अनुभव
आमची पहिली परदेशवारी.....3
आमची पहिली परदेशवारी... भाग १ , भाग २
*******
नमस्कार
मंडळी , १६ तासाचा प्रवास करून विटोरियाला पोहोचलो.
एस्पिरीतो सांतो या ब्राझील मधील घटक राज्याची राजधानी म्हणजे हे विटोरिया शहर. साधारणत: आपल्याकडील पुणे शहराच्या तोडीचं फरक एवढाच कि हे एक बंदर आहे. विस्तीर्ण समुद्रकिनारा लाभलेले हे ब्राझीलमधील प्रमुख बंदरापैकी एक आहे. मला प्रथम दर्शनीच आवडलेलं हे एक सुंदर शहर आहे.प्रशस्त अशा rodoviario (बस आगार) मधून बाहेर येऊन चालतच साधारण चार-पाच मिनिटात आम्ही घरी पोहोचलो. दरवाजा उघडला आणि मला आतमध्ये बसवून एडी लगेच बाहेर गेली आणि परतली ते लाडक्या अबुल ला घेऊनच.मला घ्यायला साओला आल्यामुळे एडीने त्याला पेट हाउस मध्ये ठेवले होते फी भरून . त्याला बेन्जामिन अबुल हे त्याच नाव.वय एक वर्ष आणि लोभस अस त्याच रूप.आल्याबरोबर त्याने माझ्याकडे झेप घेतली आणि माझ्या मांडीवरच बसला. माझी आणि याची ओळख सुद्धा वेबकॅम वरचीच पण कुठलेही आढेवेढे न घेता त्याने माझ्याशी दोस्ती केली. माझ्याकडून लाड करून घेतल्यावरच त्याने मला सोडलं.कुणीही घरी आल्यावर अबुलच पहिलं स्वागत करणार हा इथला शिरस्ता.जोपर्यंत तुम्ही याचे लाड करणार नाही तोपर्यंत हा तुमच्यावर ओरडत राहणार अगदी मालकिणीने गप्प बसायला सांगितले तरीही.एका महागड्या रेसचा हा कुत्रा (एडीला याला कुत्रा म्हणलेलं आवडत नाही) याची खासियत म्हणजे आता तो जेवढा आहे शरीराने तेवढाच तो आयुष्यभर असणार शेवटपर्यंत अगदी बोन्साय केल्यासारखा. एडीच्या सुख दुखाटला तिचा साथीदार.पुढील वर्षी जेंव्हा एडी भारतात येईल ती बेन्जामिन अबुल सोबतच.तो सुद्धा परदेशवारी करणार आमच्यासारखी. तर येथील आमच्या घरात आम्ही तीनच मेम्बर एडी मी आणि अबुल. खर सांगायचं तर एडीला याची जास्त चिता वाटत होती अबुल मला घरातील एक मेम्बर म्हणून स्वीकारेल कि नाही. त्याने माझ्या बाजूने कौल दिला आणि मी या घरातील सदस्य झालो. पुढे माझा घरातील निवांत वेळ अबुल बरोबर खेळण्यात मजेत गेला. याची समज अगदी माणसासारखी आहे. तुमचा विश्वास बसणार नाही पण एडी जर दुखी असेल तर हा दुखी होतो हे मी अनुभवाने सांगतो आहे. त्याचे सर्व नावागावासाहित रजिस्ट्रेशन आहे .आणि त्याची मेडीकल फाईलहि आहे रेगुलर चेक अप पण होते. ऐकून होतो पण प्रत्यक्ष प्रथमच पहिले. असो
दुसरया दिवशी सकाळी बाहेर निघालो. एडी एक-दोन शेजार्यांना अभिवादन केले मी आपला मागे उभा . कुणीही एडीकडे हा कोण म्हणून चौकशी केली नाही कि माझ्याकडे पाहिलेही नाही.मला आश्चर्य वाटले पण बरेही वाटले कारण भाषेची अडचण होतीच. आम्ही चालतच निघालो. रस्त्यावर छोटी मोठी दुकाने होती, बहुतेक दुकाने मुली/बायका च चालवत होत्या. बरयापैकी स्री पुरुष समानता दिसत होती. काही दुकानात मुली अगदी केस कापण्याचे काम करताना दिसत होत्या. तुम्ही माणसाकडे किंवा बाईकडे कटिंग करा पैसे तेवढेच हे ज्ञानही मला इथेच झाले. आपल्याकडे असे नाही असे ऐकून आहे अनुभव नाही. रस्त्यावर फेरीवाले दिसत नव्हते.गाड्या सुसाट धावत होत्या कारण कुणीही रस्त्यामधून चालत नाही. रस्ते चकाचक आणि सगळ्यात विशेष म्हणजे कुणीही होर्न वाजवत नव्हते याचे मला आश्चर्य वाटल्याशिवाय राहिले नाही. आमच्या इथे गिरगावात घराबाहेर पाच मिनिट पडलात तरी कर्कश आवाजांनी कान बधीर होऊन जातात.मारुती होंडा फियाट अनेक प्रकारच वाहने धावत होती. सकाळची कामावर जाण्याची वेळ असल्याने बसमध्ये गर्दी होती. आम्ही एका बँकेमध्ये शिरलो .एडीने टोकन घेतले आणि आम्ही आमचा नंबर येण्याची वाट पाहत बसलो. वातानुकुलीत वातावरण होते. बाहेर मुंबैसार्खीच गर्मी असल्याने सुखावलो. बँकेमध्ये जास्त स्टाफ लेदिएस दिसत होता. ज्याचा नंबर आहे त्याचे सर्व प्रश्न सुटल्याशिवाय दुसऱ्याकडे कर्मचारी लक्ष देत नाहीत. कितीही वेळ लागला तरी. फारशी गर्दी नसल्याने आमचे काम लवकरच आटोपले.मी एक कॉफी प्यायलो इथे एक बंर आहे बहुतेक बँक ,मॉल,शोप्पिंग सेंटरमध्ये कॉफ्फी ठेवलेली असते ती अगदी मोफत.ब्राझील हा कॉफ्फी उत्पादन करणारा जगातील १ नंबरचा देश आहे याची खात्री पटली आणि खरोखरच अप्रतिम चवीची कॉफी प्यायची असेल तर तुम्हालाही ब्राझीलला जावे लागेल.
फिरत फिरत आम्ही एका पार्कमध्ये आलो. फारशी मोठी नसली तरी तेथील आंबा फणस आणि वडाची झाडे पाहून मला एक क्षण तरी मी भारतात असल्याचा भास झाला.जरासं भटकून काही फोटो काढले.आणि संध्याकाळी परत फिरलो.रस्ता समुद्राच्या बाजूने होता. तिथे काही जहाज होते.आणि msc कंपनीचे एक जहाज पाहून मला खूप बरे वाटले ,कारण माझा एक मित्र या कंपनीत काम करतो आणि जानेवारीमध्ये याच पोर्टला त्याचं जहाज येणार होतं आणि तो मला भेटणार होता.नेहमीच्या प्रथेप्रमाणे एक बंर गाठला, चायनीज हॉटेल होते आणि जापनीज पण.चायनीज जवळचे वाटले मस्त चिकन फ्राय आणि बटाटा फ्राय मागवले. स्कोल(ब्राझील मधील सर्वां प्रसिद्ध बियर ) होतीच. मला आवडलेली ब्राझीलमधील हि एकमेव डिश. ब्राझील मध्ये बटाट्याला बतातच म्हणतात हे विशेष. मस्त ताव मारला अन घर गाठले.
क्रमश:
हे काही फोटो:-
मरणघाई (लोकल गोष्टी)
मरणघाई
=============================================
मी राजसला शाळेत सोडून पार्ला स्टेशनवर ट्रेनमध्ये चढायचे तेव्हाची गोष्ट आहे. स्टेशनवर एक जिंगल सतत वाजत असायची.. आणि शेवटच्या एका ओळी व्यतिरिक्त काहीच मला समजायचं नाही. बरं तिच्याकडे दुर्लक्ष करावं.. तर ती इतक्यांदा वाजत राहायची की एखादा तरी शब्द डोक्यात घुसायचाच. मी पाच ते दहा मिनिटं तरी स्टेशन वर असायचे त्या तेवढ्या वेळेत किमान सात-आठ वेळा तरी ती जिंगल मला ऐकावी लागायची.
मग एकदा कधीतरी मी ती जिंगल नीट लक्ष देऊन ऐकायचं ठरवलं. आणि ट्रेन येत असल्याच्या, विलंब होत असल्याच्या, स्वच्छतेच्या.. सूचना तसेच स्पीकरचा चिरणारा आवाज, मध्येच धडधड करत जाणारी लोकल, अर्धवट बंद करण्यात आलेली जिंगल या सगळ्यामधून एक एक शब्द लक्षात ठेवत ती जिंगल पूर्णपणे समजून घेतली.. त्याला तसा आता बराच काळ लोटला तरी त्या जिंगलचा बराचसा भाग अजून आठवतो.. पहिली लाइन नक्की काय होती ते आता तितकंसं आठवत नाहीये..
"रोज शाम को करता है जो घरपर कोई इतजार
रेल की पटरी क्रॉस ना करे पुलो का करे इस्तमाल
आप रहेंगे सदा सुरक्षित ओर हमेशा ही खुशहाल..."
