मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

अनुभव

तुंग- तिकोनाजवळच्या अंजनवेलमधील आकाश दर्शनाचा सोहळा!

मार्गी ·
आकाशातला प्रकाशाचा उत्सव! ✪ अखेर धुमकेतूने दर्शन दिलं! ✪ अंधार्‍या आकाशात तार्‍यांची उधळण ✪ गुरू ग्रहावर उपग्रहामुळे पडलेल्या सावलीचा थरार ✪ आकाशात तार्‍यांचा व जमिनीवर दवाचा पाऊस ✪ मोरगिरी किल्ला व घुसळखांब परिसरात भ्रमंती ✪ हजारो वर्षांपूर्वीच्या जगात नेणार्‍या बेडसा लेण्या! ✪ Anjanvel- the week-end spent well! नमस्कार. नुकताच आकाशातल्या प्रकाशाच्या उत्सवाचा अनुभव घेता आला. पवना धरणाच्या परिसरात व तुंग- तिकोना किल्ल्यांमध्ये असलेल्या अंजनवेल कृषि पर्यटनच्या सुंदर ठिकाणी आकाश दर्शनाचा आनंद घेता आला व इतरांसोबत शेअरही करता आला. त्या अनुभवाचं हे वर्णन.

फुलपाखरू

मिडास ·

श्वेता२४ 20/10/2024 - 20:05
फक्त कुणाच्या अस्तित्वाने नितळ आनंद व्हावा अशी व्यक्ती आयुष्यात असणं या सारखा सुरेख अपघात नाही. खूप छान...... तरल आणि ओघवतं लिहीलं आहे....आवडलं

श्वेता२४ 20/10/2024 - 20:05
फक्त कुणाच्या अस्तित्वाने नितळ आनंद व्हावा अशी व्यक्ती आयुष्यात असणं या सारखा सुरेख अपघात नाही. खूप छान...... तरल आणि ओघवतं लिहीलं आहे....आवडलं
ऐन पावसाळ्यातला माळशेज घाट. बाकीचे मित्र मैत्रिणी इथे तिथे पांगले होते . मस्त हिरव्यागार धुक्यात ती आणि मी दोघे चाललो होतो. एका जलाशयाच्या काठच्या दगडावर जागा बघून आम्ही दोघे बसलो. त्या पाण्यावर पण धुक्याचा हलकासा तवंग पसरला होता. अचानक ते धुकं दाट होऊन आमच्या अवतीभोवती पसरलं . दुरून पावसाचा आवाज ऐकू येत होता. मंजुळ पाय वाजवत तो पाऊस हलकेच जवळ येऊन आम्हाला मिठीत घेतो. त्या गर्द धुक्याच्या मिठीमध्ये मी, ती, तो जलाशय आणि फक्त आमच्या करता पडत असलेला पाऊस. ती माझ्या जवळ होती पण आणि नव्हती सुद्धा. एकमेकांच्या हृदयाची धडधड त्या पावसाच्या आवाजात मिसळून गेली होती.

चंद्र पाहिलेला माणूस

प्रसाद गोडबोले ·
रात्रीचे साधारण ९-१० वाजले असावेत.मी नानांच्या सोबत टेरेसवर वर शांतपणे उभा होतो. नुकतेच शारदीय नवरात्र संपुन गेले होते त्यामुळे हवेत आता जाणवण्याइतपत गारवा होता. आज कोजागिरी पौर्णिमा असल्याने रात्री उशीरा टेरेसवर सगळ्या घरच्यांच्यासोबत दुग्धपानाचा कार्यक्रम होता, नेहमीप्रमाणेच! टेरेसच्या एका कोपर्‍यातील भागात एका मोठ्ठ्या कढईत खुप सारं दुध उकळत ठेउन मगाशीच आज्जी खाली गेलेली होती. त्या स्टो चा शांत आवाज रातकिड्यांच्या आणि दूरवर असलेल्या पिपळपानांच्या सळसळीत बेमालुमपणे मिसळुन एक वेगळाच माहोल तयार करत होतो.

सायकलीवर शिवथरघळ- एक अविस्मरणीय अनुभूती

मार्गी ·

चौथा कोनाडा 11/10/2024 - 20:48
वाह... किती थरारक... अप्रतिम ओघावते जिवंत वर्णन केलेय.. चित्र-पट डोळ्यापुढे घडतोय असं वाटतं... धन्यवाद आम्हाला ही हा थरारक अनुभव दिल्या बद्दल

बाजीगर 12/10/2024 - 18:36
जबरदस्त तुम्ही वाचकांना तुमच्या सायकलवर घेऊन गेलात ! इतकं उत्कट, इतकं साहसी वर्णन वाचून मी थक्क झालो. एकटेपणा तुम्हाला अडचण वाटत नाही. स्वत:शी ,निसर्गाशी संवाद करत तुम्ही निर्धाराने मार्गक्रमण केलेत. तुमची जिद्द, तुमची सौदर्यदृष्टी, तुमचं निश्चयाचे महाबळ, तुमच्या व्यक्तीमत्व खूप देखणं करतयं, खूप प्रेरणा मिळाली. धन्यवाद

आपणं नेहमीच सायकल सफर करत असता.पण ही शिवथरघळ ची मोहीम खरच साहसी म्हणावी लागेल. मुख्य रस्त्यापासून पुढील रस्ता खुपच अरुंद, तिव्र उताराचा, तिव्र वळणांचा आणि विना संरक्षक कठड्यांचा आहे. एप्रिल महिण्यात कोकणातून महाड मार्गे सोलापूर ला येत असताना घाटात ही शिवथरघळ ची पाटी दिसल्यामुळे पहायला गेलो. समर्थ रामदासांनी ज्या कपारीत बसून दासबोधाची निर्मीती केली तेथे दर्शन घेतले. मठात जाण्यासाठी पायरया आहेत, बसायला जागा भरपूर जागा आहे. मठात दर्शन करायला जाण्याअगोदर पायथ्याशी असलेल्या घरगुती उपहार ग्रुहात जेवणाची ओर्डर दिली होती. मऊसुत तांद्ळाची भाकरी, पिठलं, लोणचं, भात सारं गरमा गरम जेवण फक्त ८०/-. रुपयात मनसोक्त जेवलो. घाटात गरम भजी खाण्याचा मोह आवरला नाही. पाऊस जरी नसला तरी, निसर्ग, डोंगर, दरीतलं भाट्घर धरणाचं पाणी आणि रानमेवा.. केवळ अविस्मरणीय.

मार्गी 14/10/2024 - 13:16
सर्वांना मन:पूर्वक धन्यवाद! तशी टफ राईड होती. खूप दुर्गम परिसर आहे. तिथे जायला रस्ता आहे हेच खरं तर विशेष आहे. पण येतानाची राईड अजून जास्त खडतर होती. :) @ बाजीगर जी एवढं काही नाही हो! आवड म्हणून. आणि नशीब! @ प्रभू- प्रसाद जी, अच्छा! ओके. @ अनामिक सदस्य जी सायकल चालवताना रेनकोट हा विचारही करता येत नाही. खूप भीषण घाम येतो. पावसाचा आनंद घेत जायचं असतं. सायकल दुरुस्तीचं बेसिक किट नेहमी सोबत ठेवतो व बेसिक बाबी शिकलो आहे. धन्यवाद!

किल्लेदार 16/10/2024 - 06:08
जुन्या आठवणी जाग्या झाल्या. एवढा पल्ला सायकलने कापणे म्हणजे खरंच कमाल. फार पूर्वी मोटरसायकलने गेलो होतो तेव्हाही प्रवास फार झेपला नव्हता. शिवथघळीत अनुमती वगैरे काही लागत नव्हते. एका सतरंजीवर आरामात ताणून देता आली होती. पहाटेच्या गारठ्यात काकड आरती साठी काकडत उठलो तेव्हा "काकड आरती" चा खरा अर्थ कळला.

चौथा कोनाडा 11/10/2024 - 20:48
वाह... किती थरारक... अप्रतिम ओघावते जिवंत वर्णन केलेय.. चित्र-पट डोळ्यापुढे घडतोय असं वाटतं... धन्यवाद आम्हाला ही हा थरारक अनुभव दिल्या बद्दल

बाजीगर 12/10/2024 - 18:36
जबरदस्त तुम्ही वाचकांना तुमच्या सायकलवर घेऊन गेलात ! इतकं उत्कट, इतकं साहसी वर्णन वाचून मी थक्क झालो. एकटेपणा तुम्हाला अडचण वाटत नाही. स्वत:शी ,निसर्गाशी संवाद करत तुम्ही निर्धाराने मार्गक्रमण केलेत. तुमची जिद्द, तुमची सौदर्यदृष्टी, तुमचं निश्चयाचे महाबळ, तुमच्या व्यक्तीमत्व खूप देखणं करतयं, खूप प्रेरणा मिळाली. धन्यवाद

आपणं नेहमीच सायकल सफर करत असता.पण ही शिवथरघळ ची मोहीम खरच साहसी म्हणावी लागेल. मुख्य रस्त्यापासून पुढील रस्ता खुपच अरुंद, तिव्र उताराचा, तिव्र वळणांचा आणि विना संरक्षक कठड्यांचा आहे. एप्रिल महिण्यात कोकणातून महाड मार्गे सोलापूर ला येत असताना घाटात ही शिवथरघळ ची पाटी दिसल्यामुळे पहायला गेलो. समर्थ रामदासांनी ज्या कपारीत बसून दासबोधाची निर्मीती केली तेथे दर्शन घेतले. मठात जाण्यासाठी पायरया आहेत, बसायला जागा भरपूर जागा आहे. मठात दर्शन करायला जाण्याअगोदर पायथ्याशी असलेल्या घरगुती उपहार ग्रुहात जेवणाची ओर्डर दिली होती. मऊसुत तांद्ळाची भाकरी, पिठलं, लोणचं, भात सारं गरमा गरम जेवण फक्त ८०/-. रुपयात मनसोक्त जेवलो. घाटात गरम भजी खाण्याचा मोह आवरला नाही. पाऊस जरी नसला तरी, निसर्ग, डोंगर, दरीतलं भाट्घर धरणाचं पाणी आणि रानमेवा.. केवळ अविस्मरणीय.

मार्गी 14/10/2024 - 13:16
सर्वांना मन:पूर्वक धन्यवाद! तशी टफ राईड होती. खूप दुर्गम परिसर आहे. तिथे जायला रस्ता आहे हेच खरं तर विशेष आहे. पण येतानाची राईड अजून जास्त खडतर होती. :) @ बाजीगर जी एवढं काही नाही हो! आवड म्हणून. आणि नशीब! @ प्रभू- प्रसाद जी, अच्छा! ओके. @ अनामिक सदस्य जी सायकल चालवताना रेनकोट हा विचारही करता येत नाही. खूप भीषण घाम येतो. पावसाचा आनंद घेत जायचं असतं. सायकल दुरुस्तीचं बेसिक किट नेहमी सोबत ठेवतो व बेसिक बाबी शिकलो आहे. धन्यवाद!

किल्लेदार 16/10/2024 - 06:08
जुन्या आठवणी जाग्या झाल्या. एवढा पल्ला सायकलने कापणे म्हणजे खरंच कमाल. फार पूर्वी मोटरसायकलने गेलो होतो तेव्हाही प्रवास फार झेपला नव्हता. शिवथघळीत अनुमती वगैरे काही लागत नव्हते. एका सतरंजीवर आरामात ताणून देता आली होती. पहाटेच्या गारठ्यात काकड आरती साठी काकडत उठलो तेव्हा "काकड आरती" चा खरा अर्थ कळला.
✪ सह्याद्री पर्वतरांग व कोकणाचा संगम असलेली शिवथरघळ! ✪ "केल्याने होत आहे रे, आधी केलेची पाहिजे!" ✪ सोलो सायकलिंग नव्हे निसर्गाच्या सान्निध्यातली तीर्थयात्रा! ✪ शेकडो धबधबे, असंख्य डोंगर आणि अजस्र वरांधा घाट ✪ अजस्र धबधबा- जीवंत प्रवाहाचं रमणीय प्रतिक ✪ आयुष्यभराचा अनुभव देणारी १२४ किमीची थरारक सायकल राईड ✪ अनेक किल्ल्यांच्या परिसरातलं निसर्गाचं विराट रूप दर्शन ✪ परतीच्या थरारक प्रवासाची उत्सुकता सर्वांना नमस्कार. २८ सप्टेंबर २०२४! कधी कधी आपल्याला अशी बुद्धी झाली ह्याचा आपल्यालाच विलक्षण आनंद होतो! खूप दिवसांपासून शिवथरघळ सायकल राईड करायची इच्छा होती.

सूर्य पाहिलेला माणूस

प्रसाद गोडबोले ·

Bhakti 30/09/2024 - 12:52
नानांचे व्यक्तिमत्त्व करारी आहे.छान लिहिलंय. रच्याकने बन्या बापू गोडबोले ५० नित्यनेमाने पहाटे पाच वाजता अजिंक्यतारा किल्ल्यावर येत,ही कोनशिला किल्ल्यावर होती.ते तुमचे कोण? तेथील ज्येष्ठांना एक प्राचीन देह,मनो शिस्त दिसत आहे _/\_

प्रचेतस 01/10/2024 - 08:54
व्यक्तित्रण चांगलंच जमलंय. बाकी तुम्ही नेहमी अद्वैताकडेच जाता. निषिक्तश्चन्द्रतेजोभिः सूयते भूगतो रविः | ओषध्यः षड्रसा मेध्यास्तदन्नं प्राणिनां भुवि || एवं भानुमयं ह्यन्नं भूतानां प्राणधारणम् | पितैष सर्वभूतानां तस्मात्तं शरणं व्रज || शेवटी वी आर नथिंग बट अ स्पेसडस्ट, ट्राईंग टू फाइंड इट्स वे बॅक टू द स्टार्स.

In reply to by प्रचेतस

धन्यवाद वल्लीसर ! आपल्या प्रतिसादातुन नेहमीच नवीन काहीतरी शिकायला मिळते !
एवं भानुमयं ह्यन्नं भूतानां प्राणधारणम् | पितैष सर्वभूतानां तस्मात्तं शरणं व्रज ||
___/\___ आसावादित्यो ब्रह्म ! ब्रह्मैवाहमस्मि !

In reply to by Bhakti

गवि 01/10/2024 - 12:10
विश्व निर्माण झालं तेव्हा फक्त हायड्रोजन होता. साधा अणू. त्यात न्युट्रान पण नाही. एक प्रोटॉन आणि एक इलेक्ट्रॉन. पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह. ऑक्सिजनच कशाला, सगळीच मूलद्रव्ये या मूळ अणूपासून तयार होत गेली आहेत. इतका काळ जाऊन देखील आजसुद्धा पूर्ण विश्वात नव्वद टक्के अणू हायड्रोजनचे आहेत. सूर्य हा प्रचंड आकाराचा हायड्रोजन बॉम्ब आहे. दूर आहे म्हणून तो आयुष्य देतोय.

