मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

प्रश्नोत्तरे

बृहन्महाराष्ट्र मंडळ अधिवेशनाचे समन्वयक श्री. शैलेश शेट्ये यांच्याशी बातचीत

बीएमएम२०१५ ·

एस 14/05/2015 - 23:57
ही मुलाखत घेतल्याबद्दल आपले आभार. बृहन्महाराष्ट्र मंडळ अधिवेशनास शुभेच्छा!

ही मुलाखत इथे प्रकाशित केल्याबद्दल धन्यवाद. अमेरिकेत राहूनही बॄममंच्या अधिवेशनाला उपस्थित राहू शकत नसल्याबद्दल वाईट वाटतं. माझ्या माहितीप्रमाणे किमान दोन मिपाकर या अधिवेशनामध्ये स्वयंसेवक आहेत. अधिकही असू शकतील. या अधिवेशनाच्या यशस्वितेसाठी आयोजकांना व सर्व स्वयंसेवकांना मनःपूर्वक शुभेच्छा. अवांतर बॄममंच्या यंदाच्या वृत्तामधील वैभव पुराणिक यांचा या अधिवेशनासंबंधीचा लेख वाचनीय आहे.

एस 14/05/2015 - 23:57
ही मुलाखत घेतल्याबद्दल आपले आभार. बृहन्महाराष्ट्र मंडळ अधिवेशनास शुभेच्छा!

ही मुलाखत इथे प्रकाशित केल्याबद्दल धन्यवाद. अमेरिकेत राहूनही बॄममंच्या अधिवेशनाला उपस्थित राहू शकत नसल्याबद्दल वाईट वाटतं. माझ्या माहितीप्रमाणे किमान दोन मिपाकर या अधिवेशनामध्ये स्वयंसेवक आहेत. अधिकही असू शकतील. या अधिवेशनाच्या यशस्वितेसाठी आयोजकांना व सर्व स्वयंसेवकांना मनःपूर्वक शुभेच्छा. अवांतर बॄममंच्या यंदाच्या वृत्तामधील वैभव पुराणिक यांचा या अधिवेशनासंबंधीचा लेख वाचनीय आहे.
बृहन्महाराष्ट्र मंडळाचे १७वे अधिवेशन आता फक्त दोन महिन्यांवर येऊन ठेपले आहे. दोन अडिचशे स्वयंसेवकांना घेऊन चार-पाच हजार लोकांचे तीन दिवस मनोरंजन करणे ही काही सोपी गोष्ट नाही. गेल्या दोन वर्षाहूनही अधिक काळ या अधिवेशनाचे काम सुरु आहे. आणि हे काम करण्याची जबाबदारी ज्यांच्या समर्थ खांद्यानी पेलली आहे त्या शैलेश शेट्येंशी केलेही ही बातचीत.

खड्डा आणि मी

शब्दानुज ·

In reply to by नगरीनिरंजन

अगदी अगदी. फायदा तेथे समानता. नुकसान, त्रास अश्या गोष्टी दिसल्या की मला बै नै जमायचं हे. तेवढं करशील का माझ्यासाठी प्लीssSSSssज असं. (सगळ्याचं असं नाही वागतं पण मेजॉरिटी अशीच आहे.) (पॉपकॉर्न)

In reply to by नगरीनिरंजन

अगदी अगदी. फायदा तेथे समानता. नुकसान, त्रास अश्या गोष्टी दिसल्या की मला बै नै जमायचं हे. तेवढं करशील का माझ्यासाठी प्लीssSSSssज असं. (सगळ्याचं असं नाही वागतं पण मेजॉरिटी अशीच आहे.) (पॉपकॉर्न)
आमच्या शहरात एक सुप्रसिद्ध खड्डा आहे.संपूर्ण महाराष्ट्र्ात जरी एक वेळ दुष्काळ पडला तरी तो तेव्हा एखाद्या नदीसारखा दुथडीभरुन वाहत असेल यात शंका नाही तर इतर खडड्याप्रमाणेच याही खड्ड्याचे पुनर्निमाण नेहमीच होत असे. अहो खड्डे आहेत म्हणुन तर लोक गाड्या हळु चालवतात अशी मी स्वताःची समजुत करुन घेतली आहे त्या दिवशी मी महत्वाच्या कामानिमित्त [कोणते ? राष्ट्रउभारणीचे अत्यंत गुपित कार्य होते ते] त्या रस्यावरुन निघालो होतो.एक ब्रह्नानंदी टाळी लावलेला टॅम्पो रस्त्यात हळुवारपणे चालला होता.इतर कोणत्याही सांसारिक गोष्टिप्रमाणे त्याला मागच्या कोणत्याही ओरडणारया वाहनाची तमा नव्हती.

एक "टवाळ" संध्याकाळ

कॅप्टन जॅक स्पॅरो ·

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

फोटु टाकयचे नैत ह्या कट्ट्याचे अशी एका सदश्याची मागणी असल्यानी फोटु टाकलेले नैत. तसे गप्पांच्या नादात फोटो काढायचं राहुन गेलेलं २-३ फोटो काढले बास्स :)
पुन्हा एकदा कट्टा करा
आयोजन करा ;)

पैसा 03/05/2015 - 14:03
फटु नसल्याने कट्टा झाला, तसेच चिमणराव आणि टका हे दोघेजण अस्तित्त्वात आहेत यावर विश्वास ठेवणार नाही. (टकाचे पुण्यात काही खास काम होते असा सौंशय आहे. त्याचे काय झाले?)

In reply to by पैसा

हेमा मालिनीचं ठिके हो. ती कमीत कमी सुंदर म्हातारी तरी आहे. माझा फोटो अगदी अंधळा माणुस सुद्धा मुद्दाम नाही लावणार चेपु ला =)) सो तो मीचं आहे.

In reply to by पैसा

टवाळ कार्टा 05/05/2015 - 14:21
फटु नसल्याने कट्टा झाला, तसेच चिमणराव आणि टका हे दोघेजण अस्तित्त्वात आहेत यावर विश्वास ठेवणार नाही. (टकाचे पुण्यात काही खास काम होते असा सौंशय आहे. त्याचे काय झाले?)
ओ पैसा टै...इथे लिहिता मी अस्तीत्वात नै...दुसर्या प्रतिसादात लिहिता की माझा फटू बघितला...ये क्या गोडा...चतुर...गोडा...चतुर जी बाकी माझे पुण्यात खास काम नव्हते...असले की तुम्हालाच घेउन जातो बोलणी करायला :)

In reply to by पैसा

टवाळ कार्टा 05/05/2015 - 15:17
ब्वार्र. बोलणी करायला फारसा उपयोग व्हायचा नै. मांडवात जेवायला बोलावलंस तरी पुरे! =))
ओ...बोल्णी करायला नै...समोरचे उग्गीच फाल्तू विषयावरून नखरे करायला लागले की त्यांना वठणीवर आणायला ;)

नाखु 03/05/2015 - 14:04
हे ठिकाण माझ्या घरापासून चालत १० मिनिटांचे अंतरावर आहे. सबब . . . . . . . . . . . . . . . . . . . . योग्य जागी सुपारी दिली आहे कॅप्टन. गपचिप नाखु

In reply to by नाखु

तुमचा भ्रमणध्वनी क्रमांक माझ्याकडे नाही तस्मात कळवु शकलो नाही. सुपारी अन्या दातारला दिलेली असल्यास कळवणे तो पुण्यात नै त्यामुळे ती सुपारी माझ्यापरंत पोचणं अवघड आहे :)

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

अन्या दातार 03/05/2015 - 15:37
माझ्याकडची सुपारीची खांडं संपलीत :P असो, तर विशेष सदस्य वगळता फोटो टाकायला हरकत नसावी. पण ज्याअर्थी एक्कही फोटो नाही, त्याअर्थी कट्टा झालेला नसल्याची शंका घेण्यास भर्पूर वाव आहे.

In reply to by पैसा

टवाळ कार्टा 05/05/2015 - 14:21
बाकी कै नै! फोनवरून जरा चौकशी केली असती टक्याची!
म्हणजे आता खरडी, व्यनी, प्रतिसाद यांनंतर फोनवरून धमक्या???

In reply to by सतिश गावडे

टवाळ कार्टा 05/05/2015 - 14:21
टवाऴजी कार्टा यांना आताच सिंहगड रस्त्यावर टेम्पोत बसवून आलो आहे.
चायला...त्या ट्येंप्यूने २ तास घेतले पुण्याच्या बाहेर पडायला :(

In reply to by यसवायजी

टवाळ कार्टा 05/05/2015 - 14:22
धनाजी वाकडे यांच्या च्याहा- डागाच्या कन्फेशनबद्दल वाचण्यासही उस्सुक.
धाग्याच्या प्रतिक्षेत ;)

वा वा, मजा आली वृत्तांत वाचून. धनकवडी अन फुरसुंगी मध्ये गोंधळ होणे म्हणजे फारच बुवा. बाकी पुणे महानगराच्या विविध टोकांवरून दुचाक्यांनी कट्ट्यांना जाणे खरंच कौतुकास्पद आहे.

फो...........टूssssssssssssssssss??????

http://www.freesmileys.org/smileys/smiley-angry017.gif @गुर्जीं फुलराणीच्या शोधात मार्केट यार्डामधे असल्यानी येउ शकले नाहीत.>>> दुष्ष्ष्ष्ट! दुष्ष्ष्ष्ट! अफवाळ http://www.freesmileys.org/emoticons/emoticon-misc-001.gif ज्याकू! "ओ...चाफा काय पुडी लावलाय?" ही फुलवाल्याला विचारलेली ओळ- फुलराणी अशी ऐकू येते क्काय?? दुत्त दुत्त! http://www.freesmileys.org/smileys/smiley-taunt010.gif @टवाळ कार्टा इथे एवढी मस्ती करतो तर प्रत्यक्षात कसा असेल असं एक चित्र मनाशी रंगवलेलं होतं. हा प्राणी भलताचं शांत निघाला की>> ये इक गेहेरा सच है। @दरम्यानच्या गप्पांमधे टकाला अचानक xxxताई आणि xx ताई आल्या असं एकदम सांगीतल्यावर तो जो काय दचकलाय उस्का जवाब नै बॉस!! >> http://www.freesmileys.org/smileys/smiley-laughing001.gif

In reply to by अत्रुप्त आत्मा

तुम्ही ला नाहीत ह्याबद्दल णीषेध...तुम्हाला सुद्द साकाहारी थाळी मिळवायची जबाबदारी घेतली असती. :P

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

@तुम्ही अला नाहीत ह्याबद्दल णीषेध...>> णिषेध करनेचा हक्क काढून घेनेत येत आहे! http://www.freesmileys.org/smileys/smiley-taunt009.gif आपणास सायंकाळी ८:२० मिनिटानी फोण केलेला होता,टेंव्हा आपणच मला "लै वेळ लागेल तुम्हाला...यायला!" अशे बोल्लात! आणि मलाच म्हन्ता व्हय "अला नाहीत" म्हणूण! :-/ दुत्त दुत्त http://www.freesmileys.org/smileys/smiley-taunt009.gif

In reply to by अत्रुप्त आत्मा

कट्टा ६.३० ला चालु झाला. तुम्ही ८.३० ला कर्वेनगरहुन निघुन अजिबात वेळेत आला नसतात एवढ्या ट्रॅफिकमधुन. दु दु दु ट्रॅफिक...पुढच्या वेळी लवकर या ना. मंजे मनसोक्त गफ्फा हाणता येतील.

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

टवाळ कार्टा 05/05/2015 - 14:22
सचित्र कट्टा केला तर एका मित्राच्या जीवाला धोका संभवतो असं त्यानी सांगीतलय :P
मग मग...मला बेसावध असताना बोचकारले तर???

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

जल्ला हेच मन काय कल्ना नाय …. काय वो कॅप्टन सायेब? बरं न्हाय वो ह्ये ……… (सनी देओल मोड ऑन ) टका… सम्झाव इसे … सम्झाव…… ऐसे डायलाग मिपापे बहोत मिलते हाय…

In reply to by मितान

आधी माहिती असतं तर तुम्हालाही कट्ट्याला बोलावलं असतं :)...सत्काराचे फोटो इथे चिकटवता आले असते :P

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

टवाळ कार्टा 05/05/2015 - 14:22
आधी माहिती असतं तर तुम्हालाही कट्ट्याला बोलावलं असतं :)...सत्काराचे फोटो इथे चिकटवता आले असते :P
आणि सत्काराऐवजी कट्टा पेटला असता तर? :)

In reply to by मितान

टवाळ कार्टा 05/05/2015 - 14:22
अरे तुम्ही लोक माझ्या गल्लीत येऊन गेलात ! किती दिवस अनाहितांतर्फे घेऊन ठेवलेला पुस्पगुच्च देऊन गेले असते ना !!!
अर्र...मला आधी माहित अस्ते तर कधीचे ते क्यॅटबरी घरात पडले आहे ते आणले असते :P llluuuuuulllluuuuu

In reply to by श्रीरंग_जोशी

टवाळ कार्टा 05/05/2015 - 14:22
सगळेच कट्टे मिपावर धागा काढून आयोजित केले जात नसतात हो...
तर तर...असे किती कट्टे होऊन काही दू...दू मिपाकरांचे ढेकर पण देउन झालेत

In reply to by देवांग

कट्टा व्हॉट्स अ‍ॅपवरुन अगदी अचानकपणे ठरलेला असल्यानी धागा काढायला वेळ झाला नाही. चर्चा बरेचं दिवस चालु होती पण कट्ट्याला मुहुर्त सापडत नव्हता.

प्रचेतस 04/05/2015 - 09:49
मस्त वृत्तांत रे. पुढच्या वेळी आठवणीने फोन कर. मस्त कट्टा करु हा का ना का. बाकी काल दुसरा कट्टा पण जोरदार साजरा झाला. शनिवार पेठेत साधनापाशी धन्या, टका भेटले. अल्पशी पुस्तक खरेदी केली. नंतर बुवेश आला. मग परत हसत खिदळत गप्पांना ऊत. नंतर ॐकारेश्वरापाशी यसवायजी भेटला. बुवास कामे असल्याने तो निघून गेला व आम्ही चौघांनी आमरस खाण्यासाठी सुकांतास प्रयाण केले. इतर काही न खाता वाट्याच्या वाट्या आमरस नुसता ओरपला गेला. नंतर पिक्चर बघायला म्हणून आर डेक्कन, तिथे हाउसफुल्ल असल्याने मंगलाला गेलो. तिथेही टाईमपास २ हाऊसफुल्ल. हाय रे कर्मा. मग अ‍ॅव्हेन्जर्स एज ऑफ अल्ट्रोनची तिकिटं काढली. आत जाऊन बसतो तर पिक्चर मूळ इंग्लिश नसून हिंदी डब केलेला. आईये जनाब पासून डायलॉग सुरु मधेच राजस्थानी, हरियाणवी भाषा. मण्णे तो पता णा था, मेरी प्यारी बेहणा वैग्रे. चुथडा करुन टाकला राव सगळा. शिरेस पिक्चरला जाम इनोदी करुन टाकलं पिक्चर संपल्यावर निघालो. मला दुसर्‍या मित्रांबरोबर बेडसे लेणीला जायचे असल्याने लगेच दोस्तांचा निरोप घेतला. बाकी टवाळ कार्टा नावाप्रमाणे नसून लै शांत आहे आम्ही त्याच्यापेक्षा जास्त टवाळ आहोत असे त्याचे मत..

In reply to by प्रचेतस

टवाळ कार्टा 05/05/2015 - 14:23
बाकी टवाळ कार्टा नावाप्रमाणे नसून लै शांत आहे आम्ही त्याच्यापेक्षा जास्त टवाळ आहोत असे त्याचे मत..
मग...हैच मी शांत... :)

In reply to by पियुशा

टवाळ कार्टा 05/05/2015 - 14:24
बाब्बो चान चान =)) बाकी चिमणराव " आये टाकी भरली मोटर बन्द कर असे ओरडातायेत की काय असे वाटुन गेले ;)
चान चान...व्हत्सप्प वरून फिरत असलेला जोक स्वताचा म्हणून खपवायचा क्षीण प्रयत्न :)

टवाळ कार्टा 04/05/2015 - 10:47
आत्ता ऑफिसात आहे...संध्याकाळी घरी पोचल्यावर एक एक प्रतिसाद टंकतो (चुन चुन के प्रतिसाद टंकूंगा) चायला या चोच्या चिमण्याने बराच नसलेला मालमसाला टाकला आहे माझ्या नावाने

In reply to by अजया

टवाळ कार्टा 05/05/2015 - 14:24
=)))आणि टकाच्या वरच्या फोटुतले पोझमधले चिमणराव पाहुन टका संशयाने कसा बघतोय बघा=)))
ही अशी कमेंट आल्यावर जसे बघायला हवे तसे बघतोय :P

पियुशा 04/05/2015 - 11:54
=)))आणि टकाच्या वरच्या फोटुतले पोझमधले चिमणराव पाहुन टका संशयाने कसा बघतोय बघा=))) नै ग नै ते अस हाय :) ( क्रु. ह.घे.) टका - " ३ फिट से था डरता अब ५ फिट जाता तु इतनी जल्दी कैसे बढ गया .......................... आखीर खाता क्या हे ....................................... ??????? चिमणराव - " आय एम चोम्प्ल्यान ब्वॉय ;) ( आता मार खायच्या आत पलते ....)

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

टवाळ कार्टा 05/05/2015 - 14:27
नाही ब्रँड वेगळा आहे माझा. बोर्न्व्हिटा पितो (खरचं पितो)
तुझे वय काय...तु पितो काय =)) वजन कमी करायचे आहे ना रे...पिणे बंद कर :)

In reply to by पियुशा

टवाळ कार्टा 05/05/2015 - 14:25
=)))आणि टकाच्या वरच्या फोटुतले पोझमधले चिमणराव पाहुन टका संशयाने कसा बघतोय बघा=))) नै ग नै ते अस हाय :) ( क्रु. ह.घे.) टका - " ३ फिट से था डरता अब ५ फिट जाता तु इतनी जल्दी कैसे बढ गया .......................... आखीर खाता क्या हे ....................................... ??????? चिमणराव - " आय एम चोम्प्ल्यान ब्वॉय ;) ( आता मार खायच्या आत पलते ....)
हाय पियुशा...कश्शी आहेस

कपिलमुनी 04/05/2015 - 12:14
रानमळा बेश्ट आहे. काळ्या रस्श्यामधला चिकन , सुका फ्राय चिकन , आणि सोलकढी तर अप्रतिम ! खाणं आणि गप्पाच्या नादात फोटू घ्यायचे राहिले. बाकी पिंचिं महाकट्टाकरू या ! पुणे-मुंबै- को`पूर पेक्षा भारी होइल !

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

फोटु टाकयचे नैत ह्या कट्ट्याचे अशी एका सदश्याची मागणी असल्यानी फोटु टाकलेले नैत. तसे गप्पांच्या नादात फोटो काढायचं राहुन गेलेलं २-३ फोटो काढले बास्स :)
पुन्हा एकदा कट्टा करा
आयोजन करा ;)

पैसा 03/05/2015 - 14:03
फटु नसल्याने कट्टा झाला, तसेच चिमणराव आणि टका हे दोघेजण अस्तित्त्वात आहेत यावर विश्वास ठेवणार नाही. (टकाचे पुण्यात काही खास काम होते असा सौंशय आहे. त्याचे काय झाले?)

In reply to by पैसा

हेमा मालिनीचं ठिके हो. ती कमीत कमी सुंदर म्हातारी तरी आहे. माझा फोटो अगदी अंधळा माणुस सुद्धा मुद्दाम नाही लावणार चेपु ला =)) सो तो मीचं आहे.

In reply to by पैसा

टवाळ कार्टा 05/05/2015 - 14:21
फटु नसल्याने कट्टा झाला, तसेच चिमणराव आणि टका हे दोघेजण अस्तित्त्वात आहेत यावर विश्वास ठेवणार नाही. (टकाचे पुण्यात काही खास काम होते असा सौंशय आहे. त्याचे काय झाले?)
ओ पैसा टै...इथे लिहिता मी अस्तीत्वात नै...दुसर्या प्रतिसादात लिहिता की माझा फटू बघितला...ये क्या गोडा...चतुर...गोडा...चतुर जी बाकी माझे पुण्यात खास काम नव्हते...असले की तुम्हालाच घेउन जातो बोलणी करायला :)

In reply to by पैसा

टवाळ कार्टा 05/05/2015 - 15:17
ब्वार्र. बोलणी करायला फारसा उपयोग व्हायचा नै. मांडवात जेवायला बोलावलंस तरी पुरे! =))
ओ...बोल्णी करायला नै...समोरचे उग्गीच फाल्तू विषयावरून नखरे करायला लागले की त्यांना वठणीवर आणायला ;)

नाखु 03/05/2015 - 14:04
हे ठिकाण माझ्या घरापासून चालत १० मिनिटांचे अंतरावर आहे. सबब . . . . . . . . . . . . . . . . . . . . योग्य जागी सुपारी दिली आहे कॅप्टन. गपचिप नाखु

In reply to by नाखु

तुमचा भ्रमणध्वनी क्रमांक माझ्याकडे नाही तस्मात कळवु शकलो नाही. सुपारी अन्या दातारला दिलेली असल्यास कळवणे तो पुण्यात नै त्यामुळे ती सुपारी माझ्यापरंत पोचणं अवघड आहे :)

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

अन्या दातार 03/05/2015 - 15:37
माझ्याकडची सुपारीची खांडं संपलीत :P असो, तर विशेष सदस्य वगळता फोटो टाकायला हरकत नसावी. पण ज्याअर्थी एक्कही फोटो नाही, त्याअर्थी कट्टा झालेला नसल्याची शंका घेण्यास भर्पूर वाव आहे.

In reply to by पैसा

टवाळ कार्टा 05/05/2015 - 14:21
बाकी कै नै! फोनवरून जरा चौकशी केली असती टक्याची!
म्हणजे आता खरडी, व्यनी, प्रतिसाद यांनंतर फोनवरून धमक्या???

In reply to by सतिश गावडे

टवाळ कार्टा 05/05/2015 - 14:21
टवाऴजी कार्टा यांना आताच सिंहगड रस्त्यावर टेम्पोत बसवून आलो आहे.
चायला...त्या ट्येंप्यूने २ तास घेतले पुण्याच्या बाहेर पडायला :(

In reply to by यसवायजी

टवाळ कार्टा 05/05/2015 - 14:22
धनाजी वाकडे यांच्या च्याहा- डागाच्या कन्फेशनबद्दल वाचण्यासही उस्सुक.
धाग्याच्या प्रतिक्षेत ;)

वा वा, मजा आली वृत्तांत वाचून. धनकवडी अन फुरसुंगी मध्ये गोंधळ होणे म्हणजे फारच बुवा. बाकी पुणे महानगराच्या विविध टोकांवरून दुचाक्यांनी कट्ट्यांना जाणे खरंच कौतुकास्पद आहे.

फो...........टूssssssssssssssssss??????

http://www.freesmileys.org/smileys/smiley-angry017.gif @गुर्जीं फुलराणीच्या शोधात मार्केट यार्डामधे असल्यानी येउ शकले नाहीत.>>> दुष्ष्ष्ष्ट! दुष्ष्ष्ष्ट! अफवाळ http://www.freesmileys.org/emoticons/emoticon-misc-001.gif ज्याकू! "ओ...चाफा काय पुडी लावलाय?" ही फुलवाल्याला विचारलेली ओळ- फुलराणी अशी ऐकू येते क्काय?? दुत्त दुत्त! http://www.freesmileys.org/smileys/smiley-taunt010.gif @टवाळ कार्टा इथे एवढी मस्ती करतो तर प्रत्यक्षात कसा असेल असं एक चित्र मनाशी रंगवलेलं होतं. हा प्राणी भलताचं शांत निघाला की>> ये इक गेहेरा सच है। @दरम्यानच्या गप्पांमधे टकाला अचानक xxxताई आणि xx ताई आल्या असं एकदम सांगीतल्यावर तो जो काय दचकलाय उस्का जवाब नै बॉस!! >> http://www.freesmileys.org/smileys/smiley-laughing001.gif

In reply to by अत्रुप्त आत्मा

तुम्ही ला नाहीत ह्याबद्दल णीषेध...तुम्हाला सुद्द साकाहारी थाळी मिळवायची जबाबदारी घेतली असती. :P

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

@तुम्ही अला नाहीत ह्याबद्दल णीषेध...>> णिषेध करनेचा हक्क काढून घेनेत येत आहे! http://www.freesmileys.org/smileys/smiley-taunt009.gif आपणास सायंकाळी ८:२० मिनिटानी फोण केलेला होता,टेंव्हा आपणच मला "लै वेळ लागेल तुम्हाला...यायला!" अशे बोल्लात! आणि मलाच म्हन्ता व्हय "अला नाहीत" म्हणूण! :-/ दुत्त दुत्त http://www.freesmileys.org/smileys/smiley-taunt009.gif

In reply to by अत्रुप्त आत्मा

कट्टा ६.३० ला चालु झाला. तुम्ही ८.३० ला कर्वेनगरहुन निघुन अजिबात वेळेत आला नसतात एवढ्या ट्रॅफिकमधुन. दु दु दु ट्रॅफिक...पुढच्या वेळी लवकर या ना. मंजे मनसोक्त गफ्फा हाणता येतील.

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

टवाळ कार्टा 05/05/2015 - 14:22
सचित्र कट्टा केला तर एका मित्राच्या जीवाला धोका संभवतो असं त्यानी सांगीतलय :P
मग मग...मला बेसावध असताना बोचकारले तर???

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

जल्ला हेच मन काय कल्ना नाय …. काय वो कॅप्टन सायेब? बरं न्हाय वो ह्ये ……… (सनी देओल मोड ऑन ) टका… सम्झाव इसे … सम्झाव…… ऐसे डायलाग मिपापे बहोत मिलते हाय…

In reply to by मितान

आधी माहिती असतं तर तुम्हालाही कट्ट्याला बोलावलं असतं :)...सत्काराचे फोटो इथे चिकटवता आले असते :P

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

टवाळ कार्टा 05/05/2015 - 14:22
आधी माहिती असतं तर तुम्हालाही कट्ट्याला बोलावलं असतं :)...सत्काराचे फोटो इथे चिकटवता आले असते :P
आणि सत्काराऐवजी कट्टा पेटला असता तर? :)

In reply to by मितान

टवाळ कार्टा 05/05/2015 - 14:22
अरे तुम्ही लोक माझ्या गल्लीत येऊन गेलात ! किती दिवस अनाहितांतर्फे घेऊन ठेवलेला पुस्पगुच्च देऊन गेले असते ना !!!
अर्र...मला आधी माहित अस्ते तर कधीचे ते क्यॅटबरी घरात पडले आहे ते आणले असते :P llluuuuuulllluuuuu

In reply to by श्रीरंग_जोशी

टवाळ कार्टा 05/05/2015 - 14:22
सगळेच कट्टे मिपावर धागा काढून आयोजित केले जात नसतात हो...
तर तर...असे किती कट्टे होऊन काही दू...दू मिपाकरांचे ढेकर पण देउन झालेत

In reply to by देवांग

कट्टा व्हॉट्स अ‍ॅपवरुन अगदी अचानकपणे ठरलेला असल्यानी धागा काढायला वेळ झाला नाही. चर्चा बरेचं दिवस चालु होती पण कट्ट्याला मुहुर्त सापडत नव्हता.

प्रचेतस 04/05/2015 - 09:49
मस्त वृत्तांत रे. पुढच्या वेळी आठवणीने फोन कर. मस्त कट्टा करु हा का ना का. बाकी काल दुसरा कट्टा पण जोरदार साजरा झाला. शनिवार पेठेत साधनापाशी धन्या, टका भेटले. अल्पशी पुस्तक खरेदी केली. नंतर बुवेश आला. मग परत हसत खिदळत गप्पांना ऊत. नंतर ॐकारेश्वरापाशी यसवायजी भेटला. बुवास कामे असल्याने तो निघून गेला व आम्ही चौघांनी आमरस खाण्यासाठी सुकांतास प्रयाण केले. इतर काही न खाता वाट्याच्या वाट्या आमरस नुसता ओरपला गेला. नंतर पिक्चर बघायला म्हणून आर डेक्कन, तिथे हाउसफुल्ल असल्याने मंगलाला गेलो. तिथेही टाईमपास २ हाऊसफुल्ल. हाय रे कर्मा. मग अ‍ॅव्हेन्जर्स एज ऑफ अल्ट्रोनची तिकिटं काढली. आत जाऊन बसतो तर पिक्चर मूळ इंग्लिश नसून हिंदी डब केलेला. आईये जनाब पासून डायलॉग सुरु मधेच राजस्थानी, हरियाणवी भाषा. मण्णे तो पता णा था, मेरी प्यारी बेहणा वैग्रे. चुथडा करुन टाकला राव सगळा. शिरेस पिक्चरला जाम इनोदी करुन टाकलं पिक्चर संपल्यावर निघालो. मला दुसर्‍या मित्रांबरोबर बेडसे लेणीला जायचे असल्याने लगेच दोस्तांचा निरोप घेतला. बाकी टवाळ कार्टा नावाप्रमाणे नसून लै शांत आहे आम्ही त्याच्यापेक्षा जास्त टवाळ आहोत असे त्याचे मत..

In reply to by प्रचेतस

टवाळ कार्टा 05/05/2015 - 14:23
बाकी टवाळ कार्टा नावाप्रमाणे नसून लै शांत आहे आम्ही त्याच्यापेक्षा जास्त टवाळ आहोत असे त्याचे मत..
मग...हैच मी शांत... :)

In reply to by पियुशा

टवाळ कार्टा 05/05/2015 - 14:24
बाब्बो चान चान =)) बाकी चिमणराव " आये टाकी भरली मोटर बन्द कर असे ओरडातायेत की काय असे वाटुन गेले ;)
चान चान...व्हत्सप्प वरून फिरत असलेला जोक स्वताचा म्हणून खपवायचा क्षीण प्रयत्न :)

टवाळ कार्टा 04/05/2015 - 10:47
आत्ता ऑफिसात आहे...संध्याकाळी घरी पोचल्यावर एक एक प्रतिसाद टंकतो (चुन चुन के प्रतिसाद टंकूंगा) चायला या चोच्या चिमण्याने बराच नसलेला मालमसाला टाकला आहे माझ्या नावाने

In reply to by अजया

टवाळ कार्टा 05/05/2015 - 14:24
=)))आणि टकाच्या वरच्या फोटुतले पोझमधले चिमणराव पाहुन टका संशयाने कसा बघतोय बघा=)))
ही अशी कमेंट आल्यावर जसे बघायला हवे तसे बघतोय :P

पियुशा 04/05/2015 - 11:54
=)))आणि टकाच्या वरच्या फोटुतले पोझमधले चिमणराव पाहुन टका संशयाने कसा बघतोय बघा=))) नै ग नै ते अस हाय :) ( क्रु. ह.घे.) टका - " ३ फिट से था डरता अब ५ फिट जाता तु इतनी जल्दी कैसे बढ गया .......................... आखीर खाता क्या हे ....................................... ??????? चिमणराव - " आय एम चोम्प्ल्यान ब्वॉय ;) ( आता मार खायच्या आत पलते ....)

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

टवाळ कार्टा 05/05/2015 - 14:27
नाही ब्रँड वेगळा आहे माझा. बोर्न्व्हिटा पितो (खरचं पितो)
तुझे वय काय...तु पितो काय =)) वजन कमी करायचे आहे ना रे...पिणे बंद कर :)

In reply to by पियुशा

टवाळ कार्टा 05/05/2015 - 14:25
=)))आणि टकाच्या वरच्या फोटुतले पोझमधले चिमणराव पाहुन टका संशयाने कसा बघतोय बघा=))) नै ग नै ते अस हाय :) ( क्रु. ह.घे.) टका - " ३ फिट से था डरता अब ५ फिट जाता तु इतनी जल्दी कैसे बढ गया .......................... आखीर खाता क्या हे ....................................... ??????? चिमणराव - " आय एम चोम्प्ल्यान ब्वॉय ;) ( आता मार खायच्या आत पलते ....)
हाय पियुशा...कश्शी आहेस

कपिलमुनी 04/05/2015 - 12:14
रानमळा बेश्ट आहे. काळ्या रस्श्यामधला चिकन , सुका फ्राय चिकन , आणि सोलकढी तर अप्रतिम ! खाणं आणि गप्पाच्या नादात फोटू घ्यायचे राहिले. बाकी पिंचिं महाकट्टाकरू या ! पुणे-मुंबै- को`पूर पेक्षा भारी होइल !
बर्याचं दिवसांपासुन व्हॉट्स अॅप गृप वरती किमान ३००० वेळा कट्टा करायच्या गोष्टी चाललेल्या होत्या. गेले २-३ आठवडे हो-ना-हो-ना करता करता शेवटी काल मोदक, मी, कपिलमुनी आणि अनाहितांचा लाडोबा असे चार जणांचा कट्टा ठरला. त्याचा एक वृत्तांत लिहायचा एक माफक प्रयत्न. कट्ट्याचं आयोजनं करतानाचं माझ्याकडुन एक मोठी चुक झाली ती म्हणजे वल्लींना फोन करायचा राहुन गेला :( (वल्ली मनापासुन सॉरी!! ). अन्या दातार कोल्हापुरला गेल्यानी आणि गुर्जीं फुलराणीच्या शोधात मार्केट यार्डामधे असल्यानी येउ शकले नाहीत.

खाऊगल्ली भाग २

रेवती ·

मदनबाण 30/04/2015 - 19:56
आज्जेने चुकुन अनाहिता मधली विचारणा खुल्या मंचावर केली की काय ? ;) { चला पळावे आता... } ;)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- 'We did not touch the Pakistani aid': Quake-struck Nepal launches inquiry as Pakistan sends 'beef masala'

In reply to by अत्रुप्त आत्मा

सस्नेह 02/05/2015 - 11:53
गुर्जी तुम्ही तरी असे म्हनू नये. अहो,गणपा आणि दीपक यांचे सल्ले अनाहितात मिळू शकत नाहीत. ...तुम्ही दिलात तरी आम्ही अनमान करणार नाही हो !

In reply to by रेवती

सूड 30/04/2015 - 21:02
तर अर्धी वाटी मूगडाळ मिक्सरवर रवाळ दळून घ्यायची. मुगडाळीच्या निम्मं (त्याहून जरा जास्त घेतलं तरी चालतं) चितळ्यांच्या गाईचं साजूक तूप कढईत तापत ठेवायचं. ;) तूप नीट तापलं की ही मूगडाळ त्यात ओतून मंद आचेवर खरपूस भाजायची. ते होतंय तोवर शेजारच्या शेगडीवर दूध तापत ठेवायचं. मूगडाळ भाजून होईपर्यंत दूधाला उकळी येते. मग हे उकळतं दूध अंदाजाने, थोडं थोडं ओतून शिरा मऊसर शिजवायचा. पहिल्यावेळेस दूध ओतताना, दूध ओतल्यावर ताबडतोब कढईवर झाकण ठेवायचं. म्हणजे वाफेने शिरा छान फुलून येतो. आता आवडीनुसार साखर, जायफळ्-वेलचीपूड आणि पसंतीप्रमाणे काजू-बदाम वैगरे घालून खायला घ्यायचं. या शिर्‍यात अक्रोड अधिक चांगले लागतात असा वैयक्तिक अनुभव आहे.

In reply to by सूड

रेवती 30/04/2015 - 21:11
मग सोपे आहे. मीही तसेच करेन. काहीजण डाळ भिजवून, भरड वाटून मग परततात, त्याला भारी वेळ लागतो म्हणून हा शिरा आवडत असूनही कधी केला नव्हता. आता निमित्त मिळताच करून पाहीन व कळवीन.

In reply to by रेवती

रुपी 30/04/2015 - 23:02
हो.. डाळ न भिजवता भाजायला सोपे जाते, पण जेवढी छान चव भिजवलेल्या डाळीची लागते, तेवढी (माझ्या आणि माझ्या आईच्या मते) त्याची लागत नाही. अर्थात, अगदीच न करता येण्यापेक्षा हा पर्याय चांगला आहे.

In reply to by रुपी

रेवती 30/04/2015 - 23:36
हेच होते ना, भिजवलेल्या डाळीचा करत बसायला सवड नसते (खरंतर पेशन्स) मग नुसताच हा शिरा करायचाय करायचाय असं होतं. मी न राहवून आत्ताच करायला घेतलाय पण साखरेचं प्रमाण सुडकूनं दिलं नाहीये वाटतं. जेवढ्यास तेवढी साखर घालून अगोड वाटतोय (इथल्या साखरेची गोडी कमी आहे) म्हणून दीडपट घातलीये.

In reply to by रेवती

स्पंदना 01/05/2015 - 04:55
मी पण कायम भिजवून करते. त्या सुमारास एखादा केक बेक करायचा असेल तर मी ओव्हन मध्ये ठेवुन देते ही डाळ भरपूर तुपात मिसळुन. निम्मी भाजते. उरलेली फिरसे चल चल रे नौ जवान!!

In reply to by स्पंदना

रुपी 01/05/2015 - 05:08
ओव्हनमध्ये अशी भाजली जाते हे माहित नव्हते. बरेच लोक मायक्रोवेव्हमध्ये भाजतात, पण मला तरी त्यात फार वेळ अन्न शिजवायला आवडत नाही, म्हणून कधी करुन पहिले नाही.

In reply to by सूड

पैसा 30/04/2015 - 21:15
आमच्याकडे चितळे नसल्याने चितळ्यांच्या गाई नाहीत. म्हशीचे किंवा अमूलचे किंवा लोणकढ़े चालेल का?

स्रुजा 30/04/2015 - 22:15
रेवाक्का, ते तपकिरी हरभरे छान भिजवुन घ्यायचे. मोहरी हिंग हळद कढीपत्ता आणि ओवा ची छान फोडणी करायची. हरभरी घालून चिंच गुळ, मीठ घालायचा. चिंच गुळाचे प्रमाण फार महत्त्वाचे. मस्त वाफेवर शिजवायचे. पाणी असाय्ला हवं नीट अगदीच कोरडं नको. आई दर वर्षी उसळ देते द्रोणात हळदी कुंकवाला नुसत्या हरभर्‍या ऐवजी. ती ही रेसिपी आहे.

In reply to by स्रुजा

स्पंदना 01/05/2015 - 04:53
तिखट नाही? रेवाक्का मी हरभरे भिजवुन मग कुकरला शिजायला घालताना त्यात मिठ,हळद,तिखट आणि एखादा टोमॅटो घालते. टोमॅटो नको असेल तर आमचूर पावडर वापरते. मग हे शिजलेले हरभरे नंतर मोहरी जिर्‍यावर हिंग कडीपत्ता आणि हवा असेल तर कांदा घालून परतायचे. शिजताना मिठ तिखट असल्याने हरभरे मुरतात त्या मसाल्यात.

In reply to by स्पंदना

स्रुजा 01/05/2015 - 05:46
तिखट घालायचं ना .. मी तिखट लिहायचे विसरले :( आणी काळा मसाला पण. हापिसातून असं अधून मधून गुपचुप प्रतिक्रिया दिल्या की असं होतं.

रेवती 01/05/2015 - 00:12
सुडकू, मुगाचा शिरा केला. पहिल्यांदाच करताना जितपत बरोबर/ चूक असेल तितपत झाला. सुधारणा करणे आवश्यक! मूग एकसारख्या प्रकारे दळणे आवश्यक. मी जे केले त्यात काही जाड तर काही वस्त्रगाळ झाले. साखर दीडपट नको, सव्वापट. आणि सगळ्यात महत्वाचे, नवर्‍याला कामात लुडबुडू देऊ नये.

In reply to by यशोधरा

खटपट्या 01/05/2015 - 05:01
मटण साहीत्य - दोन कीलो मट्ण, पाच मोठे कांदे, दोन चमचे आले लसूण पेस्ट, एक सपाट चमचा हळद, आठ लसणाच्या पाकळ्या, दोन टोमॅटो, तीन चमचे पांढरे तीळ (नसले तरी चालतील), एक छोटी वाटी सुके खोबरे, पाच लवंगा, आठ काळेमीरी, एक ईंच दालचीनी, एक्/दोन तमालपत्र, पाच टेबलस्पून तेल, मीरची पावडर किंवा मिक्स मसाला दोन चमचे (घरी बनवलेला मसाला - मीरची + हळद + बाकीचा गरम मसाला घालुन केलेला) जीरे पावडर एक चमचा, धणे पावडर एक चमचा, मीठ, बाजारातला मट्ण मसाला एक चमचा ईतर तयारी - एक कांदा बारीक चिरावा. बाकीचे कांदे लांब कापुन घ्यावेत. टोमॅटोची पेस्ट करुन घ्यावी. लसूण बारीक कापुन घ्यावा. क्रुती - मटण स्वच्छ धुवुन पाच ते सहा मिनिटे निथळत ठेवावे. कुकरमधे तीन टेबलस्पून तेल तापवावे, त्यात बारीक चीरलेला कांदा टाकून परता, कांदा लालसर होताच त्यात आले लसणाची पेस्ट टाकावी, त्यात हळद टाका. यात मटण परतून घ्या. पाच मिनिटात मट्ण संपूर्ण बुडेल एवढे पाणी टाका. एक चमचा मिठ टाका. कुकरचे झाकण लावून सात ते आठ शीट्या होउ द्या. (मटण जून असेल तर जास्त शीट्या द्याव्या लागतील.) सुके खोबरे ब्राउन होई पर्यंत भाजून घ्या. एका भांड्यात दोन टेबलस्पून तेल टाका. त्यात चिरलेला लसुण लाल होई पर्यंत परता, त्यात तीळ, लवंग, दालचीनी, काळीमीरी हे टाकून खरपूस भाजून घ्या. आता यात लांब चीरलेला कांदा परता. कांदा ब्राउन होईपर्यंत परता. आता टोपातील मिश्रण आणि भाजलेले खोबरे मिक्सर मधे बारीक वाटून घ्या. गरजेपुरते पाणी टाका. आता ज्या टोपात खडा मसाला आणि कांदा परतला त्याच टोपात दोन चमचे तेल टाका. तेल गरम होताच त्यात मिक्सर मधील मिश्रण ओता आणी सात ते आठ मिनीटे परता. यात एकेक चमचा धणे पावडर आणी जीरा पावडर टाकुन पुन्हा पाच मिनिटे परता. आता यात टोमॅटोची पेस्ट ओता. दोन मीनीटे परतुन त्यात मीरची पावडर कींवा मिक्स मसाला टाका. एक चमचा बाजारातील मटण मसाला टाका. आता टोपातल्या मीश्रणाला तेल सुटायला सुरवात होईल. कुकर उघडून मटण व्यवस्थीत शीजले आहे याची खात्री करुन घ्या. आता कुकरमधील मटण टोपातील मिश्रणात टाकून परता. आता कुकरमधील पाणी/सूप आहे ते सुद्धा टोपात ओता. एक चमचा मीठ (कींवा चवीनुसार) टाकून एक उकळी येउद्या. मटण तयार.

In reply to by खटपट्या

पगला गजोधर 01/05/2015 - 12:59
पाच मिनिटात मट्ण संपूर्ण बुडेल एवढे पाणी टाका.
पाणी टाकतानाच ते उकळते पाणी असेल याची काळजी घ्या, ( कांदा परतत असताना बाजूला दुसर्या भांड्यात पाणी उकळत ठेवा, मटन परतताना रूम टेम्प चे पाणी टाकले तर मटन वातट होण्याची शक्यता .....

मला crabs ची पाकृ हवी आहे. (crabs म्हणजेच चिंबोरी का?) crabs अजून आणले नाहीत पण आणणार आहे. धन्यवाद! स्रुजाने पुण्यातलं चांगले मासे मिळण्याचं दुकान सांगून माझी कामे वाढवली आहेत. :)

इरसाल 01/05/2015 - 12:04
क्रॅब बाबत ही घ्या रेशीपी, ४ खेकडे (क्रॅब)- २ जणांना १ ओलं नारळ (कोवळं असल्यास उत्तम) २ मध्यम कांदे १/२ टी स्पुन जिरे १/२ टी स्पुन मोहरी १/२ टी स्पुन हळद ५/६ लसुण पाकळ्या कोकणी मसाला २ चमचे मीठ चवीपुरते. सर्वप्रथम खेकडे स्वच्छ धुवुन घ्या, त्याच्या सर्व नांग्या धडापासुन वेगळ्या करुन घ्या. मोठ्या नांग्या तश्याच ठेवुन इतर सर्व नांग्या मिक्सर मधे थोडे थोडे पाणी टाकुन वाटुन घेवुन चहाच्या गाळणीने तो रस गाळुन जमा करुन ठेवा. आता ओलं खोबरं बारीक तुकडे करुन तेही मिक्सरला थोडे थोडे पाणी टाकुन वाटुन घेवुन चहाच्या गाळणीने गाळुन ते दुध जमा करुन घ्या. आता लोखंडी (हो लोखंडीच) कढईत पुरेसे तेल गरम करुन त्यात चेचलेला लसुण, जिरे, मोहरी टाकुन ते तळले गेले की त्यात बारीक चिरलेला कांदा गुलाबी होईपर्यंत परतुन घ्या. त्यात हळद, कोकणी मसाला टाका तो तळला गेला की त्यात हळु हळु तो नांग्यांचा काढलेला रस मिसळा तो मसाल्याबरोबर पुरेसा एकजीव झाला असे वाटले की त्यात नारळाचे दुध हळुहळु टाकत ढवळत रहा. हे मिश्रण एकजीव झाले की त्यात धुवुन ठेवलेले चार खे़कडे नी त्यांच्या मोठया नांग्या टाका चवीपुरते मीठ टाकुन एकदा ढवळुन झाकण ठेवुन खेकडे/ चिंबोर्‍या लाल झाल्या की गॅस मंद करुन ३/४ मिनीटांनी बंद करा. भात, तांदळाची भाकरी, चपाती कसे ही चालेल.

स्रुजा 05/05/2015 - 01:42
मला बटाटावड्याबरोबर ज्या मिरच्या तळतात आणि त्याला मीठ लावतात त्याची जरा पद्धत हवी आहे. वडा पाव च्या गाडीवर मिळतात तशा मिरच्या करायची पायरी पायरी ने कृती द्या ना कुणी तरी. नक्की कधी मीठ लावायचं ? मध्ये काप द्यायचा का तळायच्या आधी वगैरे बेसिक मधे असलेले वांधे दुर करा प्लीझ.

In reply to by स्रुजा

याबद्दल मलाही कुतूहल आहे. कचोरी समोस्यांबरोबर ज्या मवाळ मिरच्या दिल्या जातात त्यांना मवाळ करण्याची प्रक्रिया कोणती?

In reply to by स्रुजा

आनन्दिता 05/05/2015 - 03:01
मिरच्यांना तळायच्या आधी मधे काप घ्यावा लागतो. अगदी छोटा छेद दिला तरी चालेल. मिरच्या तळण्यासाठी तेल चांगलं कडकडीत तापायला हवं. तेल कमी तापलं असेल तर मिरच्या थेट वडापाव वाल्याच्या मिरच्यांसारख्या होत नाहीत. हव्या तशा तळुन झाल्या की झारीने बाहेर काढाव्यात आणि टिशुपेपर वर पसराव्या. आणि बाहेर काढल्या गरमा-गरम असतानाच मिठ भुरभुरावे.

In reply to by आनन्दिता

स्रुजा 05/05/2015 - 03:28
हि हि हि ! तुझा असा सुगरण सल्ला आल्यावर मला तुझ्या ताई हेच संबोधन योग्य वाटलं गं. नेहेमीच्या नावाने कसं बाई धन्यवाद देणार? :P ये तू पण वडापाव खायला.

In reply to by आनन्दिता

सोपी वाटत आहे पद्धत. परंतु कृती वाचल्यावर जाणवत आहे की, कचोरी समोस्यांबरोबर दिल्या जाणार्‍या मिरच्या या वेगळ्या (वाण) असाव्यात अन बनवण्याची कृती वेगळी असावी.

