मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

त्र्यंबकेश्वरमधील योग शिबिर आणि निसर्गाचा सत्संग

मार्गी ·
✪ त्र्यंबकेश्वरमध्ये बिहार स्कूल ऑफ योगाचं योग शिबिर ✪ पण त्याआधी प्रसिद्ध संस्थानाच्या नावाने झालेली ऑनलाईन फसवणूक ✪ "अखंड सावधान असावे दुश्चित कदापि नसावे!" ✪ परमहंस निरंजनानंद सरस्वतींच्या उपस्थितीतील सत्संग ✪ "चार मिले, चौसठ खिले, बीस करें जोड़" ✪ BSY चं सुंदर आयोजन आणि सत्रांची मेजवानी ✪ आदर्श गुरू बरोबर आदर्श शिष्यत्वाचं उदाहरण! ✪ साधकांची मांदियाळीसह कीर्तन, भजन आणि ध्यान ✪ त्र्यंबकेश्वर भटकंती व ब्रह्मगिरीचा अविस्मरणीय ट्रेक सर्वांना नमस्कार. नुकताच त्र्यंबकेश्वरमध्ये झालेल्या बिहार स्कूल ऑफ योगा ह्या मोठ्या योग विद्यापीठाच्या एका योग शिबिरामध्ये सहभागी होण्याची संधी मिळाली.

चार आर्यसत्ये - एक चिंतन

प्रसाद गोडबोले ·

युयुत्सु 15/02/2025 - 17:44
तर तात्पर्य काय की - दु:खाचे कारण तृष्णा हे नाही . त्या लेकरांना अशाच आई बापाच्या पोटी जन्म का मिळावा ? आपल्याला आपल्याच कुटुंबात जन्म का मिळावा ? आणि अंबानीला अंबानीच्या घराण्यात जन्म का मिळावा ? > या वरील विधानात जन्माच्या अगोदर आपण कोणत्या तरी स्वरूपात अस्तित्वात आहोत हे गृहित धरले आहे. कारण हे अस्तित्व म्ह० कदाचित आत्मा ज्याचे अस्तित्व बुद्धाने नाकारले आणि आधुनिक विज्ञान पण नाकारते. आपला जन्म हा एक जैविक अपघात आहे, हे स्वीकारले की बाकीचे सर्व डोलारे पत्त्याच्या बंगल्या प्रमाणे कोसळून पडतात. यातल्या पूर्वसंचिताला विज्ञानाची (म्ह० अधिजनुक शास्त्राची) थोडीफार मान्यता आहे. विज्ञानाची ॲलर्जी नसेल अधिक माहिती साठी हे पुस्तक वाचावे.

Bhakti 15/02/2025 - 20:56
छान लिहिले आहे.मी आजच गीतारहस्याचे आठवे प्रकरण 'विश्वाची उभारणी आणि संहार' हे वाचले.यात हे पंचीकरण विषयी सांगितले आहेच.शिवाय यात सांख्य आणि वेदांताचे या प्रकृति/सृष्टीची उभारणी व संहाराचे साम्य व भेद खुप छान सांगितले आहे.आता कधी गीतारहस्य वाचून पूर्ण करते इतकी उत्सुकता ताणली आहे 😇 १ राजयोग,कर्मयोग या विषयी विवेकानंदाचे खुप सुंदर पॉडकास्ट व्हिडिओ युट्यूबवर आहेत.भक्तीयोग,ज्ञानयोग मिळाले की ऐकेन. बाकी माझे बरेचसे दुःख मी कर्मयोगाचे मोडीत काढले आहेत. You don’t invite suffering into your life but when it comes you work with it and transform it.

चित्रगुप्त 15/02/2025 - 23:32
लेखात सुरुवातीला दिलेल्या उदाहरणातल्या गरीबांच्या दु:खाचे कारण त्यांची स्वतःचीच 'तृष्णा' असली पाहिजे, असे आहे का ? समाजातील अन्य श्रीमंत, सत्ताधारी, बलवान, असंवेदनशील, स्वार्थी वगैरे प्रभावशाली लोकांची 'तृष्णा' त्या दु:खाला कारणीभूत नाहीच, असा त्याचा अर्थ आहे का, हे समजले नाही. कृपया उलगडून सांगावे ही णम्र इनंती. -- त्या अन्य प्रभावशाली लोकांनी त्यांच्या स्वतःच्या इच्छा व हव्यासा नियंत्रित करणे हाच दुःखाच्या निरसनाचा उपाय / मार्ग नाही काय ? -- आणि त्यासाठी त्या अन्य लोकांनी: सम्यक दृष्टी - सम्यक संकल्प - सम्यक वाणी - सम्यक कर्म - सम्यक उपजीविका - सम्यक व्यायाम - सम्यक स्मृती - सम्यक समाधी .... हा मार्ग अवलंबिला पाहिजे, हा खरा उपाय. -- काय म्हणता ?

In reply to by चित्रगुप्त

नाही नाही. तसे निश्चित च नाही. तसा विचार बुध्दाने केला असता तर तो बुद्ध न राहता अशोक झाला असता ना ! बुध्दाच्या दुःखाच्या शोधाचा फोकस आता मध्ये आहे, बाहेर नाही. बहिस्थ कारणांकडे बुध्द दुःखाचे कारण म्हणून पाहताच नाही, तो म्हणतो की त्या बाह्य कृतींमुळे तुमच्या मनाची स्थिती का बिघडत आहे ? त्याचे मूळ शोधा. कारण तुमच्या मनात आहे , बाहेर नाही. "आपल्या दुःखाची कारणे आत नाहीत , बाहेर आहेत, प्रस्थापितांनी केलेली शोषक अर्थव्यवस्था हेच ते कारण" . असा विचार करायला लागला की तो बुद्ध रहात नाही , तो कार्ल मार्क्स होतो Budhda

प्रचेतस 16/02/2025 - 04:40
१. "दुःख असं काही नाहीयेच, जो आहे तो दुःखाचा भास आहे."
→ हा दावा अतिशय उच्च अध्यात्मिक पातळीवरच ग्राह्य धरता येईल. प्रत्यक्ष जगात दुःख ही एक अनुभूती आहे. शारीरिक वेदना, मानसिक यातना, सामाजिक अन्याय हे भास नसून प्रत्यक्ष अस्तित्वात असणाऱ्या गोष्टी आहेत. जर कोणाला गरिबी, भूक, आजार, छळवाद किंवा अपघातातून होणाऱ्या यातना भास वाटत असतील, तर तो भास नव्हे, तर वस्तुस्थिती नाकारण्याचा प्रयत्न आहे.
२. "हे दुःख आहे असे जे भासते आहे त्या भासाला कारण आहे."
→ जर दुःखच अस्तित्वात नाही, तर त्याला कारण कसे असू शकते? हा स्वतःलाच विरोध करणारा युक्तिवाद आहे. दुसरं म्हणजे, जर "भास" असं काही असेल, तर तो का आणि कसा निर्माण होतो, याचं स्पष्टीकरण देण्याची गरज आहे.
३. "ते कारण म्हणजे देहात्मभाव."
→ हा दावा फार सरसकट आहे. दुःखाची कारणे फक्त देहात्मभावाशी जोडणं चुकीचं आहे. सामाजिक, आर्थिक, राजकीय परिस्थिती, मानवी संबंधातील गुंतागुंत, पर्यावरणीय आपत्ती यांसारख्या अनेक गोष्टी दुःख निर्माण करतात. मानवी दुःख केवळ "मी हा देह आहे" या भावनेतूनच येतं, हा एकांगी विचार आहे.
४. "ह्या भासाचे निराकरण करण्याचे अनेक मार्ग आहेत..."
→ जर दुःख फक्त भास असेल, तर त्यावर मार्ग शोधण्याची गरजच काय? जर ते अस्तित्वातच नाही, तर ज्ञानयोग, भक्तीयोग, कर्मयोग यांची गरजच भासू नये. शिवाय, हे मार्ग व्यक्तिगत निवडीवर अवलंबून आहेत; एका व्यक्तीसाठी योग्य असलेला मार्ग दुसऱ्यासाठी तितकासा उपयुक्त नसेल.

In reply to by प्रचेतस

आपल्या प्रतिसादाबद्दल मनःपुर्वक धन्यवाद वल्ली सर ! आपल्या प्रतिसादामुळे, परत एकदा चिंतन करताना मला असे काहीसे फीलींग येत आहे ! =)) ravanth
वस्तुस्थिती नाकारण्याचा प्रयत्न
होय , बरेच लोकं अध्यात्माला - वस्तुस्थिती नाकारण्याचा प्रयत्न, अर्थात स्पिरिच्युअल एस्केपिझम असे म्हणतात. ठीक आहे आता , काय बोलणार , कोणाला काहीही समजाऊन सांगण्याच्या भानगडीत कशाला पडा ! मुळात खुद्द भगवंत अर्जुनाला गीता सांगितल्या नंतर म्हणाला की तुला पाहिजे तसं कर ! तसं काहीसं मला वाटायला लागलं आहे ! इति ते ज्ञानमाख्यातं गुह्याद्‌गुह्यतरं मया । विमृश्यैतद् अशेषेण यथा इच्छसि तथा कुरु ॥ १८-६३ ॥ पण अर्जुन युध्दभूमी सोडुन पळुन गेला नाही , हाच फरक आहे कळणे आणि न कळणे ह्यातील.
जर "भास" असं काही असेल, तर तो का आणि कसा निर्माण होतो
जिथं द्वैत निर्माण होतं तिथं हा भास निर्माण होतो, आईच्या पोटातुन बाहेर पडल्यावर पहिल्यांदा आपण ट्यॅ करतो तिथं . पण मुळात मुळात ह्या भासाच्या ब्रमाची सुरुवात कुठे आहे तर ह्याचे उत्तर छान्दोग्योपनिषद मध्ये दिलेले आहे - एकोहम बहुस्यामः . मी एक आहे , आता अनेक होईन ह्या प्रथम प्रेरणेचा उदय हाच ह्या भासाचा उदय आहे ! पण तुम्ही विचाराल की ही प्रेरणा तरी कशी आणि का निर्माण होते - तर "मी एक आहे" हा विचार हे त्याचे खरे कारण आहे. (त्याला महाकारण असे म्हणातत. ) तस्मात मी एक आहे, अहं ब्रह्मास्मि ह्या विचाराचाही लय होतो तिथे भासाचा , दु:खाचा लय होतो.
एकांगी विचार
एकांगीच आहे !! पण एकदा तो विचार झाला की संपलं सगळं ! तुका म्हणे रक्षा झाली आपोआप | उजळला दीप गुरुकृपा ||
जर दुःख फक्त भास असेल, तर त्यावर मार्ग शोधण्याची गरजच काय?
मान्यच ! हेच अष्टावक्र म्हणतो ! ( बहुतेक जे. कृष्णमुर्तीही हेच म्हणतात ! ) एकदा का हे कळलं की बाकी काही योगबिग वगैरे धडपड करावयाची आवश्यकताच नाहीये . जसं एकदा दिवा लावला की अंधार नष्ट व्हायला किती वेळ लागतो ? तसं काहीसे आहे ! तुम्हाला एकदा कळलं असेल की हे दु:ख केवळ द्वैताच्या भासाचे लक्षण आहे , मुळात द्वैत असे काही नाहीच , तत्क्षणी तुम्ही सुटलेले आहात . अंधाराचा नाश झालेला आहे , तुम्हाला अधिक काही करावयाची आवश्यकताच नाही !
एको विशुद्ध बोधव्योऽहमिति निश्चयवह्निना । प्रज्वाल्याज्ञानगहनं वीतशोकः सुखी भव ॥ ९ ॥ अनुवाद - 'मी एक विशुद्ध बोध आहे' या श्रद्धायुक्त अग्निने स्वतःचे घोर अज्ञान जाळून तू शोकरहित व सुखी हो !
पण बहुतांश लोकं हे अष्टावक्र गीता समजण्याचा जवळपास देखील नाहीत , म्हणुनच भगवंताने भगवद्गीता लिहुन हे चार सुलभ मार्ग दाखवुन दिलेले आहेत !
सर्वधर्मान् परित्यज्य मामेकं शरणं व्रज । अहं त्वां सर्वपापेभ्यो मोक्ष्ययिष्यामि मा शुचः ॥ १८-६६ ॥
इत्यलम ! :) अजुन काही लिहायची इच्छा होत नाही , आता बस अर्जुन जे म्हणाला ते बोलुन थांबतो :
नष्टो मोहः स्मृतिर्लब्धा त्वत् प्रसादात् मयाच्युत । स्थितोऽस्मि गतसंदेहः करिष्ये वचनं तव ॥

In reply to by प्रसाद गोडबोले

प्रचेतस 17/02/2025 - 19:22
जिथं द्वैत निर्माण होतं तिथं हा भास निर्माण होतो, आईच्या पोटातुन बाहेर पडल्यावर पहिल्यांदा आपण ट्यॅ करतो तिथं .
तुम्ही अद्वैताकडे जाताय असे वाटते पण द्वैत ही निसर्गाची मूलभूत रचना आहे. आई आणि बाळ एकाच नसून वेगळे आहेत आणि हा भास नसून सत्य आहे.
एकोहम बहुस्यामः . मी एक आहे , आता अनेक होईन ह्या प्रथम प्रेरणेचा उदय हाच ह्या भासाचा उदय आहे !
मुळात ब्रह्म एक असेल आणि सर्व काही त्याच्यापासून निर्माण झाले असेल, अनेक झाले असेल तर भिन्नता वास्तव आहे, भास नाही. निर्मिली गेलेली सृष्टी तर वास्तव आहे.
एकांगीच आहे !! पण एकदा तो विचार झाला की संपलं सगळं !
जर एखादा विचार एकांगी असेल, तर तो संपूर्ण सत्य सांगत नाही आणि जर तो एकदा विचार झाला की सगळं संपतं असं म्हणायचं असेल, तर तेच अपूर्णत्व दर्शवतं. एकदा तुम्ही द्वैत असे काही नाहीच असं मांडलं की मग पुढं बोलणंच खुंटलं.
बहुतांश लोकं हे अष्टावक्र गीता समजण्याचा जवळपास देखील ना
अष्टावक्र गीता मी अजून वाचलेली नाहीये मात्र महाभारतात वनपर्वात जनक अष्टावक्र संवाद काहीसा संक्षिप्त स्वरूपात येतो जो मूळच्या उपनिषदातील अद्वैताला थोड्या निराळ्या स्वरूपात प्रतिपादित करतो. नष्टो मोहः स्मृतिर्लब्धा त्वत् प्रसादात् मयाच्युत । स्थितोऽस्मि गतसंदेहः करिष्ये वचनं तव

In reply to by मुक्त विहारि

नमस्कार मुवि, आपण बहुतेक दारू पिणे ह्या अर्थाने श्रमपरिहार हा शब्द वापरला आहे , मागील प्रतिसादात म्हणाला होतात तसेच. ह्या इथे, ह्या विषयी तुकोबांचा एक चपखल अभंग स्मरत आहे, पण आपल्याला दुखावण्याची इच्छा नाही म्हणून उद्धृत करण्याचे टाळत आहे. लोभ असू द्यावा.

In reply to by प्रसाद गोडबोले

योग्य ओळखले... इथे, श्रम परिहार हा वैचारीक आहे.... तुम्ही विचार मंथन करतांना ध्यान करून मन एकाग्र करत असाल , असे वाटते. मी मदिरेचा आस्वाद घेता घेता वैचारीक मंथन करतो. जे प्रश्न तुम्हाला पडतात ते प्रश्न मलाही पडले होते. पण एक सुंदर वाक्य वाचनात आले..... स्वतःच स्वतःला मार्ग दाखवायचा. एक उदाहरण देतो.... बॅरोमीटरचा उपयोग करून एखाद्या उंच इमारतीची उंची मोजायची असेल तर, त्याची किमान ४ उत्तरे आहेत आणि कुणी कुठला मार्ग वापरायचा हा ज्याचा त्याचा प्रश्न. तुम्ही तुमच्या मार्गावर बरोबर आहात आणि मी माझ्या.... तुमच्या मार्गाला माझा अजिबात विरोध नाही उलट तो मार्ग अतिशय तरल आणि उत्तम आणि सफाचट आहे.भल्या भल्या व्यक्तींना जमत नाही.

Bhakti 16/02/2025 - 07:36
अवांतर
काही काही लोकांचा ना उगीचच गैरसमज आहे की हिंदु धर्म बौध्द आणि जैन धर्म एकमेकांचा दुस्वास करतो .
समाजात ना ना विकरी जण भरले आहेत.कोणा कोणाचा विचार करायचा.आपला मार्ग शोधत राहायचा.मी दु:स्वास वग्रै नाही.पण या तीन धर्मांचे दिसणाऱ्या साम्यावर कायम आश्चर्यचकित व्हायचे.ज्ञानयोगाने म्हणजे पुस्तकी अभ्यासाने ;) याचे गुपित जाणले.आणि कर्मयोगाने म्हणजे प्रत्यक्ष या हिंदू बौद्ध जैन पण हे तिन्ही धर्म जवळपास किमान २५०० वर्षे जुने आहे. त्यांची तत्वे , आदर्श ही तितकेच प्राचीन आणि जुने आहेत हे जाणले,अनुभवले....ते वेरूळच्या माध्यमाने.लेणी १-१२ बौद्ध,१३-२९ हिंदू,३०-३४ जैन यांचा अभूतपूर्व संगम, प्रत्यक्ष स्वर्गानुभव आहे.त्यातील जैन लेणी जरा नीट पाहायच्या राहिल्या तर स्वप्नात येतात ,परत ये म्हणतात ;) लवकर परत जाणार आहे:) १ ॐ तारे तुत्तारे तुरे सोहा'

सोत्रि 16/02/2025 - 10:46
ती लहान मुलगी , अगदी दोन तीन वर्षाची - ज्या दुपारच्या बाराच्या उन्हात आपण आपल्या पोरांना घराबाहेर ही पडु देत नाही त्या अश्या रणरण फुफाट्यात डांबरी रस्त्यावर उभी आहे. पायात काही नाही , डोक्यावर काही नाही . अन्न अन्न करुन आई पाशी रडली असेल त्यामुळे चेहर्‍यावर सुकलेल्या अश्रुंचे डाग . बिचारी आई तिही हताश . आगतिक . तिथेच पलिकडे दुसर्‍या सिग्नलच्या दुसर्‍या बाजुला तसाच ४-५ वर्षाचा एक मुलगा . तसाच उन्हाने रापलेला काळा वर्ण , फाटके कपडे , हातात गाडी पुसायचे फडके . त्याच्या डोक्याला अन डोळ्यांना काही तरी लागले होते . त्याचा २५-२७ वर्षाचा बाप काहीतरी त्याच्या डोळ्यात घालत होता , बहुतेक स्वच्छ पाण्याने धुवत असावा
हे दु:ख नाही, ही झाली परिस्थीती.
दोन वर्षाच्या पोरीला काय हवं आहे ? साधं पोटभर जेवण ? सावली ? त्या ४-५ वर्षाच्या मुलाला डोळ्याला काही लागले असेल तर डॉक्टर कडे जावे वाटले , बरे व्हावे वाटले
ही तृष्णा नाही. हे त्या प्राप्त परिस्थितीला सामोरे जाणे झाले, कर्मयोग, जे अटळ आहे. प्राप्त परिस्थितीला सम-भावनेने (equanimity) सामोरे न जाता, जे नाहीयेय त्याचा हव्यास आणि जे नकोय ते होणं ह्याचा तिरस्कार ही झाली तृष्णा, त्यामुळे येणारी व्याकुळता हे दु:ख.
आणि कोण कुठली ही ही माणसे ? माझा जीव का कळवळतोय ह्यांच्यासाठी ? मला का दु:ख होतंय ?
तुम्हाला जो कळवळा आलाय ते दु:ख नाही. ती कणव आहे त्यांच्याविषयीची, करुणा म्हणणार होतो पण लेखातलंच पुढचं वाक्य ती करूणा नाही हे जस्टीफाय करतंय.
का माझ्या मनात नाथांसारखा करुणभाव उत्पन्न होत नाही ?

लेखात उल्लेखलेली चार आर्यसत्य ह्यांचा संदर्भ मराठी विकीपीडीया दिसतोय. त्याचा मूळ संदर्भग्रंथ — बुद्धिझम फॉर यंग स्टूडन्स, लेखक - भंते डॉ. सी. फॅंगचॅंम (थायलंड) हा दिसतोय विकिपेजवर. डॉ. सी. फॅंगचॅंम यांनी त्या ग्रंथात नेमकं काय लिहिले आहे हे माहिती नाही, पण विकीपेजवरची चार आर्यसत्ये चुकीचं भाषांतर आणि चुकीचा भावार्थ आहेत. त्रिपिटकातील सुत्त पिटकानुसार चार आर्यसत्ये अशी आहेत: 1. दुःखसत्य (Dukkha Sacca) – जीवनात दुःख आहे. 2. दुःखसमुदय सत्य (Samudaya Sacca) – दुःखाची कारणे आहेत. 3. दुःखनिरोध सत्य (Nirodha Sacca) – दुःखाचे निरसन शक्य आहे. 4. दुःखनिरोधगामिनी प्रतिपदा (Magga Sacca) – अष्टांगिक मार्गाने दुःख संपुष्टात आणता येते. त्रिपिटकातील संदर्भ: धम्मचक्कप्पवत्तन सुत्त (Dhammacakkappavattana Sutta) – सुत्त पिटक, साम्युत्त निकाय (SN 56.11)

In reply to by सोत्रि

त्रिपिटकातील संदर्भ: धम्मचक्कप्पवत्तन सुत्त (Dhammacakkappavattana Sutta) – सुत्त पिटक, साम्युत्त निकाय (SN 56.11) ह्या संदर्भाबद्दल मनःपुर्वक धन्यवाद सोत्रि !

In reply to by सोत्रि

तुम्हाला जो कळवळा आलाय ते दु:ख नाही. ती कणव आहे.
उद्या जाणार आहे ऑफिसला, तेव्हा दिसतीलच ते ! तेव्हा मी माझ्या मनाला हेच समजाऊन सांगणार आहे ! अशोच्यानन्वशोचस्त्वं प्रज्ञावादांश्च भाषसे । गतासूनगतासूंश्च नानुशोचन्ति पण्डिताः ॥ २-११ ॥
प्राप्त परिस्थितीला सम-भावनेने (equanimity) सामोरे न जाता, जे नाहीयेय त्याचा हव्यास आणि जे नकोय ते होणं ह्याचा तिरस्कार ही झाली तृष्णा, त्यामुळे येणारी व्याकुळता हे दु:ख.
हेही संगुन पाहतो मनाला - हा ज्याचा त्याचा कर्मयोग आहे , जो की अटळ आहे. ते पोरं ती परिस्थिती , ते कर्म घेऊन जन्माला आली आहेत , तो त्यांचा कर्मयोग आहे. अन आपल्याला कणव वाटणे ,पण नाथांसारखी करुणा न वाटणे, हा आपला कर्मयोग आहे . मात्रास्पर्शास्तु कौन्तेय शीतोष्णसुखदुःखदाः । आगमापायिनोऽनित्यास्तांस्तितिक्षस्व भारत ॥ __/\__

In reply to by प्रसाद गोडबोले

युयुत्सु 16/02/2025 - 17:46
स्वगतः अध्यात्माला भ्रमानुभुतीचे विज्ञान म्हणणे योग्य होईल का?. रिप्रोड्युसिबिलीटीला बेदखल केलं सगळा आनंदी आनंद! (पन इण्टेण्डेड)

सोत्रि 16/02/2025 - 11:51
उलट सनातन धर्माने बुध्दाला विष्णुचा ९वा अवतार मानुन त्याला आदरच दिलेला दिसुन येतो.
हे फारच रोचक आहे, केवळ उत्सुकता एक प्रश्न पडला, म्हणून हा प्रतिसाद. पण हा प्रश्नही स्वांतसुखायच आहे. अवतार घेण्याची कारणे गीतेत कृष्णाने खालील श्लोकात (४.८) सांगीतली आहेत: यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत, अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्, परित्राणाय साधूनाम् विनाशाय च दुष्कृताम्, धर्मसंस्थापनार्थाय सम्भवामि युगे युगे म्हणजे सृजाम्यहम् - अवतार घेण्यासाठी खालील ३ कारणे असतात:
  1. परित्राणाय साधूनाम्
  2. विनाशाय च दुष्कृताम्,
  3. धर्मसंस्थापनार्थाय
असं असेल तर त्यावेळी सनातन धर्मात सज्जन लोकं धर्ममार्गावरून च्युत झाले असावेत, त्यामुळे खूप दुष्ट लोक झाले असावेत आणि धर्मस्थापना करण्याची गरज म्हणूंन नवावा अवतार (बुद्ध) घ्यावा लागला असावा का? - (अभ्यासू ) सोकाजी

In reply to by सोत्रि

माझा तत्त्वज्ञानाचा इतिहास ह्या विषयाचा जास्त अभ्यास नाही. खालील उत्तर माझ्या मर्यादित वाचन आकलनावरून देत आहे - बुध्द काळात, म्हणजे साधारणपणे इ .सु . पूर्व सहावे शतक, तत्कालीन सनातन धर्म हा पूर्व मीमांसा अर्थात कर्म मीमांसा ह्या मताला मानणारा होता. ह्या मतानुसार केवळ कर्म करणे हे मोक्षाचे साधन होते. त्यामुळे तत्कालीन समाज यज्ञ प्रधान होता. त्यामध्ये तत्त्वज्ञानापेक्षा अधिक भर कर्मकांडांवर होता. म्हणूनच चार्वाक जैन बुध्द वगैरे नास्तिक अर्थात वेद प्रामाण्य नाकारणाऱ्या मतांचा उदय झाला. पण त्यातही प्रकर्षाने पाहिले तर चार्वाकचे खंडन करायला जैन आणि बुद्ध मत हेच पुरेसे होते. जैन धर्माचे संस्थापक ऋषभ देव स्वतः इक्ष्वाकु वंशातील अर्थात श्रीरामाच्या वंशातील होते, त्यानंही विष्णूचा अवतार मानण्यात येते. पण बुध्दाच्या मताने केवळ कर्मकांड व नव्हे तर समस्त वेद उपनिषदोक्त तत्वज्ञानावर प्रश्नचिन्ह निर्माण केले. आणि त्याचे उत्तर शोधता शोधता लोकं उपनिषदोक्त धर्माकडे परतले. अर्थात विष्णूनेच लोकांना परत उपनिषदे आणि त्यांचे सार गीता आणि त्यातील धर्म अर्थात कर्मयोगशास्त्र ह्याकडे प्रवृत्त करण्यासाठी , धर्माची संस्थापना करण्यासाठी बुध्द अवतार घेतला. ह्या तर्काला अतिशय उत्तम समर्थक उदाहरण म्हणजे चाणक्य ! बुध्द इ.सु.पू 6 व शतक आणि चाणक्य इस पू 3 ते शतक. आणि महाभारत भगवद गीता लिहिली गेली ते इस 3 ते शतक आणि आचार्य म्हणजे इस 7वे शतक. म्हणजे बौद्ध मत खंडन व्हायच्या कित्येक वर्षे आधी चाणक्य झाला होता , आणि तरीही त्याच्या अर्थशास्त्र ग्रंथात कर्मयोग च दिसून येतो. अर्थात आचार्यांच्या आधीपासूनच लोकं मूळ सनातन धर्माकडे कर्मयोगशास्त्र कडे वळले होते . (ह्या साऱ्या कालगणनेत कुमारील भट्ट नावाचे अत्यंत रोचक पात्र आहे ज्यांनी आचार्यांच्या आधीच बौद्ध मताचे खंडन करून मीमांसा मताचे पुनर्स्थापना केलेली दिसून येते. पण त्यावर सविस्तर चर्चा कधीतरी निवांत!) ह्या विषयाचा सखोल अभ्यास नसल्याने उत्तरदायित्वास नकार लागू. चूक भूल देणे घेणे

In reply to by प्रसाद गोडबोले

सोत्रि 17/02/2025 - 19:08
बुध्द काळात, म्हणजे साधारणपणे इ .सु . पूर्व सहावे शतक, तत्कालीन सनातन धर्म हा पूर्व मीमांसा अर्थात कर्म मीमांसा ह्या मताला मानणारा होता. ह्या मतानुसार केवळ कर्म करणे हे मोक्षाचे साधन होते.
अर्थात विष्णूनेच लोकांना परत उपनिषदे आणि त्यांचे सार गीता आणि त्यातील धर्म अर्थात कर्मयोगशास्त्र ह्याकडे प्रवृत्त करण्यासाठी , धर्माची संस्थापना करण्यासाठी बुध्द अवतार घेतला.
प्रचंड घोळ आहे. त्यापुढेही बराच आहे. पण उत्तरदायित्वास नकार लागू असल्याने इत्यलम! - (अभ्यासू) सोकाजी

In reply to by प्रसाद गोडबोले

प्रचेतस 17/02/2025 - 21:41
पूर्व मीमांसा जरी यज्ञयागादी कर्मकांडाचे मूलाधार असली तरीही त्या काळी न्याय, वैशेषिक, सांख्य, योग, वेदांत अशी विविध तत्वज्ञाने प्रचलित होती. बुद्धानंतर यज्ञाचे स्तोम जरी कमी झाले असले तरीही ते प्रचलित होतेच मात्र भक्तीवादी असलेला भागवत संप्रदाय हळूहळू वाढू लागला होता. रामायण, महाभारतात आलेले बौद्ध मताचे खंडन (हे महाभारतात फारच विशेषाने आले आहे). कौटिल्य आणि बुद्धाच्या काळात साधारणत: ३५० वर्षांचे अंतर असले तरी बौद्धमताचा प्रसार प्रामुख्याने अशोकाच्या काळात वेगाने झाला. त्यामुळे त्याच्या काळात बौद्धमताचे खंडन फारसे नसावे. बुद्ध हा विष्णूचा अवतार किंबहुना राम कृष्णालाही विष्णूचा अवतार समजणे खूप उशिरा सुरू झाले, अन्यथा सुरुवातीच्या ब्राह्मणी लेण्यात ह्याचे प्रतिबिंब नक्कीच पडले असते.

In reply to by प्रचेतस

सोत्रि 18/02/2025 - 03:31
रामायण, महाभारतात आलेले बौद्ध मताचे खंडन (हे महाभारतात फारच विशेषाने आले आहे).
म्हणजे रामायण, महाभारत गौतम बुद्धाच्या नंतरच्या काळात घडले कि लिहीले गेले? - (कालखंड समजून घेण्यास उत्सुक असलेला) सोकाजी

In reply to by सोत्रि

प्रचेतस 18/02/2025 - 06:03
रामकथा आणि पांडवांची कथा प्राचीन काळात घडल्या, वाल्मिकी रामायण मात्र सरळसरळ इसवी सनाच्या आसपास दोन तीन शतक इकडे तिकडे लिहिलं गेलं तर महाभारतात इसवी सनाच्या आसपास पर्यंत भर पडत गेली इतकेच. व्यास, वैशंपायन, सौती असे ते वेगवेगळे कालखंड इतकेच.

In reply to by प्रचेतस

सोत्रि 18/02/2025 - 06:52
म्हणजे महाभारतात गीता नेमकी कोणत्या काळात लिहीली गेली हे नक्की सांगता येणार नाही? आणि मूळ गीतेतही भर पडली असल्याचे शक्यता नाकारता येत नाही, बरोबर? - (अतिउत्सुक) सोकाजी

In reply to by सोत्रि

प्रचेतस 18/02/2025 - 07:41
गीतेचा काळ नेमका कुठला हे नक्की सांगता येणार नाही, कदाचित पहिले तीन अध्याय व्यासप्रणित असावेत. मात्र ही शक्यता कमी आहे असे माझे मत आहे कारण गीतेच्या आधी असलेला एक अध्याय सोडून त्याआधीच्या अध्यायात खुद्द युधिष्ठिराला विषाद झालेला दाखवला आहे. बृहतीं धार्तराष्ट्राणां दृष्ट्वा सेनां समुद्यताम् | विषादमगमद्राजा कुन्तीपुत्रो युधिष्ठिरः || तेव्हा खुद्द अर्जुन युधिष्ठिराच्या विषादाचे निवारण करतो. त्यक्त्वाधर्मं च लोभं च मोहं चोद्यममास्थिताः | युध्यध्वमनहङ्कारा यतो धर्मस्ततो जयः || तेव्हा युधिष्ठिर युद्धास सिद्ध झाला असता अर्जुनासही लगोलग खेद व्हावा हे असंभाव्य वाटते. शिवाय गीतेतील श्रीकृष्णाने सांगितलेल्या श्लोकांची सुरवात ही 'श्री भगवान उवाच' अशी होते. हा तर भागवत संप्रदायाचा मुख्य आधारच म्हटला पाहिजे. अर्थात गीता जरी नंतरची असली असे माझे मत असले तरी ती अलीकडचीही नव्हे. कदाचित बुद्धपूर्वकालीन असू शकते कारण गीतेत येणारी सांख्य, योग, कर्म, ब्रम्ह या संकल्पना प्राचीन आहेत. मात्र काही ठिकाणी ती वेदांना छेद देतात.

In reply to by प्रचेतस

सोत्रि 18/02/2025 - 10:37
कदाचित बुद्धपूर्वकालीन असू शकते कारण गीतेत येणारी सांख्य, योग, कर्म, ब्रम्ह या संकल्पना प्राचीन आहेत. मात्र काही ठिकाणी ती वेदांना छेद देतात.
हे रोचक आहे! माझ्या काही इंटर्प्रीटेशनला हे पुष्टी देतंय. व्यनी करतो, व्यनितून बोलूयात. - (उत्साहित) सोकाजी

In reply to by प्रसाद गोडबोले

सोत्रि 26/02/2025 - 19:04
बुद्धाच्या अवताराबद्दल रोचक मत ऐकायला मिळाले. https://www.youtube.com/watch?v=ND_i9IihuZ8 व्हिडीओ एम्बेड करायचा प्रयत्न केला पण होत नाहीयेय. संपादक मंडळ काही मदत करू शकेल का? - (अभ्यासू ) सोकाजी

कॉमी 16/02/2025 - 12:11
यथा हि चोर: स‌ तथा हि बुद्धस्तथागतं नास्तिकमत्र विद्धि। तस्माद्धि य: श‌ङ्क्यतमः प्रजानाम् न नास्तिकेनाभिमुखो बुध: स्यात्।।2.109.34।। एक अवतार दुसऱ्या अवताराबाबत असे का बोलेल?

In reply to by कॉमी

इनपुट हेच आउटपुट देणाऱ्या, "अ न्युरल नेटवर्क विथ अ सिंगल डेटा पॉईंट" बेस्ड मॉडेल वरील मेंदूकडून, जास्त अपेक्षा करणे योग्य नाही .. त्यामुळे तुमच्या ह्या प्रश्नाचे "सयुक्तिक" उत्तर मिळेल याची अपेक्षा नाही ...

In reply to by आंद्रे वडापाव

इनपुट हेच आउटपुट देणाऱ्या, "अ न्युरल नेटवर्क विथ अ सिंगल डेटा पॉईंट" बेस्ड मॉडेल वरील मेंदूकडून, जास्त अपेक्षा करणे योग्य नाही
>>> Thank you so much !!! This is such a huge compliment. राम राम राम

In reply to by प्रसाद गोडबोले

अ न्युरल नेटवर्क विथ अ सिंगल डेटा पॉईंट फायनली ! https://youtu.be/c0yTIaNeEfw?si=xDdIyOKarHwqpaVL मन हें राम जालें मन हें राम जालें । प्रवृत्ति ग्रासुनि कैसें निवृत्तीसी आलें ॥१॥ श्रवण कीर्तन पादसेवन कैसें विष्णुस्मरण केलें । अर्चन वंदन दास्य सख्य आत्मनिवेदन केलें ॥२॥ यम नियम प्राणायाम प्रत्याहार संपादिले । ध्यान धारणा आसन मुद्रा कैसे समाधीसी आले ॥३॥ बोधीं बोधलें बोधितां नये ऐसें जालें । बापरखुमादेविवरु विठ्ठलें माझें मीपण हारपलें ॥४॥

In reply to by प्रसाद गोडबोले

ह्म्म ... तो णळस्टॉप चा "गिरीजा" आश्रम फ्लायओव्हरमुळे झाकला गेल्या असल्याने, अशी अवकळा पसरलीये तर ..

In reply to by आंद्रे वडापाव

काहीही कळलं नाही. अभंग ज्ञानेश्वर माऊलींचा आहे , माझा नाही. सिंगल डेटा पॉईंट वर न्यूरल नेटवर्क ट्रेन झाल्यावर त्यांनी लिहिलेला अभंग ! मन हेच राम झाले !! राम

In reply to by आंद्रे वडापाव

फोटो दिसत नाही. काही का असेन, तुम्हाला ऑलरेडी माहीत आहे ह्या न्यूरल नेटवर्क चे आऊटपुट काय असणार आहे ! राम

In reply to by आंद्रे वडापाव

>>>>>>> "गिरीजा" आश्रम फ्लायओव्हरमुळे झाकला गेल्या असल्याने, अशी अवकळा पसरलीये तर .. गिरिजा काकू अनाहिता आश्रमात डोकावून जायच्या म्हणे...=)) -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

अरे व्वा. सर, आपण आलात, आनंद झाला ! आपले प्रतिसाद फार मोलाचे आहेत आमचे न्यूरल नेटवर्क ट्रेन करायला ! असाच लोभ असू द्या. राम

In reply to by कॉमी

अवतार ह्या शब्दाची व्युत्पत्ती च अव+ तर अर्थात खाली उतरणे अशी आहे . शुद्ध ब्रह्म अनुभवातून खाली अर्थात ह्या जगाच्या रंगमंचावर उतरलेले लोक . ते काहीही बोलत असतात हो. खुद्द रामाला नावे ठेवणारा परीट काय रामा पेक्षा भिन्न होता का ? लक्ष्मणाने परशुरामाची मस्करी केलेली आहे, ते काय भिन्न होते का ? कृष्ण साक्षात भगवान आहे हे माहीत असताना ही गांधारी ने त्याला शाप दिलेला आहे . हे असं सगळं चालूच असतं हो ! ही सगळी लीला असते. तुमचे आकलन जेव्हा परिपक्व होते तेव्हा कळायला लागतं!!

एकदा तुम्ही द्वैत असे काही नाहीच असं मांडलं की मग पुढं बोलणंच खुंटलं. >>> बोलणं खुंटलंच आहे !! मला आत्ता कळलंय, माउलींनी तर स्पष्टच म्हणालं आहे की या शब्देविण संवादु, दुजेविण अनुवादु। हे तव कैसेनि गमें। परें ही परते बोलणे खुंटले। वैखरी कैसेनी सांगे।। बोलणं खुंटलेलेच आहे ! मी जितकं शब्दात पकडायचा प्रयत्न करतो तितका तो हातातून निसटतो ! गोरोबा काकांना - मातीत तो दिसतो, सावता माळी ह्यांना कांदा मुळा भाजी मध्ये तो दिसतो, नरहरी सोनार ह्यांना सोन्यात तो दिसतो, तोच मला न्यूरल नेटवर्क मधून दिसतोय, सिंग्युलारिटी मधून दिसतोय, फोरीये सीरिज मधून दिसतोय, सुपरपोझिशन मध्ये दिसतोय. आणि नाहीच शब्दात मांडता येत आहे. काय बोलू ? कसं सांगू ? सुचतंय तसं खरडत जाऊ... बाकी काय करू अजून !! राम पाया पडू गेले तव पाऊलची न दिसे उभा ची स्वयंभू असे समोर की पाठीमोरा न कळे थक ची पडिले कैसे !!

स्वधर्म 19/02/2025 - 21:13
सर, ते बुध्ड, वेदांत, आर्यसत्त्ये वगॅरे कूटप्रश्न आहेत. तुमच्या बुध्दाच्या विचारांविषयीची शंका पण रास्त आहे. तरी... >> ... रणरण फुफाट्यात डांबरी रस्त्यावर उभी आहे. पायात काही नाही , डोक्यावर काही नाही . अन्न अन्न करुन आई पाशी रडली असेल त्यामुळे चेहर्‍यावर सुकलेल्या अश्रुंचे डाग . बिचारी आई तिही हताश . आगतिक . आणि >> ४-५ वर्षाचा एक मुलगा . तसाच उन्हाने रापलेला काळा वर्ण , फाटके कपडे , हातात गाडी पुसायचे फडके . त्याच्या डोक्याला अन डोळ्यांना काही तरी लागले होते . त्याचा २५-२७ वर्षाचा बाप काहीतरी त्याच्या डोळ्यात घालत होता , बहुतेक स्वच्छ पाण्याने धुवत असावा . बाकी काय करु शकणार आहे ? या समाजातल्या भयाण वास्तव दु:खावर आपल्यापॅकी ९९% लोक काही करत नाहीत, करू शकत नाहीत, हे मान्य करतो. पण 'मी' काही करणार नाही, कारण... >>... नाथांचा गावाकडाचा वाडा कोणी जाळला नव्हता , नाथांची जमीन कोणी हडपली नव्हती की नाथांची इंजिनियरिंग किंवा मेडिकल करायची संधी कोणी हिसकावुन घेतली नव्हती . हे उदात्त वेदांत तत्वञानानुसार आहे का? मुळात ही दोन्हीही अन्याय आणि दु:खेच जरी असली, तरी त्यांची तुलना कदापी होऊ शकत नाही, हे तुंम्हाला तरी लक्षात यायला हवं होतं.

