मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

सणासुदीची सफाई

माहितगार ·
लेखनविषय:
"नास्तिकांनी खायला कोंडा, उशाला धोंडाचं गाणं!" कितीही म्हटलं, तरी आपल्या देशाची पक्की जमीन धर्माच्या खाटेचीच सोय! पंथाच्या गादीची उब, सांस्कृतिक उशीसंगे अल्हाददायक झोप — आपलेसेपणा देणारी ही सोय बहुतेकांना हवीच असते, नाही का? सणांच्या आधी, माळ्यावरची समृद्ध अडगळ खाली उतरते, तेव्हा माळ्याचीही सफाई होते. तसंच काहीसं — मऊ मुलायम गादीसुद्धा, खूप दिवसांनी कडक होते. मग ती कारखान्यात जाऊन सासुफ-करून, पुन्हा मुलायम होते, स्वच्छ होते, दिवाळी अंकांनी वैचारीक कल्हई दिल्या सारखी. बेडही मधूनमधून हलवावा लागतो — कचरा, जळमटे बाजूला काढून पुन्हा नीट लावावा लागतो आपलच घर चकाचक दिसण्यासाठी . सणासुदीच्या निम

'मिसळपाव' चा गदारोळ

माहितगार ·

चित्रगुप्त Wed, 04/16/2025 - 11:33
उत्स्फूर्त कवनाची सर एआय-निर्मितीला नाही , हे पुन्हा पुन्हा सिद्ध होते आहे. आता शार्दूलविक्रिडीत, भुजंगप्रयात, मालिनी इत्यादि वृत्तांमधे एआयला कविता रचण्याचे फर्मान देऊन बघा बरे. जेमिनीमुनीकुमार संस्करण दुसरें याचा नेमके नाव काय आहे ? दुवा द्यावा.

In reply to by चित्रगुप्त

Bhakti Wed, 04/16/2025 - 12:12
आता शार्दूलविक्रिडीत, भुजंगप्रयात, मालिनी इत्यादि वृत्तांमधे एआयला कविता रचण्याचे फर्मान देऊन बघा बरे.

In reply to by चित्रगुप्त

माहितगार Wed, 04/16/2025 - 13:28
खरय एआयला अद्याप बरंच काही जमत नाहीए आणि जमत नाही आहे जेवढे दिवस जमले नाही तेवढेच एका अर्थानी चांगले आहे. जरावेळापुर्वी धार्मिक काव्य लिहीण्याची आज्ञा जमली नाहीतर एआअयला आठवडाभर ट्रान्सलितेरल ओर्गचा अभ्यास कर मग आठवड्याभरानंतर प्रॉम्प्ट पुन्हा देतो म्हटले. शार्दूलविक्रिडीत, भुजंगप्रयात, मालिनी इत्यादि वृत्तांमधे एआयला कविता रचण्याचे फर्मान देऊन बघा बरे. हे नक्की बघतो माझ्या वृत्तात न बसणार्‍या जुन्या कविता एआयला वृत्तात बसवता येतील का हे एक एक वृत्त वापरून सराव घेऊन बघावे लागेल.

In reply to by माहितगार

चित्रगुप्त Wed, 04/16/2025 - 13:51
जेमिनीला बाळ गंगाधर टिळकांवर कविता लिहीण्याचे फर्मान दिल्यावर आधी खालीलप्रमाणे आले: लोकमान्य बाळ गंगाधर टिळक सिंहापरी गर्जना, 'स्वराज्य हा जन्मसिद्ध हक्क' देशासाठी लढले ते, निष्ठावंत अन ध्येयासक्त. गणेशोत्सवाचा केला, लोकमंगल सोहळा जागृत केली जनशक्ती, पेटवला स्वातंत्र्याचा ज्वाळा. 'केसरी' गर्जला त्यांचा, भेदक वाणीचा तो वक्ता ब्रिटिशांच्या सत्तेला, दाखवला त्यांनी धाक खरोखरचा. मंडालेच्या तुरुंगातही, लेखणी त्यांची तळपली 'गीतारहस्या'तून ज्ञानाची, अमृतधारा अवतरली. ध्येयवेड्या त्या वीराला, शत शत प्रणाम आमचा स्वतंत्र भारताच्या इतिहासावर, अमिट ठसा त्यांचा. ----------------------------------------------- नंतर शा.वि. मधे लिहायला सांगितल्यावर खालील आले: Okay, here's the rewritten poem in the 'Shardulvikridit' meter: शार्दूलविक्रीडित वृत्त सिंहास्यें गर्जती 'स्वराज्य मम जन्मसिद्ध अधिकार' देशास्तव झुंजले सदा, ध्येयधुनी जगीं पेटवी फार. गणेशोत्सव लोकांसाठीं, मंगल सोहळा रम्य केला जागृत जन झाले सारे, स्वातंत्र्याचा वणवा चेतला. 'केसरी' गर्जला त्यांचा, भेदक वाणीचा वक्ता थोर ब्रिटिशांच्या सत्तेला, दाखविला धाक खरा कठोर. मंडालेच्या बंदींतहि, लेखणी तळपे ज्ञानोज्ज्वाला 'गीतारहस्य' अमृताची, वर्षिली धारा दिव्य त्याला. ध्येयासक्त विरा नमो, शत शत प्रणाम असोत अर्पिले स्वतंत्र भारताच्या यशांत, अमरत्व तयांनीं मिळविले.

In reply to by चित्रगुप्त

माहितगार Wed, 04/16/2025 - 17:29
विशेषतः शार्दूलविक्रीडित वृत्त छान वाचनीय झाली आहे. पण मी आज एक धार्मीक काव्य रचनेची जेमिनीला विनंती केली. तेवढी जमली नाही. एका प्रॉम्प्टवर रेन्डरींगचा अर्थ केवळ इमेज घेतला नाही तर आजीबात रिलिव्हंट नसलेली एका मॉडेलची इमेज प्रोड्युस केली. मग थोड्यावेळाने प्रयत्न सोडून दिले. पुन्हा मुड लागेल तेव्हा करेन .

In reply to by श्रीगुरुजी

चित्रगुप्त Wed, 04/16/2025 - 13:26
अवश्य लिहा, जात्यावर बसले की ओवी सुचेल, लिहायला बसले की मूड लागेल. लेखाची वाट बघत आहे.

In reply to by चित्रगुप्त

श्वेता२४ Wed, 04/16/2025 - 16:10
जात्यावर बसले की ओवी सुचेल, लिहायला बसले की मूड लागेल. काका तुमच्या मोनालिसाच्या गूढ स्मिताच्या कहाणीची वाट बघत आहे.

In reply to by श्वेता२४

श्रीगुरुजी Wed, 04/16/2025 - 16:26
मी पण. काका लवकरात लवकर लिहून पूर्ण करा. मोनालिसाला भेटून याच महिन्यात एक वर्ष झालं. तुम्ही लेख पूर्ण केला की पुनर्भेटीचा आनंद मिळेल.

In reply to by श्वेता२४

चित्रगुप्त Wed, 04/16/2025 - 16:50
मोनालिसाचा पुढला/अंतिम भाग लिहीण्याची माझी पण इच्छा आहे पण काही ना काही व्यावहारिक अडचणींमुळे सुरुवात होत नाहीये. तरी मिपाकरांच्या प्रेमळ आग्रहामुळे लिहायला बळ मिळेल.

चित्रगुप्त Wed, 04/16/2025 - 11:33
उत्स्फूर्त कवनाची सर एआय-निर्मितीला नाही , हे पुन्हा पुन्हा सिद्ध होते आहे. आता शार्दूलविक्रिडीत, भुजंगप्रयात, मालिनी इत्यादि वृत्तांमधे एआयला कविता रचण्याचे फर्मान देऊन बघा बरे. जेमिनीमुनीकुमार संस्करण दुसरें याचा नेमके नाव काय आहे ? दुवा द्यावा.

In reply to by चित्रगुप्त

Bhakti Wed, 04/16/2025 - 12:12
आता शार्दूलविक्रिडीत, भुजंगप्रयात, मालिनी इत्यादि वृत्तांमधे एआयला कविता रचण्याचे फर्मान देऊन बघा बरे.

In reply to by चित्रगुप्त

माहितगार Wed, 04/16/2025 - 13:28
खरय एआयला अद्याप बरंच काही जमत नाहीए आणि जमत नाही आहे जेवढे दिवस जमले नाही तेवढेच एका अर्थानी चांगले आहे. जरावेळापुर्वी धार्मिक काव्य लिहीण्याची आज्ञा जमली नाहीतर एआअयला आठवडाभर ट्रान्सलितेरल ओर्गचा अभ्यास कर मग आठवड्याभरानंतर प्रॉम्प्ट पुन्हा देतो म्हटले. शार्दूलविक्रिडीत, भुजंगप्रयात, मालिनी इत्यादि वृत्तांमधे एआयला कविता रचण्याचे फर्मान देऊन बघा बरे. हे नक्की बघतो माझ्या वृत्तात न बसणार्‍या जुन्या कविता एआयला वृत्तात बसवता येतील का हे एक एक वृत्त वापरून सराव घेऊन बघावे लागेल.

In reply to by माहितगार

चित्रगुप्त Wed, 04/16/2025 - 13:51
जेमिनीला बाळ गंगाधर टिळकांवर कविता लिहीण्याचे फर्मान दिल्यावर आधी खालीलप्रमाणे आले: लोकमान्य बाळ गंगाधर टिळक सिंहापरी गर्जना, 'स्वराज्य हा जन्मसिद्ध हक्क' देशासाठी लढले ते, निष्ठावंत अन ध्येयासक्त. गणेशोत्सवाचा केला, लोकमंगल सोहळा जागृत केली जनशक्ती, पेटवला स्वातंत्र्याचा ज्वाळा. 'केसरी' गर्जला त्यांचा, भेदक वाणीचा तो वक्ता ब्रिटिशांच्या सत्तेला, दाखवला त्यांनी धाक खरोखरचा. मंडालेच्या तुरुंगातही, लेखणी त्यांची तळपली 'गीतारहस्या'तून ज्ञानाची, अमृतधारा अवतरली. ध्येयवेड्या त्या वीराला, शत शत प्रणाम आमचा स्वतंत्र भारताच्या इतिहासावर, अमिट ठसा त्यांचा. ----------------------------------------------- नंतर शा.वि. मधे लिहायला सांगितल्यावर खालील आले: Okay, here's the rewritten poem in the 'Shardulvikridit' meter: शार्दूलविक्रीडित वृत्त सिंहास्यें गर्जती 'स्वराज्य मम जन्मसिद्ध अधिकार' देशास्तव झुंजले सदा, ध्येयधुनी जगीं पेटवी फार. गणेशोत्सव लोकांसाठीं, मंगल सोहळा रम्य केला जागृत जन झाले सारे, स्वातंत्र्याचा वणवा चेतला. 'केसरी' गर्जला त्यांचा, भेदक वाणीचा वक्ता थोर ब्रिटिशांच्या सत्तेला, दाखविला धाक खरा कठोर. मंडालेच्या बंदींतहि, लेखणी तळपे ज्ञानोज्ज्वाला 'गीतारहस्य' अमृताची, वर्षिली धारा दिव्य त्याला. ध्येयासक्त विरा नमो, शत शत प्रणाम असोत अर्पिले स्वतंत्र भारताच्या यशांत, अमरत्व तयांनीं मिळविले.

In reply to by चित्रगुप्त

माहितगार Wed, 04/16/2025 - 17:29
विशेषतः शार्दूलविक्रीडित वृत्त छान वाचनीय झाली आहे. पण मी आज एक धार्मीक काव्य रचनेची जेमिनीला विनंती केली. तेवढी जमली नाही. एका प्रॉम्प्टवर रेन्डरींगचा अर्थ केवळ इमेज घेतला नाही तर आजीबात रिलिव्हंट नसलेली एका मॉडेलची इमेज प्रोड्युस केली. मग थोड्यावेळाने प्रयत्न सोडून दिले. पुन्हा मुड लागेल तेव्हा करेन .

In reply to by श्रीगुरुजी

चित्रगुप्त Wed, 04/16/2025 - 13:26
अवश्य लिहा, जात्यावर बसले की ओवी सुचेल, लिहायला बसले की मूड लागेल. लेखाची वाट बघत आहे.

In reply to by चित्रगुप्त

श्वेता२४ Wed, 04/16/2025 - 16:10
जात्यावर बसले की ओवी सुचेल, लिहायला बसले की मूड लागेल. काका तुमच्या मोनालिसाच्या गूढ स्मिताच्या कहाणीची वाट बघत आहे.

In reply to by श्वेता२४

श्रीगुरुजी Wed, 04/16/2025 - 16:26
मी पण. काका लवकरात लवकर लिहून पूर्ण करा. मोनालिसाला भेटून याच महिन्यात एक वर्ष झालं. तुम्ही लेख पूर्ण केला की पुनर्भेटीचा आनंद मिळेल.

In reply to by श्वेता२४

चित्रगुप्त Wed, 04/16/2025 - 16:50
मोनालिसाचा पुढला/अंतिम भाग लिहीण्याची माझी पण इच्छा आहे पण काही ना काही व्यावहारिक अडचणींमुळे सुरुवात होत नाहीये. तरी मिपाकरांच्या प्रेमळ आग्रहामुळे लिहायला बळ मिळेल.
नक्कीच, दिलेल्या तीन लिंकमधील माहितीच्या आधारे एक कविता तयार करण्याचा प्रयत्न मी करत आहे. **कविता:** **शीर्षक: 'मिसळपाव' चा गदारोळ** चार भिडू डावे, उजवेही चार, कुंपणाच्या वर, दोन भिडू फार. भिडू भिडतात, त्वेषे परस्परा, मौज ही इतरा, फुकटची जरा. राजकारणाच्या व्यतिरिक्त काही, घडतची नाही, देशात ह्याही. ऐसा आविर्भाव, भिडू बाळगती, आता झाले अती, हौस फिटे किती. अवांछित मजकूर, डोळे फिरवतो, दुर्लक्ष करणे, उपाय ठरतो. मिसळपाव चा रस्ता, वळणावळणाचा, वाद-विवाद, विषय नानाच. बातमी ताजी, चर्चा नवी, मतमतांतरे, इथे दाटली जगी. 'मिसळपाव' चा थाट, न्यारा असा, प्रत्येकाचा आवाज, इथे घुमतो दाही दिशा. पण, हे भिडू,

स्त्रीत्वाचे शीलहरण!

गंगाधर मुटे ·
लेखनविषय:
स्त्रीत्वाचे शीलहरण!
 
स्त्रियाच करिती परस्परांचे 
शीलचारित्र्य हनन मस्त 
मातृत्वाचे वस्त्र फाडणे 
त्यांच्या लेखी दिसते स्वस्त
 
तारतम्य अन विवेकाचे
उरत नसते त्यांना  भान
कुस्करती मग एकमेकींचा 
स्त्रीयाच स्त्रीत्वाचा सन्मान
 
बघुनी नागड्या नालस्तीला
बीभत्सतेला येते ग्लानी
निती, सभ्यता, मानवताही
वितळून होती पाणी पाणी

मातृत्वाचा शृंगाररस

गंगाधर मुटे ·

कविता अजिबात आवडली नाही. मातृत्व आणि शृंगार ह्या दोन भिन्न भावना आहेत त्यांची सरमिसळ अजिबात आवडली नाही. पहिल्या कडव्यात तुम्ही उघडी पाठ , उभार, पदराखाली भरला माठ वगैरे वगैरे म्हणत आहात अन् नंतरच्या कडव्यात अहिल्या, झाशी, मीरा , कैकयी वगैरे ह्यांना आणत आहात. बाकीच्यांची तर नावे घ्यायचे माझे धाडस ही होत नाही. कुठल्या गोष्टी कुठे जोडत आहात. तुम्हाला दहशत कशी वाटत नाही "त्या" लोकांची ? असो. अभिव्यक्ती स्वातंत्र्य असल्याने तुम्ही तुमच्या रिस्क वर काय वाटेल ते लिहायला स्वतंत्र आहात. फक्त मिसळपाव थाळीत गुलाबजाम दिला म्हणून तो तर्री त घालून खाऊ नये. बाकी आपण सुज्ञ असा. इत्यलम

In reply to by प्रसाद गोडबोले

सुबोध खरे Mon, 10/21/2024 - 10:01
फक्त मिसळपाव थाळीत गुलाबजाम दिला म्हणून तो तर्री त घालून खाऊ नये. शृंगार रस आणि वात्सल्य रस यांची सरमिसळ( कि रसमिसळ) करण्याचा हेतू समजला नाही. कोणतीही व्यक्ती मग ती आई असो कि बहीण किंवा बाप हे सर्व भावभावना आणि रस पूर्ण असतेच. त्यात वात्सल्य शृंगारच कशाला क्रोध मोह इ भावना सुद्धा असतातच परंतु त्यांचे मिश्रण अप्रस्तुत किंवा अयोग्य ( inappropriate) वाटते. बाडीस जसे आपल्या आईवडिलांची वासना हि आपल्या जन्मास कारणीभूत आणि अत्यावश्यक असली तरी त्याचे सार्वजनिक अनावरण/ वाचन हे अप्रस्तुत असते. बाकी चालू द्या

In reply to by सुबोध खरे

गंगाधर मुटे Mon, 10/21/2024 - 10:50
सर्व रसांचे मिश्रण एकत्रित केले जाऊ नये, हे खरे आहे. पण ते मांडले जाऊच नये हे तितकेसे खरे वाटत नाही. त्यात बीभत्स, बटबटीत रूप येऊ नये इतकेच. मांडलेच जाऊ नये, या मताशी मी सहमत नाही मात्र मला ते जसे मांडायला हवे तसे मांडता आले नसेल तर तो माझा व्यक्तिगत दोष आहे. कवितेचा दोष असू शकत नाही.

In reply to by गंगाधर मुटे

चौकस२१२ Tue, 10/22/2024 - 13:29
जरी बटबटीत नसले तरि दोन वेगळेच रस कशाला एकत्र केलेत ते अजिबात कळले नाही त्या बाबतीत हुकलंय आणि नुसतच हुकली असे नहि तर काही भगःची जोडणी अप्रस्तुत वाटली पण अर्थात एवढेही लिहिण्याची माझ्य सारख्याकडे प्रतिभा नसल्यमुळे आमच्या पेक्षा तुम्ही जास्त चांगले कवी

In reply to by चौकस२१२

गंगाधर मुटे Tue, 10/22/2024 - 15:13
कविता कशी असावी आणि कविता कशी नसावी याबद्दल तुमच्या मनात एक अदृश्य साचा ठरलेला आहे. त्यामुळे कुणीही कविता लिहिले तरी तुमच्या मनातील साच्यानुसारच असावी असे तुम्हाला प्रामाणिकपणे वाटते. असे वाटणे खरंच योग्य आहे का, याचा आपण विचार करावा. तुमच्या समोर तुम्हाला पडलेल्या अनेक प्रश्नांची उकल आपोआप होईल.

गंगाधर मुटे Sun, 10/20/2024 - 15:02
तुम्हाला आवडली नाही याबद्दल कुणाचे हरकत असू शकत नाही. कोणतीही कलाकृती ज्याला जेवढी कळते तेवढ्या आधारावर तो आपले मत बनवत असतो आणि त्याच आधारावर आवडणे आणि नावडणे ठरत असते.

श्वेता२४ Sun, 10/20/2024 - 15:49
मातृत्व आणि शृंगार या दोन परस्परविरुद्ध असणाऱ्या गोष्टींची सांगड तुम्ही कवितेमध्ये कशी काय घातली असेल याच्या उत्सुकतेपोटी मी ही कविता वाचली. कवितेतील तीन कडवी - कधी असते मी झाशी,मीच कैकेयी, मीच भिमाई ही तीन कडवी बाजूला करून संपूर्ण कविता वाचली तर छान वाटली. माफ करा. काव्य समजून घेण्याची माझी समज फार नाही. परंतु ही तीनही कडवी रसभंग करतात असे वाटले. ती सोडून बाकीची सर्व कविता मला आवडली.

In reply to by श्वेता२४

गंगाधर मुटे Sun, 10/20/2024 - 16:40
प्रतिसाद बद्दल आभार. तुम्ही स्वतःच्या कवीते बद्दल बोलू नये आणि कविता उलगडून दाखवण्याचा प्रयत्न करू नये, असे माझे मत आहे. कविता लिहून झाली आणि एकदा प्रकाशित केली की नंतर काय बोलायचे ते कविताच बोलली पाहिजे. मात्र, आपण जे लिहिले ते कितपत शब्दात उतरले आणि रसिकापर्यंत पोहोचले याचा पडताळा घेण्यासाठी प्रतिसादांचा फार उपयोग होतो. कविते बाहेर बोलायचे असेल तर माझे मत असे आहे की, कोणतेही मातृत्व सर्व गुण संपन्न आणि सर्व रसांनी परिपूर्ण असते. जरी एखाद्या मातृत्वातला एखादाच गुण अधोरेखित होत असला किंवा ठळकपणे जाणवत असला तरी उरलेले गुण (अदृश्य स्वरूपात वगैरे) मातृत्वामध्ये असतेच, असे माझे मत आहे. मातृत्व हे सर्वठाई सारखेच असते. कैकयीची वर्तणूक तिचे मातृत्व प्रदर्शित करते तर कौशलेची वर्तणूक तिचे मातृत्व प्रदर्शित करते. व्यक्तिरेखा बदलल्या पण मातृत्व स्थायी आहे, असे माझे मत आहे.

In reply to by श्वेता२४

गंगाधर मुटे Sun, 10/20/2024 - 16:43
कवीने स्वतःच्या कवीते बद्दल बोलू नये आणि कविता उलगडून दाखवण्याचा प्रयत्न करू नये, असे माझे मत आहे. वरील प्रतिसादातील हे वाक्य असे वाचावे.

In reply to by श्वेता२४

गंगाधर मुटे Sun, 10/20/2024 - 16:51
आपण म्हणतात असे ते तीन कडवे काढून टाकले तरी कवितेला धक्का पोहोचत नाही. मूळ गाभा कायम राहतो. ते तीन कडवे फक्त उदाहरणादाखल नमुने म्हणून आलेले आहेत. या कडव्यांमुळे विषय थोडा समजून घेणे सोपे जाईल, असे वाटते.

विवेकपटाईत Sun, 10/20/2024 - 17:33
दोन वेगवेगळ्या कविता वाचल्या. पहिल्या कवितेची ही ओळ आवडली. लपून आडून चोरून बघती फुलामागुनी पिकले पान या वयात ही सुंदर फूल दिसले की नजर तिथे जातेच. मनाने आपण कधीच म्हातारे होत नाही. पान गळतीच्या काळात ही वसंताचे स्वप्न पाहतोच.

कर्नलतपस्वी Mon, 10/21/2024 - 09:44
जरी दिसतो तुम्हां दुरुनी माझ्याठायी हा एकच रस परी मी आहे सर्व रसांचा जणू घुसळला अमृतरस नायिकेने स्वताच स्पष्ट केले आहे की वरकरणी नटवी नार दिसत असले तरी माझ्यात इतर गुण अवगुण आहेत. मातृत्व-पितृत्व शृगांराची परिणीती याचा अर्थ त्याव्यतिरिक्त इतर कुठलेही भावना नाहीत असे समजणे बरोबर नाही. कवीता आवडली.

In reply to by गवि

विंजिनेर गुरुवार, 10/24/2024 - 23:49
असेच म्हणतो. ये कुछ जम्या नही पण हरकत नाही - काहीसं coke studio सारखं झालेय - त्यांची सगळीच कॉंपोझिशन्स जमतात असं नाही पण प्रयोग करायचं धाडस मला आवडतं जुनं नाव बोर्डावर पाहून छान वाटलं हे अजून एक.

कानडाऊ योगेशु Mon, 10/21/2024 - 10:51
पहीली आठ कडवी ही पुरुषसत्ताक समाजाचा एखाद्या स्त्रीकडे पाहण्याचा दृष्टीकोन आहे आणि बाकीची कडवी ही कवितेतील नायिकेने त्यांच्या दृष्टीकोनाला दिलेले उत्तर आहे. ह्या दोन्ही बाबींना कवीचे मतच आहे असे समजल्यामुळे काही प्रतिसादकर्त्यांची गफलत झाली आहे. ह्यावरुन विवेकानंदांच्या आयुष्यातील एक प्रसंग आठवला. विदेश दौर्यावर जाण्यापूर्वी जयपूरच्या महाराजांनी त्यांच्यासाठी एक समारंभ ठेवला होती ज्यात जयपूरच्या एका गायिका/गणिकेला बोलावले होते. विवेकानंदांना त्या समारंभात गेल्यावर ह्या गोष्टी कळल्या आणि त्यांना एका संन्यासाने एका गणिकेच्या अश्या मैफिलित असणे उचीत न वाटल्याने ते उठुन जायला लागले तेव्हा त्या गाणार्या गणिकेने संत मीराबाईची एक विरहणी गायला चालु केली आणि विवेकानंदाला त्वरीत अर्थबोध झाला. त्यांनी त्या गायिकेची केवळ माफिच मागितली नाही तर तिला 'तुझ्याकडुन मला अजुन एक शिकवण मिळाली आई' असेही संबोधले.

In reply to by कानडाऊ योगेशु

गंगाधर मुटे Mon, 10/21/2024 - 11:01
सखोल आणि तर्कशुद्ध दिलेल्या प्रतिसादाबद्दल आपला आभारी आहे. प्रत्येक मातेमध्ये सर्वच्या सर्व रस असतातच. अशी एकही माता असू शकत नाही जिच्यामध्ये सर्व रस सामावलेले नाहीत. दुर्गादेवीला फार कमी लोक दुर्गादेवी म्हणतात. बहुतांश लोक दुर्गा माता म्हणतात. दुर्गा हे वीर रसाचे सर्वोत्तम उदाहरण असले तरी ती माता आहेच.

