मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

आज मै उपर , आसमां नीचे--१

विजुभाऊ ·

चौथा कोनाडा Tue, 04/14/2026 - 13:56

भारी सुरुवात ... वाचताना स्वत:च हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झालोय की काय असं वाटायला लावणारं ...

<<<< आज दहा वर्षांनन्तर ही आपले विचार तितकेच उदात्त विचार आहेत का?
शंका घ्यायला वाव आहे. रुग्णांची सेवा करता येते. या पेक्षाही आज माझा पेशा मला स्वावलंबी बनवतो.
जगाच्या कुठल्याही कोपर्‍यात गेले तरीही मी स्वावलंबी असेन हा व्यवहारी विचार मनात येतो.

पण आजही हा पेशा तितकाच आवडतो? अगदी खरे ,प्रामाणीक पण सांगायचे तर कधीकधी कंटाळा येतो.
रोज रडके आजारी चेहरे , रोज दुखणी खुपणी , आजार यांचा सामना करायचा.
रक्त लघवी , थुंकी , जखमेतली घाण , शरीरातले दोष हे पहायचे. रडणे कुंथणे कह्णणे , मॉनिटरची बीप बीप हे आपल्या आयुष्यातलं संगीत झालंय. >>>

सॉलिड चित्रदर्शी लेखन !

चौथा कोनाडा Tue, 04/14/2026 - 13:56

भारी सुरुवात ... वाचताना स्वत:च हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झालोय की काय असं वाटायला लावणारं ...

<<<< आज दहा वर्षांनन्तर ही आपले विचार तितकेच उदात्त विचार आहेत का?
शंका घ्यायला वाव आहे. रुग्णांची सेवा करता येते. या पेक्षाही आज माझा पेशा मला स्वावलंबी बनवतो.
जगाच्या कुठल्याही कोपर्‍यात गेले तरीही मी स्वावलंबी असेन हा व्यवहारी विचार मनात येतो.

पण आजही हा पेशा तितकाच आवडतो? अगदी खरे ,प्रामाणीक पण सांगायचे तर कधीकधी कंटाळा येतो.
रोज रडके आजारी चेहरे , रोज दुखणी खुपणी , आजार यांचा सामना करायचा.
रक्त लघवी , थुंकी , जखमेतली घाण , शरीरातले दोष हे पहायचे. रडणे कुंथणे कह्णणे , मॉनिटरची बीप बीप हे आपल्या आयुष्यातलं संगीत झालंय. >>>

सॉलिड चित्रदर्शी लेखन !

लेखनविषय:
लेखनप्रकार
आज मै उपर , आसमां नीचे करुणा... नावात काय असते म्हणा. जिथे करुणेचा पाझर फुटायला हवा तिथे नेमके हे नाव सापडत नाही आणि जिथे नको तिथे हे नाव सापडते. आमच्या शाळेच्या वर्गात दोन करुणा होत्या. खरे तर त्या वेळेस साथच होती दिपाली रुपाली सोनाली अशा नावांची. प्रत्येक काळात असते तशी .शाळेच्या वर्गात चार तरी दिपाल्या , सोनाल्या आणि रुपाल्या असायच्या. मुलांच्या बाबतीत दोन विजय चार सुनिल आणि तीन संजय नक्की सापडणार म्हणजे सापडणारच. आडनाव सारखे असणे समजू शकते.नाव आणि आडनावही सारखे निघायचे.

"द जिद्द ऑफ राण" आणि परिणाम

पाषाणभेद ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
"द जिद्द ऑफ राण" आणि परिणाम (सदर कथेमध्ये मानवी मनाच्या कल्पनेचा विस्तार केला आहे. सदर कथेमध्ये कोणत्याही जिवीत अथवा मृत व्यक्तीचा, देशाचा, संस्थेचा संबंध नाही. तसे आढळल्यास निव्वळ योगायोग समजावा. सदर कथा काल्पनिक आहे. वाचकांचे मनोरंजन व्हावे या हेतूने लिखाण केले आहे.) २१ व्या शतकाच्या मध्यावर जग एका विचित्र टप्प्यावर येऊन ठेपले होते. विज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि अवकाश तंत्रज्ञानात प्रचंड प्रगती झाली होती; पण मानवाचे जुने स्वभाव सत्ता, भीती आणि वर्चस्व अजूनही तसेच होते.

सैरभैर डायरी - ३

कपिलमुनी ·

सतिश पाटील Wed, 03/11/2026 - 11:22
हि गावची लोकं लई बाराबोड्याची असत्यात. हेंच्यासाठी शहरात राहिलेली अन जत्रा दिवाळीला गावाकडे आलेली लोकं म्हणजे गिऱ्हाईक असतेत. शहरात आपण कुठं राहतो, घर स्वतःच आहे का, किती किंमत आहे, पगार किती, ह्या सगळ्याचा अंदाज त्यांनी कधीतरी आपल्याकडे शहरात २ दिवस कामासाठी येऊन आपल्या घरी राहून बरोबर काढलेला असतो. शहरात राहून पगार घेतो म्हणजे आपला अधिकारच आहे ह्याला लुटायचा अन त्याने पण तक्रार नाही करायची असा अलिखित नियमच असतो त्यांच्यासाठी.

हा ही भाग मस्त!! पु भा प्र . पण जरा मागच्या भागांशी लिंक तुटल्यासारखी वाटते. की हे अनेक अनुभवांचे कोलाज आहे? की आता ३.१ /३.२ येणारेत?

In reply to by राजेंद्र मेहेंदळे

कपिलमुनी Sat, 03/14/2026 - 15:49
सलगपणा नाहीये . आठवले तसे लिहितोय . सैरभैर पसरलेल्या आठवणीच्या डायरीतले जे पान आठवले ते लिहिले

अभ्या.. Fri, 03/13/2026 - 21:21
भारीच लिहिलाय मुनीवर. गावाकडच्या डँबीसपब्लिकवर अनुभव असला तरी हे डँबिसपणा उगी गावातले म्हणून आलेला नसतो. हे काही समर्थन नाही त्याचे, किंबहुना मीही असले अनुभव भोगलेले आहेत. अगदी ७०-८० कीमीवर गाव असून उपरेपणा असतो, व्य्वहारातल्या, वहीवाटीतल्या आणि गावकीतल्या काही संज्ञा वेगळ्या पध्दतीने मेंटेन झालेल्या असतात. पूर्ण आयुष्य शहरात काढलेल्यांना तर त्या झेपतच नाहीत. अर्थात माणसासोबत डँबिसपणा सगळीकडे वेगवेगळ्या स्वरुपात असतोच. त्यांच्याशी भिडायचे फंडेही वेगवेगळे असतात. ज्यांना कळते ते तरतात.