In reply to by प्रचेतस

गवि 01/10/2024 - 12:26
तुम्हाला सर्व उलगडून सांगावे लागते. क्वार्कच मूळ कण असले तरी त्यांना स्वतंत्र अस्तित्व नसते. अगदी सुरुवातीला ते निर्माण झाले आणि एकत्र येऊन हायड्रोजन बनले. भौतिकशास्त्र विषय नव्हता वाटते तुम्हाला?! अं ?

In reply to by गवि

Hydrogen atoms when given enough time, turn into humans. Everything is hydrogen. Even Sun.
धन्यवाद गवि सर ! आपला प्रतिसाद पाहुन नेहमीच हुरुप येतो :) "ह्या विषयावर एकदा आपल्याशी सविस्तर चर्चा करायची आहे. " मुळात हाय्ड्रोजन अ‍ॅटम कसा तयार झाला ? टाईम म्हणजे काय ? हायड्रोजन अ‍ॅटमला वेळ देणे म्हणजे नक्की काय ? आणि तो काम्हणुन ह्युमन बनेल , त्याचा उद्देश काय ? वगैरे वगैरे. बाकी आपला प्रतिसाद पाहुन कणाद महर्षीं आणि त्यांच्या वैशेषिक दर्शनाची प्रकर्षाने आठवण झाली. त्याचा खंडनमंडनात खोलवर जात नाही बसत. फक्त एक छोटासा तर्क : हायड्रोजन अ‍ॅटम प्रायमाफेस्सी . प्रथमदर्शनी पाहता निर्जीव आहे , अचेतन आहे, जड आहे , मात्र जीवन ही काहीतरी भिन्न गोष्ट आहे. मग चैतन्य , जाणीव , जागृती , सचेत अवस्था कुठे जन्मास येते ? सेल्फ रप्लिकेटिंग केमिकल्स का तयार होतात ? ह्याचे काय उत्तर देणार ? तस्मात ही चेतना , हे चैतन्य हायड्रोजनच्या भौतिक रुपाच्याही परे आहे. त्यामुळे एव्हरीथिंग इज हायड्रोजन असे म्हणता , सर्वं खल्विदं ब्रह्म असे म्हणतो. आणि ते ब्रह्म इतके सूक्ष्म आहे की हायड्रोजन च्या अणु पासुन सुर्यापर्यंत , आणि प्रोटॉन इलेक्टॉन मधील पोकळी पासुन ते ब्लॅकहोल मधील पोकळीपर्यंत सर्व्य व्याप्त आहे. सूर्य हा त्याचा निरदेषक आहे , जाणीव करवून देणारा आहे , वडिला अव्यक्ताचिया वंशा । उद्योत्कारु सूर्य जैसा । येणें येके गुणें आकाशा । अंबरत्व ॥ ६-३ ॥ पण ब्रह्माची जाणीव होणे हेच तन्मय होणे , सायुज्य होणे असल्याने बस इतकेच म्हणुन थांबतो : सूर्याचिया हाता । अंधकारू नये सर्वथा । मा प्रकाशाची कथा । आईकता का ? ॥ ७-२५८ ॥ अंधारु कां उजिवडु । हा एकला येकवडु । जैसा कां मार्तंडु । भलतेथें ॥ ७-२५९ ॥ सूर्याला अंधार म्हणजे काय माहीत नाही , मग त्याला प्रकाश म्हणजे काय हे तरी कसे माहीती असणार ? त्यामुळे सूर्याला अंधार नाही अन उजेडही नाही, तो सूर्य बस त्याच्या जागी जसा आहे तसा आहे. "आहे"

In reply to by प्रसाद गोडबोले

गवि 03/10/2024 - 02:49
"ह्या विषयावर एकदा आपल्याशी सविस्तर चर्चा करायची आहे. "
हा हा हा.. माझ्या प्रतिभासाधनेच्या वेळा (दुपारी बारा ते तीन) सोडून कधीही खुशाल करा चर्चा. ;-)) बाकी जिवंत निर्जीव असे काही नाहीच आहे. सर्व काही जिवंत आहे. वेळ असे काही नसतेच. पण पुरेशी स्थित्यंतरे होऊ देणे अशा अर्थाने वेळ देणे हा शब्दप्रयोग करावा लागतो. नाईलाज. काहीतरी निर्माण होत रहावे, बदलत राहावे, सुघटित व्हावे, परत मोडावे असे सर्व होत राहणे हीच मुळात एक ईषणा आहे. त्या अर्थाने हे क्वार्क जेव्हापासून आहेत तेव्हापासून त्या ईषणेचं अस्तित्व आहेच. आता कण हे खुद्द ईषणा आहेत की ती वेगळी आहे वगैरे हा तात्विक academic भाग झाला. तसा निरुपयोगी. आपल्या मानण्यावर आहे. (जसा "वेळ"..)

Bhakti 30/09/2024 - 12:52
नानांचे व्यक्तिमत्त्व करारी आहे.छान लिहिलंय. रच्याकने बन्या बापू गोडबोले ५० नित्यनेमाने पहाटे पाच वाजता अजिंक्यतारा किल्ल्यावर येत,ही कोनशिला किल्ल्यावर होती.ते तुमचे कोण? तेथील ज्येष्ठांना एक प्राचीन देह,मनो शिस्त दिसत आहे _/\_

प्रचेतस 01/10/2024 - 08:54
व्यक्तित्रण चांगलंच जमलंय. बाकी तुम्ही नेहमी अद्वैताकडेच जाता. निषिक्तश्चन्द्रतेजोभिः सूयते भूगतो रविः | ओषध्यः षड्रसा मेध्यास्तदन्नं प्राणिनां भुवि || एवं भानुमयं ह्यन्नं भूतानां प्राणधारणम् | पितैष सर्वभूतानां तस्मात्तं शरणं व्रज || शेवटी वी आर नथिंग बट अ स्पेसडस्ट, ट्राईंग टू फाइंड इट्स वे बॅक टू द स्टार्स.

In reply to by प्रचेतस

धन्यवाद वल्लीसर ! आपल्या प्रतिसादातुन नेहमीच नवीन काहीतरी शिकायला मिळते !
एवं भानुमयं ह्यन्नं भूतानां प्राणधारणम् | पितैष सर्वभूतानां तस्मात्तं शरणं व्रज ||
___/\___ आसावादित्यो ब्रह्म ! ब्रह्मैवाहमस्मि !

In reply to by Bhakti

गवि 01/10/2024 - 12:10
विश्व निर्माण झालं तेव्हा फक्त हायड्रोजन होता. साधा अणू. त्यात न्युट्रान पण नाही. एक प्रोटॉन आणि एक इलेक्ट्रॉन. पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह. ऑक्सिजनच कशाला, सगळीच मूलद्रव्ये या मूळ अणूपासून तयार होत गेली आहेत. इतका काळ जाऊन देखील आजसुद्धा पूर्ण विश्वात नव्वद टक्के अणू हायड्रोजनचे आहेत. सूर्य हा प्रचंड आकाराचा हायड्रोजन बॉम्ब आहे. दूर आहे म्हणून तो आयुष्य देतोय.

In reply to by प्रचेतस

गवि 01/10/2024 - 12:26
तुम्हाला सर्व उलगडून सांगावे लागते. क्वार्कच मूळ कण असले तरी त्यांना स्वतंत्र अस्तित्व नसते. अगदी सुरुवातीला ते निर्माण झाले आणि एकत्र येऊन हायड्रोजन बनले. भौतिकशास्त्र विषय नव्हता वाटते तुम्हाला?! अं ?

In reply to by गवि

Hydrogen atoms when given enough time, turn into humans. Everything is hydrogen. Even Sun.
धन्यवाद गवि सर ! आपला प्रतिसाद पाहुन नेहमीच हुरुप येतो :) "ह्या विषयावर एकदा आपल्याशी सविस्तर चर्चा करायची आहे. " मुळात हाय्ड्रोजन अ‍ॅटम कसा तयार झाला ? टाईम म्हणजे काय ? हायड्रोजन अ‍ॅटमला वेळ देणे म्हणजे नक्की काय ? आणि तो काम्हणुन ह्युमन बनेल , त्याचा उद्देश काय ? वगैरे वगैरे. बाकी आपला प्रतिसाद पाहुन कणाद महर्षीं आणि त्यांच्या वैशेषिक दर्शनाची प्रकर्षाने आठवण झाली. त्याचा खंडनमंडनात खोलवर जात नाही बसत. फक्त एक छोटासा तर्क : हायड्रोजन अ‍ॅटम प्रायमाफेस्सी . प्रथमदर्शनी पाहता निर्जीव आहे , अचेतन आहे, जड आहे , मात्र जीवन ही काहीतरी भिन्न गोष्ट आहे. मग चैतन्य , जाणीव , जागृती , सचेत अवस्था कुठे जन्मास येते ? सेल्फ रप्लिकेटिंग केमिकल्स का तयार होतात ? ह्याचे काय उत्तर देणार ? तस्मात ही चेतना , हे चैतन्य हायड्रोजनच्या भौतिक रुपाच्याही परे आहे. त्यामुळे एव्हरीथिंग इज हायड्रोजन असे म्हणता , सर्वं खल्विदं ब्रह्म असे म्हणतो. आणि ते ब्रह्म इतके सूक्ष्म आहे की हायड्रोजन च्या अणु पासुन सुर्यापर्यंत , आणि प्रोटॉन इलेक्टॉन मधील पोकळी पासुन ते ब्लॅकहोल मधील पोकळीपर्यंत सर्व्य व्याप्त आहे. सूर्य हा त्याचा निरदेषक आहे , जाणीव करवून देणारा आहे , वडिला अव्यक्ताचिया वंशा । उद्योत्कारु सूर्य जैसा । येणें येके गुणें आकाशा । अंबरत्व ॥ ६-३ ॥ पण ब्रह्माची जाणीव होणे हेच तन्मय होणे , सायुज्य होणे असल्याने बस इतकेच म्हणुन थांबतो : सूर्याचिया हाता । अंधकारू नये सर्वथा । मा प्रकाशाची कथा । आईकता का ? ॥ ७-२५८ ॥ अंधारु कां उजिवडु । हा एकला येकवडु । जैसा कां मार्तंडु । भलतेथें ॥ ७-२५९ ॥ सूर्याला अंधार म्हणजे काय माहीत नाही , मग त्याला प्रकाश म्हणजे काय हे तरी कसे माहीती असणार ? त्यामुळे सूर्याला अंधार नाही अन उजेडही नाही, तो सूर्य बस त्याच्या जागी जसा आहे तसा आहे. "आहे"

In reply to by प्रसाद गोडबोले

गवि 03/10/2024 - 02:49
"ह्या विषयावर एकदा आपल्याशी सविस्तर चर्चा करायची आहे. "
हा हा हा.. माझ्या प्रतिभासाधनेच्या वेळा (दुपारी बारा ते तीन) सोडून कधीही खुशाल करा चर्चा. ;-)) बाकी जिवंत निर्जीव असे काही नाहीच आहे. सर्व काही जिवंत आहे. वेळ असे काही नसतेच. पण पुरेशी स्थित्यंतरे होऊ देणे अशा अर्थाने वेळ देणे हा शब्दप्रयोग करावा लागतो. नाईलाज. काहीतरी निर्माण होत रहावे, बदलत राहावे, सुघटित व्हावे, परत मोडावे असे सर्व होत राहणे हीच मुळात एक ईषणा आहे. त्या अर्थाने हे क्वार्क जेव्हापासून आहेत तेव्हापासून त्या ईषणेचं अस्तित्व आहेच. आता कण हे खुद्द ईषणा आहेत की ती वेगळी आहे वगैरे हा तात्विक academic भाग झाला. तसा निरुपयोगी. आपल्या मानण्यावर आहे. (जसा "वेळ"..)
सकाळचे साधारण सात वाजले असावेत. श्रावण संपून गेला होता नुकताच तरी अजून आकाशामध्ये ढगांची दाटीवाटी होती. पश्चिमेकडे दूरवर दिसणाऱ्या यवतेश्वरचा डोंगर मात्र अजूनही ढगांच्या दाट धुक्याआड होता, दक्षिणेकडे मात्र अजिंक्यतार्‍याने हिरवीगार दुलई पांघरली होती, पांढरेशुभ्र धबधबे फिसाळत वहात त्या हिरवाईतुन वाट काढत होते. पुर्वेकडे सुर्योदय होऊन गेला होता मात्र सुर्याचा अजुनही ढगांआड लपंडाव चालु होता. हवेत एक आल्हाददायक गारवा होता.

African Love Bird

कर्नलतपस्वी ·

कंजूस 27/09/2024 - 03:21
वा. सुंदर. पिंजऱ्यातून सुटलेले असे पक्षी दोन वेळा बाल्कनीत आले होते. पहिला एका मित्राला दिला होता .दुसरा दोन तास झाडात बसला आणि नंतर उडून गेला. मांजर,कुत्रा किंवा पक्षी प्राणी पाळणे सोपे नसते. घराला कुलुप लावून कुठे जायचे तर त्यांची सोय कोणाकडे करावी लागते. परदेशी पक्षी पाळण्यात वन्यजीव संरक्षण कायदा आड येत नाही. असेच बरेच प्राणी कुणी दादरला पाळले आहेत. ( यूट्यूब विडिओ आहेत.) . पूर्वी '८०-'८५ भागापर्यंत खंडाळ्याच्या राजमाची पॉइंटला एका बंगल्यात होते बरेच आफ्रिकन आणि स्थानिक पोपट. ते पाहायला गर्दी होत असे. आता ते संग्रहालय बंद झाले. ( बंगल्याबाहेर दोन सिंहाचे पुतळे आहेत. ) इथे आता माकडांना जेवण मिळते सकाळी साडे अकराला. राजमाची पॉइंटची सगळी माकडे घड्याळ लावून तिकडे जातात वेळेवर.)

In reply to by कंजूस

पण प्रतिसाद मात्र भरभरून देता. विरोधाभास आवडला. पाळीव पक्षी प्राणी यांच्या मधे भावनिक गुंतवणूक फार मोठी असते. एक वेळ शेअर बाजारातील गुंतवणूक डुबली तरी चालते,भरून काढता येते. इथे मात्र फार जड जाते.

प्रचेतस 27/09/2024 - 09:24
हा वाट चुकलेला पक्षी योगायोगाने तुमच्यासारख्या पक्षीमित्राच्याच दारात यावा हा सुखद योगायोग. खरे तर पक्ष्यांना पिंजर्‍यात ठेवणे अजिबात आवडत नाही, पण ह्याच्या बाबतीत काही इलाज नाही. तो आता सुरक्षित आहे हे उत्तम.

In reply to by प्रचेतस

आमच्या घरातील तीन चार तांदुळाच्या दाणे त्याच्या नशिबात होते. आला आणी खाऊन गेला, ते ही पितृपक्षा मधे. आमचं कर्ज फिटलं. प्रारब्ध म्हणायच.

