मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

मंगळावरील मुरुमातील मुंग्यांचा मुरांबा.

गवि ·

कंजूस Fri, 01/16/2026 - 17:36
डोकेबाज पाककला. शुक्रावरील शेवाळाची उसळ*>> घावणे म्हणायचे आहे का? शुक्र ढगांत हरवलेला असतो.

युयुत्सु Fri, 01/16/2026 - 17:44
अनेक वर्षांपूर्वी पुण्यात य० गो० जोशी 'प्रसाद' नावाचे मासिक चालवत असत. त्यात एकदा "फोलकटांचा चिवडा" अशी पाकृ प्रसिद्ध झाली होती आणि बरीच गाजली होती. तसंच पंचतत्रातला एक श्लोक याच धर्तीवर आहे - यस्य कस्य तरोर्मूलं येनकेनापि मर्दितं| यस्मै कस्मै प्रदातव्यं यद्वा तद्वा भविष्यति|| तातपर्य- वेदांत (वि० अ थर्व वेदात अशा पाकृ भरपूर सापडायची शक्यता आहे)

In reply to by टर्मीनेटर

गवि Fri, 01/16/2026 - 17:58
हा हा हा... पण तिथल्या थंडीत ती लगेच गार होते. "गुरु"वरच्या गुळवेलीचा गुळांबा टाकायचे मनात होते. पण त्यामुळे जायंट ग्यास होतो म्हणतात. म्हणून तेही टाळले.

कंजूस Fri, 01/16/2026 - 17:36
डोकेबाज पाककला. शुक्रावरील शेवाळाची उसळ*>> घावणे म्हणायचे आहे का? शुक्र ढगांत हरवलेला असतो.

युयुत्सु Fri, 01/16/2026 - 17:44
अनेक वर्षांपूर्वी पुण्यात य० गो० जोशी 'प्रसाद' नावाचे मासिक चालवत असत. त्यात एकदा "फोलकटांचा चिवडा" अशी पाकृ प्रसिद्ध झाली होती आणि बरीच गाजली होती. तसंच पंचतत्रातला एक श्लोक याच धर्तीवर आहे - यस्य कस्य तरोर्मूलं येनकेनापि मर्दितं| यस्मै कस्मै प्रदातव्यं यद्वा तद्वा भविष्यति|| तातपर्य- वेदांत (वि० अ थर्व वेदात अशा पाकृ भरपूर सापडायची शक्यता आहे)

In reply to by टर्मीनेटर

गवि Fri, 01/16/2026 - 17:58
हा हा हा... पण तिथल्या थंडीत ती लगेच गार होते. "गुरु"वरच्या गुळवेलीचा गुळांबा टाकायचे मनात होते. पण त्यामुळे जायंट ग्यास होतो म्हणतात. म्हणून तेही टाळले.
**मंगळावरील मुरुमातील मुंग्यांचा मुरांबा : एक प्राचीन-आधुनिक-वैज्ञानिक पाककृती** --- कालच घरच्या मागच्या अगण्णात मुंग्यांची रांगा दिसली आणि मन भूतकाळात गेल. माझ्या लहानपणी आमच्या गावी लाल मुंग्यांची दिसत असत. आमची आत्या त्या मुंग्यांची चविष्ट चटणी बनवत असे. मी विचार केला की आपण मानवजातीच्या विकासासाठी भविष्यकालात इतर ग्रहांवर देखिल खाता येऊ असा मुरंबा का बनवू नये.

गर्दी, चेंगराचेंगरी: कारणे, आकडेवारी आणि शास्त्रीय उपाय

माहितगार ·

माहितगार Fri, 06/06/2025 - 08:50
अशा लेखाची सर्व सेलीब्रीटी आणि कार्यक्रम व्यवस्थापकांनी दखल घेतल्यास छान होईल. या लेखात गर्दी होणार्‍या ठिकाणचे आग प्रतिबंधन आणि आतंकवादी पासून सुरक्षाचा अंतर्भाव लेखाची लांबी फारच वाढली असती म्हणून केला नाही पण ते महत्वाचे मुद्दे आहेत. आणखी एक मुद्दा राहीला तो म्हणजे मंडप आणि खुर्ची सप्लायर्स ते गेट किपर्सनाही या मुद्द्यांवर ट्रेन केले पाहीजे.

In reply to by युयुत्सु

माहितगार Fri, 06/06/2025 - 09:03
मला वाटते पोलीस ट्रेनींग स्कूलस मध्ये हा विषय असेलच पण तो अशा ट्रेनिंग स्कूल्सनी इव्हेंट मॅनेजमेन्ट स्कूलस व गर्दी होणार्‍या व्यवस्थापनांच्या व्यवपस्थाप्कांपर्यंत पोहोचवावयास हवे.

माहितगार Fri, 06/06/2025 - 08:56
नक्कीच, या अत्यंत महत्त्वाच्या विषयावर माहिती खालीलप्रमाणे आहे. जर एखादी व्यक्ती गर्दीच्या ठिकाणी चेंगराचेंगरीच्या स्थितीत अडकली असेल, तर स्वतःचा बचाव करण्यासाठी आणि अशावेळी सुरक्षा रक्षकांनी काय करावे, यासाठी काही महत्त्वपूर्ण उपाययोजना आहेत. ### **गर्दीत अडकल्यास व्यक्तीने स्वतःचा बचाव कसा करावा?** चेंगराचेंगरीच्या स्थितीत सापडल्यास शांत राहणे आणि योग्य उपाययोजना करणे जीवन वाचवू शकते. घाबरल्यास परिस्थिती आणखी बिघडू शकते. अशावेळी खालील गोष्टी करा: **१. कोणत्याही परिस्थितीत उभे राहण्याचा प्रयत्न करा:** चेंगराचेंगरीतील बहुतेक मृत्यू हे खाली पडल्यामुळे आणि लोकांच्या पायाखाली तुडवले गेल्यामुळे होतात. त्यामुळे तुमचा संपूर्ण जोर उभे राहण्यावर केंद्रित करा. **२. हात छातीजवळ ठेवा:** आपले हात छातीजवळ, एखाद्या बॉक्सरप्रमाणे ठेवा. यामुळे तुमच्या छातीला आणि फुफ्फुसांना श्वास घेण्यासाठी थोडी जागा मिळेल. गर्दीच्या दाबामुळे श्वास कोंडला जाण्याचा धोका यामुळे कमी होतो. **३. गर्दीच्या प्रवाहाबरोबर पुढे चला:** गर्दीच्या विरुद्ध दिशेने जाण्याचा किंवा तिला थांबवण्याचा प्रयत्न करू नका. यात तुमची प्रचंड ऊर्जा वाया जाईल आणि तुम्ही पडण्याचा धोका वाढेल. गर्दी ज्या दिशेने वाहत आहे, त्या दिशेने हळूहळू पुढे सरकत राहा. **४. बाजूला किंवा तिरके सरकण्याचा प्रयत्न करा:** गर्दीच्या प्रवाहाबरोबर वाहत असताना, सरळ पुढे जाण्याऐवजी हळूहळू तिरके किंवा बाजूला सरकत गर्दीच्या किनाऱ्यावर (edge) येण्याचा प्रयत्न करा. गर्दीच्या मधोमध दाब सर्वाधिक असतो. **५. भिंती, खांब आणि अडथळ्यांपासून दूर राहा:** भिंती, रेलिंग किंवा इतर कोणत्याही प्रकारच्या अडथळ्यांजवळ दाब सर्वाधिक असतो आणि तिथे लोक चिरडले जाण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे अशा जागा टाळा. **६. तुमची ऊर्जा वाचवा:** विनाकारण ओरडण्यात किंवा आरडाओरड करण्यात तुमची शक्ती वाया घालवू नका. शांत राहा आणि तुमची ऊर्जा उभे राहण्यासाठी आणि सुरक्षित ठिकाणी जाण्यासाठी वापरा. इतरांशी संवाद साधायचा असेल तर शांतपणे आणि स्पष्टपणे बोला. **७. जर तुम्ही खाली पडलात तर:** जर तुम्ही सर्व प्रयत्न करूनही खाली पडलात, तर लगेच भ्रूणासारखी स्थिती (fetal position) घ्या. तुमचे गुडघे छातीजवळ ओढा आणि तुमचे हात डोक्यावर आणि मानेवर ठेवून त्यांचे रक्षण करा. यामुळे तुमच्या महत्त्वाच्या अवयवांचे संरक्षण होण्यास मदत होईल. --- ### **अशा परिस्थितीत द्वारपाल (Gatekeepers) आणि सुरक्षा रक्षकांची भूमिका** चेंगराचेंगरीच्या वेळी सुरक्षा रक्षकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आणि निर्णायक असते. त्यांची त्वरित आणि योग्य कृती अनेकांचे प्राण वाचवू शकते. **१. गर्दीला बाहेर पडण्यासाठी मार्ग मोकळे करा:** त्यांचे पहिले आणि सर्वात महत्त्वाचे काम म्हणजे गर्दीचा दाब कमी करणे. यासाठी सर्व आपत्कालीन आणि नियमित दरवाजे त्वरित उघडा. शक्य असल्यास, तात्पुरते बॅरिकेड्स किंवा अडथळे हटवून बाहेर पडण्यासाठी नवीन मार्ग तयार करा. **२. नवीन प्रवेश ताबडतोब थांबवा:** ज्या ठिकाणी चेंगराचेंगरी होत आहे, तिथे आणखी लोकांना येण्यापासून त्वरित थांबवा. मुख्य प्रवेशद्वार बंद करा किंवा लोकांना आत येण्यापासून रोखा. **३. शांत आणि स्पष्ट सूचना द्या:** ध्वनिक्षेपकाचा (Loudspeaker/PA System) वापर करून लोकांना शांत राहण्याचे आवाहन करा. "कृपया पुढे सरकत राहा", "डावीकडील गेट उघडे आहे", "शांत राहा, आम्ही मदत करत आहोत" अशा स्पष्ट आणि सकारात्मक सूचना द्या. "चेंगराचेंगरी" किंवा "पळापळ" असे शब्द वापरणे टाळा, कारण त्यामुळे भीती वाढू शकते. **४. उंच जागेवरून परिस्थितीवर लक्ष ठेवा:** शक्य असल्यास, उंच टॉवर किंवा सुरक्षित जागेवरून परिस्थितीचे निरीक्षण करा. यामुळे गर्दीचा दाब नेमका कुठे जास्त आहे आणि कोणत्या लोकांना मदतीची गरज आहे, हे समजण्यास मदत होते. **५. अडकलेल्या लोकांना बाहेर काढा:** जे लोक बॅरिकेड्स, रेलिंग किंवा भिंतीजवळ दाबले जात आहेत, त्यांना तातडीने बाहेर काढण्याचा प्रयत्न करा. सुरक्षा रक्षकांनी एक साखळी तयार करून लोकांना सुरक्षित ठिकाणी पोहोचवण्यास मदत करावी. **६. वैद्यकीय मदतीसाठी संपर्क साधा:** तात्काळ नियंत्रण कक्षाला (Control Room) माहिती देऊन रुग्णवाहिका (Ambulances) आणि प्रथमोपचार पथकांना पाचारण करा. **७. स्वतः सुरक्षित राहा:** मदतकार्य करताना सुरक्षा रक्षकांनी स्वतःला धोक्यात घालू नये. त्यांनी गर्दीच्या प्रवाहात अडकणार नाही याची काळजी घ्यावी, जेणेकरून ते इतरांना मदत करू शकतील. सुरक्षा रक्षकांचे योग्य प्रशिक्षण आणि अशा आपत्कालीन परिस्थितीसाठी तयार केलेली एक प्रमाणित कार्यप्रणाली (Standard Operating Procedure - SOP) असणे अत्यंत आवश्यक आहे.

In reply to by माहितगार

माहितगार Fri, 06/06/2025 - 09:00
उपरोक्त जेमिनीबाबांचे उत्तर आहे. आम्ही गर्दीची स्थळे नेहमीच टाळण्याचा प्रयत्न केल्यामुळे त्याचा प्रत्यक्ष अनुभव फारसा नाही, त्याबाबत गर्दीचा अनुभव घेणारेच अधिक नेमकेपणाने सांगू शकतील म्हणून आमचा उत्तरदायित्वास नकार लागू.

In reply to by माहितगार

माहितगार Fri, 06/06/2025 - 09:44
आत चेंगराचेंगरी चालू झाल्यास बाहेरून नवीन प्रवेश ताबडतोब थांबवा ही योग्यच सूचना आहे. पण आत प्रवेश न मिळणारी बेशीस्त मंडळी बाहेर पण तेवढीच चेंगरा चेंगरी करतात या बद्दल उपाय जेमिनी बाबूंना विचारावयाचे राहीले

In reply to by माहितगार

वरील उपाय बरेच चांगले आहेत. आपल्याकडे 'विशेष दिवस' आणि 'विशेष महिने' 'बाबा-बुवा' सत्संग वगैरे हे एक गर्दीचं मोठं कारण असतं. खरं तर ती गर्दी नसते तर लोकांचा आलेला महापूर असतो. वाटेल तिथे वाटेल तसं धावणारं पाणी त्याप्रमाणे माणसं धावतात गर्दी करतात. कालच्या चेंगराचेंगरीचे काही व्हीडीयो पाहात होतो माणसं एकमेकांच्या डोके खांद्यावर पाय देऊन चालत होते. आपला जीव वाचवतांना इतरांची काही अवस्था करुन सोडतो त्यावेळी जाणवत नसेल आपला जीव प्रथम या भावनेने गर्दी तुडवल्या जाते. महिला लहान मुले यात प्राणास मुकतात. आपल्याकडे अभ्यासक्रमात किंवा इतरवेळी कधीही गर्दीवर बोलल्या जात नाही. चर्चा होत नाही. सामाजिक संस्था अथवा सरकारं यासाठी जागरुकता करतांना दिसत नाही. फार आवश्यक विषय वाटत नाही. कधी तरी अशी अनावश्यक गर्दीह होते आणि घटना घडल्यावर त्यावर चर्चा होते. खरं तर, गर्दी टाळणे हाच सर्वात पहिला मोठा आणि महत्वाचा उपाय आहे. गर्दीत गेल्यावर गर्दीच्या विरोधात जायचं की प्रवाहासोबत जायचं यात गर्दीची कोंडी आणखी वाढत जाते. गर्दी फूटली पाहिजे. गर्दी इतरत्र पांगली पाहिजे यासाठी मोठ्या स्क्रीनवर अथवा सातत्याने उद्घोषणा करुन बाहेर पडण्याचे मार्ग दाखवले पाहिजेत. व्यवस्था ऐनवेळी कोलमडते तेव्हा त्यातील काही लोकांनी गर्दी मोकळी होण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतही गर्दी झाली की, पोलिसांची वाट पाहिली जाते. तो पर्यंत वाटेल तशी वाहने वाटेल तिथे घुसवली जातात आणि वाहनांची कोंडी होते. हमरी तुमरी वाद आणि जीवावर बेतेल अशी भांडने. ब-याच वेळी कोणी तरी समजदार माणसं तरुण मुलं अशी गर्दी झाली की ट्राफीक नियंत्रण करण्याचा प्रयत्न करतांना पाहिलं आहे. अशी दृश्य पाहिलं की बरं वाटतं. वाढत्या लोकसंखेवर गर्दीचा भार सोडून चालणार नाही. गर्दी आणि होणा-या दुर्दैवी घटना मोठा विषय आहे, सातत्याने त्यावर जमेल त्या माध्यमावर सकारात्मक लिहिते राहिलं पाहिजे. काहींचे जीव नक्की वाचेल असे वाटत राहते. -दिलीप बिरुटे

कंजूस Sat, 06/07/2025 - 10:42
श्रद्धेपुढे शास्त्र बाद होते. अगदी नियमांत बसून, शिस्तीने गोष्टी होत असल्या तरीही लागणारा वेळ पाहता त्यातील निरर्थकपणा पटवून घेण्याच्या मनस्थितीत लोक नसतील तर सगळी चर्चाच व्यर्थ आहे. उदाहरणार्थ प्रसिद्ध देवळांतील देवदर्शन. डोकेबाजपणे केलेले पर्यायही पटवून न घेण्याची वृत्ती....... कुंभमेळ्यातील आंघोळीसाठी पंपाने पाणी आणून एका ठिकाणी फवारले जाणे आणि भाविकांनी त्यातून जाणे . तरीही भाविकांना नदीतच आंघोळ करायची आहे. नियोजनाला फोलपणा - मोठ्या शहरांतील गर्दी टाळण्याचे उपाय सर्व बाद झाले आहेत. शहरातून मुख्य कामाची कार्यालये दुसरीकडे हलविणे अजूनही शक्य झाले नाही. मुंबईतील लोकल ट्रेन गर्दी. ...... त्यावर केलेले पर्याय --- आणखी रस्ते....आणखी मेट्रो...आणखी उड्डाणपूल सर्व बाद ठरले.

In reply to by कंजूस

माझ्या घराजवळून आठ दहा किलोमीटरहून बारमही गोदावरी नदी वाहते, पुढे जायकवाडी धरणाचे ब्याकवाटरही तुंबलेले असते. नगरपालिकेच्या ढीसाळ नियोजनामुळे पंधरा दिवसानंतर थेट तालुक्यात पाणी घरोघर येते. पण एकादशी आणि तत्सम महत्वाच्या वारी त्या गोदावरी नदीकाठी स्नानासाठी पवित्र दिवशी प्रचंड गर्दी होते. एखादे दोन जीवघेणे अपघातही घड़तात. नळाला येणारे पाणी तितकेच पवित्र किंबहुना अधिक फिल्टर असते त्यातही स्नान होऊ शकते पण गंगाडूबकीचं समाधान गंगेतच. लोकांची हे गर्दी... -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

कंजूस Sat, 06/07/2025 - 13:04
पर्वकाळात तिर्थात स्नान ... यांचा आणि पुण्याचा हिशोब पौराणिक कथांमध्ये सांगून ठेवला आहे.घरामध्ये कुणालातरी यांचा अनुभव घ्यायची इच्छा असते. फार पूर्वी म्हणजे रेल्वे सुरू होण्याअगोदर काही शे भाविक चालत जाऊन तिकडे किती गर्दी करत असतील आणि आता सर्व वाहन सोयी झाल्यानंतर किती गर्दी होते यात खूपच अंतर आहे हे लक्षात घ्यायला पाहिजे. तर तुझी इच्छा पुरी करुया पण पर्वकाळाची अट सोड असं सांगायला हवे. आपण जाऊ तो पर्वकाळ हे पटवायला हवे.

In reply to by कंजूस

पण पर्वकाळाची अट सोड असं सांगायला हवे. आपण जाऊ तो पर्वकाळ हे पटवायला हवे.
आजच्या देव,धर्म प्रिय सरकारच्या काळात असे आधुनिक विचार सांगणे म्हणजे हे पुरोगामी आणि धर्मबुडव्या लोकांचे षडयंत्र ठरू शकते. त्यामुळे असा प्रयत्न करणे, लोकांना समजावून सांगणे महाकठीण काम झालं आहे. भला माणूस अशी रिस्क घेणार नाही. कोणत्या तरी पुराणात पर्वकाळातच गर्दी केली पाहिजे असे काही नाही, असे कोणी नवमतवादी शंकराचार्यांनी सांगितल्याशिवाय बदल शक्य नाही. किंवा भगवान श्रीकृष्ण यांनी जे काही मार्गदर्शन केले आहे त्या अशा कोणत्यातरी संस्कृत धार्मिक ग्रंथ अध्यायात पर्वकाळात गर्दी करु नये असे स्पष्ट म्हटलेले असुन भूतलावरील कोणतेही पाणी ( अटी लागू ) पवित्र असते असे सांगितल्याशिवाय ही गर्दी कमी होणार नाही. अर्थात थेट परिणाम दिसायला अजून पाच पन्नास वर्ष जावे लागतील, असे वाटते. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

माहितगार Sat, 06/07/2025 - 17:54
१) १७९६ साली डॉ. एडवर्ड जेनर ने व्हॅरिओला व्हायरस वर मात करत स्मॉल पॉक्स (उर्फ देवी) नावाच्या गंभीर त्वचा आजारावर लस काढली १९८० पर्यंत जगातून या व्हायरस साथींचे समूळ उच्चाटन करण्यात मानवाला यश मिळाले आणि देवी आजार होऊ नये म्हणून होणार्‍या अंधश्रद्धा आपोआपच मागे पडल्या. ग्रहण विषयक वैज्ञानिक जाणीव शिक्षणातून वाढत गेले तर तत्संबधी अंधश्रद्धा बर्‍यापैकी मागे पडल्या. काही अंधश्रद्धांच्या मागे असलेल्या संबधीत असुरक्षीतता मागे पडल्या की लोक आपोपाच बदलतात. बेसिकली फोकस रचनात्मक मार्गाने असुरक्षीतता कशा कमी करता येतील याकडे हवा. २) गर्दी आणि चेंगरा चेंगरी या साठी धर्माची किंवा अंधश्रद्धेचा संबंध निमीत्तमात्र आहे मूलभूत समस्या मानवी संस्कृतीतील बेशिस्तीची आहे. सध्या चर्चेत असलेल्या क्रिडा क्षेत्रातील चेंगरा चेंगरीत धार्मीक श्रद्धा अंधश्रद्धांचा काय संबंध आहे? समजा १०० कोटी भारतीयांनी स्विमींगपूल मध्ये विशीष्ट दिवशी विशीष्ष्ट वेळी स्नान करण्याची इच्छा प्रदर्शीत केली पण फर्स्ट कम फर्स्ट सर्व ने जेवढ्यांना जमेल तेवढ्यांनीच केले समस्या कुठे आहे ? समस्या बेशीस्तीतच नाही का?

कर्नलतपस्वी Sat, 06/07/2025 - 12:53
काशीसी जावे नित्य वदावे.... असे स्थानमहात्म्य पूर्वापार समाज मनावर ठसवले आहे. कबीरदास आणी इतर संतांनी "मन चंगा तो कठौती मे गंगा",असे सांगून ही काही लोकांवर याचा परिणाम होत नाही. हे सर्वच धर्मामधे आहे. माझे एक वरिष्ठ सहकारी हज यात्रेतील स्टॅम्पेड मधे आपल्या धर्मपत्नीसह पैगंबरवासी झाले. डाॅक्टर होते. हा श्रद्धेचा भाग आहे पण या बरोबर सबुरी पण हवी तेव्हांच असले अपघात टळतील.

माहितगार Fri, 06/06/2025 - 08:50
अशा लेखाची सर्व सेलीब्रीटी आणि कार्यक्रम व्यवस्थापकांनी दखल घेतल्यास छान होईल. या लेखात गर्दी होणार्‍या ठिकाणचे आग प्रतिबंधन आणि आतंकवादी पासून सुरक्षाचा अंतर्भाव लेखाची लांबी फारच वाढली असती म्हणून केला नाही पण ते महत्वाचे मुद्दे आहेत. आणखी एक मुद्दा राहीला तो म्हणजे मंडप आणि खुर्ची सप्लायर्स ते गेट किपर्सनाही या मुद्द्यांवर ट्रेन केले पाहीजे.

In reply to by युयुत्सु

माहितगार Fri, 06/06/2025 - 09:03
मला वाटते पोलीस ट्रेनींग स्कूलस मध्ये हा विषय असेलच पण तो अशा ट्रेनिंग स्कूल्सनी इव्हेंट मॅनेजमेन्ट स्कूलस व गर्दी होणार्‍या व्यवस्थापनांच्या व्यवपस्थाप्कांपर्यंत पोहोचवावयास हवे.

माहितगार Fri, 06/06/2025 - 08:56
नक्कीच, या अत्यंत महत्त्वाच्या विषयावर माहिती खालीलप्रमाणे आहे. जर एखादी व्यक्ती गर्दीच्या ठिकाणी चेंगराचेंगरीच्या स्थितीत अडकली असेल, तर स्वतःचा बचाव करण्यासाठी आणि अशावेळी सुरक्षा रक्षकांनी काय करावे, यासाठी काही महत्त्वपूर्ण उपाययोजना आहेत. ### **गर्दीत अडकल्यास व्यक्तीने स्वतःचा बचाव कसा करावा?** चेंगराचेंगरीच्या स्थितीत सापडल्यास शांत राहणे आणि योग्य उपाययोजना करणे जीवन वाचवू शकते. घाबरल्यास परिस्थिती आणखी बिघडू शकते. अशावेळी खालील गोष्टी करा: **१. कोणत्याही परिस्थितीत उभे राहण्याचा प्रयत्न करा:** चेंगराचेंगरीतील बहुतेक मृत्यू हे खाली पडल्यामुळे आणि लोकांच्या पायाखाली तुडवले गेल्यामुळे होतात. त्यामुळे तुमचा संपूर्ण जोर उभे राहण्यावर केंद्रित करा. **२. हात छातीजवळ ठेवा:** आपले हात छातीजवळ, एखाद्या बॉक्सरप्रमाणे ठेवा. यामुळे तुमच्या छातीला आणि फुफ्फुसांना श्वास घेण्यासाठी थोडी जागा मिळेल. गर्दीच्या दाबामुळे श्वास कोंडला जाण्याचा धोका यामुळे कमी होतो. **३. गर्दीच्या प्रवाहाबरोबर पुढे चला:** गर्दीच्या विरुद्ध दिशेने जाण्याचा किंवा तिला थांबवण्याचा प्रयत्न करू नका. यात तुमची प्रचंड ऊर्जा वाया जाईल आणि तुम्ही पडण्याचा धोका वाढेल. गर्दी ज्या दिशेने वाहत आहे, त्या दिशेने हळूहळू पुढे सरकत राहा. **४. बाजूला किंवा तिरके सरकण्याचा प्रयत्न करा:** गर्दीच्या प्रवाहाबरोबर वाहत असताना, सरळ पुढे जाण्याऐवजी हळूहळू तिरके किंवा बाजूला सरकत गर्दीच्या किनाऱ्यावर (edge) येण्याचा प्रयत्न करा. गर्दीच्या मधोमध दाब सर्वाधिक असतो. **५. भिंती, खांब आणि अडथळ्यांपासून दूर राहा:** भिंती, रेलिंग किंवा इतर कोणत्याही प्रकारच्या अडथळ्यांजवळ दाब सर्वाधिक असतो आणि तिथे लोक चिरडले जाण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे अशा जागा टाळा. **६. तुमची ऊर्जा वाचवा:** विनाकारण ओरडण्यात किंवा आरडाओरड करण्यात तुमची शक्ती वाया घालवू नका. शांत राहा आणि तुमची ऊर्जा उभे राहण्यासाठी आणि सुरक्षित ठिकाणी जाण्यासाठी वापरा. इतरांशी संवाद साधायचा असेल तर शांतपणे आणि स्पष्टपणे बोला. **७. जर तुम्ही खाली पडलात तर:** जर तुम्ही सर्व प्रयत्न करूनही खाली पडलात, तर लगेच भ्रूणासारखी स्थिती (fetal position) घ्या. तुमचे गुडघे छातीजवळ ओढा आणि तुमचे हात डोक्यावर आणि मानेवर ठेवून त्यांचे रक्षण करा. यामुळे तुमच्या महत्त्वाच्या अवयवांचे संरक्षण होण्यास मदत होईल. --- ### **अशा परिस्थितीत द्वारपाल (Gatekeepers) आणि सुरक्षा रक्षकांची भूमिका** चेंगराचेंगरीच्या वेळी सुरक्षा रक्षकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आणि निर्णायक असते. त्यांची त्वरित आणि योग्य कृती अनेकांचे प्राण वाचवू शकते. **१. गर्दीला बाहेर पडण्यासाठी मार्ग मोकळे करा:** त्यांचे पहिले आणि सर्वात महत्त्वाचे काम म्हणजे गर्दीचा दाब कमी करणे. यासाठी सर्व आपत्कालीन आणि नियमित दरवाजे त्वरित उघडा. शक्य असल्यास, तात्पुरते बॅरिकेड्स किंवा अडथळे हटवून बाहेर पडण्यासाठी नवीन मार्ग तयार करा. **२. नवीन प्रवेश ताबडतोब थांबवा:** ज्या ठिकाणी चेंगराचेंगरी होत आहे, तिथे आणखी लोकांना येण्यापासून त्वरित थांबवा. मुख्य प्रवेशद्वार बंद करा किंवा लोकांना आत येण्यापासून रोखा. **३. शांत आणि स्पष्ट सूचना द्या:** ध्वनिक्षेपकाचा (Loudspeaker/PA System) वापर करून लोकांना शांत राहण्याचे आवाहन करा. "कृपया पुढे सरकत राहा", "डावीकडील गेट उघडे आहे", "शांत राहा, आम्ही मदत करत आहोत" अशा स्पष्ट आणि सकारात्मक सूचना द्या. "चेंगराचेंगरी" किंवा "पळापळ" असे शब्द वापरणे टाळा, कारण त्यामुळे भीती वाढू शकते. **४. उंच जागेवरून परिस्थितीवर लक्ष ठेवा:** शक्य असल्यास, उंच टॉवर किंवा सुरक्षित जागेवरून परिस्थितीचे निरीक्षण करा. यामुळे गर्दीचा दाब नेमका कुठे जास्त आहे आणि कोणत्या लोकांना मदतीची गरज आहे, हे समजण्यास मदत होते. **५. अडकलेल्या लोकांना बाहेर काढा:** जे लोक बॅरिकेड्स, रेलिंग किंवा भिंतीजवळ दाबले जात आहेत, त्यांना तातडीने बाहेर काढण्याचा प्रयत्न करा. सुरक्षा रक्षकांनी एक साखळी तयार करून लोकांना सुरक्षित ठिकाणी पोहोचवण्यास मदत करावी. **६. वैद्यकीय मदतीसाठी संपर्क साधा:** तात्काळ नियंत्रण कक्षाला (Control Room) माहिती देऊन रुग्णवाहिका (Ambulances) आणि प्रथमोपचार पथकांना पाचारण करा. **७. स्वतः सुरक्षित राहा:** मदतकार्य करताना सुरक्षा रक्षकांनी स्वतःला धोक्यात घालू नये. त्यांनी गर्दीच्या प्रवाहात अडकणार नाही याची काळजी घ्यावी, जेणेकरून ते इतरांना मदत करू शकतील. सुरक्षा रक्षकांचे योग्य प्रशिक्षण आणि अशा आपत्कालीन परिस्थितीसाठी तयार केलेली एक प्रमाणित कार्यप्रणाली (Standard Operating Procedure - SOP) असणे अत्यंत आवश्यक आहे.

In reply to by माहितगार

माहितगार Fri, 06/06/2025 - 09:00
उपरोक्त जेमिनीबाबांचे उत्तर आहे. आम्ही गर्दीची स्थळे नेहमीच टाळण्याचा प्रयत्न केल्यामुळे त्याचा प्रत्यक्ष अनुभव फारसा नाही, त्याबाबत गर्दीचा अनुभव घेणारेच अधिक नेमकेपणाने सांगू शकतील म्हणून आमचा उत्तरदायित्वास नकार लागू.

In reply to by माहितगार

माहितगार Fri, 06/06/2025 - 09:44
आत चेंगराचेंगरी चालू झाल्यास बाहेरून नवीन प्रवेश ताबडतोब थांबवा ही योग्यच सूचना आहे. पण आत प्रवेश न मिळणारी बेशीस्त मंडळी बाहेर पण तेवढीच चेंगरा चेंगरी करतात या बद्दल उपाय जेमिनी बाबूंना विचारावयाचे राहीले

In reply to by माहितगार

वरील उपाय बरेच चांगले आहेत. आपल्याकडे 'विशेष दिवस' आणि 'विशेष महिने' 'बाबा-बुवा' सत्संग वगैरे हे एक गर्दीचं मोठं कारण असतं. खरं तर ती गर्दी नसते तर लोकांचा आलेला महापूर असतो. वाटेल तिथे वाटेल तसं धावणारं पाणी त्याप्रमाणे माणसं धावतात गर्दी करतात. कालच्या चेंगराचेंगरीचे काही व्हीडीयो पाहात होतो माणसं एकमेकांच्या डोके खांद्यावर पाय देऊन चालत होते. आपला जीव वाचवतांना इतरांची काही अवस्था करुन सोडतो त्यावेळी जाणवत नसेल आपला जीव प्रथम या भावनेने गर्दी तुडवल्या जाते. महिला लहान मुले यात प्राणास मुकतात. आपल्याकडे अभ्यासक्रमात किंवा इतरवेळी कधीही गर्दीवर बोलल्या जात नाही. चर्चा होत नाही. सामाजिक संस्था अथवा सरकारं यासाठी जागरुकता करतांना दिसत नाही. फार आवश्यक विषय वाटत नाही. कधी तरी अशी अनावश्यक गर्दीह होते आणि घटना घडल्यावर त्यावर चर्चा होते. खरं तर, गर्दी टाळणे हाच सर्वात पहिला मोठा आणि महत्वाचा उपाय आहे. गर्दीत गेल्यावर गर्दीच्या विरोधात जायचं की प्रवाहासोबत जायचं यात गर्दीची कोंडी आणखी वाढत जाते. गर्दी फूटली पाहिजे. गर्दी इतरत्र पांगली पाहिजे यासाठी मोठ्या स्क्रीनवर अथवा सातत्याने उद्घोषणा करुन बाहेर पडण्याचे मार्ग दाखवले पाहिजेत. व्यवस्था ऐनवेळी कोलमडते तेव्हा त्यातील काही लोकांनी गर्दी मोकळी होण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतही गर्दी झाली की, पोलिसांची वाट पाहिली जाते. तो पर्यंत वाटेल तशी वाहने वाटेल तिथे घुसवली जातात आणि वाहनांची कोंडी होते. हमरी तुमरी वाद आणि जीवावर बेतेल अशी भांडने. ब-याच वेळी कोणी तरी समजदार माणसं तरुण मुलं अशी गर्दी झाली की ट्राफीक नियंत्रण करण्याचा प्रयत्न करतांना पाहिलं आहे. अशी दृश्य पाहिलं की बरं वाटतं. वाढत्या लोकसंखेवर गर्दीचा भार सोडून चालणार नाही. गर्दी आणि होणा-या दुर्दैवी घटना मोठा विषय आहे, सातत्याने त्यावर जमेल त्या माध्यमावर सकारात्मक लिहिते राहिलं पाहिजे. काहींचे जीव नक्की वाचेल असे वाटत राहते. -दिलीप बिरुटे

कंजूस Sat, 06/07/2025 - 10:42
श्रद्धेपुढे शास्त्र बाद होते. अगदी नियमांत बसून, शिस्तीने गोष्टी होत असल्या तरीही लागणारा वेळ पाहता त्यातील निरर्थकपणा पटवून घेण्याच्या मनस्थितीत लोक नसतील तर सगळी चर्चाच व्यर्थ आहे. उदाहरणार्थ प्रसिद्ध देवळांतील देवदर्शन. डोकेबाजपणे केलेले पर्यायही पटवून न घेण्याची वृत्ती....... कुंभमेळ्यातील आंघोळीसाठी पंपाने पाणी आणून एका ठिकाणी फवारले जाणे आणि भाविकांनी त्यातून जाणे . तरीही भाविकांना नदीतच आंघोळ करायची आहे. नियोजनाला फोलपणा - मोठ्या शहरांतील गर्दी टाळण्याचे उपाय सर्व बाद झाले आहेत. शहरातून मुख्य कामाची कार्यालये दुसरीकडे हलविणे अजूनही शक्य झाले नाही. मुंबईतील लोकल ट्रेन गर्दी. ...... त्यावर केलेले पर्याय --- आणखी रस्ते....आणखी मेट्रो...आणखी उड्डाणपूल सर्व बाद ठरले.

In reply to by कंजूस

माझ्या घराजवळून आठ दहा किलोमीटरहून बारमही गोदावरी नदी वाहते, पुढे जायकवाडी धरणाचे ब्याकवाटरही तुंबलेले असते. नगरपालिकेच्या ढीसाळ नियोजनामुळे पंधरा दिवसानंतर थेट तालुक्यात पाणी घरोघर येते. पण एकादशी आणि तत्सम महत्वाच्या वारी त्या गोदावरी नदीकाठी स्नानासाठी पवित्र दिवशी प्रचंड गर्दी होते. एखादे दोन जीवघेणे अपघातही घड़तात. नळाला येणारे पाणी तितकेच पवित्र किंबहुना अधिक फिल्टर असते त्यातही स्नान होऊ शकते पण गंगाडूबकीचं समाधान गंगेतच. लोकांची हे गर्दी... -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

कंजूस Sat, 06/07/2025 - 13:04
पर्वकाळात तिर्थात स्नान ... यांचा आणि पुण्याचा हिशोब पौराणिक कथांमध्ये सांगून ठेवला आहे.घरामध्ये कुणालातरी यांचा अनुभव घ्यायची इच्छा असते. फार पूर्वी म्हणजे रेल्वे सुरू होण्याअगोदर काही शे भाविक चालत जाऊन तिकडे किती गर्दी करत असतील आणि आता सर्व वाहन सोयी झाल्यानंतर किती गर्दी होते यात खूपच अंतर आहे हे लक्षात घ्यायला पाहिजे. तर तुझी इच्छा पुरी करुया पण पर्वकाळाची अट सोड असं सांगायला हवे. आपण जाऊ तो पर्वकाळ हे पटवायला हवे.