सतिश पाटील Wed, 03/11/2026 - 11:22
हि गावची लोकं लई बाराबोड्याची असत्यात. हेंच्यासाठी शहरात राहिलेली अन जत्रा दिवाळीला गावाकडे आलेली लोकं म्हणजे गिऱ्हाईक असतेत. शहरात आपण कुठं राहतो, घर स्वतःच आहे का, किती किंमत आहे, पगार किती, ह्या सगळ्याचा अंदाज त्यांनी कधीतरी आपल्याकडे शहरात २ दिवस कामासाठी येऊन आपल्या घरी राहून बरोबर काढलेला असतो. शहरात राहून पगार घेतो म्हणजे आपला अधिकारच आहे ह्याला लुटायचा अन त्याने पण तक्रार नाही करायची असा अलिखित नियमच असतो त्यांच्यासाठी.

हा ही भाग मस्त!! पु भा प्र . पण जरा मागच्या भागांशी लिंक तुटल्यासारखी वाटते. की हे अनेक अनुभवांचे कोलाज आहे? की आता ३.१ /३.२ येणारेत?

In reply to by राजेंद्र मेहेंदळे

कपिलमुनी Sat, 03/14/2026 - 15:49
सलगपणा नाहीये . आठवले तसे लिहितोय . सैरभैर पसरलेल्या आठवणीच्या डायरीतले जे पान आठवले ते लिहिले

अभ्या.. Fri, 03/13/2026 - 21:21
भारीच लिहिलाय मुनीवर. गावाकडच्या डँबीसपब्लिकवर अनुभव असला तरी हे डँबिसपणा उगी गावातले म्हणून आलेला नसतो. हे काही समर्थन नाही त्याचे, किंबहुना मीही असले अनुभव भोगलेले आहेत. अगदी ७०-८० कीमीवर गाव असून उपरेपणा असतो, व्य्वहारातल्या, वहीवाटीतल्या आणि गावकीतल्या काही संज्ञा वेगळ्या पध्दतीने मेंटेन झालेल्या असतात. पूर्ण आयुष्य शहरात काढलेल्यांना तर त्या झेपतच नाहीत. अर्थात माणसासोबत डँबिसपणा सगळीकडे वेगवेगळ्या स्वरुपात असतोच. त्यांच्याशी भिडायचे फंडेही वेगवेगळे असतात. ज्यांना कळते ते तरतात.
लेखनविषय:
लेखनप्रकार
सैरभैर डायरी - १ सैरभैर डायरी - २

गावाकडच्या गप्पा

बाबा रिटायर झाले आणि गावातल्या सगळ्या रिटायर माणसाच्या पावलावर पाऊल ठेऊन शेतीकडे लक्ष द्यायला लागले. रीतीप्रमाणे भांडवल मालकाचे मेहनत गड्याची त्याचे उत्पन्नाच्या २५ % द्यायचे, वैरण, गवत करेल तसे घेऊन जाईल. परस्पर माल विकायचा नाही वगैरे गोष्टी ठरल्या . दोन वर्षे सगळे सुरळीत होते. बाळूमामा कष्टाळू होते. थोडासा तळे राखील तो पाणी चाखेल हा प्रकार होताच. पण बाबांना शेतात काहीतरी करतोय हा आनंद मोठा होता.

दोसतारः शाळेत लग्न लागते २

विजुभाऊ ·

In reply to by राजेंद्र मेहेंदळे

विजुभाऊ गुरुवार, 02/26/2026 - 15:33
मला ही म्याड की असे होते. बर्‍याच जणांना दोसतार चा पुढचा भाग वाचायचा आहे, एल्प्या , टंप्या आणि विन्याची धमाल पुन्हा अनुभवायचे आहे. त्या वेळेस मुद्दाम होऊन प्रयत्न न करता सहजगत्या लिहू शकलो. त्या पात्रांची निरागसता राखून लिहीणे कितपत जमतेय माहीत नाही. पाहुया लिहायचा प्रयत्न करतोय. तुम्हा लोकांचे प्रोत्साहन आहे हे महत्वाचे.

In reply to by राजेंद्र मेहेंदळे

विजुभाऊ गुरुवार, 02/26/2026 - 15:33
मला ही म्याड की असे होते. बर्‍याच जणांना दोसतार चा पुढचा भाग वाचायचा आहे, एल्प्या , टंप्या आणि विन्याची धमाल पुन्हा अनुभवायचे आहे. त्या वेळेस मुद्दाम होऊन प्रयत्न न करता सहजगत्या लिहू शकलो. त्या पात्रांची निरागसता राखून लिहीणे कितपत जमतेय माहीत नाही. पाहुया लिहायचा प्रयत्न करतोय. तुम्हा लोकांचे प्रोत्साहन आहे हे महत्वाचे.
लेखनविषय:
लेखनप्रकार
एरवी वर्गात सर उभे असतात मुले बाकावर बसलेली असतात. आज सर खुर्चीत बसलेले होते आणि आम्ही उभे होतो. फळा असलेली भिंत जरा इकडे सरकवली असती तर आम्ही सगळ्यानी शिकवायला सुरवात केली असती. हा विचार मनात येतोय तोच शाळा सुटल्याची घंटा होते. आम्ही तसेही उभेच होतो. आणि दप्तरेही आवरलेलीच होती. सगळ्यानीच न ठरवता दप्तरे उचलली आणि पटकन वर्गाबाहेर धूम ठोकली , सरांच्या अगोदर.
मागील दुवा https://www.misalpav.com/node/53531 इतके कंटाळलो होतो की रोजच्यासारखे जित्या बोलावत असतानाही ग्राउंडवर क्रिकेट खेळायला गेलो नाही.

दोसतारः शाळेत लग्न लागते (१)

विजुभाऊ ·

दोसतार इज ब्याक!! वाचतोय आणि लवकर पुढचे भाग येउंद्या. खरेच आता झुंबर पंखा शारदा संगीत पुन्हा वाचायला पाहीजे निवांतपणे लगे रहो विजुभाउ

In reply to by कपिलमुनी

विजुभाऊ गुरुवार, 02/26/2026 - 15:29
बर्‍याच जणांना दोसतार चा पुढचा भाग वाचायचा आहे, एल्प्या , टंप्या आणि विन्याची धमाल पुन्हा अनुभवायचे आहे

In reply to by विजुभाऊ

विजुभाऊ गुरुवार, 02/26/2026 - 15:30
त्यामुळे परत सुरू करतोय. पाहुया या वेळेस ते तिघे काय काय खोड्या करतात. तुमचे प्रोत्साहन आहे हे महत्वाचे.