In reply to by कानडाऊ योगेशु

विवेकानंदाला त्वरीत अर्थबोध झाला. त्यांनी त्या गायिकेची केवळ माफिच मागितली नाही तर तिला 'तुझ्याकडुन मला अजुन एक शिकवण मिळाली आई' असेही संबोधले.
>>> हे असल्या अतार्किक अनाकलनीय अपेक्षा ठेवल्यामुळे आजकाल कोणाला विवेकानंद व्हावेसे वाटतं नाही. गुलाबजाम तर्रीत घालून खायची हौस का असते लोकांना हे अनाकलनीय आहे. कालच एका सुप्रसिद्ध मंदिरात जाऊन आलो, आत देवीची मूर्ती आहे , तिला लोकं साष्टांग नमस्कार च करणार आहेत . पण बाहेरील शिल्पकलेत पत्रलेखिका आहे जी तिचे पुष्ट नितंब आणि कमनीय कटी दाखवत पत्र लिहीत आहे, किंवा दर्पण सुंदरी आहे जी तिचे उन्नत मोहाचे घट सावरत आरशात बघत केसांचा शृंगार करत आहे, त्यांच्याकडेही लोकांनी मातृभावाने पाहावे अन् "विवेकानंद" व्हावे ही अपेक्षाच अविवेकी आहे. असो.

In reply to by प्रसाद गोडबोले

कानडाऊ योगेशु गुरुवार, 10/24/2024 - 23:39
गुलाबजाम तर्रीत घालून खायची हौस का असते लोकांना हे अनाकलनीय आहे
. अगदी गुलाबजामुन व तर्री नाही तरी तश्याच प्रकारच्या काही पाककृती ऐकण्यात आल्या आहेत. मैसुर पाक ही अशीच एक फसलेली पाककृती होती. म्हणजे करायला गेलो एक आणि झाले दुसरेच असा प्रकार होता. तोच प्रकार पनीर बाबतही सांगितला जातो. म्हणजे नासलेल्या दूधावर केल्या गेलेल्या प्रयोगातुन रसगुल्ल्याचा जन्म झाला. मध्यंतरी आईसक्रिम पकोडा नावाची डिश पण लोकप्रिय होती.म्हणजे पकोडा तळायचा व बाहेर काढुन त्यात आईसक्रिम घालुन पुन्हा तळायचा असा काहीसा प्रकार होता. सोलापुरात चहाकॉफिच्या दुकानात मारामारी नावाचे पेय मिळायचे.चहा आणि कॉफि मिक्स करुन बनवले जायचे. टंकण्याचा एकुण उद्देश हाच कि पाककृती असो वा लेखनकृती ..प्रयोग करत राहिले पाहिजे काहीतरी नवीन हाती गवसु शकते.

वामन देशमुख Mon, 10/21/2024 - 12:19
वाट्टेल त्या गोष्टींची वाट्टेल तशी सरमिसळ करणे व वाट्टेल त्या प्रकारे ती सादर करणे असे प्रकार सदर धागाकर्त्यास नवीन नाहीत. --- बाकी, २०२४ मिपा प्रौढ दिवाळी अंकातील साहित्यरत्ने आधीच प्रकाशित होतील असे वाटले नव्हते.

In reply to by वामन देशमुख

गंगाधर मुटे Mon, 10/21/2024 - 14:29
तुमच्या वरील अर्ध्या प्रतिसादाबद्दल मला काहीच बनायचे नाही हे तुमचे मत आहे. आणि तुम्हाला वाटेल तसे मत बाळगायचा तुमचा अधिकार अबाधित आहे. ----- पण खालील अर्धा प्रतिसाद मान्य होण्यासारखा नाही. मी परत एकदा कविता वाचली आणि मला जे जाणवले त्यावरून मी हमखास सांगू शकतो की ही कविता कुठल्याही अंगाने Adult नाही. 1. कवितेत एकही थिल्लर, चिल्लर अथवा उत्तान शब्द आलेला नाही. त्यामुळे बाळबोधांना/नाबालिगांना कवितेतील शृंगार उलगडण्याची शक्यताच नाही. 2. कवितेतील अनेक रहस्य सहजासहजी सर्वांनाच कळेल अशी शब्द योजना नाही. कवितेतील अनेक उपमा, प्रतिमा आणि दृष्टांत सरसकट सर्वच भाषा प्रभुंना किंवा भाषातज्ज्ञांना किंवा समीक्षकांना किंवा गुणग्राहकांना कळण्याची शक्यता नाही. जिथे 80 वर्षाच्या म्हातार्‍याला कविता पूर्णपणे करण्याची शक्यता नाही तिथे कुठलेही स्थितीत 18 वर्षाखालील मुलाला कळेल अशी शक्यता असू शकत नाही. कवितेत माझ्या नजरेने बघितले तर खालील ओळ भयानक व अत्यंत खतरनाक आहे ज्या ओळी बद्दल माझ्यावर प्रचंड टीका होईल असा अंदाज व भीती होती पण अजूनही टीका झाली नाही याचा अर्थ ती ओळ उलगडली नसावी असा घेण्यास जागा आहे. हृदय-चक्षूंना वेधून घेते तन्मीलनाची नमनमिनार आपणास कधीकाळी जर अर्थ लागला तर मला विपु मधून अवश्य कळवा.

चांदणे संदीप Mon, 10/21/2024 - 12:47
बहिर्‍या ऐकवणे, आंधळ्या दाखवणे जमते कविते हे काम बहाद्दर असल्या काव्यास माझा केवळ प्रणाम! कविता आवडली. सं - दी - प

कंजूस Mon, 10/21/2024 - 13:26
वैचारिक कविता आहे. आमच्या मराठीच्या बाई (शिक्षिका) म्हणाल्या ते आठवलं. "तुम्हाला गुण हवे असतील तर आपली मतं पाजळू नका. कवितेच्या प्रश्नांवर उत्तरामध्ये कवी असं म्हणतो, तसं म्हणतो, आणि कवितेतल्याच ओळी परत लिहून काढा."

नठ्यारा Mon, 10/21/2024 - 18:05
गंगाधर मुटे, खूप दिवसांनी आलात. असेच वरचेवर येत रहा. उत्तरार्धात वात्सल्य रस आहे की वीररस आहे असा प्रश्न पडलात. शृंगार व वात्सल्य एकत्र जात नाहीत असं म्हणतात. पण वीर आणि शृंगार मात्र एकत्र चांगलेच खुलतात. झाशी, अहिल्या, कालिका वगैरे नावं येतात तेव्हा वीररसाची अपेक्षा असते. पुढे ती वात्सल्यरसात बदलते. हे रूपांतरण अलवार व्हायला हवं होतं. हे मझं वैयक्तिक मत आहे. विचारचक्रास चालना देणारी कविता आहे. म्हणून आवडली. सर्वस्वी पटली नाही तरीही आवडली. आपला नम्र, -नाठाळ नठ्या

In reply to by नठ्यारा

गंगाधर मुटे Mon, 10/21/2024 - 18:32
खूप खूप धन्यवाद. कवितेचा विषय आणि आवाका फार मोठा आहे. तो शब्दबद्ध करण्यात आपली लेखणी अपुरी पडू शकते. कदाचित भविष्यात हाच विषय कुणीतरी अधिक सक्षमतेने हाताळू शकेल.

स्वधर्म Mon, 10/21/2024 - 21:59
नायिकेला (विशेषत: सुंदर स्त्रीला) आपल्याकडे कसे पाहिले जाते, याची बहुतेक वेळा नीट जाणीव असते. या कवितेत नायिकेने पहाणार्यांना तिची दुसरी बाजू सांगण्याचा प्रयत्न केला आहे, असे वाटते. कदाचित ही कविता कुण्या मोठ्या कवीच्या नावे असती, तर लोक त्यांच्या वेगळ्या दृष्टीचे कौतुक करत असते.

चौकस२१२ Tue, 10/22/2024 - 13:21
हि कविता नक्की कशाबद्दल आहे ? शृंगार? स्त्री देहाची "काम" या अर्थातून वर्णन कि धाडसी महिला - माता ? ही रंगीली नटवी नार आणि मग एकदम .... मी झाशी, भीमाई, मी जीजाऊ.. दोन विषयांची मिसळ काही पटली नाही आणि कळली पण नाही

In reply to by चौकस२१२

गंगाधर मुटे Tue, 10/22/2024 - 15:09
कवितेत दोन विषय किंवा दोन रस यांची मिसळ झाली आहे असे मला तरी वाटत नाही. कवितेचा केंद्रबिंदू "मातृत्व" आहे आणि मातृत्वाची विभागणी होऊ शकत नाही. मातृत्व हे फक्त मानवी स्त्री पुरते मर्यादित नसते. मानवी स्त्री मधील मातृत्व आणि पशु, पक्षी यांच्यातील मातृत्व यात काहीही फरक नसतो जवळजवळ ते एकसमानच असते. माणूस, पशु,पक्षी, वनस्पती सहित सर्व सजीव यांच्या प्रजनन, पोषण आणि संरक्षण ह्या सर्व प्रेरणा बहुतांश प्रमाणात एकसमान आहेत.

In reply to by गंगाधर मुटे

चौकस२१२ Tue, 10/22/2024 - 15:32
"हिंदोळणाऱ्या पदरासंगे डुचमळते बेचैन उभार" आनि "कधी असते मी झाशी, अहिल्या" हे एकाच मालळे तील मणी ? नाही बुवा पटत .... असो कवी चा अधिकार आहे स्वतःचं मनाला पटेल ते लिहिण्याचाच तेवहा चालू द्या ..

In reply to by चौकस२१२

गंगाधर मुटे Tue, 10/22/2024 - 16:09
हिंदोळणाऱ्या पदरासंगे डुचमळते बेचैन उभार" ही दृष्टी रमतारामांची आहे. तर "कधी असते मी झाशी, अहिल्या... हे नायिकेने दिलेले उत्तर आहे. रमतारामांची दृष्टी वेगळी आणि कवितेच्या नायिकेची दृष्टी वेगळी. दोन दृष्टीमध्ये काहीही तुलना होत नसताना तुम्ही तुलना करण्याचा प्रयत्न करत आहात, त्यामुळे तुमच्यासमोर नको ते प्रश्न उभे राहत आहेत.

In reply to by गंगाधर मुटे

चौकस२१२ Tue, 10/22/2024 - 17:06
नको ते प्रश्न उभे राहत आहेत. कसले नको ते प्रश्न , अनेकांनी ह्याच पद्धतीचा प्रतिसाद निंदवले आहेत एकीकडे स्त्रीचे शृंगारिक / कामुक वर्णन आणि एकीकडे वीर रस ओतप्रोत भरलेली स्त्रियांचा उल्लेख एकाच कवितेत का केवळ स्त्रिया आहेत म्हणून ! हे म्हणजे उद्या जर एखाद्याने "मराठी संत, त्यांचे आध्यत्मिक कार्य आणि त्यांचे शरि सैष्ठव " हे एकाच निबंधात ( किंवा कवितेत ) घुसडले तर कसे वाटेल तसे आहे असो राग आलेला दिसतोय , तुम्ही जेवढे लिहू शकता त्याच्या जवळपास हि आम्ही नाही लिहू शकणार पण एक वाचक/ रसिक म्हणून प्रामाणिक प्रतिक्रिया नोंदवली

In reply to by चौकस२१२

गंगाधर मुटे Tue, 10/22/2024 - 17:57
मराठी संत, त्यांचे आध्यत्मिक कार्य आणि त्यांचे शरि सैष्ठव... एकाच निबंधात घुसडले तर.... तुम्हाला छान वाटले तर छान म्हणावे, वाईट वाटले तर वाईट होणारे, प्रशंसा करण्यायोग्य असेल तर प्रशंसा करावी, निंदा करण्यायोग्य असेल तर निंदा करावी, निषेध करावा, खडबडीत खरबडीत उत्तर द्यावे.... वाचक म्हणून हे सर्व अधिकार वाचकाला आहेतच. पण पण काय लिहावे आणि काय लिहू नये याचा निर्णय लिहिणाऱ्यांनी घ्यायचा असतो.... वाचणाऱ्यांनी नाही. तुम्ही तुमची मते जगावर लादण्याचा प्रयत्न समर्थनिय नाही. असे लिहिले तर काय होईल, तसे लिहिले तर काय होईल? असे उगीच प्रश्न स्वतःला पडू देऊ नका. कारण "काहीही होणार नाही" हे त्याचे उत्तर आहे. जे अस्सल असते, उपयुक्त असते तेच उत्क्रांतीच्या प्रवाहात टिकते. बाकी सारा काडीकचरा क्षणिक असतो, विशिष्ट कालावधीनंतर तो वाहून जातो आणि कालांतराने तो कसला सुद्धा रूपांतरीत होऊन नष्ट होतो.

In reply to by गंगाधर मुटे

चौकस२१२ Tue, 10/22/2024 - 18:10
"तुमची मते जगावर लादण्याचा नाही हो ....." नाही हो एक काहीतरी खटकलेली गोष्ट किंवा विस्कळीत गोष्ट जी इतराना जाणवली ती फक्त दाखवली " कला निर्माण करण्याऱ्या बंधने असू नयेत" या तत्व खाली काय वाटेल ते चालेल" असा तुमचा रोख दिसतोय ... त्यामुळे बोलणे खुंटले उद्याच "समर्थांचे श्लोक आणि त्यांच्या दंड बैठका" यावर जिलब्या पाडतो कारण "काय लिहावे आणि काय लिहू नये याचा निर्णय लिहिणाऱ्यांनी घ्यायचा असतो."

गंगाधर मुटे Wed, 10/23/2024 - 14:14
@चौकस212 सर्व सजीव सृष्टी मधील माता आणि तिचे मातृत्व हा कवितेचा केंद्रबिंदू आहे. मानवी स्त्री कवितेत केवळ त्या मातृत्वाचे प्रतिनिधित्व करते. मानवी स्त्री कवितेची नायिका असणे, कवितेची गरज म्हणून निमित्तमात्र आहे. मातृत्व हे फक्त मानवी स्त्री पुरते मर्यादित नसते. मानवी स्त्री मधील मातृत्व आणि पशु, पक्षी यांच्यातील मातृत्व यात फारसा काही फरक नसतो, जवळजवळ ते एकसमानच असते. माणूस, पशु, पक्षी, वनस्पती सहित सर्व सजीव यांच्या प्रजनन, पोषण आणि संरक्षण ह्या सर्व प्रेरणा बहुतांश प्रमाणात एकसमान आहेत. माझे मत असे आहे की, कोणतेही मातृत्व सर्व गुण संपन्न आणि सर्व रसांनी परिपूर्ण असते. जरी एखाद्या मातृत्वातला एखादाच गुण/रस अधोरेखित होत असला किंवा ठळकपणे जाणवत असला तरी उरलेले गुण (अदृश्य स्वरूपात वगैरे) मातृत्वामध्ये असतेच, असे माझे मत आहे. सर्व रसांनी परिपूर्ण नाही असे मातृत्व असू शकत नाही. जसे मानवी स्त्रीमध्ये स्त्रीत्व जन्मताच येते तसेच मातृत्वही उपजत असते. शृंगार ही मातृत्वाची प्राथमिक गरज आहे. त्यामुळे कोणतेच मातृत्व शृंगारहीन असू शकत नाही. मातृत्व हे सर्वठाई सारखेच असते. उदाहरणार्थ... कैकयीची वर्तणूक तिचे मातृत्व प्रदर्शित करते तर कौशल्येची वर्तणूक तिचे मातृत्व प्रदर्शित करते. व्यक्तिरेखा बदलल्या पण मातृत्व स्थायी आहे, असे माझे मत आहे. कविता तुकड्या तुकड्यात दिसत असली तरी मुळात ती कविता मातृत्वाभोवती फिरत असल्यामुळे कविता एकजिनसी आहे. मातृत्व आणि मातृत्वाच्या प्रेरणा केंद्रबिंदू म्हणून कविता वाचली तर कविता उलगडायला फार अवघड जाऊ नये.

In reply to by गंगाधर मुटे

सुबोध खरे गुरुवार, 10/24/2024 - 11:59
मानवी स्त्री मधील मातृत्व आणि पशु, पक्षी यांच्यातील मातृत्व यात फारसा काही फरक नसतो, आपण कविता करावी जीवशास्त्रात जाऊ नये अशी नम्र विनंती आहे. कोकिळा आपले अंडे कवळ किंवा दुसऱ्या पक्षाच्या घरट्यात घालते आणि ते अंडे उबवणे आणि पिल्लाचे संगोपन करणे हे तो दुसरा पक्षी आणि त्याची मादी करते. माशाची मादी अंडी घालून पाण्यात सोडून देते. पिले अंड्यातून बाहेर आली कि स्वतःचे अन्न स्वतः मिळवून वाढू लागतात. खेकड्याची मादी पोटातून पिल्ले बाहेर सोडून देते त्यानंतर पिल्ले स्वावलंबीच असतात. काही माशात आणि बेडकांच्या जातीत नर पिल्लाना ती मोठी होईस्तोवर आपल्या पाठीवर बाळगतात. तेंव्हा पशु पक्षी आणि मानव यातील मातृत्व हे मुळीच सारखे नाही. उत्क्रांतीच्या उतरंडीत प्राणी जितक्या उच्च दर्जाचा आहे तितके मातृत्व जास्त जास्त कठीण होत जाते. कुत्र्या मांजराची पिल्ले काही दिवसातच वासाने स्वतःचे अन्न'स्वतः मिळवू शकतात तर मानवी बालपण कित्येक वर्षे लांब आहे त्यामुळे तितकी वर्षे मातेला बालकाची सर्वतोपरी काळजी घ्यावीच लागते. मानवी मातृत्व हे अतिशय उच्च कोटीचे असू शकते. हिरकणी सारखी उदाहरणे आपण वाचली असतीलच. बाकी चालू द्या

In reply to by सुबोध खरे

गंगाधर मुटे गुरुवार, 10/24/2024 - 15:45
तुम्ही तुमची मते कविवर लादू नयेत, अशी आपणास माझी नम्र विनंती आहे. कविता वाचून कवीला जीवशास्त्राची असलेल्या जाणीवेची खोली जशी तुम्हाला कळलेली आहे तशीच तुमचे प्रतिसाद वाचून जीवशास्त्राची तुम्हाला किती जाणीव आहे हे मलाही कळलेले आहेत. कुणी कितीही स्वतःला एखाद्या विषयातला तज्ञ समजत असला तरी तो तज्ञ असतोच, असे काहीही नाही.

In reply to by गंगाधर मुटे

गंगाधर मुटे गुरुवार, 10/24/2024 - 19:48
तुमच्या प्रतिसादात पशु पक्षी आणि मानवी मातृत्व यांतील भेद सांगताना आपण जे निकष वापरले तेच निकष वापरून भारतासारख्या अत्यंत विषम संस्कृती, विषम आर्थिक स्थिती, विषम सामाजिक स्थिती, विषम सोयीसुविधा, विषम परिस्थितीत जगणारे सरकसकट सर्व मानवी मातृत्व एकसमान आणि अतिशय उच्च कोटीचे कसे असते, हे सिद्ध करून दाखवा.

In reply to by सुबोध खरे

गंगाधर मुटे गुरुवार, 10/24/2024 - 19:44
तुमच्या प्रतिसादात पशु पक्षी आणि मानवी मातृत्व यांतील भेद सांगताना आपण जे निकष वापरले तेच निकष वापरून सरकसकट सर्व मानवी मातृत्व एकसमान आणि अतिशय उच्च कोटीचे कसे असते, हे सिद्ध करून दाखवा.

In reply to by गंगाधर मुटे

सुबोध खरे गुरुवार, 10/24/2024 - 19:55
हायला काहींच्या काही विधान तुम्ही करायचे आणि मी काहीतरी सिद्ध करून दाखवायचे हे तुम्हीच मला आव्हान द्यायचे. इतका भंपकपणा पाहिला नव्हता

In reply to by गंगाधर मुटे

चौकस२१२ गुरुवार, 10/24/2024 - 15:09
मुळात ती कविता मातृत्वाभोवती फिरत असल्यामुळे खालील ओळीत जर "मातृत्व" असेल तर माझी उंची १० फूट आणि मी पाण्यावर चालू शकतो ! गोप बघुनी झाकू पाहते पदराखाली भरला माठ! डुचमळते बेचैन उभार पहिली अनेक कडवी हि चांगल्यापैकी जमलेले स्त्रीदेहाचे / वृत्तीचे शृगांरिक वर्णन आहे उगा मातृत्व वैगरे कसली कल्हई लावताय धन्य ते कवीश्वर

In reply to by चौकस२१२

गंगाधर मुटे गुरुवार, 10/24/2024 - 15:50
तुमच्या प्रतिसादावरून निदान असे जाणवते की जे तुम्हाला दिसतील तेवढेच खरे असते, बाकी सर्व खोटे असते.. असा तुमचा एकंदरीत समज आहे. आपण उदृत केलेल्या ओळी कवितेच्या विषयाच्या अनुषंगाने मातृत्वाशी निगडित आहेत असे मला वाटते, तुम्हाला नाही वाटत त्याला मी काय करू? ही कविता आहे. साता समुद्रा पलीकडे पोहोचू शकते. कवी काय त्या कवितेसोबत फिरून प्रत्येकाला अर्थ समजावून सांगू शकतो का? ज्याला जेवढा अर्थ लागला तेवढा त्याने घ्यावा. विषय संपला. तुम्हाला शंभर टक्के समजेल अशा कविता कवींनी लिहाव्या.... असल्या तत्त्वज्ञानाला काही अर्थ आहे का?

In reply to by चौकस२१२

गंगाधर मुटे गुरुवार, 10/24/2024 - 16:37
टीकेचे दोन प्रकार असतात. स्वीकार करण्यायोग्य, सन्मान करण्यायोग्य अस्वीकार करणे योग्य, लाथाडने योग्य सरसकट टिकेचा स्वीकार केला तर लोक एका दिवसात नराला वानर बनवून टाकतील. :D

In reply to by चौकस२१२

गंगाधर मुटे गुरुवार, 10/24/2024 - 16:40
खरंतर तुम्ही अजून पर्यंत कवितेवर टीकाच केलेली नाही. तुम्ही केवळ कवीला शहाणपणा शिकवत सुटलेले आहात आणि त्यालाच कवितेवरची टीका समजत आहात. कवीला शहाणपणा न शिकवता कवितेवर वाटेल तशी टीका करा. तो तुमचा अधिकार आहे. कवीला शहाणपणा शिकवणे हाही तुम्हाला अधिकार आहेच... पण तो शहाणपणा स्वीकारायचा की नाकारायचा याचा अधिकार कवीला आहे याचे भान ठेवा.

In reply to by गंगाधर मुटे

सुबोध खरे गुरुवार, 10/24/2024 - 18:57
मानवी स्त्री मधील मातृत्व आणि पशु, पक्षी यांच्यातील मातृत्व यात फारसा काही फरक नसतो, हे विधान जरा सिद्ध करून दाखवाल का? बाकी "तुमची कविता आणि त्यातील सार, त्याचे काव्यात्मक मूल्य. कवीचे अधिकार आणि सार्वजनिक स्थळावर कविता टाकल्यास वाचकाचे अधिकार" हे मुद्दे वेगळे आहेत. त्यावर कुणी टीका केली तर तुम्ही वसकन अंगावर येता हे काही पटलं नाही. बाकी नाना पाटेकरांच्या सिनेमात म्हटल्याप्रमाणे --लिपस्टिक लावून खिडकीत बसला तर खालून जाणाऱ्या माणसाने "शुक शुक" केले तर चिडचीड करू नये. तेंव्हा आपण फक्त जीवशास्त्राबद्दल बोलू या. '' म्हणजे "मानवी स्त्री मधील मातृत्व आणि पशु, पक्षी यांच्यातील मातृत्व यात फारसा काही फरक नसतो" हे विधान सिद्ध करून दाखवा

In reply to by सुबोध खरे

गंगाधर मुटे गुरुवार, 10/24/2024 - 19:59
१ ) मानवी स्त्री मधील मातृत्व आणि पशु, पक्षी यांच्यातील मातृत्वात प्रचंड फरक असतो . ... हे तुम्हीच सिद्ध करून दाखवा. २ ) आपण वरील एका प्रतिसादात मातृत्व याबद्दल जे निकष मांडले आहेत . ... त्याला मातृत्व म्हणतात, हे सिद्ध करून दाखवा . ३ ) केवळ अपत्य जन्माला घालणे म्हणजे मातृत्व असते हे सिद्ध करून दाखवा. ४) माणसाने "शुक शुक" केले तर चिडचीड करू नये. >>> असा इतरांना सल्ला देण्याइतपत तुमची काय पात्रता आहे, हे सिद्ध करून दाखवा. ५) तुम्ही दिलेला सल्ला इतरांनी ऐकावा... इतके ते अपात्र कसे आहेत हे सिद्ध करून दाखवा. किंवा ६) इतरांना प्रश्न विचारून त्यांनाच सिद्ध करायला सांगणे . .. यासाठीच तुमचा जन्म झाला आहे . ... हे तरी सिद्ध करून दाखवा. ====== मी तुमचा गुलाम नसल्याची माझी खात्री असल्याने मी तुमच्या कोणत्याही प्रश्नाचे उत्तर देण्यास अथवा सिद्ध करून दाखवण्यास बांधील नाही. सबब . .. आपण दुसरा वेठबिगार शोधून त्याचेशी असे वर्तन करावे . .... हि आग्रहाची विनंती.