In reply to by स्रुजा

आनन्दिता 05/05/2015 - 22:23
शाब्बास!! एके काळी माझ्या पाकशास्त्रातल्या ज्ञानाला हसणार्या तुला आणि रंगा काकांना एकावेळी सुगरणीचा सल्ला द्यायच्या संधीचं मी सोनं केलं =))

In reply to by आनन्दिता

सूड 05/05/2015 - 22:28
रंगाकाका कुठे दिसले आणि धाग्यावर? हल्ली संपादक लक्षुम्बाई तेवढ्या जास्त दिसतात. पंतांना का काका म्हणत्येस!! ;)

In reply to by आनन्दिता

स्रुजा 06/05/2015 - 00:17
मी बापडी तुला कधी हसले? हां आता कणीक म्हणजे काय या निरागस प्रश्नावर एक आपलं उगाच स्मित दिलं तर मी हसले??? बाकी तुला कणकेपेक्षा मिरच्याच माहिती असणार. :P आणि बिचार्‍या रगाभाऊंनी तर तुला या प्रश्नावर लाडू देऊ केले होते. पण तुला मिरची मधुन लाडू आणि स्मित हास्य कुठुन बाई अपील होणार? ( स्वगतः एक गरीब नि:श्वास )

In reply to by स्रुजा

लैच मिर्ची मिर्ची कराया लागली की सगळी.. ,आता येक मिर्ची माज्ज्याकडून... इशेषतः ज्यांणा हिरव्या मिर्च्या जेवनात कांद्यासारख्या कचाकचा हानायला आवाडतेत,थ्येंच्यासाटी!!! सात/आठ हिरव्या मिर्च्यांना सुरीने मधोमध ऑपरेशन करुन ठीवाव. णंतर त्येंच्या चीरलेल्या मद्दी बशेल एवडेच मीठ भराव. आनी मंग ग्यास जवळ जाऊण येक बारीक कढल्या मद्दी येक चमचाभर त्याल येकदम कडक मधी तापवाव. त्येच्या आदी त्ये मिठाळलेल्या मिर्च्या येका प्ल्येटात कडेला तयार ठिवने. आनी कडला आरदं फुलपात्र पानी पन ठिवाव,आनी न्हेमीचे ३ चमचे हळद पन! आनी कढल्याचं त्वांड बंद करेल अशी ताटली पन तयार ठिवाव..फुडं आता येकदम फायनल म्याचच्या शेवटच्या वोव्हरीसारकं सुप्परफाश्ट प्ल्ये होनारे..तवा आता फयल्यांन्दा नाकाला फडक लाऊण घ्याव. त्ये हल्ली स्कूटी चालवनार्‍या पोरी बांधतेत तसं! णायतर मिर्ची खान्या आदुगरच डोक्यात जाइल. तर.. त्याल चांगलं कडक तापलं..की अचानक घॅस बंद करुण त्या कढल्यात येकदम सगळ्या मिर्च्यांना समादी द्याव. मंग त्या बोंब माराया लागल्या रं लागल्या की लगीच त्येंच्या डोंबल्याव त्ये अर्दा फुलपात्र पानी टाकूण त्याच्याव तीन चम्चे हळदीनी मूठमाती द्याव.आनी कडईचं थंडगं ताटली टाकुन बंद करावं. ह्ये सगळं युद येका मिनटात जाल पायजेन. णायतर मग त्या मिर्च्यांचा आत्मा स्वर्गाला जात न्हाई,आनी णंतर आपल्या पन न्हेत नाई. मंग पाच मिनिटं त्या झाकल्येला कढल्याला घॅस वरच गार होऊ द्याव. आनी णंतर खाली काडून चमच्यानं झाकान मारलेया ताटलीचं त्वांड उचकटाव. आनी त्येच चमच्याणी कढल्यात उलथापालथ घडवून ,कुटची मिर्ची हळदीच्या ढीगार्‍यात कुटं जाऊन म्येली त्येचा शोध घ्याव. सगळ्या घावल्या की थांबाव. आनी मांग गरम गरम भाताव, सानशीच्या तोंडानं चांगली च्येचल्येल्या लसनाची फोडनी मारल्याली ,लसनाचा ठ्सका बसलेली गरम आमटी ओतूण भात कालवाव. आनी त्ये कढलं बी भुईला शेजारीच घ्यिऊन बसाव. आनी दोनचार मिर्च्या ताटाला घ्येऊन .. म्होट्यांन म्हनाव.. "सदानंदाचा येळकोट" आनी मांग भात आमटी संगाट हनायला घ्यावं. ही हळदीघाटाच्या लडाईत शहीद झाल्याली मिर्ची णंतर खाताणा स्वताची चव-दाखवूण ग्येलाबिगार र्‍हात न्हाई ..बर्का! मऊ हृदयाच्या मानसान आजाबात हिच्या वाटला जाऊ णये.. आनी बाकिच्यांण्णी पण येका ज्येवनाला चारा फेक्षा जास्त खाल्या तर ब्राम्मम्हुर्तापासूण कोंबड आरवायच्या आत कवा बी उटायची तयारी ठीऊणच खावं. ह्या ज्येवनाणंतर त्वांड लैच हळहळलं, आनी प्वाटात भट्टी प्येटल्या सारकं वाटलं,तर थंडाव्याला लागाल त्येवडं ताक माराव. आनी णंतर तासभर आपल्याला जो इषय आवाडतो,त्यात बेजान रमाव. णंतर धा मिनिटात येकदम टाइट झोप यील.. तवा मिर्ची प्रेमींण्णो... बगा चाखून येक डाव.. आवाडली तर अज्जुन येखादी अशीच मिर्ची द्यीण! बाय बाय , गुडणाइट! .. आनी फुड काय म्हनतेत त्ये ....... ;) बगा आपलं तुमचं तुम्मीच!

In reply to by अत्रुप्त आत्मा

क्या बात है, बुवां एकदम समीधाच ओतली भस्सकन भूताच्या पिक्चरमधल्या ममांत्रिकावानी ;-) . या कृतीचं कुणी सुटसुटीत पुनर्लेखन करून देईल का.

In reply to by अत्रुप्त आत्मा

बहुगुणी 28/05/2015 - 10:27
आद्य मिपाकर तात्या अभ्यंकरांच्या शब्दांत: नुसत्या वाचनानेच एकदम स्वर्गवास! काय झॅन्टामॅटिक वर्णन आहे!!

रेवती 27/05/2015 - 06:58
सुक्या खोबर्‍याच्या चटणीची रेशिपी मिळेल का? मी एरवी जिरे, लाल तिखट, लसूण घालून करते. सध्या माझ्याकडे मोठ्या ३ वाट्या किसलेले खोबरे आहे जे संपवायचे आहे. कसे कोणास ठाऊक खोबर्‍याची बरणी दुर्लक्षीत राहिली. पदार्थ चांगल्या अवस्थेत आहे पण मी चुकून आणखी खोबरे आणलेय.

त्रिवेणी 28/05/2015 - 10:03
मी खोबरे, शेंगदाणे, तीळ, लसूण आणि लाल मिरची चटका लागेलस भाजून घेते आणि जाडसर चटणी वाटते. त्यातल्या त्यात थोडी वेगळी होईल. आणि फ्रीजमध्ये टिकते खोबरे. आणि अजून एक टीप आपल्या ईशीताने दिलेली- ओलं खोबरं नसतांना याच कीस मध्ये दूध घालून थोडावेळ ठेवायचे म्हणजे हे खोबरे ही संपेल आणि ओला खोबर नसेल तर अडणार नाही.

रुपी 30/05/2015 - 00:07
२५-३० बटाटे लवकर संपवण्यासाठी काय पाकॄ करता येईल? निदान अर्धे संपले तरी चालेल. पुन्हा संपवायला दोघेच आहोत! कटलेट्स करावेत असा विचार आहे, पण अजून काही सुचवता येईल का? वेफर्स, कीस असे काही नको...

In reply to by रुपी

In reply to by श्रीरंग_जोशी

बहुगुणी 30/05/2015 - 01:04
नुसती पदार्थांची नावेच नव्हे तर प्रत्येकाचे दुवेही दिले आहेत श्रीरंगरावांनी! भले शाबास! (पुर्वी मिपावर असे दुवे देणारे एक जण होते [मला वाटतं 'नंदन' का?], त्यांना "लिंकाळ/ लिंकाळे" असं म्हंटलं जायचं...आता तो किताब श्रीरंग्_जोशींना द्यायला हवा!)

In reply to by बहुगुणी

In reply to by बहुगुणी

थर्ड पार्टी सर्च इंजिन मिपाला जोडून कस्टमाइझ्ड सर्च सुविधा मिपावर देता येईल कदाचित. मी या क्षेत्रात काम करत नसल्याने त्याची केवळ संकल्पना मांडू शकतो.

In reply to by श्रीरंग_जोशी

टीपीके 04/06/2015 - 20:56
मिसळपाव सर्च इंजिन https://cse.google.com/cse/publicurl?cx=000590099528450194719:tpmbqavfq1y कस्टम कोड पण आहे जो साइट वर टाकला तर एक सर्च बॉक्स तयार होईल पण इकडे टाकता येत नाहीये

In reply to by टीपीके

या दुव्यावरा मास्तुरे या शब्दाने शोध घेतला तसेच गुगलवर मास्तुरे site:misalpav.com असा शोध घेतला तर सारखे रिझल्ट मिळाले. मिपा स्पेसिफिक सर्च याद्वारे होत आहे पण लेखनप्रकार, उपप्रकार, प्रतिक्रिया असे अतिरिक्त घटक त्या शोधयंत्राला जोडता आल्यास कस्टमाइझ्ड सर्च टूल असे काही म्हणता येईल.

In reply to by श्रीरंग_जोशी

टीपीके 04/06/2015 - 21:14
हो, सध्या तरी तसेच आहे. तुम्ही म्हणता तशी सोय करता येईल का माहित नाही (म्हणजे करता येईल पण युझर इंटरफेस गन्डेल) प्रत्येक प्रकारासाठी वेगळे सर्च इंजिन होईल बहुतेक. तुमच्या डोक्यात कसा इंटरफेस आहे?

In reply to by टीपीके

टीपीके 04/06/2015 - 21:10
मराठी सर्च इंजिन https://cse.google.com/cse/publicurl?cx=000590099528450194719:_nz76n1_fzo सध्या ह्या साईट वर हे सर्च इंजिन काम करते मिसळपाव मनोगत मायबोली उपक्रम ऐसी अक्षरे

In reply to by टीपीके

एकाच वेळी पाच मराठी संस्थळांवर शोध घेता येणे म्हणजे खासंच. देवनागरी लिपितून शोधताना कधी कधी काही मर्यादा येतात. मागे Yellowstone नॅशनल पार्कबाबत मराठी आंतरजालावर कुणी काही लिहिले आहे का हे मी "येलोस्टोन नॅशनल पार्क" असे शब्द वापरून शोधले. इतर कुणाकडून नंतर यलोस्टोन नॅशनल पार्कचे प्रवासवर्णन मिळाले :-) .

In reply to by टीपीके

एकाच वेळी पाच मराठी संस्थळांवर शोध घेता येणे म्हणजे खासंच. देवनागरी लिपितून शोधताना कधी कधी काही मर्यादा येतात. मागे Yellowstone नॅशनल पार्कबाबत मराठी आंतरजालावर कुणी काही लिहिले आहे का हे मी "येलोस्टोन नॅशनल पार्क" असे शब्द वापरून शोधले. इतर कुणाकडून नंतर यलोस्टोन नॅशनल पार्कचे प्रवासवर्णन मिळाले :-) .

In reply to by श्रीरंग_जोशी

टीपीके 05/06/2015 - 15:46
हे आवडतं का बघा. यात आता tabs टाकले आहेत https://cse.google.com/cse/publicurl?cx=000590099528450194719:_nz76n1_fzo यात आता अनेक वर्तमान पत्रे पण टाकली आहेत. अजून काही सूचना असतील तर नक्की सांगा मराठी शोध या नावाने एक सोपी युआरल तयार करायचा पण प्रयत्न करतो आहे, hopefullly should work marathishodh.tk

In reply to by बहुगुणी

रुपी 30/05/2015 - 01:50
दुव्यांबद्दल दुवा!>> +१ !! श्रीरंग, दुव्यांबद्दल धन्यवाद! तुम्हाला अशा सगळ्या दुव्यांसाठी दुवा मिळाल्या तर कधी दवाची गरज पडणार नाही! बहुतेक बटाटा-मटार टिक्की करुन पाहीन. पोळी/ ब्रेड बरोबर खाल्ला तर फार बटाटा संपणार नाही ना :) जाता जाता, बटाटा हाईट्स ही पाकृ नाहिये, कथा आहे :)

In reply to by रुपी

एकच काम यांत्रिकपणे केले की अशी हाईट होते ;-) . यापुढे दुवे देण्यापूर्वी बघत जाईन की मजकूर काय आहे... दह्यातलि बटाटा रस्सा भाजि - सहा वर्षांपासून शून्य प्रतिसाद असलेल्या या धाग्यावर कुणी त्याची पाकृ लिहिल्यास उत्तमच.

In reply to by श्रीरंग_जोशी

रुपी 30/05/2015 - 02:14
तो धागा चुकीच्या विभागात टाकलाय ना.. काथ्याकूट मध्ये असता तर खूप पाकृ आल्या असत्या असं त्यांच्या बाकी धाग्यांवरुन वाटतं.:) पळते आता, नाहीतर हा धागा खाऊगलीतून भलतीकडेच जायचा..

In reply to by श्रीरंग_जोशी

रमेश आठवले 30/05/2015 - 07:14
बटाटयाच भुजण या नावाचा एक प्रकार, विशेषत: सारस्वत मंडळींकडे, केला जातो असे ऐकले आहे. त्या संबधी माहिती कोणी देऊ शकेल का ?

In reply to by रुपी

रुपी 04/06/2015 - 03:26
एवढ्या पाकृ मिळाल्याच तर निदान सुरुवात करावी म्हणून वरणभाताच्याच बरोबर बटाटे उकडून घेतले. न सोललेले बटाटे पाहून नवर्‍याने ऑफिसमध्ये कुणाच्या डब्यात खाल्ली तशी पाकृ करुन का म्हणून विचारले आणि मीही अगदी आनंदाने हो म्हटले! जेवताना तोंडी लावायला/ साईड-डिश म्हणून खायला घेतलं. जे काही होतं ते खूपच चवदार आणि झटपट होणारं, शिवाय माझ्या लेकानेही स्वतः घेउन आवडीने खाल्लं. तर ही त्याची पाकृ. उकडलेल्या बटाट्याची सालं न काढता भाजीसाठी करतो तसेच तुकडे करुन घ्या. अगदी जेवायला बसण्याआधी तूप-जीरे-हिंगाची फोडणी करुन त्यात ते तुकडे, गरम मसाला आणि मीठ घाला. मोठीच आच ठेवून २ मिनिटे हलवत राहा आणि लगेच वाढा.

In reply to by रुपी

ही पाककृती अमेरिकन ब्रेकफास्ट पोटॅटोजसारखी वाटत आहे. गरम मसाल्यामुळे भारतीयीकरण झाले आहे :-) . झटपट पाकृ म्हणून उपयुक्त आहे.

हि एक मस्त रेसिपी आणि मुलांच्या आवडीची , शिवाय हरभरे ऐवजी कोणतेही कडधान्य किंवा मिक्स करून इतर कडधान्य वापरू शकता. हरभरे रात्री भिजवा . दुसर्या दिवशी कुकर ला वाफवून घ्या , खूप जास्त पण नको गाळ होईल इतके आणि कच्चे पण नको अशा बेताने शिट्ट्या घ्या. आता कांदा , टोमाटो , कोथिंबीर , पुदिना , कैरी मस्त पैकी बारीक बारीक कापून घ्या. असेल तर पालक आणि काकडी सुद्धा कापून घ्या. आवडत असल्यास चिंचेचा कोळ करून घ्या. एका बाउल मध्ये वाफवलेले हरभरे , वरील चिरलेले साहित्य ,मीठ , चिंचेचा कोळ मिक्स कर. वरून चाट मसाला , असल्यास जिरे आणि धने पूड भुरभुरा आणि वरून बारीक शेव घालून दया. चिंचेचा कोळ नसेल किवा आवडत नसेल तर लिंबू पिळून घ्या.

मदनबाण 30/04/2015 - 19:56
आज्जेने चुकुन अनाहिता मधली विचारणा खुल्या मंचावर केली की काय ? ;) { चला पळावे आता... } ;)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- 'We did not touch the Pakistani aid': Quake-struck Nepal launches inquiry as Pakistan sends 'beef masala'

In reply to by अत्रुप्त आत्मा

सस्नेह 02/05/2015 - 11:53
गुर्जी तुम्ही तरी असे म्हनू नये. अहो,गणपा आणि दीपक यांचे सल्ले अनाहितात मिळू शकत नाहीत. ...तुम्ही दिलात तरी आम्ही अनमान करणार नाही हो !

In reply to by रेवती

सूड 30/04/2015 - 21:02
तर अर्धी वाटी मूगडाळ मिक्सरवर रवाळ दळून घ्यायची. मुगडाळीच्या निम्मं (त्याहून जरा जास्त घेतलं तरी चालतं) चितळ्यांच्या गाईचं साजूक तूप कढईत तापत ठेवायचं. ;) तूप नीट तापलं की ही मूगडाळ त्यात ओतून मंद आचेवर खरपूस भाजायची. ते होतंय तोवर शेजारच्या शेगडीवर दूध तापत ठेवायचं. मूगडाळ भाजून होईपर्यंत दूधाला उकळी येते. मग हे उकळतं दूध अंदाजाने, थोडं थोडं ओतून शिरा मऊसर शिजवायचा. पहिल्यावेळेस दूध ओतताना, दूध ओतल्यावर ताबडतोब कढईवर झाकण ठेवायचं. म्हणजे वाफेने शिरा छान फुलून येतो. आता आवडीनुसार साखर, जायफळ्-वेलचीपूड आणि पसंतीप्रमाणे काजू-बदाम वैगरे घालून खायला घ्यायचं. या शिर्‍यात अक्रोड अधिक चांगले लागतात असा वैयक्तिक अनुभव आहे.

In reply to by सूड

रेवती 30/04/2015 - 21:11
मग सोपे आहे. मीही तसेच करेन. काहीजण डाळ भिजवून, भरड वाटून मग परततात, त्याला भारी वेळ लागतो म्हणून हा शिरा आवडत असूनही कधी केला नव्हता. आता निमित्त मिळताच करून पाहीन व कळवीन.

In reply to by रेवती

रुपी 30/04/2015 - 23:02
हो.. डाळ न भिजवता भाजायला सोपे जाते, पण जेवढी छान चव भिजवलेल्या डाळीची लागते, तेवढी (माझ्या आणि माझ्या आईच्या मते) त्याची लागत नाही. अर्थात, अगदीच न करता येण्यापेक्षा हा पर्याय चांगला आहे.

In reply to by रुपी

रेवती 30/04/2015 - 23:36
हेच होते ना, भिजवलेल्या डाळीचा करत बसायला सवड नसते (खरंतर पेशन्स) मग नुसताच हा शिरा करायचाय करायचाय असं होतं. मी न राहवून आत्ताच करायला घेतलाय पण साखरेचं प्रमाण सुडकूनं दिलं नाहीये वाटतं. जेवढ्यास तेवढी साखर घालून अगोड वाटतोय (इथल्या साखरेची गोडी कमी आहे) म्हणून दीडपट घातलीये.

In reply to by रेवती

स्पंदना 01/05/2015 - 04:55
मी पण कायम भिजवून करते. त्या सुमारास एखादा केक बेक करायचा असेल तर मी ओव्हन मध्ये ठेवुन देते ही डाळ भरपूर तुपात मिसळुन. निम्मी भाजते. उरलेली फिरसे चल चल रे नौ जवान!!

In reply to by स्पंदना

रुपी 01/05/2015 - 05:08
ओव्हनमध्ये अशी भाजली जाते हे माहित नव्हते. बरेच लोक मायक्रोवेव्हमध्ये भाजतात, पण मला तरी त्यात फार वेळ अन्न शिजवायला आवडत नाही, म्हणून कधी करुन पहिले नाही.

In reply to by सूड

पैसा 30/04/2015 - 21:15
आमच्याकडे चितळे नसल्याने चितळ्यांच्या गाई नाहीत. म्हशीचे किंवा अमूलचे किंवा लोणकढ़े चालेल का?

स्रुजा 30/04/2015 - 22:15
रेवाक्का, ते तपकिरी हरभरे छान भिजवुन घ्यायचे. मोहरी हिंग हळद कढीपत्ता आणि ओवा ची छान फोडणी करायची. हरभरी घालून चिंच गुळ, मीठ घालायचा. चिंच गुळाचे प्रमाण फार महत्त्वाचे. मस्त वाफेवर शिजवायचे. पाणी असाय्ला हवं नीट अगदीच कोरडं नको. आई दर वर्षी उसळ देते द्रोणात हळदी कुंकवाला नुसत्या हरभर्‍या ऐवजी. ती ही रेसिपी आहे.

In reply to by स्रुजा

स्पंदना 01/05/2015 - 04:53
तिखट नाही? रेवाक्का मी हरभरे भिजवुन मग कुकरला शिजायला घालताना त्यात मिठ,हळद,तिखट आणि एखादा टोमॅटो घालते. टोमॅटो नको असेल तर आमचूर पावडर वापरते. मग हे शिजलेले हरभरे नंतर मोहरी जिर्‍यावर हिंग कडीपत्ता आणि हवा असेल तर कांदा घालून परतायचे. शिजताना मिठ तिखट असल्याने हरभरे मुरतात त्या मसाल्यात.

In reply to by स्पंदना

स्रुजा 01/05/2015 - 05:46
तिखट घालायचं ना .. मी तिखट लिहायचे विसरले :( आणी काळा मसाला पण. हापिसातून असं अधून मधून गुपचुप प्रतिक्रिया दिल्या की असं होतं.

रेवती 01/05/2015 - 00:12
सुडकू, मुगाचा शिरा केला. पहिल्यांदाच करताना जितपत बरोबर/ चूक असेल तितपत झाला. सुधारणा करणे आवश्यक! मूग एकसारख्या प्रकारे दळणे आवश्यक. मी जे केले त्यात काही जाड तर काही वस्त्रगाळ झाले. साखर दीडपट नको, सव्वापट. आणि सगळ्यात महत्वाचे, नवर्‍याला कामात लुडबुडू देऊ नये.

In reply to by यशोधरा

खटपट्या 01/05/2015 - 05:01
मटण साहीत्य - दोन कीलो मट्ण, पाच मोठे कांदे, दोन चमचे आले लसूण पेस्ट, एक सपाट चमचा हळद, आठ लसणाच्या पाकळ्या, दोन टोमॅटो, तीन चमचे पांढरे तीळ (नसले तरी चालतील), एक छोटी वाटी सुके खोबरे, पाच लवंगा, आठ काळेमीरी, एक ईंच दालचीनी, एक्/दोन तमालपत्र, पाच टेबलस्पून तेल, मीरची पावडर किंवा मिक्स मसाला दोन चमचे (घरी बनवलेला मसाला - मीरची + हळद + बाकीचा गरम मसाला घालुन केलेला) जीरे पावडर एक चमचा, धणे पावडर एक चमचा, मीठ, बाजारातला मट्ण मसाला एक चमचा ईतर तयारी - एक कांदा बारीक चिरावा. बाकीचे कांदे लांब कापुन घ्यावेत. टोमॅटोची पेस्ट करुन घ्यावी. लसूण बारीक कापुन घ्यावा. क्रुती - मटण स्वच्छ धुवुन पाच ते सहा मिनिटे निथळत ठेवावे. कुकरमधे तीन टेबलस्पून तेल तापवावे, त्यात बारीक चीरलेला कांदा टाकून परता, कांदा लालसर होताच त्यात आले लसणाची पेस्ट टाकावी, त्यात हळद टाका. यात मटण परतून घ्या. पाच मिनिटात मट्ण संपूर्ण बुडेल एवढे पाणी टाका. एक चमचा मिठ टाका. कुकरचे झाकण लावून सात ते आठ शीट्या होउ द्या. (मटण जून असेल तर जास्त शीट्या द्याव्या लागतील.) सुके खोबरे ब्राउन होई पर्यंत भाजून घ्या. एका भांड्यात दोन टेबलस्पून तेल टाका. त्यात चिरलेला लसुण लाल होई पर्यंत परता, त्यात तीळ, लवंग, दालचीनी, काळीमीरी हे टाकून खरपूस भाजून घ्या. आता यात लांब चीरलेला कांदा परता. कांदा ब्राउन होईपर्यंत परता. आता टोपातील मिश्रण आणि भाजलेले खोबरे मिक्सर मधे बारीक वाटून घ्या. गरजेपुरते पाणी टाका. आता ज्या टोपात खडा मसाला आणि कांदा परतला त्याच टोपात दोन चमचे तेल टाका. तेल गरम होताच त्यात मिक्सर मधील मिश्रण ओता आणी सात ते आठ मिनीटे परता. यात एकेक चमचा धणे पावडर आणी जीरा पावडर टाकुन पुन्हा पाच मिनिटे परता. आता यात टोमॅटोची पेस्ट ओता. दोन मीनीटे परतुन त्यात मीरची पावडर कींवा मिक्स मसाला टाका. एक चमचा बाजारातील मटण मसाला टाका. आता टोपातल्या मीश्रणाला तेल सुटायला सुरवात होईल. कुकर उघडून मटण व्यवस्थीत शीजले आहे याची खात्री करुन घ्या. आता कुकरमधील मटण टोपातील मिश्रणात टाकून परता. आता कुकरमधील पाणी/सूप आहे ते सुद्धा टोपात ओता. एक चमचा मीठ (कींवा चवीनुसार) टाकून एक उकळी येउद्या. मटण तयार.

In reply to by खटपट्या

पगला गजोधर 01/05/2015 - 12:59
पाच मिनिटात मट्ण संपूर्ण बुडेल एवढे पाणी टाका.
पाणी टाकतानाच ते उकळते पाणी असेल याची काळजी घ्या, ( कांदा परतत असताना बाजूला दुसर्या भांड्यात पाणी उकळत ठेवा, मटन परतताना रूम टेम्प चे पाणी टाकले तर मटन वातट होण्याची शक्यता .....

मला crabs ची पाकृ हवी आहे. (crabs म्हणजेच चिंबोरी का?) crabs अजून आणले नाहीत पण आणणार आहे. धन्यवाद! स्रुजाने पुण्यातलं चांगले मासे मिळण्याचं दुकान सांगून माझी कामे वाढवली आहेत. :)

इरसाल 01/05/2015 - 12:04
क्रॅब बाबत ही घ्या रेशीपी, ४ खेकडे (क्रॅब)- २ जणांना १ ओलं नारळ (कोवळं असल्यास उत्तम) २ मध्यम कांदे १/२ टी स्पुन जिरे १/२ टी स्पुन मोहरी १/२ टी स्पुन हळद ५/६ लसुण पाकळ्या कोकणी मसाला २ चमचे मीठ चवीपुरते. सर्वप्रथम खेकडे स्वच्छ धुवुन घ्या, त्याच्या सर्व नांग्या धडापासुन वेगळ्या करुन घ्या. मोठ्या नांग्या तश्याच ठेवुन इतर सर्व नांग्या मिक्सर मधे थोडे थोडे पाणी टाकुन वाटुन घेवुन चहाच्या गाळणीने तो रस गाळुन जमा करुन ठेवा. आता ओलं खोबरं बारीक तुकडे करुन तेही मिक्सरला थोडे थोडे पाणी टाकुन वाटुन घेवुन चहाच्या गाळणीने गाळुन ते दुध जमा करुन घ्या. आता लोखंडी (हो लोखंडीच) कढईत पुरेसे तेल गरम करुन त्यात चेचलेला लसुण, जिरे, मोहरी टाकुन ते तळले गेले की त्यात बारीक चिरलेला कांदा गुलाबी होईपर्यंत परतुन घ्या. त्यात हळद, कोकणी मसाला टाका तो तळला गेला की त्यात हळु हळु तो नांग्यांचा काढलेला रस मिसळा तो मसाल्याबरोबर पुरेसा एकजीव झाला असे वाटले की त्यात नारळाचे दुध हळुहळु टाकत ढवळत रहा. हे मिश्रण एकजीव झाले की त्यात धुवुन ठेवलेले चार खे़कडे नी त्यांच्या मोठया नांग्या टाका चवीपुरते मीठ टाकुन एकदा ढवळुन झाकण ठेवुन खेकडे/ चिंबोर्‍या लाल झाल्या की गॅस मंद करुन ३/४ मिनीटांनी बंद करा. भात, तांदळाची भाकरी, चपाती कसे ही चालेल.

स्रुजा 05/05/2015 - 01:42
मला बटाटावड्याबरोबर ज्या मिरच्या तळतात आणि त्याला मीठ लावतात त्याची जरा पद्धत हवी आहे. वडा पाव च्या गाडीवर मिळतात तशा मिरच्या करायची पायरी पायरी ने कृती द्या ना कुणी तरी. नक्की कधी मीठ लावायचं ? मध्ये काप द्यायचा का तळायच्या आधी वगैरे बेसिक मधे असलेले वांधे दुर करा प्लीझ.

In reply to by स्रुजा

याबद्दल मलाही कुतूहल आहे. कचोरी समोस्यांबरोबर ज्या मवाळ मिरच्या दिल्या जातात त्यांना मवाळ करण्याची प्रक्रिया कोणती?

In reply to by स्रुजा

आनन्दिता 05/05/2015 - 03:01
मिरच्यांना तळायच्या आधी मधे काप घ्यावा लागतो. अगदी छोटा छेद दिला तरी चालेल. मिरच्या तळण्यासाठी तेल चांगलं कडकडीत तापायला हवं. तेल कमी तापलं असेल तर मिरच्या थेट वडापाव वाल्याच्या मिरच्यांसारख्या होत नाहीत. हव्या तशा तळुन झाल्या की झारीने बाहेर काढाव्यात आणि टिशुपेपर वर पसराव्या. आणि बाहेर काढल्या गरमा-गरम असतानाच मिठ भुरभुरावे.

In reply to by आनन्दिता

स्रुजा 05/05/2015 - 03:28
हि हि हि ! तुझा असा सुगरण सल्ला आल्यावर मला तुझ्या ताई हेच संबोधन योग्य वाटलं गं. नेहेमीच्या नावाने कसं बाई धन्यवाद देणार? :P ये तू पण वडापाव खायला.

In reply to by आनन्दिता

सोपी वाटत आहे पद्धत. परंतु कृती वाचल्यावर जाणवत आहे की, कचोरी समोस्यांबरोबर दिल्या जाणार्‍या मिरच्या या वेगळ्या (वाण) असाव्यात अन बनवण्याची कृती वेगळी असावी.

In reply to by स्रुजा

आनन्दिता 05/05/2015 - 22:23
शाब्बास!! एके काळी माझ्या पाकशास्त्रातल्या ज्ञानाला हसणार्या तुला आणि रंगा काकांना एकावेळी सुगरणीचा सल्ला द्यायच्या संधीचं मी सोनं केलं =))

In reply to by आनन्दिता

सूड 05/05/2015 - 22:28
रंगाकाका कुठे दिसले आणि धाग्यावर? हल्ली संपादक लक्षुम्बाई तेवढ्या जास्त दिसतात. पंतांना का काका म्हणत्येस!! ;)

In reply to by आनन्दिता

स्रुजा 06/05/2015 - 00:17
मी बापडी तुला कधी हसले? हां आता कणीक म्हणजे काय या निरागस प्रश्नावर एक आपलं उगाच स्मित दिलं तर मी हसले??? बाकी तुला कणकेपेक्षा मिरच्याच माहिती असणार. :P आणि बिचार्‍या रगाभाऊंनी तर तुला या प्रश्नावर लाडू देऊ केले होते. पण तुला मिरची मधुन लाडू आणि स्मित हास्य कुठुन बाई अपील होणार? ( स्वगतः एक गरीब नि:श्वास )

In reply to by स्रुजा

लैच मिर्ची मिर्ची कराया लागली की सगळी.. ,आता येक मिर्ची माज्ज्याकडून... इशेषतः ज्यांणा हिरव्या मिर्च्या जेवनात कांद्यासारख्या कचाकचा हानायला आवाडतेत,थ्येंच्यासाटी!!! सात/आठ हिरव्या मिर्च्यांना सुरीने मधोमध ऑपरेशन करुन ठीवाव. णंतर त्येंच्या चीरलेल्या मद्दी बशेल एवडेच मीठ भराव. आनी मंग ग्यास जवळ जाऊण येक बारीक कढल्या मद्दी येक चमचाभर त्याल येकदम कडक मधी तापवाव. त्येच्या आदी त्ये मिठाळलेल्या मिर्च्या येका प्ल्येटात कडेला तयार ठिवने. आनी कडला आरदं फुलपात्र पानी पन ठिवाव,आनी न्हेमीचे ३ चमचे हळद पन! आनी कढल्याचं त्वांड बंद करेल अशी ताटली पन तयार ठिवाव..फुडं आता येकदम फायनल म्याचच्या शेवटच्या वोव्हरीसारकं सुप्परफाश्ट प्ल्ये होनारे..तवा आता फयल्यांन्दा नाकाला फडक लाऊण घ्याव. त्ये हल्ली स्कूटी चालवनार्‍या पोरी बांधतेत तसं! णायतर मिर्ची खान्या आदुगरच डोक्यात जाइल. तर.. त्याल चांगलं कडक तापलं..की अचानक घॅस बंद करुण त्या कढल्यात येकदम सगळ्या मिर्च्यांना समादी द्याव. मंग त्या बोंब माराया लागल्या रं लागल्या की लगीच त्येंच्या डोंबल्याव त्ये अर्दा फुलपात्र पानी टाकूण त्याच्याव तीन चम्चे हळदीनी मूठमाती द्याव.आनी कडईचं थंडगं ताटली टाकुन बंद करावं. ह्ये सगळं युद येका मिनटात जाल पायजेन. णायतर मग त्या मिर्च्यांचा आत्मा स्वर्गाला जात न्हाई,आनी णंतर आपल्या पन न्हेत नाई. मंग पाच मिनिटं त्या झाकल्येला कढल्याला घॅस वरच गार होऊ द्याव. आनी णंतर खाली काडून चमच्यानं झाकान मारलेया ताटलीचं त्वांड उचकटाव. आनी त्येच चमच्याणी कढल्यात उलथापालथ घडवून ,कुटची मिर्ची हळदीच्या ढीगार्‍यात कुटं जाऊन म्येली त्येचा शोध घ्याव. सगळ्या घावल्या की थांबाव. आनी मांग गरम गरम भाताव, सानशीच्या तोंडानं चांगली च्येचल्येल्या लसनाची फोडनी मारल्याली ,लसनाचा ठ्सका बसलेली गरम आमटी ओतूण भात कालवाव. आनी त्ये कढलं बी भुईला शेजारीच घ्यिऊन बसाव. आनी दोनचार मिर्च्या ताटाला घ्येऊन .. म्होट्यांन म्हनाव.. "सदानंदाचा येळकोट" आनी मांग भात आमटी संगाट हनायला घ्यावं. ही हळदीघाटाच्या लडाईत शहीद झाल्याली मिर्ची णंतर खाताणा स्वताची चव-दाखवूण ग्येलाबिगार र्‍हात न्हाई ..बर्का! मऊ हृदयाच्या मानसान आजाबात हिच्या वाटला जाऊ णये.. आनी बाकिच्यांण्णी पण येका ज्येवनाला चारा फेक्षा जास्त खाल्या तर ब्राम्मम्हुर्तापासूण कोंबड आरवायच्या आत कवा बी उटायची तयारी ठीऊणच खावं. ह्या ज्येवनाणंतर त्वांड लैच हळहळलं, आनी प्वाटात भट्टी प्येटल्या सारकं वाटलं,तर थंडाव्याला लागाल त्येवडं ताक माराव. आनी णंतर तासभर आपल्याला जो इषय आवाडतो,त्यात बेजान रमाव. णंतर धा मिनिटात येकदम टाइट झोप यील.. तवा मिर्ची प्रेमींण्णो... बगा चाखून येक डाव.. आवाडली तर अज्जुन येखादी अशीच मिर्ची द्यीण! बाय बाय , गुडणाइट! .. आनी फुड काय म्हनतेत त्ये ....... ;) बगा आपलं तुमचं तुम्मीच!

In reply to by अत्रुप्त आत्मा

क्या बात है, बुवां एकदम समीधाच ओतली भस्सकन भूताच्या पिक्चरमधल्या ममांत्रिकावानी ;-) . या कृतीचं कुणी सुटसुटीत पुनर्लेखन करून देईल का.

In reply to by अत्रुप्त आत्मा

बहुगुणी 28/05/2015 - 10:27
आद्य मिपाकर तात्या अभ्यंकरांच्या शब्दांत: नुसत्या वाचनानेच एकदम स्वर्गवास! काय झॅन्टामॅटिक वर्णन आहे!!

रेवती 27/05/2015 - 06:58
सुक्या खोबर्‍याच्या चटणीची रेशिपी मिळेल का? मी एरवी जिरे, लाल तिखट, लसूण घालून करते. सध्या माझ्याकडे मोठ्या ३ वाट्या किसलेले खोबरे आहे जे संपवायचे आहे. कसे कोणास ठाऊक खोबर्‍याची बरणी दुर्लक्षीत राहिली. पदार्थ चांगल्या अवस्थेत आहे पण मी चुकून आणखी खोबरे आणलेय.

त्रिवेणी 28/05/2015 - 10:03
मी खोबरे, शेंगदाणे, तीळ, लसूण आणि लाल मिरची चटका लागेलस भाजून घेते आणि जाडसर चटणी वाटते. त्यातल्या त्यात थोडी वेगळी होईल. आणि फ्रीजमध्ये टिकते खोबरे. आणि अजून एक टीप आपल्या ईशीताने दिलेली- ओलं खोबरं नसतांना याच कीस मध्ये दूध घालून थोडावेळ ठेवायचे म्हणजे हे खोबरे ही संपेल आणि ओला खोबर नसेल तर अडणार नाही.

रुपी 30/05/2015 - 00:07
२५-३० बटाटे लवकर संपवण्यासाठी काय पाकॄ करता येईल? निदान अर्धे संपले तरी चालेल. पुन्हा संपवायला दोघेच आहोत! कटलेट्स करावेत असा विचार आहे, पण अजून काही सुचवता येईल का? वेफर्स, कीस असे काही नको...

In reply to by रुपी

In reply to by श्रीरंग_जोशी

बहुगुणी 30/05/2015 - 01:04
नुसती पदार्थांची नावेच नव्हे तर प्रत्येकाचे दुवेही दिले आहेत श्रीरंगरावांनी! भले शाबास! (पुर्वी मिपावर असे दुवे देणारे एक जण होते [मला वाटतं 'नंदन' का?], त्यांना "लिंकाळ/ लिंकाळे" असं म्हंटलं जायचं...आता तो किताब श्रीरंग्_जोशींना द्यायला हवा!)

In reply to by बहुगुणी

In reply to by बहुगुणी

थर्ड पार्टी सर्च इंजिन मिपाला जोडून कस्टमाइझ्ड सर्च सुविधा मिपावर देता येईल कदाचित. मी या क्षेत्रात काम करत नसल्याने त्याची केवळ संकल्पना मांडू शकतो.

In reply to by श्रीरंग_जोशी

टीपीके 04/06/2015 - 20:56
मिसळपाव सर्च इंजिन https://cse.google.com/cse/publicurl?cx=000590099528450194719:tpmbqavfq1y कस्टम कोड पण आहे जो साइट वर टाकला तर एक सर्च बॉक्स तयार होईल पण इकडे टाकता येत नाहीये

In reply to by टीपीके

या दुव्यावरा मास्तुरे या शब्दाने शोध घेतला तसेच गुगलवर मास्तुरे site:misalpav.com असा शोध घेतला तर सारखे रिझल्ट मिळाले. मिपा स्पेसिफिक सर्च याद्वारे होत आहे पण लेखनप्रकार, उपप्रकार, प्रतिक्रिया असे अतिरिक्त घटक त्या शोधयंत्राला जोडता आल्यास कस्टमाइझ्ड सर्च टूल असे काही म्हणता येईल.

In reply to by श्रीरंग_जोशी

टीपीके 04/06/2015 - 21:14
हो, सध्या तरी तसेच आहे. तुम्ही म्हणता तशी सोय करता येईल का माहित नाही (म्हणजे करता येईल पण युझर इंटरफेस गन्डेल) प्रत्येक प्रकारासाठी वेगळे सर्च इंजिन होईल बहुतेक. तुमच्या डोक्यात कसा इंटरफेस आहे?

In reply to by टीपीके

टीपीके 04/06/2015 - 21:10
मराठी सर्च इंजिन https://cse.google.com/cse/publicurl?cx=000590099528450194719:_nz76n1_fzo सध्या ह्या साईट वर हे सर्च इंजिन काम करते मिसळपाव मनोगत मायबोली उपक्रम ऐसी अक्षरे

In reply to by टीपीके

एकाच वेळी पाच मराठी संस्थळांवर शोध घेता येणे म्हणजे खासंच. देवनागरी लिपितून शोधताना कधी कधी काही मर्यादा येतात. मागे Yellowstone नॅशनल पार्कबाबत मराठी आंतरजालावर कुणी काही लिहिले आहे का हे मी "येलोस्टोन नॅशनल पार्क" असे शब्द वापरून शोधले. इतर कुणाकडून नंतर यलोस्टोन नॅशनल पार्कचे प्रवासवर्णन मिळाले :-) .

In reply to by टीपीके

एकाच वेळी पाच मराठी संस्थळांवर शोध घेता येणे म्हणजे खासंच. देवनागरी लिपितून शोधताना कधी कधी काही मर्यादा येतात. मागे Yellowstone नॅशनल पार्कबाबत मराठी आंतरजालावर कुणी काही लिहिले आहे का हे मी "येलोस्टोन नॅशनल पार्क" असे शब्द वापरून शोधले. इतर कुणाकडून नंतर यलोस्टोन नॅशनल पार्कचे प्रवासवर्णन मिळाले :-) .

In reply to by श्रीरंग_जोशी

टीपीके 05/06/2015 - 15:46
हे आवडतं का बघा. यात आता tabs टाकले आहेत https://cse.google.com/cse/publicurl?cx=000590099528450194719:_nz76n1_fzo यात आता अनेक वर्तमान पत्रे पण टाकली आहेत. अजून काही सूचना असतील तर नक्की सांगा मराठी शोध या नावाने एक सोपी युआरल तयार करायचा पण प्रयत्न करतो आहे, hopefullly should work marathishodh.tk

In reply to by बहुगुणी

रुपी 30/05/2015 - 01:50
दुव्यांबद्दल दुवा!>> +१ !! श्रीरंग, दुव्यांबद्दल धन्यवाद! तुम्हाला अशा सगळ्या दुव्यांसाठी दुवा मिळाल्या तर कधी दवाची गरज पडणार नाही! बहुतेक बटाटा-मटार टिक्की करुन पाहीन. पोळी/ ब्रेड बरोबर खाल्ला तर फार बटाटा संपणार नाही ना :) जाता जाता, बटाटा हाईट्स ही पाकृ नाहिये, कथा आहे :)

In reply to by रुपी

एकच काम यांत्रिकपणे केले की अशी हाईट होते ;-) . यापुढे दुवे देण्यापूर्वी बघत जाईन की मजकूर काय आहे... दह्यातलि बटाटा रस्सा भाजि - सहा वर्षांपासून शून्य प्रतिसाद असलेल्या या धाग्यावर कुणी त्याची पाकृ लिहिल्यास उत्तमच.

In reply to by श्रीरंग_जोशी

रुपी 30/05/2015 - 02:14
तो धागा चुकीच्या विभागात टाकलाय ना.. काथ्याकूट मध्ये असता तर खूप पाकृ आल्या असत्या असं त्यांच्या बाकी धाग्यांवरुन वाटतं.:) पळते आता, नाहीतर हा धागा खाऊगलीतून भलतीकडेच जायचा..

In reply to by श्रीरंग_जोशी

रमेश आठवले 30/05/2015 - 07:14
बटाटयाच भुजण या नावाचा एक प्रकार, विशेषत: सारस्वत मंडळींकडे, केला जातो असे ऐकले आहे. त्या संबधी माहिती कोणी देऊ शकेल का ?

In reply to by रुपी

रुपी 04/06/2015 - 03:26
एवढ्या पाकृ मिळाल्याच तर निदान सुरुवात करावी म्हणून वरणभाताच्याच बरोबर बटाटे उकडून घेतले. न सोललेले बटाटे पाहून नवर्‍याने ऑफिसमध्ये कुणाच्या डब्यात खाल्ली तशी पाकृ करुन का म्हणून विचारले आणि मीही अगदी आनंदाने हो म्हटले! जेवताना तोंडी लावायला/ साईड-डिश म्हणून खायला घेतलं. जे काही होतं ते खूपच चवदार आणि झटपट होणारं, शिवाय माझ्या लेकानेही स्वतः घेउन आवडीने खाल्लं. तर ही त्याची पाकृ. उकडलेल्या बटाट्याची सालं न काढता भाजीसाठी करतो तसेच तुकडे करुन घ्या. अगदी जेवायला बसण्याआधी तूप-जीरे-हिंगाची फोडणी करुन त्यात ते तुकडे, गरम मसाला आणि मीठ घाला. मोठीच आच ठेवून २ मिनिटे हलवत राहा आणि लगेच वाढा.

In reply to by रुपी

ही पाककृती अमेरिकन ब्रेकफास्ट पोटॅटोजसारखी वाटत आहे. गरम मसाल्यामुळे भारतीयीकरण झाले आहे :-) . झटपट पाकृ म्हणून उपयुक्त आहे.

हि एक मस्त रेसिपी आणि मुलांच्या आवडीची , शिवाय हरभरे ऐवजी कोणतेही कडधान्य किंवा मिक्स करून इतर कडधान्य वापरू शकता. हरभरे रात्री भिजवा . दुसर्या दिवशी कुकर ला वाफवून घ्या , खूप जास्त पण नको गाळ होईल इतके आणि कच्चे पण नको अशा बेताने शिट्ट्या घ्या. आता कांदा , टोमाटो , कोथिंबीर , पुदिना , कैरी मस्त पैकी बारीक बारीक कापून घ्या. असेल तर पालक आणि काकडी सुद्धा कापून घ्या. आवडत असल्यास चिंचेचा कोळ करून घ्या. एका बाउल मध्ये वाफवलेले हरभरे , वरील चिरलेले साहित्य ,मीठ , चिंचेचा कोळ मिक्स कर. वरून चाट मसाला , असल्यास जिरे आणि धने पूड भुरभुरा आणि वरून बारीक शेव घालून दया. चिंचेचा कोळ नसेल किवा आवडत नसेल तर लिंबू पिळून घ्या.
================================================================== खाऊगल्ली : भाग १ ================================================================== बर्याचदा आपल्याला एखादी रेसीपी हवी असते मग ती शोधण्यात बराच वेळ जातो आणि कासकाय वर आपले हितचिंतक लगेच उपलब्ध असतील असेही नाही म्हणून थोडक्यात रेसीपी शेअर करण्यासाठी हा धागा. तर चला एकमेका सहाय्य करू------- वरील मजकूर त्रिवेणीच्या पहिल्या धाग्यातून ढापला आहे याची नोंद घ्यावी.

_सुखी वैवाहिक जीवनाचा गुरुमंत्र (बायकोचं प्रगतीपुस्तकं)

कॅप्टन जॅक स्पॅरो ·

टवाळ कार्टा 17/04/2015 - 11:12
इतके पण काही जास्त गरज नसते....अत्यावश्यक गरजा* वेळच्यावेळी आणि पोटभर पूर्ण झाल्या तरी नवर्यांना बास होते *वेळच्यावेळी खाणे-पिणे ;)

नाखु 17/04/2015 - 11:48
वि.सू. घरचा अभ्यास जोरदार चालू आहे असे एक निरिक्षण . ==================== आता मान्यवरांचे अभिप्राय:
  • ह्या प्रकृतीच्या लोकांनी काही पथ्यपाणी केलेच पाहीजे माहीती साठी व्यनी करा-भार्यु मित.
  • हा ठरावीक लोकांनी ठरावीक लोकांसाठी काढलेला धागा आहे - अजुनी बोल्ले
  • यात बोटावर नाचवले जाते बोटीवर नाही तस्मात आमचा पास - (स्व)शोध बरे
  • इतके नियम+कर्मकांड आम्च्या पूजेत पण नाहीत, च्छ्या मसाला कमी आहे (काहीच धुरळा उडणार नाही खास) असो. - अस्वस्थ जिल्बीपाडगावकर

In reply to by नाखु

तुम्हाला सगळ्या प्रसिद्ध मिपा आयडींच्या धोतरांना-पंच्याना आणि तांब्यांना हात घालायचा खुळा नाद आहे असे निरिक्षण. घरचा अभ्यास ;)

नेत्रेश 17/04/2015 - 12:25
टायटल वाचुन मला वाटले "सुखी वैवाहीक जीवन" वाले मिपावर पण जाहीरात करायला पोहोचले की काय? (मिपाच्या पहील्या पानावर लेखाचे संपुर्ण शिर्शक दीसत नाही)

रिम झिम 17/04/2015 - 16:24
संपूर्ण पार्टीभर तुम्ही सतत बायकोच्या बाजूलाच राहीलात (+१००, बोरिंग पार्टीच्या वाळवंटामधे तुही "सहारा" ;) ) - थोडावेळ तुम्ही नवर्‍याबरोबर घालवला आणि नंतर तुम्ही तुमच्या कॉलेजमधल्या एका मैत्रिणीशी गप्पा मारू लागलात (+१००, दिसायला काय आहे गं ती. तुझ्यापेक्षा अंमळ कमी आहे पण... ***आपापल्या हातापायांचा आणि डोक्याचा विमा आहे हे पाहुन हा प्रयोग करा. ब्याकफायर झाल्यास मंडळ जबाबदार णाही*** आणि तरीही बायको हसली तुमच्याकडे बघुन तर काँग्रॅच्युलेशन्स. तुमच्या बायकोचा समावेष जगातलं आठवं आश्चर्य म्हणुन करायला हरकत नाही.)

In reply to by रिम झिम

नाही. मुद्दाम तसचं ठेवलयं. कंसामधला डेटा फक्त बदलायचा होता. दोघांच्याही पर्स्पेक्टीव्हनी लिहिलयं.