दोसतार इज ब्याक!! वाचतोय आणि लवकर पुढचे भाग येउंद्या. खरेच आता झुंबर पंखा शारदा संगीत पुन्हा वाचायला पाहीजे निवांतपणे लगे रहो विजुभाउ

In reply to by कपिलमुनी

विजुभाऊ गुरुवार, 02/26/2026 - 15:29
बर्‍याच जणांना दोसतार चा पुढचा भाग वाचायचा आहे, एल्प्या , टंप्या आणि विन्याची धमाल पुन्हा अनुभवायचे आहे

In reply to by विजुभाऊ

विजुभाऊ गुरुवार, 02/26/2026 - 15:30
त्यामुळे परत सुरू करतोय. पाहुया या वेळेस ते तिघे काय काय खोड्या करतात. तुमचे प्रोत्साहन आहे हे महत्वाचे.
लेखनविषय:
लेखनप्रकार
सकाळपासून वर्गातली सगळीच शांत आहेत. तो नेहमी फरफर्‍या स्टोव्ह सारखा येणारा मुलांच्या बडबडीचा आवाज ही कमी येतोय शाळेत सतत काही ना काही तरी व्हायला हवे. रोज नुसते अभ्यास ,लहान सुट्टी, मधली सुट्टी , खेळाचे तास असे करत बसलो की कंटाळा येतो. प्रत्येक तासाला काही ना काही शिकवत असतातच पण तरीही. कितीही आवडत असली तरी बटाट्याची काचर्‍याची भाजी रोज खाऊन कंटाळाच येणार की. सोबत लोणचे , कारळ्याची नाही तर लसुण खोबर्‍याची चटणी तरी हवीच. पण हे शाळेत म्हणायचे म्हंटले की भुगोलाचे भामरे सर म्हणतात. पृथ्वी गोल आहे. तुम्ही कुठूनही निघा , कोणत्याही दिशेने प्रवास करा.

मंतरलेले बेट (ऐसी अक्षरे -३९)

Bhakti ·

रामचंद्र Tue, 01/27/2026 - 17:28
नितांतसुंदर. लहानपणी कितीतरी पारायणं झाली या पुस्तकाची. आजोबांचं दुकान, त्यात येणारी गिऱ्हाईकं, वेगवेगळ्या पुस्तकांमुळे झालेले राजकीय परिणाम, नवं शतक येण्यापूर्वीची गंमतीशीर परिस्थिती... हा अप्रतिम अनुवाद त्या मानाने उपेक्षितच राहिला असं वाटतं, भा. रा. भागवतांच्या 'एक होते सरोवर'सारखा.

In reply to by रामचंद्र

Bhakti Tue, 01/27/2026 - 20:49
नवं शतक येण्यापूर्वीची गंमतीशीर परिस्थिती...
हो, जगबुडी होणार :) अगदी २००० साल सुरू होणार तेव्हाही अशाच अफवा उठल्या होत्या!

रामचंद्र Tue, 01/27/2026 - 17:28
नितांतसुंदर. लहानपणी कितीतरी पारायणं झाली या पुस्तकाची. आजोबांचं दुकान, त्यात येणारी गिऱ्हाईकं, वेगवेगळ्या पुस्तकांमुळे झालेले राजकीय परिणाम, नवं शतक येण्यापूर्वीची गंमतीशीर परिस्थिती... हा अप्रतिम अनुवाद त्या मानाने उपेक्षितच राहिला असं वाटतं, भा. रा. भागवतांच्या 'एक होते सरोवर'सारखा.

In reply to by रामचंद्र

Bhakti Tue, 01/27/2026 - 20:49
नवं शतक येण्यापूर्वीची गंमतीशीर परिस्थिती...
हो, जगबुडी होणार :) अगदी २००० साल सुरू होणार तेव्हाही अशाच अफवा उठल्या होत्या!
लेखनविषय:
लेखनप्रकार
1 "मंतरलेले बेट" हे व्यंकटेश माडगूळकरांनी अनुवादित केलेले एक अतिशय सुंदर आणि वेगळे पुस्तक आहे. मूळ इंग्रजी नाव "Big City, Little Boy" आणि लेखक Manuel Komroff.

महामाया निळावंती (ऐसी अक्षरे ३८)

Bhakti ·

अर्धवटराव Sun, 01/25/2026 - 02:01
निळावंती पुस्तकाबद्दल एक (गैर्?)समज ऐकला आहे.. ते तांत्रीक विद्येचं आरण्यक साहित्य आहे, साध्या संसारी माणसाने ते वाचलं तर त्याला वेड लागतं किंवा काहि अघटीत होतं.. असं बरच काहि. त्याच संकल्पनेवर आधारीत आहे का हे पुस्तक ?

In reply to by अर्धवटराव

Bhakti Sun, 01/25/2026 - 13:39
हो या कादंबरीत त्याच निळावंतीचे पात्र आहे.पण मेटाफिसिकल पद्धतीने लिहिली आहे.त्यामुळे निळावंती विषयीच्या अनेक शंकांचे योग्य उत्तरे मिळतात . पोथी वाचून वेड लागत ... मुळात पोथीची सिद्धी मिळ्वण्यासाठीच्या खूप अटींची पूर्तता करावी लागते. ज्या सामान्यांच्या आवाक्याच्या बाहेर आहे. आणि जरी अटी पूर्तता झाली. तरी पोथी प्रमाणित राहिली नाही. त्यात अनेक गोष्टी आल्या अनेक गायब झाल्या कायमच्या !! तेव्हा याला साक्षीदार कोणीच नाही .हे तंत्र मंत्र अघोरच करू जाणे ..

In reply to by अनन्त्_यात्री

Bhakti Tue, 01/27/2026 - 16:00
त्या निळ्या दरीच्या गर्भी घननीळ गूढसे काही नि:शब्द काफिला भोगी ती पिठुर रानभुल देही
चांदणे शिंपीत जाशी, चालता तू चंचले ओंजळी उधळीत मोती, हासरी ताराफुले... वाहती आकाशगंगा की कटीची मेखला तेजपुंजाची झळाळी तार पदरा गुंफिले... गुंतविले जीव हे मंजीर की पायी तुझ्या जे तुझ्या तालावरी बोलांवरी नादावले... गे निळावंती कशाला, झाकिसी काया तुझी पाहू दे मेघाविण सौदर्य तुझे मोकळे... -राजा बढे या गीताची आठवण मनी निळ चांदणे पेरुन गेल :) धन्यवाद!

अर्धवटराव Sun, 01/25/2026 - 02:01
निळावंती पुस्तकाबद्दल एक (गैर्?)समज ऐकला आहे.. ते तांत्रीक विद्येचं आरण्यक साहित्य आहे, साध्या संसारी माणसाने ते वाचलं तर त्याला वेड लागतं किंवा काहि अघटीत होतं.. असं बरच काहि. त्याच संकल्पनेवर आधारीत आहे का हे पुस्तक ?

