानुसार याला पुरावा म्हणून देता येतील “गॅझफिल्ड प्रयोग”
काय आहेत हे प्रयोग ?
जयंत कुलकर्णी.
भाग ८ समाप्त.
पुढे चालू.......
अवलिया को गुस्सा क्यो आता है ?
काल संध्याकाळी दुकान बंद करायला घेतले आणि तेव्हड्यात फोन वाजला. बघतो तर चौपाटीवरच्या बारच्या म्यानेजरचा फोन.
"हॅलो परा साब जल्दी आओ यार, इधर तुम्हारा दोस्त नाना राडा कर रहा है, वेटर को गालीया दे रहा है "
मी डोक्याला हात लावला आणि चौपाटीकडे धावलो. साला चौपाटीचे रंग रुपच बदलून गेले आहे आजकाल हे जाणवुन गेले. चौपाटी अजुनच झगमगायला लागली होती. ह्यावेळी चौपाटीवर तरुणाईचा उत्साह जाणवण्यागत वाढला होता, एका कडेला मोठा स्क्रीन लावुन त्यावर फुटबॉलच्या मॅचेस दाखवल्या जात होत्या. साला क्राउड एकदम खेचला गेला होता तिकडे. काही जुने चेहरे गायब होते तर काही गायब झालेले जुने चेहरे पुन्हा दिसायला लागले होते. इकडे तिकडे बघता बघता एकदाचा बार मध्ये जाउन पोचलो.
अंधारात नजर सरावली आणि एका कोपर्यात विषण्णपणे बसलेला अवलिया दिसला, बाजुलाच आमचा बारचा म्यानेजर देखील बसला होता.
"आओ सेठ, देखो ये क्या लफडा किया. वेटरने सामनेका प्लेट उठाया तो वेटर को गालिया देना लगा. बोलता है "मेरा लेख कायको उडाया?" अब गलतीसे प्लेट उठा लिया वेटरने, इतना गुस्सा कायको करनेका ? सब राडा कर दिया.
"नान्या लेका किती पेग ढोसले ? काय झालय काय तुला?" मी नाना शेजारी बसत म्हणालो. नजर खिडकी बाहेरच्या चौपाटीकडे भिरभिरतच होती.
"आपण चौपाटी सोडुन चाललो आता. आता इकडे मन नाही लागत." नाना शून्यात नजर लावुन बोलला.
"काय नाटके करतो रे नान्या ? असे झाले काय तुला ? साला इतकी वर्षे ह्या चौपाटीवर एकत्र राहिलो, दंगा केला, मजा लुटली आणि तु असा एकदम सोडून जाणार ?"
"आपली गरज नाही राहिली आता चौपाटीला परा. जरा कुठे दुकान उघडले की अतिक्रमणवाले येतात आणि सगळा माल जप्त करुन नेतात. परत का जप्त केला ते पण सांगत नाहीत. दुकान उघडायचीच चोरे झालीये आता मला."
"काय बोलतो नाना ? अरे पण इन्स्पेक्टर पाध्येंशी सेटलमेंट झाली होती ना तुझी ?"
"सोड रे ! साप म्हणावा आपला पण 'अतिक्रमणवाला' म्हणू नये आपला" नाना एका दमात पेग संपवुन मोकळा झाला.
माझी नजर अध्ये मध्ये बाहेरच भिरभिरत होती.
"पर्या भाड्या, इकडे लक्ष दे तु ! बाहेर काय फुफाटा शोधतो का आता ?" नाना वैतागला.
"नान्या यार आपला चौपाटीवरचा फुगेवाला दिसत नाही रे आजकाल ? आणि तो धनुष्यबाण विकणारा कुठे गेला?"
"खी खी खी फुगेवाला आजकाल परिस्थीतीने नाडला गेलाय. आता तो गोग्गोड म्हातारीचा कापूस विकतो." नाना डोळे मिचकावत म्हणाला.
"नान्या लेका तुझे येवढे जुने दुकान असुन माल जप्त कसे काय करतात बॉ ? मानसीक रीत्या अल्पवयीन असणार्यांची दुकाने धो धो चालतात, मग तुझ्याशी काय प्रॉब्लेम आहे ?"
"काय कळत नाही रे परा. मला म्हणतात की नाना तु चौपाटीचे वातावरण गढुळ करतोस म्हणुन" नाना अंमळ हळवा झाला असावा.
"खी खी खी मग साल्या तु तुरटी का विकायला सुरुवात करत नाही ? ते जाउदे.. तु आता सरळ जप्त न होणारा माल विकायला सुरुवात कर बरं !"
"तो काय असतो ? डिटेलमध्ये बोल."
"चल नान्या तु भी क्या याद करेगा, कागद पेन घे तुला लिस्ट देतो बनवुन !" ह्या माझ्या उच्चाराबरोबर वातावरण निवळल्याचे ओळखुन बारचा म्यानेजर टेबलावरुन ऊठला. "अबे ए, परा साब को एक कागज देनेको बोल ना जल्दी.. और साथ मै पेनभी भेज फटाफट..!" जाता जाता त्याने हुकुम सोडला.