In reply to by कंजूस

पण पर्वकाळाची अट सोड असं सांगायला हवे. आपण जाऊ तो पर्वकाळ हे पटवायला हवे.
आजच्या देव,धर्म प्रिय सरकारच्या काळात असे आधुनिक विचार सांगणे म्हणजे हे पुरोगामी आणि धर्मबुडव्या लोकांचे षडयंत्र ठरू शकते. त्यामुळे असा प्रयत्न करणे, लोकांना समजावून सांगणे महाकठीण काम झालं आहे. भला माणूस अशी रिस्क घेणार नाही. कोणत्या तरी पुराणात पर्वकाळातच गर्दी केली पाहिजे असे काही नाही, असे कोणी नवमतवादी शंकराचार्यांनी सांगितल्याशिवाय बदल शक्य नाही. किंवा भगवान श्रीकृष्ण यांनी जे काही मार्गदर्शन केले आहे त्या अशा कोणत्यातरी संस्कृत धार्मिक ग्रंथ अध्यायात पर्वकाळात गर्दी करु नये असे स्पष्ट म्हटलेले असुन भूतलावरील कोणतेही पाणी ( अटी लागू ) पवित्र असते असे सांगितल्याशिवाय ही गर्दी कमी होणार नाही. अर्थात थेट परिणाम दिसायला अजून पाच पन्नास वर्ष जावे लागतील, असे वाटते. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

माहितगार Sat, 06/07/2025 - 17:54
१) १७९६ साली डॉ. एडवर्ड जेनर ने व्हॅरिओला व्हायरस वर मात करत स्मॉल पॉक्स (उर्फ देवी) नावाच्या गंभीर त्वचा आजारावर लस काढली १९८० पर्यंत जगातून या व्हायरस साथींचे समूळ उच्चाटन करण्यात मानवाला यश मिळाले आणि देवी आजार होऊ नये म्हणून होणार्‍या अंधश्रद्धा आपोआपच मागे पडल्या. ग्रहण विषयक वैज्ञानिक जाणीव शिक्षणातून वाढत गेले तर तत्संबधी अंधश्रद्धा बर्‍यापैकी मागे पडल्या. काही अंधश्रद्धांच्या मागे असलेल्या संबधीत असुरक्षीतता मागे पडल्या की लोक आपोपाच बदलतात. बेसिकली फोकस रचनात्मक मार्गाने असुरक्षीतता कशा कमी करता येतील याकडे हवा. २) गर्दी आणि चेंगरा चेंगरी या साठी धर्माची किंवा अंधश्रद्धेचा संबंध निमीत्तमात्र आहे मूलभूत समस्या मानवी संस्कृतीतील बेशिस्तीची आहे. सध्या चर्चेत असलेल्या क्रिडा क्षेत्रातील चेंगरा चेंगरीत धार्मीक श्रद्धा अंधश्रद्धांचा काय संबंध आहे? समजा १०० कोटी भारतीयांनी स्विमींगपूल मध्ये विशीष्ट दिवशी विशीष्ष्ट वेळी स्नान करण्याची इच्छा प्रदर्शीत केली पण फर्स्ट कम फर्स्ट सर्व ने जेवढ्यांना जमेल तेवढ्यांनीच केले समस्या कुठे आहे ? समस्या बेशीस्तीतच नाही का?

कर्नलतपस्वी Sat, 06/07/2025 - 12:53
काशीसी जावे नित्य वदावे.... असे स्थानमहात्म्य पूर्वापार समाज मनावर ठसवले आहे. कबीरदास आणी इतर संतांनी "मन चंगा तो कठौती मे गंगा",असे सांगून ही काही लोकांवर याचा परिणाम होत नाही. हे सर्वच धर्मामधे आहे. माझे एक वरिष्ठ सहकारी हज यात्रेतील स्टॅम्पेड मधे आपल्या धर्मपत्नीसह पैगंबरवासी झाले. डाॅक्टर होते. हा श्रद्धेचा भाग आहे पण या बरोबर सबुरी पण हवी तेव्हांच असले अपघात टळतील.
लेखनप्रकार
प्रेर्ना चर्चा विजयोत्सवाला गालबोट - प्रा. डॉ. दिलीप बिरुटे आरसीबीचा हा विजय साजरा करण्यासाठी बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर कर्नाटक सरकारने संघाच्या सत्काराचा कार्यक्रमदेखील आयोजित केला होता. पण या कार्यक्रमाला चेंगराचेंगरीचं गालबोट लागले. अकरा जणांना आपल्या जीवाला नाहक मुकावं लागलं दुर्दैवी घटना. आपल्याकडे गर्दी आणि गर्दीचं नियोजन ही मोठी समस्या आहे. नियोजन नसल्यामुळे लोक वाटेल तसे जमेल तिथे गर्दी करतात. लोक ऐकत नाही आणि नियोजन कोलमडतं.

सहज सुचलं म्हणून

कंजूस ·

चित्रगुप्त Sun, 12/22/2024 - 05:35
येत्या फेब्रुवारी ११-२० मी पुण्यात मुक्कामास असेन, त्या दरम्यान कट्टा करुया का ? (फक्त १६ तारीख सोडून. त्या दिवशी एका लग्नात उपस्थिती लावयची आहे)

In reply to by चित्रगुप्त

मुक्त विहारि Sun, 12/22/2024 - 10:42
सध्या आमचे भ्रमण फक्त ६ फूट बाय ३ फूट इतपतच मर्यादित असल्याने, माझ्या घरीच कट्टा करू शकतो.

In reply to by मुक्त विहारि

काळजी घ्या मुवि. हाडाचे दुखणे म्हणजे वेळखाऊ दुखणे असते. काहीही झाले तरी मुळातले दुखणे आणि मग फिजिओथेरपी वगैरे प्रकार मिळून अडीच-तीन महिने जातातच. मी पण तो अनुभव घेतला आहे. पण त्या काळात मिपावर पूर्णवेळ पडीक राहून वेळेचा सदुपयोग केला होता :)

Bhakti Sun, 12/22/2024 - 21:15
पुणे बुक फेस्टिवल २०२४ अ आ १४ डिसेंबरपासून सुरू झालेल्या पुणे बुक फेस्टिवलचा आज २२ डिसेंबर शेवटचा दिवस होता.कामाचं आठवडा नियोजन पूर्ण फुल्ल असल्याने आजचाच दिवस या फेस्टिव्हलमध्ये येण्यासाठी मिळाला.खरोखर पुस्तक प्रेमींसाठी ही एक अनोखी पंढरी फर्ग्युसन महाविद्यालयात अवतरली होती.जवळपास २५० पेक्षा अधिक प्रकाशकांचे बुक स्टॉल येथे उपलब्ध होते.फर्ग्युसन महाविद्यालयात प्रवेश करताच पुस्तक वाचण्यात मग्न अनेक भव्य प्रतिकृती ठराविक अंतरावर होत्या.पुस्तकांच्या आकाराच्या प्रतिकृतींची सजावट मार्गावर होती.अंम्पी थिअटरात अनेक कार्यक्रमांचीही रेलचेल होती.पुढे सर्वप्रथम भारतीय संविधानाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त पुस्तकरूपी "संविधान प्रतिकृती ९.९४ मीटर जिचा गिनीज बुक मध्ये समावेश करण्यात आला आहे, ती पाहिली.मग त्या भव्य प्रांगणात आलो जिथे फेस्टिव्हल भरले होते.इथे पंतप्रधान मोदी, मुख्यमंत्री फडणवीस यांचे आउटलेट छायाचित्रं काढण्यासाठी होते. आत गेल्यावर अनेक प्रसिद्ध प्रकाशनाची पुस्तके पाहून खूप आनंद झाला.इतकी पुस्तक पाहून कोणती घेऊ कोणती नको असं झालं. पहिल्याच पुस्तकाच्या स्टॉलवर पुस्तक पाहत चाळत होते.दुसऱ्या ठिकाणी हेच ,वेळेचे बंधन नसल्याने माझा नवरा आणि मुलगी मला टाटा करून पुढे निघून गेले.अनेक पुस्तकं जी नगरात पाहायलाही मिळत नाही ती जवळपास सर्वच पाहिली.इंग्रजी पुस्तकेही बरीच होती,तिथे गर्दीही भरपूर होती.मी प्रामुख्याने गीतारहस्य(लोकमान्य टिळक) पुस्त,पैशाचे मानसशास्त्र(मराठी , इंग्रजी दोन्ही भाषेत घेतले),हस्ताचा पाऊस(माडगूळकर),ज्ञानदेवा तिथे समाधी(राहूल देशपांडे), संस्कृती (इरावती कर्वे) , बिझिनेस महाराजा इत्यादी पुस्तके घेतली.थोड्या वेळाने लेकीची परत भेट झाली .तीला देखील पुस्तकांची गोडी निर्माण व्हावी म्हणून मुद्दामाहून आणले होते.ते सफलही झाले कारण घरी असलेली अनेक पुस्तके तिने ओळखून "आई हे आपल्या घरी हे पुस्तक आहे" असं सांगितलं :).रा.चि.ढेरे, कुरुंदकर ,इरावती कर्वे अशा अनेक आवडत्या लेखकांची सर्व अज्ञात पुस्तकेही पाहायला मिळाली.इथे सातवाहन गाथा सप्तशती पाहायला मिळाले.पण आता खुप उशीर झाला होता १२-४ असा वेळ इथे होते.एक तरी लेखक भेटतील अशी आशा होती पण ते घडलं नाही. फर्ग्युसन महाविद्यालय पाहत फिरत बाहेर आले.बाप लेकीने आधीच पोटोबा फुल्ल केला होता.जवळच वैशाली,वाडेश्वर आहे हे माहिती होतं.पण खूप दमलो होतो समोर ' रौनक' पावभाजी होती तिथेच गेलो.मस्त झाडांच्या सावलीत टेबल होते.पुण्यातलं पहिले १९६७ साली पावभाजीचे हे रेस्तराँ आहे असं तिथे लिहिले होते.पुण्याची पावभाजी तिखट नसणार म्हणून त्यांना तिखट द्या असं मुद्दामहूनच सांगितले.खुपच सुंदर सजवलेली (प्रेझेंटेशन)पावभाजी आणि बरोबर तिखट लसूण आलं सरबरीत चटणी,तिखटातला चिरलेला कांदा बरोबर आला.इतकी छान सर्व्हिस पाहून छान वाटलं.पुण्यात गोष्टींची 'गुणवत्ता' हाच महत्त्वाचा निकष परत दिसला.एफसी रोडवर जरा फेर फाटका मारून परत घरी निघालो. ई उ क च थ

In reply to by Bhakti

रामचंद्र Mon, 12/23/2024 - 22:05
वाचन ही शांत वातावरणात चालणारी प्रक्रिया आहे याचे थोडेसुद्धा भान आयोजकांना नसावे याचे वाईट वाटले. संध्याकाळच्या वेळेस तिथं जावं तर तिथंच चाललेल्या संगीताच्या कार्यक्रमामुळं कानठळ्या बसत होत्या. अर्थात एकंदरीतच आयोजनाच्या बाबतीत उत्सवी वातावरणात वाचनसंस्कृतीचे भान ठेवून शांत वातावरण, डोळ्याला त्रासदायक होणारा प्रखर प्रकाश टाळणे अशा गोष्टींची अपेक्षा करणं जरा जास्तच होतं याची पुरेशी जाणीव झाली आहे. बाकी हिंदी पुस्तकांच्या तसेच मराठवाड्यातल्या, तितकेसे प्रसिद्ध नसलेल्या स्टॉलवरही वेगळी, वाचनीय पुस्तकं पहायला मिळाली याचा आनंद आहे.

In reply to by Bhakti

Bhakti Fri, 03/21/2025 - 22:45
वाचाल तर आनंदी होणार अ सकाळ पुस्तक महोत्सव २०२५, अहिल्यानगर. पुणे बुक फेस्टिवलच्या धर्तीवर अगदी भव्य नाही पण बरेचसे मोठे , चांगली पुस्तके असणारे पुस्तक महोत्सव नगरमध्ये २१-२४ मार्च दरम्यान भरले आहे.पुढचे काही दिवस व्यस्त असल्यामुळे आजच फेरफटका मारला. नेहमीप्रमाणे पुस्तकाच्या दुकानात,प्रदर्शनात मला वेळेचे भान उरत नाही.तेव्हा तू एकटीच जा असं घरून सांगण्यात आले,फक्त मोबाईलची बॅटरी संपायच्या आधी घरी ये असंही सुनावण्यात आले. लोकप्रिय साहित्यिकांची पुस्तके ऑनलाईन सहज मिळतातं पण अशा प्रदर्शनात नवे पुस्तक समजतात.पुस्तकांना हातात घेऊन,पाने चाळत, अनुक्रमणिका पाहत ते पुस्तक घेणं निराळं सुखच असते. कादंबरी मी वाचनालयातून मिळालेल्या पुस्तकांतून वाचते. तेव्हा संस्कृती, अध्यात्मिक, वैज्ञानिक, समाजजीवन, निसर्ग,इतिहास,भटकंती विषयांची पुस्तके घेण्याकडे कल असतो. तरीही आनंद नाडकर्णी, ग्रेस, अच्युत गोडबोले,जयवंत दळवी,नरहर कुरुंदकर,नरेंद्र दाभोळकर यांची काही पुस्तके हेरुन ठेवली आहेत,लवकरच घेईन. मी घेतलेली अनवट पुस्तके- १.येई परतुनी ज्ञानेश्वरा' आज मला नवीन लेखक समजले डॉ.रा.श्री.मोरवंचीकर डॉ. रा. श्री. मोरवंचीकर आजही ज्ञानदानाच्या पवित्र कार्यात अखंड नंदादीपासम तेवत आहेत. त्यांनी 'येई परतुनी ज्ञानेश्वरा' हा मराठी लोकमानसाच्या जिव्हाळ्याचा ग्रंथ अध्यायनिहाय अनेक अंगांनी उलगडला आहे. त्यातील सचित्र ओव्यांचे मार्मिकपणे केलेले निरूपण पाहून त्यांच्या ज्ञानेश्वरांप्रती असलेल्या उत्कट प्रेमाचा अनुभव दिसतो. २.निसर्गायण दुसरे नव्याने समजलेले लेखक निसर्ग आणि विकास अभ्यासक दिलीप कुलकर्णी . पर्यावरणाची समस्या ही अशा प्रकारे बाह्य निसर्गातील असली, तरी तिचं मूळ आहे आपल्या मनोवृत्तीत -आपल्या विचारांत. आपली भोगवादी वृत्ती, हाव, आक्रमकता ही या समस्येला कारणीभूत आहे आणि केवळ ही एकच नव्हे, तर शस्त्रस्पर्धा, दुर्बलांवरचे अत्याचार, गुन्हेगारी, व्यसनाधीनता, मानसिक तणाव, स्वैराचार अशा अनेक समस्या त्याच मनोवृत्तीमुळे आपल्यासमोर उभ्या ठाकल्या आहेत.आधुनिक पाश्चात्त्य विज्ञान आणि प्राचीन पौर्वात्य तत्त्वज्ञान यांच्या आधारे या बदलाची दिशा शोधणारं हे पुस्तक. ३. थर्ड ॲंगल हे छोटेखानी पुस्तक हटके विषयावर म्हणजे ' थिअरॉटिकल मित्राने प्रॅक्टिकल क्लबमध्ये केलेली भाषणे एक वैचारिक अनोखा अनुभव आहे. मनाची नित्य नाव पुस्तकाच्या पानांनी वल्हवली जातात मग आयुष्याचा भवसिंधु सहज तरुन जातो ज्ञान सागराची ओढ अजुनच सहज पूर्ण होते... -भक्ती

कंजूस Mon, 12/23/2024 - 06:56
अरे वा! पुस्तक प्रदर्शन गाजलं. आता दरवर्षी होईल. तुमच्या मुलीसाठी पर्वणीच. ( आउटलेट छायाचित्रं काढण्यासाठी होते.= कटाउटस) फार पूर्वी मुंबईत (आझाद मैदान) आणि दिल्लीत ( प्रगती मैदान) येथे मोठे पुस्तक प्रदर्शन आलटून पालटून एक वर्षाआड होत असे. नंतर मुंबईतील बंदच झाले. मग छत्रपती टर्मिनस जवळचा खाजगी बुक स्टॉल आशिष दरवर्षी प्रदर्शन भरवून लागला सुंदराबाई हॉलमध्ये. पण मराठी पुस्तके नसत ( ती साहित्य संमेलनांत अधिक). अक्षर वाङमय यांनी काही वर्षे प्रदर्शने भरवली. माझ्या दृष्टीने पुस्तकं चाळायला मिळणे महत्त्वाचे कारण विकत घेत नाही. विकत आणून नंतर करायचे काय हा प्रश्न असतो. तरी भाषा शिकण्यासाठीची पुस्तके घेतो ती संग्रही आणि संदर्भासाठी कायम लागतात. स्थानिक नगरवाचनालयात काही वाचायला मिळतात. पण मोठी बाडं कधीच येत नाहीत. स्थानिक प्रकाशकांनी एक होऊन एक कायमची तारीख किंवा आठवडा प्रदर्शन भरवण्यासाठी निश्चित केला तर वाचकांच्या कायम लक्षात राहील. उदाहरणार्थ डिसेंबरचा दुसरा आठवडा.

In reply to by कंजूस

Bhakti Mon, 12/23/2024 - 08:15
सॉरी,माझी भयानक डिक्शनरी ;) =)(कटआऊट)
माझ्या दृष्टीने पुस्तकं चाळायला मिळणे महत्त्वाचे कारण विकत घेत नाही. विकत आणून नंतर करायचे काय हा प्रश्न असतो. तरी भाषा शिकण्यासाठीची पुस्तके घेतो ती संग्रही आणि संदर्भासाठी कायम लागतात.
खरं आहे,अशा मोठ्या प्रदर्शनात खुप पुस्तकं पाहायला ,चाळायला मिळतात हे महत्त्वाचे.माझा पुस्तक घेण्यासाठी हव्यास होता त्यामुळे बजेट संपल्यावर पुस्तक फक्त पाहण्याचं ऑड वाटू लागले.पुढच्यावेळी जरा याबाबत सतर्क राहीन ;) होय लेकीसाठी हळूहळू एम एच १२ केंद्रबिंदू (पर्वणी) तयार करणार आहे!

In reply to by Bhakti

मुक्त विहारि Mon, 12/23/2024 - 08:20
हे पुस्तकं खरेदी करण्यासाठी उत्तम ठिकाण आहे. आणि डोंबिवली हे केंद्रस्थानी असल्याने, डोंबिवली येथे उत्तम पुस्तके मिळतात.

In reply to by मुक्त विहारि

कर्नलतपस्वी Mon, 12/23/2024 - 09:41
बुकगंगा,अक्षरधारा,ॲमेझोन सारख्या संस्थळावर पुस्तके स्वस्त आणी घरपोच येतात. मागील वर्षापेक्षा या वर्षी अधिक चांगले प्रदर्शन होते.

श्रीरंग_जोशी Mon, 12/23/2024 - 10:18

In reply to by श्रीरंग_जोशी

अरेरे. उशीर झाला. पहिला प्याला बर्‍याच वर्षांपूर्वी पिऊन झाला आहे :(

In reply to by श्रीरंग_जोशी

कर्नलतपस्वी Mon, 12/23/2024 - 11:47
होळी, वजा तीस तापमान. शेवटचा प्याला मार्च १९९९,प्रसंग मारूती आठशे पहिली चार चाकी घेतली. व्यसनाधीन झालो का ?नाही, प्रत्येकाच्या इच्छाशक्ती वर आवलंबून. दारू पिली पाहीजे असे काही नाही. पण अती परिचयात अवाज्ञा तद्वत दारूला डोक्यावर चढवून नये. अर्थात माझे मत.

In reply to by कर्नलतपस्वी

कंजूस Mon, 12/23/2024 - 12:21
बरोबर. रोज थोडी थोडी घरीच घ्यावी म्हणजे त्यातली गंमत सामान्य होते. आणि कधी प्रसंगाप्रमाणे जे पितात भरपूर तसं होत नाही. कितीही कोणतेही दारूचे ब्रांड आले तरी बेसिकली अल्कोहोल अमुक टक्के यापलिकडे काही नाही. तांदुळाचेही तसेच आहे पंधरा रुपये ते सातशे पन्नास रुपये किलोचा असो त्यांचे पोषणमूल्य समानच असते. सगळे पॉलिश केलेलेच असतात. हातसडीचे कुठे मिळतात?

In reply to by कंजूस

कर्नलतपस्वी Mon, 12/23/2024 - 17:26
ये इंतजार गलत है के शाम हो जाये जो हो सके तो अभी दौर-ए-जाम हो जाये मुझ जैसे रिंद को भी तूने हश्र मे या रब बुला लीया है तो, कुछ इंतजाम हो जाये हुई महँगी बहत ही शराब, के थोड़ी-थोड़ी पिया करो पियो लेकिन रखो हिसाब, के थोड़ी-थोड़ी पिया करो

In reply to by कर्नलतपस्वी

कर्नलतपस्वी Mon, 12/23/2024 - 17:45
कौन कहता, अंगुर की बेटी गलत है अंगुरके दामाद को बस इसकी लत है इसके साथ कुछ गम गलत करता है तो बेरहम जमाने क्या जाता है,अगर... वो उसके साथ कुछ पल बिताता है

In reply to by श्रीरंग_जोशी

कंजूस Mon, 12/23/2024 - 12:23
सर्व विषे कमी प्रमाणात औषधेच असतात. अगदी तंबाखू, चहा, अफू,अर्सेनिक सुद्धा.

कंजूस Mon, 12/23/2024 - 12:39
आशिष बुक स्टॉल छत्रपती टर्मिनस जवळचा खाजगी बुक स्टॉल आशिष दरवर्षी प्रदर्शन भरवू लागला सुंदराबाई हॉलमध्ये. यांच्या पुस्तक प्रदर्शनात भेटी दिल्यावर एक लक्षात आलं की यामध्ये पुस्तके कोण घेतो. इंटिरिअर डेकोरेशनचा व्यवसाय करणारे मुंबईत बरेच आहेत. ते इकडे फिरतात. भरपूर रंगीत चित्र असलेली जाडजूड पुस्तके तिथे निम्म्या किंमतीत असतात. ती त्यांना हवी असतात नवनवीन फर्निचरच्या डिझाइनसाठी. शिवाय गार्डनिंग लेआउटचीही असतात. आर्किटेक्ट नाही पुस्तके लागतात. मोठ्या बास्केट घेऊन फिरतात आणि भराभर पुस्तके उचलतात. तरुण मुलं मुली इंग्रजी कादंबऱ्या विकत घेतात. काही महिला कुकींगची पुस्तके बघतात. आपण जी मराठी साहित्यातील कवितासंग्रह, कादंबऱ्या विकत घेतो त्याचा आनंद आठ दिवसांत संपतो. इतिहास,भाषा यांचे अभ्यासक पुस्तके घेतात ती त्यांच्या कामाची असतात. पण मग असा विचार येईल की वाचकांनी पुस्तके विकत घ्यावीत का? वाचनालयांनी घ्यावीत. म्हणजे महिन्याच्या फीमध्ये साहित्य वाचता येईल.

In reply to by कंजूस

मुक्त विहारि Mon, 12/23/2024 - 18:30
विना अनुदानित, वाचनालये आता ओस पडत चालली आहेत. डोंबिवली येथे एक फ्रेंड्स लायब्ररी सोडली तर बरीचशी वाचनालये बंद पडली आहेत. मानपाडा रोड वरील ३ वाचनालये, डोंबिवली पश्चिम येथील एक वाचनालय, midc मधील एक वाचनालय, ही काही ठळक उदाहरणे. रामनगर मधील एक वाचनालय आणि P ,& T मधील एक वाचनालय, फ्रेंड्स लायब्ररीच्या सहयोगाने चालतात. त्यापेक्षा पण भयावह स्थिती, अभ्यासक्रमा व्यतिरिक्त , पुस्तक विक्रेत्यांची आहे.... कालाय तस्मै नमः....

कंजूस Fri, 12/27/2024 - 06:03
गोवा पर्यटन/ कोकण/समुद्री पर्यटन गोरगावलेकर यांनी केलेल्या गोवा पर्यटनाचे धागे येत आहेत. त्यांचे अनुभव लिहित आहेत. तिसऱ्या भागात हिवाळी सहल, दक्षिण गोवा :भाग 3 : बटरफ्लाय बीच आणि लोलये-पैंगिण चे वेताळ गोवा आणि कोकण यांच्या पर्यटनाची तुलना फायदे तोटे यांची प्रतिसादांतून चर्चा फारच वाढली. ती इकडे करता येईल. धाग्यातली चर्चा इथे कॉपी पेस्ट करताही येईल पण तो त्या प्रतिसादकर्त्या लेखकांचा अधिकार आहे. मीही पूर्वी गोव्यावर एक धागा काढला होता ते आठवले. माझा समुद्र पर्यटन, खाणे पिणे वगैरेंचा आनंद फारच संकुचित आहे. तरी एकदा गोवा काय आहे म्हणून पाहण्यासाठी गेलो होतो. परतताना कुडाळहून( कोकण) आलो. एसटीचाच प्रवास त्यामुळे जमेल तेवढे पाहिले. गोव्याच्या पर्यटनाबद्दल ऐकले वाचलेले भारतातले आणि परदेशी पर्यटक इथे येतात. आनंद घेतात आणि पुन्हापुन्हा येतात. गर्दी वाढली की ट्रेनची तिकिटे मिळत नाहीत. विमान आणि हॉटेल्सचे भाडी दर वाढतात. परवडण्याच्या पलिकडे जातात. तरीही पसंती असते. कोकण ( महाराष्ट्रातला) याबद्दल श्री.ना. पेंडसे किंवा जयवंत दळवी किंवा इतर लेखकांच्या कथा कादंबऱ्यांतून मराठी वाचकांना माहीत झालेला असतो. तो खरंच कसा आहे हे पहाण्यासाठी ठाणे,रायगड, सिंधुदुर्ग जिल्हेसोडून उर्वरित महाराष्ट्रातील दूरच्या ठिकाणांहून पर्यटक येतात. त्यात किहीम, अलिबाग, श्रीवर्धन,हर्णे मुरुड, रत्नागिरी परिसर, देवगड, मालवण, देवबाग ही ठिकाणे येतात. कोकण आणि गोव्याप्रमाणेच कर्नाटकातील २६० किमी किनारपट्टीवरही कारवार,गोकर्ण, मुर्डेश्वर, उडुपी, मंगळुरू ही ठिकाणं आहेत. तीही पाहिली. हॉटेल्स(राहाणे आणि खाणे शाकाहारी तसेच मासाहारी), बसप्रवास यादृष्टीने फारच चांगल्या सोयी आहेत. शिवाय किनारपट्टीसोडून वरती घाट चढून गेल्यावरही अनेक सुंदर ठिकाणी जाता येतं. मार्चपर्यंत वाहणारे धबधबे आहेत. इथल्या लोकांना पर्यटक येण्याची सवय आहे. त्यांचा त्रास वाटत नाही . तुसडेपणा नाही. मला कर्नाटक पर्यटन फार आवडले आणि पुन्हा जावेसे वाटते. किनारे स्वच्छ चांगले आहेतच शिवाय नद्याही बारमाही पाणी वाहणाऱ्या आणि अतिशय स्वच्छ पाण्याच्या आहेत. नदीकिनारी जी धार्मिक स्थळे आहेत ती निसर्गसौंदर्याने अधिकच चांगली वाटतात. सह्याद्रीचा सुंदर निसर्ग पाहावा तर इथेच. उडुपी आणि मंगळुरू येथे समुद्र पर्यटन आणि मत्स्याहारही खूप प्रचलित आहे.

In reply to by कंजूस

गवि Fri, 12/27/2024 - 08:33
https://www.youtube.com/embed/Jhsq0fdiEq0 गोवा पर्यटन मंत्री यांची मुलाखत. ही सोशल मीडियावर सर्वत्र सुरू झालेली चर्चा हा चुकीच्या (चायनीज) आकडेवारीवर आधारित एक प्रोपागांडा आहे असे त्यांचे म्हणणे त्यांनी इथे मांडले आहे.

In reply to by कंजूस

गोरगावलेकर Fri, 12/27/2024 - 12:16
गोरगावलेकर यांनी केलेल्या गोवा पर्यटनाचे धागे येत आहेत. त्यांचे अनुभव लिहित आहेत. धाग्याच्या पहिल्या भागात आम्ही मडगाव स्टेशन ते कोलवा बीच पर्यंत प्रवास केला होता . स्टेशनच्या बाहेरच प्रीपेड टॅक्सी मिळाली . टॅक्सिवाल्यांचा कथित मुजोरपणा दिसला नाही . दुसऱ्या भागात कोलवा ते पाळोळे पर्यंत प्रवास केला . पर्यटन स्थळे बघत जात आम्ही जवळपास पूर्ण दिवस घेतला व त्यात पाच - पंचवीस किमी अंतर जास्त झाले त्याचे वाढीव पैसेही दिले . किती खर्च येतो हे कळावे इतकाच लिहिण्यामागचा उद्देश . आज कुठल्या शहरात स्विफ्ट डिझायरचे संपूर्ण दिवसासाठी ३ १ ० ० /- रुपये भाडे असेल ? ड्रायव्हरचा पगार , गाडीची देखभाल दुरुस्ती, इंधन खर्च जाऊन मालकाच्या हातात कितीसे पैसे जातील ? कोला बीचला जातांना अगदी ओबड धोबड रस्त्यावरून गाडी गेली . स्वत : ची गाडी नेतांनाही विचार करावा लागेल असा रस्ता . कुठलीही कुरकुर न करता शक्य होतील ती ठिकाणे दाखवली . येथेही गाडीवाल्यांचा कथित मुजोरपणा दिसला नाही .

In reply to by गोरगावलेकर

गवि Fri, 12/27/2024 - 13:15
मुजोर म्हणजे बोलण्यात अशा अर्थाने नसावं. पण अतिरिक्त मनाला येईल तितके पैसे मागणे हे अनेकदा घडते. पूर्ण दिवसाचे ३१०० इतकेच घेतले असतील तर तुम्हाला नशिबाने चांगले डील आणि व्यक्ती लाभली. एरवी कोपऱ्यावर सोडून यायचे सहाशे (हे उदाहरण मे २०२४ मधलं, ऑफ सिझन काळ. अंतर दोन ते तीन किमी. पार्किंग नसल्याने टॅक्सी मागवावी लागली होती.). नुसती चौकशी केली होती तेव्हा, दाभोळी एअरपोर्ट ते अगोंद वन वे नुसते ड्रॉप करण्याचे ऑफ सिझन २००० आणि सिझन मध्ये ३५०० ते ४०००. तुलनेसाठी असे पाहा की मुंबईहून गोव्याचे विमान तिकीट देखील कधी कधी याहून कमी असते. वार्का ते काबो द राम किल्ला आणि परत इतक्या अंतराचे हॉटेलशी संलग्न टॅक्सीवाल्यांनी सुमारे आठ वर्षांपूर्वी तीन हजार घेतले आणि वरून टिप मागितली. वाटेत कुठे थांबायला देखील तयार नव्हता. नव्वद टक्के वेळा मुंबईपासून स्वत:ची कारच घेऊन जाणे किंवा एअरपोर्टवर उतरताच पूर्ण मुक्कामाइतकी सेल्फ ड्राईव्ह कार घेणे हे दोन उपाय करून ही समस्या आता सोडवली आहे. बाय द वे, गोव्यातील स्थानिक लोक कोंकणी भाषेच्या सवयीनुसार एकेरीत अरेतुरे करत बोलतात आणि त्या स्टाईल मुळे काही वेळा बाहेरील लोकांना ते अशिष्ट उद्धट उगीचच वाटू शकतात.

In reply to by गवि

कंजूस Fri, 12/27/2024 - 14:58
सहमत. खाजगी वाहनाशिवाय तसेच भाड्याच्या वाहनाशिवाय जमेल तेवढे फिरणे आणि आनंद मानणे हेच आमचे ध्येय असते. त्यामुळे काही त्रास /संताप होत नाही. शेअरिंग साठी कुणाला तयार करणेही नाही. म्हणजे अगदीच घरी कॉटवर पाय हलवत गप्पा मारण्यापेक्षा चार ठिकाणं पाहाणे बरे या रुळावर आमची गाडी सुसाट धावते. शिवाय खरेदी करायची नाही हे ठरवूनच टाकले आहे. आमचा गाईड लोनली प्लानेट पुस्तक " India travel survival kit " - Tony Wheeler and others.

In reply to by गवि

टर्मीनेटर Sun, 12/29/2024 - 13:08
"पूर्ण दिवसाचे ३१०० इतकेच घेतले असतील तर तुम्हाला नशिबाने चांगले डील आणि व्यक्ती लाभली."
काशिनाथ नाडकर्णी : "तो कोकणांतला असला पाहिजे अंऽऽऽ..." कोचरेकर मास्तर : "पाहिलंत? पाहिलंत... माणुसकी नाही.. नाही म्हणतात ना?... ही घ्या माणुसकी! प्रवासात काय अनुभव येतील सांगता येत नाही. वास्तविक असल्या ह्या लोकांचे जाहीर सत्कारच करायला पाहिजेत. त्याचे नाव, नंबर वगैरे आपण टिपून घ्यायला पाहिजे होता नाही का..."
"एरवी कोपऱ्यावर सोडून यायचे सहाशे (हे उदाहरण मे २०२४ मधलं, ऑफ सिझन काळ. अंतर दोन ते तीन किमी. पार्किंग नसल्याने टॅक्सी मागवावी लागली होती.). नुसती चौकशी केली होती तेव्हा, दाभोळी एअरपोर्ट ते अगोंद वन वे नुसते ड्रॉप करण्याचे ऑफ सिझन २००० आणि सिझन मध्ये ३५०० ते ४०००."
सोकाजीनाना त्रिलोकेकर : "ए नाडकर्णी, बघ... बघ! बघ लेका तुझा कोकणातला व्हिक्टोरिया (टॅक्सी) वाला... " काशिनाथ नाडकर्णी : "तो कोकणांतला असणंच शक्य नांयऽऽऽ... अहो तो कोकणात व्हिक्टोरिया (टॅक्सी) चालवायला शिकणार कुठून मला सांगा बघू आंऽऽऽ... कायत्तरी काय? आमच्या कोकणातले म्हणजे सगळे बैल..." 😀 भ्रमण मंडळ - बटाट्याची चाळ गोव्याला असंख्य वेळा जाउनही तिथल्या सार्वजनीक वाहतुक व्यवस्थेचा आणि टॅक्सीवाल्यांचा मला फारसा अनुभव नाही. ह्या वर्षीच्या जानेवारी महिन्यात दोना पावला येथील मुक्काम असलेल्या 'इंटरनॅशनल सेंटर गोवा (ICG)' येथुन त्यांच्याचतर्फे संध्याकाळी तिथुन सुमारे सात किमी अंतरावर असलेल्या कॅसिनो पर्यंत जाउन मध्यरात्री तिथुन परतण्यासाठी घेतलेल्या टॅक्सी सेवेसाठी त्या टॅक्सीवाल्याने (आधीच बोलणी केल्याप्रमाणे) संध्याकाळी जाताना ड्रॉप साठी ३०० रुपये आणि मध्यरात्री तिथुन निघताना फोन करुन बोलवल्यावर पिक-अपसाठीचे ५०० रुपये असे जाउन-येउन एकुण ८०० रुपये घेतले होते. मध्य्ररात्री १:३० च्या नंतर फोन करुनही तो सांगीतल्याप्रमाणे परत न्यायला आला होता हे विषेश! असो, मिपाकरांना त्याठिकाणी आलेले टॅक्सीवाल्यांचे वेगवेगळे, बरे-वाईट अनुभव वाचुन माहितीत भर पडत आहे 👍

In reply to by गोरगावलेकर

विमानतळावरून आपल्या हॉटेलवर किंवा आपल्या हॉटेलवरून विमानतळावर जायचे असेल तर टॅक्सीवाल्यांचे अवाच्या सवा दर आहेत याचा मला तरी अनुभव आला नव्हता. आम्ही गोवा विमानतळापासून सगळ्यात लांब राहिलो होतो अगोंद आणि पाटणेला. दोन्ही ठिकाणी जायला विमानतळाहून १८०० रूपयात प्रीपेड टॅक्सी मिळाली होती. अर्थात ही अनुक्रमे २०१७ आणि २०१८ ची गोष्ट. सध्याचे दर किती हे माहित नाही. मात्र दोन्ही ठिकाणे दाबोळी विमानतळाहून साधारण ६०-६५ किलोमीटर अंतरावर आहेत. अंतर ध्यानात घेता तो दर अवाजवी जास्त आहे असे वाटले नव्हते. विमानतळावर समजा प्रीपेड टॅक्सी असते आणि त्यांना ठरवून दिलेले दर आहेत तितकेच घ्यावे लागतात. पण परतीच्या प्रवासात हॉटेलवरून विमानतळावर जातानाही टॅक्सीवाल्याने तेवढेच पैसे घेतले होते. अगोंदहून परत येताना आमचे विमान रात्रीचे होते त्यामुळे दाबोळी विमानतळावर रात्री साडेनऊच्या सुमारास पोचलो होतो. त्या वेळेस विमानतळावरून भाडी मिळत असतील की नाही शंकाच आहे कारण त्यावेळेनंतर फार विमाने येत नाहीत. तरीही त्याने जास्त पैसे घेतले नव्हते. टॅक्सीवाले अवाच्या सवा दर लावतात ते हॉटेलबाहेर साईटसिईंगला जाणार्‍यांकडून. वारकामध्ये आम्ही उतरलो होतो वारकाला आमच्या हॉटेलच्या बाहेर पर्यटकांसाठी म्हणून एक टॅक्सी स्टॅन्ड होता. तिथून मडगाव फार तर १०-१२ किलोमीटरवर होते. काजू आणि बेबिंका अशा गोष्टी घ्यायला मडगावला जायचे होते तेव्हा हॉटेलबाहेरील टॅक्सीवाल्यांनी जाऊन येऊन २७०० रूपये सांगितले होते. आणि ही गोष्ट २०१२ ची होती म्हणजे आणखी जुनी. ही अक्षरशः लूट होती. मला वाटते तिथे जास्त गोरे पर्यटक येतात आणि परदेशी पर्यटकांना अवाच्या सवा दर लाऊन लुटणे हा प्रकार नाही म्हटले तरी सगळीकडे होतोच. जर ते गोरे पर्यटक असे वाढीव दर द्यायला तयार होत असतील तर टॅक्सीवाल्यांना बहुदा आम्हा भारतीय पर्यटकांची गरज नसावी. त्यामुळे यायचे असेल तर या दरात या नाहीतर येऊ नका असा त्यांचा दृष्टीकोन होता.