यातलं "आप रहेंगे सदा सुरक्षित ओर हमेशा ही खुशहाल.." हे मला नेहमी ऐकू यायच बाकी जिंगल म्युझिक आणि तिच्या चाली मुळे बाकीच्या कोलाहलात ती जिंगल कुठच्या कुठे विखरून जायची.
खरं तर केवढी महत्त्वाची सूचना.. पण ती ही अशी विरून जाते. बरं रेल्वे रूळ क्रॉस करताना काय होऊ शकतं हे माहीतच नसलेली एकही व्यक्ती नसावी. (रस्ता क्रॉस करताना ही आपल्याला खबरदारी घ्यावीच लागते की..) रेल्वेंनी तर त्या साठी पुलांची सोय ही करून ठेवली आहे.. तरी लोक ट्रॅक का ओलांडतात..? बरं.. ओलांडतात तर ओलांडतात, ट्रेन इतक्याजवळ येईपर्यंत तिथे का रेंगाळतात..? किंवा ट्रेन इतक्या जवळ असताना असे धाडस कसे करतात..? ट्रॅक क्रॉस करून वाचणारी एक-दोन मिनिटं जिवा पेक्षा का महत्त्वाची असतात..? हे सगळं माहीत असताना रेल्वे ट्रॅकवर ज्या दुर्घटना होतात.. त्या नक्की दुर्घटना असतात की आत्महत्या..?
त्या दिवशी हे प्रश्न पुन्हा एकदा उफाळून आले..
मी ज्या लोकलने प्रवास करत होते ती लोकल दादर स्टेशनमध्ये अर्धीमुर्धी शिरून बराच वेळ थांबून राहिली.. आमचा डबा बरोबर जिथं पासून प्लॅटफॉर्म सुरू होतो त्या ठिकाणी येऊन थांबला गेला.. ज्यांना दादर स्टेशनवरच उतरायचं होतं त्या काही जणी खोळंबल्या गेल्या.. वेळ जाऊ लागला तशा वैतागल्या.. एक दोघींनी मागून चालत येणाऱ्या प्रवाशांना बघून ढांग टाकून प्लॅटफॉर्मवर उतरण्याचा पराक्रम ही केला.
जसं जसा वेळ सरू लागला तशी आमच्या डब्याभोवती लोकांची गर्दी वाढत गेली..
दिखता है..?
गया ना..?
स्स्स..!!!
हरे रामा..!!
असे चित्रविचित्र उदगार कानावर येत होते.
काय झालं आहे ते कोणी न सांगताच समोरच्या चेहऱ्यांवर स्पष्ट दिसत होतं.
कोणीतरी आमच्या ट्रेन खाली..
बरोब्बर आमच्या डब्याखाली...
शरीराचे तुकडे तुकडे सोडून अनंताच्या प्रवासाला निघून गेल होता.
काही जण क्षणभर थांबत होती.. काही नव्हती..
कोणी कुठून कुठून येऊन वाकून वाकून बघत होती.. तर कोणी चुकूनही काही दिसू नये म्हणून खबरदारी घेत सटकत होती..
गाडी दहा-पंधरा मिनिटं तिथेच थांबून राहिली..
आणि पुन्हा तिच्या मार्गावर धावू लागली.
मी नेहमी प्रमाणेच दाराजवळ उभी होते.
ते चेहरे..
ते चित्कार..!
मनावर ओरखडे उमटवत होते..
बरोब्बर आम्ही उभ्या होतो तिथे खाली..
एक माणूस तुकडे तुकडे होऊन पडला होता.
अन्त्य्यात्रा समोरून जाताना पाय कसे आखडले जातात,
तसंच काहीस तेव्हाही झालं.
एका पावलाच अंतर..
पण ते तेवढं चालणं, आम्हा कोणालाच नाही जमलं.
ट्रेन सुरू होईपर्यंत आम्ही जागच्या जागी खिळून उभ्या राहिलो गेलो.
त्या दिवशी डब्यात असलेल्या प्रत्येकीने मरणघाई कशास म्हणतात ते अनुभवलं असावं.
(आपल्या सुरक्षेसाठी सगळ्यात आधी आपणच जवाबदार असतो नं..!)
=============================================
स्वाती फडणीस ......................... १२-०९-२००९
आमची पहिली परदेशवारी....२
विमानातळा बाहेर आलो चहा घेतला......हॉटेल शोधले ......११ वाजता रुममध्ये प्रवेश केला......आंघोळ केली ........फ्रिजमधुन बीयर घेतली ...चकना बरोबर होताच......३-४ बीयर ओढ्ल्या....अन???? झोपी गेलो.....सकाळी उठुण साओ पावलो बघायचे होते.....
सकाळी ९ च्या सुमारास जाग आली. एडी टीव्ही पाहत होती .एडी: गुड मोर्निंग माय इंडियन ......मी :गुड मोर्निंग .......मी : edy i wants to talk with adesh .तिने मोबाईलवर आदेशचा नंबर लावला .फोन लागला नाही. २-३ वेळा असेच झाले मी: what happened edy? ..edy: i don't know...मी रागानेच तिच्याकडून मोबाईल घेतला ..रिडायल केला. फोन लागला नाही. ती बाई फोनवर पोर्तुगीज मध्ये बोलत होती. काय प्रोब्लेम आहे ते काही कळत नव्हते. एडीशी बोलण्याचा निष्फळ प्रयन्त केला...उपयोग झाला नाही....कारण एडीच इंग्रजी फारच बाल्या अवस्तेथ होते. मी काहीही विचारले तरी ती ( i don't know, sorry , i fargot, i like , my lunch ,your dinner ) अशा १-२ शब्दात उत्तर द्यायची.. तिला फारच कमी इंग्रजी येत होते आणि माझे उच्चारही तिला समजत नव्हते... मी खिडकीच्या काचा सरकवल्या आणि बाहेर नजर टाकली. शहर पूर्णपणे जागे झालेले होते. रस्त्यावर गाड्या वेगाने धावताना दिसत होत्या. एका बाजूला उंचच उंच इमारती ......मधेच छोटे छोटे बंगले....बरयापैकी हिरवी झाडेही दिसत होती. एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली ती म्हणजे तिथली स्वच्छता....फटाफट आवरून रात्री एडीच्या नकळत लपवून ठेवलेले पाकीट घेतले (कुठलीही रिस्क नको म्हणून) आणि खाली आलो नाष्टा करण्यासाठी...त्यांनी वेळ संपली असे सांगितले......रात्र चकना खाऊन काढली होती.....पोटात कावकाव चालू झालेली होतीच...
.तसेच बाहेर पडलो. मला साओला पोहोचून १५ तास झाले तरी मी आदेशला फक्त हे सांगू शकत नव्हतो कि मी सुखरूप पोहोचलो आणि एडी भेटलीय.....रस्त्याने चालत चालत निघालो ....रहदारी भरपूर होती.... काही माणसे मुले मुली चालताना दिसत होत्या .......एकंदरीत खात्यापित्या घरचे लोक दिसत होते.....अगदी गुबगुबीत..........काही आफ्क्रीकन लोकही होते.......आणि मी STD बूथ शोधत होतो....एकही बूथ दिसला नाही ..........कुणाशीही बोलण्याची सोय नव्हती.......तिथे फक्त आणि फक्त पोर्तुगीजच भाषा चालते......कुणी बरा माणूस दिसला कि त्याच्याशी मी इंग्रजीत बोलायचो आणि तो मख्ख पणे माझ्याकडे पहायचा .....मग एडी त्याला काहीतरी सांगायची .....माझ्याकडे रागाने बघायची..........तिला माझा हे वागणे आवडत नव्हते आणि मला तर फोन करायचा होता.....मग तिने एका दुकानातून फोन कार्ड घेतले आणि पिसिओवरून आदेशला फोन लावला.......फोन लागेना............तिने दुकानदाराला विचारले .......तरीही फोन लागेना ........मी तिला रस्त्यावरच्या लोकांना विचारायला सांगितले आणि तिने २-३ लोकांना विचारले ..ते ट्राय करायचे पण उपयोग झाला नाही.....मी पाहत होतो ........प्रत्येक जन सुरवातीचा कोड वेगळा डायल करायचा ,०००० ९१ ९८२००-----डायल करायचा कुणी ००११ ९८२००------ , पण फोन काही लागेना..........मला तर वाटले हि एडी नावाप्रमाणेच वेडी दिसतेय .... मी तिला फक्त मला टेलिफोन ऑफिसला घेऊन चल अस सांगितले......आणि ती कशी मूर्ख आहे तेही सांगितले .........माझा पार चढला होता......तिच उत्तर होतं मी कधीच ISd कॉल केलेला नाही.........आम्ही टेलिफोन ऑफिस शोधत २० मिनिट तरी चाललो असू आणि एकदाचे सापडले.....मी पुढे होऊन रिसेप्शन ला बसलेल्या मुलीला विचारले .......तीला काहीच समजले नाही......परत एडीला पुढे केले ......त्या मुलीने ००१५ ९८२००------ असा फोन लावा असे सांगितले ..बाजूच्याच पिसिओ वरून काल लावला आणि चक्क फोन लागला ........
