सकाळपासून वर्गातली सगळीच शांत आहेत. तो नेहमी फरफर्या स्टोव्ह सारखा येणारा मुलांच्या बडबडीचा आवाज ही कमी येतोय
शाळेत सतत काही ना काही तरी व्हायला हवे. रोज नुसते अभ्यास ,लहान सुट्टी, मधली सुट्टी , खेळाचे तास असे करत बसलो की कंटाळा येतो. प्रत्येक तासाला काही ना काही शिकवत असतातच पण तरीही.
कितीही आवडत असली तरी बटाट्याची काचर्याची भाजी रोज खाऊन कंटाळाच येणार की. सोबत लोणचे , कारळ्याची नाही तर लसुण खोबर्याची चटणी तरी हवीच.
पण हे शाळेत म्हणायचे म्हंटले की भुगोलाचे भामरे सर म्हणतात. पृथ्वी गोल आहे. तुम्ही कुठूनही निघा , कोणत्याही दिशेने प्रवास करा.
हॉस्पीटलचे जग दाखवत आहात.
पुढील दुवा https://www…
पुढील दुवा https://www.misalpav.com/story/53595
भारी सुरुवात ... वाचताना…
भारी सुरुवात ... वाचताना स्वत:च हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झालोय की काय असं वाटायला लावणारं ...
<<<< आज दहा वर्षांनन्तर ही आपले विचार तितकेच उदात्त विचार आहेत का?
शंका घ्यायला वाव आहे. रुग्णांची सेवा करता येते. या पेक्षाही आज माझा पेशा मला स्वावलंबी बनवतो.
जगाच्या कुठल्याही कोपर्यात गेले तरीही मी स्वावलंबी असेन हा व्यवहारी विचार मनात येतो.
पण आजही हा पेशा तितकाच आवडतो? अगदी खरे ,प्रामाणीक पण सांगायचे तर कधीकधी कंटाळा येतो.
रोज रडके आजारी चेहरे , रोज दुखणी खुपणी , आजार यांचा सामना करायचा.
रक्त लघवी , थुंकी , जखमेतली घाण , शरीरातले दोष हे पहायचे. रडणे कुंथणे कह्णणे , मॉनिटरची बीप बीप हे आपल्या आयुष्यातलं संगीत झालंय. >>>
सॉलिड चित्रदर्शी लेखन !