व्हाॅट्सअपवरची माणसं - व्हर्जन २०२४
*व्हाॅट्सअपवरची माणसं - व्हर्जन २०२४*
*कट्टर भाजप समर्थक* :
*व्हाॅट्सअपवरची माणसं - व्हर्जन २०२४*
*कट्टर भाजप समर्थक* :
लेखिका वीणा गवाणकर यांच्या सहज सोप्या भाषेतल्या प्रेरणादायी पुस्तकांपैकी एका आंतरराष्ट्रीय भारतीय कलाकाराची ओळख करून देणारे पुस्तक!
अॅनिमल पाहिला आणि लेखणी हाती घेतली. अॅनि मल की मळ, जे काही असेल ते आणि त्यामुळे झालेली मळमळ उलटी करून टाकावी म्हटले, म्हणजे मन शांत होईल म्हणून हा प्रपंच. सुरुवातीलाच वाईट जोक. कोणी आगाऊ म्हणेल कि मळ बाहेर काढायची दुसरी क्रिया पण असते ती इथे नाही केली याबद्दल धन्यवाद. असो कोटीचा मोह आवरला नाही.
मूळ मुद्दा चित्रपटाबद्दल. Violence presented in entertaining way (काही दृश्य सोडली तर ) हे दिग्दर्शक व कलाकार या जोडीने दाखवून दिलं. आणि खरंच, चित्रपटात जेव्हा हाणामारी चालते तेव्हाच बरं वाटतं. फॅमिली ड्रामा येतो तेव्हा बोअरच होतं.
तो मुशाफर मध्यरात्री चांदण्यांशी बोलतो
नश्वराच्या तागडीने शाश्वताला तोलतो
दीर्घिकांच्या अंतरंगी अग्नि जो कल्लोळतो
आणुनी त्या भूवरी तो मृगजळाने शिंपतो
स्थूलसूक्ष्मातील सीमा जेथ होते धूसर
त्या तिथे थबकून थोडा, द्वैत सगळे मिटवितो
चेतनेची स्पंदणारी नाळ जिथुनी उगवते
त्या जडाच्या जटिल प्रांती प्राणफुंकर घालतो
शोधिले मी त्यास जळिस्थळी, काष्ठी आणि पत्थरी
शोध माझा दर्पणी प्रतिबिंब बघुनी संपतो
शाळा, टाईमपास, ती सध्या काय करते?,फॅन्ड्री असे लहानपणीच्या कोमल?;) प्रेमाचे सिनेमा मराठीत असताना परत आत्मपॅम्फ्लेट त्याच बालवयातील प्रेमाचा सिनेमा कशाला पाहायचा अस ठरवल होतं.पण दिवाळीच्या आदल्या दिवशी मस्त गोडधोड खाऊन बसले तर हा चित्रपट घरच्यांनी लावला होता.
परवा रात्री असा अचानकच भुतकाळाचा लुप लागला अन् थेट ८०च्या दशकातलं लहानपण आठवलं. मुळगावी संगमनेरला कायमस्वरुपी स्थलांतर प्रक्रियेत आई, मी आणि लहान बहिण आजोबांसोबत रहात होतो.
भाऊ आजोबांच्या हातमागासाठी सुताच्या गुंड्या भरणे आणि शिवणकामाच्या मशीनशेजारी आईची पण एक मशिन लागली आणि दिवसभर आम्हीही तिथेच घुटमळायचो. .
सलगच्या बैठ्या कामानं गांजलेले भाऊ जुन्या कविता ऐकवायचे. त्यातली एक गमतिशीर कविता होती "शूर्पणखा" वनवासी रामासमोर आलेली राक्षशीण शूर्पणखा रामावर भुलते आणि सीतेला सोडुन तिच्यासोबत येण्यासाठी रामाचा अनुनय करते असा कवितेचा आशय.
सर्वत्र धर्म, संस्कृती याविषयी उथळ चर्चांना उधाण आलेले असताना.रा.चि.ढेरे यांचे ललितबंध (प्रकाशित २०१७)हे पुस्तक वाचणे म्हणजे केवळ सुखद अनुभव होता.ऋषीचे कूळ आणि नदीचे मूळ विचारू नये अशी म्हण विनाकारण आहे ,हे पुस्तक वाचतांना पटते.कारण एकंदरीत मज सारख्या मुळातून मुळाच्या शोधाची आवड असणाऱ्या वाचकाला अनेक प्रश्नांची उत्तरे मिळतात. धर्मोइतिहास वाचन अवजड भाषा असल्याने वाचनाची गोडी लागत नाही पण रा.चि.ढेरे यांचे लेखन अत्यंत सुगम आहे.
कावळ्यांची फिर्याद
पिंपळाच्या झाडावर कावळ्यांची भरली होती सभा....
चला,चला,चला...समोर मास भादव्याचा उभा.
संतप्त सारे काक होते,काकरव आसमंती गुजंला....
पितृपक्षी दुर जाऊ,प्रस्ताव त्यांनी मांडला.
कर्म कुणाचे फळं कुणाला, का दर्भ मागे लावला ?
क्रुद्ध होऊनी प्रभूने, पूर्वजांचा एक चक्षू फोडला.
लंपट,लुब्ध,छद्मवेषी गंधर्व होता ,काकवेष धारूनी.....
हिन कर्म,पाप त्याचे,शाप आपल्या माथी गेला मारूनी.