.मी : आदेश मी वेळेत पोहोचलो ,एडी आलेली होती ,काळजी करू नकोस.मी एडीच्या घरी गेल्यावर स्काइप वर बोलू ओके .....
आदेश : ठीक आहे ......एक वाईट बातमी आहे तुझा मित्र सुरेश ऑफ झालाय......
मी : कसा काय? .....फोन कट झाला.....
मी परत ट्राय केला ......फोन लागला नाही ..........एडी ने प्रयत्न केला आणि तिने कार्ड संपले असे सांगितले.......१ मिनिटाच्या आत....मला काहीच बोध झाला नाही .पण माझे महत्वाचे काम झाले होते आणि एक वाईट बातमी समजली होती......मी एडीला जेवायचे असे खुणेनेच सांगितले आणि सुरेशचा विचार करत तिच्यामागे चालू लागलो......मला फक्त एक फोन करायला ३ तास लागले......थोडे विषयांतर झालेय पण एवढे सर्व विस्ताराने सांगण्याचा उद्देश एवढाच कि तुम्हाला माझ्यापुढील समस्यांचा अंदाज यावा ......पुढेही असे बरेच प्रसंग आले पण आता त्याची चर्चा येथे करणार नाही............
एका हॉटेलपाशी एडी उभी राहिली .......मी मानेनेच माझा होकार दिला .....आतमध्ये एसी असल्याने बरे वाटले ......समोरच प्लेट होत्या ......मी एडीच्या मदतीने भरपूर पदार्थ घेतले ........पुढे प्लेटचे वजन केले .......आणि एक कोपर्यातल्या टेबलावर आम्ही बसलो ......माझ्यासाठी बीयर मागवली......बियरची टेस्ट मस्तच होती.......पण जेवणातला मला भात आणि वालाची उसळ (वरणा ऐवजी ) सोडून एकही पदार्थ आवडला नाही.....बाकी सर्व सोडून मी भात आणि वालाची उसळ परत घेतली......तिखट किंवा मिरची कशातही नव्हती ...पूर्ण जेवण बेचव.........प्यायला पाणी विकत .फुकटच पाणी नाही......बिल आले ७५ रियाल ......७५*२७= २०२५ रुपये .........त्यात पाण्याचे ८ रियाल ..८*२७= २१६ रुपये .........मला माझे पैसे ८ दिवसातच संपतील असे वाटले.......हे सर्व लिहिले कारण मी एक मध्यमवर्गीय आहे ........बीयर आणि कोल्ड ड्रिंक एकच भाव.........एक ना दोन गोष्टी.......अनंत समस्या.असो
जेवण करून बाहेर आलो. एडीने माहिती काढली तीही या शहरात प्रथमच आली होती..........एका बसमध्ये बसलो ..........तिकीट ६ रियाल ....कुठेही उतरा पुढच्या स्टोपला नाहीतर शेवटच्या ...तिकीट एकच ........अशा बर्याच गोष्टी मला हळूहळू समजल्या .......एके ठिकाणी उतरलो .......जवळच पार्क होते .तिथे थोडा वेळ फिरलो ........सर्व आखीव रेखीव .......नंतर लोकल ट्रेन पकडून बस डेपोला गेलो ..........वीटोरिया ची २ तिकिटे आरक्षित केली ....कुठल्याशा मॉलमध्ये भटकलो .........आणि संध्याकाळी जेवण करून ८ वाजताच हॉटेलवर आलो.....कारण एडी म्हणाली बाहेर रात्री फिरणे धोक्याचे आहे ...........टीवी लावला ........सर्व पोर्तुगीज ..........लवकरच झोपून घेतले.......सकाळी हॉटेलचे बिल भरले .......६८० रियाल .....दोन दिवसाचे ६०० आणि जे फ्रीजमधील बियर आणि पाणी प्यायलो ते ८० ............२ दिवसात १००० रियाल खर्च झाले म्हणजे २७००० रुपये .......कुठलीही ऐश केली नाही.वायफळ खर्च केला नाही .........माझ्याकडे सगळे १२५००० रुपये होते .......त्यातले २७००० खर्च झाले २ दिवसात ........९८००० मध्ये मला ६८ दिवस राहायचे होते ........माझ्या चेहऱ्यावरून एडीने माझी चिंता ओळखली .............एडी: don't worry love ...in vitoria .my money ......जीवात जीव आला .........बस डेपोला आलो ...........१ नंबरला गेलो तर १.५ रियाल म्हणजे ४० रुपये .....इलाज नव्हता दिले ............बस स्टेशन एखाद्या मॉल सारखेच होते ......इथे तिकिटाशिवाय कुणालाही बस प्लाटफोरमवर जायला परवानगी नाही .............बसमध्ये बसताना प्रत्येकाचे ओळखपत्र तपासतात ..माझा पासपोर्ट तपासला ..........आणि मगच आतमध्ये प्रवेश मिळाला.......उभा एकही प्रवासी नव्हता ......१६ तासाचा प्रवास करून वीटोरिया ला पोहोचलो .........आता पुढील भागात थोडक्यात प्रवास वर्णन आणि काही फोटो............हा भाग काहीसा कंटाळवाणा वाटेल तुम्हाला ....पण एका अनोळखी देशात (खंडात म्हणाना) ...........कुणाचीही कुठलीही मदत होण्याची शक्यता नसताना ........मी केलेले हे धाडस आणि त्याचा मनावर येणारा ताण तुमच्या लक्षात यावा म्हणून केलेला हा प्रपंच .........
क्रमश:...............
नाडी ग्रंथांवरील प्रथम आंतरराष्टीय अधिवेशनाचे वार्तांकन - दिवस दुसरा
प्रागला नाडी ग्रंथाच्या पहिल्या आंतरराष्ट्रीय अधिवेशनाचा मान मिळाला. भारतात याच्या आधी दोन ठिकाणी नाडी ग्रंथांवर अधिवेशन भरवले गेले होते. २००७ साली पुण्यात व नंतर २००९ साली बडोद्यात. त्यावेळी काही कल्पनाही नव्हती की त्यानंतरचे अधिवेशन असे भारताबाहेर घडेल म्हणून.
दि ६ जून २०१०.
जास्त वेळ न दवडता अधिवेशनाचे पहिले सत्र माझ्या भाषणाने सुरू झाले. त्यात मी नाडी ग्रंथात सुचवलेले शांती दीक्षेचे उपाय करायची गरज व ज्यांनी ते केले त्यांच्या अनुभवांची कथने सादर केली.
त्यानंतर शिवषण्मुगमना पाचारण केले गेले. त्यांनी त्यांच्या बद्दल व नाडी वाचनाच्या अनुभवांबद्दल कथन केले. बालपणापासून त्यांनी कसे शिक्षण घेतले. कसून अभ्यास केल्यानंतर गेली २५ वर्षांत त्यांनी हजारोंच्या संखेने नाडी ग्रंथांचे वाचन कले आहे. त्यांनी सर्वात जास्त जपानहून येणाऱ्या दहा हजाराच्यावर लोकांची नाडी ग्रंथ कथने केल्याचे ऐकून श्रोते थक्क झाले. त्यांचा पलनी ह्या शिष्याने गेल्या १५वर्षात अनेक नाडी केंद्रातून काम करु नाव कमावल्याचे सांगितले. भाषांतरकार रवीने नाडी ग्रंथातील क्लिष्ट तमिळकथनांची सुंदर व समर्पक इंग्रजी शब्दरचनेत कथने करायची हातोटी कशी मिळवली ते कथन केले. आपली नाडी ग्रंथांची सेवा दहा वर्षांपेक्षा जास्त जुनी असल्याचे विनम्रपणे सांगितले.
शिवाने नंतरच्या आपल्या कथनाची सुरवात ओमकाराने केली. आम्ही त्याला म्हणून साथ दिल्यावर उपस्थित सर्वांनी ओमकार म्हणून सभागृहात एक गूढ गंभीर नाद विलक्षण प्रभाव पसरला. शिवाने पॉवेलची मैत्रिण मारियांच्या “धेनका” नावाच्या मातेचा अगस्त्यमहर्षींनी आपल्या नाडीग्रंथांत मदरमेरीच्या अंशाचा जन्म असल्याचे कथन, त्यांच्या प्रेमळ नजरेचा “दिव्यदृष्टी” म्हणून महर्षींनी केलेला गौरव ऐकून उपस्थितांपैकी धेनकांच्या कृपादृष्टीची जाण व महत्व आधीच माहित असणाऱ्यांनी टाळ्यांचा गजर करून आपली संमती दर्शवली.
दुपारच्या भोजनाच्या विश्रामात व नंतर लोकांचा गराडा व प्रत्येकाला आमच्याशी बोलायची उत्सुकता जाणवत होती. मात्र योग्य रुपांतरकार नसल्याने जे त्यातल्या त्यात इंग्रजीत बोलत होते त्यांच्यापाशी गर्दी होत होती. मधल्या काळात लोकांनी आपल्या शंका एका बॉक्समधे लिहून पाठवाव्यात असे सुचवल्याप्रमाणे अनेक विचारणा आल्या होत्या. त्याला वेळ देऊन नव्या सत्राची सुरवात झाली. बहुतेकांचा सुर काहीच माहिती वा अनुभव नसल्याने आमच्या कथनातील थक्क करणाऱ्या गोष्टींच्याबद्दल आणखी जाणून घेण्याचा होता.