टवाळ कार्टा 17/04/2015 - 11:12
इतके पण काही जास्त गरज नसते....अत्यावश्यक गरजा* वेळच्यावेळी आणि पोटभर पूर्ण झाल्या तरी नवर्यांना बास होते *वेळच्यावेळी खाणे-पिणे ;)

नाखु 17/04/2015 - 11:48
वि.सू. घरचा अभ्यास जोरदार चालू आहे असे एक निरिक्षण . ==================== आता मान्यवरांचे अभिप्राय:
  • ह्या प्रकृतीच्या लोकांनी काही पथ्यपाणी केलेच पाहीजे माहीती साठी व्यनी करा-भार्यु मित.
  • हा ठरावीक लोकांनी ठरावीक लोकांसाठी काढलेला धागा आहे - अजुनी बोल्ले
  • यात बोटावर नाचवले जाते बोटीवर नाही तस्मात आमचा पास - (स्व)शोध बरे
  • इतके नियम+कर्मकांड आम्च्या पूजेत पण नाहीत, च्छ्या मसाला कमी आहे (काहीच धुरळा उडणार नाही खास) असो. - अस्वस्थ जिल्बीपाडगावकर

In reply to by नाखु

तुम्हाला सगळ्या प्रसिद्ध मिपा आयडींच्या धोतरांना-पंच्याना आणि तांब्यांना हात घालायचा खुळा नाद आहे असे निरिक्षण. घरचा अभ्यास ;)

नेत्रेश 17/04/2015 - 12:25
टायटल वाचुन मला वाटले "सुखी वैवाहीक जीवन" वाले मिपावर पण जाहीरात करायला पोहोचले की काय? (मिपाच्या पहील्या पानावर लेखाचे संपुर्ण शिर्शक दीसत नाही)

रिम झिम 17/04/2015 - 16:24
संपूर्ण पार्टीभर तुम्ही सतत बायकोच्या बाजूलाच राहीलात (+१००, बोरिंग पार्टीच्या वाळवंटामधे तुही "सहारा" ;) ) - थोडावेळ तुम्ही नवर्‍याबरोबर घालवला आणि नंतर तुम्ही तुमच्या कॉलेजमधल्या एका मैत्रिणीशी गप्पा मारू लागलात (+१००, दिसायला काय आहे गं ती. तुझ्यापेक्षा अंमळ कमी आहे पण... ***आपापल्या हातापायांचा आणि डोक्याचा विमा आहे हे पाहुन हा प्रयोग करा. ब्याकफायर झाल्यास मंडळ जबाबदार णाही*** आणि तरीही बायको हसली तुमच्याकडे बघुन तर काँग्रॅच्युलेशन्स. तुमच्या बायकोचा समावेष जगातलं आठवं आश्चर्य म्हणुन करायला हरकत नाही.)

In reply to by रिम झिम

नाही. मुद्दाम तसचं ठेवलयं. कंसामधला डेटा फक्त बदलायचा होता. दोघांच्याही पर्स्पेक्टीव्हनी लिहिलयं.
पेर्णास्त्रोतः सुखी वैवाहिक जीवनाचा गुरुमंत्र श्री. सौंदर्य ह्यांची माफी मागुन. (काही तासांपुर्वी 'सुखी वैवाहिक जीवनाचा गुरुमंत्र ' हा लेख वाचला होता. त्या धाग्याचं स्वैर विडंबन म्हणुन आणि बायकोला मार्क्स कसे मिळवावेत ह्याचं मार्गदर्शन म्हणुन हा विडंबनप्रसवप्रपंच) तुम्ही आयुष्यात खुष राहु इच्छिता? हा घ्या एक विडंबन मंत्र. आपापल्या नवर्‍यांना खुश कसे ठेवाल? अगदी सोप्पं आहे. नवर्‍याला खुश ठेवणं हे बटाट्याची सुकी भाजी करण्यापेक्षा सोप्पं आहे. कसं?????? सांगतो. १. नवर्‍याला आवडणार्‍या गोष्टी करा.

मुलाखत: पंडित संदीप अवचट

पारुबाई ·

कपिलमुनी 17/04/2015 - 14:05
मिपावर मुलाखती वाचायला मिळत नाही . त्यामुळे वेगळा आणि चांगला प्रयत्न . आता काही छिद्रान्वेषी मिपाकरांना यात झैरातीचा वास येइलच :)

पारुबै, मुलाखत मिपावर टाकल्याबद्दल आभारी आहे. मुलाखत आवडली. माझा ज्योतिषावर दोन टक्के विश्वास आहे तेही उगाच रिस्क नको म्हणुन. -दिलीप बिरुटे

मुलाखत आवडली. लेखनशैली नेटकी आहे. अवांतर - शहाण्या माणसाने ज्योतिषशास्त्रापासून चार हात लांबच रहावे हे माझे या विषयासंबंधीचे मत आहे.

माहितीपूर्ण ग पारूबाई.
कसाबच्या फाशीची तारीख वर्तमानपत्रातून ४ महिने आधी सांगून सर्व जनतेसमोर स्वीकारलेले आव्हान
हे भाकित कोठे सापडेल जालावर?

कपिलमुनी 17/04/2015 - 14:05
मिपावर मुलाखती वाचायला मिळत नाही . त्यामुळे वेगळा आणि चांगला प्रयत्न . आता काही छिद्रान्वेषी मिपाकरांना यात झैरातीचा वास येइलच :)

पारुबै, मुलाखत मिपावर टाकल्याबद्दल आभारी आहे. मुलाखत आवडली. माझा ज्योतिषावर दोन टक्के विश्वास आहे तेही उगाच रिस्क नको म्हणुन. -दिलीप बिरुटे

मुलाखत आवडली. लेखनशैली नेटकी आहे. अवांतर - शहाण्या माणसाने ज्योतिषशास्त्रापासून चार हात लांबच रहावे हे माझे या विषयासंबंधीचे मत आहे.

माहितीपूर्ण ग पारूबाई.
कसाबच्या फाशीची तारीख वर्तमानपत्रातून ४ महिने आधी सांगून सर्व जनतेसमोर स्वीकारलेले आव्हान
हे भाकित कोठे सापडेल जालावर?
आयुष्य सुखकर करण्याकरता ज्योतिषशास्त्राद्वारे मार्गदर्शन करणारे एक अग्रगण्य ज्योतिषी म्हणून पंडित संदीप अवचट आपल्याला सगळ्यांना माहितीचे आहेत. ‘पूर्वापार चालत आलेल्या अंधश्रद्धा आणि थोतांड अश्या प्रकारांना संपूर्णपणे फाटा देऊन नव्या युगात विज्ञानवादी दृष्टीकोनातून ज्योतिषाचे महत्व पटवणारे’ ही त्यांची खरी ओळख म्हणता येईल. काही दिवसापूर्वी सानफ्रान्सिस्को बे एरियामध्ये त्यांच्या ‘दिलखुलास राशी’ या कार्यक्रमामुळे त्यांची भेट झाली.

शेअर गुंतवणुकीला जुगार म्हणणे योग्य आहे का?

मार्मिक गोडसे ·

कलंत्री 06/03/2015 - 10:24
काळाच्या ओघात व्यावहारिक शहाणपण सुद्धा बदलले जात असते. पूर्वी, उत्तम शेती, मध्यम व्यापार आणि कनिष्ठ नोकरी. आता, उत्तम नोकरी, मध्यम व्यापार आणि कनिष्ठ शेती हेच खरे.

तुम्हा सर्वांच्या प्रतिसादांबद्दल धन्यवाद! सध्या शेतातली रोपटी अजुन उलटी कशी झाली नाहीत याचा विचार करतोय... लेख लिहिण्यामागे तसा उद्देश नक्किच नव्हता. आपल्या मराठी लोकांचा शेअर गुंतवणूक/व्यवसायाकडे बघण्याचा दृष्टिकोन हा पूर्वग्रहदूषित असतो, ह्या व्यवसायबद्दल आदराची भावना फारच कमी असते.. एखाद्या समारंभात माझ्या बाबांची ओळख फक्त नाव व नाते इतकीच करुन दिली जाते, समोरच्याने काय करतात विचारल्यास जवळचे नातेवाईक काढता पाय घेतात. बाबांनाच आपण काय व्यवसाय करतो हे सांगावे लागते.बर्‍याचदा समोरच्याची प्रतिक्रीया ही लेखातील मित्रासारखीच असते. शेअर गुंतवणूकीला जुगार समजू नये हाच माझा लेख लिहिण्यामागे उद्देश होता.

असंका 10/03/2015 - 17:18
टायटल वरून काहीच अंदाज लागत नव्हता आत काय असेल त्याबद्दल....किंबहुना नेहमीचेच वाद असतील असं वाटलेलं. पण लेख अगदीच नाविन्यपुर्ण निघाला....जरा वेगळं टायटल द्यायचा विचार करा ही विनंती...

मित्रहो 25/06/2015 - 15:55
ठराविक मुदतीसाठी गुंतवणुक करुन नफा मिळवणे ठीक. मग डेली ट्रेडींगचे काय? कुठल्याच कंपनीचे भवितव्य एका दिवसात तेवढे बदलत नाही जेवढे त्या कंपनीचे शेअर्स चढतात किंवा उतरतात. त्याला जुगारच म्हणावे असे नाही पण तो काही फार विचारपूर्वक केलेला व्यवहार असतो असेही नाही.

बोका-ए-आझम 27/06/2015 - 19:23
जुगार हा झीरो सम गेम आहे. जेव्हा एकजण जिंकतो तेव्हा बाकीचे हरतातच. शेअर बाजारात तसं नाहीये. तो पाॅझिटिव्ह सम गेम आहे. जेव्हा मार्केट वर जाते, तेव्हा सगळ्यांना फायदा होतो. जेव्हा ते खाली जातं तेव्हा काही जणांचा फायदा होतो व लकाही जणांचा तोटा. पण ज्यांचा तोटा होतो तो ज्यांचा फायदा होतो त्यांच्यामुळे होतो असं मुळीच नाही. एवढं सांगूनही समोरच्याला नाही समजलं किंवा तो नको ते वाद घालत बसला तर त्याला ' ये जिंदगी है एक जुआ ' हे गाणं ऐकवा. काय बिशाद त्याची माधुरी दीक्षितचं न ऐकायची!;)

बोका-ए-आझम 27/06/2015 - 19:23
जुगार हा झीरो सम गेम आहे. जेव्हा एकजण जिंकतो तेव्हा बाकीचे हरतातच. शेअर बाजारात तसं नाहीये. तो पाॅझिटिव्ह सम गेम आहे. जेव्हा मार्केट वर जाते, तेव्हा सगळ्यांना फायदा होतो. जेव्हा ते खाली जातं तेव्हा काही जणांचा फायदा होतो व लकाही जणांचा तोटा. पण ज्यांचा तोटा होतो तो ज्यांचा फायदा होतो त्यांच्यामुळे होतो असं मुळीच नाही. एवढं सांगूनही समोरच्याला नाही समजलं किंवा तो नको ते वाद घालत बसला तर त्याला ' ये जिंदगी है एक जुआ ' हे गाणं ऐकवा. काय बिशाद त्याची माधुरी दीक्षितचं न ऐकायची!;)

In reply to by बोका-ए-आझम

बेकार तरुण 30/06/2015 - 09:06
तुमची समजुन चुकीची आहे शेअर मार्केट हाहि झीरो सम गेमच आहे, ईतर कोणत्याहि खेळाप्रमाणेच

गवि 29/06/2015 - 14:10
शेती किंवा शेअरबाजार हे दोन्हीही इटसेल्फ जुगार नसून ते कोणत्या मार्गाने वापरले (किंवा तिथे कोणत्या विचाराने व्यवहार केले) यावर जुगार ठरतो. हे फक्त शेती किंवा शेअरबाजारालाच लागू नाही. जुगार ही प्रवृत्ती आहे. कोणत्या जिलबीवर माशी बसेल यावरुनही जुगार खेळता येतो. एकूण सारासार विचार, अभ्यास यांचे श्रम न घेता निव्वळ नशिबावर हवाला ठेवून किंवा आंधळेपणाने कोणाचेतरी ऐकून व्यवहार करणे म्हणजे जुगार. याठिकाणी आपण असं पाहू की शेती आहे.. त्यात अनुभवाने, ज्ञान वापरुन, मौसमानुसार, जमिनीच्या प्रकारानुसार, योग्य खतं घालत इ इ अशा पद्धतीने लागवड करणं आणि त्यातून शेवटी फायदा/तोटा काहीतरी होणं यात जुगार नाही. पण एमू पाळल्याने एका लाखाचे दोन वर्षात वीस लाख होतील असं कुठूनतरी ऐकून.. एमूशेतीच्या जगातल्या इतर सिनारिओचा अभ्यास न करता, त्यांची स्थिती काय आहे ते न पाहता, एमूचं मांस दावा केल्याप्रमाणे खरंच उत्तम आहे की वातड आणि बेचव आहे, त्याला खरंच फाईव्हस्टार हॉटेलांत मागणी आहे का? एमूच्या अंड्याचे काय बनवतात? ती कोण विकत घेईल? या कशाचाही अभ्यास न करता.. त्याच शेतीत एमूशेती करण्यासाठी डायरेक्ट पाच लाखाचे एमू खरेदी करुन आणणं हा जुगार. त्याचप्रमाणे जिल्बीभूषण टायर्स या कंपनीचे शेअर उचला, मालामाल व्हाल, रात्रीत कोट्याधीश व्हाल असं कुठेतरी "ऐकून" तिथे पाच लाख "लावणे" हाही जुगार. क्रिकेट, खेळ, हवामानशास्त्र, हळदीचे भाव इ इ इ सर्व फिल्ड्समधे जुगार खेळता येतो. त्याचा फिल्डशी संबंध नसून विचारपद्धतीशी संबंध आहे.

सुबोध खरे 30/06/2015 - 09:45
श्रम न घेता निव्वळ नशिबावर हवाला ठेवून किंवा आंधळेपणाने कोणाचेतरी ऐकून व्यवहार करणे म्हणजे जुगार. शंभर नंबरी बात आणि नेमका प्रतिसाद. गवि शेठ. मान गये

याठिकाणी आपण असं पाहू की शेती आहे.. त्यात अनुभवाने, ज्ञान वापरुन, मौसमानुसार, जमिनीच्या प्रकारानुसार, योग्य खतं घालत इ इ अशा पद्धतीने लागवड करणं आणि त्यातून शेवटी फायदा/तोटा काहीतरी होणं यात जुगार नाही. लेखकाच्या मित्राच्या मते जुगार म्हणजे- मित्र : ज्यात एकतर भरपूर फायदा होतो अथवा पूर्णपणे नुकसान होते. येथे कमी तोटा होतो असे म्हटलेले नाही. मित्राचे म्हणणे खरे मानले, तर त्या लॉजिक प्रमाणे ६)नैसर्गिक आपत्ती किंवा आग लागल्यामुळे शेतीमालाचे १००% नुकसान होऊ शकते परंतू संकटाची चाहूल लागल्यास stop लॉस लावून शेअर्स विकून तोटा कमी करता येतो व १००% नुकसान टाळता येते. अशा वेळी शेती हा जुगारच ठरतो. भले शेतकरी जुगाराच्या भावनेतुन शेती करत नसला तरी. स्टॉप लॉस बद्दल लेखकाशी सहमत. तुलनात्मक लिखाण आवडले.

चौकटराजा 30/06/2015 - 10:43
ज्या ज्या कृति चा परिणाम होताना दोन परस्पर विरोधी उत्तरे घेऊन येण्याची शक्यता असते अशी प्रत्येक कृति जुगार असते.जीवन एक जुगार .

शेअर मार्केट व शेतीची तुलना आवडली शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक करण्यापेक्ष्या जागेत गुंतवणूक करणे जास्त सोपे नाही का निव्वळ कोणाचे एकूण एखाद्याने उपनगरात जागा विकत घेतली तरी काही वर्षात तिची किंमत वाढणार ती किती प्रमणात वाढणार ह्या साठी त्या जागेला भविष्यात येणारे महत्व काही वर्षांच्या त्या भागातील जागांचा वाढणारा दर ह्यावर नफ्याचे प्रमाण अवलंबून असते अगदी टोकाची परिस्थिती निर्माण झाल्याखेरीज जागांचे भाव पडत नाहीत तेव्हा ते अधिक सुरक्षित व सोयीहे नाही का म्हणजे निव्वळ ऐकीव माहितीवर सुद्धा जागेत गुंतवून नफ्याची खात्री देता येते.उद्द ठाणा डोंबिवली मुलुंड पुणे मुंबई बद्दल बोलूच नका गेल्या दहा वर्षात जागांचे वाढलेल्या किमती पहा ,

चौकटराजा 30/06/2015 - 18:25
प्रशांत महासागरात अचानक एक मोठे बेट वर आले तर जागांचे भाव एकदम कोसळतील. तात्पर्य कसलीही गुन्तवणूक सदाची फायदेशीर नसते. बदलत्या काळात शाळा व महाविद्यालयावरील गुन्तवणूक धोक्यात येणार हे नक्की.

In reply to by चौकटराजा

संदीप डांगे 01/07/2015 - 03:55
बदलत्या काळात शाळा व महाविद्यालयावरील गुन्तवणूक धोक्यात येणार हे नक्की. सहमत. २०३० च्या तरुणांची गत १९७५ च्या तरूणांसारखी होईल. (आठवा: नो वॅकन्सीचे बोर्ड, झिजणार्‍या चपला दाखवणार्‍या चित्रपटातल्या फ्रेम्स.)

सुधीर 01/07/2015 - 11:13
लेखकाच्या आणि प्रतिसादकर्त्यांच्या भावनांशी सहमत आहे. फक्त एवढेच की, शेती हा व्यवसाय आहे आणि फार कमी लोकांचा पूर्ण वेळ गुंतवणूक (इक्विटीमधली) हा व्यवसाय असतो. शेतीमधून सृजनतेचा जो आनंद शेतकर्‍याला मिळेल तो कदाचित गुंतवणूकीतून मिळणार नाही. शेती व्यवसाय करून सुद्धा शेतकर्‍याला इक्विटी अ‍ॅसेट क्लास मध्ये गुंतवणूक करता येऊ शकते. पण शेतकरीच काय, बराच शहरी मध्यम वर्ग इक्विटी अ‍ॅसेट क्लास पासून थोडा दूरच आहे. लोकांचा अजूनही गुंतवणूकीच्या पारंपारीक मार्गांवर जास्त विश्वास आहे. मग ते परंपरागत आलेली सोन्यातली गुंतवणूक असो वा जमीनीतली असो. २% जास्त मिळतायत म्हणून लोकं बुडीत जाऊ शकणार्‍या पतपेढी- क्रेडीट सोसायटीतल्या मुदत ठेवींवरची जोखीम स्विकारायला तयार असतात पण इक्विटी अ‍ॅसेट क्लासकडे जुगार म्हणून पाहतात. डायव्हर्सीफाईड इक्विटी अ‍ॅसेट क्लास छोट्या कालावधीत तोटा देऊ शकतो वा मुदत ठेवीपेक्षा कमी परतावा देऊ शकतो. पण दीर्घ कालावधीमध्ये तो मुदत ठेव, सोनं आणि प्रॉपर्टी इन्व्हेस्टमेंटपेक्षा अधिक परतावा "देऊही शकतो". अभ्यासाबरोबर अजून एक गोष्ट ध्यानात घ्यावी लागते ती म्हणजे इमोशनल बायसेस. कारण गुंतवणूक म्हटली की भावना आल्या. या भावनांच्या आहारी जाऊन कधी कधी आपण टाळता येण्याजोगी जोखिम घेत असतो. हे बायसेस कमी कसे करायचे याचा आभ्यास अलिकडच्या काळात विकसित होत आहे.

जिल्बीभूषण टायर्स या कंपनीचे शेअर उचला हा हा हा. अपोलो , एम.आर.एफ. , मिशलीन च्या लायनीत जिल्बीभूषण टायर्स ही गोड कल्पना करून बेफाम हसतो आहे ग.वी.

खटासि खट 05/07/2015 - 10:25
हाच संवाद पुन्हा एकदा बदलून पाहूयात. इथे बाबा हा उल्लेख या लेखात धागाकर्त्याचे बाबा म्हणून झालेला असल्याने तिथे नवं आणि या लेखाशी संबंध नसलेलं पात्रं घेऊयात. अर्थात धागाकर्ते वौयक्तिक घेणार नाहीत ही खात्री आहेच. रतन खत्री : जुगार म्हणजे काय ? साने गुरुजी : ज्यात एकतर भरपूर फायदा होतो अथवा पूर्णपणे नुकसान होते. रतन : तुम्ही कधी जुगार खेळला आहात ? साने गुरुजी : नाही. रतन : शेअर्समध्ये कधी पैसे गुंतविले आहेस ? साने गुरुजी : नाही. रतन : मग तुम्ही शेअर्सच्या ट्रेडिंगला जुगार म्हणून का हिणवता ? जुगार हा ही तितकाच लाभकारक धंदा आहे. साने गुरुजी : बर्‍याच लोकांनी जुगारामध्ये पैसे कमावलेत. काहींनी जुगारात नुकसान झाल्यामुळे आत्महत्याही केल्या आहेत असे ऐकले आहे. रतन : शेतीत, शेअर ट्रेडींगमधेही बर्‍याच लोकांनी पैसे कमावलेत व काहींनी शेतीत, शेअरट्रेडींगमधे नुकसान झाल्यामुळे आत्महत्याही केल्या आहेत असे मीही ऐकले आहे. साने गुरुजी : म्हणजे तुम्हाला नक्की काय म्हणायचे आहे? रतन : शेती व्यवसाय, शेअर ट्रेडिंग व जुगारामध्ये बरेच साम्य आहे. साने गुरुजी : ते कसे ? रतन : १) शेती करायला जमीन आवश्यक असते, शेअर ट्रेडिंगसाठी demat account आवश्यक असते तसंच जुगारासाठी कॅसिनो क्लबमधले सदस्यत्व, मटक्याच्या अड्ड्यावरची पत किंवा ऑनलाईन लॉटरीचं केंद्र यांची आवश्यकता असते. आणखी एक प्रकार म्हणजे घोड्याची रेस. यात रेसकोर्स वर बुकीकडे खातं किंवा पत असणे आवश्यक असतं. २) चांगले पिक येण्यासाठी शेताची योग्य ती मशागत करावी लागते , गुंतवणुकीतून चांगला लाभ मिळावा ह्यासाठी अगोदर गुंतवणुकीच्या संदर्भात सखोल अभ्यास करावा लागतो तसंच जुगारात कुठले आकडे येऊन गेलेले आहेत, कुठले अद्याप आलेले नाहीत, कुठला पॅटर्न चालू आहे यावरून आता कुठला आकडा फुटण्याची शक्यता आहे याची शक्यता गृहीत धरता येते. घोड्याच्या रेसमधेही घोड्यांचा अभ्यास, कुठल्या घोड्याने कुठल्या रेस किती जिंकल्या याचा चार्ट, जॉकीचा इतिहास याचा अभ्यास करावा लागतो. ३) कोणतेही पिक घेण्यापूर्वी त्या पिकाला पोषक असे हवामान बघितले जाते,त्यानंतर योग्य त्या जातीचे बी निवडले जाते. जास्त उतारा देणारे बियाणे थोडे महाग घ्यावे लागते, चांगला परतावा देणार्‍या कंपन्यांचे शेअर थोडे महाग घ्यावे लागतात. चांगल्या कंपन्या निवडणे हे अभ्यासाने व अनुभवाने ठरवता येते. अगदी तसच मटका, जुगार, सट्टा आणि रेस याबाबतीतही आहे. ऑनलाईन लॉटरी, परराज्यातल्या शेवटच्या अंकाच्या लॉट-या, मटका आणि रेस यातून अनुभवाने चांगला पर्याय निवडता येतो. यातला चांगला पर्याय हा थोडा महाग असतो पण त्यात परतावा जास्त मिळू शकतो. ४) पिकांची वाढ योग्य प्रकारे होण्यासाठी निंदनी ,खुरपणी, खत व रोगापासून बचावासाठी किटकनाशक फवारणी वेळोवेळी करावी लागते. आपल्या portfolio मध्ये एखाद्या कंपनीमुळे गुंतवणुकीचे गणित चुकत असेल तर योग्य तो निर्णय घेऊन गुंतवणुकीचा तोल सांभाळण्यासाठी वेळोवेळी portfolio कडे लक्ष द्यावे लागते. आपल्या चार्टमधे न आलेल्या आकड्यांचे गणित चुकत असल्यास पॅटर्न बदलावा लागतो. उदाहरणार्थ चार्टमधे शंकरपाळी पॅटर्न अंदाज चुकवत असाल्यास करंजीहा पॅटर्न लागू करून पहावा लागतो. काही आकडे कमी करावे लागतात. रेसमधेही हे लागू पडतंच. ५)शेतमालाचे भाव जसे मागणी व पुरवठा ह्यावर अवलंबून असतात, शेअर्सचे भावही मागणी पुरवठ्यावर अवलंबून असतात. असंच ज्या आकड्याला जास्त मागणी असेल त्यावर आकडा फुटण्याचे गणित अवलंबून असते. लॉटरीच्या धंद्यात एखाद्या आकड्यावर प्रमाणाच्या बाहेर बुकींग असेल तर त्या दिवशी लॉट-यांची तिकीटं कमी छापली जातात. पण मटक्याच्या बाबतीत तुम्हाला हवा तो आकडा मिळतोच मिळतो. ६) अप्रमाणित बियाणे. खते व कीटकनाशके वापरल्यामुळे जसे शेतीचे नुकसान होऊ शकते त्याप्रमाणे penny stock मध्ये गुंतवणूक केल्यामुळे नुकसान होऊ शकते, फक्त पंटर्सच्या टीप्सवर विश्वास ठेवून स्वत:चा अभ्यास केला नाही तर नुकसान होते. ७) सरकारच्या आयात-निर्यात धोरणामुळे शेतमालाच्या भावावर परिणाम होऊ शकतो तसाच कंपन्यांच्या नफातोट्या वरही होऊन कंपन्यांच्या शेअर्सच्या भावावरही होऊ शकतो. सरकारच्या कायदेविषयक शिथिलतेच्या धोरणात बदल झाले की धंद्यावर परिणाम होऊ शकतो. सरकारची धोरणे आणि पाऊस यांचं सांगता येत नाही. इत्यादी इत्यादी... मित्रा आता तूच सांग जुगार कोण खेळतोय ते ?

In reply to by खटासि खट

खटासि खट 05/07/2015 - 10:34
सदर प्रतिसाद टंकताना याआधीचा प्रतिसाद उमटलेला आहे असा विश्वास होता, तो पेज रिफ्रेश केल्याने धुळीस मिळालेला आहे. काय नव्हतं त्या प्रतिसादात. नीळकंठराव कल्याणींच्या पिताश्रींनी त्यांना थोबाडीत मारून सट्टा आणि व्यवसाय यातला फरक समजावून सांगितलेला सीन होता, ती शिकवण लक्षात ठेवून यशस्वी झालेला एक जिद्दी तरूण होता. सट्टा आणि धोका यातला फरक समजावणारा उपदेश होता. स्वत: भाव ठरवता येत नसतानाही आणि पावसाच्या लहरीच्या धोक्यावर अवलंबून असतानाहि शेती हा व्यवसाय करणा-यांचा गौरव होता. शेती आणि शेअर ट्रेडींग यातल्या आवश्यकतेचा उहापोह होता, गरज निर्माण करून भाव खाली वर करून फायदा काढण्यातलं तंत्र समजावून सांगणारा बोध होता. पण पावसाप्रमाणेच नेटमधे येणारा व्यत्यय हा प्रतिसाद खाऊन गेला आणि एका सभ्य प्रतिसादाची नावावर लागू पाहणारी नोंद जालीय इतिहासातून नाहीशी झाली. आता आहेत पुन्हा मेलबॉक्स आणि व्यनी मधे येणा-या शिव्याशापांची बरसात... भाग्य कोणास चुकलें हो ?

लॉटरीच्या धंद्यात एखाद्या आकड्यावर प्रमाणाच्या बाहेर बुकींग असेल तर त्या दिवशी लॉट-यांची तिकीटं कमी छापली जातात. पण लॉटरीची तिकीटं अगोदरच छापलेली असतात ना? काही कळलं नाही बुवा. लेख नीट वाचावा लागेल.

In reply to by ऋतुराज चित्रे

चौकटराजा 05/07/2015 - 13:29
कोणता तरी आकडा यावाच लागतो तो कोणता आणायाचा यात काही पण काहीशीच शिस्त असते. तो आकडा ठरला की त्याची तिकिटे त्या तारखेची कमी छापण्याचा डाव खेळ्ला जातो.

मला असं म्हणायचे आहे की, जर का लॉटरीची तिकिटे बाजारात नसतील तर तिकिटाचा ठराविक नंबर अगोदर बूक कसा करता येतो? तुम्ही म्हणता तसे छापण्या अगोदर बुकिंगची सुविधा असेल तर त्या तारखेची तिकिटे कमी छापल्याने बक्षिसाची रक्कम वाटून हातात कमी रक्कम मिळेल.

In reply to by ऋतुराज चित्रे

खटासि खट 05/07/2015 - 18:25
कुख्यात समजल्या गेलेल्या धंद्यांविषयी आपण बिनदिक्कतपणे आमच्याकडे चौकशी करावी. या क्षेत्राकडे मराठी लोकांचा पाहण्य़ाचा दृष्टीकोण पूर्वग्रहदुषित असल्याने फारशी माहीती नाही. यातले जे जाणकार असतात त्यांना दहा वाजले की तिकीटाचे वेध लागतात. कारण समजा ९ हा आकडा अनेक दिवस उघडलेला नसेल तर त्यावर या मंडळींचे रोज दुप्पट या न्यायाने पन्नासाव्या दिवशी भरपूर पैसे लागलेले असतात. म्हणजे तितक्या तिकीटांची आवश्यकता त्यांना असते. ते या नंबरची तिकीटे राखून ठेवायला विक्रेत्याला सांगत असतात. त्या वाढीव गरजेप्रमाणे तिकीटे मिळतातही. पण ज्या दिवशी हा अंक उघडतो त्या दिवशी तिकीटांचा तुटवडा असतो. मणिपूर सारख्या राज्यातून येणारी तिकीटे ही प्रत्यक्षात गुप्ता, चावला आदी आडनावाची माणसेच छापत असतात, फक्त मणिपूर सरकारला त्या लॉटरीपोटी काही पैसे दिलेले असतात.

आता तुमच्याच उदाहरणाचा आधार घेतो, समजा ९ हा आकडा अनेक दिवस उघडलेला नसेल तर त्यावर या मंडळींचे रोज दुप्पट या न्यायाने पन्नासाव्या दिवशी भरपूर पैसे लागलेले असतात ओ.के. म्हणजे तितक्या तिकीटांची आवश्यकता त्यांना असते. ते या नंबरची तिकीटे राखून ठेवायला विक्रेत्याला सांगत असतात. त्या वाढीव गरजेप्रमाणे तिकीटे मिळतातही. आपण म्हणता त्याप्रमाणे ९ ह्या आकड्याची मागणी समजा १०,००० आहे तिकिटे राखून ठेवायला विक्रेत्याला सांगितल्यामुळे वाढीव गरजेप्रमाणे तिकिटे मिळतातही. पुढे आपण म्हणता, पण ज्या दिवशी हा अंक उघडतो त्या दिवशी तिकीटांचा तुटवडा असतो. ज्यांनी तिकिटे बूक केली,ती मिळालीही मग बाजारात तिकिटांच्या तुटवड्याने काय फरक पडतो?

In reply to by ऋतुराज चित्रे

खटासि खट 06/07/2015 - 06:34
तुम्हाला आधीच ब्वॉर म्हटलं होतं, तुम्ही पुन्हा समजावून घेण्याचा स्टॅण्ड घेतला. तर आता पुन्हा ब्वॉर !!

In reply to by अरवीन्द नरहर जोशि.

श्रीगुरुजी 06/07/2015 - 13:55
हा जर कायमच हरणारा जुगार आहे तर हा जुगार खेळणारे अजून किती वर्षे या जुगारात पैसे घालविणार आहेत? जुगार खेळणारा कायम हरत गेला तर एक वेळ अशी येते की त्याचा खिसा रिकामा होतो व त्यानंतर तो पुढे जुगार खेळू शकत नाही. परंतु हा जुगार खेळणारे दरवर्षी हरूनसुद्धा दरवर्षी नव्याने जुगार खेळायला पैसे आणतात तरी कोठून? द्रौपदीच्या अक्षय थाळीसारखी यांना अक्षय भरलेला खिसा लाभलेला दिसतोय.

खरच सांगतो, मला तुमच्या 'ब्वॉर' चा अर्थ अजुनही कळालेला नाही. कुख्यात समजल्या गेलेल्या धंद्यांविषयी आपण बिनदिक्कतपणे आमच्याकडे चौकशी करावी. आपल्यामुळे लॉटरीत हमखास फायदा होउ शकतो हे पटले. एकदा हाही अनुभव घ्यावा असे वाटले,परंतू मला तुमच्या प्रतिसादात वरील दोन वाक्ये ( तिकीटे बूक व तिकिटांचा तुडवडा) परस्परविरोधी वाटली व धोका वाटला. उद्या मला ठरावीक नंबरची तिकीटे नाही मिळाली आणि माझे नुकसान झाले, तर लॉटरी माझ्याकरता जुगार ठरू शकेल, म्हणुन मी आपल्याकडे चौकशी करतो. आपला मठ्ठ शिष्य.

In reply to by ऋतुराज चित्रे

खटासि खट 06/07/2015 - 13:58
उद्या अपहरणाचा धंदा यश देणारा धंदा आहे असं एखाद्याने पटवून देणा-या शैलीत सांगितलं तर त्या धंद्यात उडी घ्यावी का ? बाकी आशयनिर्मूलनापरांत रुपके,दृष्टांत, दाखले, उदाहरणे यावर खल होणे हे मानवी विकासाचं लक्षण आहे.

चांगल्या लेखावर मटक्याची कच्ची वीट लावण्याच्या आपल्या भुसभुशीत प्रयत्नांची कीव आली. काय तो मराठी बाणा आणला होता, म्हणे कुख्यात समजल्या गेलेल्या धंद्यांविषयी आपण बिनदिक्कतपणे आमच्याकडे चौकशी करावी. गिर्‍हाईक बघितल्यावर एकदम खिडकी बंद? शेवटी खटासी खेटला मठ्ठ

arunjoshi123 07/07/2015 - 15:07
कृती: उद्देशांच्या आधारावर मानवी कृतींचे खालील प्रकारे विभाजन करता येईल - १. गुंतवणूक २. अन्य मानवी भावना थेट पूर्ण करावयासाठी केलेली कृती ३. वरील दोहोंचा ओव्हरलॅप असलेली कृती ================================================================================ रियल रिटर्नः प्रथमतः गुंतवणूक करताना आपल्याकडे नक्की कशात गुंतवणूक करायची याबद्दल अनेक पर्याय उपलब्ध असतात. इतके मूल्य इथे गुंतविले तर इतका परतावा असं जे गणित मांडतात, अंदाज घेतात त्याला नॉमिनल रिटर्न म्हणतात. आपल्याला खरा रस रियल रिटर्न मधे असतो. रियल रिटर्न = नॉमिनल रिटर्न - रेट ऑफ इन्फ्लेशन गुंतवणूकीच्या कालाअंती प्रत्येकच माणसासाठी, किमान एका देशात, महागाई तीच असणार आहे. तेव्हा जिकडे नॉमिनल रिटर्न जास्त तिकडे गुंतवणूक करावी असे वाटणे साहजिक आहे. काही गुंतवणूकींत "सुनिश्चित करारबद्ध" नॉमिनल रिटर्न असते. उदा. फिक्स्ड डिपॉझीट, बॉंड्स,इ. पण प्रत्येकच गुंतवणूकीत "सुनिश्चित करारबद्ध" नॉमिनल रिटर्न नसते. उदा. कोणताही व्यवसाय, शेती, स्टॉक मार्केट, इ. आर्थिक परिस्थिती वा समोरच्याची नियत वेगळी निघाल्याने, व्यवसायाबद्दलचे वा आर्थिक वातावरणाबद्दलचे अंदाज चुकीचे निघाल्याने, सुनिश्चित करार असो वा नसो, प्रत्येक गुंतवणूकीत परताव्याची काय अपेक्षा केली होती आणि प्रत्यक्ष काय परतावा मिळाला यात तफावत निघते. ======================================================================= रिस्कः ही तफावत डोळ्यासमोर ठेऊन सर्वसाधारणपणे मागचा इतिहास पाहता प्रत्येक प्रकारच्या गुंतवणूकीत किती परतावा मिळतो याचा एक आडाखा बांधता येतो. जेव्हा "जवळजवळ प्रत्येक" परतावा या अपेक्षित परताव्याच्या आसपासच मिळतो तेव्हा अशा गुंतवणूकींना लो रिस्क गुंतवणूका म्हणतात. उदा. बाँड्स. कोणता परतावा अपेक्षित परताव्यापासून किती दूर असेल जास्त अनिश्चित असते तेव्हा अशा गुंतवणूकींना हाय रिस्क गुंतवणूका म्हणतात. उदा. शेअर्स. आपण जर मराठी फॉर रिस्क वा हिंदी फॉर रिस्क असे गुगलाल, तर धोका वा जोखिम असे शब्दार्थ मिळतील. वास्तविक हा शब्द संख्याशास्त्र (statistics) आणि अर्थशास्त्र या दोहोंची समाईक संज्ञा आहे. (इंग्रजीत संशोधन जास्त आणि संज्ञांची वाणवा हा एक दुष्ट प्रकार आहे. ते एक असो.) या शब्दाचा सामान्य अर्थ धोका असा घेतला तर अभिप्रेत धन बाजू त्याने कन्व्हे होत नाही. शिवाय "मोअर रिस्क मोअर रिटर्न" अशी एक म्हण कुप्रसिद्ध झाली आहे. ती रिस्क शब्दाची ॠण बाजू लपवते. रिस्क म्हणजे परताव्यांचे standard deviation from mean return. म्हणून रिस्क शब्दाला गुंतवणूकीच्या संदर्भात अनिश्चिती म्हणावे, धोका वैगेरे नाही. ================================================================ रिस्क- रिटर्न कॉम्बो: ज्यात परतावा मिळतो त्या प्रत्येकच प्रकाराला गुंतवणूक म्हटले तर प्रत्येक प्रकारात वेगवेगळ्या रिस्क आहेत. श्रीमंताघरी जन्म घेणे, वारश्याने संपत्ती मिळणे - ० गुंतवणूक , अनंत टक्के परतावा, ० रिस्क गिफ्ट मिळणे, श्रीमंत देशात जन्म - तेच करंट अकाउंट - ० परतावा, नगण्य रिस्क सेविंग अकाउंट - ३-४% परतावा, जुजबी रिस्क जी-सेक, बँक डिपॉझिट, बाँड्स - थोडी जास्त रिस्क, जास्त परतावा शिक्षण, नोकरी - असेच पुढे स्टॉक्स - अजून जास्त रिस्क, जास्त परतावा व्यवसाय, ट्रेडींग (चालू करणे,), शेती- अजून जास्त रिस्क, जास्त परतावा जुगार - अजून जास्त रिस्क, जास्त परतावा (आपल्यामते वरील क्रम वेगळा असू शकतो.) लोक नोकरी सोडून व्यवसाय करताना "रिस्क घेतली (मागे कधी नव्हती)" म्हणतात, पण ते नीट मांडले तर 'व्यवसाय सेटल होईपर्यंत' उपजिविकेतील "रिस्क वाढवली" असे म्हणायला पाहिजे कारण नोकरीत देखिल रिस्क होतीच. (जास्त परतावा नि कमी रिस्क अशा गुंतवणूका बाजारात का नसतात हे नंतर कधीतरी.) =========================================================================== जुगारची रिस्कः प्रत्येक गुंतवणूकीत काय काम करावे, काय करू नये याबद्दलचा एक expertise असतो. जे लोक हे सगळे कंट्रोलेबल पॅरामीटर्स व्यवस्थित हाताळतात त्यांना नशीबाने साथ दिली तर अर्थातच त्यांना जास्त परतावा मिळेल. आता कोणत्या गुंतवणूकीच्या कृतीस जुगार ठरवावे, किती जास्त रिस्क घेणे जुगारी मानावे याची थ्रेशोल्ड कशी ठरवावी? एक उदाहरण घेऊ. मटका लावताना, दहापैकी नऊ आकड्यांवर ० शून्य रुपये नि एका (बसलेल्या) आकड्यावर ८ रुपये याप्रमाणे, = (9/10)*0+(1/10)*8 = 0.8, म्हणजे सरासरी परतावाचा -२०% आहे. आकडा लागला तर ७००% परतावा आहे. नाही लागला तर ०%. इथे सर्वसाधारणपणे जे व्हायचे तेच होत गेले तर गुंतवणूकदार नेहमी आपली २०% गुंतवणूक हरवून बसेल. मग अशी गुंतवणूक करावी का? या गुंतवणूकीचे स्वरुप पहा. गुंतवणूक १ रुपया, सरासरी परतावा उणे २० पैसे, रिस्क २ रु ५३ पैसे !!! जिथे सरासरी परतावाच ऋण आहे तिथे केवळ नशीब आपल्या बाजूने चालेल असा आडाखा बांधणे म्हणजे जुगार असे म्हणता येईल. ============================================================== शेती नि शेअर बाजारः शेती आणि शेअर बाजार यांच्यातील गुंतवणूका नि त्यांचे उपप्रकार यांच्यात भिन्न भिन्न प्रकारचे परतावे नि रिस्क असू शकतात. दोन भिन्न गुंतवणुकांत रिस्क भिन्न असेल तर पैकी एक जुगार ठरत नाही. शिवाय गुंतवणूक ही सहसा १००% आर्थिक नसते, नसावी. माणसाला कशाचे ज्ञान आहे, कशात रुचि आहे, कशाचा तो नंतर तज्ञ बनू शकतो, त्याच्या भावना काय आहेत, इ इ गुंतवणूकीत देखिल महत्त्वाचे असायला पाहिजे/असू शकते. उदा. शेती कशी करावी, ती करायच्या पद्धतीत काय बदल करावेत याबद्दल माझी चार मते असली तरी अ‍ॅज सच शेती या विषयाबद्दल माझ्या व्यक्तिगत भावना पावित्र्यवाचक आहेत. याशिवाय शेतीविषयक भावना पावित्र्यवाचक असणे हे मागासलेपणाचे आहे असे मानणे मी अनिष्ट नि अनावश्यक मानतो. शेअर मार्केट बद्दल देखिल लोकांचे अनेक गैरसमज आहेत, निगेटीव भावना आहेत. मूलतः शेअर बाजाराला जुगार यासाठी म्हणू नये कि शेअरची स्वतःचे काही मूल्य नसते. जे मूल्य असते ते कंपनीच्या व्यवसायाचे असते. एका विशिष्ट कंपनीच्या नावे चाललेल्या व्यवसायाचे वा व्यवसायांचे दिलेल्या वेळी काय मूल्य आहे याबद्दल प्रत्येकाची भावना वेगवेगळी असते, अंदाज वेगवेगळा असतो. त्याशिवाय, हे मूल्य काळामानाप्रमाणे कसे बदलेल याबद्दलही प्रत्येक व्यक्तिची भावना वेगवेगळी असू शकते. हे लोक वेगवेगळ्या फोरमवर एकत्र येतात तेव्हा शेअरच्या किमती (न बोलता?) निगोशिएट करतात नि किंमत बदलत राहते. व्यवसायाची मालकी असंबंधित लोकांनी शेअर केली नि ती विकली वा विकत घेतली तर तो जुगार कसा? शेअर बाजार ही अर्थव्यवस्थेची (पर्यायाने देशाची) मंदिरे असतात. नि सहसा पवित्र (शेअर बाजार) नि अपवित्र (जुगार) शब्द एकत्र करू नयेत. शेअर बाजार नसते तर... तर ...अर्थकारणात, समाजकारणाचा दृष्टांत देऊन, समाजसुधारणच झाल्या नसत्या तर म्हटल्यासारखे आहे. जर शेती नसल्याने लोक भुकेने मरतील असे मानले तर शेअर मार्केट नसल्याने जे व्यवसाय छोटे मोठे नाहीत वा जे व्यवसाय सरकार करू शकत नाहीत ते झालेच नसते असे मानावयास स्थान आहे. अर्थातच सगळं काही इतकं आदर्श नसतं. आता काही शेतकरी शेतीत वा स्टॉक ट्रेडर्स शेअर बाजारात जुगार खेळत असतातच. त्यांचं रिस्क रिटर्न समीकरण भलतंसलतं असतं (त्यांच्यामते त्यांचा अभ्यास असतो), पण म्हणून ही क्ष्रेत्रेच (शेती वा शेअर बाजार ही क्षेत्रे) मानवतेच्या पातळीवर जुगार ठरत नाहीत. कमी ज्ञान असल्यामुळे देखिल शेतीत वा शेअर बाजारात कोण्या माणसाची रिस्क वाढेल. पण या प्रकाराला देखिल व्यक्तिशः मी जुगार म्हणणे टाळेन. म्हणून शेअर बाजार वा शेती यांच्यातील गुंतवणूकीच्या, परताव्यांच्या आणि अनिश्चितांची जाण असेल तर तिकडे आरामात गुंतवणूक करावी. =================================================================== जुगार - एक मानवी मूल्यः उरता उरतो तो प्रश्न म्हणजे शुद्ध जुगार (हे ही सब्जेक्टीव आहे तरी एक अनिष्ट गुंतवणूकीची पद्धत म्हणून स्वीकारली तरी) एक अनिष्ट मानवी मूल्य आहे काय? याचं उत्तर देखिल काळंपांढरं नाही. कधीकधी मला जो जुगार वाटत नाही तो पुढच्याला वाटतो. म्हणजे मी म्हणतो रिस्क कमी आहे नि पुढचा मानतो कि ती जास्त आहे. अशावेळी मी स्वतःला जुगारी नव्हे तर धाडसी मानत असेन. जुगारात मनोरंजन मूल्य आहेच. आपण समृद्ध असताना समोरच्याची आर्थिक काळजी घेऊन खेळलेला जुगार फार तामसिक मानता येणार नाही. जुगार माणूस आपल्या अन्य मूल्यांशी देखिल जोडू शकतो. उदाहरणार्थ कोणी केवळ भारतीय क्रिकेट टीमवर बेट लावतो, पाकिस्तानची टिम किती का सशक्त दिसेना. देशाभिमान! वा वाटते कि दरवेळी मलाच कळते कि कोणती टीम फॉर्मात आहे. मग त्या टीमवर (पर्यायाने स्वतःच्या अभ्यासावर, आत्मविश्वासावर) बेट लावतो. कुठे कोणी मी केवळ आणि केवळ माझे नशीब एका विशिष्ट संदर्भात किती जोरदार हेच आजमावत असतो, दैव इ अभ्यासत असतो. इथे सर्वत्र जुगार हे अन्य मानवी मूल्य प्रकट करावयाचे साधन आहे. म्हणून कोण्या कृतीस जुगार म्हणाताना त्यात किती ऋणभाव लिंपायचा आहे यात तारतम्य बाळगावे.

In reply to by arunjoshi123

खटासि खट 08/07/2015 - 08:55
सुंदर विवेचन. या आधी दिलेला एक प्रतिसाद वाहून गेला. नंतर पुन्हा टंकण्याचा आळस आला. पण हा प्रतिसाद पाहून थोडं कष्ट घ्यायला हरकत नाही असं वाटण्याइतपत उत्साह आला. नव्याने लिहीण्याचा प्रयत्न करतो.

In reply to by खटासि खट

खटासि खट 08/07/2015 - 09:17
शेतीशी शेअरमार्केटची तुलना अनाठायी वाटली. (इतरांचं मत वेगळं असू शकतं). तुलना करायचीच म्हटली तर कशाचीही करता येते असं वाटलं. वरच्या माझ्या प्रतिसादाचं मूल्य त्यापेक्षा जास्त नाही. शेअर बाजाराकडे गुंतवणूक म्हणून पाहण्यात गैर काही नाही. जर ट्रेडींग हा ऑप्शन निवडला तर मग त्यात आणि जुगारात कायदेशीर आणि बेकायदेशीर इतकाच फरक राहील. जसे शेअर बाजाराचे पायदे तोटे सांगता येतात तसे अट्टल जुगारी जुगाराचेही सांगू शकतो. रेसप्रमाणे शेअर बाजार सुद्धा बेभरवशाचा असू शकतो. पंटर्सच्या टीप्स वर पैसे गुंतवणे आणि ट्रेडींग करणे हे जुआगारासारखेच आहे. शेअर बाजारात कंपन्यांकडचे सगळे शेअर्स नसतात. त्यात रोख आणि वायदे असे दोन प्रकार आहेत. रोख म्हणजे माझ्याकडे एखाद्या कंपनीचे अमूक शेअर्स आहेत ते मी विकायला काढले तर जितके शेअर्स विक्रीला उपलब्ध आहेत त्यांचा व्यवहार होणे. हा झाला नेहमीचा व्यवहार. पण एखाद्या कंपनीच्या शेअरबाजाराला मागणी आहे म्हणून सर्वच्या सर्व ग्राहकांना रेल्वेच्या वेटींग लिस्टप्रमाणे तिकीटे देणे हा झाला वायदे बाजार. एखाद्या कंपनीचे सर्वच शेअर्स काही शेअर्स बाजारात विक्रीला असतात असं नाही. जास्तीत जास्त दहा टक्के हा सर्वसाधारण आकड समजू. म्हणजे ९०% शेअर्स हे कंपनीच्या संचालक मंडळ, विविध प्रकारचे गुंतवणूकदार आणि किरकोळ यांच्याकडे असतात. ते शेअर बाजारात नसतात. पण या दहा टक्क्यांच्या जोरावर शंभर टक्के शेअर्सचा वायदा करायचा आणि जसजसे शेअर्स उपलब्ध होतील तसतसे तुम्हाला देण्यात येतील हा त्यात व्यवहार होत असेल तर तो वायदा गट. यात गंमत अशी आहे की हे शेअर्स हातात न पडताच वायद्याच्या जोरावर त्यांची विक्रीही होते. म्हणजे प्रत्यक्ष शेअर्सचं ट्रेडींग न होता खरेदी विक्री होऊन मधल्या मधे मार्जिन काढलं जातं. प्रत्यक्षात त्या शेअर्सची मालकी काही गुंतवणूकदाराच्या हाती आलेली नसते. या प्रकारच्या व्यवहारात गुंतवणूक हे उदीष्ट नसतं. याला सट्टाच म्हणायला हवं. थोडक्यात कृत्रिम गरज किंवा भीती निर्माण करून किंमतीतल्या चढ उतारांमधे लाभ करून घेणे याला ट्रेडींग म्हणतात. यात जुगारापेक्षा काय वेगळं असतं ? कंपनीच्या कार्यक्षमता, पत आणि भांडवलाप्रमाणे शेअर्सची किंमत वाढत जाणे हे ट्रेडींग मधे कुठेही अपेक्षित नसतं. सुरक्षित गुंतवणूकदार मात्र फायद्यात राहणा-या कंपनीत दीर्घ कालावधीसाठी गुंतवणूक करतो. अर्थात तरीही त्यात धोका हा असतोच. कारण कंपनीची पक्षी धंद्याची वाटचाल ही अनेक घटकांवर अवलंबून असते. त्यात प्रतिकूल बदल झाले तर फटका बसू शकतो. या प्रकारच्या धंद्याची तुलना शेतीशी केलेली आवडेल. डोळसपणे जो धोका पत्करला जाऊ शकतो तो इथे अपेक्षित आहे. शेती आणि ज्ञानदान यांच्याकडे पाहण्याचा पारंपारिक दृष्टीकोण आता बदलत चालला आहे. पूर्वी हे क्षेत्रं पवित्र या अर्थानेच पाहीलं जात असे. त्यामुळं नफा तोटा या तत्त्त्वाला फाटाच होता. म्हणूनच बहुसंख्य समाजाला व्यापारात गती नाही. त्यातच शेती मधे आपल्या उत्पादनाचा भाव आपण ठरवू शकत नाही ही गोची आहे. म्हणूनच नवीन पिढी शेती करायला नाखूष असते. शेतकरी नवरा नको ग बाई म्हणून जवळपास बहुतेक मराठी वृत्तपत्रांमधे विशेष लेख आलेत. कारण मुलींना आपलं होणारं मूल हे बेभरवशाच्या धंद्याच्या जोरावर मोठं व्हावं असं वाटत नाही. एखाद्या पिकाला भाव मिळणे आणि नेमकं त्याच वेळी ते पीक आपल्या शेतात तोडणीसाठी उपलब्ध असणे हा योग नेहमी येत नाही म्हणूनच शेतकरी उस उत्पादनाकडे वळू लागले. सर्वांनी साखरच पिकवली तर मग लोकांनी खायचं काय हा प्रश्न जरी रास्त असला तरी शेतक-याला फायदा होत नसेल तर त्याने तो धंदा का करावा हा प्रश्नही आहे. पूर्वीचा लोकांचा दृष्टीकोण आता बदलतो आहे. यावर उपाय करण्यासारखे आहेत. पण फायद्यात चालणारी शेती हा स्वतंत्र लेखाचा विषय आहे. नागरीकांच्या समस्या सुटल्या तर राजकारण्यांच्या वाढतात त्यामुळेही असेल कदाचित समस्या कायम राहत असतील.