In reply to by गंगाधर मुटे

सुबोध खरे गुरुवार, 10/24/2024 - 20:18
इतकी चिडचिड करू नका. विधान सिद्ध करता येत नसेल तर सरळ क्षमस्व म्हणून पुढे जावे. उगाच शब्दांचा डोंगर उभा करून दुसर्यालाच त्याचे विधान सिद्ध करून दाखवा हा अट्टाहास आणि दुराग्रह कशासाठी. माझे विधान मी सहज सिद्ध करून दाखवू शकतो परंतु तुमच्या धाग्याचं काश्मीर करायची इच्छा नाही. एक साधे उदाहरण देऊन मी थांबतो राणी मुंगी किंवा राणी माशी केवळ हजारो लाखो अंडी घालते आणि पुढे त्यांचे काहीच करत नाही. तिचा आणि वात्सल्याचा काहीही संबंध नाही त्यांचे सर्व पालनपोषण कामकरी मुंग्या किंवा माश्याच करतात. मानवी मादी असे काही करत नाही. उत्क्रांती मध्ये जसे जसे वर जाता तसा आईचा संगोपनात सहभाग वाढत जातो. हे मूलभूत विधान तुम्हाला मान्यच नसेल तर पुढे चर्चा होणारच नाही बाकी तुमचे आत्मकुंथन आणि "मीच कसा हुशार" चालू द्या

In reply to by सुबोध खरे

गंगाधर मुटे गुरुवार, 10/24/2024 - 20:31
पुन्हा सल्ला दिलेल्याच आहे. सल्ला देण्याशिवाय ही दुसरी तुम्हाला काही येते का? दुसऱ्याला सिद्ध करायला सांगणार आणि तुम्ही सिद्ध करून दाखवा म्हटलं की दुनियाभराच्या पळवाटा शोधणार. तुमच्यात काही कौशल्य आणि पात्रता असेल तर मी विचारलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे द्या. नाहीतर क्षमस्व असे म्हणून वाट पकडा. गाठ माझ्याशी आहे. यापूर्वी बरेचदा मी तुमच्याकडे दुर्लक्ष केले. यावेळेस तसे होणार नाही. फैलावर घेतले जाईल याद राखा. स्वतःची थोडीशी तारतम्य जागे करा आणि हा कवितेचा बाफ आहे, इथे कवी बद्दल नव्हे तर कवितेची चर्चा करायची असते इतके उमजून घ्या. कवितेची थोडी जरी जाण असेल आणि थोडी जरी कविता कळत असेल तर तुमच्या आयपतीप्रमाणे कवितेचे पूर्ण अर्थ लिहून दाखवा. वाचायला आवडेल. दरवेळेस कवितेचा धागा फालतूची बडबड करून भरकटवायची तुमची शैली यावेळेस खपवून घेतली जाणार नाही. याद राखा. पुन्हा दुसरे असे की, तुम्ही मला सल्ला सांगावा अशी कोणतीही पात्रता तुमच्यात नाही. त्यामुळे जास्तीचे शहानपण पाजळणे बंद करा. यानंतर मरेस्तोवर मला शहाणपणा शिकवायला यायचे नाही. आणि सल्ला तर अजिबात द्यायचा नाही.

In reply to by गंगाधर मुटे

सुबोध खरे गुरुवार, 10/24/2024 - 20:41
राणी मुंगी किंवा राणी माशी केवळ हजारो लाखो अंडी घालते आणि पुढे त्यांचे काहीच करत नाही. तिचा आणि वात्सल्याचा काहीही संबंध नाही त्यांचे सर्व पालनपोषण कामकरी मुंग्या किंवा माश्याच करतात. मानवी मादी असे काही करत नाही. हे वाचलं च नाही का? इतकी चिडचिड नुसतं एक चूक दाखवली तर आणि काय आपली भाषा सुद्धा? दुनियाभराच्या पळवाटा तुमच्यात काही कौशल्य आणि पात्रता असेल गाठ माझ्याशी आहे. स्वतःची थोडीशी तारतम्य जागे करा कवितेचा धागा फालतूची बडबड करून भरकटवायची तुमची शैली यावेळेस खपवून घेतली जाणार नाही. याद राखा. तुम्ही मला सल्ला सांगावा अशी कोणतीही पात्रता तुमच्यात नाही. त्यामुळे जास्तीचे शहानपण पाजळणे बंद करा. यानंतर मरेस्तोवर मला शहाणपणा शिकवायला यायचे नाही. आणि सल्ला तर अजिबात द्यायचा नाही. मुटे बुवा इतकी अर्वाच्च भाषा मला सुद्धा सहज वापरता येते. पण मी सभ्य भाषेत सांगतो आहे तुम्हाला जे करायचं ते करून दाखवाच "याद राखा." "उगाच माझ्याशी गाठ आहे" सारखी फडतूस गावगुंडांची वाक्ये बोलून आपले हसे करू नका.

In reply to by सुबोध खरे

चौकस२१२ Fri, 10/25/2024 - 06:34
सहमत ( कवित्ते वरील टीकेला थोडे जरी समजून घेतले असते या महाशयांनी तरी सकारात्मक बोलणी झाली असती ) त्या ऐवजी "माणूस आणि पशु यातील मातृर्त्व " या बद्दल एक शिक्षित विदयाला हे अक्कल समजावत आहेत ! धन्य

In reply to by गंगाधर मुटे

कर्नलतपस्वी गुरुवार, 10/24/2024 - 20:53
आपली कविता ज्याना आवडली त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. ज्यांना नाही पटली त्यांनी न पटणारे मुद्दे उपस्थित केले. आपल्याला ज्या प्रतिक्रीया अनुकूल वाटल्या त्याला स्विकारले व चान चान म्हणले. ज्या प्रतिक्रिया प्रतिकूल होत्या त्यांनाच पचवणे कठिण जात आहे. लिपस्टिक लावून खिडकीत बसलात तर रस्त्यावरून जाणारा शुक शुक करणार हे नागडे सत्य आहे. आपण आपली कविता चव्हाट्यावर आणलीत मिळणाऱ्या प्रतिसादानां सहर्ष सामोरे जावे. अन्यथा..... आपण डाॅ सुबोध खरे यांच्यावर व्यक्तिगत हल्ला केला. तोच प्रश्न आपली लायकी काय हे विचारण्यास उद्युक्त करतो. बरेच सदस्य डाॅ सुबोध खरे यांना अनेक वर्षांपासून ओळखतात.आपण त्यांच्या पात्रतेवर शंका उपस्थित करून आपलीच आपलीच पात्रता चव्हाट्यावर आणली आहे. इतरांना सल्ला देण्याइतपत तुमची काय पात्रता आहे, हे सिद्ध करून दाखवा. मिपावर सर्व सदस्य सन्मानीय, म्हणून कुणालाही कुणाची पात्रता काय हे विचारण्याचा अधिकार नाही. आपला तोल जातोय,सांभाळा स्वताला. नाहीतर डोक्यावर घेणारे केव्हां कुठे कचऱ्यात फेकून देतील कळणार नाही.

धर्मराजमुटके Wed, 10/23/2024 - 22:06
छान ! कवितेत एकूण १६ परिच्छेद (की कडवी) आहेत. त्यापैकी पहिले १० परिच्छेद शृंगार रसाला वाहिले आहेत, ११ व्या परिच्छेदात पहिल्या १० चे सार सांगीतले आहे. १२ व्या कडव्यात वीररस, आणि पुढील ४ परिच्छेदात मातृरस जाणवतो. म्हणजे जर १६ घड्यांत पाणिपुरीचे पाणी आहे. तिखट पाणीपुरी (शृंगार) जास्त लोकांना आवडते त्यामुळे त्याचे प्रमाण जास्त घेतले आहे. ज्यांना वयोमानानुसार तिखट झेपत नाही त्यांच्यासाठी गोड पाणी ठेवले आहे. जर दोन्ही चवी एकत्र घ्यायच्या असतील तर ११ व्या परिच्छेदात दोन प्रकारच्या रसांची घुसळण करुन अमृतरस बनविला आहे. तस्मात वेगवेगळे रस एकत्र केले आहेत असे जाणवत नाही. ११ पर्यंत आणि १२-१६ अशी दुसरी वेगळी कविता आहे. त्यामधे एक अदृश्य रेखा आहे ती फक्त कवीमनालाच जाणवते. एकंदरीत मजकूर पाहता "मातृत्वाचा शृंगाररस" ऐवजी "शृंगाराचा मातृत्वारस" हे शीर्षक जास्त शोभून दिसले असते असे वाटते. असो, मुटे साहेब बरेच दिवसांनी परत आलात याबद्दल अभिनंदन ! लिहिते रहा. राजकीय धागे बंद झाल्यापासून मिपावर होणारी विचारांची घुसळण थांबली होती ती या कवितेच्या निमित्ताने पुन्हा पाहायला मिळाली हेही नसे थोडके ! (अवांतर : दहावीच्या मराठीच्या परीक्षेत कवीतेचे रसग्रहण करा हा प्रश्न सोडविल्याचा आनंद मिळाला.)

In reply to by धर्मराजमुटके

चौकस२१२ गुरुवार, 10/24/2024 - 08:20
११ पर्यंत आणि १२-१६ अशी दुसरी वेगळी कविता आहे. हो हेच तर म्हणणे आहे काहीसे ( तुम्ही जास्त चांगल्या पद्धतीने मांडलेत ), आणि त्यांची भेसळ विचित्र वाटते एवढेच म्हण्णे आहे पण कवी महाशय मखलाशी करीत राहतात ....असू दे

चौकस२१२ गुरुवार, 10/24/2024 - 08:16
मातृत्व अर्थात म्हणजे स्त्री आणि स्त्रीचे शारिक सौंदर्य या दोन ची विचित्र भेसळ कशाला हा साधा मुद्दा आहे डॉ खरे यांचं प्रतिक्रयेत "जसे आपल्या आईवडिलांची वासना हि आपल्या जन्मास कारणीभूत आणि अत्यावश्यक असली तरी त्याचे सार्वजनिक अनावरण/ वाचन हे अप्रस्तुत असते. " असा उल्लेख आहे तसेच म्हणेन कि " आईवडिलांचं संभोगातुन आपण निर्माण झालो पण म्हणून एकाच रचनेत "संभोगाचे सौंदर्य आणि आमचे आई वडील " लिहिणे विचित्र वाटते "कुणी म्हणाले शेंग चवळीची कुणी म्हणाले पेवंदी आम" "ही रंगीली नटवी नार" आणि "अहिल्या ( बाई होळकर) एकत्र ? पहिले १० परिच्छेद शृंगार रसाला वाहिले आहेत, आणि ती मस्तच आहेत

In reply to by चौकस२१२

गंगाधर मुटे गुरुवार, 10/24/2024 - 16:30
मातृत्व अर्थात म्हणजे स्त्री>>>> काहीच्या काही वाक्य आहे हे. ----- कुणी म्हणाले शेंग चवळीची कुणी म्हणाले पेवंदी आम" "ही रंगीली नटवी नार" ही रमतारामांची दृष्टी आहे. अहिल्या ( बाई होळकर) हे मातृत्वाने दिलेले उत्तर आहे. ही कविताच रमता राम आणि मातृत्व यांचा संवाद असल्याने दोन्ही एकाच कवितेत एकत्र येणारच.

In reply to by चौकस२१२

गंगाधर मुटे गुरुवार, 10/24/2024 - 16:33
डॉक्टर खरे यांचे विधान तुमच्यासाठी प्रमाण असेल तर तुम्ही त्यानुसार वर्तन करावे माझी कुठेही मनाई नाही. पण माझ्यासाठी जर प्रमाण नसेल किंवा मला अजिबात पटणारे नसेल तर मी का ऐकावे? तुम्ही आणि डॉक्टर खरे दोघे मिळून का बरं सृष्टीचे नियमन करू पाहता? तुमच्या इशाऱ्यावर अख्खीच्या अख्खी दुनिया चालणार नाही इतके भान ज्या दिवशी तुम्हाला येईल तो दिवस सोन्याचा समजावा.

In reply to by गंगाधर मुटे

सुबोध खरे गुरुवार, 10/24/2024 - 19:11
तुम्ही आणि डॉक्टर खरे दोघे मिळून का बरं सृष्टीचे नियमन करू पाहता? तुमच्या इशाऱ्यावर अख्खीच्या अख्खी दुनिया चालणार नाही इतके भान ज्या दिवशी तुम्हाला येईल तो दिवस सोन्याचा समजावा. हा निष्कर्ष आपण कशावरून काढला हे समजत नाही. पण आपल्या कवितेला फक्त छान छान म्हणवून घ्यायचं असेल तर सार्वजनिक न्यासावर ती टाकू नये. एखाद्या कविसंमेलनातच वाचन करावे म्हणजे श्रोत्यांचे म्हणणे ऐकायची गरजच राहणार नाही. लिपस्टीक लावून खिडकीत बसलात तर रस्त्यावरून जाणारे "शुक शुक" करणारच एवढे लक्षात ठेवा.

In reply to by गंगाधर मुटे

चौकस२१२ गुरुवार, 10/24/2024 - 19:20
कसले नियम ठरवतोय ,, सरळ साधी टिपण्णी केली कि जरी दोन्ही रसांचे वर्ण ( कि तीन काय ते तुमचच्या डोक्यात असावे ) स्वतंत्ररित्या चांगले असले तरी त्याची विचित्र मिसळ झाली आहे ,, खरेंनी त्यांच्या पद्धतीने हा मुद्दा मांडला मी माझ्या ... कुणी म्हणाले कामुक मैना आणि भिमाई जिजाई ,,,, काय संबंध पुरुषाला स्त्री कामुक वाटते आणि या दोन्ही स्त्रिया होत्या हा बादरायण संबंध लावताय तुम्ही ..आणि विचारला तर विचार स्वातंतरी वैगरे तुंबड्या लावताय

In reply to by चौकस२१२

गंगाधर मुटे गुरुवार, 10/24/2024 - 17:24
जो कवी वाचक घडवतो, वाचकांना घडवतो, वाचकांची विचार करण्याची दिशा बदलून टाकतो, वाचकांच्या आयुष्याची दिशा बदलून टाकतो... तो जातिवंत कवी असतो. जो कवी वाचकांना काय रुचेल, काय आवडेल, काय समजेल, काय पटेल याचा विचार करून लिहितो तो बाजारू कवी असतो.

चौकस२१२ गुरुवार, 10/24/2024 - 08:42
या सर्व स्त्रिया अप्रतिम लावण्यवती असतील ( असे धरुयात, आपण कुठं बघितलंय ) त्या स्त्रिया असल्यामुळे त्यांच्यापढे साहजिकच पुरुषाला लोभावणारे शारीरिक शरीरसौष्ठव असेल ( पहिली काही कडवी) तरीही त्या स्त्रिया त्यांच्या भक्ती/ वीर / मातृत्व या रसांमुले जास्त परिचित आहेत असे धरायला हरकत नसावी .. मग असे असताना काव्यात "हिंदोळणाऱ्या पदरासंगे डुचमळते बेचैन उभार हृदय-चक्षूंना वेधून घेते" किंवा "कुणी म्हणाले कामुक मैना" यासाठी हीच उदाहरणे का सापडली हा साधा प्रश्न आहे १) शृंगारिक काय अगदी कामुक ( पण दर्जेदार ) कविता जरूर करा हो ,, मग ती मस्तानी वर असो किंवा कुना काल्पनिक अप्सरेवर असो २) भक्ती/ वीर / मातृत्व यावर कविता जरूर करा हो ,,, "कलेसाठी कला" किंवा "कवी मनाला काय वाटेल ते तो लिहू शकतो घायचे तर घ्या नाहीतर फूटा " असा पवित्रा असेल तर काही बोलण्यात अर्थ नाही पण रसिक का टीका करतोय ह्याकडे जर कोणी निर्माता लक्षच देणार नसेल तर अशी कलाकृती एक तर कचऱ्यात जाईल किंवा विसरली जाईल , किंवा तद्दन भम्पकपणा म्हणून ( मूलतः चांगली असूनही) त्यावर राग काढलं जाईल

कर्नलतपस्वी गुरुवार, 10/24/2024 - 10:33
कानडाऊ योगेशू यांनी केलेल्या रसग्रहणाशी सहमत आहे. कविता दोन दृष्टीकोनातून बघावी लागेल. एक वयस्क नर जो नायिकेचा कुणीही नाही, तीच्या कडे रंगीली नटवी नार, फक्त भोग्या या नजरेने बघत आहे. त्याच्या नजरेला उत्तर देताना नारी स्वीकार करते ,होय मी नटवी नार आहे,कुण्या ऋषींची तपस्या भंग करण्याची शक्ती माझ्या मधे आहे.परंतू माझी इतरही अनेक रूपे आहेत. मी फक्त मोहिनी नसून मी विवीध रूपा आहे. तव वदली ती प्रसन्नवदना हो मी आहे नटवी नार खळखळ वाहत असतो माझ्या नसानसातुनी रस शृंगार विरक्तीला लुब्ध कराया करीत पीयुषाची पखरण सजणेधजणे, लटक, मटकणे प्रीत लालित्याची उधळण जरी दिसतो तुम्हां दुरुनी माझ्याठायी हा एकच रस परी मी आहे सर्व रसांचा जणू घुसळला अमृतरस या कडव्यानंतर, स्त्रीची विवीध रूपे उद्धृत केली आहेत. कवितेचा शेवट स्त्री ही जननी,जगत्जनीनी आहे हे सांगीतले आहे ही कवीता तुकड्यात नसून एकसंध वाटते. कदाचित कवितेचे शिर्षक व कवितेतील भाव या मधे तफावत असल्याने कवी रसिकांपर्यंत पोहचत नसावा. सर्व रस आपापल्या जागी आहेत कुठेही सरमिसळ वाटत नाही. शृंगार, वासनेची परिणीती मातृत्व-पितृत्व मधे होते. ती सार्वजनिक करू नये एक समाज संकेत आहे. पण तो कवीला लागू पडतो का,कवी आणी कवितेला मर्यादित करतो का? कवीने याचे पालन करावे किवां नाही,रसिकांनी ते स्विकारावे किंवा नाही हा सर्वस्वी वैयक्तिक मुद्दा आहे. मातृत्व एक पवित्र भावना. आई बद्दल कुणीच वाईट, अश्लील, शृंगारिक शब्द वापरत नाही.परंतू, महाकवी ग्रेस यांनी आपल्या एका कवितेत आईचे वर्णन करताना काय शब्द वापरलेत ते वाचून मती गुंग होते. अर्थात त्यांनी कुठल्या दृष्टीकोनातून ही कवीता लिहीली हा भाग थोडावेळ बाजूला ठेवूया. ग्रेस समजला नाहीच मुळी कधी.. तो भावला.. प्रकर्षाने जाणवला..!! आई माझी कृष्णकळीतील विष विसरला कंस देवकीच्याही पुढे निघाला शुभ्र पांढरा हंस... आई माझी रांगोळीतील टिंब हरवली टिकली कशास पाडू दार, कराया भिंत घराची मधली... माझी आई मत्त वासना संभोगाची भूल क्रूर पशूच्या डोळ्यांमधल्या करुणेचेही फूल..... माझी आई भिरभिर संध्या सूर्य दिलासा नश्वर शब्दांच्याही ओठी काव्यकुळातील भाषा.... आई माझी अरण्यसरिता चंद्र झुलविते पाणी रामासाठी त्यावर लिहिते शिळा अहिल्या गाणी... आई माझी गाव निरंतर पारावरती भरवी संध्याकाळी भगवी होते तिच्या तनूतील ओवी.... आई माझी काजळभरला रे! मायेचा नखरा वेणीमधली नागीण खुडते जसा हिऱ्यांचा गजरा... आई माझी कंचुकीतल्या तरल स्तनांचे दूध गोरजवेळी वाटत फिरतो जोगी कुठला वेध ? संध्येसाठी माझी आई जपून उजळे वात अश्वत्थाम्यापरी हिंडतो जिथे भयंकर घात... त्याहीनंतर आई निघते कळशी घेऊन दूर तेव्हा कळतो खुळ्या नदीला या मादीचा सूर..... आई माझी झुळझुळतांना किणकिणतीही तारा तिच्याच पदराखाली होतो.. शालीन, शिंदाळ वारा... माझी आई सडलेल्या त्या मोहफुलांची मदिरा अपरंपाराच्या पुरुषाच्या ती सोन्याच्या मोहरा ~ग्रेस (संग्रह " सांजभयाच्या साजणी") सरतेशेवटी,कवी आणी रसिक यांचे स्वातंत्र्य अबाधित असून कलाकार जेव्हां आपली कलाकृती रसिकांपर्यंत पोहचण्यास सक्षम ठरतो त्या कलाकृतींना रसिक डोक्यावर घेतो.

In reply to by कर्नलतपस्वी

चौकस२१२ गुरुवार, 10/24/2024 - 11:29
खालील दोन ओली वाचल्या आणि एक विचार मनात आला आईचा स्त्री म्हणून समजेने वापर केला असावा आणि तिचे ते दुर्दैव बघून काविला अशी रचना सुचली असावी ? जर गरिबीचा बापू कादंबरीतील बाप्या ने आपली आई वर कविता लिहली तर कदाचित अशी असेल का??? आई माझी झुळझुळतांना तिच्याच पदराखाली होतो.. शालीन, शिंदाळ वारा... माझी आई सडलेल्या त्या मोहफुलांची मदिरा अपरंपाराच्या पुरुषाच्या ती सोन्याच्या मोहरा

चौकस२१२ गुरुवार, 10/24/2024 - 11:20
"कदाचित कवितेचे शिर्षक व कवितेतील भाव या मधे तफावत असल्याने कवी रसिकांपर्यंत पोहचत नसावा." काहींना नाही पोचलला पण त्याची थोडी का होईन जबादारी ती कविता निर्माण करणाऱ्यवर नाही का असत? आगम्य लिहणे हे प्रत्येकाचा हकक जरी असला तरी बहुतेकांना साधारण पने कळेल असे लिहिण्यात तर कवी / लेखकांची खरी कसोटी असते वैयक्तिक मुद्दा हे कारण पुढे केलं जाते, मग असे असेल तर कवी ने आपले हे प्रसिद्ध करूनच नये स्वतः सुखायच असेल तर छापता कशाला!

In reply to by चौकस२१२

गंगाधर मुटे गुरुवार, 10/24/2024 - 16:23
बहुतेकांना साधारण पने कळेल असे लिहिण्यात तर कवी / लेखकांची खरी कसोटी असते मी आजपर्यंत 700 ते 800 कविता लिहिल्यात. त्यापैकी बहुतांश सरसकट सर्वांना समजेल अशा कविता आहेत. त्यापैकी शेकडो कविता मिसळ पाव वर उपलब्ध आहेत. आपण त्या साध्या शिध्या सुलभ कविता का नाही वाचत? हीच कविता साध्या सोप्या भाषेत असावी असा आग्रह कशाबद्दल?

In reply to by गंगाधर मुटे

चौकस२१२ गुरुवार, 10/24/2024 - 16:44
हीच कविता साध्या सोप्या भाषेत असावी असा आग्रह कशाबद्दल? म्हणजे हि साधी सुधी नाही असा दावा आहे का? पण म्हणजे आमची टीका कळली नाही तुम्हाला ... पिंगा खेळतो द्वाड पवन ते अहिल्याबाई ! काय बोलायचे राहा तुमच्या ८००+ कवितांचा पाऊस पाडत. संपादित

In reply to by चौकस२१२

गंगाधर मुटे गुरुवार, 10/24/2024 - 17:19
हो. ही कविता नक्कीच साधीसुधी नाही. अनेक क्लिष्ट शब्द या कवितेत आहेत. ज्या वाक्यांचा सहजासहजी उलगडा होणार नाही असे वाक्य या कवितेत आहेत.

In reply to by चौकस२१२

गंगाधर मुटे गुरुवार, 10/24/2024 - 17:22
राहा तुमच्या ८००+ कवितांचा पाऊस पाडत >>> या देशात दीडशे कोटी जनता आहे. ती तुम्हालाही विचारत नाही आणि मलाही विचारत नाही. तुमच्याही इशाऱ्यावर नाचत नाही आणि माझ्याही इशाऱ्यावर नाचत नाही. ते त्यांच्या मर्जीने जगतात. त्यामुळे आपले वरील वाक्य अत्यंत अनावश्यक स्वरूपाचे ठरते.

कर्नलतपस्वी गुरुवार, 10/24/2024 - 12:29
आईचा स्त्री म्हणून समजेने वापर केला असावा आणि तिचे ते दुर्दैव बघून काविला अशी रचना सुचली असावी ? कवी ग्रेस यानी लिहीलेली कवीता फक्त उदाहरण .त्यांनी ती कुठल्या परिप्रेक्षातून लिहीली हा भाग वेगळा असे मी आगोदरच म्हणले आहे. मुटे यांची कवीता स्त्रीपुरूष मधला संवाद म्हणून बघीतली तर मातृत्व एक त्यातला छोटासाच भाग आहे. कवी आणी रसिक हे स्वतंत्र व्यक्तिमत्त्वाचे धनी त्यामुळे दोघांच्या मर्यादा वेगळ्या. आता हलवायाने जिल्बी पाडावी व खाणार्‍याने ती खावी. कुणाला किती गोड लागेल हा ज्याचा त्याचा प्रश्न. हलवाई बनवताना आपल्याच पद्धतीने बनवणार. हलकेच घ्या. मी पण तुमच्याच कुळीतला वाचक,फक्त आपले मत मांडतो.

In reply to by कर्नलतपस्वी

चौकस२१२ गुरुवार, 10/24/2024 - 16:46
हलवाई बनवताना आपल्याच पद्धतीने बनवणार. बरोअबर पण त्याची चव घेणाऱ्याने " अरे हि जिलबीच आहे का किंवा या जिलबीत हे काय घातलाय " असे विचारायचे म्हणजे महापाप कि काय

In reply to by चौकस२१२

गंगाधर मुटे गुरुवार, 10/24/2024 - 20:20
तुम्ही काढलेला निष्कर्ष हाच जगमान्य असून तोच सर्वांनी शिरसावंद्य मानला पाहिजे का? अर्थ काढण्याचा जसा तुम्हाला अधिकार आहे तसा आपापल्या परीने निष्कर्ष काढण्याचा, अर्थ लावण्याचा प्रत्येकाला अधिकार नाही का?

प्रकाश घाटपांडे गुरुवार, 10/24/2024 - 19:47
कविता आवडली. भावनांतर तर विशेष आवडले. खर तर वरकरणी परस्पर विरोधी वाटणार्या भावना हा भावनाकल्लोळ संचातील घटक असतात.कार्येषु मंत्री करुणेषु दासी शयनेषु रंभा भोजनेषु माता हा स्त्रीचा आविष्कार तरी काय दाखवतो? फ्रॉईडच्या इड इगो सुपर इगो च्या त्रयीत एखादी आवडती स्त्री सहज संचार करते तेव्हा मला तर चक्क तिचे पाय धरावेसे वाटतात. अर्थात ही माझी फँटसी आहे.