त्यानंतर शिवषण्मुगमनी नटराजाच्या मुर्तींच्या गौरवचिन्हांनी जोसेफ, मेरिया, धेनकांना “होली मदर” असे गौरवून सत्कार केला. मी शालीं पाठींवर घालून त्यांना गौरवले. पॉवेलला मी एक गणेशाची एबस्ट्रॅक्ट रुपातील सुंदर फ्रेम देऊन सन्मान गेला. नंतर पॉवलनी माईक हातात घेऊन आपले निवेदन केले. शेवटी मुख्य नाडी वाचक शिवानी अगस्त्य, वसिष्ठ, काकभुजंदर, शुक, कौशिक, भृगु आदि अनेक महर्षींच्या केलेल्या स्तुतीगायनाने पुन्हा सभागृह भारले गेले. त्यानंतर आमचे रीतसर आभार मानून अधिवेशनाची सांगता झाल्याचे जोसेफ श्रोटरनी जाहीर केले. असे हे पहिले आंतरराष्ट्रीय नाडी ग्रंथ अधिवेशन संपन्न झाले.
पाप्यांचा कहर !
विदेशात एकमेकांना भेटायच्या व अभिवादन करायच्या विशिष्ठ पद्धती आहेत. कधी हस्तांदोलन तर कधी एकमेकांजवळ अलगद येऊन गालाला हलकेच पुसट स्पर्ष गालाने वा ओठांनी करून भेटीचा आनंद व्यक्त करायची प्रथा आहे. आम्हाला याची सवय नसल्याने प्रत्येक जण मिठीत घेऊन दोन्ही गालांवर देणाऱ्या हलक्या चुंबनाची सवय करून घेता घेता आमची तारांबळ उडत होती. विशेषतः स्त्रियांच्याकडून मिळणाऱ्या तशा जोरदार प्रतिसादाला!
पलनी न राहवून म्हणाला, “ सामी, हमने अबतक अपने वाईफका भी इतनी बार लिया नही होगा इतना यहां एक दिन में हुवा!“
मी त्याला कौतुकाने मान डोलवून होकार भरला. नंतरच्या सहवासात नाडीवाचक अशा प्रतिसादाला समरसून उत्तर देऊ लागल्याने ते या प्रथेला रुळल्याचे जाणवले. असो.
त्यानंतर पुढील तीन आठवड्यात १००पेक्षा जास्त लोकांनी नाडी ग्रंथांचे अवलोकन केले. त्या प्रत्येकाची नाडी पट्टी मिळुन एक प्रकारे विक्रम झाला, असे खुदुद नाडी शास्त्रींचे मत होते. त्या प्रत्येकाला आपले नाव वअन्य माहिती कुठे व कशी पट्टीत लिहिलेली आहे ते त्यांना आवर्जून दाखवण्यात दोघे नाडी शास्त्री तत्पर होते. त्याचे सर्वांसाठी व्हीडीओ शूटिंग होत होते. काहींना अगदी पहिली नाडीपट्टी उघडल्यापासून रेकॉर्डिंग हवे होते तसे त्यांना वेगळे पैसे भरुन मिळवायची सोय होती. प्रत्येकाने इंग्रजीतून झेक भाषेसाठी भाषांतरकाराची आपापली सोय करायची होती.
शेवटच्या दिवसात या अधिवेशनाचा थोडक्यात अहवाल व फोटो रेजेनेरेस नावाच्या मासिकात छापुन आल्याचे कळले. फोटो खाली पहा. ते नीट करून लावायला कृपया मदत हवी आहे.
अनेक ठिकाणी आम्हाला झेक लोकांचे काही उच्चार व इंग्रजीतील कथन नीटसे समजत नसे. त्यामुळे या व पुढील कथनात थोडी सरमिसळ होण्याची शक्यता आहे.
प्राग कॉलिंग लेख मालिका पुढे चालू...



बीप बीप - मोबाईल फोन - शाप की वरदान?
बीप बीप - मोबाईल फोन - शाप की वरदान?
सध्याच्या धकाधकीच्या आयुष्यात आपल्याला मोबाईल फोन ची इतकी सवय झालेली असते कि मोबाईल आपल्याजवळ नसला किंवा आपण तो घरीच विसरलो की जणू 'हेल्पलेस' झाल्याचे फिलिंग येते. मात्र, मोबाईल ची इतकी सवय होण्या मागे तो आपल्याला कनेक्टेड ठेवतो हे तर कारण आहेच, पण त्याशिवाय त्यातील इमेल, इंटरनेट, कॅमेरा, म्युझिक प्लेयर आदी अनेक सुविधांवर आपण अवलंबून असतो.
कधी कधी मात्र मोबाईलच्या अतिरेकाने आपले नुकसान संभवते - हे नुकसान परस्पर संबंधातील गैरसमज आणि त्यातून उद्भवणारे तणाव, मोबाईलच्या अतिवापराने विनाकारण आर्थिक नुकसान आदी प्रकारचे असते, तर कधी केवळ मोबाईल असल्यामुळेच तातडीने संपर्क साधता येतो आणि कोणाचा जीव बचावतो तर कोणाची मालमत्ता संकटातून बाहेर काढता येते.
आपल्या मिपाकरांना या बाबतीत काय अनुभव आहेत? मोबाईल फोन मुळे कधी खूप नुकसान झाले तर कधी अचानक आलेल्या संकटातून बाहेर निघण्यासाठी मोबाईल चा उपयोग झाला का?
मोबाईल फोन संदर्भातले आपले अनुभव, अविस्मरणीय घटना शेअर करा...
--
इंटरनेटप्रेमी,
मुंबई, इंडिया.
लेडीज कंपार्टमेंट आणि पुरुष प्रवासी (लोकल गोष्टी )
लेडीज कंपार्टमेंट आणि पुरुष प्रवासी
============================================
फेरीवाले आणि भिकारी यांचा सगळ्यात जास्त सुळसुळाट लेडीज डब्यातच असावा.. त्यात पुरूष फेरीवाले आणि भिकारी ही आलेच. आंधळ्या भिकाऱ्यांना तर लेडीज डबे अगदी अचूकपणे ओळखता येतात.. कधीही न चुकता ते या डब्यांमधून सहज चढ-उतर करतात.. डब्यात चढल्यावर मात्र त्यांना समोर उभ्या असलेल्या बायका दिसत नाहीत. कोणत्याही टीसीने आजवर भिकाऱ्यांना हटकलेलं मी पाहिलेलं नाही.. फेरीवाल्यांना मात्र कधी कधी डब्यातून उतरवलं जातं. नेहमीच दंड किंवा शिक्षा केली जाते असं नाही. ते एका डब्यातून उतरून दुसऱ्या डब्यात चढतात.. पाळली जात नसली तरी.. निदान त्यांच्या विक्रीवर भीक मागण्यावर बंदी तरी आहे. बायकाही भीक घालणं किंवा ट्रेन मधल्या विक्रेत्यांकडून खरेदी करणं थांबवत नाहीत, आणि त्यांचं लेडीज डब्यात येणं काही थांबत नाही. ( थांबवलं जात नाही. )
लेडीज डब्यातले दुसरे नियमित पुरूष प्रवासी म्हणजे शाळांना जाणारी आठवी ते दहावी पर्यंतची मुलं. यातली काही मुलं तर इतकी थोराड आणि व्रात्य असतात की त्यांना चुकूनही लहान मुलं म्हणावं असं वाटत नाही. त्यांचं दाराशी लटकणं, चालत्या ट्रेन मधून उड्या टाकून चढणं उतरणं.. मोठं-मोठ्यांनी पाचकळ विनोद करणं.. डब्या मध्ये काहीबाही लिहून ठेवणं चित्र काढणं.. या सगळ्या मुळे ती त्रासदायक वाटतात. त्यांना काही सांगायला जाणं म्हणजे तर मूर्खपणाच.
या मुलांना लेडीज डब्यातून प्रवास करायची अनुमती आहे खरी पण ते काय करतात बघायला, त्यांना आवर घालायला मात्र कोणीच नाही. लोकलचे पोलीस किंवा टीसी यांना ही मुलं, त्यांचं वागणं कधी दिसतच नाही का..? की त्यांच्या आखलेल्या कामांमध्ये याचा समावेश होत नाही असा प्रश्न बऱ्याचदा पडतो..
( नऊ डब्यांच्या गाडीमध्ये ) पुढे अर्धा डबा सेकंड क्लास.. पाव डबा फर्स्ट क्लास.. मध्ये पाऊण डबा सेकंड क्लास, पाव डबा फर्स्ट क्लास.. (बारा डब्यांच्या गाडीत) आणखी अर्ध सेकंड क्लासचं कंपार्टमेंट बायकांसाठी म्हणून राखीव असतं. असे एकूण पावणेदोन ते सव्वादोन डबे बायकांच्या वाट्याला येतात. फस्ट क्लासचा जो विभाग महिलांसाठी राखीव आहे त्याचेच दोन भाग करून त्यातील एक भाग पूर्ण वेळ महिलांसाठी तर दुसरा भाग अर्ध वेळ (म्हणजे रात्री १० पर्यंत) राखीव असतो. त्या पुढे तो जनरल डबा म्हणून धरला जातो. रात्रीच्या वेळेला महीला प्रवासींची असलेली संख्या बघता त्याला काहीच हरकत नसावी.. (नाहीच. ) डोक्यात जातं ते पुरूष प्रवाशांचं बरोबर दहा वाजता कधी कधी दहाच्या आधीच टपून बसल्या प्रमाणे या डब्यात उड्या घेणं.