ज्यात एकतर भरपूर फायदा होतो अथवा पूर्णपणे नुकसान होते असा जुगार ह्या शब्दाचा अर्थ. स्टॉप लॉस मुळे शेअरमधील गुंतवणूक जुगार ठरत नाही. फ्युचर आणि ऑप्शन हे प्रोडक्ट खरे तर आपल्या पोर्ट्फोलिओच्या संरक्षणाकरिता वापरले गेले पाहीजे, एखादा त्याचा वापर फक्त ट्रेडिंगसाठी स्टॉप लॉस (हे महत्वाचे) न लावता करत असेल तरच तो जुगार ठरू शकतो अन्यथा नाही. जसा एखाद्या कंपनीच्या फ्युचर व ऑप्शनने त्या मूळ कंपनीला काही फायदा होत नाही तसा कमोडिटीतील वायदा व्यवहारानेही मूळ शेतीला काहीही फायदा होत नाही. तेथेही गोदामात माल कमी असताना ज्यादा मालाचे व्यवहार होतात.

In reply to by मार्मिक गोडसे

खटासि खट 08/07/2015 - 12:27
हो, पण ते शेती हा व्यवसाय म्हणून स्विकारणारे करत नाहीत. सट्टेबाज करत असतात. सट्टेबाजांसाठी कमोडीटी, मेटल्स, शेअरबाजार यात काहीही फरक नाही. तुम्ही आता तेलाच्या भावानुसार व्यापा-याकडे दहा लाख जमा करा आणि दिवाळीतल्या भावानुसार वरचा नफा काढून घ्या. त्यासाठी तेल विकत घेण्य़ाची गरज नाही. या व्यापाराशी शेतीचा काहीच संबंध नाही. स्टॉप लॉस हे प्रिव्हेन्टीव्ह मेजर आहे. एकंदर बाजारावर नियंत्रण आणण्य़ाचे साधन नाही. बाजारातली घसरण तुम्ही स्टॉप लॉस लावला म्हणून थांबत नाही.

पण ते शेती हा व्यवसाय म्हणून स्विकारणारे करत नाहीत.
करू शकतात आणि करतातही. राजस्थानातील ठरावीक समाज शेती,साठवणूक,व्यापार व कमोडिटी ट्रेडिंग करतात उदा. गवार उत्पादन.
बाजारातली घसरण तुम्ही स्टॉप लॉस लावला म्हणून थांबत नाही.
असे मी कुठे म्हटलेच नाही. जो गुंतवणूक करतो तो स्टॉप लॉस लावणार, प्रत्येक गुंतवणूकदाराचा स्टॉप लॉस वेगळा असणार त्यामुळे साहजिकच बाजाराची घसरण रो़खण्याशी त्याचा संबंध येउ शकत नाही.

arunjoshi123 08/07/2015 - 16:29
उपप्रतिसाद देताना लेख दिसत नाही, अन्य प्रतिसाद दिसत नाहीत, म्हणून ... =======================================================================
शेतीशी शेअरमार्केटची तुलना अनाठायी वाटली.
सहमत. अशी तुलना अनाठायीच नव्हे तर तांत्रिकदृष्ट्या अर्थहिन आहे. हायपोथेटिकली, कोणी शेतकरी आपली "शेत लिमिटेड" ही कंपनीच लिस्ट करू शकतो. मग प्रत्यक्ष शेती करणे आणि शेत लिमिटेडचे समभाग खरीदणे, विकणे यात तुलना करणे म्हणजे वेल्डींग, मशिनिंग करणे आणि टाटा मोटर्सचे समभाग घेणे यांत तुलना केल्यासारखे आहे. मूळ लेखाच्या लेखकाचा उद्देश वेल्डर आणि टाटा मोटर्सच्या समभागांची देवाण घेवाण करणारा यांची आर्थिक/मौलिक तुलना करण्याचा दिसला. गुंतवणूक वा उपजिविका ही कंझर्वेटीव अप्रोचवर आधारित, मानवी गरजा भागवायच्या कृतींना समांतर जाणारी, एखाद्या तुक्क्यात आपल्या संपत्तीचे बरेवाईट न करणारी अशी असावी. शेती व समभागबाजार यापैकी काय असं आहे, काय नाही, इ इ. त्या अंगाने मी वरील विचार मांडले होते. =====================================================================
पंटर्सच्या टीप्स वर पैसे गुंतवणे
पंटर्स माहिती, अभ्यास इ इ नसलेले आहेत असे सिद्ध झालेले असतानाही, केवळ ट्रेड वाढवण्यासाठीच्या त्यांच्या कृतींना बळी पडत, पैसे गुंतवणे नक्कीच चूक आहे. पण इंट्रिन्सिकली व्यवसायात सल्ला घेण्यात काही अनिष्ट नसावे. ========================================================================
ट्रेडींग हा ऑप्शन निवडला तर मग त्यात आणि जुगारात कायदेशीर आणि बेकायदेशीर इतकाच फरक राहील.
भाग १: या विधानावर आपण पुनश्च सुक्ष्म विचार करावा (वा मला करायला लावावा) अशी विनंती आहे. प्रत्येक व्यवसायात भांडवल - गुंतवणूक - प्रोजेक्ट - ऑपरेशन -उत्पादन - होलसेल- रिटेल (ट्रेडिंग)-उत्पन्न अशी साखळी असते. किमान असल्या ट्रेडिंग अ‍ॅक्टीवीटीवर अर्थातच कोणाचेही काही ऑब्जेक्शन नसायला हवे. शेअरबाजारातली शेअर्सची ट्रेडिंग अर्थातच या ट्रेडिंगपेक्षा खूप भिन्न आहे हे मान्य करूयात. शेअरबाजारातली दीर्घकालीन गुंतवणूक बुद्ध्या व्यवसाय केल्याप्रमाणेच आहे आणि तिच्यासाठी आपल्याला आदर आहे हे प्रतिसादात दिसते. पण कंपन्यांच्या व्यवसायांच्या मालकीच्या अल्पशा अंशांची रोजच्या रोज खरेदी विक्री करणे मौलिक आहे का, जुगार आहे का, बेकायदेशीर असावे का, अर्थकारणासाठी अनिष्ट आहे का, इ इ प्रश्न पडणे साहजिक आहे. हा चर्चेचा विषय आहे. ------------------------ भाग २: त्यापूर्वी आपण थोडे स्टॅट्स पाहू. १. भारतात २.५ कोटी पब्लिक शेअरट्रेडर्स असावेत. (फार नक्की आकडा शोधण्यात अर्थ नाही.) २. साधारणतः ५५०० कंपन्या लिस्टेड आहेत. ३. इथे खाली एका टेबलमधे २००७ मधे पब्लिक शेअर होल्डिंग १३% होती असे लिहिले आहे. http://finmin.nic.in/reports/Discussion%20Paper%20Public%20Holdings.htm ४. या टेबलमधल्या अन्य बर्‍याच फंडांचे अंतिम मालक सामान्य लोक आहेत. जसे, म्यूच्यूअल फंड. ५. इथे सार्‍या लिस्टेड भारतीय कंपन्यांना २०१४/२०१७ पर्यंत किमान पब्लिक होल्डींग २५% आवश्यक आहे/असेल असे लिहिले आहे. http://articles.economictimes.indiatimes.com/2014-10-09/news/54827541_1_30-listed-psus-public-shareholding-cent-public-holding मालकीच्या इतक्या व्यापक बाजारात ट्रेडर्स नसले तर ...? ----------------------- भाग ३: इथे मी प्रो- शॉर्ट टर्म स्टॉक ट्रेडिंग काही आर्ग्युमेंट्स करायचा प्रयत्न करतो. १. मला दीर्घकालीन गुंतवणूक कळते असे मानले तरी माझ्याकडे कधी पैसे आहेत नि कधी पैसे गुंतवण्याची योग्य वेळ आहे हे बिंदू जुळतील का? कधी पैसे काढायचे नि कधी पैसे घरी हवे आहेत हे बिंदू जुळतील का? हे शेवटपर्यंत जुळलेच नाही तर मी शेअरबाजारात गुंतवणूक करूच नये कि काय? २. रोजच्या रोजच आर्थिक जगात आणि आर्थिक जगाबाहेर एकूणच (पर्यायाने एकूणच शेअरबाजारावर) ज्या घटना घडतात त्याचे सुक्ष्म वा मोठे, लघुकालीन (वा दीर्घकालीन -पण इथे रिडंडंट) परिणाम व्यवसायांवर (पर्यायाने शेअरच्या किमतीवर) होत नाहीत काय? काही लोकांना दीर्घकालाची अंधता असू शकते पण लघुकालाची दृष्टी शार्प असू शकते. ३. दीर्घकालाची गुंतवणूक खूप अनालिसिस नंतर होते. आदर्शतः अनालिस्टांच्या नुसार कधी गुंतवणूक करायची नि कधी काढून घ्यायची याबद्दलचा निष्कर्ष सगळ्यांप्रमाणे समान निघण्याचे चान्सेस जास्त आहेत. म्हणजे लवकरच आकर्षक एन्ट्री प्राईस वाढून अनाकर्षक होणार. म्हणजे बाजाराची दिशा एकच -वर. किंवा उलटे. मग दीर्घकालीन गुंतवणूकदारांपेक्षा रिस्कच्या आणि परताव्याच्या वेगळ्या अपेक्षा असणारांचे काय? वास्तविक ट्रेडर्स हे आपल्या भिन्न प्रकारच्या अप्रोचमुळे दीर्घकालीन गुंतवणूकदाराला लिक्विडीटी प्रोवाइड करून देतात. हा खूप महत्त्वाचा रोल आहे. ४. प्रोमोटर्स, इ ची होल्डींग सोडली तर उरलेल्या भागात अनेक फंडांच्या रुपात सामान्य लोकांची अप्रत्यक्ष होल्डींग खूप असते. म्हणून इथे "रेग्यूलर प्राइस डिस्कवरी" होत राहणे गरजेचे असते. ट्रेडर्स नसतील तर हे असंभव वाटते. ५. लघुकालीन ट्रेडींग हे तुम्ही जे पैसे हरवणे अफोर्ड करू शकता त्यावरच करणे अभिप्रेत आहे. ती संपूर्ण उपजिविका म्हणून अभिप्रेत नाही. ७. अंततः- मला जो गाडेवाला टमाटे विकतो, त्या टमाट्यांचे रिटेल भाव देखिल सकाळ, दुपार, संध्याकाळ बदलत असतात. तरीही तो त्याने ज्या किमतीला टमाटे घेतले आहेत त्यावर बिझनेस करतो. कारण आपल्याला नफा होईल असा व्यवहार होईल अशी त्याची अपेक्षा असते. मग एखाद्या फायनान्शियल इंस्ट्रूमेंटमधे ट्रेड करणे विशेष गैर का मानावे? इथे अर्थातच मी अशा ट्रेडींगमधे गैरव्यवहार करणारे लोक सोडून बोलत आहे. गैरव्यवहारावरील टिका आणि व्यवसायावरील टिका हे भिन्न मुद्दे आहेत हे लक्षात ठेवले पाहिजे. =========================================================== भाग ४: लघुकालीन ट्रेडिंग जुगार मानता येणार नाही. कारण जुगारासाठी जे रिस्क रिटर्न काँबो आहे, तसा प्रकार ट्रेडिंगमधे होत नाही. शेअरचे मूल्य कंपनीच्या मूल्यावर आधारित आहे. ट्रेडिंग गुंतवणूकदारांच्या भावना, अभ्यास, इ इ कितीही हेलकावे खात असल्या तरी त्यांना एक आधार आहे. १०० रुपयाचा शेअर २-३ दिवसात कोणत्या बँडमधे राहिल याला बर्‍यापैकी मर्यादा आहे. इथेही होत्याचा नव्हता होणे प्रकार होतो, पण तो अन्यत्र सर्व व्यवसायांत देखिल होतो. शॉर्ट टर्म ट्रेडिंग मूर्खपणाने कसेही करणारे अनेक जण असतात हा भाग वेगळा, पण त्यामुळे तो प्रकार जुगार ठरत नाही. अन्य लोक तो व्यवस्थित करत असतात. ------------------------------------- भाग ५- इथे आपण ट्रेडिंगच्या कायदेशीर/बेकायदेशीरपणा बद्दल पाहू. जुगाराचं स्वरुप (रिस्क -रिटर्न काँबो) भलतंसलतं असतं. १. छापा पडला तर अर्धे राज्य आणि राजकुमार/री आणि काटा पडला तर एक मिनिटात शिरच्छेद. २. हा खेळ खेळणे बंधनकारक नाही. ३. हा खेळ खेळायला १ रु द्यावा लागेल. इथे असला जुगार मानवतेच्या मौलिक अंगांना स्पर्श करतो. शुद्ध जुगार हा आर्थिक, म्हणजे मूल्यवाचक असायला हवा, मौलिकतावाचक नाही. जुगारात जसा माणूस बरबाद होतो तसा व्यवसायातही होतो. दोहोंत फरक काय? कदाचित तडकाफडकीचा! धुंदीच्या क्षणी आयुष्य बर्बाद करून घ्यायच्या जागा देशात नसाव्यात असे सरकारला वाटू शकते. तिथे बंदीचा विचार करता येईल. बाजारात अव्वाच्या सव्वा जास्त रिस्क आणि अव्वाच्या सव्वा रिटर्न असा काँबो गुंतवणूक ऑफर करण्याचा नि अशी गुंतवणूक स्वीकारण्याचा अपेटाईट असू शकतो. मग पहिला प्रश्न असा आहे कि शॉर्ट टर्म ट्रेडिंग असला प्रकार आहे का? दुसरा प्रश्न असा आहे कि सरकारने त्याला नियामित करावे काय वा एका मर्यादेबाहेर असा अपेटाईट, बाजार बेकायदेशीर ठरवावा काय? पहिल्या प्रश्नाचे उत्तर देताना लघुकालीन ट्रेडर्सना नेहमी तोटा होता नि नेहमी तो दुसर्‍या (promoters and institutional investors)प्रकारच्या गुंतवणूकदारांना अक्र्यू होतो असे आहे काय? असे झाले असते हे मार्केटच संपले असते. आणि हे लोक जुगारी आहेत आणि लॉस झाला तरी कधी ना कधी फायदा मिळेल म्हणून जुगारी वृत्तीने पैसे लावत असतात असे म्हणावे तर या गुंतवणूकीत तशी अव्वाच्या सव्वा काय सव्वा देखिल रिटर्न मिळत नाहीत. प्रोमोटर्स इ इ ची पार्टी चालली असताना त्यांच्यातले दाणे वेचणारे हे छोटे उंदीर आहेत. स्टॉक मार्केट हा झीरो सम गेम नाही. यात जुगारी फायदा अजिबातच नाही. या मार्केटचे सरासरी रिटर्न ऑन इन्वेस्टमेंट १% ते २५% (वार्षिक) यामधे काहीतरी असेल. (मला कल्पना नाही.) आता उरतो प्रश्न दिवसाला ५% ते ८% (सेलिंग पोहोचेपर्यंत) बदल झाला तर रिटर्न किती मिळाले. दिवसाला ५% म्हणजे वर्षाला १८ पट परतावा!!!! १८००% रिटर्न!!!!! इथे तो जुगार वाटायला चालू होतो! पण असा हिशेब करणे चूक आहे. हे गेन्स नंतर पुसले जातात नि मार्केटच्या सरासरी इतकेच रिटर्न मिळते. त्सुनामीच्या उंचीवरून भरतींची उंची मोजू नये. अगदी दुकानात माल विकताना १० सेकंदांत १००रुच्या मालावर १० रुपये मिळाले तर आपण रिटर्न तशी मोजतो का? पूर्ण महिन्यात काय होते ते पहायला पाहिजे. पहिला प्रश्न (हा प्रकार जुगार आहे का?) इथे सोडवला जातो व दुसरा (बेकायदेशीर, अनैतिक ठरवावा काय?) उद्भवत नाही. =================================================================== वायदा बाजार - समजा एका शेअरचा भाव आज ३००० रुपये आहे. तो शेअर ३ दिवसांनी ३१०० चा होणार याची मला खात्री आहे (वाटते). नाही झाला तर जो काही तो तोटा सहन करण्याची माझी इच्छा नि पात्रता आहे. पण माझ्याकडे रुपयेच ३०० आहेत. माझे हे ज्ञान वाया जावे का? मी बाजारापासून दूर राहावे का? हे झाले सामान्य बाजाराचे चित्र. कोणी जण ३ दिवसांनी हा शेअर आज ३० रु प्रिमियम घेऊन (म्हणजे ३०३० ला), बाजारात काही किंमत असेना, विकायचे प्रॉमिस करतोय. वायदा बाजारात ट्रेडिंग करण्याची सामान्य माणसाची अफोर्डेबिलिटी वाढते. मग तो चांगला का वाईट? ============================================ मी इथे केवळ, शॉर्ट टर्म शेअर ट्रेड नि जुगार इतक्याच विषयावर तांत्रिक मतांतरे मांडण्याचा प्रयत्न केला आहे. संक्षेपात मत न मांडता येणे हा दोष मान्य आहेच. शॉर्ट टर्म शेअर ट्रेड मधले गैरव्यवहार नि अन्य बाबींवरची आपली मते यांचेशी सहमती आहे.

In reply to by arunjoshi123

खटासि खट 08/07/2015 - 21:17
शेती, शेअर बाजार आणि जुगार या तिन्ही धंद्यात प्रावीण्य मी मिळवलेले नाहीये. तुमचा अभ्यास दांडगा आहे याची नोंद घेतो.त्याबद्दल कौतुक. तुलनेचा मुद्दा स्पष्ट झालेला आहे याबद्दल धन्यवाद. खूप खोलात जाण्याची आवश्यकता नाही. गुंतवणूक आणि त्रेडींग यात फरक आहे असं माझं मत आहे. हाय रिस्क हाय गेन हे सूत्र कुठल्याही धंद्याला लागू होतं अ, त्यामुळे लिमिटेड रिस्क घेतली तर नुकसानीची शक्यता कमी होते त्याचप्रमाणे फायदा ही कमी होतो. जुगारात, रेसमधेही नियमित फायद्यात असणारे लोक पाहण्यात आहेतच. त्यांची मतं वेगळी असू शकतात.

सुधीर 09/07/2015 - 10:44
@arunjoshi123 दोन्ही दीर्घ प्रतिसाद आवडले. फ्यूचर/ऑपश्न आणि इंट्राडे ट्रेडींग या दोन्हींच्या उपयुक्ततेबद्धल मी सहमत आहे. जुगार म्हणजेअमूक एका आउटकमची १००% खात्री नसताना, तेच आउटकम येण्याची जास्त शक्यता अशी अटकळ बांधून खेळलेला डाव. या न्यायाने केवळ शॉर्ट टर्म शेअर ट्रेडींगच नव्हे इक्विटी मधली लाँग टर्म गुंतवणूकीलाही जुगार म्हणता येईल. (एक ऑड आउटकम असे आहे की, एका ठराविक पाच वर्षात एफडी निफ्टीला आउट-परफॉर्म करते) मूळात जुगाराकडे वाईट नजरेनेच पहायला हवं का? हा खरा प्रश्न आहे. मी कसिनोच्या मशीन्स मध्ये पैसे उडवलेत (खात्री पण होती सगळे पैसे हरणार आहे). पण तुम्ही वर म्हटल्याप्रमाणे मनोरंजन मूल्यांचं सुख पैसे बुडाल्याच्या दु:खा पेक्षा अधिक होतं. पोर्टफोलिओची डाउनवर्ड रिस्क हेज करण्यासाठी मी ऑपश्नस मध्ये पण ट्रेडींग करतो. पण ती काउंटर रिस्क घेतल्यामुळे मला इंडेक्सला आउटपरफॉर्म करण्याची संधी मिळते. (वर म्हटल्याप्रमाणे जुगार हा दरवेळेला आर्थिक असेलच असे नाही. माझे लग्न झालेले मित्र तर मला नेहमी म्हणतात लग्न पण एक जुगार आहे असं म्हणून. ;) असो.) कुठलीही कृती म्हटली की भावना आल्याच. मग पैशाचे व्यवहार तरी कसे अपवाद असतील. माणसं परफेक्ट रॅशनल डिसिजन मेकर्स नसतात. अगदी साधी एफडी करण्याचा निर्णय घेतला तरी (जस्ट एक उदाहरण म्हणून). त्याला कारणं आहेत. १. सगळी माहिती उपलब्ध नसते. (आजूबाजूला कुठल्या खाजगी/सरकारी बँका आहेत? एफडीवर रेट काय आहेत?) २. बर्‍याच वेळा असलेल्या माहीतीचा वापर कसा करायचा याचं ज्ञान नसते. (कॉग्निटिव्ह स्किल्स. कुठल्या बँकेची अ‍ॅसेट क्वालिटी चांगली आहे? एनपीए किती आहेत वगैरे). त्यामुळे उपलब्ध माहिती आणि ज्ञान याच्या आधारे माणसं "समाधान होईल" असा जो काही निर्णय घेतात त्याला बाउंडेड रॅशनॅलिटी म्हणतात. प्रॉस्पेक्ट थिअरी आहे बिहेविअरल फायनान्स मध्ये. खूप रोचक आहे. लोक जुगाराकडे-लॉटरी तिकीटांकडे कसे पाहतात त्यावर. जुगाराचे २ सेट पाहू. पहिल्या सेट मध्ये तुम्ही अ किंवा ब निवडा. दुसर्‍या सेट मध्ये क किंवा ड. पहिला सेटः अ) २५% खात्री(प्रोबॅबिलीटी) आहे की तुम्हाला ३००० रुपये फायदा होईल. ब) २०% खात्री आहे की तुम्हाला ४००० रुपये फायदा होईल. अ) का ब) हे तुमचं उत्तर ठरवा. दुसरा सेट दोन टप्यांचा आहे. पहिला टप्पा: ७५% खात्री आहे की तुम्ही दुसर्‍या टप्यासाठी पात्र होणार नाही आणि तुम्हाला काहीच फायदा होणार नाही. २५% खात्री आहे की तुम्ही दुसर्‍या टप्यासाठी पात्र व्हाल. दुसरा टप्पा: क) १००% खात्री आहे की तुम्हाला ३००० रुपये मिळतील. ड) ८०% खात्री आहे की तुम्हाला ४००० रुपये मिळतील. क) का ड) हे तुमचं उत्तर ठरवा. हा सर्वे जेव्हा करण्यात आला तेव्हा धक्कादायक रित्या हे समोर आले की ६५% लोकांनी अ आणि ब पैकी ब निवडला आणि त्याच लोकांपैकी ७८% जणांनी क आणि ड पैकी क निवडला. गणिताच्या (प्रोबॅबिलिटीच्या) भाषेत अ - क आणि ब - ड हे समसमान आहेत आणि कुणीही रॅशनल माणूस ब किंवा ड निवडेल. कारण त्यांचे एक्सपेक्टेड रिटर्न्स (प्रोबॅबिलिटी * मिळणारा फायदा) सेम आहेत. अ) ०.२५ * ३००० = ७५० ब) ०.२० * ४००० = ८०० क) (०.२५ * १.० ) * ३००० = ७५० ड) (०.२५ * ०.८) * ४००० = ८०० याला केनमन ने "आयसोलेशन इफेक्ट" असे म्हटले आहे. माणसं उपलब्ध पर्यायाकडे कुठल्या नजरेने पाहतात (फ्रेमिंग) आणि उपलब्ध पर्यायांची तुलना (इव्हॅल्यूशन) कसे करतात यावर निवड अवलंबून असते. १०० रुपये फायदा झाल्यावर २५ क्ष आनंद होणार असेल तर १०० तोटा झाल्यावर २५ क्ष पेक्षा अधिक दु:ख होते म्हणून ही थिअरी असं म्हणते की माणसं रिस्क अव्हर्स पेक्षा लॉस अव्हर्स असतात. जुगाराच्या बाबतीत मिळणारा संभाव्य फायदा हा होणार्‍या संभाव्य तोट्या पेक्षा अधिक अनंदादायी असला तरच माणसं जुगार खेळतात.

In reply to by सुधीर

arunjoshi123 14/07/2015 - 13:48
याला केनमन ने "आयसोलेशन इफेक्ट" असे म्हटले आहे. माणसं उपलब्ध पर्यायाकडे कुठल्या नजरेने पाहतात (फ्रेमिंग) आणि उपलब्ध पर्यायांची तुलना (इव्हॅल्यूशन) कसे करतात यावर निवड अवलंबून असते.
http://market.subwiki.org/wiki/Isolation_effect इथे आयसोलेशन इफेक्टचे मूलभूत वर्णन दिले आहे. आपल्या उदाहरणांत आयसोलेशन मधे दिलेली ऑप्शन्स कोणती व बेसलाईन सहित दिलेली कोणती हे स्पष्ट करण्याची विनंती. ======================================
जुगार म्हणजे अमूक एका आउटकमची १००% खात्री नसताना, तेच आउटकम येण्याची जास्त शक्यता अशी अटकळ बांधून खेळलेला डाव.
ज्या गुंतवणूकित एक्सपेक्टेड रिटर्न हे इन्फ्लेशनपेक्षा कमी आहे हे खरोखरच सुनिश्चित आहे (तुमचे पैसे जाणार हे म्हणण्याची पद्धत) आणि रिस्क खूप जास्त आहे (मिळाले तरच खूप पैसे मिळणार) अशा गुंतवणूकीला जुगार म्हणता येईल.

In reply to by arunjoshi123

सुधीर 14/07/2015 - 22:21
पहिल्या सेट मधले दोन जुगार हे बेसलाइन आहेत. पहिल्या सेट मध्ये ब) निवडणे आणि दुसर्‍या सेट मध्ये (दोन्ही पायर्‍या एकत्रित धरून) ड) निवडणे सम-समान आहे. दुसरा सेट दोन पायर्‍यांचा (आयसोलेशन्स) बनविल्याने, पहिल्या पायरी नंतर क) जुगार काही जणांना ड) पेक्षा जास्त आकर्षक वाटतो. (काहीसं कौन बनेगा.. मध्ये 'पडाव' पार केल्यानंतर, जेव्हा एखादं उत्तर १००% माहीत नसते आणि सगळ्या हेल्पलाईन संपलेल्या असतात, तेव्हा काही माणसं कन्फर्म पैसे घेऊन न खेळता एक्झीट मारणं पसंद करतात काहीसं तसचं) वरचं उदाहरण मी सीएफए लेव्हल ३ च्या करीक्युलम बुक मध्ये वाचले होते. [नुकतेच ;) ] म्हणून शेअर केले. जुगार नेमकं कशाला म्हणावे हे माहीत नाही. जुगार व्यक्तीसापेक्ष असतात असा काहीसा तुमच्याच वरच्या प्रतिसादातला धागा पकडून मी सर्वव्यापक जुगार काय असू शकतो असा विचार केला. कदाचित त्यात काही उणीवा असूही शकतील.

कलंत्री 06/03/2015 - 10:24
काळाच्या ओघात व्यावहारिक शहाणपण सुद्धा बदलले जात असते. पूर्वी, उत्तम शेती, मध्यम व्यापार आणि कनिष्ठ नोकरी. आता, उत्तम नोकरी, मध्यम व्यापार आणि कनिष्ठ शेती हेच खरे.

तुम्हा सर्वांच्या प्रतिसादांबद्दल धन्यवाद! सध्या शेतातली रोपटी अजुन उलटी कशी झाली नाहीत याचा विचार करतोय... लेख लिहिण्यामागे तसा उद्देश नक्किच नव्हता. आपल्या मराठी लोकांचा शेअर गुंतवणूक/व्यवसायाकडे बघण्याचा दृष्टिकोन हा पूर्वग्रहदूषित असतो, ह्या व्यवसायबद्दल आदराची भावना फारच कमी असते.. एखाद्या समारंभात माझ्या बाबांची ओळख फक्त नाव व नाते इतकीच करुन दिली जाते, समोरच्याने काय करतात विचारल्यास जवळचे नातेवाईक काढता पाय घेतात. बाबांनाच आपण काय व्यवसाय करतो हे सांगावे लागते.बर्‍याचदा समोरच्याची प्रतिक्रीया ही लेखातील मित्रासारखीच असते. शेअर गुंतवणूकीला जुगार समजू नये हाच माझा लेख लिहिण्यामागे उद्देश होता.

असंका 10/03/2015 - 17:18
टायटल वरून काहीच अंदाज लागत नव्हता आत काय असेल त्याबद्दल....किंबहुना नेहमीचेच वाद असतील असं वाटलेलं. पण लेख अगदीच नाविन्यपुर्ण निघाला....जरा वेगळं टायटल द्यायचा विचार करा ही विनंती...

मित्रहो 25/06/2015 - 15:55
ठराविक मुदतीसाठी गुंतवणुक करुन नफा मिळवणे ठीक. मग डेली ट्रेडींगचे काय? कुठल्याच कंपनीचे भवितव्य एका दिवसात तेवढे बदलत नाही जेवढे त्या कंपनीचे शेअर्स चढतात किंवा उतरतात. त्याला जुगारच म्हणावे असे नाही पण तो काही फार विचारपूर्वक केलेला व्यवहार असतो असेही नाही.

बोका-ए-आझम 27/06/2015 - 19:23
जुगार हा झीरो सम गेम आहे. जेव्हा एकजण जिंकतो तेव्हा बाकीचे हरतातच. शेअर बाजारात तसं नाहीये. तो पाॅझिटिव्ह सम गेम आहे. जेव्हा मार्केट वर जाते, तेव्हा सगळ्यांना फायदा होतो. जेव्हा ते खाली जातं तेव्हा काही जणांचा फायदा होतो व लकाही जणांचा तोटा. पण ज्यांचा तोटा होतो तो ज्यांचा फायदा होतो त्यांच्यामुळे होतो असं मुळीच नाही. एवढं सांगूनही समोरच्याला नाही समजलं किंवा तो नको ते वाद घालत बसला तर त्याला ' ये जिंदगी है एक जुआ ' हे गाणं ऐकवा. काय बिशाद त्याची माधुरी दीक्षितचं न ऐकायची!;)

बोका-ए-आझम 27/06/2015 - 19:23
जुगार हा झीरो सम गेम आहे. जेव्हा एकजण जिंकतो तेव्हा बाकीचे हरतातच. शेअर बाजारात तसं नाहीये. तो पाॅझिटिव्ह सम गेम आहे. जेव्हा मार्केट वर जाते, तेव्हा सगळ्यांना फायदा होतो. जेव्हा ते खाली जातं तेव्हा काही जणांचा फायदा होतो व लकाही जणांचा तोटा. पण ज्यांचा तोटा होतो तो ज्यांचा फायदा होतो त्यांच्यामुळे होतो असं मुळीच नाही. एवढं सांगूनही समोरच्याला नाही समजलं किंवा तो नको ते वाद घालत बसला तर त्याला ' ये जिंदगी है एक जुआ ' हे गाणं ऐकवा. काय बिशाद त्याची माधुरी दीक्षितचं न ऐकायची!;)

In reply to by बोका-ए-आझम

बेकार तरुण 30/06/2015 - 09:06
तुमची समजुन चुकीची आहे शेअर मार्केट हाहि झीरो सम गेमच आहे, ईतर कोणत्याहि खेळाप्रमाणेच

गवि 29/06/2015 - 14:10
शेती किंवा शेअरबाजार हे दोन्हीही इटसेल्फ जुगार नसून ते कोणत्या मार्गाने वापरले (किंवा तिथे कोणत्या विचाराने व्यवहार केले) यावर जुगार ठरतो. हे फक्त शेती किंवा शेअरबाजारालाच लागू नाही. जुगार ही प्रवृत्ती आहे. कोणत्या जिलबीवर माशी बसेल यावरुनही जुगार खेळता येतो. एकूण सारासार विचार, अभ्यास यांचे श्रम न घेता निव्वळ नशिबावर हवाला ठेवून किंवा आंधळेपणाने कोणाचेतरी ऐकून व्यवहार करणे म्हणजे जुगार. याठिकाणी आपण असं पाहू की शेती आहे.. त्यात अनुभवाने, ज्ञान वापरुन, मौसमानुसार, जमिनीच्या प्रकारानुसार, योग्य खतं घालत इ इ अशा पद्धतीने लागवड करणं आणि त्यातून शेवटी फायदा/तोटा काहीतरी होणं यात जुगार नाही. पण एमू पाळल्याने एका लाखाचे दोन वर्षात वीस लाख होतील असं कुठूनतरी ऐकून.. एमूशेतीच्या जगातल्या इतर सिनारिओचा अभ्यास न करता, त्यांची स्थिती काय आहे ते न पाहता, एमूचं मांस दावा केल्याप्रमाणे खरंच उत्तम आहे की वातड आणि बेचव आहे, त्याला खरंच फाईव्हस्टार हॉटेलांत मागणी आहे का? एमूच्या अंड्याचे काय बनवतात? ती कोण विकत घेईल? या कशाचाही अभ्यास न करता.. त्याच शेतीत एमूशेती करण्यासाठी डायरेक्ट पाच लाखाचे एमू खरेदी करुन आणणं हा जुगार. त्याचप्रमाणे जिल्बीभूषण टायर्स या कंपनीचे शेअर उचला, मालामाल व्हाल, रात्रीत कोट्याधीश व्हाल असं कुठेतरी "ऐकून" तिथे पाच लाख "लावणे" हाही जुगार. क्रिकेट, खेळ, हवामानशास्त्र, हळदीचे भाव इ इ इ सर्व फिल्ड्समधे जुगार खेळता येतो. त्याचा फिल्डशी संबंध नसून विचारपद्धतीशी संबंध आहे.

सुबोध खरे 30/06/2015 - 09:45
श्रम न घेता निव्वळ नशिबावर हवाला ठेवून किंवा आंधळेपणाने कोणाचेतरी ऐकून व्यवहार करणे म्हणजे जुगार. शंभर नंबरी बात आणि नेमका प्रतिसाद. गवि शेठ. मान गये

याठिकाणी आपण असं पाहू की शेती आहे.. त्यात अनुभवाने, ज्ञान वापरुन, मौसमानुसार, जमिनीच्या प्रकारानुसार, योग्य खतं घालत इ इ अशा पद्धतीने लागवड करणं आणि त्यातून शेवटी फायदा/तोटा काहीतरी होणं यात जुगार नाही. लेखकाच्या मित्राच्या मते जुगार म्हणजे- मित्र : ज्यात एकतर भरपूर फायदा होतो अथवा पूर्णपणे नुकसान होते. येथे कमी तोटा होतो असे म्हटलेले नाही. मित्राचे म्हणणे खरे मानले, तर त्या लॉजिक प्रमाणे ६)नैसर्गिक आपत्ती किंवा आग लागल्यामुळे शेतीमालाचे १००% नुकसान होऊ शकते परंतू संकटाची चाहूल लागल्यास stop लॉस लावून शेअर्स विकून तोटा कमी करता येतो व १००% नुकसान टाळता येते. अशा वेळी शेती हा जुगारच ठरतो. भले शेतकरी जुगाराच्या भावनेतुन शेती करत नसला तरी. स्टॉप लॉस बद्दल लेखकाशी सहमत. तुलनात्मक लिखाण आवडले.

चौकटराजा 30/06/2015 - 10:43
ज्या ज्या कृति चा परिणाम होताना दोन परस्पर विरोधी उत्तरे घेऊन येण्याची शक्यता असते अशी प्रत्येक कृति जुगार असते.जीवन एक जुगार .

शेअर मार्केट व शेतीची तुलना आवडली शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक करण्यापेक्ष्या जागेत गुंतवणूक करणे जास्त सोपे नाही का निव्वळ कोणाचे एकूण एखाद्याने उपनगरात जागा विकत घेतली तरी काही वर्षात तिची किंमत वाढणार ती किती प्रमणात वाढणार ह्या साठी त्या जागेला भविष्यात येणारे महत्व काही वर्षांच्या त्या भागातील जागांचा वाढणारा दर ह्यावर नफ्याचे प्रमाण अवलंबून असते अगदी टोकाची परिस्थिती निर्माण झाल्याखेरीज जागांचे भाव पडत नाहीत तेव्हा ते अधिक सुरक्षित व सोयीहे नाही का म्हणजे निव्वळ ऐकीव माहितीवर सुद्धा जागेत गुंतवून नफ्याची खात्री देता येते.उद्द ठाणा डोंबिवली मुलुंड पुणे मुंबई बद्दल बोलूच नका गेल्या दहा वर्षात जागांचे वाढलेल्या किमती पहा ,

चौकटराजा 30/06/2015 - 18:25
प्रशांत महासागरात अचानक एक मोठे बेट वर आले तर जागांचे भाव एकदम कोसळतील. तात्पर्य कसलीही गुन्तवणूक सदाची फायदेशीर नसते. बदलत्या काळात शाळा व महाविद्यालयावरील गुन्तवणूक धोक्यात येणार हे नक्की.

In reply to by चौकटराजा

संदीप डांगे 01/07/2015 - 03:55
बदलत्या काळात शाळा व महाविद्यालयावरील गुन्तवणूक धोक्यात येणार हे नक्की. सहमत. २०३० च्या तरुणांची गत १९७५ च्या तरूणांसारखी होईल. (आठवा: नो वॅकन्सीचे बोर्ड, झिजणार्‍या चपला दाखवणार्‍या चित्रपटातल्या फ्रेम्स.)

सुधीर 01/07/2015 - 11:13
लेखकाच्या आणि प्रतिसादकर्त्यांच्या भावनांशी सहमत आहे. फक्त एवढेच की, शेती हा व्यवसाय आहे आणि फार कमी लोकांचा पूर्ण वेळ गुंतवणूक (इक्विटीमधली) हा व्यवसाय असतो. शेतीमधून सृजनतेचा जो आनंद शेतकर्‍याला मिळेल तो कदाचित गुंतवणूकीतून मिळणार नाही. शेती व्यवसाय करून सुद्धा शेतकर्‍याला इक्विटी अ‍ॅसेट क्लास मध्ये गुंतवणूक करता येऊ शकते. पण शेतकरीच काय, बराच शहरी मध्यम वर्ग इक्विटी अ‍ॅसेट क्लास पासून थोडा दूरच आहे. लोकांचा अजूनही गुंतवणूकीच्या पारंपारीक मार्गांवर जास्त विश्वास आहे. मग ते परंपरागत आलेली सोन्यातली गुंतवणूक असो वा जमीनीतली असो. २% जास्त मिळतायत म्हणून लोकं बुडीत जाऊ शकणार्‍या पतपेढी- क्रेडीट सोसायटीतल्या मुदत ठेवींवरची जोखीम स्विकारायला तयार असतात पण इक्विटी अ‍ॅसेट क्लासकडे जुगार म्हणून पाहतात. डायव्हर्सीफाईड इक्विटी अ‍ॅसेट क्लास छोट्या कालावधीत तोटा देऊ शकतो वा मुदत ठेवीपेक्षा कमी परतावा देऊ शकतो. पण दीर्घ कालावधीमध्ये तो मुदत ठेव, सोनं आणि प्रॉपर्टी इन्व्हेस्टमेंटपेक्षा अधिक परतावा "देऊही शकतो". अभ्यासाबरोबर अजून एक गोष्ट ध्यानात घ्यावी लागते ती म्हणजे इमोशनल बायसेस. कारण गुंतवणूक म्हटली की भावना आल्या. या भावनांच्या आहारी जाऊन कधी कधी आपण टाळता येण्याजोगी जोखिम घेत असतो. हे बायसेस कमी कसे करायचे याचा आभ्यास अलिकडच्या काळात विकसित होत आहे.

जिल्बीभूषण टायर्स या कंपनीचे शेअर उचला हा हा हा. अपोलो , एम.आर.एफ. , मिशलीन च्या लायनीत जिल्बीभूषण टायर्स ही गोड कल्पना करून बेफाम हसतो आहे ग.वी.

खटासि खट 05/07/2015 - 10:25
हाच संवाद पुन्हा एकदा बदलून पाहूयात. इथे बाबा हा उल्लेख या लेखात धागाकर्त्याचे बाबा म्हणून झालेला असल्याने तिथे नवं आणि या लेखाशी संबंध नसलेलं पात्रं घेऊयात. अर्थात धागाकर्ते वौयक्तिक घेणार नाहीत ही खात्री आहेच. रतन खत्री : जुगार म्हणजे काय ? साने गुरुजी : ज्यात एकतर भरपूर फायदा होतो अथवा पूर्णपणे नुकसान होते. रतन : तुम्ही कधी जुगार खेळला आहात ? साने गुरुजी : नाही. रतन : शेअर्समध्ये कधी पैसे गुंतविले आहेस ? साने गुरुजी : नाही. रतन : मग तुम्ही शेअर्सच्या ट्रेडिंगला जुगार म्हणून का हिणवता ? जुगार हा ही तितकाच लाभकारक धंदा आहे. साने गुरुजी : बर्‍याच लोकांनी जुगारामध्ये पैसे कमावलेत. काहींनी जुगारात नुकसान झाल्यामुळे आत्महत्याही केल्या आहेत असे ऐकले आहे. रतन : शेतीत, शेअर ट्रेडींगमधेही बर्‍याच लोकांनी पैसे कमावलेत व काहींनी शेतीत, शेअरट्रेडींगमधे नुकसान झाल्यामुळे आत्महत्याही केल्या आहेत असे मीही ऐकले आहे. साने गुरुजी : म्हणजे तुम्हाला नक्की काय म्हणायचे आहे? रतन : शेती व्यवसाय, शेअर ट्रेडिंग व जुगारामध्ये बरेच साम्य आहे. साने गुरुजी : ते कसे ? रतन : १) शेती करायला जमीन आवश्यक असते, शेअर ट्रेडिंगसाठी demat account आवश्यक असते तसंच जुगारासाठी कॅसिनो क्लबमधले सदस्यत्व, मटक्याच्या अड्ड्यावरची पत किंवा ऑनलाईन लॉटरीचं केंद्र यांची आवश्यकता असते. आणखी एक प्रकार म्हणजे घोड्याची रेस. यात रेसकोर्स वर बुकीकडे खातं किंवा पत असणे आवश्यक असतं. २) चांगले पिक येण्यासाठी शेताची योग्य ती मशागत करावी लागते , गुंतवणुकीतून चांगला लाभ मिळावा ह्यासाठी अगोदर गुंतवणुकीच्या संदर्भात सखोल अभ्यास करावा लागतो तसंच जुगारात कुठले आकडे येऊन गेलेले आहेत, कुठले अद्याप आलेले नाहीत, कुठला पॅटर्न चालू आहे यावरून आता कुठला आकडा फुटण्याची शक्यता आहे याची शक्यता गृहीत धरता येते. घोड्याच्या रेसमधेही घोड्यांचा अभ्यास, कुठल्या घोड्याने कुठल्या रेस किती जिंकल्या याचा चार्ट, जॉकीचा इतिहास याचा अभ्यास करावा लागतो. ३) कोणतेही पिक घेण्यापूर्वी त्या पिकाला पोषक असे हवामान बघितले जाते,त्यानंतर योग्य त्या जातीचे बी निवडले जाते. जास्त उतारा देणारे बियाणे थोडे महाग घ्यावे लागते, चांगला परतावा देणार्‍या कंपन्यांचे शेअर थोडे महाग घ्यावे लागतात. चांगल्या कंपन्या निवडणे हे अभ्यासाने व अनुभवाने ठरवता येते. अगदी तसच मटका, जुगार, सट्टा आणि रेस याबाबतीतही आहे. ऑनलाईन लॉटरी, परराज्यातल्या शेवटच्या अंकाच्या लॉट-या, मटका आणि रेस यातून अनुभवाने चांगला पर्याय निवडता येतो. यातला चांगला पर्याय हा थोडा महाग असतो पण त्यात परतावा जास्त मिळू शकतो. ४) पिकांची वाढ योग्य प्रकारे होण्यासाठी निंदनी ,खुरपणी, खत व रोगापासून बचावासाठी किटकनाशक फवारणी वेळोवेळी करावी लागते. आपल्या portfolio मध्ये एखाद्या कंपनीमुळे गुंतवणुकीचे गणित चुकत असेल तर योग्य तो निर्णय घेऊन गुंतवणुकीचा तोल सांभाळण्यासाठी वेळोवेळी portfolio कडे लक्ष द्यावे लागते. आपल्या चार्टमधे न आलेल्या आकड्यांचे गणित चुकत असल्यास पॅटर्न बदलावा लागतो. उदाहरणार्थ चार्टमधे शंकरपाळी पॅटर्न अंदाज चुकवत असाल्यास करंजीहा पॅटर्न लागू करून पहावा लागतो. काही आकडे कमी करावे लागतात. रेसमधेही हे लागू पडतंच. ५)शेतमालाचे भाव जसे मागणी व पुरवठा ह्यावर अवलंबून असतात, शेअर्सचे भावही मागणी पुरवठ्यावर अवलंबून असतात. असंच ज्या आकड्याला जास्त मागणी असेल त्यावर आकडा फुटण्याचे गणित अवलंबून असते. लॉटरीच्या धंद्यात एखाद्या आकड्यावर प्रमाणाच्या बाहेर बुकींग असेल तर त्या दिवशी लॉट-यांची तिकीटं कमी छापली जातात. पण मटक्याच्या बाबतीत तुम्हाला हवा तो आकडा मिळतोच मिळतो. ६) अप्रमाणित बियाणे. खते व कीटकनाशके वापरल्यामुळे जसे शेतीचे नुकसान होऊ शकते त्याप्रमाणे penny stock मध्ये गुंतवणूक केल्यामुळे नुकसान होऊ शकते, फक्त पंटर्सच्या टीप्सवर विश्वास ठेवून स्वत:चा अभ्यास केला नाही तर नुकसान होते. ७) सरकारच्या आयात-निर्यात धोरणामुळे शेतमालाच्या भावावर परिणाम होऊ शकतो तसाच कंपन्यांच्या नफातोट्या वरही होऊन कंपन्यांच्या शेअर्सच्या भावावरही होऊ शकतो. सरकारच्या कायदेविषयक शिथिलतेच्या धोरणात बदल झाले की धंद्यावर परिणाम होऊ शकतो. सरकारची धोरणे आणि पाऊस यांचं सांगता येत नाही. इत्यादी इत्यादी... मित्रा आता तूच सांग जुगार कोण खेळतोय ते ?