Bhakti 27/09/2024 - 12:57
A दोन महिन्यांपूर्वी बाल्कनीतल्या कर्दनकाळीच्या दोन रोपांना सुंदर लालचुटुक फुलं आली होती.तेव्हा एका सकाळी दोन पिवळसर पिटूकल्या चिमण्या एका फुलावर एक अशा दोन्ही मकरंद गोळा करत होत्या.ते दृश्य केवळ काही मिनिटेच होते.ते माझ्याच डोळ्यांनी टिपले.तेव्हा चांगला प्रोफेशनल कॅमेरा असायलाच पाहिजे असं वाटलं.पुरातन काळी तर तोही नव्हता.तेव्हा ते दृश्य ध्यानी ठेऊन सुंदर काव्य रचली जात.आता जमाना AI चा आहे तेव्हा मी एक AI चित्र बनवले ;) लाल गडद फुलोरा उधळला पाकळ्यांचा बोलावे प्रेम पाखरा..

In reply to by Bhakti

कर्दळीच्या झाडावर,जास्वंदीची फुले मधू मागत बागडतात,फूलचुखीची मुले भक्ती,धन्यवाद. सुर्यपक्षांना फुलचुखी असेही म्हणतात. त्यांची तलवारी सारखी लांब,पातळ चोच फुलातील मध एखाद्या पिपेट प्रमाणे ,फुलाच्या सौंदर्याला धक्का न लावता चोखून घेतात.

In reply to by Bhakti

एक संपूर्ण चित्रफित बनवली आहे. घरटे बनवण्या पासून ते पिल्ले उडून जाईपर्यंत. फोटो नक्कीच ढकलतो.

सौंदाळा 27/09/2024 - 15:43
लेख बेहद्द आवडला. फक्त पक्षी घरी आल्याचा अनुभव न सांगता : सुरुवातीचे चित्र, नंतरचे फोटो मधे केलेली कवितांची पखरण, अनुभव, व्हॉटसाप मेसेजेस, पक्षांची माहिती. बापरे!! एकाच लेखात किती वेगवेगळ्या विषयांना स्पर्श केलात ते पण सुसंबध्दपणे.

दिलखुलास प्रतिसादाने दिल खुश आणी मन प्रसन्न झाले. पुढील लेखनास हुरूप आला. या आगोदर पक्षी या विषयावर तीन चार लेख डकवले आहेत. मागील दोन वर्षांपासून हा नाद लागलाय. पक्षी निरीक्षणा बरोबर मित्र संग्रह,छायाचित्रण,पक्षांची सांगोपांग माहिती आणी काॅर्नेल विद्यापीठातून अंतरराष्ट्रीय स्तरावर होणार्या अनेक घडामोडी कळतात. अर्थात होणाऱ्या पायपीट मुळे व्यायाम व परिणामी शरीर व मन स्वास्थ्यही उत्तम रहाते प्रतिसादाबद्दल मनापासून धन्यवाद. पक्षाला दारात बघून ,"सुख आले माझ्या दारी " अशीच अवस्था झाली.

श्वेता२४ 28/09/2024 - 12:14
कोणत्याही प्राण्याला किंवा पक्षाला पाळणे म्हणजे घरात एखाद्या जिवंत माणसाची काळजी घेताना जितकी काळजी घ्यावी लागते तितकीच काळजी घेणे आवश्यक असते. त्यामुळे ती एक मोठी जबाबदारी आहे. लेख अतिशय आवडला.

सविता००१ 29/09/2024 - 11:03
अप्रतिम लेख आहे. सगळेच फोटो खूप आवडले.. आणि अस्मानी रंगाच्या अस्मानी पाहुण्याचा तर खूप आवडला.

गवि 01/10/2024 - 14:25
लेख उत्तम आहे. हे परदेशी पक्षी मोकळे सोडले तर निश्चित मरणार हे वेळेत जाणणाऱ्या व्यक्ती आसपास असणे हे त्या पक्ष्याचे चांगले नशीब. नाहीतर एखाद्याने पक्ष्याला मुक्त विहारासाठी जंगलात सोडून दिल्याचे आभासी "पुण्य" कमावले असते.

In reply to by कर्नलतपस्वी

गवि 02/10/2024 - 12:42
दिसतो छान. हाही कोकीळ वर्गातला. म्हणजे दुसऱ्याच्या घरट्यात आपली अंडी घालणारा आयतोबा.. आणि मूळ अंडी पळवणारा. ... तुझा आत्मा त्याच्यात आणि त्याचा आत्मा बाहेर. - बाबा चमत्कार

एक दिवस जंगलात फिरत असताना बरेच कावळे एका पक्षाच्या मागे लागलेले दिसले. जरा निरखून पाहीले तर तो नवीन पक्षी होता. चातक असावा असे वाटले म्हणून त्यांच्या मागे पळालो कावळ्यांना हुसकावून लावले. व कॅमेर्‍यात कैद केले. नंतर अधिक माहिती साठी गुगल खंगाळले तर अंदाज बरोबर होता. गल्लीतील दादा लोकांसारखे टेरीटोरीयल डिस्पूट पक्षांमधे सुद्धा असते. चातक हा पाहूणा पक्षी, मायग्रेटरी, पावसाचा संदेश घेऊन येतो.

कंजूस 27/09/2024 - 03:21
वा. सुंदर. पिंजऱ्यातून सुटलेले असे पक्षी दोन वेळा बाल्कनीत आले होते. पहिला एका मित्राला दिला होता .दुसरा दोन तास झाडात बसला आणि नंतर उडून गेला. मांजर,कुत्रा किंवा पक्षी प्राणी पाळणे सोपे नसते. घराला कुलुप लावून कुठे जायचे तर त्यांची सोय कोणाकडे करावी लागते. परदेशी पक्षी पाळण्यात वन्यजीव संरक्षण कायदा आड येत नाही. असेच बरेच प्राणी कुणी दादरला पाळले आहेत. ( यूट्यूब विडिओ आहेत.) . पूर्वी '८०-'८५ भागापर्यंत खंडाळ्याच्या राजमाची पॉइंटला एका बंगल्यात होते बरेच आफ्रिकन आणि स्थानिक पोपट. ते पाहायला गर्दी होत असे. आता ते संग्रहालय बंद झाले. ( बंगल्याबाहेर दोन सिंहाचे पुतळे आहेत. ) इथे आता माकडांना जेवण मिळते सकाळी साडे अकराला. राजमाची पॉइंटची सगळी माकडे घड्याळ लावून तिकडे जातात वेळेवर.)

In reply to by कंजूस

पण प्रतिसाद मात्र भरभरून देता. विरोधाभास आवडला. पाळीव पक्षी प्राणी यांच्या मधे भावनिक गुंतवणूक फार मोठी असते. एक वेळ शेअर बाजारातील गुंतवणूक डुबली तरी चालते,भरून काढता येते. इथे मात्र फार जड जाते.

प्रचेतस 27/09/2024 - 09:24
हा वाट चुकलेला पक्षी योगायोगाने तुमच्यासारख्या पक्षीमित्राच्याच दारात यावा हा सुखद योगायोग. खरे तर पक्ष्यांना पिंजर्‍यात ठेवणे अजिबात आवडत नाही, पण ह्याच्या बाबतीत काही इलाज नाही. तो आता सुरक्षित आहे हे उत्तम.

In reply to by प्रचेतस

आमच्या घरातील तीन चार तांदुळाच्या दाणे त्याच्या नशिबात होते. आला आणी खाऊन गेला, ते ही पितृपक्षा मधे. आमचं कर्ज फिटलं. प्रारब्ध म्हणायच.

Bhakti 27/09/2024 - 12:57
A दोन महिन्यांपूर्वी बाल्कनीतल्या कर्दनकाळीच्या दोन रोपांना सुंदर लालचुटुक फुलं आली होती.तेव्हा एका सकाळी दोन पिवळसर पिटूकल्या चिमण्या एका फुलावर एक अशा दोन्ही मकरंद गोळा करत होत्या.ते दृश्य केवळ काही मिनिटेच होते.ते माझ्याच डोळ्यांनी टिपले.तेव्हा चांगला प्रोफेशनल कॅमेरा असायलाच पाहिजे असं वाटलं.पुरातन काळी तर तोही नव्हता.तेव्हा ते दृश्य ध्यानी ठेऊन सुंदर काव्य रचली जात.आता जमाना AI चा आहे तेव्हा मी एक AI चित्र बनवले ;) लाल गडद फुलोरा उधळला पाकळ्यांचा बोलावे प्रेम पाखरा..

In reply to by Bhakti

कर्दळीच्या झाडावर,जास्वंदीची फुले मधू मागत बागडतात,फूलचुखीची मुले भक्ती,धन्यवाद. सुर्यपक्षांना फुलचुखी असेही म्हणतात. त्यांची तलवारी सारखी लांब,पातळ चोच फुलातील मध एखाद्या पिपेट प्रमाणे ,फुलाच्या सौंदर्याला धक्का न लावता चोखून घेतात.

In reply to by Bhakti

एक संपूर्ण चित्रफित बनवली आहे. घरटे बनवण्या पासून ते पिल्ले उडून जाईपर्यंत. फोटो नक्कीच ढकलतो.

सौंदाळा 27/09/2024 - 15:43
लेख बेहद्द आवडला. फक्त पक्षी घरी आल्याचा अनुभव न सांगता : सुरुवातीचे चित्र, नंतरचे फोटो मधे केलेली कवितांची पखरण, अनुभव, व्हॉटसाप मेसेजेस, पक्षांची माहिती. बापरे!! एकाच लेखात किती वेगवेगळ्या विषयांना स्पर्श केलात ते पण सुसंबध्दपणे.

दिलखुलास प्रतिसादाने दिल खुश आणी मन प्रसन्न झाले. पुढील लेखनास हुरूप आला. या आगोदर पक्षी या विषयावर तीन चार लेख डकवले आहेत. मागील दोन वर्षांपासून हा नाद लागलाय. पक्षी निरीक्षणा बरोबर मित्र संग्रह,छायाचित्रण,पक्षांची सांगोपांग माहिती आणी काॅर्नेल विद्यापीठातून अंतरराष्ट्रीय स्तरावर होणार्या अनेक घडामोडी कळतात. अर्थात होणाऱ्या पायपीट मुळे व्यायाम व परिणामी शरीर व मन स्वास्थ्यही उत्तम रहाते प्रतिसादाबद्दल मनापासून धन्यवाद. पक्षाला दारात बघून ,"सुख आले माझ्या दारी " अशीच अवस्था झाली.

श्वेता२४ 28/09/2024 - 12:14
कोणत्याही प्राण्याला किंवा पक्षाला पाळणे म्हणजे घरात एखाद्या जिवंत माणसाची काळजी घेताना जितकी काळजी घ्यावी लागते तितकीच काळजी घेणे आवश्यक असते. त्यामुळे ती एक मोठी जबाबदारी आहे. लेख अतिशय आवडला.

सविता००१ 29/09/2024 - 11:03
अप्रतिम लेख आहे. सगळेच फोटो खूप आवडले.. आणि अस्मानी रंगाच्या अस्मानी पाहुण्याचा तर खूप आवडला.

गवि 01/10/2024 - 14:25
लेख उत्तम आहे. हे परदेशी पक्षी मोकळे सोडले तर निश्चित मरणार हे वेळेत जाणणाऱ्या व्यक्ती आसपास असणे हे त्या पक्ष्याचे चांगले नशीब. नाहीतर एखाद्याने पक्ष्याला मुक्त विहारासाठी जंगलात सोडून दिल्याचे आभासी "पुण्य" कमावले असते.

In reply to by कर्नलतपस्वी

गवि 02/10/2024 - 12:42
दिसतो छान. हाही कोकीळ वर्गातला. म्हणजे दुसऱ्याच्या घरट्यात आपली अंडी घालणारा आयतोबा.. आणि मूळ अंडी पळवणारा. ... तुझा आत्मा त्याच्यात आणि त्याचा आत्मा बाहेर. - बाबा चमत्कार

एक दिवस जंगलात फिरत असताना बरेच कावळे एका पक्षाच्या मागे लागलेले दिसले. जरा निरखून पाहीले तर तो नवीन पक्षी होता. चातक असावा असे वाटले म्हणून त्यांच्या मागे पळालो कावळ्यांना हुसकावून लावले. व कॅमेर्‍यात कैद केले. नंतर अधिक माहिती साठी गुगल खंगाळले तर अंदाज बरोबर होता. गल्लीतील दादा लोकांसारखे टेरीटोरीयल डिस्पूट पक्षांमधे सुद्धा असते. चातक हा पाहूणा पक्षी, मायग्रेटरी, पावसाचा संदेश घेऊन येतो.
lm2 चित्रकार कसरत - ऊस डोंगा परी रस नव्हे डोंगा काय भुललासी वरलिया रंगा संत चोखामोळा यांच्या अभंगा प्रमाणे शिर्षक बघून काही मनचले...... पण तसे काही नाही.

साक्षरता, बेरोजगारी आणि आरक्षण

विवेकपटाईत ·

कंजूस 19/09/2024 - 14:01
आता निवडणुकीच्या जाहीरनाम्यातली कलमं पाहा. गरीबी हटवण्याचे कलम काढून टाकले आहे. गरिबांना महिन्याला इतके रुपये, विधवांना इतके, निवृत्तांना इतके, बेरोजगारांना इतके. या रकमा पुढे वाढतच जातील. कोण शिकून खटाटोप करेल? घरीच बसेल. कालचाच हरियाणा साठीचा कॉन्ग्रेसचा जाहिरनामा पाहा.

In reply to by कॉमी

चौकस२१२ 20/09/2024 - 04:47
एकीकडे म्हण्य्याचे जातीवयवस्था संपवा आणि दुसरी कडे जातीनिहाय आरक्षण मागायच? ती संपवण्याची साठी जातीनिहाय आरक्षण देण्यापेक्षा आर्थिक दुर्बलांना द्या मग मदत होईल संपायला .. पण तुमची विचारसरणी स्वार्थ साठी त्याला साथ देणार नाही उलट जातीनिहाय जंगम मागणार आणि त्यापेक्षाही बेकार म्हणजे आता तर काय धर्मावर बेतलेल आरक्षण ?

In reply to by चौकस२१२

कॉमी 20/09/2024 - 07:36
तुम्हाला हा विषय नीट समजतं नाही. जातीनिहाय जनगणनेमूळे तुम्ही इतके तंतरताय kaaran तुम्हाला माहितीये कीं त्याने जी विषमता तुम्हाला चटईखाली सारायची आहे ती वर येईल. जातीव्यवस्था असल्यामुळे जातीवर आधारित आरक्षण द्यावे लागते. जातीव्यवस्था आरक्षणाच्या आधीपासून आहे. जातीव्यवस्था काय आरक्षणामुळे तयार झाली नाही किंवा फक्त आज आरक्षण आहे म्हणून जातव्यवस्था अजून जिवंत आहे असेही नाही. तसें म्हणणे म्हणजे अत्यंत मूर्खपणाचे होईल. जातीचे ऑलरेडी होत्या आणि आहेत. त्यात पिचलेल्या लोकांना मदत करण्यासाठी जाती acknowledge करून मदत देणे म्हणजे जातीव्यवस्था टिकवून ठेवणे होतं नाही. जातीनिहाय आरक्षण हा गरिबी निर्मूलन कार्यक्रम नाहीये. जातीमुळे डिस्क्रिमिनेशन होते त्यावर केलेला उपाय आहे.

