कथा

आमची पन्नासावी लग्नगांठ

आमची पन्नासावी लग्नगांठ

"एव्हडी वर्ष लग्न टिकून रहाण्याचं एक कारण म्हणजे एकमेकाला वाढू देणं,बदलू देणं."

"गेली पन्नास वर्ष एकाच व्यक्ति बरोबर प्रेमाने राहिलो" असे उद्गार तोंडून यावेत हिच मुळी लगन्नाच्या जीवनाची केव्हडी मोठी देणगी-म्हणजे गीफ्ट- असावी. एखाद्दया तरूण जोडप्याला प्रेम करताना पहाणं हे डोळ्यांना नक्कीच आनंददायी वाटतं, पण एखाद्दया वृद्ध जोडप्याला तसं पहाणं हे एक खरोखरचं भाग्य म्हटलं पाहिजे.
पन्नास वर्ष एकमेकाशी नातं ठेवून रहाणं हेच जणू सन्मानाचं कारण आहे.पन्नास वर्षाच्या लग्नगांठीची-म्हणजे ऍनिव्हर्सरीची-आठवण म्हणजेच प्रेमाची आठवण, एकमेकावरच्या विश्चासाची आठवण, एकमेकाच्या सहभागाची आठवण,सहनशक्तिची आठवण, चिकाटीची आठवण आहे.
आणि ह्या सर्व आठवणी जीवनाच्या प्रत्येक वर्षाला मागे पुढे होवू शकतात.
इतके वर्ष रहाणं म्हणजेच एकमेकाच्या स्वभावाचं परिवर्तन होत असताना, एकात दुसरं मिसळून जाणं आणि त्यामुळे एक-दुसऱ्याला आणखी चांगलं करणं असं म्हणता येईल.

एखादं अपक्व-म्हणजेच इममॅच्यूर-प्रेम म्हणतं,
"मी तुझ्यावर प्रेम करतो कारण मला तुझी जरूरी आहे म्हणून."
परंतु पक्व प्रेम म्हणतं,"
मला तुझी जरूरी आहे कारण मी तुझ्यावर प्रेम करतो."
एव्हडी वर्ष लग्न टिकून रहाण्याचं एक कारण म्हणजे एकमेकाला वाढू देणं,बदलू देणं.

१२ जून १९५८ साली माझी पत्नी माझ्या घरी आपलं रहातं घर सोडून आली.किती कठीण आहे हे असं करणं. किती विश्वास होता तिचा. आपल्या आईवडीलाना मागेवळून पहाताना क्षणभर दुःखाने डोळे भरून यावेत आणि मान फिरवून समोर दुसऱ्या क्षणी पहाताना त्याच डोळ्यात भविष्यातल्य़ा सुखाचं तेज भरून यावं.
काय हा विपर्यास!

"माझा होशिल का
वसंत काली वनी दिनांती
एकच पुसिते तुज एकांती
एकांती कर कोमल माझा
हाती घेशील का"

ह्या गाण्याची आठवण एव्हड्या साठीच झाली की पन्नास वर्षापुर्वी आम्ही पण तरूण होतो ना!.
मी पंचविस वर्षाचा होतो आणि पत्नी एकविस वर्षाची होती.ती आणि मी त्यावेळी कशी दिसायचो हे फक्त ह्यावेळी आमची स्मरणशक्तिच सांगू शकते.त्यावेळी "माझा होशिल का" हे गाणं पण प्रसिद्ध होतं. त्याची आठवण आज प्रकर्षाने आली.

निसर्गातल्या अनेक गोष्टीमधे मला समुद्राने खूपच आकर्षित केलं.अशा ह्या समुद्र्रुपी संसारात मी आणि माझ्या पत्नीने पन्नास वर्षापुर्वी होडी टाकली आणि प्रवासाला निघालो.तो अथांग सागर समोर पाहून मोठ्या विश्वासाने मोठ्या जिद्दीने दोघानी हातात वल्हं घेतली आणि मागे न पहाता होडी वल्हवायला लागलो. प्रवासात बरोबर आईवडिलांच्या आणि थोरामोठ्यांच्या आशिर्वादाची,आमच्या भविष्या बद्दलच्या विश्वासाची, वाटेत येऊ घातलेल्या वादळांच्या शक्यतेची, आनंदी क्षणांच्या आशेची,पडले तरी कष्ट झेलण्याची, आणि समोर दिसणाऱ्या भव्य क्षितीजाकडे झेप घेण्याची मोठी पुरचुंडी घेवून प्रवासाला निघालो. आमच्या बरोबर अनेकांच्या अशाच होड्या होत्या.हसत खेळत,चर्चा करत जो तो क्षितीजाचाच वेध घेवून वल्हवत होता.
कधी समुद्र शांत असायचा,कधी खवळायचा,कधी लाटा यायच्या,कधी वारा बेफाम व्हायचा,कधी छोटी छोटी वादळं यायची,कधी कधी वाऱ्याच्या दिशेने शिडाची दिशा बदलावी लागायची.पण तरी सुद्धा समुद्र खुषीत दिसायचा.त्याला धीर नसायचा.आमच्या होडीला तो ठरू देत नव्हता.तो होडीला धरू बघायचा.समुद्राचं पाणी हिरवं हिरवं पांचू सारखं दिसायचं.आणि सफेद फेसाची त्याच्यावर खळबळ असायची.मास्यांसारखीच आमच्या काळजांची तळमळ व्हायची.आमची होडी हा समुद्र खाली-वर ओढायचा.

"आला खुषीत समिंदर
त्याला नाही धीर
होडीला बघतो ग धरू
ग!सजणी होडीला देई ना ठरू"

ह्या गाण्याची प्रकर्षाने आठवण यायची.
प्रवासात एक पुत्ररत्न आणि एक कन्यारत्न झालं. प्रवासात उमेद आली.कष्ट पडत होते, अडचणी येत होत्या,भिती वाटायची,पण शांत समुद्रात कधी भविष्याची स्वप्न पडायची.सहप्रवासात कधी होड्याना होड्या लागायच्या,हंसत खेळत गुंता सोडवायचा.कधी थकवा यायचा पण भरंवसा प्रचंड असायचा. कधी कधी होडीत बाहेरून पाणी यायचं,सर्व मिळून त्याचा उपसा करायचा.मुलांची मदत व्हायची.नंतर काही होड्या किनाऱ्याकडे परत फिरल्या आमची पाळी आली त्यावेळी आम्ही दोघानी पण परत फिरायचं ठरवलं. कारण आता मुलं मोठी झाली होती.त्यांच्या पण आता होड्या तयार करायच्या होत्या.त्यांच्या होड्या तयार झाल्या.त्याना घेवून पुन्हा समुद्राच्या दिशेने प्रवास चालू केला.आता आमच्या होडीत आम्ही दोघंच होतो.प्रवास चालूच होता.मिळूनच प्रवासाला निघालो होतो.कुणी मागे तर कुणी पुढे.पण एकमेकांच्या दृष्टीक्षेपात होतो.जवळ जरी असलो तरी प्रत्येकाला आपआपल्या होडीतच दिवस काढायचे असतात.मागे वळून वळून मुलांच्या होड्या नीट चालल्या आहेत पाहून बरं वाटायचं.कधी कधी मनात काळजी पण वाटायची.
ते वसंत ऋतुचे दिवस होते.
"जीवनात ही घडी अशीच राहूदे.
प्रीतिच्या फूलावरी वसंत नाचू दे."
असं गाणं मनात गुण्गुण करायचं.

सुरवातीला समुद्रात आल्यावर किती प्रवास केला ह्याचा हिशोब करता यायचा.मध्य समुद्रात आल्यावर सुद्धा क्षितीज अजून दूरच वाटायचं. अजून किती पल्ला गांठायचा आहे कोण जाणे. मुलांच्या होड्या जवळच असल्याने धीर सुटत नव्हता.पण एकदा एकाएकी एक मोठी लाट येऊन आमची होडी जवळ जवळ उलटणार होती. मुलांनी आणि अगदी जवळच्या नातेवाईकानी होडी उलटण्या पासून वाचवली.पण तोपर्यंत त्या लाटेचा फटका माझ्या पत्नीला बसला.जवळ जवळ तिचा पुनर्जन्म झाला.त्यावेळी हे गाणं रेडिओवर ऐकलं की मन खूप भाबडं व्हायचं.
" भातुकलेच्या खेळामधली राजा आणिक राणी अर्ध्यावरती डाव मोडला अधुरी एक कहाणी "

बिचारी गेली सतरा वर्ष तो फटका सहन करून उमेदीत जगत आहे.आयुष्य हे असंच असतं.
"मी कुणाचं वाईट केलं की देवाने मला ही शिक्षा देली.?"
असं ती मला म्हणते.
"पण माणसाचं सर्वच काही मनासारखं होत नसतं. देवाने "आशा" नावाची एक माणसाला क्षमता दिली आहे.त्याच्या वर आपण जगूया"
असं मी तिला नेहमी म्हणतो. ती तशी जगत आहे.हे घेण्यासारखं आहे.