In reply to by खटासि खट

खटासि खट 05/07/2015 - 10:34
सदर प्रतिसाद टंकताना याआधीचा प्रतिसाद उमटलेला आहे असा विश्वास होता, तो पेज रिफ्रेश केल्याने धुळीस मिळालेला आहे. काय नव्हतं त्या प्रतिसादात. नीळकंठराव कल्याणींच्या पिताश्रींनी त्यांना थोबाडीत मारून सट्टा आणि व्यवसाय यातला फरक समजावून सांगितलेला सीन होता, ती शिकवण लक्षात ठेवून यशस्वी झालेला एक जिद्दी तरूण होता. सट्टा आणि धोका यातला फरक समजावणारा उपदेश होता. स्वत: भाव ठरवता येत नसतानाही आणि पावसाच्या लहरीच्या धोक्यावर अवलंबून असतानाहि शेती हा व्यवसाय करणा-यांचा गौरव होता. शेती आणि शेअर ट्रेडींग यातल्या आवश्यकतेचा उहापोह होता, गरज निर्माण करून भाव खाली वर करून फायदा काढण्यातलं तंत्र समजावून सांगणारा बोध होता. पण पावसाप्रमाणेच नेटमधे येणारा व्यत्यय हा प्रतिसाद खाऊन गेला आणि एका सभ्य प्रतिसादाची नावावर लागू पाहणारी नोंद जालीय इतिहासातून नाहीशी झाली. आता आहेत पुन्हा मेलबॉक्स आणि व्यनी मधे येणा-या शिव्याशापांची बरसात... भाग्य कोणास चुकलें हो ?

लॉटरीच्या धंद्यात एखाद्या आकड्यावर प्रमाणाच्या बाहेर बुकींग असेल तर त्या दिवशी लॉट-यांची तिकीटं कमी छापली जातात. पण लॉटरीची तिकीटं अगोदरच छापलेली असतात ना? काही कळलं नाही बुवा. लेख नीट वाचावा लागेल.

In reply to by ऋतुराज चित्रे

चौकटराजा 05/07/2015 - 13:29
कोणता तरी आकडा यावाच लागतो तो कोणता आणायाचा यात काही पण काहीशीच शिस्त असते. तो आकडा ठरला की त्याची तिकिटे त्या तारखेची कमी छापण्याचा डाव खेळ्ला जातो.

मला असं म्हणायचे आहे की, जर का लॉटरीची तिकिटे बाजारात नसतील तर तिकिटाचा ठराविक नंबर अगोदर बूक कसा करता येतो? तुम्ही म्हणता तसे छापण्या अगोदर बुकिंगची सुविधा असेल तर त्या तारखेची तिकिटे कमी छापल्याने बक्षिसाची रक्कम वाटून हातात कमी रक्कम मिळेल.

In reply to by ऋतुराज चित्रे

खटासि खट 05/07/2015 - 18:25
कुख्यात समजल्या गेलेल्या धंद्यांविषयी आपण बिनदिक्कतपणे आमच्याकडे चौकशी करावी. या क्षेत्राकडे मराठी लोकांचा पाहण्य़ाचा दृष्टीकोण पूर्वग्रहदुषित असल्याने फारशी माहीती नाही. यातले जे जाणकार असतात त्यांना दहा वाजले की तिकीटाचे वेध लागतात. कारण समजा ९ हा आकडा अनेक दिवस उघडलेला नसेल तर त्यावर या मंडळींचे रोज दुप्पट या न्यायाने पन्नासाव्या दिवशी भरपूर पैसे लागलेले असतात. म्हणजे तितक्या तिकीटांची आवश्यकता त्यांना असते. ते या नंबरची तिकीटे राखून ठेवायला विक्रेत्याला सांगत असतात. त्या वाढीव गरजेप्रमाणे तिकीटे मिळतातही. पण ज्या दिवशी हा अंक उघडतो त्या दिवशी तिकीटांचा तुटवडा असतो. मणिपूर सारख्या राज्यातून येणारी तिकीटे ही प्रत्यक्षात गुप्ता, चावला आदी आडनावाची माणसेच छापत असतात, फक्त मणिपूर सरकारला त्या लॉटरीपोटी काही पैसे दिलेले असतात.

आता तुमच्याच उदाहरणाचा आधार घेतो, समजा ९ हा आकडा अनेक दिवस उघडलेला नसेल तर त्यावर या मंडळींचे रोज दुप्पट या न्यायाने पन्नासाव्या दिवशी भरपूर पैसे लागलेले असतात ओ.के. म्हणजे तितक्या तिकीटांची आवश्यकता त्यांना असते. ते या नंबरची तिकीटे राखून ठेवायला विक्रेत्याला सांगत असतात. त्या वाढीव गरजेप्रमाणे तिकीटे मिळतातही. आपण म्हणता त्याप्रमाणे ९ ह्या आकड्याची मागणी समजा १०,००० आहे तिकिटे राखून ठेवायला विक्रेत्याला सांगितल्यामुळे वाढीव गरजेप्रमाणे तिकिटे मिळतातही. पुढे आपण म्हणता, पण ज्या दिवशी हा अंक उघडतो त्या दिवशी तिकीटांचा तुटवडा असतो. ज्यांनी तिकिटे बूक केली,ती मिळालीही मग बाजारात तिकिटांच्या तुटवड्याने काय फरक पडतो?

In reply to by ऋतुराज चित्रे

खटासि खट 06/07/2015 - 06:34
तुम्हाला आधीच ब्वॉर म्हटलं होतं, तुम्ही पुन्हा समजावून घेण्याचा स्टॅण्ड घेतला. तर आता पुन्हा ब्वॉर !!

In reply to by अरवीन्द नरहर जोशि.

श्रीगुरुजी 06/07/2015 - 13:55
हा जर कायमच हरणारा जुगार आहे तर हा जुगार खेळणारे अजून किती वर्षे या जुगारात पैसे घालविणार आहेत? जुगार खेळणारा कायम हरत गेला तर एक वेळ अशी येते की त्याचा खिसा रिकामा होतो व त्यानंतर तो पुढे जुगार खेळू शकत नाही. परंतु हा जुगार खेळणारे दरवर्षी हरूनसुद्धा दरवर्षी नव्याने जुगार खेळायला पैसे आणतात तरी कोठून? द्रौपदीच्या अक्षय थाळीसारखी यांना अक्षय भरलेला खिसा लाभलेला दिसतोय.

खरच सांगतो, मला तुमच्या 'ब्वॉर' चा अर्थ अजुनही कळालेला नाही. कुख्यात समजल्या गेलेल्या धंद्यांविषयी आपण बिनदिक्कतपणे आमच्याकडे चौकशी करावी. आपल्यामुळे लॉटरीत हमखास फायदा होउ शकतो हे पटले. एकदा हाही अनुभव घ्यावा असे वाटले,परंतू मला तुमच्या प्रतिसादात वरील दोन वाक्ये ( तिकीटे बूक व तिकिटांचा तुडवडा) परस्परविरोधी वाटली व धोका वाटला. उद्या मला ठरावीक नंबरची तिकीटे नाही मिळाली आणि माझे नुकसान झाले, तर लॉटरी माझ्याकरता जुगार ठरू शकेल, म्हणुन मी आपल्याकडे चौकशी करतो. आपला मठ्ठ शिष्य.

In reply to by ऋतुराज चित्रे

खटासि खट 06/07/2015 - 13:58
उद्या अपहरणाचा धंदा यश देणारा धंदा आहे असं एखाद्याने पटवून देणा-या शैलीत सांगितलं तर त्या धंद्यात उडी घ्यावी का ? बाकी आशयनिर्मूलनापरांत रुपके,दृष्टांत, दाखले, उदाहरणे यावर खल होणे हे मानवी विकासाचं लक्षण आहे.

चांगल्या लेखावर मटक्याची कच्ची वीट लावण्याच्या आपल्या भुसभुशीत प्रयत्नांची कीव आली. काय तो मराठी बाणा आणला होता, म्हणे कुख्यात समजल्या गेलेल्या धंद्यांविषयी आपण बिनदिक्कतपणे आमच्याकडे चौकशी करावी. गिर्‍हाईक बघितल्यावर एकदम खिडकी बंद? शेवटी खटासी खेटला मठ्ठ

arunjoshi123 07/07/2015 - 15:07
कृती: उद्देशांच्या आधारावर मानवी कृतींचे खालील प्रकारे विभाजन करता येईल - १. गुंतवणूक २. अन्य मानवी भावना थेट पूर्ण करावयासाठी केलेली कृती ३. वरील दोहोंचा ओव्हरलॅप असलेली कृती ================================================================================ रियल रिटर्नः प्रथमतः गुंतवणूक करताना आपल्याकडे नक्की कशात गुंतवणूक करायची याबद्दल अनेक पर्याय उपलब्ध असतात. इतके मूल्य इथे गुंतविले तर इतका परतावा असं जे गणित मांडतात, अंदाज घेतात त्याला नॉमिनल रिटर्न म्हणतात. आपल्याला खरा रस रियल रिटर्न मधे असतो. रियल रिटर्न = नॉमिनल रिटर्न - रेट ऑफ इन्फ्लेशन गुंतवणूकीच्या कालाअंती प्रत्येकच माणसासाठी, किमान एका देशात, महागाई तीच असणार आहे. तेव्हा जिकडे नॉमिनल रिटर्न जास्त तिकडे गुंतवणूक करावी असे वाटणे साहजिक आहे. काही गुंतवणूकींत "सुनिश्चित करारबद्ध" नॉमिनल रिटर्न असते. उदा. फिक्स्ड डिपॉझीट, बॉंड्स,इ. पण प्रत्येकच गुंतवणूकीत "सुनिश्चित करारबद्ध" नॉमिनल रिटर्न नसते. उदा. कोणताही व्यवसाय, शेती, स्टॉक मार्केट, इ. आर्थिक परिस्थिती वा समोरच्याची नियत वेगळी निघाल्याने, व्यवसायाबद्दलचे वा आर्थिक वातावरणाबद्दलचे अंदाज चुकीचे निघाल्याने, सुनिश्चित करार असो वा नसो, प्रत्येक गुंतवणूकीत परताव्याची काय अपेक्षा केली होती आणि प्रत्यक्ष काय परतावा मिळाला यात तफावत निघते. ======================================================================= रिस्कः ही तफावत डोळ्यासमोर ठेऊन सर्वसाधारणपणे मागचा इतिहास पाहता प्रत्येक प्रकारच्या गुंतवणूकीत किती परतावा मिळतो याचा एक आडाखा बांधता येतो. जेव्हा "जवळजवळ प्रत्येक" परतावा या अपेक्षित परताव्याच्या आसपासच मिळतो तेव्हा अशा गुंतवणूकींना लो रिस्क गुंतवणूका म्हणतात. उदा. बाँड्स. कोणता परतावा अपेक्षित परताव्यापासून किती दूर असेल जास्त अनिश्चित असते तेव्हा अशा गुंतवणूकींना हाय रिस्क गुंतवणूका म्हणतात. उदा. शेअर्स. आपण जर मराठी फॉर रिस्क वा हिंदी फॉर रिस्क असे गुगलाल, तर धोका वा जोखिम असे शब्दार्थ मिळतील. वास्तविक हा शब्द संख्याशास्त्र (statistics) आणि अर्थशास्त्र या दोहोंची समाईक संज्ञा आहे. (इंग्रजीत संशोधन जास्त आणि संज्ञांची वाणवा हा एक दुष्ट प्रकार आहे. ते एक असो.) या शब्दाचा सामान्य अर्थ धोका असा घेतला तर अभिप्रेत धन बाजू त्याने कन्व्हे होत नाही. शिवाय "मोअर रिस्क मोअर रिटर्न" अशी एक म्हण कुप्रसिद्ध झाली आहे. ती रिस्क शब्दाची ॠण बाजू लपवते. रिस्क म्हणजे परताव्यांचे standard deviation from mean return. म्हणून रिस्क शब्दाला गुंतवणूकीच्या संदर्भात अनिश्चिती म्हणावे, धोका वैगेरे नाही. ================================================================ रिस्क- रिटर्न कॉम्बो: ज्यात परतावा मिळतो त्या प्रत्येकच प्रकाराला गुंतवणूक म्हटले तर प्रत्येक प्रकारात वेगवेगळ्या रिस्क आहेत. श्रीमंताघरी जन्म घेणे, वारश्याने संपत्ती मिळणे - ० गुंतवणूक , अनंत टक्के परतावा, ० रिस्क गिफ्ट मिळणे, श्रीमंत देशात जन्म - तेच करंट अकाउंट - ० परतावा, नगण्य रिस्क सेविंग अकाउंट - ३-४% परतावा, जुजबी रिस्क जी-सेक, बँक डिपॉझिट, बाँड्स - थोडी जास्त रिस्क, जास्त परतावा शिक्षण, नोकरी - असेच पुढे स्टॉक्स - अजून जास्त रिस्क, जास्त परतावा व्यवसाय, ट्रेडींग (चालू करणे,), शेती- अजून जास्त रिस्क, जास्त परतावा जुगार - अजून जास्त रिस्क, जास्त परतावा (आपल्यामते वरील क्रम वेगळा असू शकतो.) लोक नोकरी सोडून व्यवसाय करताना "रिस्क घेतली (मागे कधी नव्हती)" म्हणतात, पण ते नीट मांडले तर 'व्यवसाय सेटल होईपर्यंत' उपजिविकेतील "रिस्क वाढवली" असे म्हणायला पाहिजे कारण नोकरीत देखिल रिस्क होतीच. (जास्त परतावा नि कमी रिस्क अशा गुंतवणूका बाजारात का नसतात हे नंतर कधीतरी.) =========================================================================== जुगारची रिस्कः प्रत्येक गुंतवणूकीत काय काम करावे, काय करू नये याबद्दलचा एक expertise असतो. जे लोक हे सगळे कंट्रोलेबल पॅरामीटर्स व्यवस्थित हाताळतात त्यांना नशीबाने साथ दिली तर अर्थातच त्यांना जास्त परतावा मिळेल. आता कोणत्या गुंतवणूकीच्या कृतीस जुगार ठरवावे, किती जास्त रिस्क घेणे जुगारी मानावे याची थ्रेशोल्ड कशी ठरवावी? एक उदाहरण घेऊ. मटका लावताना, दहापैकी नऊ आकड्यांवर ० शून्य रुपये नि एका (बसलेल्या) आकड्यावर ८ रुपये याप्रमाणे, = (9/10)*0+(1/10)*8 = 0.8, म्हणजे सरासरी परतावाचा -२०% आहे. आकडा लागला तर ७००% परतावा आहे. नाही लागला तर ०%. इथे सर्वसाधारणपणे जे व्हायचे तेच होत गेले तर गुंतवणूकदार नेहमी आपली २०% गुंतवणूक हरवून बसेल. मग अशी गुंतवणूक करावी का? या गुंतवणूकीचे स्वरुप पहा. गुंतवणूक १ रुपया, सरासरी परतावा उणे २० पैसे, रिस्क २ रु ५३ पैसे !!! जिथे सरासरी परतावाच ऋण आहे तिथे केवळ नशीब आपल्या बाजूने चालेल असा आडाखा बांधणे म्हणजे जुगार असे म्हणता येईल. ============================================================== शेती नि शेअर बाजारः शेती आणि शेअर बाजार यांच्यातील गुंतवणूका नि त्यांचे उपप्रकार यांच्यात भिन्न भिन्न प्रकारचे परतावे नि रिस्क असू शकतात. दोन भिन्न गुंतवणुकांत रिस्क भिन्न असेल तर पैकी एक जुगार ठरत नाही. शिवाय गुंतवणूक ही सहसा १००% आर्थिक नसते, नसावी. माणसाला कशाचे ज्ञान आहे, कशात रुचि आहे, कशाचा तो नंतर तज्ञ बनू शकतो, त्याच्या भावना काय आहेत, इ इ गुंतवणूकीत देखिल महत्त्वाचे असायला पाहिजे/असू शकते. उदा. शेती कशी करावी, ती करायच्या पद्धतीत काय बदल करावेत याबद्दल माझी चार मते असली तरी अ‍ॅज सच शेती या विषयाबद्दल माझ्या व्यक्तिगत भावना पावित्र्यवाचक आहेत. याशिवाय शेतीविषयक भावना पावित्र्यवाचक असणे हे मागासलेपणाचे आहे असे मानणे मी अनिष्ट नि अनावश्यक मानतो. शेअर मार्केट बद्दल देखिल लोकांचे अनेक गैरसमज आहेत, निगेटीव भावना आहेत. मूलतः शेअर बाजाराला जुगार यासाठी म्हणू नये कि शेअरची स्वतःचे काही मूल्य नसते. जे मूल्य असते ते कंपनीच्या व्यवसायाचे असते. एका विशिष्ट कंपनीच्या नावे चाललेल्या व्यवसायाचे वा व्यवसायांचे दिलेल्या वेळी काय मूल्य आहे याबद्दल प्रत्येकाची भावना वेगवेगळी असते, अंदाज वेगवेगळा असतो. त्याशिवाय, हे मूल्य काळामानाप्रमाणे कसे बदलेल याबद्दलही प्रत्येक व्यक्तिची भावना वेगवेगळी असू शकते. हे लोक वेगवेगळ्या फोरमवर एकत्र येतात तेव्हा शेअरच्या किमती (न बोलता?) निगोशिएट करतात नि किंमत बदलत राहते. व्यवसायाची मालकी असंबंधित लोकांनी शेअर केली नि ती विकली वा विकत घेतली तर तो जुगार कसा? शेअर बाजार ही अर्थव्यवस्थेची (पर्यायाने देशाची) मंदिरे असतात. नि सहसा पवित्र (शेअर बाजार) नि अपवित्र (जुगार) शब्द एकत्र करू नयेत. शेअर बाजार नसते तर... तर ...अर्थकारणात, समाजकारणाचा दृष्टांत देऊन, समाजसुधारणच झाल्या नसत्या तर म्हटल्यासारखे आहे. जर शेती नसल्याने लोक भुकेने मरतील असे मानले तर शेअर मार्केट नसल्याने जे व्यवसाय छोटे मोठे नाहीत वा जे व्यवसाय सरकार करू शकत नाहीत ते झालेच नसते असे मानावयास स्थान आहे. अर्थातच सगळं काही इतकं आदर्श नसतं. आता काही शेतकरी शेतीत वा स्टॉक ट्रेडर्स शेअर बाजारात जुगार खेळत असतातच. त्यांचं रिस्क रिटर्न समीकरण भलतंसलतं असतं (त्यांच्यामते त्यांचा अभ्यास असतो), पण म्हणून ही क्ष्रेत्रेच (शेती वा शेअर बाजार ही क्षेत्रे) मानवतेच्या पातळीवर जुगार ठरत नाहीत. कमी ज्ञान असल्यामुळे देखिल शेतीत वा शेअर बाजारात कोण्या माणसाची रिस्क वाढेल. पण या प्रकाराला देखिल व्यक्तिशः मी जुगार म्हणणे टाळेन. म्हणून शेअर बाजार वा शेती यांच्यातील गुंतवणूकीच्या, परताव्यांच्या आणि अनिश्चितांची जाण असेल तर तिकडे आरामात गुंतवणूक करावी. =================================================================== जुगार - एक मानवी मूल्यः उरता उरतो तो प्रश्न म्हणजे शुद्ध जुगार (हे ही सब्जेक्टीव आहे तरी एक अनिष्ट गुंतवणूकीची पद्धत म्हणून स्वीकारली तरी) एक अनिष्ट मानवी मूल्य आहे काय? याचं उत्तर देखिल काळंपांढरं नाही. कधीकधी मला जो जुगार वाटत नाही तो पुढच्याला वाटतो. म्हणजे मी म्हणतो रिस्क कमी आहे नि पुढचा मानतो कि ती जास्त आहे. अशावेळी मी स्वतःला जुगारी नव्हे तर धाडसी मानत असेन. जुगारात मनोरंजन मूल्य आहेच. आपण समृद्ध असताना समोरच्याची आर्थिक काळजी घेऊन खेळलेला जुगार फार तामसिक मानता येणार नाही. जुगार माणूस आपल्या अन्य मूल्यांशी देखिल जोडू शकतो. उदाहरणार्थ कोणी केवळ भारतीय क्रिकेट टीमवर बेट लावतो, पाकिस्तानची टिम किती का सशक्त दिसेना. देशाभिमान! वा वाटते कि दरवेळी मलाच कळते कि कोणती टीम फॉर्मात आहे. मग त्या टीमवर (पर्यायाने स्वतःच्या अभ्यासावर, आत्मविश्वासावर) बेट लावतो. कुठे कोणी मी केवळ आणि केवळ माझे नशीब एका विशिष्ट संदर्भात किती जोरदार हेच आजमावत असतो, दैव इ अभ्यासत असतो. इथे सर्वत्र जुगार हे अन्य मानवी मूल्य प्रकट करावयाचे साधन आहे. म्हणून कोण्या कृतीस जुगार म्हणाताना त्यात किती ऋणभाव लिंपायचा आहे यात तारतम्य बाळगावे.

In reply to by arunjoshi123

खटासि खट 08/07/2015 - 08:55
सुंदर विवेचन. या आधी दिलेला एक प्रतिसाद वाहून गेला. नंतर पुन्हा टंकण्याचा आळस आला. पण हा प्रतिसाद पाहून थोडं कष्ट घ्यायला हरकत नाही असं वाटण्याइतपत उत्साह आला. नव्याने लिहीण्याचा प्रयत्न करतो.

In reply to by खटासि खट

खटासि खट 08/07/2015 - 09:17
शेतीशी शेअरमार्केटची तुलना अनाठायी वाटली. (इतरांचं मत वेगळं असू शकतं). तुलना करायचीच म्हटली तर कशाचीही करता येते असं वाटलं. वरच्या माझ्या प्रतिसादाचं मूल्य त्यापेक्षा जास्त नाही. शेअर बाजाराकडे गुंतवणूक म्हणून पाहण्यात गैर काही नाही. जर ट्रेडींग हा ऑप्शन निवडला तर मग त्यात आणि जुगारात कायदेशीर आणि बेकायदेशीर इतकाच फरक राहील. जसे शेअर बाजाराचे पायदे तोटे सांगता येतात तसे अट्टल जुगारी जुगाराचेही सांगू शकतो. रेसप्रमाणे शेअर बाजार सुद्धा बेभरवशाचा असू शकतो. पंटर्सच्या टीप्स वर पैसे गुंतवणे आणि ट्रेडींग करणे हे जुआगारासारखेच आहे. शेअर बाजारात कंपन्यांकडचे सगळे शेअर्स नसतात. त्यात रोख आणि वायदे असे दोन प्रकार आहेत. रोख म्हणजे माझ्याकडे एखाद्या कंपनीचे अमूक शेअर्स आहेत ते मी विकायला काढले तर जितके शेअर्स विक्रीला उपलब्ध आहेत त्यांचा व्यवहार होणे. हा झाला नेहमीचा व्यवहार. पण एखाद्या कंपनीच्या शेअरबाजाराला मागणी आहे म्हणून सर्वच्या सर्व ग्राहकांना रेल्वेच्या वेटींग लिस्टप्रमाणे तिकीटे देणे हा झाला वायदे बाजार. एखाद्या कंपनीचे सर्वच शेअर्स काही शेअर्स बाजारात विक्रीला असतात असं नाही. जास्तीत जास्त दहा टक्के हा सर्वसाधारण आकड समजू. म्हणजे ९०% शेअर्स हे कंपनीच्या संचालक मंडळ, विविध प्रकारचे गुंतवणूकदार आणि किरकोळ यांच्याकडे असतात. ते शेअर बाजारात नसतात. पण या दहा टक्क्यांच्या जोरावर शंभर टक्के शेअर्सचा वायदा करायचा आणि जसजसे शेअर्स उपलब्ध होतील तसतसे तुम्हाला देण्यात येतील हा त्यात व्यवहार होत असेल तर तो वायदा गट. यात गंमत अशी आहे की हे शेअर्स हातात न पडताच वायद्याच्या जोरावर त्यांची विक्रीही होते. म्हणजे प्रत्यक्ष शेअर्सचं ट्रेडींग न होता खरेदी विक्री होऊन मधल्या मधे मार्जिन काढलं जातं. प्रत्यक्षात त्या शेअर्सची मालकी काही गुंतवणूकदाराच्या हाती आलेली नसते. या प्रकारच्या व्यवहारात गुंतवणूक हे उदीष्ट नसतं. याला सट्टाच म्हणायला हवं. थोडक्यात कृत्रिम गरज किंवा भीती निर्माण करून किंमतीतल्या चढ उतारांमधे लाभ करून घेणे याला ट्रेडींग म्हणतात. यात जुगारापेक्षा काय वेगळं असतं ? कंपनीच्या कार्यक्षमता, पत आणि भांडवलाप्रमाणे शेअर्सची किंमत वाढत जाणे हे ट्रेडींग मधे कुठेही अपेक्षित नसतं. सुरक्षित गुंतवणूकदार मात्र फायद्यात राहणा-या कंपनीत दीर्घ कालावधीसाठी गुंतवणूक करतो. अर्थात तरीही त्यात धोका हा असतोच. कारण कंपनीची पक्षी धंद्याची वाटचाल ही अनेक घटकांवर अवलंबून असते. त्यात प्रतिकूल बदल झाले तर फटका बसू शकतो. या प्रकारच्या धंद्याची तुलना शेतीशी केलेली आवडेल. डोळसपणे जो धोका पत्करला जाऊ शकतो तो इथे अपेक्षित आहे. शेती आणि ज्ञानदान यांच्याकडे पाहण्याचा पारंपारिक दृष्टीकोण आता बदलत चालला आहे. पूर्वी हे क्षेत्रं पवित्र या अर्थानेच पाहीलं जात असे. त्यामुळं नफा तोटा या तत्त्त्वाला फाटाच होता. म्हणूनच बहुसंख्य समाजाला व्यापारात गती नाही. त्यातच शेती मधे आपल्या उत्पादनाचा भाव आपण ठरवू शकत नाही ही गोची आहे. म्हणूनच नवीन पिढी शेती करायला नाखूष असते. शेतकरी नवरा नको ग बाई म्हणून जवळपास बहुतेक मराठी वृत्तपत्रांमधे विशेष लेख आलेत. कारण मुलींना आपलं होणारं मूल हे बेभरवशाच्या धंद्याच्या जोरावर मोठं व्हावं असं वाटत नाही. एखाद्या पिकाला भाव मिळणे आणि नेमकं त्याच वेळी ते पीक आपल्या शेतात तोडणीसाठी उपलब्ध असणे हा योग नेहमी येत नाही म्हणूनच शेतकरी उस उत्पादनाकडे वळू लागले. सर्वांनी साखरच पिकवली तर मग लोकांनी खायचं काय हा प्रश्न जरी रास्त असला तरी शेतक-याला फायदा होत नसेल तर त्याने तो धंदा का करावा हा प्रश्नही आहे. पूर्वीचा लोकांचा दृष्टीकोण आता बदलतो आहे. यावर उपाय करण्यासारखे आहेत. पण फायद्यात चालणारी शेती हा स्वतंत्र लेखाचा विषय आहे. नागरीकांच्या समस्या सुटल्या तर राजकारण्यांच्या वाढतात त्यामुळेही असेल कदाचित समस्या कायम राहत असतील.

ज्यात एकतर भरपूर फायदा होतो अथवा पूर्णपणे नुकसान होते असा जुगार ह्या शब्दाचा अर्थ. स्टॉप लॉस मुळे शेअरमधील गुंतवणूक जुगार ठरत नाही. फ्युचर आणि ऑप्शन हे प्रोडक्ट खरे तर आपल्या पोर्ट्फोलिओच्या संरक्षणाकरिता वापरले गेले पाहीजे, एखादा त्याचा वापर फक्त ट्रेडिंगसाठी स्टॉप लॉस (हे महत्वाचे) न लावता करत असेल तरच तो जुगार ठरू शकतो अन्यथा नाही. जसा एखाद्या कंपनीच्या फ्युचर व ऑप्शनने त्या मूळ कंपनीला काही फायदा होत नाही तसा कमोडिटीतील वायदा व्यवहारानेही मूळ शेतीला काहीही फायदा होत नाही. तेथेही गोदामात माल कमी असताना ज्यादा मालाचे व्यवहार होतात.

In reply to by मार्मिक गोडसे

खटासि खट 08/07/2015 - 12:27
हो, पण ते शेती हा व्यवसाय म्हणून स्विकारणारे करत नाहीत. सट्टेबाज करत असतात. सट्टेबाजांसाठी कमोडीटी, मेटल्स, शेअरबाजार यात काहीही फरक नाही. तुम्ही आता तेलाच्या भावानुसार व्यापा-याकडे दहा लाख जमा करा आणि दिवाळीतल्या भावानुसार वरचा नफा काढून घ्या. त्यासाठी तेल विकत घेण्य़ाची गरज नाही. या व्यापाराशी शेतीचा काहीच संबंध नाही. स्टॉप लॉस हे प्रिव्हेन्टीव्ह मेजर आहे. एकंदर बाजारावर नियंत्रण आणण्य़ाचे साधन नाही. बाजारातली घसरण तुम्ही स्टॉप लॉस लावला म्हणून थांबत नाही.

पण ते शेती हा व्यवसाय म्हणून स्विकारणारे करत नाहीत.
करू शकतात आणि करतातही. राजस्थानातील ठरावीक समाज शेती,साठवणूक,व्यापार व कमोडिटी ट्रेडिंग करतात उदा. गवार उत्पादन.
बाजारातली घसरण तुम्ही स्टॉप लॉस लावला म्हणून थांबत नाही.
असे मी कुठे म्हटलेच नाही. जो गुंतवणूक करतो तो स्टॉप लॉस लावणार, प्रत्येक गुंतवणूकदाराचा स्टॉप लॉस वेगळा असणार त्यामुळे साहजिकच बाजाराची घसरण रो़खण्याशी त्याचा संबंध येउ शकत नाही.

arunjoshi123 08/07/2015 - 16:29
उपप्रतिसाद देताना लेख दिसत नाही, अन्य प्रतिसाद दिसत नाहीत, म्हणून ... =======================================================================
शेतीशी शेअरमार्केटची तुलना अनाठायी वाटली.
सहमत. अशी तुलना अनाठायीच नव्हे तर तांत्रिकदृष्ट्या अर्थहिन आहे. हायपोथेटिकली, कोणी शेतकरी आपली "शेत लिमिटेड" ही कंपनीच लिस्ट करू शकतो. मग प्रत्यक्ष शेती करणे आणि शेत लिमिटेडचे समभाग खरीदणे, विकणे यात तुलना करणे म्हणजे वेल्डींग, मशिनिंग करणे आणि टाटा मोटर्सचे समभाग घेणे यांत तुलना केल्यासारखे आहे. मूळ लेखाच्या लेखकाचा उद्देश वेल्डर आणि टाटा मोटर्सच्या समभागांची देवाण घेवाण करणारा यांची आर्थिक/मौलिक तुलना करण्याचा दिसला. गुंतवणूक वा उपजिविका ही कंझर्वेटीव अप्रोचवर आधारित, मानवी गरजा भागवायच्या कृतींना समांतर जाणारी, एखाद्या तुक्क्यात आपल्या संपत्तीचे बरेवाईट न करणारी अशी असावी. शेती व समभागबाजार यापैकी काय असं आहे, काय नाही, इ इ. त्या अंगाने मी वरील विचार मांडले होते. =====================================================================
पंटर्सच्या टीप्स वर पैसे गुंतवणे
पंटर्स माहिती, अभ्यास इ इ नसलेले आहेत असे सिद्ध झालेले असतानाही, केवळ ट्रेड वाढवण्यासाठीच्या त्यांच्या कृतींना बळी पडत, पैसे गुंतवणे नक्कीच चूक आहे. पण इंट्रिन्सिकली व्यवसायात सल्ला घेण्यात काही अनिष्ट नसावे. ========================================================================
ट्रेडींग हा ऑप्शन निवडला तर मग त्यात आणि जुगारात कायदेशीर आणि बेकायदेशीर इतकाच फरक राहील.
भाग १: या विधानावर आपण पुनश्च सुक्ष्म विचार करावा (वा मला करायला लावावा) अशी विनंती आहे. प्रत्येक व्यवसायात भांडवल - गुंतवणूक - प्रोजेक्ट - ऑपरेशन -उत्पादन - होलसेल- रिटेल (ट्रेडिंग)-उत्पन्न अशी साखळी असते. किमान असल्या ट्रेडिंग अ‍ॅक्टीवीटीवर अर्थातच कोणाचेही काही ऑब्जेक्शन नसायला हवे. शेअरबाजारातली शेअर्सची ट्रेडिंग अर्थातच या ट्रेडिंगपेक्षा खूप भिन्न आहे हे मान्य करूयात. शेअरबाजारातली दीर्घकालीन गुंतवणूक बुद्ध्या व्यवसाय केल्याप्रमाणेच आहे आणि तिच्यासाठी आपल्याला आदर आहे हे प्रतिसादात दिसते. पण कंपन्यांच्या व्यवसायांच्या मालकीच्या अल्पशा अंशांची रोजच्या रोज खरेदी विक्री करणे मौलिक आहे का, जुगार आहे का, बेकायदेशीर असावे का, अर्थकारणासाठी अनिष्ट आहे का, इ इ प्रश्न पडणे साहजिक आहे. हा चर्चेचा विषय आहे. ------------------------ भाग २: त्यापूर्वी आपण थोडे स्टॅट्स पाहू. १. भारतात २.५ कोटी पब्लिक शेअरट्रेडर्स असावेत. (फार नक्की आकडा शोधण्यात अर्थ नाही.) २. साधारणतः ५५०० कंपन्या लिस्टेड आहेत. ३. इथे खाली एका टेबलमधे २००७ मधे पब्लिक शेअर होल्डिंग १३% होती असे लिहिले आहे. http://finmin.nic.in/reports/Discussion%20Paper%20Public%20Holdings.htm ४. या टेबलमधल्या अन्य बर्‍याच फंडांचे अंतिम मालक सामान्य लोक आहेत. जसे, म्यूच्यूअल फंड. ५. इथे सार्‍या लिस्टेड भारतीय कंपन्यांना २०१४/२०१७ पर्यंत किमान पब्लिक होल्डींग २५% आवश्यक आहे/असेल असे लिहिले आहे. http://articles.economictimes.indiatimes.com/2014-10-09/news/54827541_1_30-listed-psus-public-shareholding-cent-public-holding मालकीच्या इतक्या व्यापक बाजारात ट्रेडर्स नसले तर ...? ----------------------- भाग ३: इथे मी प्रो- शॉर्ट टर्म स्टॉक ट्रेडिंग काही आर्ग्युमेंट्स करायचा प्रयत्न करतो. १. मला दीर्घकालीन गुंतवणूक कळते असे मानले तरी माझ्याकडे कधी पैसे आहेत नि कधी पैसे गुंतवण्याची योग्य वेळ आहे हे बिंदू जुळतील का? कधी पैसे काढायचे नि कधी पैसे घरी हवे आहेत हे बिंदू जुळतील का? हे शेवटपर्यंत जुळलेच नाही तर मी शेअरबाजारात गुंतवणूक करूच नये कि काय? २. रोजच्या रोजच आर्थिक जगात आणि आर्थिक जगाबाहेर एकूणच (पर्यायाने एकूणच शेअरबाजारावर) ज्या घटना घडतात त्याचे सुक्ष्म वा मोठे, लघुकालीन (वा दीर्घकालीन -पण इथे रिडंडंट) परिणाम व्यवसायांवर (पर्यायाने शेअरच्या किमतीवर) होत नाहीत काय? काही लोकांना दीर्घकालाची अंधता असू शकते पण लघुकालाची दृष्टी शार्प असू शकते. ३. दीर्घकालाची गुंतवणूक खूप अनालिसिस नंतर होते. आदर्शतः अनालिस्टांच्या नुसार कधी गुंतवणूक करायची नि कधी काढून घ्यायची याबद्दलचा निष्कर्ष सगळ्यांप्रमाणे समान निघण्याचे चान्सेस जास्त आहेत. म्हणजे लवकरच आकर्षक एन्ट्री प्राईस वाढून अनाकर्षक होणार. म्हणजे बाजाराची दिशा एकच -वर. किंवा उलटे. मग दीर्घकालीन गुंतवणूकदारांपेक्षा रिस्कच्या आणि परताव्याच्या वेगळ्या अपेक्षा असणारांचे काय? वास्तविक ट्रेडर्स हे आपल्या भिन्न प्रकारच्या अप्रोचमुळे दीर्घकालीन गुंतवणूकदाराला लिक्विडीटी प्रोवाइड करून देतात. हा खूप महत्त्वाचा रोल आहे. ४. प्रोमोटर्स, इ ची होल्डींग सोडली तर उरलेल्या भागात अनेक फंडांच्या रुपात सामान्य लोकांची अप्रत्यक्ष होल्डींग खूप असते. म्हणून इथे "रेग्यूलर प्राइस डिस्कवरी" होत राहणे गरजेचे असते. ट्रेडर्स नसतील तर हे असंभव वाटते. ५. लघुकालीन ट्रेडींग हे तुम्ही जे पैसे हरवणे अफोर्ड करू शकता त्यावरच करणे अभिप्रेत आहे. ती संपूर्ण उपजिविका म्हणून अभिप्रेत नाही. ७. अंततः- मला जो गाडेवाला टमाटे विकतो, त्या टमाट्यांचे रिटेल भाव देखिल सकाळ, दुपार, संध्याकाळ बदलत असतात. तरीही तो त्याने ज्या किमतीला टमाटे घेतले आहेत त्यावर बिझनेस करतो. कारण आपल्याला नफा होईल असा व्यवहार होईल अशी त्याची अपेक्षा असते. मग एखाद्या फायनान्शियल इंस्ट्रूमेंटमधे ट्रेड करणे विशेष गैर का मानावे? इथे अर्थातच मी अशा ट्रेडींगमधे गैरव्यवहार करणारे लोक सोडून बोलत आहे. गैरव्यवहारावरील टिका आणि व्यवसायावरील टिका हे भिन्न मुद्दे आहेत हे लक्षात ठेवले पाहिजे. =========================================================== भाग ४: लघुकालीन ट्रेडिंग जुगार मानता येणार नाही. कारण जुगारासाठी जे रिस्क रिटर्न काँबो आहे, तसा प्रकार ट्रेडिंगमधे होत नाही. शेअरचे मूल्य कंपनीच्या मूल्यावर आधारित आहे. ट्रेडिंग गुंतवणूकदारांच्या भावना, अभ्यास, इ इ कितीही हेलकावे खात असल्या तरी त्यांना एक आधार आहे. १०० रुपयाचा शेअर २-३ दिवसात कोणत्या बँडमधे राहिल याला बर्‍यापैकी मर्यादा आहे. इथेही होत्याचा नव्हता होणे प्रकार होतो, पण तो अन्यत्र सर्व व्यवसायांत देखिल होतो. शॉर्ट टर्म ट्रेडिंग मूर्खपणाने कसेही करणारे अनेक जण असतात हा भाग वेगळा, पण त्यामुळे तो प्रकार जुगार ठरत नाही. अन्य लोक तो व्यवस्थित करत असतात. ------------------------------------- भाग ५- इथे आपण ट्रेडिंगच्या कायदेशीर/बेकायदेशीरपणा बद्दल पाहू. जुगाराचं स्वरुप (रिस्क -रिटर्न काँबो) भलतंसलतं असतं. १. छापा पडला तर अर्धे राज्य आणि राजकुमार/री आणि काटा पडला तर एक मिनिटात शिरच्छेद. २. हा खेळ खेळणे बंधनकारक नाही. ३. हा खेळ खेळायला १ रु द्यावा लागेल. इथे असला जुगार मानवतेच्या मौलिक अंगांना स्पर्श करतो. शुद्ध जुगार हा आर्थिक, म्हणजे मूल्यवाचक असायला हवा, मौलिकतावाचक नाही. जुगारात जसा माणूस बरबाद होतो तसा व्यवसायातही होतो. दोहोंत फरक काय? कदाचित तडकाफडकीचा! धुंदीच्या क्षणी आयुष्य बर्बाद करून घ्यायच्या जागा देशात नसाव्यात असे सरकारला वाटू शकते. तिथे बंदीचा विचार करता येईल. बाजारात अव्वाच्या सव्वा जास्त रिस्क आणि अव्वाच्या सव्वा रिटर्न असा काँबो गुंतवणूक ऑफर करण्याचा नि अशी गुंतवणूक स्वीकारण्याचा अपेटाईट असू शकतो. मग पहिला प्रश्न असा आहे कि शॉर्ट टर्म ट्रेडिंग असला प्रकार आहे का? दुसरा प्रश्न असा आहे कि सरकारने त्याला नियामित करावे काय वा एका मर्यादेबाहेर असा अपेटाईट, बाजार बेकायदेशीर ठरवावा काय? पहिल्या प्रश्नाचे उत्तर देताना लघुकालीन ट्रेडर्सना नेहमी तोटा होता नि नेहमी तो दुसर्‍या (promoters and institutional investors)प्रकारच्या गुंतवणूकदारांना अक्र्यू होतो असे आहे काय? असे झाले असते हे मार्केटच संपले असते. आणि हे लोक जुगारी आहेत आणि लॉस झाला तरी कधी ना कधी फायदा मिळेल म्हणून जुगारी वृत्तीने पैसे लावत असतात असे म्हणावे तर या गुंतवणूकीत तशी अव्वाच्या सव्वा काय सव्वा देखिल रिटर्न मिळत नाहीत. प्रोमोटर्स इ इ ची पार्टी चालली असताना त्यांच्यातले दाणे वेचणारे हे छोटे उंदीर आहेत. स्टॉक मार्केट हा झीरो सम गेम नाही. यात जुगारी फायदा अजिबातच नाही. या मार्केटचे सरासरी रिटर्न ऑन इन्वेस्टमेंट १% ते २५% (वार्षिक) यामधे काहीतरी असेल. (मला कल्पना नाही.) आता उरतो प्रश्न दिवसाला ५% ते ८% (सेलिंग पोहोचेपर्यंत) बदल झाला तर रिटर्न किती मिळाले. दिवसाला ५% म्हणजे वर्षाला १८ पट परतावा!!!! १८००% रिटर्न!!!!! इथे तो जुगार वाटायला चालू होतो! पण असा हिशेब करणे चूक आहे. हे गेन्स नंतर पुसले जातात नि मार्केटच्या सरासरी इतकेच रिटर्न मिळते. त्सुनामीच्या उंचीवरून भरतींची उंची मोजू नये. अगदी दुकानात माल विकताना १० सेकंदांत १००रुच्या मालावर १० रुपये मिळाले तर आपण रिटर्न तशी मोजतो का? पूर्ण महिन्यात काय होते ते पहायला पाहिजे. पहिला प्रश्न (हा प्रकार जुगार आहे का?) इथे सोडवला जातो व दुसरा (बेकायदेशीर, अनैतिक ठरवावा काय?) उद्भवत नाही. =================================================================== वायदा बाजार - समजा एका शेअरचा भाव आज ३००० रुपये आहे. तो शेअर ३ दिवसांनी ३१०० चा होणार याची मला खात्री आहे (वाटते). नाही झाला तर जो काही तो तोटा सहन करण्याची माझी इच्छा नि पात्रता आहे. पण माझ्याकडे रुपयेच ३०० आहेत. माझे हे ज्ञान वाया जावे का? मी बाजारापासून दूर राहावे का? हे झाले सामान्य बाजाराचे चित्र. कोणी जण ३ दिवसांनी हा शेअर आज ३० रु प्रिमियम घेऊन (म्हणजे ३०३० ला), बाजारात काही किंमत असेना, विकायचे प्रॉमिस करतोय. वायदा बाजारात ट्रेडिंग करण्याची सामान्य माणसाची अफोर्डेबिलिटी वाढते. मग तो चांगला का वाईट? ============================================ मी इथे केवळ, शॉर्ट टर्म शेअर ट्रेड नि जुगार इतक्याच विषयावर तांत्रिक मतांतरे मांडण्याचा प्रयत्न केला आहे. संक्षेपात मत न मांडता येणे हा दोष मान्य आहेच. शॉर्ट टर्म शेअर ट्रेड मधले गैरव्यवहार नि अन्य बाबींवरची आपली मते यांचेशी सहमती आहे.

In reply to by arunjoshi123

खटासि खट 08/07/2015 - 21:17
शेती, शेअर बाजार आणि जुगार या तिन्ही धंद्यात प्रावीण्य मी मिळवलेले नाहीये. तुमचा अभ्यास दांडगा आहे याची नोंद घेतो.त्याबद्दल कौतुक. तुलनेचा मुद्दा स्पष्ट झालेला आहे याबद्दल धन्यवाद. खूप खोलात जाण्याची आवश्यकता नाही. गुंतवणूक आणि त्रेडींग यात फरक आहे असं माझं मत आहे. हाय रिस्क हाय गेन हे सूत्र कुठल्याही धंद्याला लागू होतं अ, त्यामुळे लिमिटेड रिस्क घेतली तर नुकसानीची शक्यता कमी होते त्याचप्रमाणे फायदा ही कमी होतो. जुगारात, रेसमधेही नियमित फायद्यात असणारे लोक पाहण्यात आहेतच. त्यांची मतं वेगळी असू शकतात.

सुधीर 09/07/2015 - 10:44
@arunjoshi123 दोन्ही दीर्घ प्रतिसाद आवडले. फ्यूचर/ऑपश्न आणि इंट्राडे ट्रेडींग या दोन्हींच्या उपयुक्ततेबद्धल मी सहमत आहे. जुगार म्हणजेअमूक एका आउटकमची १००% खात्री नसताना, तेच आउटकम येण्याची जास्त शक्यता अशी अटकळ बांधून खेळलेला डाव. या न्यायाने केवळ शॉर्ट टर्म शेअर ट्रेडींगच नव्हे इक्विटी मधली लाँग टर्म गुंतवणूकीलाही जुगार म्हणता येईल. (एक ऑड आउटकम असे आहे की, एका ठराविक पाच वर्षात एफडी निफ्टीला आउट-परफॉर्म करते) मूळात जुगाराकडे वाईट नजरेनेच पहायला हवं का? हा खरा प्रश्न आहे. मी कसिनोच्या मशीन्स मध्ये पैसे उडवलेत (खात्री पण होती सगळे पैसे हरणार आहे). पण तुम्ही वर म्हटल्याप्रमाणे मनोरंजन मूल्यांचं सुख पैसे बुडाल्याच्या दु:खा पेक्षा अधिक होतं. पोर्टफोलिओची डाउनवर्ड रिस्क हेज करण्यासाठी मी ऑपश्नस मध्ये पण ट्रेडींग करतो. पण ती काउंटर रिस्क घेतल्यामुळे मला इंडेक्सला आउटपरफॉर्म करण्याची संधी मिळते. (वर म्हटल्याप्रमाणे जुगार हा दरवेळेला आर्थिक असेलच असे नाही. माझे लग्न झालेले मित्र तर मला नेहमी म्हणतात लग्न पण एक जुगार आहे असं म्हणून. ;) असो.) कुठलीही कृती म्हटली की भावना आल्याच. मग पैशाचे व्यवहार तरी कसे अपवाद असतील. माणसं परफेक्ट रॅशनल डिसिजन मेकर्स नसतात. अगदी साधी एफडी करण्याचा निर्णय घेतला तरी (जस्ट एक उदाहरण म्हणून). त्याला कारणं आहेत. १. सगळी माहिती उपलब्ध नसते. (आजूबाजूला कुठल्या खाजगी/सरकारी बँका आहेत? एफडीवर रेट काय आहेत?) २. बर्‍याच वेळा असलेल्या माहीतीचा वापर कसा करायचा याचं ज्ञान नसते. (कॉग्निटिव्ह स्किल्स. कुठल्या बँकेची अ‍ॅसेट क्वालिटी चांगली आहे? एनपीए किती आहेत वगैरे). त्यामुळे उपलब्ध माहिती आणि ज्ञान याच्या आधारे माणसं "समाधान होईल" असा जो काही निर्णय घेतात त्याला बाउंडेड रॅशनॅलिटी म्हणतात. प्रॉस्पेक्ट थिअरी आहे बिहेविअरल फायनान्स मध्ये. खूप रोचक आहे. लोक जुगाराकडे-लॉटरी तिकीटांकडे कसे पाहतात त्यावर. जुगाराचे २ सेट पाहू. पहिल्या सेट मध्ये तुम्ही अ किंवा ब निवडा. दुसर्‍या सेट मध्ये क किंवा ड. पहिला सेटः अ) २५% खात्री(प्रोबॅबिलीटी) आहे की तुम्हाला ३००० रुपये फायदा होईल. ब) २०% खात्री आहे की तुम्हाला ४००० रुपये फायदा होईल. अ) का ब) हे तुमचं उत्तर ठरवा. दुसरा सेट दोन टप्यांचा आहे. पहिला टप्पा: ७५% खात्री आहे की तुम्ही दुसर्‍या टप्यासाठी पात्र होणार नाही आणि तुम्हाला काहीच फायदा होणार नाही. २५% खात्री आहे की तुम्ही दुसर्‍या टप्यासाठी पात्र व्हाल. दुसरा टप्पा: क) १००% खात्री आहे की तुम्हाला ३००० रुपये मिळतील. ड) ८०% खात्री आहे की तुम्हाला ४००० रुपये मिळतील. क) का ड) हे तुमचं उत्तर ठरवा. हा सर्वे जेव्हा करण्यात आला तेव्हा धक्कादायक रित्या हे समोर आले की ६५% लोकांनी अ आणि ब पैकी ब निवडला आणि त्याच लोकांपैकी ७८% जणांनी क आणि ड पैकी क निवडला. गणिताच्या (प्रोबॅबिलिटीच्या) भाषेत अ - क आणि ब - ड हे समसमान आहेत आणि कुणीही रॅशनल माणूस ब किंवा ड निवडेल. कारण त्यांचे एक्सपेक्टेड रिटर्न्स (प्रोबॅबिलिटी * मिळणारा फायदा) सेम आहेत. अ) ०.२५ * ३००० = ७५० ब) ०.२० * ४००० = ८०० क) (०.२५ * १.० ) * ३००० = ७५० ड) (०.२५ * ०.८) * ४००० = ८०० याला केनमन ने "आयसोलेशन इफेक्ट" असे म्हटले आहे. माणसं उपलब्ध पर्यायाकडे कुठल्या नजरेने पाहतात (फ्रेमिंग) आणि उपलब्ध पर्यायांची तुलना (इव्हॅल्यूशन) कसे करतात यावर निवड अवलंबून असते. १०० रुपये फायदा झाल्यावर २५ क्ष आनंद होणार असेल तर १०० तोटा झाल्यावर २५ क्ष पेक्षा अधिक दु:ख होते म्हणून ही थिअरी असं म्हणते की माणसं रिस्क अव्हर्स पेक्षा लॉस अव्हर्स असतात. जुगाराच्या बाबतीत मिळणारा संभाव्य फायदा हा होणार्‍या संभाव्य तोट्या पेक्षा अधिक अनंदादायी असला तरच माणसं जुगार खेळतात.