In reply to by कॉमी

चौकस२१२ 20/09/2024 - 14:28
सगळं समजतंय, तशी जनगणना कार्यायाची आणि म्हणायचे बघा एवढे एवढे . आहेत त्यामुळे द्याच.... ओरबड... झुंडशाही नुसती आर्थिक दुर्बलाना मदत याला तुमचा विरोध का तुमचा ? कारण चराऊ कुरण पाहिजे तुम्हाला ... जनतेला पण आणि राजकारणाऱ्यानं पण आणि मुस्लिमांना आरक्षण हे कस काय? घाणरेर्ड्या नालायक हिंदू धर्मात जशी जातीवयवसतः आहे, तशी त्यांच्यात नाही.. अल्ला ला नामंजूर आहे मग तिथे कसले आरक्षण? आंबेडकरांनी सुद्धा काय कायमचे आरक्षण ठेवा असे म्हणले नवहते

In reply to by चौकस२१२

कॉमी 20/09/2024 - 16:19
आर्थिक दुर्बलांना मदत करा कीं. माझा अजिबात वितोध नाही. तुम्ही का जातीपातीला चटईखाली सारण्याचा प्रयत्न करताय?

In reply to by कॉमी

चौकस२१२ 21/09/2024 - 09:04
आमचं म्हणणं आहे कि या पुढे फक्त आर्थिक दुर्बळांनाच मदत करा, जाती निहाय नको... पण तुम्हाला जात हा प्रश्न भिजत घोंगड्या सारखा ठेव्याचा , आणि केली जातीनिहाय जनगणना तर तुम्ही काय जाती वरील आरक्षणाची मागणी कमी करणार आहात ? नाही उलट म्हणणार हे इतके ते तितके आणि द्या त्याप्रमाणात ... अरे समाज जर जाती वयस्थेपासून दूर न्यायाचा असले तर जाती मुले जी विषमता होत राहिली ती म्हणजे शिक्षण, ते द्या ना सवलतीचं दरात पण आर्थिक दुर्बलांना

In reply to by कॉमी

चौकस२१२ 21/09/2024 - 09:07
हो ना मग हिंदूंना का दोष देताय आम्ही तर नालायक आहोतच जाती पाळणारे पण प्रिय मुस्लिम आणि नवबुद्धी तर नाहीत ना तसे? त्यांनी जातीचे जोखड झुगारले ना मग राहा ना "ओपन कॅटॅगिरीत करा कष्ट आणि कंमवा लै चापलुसी झाली .. इतके वर्षे,,, एक देश एक कायदा सर्वांनां समान वागणूक आणि संधी , जोडो इंडिया झिंदाबाद , नाही तोडो इंडिया मुर्दाबाद

In reply to by कॉमी

सुक्या 20/09/2024 - 14:57
१. ज्या विषमते विषयी तुम्ही बोलता आहात त्याचे एखादे उदाहरण देता येईल का? २. जातीनिहाय आरक्षण दिल्याने जातीमुळे होणारे डिस्क्रिमिनेशन थांबेल का? आता (२०२४ मधे) जातीवरुन काय डिस्क्रिमिनेशन होते ते सान्गता का? म्हणजे फलाना आमक्या जातीचा आहे म्हनुन त्याला घरात नाही घेतला वगेरे वगेरे. मग तो फलाना तहसिलदार का असेना. तुमच्या मुदलातच घोळ आहे. आजच्या जमाण्यात टॅलेंट चा ढोल वाजतो. काम करण्याची तयारी असेल तर काहीही सर करता येते. कामचुकार पणा करायचाच असेल तर मग आरक्षणाच्या कुबड्या लागतात. मी तर म्हणतो जातीनिहाय आरक्षण घ्या आनी फुल्ल जात पात पाळा .. हाय काय अन नाय काय.... डिस्क्लेमरः मी या तथाकथीत मागास जातीचा आहे. आजवर कधीच, पुन्हा सांगतो आजवर कधीच आरक्षणाचा लाभ घेतला नाही. मेहनत करुन आज मजेत जीवन जगतो आहे. माझ्या मुलांच्या दाखल्यावर जात हा रकाना रिकामा आहे ...

In reply to by सुक्या

कॉमी 20/09/2024 - 16:23
उदाहरण वैगेरे कशाला? थेट जातीनिहाय माहिती मिळवू आणि बोलू. एकदोन उदाहरणे कशाला हवीत. ती सुद्धा सजग पणे बघितली तर दिसतील. जर टॅलेंटचा ढोल वाजतो तर मग तुम्ही तर जातीनिहाय सर्वेक्षणाला समर्थन केले पाहिजे. कारण तुमच्या मते खुप काही फरक सापडणार नाहीत, कारण सगळे तर टॅलेंट वर चालते ना. मग तर होऊद्या सर्वेक्षण, तुमचाच मुद्दा खरा ठरेल कीं बघा, आता सगळे कसे आलबेल झाले आहे.

In reply to by कॉमी

सुक्या 20/09/2024 - 22:55
बघा, पाया पोकळ असला की इमारत बांधता येत नाही. तुमची सुई जातीनिहाय सर्वेक्षणावरच अडकलेली आहे तेव्हा जास्त काही निष्पन्न होणार नाही. मी दोन प्रश्न विचारले होते. तुमच्या दाव्याच्या समर्थनार्थ तुम्हाला एकाचे ही उत्तर देता आले नाही. कारण तशी परीस्थीती नाही. कदाचित मागास भागात असेलही परंतु आजकाल कुणीही जात विचारत फिरत नाही. एक महाभाग आहेत जे जिथे तिथे जात विचारत फिरतात. पण त्यांना कुणी सिरियस ली घेत नाही तो भाग अलहीदा. जग हे प्रतिभेवरच चालते. प्रतिभेला मेहनतीची जोड लागते. मेहेनत न करता आरामात पैसा कमवायचा असेल तर मग असले आरक्षण वगेरे लागते ... सर्वेक्षण केल्याने यात शष्प फरक पडणार नाही.

In reply to by सुक्या

Bhakti 20/09/2024 - 18:06
माझ्या मुलांच्या दाखल्यावर जात हा रकाना रिकामा आहे ...
कौतुक आहे तुमचे. जातीभेद संपवण्यासाठी हा एक मार्ग आहे.आणि दुसरा म्हणजे विविध जातीत रोटी बेटी सहज घडवता यायला हवा.पण या दोन्ही मार्गांसाठी बौद्धिक अथवा व्यवहारीक पातळी उच्च पाहिजे.यासाठी शिक्षण पाहिजे.त्यामुळे कमी शिकून पुढची पिढी पैसा बक्कळ मिळवू शकेल,पण सुशिक्षित चांगले शिक्षण घेऊनच होऊ शकते. शहरात शिकलेले हे दोन्ही मार्ग सहज हाताळू शकतात पण खेड्यात अजून खुप प्रबोधन बाकी आहे.

In reply to by कॉमी

विवेकपटाईत 20/09/2024 - 19:23
तुम्हाला विषय समजलेलाच नाही. माझ्या लेखाचा जातीशी काहीही एक संबंध नाही. मी फक्त शिक्षण व्यवस्थेतील दोष दाखविले आहे. सर्वांनाच वाटते त्याचा मुलगा ग्रॅज्युएट व्हावा आणि व्हाईट कॉलर जॉब मिळावी. केंद्र आणि राज्य सरकार ती ईच्छा पूर्ण करते आहे. प्रत्येक तरुण ग्रेजुएट होत आहे.. त्यामुळे कौशल प्रशिक्षण घेण्याची कोणाचीही इच्छा होत नाही. हे साक्षर बेरोजगारीचे मुख्य कारण आहे. जातीनिहाय जनगणना केली तरी काय साध्य होणार. सरकारी व्हाईट कॉलर नोकऱ्या वाढणार आहे का? भविष्यात महाराष्ट्र सरकार वर्षा पन्नास हजार तरुणांनाही सरकारी नोकरी देऊ शकणार नाही. वाढता सरकारी खर्च कमी करण्यासाठी केंद्र असो किंवा राज्य सरकार सर्वच कॉन्ट्रॅक्ट लेबर भरती करू लागले आहे. दिल्लीत ही अतिथी शिक्षकांची संख्या स्थायी शिक्षकांपेक्षा जास्त आहे. ही स्थिती सर्व राज्यांत असेल.

In reply to by विवेकपटाईत

चौकस२१२ 21/09/2024 - 09:28
प्रत्येक तरुण ग्रेजुएट होत आहे.. त्यामुळे कौशल प्रशिक्षण घेण्याची कोणाचीही इच्छा होत नाही. हे साक्षर बेरोजगारीचे मुख्य कारण आहे. विवेक जी आपण म्हणत ते बरोबर आहे,, लेखमागे मूळ मुद्दा "कोणत्या प्रकारचे शिक्षण आणि त्यातून कोणत्या प्रकारचे कामगार देशात असावेत याबद्दल आहे आणि मी सुधा त्यावर प्रतिसाद ना देत जात य वर वर बोलत बसलो ( येथे कामगा र म्हणजे काम करणारे मग ते मेंदूवर उपचार करणारे विवाद्य कि रस्ते साफ करणारे दोन्ही हि असा अर्थ जिवा ) खरे तर देश एवढा मोठा आहे कि "आय टी आय" पासून ते "आय आय टी" दोन्ही प्रकारचेह शिक्षण घेणार भरपूर असतील त्यामुळे समतोल राखलं जाईल असे वटते सगळेच जर फक्त संगणक क्षेत्रात गेले तर मग उत्पादन करायाला कुशल कामगार कुठीऊन मिळणार असे प्रश्न काही देशात येतो हे खरे तो काही भागात येत असणार पण पूर्ण देशात येईल असे वाटत नाही नुकतेच मी चे उद्धरण दिले हा उद्योग जवळचे "आय टी आय" चालवते ते खेडयापाडयात हात कामगार / कलाकुसर करणाऱ्या पण ना शिकलेल्या लोकांचं मुलांना प्रोत्साहन देऊन जगात छोटी लोकसंख्या आणि भरपूर श्रीमंती ( कुवेत , कतार, सिंगापुर) आशय परिस्थिती काही ठराविक काम स्थानिक जनतेला करायची नास्तात कारण त्यात शारीरिक कष्ट असतात ( जरी कौशलय लागत असले तरी ) तिथे हा प्रश्न होतोय पण तो वेगळं मुद्दा झाला एकूण भारताची अर्थव्यवस्ताह मोकळी झाल्यावर पूर्वी जय क्षेत्रात काम अगदी कमी होते किंवा नवहते ते उपलब्ध झाले , चांगलेच आहे जशी समृद्धी येईल तसे " हलक्या किंवा धिक्याचं " क्षेत्रातील काम सुसहाय होत जाईल आणि लोकं त्या साठी लागणारे शिकशान घेऊ लागतील

In reply to by कॉमी

विवेकपटाईत 20/09/2024 - 19:26
वेद पाठ करणे सहज कार्य नाही. हुशार मुले करायचे. त्यांना सन्मान आणि राजाश्रय ही मिळायचा. जसे आज हुशार मुले डॉक्टर, आय आय टी, इत्यादी करतात.

कारण कमी साक्षर असल्याने सर्व शारीरिक मेहनतीची कामे करायला ते सआfunction at() { [native code] } ठेकेदार हिंदू असूनही त्याला हिंदू कारीगर मिळत नाही. अशा काही दोन चार वाक्यांशी तंतोतंत सहमत. बाकी लेखाचा विषय लै हार्डय आहे. आरक्षण, संविधान नावाचे शब्द तर तोंडावाटे काढायला देखील भिती वाटते आजकाल. असो.

मी ज्या शाळेत शिकलो तीथे सुतार काम,मशिन ड्राॅईंग,टर्नर,फिटर असे व्यावसायिक शिक्षण दिले जायचे. बरेच विद्यार्थी पॉलिटेक्निक मधे जाऊन डिप्लोमा घ्यायचे. नोकरी किवा स्वताच व्यवसाय सुरू करण्यात इतर विद्यार्थ्यां,म्हणजे आर्ट, काॅमर्स घेतलेल्या पेक्षा पुढे असायचे. शिक्षण पद्धतीत फरक करायला हवा. बाकी आपल्या विचारांशी बहुतेक सहमत.

In reply to by कंजूस

चौकस२१२ 20/09/2024 - 04:51
इंग्लीश पद्धत = एक साहेब आणि बाकी चिल्लर.? ट्रेड ला फक्त जर्मनीत पैसे आणि मान असे नाही तर इंग्लंड आणि त्यातून वसलेले बहुतेक पाश्चिमात्य देश येथेहि असेच आहे अर्थात त्यासाठी ३-४ वर्षाचे उत्तम शिक्षण घयावे लागते येथे एक प्लबर किंवा इलेक्ट्रिशिअन एखाद्या कॉमर्स पदवीधर पेक्षा जास्त कमवतो

तिता 19/09/2024 - 23:55
मी पुण्यात बघितलेले बहुतेक कारागीर यूपी मधून आले आहेत. आणि ते सर्व हिंदू आहेत. उत्तम काम करतात. न शिकलेले मागेच राहतात, धर्म कोणताही असला तरी.

जात,पात, धर्म, पंथ या वर समाज विभाजन करून पुढारी आपली रोटी शेकत आहेत. सामान्य जनता उगाच भरडली जात आहे. अर्थात माझे मत आहे. उरलं सुरलं रेवड्या वाटून मतदारांना आकर्षित करत आहेत. लाडकी बहीण मग भाऊ,आजोबा,काका,पुतण्या वगैरे दोडके का? सरकार आणी विरोधी पक्ष जनतेने आपल्या हितासाठीच व राष्ट्र हितासाठीच निवडून दिले आहेत. दोघे मिळून एकत्र जनहितासाठी काम का करत नाहीत? निराशाजनक परिस्थिती आहे.

कंजूस 19/09/2024 - 14:01
आता निवडणुकीच्या जाहीरनाम्यातली कलमं पाहा. गरीबी हटवण्याचे कलम काढून टाकले आहे. गरिबांना महिन्याला इतके रुपये, विधवांना इतके, निवृत्तांना इतके, बेरोजगारांना इतके. या रकमा पुढे वाढतच जातील. कोण शिकून खटाटोप करेल? घरीच बसेल. कालचाच हरियाणा साठीचा कॉन्ग्रेसचा जाहिरनामा पाहा.