In reply to by स्वधर्म

माफ करा . माझे मराठी व्याकरण थोडे कच्चे आहे. एकापेक्षा दुसरे मोठे किंवा समान किंवा लहान असे काहीसे लिहिले असल्यास त्याला तुलना करणे असे म्हणतात असा माझा समज आहे. आणि माझ्या ह्या समजा नुसार मी कोणतीही तुलना केलेली नाही. माझ्यासाठी दुःख हे दुःख आहे ! तुम्ही उर्वरित लेख नीट वाचलात तर तुम्हाला कळेल की मी बुध्दाच्या मार्गावरून चालत दुःख आणि दुःखाच्या निर्मूलन करण्याच्या उपायांचा शोध घेत होतो. बुद्धाचं काही मला पटलं नाही , पण त्याची मदत खूप झाली, त्याच्या निमित्ताने मला माझे उत्तर सापडले आहे. आणि मी ते वर लेखात स्पष्टपणे लिहिलेही आहे ! तुम्हाला ते पटते की नाही ह्याच्याशी मला घेणे देणे नाही. इथे अनेक ठिकाणी माझ्या आधीच्या लेखाचा रेफरन्स घेऊन कॉमेंट्स आहे ते च पुनरेकावर म्हणतो. जे जे दुःख म्हणून मला भासत आहे त्या त्या ठिकाणी "राम" पाहणे हाच माझ्यासाठी एकमेव दुःख निर्मुलनाचा उपाय आहे ! राम खरेतर हेही प्रतिसाद देणार नव्हतो , पण तुम्ही प्रतिसाद नीट पाहिलेत तर तुमच्या लक्षात येईल की काही ठरावीक मोजक्या लोकांचे प्रतिसाद लेखन केंद्रित नसून व्यक्ती केंद्रित आहेत ! आणि म्हणूनच ह्या अशा प्रतिसादात "राम" पाहणे हा ही माझ्या उपायचाच एक भाग आहे ! म्हणूनच आपल्या प्रतिसादाबद्दल मन:पूर्वक धन्यवाद ! असाच लोभ असू द्यावा ही नम्र विनंती ! राम

In reply to by प्रसाद गोडबोले

सोत्रि 20/02/2025 - 21:52
तुम्ही उर्वरित लेख नीट वाचलात तर तुम्हाला कळेल की मी बुध्दाच्या मार्गावरून चालत दुःख आणि दुःखाच्या निर्मूलन करण्याच्या उपायांचा शोध घेत होतो. बुद्धाचं काही मला पटलं नाही
१. लेखात नेमकं कुठे बुध्दाच्या मार्गावरून चालत गेल्याचा उल्लेख आला हे मिळालं नाही. कोणता मार्ग आणि कसा वापरला हे ही लेखात नाही. २. लेखाचा गाभाच विकिपीडीया वरच्या चुकीच्या माहितीवर आधारलेला आहे त्यामुळे बुध्दाच्या चुकीच्या मार्गावरून चालत जाणे झाले असावे आणि दुःख आणि दुःखाच्या निर्मूलन करण्याच्या उपायांचा शोध लागला नसावा. ३. ज्या बुद्धाला नववा अवतार मानलं आहे त्या अवतरी पुरुषाचे काहीच पटलं नाही हे अतर्क्य आहे. एकतर तो अवतरी नसवा किंवा त्याच्या अवताराचे आकलन नीट करून घेतल्याचे दिसत नाहीयेय. - ('हे राम' म्हणावेसे वाटणारा) सोकाजी

In reply to by सोत्रि

हां तेच! मीही राम म्हणत आहेच ! कुठं सगळं लिहित बसू . माझं मला कळलं आहे की दुःखाचे कारण तृष्णा नाहीये, दुःखाचे कारण अज्ञान , अज्ञानाचा भास हे आहे. त्यामुळे त्याचा निर्मुलनाचा उपाय म्हणजे अज्ञान खंडन हा आहे ! ( योगायोगाने आता तेच ऐकत होतो, अध्याय सातवा अज्ञान खंडन. :) ) अवतार ह्या शब्दाची व्युत्पत्ती आधीच देऊन झाली आहे , कुठं परत परत तेच ते लिहित बसू. परशुरामाचं सगळं रामाला पटलं नाही रामाचं सगळं कृष्णाला पटलं नाही कृष्णाचं सगळं बुद्धाला पटलं नाही बुद्धाचं सगळं मला पटलं नाही आणि माझं सगळं तुम्हाला पटलं नाही, ( पटावं असा माझा अट्टाहासही नाही.) पण त्यामुळे आपल्या "अवतारपणाला" छेद जात नाही ! आता हेही तुम्हाला पटो की न पटो. कोणालाही काय फरक पडतो! जळ तरंगीं दोहीं । जळावांचूनि नाहीं । म्हणौनि आन कांहीं । नाहीं ना नोहे ॥ पाणी म्हणा की पाण्यावरचे तरंग म्हणा, त्याने पाणीपणाला छेद जात नाही. राम

In reply to by प्रसाद गोडबोले

सोत्रि 21/02/2025 - 06:03
त्यामुळे त्याचा निर्मुलनाचा उपाय म्हणजे अज्ञान खंडन हा आहे !
बिन्गो!
आता हेही तुम्हाला पटो की न पटो. कोणालाही काय फरक पडतो!
मला तुम्हाला काही पटवून द्यायचे नाही किंवा काही पटवून घ्याचे नाही. तुमच्या #२ डिस्क्लेमरमधे असलेल्या, "हा लेख लिहिताना जमेल तितकी तथ्ये आणि संदर्भ वापरण्याचा प्रयत्न केला आहे तथापि काही तथ्येच चुकीच्या शब्दात उधृत केलेली असतील तर आपण जरुर माझ्या निदर्शनास आणुन द्यावीत ही नम्र विनंती", ह्या विनंतीनुसार मी काही चुकीची तत्थ्य निदर्शनास आणुन देण्यासाठी प्रतिसाद देतोय. मला जाणवलेले मुद्दे: १. "हा लेख नेहमीप्रमाणेच स्वान्तःसुखाय आहे. इथे कोणाला काहीही पटवुन द्यायचे धोरण नाही कि कोणाचे काहीही मत खंडन करावयाचा विचार नाही." ही सुरुवात असल्याने लेख त्यानुसारच वाचला होता. सगळा लेख स्वःताशी हितगुज करत चिंतनपरच होता. पण शेवटच्या परिच्छेदात एकदम "तस्मात् आता आपल्यासाठी चार आर्य सत्ये अशी आहेत" आणि "तूम्ही मुळातच ह्या दु:ख्याच्या भासातुन सुटलेलेच आहात !" असा एकदम निकाल देऊन, वैयक्तिक चिंतनाच्या पलीकडे जाउन पहिल्याच डिस्क्लेमरला व्यत्यास दिला गेला. २. तुमचा लेख जरी स्वान्तःसुखाय असला तरीही तो पब्लिक फोरमवर प्रकाशित केलेला आहे. आणि, तो त्याच्या मेन टॉपिक, चार आर्यसत्य, यांच्यावर लिहीला असल्याने, त्या चार आर्यसत्यांच्या प्रामाणिक अभ्यासाने जर शेवटचा परिच्छेद आला असता तर वैयक्तिक मत म्हणून पुढे जाता आले असते. पण मेन टॉपिकच चुकीच्या चार आर्यसत्यांचा आधार घेत लिहीला आहे. त्यामुळे, संपूर्ण लेख, तुमच्याच एका प्रतिसादात तुम्ही म्हटल्याप्रमाणे ''पूर्वग्रह दूषित शब्दांचा कचरा" ठरतो. पण त्याचे निर्मूलन अज्ञान खंडन आहे, हे तुमच्या ह्या प्रतिसादात आले आहे, सो बिन्गो!! ३. दु:ख, तृष्णा ह्याविषयी नेमकं काय विवेचन आहे ह्यासाठी संदर्भग्रंथ: विभंगसुत्त, साम्युत्त निकाय (SN 12.2). त्यात सग़ळी साख़ळी अज्ञातून सुरू होते आणि ती साखळी कशी तोडायची ह्याचा मार्ग दिलेला आहे आणि त्याचं सार म्हणजे चार आर्यसत्य (धम्मचक्कप्पवत्तन सुत्त (Dhammacakkappavattana Sutta) – सुत्त पिटक, साम्युत्त निकाय (SN 56.11). - (अज्ञानाचा पडदा दूर करण्याच्या प्रयत्नात असलेला) सोकाजी

In reply to by सोत्रि

पूर्वग्रह दूषित शब्दांचा कचरा >>> हा संदर्भ पाहून "मारुतीचे शेपूट गणपतीला चिकटवणे" हा वाकप्रचार आठवला ! तो कोणाच्या लेखावरचा प्रतिसाद आहे, त्या लेखातील विषय काय ! सगळाच आनंद आहे ! =)))) पण असो. मुळात दुःख आहे हेच अज्ञान आहे, कारण दुःखाची अनुभूती करणारा देहाशी तादात्म्य भाव . हे झाले माझे आकलन. आता बुध्दाने दुःख तृष्णा ची सग़ळी साख़ळी अज्ञातून सुरू होते आणि ती साखळी कशी तोडायची ह्याचा मार्ग दिलेला आहे. मग अर्थाअर्थी मला जे साधायचं होतं आणि बुध्दाने जे ध्येय साधलं ते एकच झालं की !!! भले मग त्याचे आकलन अन् माझे आकलन समान नसेल ! त्याने काय फरक पडतो ! तुम्ही कोणताही मार्ग स्वीकारा, एकदा का तो स्वीकारला की तूम्ही मुळातच ह्या दु:ख्याच्या भासातुन सुटलेलेच आहात ! तुम्हाला अजून शंका असेल तर मात्र तुम्ही अडकलेले आहात. आणि काही माझा नवीन धर्म सुरू करून धर्म चक्र परिवर्तन वगैरे करणार नाहीये ! त्यामुळे माझे मत मला कोणाला पटवून द्यायची गरज भासत नाही. अर्थात तरीही मी जास्तीत जास्त प्रयत्न करत राहतोच टेक्निकली अक्युरेट राहायचा. पण ते माझ्यावर बंधन नाही, it's just a choice. तात्पर्य इतकेच की दुःखाचे मूळ कारण अज्ञान आहे, त्याचे खंडन झाले की बस. मग तुम्ही ते कोणत्याही मार्गाने करा. तुम्हाला असे म्हणायचे असेल की अष्टांगिक मार्ग हाच एकमेव मार्ग आहे किंवा, माझी स्वतंत्र विचार शृंखला चुकीचा मार्ग असल्याने अज्ञान खंडन करू शकत नाही वगैरे वगैरे ... तर ठीक आहे . :))))

In reply to by प्रसाद गोडबोले

हे लिहायचं राहूनच गेले... (अज्ञानाचा पडदा वगैरे काही भानगड च नाही, कारण मुळात अज्ञानच नाही हे लक्षात आलेला अन् त्या अनुभूतीत राहण्याचा प्रयत्न करीत असलेला) प्रसाद गोडबोले

In reply to by प्रसाद गोडबोले

परशुरामाचं सगळं रामाला पटलं नाही रामाचं सगळं कृष्णाला पटलं नाही कृष्णाचं सगळं बुद्धाला पटलं नाही बुद्धाचं सगळं मला पटलं नाही
ते बाकीचं सोडा हं, पण बोलता बोलता गोडबोले पंतांनी , स्वतःला रामाच्या मांदीआळींत आपसूकच ठेवलाय पहा ... परशुराम > राम > कृष्ण > बुद्ध > गोडबोले >> हे राम r

In reply to by आंद्रे वडापाव

आपसूकच
आपसूकच आहे हो ते. =)))) कधी पासून तेच तर सांगतोय मी . आणि मीच काय , तुम्हीही त्याच मांदियाळीत आहात ! तत्त्वमसि. तुकोबा त्यांच्या अभंगात म्हणाले तसे काहीसे आहे हे - महावाक्य ध्वनी बोंब झाली. आता तुम्हाला आम्ही बोललेले ऐकू येत नाहीये , किंवा तुम्ही ऐकून न ऐकल्यासारखे करताय, किंवा ऐकून घ्यायच्या आधीच नळ स्टॉप वगैरे काहीतरी बाष्कळ लिहायला घेताय, तर त्याला मी काय करू ! अजून किती वेळा सांगायचं =)))) बापरखुमादेविवरु विठ्ठलें माझें मीपण हारपलें ॥ हे मी वर एका प्रतिसाद आधीच म्हणालो आहे , तुम्ही त्यावर उत्तरप्रतिसाद ही दिला आहे , तेव्हा नाहीत का वाचले हे ? की तेव्हा वाचून अर्थ लागला नव्हता ? काही हरकत नाही, आता अर्थ लागला आहे ना , मग झालं तर !! तत्त्वमसि राम

In reply to by प्रसाद गोडबोले

ज्ञानदेवे रचिला पाया ! तुका झालासे कळस !! D संतकृपा झाली । इमारत फळा आली ।। ज्ञानदेवे घातला पाया । उभारिले देवालया ।। नामा तयाचा किंकर । तेणे केला हा विस्तार ।। जनार्दन एकनाथ । खांब दिला भागवत ।। तुका झालासे कळस । भजन करा सावकाश ।। बहेणी फडकते ध्वजा । निरुपण आले ओजा ।। हे वेदांताचे, अद्वैत दर्शनाचे मंदिर दुसऱ्या तिसऱ्या कोणा देवाचे नाहीये, त्यातील देव दुसरा तिसरा कोणी नसून तूच आहे ! तत्त्वमसि. :)

In reply to by प्रसाद गोडबोले

स्वधर्म 24/02/2025 - 15:56
मूळ मुद्दा बाजूला सरकवू नका! तो असा आहे: का माझ्या मनात नाथांसारखा करुणभाव उत्पन्न होत नाही ? का नाही मी जवळ जाऊन त्या लेकराला कडेवर घेत ? त्याचे अश्रु पुसत ? का नाही त्याला दोन घास भरवत ? नाथांची गोष्ट निराळी होती - नाथांच्या गावाकडाचा वाडा कोणी जाळला नव्हता , नाथांची जमीन कोणी हडपली नव्हती की नाथांची इंजिनियरिंग किंवा मेडिकल करायची संधी कोणी हिसकावुन घेतली नव्हती . बघ बघ अजुनही तुझा जीव त्या जुनाट दु:खाने तळमळतो आहे . का ?>> आणि त्यावर तुंम्ही काही करणार नाही, कारण... तुमचा जीव 'त्या' जुनाट दु:खाने तळमळतो आहे तुमचं सगळं तर नीट चाललेलं आहे. पण एवढी गहन अगदी हिमालयात जाऊन साधना करुन, वेदांत, गीता, तुकारामाचे अभंग मुखोद्ग्त असून... रस्त्यावरच्या अ़क्षरशः काहीही न मिळालेल्या निरागस मुलांना, माणसाला पाहून, तुमचा जीव 'त्या' जुनाट दु:खाने तळमळतो आहे, अशी स्पष्ट कबुलीच दिली आहे तुंम्ही. माझे अनेक उच्चवर्णीय मित्र काहीही साधना न करता, सहजपणे, पिढ्यानपिढ्या शोषित समाजाला आज राज्यघटनेमुळे जी शिकण्याची संधी मिळाली, तिचा स्विकार करतात. त्यांना नाही असं जुनाट दु:ख होत. अशा प्रकारे, शब्दांचा कीस काढून, ज्ञान(?) मिळवूनही तुंम्हाला हे पचवता येत नाही, त्यामुळे त्या ज्ञानाचा उपयोग काय, हा खरा मुद्दा आहे.

In reply to by स्वधर्म

स्वधर्म 24/02/2025 - 16:21
वेदांत गीता वगैरे अध्यात्म चिंतन अपराधभावातून सुटका करण्यासाठी खूप मदत करते. गांजलेल्यांसाठी पटकन काहीतरी करण्यापेक्षा त्यावर चिंतन, मनन, वाचन, चर्चा इ. केली की काहीतरी केल्याचे समाधान मिळते. किमान मी किती संवेदनाशील आहे, असे म्हणून घेता येते. काही नास्तिक लोक अध्यात्माला 'गिल्ट मॅनेजमेंट टूल' असे म्हणतात. एकदा पूर्वजन्म, प्रारब्ध इ. मान्य केले, की ते आता त्या अवस्थेला का आहेत, याचे समाधानकारक उत्तर मिळते व आपल्याला काही करण्याचे कारण रहात नाही. त्यामुळे मध्यमवर्गीयांत अध्यात्माचा छंद वाढीस लागला आहे. बुध्द चिंतन, मनन याला महत्व न देता करूणेला महत्व देतो.

In reply to by स्वधर्म

हे बघा, मला अजून एक साक्षात्कार झाला आहे की मी काहीही लिहिलं तरी ते काही लोकांना पटणारे नाहीये च. अगदी 1+1 = 2 लिहिलं तरीही पटणार नाहीये . बुध्द करुणेला महत्त्व देतो तर ह्या देशातील करोडो बुध्दाचा मार्ग अवलंबन करणाऱ्या लोकांवर माझा विश्वास आहे की ते त्या निरागस निष्पाप लेकरांना उचलून कडेवर नक्की घेतील ! मी आमच्या न्यायाची प्रतीक्षा पहात राहीन , आमचे आपलं गिल्ट मॅनेजमेंट टूल इम्प्रोव करत राहीन ! बाकी गावाला वाडा परत बांधला की नक्की सुरू करेन ह्या अशा अनाथ मुलांसाठी काहीतरी ! बाकी बास आता , कंटाळा आला ह्या इथे लिहायचा. सध्या मॅडम ने जे भाषण दिले त्यावर मनोरंजन करत आहे , तस्मात् तिथं बोलू =))))

In reply to by स्वधर्म

ज्ञानाचा उपयोग हाच आहे की दुःख असं काही नाहीये , आहे हा दुःखाचा भास आहे, त्या भासाचे कारण आपली द्वैताविषयीची ठाम धारणा ही आहे. हे लक्षात येणे !! एकदा जे आहे ते सगळं "परफेक्ट" आहे. हे लक्षात आलं एकदा ज्याला आम्ही कर्म विपाक म्हणतो , तुम्ही गिल्ट मॅनेजमेंट टूल म्हणता, ते एकदा जमलं की ह्या विश्वातील प्रत्येक गोष्टीचे परफेक्ट असणे, जे जसे आहे ते तसे असणे हे परफेक्ट आहे हे लक्षात येतं. आणि मग झोपेतून जागे झाल्यावर निद्रा आपोआप नाश पावते तसे काहीसे दुःख आपोआप नाश पावते. अजून काय उपयोग हवा ! मला जे आमचे जुनाट दुःख टोचत होते त्याचा कार्यभाग साधला गेला आहे ! आता दुःख असं काही नाही. :) आता तुम्ही म्हणाल की मग कसल्या न्यायाची वाट पाहताय ? तर त्याचेही उत्तर असे आहे की हे "न्यायासाठी झुरणे" हा ही आमच्या पूर्व कर्माचा भाग आहे , तो बस भोगून संपवत आहे. आता दुःख असे काही नाही ! आता बस राम आहे ! इथे मला तुकोबांचा एक अभंग आठवतो पण तो खूप मोठ्ठा असल्याने इथे लिहित नाही फक्त शेवटची ओळ लिहितो आतां आहे तैसा दिसतो विचार । पुढील प्रकार देव जाणे ॥१८॥ भक्ता नारायण नुपेक्षी सर्वथा । कृपावंत ऐसा कळों आलें ॥१९॥ तुका म्हणे माझें सर्व भांडवल । बोलविले बोल पांडुरंगें ॥२०॥ पांडुरंग बुद्धी देतोय तसं बस लिहित राहतोय मी ! राम कृष्ण हरी आता इतकं पुरे. पुढील चर्चा नवीन लेखावर !

In reply to by प्रसाद गोडबोले

स्वधर्म 25/02/2025 - 18:21
लेख १५ फेब्रुवारीला २०२५ टाकला आहे. त्यात तुमच्या जुनाट दु:खाचा उल्लेख आहे. माफ करा, पण माझा तुंम्हाला वेदांत व अध्यात्माचे ज्ञान खूप आधीच झाले होते, असा समज होता. कारण ३० सप्टेबर २०२४ च्या 'सूर्य पाहिलेला माणूस' या लेखात आपण खालील वाक्ये लिहीली होती: आज्जींने माझ्या हातात न्याहारीसाठी केलेल्या गोडाच्या शिऱ्याची वाटी दिली आणि आजोबांकडे बघून म्हणाली: " हे पहा आला तुमचा सूर्य पाहिलेला माणूस !" आणि हसत हसत आज्जी स्वयंपाक घरात निघुन गेली. नानांनी माझ्याकडे वळुन पाहिलं नाही मात्र त्यांच्या चेहर्‍यावर समाधानाचं हसु मात्र उमटलं. तुमचा ६ जून २०२४ च्या 'परत एकदा हिमालयाच्या कुशीत - ५ संपुर्ण.' लेखात स्वामीजींनी आपल्याबाबत खालीलप्रमाणे भाष्य केले होते: स्वामीजी म्हणाले - You explained it the best. आणि नंतर गालातल्या गालात हसत म्हणाले - It took me 20 years to understand this and you got it in just 7 days' shivir ! दोन्ही तुमच्या स्वतः बद्दलचे उल्लेख वाचून कोणाचाही समज होईल की तुंम्हाला ते तथाकथित ज्ञान खूप आधीच झालेले आहे. म्हणूनच माझाही तसाच समज झाला होता. पण १५ फेब्रुवारी २०२५ ला मात्र तुमचे वर्षानुवर्षांचे जुनाट दु:ख अजून छळत असल्याचा उल्लेख आला. तसेच आपण बुध्दाने सांगितलेले दु:खाचे कारण चूक असल्याचे व तुमचे ज्ञान मात्र बरोबर असल्याचे प्रतिपादन केले आहे. अर्थात लेख लिहीपर्यंत तुमची दु:खे तशीच होती, पण लेख लिहिल्यानंतर ते आज अशा दहा दिवसात ती दूर झाली, हे आपण स्पष्ट केले ते खूप चांगले झाले. बाकी ती रस्त्यावरची मुले, त्यांचे दीनवाणे आईबाप यांच्या दु:खाबाबत... असो.

हा धागा नि प्रतिक्रिया माझ्या समजापलीकडील आहेत त्या पेक्षा मी मशीन डिसाइन अजून दोन वेळा वाचून घेईन. फक्त प्रश्न असाय की ह्या धाग्याच्या शेवटी जो फोटोय तो गोडबोले साहेबांचा आहे का?

In reply to by अमरेंद्र बाहुबली

फक्त प्रश्न असाय की ह्या धाग्याच्या शेवटी जो फोटोय तो गोडबोले साहेबांचा आहे का? ----- लोचट माणसाचा मनोरंजक प्रतिसाद...

In reply to by अमरेंद्र बाहुबली

फक्त प्रश्न असाय की ह्या धाग्याच्या शेवटी जो फोटोय तो गोडबोले साहेबांचा आहे का?
आहा! तो फोटो रमण महर्षी ह्यांचा आहे ! मी बस तसे व्हायचा प्रयत्न करत आहे , किंबहुना , होतो !
होतो !
याचसाठी केला होता अट्टाहास । शेवटाचा दिस गोड व्हावा ॥१॥ आतां निश्चितीनें पावलों विसांवा । खुंटलिया धांवा तृष्णेचिया ॥ध्रु.॥ कवतुक वाटे जालिया वेचाचें । नांव मंगळाचें तेणें गुणें ॥२॥ तुका म्हणे मुक्ति परिणिली नोवरी । आतां दिवस चारी खेळीमेळीं ॥३॥ मन:पूर्वक धन्यवाद ! I don't have words to thank you enough ! माझे डोळे अक्षरश: पाणावले तुमचा प्रतिसाद पाहून. __/\__

In reply to by प्रसाद गोडबोले

अच्छा! मन:पूर्वक धन्यवाद ! I don't have words to thank you enough ! मी बस तसे व्हायचा प्रयत्न करत आहे , किंबहुना , होतो ! तुमची अध्यात्मिक प्रगती अशीच राहिली तर तुम्हीही त्यांच्या सारखे व्हाल! _/\_

In reply to by अमरेंद्र बाहुबली

"तुम्हीही त्यांच्या सारखे व्हाल..." म्हणजे कसे? दिसायला की त्यांच्या सारखे ज्ञानी.... गाळलेल्या जागा नीट भरावी... इतपत तरी ज्ञान हवे....

In reply to by अमरेंद्र बाहुबली

लेखकाची सर्व मतं न कळण्यासारखीच आहेत. स्वतःच विचारांचा गुंता करुन ठेवलाय अर्थात सगळं गिचमीड. आणि नाहीच कळलं तर, तुम्ही ज्ञानेश्वरांच्या किंवा तुकारामांच्या किंवा अर्जूनाच्या पायरीवर आलं पाहिजे. म्हणजे तेथून तुम्हाला लेखांतील ज्ञानकण आणि कृष्णाला काय म्हणायचं आहे ते समजू लागतं. स्वांतसुखायच्या नावाने दुसरं गेट ऑलरेडी बंद करुन टाकलंय. मला जे कळलंय ते अत्युच्च पायरीवरचं आहे. आणि त्या पायरीला पकडायचं तर, खाली मान घालून चालू पडा. =)) ऐसें कैसें झाले भोंदू। कर्म करोनि म्हणती साधु ।। अंगा लावुनिया राख। डोळे झांकूनि करिती पाप ।। दावूनि वैराग्याची कळा। भोगी विषयांचा सोहळा ।। तुका म्हणे सांगों किती। जळो तयांची संगती ।। -दिलीप बिरुटे -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मन:पूर्वक धन्यवाद सर ! माझे लेखन तुम्हाला कळो न कळो, माझी काही हरकत नाही, तुम्ही फक्त असेच लक्ष असू द्या आमच्यावर ! आतां माझा सर्वभावें हा निर्धार । न करीं विचार आणिकांचा ॥१॥ सर्वभावें नाम गाईन आवडी । सर्व माझी जोडी पाय तुझे ॥ध्रु.॥ लोटांगण तुझ्या घालीन अंगणीं । पाहीन भरोनि डोळे मुख ॥२॥ निर्लज्ज होऊनि नाचेन रंगणीं । येऊं नेदी मनीं शंका कांहीं ॥३॥ अंकित अंकिला दास तुझा देवा । संकल्प हा जीवा तुका म्हणे ॥४॥ राम

In reply to by आंद्रे वडापाव

आज काय सुट्टी आहे काय आंद्रे ? =)))) माझं काम कालच संपलं असल्याने मलाही वेळ आहे आज. थांबा, आमच्या दुसऱ्या लेखनाच्या धाग्यावर या , तिकडे तुला जास्त "रोचक" विषय देतो गप्पा मारायला. =))))

In reply to by प्रसाद गोडबोले

लेखन कळायचा विषयच नाही. लेखन मांडणी सगळीच गंडलेली आहे. ( कायमच तशी असते ) प्रतिसादांमुळे जी जाणीव होते. आनंद असो की दु;ख असे काहीच जर नसते तर तातडीने दाद द्यायला आलाच नसता. हे जे जाणवते त्याला भास नाही म्हणत ती प्रत्यक्ष जाणीव असते. =)) ( वाह सर वाह.) आई गं....! =)) -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

लेखन मांडणी सगळीच गंडलेली आहे. ( कायमच तशी असते )
ह्यातच आलं सगळं सर ! एकदा का तुम्ही हे मान्य केले आहे आता मग मी लिहिलेले तुम्हाला कळणे न कळणे हा विषयच रहात नाही ना ! =)))) मी ते गट १ गट २ म्हणालो होतो, ते पटलेलं दिसतंय तुम्हाला. कारण मी काहीही लिहिलं तरी तुमच्या लेखी ते गंडलेली मांडणी असेच असणार आहे . =)))) पण ह्या निमित्ताने तुम्ही तुकोबांची गाथा वाचता, रामाचं नाव घेता ह्यातच मला समाधान आहे, मी आधीही म्हणालो आहेच की हे ! बाकी कोणाला नाही पण तुम्हाला तातडीने साद द्यायला मी कायम हजर आहे कारण, तुमच्या प्रतिसादात राम पाहणे हीच माझी परीक्षा आहे. राम

In reply to by प्रसाद गोडबोले

काळजी घ्या. जपा. बडबडणे वाढले आहे. त्यासाठी सांगावे लागते. आपलं ते स्वांतसुखायवालं डिस्क्लेमर पुन्हा पुन्हा वाचा. =)) -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

बघा सर, मी आत्ताच म्हणालो होतो की नै, तुमच्या प्रतिसादांचा मला सगळ्यात जास्त फायदा होतो !! तुमचा हा प्रतिसाद मला काय भारी वाटलं काय सांगू. हीच अवस्था तुकोबांची झाली होती ... माझी मज झाली अनावर वाचा । विषयीं विसर पडिला निःशेष । अंगीं ब्रम्हरस ठसावला ॥१॥ माझी मज झाली अनावर वाचा । छंद या नामाचा घेतलासे ॥ध्रु.॥ लाभाचिया सोसें पुढें चाली मना । धनाचा कृपणा लोभ जैसा ॥२॥ तुका म्हणे गंगासागरसंगमीं । अवघ्या जाल्या ऊर्मी एकमय ॥३॥ ह्या प्रतिसादातून, आपल्याशी संवादातून मला सुखच मिळत आहे सर !!

In reply to by प्रसाद गोडबोले

आपल्याशी संवादातून मला सुखच मिळत आहे सर !! =)) सुख असं काही नसतं. तो सुखाचा भास आहे. तो तुम्हाला कृपास्वरुप लाभलेला आहे. =)) मरतंय आज हसून हसून.... =)) -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सुख असं काही नसतं. तो सुखाचा भास आहे.
हे चुकलं बघा सर. होईल जाला अंगें देव जो आपण । तयासी हे जन अवघे देव ॥१॥ येरांनीं सांगावी रेमट काहाणी । चित्ता रंजवणी करावया ॥ध्रु.॥ धाला आणिकांची नेणे तहान भूक । सुखें पाहें सुख आपुलिया ॥२॥ तुका म्हणे येथे पाहिजे अनुभव । शब्दाचे गौरव कामा नये ॥३॥ दुःख हा भास आहे , सुख हा आभास नव्हे, दुःखाचा अभाव हेच सुख आहे . सुखें पाहें सुख आपुलिया असे काहीसे आहे हे ! पण ही अनुभवाची बाब आहे , बघा अनुभवला आले तर !!

In reply to by प्रसाद गोडबोले

>>>> हा लेख नेहमीप्रमाणेच स्वान्तःसुखाय आहे. इथे कोणाला काहीही पटवुन द्यायचे धोरण नाही कि कोणाचे काहीही मत खंडन करावयाचा विचार नाही. उगाच अभंग टाकून काहीही पटवून द्यायचा प्रयत्न करु नये. आणि गंडलेली मतं लादू नये. =)) -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

अहो , तुम्ही प्रतिसाद वाचत तरी आहात का नाही . मी म्हणालो की हा अनुभवाचा मामला आहे. हे पटवून देण्यासारखे नाहीच. अनुभवगम्य गोष्टी शब्दांनी कशा पटवून देता येतील ? किमान एकदा वाचा तरी प्रतिसाद उत्तर द्यायच्या आधी ! तुका म्हणे येथे पाहिजे अनुभव । शब्दाचे गौरव कामा नये !!

कॉमी 21/02/2025 - 21:19
मला अजूनही कुठेतरी गफला वाटतो ब्वा. म्हणजे सगळे ब्रह्म आहे, आयुष्य माया आहे, सगळे भ्रम आहे असे सगळे पटले तरी सगळी दिनचर्या मोर ऑर लेस पूर्वीसारखी कशी राहणार? अजूनही कुटुंबं वत्सल वैगेरे कसे राहणार? (कारण तुमचे कुटुंबं पण एक भ्रमच की. सगळे ब्रम्ह आहे. मग कुटुंबं काय आणि रस्त्यावरचा दगड काय एकच. हे मला पटत नाही मी फक्त लॉजिकल एक्सट्रापोलेशन करतोय.) मग वरवरचे बोलण्यातले, अविरभावातले फरक वगळता बाकीचे आहे तसे कसे चालेल ब्वा? एक फँटसी झाकायला आणखी चार फँटॅस्या उभ्या करायला लागतात. उदा - जर सगळे ब्रम्ह आहे तर भ्रम किंवा माया कशामुळे? संचित कर्म कशामुळे? जितके प्रश्न पडतील तितकी डिटेल्ड फँटॅस्टिक उत्तरे मिळत जातात. प्रत्येक उत्तर आदल्या प्रश्नापेक्षा कमी आणि कमी तपासण्याजोगे असते. सरते शेवटी उत्तर असते की आपल्याला अनुभव आला तरच विश्वास ठेवा. बरं अनुभव कसे मिळतात? तर तुमच्या भौतिक शरीरानेच. म्हणजे तुमचे शरीर म्हणजे तुम्ही नाही हे समजण्यासाठी शरीराकडून अनुभव मिळवावा लागतो. इथे "लीला" हा प्रकार पण ऍड्रेस करतो. राम तथागत बुद्धाबद्दल प्रतिकूल बोलतो. हे दोघेही अवतार असतील तर हे कसे? उत्तर आले लीला. म्हणजे परमेश्वर स्वतःशी खेळ खेळतोय. परमेशवर म्हणजे ब्रह्मच म्हणजे तुम्हीच हा. हे म्हणजे बॉयलर उत्तर झाले. ह्यापुढे विचार करायची गरज संपली, सगळे ड्रामा, लीला मध्ये राईट ऑफ मारता येते. ह्याची इतरधर्मीय तुलनात्मक उदाहरणे पण आहेत. ख्रिषचन म्हणतात येशू सर्व विश्वाच्या पापांसाठी सुळावर चढला. बरं, पण ते ट्रिनीटी हया संकल्पनेवर पण विश्वास ठेवतात. God is a single entity made of three person किंवा असेच काहीतरी. हे देखील लिमिटेड "अद्वैत" टाईप आहे- म्हणजे निखालस अर्थहीन आणि तर्कहीन. ते असो. पण ते ट्रिनीटी मानतात म्हणजे असे मानतात की याहवे (म्हणजे येशूचे वडील, आकाशातला बाप्पा), देवाची आत्मा आणि येशू (फादर सन अँड दी होली स्पिरिट) हे एकच देवाचे तीन अंग आहेत. पण हे तिघे भिन्न पण आहेत. बरं. मग पाप पुण्य कोणी बनवले? तर देवाने. पाप करण्यास सक्षम माणसे कुणी बनवली? देवाने. पाप माफ कोण करणार? देव. माफिसाठी टॉर्चर आणि बळी कुणाचा? देवाचाच! ही सगळी भानगड कशासाठी? ख्रिषचन म्हणतात की देवालाच माहित. त्यांना कोणीतरी "लीला"ची टीप द्यायला हवी. हा गफला सर्व अब्राहमिक धर्मात आहे. पापक्षम माणसे, पापांची व्याख्या, आणि पापांचा निवाडा सगळे एकच देव करतो, का? कशासाठी? पाप शक्यच नाही असे जग का नाही बनवले? तळटीप - माझे आवडते लेखक जे आर आर टोलकीन ह्यांनी त्यांच्यापरीने वरील प्रश्नाचे उत्तर दिले आहे. लॉर्ड ऑफ द रिंग्सच्या विश्वाचा निर्माता परमेश्वर आहे एरू इलूवितार. तो त्याच्या विचारांनी इतर देवता- व्हॅलार बनवतो. आणि व्हॅलार आणि तो मिळून एक सुरेख गीत गाऊ लागतात. पण, त्यात इलूवितारनेच बनवलेला एक व्हॅलार - मॉरगॉथ, स्वतःची वेगळी धून गाऊ लागतो, जी इलूवितारच्या संगीताशी विसंगत असते. इतर काही व्हॅलार त्याला सामील होतात. दोन गीतांमधल्या संघर्षात इलूवितारचे गीत जवळपास विरून जाते. पण इलूवितार एक असा सूर पकडतो की संबंध अवकाश त्याने भरून जाते. मग इलूवितारणे मॉरगॉथला बनवलेच का? तर दोन गीतांमधल्या संघर्षामुळे इलूवितारचे गीत आणखी सुरेख झाले. हे लिखाण सुरेख आहे. टोलकीन साहेबांना दाद द्यावी तितकी कमी. पण हे स्वीकारण्यासारखे स्पष्टीकरण आहे का? केवळ शब्दांच्या करामतीने प्रभावीत होऊन काय खरे काय खोटे ठरवणे कितपत बरोबर?

In reply to by कॉमी

कॉमी 21/02/2025 - 21:28
हे काही टोलकीन साहेबाचे स्वतःचे विचार नाहीयेत. सैतान हा केवळ देवाच्या हुकूमशाहीला कंटाळून बंड करणारा देवदूत आहे ही जुनी संकल्पना आहे. मिल्टनचे सुप्रसिद्ध काव्य पॅराडाईज लॉस्ट मध्ये सुद्धा तीच कल्पना मध्यवर्ती आहे. त्या काव्यातला सैतान एक अत्यंत चर्चले गेलेले पात्र आहे. ते पात्र नायक म्हणून वाचले जाणे सुद्धा सहज शक्य आहे. सिनेमा-टीव्ही मधला दुष्ट शैतान इथे नाहीये - तर परमेश्वर जे ठरवतो तेच चांगले, आणि त्यामुळे त्याविरुद्ध बंड करणारा वाईट - असा हा सैतान आहे.

सगळे ब्रह्म आहे, आयुष्य माया आहे, सगळे भ्रम आहे. पण १९४८ ला जाळलेला वाडा खरा आहे... जग माया आहे, आणि आपण लालसा वासना जगाने सोडून दिली पाहिजे... पण तथाकथित हडपले गेलेली जमिनीची हाव आम्ही मात्र सोडणार नाही.... आधी पिढ्यानपिढ्या ओरबाडून घेतलेले आणि पूर्वापार बापजद्यांच्या वशिल्यानेच मिळणारी हक्काची जागा, हे "संचित कर्म" वैगरे सब झूठ पण कोलकल्पित इंजिनियरिंग किंवा मेडिकल करायची संधी कोणी हिसकावुन घेतली जाणे, हे मात्र खर्र खर्र, बरका...

कॉमी 24/02/2025 - 22:22
आणखी एक अनेकदा अध्यात्मिक विचाराची लोकं आपल्या पंचेंद्रियांना, शरीराला अनरिलायबल म्हणतात. पण शरीर नसलेल्या माणसाने अध्यात्मिक अनुभव घेऊन रिपोर्ट केल्याचे कुठे दिसत नाही. उलट, असे अनुभव मिळवण्यासाठी शरीरला एका विशिष्ठ स्थिती मध्ये न्यावे लागते, मग ते ध्यान करून असो वा विशिष्ठ केमिकल किंवा ड्रग घेऊन असो . आणि अश्या स्थिती मध्ये चित्रविचित्र अनुभव आले तर ते मात्र खरे मानावेत.

In reply to by कॉमी

पण शरीर नसलेल्या माणसाने अध्यात्मिक अनुभव घेऊन रिपोर्ट केल्याचे कुठे दिसत नाही.
उघडा डोळे ... बघा नीट ... एका नॉन बायोलॉजिकल व्यक्तीने तो अध्यात्माचा महामेरू कधीच सर केलाय ... ओळखा पाहू कोण ! m

युयुत्सु 15/02/2025 - 17:44
तर तात्पर्य काय की - दु:खाचे कारण तृष्णा हे नाही . त्या लेकरांना अशाच आई बापाच्या पोटी जन्म का मिळावा ? आपल्याला आपल्याच कुटुंबात जन्म का मिळावा ? आणि अंबानीला अंबानीच्या घराण्यात जन्म का मिळावा ? > या वरील विधानात जन्माच्या अगोदर आपण कोणत्या तरी स्वरूपात अस्तित्वात आहोत हे गृहित धरले आहे. कारण हे अस्तित्व म्ह० कदाचित आत्मा ज्याचे अस्तित्व बुद्धाने नाकारले आणि आधुनिक विज्ञान पण नाकारते. आपला जन्म हा एक जैविक अपघात आहे, हे स्वीकारले की बाकीचे सर्व डोलारे पत्त्याच्या बंगल्या प्रमाणे कोसळून पडतात. यातल्या पूर्वसंचिताला विज्ञानाची (म्ह० अधिजनुक शास्त्राची) थोडीफार मान्यता आहे. विज्ञानाची ॲलर्जी नसेल अधिक माहिती साठी हे पुस्तक वाचावे.

Bhakti 15/02/2025 - 20:56
छान लिहिले आहे.मी आजच गीतारहस्याचे आठवे प्रकरण 'विश्वाची उभारणी आणि संहार' हे वाचले.यात हे पंचीकरण विषयी सांगितले आहेच.शिवाय यात सांख्य आणि वेदांताचे या प्रकृति/सृष्टीची उभारणी व संहाराचे साम्य व भेद खुप छान सांगितले आहे.आता कधी गीतारहस्य वाचून पूर्ण करते इतकी उत्सुकता ताणली आहे 😇 १ राजयोग,कर्मयोग या विषयी विवेकानंदाचे खुप सुंदर पॉडकास्ट व्हिडिओ युट्यूबवर आहेत.भक्तीयोग,ज्ञानयोग मिळाले की ऐकेन. बाकी माझे बरेचसे दुःख मी कर्मयोगाचे मोडीत काढले आहेत. You don’t invite suffering into your life but when it comes you work with it and transform it.

चित्रगुप्त 15/02/2025 - 23:32
लेखात सुरुवातीला दिलेल्या उदाहरणातल्या गरीबांच्या दु:खाचे कारण त्यांची स्वतःचीच 'तृष्णा' असली पाहिजे, असे आहे का ? समाजातील अन्य श्रीमंत, सत्ताधारी, बलवान, असंवेदनशील, स्वार्थी वगैरे प्रभावशाली लोकांची 'तृष्णा' त्या दु:खाला कारणीभूत नाहीच, असा त्याचा अर्थ आहे का, हे समजले नाही. कृपया उलगडून सांगावे ही णम्र इनंती. -- त्या अन्य प्रभावशाली लोकांनी त्यांच्या स्वतःच्या इच्छा व हव्यासा नियंत्रित करणे हाच दुःखाच्या निरसनाचा उपाय / मार्ग नाही काय ? -- आणि त्यासाठी त्या अन्य लोकांनी: सम्यक दृष्टी - सम्यक संकल्प - सम्यक वाणी - सम्यक कर्म - सम्यक उपजीविका - सम्यक व्यायाम - सम्यक स्मृती - सम्यक समाधी .... हा मार्ग अवलंबिला पाहिजे, हा खरा उपाय. -- काय म्हणता ?

In reply to by चित्रगुप्त

नाही नाही. तसे निश्चित च नाही. तसा विचार बुध्दाने केला असता तर तो बुद्ध न राहता अशोक झाला असता ना ! बुध्दाच्या दुःखाच्या शोधाचा फोकस आता मध्ये आहे, बाहेर नाही. बहिस्थ कारणांकडे बुध्द दुःखाचे कारण म्हणून पाहताच नाही, तो म्हणतो की त्या बाह्य कृतींमुळे तुमच्या मनाची स्थिती का बिघडत आहे ? त्याचे मूळ शोधा. कारण तुमच्या मनात आहे , बाहेर नाही. "आपल्या दुःखाची कारणे आत नाहीत , बाहेर आहेत, प्रस्थापितांनी केलेली शोषक अर्थव्यवस्था हेच ते कारण" . असा विचार करायला लागला की तो बुद्ध रहात नाही , तो कार्ल मार्क्स होतो Budhda

प्रचेतस 16/02/2025 - 04:40
१. "दुःख असं काही नाहीयेच, जो आहे तो दुःखाचा भास आहे."
→ हा दावा अतिशय उच्च अध्यात्मिक पातळीवरच ग्राह्य धरता येईल. प्रत्यक्ष जगात दुःख ही एक अनुभूती आहे. शारीरिक वेदना, मानसिक यातना, सामाजिक अन्याय हे भास नसून प्रत्यक्ष अस्तित्वात असणाऱ्या गोष्टी आहेत. जर कोणाला गरिबी, भूक, आजार, छळवाद किंवा अपघातातून होणाऱ्या यातना भास वाटत असतील, तर तो भास नव्हे, तर वस्तुस्थिती नाकारण्याचा प्रयत्न आहे.
२. "हे दुःख आहे असे जे भासते आहे त्या भासाला कारण आहे."
→ जर दुःखच अस्तित्वात नाही, तर त्याला कारण कसे असू शकते? हा स्वतःलाच विरोध करणारा युक्तिवाद आहे. दुसरं म्हणजे, जर "भास" असं काही असेल, तर तो का आणि कसा निर्माण होतो, याचं स्पष्टीकरण देण्याची गरज आहे.
३. "ते कारण म्हणजे देहात्मभाव."
→ हा दावा फार सरसकट आहे. दुःखाची कारणे फक्त देहात्मभावाशी जोडणं चुकीचं आहे. सामाजिक, आर्थिक, राजकीय परिस्थिती, मानवी संबंधातील गुंतागुंत, पर्यावरणीय आपत्ती यांसारख्या अनेक गोष्टी दुःख निर्माण करतात. मानवी दुःख केवळ "मी हा देह आहे" या भावनेतूनच येतं, हा एकांगी विचार आहे.
४. "ह्या भासाचे निराकरण करण्याचे अनेक मार्ग आहेत..."
→ जर दुःख फक्त भास असेल, तर त्यावर मार्ग शोधण्याची गरजच काय? जर ते अस्तित्वातच नाही, तर ज्ञानयोग, भक्तीयोग, कर्मयोग यांची गरजच भासू नये. शिवाय, हे मार्ग व्यक्तिगत निवडीवर अवलंबून आहेत; एका व्यक्तीसाठी योग्य असलेला मार्ग दुसऱ्यासाठी तितकासा उपयुक्त नसेल.

In reply to by प्रचेतस

आपल्या प्रतिसादाबद्दल मनःपुर्वक धन्यवाद वल्ली सर ! आपल्या प्रतिसादामुळे, परत एकदा चिंतन करताना मला असे काहीसे फीलींग येत आहे ! =)) ravanth
वस्तुस्थिती नाकारण्याचा प्रयत्न
होय , बरेच लोकं अध्यात्माला - वस्तुस्थिती नाकारण्याचा प्रयत्न, अर्थात स्पिरिच्युअल एस्केपिझम असे म्हणतात. ठीक आहे आता , काय बोलणार , कोणाला काहीही समजाऊन सांगण्याच्या भानगडीत कशाला पडा ! मुळात खुद्द भगवंत अर्जुनाला गीता सांगितल्या नंतर म्हणाला की तुला पाहिजे तसं कर ! तसं काहीसं मला वाटायला लागलं आहे ! इति ते ज्ञानमाख्यातं गुह्याद्‌गुह्यतरं मया । विमृश्यैतद् अशेषेण यथा इच्छसि तथा कुरु ॥ १८-६३ ॥ पण अर्जुन युध्दभूमी सोडुन पळुन गेला नाही , हाच फरक आहे कळणे आणि न कळणे ह्यातील.
जर "भास" असं काही असेल, तर तो का आणि कसा निर्माण होतो
जिथं द्वैत निर्माण होतं तिथं हा भास निर्माण होतो, आईच्या पोटातुन बाहेर पडल्यावर पहिल्यांदा आपण ट्यॅ करतो तिथं . पण मुळात मुळात ह्या भासाच्या ब्रमाची सुरुवात कुठे आहे तर ह्याचे उत्तर छान्दोग्योपनिषद मध्ये दिलेले आहे - एकोहम बहुस्यामः . मी एक आहे , आता अनेक होईन ह्या प्रथम प्रेरणेचा उदय हाच ह्या भासाचा उदय आहे ! पण तुम्ही विचाराल की ही प्रेरणा तरी कशी आणि का निर्माण होते - तर "मी एक आहे" हा विचार हे त्याचे खरे कारण आहे. (त्याला महाकारण असे म्हणातत. ) तस्मात मी एक आहे, अहं ब्रह्मास्मि ह्या विचाराचाही लय होतो तिथे भासाचा , दु:खाचा लय होतो.
एकांगी विचार
एकांगीच आहे !! पण एकदा तो विचार झाला की संपलं सगळं ! तुका म्हणे रक्षा झाली आपोआप | उजळला दीप गुरुकृपा ||
जर दुःख फक्त भास असेल, तर त्यावर मार्ग शोधण्याची गरजच काय?
मान्यच ! हेच अष्टावक्र म्हणतो ! ( बहुतेक जे. कृष्णमुर्तीही हेच म्हणतात ! ) एकदा का हे कळलं की बाकी काही योगबिग वगैरे धडपड करावयाची आवश्यकताच नाहीये . जसं एकदा दिवा लावला की अंधार नष्ट व्हायला किती वेळ लागतो ? तसं काहीसे आहे ! तुम्हाला एकदा कळलं असेल की हे दु:ख केवळ द्वैताच्या भासाचे लक्षण आहे , मुळात द्वैत असे काही नाहीच , तत्क्षणी तुम्ही सुटलेले आहात . अंधाराचा नाश झालेला आहे , तुम्हाला अधिक काही करावयाची आवश्यकताच नाही !
एको विशुद्ध बोधव्योऽहमिति निश्चयवह्निना । प्रज्वाल्याज्ञानगहनं वीतशोकः सुखी भव ॥ ९ ॥ अनुवाद - 'मी एक विशुद्ध बोध आहे' या श्रद्धायुक्त अग्निने स्वतःचे घोर अज्ञान जाळून तू शोकरहित व सुखी हो !
पण बहुतांश लोकं हे अष्टावक्र गीता समजण्याचा जवळपास देखील नाहीत , म्हणुनच भगवंताने भगवद्गीता लिहुन हे चार सुलभ मार्ग दाखवुन दिलेले आहेत !
सर्वधर्मान् परित्यज्य मामेकं शरणं व्रज । अहं त्वां सर्वपापेभ्यो मोक्ष्ययिष्यामि मा शुचः ॥ १८-६६ ॥
इत्यलम ! :) अजुन काही लिहायची इच्छा होत नाही , आता बस अर्जुन जे म्हणाला ते बोलुन थांबतो :
नष्टो मोहः स्मृतिर्लब्धा त्वत् प्रसादात् मयाच्युत । स्थितोऽस्मि गतसंदेहः करिष्ये वचनं तव ॥

In reply to by प्रसाद गोडबोले

प्रचेतस 17/02/2025 - 19:22
जिथं द्वैत निर्माण होतं तिथं हा भास निर्माण होतो, आईच्या पोटातुन बाहेर पडल्यावर पहिल्यांदा आपण ट्यॅ करतो तिथं .
तुम्ही अद्वैताकडे जाताय असे वाटते पण द्वैत ही निसर्गाची मूलभूत रचना आहे. आई आणि बाळ एकाच नसून वेगळे आहेत आणि हा भास नसून सत्य आहे.
एकोहम बहुस्यामः . मी एक आहे , आता अनेक होईन ह्या प्रथम प्रेरणेचा उदय हाच ह्या भासाचा उदय आहे !
मुळात ब्रह्म एक असेल आणि सर्व काही त्याच्यापासून निर्माण झाले असेल, अनेक झाले असेल तर भिन्नता वास्तव आहे, भास नाही. निर्मिली गेलेली सृष्टी तर वास्तव आहे.
एकांगीच आहे !! पण एकदा तो विचार झाला की संपलं सगळं !
जर एखादा विचार एकांगी असेल, तर तो संपूर्ण सत्य सांगत नाही आणि जर तो एकदा विचार झाला की सगळं संपतं असं म्हणायचं असेल, तर तेच अपूर्णत्व दर्शवतं. एकदा तुम्ही द्वैत असे काही नाहीच असं मांडलं की मग पुढं बोलणंच खुंटलं.
बहुतांश लोकं हे अष्टावक्र गीता समजण्याचा जवळपास देखील ना
अष्टावक्र गीता मी अजून वाचलेली नाहीये मात्र महाभारतात वनपर्वात जनक अष्टावक्र संवाद काहीसा संक्षिप्त स्वरूपात येतो जो मूळच्या उपनिषदातील अद्वैताला थोड्या निराळ्या स्वरूपात प्रतिपादित करतो. नष्टो मोहः स्मृतिर्लब्धा त्वत् प्रसादात् मयाच्युत । स्थितोऽस्मि गतसंदेहः करिष्ये वचनं तव

In reply to by मुक्त विहारि

नमस्कार मुवि, आपण बहुतेक दारू पिणे ह्या अर्थाने श्रमपरिहार हा शब्द वापरला आहे , मागील प्रतिसादात म्हणाला होतात तसेच. ह्या इथे, ह्या विषयी तुकोबांचा एक चपखल अभंग स्मरत आहे, पण आपल्याला दुखावण्याची इच्छा नाही म्हणून उद्धृत करण्याचे टाळत आहे. लोभ असू द्यावा.

In reply to by प्रसाद गोडबोले

योग्य ओळखले... इथे, श्रम परिहार हा वैचारीक आहे.... तुम्ही विचार मंथन करतांना ध्यान करून मन एकाग्र करत असाल , असे वाटते. मी मदिरेचा आस्वाद घेता घेता वैचारीक मंथन करतो. जे प्रश्न तुम्हाला पडतात ते प्रश्न मलाही पडले होते. पण एक सुंदर वाक्य वाचनात आले..... स्वतःच स्वतःला मार्ग दाखवायचा. एक उदाहरण देतो.... बॅरोमीटरचा उपयोग करून एखाद्या उंच इमारतीची उंची मोजायची असेल तर, त्याची किमान ४ उत्तरे आहेत आणि कुणी कुठला मार्ग वापरायचा हा ज्याचा त्याचा प्रश्न. तुम्ही तुमच्या मार्गावर बरोबर आहात आणि मी माझ्या.... तुमच्या मार्गाला माझा अजिबात विरोध नाही उलट तो मार्ग अतिशय तरल आणि उत्तम आणि सफाचट आहे.भल्या भल्या व्यक्तींना जमत नाही.