हळू हळू आता होडी वल्हवण्याचा पुर्वीचा जोर राहिला नाही.आणि ते स्वाभाविकच आहे.शिडांत हवा भरली तरी आता शिडाच्या शिवणीतून हवा बाहेर जावू लागली आहे.कारण आता शिडाची शिवण सुद्धा कोरम होत चालली आहे.त्या भयानक रात्रीच्या शांत समुद्रात भयभयीत व्हायला होतं.मागे वळून पाहिल्यावर त्या कीर्र काळोखात मुलांच्या आणि आजूबाजूच्या होड्यातले मिणमिणते दिवे बघून मनात धीर येतो.पन्नास वर्षांची सोबत, म्हणजेच सहाशे महिन्यांची सोबत, म्हणजेच अठरा हजार दिवसांची सोबत,हे पाहून मन शांत होतं.आणि आमच्याच होडीत निवांत वेळी कधी कधी मी माझ्या पत्नीला विचारतो,
"उद्दया कसं होणार?"
आणि ती पण कधी कधी मला सहाजिकच म्हणते
"उद्दया कसं होणार?"

तेव्हां मी तिला म्हणतो,
आज हा कालचा उद्दया होता.आणि हाच आज उद्दयाचा काल होईल.आणि असंच आज, काल, उद्दया होतच रहाणार आहेत. तेव्हां,
"आता कशाला उद्दयाची बात
बघ उडून चालली रात
आता कशाला कशाला उद्दयाची बात
बघ उडुनी चालली रात
भर भरूनी पिऊ
रस रंग नऊ
चल
बुडुनी जाऊ रंगात
आता कशाला उद्दयाची बात"
तेव्हां सर्वांच्या शुभेच्छावर आता आमचा उद्या आहे.

श्रीकृष्ण सामंत

औद्योगीक इसापनीती भाग चार (शेवटचा) - गाढव, रानडुक्कर, घुबड, कोल्हा आणि सिंह

भाग एक- http://www.misalpav.com/node/2330
भाग दोन- http://www.misalpav.com/node/2345
भाग तीन- http://www.misalpav.com/node/2363

औद्योगीक इसापनीती भाग तीन - गाढव, रानडुक्कर, घुबड, कोल्हा आणि सिंह

एका जंगलात एक सिंह आपल्या कळपाबरोबर रहात होता. कळपातील सिंहीणी रोज त्याच्यासाठी शिकार करून आणत. एक दिवस दुसर्‍या एका सिंहाने त्याला कळपातून हुसकावून लावले. तेव्हा तो सिंह रानामधे एकटाच राहू लागला. शिकार आणण्यासाठी त्याने एक गाढव, एक रानडूक्कर, एक घुबड आणि एक कोल्हा असे चार मदतनीस कामास लावले. तेही राजाकडे काम मिळते आहे म्हणून तयार झाले. सिंहाला वाटले की या प्रत्येकाची वैशिष्टे एकत्र येवून भरपूर शिकार मिळेल.

गढव दिवसभर रानात चरत फिरायचे. चरायचा कंटाळा आला की लोळत पडायचे. खुशीत आले की दोनचार तानाबिना मारून सर्वांची करमणूक करायचे. सिंह त्याच्याकडे एक आळशी पण गमतीदार प्राणी म्हणून बघायचा. चमूला मनोरंजन येवढाच त्याचा उपयोग होता.

रानडुक्कर शिकार दिसली रे दिसली की तिच्यामागे सुसाट धावत सुटे. त्याला फक्त सरळ रेषेत धावणे जमायचे. गरज पडलीच तर अचानक पावित्रा बदलून शिकार पकडण्याची कला त्याला माहीत नव्हती. जर शिकार यदाकदाचित तावडीत आलीच, तर धडाधड धडका देउन तिला पाडणे येवधेच त्याला माहीत होते. ह्या धकाधकीत रनडुक्कर खूप काम करून थकून जायचे. हा मूर्ख प्राणी सतत कही उपयोगी, काही निरूपयोगी उद्योगात असतो येवढीच माफक माहिती सिंहाला त्याच्याविषयी होती.

घुबड आपले सतत चिंतामग्न बसून असायचे. त्याला उडतांना किंवा काम करतांना कोणीच पाहिले नसावे. चुपचाप एका जागी बसून, डोळे शुन्यात लावून विचार करीत असायचे. कामाच्या चिंतेने रात्रभर झोपायचे नाही. सिंहाला त्याचा एकूण आभास एखाद्या अभ्यासू विचारवंताचा वाटायचा.

सिंहाचा सर्वात विश्वासू मात्र कोल्हाच होता. त्याच्या समयोचित सल्ल्यावर सिंह अवलंबून रहायचा. कोल्हा नेहमीच सिंहाच्या कानाशी लागलेला असायचा. आपल्याला सिंहाची कसी काळजी वाटते, त्याचा पुर्वीचा कळप परत कसा मिळवता येईल वगैरे गुजगोष्टी सिंहाशी बोलत रहायचा. हा काय सारखी कानाफुसी करत असतो हे कोणालाच कळायचे नाही. पण सिंहाचा विश्वासू म्हणून दबदबा असल्याने बाकी चमू त्याला घाबरून होती.

एकदा जंगलामधे वणवा पेटला. जंगल सोडून जायची वेळ आली. त्यावेळी आळशी गाढव व मूर्ख रानडूक्कराला पेटलेल्या जंगलात सोडून, विचारी घुबड आणि विश्वासू कोल्हा या दोघांना घेऊन सिंह दुसर्‍या जंगलात निघून गेला.

बोध-
आराम नव्हे, काम कर.
काम नव्हे, कामाची फिक्र कर.
फिक्र देखील नव्हे, फिक्रची जिक्र कर.
गृहपाठ-
१) आपापल्या जंगलातील गाढव, रानडुक्कर, घुबड, कोल्हा आणि सिंह ओळखा, आणि तेच का निवडले ह्याची कारणे द्या.
२) औद्योगीक इसापनीती साठी पुढचे भाग लिहा

"लाला! मी पास की नापास? "

लाला हा जन्माने मुसलमान होता असावा.बुटकीशी व्यक्ति,जेमतेम साडेचार फुट उंची,डोक्याला गुंडाळलेली पगडी (मुंडासे),खाली तोटके धोतर,वरती एक सदरा, रस्त्यातून चालताना मोकळे पाय,हातात आधाराला दांडका त्याची उंची थोडी त्याच्यापेक्षा जास्त,तोंड सतत पान खावून लाल दिसणारे,तिच तोंडातली लाल थुंकी दोन्ही बाजुच्या ओठाच्या फटीतून खाली ओघळणारी, मान सतत रस्त्याकडे खाली झुकलेली,चेहऱ्यावर दाढीचे खुंट,अशी ही व्यक्ति वेंगुर्ल्याच्या मेनरोड वरून सकाळी, मध्यांनी आणि तिन्हीसांजा झाल्यावर चालत जाताना हटकून दिसायची.वाटलंतर त्याला जाताना पाहून, दिवसाची घटका कळायला कठीण होत नसे.

वेंगुर्ल्याचे लाल मातीचे त्यावेळचे रस्ते आणि सतत पानाचा तोबरा लालाच्या तोंडात असल्याने,त्याचे कपडे वर पासून खाली पर्यंत लाल झालेले असायचे.तोंडातून ओघळणारी थुंकी अधून मधून कपड्याला फुसायच्या संवयीमुळेपण, त्याचे कपडे लाल दिसायला भर पडायची.
" जुम्मेके जुम्मे " न्हाण्याची संवय असल्याने पुढल्या शनिवारी तेव्हडे ते त्याचे कपडे पांढरे शुभ्र दिसायचे.

वेंगुर्ल्याच्या बंदराच्या दिशेने मार्केटच्या अगोदर उजव्या बाजूला डोंगराकडे चढत जाणाऱ्या रस्त्याच्या दिशेने अगदी वर गेल्यावर रस्ता संपतो,त्याच्या उजव्या बाजूच्या डोंगराच्या सपाटीवर तांबळेश्वराचं मंदीर आहे. त्याच्या उजव्या बाजूला उतरणीवर गांवाचं स्मशान
आहे.ह्या स्मशाना जवळ एका पडक्या झोपडीत लालाचा,
रात्रीचा झोपण्यासाठी मुक्काम असायचा. त्या स्मशानशांततेच्या एकांताच्या परिसरात लाला कसा राहायचा हे, गावातल्या लोकांचे भयभयीत आश्चर्य असायचं.त्यावेळच्या आमच्या लहान वयांत तर लालाला
दिवसा रस्त्यावर पाहून देवचार भुताटकीचा प्रतिनिधी असावा असंच वाटायचं.दिवसा प्रेतं जाळायला येणाऱ्या लोकाना लालाची झोपडी रिकामीच दिसायची,आत डोकावून पाहिल्यावर ईतःस्था पडलेली ऍल्युमिनीयमची
कळकटलेली भांडी पातेल्या,लोटा आणि सुंभाच्या दांडीवर लटकणारी एकदोन लक्तरं दिसायची.मात्र रात्रीची प्रेतं घेवून येणाऱ्याना रात्री बारा नंतर लाला आत घोरत पडलेला दिसायचा.तो स्मशानाकडे ढुंकूनसुद्धा पहात नसे,असं नियमीत स्मशानयात्रेला जाणारे लोक म्हणायचे.तसंच प्रेत-संस्कार झाल्यावर लोकं निघून गेल्यावर ईकडे तिकडे पडलेले सामानसुमान, कपडेलत्ते पाहून लाला कशालाही हात लावत नसे.तो निरपेक्ष,निराधार,निस्पृह असावा असं लोकाच मत, त्याच्या विषयी पक्कं झालं होतं.कधी तरी तापाने फणफणला असेल तर " अल्ला,अल्ला " असं ओरडल्याचं कुणी तरी ऐकणारे सांगतात ह्या एकाच शब्दावरून लाला मुसलमान असावा अश्या निर्णयाला लोक आले होते.रस्त्यावरून फिरत असताना तसा तो अल्पभाषीच होता.एखाददुसरा शब्द कुणी ऐकला तर तो मराठीत,मालवणीत किंवा "अच्छा " असा उर्दूत असायचा त्यामुळे रस्त्यावर पहाणारे लोक लालाला मुसलमान संमजायचं की काय समजायचं ह्याच्या संभ्रमात असायंचे.त्याच्या धर्माचा विषय ओघाओघाने पुढे येणारच आहे.

