मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

The Matrix: एका अद्भुत Sci-Fi प्रवासाची कथा

कपिलमुनी ·

कपिलमुनी गुरुवार, 03/13/2025 - 18:09
लेखामध्ये असलेल्या इंग्रजी लिपीबद्दल क्षमस्व बरीच नाव, तंत्रज्ञन , इनंग्रजी चित्रपट असले कारणाने इंग्रजी वापर जास्त आहे .

कंजूस गुरुवार, 03/13/2025 - 19:40
असे चित्रपट किंवा सायफाय प्रकारातले अजून पाहिले नाहीत. अर्थात चित्रपटासाठी कथावस्तू ही काल्पनिक आणि मनोरंजन म्हणून असते. त्या कोनातूनच पाहिले पाहिजेत. "What is real? How do you define real?” हे जर ग्रीक तत्त्वज्ञानातून पाहिले तर "real" या शब्दावरच प्रश्नचिन्ह पडते. "Absolute" म्हणायचे असेल का? जगात एकमेव, इतरांपासून वेगळे स्वतंत्र काहीच नाही. एकमेकांच्या तुलनेत हेच बरोबर. ग्रीक तत्त्ववेत्त्यांनी समस्येचं स्पष्टीकरण /सत्यता / proof देतांना इतक्या गोष्टी विचारात घेतल्या आहेत की " या या गृहितकांना धरून हे विधान सत्य आहे असे काटेकोर बांधीव उत्तर देतात. म्हणजे अमुक नियम, अमुक स्थितीमध्ये अमुक हे खरे / सत्य /real म्हणून शकतो. स्थिती, वेळ आणि गती या तीन गोष्टी प्रत्येकांसाठी वेगळ्या आणि एकमेव असतात. हे विसरून चालणार नाही. Matrix आणि set theory या गणितातील कल्पना वरवर साध्यासुध्या वाटल्या तरी गहन आहेत. सिनेमाच्या कथेतून प्रेक्षकांना विचार करायला लावणे आणि मनोरंजन करणे ( भारावून टाकणे) हे साध्य होते. समीक्षा आवडली.

विजुभाऊ Fri, 03/14/2025 - 10:44
मॅट्रिक्स हा सिनेमा पाहिल्यावर डोके बधीर झालेले होते. एकूणातच भन्नाट आहे वेगवान स्टंट्स , ३६० डिग्री शॉट्स , तसेच बुलेट स्लो मोशन वगैरे त्या काळी अद्भूत होते. वेगळ्या धाटणीची तरीही खिळवून ठेवणारी कथा. हा त्याचा मुख्य आधार स्तंभ. आजही तितकाच भावतो

आंद्रे वडापाव Fri, 03/14/2025 - 12:35
खुप कमी कलाकृती किंवा चित्रपट ... आपण जीवनात 'अनुभवतो' .. हा चित्रपट पाहून .. असं वाटलं .. आपण फुल्ल झोपेत असताना कोणी , थंड पाणी तोंडावर मारलं आणि धबा धबा दोन्ही मुस्काडात लावल्यावर जो शॉक बसेल नं ... तसं काहीसं झालेलं ...

झकासराव Sat, 03/15/2025 - 16:02
जबरदस्त चित्रपट आहे फक्त action मुळे नव्हे तर सखोल अर्थ असलेली कथा फार आवडता चित्रपट बऱ्याच वेळा पाहिलाय दृष्टीकोन घडवणारा चित्रपट Agent च्या तोंडचे मनुष्याचे वाभाडे काढणारे संवाद देखील तितकेच परिणामकारक होते

In reply to by झकासराव

टीपीके Sat, 03/15/2025 - 19:52
जबरदस्त चित्रपट आहे
+१
फक्त action मुळे नव्हे तर सखोल अर्थ असलेली कथा
+१
फार आवडता चित्रपट बऱ्याच वेळा पाहिलाय
+१
दृष्टीकोन घडवणारा चित्रपट Agent च्या तोंडचे मनुष्याचे वाभाडे काढणारे संवाद देखील तितकेच परिणामकारक होते
+१

कपिलमुनी Sat, 03/15/2025 - 17:43
सदर लेख एआय ने लिहिला आहे. Chatgpt या ए आय ला काही इनपुट देऊन लेख लिहून घेतला आहे

टेक्निकल क्वेरी
बौद्ध विचारधारा
मॅट्रिक्स चित्रपटात आहे ही बौद्ध विचारधारा आहे का ? पण बौद्ध मतात जग हे निखालस सत्य आहे असे मानतात ना? ब्रह्म सत्य जगन मिथ्या अर्थात दिसणारे भासणारे जग हे मोठ्या असून आपले मूळ स्वरूप जे की ह्याच्या पारे असे असलेले ब्रह्म आहे हा विचार बौद्ध मतातही येतो का ?

In reply to by प्रसाद गोडबोले

Bhakti Wed, 04/02/2025 - 19:12
मॅट्रिक्सच्या शेवटी
ॐ असतो मा सद्गमय । तमसो मा ज्योतिर्गमय । मृत्योर्मा अमृतं गमय ।
हे गाणं आहे ब्वॉ https://youtu.be/A67OhOUoUsc?si=qjAHPlPY4nNyyuuN बौद्ध मतामध्ये ब्रम्ह नाही पण अद्वैताचा स्वीकार आहे, द्वैत नाकारले आहे.कर्माचा पुरस्कार आहे.

In reply to by प्रसाद गोडबोले

सोत्रि गुरुवार, 04/03/2025 - 14:04
पण बौद्ध मतात जग हे निखालस सत्य आहे असे मानतात ना?
ह्याचा काही रेफरन्स (विकीपीडीया व्यतिरीक्त) आहे का? - (अभ्यासू) सोकाजी

In reply to by सोत्रि

प्रश्नाला उत्तर देण्याऐवजी प्रतिप्रश्न विचारणे हा एकप्रकारे "आम्हाला काही माहीत नाही पण तुम्ही म्हणाल ते आम्ही खोडून काढू" ह्या आशयाचा, सप्तभंगीनय अर्थात जैन तत्त्वज्ञानाचा किंवा तदृश आविष्कार मानता येईल का ?

In reply to by सोत्रि

आणि म्हणूनच आपल्याला इतिहासात जैन आणि वैदिक असा शास्त्रार्थ , खंडन मंडण झालेले दिसत नाही. जैन धर्म हा बौद्ध धर्माचा इतकाच प्राचीन असून त्यांच्याशी कोठेही वाद विवाद झाल्याचे दिसत नाही ह्याचे कारण हेच आहे की त्यांना फक्त दुसऱ्याचे मत खोदून काढण्यात यश आहे, स्वतःचे मत प्रस्थापित करण्यात नाही. मग काहीही बोलण्यात अर्थच रहात नाही. पण ह्या सप्तभंगीनय मुळे बोलणे खुंटले तरी त्या नंतर आलेले मौन हे संदेहात्मक आहे, निश्चयात्मक नव्हे. उदाहरणार्थ मी जेवढा केवढा वेदांताचा अभ्यास केला आहे त्यानुसार ब्रह्म सत्य आहे , जग मिथ्या आहे, मिथ्या म्हणजे खोटे असा अर्थाने नव्हे तर भासात्मक असे. आपला भास आहे , माया आहे. ज्ञानेश्वर माऊली त्याला चिदविलास म्हणतात अर्थात पाण्यावर उठलेले तरंग हे पाणीच आहेत तसे जग हे ब्रह्मावर उमटलेले तरंग असल्याने ब्रह्मच आहेत ! तस्मात् किमान वेदांती दृष्टिकोनातून ब्रह्म सत्य जग मिथ्या हे मला माहीत आहे, ज्ञात आहे, प्रचीत आहे. आता बौद्ध धर्म सर्वं शून्य शून्यं म्हणतो तेव्हा त्या सर्वं मध्ये जग देखील येते का असा मला पडलेला प्रश्न आहे. जर बौद्ध जगात देखील शून्य आहेत असे म्हणत असतील तर हे आकलन होणारा मी हा जगाचा भाग असल्याने शून्य नाहीये हे खात्रीलायक असल्याने इथेच बौद्ध मताचे खंडन होईल ! अर्थात माझे अध्ययन हे सनातन वैदिक परंपरेत झाले असल्याने बौद्ध तत्वज्ञानाचा माझा अभ्यास विकिपीडिया आणि काही मोजके खरे बुद्धिस्त लोकं ह्याकडून ऐकलेल्या गोष्टींवर आधारित आहे. जगाचे सत्यत्व ह्या बाबत महायान काय म्हणतात , हीनयान काय म्हणतात , वज्रयान काय म्हणतात आणि विशेषतः नागार्जुन काय म्हणतो हे समजून घ्यायला मनापासून आवडेल. (पण त्यासाठी विशेष कष्ट घ्यायची मला काडीमात्र इच्छा नाही, हा प्रकार कुमारील भट्ट ह्यांनी फार पूर्वीच केला आहे, मला त्यात रस नाही.) म्हणून मी प्रथम प्रश्न विचारला होता. अर्थात ह्यावर सप्तभंगीनय चा आश्रय घेऊन प्रश्नाला प्रतिप्रश्न येत असल्यास हे जैन तत्वद्न्यान झाले. मग काहीही बोलणे खुंटले. तात्पर्य काय की मॅट्रिक्स चित्रपटात "तुम्ही अनुभवत आहात हे सत्य नसून , जग मिथ्या मायाजाल आहे." हे तत्वद्न्यान बौद्ध नसून वैदिक तत्वज्ञानाच्या जवळ जाणारे आहे.

In reply to by प्रसाद गोडबोले

सोत्रि Sun, 04/13/2025 - 12:46
तत्वज्ञान ३ प्रकारचे असते:
  1. ऐकीव (परोक्ष)
  2. चिंतनमय (परोक्ष)
  3. प्रत्यक्ष, अनुभूतीमय (अपरोक्ष)
परोक्ष ज्ञान हे स्वतःची अनुभुती नसते, त्यामुळे त्याचं खंडन-मंडण करण्याची तार्किक गरज पडत असावी, भूतकाळात आणि आताही. अपरोक्ष ज्ञान ही इंद्रियतीत अनुभूती असते जी शब्दात पकडणे शक्य नसते. जो अनुभूतीच्या त्या मितीला स्पर्श करून येतो तो सगळ्या खंडन-मंडणच्या पलीकडे गेलेला असतो कारण हे सगळं मिथ्या आहे हे त्याने अनुभवलेलं असतं. आणि काही प्रस्थापित करण्याचीही गरज नसते कारण ते ज्ञान आहेच, प्रस्थापित केलं काय आणि नाही काय, हे त्याला कळलेलं असतं.
बौद्ध तत्वज्ञानाचा माझा अभ्यास विकिपीडिया आणि काही मोजके खरे बुद्धिस्त लोकं ह्याकडून ऐकलेल्या गोष्टींवर आधारित आहे. जगाचे सत्यत्व ह्या बाबत महायान काय म्हणतात , हीनयान काय म्हणतात , वज्रयान काय म्हणतात आणि विशेषतः नागार्जुन काय म्हणतो हे समजून घ्यायला मनापासून आवडेल. पण त्यासाठी विशेष कष्ट घ्यायची मला काडीमात्र इच्छा नाही,
अशा विरोधाभासी आणि एकंदरीतच ऐकीव माहितीवर आधारित बौद्ध तत्वज्ञानावर जी निष्कर्षात्मक मतं तुमच्या लेखात आणि प्रतिसादात येतात त्याने कुतूहल वाटत आणि ती निष्कर्षात्मक मतं कशी काय बनली हे जाणून घ्यायची इच्छा होते. प्रतिप्रश्न करण्याचे कारण कोणाच्याही मताचे खंडन-मंडण हा खचितच नसतो. कारण भारतीय तत्वज्ञाचा डोलारा ह्या प्रश्नमंजुषेवर आधारलेला आहे. प्रतिप्रश्न फक्त निष्कर्षात्मक मतं कशी काय बनली हे जाणून घेण्यासाठी असतो जेणेकरून चुकीची मतं, धारणा पसरू नये. वानगीदाखल:
आता बौद्ध धर्म सर्वं शून्य शून्यं म्हणतो
मुळात बौद्ध धर्म असं काही नाहीयेय, त्यामुळे नेमकं कोण शून्य शून्यं म्हणतोय? ते शून्य म्हणजे नेमकं काय? हे प्रश्न पडतात आणि तेच विचारले जातात. - (अभ्यासू) सोकाजी

In reply to by सोत्रि

प्रश्न : बौद्ध तत्त्वज्ञानानुसार जग हे सत्य आहे का ? पर्याय: 1. होय. संदर्भ : ग्रंथ , अध्याय, पान क्रमांक 2. नाही. संदर्भ : ग्रंथ , अध्याय, पान क्रमांक 3. होय आणि नाही. दोन्ही अर्थाचे संदर्भ ग्रंथ , अध्याय, पान क्रमांक 4. मला माहित नाही.