In reply to by अर्धवटराव

Bhakti Sun, 01/25/2026 - 13:39
हो या कादंबरीत त्याच निळावंतीचे पात्र आहे.पण मेटाफिसिकल पद्धतीने लिहिली आहे.त्यामुळे निळावंती विषयीच्या अनेक शंकांचे योग्य उत्तरे मिळतात . पोथी वाचून वेड लागत ... मुळात पोथीची सिद्धी मिळ्वण्यासाठीच्या खूप अटींची पूर्तता करावी लागते. ज्या सामान्यांच्या आवाक्याच्या बाहेर आहे. आणि जरी अटी पूर्तता झाली. तरी पोथी प्रमाणित राहिली नाही. त्यात अनेक गोष्टी आल्या अनेक गायब झाल्या कायमच्या !! तेव्हा याला साक्षीदार कोणीच नाही .हे तंत्र मंत्र अघोरच करू जाणे ..

In reply to by अनन्त्_यात्री

Bhakti Tue, 01/27/2026 - 16:00
त्या निळ्या दरीच्या गर्भी घननीळ गूढसे काही नि:शब्द काफिला भोगी ती पिठुर रानभुल देही
चांदणे शिंपीत जाशी, चालता तू चंचले ओंजळी उधळीत मोती, हासरी ताराफुले... वाहती आकाशगंगा की कटीची मेखला तेजपुंजाची झळाळी तार पदरा गुंफिले... गुंतविले जीव हे मंजीर की पायी तुझ्या जे तुझ्या तालावरी बोलांवरी नादावले... गे निळावंती कशाला, झाकिसी काया तुझी पाहू दे मेघाविण सौदर्य तुझे मोकळे... -राजा बढे या गीताची आठवण मनी निळ चांदणे पेरुन गेल :) धन्यवाद!
लेखनविषय:
लेखनप्रकार
महामाया निळावंती लेखक-सुमेध 1 दोन वर्षांत २५ वी आवृत्ती प्रकाशित झालेली ही मराठी साहित्यातील आताची उत्कृष्ट कादंबरी आहे. जीवनाची लालसा मृत्यूला हरवायला पाहते.

कुंपण

रांचो ·
लेखनप्रकार
खडकवाडीची वस्ती गावाच्या बाहेर नव्हती. ती गावातच होती—पण जिथे रस्ता अचानक अरुंद होतो, तिथे, एका अदृश्य रेषेच्या पलीकडे. इथे सकाळ कोंबड्याच्या आरवण्याने सुरू न होता रिकाम्या हंड्यांच्या आवाजाने होत असे. भांडी एकमेकांवर आपटल्यासारखा आवाज हा पाणी भरण्याचा नव्हे, तर दिवस सुरू झाल्याची खूण देणारा होता. वस्तीकरता एक हौद आणि गावासाठी एक विहीर—अशी पिढ्यान्‌पिढ्यांची रचना होती. ती आता इतकी सवयीची झाली होती की कुणालाच ती प्रश्न वाटत नव्हती. लक्ष्मी रोज पहाटे चारला उठायची. घरात पाणी उरलं नसेल, तर तिला राग येत नसे. राग करण्याची सवयच नव्हती. हंडे आतून धुऊन ठेवायचे.

विषारी सरोवर : युधिष्ठिराची अखेर

विवेकपटाईत ·

युयुत्सु Wed, 01/21/2026 - 18:20
तहानलेलं असताना पाणी पिण्यासाठी कुणाची तरी परवानगी घ्यावी लागावी, त्या यक्षाला तहानलेल्यांची दया येऊ नये यासारखी मानवतेची क्रुर चेष्टा दुसरी नाही. एकंदरच अत्यंत टाकाऊ कथा...

In reply to by युयुत्सु

विवेकपटाईत गुरुवार, 01/22/2026 - 08:52
वैदिक काळापासून भारतात सरोवराच्या सुरक्षा साठी रक्षक नेमले जात होते. ब्रिटिश काळात पूर्वी ही सरोवरांची सुरक्षा करण्यासाठी रक्षकाचे नियुक्ती होत असे आणि सरोवराच्या पाण्याच्या हिशोबाने विभिन्न गावांना शेतीसाठी पाणीदिले जात होते. मालवा भागात पाटीदार हेच काम करायचे. बाकी सरकारी नीतीमुळे परंपरागत रक्षकांच्या अभावी गेल्या 70 वर्षात देशातील हजारो तलाव नष्ट झाले आणि शेतीसाठी पाण्याची समस्या आली. बाकी ही कथा सामान्य बुद्धीच्या लोकांसाठी आहे.

In reply to by विवेकपटाईत

स्वधर्म गुरुवार, 01/22/2026 - 17:28
>> बाकी सरकारी नीतीमुळे परंपरागत रक्षकांच्या अभावी गेल्या 70 वर्षात देशातील हजारो तलाव नष्ट झाले आणि शेतीसाठी पाण्याची समस्या आली. तेवढ्यातल्या तेवढ्यात पण काँग्रेस व गैर भाजप सरकारांना दोष द्यायची संधी साधलीत तुंम्ही. कमाल आहे. आजच बातमी आहे कि ताडोबा अंधारीतील खाणींमुळे ६० वाघांचा आधिवास धोक्यात. दुवा: https://www.loksatta.com/nagpur/habitat-of-60-tigers-is-in-danger-due-to-the-mine-in-tadoba-andhari-amy-95-5661684/ त्यात म्हटले आहे की ६ जानेवारीला तज्ञांचा विरोध डावलून मुख्यमंत्र्यांनी इथे लोखंडाच्या खाणींना परवानगी दिली. यावर आपले काय म्हणणे आहे? किमान वर्तमान सरकारचे काहीतरी गैर आहे असे एकदा तरी म्हणून आपण विचार करू शकता हे सिध्द करावे अशी कळकळीची विनंती आहे.

In reply to by स्वधर्म

टर्मीनेटर गुरुवार, 01/22/2026 - 17:51
'ताडोबा अंधारी' हे ठिकाण म्हणजे मला वाटतं नागपूर जवळच्या चंद्रपूर जिल्ह्यातले... म्हणजे डबल व्हॅमी. छे...फारच जास्ती अपेक्षा करताय राव तुम्ही 😀

In reply to by स्वधर्म

विवेकपटाईत Fri, 01/23/2026 - 08:27
हा लेख तलावांवर आहे खाणींवर नाही. बाकी ज्या राज्यात भाजप सरकार आहे त्या राज्यातही तलाव नष्ट होत आहे. रसायनिक कीटनाशक इत्यादींमुळे भाजपशासित राज्यात ही जमिनीच्या आतले पाणी विषारी होत आहे. इंदूर ही भाजप राज्यात आहे. प्रत्येक लेखात राजनीति आणू नका. लेखाचा उद्देश्य समजा. पुढे खाणींवर ही लेख टाकणार आहे त्यासाठी जर प्राचीन व संदर्भ तुमच्याकडे असेल तर त्याचा उल्लेख प्रतिसादात करा. कथा निर्मिती मी करतो.

