टंकलेखन साहाय्य
सामर्थ्यदाता : गमभन !
विडंबन
(स्वप्न)
प्रेषक केशवसुमार ( गुरू, ०७/०३/२००८ - १२:४८) .आमची प्रेरणा धोंडोपंतांची सुरेख गझल स्वप्न
भेटण्याची काय पण ही रीत आहे?
बुकलुनी म्हणते वरी ही प्रीत आहे
आज पण घेऊन झाडू स्वागताला
बायको अमुची उभी वस्तीत आहे
राहिली आता न मजला शुध्द साधी
मोडले पेकाट मी निपचीत आहे
आठवण गेली तुझी चुकवून ठोका
मी पुन्हा आता तिच्या धास्तीत आहे
"केशवा"पुन्हा नको ते स्वप्न पाहू
कालचा इतिहास हा स्मृतीत आहे
----केशवसुमार
(छंदात छंद तो प्रवासछंद --)
प्रेषक अमोल केळकर ( गुरू, ०७/०३/२००८ - १०:२९) .(छंदात छंद तो प्रवासछंद, फिरण्या मन हे उल्हासिते ! )
चालः राधा ही बावरी, हरीची राधा ही बावरी !
--------------------------------------------------
छंदात छंद तो प्रवासछंद, फिरण्या मन हे उल्हासिते !
घेऊन बॅग, विसरुनी काम, ही वर्षा सहल सजते !
त्या सहलीच्या या आठवणींची गुंजी सतत राही !
आम्ही हो प्रवासी, सृष्टिचे आम्ही हो प्रवासी !!
पावसाचा हा शिडकावा सकाळी लवकर निघताना !
ओल्या चिंब कपडयानी गाडीमध्ये बसताना !!
हा दरवळणारा गंध मैत्रिचा मस्ती भरपुर होई !
विनोद, गाणी, गप्पा-गोष्टी रंजक सारे होई !!
त्या सहलीच्या या आठवणींची गुंजी सतत राही !आम्ही हो प्रवासी, सृष्टिचे आम्ही हो प्रवासी !!
खंडाळ्याच्या माथ्याची दर्या शिखरे ही खुणावती !
माळशेजवरुनी जाताना उगा पाऊले घुटमळती !
हा सुखावणारा मुरुड जंजिरा ओढ जिवाला लावी !
हे ढग असे की धुके म्हणावे निसर्ग नवलाई !
घाटातल्या त्या वाटेवरती भिजुनी चिंब होई !आम्ही हो प्रवासी, सृष्टिचे आम्ही हो प्रवासी !!
--------------------------------------------------------------------
मुळ गाणे-
रंगात रंग तो श्यामरंग पाहण्या नजर भिरभिरते
ऐकून तान विसरून भान ही वाट कुणाची बघते
त्या सप्तसुरांच्या लाटेवरुनि साद ऐकुनी होई -
राधा ही बावरी, हरीची राधा ही बावरी !
हिरव्या हिरव्या झाडांची पिवळी पाने झुलताना
चिंब चिंब देहवरुनी श्रावणधारा झरताना
हा दरवळणारा गंध मातीचा मनास बिलगून जाई
हा उनाड वारा गुज प्रितीचे कानी सांगून जाई
त्या सप्तसुरांच्या लाटेवरुनि साद ऐकुनी होई -
राधा ही बावरी, हरीची राधा ही बावरी !
आज इथे या तरुतळी सूर वेणूचे खुणावती
तुजसामोरी जाताना उगा पाऊले घुटमळती
हे स्वप्न असे की सत्य म्हणावे राधा हरखून जाई
हा चंद्र चांदणे ढगा आडुनी प्रेम तयांचे पाही
त्या सप्तसुरांच्या लाटेवरुनि साद ऐकुनी होई
राधा ही बावरी, हरीची राधा ही बावरी !
राधा ही बावरी, हरीची राधा ही बावरी !
- प्रतिक्रिया प्रकाशित करण्यासाठी येण्याची नोंद करा अथवा सदस्य व्हा.
मिपावर लिहीणं धोक्याचं!