सुबोध खरे गुरुवार, 10/24/2024 - 20:10
कार्येषु मंत्री करुणेषु दासी शयनेषु रंभा भोजनेषु माता या चारही गोष्टी एकत्र असू नयेत हे तारतम्य आहे. नाही तर शयनेषु माता आणि भोज्येषु रंभा झालं तर गोची होईल. वाघीण आपल्या पिल्लांची वात्सल्यपूर्ण माता असतेच पण शिकारीच्या वेळेस तिने वात्सल्य दाखवले तर स्वतःला आणि पिल्लाना उपाशी मरावे लागेल

गंगाधर मुटे गुरुवार, 10/24/2024 - 20:40
काही आयड्याकडून नेहमीप्रमाणे कवितेशी संबंध नसलेले अनावश्यक व फालतू प्रतिसाद टाकून कवितेचा धागा भरकटवण्याचे प्रयत्न सुरू झाल्याचे दिसत आहे. माझ्या सवयीप्रमाणे मी जशास तसे उत्तर देणार आणि मग धागा भरकटवण्यात माझाही हातभार लागणार. त्यावर पर्याय म्हणून आठ दिवस मी मिसळपाव वरून विश्रांती घेत आहे. कवितेची संबंध नसलेले असंबंद्ध प्रतिसाद माझे तरी पडायचे थांबतील. धन्यवाद! भेटूयात आठ दिवसानंतर!!

In reply to by गंगाधर मुटे

चौकस२१२ Fri, 10/25/2024 - 06:21
हा आरोप अमान्य आहे , तुम्ही आमच्या टीकेशी सहमत नसाल पण केवळ मुद्दे समजावून ना घेत तुम्ही उत्तर आणि वयक्तिक टीकेवर वसकन उतरलात दोन उत्तम कविता आहेत हे पाहिचलेच सांगतले, तेवढे लिहिण्याची प्रतिभा पण आम्चि नाही पण तुम्ही पुढे माणूस आणि पशु यांचे मातृत्व ... एकच असे फालतू प्रतिसाद तारे तोडू लागतात ... विश्रन्ती ह्या नाही तर रोज टंकआ हू केंअर्स

कविता अजिबात आवडली नाही. मातृत्व आणि शृंगार ह्या दोन भिन्न भावना आहेत त्यांची सरमिसळ अजिबात आवडली नाही. पहिल्या कडव्यात तुम्ही उघडी पाठ , उभार, पदराखाली भरला माठ वगैरे वगैरे म्हणत आहात अन् नंतरच्या कडव्यात अहिल्या, झाशी, मीरा , कैकयी वगैरे ह्यांना आणत आहात. बाकीच्यांची तर नावे घ्यायचे माझे धाडस ही होत नाही. कुठल्या गोष्टी कुठे जोडत आहात. तुम्हाला दहशत कशी वाटत नाही "त्या" लोकांची ? असो. अभिव्यक्ती स्वातंत्र्य असल्याने तुम्ही तुमच्या रिस्क वर काय वाटेल ते लिहायला स्वतंत्र आहात. फक्त मिसळपाव थाळीत गुलाबजाम दिला म्हणून तो तर्री त घालून खाऊ नये. बाकी आपण सुज्ञ असा. इत्यलम

In reply to by प्रसाद गोडबोले

सुबोध खरे Mon, 10/21/2024 - 10:01
फक्त मिसळपाव थाळीत गुलाबजाम दिला म्हणून तो तर्री त घालून खाऊ नये. शृंगार रस आणि वात्सल्य रस यांची सरमिसळ( कि रसमिसळ) करण्याचा हेतू समजला नाही. कोणतीही व्यक्ती मग ती आई असो कि बहीण किंवा बाप हे सर्व भावभावना आणि रस पूर्ण असतेच. त्यात वात्सल्य शृंगारच कशाला क्रोध मोह इ भावना सुद्धा असतातच परंतु त्यांचे मिश्रण अप्रस्तुत किंवा अयोग्य ( inappropriate) वाटते. बाडीस जसे आपल्या आईवडिलांची वासना हि आपल्या जन्मास कारणीभूत आणि अत्यावश्यक असली तरी त्याचे सार्वजनिक अनावरण/ वाचन हे अप्रस्तुत असते. बाकी चालू द्या

In reply to by सुबोध खरे

गंगाधर मुटे Mon, 10/21/2024 - 10:50
सर्व रसांचे मिश्रण एकत्रित केले जाऊ नये, हे खरे आहे. पण ते मांडले जाऊच नये हे तितकेसे खरे वाटत नाही. त्यात बीभत्स, बटबटीत रूप येऊ नये इतकेच. मांडलेच जाऊ नये, या मताशी मी सहमत नाही मात्र मला ते जसे मांडायला हवे तसे मांडता आले नसेल तर तो माझा व्यक्तिगत दोष आहे. कवितेचा दोष असू शकत नाही.

In reply to by गंगाधर मुटे

चौकस२१२ Tue, 10/22/2024 - 13:29
जरी बटबटीत नसले तरि दोन वेगळेच रस कशाला एकत्र केलेत ते अजिबात कळले नाही त्या बाबतीत हुकलंय आणि नुसतच हुकली असे नहि तर काही भगःची जोडणी अप्रस्तुत वाटली पण अर्थात एवढेही लिहिण्याची माझ्य सारख्याकडे प्रतिभा नसल्यमुळे आमच्या पेक्षा तुम्ही जास्त चांगले कवी

In reply to by चौकस२१२

गंगाधर मुटे Tue, 10/22/2024 - 15:13
कविता कशी असावी आणि कविता कशी नसावी याबद्दल तुमच्या मनात एक अदृश्य साचा ठरलेला आहे. त्यामुळे कुणीही कविता लिहिले तरी तुमच्या मनातील साच्यानुसारच असावी असे तुम्हाला प्रामाणिकपणे वाटते. असे वाटणे खरंच योग्य आहे का, याचा आपण विचार करावा. तुमच्या समोर तुम्हाला पडलेल्या अनेक प्रश्नांची उकल आपोआप होईल.

गंगाधर मुटे Sun, 10/20/2024 - 15:02
तुम्हाला आवडली नाही याबद्दल कुणाचे हरकत असू शकत नाही. कोणतीही कलाकृती ज्याला जेवढी कळते तेवढ्या आधारावर तो आपले मत बनवत असतो आणि त्याच आधारावर आवडणे आणि नावडणे ठरत असते.

श्वेता२४ Sun, 10/20/2024 - 15:49
मातृत्व आणि शृंगार या दोन परस्परविरुद्ध असणाऱ्या गोष्टींची सांगड तुम्ही कवितेमध्ये कशी काय घातली असेल याच्या उत्सुकतेपोटी मी ही कविता वाचली. कवितेतील तीन कडवी - कधी असते मी झाशी,मीच कैकेयी, मीच भिमाई ही तीन कडवी बाजूला करून संपूर्ण कविता वाचली तर छान वाटली. माफ करा. काव्य समजून घेण्याची माझी समज फार नाही. परंतु ही तीनही कडवी रसभंग करतात असे वाटले. ती सोडून बाकीची सर्व कविता मला आवडली.

In reply to by श्वेता२४

गंगाधर मुटे Sun, 10/20/2024 - 16:40
प्रतिसाद बद्दल आभार. तुम्ही स्वतःच्या कवीते बद्दल बोलू नये आणि कविता उलगडून दाखवण्याचा प्रयत्न करू नये, असे माझे मत आहे. कविता लिहून झाली आणि एकदा प्रकाशित केली की नंतर काय बोलायचे ते कविताच बोलली पाहिजे. मात्र, आपण जे लिहिले ते कितपत शब्दात उतरले आणि रसिकापर्यंत पोहोचले याचा पडताळा घेण्यासाठी प्रतिसादांचा फार उपयोग होतो. कविते बाहेर बोलायचे असेल तर माझे मत असे आहे की, कोणतेही मातृत्व सर्व गुण संपन्न आणि सर्व रसांनी परिपूर्ण असते. जरी एखाद्या मातृत्वातला एखादाच गुण अधोरेखित होत असला किंवा ठळकपणे जाणवत असला तरी उरलेले गुण (अदृश्य स्वरूपात वगैरे) मातृत्वामध्ये असतेच, असे माझे मत आहे. मातृत्व हे सर्वठाई सारखेच असते. कैकयीची वर्तणूक तिचे मातृत्व प्रदर्शित करते तर कौशलेची वर्तणूक तिचे मातृत्व प्रदर्शित करते. व्यक्तिरेखा बदलल्या पण मातृत्व स्थायी आहे, असे माझे मत आहे.

In reply to by श्वेता२४

गंगाधर मुटे Sun, 10/20/2024 - 16:43
कवीने स्वतःच्या कवीते बद्दल बोलू नये आणि कविता उलगडून दाखवण्याचा प्रयत्न करू नये, असे माझे मत आहे. वरील प्रतिसादातील हे वाक्य असे वाचावे.

In reply to by श्वेता२४

गंगाधर मुटे Sun, 10/20/2024 - 16:51
आपण म्हणतात असे ते तीन कडवे काढून टाकले तरी कवितेला धक्का पोहोचत नाही. मूळ गाभा कायम राहतो. ते तीन कडवे फक्त उदाहरणादाखल नमुने म्हणून आलेले आहेत. या कडव्यांमुळे विषय थोडा समजून घेणे सोपे जाईल, असे वाटते.

विवेकपटाईत Sun, 10/20/2024 - 17:33
दोन वेगवेगळ्या कविता वाचल्या. पहिल्या कवितेची ही ओळ आवडली. लपून आडून चोरून बघती फुलामागुनी पिकले पान या वयात ही सुंदर फूल दिसले की नजर तिथे जातेच. मनाने आपण कधीच म्हातारे होत नाही. पान गळतीच्या काळात ही वसंताचे स्वप्न पाहतोच.

कर्नलतपस्वी Mon, 10/21/2024 - 09:44
जरी दिसतो तुम्हां दुरुनी माझ्याठायी हा एकच रस परी मी आहे सर्व रसांचा जणू घुसळला अमृतरस नायिकेने स्वताच स्पष्ट केले आहे की वरकरणी नटवी नार दिसत असले तरी माझ्यात इतर गुण अवगुण आहेत. मातृत्व-पितृत्व शृगांराची परिणीती याचा अर्थ त्याव्यतिरिक्त इतर कुठलेही भावना नाहीत असे समजणे बरोबर नाही. कवीता आवडली.

In reply to by गवि

विंजिनेर गुरुवार, 10/24/2024 - 23:49
असेच म्हणतो. ये कुछ जम्या नही पण हरकत नाही - काहीसं coke studio सारखं झालेय - त्यांची सगळीच कॉंपोझिशन्स जमतात असं नाही पण प्रयोग करायचं धाडस मला आवडतं जुनं नाव बोर्डावर पाहून छान वाटलं हे अजून एक.

कानडाऊ योगेशु Mon, 10/21/2024 - 10:51
पहीली आठ कडवी ही पुरुषसत्ताक समाजाचा एखाद्या स्त्रीकडे पाहण्याचा दृष्टीकोन आहे आणि बाकीची कडवी ही कवितेतील नायिकेने त्यांच्या दृष्टीकोनाला दिलेले उत्तर आहे. ह्या दोन्ही बाबींना कवीचे मतच आहे असे समजल्यामुळे काही प्रतिसादकर्त्यांची गफलत झाली आहे. ह्यावरुन विवेकानंदांच्या आयुष्यातील एक प्रसंग आठवला. विदेश दौर्यावर जाण्यापूर्वी जयपूरच्या महाराजांनी त्यांच्यासाठी एक समारंभ ठेवला होती ज्यात जयपूरच्या एका गायिका/गणिकेला बोलावले होते. विवेकानंदांना त्या समारंभात गेल्यावर ह्या गोष्टी कळल्या आणि त्यांना एका संन्यासाने एका गणिकेच्या अश्या मैफिलित असणे उचीत न वाटल्याने ते उठुन जायला लागले तेव्हा त्या गाणार्या गणिकेने संत मीराबाईची एक विरहणी गायला चालु केली आणि विवेकानंदाला त्वरीत अर्थबोध झाला. त्यांनी त्या गायिकेची केवळ माफिच मागितली नाही तर तिला 'तुझ्याकडुन मला अजुन एक शिकवण मिळाली आई' असेही संबोधले.

In reply to by कानडाऊ योगेशु

गंगाधर मुटे Mon, 10/21/2024 - 11:01
सखोल आणि तर्कशुद्ध दिलेल्या प्रतिसादाबद्दल आपला आभारी आहे. प्रत्येक मातेमध्ये सर्वच्या सर्व रस असतातच. अशी एकही माता असू शकत नाही जिच्यामध्ये सर्व रस सामावलेले नाहीत. दुर्गादेवीला फार कमी लोक दुर्गादेवी म्हणतात. बहुतांश लोक दुर्गा माता म्हणतात. दुर्गा हे वीर रसाचे सर्वोत्तम उदाहरण असले तरी ती माता आहेच.

In reply to by कानडाऊ योगेशु

विवेकानंदाला त्वरीत अर्थबोध झाला. त्यांनी त्या गायिकेची केवळ माफिच मागितली नाही तर तिला 'तुझ्याकडुन मला अजुन एक शिकवण मिळाली आई' असेही संबोधले.
>>> हे असल्या अतार्किक अनाकलनीय अपेक्षा ठेवल्यामुळे आजकाल कोणाला विवेकानंद व्हावेसे वाटतं नाही. गुलाबजाम तर्रीत घालून खायची हौस का असते लोकांना हे अनाकलनीय आहे. कालच एका सुप्रसिद्ध मंदिरात जाऊन आलो, आत देवीची मूर्ती आहे , तिला लोकं साष्टांग नमस्कार च करणार आहेत . पण बाहेरील शिल्पकलेत पत्रलेखिका आहे जी तिचे पुष्ट नितंब आणि कमनीय कटी दाखवत पत्र लिहीत आहे, किंवा दर्पण सुंदरी आहे जी तिचे उन्नत मोहाचे घट सावरत आरशात बघत केसांचा शृंगार करत आहे, त्यांच्याकडेही लोकांनी मातृभावाने पाहावे अन् "विवेकानंद" व्हावे ही अपेक्षाच अविवेकी आहे. असो.

In reply to by प्रसाद गोडबोले

कानडाऊ योगेशु गुरुवार, 10/24/2024 - 23:39
गुलाबजाम तर्रीत घालून खायची हौस का असते लोकांना हे अनाकलनीय आहे
. अगदी गुलाबजामुन व तर्री नाही तरी तश्याच प्रकारच्या काही पाककृती ऐकण्यात आल्या आहेत. मैसुर पाक ही अशीच एक फसलेली पाककृती होती. म्हणजे करायला गेलो एक आणि झाले दुसरेच असा प्रकार होता. तोच प्रकार पनीर बाबतही सांगितला जातो. म्हणजे नासलेल्या दूधावर केल्या गेलेल्या प्रयोगातुन रसगुल्ल्याचा जन्म झाला. मध्यंतरी आईसक्रिम पकोडा नावाची डिश पण लोकप्रिय होती.म्हणजे पकोडा तळायचा व बाहेर काढुन त्यात आईसक्रिम घालुन पुन्हा तळायचा असा काहीसा प्रकार होता. सोलापुरात चहाकॉफिच्या दुकानात मारामारी नावाचे पेय मिळायचे.चहा आणि कॉफि मिक्स करुन बनवले जायचे. टंकण्याचा एकुण उद्देश हाच कि पाककृती असो वा लेखनकृती ..प्रयोग करत राहिले पाहिजे काहीतरी नवीन हाती गवसु शकते.

वामन देशमुख Mon, 10/21/2024 - 12:19
वाट्टेल त्या गोष्टींची वाट्टेल तशी सरमिसळ करणे व वाट्टेल त्या प्रकारे ती सादर करणे असे प्रकार सदर धागाकर्त्यास नवीन नाहीत. --- बाकी, २०२४ मिपा प्रौढ दिवाळी अंकातील साहित्यरत्ने आधीच प्रकाशित होतील असे वाटले नव्हते.

In reply to by वामन देशमुख

गंगाधर मुटे Mon, 10/21/2024 - 14:29
तुमच्या वरील अर्ध्या प्रतिसादाबद्दल मला काहीच बनायचे नाही हे तुमचे मत आहे. आणि तुम्हाला वाटेल तसे मत बाळगायचा तुमचा अधिकार अबाधित आहे. ----- पण खालील अर्धा प्रतिसाद मान्य होण्यासारखा नाही. मी परत एकदा कविता वाचली आणि मला जे जाणवले त्यावरून मी हमखास सांगू शकतो की ही कविता कुठल्याही अंगाने Adult नाही. 1. कवितेत एकही थिल्लर, चिल्लर अथवा उत्तान शब्द आलेला नाही. त्यामुळे बाळबोधांना/नाबालिगांना कवितेतील शृंगार उलगडण्याची शक्यताच नाही. 2. कवितेतील अनेक रहस्य सहजासहजी सर्वांनाच कळेल अशी शब्द योजना नाही. कवितेतील अनेक उपमा, प्रतिमा आणि दृष्टांत सरसकट सर्वच भाषा प्रभुंना किंवा भाषातज्ज्ञांना किंवा समीक्षकांना किंवा गुणग्राहकांना कळण्याची शक्यता नाही. जिथे 80 वर्षाच्या म्हातार्‍याला कविता पूर्णपणे करण्याची शक्यता नाही तिथे कुठलेही स्थितीत 18 वर्षाखालील मुलाला कळेल अशी शक्यता असू शकत नाही. कवितेत माझ्या नजरेने बघितले तर खालील ओळ भयानक व अत्यंत खतरनाक आहे ज्या ओळी बद्दल माझ्यावर प्रचंड टीका होईल असा अंदाज व भीती होती पण अजूनही टीका झाली नाही याचा अर्थ ती ओळ उलगडली नसावी असा घेण्यास जागा आहे. हृदय-चक्षूंना वेधून घेते तन्मीलनाची नमनमिनार आपणास कधीकाळी जर अर्थ लागला तर मला विपु मधून अवश्य कळवा.

चांदणे संदीप Mon, 10/21/2024 - 12:47
बहिर्‍या ऐकवणे, आंधळ्या दाखवणे जमते कविते हे काम बहाद्दर असल्या काव्यास माझा केवळ प्रणाम! कविता आवडली. सं - दी - प

कंजूस Mon, 10/21/2024 - 13:26
वैचारिक कविता आहे. आमच्या मराठीच्या बाई (शिक्षिका) म्हणाल्या ते आठवलं. "तुम्हाला गुण हवे असतील तर आपली मतं पाजळू नका. कवितेच्या प्रश्नांवर उत्तरामध्ये कवी असं म्हणतो, तसं म्हणतो, आणि कवितेतल्याच ओळी परत लिहून काढा."

नठ्यारा Mon, 10/21/2024 - 18:05
गंगाधर मुटे, खूप दिवसांनी आलात. असेच वरचेवर येत रहा. उत्तरार्धात वात्सल्य रस आहे की वीररस आहे असा प्रश्न पडलात. शृंगार व वात्सल्य एकत्र जात नाहीत असं म्हणतात. पण वीर आणि शृंगार मात्र एकत्र चांगलेच खुलतात. झाशी, अहिल्या, कालिका वगैरे नावं येतात तेव्हा वीररसाची अपेक्षा असते. पुढे ती वात्सल्यरसात बदलते. हे रूपांतरण अलवार व्हायला हवं होतं. हे मझं वैयक्तिक मत आहे. विचारचक्रास चालना देणारी कविता आहे. म्हणून आवडली. सर्वस्वी पटली नाही तरीही आवडली. आपला नम्र, -नाठाळ नठ्या

In reply to by नठ्यारा

गंगाधर मुटे Mon, 10/21/2024 - 18:32
खूप खूप धन्यवाद. कवितेचा विषय आणि आवाका फार मोठा आहे. तो शब्दबद्ध करण्यात आपली लेखणी अपुरी पडू शकते. कदाचित भविष्यात हाच विषय कुणीतरी अधिक सक्षमतेने हाताळू शकेल.

स्वधर्म Mon, 10/21/2024 - 21:59
नायिकेला (विशेषत: सुंदर स्त्रीला) आपल्याकडे कसे पाहिले जाते, याची बहुतेक वेळा नीट जाणीव असते. या कवितेत नायिकेने पहाणार्यांना तिची दुसरी बाजू सांगण्याचा प्रयत्न केला आहे, असे वाटते. कदाचित ही कविता कुण्या मोठ्या कवीच्या नावे असती, तर लोक त्यांच्या वेगळ्या दृष्टीचे कौतुक करत असते.

चौकस२१२ Tue, 10/22/2024 - 13:21
हि कविता नक्की कशाबद्दल आहे ? शृंगार? स्त्री देहाची "काम" या अर्थातून वर्णन कि धाडसी महिला - माता ? ही रंगीली नटवी नार आणि मग एकदम .... मी झाशी, भीमाई, मी जीजाऊ.. दोन विषयांची मिसळ काही पटली नाही आणि कळली पण नाही

In reply to by चौकस२१२

गंगाधर मुटे Tue, 10/22/2024 - 15:09
कवितेत दोन विषय किंवा दोन रस यांची मिसळ झाली आहे असे मला तरी वाटत नाही. कवितेचा केंद्रबिंदू "मातृत्व" आहे आणि मातृत्वाची विभागणी होऊ शकत नाही. मातृत्व हे फक्त मानवी स्त्री पुरते मर्यादित नसते. मानवी स्त्री मधील मातृत्व आणि पशु, पक्षी यांच्यातील मातृत्व यात काहीही फरक नसतो जवळजवळ ते एकसमानच असते. माणूस, पशु,पक्षी, वनस्पती सहित सर्व सजीव यांच्या प्रजनन, पोषण आणि संरक्षण ह्या सर्व प्रेरणा बहुतांश प्रमाणात एकसमान आहेत.

In reply to by गंगाधर मुटे

चौकस२१२ Tue, 10/22/2024 - 15:32
"हिंदोळणाऱ्या पदरासंगे डुचमळते बेचैन उभार" आनि "कधी असते मी झाशी, अहिल्या" हे एकाच मालळे तील मणी ? नाही बुवा पटत .... असो कवी चा अधिकार आहे स्वतःचं मनाला पटेल ते लिहिण्याचाच तेवहा चालू द्या ..

In reply to by चौकस२१२

गंगाधर मुटे Tue, 10/22/2024 - 16:09
हिंदोळणाऱ्या पदरासंगे डुचमळते बेचैन उभार" ही दृष्टी रमतारामांची आहे. तर "कधी असते मी झाशी, अहिल्या... हे नायिकेने दिलेले उत्तर आहे. रमतारामांची दृष्टी वेगळी आणि कवितेच्या नायिकेची दृष्टी वेगळी. दोन दृष्टीमध्ये काहीही तुलना होत नसताना तुम्ही तुलना करण्याचा प्रयत्न करत आहात, त्यामुळे तुमच्यासमोर नको ते प्रश्न उभे राहत आहेत.

In reply to by गंगाधर मुटे

चौकस२१२ Tue, 10/22/2024 - 17:06
नको ते प्रश्न उभे राहत आहेत. कसले नको ते प्रश्न , अनेकांनी ह्याच पद्धतीचा प्रतिसाद निंदवले आहेत एकीकडे स्त्रीचे शृंगारिक / कामुक वर्णन आणि एकीकडे वीर रस ओतप्रोत भरलेली स्त्रियांचा उल्लेख एकाच कवितेत का केवळ स्त्रिया आहेत म्हणून ! हे म्हणजे उद्या जर एखाद्याने "मराठी संत, त्यांचे आध्यत्मिक कार्य आणि त्यांचे शरि सैष्ठव " हे एकाच निबंधात ( किंवा कवितेत ) घुसडले तर कसे वाटेल तसे आहे असो राग आलेला दिसतोय , तुम्ही जेवढे लिहू शकता त्याच्या जवळपास हि आम्ही नाही लिहू शकणार पण एक वाचक/ रसिक म्हणून प्रामाणिक प्रतिक्रिया नोंदवली

In reply to by चौकस२१२

गंगाधर मुटे Tue, 10/22/2024 - 17:57
मराठी संत, त्यांचे आध्यत्मिक कार्य आणि त्यांचे शरि सैष्ठव... एकाच निबंधात घुसडले तर.... तुम्हाला छान वाटले तर छान म्हणावे, वाईट वाटले तर वाईट होणारे, प्रशंसा करण्यायोग्य असेल तर प्रशंसा करावी, निंदा करण्यायोग्य असेल तर निंदा करावी, निषेध करावा, खडबडीत खरबडीत उत्तर द्यावे.... वाचक म्हणून हे सर्व अधिकार वाचकाला आहेतच. पण पण काय लिहावे आणि काय लिहू नये याचा निर्णय लिहिणाऱ्यांनी घ्यायचा असतो.... वाचणाऱ्यांनी नाही. तुम्ही तुमची मते जगावर लादण्याचा प्रयत्न समर्थनिय नाही. असे लिहिले तर काय होईल, तसे लिहिले तर काय होईल? असे उगीच प्रश्न स्वतःला पडू देऊ नका. कारण "काहीही होणार नाही" हे त्याचे उत्तर आहे. जे अस्सल असते, उपयुक्त असते तेच उत्क्रांतीच्या प्रवाहात टिकते. बाकी सारा काडीकचरा क्षणिक असतो, विशिष्ट कालावधीनंतर तो वाहून जातो आणि कालांतराने तो कसला सुद्धा रूपांतरीत होऊन नष्ट होतो.

In reply to by गंगाधर मुटे

चौकस२१२ Tue, 10/22/2024 - 18:10
"तुमची मते जगावर लादण्याचा नाही हो ....." नाही हो एक काहीतरी खटकलेली गोष्ट किंवा विस्कळीत गोष्ट जी इतराना जाणवली ती फक्त दाखवली " कला निर्माण करण्याऱ्या बंधने असू नयेत" या तत्व खाली काय वाटेल ते चालेल" असा तुमचा रोख दिसतोय ... त्यामुळे बोलणे खुंटले उद्याच "समर्थांचे श्लोक आणि त्यांच्या दंड बैठका" यावर जिलब्या पाडतो कारण "काय लिहावे आणि काय लिहू नये याचा निर्णय लिहिणाऱ्यांनी घ्यायचा असतो."