In reply to by कॉमी

चौकस२१२ 20/09/2024 - 04:47
एकीकडे म्हण्य्याचे जातीवयवस्था संपवा आणि दुसरी कडे जातीनिहाय आरक्षण मागायच? ती संपवण्याची साठी जातीनिहाय आरक्षण देण्यापेक्षा आर्थिक दुर्बलांना द्या मग मदत होईल संपायला .. पण तुमची विचारसरणी स्वार्थ साठी त्याला साथ देणार नाही उलट जातीनिहाय जंगम मागणार आणि त्यापेक्षाही बेकार म्हणजे आता तर काय धर्मावर बेतलेल आरक्षण ?

In reply to by चौकस२१२

कॉमी 20/09/2024 - 07:36
तुम्हाला हा विषय नीट समजतं नाही. जातीनिहाय जनगणनेमूळे तुम्ही इतके तंतरताय kaaran तुम्हाला माहितीये कीं त्याने जी विषमता तुम्हाला चटईखाली सारायची आहे ती वर येईल. जातीव्यवस्था असल्यामुळे जातीवर आधारित आरक्षण द्यावे लागते. जातीव्यवस्था आरक्षणाच्या आधीपासून आहे. जातीव्यवस्था काय आरक्षणामुळे तयार झाली नाही किंवा फक्त आज आरक्षण आहे म्हणून जातव्यवस्था अजून जिवंत आहे असेही नाही. तसें म्हणणे म्हणजे अत्यंत मूर्खपणाचे होईल. जातीचे ऑलरेडी होत्या आणि आहेत. त्यात पिचलेल्या लोकांना मदत करण्यासाठी जाती acknowledge करून मदत देणे म्हणजे जातीव्यवस्था टिकवून ठेवणे होतं नाही. जातीनिहाय आरक्षण हा गरिबी निर्मूलन कार्यक्रम नाहीये. जातीमुळे डिस्क्रिमिनेशन होते त्यावर केलेला उपाय आहे.

In reply to by कॉमी

चौकस२१२ 20/09/2024 - 14:28
सगळं समजतंय, तशी जनगणना कार्यायाची आणि म्हणायचे बघा एवढे एवढे . आहेत त्यामुळे द्याच.... ओरबड... झुंडशाही नुसती आर्थिक दुर्बलाना मदत याला तुमचा विरोध का तुमचा ? कारण चराऊ कुरण पाहिजे तुम्हाला ... जनतेला पण आणि राजकारणाऱ्यानं पण आणि मुस्लिमांना आरक्षण हे कस काय? घाणरेर्ड्या नालायक हिंदू धर्मात जशी जातीवयवसतः आहे, तशी त्यांच्यात नाही.. अल्ला ला नामंजूर आहे मग तिथे कसले आरक्षण? आंबेडकरांनी सुद्धा काय कायमचे आरक्षण ठेवा असे म्हणले नवहते

In reply to by चौकस२१२

कॉमी 20/09/2024 - 16:19
आर्थिक दुर्बलांना मदत करा कीं. माझा अजिबात वितोध नाही. तुम्ही का जातीपातीला चटईखाली सारण्याचा प्रयत्न करताय?

In reply to by कॉमी

चौकस२१२ 21/09/2024 - 09:04
आमचं म्हणणं आहे कि या पुढे फक्त आर्थिक दुर्बळांनाच मदत करा, जाती निहाय नको... पण तुम्हाला जात हा प्रश्न भिजत घोंगड्या सारखा ठेव्याचा , आणि केली जातीनिहाय जनगणना तर तुम्ही काय जाती वरील आरक्षणाची मागणी कमी करणार आहात ? नाही उलट म्हणणार हे इतके ते तितके आणि द्या त्याप्रमाणात ... अरे समाज जर जाती वयस्थेपासून दूर न्यायाचा असले तर जाती मुले जी विषमता होत राहिली ती म्हणजे शिक्षण, ते द्या ना सवलतीचं दरात पण आर्थिक दुर्बलांना

In reply to by कॉमी

चौकस२१२ 21/09/2024 - 09:07
हो ना मग हिंदूंना का दोष देताय आम्ही तर नालायक आहोतच जाती पाळणारे पण प्रिय मुस्लिम आणि नवबुद्धी तर नाहीत ना तसे? त्यांनी जातीचे जोखड झुगारले ना मग राहा ना "ओपन कॅटॅगिरीत करा कष्ट आणि कंमवा लै चापलुसी झाली .. इतके वर्षे,,, एक देश एक कायदा सर्वांनां समान वागणूक आणि संधी , जोडो इंडिया झिंदाबाद , नाही तोडो इंडिया मुर्दाबाद

In reply to by कॉमी

सुक्या 20/09/2024 - 14:57
१. ज्या विषमते विषयी तुम्ही बोलता आहात त्याचे एखादे उदाहरण देता येईल का? २. जातीनिहाय आरक्षण दिल्याने जातीमुळे होणारे डिस्क्रिमिनेशन थांबेल का? आता (२०२४ मधे) जातीवरुन काय डिस्क्रिमिनेशन होते ते सान्गता का? म्हणजे फलाना आमक्या जातीचा आहे म्हनुन त्याला घरात नाही घेतला वगेरे वगेरे. मग तो फलाना तहसिलदार का असेना. तुमच्या मुदलातच घोळ आहे. आजच्या जमाण्यात टॅलेंट चा ढोल वाजतो. काम करण्याची तयारी असेल तर काहीही सर करता येते. कामचुकार पणा करायचाच असेल तर मग आरक्षणाच्या कुबड्या लागतात. मी तर म्हणतो जातीनिहाय आरक्षण घ्या आनी फुल्ल जात पात पाळा .. हाय काय अन नाय काय.... डिस्क्लेमरः मी या तथाकथीत मागास जातीचा आहे. आजवर कधीच, पुन्हा सांगतो आजवर कधीच आरक्षणाचा लाभ घेतला नाही. मेहनत करुन आज मजेत जीवन जगतो आहे. माझ्या मुलांच्या दाखल्यावर जात हा रकाना रिकामा आहे ...

In reply to by सुक्या

कॉमी 20/09/2024 - 16:23
उदाहरण वैगेरे कशाला? थेट जातीनिहाय माहिती मिळवू आणि बोलू. एकदोन उदाहरणे कशाला हवीत. ती सुद्धा सजग पणे बघितली तर दिसतील. जर टॅलेंटचा ढोल वाजतो तर मग तुम्ही तर जातीनिहाय सर्वेक्षणाला समर्थन केले पाहिजे. कारण तुमच्या मते खुप काही फरक सापडणार नाहीत, कारण सगळे तर टॅलेंट वर चालते ना. मग तर होऊद्या सर्वेक्षण, तुमचाच मुद्दा खरा ठरेल कीं बघा, आता सगळे कसे आलबेल झाले आहे.

In reply to by कॉमी

सुक्या 20/09/2024 - 22:55
बघा, पाया पोकळ असला की इमारत बांधता येत नाही. तुमची सुई जातीनिहाय सर्वेक्षणावरच अडकलेली आहे तेव्हा जास्त काही निष्पन्न होणार नाही. मी दोन प्रश्न विचारले होते. तुमच्या दाव्याच्या समर्थनार्थ तुम्हाला एकाचे ही उत्तर देता आले नाही. कारण तशी परीस्थीती नाही. कदाचित मागास भागात असेलही परंतु आजकाल कुणीही जात विचारत फिरत नाही. एक महाभाग आहेत जे जिथे तिथे जात विचारत फिरतात. पण त्यांना कुणी सिरियस ली घेत नाही तो भाग अलहीदा. जग हे प्रतिभेवरच चालते. प्रतिभेला मेहनतीची जोड लागते. मेहेनत न करता आरामात पैसा कमवायचा असेल तर मग असले आरक्षण वगेरे लागते ... सर्वेक्षण केल्याने यात शष्प फरक पडणार नाही.

In reply to by सुक्या

Bhakti 20/09/2024 - 18:06
माझ्या मुलांच्या दाखल्यावर जात हा रकाना रिकामा आहे ...
कौतुक आहे तुमचे. जातीभेद संपवण्यासाठी हा एक मार्ग आहे.आणि दुसरा म्हणजे विविध जातीत रोटी बेटी सहज घडवता यायला हवा.पण या दोन्ही मार्गांसाठी बौद्धिक अथवा व्यवहारीक पातळी उच्च पाहिजे.यासाठी शिक्षण पाहिजे.त्यामुळे कमी शिकून पुढची पिढी पैसा बक्कळ मिळवू शकेल,पण सुशिक्षित चांगले शिक्षण घेऊनच होऊ शकते. शहरात शिकलेले हे दोन्ही मार्ग सहज हाताळू शकतात पण खेड्यात अजून खुप प्रबोधन बाकी आहे.

In reply to by कॉमी

विवेकपटाईत 20/09/2024 - 19:23
तुम्हाला विषय समजलेलाच नाही. माझ्या लेखाचा जातीशी काहीही एक संबंध नाही. मी फक्त शिक्षण व्यवस्थेतील दोष दाखविले आहे. सर्वांनाच वाटते त्याचा मुलगा ग्रॅज्युएट व्हावा आणि व्हाईट कॉलर जॉब मिळावी. केंद्र आणि राज्य सरकार ती ईच्छा पूर्ण करते आहे. प्रत्येक तरुण ग्रेजुएट होत आहे.. त्यामुळे कौशल प्रशिक्षण घेण्याची कोणाचीही इच्छा होत नाही. हे साक्षर बेरोजगारीचे मुख्य कारण आहे. जातीनिहाय जनगणना केली तरी काय साध्य होणार. सरकारी व्हाईट कॉलर नोकऱ्या वाढणार आहे का? भविष्यात महाराष्ट्र सरकार वर्षा पन्नास हजार तरुणांनाही सरकारी नोकरी देऊ शकणार नाही. वाढता सरकारी खर्च कमी करण्यासाठी केंद्र असो किंवा राज्य सरकार सर्वच कॉन्ट्रॅक्ट लेबर भरती करू लागले आहे. दिल्लीत ही अतिथी शिक्षकांची संख्या स्थायी शिक्षकांपेक्षा जास्त आहे. ही स्थिती सर्व राज्यांत असेल.

In reply to by विवेकपटाईत

चौकस२१२ 21/09/2024 - 09:28
प्रत्येक तरुण ग्रेजुएट होत आहे.. त्यामुळे कौशल प्रशिक्षण घेण्याची कोणाचीही इच्छा होत नाही. हे साक्षर बेरोजगारीचे मुख्य कारण आहे. विवेक जी आपण म्हणत ते बरोबर आहे,, लेखमागे मूळ मुद्दा "कोणत्या प्रकारचे शिक्षण आणि त्यातून कोणत्या प्रकारचे कामगार देशात असावेत याबद्दल आहे आणि मी सुधा त्यावर प्रतिसाद ना देत जात य वर वर बोलत बसलो ( येथे कामगा र म्हणजे काम करणारे मग ते मेंदूवर उपचार करणारे विवाद्य कि रस्ते साफ करणारे दोन्ही हि असा अर्थ जिवा ) खरे तर देश एवढा मोठा आहे कि "आय टी आय" पासून ते "आय आय टी" दोन्ही प्रकारचेह शिक्षण घेणार भरपूर असतील त्यामुळे समतोल राखलं जाईल असे वटते सगळेच जर फक्त संगणक क्षेत्रात गेले तर मग उत्पादन करायाला कुशल कामगार कुठीऊन मिळणार असे प्रश्न काही देशात येतो हे खरे तो काही भागात येत असणार पण पूर्ण देशात येईल असे वाटत नाही नुकतेच मी चे उद्धरण दिले हा उद्योग जवळचे "आय टी आय" चालवते ते खेडयापाडयात हात कामगार / कलाकुसर करणाऱ्या पण ना शिकलेल्या लोकांचं मुलांना प्रोत्साहन देऊन जगात छोटी लोकसंख्या आणि भरपूर श्रीमंती ( कुवेत , कतार, सिंगापुर) आशय परिस्थिती काही ठराविक काम स्थानिक जनतेला करायची नास्तात कारण त्यात शारीरिक कष्ट असतात ( जरी कौशलय लागत असले तरी ) तिथे हा प्रश्न होतोय पण तो वेगळं मुद्दा झाला एकूण भारताची अर्थव्यवस्ताह मोकळी झाल्यावर पूर्वी जय क्षेत्रात काम अगदी कमी होते किंवा नवहते ते उपलब्ध झाले , चांगलेच आहे जशी समृद्धी येईल तसे " हलक्या किंवा धिक्याचं " क्षेत्रातील काम सुसहाय होत जाईल आणि लोकं त्या साठी लागणारे शिकशान घेऊ लागतील

In reply to by कॉमी

विवेकपटाईत 20/09/2024 - 19:26
वेद पाठ करणे सहज कार्य नाही. हुशार मुले करायचे. त्यांना सन्मान आणि राजाश्रय ही मिळायचा. जसे आज हुशार मुले डॉक्टर, आय आय टी, इत्यादी करतात.

कारण कमी साक्षर असल्याने सर्व शारीरिक मेहनतीची कामे करायला ते सआfunction at() { [native code] } ठेकेदार हिंदू असूनही त्याला हिंदू कारीगर मिळत नाही. अशा काही दोन चार वाक्यांशी तंतोतंत सहमत. बाकी लेखाचा विषय लै हार्डय आहे. आरक्षण, संविधान नावाचे शब्द तर तोंडावाटे काढायला देखील भिती वाटते आजकाल. असो.

मी ज्या शाळेत शिकलो तीथे सुतार काम,मशिन ड्राॅईंग,टर्नर,फिटर असे व्यावसायिक शिक्षण दिले जायचे. बरेच विद्यार्थी पॉलिटेक्निक मधे जाऊन डिप्लोमा घ्यायचे. नोकरी किवा स्वताच व्यवसाय सुरू करण्यात इतर विद्यार्थ्यां,म्हणजे आर्ट, काॅमर्स घेतलेल्या पेक्षा पुढे असायचे. शिक्षण पद्धतीत फरक करायला हवा. बाकी आपल्या विचारांशी बहुतेक सहमत.

In reply to by कंजूस

चौकस२१२ 20/09/2024 - 04:51
इंग्लीश पद्धत = एक साहेब आणि बाकी चिल्लर.? ट्रेड ला फक्त जर्मनीत पैसे आणि मान असे नाही तर इंग्लंड आणि त्यातून वसलेले बहुतेक पाश्चिमात्य देश येथेहि असेच आहे अर्थात त्यासाठी ३-४ वर्षाचे उत्तम शिक्षण घयावे लागते येथे एक प्लबर किंवा इलेक्ट्रिशिअन एखाद्या कॉमर्स पदवीधर पेक्षा जास्त कमवतो

तिता 19/09/2024 - 23:55
मी पुण्यात बघितलेले बहुतेक कारागीर यूपी मधून आले आहेत. आणि ते सर्व हिंदू आहेत. उत्तम काम करतात. न शिकलेले मागेच राहतात, धर्म कोणताही असला तरी.