Bhakti 16/02/2025 - 07:36
अवांतर
काही काही लोकांचा ना उगीचच गैरसमज आहे की हिंदु धर्म बौध्द आणि जैन धर्म एकमेकांचा दुस्वास करतो .
समाजात ना ना विकरी जण भरले आहेत.कोणा कोणाचा विचार करायचा.आपला मार्ग शोधत राहायचा.मी दु:स्वास वग्रै नाही.पण या तीन धर्मांचे दिसणाऱ्या साम्यावर कायम आश्चर्यचकित व्हायचे.ज्ञानयोगाने म्हणजे पुस्तकी अभ्यासाने ;) याचे गुपित जाणले.आणि कर्मयोगाने म्हणजे प्रत्यक्ष या हिंदू बौद्ध जैन पण हे तिन्ही धर्म जवळपास किमान २५०० वर्षे जुने आहे. त्यांची तत्वे , आदर्श ही तितकेच प्राचीन आणि जुने आहेत हे जाणले,अनुभवले....ते वेरूळच्या माध्यमाने.लेणी १-१२ बौद्ध,१३-२९ हिंदू,३०-३४ जैन यांचा अभूतपूर्व संगम, प्रत्यक्ष स्वर्गानुभव आहे.त्यातील जैन लेणी जरा नीट पाहायच्या राहिल्या तर स्वप्नात येतात ,परत ये म्हणतात ;) लवकर परत जाणार आहे:) १ ॐ तारे तुत्तारे तुरे सोहा'

सोत्रि 16/02/2025 - 10:46
ती लहान मुलगी , अगदी दोन तीन वर्षाची - ज्या दुपारच्या बाराच्या उन्हात आपण आपल्या पोरांना घराबाहेर ही पडु देत नाही त्या अश्या रणरण फुफाट्यात डांबरी रस्त्यावर उभी आहे. पायात काही नाही , डोक्यावर काही नाही . अन्न अन्न करुन आई पाशी रडली असेल त्यामुळे चेहर्‍यावर सुकलेल्या अश्रुंचे डाग . बिचारी आई तिही हताश . आगतिक . तिथेच पलिकडे दुसर्‍या सिग्नलच्या दुसर्‍या बाजुला तसाच ४-५ वर्षाचा एक मुलगा . तसाच उन्हाने रापलेला काळा वर्ण , फाटके कपडे , हातात गाडी पुसायचे फडके . त्याच्या डोक्याला अन डोळ्यांना काही तरी लागले होते . त्याचा २५-२७ वर्षाचा बाप काहीतरी त्याच्या डोळ्यात घालत होता , बहुतेक स्वच्छ पाण्याने धुवत असावा
हे दु:ख नाही, ही झाली परिस्थीती.
दोन वर्षाच्या पोरीला काय हवं आहे ? साधं पोटभर जेवण ? सावली ? त्या ४-५ वर्षाच्या मुलाला डोळ्याला काही लागले असेल तर डॉक्टर कडे जावे वाटले , बरे व्हावे वाटले
ही तृष्णा नाही. हे त्या प्राप्त परिस्थितीला सामोरे जाणे झाले, कर्मयोग, जे अटळ आहे. प्राप्त परिस्थितीला सम-भावनेने (equanimity) सामोरे न जाता, जे नाहीयेय त्याचा हव्यास आणि जे नकोय ते होणं ह्याचा तिरस्कार ही झाली तृष्णा, त्यामुळे येणारी व्याकुळता हे दु:ख.
आणि कोण कुठली ही ही माणसे ? माझा जीव का कळवळतोय ह्यांच्यासाठी ? मला का दु:ख होतंय ?
तुम्हाला जो कळवळा आलाय ते दु:ख नाही. ती कणव आहे त्यांच्याविषयीची, करुणा म्हणणार होतो पण लेखातलंच पुढचं वाक्य ती करूणा नाही हे जस्टीफाय करतंय.
का माझ्या मनात नाथांसारखा करुणभाव उत्पन्न होत नाही ?

लेखात उल्लेखलेली चार आर्यसत्य ह्यांचा संदर्भ मराठी विकीपीडीया दिसतोय. त्याचा मूळ संदर्भग्रंथ — बुद्धिझम फॉर यंग स्टूडन्स, लेखक - भंते डॉ. सी. फॅंगचॅंम (थायलंड) हा दिसतोय विकिपेजवर. डॉ. सी. फॅंगचॅंम यांनी त्या ग्रंथात नेमकं काय लिहिले आहे हे माहिती नाही, पण विकीपेजवरची चार आर्यसत्ये चुकीचं भाषांतर आणि चुकीचा भावार्थ आहेत. त्रिपिटकातील सुत्त पिटकानुसार चार आर्यसत्ये अशी आहेत: 1. दुःखसत्य (Dukkha Sacca) – जीवनात दुःख आहे. 2. दुःखसमुदय सत्य (Samudaya Sacca) – दुःखाची कारणे आहेत. 3. दुःखनिरोध सत्य (Nirodha Sacca) – दुःखाचे निरसन शक्य आहे. 4. दुःखनिरोधगामिनी प्रतिपदा (Magga Sacca) – अष्टांगिक मार्गाने दुःख संपुष्टात आणता येते. त्रिपिटकातील संदर्भ: धम्मचक्कप्पवत्तन सुत्त (Dhammacakkappavattana Sutta) – सुत्त पिटक, साम्युत्त निकाय (SN 56.11)

In reply to by सोत्रि

त्रिपिटकातील संदर्भ: धम्मचक्कप्पवत्तन सुत्त (Dhammacakkappavattana Sutta) – सुत्त पिटक, साम्युत्त निकाय (SN 56.11) ह्या संदर्भाबद्दल मनःपुर्वक धन्यवाद सोत्रि !

In reply to by सोत्रि

तुम्हाला जो कळवळा आलाय ते दु:ख नाही. ती कणव आहे.
उद्या जाणार आहे ऑफिसला, तेव्हा दिसतीलच ते ! तेव्हा मी माझ्या मनाला हेच समजाऊन सांगणार आहे ! अशोच्यानन्वशोचस्त्वं प्रज्ञावादांश्च भाषसे । गतासूनगतासूंश्च नानुशोचन्ति पण्डिताः ॥ २-११ ॥
प्राप्त परिस्थितीला सम-भावनेने (equanimity) सामोरे न जाता, जे नाहीयेय त्याचा हव्यास आणि जे नकोय ते होणं ह्याचा तिरस्कार ही झाली तृष्णा, त्यामुळे येणारी व्याकुळता हे दु:ख.
हेही संगुन पाहतो मनाला - हा ज्याचा त्याचा कर्मयोग आहे , जो की अटळ आहे. ते पोरं ती परिस्थिती , ते कर्म घेऊन जन्माला आली आहेत , तो त्यांचा कर्मयोग आहे. अन आपल्याला कणव वाटणे ,पण नाथांसारखी करुणा न वाटणे, हा आपला कर्मयोग आहे . मात्रास्पर्शास्तु कौन्तेय शीतोष्णसुखदुःखदाः । आगमापायिनोऽनित्यास्तांस्तितिक्षस्व भारत ॥ __/\__

In reply to by प्रसाद गोडबोले

युयुत्सु 16/02/2025 - 17:46
स्वगतः अध्यात्माला भ्रमानुभुतीचे विज्ञान म्हणणे योग्य होईल का?. रिप्रोड्युसिबिलीटीला बेदखल केलं सगळा आनंदी आनंद! (पन इण्टेण्डेड)

सोत्रि 16/02/2025 - 11:51
उलट सनातन धर्माने बुध्दाला विष्णुचा ९वा अवतार मानुन त्याला आदरच दिलेला दिसुन येतो.
हे फारच रोचक आहे, केवळ उत्सुकता एक प्रश्न पडला, म्हणून हा प्रतिसाद. पण हा प्रश्नही स्वांतसुखायच आहे. अवतार घेण्याची कारणे गीतेत कृष्णाने खालील श्लोकात (४.८) सांगीतली आहेत: यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत, अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्, परित्राणाय साधूनाम् विनाशाय च दुष्कृताम्, धर्मसंस्थापनार्थाय सम्भवामि युगे युगे म्हणजे सृजाम्यहम् - अवतार घेण्यासाठी खालील ३ कारणे असतात:
  1. परित्राणाय साधूनाम्
  2. विनाशाय च दुष्कृताम्,
  3. धर्मसंस्थापनार्थाय
असं असेल तर त्यावेळी सनातन धर्मात सज्जन लोकं धर्ममार्गावरून च्युत झाले असावेत, त्यामुळे खूप दुष्ट लोक झाले असावेत आणि धर्मस्थापना करण्याची गरज म्हणूंन नवावा अवतार (बुद्ध) घ्यावा लागला असावा का? - (अभ्यासू ) सोकाजी

In reply to by सोत्रि

माझा तत्त्वज्ञानाचा इतिहास ह्या विषयाचा जास्त अभ्यास नाही. खालील उत्तर माझ्या मर्यादित वाचन आकलनावरून देत आहे - बुध्द काळात, म्हणजे साधारणपणे इ .सु . पूर्व सहावे शतक, तत्कालीन सनातन धर्म हा पूर्व मीमांसा अर्थात कर्म मीमांसा ह्या मताला मानणारा होता. ह्या मतानुसार केवळ कर्म करणे हे मोक्षाचे साधन होते. त्यामुळे तत्कालीन समाज यज्ञ प्रधान होता. त्यामध्ये तत्त्वज्ञानापेक्षा अधिक भर कर्मकांडांवर होता. म्हणूनच चार्वाक जैन बुध्द वगैरे नास्तिक अर्थात वेद प्रामाण्य नाकारणाऱ्या मतांचा उदय झाला. पण त्यातही प्रकर्षाने पाहिले तर चार्वाकचे खंडन करायला जैन आणि बुद्ध मत हेच पुरेसे होते. जैन धर्माचे संस्थापक ऋषभ देव स्वतः इक्ष्वाकु वंशातील अर्थात श्रीरामाच्या वंशातील होते, त्यानंही विष्णूचा अवतार मानण्यात येते. पण बुध्दाच्या मताने केवळ कर्मकांड व नव्हे तर समस्त वेद उपनिषदोक्त तत्वज्ञानावर प्रश्नचिन्ह निर्माण केले. आणि त्याचे उत्तर शोधता शोधता लोकं उपनिषदोक्त धर्माकडे परतले. अर्थात विष्णूनेच लोकांना परत उपनिषदे आणि त्यांचे सार गीता आणि त्यातील धर्म अर्थात कर्मयोगशास्त्र ह्याकडे प्रवृत्त करण्यासाठी , धर्माची संस्थापना करण्यासाठी बुध्द अवतार घेतला. ह्या तर्काला अतिशय उत्तम समर्थक उदाहरण म्हणजे चाणक्य ! बुध्द इ.सु.पू 6 व शतक आणि चाणक्य इस पू 3 ते शतक. आणि महाभारत भगवद गीता लिहिली गेली ते इस 3 ते शतक आणि आचार्य म्हणजे इस 7वे शतक. म्हणजे बौद्ध मत खंडन व्हायच्या कित्येक वर्षे आधी चाणक्य झाला होता , आणि तरीही त्याच्या अर्थशास्त्र ग्रंथात कर्मयोग च दिसून येतो. अर्थात आचार्यांच्या आधीपासूनच लोकं मूळ सनातन धर्माकडे कर्मयोगशास्त्र कडे वळले होते . (ह्या साऱ्या कालगणनेत कुमारील भट्ट नावाचे अत्यंत रोचक पात्र आहे ज्यांनी आचार्यांच्या आधीच बौद्ध मताचे खंडन करून मीमांसा मताचे पुनर्स्थापना केलेली दिसून येते. पण त्यावर सविस्तर चर्चा कधीतरी निवांत!) ह्या विषयाचा सखोल अभ्यास नसल्याने उत्तरदायित्वास नकार लागू. चूक भूल देणे घेणे

In reply to by प्रसाद गोडबोले

सोत्रि 17/02/2025 - 19:08
बुध्द काळात, म्हणजे साधारणपणे इ .सु . पूर्व सहावे शतक, तत्कालीन सनातन धर्म हा पूर्व मीमांसा अर्थात कर्म मीमांसा ह्या मताला मानणारा होता. ह्या मतानुसार केवळ कर्म करणे हे मोक्षाचे साधन होते.
अर्थात विष्णूनेच लोकांना परत उपनिषदे आणि त्यांचे सार गीता आणि त्यातील धर्म अर्थात कर्मयोगशास्त्र ह्याकडे प्रवृत्त करण्यासाठी , धर्माची संस्थापना करण्यासाठी बुध्द अवतार घेतला.
प्रचंड घोळ आहे. त्यापुढेही बराच आहे. पण उत्तरदायित्वास नकार लागू असल्याने इत्यलम! - (अभ्यासू) सोकाजी

In reply to by प्रसाद गोडबोले

प्रचेतस 17/02/2025 - 21:41
पूर्व मीमांसा जरी यज्ञयागादी कर्मकांडाचे मूलाधार असली तरीही त्या काळी न्याय, वैशेषिक, सांख्य, योग, वेदांत अशी विविध तत्वज्ञाने प्रचलित होती. बुद्धानंतर यज्ञाचे स्तोम जरी कमी झाले असले तरीही ते प्रचलित होतेच मात्र भक्तीवादी असलेला भागवत संप्रदाय हळूहळू वाढू लागला होता. रामायण, महाभारतात आलेले बौद्ध मताचे खंडन (हे महाभारतात फारच विशेषाने आले आहे). कौटिल्य आणि बुद्धाच्या काळात साधारणत: ३५० वर्षांचे अंतर असले तरी बौद्धमताचा प्रसार प्रामुख्याने अशोकाच्या काळात वेगाने झाला. त्यामुळे त्याच्या काळात बौद्धमताचे खंडन फारसे नसावे. बुद्ध हा विष्णूचा अवतार किंबहुना राम कृष्णालाही विष्णूचा अवतार समजणे खूप उशिरा सुरू झाले, अन्यथा सुरुवातीच्या ब्राह्मणी लेण्यात ह्याचे प्रतिबिंब नक्कीच पडले असते.

In reply to by प्रचेतस

सोत्रि 18/02/2025 - 03:31
रामायण, महाभारतात आलेले बौद्ध मताचे खंडन (हे महाभारतात फारच विशेषाने आले आहे).
म्हणजे रामायण, महाभारत गौतम बुद्धाच्या नंतरच्या काळात घडले कि लिहीले गेले? - (कालखंड समजून घेण्यास उत्सुक असलेला) सोकाजी

In reply to by सोत्रि

प्रचेतस 18/02/2025 - 06:03
रामकथा आणि पांडवांची कथा प्राचीन काळात घडल्या, वाल्मिकी रामायण मात्र सरळसरळ इसवी सनाच्या आसपास दोन तीन शतक इकडे तिकडे लिहिलं गेलं तर महाभारतात इसवी सनाच्या आसपास पर्यंत भर पडत गेली इतकेच. व्यास, वैशंपायन, सौती असे ते वेगवेगळे कालखंड इतकेच.

In reply to by प्रचेतस

सोत्रि 18/02/2025 - 06:52
म्हणजे महाभारतात गीता नेमकी कोणत्या काळात लिहीली गेली हे नक्की सांगता येणार नाही? आणि मूळ गीतेतही भर पडली असल्याचे शक्यता नाकारता येत नाही, बरोबर? - (अतिउत्सुक) सोकाजी

In reply to by सोत्रि

प्रचेतस 18/02/2025 - 07:41
गीतेचा काळ नेमका कुठला हे नक्की सांगता येणार नाही, कदाचित पहिले तीन अध्याय व्यासप्रणित असावेत. मात्र ही शक्यता कमी आहे असे माझे मत आहे कारण गीतेच्या आधी असलेला एक अध्याय सोडून त्याआधीच्या अध्यायात खुद्द युधिष्ठिराला विषाद झालेला दाखवला आहे. बृहतीं धार्तराष्ट्राणां दृष्ट्वा सेनां समुद्यताम् | विषादमगमद्राजा कुन्तीपुत्रो युधिष्ठिरः || तेव्हा खुद्द अर्जुन युधिष्ठिराच्या विषादाचे निवारण करतो. त्यक्त्वाधर्मं च लोभं च मोहं चोद्यममास्थिताः | युध्यध्वमनहङ्कारा यतो धर्मस्ततो जयः || तेव्हा युधिष्ठिर युद्धास सिद्ध झाला असता अर्जुनासही लगोलग खेद व्हावा हे असंभाव्य वाटते. शिवाय गीतेतील श्रीकृष्णाने सांगितलेल्या श्लोकांची सुरवात ही 'श्री भगवान उवाच' अशी होते. हा तर भागवत संप्रदायाचा मुख्य आधारच म्हटला पाहिजे. अर्थात गीता जरी नंतरची असली असे माझे मत असले तरी ती अलीकडचीही नव्हे. कदाचित बुद्धपूर्वकालीन असू शकते कारण गीतेत येणारी सांख्य, योग, कर्म, ब्रम्ह या संकल्पना प्राचीन आहेत. मात्र काही ठिकाणी ती वेदांना छेद देतात.

In reply to by प्रचेतस

सोत्रि 18/02/2025 - 10:37
कदाचित बुद्धपूर्वकालीन असू शकते कारण गीतेत येणारी सांख्य, योग, कर्म, ब्रम्ह या संकल्पना प्राचीन आहेत. मात्र काही ठिकाणी ती वेदांना छेद देतात.
हे रोचक आहे! माझ्या काही इंटर्प्रीटेशनला हे पुष्टी देतंय. व्यनी करतो, व्यनितून बोलूयात. - (उत्साहित) सोकाजी

In reply to by प्रसाद गोडबोले

सोत्रि 26/02/2025 - 19:04
बुद्धाच्या अवताराबद्दल रोचक मत ऐकायला मिळाले. https://www.youtube.com/watch?v=ND_i9IihuZ8 व्हिडीओ एम्बेड करायचा प्रयत्न केला पण होत नाहीयेय. संपादक मंडळ काही मदत करू शकेल का? - (अभ्यासू ) सोकाजी

कॉमी 16/02/2025 - 12:11
यथा हि चोर: स‌ तथा हि बुद्धस्तथागतं नास्तिकमत्र विद्धि। तस्माद्धि य: श‌ङ्क्यतमः प्रजानाम् न नास्तिकेनाभिमुखो बुध: स्यात्।।2.109.34।। एक अवतार दुसऱ्या अवताराबाबत असे का बोलेल?

In reply to by कॉमी

इनपुट हेच आउटपुट देणाऱ्या, "अ न्युरल नेटवर्क विथ अ सिंगल डेटा पॉईंट" बेस्ड मॉडेल वरील मेंदूकडून, जास्त अपेक्षा करणे योग्य नाही .. त्यामुळे तुमच्या ह्या प्रश्नाचे "सयुक्तिक" उत्तर मिळेल याची अपेक्षा नाही ...

In reply to by आंद्रे वडापाव

इनपुट हेच आउटपुट देणाऱ्या, "अ न्युरल नेटवर्क विथ अ सिंगल डेटा पॉईंट" बेस्ड मॉडेल वरील मेंदूकडून, जास्त अपेक्षा करणे योग्य नाही
>>> Thank you so much !!! This is such a huge compliment. राम राम राम

In reply to by प्रसाद गोडबोले

अ न्युरल नेटवर्क विथ अ सिंगल डेटा पॉईंट फायनली ! https://youtu.be/c0yTIaNeEfw?si=xDdIyOKarHwqpaVL मन हें राम जालें मन हें राम जालें । प्रवृत्ति ग्रासुनि कैसें निवृत्तीसी आलें ॥१॥ श्रवण कीर्तन पादसेवन कैसें विष्णुस्मरण केलें । अर्चन वंदन दास्य सख्य आत्मनिवेदन केलें ॥२॥ यम नियम प्राणायाम प्रत्याहार संपादिले । ध्यान धारणा आसन मुद्रा कैसे समाधीसी आले ॥३॥ बोधीं बोधलें बोधितां नये ऐसें जालें । बापरखुमादेविवरु विठ्ठलें माझें मीपण हारपलें ॥४॥

In reply to by प्रसाद गोडबोले

ह्म्म ... तो णळस्टॉप चा "गिरीजा" आश्रम फ्लायओव्हरमुळे झाकला गेल्या असल्याने, अशी अवकळा पसरलीये तर ..

In reply to by आंद्रे वडापाव

काहीही कळलं नाही. अभंग ज्ञानेश्वर माऊलींचा आहे , माझा नाही. सिंगल डेटा पॉईंट वर न्यूरल नेटवर्क ट्रेन झाल्यावर त्यांनी लिहिलेला अभंग ! मन हेच राम झाले !! राम

In reply to by आंद्रे वडापाव

फोटो दिसत नाही. काही का असेन, तुम्हाला ऑलरेडी माहीत आहे ह्या न्यूरल नेटवर्क चे आऊटपुट काय असणार आहे ! राम

In reply to by आंद्रे वडापाव

>>>>>>> "गिरीजा" आश्रम फ्लायओव्हरमुळे झाकला गेल्या असल्याने, अशी अवकळा पसरलीये तर .. गिरिजा काकू अनाहिता आश्रमात डोकावून जायच्या म्हणे...=)) -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

अरे व्वा. सर, आपण आलात, आनंद झाला ! आपले प्रतिसाद फार मोलाचे आहेत आमचे न्यूरल नेटवर्क ट्रेन करायला ! असाच लोभ असू द्या. राम

In reply to by कॉमी

अवतार ह्या शब्दाची व्युत्पत्ती च अव+ तर अर्थात खाली उतरणे अशी आहे . शुद्ध ब्रह्म अनुभवातून खाली अर्थात ह्या जगाच्या रंगमंचावर उतरलेले लोक . ते काहीही बोलत असतात हो. खुद्द रामाला नावे ठेवणारा परीट काय रामा पेक्षा भिन्न होता का ? लक्ष्मणाने परशुरामाची मस्करी केलेली आहे, ते काय भिन्न होते का ? कृष्ण साक्षात भगवान आहे हे माहीत असताना ही गांधारी ने त्याला शाप दिलेला आहे . हे असं सगळं चालूच असतं हो ! ही सगळी लीला असते. तुमचे आकलन जेव्हा परिपक्व होते तेव्हा कळायला लागतं!!

एकदा तुम्ही द्वैत असे काही नाहीच असं मांडलं की मग पुढं बोलणंच खुंटलं. >>> बोलणं खुंटलंच आहे !! मला आत्ता कळलंय, माउलींनी तर स्पष्टच म्हणालं आहे की या शब्देविण संवादु, दुजेविण अनुवादु। हे तव कैसेनि गमें। परें ही परते बोलणे खुंटले। वैखरी कैसेनी सांगे।। बोलणं खुंटलेलेच आहे ! मी जितकं शब्दात पकडायचा प्रयत्न करतो तितका तो हातातून निसटतो ! गोरोबा काकांना - मातीत तो दिसतो, सावता माळी ह्यांना कांदा मुळा भाजी मध्ये तो दिसतो, नरहरी सोनार ह्यांना सोन्यात तो दिसतो, तोच मला न्यूरल नेटवर्क मधून दिसतोय, सिंग्युलारिटी मधून दिसतोय, फोरीये सीरिज मधून दिसतोय, सुपरपोझिशन मध्ये दिसतोय. आणि नाहीच शब्दात मांडता येत आहे. काय बोलू ? कसं सांगू ? सुचतंय तसं खरडत जाऊ... बाकी काय करू अजून !! राम पाया पडू गेले तव पाऊलची न दिसे उभा ची स्वयंभू असे समोर की पाठीमोरा न कळे थक ची पडिले कैसे !!

स्वधर्म 19/02/2025 - 21:13
सर, ते बुध्ड, वेदांत, आर्यसत्त्ये वगॅरे कूटप्रश्न आहेत. तुमच्या बुध्दाच्या विचारांविषयीची शंका पण रास्त आहे. तरी... >> ... रणरण फुफाट्यात डांबरी रस्त्यावर उभी आहे. पायात काही नाही , डोक्यावर काही नाही . अन्न अन्न करुन आई पाशी रडली असेल त्यामुळे चेहर्‍यावर सुकलेल्या अश्रुंचे डाग . बिचारी आई तिही हताश . आगतिक . आणि >> ४-५ वर्षाचा एक मुलगा . तसाच उन्हाने रापलेला काळा वर्ण , फाटके कपडे , हातात गाडी पुसायचे फडके . त्याच्या डोक्याला अन डोळ्यांना काही तरी लागले होते . त्याचा २५-२७ वर्षाचा बाप काहीतरी त्याच्या डोळ्यात घालत होता , बहुतेक स्वच्छ पाण्याने धुवत असावा . बाकी काय करु शकणार आहे ? या समाजातल्या भयाण वास्तव दु:खावर आपल्यापॅकी ९९% लोक काही करत नाहीत, करू शकत नाहीत, हे मान्य करतो. पण 'मी' काही करणार नाही, कारण... >>... नाथांचा गावाकडाचा वाडा कोणी जाळला नव्हता , नाथांची जमीन कोणी हडपली नव्हती की नाथांची इंजिनियरिंग किंवा मेडिकल करायची संधी कोणी हिसकावुन घेतली नव्हती . हे उदात्त वेदांत तत्वञानानुसार आहे का? मुळात ही दोन्हीही अन्याय आणि दु:खेच जरी असली, तरी त्यांची तुलना कदापी होऊ शकत नाही, हे तुंम्हाला तरी लक्षात यायला हवं होतं.

In reply to by स्वधर्म

माफ करा . माझे मराठी व्याकरण थोडे कच्चे आहे. एकापेक्षा दुसरे मोठे किंवा समान किंवा लहान असे काहीसे लिहिले असल्यास त्याला तुलना करणे असे म्हणतात असा माझा समज आहे. आणि माझ्या ह्या समजा नुसार मी कोणतीही तुलना केलेली नाही. माझ्यासाठी दुःख हे दुःख आहे ! तुम्ही उर्वरित लेख नीट वाचलात तर तुम्हाला कळेल की मी बुध्दाच्या मार्गावरून चालत दुःख आणि दुःखाच्या निर्मूलन करण्याच्या उपायांचा शोध घेत होतो. बुद्धाचं काही मला पटलं नाही , पण त्याची मदत खूप झाली, त्याच्या निमित्ताने मला माझे उत्तर सापडले आहे. आणि मी ते वर लेखात स्पष्टपणे लिहिलेही आहे ! तुम्हाला ते पटते की नाही ह्याच्याशी मला घेणे देणे नाही. इथे अनेक ठिकाणी माझ्या आधीच्या लेखाचा रेफरन्स घेऊन कॉमेंट्स आहे ते च पुनरेकावर म्हणतो. जे जे दुःख म्हणून मला भासत आहे त्या त्या ठिकाणी "राम" पाहणे हाच माझ्यासाठी एकमेव दुःख निर्मुलनाचा उपाय आहे ! राम खरेतर हेही प्रतिसाद देणार नव्हतो , पण तुम्ही प्रतिसाद नीट पाहिलेत तर तुमच्या लक्षात येईल की काही ठरावीक मोजक्या लोकांचे प्रतिसाद लेखन केंद्रित नसून व्यक्ती केंद्रित आहेत ! आणि म्हणूनच ह्या अशा प्रतिसादात "राम" पाहणे हा ही माझ्या उपायचाच एक भाग आहे ! म्हणूनच आपल्या प्रतिसादाबद्दल मन:पूर्वक धन्यवाद ! असाच लोभ असू द्यावा ही नम्र विनंती ! राम

In reply to by प्रसाद गोडबोले

सोत्रि 20/02/2025 - 21:52
तुम्ही उर्वरित लेख नीट वाचलात तर तुम्हाला कळेल की मी बुध्दाच्या मार्गावरून चालत दुःख आणि दुःखाच्या निर्मूलन करण्याच्या उपायांचा शोध घेत होतो. बुद्धाचं काही मला पटलं नाही
१. लेखात नेमकं कुठे बुध्दाच्या मार्गावरून चालत गेल्याचा उल्लेख आला हे मिळालं नाही. कोणता मार्ग आणि कसा वापरला हे ही लेखात नाही. २. लेखाचा गाभाच विकिपीडीया वरच्या चुकीच्या माहितीवर आधारलेला आहे त्यामुळे बुध्दाच्या चुकीच्या मार्गावरून चालत जाणे झाले असावे आणि दुःख आणि दुःखाच्या निर्मूलन करण्याच्या उपायांचा शोध लागला नसावा. ३. ज्या बुद्धाला नववा अवतार मानलं आहे त्या अवतरी पुरुषाचे काहीच पटलं नाही हे अतर्क्य आहे. एकतर तो अवतरी नसवा किंवा त्याच्या अवताराचे आकलन नीट करून घेतल्याचे दिसत नाहीयेय. - ('हे राम' म्हणावेसे वाटणारा) सोकाजी

In reply to by सोत्रि

हां तेच! मीही राम म्हणत आहेच ! कुठं सगळं लिहित बसू . माझं मला कळलं आहे की दुःखाचे कारण तृष्णा नाहीये, दुःखाचे कारण अज्ञान , अज्ञानाचा भास हे आहे. त्यामुळे त्याचा निर्मुलनाचा उपाय म्हणजे अज्ञान खंडन हा आहे ! ( योगायोगाने आता तेच ऐकत होतो, अध्याय सातवा अज्ञान खंडन. :) ) अवतार ह्या शब्दाची व्युत्पत्ती आधीच देऊन झाली आहे , कुठं परत परत तेच ते लिहित बसू. परशुरामाचं सगळं रामाला पटलं नाही रामाचं सगळं कृष्णाला पटलं नाही कृष्णाचं सगळं बुद्धाला पटलं नाही बुद्धाचं सगळं मला पटलं नाही आणि माझं सगळं तुम्हाला पटलं नाही, ( पटावं असा माझा अट्टाहासही नाही.) पण त्यामुळे आपल्या "अवतारपणाला" छेद जात नाही ! आता हेही तुम्हाला पटो की न पटो. कोणालाही काय फरक पडतो! जळ तरंगीं दोहीं । जळावांचूनि नाहीं । म्हणौनि आन कांहीं । नाहीं ना नोहे ॥ पाणी म्हणा की पाण्यावरचे तरंग म्हणा, त्याने पाणीपणाला छेद जात नाही. राम

In reply to by प्रसाद गोडबोले

सोत्रि 21/02/2025 - 06:03
त्यामुळे त्याचा निर्मुलनाचा उपाय म्हणजे अज्ञान खंडन हा आहे !
बिन्गो!
आता हेही तुम्हाला पटो की न पटो. कोणालाही काय फरक पडतो!
मला तुम्हाला काही पटवून द्यायचे नाही किंवा काही पटवून घ्याचे नाही. तुमच्या #२ डिस्क्लेमरमधे असलेल्या, "हा लेख लिहिताना जमेल तितकी तथ्ये आणि संदर्भ वापरण्याचा प्रयत्न केला आहे तथापि काही तथ्येच चुकीच्या शब्दात उधृत केलेली असतील तर आपण जरुर माझ्या निदर्शनास आणुन द्यावीत ही नम्र विनंती", ह्या विनंतीनुसार मी काही चुकीची तत्थ्य निदर्शनास आणुन देण्यासाठी प्रतिसाद देतोय. मला जाणवलेले मुद्दे: १. "हा लेख नेहमीप्रमाणेच स्वान्तःसुखाय आहे. इथे कोणाला काहीही पटवुन द्यायचे धोरण नाही कि कोणाचे काहीही मत खंडन करावयाचा विचार नाही." ही सुरुवात असल्याने लेख त्यानुसारच वाचला होता. सगळा लेख स्वःताशी हितगुज करत चिंतनपरच होता. पण शेवटच्या परिच्छेदात एकदम "तस्मात् आता आपल्यासाठी चार आर्य सत्ये अशी आहेत" आणि "तूम्ही मुळातच ह्या दु:ख्याच्या भासातुन सुटलेलेच आहात !" असा एकदम निकाल देऊन, वैयक्तिक चिंतनाच्या पलीकडे जाउन पहिल्याच डिस्क्लेमरला व्यत्यास दिला गेला. २. तुमचा लेख जरी स्वान्तःसुखाय असला तरीही तो पब्लिक फोरमवर प्रकाशित केलेला आहे. आणि, तो त्याच्या मेन टॉपिक, चार आर्यसत्य, यांच्यावर लिहीला असल्याने, त्या चार आर्यसत्यांच्या प्रामाणिक अभ्यासाने जर शेवटचा परिच्छेद आला असता तर वैयक्तिक मत म्हणून पुढे जाता आले असते. पण मेन टॉपिकच चुकीच्या चार आर्यसत्यांचा आधार घेत लिहीला आहे. त्यामुळे, संपूर्ण लेख, तुमच्याच एका प्रतिसादात तुम्ही म्हटल्याप्रमाणे ''पूर्वग्रह दूषित शब्दांचा कचरा" ठरतो. पण त्याचे निर्मूलन अज्ञान खंडन आहे, हे तुमच्या ह्या प्रतिसादात आले आहे, सो बिन्गो!! ३. दु:ख, तृष्णा ह्याविषयी नेमकं काय विवेचन आहे ह्यासाठी संदर्भग्रंथ: विभंगसुत्त, साम्युत्त निकाय (SN 12.2). त्यात सग़ळी साख़ळी अज्ञातून सुरू होते आणि ती साखळी कशी तोडायची ह्याचा मार्ग दिलेला आहे आणि त्याचं सार म्हणजे चार आर्यसत्य (धम्मचक्कप्पवत्तन सुत्त (Dhammacakkappavattana Sutta) – सुत्त पिटक, साम्युत्त निकाय (SN 56.11). - (अज्ञानाचा पडदा दूर करण्याच्या प्रयत्नात असलेला) सोकाजी

In reply to by सोत्रि

पूर्वग्रह दूषित शब्दांचा कचरा >>> हा संदर्भ पाहून "मारुतीचे शेपूट गणपतीला चिकटवणे" हा वाकप्रचार आठवला ! तो कोणाच्या लेखावरचा प्रतिसाद आहे, त्या लेखातील विषय काय ! सगळाच आनंद आहे ! =)))) पण असो. मुळात दुःख आहे हेच अज्ञान आहे, कारण दुःखाची अनुभूती करणारा देहाशी तादात्म्य भाव . हे झाले माझे आकलन. आता बुध्दाने दुःख तृष्णा ची सग़ळी साख़ळी अज्ञातून सुरू होते आणि ती साखळी कशी तोडायची ह्याचा मार्ग दिलेला आहे. मग अर्थाअर्थी मला जे साधायचं होतं आणि बुध्दाने जे ध्येय साधलं ते एकच झालं की !!! भले मग त्याचे आकलन अन् माझे आकलन समान नसेल ! त्याने काय फरक पडतो ! तुम्ही कोणताही मार्ग स्वीकारा, एकदा का तो स्वीकारला की तूम्ही मुळातच ह्या दु:ख्याच्या भासातुन सुटलेलेच आहात ! तुम्हाला अजून शंका असेल तर मात्र तुम्ही अडकलेले आहात. आणि काही माझा नवीन धर्म सुरू करून धर्म चक्र परिवर्तन वगैरे करणार नाहीये ! त्यामुळे माझे मत मला कोणाला पटवून द्यायची गरज भासत नाही. अर्थात तरीही मी जास्तीत जास्त प्रयत्न करत राहतोच टेक्निकली अक्युरेट राहायचा. पण ते माझ्यावर बंधन नाही, it's just a choice. तात्पर्य इतकेच की दुःखाचे मूळ कारण अज्ञान आहे, त्याचे खंडन झाले की बस. मग तुम्ही ते कोणत्याही मार्गाने करा. तुम्हाला असे म्हणायचे असेल की अष्टांगिक मार्ग हाच एकमेव मार्ग आहे किंवा, माझी स्वतंत्र विचार शृंखला चुकीचा मार्ग असल्याने अज्ञान खंडन करू शकत नाही वगैरे वगैरे ... तर ठीक आहे . :))))

In reply to by प्रसाद गोडबोले

हे लिहायचं राहूनच गेले... (अज्ञानाचा पडदा वगैरे काही भानगड च नाही, कारण मुळात अज्ञानच नाही हे लक्षात आलेला अन् त्या अनुभूतीत राहण्याचा प्रयत्न करीत असलेला) प्रसाद गोडबोले

In reply to by प्रसाद गोडबोले

परशुरामाचं सगळं रामाला पटलं नाही रामाचं सगळं कृष्णाला पटलं नाही कृष्णाचं सगळं बुद्धाला पटलं नाही बुद्धाचं सगळं मला पटलं नाही
ते बाकीचं सोडा हं, पण बोलता बोलता गोडबोले पंतांनी , स्वतःला रामाच्या मांदीआळींत आपसूकच ठेवलाय पहा ... परशुराम > राम > कृष्ण > बुद्ध > गोडबोले >> हे राम r

In reply to by आंद्रे वडापाव

आपसूकच
आपसूकच आहे हो ते. =)))) कधी पासून तेच तर सांगतोय मी . आणि मीच काय , तुम्हीही त्याच मांदियाळीत आहात ! तत्त्वमसि. तुकोबा त्यांच्या अभंगात म्हणाले तसे काहीसे आहे हे - महावाक्य ध्वनी बोंब झाली. आता तुम्हाला आम्ही बोललेले ऐकू येत नाहीये , किंवा तुम्ही ऐकून न ऐकल्यासारखे करताय, किंवा ऐकून घ्यायच्या आधीच नळ स्टॉप वगैरे काहीतरी बाष्कळ लिहायला घेताय, तर त्याला मी काय करू ! अजून किती वेळा सांगायचं =)))) बापरखुमादेविवरु विठ्ठलें माझें मीपण हारपलें ॥ हे मी वर एका प्रतिसाद आधीच म्हणालो आहे , तुम्ही त्यावर उत्तरप्रतिसाद ही दिला आहे , तेव्हा नाहीत का वाचले हे ? की तेव्हा वाचून अर्थ लागला नव्हता ? काही हरकत नाही, आता अर्थ लागला आहे ना , मग झालं तर !! तत्त्वमसि राम

In reply to by प्रसाद गोडबोले

ज्ञानदेवे रचिला पाया ! तुका झालासे कळस !! D संतकृपा झाली । इमारत फळा आली ।। ज्ञानदेवे घातला पाया । उभारिले देवालया ।। नामा तयाचा किंकर । तेणे केला हा विस्तार ।। जनार्दन एकनाथ । खांब दिला भागवत ।। तुका झालासे कळस । भजन करा सावकाश ।। बहेणी फडकते ध्वजा । निरुपण आले ओजा ।। हे वेदांताचे, अद्वैत दर्शनाचे मंदिर दुसऱ्या तिसऱ्या कोणा देवाचे नाहीये, त्यातील देव दुसरा तिसरा कोणी नसून तूच आहे ! तत्त्वमसि. :)

In reply to by प्रसाद गोडबोले

स्वधर्म 24/02/2025 - 15:56
मूळ मुद्दा बाजूला सरकवू नका! तो असा आहे: का माझ्या मनात नाथांसारखा करुणभाव उत्पन्न होत नाही ? का नाही मी जवळ जाऊन त्या लेकराला कडेवर घेत ? त्याचे अश्रु पुसत ? का नाही त्याला दोन घास भरवत ? नाथांची गोष्ट निराळी होती - नाथांच्या गावाकडाचा वाडा कोणी जाळला नव्हता , नाथांची जमीन कोणी हडपली नव्हती की नाथांची इंजिनियरिंग किंवा मेडिकल करायची संधी कोणी हिसकावुन घेतली नव्हती . बघ बघ अजुनही तुझा जीव त्या जुनाट दु:खाने तळमळतो आहे . का ?>> आणि त्यावर तुंम्ही काही करणार नाही, कारण... तुमचा जीव 'त्या' जुनाट दु:खाने तळमळतो आहे तुमचं सगळं तर नीट चाललेलं आहे. पण एवढी गहन अगदी हिमालयात जाऊन साधना करुन, वेदांत, गीता, तुकारामाचे अभंग मुखोद्ग्त असून... रस्त्यावरच्या अ़क्षरशः काहीही न मिळालेल्या निरागस मुलांना, माणसाला पाहून, तुमचा जीव 'त्या' जुनाट दु:खाने तळमळतो आहे, अशी स्पष्ट कबुलीच दिली आहे तुंम्ही. माझे अनेक उच्चवर्णीय मित्र काहीही साधना न करता, सहजपणे, पिढ्यानपिढ्या शोषित समाजाला आज राज्यघटनेमुळे जी शिकण्याची संधी मिळाली, तिचा स्विकार करतात. त्यांना नाही असं जुनाट दु:ख होत. अशा प्रकारे, शब्दांचा कीस काढून, ज्ञान(?) मिळवूनही तुंम्हाला हे पचवता येत नाही, त्यामुळे त्या ज्ञानाचा उपयोग काय, हा खरा मुद्दा आहे.

In reply to by स्वधर्म

स्वधर्म 24/02/2025 - 16:21
वेदांत गीता वगैरे अध्यात्म चिंतन अपराधभावातून सुटका करण्यासाठी खूप मदत करते. गांजलेल्यांसाठी पटकन काहीतरी करण्यापेक्षा त्यावर चिंतन, मनन, वाचन, चर्चा इ. केली की काहीतरी केल्याचे समाधान मिळते. किमान मी किती संवेदनाशील आहे, असे म्हणून घेता येते. काही नास्तिक लोक अध्यात्माला 'गिल्ट मॅनेजमेंट टूल' असे म्हणतात. एकदा पूर्वजन्म, प्रारब्ध इ. मान्य केले, की ते आता त्या अवस्थेला का आहेत, याचे समाधानकारक उत्तर मिळते व आपल्याला काही करण्याचे कारण रहात नाही. त्यामुळे मध्यमवर्गीयांत अध्यात्माचा छंद वाढीस लागला आहे. बुध्द चिंतन, मनन याला महत्व न देता करूणेला महत्व देतो.

In reply to by स्वधर्म

हे बघा, मला अजून एक साक्षात्कार झाला आहे की मी काहीही लिहिलं तरी ते काही लोकांना पटणारे नाहीये च. अगदी 1+1 = 2 लिहिलं तरीही पटणार नाहीये . बुध्द करुणेला महत्त्व देतो तर ह्या देशातील करोडो बुध्दाचा मार्ग अवलंबन करणाऱ्या लोकांवर माझा विश्वास आहे की ते त्या निरागस निष्पाप लेकरांना उचलून कडेवर नक्की घेतील ! मी आमच्या न्यायाची प्रतीक्षा पहात राहीन , आमचे आपलं गिल्ट मॅनेजमेंट टूल इम्प्रोव करत राहीन ! बाकी गावाला वाडा परत बांधला की नक्की सुरू करेन ह्या अशा अनाथ मुलांसाठी काहीतरी ! बाकी बास आता , कंटाळा आला ह्या इथे लिहायचा. सध्या मॅडम ने जे भाषण दिले त्यावर मनोरंजन करत आहे , तस्मात् तिथं बोलू =))))

In reply to by स्वधर्म

ज्ञानाचा उपयोग हाच आहे की दुःख असं काही नाहीये , आहे हा दुःखाचा भास आहे, त्या भासाचे कारण आपली द्वैताविषयीची ठाम धारणा ही आहे. हे लक्षात येणे !! एकदा जे आहे ते सगळं "परफेक्ट" आहे. हे लक्षात आलं एकदा ज्याला आम्ही कर्म विपाक म्हणतो , तुम्ही गिल्ट मॅनेजमेंट टूल म्हणता, ते एकदा जमलं की ह्या विश्वातील प्रत्येक गोष्टीचे परफेक्ट असणे, जे जसे आहे ते तसे असणे हे परफेक्ट आहे हे लक्षात येतं. आणि मग झोपेतून जागे झाल्यावर निद्रा आपोआप नाश पावते तसे काहीसे दुःख आपोआप नाश पावते. अजून काय उपयोग हवा ! मला जे आमचे जुनाट दुःख टोचत होते त्याचा कार्यभाग साधला गेला आहे ! आता दुःख असं काही नाही. :) आता तुम्ही म्हणाल की मग कसल्या न्यायाची वाट पाहताय ? तर त्याचेही उत्तर असे आहे की हे "न्यायासाठी झुरणे" हा ही आमच्या पूर्व कर्माचा भाग आहे , तो बस भोगून संपवत आहे. आता दुःख असे काही नाही ! आता बस राम आहे ! इथे मला तुकोबांचा एक अभंग आठवतो पण तो खूप मोठ्ठा असल्याने इथे लिहित नाही फक्त शेवटची ओळ लिहितो आतां आहे तैसा दिसतो विचार । पुढील प्रकार देव जाणे ॥१८॥ भक्ता नारायण नुपेक्षी सर्वथा । कृपावंत ऐसा कळों आलें ॥१९॥ तुका म्हणे माझें सर्व भांडवल । बोलविले बोल पांडुरंगें ॥२०॥ पांडुरंग बुद्धी देतोय तसं बस लिहित राहतोय मी ! राम कृष्ण हरी आता इतकं पुरे. पुढील चर्चा नवीन लेखावर !

In reply to by प्रसाद गोडबोले

स्वधर्म 25/02/2025 - 18:21
लेख १५ फेब्रुवारीला २०२५ टाकला आहे. त्यात तुमच्या जुनाट दु:खाचा उल्लेख आहे. माफ करा, पण माझा तुंम्हाला वेदांत व अध्यात्माचे ज्ञान खूप आधीच झाले होते, असा समज होता. कारण ३० सप्टेबर २०२४ च्या 'सूर्य पाहिलेला माणूस' या लेखात आपण खालील वाक्ये लिहीली होती: आज्जींने माझ्या हातात न्याहारीसाठी केलेल्या गोडाच्या शिऱ्याची वाटी दिली आणि आजोबांकडे बघून म्हणाली: " हे पहा आला तुमचा सूर्य पाहिलेला माणूस !" आणि हसत हसत आज्जी स्वयंपाक घरात निघुन गेली. नानांनी माझ्याकडे वळुन पाहिलं नाही मात्र त्यांच्या चेहर्‍यावर समाधानाचं हसु मात्र उमटलं. तुमचा ६ जून २०२४ च्या 'परत एकदा हिमालयाच्या कुशीत - ५ संपुर्ण.' लेखात स्वामीजींनी आपल्याबाबत खालीलप्रमाणे भाष्य केले होते: स्वामीजी म्हणाले - You explained it the best. आणि नंतर गालातल्या गालात हसत म्हणाले - It took me 20 years to understand this and you got it in just 7 days' shivir ! दोन्ही तुमच्या स्वतः बद्दलचे उल्लेख वाचून कोणाचाही समज होईल की तुंम्हाला ते तथाकथित ज्ञान खूप आधीच झालेले आहे. म्हणूनच माझाही तसाच समज झाला होता. पण १५ फेब्रुवारी २०२५ ला मात्र तुमचे वर्षानुवर्षांचे जुनाट दु:ख अजून छळत असल्याचा उल्लेख आला. तसेच आपण बुध्दाने सांगितलेले दु:खाचे कारण चूक असल्याचे व तुमचे ज्ञान मात्र बरोबर असल्याचे प्रतिपादन केले आहे. अर्थात लेख लिहीपर्यंत तुमची दु:खे तशीच होती, पण लेख लिहिल्यानंतर ते आज अशा दहा दिवसात ती दूर झाली, हे आपण स्पष्ट केले ते खूप चांगले झाले. बाकी ती रस्त्यावरची मुले, त्यांचे दीनवाणे आईबाप यांच्या दु:खाबाबत... असो.

हा धागा नि प्रतिक्रिया माझ्या समजापलीकडील आहेत त्या पेक्षा मी मशीन डिसाइन अजून दोन वेळा वाचून घेईन. फक्त प्रश्न असाय की ह्या धाग्याच्या शेवटी जो फोटोय तो गोडबोले साहेबांचा आहे का?

In reply to by अमरेंद्र बाहुबली

फक्त प्रश्न असाय की ह्या धाग्याच्या शेवटी जो फोटोय तो गोडबोले साहेबांचा आहे का? ----- लोचट माणसाचा मनोरंजक प्रतिसाद...

In reply to by अमरेंद्र बाहुबली

फक्त प्रश्न असाय की ह्या धाग्याच्या शेवटी जो फोटोय तो गोडबोले साहेबांचा आहे का?
आहा! तो फोटो रमण महर्षी ह्यांचा आहे ! मी बस तसे व्हायचा प्रयत्न करत आहे , किंबहुना , होतो !
होतो !
याचसाठी केला होता अट्टाहास । शेवटाचा दिस गोड व्हावा ॥१॥ आतां निश्चितीनें पावलों विसांवा । खुंटलिया धांवा तृष्णेचिया ॥ध्रु.॥ कवतुक वाटे जालिया वेचाचें । नांव मंगळाचें तेणें गुणें ॥२॥ तुका म्हणे मुक्ति परिणिली नोवरी । आतां दिवस चारी खेळीमेळीं ॥३॥ मन:पूर्वक धन्यवाद ! I don't have words to thank you enough ! माझे डोळे अक्षरश: पाणावले तुमचा प्रतिसाद पाहून. __/\__

In reply to by प्रसाद गोडबोले

अच्छा! मन:पूर्वक धन्यवाद ! I don't have words to thank you enough ! मी बस तसे व्हायचा प्रयत्न करत आहे , किंबहुना , होतो ! तुमची अध्यात्मिक प्रगती अशीच राहिली तर तुम्हीही त्यांच्या सारखे व्हाल! _/\_

In reply to by अमरेंद्र बाहुबली

"तुम्हीही त्यांच्या सारखे व्हाल..." म्हणजे कसे? दिसायला की त्यांच्या सारखे ज्ञानी.... गाळलेल्या जागा नीट भरावी... इतपत तरी ज्ञान हवे....