श्रीरंग_जोशी Sun, 12/29/2024 - 01:44
गेल्या काही महिन्यांपासून माझी पत्नी सौरभ बोथरा यांच्या ऑनलाइन योगासन वर्गांना उपस्थिती लावत आहे. मी देखील महिन्याभरापासून सुरुवात केली आहे. शीर्षकात जरी केवळ योग असले तरी, योगासनांखेरीज, इतर कार्डिओ व श्वसनाचे व्यायाम, प्राणायम व थोडेफार ध्यान यांचाही या वर्गांत अंतर्भाव असतो. रोज युट्युब लाइव्ह द्वारे भाप्रवे नुसार सकाळ व संध्याकाळी हे वर्ग चालतात. सूचना सहजपणे समजतील अशा असतात व स्क्रीनवर पाहून आपण ते व्यायामप्रकार करू शकतो. ६ जानेवारीपासून तीन आठवडे या वर्गांचा नि:शुल्क लाभ घेता येईल - त्यासाठीचा दुवा. या वर्गांना काही दिवस उपस्थिती लावल्यावर, असे वर्ग आपल्याला काही वर्षे अगोदर का नाही मिळाले अशी भावना आमच्यासह बहुतेकांच्या मनात निर्माण झाली आहे / होत असते.

In reply to by श्रीरंग_जोशी

कंजूस Sun, 12/29/2024 - 04:00
ती साईट पाहिली. नोंदणी केली नाही. उपक्रम आणि ओनलाइन आहे हे बरे. काही शाळांत योगासने शिकवतात बहुतेक. आमच्या शाळेत शिकवली होती. पाचवी पासूनच . लहानपणी केली नाही तरी चालतात. कारण तेव्हा वाढते तरुण वय असते. पण नंतर कधी करायची झाल्यास छोट्या पुस्तिका विकत मिळतात त्या पाहिल्या की काही सोपी रोज करण्याची आसने दहा बारा आहेत ती करता येतात. चीनमध्ये तिथल्या बागांत ( parks) ६०+, ८५+ वयोगटातील नागरिकांसाठी काही त्यांच्या पद्धतींचे व्यायाम प्रकार करणारे करवून घेणारे गट असतात. त्यांचे काही विडिओ मी मागे पाहिले होते ( dwtv channel documentaries बहुतेक.) त्यांचे व्यायाम प्रकारही खूप चांगले वाटले. विशेषतः शरीराची रोजची हालचाल करण्यासाठीचे ते सराव आहेत. वरील दोन वयोगटांच्या वयाप्रमाणे हालचालींचा वेग वेगळा दिसला. इकडच्या काही बाबा लोकांचे योग प्रकार मला काही आवडले नाहीत. अतिरंजीत वाटले. ....... वजन कमी करणे/ हालचालींसाठी सराव/ रोग नियंत्रण/ मानसिक समाधान शांती यांपैकी एक किंवा सर्व असा काही झोल योगासनांमध्ये घालण्याचा खटाटोप दिसतो हे माझे मत.

Bhakti Sun, 12/29/2024 - 14:44
हरारीची मुलाखत रणवीरने घेतली.हरारी माझा आवडता विचारवंत आहे.तो भारतात नेक्सास' पुस्तक प्रकाशित करण्यासाठी आला होता.तेव्हा अनेकांना त्याच्याबरोबर मुलाखती घेतल्या. १. https://youtu.be/eNVtYPgJ6b0?si=3VfqDjCcx6_lYjk2 २. https://youtu.be/6x4UgHI7qbk?si=_Iz_eP9HF7SYH-ZM दुसरी मुलाखत अजून ऐकायची आहे. पहिली मुलाखत रणवीरने घेतली आहे.AI हा हरारीचा १० वर्षांपूर्वी पासूनचा विषय आहे.जो AI वर वरचढ होईल तोच पुढच्या काळात जगावर राज्य करणारे.इथे रशिया,ट्रम्प यांचा वर्चस्ववादी भूमिकेचा त्याने चांगला समाचार घेतला आहे.अमेरिकासारख्या बलाढ्य देशाने,लीडरने जगाच्या शांततेचा विचार आधी केला पाहिजे तरच माणूसकी टिकेल असं त्यांचं म्हणणं आहे.रणवीरचा शो म्हटला की तो स्पिरिच्युलिटीवर समोरच्याला बोलायला लावणारच हे ठरलेलं आहे 😀 त्यात हरारी विपश्यनेचा साधक आहे. पण हरारी म्हणतो कोणीही कोणाला दोन ,तीन तास ध्यानाला बसा हे म्हणणं सोपं आहे.पण पंधरा मिनिटे तरी केवळ स्वतःच्या आता बाहेर जाण्याऱ्या श्वासावर लक्ष केंद्रित करा.इतर कोणताच विचार डोक्यात आणायचा नाही,हे सांगितले तर कोणालाच हे फारसं जमणार नाही.यासाठी खुप तयारीच हवी.मेडिटेशन कसं करायचं, कोणतं करायचं हे ज्याचं त्यालाच ठरवू द्या.उगाच मेंढ्याचा कळप करण्यात अर्थ नाही. युद्ध करावं की नाही याबाबत त्याचं मत मला गोलगोल वाटलं,आधी तो म्हणाला मिलिटरी वर ५०% हून अधिक खर्च चिंताजनक आहे नंतर म्हणाला इस्राएल आणि भारताने ज्या चुका रोमन व मुस्लिम+ब्रिटिश आक्रमणाच्या काळात सैन्य ताकद वाढवण्यावर भर देतात केली ती त्यांना आता करणे अजिबात परवडणारं नाही👏

In reply to by Bhakti

कंजूस Sun, 12/29/2024 - 15:53
मराठी किंवा कुणीही. आंतरराष्ट्रीय मते राजकीय/ सामाजिक / धार्मिक ही नेहमी ती व्यक्ती कोणत्या डोक्यातली आहे त्याप्रमाणे एकांगीच असतात. विरुद्ध गटाचा साधा उल्लेखही नसतो. तर काहींची प्रसिद्ध केलेली व्यक्तव्ये त्यांच्या देशाच्या राजकीय दडपणाखालीही असतात.

कंजूस Tue, 12/31/2024 - 20:43
पहिला काचेचा पूल काल कन्याकुमारी, तमिळनाडू इथे असलेल्या विवेकानंद स्मारक आणि तिरुवल्लूवर पुतळा या दोन ठिकाणांमध्ये काचेचा पूल उभारला त्याचे उद्घाटन झाले. hindustan times बातमी

कंजूस Fri, 01/03/2025 - 11:27
खरडफळ्यावर विषय निघाला म्हणून......... गुजरातचे सुंदर समुद्र किनारे आणि पर्यटन. फार प्रचलित नाही तरीही थोडक्यात... गुजरातध्ये {सूरतजवळच्या} हजिरा येथे आणि जामनगर येथे दोन मोठे रासायनिक प्रकल्प ( भारतीय कंपन्या, रिलायन्स) अगोदरच आहेत. सूरतजवळच्या दहेज बंदरातून - घोघा पलिकडे जाऊन भावनगरला काही जण जातात. धार्मिक पर्यटन. दीवचा किनारा पर्यटनासाठी आहे. तिथून वेरावळ - सोमनाथ आहे. पण धार्मिक महत्त्व आणि मासेमारी. दमणचा किनारा काळा आहे. मासेमारी बोटींच्या डिझेलमुळे. जवळचा परिसर दारूबार आणि इतर इलेक्ट्रॉनिक्स मार्केटसाठी पूर्वी प्रसिद्ध होता. आता त्याचे महत्त्व उरले नाही. तरीही दमण- वापी- दादरा नगरहवेली- खानवेल ( गार्डन्स) अशी सहल होऊ शकते. द्वारका पोरबंदर समुद्र -धार्मिक पर्यटन अंकलेश्वर/अंकलेसर भरूच हे नर्मदा पर्यटनामुळे चर्चेत असते. गुजरात - महाराष्ट्र सीमेजवळचे डहाणू आणि बोर्डी येथे हॉटेल्स खूप आहेत. डहाणू-जव्हार- त्र्यंबकेश्वर -नाशिक - सापूतारा असाही सहल प्लान होऊ शकतो. गुजरात समुद्र किनारे थंडीतच ठीक. गरमा फार असतो. काही ठिकाणी रात्री चमकणाऱ्या लाटा दिसतात. मुंबई पुणे पर्यटकांसाठी कोकण, गोवा, कर्नाटक समुद्रच बरा.

In reply to by कंजूस

गवि Fri, 01/03/2025 - 14:19
दमण- वापी- दादरा नगरहवेली- खानवेल ( गार्डन्स) अशी सहल होऊ शकते.
दमण किनारे घाणेरडे. केमिकल आणि वास. अस्वच्छ. हल्ली काही भाग बांधून चौपाटी केली आहे असे ऐकले पण एकूण समुद्र घाण. खूप इंडस्ट्रीज. सिल्वासा कंटाळवाणे. सर्वसाधारण लहान शहर. उन्हाळ्यात तर अगदी नदी देखील कोरडी. तिथली वाटेतली लायन सफारी केविलवाणी. सापुतारा वगैरे हिल स्टेशन हा अधिक चांगला ऑप्शन आहे त्यापेक्षा.

In reply to by प्रचेतस

गवि Fri, 01/03/2025 - 15:50
आधी मद्य पिऊन मग कोणत्याही मार्केटमध्ये फिरायला मजाच येते. किंबहुना काळ्या समुद्रावर फिरायला देखील मजाच येते. :))

In reply to by प्रचेतस

गवि Fri, 01/03/2025 - 16:00
तुमच्या इतका जोरकस, प्रगाढ, वादळी, पावसाळी, ओलाकंच, इंटेंस अनुभव नसला तरी प्रवासाचा अंमळ थोडासा अनुभव आहे इतकंच..

In reply to by प्रचेतस

गवि Fri, 01/03/2025 - 16:09
सळसळत्या वाऱ्याने एखादा प्राजक्त थरथरावा आणि खालून जाणाऱ्या आपल्या तापल्या अंगावर गार दवबिंदूंचा पडलेला पाऊस हृदयाचे मधलेच चार ठोके चोरून जावा तशी अवस्था झालेली दिसते त्या आठवणींनी.

In reply to by गवि

प्रचेतस Fri, 01/03/2025 - 17:24
हो ना. अगदीच मोरपिशी अवस्था. बाकी तुमचे अनुभवही ह्याबाबतीत दांडगेच असणार म्हणा हे तुमच्या तरल शब्दांनी सहजच स्पष्ट होते.

In reply to by गवि

टर्मीनेटर Fri, 01/03/2025 - 16:55
वरच्या वाक्यात
"आधी मद्य पिऊन मग कोणत्याही मार्केटमध्ये फिरायला मजाच येते."
असे 'कोणत्याही मार्केटमध्ये' हे दोन शब्द ठळक करायचे राहुन गेले काय 😀 नीळा, हिरवा, पिवळा, तांबडाच काय पण 'मृत' समुद्रही जर कौतुकास पात्र ठरत असतील तर बिचाऱ्या 'काळ्या' समुद्राने असे काय कोणाचे घोडे मारले आहे? ('काळ्याशार' गोष्टीही आकर्षक असु शकतात 😉) तेव्हा घ्यावी की त्याच्यावरही फिरायची मजा 😂 बाकी 'काळ्या' वरुन सहज सुचलं म्हणून... काला रे सइयां काला रे तन काला रे मन काला रे काली जबान की काली गारी काले दिन की काली शामें सइयां करते जी कोल् बाज़ारी काला रे सइयां काला रे तन् काला रे मन काला रे काली जबान की काली गारी काले दिन की काली शामें सइयां करते जी कोल् बाज़ारी बैरी कोल् कोल् कोल् छीने तोल तोल तोल बैरी कोल् कोल् छीने तोल तोल तोल छत आँगन चार दिवारी सइयां करते जी सइयां करते जी सइयां करते जी सइयां करते जी सइयां करते जी कोल् बाज़ारी सइयां करते जी कोल् बाज़ारी काली मिटटी कुत्ता काला काला बिलकुल सुर्मे वाला काला कौवा हौवा काला काली मिटटी कुत्ता काला काला बिलकुल सुर्मे वाला काला कौवा हौवा काला काला बादल गिरने वाला काला मोती गिरने वाला काला झंडा डण्डा कला काला बटवा पैसा काला काली आँखों जैसा काला काली अग्नि काली गर्मी सूरज काला काला बीघा और गज काला काली हाथी हाथी काला काला बैरी कोल् कोल् कोल् छीने तोल तोल तोल बैरी कोल् कोल् छीने होल से टोल रंग पानी और पिचकारी सइयां करते जी पिया करते जी सइयां करते पिया करते जी काला रे सइयां काला रे तन काला रे मन्न काला रे काली जबान की काली गारी काले दिन की काली शामें सइयां करते जी कोल् बाज़ारी काला रे सइयां काला रे तन काला रे मन्न काला रे काली जबान की काली गारी काले दिन की काली शामें सइयां करते जी कोल् बाज़ारी. स्नेहा खानवलकर ह्या गुणी संगीत दिग्दर्शिकेने संगीतबद्ध केलेल्या 'गँग्स ऑफ वासेपूर २' मधल्या काला रे ह्या गाण्यात गीतकार वरुण ग्रोवर ह्यांनी इतक्या काळ्या गोष्टींचा उल्लेख केलाय, पण बिचारा 'काळा समुद्र' मात्र त्यात घ्यायचा राहून गेला बघा... 😎

In reply to by गवि

कंजूस Fri, 01/03/2025 - 14:46
खरंतर गुजरातला समुद्र पर्यटनाला जाऊच नये. औद्योगिकरणावर गुजरातने खूप भर दिला. नवसारीपासून पुढे वरती. मुंबई बाजारपेठ जवळ पडते. सापुतारा जरी महाराष्ट्रातील पर्यटकांना आवडत असले ( नाशिक जवळ) तरी गुजरातींना आवडत नाही. त्यांचे आवडते माथेरान महाबळेश्वर पाचगणी. मुंबई पुण्याला जवळची ठिकाणं पाहून झाल्यावर जरा बदल म्हणून दुसरीकडे काही आहे का याची चाचपणी करतात. पालघरच्य पश्चिमेला दहा किमीवर केळवे माहिम किनारा आहे. पालघर -मनोर - विक्रमगड- जव्हार- त्र्यंबकेश्वर - नाशिक या वाटेवर हल्ली 'गोवर्धन इको विलेज' मिनी वृंदावन ( इस्कॉनवाल्यांचं) हल्ली लोकप्रिय होत आहे. या मार्गावर बरीच रिसॉर्ट झाली आहेत. जव्हार मोखाडा भागातील वारली चित्रकला कमी होत आहे किंवा बाजारू होत आहे असं ऐकून आहे. सहलीच्या आराखड्यात/ मार्गावर चार पाच ठिकाणे असणे फायद्याचं ठरतं . एखादं नाही आवडलं कुणाला तर दुसरं सहल यशस्वी करतं.

In reply to by कंजूस

गवि Fri, 01/03/2025 - 15:54
केळवे किनारा तर लोकांनी घाणीने कचऱ्याने भरून टाकलेला दिसला. अगदी गेल्या वर्षात काही बदल झाला असेल तर माहीत नाही. लोक तिथे पिकनिक सारखा कार्यक्रम करून, बसून खाऊन प्लास्टिक प्लेट्स, खरकटे, उर्वरित अन्न असे सर्व जागीच टाकून उठत होते. किनाऱ्यावर हागणदारी होती. पार्किंग शुल्क किंवा तत्सम शुल्क वगैरे वसुली अवश्य होत होती पण स्वच्छतेच्या दृष्टीने काही दिसले नाही. पेड टॉयलेट होते. तेही अस्वच्छ. आपले सामान्य नागरिक देखील एकूण स्वच्छतेचा सेन्स कमी असलेले आहेत असेच वाटते सगळीकडे.

In reply to by गवि

कंजूस Fri, 01/03/2025 - 16:24
हं. नवीन अपडेट्स लक्षात ठेवायला हवेत. बाकी प्रचेतसकुमार चांगल्या जागा शोधतात. पण काहीच उघड करतात. BNHS वालेही चांगल्या जागा सांगत सुटत नाहीत. फेसबुकाच्या भिंती भरल्या की लोंढे तिकडेच जातात. राजमाची, कास पठार, सांधण, हरिहर.

टर्मीनेटर Fri, 01/03/2025 - 17:47
आपल्या सर्वांच्या माहितीतले मिपाकर लेखक 'कुमार१' हे काही कामानिमित्त मुंबईला येणार आहेत. त्या निमित्ताने सोमवार दिनांक ६ जानेवारी २०२५ रोजी संध्याकाळी ६ नंतर भायखळा येथे एक मिपा कट्टा करण्याचे ठरत आहे. सोमवारचा, म्हणजे कामकाजाचा दिवस असल्याने फार लांबुन कोणी येऊ शकणार नाहीत ह्याची कल्पना असल्यामुळे 'कट्ट्यासाठी' वेगळा धागा वगैरे काढलेला नाही, परंतु भायखळा परिसरात किंवा मुंबई उपनगरांत रहाणारे कोणी मिपाकर येऊ शकत असतील तर त्यांचे सहर्ष स्वागत आहे. (केवळ एकमेकांची सदिच्छा भेट आणि गप्पा-टप्पांचा कार्यक्रम एवढाच ह्या कट्ट्याचा मुळ उद्देश आहे 😀)

In reply to by टर्मीनेटर

कंजूस Fri, 01/03/2025 - 18:16
मुंबईत मिपाकर मोजून तीन चारच असतील. आणि त्यातून राणीबाग फुले प्रदर्शनाचे निमित्त साधले तर उत्तम.

In reply to by कंजूस

विजुभाऊ Sun, 01/05/2025 - 15:09
मुंबईत ( ठाणे डोंबिवली धरुन) किमान तीस एक मिपाकर सहज असतील. रामदास , शँपेन , क्लिंटन, प्रभू मास्तर , साक्षी , ज्योति अळवणी , मदनबाण असे बरेच आहेत.

In reply to by टर्मीनेटर

Bhakti Sat, 01/04/2025 - 11:34
कुमार १ आता मिपावर का लिहित नाही.त्यांना नक्की सांगा की तुमचे अभ्यासपूर्ण लेख मिपावर देत जा.

In reply to by टर्मीनेटर

Nitin Palkar Mon, 01/06/2025 - 08:18
या कट्ट्याला येतो असे कुमार१ यांना बोललो होतो. अचानक महत्वाचे काम निघाल्यामुळे येऊ शकत नाही. लवकरच पुन्हा असा योग येवो.

Bhakti Sat, 01/04/2025 - 11:43
आणि आजोबा परत जिवंत झाले! ;) लाखातून एखादा व्यक्ती इतका नशीबवान असू शकतो.हार्ट ॲटॅकमुळे मृत घोषित केलेल्या आजोबांचे शव रूग्णवाहिकेतून घरी नेताना रस्त्यावरील खड्ड्यांच्या धक्क्यामुळे आजोबांचे ह्रदय पुन्हा चालू झाले असावे.कारण नातवाला नंतर त्यांच्या हाताच्या बोटांची हालचाल दिसली.मग पुढील उपचाराला परत दुसऱ्या दवाखान्यात नेले.तर आजोबांच्या ह्रदयाचे ठोके दिसले. देव तारी त्याला कोण मारी... https://youtu.be/Y5Ap-dknaww?si=Ezn1IIWLjspCJ5Sl

In reply to by Bhakti

चौथा कोनाडा Sun, 01/05/2025 - 20:10
या घटनेची नोंद घेत महाराष्ट्राच्या आरोग्य खात्याने सदर खड्ड्याचे मोजमाप करून तशाच प्रकारचे खड्डे विविध रस्त्यांवर पाडण्याचे नियोजन केलेले आहे. या खड्डा इफेक्टमुळे सीपीआर ची प्रोसिजर कालबाह्य होऊ शकते असे माझी आरोग्य सचिव माननीय डॉक्टर चंगावडकर श्रीपाद यांनी प्रतिपादित केले ! या नियोजित खड्ड्यांच्या कंत्राटांवरून आत्ताच वाद सुरू झालाय ! राजकीय नेते श्री अमुक प्रमुख यांनी या कंत्राटात बावीस कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला. आणि या प्रकरणाची चौकशी करावी अशी मागणी माननीय मुख्यमंत्री यांच्याकडे केली.

कंजूस Sun, 01/05/2025 - 10:24
माथेरानमध्ये पर्यटक घोड्यावर बसून जात आहेत, काही जण मिनी ट्रेन पाहात आहेत, माकडे पर्यटकांच्या खाऊच्या पिशव्या हिसकावून घेत आहेत अशा माहितीवर Chatgpt ने काढलेलं चित्र.image थोड्या चुका आहेत, अर्धवट कापली गेली आहेत दृष्य. तरी ठीकच.

कंजूस Mon, 02/24/2025 - 00:28
उन्हाळी भटकंती. काल एक भटकंती केली. खंडाळा घाटासाठी रेल्वे जिथून पळसधरी स्टेशनानंतर वर चढते त्या पहिल्या डोंगरात आहे सोनगिरी. ( मुंबईतील तरुण नवख्या ट्रेकरांचा पावसाळ्यातला आवडता ट्रेक. आणखी एक सोंडाई डोंगर माथेरानच्या चौक पाॅइंटच्या खाली आहे.) उन्हाळा सुरू झाला आहे, रान वाळले आहे तरी दुपारी बारा ते पाच तळापासून माथ्यापर्यंत (५०० मिटर्स) अतोनात डास होते. शांतपणे बसून डबासुद्धा खाता आला नाही. या उलट मागचाच डोंगर राजमाचीचा. तिथे कधीच कुठेही डास नसतात. हे असं का?

कंजूस Wed, 03/12/2025 - 10:38
वेरूळ दहाव्या लेण्यात किरणोत्सव..... लोकसत्ता बातमी. https://youtu.be/2xX1I0EUcNk?si=Q7AHHpInuRYAN6Zc असा दिसत असला तरी त्यासाठी लेण्या तशा बांधलेल्या नसाव्यात. वेरूळ लेण्या बहुशा पश्चिमाभिमुख आहेत त्यामुळे दुपारी वर्षातून दोनवेळा किरण आतापर्यंत येत असणारच. आपली देवळं मुद्दामहून पूर्वाभिमुख बांधतात. काही पश्चिम दिशेला तोंड करून. तसं लेण्यांचं नाही. बौद्ध भिक्कुंना पावसाळ्यात विश्रांतीसाठी विहार आणि लेणी आणि चैत्य बांधण्यात ( खोदण्यात) आले होते. मूळ उद्देश हा होता.

कंजूस Wed, 03/12/2025 - 10:56
विमान परत फिरवणे.... मागच्या आठवड्यात एक शिकागो ते दिल्ली विमान टॉयलेट्स तुंबल्याने परत शिकागोला नेले. https://youtu.be/ZQemz_Enpxc?si=w1SuHw86alXZ6IiW उड्डाणाचे फक्त चार तास उरले होते. मग वाटेत कुठे emergency landing या कामासाठी मिळत नसावेत का? किंवा ते देश अशि सर्विस देत नसतील?

कंजूस Wed, 03/19/2025 - 18:32
माथेरान कालपासून बंद. टॅक्सी, इ रिक्षा आणि घोडे वाले संपावर. कारण काय तर म्हणे पर्यटकांची फसवणूक करणारे विडिओ यूट्यूबवर आले. खरं कारण ... खाजगी वाहनाने येणारे पर्यटक वाढले आणि ते दस्तुरी नाक्यावरून शटल टॉय ट्रेन किंवा इ रिक्षांनी माथेरानच्या बाजार पर्यंत जातात. ते आठवड्यात कोणत्याही दिवशी येऊन जातात. हमाल, हॉटेल्स आणि घोडेवाल्यांचा धंधा जोरात चालतो. इ रिक्षा दहा आहेत. फक्त सुट्ट्या लागल्यावर येणारे पर्यटकच टॅक्सी घेतात. एकूण काय तर २७० टॅक्सी वाल्यांना धंधा मिळत नाही पण पर्यटक खूप येतात. नेरळ ते दस्तुरी नाका जाणारी एसटी मिनीबस ( पंचवीस रुपयांत) हीसुद्धा पोटदुखी आहे. फसवणूक टॅक्सीवालेच करतात. खाजगी कार्यालयांना " आमच्या टॅक्सी नेच जा असा हेका धरतात किंवा पाचशे रुपये द्या असा दम भरतात. काही शहाणे टॅक्सी वाल्यांनी मात्र पन्नास रु सीटने धंधा सुरू ठेवला आहे. ( अधिकृत भाडे शंभर रु प्रती प्रवासी असे चारांचे चारशे रुपये घेतात. किंवा पूर्ण टॅक्सी खिडकीवर जाऊन बुक केल्यास ३६० रुपये लागतात. आता प्रश्न असा आहे की टॅक्सीवाले आठवड्याच्या इतर दिवशी ओला/ उबेर/ वगैरेंनी संबंध का ठेवत नाहीत. कारण या साईट्स " मारुती इको" वाहन नको सांगतात. सर्व माथेरान टॅक्स्या याच प्रकारच्या आहेत.

In reply to by कंजूस

चौथा कोनाडा गुरुवार, 03/20/2025 - 20:29
खासगी करण : वरच्या पातळीवर अदानी- अंबानी खालच्या पातळी छोटेआका, बडेआका अणि अन असे कार्यकर्ते म्हणवणारे खंडणीकार्यकर्ते

वामन देशमुख Fri, 03/21/2025 - 13:10
माझा कालचा WhatsApp Status SohalLalTeaTime #LifeIsFunWithFriends&SohanlalTea ☕
एका जिवलगाचा प्रतिसाद -
चहा आणी आणी ते सुद्धा संध्याकाळी 7 नंतर! उन लागलं की काय वामन तुला ? काळजी घे बाबा.
माझे उत्तर - हमारे तेलंगाणा के लोओंका मालूम नै तुमारकू? सुब्बे उट्टे जब से रात को सोने तलक कब्बी बी चायाँ पीने कू रेडीच रैतें। कल क्या वा मालूम? हमारे संजय बावा होर उनके इनो आये थे हमारे इधर म्हाराष्ट्रा सें । फिर Abits कु जाने के प्लानाँ बनायें। तो मैं बोलूं, चलो बावा, कैसे बी उदर जारैं । तो व्हांपे सोहनलाल की चाय भोत सईं रैती, दूर दूर से लोआं आते पीनेकू। पीते, तुम्म? तो उनो बोले, तुम इत्ता बोलरे तो कैकु नै पीते वामन राव? फिर हम, हमारे इनो, बावा, बावा के इनो ऐसे चार जणां गए चायाँ पीनेकू। अब तुमारकू तो मालूमिच हैं, वो चायाँ वायाँ पीने के शौकां तो अपुन नै पालते। फिर वो तीन जणां चायाँ पिए। भोत अच्चे है चायाँ बोले। बोलके मई स्टेटसां लगायूँ।

वामन देशमुख Wed, 04/30/2025 - 10:55
अक्षय्य तृतीयेनिमित्त घराजवळच्या श्री वेंकटेश्वर स्वामी (बालाजी) मंदिरात सपत्नीक गेलो होतो. घरी आंब्याची पाने-झेंडूची फुले यांची तोरणे, देवांना ताजे हार,फुले, यथासांग पूजा, विशेष नैवेद्य हे झाले. गोडधोड जेवण आहे. श्री कृपेने प्रसन्न वाटते आहे. गोविंदा गोविंदा गोऽविंदा!

In reply to by कंजूस

वामन देशमुख Wed, 04/30/2025 - 15:56
मेहकरचा बालाजी?
मी हैदराबादला राहतो. घराजवळच्या (आम्ही लोकांनी बांधलेल्या) देवळात गेलो होतो.‌ यापूर्वी मेहकरच्या बालाजी मंदिरात गेलेलो आहे.‌ तेथील बालाजीची मूर्ती खूप उंच आहे. बहुधा भारतभरातील सर्वात उंच मूर्ती असावी.

वामन देशमुख Fri, 05/09/2025 - 13:44
श्रीगुरुजी हा आइडी बॅन केल्याबद्दल मी तीव्र निषेध व्यक्त करतो. ज्या मोजक्या मिपाखरांमुळे मिसळपाववर वाचक येतात त्यांच्यापैकी एक हे श्रीगुरुजी होते.‌ हे लिहिण्याचा अधिकार मला आहे व हे लिहिल्यामुळे माझाच आइडी बॅन होणार नाही ही अपेक्षा. जय हिंद. --- हे मी खरडफळ्यावरही लिहिलं होतं; कायमची नोंद राहावी म्हणून इथे पुन्हा लिहीत आहे.

In reply to by वामन देशमुख

मारवा Fri, 05/09/2025 - 13:54
श्रीगुरुजी हे अनेकवेळा अभ्यासपूर्ण संदर्भासहित मांडणीणकरात होते हे खरे आहे. काहीवेळा मतभेद असले तरी जेबकी स्वाभाविक आहे तरी त्यांची एकूण मांडणी व चर्चेला योगदान चांगलेच होते यात शंका नाही अनेकदा माहीत नसलेले संदर्भ त्यांच्यामुळे माहिती होत होते. मात्र वामनराव त्यांची भाषेची मर्यादा भंगलेली होती असेही दिसून येते. त्यासाठी त्यांना समज देऊन संधी द्यायला हवी होती असेच अमरेंद्र बाहुबली यांना देखील संधिं द्यायाला हवी होती. असे उत्साहाने हिरीरीने चर्चा करणारे गेले तर त्याचे मला तरी नक्कीच वाईट वाटतें

चित्रगुप्त Sun, 12/22/2024 - 05:35
येत्या फेब्रुवारी ११-२० मी पुण्यात मुक्कामास असेन, त्या दरम्यान कट्टा करुया का ? (फक्त १६ तारीख सोडून. त्या दिवशी एका लग्नात उपस्थिती लावयची आहे)

In reply to by चित्रगुप्त

मुक्त विहारि Sun, 12/22/2024 - 10:42
सध्या आमचे भ्रमण फक्त ६ फूट बाय ३ फूट इतपतच मर्यादित असल्याने, माझ्या घरीच कट्टा करू शकतो.

In reply to by मुक्त विहारि

काळजी घ्या मुवि. हाडाचे दुखणे म्हणजे वेळखाऊ दुखणे असते. काहीही झाले तरी मुळातले दुखणे आणि मग फिजिओथेरपी वगैरे प्रकार मिळून अडीच-तीन महिने जातातच. मी पण तो अनुभव घेतला आहे. पण त्या काळात मिपावर पूर्णवेळ पडीक राहून वेळेचा सदुपयोग केला होता :)

Bhakti Sun, 12/22/2024 - 21:15
पुणे बुक फेस्टिवल २०२४ अ आ १४ डिसेंबरपासून सुरू झालेल्या पुणे बुक फेस्टिवलचा आज २२ डिसेंबर शेवटचा दिवस होता.कामाचं आठवडा नियोजन पूर्ण फुल्ल असल्याने आजचाच दिवस या फेस्टिव्हलमध्ये येण्यासाठी मिळाला.खरोखर पुस्तक प्रेमींसाठी ही एक अनोखी पंढरी फर्ग्युसन महाविद्यालयात अवतरली होती.जवळपास २५० पेक्षा अधिक प्रकाशकांचे बुक स्टॉल येथे उपलब्ध होते.फर्ग्युसन महाविद्यालयात प्रवेश करताच पुस्तक वाचण्यात मग्न अनेक भव्य प्रतिकृती ठराविक अंतरावर होत्या.पुस्तकांच्या आकाराच्या प्रतिकृतींची सजावट मार्गावर होती.अंम्पी थिअटरात अनेक कार्यक्रमांचीही रेलचेल होती.पुढे सर्वप्रथम भारतीय संविधानाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त पुस्तकरूपी "संविधान प्रतिकृती ९.९४ मीटर जिचा गिनीज बुक मध्ये समावेश करण्यात आला आहे, ती पाहिली.मग त्या भव्य प्रांगणात आलो जिथे फेस्टिव्हल भरले होते.इथे पंतप्रधान मोदी, मुख्यमंत्री फडणवीस यांचे आउटलेट छायाचित्रं काढण्यासाठी होते. आत गेल्यावर अनेक प्रसिद्ध प्रकाशनाची पुस्तके पाहून खूप आनंद झाला.इतकी पुस्तक पाहून कोणती घेऊ कोणती नको असं झालं. पहिल्याच पुस्तकाच्या स्टॉलवर पुस्तक पाहत चाळत होते.दुसऱ्या ठिकाणी हेच ,वेळेचे बंधन नसल्याने माझा नवरा आणि मुलगी मला टाटा करून पुढे निघून गेले.अनेक पुस्तकं जी नगरात पाहायलाही मिळत नाही ती जवळपास सर्वच पाहिली.इंग्रजी पुस्तकेही बरीच होती,तिथे गर्दीही भरपूर होती.मी प्रामुख्याने गीतारहस्य(लोकमान्य टिळक) पुस्त,पैशाचे मानसशास्त्र(मराठी , इंग्रजी दोन्ही भाषेत घेतले),हस्ताचा पाऊस(माडगूळकर),ज्ञानदेवा तिथे समाधी(राहूल देशपांडे), संस्कृती (इरावती कर्वे) , बिझिनेस महाराजा इत्यादी पुस्तके घेतली.थोड्या वेळाने लेकीची परत भेट झाली .तीला देखील पुस्तकांची गोडी निर्माण व्हावी म्हणून मुद्दामाहून आणले होते.ते सफलही झाले कारण घरी असलेली अनेक पुस्तके तिने ओळखून "आई हे आपल्या घरी हे पुस्तक आहे" असं सांगितलं :).रा.चि.ढेरे, कुरुंदकर ,इरावती कर्वे अशा अनेक आवडत्या लेखकांची सर्व अज्ञात पुस्तकेही पाहायला मिळाली.इथे सातवाहन गाथा सप्तशती पाहायला मिळाले.पण आता खुप उशीर झाला होता १२-४ असा वेळ इथे होते.एक तरी लेखक भेटतील अशी आशा होती पण ते घडलं नाही. फर्ग्युसन महाविद्यालय पाहत फिरत बाहेर आले.बाप लेकीने आधीच पोटोबा फुल्ल केला होता.जवळच वैशाली,वाडेश्वर आहे हे माहिती होतं.पण खूप दमलो होतो समोर ' रौनक' पावभाजी होती तिथेच गेलो.मस्त झाडांच्या सावलीत टेबल होते.पुण्यातलं पहिले १९६७ साली पावभाजीचे हे रेस्तराँ आहे असं तिथे लिहिले होते.पुण्याची पावभाजी तिखट नसणार म्हणून त्यांना तिखट द्या असं मुद्दामहूनच सांगितले.खुपच सुंदर सजवलेली (प्रेझेंटेशन)पावभाजी आणि बरोबर तिखट लसूण आलं सरबरीत चटणी,तिखटातला चिरलेला कांदा बरोबर आला.इतकी छान सर्व्हिस पाहून छान वाटलं.पुण्यात गोष्टींची 'गुणवत्ता' हाच महत्त्वाचा निकष परत दिसला.एफसी रोडवर जरा फेर फाटका मारून परत घरी निघालो. ई उ क च थ

In reply to by Bhakti

रामचंद्र Mon, 12/23/2024 - 22:05
वाचन ही शांत वातावरणात चालणारी प्रक्रिया आहे याचे थोडेसुद्धा भान आयोजकांना नसावे याचे वाईट वाटले. संध्याकाळच्या वेळेस तिथं जावं तर तिथंच चाललेल्या संगीताच्या कार्यक्रमामुळं कानठळ्या बसत होत्या. अर्थात एकंदरीतच आयोजनाच्या बाबतीत उत्सवी वातावरणात वाचनसंस्कृतीचे भान ठेवून शांत वातावरण, डोळ्याला त्रासदायक होणारा प्रखर प्रकाश टाळणे अशा गोष्टींची अपेक्षा करणं जरा जास्तच होतं याची पुरेशी जाणीव झाली आहे. बाकी हिंदी पुस्तकांच्या तसेच मराठवाड्यातल्या, तितकेसे प्रसिद्ध नसलेल्या स्टॉलवरही वेगळी, वाचनीय पुस्तकं पहायला मिळाली याचा आनंद आहे.

