( जेव्हा खूप खूप पाऊस पडेल ना )
( प्राचीताई माफ करशील ना ग? )
( प्राचीताई माफ करशील ना ग? )
(विडंबनच आहे, ह. घ्या. हे.वे.सा.न.ल.)
.
.
.
.
महापुरुष आणि तीर्थस्थाने
बाप आणि आई
डोळ्या समोर आली नसतील तर नसू देत
भेटलेली संध्याकाळ
स्मरणात असते
न भेटलेल्या
संध्याकाळचे काय ?
त्या संध्याकाळी माझाही
कृष्ण आलाच नाही
योगा योगाने
वेगळ्याच मळ्याच्या दिशेनी धावलेल्या
राधेचा दुसराच कृष्ण
त्याच तळ्याकाठी गवसला
एकमेकांना आधार देत
परतत असताना
तुझं चाफ्याच्या फुलांच दुकान
वाटेत लागलं त्यानी नजर
चुकवलेलं मी पाहुन
नाही पाहिलं
चिदंबरमच्या भेटी मनमोहन आला
तो झाला सोहळा तिहारात
जाहली दोघांची तुरुंगात भेट
मनातले थेट मना मध्ये
मनो म्हणे, " चिद्या, तुझे घोटाळे थोर
अवघाची inx खाऊन टाकला
चिदू म्हणे, एक ते राहिले
तुवा जे पाहिले, पंतप्रधान पदावरी
मनो म्हणे बाबा ते त्वा बरे केले
त्याने तडे गेले प्रामाणिकतेला
मॅडम अट्टल, त्यांची रीत न्यारी
माझी पाटी कोरी राज्य करोनिया
चिदू म्हणे गड्या केली वृथा पायपीट
प्रत्येकाची कोठडी वेगळाली
वेगळीच ताटे वेगळीच वाटी
जेवायला भेटे पुन्हा डाळ भात
तुझी आठवण येते.
हेच एक निर्विवाद सत्य कोपऱ्यात मुलासारखे उभे असते.
हवं ते म्हण, हव्या त्या व्याख्या आणि संज्ञा निवड.
जोवर देहाचे अस्तर नव्याने फुलत आहे तोवर माझं मन तुझ्या पास येत राहील.
चुकलेल्या क्षणांसाठी आकांत करावासा वाटतो मला,
करतोही तो जीव तोडून, आतड्यापासून.
जीविताचे गुपित जगजाहीर करू म्हणतोस तर तुझ्या आपलेपणाचा ध्यास ओरडून सांगावा लागेल.
तुला कितीवेळा ते ऐकू आलंही आहे,
तू तुझ्या दुर्लक्षाची मालकी मला दे आता.
तेव्हढी माया अजून दाटून येत असेल तुझ्यात.
ती देखील जीवापाड जपेन.
माणूस असण्याचे तापत्रय भोग-उपभोगल्यावर,
दुनियादारीचा तिरका खेकडा सर्वांगावर नाचवल्यावर,
प्रवासाची मोठीच मजल मारून,
थकून येतो तुझ्या घरी.
तुझ्या मंद हालचाली डोळे भरून पाहीन,
तुझ्या खांद्यावर शांत झोपून जाईन.
बोल बोल बोलण्याचे खापर फुटून गेलेलं असेल.
तुझ्या ओठांवरचं लालभडक हसू आणि खोल काही शोधत जाणारी नजर, दोन्हीत हरवून जायचंय.
डोळ्यात समाधान असेल तू जवळ असल्याचे,
असेल स्पर्शात निरामय ओलावा,
तेव्हा सैल झालेलं अंग आवडता कंटाळा मागेल.
तुझ्या उबेची आस लागेल कसलीच घाई नसलेली.
ओढ्यावर माळावरच्या
थांबला चांद शरदाचा,
कडब्याच्या पडवीपाशी
चमचमतो हिरवा वेचा
सौंदळीच्या झाडाखाली
भूजलात पेटली धुनी,
वाहते मंद ही रात्र
थिजलेल्या वाऱ्यामधुनि.
सिगरेट कधीची विझली
बोटांत जळुनि सबंध,
श्वासातून येतो अजुनि
त्या सातविणीचा गंध
ना मागत नाही निद्रा
ही पहाट समंजस क्षीण,
धाडली तिला कवितेच्या
माहेरी पाठराखीण
स्मरणांच्या फिकट धुक्याचे
पडतील कुठे दहिवर?
कुसळाच्या सुकल्या देठी
आधीच अडकले गहिवर
रात सरली पहाट झाली झुंझुरल्या सार्या दिशा
झोप नाही ,जीव झाला सखया वेडापिसा
वाट पहाते तुमची राया, उशीर का जाहला
सख्या सांगा उशीर का जाहला
.......
काल दुपारी राघू आला निरोप तो घेउनी
मी मैना हरखून गेले सांगावा ऐकुनी
ऐकुन माझे रूप खुलले, चमचम जणू चांदणी
दिवा ठेवते दो नयनांचा तुमच्या वाटंला
राया उशीर का जाहला.....
......
विडा केशरी सायंकाळी , काया माझी कातकेवडा
मिठीत घेता विरघळले मी, ओठ साखर खडा.
खयाल येता किणकीण वाजे, हाती हिरवा चुडा
जिच्यासाठी झटून दिनरात
दिली परीक्षा प्रीतीची
आज भेटली ती, होऊन
गर्भार सातव्या महिन्याची!
मावळला ध्यास, गळाली आस
गळ्यापाशी कोंडला श्वास
म्हणतील मामा, तिची लेकुरे
भीती मला त्या नात्याची!
क्षण पदोपदी झुरण्याचे
नकळत मागे फिरण्याचे
आता आठवती ते खर्च
आणि उसनवार मित्रांची!
आता काय, शोधू दुसरी
तीही नसेल तर तिसरी
करणार काय, मुळातच
आहे, बागेत गर्दी फुलांची!
- संदीप चांदणे
पहिल्या नजरेतच घातली ही मोहनी
माझ्या ह्दयाची तू तर स्वामिनी
काय माहिती काय ,काय पुढे होईल
पण हा क्षण मिळून , साजरा होइल
मी तर इथे , तू ही इथे
माझ्या मिठीत ये , ये ना...
हे प्रियसी , हे उर्वशी
माझ्या मिठीत ये , विसरूनी सारे..
हरएक प्रार्थनेत तुझे प्रेम असे
तुजविण ते क्षण माझे , व्यर्थ भासे
तुझीच आस मज हदयास असे
तुझपासुनी शांतीही , तुझपासुनी प्रितीही..
ज्या दिवशी गवसलीस मजला
माझा जीव तो कुठे हरपला