सकाळी खाली गावात आल्यावर थेट तुळसुली गावापर्यंत जवळ जवळ तिन मैल चालत जायचा.मधे एका चहाच्या दुकानात बाहेरच त्याला रतीबाने एक कप चहा आणि बेकरीतला पाव खायाला मिळायचा. खांद्दयावरच्या झोळीत त्याचा एक कप असायचा तसंच एक ऍल्युमिनियमची थाळी आणि एक पांढऱ्या पोरसिलीनची तबकडी,त्यावर निळ्या गर्द रंगाची किनार असायची.दुपारचा मार्केट मधे आल्यावर सांळगावकरांच्या खानावळीच्या बाहेर बसल्यावर डाळ,भात एखादा माशाचा तुकडा आणि आमटी फुकट जेवायला मिळायची,तसंच बुधवारी आणि रविवारी मयेकरांच्या हॉटेलातून बशीभर मटण आणि दोन पाव दुपारचे मिळायचे.मटण लाला पोरसीलीनच्या तबकडीत न चुकता घ्यायचा लाला कुणाकडे काही मागायचा नाही.दुकानात बाहेर बसल्यावर हॉटेलचा पोऱ्या त्याला पाहून खाणं आणून द्दयायचा.
लालाने कधीच भीक मागीतली नाही.कुणी त्याच्या कमंडलूत एखादं केळं,आंबा,चीकू सारखं फळ दान करायचा आणि लाला ती कधी खायचा किंवा एखाद्दया लहान मुलाला देवून टाकायचा.

मार्केटच्या आवारात असलेल्या एका मोठ्या पिंपळाच्या झाडाखाली बांधलेल्या चौथुऱ्यावर दुपारची वामकुक्षी घ्यायचा.कधी कधी बाबल्याच्या पानाच्या गादी जवळ जावून उभा राह्यचा.दोन चार हिरवी खायची पाने,थोडी कुटलेली सुपारी,थोडा तंबाखू आणि एका पानावर चुना लावून त्याची पुरकंडी त्याच्या झोळीत बाबल्या टाकायचा.लालाला असं दान केल्यावर त्याच्या धंद्दयाला
बरकत येईल अशी त्याची भाबडी समजूत असायची.

बाजूच्या दुकानाच्या उंबरठ्यावर दोन चार उपट्सुंभ गांवठी जुगार खेळत बसायचे.चार आण्याच्या (पावलीच्या) नाण्यावर माशी बसेल त्याला जुगार लागला असा नियम करून ईतरानी ठेवलेली नाणी त्याची व्हायची.उंबरठ्यावर रांगेत ठेवून दिलेल्या
कुणाच्या नाण्यावर माशी बसेल हे ज्याचे त्याचे नशिब असायचे.कधी कधी पंधरा पंधरा मिनीटं माशी फिरकायची पण नसायची. लालाला ह्या जुगारात कसलीच उमेद नसायची.
उभं राहायचं म्हणून तो उभा राहायचा.मात्र अन्वर खेळत असेल तर मात्र तो लालाला रोखून धरायचा.लालाच्या पायावर डोके टेकल्याशिवाय त्याला जुगारात लाभ होत नाही असा त्याचा अनुभव होता.आणि खरंच लालाच्या पायावर डोके ठेवून पावली त्याच्या पायावर घासल्याशिवाय त्याला लाभ होत नव्हता,पण ईतर म्हणजे गुरुनाथ,दाजी,दत्या वगैरे हिंदू मंडळी लाला मुसलमान असल्याने त्याच्या पायावर डोकं ठवणं त्यांना पसंत नव्हतं.धर्म बुडतो असा त्यांचा समज असायचा.अन्वर आणि लाला असताना ते जुगारातून काढता पाय घ्यायचे.लाला नसताना मात्र अन्वर कधी कधी हरायचा.

असं कां होतं?, म्हणजे लाला असताना अन्वर का जिंकतो हे चलाख पंढरीच्या लक्षात आलं.अन्वर नक्की काय करतो ते त्याने नीट लक्ष देवून हेरलं.आणि लालालाच्या पायावर डोकं न ठेवता,फक्त पावली लालाच्या पायावर पंढरी घासायचा.नंतर हटकून माशी पंढरीच्या पावलीवर बसायची.पंढरी जुगार जिंकायचा.

त्याचं गुपीत असं होतं की लालाचे मळलेले आणि कधी न धुतलेले पाय एव्हडे अस्वच्छ असायचे की त्याच्या पायावर घोंघावणाऱ्या माशा त्या घासलेल्या पावलीला आकर्षीत व्हायच्या. हे पंढरीच्या चलाख डोक्यात आलं.

अशातऱ्हेने दिवस चालले होते.आम्ही शाळेतून घरी येताना लाला दिसला की "लाला! मी पास की नापास? " असा प्रश्न केल्यावर, खाली मुंडी ठेवून चालत असलेला लाला हळू आवाजात फक्त म्हणायचा " पास ". हे ऐकून आम्हा सर्वांना बरं वाटायचं.असंच एकदां दाजी पराडकरने त्याला विचारलं,आणि तो परिक्षेत खरंच नापास झाला.त्याला खूप वाईट वाटलं.परिक्षेसाठी
नीट अभ्यास न केल्याने नापास झाल्याचं दुःख दाजीला नव्हतं,तर लालाचं भाकित खोटं ठरलं याच त्याला जास्त दुःख झालं.
पुढल्या खेपेला लाला दिसल्यावर दाजी त्याला म्हणाला
"लाला तू झूट बोलतोस,मी नापास झालो."
लाला पहिल्यांदाच रसत्यावर थांबून म्हणाला कसा, " बेटा मैने तुमको ’तुमना, पास’ असं बोललो होतो.मै झूट कभी नाही बोलत.अल्ला की कसम" दाजीच्या लक्षात आलं लाला "तुम, नापास" असं बोलला असावा.

लाला अलिकडे रोज रसत्यावर दिसत नव्हता.कधीतरी दिसायचा.साळगावकरच्या खानावळीतला पोऱ्या पण म्हणाला लाला थाळीत दिलेले नीट जेवत नाही.मयेकर हॉटेलवाले पण म्हणाले "लालाने अलिकडे मटण सोडलं थाळीत घेतो पण खात नाही". करता,करता लाला आता
खाली उतरून यायचा बंदच झाला.

असंच एकदा तांबळेश्वराला गेलेल्या काही लोकानी सांगतलं की लाला "पैगंबरवासी" झाला.तो अल्लाला प्यारा झाला. कुणी तरी म्युनसिपालीटीला कळवलं.गाडी आली होती,पण लोकानी लालाला बेवार्शी न्यायला दिलं नाही.प्रश्न पडला लालाला पुरायचं की जाळायचं.त्या गर्दीतून अन्वर पुढे आला आणि म्हणाला " लाला मुसलमानच आहे.तांबळेश्वराच्या देवळाच्या बाजूला मी त्याला बरेच वेळा नमाज पाडताना पाहिलं आहे.आणि नेहमी ’अल्लाकी कसम’असंच म्हणायचा. आणि अगदी खाजगीत म्हणजे लघूशंका करताना मी त्याला पाहिलं आहे त्याचा सुंथा झाला आहे." एव्हडं सगळं ऐकल्यावर लोकानी त्याला तांबळेश्वरच्या पठारावरच एकेठिकाणी पुरला.

तांबळेश्वराच्या स्मशानात आल्यावर लोक न चुकता ईतर सामुग्री बरोबर एक फुलाचा हार आणायला विसरत नाहीत.सर्व संस्कार झाल्यावर बाहेर येवून लालाच्या कबरीवर आस्थापुर्वक हार घालतात आणि कबरीला हात जोडतात.आणि मुसलमान कबरीला हात लावून मग आपल्याच केसावरून हात फिरवतात.

कधी कधी शाळेतून येताना रसत्यावर लालाचा भास व्हायचा."लाला! मी पास की नापास? "असं विचारल्यावर आता उत्तर द्दयायला लाला नव्हता.