गंगाधर मुटे Wed, 10/23/2024 - 14:14
@चौकस212 सर्व सजीव सृष्टी मधील माता आणि तिचे मातृत्व हा कवितेचा केंद्रबिंदू आहे. मानवी स्त्री कवितेत केवळ त्या मातृत्वाचे प्रतिनिधित्व करते. मानवी स्त्री कवितेची नायिका असणे, कवितेची गरज म्हणून निमित्तमात्र आहे. मातृत्व हे फक्त मानवी स्त्री पुरते मर्यादित नसते. मानवी स्त्री मधील मातृत्व आणि पशु, पक्षी यांच्यातील मातृत्व यात फारसा काही फरक नसतो, जवळजवळ ते एकसमानच असते. माणूस, पशु, पक्षी, वनस्पती सहित सर्व सजीव यांच्या प्रजनन, पोषण आणि संरक्षण ह्या सर्व प्रेरणा बहुतांश प्रमाणात एकसमान आहेत. माझे मत असे आहे की, कोणतेही मातृत्व सर्व गुण संपन्न आणि सर्व रसांनी परिपूर्ण असते. जरी एखाद्या मातृत्वातला एखादाच गुण/रस अधोरेखित होत असला किंवा ठळकपणे जाणवत असला तरी उरलेले गुण (अदृश्य स्वरूपात वगैरे) मातृत्वामध्ये असतेच, असे माझे मत आहे. सर्व रसांनी परिपूर्ण नाही असे मातृत्व असू शकत नाही. जसे मानवी स्त्रीमध्ये स्त्रीत्व जन्मताच येते तसेच मातृत्वही उपजत असते. शृंगार ही मातृत्वाची प्राथमिक गरज आहे. त्यामुळे कोणतेच मातृत्व शृंगारहीन असू शकत नाही. मातृत्व हे सर्वठाई सारखेच असते. उदाहरणार्थ... कैकयीची वर्तणूक तिचे मातृत्व प्रदर्शित करते तर कौशल्येची वर्तणूक तिचे मातृत्व प्रदर्शित करते. व्यक्तिरेखा बदलल्या पण मातृत्व स्थायी आहे, असे माझे मत आहे. कविता तुकड्या तुकड्यात दिसत असली तरी मुळात ती कविता मातृत्वाभोवती फिरत असल्यामुळे कविता एकजिनसी आहे. मातृत्व आणि मातृत्वाच्या प्रेरणा केंद्रबिंदू म्हणून कविता वाचली तर कविता उलगडायला फार अवघड जाऊ नये.

In reply to by गंगाधर मुटे

सुबोध खरे गुरुवार, 10/24/2024 - 11:59
मानवी स्त्री मधील मातृत्व आणि पशु, पक्षी यांच्यातील मातृत्व यात फारसा काही फरक नसतो, आपण कविता करावी जीवशास्त्रात जाऊ नये अशी नम्र विनंती आहे. कोकिळा आपले अंडे कवळ किंवा दुसऱ्या पक्षाच्या घरट्यात घालते आणि ते अंडे उबवणे आणि पिल्लाचे संगोपन करणे हे तो दुसरा पक्षी आणि त्याची मादी करते. माशाची मादी अंडी घालून पाण्यात सोडून देते. पिले अंड्यातून बाहेर आली कि स्वतःचे अन्न स्वतः मिळवून वाढू लागतात. खेकड्याची मादी पोटातून पिल्ले बाहेर सोडून देते त्यानंतर पिल्ले स्वावलंबीच असतात. काही माशात आणि बेडकांच्या जातीत नर पिल्लाना ती मोठी होईस्तोवर आपल्या पाठीवर बाळगतात. तेंव्हा पशु पक्षी आणि मानव यातील मातृत्व हे मुळीच सारखे नाही. उत्क्रांतीच्या उतरंडीत प्राणी जितक्या उच्च दर्जाचा आहे तितके मातृत्व जास्त जास्त कठीण होत जाते. कुत्र्या मांजराची पिल्ले काही दिवसातच वासाने स्वतःचे अन्न'स्वतः मिळवू शकतात तर मानवी बालपण कित्येक वर्षे लांब आहे त्यामुळे तितकी वर्षे मातेला बालकाची सर्वतोपरी काळजी घ्यावीच लागते. मानवी मातृत्व हे अतिशय उच्च कोटीचे असू शकते. हिरकणी सारखी उदाहरणे आपण वाचली असतीलच. बाकी चालू द्या

In reply to by सुबोध खरे

गंगाधर मुटे गुरुवार, 10/24/2024 - 15:45
तुम्ही तुमची मते कविवर लादू नयेत, अशी आपणास माझी नम्र विनंती आहे. कविता वाचून कवीला जीवशास्त्राची असलेल्या जाणीवेची खोली जशी तुम्हाला कळलेली आहे तशीच तुमचे प्रतिसाद वाचून जीवशास्त्राची तुम्हाला किती जाणीव आहे हे मलाही कळलेले आहेत. कुणी कितीही स्वतःला एखाद्या विषयातला तज्ञ समजत असला तरी तो तज्ञ असतोच, असे काहीही नाही.

In reply to by गंगाधर मुटे

गंगाधर मुटे गुरुवार, 10/24/2024 - 19:48
तुमच्या प्रतिसादात पशु पक्षी आणि मानवी मातृत्व यांतील भेद सांगताना आपण जे निकष वापरले तेच निकष वापरून भारतासारख्या अत्यंत विषम संस्कृती, विषम आर्थिक स्थिती, विषम सामाजिक स्थिती, विषम सोयीसुविधा, विषम परिस्थितीत जगणारे सरकसकट सर्व मानवी मातृत्व एकसमान आणि अतिशय उच्च कोटीचे कसे असते, हे सिद्ध करून दाखवा.

In reply to by सुबोध खरे

गंगाधर मुटे गुरुवार, 10/24/2024 - 19:44
तुमच्या प्रतिसादात पशु पक्षी आणि मानवी मातृत्व यांतील भेद सांगताना आपण जे निकष वापरले तेच निकष वापरून सरकसकट सर्व मानवी मातृत्व एकसमान आणि अतिशय उच्च कोटीचे कसे असते, हे सिद्ध करून दाखवा.

In reply to by गंगाधर मुटे

सुबोध खरे गुरुवार, 10/24/2024 - 19:55
हायला काहींच्या काही विधान तुम्ही करायचे आणि मी काहीतरी सिद्ध करून दाखवायचे हे तुम्हीच मला आव्हान द्यायचे. इतका भंपकपणा पाहिला नव्हता

In reply to by गंगाधर मुटे

चौकस२१२ गुरुवार, 10/24/2024 - 15:09
मुळात ती कविता मातृत्वाभोवती फिरत असल्यामुळे खालील ओळीत जर "मातृत्व" असेल तर माझी उंची १० फूट आणि मी पाण्यावर चालू शकतो ! गोप बघुनी झाकू पाहते पदराखाली भरला माठ! डुचमळते बेचैन उभार पहिली अनेक कडवी हि चांगल्यापैकी जमलेले स्त्रीदेहाचे / वृत्तीचे शृगांरिक वर्णन आहे उगा मातृत्व वैगरे कसली कल्हई लावताय धन्य ते कवीश्वर

In reply to by चौकस२१२

गंगाधर मुटे गुरुवार, 10/24/2024 - 15:50
तुमच्या प्रतिसादावरून निदान असे जाणवते की जे तुम्हाला दिसतील तेवढेच खरे असते, बाकी सर्व खोटे असते.. असा तुमचा एकंदरीत समज आहे. आपण उदृत केलेल्या ओळी कवितेच्या विषयाच्या अनुषंगाने मातृत्वाशी निगडित आहेत असे मला वाटते, तुम्हाला नाही वाटत त्याला मी काय करू? ही कविता आहे. साता समुद्रा पलीकडे पोहोचू शकते. कवी काय त्या कवितेसोबत फिरून प्रत्येकाला अर्थ समजावून सांगू शकतो का? ज्याला जेवढा अर्थ लागला तेवढा त्याने घ्यावा. विषय संपला. तुम्हाला शंभर टक्के समजेल अशा कविता कवींनी लिहाव्या.... असल्या तत्त्वज्ञानाला काही अर्थ आहे का?

In reply to by चौकस२१२

गंगाधर मुटे गुरुवार, 10/24/2024 - 16:37
टीकेचे दोन प्रकार असतात. स्वीकार करण्यायोग्य, सन्मान करण्यायोग्य अस्वीकार करणे योग्य, लाथाडने योग्य सरसकट टिकेचा स्वीकार केला तर लोक एका दिवसात नराला वानर बनवून टाकतील. :D

In reply to by चौकस२१२

गंगाधर मुटे गुरुवार, 10/24/2024 - 16:40
खरंतर तुम्ही अजून पर्यंत कवितेवर टीकाच केलेली नाही. तुम्ही केवळ कवीला शहाणपणा शिकवत सुटलेले आहात आणि त्यालाच कवितेवरची टीका समजत आहात. कवीला शहाणपणा न शिकवता कवितेवर वाटेल तशी टीका करा. तो तुमचा अधिकार आहे. कवीला शहाणपणा शिकवणे हाही तुम्हाला अधिकार आहेच... पण तो शहाणपणा स्वीकारायचा की नाकारायचा याचा अधिकार कवीला आहे याचे भान ठेवा.

In reply to by गंगाधर मुटे

सुबोध खरे गुरुवार, 10/24/2024 - 18:57
मानवी स्त्री मधील मातृत्व आणि पशु, पक्षी यांच्यातील मातृत्व यात फारसा काही फरक नसतो, हे विधान जरा सिद्ध करून दाखवाल का? बाकी "तुमची कविता आणि त्यातील सार, त्याचे काव्यात्मक मूल्य. कवीचे अधिकार आणि सार्वजनिक स्थळावर कविता टाकल्यास वाचकाचे अधिकार" हे मुद्दे वेगळे आहेत. त्यावर कुणी टीका केली तर तुम्ही वसकन अंगावर येता हे काही पटलं नाही. बाकी नाना पाटेकरांच्या सिनेमात म्हटल्याप्रमाणे --लिपस्टिक लावून खिडकीत बसला तर खालून जाणाऱ्या माणसाने "शुक शुक" केले तर चिडचीड करू नये. तेंव्हा आपण फक्त जीवशास्त्राबद्दल बोलू या. '' म्हणजे "मानवी स्त्री मधील मातृत्व आणि पशु, पक्षी यांच्यातील मातृत्व यात फारसा काही फरक नसतो" हे विधान सिद्ध करून दाखवा

In reply to by सुबोध खरे

गंगाधर मुटे गुरुवार, 10/24/2024 - 19:59
१ ) मानवी स्त्री मधील मातृत्व आणि पशु, पक्षी यांच्यातील मातृत्वात प्रचंड फरक असतो . ... हे तुम्हीच सिद्ध करून दाखवा. २ ) आपण वरील एका प्रतिसादात मातृत्व याबद्दल जे निकष मांडले आहेत . ... त्याला मातृत्व म्हणतात, हे सिद्ध करून दाखवा . ३ ) केवळ अपत्य जन्माला घालणे म्हणजे मातृत्व असते हे सिद्ध करून दाखवा. ४) माणसाने "शुक शुक" केले तर चिडचीड करू नये. >>> असा इतरांना सल्ला देण्याइतपत तुमची काय पात्रता आहे, हे सिद्ध करून दाखवा. ५) तुम्ही दिलेला सल्ला इतरांनी ऐकावा... इतके ते अपात्र कसे आहेत हे सिद्ध करून दाखवा. किंवा ६) इतरांना प्रश्न विचारून त्यांनाच सिद्ध करायला सांगणे . .. यासाठीच तुमचा जन्म झाला आहे . ... हे तरी सिद्ध करून दाखवा. ====== मी तुमचा गुलाम नसल्याची माझी खात्री असल्याने मी तुमच्या कोणत्याही प्रश्नाचे उत्तर देण्यास अथवा सिद्ध करून दाखवण्यास बांधील नाही. सबब . .. आपण दुसरा वेठबिगार शोधून त्याचेशी असे वर्तन करावे . .... हि आग्रहाची विनंती.

In reply to by गंगाधर मुटे

सुबोध खरे गुरुवार, 10/24/2024 - 20:18
इतकी चिडचिड करू नका. विधान सिद्ध करता येत नसेल तर सरळ क्षमस्व म्हणून पुढे जावे. उगाच शब्दांचा डोंगर उभा करून दुसर्यालाच त्याचे विधान सिद्ध करून दाखवा हा अट्टाहास आणि दुराग्रह कशासाठी. माझे विधान मी सहज सिद्ध करून दाखवू शकतो परंतु तुमच्या धाग्याचं काश्मीर करायची इच्छा नाही. एक साधे उदाहरण देऊन मी थांबतो राणी मुंगी किंवा राणी माशी केवळ हजारो लाखो अंडी घालते आणि पुढे त्यांचे काहीच करत नाही. तिचा आणि वात्सल्याचा काहीही संबंध नाही त्यांचे सर्व पालनपोषण कामकरी मुंग्या किंवा माश्याच करतात. मानवी मादी असे काही करत नाही. उत्क्रांती मध्ये जसे जसे वर जाता तसा आईचा संगोपनात सहभाग वाढत जातो. हे मूलभूत विधान तुम्हाला मान्यच नसेल तर पुढे चर्चा होणारच नाही बाकी तुमचे आत्मकुंथन आणि "मीच कसा हुशार" चालू द्या

In reply to by सुबोध खरे

गंगाधर मुटे गुरुवार, 10/24/2024 - 20:31
पुन्हा सल्ला दिलेल्याच आहे. सल्ला देण्याशिवाय ही दुसरी तुम्हाला काही येते का? दुसऱ्याला सिद्ध करायला सांगणार आणि तुम्ही सिद्ध करून दाखवा म्हटलं की दुनियाभराच्या पळवाटा शोधणार. तुमच्यात काही कौशल्य आणि पात्रता असेल तर मी विचारलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे द्या. नाहीतर क्षमस्व असे म्हणून वाट पकडा. गाठ माझ्याशी आहे. यापूर्वी बरेचदा मी तुमच्याकडे दुर्लक्ष केले. यावेळेस तसे होणार नाही. फैलावर घेतले जाईल याद राखा. स्वतःची थोडीशी तारतम्य जागे करा आणि हा कवितेचा बाफ आहे, इथे कवी बद्दल नव्हे तर कवितेची चर्चा करायची असते इतके उमजून घ्या. कवितेची थोडी जरी जाण असेल आणि थोडी जरी कविता कळत असेल तर तुमच्या आयपतीप्रमाणे कवितेचे पूर्ण अर्थ लिहून दाखवा. वाचायला आवडेल. दरवेळेस कवितेचा धागा फालतूची बडबड करून भरकटवायची तुमची शैली यावेळेस खपवून घेतली जाणार नाही. याद राखा. पुन्हा दुसरे असे की, तुम्ही मला सल्ला सांगावा अशी कोणतीही पात्रता तुमच्यात नाही. त्यामुळे जास्तीचे शहानपण पाजळणे बंद करा. यानंतर मरेस्तोवर मला शहाणपणा शिकवायला यायचे नाही. आणि सल्ला तर अजिबात द्यायचा नाही.

In reply to by गंगाधर मुटे

सुबोध खरे गुरुवार, 10/24/2024 - 20:41
राणी मुंगी किंवा राणी माशी केवळ हजारो लाखो अंडी घालते आणि पुढे त्यांचे काहीच करत नाही. तिचा आणि वात्सल्याचा काहीही संबंध नाही त्यांचे सर्व पालनपोषण कामकरी मुंग्या किंवा माश्याच करतात. मानवी मादी असे काही करत नाही. हे वाचलं च नाही का? इतकी चिडचिड नुसतं एक चूक दाखवली तर आणि काय आपली भाषा सुद्धा? दुनियाभराच्या पळवाटा तुमच्यात काही कौशल्य आणि पात्रता असेल गाठ माझ्याशी आहे. स्वतःची थोडीशी तारतम्य जागे करा कवितेचा धागा फालतूची बडबड करून भरकटवायची तुमची शैली यावेळेस खपवून घेतली जाणार नाही. याद राखा. तुम्ही मला सल्ला सांगावा अशी कोणतीही पात्रता तुमच्यात नाही. त्यामुळे जास्तीचे शहानपण पाजळणे बंद करा. यानंतर मरेस्तोवर मला शहाणपणा शिकवायला यायचे नाही. आणि सल्ला तर अजिबात द्यायचा नाही. मुटे बुवा इतकी अर्वाच्च भाषा मला सुद्धा सहज वापरता येते. पण मी सभ्य भाषेत सांगतो आहे तुम्हाला जे करायचं ते करून दाखवाच "याद राखा." "उगाच माझ्याशी गाठ आहे" सारखी फडतूस गावगुंडांची वाक्ये बोलून आपले हसे करू नका.

In reply to by सुबोध खरे

चौकस२१२ Fri, 10/25/2024 - 06:34
सहमत ( कवित्ते वरील टीकेला थोडे जरी समजून घेतले असते या महाशयांनी तरी सकारात्मक बोलणी झाली असती ) त्या ऐवजी "माणूस आणि पशु यातील मातृर्त्व " या बद्दल एक शिक्षित विदयाला हे अक्कल समजावत आहेत ! धन्य

In reply to by गंगाधर मुटे

कर्नलतपस्वी गुरुवार, 10/24/2024 - 20:53
आपली कविता ज्याना आवडली त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. ज्यांना नाही पटली त्यांनी न पटणारे मुद्दे उपस्थित केले. आपल्याला ज्या प्रतिक्रीया अनुकूल वाटल्या त्याला स्विकारले व चान चान म्हणले. ज्या प्रतिक्रिया प्रतिकूल होत्या त्यांनाच पचवणे कठिण जात आहे. लिपस्टिक लावून खिडकीत बसलात तर रस्त्यावरून जाणारा शुक शुक करणार हे नागडे सत्य आहे. आपण आपली कविता चव्हाट्यावर आणलीत मिळणाऱ्या प्रतिसादानां सहर्ष सामोरे जावे. अन्यथा..... आपण डाॅ सुबोध खरे यांच्यावर व्यक्तिगत हल्ला केला. तोच प्रश्न आपली लायकी काय हे विचारण्यास उद्युक्त करतो. बरेच सदस्य डाॅ सुबोध खरे यांना अनेक वर्षांपासून ओळखतात.आपण त्यांच्या पात्रतेवर शंका उपस्थित करून आपलीच आपलीच पात्रता चव्हाट्यावर आणली आहे. इतरांना सल्ला देण्याइतपत तुमची काय पात्रता आहे, हे सिद्ध करून दाखवा. मिपावर सर्व सदस्य सन्मानीय, म्हणून कुणालाही कुणाची पात्रता काय हे विचारण्याचा अधिकार नाही. आपला तोल जातोय,सांभाळा स्वताला. नाहीतर डोक्यावर घेणारे केव्हां कुठे कचऱ्यात फेकून देतील कळणार नाही.

धर्मराजमुटके Wed, 10/23/2024 - 22:06
छान ! कवितेत एकूण १६ परिच्छेद (की कडवी) आहेत. त्यापैकी पहिले १० परिच्छेद शृंगार रसाला वाहिले आहेत, ११ व्या परिच्छेदात पहिल्या १० चे सार सांगीतले आहे. १२ व्या कडव्यात वीररस, आणि पुढील ४ परिच्छेदात मातृरस जाणवतो. म्हणजे जर १६ घड्यांत पाणिपुरीचे पाणी आहे. तिखट पाणीपुरी (शृंगार) जास्त लोकांना आवडते त्यामुळे त्याचे प्रमाण जास्त घेतले आहे. ज्यांना वयोमानानुसार तिखट झेपत नाही त्यांच्यासाठी गोड पाणी ठेवले आहे. जर दोन्ही चवी एकत्र घ्यायच्या असतील तर ११ व्या परिच्छेदात दोन प्रकारच्या रसांची घुसळण करुन अमृतरस बनविला आहे. तस्मात वेगवेगळे रस एकत्र केले आहेत असे जाणवत नाही. ११ पर्यंत आणि १२-१६ अशी दुसरी वेगळी कविता आहे. त्यामधे एक अदृश्य रेखा आहे ती फक्त कवीमनालाच जाणवते. एकंदरीत मजकूर पाहता "मातृत्वाचा शृंगाररस" ऐवजी "शृंगाराचा मातृत्वारस" हे शीर्षक जास्त शोभून दिसले असते असे वाटते. असो, मुटे साहेब बरेच दिवसांनी परत आलात याबद्दल अभिनंदन ! लिहिते रहा. राजकीय धागे बंद झाल्यापासून मिपावर होणारी विचारांची घुसळण थांबली होती ती या कवितेच्या निमित्ताने पुन्हा पाहायला मिळाली हेही नसे थोडके ! (अवांतर : दहावीच्या मराठीच्या परीक्षेत कवीतेचे रसग्रहण करा हा प्रश्न सोडविल्याचा आनंद मिळाला.)

In reply to by धर्मराजमुटके

चौकस२१२ गुरुवार, 10/24/2024 - 08:20
११ पर्यंत आणि १२-१६ अशी दुसरी वेगळी कविता आहे. हो हेच तर म्हणणे आहे काहीसे ( तुम्ही जास्त चांगल्या पद्धतीने मांडलेत ), आणि त्यांची भेसळ विचित्र वाटते एवढेच म्हण्णे आहे पण कवी महाशय मखलाशी करीत राहतात ....असू दे

चौकस२१२ गुरुवार, 10/24/2024 - 08:16
मातृत्व अर्थात म्हणजे स्त्री आणि स्त्रीचे शारिक सौंदर्य या दोन ची विचित्र भेसळ कशाला हा साधा मुद्दा आहे डॉ खरे यांचं प्रतिक्रयेत "जसे आपल्या आईवडिलांची वासना हि आपल्या जन्मास कारणीभूत आणि अत्यावश्यक असली तरी त्याचे सार्वजनिक अनावरण/ वाचन हे अप्रस्तुत असते. " असा उल्लेख आहे तसेच म्हणेन कि " आईवडिलांचं संभोगातुन आपण निर्माण झालो पण म्हणून एकाच रचनेत "संभोगाचे सौंदर्य आणि आमचे आई वडील " लिहिणे विचित्र वाटते "कुणी म्हणाले शेंग चवळीची कुणी म्हणाले पेवंदी आम" "ही रंगीली नटवी नार" आणि "अहिल्या ( बाई होळकर) एकत्र ? पहिले १० परिच्छेद शृंगार रसाला वाहिले आहेत, आणि ती मस्तच आहेत

In reply to by चौकस२१२

गंगाधर मुटे गुरुवार, 10/24/2024 - 16:30
मातृत्व अर्थात म्हणजे स्त्री>>>> काहीच्या काही वाक्य आहे हे. ----- कुणी म्हणाले शेंग चवळीची कुणी म्हणाले पेवंदी आम" "ही रंगीली नटवी नार" ही रमतारामांची दृष्टी आहे. अहिल्या ( बाई होळकर) हे मातृत्वाने दिलेले उत्तर आहे. ही कविताच रमता राम आणि मातृत्व यांचा संवाद असल्याने दोन्ही एकाच कवितेत एकत्र येणारच.

In reply to by चौकस२१२

गंगाधर मुटे गुरुवार, 10/24/2024 - 16:33
डॉक्टर खरे यांचे विधान तुमच्यासाठी प्रमाण असेल तर तुम्ही त्यानुसार वर्तन करावे माझी कुठेही मनाई नाही. पण माझ्यासाठी जर प्रमाण नसेल किंवा मला अजिबात पटणारे नसेल तर मी का ऐकावे? तुम्ही आणि डॉक्टर खरे दोघे मिळून का बरं सृष्टीचे नियमन करू पाहता? तुमच्या इशाऱ्यावर अख्खीच्या अख्खी दुनिया चालणार नाही इतके भान ज्या दिवशी तुम्हाला येईल तो दिवस सोन्याचा समजावा.

In reply to by गंगाधर मुटे

सुबोध खरे गुरुवार, 10/24/2024 - 19:11
तुम्ही आणि डॉक्टर खरे दोघे मिळून का बरं सृष्टीचे नियमन करू पाहता? तुमच्या इशाऱ्यावर अख्खीच्या अख्खी दुनिया चालणार नाही इतके भान ज्या दिवशी तुम्हाला येईल तो दिवस सोन्याचा समजावा. हा निष्कर्ष आपण कशावरून काढला हे समजत नाही. पण आपल्या कवितेला फक्त छान छान म्हणवून घ्यायचं असेल तर सार्वजनिक न्यासावर ती टाकू नये. एखाद्या कविसंमेलनातच वाचन करावे म्हणजे श्रोत्यांचे म्हणणे ऐकायची गरजच राहणार नाही. लिपस्टीक लावून खिडकीत बसलात तर रस्त्यावरून जाणारे "शुक शुक" करणारच एवढे लक्षात ठेवा.

In reply to by गंगाधर मुटे

चौकस२१२ गुरुवार, 10/24/2024 - 19:20
कसले नियम ठरवतोय ,, सरळ साधी टिपण्णी केली कि जरी दोन्ही रसांचे वर्ण ( कि तीन काय ते तुमचच्या डोक्यात असावे ) स्वतंत्ररित्या चांगले असले तरी त्याची विचित्र मिसळ झाली आहे ,, खरेंनी त्यांच्या पद्धतीने हा मुद्दा मांडला मी माझ्या ... कुणी म्हणाले कामुक मैना आणि भिमाई जिजाई ,,,, काय संबंध पुरुषाला स्त्री कामुक वाटते आणि या दोन्ही स्त्रिया होत्या हा बादरायण संबंध लावताय तुम्ही ..आणि विचारला तर विचार स्वातंतरी वैगरे तुंबड्या लावताय

In reply to by चौकस२१२

गंगाधर मुटे गुरुवार, 10/24/2024 - 17:24
जो कवी वाचक घडवतो, वाचकांना घडवतो, वाचकांची विचार करण्याची दिशा बदलून टाकतो, वाचकांच्या आयुष्याची दिशा बदलून टाकतो... तो जातिवंत कवी असतो. जो कवी वाचकांना काय रुचेल, काय आवडेल, काय समजेल, काय पटेल याचा विचार करून लिहितो तो बाजारू कवी असतो.