In reply to by अमरेंद्र बाहुबली

लेखकाची सर्व मतं न कळण्यासारखीच आहेत. स्वतःच विचारांचा गुंता करुन ठेवलाय अर्थात सगळं गिचमीड. आणि नाहीच कळलं तर, तुम्ही ज्ञानेश्वरांच्या किंवा तुकारामांच्या किंवा अर्जूनाच्या पायरीवर आलं पाहिजे. म्हणजे तेथून तुम्हाला लेखांतील ज्ञानकण आणि कृष्णाला काय म्हणायचं आहे ते समजू लागतं. स्वांतसुखायच्या नावाने दुसरं गेट ऑलरेडी बंद करुन टाकलंय. मला जे कळलंय ते अत्युच्च पायरीवरचं आहे. आणि त्या पायरीला पकडायचं तर, खाली मान घालून चालू पडा. =)) ऐसें कैसें झाले भोंदू। कर्म करोनि म्हणती साधु ।। अंगा लावुनिया राख। डोळे झांकूनि करिती पाप ।। दावूनि वैराग्याची कळा। भोगी विषयांचा सोहळा ।। तुका म्हणे सांगों किती। जळो तयांची संगती ।। -दिलीप बिरुटे -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मन:पूर्वक धन्यवाद सर ! माझे लेखन तुम्हाला कळो न कळो, माझी काही हरकत नाही, तुम्ही फक्त असेच लक्ष असू द्या आमच्यावर ! आतां माझा सर्वभावें हा निर्धार । न करीं विचार आणिकांचा ॥१॥ सर्वभावें नाम गाईन आवडी । सर्व माझी जोडी पाय तुझे ॥ध्रु.॥ लोटांगण तुझ्या घालीन अंगणीं । पाहीन भरोनि डोळे मुख ॥२॥ निर्लज्ज होऊनि नाचेन रंगणीं । येऊं नेदी मनीं शंका कांहीं ॥३॥ अंकित अंकिला दास तुझा देवा । संकल्प हा जीवा तुका म्हणे ॥४॥ राम

In reply to by आंद्रे वडापाव

आज काय सुट्टी आहे काय आंद्रे ? =)))) माझं काम कालच संपलं असल्याने मलाही वेळ आहे आज. थांबा, आमच्या दुसऱ्या लेखनाच्या धाग्यावर या , तिकडे तुला जास्त "रोचक" विषय देतो गप्पा मारायला. =))))

In reply to by प्रसाद गोडबोले

लेखन कळायचा विषयच नाही. लेखन मांडणी सगळीच गंडलेली आहे. ( कायमच तशी असते ) प्रतिसादांमुळे जी जाणीव होते. आनंद असो की दु;ख असे काहीच जर नसते तर तातडीने दाद द्यायला आलाच नसता. हे जे जाणवते त्याला भास नाही म्हणत ती प्रत्यक्ष जाणीव असते. =)) ( वाह सर वाह.) आई गं....! =)) -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

लेखन मांडणी सगळीच गंडलेली आहे. ( कायमच तशी असते )
ह्यातच आलं सगळं सर ! एकदा का तुम्ही हे मान्य केले आहे आता मग मी लिहिलेले तुम्हाला कळणे न कळणे हा विषयच रहात नाही ना ! =)))) मी ते गट १ गट २ म्हणालो होतो, ते पटलेलं दिसतंय तुम्हाला. कारण मी काहीही लिहिलं तरी तुमच्या लेखी ते गंडलेली मांडणी असेच असणार आहे . =)))) पण ह्या निमित्ताने तुम्ही तुकोबांची गाथा वाचता, रामाचं नाव घेता ह्यातच मला समाधान आहे, मी आधीही म्हणालो आहेच की हे ! बाकी कोणाला नाही पण तुम्हाला तातडीने साद द्यायला मी कायम हजर आहे कारण, तुमच्या प्रतिसादात राम पाहणे हीच माझी परीक्षा आहे. राम

In reply to by प्रसाद गोडबोले

काळजी घ्या. जपा. बडबडणे वाढले आहे. त्यासाठी सांगावे लागते. आपलं ते स्वांतसुखायवालं डिस्क्लेमर पुन्हा पुन्हा वाचा. =)) -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

बघा सर, मी आत्ताच म्हणालो होतो की नै, तुमच्या प्रतिसादांचा मला सगळ्यात जास्त फायदा होतो !! तुमचा हा प्रतिसाद मला काय भारी वाटलं काय सांगू. हीच अवस्था तुकोबांची झाली होती ... माझी मज झाली अनावर वाचा । विषयीं विसर पडिला निःशेष । अंगीं ब्रम्हरस ठसावला ॥१॥ माझी मज झाली अनावर वाचा । छंद या नामाचा घेतलासे ॥ध्रु.॥ लाभाचिया सोसें पुढें चाली मना । धनाचा कृपणा लोभ जैसा ॥२॥ तुका म्हणे गंगासागरसंगमीं । अवघ्या जाल्या ऊर्मी एकमय ॥३॥ ह्या प्रतिसादातून, आपल्याशी संवादातून मला सुखच मिळत आहे सर !!

In reply to by प्रसाद गोडबोले

आपल्याशी संवादातून मला सुखच मिळत आहे सर !! =)) सुख असं काही नसतं. तो सुखाचा भास आहे. तो तुम्हाला कृपास्वरुप लाभलेला आहे. =)) मरतंय आज हसून हसून.... =)) -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सुख असं काही नसतं. तो सुखाचा भास आहे.
हे चुकलं बघा सर. होईल जाला अंगें देव जो आपण । तयासी हे जन अवघे देव ॥१॥ येरांनीं सांगावी रेमट काहाणी । चित्ता रंजवणी करावया ॥ध्रु.॥ धाला आणिकांची नेणे तहान भूक । सुखें पाहें सुख आपुलिया ॥२॥ तुका म्हणे येथे पाहिजे अनुभव । शब्दाचे गौरव कामा नये ॥३॥ दुःख हा भास आहे , सुख हा आभास नव्हे, दुःखाचा अभाव हेच सुख आहे . सुखें पाहें सुख आपुलिया असे काहीसे आहे हे ! पण ही अनुभवाची बाब आहे , बघा अनुभवला आले तर !!

In reply to by प्रसाद गोडबोले

>>>> हा लेख नेहमीप्रमाणेच स्वान्तःसुखाय आहे. इथे कोणाला काहीही पटवुन द्यायचे धोरण नाही कि कोणाचे काहीही मत खंडन करावयाचा विचार नाही. उगाच अभंग टाकून काहीही पटवून द्यायचा प्रयत्न करु नये. आणि गंडलेली मतं लादू नये. =)) -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

अहो , तुम्ही प्रतिसाद वाचत तरी आहात का नाही . मी म्हणालो की हा अनुभवाचा मामला आहे. हे पटवून देण्यासारखे नाहीच. अनुभवगम्य गोष्टी शब्दांनी कशा पटवून देता येतील ? किमान एकदा वाचा तरी प्रतिसाद उत्तर द्यायच्या आधी ! तुका म्हणे येथे पाहिजे अनुभव । शब्दाचे गौरव कामा नये !!

कॉमी 21/02/2025 - 21:19
मला अजूनही कुठेतरी गफला वाटतो ब्वा. म्हणजे सगळे ब्रह्म आहे, आयुष्य माया आहे, सगळे भ्रम आहे असे सगळे पटले तरी सगळी दिनचर्या मोर ऑर लेस पूर्वीसारखी कशी राहणार? अजूनही कुटुंबं वत्सल वैगेरे कसे राहणार? (कारण तुमचे कुटुंबं पण एक भ्रमच की. सगळे ब्रम्ह आहे. मग कुटुंबं काय आणि रस्त्यावरचा दगड काय एकच. हे मला पटत नाही मी फक्त लॉजिकल एक्सट्रापोलेशन करतोय.) मग वरवरचे बोलण्यातले, अविरभावातले फरक वगळता बाकीचे आहे तसे कसे चालेल ब्वा? एक फँटसी झाकायला आणखी चार फँटॅस्या उभ्या करायला लागतात. उदा - जर सगळे ब्रम्ह आहे तर भ्रम किंवा माया कशामुळे? संचित कर्म कशामुळे? जितके प्रश्न पडतील तितकी डिटेल्ड फँटॅस्टिक उत्तरे मिळत जातात. प्रत्येक उत्तर आदल्या प्रश्नापेक्षा कमी आणि कमी तपासण्याजोगे असते. सरते शेवटी उत्तर असते की आपल्याला अनुभव आला तरच विश्वास ठेवा. बरं अनुभव कसे मिळतात? तर तुमच्या भौतिक शरीरानेच. म्हणजे तुमचे शरीर म्हणजे तुम्ही नाही हे समजण्यासाठी शरीराकडून अनुभव मिळवावा लागतो. इथे "लीला" हा प्रकार पण ऍड्रेस करतो. राम तथागत बुद्धाबद्दल प्रतिकूल बोलतो. हे दोघेही अवतार असतील तर हे कसे? उत्तर आले लीला. म्हणजे परमेश्वर स्वतःशी खेळ खेळतोय. परमेशवर म्हणजे ब्रह्मच म्हणजे तुम्हीच हा. हे म्हणजे बॉयलर उत्तर झाले. ह्यापुढे विचार करायची गरज संपली, सगळे ड्रामा, लीला मध्ये राईट ऑफ मारता येते. ह्याची इतरधर्मीय तुलनात्मक उदाहरणे पण आहेत. ख्रिषचन म्हणतात येशू सर्व विश्वाच्या पापांसाठी सुळावर चढला. बरं, पण ते ट्रिनीटी हया संकल्पनेवर पण विश्वास ठेवतात. God is a single entity made of three person किंवा असेच काहीतरी. हे देखील लिमिटेड "अद्वैत" टाईप आहे- म्हणजे निखालस अर्थहीन आणि तर्कहीन. ते असो. पण ते ट्रिनीटी मानतात म्हणजे असे मानतात की याहवे (म्हणजे येशूचे वडील, आकाशातला बाप्पा), देवाची आत्मा आणि येशू (फादर सन अँड दी होली स्पिरिट) हे एकच देवाचे तीन अंग आहेत. पण हे तिघे भिन्न पण आहेत. बरं. मग पाप पुण्य कोणी बनवले? तर देवाने. पाप करण्यास सक्षम माणसे कुणी बनवली? देवाने. पाप माफ कोण करणार? देव. माफिसाठी टॉर्चर आणि बळी कुणाचा? देवाचाच! ही सगळी भानगड कशासाठी? ख्रिषचन म्हणतात की देवालाच माहित. त्यांना कोणीतरी "लीला"ची टीप द्यायला हवी. हा गफला सर्व अब्राहमिक धर्मात आहे. पापक्षम माणसे, पापांची व्याख्या, आणि पापांचा निवाडा सगळे एकच देव करतो, का? कशासाठी? पाप शक्यच नाही असे जग का नाही बनवले? तळटीप - माझे आवडते लेखक जे आर आर टोलकीन ह्यांनी त्यांच्यापरीने वरील प्रश्नाचे उत्तर दिले आहे. लॉर्ड ऑफ द रिंग्सच्या विश्वाचा निर्माता परमेश्वर आहे एरू इलूवितार. तो त्याच्या विचारांनी इतर देवता- व्हॅलार बनवतो. आणि व्हॅलार आणि तो मिळून एक सुरेख गीत गाऊ लागतात. पण, त्यात इलूवितारनेच बनवलेला एक व्हॅलार - मॉरगॉथ, स्वतःची वेगळी धून गाऊ लागतो, जी इलूवितारच्या संगीताशी विसंगत असते. इतर काही व्हॅलार त्याला सामील होतात. दोन गीतांमधल्या संघर्षात इलूवितारचे गीत जवळपास विरून जाते. पण इलूवितार एक असा सूर पकडतो की संबंध अवकाश त्याने भरून जाते. मग इलूवितारणे मॉरगॉथला बनवलेच का? तर दोन गीतांमधल्या संघर्षामुळे इलूवितारचे गीत आणखी सुरेख झाले. हे लिखाण सुरेख आहे. टोलकीन साहेबांना दाद द्यावी तितकी कमी. पण हे स्वीकारण्यासारखे स्पष्टीकरण आहे का? केवळ शब्दांच्या करामतीने प्रभावीत होऊन काय खरे काय खोटे ठरवणे कितपत बरोबर?

In reply to by कॉमी

कॉमी 21/02/2025 - 21:28
हे काही टोलकीन साहेबाचे स्वतःचे विचार नाहीयेत. सैतान हा केवळ देवाच्या हुकूमशाहीला कंटाळून बंड करणारा देवदूत आहे ही जुनी संकल्पना आहे. मिल्टनचे सुप्रसिद्ध काव्य पॅराडाईज लॉस्ट मध्ये सुद्धा तीच कल्पना मध्यवर्ती आहे. त्या काव्यातला सैतान एक अत्यंत चर्चले गेलेले पात्र आहे. ते पात्र नायक म्हणून वाचले जाणे सुद्धा सहज शक्य आहे. सिनेमा-टीव्ही मधला दुष्ट शैतान इथे नाहीये - तर परमेश्वर जे ठरवतो तेच चांगले, आणि त्यामुळे त्याविरुद्ध बंड करणारा वाईट - असा हा सैतान आहे.

सगळे ब्रह्म आहे, आयुष्य माया आहे, सगळे भ्रम आहे. पण १९४८ ला जाळलेला वाडा खरा आहे... जग माया आहे, आणि आपण लालसा वासना जगाने सोडून दिली पाहिजे... पण तथाकथित हडपले गेलेली जमिनीची हाव आम्ही मात्र सोडणार नाही.... आधी पिढ्यानपिढ्या ओरबाडून घेतलेले आणि पूर्वापार बापजद्यांच्या वशिल्यानेच मिळणारी हक्काची जागा, हे "संचित कर्म" वैगरे सब झूठ पण कोलकल्पित इंजिनियरिंग किंवा मेडिकल करायची संधी कोणी हिसकावुन घेतली जाणे, हे मात्र खर्र खर्र, बरका...

कॉमी 24/02/2025 - 22:22
आणखी एक अनेकदा अध्यात्मिक विचाराची लोकं आपल्या पंचेंद्रियांना, शरीराला अनरिलायबल म्हणतात. पण शरीर नसलेल्या माणसाने अध्यात्मिक अनुभव घेऊन रिपोर्ट केल्याचे कुठे दिसत नाही. उलट, असे अनुभव मिळवण्यासाठी शरीरला एका विशिष्ठ स्थिती मध्ये न्यावे लागते, मग ते ध्यान करून असो वा विशिष्ठ केमिकल किंवा ड्रग घेऊन असो . आणि अश्या स्थिती मध्ये चित्रविचित्र अनुभव आले तर ते मात्र खरे मानावेत.

In reply to by कॉमी

पण शरीर नसलेल्या माणसाने अध्यात्मिक अनुभव घेऊन रिपोर्ट केल्याचे कुठे दिसत नाही.
उघडा डोळे ... बघा नीट ... एका नॉन बायोलॉजिकल व्यक्तीने तो अध्यात्माचा महामेरू कधीच सर केलाय ... ओळखा पाहू कोण ! m
प्रस्तावना : १. हा लेख नेहमीप्रमाणेच स्वान्तःसुखाय आहे. इथे कोणाला काहीही पटवुन द्यायचे धोरण नाही कि कोणाचे काहीही मत खंडन करावयाचा विचार नाही. त्यामुळे तुम्हाला लेख पटला काय की न पटला काय मला काहीही फरक पडत नाही. २. हा लेख लिहिताना जमेल तितकी तथ्ये आणि संदर्भ वापरण्याचा प्रयत्न केला आहे तथापि काही तथ्येच चुकीच्या शब्दात उधृत केलेली असतील तर आपण जरुर माझ्या निदर्शनास आणुन द्यावीत ही नम्र विनंती ! ३. हा लेख बहुतांशपणे माझ्या वैयक्तिक जीवनातील अनुभवातुन आलेल्या चिंतनांवर आधारीत आहे. तुम्हाला आलेले अनुभव , तुमचे चिंतन , तुमचा अभ्यास , तुमचे आकलन भिन्न असु शकते !

अ न्युरल नेटवर्क विथ अ सिंगल डेटा पॉईंट

प्रसाद गोडबोले ·

युयुत्सु 10/02/2025 - 08:27
न्युरल नेटची अध्यात्माशी सांगड वाचून गंमत वाटली. पण यातला तथ्याचा भाग थोडा वेगळा आहे. "राम" ऐवजी कोणत्याही संकल्पनेवर मन एकाग्र करण्याने चेताशास्त्रीय फायदे मिळू शकतात - उदा० उपाग्रखंडाचा विकास, करूणा आणि मनःशांति इ० ची प्राप्ती तेव्हा राम, ओंकार, मेणबत्तीची ज्योत किंवा कोणतीही "पवित्र" वस्तू किंवा "संवेदना" अशा आध्यात्मिक अनुभूतीसाठी उपयोगी पडू शकते. आपले मन स्थिर राहणे निसर्गाला अभिप्रेत नाही. मन जर स्थिर राहीले तर आजूबाजूच्या परिसरात निर्माण होणारे धोक्यांची जाणीव अमिग्डाला पर्यंत पोचणार नाही आणि त्या जीवाचे अस्तित्व धोक्यात येईल ( वाल्या मुंग्यांच्या वारूळात गाडला गेला तसेच) . शेवटी तारतम्य महत्त्वाचे...

In reply to by युयुत्सु

असेलही , पण मला माहीती नाही !
"राम" ऐवजी कोणत्याही संकल्पनेवर मन एकाग्र करण्याने चेताशास्त्रीय फायदे मिळू शकतात - उदा० उपाग्रखंडाचा विकास, करूणा आणि मनःशांति इ० ची प्राप्ती तेव्हा राम, ओंकार, मेणबत्तीची ज्योत किंवा कोणतीही "पवित्र" वस्तू किंवा "संवेदना" अशा आध्यात्मिक अनुभूतीसाठी उपयोगी पडू शकते.
असुही शकेल , पण मला माहीती नाही. आणि त्या अर्थाचे काही श्लोक , ओव्या अभंग किमान मला तरी माच्या आजवरच्या वाचनात आढळले नाहीत . उलट असलं दुसरं काहीही करु नका ह्या अर्थाचे मात्र बरेच काही आढळले आहे : योगांचेनि बळे । अधिक काही मिळे । ऐसे नाही आगळे | कष्टचि तया ॥ ५९ ॥ म्हणोनि योगाचियां वाटा । जे निगाले गा सुभटा । तयां दुःखाचाचि शेलवांटा । भागा आला ॥ ६९ ॥ न वेचें कदा ग्रंथिचे अर्थ काही । मुखे नाम उच्चारिता कष्ट नाही ॥ महाघोर संसारशत्रू जिणावा । प्रभाते मनीं राम चिंतीत जावा ॥ ७२ ॥ नाम घेता उठाउठी, होय संसाराची तुटी || धृ || ऐसा लाभ बांधा गांठी विठ्ठल पायी मिठी || १ || नामापरते साधन नाही जें तू करिसी आणिक कांही || २ || हाकरोनी सांगे तुका नाम घेता राहो नका || ३ || अन्य उपाय, मार्ग असतीलही , पण मला माहीती नाही . बस इतकेच ! ज्याचा त्याचा मार्ग वेगळा !! माझे वाचन , आकलन, अनुकरण आणि अनुभव मर्यादित आहे हे मान्य करुन थांबतो ! इत्यलम राम

माहितीपूर्ण. आणखी येऊ द्या. नविन ओ.सी.आर(ऑप्टिकल कॅरॅक्टर रिकग्निशन्)मध्येही ह्या पद्धतीचा वापर केला आहे का ? किंवा Long Short-Term Memory (LSTM) ह्या रिकरंट न्युरल नेटवर्कचा वापर केलेला असतो.

Bhakti 10/02/2025 - 10:54
सहज गुगल केलं...बाकी काही नाही :)
समान इनपुट आणि आउटपुट असलेल्या न्यूरॉनचे एक साधे उदाहरण म्हणजे "ओळख कार्य" करण्यासाठी सेट केलेला एकच न्यूरॉन, जिथे आउटपुट नेहमीच इनपुट मूल्यासारखेच असते ; मूलतः, ते कोणत्याही बदलाशिवाय इनपुट सिग्नलमधून जाते. स्पष्टीकरण: इनपुट: समजा न्यूरॉनला मिळणारे इनपुट हे एकच मूल्य आहे, "x". गणना: न्यूरॉन एक साधी गणना करतो: आउटपुट = x (या प्रकरणात कोणतेही अतिरिक्त वजन किंवा बायस लागू केले जात नाही). आउटपुट: न्यूरॉनचे आउटपुट देखील "x" आहे, म्हणजेच मूल्य अपरिवर्तित राहते. महत्त्वाचे मुद्दे: कोणतेही रूपांतर नाही: हे उदाहरण एक अतिशय मूलभूत कार्य दर्शवते जिथे न्यूरॉन इनपुटवर कोणतेही रूपांतर किंवा गणना लागू करत नाही, ज्यामुळे इनपुट आणि आउटपुट एकसारखे होतात. मर्यादित वापर: हे "ओळख" फंक्शन सोपे असले तरी, न्यूरल नेटवर्क्सच्या बहुतेक व्यावहारिक अनुप्रयोगांमध्ये ते विशेषतः उपयुक्त ठरू शकत नाही, कारण वजन समायोजनाद्वारे इनपुट आणि आउटपुटमधील जटिल संबंध शिकणे हे उद्दिष्ट असते.

In reply to by Bhakti

बहुतेक व्यावहारिक अनुप्रयोगांमध्ये ते विशेषतः उपयुक्त ठरू शकत नाही
एक्झॅक्टली भक्ती ताई ! एक्झॅक्टली ! व्यवहार हा मुळातच प्रवृत्तीप्रधान अर्थात "गोष्टी , धन , पुत्र , कलत्र आदींचा संचय करा " ह्या विचारावर आधारित आहे ! तिथे ह्या सगळ्याचा अल्मोस्ट काहीच उपयोग नाही. सध्या जे विनाकारण अध्यात्माचे पेव फुटले आहे , ते लवकरच नष्ट होणार आहे . कारण लवकरच लोकांचा भ्रमनिरास होणार आहे . लोकांना अध्यात्म म्हणजे काहीतरी जादुची छडी आहे अन तिचा वापर करुन मी प्रपंचात संसारात यशस्वी होईन अशी काहीतरी बाळबोध भोळीभाबडी आशा आहे. ती भंगली त्यांना लवकरच वीट येईल ह्या सगळ्याचा ! एक संपुर्ण प्रापंचिक विषयासक्त माणुस आणि एक जीवनमुक्त पण तरीही कर्मरत गृहस्थाश्रमी माणुस ह्यांच्यात व्यावहारिक दृष्ट्या काहीच फरक नसतो. फरक असतो मनाच्या लेव्हल वर ! राम दास्स त्याच्या एका प्रवचनात अप्रतीम बोलला होता की - "अध्यात्मिक प्रवास म्हणुन तुमचे जे जे काही पुर्वग्रह आहेत की मी असेन करेन मी तसे करेन , मग असे होईल अन तसे होईल , हे सगळं व्यर्थ आहे. रादर ह्या सगळ्याची व्यर्थता लक्षात आल्यावरच तुमचा खरा अध्यात्मिक प्रवास सुरु होईल !" टृंङ्पा रिन्पोचे https://en.wikipedia.org/wiki/Ch%C3%B6gyam_Trungpa नावाचा एक विवादास्पद पण खुप प्रसिध्द असा बुध्दीस्ट स्कॉलर गुरु होऊन गेला तो त्याच्या प्रवचनात एकदा म्हणाला होता -
Enlightenment is the ultimate disappointment of the ego.
तात्पर्य इतकेच की - ह्या सार्‍याचा अध्यात्मिक गोष्टींचा व्यावहारिक असा काही उपयोग नाही हे उघडच आहे ! जे व्यावहारिक उपयोगितेच्या पलीकडचे काही शोधत आहेत , त्यांनाच ह्याचा खरा फायदा होईल ! अर्थात ही बुध्दी देणाराही रामच ! राम

In reply to by प्रसाद गोडबोले

युयुत्सु 11/02/2025 - 11:45
Enlightenment ही कल्पना वैज्ञानिक पातळीवर समजाऊन घेता येईल का असे बरेच दिवस मनात घोळत होते. वरील विधानाने याला परत एकदा चालना मिळाली म्हणून ए०आय्०लाच साकडे घातले - प्रश्न० "How the concept of enlightenment can be explained from the perspective of neuroscience?" उत्तर - १. Enlightenment, often described as a profound spiritual awakening or a deep sense of interconnectedness, has been a subject of interest in neuroscience, particularly in the field of neurotheology. Researchers aim to understand the neural correlates of such transformative experiences. Studies involving advanced meditators have utilized neuroimaging techniques to observe brain activity during deep meditative states. Findings suggest that these individuals often exhibit decreased activity in the brain's default mode network (DMN), which is associated with self-referential thoughts and mind-wandering. This reduction in DMN activity correlates with a diminished sense of self, a common characteristic reported during enlightenment experiences. citeturn0search4 Additionally, research indicates that long-term meditation can lead to structural changes in the brain. For instance, increased connectivity between different brain regions has been observed, potentially reflecting enhanced integration during meditative states. These neural adaptations may facilitate the mental states and skills associated with meditation and enlightenment. citeturn0search6 Neuroscientist Dr. Andrew Newberg has extensively studied the relationship between spiritual experiences and brain activity. His work suggests that enlightenment experiences can lead to permanent changes in brain function, particularly in areas related to self-perception and emotion regulation. citeturn0search4 While these findings provide insights into the neural mechanisms underlying enlightenment experiences, it's important to note that the subjective nature of such states presents challenges in scientific study. The field of neurophenomenology attempts to bridge this gap by combining first-person experiential reports with third-person neuroscientific data to gain a more comprehensive understanding. citeturn0search13 In summary, neuroscience approaches enlightenment by examining how certain practices, like meditation, influence brain activity and structure, leading to transformative experiences. Ongoing research continues to explore these complex interactions between the brain and profound states of consciousness. For a more in-depth exploration of this topic, you might find the following discussion by Dr. Andrew Newberg insightful: videoThe Neuroscience of Enlightenment, with Dr. Andrew Newbergturn0search1 २. From a neuroscientific perspective, enlightenment can be viewed as a unique state of consciousness characterized by changes in brain activity, connectivity, and information processing. Here's a simplified explanation: Neural Correlates of Enlightenment 1. Default Mode Network (DMN) deactivation: The DMN, responsible for self-referential thinking, ego-boundaries, and mind-wandering, is often deactivated during enlightenment experiences. This deactivation can lead to a sense of self-transcendence and reduced ego-identification. 2. Increased global neural coherence: Enlightenment experiences often involve a sense of unity, interconnectedness, and holistic awareness. This can be reflected in increased global neural coherence, where different brain regions exhibit synchronized activity, fostering a sense of integration and wholeness. 3. Neuroplasticity and rewiring: Enlightenment experiences can lead to changes in brain structure and function, particularly in regions involved in attention, emotion regulation, and memory. This neuroplasticity can result in a reorganization of neural connections, potentially leading to more adaptive and efficient information processing. Brain Regions Involved 1. Prefrontal cortex (PFC): Involved in attention, emotion regulation, and decision-making. 2. Default mode network (DMN): Involved in self-referential thinking, ego-boundaries, and mind-wandering. 3. Ventral tegmental area (VTA): Involved in reward processing and dopamine release. 4. Nucleus accumbens (NAcc): Involved in reward processing and pleasure. 5. Amygdala: Involved in stress and anxiety processing. 6. Hippocampus: Involved in memory formation and emotion regulation. Neurotransmitters and Hormones 1. Dopamine: Involved in reward processing, pleasure, and motivation. 2. Serotonin: Involved in mood regulation, emotional processing, and social behavior. 3. Endorphins: Involved in pain modulation, stress reduction, and feelings of well-being. 4. Oxytocin: Involved in social bonding, trust, and emotional connection. Theories and Models 1. Integrated Information Theory (IIT): Suggests that consciousness arises from the integrated processing of information within the brain. 2. Global Workspace Theory (GWT): Proposes that consciousness involves the global workspace of the brain, where information from various sensory and cognitive systems is integrated. 3. Neural Darwinism: Suggests that neuronal connections are strengthened or weakened based on experience, leading to changes in brain function and behavior. While neuroscience can provide insights into the neural correlates of enlightenment, it is essential to acknowledge that the experience of enlightenment is complex, multifaceted, and may not be fully captured by neuroscientific explanations.

In reply to by प्रसाद गोडबोले

रादर ह्या सगळ्याची व्यर्थता लक्षात आल्यावरच तुमचा खरा अध्यात्मिक प्रवास सुरु होईल !"
ह्या लेखाबद्द्ल आणि त्यावर होणार्‍या चर्चेबद्द्ल पण हे वाक्य लागू होईल काय ?

In reply to by धर्मराजमुटके

स्वधर्म 11/02/2025 - 13:16
तुंम्हाला गट क्र. २ मध्ये टाकण्यात येईल. प्रश्न बाकी एकदम मार्मिक आहे, बघूया काय उत्तर येते.

In reply to by धर्मराजमुटके

ह्या लेखाबद्द्ल आणि त्यावर होणार्‍या चर्चेबद्द्ल पण हे वाक्य लागू होईल काय ?
होय होय . अगदी 100%. पण ते केवळ त्याच लोकांना कळू शकेल जे त्या लेव्हल पर्यंत पोहचले आहेत. समर्थांनी काय लिहून ठेवलं आहे पहा : जाले साधनाचे फळ। संसार जाला सफळ॥ निगुर्ण ब्रह्म ते निश्चळ। अंतरी बिंबले॥ (२०.१०.२६) हिशेब जाला मायेचा। जाला निवाडा तत्त्वांचा॥ साध्य होता साधनाचा। ठाव नाही॥ (२०.१०.२७) साध्य होता साधनांचा ठाव नाही !! मला काय म्हणायचं आहे हे तुम्हाला कळल्यावर हा लेख व्यर्थच आहे . त्यानंतर फक्त नामस्मरण करा ! राम राम राम आणि ह्याच्या पुढची अवस्था आहे जिथे हा जप करायचीही आवश्यकता नाही !! ही अवस्था कबीराने त्याच्या दोहा मध्ये उत्तम वर्णन करून ठेवली आहे माला जपूं न कर जपूं और मुख से कहूँ न राम । राम हमारा हमे जपे और हम पायो विश्राम ।। राम

Bhakti 10/02/2025 - 19:27
Enlightenment is the ultimate disappointment of the ego.

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

ह्यानिमित्ताने का होईना पण तुमच्या मनीं राम येत आहे, तुम्ही "हे राम" असे लिहित आहात , ह्यातच ह्या लेखाचे सार्थक झाले ! अजामेळ पापी वदे पुत्रकामे। तया मुक्ति नारायणाचेनि नामें शुकाकारणे कुंटणी राम वाणी। मुखें बोलतां ख्याति जाली पुराणीं॥९५॥ राम

In reply to by प्रसाद गोडबोले

संत चोखोबा : गणिका अजामेळे काय साधन केलें । नामचि उच्चारिलें स्वभावता ॥१॥ नवले हें पाहा नवल हें पाहा । अनुभवें अनुभवा देहामाजी ॥२॥ उच्चारितां नाम वैकुंठींचें घेणें । ऐसें दुजें पेणें आहे कोठें ॥३॥ ब्रह्महत्या जयासी घडल्या अपार । वाल्हा तो साचार उद्धरिला ॥४॥ उफराटें नाम न येचि मुखासी । मारा मारा ध्यासीं स्मरतां झाला ॥५॥ चोखा म्हणे ऐसा नामाचा महिमा । उद्धारा अधमा स्‍त्री शुद्रा ॥६॥ संत बंका : पांडुरंगावाचोनी दुजा कोण सखा । निर्वाणीचा देखा मायबाप ॥१॥ तारीतासे एका नावासाठी जगा । ऐसा हा पै वा श्रेष्ठाचार ॥२॥ गणिका गजेंद्र यासी उध्दरिलें । प्रत्यक्ष तारिलें अजामेळा ॥३॥ बंका म्हणे ऐसा आहे हा भरवंसा । मज तंव सर्वेशा विठोबाचा ॥४॥ राम

In reply to by प्रसाद गोडबोले

>>>>ह्यानिमित्ताने का होईना पण तुमच्या मनीं राम येत आहे, तुम्ही "हे राम" असे लिहित आहात , ह्यातच ह्या लेखाचे सार्थक झाले ! रामाचं पेटेंट आहे का आपल्याकडे. =)) -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

कसलं डोंबलाच आलंय पेटंट. =)))) मी म्हणतोय की तुम्ही नामस्मरण करताय हे पाहून मला आनंद होतोय ! तुम्हीच भलता सलता अर्थ काढता तुमच्या पूर्वग्रहदूषित विचारातून. ऐक रे जना । तुझ्या स्वहिताच्या खुणा । पंढरीचा राणा । मनामाजी स्मरावा ॥१॥ मग कैचें रे बंधन । वाचे गातां नारायण । भवसिंधु तो जाण । येचि तीरी सरेल ॥ध्रु.॥ दास्य करील कळिकाळ । बंद तुटेल मायाजाळ । होतील सकळ । रिद्धीसिद्धी म्हणियाऱ्या ॥२॥ सकळशास्त्रांचें सार । हें वेदांचें गव्हर । पाहातां विचार । हाचि करिती पुराणें ॥३॥ ब्राम्हण क्षत्रिय वैश्य । शूद्र चांडाळांहि अधिकार । बाळें नारीनर । आदि करोनि वेश्या ही ॥४॥ तुका म्हणे अनुभवें । आह्मीं पाडियलें ठावें । आणीक ही दैवें । सुख घेती भाविकें ॥५॥ इथे सर्वांना अधिकार आहे - ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र चांडाळ आणि वेश्याही! कोणाचे कसलेही पेटंट नाही . आनंदाने नामाचा गजर करा ! नामाचा गजर ! गर्जे भीमातीर ! असं नामदेव महाराज ह्यांनी म्हणाले आहे तसे काहीसे होऊ द्या ! त्या तिथे कोनाड्यात लावलेल्या फोटोतल्या ज्ञानोबा तुकोबांनाही आनंदच होईल ! बोला - राम कृष्ण हरी जय जय रघुवीर समर्थ

गवि 11/02/2025 - 11:32
अतिशय ओव्हर फिटिंग, निरर्थक वेटेजेस असलेले, निरुपयोगी न्युरल नेटवर्क बनवणे हा उद्देश असल्यास एकच इनपुट ट्रेनिंग डेटा पॉइंट आणि तोच डेटा पॉइंट आऊटपुट लेबल म्हणून देणे हा उत्तम उपाय आहे. अर्थात उपयुक्तता वगैरे हे सापेक्ष असते. तुम्हाला तुमच्या न्युरल नेटवर्कचे काय करायचे आहे हा तुमचा तुमचा चॉईस. जाता जाता.. मनुष्याचा मेंदू हा असा सहज सरळ सोपा नाही. न्युरल नेटवर्क हे ओव्हर सिंपलिफिकेशन आहे. साधारण रिकरंट न्युरल नेटवर्क किंवा तत्सम उदाहरण अधिक चपखल ठरेल. काळानुसार राम मध्येही बदल होतील. आधी सूक्ष्म वाटतील. मग variation सापडतील. रामराम अशी जोडी होईल. रा गुरू आणि म लघु असे भेद होतील. अगदी जन्मतः आंधळा मुका बहिरा असला तरी लर्निंग थांबत नाही. म्हणून तर आपण टिकलो आहोत ना. शिवाय जरा थांबल्यास शेवटी ती अवस्था कम्पल्सरी प्राप्त व्हायचीच आहे उसकी घाई कायकू? असेही वाटते. अर्थात वेगळे विचार मांडणारा लेख आवडला हे आहेच.

In reply to by गवि

युयुत्सु 11/02/2025 - 11:51
अतिशय ओव्हर फिटिंग, निरर्थक वेटेजेस असलेले, निरुपयोगी न्युरल नेटवर्क बनवणे हा उद्देश असल्यास एकच इनपुट ट्रेनिंग डेटा पॉइंट आणि तोच डेटा पॉइंट आऊटपुट लेबल म्हणून देणे हा उत्तम उपाय आहे. अर्थात उपयुक्तता वगैरे हे सापेक्ष असते.
ठार मेलो...हसून!

In reply to by गवि

उपयुक्तता वगैरे हे सापेक्ष असते.
एक्झॅक्टली गवि सर ! उपयुक्ततेच्या विचाराच्या , स्वार्थाच्या , ह्यात माझा काय फायदा ह्या विचाराच्या पलीकडे जाणे ही सुरुवात आहे हे न्यूरल नेटवर्क ट्रेन करण्याची. म्हणूनच तर तुम्ही सूक्ष्म आणि चिकित्सक दृष्टीने पाहिले तर तुमच्या हेच लक्षात येईल की ह्या सर्व साधू संतानी अन्नदानाचा उपदेश केला आहे. "ह्यातून माझा काहीही फायदा नाही" हा विचार फाट्यावर मारून अन्नदान करा, सेवा करा ! राम दास ने महाराज जी ना विचारले की मी enlightened कसा होऊ, तर महाराज म्हणाले "लोकांना अन्नदान करून." मग त्याने विचारले - मी कुंडलिनी जागृत कशी करू - त्यावर महाराज म्हणाले - "लोकांची सेवा करून !!" हेच समर्थांनी सांगितलं आहे , नाथांनी सांगितलं आहे, गोंदवलेकर महाराजांनी सांगितलं आहे ! ( पण आम्हाला ही अक्कल यायला हिमालयात जावे लागले!) इतकं सोप्प आहे हे ! एकदा उपयुक्ततेच्या विचाराच्या पलीकडं येऊन पहा , इकडं , ह्या बाजूला ! It's really mind boggling beautiful ! राम

In reply to by प्रसाद गोडबोले

युयुत्सु 11/02/2025 - 15:33
ह्यात माझा काय फायदा ह्या विचाराच्या पलीकडे जाणे ही सुरुवात आहे हे न्यूरल नेटवर्क ट्रेन करण्याची.
अशाने देशाचा जीडीपी वाढणार कसा, हे तर उत्पादकता कमी करण्याचे उद्द्योग! फायदा-तोट्याचे गणित मांडल्याशिवाय कोणतेही न्यु०ने० ट्रेन करता येत नाही.

In reply to by प्रसाद गोडबोले

चित्रगुप्त 11/02/2025 - 23:28
एकदा उपयुक्ततेच्या विचाराच्या पलीकडं येऊन पहा , इकडं , ह्या बाजूला !
-- बस, एवढेही (किंवा एवढेच) पुरेसे आहे -- आणि ते आभाळाएवढेही आहे. परी मकरंद | सेवावा भ्रमरे | बेडकासी उरे | चिखलचि ||

In reply to by आंद्रे वडापाव

युयुत्सु 11/02/2025 - 15:51
मालक, ओव्हरफिटींगला काही अपवाद आहेत, त्याबद्दल कुणी बोलत नाही. जनरलायझेशन जेव्हा आवश्यक नसते तेव्हा, नजिकच्या भविष्याकाळासाठी म्ह० शॉर्ट टर्म प्रेडीकशन, एकदाच वापर केला जाणारे मॉडेल, तसेच कॉस्ट ऑफ ट्रेनिंग हा मुद्दा फार मह्त्त्वाचा नसेल तर... लोक आंधळेपणाने "ओव्हरफिटींग-ओव्हरफिटींग" म्हणून गळा काढतात.

In reply to by युयुत्सु

गवि 11/02/2025 - 18:47
अगदी. ओव्हर फिटींग नेहमी वाईट असे नसते. जर ट्रेनिंग डेटापैकीच सबसेट म्हणजे तोच तोच डेटा परत परत समोर येणार असेल तर क्लासिफिकेशनसाठी उलट ओव्हर फिटिंग एक स्ट्राटेजी म्हणून वापरावी. जिथे मानवी श्रम कमी करायचे आहेत आणि जनरलायझेशन फार मोठे नकोय तिथे.

In reply to by आंद्रे वडापाव

Lol पण टेक्निकली स्पीकिंग, ह्या न्यूरल नेटवर्क मॉडेल ची accuracy अल्मोस्ट 0% आहे कारण ते प्रत्येकालाच राम म्हणत आहे, राम असे प्रेडिक्ट करत आहे . मला आनंद ह्यासाठी आहे की ज्याने हे मॉडेल बनवले त्याने स्वतःच हा स्टँडर्ड सेट केला आहे "मॉडेल व्यवस्थित ट्रेन झाले" असे म्हणायला !! हे पहा - यावन्न पश्येदखिलं मदात्मकं तावन्मदाराधनतत्परो भवेत् । श्रद्धालुरत्यूर्जितभक्तिलक्षणो यस्तस्य दृश्योऽहमहर्निशं हृदि ॥ ५८॥ इति श्रीमदध्यात्मरामायणे उमामहेश्वरसंवादे उत्तरकाण्डे पञ्चमः सर्गः ॥

अध्यात्म व तत्सम जडव्यागळ विषय माझ्या अल्प मतीला समजत नाही. संतांनी प्रापंचिकाना जे मार्गदर्शन केले आहे ते मात्र भावते.पुढे काय होणार हे पण माहित नाही पण नामस्मरणाने प्राप्त परिस्थितीत कठीण काळात आत्मबळ वाढते यावर विश्वास जरूर आहे. यात आत्मबळावर आलेल्या प्रसंगी ठामपणे उभे रहाता येते मग परिणाम काहिही होओ त्याने काही फरक पडत नाही. अर्थात हा माझा अनुभव, मत आहे.

In reply to by कर्नलतपस्वी

सुबोध खरे 11/02/2025 - 19:22
अध्यात्म व तत्सम जडव्यागळ विषय माझ्या अल्प मतीला समजत नाही. बाडीस मी म्हणजे शरद तळवलकर ( काना मात्रा नसलेला सरळ माणूस) . अध्यात्म काय न्यूरल नेटवर्क काय सारखे गहन विषय समजत नाहीत आणि मेंदूला पेलतही नाहीत. अशा विषयाची गहन चर्चा करणार्यांना साष्टांग नमस्कार

"इमिटेशन गेम्स" या चित्रपटात ... "हाईल हिटलर" असे केवळ २ शब्दांच्या पोझिशनवर ... संपूर्ण मेसेज डिक्रीप्ट करण्याचे असाध्य काम केले गेले त्याची आठवण आली ... सुंदर लेख ...

हातात हात तरी गवसत आहे असे म्हणता म्हणता परत मनातून काही तरी निसटून जात आहे... गम्य अगम्य.... तुमची विचारसरणी वेगळी आहे... आम्ही आपले, टीचर्स, ओल्ड मंक, जॉनी वॉकर ह्यांच्या साथीने, कधी व्हाईट हॉर्स पकडणार तर कधी किंग फिशर तर कधी गोल्डन ईगल तर कधी ब्लॅक डॉग पकडणार... पसंद अपनी अपनी... खयाल अपना अपना ..

वामन देशमुख 11/02/2025 - 14:40
नव्हे कर्म ना धर्म ना योग कांही। नव्हे भोग ना त्याग ना सांग पाहीं ॥ म्हणे दास विश्वास नामी धरावा । प्रभाते मनी राम चिंतीत जावा ॥७६।। असे सध्या सोप्या शब्दांत विचार मांडणारे तत्व विवेचन आवडले. पहाटे रामनाम स्मरण करणे हा पारंपारिक हिंदू संस्कृतीचा किती अविभाज्य भाग आहे हे "रामप्रहर" या शब्दातून दिसून येते. त्या नामस्मरणातून मिळणारी शक्ती किती अजिंक्य आहे हे "रामबाण" या शब्दातून दिसते! रामो राजमणि: सदा विजयते रामं रमेशं भजे । रामेणाभिहता निशाचरचमू रामाय तस्मै नम: । रामान्नास्ति परायणं परतरं रामस्य दासोSस्म्यहम्‌ । रामे चित्तलय: सदा भवतु मे भो राम मामुद्धर ॥ --- अर्थात या (आणि तुमच्या इतरही अश्या) लेखांतील गहन आशय समजण्याइतकी माझी तेवढी अध्यात्मिक उंची नाही तरीही वाचायला आवडते. खवचट प्रतिसादांकडे यथोचित दुर्लक्ष करत लिहीत राहावे.

राघव 12/02/2025 - 01:31
मायला ह्या ऑरेलियस बाबाच्या... अरं कुठल्या कुठल्या संकल्पना कुठच्या कुठं आणून ताडून पाहत बसतंय..! हे बघ बाबा, तुझं ते जड विज्ञान आणि ते अध्यात्म मला बुवा काही म्हणजे काहीही आकळत नाही. अरे, ज्यानं केवळ जप केला.. कारण न समजता केला.. जपानं नक्की काय फरक पडतो स्थूल/सूक्ष्म शरीरात, ते जाणून घेण्याचा प्रयत्नही केला नाही.. किंबहुना त्याची तेवढी पात्रता, ईच्छा, गरजच नव्हती.. पण भाव मनीचा केवळ एवढाच होता की "ब्वॉ गुरुंनी सांगितलंय, त्यांना आवडतं" म्हणून केला.. तर त्याची आत्मोन्नती होईल की नाही? जर उत्तर हो असेल तर, बाकी सर्व जाऊं देत ना चुलीत..! कशाला ते विज्ञान आणि अध्यात्म वगैरेची सांगड घालण्याचा प्रयत्नही करायला जायचं.. अरे जे मुळातच स्वयंसिद्ध आहे ते उगाच कशाला सिद्ध करायला घ्यायचं? विवेकानंद म्हणतात तसं "माणसाचा तर्क जिथे संपतो, तिथे खरं अध्यात्मिक साधन सुरु होतं". आता आपण आपला तर्क किती वेळ उगाळत बसतो यावर आपलं साधन कधी सुरू होणार ते अवलंबून आहे. ज्याला करायची बुद्धी होईल, त्याचं काम सुरू होईल. बाबा रे, एकदा सांगतो.. बघ पटलं तर.. एखादा आपल्या म्हणण्यानुसार साधनांत लागला तर त्याचं गुरुपण आपल्याकडे येतं. ते घेण्याची पात्रता आपली असते का? कारण त्या पदासोबत येणारी जबाबदारी किती मोठी आहे ते मी तुला सांगण्याची गरज नाही. त्यामुळे माझी तुला मनःपूर्वक विनंती आहे की, तू साधनांत मस्त आहेस.. तेच कर. उगाच या फाफटपसार्‍यात कशाला कुणाला शिकवायच्या, सांगायच्या फंदात पडायचंस. तुझ्या साधनेत ज्यानं आणिक मज़ा येईल अशी संगत बघ! ते जास्त संयुक्तिक ठरेल!