श्रीकृष्ण सामंत

औद्योगीक इसापनीती भाग तीन - मुंगळा, माशी आणि माकड

भाग एक- http://www.misalpav.com/node/2330
भाग दोन- http://www.misalpav.com/node/2345

मुंगळा, माशी आणि माकड
एका झाडावर उंच ठीकाणी मधाचे एक पोळे होते. त्यातून अधुनमधून मधाचे थेंब, पोळ्याचे छोटे तुकडे खाली पडत होते. झाडाखाली एक मुंगळा ते गोळा करून हळुहळू एका ओंडक्याखाली नेऊन ठेवत होता. प्रत्येक खेपेला थोडा थोडा करून असा बराच मध त्याने ओंडक्याखाली जमवला होता. त्याचे कार्य अगदी शांतपणे आणि नेटाने सुरू होते. एक आळशी माशी त्याचा हा उद्योग पाहून तिकडे आकर्षित झाली. मुंगळ्याच्या प्रत्येक खेपेबरोबर माशी त्याच्या डोक्यावरून गुणगुण करीत उडत उडत झाडापासून ओंडक्यापर्यंत जात होती. अशा खूप खेपा झाल्या. मुंगळ्याचे काम अविरत सुरू होते.

माशीची गुणगुण ऐकून एक माकड तिथे आले. त्याला पाना पानांखालून जाणारा बारीकसा मुंगळा काही दिसला नाही. पण त्याने पाहीले, ही माशी झाडापासून ओंडक्यापर्यंत खेपा मारीत काहीतरी करीत आहे. त्याने माशीला विचारले "तुझे हे चालले तरी काय आहे?" त्याच्या मोठ्या आकाराकडे पाहून माशीला वाटले ह्याला आपल्या बाजूने करायला हवे. ती माकडाला म्हणाली, "मी कष्ट करून मध जमवत आहे. पण एक मुंगळा त्या मधावर डाका घालत आहे." असे सांगून तिने माकडाला नुकताच ओंडक्यापासून झाडापर्यंत जाणारा मुंगळा दाखवला. माकडाला ती गोष्ट खरीच वाटली. त्याने एका फटक्यात मुंगळ्याला उडवून दिले. त्यानंतर ओंडक्या खालच्या मधाचा आस्वाद घेऊन, माशीकडे ढुंकूनही न पहाता माकड तिथून चालते झाले.

बोध-
१) होणारे काम जरी द्रष्य असले तरी काम करणारा सहसा अद्रष्य असतो.
२) उंच जागेवरून काम करणारे दिसत नसले, तरी आपण काम केल्याचा डंका पिटणारे आवाज नक्कीच ऐकू येतात.
३) उंच जागी बसलेल्याला बारीक सारीक गोष्टींकडे दुर्लक्ष कर्‍न फक्त मलाई खाता येते.