चौकस२१२ गुरुवार, 10/24/2024 - 08:42
या सर्व स्त्रिया अप्रतिम लावण्यवती असतील ( असे धरुयात, आपण कुठं बघितलंय ) त्या स्त्रिया असल्यामुळे त्यांच्यापढे साहजिकच पुरुषाला लोभावणारे शारीरिक शरीरसौष्ठव असेल ( पहिली काही कडवी) तरीही त्या स्त्रिया त्यांच्या भक्ती/ वीर / मातृत्व या रसांमुले जास्त परिचित आहेत असे धरायला हरकत नसावी .. मग असे असताना काव्यात "हिंदोळणाऱ्या पदरासंगे डुचमळते बेचैन उभार हृदय-चक्षूंना वेधून घेते" किंवा "कुणी म्हणाले कामुक मैना" यासाठी हीच उदाहरणे का सापडली हा साधा प्रश्न आहे १) शृंगारिक काय अगदी कामुक ( पण दर्जेदार ) कविता जरूर करा हो ,, मग ती मस्तानी वर असो किंवा कुना काल्पनिक अप्सरेवर असो २) भक्ती/ वीर / मातृत्व यावर कविता जरूर करा हो ,,, "कलेसाठी कला" किंवा "कवी मनाला काय वाटेल ते तो लिहू शकतो घायचे तर घ्या नाहीतर फूटा " असा पवित्रा असेल तर काही बोलण्यात अर्थ नाही पण रसिक का टीका करतोय ह्याकडे जर कोणी निर्माता लक्षच देणार नसेल तर अशी कलाकृती एक तर कचऱ्यात जाईल किंवा विसरली जाईल , किंवा तद्दन भम्पकपणा म्हणून ( मूलतः चांगली असूनही) त्यावर राग काढलं जाईल

कर्नलतपस्वी गुरुवार, 10/24/2024 - 10:33
कानडाऊ योगेशू यांनी केलेल्या रसग्रहणाशी सहमत आहे. कविता दोन दृष्टीकोनातून बघावी लागेल. एक वयस्क नर जो नायिकेचा कुणीही नाही, तीच्या कडे रंगीली नटवी नार, फक्त भोग्या या नजरेने बघत आहे. त्याच्या नजरेला उत्तर देताना नारी स्वीकार करते ,होय मी नटवी नार आहे,कुण्या ऋषींची तपस्या भंग करण्याची शक्ती माझ्या मधे आहे.परंतू माझी इतरही अनेक रूपे आहेत. मी फक्त मोहिनी नसून मी विवीध रूपा आहे. तव वदली ती प्रसन्नवदना हो मी आहे नटवी नार खळखळ वाहत असतो माझ्या नसानसातुनी रस शृंगार विरक्तीला लुब्ध कराया करीत पीयुषाची पखरण सजणेधजणे, लटक, मटकणे प्रीत लालित्याची उधळण जरी दिसतो तुम्हां दुरुनी माझ्याठायी हा एकच रस परी मी आहे सर्व रसांचा जणू घुसळला अमृतरस या कडव्यानंतर, स्त्रीची विवीध रूपे उद्धृत केली आहेत. कवितेचा शेवट स्त्री ही जननी,जगत्जनीनी आहे हे सांगीतले आहे ही कवीता तुकड्यात नसून एकसंध वाटते. कदाचित कवितेचे शिर्षक व कवितेतील भाव या मधे तफावत असल्याने कवी रसिकांपर्यंत पोहचत नसावा. सर्व रस आपापल्या जागी आहेत कुठेही सरमिसळ वाटत नाही. शृंगार, वासनेची परिणीती मातृत्व-पितृत्व मधे होते. ती सार्वजनिक करू नये एक समाज संकेत आहे. पण तो कवीला लागू पडतो का,कवी आणी कवितेला मर्यादित करतो का? कवीने याचे पालन करावे किवां नाही,रसिकांनी ते स्विकारावे किंवा नाही हा सर्वस्वी वैयक्तिक मुद्दा आहे. मातृत्व एक पवित्र भावना. आई बद्दल कुणीच वाईट, अश्लील, शृंगारिक शब्द वापरत नाही.परंतू, महाकवी ग्रेस यांनी आपल्या एका कवितेत आईचे वर्णन करताना काय शब्द वापरलेत ते वाचून मती गुंग होते. अर्थात त्यांनी कुठल्या दृष्टीकोनातून ही कवीता लिहीली हा भाग थोडावेळ बाजूला ठेवूया. ग्रेस समजला नाहीच मुळी कधी.. तो भावला.. प्रकर्षाने जाणवला..!! आई माझी कृष्णकळीतील विष विसरला कंस देवकीच्याही पुढे निघाला शुभ्र पांढरा हंस... आई माझी रांगोळीतील टिंब हरवली टिकली कशास पाडू दार, कराया भिंत घराची मधली... माझी आई मत्त वासना संभोगाची भूल क्रूर पशूच्या डोळ्यांमधल्या करुणेचेही फूल..... माझी आई भिरभिर संध्या सूर्य दिलासा नश्वर शब्दांच्याही ओठी काव्यकुळातील भाषा.... आई माझी अरण्यसरिता चंद्र झुलविते पाणी रामासाठी त्यावर लिहिते शिळा अहिल्या गाणी... आई माझी गाव निरंतर पारावरती भरवी संध्याकाळी भगवी होते तिच्या तनूतील ओवी.... आई माझी काजळभरला रे! मायेचा नखरा वेणीमधली नागीण खुडते जसा हिऱ्यांचा गजरा... आई माझी कंचुकीतल्या तरल स्तनांचे दूध गोरजवेळी वाटत फिरतो जोगी कुठला वेध ? संध्येसाठी माझी आई जपून उजळे वात अश्वत्थाम्यापरी हिंडतो जिथे भयंकर घात... त्याहीनंतर आई निघते कळशी घेऊन दूर तेव्हा कळतो खुळ्या नदीला या मादीचा सूर..... आई माझी झुळझुळतांना किणकिणतीही तारा तिच्याच पदराखाली होतो.. शालीन, शिंदाळ वारा... माझी आई सडलेल्या त्या मोहफुलांची मदिरा अपरंपाराच्या पुरुषाच्या ती सोन्याच्या मोहरा ~ग्रेस (संग्रह " सांजभयाच्या साजणी") सरतेशेवटी,कवी आणी रसिक यांचे स्वातंत्र्य अबाधित असून कलाकार जेव्हां आपली कलाकृती रसिकांपर्यंत पोहचण्यास सक्षम ठरतो त्या कलाकृतींना रसिक डोक्यावर घेतो.

In reply to by कर्नलतपस्वी

चौकस२१२ गुरुवार, 10/24/2024 - 11:29
खालील दोन ओली वाचल्या आणि एक विचार मनात आला आईचा स्त्री म्हणून समजेने वापर केला असावा आणि तिचे ते दुर्दैव बघून काविला अशी रचना सुचली असावी ? जर गरिबीचा बापू कादंबरीतील बाप्या ने आपली आई वर कविता लिहली तर कदाचित अशी असेल का??? आई माझी झुळझुळतांना तिच्याच पदराखाली होतो.. शालीन, शिंदाळ वारा... माझी आई सडलेल्या त्या मोहफुलांची मदिरा अपरंपाराच्या पुरुषाच्या ती सोन्याच्या मोहरा

चौकस२१२ गुरुवार, 10/24/2024 - 11:20
"कदाचित कवितेचे शिर्षक व कवितेतील भाव या मधे तफावत असल्याने कवी रसिकांपर्यंत पोहचत नसावा." काहींना नाही पोचलला पण त्याची थोडी का होईन जबादारी ती कविता निर्माण करणाऱ्यवर नाही का असत? आगम्य लिहणे हे प्रत्येकाचा हकक जरी असला तरी बहुतेकांना साधारण पने कळेल असे लिहिण्यात तर कवी / लेखकांची खरी कसोटी असते वैयक्तिक मुद्दा हे कारण पुढे केलं जाते, मग असे असेल तर कवी ने आपले हे प्रसिद्ध करूनच नये स्वतः सुखायच असेल तर छापता कशाला!

In reply to by चौकस२१२

गंगाधर मुटे गुरुवार, 10/24/2024 - 16:23
बहुतेकांना साधारण पने कळेल असे लिहिण्यात तर कवी / लेखकांची खरी कसोटी असते मी आजपर्यंत 700 ते 800 कविता लिहिल्यात. त्यापैकी बहुतांश सरसकट सर्वांना समजेल अशा कविता आहेत. त्यापैकी शेकडो कविता मिसळ पाव वर उपलब्ध आहेत. आपण त्या साध्या शिध्या सुलभ कविता का नाही वाचत? हीच कविता साध्या सोप्या भाषेत असावी असा आग्रह कशाबद्दल?

In reply to by गंगाधर मुटे

चौकस२१२ गुरुवार, 10/24/2024 - 16:44
हीच कविता साध्या सोप्या भाषेत असावी असा आग्रह कशाबद्दल? म्हणजे हि साधी सुधी नाही असा दावा आहे का? पण म्हणजे आमची टीका कळली नाही तुम्हाला ... पिंगा खेळतो द्वाड पवन ते अहिल्याबाई ! काय बोलायचे राहा तुमच्या ८००+ कवितांचा पाऊस पाडत. संपादित

In reply to by चौकस२१२

गंगाधर मुटे गुरुवार, 10/24/2024 - 17:19
हो. ही कविता नक्कीच साधीसुधी नाही. अनेक क्लिष्ट शब्द या कवितेत आहेत. ज्या वाक्यांचा सहजासहजी उलगडा होणार नाही असे वाक्य या कवितेत आहेत.

In reply to by चौकस२१२

गंगाधर मुटे गुरुवार, 10/24/2024 - 17:22
राहा तुमच्या ८००+ कवितांचा पाऊस पाडत >>> या देशात दीडशे कोटी जनता आहे. ती तुम्हालाही विचारत नाही आणि मलाही विचारत नाही. तुमच्याही इशाऱ्यावर नाचत नाही आणि माझ्याही इशाऱ्यावर नाचत नाही. ते त्यांच्या मर्जीने जगतात. त्यामुळे आपले वरील वाक्य अत्यंत अनावश्यक स्वरूपाचे ठरते.

कर्नलतपस्वी गुरुवार, 10/24/2024 - 12:29
आईचा स्त्री म्हणून समजेने वापर केला असावा आणि तिचे ते दुर्दैव बघून काविला अशी रचना सुचली असावी ? कवी ग्रेस यानी लिहीलेली कवीता फक्त उदाहरण .त्यांनी ती कुठल्या परिप्रेक्षातून लिहीली हा भाग वेगळा असे मी आगोदरच म्हणले आहे. मुटे यांची कवीता स्त्रीपुरूष मधला संवाद म्हणून बघीतली तर मातृत्व एक त्यातला छोटासाच भाग आहे. कवी आणी रसिक हे स्वतंत्र व्यक्तिमत्त्वाचे धनी त्यामुळे दोघांच्या मर्यादा वेगळ्या. आता हलवायाने जिल्बी पाडावी व खाणार्‍याने ती खावी. कुणाला किती गोड लागेल हा ज्याचा त्याचा प्रश्न. हलवाई बनवताना आपल्याच पद्धतीने बनवणार. हलकेच घ्या. मी पण तुमच्याच कुळीतला वाचक,फक्त आपले मत मांडतो.

In reply to by कर्नलतपस्वी

चौकस२१२ गुरुवार, 10/24/2024 - 16:46
हलवाई बनवताना आपल्याच पद्धतीने बनवणार. बरोअबर पण त्याची चव घेणाऱ्याने " अरे हि जिलबीच आहे का किंवा या जिलबीत हे काय घातलाय " असे विचारायचे म्हणजे महापाप कि काय

In reply to by चौकस२१२

गंगाधर मुटे गुरुवार, 10/24/2024 - 20:20
तुम्ही काढलेला निष्कर्ष हाच जगमान्य असून तोच सर्वांनी शिरसावंद्य मानला पाहिजे का? अर्थ काढण्याचा जसा तुम्हाला अधिकार आहे तसा आपापल्या परीने निष्कर्ष काढण्याचा, अर्थ लावण्याचा प्रत्येकाला अधिकार नाही का?

प्रकाश घाटपांडे गुरुवार, 10/24/2024 - 19:47
कविता आवडली. भावनांतर तर विशेष आवडले. खर तर वरकरणी परस्पर विरोधी वाटणार्या भावना हा भावनाकल्लोळ संचातील घटक असतात.कार्येषु मंत्री करुणेषु दासी शयनेषु रंभा भोजनेषु माता हा स्त्रीचा आविष्कार तरी काय दाखवतो? फ्रॉईडच्या इड इगो सुपर इगो च्या त्रयीत एखादी आवडती स्त्री सहज संचार करते तेव्हा मला तर चक्क तिचे पाय धरावेसे वाटतात. अर्थात ही माझी फँटसी आहे.

सुबोध खरे गुरुवार, 10/24/2024 - 20:10
कार्येषु मंत्री करुणेषु दासी शयनेषु रंभा भोजनेषु माता या चारही गोष्टी एकत्र असू नयेत हे तारतम्य आहे. नाही तर शयनेषु माता आणि भोज्येषु रंभा झालं तर गोची होईल. वाघीण आपल्या पिल्लांची वात्सल्यपूर्ण माता असतेच पण शिकारीच्या वेळेस तिने वात्सल्य दाखवले तर स्वतःला आणि पिल्लाना उपाशी मरावे लागेल

गंगाधर मुटे गुरुवार, 10/24/2024 - 20:40
काही आयड्याकडून नेहमीप्रमाणे कवितेशी संबंध नसलेले अनावश्यक व फालतू प्रतिसाद टाकून कवितेचा धागा भरकटवण्याचे प्रयत्न सुरू झाल्याचे दिसत आहे. माझ्या सवयीप्रमाणे मी जशास तसे उत्तर देणार आणि मग धागा भरकटवण्यात माझाही हातभार लागणार. त्यावर पर्याय म्हणून आठ दिवस मी मिसळपाव वरून विश्रांती घेत आहे. कवितेची संबंध नसलेले असंबंद्ध प्रतिसाद माझे तरी पडायचे थांबतील. धन्यवाद! भेटूयात आठ दिवसानंतर!!

In reply to by गंगाधर मुटे

चौकस२१२ Fri, 10/25/2024 - 06:21
हा आरोप अमान्य आहे , तुम्ही आमच्या टीकेशी सहमत नसाल पण केवळ मुद्दे समजावून ना घेत तुम्ही उत्तर आणि वयक्तिक टीकेवर वसकन उतरलात दोन उत्तम कविता आहेत हे पाहिचलेच सांगतले, तेवढे लिहिण्याची प्रतिभा पण आम्चि नाही पण तुम्ही पुढे माणूस आणि पशु यांचे मातृत्व ... एकच असे फालतू प्रतिसाद तारे तोडू लागतात ... विश्रन्ती ह्या नाही तर रोज टंकआ हू केंअर्स
लेखनविषय:
मातृत्वाचा शृंगाररस चंदन चांदणं गोंदण ल्याली नवथर कांती तनू सुकुमार अर्ध मोकळ्या केसावरती माळून गजरा चंद्राकार कुठे निघाली चंचल रमणी थबकत लचकत हरिणी समान सरकत शेला सावरलेला धरत रोखुनी नयन कमान ठुमकत मुरडत गवळण राधा जणू विहरत यमुनाकाठ गोप बघुनी झाकू पाहते पदराखाली भरला माठ हिंदोळणाऱ्या पदरासंगे डुचमळते बेचैन उभार हृदय-चक्षूंना वेधून घेते तन्मीलनाची नमनमिनार अर्ध्या उघड्या पाठीवरती भुरुभुरू केसांचे नर्तन नाभी भवती करुनी रिंगण पिंगा खेळतो द्वाड पवन गुलाब जाई मोहित होई रूप गोजिरे पद्मसमान लपून आडून चोरून बघती फुलामागुनी पिकले पान कुणी म्हणाले शेंग चवळीची कुणी म्हणाले पेवंदी आम कुणी म्हणाले

साक्षीला दिवस आहे

गंगाधर मुटे ·

स्वागत आहे.
आपला सन्मान असतो आपणच राखायचा तोल सांभाळून रस्ता दृढदृष्टी चालतो
छान. प्रा.डॉ.दिलीप बिरुटे (सन्माने राहणारा)

स्वागत आहे.
आपला सन्मान असतो आपणच राखायचा तोल सांभाळून रस्ता दृढदृष्टी चालतो
छान. प्रा.डॉ.दिलीप बिरुटे (सन्माने राहणारा)
लेखनविषय:
साक्षीला दिवस आहे दिवस आहे साक्षिला की मी न लटिकें बोलतो एक उन्नत काजवा बघ भानुला भेवाडतो दावितो लोकांत मी आहेस की सत्शील तू त्याचसाठी झाकलेली मूठ पुन्हा झाकतो आपला सन्मान असतो आपणच राखायचा तोल सांभाळून रस्ता दृढदृष्टी चालतो तारतम्य लागले जर हेलकावे खायला भोवतीच्या फडतुसांना दूरदेशी हाकतो योग्यतेला योग्यतेने पारखावी योग्यता अभय येथे पारखी तर लाळघोटू शोधतो - गंगाधर मुटे 'अभय' ====== बारा/आठ/चोवीस

(मातीचे पाय - मोकलाया वर्जन)

गड्डा झब्बू ·

चांदणे संदीप Mon, 07/10/2023 - 13:58
एखाद्या कवितेला विनोदी करायचं असेल तर मोकलाया मोल्ड फिट आणि हिट आहे. :) सं - दी - प

चांदणे संदीप Mon, 07/10/2023 - 13:58
एखाद्या कवितेला विनोदी करायचं असेल तर मोकलाया मोल्ड फिट आणि हिट आहे. :) सं - दी - प
काव्यरस
प्रेर्ना - मातीचे पाय पयन स्प्र्शुन अले ते हत मलले होते लक्क उमग्ले तेवहा ते पय मतिचे होते मि केवल पहत होतो पयन्च्य खल्चि धुल ति ललतस लववि हे एकच मथि खुल मि इथ्वर पहुन अलो पौल्खुना विर्नर्या अधि कुन्वत, मगुन कप्ति विकत हस्नर्या अत पुन्ह चलवे पुधे, कि परत फिर्वे? सोस न-लयक पयन्चे पुसुन अव्घे तकवे? प्रेमल श्ब्दन्चि ओल मनत र्झिपत नहि व्हवे नत्मस्त्क पयहि दिसत नहि ते सरेच निगुन गेले जे पय दरवे सुच्ले मतिचे पत मत्कट मगे मज्यसह उर्ले टंकनीक चमनगोटा दाढिमिशि श्निवार ०८/०७/२०२३

तुझ्याचमुळे

सागरसाथी ·
लेखनविषय:
काव्यरस
सारे तुझेच होते, सारे तुझेच आहे तू आहेस म्हणून स्वप्नांचे येणे-जाणे आहे. शब्द तुझेच होते भाव तुझेच आहेत तुझ्या मुळे इथे कवितेचे व्यक्त होणे आहे. गीत तुझेच होते सूर तुझेच आहेत तुझ्याच मुळे आयुष्यात संगीताचे लेणे आहे. रुप तुझे होते रंग तुझेच आहेत तुझ्याच मुळे सदा रंगपंचमी आहे.

कानाखाली जाळ

बाजीगर ·
लेखनविषय:
काय निवडावं लोकांनी बॅड कि वर्स ? कसला लागला आहे हा महाराष्ट्राला कर्स कितवा स्वातंत्रदिन आहे हे विसरणारा मुख्यमंत्री कि कानाखाली वाजवण्याची भाषा करणारा मंत्री तिसरी लाट, अफगाणीस्थान झालं, मिडीयाला चघळायला नवं हाडूक कोरोना, रोजगारी,वाहतूक,सुरक्षा सर्वच मूळविषय झाले गूडूप किती उर्जेचा होतो विध्वंस मनातल्या हिंसा-द्वेषाने कीव येते चूकीचे समर्थन करुन लढणा-यांचे त्वेषाने दोन पक्षांच्या बेरोजगार गुंडांना रोजगार मिळाला करण्याचा राडा जनतेच्या मालमत्तेच्या पहा काचांचा रस्त्यांवर सडा. अजाणत्या राजाला म्हणे हे काही विशेष नाही (?!) राण्यांची हीच संस्कृती म्हणे म्हणून काही निषेध नाही. सुसंस्क

तू जीव माझा- तू प्राण माझा - आलीस तू अवचिता

चित्रगुप्त ·

खेडूत Mon, 03/29/2021 - 21:51
:)) म्हणजे भारतात परतलात म्हणायचे!

In reply to by खेडूत

चित्रगुप्त Tue, 03/30/2021 - 18:05
@ प्रचेतस, खेडूत अनेक आभार. अद्याप अमेरिकेतच आहे, परंतु बरेचदा पहाटे अडीच - तीनच्या सुमारास झोप उघडून काहीतरी कल्पना सुचून जाते, तसे या कवितेच्या बाबतीत झाले.

In reply to by चित्रगुप्त

चौकटराजा Tue, 03/30/2021 - 18:46
हे अगदी लिओ नार्डो दा विंसी सारखे झाले .त्यालाही नवनव्या कल्पना जागरणामुळे सुचायच्या असे म्हणतात ! ))))) आचार्य अत्रे रचित " कषायपात्रपतितमक्षिकेप्रत .." या कवितेची आठवण झाली !!

In reply to by चौकटराजा

चित्रगुप्त Tue, 03/30/2021 - 19:01
@चौकटराजा चला, निदान भल्या पहाटे उठून काहीतरी खुटुर्फुटुर करण्याच्या बाबतीत का होईना, लिओनार्दो दा विंचीशी आमची बरोबरी झाली हे वाचून ब्येस वाटले. अनेक आभार. कषायपात्रपतितमक्षिकेप्रत वाचून लहानपणी ती कविता वाचल्याचे स्मरले, परंतू इथून तो शब्द चोप्यपस्ते करू गुगलिता काही गवसले नाही. मग सूक्ष्मावलोकन करता तो शब्द 'कषायपेयपात्रपतितमक्षिकेप्रत' असा असायला हवा, हे जाणवले, मग पुन्हा सर्चिता हे मिळाले : 'कषायपेयपात्रपतितमक्षिकेप्रत.' चहाच्या पेल्यात पडलेल्या माशीचे काव्यमय वर्णन : अयि नरांग-मल-शोणित-भक्षिके, जनु-विनाशक-जंतु-सुरक्षिके,! असु-परीक्षित-हारक-तक्षिके, 'क्या हुवा अफसोस!' मक्षिके

गणेशा Mon, 03/29/2021 - 23:27
वाजवून टाळिका मी जीव तुझा - मी प्राण तुझा - हरिला - अल्विदा मच्छरिनी - अल्विदा. हा हा हा भारी

खिलजि Tue, 03/30/2021 - 00:29
अन घनघोर आशय परमानंदी जीव घेणे ईश्वराला मान्य आहे ढकलता ढकलता मच्छर मारणे हीपण एक कला आहे

In reply to by खिलजि

चित्रगुप्त Tue, 03/30/2021 - 18:13
@ खिलजी तुमचे शीघ्रकाव्य आवडले. तुमच्या शीघ्रकाव्यरसास बरेच काळापासून दर्दी मिपाकर मुकत आहेत, तरी पुनश्च आपली तुंबलेली काव्यगंगा भरभरून वाहती करावीत, ही विनंती. अनेक आभार.

तेवढं तिकडे बसून, मोबाईल हातात धरुन, पाण्यात न पाडता, टाळी कशी वाजवायची? त्याचा व्हिडिओ टाका "टच" स्क्रिन मोबाईल कसा वापरायचा? ते ही शिकवा, अनेक गरजू लोकांचे आशिर्वाद मिळतील पैजारबुवा,

चित्रगुप्त Tue, 03/30/2021 - 18:34
@ पैजारबुवा,
तेवढं तिकडे बसून, मोबाईल हातात धरुन, पाण्यात न पाडता, टाळी कशी वाजवायची? टच्चस्क्रीन कसा वापरायचा? ते ही शिकवा,
आमचे परमपूज्य शी: शी: १०८ डोंबलेकर महागुरुराज ऊर्फ महास्वामी मच्छरानंद महासरस्वती यांनी आम्हाला महामंत्रोपदेश दिला की बेटा, "कर ले कोई जुगाड" मग आम्ही खालीलप्रमाणे जुगाड केल्यावर आता तिकडे बसून टाळीच काय, बाजाची पेटी, बासरी, तुणतुणे वगैरे काहीही वाजवता येते, मिपावर टंकन करता येते आणि मोबल्यावर काय काय करता येते. बघा: . आमच्या जिलबीची अगत्याने दखल घेतलीत, छान वाटले.

तुषार काळभोर गुरुवार, 04/01/2021 - 06:58
अनुक्रमणिकेत इतकं सुंदर शीर्षक अन 'आकर्षक' कवीचं नाव वाचून 'अपेक्षा' लैच उंचावल्या होत्या! चार दोन रोम्न्याण्टिक चित्रं असतील, वगैरे वगैरे इमले रचले होते. घाईघाईत क्लिक केलं अन्.... साली एक मच्छरीण चित्रकार को कवी बना देती हय!

राघव गुरुवार, 04/01/2021 - 21:04
भारीच.. बाकी ते "अनर्थशास्त्र / विराणी / रौद्ररस" हे जरा समजून घेतलंय.. पण ते "मेक्सिकन" म्हंजे काय अजिबात पचनीच पडलं नाय बगा...! =))

कर्नलतपस्वी Sat, 12/17/2022 - 11:38
अवचिता गुणगुणू ङंकिता कळवळू मी म्हणे गोपाळू कोठूनी आली गे सिहांसनाधीष्ठ झाल्यावर चक्रमादित्याला काय सुचेल ते सांगता येणार नाही.