In reply to by राघव

नमस्कार राघव. आपला प्रतिसाद मनापासून आवडला. कोठेतरी लिहिले आहे म्हणून किंवा कोणीतरी सांगतंय म्हणून एखादी गोष्ट मान्य करावी, आचरणात आणावी हे मला कधी जमलेच नाही. प्रत्येक गोष्ट सतसत्विवेक बुद्धीच्या कसोटीवर तावून सुलाखून पाहिल्याशिवाय माझे मन माझी बुद्धी मान्य करायला तयारच होत नाही. कदाचित हे माझे पूर्वजन्मीचे कर्म आहे ! गुरू प्रचिती , ग्रंथ प्रचिती ह्यापेक्षाही आत्मप्रचिती ही कैक पटीने श्रेष्ठ मानतो मी. हां अर्थात ह्या मुळे गोष्टी कळायला वेळ लागतो, कष्ट पडतात , पण जेव्हा कळतं तेव्हा वळतं देखील !! त्यात साधार असे समर्थांचे श्लोक आठवून थोडं हायसे वाटते ! घालोनी अकलेचा पवाड! व्हावे ब्रह्मांडाहोनी जाड ! तेथे कैचे आणिले द्वाड ! करंट पण !! मी आधी म्हणालो तसे हा बुद्धीच्या सामर्थ्यावरील अतोनात विश्वास नसता तर कदाचित हे सारे 30 वर्षांपूर्वी च कळले असते ! नामसाधना विषयी फार पूर्वी पासून माहिती आहे पण त्यातील तर्क माहीत नसल्याने कधी त्या मार्गाला गेलोच नव्हतो, आता कुठं उमजायला लागलं आहे हे न्यूरल नेटवर्क ट्रेनिंग ! मी लिहितो तेही केवळ माझ्या आकलनातील गॅप्स मला कळाव्यात म्हणून. सर्वावस्थांमध्ये रामाचे स्मरण ठेवणे हीच एक साधना. आता इथे कोणाचा प्रतिसाद पाहून मन उद्विग्न होत असेल तर तिथेच रामाला आणून बसवलं पाहिजे, त्या माणसामध्ये राम पाहता आला पाहिजे, त्याच्या विक्षिप्त वागण्यात, वाकड्या प्रतिसादात, ही रामाची इच्छा असे पाहता आले पाहिजे, रादर हाही राम आहे असे पाहता आला पाहिजे. हीच साधना ! आणि एकदा ही अवस्था प्राप्त झाल्यावर काही लिहूच नये, बोलूच नये असे तरी कुठे ! आता बस आपण आपणच आहे , मग ते ते पुनः पुनः उपभोगू की !! आतां मी तूं या उपाधी । ग्रासूनि भेटी नुसधी । ते भोगिली अनुवादीं । घोळघोळू ॥

प्रचेतस 12/02/2025 - 19:03
नामस्मरण केव्हा तर सर्व मार्ग खुंटले असता किंवा आयुष्याच्या संध्याकाळी. साक्षात भगवंतच सांख्य, कर्म, ध्यान, ज्ञान, आत्मसंयमाचा उपदेश करून अक्षरब्रह्माचा उपदेश करताना म्हणतो अन्तकाले च मामेव स्मरन्मुक्त्वा कलेवरम् । यः प्रयाति स मद्भावं याति नास्त्यत्र संशयः ॥ यं यं वापि स्मरन्भावं त्यजत्यन्ते कलेवरम् । तं तमेवैति कौन्तेय सदा तद्भावभावितः ॥ तस्मात्सर्वेषु कालेषु मामनुस्मर युध्य च । मय्यर्पितमनोबुद्धिर्मामेवैष्यस्यसंशयः ॥ खुद्द तुकोबांनीही केवळ नामस्मरण न करता प्रपंच करून परमार्थ जोडला नामा घेता लाभ कयाचा । नेले बैल बैलाचा ॥ करितो तो न मिळे काही । मग फुकाचे नामा कांही ॥ उभा काठेवरी नाम घेई । पडे पाण्यामधी तरी मरे ॥ तुका म्हणे नेणे वेड । आता कैसा देईल बुड ॥ तर समर्थ इये देशी जनजागृती करत फिरले. नेणे नामस्मरण । म्हणोनी सोडू नये साधन । करिता सकळ कारण । तोचि सिध्द होय ॥ जोडोनिया धनु। धन्य धन्य म्हणो। तयाचे लवलेशु। न लाभे ॥ काय करील नाम । जो न चालवी पाय । सिद्धीचा उपाय । करा जे ॥ म्हणे फुकाचे नाम। हाचि खरा धर्म। अशाने पाविजे ब्रह्म। ते बुडाले॥

In reply to by प्रचेतस

वाह वल्ली सर , मनःपुर्वक धन्यवाद ! ह्यासाठी मला मिसळपाववर यायला, लिहायला आवडतं ! तुमचा प्रतिसाद पाहुन मी माझा लेख परत एकदा वाचला ! मी कुठेच म्हणालेलो नाहीये की हाती असलेले वर्णाश्रम धर्माने नेमुन दिलेले कर्म त्यागुन नामस्मरण करा !! विहित कर्म करत असताना नामस्मरण करा , सर्वांभुती, सर्वावस्थां मध्ये सर्व कर्मात रत असताना नामस्मरण करा , तुमच्या न्युरल नेटवर्क ला सर्वावस्थेत राम पहायला ट्रेन करा असेच मला म्हणायचे आहे ! इये विषयी वामन पंडीतांचा सुश्लोक आहे - अहो येता जाता उठत बसता कार्य करता सदा देता घेता वदनी वदता ग्रास गिळीता । घरी दारी शय्येवरी रतिसुखाचे अवसरी समस्ताची लज्जा त्यजून भगवत् चिंतन करी ।। तस्मात्सर्वेषु कालेषु मामनुस्मर युध्य च । भगवंतालाही हेच अभिप्रेत आहे - माझे नाव घेऊन माझे स्मरण करुन युध्द कर ! प्रपंच सोडुन नुस्तं हरि हरि करा असा मी कोठेच म्हणालेलो नाही , तसा कोठे अर्थ निघत असेल तर चुकीचाच आहे. नामस्मरण हे वर्णाश्रम धर्माला ओव्हरराईड करत नाही , उलट सह्हाय्यच करते ! बाकी तुम्ही म्हणालात ह्या "नामस्मरण केव्हा तर सर्व मार्ग खुंटले असता किंवा आयुष्याच्या संध्याकाळी." ह्या विधानाला मला तरी काही आधार सापडाला नाही. तुमच्या पाहण्यात असेल तर जरुर इथे उध्दृत करावा अशी विनंती करतो ! नामस्मरण सर्व मार्गांवर चालत असताना , सर्व कर्मे करत असताना, सर्व उपभोग घेत असताना , आयुष्याच्या पहाट सकाळ माध्यान्ह दुपार अशा सर्व काळी , जेणेकरुन संध्याकाळ होई पर्यंत नाम हीच वृत्ती बनुन गेलेली असेल , अजपाजप झालेली असेल ! तेव्हा, आयुष्याच्या संध्याकाळी काहीच करायची गरज नाही , तेव्हा बस एन्जोय करायचे आहे !
तुका म्हणे आता खेळतो कौतुके । झाळे तुज सुख अंतर्बाही ॥

In reply to by कॉमी

पण असे का करायचे? इनपुट हेच आउटपुट देणाऱ्या न्यूरल नेटवर्कचा उपयोग काय?
नाही आजकाल हे असंच असतं. न्यूरल-नेटवर्क वैगरे शब्दांची चलती आहे न मग् बस्स ! पाडला लेख.. आपल्या लेखात ए आय , न्यूरल-नेटवर्क... वैगरे शब्द बरोब्बर ओव्हर फिटिंग करून घुसवले ना कि लगेच अधिनुकता ची अधिनुकता , शिवाय सनातन च सनातनपणा सुद्धा ... तो फिर "न्यूरल-नेटवर्क" कि चमक, सनातन के दाम मिले , तो कोई वो क्यू ले , ये ना ले ! मान गये, लेखककि ओव्हर फिटिंग कि स्किल और सनातन सुपर दोनो को ...

In reply to by आंद्रे वडापाव

ख्या ख्या ख्या. रामा, I won't get caught in this trap anymore. तुला माहिती आहे की वरच काही प्रतिसादात उपयोगिता ह्या विषयावर चर्चा झालीय , उत्तर ही दिलं गेलं आहे. तस्मात् तू माझी परीक्षा पहायचा प्रयत्न केलास तरी मी फसणार नाहीये . ख्या ख्या ख्या. Nkb राम

In reply to by प्रसाद गोडबोले

कॉमी 14/02/2025 - 19:30
"व्यवहारिक" उपयोग नाही हे तुमचे म्हणणे समजले. पण इतर उपयोग काय आहे? न्यूरल नेटवर्कला "तू युनिकॉर्न आहेस" असे सांगितल्यावर ते पण तेच आउटपुट देईल. पण ते युनिकॉर्न होणार आहे का? फार तर ते स्वतःला पटवेल की ते युनिकॉर्न आहे. मग आपण अमुक काहीतरी आहोत असे स्वतःला पटवून देणे आणि एक फँटसी तयार करणे हा पॉईंट आहे का?

In reply to by कॉमी

आधीच्या लेखनावर एका प्रतिसादात तुम्हाला ज्ञानेश्वरी अध्याय तिसरा पहा म्हणालो होतो , पाहिलात का ? ह्या प्रश्नाचं उत्तर हवं असल्यास बारावा अध्याय, विशेष करुन त्यातील उत्तरार्ध अन त्यावरील ज्ञानेश्वर माऊलींचे विवेचन वाचा ! तुम्हाला "उपयोग" काय ते कळेल !

कंजूस 14/02/2025 - 17:51
लांबच्या रेल्वे प्रवासात आपल्या समोरच्या बाकड्यावर हे लोक बसले असतील तर काय मजा येईल. .. .. गप्पांच्या नादात स्टेशन आले तरी विसरून जाऊ. सर्वांना वडापाव माझ्याकडून.

युयुत्सु 10/02/2025 - 08:27
न्युरल नेटची अध्यात्माशी सांगड वाचून गंमत वाटली. पण यातला तथ्याचा भाग थोडा वेगळा आहे. "राम" ऐवजी कोणत्याही संकल्पनेवर मन एकाग्र करण्याने चेताशास्त्रीय फायदे मिळू शकतात - उदा० उपाग्रखंडाचा विकास, करूणा आणि मनःशांति इ० ची प्राप्ती तेव्हा राम, ओंकार, मेणबत्तीची ज्योत किंवा कोणतीही "पवित्र" वस्तू किंवा "संवेदना" अशा आध्यात्मिक अनुभूतीसाठी उपयोगी पडू शकते. आपले मन स्थिर राहणे निसर्गाला अभिप्रेत नाही. मन जर स्थिर राहीले तर आजूबाजूच्या परिसरात निर्माण होणारे धोक्यांची जाणीव अमिग्डाला पर्यंत पोचणार नाही आणि त्या जीवाचे अस्तित्व धोक्यात येईल ( वाल्या मुंग्यांच्या वारूळात गाडला गेला तसेच) . शेवटी तारतम्य महत्त्वाचे...

In reply to by युयुत्सु

असेलही , पण मला माहीती नाही !
"राम" ऐवजी कोणत्याही संकल्पनेवर मन एकाग्र करण्याने चेताशास्त्रीय फायदे मिळू शकतात - उदा० उपाग्रखंडाचा विकास, करूणा आणि मनःशांति इ० ची प्राप्ती तेव्हा राम, ओंकार, मेणबत्तीची ज्योत किंवा कोणतीही "पवित्र" वस्तू किंवा "संवेदना" अशा आध्यात्मिक अनुभूतीसाठी उपयोगी पडू शकते.
असुही शकेल , पण मला माहीती नाही. आणि त्या अर्थाचे काही श्लोक , ओव्या अभंग किमान मला तरी माच्या आजवरच्या वाचनात आढळले नाहीत . उलट असलं दुसरं काहीही करु नका ह्या अर्थाचे मात्र बरेच काही आढळले आहे : योगांचेनि बळे । अधिक काही मिळे । ऐसे नाही आगळे | कष्टचि तया ॥ ५९ ॥ म्हणोनि योगाचियां वाटा । जे निगाले गा सुभटा । तयां दुःखाचाचि शेलवांटा । भागा आला ॥ ६९ ॥ न वेचें कदा ग्रंथिचे अर्थ काही । मुखे नाम उच्चारिता कष्ट नाही ॥ महाघोर संसारशत्रू जिणावा । प्रभाते मनीं राम चिंतीत जावा ॥ ७२ ॥ नाम घेता उठाउठी, होय संसाराची तुटी || धृ || ऐसा लाभ बांधा गांठी विठ्ठल पायी मिठी || १ || नामापरते साधन नाही जें तू करिसी आणिक कांही || २ || हाकरोनी सांगे तुका नाम घेता राहो नका || ३ || अन्य उपाय, मार्ग असतीलही , पण मला माहीती नाही . बस इतकेच ! ज्याचा त्याचा मार्ग वेगळा !! माझे वाचन , आकलन, अनुकरण आणि अनुभव मर्यादित आहे हे मान्य करुन थांबतो ! इत्यलम राम

माहितीपूर्ण. आणखी येऊ द्या. नविन ओ.सी.आर(ऑप्टिकल कॅरॅक्टर रिकग्निशन्)मध्येही ह्या पद्धतीचा वापर केला आहे का ? किंवा Long Short-Term Memory (LSTM) ह्या रिकरंट न्युरल नेटवर्कचा वापर केलेला असतो.

Bhakti 10/02/2025 - 10:54
सहज गुगल केलं...बाकी काही नाही :)
समान इनपुट आणि आउटपुट असलेल्या न्यूरॉनचे एक साधे उदाहरण म्हणजे "ओळख कार्य" करण्यासाठी सेट केलेला एकच न्यूरॉन, जिथे आउटपुट नेहमीच इनपुट मूल्यासारखेच असते ; मूलतः, ते कोणत्याही बदलाशिवाय इनपुट सिग्नलमधून जाते. स्पष्टीकरण: इनपुट: समजा न्यूरॉनला मिळणारे इनपुट हे एकच मूल्य आहे, "x". गणना: न्यूरॉन एक साधी गणना करतो: आउटपुट = x (या प्रकरणात कोणतेही अतिरिक्त वजन किंवा बायस लागू केले जात नाही). आउटपुट: न्यूरॉनचे आउटपुट देखील "x" आहे, म्हणजेच मूल्य अपरिवर्तित राहते. महत्त्वाचे मुद्दे: कोणतेही रूपांतर नाही: हे उदाहरण एक अतिशय मूलभूत कार्य दर्शवते जिथे न्यूरॉन इनपुटवर कोणतेही रूपांतर किंवा गणना लागू करत नाही, ज्यामुळे इनपुट आणि आउटपुट एकसारखे होतात. मर्यादित वापर: हे "ओळख" फंक्शन सोपे असले तरी, न्यूरल नेटवर्क्सच्या बहुतेक व्यावहारिक अनुप्रयोगांमध्ये ते विशेषतः उपयुक्त ठरू शकत नाही, कारण वजन समायोजनाद्वारे इनपुट आणि आउटपुटमधील जटिल संबंध शिकणे हे उद्दिष्ट असते.

In reply to by Bhakti

बहुतेक व्यावहारिक अनुप्रयोगांमध्ये ते विशेषतः उपयुक्त ठरू शकत नाही
एक्झॅक्टली भक्ती ताई ! एक्झॅक्टली ! व्यवहार हा मुळातच प्रवृत्तीप्रधान अर्थात "गोष्टी , धन , पुत्र , कलत्र आदींचा संचय करा " ह्या विचारावर आधारित आहे ! तिथे ह्या सगळ्याचा अल्मोस्ट काहीच उपयोग नाही. सध्या जे विनाकारण अध्यात्माचे पेव फुटले आहे , ते लवकरच नष्ट होणार आहे . कारण लवकरच लोकांचा भ्रमनिरास होणार आहे . लोकांना अध्यात्म म्हणजे काहीतरी जादुची छडी आहे अन तिचा वापर करुन मी प्रपंचात संसारात यशस्वी होईन अशी काहीतरी बाळबोध भोळीभाबडी आशा आहे. ती भंगली त्यांना लवकरच वीट येईल ह्या सगळ्याचा ! एक संपुर्ण प्रापंचिक विषयासक्त माणुस आणि एक जीवनमुक्त पण तरीही कर्मरत गृहस्थाश्रमी माणुस ह्यांच्यात व्यावहारिक दृष्ट्या काहीच फरक नसतो. फरक असतो मनाच्या लेव्हल वर ! राम दास्स त्याच्या एका प्रवचनात अप्रतीम बोलला होता की - "अध्यात्मिक प्रवास म्हणुन तुमचे जे जे काही पुर्वग्रह आहेत की मी असेन करेन मी तसे करेन , मग असे होईल अन तसे होईल , हे सगळं व्यर्थ आहे. रादर ह्या सगळ्याची व्यर्थता लक्षात आल्यावरच तुमचा खरा अध्यात्मिक प्रवास सुरु होईल !" टृंङ्पा रिन्पोचे https://en.wikipedia.org/wiki/Ch%C3%B6gyam_Trungpa नावाचा एक विवादास्पद पण खुप प्रसिध्द असा बुध्दीस्ट स्कॉलर गुरु होऊन गेला तो त्याच्या प्रवचनात एकदा म्हणाला होता -
Enlightenment is the ultimate disappointment of the ego.
तात्पर्य इतकेच की - ह्या सार्‍याचा अध्यात्मिक गोष्टींचा व्यावहारिक असा काही उपयोग नाही हे उघडच आहे ! जे व्यावहारिक उपयोगितेच्या पलीकडचे काही शोधत आहेत , त्यांनाच ह्याचा खरा फायदा होईल ! अर्थात ही बुध्दी देणाराही रामच ! राम

In reply to by प्रसाद गोडबोले

युयुत्सु 11/02/2025 - 11:45
Enlightenment ही कल्पना वैज्ञानिक पातळीवर समजाऊन घेता येईल का असे बरेच दिवस मनात घोळत होते. वरील विधानाने याला परत एकदा चालना मिळाली म्हणून ए०आय्०लाच साकडे घातले - प्रश्न० "How the concept of enlightenment can be explained from the perspective of neuroscience?" उत्तर - १. Enlightenment, often described as a profound spiritual awakening or a deep sense of interconnectedness, has been a subject of interest in neuroscience, particularly in the field of neurotheology. Researchers aim to understand the neural correlates of such transformative experiences. Studies involving advanced meditators have utilized neuroimaging techniques to observe brain activity during deep meditative states. Findings suggest that these individuals often exhibit decreased activity in the brain's default mode network (DMN), which is associated with self-referential thoughts and mind-wandering. This reduction in DMN activity correlates with a diminished sense of self, a common characteristic reported during enlightenment experiences. citeturn0search4 Additionally, research indicates that long-term meditation can lead to structural changes in the brain. For instance, increased connectivity between different brain regions has been observed, potentially reflecting enhanced integration during meditative states. These neural adaptations may facilitate the mental states and skills associated with meditation and enlightenment. citeturn0search6 Neuroscientist Dr. Andrew Newberg has extensively studied the relationship between spiritual experiences and brain activity. His work suggests that enlightenment experiences can lead to permanent changes in brain function, particularly in areas related to self-perception and emotion regulation. citeturn0search4 While these findings provide insights into the neural mechanisms underlying enlightenment experiences, it's important to note that the subjective nature of such states presents challenges in scientific study. The field of neurophenomenology attempts to bridge this gap by combining first-person experiential reports with third-person neuroscientific data to gain a more comprehensive understanding. citeturn0search13 In summary, neuroscience approaches enlightenment by examining how certain practices, like meditation, influence brain activity and structure, leading to transformative experiences. Ongoing research continues to explore these complex interactions between the brain and profound states of consciousness. For a more in-depth exploration of this topic, you might find the following discussion by Dr. Andrew Newberg insightful: videoThe Neuroscience of Enlightenment, with Dr. Andrew Newbergturn0search1 २. From a neuroscientific perspective, enlightenment can be viewed as a unique state of consciousness characterized by changes in brain activity, connectivity, and information processing. Here's a simplified explanation: Neural Correlates of Enlightenment 1. Default Mode Network (DMN) deactivation: The DMN, responsible for self-referential thinking, ego-boundaries, and mind-wandering, is often deactivated during enlightenment experiences. This deactivation can lead to a sense of self-transcendence and reduced ego-identification. 2. Increased global neural coherence: Enlightenment experiences often involve a sense of unity, interconnectedness, and holistic awareness. This can be reflected in increased global neural coherence, where different brain regions exhibit synchronized activity, fostering a sense of integration and wholeness. 3. Neuroplasticity and rewiring: Enlightenment experiences can lead to changes in brain structure and function, particularly in regions involved in attention, emotion regulation, and memory. This neuroplasticity can result in a reorganization of neural connections, potentially leading to more adaptive and efficient information processing. Brain Regions Involved 1. Prefrontal cortex (PFC): Involved in attention, emotion regulation, and decision-making. 2. Default mode network (DMN): Involved in self-referential thinking, ego-boundaries, and mind-wandering. 3. Ventral tegmental area (VTA): Involved in reward processing and dopamine release. 4. Nucleus accumbens (NAcc): Involved in reward processing and pleasure. 5. Amygdala: Involved in stress and anxiety processing. 6. Hippocampus: Involved in memory formation and emotion regulation. Neurotransmitters and Hormones 1. Dopamine: Involved in reward processing, pleasure, and motivation. 2. Serotonin: Involved in mood regulation, emotional processing, and social behavior. 3. Endorphins: Involved in pain modulation, stress reduction, and feelings of well-being. 4. Oxytocin: Involved in social bonding, trust, and emotional connection. Theories and Models 1. Integrated Information Theory (IIT): Suggests that consciousness arises from the integrated processing of information within the brain. 2. Global Workspace Theory (GWT): Proposes that consciousness involves the global workspace of the brain, where information from various sensory and cognitive systems is integrated. 3. Neural Darwinism: Suggests that neuronal connections are strengthened or weakened based on experience, leading to changes in brain function and behavior. While neuroscience can provide insights into the neural correlates of enlightenment, it is essential to acknowledge that the experience of enlightenment is complex, multifaceted, and may not be fully captured by neuroscientific explanations.

In reply to by प्रसाद गोडबोले

रादर ह्या सगळ्याची व्यर्थता लक्षात आल्यावरच तुमचा खरा अध्यात्मिक प्रवास सुरु होईल !"
ह्या लेखाबद्द्ल आणि त्यावर होणार्‍या चर्चेबद्द्ल पण हे वाक्य लागू होईल काय ?

In reply to by धर्मराजमुटके

स्वधर्म 11/02/2025 - 13:16
तुंम्हाला गट क्र. २ मध्ये टाकण्यात येईल. प्रश्न बाकी एकदम मार्मिक आहे, बघूया काय उत्तर येते.

In reply to by धर्मराजमुटके

ह्या लेखाबद्द्ल आणि त्यावर होणार्‍या चर्चेबद्द्ल पण हे वाक्य लागू होईल काय ?
होय होय . अगदी 100%. पण ते केवळ त्याच लोकांना कळू शकेल जे त्या लेव्हल पर्यंत पोहचले आहेत. समर्थांनी काय लिहून ठेवलं आहे पहा : जाले साधनाचे फळ। संसार जाला सफळ॥ निगुर्ण ब्रह्म ते निश्चळ। अंतरी बिंबले॥ (२०.१०.२६) हिशेब जाला मायेचा। जाला निवाडा तत्त्वांचा॥ साध्य होता साधनाचा। ठाव नाही॥ (२०.१०.२७) साध्य होता साधनांचा ठाव नाही !! मला काय म्हणायचं आहे हे तुम्हाला कळल्यावर हा लेख व्यर्थच आहे . त्यानंतर फक्त नामस्मरण करा ! राम राम राम आणि ह्याच्या पुढची अवस्था आहे जिथे हा जप करायचीही आवश्यकता नाही !! ही अवस्था कबीराने त्याच्या दोहा मध्ये उत्तम वर्णन करून ठेवली आहे माला जपूं न कर जपूं और मुख से कहूँ न राम । राम हमारा हमे जपे और हम पायो विश्राम ।। राम

Bhakti 10/02/2025 - 19:27
Enlightenment is the ultimate disappointment of the ego.

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

ह्यानिमित्ताने का होईना पण तुमच्या मनीं राम येत आहे, तुम्ही "हे राम" असे लिहित आहात , ह्यातच ह्या लेखाचे सार्थक झाले ! अजामेळ पापी वदे पुत्रकामे। तया मुक्ति नारायणाचेनि नामें शुकाकारणे कुंटणी राम वाणी। मुखें बोलतां ख्याति जाली पुराणीं॥९५॥ राम

In reply to by प्रसाद गोडबोले

संत चोखोबा : गणिका अजामेळे काय साधन केलें । नामचि उच्चारिलें स्वभावता ॥१॥ नवले हें पाहा नवल हें पाहा । अनुभवें अनुभवा देहामाजी ॥२॥ उच्चारितां नाम वैकुंठींचें घेणें । ऐसें दुजें पेणें आहे कोठें ॥३॥ ब्रह्महत्या जयासी घडल्या अपार । वाल्हा तो साचार उद्धरिला ॥४॥ उफराटें नाम न येचि मुखासी । मारा मारा ध्यासीं स्मरतां झाला ॥५॥ चोखा म्हणे ऐसा नामाचा महिमा । उद्धारा अधमा स्‍त्री शुद्रा ॥६॥ संत बंका : पांडुरंगावाचोनी दुजा कोण सखा । निर्वाणीचा देखा मायबाप ॥१॥ तारीतासे एका नावासाठी जगा । ऐसा हा पै वा श्रेष्ठाचार ॥२॥ गणिका गजेंद्र यासी उध्दरिलें । प्रत्यक्ष तारिलें अजामेळा ॥३॥ बंका म्हणे ऐसा आहे हा भरवंसा । मज तंव सर्वेशा विठोबाचा ॥४॥ राम

In reply to by प्रसाद गोडबोले

>>>>ह्यानिमित्ताने का होईना पण तुमच्या मनीं राम येत आहे, तुम्ही "हे राम" असे लिहित आहात , ह्यातच ह्या लेखाचे सार्थक झाले ! रामाचं पेटेंट आहे का आपल्याकडे. =)) -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

कसलं डोंबलाच आलंय पेटंट. =)))) मी म्हणतोय की तुम्ही नामस्मरण करताय हे पाहून मला आनंद होतोय ! तुम्हीच भलता सलता अर्थ काढता तुमच्या पूर्वग्रहदूषित विचारातून. ऐक रे जना । तुझ्या स्वहिताच्या खुणा । पंढरीचा राणा । मनामाजी स्मरावा ॥१॥ मग कैचें रे बंधन । वाचे गातां नारायण । भवसिंधु तो जाण । येचि तीरी सरेल ॥ध्रु.॥ दास्य करील कळिकाळ । बंद तुटेल मायाजाळ । होतील सकळ । रिद्धीसिद्धी म्हणियाऱ्या ॥२॥ सकळशास्त्रांचें सार । हें वेदांचें गव्हर । पाहातां विचार । हाचि करिती पुराणें ॥३॥ ब्राम्हण क्षत्रिय वैश्य । शूद्र चांडाळांहि अधिकार । बाळें नारीनर । आदि करोनि वेश्या ही ॥४॥ तुका म्हणे अनुभवें । आह्मीं पाडियलें ठावें । आणीक ही दैवें । सुख घेती भाविकें ॥५॥ इथे सर्वांना अधिकार आहे - ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र चांडाळ आणि वेश्याही! कोणाचे कसलेही पेटंट नाही . आनंदाने नामाचा गजर करा ! नामाचा गजर ! गर्जे भीमातीर ! असं नामदेव महाराज ह्यांनी म्हणाले आहे तसे काहीसे होऊ द्या ! त्या तिथे कोनाड्यात लावलेल्या फोटोतल्या ज्ञानोबा तुकोबांनाही आनंदच होईल ! बोला - राम कृष्ण हरी जय जय रघुवीर समर्थ

गवि 11/02/2025 - 11:32
अतिशय ओव्हर फिटिंग, निरर्थक वेटेजेस असलेले, निरुपयोगी न्युरल नेटवर्क बनवणे हा उद्देश असल्यास एकच इनपुट ट्रेनिंग डेटा पॉइंट आणि तोच डेटा पॉइंट आऊटपुट लेबल म्हणून देणे हा उत्तम उपाय आहे. अर्थात उपयुक्तता वगैरे हे सापेक्ष असते. तुम्हाला तुमच्या न्युरल नेटवर्कचे काय करायचे आहे हा तुमचा तुमचा चॉईस. जाता जाता.. मनुष्याचा मेंदू हा असा सहज सरळ सोपा नाही. न्युरल नेटवर्क हे ओव्हर सिंपलिफिकेशन आहे. साधारण रिकरंट न्युरल नेटवर्क किंवा तत्सम उदाहरण अधिक चपखल ठरेल. काळानुसार राम मध्येही बदल होतील. आधी सूक्ष्म वाटतील. मग variation सापडतील. रामराम अशी जोडी होईल. रा गुरू आणि म लघु असे भेद होतील. अगदी जन्मतः आंधळा मुका बहिरा असला तरी लर्निंग थांबत नाही. म्हणून तर आपण टिकलो आहोत ना. शिवाय जरा थांबल्यास शेवटी ती अवस्था कम्पल्सरी प्राप्त व्हायचीच आहे उसकी घाई कायकू? असेही वाटते. अर्थात वेगळे विचार मांडणारा लेख आवडला हे आहेच.

In reply to by गवि

युयुत्सु 11/02/2025 - 11:51
अतिशय ओव्हर फिटिंग, निरर्थक वेटेजेस असलेले, निरुपयोगी न्युरल नेटवर्क बनवणे हा उद्देश असल्यास एकच इनपुट ट्रेनिंग डेटा पॉइंट आणि तोच डेटा पॉइंट आऊटपुट लेबल म्हणून देणे हा उत्तम उपाय आहे. अर्थात उपयुक्तता वगैरे हे सापेक्ष असते.
ठार मेलो...हसून!

In reply to by गवि

उपयुक्तता वगैरे हे सापेक्ष असते.
एक्झॅक्टली गवि सर ! उपयुक्ततेच्या विचाराच्या , स्वार्थाच्या , ह्यात माझा काय फायदा ह्या विचाराच्या पलीकडे जाणे ही सुरुवात आहे हे न्यूरल नेटवर्क ट्रेन करण्याची. म्हणूनच तर तुम्ही सूक्ष्म आणि चिकित्सक दृष्टीने पाहिले तर तुमच्या हेच लक्षात येईल की ह्या सर्व साधू संतानी अन्नदानाचा उपदेश केला आहे. "ह्यातून माझा काहीही फायदा नाही" हा विचार फाट्यावर मारून अन्नदान करा, सेवा करा ! राम दास ने महाराज जी ना विचारले की मी enlightened कसा होऊ, तर महाराज म्हणाले "लोकांना अन्नदान करून." मग त्याने विचारले - मी कुंडलिनी जागृत कशी करू - त्यावर महाराज म्हणाले - "लोकांची सेवा करून !!" हेच समर्थांनी सांगितलं आहे , नाथांनी सांगितलं आहे, गोंदवलेकर महाराजांनी सांगितलं आहे ! ( पण आम्हाला ही अक्कल यायला हिमालयात जावे लागले!) इतकं सोप्प आहे हे ! एकदा उपयुक्ततेच्या विचाराच्या पलीकडं येऊन पहा , इकडं , ह्या बाजूला ! It's really mind boggling beautiful ! राम

In reply to by प्रसाद गोडबोले

युयुत्सु 11/02/2025 - 15:33
ह्यात माझा काय फायदा ह्या विचाराच्या पलीकडे जाणे ही सुरुवात आहे हे न्यूरल नेटवर्क ट्रेन करण्याची.
अशाने देशाचा जीडीपी वाढणार कसा, हे तर उत्पादकता कमी करण्याचे उद्द्योग! फायदा-तोट्याचे गणित मांडल्याशिवाय कोणतेही न्यु०ने० ट्रेन करता येत नाही.

In reply to by प्रसाद गोडबोले

चित्रगुप्त 11/02/2025 - 23:28
एकदा उपयुक्ततेच्या विचाराच्या पलीकडं येऊन पहा , इकडं , ह्या बाजूला !
-- बस, एवढेही (किंवा एवढेच) पुरेसे आहे -- आणि ते आभाळाएवढेही आहे. परी मकरंद | सेवावा भ्रमरे | बेडकासी उरे | चिखलचि ||

In reply to by आंद्रे वडापाव

युयुत्सु 11/02/2025 - 15:51
मालक, ओव्हरफिटींगला काही अपवाद आहेत, त्याबद्दल कुणी बोलत नाही. जनरलायझेशन जेव्हा आवश्यक नसते तेव्हा, नजिकच्या भविष्याकाळासाठी म्ह० शॉर्ट टर्म प्रेडीकशन, एकदाच वापर केला जाणारे मॉडेल, तसेच कॉस्ट ऑफ ट्रेनिंग हा मुद्दा फार मह्त्त्वाचा नसेल तर... लोक आंधळेपणाने "ओव्हरफिटींग-ओव्हरफिटींग" म्हणून गळा काढतात.

In reply to by युयुत्सु

गवि 11/02/2025 - 18:47
अगदी. ओव्हर फिटींग नेहमी वाईट असे नसते. जर ट्रेनिंग डेटापैकीच सबसेट म्हणजे तोच तोच डेटा परत परत समोर येणार असेल तर क्लासिफिकेशनसाठी उलट ओव्हर फिटिंग एक स्ट्राटेजी म्हणून वापरावी. जिथे मानवी श्रम कमी करायचे आहेत आणि जनरलायझेशन फार मोठे नकोय तिथे.

In reply to by आंद्रे वडापाव

Lol पण टेक्निकली स्पीकिंग, ह्या न्यूरल नेटवर्क मॉडेल ची accuracy अल्मोस्ट 0% आहे कारण ते प्रत्येकालाच राम म्हणत आहे, राम असे प्रेडिक्ट करत आहे . मला आनंद ह्यासाठी आहे की ज्याने हे मॉडेल बनवले त्याने स्वतःच हा स्टँडर्ड सेट केला आहे "मॉडेल व्यवस्थित ट्रेन झाले" असे म्हणायला !! हे पहा - यावन्न पश्येदखिलं मदात्मकं तावन्मदाराधनतत्परो भवेत् । श्रद्धालुरत्यूर्जितभक्तिलक्षणो यस्तस्य दृश्योऽहमहर्निशं हृदि ॥ ५८॥ इति श्रीमदध्यात्मरामायणे उमामहेश्वरसंवादे उत्तरकाण्डे पञ्चमः सर्गः ॥

अध्यात्म व तत्सम जडव्यागळ विषय माझ्या अल्प मतीला समजत नाही. संतांनी प्रापंचिकाना जे मार्गदर्शन केले आहे ते मात्र भावते.पुढे काय होणार हे पण माहित नाही पण नामस्मरणाने प्राप्त परिस्थितीत कठीण काळात आत्मबळ वाढते यावर विश्वास जरूर आहे. यात आत्मबळावर आलेल्या प्रसंगी ठामपणे उभे रहाता येते मग परिणाम काहिही होओ त्याने काही फरक पडत नाही. अर्थात हा माझा अनुभव, मत आहे.

In reply to by कर्नलतपस्वी

सुबोध खरे 11/02/2025 - 19:22
अध्यात्म व तत्सम जडव्यागळ विषय माझ्या अल्प मतीला समजत नाही. बाडीस मी म्हणजे शरद तळवलकर ( काना मात्रा नसलेला सरळ माणूस) . अध्यात्म काय न्यूरल नेटवर्क काय सारखे गहन विषय समजत नाहीत आणि मेंदूला पेलतही नाहीत. अशा विषयाची गहन चर्चा करणार्यांना साष्टांग नमस्कार

"इमिटेशन गेम्स" या चित्रपटात ... "हाईल हिटलर" असे केवळ २ शब्दांच्या पोझिशनवर ... संपूर्ण मेसेज डिक्रीप्ट करण्याचे असाध्य काम केले गेले त्याची आठवण आली ... सुंदर लेख ...

हातात हात तरी गवसत आहे असे म्हणता म्हणता परत मनातून काही तरी निसटून जात आहे... गम्य अगम्य.... तुमची विचारसरणी वेगळी आहे... आम्ही आपले, टीचर्स, ओल्ड मंक, जॉनी वॉकर ह्यांच्या साथीने, कधी व्हाईट हॉर्स पकडणार तर कधी किंग फिशर तर कधी गोल्डन ईगल तर कधी ब्लॅक डॉग पकडणार... पसंद अपनी अपनी... खयाल अपना अपना ..

वामन देशमुख 11/02/2025 - 14:40
नव्हे कर्म ना धर्म ना योग कांही। नव्हे भोग ना त्याग ना सांग पाहीं ॥ म्हणे दास विश्वास नामी धरावा । प्रभाते मनी राम चिंतीत जावा ॥७६।। असे सध्या सोप्या शब्दांत विचार मांडणारे तत्व विवेचन आवडले. पहाटे रामनाम स्मरण करणे हा पारंपारिक हिंदू संस्कृतीचा किती अविभाज्य भाग आहे हे "रामप्रहर" या शब्दातून दिसून येते. त्या नामस्मरणातून मिळणारी शक्ती किती अजिंक्य आहे हे "रामबाण" या शब्दातून दिसते! रामो राजमणि: सदा विजयते रामं रमेशं भजे । रामेणाभिहता निशाचरचमू रामाय तस्मै नम: । रामान्नास्ति परायणं परतरं रामस्य दासोSस्म्यहम्‌ । रामे चित्तलय: सदा भवतु मे भो राम मामुद्धर ॥ --- अर्थात या (आणि तुमच्या इतरही अश्या) लेखांतील गहन आशय समजण्याइतकी माझी तेवढी अध्यात्मिक उंची नाही तरीही वाचायला आवडते. खवचट प्रतिसादांकडे यथोचित दुर्लक्ष करत लिहीत राहावे.

राघव 12/02/2025 - 01:31
मायला ह्या ऑरेलियस बाबाच्या... अरं कुठल्या कुठल्या संकल्पना कुठच्या कुठं आणून ताडून पाहत बसतंय..! हे बघ बाबा, तुझं ते जड विज्ञान आणि ते अध्यात्म मला बुवा काही म्हणजे काहीही आकळत नाही. अरे, ज्यानं केवळ जप केला.. कारण न समजता केला.. जपानं नक्की काय फरक पडतो स्थूल/सूक्ष्म शरीरात, ते जाणून घेण्याचा प्रयत्नही केला नाही.. किंबहुना त्याची तेवढी पात्रता, ईच्छा, गरजच नव्हती.. पण भाव मनीचा केवळ एवढाच होता की "ब्वॉ गुरुंनी सांगितलंय, त्यांना आवडतं" म्हणून केला.. तर त्याची आत्मोन्नती होईल की नाही? जर उत्तर हो असेल तर, बाकी सर्व जाऊं देत ना चुलीत..! कशाला ते विज्ञान आणि अध्यात्म वगैरेची सांगड घालण्याचा प्रयत्नही करायला जायचं.. अरे जे मुळातच स्वयंसिद्ध आहे ते उगाच कशाला सिद्ध करायला घ्यायचं? विवेकानंद म्हणतात तसं "माणसाचा तर्क जिथे संपतो, तिथे खरं अध्यात्मिक साधन सुरु होतं". आता आपण आपला तर्क किती वेळ उगाळत बसतो यावर आपलं साधन कधी सुरू होणार ते अवलंबून आहे. ज्याला करायची बुद्धी होईल, त्याचं काम सुरू होईल. बाबा रे, एकदा सांगतो.. बघ पटलं तर.. एखादा आपल्या म्हणण्यानुसार साधनांत लागला तर त्याचं गुरुपण आपल्याकडे येतं. ते घेण्याची पात्रता आपली असते का? कारण त्या पदासोबत येणारी जबाबदारी किती मोठी आहे ते मी तुला सांगण्याची गरज नाही. त्यामुळे माझी तुला मनःपूर्वक विनंती आहे की, तू साधनांत मस्त आहेस.. तेच कर. उगाच या फाफटपसार्‍यात कशाला कुणाला शिकवायच्या, सांगायच्या फंदात पडायचंस. तुझ्या साधनेत ज्यानं आणिक मज़ा येईल अशी संगत बघ! ते जास्त संयुक्तिक ठरेल!

In reply to by राघव

नमस्कार राघव. आपला प्रतिसाद मनापासून आवडला. कोठेतरी लिहिले आहे म्हणून किंवा कोणीतरी सांगतंय म्हणून एखादी गोष्ट मान्य करावी, आचरणात आणावी हे मला कधी जमलेच नाही. प्रत्येक गोष्ट सतसत्विवेक बुद्धीच्या कसोटीवर तावून सुलाखून पाहिल्याशिवाय माझे मन माझी बुद्धी मान्य करायला तयारच होत नाही. कदाचित हे माझे पूर्वजन्मीचे कर्म आहे ! गुरू प्रचिती , ग्रंथ प्रचिती ह्यापेक्षाही आत्मप्रचिती ही कैक पटीने श्रेष्ठ मानतो मी. हां अर्थात ह्या मुळे गोष्टी कळायला वेळ लागतो, कष्ट पडतात , पण जेव्हा कळतं तेव्हा वळतं देखील !! त्यात साधार असे समर्थांचे श्लोक आठवून थोडं हायसे वाटते ! घालोनी अकलेचा पवाड! व्हावे ब्रह्मांडाहोनी जाड ! तेथे कैचे आणिले द्वाड ! करंट पण !! मी आधी म्हणालो तसे हा बुद्धीच्या सामर्थ्यावरील अतोनात विश्वास नसता तर कदाचित हे सारे 30 वर्षांपूर्वी च कळले असते ! नामसाधना विषयी फार पूर्वी पासून माहिती आहे पण त्यातील तर्क माहीत नसल्याने कधी त्या मार्गाला गेलोच नव्हतो, आता कुठं उमजायला लागलं आहे हे न्यूरल नेटवर्क ट्रेनिंग ! मी लिहितो तेही केवळ माझ्या आकलनातील गॅप्स मला कळाव्यात म्हणून. सर्वावस्थांमध्ये रामाचे स्मरण ठेवणे हीच एक साधना. आता इथे कोणाचा प्रतिसाद पाहून मन उद्विग्न होत असेल तर तिथेच रामाला आणून बसवलं पाहिजे, त्या माणसामध्ये राम पाहता आला पाहिजे, त्याच्या विक्षिप्त वागण्यात, वाकड्या प्रतिसादात, ही रामाची इच्छा असे पाहता आले पाहिजे, रादर हाही राम आहे असे पाहता आला पाहिजे. हीच साधना ! आणि एकदा ही अवस्था प्राप्त झाल्यावर काही लिहूच नये, बोलूच नये असे तरी कुठे ! आता बस आपण आपणच आहे , मग ते ते पुनः पुनः उपभोगू की !! आतां मी तूं या उपाधी । ग्रासूनि भेटी नुसधी । ते भोगिली अनुवादीं । घोळघोळू ॥

प्रचेतस 12/02/2025 - 19:03
नामस्मरण केव्हा तर सर्व मार्ग खुंटले असता किंवा आयुष्याच्या संध्याकाळी. साक्षात भगवंतच सांख्य, कर्म, ध्यान, ज्ञान, आत्मसंयमाचा उपदेश करून अक्षरब्रह्माचा उपदेश करताना म्हणतो अन्तकाले च मामेव स्मरन्मुक्त्वा कलेवरम् । यः प्रयाति स मद्भावं याति नास्त्यत्र संशयः ॥ यं यं वापि स्मरन्भावं त्यजत्यन्ते कलेवरम् । तं तमेवैति कौन्तेय सदा तद्भावभावितः ॥ तस्मात्सर्वेषु कालेषु मामनुस्मर युध्य च । मय्यर्पितमनोबुद्धिर्मामेवैष्यस्यसंशयः ॥ खुद्द तुकोबांनीही केवळ नामस्मरण न करता प्रपंच करून परमार्थ जोडला नामा घेता लाभ कयाचा । नेले बैल बैलाचा ॥ करितो तो न मिळे काही । मग फुकाचे नामा कांही ॥ उभा काठेवरी नाम घेई । पडे पाण्यामधी तरी मरे ॥ तुका म्हणे नेणे वेड । आता कैसा देईल बुड ॥ तर समर्थ इये देशी जनजागृती करत फिरले. नेणे नामस्मरण । म्हणोनी सोडू नये साधन । करिता सकळ कारण । तोचि सिध्द होय ॥ जोडोनिया धनु। धन्य धन्य म्हणो। तयाचे लवलेशु। न लाभे ॥ काय करील नाम । जो न चालवी पाय । सिद्धीचा उपाय । करा जे ॥ म्हणे फुकाचे नाम। हाचि खरा धर्म। अशाने पाविजे ब्रह्म। ते बुडाले॥

In reply to by प्रचेतस

वाह वल्ली सर , मनःपुर्वक धन्यवाद ! ह्यासाठी मला मिसळपाववर यायला, लिहायला आवडतं ! तुमचा प्रतिसाद पाहुन मी माझा लेख परत एकदा वाचला ! मी कुठेच म्हणालेलो नाहीये की हाती असलेले वर्णाश्रम धर्माने नेमुन दिलेले कर्म त्यागुन नामस्मरण करा !! विहित कर्म करत असताना नामस्मरण करा , सर्वांभुती, सर्वावस्थां मध्ये सर्व कर्मात रत असताना नामस्मरण करा , तुमच्या न्युरल नेटवर्क ला सर्वावस्थेत राम पहायला ट्रेन करा असेच मला म्हणायचे आहे ! इये विषयी वामन पंडीतांचा सुश्लोक आहे - अहो येता जाता उठत बसता कार्य करता सदा देता घेता वदनी वदता ग्रास गिळीता । घरी दारी शय्येवरी रतिसुखाचे अवसरी समस्ताची लज्जा त्यजून भगवत् चिंतन करी ।। तस्मात्सर्वेषु कालेषु मामनुस्मर युध्य च । भगवंतालाही हेच अभिप्रेत आहे - माझे नाव घेऊन माझे स्मरण करुन युध्द कर ! प्रपंच सोडुन नुस्तं हरि हरि करा असा मी कोठेच म्हणालेलो नाही , तसा कोठे अर्थ निघत असेल तर चुकीचाच आहे. नामस्मरण हे वर्णाश्रम धर्माला ओव्हरराईड करत नाही , उलट सह्हाय्यच करते ! बाकी तुम्ही म्हणालात ह्या "नामस्मरण केव्हा तर सर्व मार्ग खुंटले असता किंवा आयुष्याच्या संध्याकाळी." ह्या विधानाला मला तरी काही आधार सापडाला नाही. तुमच्या पाहण्यात असेल तर जरुर इथे उध्दृत करावा अशी विनंती करतो ! नामस्मरण सर्व मार्गांवर चालत असताना , सर्व कर्मे करत असताना, सर्व उपभोग घेत असताना , आयुष्याच्या पहाट सकाळ माध्यान्ह दुपार अशा सर्व काळी , जेणेकरुन संध्याकाळ होई पर्यंत नाम हीच वृत्ती बनुन गेलेली असेल , अजपाजप झालेली असेल ! तेव्हा, आयुष्याच्या संध्याकाळी काहीच करायची गरज नाही , तेव्हा बस एन्जोय करायचे आहे !
तुका म्हणे आता खेळतो कौतुके । झाळे तुज सुख अंतर्बाही ॥

In reply to by कॉमी

पण असे का करायचे? इनपुट हेच आउटपुट देणाऱ्या न्यूरल नेटवर्कचा उपयोग काय?
नाही आजकाल हे असंच असतं. न्यूरल-नेटवर्क वैगरे शब्दांची चलती आहे न मग् बस्स ! पाडला लेख.. आपल्या लेखात ए आय , न्यूरल-नेटवर्क... वैगरे शब्द बरोब्बर ओव्हर फिटिंग करून घुसवले ना कि लगेच अधिनुकता ची अधिनुकता , शिवाय सनातन च सनातनपणा सुद्धा ... तो फिर "न्यूरल-नेटवर्क" कि चमक, सनातन के दाम मिले , तो कोई वो क्यू ले , ये ना ले ! मान गये, लेखककि ओव्हर फिटिंग कि स्किल और सनातन सुपर दोनो को ...

In reply to by आंद्रे वडापाव

ख्या ख्या ख्या. रामा, I won't get caught in this trap anymore. तुला माहिती आहे की वरच काही प्रतिसादात उपयोगिता ह्या विषयावर चर्चा झालीय , उत्तर ही दिलं गेलं आहे. तस्मात् तू माझी परीक्षा पहायचा प्रयत्न केलास तरी मी फसणार नाहीये . ख्या ख्या ख्या. Nkb राम

In reply to by प्रसाद गोडबोले

कॉमी 14/02/2025 - 19:30
"व्यवहारिक" उपयोग नाही हे तुमचे म्हणणे समजले. पण इतर उपयोग काय आहे? न्यूरल नेटवर्कला "तू युनिकॉर्न आहेस" असे सांगितल्यावर ते पण तेच आउटपुट देईल. पण ते युनिकॉर्न होणार आहे का? फार तर ते स्वतःला पटवेल की ते युनिकॉर्न आहे. मग आपण अमुक काहीतरी आहोत असे स्वतःला पटवून देणे आणि एक फँटसी तयार करणे हा पॉईंट आहे का?

In reply to by कॉमी

आधीच्या लेखनावर एका प्रतिसादात तुम्हाला ज्ञानेश्वरी अध्याय तिसरा पहा म्हणालो होतो , पाहिलात का ? ह्या प्रश्नाचं उत्तर हवं असल्यास बारावा अध्याय, विशेष करुन त्यातील उत्तरार्ध अन त्यावरील ज्ञानेश्वर माऊलींचे विवेचन वाचा ! तुम्हाला "उपयोग" काय ते कळेल !