पिसी जेसी चा पुढचा भाग

चार की पाच आठवत नव्हतं.पाय कापसाचे झाले होते. मी व्हीटी स्टेशनच्या बाहेर बस स्टॉपवर जेमतेम उभा होतो. समोर थोडी जास्तच झाली असावी.व्होडाफोनची जाहिरात चमकत होती. टॅक्सी की बस कन्फ्युज् झालो होतो. दमणच्या एअरपोर्ट वर कसं जायचं आठवत नव्हतं.मला व्होडाफोनचा राग आला .दूर हो या यार. तुमचा लोगो मेलेल्या जंतासारखा दिसतो. मी दुसरी जाहिरात बघीन.वा. वा. पार्ले... पण पार्ले तुम्ही सुद्धा फसवता. बिस्कीट आत्महत्या कपात करतं पण तुम्ही मऊच बिस्कीट बनवा.जाऊ दे.टॅक्सी....टॅक्सी इधर आव. दमण एअरपोर्ट चलो.. फास्ट चलो. विमान उडनेवाला है. टॅक्सीवाला झूम्झूम निघाला. दमण एअरपोर्ट. दारात आलो. टॅक्सीवाला हलकट पैसे न घेता फुर्रकन पळाला. इमिग्रेशन काउंटरला चक्क बाई होती. माधुरी ओह माधुरी..पासपोर्ट वर शिका मारला. आय लव्ह यू.. वा. वा.. हाउ रॉमँटीक.. पाठीमागून कोणीतरी कॉलर पकडली..बाप रे बायको. तीच्या हातात चाबूक होता.. ए .. इधर आव. पासपोर्ट काढून घेतला. दहा फटके.. बादमे जाव..
माझ्या आयुष्याचा कोंडवाडा केलास आता पळतोस काय..पाच फटके.. तू असताना मी विधवा ... पाच फटके. ..मी पळणारच होतो.. समोरून टॅक्सीवाला आडवा आला. साक्षात विरकर हाहाहाहा..त्याच्या हातात जॅक होता. आता तुझी गाडी डीमर्‍यावर भटा... परत मागे वळलो तर सासरे उभे .त्यांच्या हातात चिमटा मोठा लोखंडी चिमटा... तयासारखे भोगणे प्राप्त झाले असं म्हणून त्यांनी माझ्या जांघेत चिमटा खुपसला..ज्जाळ नुस्ता ज्जाळ.. आग लागली..
..
-------------------------------------------------------------------
बाळकृष्ण जोशी.. जोशी ... जोशी साब .
उठ लवकर .आ कर. हां आ कर . शाबाश. डोळे उघड.
परत जाळ उठला. झपकन फोकस आला. हॉस्पीटलचा बेड. हाताला ड्रीप.. एक दोन .. एक दोन...
स्साला तुमी पोलीस लोक केटला मारते.. यानी काय केला .. मर्डर के रेप
शांती ..... आरे, हा शॉक मधी गेला तर तुमी काय बोलते ते ३०२ अने ३०४..
मी पूर्ण जागा झालो . वेदना डल झाल्या . समोर एक कोट घातलेला डॉक्टर उभा होता.माझ्याकडे बघून म्हणाला
दवा दिला तुला मी. ..तुम्ही जंटलमन ... कसा काम करते..
खोदाके वास्ते विरकर मी सांगते ते प्रॉमीस लिव तू..आगळा टाईम मी नाय त्रीट करणार..
-------------------------------------------------------------------
-परत डोळ्यावर गुंगी आली.एकेक चित्र पुन्हा समोर यायला लागलं.
बँक ऑफ क्रेडीट अँड कॉमर्स . वेल. यु वेर सिनीयर मॅनेजर क्रेडीट, सॉरी , जंटलमन वी वाँट टो बी बिगर बँक ..पण आमची बीसीसीआय नाही ..साधी कॉऑपरेटीव आहे...परवडणार नाही आम्हाला..छे ..पगाराचा प्रश्न नाही....स्टाफचं मोराल जपावं लागतं ..तशी तुम्हाला पैशाची कमी नसावी.. तुमची बँक बुडलीच आहे.
आत बाहेर येत जात राहीलो रात्रभर.उजळणी सात दिवसाची चुकीच्या क्रमात येत होती. अलट पलट. अलट पलट.
-------------------------------------------------------------------------------------------------
विरकर जागचा उठून उभा राहीला.
आईये सर. इब्राहीम मुल्ला .
सर, आपको कौन नही पहचानता. मै विरकर. आयो. इस केसका.
महाडीक जोशीला आणा.
ये साब कौन है?
ये मेरा पीए. पिल्ले. एफ.आय. आर. इसने लिखा था. यस. ही होल्ड्स माय पॉवर ऑफ
ऍटर्नी...
पिल्ले आप इधर बैठीये.
विरकर आप जरा मेरा स्टेटमेंट लेकर ..
ऑफकोर्स..
मी समोर उभा राहिलो.
आप इनको पहचानते है? दोघांनीही नकार दिला.
इसके खातेमे आया था आपका दस लाख रुपया. ये है मास्तर माइंड. जबतक ये प्रोडुस करता वो शेट्टीको तबतक..महाडीक त्या रां..विरकर थांबला, त्या मिसेस शेट्टीचे फोटो दाखवा त्यांना..
बँक रेकॉर्ड मधले फोटो महाडीकनी दाखवले.पिळ्ले उठून उभा झाला.
ये चोर ..माय गॉड..
क्या हुआ पिल्ले.
सर यही है वो मोबाईल चोर्.
पिळ्ले विरकर कडे वळून म्हणाला
साब ये लडकी हमारे ऑफीस मे आयी थी. मेरा मोबाईल चोरके गयी मैने कंप्लेंट लिखाया था कोलाबा पोलीस स्टेशनमे. मै कॉपी देता हूं कल.
और क्या लेके गयी थी? और क्या? विरकर चा आवाज बदलला. पिळ्ले कडे रोखून बघत म्हणाला
याद करो . करना पडेगा.
आता त्यानी लेटरहेडची कॉपी समोर टाकली.
ये साईन तुम्हारा नही है? ये लेटरहेड तुम्हारा नही है? इसमे लिखा है ये दस लाख रुपाया जमा करो मिसेस शेट्टीके खातेमें.
पाच मिनीटे गोंधळ. एकाच वेळी मुल्ला. विरकर , पिळ्ले एकमेकांन अकाहीतरी सांगत होते.विरकनी आता पिळ्ले ला बाजूला घेतले.
मेरेको बता कौन है ये शेट्टी तेरी .. बोल ..
तेरेको क्या लगा कंप्लेंट लिखके काम निकल जायेगा तेरा.
पिल्ले थरथरा कापायला लागला. मुल्लासाहेब शांत बसून होते.
आय विल नॉट इंटरफिअर बट नो थर्ड डीग्री विरकर
मै तबतक ये जंटलमन से बात करूंगा.
माझ्याकडे बोट दाखवत त्यानी विचारलं.
महाडीक या मादर... जोशीला तीन नंबर मधे घेउन जा साहेब येतील .
तुम्ही बाहेर थांबा
------------------------------------------------------------------------------------------------- इब्राहीम मुल्ला साधारण साठीचे असावेत. वर्षानुवर्ष भोगलेली मिरासदारी चेहेर्‍यावर दिसत होती. लाल गुलाबी चेहेरा .परफेक्ट कट चे कपडे. हातात एक सॉलीटेर. साधारण चार कॅरटचा. ब्राउन गुस्सी शूज. एक बेफिकीरी.यशाची कायम खात्री.दहा मिनीटात ते मूळ विषयाकडे आले.
तुमने चोरी की है तो पैसा वापस दो. अगर नही तो पैसा मै भरूंगा.
आप को मालूम होना चाहीये ये एस्क्रो अकांउंट का पैसा है. अगले हप्ते वैती चिटणीस का डीमांड आयेगा. हमारे फर्म के इज्जत पचास -साठ लाखमे नही बिकेगी.पैसा मिला तो मै कुछ कर सकता हूं.
मैने अभीतक होम मे बात नही किया है.
एक बार बात करू तो ...आपको मालूम नही...
इथे त्याचा फ्लो तोडायचा मी ठरवलं.
तो क्या होगा ? परेशानी? वो तो पहलेही हो गयी है?
थर्ड डीग्री आपके पीए को नही .
मुझे क्यू?
वो भी तो चोर हो सकता है. शायद उसने और मैने मिलकर ..
नही डिक्रा.. नॉट दॅट इझी.. यु कांट प्रोव्होक मी.
म्हातारा अचानक खुषीत आला.
वो लडकी तुम्हारी पार्टनर थी.
तूम मार खाओगे. उसको बचाओगे.
मुझे मालूम है. चार दिन बाद तुम जाओगे जेसीमे. बादमे विरकर भी तुम्हारा दोस्त बनेगा. आज वो आयो है. चार दिन बाद नही. मुझे पैसा चाहिये अगर है तो.मै वखत ...
आता मला परत बोलायला चान्स मिळाला.
दस लाख मेरे खातेमे आया. मैने ये कब कहा की मै नही जानता मनोरमा को.
कैसे जानते हो?
एक एमेलेम मिटींग मे मिली थी. चार महीने पहले. मै पैसोके तंगी मे था. डर्बी नजदीक आयी थी. मेरे खातेमे आया पैसा मैने खर्चा किया.
बीस दिअन यही बात समझा रहा हूं मै.
मै समझ रहा था मनोरमा को मै उल्लू बना रहा हूं.सी गँबलर आय मे बी. बुट नॉट थीफ.
यू मिन तूम पैस लौअटाना चाहते हो?
जितना मेरे खाते मे आया .
बाकी का साठ लाख?
मेरे खातेमे नही आया था वो? अनिल सिंग और संदीप बहल . उनके खातेमे गया था वो.मैअ नही पहचानता उनको.
येस . आय मे बाय द स्टोरी.
लेकीन तुम्हारा आयो मानेगा . ?
आयो आपका है. आप कंप्लेनंट हो मै नही. एक लांब श्वास घेऊन तो खाली बसला. ठिक है.
अगर दस लाख आया तो ..?
नो ...नो..... धिस विल नॉट वर्क.
धिस विल. मी डोळ्याल डोळे भिडवत सांगीतलं.
कैसे? मी दहा मिनीटं बोलत होतो. इब्राहीम मुल्ला मन लावून ऐकत होता.
लेकीन एक शर्त है. मी दम खायला थांबलो. ये कुछ भी डिस्क्लोज नही होगा जुम्मेरात तक.
वादा है.
खोदा के वास्ते दगा नही.
जब रुपया मिलेगा तब आप का वकील आयेगा. ठिक है?
ठिक है.
इससे अपना फायदा क्या होगा . मिश्रा विचारत होता.
देख मिश्रा अपने अकांउंट मे पैसा आया ये बँकींग ट्रँझेक्शन है.अब ये गलत है फिर भी एंट्री रिवर्सीबल है.मेहेताका आया हुआ पैसा जमा कर दे वो खातेमे.
दो अलग अलग केस बनती है.
साठ लाख से अपना कोई वास्ता नही बनता.
दस लाख बँक मे गये मेहेता केस के बाहर्.लेकीन थोडा ड्रामा जरूरी है. विरकर नही मानेगा इस बात को.
मेहेता छूट जायेगा लेकिन संदिप और अनील सिंग जबतक नही आते तबतक अपना बेल नही होगा.
अपना फायदा बादमे होगा .
-------------------------------------------------------------------
पिळ्ले चं स्टेटमेंट संपत आलं होतं. त्याला विरकरनी एकेक बारीक प्रश्न विचारला.
दस लाख का चेक लेने बँका प्यून आया था?
यस सर.
बँक से फोन आया था?
यस सर.
फिर बादमे पचास लाख का चेक लेने भी बँकका प्यून आया था?
यस सर.
मेरेको एक बात बता तुमने बँकमे फोन किया था?
नो सर.
तो बँकवालेको कैसा पता चलता है की तुम्हारे पास चेक तयार है?
जो दस लाख का चेक लेके गया वो प्यून पचास लाख का चेक लेके गया था?
यस सर्.तो पिळ्ले अब ये बताव बँकवालेको कैसा पता चलता है के तुम्हारा चेक तयार है?
मै दलाल को फोनकरता हूं. इसमे भी दलाल?
यस सर्.कौन है बे ये दलाल.पिळ्लेचे धाबे दणाणले.बुला ले उसको .ये तो मालूम पडे.तेरा और उसका क्या चल रहा है?
क्या नाम है उसका. बोल भाई जल्दी बोल.विरकरला धागेदोरे सापडल्यासारखं वाटत होतं
बोरकर ? ठीक है कल बुला ले उसको तू.
बहोत दलाली जमा हो गयी है तेरे पास.
होम मे कौन है रे तेरा? बहोत फोन आ रहे थे उनके. उसको भी बता देता हूं तेरे दलाली का चक्कर .अगले टाईम सोचेगा फोन करनेसे पहले.
मुल्ला साहेबाला हे सगळं नविन होतं .पिल्ले चपापला.तपासकामाची दिशा बरोबर असल्याची विरकरची खात्री होत आली .
-------------------------------------------------------------------
मुल्लासाहेब जाताना विरकरला म्हणाले
"वेल , ऑफीसर ऑल दी बेस्ट."
म्हातार्‍याची पाठ वळल्यावर विरकरनी पिळ्लेला ऐकू जाईल अशी शिवी दिली."सिनीअर सगळे हरामी. आरोपीशी हे डायरेक्ट बोलणार. आयो पेक्षा हे मोठ्या लवड्याचे."
"भटा काय डील झालं रे त्याच्यासोबत?"
"तो म्हणाला आज पिळ्ले नाही सुटला तर तो मला इस्टेटीचा वारस बनवेल.फक्त बाई कुठे ते सांग?"
पिळ्ले सकट सगळे हसले. पण पिळ्ले जास्तच हसला.
विरकरनी त्याला विचारलं
" क्या रे ..बहोत हस रहा है ..."
पिळ्ले म्हणाला
" मराठी नही आता लेकीन इतनाही समझा ....फक द बाई किधर है...."
चार टेबल सोडून प्रधान च्या नाकातून चहा बाहेर आला .
----------------------------------------------------------------------------------------------
स्साला, हसत हसत मारतो विरकर,प्रधान म्हणाला.
हो ना . मी म्हणालो. मला टायपींग येत हे कळल्यानंतर प्रधानचा मी टायपीस्ट झालो होतो.
मला एक कळत नाही विरकरला यात अजून कमाई कशी झाली नाही.
म्हणजे कशी केली नाही असं विचारा ना.प्रधान खुदकन हसला. स्साला मी विसरतोच तू दोन नम्बरचा आरोपी आहेस.भटा किती दिलेस रे तू?
देण्यासारखा पुरावा कुठे आहे त्याच्याकडे अजून.प्रधान परत विचारात पडला.माझ्याकडे ही केस येणार होती पण आमचा एसीपी नविन आहे ना. डायरेक्ट आला आहे. विरकर त्याचा ट्रेनर होता ना. प्रोबेशनला.एकसुस्कारा.
योग्य ती संधी आली होती.समजा तुमच्याकडे केस आली तर ?प्रधान माझ्याकडे बघत राहीला. म्हणजे विरकरला प्रमोशन मिळतय का ?
आजकाल तुम्ही त्याला जवळचे. मी हसलो. तसं नाही. पण ..
तू माग ते देतो. मला काही नको . मी सांगतो तेव्हढं करा. काय करू बोल.मी आरोपी आहे हे
तो विसरला होता.
विवेक जाळण्याची ताकद मत्सरात असते.
दोन कामं कराल?
सांग. बस एव्हढंच. हो आत्त्तातरी.चलो डन.
-------------------------------------------------------------------हिल रोडच्या गल्लीत त्या ईमारतीच्या खाली उभंराहून तो विचार करत होता. करावा का खर्च? वासना जिंकली. दुसर्‍या मजल्यावर दरवाजा ढकलून आत गेला.थंडावा. सुगंध. आणि समोर स्पागेटी टॉपमध्ये एक मुलगी. एक वयस्कर दांडगा मिड-डे वाचत होता.आओ. ओळख पटली होती. आज क्या? डार्क रूम . ?येस. वॉटर बेड? येस,अंदर जाव.वॉश लेना. कपडा रख्खा है .पहन लेना. मोबाईल इधर. पाच जमा करो. बादमे हिसाब. बरचं ऐकलं होतं पण पैसे जमतच नव्हते.आज किकबॅक मिळाला होता. आजच.कपडे बस्दलून तो उभा होता. स्पागेटी आत आली. चलो. हात धरून धरून ती त्याला रूमच्या दरवाजापर्यंत घेऊन गेली. दरवाजा स्टूडीओच्या दरवाज्यासारखा जाडजूड होता. आत मोठा बेड . भिंती काळ्या. दरवाजा बंद. आत बाहेरचा आवाज पण येत नव्हता. हिस्स करून दरवाजा बंद झाला आणि काळोखात रूम बुडून गेली. एसी वाढला. भिंतीवर छतावर चांदण्या चमकायला लागल्या. तो बेडवर आडवा झाला. एक भिती वाटत होती. पण एका ओळखीचा सुगंध आला. सोबत ती आल्याचं कळलं. मै हू स्वीटहार्ट. हात हातात आला. त्याचे कपडे कधी दूर झाले ते त्याला कळलं नाही. दोघामधलं अंतर दूर झालं.पुढची पंधरा मिनीटं अवयवांचा चाळा.
आता तो लीडर झाला. संकोच संपला. हे त्याचं हक्काचं ठिकाण होतं. इथे तोच राजा होता. ही दासी त्याच्या मर्जीची. उष्ण ओले हूंकार. अधीर होउन त्याच्या घशातून विचीत्र आवाज यायला लागले होते. वॉटरबेड वर होडीत बसल्याचा भास होत होता. लाटांची गती वाढत होती.
म्युजीक? हां ..
ना जाने कोई .. कैसी ये जिंदगानी..
हमारी अधूरी कहानी..
आंखोमे कैसी नमी है .. आ आ हा
भिगी राते .. भिगी भिगी बाते कैसी मुलाकाते...आ आ..आ
नंतर श्वापदांच्या चित्कारानी चारी बाजू कसकसल्या.
लाईट ..हां
बेडच्या तळाशी एलीडी लँप .मून लाईट.
पुन्हा एक धसमुसळी खेळी .ती स्फुंदायला लागली. आ .. आ..हा..
मूनलाईट मध्ये तिच्या अंगाचे वळण वळण चमकत होते. अंगाला चमकी लावली होती. कुठे कुठे जांभळा रंग..दूर बेल वाजली.. तो मोकळा झाला . फिर एक बार .. ती थांबायला तयार नव्हती.मैने सिर्फ...ओठावर बोट .. मै दूंगी परत नवी खेळी तो परत जिंकला. या खेळाचा तो राजा होता . ती एक दासी
अब बस. हां...डार्लींग अब लाईट...
एका क्षणात तीनी त्याला आणि त्यानी तिला ओळखलं.तू...उसळून त्यानी हात गालावर चालवला..अंगठी लागली असावी, ओठ फाटला.. चोर साली.. दुसरी झापड .तिनी पायाला घट्ट मिठी मारली ...परत हात उगारला.. डाव्या स्तनावर रक्ताचा ओघळ.. ये मैने क्या किया.. सॉरी...लेकीन तू चोर है...
हा चोर हू.. फिरसे मारो एक तमाचा जोरसे.. मारो ना तो भानावर आला...
त्याच राज्य संपलं होतं...मैने क्या किया ये..
कुछ नही मारो ना एक जोरसे तिनी हात धरून परत विनवलं ...ओके..
हा खेळ त्याला आवडला...एक वार परत ओठातून परत रक्त...
अब ले लो मुझे... अंधार ..आता रंगत आली ..
निघताना त्यानी तीला वचन दिलं तो रोज येणार..
चोरीची शिक्षा द्यायला.. रोज येणार ..रोज रोज ....रोज
--------------------------------------------------------------------------------------------------