In reply to by प्रसाद गोडबोले

सोत्रि Sun, 04/20/2025 - 18:24
बुद्धाच्या शिकवणूकीत, "जग हे सत्य आहे का" (किंवा नाही) हे असं डायरेक्ट नाहीयेय. त्याच्या पटिच्चसमुप्पाद सुत्त, अनिच्चा (Anicca) सुत्त आणि अनत्त लक्षण सुत्त (Anattalakkhaṇa Sutta) ह्या तीन महत्वाच्या आणि एकमेकांशी निगडीत असलेल्या महत्त्वाच्या सूत्रांपैकी अनिच्चा (Anicca) सुत्तांत सर्व अनित्य/नश्वर असल्याचे विषद केले आहे. अनिच्चा (Anicca) / अनित्यबोध – सर्व गोष्टी क्षणभंगुर आहेत. म्हणजे आपण ज्या गोष्टी “स्थिर सत्य” म्हणून धरतो (जसे की शरीर, वस्तू, नाती, इ. म्हणजे एकंदरीत जग), त्या प्रत्यक्षात क्षणाक्षणाला बदलत आहेत. जरी सर्व काही बदलत असलं तरी, ते अस्तित्वात आहे, फक्त ते “स्थायी” नाही, नश्वर आहे. संदर्भ: अनिच्च सुत्त (Anicca Sutta) — साम्युत्त निकाय, SN 22.45 - (साधक) सोकाजी

In reply to by प्रसाद गोडबोले

जग मिथ्या आहे. => मग जगातील विषयांच्या सयोगाने निर्माण होणारे दुःख ही मिथ्या ठरते. => दुःख असं काही नाहीच. => जगाचं मिथ्यत्व लक्षात आलं की तिथेच ब्रह्म सत्यं झालं. => तिथं दुःख संपलं. => जग , त्यातील विषय, त्यांच्या संयोगाने होणारे व्यवहार, त्याने सुख दुःख आदी मानणारा भोगणारा "अहं" हे सर्वच मिथ्या आहे . बस इतके हे समजून घेणे हा दुःख निर्मुलनाचा सर्वात सोप्पा मार्ग आहे . Neo

In reply to by प्रसाद गोडबोले

सोत्रि Mon, 04/21/2025 - 20:55
जग मिथ्या आहे.
न्यूटनच्या अभिजात भौतिकशास्त्राचे (जड जगत् ) नियम सब-ऑटोमिक जगतात (सूक्ष्म कण), क्वाँटम फिजिक्सला, लागू पडत नाहीत, तिथले नियम आणि वास्तव यांत प्रचंड भिन्नता असते. पण त्यामुळे जड जगत् , जे सूक्ष्म कणांनी बनले असते, ते मिथ्या होत नाही. न्यूटनच्या अभिजात भौतिकशास्त्रांच्या नियमानुसार तेही सुरळीत चालू असते.
बस इतके हे समजून घेणे हा दुःख निर्मुलनाचा सर्वात सोप्पा मार्ग आहे
हे समजून घेणे हा झांगडगुता आहे. समजून घ्यायचे म्हणजे नक्की काय? तर कोणीतरी हे असं म्हणालंय हे विचारांच्या पातळीवर मानायचे. मानायचे म्हणजे तशी श्रद्धा ठेवायची. ते इतकं सोप्पं असत तर सगळेच मुक्त झाले असते आणि ही चर्चा करायलाच कोणी नसतं. पण चर्चा तर होते आहे... अरे हो, पण जगन्मिथ्या असं म्हटलं गेलय, म्हणजे ते मानल पाहिजे, म्हणजे ही सगळी चर्चाही मिथ्याच झाली की :) असो,
जग मिथ्या आहे. => मग जगातील विषयांच्या सयोगाने निर्माण होणारे दुःख ही मिथ्या ठरते. => दुःख असं काही नाहीच. => जगाचं मिथ्यत्व लक्षात आलं की तिथेच ब्रह्म सत्यं झालं. => तिथं दुःख संपलं. => जग , त्यातील विषय, त्यांच्या संयोगाने होणारे व्यवहार, त्याने सुख दुःख आदी मानणारा भोगणारा "अहं" हे सर्वच मिथ्या आहे.
ह्यात जग मिथ्या आहे हे गृहीतक धरलंय त्यामुळे पुढचं सगळच मिथ्या होऊन जातंय. पण जन्म-मृत्यू चक्र, जगणं, आहेच. ते सत्य आहे. त्यामुळे जे काही सभोवताली घडतंय ते मिथ्या नाही त्याच्या मागे कार्यकारण भाव आहे (cause & effect) हे स्वानुभूतीच्या पातळीवर अनुभवलं की खालील भवचक्राचे ज्ञान होते: अविद्या -> कर्मसंस्कार -> जाणीव -> नामरूप -> इंद्रिय -> इंद्रियविषय स्पर्ष -> तृष्णा -> आसक्ती -> भवसंस्कार -> जन्म --> मृत्यू (दु:ख) ह्या चक्रातल्या तृष्णा आणि आसक्ती ह्या कड्या तोडल्या की भवचक्र (जन्म-मृत्यू चे चक्र) तोडता येते. ह्या कड्या तोडत सर्व कर्मसंस्कारांचे निर्मूलन म्हणजे मुक्ती, म्हणजेच निर्वाण (गीता ६.१५ श्लोकातंल निर्वाण) - (नश्वर) सोकाजी

In reply to by सोत्रि

एकदा नक्की सांगा काय ते
ह्यात जग मिथ्या आहे हे गृहीतक धरलंय त्यामुळे पुढचं सगळच मिथ्या होऊन जातंय.
बौद्ध तत्जत्वज्ञानुसार जग मिथ्या आहे की सत्य ? कारण सनातन तत्त्वानुसार तरी जग मिथ्या च आहे, पुढील सगळच मिथ्या आहे, चर्चाही मिथ्या आहे. सगळं सोप्पेच आहे , सगळे मुक्तच आहेत, मिथ्या चर्चेचा उद्देश मिथ्या व्यामोह हटवणे हाच आहे. एकदा ह्या जगाच्या मित्यत्वाचीं जाणिव झाली की बोलायला, चर्चा करायला काही राहतच नाही. ह्याला माऊली "शब्देवीण संवादु, दुजेविण अनुवादु" असे म्हणतात. तात्पर्य इतकेच की जर तुम्ही म्हणता तसे बौद्ध तत्त्वानुसार जग मिथ्या आहे आणि तुम्हाला हे कळले आहे तर आपली चर्चा सफल झाली आहे. आता बोलायला काहीच नाही. :) आणि तुम्ही म्हणत असाल की जग मिथ्या आहे हे माझे गृहितक आहे तर मग चर्चेच्या सुरुवातीलाच मी म्हणालो ते मॅट्रिक चित्रपटात गृहीत धरलेली संकल्पना हिंदू ठरते, बौद्ध नव्हे.

In reply to by प्रसाद गोडबोले

सोत्रि Tue, 04/22/2025 - 10:55
जर तुम्ही म्हणता तसे बौद्ध तत्त्वानुसार जग मिथ्या आहे
ह्या मूळ प्रश्नावर दिलेले प्रतिसाद वाचूनही हाच निष्कर्ष काढला असेल तर खरंच बोलायला काहीच नाही! :) इत्यलम! - (अभ्यासू) सोकाजी

In reply to by प्रसाद गोडबोले

सोत्रि Wed, 04/23/2025 - 02:44
ओह्हो, त्या प्रतिसादाच्या शिर्षकामुळे घोळ झाला तर. पर्याय ३ ऐवजी चूकून २ टाईपला होता आणि शिर्षक रिव्हू करायचे राहून गेले. पण फक्त प्रतिसादाचं शिर्षक वाचून, प्रतिसाद न वाचताच निष्कर्ष काढलेला दिसतोय :) असो, टायपोची चूक माझी आहे, त्यामुळे ती नम्रपणे मान्य करून खाली बसतो! - (माणूस) सोकाजी

In reply to by सोत्रि

समजा तुम्ही पर्याय ३ निवडला असला तरीही जास्त फरक पडत नाही कारण प्रश्न : बौद्ध तत्त्वज्ञानानुसार जग हे सत्य आहे का ? पर्याय ३: होय आणि नाही ३.१. नाही . समजा जग अर्थात मॅट्रिक्स सत्य नाही, मिथ्या आहे , भास आहे तर मग त्यातील दु:ख तृष्णा दुखापासुन मुक्ती , मुक्तीचे उपाय आदि सर्व च मिथ्या ठरते ! अर्थात मी आधी जसं म्हणालो तसं जगाचे मॅट्रिक्स चे मिथ्यत्व लक्षात येणे हा ह्या चक्रातुन बाहेर पडण्याचा सर्वोत्तम मार्ग ठरतो. ( आणि एकदा मॅट्रिक्स मधुन बाहेर पडल्यावर ही चर्चा ही मिथ्याच आहे . ) ३.२. होय. समजा बौध्द तत्वज्ञानानुसार जग अर्थात मॅट्रिक्स सत्य आहे तर त्यातुन बाहेर पडायचा प्रश्नच येत नाही. बौध्दांच्या मते - वेदांती लोकं ह्या जगाच्या बाहेर , मॅट्रिक्स च्या बाहेर असा जो आत्मा , ब्रह्म वगैरे म्हणत आहेत तो अनात्मा अर्थात शुन्य अर्थात झीरो ह्या अर्थाने नव्हे तर वॉईड ह्या अर्थाने ! तस्मात मॅट्रिक्स मधुन तुम्हाला डिटॅच केले गेले की काहीही नाही केवळ व्हॉईड आहे. अर्थात दोन्हीही प्रकारे मॅट्रिक्स चित्रपटात वापरलेली संकल्पना ही बौध्द न ठरता वेदांती ठरते . आता हा प्रश्न इतका महत्वाचा का आहे ? तर काही लोकं म्हणातात - बुध्द हा विष्णुचा अवतार आहे आणि काही लोकं म्हणातात - श्रीमदाद्यशंकराचार्य हे प्रच्छन्न बुध्द आहेत . ह्याचे मला कळलेले कारण म्हणजे नागार्जुनाचा माध्यमिक मार्ग अर्थात शुन्यवाद अनात्मवाद आणि श्रीमदाद्यशंकराचार्य प्रणित उपनिषद ब्रह्मसुत्र आणि भग्वदगीतेवर आधारित अद्वैत वेदांत हे दोन्ही खुप जवळचे आहेत. फरक बस इतकाच आहे की - सर्व जग, मॅट्रिक्स हे मिथ्या आहे म्हणाल्यावर उरते त्याला बौध्द शुन्य म्हणत आहेत , त्यावर वेदांत म्हणत आहे की - अरे पण त्या शुन्याचे आकलन ज्याला होते तो आत्मा तो आहेच की ! तोच आत्मा आहे , ब्रह्म आहे. आणि केवळ तेच सत्य आहे , बाकी सर्व मॅट्रिक्स , जग मिथ्या आहे. भास आहे. चिद्विलास आहे.