जात,पात, धर्म, पंथ या वर समाज विभाजन करून पुढारी आपली रोटी शेकत आहेत. सामान्य जनता उगाच भरडली जात आहे. अर्थात माझे मत आहे. उरलं सुरलं रेवड्या वाटून मतदारांना आकर्षित करत आहेत. लाडकी बहीण मग भाऊ,आजोबा,काका,पुतण्या वगैरे दोडके का? सरकार आणी विरोधी पक्ष जनतेने आपल्या हितासाठीच व राष्ट्र हितासाठीच निवडून दिले आहेत. दोघे मिळून एकत्र जनहितासाठी काम का करत नाहीत? निराशाजनक परिस्थिती आहे.
तुम्हाला आश्चर्य वाटेल पण साक्षरतेचा बेरोजगारी आणि आरक्षणाची सरळ संबंध आहे. मेकॉले पूर्वीच्या शिक्षण व्यवस्थेत बेरोजगारी नावाचा प्रकार नव्हता. "द ब्युटीफुल ट्री" या पुस्तकात ईस्ट इंडिया कंपनीने १८३० ते १८५० मध्ये भारतीय शिक्षण व्यवस्थेच्या बाबतीत केलेले सर्व्हे उपलब्ध आहे. त्याकाळी देशात सहा लाखांच्या वर गुरुकुल होते. प्रत्येक गावात एक गुरुकुल निश्चित होते. वयाच्या 13 वर्षांपर्यंत विद्यार्थ्यांना स्थानिक भाषा गणित इत्यादीचे ज्ञान दिले जात होते. सामान्य व्यक्तीसाठी एवढे ज्ञान पुरेसे आहे. त्यानंतर अधिकांश विद्यार्थी त्यांच्या परंपरागत व्यवसायांचे ज्ञान गुरुं कडून प्राप्त करायचे.

संयमित आहारातून शरीरशुद्धी/वजन घटवण्याचा यशस्वी प्रयोग - भाग १ (पहिले १२ दिवस)

चित्रगुप्त ·

वाह ! उत्तम लेखन ! चित्रगुप्त काका, अतिषय प्रांजळ स्वानुभव लेखन आवडले. आपला सायंटिफिक अ‍ॅप्रोच , विशेष करुन , ठरलेल्या वेळा पाळणे, मोजका प्रमाणित आहार घेणे आणि शिस्तबध्दपणे त्याचा लॉग मेंटेन करणे हे प्रचंड आवडले ! मी काही डॉक्टर किंव्वा आहार तज्ज्ञ नाही, पण माझ्या अल्पस्वल्प माहीतीनुसार असे वाटते की - आहारात दुधाचा समावेश असायला हवा. दुध हे पुर्णान्न आहे. दुधासारखे उपकारक काही नाही! अर्थात आपण लस्सी घेत आहातच ! तरी दुधाचे प्रमाण जास्त असल्यास बोन डेन्स्टिटी व्यवस्थित रहायला मदत होईल आणी लो कॅलरी डायेटने जे व्ह्यायची मला भिती वाटते ते हाडांची ठिसुळता वगैरे त्रास होणार नाहीत. ( अर्थात हा फक्त माझा कयास आहे. मी डॉक्टर वगैरे नाही.)
फक्त मनातल्या मनातच तो जप करत असूनही असे घडावे, याचे मला फार आश्चर्य वाटते.
मन म्हणजे दुसरे तिसरे काही नसुन मेंदुतच होणार्‍या क्रिया प्रतिक्रिया असल्याने मनातल्या मनात केलेल्या गोष्टींचे फिजिऑलॉजिकल परिणाम होणे स्वाभाविक आहे. प्राणायाम, राजयोग, ध्यान धारणा , अध्यात्म हे सगळे "मनाचे खेळ " आहेत . ज्याला कळतं त्याला कळतं ! यः पश्यति स पश्यति ! ह्या विषयात कधी रस निर्माण झाल्यास , अन आराम करत रिकामा वेळ असल्यास - राम दास्स गोईंग होम ही नेटफ्लिक्स वरील डॉक्युमेंटरी नक्की पहा. पॅरालिसिस ने शरिराची अर्धी बाजु लुळी प्डलेल्या अवस्थेतही राम दास्स ज्या आत्मतृप्ती ने हसत आहे ते पाहुन माझ्या डोळ्यात अक्षरशः आनंदाश्रु आलेले ! बाकी अवांतर म्हणजे - आपण कोव्हिडच्या लसी बाबत केलेले विधान पाहुन समाधान वाटले. आपल्याकडे , इथे भारतात, डॉक्टर नर्स असे प्रांजळपणे कधी कबुल करायला लागणार देव जाणे ! पुढील लेखनाच्या प्रतिक्षेत ! आणि हो , जीवेत "शरदः" शतम !

छान. फळभाज्यांनी वजन कमी झालं त्याबद्दल अभिनंदन. वयपरत्वे आहारावर नियंत्रण आवश्यकच असतं. आरोग्यदायी प्रवासासाठी शुभेच्छा. -दिलीप बिरुटे

श्रीगणेशा 08/09/2024 - 11:04
अनुभव छान लिहिला आहे, सर्व बारकाव्यांसहित. तुमचा शरीरशुद्धी प्रयोग, आता फक्त प्रयोग न राहता, सवय व्हावी, यासाठी शुभेच्छा! या लेखातून मिपाकर, थोडीशी का असेना, पण प्रेरणा घेतील, यात शंका नाही.

शिस्त, सात्यत्त, संतुलित, संयमित, पौष्टिक इत्यादी बझ वर्ड्स आहेत. या शिवाय वेळ आणी व्यायाम हे सुद्धा महत्वाचे.याच बरोबर कुठल्याच गोष्टींचा अतिरेक नसावा. सकाळी जमेल तसा परंतू नियमित व्यायाम जरूरीच. आपले वजन,वय आणी कदकाठी( वय ७२,उंची१७२,मध्यम बांधा) बघता ६८ किलो हे वैश्विक स्तरा नुसार आयडियल वजन आहे . आपल्याला वजन कमी करण्याची अवशकता नाही हे माझे ठाम मत आहे. वयोमानानुसार दम लागणे,थोडेफार दुखणे हे सहाजिकच. विशेष काही दुखले खुपले तर त्याकडे जरुर लक्ष द्या. या वयात आयडियल वजन हे काॅम्प्लिमेन्ट च म्हणावे लागेल. माझ्या अंदाजानुसार आपल्या रक्तचाचण्या केल्यास त्या नाॅर्मल लिमिट मधेच येतील. स्वस्थ आयुष्या करता शुभेच्छा. आपल्याच वयापेक्षा दोन एक वर्ष कमी,उंची दोन तीन इंच जास्त. वैश्विक स्तरा नुसार आयडियल वजन हे 80-85 दरम्यान हवे. माझे खरे वजन 92 किलो आहे. वजना कडे जास्त लक्ष न देता दररोज सहा ते आठ किलोमीटर ब्रिस्क वाॅक करताना काही त्रास तर होत नाही ना, दिनक्रमात उत्साह कितपत टिकून असतो ,रात्री सहा ते साडे सहा तास झोप व दुपारची तासभर पाऊणतास वामकुक्षी यात काही व्यत्यय तर येत नाही ना? इत्यादी गोष्टींवर जास्त लक्ष देतो. आहार म्हणाल तर , नाष्टा,मध्यान्ह भोजन व सायंकाळच्या भोजना व्यतिरिक्त दोन कप चहा व साधारण दोनशे मिली दुध किंवा काॅफी. पांढरी साखर सहा चमचे. दुपारी एक पोळी, भाजी, आमटी, काकडी,बीटरूट, गाजर,मुळा यांचा ऋतुकाला नुसार सलाद व एक वाटी भात. संध्याकाळी एक थालीपीठ, एक भाकरी पिठलं,तीन इडली सांबार असे काही तरी एखादी डिश. हे साधारण दररोजच. कधीतरी मात्र सर्व मर्यादा उल्लंघून काय वाटेल ते ,वाटेल तितके खातो. परवाच राखी बांधून घेण्यासाठी दुपारी एका बहिणी कडे दोन खव्याच्या पोळ्या व इतर सणासुदीचे पदार्थ तर संध्याकाळी दुसर्या बहिणी कडे एक पुरणपोळी,दोन वाट्या बासुंदी व इतर सणासुदीचे पदार्थ चापले. आता बाप्पा आलेत मोदक तर खाल्लेच पाहिजेत, वर्षांत एकदाच तर येतात. देशस्थ, गौरी माहेरी आल्यात सोळा भाज्या सोळा कोशिंबीरी, पंचपक्वान्न तर होणारच ना,नाहीतर माहेरवाशीण काय वाटेल त्यांना..... संदीप खरे यांच्या कवितेत सारखं, अजुन तरी रूळ सोडून सुटला नाही डब्बा.... बाकी संत नामदेव, कबीर यांची वाणी नेहमीच लक्षात असते. काळ देहासी आला खाऊ आम्हीं आनंदे नाचू गाऊ......

In reply to by कर्नलतपस्वी

चित्रगुप्त 11/09/2024 - 14:54
आपले वजन,वय आणी कदकाठी( वय ७२,उंची१७२,मध्यम बांधा) बघता ६८ किलो हे वैश्विक स्तरा नुसार आयडियल वजन आहे . आपल्याला वजन कमी करण्याची अवशकता नाही हे माझे ठाम मत आहे.
-- मझे वय आता ७३ आणि उंची १६२ से.मी आहे. (१७२ नव्हे) बाकी 'वैश्विक स्तर' वगैरे उपयोगी असले तरी जगातल्या कोट्यावधी लोकांना असे ठराविक साच्यात कसे बसवता येणार ? व्यक्ती तितक्या प्रकृती. प्रत्येकाचा हाडांचा सापळा, स्नायु, शरिरांतर्गत अवयव, रक्त, चरबी, पोटात साठलेली जुनी घाण वगैरेंच्या वजनाचे आपसातले प्रमाण वेगवेगळे असते. त्याशिवाय कफ- वात - पित्त 'प्रवृती' प्रमाणे शरीर वेगवेगळे असते. -- याशिवाय 'योगी - भोगी - रोगी' तेही आहेच. त्यामुळे 'वजन' हा एकमेव निष्कर्ष न मानता सर्वांगिण आरोग्यासाठी प्रयत्न केले जावेत. सध्या माझी स्थिती 'रोगी' ही आहे. त्यातून विकसित होत आधी 'भोगी' आणि मग 'योगी' होऊन उर्वरित आयुष्य त्या स्थितीतच रहायचे, हे उद्दिष्ट आहे. --- 'मी स्वतःला विचारलेले प्रश्न' असा एक वेगळा प्रतिसाद लिहीणार आहे.

टिकटिकतेकिंवा कसे..... झोपेची वेळ,जेवणाची वेळ आणी जागे होण्याची वेळ हे बहाण्या करता भिंतीवर घड्याळ पहावे लागते किंवा बायोलॉजिकल घड्याळ आठवण करून देते हे फारच महत्वाचे. 'बाकीबाब' , यांचा भक्त. आयुष्याची आता झाली उजवणी येतो तो क्षण अमृताचा जे जे भेटे ते ते दर्पणीचे बिंब तुझे प्रतिबिंब लाडेगोडे सुखोत्सवे असा जीव अनावर पिंजर्याचे दार उघडावे पांडुरंग हरी,वासुदेव हरी.

खिलजि 10/09/2024 - 23:51
काय लिवलंय काका... दंडवत स्वीकारावं... आज ऊर फुटसतोवर जेवलोय नि नंतर वाचलं.. इथंच चुकलं आमचं.. आता जाड पोटावर ताण आलाय.. आपलं लिखाण आम्हांला नक्कीच मार्गदर्शक ठरेल यात शंका नाही...

कंजूस 11/09/2024 - 06:06
अभ्यासू लेख आणि प्रतिसाद आवडले. माझ्या मते हे सर्व आहार नियंत्रण तिशीतूनच सुरू होणे गरजेचे आहे. फार पुढे जाऊन यू टर्न घेण्यापेक्षा बरे.

गवि 11/09/2024 - 07:41
तरी आहाराविषयक इतर खबरदारी घेणे मंदावत जाऊन भूक नसली तरी 'वेळ झाली' म्हणून जेवणे, अधून मधून 'दिसेल ते' खाणे, भरपूर गोड पदार्थ खाणे, बरेचदा चहा-कॉफी, अधून मधून तळकट आणि बाजाराचे पदार्थ खाणे वगैरे प्रमाद घडत गेले
इथे बरोब्बर सगळी मेख आहे. आत्ता देखील तुम्ही बारा दिवस प्रयोग केला आहे आणि अजून थोडे दिवसच तो करण्याचा बेत आहे. फायदे कितीही चांगले दिसले तरी मनुष्याचा मूळ स्वभाव पुन्हा एकदा आपल्या नेहमीच्या जीवनशैली आणि आहाराकडे वळण्याचा असतो. यापुढे आयुष्यभर कायम रोज नेहमी असे काढा, फळे, चिया बिया किंवा अन्य निवडक आहार घेणे किती जणांना (आपण खुद्द धरून) शक्य आहे हा मोठा गहन प्रश्न आहे. काही दिवस एखादे पथ्य निग्रहाने पाळून शरीरात साठलेली काही विषारी द्रव्ये जणू त्यामुळे निचरा पावतात आणि शरीर असे डीटॉक्स नावाचे काही करावे लागते / होते ही एक मिथ आहे. यावर खूप मोठी लुटणारी इंडस्ट्री उभी राहू पहात आहे. अर्थात तो पूर्ण वेगळा विषय आहे. या लेखाशी त्याचा संबंध नाही. पण हा वैयक्तिक प्रयोग उत्साह आहे तोवर अवश्य चालू ठेवावा. तात्पुरता का होईना, फरक दिसतोय ना ? उत्तम.

काढे,पाढे,पथ्य वगैरेवर न बोलता एकच म्हणतो की संतुलित अहार,नियमित व्यायाम, भरपुर व नियमित पाणी पिणे व अवश्यक तेव्हढी निद्रा घेतली तर SIP प्रमाणे वजन हळूहळू कमी होत जाईल. तशीच शरीराला पण सवय लागेल. Knee jerk reaction कधीही पर्मनंट सोल्युशन होऊ शकत नाही.

In reply to by कर्नलतपस्वी

गवि 11/09/2024 - 09:23
+++ अगदी. रोज आणि कायम आपल्या रूटीनमध्ये प्रत्यक्षात शक्य होईल असे उपायच कामाचे असतात. तात्पुरते, एकवीस दिवसांचे किंवा तीन महिने निग्रहाने पाळलेले असे 'यो यो डाएट" हे अजिबात डाएटींग न करण्यापेक्षा अधिक घातक आणि भयंकर असते. शरीराची सेटिंग आणखी बिघडवते प्रत्येक नव्या प्रयत्नात. ऑनलाईन खूप लेख / माहिती आहे उपलब्ध यावर.