ज्यूलीची श्रद्धा

" मी एक साधारण माणूस आहे.फक्त मी ज्याच्यावर विश्वास ठेवते,ज्यांच्यावर माझी श्रद्धा आहे त्यांवर मी लक्ष ठेवते."
"ज्युली तू किती ग्रॆट आहेस " असं मी तिला म्हणालो.

त्याचं असं झालं,
माझी मोठी वहिनी गोव्याची.पेडण्याला तिचे आईवडिल राहायचे.लहानपणी माझ्या वहिनी बरोबर मी उन्हाळ्याच्या सुट्टीत तिच्या माहेरी अनेक वेळा गेल्याचं आठवतं.
उन्हाळ्यात विशेष करून गोव्यात फळफळावळ,फुलं आणि मासे यांची लयलूट असायची.मांडकूर आंबा मला खूपच आवडायचा.तसं पाहिलं तर आंब्यांचा राजा हापूस आणि त्यात वाद नाही.हापूस आंबा नीट पिकल्यावर त्याचा जो गंध दरवळतो तो कुणाकडून लपून राहणार नाही.तसंच हा हापूस आंबा नीट पिकल्यावर कापला की त्याचा आतला गर जास्त
आणि त्याची बिज्याला कोकणात कोयरी म्हणतात ती खूप लहान असते,आणि बाहेरची साल अतिशय पातळ असते.हापूस आंब्याचा स्वाद काय विचारता!,कितीही खाल्ला तरी कमीच वाटतो.
पण माडकूर आंब्यात जरी हापूसच्या आंब्याचे सर्व गूण नसले तरी ह्या पिकलेल्या आंब्याचा बाहेरून दिसणारा केशरी रंग, आणि त्याचा जास्त गोलट आकार,पाहून आकर्शीत व्हायला होतं.आणि चव विचाराल तर अगदी स्वर्गातलं अमृत मागे पडेल.
ह्या मांडकूर आंब्यासाठी, बांगड्या माशासाठी आणि नागचाफ्याच्या सुगंधाची आठवण येवून मी नेहमी गोव्याला जायला उत्सुक्त असायचो.