काही जणी पहिल्यांदाच इतक्या उशिरा प्रवास करत असतात.. त्यांना अशा वेळी नेमकं काय होतं आहे ते न कळल्या मुळे त्या गोंधळून जातात. त्या वेळेच्या आसपास चढलेल्या बायकांच्यात आपणच चुकीच्या डब्यात चढलोय की काय असा संभ्रम निर्माण होतो. ज्या कोणाला हा प्रकार माहीत असतो त्या बायका सहसा नऊ साडेनऊ नंतर त्या डब्यातून प्रवास करणं शक्यतो टाळतातच. पण जर कोणी दहाच्या आधी चढल्या असतील तर त्यांना या प्रकाराला सामोरं जावं लागत. दारात बायका/मुली उभ्या आहेत.. एखादीच्या कडेवर लहान मूल आहे.. वगैरे कोणत्या गोष्टी लक्षात न घेता सहज चढून बसण्या इतका वेळ आणि जागा उपलब्ध असतानाही ट्रेन पळून चालली असल्या सारख्या उड्या का घेतल्या जातात कोण जाणे..? त्या नंतर मात्र डब्यात असतील नसतील तेवढ्या बायका उतरून फर्स्ट क्लासच्या दुसऱ्या भागात किंवा सरळ सेकंड क्लासच्या डब्याकडे निघून जातात.किंबहूदा रात्रीच्या वेळी फर्स्ट क्लासच्या डब्यात पुरेशी वर्दळ नसेल तर त्या डब्यात चढणंच टाळलं जातं. ( काय सांगावं कोणी मध्येच चढलं तर..! ) अशा प्रकारे सुविधा आणि अधिकार असताना महिलांना त्यांपासून वंचित राहावं लागतं.
गेल्या काही वर्षांमध्ये घडलेल्या स्फोट, बळजबरी वगैरे प्रकरणां नंतर महिलांच्या डब्यात पोलीस दिसायला लागले.. मध्ये काही काळ महिला पोलीसही डब्यात तैनात असायच्या.. हल्ली मात्र महिला पोलिस फारशा दिसत नाहीत. त्या ऐवजी पुरूष पोलीसच डब्यात चढलेले दिसतात.. असेल बाबा तशी काही नवी योजना, असा विचार करून भाबड्या बायका त्यांचे डब्यात चढणे चालवून घेतात खऱ्या.. पण मग या पोलिसांच्या हातातल्या बॅगा.. त्यांचं मध्येच उतरून जाणं.. कधी कधी दोन तीन पोलीसां एकाच डब्यात असणं खटकत राहतं.
रोज रोज हा प्रकार पाहिल्या नंतर हे पोलीस लेडीज डब्यात घुसत असल्याच लक्षात येतं. त्यांना टोकायची बिशाद मात्र सहसा कोणाची नसते. पण एखादं दिवशी एखादी बाई " आप ड्युटीपे हो क्या? " विचारण्याची हिंमत करतेच. या असल्या प्रश्नांना चढलेल्या पोलीस शिपायांकडून उडवा उडवीची उत्तरे दिली जातात.. आपण ड्यूटीवर असल्याच अर्ध सत्य विधान सर्रास केलं जातं. मग एखादी तिडीक गेलेली बाई चक्क भिकाऱ्याला हुसकवावं तसं या पोलीस शिपायाला हुसकवून लावते.
काही दिवसांपूर्वीचीच गोष्ट आहे.. अशाच बॅग घेऊन डब्यात चढलेल्या एका पोलीस शिपायाला मी "तो ड्यूटीवर आहे का..? " म्हणून विचारले तर समोरून नेहमीचेच होकारार्थी उत्तर आले... मग मी त्याला तो आमच्या डब्याच्या ड्यूटीवर आहे का म्हणून विचारले.. त्या नंतर मात्र त्याने नाही असे उत्तर दिले. ( तेव्हाही तो बंडल मारू शकला असता खरा.. पण तेवढी कोळून प्यायला नसावा.. किंवा त्याला तो काही चुकीच करतोय असं वाटतच नसावं. त्या मुळे खरं ते बोलला.. ) पुढे.. तो दोन तीनच स्थानकां नंतर उतरणार असल्याची व या डब्यात गर्दी नसल्याची पुस्ती ही जोडली. ( या च्या पुढे काय बोलणार..! ) तरी मी त्याला हा लेडीज डबा आहे ना.. विचारलंच. तसंच त्याच लेडीज डब्यात चढणं बरोबर ( नियमांना धरून) आहे का..? असं ही विचारलं. तेवढंच माझं मला समाधान. बायका अशा लोकांना का खपवून घेतात म्हणणारी मी ही त्याच डब्यात असते ना..! पुढे माटुंगा स्थानकावर तो त्याच्या वरिष्ठांच्या समोर उतरला. तरी त्यांनीही त्याला हटकलं नाही. चार-पाच पोलिसांचा जथ्था उघड्या डोळ्यांनी आपल्या सहकाऱ्याच ते वर्तन निर्विकारपणे पाहत होता. (ते ही असाच प्रवास करत असावे.) सध्या पोलीस चढता आहेत, आणखीन काही दिवसांनंतर कोणीही चढेलं.. आणि त्या वेळी लेडीज डब्यातून प्रवास करणाऱ्या पोलिसांना बोलायला तोंडही नसेल.
कोणीही चढेल कशाला चढतंच की.. याच आठवड्यात परवा एक दारुडा डब्यात चढला होता.. बोरिवलीकडे जाणाऱ्या लोकलमध्ये डाव्या बाजूच्या दाराला लटकून झोकांड्या घेत कधीही पडेल असा फुटबोर्डवर उभा होता. डब्यात तशी बऱ्या पैकी गर्दी होती. त्याच्या शेजारी उभ्या बायका पोलिसांकडे करतात तसंच दुर्लक्ष करून उभ्या होत्या.. एक दोघींनी त्याला खाली उतरायला सांगायचा प्रयत्न केला.. कोण कोणाशी बोलतंय कोण जाणे या आविर्भावात तेव्हा मात्र तो जाणून बुजून इकडे तिकडे बघत होता तेव्हा एकही पोलीस शिपाई डब्यात आला नाही की स्टेशन स्टेशन वर उभ्या त्यांच्या पैकी एकालाही लेडीज डब्यात उभा असलेला माणूस दिसलाही नाही..
गर्दी टाळण्यासाठी जिथे पोलिसांनाच लेडीज डब्याचा आसरा घ्यावा लागतो तिथे कोणाला काय बोलणार..!
आणि तक्रार तरी कोणाकडे करणार..?
कधी कधी असं ही होतं की एखादी बाई आपल्या वयोवृद्ध वडिलांना घेऊन डब्यात चढते, ( नाहीतर मग तिला वडिलांसोबत खचाखच भरलेल्या पुरुषांच्या डब्यातून प्रवास करावा लागणार असतो. ) एकदा अशीच एक बाई कोणालातरी बरोबर घेऊन डब्यात चढली ( मोठा माणूस असल्यासारखं वाटलं. ) डब्यात भरपूर गर्दी असूनही कोणीही काही आक्षेप घेतला नाही, पुढे गर्दी ओसरता ओसरता मी त्या व्यक्तीला पाहू शकले तो एक २०-२५ वर्षांचा मतिमंद मुलगा होता. त्याला आपल्या सोबत ठेवणं किंवा त्या मुला सोबत राहणं हे त्या बाईंसाठी आवश्यक होतं. अशावेळी कोणीच नियमांवर बोट ठेवत नाही.
आज तर आणखीन एक गंमत झाली..
एक सोनेरी केसांचं गोरं जोडपं हसत खिदळत लेडीज डब्यात चढलं तसं दारा जवळ उभ्या असलेल्या बायकांनी त्यांना अडवायचा प्रयत्न केला पण ते इतके आपल्यातच मग्न होते की त्यांना काही कळलेच नाही. डब्यात फक्त बायकाच आहेत हेही त्यांच्या लक्षात आले नाही. बाकी बायकांच त्यांना ते चढलेत तो लेडीज फर्स्टक्लास आहे समजावणं चालूच होतं. तेव्हा त्यांनी त्यांच्या जवळील फर्स्टक्लासचं तिकीट काढून दाखवलं.. परदेशांत कुठे लेडीच कंपार्टमेंट वेगळं असतं नसावं..? त्यांना त्याची कल्पनाच नव्हती. मग एका बाईंनी त्यांच्यातली महीला या डब्यातून प्रवास करू शकते पुरूष प्रवाशाला शेजारच्या जनरल डब्यातून प्रवास करता येईल असे समजावून सांगितले त्यानंतरच्या स्टेशनवर ती जोडी डब्यातून उतरून गेली.. तो पर्यंत त्या दोघांनी डब्यातल्या सगळ्यांची चांगलीच करमणूक केली.