In reply to by विवेकपटाईत

स्वधर्म Fri, 01/23/2026 - 15:57
ते 'गेल्या सत्तर वर्षात' हा वाक्प्रचार सर्वसाधारणपणे भाजप समर्थक काँग्रेसच्या काळाचा उल्लेख करण्यासाठी वापरतात. आपण गेल्या ७७ वर्षात म्हणाला असतात तर मग ते सरसकट वाटले असते. असो, पण त्या निमित्ताने भाजप शासित राज्यातही पाण्याचे प्रदूषण चालू आहे याची नोंद घेतल्याबद्दल धन्यवाद.

In reply to by युयुत्सु

कॉमी Fri, 01/23/2026 - 17:50
यक्षाला दया येण्याचा संबंध येतो कुठे ? पाणी विषारी होते म्हणून ते मेले. यक्षाच्या जादू मुळे नव्हे.

निनाद गुरुवार, 01/22/2026 - 08:58
भगवान श्रीकृष्णाच्या निधनानंतर आणि कलियुगाच्या आगमनानंतर, पांडवांनी या पृथ्वीचा त्याग करण्याचा निर्णय घेतला. हस्तिनापूरचे सिंहासन अर्जुनाचा नातू परीक्षित याच्या हाती सोपवून, युधिष्ठिर आपल्या चार भावांसह आणि द्रौपदीसह हिमालयाच्या दिशेने निघाला. त्यांच्यासोबत एक अज्ञात कुत्राही या यात्रेत सामील झाला होता. पांडवांनी एका श्वानासह हिमालयात जाण्याचा निर्णय घेतला. या काळात द्रौपदीपासून सुरुवात करून शिखरावर पोहोचण्याच्या वाटेवर एक एक पांडव मरण पावले. युधिष्ठिर मागे वळून न पाहता चालत राहिले. शेवटी युधिष्ठिर आणि श्वान उरले. तिथे प्रत्यक्ष इंद्रदेव आपला रथ घेऊन प्रकट झाले. इंद्र म्हणाले, "युधिष्ठिरा, तू सदेही स्वर्गात येण्यास पात्र आहेस, पण तुला या कुत्र्याला मागे सोडावे लागेल. स्वर्गात श्वानांना स्थान नाही." युधिष्ठिर ठामपणे म्हणाला, "हा प्राणी माझ्यासोबत शेवटपर्यंत आला आहे. याच्या निष्ठेचा त्याग करणे हे माझ्यासाठी महापाप आहे." इंद्राने आठवण करून दिली की त्याने आपल्या भावांचा आणि पत्नीचाही त्याग केला, मग या प्राण्याशी एवढा मोह का? त्यावर युधिष्ठिर म्हणाला, "माझ्या भावांचा मृत्यू अटळ होता, मी त्यांना वाचवू शकत नव्हतो. पण हा जीव श्वान जिवंत आहे आणि माझ्यावर विसंबून आहे. याला सोडून मी सुखाच्या शोधात जाणार नाही." क्षणार्धात त्या कुत्र्याचे रूपांतर यमा मध्ये झाले. युधिष्ठिराची ही पहिली परीक्षा होती, ज्यात तो उत्तीर्ण झाला. पुढे ही स्वर्ग प्राप्ती कशी झाली याच्या कथा आहेत. नरकाची प्राप्ती आणि अहंकाराचा अंत या कथेत असे मानले जाते की, हिमालयात चढताना युधिष्ठिर मागे वळून पाहत नाही कारण त्याला वाटते की त्याने सर्व नातेसंबंध तोडले आहेत. पण जेव्हा तो स्वर्गात आपल्या भावांना पाहत नाही, तेव्हा तो रागाने विचारतो. यमराज त्याला सांगतात की, "तुला वाटले तू मोह सोडला आहेस, पण तुझ्या मनात अजूनही तुझ्या भावांबद्दल प्रेम आणि कौरवांबद्दल द्वेष शिल्लक आहे. हा अहंकार आणि द्वेष तुला स्वर्गासाठी अपात्र ठरवतो." या कथेत, मनातील सुप्त रागामुळे त्याला नरकाचे दर्शन घडते.

In reply to by युयुत्सु

विवेकपटाईत Fri, 01/23/2026 - 08:13
महाभारत असा ग्रंथ आहे जो कालातीत आहे. महाभारतातून धडा घेऊन भविष्यात काय करू नये हे कळते. आज सरोवर काय तर नद्याही विषारी झालेल्या आहेत. दिल्लीच्या निगम बोध घाटावर स्नान आज श्राद्धाचे कर्म करणारे ही करत नाही.

In reply to by विवेकपटाईत

सोत्रि Fri, 01/23/2026 - 11:33
महाभारतातून धडा घेऊन भविष्यात काय करू नये हे कळते.
नियोग करावा की करू नये? - (योगी) सोकाजी

In reply to by सोत्रि

युयुत्सु Fri, 01/23/2026 - 14:50
विनोदाचा भाग सोडला तर माझ्या संस्कृतच्या (माफक) ज्ञानाप्रमाणे नियोजन, नियोग या मध्ये नि+ युज् हा धातू येतो. त्याचा अर्थ प्लॅन किंवा अरेंजमेंट असा आहे. त्यामुळे नियोग करण्यास काहीच हरकत नाही ;)

In reply to by सोत्रि

विवेकपटाईत Sun, 01/25/2026 - 08:34
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेश आहे. पुत्र कोणाही पासून झाला असेल तरी पिता हा लग्न झालेला बाप राहणार. अर्थात त्यालाच त्या मुलाचा खर्च उचलावे लागेल. याचा अर्थ आता नियोगसाठी समाज किंवा नवऱ्याच्या अनुमतीची ही गरज नाही.

In reply to by निनाद

अर्धवटराव गुरुवार, 01/22/2026 - 20:22
मूळ कथा पाण्डवांच्या निर्वाणावेळ्ची नाहि तर वनवासादरम्यानची आहे. तहानलेले भाऊ एक एक करत तळ्याचं पाणी प्यायला जातात. रक्षक यक्ष त्यांना प्रथम आपल्या प्रश्नांची उत्तरं मागतो आणी तसं न केल्यामुळे चार भावांचा मृत्यु होतो. युधिष्ठीर मात्र उत्तरं देतो. अर्थात, फिलॉसॉफीकल चर्चेला कथारूप आधार द्यायचा हा प्रयत्न आहे.