माझ्या वहिनीचं माहेरचं घर चिरेबंदी आणि मंगळोरी कौलांच आणि टुमदार होतं.शेजारी एक प्रशस्त चर्च होतं.तसं गोवं सुंदर सुंदर चर्चच्या इमारती बाबत खूप प्रसिद्ध आहे.त्यावेऴच्या पोर्तुगीझ राज्यकर्त्यानी खूप अशी चर्चं बांधली होती.वहिनीच्या शेजारी प्रशस्त झोपडीवजा एक घर होतं.पावलू फर्नांडीस आणि त्याचं कुटूंब त्या घरात राहायचं.
पावलूं त्याची बायको मेरीयम,पावलूचे वडील फास्कू,आणि पावलूची दोन मुलं पास्कल आणि ज्युली असं छोटसं हे कुटूंब होतं.कोंबड्याची खूराडं आणि डूक्करांची पिलावळ त्यांच्या आवारात असायची.आम्ही वहिनी बरोबर उन्हाळ्याच्या सुट्टीत आलो की हे सर्व कुटूंब आमच्या सहवासात असायचं.
अलिकडे मी खूप दिवसानी गोव्याला गेलो होतो.फास्कू तर केव्हांच निर्वतला होता. पावलू आणि मेरियम बरीच थकली होती.
पास्कल गोवा सोडून गेला तो इंग्लंडला स्थाईक झाला होता.ज्युली मात्र लग्न न करताच घरातच होती.ती आता "नन" झाली होती.
मला भेटल्यावर मी तिला सहज विचारलं,
"जुली तू एकदम नन व्हायचं का ठरवलंस?"
मला म्हणाली,
"बाजूच्या चर्चात मी आईवडिलांबरोबर नेहमीच जायची, पास्कल निघून गेल्यावर त्याचं परत येण्याचं चिन्हं काही दिसेना.
आईवडिलांकडे कोण बघणार?"
मी ज्युलीला म्हणालो,
"तू लग्न वगैरे काही केलंस का नाही?"
ज्युली जरा हंसतच मला म्हणाली,
"लहानपणी तुला आठवतच असेल,तुम्ही सर्व इथे यायचा,त्यावेळी तू पण आमच्या बरोबर रविवारी चर्चातही यायचास."
"मी हिंदू असलो तरी तुमच्या बरोबर चर्चात येवू शकतो का? म्हणून पावलूला विचारलं होतंस.आणि पावलू तुला म्हणाला होता की येशूला सर्व धर्म सारखेच वाटतात. आपण सगळी त्याचीच मुलं.हे ऐकून तुला किती आनंद झाला होता.चर्चात
आल्यावर येशूच्या मुर्तीकडे बघून तू किती भावनावश झाला होतास. मला म्हणालास ,
"ज्युली तू नन का होत नाहीस? "
"मला पण नंतर नन व्हावंस वाटलं."
ज्युली पुढे सांगू लागली,
" विश्वास आणि श्रद्धा हे फक्त शब्दच नाहीत.मी मला ख्रिश्चन म्हणणं एक आणि त्यासाठी वाहून घेंणं दुसरी गोष्ट.नन होण्याने मला तसं जगायला मिळालं.’लव्ह दाय नेबर’ असं प्रत्यक्ष येशूने म्हटलंय आणि मी सुरवातीची नन होवून,आईवडील, शेजारी, मुलं पाहून सर्वांवर मनापासून प्रेम करू लागले.मुलान मी शिकवूं लागले.सुरवातीला हे माझं गोतावळ जरा लहान होतं.
नंतर मी पेडण्याच्या नेहमीच आरडाओरड,भांडणसांडण, आणि नेहमीच उपासमारीनें पछाडलेल्या झोपडपट्टी परिसरात जणू येशूच्या मनातल्या गहिऱ्या आव्हाहनास दोनहात करण्यासाठी जात राहीले.त्या लोकांची दारूण परिस्थितीत मी पण सामील होण्याचा प्रयत्न करू लागले.रात्रीचे भांडणाचे आवाज,मुलांना हांक मारून आक्रंद करणारे ते आयांचे रडणे,तो होणारा अन्याय पाहून काही तरी करावं असं माझ्या मनात आलं."
मी म्हणालो,
" पावलू सांगत होता की आतां तू चर्चात कमी जातेस म्हणून"
"हो मी त्या चर्चातल्या, जगातल्या पिडीतांसाठी फक्त प्रार्थना करणाऱ्या नन ऐवजी, मी ती प्रार्थना सोडून देवून माझ्या हाताच्या बाह्या वर सरसावून ह्या लोकांसाठी वेळ द्दयायला लागले.आणि आता तर मडगांवच्या फांसावर जाणाऱ्या कैद्दयांच्या सेवेत वाहून घेतलं आहे."
मी म्हणालो,
"कमाल आहे ज्युली तुझी.लहानपणी आपण इकडे असताना असं कधीच विचारात आणलं नाही की कोण पुढल्या आयुष्यात काय करील.खरोखरच तुझं काम वाखाणण्या सारखं आहे."
त्यावर हंसत हंसत ज्युली म्हणाली,
"माझी श्रद्धा आणि माझा ज्यावर विश्वास आहे त्याच गोष्टीवर मी आता माझं लक्ष केंद्रीत करते आहे.येशूचं मोठ्यात मोठ्ठं आव्हान म्हणजे ’शत्रूवरपण प्रेम कर’आणि ह्या फांशीवर जाणाऱ्या कैद्दयात मला माझा शत्रू दिसायला लागला आहे.ज्यांचं पुरनवसन होणारच नाही,असं आपल्या समाजाला वाटतं,आपल्या सुप्रीमकोर्टाने सुद्धा फांशीची शिक्षेस कायद्दयाने मंजूरी दिली आहे.

गेली कित्येक वर्षे मी ह्या लोकांच्या सानिध्यात असते.आणि माझ्या समोर सहा मानवाना फांशी दिली आहे.मरण्यापुर्वी मी त्यांना माझ्याकडे पहायला सांगितलं,जणू त्यांना मरणापुर्वी एक प्रेमळ चेहरा लक्षात राहावा. माझा प्रेमळ चेहरा त्यांना समजावत होता की ते आणि आम्ही सर्व केलेल्या कृत्यापेक्षा जास्त किंमतवान आहो."
मी ज्युलीला म्हणालो,
"केव्हडी तुझी तू उन्नती करून घेतलीस.कुठून कुठे तू गेलीस."
ज्युली मग म्हणाली,
"पुढे आणखी ऐक,ह्या गुन्हेगारांच्या सहवासात राहून सगळं काही झालं असं नाही.मी त्यांच्या कुटुंबियानापण भेटते.आणि ज्यांचा बळी घेतला गेला त्यांच्या कुटूंबियाना पण भेटते.गुन्हा ज्यांच्यावर झाला त्यांच्या कुटूंबियाना आणि गुन्हा ज्यानी केला त्यांच्या कुटूंबियाना भेटून प्रेम करणं महा कठीण जातं,बरेच वेळा ज्यांची हानी झाली आहे त्यांच्या कुटूंबियाना माझा हा डबल रोल चुकीचा वाटतो.
मला ते समजतं पण मी त्या दोघांनाही भेटण्याचा माझा हट्ट सोडला नाही.ज्यांची हानी झाली त्यांच्या कडून मी एक शिकले की त्यांना किती एकटं,एकटं वाटतं.त्यांच्या कुटूंबातल्या एकाचा काही गुन्हा नसताना खून व्हावा हे किती भयंकर आहे, त्यांच दुःख किती खोल आहे,त्यासाठी ते सर्वांपासून दूरच राहतात.परंतु त्यांना पण कुणी तरी भेटावं,त्यांच ऐकावं,त्यांच्या बद्दल काळजी दाखवावी असं सारखं वाटत असावं.एव्हडं करायला मला कसलंच काही ग्रेट केल्यासारखं वाटत नाही."

"ज्युली तू किती ग्रॆट आहेस " असं मी तिला म्हणालो.
त्यावर ती एव्हडंच म्हणाली
" मी एक साधारण माणूस आहे.फक्त मी ज्याच्यावर विश्वास ठेवते,ज्याच्यावर माझी श्रद्धा आहे त्यावर मी लक्ष ठेवते."

श्रीकृष्ण सामंत

औद्योगीक इसापनीती भाग दोन - फिताधारी कुत्री

भाग एक- http://www.misalpav.com/node/2330

फिताधारी कुत्री

एका शेतकर्‍याकडे बरीच कुत्री होती. ती घर, शेती, बैल वगैरे मालमत्तेची राखण करीत असत. रोज तेच तेच काम करून कुत्री कंटाळून जात. काहींना आपल्या कामात मग स्वारस्य वाटत नसे. काहींना वाटे, कसले हे मामुली काम रोज पाट्या टाकायचे! अशा वातावरणात मग ती कुत्री नीट काम करीत नसत. त्यांचा कामातील जोश वाढवायला शेतकर्‍याने एक युक्ती केली. काही चांगली कामसू कुत्री निवडून त्यांना चांगल्या कामाचे कौतूक म्हणून गळ्यात घालायला सभारंभपूर्वक रंगीत फिता दिल्या. ती कुत्री मोठ्या दिमाखाने गळ्यात रंगीत फिता घालून मिरवायची. त्या फितांचे महत्व इतके वाढले की सुट्टीच्या वेळात देखील इकडे तिकडे फिरतांना ती कुत्री फिता गर्वाने धारण करून फिरायची. ज्यांना रंगीत फिता मिळाल्या नव्हत्या, ती कुत्री फिताधारी कुत्र्यांचा हेवा करायची. त्यातली काही जोमाने काम करून फिता मिळवायचा प्रयत्न करायची. गळ्यात फिता असणे हे कर्तुत्वाचे लक्षण आणि फॅशन झाले. असे एकूण ठीक सुरू होते. कुत्री आणि शेतकरी सगळे खूष होते.

एकदा माळरानावर बरीच कुत्री एकत्र जमून मौजमजा करत होती. त्यात एक फिताधारी पण होता. तो अर्थातच गर्वाने आपल्या फितेचे प्रदर्शन करीत होता. सर्वांच्या गप्पा, कोरस भुंकणी ह्यांना रंग चढला होता. इतक्यात शेतकर्‍याचा नोकर आपल्या कामसू कुत्र्याला शोधत तिथे आला. गळ्यातील रंगीत फित पाहून त्याने कामसू कुत्रा बरोबर ओळखला. त्याच्या फितेला पकडून नोकर त्याला कामासाठी घेऊन गेला. सगळी मजा सोडून जातांना कामसू कुत्र्याला वाईट वाटले. पण तरी सुद्धा, आपण खूप महत्वाचे प्रस्थ आहोत, बाकीच्यांसारखे रिकामटेकडे नाही, असा आव आणत तो फिताधारी मोठ्या दिमाखाने पार्टीतून बाहेर पडला. तेव्हा काही बिनफिताधारी कुत्री त्याच्याकडे हेव्याने पाहू लागली. आजुबाजुच्या पार्टीचा नंतर त्यांना आनंद देखील उरला नाही.

बोध-
१) कंपनी मोबाईल म्हणजे २४ तास गुलामीची फित असते.
२) फॅशनचे, पदकांचे वेड पसरवून शहाणे आपला कार्यभाग साधतात.
३) निर्भेळ सुख नसतेच. सुखाबरोबर दु:खेही स्विकारावी लागतात.

श्‍वानशक्तीचा विजय असो!


;">`व्होडाफोन'चा ब्रंड अम्बसिडर असलेला आमचा नातलग.
------------------------------------------------------------

चला, गंगेत घोडं न्हालं म्हणायचं. माणूस नावाच्या "गाढवां'ना कुत्र्यांचा प्रामाणिकपणा तरी पटला. आजची "सकाळ'मधली बातमी वाचलीत? पुण्यात कुत्र्यांची मागणी दुपटीने वाढल्याची! आमच्या प्रामाणिकपणाला आत्ता कुठे भाव आलाय. बरं वाटलं.