In reply to by Bhakti

Bhakti Fri, 03/21/2025 - 22:45
वाचाल तर आनंदी होणार अ सकाळ पुस्तक महोत्सव २०२५, अहिल्यानगर. पुणे बुक फेस्टिवलच्या धर्तीवर अगदी भव्य नाही पण बरेचसे मोठे , चांगली पुस्तके असणारे पुस्तक महोत्सव नगरमध्ये २१-२४ मार्च दरम्यान भरले आहे.पुढचे काही दिवस व्यस्त असल्यामुळे आजच फेरफटका मारला. नेहमीप्रमाणे पुस्तकाच्या दुकानात,प्रदर्शनात मला वेळेचे भान उरत नाही.तेव्हा तू एकटीच जा असं घरून सांगण्यात आले,फक्त मोबाईलची बॅटरी संपायच्या आधी घरी ये असंही सुनावण्यात आले. लोकप्रिय साहित्यिकांची पुस्तके ऑनलाईन सहज मिळतातं पण अशा प्रदर्शनात नवे पुस्तक समजतात.पुस्तकांना हातात घेऊन,पाने चाळत, अनुक्रमणिका पाहत ते पुस्तक घेणं निराळं सुखच असते. कादंबरी मी वाचनालयातून मिळालेल्या पुस्तकांतून वाचते. तेव्हा संस्कृती, अध्यात्मिक, वैज्ञानिक, समाजजीवन, निसर्ग,इतिहास,भटकंती विषयांची पुस्तके घेण्याकडे कल असतो. तरीही आनंद नाडकर्णी, ग्रेस, अच्युत गोडबोले,जयवंत दळवी,नरहर कुरुंदकर,नरेंद्र दाभोळकर यांची काही पुस्तके हेरुन ठेवली आहेत,लवकरच घेईन. मी घेतलेली अनवट पुस्तके- १.येई परतुनी ज्ञानेश्वरा' आज मला नवीन लेखक समजले डॉ.रा.श्री.मोरवंचीकर डॉ. रा. श्री. मोरवंचीकर आजही ज्ञानदानाच्या पवित्र कार्यात अखंड नंदादीपासम तेवत आहेत. त्यांनी 'येई परतुनी ज्ञानेश्वरा' हा मराठी लोकमानसाच्या जिव्हाळ्याचा ग्रंथ अध्यायनिहाय अनेक अंगांनी उलगडला आहे. त्यातील सचित्र ओव्यांचे मार्मिकपणे केलेले निरूपण पाहून त्यांच्या ज्ञानेश्वरांप्रती असलेल्या उत्कट प्रेमाचा अनुभव दिसतो. २.निसर्गायण दुसरे नव्याने समजलेले लेखक निसर्ग आणि विकास अभ्यासक दिलीप कुलकर्णी . पर्यावरणाची समस्या ही अशा प्रकारे बाह्य निसर्गातील असली, तरी तिचं मूळ आहे आपल्या मनोवृत्तीत -आपल्या विचारांत. आपली भोगवादी वृत्ती, हाव, आक्रमकता ही या समस्येला कारणीभूत आहे आणि केवळ ही एकच नव्हे, तर शस्त्रस्पर्धा, दुर्बलांवरचे अत्याचार, गुन्हेगारी, व्यसनाधीनता, मानसिक तणाव, स्वैराचार अशा अनेक समस्या त्याच मनोवृत्तीमुळे आपल्यासमोर उभ्या ठाकल्या आहेत.आधुनिक पाश्चात्त्य विज्ञान आणि प्राचीन पौर्वात्य तत्त्वज्ञान यांच्या आधारे या बदलाची दिशा शोधणारं हे पुस्तक. ३. थर्ड ॲंगल हे छोटेखानी पुस्तक हटके विषयावर म्हणजे ' थिअरॉटिकल मित्राने प्रॅक्टिकल क्लबमध्ये केलेली भाषणे एक वैचारिक अनोखा अनुभव आहे. मनाची नित्य नाव पुस्तकाच्या पानांनी वल्हवली जातात मग आयुष्याचा भवसिंधु सहज तरुन जातो ज्ञान सागराची ओढ अजुनच सहज पूर्ण होते... -भक्ती

कंजूस Mon, 12/23/2024 - 06:56
अरे वा! पुस्तक प्रदर्शन गाजलं. आता दरवर्षी होईल. तुमच्या मुलीसाठी पर्वणीच. ( आउटलेट छायाचित्रं काढण्यासाठी होते.= कटाउटस) फार पूर्वी मुंबईत (आझाद मैदान) आणि दिल्लीत ( प्रगती मैदान) येथे मोठे पुस्तक प्रदर्शन आलटून पालटून एक वर्षाआड होत असे. नंतर मुंबईतील बंदच झाले. मग छत्रपती टर्मिनस जवळचा खाजगी बुक स्टॉल आशिष दरवर्षी प्रदर्शन भरवून लागला सुंदराबाई हॉलमध्ये. पण मराठी पुस्तके नसत ( ती साहित्य संमेलनांत अधिक). अक्षर वाङमय यांनी काही वर्षे प्रदर्शने भरवली. माझ्या दृष्टीने पुस्तकं चाळायला मिळणे महत्त्वाचे कारण विकत घेत नाही. विकत आणून नंतर करायचे काय हा प्रश्न असतो. तरी भाषा शिकण्यासाठीची पुस्तके घेतो ती संग्रही आणि संदर्भासाठी कायम लागतात. स्थानिक नगरवाचनालयात काही वाचायला मिळतात. पण मोठी बाडं कधीच येत नाहीत. स्थानिक प्रकाशकांनी एक होऊन एक कायमची तारीख किंवा आठवडा प्रदर्शन भरवण्यासाठी निश्चित केला तर वाचकांच्या कायम लक्षात राहील. उदाहरणार्थ डिसेंबरचा दुसरा आठवडा.

In reply to by कंजूस

Bhakti Mon, 12/23/2024 - 08:15
सॉरी,माझी भयानक डिक्शनरी ;) =)(कटआऊट)
माझ्या दृष्टीने पुस्तकं चाळायला मिळणे महत्त्वाचे कारण विकत घेत नाही. विकत आणून नंतर करायचे काय हा प्रश्न असतो. तरी भाषा शिकण्यासाठीची पुस्तके घेतो ती संग्रही आणि संदर्भासाठी कायम लागतात.
खरं आहे,अशा मोठ्या प्रदर्शनात खुप पुस्तकं पाहायला ,चाळायला मिळतात हे महत्त्वाचे.माझा पुस्तक घेण्यासाठी हव्यास होता त्यामुळे बजेट संपल्यावर पुस्तक फक्त पाहण्याचं ऑड वाटू लागले.पुढच्यावेळी जरा याबाबत सतर्क राहीन ;) होय लेकीसाठी हळूहळू एम एच १२ केंद्रबिंदू (पर्वणी) तयार करणार आहे!

In reply to by Bhakti

मुक्त विहारि Mon, 12/23/2024 - 08:20
हे पुस्तकं खरेदी करण्यासाठी उत्तम ठिकाण आहे. आणि डोंबिवली हे केंद्रस्थानी असल्याने, डोंबिवली येथे उत्तम पुस्तके मिळतात.

In reply to by मुक्त विहारि

कर्नलतपस्वी Mon, 12/23/2024 - 09:41
बुकगंगा,अक्षरधारा,ॲमेझोन सारख्या संस्थळावर पुस्तके स्वस्त आणी घरपोच येतात. मागील वर्षापेक्षा या वर्षी अधिक चांगले प्रदर्शन होते.

श्रीरंग_जोशी Mon, 12/23/2024 - 10:18

In reply to by श्रीरंग_जोशी

अरेरे. उशीर झाला. पहिला प्याला बर्‍याच वर्षांपूर्वी पिऊन झाला आहे :(

In reply to by श्रीरंग_जोशी

कर्नलतपस्वी Mon, 12/23/2024 - 11:47
होळी, वजा तीस तापमान. शेवटचा प्याला मार्च १९९९,प्रसंग मारूती आठशे पहिली चार चाकी घेतली. व्यसनाधीन झालो का ?नाही, प्रत्येकाच्या इच्छाशक्ती वर आवलंबून. दारू पिली पाहीजे असे काही नाही. पण अती परिचयात अवाज्ञा तद्वत दारूला डोक्यावर चढवून नये. अर्थात माझे मत.

In reply to by कर्नलतपस्वी

कंजूस Mon, 12/23/2024 - 12:21
बरोबर. रोज थोडी थोडी घरीच घ्यावी म्हणजे त्यातली गंमत सामान्य होते. आणि कधी प्रसंगाप्रमाणे जे पितात भरपूर तसं होत नाही. कितीही कोणतेही दारूचे ब्रांड आले तरी बेसिकली अल्कोहोल अमुक टक्के यापलिकडे काही नाही. तांदुळाचेही तसेच आहे पंधरा रुपये ते सातशे पन्नास रुपये किलोचा असो त्यांचे पोषणमूल्य समानच असते. सगळे पॉलिश केलेलेच असतात. हातसडीचे कुठे मिळतात?

In reply to by कंजूस

कर्नलतपस्वी Mon, 12/23/2024 - 17:26
ये इंतजार गलत है के शाम हो जाये जो हो सके तो अभी दौर-ए-जाम हो जाये मुझ जैसे रिंद को भी तूने हश्र मे या रब बुला लीया है तो, कुछ इंतजाम हो जाये हुई महँगी बहत ही शराब, के थोड़ी-थोड़ी पिया करो पियो लेकिन रखो हिसाब, के थोड़ी-थोड़ी पिया करो

In reply to by कर्नलतपस्वी

कर्नलतपस्वी Mon, 12/23/2024 - 17:45
कौन कहता, अंगुर की बेटी गलत है अंगुरके दामाद को बस इसकी लत है इसके साथ कुछ गम गलत करता है तो बेरहम जमाने क्या जाता है,अगर... वो उसके साथ कुछ पल बिताता है

In reply to by श्रीरंग_जोशी

कंजूस Mon, 12/23/2024 - 12:23
सर्व विषे कमी प्रमाणात औषधेच असतात. अगदी तंबाखू, चहा, अफू,अर्सेनिक सुद्धा.

कंजूस Mon, 12/23/2024 - 12:39
आशिष बुक स्टॉल छत्रपती टर्मिनस जवळचा खाजगी बुक स्टॉल आशिष दरवर्षी प्रदर्शन भरवू लागला सुंदराबाई हॉलमध्ये. यांच्या पुस्तक प्रदर्शनात भेटी दिल्यावर एक लक्षात आलं की यामध्ये पुस्तके कोण घेतो. इंटिरिअर डेकोरेशनचा व्यवसाय करणारे मुंबईत बरेच आहेत. ते इकडे फिरतात. भरपूर रंगीत चित्र असलेली जाडजूड पुस्तके तिथे निम्म्या किंमतीत असतात. ती त्यांना हवी असतात नवनवीन फर्निचरच्या डिझाइनसाठी. शिवाय गार्डनिंग लेआउटचीही असतात. आर्किटेक्ट नाही पुस्तके लागतात. मोठ्या बास्केट घेऊन फिरतात आणि भराभर पुस्तके उचलतात. तरुण मुलं मुली इंग्रजी कादंबऱ्या विकत घेतात. काही महिला कुकींगची पुस्तके बघतात. आपण जी मराठी साहित्यातील कवितासंग्रह, कादंबऱ्या विकत घेतो त्याचा आनंद आठ दिवसांत संपतो. इतिहास,भाषा यांचे अभ्यासक पुस्तके घेतात ती त्यांच्या कामाची असतात. पण मग असा विचार येईल की वाचकांनी पुस्तके विकत घ्यावीत का? वाचनालयांनी घ्यावीत. म्हणजे महिन्याच्या फीमध्ये साहित्य वाचता येईल.

In reply to by कंजूस

मुक्त विहारि Mon, 12/23/2024 - 18:30
विना अनुदानित, वाचनालये आता ओस पडत चालली आहेत. डोंबिवली येथे एक फ्रेंड्स लायब्ररी सोडली तर बरीचशी वाचनालये बंद पडली आहेत. मानपाडा रोड वरील ३ वाचनालये, डोंबिवली पश्चिम येथील एक वाचनालय, midc मधील एक वाचनालय, ही काही ठळक उदाहरणे. रामनगर मधील एक वाचनालय आणि P ,& T मधील एक वाचनालय, फ्रेंड्स लायब्ररीच्या सहयोगाने चालतात. त्यापेक्षा पण भयावह स्थिती, अभ्यासक्रमा व्यतिरिक्त , पुस्तक विक्रेत्यांची आहे.... कालाय तस्मै नमः....

कंजूस Fri, 12/27/2024 - 06:03
गोवा पर्यटन/ कोकण/समुद्री पर्यटन गोरगावलेकर यांनी केलेल्या गोवा पर्यटनाचे धागे येत आहेत. त्यांचे अनुभव लिहित आहेत. तिसऱ्या भागात हिवाळी सहल, दक्षिण गोवा :भाग 3 : बटरफ्लाय बीच आणि लोलये-पैंगिण चे वेताळ गोवा आणि कोकण यांच्या पर्यटनाची तुलना फायदे तोटे यांची प्रतिसादांतून चर्चा फारच वाढली. ती इकडे करता येईल. धाग्यातली चर्चा इथे कॉपी पेस्ट करताही येईल पण तो त्या प्रतिसादकर्त्या लेखकांचा अधिकार आहे. मीही पूर्वी गोव्यावर एक धागा काढला होता ते आठवले. माझा समुद्र पर्यटन, खाणे पिणे वगैरेंचा आनंद फारच संकुचित आहे. तरी एकदा गोवा काय आहे म्हणून पाहण्यासाठी गेलो होतो. परतताना कुडाळहून( कोकण) आलो. एसटीचाच प्रवास त्यामुळे जमेल तेवढे पाहिले. गोव्याच्या पर्यटनाबद्दल ऐकले वाचलेले भारतातले आणि परदेशी पर्यटक इथे येतात. आनंद घेतात आणि पुन्हापुन्हा येतात. गर्दी वाढली की ट्रेनची तिकिटे मिळत नाहीत. विमान आणि हॉटेल्सचे भाडी दर वाढतात. परवडण्याच्या पलिकडे जातात. तरीही पसंती असते. कोकण ( महाराष्ट्रातला) याबद्दल श्री.ना. पेंडसे किंवा जयवंत दळवी किंवा इतर लेखकांच्या कथा कादंबऱ्यांतून मराठी वाचकांना माहीत झालेला असतो. तो खरंच कसा आहे हे पहाण्यासाठी ठाणे,रायगड, सिंधुदुर्ग जिल्हेसोडून उर्वरित महाराष्ट्रातील दूरच्या ठिकाणांहून पर्यटक येतात. त्यात किहीम, अलिबाग, श्रीवर्धन,हर्णे मुरुड, रत्नागिरी परिसर, देवगड, मालवण, देवबाग ही ठिकाणे येतात. कोकण आणि गोव्याप्रमाणेच कर्नाटकातील २६० किमी किनारपट्टीवरही कारवार,गोकर्ण, मुर्डेश्वर, उडुपी, मंगळुरू ही ठिकाणं आहेत. तीही पाहिली. हॉटेल्स(राहाणे आणि खाणे शाकाहारी तसेच मासाहारी), बसप्रवास यादृष्टीने फारच चांगल्या सोयी आहेत. शिवाय किनारपट्टीसोडून वरती घाट चढून गेल्यावरही अनेक सुंदर ठिकाणी जाता येतं. मार्चपर्यंत वाहणारे धबधबे आहेत. इथल्या लोकांना पर्यटक येण्याची सवय आहे. त्यांचा त्रास वाटत नाही . तुसडेपणा नाही. मला कर्नाटक पर्यटन फार आवडले आणि पुन्हा जावेसे वाटते. किनारे स्वच्छ चांगले आहेतच शिवाय नद्याही बारमाही पाणी वाहणाऱ्या आणि अतिशय स्वच्छ पाण्याच्या आहेत. नदीकिनारी जी धार्मिक स्थळे आहेत ती निसर्गसौंदर्याने अधिकच चांगली वाटतात. सह्याद्रीचा सुंदर निसर्ग पाहावा तर इथेच. उडुपी आणि मंगळुरू येथे समुद्र पर्यटन आणि मत्स्याहारही खूप प्रचलित आहे.

In reply to by कंजूस

गवि Fri, 12/27/2024 - 08:33
https://www.youtube.com/embed/Jhsq0fdiEq0 गोवा पर्यटन मंत्री यांची मुलाखत. ही सोशल मीडियावर सर्वत्र सुरू झालेली चर्चा हा चुकीच्या (चायनीज) आकडेवारीवर आधारित एक प्रोपागांडा आहे असे त्यांचे म्हणणे त्यांनी इथे मांडले आहे.

In reply to by कंजूस

गोरगावलेकर Fri, 12/27/2024 - 12:16
गोरगावलेकर यांनी केलेल्या गोवा पर्यटनाचे धागे येत आहेत. त्यांचे अनुभव लिहित आहेत. धाग्याच्या पहिल्या भागात आम्ही मडगाव स्टेशन ते कोलवा बीच पर्यंत प्रवास केला होता . स्टेशनच्या बाहेरच प्रीपेड टॅक्सी मिळाली . टॅक्सिवाल्यांचा कथित मुजोरपणा दिसला नाही . दुसऱ्या भागात कोलवा ते पाळोळे पर्यंत प्रवास केला . पर्यटन स्थळे बघत जात आम्ही जवळपास पूर्ण दिवस घेतला व त्यात पाच - पंचवीस किमी अंतर जास्त झाले त्याचे वाढीव पैसेही दिले . किती खर्च येतो हे कळावे इतकाच लिहिण्यामागचा उद्देश . आज कुठल्या शहरात स्विफ्ट डिझायरचे संपूर्ण दिवसासाठी ३ १ ० ० /- रुपये भाडे असेल ? ड्रायव्हरचा पगार , गाडीची देखभाल दुरुस्ती, इंधन खर्च जाऊन मालकाच्या हातात कितीसे पैसे जातील ? कोला बीचला जातांना अगदी ओबड धोबड रस्त्यावरून गाडी गेली . स्वत : ची गाडी नेतांनाही विचार करावा लागेल असा रस्ता . कुठलीही कुरकुर न करता शक्य होतील ती ठिकाणे दाखवली . येथेही गाडीवाल्यांचा कथित मुजोरपणा दिसला नाही .

In reply to by गोरगावलेकर

गवि Fri, 12/27/2024 - 13:15
मुजोर म्हणजे बोलण्यात अशा अर्थाने नसावं. पण अतिरिक्त मनाला येईल तितके पैसे मागणे हे अनेकदा घडते. पूर्ण दिवसाचे ३१०० इतकेच घेतले असतील तर तुम्हाला नशिबाने चांगले डील आणि व्यक्ती लाभली. एरवी कोपऱ्यावर सोडून यायचे सहाशे (हे उदाहरण मे २०२४ मधलं, ऑफ सिझन काळ. अंतर दोन ते तीन किमी. पार्किंग नसल्याने टॅक्सी मागवावी लागली होती.). नुसती चौकशी केली होती तेव्हा, दाभोळी एअरपोर्ट ते अगोंद वन वे नुसते ड्रॉप करण्याचे ऑफ सिझन २००० आणि सिझन मध्ये ३५०० ते ४०००. तुलनेसाठी असे पाहा की मुंबईहून गोव्याचे विमान तिकीट देखील कधी कधी याहून कमी असते. वार्का ते काबो द राम किल्ला आणि परत इतक्या अंतराचे हॉटेलशी संलग्न टॅक्सीवाल्यांनी सुमारे आठ वर्षांपूर्वी तीन हजार घेतले आणि वरून टिप मागितली. वाटेत कुठे थांबायला देखील तयार नव्हता. नव्वद टक्के वेळा मुंबईपासून स्वत:ची कारच घेऊन जाणे किंवा एअरपोर्टवर उतरताच पूर्ण मुक्कामाइतकी सेल्फ ड्राईव्ह कार घेणे हे दोन उपाय करून ही समस्या आता सोडवली आहे. बाय द वे, गोव्यातील स्थानिक लोक कोंकणी भाषेच्या सवयीनुसार एकेरीत अरेतुरे करत बोलतात आणि त्या स्टाईल मुळे काही वेळा बाहेरील लोकांना ते अशिष्ट उद्धट उगीचच वाटू शकतात.

In reply to by गवि

कंजूस Fri, 12/27/2024 - 14:58
सहमत. खाजगी वाहनाशिवाय तसेच भाड्याच्या वाहनाशिवाय जमेल तेवढे फिरणे आणि आनंद मानणे हेच आमचे ध्येय असते. त्यामुळे काही त्रास /संताप होत नाही. शेअरिंग साठी कुणाला तयार करणेही नाही. म्हणजे अगदीच घरी कॉटवर पाय हलवत गप्पा मारण्यापेक्षा चार ठिकाणं पाहाणे बरे या रुळावर आमची गाडी सुसाट धावते. शिवाय खरेदी करायची नाही हे ठरवूनच टाकले आहे. आमचा गाईड लोनली प्लानेट पुस्तक " India travel survival kit " - Tony Wheeler and others.

In reply to by गवि

टर्मीनेटर Sun, 12/29/2024 - 13:08
"पूर्ण दिवसाचे ३१०० इतकेच घेतले असतील तर तुम्हाला नशिबाने चांगले डील आणि व्यक्ती लाभली."
काशिनाथ नाडकर्णी : "तो कोकणांतला असला पाहिजे अंऽऽऽ..." कोचरेकर मास्तर : "पाहिलंत? पाहिलंत... माणुसकी नाही.. नाही म्हणतात ना?... ही घ्या माणुसकी! प्रवासात काय अनुभव येतील सांगता येत नाही. वास्तविक असल्या ह्या लोकांचे जाहीर सत्कारच करायला पाहिजेत. त्याचे नाव, नंबर वगैरे आपण टिपून घ्यायला पाहिजे होता नाही का..."
"एरवी कोपऱ्यावर सोडून यायचे सहाशे (हे उदाहरण मे २०२४ मधलं, ऑफ सिझन काळ. अंतर दोन ते तीन किमी. पार्किंग नसल्याने टॅक्सी मागवावी लागली होती.). नुसती चौकशी केली होती तेव्हा, दाभोळी एअरपोर्ट ते अगोंद वन वे नुसते ड्रॉप करण्याचे ऑफ सिझन २००० आणि सिझन मध्ये ३५०० ते ४०००."
सोकाजीनाना त्रिलोकेकर : "ए नाडकर्णी, बघ... बघ! बघ लेका तुझा कोकणातला व्हिक्टोरिया (टॅक्सी) वाला... " काशिनाथ नाडकर्णी : "तो कोकणांतला असणंच शक्य नांयऽऽऽ... अहो तो कोकणात व्हिक्टोरिया (टॅक्सी) चालवायला शिकणार कुठून मला सांगा बघू आंऽऽऽ... कायत्तरी काय? आमच्या कोकणातले म्हणजे सगळे बैल..." 😀 भ्रमण मंडळ - बटाट्याची चाळ गोव्याला असंख्य वेळा जाउनही तिथल्या सार्वजनीक वाहतुक व्यवस्थेचा आणि टॅक्सीवाल्यांचा मला फारसा अनुभव नाही. ह्या वर्षीच्या जानेवारी महिन्यात दोना पावला येथील मुक्काम असलेल्या 'इंटरनॅशनल सेंटर गोवा (ICG)' येथुन त्यांच्याचतर्फे संध्याकाळी तिथुन सुमारे सात किमी अंतरावर असलेल्या कॅसिनो पर्यंत जाउन मध्यरात्री तिथुन परतण्यासाठी घेतलेल्या टॅक्सी सेवेसाठी त्या टॅक्सीवाल्याने (आधीच बोलणी केल्याप्रमाणे) संध्याकाळी जाताना ड्रॉप साठी ३०० रुपये आणि मध्यरात्री तिथुन निघताना फोन करुन बोलवल्यावर पिक-अपसाठीचे ५०० रुपये असे जाउन-येउन एकुण ८०० रुपये घेतले होते. मध्य्ररात्री १:३० च्या नंतर फोन करुनही तो सांगीतल्याप्रमाणे परत न्यायला आला होता हे विषेश! असो, मिपाकरांना त्याठिकाणी आलेले टॅक्सीवाल्यांचे वेगवेगळे, बरे-वाईट अनुभव वाचुन माहितीत भर पडत आहे 👍

In reply to by गोरगावलेकर

विमानतळावरून आपल्या हॉटेलवर किंवा आपल्या हॉटेलवरून विमानतळावर जायचे असेल तर टॅक्सीवाल्यांचे अवाच्या सवा दर आहेत याचा मला तरी अनुभव आला नव्हता. आम्ही गोवा विमानतळापासून सगळ्यात लांब राहिलो होतो अगोंद आणि पाटणेला. दोन्ही ठिकाणी जायला विमानतळाहून १८०० रूपयात प्रीपेड टॅक्सी मिळाली होती. अर्थात ही अनुक्रमे २०१७ आणि २०१८ ची गोष्ट. सध्याचे दर किती हे माहित नाही. मात्र दोन्ही ठिकाणे दाबोळी विमानतळाहून साधारण ६०-६५ किलोमीटर अंतरावर आहेत. अंतर ध्यानात घेता तो दर अवाजवी जास्त आहे असे वाटले नव्हते. विमानतळावर समजा प्रीपेड टॅक्सी असते आणि त्यांना ठरवून दिलेले दर आहेत तितकेच घ्यावे लागतात. पण परतीच्या प्रवासात हॉटेलवरून विमानतळावर जातानाही टॅक्सीवाल्याने तेवढेच पैसे घेतले होते. अगोंदहून परत येताना आमचे विमान रात्रीचे होते त्यामुळे दाबोळी विमानतळावर रात्री साडेनऊच्या सुमारास पोचलो होतो. त्या वेळेस विमानतळावरून भाडी मिळत असतील की नाही शंकाच आहे कारण त्यावेळेनंतर फार विमाने येत नाहीत. तरीही त्याने जास्त पैसे घेतले नव्हते. टॅक्सीवाले अवाच्या सवा दर लावतात ते हॉटेलबाहेर साईटसिईंगला जाणार्‍यांकडून. वारकामध्ये आम्ही उतरलो होतो वारकाला आमच्या हॉटेलच्या बाहेर पर्यटकांसाठी म्हणून एक टॅक्सी स्टॅन्ड होता. तिथून मडगाव फार तर १०-१२ किलोमीटरवर होते. काजू आणि बेबिंका अशा गोष्टी घ्यायला मडगावला जायचे होते तेव्हा हॉटेलबाहेरील टॅक्सीवाल्यांनी जाऊन येऊन २७०० रूपये सांगितले होते. आणि ही गोष्ट २०१२ ची होती म्हणजे आणखी जुनी. ही अक्षरशः लूट होती. मला वाटते तिथे जास्त गोरे पर्यटक येतात आणि परदेशी पर्यटकांना अवाच्या सवा दर लाऊन लुटणे हा प्रकार नाही म्हटले तरी सगळीकडे होतोच. जर ते गोरे पर्यटक असे वाढीव दर द्यायला तयार होत असतील तर टॅक्सीवाल्यांना बहुदा आम्हा भारतीय पर्यटकांची गरज नसावी. त्यामुळे यायचे असेल तर या दरात या नाहीतर येऊ नका असा त्यांचा दृष्टीकोन होता.

श्रीरंग_जोशी Sun, 12/29/2024 - 01:44
गेल्या काही महिन्यांपासून माझी पत्नी सौरभ बोथरा यांच्या ऑनलाइन योगासन वर्गांना उपस्थिती लावत आहे. मी देखील महिन्याभरापासून सुरुवात केली आहे. शीर्षकात जरी केवळ योग असले तरी, योगासनांखेरीज, इतर कार्डिओ व श्वसनाचे व्यायाम, प्राणायम व थोडेफार ध्यान यांचाही या वर्गांत अंतर्भाव असतो. रोज युट्युब लाइव्ह द्वारे भाप्रवे नुसार सकाळ व संध्याकाळी हे वर्ग चालतात. सूचना सहजपणे समजतील अशा असतात व स्क्रीनवर पाहून आपण ते व्यायामप्रकार करू शकतो. ६ जानेवारीपासून तीन आठवडे या वर्गांचा नि:शुल्क लाभ घेता येईल - त्यासाठीचा दुवा. या वर्गांना काही दिवस उपस्थिती लावल्यावर, असे वर्ग आपल्याला काही वर्षे अगोदर का नाही मिळाले अशी भावना आमच्यासह बहुतेकांच्या मनात निर्माण झाली आहे / होत असते.

In reply to by श्रीरंग_जोशी

कंजूस Sun, 12/29/2024 - 04:00
ती साईट पाहिली. नोंदणी केली नाही. उपक्रम आणि ओनलाइन आहे हे बरे. काही शाळांत योगासने शिकवतात बहुतेक. आमच्या शाळेत शिकवली होती. पाचवी पासूनच . लहानपणी केली नाही तरी चालतात. कारण तेव्हा वाढते तरुण वय असते. पण नंतर कधी करायची झाल्यास छोट्या पुस्तिका विकत मिळतात त्या पाहिल्या की काही सोपी रोज करण्याची आसने दहा बारा आहेत ती करता येतात. चीनमध्ये तिथल्या बागांत ( parks) ६०+, ८५+ वयोगटातील नागरिकांसाठी काही त्यांच्या पद्धतींचे व्यायाम प्रकार करणारे करवून घेणारे गट असतात. त्यांचे काही विडिओ मी मागे पाहिले होते ( dwtv channel documentaries बहुतेक.) त्यांचे व्यायाम प्रकारही खूप चांगले वाटले. विशेषतः शरीराची रोजची हालचाल करण्यासाठीचे ते सराव आहेत. वरील दोन वयोगटांच्या वयाप्रमाणे हालचालींचा वेग वेगळा दिसला. इकडच्या काही बाबा लोकांचे योग प्रकार मला काही आवडले नाहीत. अतिरंजीत वाटले. ....... वजन कमी करणे/ हालचालींसाठी सराव/ रोग नियंत्रण/ मानसिक समाधान शांती यांपैकी एक किंवा सर्व असा काही झोल योगासनांमध्ये घालण्याचा खटाटोप दिसतो हे माझे मत.

Bhakti Sun, 12/29/2024 - 14:44
हरारीची मुलाखत रणवीरने घेतली.हरारी माझा आवडता विचारवंत आहे.तो भारतात नेक्सास' पुस्तक प्रकाशित करण्यासाठी आला होता.तेव्हा अनेकांना त्याच्याबरोबर मुलाखती घेतल्या. १. https://youtu.be/eNVtYPgJ6b0?si=3VfqDjCcx6_lYjk2 २. https://youtu.be/6x4UgHI7qbk?si=_Iz_eP9HF7SYH-ZM दुसरी मुलाखत अजून ऐकायची आहे. पहिली मुलाखत रणवीरने घेतली आहे.AI हा हरारीचा १० वर्षांपूर्वी पासूनचा विषय आहे.जो AI वर वरचढ होईल तोच पुढच्या काळात जगावर राज्य करणारे.इथे रशिया,ट्रम्प यांचा वर्चस्ववादी भूमिकेचा त्याने चांगला समाचार घेतला आहे.अमेरिकासारख्या बलाढ्य देशाने,लीडरने जगाच्या शांततेचा विचार आधी केला पाहिजे तरच माणूसकी टिकेल असं त्यांचं म्हणणं आहे.रणवीरचा शो म्हटला की तो स्पिरिच्युलिटीवर समोरच्याला बोलायला लावणारच हे ठरलेलं आहे 😀 त्यात हरारी विपश्यनेचा साधक आहे. पण हरारी म्हणतो कोणीही कोणाला दोन ,तीन तास ध्यानाला बसा हे म्हणणं सोपं आहे.पण पंधरा मिनिटे तरी केवळ स्वतःच्या आता बाहेर जाण्याऱ्या श्वासावर लक्ष केंद्रित करा.इतर कोणताच विचार डोक्यात आणायचा नाही,हे सांगितले तर कोणालाच हे फारसं जमणार नाही.यासाठी खुप तयारीच हवी.मेडिटेशन कसं करायचं, कोणतं करायचं हे ज्याचं त्यालाच ठरवू द्या.उगाच मेंढ्याचा कळप करण्यात अर्थ नाही. युद्ध करावं की नाही याबाबत त्याचं मत मला गोलगोल वाटलं,आधी तो म्हणाला मिलिटरी वर ५०% हून अधिक खर्च चिंताजनक आहे नंतर म्हणाला इस्राएल आणि भारताने ज्या चुका रोमन व मुस्लिम+ब्रिटिश आक्रमणाच्या काळात सैन्य ताकद वाढवण्यावर भर देतात केली ती त्यांना आता करणे अजिबात परवडणारं नाही👏

In reply to by Bhakti

कंजूस Sun, 12/29/2024 - 15:53
मराठी किंवा कुणीही. आंतरराष्ट्रीय मते राजकीय/ सामाजिक / धार्मिक ही नेहमी ती व्यक्ती कोणत्या डोक्यातली आहे त्याप्रमाणे एकांगीच असतात. विरुद्ध गटाचा साधा उल्लेखही नसतो. तर काहींची प्रसिद्ध केलेली व्यक्तव्ये त्यांच्या देशाच्या राजकीय दडपणाखालीही असतात.

कंजूस Tue, 12/31/2024 - 20:43
पहिला काचेचा पूल काल कन्याकुमारी, तमिळनाडू इथे असलेल्या विवेकानंद स्मारक आणि तिरुवल्लूवर पुतळा या दोन ठिकाणांमध्ये काचेचा पूल उभारला त्याचे उद्घाटन झाले. hindustan times बातमी

कंजूस Fri, 01/03/2025 - 11:27
खरडफळ्यावर विषय निघाला म्हणून......... गुजरातचे सुंदर समुद्र किनारे आणि पर्यटन. फार प्रचलित नाही तरीही थोडक्यात... गुजरातध्ये {सूरतजवळच्या} हजिरा येथे आणि जामनगर येथे दोन मोठे रासायनिक प्रकल्प ( भारतीय कंपन्या, रिलायन्स) अगोदरच आहेत. सूरतजवळच्या दहेज बंदरातून - घोघा पलिकडे जाऊन भावनगरला काही जण जातात. धार्मिक पर्यटन. दीवचा किनारा पर्यटनासाठी आहे. तिथून वेरावळ - सोमनाथ आहे. पण धार्मिक महत्त्व आणि मासेमारी. दमणचा किनारा काळा आहे. मासेमारी बोटींच्या डिझेलमुळे. जवळचा परिसर दारूबार आणि इतर इलेक्ट्रॉनिक्स मार्केटसाठी पूर्वी प्रसिद्ध होता. आता त्याचे महत्त्व उरले नाही. तरीही दमण- वापी- दादरा नगरहवेली- खानवेल ( गार्डन्स) अशी सहल होऊ शकते. द्वारका पोरबंदर समुद्र -धार्मिक पर्यटन अंकलेश्वर/अंकलेसर भरूच हे नर्मदा पर्यटनामुळे चर्चेत असते. गुजरात - महाराष्ट्र सीमेजवळचे डहाणू आणि बोर्डी येथे हॉटेल्स खूप आहेत. डहाणू-जव्हार- त्र्यंबकेश्वर -नाशिक - सापूतारा असाही सहल प्लान होऊ शकतो. गुजरात समुद्र किनारे थंडीतच ठीक. गरमा फार असतो. काही ठिकाणी रात्री चमकणाऱ्या लाटा दिसतात. मुंबई पुणे पर्यटकांसाठी कोकण, गोवा, कर्नाटक समुद्रच बरा.

