प्रश्नोत्तरे
शिवस्वरोदय शास्त्र, मुद्राशास्त्र आणि कर्मविपाक सिद्धांत,पुनर्जन्म वगैरे वगैरे
प्रेषक, lakhu risbud, Fri, 03/05/2013 - 00:39मिपा वर सध्या 'कर्मविपाक' आणि 'पुनर्जन्म या व्यवस्थेसंबंधी काही प्रश्न' या धाग्यांवर चर्चा चालू आहे.त्याच अनुषंगाने मला पडलेले काही प्रश्न
मिपाच्या पाकृ अनुदिनीची (ब्लॉग) कल्पना...
प्रेषक, विसोबा खेचर, Sat, 27/04/2013 - 18:53मिपाच्या सर्व दालनांपैकी एक अतिशय समृद्ध दालन म्हणजे मिपाचं रसोईघर, अर्थातच मिपाचा पाककृती विभाग.. कुणाही शब्दप्रभुचे शब्द केवळ तोकडे पडावेत इतकं सुरेख, इतकं प्रेक्षणीय असं हे मिपाचं रसोईघर..नानाविध शाकाहारी, मांसाहारी पदार्थांची अक्षरशः रेलचेल..सोबत त्या त्या पाकृंची दृष्ट लागावीत अशी एकापेक्षा एक सुरेख छायाचित्रं..!
हा विभाग चाळत असताना एक कल्पना सुचली ती येथे मांडतो..
एक मुलाखत: गप्पाटप्पा शिळबाबांसोबत
प्रेषक, पाषाणभेद, Sun, 31/03/2013 - 21:34एक मुलाखत: गप्पाटप्पा शिळबाबांसोबत
श्रोतेहो, आज होळीनिमीत्त आपल्या स्टुडीओमध्ये प्रसिद्ध शिळपादक श्री. शिळबाबा आलेले आहेत. आपण त्यांच्याशी बोलून त्यांच्या या आगळ्यावेगळ्या छंदाबाबत माहीती करून घेवूया.
निवेदकः नमस्कार शिळबाबा. होळीनिमीत्ताने आपणाला शुभेच्छा.
शिळबाबा: नमस्कार, नमस्कार. आपणालाही होळीच्या शुभेच्छा!
निवेदकः शिळबाबा, संपूर्ण राज्यात आपल्या शिळपादनाची किर्ती पसरलेली आहे. गावोगावी आपल्या शिळपादनाचे कार्यक्रम होतात. या सर्व कार्याबद्दल आपल्याला काय वाटते?
मिपावरील तज्ञांचे मार्गदर्शन हवे आहे !
प्रेषक, आशु जोग, Sun, 31/03/2013 - 18:42तर्हेतर्हेचे प्रश्न पडतात. उत्तरे शोधून सापडत नाहीत. अशावेळी मिसळीवर यावे वाटते.
मिसळीवरचे तज्ञ काही मार्गदर्शन करु शकतील ही आशा असते.
भारत देशामधे अनेक शतकांपासून हिंदू धर्म विद्यमान आहे.
तर असे सांगितले जाते की
या देशात खूप विषमता होती. त्यापासून सुटका व्हावी म्हणून पिचलेल्या लोकांनी इतर धर्माचा अवलंब केला.
हे कितपत सत्य आहे ?
विदेशी आक्रमकांबरोबर आलेले धर्म इथल्या लोकांनी स्वखुशीने स्वीकारले.
तर मग ते स्वीकारल्यानंतर झोपडीत राहणारे लोक राजवाड्यात गेले का ?
पूर्वीचे गुलाम नंतर राजे नाहीतर निदान सरदार बनल्याची उदाहरणे आहेत का ?
काठमांडू ते कंदाहार - Flight IC 814
प्रेषक, मोदक, Sun, 24/03/2013 - 23:121998 साली झालेल्या विमान अपहरणाबद्दल अनेक ठिकाणी अनेकवेळा सतत चर्चा होत असते.