कंजूस 14/02/2025 - 17:51
लांबच्या रेल्वे प्रवासात आपल्या समोरच्या बाकड्यावर हे लोक बसले असतील तर काय मजा येईल. .. .. गप्पांच्या नादात स्टेशन आले तरी विसरून जाऊ. सर्वांना वडापाव माझ्याकडून.
"तुम्हाला आर्टिफिशियल न्युरल नेटवर्क्स विषयी माहीत आहे का पंत ?" "माहीती आहे पण खुप डिटेल्स्ड असं नाही" "बेसिक कन्सेप्ट्स माहीत आहेत ना , हां तेवढं पुरेसे आहे , हा एक इन्टरेस्टिंग प्रश्न ऐका :"
समजा एखाद्या न्युरल नेटवर्कला वेगवेगळा डेटा न देता , केवळ एकच डेटा पॉईंट वारंवार दिला , तर ते न्युरल नेटवर्क काय लर्न करेल ?

गीतारहस्य चिंतन-१

Bhakti ·

विजुभाऊ 04/02/2025 - 14:43
"न बोलता मोक्ष म्हणजे सुटका होण्यासारखी असेल तर काही झाले तरी बोलू नये आणि बोलणे अवश्यच असेल तर, किंवा न बोलल्यामुळे (दुसऱ्यास) शंका येण्याचा संभव असेल तर, त्यावे‌ळी सत्यापेक्षा खाटे बोलणे अधिक प्रशस्त असे विचारांनी ठरलेले आहे!
"विचारल्या खेरीज कोणाशी बोलू नये आणि अन्यायाने जर कोणी प्रश्न करीत असल्यास विचारिल्यावरही उत्तर देऊ नये. माहित असले तरी वेड्‌यासारखे हू हू करून वेळ - मारुन न्यावी "
हा संदेश कृष्णा ने युद्ध चालू असताना का दिला असाव हा प्रश्न पडतो.

In reply to by विजुभाऊ

Bhakti 04/02/2025 - 15:23
हे दोन्ही श्लोक गीतेतले नाही.टिळकांनी मनुस्मृती,महाभारत, उपनिषदे इ.मधील श्लोकांचे दाखले देत अनेक गोष्टी कशा आधीच अधोरेखित आहेत हे सांगितले आहे.

वाह , उत्तम लेख भक्ती ! मला हा ग्रंथ इतका लोकोत्तर वाटतो की ह्यावर काहीही लिहिण्याचे मला धाडसच होत नाही. ह्या ग्रंथाचा सगळ्यात मोठा प्लस पॉइंट म्हणजे - आमच्या सारखे लोक जे डोक्यामागुन घास खातात , अर्थात आधी पाश्चिमात्य तत्त्वज्ञान , मार्कस ऑरेलियास, शोपन्हावर, निश्चा वगैरे पासून सुरुवात करतात त्यांच्यासाठी गीतारहस्य हा ग्रंथ प्रत्येक पातळीवर उपयोगी ठरतो. सुरुवातीला निहीलिझम , सिनीसिझम, नंतर स्टॉईसिस्म, नंतर निष्चा असे करत करत लोकमान्यांनी एकेक विचार कुठे कसा कमी आहे हे दाखवले आहे अन् सरतेशेवटी कर्मयोगाचे रहस्य सांगितले आहे ! This is just mind blowing. बाकी टिळकांनी काढलेला निष्कर्ष की जीवनमुक्ताने आमरणांत लोकांच्या हिताकरिता कर्मारत राहिले पाहिजे.... हे एक विचार म्हणून ठीक आहे , गीतेतही कृष्णाने सन्यासापेक्षा कर्मयोग श्रेष्ठ आहे असे स्पष्ट म्हणाले आहे हेही मान्य ! पण तरीही , वर्णाश्रम व्यवस्थेने आखून दिलेली कर्मे योग्य रीतीने पार पाडल्यावर कर्म करत राहणे हे मला तरी एरंडाचे गुऱ्हाळ वाटते. आपल्या कन्येचे कन्यादान करून दिले आणि मुलाच्या मुलाची, नातवाची मुंज पाहिली की पुरुष (आणि स्त्री ही ) कर्माबंधनातून मुक्त आहेत. त्यांनतर कर्म करणे किंवा न करणे हा चॉईस आहे . सक्ती नाही. म्हणूनच मला कालिदासाने रघुवंश मध्ये रघुकुलातील राजांच्या बाबतीत जे म्हणाले आहे तो आदर्श जीवनक्रम वाटतो - शैशवेsभ्यस्तविद्यानां यौवने विषयैषिणाम्। वार्धक्ये मुनिवृत्तिनां योगेनान्ते तनुत्यजाम्।। मी जमेल तितका प्रयत्न करतो. बाकी कर्ता करविता श्रीराम समर्थ. इत्यलम्

In reply to by प्रसाद गोडबोले

Bhakti 05/02/2025 - 10:32
त्यांनतर कर्म करणे किंवा न करणे हा चॉईस आहे . सक्ती नाही.
बरोबर, तरीही टाटा, मंगेशकर यांसारखे कर्मयोगी समाजाला पाहिजेच.

In reply to by Bhakti

विजुभाऊ 05/02/2025 - 13:45
आपल्या कन्येचे कन्यादान करून दिले आणि मुलाच्या मुलाची, नातवाची मुंज पाहिली की पुरुष (आणि स्त्री ही ) कर्माबंधनातून मुक्त आहेत. त्यांनतर कर्म करणे किंवा न करणे हा चॉईस आहे . सक्ती नाही. पण आपल्यासारख्या पेन्शन नसणार्‍या सर्व कर्मचारी हमालाना पोट भरण्यासाठी कर्म करावेच लागणार आहे. त्यातून सुटका नाही.

अर्धवटराव 05/02/2025 - 04:37
पहिल्यांदा गीतारहस्य वाचलं तेंव्हा ओव्हरव्हेल्मींग का काय म्हणतात तसं झालं होतं :)
भगवद्गीता कर्मयोग प्रधान । प्रवृत्तिपर आहे असे कोणीच का म्हणत नाही.
याचं कारण बहुदा वर्णाश्रम पद्धतीत असावं. एखादा शिवाजी सोडला तर अगदी अखेरच्या श्वासापर्यंत ध्येयवेडाने जगणं सामान्य माणसाला जमत नाहि. फळ पिकल्यावर ते भूक मिटवायच्या कामि यावं, त्यातल्या बीयांनी स्वतःला जमीनीत रोवुन घेउन नवीन झाड जन्माला घालावं. त्याकरता सर्वप्रथम फळाने झाडापासुन आपली नाळ तोडायला हवी. ट्रांझीशनला स्वतः सामोरे जायया हवं. म्हणुन मोक्षसाधनांची सुरुवात निवृत्तीपर निरुपणाने होते, सो डीड मेनी भाष्यकार्स ऑफ भगवत्गीता (काय धेडगुजरी ई-मराठी आहे ;) ) वर्णाश्रम पद्धतीत, त्यातल्या आश्रम व्यवस्थेत, आयुष्याची सेकंड इनींग सुरु करताना सर्व प्रकारच्या कडु-गोड-खारट-तुरट भोगांपासुन फारकत घ्यायला सुरुवात करण्याचं प्रिस्क्रीप्शन आहे. भारताला काहि शतकं तरी आपला धर्म/संस्कृती समूळ उखडुन काढण्याचा धोका जाणवला नाहि. त्यामुळे एखादा बाहुबली क्षात्रधर्म सोडुन वैराग्यशील गोमटेश्वर झाल्यास त्याचं कोणाला वावगं वाटलं नाहि, किंवा त्यामुळे फार काहि नुकसान देखील झालं नाहि (बाहुबली भावाच्या वागण्याने दुखावला जाऊन अरण्यसेवन करता झाला, वर्णाश्रम धर्मामुळे नाहि हे माहित आहे... भावनाओ को समझो) हजार वर्षापूर्वी उत्तर-पश्चीम सीमेवरुन यावनी आक्रमणं धडकु लागली आणि निवृत्तीपर तत्वज्ञान त्याला तोंड देऊ शकणार नाहि याची समज यायला भारताला बरच काहि गमवावं लागलं. धर्मशास्त्रात वर्णीलेला पाप-पूण्य, सत्यासत्य, कर्तव्य-अकर्तव्य इत्यादींचा विचार आज किती रिलेव्हंट आहे हा कदाचीत वादाचा विषय होऊ शकेल.. पण शेकडो वर्ष माणसाने याविषयी चिंतन केलं, प्रयोग केले, सिद्धांत मांडले, सिद्धता आणि खंडन करण्याच्या पद्धती डेव्हलप केल्या-आचरल्या.. हे सगळं बघुन फार कौतुक वाटतं :) असो... मूळ विषय काय होता ??? हां.. ते कर्मपर का निवृत्तीपर वगैरे वगैरे... याला उत्तर एकच.. माणुस कर्म वा निवृत्ती विचाराच्या नाहि तर आपल्या मनाला बांधील असतो. मनाने म्हटलं आगे बढो तर चालत राहायचं, नाहि तर इथेच टाका तंबू.

In reply to by अर्धवटराव

Bhakti 05/02/2025 - 10:47
सुंदर प्रतिसाद!
माणुस कर्म वा निवृत्ती विचाराच्या नाहि तर आपल्या मनाला बांधील असतो. मनाने म्हटलं आगे बढो तर चालत राहायचं, नाहि तर इथेच टाका तंबू.
हो पण मनापेक्षा बुद्धी श्रेष्ठ .. मनापेक्षा श्रेष्ठ बुद्धी राही । बुद्धीहूनी श्रेष्ठ जीवात्मा पाही । जीवात्मापेक्षाही श्रेष्ठ राही । हे अनंत ब्रह्मांड ॥४४॥ -चित्रापुरगुरूपरंपरा.

In reply to by Bhakti

अर्धवटराव 06/02/2025 - 03:01
इथे श्रेष्ठ-कनिष्ठ म्हणजे क्लार्क-हेडक्लार्क अशी अधिकाराची उतरंड अपेक्षीत नाहि. आपले जीवन म्हणजे कर्मांची अभेद्य साखळी आहे. या कर्म प्रोसेसचे कॉम्पोनंट्स म्हणजे शरीर, मन, बुद्धी, चेतना. आयडीअली शरीराने मनाचं ऐकावं, मनाने बुद्धीला रेफर करावं, बुद्धीने चेतना ओळखावी, आणि चेतनेने या सर्वांचा जो स्त्रोत आहे त्या सगुण-निर्गुण एक गोविंदु रे ला शरण जावं.. अशा पद्धतीने सर्व घटकांचा समन्वय म्हणजे पर्फेक्ट कर्म. हे सिंक्रोनायझेशन करताना मधेच थांबु नये, अभि जर्नी बाकी है, या अर्थाने हा श्रेष्ठ-कनिष्ठ फरक करण्यात येतो. शरीर आणि मन संलग्न झाले तर कला जन्माला येते. पुढे बुद्धी जोडली कि माणुस वैज्ञानीक होतो. चेतनेशी नाळ जोडली गेली माणुस योगी होतो. चेतना आपल्या मुळाशी परतली कि भक्ती ची अवस्था येते... पुढे पण काहि असेल का ?? माहित नाहि :) पण भक्ती अवस्था आल्याशिवाय आपण अपूर्ण असतो. पूर्णात्वाचा पुढील टप्पा मागच्या टप्प्यापेक्षा श्रेष्ठ, कारण तेच मागच्या टप्प्याचं गंतव्य असतं.

In reply to by अर्धवटराव

Bhakti 06/02/2025 - 10:52
सुंदर! उतरंड करू नये पण वरच्या श्लोकात किंवा जवळपास सर्वच तत्वज्ञानात हेच सांगितले आहे.मनापासून माहिती तपासून बुद्धी पर्यंत आली नाही तर? म्हणून हे श्रेष्ठ, कनिष्ठ सांगितले असावे.आता एखादा बुद्धीवान असेल पण त्याची बुद्धी शुद्ध वा हितकारक असेल तर अनर्थ होईल,तर बुद्धी शुद्ध पाहिजे, आत्मनिष्ठ.पुढे चेतनेऐवजी अतिचेतन म्हणजे शरीर, मन, बुद्धी प्राण यांचा अतिउच्च समुच्चय आत्मा(जीवात्मा) असे सांगितले आहे.आता परत आत्मा आहे नाही हे ज्याने त्याने ठरवा त्यासाठी चेतना शब्द रूढ झालाय.पण पुढे ज्ञानयोग घ्या भक्तीयोग घ्या.हे सगळं स्थिर करत ब्रम्हांड म्हणजेच oneness पर्यंत जो पोहचतो तो योगी..सांख्ययोगी/कर्मयोगी/भक्तीयोगी.

मिपावर अतिशय कठीण व गुढ विषयाबद्दलचे सोप्या भाषेतील लेख वाचून मनोरंजन व ज्ञान वृद्धी होत आहे. बरेच विचार, गोष्टी डोक्यावरून जातात. असो पुस्तक अमेझोन कार्ट मधे टाकले आहे लवकरच वाचायला घेतो.

In reply to by कर्नलतपस्वी

Bhakti 05/02/2025 - 10:50
ई -साहित्यप्रकाशनाने पीडीएफ स्वरुपात गीतारहस्याचे दोन खंड प्रकाशित केले आहेत.तेही पहावे. https://www.esahity.com/uploads/5/0/1/2/501218/geeta_rahasya_1.pdf https://www.esahity.com/uploads/5/0/1/2/501218/geeta_rahasya_2.pdf

Bhakti 11/04/2025 - 10:41
भक्तीपर मार्ग- काही निरीक्षणे अनेक पुस्तकांतून वाचलेल्या माहितीनुसार हे नोंदवत आहे,कोणताही नेमका संदर्भ नाही. शैव वैष्णव अशा दोन मार्गांनी चाललेल्या समाजाला एकच करण्यासाठी 'अद्वैत' आणखीनच पुढे आला.तत्कलीन आदि शंकराचार्य यांनी भक्तीमार्ग पंचायतन, नामस्मरण,मठ, संन्यास यांद्वारे समाजापुढे देण्याचा प्रयत्न केला. ज्ञानेश्वर माऊली स्वतः नाथपंथीय होते, तरीही अद्वैताची सांगड भक्तीमार्गाला बहाल केली. तंत्रमंत्राताचा झालेला सुळसुळाट ,बाह्य आक्रमण अशा दुभ़ंग स्थितीत काहीही नको , तुमच्या यथाशक्ती अनुसार भक्तीमार्ग अवलंबावा असे मत रूजत गेले. परंतु स्वातंत्र्य लढ्यात समाजाला पुन्हा प्रवृत्तीमार्गावर जोर द्या हे बिंबवण्यासाठी टिळकांनी पुन्हा एकदा प्रवृत्तीपर , कर्मयोगशास्त्र गीतारहस्य लिहिली.

विजुभाऊ 04/02/2025 - 14:43
"न बोलता मोक्ष म्हणजे सुटका होण्यासारखी असेल तर काही झाले तरी बोलू नये आणि बोलणे अवश्यच असेल तर, किंवा न बोलल्यामुळे (दुसऱ्यास) शंका येण्याचा संभव असेल तर, त्यावे‌ळी सत्यापेक्षा खाटे बोलणे अधिक प्रशस्त असे विचारांनी ठरलेले आहे!
"विचारल्या खेरीज कोणाशी बोलू नये आणि अन्यायाने जर कोणी प्रश्न करीत असल्यास विचारिल्यावरही उत्तर देऊ नये. माहित असले तरी वेड्‌यासारखे हू हू करून वेळ - मारुन न्यावी "
हा संदेश कृष्णा ने युद्ध चालू असताना का दिला असाव हा प्रश्न पडतो.

In reply to by विजुभाऊ

Bhakti 04/02/2025 - 15:23
हे दोन्ही श्लोक गीतेतले नाही.टिळकांनी मनुस्मृती,महाभारत, उपनिषदे इ.मधील श्लोकांचे दाखले देत अनेक गोष्टी कशा आधीच अधोरेखित आहेत हे सांगितले आहे.

वाह , उत्तम लेख भक्ती ! मला हा ग्रंथ इतका लोकोत्तर वाटतो की ह्यावर काहीही लिहिण्याचे मला धाडसच होत नाही. ह्या ग्रंथाचा सगळ्यात मोठा प्लस पॉइंट म्हणजे - आमच्या सारखे लोक जे डोक्यामागुन घास खातात , अर्थात आधी पाश्चिमात्य तत्त्वज्ञान , मार्कस ऑरेलियास, शोपन्हावर, निश्चा वगैरे पासून सुरुवात करतात त्यांच्यासाठी गीतारहस्य हा ग्रंथ प्रत्येक पातळीवर उपयोगी ठरतो. सुरुवातीला निहीलिझम , सिनीसिझम, नंतर स्टॉईसिस्म, नंतर निष्चा असे करत करत लोकमान्यांनी एकेक विचार कुठे कसा कमी आहे हे दाखवले आहे अन् सरतेशेवटी कर्मयोगाचे रहस्य सांगितले आहे ! This is just mind blowing. बाकी टिळकांनी काढलेला निष्कर्ष की जीवनमुक्ताने आमरणांत लोकांच्या हिताकरिता कर्मारत राहिले पाहिजे.... हे एक विचार म्हणून ठीक आहे , गीतेतही कृष्णाने सन्यासापेक्षा कर्मयोग श्रेष्ठ आहे असे स्पष्ट म्हणाले आहे हेही मान्य ! पण तरीही , वर्णाश्रम व्यवस्थेने आखून दिलेली कर्मे योग्य रीतीने पार पाडल्यावर कर्म करत राहणे हे मला तरी एरंडाचे गुऱ्हाळ वाटते. आपल्या कन्येचे कन्यादान करून दिले आणि मुलाच्या मुलाची, नातवाची मुंज पाहिली की पुरुष (आणि स्त्री ही ) कर्माबंधनातून मुक्त आहेत. त्यांनतर कर्म करणे किंवा न करणे हा चॉईस आहे . सक्ती नाही. म्हणूनच मला कालिदासाने रघुवंश मध्ये रघुकुलातील राजांच्या बाबतीत जे म्हणाले आहे तो आदर्श जीवनक्रम वाटतो - शैशवेsभ्यस्तविद्यानां यौवने विषयैषिणाम्। वार्धक्ये मुनिवृत्तिनां योगेनान्ते तनुत्यजाम्।। मी जमेल तितका प्रयत्न करतो. बाकी कर्ता करविता श्रीराम समर्थ. इत्यलम्

In reply to by प्रसाद गोडबोले

Bhakti 05/02/2025 - 10:32
त्यांनतर कर्म करणे किंवा न करणे हा चॉईस आहे . सक्ती नाही.
बरोबर, तरीही टाटा, मंगेशकर यांसारखे कर्मयोगी समाजाला पाहिजेच.

In reply to by Bhakti

विजुभाऊ 05/02/2025 - 13:45
आपल्या कन्येचे कन्यादान करून दिले आणि मुलाच्या मुलाची, नातवाची मुंज पाहिली की पुरुष (आणि स्त्री ही ) कर्माबंधनातून मुक्त आहेत. त्यांनतर कर्म करणे किंवा न करणे हा चॉईस आहे . सक्ती नाही. पण आपल्यासारख्या पेन्शन नसणार्‍या सर्व कर्मचारी हमालाना पोट भरण्यासाठी कर्म करावेच लागणार आहे. त्यातून सुटका नाही.

अर्धवटराव 05/02/2025 - 04:37
पहिल्यांदा गीतारहस्य वाचलं तेंव्हा ओव्हरव्हेल्मींग का काय म्हणतात तसं झालं होतं :)
भगवद्गीता कर्मयोग प्रधान । प्रवृत्तिपर आहे असे कोणीच का म्हणत नाही.
याचं कारण बहुदा वर्णाश्रम पद्धतीत असावं. एखादा शिवाजी सोडला तर अगदी अखेरच्या श्वासापर्यंत ध्येयवेडाने जगणं सामान्य माणसाला जमत नाहि. फळ पिकल्यावर ते भूक मिटवायच्या कामि यावं, त्यातल्या बीयांनी स्वतःला जमीनीत रोवुन घेउन नवीन झाड जन्माला घालावं. त्याकरता सर्वप्रथम फळाने झाडापासुन आपली नाळ तोडायला हवी. ट्रांझीशनला स्वतः सामोरे जायया हवं. म्हणुन मोक्षसाधनांची सुरुवात निवृत्तीपर निरुपणाने होते, सो डीड मेनी भाष्यकार्स ऑफ भगवत्गीता (काय धेडगुजरी ई-मराठी आहे ;) ) वर्णाश्रम पद्धतीत, त्यातल्या आश्रम व्यवस्थेत, आयुष्याची सेकंड इनींग सुरु करताना सर्व प्रकारच्या कडु-गोड-खारट-तुरट भोगांपासुन फारकत घ्यायला सुरुवात करण्याचं प्रिस्क्रीप्शन आहे. भारताला काहि शतकं तरी आपला धर्म/संस्कृती समूळ उखडुन काढण्याचा धोका जाणवला नाहि. त्यामुळे एखादा बाहुबली क्षात्रधर्म सोडुन वैराग्यशील गोमटेश्वर झाल्यास त्याचं कोणाला वावगं वाटलं नाहि, किंवा त्यामुळे फार काहि नुकसान देखील झालं नाहि (बाहुबली भावाच्या वागण्याने दुखावला जाऊन अरण्यसेवन करता झाला, वर्णाश्रम धर्मामुळे नाहि हे माहित आहे... भावनाओ को समझो) हजार वर्षापूर्वी उत्तर-पश्चीम सीमेवरुन यावनी आक्रमणं धडकु लागली आणि निवृत्तीपर तत्वज्ञान त्याला तोंड देऊ शकणार नाहि याची समज यायला भारताला बरच काहि गमवावं लागलं. धर्मशास्त्रात वर्णीलेला पाप-पूण्य, सत्यासत्य, कर्तव्य-अकर्तव्य इत्यादींचा विचार आज किती रिलेव्हंट आहे हा कदाचीत वादाचा विषय होऊ शकेल.. पण शेकडो वर्ष माणसाने याविषयी चिंतन केलं, प्रयोग केले, सिद्धांत मांडले, सिद्धता आणि खंडन करण्याच्या पद्धती डेव्हलप केल्या-आचरल्या.. हे सगळं बघुन फार कौतुक वाटतं :) असो... मूळ विषय काय होता ??? हां.. ते कर्मपर का निवृत्तीपर वगैरे वगैरे... याला उत्तर एकच.. माणुस कर्म वा निवृत्ती विचाराच्या नाहि तर आपल्या मनाला बांधील असतो. मनाने म्हटलं आगे बढो तर चालत राहायचं, नाहि तर इथेच टाका तंबू.

In reply to by अर्धवटराव

Bhakti 05/02/2025 - 10:47
सुंदर प्रतिसाद!
माणुस कर्म वा निवृत्ती विचाराच्या नाहि तर आपल्या मनाला बांधील असतो. मनाने म्हटलं आगे बढो तर चालत राहायचं, नाहि तर इथेच टाका तंबू.
हो पण मनापेक्षा बुद्धी श्रेष्ठ .. मनापेक्षा श्रेष्ठ बुद्धी राही । बुद्धीहूनी श्रेष्ठ जीवात्मा पाही । जीवात्मापेक्षाही श्रेष्ठ राही । हे अनंत ब्रह्मांड ॥४४॥ -चित्रापुरगुरूपरंपरा.

In reply to by Bhakti

अर्धवटराव 06/02/2025 - 03:01
इथे श्रेष्ठ-कनिष्ठ म्हणजे क्लार्क-हेडक्लार्क अशी अधिकाराची उतरंड अपेक्षीत नाहि. आपले जीवन म्हणजे कर्मांची अभेद्य साखळी आहे. या कर्म प्रोसेसचे कॉम्पोनंट्स म्हणजे शरीर, मन, बुद्धी, चेतना. आयडीअली शरीराने मनाचं ऐकावं, मनाने बुद्धीला रेफर करावं, बुद्धीने चेतना ओळखावी, आणि चेतनेने या सर्वांचा जो स्त्रोत आहे त्या सगुण-निर्गुण एक गोविंदु रे ला शरण जावं.. अशा पद्धतीने सर्व घटकांचा समन्वय म्हणजे पर्फेक्ट कर्म. हे सिंक्रोनायझेशन करताना मधेच थांबु नये, अभि जर्नी बाकी है, या अर्थाने हा श्रेष्ठ-कनिष्ठ फरक करण्यात येतो. शरीर आणि मन संलग्न झाले तर कला जन्माला येते. पुढे बुद्धी जोडली कि माणुस वैज्ञानीक होतो. चेतनेशी नाळ जोडली गेली माणुस योगी होतो. चेतना आपल्या मुळाशी परतली कि भक्ती ची अवस्था येते... पुढे पण काहि असेल का ?? माहित नाहि :) पण भक्ती अवस्था आल्याशिवाय आपण अपूर्ण असतो. पूर्णात्वाचा पुढील टप्पा मागच्या टप्प्यापेक्षा श्रेष्ठ, कारण तेच मागच्या टप्प्याचं गंतव्य असतं.

In reply to by अर्धवटराव

Bhakti 06/02/2025 - 10:52
सुंदर! उतरंड करू नये पण वरच्या श्लोकात किंवा जवळपास सर्वच तत्वज्ञानात हेच सांगितले आहे.मनापासून माहिती तपासून बुद्धी पर्यंत आली नाही तर? म्हणून हे श्रेष्ठ, कनिष्ठ सांगितले असावे.आता एखादा बुद्धीवान असेल पण त्याची बुद्धी शुद्ध वा हितकारक असेल तर अनर्थ होईल,तर बुद्धी शुद्ध पाहिजे, आत्मनिष्ठ.पुढे चेतनेऐवजी अतिचेतन म्हणजे शरीर, मन, बुद्धी प्राण यांचा अतिउच्च समुच्चय आत्मा(जीवात्मा) असे सांगितले आहे.आता परत आत्मा आहे नाही हे ज्याने त्याने ठरवा त्यासाठी चेतना शब्द रूढ झालाय.पण पुढे ज्ञानयोग घ्या भक्तीयोग घ्या.हे सगळं स्थिर करत ब्रम्हांड म्हणजेच oneness पर्यंत जो पोहचतो तो योगी..सांख्ययोगी/कर्मयोगी/भक्तीयोगी.

मिपावर अतिशय कठीण व गुढ विषयाबद्दलचे सोप्या भाषेतील लेख वाचून मनोरंजन व ज्ञान वृद्धी होत आहे. बरेच विचार, गोष्टी डोक्यावरून जातात. असो पुस्तक अमेझोन कार्ट मधे टाकले आहे लवकरच वाचायला घेतो.

In reply to by कर्नलतपस्वी

Bhakti 05/02/2025 - 10:50
ई -साहित्यप्रकाशनाने पीडीएफ स्वरुपात गीतारहस्याचे दोन खंड प्रकाशित केले आहेत.तेही पहावे. https://www.esahity.com/uploads/5/0/1/2/501218/geeta_rahasya_1.pdf https://www.esahity.com/uploads/5/0/1/2/501218/geeta_rahasya_2.pdf

Bhakti 11/04/2025 - 10:41
भक्तीपर मार्ग- काही निरीक्षणे अनेक पुस्तकांतून वाचलेल्या माहितीनुसार हे नोंदवत आहे,कोणताही नेमका संदर्भ नाही. शैव वैष्णव अशा दोन मार्गांनी चाललेल्या समाजाला एकच करण्यासाठी 'अद्वैत' आणखीनच पुढे आला.तत्कलीन आदि शंकराचार्य यांनी भक्तीमार्ग पंचायतन, नामस्मरण,मठ, संन्यास यांद्वारे समाजापुढे देण्याचा प्रयत्न केला. ज्ञानेश्वर माऊली स्वतः नाथपंथीय होते, तरीही अद्वैताची सांगड भक्तीमार्गाला बहाल केली. तंत्रमंत्राताचा झालेला सुळसुळाट ,बाह्य आक्रमण अशा दुभ़ंग स्थितीत काहीही नको , तुमच्या यथाशक्ती अनुसार भक्तीमार्ग अवलंबावा असे मत रूजत गेले. परंतु स्वातंत्र्य लढ्यात समाजाला पुन्हा प्रवृत्तीमार्गावर जोर द्या हे बिंबवण्यासाठी टिळकांनी पुन्हा एकदा प्रवृत्तीपर , कर्मयोगशास्त्र गीतारहस्य लिहिली.
मला साधारणतः खुप प्रश्न‌ पडतात.त्यात जर भारतीय अध्यात्मावर प्रश्न असतील तर किती तरी काळ ते अनुत्तरितच राहायचे.पण जानेवारी २०२५ पासून हा जो लोकमान्य टिळकांनी लिहिलेला गीतारहस्य ग्रंथ वाचनास सुरूवात केली आहे.त्यामुळे अनेक प्रश्नांची सहज उत्तरे मिळत आहेत.या ग्रंथातील आकलन वा लिहून काढावे असे वाटलेले ज्ञान इथे देत आहे.हे सर्व टिळकांचे मत ,विचार आहेत,जे तुम्हाला नक्कीच भरघोस ज्ञान देईल. गीतारहस्य -कर्मयोगशास्त्र प्रकरण १ १.विषयप्रवेश अद्वैत मोक्ष द्वैत विशिष्टाद्वैत, पातंजलयोग हे निवृत्तिपर मार्ग गुलामी होती असे कोणी म्हटले तर ? भगवद गीतेवर टीका

एका आगीची छोटीशी गोष्ट

विवेकपटाईत ·

चित्रगुप्त 01/02/2025 - 06:07
मजेदार आठवणी आहेत ('काल्पनिक कथा' असे का लिहीले असावे, असा प्रश्न पडला आहे) या इमारती कोणत्या काळात बांधल्या गेल्या होता ? त्यावेळी या गोष्टीचा विचार केला गेला नव्हता का ? इमारतींच्या आत 'अवैध निर्माण' म्हणजे नेमके काय काय आहे ? दिल्लीत मी पंधरा वर्षे 'युसिस' - अमेरिकन सेंटर मधे कार्यरत होतो. दर महिन्यात नियमितपणे एकदा 'फायर ड्रिल' व्हायचे. त्यावेळी अक्षरशः एका मिनिटात संपूर्ण इमारत रिकामी करून बाहेर सुरक्षित ठिकाणी जाऊन उभे रहायचे. 'आलबेल' ची घंटी वाजल्यावर इमारतीत परतायचे. त्यातही 'टेररिस्ट अ‍ॅटॅक, आग लागणे, भूकंप असे वेगवेगळे प्रकार होते. त्यासाठी वेगवेगळे सायरन आणि वेगवेगळे निर्देश होते. त्या पंधरा वर्षाच्या नोकरीत मी अनेक गोष्टी नव्याने शिकलो. अतिशय आनंदाचा तो काळ होता. कधितरी त्यावर लिहीले पाहिजे. दिल्लीत केंद्र सरकारची दहा वर्षे नोकरी करून युसिस मधे मी आलेलो असल्याने मला या सर्वाचे फार कौतुक वाटायचे. (अलिकडे काही वर्षांपूर्वीच मी काम करत होतो ते भारत सरकारचे संग्रहालय आग लागून अवघ्या दोन तासात संपूर्णपणे जळून भस्मसात झाले आहे)
मोदी सरकार आल्या नंतर सरकारला जाणवले, सचिवालयाच्या अधिकान्श इमारती जुन्या आणि असुरक्षित आहेत या शिवाय जागेची कमतरता ही आहे. सरकारने नवीन सुरक्षित इमारती बांधण्याचे काम मोठ्या प्रमाणात सुरू केले आहे. संसद भवन सहित अनेक मंत्रालये आज नव्या इमारतीत शिफ्ट ही झाले आहेत. नव्या इमारती आगीपासून जास्त सुरक्षित आहे.
--- ही खरोखर समाधानाची बाब आहे. १९७७-१९८७ या काळात सरकारी 'दफ्तर' मधला गलथानपणा, भ्रष्टाचार, खाबूगिरी हे सगळे मी अनुभवले आहे. अश्याच जुन्या आठवणी लिहीत रहा.

निनाद 25/03/2025 - 06:43
मोदी सरकार आल्यानंतर सरकारला हे लक्षात आले की, सचिवालयातील बहुतेक इमारती जुन्या आणि असुरक्षित आहेत, तसेच जागेची कमतरताही आहे. त्यामुळे सरकारने नवीन आणि सुरक्षित इमारती बांधण्याचे काम मोठ्या प्रमाणात सुरू केले. सर्वसामान्य लोकांनाही जे दिसत होते ते आधी च्या सरकारात कुणाला का कळले नाही हे मात्र गूढ आहे. सरकारी कार्यालये आधुनिक झाल्यामुळे लोकांमध्ये सरकार विषयी सकारात्मक दृष्टीकोन निर्माण झाला असावा असे वाटते. मंत्रालये नव्या इमारतीत स्थलांतरित झाल्यामुळे काय सकारात्मक परिणाम आणि फायदे दिसून येत आहेत? सरकारी कामकाज अधिक सुरळीत आणि कार्यक्षम झाले आहे असे वाटते का?

चित्रगुप्त 01/02/2025 - 06:07
मजेदार आठवणी आहेत ('काल्पनिक कथा' असे का लिहीले असावे, असा प्रश्न पडला आहे) या इमारती कोणत्या काळात बांधल्या गेल्या होता ? त्यावेळी या गोष्टीचा विचार केला गेला नव्हता का ? इमारतींच्या आत 'अवैध निर्माण' म्हणजे नेमके काय काय आहे ? दिल्लीत मी पंधरा वर्षे 'युसिस' - अमेरिकन सेंटर मधे कार्यरत होतो. दर महिन्यात नियमितपणे एकदा 'फायर ड्रिल' व्हायचे. त्यावेळी अक्षरशः एका मिनिटात संपूर्ण इमारत रिकामी करून बाहेर सुरक्षित ठिकाणी जाऊन उभे रहायचे. 'आलबेल' ची घंटी वाजल्यावर इमारतीत परतायचे. त्यातही 'टेररिस्ट अ‍ॅटॅक, आग लागणे, भूकंप असे वेगवेगळे प्रकार होते. त्यासाठी वेगवेगळे सायरन आणि वेगवेगळे निर्देश होते. त्या पंधरा वर्षाच्या नोकरीत मी अनेक गोष्टी नव्याने शिकलो. अतिशय आनंदाचा तो काळ होता. कधितरी त्यावर लिहीले पाहिजे. दिल्लीत केंद्र सरकारची दहा वर्षे नोकरी करून युसिस मधे मी आलेलो असल्याने मला या सर्वाचे फार कौतुक वाटायचे. (अलिकडे काही वर्षांपूर्वीच मी काम करत होतो ते भारत सरकारचे संग्रहालय आग लागून अवघ्या दोन तासात संपूर्णपणे जळून भस्मसात झाले आहे)
मोदी सरकार आल्या नंतर सरकारला जाणवले, सचिवालयाच्या अधिकान्श इमारती जुन्या आणि असुरक्षित आहेत या शिवाय जागेची कमतरता ही आहे. सरकारने नवीन सुरक्षित इमारती बांधण्याचे काम मोठ्या प्रमाणात सुरू केले आहे. संसद भवन सहित अनेक मंत्रालये आज नव्या इमारतीत शिफ्ट ही झाले आहेत. नव्या इमारती आगीपासून जास्त सुरक्षित आहे.
--- ही खरोखर समाधानाची बाब आहे. १९७७-१९८७ या काळात सरकारी 'दफ्तर' मधला गलथानपणा, भ्रष्टाचार, खाबूगिरी हे सगळे मी अनुभवले आहे. अश्याच जुन्या आठवणी लिहीत रहा.

निनाद 25/03/2025 - 06:43
मोदी सरकार आल्यानंतर सरकारला हे लक्षात आले की, सचिवालयातील बहुतेक इमारती जुन्या आणि असुरक्षित आहेत, तसेच जागेची कमतरताही आहे. त्यामुळे सरकारने नवीन आणि सुरक्षित इमारती बांधण्याचे काम मोठ्या प्रमाणात सुरू केले. सर्वसामान्य लोकांनाही जे दिसत होते ते आधी च्या सरकारात कुणाला का कळले नाही हे मात्र गूढ आहे. सरकारी कार्यालये आधुनिक झाल्यामुळे लोकांमध्ये सरकार विषयी सकारात्मक दृष्टीकोन निर्माण झाला असावा असे वाटते. मंत्रालये नव्या इमारतीत स्थलांतरित झाल्यामुळे काय सकारात्मक परिणाम आणि फायदे दिसून येत आहेत? सरकारी कामकाज अधिक सुरळीत आणि कार्यक्षम झाले आहे असे वाटते का?
(काल्पनिक कथा) दिल्लीच्या रायसिना भागात केंद्र सरकारच्या सचिवलयांच्या इमारती आहेत. अधिकान्श इमारती पाच ते सात माल्यांच्या आहेत. अग्नि शामक नियमांच्या अनुसार कर्मचार्‍यांना इमारतीत चढण्या उतरण्यासाठी किमान दोन वेगवेगळ्या पायर्‍या असल्या पाहिजे. पण जागेची कमतरता असल्याने इमारतीच्या कोपर्‍यांवर जी मोकळी जागा असते तिथे ही निर्माण झाले असल्याने कर्मचार्‍यांना उतरण्यासाठी एकच पायरी उपलब्ध असते. इमारतींत अवैध निर्माण असल्याने अधिकान्श इमारतींना अग्नि शामक विभागाचे प्रमाण पत्र नाही. तरीही अग्निपासून असुरक्षित इमारतींत मंत्री ते संत्री हजारो कर्मचारी काम करतात. मी ज्या इमारतीत कामाला जात होतो.

सिंग्युलॅरिटी ऑफ वर्ड्स

प्रसाद गोडबोले ·

वामन देशमुख 20/01/2025 - 06:51
+१ --- माझा प्रतिसाद वरचा तेवढाच आहे. या लेखावर अजून काही प्रतिक्रिया देणे म्हणजे ताजमहालाला वीट लावण्यासारखं आहे. _/\_

सुबोध खरे 20/01/2025 - 11:23
प्रत्यक्ष अनुभव घेतल्या खेरीज ते नक्की काय आहे तुम्हाला कळुच शकत नाही . यावर श्री रा भि जोशी यांनी नर्मदा परिक्रमेतील एक अनुभव लिहिला आहे तो येथे उद्धृत करत आहे. ( हा १९५६ सालची गोष्ट आहे) नर्मदा परिक्रमा करत असताना त्यांना एका ठिकाणी एका गुफेच्या बाहेर लिहिलेले आढळले. १० पैशात ब्रम्हदर्शन. त्यांनी १० पैशात ब्रम्हदर्शन करावे म्हणून आतमध्ये प्रवेश केला. तेथे एक साधू धुनीसमोर ध्यानस्थ तप करत बसला होता. पाच मिनिटांनी त्याने डोळे उघडले आणि विचारले. आपला हेतू सांगितल्यावर त्या साधूने जोशींना तेथे १० पैसे ठेवायला सांगितले आणि खडीसाखरेचा खडा दिला. आणि म्हणाला हा खा. खडीसाखर खाल्ल्यावर साधूने विचारले कि कसा लागला जोशी - गोड साधु - गोड म्हणजे कसा? गुलाबजाम सारखा? जोशी -नाही साधु - मग जिलबी सारखा? जोशी -नाही. साधु - मग गोड म्हणजे कसा? जोशी - ते कसं सांगणार? त्यासाठी तुम्हाला खाऊन बघायला पाहिजे साधु -- ब्रम्हदर्शन असंच असतं, ते स्वतःलाच अनुभवायला लागतं. दुसर्याने देऊन ब्र्म्हदर्शन होत नाही

In reply to by मारवा

दॅट्स द व्होल पॉईंट ! 10 paise https://upload.wikimedia.org/wikipedia/commons/9/9d/10_Indian_paise_%281965%29.jpg कुठल्यातरी धातुच्या तुकड्यावर काही तरी लिहिलेलं आहे किंव्वा कोणत्यातरी कागदाच्या चिटोर्‍याला रंग देऊन कोणीतरी ह्याला 'पैसे/ रुपये' म्हणत आहे, तरी तुम्हाला ठामपणे ठाऊक आहे की मुल्य म्हणजे काय ! इतके ठामपणे की तुम्ही ते परत मागत आहात ! तुम्हाला मुल्य म्हणजे काय हे दाखवता येत नाही , पण 'कळंत' तर आहे ! नाणे , नोटा हे केवळ निर्देशक आहे मुल्याचे ! मुल्य म्हणजे नाणे नव्हे ! तसेच 'गोडीचे' आहे , तुम्हाला गोडी म्हणजे काय हे कोणालाच दाखवता येणार नाही, खडीसाखर केवळ निर्देशक आहे त्या गोडीची ! तुम्हाला गोडी ही स्वतःची स्वतःच अनुभवावी लागेल ! आणि समजा तुमच्या अनुभवास आले की ही गोडी म्हणजे काय आहे तरी तुम्ही ती कोणालाही समजाऊन शकणार नाहीये ! तुम्ही केवळ निर्देशक शब्द वापरु शकाल . दॅट्स द मॅक्स दॅट यु कॅन डू ! दॅट्स द सिंग्युलॅरिटी ! कळ्ळं का ? उपरोधाने नाही , मनापासुन कळकळीने विचारत आहे , कळंलं का ? आर यु गेटींग इट ? --- कोणाला कळ्ळं काय किंवा नाही कळ्ळं काय , त्या 'सिंग्य्लॅरिटीला' काही फरक पडत नाही ! ज्यांना "कळ्ळं " असं वाटतंय त्यांना बस निमिष मात्र हा आनंद आहे की - "हेच तर ज्ञानेश्वर माऊली म्हणत होते !!!!! " . आणि पुढच्या क्षणी तोही आनंद विरुन जाणार आहे त्या सिंग्युलॅरिटीमध्ये ! तैसें दाविलें नाहीं । तरी हाचि ययाचा ठाईं । ना दाविला तरीही । हाचि यया ॥ ७-२२५ ॥ जागृती दाविला । कां निदा हारविला । परी जैसा येकला । पुरुषपुरुषीं ॥ ७-२२६ ॥ कां रायातें तूं रावो । ऐसा दाविजे प्रत्ययो । तही ठायें ठावो । राजाचि असे ॥ ७-२२७ ॥ ना तरी रायपण राया । नाणिजे कीं प्रत्यया । तही कांहीं उणें तया । माजी असे ? ॥ ७-२२८ ॥ तैसें दावितां न दावितां । हा ययापरौता । चढे न तुटे आईता । असतचि असे ॥ ७-२२९ ॥ ||ॐ||

In reply to by सुबोध खरे

वामन देशमुख 28/01/2025 - 15:53
साधु -- ब्रम्हदर्शन असंच असतं, ते स्वतःलाच अनुभवायला लागतं.
हा अनुभव-किस्सा आवडला. अर्थात हे इतरही अनेक ठिकाणी लागू पडू शकते. आम्ही तीन मित्र मध्यरात्री दोन-अडीच वाजता वैष्णोदेवी देऊळ डोंगराच्या पायऱ्या उतरत होतो. त्यावेळी एका विशिष्ट वळणावर कुठेतरी सोनचाफ्याची झाडे होती. अर्थात अंधारात ती झाडे दिसत नव्हती. पण त्या झाडांच्या फुलांचा अतिशय मनमोहक सुगंध येत होत होता. तितका उत्कट सुगंध त्यापूर्वी कधीही आला नव्हता. पंधरावीस मिनिटे आम्ही तो सुगंध अनुभवत तिथेच थांबून होतो. तो अनुभव शब्दांत मांडणे अशक्य आहे! तसा विलक्षण सुगंधानुभव पुन्हा कुठेही कधीही मिळाला नाही.

सोत्रि 20/01/2025 - 19:31
प्रत्यक्ष अनुभुती शब्दांच्या आवाक्याच्या पलीकडे आहे !
यथार्थ! - (मुमूक्षू) सोकाजी

राघव 20/01/2025 - 22:44
ठाकुरही तेच म्हणतात ना - "ब्रह्म अजून उष्टे झालेले नाही" !! अर्थात् ब्रह्म म्हणजे काय हे कुणीही सांगू शकलेलं नाही. ते वर्णनातीत आहे.

मारवा 26/01/2025 - 21:09
ब्रह्म काय आहे कसे असावे याचा कोणीच अनुभव घेऊ शकत नाही. म्हणजे अशा टाईप च्या ज्या कोणत्याही आध्यात्मिक संकल्पना असतात त्या करोडोत एखादा जाणतो अनुभवतो या रीतीने च मांडणी प्रत्येक पंथात आवर्जून केलेली असते. शिवाय तुमचा प्रयास वगैरे ही मुप्योगाचा नाही कृपा वगैरे हवी. किंवा तुम्ही मूलतः अतिशय नालायक किंवा पतित इतके आहात की you are not eligible. सर्वसाधारणपणे सर्वच धर्मात ब्रहादी संकल्पना अनुभूती बद्दल मांडणी असते. ती तशी जर खरी मानली एकवेळ तर जे यथार्थ आहे that which is ते जे रोज अनुभवायला येते ते भले बुरे अनेकदा बुरेच अनाकलनीय दुखरे टोकदार भयाण वास्तव जे अनेक अक्राळ विक्राळ तोंडणी आपल्या दैंदिन जीवनात आपल्या समोर ठाकलेले असते. त्यापासून पालयनसाठी दिलं के बहलाने को गालिब ये खयाल अच्छा है. कारण तो anesthesia सारखं काम करतो. जबाबदारी पासून मुक्ता करतो तात्कालिक pleasure देतो. एक प्रकारचं वैचारिक हस्तमैथुन ज्यात काहीही इमॅजिन करू शकतो.

In reply to by मारवा

तथास्तु ! :) अज्ञश्चाश्रद्दधानश्च संशयात्मा विनश्यति। नायं लोकोऽस्ति न परो न सुखं संशयात्मनः।।

In reply to by प्रसाद गोडबोले

मारवा 27/01/2025 - 07:06
जडभूतविकारेषु चैतन्यं यत्तु दृश्यते । ताम्बूलपूगचूर्णानां योगाद् राग इवोत्थितम् ।। That is, being in agony over the impermanent we hopefully pursue what we call the permanent. The motive of our search is to find comfort in the ideal of the permanent, and this ideal is born of impermanency, it has grown out of the pain of constant change. The ideal is unreal, whereas the pain is real; but we do not seem to understand the fact of pain, and so we cling to the ideal, to the hope of painlessness. Thus there is born in us the dual state of fact and ideal, with its endless conflict between what is and what should be. The motive of our search is to escape from impermanency, from sorrow, into what the mind thinks is the state of permanency, of everlasting bliss. But that very thought is impermanent, for it is born of sorrow. The opposite, however exalted, holds the seed of its own opposite. Our search, then, is merely the urge to escape from what is.