In reply to by कंजूस

गवि Fri, 01/03/2025 - 14:19
दमण- वापी- दादरा नगरहवेली- खानवेल ( गार्डन्स) अशी सहल होऊ शकते.
दमण किनारे घाणेरडे. केमिकल आणि वास. अस्वच्छ. हल्ली काही भाग बांधून चौपाटी केली आहे असे ऐकले पण एकूण समुद्र घाण. खूप इंडस्ट्रीज. सिल्वासा कंटाळवाणे. सर्वसाधारण लहान शहर. उन्हाळ्यात तर अगदी नदी देखील कोरडी. तिथली वाटेतली लायन सफारी केविलवाणी. सापुतारा वगैरे हिल स्टेशन हा अधिक चांगला ऑप्शन आहे त्यापेक्षा.

In reply to by प्रचेतस

गवि Fri, 01/03/2025 - 15:50
आधी मद्य पिऊन मग कोणत्याही मार्केटमध्ये फिरायला मजाच येते. किंबहुना काळ्या समुद्रावर फिरायला देखील मजाच येते. :))

In reply to by प्रचेतस

गवि Fri, 01/03/2025 - 16:00
तुमच्या इतका जोरकस, प्रगाढ, वादळी, पावसाळी, ओलाकंच, इंटेंस अनुभव नसला तरी प्रवासाचा अंमळ थोडासा अनुभव आहे इतकंच..

In reply to by प्रचेतस

गवि Fri, 01/03/2025 - 16:09
सळसळत्या वाऱ्याने एखादा प्राजक्त थरथरावा आणि खालून जाणाऱ्या आपल्या तापल्या अंगावर गार दवबिंदूंचा पडलेला पाऊस हृदयाचे मधलेच चार ठोके चोरून जावा तशी अवस्था झालेली दिसते त्या आठवणींनी.

In reply to by गवि

प्रचेतस Fri, 01/03/2025 - 17:24
हो ना. अगदीच मोरपिशी अवस्था. बाकी तुमचे अनुभवही ह्याबाबतीत दांडगेच असणार म्हणा हे तुमच्या तरल शब्दांनी सहजच स्पष्ट होते.

In reply to by गवि

टर्मीनेटर Fri, 01/03/2025 - 16:55
वरच्या वाक्यात
"आधी मद्य पिऊन मग कोणत्याही मार्केटमध्ये फिरायला मजाच येते."
असे 'कोणत्याही मार्केटमध्ये' हे दोन शब्द ठळक करायचे राहुन गेले काय 😀 नीळा, हिरवा, पिवळा, तांबडाच काय पण 'मृत' समुद्रही जर कौतुकास पात्र ठरत असतील तर बिचाऱ्या 'काळ्या' समुद्राने असे काय कोणाचे घोडे मारले आहे? ('काळ्याशार' गोष्टीही आकर्षक असु शकतात 😉) तेव्हा घ्यावी की त्याच्यावरही फिरायची मजा 😂 बाकी 'काळ्या' वरुन सहज सुचलं म्हणून... काला रे सइयां काला रे तन काला रे मन काला रे काली जबान की काली गारी काले दिन की काली शामें सइयां करते जी कोल् बाज़ारी काला रे सइयां काला रे तन् काला रे मन काला रे काली जबान की काली गारी काले दिन की काली शामें सइयां करते जी कोल् बाज़ारी बैरी कोल् कोल् कोल् छीने तोल तोल तोल बैरी कोल् कोल् छीने तोल तोल तोल छत आँगन चार दिवारी सइयां करते जी सइयां करते जी सइयां करते जी सइयां करते जी सइयां करते जी कोल् बाज़ारी सइयां करते जी कोल् बाज़ारी काली मिटटी कुत्ता काला काला बिलकुल सुर्मे वाला काला कौवा हौवा काला काली मिटटी कुत्ता काला काला बिलकुल सुर्मे वाला काला कौवा हौवा काला काला बादल गिरने वाला काला मोती गिरने वाला काला झंडा डण्डा कला काला बटवा पैसा काला काली आँखों जैसा काला काली अग्नि काली गर्मी सूरज काला काला बीघा और गज काला काली हाथी हाथी काला काला बैरी कोल् कोल् कोल् छीने तोल तोल तोल बैरी कोल् कोल् छीने होल से टोल रंग पानी और पिचकारी सइयां करते जी पिया करते जी सइयां करते पिया करते जी काला रे सइयां काला रे तन काला रे मन्न काला रे काली जबान की काली गारी काले दिन की काली शामें सइयां करते जी कोल् बाज़ारी काला रे सइयां काला रे तन काला रे मन्न काला रे काली जबान की काली गारी काले दिन की काली शामें सइयां करते जी कोल् बाज़ारी. स्नेहा खानवलकर ह्या गुणी संगीत दिग्दर्शिकेने संगीतबद्ध केलेल्या 'गँग्स ऑफ वासेपूर २' मधल्या काला रे ह्या गाण्यात गीतकार वरुण ग्रोवर ह्यांनी इतक्या काळ्या गोष्टींचा उल्लेख केलाय, पण बिचारा 'काळा समुद्र' मात्र त्यात घ्यायचा राहून गेला बघा... 😎

In reply to by गवि

कंजूस Fri, 01/03/2025 - 14:46
खरंतर गुजरातला समुद्र पर्यटनाला जाऊच नये. औद्योगिकरणावर गुजरातने खूप भर दिला. नवसारीपासून पुढे वरती. मुंबई बाजारपेठ जवळ पडते. सापुतारा जरी महाराष्ट्रातील पर्यटकांना आवडत असले ( नाशिक जवळ) तरी गुजरातींना आवडत नाही. त्यांचे आवडते माथेरान महाबळेश्वर पाचगणी. मुंबई पुण्याला जवळची ठिकाणं पाहून झाल्यावर जरा बदल म्हणून दुसरीकडे काही आहे का याची चाचपणी करतात. पालघरच्य पश्चिमेला दहा किमीवर केळवे माहिम किनारा आहे. पालघर -मनोर - विक्रमगड- जव्हार- त्र्यंबकेश्वर - नाशिक या वाटेवर हल्ली 'गोवर्धन इको विलेज' मिनी वृंदावन ( इस्कॉनवाल्यांचं) हल्ली लोकप्रिय होत आहे. या मार्गावर बरीच रिसॉर्ट झाली आहेत. जव्हार मोखाडा भागातील वारली चित्रकला कमी होत आहे किंवा बाजारू होत आहे असं ऐकून आहे. सहलीच्या आराखड्यात/ मार्गावर चार पाच ठिकाणे असणे फायद्याचं ठरतं . एखादं नाही आवडलं कुणाला तर दुसरं सहल यशस्वी करतं.

In reply to by कंजूस

गवि Fri, 01/03/2025 - 15:54
केळवे किनारा तर लोकांनी घाणीने कचऱ्याने भरून टाकलेला दिसला. अगदी गेल्या वर्षात काही बदल झाला असेल तर माहीत नाही. लोक तिथे पिकनिक सारखा कार्यक्रम करून, बसून खाऊन प्लास्टिक प्लेट्स, खरकटे, उर्वरित अन्न असे सर्व जागीच टाकून उठत होते. किनाऱ्यावर हागणदारी होती. पार्किंग शुल्क किंवा तत्सम शुल्क वगैरे वसुली अवश्य होत होती पण स्वच्छतेच्या दृष्टीने काही दिसले नाही. पेड टॉयलेट होते. तेही अस्वच्छ. आपले सामान्य नागरिक देखील एकूण स्वच्छतेचा सेन्स कमी असलेले आहेत असेच वाटते सगळीकडे.

In reply to by गवि

कंजूस Fri, 01/03/2025 - 16:24
हं. नवीन अपडेट्स लक्षात ठेवायला हवेत. बाकी प्रचेतसकुमार चांगल्या जागा शोधतात. पण काहीच उघड करतात. BNHS वालेही चांगल्या जागा सांगत सुटत नाहीत. फेसबुकाच्या भिंती भरल्या की लोंढे तिकडेच जातात. राजमाची, कास पठार, सांधण, हरिहर.

टर्मीनेटर Fri, 01/03/2025 - 17:47
आपल्या सर्वांच्या माहितीतले मिपाकर लेखक 'कुमार१' हे काही कामानिमित्त मुंबईला येणार आहेत. त्या निमित्ताने सोमवार दिनांक ६ जानेवारी २०२५ रोजी संध्याकाळी ६ नंतर भायखळा येथे एक मिपा कट्टा करण्याचे ठरत आहे. सोमवारचा, म्हणजे कामकाजाचा दिवस असल्याने फार लांबुन कोणी येऊ शकणार नाहीत ह्याची कल्पना असल्यामुळे 'कट्ट्यासाठी' वेगळा धागा वगैरे काढलेला नाही, परंतु भायखळा परिसरात किंवा मुंबई उपनगरांत रहाणारे कोणी मिपाकर येऊ शकत असतील तर त्यांचे सहर्ष स्वागत आहे. (केवळ एकमेकांची सदिच्छा भेट आणि गप्पा-टप्पांचा कार्यक्रम एवढाच ह्या कट्ट्याचा मुळ उद्देश आहे 😀)

In reply to by टर्मीनेटर

कंजूस Fri, 01/03/2025 - 18:16
मुंबईत मिपाकर मोजून तीन चारच असतील. आणि त्यातून राणीबाग फुले प्रदर्शनाचे निमित्त साधले तर उत्तम.

In reply to by कंजूस

विजुभाऊ Sun, 01/05/2025 - 15:09
मुंबईत ( ठाणे डोंबिवली धरुन) किमान तीस एक मिपाकर सहज असतील. रामदास , शँपेन , क्लिंटन, प्रभू मास्तर , साक्षी , ज्योति अळवणी , मदनबाण असे बरेच आहेत.

In reply to by टर्मीनेटर

Bhakti Sat, 01/04/2025 - 11:34
कुमार १ आता मिपावर का लिहित नाही.त्यांना नक्की सांगा की तुमचे अभ्यासपूर्ण लेख मिपावर देत जा.

In reply to by टर्मीनेटर

Nitin Palkar Mon, 01/06/2025 - 08:18
या कट्ट्याला येतो असे कुमार१ यांना बोललो होतो. अचानक महत्वाचे काम निघाल्यामुळे येऊ शकत नाही. लवकरच पुन्हा असा योग येवो.

Bhakti Sat, 01/04/2025 - 11:43
आणि आजोबा परत जिवंत झाले! ;) लाखातून एखादा व्यक्ती इतका नशीबवान असू शकतो.हार्ट ॲटॅकमुळे मृत घोषित केलेल्या आजोबांचे शव रूग्णवाहिकेतून घरी नेताना रस्त्यावरील खड्ड्यांच्या धक्क्यामुळे आजोबांचे ह्रदय पुन्हा चालू झाले असावे.कारण नातवाला नंतर त्यांच्या हाताच्या बोटांची हालचाल दिसली.मग पुढील उपचाराला परत दुसऱ्या दवाखान्यात नेले.तर आजोबांच्या ह्रदयाचे ठोके दिसले. देव तारी त्याला कोण मारी... https://youtu.be/Y5Ap-dknaww?si=Ezn1IIWLjspCJ5Sl

In reply to by Bhakti

चौथा कोनाडा Sun, 01/05/2025 - 20:10
या घटनेची नोंद घेत महाराष्ट्राच्या आरोग्य खात्याने सदर खड्ड्याचे मोजमाप करून तशाच प्रकारचे खड्डे विविध रस्त्यांवर पाडण्याचे नियोजन केलेले आहे. या खड्डा इफेक्टमुळे सीपीआर ची प्रोसिजर कालबाह्य होऊ शकते असे माझी आरोग्य सचिव माननीय डॉक्टर चंगावडकर श्रीपाद यांनी प्रतिपादित केले ! या नियोजित खड्ड्यांच्या कंत्राटांवरून आत्ताच वाद सुरू झालाय ! राजकीय नेते श्री अमुक प्रमुख यांनी या कंत्राटात बावीस कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला. आणि या प्रकरणाची चौकशी करावी अशी मागणी माननीय मुख्यमंत्री यांच्याकडे केली.

कंजूस Sun, 01/05/2025 - 10:24
माथेरानमध्ये पर्यटक घोड्यावर बसून जात आहेत, काही जण मिनी ट्रेन पाहात आहेत, माकडे पर्यटकांच्या खाऊच्या पिशव्या हिसकावून घेत आहेत अशा माहितीवर Chatgpt ने काढलेलं चित्र.image थोड्या चुका आहेत, अर्धवट कापली गेली आहेत दृष्य. तरी ठीकच.

कंजूस Mon, 02/24/2025 - 00:28
उन्हाळी भटकंती. काल एक भटकंती केली. खंडाळा घाटासाठी रेल्वे जिथून पळसधरी स्टेशनानंतर वर चढते त्या पहिल्या डोंगरात आहे सोनगिरी. ( मुंबईतील तरुण नवख्या ट्रेकरांचा पावसाळ्यातला आवडता ट्रेक. आणखी एक सोंडाई डोंगर माथेरानच्या चौक पाॅइंटच्या खाली आहे.) उन्हाळा सुरू झाला आहे, रान वाळले आहे तरी दुपारी बारा ते पाच तळापासून माथ्यापर्यंत (५०० मिटर्स) अतोनात डास होते. शांतपणे बसून डबासुद्धा खाता आला नाही. या उलट मागचाच डोंगर राजमाचीचा. तिथे कधीच कुठेही डास नसतात. हे असं का?

कंजूस Wed, 03/12/2025 - 10:38
वेरूळ दहाव्या लेण्यात किरणोत्सव..... लोकसत्ता बातमी. https://youtu.be/2xX1I0EUcNk?si=Q7AHHpInuRYAN6Zc असा दिसत असला तरी त्यासाठी लेण्या तशा बांधलेल्या नसाव्यात. वेरूळ लेण्या बहुशा पश्चिमाभिमुख आहेत त्यामुळे दुपारी वर्षातून दोनवेळा किरण आतापर्यंत येत असणारच. आपली देवळं मुद्दामहून पूर्वाभिमुख बांधतात. काही पश्चिम दिशेला तोंड करून. तसं लेण्यांचं नाही. बौद्ध भिक्कुंना पावसाळ्यात विश्रांतीसाठी विहार आणि लेणी आणि चैत्य बांधण्यात ( खोदण्यात) आले होते. मूळ उद्देश हा होता.

कंजूस Wed, 03/12/2025 - 10:56
विमान परत फिरवणे.... मागच्या आठवड्यात एक शिकागो ते दिल्ली विमान टॉयलेट्स तुंबल्याने परत शिकागोला नेले. https://youtu.be/ZQemz_Enpxc?si=w1SuHw86alXZ6IiW उड्डाणाचे फक्त चार तास उरले होते. मग वाटेत कुठे emergency landing या कामासाठी मिळत नसावेत का? किंवा ते देश अशि सर्विस देत नसतील?

कंजूस Wed, 03/19/2025 - 18:32
माथेरान कालपासून बंद. टॅक्सी, इ रिक्षा आणि घोडे वाले संपावर. कारण काय तर म्हणे पर्यटकांची फसवणूक करणारे विडिओ यूट्यूबवर आले. खरं कारण ... खाजगी वाहनाने येणारे पर्यटक वाढले आणि ते दस्तुरी नाक्यावरून शटल टॉय ट्रेन किंवा इ रिक्षांनी माथेरानच्या बाजार पर्यंत जातात. ते आठवड्यात कोणत्याही दिवशी येऊन जातात. हमाल, हॉटेल्स आणि घोडेवाल्यांचा धंधा जोरात चालतो. इ रिक्षा दहा आहेत. फक्त सुट्ट्या लागल्यावर येणारे पर्यटकच टॅक्सी घेतात. एकूण काय तर २७० टॅक्सी वाल्यांना धंधा मिळत नाही पण पर्यटक खूप येतात. नेरळ ते दस्तुरी नाका जाणारी एसटी मिनीबस ( पंचवीस रुपयांत) हीसुद्धा पोटदुखी आहे. फसवणूक टॅक्सीवालेच करतात. खाजगी कार्यालयांना " आमच्या टॅक्सी नेच जा असा हेका धरतात किंवा पाचशे रुपये द्या असा दम भरतात. काही शहाणे टॅक्सी वाल्यांनी मात्र पन्नास रु सीटने धंधा सुरू ठेवला आहे. ( अधिकृत भाडे शंभर रु प्रती प्रवासी असे चारांचे चारशे रुपये घेतात. किंवा पूर्ण टॅक्सी खिडकीवर जाऊन बुक केल्यास ३६० रुपये लागतात. आता प्रश्न असा आहे की टॅक्सीवाले आठवड्याच्या इतर दिवशी ओला/ उबेर/ वगैरेंनी संबंध का ठेवत नाहीत. कारण या साईट्स " मारुती इको" वाहन नको सांगतात. सर्व माथेरान टॅक्स्या याच प्रकारच्या आहेत.

In reply to by कंजूस

चौथा कोनाडा गुरुवार, 03/20/2025 - 20:29
खासगी करण : वरच्या पातळीवर अदानी- अंबानी खालच्या पातळी छोटेआका, बडेआका अणि अन असे कार्यकर्ते म्हणवणारे खंडणीकार्यकर्ते

वामन देशमुख Fri, 03/21/2025 - 13:10
माझा कालचा WhatsApp Status SohalLalTeaTime #LifeIsFunWithFriends&SohanlalTea ☕
एका जिवलगाचा प्रतिसाद -
चहा आणी आणी ते सुद्धा संध्याकाळी 7 नंतर! उन लागलं की काय वामन तुला ? काळजी घे बाबा.
माझे उत्तर - हमारे तेलंगाणा के लोओंका मालूम नै तुमारकू? सुब्बे उट्टे जब से रात को सोने तलक कब्बी बी चायाँ पीने कू रेडीच रैतें। कल क्या वा मालूम? हमारे संजय बावा होर उनके इनो आये थे हमारे इधर म्हाराष्ट्रा सें । फिर Abits कु जाने के प्लानाँ बनायें। तो मैं बोलूं, चलो बावा, कैसे बी उदर जारैं । तो व्हांपे सोहनलाल की चाय भोत सईं रैती, दूर दूर से लोआं आते पीनेकू। पीते, तुम्म? तो उनो बोले, तुम इत्ता बोलरे तो कैकु नै पीते वामन राव? फिर हम, हमारे इनो, बावा, बावा के इनो ऐसे चार जणां गए चायाँ पीनेकू। अब तुमारकू तो मालूमिच हैं, वो चायाँ वायाँ पीने के शौकां तो अपुन नै पालते। फिर वो तीन जणां चायाँ पिए। भोत अच्चे है चायाँ बोले। बोलके मई स्टेटसां लगायूँ।

वामन देशमुख Wed, 04/30/2025 - 10:55
अक्षय्य तृतीयेनिमित्त घराजवळच्या श्री वेंकटेश्वर स्वामी (बालाजी) मंदिरात सपत्नीक गेलो होतो. घरी आंब्याची पाने-झेंडूची फुले यांची तोरणे, देवांना ताजे हार,फुले, यथासांग पूजा, विशेष नैवेद्य हे झाले. गोडधोड जेवण आहे. श्री कृपेने प्रसन्न वाटते आहे. गोविंदा गोविंदा गोऽविंदा!

In reply to by कंजूस

वामन देशमुख Wed, 04/30/2025 - 15:56
मेहकरचा बालाजी?
मी हैदराबादला राहतो. घराजवळच्या (आम्ही लोकांनी बांधलेल्या) देवळात गेलो होतो.‌ यापूर्वी मेहकरच्या बालाजी मंदिरात गेलेलो आहे.‌ तेथील बालाजीची मूर्ती खूप उंच आहे. बहुधा भारतभरातील सर्वात उंच मूर्ती असावी.

वामन देशमुख Fri, 05/09/2025 - 13:44
श्रीगुरुजी हा आइडी बॅन केल्याबद्दल मी तीव्र निषेध व्यक्त करतो. ज्या मोजक्या मिपाखरांमुळे मिसळपाववर वाचक येतात त्यांच्यापैकी एक हे श्रीगुरुजी होते.‌ हे लिहिण्याचा अधिकार मला आहे व हे लिहिल्यामुळे माझाच आइडी बॅन होणार नाही ही अपेक्षा. जय हिंद. --- हे मी खरडफळ्यावरही लिहिलं होतं; कायमची नोंद राहावी म्हणून इथे पुन्हा लिहीत आहे.

In reply to by वामन देशमुख

मारवा Fri, 05/09/2025 - 13:54
श्रीगुरुजी हे अनेकवेळा अभ्यासपूर्ण संदर्भासहित मांडणीणकरात होते हे खरे आहे. काहीवेळा मतभेद असले तरी जेबकी स्वाभाविक आहे तरी त्यांची एकूण मांडणी व चर्चेला योगदान चांगलेच होते यात शंका नाही अनेकदा माहीत नसलेले संदर्भ त्यांच्यामुळे माहिती होत होते. मात्र वामनराव त्यांची भाषेची मर्यादा भंगलेली होती असेही दिसून येते. त्यासाठी त्यांना समज देऊन संधी द्यायला हवी होती असेच अमरेंद्र बाहुबली यांना देखील संधिं द्यायाला हवी होती. असे उत्साहाने हिरीरीने चर्चा करणारे गेले तर त्याचे मला तरी नक्कीच वाईट वाटतें
सहज सुचलं म्हणून ( राजकारणसोडून छोट्या चर्चांसाठी) इतिहास, पुस्तकं, पाककला आणि इतर विषयांची चर्चा खरडफळ्यावर होते आणि मोठमोठे माहितीपर प्रतिसाद खरडफळा साफ झाल्यावर गायब होतात. तर तसे होऊ नये म्हणून हा धागा सुरू करत आहे. * आमच्या इथे एक पेपर आणि मासिके वाचनाचा एक मिनी ज्येष्ठ नागरिक कट्टा ( म्हणजे दोन बाकडी , कडाप्पा फरशी टाकून) सुरू झाला होता. परवा तिकडे एक पाटी वाचली आणि पुण्यात असल्यासारखं वाटलं. 'ज्येष्ठ नागरिक कट्टा' पाटीखाली 'राजकारण चर्चेसाठी नाही' असं लिहिलं होतं. हसू आलं. तर हा आपला धागाही राजकारण चर्चेसाठी नकोच असं ठरवलं. बघू असा चालतो.

तेल,साखर, मीठ प्रमाणा बाहेर प्राशन करणं म्हणजे मधुमेहाला आ मं त्र ण करणं.

श्रीकृष्ण सामंत ·

चित्रगुप्त Wed, 05/01/2024 - 23:49
वाक्ये सरळ लिहिण्याऐवजी वाट्टेलतिथे तोडून लिहीली आहेत, म्हणून वाटले. हा काही नवीन साहित्यप्रकार आहे ? की AI / speech to Text ची करामत आहे ?

In reply to by चित्रगुप्त

बाबुराव गुरुवार, 05/02/2024 - 08:27
लिहिणा-या वाटेल तसं लिहु द्या. चित्र-बीत्र त्यावर लेख लिहा. उगा शानपट्टी कशाला म्हणतो मी

श्रीकृष्ण सामंत गुरुवार, 05/02/2024 - 05:17
चित्रगुप्त सर तुमचं असं झालंय की राहुल गांधी जसा मोदी बद्दल काही ना काही तरी टीका करत असतो तसे झाले म्हणजे मी काय मला मोदी समजत नाही पण मला म्हणायचा अर्थ असा आहे की आता हे मी जे लिहिलंय ते तुम्हाला कुठच्याच गुगलवर मिळणार नाही आणि हे मी माझ्या भारतीय बांधवांसाठी लिहिलंय तर त्याच्यातही तुम्हाला आरटीबीटीजन दिसते मला म्हणायचंय यातही तुम्हाला आर्टिफिशियल इंटेलिजन्स दिसतं अहो साधारण 20 29 पासून हे जे आपल्यासारखे साहित्यिका आहेत ना त्यांची त्यांची जरुरीच भाषण नाही सुपर आर्टिफिशियल इंटेलिजन्स चे मेंदू ज्यावेळी कार्यरत होतील त्यावेळी माणसाचे मेंदू मागे पडतील पु ल देशपांडे यांसारखे लेखक हजारोंनी तयार होतील मग तुमचं आमचं काय एनीवे आता जेवढं मला सुचलं तेवढं मी ह्याच आर्टिफिशियल व्हाईस इंटेलिजन्स मधून तुम्हाला टाईप करून कळवत आहे त्याच्यात काही चुकाही दिसतील पण त्याला नाही लाज आहे यू आर वेलकम थँक्स

कंजूस गुरुवार, 05/02/2024 - 05:40
बाकी हे समर्थ कोण? तेल तूप साखर {अनावश्यक मात्रेत} खाण्याचा परिणाम म्हणजे मधुमेह ही व्याधी असा समज आहे. व्याधींचा परिणाम म्हणजे हे जिन्नस न पचणे.

श्रीकृष्ण सामंत गुरुवार, 05/02/2024 - 05:59
हे समर्थ माझे मित्र आहेत ते पूर्वी प्रोफेसर होते सायन्स सब्जेक्ट वर आम्ही दोन-चार मित्रमंडळी म्हणजे प्रोफेसर देसाई प्रोफेसर 200 प्रोफेसर समर्थ आणि मी असे मित्रमंडळी संध्याकाळी भेटतो आमच्या जवळच्या तळ्यावर आणि तिकडे गप्पागोष्टी होतात कधी कधी आम्ही चौघेही नसतो तेव्हा जे कोण भेटलो त्यांच्याशी चालू घडामोडीवर किंवा नवीन विषयावर चर्चा होतात आणि ह्या चर्चा मी माझ्या ब्लॉगवर कृष्ण वॉच गुगल केल्यावर माझा ब्लॉग मिळेल कृष्ण वाच म्हणून त्याच्या त्याच्यावर हे लिहीत असतो

चित्रगुप्त Wed, 05/01/2024 - 23:49
वाक्ये सरळ लिहिण्याऐवजी वाट्टेलतिथे तोडून लिहीली आहेत, म्हणून वाटले. हा काही नवीन साहित्यप्रकार आहे ? की AI / speech to Text ची करामत आहे ?

In reply to by चित्रगुप्त

बाबुराव गुरुवार, 05/02/2024 - 08:27
लिहिणा-या वाटेल तसं लिहु द्या. चित्र-बीत्र त्यावर लेख लिहा. उगा शानपट्टी कशाला म्हणतो मी

श्रीकृष्ण सामंत गुरुवार, 05/02/2024 - 05:17
चित्रगुप्त सर तुमचं असं झालंय की राहुल गांधी जसा मोदी बद्दल काही ना काही तरी टीका करत असतो तसे झाले म्हणजे मी काय मला मोदी समजत नाही पण मला म्हणायचा अर्थ असा आहे की आता हे मी जे लिहिलंय ते तुम्हाला कुठच्याच गुगलवर मिळणार नाही आणि हे मी माझ्या भारतीय बांधवांसाठी लिहिलंय तर त्याच्यातही तुम्हाला आरटीबीटीजन दिसते मला म्हणायचंय यातही तुम्हाला आर्टिफिशियल इंटेलिजन्स दिसतं अहो साधारण 20 29 पासून हे जे आपल्यासारखे साहित्यिका आहेत ना त्यांची त्यांची जरुरीच भाषण नाही सुपर आर्टिफिशियल इंटेलिजन्स चे मेंदू ज्यावेळी कार्यरत होतील त्यावेळी माणसाचे मेंदू मागे पडतील पु ल देशपांडे यांसारखे लेखक हजारोंनी तयार होतील मग तुमचं आमचं काय एनीवे आता जेवढं मला सुचलं तेवढं मी ह्याच आर्टिफिशियल व्हाईस इंटेलिजन्स मधून तुम्हाला टाईप करून कळवत आहे त्याच्यात काही चुकाही दिसतील पण त्याला नाही लाज आहे यू आर वेलकम थँक्स

कंजूस गुरुवार, 05/02/2024 - 05:40
बाकी हे समर्थ कोण? तेल तूप साखर {अनावश्यक मात्रेत} खाण्याचा परिणाम म्हणजे मधुमेह ही व्याधी असा समज आहे. व्याधींचा परिणाम म्हणजे हे जिन्नस न पचणे.

श्रीकृष्ण सामंत गुरुवार, 05/02/2024 - 05:59
हे समर्थ माझे मित्र आहेत ते पूर्वी प्रोफेसर होते सायन्स सब्जेक्ट वर आम्ही दोन-चार मित्रमंडळी म्हणजे प्रोफेसर देसाई प्रोफेसर 200 प्रोफेसर समर्थ आणि मी असे मित्रमंडळी संध्याकाळी भेटतो आमच्या जवळच्या तळ्यावर आणि तिकडे गप्पागोष्टी होतात कधी कधी आम्ही चौघेही नसतो तेव्हा जे कोण भेटलो त्यांच्याशी चालू घडामोडीवर किंवा नवीन विषयावर चर्चा होतात आणि ह्या चर्चा मी माझ्या ब्लॉगवर कृष्ण वॉच गुगल केल्यावर माझा ब्लॉग मिळेल कृष्ण वाच म्हणून त्याच्या त्याच्यावर हे लिहीत असतो
लेखनविषय:
लेखनप्रकार
तेल,साखर, मीठ प्रमाणा बाहेर प्राशन करणं म्हणजे मधुमेहाला आ मं त्र ण करणं. काल मी आणि श्री समर्थ असे दोघेच तळ्यावर फेऱ्या घालत होतो.बोलता बोलता मधुमेह ह्या व्याधीचा विषय निघाला. “अलीकडे आपल्याकडे ह्या व्याधींचं प्रमाण प्रचंड वाढलं आहे “ असं मी समर्थांना म्हणालो. “जशी देशाची श्रीमंती वाढत चालली आहे तशी अनेक जणांची खाण्याची सवय वृद्धींगत होत चालली आहे असं मला वाटतं. आणि हळूहळू एव्हडं जेवण घरी तयार करून ठेवण्यापेक्षा बाहेर उक्तं मिळत असेल तर बाहेर पैसे खर्च केल्यास घरी कष्ट कमी होतात.आणि बाहेर जेवण्याच्या सवयी वाढत असल्याने त्याची पुर्तता करण्यासाठी खाण्याच्या सोई वाढत आहेत.

मी काय चुकीचे केले??

अमरेंद्र बाहुबली ·

कर्नलतपस्वी गुरुवार, 04/11/2024 - 18:43
एकदा कुल्ल्यावर पाणी टाक म्हणला, खाली काय लोंबत म्हणून विचारलं? त्यानं धू धू धुतला, मला सांगा अबांच काय चुकलं..... अबांची निरागस तक्रार आवडली. अबा,हल्के घ्या. पुलंचा भक्त.

अहिरावण गुरुवार, 04/11/2024 - 18:54
हा हा हा भारी किस्से आहेत... कधी कधी आपलं आपल्यालाच कळत नाही ... च्यामारी.. काय चुकलं आपलं? शांत बसायचं आणि सोडून द्यायचं...

चित्रगुप्त गुरुवार, 04/11/2024 - 19:38
अबा, तुमच्या एका जुन्या खुसखुशीत लेखाची आठवण आली. आता त्याचे नाव विसरलो. असे हलकेफुलके, काहीसे विक्षिप्त, खुसखुशीत लेखन तुम्हाला मस्त जमते. आणखी जरूर लिहा.

In reply to by सुबोध खरे

ह्यावरून एक मस्त राजकीय कोटि सुचली होती पण माझ्या दारात भांडणं नको म्हणून आवरत घेतो. :)

In reply to by अमरेंद्र बाहुबली

अहिरावण Mon, 04/15/2024 - 06:58
नाही, पण बिनडोक, शेंडा ना बुडूख, कशालाही संबंध नसलेली म्हणजेच नेमके सांगायचे तर तुम्ही करता तशी टीका हा हैदोस असतो. हास्यास्पद बनला आहात तुम्ही !! अजुनही वेळ गेलेली नाही सुधरा !! नैराश्याच्या गर्तेत पडत चालला आहात. सावरा स्वतःला. राहुल सत्तेवर आला काय आणि मोदी सत्तेवर राहीले काय तुमचे आयुष्य आहे तेच रहाणार आहे. त्यात बदल फक्त तुम्ही स्वत: सकारात्मकतेने करु शकता. सकारात्मक रहा !! आनंदी रहा.. जीवनाची मजा घ्यायला शिका... कायम एरंडेल पिऊन फिरु नका !

In reply to by अहिरावण

चित्रगुप्त Mon, 04/15/2024 - 08:14
@अहिरावण यांच्या प्रतिसादाशी सहमत. कुणाच्यातरी द्वेषाने अंध झाले की साध्या गोष्टीही समजत नाहीश्या होतात असे दिसते. हास्यास्पद प्रतिसाद टाकून आपली प्रतिमा खराब करुन घेण्याऐवजी काही सकस लेखन करा, त्यासाठी अभ्यास करा. त्यातूनच उत्तम लेखन आणि व्यक्तिमत्व घडेल. एकदा आपली प्रतिमा खराब झाली की आपल्या चांगल्या लेखनाकडेही वाचक पाठ फिरवतात. वेळीच सावध व्हा. ( हा इशारा तुमच्या हितचिंतकांनी पूर्वीही दिला असेल) .

In reply to by चित्रगुप्त

चौकस२१२ Tue, 04/16/2024 - 05:28
जीवनाची मजा घ्यायला शिका... कायम एरंडेल पिऊन फिरु नका ! कुणाच्यातरी द्वेषाने अंध झाले की साध्या गोष्टीही समजत नाहीश्या होतात असे दिसते. जळी स्थळी काष्ठी पाषाणी कि काय म्हणतात तसे बाहुबलींना सतत असलेच मुद्दे काढायचे असतात उदाहरण : फ्रान्स मधील प्रवास वर्णन लिहिले .. त्यात सुधा एक पिंक मारलीच " आय कमी फ्रॉम लॅड हु किल्ड गांधी " ह्यांना दुसरे काही महाराष्ट्रात दिसले नाही

In reply to by चौकस२१२

Trump Tue, 04/16/2024 - 11:24
जळी स्थळी काष्ठी पाषाणी कि काय म्हणतात तसे बाहुबलींना सतत असलेच मुद्दे काढायचे असतात
+१ श्री बाहुबलींना प्रत्येक धाग्यावर घाण करायची असते. बहुतेक लिखाण बालिशपणाचे आणि मुर्खपणाचे असते. एका ठिकाणी इस्त्राईलने गाझामध्ये नरसंहार केला पाहिजे असे सुचवले होते. सुधारण्याच्या पलिकडे गेलेले प्रकरण आहे.

In reply to by Trump

अहिरावण Tue, 04/16/2024 - 11:36
नेमके. पण इतके सांगूनही त्यांना समजत नाही, की समजते पण उमजत नाही की समजून घ्यायचेच नाही !! एकंदरीत प्रचंड नैराश्याने ग्रासलेले, पीडलेले दिसत आहेत. त्यांच्या जवळच्यांनी त्यांची काळजी घ्यायला हवी. कूणी जर त्यांच्या घरच्यांना ओळखत असतील तर त्यांना मनोचिकित्सकाकडे घेऊन जायला हवे.

In reply to by अहिरावण

Trump Tue, 04/16/2024 - 11:44
नेमके. पण इतके सांगूनही त्यांना समजत नाही, की समजते पण उमजत नाही की समजून घ्यायचेच नाही !!
किंवा ज्या सातत्याने ते लिहीत असतात आणि रोज वेळ खर्च करतात त्यावरुन असेही वाटते की बहुतेक त्यांना त्याचे पैसे मिळत असतील.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

Trump Tue, 04/16/2024 - 12:47
या तुम्ही. इथे घाण नका करू.
म्हणजे तुम्ही दुसरीकडे घाण करत फिरणार. स्वत:चे ठेवावे झाकुन आणि दुसर्याचे बघावे वाकुन.

In reply to by Trump

अहिरावण Tue, 04/16/2024 - 13:25
अगदी अगदी हाच दांभिक दळभद्रीपणा प्रत्येक धाग्यावर करत असतात संबंध असो नसो.. मोदी, बीजेपी, संघ, हिंदूंवर कारण नसतांना ओका-या काढत असतात

In reply to by Trump

कर्नलतपस्वी Tue, 04/16/2024 - 13:14
बरेच वेळा प्रत्यक्ष भेटलो आहे.ते एक उत्साही,स्वतंत्र व्यक्तिमत्त्वाचे धनी आहेत. समोरच्याला बोलते करण्याचे कसब त्यांच्यामधे आहे.त्यांची मते वेगळी आहेत पण अशी बर्‍याच लोकांची आहेत. त्यांची मते वेगळी म्हणून मानसोपचार चा दरवाजा दाखवणे मला तरी योग्य वाटत नाही. लोकशाहीत स्वतंत्र मत ठेवणे हा मुलभूत हक्क आहे. अबांना फक्त एकच न मागितलेला सल्ला,भाषेला धार लावा व लिहीण्यापुर्वी स्वमतावर एकदा अंतर्मुख होऊन पुनर्विचार करा आणी मगच लिहा.