In reply to by सुधीर

arunjoshi123 14/07/2015 - 13:48
याला केनमन ने "आयसोलेशन इफेक्ट" असे म्हटले आहे. माणसं उपलब्ध पर्यायाकडे कुठल्या नजरेने पाहतात (फ्रेमिंग) आणि उपलब्ध पर्यायांची तुलना (इव्हॅल्यूशन) कसे करतात यावर निवड अवलंबून असते.
http://market.subwiki.org/wiki/Isolation_effect इथे आयसोलेशन इफेक्टचे मूलभूत वर्णन दिले आहे. आपल्या उदाहरणांत आयसोलेशन मधे दिलेली ऑप्शन्स कोणती व बेसलाईन सहित दिलेली कोणती हे स्पष्ट करण्याची विनंती. ======================================
जुगार म्हणजे अमूक एका आउटकमची १००% खात्री नसताना, तेच आउटकम येण्याची जास्त शक्यता अशी अटकळ बांधून खेळलेला डाव.
ज्या गुंतवणूकित एक्सपेक्टेड रिटर्न हे इन्फ्लेशनपेक्षा कमी आहे हे खरोखरच सुनिश्चित आहे (तुमचे पैसे जाणार हे म्हणण्याची पद्धत) आणि रिस्क खूप जास्त आहे (मिळाले तरच खूप पैसे मिळणार) अशा गुंतवणूकीला जुगार म्हणता येईल.

In reply to by arunjoshi123

सुधीर 14/07/2015 - 22:21
पहिल्या सेट मधले दोन जुगार हे बेसलाइन आहेत. पहिल्या सेट मध्ये ब) निवडणे आणि दुसर्‍या सेट मध्ये (दोन्ही पायर्‍या एकत्रित धरून) ड) निवडणे सम-समान आहे. दुसरा सेट दोन पायर्‍यांचा (आयसोलेशन्स) बनविल्याने, पहिल्या पायरी नंतर क) जुगार काही जणांना ड) पेक्षा जास्त आकर्षक वाटतो. (काहीसं कौन बनेगा.. मध्ये 'पडाव' पार केल्यानंतर, जेव्हा एखादं उत्तर १००% माहीत नसते आणि सगळ्या हेल्पलाईन संपलेल्या असतात, तेव्हा काही माणसं कन्फर्म पैसे घेऊन न खेळता एक्झीट मारणं पसंद करतात काहीसं तसचं) वरचं उदाहरण मी सीएफए लेव्हल ३ च्या करीक्युलम बुक मध्ये वाचले होते. [नुकतेच ;) ] म्हणून शेअर केले. जुगार नेमकं कशाला म्हणावे हे माहीत नाही. जुगार व्यक्तीसापेक्ष असतात असा काहीसा तुमच्याच वरच्या प्रतिसादातला धागा पकडून मी सर्वव्यापक जुगार काय असू शकतो असा विचार केला. कदाचित त्यात काही उणीवा असूही शकतील.
माझे बाबा घरूनच ऑनलाईन शेअर ट्रेडिंग करतात. एके दिवशी बाबांबरोबर मी शेअर ट्रेडिंगचे लाइव ट्रेनिंग घेत असताना बाबांचा मित्र घरी आला, माझ्या डोक्यात टपली मारली व म्हणाला जुगाराचे ट्रेनिंग चाललेय वाटत ? बाबा गालातल्या गालात हसले, त्यांनी आपली खुर्ची स्क्रीनपासून बाजूला घेतली व ट्रेडिंगची सूत्रे माझ्याकडे दिली. मित्राला बसावयास खुर्ची दिली. (बाबांचे हे मित्र विज्ञानाचे पदवीधर होते परंतू गावाकडे वडिलोपार्जित २५-३० एकर शेती होती व शेतीची आवड असल्यामुळे त्यांनी शेती हाच व्यवसाय स्वीकारला आज ते यशस्वी बागायतदार म्हणून ओळखले जातात.) बाबांनी आपला मोर्चा मित्राकडे वळवला.

हिंदी चित्रपट प्रश्न

आशु जोग ·

६. अभिनेत्री टूणटूण यांनी गायलेले सुरेल गाणे ====> अफसाना लिख रही हुं... १०. विमल रॉय यांनी पुनर्जन्मावर काढलेला चित्रपट सांगा ====> मधुमती (युसुफखान उर्फ दिलीप कुमार २ भुमिका, वैजयंती माला ३ भुमिका) ११. मूळात कॅमेरामन असलेल्या दिग्दर्शकांची नावे आणि त्यांचे चित्रपट सांगा ====> नरीमन इराणी (डॉन १९७८...उर्फ कालिचरणचे विडंबन)

५. ओह माय गॉड २६. कटरीना कैफ करणार आहे म्हणे रणबीर कपूरशी! बाकी माझा पण पास. आणि र्‍हितिक रोशन चा फोटो द्यावा ही विनंती म्हणजे बाकी उत्तरांसाठी थोडे इन्स्पिरेशन मिळेल.

१. अनुष्का शर्मा यांचे किमान दोन हिट चित्रपट सांगा
पीके जब तक है जान
२. जॉन अब्राहम यांची निर्मिती असलेला चित्रपट सांगा
विकी डोनर
८. आशुतोष गोवारीकर यांनी आपल्या काकांच्या व्यक्तिरेखेचा आधार घेऊन काढलेला चित्रपट कोणता
स्वदेस .
१४. दिलीपकुमार यांचे जन्मगाव कोणते
पेशावर
१६. विजय भट यांचा 'गु' ने सुरु होणारा चित्रपट सांगा
गुंज उठी शहनाई
१७. तसेच त्यांच्या नातवाचाही 'गु' ने सुरु होणारा चित्रपट सांगा
गुलाम
२१. सुधीर फडके यांनी संगीत दिलेली हिंदीतली किमान दोन गाणी सांगा
ज्योती कलश छलके - एकच आठवतय ...
२६. परदेशी धर्मीय नटीने भारतीय धर्मीय मनुष्याशी लग्न केले आहे अशी उदाहरणे सांगा
जेनिफर केंडल - शशी कपूर
२९. घरातून कुणाचाही वारसा नसताना हिंदी चित्रपटात नायक बनलेल्यांची नावे सांगा
शाहरुख खान अक्षयकुमार नवाझुद्दिन सिद्दिकी सुशांत सिंग

हुप्प्या 03/02/2015 - 08:48
१२. हृषिकेश मुखर्जी हे आधी कॅमेरामन होते. मग दिग्दर्शक. सिनेमे आनंद, नमक हराम, अभिमान, गोलमाल, नरम गरम, रंगबिरंगी इ. २४. ये जीवन है हे पिया का घर ह्या सिनेमातले गाणे आहे. हा सिनेमा मुंबईचा जावई ह्या मराठी सिनेमावर आधारित होता. हा सिनेमा व. पु. काळ्यांच्या कथेवर आधारित होता. २६. परदेशी धर्मीय म्हणजे काय? भारतीय धर्मीय म्हणजे काय? २७. रमेश भाटकर आणि राकेश रोशन ह्या दोघांचे वडिल संगीतकार होते.

In reply to by हुप्प्या

बोका-ए-आझम 03/02/2015 - 09:44
ह्रषिकेश मुखर्जी कॅमेरामन नाही, संकलक होते. जशी बिमलदांनी कॅमेरामन-दिग्दर्शक ही परंपरा सुरु केली, तशी ह्रषिदांनी संकलक-दिग्दर्शक ही परंपरा सुरु केली.

In reply to by हुप्प्या

आशु जोग 03/02/2015 - 16:25
बरोबर हुप्प्याजी व पु काळे यांची मासिकात प्रसिद्ध झालेली कथा होती 'कुचंबणा' त्यावर मुंबईचा जावई, त्यावर पिया का घर

बोका-ए-आझम 03/02/2015 - 09:15
१. अनुष्का शर्मा यांचे किमान दोन हिट चित्रपट सांगा रब ने बना दी जोडी, बँड बाजा बारात,पीके २. जॉन अब्राहम यांची निर्मिती असलेला चित्रपट सांगा विकी डोनर, मद्रास कॅफे ३. बेला शेंडे, हृतिक रोशन यांचे योगदान असलेला चित्रपट सांगा ४. चलती का नाम गाडी आणि साडे माडे तीन यांच्या कथेमधला किंवा प्रसंगामधला एखादा फरक सांगा ५. श्रीकृष्णाची व्यक्तिरेखा असलेला अलिकडचा हिंदी चित्रपट सांगा ६. अभिनेत्री टूणटूण यांनी गायलेले सुरेल गाणे अफसाना लिख रही हूँ - चित्रपट दर्द, संगीतकार नौशाद, गीतकार - प्रेम धवन ७. मुन्नाभाई एम बी बी एस शी साधर्म्य असणारे मराठीतील दोन चित्रपट सांगा. कसे तेही सांगा ८. आशुतोष गोवारीकर यांनी आपल्या काकांच्या व्यक्तिरेखेचा आधार घेऊन काढलेला चित्रपट कोणता स्वदेस ९. राज कपूर आणि पृथ्वीराज कपूर यांच्या वयातले अंतर किती १०. विमल रॉय यांनी पुनर्जन्मावर काढलेला चित्रपट सांगा मधुमती ११. विमल रॉय यांच्या काही शिष्य किंवा सह-दिग्दर्शकांची नावे सांगा ह्रषिकेश मुखर्जी, बासु भट्टाचार्य (जावई) १२. मूळात कॅमेरामन असलेल्या दिग्दर्शकांची नावे आणि त्यांचे चित्रपट सांगा बिमल राॅय - बंदिनी, सुजाता, देवदास अशोक मेहता - मोक्ष संतोष सिवन - अशोका १३. लता मंगेशकर यांना सर्वप्रथम गायनाची संधी देणार्‍या निर्मात्याचे आडनाव सांगा जोगळेकर (आपकी सेवामे चे निर्माते वसंत जोगळेकर.) १४. दिलीपकुमार यांचे जन्मगाव कोणते पेशावर १५. मराठीतल्या 'आई शप्पथ' या चित्रपटाशी हिंदीतल्या कोणत्या चित्रपटाचे साधर्म्य आढळते. स्पष्ट करा. १६. विजय भट यांचा 'गु' ने सुरु होणारा चित्रपट सांगा १७. तसेच त्यांच्या नातवाचाही 'गु' ने सुरु होणारा चित्रपट सांगा १८. गदिमांची पटकथा असलेले हिंदी चित्रपट सांगा १९. एकाच वर्षी हिंदी व मराठीमधे सर्वात हिट चित्रपटाला संगीत देणारा संगीतकार कोण २०. सुधीर फडके यांच्या हाताखाली अनेक संगीतकार तयार झाले, त्यांच्याही हाताखाली अनेक संगीतकार तयार झाले. सुधीर फडके ते गदरचे संगीतकार यांच्यातली परंपरा सांगा २१. सुधीर फडके यांनी संगीत दिलेली हिंदीतली किमान दोन गाणी सांगा ज्योति कलश छलके - भाभी की चूडियां, बांध प्रीती फुलडोर - मालती माधव २२. ए आर रेहमान यांचे फ्लॉप चित्रपट सांगा तहजीब २३. मुन्नाभाई एमबीबीएस आणि थ्री इडियट्स यांमधील साम्ये सांगा (दिग्दर्शक, निर्माते तर सांगाच पण चित्रपटातली सुद्धा सांगा) २४. व पु काळे आणि ये जीवन है इस जीवन का या गाण्यातला संबंध स्पष्ट करा २५. लक्ष्मी प्यारे यांची बडबडगीते न वाटणारी सुरेल गाणी सांगा २६. परदेशी धर्मीय नटीने भारतीय धर्मीय मनुष्याशी लग्न केले आहे अशी उदाहरणे सांगा जेनिफर केंडाॅल - शशी कपूर २७. रमेश भाटकर आणि राकेश रोशन यांच्यातले एखादे साम्य सांगा दोघेही डोक्यात जातात! २८. भालजी पेंढारकर दिग्दर्शक, पृथ्वीराज कपूर अभिनेते असा हिंदी चित्रपट सांगा २९. घरातून कुणाचाही वारसा नसताना हिंदी चित्रपटात नायक बनलेल्यांची नावे सांगा राजेश खन्ना, शाहरुख खान

In reply to by बोका-ए-आझम

आशु जोग 03/02/2015 - 16:22
संतोष सिवन यांचे नाव वाचून बरे वाटले अलिकडे त्यांचा तहान नावाचा एक चित्रपट आला होता. लॉरेन्स डिसूझा - साजन

क्लिंटन 03/02/2015 - 17:03
दिलीपकुमारचा जन्म कुठे झाला या प्रश्नाचे सोडून इतर एकाही प्रश्नाचे उत्तर मला माहित नव्हते. टुण्टुण नावाची कोणी अभिनेती आहे हे ही मला माहित नव्हते. (एक नंबरचा रूक्ष) क्लिंटन

In reply to by आशु जोग

आशु जोग 06/02/2015 - 00:01
7 9 15 18 19 23 25 28 हे प्रश्न राहीलेच की प्रयत्न करा धमकी : -अन्यथा राहिलेल्या प्रश्नांसाठी मी नवा धागा काढेन

चौकटराजा 03/02/2015 - 18:35
वपुंच्या कथेवर प्रथम मराठीत मुंबईचा जावई हा चित्रपट निघाला मग अनिल धवन , जया भादुरी यांचा पिया का घर निघाला. त्यात हे गीत आहे ये जीवन हे, इस जीवनका यही है यजी है रंगरूप......

अफसाना लिख रही हुं ...हे उमा देवीने म्हटलेले आहे ... तेव्हा उमादेवी tuntun म्हणून ओळखली जात नव्हती

पहिला राजा 04/02/2015 - 16:01
उत्तर नंतर , आधी माझा पण १ सोप्पा प्रश्न : तुम्हाला हे सगळे प्रश्न का पडले ????? ( केव्हा नाही, कारण वेळ ००.४५ दिसते आहे , इतक्या रात्री पर्यंत जागरण केले तरच असे विचार (कम प्रश्न) येऊ शकतात अशी आमची १ शक्यता

आदूबाळ 06/02/2015 - 02:20
१९. एकाच वर्षी हिंदी व मराठीमधे सर्वात हिट चित्रपटाला संगीत देणारा संगीतकार कोण
वसंत देसाई, अण्णा चितळकर यापैकीच उत्तर असणार

In reply to by आशु जोग

आदूबाळ 06/02/2015 - 16:24
चितळकर, देसाई आणि (काही प्रमाणात) राम वाईरकर हेच एका वेळी मराठी + हिंदी चित्रपटांना संगीत देत असत. त्यावरून केलेला अंदाज आहे.

In reply to by टवाळ कार्टा

आशु जोग 07/02/2015 - 00:44
अजय - अतुल?? असतील तर चित्रपटही सांगा चितळकर असतील तरी चित्रपट सांगा... वरचे काही प्रश्न सोडवल्यास आपोआप उत्तर मिळू शकेल

In reply to by अर्धवटराव

आशु जोग 07/02/2015 - 16:52
कुठले वर्ष कोणते चित्रपट बा द वे पृथ्वी आणि राज हेही कोणी उत्तरलेले नाही

प्रदीप 15/02/2015 - 14:11
लक्ष्मी प्यारे यांची बडबडगीते न वाटणारी सुरेल गाणी सांगा म्हणजे नक्की काय हवे आहे, कृपया सोदाहरण खुलासा करावा. (बहुधा बडबडगीते म्हणजे 'सावन का महिमा' च्या ठेक्याची त्यांची गाणी तुम्हाला अभिप्रेत असावीत ?)

In reply to by प्रदीप

प्रदीप 15/02/2015 - 14:15
प्रश्नः सुरेल म्हणजे नक्की काय अभिप्रेत आहे? माझ्या व्याख्येनुसार जे सुरात आहे, ते सुरेल. तसे अभिप्रेत असेल तर बरेच काही सांगता येईल. अथवा 'सुरेल' म्हणजे 'छान चाल असलेली' अशापैकी काही व्याख्या असेल तर उत्तर अर्थात अशक्य आहे, कारण 'छान चाल' हे अगदी सब्जेक्टिव्ह प्रकरण आहे.

आशु जोग 16/02/2015 - 00:32
उपरवाला वेरी गूड वेरी गूड असली गाणी म्हणजे बडबडगीत .

६. अभिनेत्री टूणटूण यांनी गायलेले सुरेल गाणे ====> अफसाना लिख रही हुं... १०. विमल रॉय यांनी पुनर्जन्मावर काढलेला चित्रपट सांगा ====> मधुमती (युसुफखान उर्फ दिलीप कुमार २ भुमिका, वैजयंती माला ३ भुमिका) ११. मूळात कॅमेरामन असलेल्या दिग्दर्शकांची नावे आणि त्यांचे चित्रपट सांगा ====> नरीमन इराणी (डॉन १९७८...उर्फ कालिचरणचे विडंबन)

५. ओह माय गॉड २६. कटरीना कैफ करणार आहे म्हणे रणबीर कपूरशी! बाकी माझा पण पास. आणि र्‍हितिक रोशन चा फोटो द्यावा ही विनंती म्हणजे बाकी उत्तरांसाठी थोडे इन्स्पिरेशन मिळेल.

१. अनुष्का शर्मा यांचे किमान दोन हिट चित्रपट सांगा
पीके जब तक है जान
२. जॉन अब्राहम यांची निर्मिती असलेला चित्रपट सांगा
विकी डोनर
८. आशुतोष गोवारीकर यांनी आपल्या काकांच्या व्यक्तिरेखेचा आधार घेऊन काढलेला चित्रपट कोणता
स्वदेस .
१४. दिलीपकुमार यांचे जन्मगाव कोणते
पेशावर
१६. विजय भट यांचा 'गु' ने सुरु होणारा चित्रपट सांगा
गुंज उठी शहनाई
१७. तसेच त्यांच्या नातवाचाही 'गु' ने सुरु होणारा चित्रपट सांगा
गुलाम
२१. सुधीर फडके यांनी संगीत दिलेली हिंदीतली किमान दोन गाणी सांगा
ज्योती कलश छलके - एकच आठवतय ...
२६. परदेशी धर्मीय नटीने भारतीय धर्मीय मनुष्याशी लग्न केले आहे अशी उदाहरणे सांगा
जेनिफर केंडल - शशी कपूर
२९. घरातून कुणाचाही वारसा नसताना हिंदी चित्रपटात नायक बनलेल्यांची नावे सांगा
शाहरुख खान अक्षयकुमार नवाझुद्दिन सिद्दिकी सुशांत सिंग

हुप्प्या 03/02/2015 - 08:48
१२. हृषिकेश मुखर्जी हे आधी कॅमेरामन होते. मग दिग्दर्शक. सिनेमे आनंद, नमक हराम, अभिमान, गोलमाल, नरम गरम, रंगबिरंगी इ. २४. ये जीवन है हे पिया का घर ह्या सिनेमातले गाणे आहे. हा सिनेमा मुंबईचा जावई ह्या मराठी सिनेमावर आधारित होता. हा सिनेमा व. पु. काळ्यांच्या कथेवर आधारित होता. २६. परदेशी धर्मीय म्हणजे काय? भारतीय धर्मीय म्हणजे काय? २७. रमेश भाटकर आणि राकेश रोशन ह्या दोघांचे वडिल संगीतकार होते.

In reply to by हुप्प्या

बोका-ए-आझम 03/02/2015 - 09:44
ह्रषिकेश मुखर्जी कॅमेरामन नाही, संकलक होते. जशी बिमलदांनी कॅमेरामन-दिग्दर्शक ही परंपरा सुरु केली, तशी ह्रषिदांनी संकलक-दिग्दर्शक ही परंपरा सुरु केली.

In reply to by हुप्प्या

आशु जोग 03/02/2015 - 16:25
बरोबर हुप्प्याजी व पु काळे यांची मासिकात प्रसिद्ध झालेली कथा होती 'कुचंबणा' त्यावर मुंबईचा जावई, त्यावर पिया का घर

बोका-ए-आझम 03/02/2015 - 09:15
१. अनुष्का शर्मा यांचे किमान दोन हिट चित्रपट सांगा रब ने बना दी जोडी, बँड बाजा बारात,पीके २. जॉन अब्राहम यांची निर्मिती असलेला चित्रपट सांगा विकी डोनर, मद्रास कॅफे ३. बेला शेंडे, हृतिक रोशन यांचे योगदान असलेला चित्रपट सांगा ४. चलती का नाम गाडी आणि साडे माडे तीन यांच्या कथेमधला किंवा प्रसंगामधला एखादा फरक सांगा ५. श्रीकृष्णाची व्यक्तिरेखा असलेला अलिकडचा हिंदी चित्रपट सांगा ६. अभिनेत्री टूणटूण यांनी गायलेले सुरेल गाणे अफसाना लिख रही हूँ - चित्रपट दर्द, संगीतकार नौशाद, गीतकार - प्रेम धवन ७. मुन्नाभाई एम बी बी एस शी साधर्म्य असणारे मराठीतील दोन चित्रपट सांगा. कसे तेही सांगा ८. आशुतोष गोवारीकर यांनी आपल्या काकांच्या व्यक्तिरेखेचा आधार घेऊन काढलेला चित्रपट कोणता स्वदेस ९. राज कपूर आणि पृथ्वीराज कपूर यांच्या वयातले अंतर किती १०. विमल रॉय यांनी पुनर्जन्मावर काढलेला चित्रपट सांगा मधुमती ११. विमल रॉय यांच्या काही शिष्य किंवा सह-दिग्दर्शकांची नावे सांगा ह्रषिकेश मुखर्जी, बासु भट्टाचार्य (जावई) १२. मूळात कॅमेरामन असलेल्या दिग्दर्शकांची नावे आणि त्यांचे चित्रपट सांगा बिमल राॅय - बंदिनी, सुजाता, देवदास अशोक मेहता - मोक्ष संतोष सिवन - अशोका १३. लता मंगेशकर यांना सर्वप्रथम गायनाची संधी देणार्‍या निर्मात्याचे आडनाव सांगा जोगळेकर (आपकी सेवामे चे निर्माते वसंत जोगळेकर.) १४. दिलीपकुमार यांचे जन्मगाव कोणते पेशावर १५. मराठीतल्या 'आई शप्पथ' या चित्रपटाशी हिंदीतल्या कोणत्या चित्रपटाचे साधर्म्य आढळते. स्पष्ट करा. १६. विजय भट यांचा 'गु' ने सुरु होणारा चित्रपट सांगा १७. तसेच त्यांच्या नातवाचाही 'गु' ने सुरु होणारा चित्रपट सांगा १८. गदिमांची पटकथा असलेले हिंदी चित्रपट सांगा १९. एकाच वर्षी हिंदी व मराठीमधे सर्वात हिट चित्रपटाला संगीत देणारा संगीतकार कोण २०. सुधीर फडके यांच्या हाताखाली अनेक संगीतकार तयार झाले, त्यांच्याही हाताखाली अनेक संगीतकार तयार झाले. सुधीर फडके ते गदरचे संगीतकार यांच्यातली परंपरा सांगा २१. सुधीर फडके यांनी संगीत दिलेली हिंदीतली किमान दोन गाणी सांगा ज्योति कलश छलके - भाभी की चूडियां, बांध प्रीती फुलडोर - मालती माधव २२. ए आर रेहमान यांचे फ्लॉप चित्रपट सांगा तहजीब २३. मुन्नाभाई एमबीबीएस आणि थ्री इडियट्स यांमधील साम्ये सांगा (दिग्दर्शक, निर्माते तर सांगाच पण चित्रपटातली सुद्धा सांगा) २४. व पु काळे आणि ये जीवन है इस जीवन का या गाण्यातला संबंध स्पष्ट करा २५. लक्ष्मी प्यारे यांची बडबडगीते न वाटणारी सुरेल गाणी सांगा २६. परदेशी धर्मीय नटीने भारतीय धर्मीय मनुष्याशी लग्न केले आहे अशी उदाहरणे सांगा जेनिफर केंडाॅल - शशी कपूर २७. रमेश भाटकर आणि राकेश रोशन यांच्यातले एखादे साम्य सांगा दोघेही डोक्यात जातात! २८. भालजी पेंढारकर दिग्दर्शक, पृथ्वीराज कपूर अभिनेते असा हिंदी चित्रपट सांगा २९. घरातून कुणाचाही वारसा नसताना हिंदी चित्रपटात नायक बनलेल्यांची नावे सांगा राजेश खन्ना, शाहरुख खान

In reply to by बोका-ए-आझम

आशु जोग 03/02/2015 - 16:22
संतोष सिवन यांचे नाव वाचून बरे वाटले अलिकडे त्यांचा तहान नावाचा एक चित्रपट आला होता. लॉरेन्स डिसूझा - साजन

क्लिंटन 03/02/2015 - 17:03
दिलीपकुमारचा जन्म कुठे झाला या प्रश्नाचे सोडून इतर एकाही प्रश्नाचे उत्तर मला माहित नव्हते. टुण्टुण नावाची कोणी अभिनेती आहे हे ही मला माहित नव्हते. (एक नंबरचा रूक्ष) क्लिंटन

In reply to by आशु जोग

आशु जोग 06/02/2015 - 00:01
7 9 15 18 19 23 25 28 हे प्रश्न राहीलेच की प्रयत्न करा धमकी : -अन्यथा राहिलेल्या प्रश्नांसाठी मी नवा धागा काढेन

चौकटराजा 03/02/2015 - 18:35
वपुंच्या कथेवर प्रथम मराठीत मुंबईचा जावई हा चित्रपट निघाला मग अनिल धवन , जया भादुरी यांचा पिया का घर निघाला. त्यात हे गीत आहे ये जीवन हे, इस जीवनका यही है यजी है रंगरूप......

अफसाना लिख रही हुं ...हे उमा देवीने म्हटलेले आहे ... तेव्हा उमादेवी tuntun म्हणून ओळखली जात नव्हती

पहिला राजा 04/02/2015 - 16:01
उत्तर नंतर , आधी माझा पण १ सोप्पा प्रश्न : तुम्हाला हे सगळे प्रश्न का पडले ????? ( केव्हा नाही, कारण वेळ ००.४५ दिसते आहे , इतक्या रात्री पर्यंत जागरण केले तरच असे विचार (कम प्रश्न) येऊ शकतात अशी आमची १ शक्यता

आदूबाळ 06/02/2015 - 02:20
१९. एकाच वर्षी हिंदी व मराठीमधे सर्वात हिट चित्रपटाला संगीत देणारा संगीतकार कोण
वसंत देसाई, अण्णा चितळकर यापैकीच उत्तर असणार

In reply to by आशु जोग

आदूबाळ 06/02/2015 - 16:24
चितळकर, देसाई आणि (काही प्रमाणात) राम वाईरकर हेच एका वेळी मराठी + हिंदी चित्रपटांना संगीत देत असत. त्यावरून केलेला अंदाज आहे.

In reply to by टवाळ कार्टा

आशु जोग 07/02/2015 - 00:44
अजय - अतुल?? असतील तर चित्रपटही सांगा चितळकर असतील तरी चित्रपट सांगा... वरचे काही प्रश्न सोडवल्यास आपोआप उत्तर मिळू शकेल

In reply to by अर्धवटराव

आशु जोग 07/02/2015 - 16:52
कुठले वर्ष कोणते चित्रपट बा द वे पृथ्वी आणि राज हेही कोणी उत्तरलेले नाही

प्रदीप 15/02/2015 - 14:11
लक्ष्मी प्यारे यांची बडबडगीते न वाटणारी सुरेल गाणी सांगा म्हणजे नक्की काय हवे आहे, कृपया सोदाहरण खुलासा करावा. (बहुधा बडबडगीते म्हणजे 'सावन का महिमा' च्या ठेक्याची त्यांची गाणी तुम्हाला अभिप्रेत असावीत ?)

In reply to by प्रदीप

प्रदीप 15/02/2015 - 14:15
प्रश्नः सुरेल म्हणजे नक्की काय अभिप्रेत आहे? माझ्या व्याख्येनुसार जे सुरात आहे, ते सुरेल. तसे अभिप्रेत असेल तर बरेच काही सांगता येईल. अथवा 'सुरेल' म्हणजे 'छान चाल असलेली' अशापैकी काही व्याख्या असेल तर उत्तर अर्थात अशक्य आहे, कारण 'छान चाल' हे अगदी सब्जेक्टिव्ह प्रकरण आहे.

आशु जोग 16/02/2015 - 00:32
उपरवाला वेरी गूड वेरी गूड असली गाणी म्हणजे बडबडगीत .


हिंदी चित्रपट प्रश्न !

एस. एस. सी., सी. बी. एस. ई, आय. सी. एस. ई.

वारा ·

माझ्या जिव्हाळ्याच्या विषयावर धागा.. हीच माहिती सध्या मी सुद्धा शोधत आहे. SSC - मला हा अभ्यासक्रम पुरेसा वाटत नाही. स्पर्धा परीक्षांसाठी खरं तर CBSE हवा. पण मुळात आपला मुलगा डॉक्टर / इंजिनिअरच बनेल ह्याची काय खात्री? समजा सेफ साईड तसं धरलं तरी तो अभ्यास आपणही घरी करुन घेऊ शकतो असं मला वाटतय. मला कितीही इच्छा असली तरी चांगली CBSE जवळपास न सापडल्याने मी ह्या पर्यायाचा विचार करतेय. शिवाय माझ्या घराजवळ जुन्या प्रसिद्ध अनेक SSC च्या शाळा आहेत. शाळा घराजवळ असणे हा मुद्दा अत्यंत मह्त्वाचा असल्याने मी त्या शाळांचा विचार करतेय. ह्यांच्याही फीस तोडीस तोड आहेत. ICSE - हे ऐकायला छान वाटतं.. पण मला स्वतःला अजुन ह्या ब्यासक्रामातुन पास आउट झालेलं कुणीही माहिती नाही. त्यामुळे ह्या अभ्यासक्रामातुन बाहेर पडून सामान्य मुलां सोबत बारावी - ग्रॅजुएशन केलं तर नक्की त्याचे फायदे तोटे काय हे मला माहिती नाहीत. ह्या अभ्यासक्रामात खुप सार्‍या माहितीपेक्षा प्रॅक्टिकलवर भर दिल्या जातो. अनेक विषय असतात (सहावीलाच म्हणे १२-१३ विषय असतात).. काही पालक म्हणतात की आजकालची मुलं जास्त हुषार आहेत.. त्यांच्या बुद्धिला एवढं खाद्य लागतंच.. ह्या शाळांच्या फीस पण भरपुर आहेत. मायबोलीवर ह्यावर पुष्कळ चर्चा झाल्याचं आठवतय पण दोन दिवस झाले मलाही लिंक सापडलेली नाही. तिथे कुणी तरी ह्या ३ अभ्यासक्रमांवर सविस्तर लिहिलं होतं. तोवर ही एक लिंक पहा - http://www.thinkvidya.com/a/cbse-vs-icse-the-pros-and-cons-of-each-educational-board

In reply to by पिलीयन रायडर

सर्वोत्तम शिक्षण हे मातृ भाषेतुनच असते. आपल्या मुलाला मराठी माध्यामाच्या शाळेत घाला आणी रोज थोडा वेळ देऊन त्याला ईतर गोष्टी शिकवा. नुसता मुलाला वेळ दिला तरी पुष़्अळ आहे. एसेस्सीलाच टाका तेही मराट्।ई माध्यमातुन. मी अनेक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या आहेते नोकरीसाठी त्यातुन मला असे आढळले नाही अश्या अभ्यासक्रामामुळे लोक जास्त चांगले होतात. उत्तम आई वडील असले तरच मुलं चांगली होतात.

In reply to by पिलीयन रायडर

सर्वोत्तम शिक्षण हे मातृ भाषेतुनच असते. आपल्या मुलाला मराठी माध्यामाच्या शाळेत घाला आणी रोज थोडा वेळ देऊन त्याला ईतर गोष्टी शिकवा. नुसता मुलाला वेळ दिला तरी पुष़्अळ आहे. एसेस्सीलाच टाका तेही मराट्।ई माध्यमातुन. मी अनेक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या आहेते नोकरीसाठी त्यातुन मला असे आढळले नाही अश्या अभ्यासक्रामामुळे लोक जास्त चांगले होतात. उत्तम आई वडील असले तरच मुलं चांगली होतात.

hitesh 12/01/2015 - 14:25
इंग्लिश मेडियम स्टेट किंवा फार्फार तर कॉन्वेंट फायनल केले आहे

सी.बी.एस.सी. चा विचार करा. एस.एस.सी. पॅटर्न बर्‍यापैकी औटडेटेड झालाय. १० वी-१२वी नंतर स्पर्धेमधे टिकायचं असेल तर अपडेटेड ज्ञान असणं आवश्यक आहे. आय.सी.ए.सी विषयी फार माहिती नाही त्यामुळे बोलतं नाही.

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

SSC मध्ये गणित विज्ञानाचा काहितरी घोळ घातलाय म्हणे... पुस्तक बदलली आहेत की २ -२ पुस्तकं केली आहेत (म्हणजे NCRTE ची सुद्धा आणली आहेत) असं काय काय ऐकायला मिळतय... कुणाला काही माहिती आहे का?

In reply to by पिलीयन रायडर

हो गणिताचे आमच्या वेळी होतं तसं गणित आणि सामान्य गणित असे दोन इलेक्टिव्ह्ज ठेवलेत. ज्यांना पुढे करिअर मधे मॅथेमॅटिक्स अ‍ॅप्टीट्युडची विशेष आवश्यकता नाही त्यांच्यासाठी हा पर्याय आहे. खरं तर वेडेपणाचा निर्णय आहे. आर्टस, कॉमर्स आणि सायन्स तिन्हीचा ह्या ना त्या प्रकारानी गणोबाशी संबंध येतोचं. काठिण्य पातळी आणि वापरामधे फरक असु शकतो. पण त्याला सामान्य गणित ही पळवाट अयोग्य आहे. दहावी मधे सामान्य गणित घेतलेला विद्यार्थी पुढे अभियांत्रिकी पदविका आणि पदवीकडे वळु शकत नाही.

रायनची आई 12/01/2015 - 16:42
आमच्या कडे गेल्या वर्षी माझ्या मुलाच्या एड्मिशन च्या वेळी हेच प्रश्न पडले होते..आमचा पहिला प्रेफरेन्स शाळा जवळ असण्याला होता..आणि आमच्या घराजवळ सगळ्या शाळा एस. एस. सी. बोर्ड च्याच आहेत..म्हणून आम्ही सगळा विचार करून त्याला घराजवळच्याच एका चांगल्या शाळेत त्याला घातल..अभ्यास तर काय आपण घरी पण करून घेऊ शकतो, आणि नंतर कॉलेज सगळ्यांची एकच असणार आहेत..

सस्नेह 12/01/2015 - 16:50
CBSE बेस्ट ! पण खात्री करून घ्या की शाळेमध्ये फक्त CBSE अभ्यासक्रमच नाही तर टोटल CBSE Curriculum घेतला जातो. कारण CBSE बोर्डाची परीक्षा म्हणजे स्पेशल स्किल्स, अवेअरनेस, जनरल इंटरप्रिटेशन आणि बरंच काही असतं. त्यामुळे मुलांचा सर्वांगीण व्यक्तिमत्व विकास सहजपणे होतो. ट्युशन मिळत नसेल तर एस. चांद यांची रेफरन्स बुक्स घ्या आणि स्वत: वाचून शिकवा मुलांना. तुम्हाला वाचायलासुद्धा इंटरेस्ट वाटेल. पुस्तकांच्या किमतीपण भरपूर आहेत.

अजया 12/01/2015 - 17:06
माझा मुलगा ज्यु केजी ते दहावी सीबीएसईमध्ये शिकला आहे.सुरुवातीपासुन घेतल्यास सिबिएसई चांगला पर्याय आहे.एकतर विचारपूर्वक तयार केलेला अभ्यासक्रम,मनाला येईल ते मंत्री नियम काढणार बदलणार असे काही फारसे नाही.मराठीचा पर्याय माझ्या मुलाने आठवीपर्यंत वापरला.नववी दहावी दोनच भाषा आहेत.त्यामुळे हिंदी द्वितीय भाषा घेतली आहे.मात्र सिबिएसई शाळेला त्यात प्रशिक्षित अनुभवी शिक्षकवर्ग हवा.नवशिक्या शिक्षकांचे ते काम नाही. आॅब्जेक्टिव्ह पेपर नसतात.पेपरातला काही भाग जास्त पर्यायातला एक निवडा असा असतो. मराठी पर्याय महाराष्ट्रातल्या शाळेत तर मिळतोच .बहारिनच्या सिबिएसई शाळेत पण होता. दहावीपर्यंत ग्रेड पध्दत आहे.दहावीचा रिझल्ट एकत्रित ग्रेड पाॅइंट अॅवरेज असा दहापैकी गुण मिळतो. टप्प्याटप्प्याने अभ्यासाची तीव्रता वाढत जाते.त्याची सवय हळूहळू मुलाना होत जाते.त्याप्रमाणेच अगदी तिसरीपासुनचे पेपर पॅटर्न्स असतात. मुलांना रोज अभ्यास फक्त टेक्स्टबुकमधुन केलेला पुरतो.आपण लक्ष घालणे जरुरी आहे.ट्युशनची आवश्यकता आम्हाला फक्त दहावीच्या गणिताला लागली.रोज अभ्यास करण्याला पर्याय नाही.फक्त शाळेवर अवलंबुन राहणेही नाही चालु शकत.मी बरेच पालक शाळेला,अभ्यासक्रमाला मुलांच्या अपयशाचे कारण मानताना पाहिले आहे.पण ते सोयिस्कर स्वतःच्या असहभागाबद्दल बोलत नाहीत. ५०%शाळेचा आणि तेवढाच पालकांचा सहभाग हवा. शाळेत एका वर्गात ४० मुलं आणि तुमचा एकच तुमच्यासमोर.मुलांना काय येतं येत नाही का येत नाही हे सर्व आपण जाणून घेऊ शकतो. अकरावी बारावी देखिल आम्ही सिबिएसईलाच कंटिन्यु करणार आहोत.इतका आम्हाला हा अभ्यासक्रम आवडतो! आम्ही म्हणजे आम्ही आणि आमचा मुलगा!नुसते आम्ही नाही!!

In reply to by अजया

म्हणुनच मला CBSE हवं होतं.. पण जवळ २-३ च शाळा आहेत. पैकी २ भिकार आहेत. (त्या चक्क अपार्ट्मेंट टाईप एका बिल्डिंगच्या शाळा आहेत.. आणि त्यांना मैदानच नाही... मैदान नसलेली शाळा अजिबात नको...) आणि १ उरते ती भयानक महाग आहे. १ लाख फीस मी ३ वर्षाच्या मुलासाठी भरु शकत नाही. (१० वीला मी काय फीस भरत असेन ह्या विचारानेच मला फेफरं आलं..) आता पर्याय फक्त २ च आहेत.. SSC and ICSE... तर ICSE बद्दल थोडी माहिती कुणी देऊ शकेल का?

In reply to by काळा पहाड

खेडूत 12/01/2015 - 21:22
बहुधा नाही. त्यांची साठ हजारच्या आसपास आहे., त्यात फी शिवाय न्याहारी जेवण व संध्याकाळचे दूध पण देतात . घरचा डबा नेण्यास मुभा नाही

In reply to by खेडूत

मिलेनियमच.. आम्ही चौकशी केली तेव्हा "या वर्षी ७९ हजार आहे.. १०% वाढेल असं धरुन चाला" असं म्हणाले. त्यांचे फोर्म्स जस्ट ५-६ जानेवारीला भरायचे होते, काही कारणाने तेव्हा नाही भरता आले, त्यामुळे नक्की फीस किती आहे ते कळाले नाही. मला इतक्या लहान मुलांना शाळेनी जेवण देणं आवडत नाही. माझ्या मुलाला मी जितकं उत्तम करुन देऊ शकते ते कुणीच १००-२०० मुलांच एकदम जेवण बनवणारा आचारी देऊ शकत नाही. दुसरं असं की त्या शाळेत मुल असणारे पालक भेटले, त्यांनी सुद्धा अशीच ८०-९० हजार फिस सांगितली आणि शिवाय "फाटक सर गेल्यापासुन पुर्वी सारखं वातावरण राहिलं नाही" असंही म्हणाले. तिसरा मुद्दा असा की बुकलेस शाळा आहे. त्यामुळे घरी मुलं काही होमवर्क वगैरे करत नाहीत, अनेक पालकांना अशावेळी नक्की मुलाला काय कळतय काय नाही हे समजत नाही. अशा अनेक आक्षेपांमुळे लाखभर फीस भरायचे धाडस माझ्यात तरी नाही..

In reply to by पिलीयन रायडर

आजानुकर्ण 12/01/2015 - 21:30
होमवर्क नसतो. मग परीक्षा असतात का? हल्ली १०वीपर्यंत परीक्षा नसतात असं ऐकलंय. मग मुलाला शिकवलेलं समजतंय की नाही हे कसं कळतं?

In reply to by आजानुकर्ण

प्रत्येक आठवड्याच्या शीट्स असतात. त्यावरुन काय ते समजुन घ्या आणि करुन घ्या मुलाचा अभ्यास... परीक्षांचं माहिती नाही. पण मुलाला कळतय की नाही ह्याचा आई वडीलांना अंदाज येत नाही हे २-३ जणांनी सांगितलं...

In reply to by पिलीयन रायडर

खेडूत 12/01/2015 - 22:21
आमचं इथे पाहिलंच वर्ष चाललंय. सध्या तरी ठीक-ठीक . परीक्षा यथातथाच असतात. आपण भरपूर वेळ द्यावा लागतो. वर्षाच्या अधेमधे भारतात परतल्यामुळे जी मिळेल ती शाळा घेणे भाग होते. पण पूर्वी अनेक वाईट शाळा पाहिल्यात त्या तुलनेत ही ओक्के वाटते . प्रत्येक शाळेत काहीतरी उणीवा आहेतच. शाळेतले जेवण आम्हालाही पटत नाही पण ते बिल्ट-इन फीचर आहे ! :( पुढे बाहेर रहायची वेळ येईल तेव्हां अशी सवय असल्याने जड जाणार नाही अशी समजूत करून घेणारे पालक पाहिलेत.

अजयाशी सहमत! त्यातल्या त्यात CBSE चा अभ्यासक्रम उत्तम, पण अर्थातच पालकांची पाल्याबरोबर त्यात्या इयत्तेचा अभ्यास करण्याची तयारी हवी. यात जबरदस्तीने करावं लागण्यापेक्षा त्यांनाही (म्हणजे पालकांना) आनंद वाटायला हवा. थोड्या अवांतराबद्दल क्षमस्व - CBSE ची 9 वी आणि 10 वीची Democratic Politics ची पुस्तके सर्वानीच जरूर वाचावीत अशी आहेत.

माझा मुलगा सीबीएसइ मधे शिकतोय. पण त्याच्या शिक्षकांवर त्याचा परफॉर्म्स ठरतोय. अनुभवी शिक्षक नसल्यामुळे त्याची जरा गोची होत आहे. मुळात त्या शिक्षिकेलाचा सीबीएसइ चा अभ्यासक्रम अजून नीट समजलेला नाही. मुलाला गणिताची ट्युशन लावली तो पर्यंत बरं चाललं होतं. ट्युशनवाला शिक्षकही कुठे तरी निघुन गेला याचं गणित पुन्हा खालावलं. मी त्या म्याथवाल्या शिक्षिकेला भेटलोय, आमचं ऐकुन घ्यायच्या ऐवजी तिचच सुरु असतं आम्ही कशी विद्यार्थ्यांची काळजी घेतो, अभ्यासक्रम तसा टफच असतो पण मुलांचा परफॉर्म्स आता सुधारु लागला आहे, मी व्यक्तिगत लक्ष घालते असं म्हणुन ती माझी बोळवण करते आहे, मला माझ्या गावी तीच एक शाळा बरी असल्यामुळे काही दुसरा पर्याय नाही. -दिलीप बिरुटे

आजानुकर्ण 12/01/2015 - 21:25
आयला बरंच अवघड झालंय... जास्त पर्याय असल्याने फायदा होतो की नुकसान असा प्रश्न पडतो. एसएससी बोर्डाच्या शिक्षणाची नक्की काय मर्यादा आहे बॉ? माझे शिक्षण एसएससी बोर्डात झाले. माझे एकदोन चुलत नातेवाईक सीबीएससी बोर्डातले आहेत. सीबीएससी बोर्डाचा नोकरी/पुढील शिक्षणात प्रवेश वगैरे मिळवताना विशेष फायदा होत असल्याचे ऐकले नाही. नक्की काय परिस्थिती आहे?

In reply to by आजानुकर्ण

सतिश गावडे 12/01/2015 - 21:43
एसएससी बोर्डाच्या शिक्षणाची नक्की काय मर्यादा आहे बॉ? माझे शिक्षण एसएससी बोर्डात झाले.
अगदी हेच म्हणायचं आहे.

In reply to by खटपट्या

नाखु 13/01/2015 - 15:20
माझा ल्येक एस्.एस्.सी. वाले त्याने काही मोठा फरक जाणवेल काय? कारण मी घरापासून फक्त ५ मिनिटाचे अंतरावरील (जाहीरातीप्रमाणे नाही खरोखर चालत) शाळेत पुढे खेळायला/अभ्यासाला पुरेसा वेळ मिळावा म्हणून दाखल केले आहे लेक आणि लेकीला. जाणकारांनी जरा इकडे प्रकाश टाकावा.

In reply to by आजानुकर्ण

खेडूत 12/01/2015 - 22:51
सर्व व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी प्रवेश चाचण्या सुरु झाल्यात. ज्या पूर्वी नसल्याने आपल्याला काही फरक पडला नाही. सी ई टी चे पेपर्स 'सी बी एस ई ' अभ्यासक्रमाच्या आधारे काढले जातात. याला सरकारी कारण म्हणजे विविध कर्मचारी नोकरीनिमित्य गावं बदलत असल्याने त्यांची मुलं सी बी एस ई / केंद्रीय शाळेत असतात. त्यासाठी सरकारी बाबुनीच हा निर्णय घेतला असणार. त्यामुळे भविष्यातल्या सुविधेसाठी अनेक पालक इतर शाळातून काढून पाल्याला सी बी एस ई शाळेत घालताना दिसतात. हा प्रकार गेल्या चारपाच वर्षातला आहे. आय सी एस सी अभ्यासक्रम घासू मुलं तयार करतो. पाठांतरावर बराच भर असतो. मात्र इथून मधेच परदेशात जायचं असेल तर तिकडे सहज प्रवेश मिळतो. हा माझा अनुभव आहे. त्यांचे इंग्रजी उच्चार (व्याकरण नाही ) चांगले असतात. इतर वाचन भरपूर असते जे व्यवहारात कामाला येते. फार थोड्या चांगल्या शाळा प्रत्येक महानगरात असतील. पण प्रतिष्ठेपायी ही शाळा काढणाऱ्या भल्याभल्यांच्या तोंडाला फेस येतो कारण या अभ्यासक्रमाचे शिक्षक मिळणे कठीण असते. ग्रामीण भागात एस एस सी ला पर्याय नाही. अत्यंत लहान गांवातल्या आणि अतिसामान्य मुलाना समोर ठेवून हा अभ्यासक्रम केला असल्याने त्यातून पुढे येणारी मुले उर्वरित प्रकारातल्या मुलांच्या मानाने मागे असल्यासारखी फक्त वाटतात. मात्र चांगल्या एस एस सी शाळेत कमालीची चमकदार मुलं असतात ! आपल्या पाल्याने काय करावे हे नर्सरीतच ठरवणाऱ्या पालकांना, मुलाना कुठच्याही अभ्यास क्रमात घातले तरी असुरक्षित वाटत रहाते.

In reply to by खेडूत

सतिश गावडे 12/01/2015 - 23:25
सर्व व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी प्रवेश चाचण्या सुरु झाल्यात. ज्या पूर्वी नसल्याने आपल्याला काही फरक पडला नाही.
माझी बारावी ज्या वर्षी झाली त्याच्या एक वर्ष आधी मेडीकल सीईटी चालू झाली होती. मी ही दिली होती आणि बी ए एम एसला प्रवेश मिळत होता. माझा ओढा इंजिनीयरींगकडे असल्याने मी ती सीट घेतली नाही. इंजिनीयरींगची सीईटी पुढे एक दोन वर्षांनी सुरु झाली. समजा माझ्या वेळीही इंजिनीयरींगला सीईटी असती तर मी ती नक्कीच उत्तीर्ण झालो असतो.
सी ई टी चे पेपर्स 'सी बी एस ई ' अभ्यासक्रमाच्या आधारे काढले जातात.
हा गोड गैरसमज आहे. बारावी नंतरच्या इंजिनीयरींग/मेडिकलच्या सीईटीला मुल शिकायला लागल्यापासून ते बारावीपर्यंतचा अभ्यासक्रम असतो. :) बाकी माहितीशी सहमत.
आपल्या पाल्याने काय करावे हे नर्सरीतच ठरवणाऱ्या पालकांना, मुलाना कुठच्याही अभ्यास क्रमात घातले तरी असुरक्षित वाटत रहाते.
खरा मुद्दा हा आहे. तीन वर्षांच्या बाळाला शाळा असं काय शिकवतात की ज्यासाठी त्या साठ पासष्ठ हजार फी घेतात?