In reply to by निनाद

विवेकपटाईत Fri, 01/23/2026 - 08:10
मूळ कथे वेगळी आहे.ही कथा आजच्या संदर्भात आहे. जमिनीचे पाणी ही रासायनिक कीटनाशक इत्यादींमुळे विषारी झाले आहे. देशात अनेक भागात जमिनीचे पाणी पिण्यालायक राहिले नाही आहे. त मूळ कारण तलावांचे नष्ट होणे आहे. आमच्या दिल्लीत ही पाचशेच्या वर तलाव होते जे पावसाचे पाणी साठवायचे. तलावाच्या शेजारी स्मशान आणि जंगल असायचे. आपल्या सरकारने सत्ता कोणाचीही असो उदाहरण बिंदापूरमध्ये जंगलाच्या जमिनीवर कम्युनिटी सेंटर एक मोठे प्रसूती हॉस्पिटल एक वृद्धाश्रम, एक झुग्गी कालोनी रीसेटल केली आणि लोकांनी कब्जा करून वाल्मिकी मंदिर रविदास मंदिर एवढेच नव्हे तर संत गाडगेबाबा मंदिर ही बांधले. परिणाम वीस वर्षे आधी तलाव सुकून गेला. जमिनीचे पाणी दीडशे फूट खोल गेले आहे. हे देशात सर्वत्र झाले आहे.

मदनबाण गुरुवार, 01/22/2026 - 12:39
त्याकाळी देखी पाणी पिऊन मृत्यु मिळत असे आणि आजच्या काळात देखील पिऊन मृत्युमुखी पडत आहेत. तेव्हा यक्ष होता आता मोदी आहेत. Another Indore Man Dies Due To Contaminated Water, Number Of Deaths Now 25

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Kabhi Bekasi Ne Maara... Alag Alag ( 1985 )

In reply to by मदनबाण

विवेकपटाईत Sun, 01/25/2026 - 08:31
उत्तम नगर दिल्लीत प्रत्येक दुसऱ्या गल्लीत सीवर लाइन तुटलेली असते. दोन तीन महिन्यानंतर काही महिने पाणी ती येते. वर्षातून आठ महिने प्रदूषित पाणी येते. दिल्लीच्या सर्व अवैध कॉलोनीस मध्ये हीच दशा आहे. ( दिल्लीत ८० टक्के लोक अश्याच भागात राहतात) . जवळपास सर्वच ro पाणी पितात. सरकारने पाईपलाईन बदलण्याचा निश्चय केला तरी दहा बारा वर्ष लागतील. दिल्लीत हजारो लोक दरवर्षी दूषित पाण्यामुळे दगावले जात असतील. बाकी इंदोर स्वच्छ शहर आहे म्हणून तिथली घटना मीडियावर आली.

युयुत्सु Wed, 01/21/2026 - 18:20
तहानलेलं असताना पाणी पिण्यासाठी कुणाची तरी परवानगी घ्यावी लागावी, त्या यक्षाला तहानलेल्यांची दया येऊ नये यासारखी मानवतेची क्रुर चेष्टा दुसरी नाही. एकंदरच अत्यंत टाकाऊ कथा...

In reply to by युयुत्सु

विवेकपटाईत गुरुवार, 01/22/2026 - 08:52
वैदिक काळापासून भारतात सरोवराच्या सुरक्षा साठी रक्षक नेमले जात होते. ब्रिटिश काळात पूर्वी ही सरोवरांची सुरक्षा करण्यासाठी रक्षकाचे नियुक्ती होत असे आणि सरोवराच्या पाण्याच्या हिशोबाने विभिन्न गावांना शेतीसाठी पाणीदिले जात होते. मालवा भागात पाटीदार हेच काम करायचे. बाकी सरकारी नीतीमुळे परंपरागत रक्षकांच्या अभावी गेल्या 70 वर्षात देशातील हजारो तलाव नष्ट झाले आणि शेतीसाठी पाण्याची समस्या आली. बाकी ही कथा सामान्य बुद्धीच्या लोकांसाठी आहे.

In reply to by विवेकपटाईत

स्वधर्म गुरुवार, 01/22/2026 - 17:28
>> बाकी सरकारी नीतीमुळे परंपरागत रक्षकांच्या अभावी गेल्या 70 वर्षात देशातील हजारो तलाव नष्ट झाले आणि शेतीसाठी पाण्याची समस्या आली. तेवढ्यातल्या तेवढ्यात पण काँग्रेस व गैर भाजप सरकारांना दोष द्यायची संधी साधलीत तुंम्ही. कमाल आहे. आजच बातमी आहे कि ताडोबा अंधारीतील खाणींमुळे ६० वाघांचा आधिवास धोक्यात. दुवा: https://www.loksatta.com/nagpur/habitat-of-60-tigers-is-in-danger-due-to-the-mine-in-tadoba-andhari-amy-95-5661684/ त्यात म्हटले आहे की ६ जानेवारीला तज्ञांचा विरोध डावलून मुख्यमंत्र्यांनी इथे लोखंडाच्या खाणींना परवानगी दिली. यावर आपले काय म्हणणे आहे? किमान वर्तमान सरकारचे काहीतरी गैर आहे असे एकदा तरी म्हणून आपण विचार करू शकता हे सिध्द करावे अशी कळकळीची विनंती आहे.

In reply to by स्वधर्म

टर्मीनेटर गुरुवार, 01/22/2026 - 17:51
'ताडोबा अंधारी' हे ठिकाण म्हणजे मला वाटतं नागपूर जवळच्या चंद्रपूर जिल्ह्यातले... म्हणजे डबल व्हॅमी. छे...फारच जास्ती अपेक्षा करताय राव तुम्ही 😀

In reply to by स्वधर्म

विवेकपटाईत Fri, 01/23/2026 - 08:27
हा लेख तलावांवर आहे खाणींवर नाही. बाकी ज्या राज्यात भाजप सरकार आहे त्या राज्यातही तलाव नष्ट होत आहे. रसायनिक कीटनाशक इत्यादींमुळे भाजपशासित राज्यात ही जमिनीच्या आतले पाणी विषारी होत आहे. इंदूर ही भाजप राज्यात आहे. प्रत्येक लेखात राजनीति आणू नका. लेखाचा उद्देश्य समजा. पुढे खाणींवर ही लेख टाकणार आहे त्यासाठी जर प्राचीन व संदर्भ तुमच्याकडे असेल तर त्याचा उल्लेख प्रतिसादात करा. कथा निर्मिती मी करतो.

In reply to by विवेकपटाईत

स्वधर्म Fri, 01/23/2026 - 15:57
ते 'गेल्या सत्तर वर्षात' हा वाक्प्रचार सर्वसाधारणपणे भाजप समर्थक काँग्रेसच्या काळाचा उल्लेख करण्यासाठी वापरतात. आपण गेल्या ७७ वर्षात म्हणाला असतात तर मग ते सरसकट वाटले असते. असो, पण त्या निमित्ताने भाजप शासित राज्यातही पाण्याचे प्रदूषण चालू आहे याची नोंद घेतल्याबद्दल धन्यवाद.

In reply to by युयुत्सु

कॉमी Fri, 01/23/2026 - 17:50
यक्षाला दया येण्याचा संबंध येतो कुठे ? पाणी विषारी होते म्हणून ते मेले. यक्षाच्या जादू मुळे नव्हे.