In reply to by प्रसाद गोडबोले

कॉमी Tue, 04/08/2025 - 02:09
चित्रपट लेखिका-दिग्दर्शिका भगिनी दोघीही ट्रान्सजेंडर महिला आहेत. मॅट्रिक्स लिहिताना कुठेतरी बॅक ऑफ द माईंड ट्रान्सजेंडर लोकांचा क्लेश त्यांच्या विचारात होता.

In reply to by कॉमी

Bhakti Tue, 04/08/2025 - 06:26
कुठेतरी बॅक ऑफ द माईंड ट्रान्सजेंडर लोकांचा क्लेश त्यांच्या विचारात होता.
असे वाटले नाही... याबाबत पण अजून समजून घ्यावे लागेल. आणि मॅट्रिक्स मध्ये इतकं स्पष्टपणे मायाजालचाच प्रत्येक काळी समावेश आहे, वैदिक अध्यात्म संकल्पनांची क्षणोक्षणी आठवण येत राहते

Bhakti गुरुवार, 04/17/2025 - 11:19
मॅट्रिक्सच्या एका भागात(२ का ३ आठवत नाही.)निओ निर्मात्याला भेटतो तेव्हा तो सांगतो ,तू या प्रोग्रॅम मोडायला आला आहेस तो पहिला नाही,पाचवा की सहावा आहे.याचा संबंध क्लप वा युग या संकल्पनेशी वाटतो.ओरॅकल मला वाटतं प्रकृती आहे,अर्थात निओ पुरूष आहे.शेवटी जो चेहरा आहे तो परब्रम्ह वाटतं आहे.पण स्मिथ कोण आहे? ते तीन होते पहिल्यांदा ते सत्व,रज,तम त्रिगुण होते का? मग केवळ एकच गुण रज म्हणजे असंख्य स्मिथ तय्यार होतात का? -अतिविचारी भक्ती ;):)

कपिलमुनी Tue, 04/22/2025 - 10:54
द मॅट्रिक्स मधले बौद्ध रेफरन्स माया - सगळं भासमात्र आहे बौद्ध धर्मात “माया” म्हणजे सगळं जग एक भास आहे, भ्रम आहे. आपल्याला जे दिसतं, वाटतं ते खरं नसतं. द मॅट्रिक्समध्येही आपण बघतो की माणसं एका बनावट जगात जगत आहेत – कम्प्युटरनी बनवलेलं वर्च्युअल रिअॅलिटी. हेच तर माया! आणि निओ – मुख्य पात्र – जेव्हा जागा होतो, तेव्हा त्याला समजतं की तो खरा जगतच नव्हता. ही जागृती म्हणजेच बोधी. संसारचक्र आणि मुक्ती बौद्ध तत्त्वज्ञानात “संसार” म्हणजे जन्म-मरणाचं चक्र. हे चक्र अज्ञान आणि आसक्तीमुळे सुरू राहतं. मॅट्रिक्स हेही असंच एक चक्र आहे – सगळे लोक त्यात अडकलेत, रोजचं तेच जगणं, कोणताही विचार न करता. मोर्फियस, ट्रिनिटी हे लोक जणू बोधिसत्व आहेत — जे स्वतः जागे झालेत आणि इतरांनाही मुक्त करत आहेत. बोधी – आत्मज्ञान निओ जेव्हा Matrix वर पूर्ण नियंत्रण मिळवतो, तेव्हा तो केवळ शक्तिमान होत नाही, तर त्याला वास्तव काय आहे याची जाणीव होते. हीच बोधी, आत्मज्ञान. Oracle ज्या प्रकारे निओला सरळ उत्तरं न देता त्याला विचारात टाकते, तो संवाद – हा झेन बौद्ध परंपरेतला कोअन (koan) वाटतो. अहंभावाचा लय (अनात्मा) बौद्ध धर्मात "अनात्मा" म्हणजे "स्व" ही कल्पनाच खोटी आहे. आपण जे आहोत असं वाटतं, ते खरं नसतं. निओचं परिवर्तन हेच दाखवतं — तो “मी” असण्याच्या पलीकडे जातो, सगळं विश्वमय होतो. पुनर्जन्म आणि रूपांतरण निओचा पुनर्जन्म — विशेषतः पहिल्या भागात तो मरण्याच्या टप्प्यावर जातो आणि परत उगम पावतो — हेही आध्यात्मिक पुनर्जन्म दर्शवतं. बौद्ध मार्गामध्ये हा एक महत्त्वाचा टप्पा आहे — जुनं सोडून नव्याच जाणीवेकडे वाटचाल. आत्मपरीक्षण Oracle चं वाक्य लक्षात आहे का? "You’re not here to make the choice. You’ve already made it. You’re here to understand why you made it." हे अगदी बौद्ध झेन पद्धतीचं आहे — जेथे उत्तरं नसतात, फक्त विचार आणि अनुभव असतो. शेवटचा विचार द मॅट्रिक्स बघताना जर आपण केवळ दृश्य प्रभावांवर लक्ष न देता त्यामागच्या तत्त्वज्ञानाकडे बघितलं, तर तो एक गूढ आणि आध्यात्मिक प्रवास वाटतो. बौद्ध धर्माने जसं आपल्याला आत्मसाक्षात्कार आणि मुक्ती शिकवली, तसंच निओचा प्रवास आपल्याला दाखवतो — की आपल्याला जागं व्हायचं आहे, Matrix (माया) मधून बाहेर यायचं आहे. हाच तर संदेश आहे – “Wake up, Neo.”

In reply to by कपिलमुनी

बौद्ध धर्मात “माया” म्हणजे सगळं जग एक भास आहे, भ्रम आहे. आपल्याला जे दिसतं, वाटतं ते खरं नसतं.
माया ब्रह्म वगैरे मांडणी वेदांतातील आहे. बौद्ध तत्त्वज्ञान ब्रह्म आत्मा वगैरे मानत नाहीत . अनात्मा उल्लेख तुम्हीच केलेला आहे. बौद्ध तत्त्वज्ञानास अनुसरून मॅट्रिक्स चित्रपट बनवला असता तर ज्या क्षणी निओ ला मॅट्रिक्स सोबत जोडणारी कनेक्शन काढली त्याक्षणी स्क्रीन ब्लॅक आउट होऊन चित्रपट संपेल, कारण निओ ची "मी निओ आहे" ही कल्पनाच आत्मकल्पना असल्याने खोटी ठरते.

In reply to by प्रसाद गोडबोले

सोत्रि Wed, 04/23/2025 - 03:02
बौद्ध तत्त्वज्ञानास अनुसरून मॅट्रिक्स चित्रपट बनवला असता तर ज्या क्षणी निओ ला मॅट्रिक्स सोबत जोडणारी कनेक्शन काढली त्याक्षणी स्क्रीन ब्लॅक आउट होऊन चित्रपट संपेल, कारण निओ ची "मी निओ आहे" ही कल्पनाच आत्मकल्पना असल्याने खोटी ठरते.
तुम्ही म्हणाला होतात , “बौद्ध तत्वज्ञानाचा माझा अभ्यास विकिपीडिया आणि काही मोजके खरे बुद्धिस्त लोकं ह्याकडून ऐकलेल्या गोष्टींवर आधारित आहे.” त्यामुळे स्क्रीन ब्लॅक आउट होईल हा निष्कर्ष ऐकीव गोष्टींवर आधारित ठरतो, जो यथार्थ नाही. पण तुम्हाला हवे तसे निष्कर्ष काढण्याचा तुम्हाला अधिकार (फ्री वील ;) ) आहे आणि तो मान्यही आहे. (ऐकीव गोष्टींवर आधारित निष्कर्ष काढण्याच्या प्रयत्नांच नेहमीच कुतूहल वाटतं राहिल.) - (कुतूहल न शमलेला) सोकाजी

In reply to by सोत्रि

वर सविस्तर उत्तर दिलेले आहे : https://www.misalpav.com/node/52791#comment-1192893
त्यामुळे स्क्रीन ब्लॅक आउट होईल हा निष्कर्ष ऐकीव गोष्टींवर आधारित ठरतो
हे बघा , मॅट्रिक्स अर्थात जग मिथ्या मानले आणि निओला त्या मॅट्रिक्स मधुन बाहेर काढले तर तो जो काही निओ दिसतो आहे त्याला वेदांती आत्मा म्हणातात , बौध्द मतानुसार आत्मा असं काही नाही, सर्व शुन्य आहे. व्हॉईड आहे , मग काय उरलं ? अर्थात बौध्द मतानुसार मॅट्रिक्सच्या "बाहेर" असं काहीच नाही . मग स्क्रीन ब्लॅकाऊट होऊन पिक्चर संपणार नाही का ! चुकीचे असेल तर तुम्ही सांगा - बौध्द मतानुसार काय होईल निओला मॅट्रिक्स मधुन बाहेर काढल्यावर! अवांतर : मला काहीकाही लोकं विचारतात की तुला 'कळलं' आहे ना , तु तर 'बाहेर पडला' आहेस ना , मग तु कशाला ह्या भानगडीत पडतोस चर्चा वगैरे करण्याचा ? -कारण एकदा बाहेर पडुन परत आत आल्यावर "मजा " आहे राव !! bliss

Bhakti Tue, 04/22/2025 - 11:30
मॅट्रिक्स (1999) हा चित्रपट वेदांत तत्त्वज्ञानाशी अनेक प्रकारे जोडला जाऊ शकतो, विशेषतः मायावाद (माया) आणि आत्म्याच्या स्वरूपाविषयीच्या संकल्पनांशी. खाली काही प्रमुख मुद्दे आहेत जे या संबंधाला स्पष्ट करतात:माया आणि मॅट्रिक्स: वेदांतात, माया ही विश्वाची भ्रामक शक्ती आहे जी खरे वास्तव (ब्रह्म) लपवते आणि आपल्याला भौतिक जगात अडकवते. मॅट्रिक्समध्ये, "मॅट्रिक्स" हे एक संगणकीय सिम्युलेशन आहे जे मानवांना खरे वास्तव (त्यांचे गुलामगिरीचे जीवन) पाहू देत नाही. निओ आणि इतर पात्रे या मायेतून बाहेर येण्याचा प्रयत्न करतात, ज्याप्रमाणे वेदांतात आत्मा मायेच्या बंधनातून मुक्त होऊन ब्रह्माची जाणीव करून घेतो.आत्मा आणि निओचा प्रवास: वेदांतात, आत्मा हा शाश्वत, अविनाशी आणि ब्रह्माशी एकरूप आहे. निओचा प्रवास हा आत्मज्ञानाच्या शोधासारखा आहे. तो स्वतःच्या खऱ्या स्वरूपाची (The One) ओळख करून घेतो, ज्यामुळे त्याला मॅट्रिक्सच्या मर्यादांवर मात करता येते. हा प्रवास वेदांतातील "अहं ब्रह्मास्मि" (मी ब्रह्म आहे) या तत्त्वाशी मिळताजुळता आहे.द्वैत आणि अद्वैत: वेदांतातील अद्वैत तत्त्वज्ञान सांगते की खरे वास्तव एकच आहे (ब्रह्म), आणि भौतिक जगातील द्वैत (द्वंद्व) हे मायेमुळे आहे. मॅट्रिक्समध्ये, निओला मॅट्रिक्स आणि वास्तविक जग यांच्यातील द्वैत समजते, आणि शेवटी तो या द्वैताच्या पलीकडे जाऊन मॅट्रिक्सच्या नियमांवर नियंत्रण मिळवतो. हे अद्वैताच्या विचाराशी सुसंगत आहे, जिथे सर्व काही एकच आहे.मुक्ती आणि मोक्ष: वेदांतात, मोक्ष म्हणजे मायेच्या बंधनातून मुक्ती आणि ब्रह्माशी एकरूप होणे. मॅट्रिक्समध्ये, निओ आणि इतर पात्रांचा उद्देश मानवांना मॅट्रिक्सच्या गुलामगिरीतून मुक्त करणे आहे. निओचा स्वतःचा बलिदान आणि पुनर्जन्म (चित्रपटाच्या शेवटी) हे मोक्षाच्या संकल्पनेशी प्रतीकात्मकरीत्या जोडले जाऊ शकते.गुरू आणि मार्गदर्शन: वेदांतात, गुरू हा आत्मज्ञानाचा मार्ग दाखवतो. मॅट्रिक्समध्ये, मॉर्फियस आणि ओरॅकल ही पात्रे निओला त्याच्या खऱ्या सामर्थ्याची आणि उद्देशाची जाणीव करून देतात, जे गुरूच्या भूमिकेसारखे आहे.कर्म आणि निवड: वेदांतात, कर्म आणि स्वतंत्र इच्छा (free will) यांचा समतोल महत्त्वाचा आहे. मॅट्रिक्समध्ये, "निवड" (choice) हा एक केंद्रीय विषय आहे. ओरॅकल निओला सांगते की तो आधीच निवड करून आला आहे, पण ती समजून घेणे त्याच्यावर अवलंबून आहे. हे वेदांतातील कर्म आणि आत्मनिर्णयाच्या संकल्पनेशी मिळते.निष्कर्ष: मॅट्रिक्स हा चित्रपट वेदांत तत्त्वज्ञानाला थेट उद्धृत करत नसला, तरी त्यातील थीम्स—मायेचे भ्रम, आत्मज्ञानाचा शोध, आणि खऱ्या वास्तवाची ओळख—वेदांताशी सखोलपणे जोडलेल्या आहेत. निओचा प्रवास हा वेदांतातील आत्म्याच्या मुक्तीच्या मार्गाचे प्रतीक आहे, जिथे तो मायेच्या पडद्याला फाडून सत्यापर्यंत पोहोचतो.