In reply to by गवि

चित्रगुप्त 11/09/2024 - 14:26
मनुष्य भिती आणि आशा याने नियंत्रित होत असतो. जगातले बहुतांश 'धर्म' यावरच आधारित असलेले दिसतात.अमुक व्रत केले तर अमूक फळ मिळते, नाहीतर तमूक नुकसान होते, वगैरे मनावर बिंबवणार्‍या 'कहाण्या', साधुवाण्याची गोष्ट, स्वर्ग-नरक या कल्पना, वगैरेतून हेच दिसते. -- याची सुरुवात अगदी लहानपणीच होत असते. "होमवर्क केले तर चॉकलेट मिळेल, नाहीतर बाबाजी घेऊन जाईल" अशी लालूच आणि भिती दाखवून मुले नियंत्रणात ठेवली जातात... मग आयुष्यभर तीच सवय लगते. -- माझ्या बाबतीत छातीत रात्रभर कळा येणे हे फार भयंकर होते. असे पुन्हा झले तर आपण संपलोच, ही भिती, तसेच रसाहाराने 'शरीरशुद्धी' होऊन पंचवीस वर्षे जुना भगंदर (फिस्टुला) आणि मूळव्याध अवघ्या एका आठवड्यात कायमचे बरे झाले, या स्वानुभवातून जागृत झालेली 'आशा' यांनी प्रेरित होऊन हा उपक्रम सुरु केलेला आहे.

In reply to by चित्रगुप्त

गवि 11/09/2024 - 14:48
तुम्ही म्हणताय ते सर्व अगदी योग्य वैध रास्त इत्यादि आहे. मी आणि तपस्वी सरांनी मांडलेला मुद्दा हा मर्यादित काळ टिकू शकेल असे करण्यास कठीण व्रत घेऊन त्याचा दीर्घकालीन फायदा होऊ शकत नाही अशी निराशा मांडणारा आहे. तुमच्या उपक्रमास विरोध अथवा खीळ घालण्याचा दूरान्वयानेही संबंध नव्हता, नाही आणि नसेल. _/\_ तुम्ही पॉजिटिव्ह प्रयत्न करत रहा.

In reply to by गवि

चित्रगुप्त 11/09/2024 - 15:10
मर्यादित काळ टिकू शकेल असे करण्यास कठीण व्रत घेऊन त्याचा दीर्घकालीन फायदा होऊ शकत नाही
-- हे अगदी खरे. म्हणूनच आपल्याला कायमस्वरूपी असे काय करता येईल, याचाच शोध सध्या घेतो आहे. 'फॅटी लीव्हर' पासून मुक्ती मिळवणे अत्यावश्यक आहे. त्यादृष्टीने प्रयत्न आहेत. चरबी कमी करणे हा त्यातला एक भाग. हल्ली पंचवीस टक्के लोकांना तरी ही व्याधी असते म्हणे. याची लक्षणे काहीच नसतात त्यामुळे आपल्याला ते कळतच नाही. अनेक रोगांचे ते मूळ कारण असते. माझ्या अनेक तपासण्या (उदा. सिटी स्कॅन, छातीपासून पायाच्या पोटर्‍यापर्यंतसे अल्ट्रासाऊंड वगैरे) केल्या गेल्याने ते कळले. नाहीतर 'वाढलेले पोट' हे आपण समृद्धीचे लक्षण मानतो. आपल्या गणपतीबाप्पाच्या पोटाचे कौतुक केले जाते. असो.

Bhakti 11/09/2024 - 10:33
हे सर्व करताना १००% नाही पण ५०%/६०%/७०% गोष्टीतर अंगवळणी पडतात.सुरुवात आणि सातत्य दोन्ही कष्टाच्या गोष्टी साध्य व्हायला पाहिजे.

In reply to by Bhakti

गवि 11/09/2024 - 10:59
सुरुवात आणि सातत्य दोन्ही
हे अगदी योग्यच. पण अनेक प्लॅन्स, डाएटस् यांच्या रचनेतच तात्पुरतेपणा अंतर्भूत असल्याचे दिसते. दिवस १, दिवस २.. किंवा एखादा घटक पूर्ण कट , किंवा तीन आठवड्यांचे टार्गेट ... अशा प्रकारात सुरुवात तर झाली असे समाधान असते पण त्याचे स्वरूपच केवळ काही काळच टिकवता येईल असे असते.

चित्रगुप्त 07/11/2024 - 03:03
हा लेख लिहून आता दोन महिने झाले. या मधल्या काळात गणपती उत्सवात बरेचदा कुणा ना कुणातरी जेवायला जाणे, नंतर दिवाळीचे फराळ वगैरेतून पोटावर पुन्हा ताण पडून ते बिघडले. वजन मात्र स्थिर (६८.५ किलो) राहिलेले आहे. थोड्या दिवसांपासून एक प्रयोग करून बघत आहे: सकाळी नऊच्या सुमारास गाजर, टमाटर, काकडी, आवळा, दुधी वगैरेचा एक ग्लास रस, किंवा एका डाळिंबाचे दाणे, एक केळे, दही, Dried Prunes, अक्रोड, अंकुरित मूग-चणे आणि एकादे अन्य फळ, हे सगळे मिक्सरमधून (थोडे पाणी घालून ) काढून बनवलेली स्मूदी, हे पिणे सुरु केले आहे. -- तसेच इंदौरला आल्यावर नवीन सायकल घेऊन सकाळ- संध्याकाळ अर्धा तास ती मोकळ्या जागी चालवणे पण प्रारंभिले आहे. या दोन्हीचे चांगले परिणाम मिळत आहेत.

चित्रगुप्त 22/12/2024 - 06:00
हा लेख लिहून साडेतीन महिने झाले. आणखी कुणी असा काही प्रयत्न केला आहे का ? असेल तर त्याविषयी अवश्य लिहावे. आता लवकरच मी पुन्हा एकदा सुरुवात करणार आहे.

चित्रगुप्त 18/01/2026 - 05:43
रक्त-चाचणीत होमोसिस्टीन वाढलेले असल्याचे दिसत आहे, त्यासाठी औषधही घ्यावे लागत आहे. वाढलेल्या होमोसिस्टीनची लक्षणे म्हणजे तळहात-तळापाय यावर झिणझिण्या येणे/चटका बसल्यासरखे वाटणे, ओठ जड होणे, स्मृतीभंश, निराशा, निरुत्साह, अशक्तपणा, पचनसंस्था बिघडणे वगैरे असतात, ती अनुभवास येत आहेत. सक्रांतीच्या निमित्ताने गुळाच्या पोळ्या, तिळगूळ वगैरे बरेच खाल्ले गेले, थंडीमुळे चहा-कॉफीचेपण प्रमाण वाढलेले आहे. पोट बिघडले असल्याचे जाणवत आहे. हा लेख हुडकून वाचला. आता पुन्हा एकदा असा काहीतरी प्रयोग करून बघायचा विचार आहे.

वाह ! उत्तम लेखन ! चित्रगुप्त काका, अतिषय प्रांजळ स्वानुभव लेखन आवडले. आपला सायंटिफिक अ‍ॅप्रोच , विशेष करुन , ठरलेल्या वेळा पाळणे, मोजका प्रमाणित आहार घेणे आणि शिस्तबध्दपणे त्याचा लॉग मेंटेन करणे हे प्रचंड आवडले ! मी काही डॉक्टर किंव्वा आहार तज्ज्ञ नाही, पण माझ्या अल्पस्वल्प माहीतीनुसार असे वाटते की - आहारात दुधाचा समावेश असायला हवा. दुध हे पुर्णान्न आहे. दुधासारखे उपकारक काही नाही! अर्थात आपण लस्सी घेत आहातच ! तरी दुधाचे प्रमाण जास्त असल्यास बोन डेन्स्टिटी व्यवस्थित रहायला मदत होईल आणी लो कॅलरी डायेटने जे व्ह्यायची मला भिती वाटते ते हाडांची ठिसुळता वगैरे त्रास होणार नाहीत. ( अर्थात हा फक्त माझा कयास आहे. मी डॉक्टर वगैरे नाही.)
फक्त मनातल्या मनातच तो जप करत असूनही असे घडावे, याचे मला फार आश्चर्य वाटते.
मन म्हणजे दुसरे तिसरे काही नसुन मेंदुतच होणार्‍या क्रिया प्रतिक्रिया असल्याने मनातल्या मनात केलेल्या गोष्टींचे फिजिऑलॉजिकल परिणाम होणे स्वाभाविक आहे. प्राणायाम, राजयोग, ध्यान धारणा , अध्यात्म हे सगळे "मनाचे खेळ " आहेत . ज्याला कळतं त्याला कळतं ! यः पश्यति स पश्यति ! ह्या विषयात कधी रस निर्माण झाल्यास , अन आराम करत रिकामा वेळ असल्यास - राम दास्स गोईंग होम ही नेटफ्लिक्स वरील डॉक्युमेंटरी नक्की पहा. पॅरालिसिस ने शरिराची अर्धी बाजु लुळी प्डलेल्या अवस्थेतही राम दास्स ज्या आत्मतृप्ती ने हसत आहे ते पाहुन माझ्या डोळ्यात अक्षरशः आनंदाश्रु आलेले ! बाकी अवांतर म्हणजे - आपण कोव्हिडच्या लसी बाबत केलेले विधान पाहुन समाधान वाटले. आपल्याकडे , इथे भारतात, डॉक्टर नर्स असे प्रांजळपणे कधी कबुल करायला लागणार देव जाणे ! पुढील लेखनाच्या प्रतिक्षेत ! आणि हो , जीवेत "शरदः" शतम !

छान. फळभाज्यांनी वजन कमी झालं त्याबद्दल अभिनंदन. वयपरत्वे आहारावर नियंत्रण आवश्यकच असतं. आरोग्यदायी प्रवासासाठी शुभेच्छा. -दिलीप बिरुटे

श्रीगणेशा 08/09/2024 - 11:04
अनुभव छान लिहिला आहे, सर्व बारकाव्यांसहित. तुमचा शरीरशुद्धी प्रयोग, आता फक्त प्रयोग न राहता, सवय व्हावी, यासाठी शुभेच्छा! या लेखातून मिपाकर, थोडीशी का असेना, पण प्रेरणा घेतील, यात शंका नाही.

शिस्त, सात्यत्त, संतुलित, संयमित, पौष्टिक इत्यादी बझ वर्ड्स आहेत. या शिवाय वेळ आणी व्यायाम हे सुद्धा महत्वाचे.याच बरोबर कुठल्याच गोष्टींचा अतिरेक नसावा. सकाळी जमेल तसा परंतू नियमित व्यायाम जरूरीच. आपले वजन,वय आणी कदकाठी( वय ७२,उंची१७२,मध्यम बांधा) बघता ६८ किलो हे वैश्विक स्तरा नुसार आयडियल वजन आहे . आपल्याला वजन कमी करण्याची अवशकता नाही हे माझे ठाम मत आहे. वयोमानानुसार दम लागणे,थोडेफार दुखणे हे सहाजिकच. विशेष काही दुखले खुपले तर त्याकडे जरुर लक्ष द्या. या वयात आयडियल वजन हे काॅम्प्लिमेन्ट च म्हणावे लागेल. माझ्या अंदाजानुसार आपल्या रक्तचाचण्या केल्यास त्या नाॅर्मल लिमिट मधेच येतील. स्वस्थ आयुष्या करता शुभेच्छा. आपल्याच वयापेक्षा दोन एक वर्ष कमी,उंची दोन तीन इंच जास्त. वैश्विक स्तरा नुसार आयडियल वजन हे 80-85 दरम्यान हवे. माझे खरे वजन 92 किलो आहे. वजना कडे जास्त लक्ष न देता दररोज सहा ते आठ किलोमीटर ब्रिस्क वाॅक करताना काही त्रास तर होत नाही ना, दिनक्रमात उत्साह कितपत टिकून असतो ,रात्री सहा ते साडे सहा तास झोप व दुपारची तासभर पाऊणतास वामकुक्षी यात काही व्यत्यय तर येत नाही ना? इत्यादी गोष्टींवर जास्त लक्ष देतो. आहार म्हणाल तर , नाष्टा,मध्यान्ह भोजन व सायंकाळच्या भोजना व्यतिरिक्त दोन कप चहा व साधारण दोनशे मिली दुध किंवा काॅफी. पांढरी साखर सहा चमचे. दुपारी एक पोळी, भाजी, आमटी, काकडी,बीटरूट, गाजर,मुळा यांचा ऋतुकाला नुसार सलाद व एक वाटी भात. संध्याकाळी एक थालीपीठ, एक भाकरी पिठलं,तीन इडली सांबार असे काही तरी एखादी डिश. हे साधारण दररोजच. कधीतरी मात्र सर्व मर्यादा उल्लंघून काय वाटेल ते ,वाटेल तितके खातो. परवाच राखी बांधून घेण्यासाठी दुपारी एका बहिणी कडे दोन खव्याच्या पोळ्या व इतर सणासुदीचे पदार्थ तर संध्याकाळी दुसर्या बहिणी कडे एक पुरणपोळी,दोन वाट्या बासुंदी व इतर सणासुदीचे पदार्थ चापले. आता बाप्पा आलेत मोदक तर खाल्लेच पाहिजेत, वर्षांत एकदाच तर येतात. देशस्थ, गौरी माहेरी आल्यात सोळा भाज्या सोळा कोशिंबीरी, पंचपक्वान्न तर होणारच ना,नाहीतर माहेरवाशीण काय वाटेल त्यांना..... संदीप खरे यांच्या कवितेत सारखं, अजुन तरी रूळ सोडून सुटला नाही डब्बा.... बाकी संत नामदेव, कबीर यांची वाणी नेहमीच लक्षात असते. काळ देहासी आला खाऊ आम्हीं आनंदे नाचू गाऊ......

In reply to by कर्नलतपस्वी

चित्रगुप्त 11/09/2024 - 14:54
आपले वजन,वय आणी कदकाठी( वय ७२,उंची१७२,मध्यम बांधा) बघता ६८ किलो हे वैश्विक स्तरा नुसार आयडियल वजन आहे . आपल्याला वजन कमी करण्याची अवशकता नाही हे माझे ठाम मत आहे.
-- मझे वय आता ७३ आणि उंची १६२ से.मी आहे. (१७२ नव्हे) बाकी 'वैश्विक स्तर' वगैरे उपयोगी असले तरी जगातल्या कोट्यावधी लोकांना असे ठराविक साच्यात कसे बसवता येणार ? व्यक्ती तितक्या प्रकृती. प्रत्येकाचा हाडांचा सापळा, स्नायु, शरिरांतर्गत अवयव, रक्त, चरबी, पोटात साठलेली जुनी घाण वगैरेंच्या वजनाचे आपसातले प्रमाण वेगवेगळे असते. त्याशिवाय कफ- वात - पित्त 'प्रवृती' प्रमाणे शरीर वेगवेगळे असते. -- याशिवाय 'योगी - भोगी - रोगी' तेही आहेच. त्यामुळे 'वजन' हा एकमेव निष्कर्ष न मानता सर्वांगिण आरोग्यासाठी प्रयत्न केले जावेत. सध्या माझी स्थिती 'रोगी' ही आहे. त्यातून विकसित होत आधी 'भोगी' आणि मग 'योगी' होऊन उर्वरित आयुष्य त्या स्थितीतच रहायचे, हे उद्दिष्ट आहे. --- 'मी स्वतःला विचारलेले प्रश्न' असा एक वेगळा प्रतिसाद लिहीणार आहे.