निनाद गुरुवार, 01/22/2026 - 08:58
भगवान श्रीकृष्णाच्या निधनानंतर आणि कलियुगाच्या आगमनानंतर, पांडवांनी या पृथ्वीचा त्याग करण्याचा निर्णय घेतला. हस्तिनापूरचे सिंहासन अर्जुनाचा नातू परीक्षित याच्या हाती सोपवून, युधिष्ठिर आपल्या चार भावांसह आणि द्रौपदीसह हिमालयाच्या दिशेने निघाला. त्यांच्यासोबत एक अज्ञात कुत्राही या यात्रेत सामील झाला होता. पांडवांनी एका श्वानासह हिमालयात जाण्याचा निर्णय घेतला. या काळात द्रौपदीपासून सुरुवात करून शिखरावर पोहोचण्याच्या वाटेवर एक एक पांडव मरण पावले. युधिष्ठिर मागे वळून न पाहता चालत राहिले. शेवटी युधिष्ठिर आणि श्वान उरले. तिथे प्रत्यक्ष इंद्रदेव आपला रथ घेऊन प्रकट झाले. इंद्र म्हणाले, "युधिष्ठिरा, तू सदेही स्वर्गात येण्यास पात्र आहेस, पण तुला या कुत्र्याला मागे सोडावे लागेल. स्वर्गात श्वानांना स्थान नाही." युधिष्ठिर ठामपणे म्हणाला, "हा प्राणी माझ्यासोबत शेवटपर्यंत आला आहे. याच्या निष्ठेचा त्याग करणे हे माझ्यासाठी महापाप आहे." इंद्राने आठवण करून दिली की त्याने आपल्या भावांचा आणि पत्नीचाही त्याग केला, मग या प्राण्याशी एवढा मोह का? त्यावर युधिष्ठिर म्हणाला, "माझ्या भावांचा मृत्यू अटळ होता, मी त्यांना वाचवू शकत नव्हतो. पण हा जीव श्वान जिवंत आहे आणि माझ्यावर विसंबून आहे. याला सोडून मी सुखाच्या शोधात जाणार नाही." क्षणार्धात त्या कुत्र्याचे रूपांतर यमा मध्ये झाले. युधिष्ठिराची ही पहिली परीक्षा होती, ज्यात तो उत्तीर्ण झाला. पुढे ही स्वर्ग प्राप्ती कशी झाली याच्या कथा आहेत. नरकाची प्राप्ती आणि अहंकाराचा अंत या कथेत असे मानले जाते की, हिमालयात चढताना युधिष्ठिर मागे वळून पाहत नाही कारण त्याला वाटते की त्याने सर्व नातेसंबंध तोडले आहेत. पण जेव्हा तो स्वर्गात आपल्या भावांना पाहत नाही, तेव्हा तो रागाने विचारतो. यमराज त्याला सांगतात की, "तुला वाटले तू मोह सोडला आहेस, पण तुझ्या मनात अजूनही तुझ्या भावांबद्दल प्रेम आणि कौरवांबद्दल द्वेष शिल्लक आहे. हा अहंकार आणि द्वेष तुला स्वर्गासाठी अपात्र ठरवतो." या कथेत, मनातील सुप्त रागामुळे त्याला नरकाचे दर्शन घडते.

In reply to by युयुत्सु

विवेकपटाईत Fri, 01/23/2026 - 08:13
महाभारत असा ग्रंथ आहे जो कालातीत आहे. महाभारतातून धडा घेऊन भविष्यात काय करू नये हे कळते. आज सरोवर काय तर नद्याही विषारी झालेल्या आहेत. दिल्लीच्या निगम बोध घाटावर स्नान आज श्राद्धाचे कर्म करणारे ही करत नाही.

In reply to by विवेकपटाईत

सोत्रि Fri, 01/23/2026 - 11:33
महाभारतातून धडा घेऊन भविष्यात काय करू नये हे कळते.
नियोग करावा की करू नये? - (योगी) सोकाजी

In reply to by सोत्रि

युयुत्सु Fri, 01/23/2026 - 14:50
विनोदाचा भाग सोडला तर माझ्या संस्कृतच्या (माफक) ज्ञानाप्रमाणे नियोजन, नियोग या मध्ये नि+ युज् हा धातू येतो. त्याचा अर्थ प्लॅन किंवा अरेंजमेंट असा आहे. त्यामुळे नियोग करण्यास काहीच हरकत नाही ;)

In reply to by सोत्रि

विवेकपटाईत Sun, 01/25/2026 - 08:34
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेश आहे. पुत्र कोणाही पासून झाला असेल तरी पिता हा लग्न झालेला बाप राहणार. अर्थात त्यालाच त्या मुलाचा खर्च उचलावे लागेल. याचा अर्थ आता नियोगसाठी समाज किंवा नवऱ्याच्या अनुमतीची ही गरज नाही.

In reply to by निनाद

अर्धवटराव गुरुवार, 01/22/2026 - 20:22
मूळ कथा पाण्डवांच्या निर्वाणावेळ्ची नाहि तर वनवासादरम्यानची आहे. तहानलेले भाऊ एक एक करत तळ्याचं पाणी प्यायला जातात. रक्षक यक्ष त्यांना प्रथम आपल्या प्रश्नांची उत्तरं मागतो आणी तसं न केल्यामुळे चार भावांचा मृत्यु होतो. युधिष्ठीर मात्र उत्तरं देतो. अर्थात, फिलॉसॉफीकल चर्चेला कथारूप आधार द्यायचा हा प्रयत्न आहे.

In reply to by निनाद

विवेकपटाईत Fri, 01/23/2026 - 08:10
मूळ कथे वेगळी आहे.ही कथा आजच्या संदर्भात आहे. जमिनीचे पाणी ही रासायनिक कीटनाशक इत्यादींमुळे विषारी झाले आहे. देशात अनेक भागात जमिनीचे पाणी पिण्यालायक राहिले नाही आहे. त मूळ कारण तलावांचे नष्ट होणे आहे. आमच्या दिल्लीत ही पाचशेच्या वर तलाव होते जे पावसाचे पाणी साठवायचे. तलावाच्या शेजारी स्मशान आणि जंगल असायचे. आपल्या सरकारने सत्ता कोणाचीही असो उदाहरण बिंदापूरमध्ये जंगलाच्या जमिनीवर कम्युनिटी सेंटर एक मोठे प्रसूती हॉस्पिटल एक वृद्धाश्रम, एक झुग्गी कालोनी रीसेटल केली आणि लोकांनी कब्जा करून वाल्मिकी मंदिर रविदास मंदिर एवढेच नव्हे तर संत गाडगेबाबा मंदिर ही बांधले. परिणाम वीस वर्षे आधी तलाव सुकून गेला. जमिनीचे पाणी दीडशे फूट खोल गेले आहे. हे देशात सर्वत्र झाले आहे.