In reply to by आजानुकर्ण

मी स्वतःसुद्धा एस.एस.सी. बोर्ड (शुद्ध मराठी मिडियम) मधुन शिकलोय. एस.एस.सी. बोर्ड वाईट नाही हे मान्यं. पण जर तुम्ही अगदी आजचा एस.एस.सी. बोर्डचा अभ्यासक्रम आणि सी.बी.एस.सी. चा अभ्यासक्रम अशी तुलना केलीत तर तुम्हाला लगेचं समजेल का सी.बी.एस.सी. म्हणतोय ते. सी.बी.एस.सी. च्या अभ्यासक्रमाचा भर नुसत्या रट्टा मारुन पास होण्यापेक्षा मुलांच्या मनामधे संकल्पना रुजतील अश्या रितीनी बनवलेला आहे. अश्या पद्धतीचा अभ्यासक्रम बाकी क्षेत्रात माहित नाही पण अभियांत्रिकीमधे तरी नक्की उपयोगी पडतो. हुच्च शिक्षणासाठी त्या त्या प्रवेश समित्या परसेंटाईल वापरुन समसमान गुण करतात आणि त्यानुसार आणि कास्ट वगैरे गृहित धरुन मिळतो त्यामुळे सी.बी.एस.सी. चा थेट फायदा होत नाही हे मान्य.

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

सस्नेह 13/01/2015 - 12:19
SSC Board वाईट होते असे मुळीच नाही. पण आधुनिक काळाच्या गरजेप्रमाणे त्यात सुधारणा करून CBSE बनवले तर ते poreferable नाही का ? तुलना थोडी बादरायण आहे, पण मारुती 800 कार अजूनही चांगलीच आहेच पण म्हणून होंडा किंवा वोक्सवॅगन (परवडत असेल तर ) वापरणे नाकारावे का ?

In reply to by सस्नेह

आदूबाळ 13/01/2015 - 15:22
ध्येय काय आहे? अ ठिकाणाहून ब ठिकाणी जाणं हे ध्येय असेल, तर मारूती ८०० वापरली काय आणि होंडा सिटी वापरली काय, सारखंच. तद्वत - एका विशिष्ट पातळीचं शिक्षण बारावीपर्यंत होणे हे ध्येय असेल, तर कोणतंही बोर्ड का असेना - काय फरक पडतो? आज सीबीएसई भारी आहे (असं सगळ्या प्रतिसादांवरून वाटतं आहे). त्याप्रमाणे पाल्याला सीबीएसई शाळेत घातलं. उद्या काही जास्त भारी निघालं, तर आपण शाळा/बोर्ड बदलणार आहोत का? माझ्याबाबतीत तरी उत्तर नाही असं आहे.

In reply to by आदूबाळ

सस्नेह 13/01/2015 - 16:59
अ ठिकाणाहून ब ठिकाणी जाणं हे ध्येय असेल, तर मारूती ८०० वापरली काय आणि होंडा सिटी वापरली काय, सारखंच.
वा वा ! प्रवास कसा झाला याला काहीच महत्व नाही का ?
एका विशिष्ट पातळीचं शिक्षण बारावीपर्यंत होणे हे ध्येय असेल
कदाचित मार्क तितकेच पडतील आणि मुलाला/मुलीला त्याच कॉलेजात प्रवेश मिळेल. पण त्या मुलाच्या व्यक्तीमत्वात आणि ग्रहणक्षमतेत, जीवनाकडे पाहण्याच्या दृष्टीकोनात जो फरक पडेल, त्याला माझ्या दृष्टीने तरी फार महत्व आहे. शिक्षण हे त्याच्यासाठी रट्टा मारायची गोष्ट न राहता काहीतरी खरोखर शिकण्याची, करून दाखवायची गोष्ट होईल. शैक्षणिक जीवनातला प्रत्येक क्षण तो डोळसपणे ‘जगायला’ शिकेल, हीच माझ्यासाठी समाधानाची गोष्ट असेल.
आज सीबीएसई भारी आहे (असं सगळ्या प्रतिसादांवरून वाटतं आहे). त्याप्रमाणे पाल्याला सीबीएसई शाळेत घातलं. उद्या काही जास्त भारी निघालं, तर आपण शाळा/बोर्ड बदलणार आहोत का? माझ्याबाबतीत तरी उत्तर नाही असं आहे.
पसंद अपनी अपनी.. माझ्या बाबतीत उत्तर 'हो' असे राहील. माझ्या मुलाला सातवीपासून SSC बोर्ड बदलून CBSE ला घातले आहे. आणि त्याचे खूप चांगले परिणाम (मार्क्स व्यतिरिक्त ) मिळाले आहेत ! *smile*

In reply to by सस्नेह

असंका 13/01/2015 - 17:21
हा फार चांगला मुद्दा आहे... कृपया थोडा अधिक विस्तार करू शकाल का? मीही निर्णय घेणार आहे पुढील काही दिवसात...आणि आपण दोन्ही प्रकारचा अनुभव घेतलेला दिसतो आहे. तेव्हा आपल्या इतकं चांगलं कोणी सांगु शकेल असं वाटत नाही?

In reply to by असंका

सस्नेह 13/01/2015 - 17:41
माझा मुलगा सहावीपर्यंत SSC बोर्ड शाळेत होता. तेव्हा पठडीबाहेरच्या प्रश्नांची उत्तरे देऊ शकत नव्हता. कॉम्पुटर विषय होता पण फक्त पुस्तकात. प्रत्यक्ष हाताळायला पंधरा मिनिटे मिळे तेपण ग्रुपमध्ये. सहामाही परिक्षा होईपर्यंत त्याचे प्रॅक्टिकलच्या बॅचमधे नावच नव्हते आणि हाईट म्हणजे विषय-शिक्षिकेला याचा पत्ताच नव्हता ! हे सगळे पाहून मी सातवीला त्याला CBSE शाळेत घातले. फी थोडीशी जास्त म्हंजे वर्षाला ३५०००. यात युनिफॉर्म, नाष्टा, जेवण वह्या पुस्तके आणि ट्रान्स्पोर्ट हे सगळे आले. वेगळी ट्युशन बंद केली. फारच चांगले परिणाम सहाच महिन्यात दिसले. वर्षाअखेर मुलगा प्रत्येक विषयात स्वत:हून रस घेऊ लागला. मार्क्स तर सुधारलेच, जनरल अवेअरनेस पण सुधारला. कॉम्प्यूटर माझ्यापेक्षाही लीलया हाताळू लागला. तिथे त्यांना रोज एक न्यूज स्वत: सर्वांपुढे सांगावी लागे. वर्गातले लाईट, पंखे इ. बाहेर जाताना बंद करण्याची जबाबदारी रोज एका विद्यार्थ्याची. लहान इयात्तेतल्या मुलांना सांभाळून लाईन करून ग्राउंडवर नेणे, आणणे , त्यांच्याकडून बागकाम इ. करून घेणे आणि त्यांना शिकवणे अशा अनेक गोष्टी जबाबदारी सोपवून करून घेतल्या जात. महिन्यातून एक दिवस स्पेशल स्कील असणारे पालक शाळेत जाऊन एखादा तास मुलांना ते शिकवत. खूपच विधायक शिक्षणपद्धत अनुभवायला मिळाली. पुन्हा मार्क्स हे केवळ लिखाणावर अवलंबून नसता एकूण परफॉर्मन्स आणि सुसंस्कृतपणा यावर अवलंबून असत. पूर्वी शाय असणारा मुलगा आता खूपच कॉन्फिडंट झाला आहे आणि

In reply to by सस्नेह

संदीप डांगे 13/01/2015 - 21:25
तिथे त्यांना रोज एक न्यूज स्वत: सर्वांपुढे सांगावी लागे. वर्गातले लाईट, पंखे इ. बाहेर जाताना बंद करण्याची जबाबदारी रोज एका विद्यार्थ्याची. लहान इयात्तेतल्या मुलांना सांभाळून लाईन करून ग्राउंडवर नेणे, आणणे , त्यांच्याकडून बागकाम इ. करून घेणे आणि त्यांना शिकवणे अशा अनेक गोष्टी जबाबदारी सोपवून करून घेतल्या जात. महिन्यातून एक दिवस स्पेशल स्कील असणारे पालक शाळेत जाऊन एखादा तास मुलांना ते शिकवत. खूपच विधायक शिक्षणपद्धत अनुभवायला मिळाली. पुन्हा मार्क्स हे केवळ लिखाणावर अवलंबून नसता एकूण परफॉर्मन्स आणि सुसंस्कृतपणा यावर अवलंबून असत. पूर्वी शाय असणारा मुलगा आता खूपच कॉन्फिडंट झाला आहे
> अगदी हेच माझ्या मुलाला नाशिक च्या आनंदनिकेतन ह्या १००% मराठी शाळेत मिळत आहे. तेही फक्त रु.५,५०० वार्षिक. गणवेश, खाणे आणि ने-आण पालकांकडे. इतर कुठलाही छुपा खर्च नाही. आता माझा मुलगा बालवाडी २ मध्ये जाईल पण त्याची मागील दोन वर्षातली प्रगती अतिशय समाधानकारक आहे. इंग्रजी माध्यमात शिकणाऱ्या इतर मुलांच्या तुलनेत माझ्या मुलाची शाळेत जायची इच्छा व उत्साह यात खूपच फरक दिसतो. पाहुण्यांसमोर उगाच इंग्रजीतल्या कविता म्हणून दाखवण्यापेक्षा त्याचा व्यवस्थितपणा, टापटीप आणि समजूतदारपणा मला महत्वाचा वाटत आलेला आहे. दहावीपर्यंतच्या मुलांचा एकंदर अंदाज घेतला असता मुले कुठेही बुजरी किंवा कालबाह्य वाटली नाहीत.त्यामुळे कुठलाही अभ्यासक्रम अथवा पद्धतीपेक्षा शाळेची गुणवत्ता फार महत्वाची आहे असे मला वाटते. शाळेची एकूण विचारधारा आणि शिक्षकवृंद ह्यांचा मुलांवर जास्त परिणाम होतो.

In reply to by सस्नेह

मी CBSE च्याच बाजुने आहे.. पण स्नेहाताई असं नाही का वाटत की तू जे मुद्दे मांडले आहेत ते शाळेशी निगडीत आहेत, अभ्यासक्रमाशी नाही...? SSC बोर्डाची पण अशाच जबाबदारीने मुलांना सांभाळणारी शाळा (मितानच्या मुलीची आहे तशी) असती तरी तुझ्या मुलात हाच फरक दिसल असता.. अर्थात CBSE बोर्डाचा अभ्यासक्रम जास्त चांगला आहे ज्यानी मुलांना १०-१२ ला निश्चित फायदा होत असणार..

In reply to by पिलीयन रायडर

सस्नेह 14/01/2015 - 11:03
CBSE अभ्यासक्रमात या सर्व गोष्टीना मार्क्स असतात, त्यामुळे कंपल्सरी ऑब्झर्व्ह केल्या जातात. इतर शाळांमधे एखादीच शाळा हे सर्व ऑब्झर्व्ह करेल. CBSE मध्ये मुलांना त्यांचा कल पाहून डेव्हलप करण्याचे स्वातंत्र्य शिक्षकांना दिले आहे तसे SSC मध्ये नाही. SSC मार्क्स हे पूर्णत: मुलाच्या लिखित performance वरच अवलंबून असतात. तसेच CBSE अभ्यासक्रम SSC पेक्षा फार वेगळ्या पद्धतीवर आधारित आहे. इथे मुले उत्तरे लिहू शकतात का यापेक्षा त्यांना ते समजले आहे का यावर जास्त भर असतो. understanding हा कन्सेप्ट ssc बोर्डाच्या पुस्तकातच नाही. CBSE परीक्षापद्धतसुद्धा understandingवरच आधारित असते. पुस्तके पाहिली असता हे समजेल आणि CBSE बोर्डाच्या प्रश्नपेत्रिका पाहिल्यावर तर पूर्ण क्लिअर होईल. आणखीही बऱ्याच गोष्टी आहेत. आठवतील तशा लिहिते.

In reply to by आजानुकर्ण

मिहिर 12/01/2015 - 23:37
माझे शिक्षण एसएससी बोर्डात झाले.
माझेही. स्पर्धा परीक्षांचा इतका बाऊ का करताहेत ते कळले नाही. फक्त इंजिनिअरिंगचा जरी विचार केला, तरी राज्यात शिकण्यासाठी लागणारी सीईटी ही एसेस्सीच्या अभ्यासक्रमावर आधारलेली असते. जेईईसारख्या परीक्षांचा विचार केला, तर त्या परीक्षा देणारा तसाही त्या अभ्यासक्रमाचा अभ्यास करणार असतोच, मग बोर्ड कुठले आहे त्याने कितीसा फरक पडतो! बाकी मराठी माध्यमाचा कोणी विचारही न करताना पाहून वाईट वाटले.

अजया 12/01/2015 - 22:15
CBSE अभ्यासक्रम मुलाच्या पुढच्या शिक्षणाची तयारी चांगली करुन घेतो ,सायन्स आर्ट्स कॉमर्स कोणत्याही साइडला मुलं गेली तरी त्या विषयांबद्दल माहिती त्यांना पॉलिटिक्स्,इकॉनॉमिक्स्,सायन्स च्या त्या अनुषंगाने तयार केलेल्या अभ्यासक्रमाने मिळते.जे मला एसेस्सी मध्ये नाही आढळ्ले. हल्लीच्या एन्ट्रन्स टेस्ट सिबिएस्सी च्या अभ्यासक्रमानुसार होतात.त्यामुळेही सुरुवातीपासून हा अभ्यासक्रम असणे सोयीचे पडते. सर्व नॅशनल लेव्हल परिक्षांसाठी हाच अभ्यासक्रम लागतो. मी स्वतः एसेस्सीबोर्डात शिकले आहे.पण डेंटल कॉलेजला गेल्यावर आमच्यातला आणि त्यावेळी दिल्ली बोर्ड म्हणायचे यांच्या कॉन्सेप्ट समजण्यातला फरक लक्षात आला.माझ्या बोर्डात ज्या विषयांची तोंडओळख होती त्याची व्यवस्थित समज आणि उमज त्या मुलांना होती.अजुनही हा मुख्य फरक किंवा मर्यादा एसएससी बोर्डात आहे. मात्र चांगले अनुभवी शिक्षक असणारी, मुलांकडे वैयक्तिक लक्ष देउ शकणारी शाळा जर एसएससी बोर्डाची आहे तर नाकारू नयेच.

कोऽहम् 13/01/2015 - 12:10
सी.बी.एस.सी. च्या अभ्यासक्रमाचा भर नुसत्या रट्टा मारुन पास होण्यापेक्षा मुलांच्या मनामधे संकल्पना रुजतील अश्या रितीनी बनवलेला आहे -> ह्या शिक्षण पद्धतीमुळे मुले स्वतःच विचार करायला लागतात आणि कोणत्याही गोष्टीचा सखोल विचार करूनच निर्णय घेण्याची सवय लागते. आमच्या निकटवर्तीय आय. आय. टी प्राध्यापकांचे असे मत आहे की, सी.बि.एस.ई. चे विद्यार्थी विषयाचा गाभा/मूळ संकल्पना माहित असल्यामुळे नवीन /प्रगत कल्पना फार लवकर आत्मसात करतात आणि स्वतंत्रपणे विचार करण्याचे कौशल्य ह्या विद्यार्थ्यांमधे तुलनेने जास्त असते (हे मत माझे स्वतःचे नाही, आणि ह्याद्वारे इतर अभ्यासक्रमांचा वा विद्यार्थांच्या उणीवा दाखवण्याचा हेतू नाही. )

ह्याच विषयाचा गेले तीन महिने सतत विचार करून डोक्याचा पार भुगा झाल्यावर गेल्याच आठवडयात मुलीकरता एस.एस.सी. बोर्ड शाळेत प्रवेश घेतला आहे कारण नर्सरी करता १ लाख ४० हजार आणि त्यानंतर प्रत्येक वर्षी १०% फी वाढ हे गणित आम्हाला तरी जमणारे नाही (भविष्यातील सर्वच गोष्टींचा विचार करून). सी. बी. एस. ई, आय. सी. एस. ई., आय. बी., सी. आय. ई. सर्वांचीच फी लाख-दीड लाखाच्या आसपासच.

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

अजया 13/01/2015 - 22:30
नाही हो.माझ्या मुलाची cbse ची नामवंत शाळा असूनही त्याची दहाविची वार्षिक फी ट्रान्सपोर्टसह तीस हजार पण नाही.दिड हजाराची पुस्तकं.ती शाळेतच मिळतात.बाहेर नाही. मोठ्या शहरांत ही लूटमार चालत असावी.

In reply to by अजया

हल्ली त्या इंटरनॅशनल शाळांनी धुमाकुळ घातलाय ना. त्यामधे आहेत एवढ्या फिया. भाचीच्या अ‍ॅडमिशनसाठी सहज हा इंटरनॅशल प्रकार काय आहे हे पहायला गेलेलो. कपाळावर (माझ्याचं) हात मारुन घेतला. कोप्रापासुन नमस्कार केला आणि घरी आलो. ए.सी. क्लासरुम कशाला पाहिजे पिंपरी-चिंचवडमधे? मुंबई वगैरे दमट ठिकाणी ठिक आहे. म्हणे आम्ही इंटरनॅशनल पद्धतीनी मॅनर्स आणि एटीकेट्स वगैरे शिकवतो म्हणे. शाळेचे गुर्जी-गुर्जीणी कधी इंटरनॅशनल सोडा कधी महाराष्ट्राबाहेर गेले असतील का नाही ही शंका. त्या गुर्जीणीला गेल्या गेल्या गुडमॉर्निंग घातला तर साधं हसली सुद्धा नाही, परतफेड सोडा. जाताना शिस्तीत मराठीत धन्यवाद म्हणुन बाहेर आलो.

In reply to by वैदेही बेलवलकर

आजानुकर्ण 13/01/2015 - 22:21
एका मुलाची फी १ लाख ४० हजार? वर्गात ५० मुले पकडली तर फक्त एका वर्गाचे उत्पन्न ७० लाख. मैदानेही नसलेल्या या शाळा असं नक्की काय शिकवतात. बहुतेक शिक्षक तर शिक्षण सेवक व तत्सम प्रकल्पाखाली तासिका बेसिसवर पाचदहा हजार रुपड्यांवर नोकऱ्या करतात.

In reply to by आजानुकर्ण

सस्नेह 13/01/2015 - 22:47
मला वाटतं फी चा आणि CBSE pattern चा काही संबंध नसावा. एसेस्सीच्या काही शाळांच्या फीज आणि डोनेशन्स लाखावर असलेल्या माहिती आहेत. झी स्कूल सीरिजच्या शाळा देशभरात वाजवी फीमधे चांगले शिक्षण देताहेत. उद्या लिंक शोधून देते.

In reply to by सस्नेह

तुझे एक एक प्रतिसाद वाचुन अजुनच त्रास होतोय.. कारण एकतर चांगली CBSE शाळा जवळ नाही. आणि ज्या आह्ते त्या खरच भिकार आहेत ग.. तू म्हणतेस त्या पद्धतीने अजिबात काहि होत नसणार तिथे.. स्टाफच तेवढा "महान" आहे... आता कसं व्हावं आमचं?

पदम 13/01/2015 - 12:18
मी स्वतःसुद्धा एस.एस.सी. बोर्डातुन (शुद्ध मराठी मिडियम) मधुन शिकलोय. आणी ते हि महानगर पालिकेतुन सातवीपर्यन्त त्यानन्तर खाजगि शालेतुन.

In reply to by पदम

यसवायजी 13/01/2015 - 22:33
मी स्वतःसुद्धा एस.एस.एल.सी. बोर्डातुन (शुद्ध मराठी+कन्नड मिडियम) मधुन शिकलोय. आणी तेही फुक्कट सातवीपर्यन्त त्यानन्तर १४० रू.वार्षीक फी भरुन खाजगि शालेतुन. (चला.. त्या निमित्ताने मी SSLC पास आहे हे सांगून घेतो.) ;)

अगदी भाबडा विचार... CBSE अर्थात स्टेट बोर्डापेक्षा चांगलं आहे.. पण आता नाही आमच्या घराजवळ ती शाळा... अशा केस मध्ये आपण घरी CBSE ची पुस्तकं आणुन मुलांना घरी समजावु शकतो ना.. शाळा जरी घोकंपट्टी करुन घेत असली तरी तीच गोष्ट कळेल अशा पद्धतीने, प्रयोगांमधुन, उदाहरणांमधुन आपण मुलांना सांगु शकतोच.. अजुन एक.. होमी भाभा सारख्या परीक्षांना बसल्यामुळे तसाही मुलं गणित आणि विज्ञानाचा खोलात जाऊन अभ्यास करतात ना? मग स्टेट बोर्डाच्या मुलांना तोही एक पर्याय आहे...

श्रीगुरुजी 13/01/2015 - 12:58
सीबीएसई व एसएससी च्या ८ वी, ९ वी व १० वी च्या गणित व शास्त्राच्या पुस्तकांची तुलना करा व स्वतःच ठरवा कोणता अभ्यासक्रम जास अवघड व आव्हानात्मक आहे ते. बादवे, सीबीएसई च्या अभ्यासक्रमात हिंदी व इतिहास-भूगोल हे विषय भयंकर अवघड आहेत. हिंदीतले बरेचसे शब्द कळतच नाहीत. संदर्भाने अर्थ लावावा लागतो.

In reply to by श्रीगुरुजी

अजया 13/01/2015 - 14:21
भयंकर अवघड असं काहीही नाही.मी स्वतः मुलाचा अभ्यास घेते त्यावरुन सांगू शकते.अशी दोन सायन्सच्या पुस्तकांची तुलना करुन ठरवणे चुकीचे आहे.सुरुवातीपासुन एक अभ्यासक्रम असला की मुलांना बरोबर लिंक लागते.अापण अभ्यास घेत असतानाही सलग वाचत गेले की व्यवस्थित कळते.ही मुलं सुरुवातीपासुन हिंदी शिकत असतात.हिंदी हा अवघड विषय मुलाना वाटत नाही.एकतर फक्त पुस्तकावर आधारित पेपर नसतात.त्यात तेवढ्याच मार्काचा भाग व्याकरण, वाचन,उतारे असं सर्व असतं.शाळांमध्ये आठवीपर्यंत झालेले व्याकरण नंतर परत असते.त्यामुळे अवघड जात नाही. मला स्वतःला त्यांची इतिहास भूगोल पाॅलिटिक्स ही पुस्तकं तसंच फिजिक्स आणि बायोलाॅजीचीही अावडतात वाचायला.

वारा 13/01/2015 - 13:45
सर्व सदस्यांचे मनापासुन धन्यवाद. खाली CBSE च्या अभ्यासक्रमाची लिंक आहे. http://www.cbseguess.com/syllabus/2015/

In reply to by असंका

वारा 14/01/2015 - 12:19
२ शाळांमधे फॉर्म भरलेत. पहीली एस एस सी वाली आहे. पण ८० सिट आणि बरेच फॉर्म आहेत. लॉटरी लागली तर लागली. दुसरी सी. बी. एस. सी. अ‍ॅडमीशन मिळेल अस वाटतय. सी. बी. एस. सी.वाल्या बर्याच शाळांचे फॉर्म भरायच्या तारखा संपल्यात. एस. एस. सी. अजुन काही शाळा चालुच झाल्या नाहीत. एका शाळेत ४० % रिसर्व ४०% भाउबंध आणि राहीलेल्या सिट ईतर लोकांना. म्हणजे सरळ आहे, अ‍ॅड्मिशन नो गॅरंटी. परत रांगेत उभे रहा रात्री पासुन. आय सी एस सी वाले म्हणतात कधीही या अ‍ॅड्मिशन देतो. पण शाळा प्रपोस्ड आय सी एस सी. बाकी ज्या शाळेत अ‍ॅड्मिशन मिळतय ती या वर्शा पासुन सी. बी. एस. सी. झालीय, म्हणजे आधीच्या बॅच एस. एस. सी. झाल्यात. असो प्रोसेस चालु आहे.

In reply to by वारा

असंका 14/01/2015 - 12:47
शुभेच्छा!! पटकन निर्णय घेतलात हे बेष्ट!! (... पण शेवटी काय? एस एस सी चांगलं की सी बी एस ई? की शाळा चांगली असणं जास्त महत्त्वाचं? )

In reply to by वारा

डिट्टो!!!!! अगदी हेच झालं आहे.. आम्ही कुठेही फॉर्म भरलेला नाही. बहुदा SSC साठीच भरु. कारण जुन्या शाळांमध्ये शिक्षक चांगले असतात.

पदम 13/01/2015 - 14:36
मी स्वतःसुद्धा एस.एस.सी. बोर्डातुन (शुद्ध मराठी मिडियम) मधुन शिकलेय. आणी ते हि महानगर पालिकेतुन सातवीपर्यन्त त्यानन्तर खाजगि शालेतुन. शाळा मुलुन्डची मराठि विद्यालय.

चिगो 13/01/2015 - 15:31
५वी नंतर नवोदयच्या परीक्षेला बसवा.. क्लियर झाली तर बारावीपर्यंत पोर सी.बी.एस.ई.त शिकेल. ते पण फुकट.. हाकानाका.. फक्त पोरापासून सात वर्षं दुर रहायला लागेल. दर आठवड्याअखेर भेटू शकता म्हणा.. (नवोदयचा माजी विद्यार्थी) चिगो

शिद 13/01/2015 - 20:30
चांगली चर्चा चालू आहे. सगळ्यांच्या अनुभवांवरून चांगलं मार्गदर्शन मिळतंय. आम्हाला पण लवकरच ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करावा लागणार आहे.

मितान 13/01/2015 - 22:21
मुलीला शाळेत घालताना शाळा घराजवळ असणे, मैदान व इतर भौतिक सुविधा चांगल्या असाव्यात, अभ्यासेतर गोष्टींना प्रोत्साहन देणारे वातावरण असावे या किमान अटी होत्या. प्राथमिक शिक्षण मातृभाषेतून याचा आग्रह होता. सुदैवाने घरापासून १ कि मी अंतरावर अशीच शाळा आहे. त्या शाळेशी मी गेली १२ वर्षे जोडलेली असल्याने अंतर्गत व्यवस्थापन व शिक्षक माहितीतले आहेत. शाळेत झाडाला निळा जांभळा रंग दिलेला, कधीतरी स्वतःच स्वतःचा गृहपाठ ठरवून करण्याचा इथपासून अनेक नवे प्रयोग व मुलांना अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिले जाते.५ वीपासून सेमी इंग्लिश आहे. मुक्तांगण विज्ञानशोधिका, भास्कराचार्य साठी गणित तयारी, समाज अभ्यासासाठी ७ वीपासून पुढे अभ्याससहली व शिबिरे, पोहणे,जिम्नास्टिक्,अ‍ॅथलेटिक्स, खेळ लायब्रेरी, गायनवादननृत्यचित्र इ स्वतंत्र शिकण्याची सोय, परदेशी भाषा व स्पोकन इंग्लिश लहान वयापासून शिकण्याची सोय हे सगळं असणारी शाळा कोणत्या बोर्डाची हा सवालच नव्हता. स्टेट बोर्ड मराठी माध्यमात मुलगी आणि आम्ही दोघे समाधानी आहोत. दुसरी इयत्तेच्या मानाने प्रगती खूप चांगली आहे. नवे शिकायला आवडते. शाळा खूप आवडते. राहिला इंग्रजीचा मुद्दा. इंग्रजी भाषा म्हणून आवडत असल्याने आम्ही तिला इंग्रजीतूनही गोष्टी वाचून दाखवतो. कार्टून्स ती हिंदी न बघता इंग्रजीतून बघते. अनेक शब्द विचारते. हे सगळं तिला समजतं आणि ती उपयोगातही आणते. हा आत्मविश्वास येण्यात शाळेच्या वातावरणाचा आणि शिक्षकांचा नक्कीच मोठा सहभाग आहे. हे सगळं करताना तिच्या शिक्षणात आमचा सक्रीय सहभाग आम्ही गृहित धरलाय आणि प्रयत्नपूर्वक अभ्यासपूर्वक चार गोष्टी नियमीत करत आहोत. फायदे - शाळा ७ ते १२ असल्याने बाकीचा दिवस हातात आहे. शाळा जवळ आहे. कधीमधी चालत जातो. पुढे तिची ती सायकलवर जाऊ शकेल. घरातले आणि शाळेतले सांस्कृतिक सामाजिक वातावरण फार वेगवेगळे नाही. समविचारी पालक भेटल्यामुळे छान पिअर ग्रुप तयार झालाय. त्यामुळे अभ्यासेतर गोष्टी मिळून करायला मजा येते. मुलांना या वयात शिकायला आवडलं पाहिजे.ती भूक वाढली पाहिजे. स्पर्धा आवाक्यातली वाटली पाहिजे. हे सगळं होतंय. तोटे - शालाबाह्य गटात आम्ही एकटेच एसेसी मराठी वाले असल्याने ही काय बोलते ते तिच्या बरोबरीच्या मुलांना कळत नाही. हिला मात्र आंग्लाळलेलं हिंदाळलेलं मराठी छान समजतं. मग ही त्या भाषेत बोलते. हे पिअर प्रेशर. स्टेट बोर्डाच्या व सी बी एस सी च्या सुट्या वेगवेगळ्या असल्याने इतरांसोबत सुट्टी प्लान करता येत नाही. बराच विस्कळीत झालाय प्रतिसाद. पण हे शेअर करावं वाटलं. एक सल्ला - तुम्हाला आणि तुमच्या मुलाला काय झेपेल आवडेल पटेल तेच करा. ज्या शाळेत मूल किमान १२ वर्ष जाणार आहे ते त्याला बॅटलफील्ड न वाटता कम्फर्ट झोन वाटला पाहिजे. ही गोष्ट आपण पालकांनी पिअर प्रेशर घेऊन करण्याची नाही. कोणतेही बोर्ड असले तरी मुलाच्या विश्वात तुमचा किती प्रभाव आहे, सहभाग आहे यावर मुलांचे व्यक्तिमत्व क्से असेल हे ठरणार आहे. अ‍ॅकॅडमीक हा त्याचा केवळ एक भाग झाला. त्याला संपूर्ण समजण्याची चूक करू नये.

In reply to by मितान

"एक सल्ला - तुम्हाला आणि तुमच्या मुलाला काय झेपेल आवडेल पटेल तेच करा. ज्या शाळेत मूल किमान १२ वर्ष जाणार आहे ते त्याला बॅटलफील्ड न वाटता कम्फर्ट झोन वाटला पाहिजे. ही गोष्ट आपण पालकांनी पिअर प्रेशर घेऊन करण्याची नाही." "कोणतेही बोर्ड असले तरी मुलाच्या विश्वात तुमचा किती प्रभाव आहे, सहभाग आहे यावर मुलांचे व्यक्तिमत्व क्से असेल हे ठरणार आहे. अ‍ॅकॅडमीक हा त्याचा केवळ एक भाग झाला. त्याला संपूर्ण समजण्याची चूक करू नये." १००% सहमत...

In reply to by मितान

काळा पहाड 14/01/2015 - 01:36
फारसं सहमत नाहीये. १० वी पर्यंत सगळी टर्मिनॉलॉजी ही मराठीतून असेल आणि ११ पासून इंग्लिश मधून. अर्थात सेमी इंग्लिश हा काय प्रकार आहे ते माहीत नाही. पण जर गणित/सायन्स मराठी मधून शिकवणार असतील तर पुढे प्रॉब्लेम होवू शकतो.

In reply to by काळा पहाड

खटपट्या 14/01/2015 - 03:16
सेमी ईंग्लीश म्हणजे ५वी किंवा ८वी पासुन गणित आणि विज्ञान हे विषय ईंग्रजीमधून शिकवले जातात. काही शाळात ५वी पासून तर काही शाळात ८वी पासून असे करतात.

In reply to by खटपट्या

काळा पहाड 14/01/2015 - 10:33
असं असलं तरी उदाहरणार्थ युपीएससी ला जाणार्‍या विद्यार्थ्यांना बर्‍याच संज्ञा नव्याने शिकाव्या लागणार. त्यामुळे एकूणच हा प्रकार मर्यादित प्रमाणातच यशस्वी होणार. असे प्रयोग करण्यापेक्षा शिक्षणाचं प्रमाणीकरण करणं इतकं का अवघड आहे हे कुणी सांगेल? देशभर एकच अभ्यासक्रम आणि एकच गुणवत्ता प्रमाण हे ध्येय असायला काय हरकत आहे?

माझ्या जिव्हाळ्याच्या विषयावर धागा.. हीच माहिती सध्या मी सुद्धा शोधत आहे. SSC - मला हा अभ्यासक्रम पुरेसा वाटत नाही. स्पर्धा परीक्षांसाठी खरं तर CBSE हवा. पण मुळात आपला मुलगा डॉक्टर / इंजिनिअरच बनेल ह्याची काय खात्री? समजा सेफ साईड तसं धरलं तरी तो अभ्यास आपणही घरी करुन घेऊ शकतो असं मला वाटतय. मला कितीही इच्छा असली तरी चांगली CBSE जवळपास न सापडल्याने मी ह्या पर्यायाचा विचार करतेय. शिवाय माझ्या घराजवळ जुन्या प्रसिद्ध अनेक SSC च्या शाळा आहेत. शाळा घराजवळ असणे हा मुद्दा अत्यंत मह्त्वाचा असल्याने मी त्या शाळांचा विचार करतेय. ह्यांच्याही फीस तोडीस तोड आहेत. ICSE - हे ऐकायला छान वाटतं.. पण मला स्वतःला अजुन ह्या ब्यासक्रामातुन पास आउट झालेलं कुणीही माहिती नाही. त्यामुळे ह्या अभ्यासक्रामातुन बाहेर पडून सामान्य मुलां सोबत बारावी - ग्रॅजुएशन केलं तर नक्की त्याचे फायदे तोटे काय हे मला माहिती नाहीत. ह्या अभ्यासक्रामात खुप सार्‍या माहितीपेक्षा प्रॅक्टिकलवर भर दिल्या जातो. अनेक विषय असतात (सहावीलाच म्हणे १२-१३ विषय असतात).. काही पालक म्हणतात की आजकालची मुलं जास्त हुषार आहेत.. त्यांच्या बुद्धिला एवढं खाद्य लागतंच.. ह्या शाळांच्या फीस पण भरपुर आहेत. मायबोलीवर ह्यावर पुष्कळ चर्चा झाल्याचं आठवतय पण दोन दिवस झाले मलाही लिंक सापडलेली नाही. तिथे कुणी तरी ह्या ३ अभ्यासक्रमांवर सविस्तर लिहिलं होतं. तोवर ही एक लिंक पहा - http://www.thinkvidya.com/a/cbse-vs-icse-the-pros-and-cons-of-each-educational-board

In reply to by पिलीयन रायडर

सर्वोत्तम शिक्षण हे मातृ भाषेतुनच असते. आपल्या मुलाला मराठी माध्यामाच्या शाळेत घाला आणी रोज थोडा वेळ देऊन त्याला ईतर गोष्टी शिकवा. नुसता मुलाला वेळ दिला तरी पुष़्अळ आहे. एसेस्सीलाच टाका तेही मराट्।ई माध्यमातुन. मी अनेक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या आहेते नोकरीसाठी त्यातुन मला असे आढळले नाही अश्या अभ्यासक्रामामुळे लोक जास्त चांगले होतात. उत्तम आई वडील असले तरच मुलं चांगली होतात.

In reply to by पिलीयन रायडर

सर्वोत्तम शिक्षण हे मातृ भाषेतुनच असते. आपल्या मुलाला मराठी माध्यामाच्या शाळेत घाला आणी रोज थोडा वेळ देऊन त्याला ईतर गोष्टी शिकवा. नुसता मुलाला वेळ दिला तरी पुष़्अळ आहे. एसेस्सीलाच टाका तेही मराट्।ई माध्यमातुन. मी अनेक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या आहेते नोकरीसाठी त्यातुन मला असे आढळले नाही अश्या अभ्यासक्रामामुळे लोक जास्त चांगले होतात. उत्तम आई वडील असले तरच मुलं चांगली होतात.

hitesh 12/01/2015 - 14:25
इंग्लिश मेडियम स्टेट किंवा फार्फार तर कॉन्वेंट फायनल केले आहे

सी.बी.एस.सी. चा विचार करा. एस.एस.सी. पॅटर्न बर्‍यापैकी औटडेटेड झालाय. १० वी-१२वी नंतर स्पर्धेमधे टिकायचं असेल तर अपडेटेड ज्ञान असणं आवश्यक आहे. आय.सी.ए.सी विषयी फार माहिती नाही त्यामुळे बोलतं नाही.

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

SSC मध्ये गणित विज्ञानाचा काहितरी घोळ घातलाय म्हणे... पुस्तक बदलली आहेत की २ -२ पुस्तकं केली आहेत (म्हणजे NCRTE ची सुद्धा आणली आहेत) असं काय काय ऐकायला मिळतय... कुणाला काही माहिती आहे का?

In reply to by पिलीयन रायडर

हो गणिताचे आमच्या वेळी होतं तसं गणित आणि सामान्य गणित असे दोन इलेक्टिव्ह्ज ठेवलेत. ज्यांना पुढे करिअर मधे मॅथेमॅटिक्स अ‍ॅप्टीट्युडची विशेष आवश्यकता नाही त्यांच्यासाठी हा पर्याय आहे. खरं तर वेडेपणाचा निर्णय आहे. आर्टस, कॉमर्स आणि सायन्स तिन्हीचा ह्या ना त्या प्रकारानी गणोबाशी संबंध येतोचं. काठिण्य पातळी आणि वापरामधे फरक असु शकतो. पण त्याला सामान्य गणित ही पळवाट अयोग्य आहे. दहावी मधे सामान्य गणित घेतलेला विद्यार्थी पुढे अभियांत्रिकी पदविका आणि पदवीकडे वळु शकत नाही.

रायनची आई 12/01/2015 - 16:42
आमच्या कडे गेल्या वर्षी माझ्या मुलाच्या एड्मिशन च्या वेळी हेच प्रश्न पडले होते..आमचा पहिला प्रेफरेन्स शाळा जवळ असण्याला होता..आणि आमच्या घराजवळ सगळ्या शाळा एस. एस. सी. बोर्ड च्याच आहेत..म्हणून आम्ही सगळा विचार करून त्याला घराजवळच्याच एका चांगल्या शाळेत त्याला घातल..अभ्यास तर काय आपण घरी पण करून घेऊ शकतो, आणि नंतर कॉलेज सगळ्यांची एकच असणार आहेत..

सस्नेह 12/01/2015 - 16:50
CBSE बेस्ट ! पण खात्री करून घ्या की शाळेमध्ये फक्त CBSE अभ्यासक्रमच नाही तर टोटल CBSE Curriculum घेतला जातो. कारण CBSE बोर्डाची परीक्षा म्हणजे स्पेशल स्किल्स, अवेअरनेस, जनरल इंटरप्रिटेशन आणि बरंच काही असतं. त्यामुळे मुलांचा सर्वांगीण व्यक्तिमत्व विकास सहजपणे होतो. ट्युशन मिळत नसेल तर एस. चांद यांची रेफरन्स बुक्स घ्या आणि स्वत: वाचून शिकवा मुलांना. तुम्हाला वाचायलासुद्धा इंटरेस्ट वाटेल. पुस्तकांच्या किमतीपण भरपूर आहेत.

अजया 12/01/2015 - 17:06
माझा मुलगा ज्यु केजी ते दहावी सीबीएसईमध्ये शिकला आहे.सुरुवातीपासुन घेतल्यास सिबिएसई चांगला पर्याय आहे.एकतर विचारपूर्वक तयार केलेला अभ्यासक्रम,मनाला येईल ते मंत्री नियम काढणार बदलणार असे काही फारसे नाही.मराठीचा पर्याय माझ्या मुलाने आठवीपर्यंत वापरला.नववी दहावी दोनच भाषा आहेत.त्यामुळे हिंदी द्वितीय भाषा घेतली आहे.मात्र सिबिएसई शाळेला त्यात प्रशिक्षित अनुभवी शिक्षकवर्ग हवा.नवशिक्या शिक्षकांचे ते काम नाही. आॅब्जेक्टिव्ह पेपर नसतात.पेपरातला काही भाग जास्त पर्यायातला एक निवडा असा असतो. मराठी पर्याय महाराष्ट्रातल्या शाळेत तर मिळतोच .बहारिनच्या सिबिएसई शाळेत पण होता. दहावीपर्यंत ग्रेड पध्दत आहे.दहावीचा रिझल्ट एकत्रित ग्रेड पाॅइंट अॅवरेज असा दहापैकी गुण मिळतो. टप्प्याटप्प्याने अभ्यासाची तीव्रता वाढत जाते.त्याची सवय हळूहळू मुलाना होत जाते.त्याप्रमाणेच अगदी तिसरीपासुनचे पेपर पॅटर्न्स असतात. मुलांना रोज अभ्यास फक्त टेक्स्टबुकमधुन केलेला पुरतो.आपण लक्ष घालणे जरुरी आहे.ट्युशनची आवश्यकता आम्हाला फक्त दहावीच्या गणिताला लागली.रोज अभ्यास करण्याला पर्याय नाही.फक्त शाळेवर अवलंबुन राहणेही नाही चालु शकत.मी बरेच पालक शाळेला,अभ्यासक्रमाला मुलांच्या अपयशाचे कारण मानताना पाहिले आहे.पण ते सोयिस्कर स्वतःच्या असहभागाबद्दल बोलत नाहीत. ५०%शाळेचा आणि तेवढाच पालकांचा सहभाग हवा. शाळेत एका वर्गात ४० मुलं आणि तुमचा एकच तुमच्यासमोर.मुलांना काय येतं येत नाही का येत नाही हे सर्व आपण जाणून घेऊ शकतो. अकरावी बारावी देखिल आम्ही सिबिएसईलाच कंटिन्यु करणार आहोत.इतका आम्हाला हा अभ्यासक्रम आवडतो! आम्ही म्हणजे आम्ही आणि आमचा मुलगा!नुसते आम्ही नाही!!

In reply to by अजया

म्हणुनच मला CBSE हवं होतं.. पण जवळ २-३ च शाळा आहेत. पैकी २ भिकार आहेत. (त्या चक्क अपार्ट्मेंट टाईप एका बिल्डिंगच्या शाळा आहेत.. आणि त्यांना मैदानच नाही... मैदान नसलेली शाळा अजिबात नको...) आणि १ उरते ती भयानक महाग आहे. १ लाख फीस मी ३ वर्षाच्या मुलासाठी भरु शकत नाही. (१० वीला मी काय फीस भरत असेन ह्या विचारानेच मला फेफरं आलं..) आता पर्याय फक्त २ च आहेत.. SSC and ICSE... तर ICSE बद्दल थोडी माहिती कुणी देऊ शकेल का?

In reply to by काळा पहाड

खेडूत 12/01/2015 - 21:22
बहुधा नाही. त्यांची साठ हजारच्या आसपास आहे., त्यात फी शिवाय न्याहारी जेवण व संध्याकाळचे दूध पण देतात . घरचा डबा नेण्यास मुभा नाही

In reply to by खेडूत

मिलेनियमच.. आम्ही चौकशी केली तेव्हा "या वर्षी ७९ हजार आहे.. १०% वाढेल असं धरुन चाला" असं म्हणाले. त्यांचे फोर्म्स जस्ट ५-६ जानेवारीला भरायचे होते, काही कारणाने तेव्हा नाही भरता आले, त्यामुळे नक्की फीस किती आहे ते कळाले नाही. मला इतक्या लहान मुलांना शाळेनी जेवण देणं आवडत नाही. माझ्या मुलाला मी जितकं उत्तम करुन देऊ शकते ते कुणीच १००-२०० मुलांच एकदम जेवण बनवणारा आचारी देऊ शकत नाही. दुसरं असं की त्या शाळेत मुल असणारे पालक भेटले, त्यांनी सुद्धा अशीच ८०-९० हजार फिस सांगितली आणि शिवाय "फाटक सर गेल्यापासुन पुर्वी सारखं वातावरण राहिलं नाही" असंही म्हणाले. तिसरा मुद्दा असा की बुकलेस शाळा आहे. त्यामुळे घरी मुलं काही होमवर्क वगैरे करत नाहीत, अनेक पालकांना अशावेळी नक्की मुलाला काय कळतय काय नाही हे समजत नाही. अशा अनेक आक्षेपांमुळे लाखभर फीस भरायचे धाडस माझ्यात तरी नाही..

In reply to by पिलीयन रायडर

आजानुकर्ण 12/01/2015 - 21:30
होमवर्क नसतो. मग परीक्षा असतात का? हल्ली १०वीपर्यंत परीक्षा नसतात असं ऐकलंय. मग मुलाला शिकवलेलं समजतंय की नाही हे कसं कळतं?

In reply to by आजानुकर्ण

प्रत्येक आठवड्याच्या शीट्स असतात. त्यावरुन काय ते समजुन घ्या आणि करुन घ्या मुलाचा अभ्यास... परीक्षांचं माहिती नाही. पण मुलाला कळतय की नाही ह्याचा आई वडीलांना अंदाज येत नाही हे २-३ जणांनी सांगितलं...

In reply to by पिलीयन रायडर

खेडूत 12/01/2015 - 22:21
आमचं इथे पाहिलंच वर्ष चाललंय. सध्या तरी ठीक-ठीक . परीक्षा यथातथाच असतात. आपण भरपूर वेळ द्यावा लागतो. वर्षाच्या अधेमधे भारतात परतल्यामुळे जी मिळेल ती शाळा घेणे भाग होते. पण पूर्वी अनेक वाईट शाळा पाहिल्यात त्या तुलनेत ही ओक्के वाटते . प्रत्येक शाळेत काहीतरी उणीवा आहेतच. शाळेतले जेवण आम्हालाही पटत नाही पण ते बिल्ट-इन फीचर आहे ! :( पुढे बाहेर रहायची वेळ येईल तेव्हां अशी सवय असल्याने जड जाणार नाही अशी समजूत करून घेणारे पालक पाहिलेत.

अजयाशी सहमत! त्यातल्या त्यात CBSE चा अभ्यासक्रम उत्तम, पण अर्थातच पालकांची पाल्याबरोबर त्यात्या इयत्तेचा अभ्यास करण्याची तयारी हवी. यात जबरदस्तीने करावं लागण्यापेक्षा त्यांनाही (म्हणजे पालकांना) आनंद वाटायला हवा. थोड्या अवांतराबद्दल क्षमस्व - CBSE ची 9 वी आणि 10 वीची Democratic Politics ची पुस्तके सर्वानीच जरूर वाचावीत अशी आहेत.

माझा मुलगा सीबीएसइ मधे शिकतोय. पण त्याच्या शिक्षकांवर त्याचा परफॉर्म्स ठरतोय. अनुभवी शिक्षक नसल्यामुळे त्याची जरा गोची होत आहे. मुळात त्या शिक्षिकेलाचा सीबीएसइ चा अभ्यासक्रम अजून नीट समजलेला नाही. मुलाला गणिताची ट्युशन लावली तो पर्यंत बरं चाललं होतं. ट्युशनवाला शिक्षकही कुठे तरी निघुन गेला याचं गणित पुन्हा खालावलं. मी त्या म्याथवाल्या शिक्षिकेला भेटलोय, आमचं ऐकुन घ्यायच्या ऐवजी तिचच सुरु असतं आम्ही कशी विद्यार्थ्यांची काळजी घेतो, अभ्यासक्रम तसा टफच असतो पण मुलांचा परफॉर्म्स आता सुधारु लागला आहे, मी व्यक्तिगत लक्ष घालते असं म्हणुन ती माझी बोळवण करते आहे, मला माझ्या गावी तीच एक शाळा बरी असल्यामुळे काही दुसरा पर्याय नाही. -दिलीप बिरुटे

आजानुकर्ण 12/01/2015 - 21:25
आयला बरंच अवघड झालंय... जास्त पर्याय असल्याने फायदा होतो की नुकसान असा प्रश्न पडतो. एसएससी बोर्डाच्या शिक्षणाची नक्की काय मर्यादा आहे बॉ? माझे शिक्षण एसएससी बोर्डात झाले. माझे एकदोन चुलत नातेवाईक सीबीएससी बोर्डातले आहेत. सीबीएससी बोर्डाचा नोकरी/पुढील शिक्षणात प्रवेश वगैरे मिळवताना विशेष फायदा होत असल्याचे ऐकले नाही. नक्की काय परिस्थिती आहे?

In reply to by आजानुकर्ण

सतिश गावडे 12/01/2015 - 21:43
एसएससी बोर्डाच्या शिक्षणाची नक्की काय मर्यादा आहे बॉ? माझे शिक्षण एसएससी बोर्डात झाले.
अगदी हेच म्हणायचं आहे.

In reply to by खटपट्या

नाखु 13/01/2015 - 15:20
माझा ल्येक एस्.एस्.सी. वाले त्याने काही मोठा फरक जाणवेल काय? कारण मी घरापासून फक्त ५ मिनिटाचे अंतरावरील (जाहीरातीप्रमाणे नाही खरोखर चालत) शाळेत पुढे खेळायला/अभ्यासाला पुरेसा वेळ मिळावा म्हणून दाखल केले आहे लेक आणि लेकीला. जाणकारांनी जरा इकडे प्रकाश टाकावा.