प्रेषक पिवळा डांबिस ( गुरू, ०७/०३/२००८ - १०:२७) .("सोळावं वरीस धोक्याचं" या लावणीवरून स्फूर्ती घेऊन,)
मिपावर लिहीणं धोक्याचं गं, मिपावर लिहीणं धोक्याचं ||
कथा-लेख मी कसा लिहू?
प्रवासवर्णन कसा करू?
जागोजागी उभे "समीक्षक",
निशाण बांधून मोक्याचं |
मिपावर लिहीणं धोक्याचं गं, मिपावर लिहीणं धोक्याचं ||
ओढ लागली खरडीची
धम्या-डॉन्याच्या गंमतीची
इनोबाही इथे नाचतो,
बँडेज सावरत गुढघ्याचं |
मिपावर लिहीणं धोक्याचं गं, मिपावर लिहीणं धोक्याचं ||
तात्याची खादाडी खरी
वरदा टाईम-पास करी
नाना चेंगट गुह्य उकलती,
"समभागां"च्या मटक्याचं |
मिपावर लिहीणं धोक्याचं गं, मिपावर लिहीणं धोक्याचं ||
चतुरंगाची बुद्धिबळं
विजुभाऊचं स्वप्न खुळं
स्वातीबाई कट्लेट तळते,
कोंबडी सोडून हाडकाचं |
मिपावर लिहीणं धोक्याचं गं, मिपावर लिहीणं धोक्याचं ||
आचरटपणा सोड बरा
पिकल्या केसां जाग जरा
डांबिसकाका, मनात भय धर,
सरपंचांच्या फटक्याचं |
मिपावर लिहीणं धोक्याचं गं, मिपावर लिहीणं धोक्याचं ||
(निवेदनः आमचे हे पहिले-वहिले विडंबन आमचे या विषयातले मानसगुरू श्री केशवसुमार यांच्या चरणी अर्पण!! कवितेत वर्णन केलेल्या व्यक्तींना प्रार्थना: कृपया, कृपया, ह. घ्या!!
)
(...मी खरा की तू खरा?)
प्रेषक चतुरंग ( गुरू, ०७/०३/२००८ - ०१:२७) .प्रदीप कुलकर्णी ह्यांची '...मी खरा की तू खरा?' ही अप्रतिम गजल अनेक प्रश्न उभे करुन गेली आणि त्या प्रश्नांना वाचा फुटली ह्या काव्यातून!
........................................
...मी खरा की तू खरा ?
........................................
बॉस मज माझा विचारी - मी खरा की तू खरा ?
ही पुरे झाली 'हुशारी' - मी खरा की तू खरा ?
मध्यरात्री काल मी जे काम त्याचे उपसले...
आज तो म्हणतो दुपारी - मी खरा की तू खरा ?
उत्तराची मेल नाही धाडता आली मला...
प्रश्न आला तोच भारी - मी खरा की तू खरा ?
शेवटी घोळात मी! सार्याहुनी मोठ्या जरा...
मी पगारी; तू करारी - मी खरा की तू खरा ?
बॉस माझा, आणि त्याचा...याचसाठी झुंजती
याचसाठी 'चॅट'मारी - मी खरा की तू खरा ?
बातम्या देशील माझ्या बॉसला माझ्या परी....
व्हायची 'खानेसुमारी' - मी खरा की तू खरा !
बरळ तू सोईप्रमाणे जे तुला बरळायचे...
'बाटली' सांगेल प्यारी - मी खरा की तू खरा !
कोण जाणे काय झाले? बॉस मी झालो अता -
- प्रश्न मी आता विचारी - मी खरा की तू खरा ?
चतुरंग
( जाता दुरदेशी सुख वाटे जीवा -)
प्रेषक अमोल केळकर ( मंगळ, ०७/०१/२००८ - १०:४८) .जाता दुरदेशी सुख वाटे जीवा!
डॉलरे भेटता आनंदहोई !!१!!
या चलनाची उपमा नाही त्रिभुवनी!
करुन चाकरी इतर देशा !!२!!
ऐसा परदेश ऐसे देशोदेशी लोक !
ऐसे रहाणीमान दावा कोठें !!३!!