सांगण्याचा मुद्दा हा की असं ही होऊ शकतं.
मध्ये असाच बोलता बोलता हाच विषय निघाला ( लेडीज कंपार्टमेंट आणि पुरुष प्रवासी ) असताना एकाने डब्यात चढणाऱ्या पोलिसांकडून अशा ( पोलिस इतर ) पुरूष प्रवाशांचा बंदोबस्त करून घेतला पाहिजे म्हणून सुचवलेलं तेव्हा हसूच आलं.. पाहिजे त्या वेळी पाहिजे त्या ठिकाणी उपस्तित असतील तर ते पोलिसच कुठले..! बरोबर ना?
============================================
स्वाती फडणीस ........................ ११-०९-२००९
नाडी ग्रंथांवरील प्रथम आंतरराष्टीय अधिवेशनाचे वार्तांकन - दिवस पहिला
दि ५ जून २०१०
प्रागला नाडी ग्रंथाच्या पहिल्या आंतरराष्ट्रीय अधिवेशनाचा मान मिळाला. भारतात याच्या आधी दोन ठिकाणी नाडी ग्रंथांवर अधिवेशन भरवले गेले होते. २००७ साली पुण्यात व नंतर २००९ साली बडोद्यात. त्यावेळी काही कल्पनाही नव्हती की त्यानंतरचे अधिवेशन असे भारताबाहेर घडेल म्हणून.
दि. ५जून २०१०, शनिवारी सकाळी दहा वाजता जुन्या टाऊन हॉलच्या एका मोठ्या हॉलमधे अधिवेशनाची सुरवात झाली. त्याआधी नऊ वाजल्यापासून बाहेर ज्यांनी आपली नावे नोंदवली होती त्याचे व नविन लोकांचे नावनोंदणीचे काम करायला गर्दी जमा झाली होती. पण कुठेच धक्काबुक्की नव्हती. शांतपणे लोक क्यूला उभे होते. असो.

जोसेफ श्रोटर यांनी अधिवेशनाची सुरवात झाल्याचे जाहीर केले. मात्र स्टेजवर नेहमी प्रमाणे टेबलखुर्च्यांची मांडामांड नव्हती की समईच्या दीपप्रज्वलनाची सोय. मात्र मी आणलेल्या अगस्त्य व भृगु महर्षींचे फोटो आवर्जून ठेवले गेले होते.
पॉवेलने अगोदर सांगून ठेवले होते. त्याच्या भाषेत, "आय दोंत लाईक आरेंजमेत ऑफ स्तुपीद कम्युनिस्ट. नोथिंग ऑन स्टेज." त्याप्रमाणे स्टेजवर मांडामांड होणार नाही. साधेपणाने प्रत्येकाने उभे राहून बोलायचे आहे. माईक हातात घरून.
आम्हाला पुढील रांगेत बसायची सोय होती. चीफ नाडी ग्रंथ वाचक शिवषणमुगम, दुसरे नाडी वाचक पलनी त्यानंतर भाषांतरकार रवी, स्वतः पॉवेल, नाडी ग्रंथ प्रेमी मेरीया, तिची वृद्ध आई धेनका व अन्य काही पहिल्या रांगेत होते. स्टेजच्या एका बाजूला माईक व व्हीडिओ शूटिंगच्या टीममधे काम करणारे जॉन, मीशा, येरी तत्परतेने उभे होते. आम्हा भारतातून आलेल्या निमंत्रितांचा सत्कार रुबाबदार पुष्पगुछ्यांनी झाला.
जोसेफ श्रोटर प्रागमधील एक मान्यवर सायकिक अनॅलेलिस करणारे एक्सपर्ट म्हणून गणले जातात. त्यांनी प्रथम सत्रात सिक्स्थ सेंन्स व नाडी ग्रंथ यावर आपले भाषण केले. त्यांच्या भाषणाचा गोषवारा त्यांचा मुलगा रोडिक मला दबक्या आवाजात सांगत होता. त्यांचे संपुर्ण (पॉवर पॉईटवरून केलेले) भाषण वेगळे येथे वाचायला मिळेल. त्यांच्या भाषणाला टाळ्याचा कडकडाट होऊन उत्साहाचा प्रतिसाद मिळाला. नंतर माझी वेळ आली. मी आधीच्या श्रोटरांच्या भाषणातील धागा पकडून नाडी ग्रंथांतील कथन हे मानवी बुद्धीच्या पलिकडील वैश्विक ज्ञानाच्या साठ्यातून मिळवलेले असल्याचे प्रतिपादन केले. त्यासाठी महर्षींचीच कथने त्याला पुरक आहेत असा खुलासा केला. त्याआधी मी थोडक्यात या अधिवेशनाचा माझ्या दृष्टीने उद्देश व महत्व कथन करणारे निवेदन व स्वागत भाषण केले. माझ्या भाषणाचा अनुवाद रोडिक तत्परतेने करत होता. वेळोवेळी ऐकू येणाऱ्या टाळ्यांमुळे माझे म्हणणे श्रोत्यांपर्यंत पोचत असल्याचे जाणवत होते.
मी नजरेने केलेल्या मोजणी प्रमाणे सर्व खुर्च्या भरलेल्या दिसत होत्या. त्यानुसार सुरवातीला १२० श्रोते होते नंतर वाढून १४० जमले असावेत. माझ्या नंतर मेरीयाने तिचा नाडी ग्रंथांचा भारतातील अनुभव थोडक्यात कथन केला. मग जेवायला सर्व पांगले. भोजन आपापले सोईने करायचे होते. त्यामुळे भारतात हटकून दिसणारी भोजन भाऊंची लगबग इथे नव्हती.
आम्हाला जवळच्या एका रेस्तोरॉंमधे नेले गेले. नेहमी प्रमाणे बीरची ऑर्डर झाली. “पटा पटा आटपा” असा खाक्या नव्हता. तरीही आम्ही तासाभरात हॉलवर वेळेवर परतून पुढील कार्यक्रमात सामील झालो. नंबर माझ्याच होता. यावेळी मला आलेल्या विविध अनुभवांचे कथन करायला सांगण्यात आले होते. योगी रामसुरत कुमारांचा व पॉन्डेचरीतील अरविंदाश्रमाचा भाग सांगताना वेळ संपली. कारण मला रोडिकच्या झेकमधील रुपांतरासाठी वेळ द्यायला लागत होता. असो.
त्या नंतर शिवषण्मुगना पाचारण करण्यात आले. त्यांनी आपल्या खड्या आवाजात तमिळ गायनाने अनेक महर्षींची आळवणी करणारे गायन केले. त्यावर श्रोत्यांच्या आनंदाच्या टाळ्या आल्या. त्यांनी व पलनीने शिवस्तुतीही म्हटली. पुन्हा मला बोलायला आमंत्रित केले गेले. यावेळी मी नाडी ग्रंथांतील विविध कांडांची रचना व त्यातील मजेशीर माहिती दिली.
त्यानंतरच्या सत्रात मानवीशरीरातील सात आंतरअंगांची कल्पना मी सांगितली व चौथ्याशरीरातील विविध शक्ती प्राप्त महर्षींनी संपुर्ण मानवाला देश, धर्म, जाती वा भाषा आदिंची बंधने झुगारून केलेली ही अनन्य साधारण मानवतेची सेवा आहे असे ठासून सांगितले. असा अधिवेशनाचा पहिला दिवस संपन्न झाला.
अधिवेशनाला जमलेल्यात समाजात ९५ टक्के स्त्रियांचा भरणा होता! काही विविध तंग पोषाखातील तरुणी, काही उच्च विचारांच्या गर्भश्रीमंत वाटल्या, तर काही पन्नाशी नंतरच्या! काहींशी बोलताना भारताबद्दल खुप माहिती असलेल्या तर काहींना योगा, प्राणायाम, मंत्र, आस्त्रालोगी(जी), एनर्गी(र्जी) लेवल वर अभ्यास केल्याची जाण असलेल्या विदुशी होत्या. उरलेले पुरुष मारुन मुटकून आल्यासारखे चेहरे करून बसलेले वाटत होते. काही पुरुषांनी मात्र खुप प्रश्न विचारून आपली जागरूकता दर्शवली.
दुसऱ्या दिवसाचे कथन आणि प्राग कॉलिंग लेखमालिका क्रमशः
तम्मनाकिंत प्रिती - १/३
" आप ईतनी शराब क्यों पिते हो ? "........
तमन्नाच्या ह्या प्रश्नाने अंकितला जरा भानावर आल्यासारखा झाल.रमची क्वार्टर पोटात गेल्यानंतर, सिगरेटचा पहिला झुरका घेतला की दारूच्या धुंदीला एक जोरदार किक बसते आणी त्या रमचा कैफ पोटातुन उलट्या दिशेने थेट मेंदुत शिरतो.हा प्रश्न तिच्या दिशेने नेमका त्या उलट्या दिशेचा प्रवाह सुरु असताना आला.