In reply to by मारवा

परत एकदा तेच म्हणतो ... "तथास्तु" मुक्ताभिमानी मुक्तो हि बद्धो बद्धाभिमान्यपि । किं वदन्तीह सत्येयं या मतिः सा गतिर्भवेत् ॥ ११ ॥ :)

In reply to by प्रसाद गोडबोले

मारवा 27/01/2025 - 15:58
नित्य शुद्ध बुद्ध मुक्त अशा ब्रह्म्याला माझे हृदय पूर्ण वंदन. मायेच्या आवरणाखाली जरी माझे शूद्र ब्रह्म झाकलेले असले तरी मी एक दिवस नक्कीच तुमच्या बरोबर बसून अहं ब्रह्मास्मी चा जयघोष करणारच. आणि एक दिवस अखिल विश्वातील शूद्र वैश्य क्षत्रिय ब्राह्मण इतकेच काय म्लेच्छ ब्रह्मंसुद्धा एकमेकांत बसून जयघोष करणारच वयं ब्रह्मास्मी वयं ब्रह्मस्मी

In reply to by मारवा

मी माझे लेखन किमान ३ ते ४ वेळा वाचुनच प्रकाशित करतो पण तुमचा हा प्रतिसाद पाहुन बुचकळ्यात पडल्याने मी वरील लेखन परत दोन वेळा वाचले ! अहाहा . मजा आली ! त्यामुळे आधी तुम्हाला धन्यवाद देतो :)
नित्य शुद्ध बुद्ध मुक्त अशा ब्रह्म्याला माझे हृदय पूर्ण वंदन.
तुम्ही एक तर लेख नीट वाचलाच नाहीये किंवा वाचुन तुम्हाला कळाला नाहीये , किंवा तुम्ही माझे नाव वाचुन आधीच ठरवुन आला होता की काय प्रतिसाद द्यायचे ! मी लेखाचे नावच सिंग्युलॅरिटी ऑफ वर्ड्स असे लिहिले आहे , तस्मात तुम्ही वापरलेले हे सगळे शब्द केवळ इव्हेंट होरायझन वर आहेत ! आणि कसलं वंदन अन कसलं काय ? कोण कोणाला काय वंदन करणार ? हे सगळे इव्हेंट होरायझॉनवर , "सिंग्युलॅरिटी" मध्ये नाही !
मायेच्या आवरणाखाली जरी माझे शूद्र ब्रह्म झाकलेले असले तरी मी एक दिवस नक्कीच तुमच्या बरोबर बसून अहं ब्रह्मास्मी चा जयघोष करणारच.
मायेचे आवरण , झाकलेले ब्रह्म वगैरे शब्द तुमचे बाळबोध आकलन आणि तुम्ही लेख वाचलाच नाही ह्याची प्रतीती देत आहेत ! . तुम्हाला कळणार नाहीयेच , पण तरीही रिव्हिजन म्हणुन लिहिति - माया ह्या शब्दाची व्युतप्त्तीच या मा सा माया अर्थात जी नाहीच ती म्हणजे माया अशी आहे . ह्यावर ज्ञानेश्वर माऊलींनी अतिषय सुंदर ओवी लिहिली आहे -
अविद्या येणें नांवें । मी विद्यमानचि नव्हे । हे अविद्याची स्वभावें । सांगतसे ॥
पुढे माऊली म्हणतात :
आतां अविद्या नाहींपणें । नाहीं तयेतें नासणें । आत्मा सिद्धुचि मा कोणें । काय साधावें ? ॥
बाकी तुम्ही शुद्र वगैरे म्हणालात त्यातुन तुमचे पुर्वग्रहदुषित अंतःकरण दिसुन येते , कारण मी माझ्या लेखनात ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शुद्र , एकुणच सनातन वर्णाश्रम धर्म ह्या विषयी चकार शब्द काढलेला नाही . समर्थांनी स्पष्ट म्हणुन ठेवलं आहे -
ब्राह्मणांचें ब्रह्म तें सोंवळें । शूद्राचें ब्रह्म तें ओंवळें । ऐसें वेगळें आगळें । तेथें असेचिना ॥ २५॥
तुमचे पुर्वग्रह तुमच्यापाशी , मला त्यांचा स्पर्ष होत नाही. मी कित्येक अशा शुद्रवर्णातील लोकांना ओळखतो ज्यांचे सनातन धर्मावर , वर्णाश्र्रम व्यवस्थेवर ठाम श्रध्दा आहे , आणि मी एका अशा महाभाग ब्राह्मणालाही ओळखतो जो भोळ्या भाबड्या भाविकांच्या श्रध्देचा गैरफायदा घेऊन त्यांना लुबाडतो आहे. माझ्या लेखी हे असे शुद्र अशा ब्राह्मणांपेक्षा कैकपटीने उच्च आहेत ! आणि तुम्ही लेख नीट वाचला तर तुम्हाला लेखाच्या शेवटी जगद्गुरु संत तुकाराम महाराज ह्यांच्या ब्रह्मानुभुतीचा अभंग दिसेल . तुकोबा स्वतःहुनच "याति शुद्र केला वेवसाय " असे म्हणाले आहेत . तरी त्यांच्या अभंगात मला तीच झलक दिसते जी ज्ञानेश्वर माऊलींच्या अभंगात आहे , समर्थांच्या श्लोकात आहे ! फक्त त्यासाठी दृष्टी पाहिजे ! जोवर तुम्ही "मी शुद्र" ह्या अहंकाराला कवटाळुन बसला आहात तोवर तुम्हा सिंग्युलॅरिटी तर सोडाच पण इव्हेंट होरायझॉन देखील दिसणार नाही !
आणि एक दिवस अखिल विश्वातील शूद्र वैश्य क्षत्रिय ब्राह्मण इतकेच काय म्लेच्छ ब्रह्मंसुद्धा एकमेकांत बसून जयघोष करणारच वयं ब्रह्मास्मी वयं ब्रह्मस्मी
आता हे तुम्ही उपरोधिक पणे लिहिले आहे की खर्‍या श्रध्देने हे तुमचे तुमालाच ठाऊक , पण कसेही असले तरी परत एकदा तेच म्हणतो जे आधी दोन वेळा म्हणालो आहे - तथास्तु ! अर्थात तसेच असो ! जयाचा भावार्थ जैसा । तयास लाभ तैसा । मत्सर धरी जो पुंसा । तयास तेंचि प्राप्त ॥ इत्यलम ! अवांतर : समुद्रमंथनाच्या वेळेला जेव्हा भगवान विष्णु मोहिनी रुप घेऊन देवांना अमृत वाटत होते तेव्हा मायावी राहु देवांचे रुप घेऊन त्यांच्या प़तीत जाऊन बसला, इतकेच नव्हे तर त्याने चक्क अमृत प्राशनही केले पण ते लक्षात आल्यावर भगवंतांनी तत्काळ सुदर्शनचक्राने त्याच्या शिरछेद केला आणि अमृत पोटात जाऊन पचण्या आधीच राहु मेला ! अमृत प्राशन करुन देखील मेला ! अमृत सेवितांच पावला । मृत्य राहो ॥ फार मजेशीर गोष्ट आहे नै ! =))))

In reply to by मारवा

Bhakti 27/01/2025 - 11:41
पण पाश्चात्य लोक ब्रम्ह शोधण्याऐवजी भौतिक गोष्टींमागे अभ्यास करू लागले.त्यामुळे त्यांनी अधिक प्रगती केली का?असा मला तर प्रश्न पडतो.ब्रम्ह सर्वांमध्ये आहे तर ते शोधायचे कुठे? ब्रम्हज्ञान प्राप्ती झाली हे ओळखायचं कसं?

In reply to by Bhakti

मारवा 27/01/2025 - 14:03
या दिलासादायक संकल्पना आहेत. तुम्ही हव्या तशा खेळू शकता तुम्ही स्वतः त्याचा प्रत्यक्ष अनुभव घेतलेला नसेल तरी अमुक अमुक महात्म्याने तो घेतलेला आहे व त्याचे अमुक अमुक म्हणणे आहे. त्याने याच्या अनुभवाचा अमुक अमुक मार्ग दाखवलेला आहे. तो तुम्हाला येत नाही याचा अर्थ त्या महात्म्याच्या म्हणण्याप्रमाणे तुम्ही अमुक अमुक कारणास्तव अपात्र आहात. आणि हे सर्व ठरवण्यासाठी मी अमुक अमुक प्रमाणे पात्र आहे. वगैरे वगैरे. ही संकल्पना एका अत्यंत सुंदर अशा कवितेसारखी आहे अदभुत अशा fantasy सारखी आहे. त्याचा आनंद तुम्ही घेऊ शकता त्यावर चर्चा करण्यासाठी मोठा आनंद आहेच. जसे फुलराणी या रम्य कवितेविषयी चर्चेत इतकंच काय तिला उलगडून पहतानही आनंदच येत असतो. तशा या प्रचीनांच्या नितांत सुंदर असा कल्पनाविलास असलेल्या संकल्पना आहेत.

In reply to by Bhakti

मारवा 27/01/2025 - 14:05
या दिलासादायक संकल्पना आहेत. तुम्ही हव्या तशा खेळू शकता तुम्ही स्वतः त्याचा प्रत्यक्ष अनुभव घेतलेला नसेल तरी अमुक अमुक महात्म्याने तो घेतलेला आहे व त्याचे अमुक अमुक म्हणणे आहे. त्याने याच्या अनुभवाचा अमुक अमुक मार्ग दाखवलेला आहे. तो तुम्हाला येत नाही याचा अर्थ त्या महात्म्याच्या म्हणण्याप्रमाणे तुम्ही अमुक अमुक कारणास्तव अपात्र आहात. आणि हे सर्व ठरवण्यासाठी मी अमुक अमुक प्रमाणे पात्र आहे. वगैरे वगैरे. ही संकल्पना एका अत्यंत सुंदर अशा कवितेसारखी आहे अदभुत अशा fantasy सारखी आहे. त्याचा आनंद तुम्ही घेऊ शकता त्यावर चर्चा करण्यासाठी मोठा आनंद आहेच. जसे फुलराणी या रम्य कवितेविषयी चर्चेत इतकंच काय तिला उलगडून पहतानही आनंदच येत असतो. तशा या प्रचीनांच्या नितांत सुंदर असा कल्पनाविलास असलेल्या संकल्पना आहेत. शिवाय त्या गोळीबंद अशा संकल्पना आहेत. Watertight किंवा वर्तुळ पूर्ण करणारी theory शुद्ध तत्त्वज्ञानाचा अनुसार अमान्य असते.

In reply to by मारवा

Bhakti 27/01/2025 - 14:42
त्याचा आनंद तुम्ही घेऊ शकता त्यावर चर्चा करण्यासाठी मोठा आनंद आहेच. जसे फुलराणी या रम्य कवितेविषयी चर्चेत इतकंच काय तिला उलगडून पहतानही आनंदच येत असतो. अगदी अगदी.. ब्रम्ह संकल्पनेच्या? यशाचे हे एक मोठे कारण आहे...आनंद! गोळीबंद संकल्पना नव्हतं माहिती, नवीन समजलं.

In reply to by मारवा

स्वधर्म 27/01/2025 - 19:30
- या दिलासादायक संकल्पना आहेत. - त्यांचा आनंद तुम्ही घेऊ शकता त्यावर चर्चा करण्यासाठी मोठा आनंद आहेच. - शिवाय त्या गोळीबंद अशा संकल्पना आहेत. मारवा, तुमची वरील वाक्ये अगदी मनोमन पटली आहेत. मूळ थियरी खूप छोटी असली तरी त्यावर हजारो श्लोकांचा, पाचशे पानांचा ग्रंथ भाषाप्रभू लोक पाडतात. जे तसले ग्रंथ वाचत नाहीत, बौध्दिक चर्चा करत नाहीत, ती साधी लोकं अगदी दिपून जातात, भक्त बनतात. आणि जे लोक परिश्रम करून ग्रंथ वाचतात, त्यांना प्रश्न पडले, नाही पटले, तरी संक कॉस्ट फ॓लसी तयार झाल्याने सोडू शकत नाहीत. उलट त्यातच आणखी भर घालत रहातात. बुध्दाने याला बुध्दिविलास, वाणीविलास म्हटले आहे, आणि अध्यात्मिक उन्नतीच्या मार्गात काहीही उपयोग नाही, असे स्पष्ट बजावले आहे.

In reply to by मारवा

सोत्रि 29/01/2025 - 09:41
अशा टाईप च्या ज्या कोणत्याही आध्यात्मिक संकल्पना असतात त्या करोडोत एखादा जाणतो अनुभवतो या रीतीने च मांडणी प्रत्येक पंथात आवर्जून केलेली असते. शिवाय तुमचा प्रयास वगैरे ही मुप्योगाचा नाही कृपा वगैरे हवी. किंवा तुम्ही मूलतः अतिशय नालायक किंवा पतित इतके आहात की you are not eligible. सर्वसाधारणपणे सर्वच धर्मात ब्रहादी संकल्पना अनुभूती बद्दल मांडणी असते.
दुर्दैवाने हे तंतोतंत खरे आहे.
ब्रह्म काय आहे कसे असावे याचा कोणीच अनुभव घेऊ शकत नाही
ह्याला कारणीभूत आहे वरच्या परिच्छेदातील पंथ आणि त्यांची माडणी. अध्यात्माला शास्त्रिय दृष्टीकोनातून न बघता त्यात इश्वरी, दैवी, धार्मिक अंगाने बघून कृतीवर भर न देता शब्दांचे अवडंबर केल्याने ब्रह्म काय आहे कसे असावे याचा कोणीच अनुभव घेयेऊ शकत नाही. भूमितीमधे प्रमेय सोडवण्याची एक पद्धत आहे. प्रमेयाची सिद्धता खालील पायर्‍यांनी करतात.
  1. पक्ष
  2. साध्य
  3. सिद्धता
  4. निष्कर्ष
अध्यात्मात दुर्दैवाने पक्ष साध्य आणि निष्कर्ष ह्यांचा जयघोष केला गेलाय. अगणीत शब्दसंपदा केवळ ह्यावरच खर्च केलेली आहे. सिध्दता म्हणजे पक्ष आणि साध्य यांच्या निष्कर्षापर्यंत खात्रीने पोहोचण्याचा मार्ग, तंत्र, पध्दती, कार्यप्रणाली नेमकं हेच हरवलेलं आहे. त्यामुळे साक्षात्कार म्हणजे नेमकं काय आणि तो खात्रीने नेमका कसा होईल हे ह्याची पध्दती, कार्यप्रणाली कोणीच सांगत नाही. त्याऐवजी शाब्दिक बुडबुडे सोडून निष्कर्षाचा जयघोष केला जातो. त्याने पंथ, गुरू, बुवा, (स्वयं)सिद्ध ह्यांची भरमार होते. बर्‍याच साधनाप्रणालींची अभ्यास केल्यानंतर विपश्यना साधनाप्रणाली ही सिद्धते वर भर देणारी आणि सुस्प्ष्ट मार्ग आणि तंत्र उलगडून सांगणारी साधनाप्रणाली आहे ह्याचा साक्षात्कार झाला.' शरीर आणि मन म्हणजे आपण नाही' म्हणजे नेमकं काय आणि त्याची अनुभूती (साक्षात्कार), आपली आपण, कोणतेही जयघोष करणारे ग्रंथ, पुस्तके, शास्त्र-पुराणे न वाचता, कशी करून घ्यायचे ह्याची कृती विपश्यना शिकवते. त्यामुळे, 'ब्रह्म काय आहे कसे असावे याचा कोणीच अनुभव घेऊ शकत नाही' असं म्हणणं रास्त होणार नाही. - (साधक) सोकाजी

In reply to by सोत्रि

हवालदार 29/01/2025 - 15:17
यम नियमचे महत्व समजावुन देणारा राम ७ वा, योग समजवणारा योगेश्वर ८ वा आणि ब्रह्म कसे अनुभवयाचे हे समजावणारा बुद्ध ९ वा अवतार समजले जात असावेत .

In reply to by सोत्रि

स्वधर्म 29/01/2025 - 17:27
वरील विवेचनाच्या शब्दाश्ब्दाशी सहमत. शब्दांचा पिसारा फुलवून भुलवणार्या लोक व ग्रंथ यापासून मुक्ती मिळवण्याचा आनंद अवर्णनीय आहे.

In reply to by स्वधर्म

है का !
शब्दांचा पिसारा फुलवून भुलवणार्या लोक व ग्रंथ यापासून मुक्ती मिळवण्याचा आनंद
हेच आम्ही सांगितलं तर तुम्हाला पटत नाही . गट क्रमांक १ आणि २ हे अन डिस्युटेबल आहेत . गट क्रमा़ १ मधील कोणीही काहीही लिहिलं तरी तुम्हाला शब्दाचा पिसारा वाटणार आहे . साधं सोप्पं आहे बघा , १९५६ साली बाबासाहेबांनी समस्त जगाला बुध्दाचा मार्ग दाखवुन दिलेला आहे . तुम्ही कशाला ह्या गट क्रमा़ १ वाल्यांच्या शब्दाचा पसारा अन भुलवणारे ग्रंथ वगैरे बघत बसता ! सरळ विपश्यना करा ! मोक्ष बिक्ष आत्मा ब्रह्म बिम्ह सब झूट आहे हे तुम्हाला माहीत आहेच की आधीच ! कशाला तुम्ही हा शब्दांचा पिसारा बघुन त्रास करुन घेताय ? देश स्वतंत्र आहे , ग्रंथ बिंथ जाळायला तुम्हाला मोकळीक आहे ! अगदीच हा लेख आवडला नसेल तर ह्या लेखाची प्रिंट काढुन जाळा ! जाळपोळ करायची परंपरा ही आहेच ! पण ज्यांना शब्दांचा पिसारा फुलवायचा आहे , ग्रंथ वगैरे वाचायचे आहेत त्यांना वाचु द्या की ! त्यांन्नी तुम्हाला आमंत्रण दिले आहे का वाचायचे ? कि तुम्हाला त्यांच्या व्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणायची आहे ? तुम्ही तुमच्या आनंदात रहा , त्यांना त्यांच्या आनंदात राहु दे ! तुम्ही बुध्दाच्या मार्गाचे आचरण केले तर त्यात आम्हाला आनंदच आहे कारण आम्ही बुध्दाला विष्णुचा ९वा अवतार मानतोच ! एके हाती दंतु | जो स्वभावता खंडितु | तो बौद्धमत संकेतु | वार्तिकांचा ||१-१२|| असे म्हणुन माऊलींनी बौध्दमताला गणेशाचा रुपात स्थान दिलेले आहेच ना ! कसेही करा , कोणताही मार्ग आचरा , किंवा कोणताही मार्ग टाळा . आमची कसली सक्ती नाही कि कसला आग्रह नाही ! आमचं काही भांडण नाही विपश्यनेशी . उलट आम्हालाही कौतुकच आहे ! जो जे वांच्छील तो ते लाहो हीच आमची प्रार्थना आहे पहिल्यापासुन ! म्हणुनच म्हण्तो - तथास्तु !

In reply to by प्रसाद गोडबोले

स्वधर्म 30/01/2025 - 23:27
मग इथल्या प्रत्येक प्रतिसादाला प्रतिसाद आपण का देता? स्वांतसु़खाय म्हणता आणि सुरूवातच प्रत्येकाला कळायला पाहिजे असं नाही म्हणत बहुतेक लोकांना तुम्हाला प्राप्त झालेलं ज्ञान (?) कळणार नाही, असं आधीच सांगता? बरं जर स्वांतसुखायच लिहायचं आहे, तर सार्वजनिक संसंसळावर मुळात टाकता तरी का? (याचं उत्तर खरं तर सगळ्यांना माहित आहे :-) ) इथे टाकलं तर लोक त्यांचे विचार न पटले मांडणारच ना? असो. वेदांचा तो अर्थ | आंम्हासिच ठावा || येरांनी वहावा | भार माथा || हे तुकोबांचे बोल मनोमन पटलेला, - स्वधर्म

In reply to by स्वधर्म

मग इथल्या प्रत्येक प्रतिसादाला प्रतिसाद आपण का देता?
तुम्ही इतर प्रतिसाद वाचत नाही काय ? ह्या प्रश्नाचं उत्तर मी खालीच एका प्रतिसादात आधीच दिले आहे - मला मजा येत आहे म्हणुन ! तुम्हाला पटलं तरी हरकत नाही , नाही पटलं तरी हरकत नाही . आम्ही तुमच्या भाषेत "शब्दांचा पिसारा " फुलवत राहु , तुम्ही बस त्रास करुन घेऊ नका ! बाकी ह्या निमित्ताने तुम्ही तुकोबांची गाथा वाचताय , वेदांचा अर्थ समजुन घेताय हीच आमच्यासाठी आनंदाची बाब आहे , मग मजा तर येणारच ना ! :)

कॉमी 28/01/2025 - 18:51
एका बाबीचे रिकन्सिलेशन मला कधी करता आले नाही. जर आपण मन नाही, शरीर तर नाहीच नाही - हे मनापासून पटले तर माणूस का ऐहिक बाबींमध्ये वेळ घालवेल? त्यांच्या दृष्टिकोनातून हे करणे म्हणजे जो माणूस आपल्या कपड्यांना इस्त्री करण्यात दररोज बरा तस घालवतो त्याच्याइतकीच निष्फळ घालमेल नाही का? म्हणजे बुवा आमच्यासारखी भौतिक जडवादी मंडळी नऊ ते पाच कामाला जातात हे समजण्यासारखे आहे. आम्ही स्वतःला शरीरापासून वेगळे समजत नाही. आम्हाला स्वतःला अर्थात शरीराला सुख, शांती, समाधान द्यायचे आहे. पण स्वतःला ब्रम्ह समजणारी मंडळी का करतात हे सगळे उद्योग? म्हणजे अजून स्वतःचा साक्षात्कार पूर्ण झाला नाहीये की आणि काही? उपरोध नाही. सिरीयस प्रश्न.

In reply to by कॉमी

Bhakti 28/01/2025 - 19:10
कारण सनातननुसार ब्रम्हज्ञानानंतर आत्मसुखासाठी /परम कल्याणासाठी संन्यास अथवा कर्मयोगी यापैकी दोन मार्ग स्वीकारायचे असतात.ज्या अर्थी त्यांनी संन्यास स्विकारला नाही.त्याअर्थी त्यांंनी निष्काम कर्मयोगाचा मार्ग स्वीकारला आहे.

In reply to by Bhakti

कॉमी 28/01/2025 - 20:03
मार्ग आहेत हे ठीक. पण का? ज्यांना स्वतःचा साक्षात्कार झाला आहे आणि ज्यांना शरीर म्हणजे आपण नाही आहे हे समजले आहे ते शरीराची उस्तभार कशाला करतात? गरज काय आहे? जर स्वतःला इतके स्वतःच्या भावना आणि अशाश्वत गोष्टींपासून अलिप्त करायचे आहे तर मग तेच टिकवण्याची मरमर काय म्हणून?

In reply to by कॉमी

Bhakti 28/01/2025 - 21:13
स्वतःचा साक्षात्कार हे चूक आहे.तुम्ही अलिप्त कधीच होऊ शकत नाही.ब्रम्ह म्हणजे हेच तर की सगळेच जीव/आत्मा जुळलेले आहेत.कर्मयोगीसाठी शरीर हे कर्माचे माध्यम आहे,त्याचा त्याग/ त्याच्या श्रेयसाचा त्याग सर्वांचा समतोल बिघडवतो.

In reply to by Bhakti

कॉमी 28/01/2025 - 22:32
ब्रम्हाला कर्माची फिकीर कशाला? ब्रम्हाच्या पातळीवर जर दोन काही नाहीच तर पाप पुण्य आलेच कुठून? जर ब्रम्ह सोडून इतर काही नाहीच, आणि साक्षात्कार म्हणजे आपण ब्रह्म आहोत, हा असेल, तर मग ऐहिक गोष्टींची चिंता कशासाठी?

In reply to by कॉमी

गीता सुगीता कर्तव्या किमन्यैः शास्त्रविस्तरैः | या स्वया पद्मनाभस्य मुखपद्माद्विनिः सृता || एका सुगम अशा भगवद्गीतेचा अभ्यास करा , बाकी इतर सार्‍या शास्त्रांची काय गरज आहे ? ही भगवग्द्गीता जी की साक्षात पद्मनाभ विष्णुंच्या वासुदेवाचा मुखातुन उत्पन्न झालेली आहे ! तुम्हाला तुमच्या प्रश्नाचे उत्तर भग्वद्गीतेतील तिसर्‍या अध्यायात मिळेल कारण दुसर्‍या अध्यायात भगवंतान्नी सांख्ययोग विषद केल्यावर अर्जुनाने एक्झॅक्टली हाच प्रश्न भगवंताला विचारला होता की , हे ज्ञान , ही स्थितप्रज्ञ अवस्था , ही ब्राह्मी स्थिती जर सर्व श्रेष्ठ आहे तर मग तुम्ही मला निष्कारण ह्या कर्माच्या फेर्‍यात का अडकवता ? (अर्थात माझा मी आपला ब्रह्मानंदी लागली टाळी अवस्थेत सुखनैव बसतो , तिकडे खड्यात गेली दुनिया, अन हे युध्द, अन राज्य वगैरे ) त्यावर भगवंतांनी सविस्तर उत्तर दिलेले आहे ! माऊलींनी काय निरुपण केले आहे राव . निव्वळ लोकोत्तर ! म्हणौनि संगू जंव प्रकृतीचा । तंव त्यागु न घडे कर्माचा । ऐसियाहि करूं म्हणती तयांचा । आग्रहोचि उरे ॥ ६३ ॥ मी मुद्दाम स्पष्ट उत्तर देत नाहीये कारण माझी इच्छा आहे की ह्या निमित्ताने तुम्ही गीता ज्ञानेश्वरी उघडावी , श्रध्देने वाचावी , त्यातुन तुम्हाला बोध होईल ! I don't want to steal your joy of the discovery of truth ! मला अक्षरशः तुकोबांसारखे "माझी मज झाली अनावर वाचा" असे काहीसे ज्ञानेश्वरी वाचताना होत असल्याने माऊलींच्या अजुन काही ओव्या करतो : तूं मानसा नियमु करीं । निश्चळु होय अंतरीं । मग कर्मेंद्रियें व्यापारीं । वर्ततु सुखें ॥ ७६ ॥ म्हणौनि जें जें उचित । आणि अवसरेंकरूनि प्राप्त । तें कर्म हेतुरहित । आचरें तूं ॥ ७८ ॥ म्हणौनि स्वधर्मानुष्ठान । तें अखंड यज्ञ याजन । जो करी तया बंधन । कहींच न घडे ॥ ८३ ॥ म्हणौनि स्वधर्में जें अर्जे । तें स्वधर्मेंचि विनियोगिजे । मग उरे तें भोगिजे । संतोषेंसीं ॥ १२५ ॥ हा कर्मयोग म्हणजे मजा आहे राव ! हे म्हणजे मायेशी कुस्ती खेळल्यासारखे आहे ! तुम्ही ध्यान धारणा साधना अभ्यास चिंतन करता अन ब्रह्मलीन होता अन मग माया म्हणते - " शिवोहं शिवोहं काय ? तुला वाटतंय ना तु ब्रह्मलीन झाला आहेस , मग आता ह्या अवस्थेत सर्वांभूतीं ब्रह्म पाहुन अन शांत , तद्रुप राहुन दाखव !" अन माया कुस्तीचा डाव टाकते , अन मग आपल्या प्रापंचिक आयुष्यात काहीतरी अडी अडचणी येतात , संकटे येतात , आणि आपण आत्मभावातुन देह भावात परत येतो . मग परत नाम , परत साधना अन परत उपासना, परत गीता ज्ञानेश्वरी दासबोध ! परत संध्यावंदन ! अन आपण परत ब्रह्मभावात लीन होतो ! अन मायेचा डाव उलटवुन लावतो ! आणि मग माया परत गालातल्या गालात हसते , म्हणते - ठीक आहे ठीक आहे ! आता हा नवीन डाव घे ! आणि मग तो डाव असतो आनंदाचा सुखाचा समाधानाचा ! आणि आपण तोही पलटवुन लावतो ! आणि मग एक वेळ अशी येते की तुम्हाला हा सगळा खेळ कळतो अन तुम्हीही तिच्या सोबत हसायला लागता आणि म्हणता - "ठीक आहे , ब्रिंग इट ऑन ! " =))

In reply to by प्रसाद गोडबोले

सोत्रि 29/01/2025 - 08:54
आपलं आपल्याला कळाल्याशी मतलब. आपल्याला जे कळलं अनुभवाला आलं त्याचेच निरनिराळे पैलु आपणच उपभोगावेत ह्यासाठी लिहावे हे उत्तम !
अशी प्रस्तावना केल्यावर लेख 'गंगार्पणमस्तू' म्हणून सोडून देण्यातच गंमत आहे (हे माझ मत)! - (स्वांतसुखी होण्याच्या प्रयत्नात असलेला) सोकाजी

In reply to by सोत्रि

येस, इट्स ए मॅटर ऑफ चॉईस ! योगरतो वा भोगरतो वा सङ्गरतो वा सङ्गविहीनः | यस्य ब्रह्मणि रमते चित्तं नन्दति नन्दति नन्दत्येव ‖ मौन धारण करणे आणि प्रश्नोत्तरे करणे दोन्ही चॉईस आहेस. दोन्ही कुस्ती ! ब्रह्मीभूत माणूस स्वच्छंद असतो. त्याला वाटलं तर तो उत्तर देतो नाहीतर तथास्तु म्हणून निघून जातो :) माऊली संजीवन समाधी घेतात , समर्थ भारत भर मठ स्थापन करून जनजागृती करतात. तुकोबा कर्जाच्या वह्या इंद्रायणीत बुडवून सगळं संसार पांडुरंगाच्या पायी अर्पण करतात , एकनाथ सगळं काही व्यवस्थित करतात अगदी सर्वसामान्य गृहस्थ माणसासारखे ! तसेच काहीसे. स्वांत सुखाय. माझा येते आहे तोवर इथे लेख प्रतिसाद गप्पा टप्पा करायच्या , कंटाळा आला की इथून निघून जायचं ! I think one of the most obvious sign of enlightenment is this sort of simple basic freedom ! This is really amazing indeed. ! जय जय रघुवीर समर्थ

In reply to by Bhakti

सोत्रि 29/01/2025 - 08:49
स्वतःचा साक्षात्कार हे चूक आहे.
हे कसं काय चूक आहे? नेमकं काय म्हणायचं आहे ते कळलं नाही म्हणून हा प्रश्न आहे.
तुम्ही अलिप्त कधीच होऊ शकत नाही
अलिप्त होण हीच मुक्ती आणि त्यासाठीच तर सर्व अट्टाहास आहे! असो, अलिप्त होऊ शकत नाही हे तुमचे म्हणणे जरा स्पष्ट करून सांगाल का? - (अभ्यासू) सोकाजी

In reply to by सोत्रि

Bhakti 29/01/2025 - 11:10
स्वतःचा साक्षात्कार होतो? तुमचं अस्तित्व/एखादं ज्ञान या जगात आले ते सत्य आहे साक्षात्कार नाही.उगाच mature झालो की त्याला स्वतःचा साक्षात्कार असं नावं दिलं जाते.यानुसार तर मला दर आठवड्याला स्वतः चा नवा साक्षात्कार होतो.मग काय दरवेळी मी काहीतरी समजलं इकडे पहा असं समजू का? सगळ्यांना साक्षात्कार /सत्य उमगते,सगळे mature होतात... कालावधी वेगवेगळा आहे. अलिप्तता ही कोणत्या लेव्हलची आहे.वैयक्तिक नात्यांची? तो झाला संन्यासी ..सामाजिक जबाबदारीची?..तो झाला संन्यासी. पण त्याला पण /इंद्रियांना भूक लागली की भिक्षा मागावीच लागते ना...ना इंद्रियांपासून अलिप्त ना प्रकृती पासून. संत जर अलिप्त राहिले असते तर प्रबोधन केले असते का? समाजाचे /प्रकृतीचे/सर्व जीवांचे(oneness) कल्याण व्हावे यासाठीच मार्ग देत राहतात. अलिप्त म्हणजे मुक्ती नव्हे,अलिप्त म्हणजे कल्याण व्हावे ही इच्छा तुमचं पण माझं पण सर्वांचे पण! -(दार्शनिक जिज्ञासू )भक्ती

In reply to by कॉमी

सोत्रि 29/01/2025 - 08:42
ज्यांना स्वतःचा साक्षात्कार झाला आहे आणि ज्यांना शरीर म्हणजे आपण नाही आहे हे समजले आहे ते शरीराची उस्तभार कशाला करतात
दोन उदाहरणं ह्यासाठी. १. ज्ञानेश्वर माउली, त्यांना जेव्हा साक्षात्कार झाला तेव्हा त्यांनी ज्ञानेश्वरी लिहीपर्यंत शरीराची उस्तभार केली. त्यानंतर त्यांनी समाधी घेऊन शरीराचा त्याग केला. २. गौतम बुद्धाला जेव्हा बोधीप्राप्ती झाली तेव्हा त्याच्यातल्या करुणेमुळे, ते ज्ञान सर्वसामान्यांपर्यंत पोहोचले पाहिजे ह्यासाठी उर्वरीत जीवन त्याची शिकवण शिकवण्यासाठी शरीराची उस्तभार केली सगळे साक्षात्कारी मोस्टली ह्या दोन कॅटेगरीमधे मोडतात. - (मुमूक्षू) सोकाजी

In reply to by सोत्रि

विजुभाऊ 29/01/2025 - 14:14
ज्याना साक्षात्कार झालेला आहे. आणि शरीराची उस्तरवार करावयाची नाही. त्याना रजनीश " चलते फिरते प्रेत" असे म्हणतात. शरीराची आसक्ति असणे वेगळे आणि विरक्त असणे वेगळे. विरक्त शरीराला ही देहभोग असतातच की.

Bhakti 29/01/2025 - 11:20
प्रिय मिपाकरांनो खुप छान चर्चा झाली.पण मला लई कामे आहेत😅 त्यामुळे इथल्या शास्त्रार्थांना विराम देते, नाहीतर मंडणमिश्रांप्रमाणे गळ्यातली माळ सुटेपर्यंत टाईप केले असते 😉 अधिक प्रश्नांची उत्तरे जाणून घ्यायची असल्यास मी सध्या जो ग्रंथ वाचतेय तो तुम्हीही वाचा.... गीतारहस्य!

वामन देशमुख 20/01/2025 - 06:51
+१ --- माझा प्रतिसाद वरचा तेवढाच आहे. या लेखावर अजून काही प्रतिक्रिया देणे म्हणजे ताजमहालाला वीट लावण्यासारखं आहे. _/\_

सुबोध खरे 20/01/2025 - 11:23
प्रत्यक्ष अनुभव घेतल्या खेरीज ते नक्की काय आहे तुम्हाला कळुच शकत नाही . यावर श्री रा भि जोशी यांनी नर्मदा परिक्रमेतील एक अनुभव लिहिला आहे तो येथे उद्धृत करत आहे. ( हा १९५६ सालची गोष्ट आहे) नर्मदा परिक्रमा करत असताना त्यांना एका ठिकाणी एका गुफेच्या बाहेर लिहिलेले आढळले. १० पैशात ब्रम्हदर्शन. त्यांनी १० पैशात ब्रम्हदर्शन करावे म्हणून आतमध्ये प्रवेश केला. तेथे एक साधू धुनीसमोर ध्यानस्थ तप करत बसला होता. पाच मिनिटांनी त्याने डोळे उघडले आणि विचारले. आपला हेतू सांगितल्यावर त्या साधूने जोशींना तेथे १० पैसे ठेवायला सांगितले आणि खडीसाखरेचा खडा दिला. आणि म्हणाला हा खा. खडीसाखर खाल्ल्यावर साधूने विचारले कि कसा लागला जोशी - गोड साधु - गोड म्हणजे कसा? गुलाबजाम सारखा? जोशी -नाही साधु - मग जिलबी सारखा? जोशी -नाही. साधु - मग गोड म्हणजे कसा? जोशी - ते कसं सांगणार? त्यासाठी तुम्हाला खाऊन बघायला पाहिजे साधु -- ब्रम्हदर्शन असंच असतं, ते स्वतःलाच अनुभवायला लागतं. दुसर्याने देऊन ब्र्म्हदर्शन होत नाही

In reply to by मारवा

दॅट्स द व्होल पॉईंट ! 10 paise https://upload.wikimedia.org/wikipedia/commons/9/9d/10_Indian_paise_%281965%29.jpg कुठल्यातरी धातुच्या तुकड्यावर काही तरी लिहिलेलं आहे किंव्वा कोणत्यातरी कागदाच्या चिटोर्‍याला रंग देऊन कोणीतरी ह्याला 'पैसे/ रुपये' म्हणत आहे, तरी तुम्हाला ठामपणे ठाऊक आहे की मुल्य म्हणजे काय ! इतके ठामपणे की तुम्ही ते परत मागत आहात ! तुम्हाला मुल्य म्हणजे काय हे दाखवता येत नाही , पण 'कळंत' तर आहे ! नाणे , नोटा हे केवळ निर्देशक आहे मुल्याचे ! मुल्य म्हणजे नाणे नव्हे ! तसेच 'गोडीचे' आहे , तुम्हाला गोडी म्हणजे काय हे कोणालाच दाखवता येणार नाही, खडीसाखर केवळ निर्देशक आहे त्या गोडीची ! तुम्हाला गोडी ही स्वतःची स्वतःच अनुभवावी लागेल ! आणि समजा तुमच्या अनुभवास आले की ही गोडी म्हणजे काय आहे तरी तुम्ही ती कोणालाही समजाऊन शकणार नाहीये ! तुम्ही केवळ निर्देशक शब्द वापरु शकाल . दॅट्स द मॅक्स दॅट यु कॅन डू ! दॅट्स द सिंग्युलॅरिटी ! कळ्ळं का ? उपरोधाने नाही , मनापासुन कळकळीने विचारत आहे , कळंलं का ? आर यु गेटींग इट ? --- कोणाला कळ्ळं काय किंवा नाही कळ्ळं काय , त्या 'सिंग्य्लॅरिटीला' काही फरक पडत नाही ! ज्यांना "कळ्ळं " असं वाटतंय त्यांना बस निमिष मात्र हा आनंद आहे की - "हेच तर ज्ञानेश्वर माऊली म्हणत होते !!!!! " . आणि पुढच्या क्षणी तोही आनंद विरुन जाणार आहे त्या सिंग्युलॅरिटीमध्ये ! तैसें दाविलें नाहीं । तरी हाचि ययाचा ठाईं । ना दाविला तरीही । हाचि यया ॥ ७-२२५ ॥ जागृती दाविला । कां निदा हारविला । परी जैसा येकला । पुरुषपुरुषीं ॥ ७-२२६ ॥ कां रायातें तूं रावो । ऐसा दाविजे प्रत्ययो । तही ठायें ठावो । राजाचि असे ॥ ७-२२७ ॥ ना तरी रायपण राया । नाणिजे कीं प्रत्यया । तही कांहीं उणें तया । माजी असे ? ॥ ७-२२८ ॥ तैसें दावितां न दावितां । हा ययापरौता । चढे न तुटे आईता । असतचि असे ॥ ७-२२९ ॥ ||ॐ||

In reply to by सुबोध खरे

वामन देशमुख 28/01/2025 - 15:53
साधु -- ब्रम्हदर्शन असंच असतं, ते स्वतःलाच अनुभवायला लागतं.
हा अनुभव-किस्सा आवडला. अर्थात हे इतरही अनेक ठिकाणी लागू पडू शकते. आम्ही तीन मित्र मध्यरात्री दोन-अडीच वाजता वैष्णोदेवी देऊळ डोंगराच्या पायऱ्या उतरत होतो. त्यावेळी एका विशिष्ट वळणावर कुठेतरी सोनचाफ्याची झाडे होती. अर्थात अंधारात ती झाडे दिसत नव्हती. पण त्या झाडांच्या फुलांचा अतिशय मनमोहक सुगंध येत होत होता. तितका उत्कट सुगंध त्यापूर्वी कधीही आला नव्हता. पंधरावीस मिनिटे आम्ही तो सुगंध अनुभवत तिथेच थांबून होतो. तो अनुभव शब्दांत मांडणे अशक्य आहे! तसा विलक्षण सुगंधानुभव पुन्हा कुठेही कधीही मिळाला नाही.

सोत्रि 20/01/2025 - 19:31
प्रत्यक्ष अनुभुती शब्दांच्या आवाक्याच्या पलीकडे आहे !
यथार्थ! - (मुमूक्षू) सोकाजी

राघव 20/01/2025 - 22:44
ठाकुरही तेच म्हणतात ना - "ब्रह्म अजून उष्टे झालेले नाही" !! अर्थात् ब्रह्म म्हणजे काय हे कुणीही सांगू शकलेलं नाही. ते वर्णनातीत आहे.

मारवा 26/01/2025 - 21:09
ब्रह्म काय आहे कसे असावे याचा कोणीच अनुभव घेऊ शकत नाही. म्हणजे अशा टाईप च्या ज्या कोणत्याही आध्यात्मिक संकल्पना असतात त्या करोडोत एखादा जाणतो अनुभवतो या रीतीने च मांडणी प्रत्येक पंथात आवर्जून केलेली असते. शिवाय तुमचा प्रयास वगैरे ही मुप्योगाचा नाही कृपा वगैरे हवी. किंवा तुम्ही मूलतः अतिशय नालायक किंवा पतित इतके आहात की you are not eligible. सर्वसाधारणपणे सर्वच धर्मात ब्रहादी संकल्पना अनुभूती बद्दल मांडणी असते. ती तशी जर खरी मानली एकवेळ तर जे यथार्थ आहे that which is ते जे रोज अनुभवायला येते ते भले बुरे अनेकदा बुरेच अनाकलनीय दुखरे टोकदार भयाण वास्तव जे अनेक अक्राळ विक्राळ तोंडणी आपल्या दैंदिन जीवनात आपल्या समोर ठाकलेले असते. त्यापासून पालयनसाठी दिलं के बहलाने को गालिब ये खयाल अच्छा है. कारण तो anesthesia सारखं काम करतो. जबाबदारी पासून मुक्ता करतो तात्कालिक pleasure देतो. एक प्रकारचं वैचारिक हस्तमैथुन ज्यात काहीही इमॅजिन करू शकतो.

In reply to by मारवा

तथास्तु ! :) अज्ञश्चाश्रद्दधानश्च संशयात्मा विनश्यति। नायं लोकोऽस्ति न परो न सुखं संशयात्मनः।।

In reply to by प्रसाद गोडबोले

मारवा 27/01/2025 - 07:06
जडभूतविकारेषु चैतन्यं यत्तु दृश्यते । ताम्बूलपूगचूर्णानां योगाद् राग इवोत्थितम् ।। That is, being in agony over the impermanent we hopefully pursue what we call the permanent. The motive of our search is to find comfort in the ideal of the permanent, and this ideal is born of impermanency, it has grown out of the pain of constant change. The ideal is unreal, whereas the pain is real; but we do not seem to understand the fact of pain, and so we cling to the ideal, to the hope of painlessness. Thus there is born in us the dual state of fact and ideal, with its endless conflict between what is and what should be. The motive of our search is to escape from impermanency, from sorrow, into what the mind thinks is the state of permanency, of everlasting bliss. But that very thought is impermanent, for it is born of sorrow. The opposite, however exalted, holds the seed of its own opposite. Our search, then, is merely the urge to escape from what is.

In reply to by मारवा

परत एकदा तेच म्हणतो ... "तथास्तु" मुक्ताभिमानी मुक्तो हि बद्धो बद्धाभिमान्यपि । किं वदन्तीह सत्येयं या मतिः सा गतिर्भवेत् ॥ ११ ॥ :)

In reply to by प्रसाद गोडबोले

मारवा 27/01/2025 - 15:58
नित्य शुद्ध बुद्ध मुक्त अशा ब्रह्म्याला माझे हृदय पूर्ण वंदन. मायेच्या आवरणाखाली जरी माझे शूद्र ब्रह्म झाकलेले असले तरी मी एक दिवस नक्कीच तुमच्या बरोबर बसून अहं ब्रह्मास्मी चा जयघोष करणारच. आणि एक दिवस अखिल विश्वातील शूद्र वैश्य क्षत्रिय ब्राह्मण इतकेच काय म्लेच्छ ब्रह्मंसुद्धा एकमेकांत बसून जयघोष करणारच वयं ब्रह्मास्मी वयं ब्रह्मस्मी

In reply to by मारवा

मी माझे लेखन किमान ३ ते ४ वेळा वाचुनच प्रकाशित करतो पण तुमचा हा प्रतिसाद पाहुन बुचकळ्यात पडल्याने मी वरील लेखन परत दोन वेळा वाचले ! अहाहा . मजा आली ! त्यामुळे आधी तुम्हाला धन्यवाद देतो :)
नित्य शुद्ध बुद्ध मुक्त अशा ब्रह्म्याला माझे हृदय पूर्ण वंदन.
तुम्ही एक तर लेख नीट वाचलाच नाहीये किंवा वाचुन तुम्हाला कळाला नाहीये , किंवा तुम्ही माझे नाव वाचुन आधीच ठरवुन आला होता की काय प्रतिसाद द्यायचे ! मी लेखाचे नावच सिंग्युलॅरिटी ऑफ वर्ड्स असे लिहिले आहे , तस्मात तुम्ही वापरलेले हे सगळे शब्द केवळ इव्हेंट होरायझन वर आहेत ! आणि कसलं वंदन अन कसलं काय ? कोण कोणाला काय वंदन करणार ? हे सगळे इव्हेंट होरायझॉनवर , "सिंग्युलॅरिटी" मध्ये नाही !
मायेच्या आवरणाखाली जरी माझे शूद्र ब्रह्म झाकलेले असले तरी मी एक दिवस नक्कीच तुमच्या बरोबर बसून अहं ब्रह्मास्मी चा जयघोष करणारच.
मायेचे आवरण , झाकलेले ब्रह्म वगैरे शब्द तुमचे बाळबोध आकलन आणि तुम्ही लेख वाचलाच नाही ह्याची प्रतीती देत आहेत ! . तुम्हाला कळणार नाहीयेच , पण तरीही रिव्हिजन म्हणुन लिहिति - माया ह्या शब्दाची व्युतप्त्तीच या मा सा माया अर्थात जी नाहीच ती म्हणजे माया अशी आहे . ह्यावर ज्ञानेश्वर माऊलींनी अतिषय सुंदर ओवी लिहिली आहे -
अविद्या येणें नांवें । मी विद्यमानचि नव्हे । हे अविद्याची स्वभावें । सांगतसे ॥
पुढे माऊली म्हणतात :
आतां अविद्या नाहींपणें । नाहीं तयेतें नासणें । आत्मा सिद्धुचि मा कोणें । काय साधावें ? ॥
बाकी तुम्ही शुद्र वगैरे म्हणालात त्यातुन तुमचे पुर्वग्रहदुषित अंतःकरण दिसुन येते , कारण मी माझ्या लेखनात ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शुद्र , एकुणच सनातन वर्णाश्रम धर्म ह्या विषयी चकार शब्द काढलेला नाही . समर्थांनी स्पष्ट म्हणुन ठेवलं आहे -
ब्राह्मणांचें ब्रह्म तें सोंवळें । शूद्राचें ब्रह्म तें ओंवळें । ऐसें वेगळें आगळें । तेथें असेचिना ॥ २५॥
तुमचे पुर्वग्रह तुमच्यापाशी , मला त्यांचा स्पर्ष होत नाही. मी कित्येक अशा शुद्रवर्णातील लोकांना ओळखतो ज्यांचे सनातन धर्मावर , वर्णाश्र्रम व्यवस्थेवर ठाम श्रध्दा आहे , आणि मी एका अशा महाभाग ब्राह्मणालाही ओळखतो जो भोळ्या भाबड्या भाविकांच्या श्रध्देचा गैरफायदा घेऊन त्यांना लुबाडतो आहे. माझ्या लेखी हे असे शुद्र अशा ब्राह्मणांपेक्षा कैकपटीने उच्च आहेत ! आणि तुम्ही लेख नीट वाचला तर तुम्हाला लेखाच्या शेवटी जगद्गुरु संत तुकाराम महाराज ह्यांच्या ब्रह्मानुभुतीचा अभंग दिसेल . तुकोबा स्वतःहुनच "याति शुद्र केला वेवसाय " असे म्हणाले आहेत . तरी त्यांच्या अभंगात मला तीच झलक दिसते जी ज्ञानेश्वर माऊलींच्या अभंगात आहे , समर्थांच्या श्लोकात आहे ! फक्त त्यासाठी दृष्टी पाहिजे ! जोवर तुम्ही "मी शुद्र" ह्या अहंकाराला कवटाळुन बसला आहात तोवर तुम्हा सिंग्युलॅरिटी तर सोडाच पण इव्हेंट होरायझॉन देखील दिसणार नाही !
आणि एक दिवस अखिल विश्वातील शूद्र वैश्य क्षत्रिय ब्राह्मण इतकेच काय म्लेच्छ ब्रह्मंसुद्धा एकमेकांत बसून जयघोष करणारच वयं ब्रह्मास्मी वयं ब्रह्मस्मी
आता हे तुम्ही उपरोधिक पणे लिहिले आहे की खर्‍या श्रध्देने हे तुमचे तुमालाच ठाऊक , पण कसेही असले तरी परत एकदा तेच म्हणतो जे आधी दोन वेळा म्हणालो आहे - तथास्तु ! अर्थात तसेच असो ! जयाचा भावार्थ जैसा । तयास लाभ तैसा । मत्सर धरी जो पुंसा । तयास तेंचि प्राप्त ॥ इत्यलम ! अवांतर : समुद्रमंथनाच्या वेळेला जेव्हा भगवान विष्णु मोहिनी रुप घेऊन देवांना अमृत वाटत होते तेव्हा मायावी राहु देवांचे रुप घेऊन त्यांच्या प़तीत जाऊन बसला, इतकेच नव्हे तर त्याने चक्क अमृत प्राशनही केले पण ते लक्षात आल्यावर भगवंतांनी तत्काळ सुदर्शनचक्राने त्याच्या शिरछेद केला आणि अमृत पोटात जाऊन पचण्या आधीच राहु मेला ! अमृत प्राशन करुन देखील मेला ! अमृत सेवितांच पावला । मृत्य राहो ॥ फार मजेशीर गोष्ट आहे नै ! =))))

In reply to by मारवा

Bhakti 27/01/2025 - 11:41
पण पाश्चात्य लोक ब्रम्ह शोधण्याऐवजी भौतिक गोष्टींमागे अभ्यास करू लागले.त्यामुळे त्यांनी अधिक प्रगती केली का?असा मला तर प्रश्न पडतो.ब्रम्ह सर्वांमध्ये आहे तर ते शोधायचे कुठे? ब्रम्हज्ञान प्राप्ती झाली हे ओळखायचं कसं?