Bhakti Sat, 05/10/2025 - 10:57
मॅट्रिक्सचा चौथा भाग परवा पाहिला.निओला परत मॅट्रिक्समध्ये यंत्र पाठवतात.जवळपास ६० वर्षे होतात.निओ सर्व विसरलेला असतो.तो एक गेम डिझायनर होतो.थोडाशा आठवणींसह तो मॅट्रिक्समध्ये पूर्वी घडलेल्या घटनांवरून मॅट्रिक्स नावाचाच गेम बनवतो.ट्रिनिटीलाही वाचवून मॅट्रिक्समध्ये पाठवतात.शेवटी निओला इतर लोक मॅट्रिक्सबाहेर काढतात.मग तो ट्रिनिटीलाही बाहेर काढतो.आता मसिहाची शक्ती ट्रिनिटीमध्ये येते. तेव्हा ते स्मिथला विचारतात.तू दोघांना का वाचवलं कोणा एकालाच वाचवायचं होत.तेव्हा तो सांगतो तुम्ही एकत्र असाल तेव्हाच शक्ती परिपूर्ण असाल हे लक्षात आले.तुम्ही एकमेकांशिवाय शक्तीहीन आहात. इथेच शिवशक्ती अद्वैत संकल्पना लक्षात येते.शिव शक्ती शिवाय अधुरा आहे.यांचे द्वैत केवळ माया आहे.हे दोन्ही अद्वैत आहेत. We are in simulation https://youtu.be/X9TbJWb8k2Y?si=EmpIqJoNE55ClIKS खुपच भारी मुलाखत आहे.जर आपण मॅट्रिक्समध्ये आहोत तर प्रेम ,द्वेष,पैसा या गोष्टी कशा जस्टीफाय करणार याची खुप सुंदर उत्तरे दिली आहेत.निवांत यावर टिपणं काढून लेखच देईन.तोपर्यंत नक्की ऐका. -अतिविचारी भक्ती

कपिलमुनी गुरुवार, 03/13/2025 - 18:09
लेखामध्ये असलेल्या इंग्रजी लिपीबद्दल क्षमस्व बरीच नाव, तंत्रज्ञन , इनंग्रजी चित्रपट असले कारणाने इंग्रजी वापर जास्त आहे .

कंजूस गुरुवार, 03/13/2025 - 19:40
असे चित्रपट किंवा सायफाय प्रकारातले अजून पाहिले नाहीत. अर्थात चित्रपटासाठी कथावस्तू ही काल्पनिक आणि मनोरंजन म्हणून असते. त्या कोनातूनच पाहिले पाहिजेत. "What is real? How do you define real?” हे जर ग्रीक तत्त्वज्ञानातून पाहिले तर "real" या शब्दावरच प्रश्नचिन्ह पडते. "Absolute" म्हणायचे असेल का? जगात एकमेव, इतरांपासून वेगळे स्वतंत्र काहीच नाही. एकमेकांच्या तुलनेत हेच बरोबर. ग्रीक तत्त्ववेत्त्यांनी समस्येचं स्पष्टीकरण /सत्यता / proof देतांना इतक्या गोष्टी विचारात घेतल्या आहेत की " या या गृहितकांना धरून हे विधान सत्य आहे असे काटेकोर बांधीव उत्तर देतात. म्हणजे अमुक नियम, अमुक स्थितीमध्ये अमुक हे खरे / सत्य /real म्हणून शकतो. स्थिती, वेळ आणि गती या तीन गोष्टी प्रत्येकांसाठी वेगळ्या आणि एकमेव असतात. हे विसरून चालणार नाही. Matrix आणि set theory या गणितातील कल्पना वरवर साध्यासुध्या वाटल्या तरी गहन आहेत. सिनेमाच्या कथेतून प्रेक्षकांना विचार करायला लावणे आणि मनोरंजन करणे ( भारावून टाकणे) हे साध्य होते. समीक्षा आवडली.

विजुभाऊ Fri, 03/14/2025 - 10:44
मॅट्रिक्स हा सिनेमा पाहिल्यावर डोके बधीर झालेले होते. एकूणातच भन्नाट आहे वेगवान स्टंट्स , ३६० डिग्री शॉट्स , तसेच बुलेट स्लो मोशन वगैरे त्या काळी अद्भूत होते. वेगळ्या धाटणीची तरीही खिळवून ठेवणारी कथा. हा त्याचा मुख्य आधार स्तंभ. आजही तितकाच भावतो

आंद्रे वडापाव Fri, 03/14/2025 - 12:35
खुप कमी कलाकृती किंवा चित्रपट ... आपण जीवनात 'अनुभवतो' .. हा चित्रपट पाहून .. असं वाटलं .. आपण फुल्ल झोपेत असताना कोणी , थंड पाणी तोंडावर मारलं आणि धबा धबा दोन्ही मुस्काडात लावल्यावर जो शॉक बसेल नं ... तसं काहीसं झालेलं ...

झकासराव Sat, 03/15/2025 - 16:02
जबरदस्त चित्रपट आहे फक्त action मुळे नव्हे तर सखोल अर्थ असलेली कथा फार आवडता चित्रपट बऱ्याच वेळा पाहिलाय दृष्टीकोन घडवणारा चित्रपट Agent च्या तोंडचे मनुष्याचे वाभाडे काढणारे संवाद देखील तितकेच परिणामकारक होते

In reply to by झकासराव

टीपीके Sat, 03/15/2025 - 19:52
जबरदस्त चित्रपट आहे
+१
फक्त action मुळे नव्हे तर सखोल अर्थ असलेली कथा
+१
फार आवडता चित्रपट बऱ्याच वेळा पाहिलाय
+१
दृष्टीकोन घडवणारा चित्रपट Agent च्या तोंडचे मनुष्याचे वाभाडे काढणारे संवाद देखील तितकेच परिणामकारक होते
+१

कपिलमुनी Sat, 03/15/2025 - 17:43
सदर लेख एआय ने लिहिला आहे. Chatgpt या ए आय ला काही इनपुट देऊन लेख लिहून घेतला आहे

टेक्निकल क्वेरी
बौद्ध विचारधारा
मॅट्रिक्स चित्रपटात आहे ही बौद्ध विचारधारा आहे का ? पण बौद्ध मतात जग हे निखालस सत्य आहे असे मानतात ना? ब्रह्म सत्य जगन मिथ्या अर्थात दिसणारे भासणारे जग हे मोठ्या असून आपले मूळ स्वरूप जे की ह्याच्या पारे असे असलेले ब्रह्म आहे हा विचार बौद्ध मतातही येतो का ?

In reply to by प्रसाद गोडबोले

Bhakti Wed, 04/02/2025 - 19:12
मॅट्रिक्सच्या शेवटी
ॐ असतो मा सद्गमय । तमसो मा ज्योतिर्गमय । मृत्योर्मा अमृतं गमय ।
हे गाणं आहे ब्वॉ https://youtu.be/A67OhOUoUsc?si=qjAHPlPY4nNyyuuN बौद्ध मतामध्ये ब्रम्ह नाही पण अद्वैताचा स्वीकार आहे, द्वैत नाकारले आहे.कर्माचा पुरस्कार आहे.

In reply to by प्रसाद गोडबोले

सोत्रि गुरुवार, 04/03/2025 - 14:04
पण बौद्ध मतात जग हे निखालस सत्य आहे असे मानतात ना?
ह्याचा काही रेफरन्स (विकीपीडीया व्यतिरीक्त) आहे का? - (अभ्यासू) सोकाजी

In reply to by सोत्रि

प्रश्नाला उत्तर देण्याऐवजी प्रतिप्रश्न विचारणे हा एकप्रकारे "आम्हाला काही माहीत नाही पण तुम्ही म्हणाल ते आम्ही खोडून काढू" ह्या आशयाचा, सप्तभंगीनय अर्थात जैन तत्त्वज्ञानाचा किंवा तदृश आविष्कार मानता येईल का ?

In reply to by सोत्रि

आणि म्हणूनच आपल्याला इतिहासात जैन आणि वैदिक असा शास्त्रार्थ , खंडन मंडण झालेले दिसत नाही. जैन धर्म हा बौद्ध धर्माचा इतकाच प्राचीन असून त्यांच्याशी कोठेही वाद विवाद झाल्याचे दिसत नाही ह्याचे कारण हेच आहे की त्यांना फक्त दुसऱ्याचे मत खोदून काढण्यात यश आहे, स्वतःचे मत प्रस्थापित करण्यात नाही. मग काहीही बोलण्यात अर्थच रहात नाही. पण ह्या सप्तभंगीनय मुळे बोलणे खुंटले तरी त्या नंतर आलेले मौन हे संदेहात्मक आहे, निश्चयात्मक नव्हे. उदाहरणार्थ मी जेवढा केवढा वेदांताचा अभ्यास केला आहे त्यानुसार ब्रह्म सत्य आहे , जग मिथ्या आहे, मिथ्या म्हणजे खोटे असा अर्थाने नव्हे तर भासात्मक असे. आपला भास आहे , माया आहे. ज्ञानेश्वर माऊली त्याला चिदविलास म्हणतात अर्थात पाण्यावर उठलेले तरंग हे पाणीच आहेत तसे जग हे ब्रह्मावर उमटलेले तरंग असल्याने ब्रह्मच आहेत ! तस्मात् किमान वेदांती दृष्टिकोनातून ब्रह्म सत्य जग मिथ्या हे मला माहीत आहे, ज्ञात आहे, प्रचीत आहे. आता बौद्ध धर्म सर्वं शून्य शून्यं म्हणतो तेव्हा त्या सर्वं मध्ये जग देखील येते का असा मला पडलेला प्रश्न आहे. जर बौद्ध जगात देखील शून्य आहेत असे म्हणत असतील तर हे आकलन होणारा मी हा जगाचा भाग असल्याने शून्य नाहीये हे खात्रीलायक असल्याने इथेच बौद्ध मताचे खंडन होईल ! अर्थात माझे अध्ययन हे सनातन वैदिक परंपरेत झाले असल्याने बौद्ध तत्वज्ञानाचा माझा अभ्यास विकिपीडिया आणि काही मोजके खरे बुद्धिस्त लोकं ह्याकडून ऐकलेल्या गोष्टींवर आधारित आहे. जगाचे सत्यत्व ह्या बाबत महायान काय म्हणतात , हीनयान काय म्हणतात , वज्रयान काय म्हणतात आणि विशेषतः नागार्जुन काय म्हणतो हे समजून घ्यायला मनापासून आवडेल. (पण त्यासाठी विशेष कष्ट घ्यायची मला काडीमात्र इच्छा नाही, हा प्रकार कुमारील भट्ट ह्यांनी फार पूर्वीच केला आहे, मला त्यात रस नाही.) म्हणून मी प्रथम प्रश्न विचारला होता. अर्थात ह्यावर सप्तभंगीनय चा आश्रय घेऊन प्रश्नाला प्रतिप्रश्न येत असल्यास हे जैन तत्वद्न्यान झाले. मग काहीही बोलणे खुंटले. तात्पर्य काय की मॅट्रिक्स चित्रपटात "तुम्ही अनुभवत आहात हे सत्य नसून , जग मिथ्या मायाजाल आहे." हे तत्वद्न्यान बौद्ध नसून वैदिक तत्वज्ञानाच्या जवळ जाणारे आहे.