चित्रगुप्त Sun, 12/18/2022 - 02:45
कर्नल साहेब, तुम्हाला सुचलेल्या ओळी मस्त आहेत. 'डंकिता कळवळू' वरून आमचाच, "मारा डंख मारा डंख मारा बिछुवा, मिपाप्रवेशाकांक्षिण्यांची गोची आणि आमची काशीयात्रा" असे लांबलचक शीर्षक असलेला एक जुना आचरट धागा आठवला, आणि हुडकून वाचला. मशारनिल्हे धाग्यात प्रत्येकाने वाचावच, असा 'मूखदूर्बळ' यांचा धमाल लेखः "सठीयाय गयी सजनवा हमार" हा पुन्हा एकदा वाचायला मिळाला, हे आणखीन एक. आणि या दोन्ही लेखांमुळे आमचाच एक जुना आचरट लेखः "नेपोलियन, दासबोध आणि स्त्री-आयडींची त्सुनामी" आणि त्यावरले प्रतिसाद पुन्हा एकदा वाचायला मिळाले हे आणखिन आणखिन एक. 'स्त्रीआयडींची त्सुनामी' मधील 'कंपू' वा 'कंपूबाजी' वरून सुचलेले संभाव्य स्त्रीआयडी बघा: कंपूबाला, कंपूशीला, कंपूकुमारी कंपूबालिका, कंपूचालिका कंपूचारिणी, कंपूविचरिणी, कंपूभद्रा, कंपूचंद्रा, कंपूचंद्रिका कंपूशालिनी, कंपूमालिनी, कंपूवाहिनी कंपूतारिणी,कंपूविरहिणी, कंपू-रमणी, कंपूविहारिनि, कंपूवासिनी कंपूप्रिया, कंपूस्मिता, कंपूअस्मिता कंपूरमणीगणमुकुटमणी, कंपूगणविदारिणी, कंपूहारिणी कंपूभामा, कंपूभंगिमा, कंपूवर्धिनी, कंपूभंगिनी, कंपूमर्दिनी, कंपूविध्वंसिनी, कंपूनाशिका, कंपूवारिणी, कंपूताडिनी कंपूसंवर्धिनी, कंपूस्वप्ना, कंपूमग्ना कंपूविलासिनी, कंपूसौदामिनी, कंपूकौस्तुभी कंपूगौरी, कंपूशोभिनी, कंपूशरदिनी, कंपूगुंजना, कंपूप्रिता कंपूप्रवेशदायिनी, कंपूप्रवेशहारिणी कंपूडाकिनी, कंपूपिशाच्चिनी, कंपूलोलिता कंपूमति, कंपूचित्ता, कंपूप्रज्ञा तर कर्नल साहेब, या तिहेरी फायद्याला जबाबदार असलेल्या तुमच्या या प्रतिसादाबद्दल अनेक आभार. या कवितेतील शेवटल्या कडव्यात एका शब्दाची भर टाकून बघितली, ती अशी: मग स्मरून 'हरि'ला - वाजवून टाळिका - मी जीव तुझा - मी प्राण तुझा - 'हरिला' - अल्विदा मच्छरिनी - अल्विदा !

शशिकांत ओक Sun, 12/18/2022 - 12:21
व्यंग काव्य रंगले... १ कोण तो लेकाचा आम्हावरी रागवे... आमच्या शिताफीचे कौतुक नसे बरवे पिता रसाळ पेय आम्हास जोर येतो... मग फवार्‍याशी झगडुनी जीव देतो... किती मार खाऊन पुन: पुन्हा जन्मतो ... हे आपापल्यात रुधिराचा करती व्यापार... मलेरिया म्हणून आम्ही झालो हद्दपार आमच्या वैश्विक अधिकारावर चर्चा अपार म्हणे डासिणी ना मरू आम्ही याद राखा... जहन्नम मधेही असे आमची शाखा

चित्रगुप्त Sun, 12/18/2022 - 13:51
ओक साहेब, जहन्नममधेही 'शाखा' असल्याचे वाचून गद् गद् का काय म्हणतात ते झालो. हे फारच ब्येस झाले. आता पार तिथपर्यंत भगवा फडफडणार. आणि विशेष म्हणजे हे कार्य डासांमार्फत केले गेलेय. याला म्हणतात तळा-गाळापर्यंत पोचणे. धन्य धन्य. मोदी हय तो मुमकिन हय. हर हर महादेव.

चित्रगुप्त Tue, 04/15/2025 - 17:51
या कवितेवर एआयची मल्लिनथी:What a delightful and humorous poem! The speaker's clever wordplay and satirical tone make for an entertaining read. Here's a possible review: This Marathi poem is a masterclass in clever wordplay and satire. The speaker's witty observations and clever turns of phrase make for an entertaining read. The poem's central theme - the speaker's tumultuous relationship with a mosquito - is expertly woven throughout the verses, with the speaker's frustration and exasperation palpable. The use of metaphors ("तू जीव माझा - तू प्राण माझा") and clever wordplay ("मी जीव तुझा - मी प्राण तुझा - हरिला") adds depth and complexity to the poem. The final farewell to the mosquito ("अल्विदा मच्छरिनी - अल्विदा") is a brilliant touch, leaving the reader chuckling. Overall, this poem is a delightful read that showcases the poet's skill with language and humor. Would you like me to add or modify anything in this review? एआय मेटावर हे आले. परंतु मराठीत ते येत नाहीये. आणखी कुठे करता येईल ?

शशिकांत ओक Sat, 04/19/2025 - 17:32
जेमिनी एआय अहो! काय ही डासांची कैफियत! वाचताना हसू आवरवत नाही आणि त्यांची केविलवाणी अवस्था पाहून थोडी सहानुभूतीही वाटते. कवीने डासांच्या भावनांना आणि त्यांच्या जगण्याला किती सुंदर आणि विनोदी पद्धतीने शब्दांत उतरवलं आहे! या कवितेतील प्रत्येक ओळीत डासांचं बोलणं जिवंत वाटतं. ते तक्रार करतात की कोणीतरी त्यांचा उगाच राग करतो. त्यांच्या 'शिताफी' म्हणजे चपळाईचं, रक्त पिण्याच्या कौशल्याचं कुणी कौतुक करत नाही. उलट, माणूस गोड पेय पितो आणि मग त्यांना मारण्यासाठी फवारा घेऊन येतो, तेव्हा ते बिचारे त्याच्याशी झगडताना जीव गमावतात. "किती मार खाऊन पुन: पुन्हा जन्मतो..." या ओळीत डासांच्या जिद्दीचं आणि त्यांच्या जीवनाच्या चक्राचं वर्णन आहे. कितीही मारलं तरी ते पुन्हा येतात, हे वास्तव विनोदी आणि थोडं निराशाजनकही आहे. पुढच्या ओळी तर फारच मार्मिक आहेत - "हे आपापल्यात रुधिराचा करती व्यापार... मलेरिया म्हणून आम्ही झालो हद्दपार". इथे डास माणसांना मलेरिया होतो म्हणून त्यांना हद्दपार केल्याबद्दल तक्रार करत आहेत. गंमत म्हणजे, ते स्वतःच तर माणसांच्या रक्ताचा 'व्यापार' करतात! "आमच्या वैश्विक अधिकारावर चर्चा अपार... म्हणे डासिणी ना मरू आम्ही याद राखा..." या शेवटच्या ओळी तर कळसच आहेत! डास त्यांच्या 'वैश्विक अधिकारां'बद्दल बोलत आहेत आणि डासिणींना न मारण्याची धमकी देत आहेत, जणू काही ते या जगाचे मालकच आहेत! "जहन्नम मधेही असे आमची शाखा" म्हणजे नरकातसुद्धा डास असणार, ही कल्पना खूपच विनोदी आणि भीतीदायक आहे. कवीने डासांच्या तोंडून त्यांची व्यथा आणि त्यांचा दृष्टिकोन मांडला आहे, ज्यामुळे ही कविता केवळ माहितीपूर्ण न राहता मनोरंजक आणि विचार करायला लावणारी ठरते. डासांच्या जगण्यातील अडचणी, त्यांची जिद्द आणि त्यांचा तथाकथित 'अधिकार' यावर मार्मिक टिप्पणी करताना कवीने हलकाफुलका दृष्टिकोन ठेवला आहे, जो वाचकाला नक्कीच आवडतो. एकंदरीत, हे डास-काव्य खूपच मजेदार आणि प्रभावी आहे!

खेडूत Mon, 03/29/2021 - 21:51
:)) म्हणजे भारतात परतलात म्हणायचे!

In reply to by खेडूत

चित्रगुप्त Tue, 03/30/2021 - 18:05
@ प्रचेतस, खेडूत अनेक आभार. अद्याप अमेरिकेतच आहे, परंतु बरेचदा पहाटे अडीच - तीनच्या सुमारास झोप उघडून काहीतरी कल्पना सुचून जाते, तसे या कवितेच्या बाबतीत झाले.

In reply to by चित्रगुप्त

चौकटराजा Tue, 03/30/2021 - 18:46
हे अगदी लिओ नार्डो दा विंसी सारखे झाले .त्यालाही नवनव्या कल्पना जागरणामुळे सुचायच्या असे म्हणतात ! ))))) आचार्य अत्रे रचित " कषायपात्रपतितमक्षिकेप्रत .." या कवितेची आठवण झाली !!

In reply to by चौकटराजा

चित्रगुप्त Tue, 03/30/2021 - 19:01
@चौकटराजा चला, निदान भल्या पहाटे उठून काहीतरी खुटुर्फुटुर करण्याच्या बाबतीत का होईना, लिओनार्दो दा विंचीशी आमची बरोबरी झाली हे वाचून ब्येस वाटले. अनेक आभार. कषायपात्रपतितमक्षिकेप्रत वाचून लहानपणी ती कविता वाचल्याचे स्मरले, परंतू इथून तो शब्द चोप्यपस्ते करू गुगलिता काही गवसले नाही. मग सूक्ष्मावलोकन करता तो शब्द 'कषायपेयपात्रपतितमक्षिकेप्रत' असा असायला हवा, हे जाणवले, मग पुन्हा सर्चिता हे मिळाले : 'कषायपेयपात्रपतितमक्षिकेप्रत.' चहाच्या पेल्यात पडलेल्या माशीचे काव्यमय वर्णन : अयि नरांग-मल-शोणित-भक्षिके, जनु-विनाशक-जंतु-सुरक्षिके,! असु-परीक्षित-हारक-तक्षिके, 'क्या हुवा अफसोस!' मक्षिके

गणेशा Mon, 03/29/2021 - 23:27
वाजवून टाळिका मी जीव तुझा - मी प्राण तुझा - हरिला - अल्विदा मच्छरिनी - अल्विदा. हा हा हा भारी

खिलजि Tue, 03/30/2021 - 00:29
अन घनघोर आशय परमानंदी जीव घेणे ईश्वराला मान्य आहे ढकलता ढकलता मच्छर मारणे हीपण एक कला आहे

In reply to by खिलजि

चित्रगुप्त Tue, 03/30/2021 - 18:13
@ खिलजी तुमचे शीघ्रकाव्य आवडले. तुमच्या शीघ्रकाव्यरसास बरेच काळापासून दर्दी मिपाकर मुकत आहेत, तरी पुनश्च आपली तुंबलेली काव्यगंगा भरभरून वाहती करावीत, ही विनंती. अनेक आभार.

तेवढं तिकडे बसून, मोबाईल हातात धरुन, पाण्यात न पाडता, टाळी कशी वाजवायची? त्याचा व्हिडिओ टाका "टच" स्क्रिन मोबाईल कसा वापरायचा? ते ही शिकवा, अनेक गरजू लोकांचे आशिर्वाद मिळतील पैजारबुवा,

चित्रगुप्त Tue, 03/30/2021 - 18:34
@ पैजारबुवा,
तेवढं तिकडे बसून, मोबाईल हातात धरुन, पाण्यात न पाडता, टाळी कशी वाजवायची? टच्चस्क्रीन कसा वापरायचा? ते ही शिकवा,
आमचे परमपूज्य शी: शी: १०८ डोंबलेकर महागुरुराज ऊर्फ महास्वामी मच्छरानंद महासरस्वती यांनी आम्हाला महामंत्रोपदेश दिला की बेटा, "कर ले कोई जुगाड" मग आम्ही खालीलप्रमाणे जुगाड केल्यावर आता तिकडे बसून टाळीच काय, बाजाची पेटी, बासरी, तुणतुणे वगैरे काहीही वाजवता येते, मिपावर टंकन करता येते आणि मोबल्यावर काय काय करता येते. बघा: . आमच्या जिलबीची अगत्याने दखल घेतलीत, छान वाटले.

तुषार काळभोर गुरुवार, 04/01/2021 - 06:58
अनुक्रमणिकेत इतकं सुंदर शीर्षक अन 'आकर्षक' कवीचं नाव वाचून 'अपेक्षा' लैच उंचावल्या होत्या! चार दोन रोम्न्याण्टिक चित्रं असतील, वगैरे वगैरे इमले रचले होते. घाईघाईत क्लिक केलं अन्.... साली एक मच्छरीण चित्रकार को कवी बना देती हय!

राघव गुरुवार, 04/01/2021 - 21:04
भारीच.. बाकी ते "अनर्थशास्त्र / विराणी / रौद्ररस" हे जरा समजून घेतलंय.. पण ते "मेक्सिकन" म्हंजे काय अजिबात पचनीच पडलं नाय बगा...! =))

कर्नलतपस्वी Sat, 12/17/2022 - 11:38
अवचिता गुणगुणू ङंकिता कळवळू मी म्हणे गोपाळू कोठूनी आली गे सिहांसनाधीष्ठ झाल्यावर चक्रमादित्याला काय सुचेल ते सांगता येणार नाही.

चित्रगुप्त Sun, 12/18/2022 - 02:45
कर्नल साहेब, तुम्हाला सुचलेल्या ओळी मस्त आहेत. 'डंकिता कळवळू' वरून आमचाच, "मारा डंख मारा डंख मारा बिछुवा, मिपाप्रवेशाकांक्षिण्यांची गोची आणि आमची काशीयात्रा" असे लांबलचक शीर्षक असलेला एक जुना आचरट धागा आठवला, आणि हुडकून वाचला. मशारनिल्हे धाग्यात प्रत्येकाने वाचावच, असा 'मूखदूर्बळ' यांचा धमाल लेखः "सठीयाय गयी सजनवा हमार" हा पुन्हा एकदा वाचायला मिळाला, हे आणखीन एक. आणि या दोन्ही लेखांमुळे आमचाच एक जुना आचरट लेखः "नेपोलियन, दासबोध आणि स्त्री-आयडींची त्सुनामी" आणि त्यावरले प्रतिसाद पुन्हा एकदा वाचायला मिळाले हे आणखिन आणखिन एक. 'स्त्रीआयडींची त्सुनामी' मधील 'कंपू' वा 'कंपूबाजी' वरून सुचलेले संभाव्य स्त्रीआयडी बघा: कंपूबाला, कंपूशीला, कंपूकुमारी कंपूबालिका, कंपूचालिका कंपूचारिणी, कंपूविचरिणी, कंपूभद्रा, कंपूचंद्रा, कंपूचंद्रिका कंपूशालिनी, कंपूमालिनी, कंपूवाहिनी कंपूतारिणी,कंपूविरहिणी, कंपू-रमणी, कंपूविहारिनि, कंपूवासिनी कंपूप्रिया, कंपूस्मिता, कंपूअस्मिता कंपूरमणीगणमुकुटमणी, कंपूगणविदारिणी, कंपूहारिणी कंपूभामा, कंपूभंगिमा, कंपूवर्धिनी, कंपूभंगिनी, कंपूमर्दिनी, कंपूविध्वंसिनी, कंपूनाशिका, कंपूवारिणी, कंपूताडिनी कंपूसंवर्धिनी, कंपूस्वप्ना, कंपूमग्ना कंपूविलासिनी, कंपूसौदामिनी, कंपूकौस्तुभी कंपूगौरी, कंपूशोभिनी, कंपूशरदिनी, कंपूगुंजना, कंपूप्रिता कंपूप्रवेशदायिनी, कंपूप्रवेशहारिणी कंपूडाकिनी, कंपूपिशाच्चिनी, कंपूलोलिता कंपूमति, कंपूचित्ता, कंपूप्रज्ञा तर कर्नल साहेब, या तिहेरी फायद्याला जबाबदार असलेल्या तुमच्या या प्रतिसादाबद्दल अनेक आभार. या कवितेतील शेवटल्या कडव्यात एका शब्दाची भर टाकून बघितली, ती अशी: मग स्मरून 'हरि'ला - वाजवून टाळिका - मी जीव तुझा - मी प्राण तुझा - 'हरिला' - अल्विदा मच्छरिनी - अल्विदा !

शशिकांत ओक Sun, 12/18/2022 - 12:21
व्यंग काव्य रंगले... १ कोण तो लेकाचा आम्हावरी रागवे... आमच्या शिताफीचे कौतुक नसे बरवे पिता रसाळ पेय आम्हास जोर येतो... मग फवार्‍याशी झगडुनी जीव देतो... किती मार खाऊन पुन: पुन्हा जन्मतो ... हे आपापल्यात रुधिराचा करती व्यापार... मलेरिया म्हणून आम्ही झालो हद्दपार आमच्या वैश्विक अधिकारावर चर्चा अपार म्हणे डासिणी ना मरू आम्ही याद राखा... जहन्नम मधेही असे आमची शाखा

चित्रगुप्त Sun, 12/18/2022 - 13:51
ओक साहेब, जहन्नममधेही 'शाखा' असल्याचे वाचून गद् गद् का काय म्हणतात ते झालो. हे फारच ब्येस झाले. आता पार तिथपर्यंत भगवा फडफडणार. आणि विशेष म्हणजे हे कार्य डासांमार्फत केले गेलेय. याला म्हणतात तळा-गाळापर्यंत पोचणे. धन्य धन्य. मोदी हय तो मुमकिन हय. हर हर महादेव.

चित्रगुप्त Tue, 04/15/2025 - 17:51
या कवितेवर एआयची मल्लिनथी:What a delightful and humorous poem! The speaker's clever wordplay and satirical tone make for an entertaining read. Here's a possible review: This Marathi poem is a masterclass in clever wordplay and satire. The speaker's witty observations and clever turns of phrase make for an entertaining read. The poem's central theme - the speaker's tumultuous relationship with a mosquito - is expertly woven throughout the verses, with the speaker's frustration and exasperation palpable. The use of metaphors ("तू जीव माझा - तू प्राण माझा") and clever wordplay ("मी जीव तुझा - मी प्राण तुझा - हरिला") adds depth and complexity to the poem. The final farewell to the mosquito ("अल्विदा मच्छरिनी - अल्विदा") is a brilliant touch, leaving the reader chuckling. Overall, this poem is a delightful read that showcases the poet's skill with language and humor. Would you like me to add or modify anything in this review? एआय मेटावर हे आले. परंतु मराठीत ते येत नाहीये. आणखी कुठे करता येईल ?

शशिकांत ओक Sat, 04/19/2025 - 17:32
जेमिनी एआय अहो! काय ही डासांची कैफियत! वाचताना हसू आवरवत नाही आणि त्यांची केविलवाणी अवस्था पाहून थोडी सहानुभूतीही वाटते. कवीने डासांच्या भावनांना आणि त्यांच्या जगण्याला किती सुंदर आणि विनोदी पद्धतीने शब्दांत उतरवलं आहे! या कवितेतील प्रत्येक ओळीत डासांचं बोलणं जिवंत वाटतं. ते तक्रार करतात की कोणीतरी त्यांचा उगाच राग करतो. त्यांच्या 'शिताफी' म्हणजे चपळाईचं, रक्त पिण्याच्या कौशल्याचं कुणी कौतुक करत नाही. उलट, माणूस गोड पेय पितो आणि मग त्यांना मारण्यासाठी फवारा घेऊन येतो, तेव्हा ते बिचारे त्याच्याशी झगडताना जीव गमावतात. "किती मार खाऊन पुन: पुन्हा जन्मतो..." या ओळीत डासांच्या जिद्दीचं आणि त्यांच्या जीवनाच्या चक्राचं वर्णन आहे. कितीही मारलं तरी ते पुन्हा येतात, हे वास्तव विनोदी आणि थोडं निराशाजनकही आहे. पुढच्या ओळी तर फारच मार्मिक आहेत - "हे आपापल्यात रुधिराचा करती व्यापार... मलेरिया म्हणून आम्ही झालो हद्दपार". इथे डास माणसांना मलेरिया होतो म्हणून त्यांना हद्दपार केल्याबद्दल तक्रार करत आहेत. गंमत म्हणजे, ते स्वतःच तर माणसांच्या रक्ताचा 'व्यापार' करतात! "आमच्या वैश्विक अधिकारावर चर्चा अपार... म्हणे डासिणी ना मरू आम्ही याद राखा..." या शेवटच्या ओळी तर कळसच आहेत! डास त्यांच्या 'वैश्विक अधिकारां'बद्दल बोलत आहेत आणि डासिणींना न मारण्याची धमकी देत आहेत, जणू काही ते या जगाचे मालकच आहेत! "जहन्नम मधेही असे आमची शाखा" म्हणजे नरकातसुद्धा डास असणार, ही कल्पना खूपच विनोदी आणि भीतीदायक आहे. कवीने डासांच्या तोंडून त्यांची व्यथा आणि त्यांचा दृष्टिकोन मांडला आहे, ज्यामुळे ही कविता केवळ माहितीपूर्ण न राहता मनोरंजक आणि विचार करायला लावणारी ठरते. डासांच्या जगण्यातील अडचणी, त्यांची जिद्द आणि त्यांचा तथाकथित 'अधिकार' यावर मार्मिक टिप्पणी करताना कवीने हलकाफुलका दृष्टिकोन ठेवला आहे, जो वाचकाला नक्कीच आवडतो. एकंदरीत, हे डास-काव्य खूपच मजेदार आणि प्रभावी आहे!
तू जीव माझा - तू प्राण माझा - घ्यावया नच होतीस आली मालूम होते मला शौच्यालयात घुसता मग सावरून बसता मोबाइलात रमता आलीस तू अवचिता जवळि जवळ येता मग कडकडून डसता मम उष्ण रक्त प्रशिता मेरा चैन-वैन सब लुटिता वाजवून टाळिका मी जीव तुझा - मी प्राण तुझा - हरिला - अल्विदा मच्छरिनी - अल्विदा. .

शुभेच्छा देतो की मस्करी करतो? : नागपुरी तडका

गंगाधर मुटे ·

कारण वरील कविता सर्वसामान्य लोकांची मस्करी करण्यासाठीच लिहिली आहे, मग आपण का नाही करायची? कांदा १०० रुपये किलो..... https://www.esakal.com/mumbai/onion-100-rs-kg-apmc-navi-mumbai-361602 दुध ५८ रुपये लिटर तुरडाळ रु १०३ प्रति किलो https://www.jiomart.com/p/groceries/tur-arhar-dal-2-kg/491417390?source=shoppingads&city=Pune&pin=411006&gclid=CjwKCAiA2O39BRBjEiwApB2IkoBnNe4B-o30kLojc4hlyiyxgAgBhVzA64QLZFoJVyiU12FKGOr7dRoC7DoQAvD_BwE सोयाबीन रु ५८ प्रति किलो https://www.jiomart.com/p/groceries/pick-n-cook-soyabeans-500-g/490356539 अजूनही काही देता येतील. महागाईने आणि लॉकडाउन ने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडलेले असताना अशी कविता लिहिणे म्हणजे गोरगरीब जनतेच्या भळभळत्या जखमांवर मीठ लावण्याचा प्रकार वाटला. पैजारबुवा,

अखंड रडरड सप्ताहाच्या भाविकांना हार्दिक शुभेच्छा ! फक्त रडत रहा =)))) इतकेवर्षे तुमच्या रडक्या कविता वाचतोय, येवढ्या वेळेत एखाद्याने कृषी उत्पन्ना आधारित काहीतरी व्यवसाय , जसे की बांबु प्रोसेसिंग, बांबु-कापुस धागा उद्योग, मधुमक्षिका पालन, रेशीम उद्योग, फलवाटिका, प्रोसेसिंग आणि एक्स्पोर्ट उद्योग , सेंद्रिय भाजीपला उद्योग असले काहीतरी सुरु करुन शेतकर्‍यांना समृधीचा मार्ग दाखवला अस्सता ! पण ते करण्या ऐवजी नुसत्या रडक्या कविता लिहुन फक्त राजकारणची शेती जोमाने चालेल , दुसरी कोणतीही नाही ! हे सोशॅलिस्ट रुदाली लोकं शेतकर्यांना कायमच बुडवत रहाणार ! त्या श्री. ज्ञानेश्वर बोडकेंकडुन काहीतरी शिका राव .

In reply to by प्रसाद गोडबोले

गंगाधर मुटे Mon, 11/23/2020 - 15:54
देवाने जेवढी अक्कल तुम्हाला दिली आहे... तितकीच अक्कल मलाही दिलेली आहे... असे तुम्ही जे समजताय ना.... तोच खरा केमिकल लोच्या आहे. असं नसतं हो! :D

बाप्पू Mon, 11/23/2020 - 15:34
रोजचे मढे त्याला कोण रडे. वीट आलाय त्याच त्याच कविता आणि शेतकऱ्यांच्या रडगाण्याचा. जमत नसेल तर शेती सोडून दया पण आता बास करा तुमचे रडगाणे. कालच एकाचा व्हाट्सअप स्टेट्स पाहिला. त्यात एक शेतकरी (दुःखी चेहऱ्याचा, काळवंडलेला, दीनदुबळा ) धमकी देत होता कि आम्ही पिकवतो म्हणून तुम्ही खाता जास्त माजू नका .. ज्यादिवशी शेतकरी संपावर जाईल तेव्हा तुम्हाला एका एका दाण्याची किंमत कळेल. पिझ्झा 300चा खाता, पिक्चर 200 रुपये देऊन बघता , सामोसा शंभर रु चा खाता आणि बाजारात बटाटे घ्यायला गेले 4-5 रुपयांसाठी शेतकऱ्याला नाडता.. आणि पुढे असे बरेच तत्वज्ञान होते. च्यायला.. किती भोकाड पसरणार ही लोक आणि कधीपर्यंत हेच चालणार देव जाणे...

In reply to by गंगाधर मुटे

बाप्पू Mon, 11/23/2020 - 19:11
चांगलेच आहे कि शेती सोडून जात आहेत. दुसरं काहीतरी काम करतील तर हाताला आणि डोक्याला नवीन काम भेटेल. नव्या आयडिया आणि रोजगार तयार होतील. उगाच तोट्याची शेती करून नंतर इतर उपकार केल्याचा आव आणण्यापेक्षा बरे आहे. आणि जग सोडून देण्याबद्दल म्हणत असताल तर - जगात आत्महत्या कोण करत नाही?? कामगार, रस्त्यावर फुटपाथ वर हातविक्री करणारे ते फिरत्या खुर्च्यांवर बसून आपल्या उद्योगाचा डोलारा सांभाळणारे उद्योजक सर्वच क्षेत्रातील लोक आत्महत्या करत असतात. पण शेतकर्यांसारखे पॅकेज आणि कोट्यवधींची मदत कोणाला मिळतेय का?? पाऊस पडल्यावर फक्त शेतकऱ्याचे नुकसान होते का?? एखाद्या नैसर्गिक आपत्ती मुळे फक्त शेतकरीच अडचणीत येतो का?? आणि सर्वात शेवटी - सर्व शेतकरी जे आत्महत्या करतात त्यामागे फक्त शेतीतील नुकसान हाच फॅक्टर असतो का?? असो गाढवासमोर गीता वाचून काय उपयोग.. इथून पुढे पण हे असच चालत राहणार. शेतकरी शेती करत राहणार.. तुम्ही आणि तुमच्यासारखे शेतकऱयांवर दर्दभऱ्या कविता करत राहणार..