गेली दोन वर्षे हे त्याच पिणं दररोजच होत.अंकितची दुपारी १२ ते रात्री १० ची शिफ्ट संपली की गाडी हिंजवडीच्या आयटी पार्कातल्या सिटीएस कंपनीच्या पार्कींग मधुन, थेट, वाकड रोडच्या "राजरानी " बारच्या पार्कींग लॉटला पार्क व्हायची.नेहमीचा वेटर,नेहमीच टेबल आणी समोर नेहमीची थम्प्स-अप आणी भरपुर आईस क्युब्स मध्ये बुडालेली रम.दारु पिताना तो कधीच सिगरेट पित नसे पण एकदा क्वार्टर संपली की वेटरच्या हातावर वीस रुपये ठेऊन,बिलाची रक्कम जमा करुन अंकित चाचाच्या टपरीवर जायचा.टपरीवर कधी चाचा तर कधी तमन्ना असायची.गप एक लाईट्स आणी एक पान बांधुन घ्यायचा आणी घरी सटकायचा.गेली दोन वर्षे,सोमवार ते शुक्रवार हा त्याचा दिनक्रम असाच चालायचा.पण त्या दिवसांत असा प्रश्न त्याला कोणीही विचारला नव्हता.घरी आईने सुध्दा !!आणी तमन्ना कडुन,जिने त्याच्या कडे कधी ढुंकनसुध्दा पाहिले नाही, तिच्याकडुन तर असा प्रश्न अजिबात अपेक्षित नव्हता.झटका ओसरल्यावर अंकित विचारात पडला..
" खरच !! आपण ईतकी दारु का पितो? " सोमवार ते शुक्रवार एक क्वार्टर आणी शनीवारी/रवीवारी तर आपला ड्रम झालेला असतो.कोणी म्हणेला का मी कधी एकेकाळी शनीवारचा उपास करायचो. तेव्हा तर आपण दारुला स्पर्शही करत नव्हतो,मग अस कशानी झाल ? आणी झटकन त्याला स्वताच्याच डोळ्यासमोर अडीज-एक वर्षापुर्वीचा 'अंकित' ऊभा राहीला.
बंगळुरातल्या एका प्रतिष्ठित आयटी कंपनीत जॉईन झाल्यावर, त्याच्या स्वताच्या व्यक्तीमत्वाला एक प्रकारची "स्टेबेलिटी " प्राप्त झाली होती.वडिलांच्या मृत्यूनंतर आईने कष्ट घेऊन त्याला शिकवलं.दहावी-बारावी,बी.ई. आणी एम.एस. करता-करता वयाची पस्तीशी कधी आली ते त्याला स्वतालाही जाणवल नाही.सुरवातीच्या काळात आयटी क्षेत्रातला फ्रेशरला होणार्या त्रासाचा त्याला दांडगा अनुभव आला होता.कोणे एकेकाळी सहा आकडी पगार असण्याच त्याच स्वप्न सत्यात ऊतरलं होत.आणी त्या स्वप्नाला सत्यात ऊतरवताना तिची,त्याच्या पहिल्या-वहिल्या प्रेमाची ,प्रितीची साथ लाभली होती.अंधार्या काळ्याकुट्ट राती,खडबडया रस्त्यातुन चालण्याची केविलवाणी कसरत करताना,अचानक एखादा प्रकाशझोत यावा व आपल्याला दिशा सापडावी अशीच साथ प्रितीने त्याला दिली होती.प्रिती जर त्याच्या बरोबर नसती तर आपण ईथवर आलो असतो का ? असा प्रश्न त्याला अजुनही पडत असे.
प्रिती !! गारव्यातल्या पहाटे साखरझोपेत पडलेले सुंदर स्वप्न,दोन-चार दिवस पावसाची रिपरिप चालु असावी,, सगळीकडे चिक-चिक झालेली असवी,आणी अचानक कोवळ्या ऊन्हाशी स्पर्धा करणार उन पडाव,ते उन जस त्या वेळेला हवहवस वाटत तशी त्याला ती हवीहवीशी वाटायची, ती जाईची कळी,जगातल्या कवींनी,स्त्री सौंदर्याला दिलेल्या सर्व उपमा तिच्यापुढे फिक्या पडाव्या ईतपत प्रिती मोहक होती. पण त्याही पेक्षा मोहक होता तिचा आगळावेगळा स्वभाव!! कोणालाही आकृष्ट करेल असा खेळकरपणा आणी प्रगल्भता याच सुरेख मिश्रण तिच्या स्वभावात होतं.आणी त्या स्वभावामुळेच या दोघांचे एक-दोनदा "फिजीकल रिलेशन" होऊन सुध्दा अकिंतचा तिच्याबद्दल असणारा आदर,तिच्याबद्दल असणार्या प्रेमात तसुभरही फरक पडला नव्हता.पण तिच्या ह्याच स्वभावात एक खोटही होती.तिला यु.एस.चं,तिथल्या लाईफ-स्टाईलच सुप्त आकर्षण होतं आणी त्याच आकर्षणापायी,एक दिवस त्याची आणी तिची ताटातुट झाली.
पहिली ताटातुट होती ती केवळ तीन महिन्यांची.प्रितीला नवीन प्रोजेक्टकरिता यु.एस.ला जायला मिळण हे अंकितसाठी आनंददायी होत खरे पण थोडस काळजीच पण होत. त्याच तीन महिन्यात तिच्या आम्रगुल फरक पडला होता.त्याची अंकितला जाणीव होत असतानाही तिला दुखवण्याचा प्रश्नच नव्हता.आतापर्यंत सगळ काही ती म्हणेल तसच सर्व काही होते.तीन महिन्यांनी ती परत आली तेव्हा विमानतळावरच 'बिसलरी'ची बाटली विकत घेण्यापासुनच अंकितला,आपल्या आयुष्यात येणार्या वादळाची कल्पना आली होती.दोन महिने तो त्या वादळाची वाट पहात होता.तिला पुन्यांदा स्वताकडे ओढण्याच्या प्रयत्नात बराच खर्च झाला. कधी टेडी बेअर, कधी कार्डस,कधी बार्बी गर्लचा सेट,कधी ब्रिगेड रोडचे पब्स,तर कधी ला मेरिडियन ला डिनर.एक दिवस,तिच्या चेहर्यावर पसरलेला आनंद पाहुन त्याला वाटल की सगळ काही सुरळीत झाल असाव.म्हणुन........
" आपण लग्न करुयात का ?"
" अंकित, मला तुझ्याशी बोलायच आहे."
"मग बोल ना "
" नाही ,ईथे नाही सांगु शकत,तु आज ११ च्या सुमारास एयरपोर्टला ये."
"एयरपोर्टला?"
त्याच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करित,ती पटदिशी ऊठली आणी रेस्टारंट मधुन निघुन गेली.
अंकितला झटका बसला, ११ च्या सुमारास एयरपोर्ट ?? तस बघायल गेल तर ओअॅसिस,टि.जी.पुरापासुन एच.ए.एल. विमानतळ काही लांब नव्हत.प्रायव्हेट आटो करुन जरी गेला १५ मिनीटापेक्षा जास्त वेळ लागणार नव्हता.पण ईतक्या रात्री विमानतळावर का भेटायच?
गढलेल्या विचारात तो रुमवर परत आला.सातवाजेपासुन ते साडेदहापर्यंत त्याची मनस्थिती कायम होती.आपण आधी तिला लग्नाचं विचारल होतं.पण..............
क्रमश...........
आमची पहिली परदेशवारी..........................१
नमस्कार
मंडळी ,
पहिलाच परदेश प्रवास असल्यामुळे जी काही मित्रमंडळी परदेशी आहेत,त्यांच्याबरोबर चर्चा करुन प्राथमिक माहीती घेतली...आणी विजासाठी अर्ज केला आणी विजा मिळाला.
जायची तयारी सुरू झाली. कुणी सांगीतले म्हनुण फरसाण,
काजु, मनुखे,बदाम्,विविध चॉकलेट्,लोणचे,पापड असे अनेक खाद्यप्रकार बरोबर घेतले.मैत्रिणिसाठी भारतिय ड्रेस घेतले,प्रवासी बॅगसुध्दा नविन घेतली कारण कधी अशी वेळच आली नव्ह्ती. असो.....
गावावरुन ४-५ मित्र आले जोरदार पार्टी झाली,प्रत्येकाने आपापल्या परिणे मोलाचे मार्गदर्शन केले जरी ते कधी परदेशी गेले नव्ह्ते.रात्रि १:५० चे विमान होते, निघण्यापुर्वी स्काईपे वरूण मैत्रिणीशी बोललो आणी खात्री करुन घेतली की कितीही आणीबाणी आली तरीही तीने माझ्या आगमनापुर्वी साओ पावलो विमानतळावर हजर रहावे.कारण मी माझा भ्रमणध्वनी नेणार नव्ह्तो म्हनुन.दोन टॅक्सी घेउन आम्ही ८ जण गिरगावातुन निघालो तेव्हा रात्रिचे १० वाजले होते.सोसायटीकडे एक नजर टाकली जसा मी कधीच परतणार नव्ह्तो.......आणि निघालो.मित्र मस्करी करत होते पण माझे तिकडे लक्ष नव्ह्तेच मुळी.मी जे काही करतोय ते बरोबर कि नुसताच वेडेपणा चाललाय असा विचार मनात डोकाउन गेला..आणी माझ मलाच ओशाळल्यासारखं
वाटले.अशा विचारातच विमानतळावर पोहोचलो.मित्रांशी गप्पा आटोपत्या घेउन विमानतळामधे प्रवेश केला
.सामान जमा करण्यासाठी रांगेत दाखल झालो.....ईतक्यात
एक अधिकारी माझ्याकडे आला ....तिकीट , पासपोर्ट तपासले आणी चौकशी करू लागला.