In reply to by प्रसाद गोडबोले

सोत्रि Sun, 04/13/2025 - 12:46
तत्वज्ञान ३ प्रकारचे असते:
  1. ऐकीव (परोक्ष)
  2. चिंतनमय (परोक्ष)
  3. प्रत्यक्ष, अनुभूतीमय (अपरोक्ष)
परोक्ष ज्ञान हे स्वतःची अनुभुती नसते, त्यामुळे त्याचं खंडन-मंडण करण्याची तार्किक गरज पडत असावी, भूतकाळात आणि आताही. अपरोक्ष ज्ञान ही इंद्रियतीत अनुभूती असते जी शब्दात पकडणे शक्य नसते. जो अनुभूतीच्या त्या मितीला स्पर्श करून येतो तो सगळ्या खंडन-मंडणच्या पलीकडे गेलेला असतो कारण हे सगळं मिथ्या आहे हे त्याने अनुभवलेलं असतं. आणि काही प्रस्थापित करण्याचीही गरज नसते कारण ते ज्ञान आहेच, प्रस्थापित केलं काय आणि नाही काय, हे त्याला कळलेलं असतं.
बौद्ध तत्वज्ञानाचा माझा अभ्यास विकिपीडिया आणि काही मोजके खरे बुद्धिस्त लोकं ह्याकडून ऐकलेल्या गोष्टींवर आधारित आहे. जगाचे सत्यत्व ह्या बाबत महायान काय म्हणतात , हीनयान काय म्हणतात , वज्रयान काय म्हणतात आणि विशेषतः नागार्जुन काय म्हणतो हे समजून घ्यायला मनापासून आवडेल. पण त्यासाठी विशेष कष्ट घ्यायची मला काडीमात्र इच्छा नाही,
अशा विरोधाभासी आणि एकंदरीतच ऐकीव माहितीवर आधारित बौद्ध तत्वज्ञानावर जी निष्कर्षात्मक मतं तुमच्या लेखात आणि प्रतिसादात येतात त्याने कुतूहल वाटत आणि ती निष्कर्षात्मक मतं कशी काय बनली हे जाणून घ्यायची इच्छा होते. प्रतिप्रश्न करण्याचे कारण कोणाच्याही मताचे खंडन-मंडण हा खचितच नसतो. कारण भारतीय तत्वज्ञाचा डोलारा ह्या प्रश्नमंजुषेवर आधारलेला आहे. प्रतिप्रश्न फक्त निष्कर्षात्मक मतं कशी काय बनली हे जाणून घेण्यासाठी असतो जेणेकरून चुकीची मतं, धारणा पसरू नये. वानगीदाखल:
आता बौद्ध धर्म सर्वं शून्य शून्यं म्हणतो
मुळात बौद्ध धर्म असं काही नाहीयेय, त्यामुळे नेमकं कोण शून्य शून्यं म्हणतोय? ते शून्य म्हणजे नेमकं काय? हे प्रश्न पडतात आणि तेच विचारले जातात. - (अभ्यासू) सोकाजी

In reply to by सोत्रि

प्रश्न : बौद्ध तत्त्वज्ञानानुसार जग हे सत्य आहे का ? पर्याय: 1. होय. संदर्भ : ग्रंथ , अध्याय, पान क्रमांक 2. नाही. संदर्भ : ग्रंथ , अध्याय, पान क्रमांक 3. होय आणि नाही. दोन्ही अर्थाचे संदर्भ ग्रंथ , अध्याय, पान क्रमांक 4. मला माहित नाही.

In reply to by प्रसाद गोडबोले

सोत्रि Sun, 04/20/2025 - 18:24
बुद्धाच्या शिकवणूकीत, "जग हे सत्य आहे का" (किंवा नाही) हे असं डायरेक्ट नाहीयेय. त्याच्या पटिच्चसमुप्पाद सुत्त, अनिच्चा (Anicca) सुत्त आणि अनत्त लक्षण सुत्त (Anattalakkhaṇa Sutta) ह्या तीन महत्वाच्या आणि एकमेकांशी निगडीत असलेल्या महत्त्वाच्या सूत्रांपैकी अनिच्चा (Anicca) सुत्तांत सर्व अनित्य/नश्वर असल्याचे विषद केले आहे. अनिच्चा (Anicca) / अनित्यबोध – सर्व गोष्टी क्षणभंगुर आहेत. म्हणजे आपण ज्या गोष्टी “स्थिर सत्य” म्हणून धरतो (जसे की शरीर, वस्तू, नाती, इ. म्हणजे एकंदरीत जग), त्या प्रत्यक्षात क्षणाक्षणाला बदलत आहेत. जरी सर्व काही बदलत असलं तरी, ते अस्तित्वात आहे, फक्त ते “स्थायी” नाही, नश्वर आहे. संदर्भ: अनिच्च सुत्त (Anicca Sutta) — साम्युत्त निकाय, SN 22.45 - (साधक) सोकाजी

In reply to by प्रसाद गोडबोले

जग मिथ्या आहे. => मग जगातील विषयांच्या सयोगाने निर्माण होणारे दुःख ही मिथ्या ठरते. => दुःख असं काही नाहीच. => जगाचं मिथ्यत्व लक्षात आलं की तिथेच ब्रह्म सत्यं झालं. => तिथं दुःख संपलं. => जग , त्यातील विषय, त्यांच्या संयोगाने होणारे व्यवहार, त्याने सुख दुःख आदी मानणारा भोगणारा "अहं" हे सर्वच मिथ्या आहे . बस इतके हे समजून घेणे हा दुःख निर्मुलनाचा सर्वात सोप्पा मार्ग आहे . Neo

In reply to by प्रसाद गोडबोले

सोत्रि Mon, 04/21/2025 - 20:55
जग मिथ्या आहे.
न्यूटनच्या अभिजात भौतिकशास्त्राचे (जड जगत् ) नियम सब-ऑटोमिक जगतात (सूक्ष्म कण), क्वाँटम फिजिक्सला, लागू पडत नाहीत, तिथले नियम आणि वास्तव यांत प्रचंड भिन्नता असते. पण त्यामुळे जड जगत् , जे सूक्ष्म कणांनी बनले असते, ते मिथ्या होत नाही. न्यूटनच्या अभिजात भौतिकशास्त्रांच्या नियमानुसार तेही सुरळीत चालू असते.
बस इतके हे समजून घेणे हा दुःख निर्मुलनाचा सर्वात सोप्पा मार्ग आहे
हे समजून घेणे हा झांगडगुता आहे. समजून घ्यायचे म्हणजे नक्की काय? तर कोणीतरी हे असं म्हणालंय हे विचारांच्या पातळीवर मानायचे. मानायचे म्हणजे तशी श्रद्धा ठेवायची. ते इतकं सोप्पं असत तर सगळेच मुक्त झाले असते आणि ही चर्चा करायलाच कोणी नसतं. पण चर्चा तर होते आहे... अरे हो, पण जगन्मिथ्या असं म्हटलं गेलय, म्हणजे ते मानल पाहिजे, म्हणजे ही सगळी चर्चाही मिथ्याच झाली की :) असो,
जग मिथ्या आहे. => मग जगातील विषयांच्या सयोगाने निर्माण होणारे दुःख ही मिथ्या ठरते. => दुःख असं काही नाहीच. => जगाचं मिथ्यत्व लक्षात आलं की तिथेच ब्रह्म सत्यं झालं. => तिथं दुःख संपलं. => जग , त्यातील विषय, त्यांच्या संयोगाने होणारे व्यवहार, त्याने सुख दुःख आदी मानणारा भोगणारा "अहं" हे सर्वच मिथ्या आहे.
ह्यात जग मिथ्या आहे हे गृहीतक धरलंय त्यामुळे पुढचं सगळच मिथ्या होऊन जातंय. पण जन्म-मृत्यू चक्र, जगणं, आहेच. ते सत्य आहे. त्यामुळे जे काही सभोवताली घडतंय ते मिथ्या नाही त्याच्या मागे कार्यकारण भाव आहे (cause & effect) हे स्वानुभूतीच्या पातळीवर अनुभवलं की खालील भवचक्राचे ज्ञान होते: अविद्या -> कर्मसंस्कार -> जाणीव -> नामरूप -> इंद्रिय -> इंद्रियविषय स्पर्ष -> तृष्णा -> आसक्ती -> भवसंस्कार -> जन्म --> मृत्यू (दु:ख) ह्या चक्रातल्या तृष्णा आणि आसक्ती ह्या कड्या तोडल्या की भवचक्र (जन्म-मृत्यू चे चक्र) तोडता येते. ह्या कड्या तोडत सर्व कर्मसंस्कारांचे निर्मूलन म्हणजे मुक्ती, म्हणजेच निर्वाण (गीता ६.१५ श्लोकातंल निर्वाण) - (नश्वर) सोकाजी

In reply to by सोत्रि

एकदा नक्की सांगा काय ते
ह्यात जग मिथ्या आहे हे गृहीतक धरलंय त्यामुळे पुढचं सगळच मिथ्या होऊन जातंय.
बौद्ध तत्जत्वज्ञानुसार जग मिथ्या आहे की सत्य ? कारण सनातन तत्त्वानुसार तरी जग मिथ्या च आहे, पुढील सगळच मिथ्या आहे, चर्चाही मिथ्या आहे. सगळं सोप्पेच आहे , सगळे मुक्तच आहेत, मिथ्या चर्चेचा उद्देश मिथ्या व्यामोह हटवणे हाच आहे. एकदा ह्या जगाच्या मित्यत्वाचीं जाणिव झाली की बोलायला, चर्चा करायला काही राहतच नाही. ह्याला माऊली "शब्देवीण संवादु, दुजेविण अनुवादु" असे म्हणतात. तात्पर्य इतकेच की जर तुम्ही म्हणता तसे बौद्ध तत्त्वानुसार जग मिथ्या आहे आणि तुम्हाला हे कळले आहे तर आपली चर्चा सफल झाली आहे. आता बोलायला काहीच नाही. :) आणि तुम्ही म्हणत असाल की जग मिथ्या आहे हे माझे गृहितक आहे तर मग चर्चेच्या सुरुवातीलाच मी म्हणालो ते मॅट्रिक चित्रपटात गृहीत धरलेली संकल्पना हिंदू ठरते, बौद्ध नव्हे.