ऐसी उठाठेव ऐसा व्यवहार!
ऐसा N R I कोणी दावा !!४!!
ऐसे सरकार लावी करावर कर
आउट्सोअर्सिंग चालू येथे !!५!!
पैसा परी खुप केलीस भ्रमंती!
देशा परी सुख न मिळे जीवा !! ६!!
-------------------------------------------------------------------------
मुळ गाणे असे आहे -
जातां पंढरीस सुख वाटे जीवा ।
आनंदे केशवा भेटतांचि ॥१॥
या सुखाची उपमा नाहीं त्रिभुवनीं ।
पाहिली शोधोनी अवघी तीर्थे ॥२॥
ऐसा नामघोष ऐसे पताकांचे भार ।
ऐसे वैष्णव दिगंबर दावा कोठें ॥३॥
ऐसी चंद्रभागा ऐसा पुंडलीक ।
ऐसा वेणूनादीं कान्हा दावा ॥४॥
ऐसा विटेवरी उभा कटेवरी कर ।
ऐसें पाहतां निर्धार नाही कोठें ॥५॥
सेना म्हणे खूण सांगितली संती ।
या परती विश्रांती न मिळे जीवा ॥६॥
रचना - सेना महाराज
संगीत - राम फाटक
स्वर - पं. भीमसेन जोशी
(आता कशाला उड्याची बात!)
प्रेषक चतुरंग ( मंगळ, ०७/०१/२००८ - ००:१८) .श्रीकृष्ण सामंत ह्यांचे काव्य 'आता कशाला उद्याची बात' वाचले मात्र आमचा मेंदू उड्या मारु लागला आणि एक काव्य टुणकन उडी मारुन बाहेर पडले!
आज काल ह्या उड्या असतात
आणि
आजच्या उड्या कालच्याच कोलांट्या
मग
आज जेव्हा उड्या माराल
आणि
उद्या त्यांच्या कोलांट्या होतील
तेव्हा
त्या उद्याच्या उड्यांना
आजच्या कोलांट्याच म्हटलं जाईल
आता
आज ज्या उड्या चालू राहिल्यात
त्याच
उद्या कोलांटउड्या म्हणून होणार
ज्या
उद्या कोलांटउड्या म्हणून असणार आहेत
त्याला
आज उड्या म्हणून म्हटलं जाणार
म्हणून
“आता कशाला उड्याची बात
बघ मारु उड्या रातोरात
भर भरूनी पिऊ
रस रंग नऊ
चल
मारु उड्या रंगात”
चतुरंग
खणले रे पथ
प्रेषक हेरंब ( रवी, ०६/२९/२००८ - १०:१५) .आमचे प्रेरणास्थान : फुलले रे क्षण माझे ......
खणले रे पथ माझे खणले रे
ड्रेनेजच्या , हो s s टेलिफोनच्या
आणि गॅ s sसच्या लोकांनी
तुटले रे पथ माझे तुटले रे
धुळीच्या लोटात गर्दीच्या पोटात भयभीत जीव फिरे
डांबरीकरण, कांक्रीटीकरण लोकांचे मरण रे
या वेडाच्या, आधीन शासन झाले मिंधे रे
पैशांच्या थैलीने
खणले रे .............
रीत ही दरवर्षीची थांबेना
रहदारीची दुर्दशा साहवेना
कुणा सांगु मी काय सांगु मी
निबर मनास काही उमगेना
पोटाच्या खळगीने
खणले रे पथ माझे खणले रे
संता आणी बंता
प्रेषक अमोल केळकर ( शनी, ०६/२८/२००८ - ११:४५) .सरदारजींवरचे आपण नेहमी विनोद ऐकतो इतरांना सांगतो. त्यात ही संता आणी बंता ही आपली आवडती पात्रे.
त्यांचा एक विनोद गाण्यातुन सांगण्याचा एक प्रयत्न. कसा वाटला हा प्रयोग ते अवश्य सांगा.
आमची प्रेरणा - सध्या माझ्या १ वर्षाच्या मुलीचे अतीशय आवडते बालगीत
ससा हो ससा जसा कापुस जसा त्याने कासवाशी पैज लाविली !