"हा नान्या घे लिहायला..."
मालाचे नाव - मालाचा प्रकार
१) मकर राशीत शिरलेल्या शनीचा आणि कर्केत आलेल्या बुधाचा इतर राशींवर होणारा परिणाम = माहितीपुर्ण लेख.
२) अंतर्वस्त्रांचे बाह्यसौंदर्य = महितीवजा अनुभवकथन.
३) सुई-दोर्याशीवाय शर्टाला बटने कशी लावावीत = अनुभव कथन + सल्ला.
४) लवकरच लग्न होणार आहे त्यामुळे काही काळातच बायको जेंव्हा गरोदर होईल तेंव्हा तिला सरकारी दवाखान्यात अॅडमीट करावे का खाजगी ? आजकाल घरी सुईणी वगैरे येतात का ? ते कितपत सुरक्षीत असते ? = काथ्याकूट + मदत हवी आहे.
५) माझा अमेरीकेतला मित्र आणि त्याच्या बायकोचे पगारावरुन होणारे वाद = अनुभव कथन
६) माझ्या भाच्याने मला मी त्याला एक कागदी नाव करुन दाखवल्यावर वेगवेगळ्या प्रकारचे ५० कागदी पक्षी, १०० नक्षीकामे कशी करुन दाखवली, आजकालची स्मार्ट पिढी इ. इ. - अनुभवकथन + आस्वाद
७) माझ्या खोलीच्या खिडकीतुन दिसणर्या भाजीच्या स्टॉलवरील विविध रंगी आकर्षक भाज्या = कलादालन.
८) माझ्या बाथरुम मध्ये पोपडे उडालेल्या भिंतीवर पाणी पडुन निर्माण झालेले विविध मनमोहक आकार = कलादालन.
९) 'आज सकाळ मध्ये आलेली फलाना-फलाना बातमी' हि कोणी वाचली का ? अजुन किती अधोगती होणार आहे भारताची ??? = काथ्याकूट.
१०) मी संगणकाचा माऊस साफ करायला कसा शिकलो = प्रकटन + अनुभवकथन.
११) "पिपात मेले ओल्या उंदिर " ह्या कडव्यात नक्की कोणते छंद आहेत ? हि गझल आहे का कविता ? = छंदशास्त्र + काथ्याकुट.
१२) शरिराला नक्की अपायकार काय असते ? आत्ममैथुन का हस्तमैथुन ? = मदत हवी आहे.
१३) कुठल्याही चित्रपटाबद्दल १५/२० वाक्ये आणि त्याच्या अध्ये मध्ये ५/१० फोटु = चित्रपट परिक्षण.
"म्हणजे तु करतो तसे ??" नान्याचा हलकटपणा जागृत झाला...
मी काहीएक सडेतोड उत्तर देणारा येवढ्यात माझा फोन वाजला. फोनवरील संभाषण संपताच मी ताडकन उभा राहिलो.
"नान्या चल मी पळतो रे आता.."
"अरे पर्या पण लिस्ट अर्धवट राहिली ना. कुठे चालला येवढ्या घाईत ? "
"डोन्रावांचा फोन होता.. दुकानच उडवले म्हणतायत माझे....."
स्टॉप अनदर भोपाल..
१) हे मराठी संस्थळ आहे याची कल्पना आहे, पण तरीही हा धागा अपवाद समजला जावा अशी विनंती..
२) स्वाती बांदेकर ह्या व्यक्तिला मी ओळखत नाही पण विषय महत्वाचा आहे म्हणून, आणि सर्वांच्या माहितीकरता म्हणून मला आलेले त्यांचे विपत्र मी येथे डकवत आहे..
-------------------------------------------------------------------------------------------
from swatibandekar@gmail.com
reply-to swatibandekar@gmail.com
to tatya7@gmail.com
date 19 June 2010 12:41
subject Stop Another Bhopal
Hi Tatya Abhyankar Misal Pav,
What a shame! The Bhopal judgement is so unfair! The real culprits are free and the ones punished are already out on bail.
After all this our government is still bent on appeasing foreign corporations. It is only considering some cosmetic changes in the nuclear liability bill. The proposed nuclear liability bill allows foreign corporations to get away by paying a meagre compensation in case of a nuclear accident in our country.
We have to stop another Bhopal in the making. Over 1.8 lakh people, including me, have already signed the petition asking Prime Minister Manmohan Singh to stop the bill in its current form. More signatures will make the opposition to this bill stronger.
Check out this video and then add your signature to this petition.
http://www.greenpeace.org/india/stop-another-bhopal
The petition says: India must hold a public consultation before changing the liability rules for any nuclear accidents caused by U.S. corporations.
Thanks!
You are receiving this email because someone you know sent it to you from the Greenpeace site. Greenpeace retains no information about individuals contacted through its site, and will not send you further messages without your consent -- although your friends could, of course, send you another message.