In reply to by प्रसाद गोडबोले

सोत्रि Tue, 04/22/2025 - 10:55
जर तुम्ही म्हणता तसे बौद्ध तत्त्वानुसार जग मिथ्या आहे
ह्या मूळ प्रश्नावर दिलेले प्रतिसाद वाचूनही हाच निष्कर्ष काढला असेल तर खरंच बोलायला काहीच नाही! :) इत्यलम! - (अभ्यासू) सोकाजी

In reply to by प्रसाद गोडबोले

सोत्रि Wed, 04/23/2025 - 02:44
ओह्हो, त्या प्रतिसादाच्या शिर्षकामुळे घोळ झाला तर. पर्याय ३ ऐवजी चूकून २ टाईपला होता आणि शिर्षक रिव्हू करायचे राहून गेले. पण फक्त प्रतिसादाचं शिर्षक वाचून, प्रतिसाद न वाचताच निष्कर्ष काढलेला दिसतोय :) असो, टायपोची चूक माझी आहे, त्यामुळे ती नम्रपणे मान्य करून खाली बसतो! - (माणूस) सोकाजी

In reply to by सोत्रि

समजा तुम्ही पर्याय ३ निवडला असला तरीही जास्त फरक पडत नाही कारण प्रश्न : बौद्ध तत्त्वज्ञानानुसार जग हे सत्य आहे का ? पर्याय ३: होय आणि नाही ३.१. नाही . समजा जग अर्थात मॅट्रिक्स सत्य नाही, मिथ्या आहे , भास आहे तर मग त्यातील दु:ख तृष्णा दुखापासुन मुक्ती , मुक्तीचे उपाय आदि सर्व च मिथ्या ठरते ! अर्थात मी आधी जसं म्हणालो तसं जगाचे मॅट्रिक्स चे मिथ्यत्व लक्षात येणे हा ह्या चक्रातुन बाहेर पडण्याचा सर्वोत्तम मार्ग ठरतो. ( आणि एकदा मॅट्रिक्स मधुन बाहेर पडल्यावर ही चर्चा ही मिथ्याच आहे . ) ३.२. होय. समजा बौध्द तत्वज्ञानानुसार जग अर्थात मॅट्रिक्स सत्य आहे तर त्यातुन बाहेर पडायचा प्रश्नच येत नाही. बौध्दांच्या मते - वेदांती लोकं ह्या जगाच्या बाहेर , मॅट्रिक्स च्या बाहेर असा जो आत्मा , ब्रह्म वगैरे म्हणत आहेत तो अनात्मा अर्थात शुन्य अर्थात झीरो ह्या अर्थाने नव्हे तर वॉईड ह्या अर्थाने ! तस्मात मॅट्रिक्स मधुन तुम्हाला डिटॅच केले गेले की काहीही नाही केवळ व्हॉईड आहे. अर्थात दोन्हीही प्रकारे मॅट्रिक्स चित्रपटात वापरलेली संकल्पना ही बौध्द न ठरता वेदांती ठरते . आता हा प्रश्न इतका महत्वाचा का आहे ? तर काही लोकं म्हणातात - बुध्द हा विष्णुचा अवतार आहे आणि काही लोकं म्हणातात - श्रीमदाद्यशंकराचार्य हे प्रच्छन्न बुध्द आहेत . ह्याचे मला कळलेले कारण म्हणजे नागार्जुनाचा माध्यमिक मार्ग अर्थात शुन्यवाद अनात्मवाद आणि श्रीमदाद्यशंकराचार्य प्रणित उपनिषद ब्रह्मसुत्र आणि भग्वदगीतेवर आधारित अद्वैत वेदांत हे दोन्ही खुप जवळचे आहेत. फरक बस इतकाच आहे की - सर्व जग, मॅट्रिक्स हे मिथ्या आहे म्हणाल्यावर उरते त्याला बौध्द शुन्य म्हणत आहेत , त्यावर वेदांत म्हणत आहे की - अरे पण त्या शुन्याचे आकलन ज्याला होते तो आत्मा तो आहेच की ! तोच आत्मा आहे , ब्रह्म आहे. आणि केवळ तेच सत्य आहे , बाकी सर्व मॅट्रिक्स , जग मिथ्या आहे. भास आहे. चिद्विलास आहे.

In reply to by प्रसाद गोडबोले

कॉमी Tue, 04/08/2025 - 02:09
चित्रपट लेखिका-दिग्दर्शिका भगिनी दोघीही ट्रान्सजेंडर महिला आहेत. मॅट्रिक्स लिहिताना कुठेतरी बॅक ऑफ द माईंड ट्रान्सजेंडर लोकांचा क्लेश त्यांच्या विचारात होता.

In reply to by कॉमी

Bhakti Tue, 04/08/2025 - 06:26
कुठेतरी बॅक ऑफ द माईंड ट्रान्सजेंडर लोकांचा क्लेश त्यांच्या विचारात होता.
असे वाटले नाही... याबाबत पण अजून समजून घ्यावे लागेल. आणि मॅट्रिक्स मध्ये इतकं स्पष्टपणे मायाजालचाच प्रत्येक काळी समावेश आहे, वैदिक अध्यात्म संकल्पनांची क्षणोक्षणी आठवण येत राहते

Bhakti गुरुवार, 04/17/2025 - 11:19
मॅट्रिक्सच्या एका भागात(२ का ३ आठवत नाही.)निओ निर्मात्याला भेटतो तेव्हा तो सांगतो ,तू या प्रोग्रॅम मोडायला आला आहेस तो पहिला नाही,पाचवा की सहावा आहे.याचा संबंध क्लप वा युग या संकल्पनेशी वाटतो.ओरॅकल मला वाटतं प्रकृती आहे,अर्थात निओ पुरूष आहे.शेवटी जो चेहरा आहे तो परब्रम्ह वाटतं आहे.पण स्मिथ कोण आहे? ते तीन होते पहिल्यांदा ते सत्व,रज,तम त्रिगुण होते का? मग केवळ एकच गुण रज म्हणजे असंख्य स्मिथ तय्यार होतात का? -अतिविचारी भक्ती ;):)

कपिलमुनी Tue, 04/22/2025 - 10:54
द मॅट्रिक्स मधले बौद्ध रेफरन्स माया - सगळं भासमात्र आहे बौद्ध धर्मात “माया” म्हणजे सगळं जग एक भास आहे, भ्रम आहे. आपल्याला जे दिसतं, वाटतं ते खरं नसतं. द मॅट्रिक्समध्येही आपण बघतो की माणसं एका बनावट जगात जगत आहेत – कम्प्युटरनी बनवलेलं वर्च्युअल रिअॅलिटी. हेच तर माया! आणि निओ – मुख्य पात्र – जेव्हा जागा होतो, तेव्हा त्याला समजतं की तो खरा जगतच नव्हता. ही जागृती म्हणजेच बोधी. संसारचक्र आणि मुक्ती बौद्ध तत्त्वज्ञानात “संसार” म्हणजे जन्म-मरणाचं चक्र. हे चक्र अज्ञान आणि आसक्तीमुळे सुरू राहतं. मॅट्रिक्स हेही असंच एक चक्र आहे – सगळे लोक त्यात अडकलेत, रोजचं तेच जगणं, कोणताही विचार न करता. मोर्फियस, ट्रिनिटी हे लोक जणू बोधिसत्व आहेत — जे स्वतः जागे झालेत आणि इतरांनाही मुक्त करत आहेत. बोधी – आत्मज्ञान निओ जेव्हा Matrix वर पूर्ण नियंत्रण मिळवतो, तेव्हा तो केवळ शक्तिमान होत नाही, तर त्याला वास्तव काय आहे याची जाणीव होते. हीच बोधी, आत्मज्ञान. Oracle ज्या प्रकारे निओला सरळ उत्तरं न देता त्याला विचारात टाकते, तो संवाद – हा झेन बौद्ध परंपरेतला कोअन (koan) वाटतो. अहंभावाचा लय (अनात्मा) बौद्ध धर्मात "अनात्मा" म्हणजे "स्व" ही कल्पनाच खोटी आहे. आपण जे आहोत असं वाटतं, ते खरं नसतं. निओचं परिवर्तन हेच दाखवतं — तो “मी” असण्याच्या पलीकडे जातो, सगळं विश्वमय होतो. पुनर्जन्म आणि रूपांतरण निओचा पुनर्जन्म — विशेषतः पहिल्या भागात तो मरण्याच्या टप्प्यावर जातो आणि परत उगम पावतो — हेही आध्यात्मिक पुनर्जन्म दर्शवतं. बौद्ध मार्गामध्ये हा एक महत्त्वाचा टप्पा आहे — जुनं सोडून नव्याच जाणीवेकडे वाटचाल. आत्मपरीक्षण Oracle चं वाक्य लक्षात आहे का? "You’re not here to make the choice. You’ve already made it. You’re here to understand why you made it." हे अगदी बौद्ध झेन पद्धतीचं आहे — जेथे उत्तरं नसतात, फक्त विचार आणि अनुभव असतो. शेवटचा विचार द मॅट्रिक्स बघताना जर आपण केवळ दृश्य प्रभावांवर लक्ष न देता त्यामागच्या तत्त्वज्ञानाकडे बघितलं, तर तो एक गूढ आणि आध्यात्मिक प्रवास वाटतो. बौद्ध धर्माने जसं आपल्याला आत्मसाक्षात्कार आणि मुक्ती शिकवली, तसंच निओचा प्रवास आपल्याला दाखवतो — की आपल्याला जागं व्हायचं आहे, Matrix (माया) मधून बाहेर यायचं आहे. हाच तर संदेश आहे – “Wake up, Neo.”

In reply to by कपिलमुनी

बौद्ध धर्मात “माया” म्हणजे सगळं जग एक भास आहे, भ्रम आहे. आपल्याला जे दिसतं, वाटतं ते खरं नसतं.
माया ब्रह्म वगैरे मांडणी वेदांतातील आहे. बौद्ध तत्त्वज्ञान ब्रह्म आत्मा वगैरे मानत नाहीत . अनात्मा उल्लेख तुम्हीच केलेला आहे. बौद्ध तत्त्वज्ञानास अनुसरून मॅट्रिक्स चित्रपट बनवला असता तर ज्या क्षणी निओ ला मॅट्रिक्स सोबत जोडणारी कनेक्शन काढली त्याक्षणी स्क्रीन ब्लॅक आउट होऊन चित्रपट संपेल, कारण निओ ची "मी निओ आहे" ही कल्पनाच आत्मकल्पना असल्याने खोटी ठरते.

In reply to by प्रसाद गोडबोले

सोत्रि Wed, 04/23/2025 - 03:02
बौद्ध तत्त्वज्ञानास अनुसरून मॅट्रिक्स चित्रपट बनवला असता तर ज्या क्षणी निओ ला मॅट्रिक्स सोबत जोडणारी कनेक्शन काढली त्याक्षणी स्क्रीन ब्लॅक आउट होऊन चित्रपट संपेल, कारण निओ ची "मी निओ आहे" ही कल्पनाच आत्मकल्पना असल्याने खोटी ठरते.
तुम्ही म्हणाला होतात , “बौद्ध तत्वज्ञानाचा माझा अभ्यास विकिपीडिया आणि काही मोजके खरे बुद्धिस्त लोकं ह्याकडून ऐकलेल्या गोष्टींवर आधारित आहे.” त्यामुळे स्क्रीन ब्लॅक आउट होईल हा निष्कर्ष ऐकीव गोष्टींवर आधारित ठरतो, जो यथार्थ नाही. पण तुम्हाला हवे तसे निष्कर्ष काढण्याचा तुम्हाला अधिकार (फ्री वील ;) ) आहे आणि तो मान्यही आहे. (ऐकीव गोष्टींवर आधारित निष्कर्ष काढण्याच्या प्रयत्नांच नेहमीच कुतूहल वाटतं राहिल.) - (कुतूहल न शमलेला) सोकाजी

In reply to by सोत्रि

वर सविस्तर उत्तर दिलेले आहे : https://www.misalpav.com/node/52791#comment-1192893
त्यामुळे स्क्रीन ब्लॅक आउट होईल हा निष्कर्ष ऐकीव गोष्टींवर आधारित ठरतो
हे बघा , मॅट्रिक्स अर्थात जग मिथ्या मानले आणि निओला त्या मॅट्रिक्स मधुन बाहेर काढले तर तो जो काही निओ दिसतो आहे त्याला वेदांती आत्मा म्हणातात , बौध्द मतानुसार आत्मा असं काही नाही, सर्व शुन्य आहे. व्हॉईड आहे , मग काय उरलं ? अर्थात बौध्द मतानुसार मॅट्रिक्सच्या "बाहेर" असं काहीच नाही . मग स्क्रीन ब्लॅकाऊट होऊन पिक्चर संपणार नाही का ! चुकीचे असेल तर तुम्ही सांगा - बौध्द मतानुसार काय होईल निओला मॅट्रिक्स मधुन बाहेर काढल्यावर! अवांतर : मला काहीकाही लोकं विचारतात की तुला 'कळलं' आहे ना , तु तर 'बाहेर पडला' आहेस ना , मग तु कशाला ह्या भानगडीत पडतोस चर्चा वगैरे करण्याचा ? -कारण एकदा बाहेर पडुन परत आत आल्यावर "मजा " आहे राव !! bliss