In reply to by कर्नलतपस्वी

चौकस२१२ Tue, 04/16/2024 - 16:15
बरेच वेळा प्रत्यक्ष भेटलो आहे.ते एक उत्साही,स्वतंत्र व्यक्तिमत्त्वाचे धनी आहेत. असतील नसतील काय त्याचे .. इथे जी सतत (अगदी प्रवास वर्णनात सुद्धा ) जी वृत्ती दाखवतात त्याबद्दल लोक बोलत आहेत

In reply to by अहिरावण

सर तुमच्या सारख डू आय डी घेऊन तोंड लपवत फिरत नाही मी. अशी पळपुटेपणाची भीती घालवायला तुम्ही कुठल्यातरी मानसोपचार तज्ञा कडे जा. तुम्हाला कुणी विचारत नाही इथे. डू आय डी ना फाट्यावर मारले जाते नी तुम्हालाही लोक तेच करताहेत.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

अहिरावण Tue, 04/16/2024 - 13:24
अरे बिनडोक पणा कमी करा... टोपण नावाने तुम्ही पण लिहित आहे. सारखे सारखे डु आयडी डुआयडी बरळत आहात... सावरा स्वतःला जा ! संपादक मंडळाला सांगा माझं नाव आणि करा रीतसर तक्रार...

In reply to by अमरेंद्र बाहुबली

कांदा लिंबू Wed, 04/24/2024 - 12:56
सर तुमच्या सारख डू आय डी घेऊन तोंड लपवत फिरत नाही मी. अशी पळपुटेपणाची भीती घालवायला तुम्ही कुठल्यातरी मानसोपचार तज्ञा कडे जा. तुम्हाला कुणी विचारत नाही इथे. डू आय डी ना फाट्यावर मारले जाते नी तुम्हालाही लोक तेच करताहेत.
तुम्हाला माहित नाहीसं दिसतंय. चला, तुम्हाला सामान्यज्ञान सांगतो. सरांसारखाच काय तर इतर कुणासारखाही आयडी तुम्हाला घेता येत नाही. प्रत्येक आयडी हा unique असतो. तुम्ही तोंड लपवत फिरता हा काही तुमचा choice नाहीय. मिपावर खराखुरा फोटो टाकणे अनिवार्य नाही. एक avatar म्हणून चित्र असते ते by default सर्वांसाठी एकाच असते. ते बदलता येते. जसे मी माझ्या आईडीनुसार कांदा लिंबू ठेवलेले आहे. तुम्ही ते बदलू शकता. स्वतःचा खराखुरा फोटो upload करू शकता. डुआयडी ना फाट्यावर मारण्याआधी डुआयडी हि कल्पना समजून घ्या. अजून काही मदत लागली तर व्यनि करा.

In reply to by Trump

ट्रम्प सर आवरा तुमच्या डोक्यात बुद्धी शाबूत असेल तर परत जाऊन ते इस्राईल वरचे प्रतिसाद वाचा. तिथे मी स्पष्ट लिहिलय की “जर हमस्क किंवा पॅलेस्टाइनच्या हल्ल्यात इस्राईल्क चा एक मनुष्यही मरत असेल तर इस्राईल्क ने हमस्क किंवा पॅलेस्टाइन बेचिराख करायला आजीबाबत मागे पुढे पाहू नये. इस्राईल च्या लोकांनाही जगायचाक तितकाच अधिकार आहे जितक्या तुमच्याक लाडक्या हमासच्या.” आणी भाजपवर टिका झाल्यामुळे असे पिसाळत जाऊन काहीबही लिहत जाऊ नका. नाहीतर वाचत नका जाऊ. स्वतःत सुधारणा करा आधी. आले मोठे शहाणे ज्ञान शिकवायला.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

Trump Tue, 04/16/2024 - 12:46
आणी भाजपवर टिका झाल्यामुळे असे पिसाळत जाऊन काहीबही लिहत जाऊ नका. नाहीतर वाचत नका जाऊ. स्वतःत सुधारणा करा आधी. आले मोठे शहाणे ज्ञान शिकवायला.
इस्त्राईलचा संदर्भ दिला, तिथे भाजप कोठे आले ? आणि भाजपचा आणि माझा सबंध काय ?

In reply to by अमरेंद्र बाहुबली

कांदा लिंबू Wed, 04/24/2024 - 12:42
ट्रम्प सर आवरा तुमच्या डोक्यात बुद्धी शाबूत असेल तर...
... स्वतःत सुधारणा करा आधी. आले मोठे शहाणे ज्ञान शिकवायला.
एखाद्या डूआइडीने Trump यांना असे म्हटलेले पाहून एक मिपाकर म्हणून मला शरम वाटली.

दोन किस्से राहिले टाकायचे. त्याने प्रीबेबी शूट चे फोटो फेसबुक वर टाकून टॅगलाइन लिहीली. “बाळा लवकर ये आम्ही तुझी वाट पाहतोय.” मी लिहीले, “लवकर कसं येणार ते?? ९ महिने लागतीलच ना?” त्याने बरेच फ़ोन केले. पण मी उचलला नाही. मी काय चुकीच केले? एका अमेरिकास्थित भारतीयाच्या व्हॉट्सअप स्टेटसवर “Nation first” अस लिहिलं होतं. मी “नेमकं कुठलं नेशन?, भारत की अमेरिका?” विचारलं. त्यानी मला ब्लॉक केले. मी काय चुकीच केलं?

In reply to by अमरेंद्र बाहुबली

अहिरावण Sun, 04/14/2024 - 20:06
>>>त्याने प्रीबेबी शूट चे फोटो फेसबुक वर टाकून टॅगलाइन लिहीली. “बाळा लवकर ये आम्ही तुझी वाट पाहतोय.” मी लिहीले, “लवकर कसं येणार ते?? ९ महिने लागतीलच ना?” प्री बेबी शुट साधारण कितव्या महिन्यात करतात? तेव्हापासून ९ महिने म्हणजे गर्भधारणा नक्की किती महिन्यांची? साहजिक आहे कुणी पण रागावणारच ना !! चुकलंच तुमचं गणित !!

In reply to by अमरेंद्र बाहुबली

चौकस२१२ Mon, 04/15/2024 - 04:35
एका अमेरिकास्थित भारतीयाच्या व्हॉट्सअप स्टेटसवर “Nation first” अस लिहिलं होतं. मी “नेमकं कुठलं नेशन?, भारत की अमेरिका?” विचारलं. त्यानी मला ब्लॉक केले. मी काय चुकीच केलं? त्याचा संधर्भ नाही दिलात? "नेशन फर्स्ट" हे "धर्म फर्स्ट" पेक्षा वरचे अश्या अर्थाने त्याला म्हणावेसे वाटले असावे असा माझा तर्क ( चुकीचा असेल पण तुम्ही स्पष्ट केल्याशिवाय कसे कळणार) तुम्ही बहुतेक सोयीस्कर रित्या तो माणूस भारत आणि अमेरिका यासंधार्बत बोलतोय असा अर्थ काढलेला दिसतोय हा प्रतिसाद देण्याचे कारण कि बरेचदा नेशन फर्स्ट हे सध्याचं काळात अनेक देशांत धर्म कि देश या संधरबात बोलले जाते म्हणून

In reply to by कंजूस

अहिरावण Tue, 04/16/2024 - 13:27
क्रांती भारतात एकदाच झाली... आणीबाणी नंतर... आता काही तितकी भयावह स्थिती नाही... ४०० पार नाही पण ३०० पार नक्की होणार

कांदा लिंबू Tue, 04/16/2024 - 16:40
अमरेंद्र बाहुबली यांच्यावर इतर मिपाकरांनी रागावू नये. ते आपल्यासारखेच मिपा सदस्य आहेत. त्यांना आपल्या मदतीची गरज आहे. काही वेळा माणूस चीडचीड, निराशा, त्वेष इत्यादी भावनांच्या अवस्थेतून जात असतो. व्यक्तिव्यक्तीनुसार या अवस्थेचा कालावधी कमी अधिक असू शकतो. काही मिनिटे ते अनेक महिने-वर्षे असा तो असू शकतो. अश्या अवस्थेत असताना तो अनपेक्षित, समाजअमान्य, अवमानकारक, नकारात्मक प्रतिसाद देत असतो. ते लवकरच सामान्य अवस्थेत येतील आणि त्यानंतर ते असे वागणार नाहीत अशी अपेक्षा. #HelpAmbA

In reply to by अमरेंद्र बाहुबली

चौकस२१२ Wed, 04/17/2024 - 04:17
अमरेंद्र बाहुबली, भाजप विरोधी युक्तिवाद प्रतिसाद मुद्देसूद पणे जरुर दयावा नाही कोण म्हणतो पण जिथे तिथे भाजप / संघ / मोदी / मनुवादी हिंदू वैगरे आणू नये एवढेच लोक म्हणत आहेत , (अर्थात असे नाही म्हणत कि तुम्ही एखादा लेख " भाजप कसा चुकतो " वैगरे लिहू नये नक्की लिहा ) आणि दुसरे भाजपचच्या एखाद्या कामाची स्तुती केल्यास लगेचच ती व्यक्ती चड्डीवाली/ संघिष्ट/ मनुवादी होत नाही सिहासन मधील डिकास्टा म्हणतो तसे " आज या मुख्य मंत्र्याला मी पाठिंबा देईन पण उद्या जर काम नाही केलं तर याच विधान भवना समोर जोड्याने मारिन " ( शब्द पुढेच मागे झाले असतील ) तसेच मोदी म्हणजे काही देव नाहीत पण दानव पण नाहीत

In reply to by चौकस२१२

बाबुराव Wed, 04/17/2024 - 15:53
भाजप / संघ / मोदी / मनुवादी हिंदू वैगरे आणू नये एवढेच लोक म्हणत आहेत ,
काका आपल्या सारख्या काहीनच्या विचारातून दिसतं की ते... म्हणून काही लोक तशी टीका करीत असावेत.

In reply to by कांदा लिंबू

कर्नलतपस्वी Tue, 04/16/2024 - 18:29
नावाप्रमाणेच बाहूबली आहे. आपल्याला भल्लालदेव आणी कटप्पा शोधायला लागेल. मलाही त्यांची मते पटत नाहीत पण मिपा बाहेर आवडतात. बाकी प्रत्येक सदस्य आपले मत व्यक्त करू शकतो. पण त्याने विचलित होऊ नये. जरी तुकोबाराय म्हणत असतील की, घासावा शब्द तासावा शब्द .... पण मग वाद सवांद पुढे चालणार कसा....

In reply to by कपिलमुनी

अहिरावण Tue, 04/16/2024 - 18:53
आम्ही कोणत्याही प्रकारे भाजप, मोदी, संघ यांच्याशी संबंधीत नाही, नव्हतो आणि नसू. भाजपला मत देणे किंवा भाजप सध्या इतर कोणापेक्षाही "बरा" पर्याय आहे असे म्हणणे म्हणजे त्यांच्याशी "संबंध" असणे असे नव्हे. बाकी आम्ही कट्टर हिंदू आहोत, होतो. असू. शेंडा ना बुडूख, बिनडोक प्रतिसाद देणा-यांना विरोध करुच यात शंका नाही. बाकी तुमचे चालू द्या !!

Vichar Manus Tue, 04/16/2024 - 18:52
अमरेंद्र जर एकांगी, एकसुरी, द्वेषमूलक , नकारात्मक लिहीत असतील तर एक भक्तविहारी नावाचे id पण तसेच किंबहुना जास्त एकांगी लिहतात, त्याबद्दल कोणीच काही म्हणत नाही

In reply to by Vichar Manus

अहिरावण Tue, 04/16/2024 - 18:55
त्यांचे वय झाले आहे सुधरण्याची शक्यता संपली. हे तरुण आहेत म्हणून वाटते. आता त्यांची इच्छा नसेल तर राहिले. फक्त १०-१२ वर्षापूर्वीची "यकु" नावाच्या आयडीची दुर्देवी कथा आठवली, म्हणून तळमळ. जाऊ द्या ! ज्याचे त्याचे नशीब आणि कर्मफळ म्हणावे आणि सोडून द्यावे असे वाटते.

चित्रगुप्त Wed, 04/17/2024 - 02:33
@ अबा: द्वेषभावनेपेक्षा भक्तिभावना तब्ब्येतीस बरी, तस्मात आता यापुढले काही आठवडे सध्याच्या द्वेषपूर्ण प्रतिसादांऐवजी तुमच्या मनात ज्यांचेविषयी भक्तिभाव वसत असेल त्या व्यक्ती, पक्ष, संघटना, संस्था, विचारसरण्या वगैरेंविषयी काही सकारात्मक लिहून बघा. त्यामुळे तथाकथित 'अंधभक्तां'ना सुद्धा 'दुसरी बाजू' पण कळेल, आणि तुमच्या मनात धगधगणारी त्वेषाची, द्वेषाची आग जरा शमून शांती, समाधान लाभेल. वाचनमात्र असणार्‍या वाचकांनाही उबाठा, रागा, जाणता राजा किंव्हा जी कुणी तुमची X YZ आदरस्थाने असतील, त्यांचेविषयी काही चांगले वाचायला मिळेल. प्रयत्न करून बघा. सुरुवात म्हणून "मला बुवा अमूक .. अमूक ... अमूक .. यांचेविषयी भक्ती, प्रेम, आदर वगैरे वाटतो, एवढेतरी स्पष्ट करण्याचे साहस दाखवावे, ही विनंती. -- आपला एक हितचिंतक.

In reply to by चित्रगुप्त

बाबुराव Wed, 04/17/2024 - 16:20
तथाकथित 'अंधभक्तां'ना सुद्धा 'दुसरी बाजू' पण कळेल, चित्रगुप्तकाका भक्तांना कोणतीची बाजू समजू शकत नाही. एकच बाजू कळते ती म्हणजे मन लावून भक्ती.

चावटमेला Wed, 04/17/2024 - 15:31
मी मिपावर गेली कित्येक वर्षे वाचनमात्रच आहे. सहसा राजकीय धाग्यांवर/वादग्रस्त विषयांवर प्रतिसाद देण्याचे टाळतो. पण सदर धागालेखकाच्या लिखाणातला, प्रतिसादांमधला विखार, एखादी जात, समाज, धर्म, विचारसरणी ह्याबद्दलचा पराकोटीचा द्वेष खरोखरच चिन्ताजनक आहे. हा केवळ जालीय अवतार असेल तर ठीक, पण प्रत्यक्षातही तेच विचार असतील तर मात्र डोके चक्रावणारे आहे. विशेषतः सावरकरांच्या धाग्यावर जी गरळ ओकली ती तर घृणास्पद होती. समाजविघातक नरसंहारांची सुरूवात असल्याच द्वेषमूलक विचारांतून होते.

In reply to by चावटमेला

कांदा लिंबू Wed, 04/17/2024 - 16:10
हा केवळ जालीय अवतार असेल तर ठीक, पण प्रत्यक्षातही तेच विचार असतील तर मात्र डोके चक्रावणारे आहे.
सर्वसाधारणपणे, एखादी व्यक्ती जशी खऱ्या आयुष्यात वागते, जालावरही तशीच वागते.

In reply to by चावटमेला

अहो मेला चावट, सावरकर किंवा कुठल्याही जातीवर मी टीका केलेली नाही. केली असेल तर तस सिद्ध करा नाहीतर पळ काढून पुन्हा वाचनमात्र व्हा, नी पुन्हा अशी गरळ ओकायला येऊ नका.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

चावटमेला Wed, 04/17/2024 - 20:46
तशीही शेणात दगड टाकायची हौस नाही, पण आता टाकलाच आहे, तर, का? काय दादागिरी आहे का हुकूम सोडायला? का तुमची वैयक्तिक मालमत्ता आहे मिपा?

In reply to by चावटमेला

तुम्ही इथे काय गरळ ओकायची ती ओका, तुम्हाला कोण अडवणार?? पंक कुणावर आरोप लावन्या आधी पुरावेक गोळा करा. ते नसेल होत तर मग गप बसा नी पुन्हा असा पांचटपणा करू नका.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

चावटमेला गुरुवार, 04/18/2024 - 13:12
अलेच्चा, तुमच्याशी तुमच्या पातळीवरच येवून बोलावं लागणार ना पांचट शिरोमणी, त्यात काय चुकीचे केले आता? भलतेच विनोदी बुवा तुम्ही

बाबुराव Wed, 04/17/2024 - 15:50
काका ते दोन्ही बाजूंनी असतं अशी एकाची बाजू घेऊन मत मांडू नका. आपलंही काही तरी आतला गंड दुखावलं असेल म्हणून पराकोटीचा द्वेष वाटत असेल. :)

In reply to by बाबुराव

चौकस२१२ Wed, 04/17/2024 - 17:42
उग्रसेन अहो जी व्यक्ती साध्या प्रवास वर्णनात सुद्धा गांधी / गोडसे करते त्यांच्या हेतू बद्दल काय बोलायचे ?

In reply to by चौकस२१२

सुबोध खरे Wed, 04/17/2024 - 18:39
कुठे त्या भुजबळांच्या नादाला लागताय? खांद्या खाली बळकट असलेल्या माणसांशी वाद घालून निष्पन्न काहीच होत नाही.

In reply to by सुबोध खरे

भ्रष्टाचार इतर पक्षात राहुन केला तर तो देशद्रोह. पण भाजप मध्ये राहून केला तर राष्ट्रहित. कुटुंबातील सदस्याना इतर पक्षानी उमेदवारी दिली तर ती घराणेशाही पण भाजपात तस असेल तर ती घराणेशाही नाही. (उदा. फडणवीसांबद्दल डॉ. साहेबांच मत) त्याच प्रमाणे भाजप समर्थक असेल तर तो खांद्याच्या वर बळकट पण भाजप विरोधक् असेल तर तो खांद्याच्या खाली बळकट. - भाजप प्रेमी डॉ. खरे.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

सुबोध खरे Wed, 04/17/2024 - 20:22
मूर्ख --काहीतरी बोलायलाच पाहिजे म्हणून बोलणारा सुशिक्षित --काहीतरी बोलण्यासारखे आहे म्हणून बोलणारा ज्ञानी -- काहीच बोलत नाही.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

अहिरावण Wed, 04/17/2024 - 20:30
मनमोहन - The Raj was beneficial: Manmohan https://timesofindia.indiatimes.com/world/rest-of-world/the-raj-was-beneficial-manmohan/articleshow/1165516.cms नेहरु - डिसकवरी ऑफ इंडीञ (काही मुद्दे भरकटलेले) मोदी - मौत का सौदागर म्हटले तरी शांत मिळाले उत्तर ?

In reply to by अहिरावण

वाटलच होतं तुम्ही मध्ये लुडबुड करनार ते. मोदी शब्द आला म्हणजे धावत पळत जाऊन आरती ओवाळायची अस गरजेचं नाही. भक्ति (काहीकाळ तरी) दाबून धरावी. ज्यांना प्रश्न विचारलाय त्यांना उत्तर देऊ द्या. एवढीच उत्तर द्यायचिक हौस असेल तर खऱ्या आयडीने या.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

अहिरावण गुरुवार, 04/18/2024 - 10:01
अरेरे आम्ही सहज टंकन केले आणि तुमच्या मुस्काटीत खाडकन बसली याबद्दल खेद आहे

In reply to by अहिरावण

सुबोध खरे गुरुवार, 04/18/2024 - 09:56
@अहिरावण कुठे त्या भुजबळांच्या नादाला लागताय? खांद्या खाली बळकट असलेल्या माणसांशी वाद घालून निष्पन्न काहीच होत नाही.

In reply to by सुबोध खरे

अमरेंद्र बाहुबली गुरुवार, 04/18/2024 - 10:05
ह्यात मनमोहनसिंग, मोदी आणी नेहरु बसवायचे म्हटले तर कसे बसतील? :) हया प्रश्नाला तुम्ही बगल दिलीत. उत्तर मिळालय. :)

कर्नलतपस्वी गुरुवार, 04/11/2024 - 18:43
एकदा कुल्ल्यावर पाणी टाक म्हणला, खाली काय लोंबत म्हणून विचारलं? त्यानं धू धू धुतला, मला सांगा अबांच काय चुकलं..... अबांची निरागस तक्रार आवडली. अबा,हल्के घ्या. पुलंचा भक्त.

अहिरावण गुरुवार, 04/11/2024 - 18:54
हा हा हा भारी किस्से आहेत... कधी कधी आपलं आपल्यालाच कळत नाही ... च्यामारी.. काय चुकलं आपलं? शांत बसायचं आणि सोडून द्यायचं...

चित्रगुप्त गुरुवार, 04/11/2024 - 19:38
अबा, तुमच्या एका जुन्या खुसखुशीत लेखाची आठवण आली. आता त्याचे नाव विसरलो. असे हलकेफुलके, काहीसे विक्षिप्त, खुसखुशीत लेखन तुम्हाला मस्त जमते. आणखी जरूर लिहा.

In reply to by सुबोध खरे

ह्यावरून एक मस्त राजकीय कोटि सुचली होती पण माझ्या दारात भांडणं नको म्हणून आवरत घेतो. :)

In reply to by अमरेंद्र बाहुबली

अहिरावण Mon, 04/15/2024 - 06:58
नाही, पण बिनडोक, शेंडा ना बुडूख, कशालाही संबंध नसलेली म्हणजेच नेमके सांगायचे तर तुम्ही करता तशी टीका हा हैदोस असतो. हास्यास्पद बनला आहात तुम्ही !! अजुनही वेळ गेलेली नाही सुधरा !! नैराश्याच्या गर्तेत पडत चालला आहात. सावरा स्वतःला. राहुल सत्तेवर आला काय आणि मोदी सत्तेवर राहीले काय तुमचे आयुष्य आहे तेच रहाणार आहे. त्यात बदल फक्त तुम्ही स्वत: सकारात्मकतेने करु शकता. सकारात्मक रहा !! आनंदी रहा.. जीवनाची मजा घ्यायला शिका... कायम एरंडेल पिऊन फिरु नका !

In reply to by अहिरावण

चित्रगुप्त Mon, 04/15/2024 - 08:14
@अहिरावण यांच्या प्रतिसादाशी सहमत. कुणाच्यातरी द्वेषाने अंध झाले की साध्या गोष्टीही समजत नाहीश्या होतात असे दिसते. हास्यास्पद प्रतिसाद टाकून आपली प्रतिमा खराब करुन घेण्याऐवजी काही सकस लेखन करा, त्यासाठी अभ्यास करा. त्यातूनच उत्तम लेखन आणि व्यक्तिमत्व घडेल. एकदा आपली प्रतिमा खराब झाली की आपल्या चांगल्या लेखनाकडेही वाचक पाठ फिरवतात. वेळीच सावध व्हा. ( हा इशारा तुमच्या हितचिंतकांनी पूर्वीही दिला असेल) .

In reply to by चित्रगुप्त

चौकस२१२ Tue, 04/16/2024 - 05:28
जीवनाची मजा घ्यायला शिका... कायम एरंडेल पिऊन फिरु नका ! कुणाच्यातरी द्वेषाने अंध झाले की साध्या गोष्टीही समजत नाहीश्या होतात असे दिसते. जळी स्थळी काष्ठी पाषाणी कि काय म्हणतात तसे बाहुबलींना सतत असलेच मुद्दे काढायचे असतात उदाहरण : फ्रान्स मधील प्रवास वर्णन लिहिले .. त्यात सुधा एक पिंक मारलीच " आय कमी फ्रॉम लॅड हु किल्ड गांधी " ह्यांना दुसरे काही महाराष्ट्रात दिसले नाही

In reply to by चौकस२१२

Trump Tue, 04/16/2024 - 11:24
जळी स्थळी काष्ठी पाषाणी कि काय म्हणतात तसे बाहुबलींना सतत असलेच मुद्दे काढायचे असतात
+१ श्री बाहुबलींना प्रत्येक धाग्यावर घाण करायची असते. बहुतेक लिखाण बालिशपणाचे आणि मुर्खपणाचे असते. एका ठिकाणी इस्त्राईलने गाझामध्ये नरसंहार केला पाहिजे असे सुचवले होते. सुधारण्याच्या पलिकडे गेलेले प्रकरण आहे.

In reply to by Trump

अहिरावण Tue, 04/16/2024 - 11:36
नेमके. पण इतके सांगूनही त्यांना समजत नाही, की समजते पण उमजत नाही की समजून घ्यायचेच नाही !! एकंदरीत प्रचंड नैराश्याने ग्रासलेले, पीडलेले दिसत आहेत. त्यांच्या जवळच्यांनी त्यांची काळजी घ्यायला हवी. कूणी जर त्यांच्या घरच्यांना ओळखत असतील तर त्यांना मनोचिकित्सकाकडे घेऊन जायला हवे.

In reply to by अहिरावण

Trump Tue, 04/16/2024 - 11:44
नेमके. पण इतके सांगूनही त्यांना समजत नाही, की समजते पण उमजत नाही की समजून घ्यायचेच नाही !!
किंवा ज्या सातत्याने ते लिहीत असतात आणि रोज वेळ खर्च करतात त्यावरुन असेही वाटते की बहुतेक त्यांना त्याचे पैसे मिळत असतील.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

Trump Tue, 04/16/2024 - 12:47
या तुम्ही. इथे घाण नका करू.
म्हणजे तुम्ही दुसरीकडे घाण करत फिरणार. स्वत:चे ठेवावे झाकुन आणि दुसर्याचे बघावे वाकुन.

In reply to by Trump

अहिरावण Tue, 04/16/2024 - 13:25
अगदी अगदी हाच दांभिक दळभद्रीपणा प्रत्येक धाग्यावर करत असतात संबंध असो नसो.. मोदी, बीजेपी, संघ, हिंदूंवर कारण नसतांना ओका-या काढत असतात

In reply to by Trump

कर्नलतपस्वी Tue, 04/16/2024 - 13:14
बरेच वेळा प्रत्यक्ष भेटलो आहे.ते एक उत्साही,स्वतंत्र व्यक्तिमत्त्वाचे धनी आहेत. समोरच्याला बोलते करण्याचे कसब त्यांच्यामधे आहे.त्यांची मते वेगळी आहेत पण अशी बर्‍याच लोकांची आहेत. त्यांची मते वेगळी म्हणून मानसोपचार चा दरवाजा दाखवणे मला तरी योग्य वाटत नाही. लोकशाहीत स्वतंत्र मत ठेवणे हा मुलभूत हक्क आहे. अबांना फक्त एकच न मागितलेला सल्ला,भाषेला धार लावा व लिहीण्यापुर्वी स्वमतावर एकदा अंतर्मुख होऊन पुनर्विचार करा आणी मगच लिहा.

In reply to by कर्नलतपस्वी

चौकस२१२ Tue, 04/16/2024 - 16:15
बरेच वेळा प्रत्यक्ष भेटलो आहे.ते एक उत्साही,स्वतंत्र व्यक्तिमत्त्वाचे धनी आहेत. असतील नसतील काय त्याचे .. इथे जी सतत (अगदी प्रवास वर्णनात सुद्धा ) जी वृत्ती दाखवतात त्याबद्दल लोक बोलत आहेत

In reply to by अहिरावण

सर तुमच्या सारख डू आय डी घेऊन तोंड लपवत फिरत नाही मी. अशी पळपुटेपणाची भीती घालवायला तुम्ही कुठल्यातरी मानसोपचार तज्ञा कडे जा. तुम्हाला कुणी विचारत नाही इथे. डू आय डी ना फाट्यावर मारले जाते नी तुम्हालाही लोक तेच करताहेत.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

अहिरावण Tue, 04/16/2024 - 13:24
अरे बिनडोक पणा कमी करा... टोपण नावाने तुम्ही पण लिहित आहे. सारखे सारखे डु आयडी डुआयडी बरळत आहात... सावरा स्वतःला जा ! संपादक मंडळाला सांगा माझं नाव आणि करा रीतसर तक्रार...

In reply to by अमरेंद्र बाहुबली

कांदा लिंबू Wed, 04/24/2024 - 12:56
सर तुमच्या सारख डू आय डी घेऊन तोंड लपवत फिरत नाही मी. अशी पळपुटेपणाची भीती घालवायला तुम्ही कुठल्यातरी मानसोपचार तज्ञा कडे जा. तुम्हाला कुणी विचारत नाही इथे. डू आय डी ना फाट्यावर मारले जाते नी तुम्हालाही लोक तेच करताहेत.
तुम्हाला माहित नाहीसं दिसतंय. चला, तुम्हाला सामान्यज्ञान सांगतो. सरांसारखाच काय तर इतर कुणासारखाही आयडी तुम्हाला घेता येत नाही. प्रत्येक आयडी हा unique असतो. तुम्ही तोंड लपवत फिरता हा काही तुमचा choice नाहीय. मिपावर खराखुरा फोटो टाकणे अनिवार्य नाही. एक avatar म्हणून चित्र असते ते by default सर्वांसाठी एकाच असते. ते बदलता येते. जसे मी माझ्या आईडीनुसार कांदा लिंबू ठेवलेले आहे. तुम्ही ते बदलू शकता. स्वतःचा खराखुरा फोटो upload करू शकता. डुआयडी ना फाट्यावर मारण्याआधी डुआयडी हि कल्पना समजून घ्या. अजून काही मदत लागली तर व्यनि करा.

In reply to by Trump

ट्रम्प सर आवरा तुमच्या डोक्यात बुद्धी शाबूत असेल तर परत जाऊन ते इस्राईल वरचे प्रतिसाद वाचा. तिथे मी स्पष्ट लिहिलय की “जर हमस्क किंवा पॅलेस्टाइनच्या हल्ल्यात इस्राईल्क चा एक मनुष्यही मरत असेल तर इस्राईल्क ने हमस्क किंवा पॅलेस्टाइन बेचिराख करायला आजीबाबत मागे पुढे पाहू नये. इस्राईल च्या लोकांनाही जगायचाक तितकाच अधिकार आहे जितक्या तुमच्याक लाडक्या हमासच्या.” आणी भाजपवर टिका झाल्यामुळे असे पिसाळत जाऊन काहीबही लिहत जाऊ नका. नाहीतर वाचत नका जाऊ. स्वतःत सुधारणा करा आधी. आले मोठे शहाणे ज्ञान शिकवायला.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

Trump Tue, 04/16/2024 - 12:46
आणी भाजपवर टिका झाल्यामुळे असे पिसाळत जाऊन काहीबही लिहत जाऊ नका. नाहीतर वाचत नका जाऊ. स्वतःत सुधारणा करा आधी. आले मोठे शहाणे ज्ञान शिकवायला.
इस्त्राईलचा संदर्भ दिला, तिथे भाजप कोठे आले ? आणि भाजपचा आणि माझा सबंध काय ?

In reply to by अमरेंद्र बाहुबली

कांदा लिंबू Wed, 04/24/2024 - 12:42
ट्रम्प सर आवरा तुमच्या डोक्यात बुद्धी शाबूत असेल तर...
... स्वतःत सुधारणा करा आधी. आले मोठे शहाणे ज्ञान शिकवायला.
एखाद्या डूआइडीने Trump यांना असे म्हटलेले पाहून एक मिपाकर म्हणून मला शरम वाटली.

दोन किस्से राहिले टाकायचे. त्याने प्रीबेबी शूट चे फोटो फेसबुक वर टाकून टॅगलाइन लिहीली. “बाळा लवकर ये आम्ही तुझी वाट पाहतोय.” मी लिहीले, “लवकर कसं येणार ते?? ९ महिने लागतीलच ना?” त्याने बरेच फ़ोन केले. पण मी उचलला नाही. मी काय चुकीच केले? एका अमेरिकास्थित भारतीयाच्या व्हॉट्सअप स्टेटसवर “Nation first” अस लिहिलं होतं. मी “नेमकं कुठलं नेशन?, भारत की अमेरिका?” विचारलं. त्यानी मला ब्लॉक केले. मी काय चुकीच केलं?

In reply to by अमरेंद्र बाहुबली

अहिरावण Sun, 04/14/2024 - 20:06
>>>त्याने प्रीबेबी शूट चे फोटो फेसबुक वर टाकून टॅगलाइन लिहीली. “बाळा लवकर ये आम्ही तुझी वाट पाहतोय.” मी लिहीले, “लवकर कसं येणार ते?? ९ महिने लागतीलच ना?” प्री बेबी शुट साधारण कितव्या महिन्यात करतात? तेव्हापासून ९ महिने म्हणजे गर्भधारणा नक्की किती महिन्यांची? साहजिक आहे कुणी पण रागावणारच ना !! चुकलंच तुमचं गणित !!

In reply to by अमरेंद्र बाहुबली

चौकस२१२ Mon, 04/15/2024 - 04:35
एका अमेरिकास्थित भारतीयाच्या व्हॉट्सअप स्टेटसवर “Nation first” अस लिहिलं होतं. मी “नेमकं कुठलं नेशन?, भारत की अमेरिका?” विचारलं. त्यानी मला ब्लॉक केले. मी काय चुकीच केलं? त्याचा संधर्भ नाही दिलात? "नेशन फर्स्ट" हे "धर्म फर्स्ट" पेक्षा वरचे अश्या अर्थाने त्याला म्हणावेसे वाटले असावे असा माझा तर्क ( चुकीचा असेल पण तुम्ही स्पष्ट केल्याशिवाय कसे कळणार) तुम्ही बहुतेक सोयीस्कर रित्या तो माणूस भारत आणि अमेरिका यासंधार्बत बोलतोय असा अर्थ काढलेला दिसतोय हा प्रतिसाद देण्याचे कारण कि बरेचदा नेशन फर्स्ट हे सध्याचं काळात अनेक देशांत धर्म कि देश या संधरबात बोलले जाते म्हणून

In reply to by कंजूस

अहिरावण Tue, 04/16/2024 - 13:27
क्रांती भारतात एकदाच झाली... आणीबाणी नंतर... आता काही तितकी भयावह स्थिती नाही... ४०० पार नाही पण ३०० पार नक्की होणार

कांदा लिंबू Tue, 04/16/2024 - 16:40
अमरेंद्र बाहुबली यांच्यावर इतर मिपाकरांनी रागावू नये. ते आपल्यासारखेच मिपा सदस्य आहेत. त्यांना आपल्या मदतीची गरज आहे. काही वेळा माणूस चीडचीड, निराशा, त्वेष इत्यादी भावनांच्या अवस्थेतून जात असतो. व्यक्तिव्यक्तीनुसार या अवस्थेचा कालावधी कमी अधिक असू शकतो. काही मिनिटे ते अनेक महिने-वर्षे असा तो असू शकतो. अश्या अवस्थेत असताना तो अनपेक्षित, समाजअमान्य, अवमानकारक, नकारात्मक प्रतिसाद देत असतो. ते लवकरच सामान्य अवस्थेत येतील आणि त्यानंतर ते असे वागणार नाहीत अशी अपेक्षा. #HelpAmbA

In reply to by अमरेंद्र बाहुबली

चौकस२१२ Wed, 04/17/2024 - 04:17
अमरेंद्र बाहुबली, भाजप विरोधी युक्तिवाद प्रतिसाद मुद्देसूद पणे जरुर दयावा नाही कोण म्हणतो पण जिथे तिथे भाजप / संघ / मोदी / मनुवादी हिंदू वैगरे आणू नये एवढेच लोक म्हणत आहेत , (अर्थात असे नाही म्हणत कि तुम्ही एखादा लेख " भाजप कसा चुकतो " वैगरे लिहू नये नक्की लिहा ) आणि दुसरे भाजपचच्या एखाद्या कामाची स्तुती केल्यास लगेचच ती व्यक्ती चड्डीवाली/ संघिष्ट/ मनुवादी होत नाही सिहासन मधील डिकास्टा म्हणतो तसे " आज या मुख्य मंत्र्याला मी पाठिंबा देईन पण उद्या जर काम नाही केलं तर याच विधान भवना समोर जोड्याने मारिन " ( शब्द पुढेच मागे झाले असतील ) तसेच मोदी म्हणजे काही देव नाहीत पण दानव पण नाहीत

In reply to by चौकस२१२

बाबुराव Wed, 04/17/2024 - 15:53
भाजप / संघ / मोदी / मनुवादी हिंदू वैगरे आणू नये एवढेच लोक म्हणत आहेत ,
काका आपल्या सारख्या काहीनच्या विचारातून दिसतं की ते... म्हणून काही लोक तशी टीका करीत असावेत.

In reply to by कांदा लिंबू

कर्नलतपस्वी Tue, 04/16/2024 - 18:29
नावाप्रमाणेच बाहूबली आहे. आपल्याला भल्लालदेव आणी कटप्पा शोधायला लागेल. मलाही त्यांची मते पटत नाहीत पण मिपा बाहेर आवडतात. बाकी प्रत्येक सदस्य आपले मत व्यक्त करू शकतो. पण त्याने विचलित होऊ नये. जरी तुकोबाराय म्हणत असतील की, घासावा शब्द तासावा शब्द .... पण मग वाद सवांद पुढे चालणार कसा....