टिकटिकतेकिंवा कसे..... झोपेची वेळ,जेवणाची वेळ आणी जागे होण्याची वेळ हे बहाण्या करता भिंतीवर घड्याळ पहावे लागते किंवा बायोलॉजिकल घड्याळ आठवण करून देते हे फारच महत्वाचे. 'बाकीबाब' , यांचा भक्त. आयुष्याची आता झाली उजवणी येतो तो क्षण अमृताचा जे जे भेटे ते ते दर्पणीचे बिंब तुझे प्रतिबिंब लाडेगोडे सुखोत्सवे असा जीव अनावर पिंजर्याचे दार उघडावे पांडुरंग हरी,वासुदेव हरी.

खिलजि 10/09/2024 - 23:51
काय लिवलंय काका... दंडवत स्वीकारावं... आज ऊर फुटसतोवर जेवलोय नि नंतर वाचलं.. इथंच चुकलं आमचं.. आता जाड पोटावर ताण आलाय.. आपलं लिखाण आम्हांला नक्कीच मार्गदर्शक ठरेल यात शंका नाही...

कंजूस 11/09/2024 - 06:06
अभ्यासू लेख आणि प्रतिसाद आवडले. माझ्या मते हे सर्व आहार नियंत्रण तिशीतूनच सुरू होणे गरजेचे आहे. फार पुढे जाऊन यू टर्न घेण्यापेक्षा बरे.

गवि 11/09/2024 - 07:41
तरी आहाराविषयक इतर खबरदारी घेणे मंदावत जाऊन भूक नसली तरी 'वेळ झाली' म्हणून जेवणे, अधून मधून 'दिसेल ते' खाणे, भरपूर गोड पदार्थ खाणे, बरेचदा चहा-कॉफी, अधून मधून तळकट आणि बाजाराचे पदार्थ खाणे वगैरे प्रमाद घडत गेले
इथे बरोब्बर सगळी मेख आहे. आत्ता देखील तुम्ही बारा दिवस प्रयोग केला आहे आणि अजून थोडे दिवसच तो करण्याचा बेत आहे. फायदे कितीही चांगले दिसले तरी मनुष्याचा मूळ स्वभाव पुन्हा एकदा आपल्या नेहमीच्या जीवनशैली आणि आहाराकडे वळण्याचा असतो. यापुढे आयुष्यभर कायम रोज नेहमी असे काढा, फळे, चिया बिया किंवा अन्य निवडक आहार घेणे किती जणांना (आपण खुद्द धरून) शक्य आहे हा मोठा गहन प्रश्न आहे. काही दिवस एखादे पथ्य निग्रहाने पाळून शरीरात साठलेली काही विषारी द्रव्ये जणू त्यामुळे निचरा पावतात आणि शरीर असे डीटॉक्स नावाचे काही करावे लागते / होते ही एक मिथ आहे. यावर खूप मोठी लुटणारी इंडस्ट्री उभी राहू पहात आहे. अर्थात तो पूर्ण वेगळा विषय आहे. या लेखाशी त्याचा संबंध नाही. पण हा वैयक्तिक प्रयोग उत्साह आहे तोवर अवश्य चालू ठेवावा. तात्पुरता का होईना, फरक दिसतोय ना ? उत्तम.

काढे,पाढे,पथ्य वगैरेवर न बोलता एकच म्हणतो की संतुलित अहार,नियमित व्यायाम, भरपुर व नियमित पाणी पिणे व अवश्यक तेव्हढी निद्रा घेतली तर SIP प्रमाणे वजन हळूहळू कमी होत जाईल. तशीच शरीराला पण सवय लागेल. Knee jerk reaction कधीही पर्मनंट सोल्युशन होऊ शकत नाही.

In reply to by कर्नलतपस्वी

गवि 11/09/2024 - 09:23
+++ अगदी. रोज आणि कायम आपल्या रूटीनमध्ये प्रत्यक्षात शक्य होईल असे उपायच कामाचे असतात. तात्पुरते, एकवीस दिवसांचे किंवा तीन महिने निग्रहाने पाळलेले असे 'यो यो डाएट" हे अजिबात डाएटींग न करण्यापेक्षा अधिक घातक आणि भयंकर असते. शरीराची सेटिंग आणखी बिघडवते प्रत्येक नव्या प्रयत्नात. ऑनलाईन खूप लेख / माहिती आहे उपलब्ध यावर.

In reply to by गवि

चित्रगुप्त 11/09/2024 - 14:26
मनुष्य भिती आणि आशा याने नियंत्रित होत असतो. जगातले बहुतांश 'धर्म' यावरच आधारित असलेले दिसतात.अमुक व्रत केले तर अमूक फळ मिळते, नाहीतर तमूक नुकसान होते, वगैरे मनावर बिंबवणार्‍या 'कहाण्या', साधुवाण्याची गोष्ट, स्वर्ग-नरक या कल्पना, वगैरेतून हेच दिसते. -- याची सुरुवात अगदी लहानपणीच होत असते. "होमवर्क केले तर चॉकलेट मिळेल, नाहीतर बाबाजी घेऊन जाईल" अशी लालूच आणि भिती दाखवून मुले नियंत्रणात ठेवली जातात... मग आयुष्यभर तीच सवय लगते. -- माझ्या बाबतीत छातीत रात्रभर कळा येणे हे फार भयंकर होते. असे पुन्हा झले तर आपण संपलोच, ही भिती, तसेच रसाहाराने 'शरीरशुद्धी' होऊन पंचवीस वर्षे जुना भगंदर (फिस्टुला) आणि मूळव्याध अवघ्या एका आठवड्यात कायमचे बरे झाले, या स्वानुभवातून जागृत झालेली 'आशा' यांनी प्रेरित होऊन हा उपक्रम सुरु केलेला आहे.

In reply to by चित्रगुप्त

गवि 11/09/2024 - 14:48
तुम्ही म्हणताय ते सर्व अगदी योग्य वैध रास्त इत्यादि आहे. मी आणि तपस्वी सरांनी मांडलेला मुद्दा हा मर्यादित काळ टिकू शकेल असे करण्यास कठीण व्रत घेऊन त्याचा दीर्घकालीन फायदा होऊ शकत नाही अशी निराशा मांडणारा आहे. तुमच्या उपक्रमास विरोध अथवा खीळ घालण्याचा दूरान्वयानेही संबंध नव्हता, नाही आणि नसेल. _/\_ तुम्ही पॉजिटिव्ह प्रयत्न करत रहा.

In reply to by गवि

चित्रगुप्त 11/09/2024 - 15:10
मर्यादित काळ टिकू शकेल असे करण्यास कठीण व्रत घेऊन त्याचा दीर्घकालीन फायदा होऊ शकत नाही
-- हे अगदी खरे. म्हणूनच आपल्याला कायमस्वरूपी असे काय करता येईल, याचाच शोध सध्या घेतो आहे. 'फॅटी लीव्हर' पासून मुक्ती मिळवणे अत्यावश्यक आहे. त्यादृष्टीने प्रयत्न आहेत. चरबी कमी करणे हा त्यातला एक भाग. हल्ली पंचवीस टक्के लोकांना तरी ही व्याधी असते म्हणे. याची लक्षणे काहीच नसतात त्यामुळे आपल्याला ते कळतच नाही. अनेक रोगांचे ते मूळ कारण असते. माझ्या अनेक तपासण्या (उदा. सिटी स्कॅन, छातीपासून पायाच्या पोटर्‍यापर्यंतसे अल्ट्रासाऊंड वगैरे) केल्या गेल्याने ते कळले. नाहीतर 'वाढलेले पोट' हे आपण समृद्धीचे लक्षण मानतो. आपल्या गणपतीबाप्पाच्या पोटाचे कौतुक केले जाते. असो.

Bhakti 11/09/2024 - 10:33
हे सर्व करताना १००% नाही पण ५०%/६०%/७०% गोष्टीतर अंगवळणी पडतात.सुरुवात आणि सातत्य दोन्ही कष्टाच्या गोष्टी साध्य व्हायला पाहिजे.

In reply to by Bhakti

गवि 11/09/2024 - 10:59
सुरुवात आणि सातत्य दोन्ही
हे अगदी योग्यच. पण अनेक प्लॅन्स, डाएटस् यांच्या रचनेतच तात्पुरतेपणा अंतर्भूत असल्याचे दिसते. दिवस १, दिवस २.. किंवा एखादा घटक पूर्ण कट , किंवा तीन आठवड्यांचे टार्गेट ... अशा प्रकारात सुरुवात तर झाली असे समाधान असते पण त्याचे स्वरूपच केवळ काही काळच टिकवता येईल असे असते.

चित्रगुप्त 07/11/2024 - 03:03
हा लेख लिहून आता दोन महिने झाले. या मधल्या काळात गणपती उत्सवात बरेचदा कुणा ना कुणातरी जेवायला जाणे, नंतर दिवाळीचे फराळ वगैरेतून पोटावर पुन्हा ताण पडून ते बिघडले. वजन मात्र स्थिर (६८.५ किलो) राहिलेले आहे. थोड्या दिवसांपासून एक प्रयोग करून बघत आहे: सकाळी नऊच्या सुमारास गाजर, टमाटर, काकडी, आवळा, दुधी वगैरेचा एक ग्लास रस, किंवा एका डाळिंबाचे दाणे, एक केळे, दही, Dried Prunes, अक्रोड, अंकुरित मूग-चणे आणि एकादे अन्य फळ, हे सगळे मिक्सरमधून (थोडे पाणी घालून ) काढून बनवलेली स्मूदी, हे पिणे सुरु केले आहे. -- तसेच इंदौरला आल्यावर नवीन सायकल घेऊन सकाळ- संध्याकाळ अर्धा तास ती मोकळ्या जागी चालवणे पण प्रारंभिले आहे. या दोन्हीचे चांगले परिणाम मिळत आहेत.

चित्रगुप्त 22/12/2024 - 06:00
हा लेख लिहून साडेतीन महिने झाले. आणखी कुणी असा काही प्रयत्न केला आहे का ? असेल तर त्याविषयी अवश्य लिहावे. आता लवकरच मी पुन्हा एकदा सुरुवात करणार आहे.

चित्रगुप्त 18/01/2026 - 05:43
रक्त-चाचणीत होमोसिस्टीन वाढलेले असल्याचे दिसत आहे, त्यासाठी औषधही घ्यावे लागत आहे. वाढलेल्या होमोसिस्टीनची लक्षणे म्हणजे तळहात-तळापाय यावर झिणझिण्या येणे/चटका बसल्यासरखे वाटणे, ओठ जड होणे, स्मृतीभंश, निराशा, निरुत्साह, अशक्तपणा, पचनसंस्था बिघडणे वगैरे असतात, ती अनुभवास येत आहेत. सक्रांतीच्या निमित्ताने गुळाच्या पोळ्या, तिळगूळ वगैरे बरेच खाल्ले गेले, थंडीमुळे चहा-कॉफीचेपण प्रमाण वाढलेले आहे. पोट बिघडले असल्याचे जाणवत आहे. हा लेख हुडकून वाचला. आता पुन्हा एकदा असा काहीतरी प्रयोग करून बघायचा विचार आहे.
दि. २७ ऑगस्टला सुरुवात करून गेल्या १२ दिवसात मुख्यतः भाज्या आणि फळांद्वारे शरीरशुद्धीचा प्रयोग करून माझे बिघडलेले स्वास्थ्य मी परत कसे मिळवत आहे याबद्दल हा लेख आहे. महर्षी पतंजली यांनी सांगितले आहे : योगश्चित्तवृत्तिनिरोध: ('योग' म्हणजे (मोकाट सुटलेल्या) चित्तवृत्तीवर ताबा मिळवणे). अभ्यासवैराग्याभ्यांतन्निरोध: ( हा ताबा मिळवण्याचा उपाय म्हणजे वैराग्य, अर्थात 'अयोग्य' (अनिष्ट, हानिकारक) गोष्टींचा त्याग आणि त्याबरोबरच 'योग्य' गोष्टींचा अभ्यास (सराव, सवय) आपले आरोग्य आणि आहार, या विषयीसुद्धा हे लागू होत असते.

चतुर्थी, षष्ठी आणि प्रथमा.

प्रसाद गोडबोले ·

कंजूस 16/08/2024 - 05:15
अहं ब्रह्मास्मि ठीक आहे पण..... परिस्थिती आहेच. जन्मापासूनच रडारड करावी लागते. त्याशिवाय काही होत नाही. संन्यासी साधूंची यातून सुटलेले नाहीत. आपण आणि अजुन एक कुणी किंवा समाज लागतोच. परमात्मा देव वगैरे लांबच्या गोष्टी आहेत.

In reply to by कंजूस

Bhakti 16/08/2024 - 10:47
अगदी, ज्ञान प्राप्त करतांना गुरू लागतो,ज्ञान वृद्धिंगत करतांना ज्ञानी लोकांचा सहवास लागतो.तेव्हा 'अहं ब्रह्मास्मि ' हे जाणणाऱ्याने इतरांमध्ये ब्रम्ह पहावा भले समोरच्याला 'अहं ब्रम्हास्मि' हे अजून ज्ञात झाले नसेल. बाकी व्याकरणची ही बाजू ज्ञात नव्हती... सुंदर!

कंजूस 16/08/2024 - 05:15
अहं ब्रह्मास्मि ठीक आहे पण..... परिस्थिती आहेच. जन्मापासूनच रडारड करावी लागते. त्याशिवाय काही होत नाही. संन्यासी साधूंची यातून सुटलेले नाहीत. आपण आणि अजुन एक कुणी किंवा समाज लागतोच. परमात्मा देव वगैरे लांबच्या गोष्टी आहेत.

In reply to by कंजूस

Bhakti 16/08/2024 - 10:47
अगदी, ज्ञान प्राप्त करतांना गुरू लागतो,ज्ञान वृद्धिंगत करतांना ज्ञानी लोकांचा सहवास लागतो.तेव्हा 'अहं ब्रह्मास्मि ' हे जाणणाऱ्याने इतरांमध्ये ब्रम्ह पहावा भले समोरच्याला 'अहं ब्रम्हास्मि' हे अजून ज्ञात झाले नसेल. बाकी व्याकरणची ही बाजू ज्ञात नव्हती... सुंदर!
प्रस्तावना : मला व्याकरण हा विषय , त्यातही विशेष करुन संस्कृत व्याकरण फार आवडते ! संस्कृत तर साक्षात देववाणी देवाची वाणी षष्ठी तत्पुरुष समास ! प्रत्येक शब्दाला , अक्षराला अर्थ आहे , व्युतप्त्ती आहे . अभ्यास केला पाहिजे . कळलं पाहिजे ... कळलं पाहिजे .