Bhakti Tue, 04/22/2025 - 11:30
मॅट्रिक्स (1999) हा चित्रपट वेदांत तत्त्वज्ञानाशी अनेक प्रकारे जोडला जाऊ शकतो, विशेषतः मायावाद (माया) आणि आत्म्याच्या स्वरूपाविषयीच्या संकल्पनांशी. खाली काही प्रमुख मुद्दे आहेत जे या संबंधाला स्पष्ट करतात:माया आणि मॅट्रिक्स: वेदांतात, माया ही विश्वाची भ्रामक शक्ती आहे जी खरे वास्तव (ब्रह्म) लपवते आणि आपल्याला भौतिक जगात अडकवते. मॅट्रिक्समध्ये, "मॅट्रिक्स" हे एक संगणकीय सिम्युलेशन आहे जे मानवांना खरे वास्तव (त्यांचे गुलामगिरीचे जीवन) पाहू देत नाही. निओ आणि इतर पात्रे या मायेतून बाहेर येण्याचा प्रयत्न करतात, ज्याप्रमाणे वेदांतात आत्मा मायेच्या बंधनातून मुक्त होऊन ब्रह्माची जाणीव करून घेतो.आत्मा आणि निओचा प्रवास: वेदांतात, आत्मा हा शाश्वत, अविनाशी आणि ब्रह्माशी एकरूप आहे. निओचा प्रवास हा आत्मज्ञानाच्या शोधासारखा आहे. तो स्वतःच्या खऱ्या स्वरूपाची (The One) ओळख करून घेतो, ज्यामुळे त्याला मॅट्रिक्सच्या मर्यादांवर मात करता येते. हा प्रवास वेदांतातील "अहं ब्रह्मास्मि" (मी ब्रह्म आहे) या तत्त्वाशी मिळताजुळता आहे.द्वैत आणि अद्वैत: वेदांतातील अद्वैत तत्त्वज्ञान सांगते की खरे वास्तव एकच आहे (ब्रह्म), आणि भौतिक जगातील द्वैत (द्वंद्व) हे मायेमुळे आहे. मॅट्रिक्समध्ये, निओला मॅट्रिक्स आणि वास्तविक जग यांच्यातील द्वैत समजते, आणि शेवटी तो या द्वैताच्या पलीकडे जाऊन मॅट्रिक्सच्या नियमांवर नियंत्रण मिळवतो. हे अद्वैताच्या विचाराशी सुसंगत आहे, जिथे सर्व काही एकच आहे.मुक्ती आणि मोक्ष: वेदांतात, मोक्ष म्हणजे मायेच्या बंधनातून मुक्ती आणि ब्रह्माशी एकरूप होणे. मॅट्रिक्समध्ये, निओ आणि इतर पात्रांचा उद्देश मानवांना मॅट्रिक्सच्या गुलामगिरीतून मुक्त करणे आहे. निओचा स्वतःचा बलिदान आणि पुनर्जन्म (चित्रपटाच्या शेवटी) हे मोक्षाच्या संकल्पनेशी प्रतीकात्मकरीत्या जोडले जाऊ शकते.गुरू आणि मार्गदर्शन: वेदांतात, गुरू हा आत्मज्ञानाचा मार्ग दाखवतो. मॅट्रिक्समध्ये, मॉर्फियस आणि ओरॅकल ही पात्रे निओला त्याच्या खऱ्या सामर्थ्याची आणि उद्देशाची जाणीव करून देतात, जे गुरूच्या भूमिकेसारखे आहे.कर्म आणि निवड: वेदांतात, कर्म आणि स्वतंत्र इच्छा (free will) यांचा समतोल महत्त्वाचा आहे. मॅट्रिक्समध्ये, "निवड" (choice) हा एक केंद्रीय विषय आहे. ओरॅकल निओला सांगते की तो आधीच निवड करून आला आहे, पण ती समजून घेणे त्याच्यावर अवलंबून आहे. हे वेदांतातील कर्म आणि आत्मनिर्णयाच्या संकल्पनेशी मिळते.निष्कर्ष: मॅट्रिक्स हा चित्रपट वेदांत तत्त्वज्ञानाला थेट उद्धृत करत नसला, तरी त्यातील थीम्स—मायेचे भ्रम, आत्मज्ञानाचा शोध, आणि खऱ्या वास्तवाची ओळख—वेदांताशी सखोलपणे जोडलेल्या आहेत. निओचा प्रवास हा वेदांतातील आत्म्याच्या मुक्तीच्या मार्गाचे प्रतीक आहे, जिथे तो मायेच्या पडद्याला फाडून सत्यापर्यंत पोहोचतो.

Bhakti Sat, 05/10/2025 - 10:57
मॅट्रिक्सचा चौथा भाग परवा पाहिला.निओला परत मॅट्रिक्समध्ये यंत्र पाठवतात.जवळपास ६० वर्षे होतात.निओ सर्व विसरलेला असतो.तो एक गेम डिझायनर होतो.थोडाशा आठवणींसह तो मॅट्रिक्समध्ये पूर्वी घडलेल्या घटनांवरून मॅट्रिक्स नावाचाच गेम बनवतो.ट्रिनिटीलाही वाचवून मॅट्रिक्समध्ये पाठवतात.शेवटी निओला इतर लोक मॅट्रिक्सबाहेर काढतात.मग तो ट्रिनिटीलाही बाहेर काढतो.आता मसिहाची शक्ती ट्रिनिटीमध्ये येते. तेव्हा ते स्मिथला विचारतात.तू दोघांना का वाचवलं कोणा एकालाच वाचवायचं होत.तेव्हा तो सांगतो तुम्ही एकत्र असाल तेव्हाच शक्ती परिपूर्ण असाल हे लक्षात आले.तुम्ही एकमेकांशिवाय शक्तीहीन आहात. इथेच शिवशक्ती अद्वैत संकल्पना लक्षात येते.शिव शक्ती शिवाय अधुरा आहे.यांचे द्वैत केवळ माया आहे.हे दोन्ही अद्वैत आहेत. We are in simulation https://youtu.be/X9TbJWb8k2Y?si=EmpIqJoNE55ClIKS खुपच भारी मुलाखत आहे.जर आपण मॅट्रिक्समध्ये आहोत तर प्रेम ,द्वेष,पैसा या गोष्टी कशा जस्टीफाय करणार याची खुप सुंदर उत्तरे दिली आहेत.निवांत यावर टिपणं काढून लेखच देईन.तोपर्यंत नक्की ऐका. -अतिविचारी भक्ती
लेखनप्रकार
एका तांत्रिक क्रांतीच्या उंबरठ्यावर उभा असलेला जग, इंटरनेटने नुकतीच पायाभरणी केलेली आणि कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (AI) संकल्पनांना अजूनही फक्त विज्ञानकथांमध्ये स्थान असलेला काळ म्हणजे एकविसावे शतक. याच्या उंबरठ्यावर १९९९ साली एक सिनेमा प्रदर्शित होतो, जो प्रेक्षकांच्या विचारसरणीला एक नवीन दिशा देतो—The Matrix.

स्निग्ध पिठलं चिकन

हणमंतअण्णा शंकराप्पा रावळगुंडवाडीकर ·

वामन देशमुख गुरुवार, 01/30/2025 - 18:37
फोटो अत्यंत जीवघेणा देखणा आला आहे त्यासाठी ***** किंचित विस्कळीत वाटली तरीही पाकृ आवडली. --- बाकी, सध्या शाकाहारी असल्यामुळे "ही पाकृ अंडं घालून करता येईल का" असा मिपा-अभिजात प्रश्न विचारण्याचीही सोय नाहीय.

शानबा५१२ Sun, 02/02/2025 - 09:23
जापनीस चिकन ब्रॉथ पन बनवुन बघा.....तसेच एकदा मच्छी मसाला (खातु मसाले) वापरुन त्यात लालसर रस्स्याचे चिकन बन्वा, थोडे घट्ट, पुअधच्या वेळी ही रेसीपी दाखवा प्लीज. वरील रेसीपी खरोखर छान आहे पण तिखट कमी असावी.

In reply to by शानबा५१२

डुकराचा मस्त ब्रॉथ आणि तोन्कोत्सु रामेन हे स्वर्गीय लागते. ज्याने कुणी रामेन शोधले आहे त्याला सलाम!!!

वामन देशमुख गुरुवार, 01/30/2025 - 18:37
फोटो अत्यंत जीवघेणा देखणा आला आहे त्यासाठी ***** किंचित विस्कळीत वाटली तरीही पाकृ आवडली. --- बाकी, सध्या शाकाहारी असल्यामुळे "ही पाकृ अंडं घालून करता येईल का" असा मिपा-अभिजात प्रश्न विचारण्याचीही सोय नाहीय.

शानबा५१२ Sun, 02/02/2025 - 09:23
जापनीस चिकन ब्रॉथ पन बनवुन बघा.....तसेच एकदा मच्छी मसाला (खातु मसाले) वापरुन त्यात लालसर रस्स्याचे चिकन बन्वा, थोडे घट्ट, पुअधच्या वेळी ही रेसीपी दाखवा प्लीज. वरील रेसीपी खरोखर छान आहे पण तिखट कमी असावी.

In reply to by शानबा५१२

डुकराचा मस्त ब्रॉथ आणि तोन्कोत्सु रामेन हे स्वर्गीय लागते. ज्याने कुणी रामेन शोधले आहे त्याला सलाम!!!
Taxonomy upgrade extras
नमस्कार मित्रहो. बऱ्याच दिवसांनी एक ओपन एंडेड पाककृती करायला वेळ मिळाला. त्यात अजून काही मॉडिफिकेशन करून तुम्ही ती पुढे इंप्रोवाइज करावी ही नम्र विनंती. नाव जे पटकन सुचले ते दिले आहे. ही पाककृती तशी अतिशय सोपी आणि जगभर या ना त्या प्रकारे केली जाते. तिखट नसल्याने मुलांना आवडेल. कमकुवत हृदयाच्या लोकांनी पुढचे वाचू नये. साहित्य: १. चिकन (बोनलेस असेल तर चिकन स्टॉक साठी चिकन स्टॉकची पावडर लागेल. कोंबडीच असेल तर चिकन स्टॉक वेगळा करता येईल. परंतु वेगळादेखील करायचा नसेल तरी काही हरकत नाही. एकत्र केले तरी बिघडत नाही) २. मशरूम (नसतील तरी चालतील मात्र असतील तर लाजवाब लागतं.

(मातीचे पाय - मोकलाया वर्जन)

गड्डा झब्बू ·

चांदणे संदीप Mon, 07/10/2023 - 13:58
एखाद्या कवितेला विनोदी करायचं असेल तर मोकलाया मोल्ड फिट आणि हिट आहे. :) सं - दी - प

चांदणे संदीप Mon, 07/10/2023 - 13:58
एखाद्या कवितेला विनोदी करायचं असेल तर मोकलाया मोल्ड फिट आणि हिट आहे. :) सं - दी - प
काव्यरस
प्रेर्ना - मातीचे पाय पयन स्प्र्शुन अले ते हत मलले होते लक्क उमग्ले तेवहा ते पय मतिचे होते मि केवल पहत होतो पयन्च्य खल्चि धुल ति ललतस लववि हे एकच मथि खुल मि इथ्वर पहुन अलो पौल्खुना विर्नर्या अधि कुन्वत, मगुन कप्ति विकत हस्नर्या अत पुन्ह चलवे पुधे, कि परत फिर्वे? सोस न-लयक पयन्चे पुसुन अव्घे तकवे? प्रेमल श्ब्दन्चि ओल मनत र्झिपत नहि व्हवे नत्मस्त्क पयहि दिसत नहि ते सरेच निगुन गेले जे पय दरवे सुच्ले मतिचे पत मत्कट मगे मज्यसह उर्ले टंकनीक चमनगोटा दाढिमिशि श्निवार ०८/०७/२०२३

(why is there nothing rather than something ???????)