In reply to by कपिलमुनी

अहिरावण Tue, 04/16/2024 - 18:53
आम्ही कोणत्याही प्रकारे भाजप, मोदी, संघ यांच्याशी संबंधीत नाही, नव्हतो आणि नसू. भाजपला मत देणे किंवा भाजप सध्या इतर कोणापेक्षाही "बरा" पर्याय आहे असे म्हणणे म्हणजे त्यांच्याशी "संबंध" असणे असे नव्हे. बाकी आम्ही कट्टर हिंदू आहोत, होतो. असू. शेंडा ना बुडूख, बिनडोक प्रतिसाद देणा-यांना विरोध करुच यात शंका नाही. बाकी तुमचे चालू द्या !!

Vichar Manus Tue, 04/16/2024 - 18:52
अमरेंद्र जर एकांगी, एकसुरी, द्वेषमूलक , नकारात्मक लिहीत असतील तर एक भक्तविहारी नावाचे id पण तसेच किंबहुना जास्त एकांगी लिहतात, त्याबद्दल कोणीच काही म्हणत नाही

In reply to by Vichar Manus

अहिरावण Tue, 04/16/2024 - 18:55
त्यांचे वय झाले आहे सुधरण्याची शक्यता संपली. हे तरुण आहेत म्हणून वाटते. आता त्यांची इच्छा नसेल तर राहिले. फक्त १०-१२ वर्षापूर्वीची "यकु" नावाच्या आयडीची दुर्देवी कथा आठवली, म्हणून तळमळ. जाऊ द्या ! ज्याचे त्याचे नशीब आणि कर्मफळ म्हणावे आणि सोडून द्यावे असे वाटते.

चित्रगुप्त Wed, 04/17/2024 - 02:33
@ अबा: द्वेषभावनेपेक्षा भक्तिभावना तब्ब्येतीस बरी, तस्मात आता यापुढले काही आठवडे सध्याच्या द्वेषपूर्ण प्रतिसादांऐवजी तुमच्या मनात ज्यांचेविषयी भक्तिभाव वसत असेल त्या व्यक्ती, पक्ष, संघटना, संस्था, विचारसरण्या वगैरेंविषयी काही सकारात्मक लिहून बघा. त्यामुळे तथाकथित 'अंधभक्तां'ना सुद्धा 'दुसरी बाजू' पण कळेल, आणि तुमच्या मनात धगधगणारी त्वेषाची, द्वेषाची आग जरा शमून शांती, समाधान लाभेल. वाचनमात्र असणार्‍या वाचकांनाही उबाठा, रागा, जाणता राजा किंव्हा जी कुणी तुमची X YZ आदरस्थाने असतील, त्यांचेविषयी काही चांगले वाचायला मिळेल. प्रयत्न करून बघा. सुरुवात म्हणून "मला बुवा अमूक .. अमूक ... अमूक .. यांचेविषयी भक्ती, प्रेम, आदर वगैरे वाटतो, एवढेतरी स्पष्ट करण्याचे साहस दाखवावे, ही विनंती. -- आपला एक हितचिंतक.

In reply to by चित्रगुप्त

बाबुराव Wed, 04/17/2024 - 16:20
तथाकथित 'अंधभक्तां'ना सुद्धा 'दुसरी बाजू' पण कळेल, चित्रगुप्तकाका भक्तांना कोणतीची बाजू समजू शकत नाही. एकच बाजू कळते ती म्हणजे मन लावून भक्ती.

चावटमेला Wed, 04/17/2024 - 15:31
मी मिपावर गेली कित्येक वर्षे वाचनमात्रच आहे. सहसा राजकीय धाग्यांवर/वादग्रस्त विषयांवर प्रतिसाद देण्याचे टाळतो. पण सदर धागालेखकाच्या लिखाणातला, प्रतिसादांमधला विखार, एखादी जात, समाज, धर्म, विचारसरणी ह्याबद्दलचा पराकोटीचा द्वेष खरोखरच चिन्ताजनक आहे. हा केवळ जालीय अवतार असेल तर ठीक, पण प्रत्यक्षातही तेच विचार असतील तर मात्र डोके चक्रावणारे आहे. विशेषतः सावरकरांच्या धाग्यावर जी गरळ ओकली ती तर घृणास्पद होती. समाजविघातक नरसंहारांची सुरूवात असल्याच द्वेषमूलक विचारांतून होते.

In reply to by चावटमेला

कांदा लिंबू Wed, 04/17/2024 - 16:10
हा केवळ जालीय अवतार असेल तर ठीक, पण प्रत्यक्षातही तेच विचार असतील तर मात्र डोके चक्रावणारे आहे.
सर्वसाधारणपणे, एखादी व्यक्ती जशी खऱ्या आयुष्यात वागते, जालावरही तशीच वागते.

In reply to by चावटमेला

अहो मेला चावट, सावरकर किंवा कुठल्याही जातीवर मी टीका केलेली नाही. केली असेल तर तस सिद्ध करा नाहीतर पळ काढून पुन्हा वाचनमात्र व्हा, नी पुन्हा अशी गरळ ओकायला येऊ नका.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

चावटमेला Wed, 04/17/2024 - 20:46
तशीही शेणात दगड टाकायची हौस नाही, पण आता टाकलाच आहे, तर, का? काय दादागिरी आहे का हुकूम सोडायला? का तुमची वैयक्तिक मालमत्ता आहे मिपा?

In reply to by चावटमेला

तुम्ही इथे काय गरळ ओकायची ती ओका, तुम्हाला कोण अडवणार?? पंक कुणावर आरोप लावन्या आधी पुरावेक गोळा करा. ते नसेल होत तर मग गप बसा नी पुन्हा असा पांचटपणा करू नका.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

चावटमेला गुरुवार, 04/18/2024 - 13:12
अलेच्चा, तुमच्याशी तुमच्या पातळीवरच येवून बोलावं लागणार ना पांचट शिरोमणी, त्यात काय चुकीचे केले आता? भलतेच विनोदी बुवा तुम्ही

बाबुराव Wed, 04/17/2024 - 15:50
काका ते दोन्ही बाजूंनी असतं अशी एकाची बाजू घेऊन मत मांडू नका. आपलंही काही तरी आतला गंड दुखावलं असेल म्हणून पराकोटीचा द्वेष वाटत असेल. :)

In reply to by बाबुराव

चौकस२१२ Wed, 04/17/2024 - 17:42
उग्रसेन अहो जी व्यक्ती साध्या प्रवास वर्णनात सुद्धा गांधी / गोडसे करते त्यांच्या हेतू बद्दल काय बोलायचे ?

In reply to by चौकस२१२

सुबोध खरे Wed, 04/17/2024 - 18:39
कुठे त्या भुजबळांच्या नादाला लागताय? खांद्या खाली बळकट असलेल्या माणसांशी वाद घालून निष्पन्न काहीच होत नाही.

In reply to by सुबोध खरे

भ्रष्टाचार इतर पक्षात राहुन केला तर तो देशद्रोह. पण भाजप मध्ये राहून केला तर राष्ट्रहित. कुटुंबातील सदस्याना इतर पक्षानी उमेदवारी दिली तर ती घराणेशाही पण भाजपात तस असेल तर ती घराणेशाही नाही. (उदा. फडणवीसांबद्दल डॉ. साहेबांच मत) त्याच प्रमाणे भाजप समर्थक असेल तर तो खांद्याच्या वर बळकट पण भाजप विरोधक् असेल तर तो खांद्याच्या खाली बळकट. - भाजप प्रेमी डॉ. खरे.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

सुबोध खरे Wed, 04/17/2024 - 20:22
मूर्ख --काहीतरी बोलायलाच पाहिजे म्हणून बोलणारा सुशिक्षित --काहीतरी बोलण्यासारखे आहे म्हणून बोलणारा ज्ञानी -- काहीच बोलत नाही.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

अहिरावण Wed, 04/17/2024 - 20:30
मनमोहन - The Raj was beneficial: Manmohan https://timesofindia.indiatimes.com/world/rest-of-world/the-raj-was-beneficial-manmohan/articleshow/1165516.cms नेहरु - डिसकवरी ऑफ इंडीञ (काही मुद्दे भरकटलेले) मोदी - मौत का सौदागर म्हटले तरी शांत मिळाले उत्तर ?

In reply to by अहिरावण

वाटलच होतं तुम्ही मध्ये लुडबुड करनार ते. मोदी शब्द आला म्हणजे धावत पळत जाऊन आरती ओवाळायची अस गरजेचं नाही. भक्ति (काहीकाळ तरी) दाबून धरावी. ज्यांना प्रश्न विचारलाय त्यांना उत्तर देऊ द्या. एवढीच उत्तर द्यायचिक हौस असेल तर खऱ्या आयडीने या.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

अहिरावण गुरुवार, 04/18/2024 - 10:01
अरेरे आम्ही सहज टंकन केले आणि तुमच्या मुस्काटीत खाडकन बसली याबद्दल खेद आहे

In reply to by अहिरावण

सुबोध खरे गुरुवार, 04/18/2024 - 09:56
@अहिरावण कुठे त्या भुजबळांच्या नादाला लागताय? खांद्या खाली बळकट असलेल्या माणसांशी वाद घालून निष्पन्न काहीच होत नाही.

In reply to by सुबोध खरे

अमरेंद्र बाहुबली गुरुवार, 04/18/2024 - 10:05
ह्यात मनमोहनसिंग, मोदी आणी नेहरु बसवायचे म्हटले तर कसे बसतील? :) हया प्रश्नाला तुम्ही बगल दिलीत. उत्तर मिळालय. :)
मी काय चुकीचे केले?? “कुणी दहावीचा विद्यार्थी तुम्हाला परीक्षा केंद्रावर जाताना दिसल्यास त्याला लिफ्ट द्या.” असा मॅसेज एकाने व्हॉट्सअप समूहात टाकला. त्याला “तुला दहावीत किती टक्के होते??” विचारले. त्याने मला फोन करुन शिव्या घातल्या. मी काय चुकीचे केले?? भालाफेकीत भारतीय खेळाडूने सुवर्णपदक जिंकले. “निरज चोप्रा हा भारतातील दुसरा सर्वात लांब फेकणारा खेळाडू आहे.” मॅसेज मी व्हॉट्सअप समूहात टाकला. समूहसंचालकाने मला रिमूव केले. मी काय चुकीचे केले?? एकाने लग्न झाल्यानंतर प्रिव्हेडिंग चे फोटो फेसबुक वर टाकले. मी “बारश्याला बोलव रे” अशी कमेंट केली.

।। 'हिंग' पुराण - अध्याय तिसरा ।। (अंतिम)

टर्मीनेटर ·

अथांग आकाश Sun, 08/06/2023 - 13:22
खूप सुरेख झालंय हिंग पुराण! सर्व भागांची सुरवात जाहिरात किंवा सिनेमातील दृश्याने करण्याची कल्पना आवडली!! तीनही माहितीपूर्ण भाग वाचताना कुठे कंटाळा नाही आला आणि हिंग इतके गुणी असेल याची कल्पनापण कधी केली नव्हती!!!
अथक प्रयत्न करणाऱ्या भारतीय शास्त्रज्ञांची आणि त्यांना तेवढ्याच तोलामोलाची साथ देणाऱ्या शेतकरी बांधवांची मेहनत लवकरच फळाला येऊन ह्या प्रयोगाला घवघवीत यश मिळो अशी ईश्वरचरणी प्रार्थना
+१ त्यांची मेहनत लवकरच फळाला येवो! -

In reply to by अथांग आकाश

टर्मीनेटर Mon, 08/07/2023 - 16:26
कर्नलतपस्वी | कंजूस | आंद्रे वडापाव | अथांग आकाश प्रतिसादांसाठी आपल्या सर्वांचे मनःपूर्वक आभार 🙏 @ अथांग आकाश विषयाशी निगडीत GIF इमेजेस शोधुन काढण्याचे तुमचे कसब कौतुकास्पद आहे!

धर्मराजमुटके Sun, 08/06/2023 - 16:16
पुर्ण लेखमाला वाचली. लेखमाला अतिशय सुरेख झाली आहे. आपल्या मेहनतीच्या बळावर आम्हाला विनासायास अनमोल माहिती मिळते आहे त्याबद्द्ल आपले आभार !

सौंदाळा Sun, 08/06/2023 - 22:55
दंडवत स्वीकारा. ही लेखमाला लिहिणे म्हणजे सेमिनार साठी एखादा विषय घेऊन पेपर लिहायचो त्याची आठवण झाली. प्रत्येक ठिकाणी तुम्ही घेतलेले परिश्रम जाणवले. हिंगाबद्दल एवढी माहिती असेल आणि ती इतक्या रंजकपणे लिहिता येईल असे वाटले नव्हते. पुरातन काळ, संदर्भ, वेगवेगळे देश, उत्पादन प्रक्रिया, जाहिराती, संशोधन, स्वदेशी लागवड इतके वेगवेगळे टप्पे!! जबरदस्त 'मेकिंग ऑफ हिंगपुराण - बाय टर्मिनेटर' असा पण एक लेख किंवा सविस्तर प्रतिसाद आलाच पाहिजे.

In reply to by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)

टर्मीनेटर Mon, 08/07/2023 - 16:35
@ धर्मराजमुटके | सौंदाळा प्रतिसादांसाठी आपले मनःपूर्वक आभार 🙏 @ सौंदाळा,
सेमिनार साठी एखादा विषय घेऊन पेपर लिहायचो त्याची आठवण झाली.
हा देखील तसाच काहिसा प्रकार आहे 😀 'मेकिंग ऑफ हिंगपुराण' मध्ये लिहिण्यासारखं फार काही नाही, पण मागच्या भागावर दिलेल्या एका प्रतिसादात ह्या पुराणाच्या जन्माचे बिज कशातुन पेरले गेले ते लिहिलंय!

सुबोध खरे Mon, 08/07/2023 - 12:09
The scientist said that around 6,000 plants are now also being grown in other high-altitude areas of the state besides Lahaul, including parts of Kinnaur, Chamba and the Janjehli valley in Mandi. IHBT’s director Dr Sanjay Kumar said that India currently imports Hing worth nearly Rs 1,000 crore from Iran, Afghanistan and Uzbekistan. https://indianexpress.com/article/cities/shimla/taking-roots-in-high-hills-of-himachal-the-first-hing-plants-7341792/

In reply to by सुबोध खरे

टर्मीनेटर Mon, 08/07/2023 - 16:46
हा पुढचा अपडेट “By now, we have planted F assafoetida over 3.5 ha in Himachal Pradesh (Lahaul and Spiti, Mandi, Kullu, Kinnaur and Chamba districts), Uttarakhand (Chamoli), Ladakh (Ranbirpur, Leh) and Jammu and Kashmir (Kistwar, Doda and Rajouri districts),” says Ashok Kumar, senior scientist at the agro-technology division of IHBT. https://www.downtoearth.org.in/news/agriculture/tantalising-wait-will-india-be-able-to-harvest-its-own-heeng--80577 आता ह्या प्रयोगांची व्याप्ती अजुन वाढवताना 'अरुणाचल प्रदेश' मध्येहि प्रयोगिक लागवड केल्याचे ऐकुन आहे पण त्याला दुजोरा देणारी बातमी वाचायला मिळाली नसल्याने त्याचा उल्लेख नाही केला!

प्रचेतस Mon, 08/07/2023 - 12:28
जबरदस्त लेखमाला झाली ही. हिंगाच्या अथपासून इतिपर्यंत सर्व माहिती तपशीलवार समजली. चिमूटभर हिंगाचे विविध देशांमधील उपयोग एकदम भारी. आपल्या देशामध्ये हिंग लागवडीला यश मिळेलच असे वाटते.

In reply to by प्रचेतस

टर्मीनेटर Mon, 08/07/2023 - 18:14
आपल्या देशामध्ये हिंग लागवडीला यश मिळेलच असे वाटते.
🙏 येस्स! यश मिळायलाच हवे अशी फार फार इच्छा आहे, पण स्वदेशी हिंग निर्मितीच्या प्रयोगाला सुरुवात झाल्यावर 'द डॉलर बिझनेस' ह्या मासिकने अनेक पिढ्यांपासुन हिंगाच्या आयात, प्रक्रिया आणि विक्रिचा अनुभव असलेल्या काही आघाडिच्या हिंग व्यावसयिकांच्या मुलखती घेतल्या होत्या त्यात त्यांनी व्यक्त केलेली मतेही विचारप्रवर्तक आहेत! त्यांच्या म्हणण्याचा एकत्रीत सारांश असा (स्वैर भाषांतर), "स्वदेशी हिंग निर्मितीचे प्रयोग नक्कीच प्रशंसनीय आहेत पण त्यांची सुरुवात मात्र खुप विलंबाने झाली. भारतात बहुतांश हिंगाची आयात अफगाणिस्तानातुन होते आणि हा देश भुवेष्टीत (Land Locked) असल्याने तिथुन एकतर थेट हवाईमार्गे किंवा इराणच्या बंदरांपर्यंत भुमार्गे आणि तिथुन समुद्रमार्गे त्याची आयात करावी लागत असल्याने वाहतुक खर्च जास्त होतो पर्यायाने हिंगाची किंमतही वाढते. त्यात तिथे राजकिय उलथापालथ, युध्दजन्य, अंतर्गत यादवी सारखी परिस्थिती उद्भवली की पर्यायी मार्गांची निवड करावी लागते त्याचा पुरवठ्यावर विपरीत परिणाम होतो, किमती वाढतात. अशा अनेक कारणांसाठी आम्ही गेल्या काही दशकांपासुन सरकार दरबारी ही मागणी लाउन धरली होती. त्यासाठी काही किरकोळ प्रयत्नही झाले नाही असे नाही, पण ह्या गोष्टीकडे फारसे गांभिर्याने पाहिले गेले नव्हते. २००७ ते २०१६ ह्या दहा आर्थिक वर्षांत भारतात हिंगाची आयात तब्बल ३८४.२६ टक्क्यांनी वाढल्यावर मात्र परिस्थिती बदलली. सध्या सुरु असलेल्या प्रयत्नांचे आम्ही स्वागत करतो आणि ते प्रयत्न यशस्वी होण्याची सदिच्छाही बाळगतो पण 'फेरुला असाफोटीडा' ही रानटी वनस्पती आपल्या इथल्या वातावरणात कितपत टिकाव धरु शकेल आणि प्रयोग यशस्वी झाल्यानंतर प्रत्यक्ष हिंगोत्पादनाला सुरुवात झाल्यावर तयार होणारा हिंग आपल्याकडे सर्वाधीक मागणी असलेल्या 'काबुली सुफैद' ह्या अफगाणी हिंगाच्या दर्जाची बरोबरी करु शकेल कि नाही ह्याविषयी साशंकही आहोत". बघुयात दोन वर्षांनी काय निकाल येतो ते, तो पर्यंत आशावादी रहाणे तेवढे आपल्या हातात आहे!

In reply to by टर्मीनेटर

प्रचेतस Mon, 08/07/2023 - 20:20
त्या त्या ठिकाणच्या वातावरणात फरक असतोच तरीही भारतात सर्वच प्रकारचे वातावरण असल्याने हा प्रयोगही यशस्वी होईल असे वाटतेय.

In reply to by प्रचेतस

टर्मीनेटर Tue, 08/08/2023 - 11:06
"भारतात सर्वच प्रकारचे वातावरण असल्याने हा प्रयोगही यशस्वी होईल असे वाटतेय."
हो, भारताला सर्व प्रकारच्या हवामानाची निसर्गदत्त देणगी लाभली आहे! पण सध्या निसर्ग फारच लहरी स्वभावाचा झाला आहे 😀 ह्या बहुवर्षीय वनस्पतीसाठी पोषक असलेल्या इराणच्या प्रदेशातील हवामानाशी मिळते जुळते हवामान असल्याने प्रथम प्राधान्य देण्यात आलेल्या लाहौल-स्पितीचे उदाहरण बघता निसर्ग आता ह्या प्रयोगात सहभागी झालेल्या शेतकऱ्यांची आणि शास्त्रज्ञांची परीक्षा बघतोय कि काय असे वाटते. लागवडीस सुरुवात झाल्यावर एप्रिल महिन्यात झालेला अवकाळी हिमवर्षाव, जुलै महिन्यात झालेली विक्रमी पावसाची नोंद अशा असामान्य गोष्टी ह्या वनस्पतीला मानवणाऱ्या नाहीत. अर्थात निसर्गाच्या कोपामुळे अनेक रोपे मेली असली तरी त्यामुळे खचून न जाता पुन्हा जिद्दीने नवीन रोपांची लागवड करून त्यातल्या सरासरी साठ टक्के रोपांची समाधानकारक वाढ करण्यात यशस्वी झालेल्या शेतकरी आणि शास्त्रज्ञांचे त्यासाठीच कौतुक वाटते!

Bhakti Mon, 08/07/2023 - 22:12
पुढची सुमारे दोन वर्षे 'इन्स्टिट्यूट ऑफ हिमालयन बायोरिसोर्स टेक्नॉलॉजी, पालमपूर' ह्या संस्थेचे संचालक डॉ. संजय कुमार आणि वरिष्ठ वैज्ञानिक डॉ. अशोक कुमार ह्या दोघांच्या अथक परिश्रमांचे फलस्वरूप म्हणून बीजांकुरणाचे प्रमाण शंभरपैकी दोन वरून साठ पर्यंत वाढवण्यात यश मिळाले
प्रचंड बौद्धिक मेहनत _/\_

In reply to by Bhakti

टर्मीनेटर Tue, 08/08/2023 - 11:19
सदर संशोधन कमालीची गोपनीयता पाळून केले जात असल्याने त्याचे तपशील उपलब्ध नाहीत, केवळ चिलिंग आणि हॉर्मोनल ट्रीटमेंट बद्दलचे त्रोटक उल्लेख तेवढे वाचायला मिळाले आहेत त्यामुळे बॉटनी विषयक शून्य शास्त्रीय ज्ञान असलेल्या माझ्यासारख्या वाचकांना 'वनस्पती उती संवर्धनाबद्दल' आणखीन माहिती वाचायला आवडेल. प्रतिसादात ती माहिती देणे शक्य नसल्यास कृपया त्यावर स्वतंत्र लेख लिहावा अशी विनंती 🙏

In reply to by Bhakti

टर्मीनेटर Wed, 08/09/2023 - 11:47
जेब्बात! पुरवणीत सोप्या भाषेत ग्राफ सहित उलगडून सांगितलेल्या शास्त्रीय माहितीसाठी आभार 🙏 पुरवणीची लिंक धाग्यात अपडेटवली आहे 👍

प्रथम तुमच्य चिकाटी आणि अभ्यासु वृत्तीला दंडवत _/\_ चिमुटभर हिंगामागे ईतके मोठे पुराण असेल असे कधीच वाटले नव्हते. जरी जालावर सगळी माहिती उपलब्ध असली तरी ती सर्व एकत्रित करणे आणि क्रमवार लावुन रंजकतेने वाचकांसमोर सादर करणे हे एक मोठेच वेळखाउपणाचे काम आहे. ते तुम्ही जिद्दीने पार पाडलेत आणि आम्हाला ही मेजवानी दिलीत त्या बद्दल घन्यवाद!!

श्वेता व्यास Wed, 08/16/2023 - 17:15
हिंग पुराण खूपच आवडले. फोडणीतल्या चिमूटभर पदार्थामागे इतका इतिहास असेल असं कधी मनातसुद्धा आलं नाही. हिंग सैंधव मिठाचाच भाऊ असेल असं वाटलं होतं. इतकं अभ्यासपूर्ण लेखनसुद्धा ओघवतं लिहिणं कसं जमतं तुम्हाला, एका बैठकीत तिन्ही अध्याय वाचले.

टर्मीनेटर Sun, 08/20/2023 - 11:48
राजेंद्र मेहेंदळे | मदनबाण | रंगीला रतन | ज्ञानोबाचे पैजार | श्वेता व्यास उत्साहवर्धक प्रतिसादांसाठी आपल्या सर्वांचे मनःपूर्वक आभार 🙏

अथांग आकाश Sun, 08/06/2023 - 13:22
खूप सुरेख झालंय हिंग पुराण! सर्व भागांची सुरवात जाहिरात किंवा सिनेमातील दृश्याने करण्याची कल्पना आवडली!! तीनही माहितीपूर्ण भाग वाचताना कुठे कंटाळा नाही आला आणि हिंग इतके गुणी असेल याची कल्पनापण कधी केली नव्हती!!!
अथक प्रयत्न करणाऱ्या भारतीय शास्त्रज्ञांची आणि त्यांना तेवढ्याच तोलामोलाची साथ देणाऱ्या शेतकरी बांधवांची मेहनत लवकरच फळाला येऊन ह्या प्रयोगाला घवघवीत यश मिळो अशी ईश्वरचरणी प्रार्थना
+१ त्यांची मेहनत लवकरच फळाला येवो! -

In reply to by अथांग आकाश

टर्मीनेटर Mon, 08/07/2023 - 16:26
कर्नलतपस्वी | कंजूस | आंद्रे वडापाव | अथांग आकाश प्रतिसादांसाठी आपल्या सर्वांचे मनःपूर्वक आभार 🙏 @ अथांग आकाश विषयाशी निगडीत GIF इमेजेस शोधुन काढण्याचे तुमचे कसब कौतुकास्पद आहे!

धर्मराजमुटके Sun, 08/06/2023 - 16:16
पुर्ण लेखमाला वाचली. लेखमाला अतिशय सुरेख झाली आहे. आपल्या मेहनतीच्या बळावर आम्हाला विनासायास अनमोल माहिती मिळते आहे त्याबद्द्ल आपले आभार !

सौंदाळा Sun, 08/06/2023 - 22:55
दंडवत स्वीकारा. ही लेखमाला लिहिणे म्हणजे सेमिनार साठी एखादा विषय घेऊन पेपर लिहायचो त्याची आठवण झाली. प्रत्येक ठिकाणी तुम्ही घेतलेले परिश्रम जाणवले. हिंगाबद्दल एवढी माहिती असेल आणि ती इतक्या रंजकपणे लिहिता येईल असे वाटले नव्हते. पुरातन काळ, संदर्भ, वेगवेगळे देश, उत्पादन प्रक्रिया, जाहिराती, संशोधन, स्वदेशी लागवड इतके वेगवेगळे टप्पे!! जबरदस्त 'मेकिंग ऑफ हिंगपुराण - बाय टर्मिनेटर' असा पण एक लेख किंवा सविस्तर प्रतिसाद आलाच पाहिजे.

In reply to by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)

टर्मीनेटर Mon, 08/07/2023 - 16:35
@ धर्मराजमुटके | सौंदाळा प्रतिसादांसाठी आपले मनःपूर्वक आभार 🙏 @ सौंदाळा,
सेमिनार साठी एखादा विषय घेऊन पेपर लिहायचो त्याची आठवण झाली.
हा देखील तसाच काहिसा प्रकार आहे 😀 'मेकिंग ऑफ हिंगपुराण' मध्ये लिहिण्यासारखं फार काही नाही, पण मागच्या भागावर दिलेल्या एका प्रतिसादात ह्या पुराणाच्या जन्माचे बिज कशातुन पेरले गेले ते लिहिलंय!

सुबोध खरे Mon, 08/07/2023 - 12:09
The scientist said that around 6,000 plants are now also being grown in other high-altitude areas of the state besides Lahaul, including parts of Kinnaur, Chamba and the Janjehli valley in Mandi. IHBT’s director Dr Sanjay Kumar said that India currently imports Hing worth nearly Rs 1,000 crore from Iran, Afghanistan and Uzbekistan. https://indianexpress.com/article/cities/shimla/taking-roots-in-high-hills-of-himachal-the-first-hing-plants-7341792/

In reply to by सुबोध खरे

टर्मीनेटर Mon, 08/07/2023 - 16:46
हा पुढचा अपडेट “By now, we have planted F assafoetida over 3.5 ha in Himachal Pradesh (Lahaul and Spiti, Mandi, Kullu, Kinnaur and Chamba districts), Uttarakhand (Chamoli), Ladakh (Ranbirpur, Leh) and Jammu and Kashmir (Kistwar, Doda and Rajouri districts),” says Ashok Kumar, senior scientist at the agro-technology division of IHBT. https://www.downtoearth.org.in/news/agriculture/tantalising-wait-will-india-be-able-to-harvest-its-own-heeng--80577 आता ह्या प्रयोगांची व्याप्ती अजुन वाढवताना 'अरुणाचल प्रदेश' मध्येहि प्रयोगिक लागवड केल्याचे ऐकुन आहे पण त्याला दुजोरा देणारी बातमी वाचायला मिळाली नसल्याने त्याचा उल्लेख नाही केला!

प्रचेतस Mon, 08/07/2023 - 12:28
जबरदस्त लेखमाला झाली ही. हिंगाच्या अथपासून इतिपर्यंत सर्व माहिती तपशीलवार समजली. चिमूटभर हिंगाचे विविध देशांमधील उपयोग एकदम भारी. आपल्या देशामध्ये हिंग लागवडीला यश मिळेलच असे वाटते.

In reply to by प्रचेतस

टर्मीनेटर Mon, 08/07/2023 - 18:14
आपल्या देशामध्ये हिंग लागवडीला यश मिळेलच असे वाटते.
🙏 येस्स! यश मिळायलाच हवे अशी फार फार इच्छा आहे, पण स्वदेशी हिंग निर्मितीच्या प्रयोगाला सुरुवात झाल्यावर 'द डॉलर बिझनेस' ह्या मासिकने अनेक पिढ्यांपासुन हिंगाच्या आयात, प्रक्रिया आणि विक्रिचा अनुभव असलेल्या काही आघाडिच्या हिंग व्यावसयिकांच्या मुलखती घेतल्या होत्या त्यात त्यांनी व्यक्त केलेली मतेही विचारप्रवर्तक आहेत! त्यांच्या म्हणण्याचा एकत्रीत सारांश असा (स्वैर भाषांतर), "स्वदेशी हिंग निर्मितीचे प्रयोग नक्कीच प्रशंसनीय आहेत पण त्यांची सुरुवात मात्र खुप विलंबाने झाली. भारतात बहुतांश हिंगाची आयात अफगाणिस्तानातुन होते आणि हा देश भुवेष्टीत (Land Locked) असल्याने तिथुन एकतर थेट हवाईमार्गे किंवा इराणच्या बंदरांपर्यंत भुमार्गे आणि तिथुन समुद्रमार्गे त्याची आयात करावी लागत असल्याने वाहतुक खर्च जास्त होतो पर्यायाने हिंगाची किंमतही वाढते. त्यात तिथे राजकिय उलथापालथ, युध्दजन्य, अंतर्गत यादवी सारखी परिस्थिती उद्भवली की पर्यायी मार्गांची निवड करावी लागते त्याचा पुरवठ्यावर विपरीत परिणाम होतो, किमती वाढतात. अशा अनेक कारणांसाठी आम्ही गेल्या काही दशकांपासुन सरकार दरबारी ही मागणी लाउन धरली होती. त्यासाठी काही किरकोळ प्रयत्नही झाले नाही असे नाही, पण ह्या गोष्टीकडे फारसे गांभिर्याने पाहिले गेले नव्हते. २००७ ते २०१६ ह्या दहा आर्थिक वर्षांत भारतात हिंगाची आयात तब्बल ३८४.२६ टक्क्यांनी वाढल्यावर मात्र परिस्थिती बदलली. सध्या सुरु असलेल्या प्रयत्नांचे आम्ही स्वागत करतो आणि ते प्रयत्न यशस्वी होण्याची सदिच्छाही बाळगतो पण 'फेरुला असाफोटीडा' ही रानटी वनस्पती आपल्या इथल्या वातावरणात कितपत टिकाव धरु शकेल आणि प्रयोग यशस्वी झाल्यानंतर प्रत्यक्ष हिंगोत्पादनाला सुरुवात झाल्यावर तयार होणारा हिंग आपल्याकडे सर्वाधीक मागणी असलेल्या 'काबुली सुफैद' ह्या अफगाणी हिंगाच्या दर्जाची बरोबरी करु शकेल कि नाही ह्याविषयी साशंकही आहोत". बघुयात दोन वर्षांनी काय निकाल येतो ते, तो पर्यंत आशावादी रहाणे तेवढे आपल्या हातात आहे!

In reply to by टर्मीनेटर

प्रचेतस Mon, 08/07/2023 - 20:20
त्या त्या ठिकाणच्या वातावरणात फरक असतोच तरीही भारतात सर्वच प्रकारचे वातावरण असल्याने हा प्रयोगही यशस्वी होईल असे वाटतेय.

In reply to by प्रचेतस

टर्मीनेटर Tue, 08/08/2023 - 11:06
"भारतात सर्वच प्रकारचे वातावरण असल्याने हा प्रयोगही यशस्वी होईल असे वाटतेय."
हो, भारताला सर्व प्रकारच्या हवामानाची निसर्गदत्त देणगी लाभली आहे! पण सध्या निसर्ग फारच लहरी स्वभावाचा झाला आहे 😀 ह्या बहुवर्षीय वनस्पतीसाठी पोषक असलेल्या इराणच्या प्रदेशातील हवामानाशी मिळते जुळते हवामान असल्याने प्रथम प्राधान्य देण्यात आलेल्या लाहौल-स्पितीचे उदाहरण बघता निसर्ग आता ह्या प्रयोगात सहभागी झालेल्या शेतकऱ्यांची आणि शास्त्रज्ञांची परीक्षा बघतोय कि काय असे वाटते. लागवडीस सुरुवात झाल्यावर एप्रिल महिन्यात झालेला अवकाळी हिमवर्षाव, जुलै महिन्यात झालेली विक्रमी पावसाची नोंद अशा असामान्य गोष्टी ह्या वनस्पतीला मानवणाऱ्या नाहीत. अर्थात निसर्गाच्या कोपामुळे अनेक रोपे मेली असली तरी त्यामुळे खचून न जाता पुन्हा जिद्दीने नवीन रोपांची लागवड करून त्यातल्या सरासरी साठ टक्के रोपांची समाधानकारक वाढ करण्यात यशस्वी झालेल्या शेतकरी आणि शास्त्रज्ञांचे त्यासाठीच कौतुक वाटते!

Bhakti Mon, 08/07/2023 - 22:12
पुढची सुमारे दोन वर्षे 'इन्स्टिट्यूट ऑफ हिमालयन बायोरिसोर्स टेक्नॉलॉजी, पालमपूर' ह्या संस्थेचे संचालक डॉ. संजय कुमार आणि वरिष्ठ वैज्ञानिक डॉ. अशोक कुमार ह्या दोघांच्या अथक परिश्रमांचे फलस्वरूप म्हणून बीजांकुरणाचे प्रमाण शंभरपैकी दोन वरून साठ पर्यंत वाढवण्यात यश मिळाले
प्रचंड बौद्धिक मेहनत _/\_

In reply to by Bhakti

टर्मीनेटर Tue, 08/08/2023 - 11:19
सदर संशोधन कमालीची गोपनीयता पाळून केले जात असल्याने त्याचे तपशील उपलब्ध नाहीत, केवळ चिलिंग आणि हॉर्मोनल ट्रीटमेंट बद्दलचे त्रोटक उल्लेख तेवढे वाचायला मिळाले आहेत त्यामुळे बॉटनी विषयक शून्य शास्त्रीय ज्ञान असलेल्या माझ्यासारख्या वाचकांना 'वनस्पती उती संवर्धनाबद्दल' आणखीन माहिती वाचायला आवडेल. प्रतिसादात ती माहिती देणे शक्य नसल्यास कृपया त्यावर स्वतंत्र लेख लिहावा अशी विनंती 🙏

In reply to by Bhakti

टर्मीनेटर Wed, 08/09/2023 - 11:47
जेब्बात! पुरवणीत सोप्या भाषेत ग्राफ सहित उलगडून सांगितलेल्या शास्त्रीय माहितीसाठी आभार 🙏 पुरवणीची लिंक धाग्यात अपडेटवली आहे 👍

प्रथम तुमच्य चिकाटी आणि अभ्यासु वृत्तीला दंडवत _/\_ चिमुटभर हिंगामागे ईतके मोठे पुराण असेल असे कधीच वाटले नव्हते. जरी जालावर सगळी माहिती उपलब्ध असली तरी ती सर्व एकत्रित करणे आणि क्रमवार लावुन रंजकतेने वाचकांसमोर सादर करणे हे एक मोठेच वेळखाउपणाचे काम आहे. ते तुम्ही जिद्दीने पार पाडलेत आणि आम्हाला ही मेजवानी दिलीत त्या बद्दल घन्यवाद!!

श्वेता व्यास Wed, 08/16/2023 - 17:15
हिंग पुराण खूपच आवडले. फोडणीतल्या चिमूटभर पदार्थामागे इतका इतिहास असेल असं कधी मनातसुद्धा आलं नाही. हिंग सैंधव मिठाचाच भाऊ असेल असं वाटलं होतं. इतकं अभ्यासपूर्ण लेखनसुद्धा ओघवतं लिहिणं कसं जमतं तुम्हाला, एका बैठकीत तिन्ही अध्याय वाचले.