In reply to by बाप्पू

गंगाधर मुटे Mon, 11/23/2020 - 20:00
शेतकरी शेती सोडून आहे हे चांगले आहे त्यामुळे शेतकऱ्यांचा फायदा होईल असे तुमचे मत मान्य आहे. आणि शेतकरी इहलोक सोडून गेले तर तुम्हाला ऐसपैस मोकळी जागा उपलब्ध होईल, तुमचे अनेक बाबतीतले स्पर्धकही कमी होतील ... हाही एक फायदाच आहे.

In reply to by बाप्पू

गंगाधर मुटे Mon, 11/23/2020 - 20:06
आणि तुम्ही मयतांच्या मढ्यावरचे लोणी खात खात बांडगुळ म्हणून ऐश करत राहणार. (तुमची लेखनशैली सिद्ध करून जात आहे कि तुम्ही बांडगुळ आहात. बांडगुळ नसलेला मनुष्य असा विचार करत नाही. जो काही तरी करतो त्याला समस्यांची जाण होते. त्याला स्वतःसमोरील समस्या कळतात आणि इतरांच्याही समस्या कळतात. )

In reply to by गंगाधर मुटे

बाप्पू Mon, 11/23/2020 - 21:54
वा आलात वैयक्तिक टीका टिप्पणीवर?? असो. तुमची लायकी दाखवलीत. थोडेसे स्पष्टीकरण देतो. बांडगुळ = झाडावर वाढलेली वनस्पती जी मूळ झाडाकडून मिळालेली पोषकतत्वे विना कष्ट शोषून घेते. आमच्याकडे ही एक शिवी म्हणून वापरली जाते जो व्यक्ती आयते किंवा फुकट चे खाऊन जगते. मी कोणत्याही शेतकऱयांकडून कोणतीही वस्तु फुकट घेतलेली नाही. बाजारभावाप्रमाणे रोख पैसे मोजतो. कांदे 5 रुपये किलो असले तरी घेतो आणि 100 रुपये असले तरी घेतो. माझ्या उत्पन्नावर नियमानुसार टॅक्स भरतो. माझा व्यवसाय बुडाला किंवा नैसर्गिक कारणामुळे काही नुकसान झाले तर सरकारकडून अनुदान/ भरपाई घेत नाही.. किंबहुना ती मिळत पण नाही. पण याउलट शेतकरी कित्येक गोष्टींवर अनुदान घेतो , टॅक्स भरत नाही, नुकसान झाले कि लगेच सरकारकडे पैसा मागतो. आणि इतके सगळे होऊन सुद्धा पुन्हा तोच तोच व्यवसाय, तीच स्ट्रॅटर्जी, तीच पिके, तीच बाजारपेठ try करून वेगळ्या रिझल्ट ची अपेक्षा करतो. मग खरा बांडगुळ कोण?? तुम्हाला सहानुभूती मिळवण्याची सवय झालीये. एखाद्याने थोडीशी विरोधी किंवा प्रॅक्टिकल वाटणारी भूमिका घेतली कि लगेच आपली गँग करून त्याच्यावर तुटून पडायचे.. आपली नुसेन्स व्हॅल्यू दाखवून द्यायची.

वामन देशमुख Mon, 11/23/2020 - 17:22
दोन प्रश्न, सिरिअसली विचारतोय - १. शुभेच्छा कोण कुणाला दिल्या, कोणत्या संदर्भात आणि त्याचा कवितेच्या अपेक्षित अर्थाशी काय संबंध आहे? २. कवितेच्या मजकुराच्या खाली दोन बातम्यांची कात्रणे आहेत, त्यांचा कवितेशी काय संबंध आहे?

In reply to by वामन देशमुख

गंगाधर मुटे Mon, 11/23/2020 - 18:03
प्रतिसादाबद्दल धन्यवाद. पण कवीने आपल्या कवितेचे समीक्षण करू नये किंवा त्याचा उलगडाही करू नये. असे माझे मत आहे. ती कविता आहे. त्यामुळे वाचकांना जसा अर्थ लागेल तसा त्यांनी घेणे अपेक्षित आहे. (कुणी कविता सोडून कवीच्या अंगावर आला तरच मी त्याला शिंगावर घेत असतो.)

गंगाधर मुटे Mon, 11/23/2020 - 18:03
प्रतिसादाबद्दल धन्यवाद. पण कवीने आपल्या कवितेचे समीक्षण करू नये किंवा त्याचा उलगडाही करू नये. असे माझे मत आहे. ती कविता आहे. त्यामुळे वाचकांना जसा अर्थ लागेल तसा त्यांनी घेणे अपेक्षित आहे. (कुणी कविता सोडून कवीच्या अंगावर आला तरच मी त्याला शिंगावर घेत असतो.)

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

गंगाधर मुटे Mon, 11/23/2020 - 20:11
मी साहित्य विषयक विशेषतः कविता लेखन केले तर मायबोली आणि मिसळपाववर ती रचना नक्कीच न चुकता घेऊन येत असतो. आज मी जे काही असेल ती मायबोली आणि मिसळपावचीच देण आहे. रामराम रामराम

आंबट चिंच Mon, 11/23/2020 - 20:33
पहिली गोष्टा भारत अजुनही शेती प्रधान देश आहे त्यामुळे तुम्ही सगळेजण जी तुलना शेतकरी आणि दुसरे उद्योग करणारे लोक यांचे प्रमाण बघायला हवे. त्यामुळे दुसर्या कोणत्याही क्षेत्रातल्या लोकांनी आत्माहत्या केली तरी प्रमाण नगण्य आहे. दुसरी गोष्ट सगळ्याच शेतकर्यांनी शेती सोडुन देवुन दुसरे काही करायला आधी त्यांना ते काम यायला तर हवे? उतारवयाच्या कोणत्या शेतकर्याला कोणी दुसरा माणुस /उद्योगपती नोकरी देवु शकेल? तुमची कं जर स्वतः बंद पडली तर तुम्ही लगेचच दुसरा जॉब शोधु शकता पण म्हणुन तुम्ही दुसर्या क्षेत्रात नाही ना जावु शकत तर आहे त्याच क्षेत्रात नोकरी करायला बघणार कारण तुम्ही त्या त्या क्षेत्रातले अनुभवी लोक आहात बरोबर? म्हणजे एखादा शिक्षक लगेच बँकेत नोकरी नाही करु शकत तो घरी शिकवणी घेईल, एखादा सुतार रंगारी आपापले क्षेत्र सोडुन दुसरे काही करु शकणार नाही त्याला संधी साठी थोडे थांबावे लागेल. पणा शेती हा व्यवसाय अनेक घटाकांवर अवलंबुन आहे त्यातले एक कारण म्हणजे निसर्गाचा लहरी पणा त्याला कोणी काही करु शकत नाही. चांगली अधुनिक अवजारे, खुप मजुर असुन सुध्दा शेतात राबल्यावर जर वेळेत पाऊस नाही पडला किंवा खुप झाला तरीही नुकसान होतेच आहे. यावर सरकार काय कोणीच काही करु शकत नाही. फक्त आर्थिक मदत दिली तर ती दुसर्या दिवशी संपुनही जाईल. यावर दोन्ही बाजुने विचार करुन योग्य तो मार्ग काढायला हवा पण कोणी मंत्री कधीच लक्ष देत नाही. इवलाशा इराण मध्ये ४ वर्शातुन एकदा पाऊस पडतो पण असे काही पाणी नियोजन केले गेलेकी आता त्या वाळवंटातही गुलाब आणि ट्युलिप फुलांची शेती होते. तेव्हा नियोजन महत्वाचे. आणि जात जात तुम्ही म्हणता तसे जर एक वर्ष सराव करुन असे सगळे शेतकरी खरेच दुसरे काही करु लागले तर जो अन्नाचा तुटवडा भविष्यात जाणवणार आहे त्याचे काय मग खरोखरच टोमॅटो २०० रुपये किलोने आपण घ्यायला (आयात) तयार आहोत का?

In reply to by आंबट चिंच

बाप्पू Mon, 11/23/2020 - 21:41
भारत हा कृषी प्रधान देश आहे.. लहानपानापासून हे गौरवास्पद वाक्य वाटायचे. पण बारीक विचार केला तेव्हा ही गौरवाची किंवा अभिमानाची बाब नसुन चिंतेची बाब आहे हे लक्षात आले. शेती करणारा शेतकरी नेहमीच दीनदुबळा, हतबल, आणि तरीही इतरांवर उपकार करणारा असा प्रोपेगेंडा चालवून काय मिळते तुम्हा लोकांना? आणि शेती हा व्यवसाय खूप वर्षांपासून चालत आलेला आहे. 5-10 वर्षात डेव्हलोप झालेला नाहीये. त्यामुळे त्यात असणारे फायदे तोटे (रिस्क ) ही सर्व शेतकऱ्यांना ( ते कितीही अडाणी असले तरी ) माहिती आहे तरीही ते आपल्या पुढच्या पिढीला तोच व्यवसाय त्याच पद्धतीने ( व्यवसाय हाच शब्द बरोबर आहे ) करायला लावत असतील तर नक्कीच कुठेतरी चुकतेय. टोमॅटो 200 रुपये किलो होतील आणि ते इतरांना परवडणार नाहीत त्यामुळे मी खड्ड्यात गेलो तरी चालेल पण शेतीच करणार असा दैवी विचार करून कोणताही शेतकरी शेती करत नाही. म्हणून शेती व्यवसायाला उपकाराची भावना जोडून तुम्ही त्यांना पंगू बनवताय. त्यांच्या मूळ प्रश्नाकडे दुर्लक्ष होतेय. तेच तेच प्रतिसाद टंकून आता कंटाळा यायला लागला आहे. आणि प्रत्युत्तरात तीच तीच रडारड वाचून पण वीट आलाय. मिपावर कृषिजगत कि असेच काहीतरी एक विभाग आहे /होता तिथे महिनोंमहिने कोणताही इनोव्हेटिव्ह किंवा प्रोडक्टीव्ह लेख येत नाही पण दर 15 दिवसाला रडगाणेरूपी कविता किंवा तश्याच लेखाची जिलेबी कोण ना कोणतरी पाडून जाते. सगळ्या प्रॉब्लेम चे मूळ इथे आहे...

कारण वरील कविता सर्वसामान्य लोकांची मस्करी करण्यासाठीच लिहिली आहे, मग आपण का नाही करायची? कांदा १०० रुपये किलो..... https://www.esakal.com/mumbai/onion-100-rs-kg-apmc-navi-mumbai-361602 दुध ५८ रुपये लिटर तुरडाळ रु १०३ प्रति किलो https://www.jiomart.com/p/groceries/tur-arhar-dal-2-kg/491417390?source=shoppingads&city=Pune&pin=411006&gclid=CjwKCAiA2O39BRBjEiwApB2IkoBnNe4B-o30kLojc4hlyiyxgAgBhVzA64QLZFoJVyiU12FKGOr7dRoC7DoQAvD_BwE सोयाबीन रु ५८ प्रति किलो https://www.jiomart.com/p/groceries/pick-n-cook-soyabeans-500-g/490356539 अजूनही काही देता येतील. महागाईने आणि लॉकडाउन ने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडलेले असताना अशी कविता लिहिणे म्हणजे गोरगरीब जनतेच्या भळभळत्या जखमांवर मीठ लावण्याचा प्रकार वाटला. पैजारबुवा,

अखंड रडरड सप्ताहाच्या भाविकांना हार्दिक शुभेच्छा ! फक्त रडत रहा =)))) इतकेवर्षे तुमच्या रडक्या कविता वाचतोय, येवढ्या वेळेत एखाद्याने कृषी उत्पन्ना आधारित काहीतरी व्यवसाय , जसे की बांबु प्रोसेसिंग, बांबु-कापुस धागा उद्योग, मधुमक्षिका पालन, रेशीम उद्योग, फलवाटिका, प्रोसेसिंग आणि एक्स्पोर्ट उद्योग , सेंद्रिय भाजीपला उद्योग असले काहीतरी सुरु करुन शेतकर्‍यांना समृधीचा मार्ग दाखवला अस्सता ! पण ते करण्या ऐवजी नुसत्या रडक्या कविता लिहुन फक्त राजकारणची शेती जोमाने चालेल , दुसरी कोणतीही नाही ! हे सोशॅलिस्ट रुदाली लोकं शेतकर्यांना कायमच बुडवत रहाणार ! त्या श्री. ज्ञानेश्वर बोडकेंकडुन काहीतरी शिका राव .

In reply to by प्रसाद गोडबोले

गंगाधर मुटे Mon, 11/23/2020 - 15:54
देवाने जेवढी अक्कल तुम्हाला दिली आहे... तितकीच अक्कल मलाही दिलेली आहे... असे तुम्ही जे समजताय ना.... तोच खरा केमिकल लोच्या आहे. असं नसतं हो! :D

बाप्पू Mon, 11/23/2020 - 15:34
रोजचे मढे त्याला कोण रडे. वीट आलाय त्याच त्याच कविता आणि शेतकऱ्यांच्या रडगाण्याचा. जमत नसेल तर शेती सोडून दया पण आता बास करा तुमचे रडगाणे. कालच एकाचा व्हाट्सअप स्टेट्स पाहिला. त्यात एक शेतकरी (दुःखी चेहऱ्याचा, काळवंडलेला, दीनदुबळा ) धमकी देत होता कि आम्ही पिकवतो म्हणून तुम्ही खाता जास्त माजू नका .. ज्यादिवशी शेतकरी संपावर जाईल तेव्हा तुम्हाला एका एका दाण्याची किंमत कळेल. पिझ्झा 300चा खाता, पिक्चर 200 रुपये देऊन बघता , सामोसा शंभर रु चा खाता आणि बाजारात बटाटे घ्यायला गेले 4-5 रुपयांसाठी शेतकऱ्याला नाडता.. आणि पुढे असे बरेच तत्वज्ञान होते. च्यायला.. किती भोकाड पसरणार ही लोक आणि कधीपर्यंत हेच चालणार देव जाणे...

In reply to by गंगाधर मुटे

बाप्पू Mon, 11/23/2020 - 19:11
चांगलेच आहे कि शेती सोडून जात आहेत. दुसरं काहीतरी काम करतील तर हाताला आणि डोक्याला नवीन काम भेटेल. नव्या आयडिया आणि रोजगार तयार होतील. उगाच तोट्याची शेती करून नंतर इतर उपकार केल्याचा आव आणण्यापेक्षा बरे आहे. आणि जग सोडून देण्याबद्दल म्हणत असताल तर - जगात आत्महत्या कोण करत नाही?? कामगार, रस्त्यावर फुटपाथ वर हातविक्री करणारे ते फिरत्या खुर्च्यांवर बसून आपल्या उद्योगाचा डोलारा सांभाळणारे उद्योजक सर्वच क्षेत्रातील लोक आत्महत्या करत असतात. पण शेतकर्यांसारखे पॅकेज आणि कोट्यवधींची मदत कोणाला मिळतेय का?? पाऊस पडल्यावर फक्त शेतकऱ्याचे नुकसान होते का?? एखाद्या नैसर्गिक आपत्ती मुळे फक्त शेतकरीच अडचणीत येतो का?? आणि सर्वात शेवटी - सर्व शेतकरी जे आत्महत्या करतात त्यामागे फक्त शेतीतील नुकसान हाच फॅक्टर असतो का?? असो गाढवासमोर गीता वाचून काय उपयोग.. इथून पुढे पण हे असच चालत राहणार. शेतकरी शेती करत राहणार.. तुम्ही आणि तुमच्यासारखे शेतकऱयांवर दर्दभऱ्या कविता करत राहणार..

In reply to by बाप्पू

गंगाधर मुटे Mon, 11/23/2020 - 20:00
शेतकरी शेती सोडून आहे हे चांगले आहे त्यामुळे शेतकऱ्यांचा फायदा होईल असे तुमचे मत मान्य आहे. आणि शेतकरी इहलोक सोडून गेले तर तुम्हाला ऐसपैस मोकळी जागा उपलब्ध होईल, तुमचे अनेक बाबतीतले स्पर्धकही कमी होतील ... हाही एक फायदाच आहे.

In reply to by बाप्पू

गंगाधर मुटे Mon, 11/23/2020 - 20:06
आणि तुम्ही मयतांच्या मढ्यावरचे लोणी खात खात बांडगुळ म्हणून ऐश करत राहणार. (तुमची लेखनशैली सिद्ध करून जात आहे कि तुम्ही बांडगुळ आहात. बांडगुळ नसलेला मनुष्य असा विचार करत नाही. जो काही तरी करतो त्याला समस्यांची जाण होते. त्याला स्वतःसमोरील समस्या कळतात आणि इतरांच्याही समस्या कळतात. )

In reply to by गंगाधर मुटे

बाप्पू Mon, 11/23/2020 - 21:54
वा आलात वैयक्तिक टीका टिप्पणीवर?? असो. तुमची लायकी दाखवलीत. थोडेसे स्पष्टीकरण देतो. बांडगुळ = झाडावर वाढलेली वनस्पती जी मूळ झाडाकडून मिळालेली पोषकतत्वे विना कष्ट शोषून घेते. आमच्याकडे ही एक शिवी म्हणून वापरली जाते जो व्यक्ती आयते किंवा फुकट चे खाऊन जगते. मी कोणत्याही शेतकऱयांकडून कोणतीही वस्तु फुकट घेतलेली नाही. बाजारभावाप्रमाणे रोख पैसे मोजतो. कांदे 5 रुपये किलो असले तरी घेतो आणि 100 रुपये असले तरी घेतो. माझ्या उत्पन्नावर नियमानुसार टॅक्स भरतो. माझा व्यवसाय बुडाला किंवा नैसर्गिक कारणामुळे काही नुकसान झाले तर सरकारकडून अनुदान/ भरपाई घेत नाही.. किंबहुना ती मिळत पण नाही. पण याउलट शेतकरी कित्येक गोष्टींवर अनुदान घेतो , टॅक्स भरत नाही, नुकसान झाले कि लगेच सरकारकडे पैसा मागतो. आणि इतके सगळे होऊन सुद्धा पुन्हा तोच तोच व्यवसाय, तीच स्ट्रॅटर्जी, तीच पिके, तीच बाजारपेठ try करून वेगळ्या रिझल्ट ची अपेक्षा करतो. मग खरा बांडगुळ कोण?? तुम्हाला सहानुभूती मिळवण्याची सवय झालीये. एखाद्याने थोडीशी विरोधी किंवा प्रॅक्टिकल वाटणारी भूमिका घेतली कि लगेच आपली गँग करून त्याच्यावर तुटून पडायचे.. आपली नुसेन्स व्हॅल्यू दाखवून द्यायची.

वामन देशमुख Mon, 11/23/2020 - 17:22
दोन प्रश्न, सिरिअसली विचारतोय - १. शुभेच्छा कोण कुणाला दिल्या, कोणत्या संदर्भात आणि त्याचा कवितेच्या अपेक्षित अर्थाशी काय संबंध आहे? २. कवितेच्या मजकुराच्या खाली दोन बातम्यांची कात्रणे आहेत, त्यांचा कवितेशी काय संबंध आहे?

In reply to by वामन देशमुख

गंगाधर मुटे Mon, 11/23/2020 - 18:03
प्रतिसादाबद्दल धन्यवाद. पण कवीने आपल्या कवितेचे समीक्षण करू नये किंवा त्याचा उलगडाही करू नये. असे माझे मत आहे. ती कविता आहे. त्यामुळे वाचकांना जसा अर्थ लागेल तसा त्यांनी घेणे अपेक्षित आहे. (कुणी कविता सोडून कवीच्या अंगावर आला तरच मी त्याला शिंगावर घेत असतो.)

गंगाधर मुटे Mon, 11/23/2020 - 18:03
प्रतिसादाबद्दल धन्यवाद. पण कवीने आपल्या कवितेचे समीक्षण करू नये किंवा त्याचा उलगडाही करू नये. असे माझे मत आहे. ती कविता आहे. त्यामुळे वाचकांना जसा अर्थ लागेल तसा त्यांनी घेणे अपेक्षित आहे. (कुणी कविता सोडून कवीच्या अंगावर आला तरच मी त्याला शिंगावर घेत असतो.)

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

गंगाधर मुटे Mon, 11/23/2020 - 20:11
मी साहित्य विषयक विशेषतः कविता लेखन केले तर मायबोली आणि मिसळपाववर ती रचना नक्कीच न चुकता घेऊन येत असतो. आज मी जे काही असेल ती मायबोली आणि मिसळपावचीच देण आहे. रामराम रामराम

आंबट चिंच Mon, 11/23/2020 - 20:33
पहिली गोष्टा भारत अजुनही शेती प्रधान देश आहे त्यामुळे तुम्ही सगळेजण जी तुलना शेतकरी आणि दुसरे उद्योग करणारे लोक यांचे प्रमाण बघायला हवे. त्यामुळे दुसर्या कोणत्याही क्षेत्रातल्या लोकांनी आत्माहत्या केली तरी प्रमाण नगण्य आहे. दुसरी गोष्ट सगळ्याच शेतकर्यांनी शेती सोडुन देवुन दुसरे काही करायला आधी त्यांना ते काम यायला तर हवे? उतारवयाच्या कोणत्या शेतकर्याला कोणी दुसरा माणुस /उद्योगपती नोकरी देवु शकेल? तुमची कं जर स्वतः बंद पडली तर तुम्ही लगेचच दुसरा जॉब शोधु शकता पण म्हणुन तुम्ही दुसर्या क्षेत्रात नाही ना जावु शकत तर आहे त्याच क्षेत्रात नोकरी करायला बघणार कारण तुम्ही त्या त्या क्षेत्रातले अनुभवी लोक आहात बरोबर? म्हणजे एखादा शिक्षक लगेच बँकेत नोकरी नाही करु शकत तो घरी शिकवणी घेईल, एखादा सुतार रंगारी आपापले क्षेत्र सोडुन दुसरे काही करु शकणार नाही त्याला संधी साठी थोडे थांबावे लागेल. पणा शेती हा व्यवसाय अनेक घटाकांवर अवलंबुन आहे त्यातले एक कारण म्हणजे निसर्गाचा लहरी पणा त्याला कोणी काही करु शकत नाही. चांगली अधुनिक अवजारे, खुप मजुर असुन सुध्दा शेतात राबल्यावर जर वेळेत पाऊस नाही पडला किंवा खुप झाला तरीही नुकसान होतेच आहे. यावर सरकार काय कोणीच काही करु शकत नाही. फक्त आर्थिक मदत दिली तर ती दुसर्या दिवशी संपुनही जाईल. यावर दोन्ही बाजुने विचार करुन योग्य तो मार्ग काढायला हवा पण कोणी मंत्री कधीच लक्ष देत नाही. इवलाशा इराण मध्ये ४ वर्शातुन एकदा पाऊस पडतो पण असे काही पाणी नियोजन केले गेलेकी आता त्या वाळवंटातही गुलाब आणि ट्युलिप फुलांची शेती होते. तेव्हा नियोजन महत्वाचे. आणि जात जात तुम्ही म्हणता तसे जर एक वर्ष सराव करुन असे सगळे शेतकरी खरेच दुसरे काही करु लागले तर जो अन्नाचा तुटवडा भविष्यात जाणवणार आहे त्याचे काय मग खरोखरच टोमॅटो २०० रुपये किलोने आपण घ्यायला (आयात) तयार आहोत का?

In reply to by आंबट चिंच

बाप्पू Mon, 11/23/2020 - 21:41
भारत हा कृषी प्रधान देश आहे.. लहानपानापासून हे गौरवास्पद वाक्य वाटायचे. पण बारीक विचार केला तेव्हा ही गौरवाची किंवा अभिमानाची बाब नसुन चिंतेची बाब आहे हे लक्षात आले. शेती करणारा शेतकरी नेहमीच दीनदुबळा, हतबल, आणि तरीही इतरांवर उपकार करणारा असा प्रोपेगेंडा चालवून काय मिळते तुम्हा लोकांना? आणि शेती हा व्यवसाय खूप वर्षांपासून चालत आलेला आहे. 5-10 वर्षात डेव्हलोप झालेला नाहीये. त्यामुळे त्यात असणारे फायदे तोटे (रिस्क ) ही सर्व शेतकऱ्यांना ( ते कितीही अडाणी असले तरी ) माहिती आहे तरीही ते आपल्या पुढच्या पिढीला तोच व्यवसाय त्याच पद्धतीने ( व्यवसाय हाच शब्द बरोबर आहे ) करायला लावत असतील तर नक्कीच कुठेतरी चुकतेय. टोमॅटो 200 रुपये किलो होतील आणि ते इतरांना परवडणार नाहीत त्यामुळे मी खड्ड्यात गेलो तरी चालेल पण शेतीच करणार असा दैवी विचार करून कोणताही शेतकरी शेती करत नाही. म्हणून शेती व्यवसायाला उपकाराची भावना जोडून तुम्ही त्यांना पंगू बनवताय. त्यांच्या मूळ प्रश्नाकडे दुर्लक्ष होतेय. तेच तेच प्रतिसाद टंकून आता कंटाळा यायला लागला आहे. आणि प्रत्युत्तरात तीच तीच रडारड वाचून पण वीट आलाय. मिपावर कृषिजगत कि असेच काहीतरी एक विभाग आहे /होता तिथे महिनोंमहिने कोणताही इनोव्हेटिव्ह किंवा प्रोडक्टीव्ह लेख येत नाही पण दर 15 दिवसाला रडगाणेरूपी कविता किंवा तश्याच लेखाची जिलेबी कोण ना कोणतरी पाडून जाते. सगळ्या प्रॉब्लेम चे मूळ इथे आहे...
लेखनविषय:
शुभेच्छा देतो की मस्करी करतो?