In reply to by Bhakti

मारवा 27/01/2025 - 14:03
या दिलासादायक संकल्पना आहेत. तुम्ही हव्या तशा खेळू शकता तुम्ही स्वतः त्याचा प्रत्यक्ष अनुभव घेतलेला नसेल तरी अमुक अमुक महात्म्याने तो घेतलेला आहे व त्याचे अमुक अमुक म्हणणे आहे. त्याने याच्या अनुभवाचा अमुक अमुक मार्ग दाखवलेला आहे. तो तुम्हाला येत नाही याचा अर्थ त्या महात्म्याच्या म्हणण्याप्रमाणे तुम्ही अमुक अमुक कारणास्तव अपात्र आहात. आणि हे सर्व ठरवण्यासाठी मी अमुक अमुक प्रमाणे पात्र आहे. वगैरे वगैरे. ही संकल्पना एका अत्यंत सुंदर अशा कवितेसारखी आहे अदभुत अशा fantasy सारखी आहे. त्याचा आनंद तुम्ही घेऊ शकता त्यावर चर्चा करण्यासाठी मोठा आनंद आहेच. जसे फुलराणी या रम्य कवितेविषयी चर्चेत इतकंच काय तिला उलगडून पहतानही आनंदच येत असतो. तशा या प्रचीनांच्या नितांत सुंदर असा कल्पनाविलास असलेल्या संकल्पना आहेत.

In reply to by Bhakti

मारवा 27/01/2025 - 14:05
या दिलासादायक संकल्पना आहेत. तुम्ही हव्या तशा खेळू शकता तुम्ही स्वतः त्याचा प्रत्यक्ष अनुभव घेतलेला नसेल तरी अमुक अमुक महात्म्याने तो घेतलेला आहे व त्याचे अमुक अमुक म्हणणे आहे. त्याने याच्या अनुभवाचा अमुक अमुक मार्ग दाखवलेला आहे. तो तुम्हाला येत नाही याचा अर्थ त्या महात्म्याच्या म्हणण्याप्रमाणे तुम्ही अमुक अमुक कारणास्तव अपात्र आहात. आणि हे सर्व ठरवण्यासाठी मी अमुक अमुक प्रमाणे पात्र आहे. वगैरे वगैरे. ही संकल्पना एका अत्यंत सुंदर अशा कवितेसारखी आहे अदभुत अशा fantasy सारखी आहे. त्याचा आनंद तुम्ही घेऊ शकता त्यावर चर्चा करण्यासाठी मोठा आनंद आहेच. जसे फुलराणी या रम्य कवितेविषयी चर्चेत इतकंच काय तिला उलगडून पहतानही आनंदच येत असतो. तशा या प्रचीनांच्या नितांत सुंदर असा कल्पनाविलास असलेल्या संकल्पना आहेत. शिवाय त्या गोळीबंद अशा संकल्पना आहेत. Watertight किंवा वर्तुळ पूर्ण करणारी theory शुद्ध तत्त्वज्ञानाचा अनुसार अमान्य असते.

In reply to by मारवा

Bhakti 27/01/2025 - 14:42
त्याचा आनंद तुम्ही घेऊ शकता त्यावर चर्चा करण्यासाठी मोठा आनंद आहेच. जसे फुलराणी या रम्य कवितेविषयी चर्चेत इतकंच काय तिला उलगडून पहतानही आनंदच येत असतो. अगदी अगदी.. ब्रम्ह संकल्पनेच्या? यशाचे हे एक मोठे कारण आहे...आनंद! गोळीबंद संकल्पना नव्हतं माहिती, नवीन समजलं.

In reply to by मारवा

स्वधर्म 27/01/2025 - 19:30
- या दिलासादायक संकल्पना आहेत. - त्यांचा आनंद तुम्ही घेऊ शकता त्यावर चर्चा करण्यासाठी मोठा आनंद आहेच. - शिवाय त्या गोळीबंद अशा संकल्पना आहेत. मारवा, तुमची वरील वाक्ये अगदी मनोमन पटली आहेत. मूळ थियरी खूप छोटी असली तरी त्यावर हजारो श्लोकांचा, पाचशे पानांचा ग्रंथ भाषाप्रभू लोक पाडतात. जे तसले ग्रंथ वाचत नाहीत, बौध्दिक चर्चा करत नाहीत, ती साधी लोकं अगदी दिपून जातात, भक्त बनतात. आणि जे लोक परिश्रम करून ग्रंथ वाचतात, त्यांना प्रश्न पडले, नाही पटले, तरी संक कॉस्ट फ॓लसी तयार झाल्याने सोडू शकत नाहीत. उलट त्यातच आणखी भर घालत रहातात. बुध्दाने याला बुध्दिविलास, वाणीविलास म्हटले आहे, आणि अध्यात्मिक उन्नतीच्या मार्गात काहीही उपयोग नाही, असे स्पष्ट बजावले आहे.

In reply to by मारवा

सोत्रि 29/01/2025 - 09:41
अशा टाईप च्या ज्या कोणत्याही आध्यात्मिक संकल्पना असतात त्या करोडोत एखादा जाणतो अनुभवतो या रीतीने च मांडणी प्रत्येक पंथात आवर्जून केलेली असते. शिवाय तुमचा प्रयास वगैरे ही मुप्योगाचा नाही कृपा वगैरे हवी. किंवा तुम्ही मूलतः अतिशय नालायक किंवा पतित इतके आहात की you are not eligible. सर्वसाधारणपणे सर्वच धर्मात ब्रहादी संकल्पना अनुभूती बद्दल मांडणी असते.
दुर्दैवाने हे तंतोतंत खरे आहे.
ब्रह्म काय आहे कसे असावे याचा कोणीच अनुभव घेऊ शकत नाही
ह्याला कारणीभूत आहे वरच्या परिच्छेदातील पंथ आणि त्यांची माडणी. अध्यात्माला शास्त्रिय दृष्टीकोनातून न बघता त्यात इश्वरी, दैवी, धार्मिक अंगाने बघून कृतीवर भर न देता शब्दांचे अवडंबर केल्याने ब्रह्म काय आहे कसे असावे याचा कोणीच अनुभव घेयेऊ शकत नाही. भूमितीमधे प्रमेय सोडवण्याची एक पद्धत आहे. प्रमेयाची सिद्धता खालील पायर्‍यांनी करतात.
  1. पक्ष
  2. साध्य
  3. सिद्धता
  4. निष्कर्ष
अध्यात्मात दुर्दैवाने पक्ष साध्य आणि निष्कर्ष ह्यांचा जयघोष केला गेलाय. अगणीत शब्दसंपदा केवळ ह्यावरच खर्च केलेली आहे. सिध्दता म्हणजे पक्ष आणि साध्य यांच्या निष्कर्षापर्यंत खात्रीने पोहोचण्याचा मार्ग, तंत्र, पध्दती, कार्यप्रणाली नेमकं हेच हरवलेलं आहे. त्यामुळे साक्षात्कार म्हणजे नेमकं काय आणि तो खात्रीने नेमका कसा होईल हे ह्याची पध्दती, कार्यप्रणाली कोणीच सांगत नाही. त्याऐवजी शाब्दिक बुडबुडे सोडून निष्कर्षाचा जयघोष केला जातो. त्याने पंथ, गुरू, बुवा, (स्वयं)सिद्ध ह्यांची भरमार होते. बर्‍याच साधनाप्रणालींची अभ्यास केल्यानंतर विपश्यना साधनाप्रणाली ही सिद्धते वर भर देणारी आणि सुस्प्ष्ट मार्ग आणि तंत्र उलगडून सांगणारी साधनाप्रणाली आहे ह्याचा साक्षात्कार झाला.' शरीर आणि मन म्हणजे आपण नाही' म्हणजे नेमकं काय आणि त्याची अनुभूती (साक्षात्कार), आपली आपण, कोणतेही जयघोष करणारे ग्रंथ, पुस्तके, शास्त्र-पुराणे न वाचता, कशी करून घ्यायचे ह्याची कृती विपश्यना शिकवते. त्यामुळे, 'ब्रह्म काय आहे कसे असावे याचा कोणीच अनुभव घेऊ शकत नाही' असं म्हणणं रास्त होणार नाही. - (साधक) सोकाजी

In reply to by सोत्रि

हवालदार 29/01/2025 - 15:17
यम नियमचे महत्व समजावुन देणारा राम ७ वा, योग समजवणारा योगेश्वर ८ वा आणि ब्रह्म कसे अनुभवयाचे हे समजावणारा बुद्ध ९ वा अवतार समजले जात असावेत .

In reply to by सोत्रि

स्वधर्म 29/01/2025 - 17:27
वरील विवेचनाच्या शब्दाश्ब्दाशी सहमत. शब्दांचा पिसारा फुलवून भुलवणार्या लोक व ग्रंथ यापासून मुक्ती मिळवण्याचा आनंद अवर्णनीय आहे.

In reply to by स्वधर्म

है का !
शब्दांचा पिसारा फुलवून भुलवणार्या लोक व ग्रंथ यापासून मुक्ती मिळवण्याचा आनंद
हेच आम्ही सांगितलं तर तुम्हाला पटत नाही . गट क्रमांक १ आणि २ हे अन डिस्युटेबल आहेत . गट क्रमा़ १ मधील कोणीही काहीही लिहिलं तरी तुम्हाला शब्दाचा पिसारा वाटणार आहे . साधं सोप्पं आहे बघा , १९५६ साली बाबासाहेबांनी समस्त जगाला बुध्दाचा मार्ग दाखवुन दिलेला आहे . तुम्ही कशाला ह्या गट क्रमा़ १ वाल्यांच्या शब्दाचा पसारा अन भुलवणारे ग्रंथ वगैरे बघत बसता ! सरळ विपश्यना करा ! मोक्ष बिक्ष आत्मा ब्रह्म बिम्ह सब झूट आहे हे तुम्हाला माहीत आहेच की आधीच ! कशाला तुम्ही हा शब्दांचा पिसारा बघुन त्रास करुन घेताय ? देश स्वतंत्र आहे , ग्रंथ बिंथ जाळायला तुम्हाला मोकळीक आहे ! अगदीच हा लेख आवडला नसेल तर ह्या लेखाची प्रिंट काढुन जाळा ! जाळपोळ करायची परंपरा ही आहेच ! पण ज्यांना शब्दांचा पिसारा फुलवायचा आहे , ग्रंथ वगैरे वाचायचे आहेत त्यांना वाचु द्या की ! त्यांन्नी तुम्हाला आमंत्रण दिले आहे का वाचायचे ? कि तुम्हाला त्यांच्या व्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणायची आहे ? तुम्ही तुमच्या आनंदात रहा , त्यांना त्यांच्या आनंदात राहु दे ! तुम्ही बुध्दाच्या मार्गाचे आचरण केले तर त्यात आम्हाला आनंदच आहे कारण आम्ही बुध्दाला विष्णुचा ९वा अवतार मानतोच ! एके हाती दंतु | जो स्वभावता खंडितु | तो बौद्धमत संकेतु | वार्तिकांचा ||१-१२|| असे म्हणुन माऊलींनी बौध्दमताला गणेशाचा रुपात स्थान दिलेले आहेच ना ! कसेही करा , कोणताही मार्ग आचरा , किंवा कोणताही मार्ग टाळा . आमची कसली सक्ती नाही कि कसला आग्रह नाही ! आमचं काही भांडण नाही विपश्यनेशी . उलट आम्हालाही कौतुकच आहे ! जो जे वांच्छील तो ते लाहो हीच आमची प्रार्थना आहे पहिल्यापासुन ! म्हणुनच म्हण्तो - तथास्तु !

In reply to by प्रसाद गोडबोले

स्वधर्म 30/01/2025 - 23:27
मग इथल्या प्रत्येक प्रतिसादाला प्रतिसाद आपण का देता? स्वांतसु़खाय म्हणता आणि सुरूवातच प्रत्येकाला कळायला पाहिजे असं नाही म्हणत बहुतेक लोकांना तुम्हाला प्राप्त झालेलं ज्ञान (?) कळणार नाही, असं आधीच सांगता? बरं जर स्वांतसुखायच लिहायचं आहे, तर सार्वजनिक संसंसळावर मुळात टाकता तरी का? (याचं उत्तर खरं तर सगळ्यांना माहित आहे :-) ) इथे टाकलं तर लोक त्यांचे विचार न पटले मांडणारच ना? असो. वेदांचा तो अर्थ | आंम्हासिच ठावा || येरांनी वहावा | भार माथा || हे तुकोबांचे बोल मनोमन पटलेला, - स्वधर्म

In reply to by स्वधर्म

मग इथल्या प्रत्येक प्रतिसादाला प्रतिसाद आपण का देता?
तुम्ही इतर प्रतिसाद वाचत नाही काय ? ह्या प्रश्नाचं उत्तर मी खालीच एका प्रतिसादात आधीच दिले आहे - मला मजा येत आहे म्हणुन ! तुम्हाला पटलं तरी हरकत नाही , नाही पटलं तरी हरकत नाही . आम्ही तुमच्या भाषेत "शब्दांचा पिसारा " फुलवत राहु , तुम्ही बस त्रास करुन घेऊ नका ! बाकी ह्या निमित्ताने तुम्ही तुकोबांची गाथा वाचताय , वेदांचा अर्थ समजुन घेताय हीच आमच्यासाठी आनंदाची बाब आहे , मग मजा तर येणारच ना ! :)

कॉमी 28/01/2025 - 18:51
एका बाबीचे रिकन्सिलेशन मला कधी करता आले नाही. जर आपण मन नाही, शरीर तर नाहीच नाही - हे मनापासून पटले तर माणूस का ऐहिक बाबींमध्ये वेळ घालवेल? त्यांच्या दृष्टिकोनातून हे करणे म्हणजे जो माणूस आपल्या कपड्यांना इस्त्री करण्यात दररोज बरा तस घालवतो त्याच्याइतकीच निष्फळ घालमेल नाही का? म्हणजे बुवा आमच्यासारखी भौतिक जडवादी मंडळी नऊ ते पाच कामाला जातात हे समजण्यासारखे आहे. आम्ही स्वतःला शरीरापासून वेगळे समजत नाही. आम्हाला स्वतःला अर्थात शरीराला सुख, शांती, समाधान द्यायचे आहे. पण स्वतःला ब्रम्ह समजणारी मंडळी का करतात हे सगळे उद्योग? म्हणजे अजून स्वतःचा साक्षात्कार पूर्ण झाला नाहीये की आणि काही? उपरोध नाही. सिरीयस प्रश्न.

In reply to by कॉमी

Bhakti 28/01/2025 - 19:10
कारण सनातननुसार ब्रम्हज्ञानानंतर आत्मसुखासाठी /परम कल्याणासाठी संन्यास अथवा कर्मयोगी यापैकी दोन मार्ग स्वीकारायचे असतात.ज्या अर्थी त्यांनी संन्यास स्विकारला नाही.त्याअर्थी त्यांंनी निष्काम कर्मयोगाचा मार्ग स्वीकारला आहे.

In reply to by Bhakti

कॉमी 28/01/2025 - 20:03
मार्ग आहेत हे ठीक. पण का? ज्यांना स्वतःचा साक्षात्कार झाला आहे आणि ज्यांना शरीर म्हणजे आपण नाही आहे हे समजले आहे ते शरीराची उस्तभार कशाला करतात? गरज काय आहे? जर स्वतःला इतके स्वतःच्या भावना आणि अशाश्वत गोष्टींपासून अलिप्त करायचे आहे तर मग तेच टिकवण्याची मरमर काय म्हणून?

In reply to by कॉमी

Bhakti 28/01/2025 - 21:13
स्वतःचा साक्षात्कार हे चूक आहे.तुम्ही अलिप्त कधीच होऊ शकत नाही.ब्रम्ह म्हणजे हेच तर की सगळेच जीव/आत्मा जुळलेले आहेत.कर्मयोगीसाठी शरीर हे कर्माचे माध्यम आहे,त्याचा त्याग/ त्याच्या श्रेयसाचा त्याग सर्वांचा समतोल बिघडवतो.

In reply to by Bhakti

कॉमी 28/01/2025 - 22:32
ब्रम्हाला कर्माची फिकीर कशाला? ब्रम्हाच्या पातळीवर जर दोन काही नाहीच तर पाप पुण्य आलेच कुठून? जर ब्रम्ह सोडून इतर काही नाहीच, आणि साक्षात्कार म्हणजे आपण ब्रह्म आहोत, हा असेल, तर मग ऐहिक गोष्टींची चिंता कशासाठी?

In reply to by कॉमी

गीता सुगीता कर्तव्या किमन्यैः शास्त्रविस्तरैः | या स्वया पद्मनाभस्य मुखपद्माद्विनिः सृता || एका सुगम अशा भगवद्गीतेचा अभ्यास करा , बाकी इतर सार्‍या शास्त्रांची काय गरज आहे ? ही भगवग्द्गीता जी की साक्षात पद्मनाभ विष्णुंच्या वासुदेवाचा मुखातुन उत्पन्न झालेली आहे ! तुम्हाला तुमच्या प्रश्नाचे उत्तर भग्वद्गीतेतील तिसर्‍या अध्यायात मिळेल कारण दुसर्‍या अध्यायात भगवंतान्नी सांख्ययोग विषद केल्यावर अर्जुनाने एक्झॅक्टली हाच प्रश्न भगवंताला विचारला होता की , हे ज्ञान , ही स्थितप्रज्ञ अवस्था , ही ब्राह्मी स्थिती जर सर्व श्रेष्ठ आहे तर मग तुम्ही मला निष्कारण ह्या कर्माच्या फेर्‍यात का अडकवता ? (अर्थात माझा मी आपला ब्रह्मानंदी लागली टाळी अवस्थेत सुखनैव बसतो , तिकडे खड्यात गेली दुनिया, अन हे युध्द, अन राज्य वगैरे ) त्यावर भगवंतांनी सविस्तर उत्तर दिलेले आहे ! माऊलींनी काय निरुपण केले आहे राव . निव्वळ लोकोत्तर ! म्हणौनि संगू जंव प्रकृतीचा । तंव त्यागु न घडे कर्माचा । ऐसियाहि करूं म्हणती तयांचा । आग्रहोचि उरे ॥ ६३ ॥ मी मुद्दाम स्पष्ट उत्तर देत नाहीये कारण माझी इच्छा आहे की ह्या निमित्ताने तुम्ही गीता ज्ञानेश्वरी उघडावी , श्रध्देने वाचावी , त्यातुन तुम्हाला बोध होईल ! I don't want to steal your joy of the discovery of truth ! मला अक्षरशः तुकोबांसारखे "माझी मज झाली अनावर वाचा" असे काहीसे ज्ञानेश्वरी वाचताना होत असल्याने माऊलींच्या अजुन काही ओव्या करतो : तूं मानसा नियमु करीं । निश्चळु होय अंतरीं । मग कर्मेंद्रियें व्यापारीं । वर्ततु सुखें ॥ ७६ ॥ म्हणौनि जें जें उचित । आणि अवसरेंकरूनि प्राप्त । तें कर्म हेतुरहित । आचरें तूं ॥ ७८ ॥ म्हणौनि स्वधर्मानुष्ठान । तें अखंड यज्ञ याजन । जो करी तया बंधन । कहींच न घडे ॥ ८३ ॥ म्हणौनि स्वधर्में जें अर्जे । तें स्वधर्मेंचि विनियोगिजे । मग उरे तें भोगिजे । संतोषेंसीं ॥ १२५ ॥ हा कर्मयोग म्हणजे मजा आहे राव ! हे म्हणजे मायेशी कुस्ती खेळल्यासारखे आहे ! तुम्ही ध्यान धारणा साधना अभ्यास चिंतन करता अन ब्रह्मलीन होता अन मग माया म्हणते - " शिवोहं शिवोहं काय ? तुला वाटतंय ना तु ब्रह्मलीन झाला आहेस , मग आता ह्या अवस्थेत सर्वांभूतीं ब्रह्म पाहुन अन शांत , तद्रुप राहुन दाखव !" अन माया कुस्तीचा डाव टाकते , अन मग आपल्या प्रापंचिक आयुष्यात काहीतरी अडी अडचणी येतात , संकटे येतात , आणि आपण आत्मभावातुन देह भावात परत येतो . मग परत नाम , परत साधना अन परत उपासना, परत गीता ज्ञानेश्वरी दासबोध ! परत संध्यावंदन ! अन आपण परत ब्रह्मभावात लीन होतो ! अन मायेचा डाव उलटवुन लावतो ! आणि मग माया परत गालातल्या गालात हसते , म्हणते - ठीक आहे ठीक आहे ! आता हा नवीन डाव घे ! आणि मग तो डाव असतो आनंदाचा सुखाचा समाधानाचा ! आणि आपण तोही पलटवुन लावतो ! आणि मग एक वेळ अशी येते की तुम्हाला हा सगळा खेळ कळतो अन तुम्हीही तिच्या सोबत हसायला लागता आणि म्हणता - "ठीक आहे , ब्रिंग इट ऑन ! " =))

In reply to by प्रसाद गोडबोले

सोत्रि 29/01/2025 - 08:54
आपलं आपल्याला कळाल्याशी मतलब. आपल्याला जे कळलं अनुभवाला आलं त्याचेच निरनिराळे पैलु आपणच उपभोगावेत ह्यासाठी लिहावे हे उत्तम !
अशी प्रस्तावना केल्यावर लेख 'गंगार्पणमस्तू' म्हणून सोडून देण्यातच गंमत आहे (हे माझ मत)! - (स्वांतसुखी होण्याच्या प्रयत्नात असलेला) सोकाजी

In reply to by सोत्रि

येस, इट्स ए मॅटर ऑफ चॉईस ! योगरतो वा भोगरतो वा सङ्गरतो वा सङ्गविहीनः | यस्य ब्रह्मणि रमते चित्तं नन्दति नन्दति नन्दत्येव ‖ मौन धारण करणे आणि प्रश्नोत्तरे करणे दोन्ही चॉईस आहेस. दोन्ही कुस्ती ! ब्रह्मीभूत माणूस स्वच्छंद असतो. त्याला वाटलं तर तो उत्तर देतो नाहीतर तथास्तु म्हणून निघून जातो :) माऊली संजीवन समाधी घेतात , समर्थ भारत भर मठ स्थापन करून जनजागृती करतात. तुकोबा कर्जाच्या वह्या इंद्रायणीत बुडवून सगळं संसार पांडुरंगाच्या पायी अर्पण करतात , एकनाथ सगळं काही व्यवस्थित करतात अगदी सर्वसामान्य गृहस्थ माणसासारखे ! तसेच काहीसे. स्वांत सुखाय. माझा येते आहे तोवर इथे लेख प्रतिसाद गप्पा टप्पा करायच्या , कंटाळा आला की इथून निघून जायचं ! I think one of the most obvious sign of enlightenment is this sort of simple basic freedom ! This is really amazing indeed. ! जय जय रघुवीर समर्थ

In reply to by Bhakti

सोत्रि 29/01/2025 - 08:49
स्वतःचा साक्षात्कार हे चूक आहे.
हे कसं काय चूक आहे? नेमकं काय म्हणायचं आहे ते कळलं नाही म्हणून हा प्रश्न आहे.
तुम्ही अलिप्त कधीच होऊ शकत नाही
अलिप्त होण हीच मुक्ती आणि त्यासाठीच तर सर्व अट्टाहास आहे! असो, अलिप्त होऊ शकत नाही हे तुमचे म्हणणे जरा स्पष्ट करून सांगाल का? - (अभ्यासू) सोकाजी

In reply to by सोत्रि

Bhakti 29/01/2025 - 11:10
स्वतःचा साक्षात्कार होतो? तुमचं अस्तित्व/एखादं ज्ञान या जगात आले ते सत्य आहे साक्षात्कार नाही.उगाच mature झालो की त्याला स्वतःचा साक्षात्कार असं नावं दिलं जाते.यानुसार तर मला दर आठवड्याला स्वतः चा नवा साक्षात्कार होतो.मग काय दरवेळी मी काहीतरी समजलं इकडे पहा असं समजू का? सगळ्यांना साक्षात्कार /सत्य उमगते,सगळे mature होतात... कालावधी वेगवेगळा आहे. अलिप्तता ही कोणत्या लेव्हलची आहे.वैयक्तिक नात्यांची? तो झाला संन्यासी ..सामाजिक जबाबदारीची?..तो झाला संन्यासी. पण त्याला पण /इंद्रियांना भूक लागली की भिक्षा मागावीच लागते ना...ना इंद्रियांपासून अलिप्त ना प्रकृती पासून. संत जर अलिप्त राहिले असते तर प्रबोधन केले असते का? समाजाचे /प्रकृतीचे/सर्व जीवांचे(oneness) कल्याण व्हावे यासाठीच मार्ग देत राहतात. अलिप्त म्हणजे मुक्ती नव्हे,अलिप्त म्हणजे कल्याण व्हावे ही इच्छा तुमचं पण माझं पण सर्वांचे पण! -(दार्शनिक जिज्ञासू )भक्ती

In reply to by कॉमी

सोत्रि 29/01/2025 - 08:42
ज्यांना स्वतःचा साक्षात्कार झाला आहे आणि ज्यांना शरीर म्हणजे आपण नाही आहे हे समजले आहे ते शरीराची उस्तभार कशाला करतात
दोन उदाहरणं ह्यासाठी. १. ज्ञानेश्वर माउली, त्यांना जेव्हा साक्षात्कार झाला तेव्हा त्यांनी ज्ञानेश्वरी लिहीपर्यंत शरीराची उस्तभार केली. त्यानंतर त्यांनी समाधी घेऊन शरीराचा त्याग केला. २. गौतम बुद्धाला जेव्हा बोधीप्राप्ती झाली तेव्हा त्याच्यातल्या करुणेमुळे, ते ज्ञान सर्वसामान्यांपर्यंत पोहोचले पाहिजे ह्यासाठी उर्वरीत जीवन त्याची शिकवण शिकवण्यासाठी शरीराची उस्तभार केली सगळे साक्षात्कारी मोस्टली ह्या दोन कॅटेगरीमधे मोडतात. - (मुमूक्षू) सोकाजी

In reply to by सोत्रि

विजुभाऊ 29/01/2025 - 14:14
ज्याना साक्षात्कार झालेला आहे. आणि शरीराची उस्तरवार करावयाची नाही. त्याना रजनीश " चलते फिरते प्रेत" असे म्हणतात. शरीराची आसक्ति असणे वेगळे आणि विरक्त असणे वेगळे. विरक्त शरीराला ही देहभोग असतातच की.

Bhakti 29/01/2025 - 11:20
प्रिय मिपाकरांनो खुप छान चर्चा झाली.पण मला लई कामे आहेत😅 त्यामुळे इथल्या शास्त्रार्थांना विराम देते, नाहीतर मंडणमिश्रांप्रमाणे गळ्यातली माळ सुटेपर्यंत टाईप केले असते 😉 अधिक प्रश्नांची उत्तरे जाणून घ्यायची असल्यास मी सध्या जो ग्रंथ वाचतेय तो तुम्हीही वाचा.... गीतारहस्य!
प्रस्तावना : १. सर्वच लोकांची बुध्दीमत्ता समान नसते. हे अगदी वैश्विक सत्य आहे. आणि आपल्याला हे अगदी लहानपणापासुन माहीती आहे. त्यामुळे सगळ्यांना सगळं कळलंच पाहिजे , अनुभवाला आलेच पाहिजे असा आपला हट्ट किंवा दुराग्रह नाही. २. मुळात कोणाला काही तरी कळावं ह्यासाठी काहीही खटाटोप करणे ह्यात आपला काय फायदा ? आपण आपल्या स्वानंदासाठी लिहावं . आपलं आपल्याला कळाल्याशी मतलब. आपल्याला जे कळलं अनुभवाला आलं त्याचेच निरनिराळे पैलु आपणच उपभोगावेत ह्यासाठी लिहावे हे उत्तम ! ३.

सामान्यांमधले असामान्य: कर्नल समीर गुजर

मार्गी ·

परीक्षेमध्ये काय काय बघितलं जातं, काय त्यांना हवं असतं हे त्याने सांगितलं! एस एस बी ही सर्व साधारण परिक्षां पेक्षा वेगळी परिक्षा असते. इथे सिलेक्ट किंवा रिजेक्ट का झालो हे कधीच सांगत नाही आणी कुणालाच कळत नाही. सोळा गुण जरी पहात असले तरी परीक्षार्थीना ते दाखवायचे असतात. वरवर साध्या सोप्या दिसणाऱ्या परिक्षा अतिशय गहन आणी अवघड . कॅण्डिडेट आपली खरी पर्सनॅलिटी लपवू शकत नाही. मला माझ्या परिक्षेची आठवण झाली. As per my understanding examination is in three stages. Identification of material, -is anyone suitable or otherwise. Testing Quality of material Confirmation- Yes he real material . However, it is big subject and cannot be covered in few words. What qualities are required for military leadership? Whether one do possess or otherwise. How to exhibit qualities and tell examinar that ,I am suitable material.

NCC मध्ये असतांना, NDA ला अर्ध्या दिवसाची प्रत्यक्ष भेट द्यायला मिळाली होती. NDA मध्ये प्रशिक्षण घ्यायचे स्वप्न, प्रत्यक्षात कधी उतरलेच नाही.

"खरं तर वीरश्री त्यांच्या रक्तातच आहे, असं म्हणावं लागेल. ते छत्रपतींचे सरसेनापती प्रतापराव गुजर ह्यांचे वंशज आहेत." हे नेपोटिझम नव्हे काय? का नेपोटिझम फक्त सिने कलाकार आणि उद्योगपती घराण्यातच असते? सरसेनापती ते कर्नल साहेब यान्च्या मधिल पिढ्यानमध्येही तेच रक्त होते ना?

In reply to by अनामिक सदस्य

नेपोटिझम -nepotism हा शब्द पुतण्या, nepote या इटालियन शब्दावरून आला आहे . वरवर पाहता 17 व्या शतकात बरेच लोक इतर उमेदवारांच्या खर्चावर त्यांच्या पुतण्यांना शक्तिशाली पदांवर बढती देण्याकडे झुकत होते. आपल्या कुटुंबाला किंवा मित्रांना नोकऱ्या किंवा इतर फायदे मिळवून देण्यासाठी सत्तेचा अयोग्य वापर म्हणजे नेपोटिझम. प्रतिसाद देताना आपण वापरलेला शब्द नेपोटिझम अनुचित आहे. कर्नल समीर गुजर जरी सरसेनापती प्रतापराव गुजर यांचे वंशज आहेत पण त्यांची निवड एस एस बी परीक्षा उत्तीर्ण केल्यानंतरच झाली व सेवारत असताना योग्यतेनुसार पदोन्नती झाली आहे. इथे कुठेच भाई भतीजा वाद कामाला येत नाही. सैन्यामधे पिढ्यानुपिढ्या भरती होणारे अनेक भारतीय आहेत. पंजाब,हरियाणात तर घरटी कमीत कमी एक तरी सैन्यात दाखल होण्याची परंपरा आहे. तशीच महाराष्ट्रात सुद्धा. साताऱ्यात अपशिंगे गाव हे या साठी प्रसिद्ध आहे. वीरश्री, देशप्रेम हे अंगभूत गुण जे सैन्यात येण्यासाठी प्रेरित करतात. लेखकाने कर्नल गुजर सरांचा पूर्वेतिहास संदर्भ म्हणून दिला आहे.याचा अर्थ नेपोटिझम अशा संदर्भात लावणे सर्वथैव चुकीचे आहे. सरदार अंताजी माणकेश्वर गंधे,मोहीते, सातपुते आणी अनेक सरदार घराण्यातील सदस्य आजही सैन्यात आहेत व आपल्या पुर्वजांचा अभिमान बाळगुन आहेत.असे जरी असले तरी प्रत्येकजण आपापल्या गुणवत्तेवर,य्योग्यतेवर सिलेक्ट झाले आहेत. हे नेपोटिझम नव्हे काय? का नेपोटिझम फक्त सिने कलाकार आणि उद्योगपती घराण्यातच असते? हे उदाहरण म्हणजे वडाची साल पिंपळाला लावण्या सारखेच म्हणावे लागेल. सरसेनापती ते कर्नल साहेब यान्च्या मधिल पिढ्यानमध्येही तेच रक्त होते ना? असे जरी असले तरी जरूरी नाही की प्रत्येकानेच सैन्यात दाखल व्हायलाच हवे.

In reply to by कर्नलतपस्वी

रणजित चितळे, यांनी एक लेखमाला लिहिली होती.. राजाराम सीताराम, ह्या नावाची. त्यात, वंश परंपरागत एखादी बटालियन निवडायचा अधिकार त्या त्या उमेदवाराला फायनल सीलेक्शन नंतर असतो. असा उल्लेख आहे. बाकी, वंश परंपरागत व्यवसाय, हे एकदा मान्य केले की इतर सगळेच सोपे होते. नेतेगिरी ते संघटीत गुन्हेगारी, सगळीकडे हा फंडा उपयोगी पडतो.

In reply to by मुक्त विहारि

होय. पॅरेंटल क्लेम म्हणतात. हा सर्वांनाच असतो. अधिकारी व सिपाही आपल्या वडिलांची रेजिमेंट निवडण्याचा अधिकार. अभिमानाने सांगतात आमची तिसरी पिढी वगैरे.

In reply to by कर्नलतपस्वी

पण हा, पॅरेंटल क्लेम, प्रशिक्षण पूर्ण झाल्या नंतरच मिळत असेल. आधी गूण सिद्ध करा आणि मग बक्षीस मिळवा..

In reply to by कर्नलतपस्वी

नेपोटिझम हा शब्द फक्त खालील वाक्यापुरता होता. "खरं तर वीरश्री त्यांच्या रक्तातच आहे, असं म्हणावं लागेल. ते छत्रपतींचे सरसेनापती प्रतापराव गुजर ह्यांचे वंशज आहेत." कर्नल साहेबान्ची योग्यता, भरती, किन्वा पदोन्नती याबद्दल कुठलाही अनादर किन्वा शन्का नाही. तुम्ही म्हणालात तसे कदाचित तो शब्द अनुचित असेल, पण शतकान्पुर्वीच्या एका पूर्वजाच्या परक्रमावरून, एखाद्या व्यक्तीच्या रक्तातच वीरश्री आहे असे म्हणणे योग्य आहे का?

मार्गी 14/01/2025 - 15:10
सर्वांना नमस्कार. वाचनाबद्दल व प्रतिक्रियांबद्दल धन्यवाद! इथे लिहीणा-या सर्व सेनानींबद्दल खूप आदर आहे. अनेकदा त्यांचे लेख वाचलेले आहेत. @ अनामिक सदस्य जी, तुमचासुद्धा मुद्दा बरोबर आहे. तसं वाटूच शकतं. मलाही लिहीताना क्षणभर तसं वाटलं होतं. धन्यवाद.

परीक्षेमध्ये काय काय बघितलं जातं, काय त्यांना हवं असतं हे त्याने सांगितलं! एस एस बी ही सर्व साधारण परिक्षां पेक्षा वेगळी परिक्षा असते. इथे सिलेक्ट किंवा रिजेक्ट का झालो हे कधीच सांगत नाही आणी कुणालाच कळत नाही. सोळा गुण जरी पहात असले तरी परीक्षार्थीना ते दाखवायचे असतात. वरवर साध्या सोप्या दिसणाऱ्या परिक्षा अतिशय गहन आणी अवघड . कॅण्डिडेट आपली खरी पर्सनॅलिटी लपवू शकत नाही. मला माझ्या परिक्षेची आठवण झाली. As per my understanding examination is in three stages. Identification of material, -is anyone suitable or otherwise. Testing Quality of material Confirmation- Yes he real material . However, it is big subject and cannot be covered in few words. What qualities are required for military leadership? Whether one do possess or otherwise. How to exhibit qualities and tell examinar that ,I am suitable material.

NCC मध्ये असतांना, NDA ला अर्ध्या दिवसाची प्रत्यक्ष भेट द्यायला मिळाली होती. NDA मध्ये प्रशिक्षण घ्यायचे स्वप्न, प्रत्यक्षात कधी उतरलेच नाही.

"खरं तर वीरश्री त्यांच्या रक्तातच आहे, असं म्हणावं लागेल. ते छत्रपतींचे सरसेनापती प्रतापराव गुजर ह्यांचे वंशज आहेत." हे नेपोटिझम नव्हे काय? का नेपोटिझम फक्त सिने कलाकार आणि उद्योगपती घराण्यातच असते? सरसेनापती ते कर्नल साहेब यान्च्या मधिल पिढ्यानमध्येही तेच रक्त होते ना?

In reply to by अनामिक सदस्य

नेपोटिझम -nepotism हा शब्द पुतण्या, nepote या इटालियन शब्दावरून आला आहे . वरवर पाहता 17 व्या शतकात बरेच लोक इतर उमेदवारांच्या खर्चावर त्यांच्या पुतण्यांना शक्तिशाली पदांवर बढती देण्याकडे झुकत होते. आपल्या कुटुंबाला किंवा मित्रांना नोकऱ्या किंवा इतर फायदे मिळवून देण्यासाठी सत्तेचा अयोग्य वापर म्हणजे नेपोटिझम. प्रतिसाद देताना आपण वापरलेला शब्द नेपोटिझम अनुचित आहे. कर्नल समीर गुजर जरी सरसेनापती प्रतापराव गुजर यांचे वंशज आहेत पण त्यांची निवड एस एस बी परीक्षा उत्तीर्ण केल्यानंतरच झाली व सेवारत असताना योग्यतेनुसार पदोन्नती झाली आहे. इथे कुठेच भाई भतीजा वाद कामाला येत नाही. सैन्यामधे पिढ्यानुपिढ्या भरती होणारे अनेक भारतीय आहेत. पंजाब,हरियाणात तर घरटी कमीत कमी एक तरी सैन्यात दाखल होण्याची परंपरा आहे. तशीच महाराष्ट्रात सुद्धा. साताऱ्यात अपशिंगे गाव हे या साठी प्रसिद्ध आहे. वीरश्री, देशप्रेम हे अंगभूत गुण जे सैन्यात येण्यासाठी प्रेरित करतात. लेखकाने कर्नल गुजर सरांचा पूर्वेतिहास संदर्भ म्हणून दिला आहे.याचा अर्थ नेपोटिझम अशा संदर्भात लावणे सर्वथैव चुकीचे आहे. सरदार अंताजी माणकेश्वर गंधे,मोहीते, सातपुते आणी अनेक सरदार घराण्यातील सदस्य आजही सैन्यात आहेत व आपल्या पुर्वजांचा अभिमान बाळगुन आहेत.असे जरी असले तरी प्रत्येकजण आपापल्या गुणवत्तेवर,य्योग्यतेवर सिलेक्ट झाले आहेत. हे नेपोटिझम नव्हे काय? का नेपोटिझम फक्त सिने कलाकार आणि उद्योगपती घराण्यातच असते? हे उदाहरण म्हणजे वडाची साल पिंपळाला लावण्या सारखेच म्हणावे लागेल. सरसेनापती ते कर्नल साहेब यान्च्या मधिल पिढ्यानमध्येही तेच रक्त होते ना? असे जरी असले तरी जरूरी नाही की प्रत्येकानेच सैन्यात दाखल व्हायलाच हवे.

In reply to by कर्नलतपस्वी

रणजित चितळे, यांनी एक लेखमाला लिहिली होती.. राजाराम सीताराम, ह्या नावाची. त्यात, वंश परंपरागत एखादी बटालियन निवडायचा अधिकार त्या त्या उमेदवाराला फायनल सीलेक्शन नंतर असतो. असा उल्लेख आहे. बाकी, वंश परंपरागत व्यवसाय, हे एकदा मान्य केले की इतर सगळेच सोपे होते. नेतेगिरी ते संघटीत गुन्हेगारी, सगळीकडे हा फंडा उपयोगी पडतो.

In reply to by मुक्त विहारि

होय. पॅरेंटल क्लेम म्हणतात. हा सर्वांनाच असतो. अधिकारी व सिपाही आपल्या वडिलांची रेजिमेंट निवडण्याचा अधिकार. अभिमानाने सांगतात आमची तिसरी पिढी वगैरे.

In reply to by कर्नलतपस्वी

पण हा, पॅरेंटल क्लेम, प्रशिक्षण पूर्ण झाल्या नंतरच मिळत असेल. आधी गूण सिद्ध करा आणि मग बक्षीस मिळवा..

In reply to by कर्नलतपस्वी

नेपोटिझम हा शब्द फक्त खालील वाक्यापुरता होता. "खरं तर वीरश्री त्यांच्या रक्तातच आहे, असं म्हणावं लागेल. ते छत्रपतींचे सरसेनापती प्रतापराव गुजर ह्यांचे वंशज आहेत." कर्नल साहेबान्ची योग्यता, भरती, किन्वा पदोन्नती याबद्दल कुठलाही अनादर किन्वा शन्का नाही. तुम्ही म्हणालात तसे कदाचित तो शब्द अनुचित असेल, पण शतकान्पुर्वीच्या एका पूर्वजाच्या परक्रमावरून, एखाद्या व्यक्तीच्या रक्तातच वीरश्री आहे असे म्हणणे योग्य आहे का?

मार्गी 14/01/2025 - 15:10
सर्वांना नमस्कार. वाचनाबद्दल व प्रतिक्रियांबद्दल धन्यवाद! इथे लिहीणा-या सर्व सेनानींबद्दल खूप आदर आहे. अनेकदा त्यांचे लेख वाचलेले आहेत. @ अनामिक सदस्य जी, तुमचासुद्धा मुद्दा बरोबर आहे. तसं वाटूच शकतं. मलाही लिहीताना क्षणभर तसं वाटलं होतं. धन्यवाद.
नमस्कार. भारतीय सेनेमध्ये महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल नावाजले गेलेले मूळचे परभणीचे असलेले कर्नल समीर गुजर हे माझे मित्र! हे सांगताना अतिशय अभिमान वाटतो! नुकताच त्यांच्या सहवासाचा योग आला. सेनेमध्ये इतक्या उच्च पदावर व दायित्वावर असूनही जनतेसोबतचं त्यांचं आत्मीयतेचं वागणं- बोलणं, गावच्या लोकांसोबत व समाजासोबत असलेली त्यांची बांधिलकी, इतक्या उंचीवर पोहचूनही त्यांचं डाउन टू अर्थ वागणं हे खूप जवळून बघता आलं. त्यांच्याकडून त्यांच्या वाटचालीतले काही किस्से ऐकायला मिळाले. माझे गावचे मित्र म्हणून हे लिहावसं वाटलं.

​आणि... हॉस्टलर मुलांकरिता सुपरफास्ट गाडी स्टाॅपेज नसलेल्या स्टेशनावर थांबली...

महामाया ·

सौंदाळा 26/12/2024 - 15:13
भारीच स्टेशन मास्तर देव माणुसच म्हणायला पाहिजे. तुमचे कन्व्हींसिंग स्किल्स पण भारीच असणार हे नक्की.

सौंदाळा 26/12/2024 - 15:13
भारीच स्टेशन मास्तर देव माणुसच म्हणायला पाहिजे. तुमचे कन्व्हींसिंग स्किल्स पण भारीच असणार हे नक्की.
रेलवेच्या आठवणी असाच एका कामानिमित्त बहिणीकडे भोपाळला गेलो होतो... भोपाल- बिलासपुर अमरकंटक एक्सप्रेसनी परत येत होतो... (वाटेत लागणारया जबलपुरला थांबलेली माझी आई तिथूनच आमच्या सोबत पुढे येणार होती.) गाडीत पाय ठेवायला जागा नव्हती... दोन दिवसानंतर दिवाळी होती. म्हणून गाडीत सगळी हॉस्टलर मुला-मुलींची ही गर्दी होती... भोपाळला शिकायला आलेली ही मंडळी सणावारासाठी आपापल्या घरी परत जात होती... आमच्या जवळपास बसलेल्या मुलं-मुलींच्या बोलण्या वरुन समजलं की ते या गाडीने जबलपुरपर्यंत जातील. तिथून दुसरी गाडी ‘इस्पात नगरी...’ पकडून पुढे जातील... ती गाडी रात्री साढे दहाला होती...

रामानुजनचे वारस: गणिताचा आनंद घेणार्‍या मुलांना भेटण्याचा सुखद धक्का!

मार्गी ·

श्रीगुरुजी 22/12/2024 - 20:45
१५३, ३७०, ३७१ व ४०७ ह्या संख्यांमध्ये एक गणिती गंमत आहे, ती कोणती? सर्व संख्या या त्या संख्येतील तीनही अंकांच्या घनाची बेरीज आहे. मी स्वतः एका आय आय टी जे ई ई प्रशिक्षण संस्थेत गणित शिकवितो. तसेही अंकांची आकडेमोड मला थोडी लवकर जमते. त्यामुळे उत्तर सुचलं.

श्रीगुरुजी 22/12/2024 - 20:45
१५३, ३७०, ३७१ व ४०७ ह्या संख्यांमध्ये एक गणिती गंमत आहे, ती कोणती? सर्व संख्या या त्या संख्येतील तीनही अंकांच्या घनाची बेरीज आहे. मी स्वतः एका आय आय टी जे ई ई प्रशिक्षण संस्थेत गणित शिकवितो. तसेही अंकांची आकडेमोड मला थोडी लवकर जमते. त्यामुळे उत्तर सुचलं.
✪ मुलांचं गणित शिकणं व शिकवणं! ✪ शिकण्याची अशी "प्रक्रिया, "स्पेस" आणि "मिती" ✪ गणित अवघड असतं ह्या भ्रमाला "पूर्ण छेद" ✪ कठिण गोष्टी सोपं करणं इतकं सोपं! ✪ पालकांसाठी व मुलांसाठी सोपं गणिती कोडं ✪ तुमच्या वाढदिवसाला तुम्हांला किती चॉकलेटस मिळायला हवेत? नमस्कार. आज २२ डिसेंबर म्हणजे जगातला विलक्षण गणितज्ज्ञ असलेल्या श्रीनिवास रामानुजन ह्यांची जयंती व त्यामुळे आज राष्ट्रीय गणित दिवस साजरा केला जातो. ह्या दिवसानिमित्त मुग्धाताई नलावडेंच्या "प्रक्रिया को-लर्निंग स्पेसद्वारे" आयोजित एका सुंदर उपक्रमाचा अनुभव घेता आला.

अपघात टळला तो प्रवास

पराग१२२६३ ·

आता कोणताही प्रवास कोणत्याही वाहनाने सुरक्षित राहिलेला नाही. जीव मुठीत धरुनच आयुष्याचा प्रवास करायचा. लिहिण्याची शैली सुरेख असते. लिहिते राहा. पुढील लेखनास शुभेच्छा. -दिलीप बिरुटे

आता कोणताही प्रवास कोणत्याही वाहनाने सुरक्षित राहिलेला नाही. जीव मुठीत धरुनच आयुष्याचा प्रवास करायचा. लिहिण्याची शैली सुरेख असते. लिहिते राहा. पुढील लेखनास शुभेच्छा. -दिलीप बिरुटे
फोटो एका लग्नाच्या निमित्तानं अलीकडेच नागपूरला जाणं झालं होतं. 32 वर्षांनी नागपूरला जाणं होत असल्यामुळं उत्साह वाढलेला होताच. मग बऱ्याच आधी मी पुणे-अजनी एक्सप्रेसच्या विनावातानुकुलित श्रेणीचं आरक्षण करून ठेवलं.