बरेच दिवस याच विचारानं अस्वस्थ होतो. डायरी सुद्धा लिहावीशी वाटत नव्हती. आमच्या प्रामाणिकपणाबद्दल संशय घेतला जात होता. "ही कुत्तरडी करायची काय?' असले भोचक आणि अवमानास्पद प्रश्‍न विचारले जात होते. कुणीकुणी उपटसुंभ तर जंगलातून वस्तीत येणाऱ्या बिबट्यांसाठी खाद्य म्हणून सगळी कुत्तरडी जंगलात फेका, अशी भाषा करत होते. मुन्सिपाल्टीच्या लोकांपुढे तर कित्येक भाईबंदांनी हौतात्म्य पत्करलं. पण आम्ही त्यांच्या बाजूनं ठाम उभे राहिलो. म्हटलं, होताहेत क्रांतिकारक तर होऊ द्यात! हे बलिदान व्यर्थ जाणार नाही! काहींना बंदिवासात टाकण्यात आलं. त्यांच्यासाठीही लढा दिला. निदर्शनं केली. तुरुंगांच्या दरवाजांवर, अधिकाऱ्यांच्या घरांच्या भिंतींवर, दंडेलशाही करणाऱ्यांच्या चकचकीत गाड्यांवर जाहीरपणे तंगडं वर केली. तरीही काही फायदा झाला नाही.

आमचा प्रामाणिकपणा, आमची उपयुक्तता पटायला चोरांनी घरं लुटायला हवी होती. मुडदे पडायला हवे होते. भरदिवसा अपहरणं व्हायला हवी होती....!

असो, उशीरा का होईना, माणसांना शहाणपण सुचलं, हे महत्त्वाचं. त्या "व्होडाफोन'वाल्यांच्या सात पिढ्यांवर तंगडं वर करावं, असं जाहिरात बघून वाटलं होतं. कारण त्यांनी आमच्या एका परदेशी भाईबंदाला जाहिरातीसाठी कुठल्यातरी गाडीच्या मागे तंगडतोड करत पळायला लावलं होतं. पण त्यांनीच आमची "इमेज' सुधारली. कुठल्याही मदतीला तयार, अशी आमची ओळख लोकांवर ठसवली. आता त्या जाहिरातीतल्या कुत्र्याच्या तोंडावरची माशीही हलत नाही, ही गोष्ट अलाहिदा. पण आपल्या एका भाईबंदाचं कौतुक होतंय आणि आपला मान वाढतोय, हा आनंद मोठा होता. बरं, त्याच्या जातीतल्या इतर पंटर्सचीही किंमत वाढली ना त्याच्यामुळं!

मलाही कुण्या केळकरानं विकत घेतलाय. माजी लष्करी अधिकारी आहे म्हणे. आता त्याच्या शिस्तीत राहावं लागणार. आयला, गोचीच आहे! पण आता संधी मिळालेय. आता जिवाचं रान करून मालकाचं घर राखायचं. फक्त एकच प्रॉब्लेम होईल. स्वीटीला सारखं सारखं भेटता येणार नाही. सध्या ती तरी कुणाच्या घरची शोभा झालेय, कुणास ठाऊक! बाकी, ती काही घराच्या रक्षणाबिक्षणाच्या कामाची नाही म्हणा! ती पडली ऑल्सेशियन! आमच्यापेक्षा वरच्या जातीतली. ती कुणातरी धनिकाच्या घरातच पडली असणार. कुणीतरी फटाकडी नको तेव्हा घरी येणाऱ्या बॉयफ्रेंडपासून संरक्षणासाठीच तिचा उपयोग करत असणार.
असो. हेही नसे थोडके!

औद्योगीक इसापनीती भाग एक

इसवीसनपूर्व सहाव्या शतकात होऊन गेलेला इसाप आपणाला माहीत आहेच. प्राणीजगतातली पात्रे घेऊन अगदी सोप्या भाषेत त्याने जीवनाचे तत्वज्ञान सांगणार्‍या नीतीकथा लिहील्या. आज जर इसाप असता, तर आजच्या औद्योगीक (कॉर्पोरेट) जगाचे निरीक्षण करून त्याने कुठल्या नीतीकथा लिहील्या असत्या? जालावर अशी एक कथा वाचली. मग त्यात माझ्या कल्पनेतून आणखी काही कथांची भर घालण्याचे ठरवले. आणि काही नवयुगाच्या औद्योगीक इसापकथा जन्माला आल्या. मिपाकरांच्या मनोरंजनासाठी देत आहे.

**************************

तीन बेडके

एकदा एका कोरड्या विहीरीत तीन बेडके पडली. विहीर बरीच खोल होती. त्यामुळे उड्या मारून किंवा चढून वर येणे शक्य वाटत नव्हते. विहीरीत खाण्यासाठी काही खास दिसत नव्हते. थोड्या फार माशा, किडे, काही हिरवे कोंभ वगैरे असावेत. त्यातल्या हुशार बेडकांनी लगेच सर्व परिस्थीती ताडली. जर खाद्यपदार्थांमधे सर्वांचा वाटा पडला, तर लवकरच उपासमारीची पाळी येणार! हुशार बेडके मठ्ठ बेडकाला म्हणाली "तू असे कर....तू सर्वात बारीक आहेस. उंच उंच उड्या मारून विहीरीबाहेर पडण्याचा प्रयत्न कर. जर कसोशीने प्रयत्न केला, तर तुला बाहेर नक्कीच पडता येईल. मग तू बाहेरून आमच्यासाठी मदत पाठवू शकतोस."

मठ्ठ बेडूक उंच उड्या मरून वर जाण्याचा प्रयत्न करू लागले. हुशार बेडके मोठमोठ्याने ओरडून त्याला प्रोत्साहन देऊ लागली. "हा हा! शाबास पठ्ठे, आणखीन जोरात.." इकडे ओरडता ओरडता हुशार बेडकांचे विहीरीत असलेले अन्न खाणे सुरूच होते. ती हुशार बेडके थोड्याच वेळात टम्म फुगली. मठ्ठ बेडूक दमून निपचीत पडले. हुशार बेडकांचे ओरडणे ऐकून एक साप तेथे आला. टम्म फुगलेल्या बेडकांना पहून लगेच त्याने ती बेडके मटकावली. नंतर दमून निपचीत पडलेले मठ्ठ बेडूक देखील गिळंकृत करून तो साप तेथून दुसर्‍या भक्षाच्या शोधात निघून गेला.

बोध-
१) प्रॉडक्टीव कामे करणारे लोक एखाद दुसरेच असतात. बाकीचे फक्त गाजावाजा करणारे असतात.
२) प्रॉडक्टीव भासणारी कामे वास्तवात प्रॉडक्टीवच असतील असे नाही.
३) होणार्‍या आणि न होणार्‍या कामांचा गाजावाजा करून छोटे समूह लठ्ठ झाले की मोठे समूह त्यांना आपल्यात सामावून घेतात. (ऍक्वीजीशन)

*********************************

ठाम मताचे आमचे बंडूतात्या

तसं पाहिलंत तर आमच्या बंडूतात्याना प्रत्येक विषयात आपलं मत द्दायची दिलचस्पी आहे.मग ते कोर्टकचेरी पासून राजकरणापासून साहित्या पर्यंत तात्या आपलं मत देत असतात.आणि त्यांच ते मत नेहमी ठाम असतं.
मला एकदा म्हणाले,
"ह्या विषयावर माझं ठाम मत आहे आणि ते कधीच बदलणार नाही."
मी त्यांना म्हणालो,
"बंडूतात्या,ठाम मत म्हणजेच न बदलणारं मत नां?का तुमचं न बदलणारं ठाम मत म्हणजे काही विषेश आहे काय?"
अशा वेळी तात्या अळीमिळी गुपचिळी ठेवतात.
जेम तेम हायस्कूल (मराठी मिडीयम)पर्यंत शिकलेले बंडूतात्या मधे कोर्टकचेऱ्यात दिलचस्पी घेवू लागले होते.कायदेबाजी आणि वकिली-न्याक ते सर्व शिकल्याशिवाय कशी येणार?पण
"मला तितका काय गंध नाही"
असं म्हणता म्हणता तात्या, त्या विषयावर आपलं ठाम मत द्दायला विसरत नसत.
वकिलांच्या घोळक्यात सामावून घेण्यासाठी त्यानी एकदा काळा कोट शिवून घेतला होता.आणि तो कोट घालून ते चक्क कोर्टात जात असत.इतर वकिल तात्याना ओळखत असल्यामुळे ते त्याना काही म्हणत नसत.
"काळा कोट घातला तर कायद्दाने त्यात ऑबजेक्षन कसलं?"
असं मला एकदा त्यानी मी पृच्छा केल्यावर सांगितलं.

वकिल लोकांच्या घोळक्यात बसून त्यांच्या चर्चा ऐकून संध्याकाळी दाजीकाका,भाऊसाहेब देसाई,शिर्के फौजादार वगैरेंच्या घोळक्यात त्यांच्या बरोबर तळ्यावर जावून बसत.आणि ऐकलेल्या कोर्टातल्या केसीस समजावून सांगत.
इंग्रजीचा