मदनबाण गुरुवार, 01/22/2026 - 12:39
त्याकाळी देखी पाणी पिऊन मृत्यु मिळत असे आणि आजच्या काळात देखील पिऊन मृत्युमुखी पडत आहेत. तेव्हा यक्ष होता आता मोदी आहेत. Another Indore Man Dies Due To Contaminated Water, Number Of Deaths Now 25

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Kabhi Bekasi Ne Maara... Alag Alag ( 1985 )

In reply to by मदनबाण

विवेकपटाईत Sun, 01/25/2026 - 08:31
उत्तम नगर दिल्लीत प्रत्येक दुसऱ्या गल्लीत सीवर लाइन तुटलेली असते. दोन तीन महिन्यानंतर काही महिने पाणी ती येते. वर्षातून आठ महिने प्रदूषित पाणी येते. दिल्लीच्या सर्व अवैध कॉलोनीस मध्ये हीच दशा आहे. ( दिल्लीत ८० टक्के लोक अश्याच भागात राहतात) . जवळपास सर्वच ro पाणी पितात. सरकारने पाईपलाईन बदलण्याचा निश्चय केला तरी दहा बारा वर्ष लागतील. दिल्लीत हजारो लोक दरवर्षी दूषित पाण्यामुळे दगावले जात असतील. बाकी इंदोर स्वच्छ शहर आहे म्हणून तिथली घटना मीडियावर आली.
लेखनविषय:
लेखनप्रकार
बराच वेळ वाट पाहून अखेर युधिष्ठिर आपल्या भावंडांना शोधायला निघाला. दूर-दूर पसरलेल्या वाळवंटात एकही वृक्ष दिसत नव्हता. सूर्य आग ओकत होता. तहानेने त्याचा गळा कोरडा पडला होता. अखेर त्याला वाळवंटात दूर एक सरोवर दिसले. "आता पाणी मिळेल, तहान भागेल," या आशेने तो त्वरित सरोवराजवळ पोहोचला. पाहतो काय, भीम, अर्जुन, नकुल आणि सहदेव सरोवराच्या काठावर निष्प्राण पडलेले! हे दृश्य पाहून युधिष्ठिर व्यथित झाला. त्रिलोक विजयी भीम आणि अर्जुनाची अशी अवस्था कुणी केली असावी? बहुतेक सरोवराचा रक्षक यक्ष असावा.

सैरभैर डायरी - २.४

कपिलमुनी ·

गवि Fri, 01/16/2026 - 16:49
फायनल साक्ष नेमकी काय झाली? उस्मानचे नाव घेतले? तसे वाटते आहे. तरीही कोणाकडून काही पीडा झाली नाही हे सुदैवच. या भागात काहीसं कन्फ्युजन झालं खरं. पण आवडलं. सॉरी.. ही चुकीची भाषा..खाली पुन्हा लिहीतो ;-) फायनल साक्षीत नेमका काय झाला? उस्मानचा नाव घेतला? तसाच वाटला मला वाचून. तरीही कोणाकडून काही कॉल आला नाही हा साला चांगला नशीबच म्हणायचा. हा भाग संपला की कथा संपली? कथेच्या या भागात काहीसा कन्फ्युजन झाला खरा. पण आपल्याला आवडला..

In reply to by गवि

कपिलमुनी Fri, 01/16/2026 - 19:54
जसा होता तसा खरा जबाब दिला. पुढे मेडिकल ऑफिसर ,पोलिस आणि मुलीचे आईबाप सगळ्यांनी पैसे घेऊन केस दाबली. आपल्याकडे फक्त खरे बोलल्याचे समाधान राहिले.

अभ्या.. Sun, 01/25/2026 - 18:06
एकच नंबर लेखन झाले आहे मुनी. . डायरी येऊ द्या जितकी आहे तितकी.

सौंदाळा Tue, 01/27/2026 - 21:51
दमदार लिखाण बहुतांश मध्यमवर्गीय पापभीरु लोकांनी असेच केले असते.

अस्वस्थामा Fri, 01/30/2026 - 06:06
जबरदस्त गुगली आम्हाला मुनी! कथा चांगलीच रंगलेली, अजून उत्कंठा वाढवत नेली असतीत तरी काही हरकत नसती हो. :)

गवि Fri, 01/16/2026 - 16:49
फायनल साक्ष नेमकी काय झाली? उस्मानचे नाव घेतले? तसे वाटते आहे. तरीही कोणाकडून काही पीडा झाली नाही हे सुदैवच. या भागात काहीसं कन्फ्युजन झालं खरं. पण आवडलं. सॉरी.. ही चुकीची भाषा..खाली पुन्हा लिहीतो ;-) फायनल साक्षीत नेमका काय झाला? उस्मानचा नाव घेतला? तसाच वाटला मला वाचून. तरीही कोणाकडून काही कॉल आला नाही हा साला चांगला नशीबच म्हणायचा. हा भाग संपला की कथा संपली? कथेच्या या भागात काहीसा कन्फ्युजन झाला खरा. पण आपल्याला आवडला..

In reply to by गवि

कपिलमुनी Fri, 01/16/2026 - 19:54
जसा होता तसा खरा जबाब दिला. पुढे मेडिकल ऑफिसर ,पोलिस आणि मुलीचे आईबाप सगळ्यांनी पैसे घेऊन केस दाबली. आपल्याकडे फक्त खरे बोलल्याचे समाधान राहिले.

अभ्या.. Sun, 01/25/2026 - 18:06
एकच नंबर लेखन झाले आहे मुनी. . डायरी येऊ द्या जितकी आहे तितकी.

सौंदाळा Tue, 01/27/2026 - 21:51
दमदार लिखाण बहुतांश मध्यमवर्गीय पापभीरु लोकांनी असेच केले असते.

अस्वस्थामा Fri, 01/30/2026 - 06:06
जबरदस्त गुगली आम्हाला मुनी! कथा चांगलीच रंगलेली, अजून उत्कंठा वाढवत नेली असतीत तरी काही हरकत नसती हो. :)
लेखनविषय:
लेखनप्रकार
२.१ २.२ २.३ ज्याचा पगार ७००० आहे.त्याला एकरकमी २ लाख म्हणजे मोठी रक्कम होती. बुलेटची डुग डुग कानात ऐकू यायला लागली होती. २.४ विचार करून सांगतो म्हणून बाहेर सटकलो. बिल्डरला प्रत्यक्ष बघणारा मी एकमेव साक्षीदार होतो , माझ्या साक्षीवर केस बरीच पुढे जाणार होती . पोलिसांना मोठा रीमांड मिळाला असता म्हणून ही गुळपट्टी लावणे चालले होते. उगाच माझ्या मागे झा*उपट ! असला रोज रोज थोडी आपल्या आयुष्यात घडते ?