वेगे वेगे जाऊ नी डोंगरावर जाऊ ही शर्यत रे अपुली !! ससा -
---------------------------------------------------------------------------
संता रे संता त्याचा फसण्याचा धंदा, त्याने बंताशी गोष्ट बोलली !
काही तरी करु नि दुनियेला फसवू, सांग आयडिया एक छानशी ! संता --
कोणे एके दिवशी, दोघे थांबी रस्त्यावरती, अन न्याहाळती आकाशहे सारे !
चाहुल घेही बंता, किती झाली गर्दी जमा, मनोमनी संताही सुखावे !
लोकही थांबुन तेथे पाहती आकाश ,जैसे पाहती संता अन बंता !!!
झाली सांज वेळ तो गेला किती काळ की रस्त्यावरती दिवे लागले !!
संता पाही मागे खुदकन हसे, की फसवले आपण सर्वांना !
फिरुनी मागे देखे ओशाळले ते दोघे राहिले उभे फक्त सरदार !!!!!
संता न बंता -
धमुचे केळवण (जेव्हा पुरी नि भाजी - )
प्रेषक अमोल केळकर ( गुरू, ०६/२६/२००८ - १३:२८) .
मनस्वी ताईंनी 'धमाल मुलासाठी 'केलेला केळवणाचा बेत पाहुन तोंडाला पाणी सुटले आणी हे काव्य ही स्फुरले
चालः जेव्हा तिची नि माझी चोरून भेट झाली ,झाली फुले कळ्यांची, झाडे भरास आली !!
गीत - मंगेश पाडगावकर
संगीत - यशवंत देव
स्वर - अरुण दाते
'
------------------------------------------------------------------------
जेव्हा पुरी नि भाजी ताटात ही पडाली !
जेवुनी हेच सारे ढेकर मस्त आली. !!
ताटातल्या अन्नांचे मणिहार मांडलेले !
भोवती काकडीचे सॅलेड सजलेले !
खुशीत पाहुण्यांची पंगतही बसली ! जेवुनी हेच सारे ढेकर मस्त आली. !!
आमटीतल्या शेंगाना कोवळा स्पर्श होता!
वाटीतल्या रसाला केसर रंग होता !
आ़जीच्या ताटातली बेसन वडी मिळाली ! जेवुनी हेच सारे ढेकर मस्त आली. !!
नसतेच भुक जेव्हा, असते शांत सारे
वासाचा गंध येता पोटात काव कावे
ओथंबला तुपानी मेतकुटभात भारी ! जेवुनी हेच सारे ढेकर मस्त आली. !!
अवांतर - कैवल्या माझ्यातर्फे हे कवितारुपी केळवण गोड मानुन घे
(सख्या रे, घामट मी तरुणी!)
प्रेषक चतुरंग ( मंगळ, ०६/२४/२००८ - २०:५८) .जगदीश खेबुडकरांचं, दीदींच्या आवाजातलं 'सख्या रे घायाळ मी हरणी' हे सुंदर गीत ऐकलं. प्रियकराला भेटायला निघालेल्या पण उन्हाळ्यानं आणि प्रदूषणानं हैराण झालेल्या तरुणीची कैफियत आमच्या नजरेसमोर आली!
(श्रेय - मूळ गाणे गुणगुणत असतानाच सौ. चतुरंग यांना काही ओळी स्फुरल्या आणि तो धागा पकडून लगोलग आम्ही विणकाम करायला घेतले!
)
हा लोट कसला, धूर असे हो दाट
अंधार दिवसा, कुठं दिसंना वाटं
कुण्या द्वाडानं हाणता गाडी
केली मनधरणी
सख्या रे, घामट मी तरुणी
धूळमाखला जर्द कोट अन् घाम घाम अंगात
ओघळणार्या थेंबांनांही कुबटवास दे साथ
कुठं पुसू मी, कशी पुसू मी, गेले भांबावुनी
थेंब उमलले चेहर्यावरती, प्राण दाटले डोळ्यात
केस गुंतले असती माझे, डबडबल्या त्या भेटीत
कुठं लपू मी, कशी लपू मी, गेले मी हरवुनी
चतुरंग

