मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

कुंपण

रांचो ·
लेखनप्रकार
खडकवाडीची वस्ती गावाच्या बाहेर नव्हती. ती गावातच होती—पण जिथे रस्ता अचानक अरुंद होतो, तिथे, एका अदृश्य रेषेच्या पलीकडे. इथे सकाळ कोंबड्याच्या आरवण्याने सुरू न होता रिकाम्या हंड्यांच्या आवाजाने होत असे. भांडी एकमेकांवर आपटल्यासारखा आवाज हा पाणी भरण्याचा नव्हे, तर दिवस सुरू झाल्याची खूण देणारा होता. वस्तीकरता एक हौद आणि गावासाठी एक विहीर—अशी पिढ्यान्‌पिढ्यांची रचना होती. ती आता इतकी सवयीची झाली होती की कुणालाच ती प्रश्न वाटत नव्हती. लक्ष्मी रोज पहाटे चारला उठायची. घरात पाणी उरलं नसेल, तर तिला राग येत नसे. राग करण्याची सवयच नव्हती. हंडे आतून धुऊन ठेवायचे.

आपरेशन सिंदूर : ट्रंप तात्या कोमात

विवेकपटाईत ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
ओपेरेशन सिंदूर नंतर ट्रंप तात्या कोमात गेले असे वाटू लागले आहे. तात्या एखाद्या मतिभ्रष्ट माणसासारखे बरगळू लागले आहे. नुकतेच ते म्हणाले भारत-पाक युद्धात अनेक जेट पडले. पण कोणाचे ते मात्र सांगू शकले नाही. अमेरिकेचे शेकडो आकाशात गमन करत हेरगिरी करणारे उपग्रह आणि सीआयए त्यांना खरी माहिती देऊ शकले नाही. बहुतेक खरी माहिती मिळाल्यानंतर त्यांना कळून चुकले असेल की भविष्यात भारताला ब्लॅक मेल करणे संभव नाही याचा मानसिक धक्का बसला आहे, हे मात्र निश्चित. माझा एक मित्र कट्टर मोदी विरोधी आहे, काल त्याने मला फोन करून म्हंटले, पटाईत, ट्रंप तात्या पुन्हा म्हणाले आहे, भारताचे जेट पडले.

गर्दी, चेंगराचेंगरी: कारणे, आकडेवारी आणि शास्त्रीय उपाय

माहितगार ·
लेखनप्रकार
प्रेर्ना चर्चा विजयोत्सवाला गालबोट - प्रा. डॉ. दिलीप बिरुटे आरसीबीचा हा विजय साजरा करण्यासाठी बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर कर्नाटक सरकारने संघाच्या सत्काराचा कार्यक्रमदेखील आयोजित केला होता. पण या कार्यक्रमाला चेंगराचेंगरीचं गालबोट लागले. अकरा जणांना आपल्या जीवाला नाहक मुकावं लागलं दुर्दैवी घटना. आपल्याकडे गर्दी आणि गर्दीचं नियोजन ही मोठी समस्या आहे. नियोजन नसल्यामुळे लोक वाटेल तसे जमेल तिथे गर्दी करतात. लोक ऐकत नाही आणि नियोजन कोलमडतं.

(ताज्या घडामोडी~ एप्रिल फूल २०२५)

अनन्त्_यात्री ·
चार भिडू डावे उजवेही चार कुंपणाच्या वर दोन भिडू भिडू भिडतात त्वेषे परस्परा मौज ही इतरा फुकटची राजकारणाच्या व्यतिरिक्त काही घडतची नाही देशात ह्या ऐसा आविर्भाव भिडू बाळगती आता झाले अती हौस फिटे

जॉन अब्राहम (अंतिम भाग ६)