मुक्त विहारि ·
लेखनविषय:
डिस्क्लेमर : सध्या आम्हाला फावला वेळ भरपूर असल्याने आणि ...... आणि....... आणि......... आणि........हा लेख टाकला आहे.आमच्या लेखात कुठलेही वैचारिक धन नसल्याने, विचारवंतांनी ह्या धाग्याकडे दुर्लक्ष करावे, टवाळांनी, टवाळांसाठी काढलेला हा टवाळ धागा आहे.

हनी अँड ब्लॅक पेपर चिकन

केडी ·

आषाढ_दर्द_गाणे Fri, 04/14/2017 - 07:53
काय दिसतायत चित्रे! अतिशय सुंदर! भूक लागली वाचून! एक शंका - तीन तीन चमचे मध मिक्सर मध्ये टाकल्यावर अतिचिकट नाही झालं सगळं? म्हणजे बाकी गोष्टी वाटून त्या मधात घोळवता येतील का?

In reply to by आषाढ_दर्द_गाणे

केडी Fri, 04/14/2017 - 09:11
एक शंका - तीन तीन चमचे मध मिक्सर मध्ये टाकल्यावर अतिचिकट नाही झालं सगळं? म्हणजे बाकी गोष्टी वाटून त्या मधात घोळवता येतील का?
सोया सौंस घातल्यामुळे एवढा चिकट नाही होत, तरीही वाटत असेल तर मध शेवटी घाला, इतर गोष्टी आधी मिक्सर मधून फिरवून घ्या

In reply to by पिलीयन रायडर

आषाढ_दर्द_गाणे Tue, 04/18/2017 - 03:47
सपष्टपणे 'चिकन' असं लिहिलेल्या धाग्यात येऊन अशी तक्रारवजा सूचना करणे हादेखील पुणेरीतला एक 'फाऊल'आहे का? भाषणातल्या तिसऱ्या वाक्याला विनोद केला नाही की जसा होतो तसा...

In reply to by पिलीयन रायडर

केडी Tue, 04/18/2017 - 21:25
शाकाहारी साठी नेहेमीचे यशस्वी कलाकार (पनीर, बटाटे इत्यादी ) दिलेत आधीच, पण अजून एक म्हणजे अमेरिकन स्वीट कॉर्न चे दाणे. हे उकडून मग थोडे कोरडे करून ह्या मिश्रणात तव्यावर फ्राय करून घ्या.....नक्कीच छान लागेल... (अजून वेगळी चव हवी असेल, तर असे उकडलेले कॉर्न चे दाणे थोडं कॉर्नफ्लॉवर लावून मग ह्या मिश्रणात घोळवून, मस्त तेलात डीप फ्राय करून घ्या...अजून वेगळी चव लागेल...फ्राईड कॉर्न इन हनी अँड पेपर!

आषाढ_दर्द_गाणे Fri, 04/14/2017 - 07:53
काय दिसतायत चित्रे! अतिशय सुंदर! भूक लागली वाचून! एक शंका - तीन तीन चमचे मध मिक्सर मध्ये टाकल्यावर अतिचिकट नाही झालं सगळं? म्हणजे बाकी गोष्टी वाटून त्या मधात घोळवता येतील का?

In reply to by आषाढ_दर्द_गाणे

केडी Fri, 04/14/2017 - 09:11
एक शंका - तीन तीन चमचे मध मिक्सर मध्ये टाकल्यावर अतिचिकट नाही झालं सगळं? म्हणजे बाकी गोष्टी वाटून त्या मधात घोळवता येतील का?
सोया सौंस घातल्यामुळे एवढा चिकट नाही होत, तरीही वाटत असेल तर मध शेवटी घाला, इतर गोष्टी आधी मिक्सर मधून फिरवून घ्या

In reply to by पिलीयन रायडर

आषाढ_दर्द_गाणे Tue, 04/18/2017 - 03:47
सपष्टपणे 'चिकन' असं लिहिलेल्या धाग्यात येऊन अशी तक्रारवजा सूचना करणे हादेखील पुणेरीतला एक 'फाऊल'आहे का? भाषणातल्या तिसऱ्या वाक्याला विनोद केला नाही की जसा होतो तसा...

In reply to by पिलीयन रायडर

केडी Tue, 04/18/2017 - 21:25
शाकाहारी साठी नेहेमीचे यशस्वी कलाकार (पनीर, बटाटे इत्यादी ) दिलेत आधीच, पण अजून एक म्हणजे अमेरिकन स्वीट कॉर्न चे दाणे. हे उकडून मग थोडे कोरडे करून ह्या मिश्रणात तव्यावर फ्राय करून घ्या.....नक्कीच छान लागेल... (अजून वेगळी चव हवी असेल, तर असे उकडलेले कॉर्न चे दाणे थोडं कॉर्नफ्लॉवर लावून मग ह्या मिश्रणात घोळवून, मस्त तेलात डीप फ्राय करून घ्या...अजून वेगळी चव लागेल...फ्राईड कॉर्न इन हनी अँड पेपर!

संडे स्पेशल (बटर चिकन)

स्वाती राजेश ·

प्राजु Sun, 01/27/2008 - 02:39
मस्त रेसिपी. खरं तर आजपर्यंत मी नॉनव्हेज पदार्थ केले नाहीत कधी. पण तुझी रेसिपी वाचून करावे असे वाटू लागले आहे. नाही जमलं तर तुझ्याकडे यावे असा विचार आहे. :) - प्राजु.

विसोबा खेचर Mon, 01/28/2008 - 11:51
स्वातीताई, नेहमीप्रमाणेच सुंदर पाककृती...! आता पुढची पाककृती कुठली? आता मिपाकरांना काय खिलवताय याची वाट पाहतो आहे! :) आपला, (खादाड) तात्या.

चतुरंग Tue, 01/29/2008 - 00:24
तरी एक खाद्यवेडा म्हणून ही कृती वाचली. मॅरिनेट केल्यावर चिकन फ्रिजमधे ठेवावे असे काहीसे माझ्या मावसभावाशी बोलतानाचे स्मरते - कारण बाहेर ठेवल्यास, लावलेल्या मिठामुळे त्याला किंचित पाणी सुटण्याची शक्यता असते. बरोबर की चूक आपण सांगू शकता. चतुरंग

In reply to by चतुरंग

स्वाती राजेश Tue, 01/29/2008 - 15:44
आपण जरी चिकन/मटण मॅरिनेट केले तरी तरी ते रॉ असते. ते फ्रिज मध्ये ठेवावे कारण This procedure is essential to reduce the risk of food poisoning: chickens are potential carriers of salmonella and if birds are cooked from frozen state there is the risk of the requied degree of heat to kill off salmonella not reaching the centre of the birds. रॉ मटण हे बॅक्टेरीया पसरवू शकतात. म्हणून खाली दिलेल्या काही गोष्टी पाळाव्यात.. १.नेहमी चंगल्या क्वालीटीचे /माहिती तील दुकानातून मटण/चिकन आणावे.(refrigerrated) २.आणलेल्या दिवशी वापरावे किंवा फ्रिज करावे.झाकून ठेवावे. ३. मटण /चिकन शिजवल्यानंतर १ तासात वापरावे किंवा थंड झालेवर refrigerrate किंवा फ्रिज करावे. ४.परत वापरताना थॉ करून वापरावे. म्हणून मोठ्या होटेल्स मध्ये मटण्/चिकन मॅरिनेट करून फ्रिज मध्ये १०/१२ तास ठेवतात. फ्रिज मध्ये ३० तास त्याला काही होत नाही असे एका पुस्तकात वाचले आहे.

धोंडोपंत Tue, 01/29/2008 - 13:00
स्वाती ताई, अतीव सुंदर पाककृती. क्या बात है | तुमच्यासारख्या सुगरणीकडून अशाच उत्तमोत्तम पाककृती मिपावर येत राहोत. आपला, (खवैय्या) धोंडोपंत झकास कोंबडीवड्याची पाककृती येऊ द्या. वडे हळद घातलेले बरं का? आपला, (भुकेला) धोंडोपंत आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com

स्वाती राजेश Tue, 01/29/2008 - 15:56
धोंडोपंत भाऊ, तुमची इच्छा लवकरच पूर्ण होईल. इथे एवढे खवय्ये असतील याची कल्पना नव्हती. तात्या , प्राजु, चतुरंग आणि विनायक यांचीही मी आभारी आहे. मी तुमच्या रेसीपी च्या फर्माइशी पुर्ण करण्याचा करण्याचा प्रयत्न करेन.

प्राजु Sun, 01/27/2008 - 02:39
मस्त रेसिपी. खरं तर आजपर्यंत मी नॉनव्हेज पदार्थ केले नाहीत कधी. पण तुझी रेसिपी वाचून करावे असे वाटू लागले आहे. नाही जमलं तर तुझ्याकडे यावे असा विचार आहे. :) - प्राजु.

विसोबा खेचर Mon, 01/28/2008 - 11:51
स्वातीताई, नेहमीप्रमाणेच सुंदर पाककृती...! आता पुढची पाककृती कुठली? आता मिपाकरांना काय खिलवताय याची वाट पाहतो आहे! :) आपला, (खादाड) तात्या.

चतुरंग Tue, 01/29/2008 - 00:24
तरी एक खाद्यवेडा म्हणून ही कृती वाचली. मॅरिनेट केल्यावर चिकन फ्रिजमधे ठेवावे असे काहीसे माझ्या मावसभावाशी बोलतानाचे स्मरते - कारण बाहेर ठेवल्यास, लावलेल्या मिठामुळे त्याला किंचित पाणी सुटण्याची शक्यता असते. बरोबर की चूक आपण सांगू शकता. चतुरंग

In reply to by चतुरंग

स्वाती राजेश Tue, 01/29/2008 - 15:44
आपण जरी चिकन/मटण मॅरिनेट केले तरी तरी ते रॉ असते. ते फ्रिज मध्ये ठेवावे कारण This procedure is essential to reduce the risk of food poisoning: chickens are potential carriers of salmonella and if birds are cooked from frozen state there is the risk of the requied degree of heat to kill off salmonella not reaching the centre of the birds. रॉ मटण हे बॅक्टेरीया पसरवू शकतात. म्हणून खाली दिलेल्या काही गोष्टी पाळाव्यात.. १.नेहमी चंगल्या क्वालीटीचे /माहिती तील दुकानातून मटण/चिकन आणावे.(refrigerrated) २.आणलेल्या दिवशी वापरावे किंवा फ्रिज करावे.झाकून ठेवावे. ३. मटण /चिकन शिजवल्यानंतर १ तासात वापरावे किंवा थंड झालेवर refrigerrate किंवा फ्रिज करावे. ४.परत वापरताना थॉ करून वापरावे. म्हणून मोठ्या होटेल्स मध्ये मटण्/चिकन मॅरिनेट करून फ्रिज मध्ये १०/१२ तास ठेवतात. फ्रिज मध्ये ३० तास त्याला काही होत नाही असे एका पुस्तकात वाचले आहे.

धोंडोपंत Tue, 01/29/2008 - 13:00
स्वाती ताई, अतीव सुंदर पाककृती. क्या बात है | तुमच्यासारख्या सुगरणीकडून अशाच उत्तमोत्तम पाककृती मिपावर येत राहोत. आपला, (खवैय्या) धोंडोपंत झकास कोंबडीवड्याची पाककृती येऊ द्या. वडे हळद घातलेले बरं का? आपला, (भुकेला) धोंडोपंत आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com

स्वाती राजेश Tue, 01/29/2008 - 15:56
धोंडोपंत भाऊ, तुमची इच्छा लवकरच पूर्ण होईल. इथे एवढे खवय्ये असतील याची कल्पना नव्हती. तात्या , प्राजु, चतुरंग आणि विनायक यांचीही मी आभारी आहे. मी तुमच्या रेसीपी च्या फर्माइशी पुर्ण करण्याचा करण्याचा प्रयत्न करेन.
3