टर्मीनेटर Sun, 08/20/2023 - 11:48
राजेंद्र मेहेंदळे | मदनबाण | रंगीला रतन | ज्ञानोबाचे पैजार | श्वेता व्यास उत्साहवर्धक प्रतिसादांसाठी आपल्या सर्वांचे मनःपूर्वक आभार 🙏
लेखनविषय:
लेखनप्रकार

"तडका तो सब लगाते हैं... "

(मातीचे पाय - मोकलाया वर्जन)

गड्डा झब्बू ·

चांदणे संदीप Mon, 07/10/2023 - 13:58
एखाद्या कवितेला विनोदी करायचं असेल तर मोकलाया मोल्ड फिट आणि हिट आहे. :) सं - दी - प

चांदणे संदीप Mon, 07/10/2023 - 13:58
एखाद्या कवितेला विनोदी करायचं असेल तर मोकलाया मोल्ड फिट आणि हिट आहे. :) सं - दी - प
काव्यरस
प्रेर्ना - मातीचे पाय पयन स्प्र्शुन अले ते हत मलले होते लक्क उमग्ले तेवहा ते पय मतिचे होते मि केवल पहत होतो पयन्च्य खल्चि धुल ति ललतस लववि हे एकच मथि खुल मि इथ्वर पहुन अलो पौल्खुना विर्नर्या अधि कुन्वत, मगुन कप्ति विकत हस्नर्या अत पुन्ह चलवे पुधे, कि परत फिर्वे? सोस न-लयक पयन्चे पुसुन अव्घे तकवे? प्रेमल श्ब्दन्चि ओल मनत र्झिपत नहि व्हवे नत्मस्त्क पयहि दिसत नहि ते सरेच निगुन गेले जे पय दरवे सुच्ले मतिचे पत मत्कट मगे मज्यसह उर्ले टंकनीक चमनगोटा दाढिमिशि श्निवार ०८/०७/२०२३

नपुंसकत्व

राहुल ·

सुबोध खरे Sat, 10/01/2022 - 09:56
मूलभूत चूक आहे. Impotence -असमर्थ, लिन्ग शैथिल्य ( erectile dysfunction) अकाली किंवा वेळेआधी वीर्यस्खलन ( premature ejaculation) यात गोंधळ होतो आहे. नपुंसकत्व याची व्याख्या म्हणजे न पुरुष न स्त्री अशी अवस्था.याचा अर्थ खरं तर बृहन्नडा किंवा हिजडा असा आहे. याला इंग्रजीमध्ये impotence म्हणतात. पण हा अर्थ तितकासा बरोबर नाही potence/ potency याचा अर्थ --समर्थ/सामर्थ्य . Impotence म्हणजे संभोग करण्यास असमर्थ. Impotence --मग तो कायमचा असेल, तात्पुरता असेल किंवा मुळात पुरुषच नसलेला असाही असू शकतो. लिंग उत्थान न होणे म्हणजे लिन्ग शैथिल्य ( erectile dysfunction) लिंग शैथिल्य आणि नपुंसकत्व यात गोंधळ होतो आहे. अशी उद्दीपनावस्था वीर्यपतनाआधीच नाहीशी होणे. याला नपुंसकत्व नाही तर अकाली किंवा वेळेआधी वीर्यस्खलन ( premature ejaculation) म्हणतात. हे जवळ जवळ ९९ % पुरुषांच्या बाबतीत (कदाचित १०० %) कधी ना कधी घडतेच. बऱ्याच पुरुषांच्या बाबतीत मधुचंद्राची वेळेसच घडते. याचे कारण पहिल्या रात्रीत बायकोला आपले पौरुषत्व दाखवलेच पाहिजे अन्यथा ती "बाहेरख्याली" होईल अशा गैरसमजुतीपासून आपल्याला कर्म करता येईल कि नाही अशा शंका असतात. यामुळे एक मानसिक तणाव performance anxietyआणि अति उल्हसित (over excitation) अवस्था "आज पलंगतोड कार्य करायचेच" यामुळे वेळेआधी वीर्यस्खलन होते. याशिवाय बहुसंख्य पुरुषांना लग्नाआधी संभोगाचा कोणताही अनुभव नसतो तेंव्हा एका तशा अनोळखी स्त्रीपुढे संपूर्ण विवस्त्र होणे या कृतीमधून येणाऱ्या तणावा मुळे वेळेआधी वीर्यस्खलन होते. त्यामुळे वेळेआधी वीर्यस्खलन याला नपुंसकत्व म्हणण्यामुळे सामान्य लोकांच्या मनात शंका निर्माण होईल मानसिक कारणांमध्ये उपचार करताना बऱ्याचदा एक दिवस ते एक महिना वेळ लागतो. एक दिवसात उपचार होत असेल तर तो चमत्कारच म्हणावा लागेल. मानसिक कारणात मूळ मनाची जडणघडण, अनेक वर्षांपासून असलेले गैरसमज, रूढी आणि परंपरांचा असलेला पगडा या सर्व गोष्टीतून एखाद्या माणसाला बाहेर काढणे ते सुद्धा एका दिवसात हे फारच कठीण आहे.

कर्नलतपस्वी Sat, 10/01/2022 - 11:55
साहित्य संपादकांनी डाॅक्टर खरे व इतर मिपाकरांच्या प्रतिसादाची नोंद घ्यावी. मानवी काम जीवन हा अत्यंत महत्त्वपूर्ण विषय आहे. लेखात खालील तीन विभिन्न शारीरीक अवस्थांवर प्रकाश न टाकता विषय जनरलाइज्ड केला आहे. डाॅक्टर खरे यांनी विस्तृत प्रतिसाद दिला आहे. Impotancy,Prematura ejaucalation and Erectile Dysfunction या सारख्या मुलभूत समस्येवर योग्य माहीती न देऊ शकणारे खालील गंभीर समस्येवर समुपदेशन करू शकतील या बाबत मी तरी सांशक आहे. Atypical genitalia which can be a difficult experience for families. Gonadal dysgenesis. Androgen insensitivity syndrom. CAH,Congenital Adernal Hyperplasia So on so forth. My humble request to learned writer please be more specific and precise while writing on very sensetive subject or stop writing. साहीत्य संपादक, कृपया नोदं घेणे लेखक कुणाच्याही शंका किवा प्रश्नानां उत्तर देत नाहीत व ही लेखकाची मुलभूत जबाबदारी आहे असे मला वाटते.

सामान्यनागरिक Sat, 10/01/2022 - 14:58
या लेखात काय असे आहे जे लोकांस माहीत नाही ? चार ओळी टाकल्या की त्याला लेख म्हणायचे ? लेखक महाशय ईतर कुठे भाव दिला जात नाही म्हणुन मिपा वर येऊन पब्लीशीटी मिळवण्य़ाचा प्रयत्नं करीत आहेत. त्यांच्या बायो डेटा त लिहीत असतील " या विद्वान डॊक्टरांचे अनेक (?) माहितीपूर्ण लेख प्रकाशित झालेले आहेत ". मिपा वर असे लेख प्रकाशित करुन जगण्य़ाची वेळ आली आहे काय ?

In reply to by सामान्यनागरिक

चौथा कोनाडा Sun, 10/02/2022 - 18:06
मिपा वर असे लेख प्रकाशित करुन जगण्य़ाची वेळ आली आहे काय ?
महत्वाचा प्रश्न ! आजकाल या पेक्षा चांगली आणि शास्त्रशुद्ध माहिती फेबू, यु ट्युब आणि रील्स मधून मिळत असते. हे महाशय बहुधा कुठल्यातरी तत्सम हिंदी साईटवरुन गुगल ट्रान्सलेट करुन मिपावर छापत असावेत.
(अवांतरः हा एखादा ड्युआयडी देखिल असण्याची शक्यता आहे अशी माझी शंका आहे)

कंजूस Sat, 10/01/2022 - 15:43
फक्त पदवी नसते. दुसरा प्रकार म्हणजे वर दिलेल्या कारणांनी तात्पुरती आलेली अडचण किंवा असमर्थता ही सहचारीने समजून न घेता चिडणे किंवा टोकाची भूमिका घेतली जाते.

विवेकपटाईत Mon, 10/03/2022 - 15:12
फक्त allopathy औषधी घ्यावी आणि डॉक्टर साहेबांकडून. इतर पैथीत औषधी नाहीत, हे विधान कुठल्या आधारावर?? व्यायाम, प्राणायाम आहार आणि मन चिकत्सकाचे सल्ले जास्त उपयोगी पडतील. बाकी मणक्याचे दुखणे आणि हृदयाचे ऑपरेशन इत्यादीचा सुतराम ही संबंध नाही.( स्वतः चा अनुभव. ) फक्त काही आसने तुम्ही करू शकणार नाही. तसेही संतुष्टी आणि आसन याच्या जास्त संबंध नाही.

सुबोध खरे Sat, 10/01/2022 - 09:56
मूलभूत चूक आहे. Impotence -असमर्थ, लिन्ग शैथिल्य ( erectile dysfunction) अकाली किंवा वेळेआधी वीर्यस्खलन ( premature ejaculation) यात गोंधळ होतो आहे. नपुंसकत्व याची व्याख्या म्हणजे न पुरुष न स्त्री अशी अवस्था.याचा अर्थ खरं तर बृहन्नडा किंवा हिजडा असा आहे. याला इंग्रजीमध्ये impotence म्हणतात. पण हा अर्थ तितकासा बरोबर नाही potence/ potency याचा अर्थ --समर्थ/सामर्थ्य . Impotence म्हणजे संभोग करण्यास असमर्थ. Impotence --मग तो कायमचा असेल, तात्पुरता असेल किंवा मुळात पुरुषच नसलेला असाही असू शकतो. लिंग उत्थान न होणे म्हणजे लिन्ग शैथिल्य ( erectile dysfunction) लिंग शैथिल्य आणि नपुंसकत्व यात गोंधळ होतो आहे. अशी उद्दीपनावस्था वीर्यपतनाआधीच नाहीशी होणे. याला नपुंसकत्व नाही तर अकाली किंवा वेळेआधी वीर्यस्खलन ( premature ejaculation) म्हणतात. हे जवळ जवळ ९९ % पुरुषांच्या बाबतीत (कदाचित १०० %) कधी ना कधी घडतेच. बऱ्याच पुरुषांच्या बाबतीत मधुचंद्राची वेळेसच घडते. याचे कारण पहिल्या रात्रीत बायकोला आपले पौरुषत्व दाखवलेच पाहिजे अन्यथा ती "बाहेरख्याली" होईल अशा गैरसमजुतीपासून आपल्याला कर्म करता येईल कि नाही अशा शंका असतात. यामुळे एक मानसिक तणाव performance anxietyआणि अति उल्हसित (over excitation) अवस्था "आज पलंगतोड कार्य करायचेच" यामुळे वेळेआधी वीर्यस्खलन होते. याशिवाय बहुसंख्य पुरुषांना लग्नाआधी संभोगाचा कोणताही अनुभव नसतो तेंव्हा एका तशा अनोळखी स्त्रीपुढे संपूर्ण विवस्त्र होणे या कृतीमधून येणाऱ्या तणावा मुळे वेळेआधी वीर्यस्खलन होते. त्यामुळे वेळेआधी वीर्यस्खलन याला नपुंसकत्व म्हणण्यामुळे सामान्य लोकांच्या मनात शंका निर्माण होईल मानसिक कारणांमध्ये उपचार करताना बऱ्याचदा एक दिवस ते एक महिना वेळ लागतो. एक दिवसात उपचार होत असेल तर तो चमत्कारच म्हणावा लागेल. मानसिक कारणात मूळ मनाची जडणघडण, अनेक वर्षांपासून असलेले गैरसमज, रूढी आणि परंपरांचा असलेला पगडा या सर्व गोष्टीतून एखाद्या माणसाला बाहेर काढणे ते सुद्धा एका दिवसात हे फारच कठीण आहे.

कर्नलतपस्वी Sat, 10/01/2022 - 11:55
साहित्य संपादकांनी डाॅक्टर खरे व इतर मिपाकरांच्या प्रतिसादाची नोंद घ्यावी. मानवी काम जीवन हा अत्यंत महत्त्वपूर्ण विषय आहे. लेखात खालील तीन विभिन्न शारीरीक अवस्थांवर प्रकाश न टाकता विषय जनरलाइज्ड केला आहे. डाॅक्टर खरे यांनी विस्तृत प्रतिसाद दिला आहे. Impotancy,Prematura ejaucalation and Erectile Dysfunction या सारख्या मुलभूत समस्येवर योग्य माहीती न देऊ शकणारे खालील गंभीर समस्येवर समुपदेशन करू शकतील या बाबत मी तरी सांशक आहे. Atypical genitalia which can be a difficult experience for families. Gonadal dysgenesis. Androgen insensitivity syndrom. CAH,Congenital Adernal Hyperplasia So on so forth. My humble request to learned writer please be more specific and precise while writing on very sensetive subject or stop writing. साहीत्य संपादक, कृपया नोदं घेणे लेखक कुणाच्याही शंका किवा प्रश्नानां उत्तर देत नाहीत व ही लेखकाची मुलभूत जबाबदारी आहे असे मला वाटते.

सामान्यनागरिक Sat, 10/01/2022 - 14:58
या लेखात काय असे आहे जे लोकांस माहीत नाही ? चार ओळी टाकल्या की त्याला लेख म्हणायचे ? लेखक महाशय ईतर कुठे भाव दिला जात नाही म्हणुन मिपा वर येऊन पब्लीशीटी मिळवण्य़ाचा प्रयत्नं करीत आहेत. त्यांच्या बायो डेटा त लिहीत असतील " या विद्वान डॊक्टरांचे अनेक (?) माहितीपूर्ण लेख प्रकाशित झालेले आहेत ". मिपा वर असे लेख प्रकाशित करुन जगण्य़ाची वेळ आली आहे काय ?

In reply to by सामान्यनागरिक

चौथा कोनाडा Sun, 10/02/2022 - 18:06
मिपा वर असे लेख प्रकाशित करुन जगण्य़ाची वेळ आली आहे काय ?
महत्वाचा प्रश्न ! आजकाल या पेक्षा चांगली आणि शास्त्रशुद्ध माहिती फेबू, यु ट्युब आणि रील्स मधून मिळत असते. हे महाशय बहुधा कुठल्यातरी तत्सम हिंदी साईटवरुन गुगल ट्रान्सलेट करुन मिपावर छापत असावेत.
(अवांतरः हा एखादा ड्युआयडी देखिल असण्याची शक्यता आहे अशी माझी शंका आहे)

कंजूस Sat, 10/01/2022 - 15:43
फक्त पदवी नसते. दुसरा प्रकार म्हणजे वर दिलेल्या कारणांनी तात्पुरती आलेली अडचण किंवा असमर्थता ही सहचारीने समजून न घेता चिडणे किंवा टोकाची भूमिका घेतली जाते.

विवेकपटाईत Mon, 10/03/2022 - 15:12
फक्त allopathy औषधी घ्यावी आणि डॉक्टर साहेबांकडून. इतर पैथीत औषधी नाहीत, हे विधान कुठल्या आधारावर?? व्यायाम, प्राणायाम आहार आणि मन चिकत्सकाचे सल्ले जास्त उपयोगी पडतील. बाकी मणक्याचे दुखणे आणि हृदयाचे ऑपरेशन इत्यादीचा सुतराम ही संबंध नाही.( स्वतः चा अनुभव. ) फक्त काही आसने तुम्ही करू शकणार नाही. तसेही संतुष्टी आणि आसन याच्या जास्त संबंध नाही.
लेखनविषय:
लेखनप्रकार
नपुंसकत्व पुरुषाच्या लिंगाला उद्दीपनावस्था येऊन ती वीर्यपतन होईपर्यंत टिकणे हे नैसर्गिक आहे. परंतु अशी उद्दीपनावस्था वीर्यपतनाआधीच नाहीशी होणे, संभोग करण्यास असमर्थ ठरणे किंवा कामक्रीडा करताना लिंग उद्दीपन बिलकुल न होणे याला नपुंसकत्व म्हणतात. जगामध्ये नपुंसकत्व तक्रार असणाऱ्यांची संख्या प्रचंड आहे. भारतात करोडो पुरुषांना ही समस्या आहे. आंतरराष्ट्रीय संशोधकांनी २०२५ पर्यंत जगात याची संख्या वाढण्याची शक्यता वर्तवली आहे.

मानवी कामजीवन: प्रश्न आणि उत्तर

राहुल ·

अनिकेत वैद्य Wed, 09/28/2022 - 13:08
ह्यापूर्वीच्या लेखातही प्रश्न विचारला होता. बहुदा आपल्या ज्ञानाची खिल्ली न उडवाल्यानी आपण प्रतिसाद दिला नाहीत. शैक्षणिक डिग्री सार्वजनिक करायला हरकत नसावी (त्यात काय खासगी आहे?). हवंतर कॉलेजचं नाव किंवा उत्तीर्ण झाल्याचे गुण/ वर्ष नका सांगू.

In reply to by अनिकेत वैद्य

खर आहे अगदी वैद्यकीय क्षेत्रात सुद्धा नुसत्या डॉ उपाधीने मॉडर्न मेडिसीन ( अ‍ॅलोपथी) होमिओपॅथी की आयुर्वेद शाखेतील डॉक्टर आहेत हे समजत नाही. दवाखान्यात पाटीवर डॉक्टरांची डिग्री लिहिणे हे बंधनकारक असते. मेडिकल एथिक्स बाबत नॅशनल मेडिकल कौन्सिल ने नवीन कोड ऑफ कंडक्ट चा मसुदा शासनाला दिला आहे. महत्वाची बातमी आहे. त्यानुसार आपापल्या पॆथी व्यतिरिक्त डॉक्टरांना अन्य पॆथीची औषधे देता येणार नाहीत. https://www.newindianexpress.com/nation/2022/may/30/nmc-prescribes-new-rules-for-ayush-doctors-2459600.html?fbclid=IwAR28OeAZdZiOl98LHMtyAYYHJ4F8dzirZg2vAvD1tQ5ZcrwsbtN4ud-k-Bs

In reply to by प्रकाश घाटपांडे

चौथा कोनाडा Wed, 09/28/2022 - 17:54
+१ खरं आहे, असे लेख लिहिताना सुद्धा शैक्षणिक उपाधी लिहिणे गरजेचे वाटते. आजकाल या क्षेत्रात सुद्धा सुळसुळाट झाला आहे, बरेच विना नोंदणी / बोगस डॉक्टर्स पकडल्याच्या बातम्या येत असतात. या पार्श्वभुमीवर शैक्षणिक उपाधी आणि नोंदणी क्रमांक लिहिणे गरजेचे वाटते !

In reply to by चौथा कोनाडा

दिलेल्या लिंकवरुन डॉक्टर राहूल पाटील हे BAMS आहेत. म्हणजे आयुर्वेदिक डॉक्टर ना ? अर्थात वरील बहुतांशी माहिती देण्यासाठी डिग्रीचीही गरज नाही. पण असो.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

प्रकाश घाटपांडे गुरुवार, 09/29/2022 - 09:48
अर्थात वरील बहुतांशी माहिती देण्यासाठी डिग्रीचीही गरज नाही. पण असो.
पण उपचार करण्यासाठी आहे. शिवाय दिलेली माहितीचा स्त्रोत व विश्वासार्हता देखील वाचकांच्या दृष्टीने महत्वाची आहे असे प्रतिक्रियांवरुन दिसत आहे. त्यावेळी खुलासा लेखकाकडून अपेक्षित असतो. लेख प्रचारकी वा जाहिरातबाजीसारखा वाटतो हे देखील प्रतिक्रियेत आलेले आहे अशा वेळी जर लेखकाने खुलास केला तर विश्वासार्हता वाढते.

In reply to by प्रकाश घाटपांडे

सुबोध खरे गुरुवार, 09/29/2022 - 10:55
लेख प्रचारकी वा जाहिरातबाजीसारखा वाटतो - डॉ. राहुल पाटील, लैंगिक समस्या तज्ञ, कोल्हापूर (मोबाईल-9822534754) अधोरेखित गोष्टी हेच दर्शवतात. हे वैद्यकीय नीतितत्त्वात बसते का?

कर्नलतपस्वी Wed, 09/28/2022 - 19:34
मला आजुनही वाटतयं की असल्या ज्ञानाची इथे मिपावर जरूर आहे का? १.बहुतेक सर्व सदस्य वयस्क आणी सर्वांनीच ती "जपानी रमलाची रात्र" अनुभवलेली आहे. बरेचसे सदस्य आयुष्याच्या विद्यापीठातून ही प्रश्न पत्रीका सोडवित प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत.या विषयावर काही विद्यावाचस्पती सुद्धा असतील. "तुझे विजेचे चांदपाखरू दीप-राग गात रचीत होते शयनमहाली निळी चांदरात" २. बरेच सदस्य या क्षेत्रातील आपापली जबाबदारी पार पाडून निवृत्त झाले आहेत. २. स्वतः वात्सायनाने अनैसर्गिक मैथुन निषिद्ध सांगीतले आहे. ३.बरेच सदस्य माझ्यासारखेच आनंदयात्री. मुक्कामाच्या शेवटच्या गाडीची वाट पहात आहेत. ५.महिला सदस्य सुद्धा आहेत व भारतीय महिलांना अशा विषयावर सार्वजनिक पणे व्यक्त होण्यास अडचण वाटते. ६.ह्या सर्व गोष्टी वाचकांना आकर्षित करण्यासाठी वर्तमानपत्रात नियमित वाचायला मीळतात. नवीन काहीच नाही. बाकी लोकशाही आहे त्यामुळे डाॅक्टरांनी लेख या विषयावर लिहावे अथवा नाही हा त्यांचा विषय आहे. डॉक्टर मानसोपचार तज्ज्ञ आहेत.(MD psychology असावेत असे गृहीत धरतो) फार चांगली गोष्ट आहे.Instead of Sexology, त्यांनी जर खालील विषयावर प्रकाश टाकला तर सदस्यांना फायदा होईल असे माझे मत आहे. Depression Schizophrenia and marital harmony Psychosis Phobia Intellectual Disability Psychological Disorders Developmental Disorders. Senile Depression Anxiety Disorders. इत्यादी.

In reply to by कर्नलतपस्वी

आग्या१९९० Wed, 09/28/2022 - 20:51
स्वतः वात्सायनाने अनैसर्गिक मैथुन निषिद्ध सांगीतले आहे. कारण काय? वात्सायनाने अनैसर्गिक मैथुनची कशास म्हटले आहे?

सुबोध खरे Wed, 09/28/2022 - 19:51
जवळजवळ ८०% लोक संभोग अंधारात करतात. डोळे असल्याचा काय फायदा "स्वप्नरंजन" याचे मानवी जीवनात आणि लैंगिक सुखात अपरिमित महत्व आहे. सर्वांच्या बायका अप्सरा नसतात. त्यातून स्त्रीदेह सिनेमात, मासिकात जसा दाखवला जातो तो आदर्श असा असतो. सर्वाना अप्सरा बायको म्हणून मिळत नाही त्यातून स्त्री चिरतरुण नसते. तारुण्य काळानंतर स्त्रीदेहात बराच बदल होतो आणि तिशीनंतर हा बदल दर पाच वर्षात जाणवण्याइतका जास्त असतो. शिवाय ४५ च्या आसपास स्त्रियांची रजोनिवृत्ती होते त्यानंतर तर हे फारच वेगाने होऊ लागते. वस्त्राच्छादित आणि वस्त्रहीन स्त्रीदेह यात प्रचंड फरक असतो.यामुळे स्पर्श होणारा स्त्रीदेह आणि स्वप्नरंजनात दिसणारा स्त्रीदेह याची सांगड घालून पुरुष संबंधाचे सुख मिळवू शकतो. आता हा प्रश्न स्त्रियांमध्ये नाही का? आहेच परंतु समागमात स्त्री हि सक्रिय नसते. त्यामुळे पुरुषाचा देह आवडत नसला तरी स्त्रीला लिंग उथ्थानाची गरज नसल्यामुळे तिच्या सक्रियतेची गरज नसते. स्त्रीरोग शास्त्रात काम सुरुवात केल्यावर सुरुवातीच्या काही आठवड्यात स्त्रीदेहाबद्दल किळस निर्माण होते हा डॉक्टरांचा सार्वत्रिक अनुभव आहे. यानंतर माणसे हा कप्पा बंद करायला शिकतात.( compartmentalisation) (बाकी जीवनात सात्विक असणारी माणसे जशी व्यवसायात एकमेकांचा गळा कापू शकतात). स्त्रीसुखात समाधानीअसणारा माणूस बाहेरख्याली होण्याची शक्यता (अंशतः का होईना) कमी होते हे पतिपत्नीत संबंध दृढ होण्यासाठी महत्त्वाचे आहेच. त्यामुळे अंधारात समागम करणे हि अनेकांची गरज/ आवश्यकता असू शकते.

कपिलमुनी Wed, 09/28/2022 - 22:39
बेसिक असले तरि सगळ्यंना माहिती असेल असे नाही, अशी माहिती लिहिण्यात वाईट काही नाही. दरमहा घडामोडीचे धागे काढून राजकीय , धार्मिक पो टा़कण्या पेक्षा बरेच उत्तम.

अनिकेत वैद्य Wed, 09/28/2022 - 13:08
ह्यापूर्वीच्या लेखातही प्रश्न विचारला होता. बहुदा आपल्या ज्ञानाची खिल्ली न उडवाल्यानी आपण प्रतिसाद दिला नाहीत. शैक्षणिक डिग्री सार्वजनिक करायला हरकत नसावी (त्यात काय खासगी आहे?). हवंतर कॉलेजचं नाव किंवा उत्तीर्ण झाल्याचे गुण/ वर्ष नका सांगू.

In reply to by अनिकेत वैद्य

खर आहे अगदी वैद्यकीय क्षेत्रात सुद्धा नुसत्या डॉ उपाधीने मॉडर्न मेडिसीन ( अ‍ॅलोपथी) होमिओपॅथी की आयुर्वेद शाखेतील डॉक्टर आहेत हे समजत नाही. दवाखान्यात पाटीवर डॉक्टरांची डिग्री लिहिणे हे बंधनकारक असते. मेडिकल एथिक्स बाबत नॅशनल मेडिकल कौन्सिल ने नवीन कोड ऑफ कंडक्ट चा मसुदा शासनाला दिला आहे. महत्वाची बातमी आहे. त्यानुसार आपापल्या पॆथी व्यतिरिक्त डॉक्टरांना अन्य पॆथीची औषधे देता येणार नाहीत. https://www.newindianexpress.com/nation/2022/may/30/nmc-prescribes-new-rules-for-ayush-doctors-2459600.html?fbclid=IwAR28OeAZdZiOl98LHMtyAYYHJ4F8dzirZg2vAvD1tQ5ZcrwsbtN4ud-k-Bs

In reply to by प्रकाश घाटपांडे

चौथा कोनाडा Wed, 09/28/2022 - 17:54
+१ खरं आहे, असे लेख लिहिताना सुद्धा शैक्षणिक उपाधी लिहिणे गरजेचे वाटते. आजकाल या क्षेत्रात सुद्धा सुळसुळाट झाला आहे, बरेच विना नोंदणी / बोगस डॉक्टर्स पकडल्याच्या बातम्या येत असतात. या पार्श्वभुमीवर शैक्षणिक उपाधी आणि नोंदणी क्रमांक लिहिणे गरजेचे वाटते !

In reply to by चौथा कोनाडा

दिलेल्या लिंकवरुन डॉक्टर राहूल पाटील हे BAMS आहेत. म्हणजे आयुर्वेदिक डॉक्टर ना ? अर्थात वरील बहुतांशी माहिती देण्यासाठी डिग्रीचीही गरज नाही. पण असो.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

प्रकाश घाटपांडे गुरुवार, 09/29/2022 - 09:48
अर्थात वरील बहुतांशी माहिती देण्यासाठी डिग्रीचीही गरज नाही. पण असो.
पण उपचार करण्यासाठी आहे. शिवाय दिलेली माहितीचा स्त्रोत व विश्वासार्हता देखील वाचकांच्या दृष्टीने महत्वाची आहे असे प्रतिक्रियांवरुन दिसत आहे. त्यावेळी खुलासा लेखकाकडून अपेक्षित असतो. लेख प्रचारकी वा जाहिरातबाजीसारखा वाटतो हे देखील प्रतिक्रियेत आलेले आहे अशा वेळी जर लेखकाने खुलास केला तर विश्वासार्हता वाढते.

In reply to by प्रकाश घाटपांडे

सुबोध खरे गुरुवार, 09/29/2022 - 10:55
लेख प्रचारकी वा जाहिरातबाजीसारखा वाटतो - डॉ. राहुल पाटील, लैंगिक समस्या तज्ञ, कोल्हापूर (मोबाईल-9822534754) अधोरेखित गोष्टी हेच दर्शवतात. हे वैद्यकीय नीतितत्त्वात बसते का?

कर्नलतपस्वी Wed, 09/28/2022 - 19:34
मला आजुनही वाटतयं की असल्या ज्ञानाची इथे मिपावर जरूर आहे का? १.बहुतेक सर्व सदस्य वयस्क आणी सर्वांनीच ती "जपानी रमलाची रात्र" अनुभवलेली आहे. बरेचसे सदस्य आयुष्याच्या विद्यापीठातून ही प्रश्न पत्रीका सोडवित प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत.या विषयावर काही विद्यावाचस्पती सुद्धा असतील. "तुझे विजेचे चांदपाखरू दीप-राग गात रचीत होते शयनमहाली निळी चांदरात" २. बरेच सदस्य या क्षेत्रातील आपापली जबाबदारी पार पाडून निवृत्त झाले आहेत. २. स्वतः वात्सायनाने अनैसर्गिक मैथुन निषिद्ध सांगीतले आहे. ३.बरेच सदस्य माझ्यासारखेच आनंदयात्री. मुक्कामाच्या शेवटच्या गाडीची वाट पहात आहेत. ५.महिला सदस्य सुद्धा आहेत व भारतीय महिलांना अशा विषयावर सार्वजनिक पणे व्यक्त होण्यास अडचण वाटते. ६.ह्या सर्व गोष्टी वाचकांना आकर्षित करण्यासाठी वर्तमानपत्रात नियमित वाचायला मीळतात. नवीन काहीच नाही. बाकी लोकशाही आहे त्यामुळे डाॅक्टरांनी लेख या विषयावर लिहावे अथवा नाही हा त्यांचा विषय आहे. डॉक्टर मानसोपचार तज्ज्ञ आहेत.(MD psychology असावेत असे गृहीत धरतो) फार चांगली गोष्ट आहे.Instead of Sexology, त्यांनी जर खालील विषयावर प्रकाश टाकला तर सदस्यांना फायदा होईल असे माझे मत आहे. Depression Schizophrenia and marital harmony Psychosis Phobia Intellectual Disability Psychological Disorders Developmental Disorders. Senile Depression Anxiety Disorders. इत्यादी.

In reply to by कर्नलतपस्वी

आग्या१९९० Wed, 09/28/2022 - 20:51
स्वतः वात्सायनाने अनैसर्गिक मैथुन निषिद्ध सांगीतले आहे. कारण काय? वात्सायनाने अनैसर्गिक मैथुनची कशास म्हटले आहे?

सुबोध खरे Wed, 09/28/2022 - 19:51
जवळजवळ ८०% लोक संभोग अंधारात करतात. डोळे असल्याचा काय फायदा "स्वप्नरंजन" याचे मानवी जीवनात आणि लैंगिक सुखात अपरिमित महत्व आहे. सर्वांच्या बायका अप्सरा नसतात. त्यातून स्त्रीदेह सिनेमात, मासिकात जसा दाखवला जातो तो आदर्श असा असतो. सर्वाना अप्सरा बायको म्हणून मिळत नाही त्यातून स्त्री चिरतरुण नसते. तारुण्य काळानंतर स्त्रीदेहात बराच बदल होतो आणि तिशीनंतर हा बदल दर पाच वर्षात जाणवण्याइतका जास्त असतो. शिवाय ४५ च्या आसपास स्त्रियांची रजोनिवृत्ती होते त्यानंतर तर हे फारच वेगाने होऊ लागते. वस्त्राच्छादित आणि वस्त्रहीन स्त्रीदेह यात प्रचंड फरक असतो.यामुळे स्पर्श होणारा स्त्रीदेह आणि स्वप्नरंजनात दिसणारा स्त्रीदेह याची सांगड घालून पुरुष संबंधाचे सुख मिळवू शकतो. आता हा प्रश्न स्त्रियांमध्ये नाही का? आहेच परंतु समागमात स्त्री हि सक्रिय नसते. त्यामुळे पुरुषाचा देह आवडत नसला तरी स्त्रीला लिंग उथ्थानाची गरज नसल्यामुळे तिच्या सक्रियतेची गरज नसते. स्त्रीरोग शास्त्रात काम सुरुवात केल्यावर सुरुवातीच्या काही आठवड्यात स्त्रीदेहाबद्दल किळस निर्माण होते हा डॉक्टरांचा सार्वत्रिक अनुभव आहे. यानंतर माणसे हा कप्पा बंद करायला शिकतात.( compartmentalisation) (बाकी जीवनात सात्विक असणारी माणसे जशी व्यवसायात एकमेकांचा गळा कापू शकतात). स्त्रीसुखात समाधानीअसणारा माणूस बाहेरख्याली होण्याची शक्यता (अंशतः का होईना) कमी होते हे पतिपत्नीत संबंध दृढ होण्यासाठी महत्त्वाचे आहेच. त्यामुळे अंधारात समागम करणे हि अनेकांची गरज/ आवश्यकता असू शकते.

कपिलमुनी Wed, 09/28/2022 - 22:39
बेसिक असले तरि सगळ्यंना माहिती असेल असे नाही, अशी माहिती लिहिण्यात वाईट काही नाही. दरमहा घडामोडीचे धागे काढून राजकीय , धार्मिक पो टा़कण्या पेक्षा बरेच उत्तम.
स्त्रियांना गुदमैथुन आवडते का ? त्यातून कोणते आजार होतात का? भारतासहित काही देशात याला विकृत मानले गेले आहे. तरी दोघांच्या इच्छेने कोणताही आजार पसरत नसेल अशी खबरदारी घेऊन जर कोणी त्याचा आनंद त्यांच्या खाजगी आयुष्यात घेत असेल तर त्याला तिसरा कोणताही व्यक्ती विरोध करु शकत नाही. स्त्रीयांना गुदमैथुन आवडते असे नाही. यांचे प्रमाण कमी आहे. तसेच पुरूषांनाही फार आवडते असेही नाही. फक्त होमोसेक्श्युयल लोकच गुदमैथुन करतात हा गैरसमज आहे. आणि सर्व होमोसेक्शुयल हे करतातच असेही नाही.

खरचं गरज आहे का?

कर्नलतपस्वी ·

कर्नलतपस्वी Mon, 09/26/2022 - 22:41
पोलीसा पेक्षा पण बारीक निरीक्षण करताय की राव. खुनी,चोर,दरोडेखोर लगेच पकडताल. सॅल्युट. मोबाईल मुआ दांडीयामुळं बिथरलाय.

व!!कविता आवडली. पण तरीही वयाच्या काही टप्प्यांवर काही जणाना सेक्सॉलॉजिस्ट्ची मदत लागु शकते. जसे आपण ईतर डॉक्टरांकडे(डोळे/दात्/ईतर तक्रारी) त्या त्या वेळी जाउन सल्ला/ औषधे घेतो तसेच. त्यामुळे"खरच गरज आहे का?" याचे उत्तर होय असु शकते.

कर्नलतपस्वी Mon, 09/26/2022 - 22:41
पोलीसा पेक्षा पण बारीक निरीक्षण करताय की राव. खुनी,चोर,दरोडेखोर लगेच पकडताल. सॅल्युट. मोबाईल मुआ दांडीयामुळं बिथरलाय.

व!!कविता आवडली. पण तरीही वयाच्या काही टप्प्यांवर काही जणाना सेक्सॉलॉजिस्ट्ची मदत लागु शकते. जसे आपण ईतर डॉक्टरांकडे(डोळे/दात्/ईतर तक्रारी) त्या त्या वेळी जाउन सल्ला/ औषधे घेतो तसेच. त्यामुळे"खरच गरज आहे का?" याचे उत्तर होय असु शकते.
लेखनविषय:
ढवळ्या शेजारी पवळा बांधला वाण नाही पण गुण लागला पेरणा एकदा सुट्टीवर गेलो होतो. टाईमपास म्हणून डॉक्टर मित्राच्या दवाखान्यात बसलो होतो. बऱ्यापैकी गर्दी होती. रोगी येत होते, मित्र त्यांना तपासून औषधे गोळ्या, इंजेक्शन इ. देत होता. मला पण बर्‍यापैकी वैद्यकीय क्षेत्रात अनुभव म्हणून त्याच विषयावर अधून मधून गप्पा चालू होत्या. मित्र रोगी तपासत असताना मी रोडवर येणारे जाणारे बघत आपले मनोरंजन करत होतो. कुणी ओळखीचा आसेल तर हाय,हॅलो. कधी आला,कधी जाणार टाईप विचारपूस.