श्री श्रीरंग जोशींनी या घटनेसंदर्भात विस्तृत लेखन दिवाळी अंकामधील काठमांडू ते कंदहार या लेखामध्ये केले आहेच.
अनेक ठिकाणी होणारे विषयांतर पाहता या विषयावर हा धागा काढत आहे. या धाग्यामध्ये आपण या अपहरणासंदर्भात चर्चा करूया.
संपादक मंडळास नम्र विनंती.
वर्तुळ-कोन सिद्धांत
प्रेषक, श्रावण मोडक, Fri, 08/03/2013 - 17:57"
प्रश्न
प्रेषक, तिमा, Tue, 05/03/2013 - 15:12हे यक्षाचे प्रश्न नाहीत. एका सश्रद्ध आदरणीय व्यक्तीने एका विज्ञाननिष्ठाला म्हणजे (माझ्यासारख्या माणसाला) विचारलेले बेसिक प्रश्न आहेत. त्याला मी माझ्या बुद्धीला झेपेल अशी उत्तरे दिली आहेत. संभाषण वैयक्तिक निरोपातून असल्यामुळे आत्तापर्यंत अप्रकाशित आहे. त्यावर चर्चा व्हावी या हेतूने इथे देत आहे.
१. मन खंबीर नसेल तर माणसाने अश्या प्रसंगी काय करावे?
मन खंबीर नसेल तर माणसाने परमेश्वराचा जरुर आधार घ्यावा.
२. विज्ञानाभिमुख होण्याने मन खंबीर होते काय?
माझे तरी झाले आहे.
कुंडली विवेचन आणि करिअर!!
प्रेषक, निमिष सोनार, Thu, 21/02/2013 - 00:17(विनंतीवजा सूचना: हा धागा फक्त ज्यांना ज्योतिषशास्त्राच्या अनुषंगाने चर्चा करावयाची आहे, त्यांचेसाठीच आहे. कृपया, येथे ज्योतिष शास्त्र खरे का खोटे ही चर्चा आणि त्यासंदर्भातली खिल्ली अपेक्षीत नाही)
(१) ज्योतिषशास्त्रात जन्मलग्न कुंडली सोबतच भावचलीत कुंडली, नवमांश कुंडली आणि राशी कुंडली यांचे महत्व काय असते? कुठली कुंडली कशासाठी बघायची असते?
(२) जन्मलग्न कुंडली मध्ये करीअर/नोकरी/जॉब चे स्थान कोणते? करीअर चांगले होण्यासाठी कोणता/कोणते ग्रह जबाबदार असतात? व ते कुठल्या स्थानी असावे लागतात?
ॠषीकुमाराचे प्रश्र्ण
प्रेषक, ज्ञानोबाचे पैजार, Wed, 06/02/2013 - 15:12एका माळरानावर एक हरीणाची जोडी निवांतपणे चरत होते. अतिशय सुंदर गोजीरवाणी जोडी होती ती. दोघांनीही नुकतेच यौवनात पदार्पण केले होते. सहजीवनाचा हा त्यांचा पहिलावहीला अनुभव होता. तारुण्याचा उन्मादाच्या शिखरावर होते ते दोघेजण. एकमेकांच्या तोंडावर तोंड घासत. एकमेकांना ढुशा मारत त्यांचे प्रणयाराधान सुरु होते. नुकत्याच झालेल्या पावसा मुळे मोठे छान लुसलिशीत गवत उगवलेले होते. नविनच उगवलेल्या या कोवळ्या गवता मुळे त्यांना पोट भर खायला मिळत होते. त्यामुळे खुश झालेली जोडी इकडे तिकडे हुंदडत फिरत गवताचा आस्वाद घेत होती. त्यांच्या गवतात फिरण्या मुळे गवतातले किडे पण उडत होते.