मुक्तक
"ती धावत आली आणि गच्च मिठी मारून मुका घेतला" - मराठीच्या एका भावी प्रोफेसरची कहाणी.
"ती धावत आली आणि गच्च मिठी मारून मुका घेतला"
चांद्रयान तीन......स्वप्न पूर्ण जाहले
देखणे ते चेहरे पंडितांचे, हिरमुसले
स्वप्न चांद्रयान, जेव्हां विखुरले
हसले फिदीफिदी, छद्मवेषी
म्हणती
नऊशे कोटी मातीत घातले.
"आर्यभट्ट,मिहीर,विक्रम का इतिहास अपना,
दधिचीसा दृढःसंकल्प,पवनपुत्रसा बल अपना
दिल ना तोडो,छप्पन इंच सिना अपना
एक सौ चालीस साथ है...'कर लो मुठ्ठीमें चांद को',
फिरसे बनाओ चांद्रयान तीन को"....
घेउन ओज,तेजःपुंज ज्ञानीयांचा,सज्ज तांडा जाहला
मिशन चांद्रयान तीनचा,पुनश्च पांचजन्य वाजला
मी पाऊस आणि कविता
काही गोष्टी बदलत नाही म्हणतात ना ते खरे आहे. आता हेच बघा उन्हामुळे तापून पाण्याचे बाष्प होते. त्याचे ढगात रुपांतर होते. कुठेतरी कसातरी कमी दाबाचा पट्टा वगैरे तयार होतो आणि मग पाऊस पडतो. हा कमी दाबाचा पट्टा निर्माण होण्यासाठी कोण कुठे काय खणतो ते माहित नाही पण तो तयार होत असतो. थोडक्यात काय पाऊस पडणे ही एक सरळ साधी नैसर्गिक प्रक्रिया आहे. दवाखान्यात उगाचच चेकअपसाठी अॅडमिशन घ्यावी इतकं हे रटाळ प्रकरण आहे.
"स्वामी" तिन्ही जगाचा..... मी मात्र भिकारी
माझ्या वयातल्या इतर कुणाही मुलाप्रमाणे मी सहावी किंवा सातवीत पहिल्यांदा स्वामी कादंबरी वाचली. मला हे कबुल करायला अजिबात संकोच वाटत नाही की ती कादंबरी त्यावेळी मला खुप आवडली होती. माधवरावांची एक प्रतिमा माझ्या मनात नोंदली गेली होती. कादंबरीच्या सुरवातीच्या पानावर असलेल्या इतिहासकारांच्या काही अभिप्रायामुळे शेंदराचा टीळा व्यवस्थित लागला होता. एकंदर ब्राह्मणी वातावरणात लहानपण गेल्यामुळे लावणी वगैरे अतिशय घाण प्रकार असतो त्याला टाळणे हेच उत्तम असा संस्कार असल्यामुळे कादंबरीतील माधवराव मधुन उठून जातात इत्यादी प्रसंग दाद देणारे आणि माधवराव या व्यक्तीबद्दल आदर वाढवणारे ठरले.
जुन्नर भटकंती -२
नाईन इलेव्हन - Twin To-Worse: प्रस्तावना
मंगळवार दिनांक ११ सप्टेंबर २००१, संध्याकाळी सात-सव्वा सातची वेळ.
रोजच्या प्रमाणे त्या संध्याकाळीही चकाट्या पिटण्यासाठीचा आमचा अड्डा असलेल्या एका मित्राच्या सायबर कॅफेवर आम्ही काही मित्रमंडळी हजर होतो.
आतमध्ये अमेरिकेतील आपल्या नातेवाईकाशी याहू मेसेंजरवर चॅट करत बसलेला एक नेहमीचा ग्राहक लगबगीने बाहेर आला आणि त्याने अमेरिकेतील 'वर्ल्ड ट्रेड सेंटरवर' विमान धडकल्याची त्याला नुकतीच समजलेली बातमी आम्हाला सांगितली.
पावसाचं वय....
मऊ मऊ दुपटं,ऊबदार कुशीत
तोंडात अंगठा,गाल लुसलुशीत
तड तड ताशा,मोत्याच्या माळा
सांगतो का रे पावसा वय माझ्या बाळा?
भिरभीर डोळे, संतत धार
रस्त्यातले डबके,आईचा मार
भिजलेलं डोकं,कागदी होड्या
सांग ना रे पावसा वय तुझं गड्या?
मनात चुळबुळ,बाहेर भुरभुर
मातीला गंध,हिरवळ दूरदूर
छत्रीतलं भिजणं,भेटीची सय
सांग ना रे पावसा काय तुझं वय?
उरात उर्मी,अंगात गर्मी
सह्याद्रीची साथ,मित्रांचा हाथ
रानं आबादानी,नभात 'मल्हार' लय
सांग ना रे पावसा तुझं काय वयं?
चांद्रयान ३
चांद माझा हांसरा, उधाण येई सागरा
चंद्र उगवला नभी, लाजली वसुंधरा
स्मरणातील रुप तुझे जे कवीने रेखले
चांदभरल्या रातीतले स्वप्न आज भंगले
चंद्रमुखी तू मेघसावळी कसे म्हणू मी....
क्षण एक पुरे प्रेमाचा, वर्षाव पडो मरणाचा
कसे म्हणू मी.....
आता कसे म्हणू मी चंद्र उगवले दोन
एक चंद्र अंबरी,एक मंचकावरी
कसे म्हणू मी.....
......
......
होईल वर्षाव लाटण्यांचा.
जेव्हां तुझ्या नजीक चांद्रयान तीन पोहचले
अन् नव रुप तुझे यान चक्षुंनी पाहिले
यान चक्षुंनी जे दाविले,ते मी ही पाहिले....
खेळीया शब्दांचा
कसे स्मरतात शब्द त्यांना नित्य कवीता बांधती
त्याच वाटा, त्याच लाटा, तोच चंद्रमा अन् त्याच चांदराती
शिशिर तोच ,वसंत तोच,तेच क्षितिज, भुवरी टेकले
उगवती अन् मावळती तीच,अंबरात तेच रंग पेरले
गुंजारव तोच, तोच मधुप, तीच राधा बावरी
तोच कृष्ण सावळा, तरी नित्य वेगळे कवन यावरी
‐------------------------------------------------
भरतीचा रौद्र रूप,परतीचा अंतरंग दावतो
कर्कटांनी रेखाटलेला किनारा नित्य नवा भासतो
कधी पूर्ण चंद्र,कधी चंद्रकोर कधी लखलखत्या चांदण्या
घन तमीचा शुक्र तारा, प्रेरणा कवन बाधंण्या