श्रीगुरुजी ·
लेखनविषय:
जॉन अब्राहम (भाग १) >>> जॉन अब्राहम (भाग २) >>> जॉन अब्राहम (भाग ३) >>> जॉन अब्राहम (भाग ४) >>> जॉन अब्राहम (भाग ५) शेवटी २६ एप्रिलला व्हर्जिन्यातील एका शेतघरात तपास अधिकार्‍यांना बूथ व हेरॉल्ड सापडले. ते एका गवताच्या गंजीत लपले असल्याच

रासपुतीन ते पुतीन (ऐसी अक्षरे -२३)

Bhakti ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
रासपुतीन ते पुतीन - लेखक-पंकज कालुवाला २ आंतरराष्ट्रीय राजकारणातील गतिविधिमध्ये सामान्य गती असणारी मला यात उत्सुकता निर्माण झाली आहे. गाथा इराणी हे पुस्तक वाचतांना तेलासंबंधी आखाती देश व आंतरराष्ट्रीय देश यांचे राजकारण कसे सतत उतार-चढाचे हे समजले. ग्रंथालयात् रासपुतीन ते पुतीन हे पुस्तक दिसले.

निवडणूक: एका मतदान केंद्र व्यवस्थापनाचा पक्षांचा खर्च किती येतो

विवेकपटाईत ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
निवडणूकीच्या दिवशी मतदाता मत देण्यासाठी मतदान केंद्रावर जातो. मतदात्याने मतदान केन्द्रावर जाऊन आपल्या पक्षासाठी मतदान केले पाहिजे यासाठी प्रत्येक राजनीतिक पक्षाला यंत्रणा राबवावी लागते आणि त्यासाठी मनुष्यबळ ही लागतो आणि त्यासाठी पैसा ही खर्च करावा लागतो. लोकसभा निवडणूकीच्या वेळी दोन्ही पक्षांचे बूथ प्रमुख माझ्या समोरच लहानचे मोठे झाले होते. त्यांच्या कडून मिळालेल्या माहिती आधारावर हा लेख. लेखात बूथ व्यवस्थापकाचे नाव मी सचिन ठेवले आहे. सचिनच्या शब्दांत: सचिन मला म्हणाला, विवेकजी, निवडणूक आयोगाने निवडणूक घोषित केली.

एका तेलियाने(ऐसी अक्षरे-२२)

Bhakti ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
पुस्तकाचे नाव -एका तेलियाने लेखक - गिरीश कुबेर अ शेख अहमद झाकी यामिनी या पुस्तकाच्या २००९ पासून २०२३ पर्यंत, सतरा आवृत्ती निघाल्या आहेत. गाथा इराणी' या पुस्तकानंतर आखाती देशांबद्‌दल एक कुतूहल निर्माण झालेच आहे.

माझी योगचर्या

अनन्त्_यात्री ·
काव्यरस
भुजंगासनाची माझी रीत न्यारी डसेन जिव्हारी नकळत ॥१॥ शीर्षासन तर माझे आवडते नको ते उलटे पाहतो मी ॥२॥ "धनुरा"सनाची सवय लाविली "मशाल" फेकली दूरवर ॥३॥ सध्या "पद्मा"सन घालतो मुकाट ED चे झेंगट कोणा हवे? ॥४॥

२४० वर्षांचं परराष्ट्र व्यवहार मंत्रालय

पराग१२२६३ ·
भारताचा बहुतांश प्रदेश ब्रिटिशांच्या अधिपत्त्याखाली आल्यावर ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीला भारतात असलेल्या अन्य युरोपीय वसाहती आणि भारतीय संस्थानांबरोबरचा व्यवहार पाहण्यासाठी स्वतंत्र विभागाची गरज भासू लागली. तत्कालीन गव्हर्नर जनरल वॉरन हेस्टिंग्जच्या कार्यकाळात कंपनीच्या कोलकत्यातील Board of Directors ने परवानगी दिल्यावर 13 सप्टेंबर 1783 ला कंपनीचा भारतीय परराष्ट्र विभाग स्थापन झाला. भारताच्या सध्याच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचं (Ministry of External Affairs) ते मूळ मानलं जातं.