In reply to by आजानुकर्ण

खेडूत 12/01/2015 - 22:51
सर्व व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी प्रवेश चाचण्या सुरु झाल्यात. ज्या पूर्वी नसल्याने आपल्याला काही फरक पडला नाही. सी ई टी चे पेपर्स 'सी बी एस ई ' अभ्यासक्रमाच्या आधारे काढले जातात. याला सरकारी कारण म्हणजे विविध कर्मचारी नोकरीनिमित्य गावं बदलत असल्याने त्यांची मुलं सी बी एस ई / केंद्रीय शाळेत असतात. त्यासाठी सरकारी बाबुनीच हा निर्णय घेतला असणार. त्यामुळे भविष्यातल्या सुविधेसाठी अनेक पालक इतर शाळातून काढून पाल्याला सी बी एस ई शाळेत घालताना दिसतात. हा प्रकार गेल्या चारपाच वर्षातला आहे. आय सी एस सी अभ्यासक्रम घासू मुलं तयार करतो. पाठांतरावर बराच भर असतो. मात्र इथून मधेच परदेशात जायचं असेल तर तिकडे सहज प्रवेश मिळतो. हा माझा अनुभव आहे. त्यांचे इंग्रजी उच्चार (व्याकरण नाही ) चांगले असतात. इतर वाचन भरपूर असते जे व्यवहारात कामाला येते. फार थोड्या चांगल्या शाळा प्रत्येक महानगरात असतील. पण प्रतिष्ठेपायी ही शाळा काढणाऱ्या भल्याभल्यांच्या तोंडाला फेस येतो कारण या अभ्यासक्रमाचे शिक्षक मिळणे कठीण असते. ग्रामीण भागात एस एस सी ला पर्याय नाही. अत्यंत लहान गांवातल्या आणि अतिसामान्य मुलाना समोर ठेवून हा अभ्यासक्रम केला असल्याने त्यातून पुढे येणारी मुले उर्वरित प्रकारातल्या मुलांच्या मानाने मागे असल्यासारखी फक्त वाटतात. मात्र चांगल्या एस एस सी शाळेत कमालीची चमकदार मुलं असतात ! आपल्या पाल्याने काय करावे हे नर्सरीतच ठरवणाऱ्या पालकांना, मुलाना कुठच्याही अभ्यास क्रमात घातले तरी असुरक्षित वाटत रहाते.

In reply to by खेडूत

सतिश गावडे 12/01/2015 - 23:25
सर्व व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी प्रवेश चाचण्या सुरु झाल्यात. ज्या पूर्वी नसल्याने आपल्याला काही फरक पडला नाही.
माझी बारावी ज्या वर्षी झाली त्याच्या एक वर्ष आधी मेडीकल सीईटी चालू झाली होती. मी ही दिली होती आणि बी ए एम एसला प्रवेश मिळत होता. माझा ओढा इंजिनीयरींगकडे असल्याने मी ती सीट घेतली नाही. इंजिनीयरींगची सीईटी पुढे एक दोन वर्षांनी सुरु झाली. समजा माझ्या वेळीही इंजिनीयरींगला सीईटी असती तर मी ती नक्कीच उत्तीर्ण झालो असतो.
सी ई टी चे पेपर्स 'सी बी एस ई ' अभ्यासक्रमाच्या आधारे काढले जातात.
हा गोड गैरसमज आहे. बारावी नंतरच्या इंजिनीयरींग/मेडिकलच्या सीईटीला मुल शिकायला लागल्यापासून ते बारावीपर्यंतचा अभ्यासक्रम असतो. :) बाकी माहितीशी सहमत.
आपल्या पाल्याने काय करावे हे नर्सरीतच ठरवणाऱ्या पालकांना, मुलाना कुठच्याही अभ्यास क्रमात घातले तरी असुरक्षित वाटत रहाते.
खरा मुद्दा हा आहे. तीन वर्षांच्या बाळाला शाळा असं काय शिकवतात की ज्यासाठी त्या साठ पासष्ठ हजार फी घेतात?

In reply to by आजानुकर्ण

मी स्वतःसुद्धा एस.एस.सी. बोर्ड (शुद्ध मराठी मिडियम) मधुन शिकलोय. एस.एस.सी. बोर्ड वाईट नाही हे मान्यं. पण जर तुम्ही अगदी आजचा एस.एस.सी. बोर्डचा अभ्यासक्रम आणि सी.बी.एस.सी. चा अभ्यासक्रम अशी तुलना केलीत तर तुम्हाला लगेचं समजेल का सी.बी.एस.सी. म्हणतोय ते. सी.बी.एस.सी. च्या अभ्यासक्रमाचा भर नुसत्या रट्टा मारुन पास होण्यापेक्षा मुलांच्या मनामधे संकल्पना रुजतील अश्या रितीनी बनवलेला आहे. अश्या पद्धतीचा अभ्यासक्रम बाकी क्षेत्रात माहित नाही पण अभियांत्रिकीमधे तरी नक्की उपयोगी पडतो. हुच्च शिक्षणासाठी त्या त्या प्रवेश समित्या परसेंटाईल वापरुन समसमान गुण करतात आणि त्यानुसार आणि कास्ट वगैरे गृहित धरुन मिळतो त्यामुळे सी.बी.एस.सी. चा थेट फायदा होत नाही हे मान्य.

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

सस्नेह 13/01/2015 - 12:19
SSC Board वाईट होते असे मुळीच नाही. पण आधुनिक काळाच्या गरजेप्रमाणे त्यात सुधारणा करून CBSE बनवले तर ते poreferable नाही का ? तुलना थोडी बादरायण आहे, पण मारुती 800 कार अजूनही चांगलीच आहेच पण म्हणून होंडा किंवा वोक्सवॅगन (परवडत असेल तर ) वापरणे नाकारावे का ?

In reply to by सस्नेह

आदूबाळ 13/01/2015 - 15:22
ध्येय काय आहे? अ ठिकाणाहून ब ठिकाणी जाणं हे ध्येय असेल, तर मारूती ८०० वापरली काय आणि होंडा सिटी वापरली काय, सारखंच. तद्वत - एका विशिष्ट पातळीचं शिक्षण बारावीपर्यंत होणे हे ध्येय असेल, तर कोणतंही बोर्ड का असेना - काय फरक पडतो? आज सीबीएसई भारी आहे (असं सगळ्या प्रतिसादांवरून वाटतं आहे). त्याप्रमाणे पाल्याला सीबीएसई शाळेत घातलं. उद्या काही जास्त भारी निघालं, तर आपण शाळा/बोर्ड बदलणार आहोत का? माझ्याबाबतीत तरी उत्तर नाही असं आहे.

In reply to by आदूबाळ

सस्नेह 13/01/2015 - 16:59
अ ठिकाणाहून ब ठिकाणी जाणं हे ध्येय असेल, तर मारूती ८०० वापरली काय आणि होंडा सिटी वापरली काय, सारखंच.
वा वा ! प्रवास कसा झाला याला काहीच महत्व नाही का ?
एका विशिष्ट पातळीचं शिक्षण बारावीपर्यंत होणे हे ध्येय असेल
कदाचित मार्क तितकेच पडतील आणि मुलाला/मुलीला त्याच कॉलेजात प्रवेश मिळेल. पण त्या मुलाच्या व्यक्तीमत्वात आणि ग्रहणक्षमतेत, जीवनाकडे पाहण्याच्या दृष्टीकोनात जो फरक पडेल, त्याला माझ्या दृष्टीने तरी फार महत्व आहे. शिक्षण हे त्याच्यासाठी रट्टा मारायची गोष्ट न राहता काहीतरी खरोखर शिकण्याची, करून दाखवायची गोष्ट होईल. शैक्षणिक जीवनातला प्रत्येक क्षण तो डोळसपणे ‘जगायला’ शिकेल, हीच माझ्यासाठी समाधानाची गोष्ट असेल.
आज सीबीएसई भारी आहे (असं सगळ्या प्रतिसादांवरून वाटतं आहे). त्याप्रमाणे पाल्याला सीबीएसई शाळेत घातलं. उद्या काही जास्त भारी निघालं, तर आपण शाळा/बोर्ड बदलणार आहोत का? माझ्याबाबतीत तरी उत्तर नाही असं आहे.
पसंद अपनी अपनी.. माझ्या बाबतीत उत्तर 'हो' असे राहील. माझ्या मुलाला सातवीपासून SSC बोर्ड बदलून CBSE ला घातले आहे. आणि त्याचे खूप चांगले परिणाम (मार्क्स व्यतिरिक्त ) मिळाले आहेत ! *smile*

In reply to by सस्नेह

असंका 13/01/2015 - 17:21
हा फार चांगला मुद्दा आहे... कृपया थोडा अधिक विस्तार करू शकाल का? मीही निर्णय घेणार आहे पुढील काही दिवसात...आणि आपण दोन्ही प्रकारचा अनुभव घेतलेला दिसतो आहे. तेव्हा आपल्या इतकं चांगलं कोणी सांगु शकेल असं वाटत नाही?

In reply to by असंका

सस्नेह 13/01/2015 - 17:41
माझा मुलगा सहावीपर्यंत SSC बोर्ड शाळेत होता. तेव्हा पठडीबाहेरच्या प्रश्नांची उत्तरे देऊ शकत नव्हता. कॉम्पुटर विषय होता पण फक्त पुस्तकात. प्रत्यक्ष हाताळायला पंधरा मिनिटे मिळे तेपण ग्रुपमध्ये. सहामाही परिक्षा होईपर्यंत त्याचे प्रॅक्टिकलच्या बॅचमधे नावच नव्हते आणि हाईट म्हणजे विषय-शिक्षिकेला याचा पत्ताच नव्हता ! हे सगळे पाहून मी सातवीला त्याला CBSE शाळेत घातले. फी थोडीशी जास्त म्हंजे वर्षाला ३५०००. यात युनिफॉर्म, नाष्टा, जेवण वह्या पुस्तके आणि ट्रान्स्पोर्ट हे सगळे आले. वेगळी ट्युशन बंद केली. फारच चांगले परिणाम सहाच महिन्यात दिसले. वर्षाअखेर मुलगा प्रत्येक विषयात स्वत:हून रस घेऊ लागला. मार्क्स तर सुधारलेच, जनरल अवेअरनेस पण सुधारला. कॉम्प्यूटर माझ्यापेक्षाही लीलया हाताळू लागला. तिथे त्यांना रोज एक न्यूज स्वत: सर्वांपुढे सांगावी लागे. वर्गातले लाईट, पंखे इ. बाहेर जाताना बंद करण्याची जबाबदारी रोज एका विद्यार्थ्याची. लहान इयात्तेतल्या मुलांना सांभाळून लाईन करून ग्राउंडवर नेणे, आणणे , त्यांच्याकडून बागकाम इ. करून घेणे आणि त्यांना शिकवणे अशा अनेक गोष्टी जबाबदारी सोपवून करून घेतल्या जात. महिन्यातून एक दिवस स्पेशल स्कील असणारे पालक शाळेत जाऊन एखादा तास मुलांना ते शिकवत. खूपच विधायक शिक्षणपद्धत अनुभवायला मिळाली. पुन्हा मार्क्स हे केवळ लिखाणावर अवलंबून नसता एकूण परफॉर्मन्स आणि सुसंस्कृतपणा यावर अवलंबून असत. पूर्वी शाय असणारा मुलगा आता खूपच कॉन्फिडंट झाला आहे आणि

In reply to by सस्नेह

संदीप डांगे 13/01/2015 - 21:25
तिथे त्यांना रोज एक न्यूज स्वत: सर्वांपुढे सांगावी लागे. वर्गातले लाईट, पंखे इ. बाहेर जाताना बंद करण्याची जबाबदारी रोज एका विद्यार्थ्याची. लहान इयात्तेतल्या मुलांना सांभाळून लाईन करून ग्राउंडवर नेणे, आणणे , त्यांच्याकडून बागकाम इ. करून घेणे आणि त्यांना शिकवणे अशा अनेक गोष्टी जबाबदारी सोपवून करून घेतल्या जात. महिन्यातून एक दिवस स्पेशल स्कील असणारे पालक शाळेत जाऊन एखादा तास मुलांना ते शिकवत. खूपच विधायक शिक्षणपद्धत अनुभवायला मिळाली. पुन्हा मार्क्स हे केवळ लिखाणावर अवलंबून नसता एकूण परफॉर्मन्स आणि सुसंस्कृतपणा यावर अवलंबून असत. पूर्वी शाय असणारा मुलगा आता खूपच कॉन्फिडंट झाला आहे
> अगदी हेच माझ्या मुलाला नाशिक च्या आनंदनिकेतन ह्या १००% मराठी शाळेत मिळत आहे. तेही फक्त रु.५,५०० वार्षिक. गणवेश, खाणे आणि ने-आण पालकांकडे. इतर कुठलाही छुपा खर्च नाही. आता माझा मुलगा बालवाडी २ मध्ये जाईल पण त्याची मागील दोन वर्षातली प्रगती अतिशय समाधानकारक आहे. इंग्रजी माध्यमात शिकणाऱ्या इतर मुलांच्या तुलनेत माझ्या मुलाची शाळेत जायची इच्छा व उत्साह यात खूपच फरक दिसतो. पाहुण्यांसमोर उगाच इंग्रजीतल्या कविता म्हणून दाखवण्यापेक्षा त्याचा व्यवस्थितपणा, टापटीप आणि समजूतदारपणा मला महत्वाचा वाटत आलेला आहे. दहावीपर्यंतच्या मुलांचा एकंदर अंदाज घेतला असता मुले कुठेही बुजरी किंवा कालबाह्य वाटली नाहीत.त्यामुळे कुठलाही अभ्यासक्रम अथवा पद्धतीपेक्षा शाळेची गुणवत्ता फार महत्वाची आहे असे मला वाटते. शाळेची एकूण विचारधारा आणि शिक्षकवृंद ह्यांचा मुलांवर जास्त परिणाम होतो.

In reply to by सस्नेह

मी CBSE च्याच बाजुने आहे.. पण स्नेहाताई असं नाही का वाटत की तू जे मुद्दे मांडले आहेत ते शाळेशी निगडीत आहेत, अभ्यासक्रमाशी नाही...? SSC बोर्डाची पण अशाच जबाबदारीने मुलांना सांभाळणारी शाळा (मितानच्या मुलीची आहे तशी) असती तरी तुझ्या मुलात हाच फरक दिसल असता.. अर्थात CBSE बोर्डाचा अभ्यासक्रम जास्त चांगला आहे ज्यानी मुलांना १०-१२ ला निश्चित फायदा होत असणार..

In reply to by पिलीयन रायडर

सस्नेह 14/01/2015 - 11:03
CBSE अभ्यासक्रमात या सर्व गोष्टीना मार्क्स असतात, त्यामुळे कंपल्सरी ऑब्झर्व्ह केल्या जातात. इतर शाळांमधे एखादीच शाळा हे सर्व ऑब्झर्व्ह करेल. CBSE मध्ये मुलांना त्यांचा कल पाहून डेव्हलप करण्याचे स्वातंत्र्य शिक्षकांना दिले आहे तसे SSC मध्ये नाही. SSC मार्क्स हे पूर्णत: मुलाच्या लिखित performance वरच अवलंबून असतात. तसेच CBSE अभ्यासक्रम SSC पेक्षा फार वेगळ्या पद्धतीवर आधारित आहे. इथे मुले उत्तरे लिहू शकतात का यापेक्षा त्यांना ते समजले आहे का यावर जास्त भर असतो. understanding हा कन्सेप्ट ssc बोर्डाच्या पुस्तकातच नाही. CBSE परीक्षापद्धतसुद्धा understandingवरच आधारित असते. पुस्तके पाहिली असता हे समजेल आणि CBSE बोर्डाच्या प्रश्नपेत्रिका पाहिल्यावर तर पूर्ण क्लिअर होईल. आणखीही बऱ्याच गोष्टी आहेत. आठवतील तशा लिहिते.

In reply to by आजानुकर्ण

मिहिर 12/01/2015 - 23:37
माझे शिक्षण एसएससी बोर्डात झाले.
माझेही. स्पर्धा परीक्षांचा इतका बाऊ का करताहेत ते कळले नाही. फक्त इंजिनिअरिंगचा जरी विचार केला, तरी राज्यात शिकण्यासाठी लागणारी सीईटी ही एसेस्सीच्या अभ्यासक्रमावर आधारलेली असते. जेईईसारख्या परीक्षांचा विचार केला, तर त्या परीक्षा देणारा तसाही त्या अभ्यासक्रमाचा अभ्यास करणार असतोच, मग बोर्ड कुठले आहे त्याने कितीसा फरक पडतो! बाकी मराठी माध्यमाचा कोणी विचारही न करताना पाहून वाईट वाटले.

अजया 12/01/2015 - 22:15
CBSE अभ्यासक्रम मुलाच्या पुढच्या शिक्षणाची तयारी चांगली करुन घेतो ,सायन्स आर्ट्स कॉमर्स कोणत्याही साइडला मुलं गेली तरी त्या विषयांबद्दल माहिती त्यांना पॉलिटिक्स्,इकॉनॉमिक्स्,सायन्स च्या त्या अनुषंगाने तयार केलेल्या अभ्यासक्रमाने मिळते.जे मला एसेस्सी मध्ये नाही आढळ्ले. हल्लीच्या एन्ट्रन्स टेस्ट सिबिएस्सी च्या अभ्यासक्रमानुसार होतात.त्यामुळेही सुरुवातीपासून हा अभ्यासक्रम असणे सोयीचे पडते. सर्व नॅशनल लेव्हल परिक्षांसाठी हाच अभ्यासक्रम लागतो. मी स्वतः एसेस्सीबोर्डात शिकले आहे.पण डेंटल कॉलेजला गेल्यावर आमच्यातला आणि त्यावेळी दिल्ली बोर्ड म्हणायचे यांच्या कॉन्सेप्ट समजण्यातला फरक लक्षात आला.माझ्या बोर्डात ज्या विषयांची तोंडओळख होती त्याची व्यवस्थित समज आणि उमज त्या मुलांना होती.अजुनही हा मुख्य फरक किंवा मर्यादा एसएससी बोर्डात आहे. मात्र चांगले अनुभवी शिक्षक असणारी, मुलांकडे वैयक्तिक लक्ष देउ शकणारी शाळा जर एसएससी बोर्डाची आहे तर नाकारू नयेच.

कोऽहम् 13/01/2015 - 12:10
सी.बी.एस.सी. च्या अभ्यासक्रमाचा भर नुसत्या रट्टा मारुन पास होण्यापेक्षा मुलांच्या मनामधे संकल्पना रुजतील अश्या रितीनी बनवलेला आहे -> ह्या शिक्षण पद्धतीमुळे मुले स्वतःच विचार करायला लागतात आणि कोणत्याही गोष्टीचा सखोल विचार करूनच निर्णय घेण्याची सवय लागते. आमच्या निकटवर्तीय आय. आय. टी प्राध्यापकांचे असे मत आहे की, सी.बि.एस.ई. चे विद्यार्थी विषयाचा गाभा/मूळ संकल्पना माहित असल्यामुळे नवीन /प्रगत कल्पना फार लवकर आत्मसात करतात आणि स्वतंत्रपणे विचार करण्याचे कौशल्य ह्या विद्यार्थ्यांमधे तुलनेने जास्त असते (हे मत माझे स्वतःचे नाही, आणि ह्याद्वारे इतर अभ्यासक्रमांचा वा विद्यार्थांच्या उणीवा दाखवण्याचा हेतू नाही. )

ह्याच विषयाचा गेले तीन महिने सतत विचार करून डोक्याचा पार भुगा झाल्यावर गेल्याच आठवडयात मुलीकरता एस.एस.सी. बोर्ड शाळेत प्रवेश घेतला आहे कारण नर्सरी करता १ लाख ४० हजार आणि त्यानंतर प्रत्येक वर्षी १०% फी वाढ हे गणित आम्हाला तरी जमणारे नाही (भविष्यातील सर्वच गोष्टींचा विचार करून). सी. बी. एस. ई, आय. सी. एस. ई., आय. बी., सी. आय. ई. सर्वांचीच फी लाख-दीड लाखाच्या आसपासच.

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

अजया 13/01/2015 - 22:30
नाही हो.माझ्या मुलाची cbse ची नामवंत शाळा असूनही त्याची दहाविची वार्षिक फी ट्रान्सपोर्टसह तीस हजार पण नाही.दिड हजाराची पुस्तकं.ती शाळेतच मिळतात.बाहेर नाही. मोठ्या शहरांत ही लूटमार चालत असावी.

In reply to by अजया

हल्ली त्या इंटरनॅशनल शाळांनी धुमाकुळ घातलाय ना. त्यामधे आहेत एवढ्या फिया. भाचीच्या अ‍ॅडमिशनसाठी सहज हा इंटरनॅशल प्रकार काय आहे हे पहायला गेलेलो. कपाळावर (माझ्याचं) हात मारुन घेतला. कोप्रापासुन नमस्कार केला आणि घरी आलो. ए.सी. क्लासरुम कशाला पाहिजे पिंपरी-चिंचवडमधे? मुंबई वगैरे दमट ठिकाणी ठिक आहे. म्हणे आम्ही इंटरनॅशनल पद्धतीनी मॅनर्स आणि एटीकेट्स वगैरे शिकवतो म्हणे. शाळेचे गुर्जी-गुर्जीणी कधी इंटरनॅशनल सोडा कधी महाराष्ट्राबाहेर गेले असतील का नाही ही शंका. त्या गुर्जीणीला गेल्या गेल्या गुडमॉर्निंग घातला तर साधं हसली सुद्धा नाही, परतफेड सोडा. जाताना शिस्तीत मराठीत धन्यवाद म्हणुन बाहेर आलो.

In reply to by वैदेही बेलवलकर

आजानुकर्ण 13/01/2015 - 22:21
एका मुलाची फी १ लाख ४० हजार? वर्गात ५० मुले पकडली तर फक्त एका वर्गाचे उत्पन्न ७० लाख. मैदानेही नसलेल्या या शाळा असं नक्की काय शिकवतात. बहुतेक शिक्षक तर शिक्षण सेवक व तत्सम प्रकल्पाखाली तासिका बेसिसवर पाचदहा हजार रुपड्यांवर नोकऱ्या करतात.

In reply to by आजानुकर्ण

सस्नेह 13/01/2015 - 22:47
मला वाटतं फी चा आणि CBSE pattern चा काही संबंध नसावा. एसेस्सीच्या काही शाळांच्या फीज आणि डोनेशन्स लाखावर असलेल्या माहिती आहेत. झी स्कूल सीरिजच्या शाळा देशभरात वाजवी फीमधे चांगले शिक्षण देताहेत. उद्या लिंक शोधून देते.

In reply to by सस्नेह

तुझे एक एक प्रतिसाद वाचुन अजुनच त्रास होतोय.. कारण एकतर चांगली CBSE शाळा जवळ नाही. आणि ज्या आह्ते त्या खरच भिकार आहेत ग.. तू म्हणतेस त्या पद्धतीने अजिबात काहि होत नसणार तिथे.. स्टाफच तेवढा "महान" आहे... आता कसं व्हावं आमचं?

पदम 13/01/2015 - 12:18
मी स्वतःसुद्धा एस.एस.सी. बोर्डातुन (शुद्ध मराठी मिडियम) मधुन शिकलोय. आणी ते हि महानगर पालिकेतुन सातवीपर्यन्त त्यानन्तर खाजगि शालेतुन.

In reply to by पदम

यसवायजी 13/01/2015 - 22:33
मी स्वतःसुद्धा एस.एस.एल.सी. बोर्डातुन (शुद्ध मराठी+कन्नड मिडियम) मधुन शिकलोय. आणी तेही फुक्कट सातवीपर्यन्त त्यानन्तर १४० रू.वार्षीक फी भरुन खाजगि शालेतुन. (चला.. त्या निमित्ताने मी SSLC पास आहे हे सांगून घेतो.) ;)

अगदी भाबडा विचार... CBSE अर्थात स्टेट बोर्डापेक्षा चांगलं आहे.. पण आता नाही आमच्या घराजवळ ती शाळा... अशा केस मध्ये आपण घरी CBSE ची पुस्तकं आणुन मुलांना घरी समजावु शकतो ना.. शाळा जरी घोकंपट्टी करुन घेत असली तरी तीच गोष्ट कळेल अशा पद्धतीने, प्रयोगांमधुन, उदाहरणांमधुन आपण मुलांना सांगु शकतोच.. अजुन एक.. होमी भाभा सारख्या परीक्षांना बसल्यामुळे तसाही मुलं गणित आणि विज्ञानाचा खोलात जाऊन अभ्यास करतात ना? मग स्टेट बोर्डाच्या मुलांना तोही एक पर्याय आहे...

श्रीगुरुजी 13/01/2015 - 12:58
सीबीएसई व एसएससी च्या ८ वी, ९ वी व १० वी च्या गणित व शास्त्राच्या पुस्तकांची तुलना करा व स्वतःच ठरवा कोणता अभ्यासक्रम जास अवघड व आव्हानात्मक आहे ते. बादवे, सीबीएसई च्या अभ्यासक्रमात हिंदी व इतिहास-भूगोल हे विषय भयंकर अवघड आहेत. हिंदीतले बरेचसे शब्द कळतच नाहीत. संदर्भाने अर्थ लावावा लागतो.

In reply to by श्रीगुरुजी

अजया 13/01/2015 - 14:21
भयंकर अवघड असं काहीही नाही.मी स्वतः मुलाचा अभ्यास घेते त्यावरुन सांगू शकते.अशी दोन सायन्सच्या पुस्तकांची तुलना करुन ठरवणे चुकीचे आहे.सुरुवातीपासुन एक अभ्यासक्रम असला की मुलांना बरोबर लिंक लागते.अापण अभ्यास घेत असतानाही सलग वाचत गेले की व्यवस्थित कळते.ही मुलं सुरुवातीपासुन हिंदी शिकत असतात.हिंदी हा अवघड विषय मुलाना वाटत नाही.एकतर फक्त पुस्तकावर आधारित पेपर नसतात.त्यात तेवढ्याच मार्काचा भाग व्याकरण, वाचन,उतारे असं सर्व असतं.शाळांमध्ये आठवीपर्यंत झालेले व्याकरण नंतर परत असते.त्यामुळे अवघड जात नाही. मला स्वतःला त्यांची इतिहास भूगोल पाॅलिटिक्स ही पुस्तकं तसंच फिजिक्स आणि बायोलाॅजीचीही अावडतात वाचायला.

वारा 13/01/2015 - 13:45
सर्व सदस्यांचे मनापासुन धन्यवाद. खाली CBSE च्या अभ्यासक्रमाची लिंक आहे. http://www.cbseguess.com/syllabus/2015/

In reply to by असंका

वारा 14/01/2015 - 12:19
२ शाळांमधे फॉर्म भरलेत. पहीली एस एस सी वाली आहे. पण ८० सिट आणि बरेच फॉर्म आहेत. लॉटरी लागली तर लागली. दुसरी सी. बी. एस. सी. अ‍ॅडमीशन मिळेल अस वाटतय. सी. बी. एस. सी.वाल्या बर्याच शाळांचे फॉर्म भरायच्या तारखा संपल्यात. एस. एस. सी. अजुन काही शाळा चालुच झाल्या नाहीत. एका शाळेत ४० % रिसर्व ४०% भाउबंध आणि राहीलेल्या सिट ईतर लोकांना. म्हणजे सरळ आहे, अ‍ॅड्मिशन नो गॅरंटी. परत रांगेत उभे रहा रात्री पासुन. आय सी एस सी वाले म्हणतात कधीही या अ‍ॅड्मिशन देतो. पण शाळा प्रपोस्ड आय सी एस सी. बाकी ज्या शाळेत अ‍ॅड्मिशन मिळतय ती या वर्शा पासुन सी. बी. एस. सी. झालीय, म्हणजे आधीच्या बॅच एस. एस. सी. झाल्यात. असो प्रोसेस चालु आहे.

In reply to by वारा

असंका 14/01/2015 - 12:47
शुभेच्छा!! पटकन निर्णय घेतलात हे बेष्ट!! (... पण शेवटी काय? एस एस सी चांगलं की सी बी एस ई? की शाळा चांगली असणं जास्त महत्त्वाचं? )

In reply to by वारा

डिट्टो!!!!! अगदी हेच झालं आहे.. आम्ही कुठेही फॉर्म भरलेला नाही. बहुदा SSC साठीच भरु. कारण जुन्या शाळांमध्ये शिक्षक चांगले असतात.

पदम 13/01/2015 - 14:36
मी स्वतःसुद्धा एस.एस.सी. बोर्डातुन (शुद्ध मराठी मिडियम) मधुन शिकलेय. आणी ते हि महानगर पालिकेतुन सातवीपर्यन्त त्यानन्तर खाजगि शालेतुन. शाळा मुलुन्डची मराठि विद्यालय.

चिगो 13/01/2015 - 15:31
५वी नंतर नवोदयच्या परीक्षेला बसवा.. क्लियर झाली तर बारावीपर्यंत पोर सी.बी.एस.ई.त शिकेल. ते पण फुकट.. हाकानाका.. फक्त पोरापासून सात वर्षं दुर रहायला लागेल. दर आठवड्याअखेर भेटू शकता म्हणा.. (नवोदयचा माजी विद्यार्थी) चिगो

शिद 13/01/2015 - 20:30
चांगली चर्चा चालू आहे. सगळ्यांच्या अनुभवांवरून चांगलं मार्गदर्शन मिळतंय. आम्हाला पण लवकरच ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करावा लागणार आहे.

मितान 13/01/2015 - 22:21
मुलीला शाळेत घालताना शाळा घराजवळ असणे, मैदान व इतर भौतिक सुविधा चांगल्या असाव्यात, अभ्यासेतर गोष्टींना प्रोत्साहन देणारे वातावरण असावे या किमान अटी होत्या. प्राथमिक शिक्षण मातृभाषेतून याचा आग्रह होता. सुदैवाने घरापासून १ कि मी अंतरावर अशीच शाळा आहे. त्या शाळेशी मी गेली १२ वर्षे जोडलेली असल्याने अंतर्गत व्यवस्थापन व शिक्षक माहितीतले आहेत. शाळेत झाडाला निळा जांभळा रंग दिलेला, कधीतरी स्वतःच स्वतःचा गृहपाठ ठरवून करण्याचा इथपासून अनेक नवे प्रयोग व मुलांना अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिले जाते.५ वीपासून सेमी इंग्लिश आहे. मुक्तांगण विज्ञानशोधिका, भास्कराचार्य साठी गणित तयारी, समाज अभ्यासासाठी ७ वीपासून पुढे अभ्याससहली व शिबिरे, पोहणे,जिम्नास्टिक्,अ‍ॅथलेटिक्स, खेळ लायब्रेरी, गायनवादननृत्यचित्र इ स्वतंत्र शिकण्याची सोय, परदेशी भाषा व स्पोकन इंग्लिश लहान वयापासून शिकण्याची सोय हे सगळं असणारी शाळा कोणत्या बोर्डाची हा सवालच नव्हता. स्टेट बोर्ड मराठी माध्यमात मुलगी आणि आम्ही दोघे समाधानी आहोत. दुसरी इयत्तेच्या मानाने प्रगती खूप चांगली आहे. नवे शिकायला आवडते. शाळा खूप आवडते. राहिला इंग्रजीचा मुद्दा. इंग्रजी भाषा म्हणून आवडत असल्याने आम्ही तिला इंग्रजीतूनही गोष्टी वाचून दाखवतो. कार्टून्स ती हिंदी न बघता इंग्रजीतून बघते. अनेक शब्द विचारते. हे सगळं तिला समजतं आणि ती उपयोगातही आणते. हा आत्मविश्वास येण्यात शाळेच्या वातावरणाचा आणि शिक्षकांचा नक्कीच मोठा सहभाग आहे. हे सगळं करताना तिच्या शिक्षणात आमचा सक्रीय सहभाग आम्ही गृहित धरलाय आणि प्रयत्नपूर्वक अभ्यासपूर्वक चार गोष्टी नियमीत करत आहोत. फायदे - शाळा ७ ते १२ असल्याने बाकीचा दिवस हातात आहे. शाळा जवळ आहे. कधीमधी चालत जातो. पुढे तिची ती सायकलवर जाऊ शकेल. घरातले आणि शाळेतले सांस्कृतिक सामाजिक वातावरण फार वेगवेगळे नाही. समविचारी पालक भेटल्यामुळे छान पिअर ग्रुप तयार झालाय. त्यामुळे अभ्यासेतर गोष्टी मिळून करायला मजा येते. मुलांना या वयात शिकायला आवडलं पाहिजे.ती भूक वाढली पाहिजे. स्पर्धा आवाक्यातली वाटली पाहिजे. हे सगळं होतंय. तोटे - शालाबाह्य गटात आम्ही एकटेच एसेसी मराठी वाले असल्याने ही काय बोलते ते तिच्या बरोबरीच्या मुलांना कळत नाही. हिला मात्र आंग्लाळलेलं हिंदाळलेलं मराठी छान समजतं. मग ही त्या भाषेत बोलते. हे पिअर प्रेशर. स्टेट बोर्डाच्या व सी बी एस सी च्या सुट्या वेगवेगळ्या असल्याने इतरांसोबत सुट्टी प्लान करता येत नाही. बराच विस्कळीत झालाय प्रतिसाद. पण हे शेअर करावं वाटलं. एक सल्ला - तुम्हाला आणि तुमच्या मुलाला काय झेपेल आवडेल पटेल तेच करा. ज्या शाळेत मूल किमान १२ वर्ष जाणार आहे ते त्याला बॅटलफील्ड न वाटता कम्फर्ट झोन वाटला पाहिजे. ही गोष्ट आपण पालकांनी पिअर प्रेशर घेऊन करण्याची नाही. कोणतेही बोर्ड असले तरी मुलाच्या विश्वात तुमचा किती प्रभाव आहे, सहभाग आहे यावर मुलांचे व्यक्तिमत्व क्से असेल हे ठरणार आहे. अ‍ॅकॅडमीक हा त्याचा केवळ एक भाग झाला. त्याला संपूर्ण समजण्याची चूक करू नये.

In reply to by मितान

"एक सल्ला - तुम्हाला आणि तुमच्या मुलाला काय झेपेल आवडेल पटेल तेच करा. ज्या शाळेत मूल किमान १२ वर्ष जाणार आहे ते त्याला बॅटलफील्ड न वाटता कम्फर्ट झोन वाटला पाहिजे. ही गोष्ट आपण पालकांनी पिअर प्रेशर घेऊन करण्याची नाही." "कोणतेही बोर्ड असले तरी मुलाच्या विश्वात तुमचा किती प्रभाव आहे, सहभाग आहे यावर मुलांचे व्यक्तिमत्व क्से असेल हे ठरणार आहे. अ‍ॅकॅडमीक हा त्याचा केवळ एक भाग झाला. त्याला संपूर्ण समजण्याची चूक करू नये." १००% सहमत...

In reply to by मितान

काळा पहाड 14/01/2015 - 01:36
फारसं सहमत नाहीये. १० वी पर्यंत सगळी टर्मिनॉलॉजी ही मराठीतून असेल आणि ११ पासून इंग्लिश मधून. अर्थात सेमी इंग्लिश हा काय प्रकार आहे ते माहीत नाही. पण जर गणित/सायन्स मराठी मधून शिकवणार असतील तर पुढे प्रॉब्लेम होवू शकतो.

In reply to by काळा पहाड

खटपट्या 14/01/2015 - 03:16
सेमी ईंग्लीश म्हणजे ५वी किंवा ८वी पासुन गणित आणि विज्ञान हे विषय ईंग्रजीमधून शिकवले जातात. काही शाळात ५वी पासून तर काही शाळात ८वी पासून असे करतात.

In reply to by खटपट्या

काळा पहाड 14/01/2015 - 10:33
असं असलं तरी उदाहरणार्थ युपीएससी ला जाणार्‍या विद्यार्थ्यांना बर्‍याच संज्ञा नव्याने शिकाव्या लागणार. त्यामुळे एकूणच हा प्रकार मर्यादित प्रमाणातच यशस्वी होणार. असे प्रयोग करण्यापेक्षा शिक्षणाचं प्रमाणीकरण करणं इतकं का अवघड आहे हे कुणी सांगेल? देशभर एकच अभ्यासक्रम आणि एकच गुणवत्ता प्रमाण हे ध्येय असायला काय हरकत आहे?
पिल्लु ला शाळेत अ‍ॅड्मिशन घेतोय. पण सध्या असलेल्या बर्याच ऑप्शन मधे कन्फ्युज झालोय. १) एस. एस. सी - ट्रेडीशनल अभ्यासक्रम, स्वतः शिकल्यामुळे पुर्ण माहीती आहे. फायदे - ट्युशन आहेत , पुस्तके महीतीतील, गाईड मिळतात, प्रश्नसंच मिळतात, मराठी मिडीयम फी कमी. तोटे - स्पर्धा परीक्षा साठी पुरेसा अभ्यासक्रम नाही, महाराष्ट्राबाहेर अभ्यासक्रम नाही, ईंग्लीश मिडीयम फी जास्त. अ‍ॅड्मीशन प्रोसेस लॉटरी पद्धतीने , कमी जागा विद्यार्थी जास्त. २) सी. बी. एस. ई - दिल्ली बोर्ड , माहीतीतील जवळपास कोणी नाही. फायदे - स्पर्धा परीक्षा अभ्यासक्रम , भारतभर सर्व मोठ्या शहरात शाळा.

माहिती हवी आहे - हिरे, माणिक, मोती, पोवळा

भास्कर केन्डे ·

कंजूस 25/12/2014 - 13:05
एक जेमोलजीचा कोर्स करून टाका. कृत्रिम आणि खरे हिरे यात केमिकली काहीच फरक नसतो. खरे मोती आणि कल्चर्ड मोती दोन्ही खरे नैसर्गिकरित्या किड्यांनीच बनवलेले असतात. पण किलोच्या भावातले प्लास्टीकचे असतात. हीरा diamond ,मोती pearl, माणिक ruby ,पाचू emarald ,jade पुषकराज topaz, आणि नील saphire हीच मौल्यवान रत्ने precious stones/gem/jewel आहेत. इतर 'खडे' कमी मौ॰रत्ने semi precious stonesआपल्या भारतात वापरात नव्हती.

आयुर्हित 25/12/2014 - 13:10
REGISTERED OFFICE & EDUCATIONAL CENTER : ADDRESS : 29, Gurukul Chambers, 187-189, Mumbadevi Road, Mumbai - 400 002. TELE PHONE : 91-22-2342 0039 / 2341 3785 FAX : 91-22-2341 3785 E-MAIL : edu@giionline.com, infoedugii@gmail.com WEBSITE : www.giionline.com LABORATORY SERVICES : ADDRESS : 304, Sukh Sagar Building, N. S. Patkar Marg, Opera House, Mumbai - 400 007. TELE : 91-22-23612769 / 66519030 / 66519031 FAX : 91-22-23679189 E-MAIL : marketing@giionline.com, gemforum@giionline.com, gemforum@gmail.com NEW BRANCH FOR DIAMOND STUDDED JEWELLERY CERTIFICATION ADDRESS : C/o Indian Institute of Gems & Jewellery, Bagmal Laxmichand Parikh Campus,Plot No. 111/2, 13th Road, MIDC, Andheri (East), Mumbai – 400093 TELE : 91-022 – 28263504 / 05 WORKING DAYS : Monday to Friday (Saturday – Sunday: Closed) TIMINGS : 9.15 a.m. to 4.30 p.m. E-MAIL : info@giionline.com DIAMOND DETECTION RESOURCE CENTER ADDRESS : S.G. Jhaveri Trading Center, H-Tower (West), Bharat Diamond Bourse Bandra - Kurla Complex TELE : 91-22-60602888 E-MAIL : ddrc@giionline.com

In reply to by आयुर्हित

तुमचे प्रतिसाद बरेचदा पैशाची मागणी करणारे असतात बुवा ! :) म्हणजे व्यक्तीशः तुम्ही पैसे मागतायत असे नाही. ते इथे फुकटचा सल्ला मागतायत आणि तुम्ही त्यांना कोर्स करायला सांगा. :)

In reply to by धर्मराजमुटके

आयुर्हित 26/12/2014 - 03:00
बरीच लोकं भ्रमात जगतात नाही का! स्पष्ट लिहिलेले वाचता येवूनही मनातले भ्रम काही जाता जात नाही!! वरील प्रतिसाद लिहून आपण आपल्या मनातील भ्रम स्पष्ट केले आहेत. १) मला माझा किमान एक प्रतिसाद दाखवा, जेथे मी पैशाची मागणी केली आहे. २) ते इथे फुकटचा सल्ला मागतायत असे कुठे लिहिले आहे? 3) मी त्यांना कुठेही कोर्स करायला सांगितलेले नाही, उलट कंजूससरांनी त्यांना कोर्स करायला सांगितले आहे हे आपण वाचलेले दिसत नाही. मी फक्त पत्ता दिला आहे, हे कृपया परत लक्ष देवून वाचावे. मनात अनेक भ्रम असले तर हे असेच नेहमी होणार हे हि तितकेच खरे!

In reply to by आयुर्हित

मी प्रतिसादात दिलेल्या स्मायली वाया गेल्या तर. तुम्हाला माझा प्रतिसाद विनोदी वाटला नाहि म्हणजे मी लिहिण्यात कोठेतरी कमी पडलो. असो. मी लिहिलेले समोरच्याला समजते हा देखील माझा एक भ्रमच आहे हे आज समजले. मनापासून क्षमस्व ! कटुता नको.

बहुगुणी 25/12/2014 - 21:49
त्यांचा हा एक जुना माहितीपूर्ण लेख आठवला. मौल्यवान खड्यांबद्दल माहिती देणारी लेखमालिका सुरु करावी, अशी रामदासांना त्यावेळी गळ घातली गेली होती, ती त्यांनी लिहिली नसेल तर लवकरच लिहितील अशी आशा आहे.

कंजूस 26/12/2014 - 03:55
यावर काही डिस्कवरी चानेलचा कार्यक्रम असेल तर पाहा. पैसे खर्च न करता माहिती मिळेल. महागड्या कार्स संबंधी तसे कार्यक्रम बऱ्याच चानेलचे आहेत. आपल्याला कोणी श्रीमंत त्याच्याकडची रत्ने फुकट दाखवून माहिती देत असेल तर मी येण्यास तयार आहे.अशी विनंती केल्यास तो म्हणेल "मसूरदाल मॉँगनेवाले का मुंह तो देखो ।" हैदराबादच्या सालारजंग म्युझिअमच्या २६क्रमांकाच्या दालनात बरीच रत्ने पाहता येतील.

एकापेक्षा एक उत्तम प्रितिसाद दिल्याबद्दल अनेकानेक आभार. पोवळ्याबद्दल माहिती मिळवण्यासाठी त्याचे विलयती नाव काय आहे हे कृपया कुणी सांगाल का? आमच्या मंडळीचे पोवळ्याच्या महत्वाबद्दल तिच्या मैत्रिनि मैत्रिणीसोबतचे संभाषण ऐकुन जरा कुतुहल जागे झाले आणि धागा टाकला. ओघात बर्‍याच गोष्टी कळाल्या. धन्यवाद!

कलंत्री 10/01/2015 - 12:20
हिर्‍यामोतीला आपण खडा म्हणतो यात काहीतरी गोम असली पाहिजे. दगडाच्या छोट्या हिश्याला पण आपण खडाच ( खडा-माती) असे म्हणतो.

कंजूस 25/12/2014 - 13:05
एक जेमोलजीचा कोर्स करून टाका. कृत्रिम आणि खरे हिरे यात केमिकली काहीच फरक नसतो. खरे मोती आणि कल्चर्ड मोती दोन्ही खरे नैसर्गिकरित्या किड्यांनीच बनवलेले असतात. पण किलोच्या भावातले प्लास्टीकचे असतात. हीरा diamond ,मोती pearl, माणिक ruby ,पाचू emarald ,jade पुषकराज topaz, आणि नील saphire हीच मौल्यवान रत्ने precious stones/gem/jewel आहेत. इतर 'खडे' कमी मौ॰रत्ने semi precious stonesआपल्या भारतात वापरात नव्हती.

आयुर्हित 25/12/2014 - 13:10
REGISTERED OFFICE & EDUCATIONAL CENTER : ADDRESS : 29, Gurukul Chambers, 187-189, Mumbadevi Road, Mumbai - 400 002. TELE PHONE : 91-22-2342 0039 / 2341 3785 FAX : 91-22-2341 3785 E-MAIL : edu@giionline.com, infoedugii@gmail.com WEBSITE : www.giionline.com LABORATORY SERVICES : ADDRESS : 304, Sukh Sagar Building, N. S. Patkar Marg, Opera House, Mumbai - 400 007. TELE : 91-22-23612769 / 66519030 / 66519031 FAX : 91-22-23679189 E-MAIL : marketing@giionline.com, gemforum@giionline.com, gemforum@gmail.com NEW BRANCH FOR DIAMOND STUDDED JEWELLERY CERTIFICATION ADDRESS : C/o Indian Institute of Gems & Jewellery, Bagmal Laxmichand Parikh Campus,Plot No. 111/2, 13th Road, MIDC, Andheri (East), Mumbai – 400093 TELE : 91-022 – 28263504 / 05 WORKING DAYS : Monday to Friday (Saturday – Sunday: Closed) TIMINGS : 9.15 a.m. to 4.30 p.m. E-MAIL : info@giionline.com DIAMOND DETECTION RESOURCE CENTER ADDRESS : S.G. Jhaveri Trading Center, H-Tower (West), Bharat Diamond Bourse Bandra - Kurla Complex TELE : 91-22-60602888 E-MAIL : ddrc@giionline.com

In reply to by आयुर्हित

तुमचे प्रतिसाद बरेचदा पैशाची मागणी करणारे असतात बुवा ! :) म्हणजे व्यक्तीशः तुम्ही पैसे मागतायत असे नाही. ते इथे फुकटचा सल्ला मागतायत आणि तुम्ही त्यांना कोर्स करायला सांगा. :)

In reply to by धर्मराजमुटके

आयुर्हित 26/12/2014 - 03:00
बरीच लोकं भ्रमात जगतात नाही का! स्पष्ट लिहिलेले वाचता येवूनही मनातले भ्रम काही जाता जात नाही!! वरील प्रतिसाद लिहून आपण आपल्या मनातील भ्रम स्पष्ट केले आहेत. १) मला माझा किमान एक प्रतिसाद दाखवा, जेथे मी पैशाची मागणी केली आहे. २) ते इथे फुकटचा सल्ला मागतायत असे कुठे लिहिले आहे? 3) मी त्यांना कुठेही कोर्स करायला सांगितलेले नाही, उलट कंजूससरांनी त्यांना कोर्स करायला सांगितले आहे हे आपण वाचलेले दिसत नाही. मी फक्त पत्ता दिला आहे, हे कृपया परत लक्ष देवून वाचावे. मनात अनेक भ्रम असले तर हे असेच नेहमी होणार हे हि तितकेच खरे!

In reply to by आयुर्हित

मी प्रतिसादात दिलेल्या स्मायली वाया गेल्या तर. तुम्हाला माझा प्रतिसाद विनोदी वाटला नाहि म्हणजे मी लिहिण्यात कोठेतरी कमी पडलो. असो. मी लिहिलेले समोरच्याला समजते हा देखील माझा एक भ्रमच आहे हे आज समजले. मनापासून क्षमस्व ! कटुता नको.

बहुगुणी 25/12/2014 - 21:49
त्यांचा हा एक जुना माहितीपूर्ण लेख आठवला. मौल्यवान खड्यांबद्दल माहिती देणारी लेखमालिका सुरु करावी, अशी रामदासांना त्यावेळी गळ घातली गेली होती, ती त्यांनी लिहिली नसेल तर लवकरच लिहितील अशी आशा आहे.

कंजूस 26/12/2014 - 03:55
यावर काही डिस्कवरी चानेलचा कार्यक्रम असेल तर पाहा. पैसे खर्च न करता माहिती मिळेल. महागड्या कार्स संबंधी तसे कार्यक्रम बऱ्याच चानेलचे आहेत. आपल्याला कोणी श्रीमंत त्याच्याकडची रत्ने फुकट दाखवून माहिती देत असेल तर मी येण्यास तयार आहे.अशी विनंती केल्यास तो म्हणेल "मसूरदाल मॉँगनेवाले का मुंह तो देखो ।" हैदराबादच्या सालारजंग म्युझिअमच्या २६क्रमांकाच्या दालनात बरीच रत्ने पाहता येतील.

एकापेक्षा एक उत्तम प्रितिसाद दिल्याबद्दल अनेकानेक आभार. पोवळ्याबद्दल माहिती मिळवण्यासाठी त्याचे विलयती नाव काय आहे हे कृपया कुणी सांगाल का? आमच्या मंडळीचे पोवळ्याच्या महत्वाबद्दल तिच्या मैत्रिनि मैत्रिणीसोबतचे संभाषण ऐकुन जरा कुतुहल जागे झाले आणि धागा टाकला. ओघात बर्‍याच गोष्टी कळाल्या. धन्यवाद!

कलंत्री 10/01/2015 - 12:20
हिर्‍यामोतीला आपण खडा म्हणतो यात काहीतरी गोम असली पाहिजे. दगडाच्या छोट्या हिश्याला पण आपण खडाच ( खडा-माती) असे म्हणतो.
मौल्यवान खडे, त्यांचे दागिन्यांतील महत्व वा वापर, त्यांची पारख, खरेदी, व इतिहास याच्या ज्ञानाविषयी आपला आनंदी आनंदच आहे. म्हटलं इथे काही मर्गदर्शन मिळाले तर मदत होईल. हिरे सोडले तर बाकीच्या खड्यांबद्दल अंतरजाळावर सुद्धा वाचण्याची काही सोय नाही कारण त्यांचे विंग्रजी नावे माहित नाहीत, आणि जर अंदाजाने काही शोधले तर नेमके तेच शोधत आहोत याचा भरोसा नाही.