अधिकारी: कुठे चाललात?
मी: ब्राझिलला.
अधिकारी: कशासाठी?
मी: फिरण्यासाठी.
अधिकारी:३ महीने ?......इथे काही कामधंदा नाही का?
मी: आहे साहेब,माझं ऑफीसच कामकाज माझा भाऊ बघणार आहे.
ईतक्यात दुसरा अधिकारी तेथे आला ..दोघे काहीतरी बोलले .......परिणामी मला रांगेमधून बाजुला घेण्यात आले.माझे बॅगमधील सर्व सामानाची कसुन तपासणी केली गेली.आनी परत.......
अधिकारी: एवढे खाद्यपदार्थ का घेऊण जाताय? तिकडे काही मीळत नाही का?
मी: ३ महीने रहायच आहे आनि आपले पदार्थ तिकडे मीळत नाहीत साहेब......
अधिकारी:हुं....आनी ही व्हिस्की ?
मी: तिकडच्या मित्रांसाठी....(खरं तर माझ्यासाठीच. असावा आपला ब्रॅंड म्हनुन)
तब्बल दीड तासांनी मला सोड्ण्यात आले.एवढ्च सांगतो कि एखाद्या अतिरेक्यासारखी माझी चौकशी झाली.बॅग जमा करुन,तपासणी यंत्राची परीक्षा पास झालो.....जोराचा श्वास घेतला...जराशी बरं वाटले आनी आतिल दुकानामधे ऊगाचच
डोकावत हळुह्ळु पुढे निघालो.येथील श्रिमंती थाट बघुन मलातरी परदेशात आल्यासारखे वाटले. मी फक्त वस्तुंच्या किमति पाहुन समाधान मानले( काय करणार?)......अन जरा रमतगमतच गेटवर पोहोचलो..परत एकदा बॅग तपासणी झाली ...विमा नात जाउन बसलो.मित्राना फोन केला ,हकिकत सांगितली अनि मला पहिल्यांदाच गहिवरुन आले ........तसाच निरोप घेतला...
२ बाय २ सीटवर खिड्कीजवळ बसलो.थोड्या वेळाणे एक मध्यम वयाच्या बाई आल्या...अनि त्यांनी खिड्कीजवळच्या
जागेवर दावा केला. मी खात्रि करुन त्यांना जागा देउन बाजुच्या सिटवर बसलो. मनातच ट्रॅव्हल एजंटला शिव्यांची
लाखोली वाहिली कारण त्याने मला खिड्कीजवळची जागा बूक केल्याच सांगितले होते.असो मी स्वतः खात्रि न करताच बसलो आनी आमचा पोपट झाला.विमानाने टेक ऑफ घेतला....मी खिड्कीतुन खाली पाहिले...काळोख अन खाली
दिव्यांच्या प्रकाशात ऊजळलेली मुंबई.....केवळ अप्रतिम नजारा!!!!!! थोड्या वेळाने नाश्टा आला.. यथेच्च समाचार घेतला, नंतर काही वेळाणे ड्रिंक्स आले ,न लाजता ३-४ टिन बियर प्यायलो..अन दीली ताणुन.सकाळी ८ वाजता अॅमस्टरडॅमला उतरलो....फ्रेश झालो ..२:३० तास वेळ होता.
सुंदर विमानतळ अनि त्याहुन सुंदर तिथल्या मुली बघत गेट्वर आलो. पुढील विमान वेळेवर निघाले.आता माझी जागा खिड्कीजव़ळ होती.विमानाने टेक ऑफ घेतला....मी
खिड्कीतुन खाली बघितले .......बराच वेळ तो कापुस पींजल्यासारखा नजारा अन खाली नि़ळाशार समुद्र..कॅमेरा नसल्याची खंत वाटली. सवयीने परत ३-४ टिन बियर प्यायलो ,पोट्पुजा केली ...अन झोपी
गेलो..थोड्या वेळात जाग आली...बियरने आपली जात दाखवली......माझ्या शेजारी एक जर्मण माणुस अनि पलिकडे ब्रझिलियन बाई ...दोघांनी उठायच तेव्हा आमी १
नंबरला जाणार....एकदा दोनदा असं दर अर्ध्या तासाने ४-५ वेळा जाव लागले...१-२ वेळा हसुन मला जाऊ देणारे माझे शेजारी खाऊ की गिळू असे नजरेनेच सांगु लागले.आता मनाशिच ठरवले परत विमानात बियर प्यायची नाही.(फुकट आसली तरीही).
आताशा जरा बरे वाट्ले....विमान ३३००० फुटावरुन चालले होते...खिड्कीतुन खाली बघितले अजुनहि फक्त पाणीच दिसत होते.......दुरदुरपर्यंत जमीन दिसत नह्वती...
घड्याळात ३ वाजलेले......आत्तापर्यंत काहीसा बिनधास्त असलेला मी मनातुन घाबरलो....मनात अचानक विचाराच काहुर ऊठ्ले.......अन केव़ळ चॅट वरची ओळख असताना एका अनोळखी व्यकतीला भेटायला मी १७००० कि.मि.च्या प्रवासाला निघालो होतो....मला मी केलेल्या धाडसाची भीति वाटायला लागली...एकाही मित्राला माझ हे धाडस आवड्ल नव्हते......जवळजवळ सर्वांना खात्रिच होति की माझा पोपट
होणार........अचाऩक मला तिचा चेहरा आठवला .......माझा हरवलेला आत्मविश्वास परत आला....जरासा सावरलो ...जर ती भेटली तर तो माझ्यासाठी ए॓तिहसिक क्षण असणार होता.......मी मनातच त्या भेटीची ऊजळणी केली....अनि
शान्त चित्ताने एक झपकी मारली.....अनाऊन्समेंट झालि ..मला जाग आली.. काय बोलली ती बाई एक शब्दही समजला नाही..कुठ्ली भाशा आहे ते पण नाही समजल.६:३० वाजले होते ......१ तास बाकी होता.....फ्रेश झालो ......कॉफी घेतली .....कसलासा फॉर्म भरायला दिला अनो़ळखी भाशेत
.....पुन्हा शेजारी ऊपयोगी पडले.....जे जे त्यांनी सांगितले तसे डोके गहाण ठेवुन लिहिले. मला तर मी निरक्षर आहे असेच वाटले.......लॅडींगची सुचना झाली अनि विमान सुखरुप
उतरले......चालत चालत पुढे आलो.......ईथे एका सुंदर मुलीने हसुन स्वागत केले......दोन मधील एका रांगेकडे बोट दाखवले......एक रांग स्थानिक लोकांची अनि दुसरी आमची परप्रांतियांची
......पुढे आलो बॅग कुठे मीळतील हे विचारले ....समोरचा माणुस काय बोलला काहीच समजले नाही....जे माझ्या विमानातले प्रवासी होते त्यांच्या मागे चालु लागलो.एवढ्या गर्दीमधे मला बॅग सापडेल हे अशक्यच वाट्ले.१० मिनिटातच गुलाबि रंगाची रिबीण बांधलेली बॅग दिसली .......दोन्हि बॅग
घेतल्या .......लोकल फोनवर नंबर एडी चा मोबाईल नंबर फिरवला......फोनमधली बाई काय बोलत होती काहिच कळेणा.......रात्रिचे ९ वाजलेले.....१० वेळेला फोन लावला
असेल पण पलिकडुन ओळखीचा आवाज आला नाही...ए़का माणसाच्या हातात भारतिय पासपोर्ट पाहिला धावत जाऊण त्याला गाठ्ले.....त्याने टेलिफोन चे कार्ड घ्यायला सांगितले.मी त्याला मदतिची विनंति केली , त्याने कारण
सांगुन पोबारा केला....संपलं सगळं....शेवटी देवावर हवाला ठेवुण बाहेर जायचा निर्णय घेतला......कधी फारसा देवावर न विसंबणारा मी पण आठवतील तेवढ्या देवांची नावे घेत बाहेर आलो....समोर बरीच गर्दी दिसत होती .......जरा बाजुला होऊन शोधाव असा विचार आला ईतक्यात झपकन एक लाल टी शर्ट घातलेली आक्रुती आली .......मला काही कळायच्या आत त्या आक्रुतीने मला मीठी मारली अन मी भानावर येईपर्यंत तिने माझे चुंबनही घेतले होते.........होय ती एडीच
होती.....माझा २४ तास प्रवासाचा शिण नाहीसा झालेला.तिच्याकडे एकदा बघितले ...........आयुश्यात पहिल्यांदाच डोळ्यातुन आनंदाश्रु आले......बाहेर आलो चहा घेतला......हॉटेल शोधले ......११ वाजता रुममध्ये प्रवेश केला
......आंघोळ केली ........फ्रिजमधुन बीयर घेतली ...चकना बरोबर होताच......३-४ बीयर ओढ्ल्या....अन???? झोपी गेलो.....सकाळी उठुण साओ पावलो बघायचे होते.....
क्रमशः...........
.
.
.

